diff --git "a/data_multi/mr/2019-13_mr_all_0139.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-13_mr_all_0139.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2019-13_mr_all_0139.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,984 @@
+{"url": "http://gangadharmute.com/taxonomy/term/494", "date_download": "2019-03-25T08:51:50Z", "digest": "sha1:ZKVXRK7QYR4TC4R7VCISJ2MI23HAXWIB", "length": 9980, "nlines": 137, "source_domain": "gangadharmute.com", "title": " पोवाडा | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nभ्रष्टाचार्यास हाण पाठी : पोवाडा\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 23/08/2011 - 12:02 ह्यावेळी प्रकाशित केले.\nभ्रष्टाचार्यास हाण पाठी : पोवाडा\nकशी झाली देशाची गती, कुंठली मती\nभ्रष्ट पुढारी नेते झाले\nभ्रष्टाचार्यांचे राज आले, रं जी जी .... ॥१॥\nएक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे\nमग तो सत्तेमध्ये गेला\nकसा हा चमत्कार झाला रं जी जी .... ॥२॥\nएक होता गोविंदा रेड्डी, पॅंट आणि चड्डी\nRead more about भ्रष्टाचार्यास हाण पाठी : पोवाडा\nयुगात्मा परिवार मोबाईल अ��ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3152", "date_download": "2019-03-25T08:30:09Z", "digest": "sha1:W7NTFKHRIW4SZJDQVOVOUEH4DLLAZG3X", "length": 10373, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "छू | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nलहान मूल खेळताना पडले आणि त्याला खरचटले, तर ते मोठ्याने भोकांड पसरते. त्या वेळी मूल त्याच्यासमोर कोणी ‘आला मंतर, केला मंतर, जादूची कांडी छू.’ असे म्हणताच रडायचे थांबते. त्यांपैकी ‘छू’ हा मराठीतील एकाक्षरी शब्द आहे.\n‘छाछू’ (किंवा नुसतेच छू) याचा अर्थ अंगारे, धुपारे, मंत्रतंत्र किंवा जादूटोणा करणे असा आहे. जादूगार ‘छू मंतर’ म्हणून मुठीतील वस्तू गायब करून दाखवतो. ती त्याची हातचलाखी असते. जादूचे प्रयोग हे विज्ञानावर आधारित असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. जादूगार त्यातून लोकांचे प्रबोधन करतो. परंतु काही लोक ‘छाछू’ करून भोळ्याभाबड्या लोकांना फसवतातही. त्यामुळे कोठे काही बनवाबनवी आढळली, तर त्यात काहीतरी ‘छाछुगिरी’ आहे असे म्हटले जाते. जादूटोणाविरोधी कायद्यामुळे छाछुगिरी करणाऱ्या लोकांना गजाआड टाकता येते.\n‘छू करणे’ हा वाक्प्रयोग ‘एखाद्याच्या पाठी सोडणे’ अशा अर्थानेही केला जातो. प्रामुख्याने, ‘छू’ हा कुत्र्याला इशारा किंवा हुकूम करण्याचा शब्द आहे. ‘छू’ म्हणताच कुत्रा कान टवकारतो व बोट केलेल्या दिशेने धावून जातो आणि युऽऽयूऽऽ करताच कुत्रा जवळ येतो. तसेच कुत्र्याला हाकलण्या/साठी ‘हाडऽ’ हा शब्द उच्चारला जातो. आणि तसा तो शब्द म्हणताच कुत्रे दूर होते. परंतु तसे होण्यासाठी हजारो वर्षें आणि कुत्र्यांच्या शेकडो पिढ्या जाव्या लागल्या आहेत. माणूस आणि कुत्रा यांचे नाते जुने आहे. महाभ��रतातील धर्मराजाचा कुत्रा त्याच्याबरोबर पार स्वर्गापर्यंत होता अशी कथा आहे. महाभारताचा काळ इसवी सनपूर्व 2000 धरला जातो. त्याच्याही आधीपासून माणसाने कुत्रा पाळण्यास सुरुवात केली असणार. अर्थात त्या काळी कुत्र्याला आज्ञा देण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केला जाई का याची कल्पना नाही. परंतु ‘छू’ हा शब्द त्यासाठी तीन-चारशे वर्षांपूर्वी नक्की वापरात होता. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात तसा उल्लेख आहे -\nयेऊनि दडे तुमच्या पायी \nधावे तई छो म्हणा ॥\nतुकाराम महाराजांचे पाच विशेष अभंग आहेत, त्यात त्यांनी स्वत:ला विठ्ठलाचे कुत्रे म्हणवून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात –\nदेवा, मी तुमचे कुत्रे असून तुमच्या पायांजवळ लपून बसत आहे. तुम्ही म्हणाल (आज्ञा करा), त्या वेळी सांसारिक लोकांच्या अंगावर धावून जाईन.\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: भाषा, शब्दार्थ, शब्दशोध\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Satana-vinchur-Prakash-national-highway-status-issue/", "date_download": "2019-03-25T07:46:32Z", "digest": "sha1:HRPQFIFM24IDBFC3USTEAZU6U5NHKSNP", "length": 6411, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘विंचूर-प्रकाशा’ आता राष्ट्रीय महामार्ग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘विंचूर-प्रकाशा’ आता राष्ट्रीय महामार्ग\n‘विंचूर-प्रकाशा’ आता राष्ट्रीय महामार्ग\nशहरातून जाणार्या विंचूर-प्रकाशा राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेला ��ाठपुरावा सत्कारणी लागला असून, केंद्र शासनाने नुकतीच त्यास मंजुरी दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी पहिल्या टप्प्यात 300 कोटी रुपयांची आर्थिक तरतूददेखील करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. मध्य प्रदेशातील खेतीयापासून शहादा, साक्री, पिंपळनेर, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी ते कर्नाटकातील चिकोडीपर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, राष्ट्रीय महामार्ग ‘756-जी’ या क्रमांकाने हा राष्ट्रीय महामार्ग ओळखला जाणार आहे. या महामार्गाची लांबी 195 किमी असून, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन दोन राज्यांना हा महामार्ग जोडला जाणार आहे.\nगुजरात राज्याला अत्यंत जवळचा महामार्ग असल्याने गेल्या अनेक वर्षापासून शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक या रस्त्यावर केली जाते. याच रस्त्यावर असंख्य अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. साक्री ते पिंपळनेर 21.42 किमी रस्त्यासाठी 100 कोटी, पिंपळनेर ते सटाणा या 42.57 किमीच्या रस्त्यासाठी 198 कोटी तर सटाणा-मंगळूर 37.14 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 200 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या सर्व कामांची निविदा निघाली असून, पुढील दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.सटाणा शहराच्या हद्दीपासून कंधाणा फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व चौपदरीकरण होणार असून, नवीन दुभाजक टाकण्यात येणार आहेत. तसेच, जड वाहतुकीला आळा बसण्यासाठी शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूकडून वळणरस्ता लवकरात लवकर तयार होण्यासाठी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे नागरीकांची अनेक वर्षापासूनची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Jayachand-Tiger-fell-into-the-water/", "date_download": "2019-03-25T08:23:32Z", "digest": "sha1:DCR3Y2FSF66OBVNLMT2NQR3XHHZKYYZ4", "length": 5183, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टायगर अभी जिंदा है! पाहा 'जयचंद'चा थरार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › टायगर अभी जिंदा है\nटायगर अभी जिंदा है\nनागपूर जिल्ह्यातील उमरेड कर्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध वाघ जय हा गेल्या अडीच वर्षांपासून बेपत्ता आहे. जय आणि चांदणीचा मुलगा म्हणून ओळखला जाणारा जयचंद आज गोसीखुर्दच्या कालव्यात पडला. गुराख्याच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले.\nप्रसिद्ध रुबाबदार जयचंद बुधवारी गोसेखुर्द उजव्या कालव्यात पडल्याने वन्यजीवप्रेमींच्या हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, वन खात्याने अत्यंत काळजीपूर्वक त्याला बाहेर काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यापूर्वीही कातलाबोडी शिवारातील एका विहिरीत वाघीण पडल्याची घटना घडली होती. जय वाघाच्या रहस्यमय बेपत्ता होण्यानंतर उमरेड-कर्हांडला अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती.\nपण अलीकडे जयचा छावा जयचंदमुळे पर्यटकांचा ओढा उमरेड-कर्हांडलाकडे वाढला आहे. तरणाबांड व देखणा जयचंद पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास पाणी पिण्यासाठी म्हणून तो गोसेखुर्दच्या कालव्याकडे आला. मात्र, तेथील शेवाळामुळे त्याचे पाय घसरत होते. त्यातच तोल जाऊन तो पाण्याने भरलेल्या कालव्यात पडला. ही माहिती एका गुराख्याने वनविभागाला दिली. तोपर्यंत ही बातमी वार्यासारखी पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी दादा राऊत तसेच बारई यांनी घटनास्थळी धाव घेऊन जयचंदला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल अडीच तास जयचंद पाण्यात पोहोत होता.\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/hoc-gas-leak-rasayani-fifty-monkeys-died-3985", "date_download": "2019-03-25T07:27:42Z", "digest": "sha1:M4Y5IUUQXHWMFUIF7O26CYH2NVNSKR2B", "length": 7503, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "HOC gas leak in rasayani fifty monkeys died | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरसायनीतील HOC कंपनीतील वायुगळती प्राण्यांच्या जिवावर\nरसायनीतील HOC कंपनीतील वायुगळती प्राण्यांच्या जिवावर\nरसायनीतील HOC कंपनीतील वायुगळती प्राण्यांच्या जिवावर\nरसायनीतील HOC कंपनीतील वायुगळती प्राण्यांच्या जिवावर\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nरसायनीतील HOC कंपनीतील वायुगळती प्राण्यांच्या जिवावर; वायुगळतीमुळे दोन वाॅचमनही बेशुद्ध\nVideo of रसायनीतील HOC कंपनीतील वायुगळती प्राण्यांच्या जिवावर; वायुगळतीमुळे दोन वाॅचमनही बेशुद्ध\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर आज वनविभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांनी एचओसी व इस्त्रो अधिका-यांची कार्यालयात चौकशी केली.\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर आज वनविभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांनी एचओसी व इस्त्रो अधिका-यांची कार्यालयात चौकशी केली.\nरसायनीतील एचओसीएल कंपनी बंद झाली आहे. कंपनीतील सुरू असलेले संयंत्र सीएनए इस्त्रो कंपनीने घेतले आहे. या संयंत्रात नायट्रीक अॅसीड मधुन वायुगळती झाली. वायुगळतीमुळे कंपनीतील माकड आणि कबूतर मेले असल्याचे कंत्राटी कामगार नवनाथ विटकर व नागरिकांनी सांगितले. मेलेली माकड मातीत गाडुन टाकले आहे, असेही सांगितले. वनविभाचे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुपारी दोन वाजता घटना स्थळी गेले सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुन्हा प्रवेशव्दारा आले नाही त्यामुळे आधिकृत माहिती मिळाली नाही. तर घटनास्थळी जाण्यासाठी पत्रकारांना रोखण्यात आले. वनविभागाचे सोनवणे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्ष���त्र अधिकारी सचिन देसाई यांच्याशी अनेकदा मोबाइलवर संपर्क साधला असता मात्र होऊ शकला नाही. तर आधिकृत माहिती देण्यासाठी सरकारी अधिकारी टाळाटाळ करत आहे. हे समोर आले आहे.\nदरम्यान, घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे, वनपाल आर के कांबळे, प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले आहे. यावेळी इस्रो युनिट इंनचार्ज राजेंद्र सोरटे आणि कंपनीचे इतर अधिकारी उपस्थित होते.\nरायगड प्रदूषण घटना incidents सरकार government\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/author/saket/", "date_download": "2019-03-25T07:59:29Z", "digest": "sha1:SVDVE2F64F3HHGK6T4SCLHV2PX6423KC", "length": 2683, "nlines": 48, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Saaket Dalal, Author at मराठी कलाकार", "raw_content": "\nमैत्रीच्या नात्यातील अव्यक्त भावना – ओढ \nजगातील सर्वात पवित्र व शुद्ध नातं म्हणजे मैत्री चं नातं. ती हि एक मुलगा आणि एका...\nआता लवकरच बिग बॉस येणार मराठीत सलमान खानने केली घोषणा\n‘बिग बॉस’ च्या मराठी चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे आणि ती म्हणजे हिंदीतला प्रसिद्ध रिऍलिटी टीव्ही...\nएका रहस्यमय मृत्यूची उकल करणारा चित्रपट “आपला मानूस”\nमित्रांनो, नाना पाटेकर हे नाव सिनेविश्वाला चांगलचं सुपरिचित आहे. ९ फेब्रुवारीला नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090527/main.htm", "date_download": "2019-03-25T08:15:52Z", "digest": "sha1:ABHJAGC44FKKHMSAMY7RV43GJPE2ZHBI", "length": 21635, "nlines": 59, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २७ मे २००९\nलोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू चौधरी यांचा निर्घृण खून\nपुणे, २६ मे / प्रतिनिधी\nलोणावळा नगरपालिकेतील काँग्रेसचे नगराध्यक्ष व कुख्यात गुंड राजू ऊर्फ भूपेंद्र हिरालाल चौधरी यांचा आज भरदुपारी गळा चिरून खून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या ��ावाने पूर्ववैमनस्यातून चौधरी यांचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणावळा शिक्षणमंडळाचे सभापतीही या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. शिवाजी चौकातील नगरपालिका भवनामध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर खंडाळा-लोणावळा शहर तणावपूर्ण शांततेखाली बंद ठेवण्यात आले.\nपैशांचा पाऊस पाडण्याचा बनाव करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस येथे मुंबई, पुण्याच्या १० जणांचा निर्घृण खून करणाऱ्या चार जणांना जिल्हा न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा ठोठावली, तर अन्य दोघाजणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मुख्य आरोपी संतोष मनोहर चव्हाण, अमित अशोक शिंदे, योगेश मधुकर चव्हाण या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, तर प्रमुख आरोपीचा मामा सूर्यकांत अनंत कोरगांवकर व तानाजी सीताराम गावडे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोषमुक्त केले. विशेष सरकारी वकील अॅड. अजित भणगे यांनी ही माहिती दिली.\nपाचशेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना\nरेल्वेचा मासिक पास २० रुपयांत\nनवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी\nपरंपरेला छेद देत नवा पायंडा पाडत आज राजधानी दिल्लीऐवजी कोलकात्यातील पूर्व रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी महिन्याला पाचशे रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कष्टकऱ्यांना रेल्वे प्रवास करणे शक्य व्हावे म्हणून २० रुपयांचा मासिक पास देण्याची घोषणा केली.\nमंत्रिमंडळ विस्तारासाठी आता उद्याचा मुहूर्त\nनवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी\nकाँग्रेसमधील दावेदारांची संख्या वाढल्यामुळे मंत्रीपदे आणि खातेवाटपाच्या मुद्यावरून उडालेला गोंधळ तसेच पंजाब आणि हरयाणात उफाळलेल्या िहसाचारामुळे आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. काँग्रेस तसेच घटक पक्षांच्या सदस्यांना आता मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी किमान गुरुवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nअर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात\nनवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी\nकेंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या इनिंगची खरी सुरुवात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मांडण्यात येईल, असे आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एक��� वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सादर करून जुलैअखेरपर्यंत पारित करण्यात येईल. ३१ जुलैपर्यंत लेखानुदान प्रस्तावाद्वारे केलेली आर्थिक तरतूद संपणार आहे. लेखानुदान प्रस्ताव दुसऱ्यांदा मांडण्याची वेळ येऊ नये, असे आपल्या अधिकाऱ्यांना बजावले असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. वित्तीय शिस्तीशी तडजोड न करता आर्थिक विकासाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. २००८-०९ सालात आर्थिक विकासाचा दर ७ टक्क्यांच्या आसपास असेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला.\nराज्यकर्त्यांचे औदार्य अन् आरोग्य विद्यापीठाचे साजरे डोंगर\nसंशोधन प्रकल्प, महाविद्यालय, रुग्णालय वा तत्सम उपक्रमांसाठी भविष्यात जागेची आवश्यकता भासणार असल्याने ‘या समोरच्या टेकडय़ा तुम्हाला घ्या’, असे औदार्य दस्तुरखुद्द शरद पवारांनी दाखविल्याला पाच वर्षे उलटून सुद्धा या टेकडय़ा म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ असल्याची अनुभूती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला घ्यावी लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी, विद्यापीठातर्फे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव आल्यास त्याला विनाविलंब मान्यता देण्याचे नव्याने केलेले सूतोवाच ही देखील बोलाचीच कढी ठरणार की काय, अशी शंका वैद्यकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.\n१५ रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना\nकामत हॉटेल व धारीवाल इंडस्ट्रीजला ग्राहक मंचचा दणका\nसर्वत्र १५ रुपये किमतीला विकत मिळणारी धारीवाल इंडस्ट्रीज निर्मित ‘ऑक्सिरीच’ पिण्याच्या पाण्याची बाटली ‘विठ्ठल कामत हॉटेल’ मध्ये तब्बल दहा रुपये ग्राहकांकडून अधिक उकळून २५ रुपये अशा अवास्तव व गैरवाजवी किमतीस विक्री करून ग्राहकांची पिळवणूक केल्या प्रकरणी हॉटेलचे संचालक विठ्ठल गोविंद कामत आणि म़े धारीवाल इंडस्ट्रीज लि़ चे संचालक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोषी ठरविले आह़े\nनवी दिल्ली, २६ मे / पी.टी.आय.\nपंजाब आणि हरियाणातील हिसांचारामुळे सलग दुसऱ्या दिवशीही रेल्वेसेवा विस्कळीत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान पंजाबमधील हिंसाचार मंगळवारी काही प्रमाणात कमी झाला असला तरी हरियाणात तो कायम होता. मुक्तसर जिल्ह्य���तील संचारबंदी अद्यापही चालू ठेवण्यात आली असून काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या अथवा त्या अन्यत्र वळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी या मार्गावरील निजामुद्दीन-अमृतसर शान -ए एक्स्प्रेस, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी एक्स्प्रेस, दिल्ली-पठाणकोट एक्स्प्रेस आणि भटिंडा-जम्मुतावी एक्स्प्रेस या चार गाडय़ा रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली. या व्यतिरिक्त काही गाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने हिंसाचार मोठय़ा प्रमाणात झालेल्या जालंधर, लुधियाना तसेच फगवारा आणि अन्य काही स्थानकांवर हजारो प्रवासी अडकून पडले असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. व्हिएन्नामध्ये दोन शीख गटांमध्ये झालेल्या संघर्षांचे पडसाद सोमवारी या भागात उमटून मोठय़ा प्रमाणात हिंसाचार उसळलेला होता. यामध्ये जम्मू-कन्याकुमारी हिमसागरी एक्स्प्रेसचे चार डबे आंदोलकांनी पेटवले होते तसेच सोनपूर-जम्मू एक्स्प्रेसचे इंजिन पेटविण्यात आले होते.\n‘एला’मुळे बंगालमध्ये दरडी कोसळून १५ ठार\nसिलिगुडी / गंगटोक, २६ मे / पी. टी. आय.\n‘एला’ चक्रीवादळ आज बंगालच्या उत्तर भागात सरकल्याने दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने किमान १५ जण ठार आणि २१ जण जखमी झाले. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्रात कोसळलेल्या दरडींखाली नऊ प्रेते सापडली तर कुरसेओंग येथे सहा मृतदेह सापडल्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पी. झिम्बा यांनी सांगितले. या वादळाचा सर्वात जास्त तडाखा २४ दक्षिण परगाणा जिल्ह्याला बसला असून येथील सुमारे चार लाख लोकांवर त्याचा परिणाम झाल्याचे मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी सांगितले. दक्षिण परगाणा जिल्ह्याच्या १३ विभागामध्ये या चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झाले असून येथील जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री भट्टाचार्य यांनी आज या भागाला भेट देऊन पाहणी केली. चक्रीवादळामुळे या जिल्ह्यातील सुमारे ४०० कि.मी. किनारपट्टीचे प्रचंड नुकसान झाले असून त्याच्या दुरूस्तीसाठी मोठा कालावधी लागेल असे मुख्यमंत्री भट्टाचार्य यांनी सांगितले. लष्कराने या भागात मदत आणि पुनवर्सन काम सुरू केले बेघर झालेल्या सुमारे ५० हजार लोकांची निवासाची व्यवस्था अन्यत्र करण्यात आल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.\nम. फुले यांचे नाव काढून जोशींचे नाव देण्याएवढे आम्ही खुळे नाही\nबाबुराव माने यांचे स्पष्टीकरण\nमहात्मा ज्योतिबा फुले व मनोहर जोशी यांच्यातला फरक दलित चळवळीत काम केल्याने आम्हाला नक्की कळतो. महात्मा फुले यांचे नाव काढून मनोहर जोशी यांचे नाव धारावीतील महाविद्यालयाला देण्याएवढे आम्ही खुळे नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी दिले. दैनिक ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकात ‘महात्मा फुले यांचे नाव पुसून मनोहर जोशीेंचे देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबद्दल माने म्हणतात की, धारावी येथील महाविद्यालयाला सध्या कोणाचेही नाव दिलेले नाही. हे महाविद्यालय म. फुले ट्रस्टमार्फत चालविले जाते. त्यामुळे म. फुले यांचे नाव काढून मनोहर जोशी यांचे नाव दिलेले नाही. महात्मा फुले यांचे नाव काढून स्वतचे नाव चढविणे मनोहर जोशी यांना सुद्धा आवडणार नाही. जोशी यांनी सामाजिक बांधिलकी व आत्मभान बाळगून आतापर्यंत काम केल्यानेच त्यांची देशपातळीवर प्रतिमा निर्माण झाली आहे. म. फुले शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयास मनोहर जोशी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव घेऊन जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला होता. परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यावर ते नाव देण्यास तयार झाले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचार आमचाही श्वास आहे. शंभर टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राज्यातील एकमेव शाळा संस्थेच्या वतीने चालविली जाते व त्यामधील ८० टक्के कर्मचारीवर्ग मागासवर्गीय आहे.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/blog-post_81.html", "date_download": "2019-03-25T08:03:47Z", "digest": "sha1:YQG6ELEJ36FP7LCVBMR5D7H6YAMY43MN", "length": 7542, "nlines": 149, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो…. ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य ब��लतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकाल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो….\nकाल पर्यंत मी तुझ्या सोबतच\nआत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ….\nआणि नंतरही मी तुझ्या सोबतच\nउन्ह्याळ्यात तुझी तहान बनून,\nपडणार्या पाण्यात मी असेन,\nआणि हिवाळ्यात थंडी बनून\nमी तुझ्या सोबत असेन…\nउजेडात तुझी सावली बनून,\nतुझ्या मनातला विचार बनून\nमी तुझ्या सोबत असेन…\nहसताना तुझ्या गालावरची खळी बनून….\nरडताना तुझ्या प्रत्येक अश्रूत मीच\nआणि रागावशील तेव्हा लाल रंग\nबनून तुझ्या डोळ्यांत मीच असेन ….\nतर लिहिताना तुझ्या प्रत्येक\nआणि नेहमीच तुझा श्वास बनून\n….मी तुझ्या सोबत असेन ….\nतुझ्या तळ हातांच्या रेषांत,\ntension मध्ये कपाळाच्या आटयात\nअसलेल्या त्या प्रत्येक गाण्यात\n…. मी तुझ्या सोबतच असेन ….\nतुझ्या बंद डोळ्यांतल्या स्वप्नात …\nउघड्या डोळ्यातली आशा बनून ….\nआणि मनातली इच्छा बनून\nमी तुझ्या सोबतच असेन …\nतू विसरलेल्या त्या प्रत्येक\nआणि तुझ्या प्रत्येक प्रवासात\nमी तुझ्या सोबत असेन ….\nकाल पर्यंत मी तुझ्या सोबतच\nआत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ….\nआणि नंतरही मी तुझ्या सोबतच\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2017-Kapoos.html", "date_download": "2019-03-25T07:59:32Z", "digest": "sha1:WBGZRFOXATMJKSRG5VQKMCGH4FP3HIYZ", "length": 8135, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - २ एकरात कापूस उत्पादन ५० क्विंटल ३५ किलो, दर ५१०० रु./क्विंटल, उत्पन्न २,५६,७८५/-रु", "raw_content": "\n२ एकरात कापूस उत्पादन ५० क्विंटल ३५ किलो, दर ५१०० रु./क्विंटल, उत्पन्न २,५६,७८५/-रु\nश्री. गोपीनाथ नागनाथराव मुंडे, मु.पो. गोविंदवादी, ता. माज��गाव, जि. बीड - ४३११३१. मो. ९८२३४६११०५\nकापूस हे पीक नियोजन व मेहनत केल्यास नेहमी फायदेशीर रहाते असा माझा मागच्या काही वर्षापासूनचा अनुभव आहे. मुळात मी अल्पमुधारक शेतकरी आहे. त्यामुळे सचोटीने व अभ्यासू वृत्तीमुळे नवनवीन तंत्राच्या मदतीने शेती करीत असतो. मात्र मागच्या काही वर्षापासून खोल गेलेली पाण्याची पातळी यामुळे पिके घेणे जिकीरीचे झाले आहे. तेव्हा कमी पाण्यावर पिके घेण्यासाठी आवश्यकता आहे ती नविन तंत्रज्ञानाची. यामध्ये आम्ही कमी पाण्यावर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करतो.\nमी माझ्या शेतामध्ये दि. १० जून २०१६ रोजी २ एकरमध्ये कापूस कावेरी सीड्सच्या एटीएम या जातीची लागवड केली. प्रथम रेषा पाडून ४ x १.५ फुट अंतरावर ड्रीप अंथरले व कापसाची लागवड केली. त्या कालावधी दरम्यान माझी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. कंपनी प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) यांची श्री तिरूपती कृषी सेवा केंद्र, माजलगाव येथे भेट झाली व त्यांनी मला व माझ्या काही सहकार्यांना एकत्रीतरित्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरून उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला. तसेच आमच्या प्रश्नांचे त्यांनी समाधान केले. सुरुवातीला ड्रीपमधून जर्मिनेटर एकरी १ लि. सोडले व नंतर फवारणीच्या वेळेस किटकनाशकासोबत जर्मिनेटर ५० मिली + कॉटन थ्राईवर ५० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यानंतर तिसऱ्या फवारणीच्या वेळेस लालकोळी नियंत्रणासाठी स्प्लेंडर ३० मिली १५ लि. पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली.\nमी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरल्यामुले माझ्या प्लॉटमधल्या झाडांची प्रतिकारक शक्ती वाढली. गेल्यावर्षी अतिरिक्त पाऊस झाला तरीही झाडांची मर झाली नाही वा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवला नाही. झाडावरचे तेज व हिरवेगारपणा एवढा होता की, शेजारील शेतकरी प्लॉट पहायला यायचे. माझ्या कापसाच्या झाडाचे एकही पण लाला पडले नाही वा पिवळे दिसत नव्हते. थोडक्यात झाडाला म्हातारपण आलेच नाही. कापसाची वाढ एवढी झाली की, त्यामधून माणूस उभा राहिला तरी दिसत नसे. ७ ते ८ फुट उंचीची झाडे फुलपात्यांनी लगडलेली होती. पाते लागण्याच्या अवस्थेमध्ये कॉटन थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + १५ लि. पाणी अशी फवारणी केल्यानंतर पात्यांची संख्या वाढली, तसेच पातेगळ झाली नाही. बोंडे पोसण्यासाठी कॉटन थ्राईवर, राईपनर, न्युट्राटोन च्या फवारण्या केल्यामुळे मोठ्या बोंडांची संख्या जास्तीत जास्त राहिली. त्यामुळे पोषण व्यवस्थीत झाल्यामुळे वजनदार बोंडे भरली आणि उत्पादन जास्त आले.\nमला २ एकर क्षेत्रामधून पहिल्या वेचणीस २२ क्विंटल कापूस निघाला व दुसऱ्या वेचणीस ११ क्विंटल कापूस निघाला. त्यानंतर मी ड्रीपने पाणी दिले व एकरी जर्मिनेटर १ लि. सोडून वरून किटकनाशकासोबत जर्मिनेटरची फवारणी केली, तर नंतरच्या बहाराला १७ क्विंटल ३५ किलो असे एकूण मला २ एकर क्षेत्रामधून ५० क्विंटल ३५ किलो कापसाचे उत्पादन निघाले. सुरुवातीला कापूस विकल्यामुळे मला ५१०० रु. प्रति क्विंटल भाव मिळाला व एकूण २ एकर क्षेत्रामधून २,५६,७८५/- रु. चे उत्पन्न झाले. त्यामुळे चालूवर्षी (२०१७) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा सुरुवातीपासून वापर चालू असून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/matahi-news-akhil-bharatiy-marathi-sahitya-sammelan-2019-nayantara-shehgal-ontroversy-4089", "date_download": "2019-03-25T07:32:39Z", "digest": "sha1:7HQNCPOKXP556IRCPT3OPFCVZU2GKPFE", "length": 12500, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "matahi news akhil bharatiy marathi sahitya sammelan 2019 nayantara shehgal ontroversy | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाद संमेलनाचा : अजूनही वेळ गेलेली नाही...\nवाद संमेलनाचा : अजूनही वेळ गेलेली नाही...\nवाद संमेलनाचा : अजूनही वेळ गेलेली नाही...\nवाद संमेलनाचा : अजूनही वेळ गेलेली नाही...\nसोमवार, 7 जानेवारी 2019\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ्य लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन केल्यास ते उधळून लावू अशी धमकी येताच संयोजकांनी मान तुकवत थेट सहगल यांना दिलेले निमंत्रणच रद्द केले. यामुळे साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कार वापसीची सुरुवात करणाऱ्या निर्भीड व स्पष्टवक्त्या लेखिका सहगल संमेलनात काय बोलणार याची तमाम मराठीजनांना उत्सुकता होती. मात्र संयोजकांनी त्यांचे निमंत्रण रद्द करून असिहुष्णतेची परिसिमाच गाठली आहे.\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्��्य लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन केल्यास ते उधळून लावू अशी धमकी येताच संयोजकांनी मान तुकवत थेट सहगल यांना दिलेले निमंत्रणच रद्द केले. यामुळे साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कार वापसीची सुरुवात करणाऱ्या निर्भीड व स्पष्टवक्त्या लेखिका सहगल संमेलनात काय बोलणार याची तमाम मराठीजनांना उत्सुकता होती. मात्र संयोजकांनी त्यांचे निमंत्रण रद्द करून असिहुष्णतेची परिसिमाच गाठली आहे. हा जसा नयनतरा सहगल यांचा अपमान आहे तसाच तो तमाम मराठी जनांचा व महाराष्ट्राच्या थोर परंपरेचाही अवमान आहे.\nविजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या असलेल्या नयनतारा सहगल यांनी आपली मते कायमच परखडपणे मांडली आहेत. तत्कालीन पंतप्रधान व आत्येबहिण इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती त्यावेळीही सहगल यांनी त्याला विरोध केला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. महाराष्ट्राशीही त्यांचे जवळचे नाते होते. त्यांचे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे मराठी साहित्य संमेलनाचे मुहूर्तमेढ रोवणारे महादेव गोविंद रानडे यांचे स्नेही होते. त्यामुळे संमेलनात त्या आपली मते परखडपणे मांडणार याची जाणीव असतानाही आयोजकांनी त्यांना उद्धाटक म्हणून बोलावले होते हे एका अर्थी योग्यच होते. पण आता त्यांचे आमंत्रण रद्द करणे म्हणजे त्यांचा थेट अपमान करण्यासारखेच आहे.\nसहगल यांचे भाषण आता सोशल मिडीयातून सर्वदूर पोहचले आहे. त्यात त्यांनी जे विचार मांडले आहे त्याची चर्चा एव्हाना सुरु झालेलीच आहे. संमेलनात त्यांच्या भाषणाची चर्चा झाली नसती तेवढी किंवा त्याहीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या या होवू घातलेल्या भाषणाची होणार आहे.\nआता खरा प्रश्न आहे तो मराठी साहित्यिक, विचारी लेखक यावर काय भूमीका घेतात हा. साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी साहित्यविश्वाची मान खाली गेली आहे. अशा वेळी साहित्यिक, लेखक शांत राहिले तर येणारी पिढी त्यांना कधीच माफ करणार नाही. व्यक्तीस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्याला किंमत न देणाऱ्या झुंडीच्या हाती मराठी साहित्य व संस्कृती कधीच सुरक्षित राहणार नाही. अशा संमेलनात उपस्थित राहून आपण कोणते विचार मांडणार आहोत असा प्रश्न या संमेलनात सहभागी होणाऱ्या लेखक, कवींनी स्वतःला विचारला पाहिजे. मराठी साहित्य संमेलन हा केवळ मिरवण्याचा सोहळा नाही. मराठी मनाचा तो मानबिंदू आहे. दहा कोटींहून अधिक मराठी बोलणाऱ्या लोकसमूहाच्या अभिमानाचा तो सोहळा आहे याचा विचार आता त्यात सहभगी होणाऱ्या प्रत्येक मराठी लेखक, कवींनी केलाच पाहिजे. यासाठी त्यांनी संमेलनात सहभागी न होता आयोजकांवर दबाव वाढवला पाहिजे. यातच खरे हित आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावता कामा नये.\nत्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही संमेलन आयोजकांच्या या कृतीची गंभीर दखल घेवून त्यात वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे. कारण आयोजकांच्या या कृतीमुळे साऱ्या जगात महाराष्ट्राविषयी चुकीचा संदेश गेला आहे. तो पुसून टाकण्याची संधी अजूनही सरकारला आहे. स्वतः मुख्यमंत्री तसेच सांस्कृतीक मंत्र्यांनी सहगल यांना सन्मानाने आमंत्रित करून महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आदर राखणारे राज्य असल्याचे दाखवण्याची संधी सरकारला आहे. महाराष्ट्र माहेरवाशिणीचे स्वागत खुल्या मनाने करतो असा संदेश यातून जगभर जाईल. यामुळे सरकारची व पर्यायाने राज्याची प्रतिमा उंचावणार आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही.\nअन्यथा संमेलन वाजत गाजत होईल. पण त्यात जान नसेल. विचारस्वातंत्र्याची बूज न राखणाऱ्या कणाहीन लेखक-कवींचाच तो मेळा ठरले.\nसाहित्य literature पुरस्कार awards साहित्य अकादमी पुरस्कार नयनतारा सहगल मराठी महाराष्ट्र maharashtra\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/marathi-kalakar/", "date_download": "2019-03-25T08:05:15Z", "digest": "sha1:WQ3JHBHFSPBTLUWM54YH5I4FBGEBH4YW", "length": 3378, "nlines": 63, "source_domain": "marathikalakar.com", "title": " marathi kalakar - मराठी कलाकार", "raw_content": "\nपहा अदिती येवलेच्या विवाहसोहळ्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.\nअभिनेत्री अदिती येवलेचा विवाहसोहळा ह्या २३ डिसेंबर रोजी पार पडला असून त्याचे फोटोज आता बाहेर आले...\nलवकरच आई होणार आहे क्रांती रेडकर. पहा डोहाळे जेवणाचे फोटोज.\nहल्ली बॉलिवूडमध्ये या ना त्या लग्नाची गडबड सुरू आहे तिथे मराठी सिनेसृष्टीत एक गोड बातमी मिळणार...\n‘जाऊ दे ना वं’ आगामी ‘नाळ’ सिनेमातील गाणं प्रदर्शित.\nकाही दिवसांपूर्वी अचानक दिग्दर्शक नागराज मं��ुळेंच्या आगामी सिनेमाची बातमी आली. ‘नाळ’ असं सिनेमाचं नाव असून प्रथमच...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/190", "date_download": "2019-03-25T08:46:49Z", "digest": "sha1:RET5Y537CWSFODSQH4OH2YQXQOYEEYPQ", "length": 10701, "nlines": 129, "source_domain": "gangadharmute.com", "title": " किती चाटणार भारतपुत्रा? | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / किती चाटणार भारतपुत्रा\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * व��नोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 12/07/2011 - 08:41 ह्यावेळी प्रकाशित केले.\nकृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय\nकिती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय\nजन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी\nगुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी\nदास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही\nआनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही\nचापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय …\nराजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली\nभाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली\nकणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला\nस्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला\nलोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय …\nशंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही\n‘ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही\nअसेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही\nभगत-बापूंना माहीत नव्हते, अर्थ निघणार असाही\nमुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय …\nमनातले लिहले आहे , वा मुटे\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/balgite/shala/", "date_download": "2019-03-25T07:45:41Z", "digest": "sha1:QGWW6NPDJRTJKC7YKOEVFYQDZYXY3J4F", "length": 6595, "nlines": 86, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nजननीपेक्षा या आईचा अधिक लागला लळा\nत्या आईने अन्न भरविले, ��ा आईने ज्ञान पुरविले\nतिने कळीला रूप दिले, मधुगंध हिने अर्पिला,\nऊब तिच्या घरट्यातील प्रेमळ, हिने पाजिले पंखांना बळ\nगीत तिने, तर हिने शिकविली उड्डाणाची कला,\nती आई दे भाऊ बहिणी, ही दे जिवलग मित्र मैत्रिणी\nअंगण इवले तिचे, इथे तर बाग नभाचा निळा,\nशाळेमधल्या बालबालिका, निळ्या नभातील उजळ तारका\nसप्तर्षी सद्गुरू शिकविती, मुक्तिमार्ग आगळा\nसुखद येथले सरता जीवन, दिशादिशांना जाऊ पांगुन\nपरंतु राहिल आठवणींचा, कोंभ सदा कोवळा,\nबाळे आमुची पुढे कदाचित, इथेच शिकतिल हासत नाचत\nअपुऱ्या अमुच्या आकांक्षांचा अवतारच सानुला,\nदेश धर्म कुळ या सर्वांहुन, प्रिय आम्हाला ही स्वर्गाहुन\nहिची थोरवी कवनी गाता, शब्दच हो पांगळा,\nशाळा नच ही पुण्यपंढरी, पिढ्यापिढ्यांनी करणे वारी\nशिळेशिळेतुन भरला 'विट्ठल', 'ज्ञानदेव' सावळा,\nचित्रकाराचा फलक आणि कोराच राहिला\nनाविका पल्याड ने रे मला\nवारा वाहतो वाहतो वारा दिसेना दिसेना\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/samsung-to-pay-apple-548-million-dollars/", "date_download": "2019-03-25T07:28:43Z", "digest": "sha1:D3QSBP47UWEXOLT5ICTXSSUTT7SZHIK4", "length": 9196, "nlines": 89, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Samsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nSamsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्���ासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n२०११ पासून Samsung आणि Apple मध्ये चालू असलेला patents चा न्यायालयीन लढा आता अंतिम टप्प्यात आलाय.\n२०११ मध्ये Apple ने Samsung विरुद्ध designs आणि patents चे उल्लंघन करण्याची case दाखल केली होती. Samsung ने Apple च्या phones च्या software designs सारखेच Samsung च्या phones मध्ये designs वापरायला सुरुवात केली होती आणि तेंव्हापासून या दोन्ही कंपनी मध्ये कोर्टात वाद चालू होते. या सगळ्या प्रकरणात कोर्टाने Samsung ला दोषी ठरवले असून त्यांना आता Apple ला $५४८ million dollars एवढा fine द्यायचा आहे.\nApple ने कोर्टात Samsung कडून ९३० million dollars ची मागणी केली होती. पण कोर्टाने ती रक्कम मे महिन्यात कमी करून, ५४८ million dollars इतका दंड Samsung ला ठोठावला होता. ही रक्कम रुपयांमध्ये होते – ३५ अब्ज ६२ कोटी रुपये San Jose मधील Federal court मध्ये file केलेल्या papers नुसार Samsung ही रक्कम १४ डिसेंबर पर्यंत Apple ला देण्याची शक्यता आहे. परंतु Samsung नी म्हटलंय की Apple आधी दंडाच्या रकमेची invoice पाठवेल आणि मगच ही रक्कम ते त्यांना देतील. या सगळ्यावर Apple कडून काही comments आलेल्या नाहीत.\nमोठ्ठ्या कंपनीज, मोठ्ठी भांडणं, मोठ्ठे आकडे \nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← यशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\n६२ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात +१००९ वेळा आलेलं अपयश = जगप्रसिद्ध फूड चेन\nविवाहबाह्य संबंध म्हणजेच “व्यभिचारासाठी” देशोदेशी दिल्या जातात या कठोर शिक्षा\nया मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते\nसमस्या अनेक उपाय एक : बस्स हे इतकंच करा आणि थायरॉईड ते कॅन्सरशी लढण्यास सज्ज व्हा…\nतुम्हाला कल्पनाही नसेल : हे १२ घरघुती उपाय ऍसिडिटी पासून कायमची मुक्ती देतात\nखिश्यात बंदूक बाळगा – ‘निडर’ बना…\nनिकोला टेस्लाची भविष्यातील तंत्रज्ञान प्रगतीविषयीची ही पाच भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\n“पुश-अप” चे चाहते ह्या ११ चुका करतात आणि परिणाम जन्मभर भोगतात\nमृत्यू म्हणजे नेमकं काय – सोप्या भाषेत प्रक्रिया समजून घ्या\n“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरे��चे पत्र\nतुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nहिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी\nख्रिश्चन धर्माची पवित्र व्हेटीकन सिटी म्हणजे एक शिवलिंग आहे का\n सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)\nचीडलेल्या धोनी ने दिलं पत्रकाराला आक्रमक उत्तर\nप्रामाणिकपणाच्या बदल्यात ह्या अधिकाऱ्यांच्या नशिबी आली ‘हत्या’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato9.html", "date_download": "2019-03-25T07:48:24Z", "digest": "sha1:Q5C7KATJIBP775ISWGI62FM4RR7FSWMK", "length": 4952, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - अवकाळी पाऊस गारपीटीने ३ एकर उद्ध्वस्त टोमॅटो प्लॉट दुरुस्त होऊन ८ ते ८।। लाखाचे उत्पन्न", "raw_content": "\nअवकाळी पाऊस गारपीटीने ३ एकर उद्ध्वस्त टोमॅटो प्लॉट दुरुस्त होऊन ८ ते ८\nश्री. विष्णु बंडू खांडबहाले, मु.पो. महिरावणी , ता.जि. नाशिक. मो. ७५८८५१५०४४\nमी मागील ६ वर्षांपासून माझ्याकडे असलेल्या द्राक्ष बागेसाठी डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.\n१२ फेब्रुवारी २०१० ला ३ एकर टोमॅटोची लागवड केली. मागील वर्षी फयान वादळात द्राक्ष बाग सापडली. १ एकर द्राक्ष बाग काढून त्या ठिकाणी १ एकर द्राक्ष बाग काढून त्या ठिकाणी १ एकरात अभिनव जातीची टोमॅटो व दुसऱ्या १ एकरात अभिनव जातीची टोमॅटो व दुसऱ्या १ एकरात नामधारी ५०१ जातीची टोमॅटो लावली.\nटोमॅटोची रोपे नेटाफेमची इनलाईन ड्रिप करून मल्चिंग पेपरचा वापर करून लावली. सुरुवातीस जर्मिनेटरचा रोपे लागवडीच्यावेळी १० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर या प्रमाणात वापर केला. त्यामुळे टोमॅटोची वाढ चांगली झाली. फळे लागलेल्या अवस्थेत मे २०१० ला अवकाळी पाऊस झाला. गारपीट झाली. त्याने पुर्ण झाडांना जखमा होऊन पाने पुर्णपणे फाटून गेली होती. टोमॅटोची फुले - फुळे पुर्णपणे गळून गेली होती. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत मी डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीच्या नाशिक शाखेत जाऊन जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५ लि. घेऊन आलो. टोमॅटोचा प्लॉट उद्ध्वस्त झालेला अ���तानासुद्धा हार न मानता माझ्या ३ एकर टोमॅटो प्लॉटसाठी २०० लि. पाण्यामध्ये सप्तामृत प्रत्ययेकी १ लि. या प्रमाणत ५ दिवसांच्या अंतराने दोनच फवारण्या केल्या. त्याने फुलकळी निघून जसेच्या तसे झाड पूर्ववत झाले. पाहिल्यासारखाच फ्रेशपणा प्लॉटमध्ये दिसायला लागला. अडीच फूट ते तीन फूट उंचीची झाडे झाली. टोमॅटो फळांची संख्या १०० ते १२५ पर्यंत प्रत्येक झाडावर दिसू लागली. पाने रुंद हिरवीगार झाली. फुटवा मोठ्या प्रमाणात झाला. अवकाळी पावसात सापडलेले टोमॅटो प्लॉट बाकीच्या लोकांनी काढून टाकले.\nतीन एकरात आठ ते साडे आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ५०० रु./क्रेट याप्रमाणे दर मिळाला. ४ ते ५ महिने टोमॅटो चालू होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/mark-zuckergerb-and-wirehog/", "date_download": "2019-03-25T07:23:19Z", "digest": "sha1:YDKDPAO7DHUUBJJFYGMJHPZZHKOJH3QJ", "length": 19413, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मार्क झुकरबर्ग ने फेसबुक निर्माण केले नसते तर काय झाले असते? उत्तर अपेक्षितच आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमार्क झुकरबर्ग ने फेसबुक निर्माण केले नसते तर काय झाले असते\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलहानपणी भाषेच्या परीक्षेत निबंधाला हमखास एक कल्पनाविस्ताराचा विषय असायचा. मी पंतप्रधान झालो तर किंवा अमुक झाले तर, तमुक नसते तर तसाच हल्ली आपण एक विषय घेऊ शकतो. फेसबुक नसते तर\nफेसबुक नसते तर आपण काय केले असते किंवा नसते हा नंतरचा विषय झाला – पण स्वतः ज्याने फेसबुकची निर्मिती केली आहे त्या मार्क झुकरबर्ग ने काय केले असते\nQuora वर हा प्रश्न विचारला गेला आणि अभिषेक कुलकर्णी ह्या एका अभ्यासूने फार अभ्यासपूर्ण उत्तर दिलं. त्या उत्तराचं हे मुक्त भाषांतर. मूळ प्रश्न आणि त्यावरील इतर उत्तरं वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nजर फेसबुक बनवलं नसतं तर, कदाचित, मार्क ला फारसा फरक पडला नसता – कारण त्याने फेसबुक ऐवजी दुसरे काहीतरी बनवले असते…\nतो wirehog नावाच्या एका नेट्वर्किंग वेबसाईट वर काम करत होता. त्याने त्याच वेबसाईट वर मेहनत घेऊन त्याचे संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित केले असते.\n२००४ च्या उन्हाळ्यात Palo Alto येथे फेसबुक ह्या सोशल नेट्वर्किंग साईट वर काम करत असतानाच Andrew McCollum, Mark Zukerberg, Adam D’Angelo आणि Sean Parker ह्यांनी wirehog तयार केले. Wirehog वर जॉईन होण्यासाठी त्याचा आधीच ��ेंबर असलेल्या व्यक्तीची रिक्वेस्ट आवश्यक होती. त्याशिवाय wirehog जॉईन करता येत नसे. Wirehog हे फेसबुकचेच महत्वाचे फिचर असणार होते. हे फिचर जे फेसबुक वर नाहीत त्यांनाही वापरता येणार होते. Wirehog ऑक्टोबर २००४ मध्ये लाँच झाले होते. पण जानेवारी २००६ ला ते इंटरनेट वरून काढून टाकण्यात आले. जेव्हा wirehog लाँच झाले होते त्याच्या आदल्या वर्षी त्याच सारखे campus only file sharing सर्विस देणारे I2Hub सुद्धा इंटरनेट प्लॅटफॉर्म वर आले होते आणि ते बरेच लोकप्रिय झाले होते. द हार्वर्ड क्रिमसन ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मार्क झुकेरबर्ग म्हणाला होता कि कदाचित फेसबुक सारखेच wirehog सुद्धा जगात पटकन आणि खूप लोकप्रिय झाले असते.\n२०१० साली झालेल्या एका मुलाखतीमध्ये Sean Parker ने सांगितले कि wirehog हे झुकेरबर्ग चे साईड प्रोजेक्ट होते. पण मार्क ने wirehog वरच इतके जास्त लक्ष केंद्रित केले होते कि कदाचित त्यामुळे फेसबुक बंद पडले असते. फेसबुक चे पहिले वर्जन, ज्याला त्यांनी “द फेसबुक” असे नाव दिले होते, त्याच्या निर्मिती नंतर मार्क ने wirehog वरच भरपूर काम करणे सुरु केले होते. त्याच्या ह्या कामामुळे फेसबुक कडे दुर्लक्ष होऊन ते बंद पडू नये असे त्या सगळ्यांना वाटत होते. म्हणून त्यांना (झुकेरबर्ग आणि त्याच्या टीम ला ) फेसबुक वर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी wirehog बंद करावे लागले.\nWirehog म्हणजे आधीच्या फेसबुक वरची P2P (peer to peer) file-sharing service होती. म्हणजेच मोठ्या फाईल्स एकमेकांना पाठवण्याची सोय. सध्या आपण gmail attachment करून किंवा गूगल ड्राइव्ह वर अपलोड करून एकमेकांना व्हिडीओ, फोटो इत्यादी पाठवतो – तेच करण्याची खास सोय.\nजेव्हा २००४ मध्ये त्यांनी ते लाँच केले तेव्हा मार्क काळाच्या पुढच्या टेकनॉलॉजी चा विचार करत होता. हे अँप्लिकेशन फेसबुक वर काम करत होते. ते २००६ पर्यंत व्यवस्थित सुरु होते पण फेसबुक च्या भविष्यासाठी पार्करने ते संपवले. एका आर्टिकल मध्ये मार्क ने म्हटले आहे कि जवळजवळ सगळेच व्यावसायिक हे सुरुवातीला क्रीयेटीव पण अधीर असतात. हा संयोग बऱ्याच वेळा घातक ठरतो. कारण व्यावसायिकांना एका वेळी बऱ्याच गोष्टींसाठी प्रयत्न करण्याची सवय असते. अशा वेळी एक न धड भाराभर चिंध्या असे होऊ शकते. मार्क अशाच जाळ्यात ओढल्या जात होता. २००४ साली Palo Alto येथे काम सुरु केल्यानंतर त्याने त्याचे पूर्ण लक्ष फाईल शेअरिंग सर्विस वर केंद्रित केले – ज्य��ला त्याने wirehog नाव दिले होते. २००५ पर्यंत wirehog व्यवस्थित काम करत होतं आणि त्याच्या पुढील डेव्हल्पमेंट्वर देखील काम सुरू होतं. फेसबुक वर wirehog बद्दल माहिती देखल होती –\nफेसबुक तेव्हा लोकांना आवडू लागले होते पण ते पुढे मार्केट मध्ये टिकेल कि नाही ह्याची मार्कला खात्री नव्हती. जेव्हा पहिल्यांदा फेसबुकने मार्क ला फायदा मिळवून दिला तेव्हा मार्कने त्याचे आणि टीमचे संपूर्ण लक्ष फक्त फेसबुकच्या डेव्हलपमेंट कडे केंद्रित केले.\nथोडक्यात – फेसबुक निर्माणच झाले नसते तर किंवा चालले नसते तरीही मार्क झुकेरबर्गने wirehog नावाची टेक कंपनी काढली असती.\nकोणी असेही म्हणेल कि फेसबुकच तयार नसते झाले तर wirehog कसे आले असते\nअश्या परिस्थितीत – इतर हार्वर्ड ग्रॅज्युएट्स प्रमाणे मार्कसुद्धा गुगल, लिंक्ड-इन किंवा अँपल मध्ये जॉईन झाला असता. तो गुगलला जॉईन झाला असता तर त्याने गुगल प्लस सारखे काहीतरी अँप्लिकेशन काढून गुगलचा भरपूर फायदा करून दिला असता किंवा लिंक्ड-इन मध्ये जॉईन झाला असता तर प्रोफेशनल लोकांसाठी एक सिंगल प्लॅटफॉर्म तयार करून त्याने प्रोफेशनल लोकांचा फायदा करून दिला असता.\nथोडक्यात काय तर तो जिकडे गेला असता तिकडे त्याने काहीतरी वेगळे आणि चांगले नक्कीच केले असते.\nपण त्याने फेसबुक तयार नसते केले तर आपण काय केले असते, कुठे आपला वेळ घालवला असता, जुने मित्र मैत्रिणी आणि नवीन मित्र मैत्रिणी कुठे शोधले असते, आपण कुठे जातो, काय करतो, काय खातो, काय बघतो , काय वाचतो, काय लिहितो हे लोकांना कसे कळले असते हे प्रश्न मात्र डोक्यात फेर घालून पिंगा घालतात.\nसो मार्कभाऊ झुकेरबर्ग…आजची पिढी हि तुमची शतशः आभारी आहे… कारण तुम्ही आमच्यासाठी फेसबुक आणलंत…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← डॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nकारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या ‘शेर शाह’ची गोष्ट\n फेसबुकची पहिली महिला इंजिनियर होती ही महाराष्ट्राची कन्या..\nमार्क झुकरबर्गला धारेवर धरताना अमेरिकन संसदेने विचारलेले चित्रविचित्र प्रश्न\nफेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरून व्हिडीओज डाऊनलोड करायचे आहेत\nदक्षिण आशियामधील सर्वात मोठं तुरुंग असणाऱ्या ‘तिहार जेल’बद्दल काही रंज��� गोष्टी\nमाझ्या जीवनाला कलाटणी देणारे – अब्दुल कलाम सर\nया खाद्यपदार्थांची सवय लावा आणि सिगारेटला ‘रामराम’ करा\nपटेलांनी नेहरूंचं ऐकलं असतं तर मराठवाडा निजामाच्याच पंज्यात अडकून राहिला असता\nलहान मुलांच्या पाठपुस्तकात “कामातुर, मिलन, कौमार्यभंग” सारख्या शब्दांची पेरणी का केली जातीये\nहा असा असेल नवा बॉस – Nokia 3310 ची सगळी माहिती वाचा\nहॉटेल्स चालक तुमच्यापासून या गोष्टी लपवून ठेवतात \nपद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय\nपेटीएम विसरा, जय “भीम” म्हणा \nशाहबानो ते शायरा बानो: व्हाया जाणत्यांचे अनुनयाचे राजकारण\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \nअमेरिकेच्या भीतीपोटी जन्मलेल्या, भारतीय नौ सेनेतील, अजस्त्र रशियन विमानाचा थरारक इतिहास\n‘मनाला आनंद आणि समाधान देणारा’ एक वेगळा व्हॅलेंटाईन डे \nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते\nबॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\nह्या ७ अप्रतिम पर्यटन स्थळांची आजची अवस्था प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड आणेल\n“चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत\nपुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर \nजाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/bhavkavita/tarak-aani-dipak/", "date_download": "2019-03-25T07:59:09Z", "digest": "sha1:OLE3CCQASFWX2IDTJBK5RTQFUVKC5AUX", "length": 4966, "nlines": 70, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nविस्तीर्ण गगन हे गमते मज भीषण\nहे 'झगमग' जीवन सुखवि न माझे मन \nजाईन भूवरी शांत दीप होऊनी\nमंदिरात मंगल हृदयज्योत उजळून\nसेवेत निरंतर, प्रभू, तुमच्या राहीन \nदगडाचा ईश्वर दगडाचे मंदीर\nहे 'मिणमिण' जीवन गमते मज पामर.\nजाईन अंबरी तारक मी होऊनी\nचमकेन वैभवी विशाल गगनांगणी\nउजळीन जीविता अनंतास पूजुनी \nआई व मूल (ओव्या)\nआई आणि मूल (��विता)\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%A7-3/", "date_download": "2019-03-25T08:17:54Z", "digest": "sha1:UC7IIJ4H2LIVOWTXPFDAFHH6GB3UXU5B", "length": 13570, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#यादों की बारात “रेनकोट’ मधून त्यागाचा आशयपूर्ण संदेश (भाग-३) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#यादों की बारात “रेनकोट’ मधून त्यागाचा आशयपूर्ण संदेश (भाग-३)\nचित्रपट हा प्रत्येकाचा आवडता विषय. काही चित्रपट मनावर कायमचं अधिराज्य गाजवितात. अभिनय, चित्रण, संगीत, गाणी अशा वेगवेगळ्या अंगांनी चित्रपट लक्षात राहतात. अशा गाजलेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणीचा धांडोळा दर आठवड्याला वाचकांच्या भेटीला…नव्या सदरातून…\nदोन जुने प्रियकर प्रेयसी भेटल्यानंतर होणारी त्यांची घालमेल, तुला सोडल्यानंतर माझं काहीच वाईट झालं नाही. उलट, सगळं किती छान आणि सुंदर सुरू आहे, हे दाखविण्याचा दोघांचाही अट्टहास आणि आहे ती परिस्थिती अगदी बेमालूमपणे एकमेकांपासून लपवताना होणारी दमछाक अजय आणि ऐश्वर्यानं इतक्या सुंदर पद्धतीनं साकारली आहे की बास मुळातच अजय हा कमी बोलणारा अभिनेता; मात्र त्याच्या बोलक्या डोळ्यांमुळं त्याचा अभिनय अत्यंत बोलका झालेला आहे. ऐश्वर्यानं मात्र खरंच या पात्रात जीव ओतला आहे. तिचा अभिनय तिच्या इतकाच सुंदर आहे. तिनं साकारलेलं निरूचं पात्र कदाचित तिच्याऐवजी इतर कुणीही इतक्या दमदारपणे साकारू शकलं नसतं.\nसिनेमातील सर्वंच गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. देबज्योती मिश्रा यांनी या सिनेमात संगीताचा वेगळाच प्रयोग केला आहे. यातील सर्वंच गाणी ही “बॅकग्राऊंड’ ला वाजतात. त्यातील “मथुरा नागरापती’ हे शुभा मुद्गल यांच्या आवाजातील गाणं तर स्वर्गसुख देणारं आहे. देबज्योतीच्या संगीतासोबतच पावसाचा नितांत सुंदर वापर या सिनेमात केला गेला आहे सिनेमाच्या नावाला अगदी साजेशी वातावरणनिर्मिती या पावसानं केली आहे\nदिग्दर्शकानं रेनकोट हे प्रतीक म्हणून वापरलं असावं. कारण त्या वेळी तिथं बरसणारा तो पाऊस म्हणजे जणू काही त्या दोघांची वाताहत झालेली आयुष्यचं आहेत. एकामागून एक सारखी बरसणारी संकटं आणि मित्राच्या घरातील नोकराचा तो “रेनकोट’. त्याची ती काय ऐपत असणार तो रेनकोट त्याच्या कुवतीप्रमाणे थोड्या वेळेसाठी का होईना त्या दोघांचाही पावसापासून बचाव करतोय\nया सिनेमातील अगदी शेवटचा म्हणावा तसा “सीन’ ज्यात निरूची परिस्थिती कळल्यामुळं उद्विग्न झालेला मनू बाथरूममध्ये जाऊन रडतो. मित्राची बायको त्याला बाहेर बोलावताना तिला आंघोळीचं कारण देतो. ती तरीही बाहेर बोलावते, तेव्हा त्याचे रडून सुजलेले डोळे आणि त्याची होणारी प्रचंड घालमेल अजयनं इतकी अफलातून साकारलीय की अगदी जीव ओवाळून टाकावा. खऱ्या प्रेमाचा, त्यातील व्याकुळतेचा आणि हिरावून घेण्याऐवजी देण्यातच खरं प्रेम आहे असा साधा; पण आशयपूर्ण संदेश देणारा सिनेमा एकदा तरी पाहायलाच हवा.\nमंथन: अझहरची मृत्यूवार्ता आणि भारत\nस्मरण: आठवणीतील कुसुमाग्रज… वास्तल्यमुर्ती \nमंथन : एअर स्ट्राईकची रणनीती आणि परिणामांचा वेध\nप्रवाह : प्रेम म्हणजे काय \nविविधा : फुकटचे सल्ले आणि खमके उत्तर\nप्रासंगिक: कशाला जाळावा अथवा पुरावा मृत देह \nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-jalna-farmer-kagegaon-93193", "date_download": "2019-03-25T08:47:56Z", "digest": "sha1:RCY7OR6DOJNCWFMZTIUJ2QNWGWF6JZQY", "length": 22868, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news jalna farmer kagegaon तंत्रज्ञान, प्रयोगशीलतेतूनच विकास घडविलेले कडेगाव | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nतंत्रज्ञान, प्रयोगशीलतेतूनच विकास घडविलेले कडेगाव\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nजालना हा उद्योग नगरीचा जिल्हा. याच जिल्ह्यातील कडेगावने शेती उद्योगात प्रयोगशीलता, प्रात्यक्षिक, तंत्रज्ञान, पूरक उद्योगाचा स्वीकार या बाबींमधून आर्थिक उन्नतीचा मार्ग निवडला आहे. कपाशी पिकात पथदर्शक काम केल्यानंतर पोल्ट्री, रेशीम शेती तसेच विविध पिकांच्या सुधारीत वाणांच्या लागवडीतून काळासोबत चालण्याची इथल्या शेतकऱ्यांची धडपड दिसून येते. आपल्या कुटुंबांचे व पर्यायाने गावाचे अर्थकारण उंचावण्यात ते यशस्वी झाले आहेत.\nजालना जिल्हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा म्हणूनच अोळखला जातो. याच जिल्ह्यातील कडेगाव या गावाने शेतीत उल्लेखनीय भरारी घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिथे अन्य भागा���त कपाशी उत्पादकांना ८ ते १० क्विंटलवर समाधान मानावे लागे, तिथे कडेगावच्या नॉन बीटी कपाशी उत्पादकांनी एकरी सुमारे १४ पासून १८ क्विंटलपर्यंत तर सरासरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्याची किमया एकेकाळी करून दाखविली होती. त्यांच्या या शेती व्यवस्थापनाची दखल देशाबरोबरच परदेशातील तज्ज्ञांनीही घेत कडेगावला भेट दिली होती. या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीची पाहणी केली होती.\nनिक्रा प्रकल्पाचा मोठा आधार\nकडेगाव हे तसे उपक्रमशील गाव म्हणूनच अोळखले जाते. आता हेच पाहा. जालना-खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगावात निक्रा प्रकल्प राबविला जातो आहे. अवर्षणप्रवण भागासाठी असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती व पीकपद्धतीत बदल करण्यासह त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पूरक उद्योगाची जोड शेतकऱ्यांना दिली जाते आहे.\nपंचावन्न कुटुंबांना रेशीम शेतीचा आधार\nमराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम रेशीम उद्योगाने केले आहे. कपाशीत चांगले प्राविण्य मिळवलेल्या कडेगावच्या शेतकऱ्यांनी तीन वर्षापासून रेशीम उद्योगाचीही कास धरली आहे. सुमारे २५ शेतकऱ्यांकडे हा उद्योग आहे. त्याला यंदा नव्याने तीस शेतकऱ्यांची जोड मिळाली आहे. वर्षाला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी केला आहे.\nचौदा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्राची साथ\nजालना येथील कृषी विज्ञान केंद्राची कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनात कडेगावच्या शेतकऱ्यांना तब्बल14 वर्षापासून साथ व तेथील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळते आहे.\nकापूस एकात्मीक कीड व्यवस्थापनासंदर्भातील मार्गदर्शनापासून सुरू झालेले कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य अव्याहतपणे सुरू आहे. कडेगावच्या शेतकऱ्यांची जिद्द चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती आम्हालाही आकर्षित करीत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ सांगतात.\nप्रगतिशील शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये\nकपाशीची चार बाय दीड किंवा तीन बाय दीड फुटावर लागवड करण्याचा पॅटर्न.\nकपाशीत एकात्मीक कीड नियंत्रण व्यवस्थापन तसेच लागवडीआधी खतांचा वापर करून त्यांचा कार्यक्षम वापर करण्याचा आदर���श.\nप्रकाश सापळा नियंत्रणासाठी सुमारे दोनशे प्रात्यक्षिके घेणारं गाव.\n‘कॉटन कनेक्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबाद, वर्धा व यवतमाळ या तीन जिल्ह्यांत शंभरावर गावात कापूस पिकविण्याबाबतचं मार्गदर्शन करण्याची संधी गावातील बाबासाहेब काटकर यांना मिळाली.\nमाझी बारा एकर शेती आहे. मात्र अवर्षणप्रवण स्थितीमुळे शेतीला जोड देण्याशिवाय पर्याय नव्हता. जालना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना कुक्कुटपालनाचा उद्योग मिळाला. उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण झाले.\n- बद्रीनाथ मोरे, ८५५४०८११११\nरेशीम उद्योगानं आम्हाला खरं सावरलं. गेल्या वर्षीपासून एकरी काही लाखांपर्यंतची रक्कम हाती येऊ लागली आहे. पाण्याची सोय असल्यानं आता बॅच वाढवणे शक्य झाले आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याला हा उद्योग कारणीभूत ठरतो आहे.\n- प्रतापसिंग मारग, ७८७५४६५४२२, धरमसिंग मारग- ९६३७५८५२५४\nकापूस शेतीला पर्यायी म्हणून रेशीम उद्योगाची निवड केली. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली चोपण जमिनीत तुतीची लागवड यशस्वी करून दाखविली.\n- दत्तू निंबाळकर, ९८९०६०४०९६\nचौदा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्राने गावात वेगवेगळी शेती प्रात्यक्षिके घेतली. तंत्रज्ञानाशी नाळ जुळविण्यात कृषी विज्ञान केंद्राची सर्वच ‘टीम’ यशस्वी झाली. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे अर्थकारण प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहिले. एकीचे बळ काय असते हे गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.\n- भीमराव जाधव, सरपंच, कडेगाव, ९१५८३९२४६९\nतंत्रज्ञान, प्रयोग यांचा स्वीकार करणारे कडेगावचे शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांचा व आमचाही उत्साह वाढवताहेत. त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे.\n- अजय मिटकरी, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जालना, ७३५००१३१४७\nरेशीम शेतीत दोन बॅचमध्ये साधारणपणे दीड ते दोन महिने अंतर पडते. अळ्यांची वाढ पूर्ण झाली की त्या कोषावर धागा टाकण्याची प्रक्रिया सुरू करतात. पुढे चार ते पाच दिवस त्या काहीच खात नाहीत. हे पाच दिवस, धागा काढणी एक दिवस, विक्रीतील तीन ते चार दिवस असे एकूण दहा दिवस व पुन्हा दोन दिवसांनी छाटणीचे काम रेशीम उत्पादक करतात. कडेगावचे रेशीम उत्पादक मात्र अळी कोषांवर धागा टाकण्यास गेली की तुतीच्या छाटणीकडे वळतात. वेळेच्या नियोजनामुळे मधले अंतर दहा ते ���ीस दिवसांनी वाचते. शिवाय बुंध्यापासून थोड्या वरती छाटणी केल्याने पाणीटंचाईत टिकून राहण्याची क्षमता वाढल्याचे शेतकरी सांगतात.\nगावात प्रत्येकी पाच व्यक्तींचा सहभाग असलेली तीन व स्वतंत्र वीस अशी कुक्कुटपालनाची सुमारे २३ युनीट्स निर्माण करण्यात आली आहेत. सुरवातीला दोनशे पक्षी प्रत्येक गटाला देण्यात आले होते. जवळपास १६ हजार रुपये खर्चून देण्यात आलेल्या या पक्ष्यांच्या विक्रीपोटी प्रत्येक गटाला सुमारे ३२ हजार रुपये मिळाले. गटातील प्रत्येक सदस्याला या व्यवसायातून चांगले अर्थार्जन मिळण्याची सोय झाली आहे.\nकोयनेचे पाणी कृष्णाला देण्यास शासनाची समिती अनुकूल\nचिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली. ...\nLoksabha 2019 : वारसदारांमध्ये प्रतिष्ठेची झुंज\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात दोन मातब्बर राजकारण्यांचे वारसदार विजयासाठी झुंजणार आहेत. सहकाराची पायाभरणी, दुधाचा महापूर, \"रोहयो' ते शेतीतील प्रयोगातून...\nऔरंगाबाद - यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने शेतात काही उगवले नाही. चारही बाजूंनी उजाड झालेली शेती. भोवती उंच डोंगर, माळरान. शिवगड तांड्यापुढं सिंदोन...\nदोन हजार कोटींचे व्याज द्या\nसोलापूर - कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार १२५ कोटी रुपये वितरित करण्यात...\nजेव्हा गायच कोंबड्या खाते...\nनांदुरा (जि. बुलडाणा) - नांदुरा तालुक्यातील टाकरखेडा येथील एक गाय चक्क कोंबड्याच फस्त करीत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शेतकरी बारस...\nशिरूर शहरात पाण्याची टंचाई; वीज नसल्याने खोळंबा (व्हिडिओ)\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्यातील घोड नदीला पाणी आले असले, तरीदेखील वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. तत्काळ आठ तास वीज द्यावी, अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-first-skating-ring-navi-mumbai-94470", "date_download": "2019-03-25T08:40:30Z", "digest": "sha1:EMHUC7NQYAXU46UQLUKSQZ36YIZRFSBG", "length": 14013, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news First Skating Ring in Navi Mumbai पहिली स्केटिंग रिंग नवी मुंबईत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nपहिली स्केटिंग रिंग नवी मुंबईत\nशुक्रवार, 26 जानेवारी 2018\nबेलापूर - नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घणसोली सेंट्रल पार्क येथे स्केटिंग रिंग तयार करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच स्केटिंग रिंग असल्यामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात त्यामुळे भर पडली आहे. तसेच या सुविधेमुळे शहरातील होतकरू खेळाडूंना स्केटिंगच्या सरावासाठी शहराबाहेर जावे लागणार नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे.\nबेलापूर - नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घणसोली सेंट्रल पार्क येथे स्केटिंग रिंग तयार करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच स्केटिंग रिंग असल्यामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात त्यामुळे भर पडली आहे. तसेच या सुविधेमुळे शहरातील होतकरू खेळाडूंना स्केटिंगच्या सरावासाठी शहराबाहेर जावे लागणार नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे.\nनवी मुंबई शहराने विविध क्रीडाप्रकारातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंना सरावासाठी पालिकेने जागा आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध देण्यावर भर दिला आहे. आजच्या घडीला नवी मुंबई शहरात १० हजारांपेक्षा अधिक स्केटिंग खेळणारे खेळाडू असून राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू वास्तव्य करतात. मात्र स्केटिंग रिंगची सुविधा ठाणे जिल्ह्यात स्केटिंग रिंगची सुविधा नसल्यामुळे या खेळात करियर करण्याची इच्छा असलेल्या खेळाडूंना नियमित सरावासाठी पालघर जिल्ह्यातील विरार येथील अमेय स्पोर्टस क्लब येथे शुल्क भरून सरावासाठी जावे लागत होते. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना बंगळूरु येथे सरावासाठी जावे लागत होते. त्यामुळे खेळाडूंचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्ची होत होता. म्हणूनच नवी मुंबई महापालिकेने घणसोली येथील सेंट्रल पार्क येथे २०० मीटर लांबीची स्केटिंग रिंग तयार केली आहे.\nघणसोलीत बनविलेले हे स्केटिंग रिंग अत्��ाधुनिक आणि दर्जेदार आहे. या स्केटिंग रिंगमुळे शहरातील खळाडूंना सरावासाठी पालघर किंवा मुंबई जिल्ह्यात जावे लागणार नाही. तसेच या खेळाची आवड निर्माण होऊन यातूनच भविष्यातील खेळाडू घडतील.\n- मोहन डगावकर (शहर अभियंता)\nवाशीतील धोकादायक इमारती रडारवर\nनवी मुंबई - मुंबईतील रेल्वेस्थानकाला जोडणारा पादचारी पूल गेल्या आठवड्यात कोसळला. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई पालिकेने वाशीतील अतिधोकादायक म्हणून...\nLoksabha 2019 : कोल्हापुरातून प्रचाराचे बाण\nमुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे...\nLoksabha 2019 : ठाण्यातून लढण्यास गणेश नाईकांचा नकार\nनवी मुंबई - ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी अखेर पक्षश्रेष्ठींना नकार दिल्याची चर्चा राजकीय...\nपालिकेचा अर्थसंकल्प अखेर मंजूर\nवाशी - नवी मुंबईला एकीकडे \"स्वच्छ शहरा'चा बहुमान मिळाला असताना दुसरीकडे शहराच्या विकासाचे प्रगती पुस्तक असणाऱ्या अर्थसंकल्पावरील चर्चेत...\nबेकायदा बांधकामांना पालिकेच्या केवळ नोटिसा\nतुर्भे - शहरातील बेकायदा बांधकामांना केवळ नोटिसा पाठवून मालकांवर गुन्हे नोंदवण्यापलीकडे नवी मुंबई महापालिका काहीच करत नसल्याने भूमाफियांचे...\nदत्ता नरसाळे ‘महापौर केसरी’\nनवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptrang-artical-save-children-violence-53423", "date_download": "2019-03-25T08:56:01Z", "digest": "sha1:5GDVLZZ2ZCZFFMFDSRECM4KXPGTLTVTK", "length": 23965, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptrang artical Save children from violence हिंसेपासून मुलांना वाचवू��ा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nरविवार, 18 जून 2017\nमुलांना चांगले कार्यक्रम, चित्रपट दाखवायला हवेत. केवळ दाखवून चालणार नाही, त्याविषयी बोलायला हवं. मुद्दा आहे तो त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांचा. पालकांची ती जबाबदारी आहेच; पण शिक्षकांनाही यापासून दूर जाता येणार नाही आणि कदाचित या बाबतीत पालकांना सजग करण्याची जबाबदारीही शिक्षकांनाच उचलावी लागणार आहे.\nचित्रपट, मालिकांतील हिंसाचाराचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या वर्तनातही याचे प्रतिबिंब पडताना दिसते, हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल.\nदोन प्रसंग. काही दिवसांच्या अंतराने घडलेले. प्रसंग एक ः उत्पन्नाचे विक्रम मोडणारा ‘बाहुबली’ चित्रपट नुकताच पाहिला. शेजारी एक कुटुंब बसलं होतं. त्यांचा सात- आठ वर्षांचा मुलगा चित्रपटातील हाणामाऱ्या, लढाया, खून सहजपणे पाहत होता. त्याचे आई- वडीलसुद्धा ‘एन्जॉय’ करत होते. चित्रपटातील, कुणाच्या तरी छातीत तलवार खुपसणं, मुंडकं कापणं अशी हिंसात्मक दृश्यं पाहताना मीच अस्वस्थ होत होतो. चित्रपटाच्या प्रभावी मांडणीसाठी ती दृश्यं आवश्यक असतीलही; पण त्या मुलानं आणि प्रेक्षागृहातील इतर मुलांनी तरी ती पाहू नयेत, असा विचार करत होतो.\nचित्रपटगृहातून बाहेर पडताना त्या पती- पत्नीचा संवाद सुरू होता - चित्रपटाचा सेट, त्यातील दृश्यं, इफेक्ट्स, इत्यादी... आणि इतक्यात मुलाची प्रतिक्रिया उमटली, ‘‘पप्पा, कटप्पानं कशी तलवार खुपसली ना त्याच्या पोटात\nखरंतर याचं आश्चर्य वाटलं. चित्रपट पाहून त्या मुलाच्या लक्षात काय राहिलं, तर कुणीतरी कुणालातरी निर्घृणपणे मारतोय. प्रेक्षकांमध्ये अनेक मुलं होती. सगळ्यांनी चित्रपटातील अशी हिंसात्मक दृश्यं पाहिली असणार. त्यातली कुठली कुठली त्यांच्या मनावर कोरली गेली असतील \nप्रसंग दोन - चार- पाच मुलं खेळत होती. अचानक एका मुलानं तोंडानं \"धड धड धड' आवाज केला. पाठोपाठ ‘ए, सगळे मरा’ अशी सूचनाही कानावर आली. हातातली काठी बंदुकीसारखी धरून तो गोळ्या झाडत होता. बाकीची मुलं मरून पडल्याचं नाटक करत होती. एका मुलानं तसं केलं नाही. हा मुलगा ओरडला, ‘ए मर.’ असं म्हणून त्यानं पुन्हा गोळ्या चालवल्या. सगळी सात- आठ वर्��ांची मुलं. रागावण्यात मतलब नव्हता. त्यांच्याशी बोललो. लक्षात आलं, असा खेळ ते बऱ्याचदा खेळतात. कधी तलवारीची मारामारी, कधी गन घेऊन. हे सगळं त्यांनी कुठं पाहिलं हे शोधण्याचा प्रयत्न केला. चित्रपटांची, संगणकावरील गेमची मला माहीत नसलेली अनेक नावं आणि त्यातले मारामारीचे प्रसंग मुलांकडून समजले. हे केवढं मोठं आव्हान आपल्यासमोर वाढून ठेवलंय ते लक्षात आलं.\nमुलं खेळताना, त्यांच्या गप्पांमध्ये काय बोलत असतात, हे अनेकदा त्यांच्या नकळत मी ऐकतो. लक्षात आलं, की अनेक मुलांच्या गप्पा मारामारीच्याच असतात. त्यात चित्रपटात वा इंटरनेटवर पाहिलेल्या सिरीजमधील पात्रांचे उल्लेख असतात. अनेकदा मुलं काठीची बंदूक करून एकमेकांना ठार मारण्याचा प्रयोग करत असतात. कुणी म्हणेल, मुलंच ती, त्यांना काय कळतंय जे पाहतात ते करतात. त्यांचा काय दोष जे पाहतात ते करतात. त्यांचा काय दोष मुद्दा बरोबर असला, तरी सोडून देण्यासारखा नाही. समाजातली संवेदनशीलता हरवतेय ही जबाबदारीने लक्षात घेऊन उपाय करायची बाब आहे.\nमुलांना कुणाला तरी मारावं, ठार करावं, किंवा कुणीतरी कुणावरतरी अत्याचार करतानाचा आनंद घ्यावा असं का वाटतं हिंसात्मक दृश्यांचा मुलांवर, त्यांच्या विचारांवर, मनःस्थितीवर, वर्तनावर काय परिणाम होतो, यावर जगभरात मानसशास्त्राच्या, तसंच मेंदूशास्त्राच्या क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्यातून समोर येणारं वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल.\nपालकांपैकी अनेकांना मुळात मूल असं काही हिंसात्मक खेळतंय, टीव्ही- संगणकावर काय पाहतंय हे जाणिवेतच नसतं. तर, अनेकांनी मूल हट्ट करतंय म्हणून बंदुका वा तत्सम वस्तू घेऊन दिलेल्या असतात. मुलांना कोणते चित्रपट दाखवायचे यावर फारसा विचारच झालेला नसतो. सॅनेटरी नॅपकिन्सची जाहिरात लागली म्हणून चॅनेल बदलणारी आई त्याच मुलांबरोबर खून, मारामारी, अत्याचाराची दृश्यं मात्र पाहते. माध्यम साक्षरता कोणी आपल्याला शिकवलेलीच नाही. हे चित्र सार्वत्रिक आहे.\nहे चित्रपट आणि त्यासारखी अनेक माध्यमं मुलांसमोर काय घेऊन येताहेत हे सर्वांना माहीत आहे. मुलांची (आणि एकूणच समाजाची) संवेदनशीलता हरवतेय हे सातत्याने बोललं जातं. प्रश्न आहे तो या सगळ्यातून बाहेर कसं पडणार याचा. समाजातील दोन घटकांना यात मुख्य भूमिका निभावावी लागणार आहे. घरात पालक व शाळेत शिक्षक. ‘मूल काय करतंय हे माहितीच नाही’ ही भूमिका पालकांना वा शिक्षकांना परवडणारी नाही.\nमुलांना काय दाखवायचं व काय नाही याचा विचार पालकांनी करायला हवा. जो चित्रपट आपण पाहायला चाललोय, वा घरात टीव्हीवर जो कार्यक्रम मुलांसोबत पाहतोय, तो नेमका कसा आहे हे नीट माहिती करून घ्यायला हवं आणि आपण कितीही थांबवायचे प्रयत्न केले, तरी कुठून ना कुठून तरी मुलं ते पाहणारच. अशा वेळी मुलांशी पाहिलेल्या घटकांवर चर्चा करणं, त्यातील योग्य- अयोग्य मुलांसमोर आणणं आणि हे सातत्याने करणं हाच मार्ग उरतो.\nएखादा चित्रपट पाहायचा की नाही यावर आणि पाहिलेल्या घटकांवर\nमुलांशी मोकळेपणानं, आपलं म्हणणं न लादता; पण मुलांना पटवून देत चर्चा करायला हवी. शिक्षेतून फार काही साध्य होत नाही. मुळातच आपल्याकडे चित्रपटाला वास्तवाच्या पलीकडे जाऊन अतिरंजित स्वरूप देण्याची पद्धत आहे आणि आपण प्रेक्षकही ते पाहून एन्जॉय करत असतो. मुलांना मात्र हे समजत नाही. ती तेच वास्तव मानून चालतात आणि ‘हिरो असल्याने मला काहीच होणार नाही’ ही भावना त्यांच्या मनात घर करते. इथेच पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी संवादातून, त्यात जे दिसतं ते वास्तव नाही, या वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी. दुसरी बाब आहे ती पर्याय देण्याची.\nमुलांना चांगले कार्यक्रम, चित्रपट दाखवायला हवेत. केवळ दाखवून चालणार नाही, त्याविषयी बोलायला हवं. मुद्दा आहे तो त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांचा. पालकांची ती जबाबदारी आहेच; पण शिक्षकांनाही यापासून दूर जाता येणार नाही आणि कदाचित या बाबतीत पालकांना सजग करण्याची जबाबदारीही शिक्षकांनाच उचलावी लागणार आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nजमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास\nअविवाहीत मुलीच्या आत्महत्येवरुन चांदुर रेल्वे शहरात तणाव\nकन्नौजमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 7 ठार\nदार्जिलिंगचा वणवा (श्रीराम पवार)\nकर्जमाफी, निकष आणि भोग\n#स्पर्धापरीक्षा - फेसबुकचे सोलार ड्रोन\nबायोपिकने वाढला आत्मचरित्रांचा खप\nपुणे - ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, आदी क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपटांची (बायोपिक) लाट हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आली आहे....\n'एचटूओ' सांगण���र 'कहाणी थेंबाची'\n'H2O ' म्हटले की सर्वात आधी समोर येते ते म्हणजे पाण्याचे सूत्र. कारण पाण्याला वैज्ञानिक भाषेत 'H2O' ने संबोधले जाते. पण आता 'H2O' या नावाचा...\nराजकारणात दोस्त, दोस्त ना रहा...\nकोल्हापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतोच. जिल्ह्याच्या २०-२५ वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली, तर हे अनेकदा अनुभवायला मिळाले...\nअंतराळातील स्त्रीशक्ती (श्वेता चक्रदेव)\nनासातर्फे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या मंगळ मोहिमेत महिलांचा मोठा वाटा असणार आहे. नंतर होणाऱ्या मंगळावरच्या मानवी मोहिमेत तर पहिलं पाऊल कदाचित महिलेचं...\n'स्वतःसाठी किमान 15 मिनिटं द्या' (श्रेयस तळपदे)\nप्रत्येकानं स्वतःसाठी रोज किमान 15 मिनिटं द्यावीत. स्वतःसाठी दिवसातून फक्त 15 मिनिटं काढणं काहीच अवघड नाहीये. आपण बसल्याबसल्या किंवा उभे राहूनही...\nमेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)\nहळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A5%AE%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2019-03-25T08:16:11Z", "digest": "sha1:HK4RLT2UVATRG2HL3QAYTGGN2BX26VC5", "length": 5009, "nlines": 42, "source_domain": "vicharpravah.in", "title": "आपण आत्ता कुठे ४के बद्दल ऐकू लागलो असताना, तिकडे जपानच्या सरकारी वाहिनीने कालपासून ८के प्रक्षेपणास सुरुवात केली आहे! - विचारप्रवाह", "raw_content": "\nआपण आत्ता कुठे ४के बद्दल ऐकू लागलो असताना, तिकडे जपानच्या सरकारी वाहिनीने कालपासून ८के प्रक्षेपणास सुरुवात केली आहे\nअत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करण्यात जपान देश नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. मागील काही काळापासून NHK या जपानच्या सरकारी वाहिनीची ८के टीव्ह�� प्रक्षेपणाबाबत चाचपणी सुरू होती. आता या साऱ्या चाचण्या संपल्या असून कालपासून त्यांनी ८के प्रक्षेपणास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.\nजपानमध्ये ८के तंत्रज्ञानाचा विकास होत आहे\n अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर ८के म्हणजे अधिक गुणवत्तेची फित (Video). तुलनात्मकरित्या सांगायचे झाले, तर ७२०पी म्हणजे ‘एचडी’, १०८०पी म्हणजे ‘फुल एचडी’, तर ४के म्हणजे ‘अल्ट्रा एचडी’. सध्या अल्ट्रा एचडी टीव्ही बाजारात आलेले आहेत.\n८के मध्ये शूट करण्यासाठी खास प्रकारचा कॅमेरा लागतो. यामागील एकंदरीत तंत्रज्ञान आपल्याला खलील फितीमध्ये पाहायला मिळेल.\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n‘गुगल असिस्टंट’ आणि ‘ॲलेक्सा’ यांना एकमेकांबद्दल काय वाटतं\nचित्रफितीवर देवनागरी मराठी कसे लिहावे\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-kavita-mi-marathi-majhi-marathi_13.html", "date_download": "2019-03-25T08:25:00Z", "digest": "sha1:3KEI6A5Y6WX7OIADAR4HNGEJ4UEQLQFQ", "length": 5723, "nlines": 122, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "अकुंर मुलीचा ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nऊबेत तुझ्या वाढू दे\nतुच तिला साथ दे \nअपमान करू नको कुशीचा,\nकुस तुझी उजळू दे \nदिशा दे तिला,सावली बन तिची\nस्ञीत्वाची कळी ऊमलू दे ,\nतिच्या शस्ञानां धार दे\nतिच्या पंखाना बळ दे,\nतिची लढाई तुझीच तर आहे,\nघरा घरात पनती ऊजळू दे \nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/salwar-churidar/latest-unbranded+salwar-churidar-price-list.html", "date_download": "2019-03-25T08:20:20Z", "digest": "sha1:XIY3ZXK3EYYWLO3Y7IDXIDPYANRTXBLT", "length": 13140, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या उंब्रन्डेड सलवार & चुरीदार 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest उंब्रन्डेड सलवार & चुरीदार Indiaकिंमत\nताज्या उंब्रन्डेड सलवार & चुरीदारIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये उंब्रन्डेड सलवार & चुरीदार म्हणून 25 Mar 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 14 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक नवयौ कॉटन सॉलिड पतियाळा 499 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त उंब्रन्डेड सलवार अँड चुरीदार गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश सलवार & चुरीदार संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 14 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\nशीर्ष 10उंब्रन्डेड सलवार & चुरीदार\nताज्याउंब्रन्डेड सलवार & चुरीदार\nसिल्व्हेरलीने मुलतीकोलोर सिन्थेटिक उन्स्टीटछेद चुरीदार\nआस्क फॉर फॅशन हॅरॅम्स जक्सव्हा००१\nव्ह���वा सेमी पतियाळा सलवार\nवेदडींग स्पेसिअल रेडी तो स्तीतच सूट बी हिब\nकरतात 22 वूमेन्स बेरीज सँडल्स कँ२२ 3466 अ६\nश्री वूमेन्स नव्य पतियाळा\nश्री वूमेन्स ब्लॅक क्रीम सेमी पतियाळा\nश्री वूमेन्स क्रीम ब्लॅक जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स पूरपले येल्लोव जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स पिंक ब्राउन जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स ग्रीन पिंक जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स पिंक जोधपुरी सलवार\nआस्क फॉर फॅशन स्टयलिश हॅरॅम्स रॉयल Blue\nआस्क फॉर फॅशन स्टयलिश हॅरॅम्स व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/business-standard-misquotes-army-chief-bipin-rawat/", "date_download": "2019-03-25T08:03:49Z", "digest": "sha1:LLH5HHTU6Q57TYK7DAPR2Y4S3Z34F4Q5", "length": 25433, "nlines": 131, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतीय माध्यमांची विश्वासार्हता हे अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं आहे. सारख्याच घटनांचा वेगळ्या गांभीर्याने – कमी अधिक तीव्रतेने घेतलेला आढावा असो वा तथ्यांचं मिस-रिप्रेझेंटेशन असो…वा…महत्वाच्या व्यक्तींच्या विधानांचा असंबद्ध विपर्यास असो…आपल्या प्रस्थापित माध्यमांनी आपापले अजेंडे रेटण्यासाठी किंवा फक्त टीआरपी वा आय बॉल्स मिळवण्यासाठी सर्वकाही केलेलं आहे. अजूनही करतच असतात.\nग्लोबल हंगर इंडेक्स प्रसिद्ध झाल्यावर असाच अपप्रचार केला गेला. भारत “१०० व्या स्थानावर घसरला आहे” अशी सार्वत्रिक ओरड झाली. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. ते सत्य आपण वेगळ्या लेखात बघितलं आहेच. (इच्छुक इथे क्लिक करून वाचू शकतात.) त्या आधी – एकाच दिवशी, एकाच एडिशन मध्ये, लोकसत्ताने दोन वेगवेगळ्या व्यक्ती-घटनांचं केलेलं विचित्र वार्तांकन देखील आपण बघितलं होतं. (तो लेख आपण इथे वाचू शकता : “कट्टर हिंदुत्ववाद” आणि पोलीस स्थानकावर हल्ला करणारा “हिंसक जमाव” ).\nपरंतु वरील घटनांना संघटना / पक्ष अशी झालर आहे. माध्यमांनी निःपक्ष असावं ही अपेक्षाच अनरियलिस्टिक वाटावी अश्या काळात वरील वार्तांकनं “स्वाभाविक” म्हणावी लागतील अशी दुरावस्था आहे. पण हे संघटना, पक्ष, आयडियॉलॉजी…ह्यांच्या बाबतीत. राष्ट्राच्या सैन्याबद्दल असा अपप्रचार मात्र कोणत्याही दृष्टीने समजून घेता येणं अशक्य आहे. असाच प्रकार घडला आहे बिझनेस स्टॅंडर्ड कडून. सैन्य प्रमुखांच्या बाबतीत.\nबिझनेस स्टँडर्डने सैन्य प्रमुख जे म्हणालेच नाहीत – ते त्यांच्या तोंडी घालून, चक्क तोच मथळा करून बातमी प्रसारित केली आहे.\nविषय आहे एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या ब्रिज च्या बांधणीचा.\nभारतीय सैन्याने मुंबईतील ३ पादचारी पूल बांधण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यातील एक आहे एल्फिन्स्टन रोड इथे दुर्घटना ग्रस्त झालेला पादचारी पूल. अश्या नागरी कामांच्या बाबतीत सैन्याला पाचारण केल्याबद्दल अनेकांनी कठोर शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. टीका होत आहे. आर्मी चीफ बिपीन रावत ह्यांनी बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत ह्या विषयावर अनेक प्रश्नांची उत्तरं दिलं. ह्या मुलाखतीचा वृत्तांत बिझनेस स्टॅंडर्ड ने पुढील मथळ्याखाली प्रसिद्ध केला आहे :\nसैन्याची प्रतिमा सुधारण्याच्या हेतूने रेल्वे ब्रिज बांधण्यास सहमती दिली : जनरल बिपीन रावत\nमथळा वाचताच कोणत्याही सुजाण भारतीयाच्या भुवया उंचावतील.\nआर्मीला स्वतःची “प्रतिमा” “सुधारवीशी” का वाटावी प्रतिमा मलीन कधी झालीये प्रतिमा मलीन कधी झालीये का झालीये खुद्द आर्मी जनरल ला असं का वाटतं\nकोणत्याही विचारशील माणसाच्या मनात हे प्रश्न निर्माण होतील. त्यात जर हेत्वाआरोपाची चटक असेल तर विषयच संपला\nसोशल मीडियावर लोकांनी, अर्थातच, शेलक्या टिपण्या मारायला सुरूवात केली. खुद्द रावत स्वतः काश्मीर मधील “ह्युमन शिल्ड” प्रकरणात मेजर गोगोईंच्या समर्थनात रावत ठामपणे उभे राहिले होते. तिथपर्यंत टीकाकारांची मजल गेली आहे. “हे असं वागल्याने सैन्याची प्रतिमा मलीन होत आहे” हा र्हेटरीक सुरू झाला आहे. (त्यावर भाष्य करणारा हा लेख इथे क्लिक करून आवर्जून वाचावा .)\nपण मुळात जनरल बिपीन रावत असं म्हणाले आहेत का\nसदर मुलाखत संपूर्ण वाचावी. त्याच मथळ्याखाली प्रसिद्ध केलेली आहे.\nह्या लिंकवर, एकूण प्रकरणाची पार्श्वभूमी दिली गेली आहे. आर्मीकडून ३ ब्रिज बांधल्या जाणे, त्या अनुषंगाने होणारी टीका इत्यादी. आणि त्या सोबत दिले आहेत जनरल रावत ह्यांचे भाष्य. जनरल बिपीन ह्यांचे एकूण ६ भाष्य आहेत. एक एक करून बघूया जनरल काय म्हणालेत.\nआम्ही विविध गाव-शहरांमध्ये “नो युअर आर्मी” – “सैन्याशी ओळख” – ह्या कार्यक्रमा अंतर्गत कॅम्प्स घेत असतो. आम्ही आमच्या कार्यक्षमतेसकट लोकांच्या मदतीस गेलेलं लोकांनी बघावं आणि त्यातून आम्हाला ओळखावं हेच मी कधीही अधिक पसंत करेन.\nलष्करी अभियंत्यांच्या तुकड्या ह्या बांधकामांत गुंतणार आहेत. ह्या तुकड्यांचा वापर युद्धात सैन्याच्या आगेकूचसाठी असेच पूल बांधण्यासाठी केला जातो. मुळा मुठा नदीवर ब्रिज बांधण्याचा सराव करण्याच्या ऐवजी ह्या तुकड्या मुंबईत ब्रिज बांधून सराव करतील. दोन्ही प्रकारांत एकच कसब लागतं.\n३ , ४ – हे महत्वाचं आहे –\nआर्मी चीफ म्हणाले की सर्वांसमोर आपल्या क्षमता / कसब दाखवल्याने ह्याच आर्मीच्या लोकांना निवृत्तीनंतर नवा रोजगार मिळण्यात मदत होईल.\nआमच्या लवकर निवृत्त होणाऱ्या तरुण अधिकारी आणि जवानांना बाहेर नोकरी मिळावी अशी आमची इच्छा असेल, तर रेल्वेला आमच्याच १-२ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बटालियन्स ना संधी देण्यासाठी प्रवृत्त करण्याचं ह्याहून अधिक निमित्त कोणतं असेल आम्ही आमची शिस्त, क्षमता आणि वेळेच्या बंधनांना पाळण्याचं कसब दाखवलं तर रेल्वे सारख्या संस्थेकडून सैनिकांना समांतर रोजगार असाच उपलब्ध होईल.\nतरुणांना सैन्य भरतीसाठी उद्युक्त करणाऱ्या आमच्या महागड्या जाहिराती मी थांबवल्या आहेत. आम्हाला जाहिरातबाजीची गरज नाही. जनतेची मदत करून आम्ही सैन्याबद्दल जागृती निर्माण करायला हवी.\nपुढे त्यांनी विविध नैसर्गिक आपत्तीत सैन्याने केलेल्या कार्याची माहिती दिली. ज्यात अश्याच पुलांच्या बांधकामांचा समावेश आहे.\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्यांनी सैन्याद्वारे होणाऱ्या सदर पुलाच्या बांधणीची घोषणा केली. तयार बोलताना रावत म्हणाले –\nएल्फिन्स्टन रोड स्टेशनवर घडलेल्या अश्या दुःखद घटने नंतर सैन्य मदत करण्यास नकार कसा देऊ शकेल क्षमता असेल तर तिचा वापर करणे ही माझी जबाबदारी आहे.\nपुढील भाष्य आपत्ती व्यवस्थाबद्दल आहे. रावत म्हणतात, आम्ही नेहेमीच अश्या प्रसंगी मदतीस ध���वणारे सर्वप्रथम असू. परंतु त्यासाठी लागणारी सामुग्री विकत घेण्याची अधिकृत परवानगी आणि त्यासाठी लागणारे फंड्स आम्हाला मंजूर करावेत.\nतर इथे रावत हांची भाष्यं संपतात.\nह्या सहाच्या सहा वाक्यांमधून बिझनेस स्टॅंडर्ड ने दिलेल्या मथळ्याचा अर्थ कुठून निघतो\nरावंतांनी फक्त आर्मीची ओळख, जनतेस प्रोत्साहन, ह्याच प्रकारचा सराव आणि जवानांचा रोजगार – ह्या अनुषंगाने विविध प्रकारे सदर पूल बांधणी कशी योग्य आहे हे सांगितलं आहे. त्यात “जनतेत सैन्याचं प्रतिमासंवर्धन” चा मुद्दा कुठे येतो\nपण तसं खरं खरं सांगितलं तर सनसनाटी कशी निर्माण होणार म्हणून मग धादांत खोटा मथळा, चक्क बिझनेस स्टॅंडर्डसारख्या वृत्त संस्थेने दिलाय. अश्या मथळ्यामुळे जनतेत संभ्रम, निराशा निर्माण होईल – तीही सैन्याच्या बाबतीत – हा विधिनिषेध ते हरवून बसलेत.\nएक गोष्ट लक्षात घ्यायला हवी – सदर प्रकरणात सैन्याने पूल बांधायला हवा की नको, सरकारने सैन्याला पाचारण करायला हवं की नको ह्यावर मत मतांतरे असू शकतात. मला वैयक्तिक सरकारने उचललेलं हे पाऊल अजिबात आवडलं नाही. तीन वर्षाहून अधिक काळ सत्तेत राहिल्यानंतर जलद गतीने कार्यवाही करण्याची क्षमता सरकार तयार करू शकत नसेल तर “गव्हर्नन्स” च्या आश्वासनांचा बोजवारा उडाला आहे हे सिद्ध होतं. सैन्याची क्षमता वादातीत आहे. त्यांची निष्ठा देखील वादातीत आहे. सरकारने पाचारण केल्यास क्षणार्धात सैन्य धावून येणारच. पण सरकारने सैन्याला कधी पाचारण करावं ह्याचं भान सोडू नये.\nजनरल रावत ह्यांच्या स्पष्टीकरणानंतर, सैन्याच्या ह्या कामगिरीत काही हरकत घ्यावीशी वाटत नाही. परंतु ते सैन्याच्या दृष्टीने. सरकार वर ही वेळ येणं शोचनीय आहे.\nपण – हा सरकारवरील टीकेचा भाग झाला. बिपीन रावत जे बोलले – त्याचा विपर्यास कोणत्याही परिस्थिती स्वीकारार्ह नाही. आरोप-प्रत्यारोप होत रहातील. पक्ष-विचारप्रणाली-संघटना ह्यांच्या नैतिक-अनैतिक खेळी खेळल्या जातील. त्यांत माध्यमांना हाताशी धरल्या जाईल.\nपण ह्या चिखलात सैन्याला ओढू नये. बस्स एवढी लाज माध्यमांनी बाळगायला हवी एवढीच माफक अपेक्षा आहे.\nबहुतेक तीसुद्धा आता पूर्ण होऊ शकणार नाही.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या ���पडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← परिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nएका महिलेच्या संघर्षाची ग्वाही देणारे ‘Humanity Hospital’… →\n बीएसएफच्या महिला सैनिक पहिल्यांदाच दाखवणार मोटरसायकलच्या कसरती\n सर्जिकल स्ट्राईक दिनी, आणखी एक स्ट्राईक करून हुतात्म्याचा प्रतिशोध\n‘ह्या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य\nभीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू\nचर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध\n“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय \nपडद्यामागचा सूत्रधार : मेट्रोमॅन ई श्रीधरन\nकुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत वाचा त्यांना काय शिक्षा झाली…\nग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी\nभारताला लाभलेला “सर्वोत्तम पंतप्रधान कोण”: एका सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाचं अभ्यासपूर्ण मत\nट्रम्प चं “अमेरिकन स्वदेशी” भारताच्या फायद्याचं कसं\nभारत-पाक संबंधांवर बिम्स्टेक आणि सार्क चे परिणाम\n“तामिळ वाघ” LTTE बद्दल एक अज्ञात अचाट धक्कादायक गोष्ट – त्यांचं सुसज्ज हवाई दल\nभारताबद्दल त्या ‘१०’ धादांत खोट्या गोष्टी, ज्या आपण आजवर खऱ्या मानत आलो\nदुर्गा मातेच्या चारित्र्यावर घसरण्यापर्यंत विकृतीची मजल गेलीये, आणि “ते” नेहेमीप्रमाणे गप्प आहेत\nहिंदी YouTube सिरीज ज्या भारतीय तरुणाई represent करतात\nImperial Blue आणि Royal Challenge हे दोन ब्रँड नेमकं विकतात तरी काय\nपॅनकार्ड नसेल तर ह्या १० महत्वपूर्ण लाभांपासून वंचित रहाल\nधान्याला कीड लागू नये यासाठी कोणकोणत्या युक्ती वापराव्यात\nप्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करणाऱ्या आजी\nलाडकी लेक वयात येताना : भाग २\nराहुल गांधींचं अमेरिकेतील भाषण गेम चेंजर ठरणार\nअमिताभने रंगवलेल्या अँथोनी गोन्सालवीस मागचा खरा ‘अँथोनी गोन्सालवीस’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/metoo-actress-saloni-chopra-accuses-sajid-khan-of-sexual-harassment/articleshow/66173592.cms", "date_download": "2019-03-25T08:52:44Z", "digest": "sha1:GGG6RW3WVCGZFXGXNE6VIFXJPVCH3Z7T", "length": 11867, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sajid Khan: MeToo: सलोनी चोप्राचा साजिद खानवर गंभीर आरोप - metoo actress saloni chopra accuses sajid khan of sexual harassment | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nMeToo: सलोनी चोप्राचा साजिद खानवर गंभीर आरोप\n'मी टू'च्या वादळात आता बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांची नावं समोर येत आहेत. अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं देखील दिग्दर्शक-निर्माता साजिद खानवर लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या आरोप केला आहे.\nMeToo: सलोनी चोप्राचा साजिद खानवर गंभीर आरोप\n'मी टू'च्या वादळात आता बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांची नावं समोर येत आहेत. अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं देखील दिग्दर्शक-निर्माता साजिद खानवर लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या आरोप केला आहे.\n२०११मध्ये साजिद खानच्या एका चित्रपटात सलोनी चोप्रानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. त्या दरम्यान साजिदनं गैरवर्तन केल्याचं तिनं म्हटलं आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळण्यापूर्वी साजिदनं सलोनीची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीतही साजिदनं तिला सेक्स संदर्भात काही आक्षेपार्ह प्रश्न विचारले होते असा आरोपही सलोनीनं केला आहे.\nइतकंच नव्हे, तर साजिद अनेकदा सलोनीला बिकीनीतले फोटो पाठवण्यास सांगायचा. 'तू सहाय्यक दिग्दर्शक नसून दिग्दर्शकाची सहाय्यक आहेस', असं साजिद सलोनीला म्हणायचा. साजिद इतक्यावरच थांबला नाही, तर तो सलोनीला रात्री-बेरात्री कॉल फोन करून त्रास द्यायचा. 'बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्यासाठी ज्या गोष्टी हव्या असतात त्या तुझ्यात नाहीत. त्यामुळं हिरोईन म्हणून एन्ट्री करायची असल्यास काही गोष्टी कराव्याच लागतील असं म्हणत साजिदनं सलोनीकडं शरीरसुखाची मागणी केली होती, असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.\nकेवळ सलोनीनंच नाही तर अभिनेत्री रेचल व्हाइट आणि पत्रकार करिश्मा हिनं देखील साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा प��न्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nsavi sidhu: 'गुलाल'च्या अभिनेत्याची दुर्दशा\nbigg boss marathi 2: मुंबईत उभं राहणार 'बिग बॉस'चं घर\ndisha vakani: शोमध्ये परतण्यासाठी दयाबेनला ३० दिवसांचा अल्टि...\naamir khan: आमीर खान झाला वृद्ध; लूक व्हायरल\nvicky kaushal: कतरिना नाही, 'हिच्या'मुळे झाले विकी कौशलचे ब्...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nMeToo: सलोनी चोप्राचा साजिद खानवर गंभीर आरोप...\nMeToo: सुभाष घई यांच्यावरही आरोप...\nकाजोलने आलियाला 'आलिया कपूर' म्हटलं आणि......\nकोणत्याही महिलेशी गैरवर्तणूक होऊ नये: अमिताभ बच्चन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/thakre-marathi-movie/", "date_download": "2019-03-25T07:35:43Z", "digest": "sha1:QFJRMQBKCCQTZMZA64JF6IJMWFFCXMMT", "length": 1879, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " thakre marathi movie - मराठी कलाकार", "raw_content": "\nठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.\nशिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित मच अवेटेड असलेल्या “ठाकरे” सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2019-03-25T08:22:18Z", "digest": "sha1:3PQKXTK7P5RGO3FNSMU3YEY6X5SFA22S", "length": 13627, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दूध उत्पादकांना प्रतिलीटर 5 रुपये अनुदान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदूध उत्पादकांना प्रतिलीटर 5 रुपये अनुदान\nदुग्ध संस्थांच्य�� माध्यमातून होणार अंमलबजावणी\nदूध भुकटी प्रकल्पधारकांनाही निर्यातीस प्रोत्साहन अनुदान\nपिशवीबंद दुधाला अनुदान नाही\nमुंबई – राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या 5 रुपये अनुदानाचा लाभ देण्याच्या अटीवर सहकारी व खासगी दूध संस्थांना राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गाय दूध रुपांतरणास 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासूनच होणार आहे.\nदुधाला अनुदान मिळावे, यासाठी शेतक-यांनी आंदोलन पुकारले होते.\nया पार्श्वभूमिवर पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी या प्रश्नी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच दुग्ध संस्था आणि दूध भुकटी प्रकल्पधारकांशी अनेक बैठका घेतल्या. राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2/8.3 गाय दूध व त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दूध रुपांतरणास 5 रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nत्यानुसार सहकारी व खासगी दूग्ध संस्थांनी शेतकऱ्यांना 3.2 टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधासाठी 24.10 रुपये दर देणे बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये 19.10 रुपये दुग्ध संस्थेचे, तर 5 रुपये शासनाचे अनुदानाचा समावेश असणार आहे. 3.3 टक्के फॅटच्या दुधास 24.40 रुपये (19.40 रुपये + 5 अनुदान), 3.4 टक्के फॅटच्या दुधास 24.70 रुपये (19.70 रुपये + 5 रुपये अनुदान) आणि 3.5 टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधास 25 रुपये (20 रुपये + 5 रुपये अनुदान) प्रतिलीटर असा दर दूध उत्पादकांना देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nदूध प्रकिया संस्थांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही. हे अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस लागू राहिल. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-या संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट 2018पासून वरील प्रमाणे प्रतिलिटर खरेदी दर अदा करित असल्याबाबतचे हमिपत्र/बंधपत्र संबंधीत प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.\nशेतकऱ्यांना/दूध उत्पादकांना आजच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेला दर देणे बंधनकारक राहील. मात्र, दुग्ध व्यवसायात ऍडव्हान्स, पतसंस्थांचे कर्जहप्ते, पशुखाद्यापोटी येणे, स्टोअरमधील इतर साहित्याची येणी आदी करिता कपात करुन दूध बिलाची अदायगी करण्यात येत असल्याने अशा प्रकारे कपात करण्यास मुभा राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\n….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होती\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले\nभारताचा जपानवर दणदणीत विजय\nसलग पाचव्यांदा भारतीय महिलांनी जिंकला सॅफ चषक\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nसत्तेबाजी : ओळख दिग्गजांची\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर २-० ने मात\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T07:55:23Z", "digest": "sha1:D6IAADFVGD7RMK744ZPFYNR2NPH5OUEX", "length": 12415, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संसदेच्या इमारतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साफ-सफाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंसदेच्या इमारतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साफ-सफाई\nनवी दिल्ली – सोळाव्या लोकसभेच्या पंधराव्या अधिवेशनात सहभागी होताना देशभरातील खासदारांना खास रोमांचक अनुभूतीचा आभास होत आहे. सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत संसदेची इमारत चकाचक केली आहे.\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात संसदेचे स्वरूप आधीपेक्षा खूप बदलले आहे. केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 88 वर्षे जुन्या संसदेच्या इमारतीची साफ-सफाई अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली आहे. यामुळे संसदेची इमारत पूर्णपणे चकाचक झाली आहे.\nसंसदेची इमारत लाल दगडाची आहे. धूळ, माती, धुंवा आणि खाण्यापिण्याच्या वस्तुंमुळे इमारत फार खराब झाली होती. काही ठिकाणचे लाल दगड काळ्या रंगाचे झाले होते. घाणीमुळे दगडातील बारीक-बारीक छिद्र बंद झाले होते. प्रदुषणातील सल्फर डाय ऑक्साईडमुळे दगडाची झिज होत होती.\nअशात लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेला चकाचक करण्याचे आदेश दिले. तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर संसद भवन, सेंट्रल हॉल आणि लोकसभेचा हॉल चकाचक करण्यात आला आहे. सफाई करताना वॉटर जेट, स्टीम जेट आणि मायक्रो सॅंड ब्लास्टिंगचा वापर करण्यात आला.\nसंसदेची इमारत एक ऐतिहासीक वास्तू आहे. यामुळे स्वच्छता करताना इमारतीचे काहीही नुकसान होणार नाही याची खास खबरदारी घेण्यात आली आहे. सीपीडब्ल्यूडी विभागाने साफ-सफाईचे काम हाती घेण्यापूर्वी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणजे इनटेकच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला.\nसाफ सफाई करताना केमीकलचा अजिबात वापर झालेला नाही. साबण बनविण्यासाठी उपयोगात येणारा अमोनिया आणि टिपोलचा वापर करण्यात आला आहे. घट्ट डाग काढण्यासाठी सॅंड मायक्रो ब्लास्टींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमुलायम सिंहांच्या जागेवर अखिलेश निवडणूक लढवणार\nभाजपच्या उपाध्यक्षपदी उमा भारती यांची नियुक्ती\n….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होत���\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले\nभाजपकडून सहावी यादी जाहीर ; भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा\nमी कोणतीही निवडणूक लढवणार नाही- सपना चौधरी\nभारताचा जपानवर दणदणीत विजय\nसलग पाचव्यांदा भारतीय महिलांनी जिंकला सॅफ चषक\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/sagarika-ghatge-make-comeback-marathi-movie-industry-film/", "date_download": "2019-03-25T08:19:37Z", "digest": "sha1:OXOLYVB7K3XMXBBXJ323QGVERWNJSNHJ", "length": 6546, "nlines": 84, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Sagarika Ghatge to make a comeback in Marathi Movie Industry with THIS film", "raw_content": "\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nफॅन्स पसंत करतायत”ह्या”चौघांची जोडी.पहा व्हीडिओ.\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nफॅन्स पसंत करतायत”ह्या”चौघांची जोडी.पहा व्हीडिओ.\n“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.\nमधुरा साने आठवतेय का ती काही महिन्यांपूर्वीच आपल्याला एका छानशा मराठी सिनेमातून भेटीला आली होती. नाही...\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nपहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.\nसिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी...\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nमराठी मनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्का, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर...\n‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला\nअभिनेते सुनिल बर्वे यांनी आपल्या सुबक नाट्यसंस्थेच्यावतीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातील...\nसैराट फेम रिंकू राजगुरु मोठ्या स्क्रीनवर परत\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-03-25T07:49:14Z", "digest": "sha1:YGQDCU5BBWTYBJZPXZDE533PLEMOSWAF", "length": 23154, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुरुषोत्तम भास्कर भावे - विकिपीडिया", "raw_content": "\nपुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. [१]. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौदर्यवादी लेखक आहेत.\nअध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, पुणे, १९७७\nभाषाप्रभू पु.भा.भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक कै. पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप असते. इ.स.२०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :-\nपु.भा.भावे चित्रपट दिग्दर्शन पुरस्कार : राजदत्त (पत्रकारिता)\nपु.भा.भावे पत्रकारिता पुरस्कार : विक्रमसिंह ओक\nपु.भा.भावे समाजसेवा पुरस्कार : वामनराव पै (मरणोत्तर)\nपु.भा.भावे सामाजिक कार्य पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर\nपु.भा.भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द.खेर(मरणोत्तर)\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम येथील लेख\nद एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर (इंग्लिश)\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय ��ुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९८० मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१९ रोजी १५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2014-MiriLagwad.html", "date_download": "2019-03-25T07:52:26Z", "digest": "sha1:TWH42QUXJUUNBRTPR5YUWPOIO44G4GNO", "length": 42158, "nlines": 53, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - मिरी लागवड", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nभारत हे मिरीचे मूळस्थान असून इ.स. पूर्वी चौथ्या शतकापासून मिरी हे मसाल्याचे पीक म्हणून लागवडीखाली असल्याचा उल्लेख थिओ फ्रास्ट ह्या शास्त्रज्ञाने केला आहे. पैसा मिळवून देणाऱ्या पिकांपैकी मिरी हे एक महत्त्वाचे पीक आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला इंडोनेशिया, मलाया आणि अतिपूर्वेकडील देशांत मिरीची लागवड सुरू झाली. तोपर्यंत जागतिक बाजारपेठेत मिरी उत्पादनामध्ये भारताचा प्रथम क्रमांक होता. इ.स. १९४० पासून मिरीला वाढते बाजारभाव मिळू लागले. तेव्हापासून मिरी उत्पादकांनी मिरीचे जास्तीत जास्त उत्पान करण्याकडे अघिक लक्ष पुरविले. गेल्या संपुर्ण शतकात मिरी उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते.\nक्षेत्र व उत्पादन : भारतात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व पांडेचरी या प्रदेशात मिरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. एकून उत्पादनाच्या ९७% उत्पादन एकट्या केरळ राज्यात होते. केरळ राज्यात मिरीचे ५०% उत्पादन परसबागेत होते. पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये थोड्या प्रमाणात मिरीची लागवड केली जाते. कन्नोर जिल्ह्यातील उत्तर घाटापासून दक्षिणेकडील त्रावणकोरपर्यंत मिरीची लागवड केली जाते, सिलोन, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ आणि सयाम बेटामध्येसुद्धा मिरीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात रत्नागिरी व कुलाबा जिल्ह्यात मिरीच्या स्थानिक जातीची लागवड तुरळक प्रमाणात केली जाते.\nवनस्पती शास्त्रीयदृष्टिकोन: मिरी हे मरीच कुल (Piperaceae) ह्या वनस्पतीकुलातील पीक असून वनस्पतीशास्त्रात पायपर नायग्रम ह्या नावाने ओळखले जाते. मिरीच्या वेलची तुलना बऱ्याच अंशी विड्याच्या पानांच्या वेलाबरोबर केली जाते. विड्याच्या वेलाप्रमाणेच मिरीच्या वेलालासुद्धा आधार द्यावा लागतो. मिरीचा वेळ सतत हिरवा राहणार असून त्याला पेरी (कांड्या) असतात. प्रत्येक पेरावर आधारासाठी तंतुमुळे फुटतात. पेरावर जमिनीला समांतर वेळ फुटतात. परंतु त्यांची लांबी मात्र फारशी नसते. मिरीच्या वेलाची पाने आकाराने निरनिराळ्या जातीत भिन्न असतात. पानाचा आकार मध्यम, रुंद किंवा अरुंद असतो. मिरीची पाने सर्वसाधारणपणे विड्याच्या पानाप्रमाणे रुंद वाढलेला वेल झुडुपाप्रमाणे दिसतो आणि त्याचा घेर साधारणत: १२० ते १५० सें.मी. इतका असतो. मिरीची फुले रंगाने मळकट पांढरी असून फुलाच्या गुच्छा ची लांबी वेगवेगळ्या जातीनुसार ५ सें.मी. ते १२ सें.मी. पर्यंत असते. नर वेलावरील फुलोरा शोभादायक असतो. वेलावरील संकर नैसर्गिकरित्या होत असतो. त्यामुळे फळधारणेत तफावत पडते आणि शेवटी तयार होणारी फळे एकाच वेळी तयार होत नाहीत. फळे तयार होण्यासाठी २७५ दिवस लागतात. प्रत्येक फळात एकाच बी असते. फळ तयार होतात फळांचा रंग गडद नारंगी किंवा लाल होतो. मिरीच्या काही जातींमध्ये फल तयार झाले की ते गळून जमिनीवर पडते. परंतु बऱ्याचशा जात��ंमध्ये मिरीचा संपुर्ण गुच्छ पक्व होऊन जमिनीवर पडतो. मिरीच्या एका गुच्छामध्ये जातीनुसार साधारणत: २० ते ८० फळे असतात.\nहवामान : समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीच्या भूभागात मिरीचा लागवड केली जाते. उष्ण हवामानाच्या देशात हे पीक चांगले टिकाव धरू शकते. मिरीला दमट हवामान चांगले मानवते. २५० सें.मी. पावसाच्या प्रदेशात मिरीचे पीक चांगले येते. मिरीचे पीक केवळ पावसावर वाढत असल्यामुळे पावसाने ताण दिल्यास आणी हंगाम कोरडा गेल्यास मिरीच्या पिकांवर आणि शेवटी उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. त्यासाठी पाण्याची पाळी आवश्यकतेनुसार देता यावी, अशी सोय असावी. मिरीला १६ डी. सें. ते ३८ डी. सें. इतके तापमान मानवते.\nजमीन: सेंद्रिय खतांचे भरपूर प्रमाण असलेली चांगली कसदार, गाळाची आणि पोयट्याची उत्तम निचरा होणारी जमीन पिकाच्या लागवडी साठी चांगली असते. मिरीची लागवड मुख्य पीक म्हणून किंवा कॉफी, सुपारी, चहा ह्यांसारख्या पिकात मिश्रपीक म्हणून केली जाते. मिरीच्या बागा डोंगरमाथ्यावर असल्यास दक्षिणेकडील उतार सहसा टाळतात, कारण अशा भागात उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणे मिरीच्या पिकाला सहन होत नाहीत. कोकणात टेकड्यांच्या उतारावर लालसर रेताड (लॅटेराइट) जमिनीत हे पीक घेतले जाते.\n१) कारी मोराटा : ही काळी मिरी प्रकारातील जात असून वेलावर आखूड आणि वक्र घड असतात. फळे आकाराने लहान व लाल रंगाची असतात. पानांचा रंग गडद हिरवा असून वेलीवर फक्त मादीफुले असतात. वेलीवर फळे एकाच वेळी तयार होत असून मध्यम उत्पादन देणारी जात आहे.\n२) अरिसिना मोराटा : ही काळी मिरी प्रकारातील जात असून करी मोराटा जातीप्रमाणेच घड आखूड व वक्र असतात. फळे आकाराने लहान व लाल रंगाची असतात. वेलीवर सर्व मादीफुलेच असतात. ही मध्यम उत्पादन देणारी जात असून फळे एकाच वेळी तयार होतात.\n३) माली गेसारा : ही देखील काळी मिरी प्रकारातील जात असून पाने रुंद असतात. घड १० सेंमी लांब असून पक्व झालेल्या फळांचा रंग लाल असतो. वेलीवर सर्व मादीफुले असून चांगले उत्पदान देणारी जात आहे.\n४) कळू व्याली : ही जात काळी मिरीची असून पाने लाल असतात. या जातीच्या वेलीवर नर, मादी अशी दोन्ही प्रकारची फुले येतात. मलबार किनाऱ्यावर भरपूर उत्पादन देणारी जात आहे.\n५) तफीसारा : ही पांढऱ्या मिरीची जात असून पाने रुंद व घड आकाराचे असतात. या जातीच्या वेलीवर ���ोन्ही प्रकारची फुले येत असून फळे लाल रंगाची असतात. मध्यम उत्पादन देणारी जात आहे.\n६) बाकाळ मोराटा :ही पांढरी मिरी असून या जातीच्या झाडांची पाने लांब व फिक्कट हिरवी असतात. घड २० फळांचे असतात. वेलावर फक्त मादी फुले असतात. मात्र या जातीच्या मिरीच्या घडातून पक्व झालेली फळे सुटी होऊन गळून पडतात.\n७) दोडगा : ही पांढऱ्या मिरीची जात असून पाने रुंद व घड वक्र आकाराचे असतात. या जातीच्या वेलीवर दोन्ही प्रकारची फुले येत असून फळे लाल रंगाची असतात. मध्यम उत्पादन देणारी जात आहे.\nह्या जातींशिवाय केरळ राज्यात बालनकोटा, कारीमुंडा, कन्याकडन ह्या जाती लागवडीखाली आहेत. केरळमधील मिरी संशोधन केंद्र तालीपरंबा येथे चेरीयाकानियाकादन व उथीरामकोता या दोन जातींचा संकर करून पन्नीयूर -१ नावाची नवीन जात शोधून काढली आहे. पूर्ण वाढ झालेल्या ह्या जातीच्या एका वेळापासून ७ किलो मिरीचे पीक मिळते. ही जात इतर जातींपेक्षा तीन पट अधिक उत्पन्न देते. कारी, माली गेसारा इ. जाती कर्नाटक राज्यात प्रचलित आहेत. मिरीच्या वेलावर मादी फुले किंवा नरफुले आढळतात. तरीपण काही जातीच्या वेलावर दोन्ही प्रकारची फुले आढळून येतात. अशा मिरीच्या जाती अधिक उत्पन्न देतात.\nपूर्व मशागत : बागेसाठी बागेची निवड केल्यावर ३ मी. x ३ मी. अंतरावर खड्डे घेऊन त्यामध्ये आधारासाठी एप्रिल - मे महिन्यात झाडे किंवा खांब लावावे लागतात. आधार म्हणून लावावयाची झाडे सरळ आणि भरभर वाढणारी असावीत, म्हणून मिरीची नवीन बाग करण्यासाठी ददम किंवा रेशमी सावलीची झाडे लावतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यात मिश्रपीक घेतल्यास सावलीसाठी लावलेल्या सिल्वर ओकच्या झाडांचा उपयोग मिरीच्या वेलांना आधारासाठी होतो किंवा सुपारीच्या बागेत मिरीचे वेल सुपारीच्या झाडांवर सोडतात, कॉफीच्या पिकाला गर्द छायेची आवश्यकता असते, परंतु मिरीला अगदी तुरळक छाया मिळाली तरी चालते, काही वेळा झाडाशिवाय वाळलेले लाकडी खांब किंवा दगडी खांब वेलांना आधारासाठी लावतात. आधारासाठी लावलेल्या झाडाची पुर्णपणे वाढ झाल्यावर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये मिरीची लागवड करता येते. मिरीच्या वेलची लागवड दाट किंवा पातळ करणे बागायतदाराच्या मनावर आणि आवडीवर अवलंबून असते. सर्वसाधारणत: मिश्र पिकात दर हेक्टरी १७५ वेलांचे गट असता. तर स्वतंत्र बागेत हे गट दर हेक्टरी ७५० किंवा ��्याहून अधिक असतात. मिरीला आधारासाठी लावलेल्या झाडाशिवाय नैऋत्य बाजूस सुरक्षित असा झाडाचा पट्टा लावावा लागतो.\nलागवडीसाठी बियाणे : मिरीची लागवड वेलाच्या तुकड्यापासून केली जाते. हे तुकडे काढण्यासाठी फुलांत पुंकेसर व स्त्रीकेसर दोन्ही असलेले. चांगले भरघोस उत्पन्न देणारे वेल निवडावेत. फुलात पूंकेसर व स्त्रीकेसर दोन्ही असल्यास अशा वेलांना वेळेवर फुले येऊन उत्पादन चांगले येते. निवडलेल्या वेळापासून ४५ सें.मी. लांबीचे तुकडे काढावेत. पुष्कळ वेळा निवड न केलेल्या वेळापासून तुकडे काढून घेतल्यास त्यांचा उत्पन्नाव अनिष्ट परिणाम होतो. मोठ्या प्रमाणवर लागवड करावयाची असल्यास अशा प्रकारचे बियाणे एकाच वेळी उपलब्ध होऊन शकत नाही. म्हणून निवड केलेल्या वेलाचे तुकडे एका रोपवाटिकेत लावून त्याला मुळे फुटू द्यावीत आणि नंतर मोठ्या प्रमाणावर लागवड करावी.\nवेलाच्या तुकड्यापासून रोपे तयार करणे : मिरीच्या वेलाची छाटणी चालू असताना त्यातून निवडलेले बियाणे रोपवाटिकेत लावून ठेवावे. या तुकड्यांना मुळे फुटल्यानंतर ते कायम ठिकाणी लावले जाते. कायम ठिकाणी लावलेली रोपे रोपवाटिकेत कायम राखली जातात. वेलाचे तुकडे फार लांबून आणलेले असतील तर अगदी थोड्या तुकड्यांना मुळे फुटतात. हे होऊ नये, यासाठी सुरूवातीसाच निवडलेले तुकडे (छाट) ५० मिली जर्मिनेटर + १० लि. पाणी या द्रावणात बुडवूनच लागवड करावी. म्हणजे काड्यांना जारवा फुटून सर्व रोपे यशस्वीरित्या फुटतात.\nदाबकलमे करूनसुद्धा मुळे फुटलेल्या वेलाचे तुकडे काढता येतात. ही पद्धत खर्चीक असली तरी फायदेशीर असते. दाबकलमापासून लावलेले वेल लवकर फळे देण्यास सुरुवात करतात.\nबियापासून रोपे तयार करणे :मिरीची लागवड बियापासून देखील केली जाते. एप्रिल महिन्यात निवडलेल्या झाडापासून पक्व झालेली मिरीची फळे गोळा केली जातात. गोळा केलेली फळे रात्रभर भिजत ठेवतात. भिजवलेली फळे गाईच्या शेणामध्ये मिसळतात व जोराने घासतात आणि रोपवाटिकेत लावतात. रोपवाटिकेला दररोज पाणी घातले जाते. लागवडीनंतर ३० दिवसांच्या अवधीत बी उगवण्यास सुरुवात होते व पंधरा दिवसात सर्व बियांची उगवण पूर्ण होते. याशिवाय अजून खात्रीशीर उपाय म्हणून बियाणे जर्मिनेटर ३० मिली + १ लि. पाणी या द्रावणात रात्रभर बुडवून नंतर लावल्याने कमी दिवसात १००% उगवण होऊन वाढ झपा��्याने होते. अशा प्रकारे बियांपासून जुलै - ओगस्टमध्ये रोपे लागवडीस तयार होतात. अशा रितीने लागवड केलेली बाग वेगवेगळ्या प्रकारच्या वेलांची असते आणि म्हणून या पद्धतीची शिफारस लागवडीसाठी केली जात नाही.\nलागवड : मिरीच्या वेलाच्या आधारासाठी लावलेल्या झाडांच्या उत्तरेला किंवा ईशान्येला मिरीच्या लागवडीसाठी केलेल्या ४५ सेंमी x ४५ सेंमी x ५० सेंमी आकाराचे खड्डे जंगलातील मातीने अर्धवट भरून काढावेत. निवड केलेले वेलाचे तुकडे किंवा मुळे आलेले वेल एका खड्ड्यात ६ ते ७ या प्रमाणात आधारासाठी लावलेल्या झाडांच्या किंवा खांबाच्या भोवताली गोलाकार लावावेत किंवा लागवडीच्या अगोदर सात दिवस निवडक वेलाचे ३ - ४ तुकडे बांबूच्या टोपल्यात लावावे. ते चांगले वाढीस लागल्यावर बांबूची टोपली अलगद बाजूला काढून मातीसकट ३ - ४ रोपे प्रत्येक ठिकाणी लावावीत. रोपे किंवा निवडक वेलांचे तुकडे लावताना त्याबियाण्याची एक ते दोन पेरी जमिनीत गाडली जातील अशी काळजी घ्यावी. फळझाडांची लागवड करून त्याभोवती मातीचा वर्तुळाकार उंचवटा तयार करावा. त्याप्रमाणे मिरीच्या लावलेल्या तुकड्याभोवती मातीचा आधार द्यावा. लागवडीनंतर त्यावर जर्मिनेटर ३० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅमचे १० लि. पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येकी ३० ते ५० मिलीप्रमाणे द्रावणाचे ड्रेंचिंग (आळवणी) करावे. त्याने मिरीच्या वेलांची वाढ जोमात होत राहते. एक वर्षात वेलची वाढ १२० ते १५० सेमी पर्यंत होते. वेळ वाढत असताना प्रत्येक ३० सेंमी अंतरावर वेल हळूवारपणे आधारावर बांधत जावे. काही देशांमध्ये १२ ते १८ महिन्यानंतर पानावेलीची ज्याप्रमाणे उतरण (Lowering) करतात, त्याप्रमाणे मिरीच्या वेलांची उतरण करण्याची प्रथा आहे. उतरण ही आधारासाठी लावलेल्या झाडाजवळच गोलाकार गुंडाळी करून केली जाते. वेलाची उतरण केल्याने वेलांना अधिक प्रमाणात मुळे फुटून नवीन धुमारे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्यामुळे मिरीच्या उत्पादनात वाढ होते. असे काही प्रयोगांती आढळून आले आहे. अशी उतरण - पद्धत कर्नाटक राज्यात अवलंबिली जात नाही.\nआंतरमशागत : मिरीच्या वेलाची वाद साधारण ९० सें.मी. उंच होईपर्यंत त्याला कसल्याही प्रकारच्या फांद्या फुटू देत नाहीत. वेलांना फुटलेल्या आडव्या फांद्या साधारणत: जोराचा मान्सून पाऊस उतरल्यावर म्हणजे जून महिन्यानंतर काढल्या जातात. दरवर्षी मिरीच्या वेलाची वाढ साधारण: १५० सेमी इतकी होते. वर वर्णन केल्याप्रमाणे मिरीचे वेल प्रत्येक ३० सेमी अंतरावर आधाराने हळूवार बांधावेत. लागवडीनंतर साधारणत: ४ वर्षांची मिरीच्या वेलांना बहर येण्यास सुरुवात होते. मिरीच्या फळांची काढणी झाल्यावर सहसा एप्रिल महिन्यात वेलांना खत देऊन भर द्यावी. सुपारीच्या बागेत मिरीचे पीक मिश्रपीक म्हणून घेतले असेल तर सुपारीला दिलेले खत मिरीच्या वेलांना पुरेसे होते. मिरीच्या बागेतील आधाराची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. आधारासाठी लावलेल्या झाडांची वाजवी वाढ रोखण्यासाठी झाडांचे शेंडे ठराविक उंचीवर मोडावेत. तसेच वेलांची वाजवी वाढ रोखण्यासाठी वेलांचे शेंडेदेखील ठराविक उंचीला तोडावेत. त्यामुळे फळे काढणे सोपे जाते. अर्थात ही कामे वेलाची फळे काढून झाल्यावर करावीत.\nखते : पालापाचोळा आणि चांगले कुजलेले शेणखत समप्रमाणात मिसळून प्रत्येक वेलाला साधारणत: ५ किली आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात दरवर्षी दोन हप्त्यात द्यावे. तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत मिरीच्या वेलांना नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण वरखतांच्या द्वारे दिले जाते.\nरोग आणि कीड :\nपोलू भुंगा किंवा फळे पोखरणारी अळी : पक्व झालेल्या फळांना भोके पाडून ही अळी फळातील गर खाते आणि त्यामुळे फळ पोकळ राहते. हा अतिशय छोटा किटक असून त्याची मादी घडातील पोकळीत अंडी घालते. ह्या किडीमुळे मिरीचे ३० ते ४०% नुकसान होते.\nउपाय : ही कीड पडू नये म्हणून बाग अगदी स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक असते. बागेत स्वच्छता ठेवल्याने कोशावस्थेत असणाऱ्या किटकांचा सहजासहजी नाश होतो. तसेच प्रोटेक्टंट आणि कार्बारिल किंवा २:२:५० च्या बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.\nमर रोग : हा दोन प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे. एका प्रकारात वेलाची मुळे कुजतात, त्यानंतर हळूहळू पाने पिवळी पडून गळतात व वेल मरतो दुसऱ्या प्रकारात ३० सें.मी. उंची वर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्या ठिकाणी वेलीची साल फुटते, पाने पिवळी पडून गळतात व वेल मरतो.\nउपाय : जर्मिनेटर ३० मिली + कॉपर ऑक्झिक्लोराईड २० ग्रॅमचे १० लिटर पाण्यात द्रावण तयार करून वेलीच्या मुळांना द्यावे. तसेच रोग प्रतिबंधक जात लावावी.\nवरील रोगाशिवाय धान्याची कीड, सिगारेट कीड आणि अशाच प्रकारच्या काही किडीचा मिरीवर प���रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी स्वच्छ आणि हवेशीर जागेत मिरीची साठवण करावी.\nकीड, रोगमुक्त मिरीच्या जोमदार वाढीसाठी उत्पादन सुरू होईपर्यंत पहिले तीन वर्षे खालील प्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात.\n१) पहिली फवारणी : (जूनमध्ये) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ते २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : (जुलैमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम+ १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (ऑगस्टमध्ये) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम. + २०० लि.पाणी.\n३ वर्षानंतर उत्पादन चालू होऊन अधिक मिळण्यासाठी वरील फवारण्या घेत असताना दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत राईपनर आणि न्युट्राटोन अनुक्रमे ५००,७५० मिलीप्रमाणे वापरावे. तसेच सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान चौथी फवारणी थ्राईवर ७५० मिली, क्रॉपशाईनर ७५० मिली, राईपनर ७५० मिली, न्युट्राटोन ७५० मिली, २५० लि. पाणी या प्रमाणात करावी. बहार लवकर घ्यावयाचा असल्यास एप्रिलपासून एक - एक महिन्याच्या अंतराने फवारण्या घेतल्या तरी चालते.\nकाढणी : मिरीच्या वेलाला साधारणत: तिसऱ्या वर्षापासून फुले येण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर मान्सूनचा जोराचा पाऊस संपल्यावर जून महिन्यात वेलांच्या आडव्या फांद्याला घड येण्यास सुरुवात होते. ४ वर्षापासून मिरीचे फळे निघावयास सुरुवात होते. तरी पण पाचव्या अगर सहाव्या वर्षी मिरीच्या वेलापासून भरघोस उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. सपाटीवर मिरी काढणीचा हंगाम नोव्हेंबरपासून फेबुवारीपर्यंत असतो. तर डोंगराळ भागामध्ये मिरी काढणीचा हंगाम जानेवारीपासून मार्च महिन्यापर्यंत असतो. पक्व झालेल्या मिरीच्या फळाचा रंग गर्द नारंगी किंवा भडक लाल असतो. फळे काढण्यासाठी बऱ्याच वेळा शिडीचा वापर केला जातो. फळे काढताना प्रत्येक घड वेगवेगळा केला जातो. मिरीचे घड पक्व होण्यापूर्वी काढून ८ ते १० दिवसापर्यंत उन्हात वाळविले जातात. पांढरी मिरी मात्र पक्व झालेलीच काढली जाते. पांढऱ्या मिरीची टरफले पक्व झाल्यावर हाताने सहज निघू शकतात. मिरीची काढणी झाल्यावर सर्व घड खळ्यावर किंवा परसात गोळा करून हाताने चोळून किंवा पायाखाली तुडवून मिरीची फळे सुटी केली जातात. नंतर फळे ५ ते १० दिवसांपर्यंत उन्हात वाळविली जातात. त्या काळात बाहेरची साल काळी पडून सुरकुतते आणि हीच काळी मिरी बाजारात विक्रीला येते.\nपांढरी मिरी : पांढऱ्या मिरीचे पक्व झालेले घड अंगणात आणून १ - २ दिवस ढीग करून ठेवतात. ह्या काळात सर्व घड पिवळसर होतात. देठापासून फळे मोकळी केल्यावर एक रात्रभर पाण्यात भिजत ठेवतात. भिजलेली मिरी आकसून ती काही प्रमाणात बुरसटते. अशावेळी बाहेरील साल सहजासहजी काढता येते. म्हणून अशी मिरीची फळे परत पाण्यात टाकून हाताने चोळावीत. काही वेळानंतर मिरीच्या फळांची बाहेरील साल निघून जाते आणि पांढरी मिरी दिसू लागते. अशी फळे परत उन्हात ५ ते १० दिवसांपर्यंत वाळवावीत अशी प्रक्रिया करून तयार झालेली मिरी बाजारात येते आणि तिलाच 'पांढरी मिरी' असे म्हणतात.\nउत्पादन : निरनिराळ्या भागातील जमीन आणि तिचा पोत, हंगामी पाऊस, लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती, मिरीच्या वेगवेगळ्या जाती आणि वेलांचे वय ह्यावर मिरीचे उत्पादन अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या वेलापासून प्रत्येकी ९०० ते ११०० ग्रॅम इतके वाळलेल्या मिरीचे उत्पादन मिळू शकते. स्वतंत्र बागेतील मिरीच्या उत्पादनापेक्षा परसातील फणसासारख्या झाडाजवळ लागवड केलेल्या मिरीच्या वेलाचे उत्पादन अधिक येते. अशा मिरीच्या वेलापासून कधी - कधी ३ किलो उत्पादन येऊ शकते. काही भागामध्ये ३.६ x ३.६ मीटर अंतरावर एका हेक्टरमध्ये ७५० मिरीचे वेल असतात. त्यापासून ३५० ते १७५० किलो वाळलेल्या मिरीचे उत्पादन झाल्याचे आढळून आले आहे. वेलावरून काढलेल्या मिरीचे वजन वाळविल्यानंतर केवळ २५ टक्के घटते. म्हणजे १०० किलोपासून ७५ किलो वाळलेली मिरी मिळू शकते. चांगला वाढलेला मिरीचा बाग २० वर्षांपर्यंत चांगले उत्पादन देऊ शकतो.\nउपयोग : निरनिराळ्या चटण्या आणि आमटीत मिरीचा उपयोग करतात. ट्रायमोडसारखी अनेक औषधे तयार करण्यात मिरी वापरतात. अल्कलॉइड , पिपरेन आणि रोझीन तयार करण्यात मिरीचा वापर केला जातो. मिरीमध्ये तिखटपणा त्यातील रेझीनमुळे येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-reading-culture-Notable/", "date_download": "2019-03-25T08:05:29Z", "digest": "sha1:JYK2CTGPASL3LBKSNUPF6OQCZXTEOP2T", "length": 8407, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ध्��ेयवेडा तरुण चालवतोय ‘वाचनकट्टा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ध्येयवेडा तरुण चालवतोय ‘वाचनकट्टा\nध्येयवेडा तरुण चालवतोय ‘वाचनकट्टा\n’बेळगाव : संदीप तारीहाळकर\nमणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील हरहुन्नरी, वाचनवेडा तरूण युवराज सतबा कदम याची वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अन विस्तारासाठी सुरू असलेली धडपड लक्षवेधी आहे. 2012 साली कोल्हापूर येथे विनामोबदला सुरू केलेला उपक्रम पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातार्यात पोहचला आहे. या उपक्रमाचे कौतुक महाराष्ट्रभर होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आवारात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते या वाचनकट्ट्याला प्रारंभ करण्यात आला. या माध्यमातून शेकडो शाळा, महाविद्यायातील वाचन चळवळीसाठी जागर सुरू आहे. शिवाजी विद्यापीठ आवारातील वाचनकट्टट्याचा परिघ आता सीमाभागासह चंदगडपर्यंत विस्तारू लागला आहे. आतापर्यंत सांगली, सातार्यासह इतर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.\n‘दादांची पुस्तक बॅग’ या उपक्रमांतर्गत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. अशा एकूण 5 बॅग असून प्रत्येक बॅगमध्ये शंभरहून अधिक पुस्तके आहेत. ही बॅग पंधरवड्यापर्यंत एकाच शाळेत ठेवली जाते. दरम्यानच्या काळात थोर चरित्रावर संवाद तसेच मनोरंजनात्मक कथांवर चर्चा केली जाते. सामाजिक भान जपत तरुणाई सर्जनशिलता व्हावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा याबरोबरच भाषासंवर्धनही व्हावे, हा उद्देश ठेवून सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रा.चंद्रकुमार नलगे, डॉ. सुनीलकुमार लव्हटे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ.विनोद कांबळे, प्रा. अनुराधा गुरव, कृष्णात खोत, राजन गवस, डॉ. बी. एम. हिर्डेकर, सोनाली नवांगुळ, सुप्रिया वकील, नीलांबरी कुलकर्णी, हेमा गंगातीरकर, गोविंद गोडबोले हे मान्यवर लेखक, कादंबरीकार विनामोबदला वाचनकट्ट्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वाचकांशी संवाद साधत आहेत.\nयंदा 12 जानेवारी ते 15 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत वाचन चळवळीसाठी दुर्गम भागातील 5 शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळांत काव्यमैफल, एका पुस्तकावर मतमतांतरे घेतली जातात. पंधरवड्यातून एकदा लेखक वा कवींची थेट भेट घडविली जाते. या उपक्रमाचा लाभ आजपर्यंत किमान 15 हजार विद्यार्थ्यांना झाला आहे. यातून अनेक विद्यार्थी वाचन संस्कारीत झाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वृ���्दिंगत झाला आहे. युवराज कदम यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मणगुत्ती येथेच झाले. हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत हॉटेलमधून काम करून उच्च शिक्षण पूर्ण केले. या प्रवासात कोल्हापूरस्थित कै. मंगल चंद्रकांत कागिणकर यांची प्रेरणा लाभली आहे. बालपणी स्वत:च्या घरी काही महिने बहीण, वडिलांबरोबर ग्रंथवाचन होत असे. त्यातूनच युवराज याने हा संकल्प तडीस नेला आहे.\nमनपाच्या 5 महिन्यांच्या खर्चाला मंजुरी\nविभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे\nपोक्सो आरोपातून निर्दोष मुक्तता\nतर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा घसरणार\nमोदगा ग्रा. पं. उपध्यक्षांवर कारवाई करा\nमराठी भाषिकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा‘कर’नाटकी डाव\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Decrease-in-industrial-production-in-the-country/", "date_download": "2019-03-25T07:45:56Z", "digest": "sha1:BBZ65ZK6WY4Z23NWDCZDGOQRPXCHMUTZ", "length": 6499, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशातील औद्योगिक उत्पादनात घट? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › देशातील औद्योगिक उत्पादनात घट\nदेशातील औद्योगिक उत्पादनात घट\nकोल्हापूर : विशेष प्रतिनीधी\nभारतात अपुरा भांडवल पुरवठा आणि व्याजदर वाढीमुळे औद्योगिक उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीतून औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे बाहेर येण्याच्या मार्गावर असतानाच महाग भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भांडवल पुरवठा वाढला नाही तर आगामी काळातही औद्योगिक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (अॅसोचेम) या देशातील व्यापार क्षेत्रातील शिखर संस्थेने वर्तविली आहे.\nदेशात मे महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 3.2 टक्क्यांनी वाढले आहे. हा 7 महिन्यांचा नीचांक आहे. या महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता ���रीच घसरली आहे. एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादन 4.8 टक्क्यांनी वाढले होते. तर गेल्यावर्षी मे महिन्यात औद्योगिक उत्पादन 2.9 टक्क्यांनी वाढले होते. यावर्षी एप्रिल ते मे या काळात औद्योगिक उत्पादन 4.4 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी या काळात औद्योगिक उत्पादन 3.1 टक्क्यांनी वाढले होते. मे महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.8 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी या क्षेत्राची उत्पादकता 2.6 टक्क्यांनी वाढली होती. ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 5.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. मे महिन्यात सर्वात खराब कामगिरी ग्राहक वस्तू क्षेत्राने केली आहे. याकडे ‘अॅसोचेम’ने लक्ष वेधले आहे.\nउद्योग क्षेत्राला अगोदरच भांडवलाचा पुरवठा कमी होत होता. बँका अडचणीत असल्यामुळे आणखी भांडवलाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भांडवल पुरवठ्याच्या अभावामुळे औद्योगिक उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या क्षेत्रातून तुलनेने कमी रोजगार निर्मिती होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असल्याचे औद्योगिक संघटनांचे मत आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-dark-places-where-crime-are-happening/", "date_download": "2019-03-25T07:43:07Z", "digest": "sha1:YU3YAFGAI3JS4Z44SAIHCPLB477E5K7W", "length": 6006, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेमीयुगुलांचे चाळे, ओपन बार, दडपलेल्या गुन्ह्यांसह काहीही... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्रेमीयुगुलांचे चाळे, ओपन बार, दडपलेल्या गुन्ह्यांसह काहीही...\nप्रेमीयुगुलांचे चाळे, ओपन बार, दडपलेल्या गुन्ह्यांसह काहीही...\nगिरगाव, मोरेवाडीसह कात्यायणी, शेंडा पार्क शहराच्या दक्षिणेकडे विस्तारणारा परिसर, अलीकडच्या काळात दाट नागरी वस्त्यांचा घटक बनतो आहे. टोलेजंग इमारतीमुळे परिसराचं काहीसं रूपडं बदलत असलं तरी उपनगरालगतची निर्जन ठिकाणे, माळरानासह झाडा- झुडपांनी वेढलेला डोंगराळ भाग धोकादायक बनू लागला आहे. प्रेमीयुगुलांचे चाळे, ओपन बार, लूटमारीसह गंभीर गुन्ह्यांतील पुरावे दडपण्यासाठी निर्जन ठिकाणांचा वापर होऊ लागला आहे. किंबहुना निर्जन परिसर समाजकंटकांच्या हालचालींची केंद्रे बनू लागली आहेत.\nउजळाईवाडी विमानतळालगत खणीसह मोरेवाडी येथील चित्रनगरीच्या पिछाडीस माळरानावर विहिरीत दोन मृतदेह आढळून आले. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील नामचिन गुन्हेगार लहू ढेकणेने उचगावातील एका निष्पापाचा मुंडके तोडून अमानुष खून केला. विद्यापीठ परिसरासह शेंडापार्क, गिरगाव मार्गावर भामट्या पोलिसाने तीसवर वाहनधारकांना शस्त्रांचा धाकावर लुटले. प्रेमीयुगुलांचा अड्डा बनलेल्या परिसरातील अनेक निर्जन ठिकाणावर लुटारू टोळ्यांचा तळ पडलेला दिसून येतो.\nमोरेवाडीतील स्मशानभूमी, चित्रनगरीची पूर्व बाजू, शेंडापार्क, कात्यायनी परिसरातील निर्जन ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रेमीयुगुलांचा तळ पडलेला असतो. झाडा-झुडपांच्या आडोशाला इष्कात बुडालेल्या युगुलांना मारहाण करून त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. किंबहुना तरुणींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बळजबरीचाही प्रयत्न होत असल्याच्या घटना घडताहेत. बदनामीच्या धास्तीने या घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्याचा गैरफायदा घेत सराईत टोळ्या आणखीन सोकावू लागल्या आहेत.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-shiv-sena-protest-on-cpr/", "date_download": "2019-03-25T07:45:30Z", "digest": "sha1:TEIDZTEATK3WO7Y3AP6WMRIJWRDXBQSB", "length": 6455, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेचा सीपीआरवर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिवसेनेचा सीपीआरवर मोर्चा\nराजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सात वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या केल्याने सीपीआरमधील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे, असा आरोप करत शिवसेनेच्या वतीने मंगळवारी सीपीआरवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीवर चढविले.\nयेथील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जरी, मेडिसीन, ए.एन.टी, त्वचा रोग, रिडियालॉजी, औषध शास्त्र, बालरोग आदी विभागांतील वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे महिन्याभरापासून सीपीआरमधील वैद्यकीय सेवा कोलमडू लागली आहे. काही चुतुर्थश्रेणी कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर यांची येथे मनमानी वाढली आहे. याचा विपरित परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. सात दिवसांत सीपीआरमधील समस्यांची परिपूर्ण माहिती द्या, अधिवेशनात आवाज उठवू, असे आ. क्षीरसागर यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना सांगितले.\nआ. क्षीरसागर म्हणाले, दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी सीपीआरला गतवैभव प्राप्त करून दिल्याने रुग्णालयाच्या लौकिकात भर पडली आहे. मध्यंतरी विविध कारणांमुळे रुग्णालय डबघाईला आले होते. साडेतीन ते चार वर्षांपासून आम्ही लोकप्रतिनिधींनी शासकीय पातळीवर निधी आणि तज्ज्ञ डॉक्टर येथे आणले. त्यामुळे रुग्णालयाची डागाळलेली प्रतिमा सुधारली.\nकोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक शासकीय दवाखान्यांतील डॉक्टर खासगी व्यवसाय करत आहेत. मग कोल्हापूरला वेगळा नियम का, असा प्रश्न देखील आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला. बोगस पदवी घेऊन अनेक रुग्णांचा जीवन घेणारा न्युरो सर्जन डॉक्टर कौस्तुभ वाईक याच्यावर कारवाईला इतका उशीर का त्याच्यावर त्वरित कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी केली.\nयावेळी युवा सेनेचे पियुष चव्हाण, जयवंत हारूगले, विश्वजित साळोखे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे, पद्माकर कापसे, अजित गायकवाड, पूजा भोर, मंगल साळोखे आदी उपस्थित होते.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्���ेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/For-upgradation-of-Gurgoind-Singhji-Stadium-the-Central-Government-has-spent-Rs-67-crores/", "date_download": "2019-03-25T07:43:38Z", "digest": "sha1:GPCPAGDULFPBEIOUZPWVWPPMDFIPTBAX", "length": 5392, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमसाठी केंद्राकडून ६७ कोटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमसाठी केंद्राकडून ६७ कोटी\nगुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमसाठी केंद्राकडून ६७ कोटी\nश्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने नांदेड येथे प्रस्तावित केलेल्या स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि अध्यासन संकुलाच्या इमारतीसाठी केंद्र सरकारकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nश्री गुरूगोविंदसिंहजी यांचे 350 वी जयंती गेल्या वर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली होती. श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राची इमारत बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.\nया पाठपुराव्यास यश मिळाले असून या स्टेडिअमच्या आधुनिकीकरणासाठी 45 कोटी आणि श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी 22 कोटी रुपये असा एकूण 67 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या विभागाचे राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. शर्मा यांचे आभार मानले आहेत.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/I-will-not-contest-the-Lok-Sabha-says-Vishwajeet-Kadam/", "date_download": "2019-03-25T08:09:01Z", "digest": "sha1:FKE7B3I6UUTPSZ737E2B4C5XXXBVEHKH", "length": 7439, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मी लोकसभा लढणार नाही : डॉ. विश्वजित कदम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मी लोकसभा लढणार नाही : डॉ. विश्वजित कदम\nमी लोकसभा लढणार नाही : डॉ. विश्वजित कदम\nपलूस-कडेगाव मतदारसंघातच मी पूर्णपणे लक्ष दिले आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणूकच लढणार आहे. कोणी कितीही चर्चा केली तरीही मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे स्पष्ट मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. लोकसभेसाठी अन्य इच्छुकांना शुभेच्छा आहेत. त्यांच्यासाठी पूर्ण ताकद लावू, असे ते म्हणाले.\nडॉ. कदम म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पंतगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यादृष्टीने मी मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. येथील जनतेला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये याची दक्षता मी घेणार आहे. त्यामुळे याच विधानसभा मतदारसंघाचाच पूर्ण विचार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीबाबत विचारता ते म्हणाले, मी ही निवडणूक अजिबात लढविणार नाही. तशी चर्चा केली जात असले तर त्याला अर्थ नाही. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत कधीच विचार केला नाही. काँग्रेसकडे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहेत. पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने आणि समन्वयाने लढविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.\nते म्हणाले, भाजपसारख्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे हे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आगामी न���वडणुकांमध्ये पक्षाचे वरिष्ठ तसेच स्थानिक नेते एकवटतील. येथे भाजपचे यश ही आमच्यातीलच उणिवांमुळे आलेली सूज आहे. आम्ही एकदिलाने पूर्ण ताकद लावल्यास भाजपला याठिकाणी यश मिळणार नाही.\nडॉ. कदम म्हणाले, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी आगामी सर्व निवडणुकांसाठी एक कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येकठिकाणी सक्रीय राहणार आहे. येथे जास्तीत जास्त काँग्रेस उमेदवार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कसे विजयी होतील, यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी माझ्यापरीने काहीच कमी पडू देणार नाही,\nडॉ. कदम म्हणाले, नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीतील पराभवाने बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. या निवडणुकीतील चुकांची पुनुरावृत्ती टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीबाबतचा निर्णय हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा आहे. महापालिका निवडणुकीत आघाडी करताना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचा पर्याय काढला, तो तोट्याचा ठरला. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी भविष्यात टाळता येऊ शकतात. याचा विचार होईल.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Due-to-inefficiency-of-the-government-farmers-are-ruined/", "date_download": "2019-03-25T07:44:42Z", "digest": "sha1:JOABQ6IMUYPADHXFQ66D6FQX37ZCTVCW", "length": 7236, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारच्या निष्क्रियतेमुळेच शेतकरी उद्ध्वस्त : चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सरकारच्या निष्क्रियतेमुळेच शेतकरी उद्ध्वस्त : चव्हाण\nसरकारच्या निष्क्रियतेमुळेच शेतकरी उद्ध्वस्त : चव्हाण\nभाजप सरकारच्या शेतकर्यांविषयी असलेल्या उदासीन धोरणामुळे शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकर्यांची दयनिय अवस्था झाली असून सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे�� शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.आ. पृथ्वीराज चव्हाण हे शनिवारी एका कार्यक्रमासाठी सोलापूरला आले होते. यावेळी त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.\nयावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारच्या राजवटीतच राज्यातील शेतकरी हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही. दुधाचा व्यवसायही सरकार मोडीत काढू पाहतयं.कधी नव्हती इतकी बिकट अवस्था राज्यातील बळीराजाची झाली असून शेतकर्यांच्या आत्महत्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. जगाच्या पोशिंद्याची अशी अवस्था करणार्या सरकारला जनता कधीच माफ करणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.\nराज्यात सध्या भाजपाकडे एकहाती सत्ता आहे. तरीदेखील राज्यात विकासकामे करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री नुसत्याच घोषणा करीत सुटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: कितीही पारदर्शी असल्याचा कांगावा करीत असले तरी त्यांच्या पारदर्शीपणाचा चेहरा महाराष्ट्राने ओळखला आहे.त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांची चौकशी न करताच त्यांना क्लिन चिट दिली जात आहे. या सर्व भ्रष्ट मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी झाली तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी टीका यावेळी चव्हाण यांनी केली.\nयावेळी खा. कुमार केतकर, आ. गणपतराव देशमुख, आ. सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, विश्वनाथ चाकोते, निर्मलाताई ठोकळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कल्याणराव काळे, नगरसेवक बाबा मिस्त्री, शिवा बाटलीवाला, प्रवीण निकाळजे, गटनेते चेतन नरूटे, प्रवीण देशपांडे, महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी महापौर अलका राठोड, जयश्री माने, पृथ्वीराज माने आदी मान्यवर उपस्थित होते.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आ���के स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-aggressive-on-mlc-prashant-paricharak-suspension-cancellation/", "date_download": "2019-03-25T08:05:48Z", "digest": "sha1:MPFU7K2MXVGDY6HRXIKG6V62M6IUCT5Z", "length": 6318, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आ परिचारकांचे निलंबन मागे घेतल्याने शिवसेना आक्रमक", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nआ परिचारकांचे निलंबन मागे घेतल्याने शिवसेना आक्रमक\nमुंबई: सीमेवरील सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे काल निलंबन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. आज विधिमंडळ सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर शिवसेना आमदारांनी परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.\nजिल्हा परिषद निवडणुकीवेळी पंढरपूरमधील भोसे येथे बोलताना प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर चारी बाजूने टीका होवू लागल्याने दीड वर्षासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, सत्ताधारी भाजपशी असणाऱ्या जवळीमुळे काल त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.\nमहापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.\n“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. ��्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nराम मंदिर वादावर कोर्टातून तोडगा अशक्य: श्री श्री रविशंकर\nदहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात अनोख्या पद्धतीने स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/bigg-boss-marathi-teaser/", "date_download": "2019-03-25T08:01:43Z", "digest": "sha1:FL47ZWTTY74MYKTPP2IM5VSWLERCG6IW", "length": 1812, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Bigg Boss Marathi Teaser - मराठी कलाकार", "raw_content": "\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/aha-to-kshan-anandacha/", "date_download": "2019-03-25T07:44:08Z", "digest": "sha1:AG2DIEUN6TUQIBGBATZ7X4YA45QSCYZ5", "length": 20755, "nlines": 235, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nअहा तो क्षण आनंदाचा\nदिवा दुचाकीला नसावा, व्हावा अंधार\nतसेच रस्त्याने निघावे होऊनिया स्वार\nघराजवळ अगदी दिसावा समोर पोलीस\nपाय लटपटावे व्हावे उरामध्ये धस्स\nकचऱ्याची गाडी आडवी तेवढ्यात यावी\nत्या निमिषार्धात दुचाकी आपण वळवावी\nयोगायोगाने करावा भंग अरिष्टाचा\nछोटा पण मोठा, अहा तो क्षण आनंदाचा\nअनोळखी कोणी प्रवासी समोर बसलेला\nवाचनात होता रसिक तो गढून गेलेला\nम्हणत \"छान छान\" त्याने वर केली मान\nअति आनंदाने जाहला क्षणभर बेभान\nबघत राहिलो मी ��्याकडे सहज कौतुकाने\nओळख नसताही म्हणे तो मज आवेगाने\n\"अति सुंदर कविता, अहाहा आवडली मजला\"\nम्हणत मासिकाचा खुणेसह अंक पुढे केला\nविस्मित मी झालो टाकिता पानावर दृष्टी\nकविता माझीच त्याला आवडली होती\nबघत राहिला तो माझिया भाव मुखावरचे\nकौतुक मी केले तयाच्या काव्यरसिकतेचे\nअनाहूत त्याचा ऐकुनी खरा अभिप्राय\nशब्दात न मावे वाटले मनामधे काय\nत्यास कसे सांगू मीच त्या लेखक काव्याचा\nमुकी करी वाचा, अहा तो क्षण आनंदाचा\nकधी न जाणारा निघालो मी बाजारात\n'चला तुम्ही संगे' लाडका 'घरात'ला हट्ट.\nखिशामध्ये रुपये मोजके वीस पंचवीस\nपातळ पत्नीला घ्यायचे उंची फर्मास\nदुकानात जाता पुढे ये ढीग पातळांचा\nक्षण दो क्षण माझ्या उडाला गोंधळ नजरेचा\nहासत पत्नीने खुणविले, 'निवड करा नीट'\nघडी एक हाती घेतली मीहि भीत भीत.\nआवडला तिजला त्याचा पोत, पदर, रंग\nकिमतीतही नाही जाहला मुळी मनोभंग.\n'बांधा' मी म्हटले मोजले रुपयेही वीस\nओसंडत होता प्रियेच्या वदनावर हर्ष.\nपायपीट नाही न चर्चा नच घासाघीस\nअनुभविले मी या जीवनी अद्भुत सत्यास\nसंयम सूज्ञपणा मनाला रुचला पत्नीचा\nदुर्मिळ संसारी, अहा तो क्षण आनंदाचा\nबेसुमार होती उसळली गर्दी 'जनते'ला\nकशीबशी जागा मिळाली उभी राहण्याला.\nपगारात बढती, मिळाली जागाही वरची\nवार्ता कळलेली 'लाडकी' प्रसूत झाल्याची.\nस्वाभाविक होती आमुची खुशीमधे स्वारी\nम्हणुनि आडवारी पुण्याची होती ही वारी.\n'कर्जतला घ्यावा वडा अन् चिवडा चवदार'\nविचार हा माझा जिभेला आवडला फार\n'गर्दी ही असली, डबा हा कुठे थांबणार\nचिंतेने मी या उगीचच झालो बेजार.\nधडाधडा तोच निघुनिया बदलापूर गेले\nअन् बघता बघता पुसट ते नेरळही झाले\nमंदावत वेग थांबली गाडी कर्जतला\nडब्यापुढे अगदी चहाचा stall हसत आला.\nखांद्यावर पडला अचानक मित्राचा हात\nचहा न चिवड्याला मिळाली स्नेहाची साथ.\nविसरू मी केवी, अहा, तो क्षण आनंदाचा\nघडो प्रवास असा नेहमी पुण्या मुंबईचा\nसुट्टीच्या दिवशी जाहला हूडपणा काही\nरागाला आली लाडक्या लेकावर आई.\nलागे सोसावा कोवळ्या कोम्भाला मार\nआजीने सुद्धा घेतला नाही कैवार.\nमानी बाळाच्या जिव्हारी गेला अपमान\nवदनचंद्र झाला त्याचा क्षणार्धात म्लान.\nआणि सुरु झाला अबोला माय लेकरात\nरुसून बसला तो चिमुरडा दूर कोपऱ्यात.\nघरात सगळ्यांनी तयाची केली मनधरणी\nशरण हवी होती यावया त्याला प्रिय जननी.\nजननीही मानी न सोड��� ती अपुला पीळ\nतुटत जरी होते आतडे आतुनी तीळतीळ.\nशब्द न बोले न घेई अन्नाचा घास\nआईला घडला मुलाच्या संगे उपवास.\nझोपी ते गेले शेवटी कंटाळून सोने\nपदराच्या खाली घेतले ओढून आईने.\nसरे रात्र काळी, उघडता चिमण्याने डोळे\nहोते आईने त्याला हृदयाशी धरले.\nओसरला राग, अबोला दूर पळुनि गेला\nघट्ट आणखी ते बिलगले फूल माउलीला.\nकढत आसवांनी घातले गालांना न्हाऊ\nभुकेजल्या तान्ह्या मिळाला गोड गोड खाऊ.\nसाउली न जेथे फिरकते पापातापाची\nअनुपम सौख्याची मिठी ती मायलेकरांची.\nलोभ जयासाठी धरावा पुढल्या जन्माचा\nबाळपणामधला, अहा तो क्षण आनंदाचा\nमेघ गडगडावे, सुटावा जोराचा वारा\nआणि सुरु व्हाव्या नभातुन टपटप जलधारा\nजलधारांसंगे पडाव्या सडासडा गारा\nभूवर गगनाने करावा हर्षाचा मारा.\nआत आणि शांत असावी आई झोपेत\nवडील त्या दिवशी सुदैवे घरी नसावेत.\nसाधावी संधी, पळावे धूम अंगणात\nवेचाव्या गारा होऊनी चिंब पावसात.\nआणि सौंगड्यांची भोवती जमवावी सेना\n'बिया अमृताच्या' वाटुनी द्याव्या सगळ्यांना.\nघटकाभर यावे न काही विघ्न अनुभवास\nआणि टिकावा तो आगळा ओला उल्हास.\nदेवांनी हेवा करावा स्वर्गातही ज्याचा\nबालपणामधला, अहा तो क्षण आनंदाचा\nबोलभांड स्त्रीच्या जिभेचा अखंड भडीमार\nतशी पावसाची सारखी सुरु मुसळधार.\nकंटाळुनी यावे दुपारी कामावरून घरी\nअर्धागीचीही असावी खुशीमधे स्वारी\nचहा, शिरा, पोहे भराभर न सांगता व्हावे\nएकांताचा त्या कराया भंग न कुणी यावे\nस्मृतीत कोरावा अहा, तो क्षण आनंदाचा\nमजला आताशा न येतो राग पावसाचा \nराग वरिष्ठाचा अचानक कचेरीत व्हावा\nआणि घरी येत उगीचच पत्नीचा रुसवा.\nकंटाळुनी जावे कुठे तरी फिरावया दूर\nजिथे जगाची या मुळी ना कटकट कुरकूर.\nशरदऋतु मधली असावी ती सायंकाळ\nअनंत रंगांनी असावे नटले आभाळ.\nबघुनी निसर्गाचा रम्य तो विलास रंगांचा\nलोप सहज व्हावा मनातिल दु:खतरंगांचा.\nसाक्षात्कारच तो म्हणावा का न ईश्वराचा\nस्मृतीत कोरावा अहा तो क्षण आनंदाचा\nसमारंभ होता कुणातरी मित्राच्या सदनी\nजमलेल्या तेथे कितितरी रसिक तरुण रमणी.\nलावण्याचे ते पाहुनी विलास रसरंग\nरसिक लोचनांचे धावले रसलोलुप भृंग.\nआकर्षक वसने आकृती त्यातून रेखीव\nएक एक उमले तडागी प्रसन्न राजीव.\nनिवांत अवकाशी कुणितरी छेडावे सूर\nत्या स्वरलहरींनी भिजावे हृदयाचे तीर.\nअसेच काहीतरी माझिया वृत्तींना झाले\nया जड जगता��्या पलिकडे चित्त उडुनि गेले.\nकिती तरी वेळ उभा मी तटस्थ बेभान\nदृश्याने एका वेधिले अवचित अवधान.\nलगबगीने वेगे पातली आतुनि कुणि नारी\nभरली डोळ्यात आकृती तिची पाठमोरी.\nपदर बांधलेला चपलता संयम जणु शिकली\nकळी मोगऱ्याची अंबरामधली लुकलुकली.\nदुरून दिसले की असावा सावळाच रंग\nझेपावू लागे मनाचा उगीच सारंग.\nतोच सुबक हसरे वळविले वदन तिने अपुले\nआणि हाय माझे क्षणातच अधोवदन झाले\nआवडली मजला, जिच्यावर झालो मी लुब्ध\nहोती ती माझी लाडकी अर्धांगी मुग्ध\nभाव अंतरात उसळला क्षणभर लज्जेचा\nअनपेक्षित तरीही, अहा तो क्षण आनंदाचा\nदूर नदीकाठी रम्य ते विशाल उद्यान\nसहलीस्तव गेलो मुलांना तेथे घेऊन.\nमखमल गवताची हासरी चहूकडे होती\nउत्सुक वाराही कराया रसिकांशी मैत्री.\nसुबक वृक्ष वेली, सुरस ते सृष्टीचे ग्रंथ\nपुष्प एक एक उमलते मृदुल भावगीत.\nकळ्या गुलाबाच्या देखण्या एका कुंजात\nबघुनि लुब्ध झाले अमुचे नेत्र आणि चित्त.\nकाम करीत होता कुणितरी माळी मातीत\nखुरपे हातात, स्नेह पण त्याच्या डोळ्यात.\nओळखला त्याने अमुच्या भाव अंतरीचा\nदे तोडूनि आम्हा गेंद तो गुलाब कलिकांचा.\nक्षणात बाळांच्या मुखांचे गुलाबही फुलले\nफुले फुलांपाशी दृष्य ते नैसर्गिक गमले.\nस्मरता केव्हांही, अहा तो क्षण आनंदाचा,\nबोथटतो दाह जगातील कंटक शल्यांचा\nठरलेल्या वेळी बहुधा रोज भेटणारी\nहसऱ्या नजरेने खुबीने ओळख देणारी\n'बस'मध्ये बाला शिरावी मोहक सुकुमारी\n'सीट' एक 'खाली' असावी आपुल्या शेजारी.\nखेटुनिया अगदी बसावा सुखद पुष्पगेंद\nक्षणभर विसरावे जगाला, मन व्हावे धुंद.\nहलत्या गाडीत स्पर्श तो कलत्या कायेचा\nचुळबुळ दोघांची, अहा तो क्षण आनंदाचा\nपुरणा वरणाचा असावा घरामधे बेत\nअभ्यासामध्ये कसे मग लागावे चित्त\nबुडवावी शाळा मनाला मोह असा व्हावा\nपरंतु आईला कसा हा मार्ग मानवावा\nबळेच शाळेला निघावे, मनात चडफडुनी\nआणि दहा वेळा बघावे मागे फिरफिरुनी.\nपाउल शाळेत ठेविता चमत्कार व्हावा\nफलक लाविलेला दारी ठळक दिसुनि यावा.\n'क्रीडास्पर्धेत अपुला क्रमांक ये पहिला\nआनंदासाठी आज त्या सुट्टी शाळेला\nपळत घरी यावे दूर ते दप्तर फेकावे\nअन् आनंदाने थयथया घरभर नाचावे.\nआणि भोजनाचा काय मग वर्णावा थाट\nअशा प्रसंगांचा जिभेला येईल का वीट\nथोरपणीसुद्धा मनावर उरे ठसा ज्याचा\nबालपणामधला, अहा तो क्षण आनंदाचा\nनुक्ती झालेली सुदैवे पगारात व���ढ\nअर्धांगीचेही त्यामुळे मन आनंदात\nमित्र बालपणचा अचानक आला भेटीला\nक्षणात ओळखले पाहिजे काय बिचाऱ्याला.\nखडतर दैवाने गांजिले, द्रव्यहीन झाला\nन बोलता दिधले 'पाहिजे होते ते' त्याला.\nडोळ्यातुनी अमुच्या वर्षला मेघ अमृताचा\nअमोल अविनाशी, अहा तो क्षण आनंदाचा\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2016-Tomato.html", "date_download": "2019-03-25T07:50:45Z", "digest": "sha1:YU777YO7U7GD4HJGALMZFM2LW47LITB6", "length": 4717, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - टोमॅटोचा खर्च ३० - ३५ हजार, उत्पन्न १ लाख २० हजार", "raw_content": "\nटोमॅटोचा खर्च ३० - ३५ हजार, उत्पन्न १ लाख २० हजार\nश्री. प्रविण रा. फुलझेले. मु.पो. आर्वी (छोटी), ता. हिंगणघाट, जि. वर्धा - ४४२००१. मो. ९९६०३१२९३१\nमी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कृषी विज्ञान मासिकाचा वाचक असून मी त्यातील वेगवेगळ्या पिकांविषयीचे शेतकऱ्यांचे अनुभव वाचून प्रभावित झालो. मासिकामध्ये फोरसाईट कृषी केंद्र, वर्धा यांची जाहिरात वाचली व त्या कृषी केंद्राला भेट दिली. त्यांच्याकडून मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ओषाधांची माहिती घेऊन त्याचा टोमॅटो पिकासाठी वापर करण्याचे ठरविले. अंकुर कंपनीच्या वैशाली जातीची मध्यम प्रतीच्या २० गुंठे जमिनीत ५ x १.५ फुटावर १५ जून २०१५ रोजी जर्मिनेटरच्या द्र��वणात रोपे बुडवून लागवड केली. त्यामुळे मर झाली नाही. रोपे जोमदार वाढीस लागली. लागवडीनंतर १५ - २० दिवसांच्या अंतराने थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली + हार्मोनी २०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १५० लि. पाणी याप्रमाणे एकूण ३ फवारण्या केल्या. एवढ्यावर झाडांची निरोगी वाढ होऊन कलधारणा चांगल्याप्रकारे होऊन फळांचे पोषण झाले. १५ जून २०१५ ला लावलेले टोमॅटो सप्टेंबरच्या सुरुवातीस चालू झाले. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्यांमुळे फळांची क्वॉलिटी नेहमीपेक्षा व बाजारातील इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगली मिळाल्याचे आम्ही प्रथमच अनुभवले. तोडे चालू झाल्यावर पुढेही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्याच्या २ फवारण्या १ - १ महिन्याला केल्या. एवढ्यावरच दिवसाआड २० गुंठ्यातून १० - १२ क्रेट माल निघत होता. हिंगणघाट मार्केटला सुरुवातीस ४०० रु./क्रेट भाव मिळाला. त्यानंतर हिवाळ्यात भाव कमी होऊन १०० ते १५० रु./क्रेट भाव मिळाला. तरी या टोमॅटोपासून १ लाख २० हजार रु. हे केवळ आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्यामुळे मिळाले. यासाठी एकूण ३० ते ३५ हजार रु. खर्च आला. अशा पद्धतीने आम्हाला अर्धा एकरातून ८० हजार रु. नफा मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-black-flags-sadabhau-khot-farmers-washim-1292", "date_download": "2019-03-25T08:15:57Z", "digest": "sha1:HJFCS3GNY43Y3OTNRY27QQJPJE6XTMP4", "length": 6060, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news black flags sadabhau khot farmers washim | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसदाभाऊंना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे\nसदाभाऊंना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे\nसदाभाऊंना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे\nसदाभाऊंना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nवाशीम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना यांच्यातील कलगीतुऱ्याचे पडसाद आज विदर्भात उमटले. मानोरा येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व काही शेतकऱ्यांनी सदाभाऊच्या ताफ्यासमोर काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या.\nवाशीम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना यांच्यातील कलगीतुऱ्याचे पडसाद आज विदर्भात उमटले. मानोरा येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व काही शेतकऱ्यांनी सदाभाऊच्या ताफ्यासमोर काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या.\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगवारी (ता.26) वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली. मानोरा येथील शिव चौकात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनाचा ताफा आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.\nआंदोलकांना पांगवितांना पोलिसांची मात्र भंबेरी उडाली. मालेगाव पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह कार्यकर्त्यांना सकाळीच ताब्यात घेतले होते.त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.\nवाशीम सदाभाऊ खोत विदर्भ मालेगाव सकाळ पोलिस\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/woman-attack-wine-shop-crime-4096", "date_download": "2019-03-25T07:31:06Z", "digest": "sha1:A5LOKUE3GLIZ6U6HM2RRU3QJDFZLDANS", "length": 9150, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Woman Attack on Wine Shop Crime | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदारु दुकानावर हल्लाबोल; महिला आक्रमक\nदारु दुकानावर हल्लाबोल; महिला आक्रमक\nदारु दुकानावर हल्लाबोल; महिला आक्रमक\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nऔरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिलांसह स्थानिकांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून तोडफोड केली. यानंतर रस्त्यावर दारू बाटल्या फेकून आग लावत त्यांनी देशी दुकान बंद केले. हा प्रकार सोमवारी (ता. सात) सायंकाळी सव्वापाचनंतर घडला.\nऔरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्था���िकांच्या संयमाचा बांध फुटला. महिलांसह स्थानिकांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून तोडफोड केली. यानंतर रस्त्यावर दारू बाटल्या फेकून आग लावत त्यांनी देशी दुकान बंद केले. हा प्रकार सोमवारी (ता. सात) सायंकाळी सव्वापाचनंतर घडला.\nविजयनगरच्या भरचौकात असलेल्या देशी दारू दुकानामुळे मद्यपींचा स्थानिकांना त्रास सुरू होता. मद्यपींकडून छेडछाड, असभ्य वर्तनाचे प्रकारही घडले होते. याविरोधात स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवदेनही दिले होते; परंतु त्या वेळी निवदेनाची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, विजयनगर चौक परिसरातील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याला मद्याचे व्यसन होते.\nमद्यसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. ही बाब असह्य झाल्याने स्थानिक महिलांचा संयम सुटला. यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिक सायंकाळी एकत्र जमले. सुमारे दीडशेच्या जमावाने चौकातील सर्व रस्ते बंद केले. त्यानंतर देशी दारू दुकानावर हल्लाबोल केला. आत वीस ते पंचवीस जणांनी घुसून दुकानाची तोडफोड केली. दुकानची नासधूस केल्यानंतर संतप्त जमावाने दारूच्या बाटल्या, बॉक्स रस्त्यावर आणून फेकले. त्याचाही रस्त्यावरच चुराडा करून त्याला आग लावण्यात आली. या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले.\nआंदोलनात औरंगाबाद महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, शहर सचिव मीरा प्रधान, जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणिस श्रीकांत तौर पाटील, विमल अवसरमोल, सपना अवसरमोल, कल्पना दंवडे, सुनंदा खरात, जयश्री खाडे, सुनील त्रिभुवन, सचिन कापसे, आकाश मिसाळ, अविनाश आटोळे, भगवान वाघमारे, बाबासाहेब दाभाडे, बाबासाहेब साळवे, कैलास सोनवणे, राजू सावळे यांचा सहभाग होता.\nघटनेनंतर स्थानिकांनी पुंडलिकनगर ठाण्यात उपस्थित सहायक आयुक्तांना निवदेन दिले. पोलिस आयुक्तांच्या अधिकारात एक महिन्यासाठी देशी दारू दुकान बंद करण्यासाठी पावले उचलू, असे आश्वासन सहायक आयुक्तांनी दिल्याची माहिती योगेश मसलगे पाटील यांनी दिली.\nविजयनगर अत्यंत गजबजलेला भाग असून, येथे शाळाही आहे. चौकातही मोठी वर्दळ असल्याने या भागात मुली, महिलांची वर्दळ असते. त्यांच्याशी छेडछाड होत असून, यामुळे नागरिकही त्रासले होते. आंदोलनकर्त्या पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली; तसेच चौक���त पोलिसांचा बराच वेळ पहारा होता.\nऔरंगाबाद aurangabad महिला women दारू तोडफोड आग छेडछाड व्यसन घटना incidents आंदोलन agitation काँग्रेस पोलिस पोलिस आयुक्त शाळा attack wine crime\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/carrot-health-benefits/", "date_download": "2019-03-25T08:11:32Z", "digest": "sha1:BWHOWT2REFYAX5SNCZMFGJUV5TH7MDRA", "length": 6734, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गाजराचे आहेत अनेक फायदे, दूर होतील या समस्या", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nगाजराचे आहेत अनेक फायदे, दूर होतील या समस्या\nटीम महाराष्ट्र देशा – आजकालच्या धावपळीच्या जिवनात आपण स्वताकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच डोळ्यांचे आणि पोटाचे विकारसुद्धा दूर होतात. आज आम्ही तुम्हाला गाजराचे काही फायदे सांगत आहोत.\n* गाजरात बिटा कॅरोटिन असल्याने ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरते. तसेच गाजरामुळे पचनशक्ती वाढते.\n* गाजरच नव्हे तर त्याच्या पानामध्येसुद्धा लोह असते. त्यामुळे अॅनिमियाची समस्या दुर होते.\n* हिवाळ्यात गाजर खाल्यास शरीरात उब राहते.\n* गाजरामध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘ई’चे प्रमाण असते. त्यामुळे डोळ्यांची कमकुवतात दूर होते तसेच त्वचा आणि केसांना निरोगी आणि चमकदार ठेवते.\n* गाजर चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. तसेच बध्दकोष्ठसारख्या समस्यापासुन आराम मिळतो.\n* गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्यास त्वचा चमकादर दिसू लागते.\n* एक ग्लास ��ाजरच्या रसामध्ये एक कप कारल्याचा रस टाकून प्यायल्याने डायबिटीजपासुन लाभ मिळतो.\n* गरोदर महिला आणि होणा-या बाळासाठी गाजराचा ज्यूस खुप फायदेशीर असते.\n* एक ग्लास गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते.\n* तोंड आले असेल तर गाजराचा ज्यूस तोंडात घेऊन त्याने गुळणी करावी. यामुळे तोंड येण्याची समस्या दूर होते.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nजीएसटीअंतर्गत करदात्यांची महाराष्ट्रातून लक्षणीय वाढ\nVideo- उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांना पुन्हा जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://killicorner.in/", "date_download": "2019-03-25T07:46:12Z", "digest": "sha1:RCURS3QDRTAKWI77DT4NUGVVSLS6AO7O", "length": 9252, "nlines": 56, "source_domain": "killicorner.in", "title": "किल्ली Corner | Writer", "raw_content": "\n सीझन दुसरा – भाग 3\n सीझन दुसरा – भाग 3\nकथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. ——————————————————————————————————————– भाग 9 आजची सकाळ निराळीच होती. एकदम उत्साही आणि टवटवीत (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. ——————————————————————————————————————– भाग 9 आजची सकाळ निराळीच होती. एकदम उत्साही आणि टवटवीत कानात एअरफोन्सचे बोळे कोंबून गुणगुणत आपल्याच तंद्रीत श्रुती पार्कमध्ये जॉगिंग करत होती. गुलाबी रंगाचा स्पोर्ट्स टी शर्ट,काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, केसांचा हाय पोनी, स्पोर्ट्स शूज ह्या तिला सर्वात आरामदायी वाटणाऱ्या…\n सीझन दुसरा – भाग २\n सीझन दुसरा – भाग २\nकथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. भाग ५ हर्षदाची कंपनी मिळाल्यामुळे श्रुतीला तसं बरंच मोकळं वाटत होतं. ती श्रुतीच्या अगदीच मोजक्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती. फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहावे असं जरी ठर���ं असलं तरी श्रुतीला एकटीला फ्लॅटवर राहण्यास धाकधूक वाटत होती. बरं , फ्लॅट sharing बेसिस वर घ्यावा म्हटलं तरी जराश्या रिजिड स्वभावाच्या श्रुतीला नवीन मुलींमध्ये मिसळुन राहणे…\n सीझन दुसरा – भाग १\n सीझन दुसरा – भाग १\n (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग १ श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. भाग १ आदित्य आपल्या आलिशान ऑडी a४ गाडीमध्ये बसून एकटाच भरधाव वेगाने हायवरून जात होता. ही त्याची आवडती कार होती. जेव्हा त्याच्या अथक प्रयत्नानंतर कंपनीला नफा झाला तेव्हा त्याच्या बाबांनी ही कार बक्षीस दिली होती. आता तर अगदीच सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी नव्हतीच. एरवी भरगच्च रहदारी असणारा हिंजवडीला जाणारा रस्ता ह्यावेळी सुना सुना वाटत होता. खरे तर त्याने…\nहकालपट्टी – शतशब्दकथा “ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं.”“असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”“तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन.”“तिच्या वाईट अवस्थेला…\nकृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)\nकृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)\nप्रत्यक्ष AI काय ही संकल्पना काय आहे हे समजून घेण्याआधी दैनंदिन जीवनातील उदाहरण बघूया. समजा, तुम्ही चारचाकी गाडी चालवत तुमच्या इष्ट स्थळी पोचलात आणि आता तुम्हाला तुमची गाडी पार्क करायची आहे. मग तुम्ही पार्किंगसाठी जागा शोधता आणि व्यवस्थित वळवून तुमचे वाहन त्या जागी उभे करता. ह्यासाठी तुम्ही तुमच्या मानवी मेंदूचा(Human Intelligence) वापर करून available parking spot detection, vehicle parking ही कार्ये करता. जागा शोधून गाडी लावणे हे मानवी मेंदूसाठी अगदी सोपे काम आहे. त्यासाठी विचार करून कृती करण्यासाठी लागणार वेळ…\nहकालपट्टी – शतशब्दकथा March 5, 2019\nउपासाचे पदार्थ कांदा खमंग गोड चटणी चीझ तंत्रज्ञान थालीपिठ दीर्घकथा द्विशतशब्दकथा नाश्ता पक्वान्न पराठे पाककृती पौष्टिक प्रेमकथा प्रेरणादायक फराळ भयकथा भाजी मिष्टान्न लघुक��ा लेख विज्ञान व्हेज कोल्हापुरी शतशब्दकथा शतशब्दलेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/mohan-joshi/", "date_download": "2019-03-25T07:36:11Z", "digest": "sha1:HOLVF47TED6VFDTFUM2DNR6XWBY2JNTS", "length": 5527, "nlines": 75, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Mohan Joshi - मराठी कलाकार", "raw_content": "\nएखाद्या तरुणाप्रमाणे एनर्जेटिक आहेत सचिन पिळगांवकर-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे\nअभिनय, नृत्य, संगीत अशा एक ना विविध कलेत पारंगत असणारे महाराष्ट्राचे महागुरू म्हणजेच जेष्ठ अभिनेते सचिन...\nविभक्त कुटुंबाची अनोखी कहाणी.पहा सोहळा सिनेमाचा ट्रेलर.\nआजवर विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीस आलेले आहेत. मात्र याच धाटणीवर काहीशी हटके...\nस्वप्नपूर्तीसाठीचा खडतर प्रवास, पहा ‘तू तिथे असावे’ संगीतमय सिनेमाचा ट्रेलर.\nगाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या एका युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास आगामी ‘तू तिथे...\n‘नटसम्राट’चा पोस्टर आऊट. पुन्हा एकदा रंगमंच गाजवायला तयार.\nमराठी रंगभूमीवरील अजरामर कलाकृती ‘नटसम्राट’ पुन्हा एकदा नव्या ढंगात रंगभूमीवर येतंय. पुन्हा एकदा आपल्याला रंगमंचावर “कुणी...\nमच अवेटेड “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर”च्या टिझरला रसिकांचा जोरदार प्रतिसाद.\n१९६० च्या दशकातील एका महान कलावंताची हि गोष्ट. ज्यांचा प्रवेश होताच नाट्यगृह टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून जायचे...\nअभिनेता ह्रिषिकेश जोशी करतोय दिग्दर्शन तर दिवंगत अभिनेत्री रीमा लागूंचा अखेरचा सिनेमा “होम स्वीट होम”.\nमच अवेटेड आणि मल्टीस्टारर सिनेमा होम स्वीट होमचा ट्रेलर यूट्यूबवर लॉन्च झाला आहे. ह्रिषिकेश जोशी, मोहन...\nमैत्रीच्या नात्यातील अव्यक्त भावना – ओढ \nजगातील सर्वात पवित्र व शुद्ध नातं म्हणजे मैत्री चं नातं. ती हि एक मुलगा आणि एका...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-25T08:01:57Z", "digest": "sha1:FFGUX267OTAENUHJRT3HTGMDKIX2YXAJ", "length": 8422, "nlines": 44, "source_domain": "vicharpravah.in", "title": "३०. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : कॉम्पटॉमिटर - विचारप्रवाह", "raw_content": "\n३०. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : कॉम्पटॉमिटर\n१९व्या शतकाच्या अखेरीस उद्योग-व्यवसायास चांगलीच गती प्राप्त झाली होती. तेंव्हा वेगवान आकडेमोड करु शकेल अशी सुधारित ॲडिंग मशिन तयार करण्याच्या दिशेने विशेष प्रयत्न होऊ लागले. डॉर फेल्ट या २२ वर्षिय तरुणाने १८८४ साली त्याद्ष्टीने एक यंत्र तयार करण्यास सुरुवात केली. आपल्या संकल्पनेस आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता फेल्ट यांनी शिकागोस्थित रॉबर्ट टॅरंट या उद्योजगाची मदत घेतली. अशाप्रकारे १८८९ साली ‘फेल्ट अँड टॅरंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ उदयास आली. फेल्ट यांनी आपल्या यंत्रास ‘कॉम्पटॉमिटर’ असे नाव दिले. सुरुवातीच्या दशकात या यंत्रास तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु २०व्या शतकाच्या प्रारंभी या यंत्राची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली.\n‘कॉम्पटॉमिटर’ हे मुख्यतः बेरजेवर आधारित असे यंत्र होते. पण विशेष कौशल्याचा वापर केला असता, या यंत्राच्या सहाय्याने वजाबाकी, गुणाकार, भागाकार देखील करता येत असत. संगणकाच्या कीबोर्डवर जशा अक्षरांच्या, अकांच्या आणि चिन्हांच्या ‘की’ (Keys) असतात; अगदी त्याचप्रमाणे कॉम्पटॉमिटरवर १ ते ९ या अंकांच्या ‘की’ होत्या. कॉम्पटॉमिटरच्या निमित्ताने एखाद्या ॲडिंग मशिनमध्ये प्रथमच ‘की’चा वापर करण्यात आला. या यंत्रावरील एकाहून अधिक ‘की’ या एकाचवेळी दाबता येत असत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक वेगवान पद्धतीने आकडेमोड करता येऊ लागली.\nटाईपरायटरप्रमाणेच ‘कॉम्पटॉमिटर’ हे यंत्र चालवण्यास प्रशिक्षणाची आवश्यकता होती. म्हणूनच ‘कॉम्पटॉमिटर ट्रेनिंग स्कूल’च्या माध्यमातून यासंदर्भातील प्रशिक्षण घ्यावे लागत असे. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान कॉम्पटॉमिटरला मोठी मागणी होती. त्यामुळे अनेक तरुण मुला-मुलींचा कॉम्पटॉमिटर शिकण्याकडे ओढा होता. कॉम्पटॉमिटर चालवण्याचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्यावर अत्यंत वेगवान पद्धतीने काम करता येत असे. २०व्या शतकाच्या पूर्वार्धात ‘कॉम्पटॉमिटर’ हे एक महत्त्वाचे यंत्र होते. अगदी १९६० पर्यंत या यंत्रात काळानुरुप सुधारणा होत गेल्या.\nफेल्ट एक अत्यंत कल्पक व्यक्ती होते. त्���ांनी आपल्या जीवनात अनेक निरनिराळ्या गोष्टी निर्माण केल्या. त्यासाठी त्यांना ५० हून अधिक पेटंट्स मिळाली. आपल्या जीवनाच्या अखेरच्या काही वर्षांत फेल्ट यांनी आपल्या पत्नीसाठी एक भव्य महाल बांधला. या महालाचा परिसर हा त्यावेळी शेकडो एकरांवर पसरला होता. आज हा महाल ‘दी फेल्ट मॅन्शन’ म्हणून ओळखला जातो.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n६५. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : गोल्डस्टाईन आणि नॉयमन यांची भेट\n६०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : जॉन प्रेसपर एकर्ट\n४१. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : आयबीएम अकांऊंटिंग मशिन : पहिले महायुद्ध\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090404/main.htm", "date_download": "2019-03-25T08:19:33Z", "digest": "sha1:IEWDQPQDFGCMP3MDJ6P3NC6ARNBF7G6A", "length": 21471, "nlines": 55, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ४ एप्रिल २००९\nअमेरिकेच्या दारावर पुन्हा दहशतवादाची थाप\nअज्ञात इसमाच्या गोळीबारात १२ ठार; ४१ ओलिस\nबिंग्हॅम्टन येथील इमिग्रेशन सव्र्हिसेस सेंटरमध्ये आज एका बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार झाले. हे सेंटर असलेल्या अमेरिकन सिव्हिक असोसिएशनच्या इमारतीमध्ये या हल्लेखोराने किमान ४१ लोकांना ओलिस ठेवले आहे. बिंग्हॅम्टन प्रेस व सन बुलेटिनने यासंदर्भात दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हा बंदुकधारी इमारतीमध्ये शिरला आणि त्याने अचानक बेछूट गोळीबाराला प्रारंभ केला.\nकाँग्रेसच्या दबावामुळे भुवनेश्वरला जाणाऱ्या पवार यांच्या विमानात ‘तांत्रिक बिघाड’\nनवी दिल्ली, ३ एप्रिल/खास प्रतिनिधी\nभुवनेश्वरमध्ये तिसऱ्या आघाडीच्या विमानतळावर उतरण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ‘सज्ज’ होते. पण भुवनेश्वरला जाणारे त्यांचे विमान युपीएच्या धावपट्टीवरून उडालेच नाही. काँग्रेस विरोधकांच्या व्यासपीठावर जाऊ नका, असा काँग्रेसच्या वतीने गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम होऊन पवार यांच्या विमानात ऐनवेळी ‘तांत्रिक बिघाड’ उद्भवला आणि त्यांना काँग्रेसच्या दबावाखाली तिसऱ्या आघाडीला ‘खो’ देणे भाग पडले.\nडाव्यांना टाळून पवारांचा आता भुवनेश्वर दौरा\nमुंबई, ३ एप्रिल / खास प्रतिनिधी\nकाँग्रेसच्या दबावामुळेच शरद पवारांनी भुवनेश्वरचा दौरा रद्द केल्याचा दावा काँग्रेसच्या वर्तुळातून केला जात असला तरी आपल्याला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही व आपण अन्य पक्षाच्या नेत्यांच्या सल्ल्याला फारशी किंमत देत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या दबावामुळे दौरा टाळल्याच्या आरोपांचा इन्कार करण्याचा आज प्रयत्न केला.\nनवी दिल्ली, ३ एप्रिल/खास प्रतिनिधी\nगरीबांना तीन रुपये प्रतिकिलो दराने महिन्याला २५ किलो गहू किंवा तांदूळ उपलब्ध करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर कुरघोडी करताना आज भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दारीद्रय़रेषेखालील कुटुंबांना २ रुपये प्रतिकिलो दराने महिन्याला किलो गहू वा तांदूळ देण्याची घोषणा केली. भाजप मुख्यालयात आज दुपारी पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थित प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात भाजपने राम मंदिर, राम सेतु, गंगा व गोवंश या हिंदूुत्वाच्या मुद्यांसह कलम ३७० आणि समान नागरी कायद्यासारखे मुद्दे ऐरणीवर आणले आहेत.\nरामनवमीचे निमित्त साधून आज भाजपने २००९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा जनतेपुढे मांडला. पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या या जाहीरनाम्यात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंसह अंतर्गत सुरक्षा, दहशतवाद, ऊर्जा, आरोग्य, महिला, युवक, देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित वर��गाविषयी पक्षाच्या भूमिका स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ‘आम आदमी’वर लक्ष केंद्रीत करणाऱ्या प्रतिस्पर्धी काँग्रेसप्रमाणेच भाजपनेही चाळीस पानांच्या या जाहीरनाम्यात गरीबांच्याच प्रश्नांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.\nदहशतवादाचा बिमोड करण्याची संधी पाकिस्तानने साधावी\nमनमोहन सिंग यांचे आवाहन\nदहशतवादाला आळा घालण्याबाबत आपण प्रामाणिक आणि इच्छुक आहोत, हे जगाला दाखविण्याची सुसंधी पाकिस्तानकडे चालून आली आहे. ही संधी पाकिस्तानने साधावी, असे आवाहन करतानाच पाकिस्तानी भूमीवरून दहशतवादाला प्रोत्साहन मिळणे थांबत नाही तोपर्यंत द्विपक्षीय संवाद होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. ‘जी-२०’ देशांच्या शिखर परिषदेसाठी येथे आलेल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानविषयीची भारताची भूमिका जगातील सर्वात प्रबळ अशा राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीच्या पाश्र्वभूमीवर विषद केली.\nग्वान्टानामोचा तुरुंग बंद करण्याच्या ओबामा यांच्या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत\nग्वान्टानामो येथील तुरुंग बंद करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्ट्रॉसबर्ग येथील टाऊन हॉलमध्ये आयोजिलेल्या सभेत जाहीर करताच तेथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांनी या घोषणेचे टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्वागत केले. या सभेला मुख्यत्वे फ्रान्स व जर्मनी येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अण्वस्त्रांच्या संख्येत कपात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचीही ओबामा यांनी आपल्या भाषणादरम्यान घोषणा केली.\nमनमोहन सिंह हे सुज्ञ आणि आनंददायी व्यक्तिमत्व -ओबामा\nभारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांना भेटल्याने विशेष आनंद झाला असे सांगतानाच मनमोहन सिंह हे सुज्ञ आणि आनंददायी व्यक्तिमत्व असल्याचे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले. ओबामा यांनी मनमोहन सिंह यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा वेध घेताना त्यांची स्तुती केली. भारताला विकासाच्या रस्त्याने घेऊन जाणारा हा एक चांगाला पंतप्रधान असल्याचे सांगून ओबामा म्हणाले त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यत्रामुळे भारताची प्रगती वेगाने होत आहे त्याला सिंह यांचे धोरण कारणीभूत आहे. मनमोहन सिंह हे हुषार आणि तेवढेच चांगले सर्वाना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व अस���्याचेही ओबामा म्हणाले.\nवेलिंग्टन, ३ एप्रिल / पीटीआय\nआघाडीचे पाच फलंदाज दोनशे धावांचा टप्पा ओलांडण्यापूर्वीच माघारी परतल्यानंतरही भारताच्या शेपटाने दिलेल्या तडाख्यामुळे तिसऱ्या आणि अखरेच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघ गलितगात्र झाला. भारताने ५ बाद १८२ धावसंख्येवरून दिवसअखेर ९ बाद ३७५ अशी आश्वासक धावसंख्या गाठली आहे. त्यात हरभजनसिंग (६०), झहीर खान (३३) यांच्यासह महेंद्रसिंग धोनी (५२) यांच्या जिगरबाज खेळीचा समावेश आहे.\nनाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर यजमानांनी आज भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. भारताने सुरुवातही तडाखेबंद फलंदाजीने केली. वीरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना ४८ धावांचे योगदान दिले. सचिन तेंडुलकरचीही ६२ धावांची खेळी मोलाची ठरली. पण १ बाद ७२ अशी सुरुवात करणारा भारतीय संघ ६ बाद २०४ अशा अडचणीत सापडला होता. मात्र पाठदुखीतून सावरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी व हरभजनसिंग यांनी सातव्या विकेटसाठी केलेली ७९ धावांची भागीदारी न्यूझीलंडच्या स्वप्नांवर पाणी फेरणारी ठरली. दिवसअखेर इशांत शर्मा (१५) व मुनाफ पटेल (१४) नाबाद होते. भारताने कठीण परिस्थितीतून स्वत:ला सावरल्यानंतरही किवी खेळाडू आपल्या कामगिरीबद्दल समाधानी होते. आपल्या पहिल्या डावात भारताची धावसंख्या मागे टाकून भक्कम आघाडी घेण्याचा यजमानांचा विचार आहे.\nजादुई आकडय़ासाठी मदत करीन, पण पंतप्रधान सहमतीने ठरावा - शरद पवार\nमुंबई, ३ एप्रिल / खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यूपीएमध्येच राहील, अशी ग्वाही देतानाच यूपीएला २७२चा जादुई आकडा गाठण्यासाठी संख्याबळ कमी पडत असल्यास अन्य निधर्मवादी पक्षांची मदत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेईल, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. मात्र दुसऱ्याच क्षणाला पंतप्रधानपदाचा उमेदवार सहमतीने ठरावावा असा आग्रह धरीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील आपला दावा कायम ठेवला. राष्ट्रीय पातळीवर यूपीएने आघाडी करावी ही राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसने मान्य केली नाही. त्यामुळे यूपीएतील प्रत्येक घटक पक्षांना वेगवेगळी भूमिका घ्यावी लागली. राष्ट्रवादीची महाराष्ट्र व गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडी झाली आहे. अन्य काही राज्���ांमध्ये राष्ट्रवादीची अन्य पक्षांबरोबर आघाडी होणार आहे. अन्य राज्यांमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात असलो तरी निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी यूपीएबरोबरच कायम राहिल, अशी ग्वाही पवारांनी दिली. मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आदी यूपीएतील प्रमुख नेते काँग्रेसच्या विरोधात लढत असले तरी त्याचा भाजपसारख्या जातीयवादी पक्षांना फायदा होणार नाही, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. निकालानंतर यूपीएचे सर्व घटक पक्षांचे नेते एकत्र येतील व पंतप्रधानपदासाठी सहमतीने नाव ठरविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nगुजरातमध्ये उष्णतेची लाट असून ती आणखी काही दिवस कायम राहील, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले. नेहमीपेक्षा राज्यातील तापमान तीन ते चार अंश सेल्सियसने वाढले आहे. अहमदाबादमधील कमाल तापमान काल ४० अंश सेल्सियस नोंदले गेले. राजकोटमध्ये ते ४२ अंश सेल्सियस नोंदले गेले. बडोद्यातही तापमान ४२ अंश सेल्सियस होते. नेहमीच्या तापमानापेक्षा ते दोन अंश सेल्सियसने अधिक होते. अरबी समुद्रापासून १५ किलोमीटरवर असलेल्या सुरतमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियस आहे.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-news-festival-ramzan-48400", "date_download": "2019-03-25T08:41:09Z", "digest": "sha1:QKQCGQKRCMFHURSQJ6WI7H2J6Z6CZWUY", "length": 18408, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nanded News: Festival of Ramzan पहिल्या उपवासाने पवित्र रमजानची आजपासून सुरवात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nपहिल्या उपवासाने पवित्र रमजानची आजपासून सुरवात\nरविवार, 28 मे 2017\nकेवळ उपाशी राहणे हे राेजा ठरत नाही. ईश्वराला ते अपेक्षितही नाही. समाजातील गरीब, वंचित भूकेले लाेक आशेपाेटी जीवन जगतात. त्या भुकेल्यांची भुकाची भावना सर्वसामान्यांना कळावी व त्यांच्याविषयी दया करूणेची भावना जागावी, हा देखील राेजा ठेवण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे\nनांदेड - मुस्लिम बांधवांच्या पहिल्या उपवासाने रविवारपासून (ता. २८) पवित्र रमजान महिन्यास सुरवात झाली. काल चंद्रदर्शनानंतर रमजान उपवासाचे सत्र सुरू झाले आहे. तब्बल एक तपानंतर पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हात रमजानचे आगमन झाले हे विशेष.\nइस्लाम धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व असलेल्या पवित्र रमजानचा पहिला राेजा आज सर्व भाविकांनी धरला आहे. पवित्र कुराणचे अवतरण याच महिन्यात झाल्यामुळे या महिन्यास अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. या महिन्यातील प्रत्येक आचरण व उपासनेत एकासाठी ७० पट पुण्य या महिन्यात प्राप्त हाेते. इस्लाम धर्माच्या संपूर्ण तत्वाप्रमाणे जीवन जगण्याचे प्रशिक्षण या महिन्यात सर्वांना प्राप्त हाेते.\nरमजान महिन्याच्या चंद्रदर्शनापासून ते शव्वाल महिन्याच्या चंद्रदर्शनापर्यंत मुस्लिम बांधव दरराेज दिवसभर राेजा ठेवतात. ईश्वराच्या आज्ञेनुसार दिवसभर अन्नपाण्याचा त्याग करतात. केवळ उपाशी राहणे हे राेजा ठरत नाही. ईश्वराला ते अपेक्षितही नाही. समाजातील गरीब, वंचित भूकेले लाेक आशेपाेटी जीवन जगतात. त्या भुकेल्यांची भुकाची भावना सर्वसामान्यांना कळावी व त्यांच्याविषयी दया करूणाची भावना जागावी, हा देखील राेजा ठेवण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.\nदिवसभरातील अनिवार्य पाच नमाजाबराेबरच मध्यरात्रीनंतर एकांतात अदा केली जाणारे नमाजे तहाजूत ज्यामध्ये एकांतात ईश्वराची क्षमायाचना केली जाते. तसेच नमाजे इशाबराेबर हाेणारी नमाजे तरावी आदी प्रार्थना करणे ही अनिवार्य आहे. त्याशिवाय राेजाचे खरे पुण्य प्राप्त हाेत नाही. रमजान हा महिना अत्यंत पवित्र असून, या महिन्यात केले जाणारी इबादत कुराण पठण, जिक्र (जप), असत गफार (क्षमायाचना) प्रेषक महंमद (स. अ.) यांच्यावर दुरूद पठण इत्यादी अल्लाह पसंत करताे व त्यांची अनेक पटीने पुण्याई प्रदान करताे.\nरमजान महिन्यात ईश्वर केवळ धार्मिक विधी व इबादताचे अल्लाह आदेश देत नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून गाेरगरीब, वंचित, अनाथ, प्रवासी यांच्याविषयीही दानधर्म करून पुण्य कमाविण्याचे आवाहन अल्लाहने केले आहे. ईश्वराची उपासनेबराेबरच सामाजिक संतुलनासाठी रमजान महिन्यात विशेषदान जकात अदा करण्याचे आदेश ईश्वराने पवित्र कुराणमध्ये स्पष्ट दिले आहे. प्रत्येक मुस्लिम स्त्री - पुरुषांस आपल्या हलाल कमाईमधील अशी आगावू व एक वर��षे कालावधीसाठी जमा आहे. राेख रक्कम, साेने, चांदी इत्यादींवर अडीच टक्के रक्कम गाेरगरीबात दान करणे अत्यंत अनिवार्य आहे. हे समाजातील गरीब, अनाथ, वंचित, प्रवासी आदींना देण्याचा अहकाम आहे. सर्वात प्रथम आपल्या नातेवाईकांना व इतरांना जकात दान अनिवार्य आहे. रमजान ईद व इतर आनंदापासून गाेरगरीब, अनाथ, वचित राहू नये, यासाठी ईश्वराने ही व्यवस्था केली आहे.\nएकूण शहरात रमजान महिन्याचे स्वागत उत्साहाने करण्यात आले आहे. शहरातील जवळपास सर्वच मशिदीची साफसफाई, रंगरंगाेटी, राेषणाई करण्यात आलेली आहे. सर्व भाविकांनीही आपला व्यवसाय सांभाळून रमजान महिन्याची इबादतीची याेजना आखली आहे, तर दुसरीकडे इफ्तारसाठी लागणाऱ्या फळांची व देशी, विदेशी पेंडखजुराची आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. जून महिन्याच्या २६ तारखेपर्यंत या पवित्र रमजान महिन्याचा उत्साह रंगणार आहे. शव्वाल महिन्याच्या चंद्रदर्शनानंतर रमजान ईद व ईद ऊल - फित्र मुस्लिम बांधव साजरी करतील, अशी अपेक्षा आहे.\nजवळपास दाेन - तीन दशकानंतर मे महिन्याच्या चढत्या पाऱ्यात मुस्लिम बांधव राेजा ठेवणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या मान्सूनने चढत्या पाऱ्यापासून दिलासा मिळेल, अशीही अपेक्षा आहे. एकूण शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये जास्तीत - जास्त पुण्याईसाठी तत्परता दिसून येत आहे.\nLoksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम...\nबारमधील उधळपट्टीवर ‘सत्कर्म’चा तोडगा\nमुंबई - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडदेवच्या इंडियाना बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोठडीत रात्र घालवायची नसेल, तर त्यांनी बदलापूरच्या सत्कर्म...\nLoksabha 2019 : सोलापुरात भगव्या, निळ्या, हिरव्या रंगावर निवडणूक\nसोलापूर - देशातील उत्सवप्रिय व सर्व जाती-धर्मांना घेऊन गुण्यागोविंदाने राहणारे सोलापूर शहर आज जातीच्या नावावर आक्रमक होऊ लागले आहे. अनुसूचित...\nLoksabha 2019 : महास्वामी म्हणाले, किती माताधिक्य द्या\nसोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. राजकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर...\nबुद्धीची निर्यात म्हणजे \"ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या...\nएमपीएससीच्या परिक्षेत वेळेआधीच फुटल्या प्रश्नपत्रिका\nजालना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात रविवारी (ता. 24) जिल्हा केंद्रावर अराजपत्रित (गट-ब) पूर्व परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090711/main.htm", "date_download": "2019-03-25T08:24:31Z", "digest": "sha1:64DZHROQWTUG524ZGJG7ILFFZ5DUBUG2", "length": 18613, "nlines": 52, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार , ११ जुलै २००९\nभारतात कृत्रिम पावसाचे यश; एक अनुत्तरित प्रश्न\nजगभरातील वीस-पंचवीस देशांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग नियमितपणे हाती घेण्यात येत असून, त्यांच्या यशस्वीतेबद्दल दावे केले जात असले, तरी भारतातील या प्रयोगांचे यश हा अजून तरी अनुत्तरीतच प्रश्न आहे. पावसाळ्यात आकाशात काळे ढग असतानाही पाऊस पडत नाही, तेव्हा या प्रयोगांची भरपूर चर्चा होते. अशा काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस अशाप्रकारे ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. याशिवाय काही प्रदेश पावसापासून मुक्त ठेवायचा असेल, तर या प्रयोगांद्वारे पाऊस आधीच पाडून ढग रिते केले जातात. असे वेगवेगळ्या प्रकारे हवामानात बदल घडवून आणणे म्हणजे ‘वेदर मॉडिफिकेशन’ अशाप्रकारे ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. याशिवाय काही प्रदेश पावसापासून मुक्त ठेवायचा असेल, तर या प्रयोगांद्वारे पाऊस आधीच पाडून ढग रिते केले जातात. असे वेगवेगळ्या प्रकारे हवामानात बदल घडवून आणणे म्हणजे ‘वेदर मॉडिफिकेशन’ तहान लागल्यावर विहीर- अग्रलेख\nशरद पवार यांची कबुली\nनवी दिल्ली, १० जुलै/खास प्रतिनिधी\nयंदा मान्सून सामान्य असून देशात कुठेही दुष्काळाची स्थिती नाही, अशी ग्वाही देणारे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना यंदा पावसाने दगा दिल्याचे अखेर आज मान्य करावे लागले. पावसाअभावी पेरण्या वाया गेल्यास राज्यांना अतिरिक्त बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील, असेही पवार यांनी आज राज्यसभेत जाहीर केले. यंदा देशभरात सरासरीच्या ९३ टक्के मान्सूनचा पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन आठवडय़ांपूर्वी दिले होते.\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ‘एटीकेटी’चा दिलासा\nऔरंगाबाद, १० जुलै/खास प्रतिनिधी\nदहावी-बारावीमध्ये दोन विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्याची संधी मिळणार आहे ‘ए. टी. के. टी.’च्या या ऐतिहासिक निर्णयाची माहिती शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज पत्रकारांना दिली. या निर्णयामुळे दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. त्यांना अकरावीत या वर्षांपासूनच प्रवेश मिळणार आहे. विखे म्हणाले, ‘‘दहावी आणि बारावीमध्ये नापास झाल्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले होते आणि वर्षही वाया जात होते. या संदर्भात राज्यातील अनेक शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार हा ऐतिहासिक निर्णय घेतला.’’\n‘मराठी माणसाशी प्रतारणा झाल्यानेच मनसेला रामराम’\nमुंबई, १० जुलै / खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मनसेत मी फार अस्वस्थ होते. मराठी मतांत फुट पडून मराठी माणसाचेच नुकसान झाले. आपण मराठी माणसाशी प्रतारणा केल्याची जाणीव झाली आणि मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन मनसेच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्वेता परुळकर यांनी आज केले. श्वेता परुळकर यांनी गुरुवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज ‘शिवालय’ येथे परुळकर यांनी आपल्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. या प्रसंगी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, दक्षिण मध्य मुंबईचे विभागप्रमुख अजय चौधरी तसेच परुळकर यांच्या आधी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले दिगंबर कांडरकर आदी उपस्थित होते.\nपवार गटाचीच बाजी ; मात्र विरोधकांचा कार्यकारिणीत शिरकाव\nमुंबई, १० जुलै / क्री. प्र.\nमुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत शरद पवार गटाने बाळ महाडदळकर गटाचा पराभव करून सत्ता आपल्याकडेच राखली. या निवडणुकीचे प्रमुख आकर्षण असलेली कोषाध्यक्षपदाची निवडणूक रत्नाकर शेट्टी यांनी बाळ महाडदळकर गटाचे प्रमुख रवी सावंत यांचा ४० मतांनी पराभव करून जिंकली. संयुक्त चिटणीसपदाच्या निवडणुकीत मात्र पवार गटाला जबरदस्त धक्का बसला. हेमंत वायंगणकर यांनी आपले संयुक्त चिटणीसपद राखण्यात यश मिळविले असले तरीही पवार गटाचे दुसरे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी मात्र पराभूत झाले आहेत. महाडदळकर गटाचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार लालचंद राजपूत निवडून आले आहेत. समिती सदस्यांसाठीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पवार गटाचे ७ उमेदवार विजयी झाले, तर महाडदळकर गटाचे ४ जण जिंकले आहेत.\nजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी जमीन संपादन थांबले\nभारत-अमेरिका अणू-सहकार्य कराराने जागतिक बाजारपेठेतून अणूतंत्रज्ञान प्राप्त करण्यातील भारताचा वनवास संपल्यानंतर परकीय तंत्रज्ञानाने उभारल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील नियोजित अणूऊर्जा प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या बाबतीत ‘जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने भूसंपादनाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वीच थांबली आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीएल) उभारत असून सुरुवातीस तेथे प्रत्येकी १६५० मेवॉ वीजनिर्मिती करणाऱ्या दोन अणुभट्टय़ा उभारण्यात येणार आहेत. अंतिमत: तेथे एकूण १० हजार मेव्ॉ वीजनिर्मितीचे ‘अॅटॉमिक एनर्जी पार्क’ उभारण्याची योजना आहे. यासाठी राज्य सरकार जैतापूरच्या परिसरातील माडबन, निवेली, करेल, मिठगव्हाणे आणि वारलीपाडा या पाच गावांमधील एकूण ९६८ हेक्टर खासगी जमीन पहिल्या टप्प्यात संपादित करून ‘एनपीसीएल’ला देणार आहे.\nचोवीस तासांत कामावर हजर व्हा\nपुणे, १० जुलै / प्रतिनिधी\nसंपावर गेलेले मार्डचे निवासी डॉक्टर उद्या दुपारपर्यंत पुन्हा कामावर रुजू न झाल्यास त्यांचे प्रवेश रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. नागपूर उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारल्यास त्यांचे प्रवेश रद्द करावेत, असे आदेश दिले होते.\nदेशात अवघा १०.५% जलसाठा शिल्लक\nनवी दिल्ली, १० जुलै/खास प्रतिनिधी\nजुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होऊनही मान्सूनची अनिश्चितता कायम असताना देशातील ८१ प्रमुख धरणांमध्ये आता केवळ १०.५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आज केंद्रीय जलसंपदा मंत्री पवनकुमार बन्सल यांनी ही माहिती दिली. देशात आजच्या घडीला वापरायोग्य ११२३ अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध असून त्यापैकी भूपृष्ठावर ६९३ अब्ज घनमीटर, तर ४३३ अब्ज घनमीटर भूजल साठा असल्याची माहिती बन्सल यांनी दिली. देशातील ८१ प्रमुख धरणांमध्ये ९ जुलै २००९ रोजी १६.००३ अब्ज घनमीटर पाण्याचा साठा उरला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा केवळ ४३ टक्केच असल्याचे बन्सल यांनी सांगितले. या धरणांची पाणी साठविण्याची एकूण क्षमता १५१.७७ अब्ज घनमीटर एवढी आहे. त्यामुळे धरणांमध्ये आता केवळ साडेदहा टक्केच पाणी शिल्लक असून जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उगवूनही पावसाचा पत्ता नसल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच धरणांमधील पाणी संपले आहे. १४ धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक, २३ धरणांमध्ये ५० ते ८० टक्के, १८ धरणांमध्ये ३० ते ५० टक्के, तर २१ धरणांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणी उरले आहे.\nधरण क्षेत्रात वरूणराजा रुसलेलाच\nठाणे जिल्ह्यात कालपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० जुलै-२००९ अखेर झालेल्या पावसाची सरासरी अद्याप ५०४ मि. मी. ने कमीच आहे. विशेषत: ठाणे जिल्ह्यातील मोठी धरणे असलेल्या शहापूर व अंबरनाथ या तालुक्यातही आजपर्यंतच्या पावसाची इतर तालुक्यांच्या तुलनेतील सरासरी बरीच कमी असल्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे संकट अद्यापही कायमच आहे.\nमहाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.orientpublication.com/2016/03/ttmm.html", "date_download": "2019-03-25T07:30:14Z", "digest": "sha1:WI4UVOWE3UB6VGG4WRRDUOSZDHT5A25W", "length": 5163, "nlines": 29, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'TTMM’ चित्रपटाचा मुहूर्त", "raw_content": "\nमराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड जाणीवपूर्वक निर्माते व दिग्दर्शक करू लागले आहेत. मराठी प्रेक्षक वेगळ्या विषयांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. ही बाब लक्षात घेवून संस्कृती सिनेव्हिजनतर्फे'TTMM’ या आगळ्या विषयावरच्या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. संदेश म्हात्रे निर्मित, गिरीश मोहिते दिग्दर्शित 'TTMM’ चित्रपटाचा मुहूर्त एका प्रेमगीताच्या चित्रीकरणाने नुकताच संपन्न झाला.\nकाळची पावलं ओळखत त्याचा नेमका वेध कलाकृतीच्या माध्यमातून घेणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये गिरीश मोहिते यांचं नावं आवर्जून घ्यावं लागेल. आपल्या आगामी ‘TTMM’ या चित्रपटातूनही प्रेमाच्या नव्या कल्पना, नात्यांची नवी परिमाणं मानवी संबंधातील नवीन प्रवाह, याविषयीचा वेध घेतला आहे. या सिनेमात रसिकांना दमदारकथानकासोबतच अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री दीप्ती देवी ही फ्रेश जोडी रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. आजच्या काळचं प्रतिबिंब दाखवणारा हा सिनेमा निश्चितच वेगळा असल्याची भावना सुबोध भावे व दीप्ती देवी यांनी यावेळी बोलून दाखवली.\nसचिन भोसले चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचं लेखन संजय पवार याचं आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचं आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचं आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुबोध भावे, दीप्ती देवी यांच्या अतुल परचुरे ही आहेत. 'TTMM’ चे यापुढील चित्रीकरण पुण्यात होणार आहे. वेगळा विषय व नवी जोडी यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2015-MixCrop-DrBawasakarTechnology.html", "date_download": "2019-03-25T08:22:34Z", "digest": "sha1:3U6P2PQ7TBFPF3GY2JPIJQCYKDIPJY3M", "length": 4339, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कापूस, मिरची, कोबी, हळद या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अत्यंत उपयोगी !", "raw_content": "\nकापूस, मिरची, कोबी, हळद या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अत्यंत उपयोगी \nश्री. नामदेवराव सोनबाजी कळंबे, ��ु.पो. मलकापूर, ता.वरूड, जि.अमरावती. मोबा. ९४२१७८७५९१\nगेल्या २० वर्षापासून मी संत्र्याची पन्हेरी नर्सरी तयार करीत आहे आणि २ वर्षापुर्वी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती मिळाली. मी शेंदुरजनाघाट, ता. वरूड, जि. अमरावती येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रॉडक्टची मागणी केली मात्र तेथे वेळेत पुरवठा होत नसल्याने तेवढ्यासाठी शें.घाट फर्टिलायझर्सवर अवलंबून रहावे लागत होत. म्हणून मी डायरेक्ट नागपूरला चौकशी केली आणि फवारणी औषधे मागवून घेतली. त्यांची फवारणी प्रथम माझ्याकडील २ एकर वांगी पिकावर केली असता वांग्याची वाढ जोमाने होऊन क्वालिटी एकदम बदलली. तेव्हापासून मी संत्र्याच्या पन्हेरीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे नियमित करीत आहे. त्याचा माझ्या पन्हेरीला खूप चांगला फायदा झाला. मला बाहेरच्या रसायनाचा वापर कमी करावा लागला.\nफेब्रुवारी व मार्च महिन्यात सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या पन्हेरीमध्ये मुळकूज रोगाचे प्रमाण वाढले होते. पण मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्प्रेमुले आणि ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर, प्रिझम व बाहेरचे रेडोमिल वापरात आहे. त्यामुळे मुळकूज हा रोग माझ्याकडे इतरांपेक्षा खूपच कमी होता. तसेच कपाशी, मिरची कोबी आणि हळद या पिकांवर पण मी सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले असता माझ्या उत्पन्नात वाढ झाली. माझ्या अनुभवानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची उत्पादने इतर कंपनीपेक्षा परवडणारी असल्यामुळे शिवाय खात्रीशीर रिझल्ट मिळत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/maratha-reservation-one-did-suicide-aurangabad-136848", "date_download": "2019-03-25T08:18:58Z", "digest": "sha1:J6AMLILUJBOJZVAZMLY7TTYJX6T3ICIS", "length": 12678, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "For Maratha Reservation one did suicide in Aurangabad #MarathaKrantiMorcha आरक्षणासाठी औरंगाबादेत आणखी एकाची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\n#MarathaKrantiMorcha आरक्षणासाठी औरंगाबादेत आणखी एकाची आत्महत्या\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : गारखेडा परिसरातील विजयनगरातील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (ता. १०) पहाटे मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.\nऔरंगाबाद : गारखेडा परिसरातील विजयनगरातील कारभारी शेळके (४३) यांनी श��क्रवारी (ता. १०) पहाटे मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.\nकारभारी दादाराव शेळके (वय 43, गल्ली क्रमांक 4 विजयनगर, गारखेड परिसर, औरंगाबाद) यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार पहाटे साडेतीनला उघडकीस आला. त्यांना 15 मिनिटांत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पुंडलीकनगर पोलिसांनी दिली. आत्महत्येच्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईडनोटमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nदरम्यान, काल (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चाने बंद पुकारला होता. त्यानंतर आज ही घटना घडल्याने \"कारभारी शेळके अमर रहे\" अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.\nLoksabha 2019 : पक्षातील मंडळींचे \"षड्यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील\nपारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या...\nभाजप- शिवसेनेतील कलह राष्ट्रवादीला तारक \nजळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. यात पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ वगळण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुका पूर्ण...\nपुर्णेच्या पाण्यात बुडून मलकापूरातील एकाचा मृत्यू\nमलकापूर : पूर्णा नदी पात्रात आंघोळ करीत असताना एका ३३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २१ मार्च रोजी दुपारी अडीजच्या सुमारास...\nLoksabha 2019 : राहुल गांधींसमोर पुन्हा स्मृती इराणींचे खडतर आव्हान\nनवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीदरम्यान अमेठी मतदारसंघामधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी लढत होणार आहे. 2014...\nLoksabha 2019 : केडर मोडलेली पुणे काँग्रेस\nदेशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत...\nपुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याच�� गरज आहे. काश्मिरी लोकांचा विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/cars/maserati-gran-cabrio-price-mp.html", "date_download": "2019-03-25T08:06:45Z", "digest": "sha1:5GAY5MZME2MELCTVMKG4IRVK27P776FS", "length": 16085, "nlines": 388, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मासेराती ग्रान कॅब्रिओ India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमासेराती ग्रान कॅब्रिओ - चल यादी\nमासेराती ग्रान कॅब्रिओ 4 7 व्८\nमासेराती ग्रान कॅब्रिओ 4 7 व्८\nमासेराती ग्रान कॅब्रिओ वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमासेराती ग्रान कॅब्रिओ - वैशिष्ट्य\nरेन सेन्सिंग विपेर Standard\nरेमोवाबळे वर कॉन्व्हर्टिबल टॉप Standard\nपॉवर अडजस्टेबल एक्सटेरिअर रिअर विरहि मिररोर Standard\nफॉग लिघटस रिअर Standard\nफॉग लिघटस फ्रंट Standard\nइलेक्ट्रिक फोल्डिंग रिअर विरहि मिररोर Standard\nलाथेर सतीरिंग व्हील Standard\nउत्सिडे टेम्पेरतुरे डिस्प्ले Standard\nकंट्री ऑफ असेम्ब्ली Germany\nकंट्री ऑफ मॅनुफॅकतुरे Germany\nरिअर सीट बेल्ट्स Standard\nसीट बेल्ट वॉर्निंग Standard\nसेण्टरल्य मौन्टेड फ्युएल टॅंक Standard\nपससेंजर सीडी रिअर विरहि मिररोर Standard\nपॉवर दार लोकस Standard\nसीडी इम्पॅक्ट बेअम्स Standard\nतुरे प्रेमसुरे मॉनिटर Standard\nवेहिकले स्टॅबिलि���ी कंट्रोल सिस्टिम Standard\nकप होल्डर्स फ्रंट Standard\nकप होल्डर्स रिअर Standard\nआकससूर्य पॉवर आउटलेट Standard\nऑटोमॅटिक कलिमाते कंट्रोल Standard\nपॉवर विंडोवस फ्रंट Standard\nरिमोट ट्रंक ओपनर Standard\nरिअर सीट हेडरेस्ट Standard\nमुलतीफुन्कशन सतीरिंग व्हील Standard\nलो फ्युएल वॉर्निंग लीगत Standard\nएमिस्सीओं नॉर्म कॉम्पलिअन्स Euro V\nआलोय व्हील सिझे 20 Inch\nतुरनिंग रॅडिस 6.15 meters\nगियर बॉक्स 6 Speed\nसतीरिंग गियर तुपे Rack & Pinion\nरिअर बारके तुपे Ventilated Disc\nफ्रंट बारके तुपे Ventilated Disc\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/don-ghadicha-daav/", "date_download": "2019-03-25T07:42:25Z", "digest": "sha1:44OLDJX7OHGD4RWBKWIAHI7YADVMTIQJ", "length": 5696, "nlines": 62, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nदोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव\nदोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव\nजगताचे हे सुरेख अंगण, खेळ खेळूया सारे आपण\nरंक आणखी राव, खेळू या रंक आणखी राव\nयाला जीवन ऐसे नाव.\nमाळ यशाची हासत घालू, हासत हासत तसेच झेलू\nपराजयाचे घाव, झेलू या पराजयाचे घाव\nयाला जीवन ऐसे नाव.\nमनासारखा मिळे सौंगडी, खेळाया मग अवीट गोडी\nदु:खाला नच वाव, दु:खाला नच वाव\nयाला जीवन ऐसे नाव.\n'रामशास्त्री' या ऐतिहासिक चित्रपटात आधी एकच गीत घालायचे असे ठरले होते. तेही छोटा राम आणि त्याची सखी जानकी ही दोघे खेळत असताना. या प्रसंगासाठी आठवले यांनी मराठी चित्रपटगीतात मनाचे स्थान प्राप्त झालेले 'दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव' हे गीत लिहिले. जीवनाचे तत्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात सांगितलेले इतरत्र कुठेही सापडणार नाही.\nदोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/forgetting-shows-how-intellligent-you-are/", "date_download": "2019-03-25T08:03:36Z", "digest": "sha1:EUVV7JP4AAP5HW4CH6UMMQQIVFSX67UP", "length": 18610, "nlines": 118, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुम्हीही विसराळू आहात? हे वाचून तुम्हाला तुमच्या विसराळू असण्याचा अभिमान वाटेल!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n हे वाचून तुम्हाला तुमच्या विसराळू असण्याचा अभिमान वाटेल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nअशी काही माणसं असतात ज्यांना स्वतःच्या स्मरणशक्तीबद्दल अभिमान असतो. या स्मरणशक्तीचा वापर शालेय स्तरावर किंवा समाजातील एक घटक म्हणून वावरत असताना निश्चितच होत असतो.\nपण खरंतर प्रत्येक घटनेतील अगदी छोट्यात छोटी बाब, शाळेत शिकलेली छोट्यात छोटी गोष्ट लक्षात ठेवणं हे अगदीच अशक्य असतं.\nजेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विसरता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल कमीपणा वाटायला लागतो. वाणसामानाच्या दुकानात उभं राहून आपण नेमकं काय घ्यायला आलो होतो याबद्दल तुम्ही ब्लँक होऊन जाता तेव्हा तुम्हाला स्वतःच्या स्मरणशक्तीवर शंका यायला लागते.\nकधीकधी आपण घरातल्या घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत एखादी वस्तू आणायला जातो. त्या दोन सेकंदात आपण नेमकं काय आणायला आलो आहोत याचा आपल्याला विसर पडतो आणि आपली प्रचंड चिडचिड होते.\nइतक्या साध्या स��ध्या गोष्टी आपण कशा विसरतो याबद्दल आपल्याला कमीपणा वाटायला लागतो. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की असं का होतं. पण टेन्शन नॉट… पॉल फ्रॅन्कलँड आणि ब्लेक रिचर्ड या टोरोंटो युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांनी याबद्दल संशोधन केले आहे.\nया संशोधनाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की मेंदूतील जुन्या आठवणी शब्दशः पुसल्या जाऊन त्यांची जागा नवीन आठवणी घेत असतात. खरंतर जुन्या आठवणींचे ठसे आपल्या मनावर असतात. ते पूर्णतः पुसले जात नाहीत. पण ते प्रसंग संपूर्णपणे लक्षातही नसतात. ते धूसर होत जातात.\nएका संशोधनाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती ही त्या व्यक्तीच्या उच्च बुद्धिमत्तेशी जोडली जाते हे गैर आहे. खरंतर हे याच्या विरुद्ध असते. सर्वसामान्यपणे चांगली स्मरणशक्ती = उच्च बुद्धिमत्ता हे समीकरण मानले जाते.\nमात्र अधिक उपयुक्त आणि फायदेशीर असते ते एखाद्या मोठ्या घटनेचा गाभा आणि त्याला अनुसरून ढोबळमानाने तो प्रसंग लक्षात ठेवणे आणि त्यातील बारीकसारीक तपशील विसरून जाऊन मेंदूतील जागा इतर गोष्टींसाठी रिकामी ठेवणे.\nरिचर्ड हा संशोधक CNN वाहिनीवरील आपल्या मुलाखतीत म्हणतो, “मेंदू हा अनावश्यक तपशील विसरून जातो आणि तुम्हाला ज्या गोष्टी भविष्यात निर्णय घ्यायला उपयोगी पडतील अशा संदर्भांचे जतन करतो. हे मेंदूचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.\nमाणसाच्या आठवणी ‘खोट्या’ असू शकतात\n“थोडेसे आळशी” व्हा – स्मरणशक्ती तीक्ष्ण करा प्रत्येकाला आवडेल असा हा रिसर्च वाचाच\nआपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाची एक सूक्ष्म यंत्रणा असते आणि ती आपल्या मेंदूत आठवणींचे जतन करण्याचे कार्य करते. ही आठवणींचे जतन करण्याबरोबरच अनावश्यक असा आठवणींचा भाग पुसून टाकण्याचे सुद्धा काम करते जेणेकरून तुम्ही अधिक महत्त्वाच्या बाबींवर तुमचे लक्ष केंद्रित करू शकता. त्यामुळे तुम्ही अधिक प्रभावीपणे योग्य तो निर्णय घेऊ शकता.\nही प्रक्रिया होत असताना नेमके काय होत असते तुमचा मेंदू तुमच्या जुन्या अनावश्यक आठवणींची जागा ही नवीन आवश्यक अशा आठवणींनी व्यापून टाकत असतो. ज्या मेंदूमध्ये आठवणींची गर्दी असते तो मेंदू योग्य रीतीने प्रभावी निर्णय घेऊ शकत नाही.\nम्हणजेच अनेक आठवणींचा गुंता असलेल्या मेंदूची निर्णयक्षमता कमी असते कारण तो खूप गोष्टी विचारात घेतो आणि स्वतःतच गोंधळ निर्माण करतो.\nरिचर्ड सांगतात, “खेळामुळे हिप्पोकॅम्पस मधील न्यूरॉन्सची संख्या वाढते. तुमच्या आयुष्यातील बारीकसारीक अनावश्यक आठवणी तुम्हाला प्रभावी आणि योग्य निर्णय घेण्यापासून रोखतात.\nजैविकदृष्ट्या म्हणायचे तर आदिम काळातील मानवाला जगण्यासाठी, आहे त्या परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी कित्येक बारीकसारीक तपशील लक्षात ठेवणे भाग होते.\nत्यामुळे मेंदूला तसं बारीक लक्ष ठेवण्याची, एखाद्या गोष्टीचे सखोल निरीक्षण करण्याची सवय होती.\nत्यामुळे तेव्हा मेंदूचा तसा विकास झाला. मात्र गेल्या काही वर्षांतील तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, माणसाला प्रत्येक गोष्टीचे बारीकसारीक तपशील लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही.\nत्यापेक्षा आजच्या काळातील लोकांना गुगल कसे काम करते, त्याच्यावर गोष्टी कशा शोधायच्या हे माहीत असून पुरते. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट विसरलात तरी ती गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायचे काम आंतरजाल म्हणजेच इंटरनेट अगदी चोख करते. त्यावर तुम्ही एखादी गोष्ट सहजपणे शोधू शकता.\nत्यामुळे तुम्ही अगदी लक्षात रहायलाच हव्यात अशा गोष्टी जर विसरत असाल किंवा तुमच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या घटना जर तुम्हाला आठवत नसतील तरच ही गंभीर बाब आहे. नाहीतर एखाद्या घटनेचे तपशील कालांतराने विसरणं हे अगदीच सामान्य बाब आहे.\nया छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याबद्दल तुम्ही स्वतःला कमी तर लेखू नकाच तर उलट शाबासकीच द्या की तुमचा मेंदू तुम्ही हवं त्या गोष्टी साठवण्यासाठी वापरत आहात.\nस्मरणशक्ती दीर्घकाळ शाबूत ठेवायची आहे मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच\nजर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर हे उपाय करून पाहाच\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← डॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट\nमोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश →\n“थोडेसे आळशी” व्हा – स्मरणशक्ती तीक्ष्ण करा प्रत्येकाला आवडेल असा हा रिसर्च वाचाच\nह्या गोष्टी नियमित खा आणि कार्यक्षम, लक्ष विचलित नं होणारा मेंदू विकसित करा\nहे बालपण कुणी आम्हाला परत मिळवून देईल का हो\n“भोळ्या संजू” च्या जीवनातल्या ह्या ७ अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी दा��वायचं “विसराळू राजू” विसरला\n“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय \nअमेरिकेत बनतोय लढाऊ जहाजांचा समुद्री पूल \n“ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर \nखुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट\nजगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २\nनेहरूंनी त्यांचं “Tryst with destiny” भाषण इंग्रजीतून करायला नको होतं असं वाटत असेल तर हे वाचा\nउत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर\nबॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\nया एकाच इंग्रजाने राणी लक्ष्मीबाईला “प्रत्यक्ष” बघितले होते\nएक असा दगड जो तुटला की त्यातून रक्त वाहतं..\nभीतीने पराभूत झालेला सेहवाग तर त्याच भीतीवर विजय मिळवणारा पार्थिव…एक विलक्षण अनुभव\nहे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत\nजास्त काळ साठवलेली वाईन चवदार का लागते\nमोदीजी… तुमच्या प्रिय गंगा नदीसाठी जीव गमावणाऱ्या स्वामींच्या मृत्यूस जबाबदार कोण\nइस्लाम+ख्रिश्चनिटीच्या १००० वर्षांच्या आक्रमणांनंतरही हिंदू धर्म का टिकून आहे\nगाईच्या शेणाचा वापर करून “बायोटॉयलेट” भारतीय रेल्वेचा अभिनव उपक्रम\nसार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_8.html", "date_download": "2019-03-25T07:44:42Z", "digest": "sha1:BUP6MALUITGPHOZ646GP55O4GQ5ASEYK", "length": 7239, "nlines": 125, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मी कशी वाटते तुला ? ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nमी कशी वाटते तुला \nमी कशी वाटते तुला तिने अचूक खडा मारला\nप्रश्न साधा सरळ, पण माझा अभिमन्यु झाला\nहे काय वेड्यासारख, मी प्रश्न टाळउन पाहिला\nतिच्या मनात एकच, आज बरा हा तावडीत भेटला\nचल निघू आपण, बघ दिवस पण मावळला\nथाम्बुया ना थोडावेळ, तिने पुन्हा गळ टाकला\nसुटका नाही आज म्हणत, तिने हात माझा पकडला\nप्रेम म्हणावे की पाश हे, आता तुम्हीच काय ते बोला\nकाय उपमा देऊ अन, काय सांगू आता हिला\nमाधुरी-ऐश्वर्या म्हणू की, म्हणू सरळ मधुबाला\nफूल म्हणू की फुलामधला, गंध म्हणू निराळआ\nस्वप्न म्हणू की वास्तवाचा, भास् तो आगाळआ\nथोड चढवून सांगू की, सरळ स्पष्टच सांगू तिला\nबाई ग प्रेम-बिम समजल नाही अजुन, थोडा वेळ दे मला\nनाहीतर नकोच ही दुनियादारी, उगीच व्हायची शाळआ\nआवडल तर ठीक, नाहीतर फसायाचा बेत सगळआ\nअरे सांग ना..., पुन्हा तिने तोच राग आळवला\nआता काहीतरी बोलायचे ठरवत, मीही शब्द उच्चारला\nसांगणार होतो तितक्यात तिचा फोन अचानक वाजला\nघरचा नंबर बघताच तिने, रुमालाने घाम टिपला\nनिघते मी आता म्हणत तिने, हात माझा सैल केला\nसुटलो बाबा एकदाच म्हणत, मी दीर्घ उसासा सोडला\nप्रश्न होता साधा सरळ, पण मी वेढ्यात अडकलेला\nएक दिवसासाठी का होइना, अभिमन्यु तेव्हा सुटलेला\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T08:21:15Z", "digest": "sha1:HZBZT2JQTJH7WXZDUPIGWEFUXI5DQTAO", "length": 2403, "nlines": 59, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "काव्य पाठवा | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\n34 आणि 83 बेरीज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/collage-diary-marathi-movie/", "date_download": "2019-03-25T07:35:35Z", "digest": "sha1:2725AFTBALIRAUM7RNIIQFMLN3BS4QUI", "length": 1843, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " collage diary marathi movie - मराठी कलाकार", "raw_content": "\n१ मराठी चित्रपट आणि तब्बल ५ वेगवेगळ्या भाषांतील गाणी.मराठी सिनेमांतील नवा विक्रम\nमनाने तरुण असणारा प्रत्येकजण कधी ना कधी आपली ‘कॉलेज डायरी’ उघडून त्यात रममाण होत असतो. कारण,...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T07:22:20Z", "digest": "sha1:KV3XFBOAJWCWT6CZAGCNJKLZCXSQFLK6", "length": 5284, "nlines": 40, "source_domain": "vicharpravah.in", "title": "अदानी यांच्या कंपनीने इस्त्राईल मधील एका कंपनीसोबत भागीदारी केली असून त्याअंतर्गत हैदराबाद शहरात अत्याधुनिक ड्रोन निर्मिती केली जाणार आहे. - विचारप्रवाह", "raw_content": "\nअदानी यांच्या कंपनीने इस्त्राईल मधील एका कंपनीसोबत भागीदारी केली असून त्याअंतर्गत हैदराबाद शहरात अत्याधुनिक ड्रोन निर्मिती केली जाणार आहे.\nएलबिट सिस्टम्सचे हरमिस ९०० ड्रोन\nअदानी यांच्या ‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’ या कंपनीने इस्राईलच्या ‘एलबिट सिस्टम्स’ या कंपनीसोबत मिळून हैदराबाद येथे अत्याधुनिक ड्रोन निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हरमिस ९०० आणि हरमिस ४५० हे जगातील अत्याधुनिक ड्रोन तयार केले जातील. अशाप्रकारचा हा भारतातील पहिलाच खाजगी प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पासाठी कंपनीतर्फे पहिल्या टप्प्यात दीड कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाईल. उपखंडातील भारत सरकारच्या धोरणात्मक नियोजनामध्ये संरक्षणात्मक दृष्टिकोनातून या प्रकल्पातील ड्रोन उपयोगात आणले जाणार आहेत.\nआपणाला हेही वाचायला आवडेल\nएप्रिल २०१९ पर्यंत सर्वसाधारण वापरकर्त्यांसाठी ‘गुगल प्लस’ बंद होणार असल्याची घोषणा गुगलने केली आहे.\nमंगळ मोहिमेवरील ‘इनसाइट मार्स लँडर’ने आपले यांत्रिक हात वापरून स्वतःचा सुरेख सेल्फी घेतला आहे.\nकृत्रिम बुद्धिमत्तेचे वितरण नक्की कशाप्रकारे करायचे हे जोपर्यंत निश्चित ��ोत नाही, तोपर्यंत गुगलने चेहरा ओळखणारे आपले तंत्रज्ञान न विकण्याचा निर्णय घेतला आहे.\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2016-Soyabin.html", "date_download": "2019-03-25T08:02:55Z", "digest": "sha1:I6TAZ4PRP4FB7HTKKVZ2NCDSBRQGRCW3", "length": 7373, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - मागील वर्षापर्यंत शेतीत नेहमी येणारे नैराश्य व अति पाऊस होऊनही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दिले हमखास सोयाबिनचे उत्पादन व तूर डवरली", "raw_content": "\nमागील वर्षापर्यंत शेतीत नेहमी येणारे नैराश्य व अति पाऊस होऊनही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दिले हमखास सोयाबिनचे उत्पादन व तूर डवरली\nश्री. धनेश उमाशंकर जयस्वाल, मु.पो. गावनेर, ता. नांदगाव, जि. अमरावती - ४४४६०३. मो. ९८५०३४३५३६\nमला शेतीचा अनुभव कमी असल्याने गेल्या वर्षी कृषी सेवा केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे वापरत होतो. मात्र यामध्ये माझे फार नुकसान झाले. त्यामुळे यावेळेस आमचे साळभाऊ यांच्या सल्ल्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापर करण्याचे ठरविले अमरावती येथे सुधीर लढ्ढा यांच्याकडे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे मिळत असल्याने समजले कंपनी प्रतिनिधी सुजीत भजभुजे (मो. ९६६५२९०४९५) यांच्या मार्गदर्शनानुसार सोयाबीन व तुरीला हे तंत्रज्ञान वापरू लागलो.\n१० एकरमध्ये सोयाबीनच्या ७ ओळी नंतर तुरीची १ ओळ अशी २५ जून २०१६ रोजी पेरणी केली होती. सोयाबीन जेएस - ३३५ आणि मारुती वाणाची तूर आहे. जमीन हलकी मुरमाड प्रतिची आहे. प्रथम जर्मिनेटर व प्रोटेक्टंटची बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण एकसारखी दिसत ह���ती. त्यानंतर १० दिवसांनी पंपास जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + प्रिझम ५० मिली आणि टरगासुपर घेऊन फवारले. त्यामुळे सोयाबीन ताजेतवाने दिसत होते. मात्र त्यानंतर सतत १० - १२ दिवस पाऊस पडत असल्याने सोयाबीन व तुरीचा अति पाण्याने ७० - ८० टक्के प्लॉट वाया जाणार अशी परिस्थिती झाली. याकरीता मी सोनाली ट्रेडर्स, अमरावती येथे गेलो. त्यांना पिकाची परिस्थिती सांगितली. त्यावर त्यांनी सांगितले की खोडामधील एक जरी पांढरी मुळी जिवंत असली तरी आपण पुर्ण झाड जिवंत करू. त्यावर माझा विश्वास बसेना. मात्र पर्याय नसल्याने वापरून बघूया, कारण पीक वाचले तर दुबार पेरणीचे संकट तरी टळेल. यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर खर्च करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी दिलेले जर्मिनेटर हे पाण्यामध्ये मिक्स करून झाडांच्या मुळापाशी सोडले. त्यानंतर ७ - ८ दिवसात झाडांना पाने फुटली व काडी जोम धरू लागली. ते पाहून मला आश्चर्य वाटले. ८ ते १० दिवसात ७० ते ८०% मरगळलेला प्लॉट ५० ते ६० % पुर्णपणे बहरला. नंतर मी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली प्रति पंपास घेऊन दुसरी फवारणी केली. त्यामुळे कोणत्याही रोगाचा तसेच खराब हवामानाचा पिकांवर वाईट परिणाम झाला नाही.\nत्यानंतर सोयाबीन फुलावर आल्यावर प्रति पंपास थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + न्युट्राटोन ६० मिली + राईपनर ६० मिलीची किटकनाशकासोबत फवारणी केली. एवढ्यावर सोयाबीन व तुरीचे पीक अतिशय उत्तम असे बाहरून एकरी १० ते १२ पोते सोयाबीनचा उतारा मिळाला तर तुरीला पुन्हा एक फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनची केली आहे. शेंगा बऱ्यापैकी असल्याने ५ ते ६ पोटे तूर होईल असा अंदाज आहे. शेतीत गेल्यावर्षी नुकसानीत गेलो होतो. त्यामुळे आलेले नैराश्य डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे जाऊन मला शेतीत आवड निर्माण झाली. पुढील वर्षी मी कपाशी लावणार असून त्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato7.html", "date_download": "2019-03-25T07:52:55Z", "digest": "sha1:7ETCWF2QHPWSS7UWW7FDU2VQXOGTVGDI", "length": 2909, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - मोठ्या पावसाने खराब झालेली टोमॅटो रोपे जर्मिनेटरने सुधारली", "raw_content": "\nमोठ्या पावसाने खराब झालेली टोमॅटो रोपे जर्मिनेटरने सुधारली\nश्री. पंडीत विठ्ठल इंचळे, मु.पो. रासेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक .\nनामधारी २५३५ टोमॅटोची ३० गुंठ्यामध्ये लागवड केली आहे. रोपांना गळ पडत होती. पाऊस मोठा होता. त्यामुळे वाफ्यावर रोपे खराब होऊन पावसाने प्लॉट खराब होत चालला होता. त्यावेळेस टोमॅटोची रोपे वाफ्यावर असताना जर्मिनेटर ५० मिली + १५ लि. पाणी अशी दाट (ड्रेंचिंगप्रमाणे) फवारणी केल्याने रोपे तरारून आली. एकही रोप वाया गेले नाही. नंतर ४ ते ५ दिवसांनी रोपे लावली. लागण केल्यानंतर ८ दिवसांनी थ्राईवर व क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिलीची १५ लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे वाढ जोमाने झाली. बगल फुट भरपूर निघाली. दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ६० मिलीची केली असता, पानाला काळोखी चांगली आल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर व राईपनरची केली असता, फुल कळी जोरात लागली, मालाला शाईनिंग आली. त्यामुळे मार्केटला माल एका नंबरने विकला जात होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/definitely-take-firm-stand-for-marathi-hindus-says-uddhav-thackeray/", "date_download": "2019-03-25T08:13:06Z", "digest": "sha1:EFP5MHDFDFDLY6QK2LHPVWR62USLX4R7", "length": 6420, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत – उद्धव ठाकरे", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत – उद्धव ठाकरे\nमुंबई: सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत. त्यामुळे जेव्हा घ्यायची तेव्हा नक्कीच भूमिका घेणार. मात्र माझ्या स्वार्थासाठी नाही तर वेळ आल्यावर मराठी आणि हिंदूंसाठी ठाम भूमिका घेऊ घेणार, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे येथे केले. परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना व मुंबई वृत्तपत्र संघटना यांच्या एकदिवसीय अधिवे��नात ते बोलत होते.\nपत्रकारिता हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे. न्यायव्यवस्थेला तुमच्याकडे येऊन आपल्या वेदनेला वाचा फोडावी लागते हे या स्तंभाचे महत्व आहे. आजकालच्या राजकारण्यांना फेरीवाला आणि वृत्तपत्र विक्रेता यातला फरक कळायला हवा. शिवसेना वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत आहे. सुर्य उगवला की सकाळी उजेड पडतो तसेच वृत्तपत्र डोक्यात प्रकाश पाडते. त्यामुळे पत्रकारांइतकेच ते घरोघरी पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचेही तितकेच महत्व आहे.\nबाळासाहेबांनी सुरू केलेल्या मार्मिकची क्रांती घरोघरी पोहोचवण्याचे काम या त्यावेळच्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढल्याबद्दल विक्रेत्यांचे विशेष कौतुक, असे म्हणत ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आवाज दणदणीत असूनही तो कोण दाबत आहे, असा टोलाही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nदिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा\nतर क्षणाचा विलंब न करता विहरीतही उडी मारेल – अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-on-congress/", "date_download": "2019-03-25T08:06:58Z", "digest": "sha1:76AKGQDD7D4CFS57UH465HC7SMTVVBHY", "length": 5963, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमच्यावर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसने आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली : गडकरी", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nआमच्यावर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसने आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली : गडकरी\nटीम महाराष्ट्र देशा- आमच्यावर घटना बदलणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जातात मात्र आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली असा सणसणीत टोला केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसला लगावला.निवडणुका आल्यावर जातीयवादाची भीती निर्माण केली जाते.पुण्याजवळ घडलेली घटनेचा उल्लेख करत जातीयवादाचं राजकारण करणाऱ्यांवर गडकरींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.\nकेंद्र सरकारच्या चार वर्षातील योजना, विकास कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकाबाबत बोलताना ईव्हीएम वरून आरोप करणाऱ्या विरोधकांना गडकरींनी लक्ष केलं. आम्ही जिंकलो की ईव्हीएम खराब आणि दुसरे जिंकले की चांगलं अशी विरोधकांची सध्या स्थिती आहे, भंडारा गोंदिया मध्ये मतदान झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल ईव्हीएम च्या विरोधात बोलत होते आता जिंकल्यानंतर काय अस गडकरी म्हणाले. काँग्रेसने आणि आम्ही घटना बदलणार असल्याचे आरोप होतात अस ही गडकरी म्हणाले.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nआम्ही जिंकलो की ईव्हीएम खराब, दुसरे जिंकले की चांगलं कसं\nराज्य सरकारने मनात आणल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात : गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/bigg-boss-marathi-day-31-updates/", "date_download": "2019-03-25T07:37:53Z", "digest": "sha1:PN67GFRBJQ2VFKPNE5NDNXCJVMGJATHU", "length": 10419, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "थेंबे थेंबे तळे साचे टास्क - पाण्यासाठी नळावर होणार भांडण", "raw_content": "\nथेंबे थेंबे तळे साचे टास्क – पाण्यासाठी नळावर होणार भांडण\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nबिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा नाडकर्णी.\nथेंबे थेंबे तळे साचे टास्क – पाण्यासाठी नळावर होणार भांडण\nबिगबॉसच्या घरापासून दूर तब्बल आठवडाभर सिक्रेट रूम मध्ये राहिल्यानंतर राजेश सोमवारी बाहेर आलेला दिसला. त्याच्या बाहेर येण्याने घरातील सदस्यांना आनंद झालेला दिसत होता. सर्वानी आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले. स्मिता, आस्ताद, भूषण, सुशांत ह्यांना तर आनंद झालेला होताच पण दुसरीकडे सई, मेघ आणि पुष्कर थोडेसे नाखूष वाटले. त्यांनी राजेशचं स्वागत केलं खरं पण त्याची परत रेशीमसोबत वाढत असलेली जवळीक पाहून ते नाराज होते. आठवड्याच्या शेवटी कुणीतरी एक जण घराबाहेर पडणार होता, आणि आपल्याला पत्रकार अनिल थत्ते ह्या शो मधून एक्झिट घेताना दिसले. ते बाहेर पडल्यानंतर सोमवारच्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना त्यांची आठवण असं दिसत होतं. राजेशच्या घरात वापस येण्याने पुन्हा एकदा घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसले.\nरेशम तर राजेशला बघून खूपच खुश वाटत होती. ह्यावेळी राजेशने पुन्हा एकदा रेशमला प्रेमाची कबुली दिली. तुझ्या अशा वागण्याने तुझ्या पत्नीला काय वाटेल असं रेशमने राजेशला विचारलं असता माझी पत्नी डिम्पल समजूतदार असून ती आपल्यामधल्या फीलिंग्स समजून घेईल असं तो म्हणाला. घरात निर्माण झालेल्या ह्या स्थितीत आता अजून मसाला आपल्याला ह्यापुढे बघायला मिळणार असं दिसतंय. आजच्या ३१ व्या एपिसोड मध्ये आता नवीन आठवडा आणि नवीन टास्क्स मुळे सुरु झालेली गडबड आपल्याला दिसली. थेंबे थेंबे तळे साचे हा टास्क सध्या घरात चालू आहे. ह्या टास्कमध्ये दोन्ही ग्रुप्सना बादलीने पाणी भरून जवळच्या टाक्यात ओतायचं आहे आणि विरुद्ध टीमला ते करण्यापासून त्यांना रोखायचं आहे.दोन्ही ग्रुप्स सुरुवातीला स्ट्रॅटेजी आखण्यात बिझी दिसले. पुढे हा टास्क चालू असताना आज आपल्याला स्मिता आणि सईमध्ये थोडस लढाई स्वरूपाची झटपट आपल्याला बघायला मिळाली.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nबिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा नाडकर्णी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\nआजकाल जे क्षेञ बघावं त्यात चढाओढ सुरु आहे. त्या त्या क्षेत्रातील स्पर्धकांमध्ये कमालीची स्पर्धा आजच्या जमान्यात...\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\nबिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. वाद, विरोध, प्रेम,...\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n‘चॉकलेट बॉय’ स्वप्नील जोशी, ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री...\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“घाडगे & सून” ही कलर्स मराठीवरील मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत...\n‘इयर डाऊन’चा २ तासांचा विशेष चित्रपट.पुन्हा भेटीला येतोय जन्मेजय.\n‘इयर डाऊन’चे पहिले पर्व संपले असून या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. समीर...\n‘बिगबॉसच्या घरात परत न्या’ सिक्रेट रूम मधील राजेश ढसाढसा रडला\nबिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.farmguru.in/new-blog/2016/3/21/jam8fbwp89g4xu99g79c27eukc3ai5", "date_download": "2019-03-25T07:31:56Z", "digest": "sha1:ODDW3C5EPIADGHG6KUPR6J6OU4YW4ZAD", "length": 2335, "nlines": 37, "source_domain": "www.farmguru.in", "title": "टोमॅटो मार्च कॅम्पेन — farmguru", "raw_content": "\n२५ मार्च २०१६ पर्यंत\nटोमॅटो उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.\nकृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.\n\" फार्मगुरू \" ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात \nआता एम. आर. पी वर मिळवा बंपर डिस्काउंट ३०% पर्यंत सूट\nफार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.\n१०० % मूळ उत्पादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2019-03-25T08:15:08Z", "digest": "sha1:PQJPDMLCUOJOVTZT7ZXJZF5GCR5FO4K5", "length": 10344, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहर टाकळी येथे “रास्ता रोको’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशहर टाकळी येथे “रास्ता रोको’\nशिवाजी महाराजांविषयी समाजमाध्यमांत आक्षेपार्ह मजकूर\nभावीनिमगाव – शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे एका व्हॉटस्ऍप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या युवकांनी शहर टाकळी-दहिगाव (ने) रस्त्यावर दोन तास “रास्ता रोको’ आंदोलन केले.\nया घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून गावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. गावातील मुख्य चौकात ‘रास्ता रोको’ झाला. त्यानंतर तिथे निषेध सभा घेऊन आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. या वेळी गावातील मुख्य चौकात संतप्त जमावाकडून टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. गावातील सर्व व्यापारी व छोट्या मोठ्या दुकानदारांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनास्थळी शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त जमावाकडून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.शेवगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.\nदरम्यान, “सोशल मीडिया’च्या वापराबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्या वापरावर निर्बंध येण्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पु���रावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/akash-thosar/", "date_download": "2019-03-25T07:35:09Z", "digest": "sha1:4E2AAYL5YMS3ODVQ5HA6PV4BKAIHHAKE", "length": 2024, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Akash Thosar - मराठी कलाकार", "raw_content": "\nआर्ची आणि परश्याच्या मुलाची कथा “सैराट२” मध्ये\nअभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा पहिलाच चित्रपट “सैराट” सुपरडुपर हिट ठरला होता. बॉक्स...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/nayan-jadhav/", "date_download": "2019-03-25T08:10:58Z", "digest": "sha1:HWJ72KZMPXLBNYL5VAX7MCOJEZJITDXP", "length": 2076, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Nayan Jadhav - मराठी कलाकार", "raw_content": "\n‘चॉकलेट बॉय’ची इमेज पुसणार आहे ‘हा’ अभिनेता.आगामी मराठी सिनेमा’मुंबई आपली आहे’.\nमराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक ���सतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8", "date_download": "2019-03-25T08:34:50Z", "digest": "sha1:NV4DFXBCSE7W2TRC2KFJDVVR2RANB54X", "length": 12194, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्ल फ्रीदरिश गाउस - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nख्रिस्टियान आल्ब्रेख्त येन्सन याने रंगविलेले गाउसचे व्यक्तिचित्र\nपूर्ण नाव योहान्न कार्ल फ्रिडरीश गाउस\nजन्म एप्रिल ३०, १७७७\nमृत्यू फेब्रुवारी २३, १८५५\nकार्यसंस्था गेओर्ग-आउगुस्त विद्यापीठ, ग्यॉटिंगन\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक योहान फ्रिदरिश फाफ\nडॉक्टरेटकरता विद्यार्थी फ्रिदरिश बेसेल\nगेओर्ग फ्रिडरिश बेर्नहार्ड रीमान\nपुरस्कार Copley Medal (१८३८)\nयोहान्न कार्ल फ्रीडरीश गाउस हा एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. गाउसने गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली. Number theory, संख्याशास्त्र (Statistics), गणितीय विश्लेषण (Mathematical Analysis), Differential Geometry, Geodesy, Electrostatics, खगोलशास्त्र, Optics अशा अनेक शाखांचा ह्यात समावेश आहे. गाउसला बऱ्याच वेळा \"गणिताचा राजकुमार\" असे संबोधले जाते तसेच \"आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ गणितज्ञ\" असे मानले जाते. शास्त्र आणि गणिताच्या विविध शाखांवर गाउसचा अतिशय मोठा प्रभाव आहे आणि त्याला इतिहासातील सर्वांत प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते.\nगाउसने अंकगणितामधे समरुपतेची (Congruance) संकल्पना मांडली. त्यासाठी गाउसने तीन लहान समांतर् रेषा (≡) हे चिह्न वापरले. या चिह्नाच्या वापरामुळे अंकाच्या समरूपतेचा अर्थबोध फार चटकन होतो. यामुळे गणितामधे केवळ संकल्पनाच नाही तर् चिह्नेही अतिशय महत्वाची आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गाउसने Disquisitiones Arithmeticae अंकगणितामधील संशोधन हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामधे अंकगणितातील जुने सिद्धांत अतिशय काटेकोर नि सुसंबद्ध पद्धतीने लिहून काढले. अंकगणितामधे काही क्रांतिकरी संशोधन गाउसने या ग्रंथामधे मांडले. गाउसने वयाच्या १���व्या वर्षी बीजगणिताचे मुलभूत प्रमेय सिद्ध केले. त्याने पुढे जाऊन त्याने आपल्या सिद्धांतामधील चुकही शोधली आणि ती दुरुस्त करत, मृत्युपुर्वी त्याने बीजगणिताचे मुलभूत प्रमेयाच्या अनेक सिद्धता दिल्या. गाउसने पहिल्यांदा कॉम्प्लेक्स नंबर पद्धतीच्या अस्तित्वाची सिद्धता दिली. त्याने \"नकाशे बनवणाऱ्यांचा प्रश्न\" = Map makers problem सोडवला. तो सोडवताना त्याने अतिशय सुंदर भौमितीक संकल्पनांना जन्म दिला. अयुक्लिडीयन भुमितीचा शोध लागल्यावर आपणासही ही कल्पना ठाऊक होती मात्र लोक भयास्तव आपण हे काम् कधी बाहेर आणले नाही असा गौप्यस्फोट गाउसने केला होता. यामुळे जरी वाद निर्माण झाला असला तरी आता हे सिद्ध झाले आहे की गाउस खरे बोलत होता. गाउसने भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीतही काम केले. भौतिकशास्त्रातील स्थिरविद्युत (Electrostatics) गाउसचा सिद्धांत अतिशय मुलभुत म्हणून प्रसिद्ध आहे. संख्याशास्त्रामधे त्याने \"गाउसचा वक्राकार\" (Gaussian curve) ही संकल्पना मांडली. त्याने प्रकाशाचा नि भिंगांचाही अभ्यास केला.\nइ.स. १७७७ मधील जन्म\nइ.स. १८५५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१७ रोजी १४:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/joints-pain-1357881/", "date_download": "2019-03-25T08:30:57Z", "digest": "sha1:JKW2V2EURCKNHBDWHPGNDLCVBYZ26VAA", "length": 10612, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "joints pain | सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nहिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे.\nहिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे. सांधे जखडणे, सुजणे, वेदनापूर्वक हालचाली इत्यादी सांध्याबद्दलच्या अनेक तक्रारी सुरू होतात किंवा तक्रारींची तीव्रता वाढते. थंडीमुळे हालचाली कमी राहतात त्यामुळे सांधे अजून जखडल्यासारखे वाटतात. आहाराचा आणि व्यायामाचा संधिवाताच्या तक्रारींवर बराच परिणाम होतो.\nसांधे दुखू नयेत म्हणून किंवा सूज कमी राहावी म्हणून आणि हालचाली वेदनारहित राहाव्यात म्हणून आहार खूप मदत करील. ओमेगा-३, कॅल्शिअम, ड-जीवनसत्त्व यांची यात खूप मोठी भूमिका आहे. कॅल्शिअम आणि ड जीवनसत्त्व यांच्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो व वेदना कमी होण्यास मदत होते. दूध, दुधाचे पदार्थ, सोयाबीन, अंडी इत्यादी मधूनही जीवनसत्त्वे मिळतात. पण ‘ड’ जीवनसत्त्वासाठी सूर्यप्रकाश हाच उत्तम स्रोत आहे. (सकाळी सकाळी मिळणारा सूर्यप्रकाश) ओमेगा- ३ हे एक प्रकारचा स्निग्ध पदार्थच आहे, जो मासे, अक्रोड, सोयाबीन, जवस इत्यादी पदार्थामधून मिळतो. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. जवस चटणी, सोयाबीन, अक्रोड हे पदार्थ तर रोजच्या जेवणात वापरावे. लसूण, हळद, गुळवेल इत्यादी पदार्थाची पण मदत हा0ेते.\nसंधिवातामुळे वजन वाढणे आणि वजन वाढल्यामुळे संधिवाताच्या तक्रारी वाढणे हे विषचक्र आहे. वजन आटोक्यात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये व्यायामाच्या आधी वार्मअप करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते व परिणामी सांध्यांनाही त्रास होऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B3/", "date_download": "2019-03-25T07:22:03Z", "digest": "sha1:U3LCQ4T6QBAJTIZ7FCN4C6GO2TLM4DUK", "length": 15280, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#अबाऊट टर्न : ज्ञानकल्लोळ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#अबाऊट टर्न : ज्ञानकल्लोळ\nविकीपीडिया हा निःशुल्क ज्ञानकोश आहे. ज्ञानावर मक्तेदारी प्रस्थापित करून त्याची विक्री करणाऱ्या कोशांना पर्याय म्हणून हे व्यासपीठ काही जाणत्यांनी जगाला उपलब्ध करून दिलं. विकीपीडियानं वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञांना लिहिण्यासाठी आमंत्रित केलं; पण विद्वानांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. मग ज्या-त्या विषयात जेवढी माहिती असेल, ती अपलोड करण्याची विनंती सामान्य लोकांना करण्यात आली. पण तपशिलात चुका होऊ लागल्या. तज्ज्ञांना त्या सहन झाल्या नाहीत आणि मग ते दुरुस्त्या करण्यासाठी धावले. आमंत्रण देऊनही न आलेले तज्ज्ञ अशा प्रकारे या वाटचालीत हळूहळू सहभागी झाले, असं विकीपीडियाचे प्रतिनिधीच सांगतात. आजही तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांत हा कोश वेगळ्याच कारणांनी गाजू लागलाय.\nपाकिस्तानातल्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या पाळीव कुत्र्यांचं विकीपीडियावरचं पेज गाजायला लागलं. निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांच्यापासून फारकत घेणाऱ्या त्यांच्या पत्नीनं घटस्फोटाचं एक कारण इम्रान यांचा पाळीव कुत्रा हेही आहे, असं सांगितल्याचं प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर इम्रान यांचं श्वानप्रेम दुसऱ्यांदा गाजतंय. प्रत्येकाची वेळ असते आणि वेळ सांगून येत नाही, हेच खरं\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही पाळीव कुत्र्यांचं भलतंच वेड आहे म्हणे विकीपीडियानं या कुत्र्यांची अनेक पेजेस तयार केली आहेत. आता त्याच धर्तीवर इम्रान खान यांच्या कुत्र्यांचं पेज तयार करायला घेतलंय, असं विकीपीडियाच्या अधिकाऱ्यानं पाकिस्तानातल्या मीडियाला सांगून टाकलं. या पेजवर इम्रान यांच्या कुत्र्यांची शेरू, मोतू, शेरनी, पिडू, मॅक्सिमस अशी नावं दिसू लागलीत.\nपण त्यांच्या जन्मतारखा आणि इतर तपशील उपलब्ध झालेला नाही, असं हा अधिकारी सांगतो. एकाएकी या श्वानांनी मीडियाचं लक्ष वेधू�� घेण्यामागचं करण काय असावं “खानाघरचं श्वान’ एवढं म्हणून आम्ही तो विषय डोक्यातून काढला. तेवढ्यात त्रिपुरातून विप्लव देव यांची बातमी आली. आठवतात ना “खानाघरचं श्वान’ एवढं म्हणून आम्ही तो विषय डोक्यातून काढला. तेवढ्यात त्रिपुरातून विप्लव देव यांची बातमी आली. आठवतात ना महाभारतात इंटरनेट होतं, हा शोध लावणारे मुख्यमंत्री हेच महाभारतात इंटरनेट होतं, हा शोध लावणारे मुख्यमंत्री हेच त्यांच्या विकीपीडिया पेजवर तीन दिवसांत 37 वेळा बदल केले गेल्याचं प्रकरण सध्या गाजतंय. कुणीतरी त्यांचं पेज सतत संपादित करतंय. त्यांनी लावलेल्या शोधांसाठी जर हे घडलं असतं, तर सद्यःस्थितीत फारसं काही वाटलं नसतं. पण वाद आहे त्यांच्या जन्मगावाचा. त्रिपुरातल्या गोमती जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला, असं सुरुवातीला या पेजवर दिसत होतं. कुणीतरी त्यात बदल करून बांगलादेशातल्या चांदपूरमध्ये त्यांचा जन्म झाल्याची नोंद केली. काही तासांनी पुन्हा गोमती जिल्हा दिसू लागला.\nदेव यांच्या पेजमध्ये बदल करणाऱ्या व्यक्तीनं ते भारतात अवैधरीत्या आल्याचा उल्लेख केलाय. मग त्यांचं शिक्षण वगैरे भारतातच झालं, असंही म्हटलंय. दोन-तीन दिवस अशीच अदलाबदल चालली आणि शेवटी विप्लव देव यांचं जन्मस्थळ गोमती जिल्ह्यात स्थिरावलं. मोजक्या माहीतगार व्यक्तींना पेज एडिट करण्याची परवानगी देणाऱ्या विकीपीडियानं या गोष्टीचा गंभीरपणे विचार केलेला बरा इम्रान खान यांच्या श्वानांचं एकवेळ ठीक आहे. पण ईशान्येत आधीच नागरिकत्वाचा गोंधळ सुरू असताना ही भर कशाला त्यात\nतुकारामबीज: संत तुकारामांचे संतमहात्म्य\nलक्षवेधी: गोव्यातील स्थैर्य स्थायी की आभासी\nबंडोबांचे झेंडे सर्वच पक्षात (अग्रलेख)\nजीवनगाणे : मी… तू… आपण…\nसंडे स्पेशल : रायडिंग टू द टॉप ऑफ द वर्ल्ड (भाग-1)\nविज्ञानविश्व : पोर्ट्रेट एडमंड डी बेलामीचं…\nप्रेरणा : अंध युवकाची प्रशासनसेवा\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर���ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-criticize-maharashtra-government/", "date_download": "2019-03-25T08:19:41Z", "digest": "sha1:M3K34FL3XHM5UOALMT2F4EJX3NEF64V6", "length": 5999, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारला लाज वाटली पाहिजे – धनंजय मुंडे", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसरकारला लाज वाटली पाहिजे – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांचे पंचनामे करताना सरकारला लाज वाटली पाहिजे , शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटया लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का असा शब्दात शब्दात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘१७ जिल्हयांचा दौरा केला, एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. गारपीटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. धर्मा पाटील यांना मृत्यू नंतरही न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरु आहेत. शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. शासनाचे अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. शासनाचे अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nया वेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला 20 मिनिटे आणि नंतर दिवासभारासाठी तहकुब करण्यात आले.\nपहा काय म्हणाले धनंजय मुंडे\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\n“सिगुदा” तरूण पिढी : आत्मघातकी तरूणाई- प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे\nउद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/food-hunter-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T08:01:15Z", "digest": "sha1:3FRGZL2GQXOZKJ6UNLBWDTNY5Z4ZXIKS", "length": 5612, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Food hunter : सुरळीच्या वड्या", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nFood hunter : सुरळीच्या वड्या\nचण्याच्या डाळीचे पीठ 1 कप , ताक 1 कप , पाणी 1 कप ,चवी प्रमाणे मीठ, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं एक इंच, 1/2 चमचा जिरे.फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, तेल, ��ड़ी पत्ता 7/8 पान. ओले खवलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.\nप्रथम मिरची जिरे आल एकत्र बारीक वाटुन घ्या. मग त्या मधे एक कप पाणी ,एक कप ताक घालुन मिक्स करा आणि गाळुन घ्या. नंतर चण्याच्या पिठात हे पाणी मिक्स करून एकजीव होईपर्यंत घोटून घ्या.कढईत हे मिश्रण घालुन मध्यम आचेवर शिजवावे. मिश्रण साधारण घट्ट झाल्यावर ताटाला तेल लावून घ्या नंतर चमच्याने थोडे मिश्रण ताटात लावुन घ्यावे.मिश्रण गार झाल्यावर त्याची सुरळी होत असेल म्हणजे ते घट्ट राहिले तर गॅस बंद करून एक दोन डाव ताटाच्या मागे पातळ पसरावे.मग पसरलेल्या मिश्रणाच्या वड्या कराव्या त्यावर तेलाची फोडणी घालावी आणि ओल खोबरे आणि कोथिंबीर घालुन छान त्याची सुरळी करावी अश्या प्रकारे खमंग अशी सुरळीची वडी तयार आहे.\nटीप : तुमच्याकडे अशा खमंग रेसिपी असतील तर या मेल आयडी वर टाइप करून पाठवा [email protected] आम्ही तुमच्या नावासह प्रसिध्द करू.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nराज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक; भाजपकडून नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर\n‘धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे’ -अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/water-supply-in-pune-will-remain-closed-on-thursday/", "date_download": "2019-03-25T08:09:37Z", "digest": "sha1:NUTQGRYHHWX53C7VSVA7IXWQFV3H6FSK", "length": 6580, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nगुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार\nपुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जल केंद्रावरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामानिमित्त येत्या गुरूवारी १२ ऑक्टोबरला संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.\nशहरातील पाणीपुरवठा बंद असणारा भाग\nपर्वती जलकेंद्र भाग : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिन्नरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्;वरीनगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्रमांक ४२ आणि ४६, कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.\nचतु:शृंगी एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nपत्नीला जीन्स घालायला विरोध, पतीवर गुन्हा दाखल\nमोदींने मानले महाराष्ट्रातील जनतेचे मराठीतून आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/trek-harishchandragad-1226647/", "date_download": "2019-03-25T08:21:33Z", "digest": "sha1:Z4QVJ5UXWSGN2TUCDBNLWTS67VHMRROH", "length": 63166, "nlines": 280, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हरिश्चंद्राची परिक्रमा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nसह्य़ाद्रीच्या डोंगररांगा हाडाच्या ट्रेकर्सना नेहमीच साद घालत असतात.\nसह्य़ाद्रीच्या डोंगररांगा हाडाच्या ट्रेकर्सना नेहमीच साद घालत असतात. हरिश्चंद्र गडाचा ट्रेकही असाच. कितीही वेळा केला तरी तो नवनव्या वाटा धुंडाळू पाहणाऱ्यांच्या हाती असा काही खजिना ठेवतो की पावलं पुढच्या शोधासाठी पुन्हा आपसूक तिकडे वळतात.\nगेले कित्येक दिवस एका भन्नाट ट्रेकचा बेत शिजत होता. तो होता शिव-सह्य़ाद्रीचं मनस्वी दर्शन घडवणाऱ्या ‘हरिश्चंद्रगडा’चा. अर्थातच, नेहमीच्या रुळलेल्या वाटांवरून खिरेश्वर किंवा पाचनई गावातून करायचा हा ट्रेक नव्हता. तर ‘प्रगतं दक्षिणमिति प्रदक्षिणं’ या वचनानुसार आम्ही दक्षिणेकडून (डावीकडून) गडाला सुरुवात करून प्रदक्षिणा घालणार होतो. हरिश्चंद्रगडाची अनुभूती घेणार होतो – ‘जुन्या माळशेज’ घाटवाटेतून, ‘काळूच्या वोघा’जवळून, पश्चिमेच्या बेलपाडा गावातून, उत्तरेच्या ‘सादडे घाटा’तून, गडाच्या कोकणकडय़ावरून आणि आग्नेयेच्या ‘जुन्नर द्वारातून राजनाळे’तून. बेत होता तीन दिवसांच्या खडतर परिक्रमेचा. साकेत आणि मििलद हे कसलेले ट्रेकरदोस्त सोबत असल्यामुळे ही परिक्रमा आनंददायी होणार याची खात्री होती.\nअवसरी घाटात ढाब्यातलं जेवण, नारायणगावचं ‘एक्स्ट्रा-मलई-मारके’ मसाला दूध आणि खुबी फाटय़ावर कडक चहामुळे ट्रेकच्या आदल्या रात्रीचा गाडीप्रवास सुसह्य़ झाला. मुक्कामाला हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी खिरेश्वर गावी पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली. चिंतामण कवटे यांच्या ‘ऐश्वर्या’नामक घरगुती हॉटेलपाशी मुक्काम आणि गाडीपाìकगची सोय झाली. गावात मुक्कामाला असलेल्या बेशिस्त टुरिस्टांचा कोलाहल आणि दणदणीत थंडी यांच्याकडे दुर्लक्ष करत स्लीिपगबॅगमध्ये गुरफटलो.\nउजाडला परिक्रमेचा पहिला दिवस आजचा पल्ला दमदार होता. दक्षिणेकडील ‘जुन्या माळशेज’ घाटाच्या पाऊलवाटेवरून, गडाच्या पोटातल्या ‘काळूचा वोघ’ धबधब्याजवळून आणि खोरं ओलांडून पश्चिमेकडून बेलपाडा गावातून गडाचं दर्शन घ्यायचं होतं. सकाळी साडेसहा वाजता खिरेश्वरच्या प्राचीन राऊळातल्या नागेश्वर महादेवाला वंदन करून परिक्रमेचा शुभारंभ केला.\nगडाच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या पठारावरून प्रदक्षिणा घालत निघालो. नागेश्वर राऊळ आणि शेजारच्या कातळकोरीव लेण्यापासून माळशेज घाटाकडे जाणारी पाऊलवाट आम्ही निवडली होती. वाटेतल्या कातळावरचं कोरलेलं शिविलग बघता, ही वाट पुरातन काळाप���सून वापरात असणार असं वाटलं. दीड तासाची पठारावरून चाल, पण किती मनोहारी. पूर्वेला सूर्य अजूनही निरोळी-रांजणाच्या डोंगरांमागे दडलेला. तरीही, हरिश्चंद्रगडाच्या शिखरांचे (हरिश्चंद्र-तारामती-रोहिदास) माथे हलकेच उजळू लागलेले. वाटेवरून कधी दिसलं गडाचं देखणं प्रतििबब पुष्पावती नदीतल्या पात्रात, तर कधी गड उठून दिसला वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनसळी गवताळ पठारामागे. कधी खिळवून ठेवलं तळ्याच्या काठी उमललेल्या निळ्या मंजिऱ्या, पोहणारी बदकं आणि मागे गडाच्या विस्तृत पॅनोरमाने. आमच्या परिक्रमेची सुरुवात अशी प्रसन्न झालेली..\nघाटमाथ्यापासून कोकणात उतरणाऱ्या माळशेज घाटाचा ‘गाडीरस्ता’ बनायच्या काहीशे वष्रे आधीपासून वापरात होती ‘जुन्या माळशेज’ घाटाची पाऊलवाट. मराठय़ांच्या वसई मोहिमेत या घाटातून भिवंडीकडे सन्य गेल्याचे अनेक उल्लेख आढळतात. त्यामुळे हरिश्चंद्रच्या परिक्रमेत या पुरातन घाटवाटेने उतरण्यासाठी आम्ही आतुर झालेलो. घाटापाशी पोहोचण्यासाठी खुबी गावापासून महामार्गावरून कल्याणच्या दिशेने चालत निघालो. उधळ्या, घोण्या, भोजगिरी, दौंडय़ा-देवदांडय़ा अशा सह्य़माथ्याच्या अजस्र डोंगरांच्या कुशीतल्या निवांत शांत घळीत दडलेल्या घाटदेवाच्या राऊळापाशी विसावलो, तेंव्हा जुनी घाटवाट सापडणार का असा प्रश्न पडलेला. राऊळापासून परत महामार्गावर आलो, तेंव्हा डावीकडे होतं रस्त्याचं लपेटदार वळण, तर उजवीकडे होतं पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहाच्या प्रवेशद्वार. समोर घाटाचा लोखंडी सुरक्षा कठडा किंचित मोकळा ठेवला होता आणि इथूनच होती माळशेजच्या जुन्या घाटवाटेची सुरुवात\nखडका-झुडपांमधून उतार उतरू लागलो आणि लवकरच सुरू झाली दगड घट्ट बसवून बनवलेली फरसबंदीची मोठ्ठी मोकळी-ढाकळी जुनी घाटवाट आणि दिशादर्शक बाण. काही वर्षांपूर्वी गच्च कारवीच्या रानात हरवू पाहणारी ही वाट अलीकडेच वनखात्याने वाट मोकळी केली होती. समोर दिसणारी माळशेजच्या गाडीरस्त्याची वळणे आणि निरीक्षणे-टोके उंचावत गेली. वाट आता झपाटय़ाने डावीकडे (दक्षिणेला) माळशेज घाटाच्या मुख्य दरीच्या कुशीत शिरू लागली. वायव्येकडे उघडत जाणाऱ्या या दरीमधला ओढा पावसाळ्यात काय सणसणीत वाहत असेल. माथ्यापासून शंभर मीटर उतरल्यावर कातळात कोरलेल्या खोबण्या आणि पायऱ्या लागल्या. उजवीकडे ओढय़ापाशी उतरल्यावर खुणावत होतं अजस्र खडकांच्या कुशीतलं उंबराचं झाड – डवरलेलं, झुकलेलं. खोबणीत होता निखळ थंड पाण्याचा स्रोत. माळशेजच्या उंचचउंच कडय़ांच्या पोटातल्या दाट झाडीतली नीरव शांतता अनुभवली.\nथोडं पुढे उभ्या खडकाळ उतरंडीवरून उतरताना जुन्या घाटवाटेच्या पाऊलखुणा सामोऱ्या आल्या. खोदीव पायऱ्या उतरत गेल्यावर उजवीकडच्या कातळात होती शेंदूरचíचत गणेशमूर्ती आणि चंद्र-सूर्याची महिरप असलेली छत्री. पल्याड उंचावर कातळात होतं खोलवर खोदत नेलेल्या थंड पाण्याचं टाकं आणि त्याच्या बाजूला आणखी एक अर्धवट खोदाई सोडलेलं टाकं कित्येकशे वष्रे सन्य-व्यापार-वाटसरू यांना उपयुक्त असलेली पुरातन वहिवाट आजच्या व्यावहारिक गरजांसाठी निकामी झाली होती. जुन्या वाटेचं कवतिक आता फक्त लाकूडतोडे, गुराखी, शिकारी आणि चुकूनमाकून फिरकणाऱ्या ट्रेकर्सना\nसकाळी निघाल्यापासून अडीच तास आणि माथ्यावरून घाट उतरायला सुरुवात केल्यापासून अर्धा तास झालेला. खजूर-चिक्की-फळांचा खुराक घेऊन आणि टाक्यातलं गोड गार पाणी पिऊन टीम तरतरीत झाली. माळशेज घाटरस्त्यालगतच्या मुख्य ओढय़ाच्या उजव्या काठावरून दाट झाडीच्या टप्प्यांतून आता वाट झपाटय़ाने उतरू लागली. माळशेज घाटरस्त्यात बेताल पर्यटकांनी अव्याहत फेकलेला तऱ्हेतऱ्हेचा कचरा याच ओढय़ातून इतक्या लांब वाहत आलेला, साचत राहिलेला, विषण्ण करून गेला\nफरसबंद मोठ्ठय़ा पाऊलवाटेवरून लांबलचक वळणं घेत उतरणाऱ्या वाटेवर झुकलेल्या झाडोऱ्यावर भल्या मोठ्ठय़ा कोळ्यांनी जाळं विणलेली. अजूनही काही ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या होत्या. गच्च जंगलातून निवांत रुंद वाट ओढय़ात रेंगाळलेल्या पाण्यापाशी थबकली. दोन तासांत माळशेज घाटाची ६०० मीटरची उतराई केल्यावर पायथ्याशी निसर्ग आणि तथाकथित विकास यातली विसंगती अंगावर आली. एकीकडे सह्य़ाद्रीचं विराट दृश्य, तर दुसरीकडे रान कापून रस्ते-रिसॉर्टचा भस्म्या आणि गुंठामंत्र्यांच्या स्कोíपओ\nओढय़ातल्या रांजणकुंडांच्या नक्षीजवळून चालताना हरिश्चंद्राची उंची आणि विस्तार नजरेत मावेना. गडाची कोकणात कोसळलेली कातळिभत आणि तारामती-रोहिदास शिखरं कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होती. वाघराच्या शेंदूर फासलेल्या शिल्पाच्या बाजूने, मोकळ्या पठारावरून जीपरस्ता अध्र्या तासात थिटबी गावाकडे घेऊन जाणार होता. डावीकडे झाडोऱ्यात घाटाचं रक्षण करणाऱ्या मारुतीचं ठाणं, त्याच्या पूर्वेला एक कबर. घाटाकडे जाणाऱ्या वाटेवर खडकात व्याघ्र-चंद्र-सूर्य अशा निसर्गदेवता खोदलेल्या. कोरलेल्या व्याघ्राचे लांब पाय, लपेटदार शेपूट आणि टवकारलेले कान रानच्या राजाचा रुबाब आणि दरारा दाखवणारे. माळशेजच्या जुन्या महत्त्वाच्या घाटवाटेवरून उतराई करत आम्ही हरिश्चंद्र-दर्शन घेतलं होतं. असा हा परिक्रमेचा पहिला टप्पा आम्हाला सुखावून गेलेला..\nकाळूच्या वोघापासून हरिश्चंद्रचं रौद्रविराट दर्शन\nमाळशेज घाटाच्या पश्चिम कातळकडय़ामध्ये एक निसर्गनवल दडलंय. ‘काळूचा वोघ’ नावाचा अजस्र धबधबा. धबाबा तोय आदळून धबधब्याच्या पोटापाशी बनलेला ‘वोघ’ (म्हणजे घळ) आणि रांजणखळगे बघण्याची उत्सुकता होती. थिटबी गावामध्ये सॅक्स ठेवून परत एकदा आल्या वाटेने पूर्वेला सह्य़ाद्रीकडे निघालो. माळशेजघाटाची जी जुनी पाऊलवाट आम्ही उतरलो होतो, त्याच्या उत्तरेला (डावीकडे) ‘काळूचा वोघ’ असणार होता. घाटाकडे जाणारा कच्चा रस्ता सोडून डावीकडील रानातल्या वाटेने निघालो. एव्हाना ऊन तापायला लागलेलं आणि वारं पडलेलं. दोन कोरडे ओढे पार केले आणि समोरचं दृश्य बदलू लागलं. सह्य़ाद्रीच्या िभतीच्या जवळजवळ जाणारी वळणां-वळणांची हलक्या चढाईची वाट आता काळूच्या मुख्य मोठ्ठय़ा ओढय़ाच्या पात्रात उतरली. समोर होता अक्षरश: थ-रा-रू-न टाकणारा पॅनोरमा. हरिश्चंद्रगडाची शिखरे आभाळात घुसलेली. डावीकडे मागे अफाट उंचीची रोहिदास-तारामती शिखरे, रोहिदासजवळचा सुळका ‘काटय़ाची िलगी’ आणि समोरचे अजस्र धबधबे – डावीकडचा ‘काळूचा वोघ’ आणि उजवीकडचा ‘रेठीचा झुरा’. आता आम्ही ओढय़ाच्या पात्रामधून डाव्या बाजूने चढत काळूच्या वोघाजवळ पोहोचलो. थिटबी गावातून सॅक्स न घेता काळूच्या वोघापाशी पोहोचायला तासभर लागलेला. समोर होता घाटमाथ्यापासून पाच टप्प्यांमध्ये उतरणारा अजस्र धबधबा – काळूचा वोघ आणि पाण्याने दोहोबाजूचा कातळ कातून बनवलेली रांजणकुंडं आणि एक जबरदस्त घळ – २५० ते ३०० फूट लांब आणि ७०-८० फूट खोलीची. रौद्रविराट सह्य़ाद्रीच्या दर्शनाने भारावून गेलेलो. भर पावसाळ्यात धबाबा कोसळणाऱ्या जलौघाचं काय देखणं तांडव असेल इथे आता मात्र डिसेंबरमध्ये आम्ही कातळाला पाठ टेकून, खळाळणाऱ्या अल्लड पाण्याच्या झऱ्याचा नाद आणि हलक्या वाऱ्यासोबत घुमत येणारा कारवीच��� मंद सुवास अनुभवत होतो..\nडोळ्याचं पारणं फेडणारा कोकणकडा\nआता गाठायचा होता हरिश्चंद्रच्या परिक्रमेतला पुढचा टप्पा थिटबी गावातून माळशेजच्या सुपाच्या आकाराच्या खोऱ्यातून उत्तरेला जात हरिश्चंद्रगडच्या रोहिदास शिखराच्या पायथ्याची डोंगरसोंड चढून पल्याडच्या खोऱ्यात उतरायचं होतं. दुपारचे अडीच वाजलेले. भूक लागलेली. अनायासे समोर आलेलं नदीचं गारेगार पात्र, रेंगाळलेल्या पाण्याची साथ आणि गर्द सावलीचं आवताण नाकारणं शक्यच नव्हतं. काठाशी शिदोरी सोडली अन् दोन घास खाऊन घेतले. नदीच्या पाण्यापल्याडच्या उभ्या दरडीवरून उतरणाऱ्या, आणि आपल्याच प्रतििबबाने दचकून घसरणाऱ्या शेरडाची गंमत बघत विश्रांती घेतली.\nकाळू नदीपासून मुक्कामाचं बेलपाडा गाव गाठण्यासाठी, आमच्या चालीने अजून दोन तास लागणार होते. रोहिदास शिखराच्या पश्चिमेला उतरणाऱ्या सोंडेवर नक्की कुठे चढायचं म्हणजे पल्याडच्या खोऱ्यात उतरणारी वाट मिळेल, ते एका गुराखी आजानं समजावून सांगितलं. सपाटीवरची शेताडी पार करून िखडीकडे चढणारी योग्य वाट शोधली. आम्ही होतो रोहिदास शिखराच्या अगदी पायथ्याशी. खरंतर, हरिश्चंद्रगडावरून रोहिदास शिखराची उंची कळत नाही. इथून तळातून बघताना मात्र त्याचे एकावर एक रचल्यासारखे दिसणारे कातळ-झाडीभरले टप्पे आणि वरचा कातळमाथा बघताना मान अवघडली.\nएव्हाना रोहिदासच्या सोंडेवर चढताना आमची टीम धापा टाकू लागलेली. उभा तीव्र चढ, दिवसभराचे श्रम आणि पाठीवरच्या वजनदार सॅक्समुळे वेग मंदावलेला. आधी काही काळ कोकणातल्या आद्र्रतेमुळे घामानं निथळत होतो. पुढे तर वेळोवेळी पाणी पिऊनही घाम न येता, नुसतंच इंजिन तापायला लागलं. रोहिदास शिखरापासून उतरणाऱ्या सोंडेवर कसंबसं पोहोचलो होतो. शरीर काय सिग्नल्स देतंय, त्याचा अंदाज घेऊन सक्तीचा ब्रेक घेतला. पाण्यासोबत संत्री-खजूर-चिक्की-राजगिरा असा शक्तीदायक, पण हेल्दी खाऊ घेतला.\nआता पल्याड खोऱ्यातून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाच्या दर्शनाची विलक्षण आस लागलेली. उतारावरच्या झाडीभरल्या वाटेमुळे अजूनही कुठलं दृश्य दिसलं नव्हतं. जास्तीतजास्त जलद निघालो. एका क्षणी मळलेली वाट मोकळवनात आली आणि समोर उलगडलेल्या नजरियाने आम्ही अक्षरश: स्पीचलेस ..ओढय़ापाशी रेंगाळलेलं पाणी, उंबरांनी लगडून झुकलेली झाडाची फांदी, घरी परतणाऱ्या गायी आणि सोनेरी गवताळ उतारांमागे मावळतीच्या सूर्यकिरणांनी उजळून काढलेला कोकणकडा आणि आकाशाला भिडलेली कोंबडा-न्हाप्ता-रोहिदास शिखरं\n..ट्रेकर्सना मदत करणाऱ्या बेलपाडय़ातल्या ‘कमळू पोकळे’च्या घरी मुक्कामाची झक्क सोय झालेली. रानोमाळ भटकलेल्या ट्रेकर्सना गर्रम पाण्याच्या अंघोळी, घरगुती जेवण आणि विश्रांतीमुळे तरतरी आली. दऱ्याकडय़ांची, ऊन्हावाऱ्याची, रानझाडीची, दमवणाऱ्या-सुखावणाऱ्या रानवाटांची दृश्यं स्वप्नातही रुंजी घालत होती. पहाटे खणखणीत आवाजात कोंबडेबुवा आरवू लागले आणि साखरझोपेतून हलकेच जाग आली. घरासमोर सारवलेल्या अंगणात आलो. बाहेर मिट्ट काळोख आणि दूरवरून घुमत येणारा पहाट भूपाळीचा मृदुंग. अंगावर काटा आला मंद थंडीमुळे आणि समोरच्या दृश्यानेही. कारण, पूर्वेला होती चांदण्या रातीनं मढवलेल्या आभाळाला छेदत जाणारी भव्य कोकणकडय़ाची अंधूक धूसर अंतर्वक्र रेषा\nन्हाप्ता शिखर आणि सादडे घाट\nपरिक्रमेच्या दुसऱ्या दिवसाची आता ओढ लागलेली. मजबूत न्याहारी करून सकाळी सातच्या आत आम्ही कूच केलं. हरिश्चंद्रगडाच्या उत्तरेला असलेल्या अजस्र न्हाप्ता (नकटा) शिखराच्या पोटातून ‘सादडे घाटा’ने (याला ‘साधले घाट’ असंही म्हणतात) चढाई करून सह्य़ाद्रीमाथा आणि पुढे मुक्कामासाठी हरिश्चंद्रगडाची चढाई – अशी भरपूर चढाई वाट पाहत होती.\nबेलपाडा गावातून बाहेर पडल्यावर सह्य़ाद्रीतलं एक सर्वोत्तम दृश्य सामोरं आलं. पॅनोरमामध्ये उजवीकडे कोकणकडय़ाचं आणि डावीकडे त्याचा तालेवार सोबती ‘न्हाप्ता’ शिखराचं – अशी दोन अर्धवर्तुळाकार खोरी दिसत होती. घोडीसुळके, अजस्र न्हाप्ता शिखर, सादडे घाटाची िखड, कोंबडा शिखर, उतरणाऱ्या सोंडेवरचा केळेवाडी सुळका, कोकणकडय़ाची गूढ धूसर कातळिभत आणि रोहिदास शिखर अशा अतिभव्य दृश्याने अक्षरश वेड लावलं. भुऱ्या गवताळ माळावरून-झुडपांमधून जाणारी, वाहत्या ओहोळांशी लगट करणारी हलक्या चढउताराची मळलेली वाट न्हाप्ता शिखराच्या पायथ्याशी घेऊन गेली. अवघं खोरं साखरझोपेत हरवलं असताना, सूर्याची हलकी नाजूक किरणं न्हाप्ताच्या माथ्याला अलगद उजळवू लागली. एकावर एक रचलेले कातळटप्पे, भुरे गवताचे-झाडी टप्पे आणि अतिशय दिमाखात तोऱ्यात उठवलेलं माथ्याचं नाकाड हे दृश्य बघून अंगावर सुखद शहारा आला.\nबेलपाडय़ातून निघाल्यापासून निवांत चालीने तासभर चालल्य��वर एका मोठय़ा ओढय़ाशी पोहोचलो होतो. ‘‘आसं बगा, त्यो ओढा गावला ना, की गेलात तुमी सरळ सादडय़ाच्या वाटेनं. बाकी रानात जाणाऱ्या इतर ढोरवाटांवर हरवू नका’’, असं गावकऱ्यांनी बजावलं होतं. न्हाप्ताच्या पूर्वेला कातळिभतीतली सर्वात कमी उंचीची जागा म्हणजे सादडे घाट. तिथल्या िखडीच्या दिशेने ओढय़ाला लगटून घाटवाट चढणार होती.\nघाटाच्या सुरुवातीला हळूहळू चढणारी प्रशस्त वाट होती. सकाळची वेळ. कारवीचा किंचित तिखट गंध आणि अनवट पक्ष्यांचे सूर आसमंतात घुमत होते. प्रत्येक क्षणी थबकून निरखावेसे वाटावे अशी न्हाप्ता शिखराची रूपं अनुभवत होतो. ओढय़ाच्या बाजूने चढत अध्र्या तासात पदरातल्या मोकळवनात पोहोचलो. कातळाला पाठ टेकवून हाताची उशी करून पडल्यावर समोर होतं सुरेख दृश्य – कोकणकडय़ाच्या कोंबडा शिखराकडून उतरणारी करवती धार, केळेवाडी सुळका, सादडे घाटाची झाडीभरली िखड आणि न्हाप्ता शिखराची उभी िभत एव्हाना आम्हाला चढाईची मस्त लय गवसलेली आणि अधूनमधून चिक्की-फळं-खजूर असा हेल्दी खुराक चालू होताच. त्यामुळे, सह्य़ाद्रीतल्या एका सुरेख घाटाच्या चढाईची मजा अनुभवत होतो.\nवाऱ्यावर डोलणाऱ्या सोनेरी गवताच्या दांडावरून उभी चढाई सुरू झाली. कातळात खोदलेल्या दोन-चार पायऱ्या बघून ही घाटवाट पुरातन आहे, याची खात्री पटली. घनदाट झाडीतून, मोठ्ठाल्या कातळांच्या बाजूने आणि नुकताच बहर येऊन गेलेल्या कारवीच्या झुडपांमधून वळणे घेत चढाई चालू होती. ओढय़ाच्या पात्रातल्या कातळापाशी फुलपाखरांची अन् मधमाश्यांची लगबग चाललेली दिसली. निरखून बघितलं, तर कातळाच्या ओंजळभर खोबणीत नितळ थंड पाण्याचा स्रोत होता. सादडे घाटात ६० टक्के उंचीवर असलेला हा पाणीसाठा साधारणत: जानेवारीपर्यंत ट्रेकर्सना आधार देतो.\nउभ्या उताराच्या वळणवाटेवर दगड घट्ट बसवून फरसबंदीची उभी वाट चढताना घामटं निघू लागलं. आता यापुढची चढाई बऱ्यापकी ओढय़ातूनच होती. ओढय़ातून डावीकडे जाणारी उभ्या धारेवरची वाट घाटमाथ्याकडे पेठेच्या वाडीकडे जाते. साकेत आणि मििलदने ओढय़ाच्या उजव्या काठावरून चढणारी आणि पुढे िखडीतून पाचनईकडे नेणारी वाट अचूक पकडली. मी मात्र डोंगरउतारावरून माती-धोंडे-काटक्यांमधून धस्सक-फस्सक करत उगा जिवाला त्रास करून घेतला. मग योग्य वाट गाठल्यावर क्षणभर विश्रांती घेतली. ऊर धपापत होतं – चढाईमुळे आणि समोरच्या ���ृश्यानेही. गच्च झाडीतून चढत कसं आणि कित्ती चढलो याचा आलेख डोळ्यांसमोर होता. निळंशार आभाळ, हिरवंगर्द कारवीचं रान आणि काळ्या कातळाच्या पाश्र्वभूमीवर न्हाप्ता शिखर, त्याचे पूर्वेकडचे कडे, जोडशिखरे आणि माथ्याजवळचं छोटंसं नेढं भन्नाट दिसत होतं.\nआता सादडे घाटाची नाळ सुरू झाली. दोहोबाजूच्या उंचच उंच कातळिभतींमधून अजस्र धोंडय़ांच्या राशीवरून चढत गेलो. पावसाळ्यात धबाबा तोय आदळून बनलेल्या खोलगट घळीतून चढताना क्वचित खोदलेल्या पायऱ्या कवतिकाने निरखल्या. अखेरीस पोहोचलो सादडे घाटाच्या िखडीत-सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर. बेलपाडय़ातून निघाल्यापासून इथे पोहोचायला चार तास लागलेले. िखडीत कातळावर बसून भर्राट वारं खाताना ऊर धपापलेलं, घामाने गच्च भिजलेलो; पण न्हाप्ता शिखराच्या अ-ज-स्त्र दर्शनाने अग्गदी तृप्त झालेलो. सादडे घाट फक्त ट्रेकर्ससाठी. उभ्या चढाईची, पण वापरातली पाऊलवाट आहे. कोठेच दोर किंवा इतर उपकरणांची गरज नाही. हरिश्चंद्रगडाच्या परिक्रमेतला महत्त्वाचा टप्पा गाठलेला. ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झाला..\nहरिश्चंद्रगडाची परिक्रमा करताना आता आम्हाला पोहोचायचं होतं थेट गडावरच. पाचनईच्या नेहेमीच्या वाटेपेक्षा आम्ही शोधणार होतो, कोंबडा शिखराजवळून थेट कोकणकडय़ाकडे चढणारी आडवाट\nसादडे घाटाच्या िखडीतून पूर्वेला सदाहरित रानातून उतरणारी वाट पकडली. वाहत्या झऱ्याच्या शेजारून उतरत दहा मिनिटात गवताळ माळावर आलो, अन् समोर आला मुळा खोऱ्यातून घुमणारा वारा. डावीकडे उत्तरेला कलाडगड आणि ‘कलाडचा कोंबडा’ नावाचा सुळका, वनखात्याचा निरीक्षण मनोरा, उजवीकडे दक्षिणेला अस्ताव्यस्त पसरलेला हरिश्चंद्र पर्वत आणि कोंबडय़ाचा तुरा असावा अशा आकाराचं गडाचं ‘कोंबडा’ शिखर. वाट कशी असेल याचा अंदाज घेऊन, वाटांच्या चौकापासून उजवीकडे दक्षिणेला वळलो. वाऱ्याने पठारावर डोलणारे गवत, मध्येच कातळाची सपाटी, रेंगाळलेले पाण्याचे ओहोळ, रानफुलांची दुलई अशी गवताळ माळावरची परिसंस्था अनुभवत तासभर सुरेख चाल होती. पाणथळ भागापाशी शेरळाच्या रानफुलांचे तुरे, शेताच्या खळ्याशेजारी शेंदूरचíचत रानदेवाचं ठाणं आणि पल्याड वाहत्या ओहोळापाशी गारेगार सावली होती. खादाडी, थोडकी विश्रांती आणि गप्पाष्टकासाठी परफेक्ट स्पॉट\nमंजिऱ्याच्या तणांच्या दुलईमागे कोंबडा आणि त्याची झ��डीभरली िखड खुणावत होते. थेट िखडीची दिशा पकडून माळ तुडवत निघालो. िखडीकडे चढणाऱ्या वाटेची सुरुवात किंचित शोधावी लागली. आणि, गच्च सदाहरित जंगलातून ओढय़ाच्या उजवीकडून कारवीतून चढणारी सुरेख मळलेली वाट लागली. िखडीत पोहोचलो आणि लक्षात आलं, की कोकणकडय़ाशेजारून ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असलेली ‘नळीची वाट’ जिथे घाटमाथ्यावर पोहोचते त्याच िखडीत आम्ही पोहोचलेलो. पश्चिमेकडील काळू नदीच्या आणि पूर्वेच्या मुळा नदीच्या खोऱ्याच्या दृश्याने थकवा कुठच्या कुठे पळून गेला. एकीकडे नळीच्या थरारक वाटेचं आणि रोहिदास शिखराचे दर्शन; तर दुसरीकडे मुळा खोऱ्यातून झाडीतून चढून आलेली वाट आता गडावर पोहोचण्यासाठी १५० मीटर्सची चढाई बाकी होती. कोंबडय़ाच्या भव्य कातळाकडे पाठ फिरवून, समोरच्या उतरंडीच्या कातळावर १० मीटर सोप्या श्रेणीचे कातळारोहण करायचं होतं. वाऱ्यामुळे सॅक हेलकावे घेत होती आणि ट्रेकर्सची भंबेरी उडवत होती. कातळ चढल्यावरच्या पठारावर डहाणीच्या तुऱ्यांवर मोहून भुंगे आणि मधमाश्या गुणगुणत होते. पठार पार करून झुडुपांमधून चढत, शेवटी कातळावरून आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर आता गडावर पोहोचण्यासाठी १५० मीटर्सची चढाई बाकी होती. कोंबडय़ाच्या भव्य कातळाकडे पाठ फिरवून, समोरच्या उतरंडीच्या कातळावर १० मीटर सोप्या श्रेणीचे कातळारोहण करायचं होतं. वाऱ्यामुळे सॅक हेलकावे घेत होती आणि ट्रेकर्सची भंबेरी उडवत होती. कातळ चढल्यावरच्या पठारावर डहाणीच्या तुऱ्यांवर मोहून भुंगे आणि मधमाश्या गुणगुणत होते. पठार पार करून झुडुपांमधून चढत, शेवटी कातळावरून आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर सादडे घाटातून निघाल्यापासून घाटमाथ्यावरच्या प्रसन्न वाटांनी अडीच तासात गडमाथा गाठलेला आणि समोर आलं अद्भुत दर्शन कोकणकडय़ाचं..\nरविवारची पर्यटकांची गर्दी ओसरू लागली आणि सख्या कोकणकडय़ासोबत आम्हाला निवांत मोकळा वेळ मिळाला. सोनेरी उतरत्या उन्हात उजळलेल्या कोकणकडय़ाचं – एकाच वेळी हृदयाचा थरकाप उडवणारं आणि त्याच वेळी उत्कट मनस्वी आनंद देणारं – दृश्य अनुभवत निवांत तासन्तास बसलो.\nट्रेकर्सना मदत करणाऱ्या भास्करकडे नेहेमीप्रमाणे मुक्काम होता. गडावर भास्कर नव्हता, पण यावेळी भेटला भास्करचा बाबा. शेवग्याच्या शेंगांची विलक्षण चवदार भाजी, भाकरी, पिठलं-भात आणि ठेचा असं जगात भ��री जेवण बाबाने आग्रह करकरून वाढलं. आजच्या कमíशयल युगात भास्करच्या बाबाकडून मात्र जे निखळ मत्र आणि प्रेम अनुभवलं, त्याला तोडच नाही. मिश्कील, प्रेमळ, गप्पिष्ट, सारखं गदागदा हसणाऱ्या भास्करच्या बाबाने आमच्या मनात कायमचं घर केलं.\nजेवणं झाल्यावर परत कोकणकडा फक्त आमच्यासाठी मोकळा मिळाला. चंद्रप्रकाशात उजळलेल्या कोकणकडय़ावर वाफाळलेल्या कॉफीच्या मगने हात शेकत, तारांगणातल्या उल्का धुंडाळत आणि दूरवरच्या धूसर गूढ शिखरांची टोकं न्याहाळण्यातला आनंद समजायला ट्रेकरचं काळीज हवं..\nदिवस तिसरा. आज हरिश्चंद्रगड परिक्रमेची सांगता करण्यासाठी जुन्नर दरवाजाची आडवाट निवडलेली. कोकणकडा आणि भास्करच्या बाबाला अलविदा करून सातच्या आत पूर्वेला मंगळगंगेच्या काठावरचं कुळकुळीत काळ्या पाषाणातले भव्य हरिश्चंद्रेश्वर राऊळ गाठलं. विश्वामित्र-हरिश्चंद्राच्या पौराणिक कथेची पाश्र्वभूमी असल्याने परिसरात लेणी-राऊळं-टाकी-शिलालेख-शिल्पे यांचा खजिना होता. समोरच्या पुष्करणीतलं पाणी ओंजळीत घेऊन एका गावकऱ्याने अघ्र्य वाहिलं, अन पाण्यातल्या तारामती शिखराच्या प्रतििबबावर तरंग उमटले.\nआता आम्हांला हरिश्चंद्र शिखराजवळ चढून जुन्नर दरवाजाची वाट गाठायची होती. सूर्याची कोवळी किरणं दाट झाडीपासून निसटून गवतातून-कातळावरून जाणाऱ्या वाटेला बिलगू लागली. नेहेमीची खिरेश्वरची वाट सोडून उजवीकडे हरिश्चंद्र शिखराकडे चढणारी ठळक वाट घेतली. सुरेख कारवीतून, झुकलेल्या फांद्यांखालून चढत जाताना देखण्या मदम-पुष्पापाशी मधमाशा गुणगुणत होत्या.\nहरिश्चंद्र आणि तारामती शिखरांना जोडणाऱ्या धारेवर पोहोचल्यावर, सकाळच्या कोवळ्या उन्हांत समोर आली काहीच्या काही अशक्य लँडस्केप्स. निळ्या आभाळात हलकेच विखुरलेले ढगाचे पुंजके, त्याचे क्षणाक्षणाला बदलत जाणारे रंग. उत्तरेला तालेवार दुर्ग-डोंगर-अलंग-कुलंग-मदन-कळसूबाई-कलाडगड-आजोबा-कात्राबाई-मुडा-गवळदेव-घनचक्कर-भरवगड-पाबरगड-औंढा-पट्टा-बितन; पश्चिमेला नागफणीसारखं उठवलेलं तारामती आणि मागचं रोहिदास शिखर आणि दक्षिणेला सिंदोळा, निमगिरी, माळशेजची शिखरे, ढाकोबा, गोरख-मिच्छद्र, हटकेश्वर आणि िपपळगाव जोगा धरणाचं पाणी असं विलक्षण पॅनोरमा\nहरिश्चंद्र शिखराला डावीकडे ठेवून गेल्यावर, खोलवर घळीत डोकावणारी चिंचोळी आडवी वाट होती. हरिश्चंद्र शिखराच्या उतारावर कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं, घराचं जोतं आणि खोदीव पायऱ्या न्याहाळल्या. पठारावरून डावीकडे पूर्वेला जात दक्षिणेला उतरणारी ‘राजनाळ’ गाठली. सकाळी कोकणकडय़ापासून निघाल्यापासून गडदर्शन करत, इथे पोहोचायला दोन तास लागलेले. आता दगड-धोंडय़ातून अरुंद नाळेची उभी उतराई सुरू झाली. काही ठिकाणी उभ्या कातळाकडे तोंड करून उतरणं भाग होतं, तेव्हा आजूबाजूच्या कातळातले गोल आधार खळगे सहजीच हातात येत होते. शिविलग आणि पूजक खोदलेले शिल्प, खोदलेल्या पायऱ्या, मेटाच्या जागा बघता, पूर्वी कदाचित हीच मुख्य वाट असेल असं वाटलं. नाळ संपून धोंडे भरलेला ओढा सुरू झाला, ओढय़ात झुडुपे सुरू झाली, डावीकडच्या धारेमधले आरपार छिद्र नेढे डोक्यावर आलं. मागे वळून हरिश्चंद्रच्या भव्य कातळकडय़ांना डोळ्यांत साठवलं आणि ओढा सोडून डावीकडची आडवी वाट पकडली.\nमोठ्ठी नसíगक गुहा बाजूला ठेवत गच्च कारवीमधून पुढे धारेवर पोहोचलो. कोरांटीसारखी दिसणाऱ्या कारवीच्या जातीतल्या ‘आखरा’ नावाच्या झुडुपांमधून वाट होती. कमरेएवढय़ा उंचीची ही झुडुपं अतिशय बोचत होती. चार वर्षांनी फुलणाऱ्या आखराचा मध औषधी असतो म्हणे. उभ्या धारेवरची घसारायुक्त उतराई केली. सुळकेवजा डोंगरास डावीकडून वळसा घालून आडव्या वाटेवरून कोरीव पावठय़ा न्याहाळत ओढय़ाजवळच्या गच्च झाडीत विसावलो. झाडीतून उतरणाऱ्या उभ्या वाटेने खिरेश्वर गावची सपाटी गाठली. हरिश्चंद्राच्या थरारक परिक्रमेची सांगता करणारी राजनाळ उतरायला आम्हाला तीन तास लागलेले…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nट्रेकिंग गिअर्स : मोसमानुसार पेहराव\nट्रेकिंग गिअर्स : दोराची करामत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोस��यटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/best-to-get-intelligent-management-system/articleshow/63289760.cms", "date_download": "2019-03-25T09:01:04Z", "digest": "sha1:NAGMC4D3JGJVH4EEHDFQHFKWDZKB2GOO", "length": 13873, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "intelligent management system: बसची नेमकी वेळ समजण्यासाठी ११२ कोटींचा प्रकल्प - best to get intelligent management system | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nबसची नेमकी वेळ समजण्यासाठी ११२ कोटींचा प्रकल्प\nबसथांब्यावर बसची प्रतीक्षा करून कंटाळलेल्या प्रवाशांना प्रशासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बसथांब्यावर बसच्या ताटकळणाऱ्यांना लवकरच बस नेमकी कधी थांब्यावर येणार, ही वेळ समजणार आहे. त्यासाठी बेस्टने 'इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम' (आयटीमएमएस) यंत्रणा अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ११२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\nबसची नेमकी वेळ समजण्यासाठी ११२ कोटींचा प्रकल्प\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nबसथांब्यावर बसची प्रतीक्षा करून कंटाळलेल्या प्रवाशांना प्रशासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बसथांब्यावर बसच्या ताटकळणाऱ्यांना लवकरच बस नेमकी कधी थांब्यावर येणार, ही वेळ समजणार आहे. त्यासाठी बेस्टने 'इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम' (आयटीमएमएस) यंत्रणा अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ११२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\nलोकल सेवेचे अचूक वेळापत्रक सांगणाऱ्या अॅपप्रमाणेच रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट उपलब्ध आहेत. पण, आतापर्यंत बेस्ट सेवेत अशा प्रकारची वानवा असल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. बसथांब्यावर उभे राहिल्यानंतर बस नेमकी कधी येईल याची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळे प्रवासीही कंटाळून खासगी टॅक्सी, रिक्षा आदी सेवांकडे वळतो. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र घटती प्रवासी संख्या लक्षात घेता बेस्टने सेवेत बदल करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आयटीएमएस प्रणाली सेवेत आणण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या बेस्ट समिती बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.\nअत्याधुनिक पद्धतीमुळे प्रवाशांना नेमकी बस कोणत्या वेळेत येईल, याची अचूक माहिती समजणार आहे. या पद्धतीत आगार, गाड्यांचा ताफा, कार्यशाळा आदींशी संबंधित गोष्टींचीही सांगड घालण्यात येणार आहे. फेऱ्यांचे नियोजन, वेळापत्रक, प्रवासी नोंदणी, वाय-फाय, सीसीटीव्ही, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आगारातून बस बाहेर पडण्याची-येण्याची वेळ, वेग, ठिकाण आदींची माहिती एकत्र होणार आहे. बेस्ट व्यवस्थापनास नियोजनाच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या थांब्यावर प्रवाशांची जास्त गर्दी लक्षात घेऊन तिथे जादा फेऱ्या चालवणेही सोपे ठरणार आहे.\nत्यासाठी क्वेस कॉर्पोरेशन कंपनीस पाच वर्षांसाठी कंत्राट दिले जाणार आहे. सुरुवातीस कंपनीने या प्रणालीसाठी ११६ कोटी रुपये इतकी रक्कम ठरवली होती. पण बेस्टने कंपनीशी वाटाघाटी केल्यानंतर ही रक्कम कमी करण्यात आली आहे. पण ही रक्कम देण्यासाठी मुंबई महापालिकेचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nRanjitsinh Mohite-Patil: रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध...\nRaj Thackeray-Sharad Pawar: मुंबई: राज ठाकरे शरद पवार यांच्य...\nलोकसभा: सेनेची पहिली यादी जाहीर; सातारा, पालघरबाबत निर्णय ना...\nमुंबईः प्रवीण छेडा यांची भाजपत 'घरवापसी'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिं���्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबसची नेमकी वेळ समजण्यासाठी ११२ कोटींचा प्रकल्प...\nशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य योजना...\nपित्याच्या नावाविना जन्मदाखल्याचा अधिकार...\nसंधी ‘मटा सन्मान’च्या प्रवेशिका मिळवण्याची...\nविद्यापीठ, कॉलेजांमध्ये समुपदेशन केंद्र सक्तीचे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/vengeance-meaning-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-03-25T08:22:25Z", "digest": "sha1:MTNQS5QM4DZQ4SFSFMUS4Y6TSZWDFNK7", "length": 3305, "nlines": 47, "source_domain": "vicharpravah.in", "title": "Vengeance (व्हेंजन्स) - सूड - विचारप्रवाह", "raw_content": "\nVengeance (व्हेंजन्स) – सूड\nVengeance (व्हेंजन्स) म्हणजे काय\nएखाद्याच्या कृत्याची मोठ्या ताकदीनिशी परतफेड करणे यास ‘व्हेंजन्स’ घेणे अर्थात ‘सूड’ घेणे असे म्हणतात.\nVengeance (व्हेंजन्स) – सूड\nVengeance शब्दाचा वाक्यात उपयोग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\nनासाकडून भविष्यातील मंगळ मोहिमेवरील अंतराळवीरांमधील मतभेदांची चाचपणी\nSympathy (सिम्पथी) – सहानुभूती\nRevenge (रिव्हेंज) – बदला\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/", "date_download": "2019-03-25T08:15:57Z", "digest": "sha1:DZ666SERTJ4F6EPU5C5DUPCMUZSJFBX2", "length": 13179, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lokprabha: Social, Political, Educational, Cultural Marathi Supplement, Weekly Marathi Magzine | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nपर्रिकर किती साधे राहायचे हे तर ��े गोव्याचे मुख्यमंत्री असतानाही प्रसिद्धच होते.\nचीन आणि पाकिस्तान भारताविरोधात एक आहेत.\nबांधकाम व्यवसायाला आता पुन्हा झळाळी मिळत आहे.\n१९ लाख… परवडणारी घरे\nम्हाडा ही सरकारी यंत्रणा जी घरे बांधत होती त्याचीच गणना परवडणाऱ्या घरांमध्ये केली जात असे.\nराशिभविष्य : दि. २३ ते २८ मार्च २०१९\nमंगळ-शुक्राच्या केंद्रयोगामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असे नाही.\nप्रचाराची एकच राळ उडते आणि सर्वत्र सुरू होते ती जोरदार राजकीय धुळवड.\n२०१४ प्रमाणेच २०१९ मध्येदेखील मोदी विरुद्ध राहुल असाच सामना रंगणार आहे.\nपुलवामाचा धडा आणि पुढे…\nपुलवामा हल्ला आणि बालाकोट प्रतिहल्ला यानंतर देशात एक जोश जाणवतो.\nतृतीयपंथीही ‘आखाडय़ात’ (उत्तर प्रदेश)\nखासकरून हा कुंभमेळा परिपूर्ण ठरला तो किन्नर आखाडय़ामुळे.\n‘तंदुरुस्त पंजाब’चा नवा रक्ताध्याय (पंजाब)\nपंजाब राज्याने आजवर घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी ‘तंदुरुस्त पंजाब’ हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.\nराशिभविष्य : दि. १६ ते २२ मार्च २०१९\nमंगळ-प्लूटो नवपंचम योगामुळे संघर्ष करून यश मिळवाल.\nगेली तीन वर्षे माहिती तंत्रज्ञान उद्योगावर मळभ जमले आहे.\nयुद्धखोरी माध्यमांची आणि नागरिकांचीही\nआपला जवान पाकिस्तानात माहिती नाकारतोय आणि वाहिन्या मात्र तीच माहिती खुलेआम देत आहेत.\nराष्ट्रीय एकात्मता आणि काश्मीरची आजादी\nस्वतंत्र काश्मीरची मागणी घेऊन कैक वर्षांपासून काश्मीर धुमसतोय.\nमिझोराममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत मद्यविक्री बंदीचा मुद्दा गाजला.\nवृक्षाकडून विकासाकडे (अरुणाचल प्रदेश)\nसुमारे ६० मीटर रुंद असलेल्या या झाडाची उंची ६४८ मीटर आहे.\nराशिभविष्य : दि. ८ ते १५ मार्च २०१९\nमंगळ-नेपच्युनच्या लाभ योगामुळे बौद्धिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य कराल.\nमराठीतील ‘अँग्री यंग लेखक’\nविनोदी साहित्यापासून ते गंभीर आशय असणाऱ्या सर्वच साहित्याला एकाच तागडीत तोलण्याचा प्रकार केला जातो.\nसरकारच्या दुर्लक्षामुळे कर्करुग्णांना महागडय़ा औषधांचा गळफास\nकर्करोगांवरील अनेक औषधांचा खर्च हा खूपच महाग असतो.\nराशिभविष्य : दि. १ ते ७ मार्च २०१९\nनव्या उत्साहाने नव्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मागे लागाल.\nभारतासारख्या देशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे...\nएकदा लडाखला गेलं की ती भूमी आपल्��ाला पुन्हा पुन्हा साद घालत राहते.\nकोलोशियम प्राचीन काळातील विराट क्रीडागृह\nरोममधील कोलोशियमची प्राचीन वास्तू जगभरच्या पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे.\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-agriculture-strawberry-farming-raigadh-success-story-4128", "date_download": "2019-03-25T07:58:08Z", "digest": "sha1:P4SNUUF43ZPPYFASGFWJDGIACMCXDGOD", "length": 5558, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news agriculture strawberry farming in raigadh success story | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरायगडात बहरली स्ट्राॅबेरी; पाहा गणेश खांबे यांच्या स्ट्राॅबेरी शेतीची यशोगाथा\nरायगडात बहरली स्ट्राॅबेरी; पाहा गणेश खांबे यांच्या स्ट्राॅबेरी शेतीची यशोगाथा\nरायगडात बहरली स्ट्राॅबेरी; पाहा गणेश खांबे यांच्या स्ट्राॅबेरी शेतीची यशोगाथा\nरायगडात बहरली स्ट्राॅबेरी; पाहा गणेश खांबे यांच्या स्ट्राॅबेरी शेतीची यशोगाथा\nशनिवार, 12 जानेवारी 2019\nरायगडात बहरली स्ट्राॅबेरी.. पाहा गणेश खांबे यांच्या स्ट्राॅबेरी शेतीची यशोगाथा\nVideo of रायगडात बहरली स्ट्राॅबेरी.. पाहा गणेश खांबे यांच्या स्ट्राॅबेरी शेतीची यशोगाथा\nस्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्येच पिकते असा समज आपल्या सगळ्यांचाच आहे. मात्र या समजाला बगल देत महाड जवळील चांभारखिंड इथले गणेश खांबे यांनी रायगडात स्ट्रॉबेरी पिकवलीय. महाड आणि पोलादपूरमध्ये शेतकरी स्ट्रॉबेरी शेती करण्यासा��ी पुढे येतायत. तर, गणेश खांबे यांची स्ट्रॉबेरी त्यांच्या शेतात चांगलीच बहरलीय. याशोगाथेसाठी पाहा व्हिडीओ.\nस्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्येच पिकते असा समज आपल्या सगळ्यांचाच आहे. मात्र या समजाला बगल देत महाड जवळील चांभारखिंड इथले गणेश खांबे यांनी रायगडात स्ट्रॉबेरी पिकवलीय. महाड आणि पोलादपूरमध्ये शेतकरी स्ट्रॉबेरी शेती करण्यासाठी पुढे येतायत. तर, गणेश खांबे यांची स्ट्रॉबेरी त्यांच्या शेतात चांगलीच बहरलीय. याशोगाथेसाठी पाहा व्हिडीओ.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-03-25T07:28:49Z", "digest": "sha1:GVKTSLITVMODN4UDMG73BOELKHP7TWOY", "length": 4371, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्नोरी स्टुर्लसन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्नोरी स्टुर्लसन (११७९ - २३ सप्टेंबर १२४१; इस्लेन्स्का: Snorri Sturluson) हा एक आइसलँडिक इतिहासकार, राजकारणी व कवी होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. ११७९ मधील जन्म\nइ.स. १२४१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१५ रोजी ११:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/46", "date_download": "2019-03-25T08:29:01Z", "digest": "sha1:BR7DNS7TYAJWZQ7KCONEW56RTSG6FVCU", "length": 25446, "nlines": 79, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नांदेड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबुधाई देवीचे ठाणे बोड्डावार या विणकर समाजाच्या घराण्यात बहाद्दरपुरा, तालुका कंधार येथे आहे. रामजी बोड्डावार हे बुधाई देवीचे मानकरी पन्नासच्या दशकात होते. बुधाईची समाधी गावातील महाकाली मंदिराजवळ बांधण्यात आली आहे. बुधाई ही मूळची बोधन. ती निजामाबाद - (आंध्र) येथील असून तेथून ती बहाद्दरपुरा येथे आली. तिने तेथे समाजसेवा केली. तिने गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. बुधाईचा सत्कार किल्ल्यातील राजानेही केला होता व तिला साडी-चोळी ‘भेट’ देऊन तिचे दर्शन घेतले होते.\nबुधाईच्या पूजेच्या दिवशी बुधाईच्या आडापासून गावात मिरवणूक वाजतगाजत निघते. मिरवणुकीत देवीचा बकराही चालवत नेतात. बक-यास शेंदूर व हळद लावलेली असते. मिरवणुकीत मानक-यांच्या घरच्या मायमाऊली कडुनिंबाचे ढाळे हाती घेऊन, जमिनीवर लोटांगण व देवीला दंडवत घालत देवीपर्यंत जातात. बोड्डावार कुटुंबीय आठ दिवस आधी गावात जोगवा मागून ज्वारीचे पीठ व तांदूळ जमा करतात. ते तसा जोगवा सर्वप्रथम मातंगाच्या घरी जाऊन मागतात हे विशेष आहे.\nज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर\nवारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो.\nदेगलूरकर घराण्यातील संत परंपरेचा इतिहास जवळपास दोनशेसाठ वर्षाचा आहे. त्या घराण्याचे मुळ पुरुष गुंडा महाराज यांचा जन्म 1753 साली महिपती नाईक आणि भाग्यवती यांच्या पोटी देगलूर येथे झाला. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सराफीचा होता. गुंडा महाराजांना बालपणापासून संतसंगाची आवड होती. त्यांनी ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा लाभलेले सिद्धयोगी संत चुडामणी महाराज यांचे शिष्यत्व पत्करले. गुंडा महाराजांनी भारतभर तीर्थयात्रा केली. तिचा आरंभ देगलूर ते पंढरपूर पदयात्रेने झाला. त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरात चक्रिभजन रूढ केले. त्यांचे रसाळ कीर्तन आणि प्रवचन पंढरपूर येथे चातुर्मासात होत असे. त्यामुळे गुंडा महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली. महाराजांचा शिष्यपरिवार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या प्रदेशांत वाढला. औशाचे वीरनाथ महाराज, विजापूरचे रामचंद्र महाराज तिकोटेकर, तत्त्वज्ञानी बाबा गर्दे, श्रीगोंद्याचे श्रीकृष्णानंद महाराज, कुशतपर्णकर नाथमहाराज इत्यादी श्रेष्ठ मंडळींनी गुंडा महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. गुंडा महाराजांनी पंढरपूर येथे 1817 साली देह ठेवला. गुंडा महाराजांच्या शिष्यत्वाचा वारसा जोपासणारे देशात पंचवीस मठ अस्तित्वात आहेत.\nश्री तुकारामचैतन्य ऊर्फ तुकामाई हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील येहळे या गावाचे रहिवासी. त्यांचे वडील काशिनाथपंत व आई पार्वतीबाई हे श्री दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांना पंधरा वर्षे होऊनही मूलबाळ नव्हते. त्यांचे पूजाअर्चा, जपजाप्य, अखंड व��रताचरण चालू असे. त्यांना यथावकाश मार्च 1813 मध्ये मुलगा झाला. तो अजानबाहू होता आणि त्याचे डोळे तेजस्वी होते. त्याचे नाव ‘तुकाराम’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या येहळे या गावापासून जवळ उमरखे या गावात चिन्मयानंद नावाचे थोर पुरुष राहत होते. एकदा ते पंढरपूरहून परतीच्या मार्गावर येहळे या गावात मुक्कामाला राहिले. त्यांना ते पहाटे नदीवर स्नानाला गेलेले असताना नदीकाठावर एक युवक ध्यानस्थ बसलेला दिसला. दोघांची दृष्टादृष्ट होताच चिन्मयानंदांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून, त्याला आशीर्वाद दिला. ‘आता तू ‘तुकारामचैतन्य’ झालास. तुला इतरांना अनुग्रह देता येईल’ असे सांगितले.\nश्री तुकामाय हे नाथपंथीय होते. ते लोकांना संतसेवा करावी, सतत नामस्मरण करावे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याला अनन्यभावाने शरण जावे असे सांगत असत. त्यांचे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर कळमनुरीला राहत होते, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी शेवाळकरांना ‘आज देवाला आमरसाचा नैवेद्य कर’ असे सांगितले. दिवस आंब्याचे असूनही रावसाहेबांच्या झाडाला एकही आंबा लागला नव्हता. त्यांना आमरसाचा नैवेद्य कसा करावा अशी काळजी वाटू लागली. योगायोग असा, की ते निघून गेल्यावर एक बाई त्यांच्या दर्शनाला आली आणि तिने संत तुकामाईंपुढे आंबा ठेवला. लगेच, त्यांनी त्या बाईंना जेवढे आंबे असतील तेवढे रावसाहेबांना देण्यास सांगितले. तिनेही प्रेमाने गाडीभर आंबे पाठवले आणि संपूर्ण गावाला त्या दिवशी आमरसाचे जेवण मिळाले\nमधुकर धर्मापुरीकर - व्यंगचित्रांचा साक्षेपी संग्राहक\nएखादे व्यंगचित्र किती खळबळ माजवू शकते याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला, मुंबईतील असीम त्रिवेदी या तरुण व्यंगचित्रकाराच्या एका व्यंगचित्रामुळे. त्याच्याविरुद्ध त्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र त्या विरुध्द जनक्षोभ उसळताच तो मागेही घेण्यात आला. म्हणूनच वृत्तपत्रामधील शंभर अग्रलेखांचे काम एका 'मार्मिक' व्यंगचित्राने होऊ शकते असे म्हणतात. व्यंगचित्र म्हणजे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमधील विसंगती-विरोधाभास प्रकट करून त्यातून समाजप्रबोधन करण्याचे प्रभावी माध्यम. त्यामुळे कोणतेही वृत्तपत्र उघडले, की त्यामध्ये व्यंगचित्र हमखास नजरेस पडते. 'व्यंगचित्रां’चा केवळ अभ्यासू वाचक नव्हे तर साक्��ेपी संग्राहक मराठवाडयात आहे. त्या कलंदर व्यक्तीचे नाव आहे, मधुकर धर्मापुरीकर. त्यांनी व्यंगचित्रांचा मोठा खजिना नांदेड येथील भाग्यनगरमधील त्यांच्या बंगल्यात आस्थेने जतन करून ठेवला आहे.\nभारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव पहिल्यांदाच घेतला खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्हारी, मल्हारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी खंडोबाला वेगवेगळी नावे आहेत. खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये मिळून एकूण बारा स्थाने आहेत. त्यांपैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. श्रीक्षेत्र माळेगावचा खंडोबा म्हणजे लोकांचा देव. माळेगावचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा हेच आहे, मराठवाड्याची ती सर्वात मोठी ग्रामदेवता आहे. तिच्या नावाने माळेगावला मोठी यात्रा भरते. खरीपाची कापणी झाली की शेतकरी आणि कष्टक-यांना वेध लागतात ते माळेगावच्या यात्रेचे...\nमाळेगावची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी भरवली जाते. निजाम राजवटीमध्येदेखील यात्रा भरवली जात असे. माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा समजली जाते. ‘येळकोट-येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात राज्याच्या; तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमधूनदेखील हजारो भाविक आणि व्यापारी माळेगावमध्ये येत असतात.\nमाळेगावची जत्रा म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची-कपड्यांची दुकानं आणि आकाश पाळण्यांचा खेळ नव्हे. ती सामजिक अभिसरणाला मदत करते... मार्गशीर्षाचा महिना मध्यावर आला म्हणजे मन्याड खो-याच्या टापूत माळेगावच्या जत्रेची लगबग सुरू होते. जत्रेचा आरंभ मार्गशीर्षाच्या अवसेला मल्हारी म्हाळसाकांत खंडेरायाच्या देवसवारीनं होतो. 'यळकोट यळकोट, जय मल्हार' च्या जयघोषानं आसमंत गर्जू लागतो. आभाळाच्या निळाईवर खंडोबाच्या देवसवारीवर उधळलेलं खोबरं अन् बेलभंडार भारी वाटतो. मल्हारी देवाच्या वाटेवर भक्तगण आपल्या देहाच्या पायघड्या अंथरतात. त्यापुढे अंगात आलेले पाच-पन्नास वारूं घुमत असतात ; चाबकाच्या फटका-यांनी आपल्या अंगाची कातडी सोलून घ���तात. सर्वांत पुढे सनईचे सूर आणि हलगीवर घोड्या- वारूंची घाई निघते. हलगीवर पडणा-या टिप-यांच्या कडाडणा-या आवाजाने वारू बेभान होऊन झुलत असतात. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकातील हजारो भक्तगण माळेगावची वाट तुडवून, तहान-भूक हरवून जत्रेची मजा घेतात.\nश्यामची आई आणि आजची मुले\nसाने गुरुजीचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र आहे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. श्याम या शाळकरी मुलाच्या भूमिकेतून छोट्या कथा अन् प्रसंग साने गुरुजींनी लिहिले. एका छोट्या गावात संध्याकाळी श्याम आपल्या मित्रांना आपल्या आईविषयीच्या कथा सांगतो, अशी सर्व प्रसंगाची रचना आहे. कोमल हृदयाचा, भाबडा मुलगा आपल्या आईविषयी सांगतो तेव्हा त्याचा कंठ भरून येतो, डोळ्यांत अश्रू दाटतात व ऐकणार्या मुलांचीही तशीच स्थिती होते.\nआज साठीच्या वयात असलेल्यांनी साने गुरुजींना पाहिले आहे, ऐकले आहे. ना.ग.गोरे, एस. एम.जोशी, प्रकाशभाई मोहाडीकर, वसंत बापट, निळू फुले व सेवादलातील सर्वच जण साने गुरुजींची वेडी मुले होती, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सारी उदात्त तत्त्वे गुरुजींच्या आचरणातून, कथांतून त्या पिढीत उतरली. ती सर्व मंडळी स्वातंत्र्याच्या चळवळीत तर होतीच; शिवाय शिक्षण, कला, साहित्य, समाजकारणात यशस्वी ठरली. मात्र ती सर्वजण साने गुरुजींची ‘मुले’च होती.\nआचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट काढला व त्यास चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान अर्थात सुवर्ण कमल मिळाले.\n‘ग्रंथाली वाचक दिना’निमित्त या वर्षी ‘श्यामची आई’ हेच सूत्र घेतले आहे\nएस.टी.महामंडळामधून 2008 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर दीड-दोन वर्षे इकडेतिकडे फिरण्यात घालवले. त्यानंतर दिवस कंटाळवाणे जात होते. तेवढ्यात ‘रयत रुग्णालया’ची ‘प्रशासकीय अधिकारी पाहिजे’ अशी जाहिरात वाचली. म्हणून विचार केला, की बघावा अर्ज करून. माझा दिवस चांगला जाईल व एका सेवाभावी संस्थेमध्ये काम केल्याचे समाधानही मिळेल रयत आरोग्य मंडळात एक नाव मी ऐकून होतो. ती व्यक्ती होती डॉ.एस.टी.खुरसाळे. खुरसाळे फार कडक आहेत, रागीट आहेत, कोणाला मदत वगैरे करत नाहीत इत्यादी. मी माझा अर्ज घेऊन मुलाखतीसाठी गेलो, इतरही पाच-सहा जण होते.\nएस.टी.महामंडळामधून 2008 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर दीड-दोन वर्षे इकडेतिकडे फिरण्यात घालवले. त्यानंतर दिवस कंटाळवाणे जात होते. तेवढ्यात ‘रयत रुग्णालया’ची ‘प्रशासकीय अधिकारी पाहिजे’ अशी जाहिरात वाचली. म्हणून विचार केला, की बघावा अर्ज करून. माझा दिवस चांगला जाईल व एका सेवाभावी संस्थेमध्ये काम केल्याचे समाधानही मिळेल रयत आरोग्य मंडळात एक नाव मी ऐकून होतो. ती व्यक्ती होती डॉ.एस.टी.खुरसाळे. खुरसाळे फार कडक आहेत, रागीट आहेत, कोणाला मदत वगैरे करत नाहीत इत्यादी. मी माझा अर्ज घेऊन मुलाखतीसाठी गेलो, इतरही पाच-सहा जण होते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/rangsang-vijay-kenkary-dent-dress-for-life-comedy-theaters-dircter-john-tillinger-drama-4938/", "date_download": "2019-03-25T08:25:19Z", "digest": "sha1:36WIVFQ3PZSDO43FKI2THHMZBTLSNIAK", "length": 45055, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\n‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’\n‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’\nरेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम सीरियस बिझनेस.’ ‘डोन्ट ड्रेस फॉर\nरेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम सीरियस बिझनेस.’ ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ ही कॉमेडी पाहताना याचा साक्षात् प्रत्यय आला. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’चा दिग्दर्शक होता जॉन टिलिंजर. त्याने प्रयोग ‘कनसिव्ह’ करण्यातच गडबड केली होती. नाटकाच्या नावात ‘डिनर’ होतं, पण जे पाहिलं ते स्टार्टर्ससुद्धा नव्हते. या नाटकानं जाणीव करून दिली, की बाबा रे, ब्रॉडवेवरचं सगळंच चांगलं असा समज करून घेऊ नकोस. हे लोक काही जगावेगळे नाहीत. इथे जशी उत्तम नाटकं होतात, तशीच वाईटही होतात.\nन्यू यॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरवर असलेल्या ‘टीकेटीएस्’ या नाटकाची तिकिटं मिळणाऱ्या बूथसमोर उभा होतो. नाटकांच्या नावाची यादी वाचत होतो. एका नाटकाच्या नावावर नजर स्थिरावली.. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’- दोन अंकी फार्स. मला बरेच दिवस ब्रॉडवेवरचा एक तरी चांगला फॉर्स बघायचा होताच. मी बूथच्या खिडकीवर जाऊन नाटकाचं तिकीट काढलं. दुपारचे दोन वाजले होते. तीनचं नाटक होतं. नाटक टाइम्स स्क्वेअरपासून पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. दि अमेरिकन एक्सप्रेस थिएटर, फॉर्टी सेकंड स्ट्रीट. मी खूश झालो होतो. कारण शनिवार असूनही मला चांगलं तिकीट मिळालं होतं. थिएटरवर पोहोचलो. थिएटर नेहमीपेक्षा जरा वेगळं वाटत होतं. इमारतीच्या मुख्य दरवाजातून आत शिरल्याबरोबर मोठ्ठा पॅसेज होता. खाली कारपेट आणि दोन्ही बाजूच्या भिंतींवर अंतरा-अंतराने लावलेली पेंटिग्ज. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्येच आपण शिरतोय असं मला वाटलं. थिएटर खूप जूनं नसावं, किंवा नुकतंच नूतनीकरण केलेलं असावं. मुख्य नाटय़गृहाच्या आत शिरलो. चांगलं प्रशस्त नाटय़गृह होतं. पण मला काहीतरी वेगळं वाटत होतं. नाटय़गृहात शिरल्यानंतर जसं वाटतं तसं वाटत नव्हतं. मी लवकर पोहोचलो असल्यामुळे माझ्या सीटवर जाऊन बसलो आणि निवांतपणे प्लेबिल वाचायला सुरुवात केली.\nहे अमेरिकन एक्सप्रेस थिएटर १९१८ साली बांधलेलं होतं. तेव्हा त्याचं नाव होतं- सेल्वायन थिएटर. १९३० साली या नाटय़गृहाचं चित्रपटगृहात रूपांतर झालं. आणि २००० साली डागडुजी करून राऊंड अबाऊट थिएटर कंपनीने हे नाटय़गृह पुन्हा सुरू केलं. नाटय़गृहाच्या बाबतीतला माझा अंदाज अगदीच चुकलेला नव्हता हे लक्षात आलं, त्यामुळे जरा बरं वाटलं.\n‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ हे मार्क कॅमोलिती नावाच्या फ्रेंच नाटककाराच्या फार्सचं रॉबिन हॉडनने केलेलं इंग्रजी रूपांतर होतं. मूळ नाटकाचं नाव होतं- ‘पायजमास फॉर सिक्स.’ फ्रान्समध्ये हा फार्स गाजला होता. रॉबिन हॉडन हा चांगला नाटककार आहे हे माहीत होतं. त्यामुळे इंग्रजी रूपांतर चांगलंच झालं असणार अशी माझी खात्री होती. रॉबिन हॉडनने लिहिलेलं ‘बर्थडे स्वीट’ नावाचं इंग्रजी नाटक मी दिग्दर्शित केलं होतं. त्यामुळे या नाटककाराची थोडीशी ओळख झाली होती.\nनाटक सुरू झालं. प्रयोगाला खूप गर्दी होती. नाटक घडतं ते बर्नार्डच्या पॅरिसपासून दोन तासावर असलेल्या फार्महाऊसमध्ये. बर्नार्ड आपल्या बायकोला- म्हणजे जॅकलिनला वीकएन्डला तिच्या आईकडे जायला सांगतो. ती तयार होते. बर्नार्ड खूप खूश असतो. कारण बायकोला घरा���ाहेर पाठवून त्याने त्याच्या मैत्रिणीला- सुझ्ॉनला येण्याचा मार्ग मोकळा केलेला असतो. नाटकाच्या सुरवातीलाच लक्षात येतं की, ही सेक्स कॉमेडी आहे. प्रेक्षकही त्याच दृष्टीने नाटक पाहायला तयार होतो. जॅकलिनला संशय येऊ नये म्हणून बर्नार्डने आपला जिवलग मित्र रॉबर्ट याला रात्री राहायला बोलावलेलं असतं. आणि बायको जाणार म्हणून जेवण बनवायला एक स्वयंपाकीण मागवतो; जिचं नाव असतं-सुझेट. थोडक्यात काय, तर जॅकलिनला संशय आलाच, तर दोन साक्षीदार असलेले बरे. जॅकलिन आईकडे जायला निघते इतक्यात घरचा फोन वाजतो. जॅकलिन फोन उचलते. तो बॉन अॅपिटाइट या एजन्सीचा असतो. हे सांगायला, की स्वयंपाकीण सुझेट त्यांच्या घराकडे यायला वेळेवर निघाली आहे. जॅकलिनच्या लक्षात येते की, काहीतरी गडबड आहे. ती बर्नार्डला त्याबद्दल विचारणार इतक्यात परत फोन वाजतो. ती उचलते. फोन रॉबर्टचा असतो. तो तिला सांगतो की, वीकएन्डला तो त्यांच्या घरी राहायला येतो आहे. हे जॅकलिनला माहीत नसतं. तिला शॉक बसतो. पण ती खूप खूश होते. कारण तिचं आणि रॉबर्टचं अफेअर असतं. हे आपल्याला त्यांच्या फोनवरच्या संभाषणावरून उमगतं. फोन ठेवल्यावर जॅकलिन बर्नार्डला सांगते की, ती तिच्या आईकडे जात नाहीए. कारण तिच्या आईला फ्ल्यू झाला आहे. बर्नार्ड गडबडतो. अगदी टिपिकल फार्समधली घटना इथून पुढे गोंधळांना सुरुवात होणार याची ही नांदी\nप्रेक्षक प्रयोगाला चांगल्यापैकी दाद देत होते. पण मी मात्र अचंबित झालो होतो. कॉमेडी फार्स हा माझा आवडता प्रांत.. करायला आणि बघायलासुद्धा विनोदाला भरभरून दाद द्यायला मला आवडतं. हसायला आलं तरी न हसता मख्ख चेहरा ठेवणाऱ्या प्रेक्षकांपैकी मी नाही. पण.. पण.. पण माझ्यासमोर नाटकाच्या नावाखाली जे काही सुरू होतं, त्याने मला अजिबात हसायला येत नव्हतं. हसणं सोडा; हळूहळू वैतागच यायला लागला होता. म्हणजे नाटक सुरू झाल्या झाल्या अगदी पहिल्या दहा मिनिटांतच विनोदाला भरभरून दाद द्यायला मला आवडतं. हसायला आलं तरी न हसता मख्ख चेहरा ठेवणाऱ्या प्रेक्षकांपैकी मी नाही. पण.. पण.. पण माझ्यासमोर नाटकाच्या नावाखाली जे काही सुरू होतं, त्याने मला अजिबात हसायला येत नव्हतं. हसणं सोडा; हळूहळू वैतागच यायला लागला होता. म्हणजे नाटक सुरू झाल्या झाल्या अगदी पहिल्या दहा मिनिटांतच ‘माझ्या आजूबाजूचे प्रेक्षक जर नाटक एन्जॉय करत आहेत, त��� मग माझंच असं का होतंय ‘माझ्या आजूबाजूचे प्रेक्षक जर नाटक एन्जॉय करत आहेत, तर मग माझंच असं का होतंय’ हा विचार झटकून टाकून मी पुढे नाटक बघायला लागलो. मनात आशा होती की, नाटक पुढे पिकअप् होईल. कारण प्लॉटला तर हात घातला होता नाटककाराने’ हा विचार झटकून टाकून मी पुढे नाटक बघायला लागलो. मनात आशा होती की, नाटक पुढे पिकअप् होईल. कारण प्लॉटला तर हात घातला होता नाटककाराने पुढे घडणाऱ्या घटनांसाठी पायाभरणीही केली होती.\n.. इतक्यात रॉबर्ट येतो. बर्नार्ड त्याची वाटच बघत असतो. रॉबर्ट आल्या आल्या बर्नार्ड त्याला त्याच्या आणि सुझॅनच्या अफेअरबद्दल सांगतो. सुझॅन कुठल्याही क्षणी येऊन पोहोचेल अशी अवस्था. बर्नार्ड रॉबर्टला विनंती करतो की, जॅकलिनला रॉबर्टने सांगावं- सुझॅन त्याची गर्लफ्रेंड आहे रॉबर्ट त्याला ‘नाही’ म्हणतो. कारण पुढे त्याला धोका दिसत असतो. जॅकलिन येते. ती रॉबर्टला बघून खूश होते. पण रॉबर्ट मनातून हबकलेला असतो. जॅकलिनला बर्नार्डने सांगितलं, की सुझॅन माझी गर्लफ्रेंड आहे, तर काय होईल, याची त्याला भीती वाटत असते. बर्नार्ड जॅकलिनला घेऊन वाणसामान आणायला जातो. ते गेल्या गेल्या सुझी येते. म्हणजे कोण रॉबर्ट त्याला ‘नाही’ म्हणतो. कारण पुढे त्याला धोका दिसत असतो. जॅकलिन येते. ती रॉबर्टला बघून खूश होते. पण रॉबर्ट मनातून हबकलेला असतो. जॅकलिनला बर्नार्डने सांगितलं, की सुझॅन माझी गर्लफ्रेंड आहे, तर काय होईल, याची त्याला भीती वाटत असते. बर्नार्ड जॅकलिनला घेऊन वाणसामान आणायला जातो. ते गेल्या गेल्या सुझी येते. म्हणजे कोण तर सुझेट स्वयंपाकीण ती स्वत:चं नाव सुझी सांगते. रॉबर्टला वाटतं- हीच सुझॅन आहे. त्यामुळे बर्नार्ड आणि जॅकलिन आल्यावर तो ती तिची ओळख आपली गर्लफ्रेंड म्हणून करून देतो. बर्नार्ड या गोंधळामुळे हैराण होतो. जॅकलिन रॉबर्टवर चिडते. कारण तिला वाटत असतं की, ती एकटीच रॉबर्टची गर्लफ्रेंड आहे. बर्नार्ड आणि रॉबर्ट सुझेटला जास्त पैसे देऊन रॉबर्टची गर्लफ्रेंड असल्याचा अभिनय करायला सांगतात. ती तयार होते. एवढय़ात सुझॅन येते. आता हे उघडच होतं की सुझॅनला ते दोघं स्वयंपाकीण बनवणार घडतंही तसंच. सुझॅन खूप चिडते. पण तिच्यापुढे आता पर्याय नसतो. जॅकलिन रॉबर्टला जाब विचारते, तेव्हा पुढे येणारा प्रलय टाळायला रॉबर्ट तिला सांगतो की, वास्तविक सुझेट ही त्याची भाची आहे.\nइथे नाटकाचा पहिला अंक संपला.\nइथवर माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत फारसा फरक पडलेला नव्हता. मधे एखाद् दुसरा प्रवेश जरा बरा वाटला. पण तरीही मला हा फार्स मनसोक्त हसवत नव्हता किंवा अतक्र्य घटनांमध्ये गुंतवतही नव्हता. दुसऱ्या अंकात काहीतरी धमाल होईल या आशेवर मी होतो. अगदी लोटपोट नाही तरी प्रेक्षक बऱ्यापैकी हसून नाटकाला दाद देत होते. नाटकाच्या प्लॉटमध्ये गंमत होती, घटना घडत होत्या. व्यक्तिरेखा एका परिस्थितीतून सुटून दुसऱ्यात अडकत होत्या. तरीही मजा येत नव्हती. अभिनय म्हणाल तर खरी स्वयंपाकीण सुझेटचं काम करणारी अभिनेत्री वगळता इतर सगळे बेताचेच होते. मध्यंतरात बाहेर लॉबीत फिरताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो. बरेचसे प्रेक्षक खूश दिसत होते. मी एका वयस्कर प्रेक्षकाला विचारलंसुद्धा, कसं वाटतंय तर तो म्हणाला, ‘चांगली करमणूक आहे.’ वर म्हणाला, ‘मला सेक्स कॉमेडीज् आवडतात.’\nदुसरा अंक बघायला प्रेक्षागृहात जाऊन बसलो. ब्रॉडवेवरची किंवा वेस्ट एन्डवरची बरीचशी नाटकं बघताना मी जितका खूश झालो होतो, तितकाच आज निराश. प्रयोग सुरू व्हायला पाच मिनिटं होती म्हणून मी परत प्लेबिल उघडलं. वाचायला लागलो. तेव्हा मला कळलं की, मार्क कॅमोलितीच्याच गाजलेल्या ‘बोईंग बोईंग’ नाटकाचा हा सीक्वेल होता. ते वाचल्यावर मी अधिकच निराश झालो. कारण ‘बोईंग बोईंग’ हा टेरिफिक फार्स होता.\nदुसरा अंक सुरू झाला. रॉबर्ट आणि सुझेट डान्स करत असताना एखाद्या पार्टीत जशी धम्माल सुरू असते तसंच काहीसं वातावरण. बर्नार्डच्या जॅकेटमध्ये जॅकलिनला एक चॅनेल कोट विकत घेतल्याची पावती सापडते. त्याच्यावर ‘फॉर सुझी’ असं लिहिलेलं असतं. त्यावरून जॅकलिनला वाटायला लागतं की, सुझेट आणि बर्नार्डचं अफेअर आहे. सुझॅनला पण तसंच वाटत असतं. दोघी त्याचा बदला घ्यायचं ठरवतात. जॅकलिन बर्नार्ड आणि सुझीच्या अंगावर बर्फ टाकते. सुझॅन खुश होते. पण जॅकलिनचं समाधान होत नाही. ती बर्नार्डच्या अंगावर सोडय़ाचा स्प्रे उडवते. त्या गोंधळात सुझेट रॉबर्टची भाची नाही, हे उघडकीला येतं. सुझेट बर्नार्डला सांगते की, तिचं लग्न झालेलं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव जॉर्ज आहे. त्याला पुसटशी जरी शंका आली, की सुझेटचं नाव कुणाबरोबर जोडलं जातंय, तर तो त्या व्यक्तीला ठारच मारेल.\nजॅकलिन खूप विचार करते आणि शेवटी बर्नार्डला आपल्या ��फेअरबद्दल सांगते. कुणाबरोबर आहे, त्याचं नाव मात्र सांगत नाही. बर्नार्ड चिडतो. म्हणतो- मी तुझ्या याराला ठार मारीन. जॅकलिन रॉबर्टचं नाव सांगते. त्यावर तो काही करणार, इतक्यात सुझेटला न्यायला जॉर्ज येतो. त्याचा अवतार बघून सगळ्यांचं धाबं दणाणतं. पण जॉर्जला तिथं काय घडलंय याची कल्पना नाही. बर्नार्ड आणि रॉबर्ट ‘सुझॅन त्याची बायको आहे’ असं जॉर्जला पटवायचा प्रयत्न करतात. जॉर्ज खवळतो. मग ते दोघं त्याला सांगतात- सुझेट शेजारच्या घरात गेली आहे. ती येईपर्यंतच हे नाटक करायचं आहे. जॉर्ज ऐकत नाही. शेवटी सुझेट आतल्या खोलीतून बाहेर येते. सगळ्यांना सगळं कळतं आणि त्यामुळे सर्व प्रकरण निस्तरलं जातं. जॉर्ज व सुझेट जातात. बर्नार्ड आणि जॅकलिन आपल्या बेडरूममध्ये झोपायला जातात. थोडय़ा वेळात सुझॅन आपल्या खोलीतून बाहेर येते. रॉबर्टला बाहेर बोलावते. ते दोघं एकमेकांच्या मिठीत विसावतात. नाटक संपतं.\nफक्त दोन तास पाच मिनिटांचं नाटक; पण मला दोन दिवस नाटक बघत असल्यासारखं वाटलं. ब्रॉडवेवरची सर्वच नाटकं चांगली असतात असा माझा समज होत चालला होता, त्याला या नाटकाने चांगलाच धक्का दिला. वाईट म्हणजे किती वाईट असावं एकीकडे अत्यंत विचारपूर्वक, खूप मेहनत घेऊन केली जाणारी नाटकं; तर दुसऱ्या बाजूला संख्येने कमी, पण ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’सारखी नाटकं एकीकडे अत्यंत विचारपूर्वक, खूप मेहनत घेऊन केली जाणारी नाटकं; तर दुसऱ्या बाजूला संख्येने कमी, पण ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’सारखी नाटकं मला नाण्याची दुसरी बाजू बघायला मिळाली नव्हती. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ने ती दाखवली. फार्सला आवश्यक असलेली प्लॉटची गुंतागुंत या नाटकात होती. एका प्रसंगातून सुटून दुसऱ्यात अडकवणारी पात्रं होती. वैचित्र्यपूर्ण व्यक्तिरेखा होत्या. ‘मिस्टेकन आयडेंटिटीज्’ होत्या. फार्सला आवश्यक असलेले सर्व घटक छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात नाटकात होते. पण तरीही नाटक परिणामकारक होत नव्हतं. निदान माझ्यासाठी तरी मला नाण्याची दुसरी बाजू बघायला मिळाली नव्हती. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ने ती दाखवली. फार्सला आवश्यक असलेली प्लॉटची गुंतागुंत या नाटकात होती. एका प्रसंगातून सुटून दुसऱ्यात अडकवणारी पात्रं होती. वैचित्र्यपूर्ण व्यक्तिरेखा होत्या. ‘मिस्टेकन आयडेंटिटीज्’ होत्या. फार्सला आवश्यक असलेले सर्व घटक छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात नाटकात होते. पण तरीही नाटक परिणामकारक होत नव्हतं. निदान माझ्यासाठी तरी असं का घडलं असेल, याचा मी विचार करायला लागलो. नाटकाची दोन भागात विभागणी होते- संहिता आणि प्रयोग. संहितेत गंमत असेल तर ती प्रयोगात रूपांतरित होण्याची शक्यता असते. पण आडय़ातच नसेल तर पोहोऱ्यात कुठून येणार असं का घडलं असेल, याचा मी विचार करायला लागलो. नाटकाची दोन भागात विभागणी होते- संहिता आणि प्रयोग. संहितेत गंमत असेल तर ती प्रयोगात रूपांतरित होण्याची शक्यता असते. पण आडय़ातच नसेल तर पोहोऱ्यात कुठून येणार मी ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ नाटकाचं पुस्तक घेऊन वाचलं. संवादांमध्ये पुरेशी मजा नव्हती. त्यांनी विनोदनिर्मिती होत नव्हती. मूळ फ्रेंच नाटकात होत असेलही; पण रूपांतरात मात्र ती नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे फार्समधल्या वेडेपणालाही त्याचं म्हणून एक शास्त्र असतं. एकदा आपण तर्काच्या पलीकडच्या घटना घडणार हे मान्य केल्यानंतर त्या आपल्याला धक्के देत यायला पाहिजेत. इथे तसं होत नव्हतं. सगळं ठरवलेलं वाटत होतं. नाटकाची संरचना ओघवती नव्हती. प्रेक्षकांना पूर्वानुमान करता येईल अशाच घटना घडत राहतात. लिखाणात पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक जरा बरा होता. पण ‘बोईंग बोईंग’ या फार्सच्या लेखनात जी मजा होती, ती या नाटकाच्या लेखनात नव्हती.\nआता प्रयोग.. राऊंड अबाऊट थिएटर कंपनीचं हे प्रॉडक्शन. विनोदी नाटकाच्या प्रयोगाची एक गंमत असते. ते तुम्ही जितक्या सीरियसली कराल, तेवढं जास्त वर्क होतं. म्हणजे रंगमंचावर जे काही चाललं आहे ते पाहून प्रेक्षकांना खूप हसायला येतं, पण काम करणारी पात्रं ते खूप गंभीरपणे करत असतात. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’मधला बर्नार्ड अत्यंत हुशारीने एक प्लॅन आखतो आणि कसा त्यात अडकला जातो, याची मजा यायला पाहिजे. पण बर्नार्ड हे पात्र खरंच त्यात अडकलंय असं वाटायला हवं. इथे तसं होत नाही. नाटकातली सर्व पात्रं मुद्दाम प्रेक्षकांना हसवण्यासाठी जबरदस्तीने विनोदनिर्मितीचा प्रयत्न करताहेत असं वाटत राहिलं. रेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम सीरियस बिझनेस.’ अतिशय महत्त्वाचं विधान आहे हे. सर्वच अभिनेते विनोदनिर्मितीचा प्रयत्न करत होते. फक्त सुझेटचं काम करणारी स्पेन्सर केडन सोडून या बाईने मात्र अ���लातून काम केलं होतं. ती स्वयंपाकीण म्हणून सुरुवातीला या घरात येते. जराशी बुजलेली. चालण्या-बोलण्यात अवघडलेपण. हळूहळू घरात काय चाललंय, हे तिला कळायला लागतं. त्यानंतरचा तिचा बर्नार्ड आणि रॉबर्टबरोबरचा पैसे मागण्याचा प्रवेश. या प्रवेशात ती थोडी जास्त मोकळी झाली. हातवारे जरा मोकळेपणाने करायला लागली. बोलण्यातसुद्धा वाढलेला कॉन्फिडन्स तिनं दाखवला होता. शिवाय परिस्थितीचा फायदा घेण्याची वृत्ती उफाळून बाहेर आल्याचं सूचन पण तिनं शारीरभाषेतून छान केलं. नंतर दुसऱ्या अंकातला रॉबर्टबरोबर फ्लर्ट करण्याचा सीन आणि एक छोटासा विनोदी नाच यात तर तिने धमालच उडवून दिली. विशेषत: तिच्या कपडय़ांमध्ये झालेला बदल त्या- त्या ड्रेसप्रमाणे शारीरभाषा बदलून केडनबाईने फार मस्त दाखवला. सबंध नाटकात एन्जॉय करण्यासारखं काय असेल, तर तिचं काम या बाईने मात्र अफलातून काम केलं होतं. ती स्वयंपाकीण म्हणून सुरुवातीला या घरात येते. जराशी बुजलेली. चालण्या-बोलण्यात अवघडलेपण. हळूहळू घरात काय चाललंय, हे तिला कळायला लागतं. त्यानंतरचा तिचा बर्नार्ड आणि रॉबर्टबरोबरचा पैसे मागण्याचा प्रवेश. या प्रवेशात ती थोडी जास्त मोकळी झाली. हातवारे जरा मोकळेपणाने करायला लागली. बोलण्यातसुद्धा वाढलेला कॉन्फिडन्स तिनं दाखवला होता. शिवाय परिस्थितीचा फायदा घेण्याची वृत्ती उफाळून बाहेर आल्याचं सूचन पण तिनं शारीरभाषेतून छान केलं. नंतर दुसऱ्या अंकातला रॉबर्टबरोबर फ्लर्ट करण्याचा सीन आणि एक छोटासा विनोदी नाच यात तर तिने धमालच उडवून दिली. विशेषत: तिच्या कपडय़ांमध्ये झालेला बदल त्या- त्या ड्रेसप्रमाणे शारीरभाषा बदलून केडनबाईने फार मस्त दाखवला. सबंध नाटकात एन्जॉय करण्यासारखं काय असेल, तर तिचं काम पण फार्सला टीमवर्क जबरदस्त लागतं. त्यामुळे तिचं एकटीचं चांगलं काम हा कोसळणारा डोलारा सावरू शकत नव्हतं.\n‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’चा दिग्दर्शक होता जॉन टिलिंजर. त्याने हा प्रयोग ‘कनसिव्ह’ करण्यातच गडबड केली होती. प्रत्येक पात्र वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होतं. प्रत्येकाची स्वतंत्र शैली. एका प्रवेशातून दुसऱ्या प्रवेशात नाटक जात असताना ते प्रवाही असायला हवं, इथे तसं होतच नव्हतं. सगळ्यांचे सूर वेगवेगळे, त्यामुळे आवाजाच्या पट्टय़ा वेगवेगळ्या. पात्रं एकमेकांचं ऐकून बोलत आहेत असं बऱ्याचदा वाटत नव्हतं. जॉन लिबॅटीचं फार्म-हाऊस दिसायला बरं होतं, पण दिग्दर्शकाने त्याचा वापर एखाद् दुसरा प्रसंग वगळता नीट केलाच नव्हता. बऱ्याचदा अभिनेते स्टेजवर रांगेत उभे राहिल्यासारखे वाटत होते. अगदी आत्ता राष्ट्रगीत म्हणतील असं वाटावं असे. आकृतिबंध नावाची गोष्ट दिग्दर्शकाच्या गावीच नसावी. एकदा दोघंजण फोनच्या वायरमध्ये अडकतात तो प्रसंग आणि एकदा सर्वजण एकमेकांच्या अंगावर पडतात तो दुसरा प्रसंग असे काही अपवाद वगळता चांगले दृश्यबंध नाटकात नव्हतेच. नेपथ्यकाराने जागा दिल्या होत्या, पण त्याचा वापर शून्य फार्स गतिमान हवा, प्रसंगांची लय समजून घेऊन, त्यातले चढउतार समजून घेऊन प्रयोगाची बांधणी करावी लागते, वगैरे गोष्टी तर प्रयोगात नव्हत्याच. नाटक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की, सर्वाना छोटय़ा छोटय़ा प्रतारणा करायच्या आहेत, पण तेही त्यांना धड जमत नाहीए. प्रयोग बघताना ‘बोईंग बोईंग’ नाटकात ज्या गोष्टी हीच माणसं- रॉबर्ट आणि बर्नार्ड शिताफीने करतात, ती करताना आता लग्न वगैरे झाल्यावर, मधे काही र्वष गेल्यामुळे गोंधळ होतोय, आता ती हुशारी उरलेली नाहीए. हे जरी खरं असलं तरी माझ्या मते, ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ हे स्वतंत्र नाटक आहे. तो ‘बोईंग बोईंग’चा सीक्वेल वाटत नाही.\nनाटक किती दिवस चालेल, माहिती नाही. पण नाटक बघायला आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्रच असणार, असं प्रयोग सुरू असताना आणि प्रयोग संपल्यावर इतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून वाटलं. मला या नाटकाने धक्का दिला. खाडकन् जागं केलं. आणि जाणीव करून दिली, की बाबा रे, ब्रॉडवेवरचं सगळंच चांगलं असा समज करून घेऊ नकोस. हे लोक काही जगावेगळे नाहीत. इथे जशी उत्तम नाटकं होतात, तशीच वाईटही होतात. बऱ्याचदा काय होतं- आपण ब्रॉडवे किंवा वेस्ट एन्डवर नाटक बघायला जाताना ज्या नाटकांबद्दल चांगलं ऐकलं वा वाचलेलं असतं अशीच नाटकं बघायला जातो. त्यामुळे ती चांगलीच निघण्याची शक्यता वाढते. पण असं- नुसती नाटकाची यादी बघून, कसलीही पूर्वसूचना नसताना एखादं नाटक बघायला गेलं तर काय होईल, याचा प्रत्यय त्या दिवशी आला.\nनाटकाच्या नावात ‘डिनर’ होतं, पण जे पाहिलं ते स्टार्टर्ससुद्धा नव्हतं. आणि मी पूर्ण जेवणाची भूक घेऊन गेलो होतो. मी विचार केला- आता परत टीकेटीएसवर जावं, तिकीट काढावं आणि स्वीट डिश म्हणून एखादं नावाजलेलं चांगलं नाटक पाहावं, म्हणजे तोंडाची बिघडलेली चव तरी सुधारेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकाचे गाव.. अविन्यो त्याचे नाव\nनाटक : गेले ते दिन गेले…\nजयललितांच्या भाचीचा पोएस गार्डनबाहेर ड्रामा\nMarathi Drama: चिमुरडय़ाच्या बडबडीने ‘दोन स्पेशल’मध्ये मीठ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-sbha-at-thane/", "date_download": "2019-03-25T08:34:12Z", "digest": "sha1:OJUKUFG7I364MZWRWT4AIBM4UK36EENS", "length": 4792, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ठरल तर मग. . ठाण्यात या ठिकाणी होणार राज ठाकरेंची जंगी सभा", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nठरल तर मग. . ठाण्यात या ठिकाणी होणार राज ठाकरेंची जंगी सभा\nठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 18 नोव्हेंबरला होणाऱ्या ठाण्यातील सभेची जागा निश्चिती अखेर झाली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन मार्गावर ही सभा होणार आहे.\nअनधिकृत फेरीवाल्यां विरो��ात मनसेकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनानंतर ही सभा घेतली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमक काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान मनसेकडून रेल्वे स्थानक परिसरात सभेची तयारी करण्यात येत होती. मात्र या ठिकाणी सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आज ठाणे पोलिसांसह मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या जागेची पाहणी केली आहे.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nराणेंच्या राजकीय कारकीर्दीचा फैसला ७ डिसेंबरला\nखर्च सादर न करणे भोवले; १५६ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-demands-repoling-in-palghar-14555/", "date_download": "2019-03-25T08:05:21Z", "digest": "sha1:47ODNACAXRASXIZQ332TRIITOGKZ5EHL", "length": 5104, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघरमध्ये फेरमतदान घेण्याची शिवसेनेची मागणी", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nपालघरमध्ये फेरमतदान घेण्याची शिवसेनेची मागणी\nपालघर : पालघरमध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलंय. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. तर श्रीनिवास वनगा यांना २,४०,६१९ मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,१६,९५३ मतं मिळाली. गावित 44589 मतांनी विजयी झाले.\nदरम्यान आता शिवसेनेनं पालघर निवडणुकीच्या निकालावर हरकत घेतलीये. निवडणूक आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचं कारण देत, शिवसेनेनं पालघरमध्ये फेरमतदान घ्यावं अशी मागणी केली आहे. तशी मागणी करणारं पत्र शिवस���नेनं निवडणूक आयोगाला दिलं आहे. दरम्यान आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nअहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज\nपालघरमधील विजय भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा- संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/india-wins-the-match-against-sri-lanka-by-6-wickets/articleshow/63275675.cms", "date_download": "2019-03-25T08:57:52Z", "digest": "sha1:NQLH64ICOZAVGQYACIHKXKPKNGJ7YRJX", "length": 22606, "nlines": 422, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india wins the match: भारताचा श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय - india wins the match against sri lanka by 6 wickets | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nभारताचा श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय\nमनीष पांडे आणि दिनेश कार्तिकने पाचव्या विकेटसाठी केलेल्या ६८ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर भारताने निदाहस करंडक टी-२० तिरंगी क्रिकेट मालिकेत श्रीलंकेवर ६ विकेटनी मात केली. श्रीलंकेने दिलेल्या १५३ धावांचे लक्ष्य भारताने चार विकेटच्या मोबदल्यात १७.३ षटकांत पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघ चार गुणांसह गुणतक्त्यात आघाडीवर पोहोचला. त्याचबरोबर भारताने मागील पराभवाची परतफेडही केली.\nभारताचा श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय\nमनीष पांडे आणि दिनेश कार्तिकने पाचव्या विकेटसाठी केलेल्या ६८ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर भारताने निदाहस करंडक टी-२० तिरंगी क्रिकेट मालिकेत श्रीलंकेवर ६ विकेटनी मात केली. श्रीलंकेने दिलेल्या १५३ धावांचे लक्ष्य भारताने चार विकेटच्या मोबदल्यात १७.३ षटकांत पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघ चार गुणांसह गुणतक्त्यात आघाडीवर पोहोचला. त्याचबरोबर भारताने मागील पराभवाची परतफेडही केली.\nश्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मागील दोन्ही डावांत अर्धशतक ठोकणारा शिखर धवन ८ धावांवर बाद झाला. यानंतर धनंजयने रोहित शर्मालाही माघारी पाठवले. भारताची सलामी जोडी २२ धावांत माघारी परतली होती. सुरेश रैनाने १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २७ धावा जोडल्या. रैन��, लोकेश राहुल पाठोपाठ माघारी परतले. या वेळी भारताच्या ४ बाद ८५ धावा झाल्या होत्या. मनीष पांडे आणि दिनेश कार्तिकने डावाची सूत्रे हाती घेत श्रीलंकेला आणखी यश मिळू दिले नाही. पांडेने ३१ चेंडूंत नाबाद ४२, तर कार्तिकने २५ चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या.\nतत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. लढतीपूर्वी पाऊस झाल्याने लढत उशिरा सुरू झाली. त्यामुळे एक षटक कमी करून ही लढत प्रत्येकी १९ षटकांची खेळविण्यात आली. डावाच्या तिसऱ्या षटकात शार्दूल ठाकूरने गुणतिलकाला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर पुढच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने कुसल परेराचा त्रिफळा उडविला. यानंतर कुसल मेंडिसने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा जोडल्या. मेंडिस मैदानात असेपर्यंत श्रीलंका सुस्थितीत होता. मात्र, मेंडिस माघारी परतला. आणि श्रीलंकेच्या इतर फलंदाजांवर अंकुश राखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. शार्दूलने चार विकेट घेतल्या.\nश्रीलंका : गुणतिलका झे. रैना गो. ठाकूर १७, मेंडिस झे. शर्मा गो. चहल ५५, कुसल परेरा झे. वॉशिंग्टन गो. सुंदर ३, थरंगा त्रि. गो. शंकर २२, थिसारा परेरा झे. चहल गो. ठाकूर १५, जीवन मेंडिस त्रि. गो. वॉशिंग्टन सुंदर १, शनाका झे. कार्तिक गो. ठाकूर १९, धनंजय झे. राहुल गो. उनाडकट ५, लकमल नाबाद ५, चमीरा झे. उनाडकट गो. ठाकूर ०, फर्नांडो नाबाद ०, अवांतर -१०, एकूण - १९ षटकांत ९ बाद १५२.\nबाद क्रम : १-२५, २-३४, ३-९६, ४-११३, ५-११८, ६-१२०, ७-१४६, ८-१५१, ९-१५१.\nगोलंदाजी : जयदेव उनाडकट ३-०-३३-१, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२१-२, शार्दूल ठाकूर ४-०-२७-४, युझवेंद्र चहल ४-०-३४-१, विजय शंकर ३-०-३०-१, सुरेश रैना १-०-६-०.\nभारत : रोहित शर्मा झे. मेंडिस गो. धनंजय ११, शिखर धवन झे. परेरा गो. धनंजय ८, लोकेश राहुल हिट विकेट गो. मेंडिस १८, सुरेश रैना झे. परेरा गो. फर्नांडो २७, मनीष पांडे नाबाद ४२, दिनेश कार्तिक नाबाद ३९, अवांतर - ८, एकूण - १७.३ षटकांत ४ बाद १५३.\nबाद क्रम : १-१३, २-२२, ३-६२, ४-८५.\nगोलंदाजी : लकमल २-०-१९-०, धनंजय ४-०-१९-२, चामीरा ३-०-३३-०, फर्नांडो २.३-०-३०-१, मेंडिस ४-०-३४-१, परेरा २-०-१७-०.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंध���त ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपहिल्याच सामन्यात दिल्लीकडून मुंबईचा पराभव\nकाश्मीरच्या रसिकनं केलं आयपीएल पदार्पण\nपंतनं केली 'मुंबई'ची धुलाई; २७ चेंडूत ७८ धावा\nआंद्रे रसेल बरसला, हैदराबाद पराभूत\n...तरीही स्मिथ, वॉर्नरला वर्ल्डकपमध्ये संधी\n3/25/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n3/26/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n3/27/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n3/28/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n3/29/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n3/30/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n3/30/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n3/31/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n3/31/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/1/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/2/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/3/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/4/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/5/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/6/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/6/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/7/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/7/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/8/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/9/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/10/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/11/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/12/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/13/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/13/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/14/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/14/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/15/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/16/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/17/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/18/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/19/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/20/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/20/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/21/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/21/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/22/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/23/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/24/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/25/2019 - ईडर्न गार्���न्स, कोलकाता\n4/26/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/27/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/28/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/28/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/29/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/30/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n5/1/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n5/2/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n5/3/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n5/4/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n5/4/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n5/5/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n5/5/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nvirat-Gambhir: विराट चतुर कॅप्टन नाही; धोनी, रोहितशी तुलना न...\nविल जॅक्सने २५ चेंडूंत ठोकले शतक\nआयपीएलचा रणसंग्राम आजपासून, चेन्नई विरुद्ध बेंगळुरू भिडणार\nIPL: 'आयपीएल'च्या थेट प्रक्षेपणावर पाकमध्ये बंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभारताचा श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय...\nदक्षिण आफ्रिकेची सामन्यावर पकड...\nभारत पराभवाची परतफेड करेल आज श्रीलंकेविरुद्ध टी-२० लढत...\n'शमीला मुलीची काळजी असेल तर विचार करेन'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-03-25T07:28:46Z", "digest": "sha1:AHAPIK4XIVVKRLBTNPV5D77FGQ5CAPW5", "length": 5539, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंकाई रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nअंकाई, अहमदनगर जिल्हा, ४२३ १०४\nदौंड मनमाड रेल्वेमार्ग, मनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nसोलापूर विभाग, मध्य रेल्वे\nअंकाई रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंकाई गावात असलेल्या या स्थानकावर पुणे मनमाड पॅसेंजर आणि पुणे निझामाबाद पॅसेंजर गाड्या थांबतात.\nमनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग या स्थानकाच्या दक्षिणेकडून मनमाड-दौंड रेल्वेमार्गापासून वेगळा होतो.\nनाशिक जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-03-25T08:24:51Z", "digest": "sha1:SQO7QLIDCTKAYGTGYWJTOF7JIZB57JC3", "length": 6326, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॅग्वार कार्स - विकिपीडिया", "raw_content": "\nसर विल्यम ल्यॉन्स आणि विल्यम वामस्ले\nजॅग्वार (अमेरिकेमधे) किंवा जॅग्यूअर (युके मधे) ही ब्रिटिश आलिशान गाड्या बनवणारी कंपनी आहे, जिचे मुख्यालय इंग्लंड मधील कॉव्हेंट्री शहरातील व्हीटली येथे आहे. ती संपूर्णतः टाटा मोटर्स या भारतीय कंपनीच्या मालकीची आहे.\nजॅग्वारची स्थापना स्वॉलो साइडकार कंपनी या नावाने १९२२ मधे झाली. तेव्हा फक्त साइडकार(दुचाकीच्या बाजुला बसण्यासाठी लावण्यात येणारी बोगी) बनवल्या जात होत्या. कंपनीचे नाव दुसऱ्या महायुद्धानंतर जॅग्वार करण्यात आले. १९६८ मधे ब्रिटिश मोटर कॉर्पोरेशन व त्यापाठोपाठ लेलँड या कंपन्यांमधे तिचे विलिनिकरण करण्यात आले.१९९० मधे फोर्ड या कंपनीने तिची मालकी स्विकारली, व २००८ मधे टाटा मोटर्सने फोर्डकडून ती विकत घेतली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१४ रोजी ००:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090529/main.htm", "date_download": "2019-03-25T08:39:07Z", "digest": "sha1:NDRZRF4U6QYTNOS3AYBAPFJWISSWHDOM", "length": 20237, "nlines": 56, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, २९ मे २००९\nमनमोहन सिंग मंत्रिमंडळाचा विस्तार\nविलासराव देशमुख यांच्याकडे अवजड उद्योग\nनवी दिल्ली, २८ मे/खास प्रतिनिधी\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-युपीए सरकारमधील ५९ मंत्र्यांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडल्यानंतर अनेकांची उत्सुकता लागून लाहिलेले खातेवाटपही आज रात्री जाहीर झाले. पंतप्रधानांनी ७९ सदस्यीय जम्बो मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले असून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे अवजड उद्योग खात्याचा परभार सोपविला आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे उर्जा तर मुरली देवरा यांच्याकडे पेट्रोलियम खाते दिले आहे. मुकुल वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nबाबासाहेब पुरंदरे यांच्यावर हात उचलणाऱ्यांविरुद्ध हजारो हात उठतील\nराज ठाकरे यांचा सणसणीत इशारा\nमुंबई, २८ मे/ खास प्रतिनिधी\nछत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करून हजारो पानांचा इतिहास जिवंत करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती जो हात उचलला जाईल, त्या हाताचा बंदोबस्त करण्यासाठी हजारो हात उचलले जातील, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. शिवछत्रपतींचा पुतळा बसविण्यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या समितीवरुन बाबासाहेब पुरंदरे यांना हटविण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर व विनायक मेटे यांनी प्रयत्न चालवले आहेत.\nबाबासाहेब पुरंदरे यांना विरोध नाही, पण अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे असावे - मेटे\nमुंबई, २८ मे / खास प्रतिनिधी\nमुंबईत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्षपद शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवावे. बाबासाहेबांची समितीवर निवड करण्यास आमचा विरोध नाही, असे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आज स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणासाठी जुलै महिन्यात राज्यभर उग्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. नियोजित स्मारकाच्या अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नियुक्तीस काही मराठा संघटनांनी विरोध दर्शविला आहे.\n���ता पेशावरमध्ये तीन बॉम्बस्फोट\nपाच ठार, १०० जखमी\nपाकिस्तानातील पेशावर शहर आज तीन बॉम्बस्फोटांनी हादरले. त्यापैकी भरगर्दीच्या ठिकाणी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये पाच ठार व १०० जण जखमी झाले. पेशावर शहराबाहेर पोलिस चौकीला लक्ष्य करीत तिसरा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यामध्ये किती हानी झाली याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या लाहोर येथील मुख्यालयाला लक्ष्य करीत अतिरेक्यांनी बुधवारी घडविलेल्या भीषण कारबॉम्बस्फोटात ३५ जण ठार झाले होते.\nनाशिकजवळ वैमानिकरहित ‘सर्चर मार्क-१’ विमान कोसळले\nनाशिक, २८ मे / प्रतिनिधी\nदेवळाली कॅम्पस्थित तोफखाना स्कूलमधील प्रशिक्षणादरम्यान ‘सर्चर मार्क- १’ हे वैमानिकरहित विमान आज सकाळी शहरालगतच्या वडनेर दुमाला भागात कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. विमानाच्या इंजिनात अचानक निर्माण झालेला तांत्रिक दोष या दुर्घटनेस कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज तोफखाना स्कुलने वर्तविला आहे. या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यातील वैमानिकरहित विमानांचे प्रशिक्षण तोफखाना स्कुलतर्फे दिले जाते.\nचार लाख रुपयांत राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाची योजना\nचार लाख रुपये द्या आणि बालकाश्रम, बालसदन, अनाथालय घेऊन जा, अशी योजनाच राज्यातील आघाडी सरकारने आपल्या कार्यकर्त्यांकरिता राबविली होती, असे आता स्पष्ट होत आहे. एकदा का महिला व बालकल्याण विभागाने संस्था मंजूर केली की मग कार्यकर्त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न मिटला, अशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. महिला व बालकल्याण विभागातील काही अधिकारी बालकाश्रम, बालसदन आदी संस्था मंजूर करण्याकरिता पैशांची मागणी करतात हे सत्य आहे. त्याचप्रमाणे अशा संस्था पदरात पाडून घेतल्यावर अनुदानाच्या रुपाने मिळणाऱ्या पैशाचा स्वतच्या फायद्याकरिता वापर करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रात उदंड पीक आलेले आहे ही नाण्याची दुसरी बाजू आहे.\nमुंबईत आणखी १० स्कायवॉक\nमुंबई, २८ मे / प्रतिनिधी\nमुंबई १० नवीन स्कायवॉक, वडाळा ट्रक टर्मिनस येथील रस्त्याचे कॉँक्रिटीकरण आणि एनसी फडके रोडवरील साई��ाडी जंक्शन येथे उड्डाणपुल बांधण्यास एमएमआरडीएच्या समितीतर्फे मंजूरी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी आज या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. घाटकोपर (पू.), माहीम (पू. व प.), अंबरनाथ (पू. व प.), विक्रोळी (पू. व प.), महालक्ष्मी, खडा पारसी आणि शीव येथे हे स्कायवॉक बांधण्यात येणार आहेत. यासाठी २२२.५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या तीस वर्षांत वडाळा ट्रक टर्मिनस भागातील वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. ५.२ किमी लांबीच्या या रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करण्यासाठी ४१.८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\nअमलीपदार्थाची कोटय़वधींची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक\nमुंबई, २८ मे / प्रतिनिधी\nमुंबई सेंट्रल परिसरातून आज मुंबई पोलिसांनी २.१६४ किलो अंमलीपदार्थ जप्त केले. या अंमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २.११ कोटी आहे. याप्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.मोहम्मद रफीक शेख (४३), जेवीलाल जाट (३२) आणि दुर्गाशंकर गुज्जर (२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून तिघेही राजस्थान येथील राहणारे आहेत. मारिया यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आज दुपारी काही लोक मुंबई सेंट्रल येथील बेलासिस मार्गावर अंमलीपदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी सापळा रचण्यात आला व तिघा आरोपींना अटक करण्यात आली. शेख याला २००४ मध्ये अंमलीपदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) दिल्ली येथे अटक केली होती व त्याप्रकरणी त्याला चार वर्षांचा तुरूंगवासही झाला होता. तर २००५ मध्ये एनसीबीने जाट यालाही अंमलीपदार्थाच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती.\nज्ञानदेव भोसले यांच्या मुलाला मिळणार एअर इंडियात नोकरी\nमुंबई, २८ मे / प्रतिनिधी\nडय़ुटीवर नसतानाही एअर इंडिया कार्गोवरील दरोडय़ात आपल्या प्राणांची पर्वा न करता दरोडेखोरांशी मुकाबला करताना मृत्युमुखी पडलेले पहारेकरी ज्ञानदेव भोसले यांच्या मुलाला आता अनुकंपा तत्वावर एअर इंडियात नोकरी मिळणार आहे. या संदर्भातील बातमी ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकात देण्यात आली होती. आज बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाकडून त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि भोसले यांच्या मुलाला एअर इंडियाच्या नोकरीत घेण्याचे आश्वासन भोसले कुटुंबीयांना देण्यात आले. एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरिवद जाधव यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भोसले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच भोसले यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर एअर इंडियात नोकरी देण्याबाबतचे ऑफर लेटरही त्यांनी कुटुंबीयांना दिले.\n९१७ जिवंत काडतुसे जप्त;भंगार व्यावसायिकाला अटक\nमुंबई, २८ मे / प्रतिनिधी\nचोर बाजारातील राहणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाकडून मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी आज ९१७ जिवंत काडतुसे जप्त केले. याप्रकरणी भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी दिली. मकसूद अली खान (३१) असे या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. नागपाडा येथील ‘स्टार हॉटेल ऑफ यू पी’ येथे एक संशयित येणार असल्याची माहिती युनिट एकच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला व खानला अटक केली. खानकडून अटकेच्या वेळी ५०० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. तसेच त्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी उर्वरित काडतुसे नळबाजारातील शौचालयाच्या छतावरून हस्तगत केली. ९एमएम, .२२, .३० आणि .३२ या पिस्तुलांची ही काडतुसे असून सर्व परदेशी बनावटीची असल्याचे मारिया यांनी सांगितले. खान याच्याकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात परदेशी बनावटीची जिवंत काडतुसे कुठून आली, त्याचे कोणत्या टोळीशी संबंध आहेत का, याचा तपास केला जात असल्याचेही मारिया यांनी या वेळी स्पष्ट केले.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/womens-day-special-st-for-women/articleshow/63201779.cms", "date_download": "2019-03-25T08:54:55Z", "digest": "sha1:NNREASENZ3VM23VYLOMOXGOCL445QFAZ", "length": 15339, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "women's day special: कोल्हापूर-सांगली लेडीज स्पेशल एसटी बस - women's day special - st for women | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nकोल्हापूर-सांगली लेडीज स्पेशल एसटी बस\nराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने ८ मार्चपासून फक्त महिला प्रवाशांसाठी विशेष बससेवा सुरू करणार आहे. आता कोल्हापूर ते सांगली मार्गावर खास महिलांसाठी एसटी सुरू होत आहे.\nकोल्हापूर-सांगली लेडीज स्पेशल एसटी बस\nराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने ८ मार्चपासून फक्त महिला प्रवाशांसाठी विशेष बससेवा सुरू करणार आहे. आता कोल्हापूर ते सांगली मार्गावर खास महिलांसाठी एसटी सुरू होत आहे. महानगरपालिका परिवहन विभागानेही (केएमटी) महिलांसाठी लेडिज स्पेशल केएमटी सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एसटीने बाजी मारली आहे. कोल्हापूर आणि सांगली आगारातर्फे ही सेवा देण्यात येणार आहे.\nएसटीने कल्याण ते ठाणे मार्गावर खास महिलांसाठी हा प्रयोग केला होता. त्याच्या यशस्वीतेनंतर कोल्हापूर ते सांगली मार्गावरील महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावर खास महिलांसाठी एसटी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसस्थानकात सातत्याने असलेली प्रवाशांची गर्दी, या गर्दीतून एसटीत बसण्यासाठी जागा मिळविण्यासाठी सुरू होणारी धावपळ आता थांबणार आहे. दररोज अनेक महिला नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडतात. मात्र एसटीतून प्रवास करताना अनेक महिलांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक महिलांना उभे राहून प्रवास करावा लागतो. सरकारी, निमसरकारी कार्यालये, कार्पोरेट कार्यालयात अनेक महिला नोकरी करतात. त्याचा कोल्हापूर बसस्थानकातून सकाळी नऊ वाजल्यापासून प्रवास सुरू होतो. सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत कार्यालयाची वेळ संपल्यानंतर घरी येण्याची त्यांची धावपळ सुरू असते. या महिलांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीच्या कोल्हापूर आणि सांगली विभागाने खास महिलांसाठी कोल्हापूर ते सांगली मार्गावर एसटी सेवा देण्यात येत आहे.\nया एसटीच्या वाहकही महिला असतील. एसटी महिलांसाठी राबवित असलेले विविध उपक्रमांची यात माहिती सांगितली जाणार आहे. कोल्हापूर बसस्थानकातून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी आणि सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी बस सुटणार आहे. सांगली बसस्थानकातून कोल्हापूरकडे सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी आणि सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी ही बस धावेल.\nमहापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्��ात ७५ बसेस दाखल झाल्या. या पैकी एक केएमटी बस खास महिलांसाठी देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शहरात महिलांसाठी लेडिज स्पेशल केएमटीची सुविधा अपेक्षित होती. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.\nकेएमटी प्रशासनाने खास महिलांसाठी केएमटी बसेस देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. महिलांसाठी विशेष बस दिल्यास केएमटीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत महिलांसाठी खास सवलत द्यावी. नवीन केएमटी बसेस देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाची अद्याप दखल घेतलेली नाही.\nपश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे. प्रवासात महिला प्रवाशांची नेहमीच कुचंबणा होते. ही टाळण्यासाठी महिलांसाठी एसटी बसफेरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महिलांसाठी महिला दिनानिमित्त विशेष भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापुर विभागात ही सेवा सुरू होत आहे.\n- शैलेंद्र चव्हाण, विभाग नियंत्रक\nमिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nKolhapur + Western Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nPratik Patil : काँग्रेसचा आणि माझा संबंध संपलाः प्रतीक पाटील...\nuddhav thackeray : युतीच्या सभेतून मुख्यमंत्री, उद्धव यांचा ...\nभाजप-सेनेची प्रचाराची सभा म्हणजे इव्हेंट\nखासगीकरणातून आरक्षण संपवण्याचा डाव\nबँकांनी लाखांवरील पैशाची माहितीनिवडणूक विभागास द्यावी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकोल्हापूर-सांगली लेडीज स्पेशल एसटी बस...\nबलात्कार प्रकरणी आरोपी दोषी...\nअवैध गॅस भरताना कारवाई...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3163", "date_download": "2019-03-25T08:34:40Z", "digest": "sha1:3MADMAGH7AOZ5CRABBMQYJ32LFGKLGEB", "length": 11703, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पळसाला पाने तीन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते.\nवसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. ते संपूर्ण रानात लक्षवेधक ठरते. पळसाची फुले पाण्यात टाकली असता फुलांचा रंग पाण्यात उतरतो. आदिवासींची रंगपंचमी त्या नैसर्गिक रंगाने साजरी होत असते.\nपळसाला बहुतेक नावे त्याच्या फुलांवरूनच पडली आहेत. पळसाला इंग्रजीत ‘प्लेम ऑफ फॉरेस्ट’ तर संस्कृतमध्ये ‘अग्निशिखा’ असे म्हणतात. वाऱ्यावर हलणाऱ्या लाल-शेंदरी फुलांमुळे जणू काही त्या झाडाने पेट घेतलाय आणि ते ज्वालांनी घेरलेय, असे लांबून दिसते. संस्कृतमध्ये पळसाला ‘किंशुक’ असेही नाव आहे. ती फुले पाहून पोपटाच्या चोचीची आठवण होते – ‘किंचित शुक इव’ वाटणारे ते किंशुक अथवा हा पोपट तर नव्हे अशी शंका मनात निर्माण होते, म्हणून किंशुक. बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यात पळसाच्या त्याच वैशिष्ट्याचे समर्पक वर्णन केले आहे.\nपाहा पयसाचे लाल फूल हिरवे पान गेले झडी\nइसरले लाल चोची मिठ्ठू गेले कुठे उडी\nबाबा आमटे यांच्या ‘या सीमांना मरण नाही’ या कवितेत ‘ते मोहोर येतील, तेव्हा अंगार भडक होतील पळस; त्या आगीने दिपून जातील प्रासादांचे सारे कळस’ अशा ओळी आहेत. त्या वाचून बाबांना ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकाचे नाव पळसफुलांवरून सुचले असेल, असे वाटते.\nभारताच्या इतिहासात प्लासी लढाई (1757) प्रसिद्ध आहे. त्या रणांगणाला ‘प्लासी’ हे नाव पळसाची वने जवळ असल्यामुळे पडले होते. ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण मराठीत पळसावरून रूढ झाली. त्याचे कारण पळसाला पाने फक्त तीन असतात. बेलालाही पळसासारखी तीन पाने असतात; तशीच, निर्गुंडीलाही असतात. निर्गुंडीचे शास्त्रीय नाव Vitex Nirgunda Trifolia असे आहे. त्यामुळे ही म्हण पळसालाच का चिकटली, असा प्रश्न पडतो.\nपळसाच्या पानांचा उपयोग द्रोण, पत्रावळी करण्यासाठी केला जातो; त्यावरून एक शक्यता मनात डोकावली. ती अशी, की बेल, निर्गुंडी ह्या वनस्पती गावात सहज आढळतात. बेल शंकराच्या देवळात किंवा बागेत औषधी वृक्ष म्हणून लावला जातो. निर्गुंडी ही कुंपण म्हणून लावली जाते. त्यामुळे त्या वनस्पती सर्वांच्या परिचयाच्या असतात. त्या मानाने\nपळस गावात सहसा आढळत नाही.\nपूर्वी जेवणावळीसाठी द्रोण-पत्रावळींचा वापर खेडोपाडी केला जाई. त्यासाठी पळसाची पाने लागत. फुललेला पळस सहज ओळखता येतो. परंतु इतर काळात तो ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याची मोठी तीन पाने ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण अशी अस्तित्वात आली असण्याची ही एक शक्यता. गोष्टीचे सामान्यत्व त्या म्हणीतून सूचित होते. देशात स्थल, काल, धर्म, जात, लिंग सर्व व्यापून राहणारी सरकारी कचेऱ्यांतील एक समान गोष्ट – ‘भ्रष्टाचार ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण अशी अस्तित्वात आली असण्याची ही एक शक्यता. गोष्टीचे सामान्यत्व त्या म्हणीतून सूचित होते. देशात स्थल, काल, धर्म, जात, लिंग सर्व व्यापून राहणारी सरकारी कचेऱ्यांतील एक समान गोष्ट – ‘भ्रष्टाचार’ त्यामुळे कोठल्याही कचेरीत जा, एकच अनुभव तुम्हाला येईल. कारण कोठेही जा, पळसाला...\n(‘राजहंस ग्रंथवेध’ एप्रिल 2016 वरून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/dev-khara-aadhar/", "date_download": "2019-03-25T08:28:33Z", "digest": "sha1:LUHV7IKYQIDUVNFDWVOAIQPKGQ5LZHCS", "length": 6957, "nlines": 73, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nदेव खरा आधार, दयाघन देव खरा आधार\nदेव खरा आधार, दयाघन देव खरा आधार\nनिवांत राही टाकुन अवघा देवावरती भार\nदयाघन, देव खरा आधार.\nआज उन्हाळा उद्या हिवाळा\nसृष्टीनियम हा टळे कुणाला\nकाळाचे हे चक्र सारखे वरखाली होणार\nदयाघन, देव खरा आधार.\nसदैव लाभे सुख कवणाला\nतुझेचि संचित तुला भोगणे\nते न कधी टळणार\nदयाघन, देव खरा आधार.\nआज अमंगल रात्र काजळी\nदयाघन, देव खरा आधार.\n१९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन, सामान्यांचा त्यांना मिळालेला सक्रीय, धाडसी पाठिंबा अशी राजकीय पार्श्वभूमी, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग आणि \"निर्भयतेने जीवन जग\" असा संदेश देणारे हे चित्र होते. पटकथा, गीते आणि दिग्दर्शन या जबाबदाऱ्या आठवले यांनी उचलल्या. केशवराव भोळे यांनी श्रीधर पार्सेकर या तरुण संगीतकाराबरोबर आठवल्यांच्या गीतांना संगीताने नटवले. शांता आपटे, बाबुराव पेंढारकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत पु.ल.देशपांडे यांनीही या चित्रपटात भूमिका केली होती. तो त्यांचा दुसराच चित्रपट होता.\nमाझ्या माहेरी सुखाची सावली गं\nदेव खरा आधार, दयाघन देव खरा आधार\nपाटलाच्या पोरा जरा जपून जपून\nवीरा झोप सुखे तू घेई\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – ��ाव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2015-Zendu.html", "date_download": "2019-03-25T07:50:51Z", "digest": "sha1:WNRHZP47TVZMIUKWIJFRXL3QL4YXC6GI", "length": 8327, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कीड - रोगाने गेलेल्या झेंडूच्या प्लॉटने दिला १।। लाख नफा", "raw_content": "\nकीड - रोगाने गेलेल्या झेंडूच्या प्लॉटने दिला १\nश्री. अंकुश माणिक कुबेर, मु.पो. अकोले (खु.), ता. माढा. जि. सोलापूर ४१३२११, मो.: ९९७०९५७८९७\nआम्ही गेली १२ - १५ वर्षापासून उसामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतो. अनुभव दांडगा असल्याने पिकाचे व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करून चांगले पैसे होतात. चालूवर्षी इंडोस कंपनीच्या केशरगोल्ड वाणाची १६५०० रोपे ३ रू. प्रमाणे आणून ५ x १ फुटावर ३ एकरामध्ये लावली. जमीन मध्यम प्रतिची असून ठिबकने पाणी देतो. झेंडू लावल्यानंतर मधल्या सरीत उसाची लागवड करायची होती, मात्र यावर्षी पाऊस फारच कमी झाल्याने उजनी धरणात पुरेसे पाणी नाही. त्यामुळे ऊस लागवड करता आली नाही. झेंडूला नेहमीप्रमाणे रासायनिक खते देऊन किटकनाशके बुरशीनाशके फवारत असे. मात्र १ महिन्याचे पीक असताना पाने करपू लागली. रस शोषणारे किडे वाढले. त्याने पाने आकसून झाडे निस्तेज होऊन सुकू लागली. यासाठी कॅबराटॉफ, बाविस्टीन, कवच अशी औषधे नियमित अंतराने फवारली, मात्र रोग - कीड काही आटोक्यात येईना. प्लॉट सोडून देण्याची वेळ आली. अशी औषधे नियामीन अंतराने फवारली, मात्र रोग - कीड काही आटोक्यात येईना. प्लॉट सोडून देण्याची वेळ आली. अशी वेळ गेली १२ - १५ वर्षात कधी आली नव्हती. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा थोडा अनुभव होता. म्हणून बारामतीला ११ सप्टेंबर २०१५ रोजी कृषी प्रदर्शन पाहण्यास गेलो तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पहिलाच स्टॉल दिसला. प्रदर्शन पाहण्यास जाताना अशी रोगट २ - ३ रोपे सोबत घेऊन गेलो होती. ती प्रदर्शनात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सोलापूर प्रतिनिधी श्री. नागेश पाटील (मो. ९६८९५०९९७६) यांना दाखविली. त्यांनी सांगितले, \"करपा, कीड यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हा प्लॉट सुधारेल. तेव्हा तुम्ही प्लॉट काढू नका.\" या रोगामुळे १६५०० रोपांपैकी फक्त ८ ते ९ हजार रोपे शिल्लक राहिली होती. मग या ८ - ९ हजार रोगट रोपांसाठी प्रदर्शनातून सप्तामृत, हार्मोनी ही औषधे नेली. त्याची पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी केली असता ३ ऱ्या दिवशी पाने टवटवी त होऊ लागली.\nउजनीचा माझा मित्र श्री. बाळू मेटे हे देखील झेंडू नेहमी लावतात. त्यांना सुद्धा रोग आटोक्यात न आल्याने २ - ३ लाखाचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी मला सांगितले होते, प्लॉट काही सुधारणार नाही तेव्हा अजून खर्च करू नकोस, प्लॉट सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. मात्र शेवटचा पर्याय म्हणून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली. तिसऱ्या दिवशी फरक जाणवल्यावर पुढेदेखील नियमित फवारण्या घेतल्या. तर अक्षरश: गेलेल्या प्लॉटमधील ८ हजार रोपांपासून दसऱ्याला २ टन फुले मिळाली. ती ८० ते १२० रू./किलो दराने विकली. नंतर दिवाळीत ३ तोडे केले तेव्हा पहिल्या तोड्याला १०० रू. भाव मिळाला. नंतरचा माल ९० रू. ने व तिसऱ्या तोड्याच्या मालास ७० - ८० रू. किलो भाव मिळाला. दसरा दिवाळीच्य मध्ये एकदा ६० क्रेट फुले (६०० ते ७०० किलो) काढली होती. ती २५ ते ३० रू. ने गेली. असा एकूण ८००० रोपांपासून ६ टन माल निघाला.\nदरवर्षी एका रोपापासून २ किलो फुले मिळतात. मात्र यंदा जुनचा पाऊस नाही. नंतर मधेच अचानक पडला की रोगराई वाढली. त्यामुळे खर्चही निघाला नसता. म्हणजे रोपांचा ५०,००० रू. आणि इतर खर्च ५०,००० रू. असे १ लाख रू. चे नुसकासन झाले असते.\nतेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ लाख रू. खर्च निघून १ लाख रू. नफा मिळाला. आता आले पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. जर्मिनेटरचे आल्याला ड्रेंचिंग केले असता. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून वर फुट निघाली. तेव्हा आले पोसण्यासाठी पुढील फवारण्या करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-03-25T08:23:51Z", "digest": "sha1:M7PNEGTD3X2BC5CDFYJESDPWGTAGXYDF", "length": 9996, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चंद्रावर जाण्याची रशियाची तयारी : व्लादिमिर पुतीन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचंद्रावर जाण्याची रशियाची तयारी : व्लादिमिर पुतीन\nमॉस्को : ‘होय, आम्ही चंद्रावर जाणार आहोत’ असे सांगत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आगा��ी चंद्र मोहिमेची माहिती दिली आहे.रशियाच्या ‘कॉस्मोनॉटिक्स डे’च्या निमित्ताने भाषण देताना पुतीन यांनी ही घोषणा केली आहे.\nचंद्राच्या कक्षेत रशिया पहिले स्पेस स्टेशनही स्थापन करील, असे त्यांनी सांगितले. चांद्रभूमीवर यान उतरून रशियन अंतराळवीरांचे पाऊल चंद्रावर पडेल. याबाबतच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून, ती २०३० पर्यंत सुरू राहील. त्यासाठीचे ‘फेडरात्सिया’ हे यान आता पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे. या मोहिमेसाठी सुपर-हेवी रॉकेट निर्माण करण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. या रॉकेटची येत्या दहा वर्षांच्या काळात चाचणी घेण्यात येईल, असे पुतीन म्हणालेत.\nनवाझ शरीफ यांची प्रकृती खालावली\nजबरदस्तीच्या धर्मांतरांची चौकशीचे इम्रान खान यांचे आदेश\nसिरीयात इस्लामिक स्टेटवर विजय मिळवल्याची घोषणा\nभारतावर अधिक दहशतवादी हल्ले झाल्यास गंभीर स्थिती : अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा\nचीनमध्ये रसायनांच्या कारखान्यात स्फोट; 6 ठार 30 जखमी\nनीरव मोदीची होळी तुरुंगातच\nतीन दिवसांची जागतिक संस्कृत परिषद नेपाळमध्ये सुरू\nमालीत 21 लष्करी जवानांची हत्या\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांग��ी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/u-s-secretary-of-state-rex-tillerson-is-out-president-trump-tweets-on-succession-plan/articleshow/63290322.cms", "date_download": "2019-03-25T08:54:01Z", "digest": "sha1:HXYGFS63U4IIHTUQBWRNACBXN5X2OPKZ", "length": 16932, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rex Tillerson: ट्रम्प यांनी ट्विटरवरून बदलला परराष्ट्रमंत्री - u.s. secretary of state rex tillerson is out, president trump tweets on succession plan | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nट्रम्प यांनी ट्विटरवरून बदलला परराष्ट्रमंत्री\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदच्युत केले. विशेष म्हणजे टिलरसन आफ्रिका दौऱ्यावर असतानाच, ट्रम्प यांनी ट्विटरवरून त्यांची पदावरून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. त्यांच्याऐवजी, 'सीआयए'चे संचालक माइक पोम्पेओ यांची नियुक्ती केली आहे.\nट्रम्प यांनी ट्विटरवरून बदलला परराष्ट्रमंत्री\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदच्युत केले. विशेष म्हणजे टिलरसन आफ्रिका दौऱ्यावर असतानाच, ट्रम्प यांनी ट्विटरवरून त्यांची पदावरून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. त्यांच्याऐवजी, 'सीआयए'चे संचालक माइक पोम्पेओ यांची नियुक्ती केली आहे.\nट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये सातत्याने बदल केले असून, टिलरसन यांच्याशीही त्यांचे अनेक दिवसांपासून मतभेद होते. या पार्श्वभूमीवर, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. 'सीआयएचे संचालक माइक पोम्पेओ नवे परराष्ट्रमंत्री असतील. ते ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतील,' असे ट्विट ट्रम्प यांनी केले. आता त्यांना पोम्पेओ यांच्या नियुक्तीला सिनेटकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. व्हाइट हाउसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात ट्रम्प म्हणाले, की 'सध्याच्या नाजूक परिस्थितीमध्ये पोम्पेओ हे परराष्ट्र मंत्���िपदासाठी अतिशय योग्य व्यक्ती आहेत. अमेरिकेचे जगातील प्रतिष्ठेचे स्थान पुनर्स्थापित करणे, मित्रदेशांची आघाडी आणखी मजबूत करणे, शत्रू देशांविरोधातील कारवाईला बळ देणे, कोरियाचा द्विपकल्प अण्वस्त्रांपासून मुक्त करणे, या आमच्या प्रयत्नांमध्ये ते योगदान देतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या लष्कर, सीआयएचे प्रमुख आणि काँग्रेसमधील अनुभवाचा परराष्ट्रमंत्री म्हणून फायदा होणार आहे.'\nटिलरसन यांचेही ट्रम्प यांनी आभार मानले आहे. गेल्या १४ महिन्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली, असे म्हटले आहे. टिलरसन एक्सॉन मोबिल या कंपनीचे माजी सीईओ असून, त्यांनी गेल्या वर्षी एक फेब्रुवारी रोजी परराष्ट्रमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती.\nपरराष्ट्र धोरणांमध्ये मूलभूत मतभेद\nट्रम्प आणि टिलरसन यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच मतभेद होते. त्यामुळे, त्यांना कोणत्याही क्षणी पदावरून काढून टाकले जाऊ शकते, अशीच चर्चा होती. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन यांचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारत ट्रम्प यांनी आश्चर्याचा धक्का दिला होता. इस्रायलची राजधानी जेरुसलेमला हलविणे, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाचा हस्तक्षेप, ब्रिटनमध्ये एका गुप्तहेर आणि त्याच्या मुलीची हत्या अशा परराष्ट्र धोरणांतील बहुतांश मुद्द्यांवर ट्रम्प आणि टिलरसन यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्याचीच परिणती म्हणून त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. काही नियुक्त्यांवरूनही त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते.\nट्रम्प यांचे विश्वासू पोम्पेओ\n'सीआयए'चे प्रमुख असणारे पोम्पेओ ट्रम्प यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. त्यामुळे टिलरसन यांना काढून टाकण्याच्या चर्चेबरोबरच पोम्पेओ यांच्या नियुक्तीची चर्चा रंगत होती. उत्तर कोरिया आणि इराणबरोबरील अणुकरारावर टिलरसन यांच्यापेक्षा पोम्पेओ यांची भूमिका आक्रमक आणि ट्रम्प यांच्याशी मिळतीजुळती होती. राष्ट्रीय सुरक्षेविषयी पोम्पेओ दररोज ट्रम्प यांना आढावा देत होते, यातूनच ते ट्रम्प यांच्या निकटवर्तियांमध्ये गेल्याकडे लक्ष वेधण्यात येते.\n'सीआयए'ला पहिली महिला प्रमुख\nमाइक पोम्पेओ यांची परराष्ट्रमंत्रिपदी नियुक्ती केल्यानंतर, 'सीआयए'च्या उपसंचालिका गिना हास्पेल यांची संचालक प���ावर नियुक्ती करण्यात आली आहे. 'सीआयए'च्या संचालक पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. ही नियुक्ती मैलाचा दगड असल्याचे सांगत, 'पोम्पेओ आणि गिना यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ एकत्रित काम केले असून, परस्परांविषयी त्यांना खूप आदर आहे,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nus warns pakistan: भारतात पुन्हा हल्ला झाल्यास पाकला महागात ...\nNirav Modi: बँक खाते उघडतानाच नीरव मोदीला पकडलं\nपाकिस्तानात २ अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण\nworld happiness day: भारतीयांहून पाकिस्तानी अधिक आनंदी: UN\nसहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nट्रम्प यांनी ट्विटरवरून बदलला परराष्ट्रमंत्री...\nविदेशी शस्त्रे आयात करण्यात भारत 'अव्वल'...\nपाकिस्तानातील शाळांत नृत्यांवर बंदी...\nकाठमांडू विमानतळाच्या रनवेवर विमान कोसळले...\nपगडीधारक शीखास पबमधून हुसकावले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE-%E0%A5%AB%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2019-03-25T07:25:04Z", "digest": "sha1:QI3FAVD3X75756XCPFD7DDAL4RSZWLYW", "length": 3855, "nlines": 40, "source_domain": "vicharpravah.in", "title": "कॉलकॉम (Qualcomm) ५जी मोडेमची दुसरी पिढी लवकरच - विचारप्रवाह", "raw_content": "\nकॉलकॉम (Qualcomm) ५जी मोडेमची दुसरी पिढी लवकरच\nयावर्षी ५जी’चा समावेश असलेले स्मार्टफोन मोबाईलची बाजार��ेठ व्यापण्यास सुरुवात करतील. कॉलकॉमने (Qualcomm) काल दुसऱ्या पिढीच्या ५जी मोडेमची घोषणा केली. या मोडेमची गती ७जीबी प्रति सेकंद (पूर्वीपेक्षा ४० टक्के अधिक) असेल. यामुळे भविष्यातील स्मार्टफोन ५जी’शी अधिक चांगल्याप्रकारे जोडले जातील.\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n‘बेन्यू’ या खगोलीय पिंडावर पाणी असल्याची माहिती समोर आली आहे.\nअदानी यांच्या कंपनीने इस्त्राईल मधील एका कंपनीसोबत भागीदारी केली असून त्याअंतर्गत हैदराबाद शहरात अत्याधुनिक ड्रोन निर्मिती केली जाणार आहे.\nअनिच्छेने का होईना पण वरकरणी एक सदिच्छा म्हणून गुगलने duck.com हे डोमेन सरतेशेवटी ‘डक-डक-गो’ला देऊन टाकले आहे.\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T07:52:30Z", "digest": "sha1:557UIVGC2UILOIGJIZ4E3TYZGYUTHEPO", "length": 8948, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "७०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : इलेक्ट्रॉनिक ब्रेन - विचारप्रवाह", "raw_content": "\n७०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : इलेक्ट्रॉनिक ब्रेन\nएव्हाना इनिॲकचा विविध प्रसिद्धी माध्यमांमधून गाजावाजा झाला होता. प्रसिद्धी माध्यमांनी त्यास ‘इलेक्ट्रॉनिक ब्रेन’ अशी संज्ञा दिली. त्यामुळे जगभर या यंत्राबाबत उत्सुकता निर्माण झाली. दुसरे महायुद्ध संपून आता वर्ष होत आले होते. त्यामुळे महायुद्धात प्राप्त झालेल्या तंत्रज्ञानामध्ये सर्वांनाच स्वारस्य होते. विविध सरकारी, खाजगी, तसेच उद्योगिक अशा संस्थांनी मूरे स्कूलला तंत्र���्ञानाबाबत विनंती केली. इकडे मूरे स्कूलमधील तंत्रज्ञ एकतर वॉन नॉयमन यांच्या संगणक प्रकल्पात किंवा एकर्ट व मॉकली यांच्या नव्या कंपनीत सामिल होत होते. त्यामुळे मूरे स्कूलवर त्यावेळी कामाचा पुष्कळ ताण होता.\n१२ डिसेंबर १९४७ रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आलेली बातमी\nया सर्व परिस्थित मूरे स्कूलने अखेर एक कोर्स आयोजित केला. १९४६ सालच्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत हा कोर्स पार पडला. त्यात विविध संस्थांच्या केवळ ३० ते ४० प्रतिनिधींना निमंत्रणावरुन सहभागी करुन घेण्यात आले होते. कोर्सचे वेळापत्रक अगदी भरगच्च होते. तेथील विद्यार्थ्यांत होतकरु शास्त्रज्ञ, गणितज्ञ, तसेच अभियंते यांचा समावेश होता. एकर्ट, मॉकली, गोल्डस्टाईन, इत्यादी लोकांनी त्यांस शिकवण्याचे काम केले. याशिवाय वॉन नॉयमन यांनी देखील काही तास घेतले. कोर्सदरम्यान इनिॲक विषयी विस्तृत माहिती सांगण्यात आली. मात्र एडवॅक संदर्भात अगदी मर्यादित माहिती दिली गेली. कारण तोपर्यंत तो एक गुप्त प्रकल्प होता व त्यांस त्याबाबत गुप्तता बाळगायची होती. तरी कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना एडवॅकची ठोकळाकृती दाखवण्यात आली. मूरे स्कूल येथील कोर्स पूर्ण झाल्यानंतर संगणक निर्मितीच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या.\nइकडे एडवॅकच्या निर्मितीचे काम अजूनही सुरुच होते. एकर्ट व मॉकली आणि पेन्सलवेनिया विद्यापीठ यांच्यादरम्यान पेटंटचा वाद रंगल्याने खरं तर एडवॅकच्या निर्मितीस विलंब होत होता. एकर्ट व मॉकली यांनी पेटंटच्या कारणास्तव राजिनामा देऊन जेंव्हा स्वतःची कंपनी स्थापन केली, तेंव्हा एडवॅक प्रकल्पावर काम करणारे अनेक तज्ञ त्यांच्या नव्या कंपनीत रुजू झाले. अशाने एडवॅकच्या निर्मितीची गती मंदावली. अखेर १९४९ सालच्या ऑगस्ट महिन्यांत एडवॅक संगणक अमेरिकी सेनेला हस्तांतरित करण्यात आला. तरी त्यातील उरल्यासुरल्या समस्या सोडवण्याचे काम १९५१ सालापर्यंत सुरुच होते. या संगणकाच्या निर्मितीसही साधरण इनिॲक एव्हढाच खर्च आला. पुढील दशकभर या संगणकाने आपली कामगिरी केली. त्यादरम्यान त्यात अधुनमधून सुधारणा करण्यात येत होत्या. सरतेशेवटी या संगणकास १९६१ साली निवृत्ती देण्यात आली. त्यानंतर त्याची जागा दुसर्या संगणकाने घेतली.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n३६. संगणकाची गोष्ट : कार���यालयीन गरज : जॉन पॅटरसन : गुणवत्ता आणि प्रशिक्षण\n७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : धातूची रहस्यमय वस्तू\n७४. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग ३\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-corruption-palghar-jilha-parishad-89128", "date_download": "2019-03-25T08:28:44Z", "digest": "sha1:BW23WG66YXUGP5JP7NZ7LGPB6JXZ5EFB", "length": 18092, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news corruption in palghar jilha parishad पालघर जिल्हयात ग्रामपंचायती बनत आहेत भ्रष्टाचाराचे कुरणं | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nपालघर जिल्हयात ग्रामपंचायती बनत आहेत भ्रष्टाचाराचे कुरणं\nसोमवार, 25 डिसेंबर 2017\nमोखाडा : आदिवासी केंद्रबिंदू मानून निर्माण केलेल्या पालघर जिल्हयातील आदिवासी तालुक्यांमधील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जव्हार तालुक्यातील शौचालय निधी हडपल्याप्रकरणी शरद डोके या ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले आहे. तसेच दहा ग्रामपंचायतींची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले आहेत. याचपध्दतीने अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी पुढे येत असल्याने, जिल्हयातील आदिवासी तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती भ्रष्टाचाराचे कुरण बनत आहेत.\nमोखाडा : आदिवासी केंद्रबिंदू मानून निर्माण केलेल्या पालघर जिल्हयातील आदिवासी तालुक्यांमधील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जव्हार तालुक्यातील शौचालय निधी हडपल्य���प्रकरणी शरद डोके या ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले आहे. तसेच दहा ग्रामपंचायतींची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले आहेत. याचपध्दतीने अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी पुढे येत असल्याने, जिल्हयातील आदिवासी तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती भ्रष्टाचाराचे कुरण बनत आहेत. वस्तूनिष्ठ चौकशी झाल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गावाचा विकास करण्यासाठी, गावगाड्याचा कारभार पाहणार्या, ग्रामपंचायतीला थेट निधी देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्यातच पेसा कायदा पालघर जिल्ह्याला लागू झाल्याने, ग्रामपंचायतीच्या अधिकारात अधिकच वाढ झाली आहे. त्यानुसार 5 टक्के निधी, 14 वा वित्त आयोग, जनसुविधेचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो. त्याचबरोबर शौचालय बांधकाम व दुरूस्ती, विहीर, रस्ते, वृक्ष लागवड अंगणवाडी, बालवाडी बांधकाम व दुरूस्ती आदी कामे ग्रामपंचायती द्वारे केली जातात. त्यासाठी शासन आणि जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला जातो आहे.\nदरम्यान, बहुतांश आदिवासी तालुक्यांमधील सरपंच हे निरक्षर अथवा कायद्याची माहिती नसल्याने अज्ञानी आहेत. त्याचाच फायदा घेत, काही ग्रामसेवकांनी भ्रष्ट कारभार करून, आदिवासींच्या विकासाचा निधी लाटल्याच्या घटना चव्हाटय़ावर आल्या आहेत. तर काही ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने भ्रष्ट कारभार करून आदिवासींचा विकास निधी हडपल्याच्या तक्रारी जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी आणि डहाणू व पालघर तालुक्यातुन पुढे आल्या आहेत. प्रामुख्याने जव्हार तालुक्यातील वावर, रायतळे, कौलाळे, किरमीरा, दाभलोन, डेंगाचीमेट, धानोशी आणि कासटवाडी अशा एकूण 10 ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यामुळे त्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून शौचालायाचा निधी हडपल्याप्रकरणी शरद डोके या ग्रामसेवकास मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी निलंबित केले आहे. तथापि, जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमधील ग्रामपंचायतीद्वारे केल्या जाणाऱ्या विकास कामे तसेच वस्तू खरेदींची वस्तूनिष्ठ चौकशी केल्यास मोठा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच 3 लाखापुढील वस्तू खरेदी ही ई निवीदा प्रक्रियेने होणे अपेक्षित असतांना अनेक ग्रामपंचायतीमध्ये नियमांना फाट्यावर मारून मर्जीतील व्यापारींना हाताशी धरून वस्तू खरेदी केल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.\nपालघर जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याने, जिल्हयातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भ्रष्टाचार करण्यासाठी निर्ढावले आहेत.\nतसेच संबंधित अधिकारी ही या गैरव्यवहारात सामील असल्याचा आरोप आदिवासी संघर्ष समितीचे सचिव नामदेव खिरारी यांनी केला आहे.\nऔरंगाबाद - यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने शेतात काही उगवले नाही. चारही बाजूंनी उजाड झालेली शेती. भोवती उंच डोंगर, माळरान. शिवगड तांड्यापुढं सिंदोन...\nLoksabha 2019 : शिवसेना २०-२१ जागांवर जिंकणार\nमुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर...\nLoksabha 2019 : शिवसेनेकडून अपेक्षा अन् दुसरीकडून आरोप हे अमान्य\nजळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही...\nLoksabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अनिल जाधव यांनी उमेदवारी\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर...\nनागपुरातून सर्वाधिक \"आरटीई' अर्ज\nनागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे...\nLoksabha 2019 ः कोणीच कोणाचे ऐकेना\nमहाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/22-lakh-laddu-mahaprasad-two-years-139096", "date_download": "2019-03-25T08:25:06Z", "digest": "sha1:FETG4CW25XH7J7KNZAGKRDLVMFSEN7B7", "length": 14994, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "22 lakh laddu for Mahaprasad in two years दोन वर्षांत महाप्रसादासाठी बनविले २२ लाख लाडू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nदोन वर्षांत महाप्रसादासाठी बनविले २२ लाख लाडू\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nयेरवडा : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील पंचवीस महिला कैदी गेली दोन वर्षांपासून महालक्ष्मीचा महाप्रसादासाठी लाडू बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आता पर्यंत २२ लाख लाडू तयार केले आहे. त्यांनी दोन कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून राज्य सरकारला निव्वळ ७० लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. त्यांनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सरकारकडे साकडे घातले आहे.\nयेरवडा : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील पंचवीस महिला कैदी गेली दोन वर्षांपासून महालक्ष्मीचा महाप्रसादासाठी लाडू बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आता पर्यंत २२ लाख लाडू तयार केले आहे. त्यांनी दोन कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून राज्य सरकारला निव्वळ ७० लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. त्यांनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सरकारकडे साकडे घातले आहे.\n‘कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन’अंतर्गत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील २५ महिला कैदी महालक्ष्मीचा महाप्रसादासाठी लाडू तयार करीत आहेत. लाडूंची गुणवत्ता व स्वच्छ परिसरामुळे महालक्ष्मी देवस्थान समितीने कैद्यांना लाडू बनविण्याचे काम दिले आहे. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमाची अनेकांनी प्रसंया केली आहे.\nया सदंर्भात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक शरद शेळके म्हणाले, ‘‘ सध्या कोल्हापूर कारागृहातील २५ महिला कैदी व २० पुरुष कैदी महाप्रसादासाठीचे लाडू बनवित आहेत.गेल्या नवरात्रीमध्ये कैद्यांनी २० लाख लाडू बनविले होते. आषाढ महिन्यात दररोज दहा हजार लाडूंची मागणी होती. तर देवस्थान समितीकडून नियमित पाच हजार लाडूंची मागणी असते.\n‘‘महालक्ष्मी देवस्थान समितीने नुकतेच महाप्रसाद बनविणाऱ्या महिला कैद्यांना देवीची साडीचोळी देऊन सत्कार केला. यावेळी महिला कैद्यांनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी इच्छा प्रकट केली. याबाबत कारागृह प्रशासनाकडे राज्याच्या गृहविभागाकडे परवानगी मागितली आहे.’’\n- शरद शेळके, अधिक्षक, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह\n‘‘महिला कैद्यांनी दोन वर्षांत २२ लाख लाडू बनविले आहे.कोल्हापूर कारागृहाने लाडू उत्पादनातून दोन कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर त्यातून सरकारला ७० लाख रुपयांचा महसूल मिळाला असला तरी समाजाने कैद्यांच्या हातचा प्रसाद स्विकारणे हा मोठा सामाजिक बदल आहे’’\n- स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम महाराष्ट्र\nLoksabha 2019 : रावेर लोकसभेतून संतोष चौधरींची माघार\nभुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा...\nLoksabha 2019 : वारसदारांमध्ये प्रतिष्ठेची झुंज\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात दोन मातब्बर राजकारण्यांचे वारसदार विजयासाठी झुंजणार आहेत. सहकाराची पायाभरणी, दुधाचा महापूर, \"रोहयो' ते शेतीतील प्रयोगातून...\nपुणे : बेकायदा वाळु विक्री प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल\nपुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nआशियातील सर्वांत उंच केबल पूल\nपुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यानची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन बोगदे व एक केबल ब्रिज बांधण्याच्या कामास...\nशहरीकरणात वनांच्या संरक्षणाचे आव्हान\nपुणे - आपल्यापासून तास-दीड तासाच्या अंतरावर असणारा हडपसर, सोलापूर हा गवताळ प्रदेश होता. तेथे चित्ता, चिंकारा, लांडगा यांचे वास्तव्य होते. पण, या...\nकारखान्यांकडून एकरकमी ‘एफआरपी’बाबत मौन\nकाशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/karate-coach-dead-accident-near-pune-137226", "date_download": "2019-03-25T08:38:15Z", "digest": "sha1:X4MB2E74REZ6OMDXSF2ZL7MESAOW5XD3", "length": 14278, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "karate coach dead in accident near Pune पुणे: कालव्यात मोटार कोसळून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nपुणे: कालव्यात मोटार कोसळून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nसोनार पुल परीसरातील नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुळा-मुठा बेबी कालव्यावरील रस्त्यावर सकाळी जण अनेक व्यायाम करायला येतात. सोनार पुलाजवळुन जात असताना, काही जणांना साडेसहा वाजनेच्या सुमारास सोनार पुलाचा कठडा तुटलेला दिसला. यावर काही नागरीकांनी खाली वाकून पाण्यात पाहिले असता, त्यांना कालव्यातील पाण्यात एका चारचाकी गाडीचा टप तरंगताना दिसला.\nलोणी काळभोर : भरधाव सॅन्ट्रो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, फुरसुंगी (ता. हवेली) हद्दीतील जन्या मुळा-मुठा बेबी कालव्यावरील सोनार पुलाचा कठडा तोडून कार कॅनॉलमध्ये पडल्याने झालेल्या अपघातात नितीन निवृत्ती कुंभार (वय, 44, रा. सासवड ता. पुरंधर) या कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. 12) पहाटे सहाच्या सुमारास घडला. नितीन कुंभार हे कदमवाकवस्ती येथील एजंल हायस्कुलमध्ये क्रिडा प्रशिक्षक होते.\nसोनार पुल परीसरातील नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुळा-मुठा बेबी कालव्यावरील रस्त्यावर सकाळी जण अनेक व्यायाम करायला येतात. सोनार पुलाजवळुन जात असताना, काही जणांना साडेसहा वाजनेच्या सुमारास सोनार पुलाचा कठडा तुटलेला दिसला. यावर काही नागरीकांनी खाली वाकून पाण्यात पाहिले असता, त्यांना कालव्यातील पाण्यात एका चारचाकी गाडीचा टप तरंगताना दिसला. यावर स्थानिक नागरीकांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली, तोपर्यंत विशाल हरपळे व त्यांच्या स्थानिक सहकाऱ्यांनी गाडीला दोर बांधुन गाडी बाहेर काढली होती. यावेळी नितीन कुंभार हे गाडीत एकटेच होते.\nनितीन कुंभार हे मागिल पंधरा वर्षापासुन एंजल हायस्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत क्रिडा प्रशिक्षक म्हणुण काम पहात होते. त्यांच्या ह���ताखालील अनेक खेळाडुनी क्रिकेट, कराटे, हॉकी व फुटबॉल सारख्या खेलात राज्य पातळीवर चमक दाखवलेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, संध्या व मुलगा ओंकार असा परीवार आहे. एंजल हायस्कुल परीवारातील एक उमदा क्रिडा प्रशिक्षक अपघातात गमावल्याने, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परीसरात दुखःचे वातावरण पसरले आहे.\n#WeCareForPune फलक कोसळून अपघाताची शक्यता\nपुणे : कात्रज नऱ्हे रस्त्य़ावर भुमकर चौकात दिशादर्शक फलक धोकादायक अवस्थेत लटकत असून केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. तरी याकडे गांभीर्याने लक्ष...\nनाशिक जवळील तोरंगना घाटात भीषण अपघात\nपालघर : नाशिक जव्हार रोडवर तोरंगना घाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 ते...\nमेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)\nहळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून...\n#WeCareForPune मोकाट जनावरांमुळे रहिवाशांना त्रास\nपुणे : सदाशिव पेठ येथील पेरु गेट पोलिस चौकीजवळ 50 मीटरच्या अंतरावरच जनावरे मोकाट फिरत आहे. कित्येकदा हे जनावरे रस्त्यावर येतात. त्यामुळे...\nमहामार्गासह राज्य मार्गांवर \"चेक पोस्ट' नेमा : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना\nजळगाव : अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून रस्ते अपघातांमागील कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) ठिकठिकाणी...\nआशियातील सर्वांत उंच केबल पूल\nपुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यानची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन बोगदे व एक केबल ब्रिज बांधण्याच्या कामास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://forum.quest.org.in/content/documents", "date_download": "2019-03-25T09:00:24Z", "digest": "sha1:H3QNRB5RHN6PTNQGN4APHK7RF4CNK6FJ", "length": 2007, "nlines": 55, "source_domain": "forum.quest.org.in", "title": "Documents | शिक्षक अभ्यास मंडळाचे व्यासपीठ....", "raw_content": "\nशिक्षक अभ्यास मंडळाचे व्यासपीठ....\nadmin मॅक्सीन मावशींचे लेख4 Replies Tags:\nमॅक्सीन मावशींचा लेख क्रमांक 1\nमॅक्सीन मावशींचा लेख क्रमांक 2\nRammohan शासननिर्णय- मराठी वर्णमाला3 Replies Tags: देवनागरी लिपी\nnilesh.nimkar पोस्टर अंकुरती साक्षरता - लेखी मजकुराची जाण0 Replies Tags: पोस्टर, वाचन लेखन\nअंकुरती साक्षरता-लेखी मजकुराची जाण. 5 पोस्टर साठी मजकूर\nफोरमचा वापर देवनागरी लिपी वाचन लेखन पोस्टर मराठी शाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2017-Mirachi1.html", "date_download": "2019-03-25T07:55:45Z", "digest": "sha1:ZGX6MK4E2M26H4DHVUC6VYGPWVRVAOCA", "length": 7716, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - ढोबळी २० गुंठे खर्च ५० हजार उत्पन्न २।। लाख केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे", "raw_content": "\nढोबळी २० गुंठे खर्च ५० हजार उत्पन्न २ लाख केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे\nश्री. हिम्मतराव वाढेकर, मु.पो. कवठा, ता.जि. जालना. मो. ९५२७९७४७३३\nआम्ही इंद्रा वाणाची ढोबळी मिरची ऑगस्ट २०१६ मध्ये बेडवर २० गुंठ्यात लावली होती. ३ फुट रूंदीच्या बेडवर जोड ओळ लावून २ रोपात १ फुट रूंदीच्या बेडवर जोड ओळ लावून २ रोपात १ फुट अंतर ठेवले. एकूण २६ ओळी होत्या. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल बरेच ऐकले होते. मात्र स्वतः वापरले नवहते. तेव्हा मी या मिरचीमधील ६ ओळीला सुरुवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर सुरू ठेवला आणि बाकी २० ओळींना नेहमीप्रमाणे खते औषधे फवारण्या करत होते. हे प्लॉट सप्टेंबर अखेरीस सुरू झाले. मात्र यामध्ये मला प्रचंड तफावर जाणवली. कारण आठवड्याला तोडे करत होतो तर जो २० ओळीमध्ये तोड्याला १५० किलो माल निघत होता तो मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या ६ ओळीमध्येच मिळत होता. म्हणजे ६ ओळी व २० ओळीमधील उत्पादन सारखेच होते. अशा तऱ्हेने डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पारंपरिकतेपेक्षा तिप्पट उत्पादन मिळत होते. हा फरक पहिल्या ४ - ५ तोड्यामध्ये जाणवल्यानंतर मग पुर्ण प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या १५ दिवसांना घेऊ लागलो. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने केलेल्या २० ओळीमधीलही उत्पादनात वाढ झाली. मात्र तरीही सुरुवातीपासून ज्या ६ ओळींना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले होते त्या ओळींमधील माल तुलन��त थोडा जास्तच मिळत होता.\nविशेष म्हणजे मला यामध्ये हार्मोनी या औषधाचा अतिशय चांगला रिझल्ट मिळाला. मिरची चालू होण्याच्या भुरी रोगाचा प्लॉटवर प्रादुर्भाव झाला होता. त्यावर मी हार्मोनी औषधाची स्पेशल फवारणी केली. त्याने काही प्रमाणातच भुरी कमी झाली. मात्र कंपनी प्रतिनिधी श्री. अशोक काटे (मो. ९७६४९२७०७०) यांच्या सल्ल्यानुसार लगेच ८ व्या दिवशी हार्मोनीची दुसरी फवारणी केली. त्याने भुरी रोग पुर्णतः थांबला व त्यानंतर शेवटपर्यंत प्रादुर्भाव झाला नाही. सांगायचे तात्पर्य म्हणजे 'हार्मोनी' हे एक सेंद्रिय बुरशीनाशक असल्याने त्याचा परिणाम होण्यास थोडा जास्त वेळ लागला पण दिर्घकाळ परिणाम राहिल्याने प्लॉट संपेपर्यंत भुरी रोगाचा पुन्हा प्रादुर्भाव झाला नाही.\nयावरून असे जाणवले डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर कधीही केला तरी उत्पादनात वाढ होते. मात्र सुरुवातीपासून वारपले तर 'खर्च कमी व उत्पादन विक्रमी' असाच अनुभव येतो. या प्लॉटमधून नोव्हेंबर २०१६ नंतर दर आठवड्याला ४ - ५ क्विंटल उत्पादन मिळू लागले. सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये या मालाला ८ रु. किलो भाव मिळाला. पुढे मात्र भावात वाढ होऊन ३० रु. किलोपर्यंत भाव मिळाला. ही मिरची १० मे २०१७ पर्यंत चालली. तर एकूण २०० क्विंटल उत्पादन मिळाले. सरासरी १५ - २० रु. किलो भावाप्रमाणे २ लाख रु. अर्ध्या एकरातून २०० क्विंटल उत्पादन मिळाले. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्यांचा खर्च २० हजार रु. इतर औषधे ८ हजर रु., बियाणे ७ हजर रु. आणि किरकोळ मशागत वगैरे १५ हजार असा एकूण ५० हजार रु. खर्च आला.\nया अनुभवावरून चालूवर्षी ऑगस्ट २०१७ च्या ढोबळी मिरची लागवडीस तसेच कापूस, सोयाबीन या पिकांवर देखील सुरुवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर आमच्या भागातील प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialOctober2016.html", "date_download": "2019-03-25T07:51:27Z", "digest": "sha1:TZ7EHW7KW6KRZYF6F54WDIIQO6JHWA4X", "length": 27050, "nlines": 27, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - शेतकऱ्याला व सामान्य माणसाला सुख - शांती, समाधान देणाऱ्या आठवडे (डी) बाजाराचे पुनरागमन", "raw_content": "\nशेतकऱ्याला व सामान्य माणसाला सुख - शांती, समाधान देणाऱ्या आठवडे (डी) बाजाराचे पुनरागमन\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nपारंपारिक पद्धती��े शेतकऱ्याला शेतीमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशभर आणावा लागत असे व तो दलालाच्या म्हणण्यानुसार तो पहाटे ६ च्या अगोदर आला पाहिजे या परंपरेनुसार बरेचसे शेतकरी मालाबरोबरच रात्री गाळ्यावर मुक्कामाला येत असत. काही मध्यरात्री तर जवळपासचे शेतकरी पहाटे येत असत. काही हुशार शेतकरी हे बारदाना किंवा व्यवस्थित पॅकिंग करून प्रतवारी करून आणत असे. म्हणजे दलालाचे म्हणण्यानुसार मालाला चांगला भाव मिळतो आणि त्यानुसार सुज्ञ व सुशिक्षीत माणसे करत असत. पण ज्यांना याचे ज्ञान किंवा जाण नसे ते किलतानात पालेभाज्या जसे गवत बांधून शेतातून बांधावर फेकले जाते. तसे पालेभाज्या इ. बांधून आणत. यामध्ये जर मालाची आवक कमी असेल तर भाव मिळतो अशी गोष्ट पितृ पंधरवडा व अक्षय्य तृतीयेच्या काळात घडत असे. परंतु जेव्हा पाऊसमान जास्त असते तेव्हा ह्या पालेभाज्या माजतात, सडतात. तेव्हा सर्व शेतकरी व काही चुकून - माकून कोथिंबीर, मेथी लावून मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने दर न मिळाल्याने मार्केटमध्येच पडून राहते व त्याचा कचरा होतो. भुईमूग पावसाळ्यामध्ये काढल्यावर माती आणि चिखल असल्याने दलाल ५० किलोच्या पोत्यामध्ये ५ ते ७ किलो कडता (तूट) लावतो आणि ६० रु. भाव असताना ३५ रु. भाव देतो आणि हे जर शेंगा धुवून आणल्या तर कडता धरता येत नाही व १० रु. भाव अधिक मिळतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सामान्य शेतकऱ्याला कळत नाहीत. दलालांना माल घेणाऱ्या केवट्यांना उधार माल द्यावा लागतो. त्यामुळे दलालाला पट्टी करण्यासाठी व्याजाने पैसे काढावे लागतात असे त्याचे गोंडस म्हणणे असते.\nयासर्व कौटुंबिक आणि शेतीच्या कामाच्या अनंत प्रश्नांनी पिचल्यामुळे शेतकऱ्याची अवस्था उसाच्या चरख्यातील पाचटासारखी होते आणि महिनेच्या महिने त्याला पैसे न दिसल्याने आणि दलाल उचल देण्याचे सांगतो तेव्हा शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडला असे वाटते किंवा व्यवहाराची थोडी हालचाल करता येईल असे होते. ही प्रथा ब्रिटिश जेव्हा या देशात आले तेव्हापासून शेतकऱ्यांनी धुळधान झालेली आहे.\nया सर्व संकटांच्या जोखडातून बाहेर यावे, त्याचे जीवन पुलकीत, सुखी, आनंदी, समृद्ध व्हायला अजून १० वर्ष तरी लागतील, पण ते सुसह्य होण्यासाठी व नैराश्येतून बाहेर येण्यासाठी त्याला उभारी येण्यासाठी दलालाच्या जोखडातून काढण्याचा ���ाडसी निर्णय झालेला आहे आणि अनेक पर्यायी उपायांमध्ये 'आठवडे बाजार' ही संकल्पना पारंपारिक ६० ते ७० वर्षापासून चालू झालेली होती, ती थेट कृषी उत्पन्न बाजार समितीचा जन्म होईपर्यंत होती.\nस्वातंत्र्यापूर्वीची ५ वर्षे व स्वांतत्र्यानंतर ५२ चा दुष्काळ पडण्यापर्यंत सर्वसाधारण कुटुंबाची भाजी २ आण्यात येत असे. पाव आण्याची कोथिंबीर, पाव आण्याचे लिंबू व अर्धा ते १ आण्यात पालेभाजी येत असे. मेथी, शेपू, अंबाडी, चुका आणि चिलघोळ (कडेला तांबूस रंगाची व बारीक गोल पाने असलेली, जमिनीलगत वाढणारी, कधीही न मरणारी व न पेरता येणारी अशी भाजी शेतकऱ्यास फ्री मिळत असे) तसेच वांगी, कांदा, गावठी (खाजरी) गवार ह्या भाज्या प्रचलित होत्या. बटाटा म्हणजे दसरा, दिवाळी आणि पाहुणा आला तर अशी ही श्रीमंत भाजी होती. त्याकाळी घरच्या तुरीच्या डाळीची न शिजणारी हिरवी आणि लालसर पापुद्रा (टरफल) आणि डाळ करून उरलेली चुणी ह्याचे फुणके करताना त्यात अशा या चिलघोळच्या २ - ३ बुचकुल्या भाजीचा वापर केला असता. ते फुणके गरम पाण्यावर पितळेच्या कल्हई केलेल्या चाळणीत चुलीवर शिजवून कढी व भाकरी सोबत गोरगरीब मजुर लोक व सामान्य माणसेही खात असत. खेडेगावात घरातील निम्म्याहून अधिक लोकांना ते आवडत असे. इतक्या भाज्या त्या काली सहज उपलब्ध होत असते.\nहे म्हणण्याचे कारण असे २ आण्यामध्ये त्याकाळी भाजी मिळत असे. हे आजच्या पिढीत स्वतःला दिवसा चिमटा काढून आपण स्वप्नात तर नाही ना किंवा हे खरे असेल का किंवा हे खरे असेल का हे तो त्याच्या आजी आजोबाला विचारेल तेव्हा ते सांगतील होय हे सत्य आहे. त्याकाळात भाजी ही फारशी विकत कोणी आणत नसत. आजूबाजूचे शेतकरी त्याकाळात भाजी पिकली की त्याचा वानोळा एकमेकाला देत असत आणि म्हणून भाजी हा प्रश्नचिन्हात्मक विषय गृहिणीमध्ये किंवा शेतकऱ्याकडे व्यापारी पीक म्हणून येत नसे. तर ते सहज उपलबध होणारे उदरनिर्वाहाचे मामुली साधन होते. म्हणून बाजार समितीची तेव्हा गरज भासली नाही. अशा काळात गावामध्ये दाट वस्तीची बऱ्यापैकी सारवलेली घरे पुढे ओसरी असलेली असत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला सांड पाण्याच्या वेड्यावाकड्या घरातील सांडपाण्याचा न्हाणीवाटे वाट करून देणाऱ्या चारी असत. चारीच्या बाजूने ४ -६ गृहिणी, मुली, बाया ह्या संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत शेतात असलेला भाजीपाला, कोथिंबीर, पालक, अंबाडी, गवार विकण्यास बसत असत. तेव्हा १ हे तो त्याच्या आजी आजोबाला विचारेल तेव्हा ते सांगतील होय हे सत्य आहे. त्याकाळात भाजी ही फारशी विकत कोणी आणत नसत. आजूबाजूचे शेतकरी त्याकाळात भाजी पिकली की त्याचा वानोळा एकमेकाला देत असत आणि म्हणून भाजी हा प्रश्नचिन्हात्मक विषय गृहिणीमध्ये किंवा शेतकऱ्याकडे व्यापारी पीक म्हणून येत नसे. तर ते सहज उपलबध होणारे उदरनिर्वाहाचे मामुली साधन होते. म्हणून बाजार समितीची तेव्हा गरज भासली नाही. अशा काळात गावामध्ये दाट वस्तीची बऱ्यापैकी सारवलेली घरे पुढे ओसरी असलेली असत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला सांड पाण्याच्या वेड्यावाकड्या घरातील सांडपाण्याचा न्हाणीवाटे वाट करून देणाऱ्या चारी असत. चारीच्या बाजूने ४ -६ गृहिणी, मुली, बाया ह्या संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत शेतात असलेला भाजीपाला, कोथिंबीर, पालक, अंबाडी, गवार विकण्यास बसत असत. तेव्हा १ ते २ तासात आठआणे ते रुपया मिळाला की बक्कळ कमाई झाली असा तो महान काळ होता.\nशैक्षणीकी सुविधा, शिक्षणाचे पर्याय, आर्थिक सुधारणा, उत्पन्नाचे श्रोत, नोकऱ्या, दुकानदारी, उदयोगधंदे व कारखानदारी ही नव्हती. नंतर साधारण १९५० ते ६० चे दरम्यान बाजार समिती निर्माण झाली. तेव्हा शेतकरी धनधान्य, कडधान्य, तृणधान्य, भुसार, भाजीपाला व तत्सम शेतीमाल हा या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस घेऊन येऊ लागला आणि त्या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या सुरुवातीला सरकारच्या आर्थिक टेकूवरच चालत असत. शेतीमालाचे आडते, दलाल व व्यापारी हे सुज्ञ झालेले नव्हते आणि मग जसे गाळे सिस्टीम सुरू झाली. तरी ती मुख्य बाजारपेठा सोडून गावाबाहेरच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जे गाळे किंवा प्लॉट हे अत्यल्प व काही वर्ष मुदतीत भरणा करण्याच्या बोलीवर देऊन तेथे हलविण्याचा प्रयत्न सरकार करत असे. तरीही पारंपारिक बाजाराचा गावात जो जम बसला आहे तो एवढ्या दूर मुंबई, पुणे, नागपूर, इंदौर, सुरत, बडोदा, अहमदाबाद, कोचिन, मुद्रास, दिल्ली, बेंगलोर अशा शहरात जम बसवायला जवळजवळ २० वर्षे यंत्रणेला लोकांची मने वळविण्यासाठी समय लागला आणि त्यानंतर बाजार समितीतील दलाल, व्यापारी आणि शेतकरी यांचे नाते अपवाद सोडून साप - मुंगुस, विळा- भोपळा, उंदीर-मांजर, वाघ - बकरी, सिंह -हरिण, कोळी आणि त्याच्या जाळ्यात सापडलेला किटक असा गेल्या ४० - ५० वर्षांमध्ये झालेला सगळा इतिहास याने ब्रिटिश या देशात अवतरण्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या जिवनात व भारतीय जिवनात जी सुख समृद्धी, प्रामाणिकपणा, माणुसकीचा गहिवर व उत्कंठा होती ती कशी लोप पावली त्याचा चलचित्रपट न संपणारा क्लेशदायक ठरला.\nम्हणून शेतकऱ्याला मार्केटची पर्यायी व्यवस्था त्याच्या मालाला भाव देण्यासाठी शोधावी लागली. शेतकऱ्याला त्याच्या मर्यादित गरजा परंतु त्याला जगाचा पोशिंदा होण्यासाठी जगाची काळजी मिटावी यासाठी गरज मिटण्यासाठी त्यांना लागणाऱ्या निविष्टा, गरजा, सेवा ह्या विकत घेण्यासाठी त्या -त्या गोष्टींचे भाव व्यापारी ठरवतात आणि जगाच्या कल्याणाचे सत्कर्म करणाऱ्या पोशिंद्याला त्याच्या मालाचा भाव ठरवता येत नाही या दुःखाची सल इतकी अगाध (मोठी) न दुरुस्त होणारी (Incurable) होती की मोत्यासारखे पिकविलेले धान्य या नवीन अर्थ व्यवस्थेमध्ये पिस्तुलातील गोळीतील छऱ्याप्रमाणे अंत:करणाला जखमा करीत असत.\n८० वर्षाच्या वाटचालीनंतर काळ उद्योगधंदे, व्यापार उदीम, शेतीव्यवस्था, शिक्षण, शिक्षणाचे पर्याय, व्यवसायाचे पर्याय, कुटीरउद्योग, लघुउद्योग, विविध सरकारी, निमसरकारी, एन. जी. ओ. च्या संस्था, बालवाड्या, वस्तीगृहे, प्राथमिक शाळा बॅंका, पतपेढ्या, बचत गट, रेडीओ, ट्रांजिस्टर, टी. व्ही., मोबाईल, पारंपारिक बलुते सिस्टीम जाऊन व्यापाराचे, व्यवहाराचे उद्योगाचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने गावाला एक प्रकारचे बाळसे (नवे रूपडे) आले आणि ८० वर्षापुर्वीची १ - २ मध्यम घरे जाऊन त्यांच्या जागी, सिमेंटची जंगले उभारली जाऊ लागली व अशारितीने पर्यावरणाचा ऱ्हास निर्माण झाला. मात्र ८० वर्षाच्या गावातला एकदम छोट्या बाजारात वाढ होऊन आठवडे बाजाराच्या पसाऱ्यामध्ये ४० ते ५० पट व्याप्ती झाली आणि ही संकल्पना नुकतीच २ महिन्यापासून थोडक्यात नवीन भाजीपाला उत्पादन सुरू झाल्यापासून आणि सर्वसाधारणपणे रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस म्हणून करण्याचा ठरला. कारण रविवार हा सर्वसाधारण सुट्टीचा मजाहजा करण्याचा, आठवड्याची भाजी घेण्याचा दिवस सर्व मान्य ठरला. म्हणून स्थानिक नेतृत्वाने या बाजाराची सुरुवात दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्याचा दवंडी, फ्लेक्स लावून मुहूर्तमेढ केली आणि १० ते २० किमी परिसरातील लोक मोटर सायकलवर ३ चाकी छोट्या, मध्यम टेम्पोतून आवाक्याप्रमाणे आपला भाजीपाला आणून देवळाच्या पुढे असलेले गावाची यात्रा भरते, कुस्तीचे फड उठतात, गणपती बसतात किंवा नवरात्र उत्सव असतो किंवा बैल पोळ्याला बैलाची मिरवणूक निघते अशा प्रकारे सामाजिक, धार्मिक आपल्या गावाची ओळख उजळ करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम करणारे हक्काचे सर्वमान्य असणारे हे आठवडे बाजाराचे बाजारतळ म्हणून एक 'पावन ठिकाण' ठरले. येथे परिस्थितीनुसार पाल, तंबू अशी पारंपारिक व्यवस्था आणि सुधारित आवृत्तीमध्ये कव्हरवरील फोटोत दाखविल्याप्रमाणे आधुनिक संरक्षित पाल व शेतकऱ्याचा माल व्यवस्थित मांडणी करून ठेवण्यासाठी आणि घेणाऱ्याला सोईचे व्हावे आणि पारंपारिक बैठकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपेक्षा पण पुरातन काळी तीच एकमेव गाजलेली जाऊन त्याजागी डायनिंग टेबल सारखी व्यवस्था आली त्याप्रमाणे घेणाऱ्याला व विकणाऱ्याला सुलभ व सहज भावणारी लोखंडी, टेबल यांची मांडणी सुरू झाली. शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाला त्याच्या तोंडून भावाचा दर ठरवण्याचे स्वातंत्र्य व अधिकार हे देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाण्याचा जो आनंद होता त्यापेक्षा अधिक आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. तर दुसऱ्या बाजुला सामान्य ग्राहकाला शेतकऱ्याचा ताजा माल हवा तसा हवा तेवढा अत्यंत रास्त भावात म्हणजे एरवी १५ ते २० रुपयाला मिळणारी १ मेथी - कोथिंबीरीची गड्डी १५ रु. त २ अशी मिळत होती. खर तर १० रुपयातच २ मिळायला पाहिजे. परंतु त्याच्या शेतीच्या अंतरापासून ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरला होता. तेथे आणण्यास २ रु. एका गड्डीस खर्च लागला. परंतु ज्याठिकाणी आठवडे बाजार भरला त्या परिसरातील शेतकऱ्याला १ किमी अंतर चालण्यात पैसे खर्च न होता पायी चालण्याने घर ते एसटी स्टॅण्ड यात लागणारा वेळ व मामुली पेट्रोल हे न्युनतम असते. त्यामुळे एका गड्डीस २ रु. एका गड्डीस खर्च लागला. परंतु ज्याठिकाणी आठवडे बाजार भरला त्या परिसरातील शेतकऱ्याला १ किमी अंतर चालण्यात पैसे खर्च न होता पायी चालण्याने घर ते एसटी स्टॅण्ड यात लागणारा वेळ व मामुली पेट्रोल हे न्युनतम असते. त्यामुळे एका गड्डीस २ रु. हा जादा भाव त्याला 'बोनसच' ठरला आणि प्रत्यक्षात सामान्य माणसाला १ गड्डीच्या पैशामध्ये २ भाजीच्या ताज्या गड्ड्या, पाव किलोच्या पैशात १ किलो भेंडी, गवार, मिरची, टोमॅटो मिळाल्याने सामा���्य माणसाला अत्यंत वाजवी अशा दरात चांगला, ताजा, चविष्ट असा ८ दिवसाचा भाजीपाला एकाच जागी, एकाच वेळेस, कमी पैशामध्ये मिळाला. यामध्ये त्याचे वेळ, श्रम, शक्ती, पैसा, पेट्रोल - डिझेलची बचत, पर्यावरण, सुविधा, शांतता, समाधान, सुद्दढ आरोग्य हे मिळाल्याने त्याला अटकेपार झेंडा लावल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळाळू लागले.\nयामध्ये बचत गटवाले उद्योजक हे त्यांचा स्वतःच माल विकू शकतात व ते त्यांचा माल स्वित्झर्लंडची घड्याळे, चॉकलेट, फळांची रसयुक्त पेये, कोकाकोला किंवा पेप्सी यांना मज्जाव करून पिझ्झा, पास्ता व बर्गर यांना हद्दपार करून ज्या आयुर्वेदाने व फळांच्या सुमधुर ताज्या, पाचक रसांना भारतीय संस्कृतीने आयुरारोग्य दिले त्याला उभारी द्यावी. म्हणजे या आठवडी बाजाराला मॉलच्या सेलचे स्वरूप न येता मानवतेचे व मानवाचे अलबेल होईल.\nही बाजार व्यवस्था सफल, सदृढ, सर्वमान्य, सयुक्तिक, सुलभ, शेतकऱ्यांना कायमच्या समृद्धीकडे वाटचाल नेणारी व सामान्य ग्राहकाला वेठीस न धरता कांद्यासारखी अवस्था जनतेची, शेतकऱ्याची व सरकारची न करता सामान्य माणसाचे जीवन सदाफुलीसारखे गुलाबी - जांभळ्या रंगाचे सतत फुलणारे, टवटवीत कायम समाधान आणि शांती देणारे, न सुकणारे अशी जीवन शैली शेतकऱ्याची रहावी आणि एका दगडात दोन पक्षी मारले म्हणजे राष्ट्राचा सुवर्णो उद्धार होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/a-woman-stoned-to-death-in-somalia/", "date_download": "2019-03-25T08:32:42Z", "digest": "sha1:V77CG6BLZLVAFVTZS35LBRVMGBOZN37T", "length": 6428, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": ".... 'म्हणून' सोमालियात महिलेला दगडाने ठेचून मारले", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\n…. ‘म्हणून’ सोमालियात महिलेला दगडाने ठेचून मारले\nसोमालियात – सोमालियात एका महिलेला दगडांनी ठेचून ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुकरी अब्दु���्लाही वारसेम असं या महिलेचं नाव आहे.\nदहशतवादी संघटना अल-शबाबने या महिलेला एकापेक्षा जास्त पती असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं. या महिलेवर तलाक न घेता ११ लग्न केल्याचा आरोप होता. महिलेला आधी मानेपर्यंत जमिनीत गाढण्यात आलं, यानंतर अल-शबाबकडून तिच्यावर दगडफेक करत ठार करण्यात आलं. अल-शबाब ही संघटना शरिया कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करत असते.\nया दहशतवादी संघटनेचं सोमालियाच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे. अल-शबाबच्या स्वयंघोषित न्यायाधीशाने महिलेने आपण गुप्तपणे ११ लग्नं केल्याची कबुली दिल्याचं म्हंटल आहे.“शकुरी अब्दुल्लाही आणि तिच्या नऊ पतींना ज्यामध्ये तिच्या कायदेशीर पतीचाही समावेश होता, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. प्रत्येकजण ही आपली पत्नी असल्याचं सांगत होतं”, अशी माहिती शब्बाबचे गव्हर्नर मोहम्मद अबू उसामा याने दिली आहे.\nइस्लाममध्ये महिलेने एकाहून जास्त लग्न करणं बेकादेशीर आहे. मात्र पुरुषांना चार लग्नं करण्याची परवानगी आहे. पती आणि पत्नी दोघांसाठी घटस्फोटाची सुविधा आहे, मात्र पुरुष स्वत:हून वेगळा होऊ शकतो तर महिलेला पतीची परवानगी घेणं आवश्यक असतं. जर पतीने नकार दिला तर तिला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागते.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nअतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या\nशारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीस हातपाय बांधून जाळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/bjp-rss-men-involved-in-rape-cases-because-they-dont-get-marry-says-manak-agrawal/", "date_download": "2019-03-25T08:35:01Z", "digest": "sha1:BODEUXGOL3MZ4Y4ODCEA55Z2IN3RHHVE", "length": 6198, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": ".... म्हणून संघाचे लोक बलात्कार करतात - कॉंग्रेस", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शक�� नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\n…. म्हणून संघाचे लोक बलात्कार करतात – कॉंग्रेस\nनवी दिल्ली – काँग्रेस प्रवक्ता मानक अग्रवाल यांनी संघाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या लोकांचा सहभाग असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. दरम्यान मानक अग्रवाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nमध्य प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या लोकांचा यामध्ये सहभाग आहे असं विधान अग्रवाल यांनी केलं आहे. इतकंच नाही तर माझ्याकडे याबाबत पुरावे देखील आहेत असंही अग्रवाल म्हणाले. काही दिवसांपूर्वीच अग्रवाल यांची मीडिया प्रभारी म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली होती.\n‘महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज बलात्काराच्या घटना ऐकायला येत आहेत. बलात्काराच्या वाढत्या घटनांमध्ये मध्यप्रदेशचा तीसरा क्रमांक लागतो. मध्यप्रदेशमध्ये जेवढ्या बलात्काराच्या घटना होत आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसच्या लोकांचा सहभाग आहे. मी तर आरोप करतोय की, संघाचे लोक लग्न करत नाहीत, त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडतात’. अशी टीका त्यांनी केली आहे.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nविराट मोर्चानंतर देखील शेतकऱ्यांच्या मागण्या अपूर्णच ; किसान सभा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत\nशेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/positive-discussions-with-the-chief-ministers-of-dubai-in-various-industries/", "date_download": "2019-03-25T08:12:47Z", "digest": "sha1:LQZXXUKKRZF3FLLR4J6FFCO25BGXDHJ6", "length": 9113, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांची दुबईत विविध उद्योग समूहांशी सकारात्मक चर्चा", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक ��ेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nमुख्यमंत्र्यांची दुबईत विविध उद्योग समूहांशी सकारात्मक चर्चा\nमुंबई : दुबईतील प्रसिद्ध एमबीएम समूहाने मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्यास सहमती दाखवली आहे. तर डीपी वर्ल्ड समूहाने मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत आणि थुम्बे समूहाने आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहयोग देण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (9 जून रोजी) दुबईत या तिन्ही समूहांशी यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ काल कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात अनेक संस्था, कंपन्यांशी ते संवाद साधणार असून, त्यातून राज्यातील कृषी विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान आधारित उपक्रमांना गती देणार आहेत.\nया दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल दुबई येथे या शिष्टमंडळाचे आगमन झाले. भारतीय राजदूत नवदीप सुरी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची डीपी वर्ल्डचे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांच्याशी चर्चा झाली. कॉर्पोरेट व्यवहार उपाध्यक्ष अनिल मोहता आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. डीपी वर्ल्डने राज्य सरकारसोबत मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत योगदान देण्याची तयारी दर्शविली. विशेषत: नागपुरात काम करण्यास हा समूह उत्सुक आहे. डीपी वर्ल्ड ही जगातील आघाडीची कंपनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीमध्ये (एनआयआयएफ) भागीदार असलेली कंपनी आहे.\nएमबीएम समूहाचे चेअरमन शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची सायंकाळी भेट झाली. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील वि��िध नागरी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याविषयी शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांनी या भेटीत सहमती दाखवली.\nथुम्बे समूहाचे संस्थापक अध्यक्ष थुम्बे मोईदीन यांनी सायंकाळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारसोबत आरोग्यसुविधा क्षेत्रात काम करण्याची तसेच यासंदर्भात सामंजस्य करार करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. मध्यपूर्वेतील प्रभावशाली 100 कंपन्यांच्या यादीत थुम्बेचा समावेश असून, विविध 13 क्षेत्रात हा समूह कार्यरत आहे. सुमारे 80 राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या कंपनीचा शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात प्रवास सुरू आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\n‘मोदींच्या हत्येचा कट, ही केवळ अफवा’ : निरुपम\nमुख्यमंत्र्याचं गृहखाते जनआंदोलने दडपवण्याचं काम करते- संग्राम कोते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/two-more-arrested-in-the-gang-selling-the-girls/", "date_download": "2019-03-25T08:07:28Z", "digest": "sha1:CHTQOYTRUQ6V2DW5ZKWI4YKUAMYUJMN4", "length": 5912, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुलींची विक्री करणा-या टोळीतील आणखी दोघांना अटक", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nमुलींची विक्री करणा-या टोळीतील आणखी दोघांना अटक\nजालना:गेल्या काही दिवसांपासून मुलींची विक्री करणारी टोळी महाराष्ट्रभर सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.मुली विकणा-या टोळीतील दोघांना जळगावमधुन पोलिसांनी काल रात्री अटक केली असून ही टोळी राज्यभरात कार्यरत असल्याचा पोलिसांचा कयास खरा ठरला आहे.\nजालन्यात आपल्याकडे कामासाठी येणा-या आठरा वर्षाच्या मुलीला पोलिस क्वॉर्टरमध्ये राहणा-या एका महिलेने 18 ऑगस्ट 2017 ल�� महिलेने फुस लावुन राजस्थानमध्ये सुजितकुमार मोतीलाल लोहार या इसमास अडीच लाखाला विकले होते या माणसाने आठ दिवस त्या मुलीवर बलात्कार केला होता.मुलीच्या पालकांनी मुलीला सदर महिलेनेच गायब केल्याचा संशय व्यक्त केला होता त्यावरून पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता सदर महिलेला अटक केल्यानंतर राजस्थानातील वृषभदेव (ता. खेरवाडा, जि. उदयपूर) येथून लोहार याला अटक केली. सदर मुलीची सुटका केल्यानंतर जालना पोलिसांनी आता जळगाव जिल्हयातील पहूर पोलिसांच्या मदतीने वाकोद येथील सुरेश शिवारे व दुस-या एका ठिकाणावरून सुभाष भोई या दोघांना अटक केली. या प्रकरणात आणखी दोघे आरोपी असून मुलींची विक्री करणारी ही टोळी महाराष्ट्रभर असल्याचा संशय खरा ठरत आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपाण्यात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले\nअवैध पिस्तुल निर्मिती व तस्करी करणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ajit-nawale-warns-government/", "date_download": "2019-03-25T08:21:25Z", "digest": "sha1:7SWJE2MOHRY3WVNQ7IWCJFOAXL7BSCIY", "length": 8558, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सळो की पळो करून सोडणार : डॉ.अजित नवले", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सळो की पळो करून सोडणार : डॉ.अजित नवले\nमहाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- तमाम भारतीयांना फसवून ४ वर्षांपूर्वी देशात सत्तेत व राज्यात सत्तेत आलेले भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून हे सरकार फक्त भांडवलदार व उद्योगपती धार्जिणे आहे, यांना शेतक-यांचे काहीच घ��णंदेणं नाही. देशात ८० टक्के शेतकरी राहतो आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे, आणि आज हाच शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या दुधाला, शेतमालाला रास्त भाव नाही, या सर्व समस्यांनी शेतकरी पिचला असून आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय या सरकारने ठेवला नाही, आता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असून, सरकारला आता मागण्या पूर्ण होइपर्यंत सळो की पळो करून सोडणार आहे, तसेच शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांनी सरकारला दिला.\nअहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे आज सकाळी ८ वाजता छावा वारियर्स व कळस बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने शेतक-यांच्या प्रश्नावर रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी कोल्हार घोटी राजमार्ग सुमारे ४ तास अडवून ठेवला होता, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कळस बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी आपापली सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन या रास्तारोको आंदोलनाला पाठिंबा दिला.\nशेतकरी नेते किसन सभेचे सचिव डॉ.अजित नवले म्हणाले, या सरकारच्या काळात कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नाही, शेतीमध्ये उत्पन्न येण्यासाठी केलेला खर्च सुद्धा फिटत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी संघटना शेतक-यांसाठी लढा उभारीत असून सर्व शेतक-यांनी या लढ्यात सहभागी होऊन ही चळवळ अधिक व्यापक करावी, असेही आवाहन डॉ.अजित नवले यांनी केले. या रास्तारोको आंदोलनामुळे कोल्हार घोटी राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी रास्तारोको आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे डॉ.संदीप कडलग, सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, निवृत्ती मोहिते, अरुण वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे उपस्थित होते. यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी सूत्रसंचालन केले.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nस्मृती इराणींच्या सभेकडे मतदारांची पाठ , खुर्च्या रिकाम्या\n���वघ्या एक हजार रूपयांच्या घरपट्टीसाठी गमावले सरपंचपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/solapur-municipal-commissioner-absent-for-hearing-of-minister-shubhash-deshmukh-bungalow/", "date_download": "2019-03-25T08:37:18Z", "digest": "sha1:XQIPE4W7F7JTVOGDAIBLXBL6RVCTRLBI", "length": 5626, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सहकारमंत्र्यांचा अनधिकृत बंगला; सुनावणीवेळी मनपा आयुक्तच गैरहजर", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nसहकारमंत्र्यांचा अनधिकृत बंगला; सुनावणीवेळी मनपा आयुक्तच गैरहजर\nसोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूरमधील अलिशान बंगला महापालिकेच्या आरक्षित जागेवर बांधण्यात आल्याची तक्रार महेश चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.\nआज याच संदर्भात खुद्द देशमुख यांना सुनावणीवेळी हजर राहण्यास सांगण्यात आल होत. मात्र या सर्व प्रकरणाची सुनावणी घेणारे महापालिका आयुक्तच गैरहजर राहिल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.\nअग्निशमन दलासाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर सुभाष देशमुख यांनी अलिशान बंगला बांधल्याचे प्रकरण सध्या सोलापूरमध्ये गाजत आहे. देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकामा विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.\nदरम्यान, या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी देशमुख यांना आज म्हणजे १७ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र खुद्द महापालिका आयुक्त आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख हेही सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\n‘त्या’ क्षणी मी सर्व काही गमावले असच मला वाटलं होतं… -अमृता फडणवीस\nभाजपने अल्पसंख्याकांना झुलवत ठेवले; एकनाथ खडसेंनी दिला घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/3934", "date_download": "2019-03-25T07:34:38Z", "digest": "sha1:5SUP7BYB4N7PIFALA7KQCQGNA7IBNHEK", "length": 8845, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येणार\nनिवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येणार\nनिवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येणार\nनिवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येणार\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nपंढरपूर : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. काही आमदार थेट आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.\nविखे पाटील आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखेंच्या या गौप्यस्फोटोमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याचे समोर आले आहे.\nपंढरपूर : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. काही आमदार थेट आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.\nविखे पाटील आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखेंच्या या गौप्यस्फोटोमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याचे समोर आले आहे.\nदोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पंढरपुरातील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत काँग्रेसचे आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे काही आमदार देखील राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याचे मुंडे म्हणाले होते.\nमुंडेंच्या या विधानाविषयी विखे पाटील यांना विचारले असता, राष्ट्रवादीचेही काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत त्यांनी मुंडेंवर पलटवार केला.\nजनसंघर्ष यात्रेनंतरही धुळे आणि नगर महानगरपालिका निवडणूकीत भाजप वरचढ ठरले आहे, असे विचारले असता, सत्ताधारी भाजपने धनशक्तीबरोबरच पोलिसी बळाचा वापर करुन निव़डणूका जिंकल्या आहेत. भाजपने या निवडणुकीत अनेक गुंडांना राजाश्रय दिला आहे. आजपर्यंत जेवढा सत्तेचा दुरुपयोग कोणी केला नव्हता इतका दुरुपयोग भाजपने केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेला हल्ला समाजाच्या आरक्षणासाठी असलेल्या तीव्र भावना आहेत. मात्र अशा भ्याड हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. कायदेशीर लढाई लढणे गरजे असल्याचेही यावेळी विखे पाटील यांनी सांगितले.\nयावेळी आमदार भारत भालके, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील( तुंगत) आदी उपस्थित होते.\nपंढरपूर लोकसभा राष्ट्रवाद आमदार काँग्रेस राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil राजकारण politics धनंजय मुंडे dhanajay munde भारत विषय topics धुळे dhule नगर निवडणूक भाजप आरक्षण वन forest प्रकाश पाटील\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:30:22Z", "digest": "sha1:K5G3TCHIDNLIT7CUXHSLVIHPQWSOUFN4", "length": 3994, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एजिया - विकिपीडिया", "raw_content": "\nएजिया ही प्राचीन मॅसेडोनियाची राजधानी होती. सध्याचे व्हर्जिना हे ग्रीसच्या उत्तरेकडील शहर.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T07:33:12Z", "digest": "sha1:GLGIKGOONTBD2SOTAG3ARXE5IGJCUALS", "length": 6880, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "५०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : कॉन्रॅड जुजा - विचारप्रवाह", "raw_content": "\n५०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : कॉन्रॅड जुजा\nॲटनॅसऑफ यांचा संगणक गणिती सुत्र सोडवण्यास सक्षम असला, तरी तो ‘प्रोग्रॅमेबल संगणक’ नव्हता. अनेक लोक पहिल्या प्रोग्रॅमेबल संगणकाचे श्रेय कॉन्रॅड जुजा यांना देतात. त्यांनी आपल्या संगणकासाठी जगातील पहिली ‘प्रोग्रॅमिंग लँग्वेज’ देखील विकसित केली होती.\nकॉन्रॅड जुजा यांचा जन्म १० जून १९१० रोजी जर्मनीतील बर्लिन या शहरात झाला. त्यांचे वडील टपाल खात्यात कारकून होते. जुजा यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दित मशिन कन्स्ट्रक्शन आणि स्थापत्यशास्त्र अशी दोन निरनिराळी क्षेत्रे आजमावून पाहिली. परंतु त्यांत त्यांचे मन रमले नाही. तेंव्हा १९३५ साली त्यांनी ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’ची पदवी प्राप्त केली. पदवी मिळवल्यानंतर फोर्ड मोटार कंपनीत त्यांनी अल्पकाळ काम केले. त्यानंतर लगेच एका विमान कारखान्यात ‘डिझाईन इंजिनिअर’ म्हणून नोकरी पत्करली.\n‘विमानाच्या पंखांवर हवेचा कसा परिणाम होतो’ यानुषंगाने त्यांना नोकरीच्या ठिकाणी अनेक किचकट गणिते सोडवावी लागत असत. त्यांच्या सहकार्यांना देखील याच समस्येने भांडावून सोडले होते’ यानुषंगाने त्यांना नोकरीच्या ठिकाणी अनेक किचकट गणिते सोडवावी लागत असत. त्यांच्या सहकार्यांना देखील याच समस्येने भांडावून सोडले होते तेंव्हा जुजा यांनी त्यावर विचार सुरु केला. गणित सोडवण्याच्या दृष्टिने जर एखादे अत्याधुनिक यंत्र तयार केले, तर त्यास आयतीच बाजारपेठ उपलब्ध असल्याचे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले. असे यंत्र तयार करायच्या निर्धाराने कॉन्रॅड जुजा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपले बस्तान आपल्या आई-वडिलांच्या घरी हलवले. गणित सोडवण्यासाठी आपण एक भव्य यंत्र तयार करत असल्याचे त्यांनी आपल्या आई-वडिलांना सांगितले. ‘यांत्रिक मेंदू’ तयार करायचा हे कॉन्रॅड जुजा यांनी अगदी मनोमन ठरवून टाकले होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्या आई-वडिलांनी व मित्रपरिवाराने याकामी त्यांस शक्य तेव्हढे आर्थिक सहाय्य केले.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n४३. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण\n४४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर : जॉन विंसेंट ॲटॅनॅसऑफ\n२९. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : अरिदमॉमिटर\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/major-gogoi-man-tied-to-the-jeep-and-sawarkars-sadgun-vikruti/", "date_download": "2019-03-25T07:22:12Z", "digest": "sha1:O3DCTOX476ONYCBSMQ25LUG55YVYDHEV", "length": 17956, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काश्मीरमध्ये जीपला बांधलेला आरोपी आणि सावरकरांनी उल्लेखलेली सद्गुण विकृती", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाश्मीरमध्ये जीपला बांधलेला आरोपी आणि सावरकरांनी उल्लेखलेली सद्गुण विकृती\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nगेल्या महिन्यात जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात-भारतात, लोकशाहीचा महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूका झाल्या काही राज्यांत. अशीच एक पोट-निवडणूक काश्मीरात देखील झाली.\nकाश्मीरमध्ये अशाच एका मतदान केंद्रावर स्थानीक काश्मीर पोलीस आणी ईतर सुरक्षा यंत्रणांचे जवान आपले कर्तव्य बजावत होते.\nसंध्यकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर, निवडणूक अधिकारी आणी सुरक्षाकर्मी मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना, त्या केंद्राला गराडा घालून ८००/१००० लोकांचा जमाव दगडफेक करू लागला.\n“Maximum restraint – जास्तीत-जास्त संयम पाळा” असे आदेश असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी, मतदान केंद्रातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अधिक सुरक्षेची मागणी केली.\nत्याप्रमाणे, भारतीय सैन्य दलाची एक तुकडी मेजर लितूल गोगोई, यांच्या ��ेतृत्वाखाली तिथे पोहोचली.\nपण ८००/१००० जणांचा जमाव त्यांना आवरणे शक्य झाले नाही. “Maximum restraint- जास्तीत-जास्त संयम” या आदेशांमुळे २०-२५ जवानांकडे असलेल्या AK-47 सारख्या शस्त्रांचा वापर करता येणार नव्हता. त्यात कित्येक विनवण्या करून देखील, दगडफेक करणारे थांबत नव्हते.\nमतदान केंद्रात अडकलेले कर्मचारी आणि सुरक्षाकर्मी यांची जबाबदारी असलेल्या मेजर गोगोई यांनी “प्रसंगावधान ठेवून” दगडफेक करणाऱ्या तिथल्याच एका म्होरक्याला पकडले, जीपच्या पूढे बांधले आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेत तिथून बाहेर पडले.\nघटनेनंतर अपेक्षेप्रमाणे “फक्त काश्मीरातील दहशतवाद्यांना, दगडफेक करणाऱ्यांना, त्यांची बाजू घेत समर्थन करणाऱ्यांनाच फक्त मानवाधीकार आहेत” असे समजणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, बुद्धिवंतांची मानवतावाद्यांची ओरड सुरु झाली.\n“भारतीय सैन्य हे काय करतंय\n“हे नियमांच्या विरुद्ध नाही का\n“त्या गरीब बिचाऱ्या तरुणाचा मानवी ढाल- human shield म्हणून केलेला वापर, भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे….”\n……अशी बरीच विधानं केली गेली.\nया आशयाचे अग्रलेख, लेख वृत्तपत्रांत लिहीले गेले, विविध चॅनेलवर कित्येक तासांच्या डिबेट्स रंगवल्या गेल्या. अगदी जागतीक पातळीच्या चॅनल्सनी ” हे मानवाधीकारांचे हनन आहे”, “भारतात हे असं भयंकर काही होतंय” असं वृत्तांकन प्रसारीत केलं.\nभारतीय सैन्याने मात्र, AK47 सारखी फायर आर्मस सोबत असतानाही, मेजर गोगोईंनी दाखवलेल्या “प्रसंगावधनाच” योग्य आकलन केलं. संभावीत रक्तपात टाळून नागरीक, मतदान कर्मचारी आणी सुरक्षाकर्मी यांचे संरक्षण करण्याच्या कृतीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.\n“सैन्याकडून कौतुकाची थाप, पण मानवतावाद्यांकडून टिका” या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा “सद्गुण विकृती” हा शब्द आठवला.\nविचार करा मित्रांनो, २०-२५ जवानांकडे बंदुकीच्या प्रत्येकी १०/१५ गोळ्या आहेत, परिस्थिती हाताबाहेर गेली असती, आणि शेवटच्या क्षणी सैन्याने गोळीबार केला गेला असता, तर काय झालं असतं कल्पना करतानाही अंगावर काटा येतोय.\nदगडफेक करणाऱ्यांपैकी एखादा दगावला असता, तर हेच मानवतावादी लोक भारतीय सैन्याकडून अत्याचार, असे बरळले असते.\nआणि जर एखादा सुरक्षाकर्मी या झटापटीत हुतात्मा झाला असता, तर त्याबद्दल अवाक्षरही काढले गेले नसते. कारण सैनीकांना, पोलीसांना “मानवाधीकार असुच कसे शकतात” अशी यांची शिकवण आणी धारणा आहे.\nमानवतावाद मान्य, पण सद्गुण विकृतीमूळे तिथे रक्तपात झाला नसता काय आणि मेजर गोगोईंच्या प्रसंगावधनामूळे संभाव्य रक्तपात टाळला गेला नाही काय\nउच्च आदर्शमूल्य वगैरे ठिक आहे, पण सद्गुण विकृतीमूळे हानी तर होत नाही ना, हे देखील पहावयास हवे \nबाकी – ह्या वर्तनामुळे एक चांगलं होतंय.\nवर्गशत्रू, “भांडवलदारविरोधी प्रोलेटरीयेटांचा लढा”, अशा गोंडस नावाखाली जबरदस्तीचे स्थलांतरण, कोणतीही सुट नसणारे forced labor camps आणी तिथे झालेल्या मृत्यू-हत्या, हेकेखोर वृत्तीमुळे घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे झालेले दुष्काळ आणि भुकबळी, राजकीय विरोधकांच्या आणि न-पटणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांच्या/जनतेच्या हत्या, रोगराईमूळे झालेले मृत्यू, विकृत निरंकुश सत्ता लालसेपोटी, स्वतःची विचारधारा इतरांवर लादण्याच्या मोहापायी करोडो लोकांच्या हत्या करणाऱ्या माओ, लेनीन, स्टालीन, पॉल पॉट ते अगदी भारतातील काही राज्यांतील या आयातीत विचारधारेनुसार कार्यपद्धती असणाऱ्या कम्युनीस्ट राजवटींच्या वैचारीक पाठीराख्यांच्या चेहऱ्यांवरून मुखवटे उतरत आहेत \nमेजर गोगोईंच्या म्हणण्याप्रमाणे, जर जिपला बांधलेला व्यक्ती दगडफेक करणाऱ्या लोकांचा म्होरक्या होता, तर पोलीसांनी त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← दगडूशेठ गणपतीचं हे शब्दचित्र, आपल्या डोळ्यात भक्तिरसपूर्ण अश्रू उभं करेल\n…आणि ह्या तरुण डॉक्टर मुलीने एका चिमुकल्याचे प्राण अबॉर्शन होण्यापासून वाचवले\nझायराची माफी – हे कट्टरवादाचं अस्तित्व नाकारणाऱ्या सर्वांचं पाप आहे\nजम्मू काश्मीर महत्वाचं का आहे\n“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम\nदेशातल्या तिसऱ्या “तृतीयपंथी” जजचा प्रवास:\nलिंग भेदाच्या सीमा ओलांडणारा आधुनिक क्रांतिकारी : ‘साडी मॅन’ हिमांशू वर्मा\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\nभारताने साध्य केलेल्या ह्या अभिमानास्पद गोष्टी कितीतरी विकसित देशांनासुद्धा जमलेल्या नाहीत\nजन्मत: हात-पाय नसूनही तुमच्या-आमच्यापेक्षा कितीतरी अधिक रसरशीत जीवन जगणारा अवलिया\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली\nनक्षल समर्थकांची देशव्यापी “चळवळ”\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं\nआणि गहिवरली ‘ती’ बांग्लादेशी माय: नागपूरच्या मनोरुग्णालयातील मातेची बांग्लादेशी लेकराशी भेट\nबहुचर्चित हिंदी चित्रपटांची ११ रंजक तथ्ये\n“बाबा…थांब ना रे तू…” मनाला भिडणारी प्रियांका चोप्राची हळवी साद\nबॉस कडून आदर मिळवण्यासाठी हे करा.\nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nह्या १२ गोष्टी, ज्यांवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय – १००% खोट्या आहेत\nलैंगिक आकर्षणाचे हे १० प्रकार तुम्हाला माहित असायलाच हवेत…\nतब्बल ३० वर्षे अकबराला झुंझवणाऱ्या ‘महाराणा प्रताप’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nBrexit आणि युरोपियन युनियनची पार्श्वभूमी : भारतात असं referendum घ्यावं का\nमाओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)\n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nCA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/dharani-mukali/", "date_download": "2019-03-25T07:57:22Z", "digest": "sha1:B2OHRSOJBMLDEMCFVSG3ZS3SEY3CMW5S", "length": 7997, "nlines": 68, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nधरणी मुकली मृगाच्या पावसाला (ओव्या)\nधरणी मुकली मृगाच्या पावसाला\nसुख माझे हरपले, कुठे शोधू गं भावाला\nअनंत गगनी तारका अगणित\nतसे आठवू भावांचे गुण किती असंख्यात.\nचंद्राचे प्रतिबिंब, गंगेच्या प्रवाहात, गंगेच्या प्रवाहात\nभावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात.\nदेवाच्या देवळात गोड सनई वाजते, गोड सनई वाजते\nभाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते.\nवार्याची झुळूक आणी सुगंध फुलांचा आणी सुगंध फुलांचा\nसांग जिवाच्या मैत्रिणी, गोड निरोप भावाचा,\nव��िलांच्या मृत्युनंतर एकमेकांकडे पाठ फिरवलेल्या भावांना आपल्या प्रेमाने पुन्हा एकत्र आणून विस्कटलेले घर सावरणाऱ्या बहिणीची ही कथा. बेबी नंदा या हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा हा तिच्या या क्षेत्रातील पदार्पणातील पहिल्या काही चित्रांपैकी यशस्वी ठरलेला चित्रपट. तिच्याबरोबर मास्टर छोटू, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले हे पिता पुत्र, सुमती गुप्ते असे दर्जेदार कलावंत होते. वडिलांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीच्या समारंभात शास्त्रीय संगीताची मैफल दाखवली आहे, त्यासाठी सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांना पाचारण केले होते आणि त्यांच्यावर त्यांनीच गायलेले गाणे चित्रित करण्यात आले होते.\nआज प्रचलित असलेली 'स्टोरी बोर्ड' ही संकल्पना आठवले यांनी १९५४ साली या चित्रासाठी वापरली होती. 'वहिनींच्या बांगडया'चे वेळी ते चित्रीकरणाचा आराखडा करीतच होते. या वेळी त्यांनी दीक्षित नावाच्या एका चित्रकाराच्या मदतीने कॅमेऱ्यातून दिसणारा प्रत्येक शॉट चित्रबद्ध केला आणि त्या आराखड्यात अंतर्भूत केला. पुण्याच्या फिल्म अर्काइव्हजमध्ये याचे नमुने जतन केलेले आहेत.\nसोनुल्या गुपित सांगते तुला\nबाई मी कशी ग बाई मी कशी\nधरणी मुकली मृगाच्या पावसाला (ओव्या)\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6", "date_download": "2019-03-25T08:24:20Z", "digest": "sha1:IOUJZLGPXMMZYFXCRZRHYO3LT7FCPKO3", "length": 34185, "nlines": 314, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयुर्वेद - विकिपीडिया", "raw_content": "\nआद्य वैद्य श्री धन्वंतरी\nआयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.\nकर्नाटकातील सोमनाथपुर येथील धन्वंतरीची प्रतिमा\nआयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या clinical trials ची मोठ्या प्रमाणात गरज आहे असे काही लोकांचे मत आहे.[१] आयुर्वेदिक औषधांचा विशेषतः मुलांना उपयोग होतो.\n१.१ परंपरा आणि ग्रंथसंपदा\n२ मार्गदर्शक आणि मूळ तत्त्वे\n३.१ अष्टविध निदान पद्धती\n४.१.१ १ - वमन\n४.१.२ २ - विरेचन\n४.२ ३ - बस्ती\n४.२.१ ४ - नस्य\n४.२.२ ५ - रक्तमोक्षण\nआयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे. म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक मोलाच्या गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते.\nआयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन तत्त्वपरंपरा[श १] आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्��प संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत. तिसरी परंपरा कश्यपांची आहे.\nआयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसवी सनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इ.स. ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारिक सिद्धान्त आणि युक्त्या मूळ बौद्ध साहित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बऱ्याच लोकांनी संपादन केले आहे. अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही जी परंपरा आहे तिची सुरुवात सुश्रुताने केली असे मानतात.\nइसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणाऱ्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदिक साहित्यांचे एकत्रीकरण केले. त्याला अष्टांग हृदय असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळ आधार समजले जाते म्हणून या तिघांना आदराने बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे. यानंतर भावप्रकाश व योगरत्नाकर हेही ग्रंथ निर्माण झाले. नवीन भर पडल्याने हे तीन ग्रंथ आजही प्रमाण मानले जातात. यांना लघु त्रयी म्हणून ओळखले जाते. विविध औषध निर्मितीच्या प्रक्रिया विषद करणारा शारंगधर हाही एक प्रमुख वैद्य. बृहद् त्रयी, लघु त्रयी व शारंगधर या तिन्हीत आयुर्वेद सामावला आहे.[२]\nआयुर्वेदात मुख्यतः वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. इ.स.च्या आठव्या शतकात उग्रादित्य आणि इ.स.च्या चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बऱ्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाही प्राणिज औषध म्हणून वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे.\nआयुर्वेदांच्या प्राचीन ग्रंथांत केवळ आहाराचाच विचार केला नाही तर विविध ऋतूंमध्ये, कालानुरूप, हवापाण्यात बदल होत असताना आपण कसे राहावे, कसे राहू नये, याचा साधकबाधक विचार केलेला आहे. तर या ग्रंथ आणि पोथ्यांमध्ये अगदी सर्वसामान्य विकारांपासून दुर्मीळ विकारांवर मात्रा आहेत. आयुर्वेदाच्या दुर्मीळ पोथ्यांचे संग्रहण अनेकांनी केले आहे, नाशिकचे दिनेश वैद्य हे त्यांपैकी एक आहेत.\nमार्गदर्शक आणि मूळ तत्त्वे[संपादन]\nप्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेला आहे. त्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्त्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळ तत्त्वाचे स्वतःचे काही गुण आहेत. ही मूळ तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत -\nगुरू (जड) लघु (हलका)\nमंद (हळूहळू) तीक्ष्ण (तीव्र)\nहिम, शीत (थंड) उष्ण (गरम)\nस्निग्ध (तेलकट, ओशट) रूक्ष (कोरडा)\nश्लक्ष्ण (गुळगुळीत) खर (खरखरीत)\nसांद्र (घन, दाट) द्रव (पातळ)\nमृदू (मऊ, कोमल) कठीण (बळकट, दृढ)\nस्थिर (टिकाऊ) चल, सर (गतिमान)\nसूक्ष्म (अतिशय बारीक) स्थूल (मोठा)\nविशद (स्वच्छ) पिच्छील (बुळबुळीत)\nआयुर्वेदाचा लेखक सुश्रुत ह्याने अन्नाचे सहा प्रकार सांगितले आहेत:\nभक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम्\nइति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः॥\nसर्व शारीरिक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात, असे आयुर्वेद मानते.\nवात हा शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.\nकफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक(lubricant), जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रे��, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि प्रत्यूर्जता ((ॲलर्जी) allergy) इत्यादी त्रास होतात.\nपित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अति पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.\nया आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.\nआयुर्वेदिक उपचार पद्धती प्रामुख्याने शमन आणि शोधन अशी वर्गीकृत केली जाते. वाढलेले दोष स्वस्थानी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेस शमन असे म्हणतात. तर वाढलेले दोष स्वस्थानातून खेचून बाहेर काढून शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस शोधन असे म्हणतात. पंचकर्मे ही शोधन प्रक्रियेचा भाग मानली जातात. म्हणूनच पंचाकर्मांना 'शोधन कर्मे' असेदेखील म्हटले जाते.\nपंचकर्मे ही शोधन कर्मे आहेत. ती संख्येने पाच आहेत म्हणून त्यास पंचकर्मे असे म्हटले जाते.\nही पाच कर्मे पंचकर्मे म्हणून ओळखली जातात.\nही एक आयुर्वेद उपचार पद्धती आहे.\nयाचे विश्लेxण पुढील प्रमाणे :-\nशरीरातील वाढलेले दोष मुखावाटे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस वमन असे म्हणतात. वमन ही कफ दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.\nशरीरातील वाढलेले दोष अधोमार्गाने बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस विरेचन असे म्हणतात. विरेचन ही पित्त दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.\nशरीरातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी गुदद्वारामार्गे औषधी देण्याच्या प्रक्रियेस बस्ती असे म्हटले जाते. बस्ती ही वात दोषाची प्रमुख चिकित्सा मानले जाते.\nमानेच्या वरील प्रदेशातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी नाकाद्वारे औषध देण्याच्या प्रक्रियेस नस्य असे म्हणतात.\nअशुद्ध रक्त शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस रक्तमोक्षण असे म्हणतात\nज्या पदार्थांचा काढा करावयाचा असेल ते घटकपदार्थ घेतात व त्यावर पदार्थांच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी एक अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळवताtत, हे पाणी गाळून घेतल्यावर बनलेल्या द्रवपदार्थाला त्या घटकपदार्थातील मुख्य घटकाचा काढा म्हणतात..\nयात औषधाची पूड करून मग त्यात पातळ पदार्थ जसे पाणी, तूप इत्यादी मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यालाच घनवटी (गोळ्या ) असे म्हणतात.\nचूर्ण :- म्हणजे त्या वनस्पतीला / तिच्या सालीला/फळाला वाळवून नंतर त्याला कुटून बारीक करणे. (चूर्ण करणे)\nहे चूर्ण पाणी,तूप,मध किंवा गुळासोबत औषध म्हणून घेतात.\nतैल :- यात काही वनस्पती मोहरी, एरंड, तीळ आदि तेलात मिसळून त्याला उकळून मग त्याचा वापर मालिश करणे, हळूवार चोळणे याकरिता करतात.\nघृत :- म्हणजे तूप होय.\nयात गाईच्या तुपात अथवा अन्य तुपात इतर औषधी मिसळतात. हे मिश्रण उकळून एकजीव केल्यावर त्याचा वापर करतात.\nआयुर्वेदामध्ये संशोधनाची गरज असून जगात अनेक ठिकाणी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.[३]आयुर्वेदात संशोधन करण्याचे अनेक मार्ग आहेत. क्लिनिकल ट्रायल हा त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग आहे.आयुर्वेदिक सिद्धान्त तपासून पहाणे हेही एक प्रकारचे संशोधनच आहे.\n^ तत्त्वपरंपरा (इंग्लिश: Schools of Thought)\nBookIds=1590 | सार्थ वाग्भट - गणेश कृष्ण गर्दे कृत मराठी भाषांतर\nआयुर्वेद - लबाडी की विज्ञान \nआयुर्वेदाशी संबंधित माहितीचे संकेतस्थळ (अभ्यासक्रम, पदवी/पदविका यांची माहिती, वगैरे)\nपारंपरिक औषधपद्धतीवरील भारतीय राष्ट्रीय संकेतस्थळ\nआयुर्वेद,पर्यायी व पूरक औषध पद्धती मराठी व English ब्लॉग\nआपल्यासाठी आयुर्वेद : हिंदी व English ब्लॉग\nआयुर्वेदिक दवाखाना आणि संशोधन केंद्र, वाघोली, भारत\nडेव्हिड फ्राली यांच्या \"The River of Heaven\" पुस्तकातील आयुर्वेदावरील प्रकरण\nभारतीय पारंपरिक औषधपद्धतींचा इतिहास\nऋग्वेद • यजुर्वेद • सामवेद • अथर्ववेद • उपनिषद •\nइतिहास (रामायण • महाभारत • भगवद्गीता) • आगम (तंत्र • यंत्र) • पुराण • सूत्र • वेदान्त\nअवतार • आत्मा • ब्राह्मण • कोसस • धर्म • कर्म • मोक्ष • माया • इष्ट-देव • मूर्ति • पुनर्जन्म • संसार • तत्त्व • त्रिमूर्ती • कतुर्थ • गुरु\nमान्यता • प्राचीन हिंदू धर्म • सांख्य • न्याय • वैशेषिक • योग • मीमांसा • वेदान्त • तंत्र • भक्ती\nज्योतिष • आयुर्वेद • आरती • भजन • दर्शन • दीक्षा • मंत्र • पूजा • सत्संग • स्तोत्र • विवाह • यज्ञ\nशंकर • रामानुज • मध्व • रामकृष्ण • शारदा देवी • विवेकानंद • नारायण गुरु • अरबिन्दो • रमण महर्षी • चैतन्य महाप्रभू • शिवानंद • चिन्मयानंद • स्वामीनारायण • तुकाराम • प्रभुपाद • लोकेनाथ • जलाराम\nवैष्णव • शैव • शक्ति • स्मृति • ���िंदू पुनरुत्थान\nहिंदू दैवते • हिंदू मिथकशास्त्र\nसत्य • त्रेता • द्वापार • कलि\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nप्रमुख आणि पर्यायी उपचारपद्धती\nॲलोपॅथी · शल्यचिकित्सा · होमिओपॅथी · आयुर्वेद · युनानी · निसर्गोपचार · बाराक्षार पद्धती · प्राणायाम · योगासन · ॲक्युपंक्चर · ॲक्युप्रेशर · चुंबकिय उपचार · मेटामॉर्फिक तंत्र · रेडिऑनिक्स · प्रतिमा तंत्र · शरीर-मनोवैद्यक · कायरोप्रॅक्टिक · शारीर तंत्र · मसाज · रोल्फिंग · फेल्डेनक्रेस · ऑस्टिओपॅथी · उर्जावैद्यक · किरणोपचार · ताई ची व ची गाँग · संगीतोपचार · जलोपचार · सायमाथेरपी · आयरिडॉलॉजी · कायनेसिऑलॉजी · रसायनोपचार · आहारशास्त्र · पूर्णोपचार\n२००५ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१८ रोजी १९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-03-25T07:27:24Z", "digest": "sha1:FCPSZLQXC27WYJAP4W6KEPOVUIYWA3OI", "length": 5253, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेरोकी - विकिपीडिया", "raw_content": "\nजीप चेरोकी याच्याशी गल्लत करू नका.\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक मूळ अमेरिकन जमात. एकूण लोकसंख्या ३,००,०००. हे लोक ओक्लाहोमा, कॅलिफोर्निया व उत्तर कॅरोलिना या राज्यांत राहतात.\nत्यांची मूळ भाषा चेरोकी ही आहे परंतु आज ती फक्त २०,००० लोकच बोलू शकतात.\n’अश्रूंची पाऊलवाट’ मध्ये बळी पडलेल्या मृतांचे New Echota येथील स्मारक\nइ.स. १८३८ मध्ये युरोपियन लोकांनी त्यांना त्यांच्या मूळ प्रदेशातून जबरदस्तीने हाकलून लावले त्यात जवळजवळ ४००० चेरोकी लोक मरण पावले. ही घटना अश्रूंची पाऊलवाट या नावाने ओळखली जाते (खाली इंग्रजी दुवा पहा).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी ०५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स ��ा अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/sensex-closes-610-points-up-nifty-gains-nearly-2-telecom-fmcg-stocks-rally/articleshow/63273719.cms", "date_download": "2019-03-25T08:48:50Z", "digest": "sha1:LBFMCG6VNNR2JR7RQ3UQPBIMDFNCA6QO", "length": 13269, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sensex: सेन्सेक्सचा उच्चांक - sensex closes 610 points up, nifty gains nearly 2%, telecom, fmcg stocks rally | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nअमेरिकेकडून व्यापारविषयक नियमांमध्ये फेरफार करण्यात आल्यामुळे, आयातशुल्क वाढवण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या ट्रेड वॉरची स्थिती काहीशी निवळल्याचा परिणाम देशातील भांडवल बाजारांवर सोमवारी दिसून आला. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने एकाच दिवसाती वाढीचा गेल्या दोन वर्षांचा उच्चांक गाठला. सेन्सेक्स दिवसअखेर ६१०.८० अंकांनी उसळी घेत ३३९१७.९४ या पातळीवर गेला.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nअमेरिकेकडून व्यापारविषयक नियमांमध्ये फेरफार करण्यात आल्यामुळे, आयातशुल्क वाढवण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या ट्रेड वॉरची स्थिती काहीशी निवळल्याचा परिणाम देशातील भांडवल बाजारांवर सोमवारी दिसून आला. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने एकाच दिवसाती वाढीचा गेल्या दोन वर्षांचा उच्चांक गाठला. सेन्सेक्स दिवसअखेर ६१०.८० अंकांनी उसळी घेत ३३९१७.९४ या पातळीवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १९४.५५ अंक वर जात १०४२१.४० या पातळीवर स्थिरावला.\nयापूर्वी सेन्सेक्सने एका दिवसात अशी उसळी १ मार्च २०१६ रोजी घेतली होती. त्या दिवशी सेन्सेक्स ७७७.३५ अंक झेपावला होता. गुंतवणूकदारांनी धातू, तेल व वायू, एफएमसीजी, बँकिंग, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आयटी, वाहन व यंत्रसामग्री या क्षेत्रांतील कंपन्यांना झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले. या सर्व क्षेत्रांचे क्षेत्रीय निर्देशांक वधारले. या क्षेत्रांतून परदेशी गुंतवणुकीचा ओघही मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून आला. आयआयपी व महागाई दराने सरकारला दिलेला दिलासाही बाजाराच्या पथ्यावर पडला. दिवसभरात मुंबई शेअर बाजारात देशी फंड आणि रिटेल गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर भागखरेदी केली. राष्ट्रीय शेअर बाजारातही भागखरेदीचा जोर दिसून आला. यामुळे निफ्टी १९४.५५ अंकांनी वधारला.\nदिवसभरात भारती एअरटेलच्या भागांना सर्वाधिक फायदा होऊन या कंपनीचा एक शेअर ४.६८ टक्के वर गेला. आयटीसीचा भाग ४.०९ टक्के तर एनटीपीसीचा भाग ४.३३ टक्के वधारला. टाटा स्टील, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, अदानी पोर्ट, ओएनजीसी, विप्रो, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, सन फार्मा, कोटक बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस, एशियन पेन्ट्स या कंपन्यांना दिवसभरात फायदा झाला.\n- वाहन उद्योगातील कंपन्यांचे भाग वधारले\n- आशियाई व युरोपीय भांडवल बाजारही वर गेले\n- मिडकॅप कंपन्यांचे लक्षणीय योगदान राहिले\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nएक एप्रिलपासून गॅस महागणार\nफरार घोटाळेबाज हितेश पटेलला अटक\nNirav Modi : नीरव मोदीला दणका, जामीन अर्ज फेटाळला\nNirav Modi: नीरव मोदीच्या ११ कार, १७३ पेंटिंग्जचा होणार लिला...\nदूरसंचार ग्राहकांची ग्राहकसंख्या १२० कोटींवर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nव्यापाऱ्यांनी बुडवला ३४,००० कोटींचा जीएसटी\n‘पीएफ’, पेन्शन नोंदणीकर्मचाऱ्यांनाही शक्य...\n‘सौर ऊर्जेसाठी जोखीममुक्त पतपुरवठा हवा’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A/", "date_download": "2019-03-25T08:17:12Z", "digest": "sha1:XFTOIH4DRU7B566V5HCXWQRPFVSWY2H6", "length": 13425, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काद्यांच्या भावाला उठावच नाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकाद्यांच्या भावाला उठावच नाही\nचाकण- चाकण बाजारात कांद्याची आवक घटून भाव मात्र किरकोळीत उतरले. बटाटा आवक घटून भावही उतरले. हिरवी मिरची आवक वाढली व भावही वाढले. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 50 लाख रुपये झाली.\nखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक 2015 क्विंटलने घटून मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 11 रुपयाने घट झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 3585 क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 11 रुपयांनी घट झाली. कांद्याचा कमाल भाव 811 रूपयांवरून 800 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1300 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 170 क्विंटलने घटली बटाट्याचा कमाल भाव 1400 रुपये झाला. भुईमूग शेंगाची (जळगाव) एकूण आवक 10 क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव 5300 रुपयांवर स्थिर झाला. लसणाची एकूण आवक 15 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 460 पोती झाली.\nराजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 5 लाख 15 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 2250 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 4 लाख 47 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 1800 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 70 हजार जुड्या झाली. 300 ते 900 असा जुड्यांना भाव मिळाला .\nशेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)\nक्रमांक एक : 800\nक्रमांक दोन : 650\nक्रमांक तीन : 400\nएकूण आवक : 3585 क्विंटल\nक्रमांक एक : 1400\nक्रमांक दोन : 1300\nक्रमांक तीन : 1200\nएकूण आवक : 1300 क्विंटल\nक्रमांक एक : 5300\nक्रमांक दोन : 5000\nक्रमांक तीन : 4500\nएकूण आवक : 10 क्विंटल\nक्रमांक एक : 2500\nक्रमांक दोन : 2000\nक्रमांक तीन : 1800\nएकूण आवक : 15 क्विंटल\nफळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)\nपालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)\nमेथी : एकूण आवक : 12720 जुड्या (500 ते 1000), कोथिंबीर : एकूण आवक : 18970 जुड्या (500 ते 1000), शेपू : एकूण आवक : 4560 जुड्या (400 ते 700), पालक : एकूण आवक : 3450 जुड्या (300 ते 500).\nजनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 95 जर्शी गायींपैकी 30 गाईची विक्री झाली (10 ते 40 हजार रुपये), 155 बैलांपैकी 75 बैलांची विक्री झाली (15 ते 25 हजार रुपये), 90 म्हशींपैकी 55 म्हशींची विक्री झाली (20 ते 60 हजार रुपय��), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 8960 शेळ्या-मेंढ्यापैकी 8250 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 90 लाखांची उलाढाल\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/suvrat-joshi-to-make-debut-shikari-movie/", "date_download": "2019-03-25T08:00:17Z", "digest": "sha1:7QYZXJN7ZH5Z5YSOEUDWE2CBRQETMDKF", "length": 9222, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "सुव्रत जोशी झळकतोय मोठ्या पडद्यावर।आगामी 'शिकारी'ची स्टारकास्ट", "raw_content": "\nसुव्रत जोशी झळकतोय मोठ्या पडद्यावर\n‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nसुव्रत जोशी झळकतोय मोठ्या पडद्यावर\nसध्या छोट्या पडद्यावरील गुणी कलाकार म्हणजे सुव्रत जोशी. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ह्या घरोघरी पोचलेल्या मालिकेमधून तो सर्वाना परिचयाचा झाला. सुव्रत आता आगामी ‘शिकारी’ मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेत असल्याचं कळतंय. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सिनेमा आहे. त्यांच्यासोबतच सिनेमात कश्मीरा शाह, मृन्मयी देशपांडे, भाऊ कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव ह्यांच्यासुद्धा महत्वाच्या भुमिका असतील. सुरुवातीला झळकलेल्या बोल्ड पोस्टर्सनंतर सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. महेश मांजरेकर सादर आणि विजू माने दिगदर्शित हा सिनेमा 20 एप्रिलला रिलीज होत आहे.\nसुव्रत बाबतीत बोलायचं झालं तर तो मुळचा पुण्याचा असून सध्या मुंबईत राहतो. पुण्याच्या एनएसडी चा (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) तो विद्यार्थी आहे. पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्याने सुरुवातीस शिक्षकाची नौकरी केली पण अभिनयाच्या ओढीने तो तशा संधी मिळवत गेला. अनेक नाटकं, एकांकिकामधून त्याने अभिनय केलेला आहे. बिन कामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम, अमर फोटो स्टुडिओ हि त्याने केलेली काही नाटके आहेत. पुढे झी मराठीवरील गाजलेल्या दिल दोस्ती दुनियादारी मध्येही त्याने अभिनय केला. ह्याच मालिकांमधून घरोघरी पोचलेला सुव्रत आता मोठ्या पडद्यावरही ‘शिकारी’च्या निमित्ताने त्याच्या अभिनयाची चुणूक आपल्याला दाखवायला तयार आहे.\n‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\n“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.\nमधुरा साने आठवतेय का ती काही महिन्यांपूर्वीच आपल्याला एका छानशा मराठी सिनेमातून भेटीला आली होती. नाही...\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nपहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.\nसिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी...\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nमराठी मनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्का, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर...\n‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला\nअभिनेते सुनिल बर्वे यांनी आपल्या सुबक नाट्यसंस्थेच्यावतीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातील...\nमहेश मांजरेकर होस्ट करणार बिगबॉस मराठी\nएक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T08:18:13Z", "digest": "sha1:J5WELOV5LK7SPDXBIH5MSYPP56MK4JTD", "length": 5651, "nlines": 42, "source_domain": "vicharpravah.in", "title": "१७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : पास्कलाईन - विचारप्रवाह", "raw_content": "\n१७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : पास्कलाईन\nयादरम्यान पास्कल यांनी अथक प्रयत्न करुन एक मेकॅनिकल कॅलक्युलेटर तयार केला. १६४५ साली त्यांनी त्याचे सर्वांसमोर सादरीकरण केले. या कॅलक्युलेटरच्या सहाय्याने बेरीज व वजाबाकी करता येत असे. ‘अरिदमॅटिक मशिन’ नावाचे हे कॅलक्युलेटर पुढे ‘पास्कलाईन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या यंत्रात गिअरचा कौशल्याने वापर करण्यात आला होता. ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’मध्ये वापरण्यात आलेले गिअरचे तंत्रज्ञान हे कधीही पूर्णपणे विस्मृतीत गेले नाही, तर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शेकडो वर्षं टिकून राहिले, याचा ‘पास्कलाईन’ हा जणू एक पुरावा होता गिअरचा कल्पकतेने वापर करुन तयार करण्यात आलेली अशाप्रकारची निरनिराळी यंत्रे रिनेसॉन्सच्या काळात सर्वत्र दिसू लागली होती.\nअरिदमॅटिक मशिन – पास्कलाईन\nपास्कल यांनी फ्रांसच्य�� राजाकडून आपल्या यंत्राकरिता पेटंटसदृश हक्क मिळवले, तसेच आपल्या यंत्राचे व्यवसायिकरण करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले. भविष्यात अशाचप्रकारे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने उद्योगधंद्यांची जडणघडण होत गेली. म्हणूनच पास्कल यांनी त्यासंदर्भात दाखवलेली दृष्टी विशेष उल्लेखनीय ठरते.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : धातूची रहस्यमय वस्तू\n५३. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ट्युरिंग मशिन\n११. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : आर्किमिडीज आणि ॲलेक्झांड्रिया\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/mithila-palkar-photoshoot-in-saree/", "date_download": "2019-03-25T07:36:03Z", "digest": "sha1:23Y4L4OKZJNGSIYMY3WKGQRJ5XQMWU2T", "length": 7763, "nlines": 80, "source_domain": "marathikalakar.com", "title": "अभिनेत्री मिथिला पालकरच्या घायाळ अदा. पहा साडीतील लेटेस्ट फोटोशूट.", "raw_content": "\nअभिनेत्री मिथिला पालकरच्या घायाळ अदा. पहा साडीतील लेटेस्ट फोटोशूट.\nफोर्ब्सच्या ‘३० अंडर ३०’ च्या यादीत झळकल्या मराठी तारका\nअभिनेत्री मिथिला पालकरच्या घायाळ अदा. पहा साडीतील लेटेस्ट फोटोशूट.\nकरिअरच्या सुरुवातीस अभिनेत्री मिथीला पालकर कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. आपल्या आनंदी चेहऱ्यासोबतच एक उत्स्फूर्त आणि उत्तम अभिनेत्री असल्याचं अभिनेत्री मिथीला पालकरने आता सिद्ध केलं आहे. स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असलेल्या मिथिलाचा ड्रेसिंग सेन्सही अ��दी उत्तम आहे. नुकतंच तिने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून फोटोत तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिचा हा साडीतील लूक नेटिझन्सना सध्या बराच आवडलेला बघायला मिळत आहे.\nमुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या मिथीलाने काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं. ‘कारवाँ’ या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले होते.\nफोर्ब्सच्या ‘३० अंडर ३०’ च्या यादीत झळकल्या मराठी तारका\n१८वर्षांची झालीये पुष्कर श्रोत्रीची मुलगी.पहा बर्थडे फोटोज.\nआपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे अभिनेता पुष्कर शोत्री रसिकांचा लाडका बनला आहे. नुकतीच पुष्करची मुलगी...\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\n“देऊळबंद” सिनेमात राघव शास्त्री हि जबरदस्त भुमिका वठवणारा अभिनेता गश्मीर महाजनी. यासमवेत तो ‘कान्हा’, ‘वन वे...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nमराठीतील गुणी अभिनेत्री पूजा सावंतने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली...\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nगेल्या महिन्यात अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल डिटॉक्स घेतला होता, आणि तब्बल एका महिन्यानंतर आता ती सोशल...\nआणि सोशल मीडियावरून नाहीशी झालेली सई परतली वापस\nमराठीतील सर्वांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकरने गेल्या एका महिन्यात सोशल मीडियावरून डिजीटल डिटॉक्स घेतला होता. तब्बल...\n#अल्टिमेटफेनऑफअमृता’ स्पर्धेच्या विजेत्यांसोबत अभिनेत्री अमृता खानविलकर ने सेलिब्रेट केला बर्थ डे.पहा फोटोज.\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ti-ani-me-news/shekhar-tamhane-article-on-savita-damodar-paranjpe-marathi-drama-1632936/", "date_download": "2019-03-25T08:20:28Z", "digest": "sha1:LCBRIJKWLZUI5QJJ45PHGLGUQ2JF4YSH", "length": 26972, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shekhar tamhane article on Savita Damodar Paranjpe Marathi Drama | सविता : एक गूढ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nती आणि मी »\nसविता : एक गूढ\nसविता : एक गूढ\nखरं सांगायचं तर त्या व्यक्तिरेखेचे गूढ आजही मला उकललेले नाही.\nएका उच्चशिक्षित स्त्रीच्या शरीरात एका अशिक्षित मृत स्त्रीचा संचार होणे, ही मृत स्त्री अंगात येताच त्या स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि आवाज बदलणे असा अजब प्रकार घडत होता. त्या घरात मी महिनाभर नोकरीधंदा सोडून बसून होतो. मी स्वत: इंजिनीअर असल्यामुळे भूतप्रेत या संकल्पना मी मान्य करणे शक्यच नव्हते. शेवटी आव्हान म्हणून मी ही अंगात येणारी बाई मृतात्मा आहे हे स्वत:शी मान्य करून या प्रेतात्म्याच्या मानसिकतेचा विचार करू लागलो, प्रेतात्म्याशी चर्चा करू लागलो. हा प्रकार भयानक होता. मात्र त्यातूनच उभी राहिली, सविता दामोदर परांजपे\nमाझी जेवढी व्यावसायिक नाटके आहेत त्यांच्या कथा स्त्री या मध्यवर्ती व्यक्तिरेखेभोवतीच गुंफल्या गेल्या आहेत. या व्यक्तिरेखा मी जवळून किंवा दुरून पाहिल्या आहेत. स्त्री मनातील अंतर्नादाचा शोध हा सर्वच लेखकांच्या आवडीचा विषय राहिला आहे. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे,’ असे म्हटले जाते तेव्हा प्रेयसी आणि माता यामधील मोकळ्या जागा भरताना लेखकाचे संपूर्ण आयुष्य खर्ची पडेल पण त्या मोकळ्या वाटणाऱ्या जागा संपणार नाहीत.\nनाटय़ संकल्पनेची बीजे ही पाहिलेल्या, वाचलेल्या किंवा ऐकलेल्या असाधारण घटनांतून मिळतात तशीच ती भन्नाट व्यक्तिरेखांतूनही मिळतात. याच सदरात फैयाजताईंनी मी लिहिलेल्या ‘वादळवारं’ या नाटकातील ‘अम्मी’ या त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेवर लिहिले आहे. ही ‘अम्मी’ मी प्रभादेवीला असलेल्या अड्डय़ावर पाहिली होती. त्या नाटकातील इतर पात्रेही त्या अड्डय़ावर मला भेटली होती. पण नाटकाची कथा मात्र अगदी तशीच घडली नव्हती. ‘अम्मी’ मला कळली होती, तिला मांडण्यासाठी तशी कथा मला रचावी लागली. काही नाटके घडलेल्या घटनांवर आधारित असतात. तेव्हा व्यक्तिरेखांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागतो. हे असे माझ्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाच्या बाबतीत घडले. त्या सत्य घटनेत मी स्वत: सामील होतो. नाटकातील ‘कुसुम अभ्यंकर’ ही व्यक्तिरेखा अशी का वागते आहे याचा त्या वेळी विचार करून डोक्याचा भुगा झाला होता. खरं सांगायचं तर त्या व्यक्तिरेखेचे गूढ आजही मला उकललेले नाही.\nघडले असे होते की मी त्या काळात (१९८१) ‘निरलॉन’ नामक गोरेगाव स्थित कंपनीत मॅनेजरचे काम करीत होतो. त्या वेळी मी राहायला प्रभादेवीला होतो. अधूनमधून मी वसईला माझ्या मामीकडे राहून कामावर जात असे. कुसुम (नाटकातले नाव) ही मामीची मैत्रीण. तिला सोळा र्वष पोटदुखीचा अधूनमधून अॅटॅक येत असे. ती अक्षरश: गडबडा लोळत असे. अनेक उपचार होऊनही ती बरी होत नव्हती. मी त्या वेळी नावाजलेला (सोकॉल्ड) हस्तरेषातज्ज्ञ होतो. मामीने मला तिच्या या मैत्रिणीचा हात बघायला सांगितले. माझ्या हात बघण्याच्या प्रक्रियेतून उलगडले ते १६ र्वष तिच्या शरीरात (की मनात) हस्तरेषातज्ज्ञ होतो. मामीने मला तिच्या या मैत्रिणीचा हात बघायला सांगितले. माझ्या हात बघण्याच्या प्रक्रियेतून उलगडले ते १६ र्वष तिच्या शरीरात (की मनात) लपलेले प्रेतात्म्याचे आस्तित्व. त्यातून घडत गेले एक भीषण नाटय़\nएका उच्चशिक्षित घराण्यातील उच्चशिक्षित स्त्रीच्या शरीरात अधूनमधून एका अशिक्षित मृत स्त्रीचा संचार होणे, ही मृत स्त्री अंगात येताच त्या स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि आवाज बदलणे असा अजब प्रकार घडत होता. त्या घरात मी महिनाभर नोकरीधंदा सोडून बसून होतो. तिच्या शरीरातील संचार काही काळ असायचा आणि ती शांत झाली की अतिशय साध्या गृहिणीसारखी वागायची. मी स्वत: केमिकल इंजिनीअर असल्यामुळे या गोष्टी भूतप्रेत या संकल्पना मी लगेच मान्य करणे शक्यच नव्हते. वसईचे डॉक्टर कुलुर आणि मुंबईचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गुप्ते यांच्याशी सतत चर्चा व्हायच्या. या विषयातील पुस्तके आणून वाचून काढली. मी खरंतर अनवधानाने यात ओढला गेलो होतो, पण ते एक आव्हान म्हणून स्वीकारले. या प्रकाराची भीषणता नंतर वाढतच गेली. त्यावर वैद्यकीय उपचारांचा काही परिणाम होत नव्हता. मग मी ठरवले की ही अंगात येणारी बाई मृतात्मा आहे हे स्वत:शी मान्य करून या प्रेतात्म्याच्या मानसिकतेच��� विचार करू. मग मी त्या प्रेतात्म्याशी चर्चा करू लागलो (हा प्रकार भयानक होता. घरातले रात्री थांबत नसत. मी रात्री तिच्याशी एकटा बोलायचो.). यातून मार्ग निघाला. महत्त्वाचे म्हणजे ती स्त्री बरी झाली. अथपासून इतिपर्यंत सगळं सांगायला कादंबरी लिहावी लागेल.\nहे सर्व संपल्यावर प्रचंड ताण आला होता. एका बैठकीत मी प्रथम एकांकिका लिहून काढली ती म्हणजे ‘कलकी’. ती प्रचंड गाजली. अर्थात त्या एकांकिकेचा या कथेशी काही संबंध नव्हता. थोडा मानसिकदृष्टय़ा स्थिर झालो तेव्हा पहिल्यांदा या घटनेवर कादंबरी लिहावी असे वाटले होते. पण माझी वैचारिक किंवा मानसिक पातळीवरची देवाणघेवाण एका सुशील साध्या गृहिणीशी तसेच तिच्यात शिरणाऱ्या अशिक्षित जहाल मृत बाईशी संवाद रूपात झाली होती. त्यामुळे नाटक लिहिले.\nमाझे मित्र महेश सावंत यांनी त्यांच्या ‘प्रतिपदा’ या संस्थेतर्फे हे नाटक करावयाचे ठरवले. आजचे आघाडीचे दिग्दर्शक-अभिनेते राजन ताम्हाणे आणि मी त्या काळी अभिनेत्री रिमा लागू यांना गळ घालू शकत होतो (त्यावेळी आम्ही नवोदित असल्यामुळे आम्हाला पटकन इतर कोणी उभे करण्यापैकी नव्हते). रिमा नाटकात काम करायला तयार झाली, पण काही दिवसांनी ती गरोदर असल्याचे तिला कळल्यावर तिचा नाइलाज झाला. त्यामुळे आमच्या पुढे पुन्हा प्रश्न उभा राहिला. आता नटीच्या शोधात दोन पात्रे असा प्रवास सुरू झाला, भक्ती बर्वे, आशालता आणि वगैरे वगैरे. नाटक आणि ही व्यक्तिरेखासुद्धा सर्वाना आवडत होती, पण सगळ्या नको म्हणत होत्या. खरंतर हे नाटक सायकॉलॉजिकल आहे, पण त्याचे बॅकग्राऊंड भिववणारे आहे. भक्ती मला म्हणाली होती, ‘ही सादर करायला कठीण व्यक्तिरेखा आहे. ती मला त्रास देईल, झोपू देणार नाही.’ असा शोध घेता घेता एक वर्ष निघून गेले होते. तोपर्यंत रिमा ‘फ्री’ झाली होती. नाटक सुरू केले. व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा करावा आणि त्यासाठी किती अथक प्रयत्न करावे लागतात हे आजच्या अभिनेत्रींनी (अपवादांनी क्षमा करावी) रिमासारख्या जुन्या अभिनेत्रींकडून शिकावे. आज पंधरा दिवसांत नाटके बसतात. रिमाने\n१७ दिवस माझ्याबरोबर बसून फक्त ‘आवाजात होणारे बदल’ यावर मेहनत घेतली. रिमाने नाटकाचे सोने केले. आज तिची खूप आठवण येतेय. ‘सविता’चे शेकडो प्रयोग झाले. नाटकाच्या मध्यंतरात आणि शेवटीदेखील टाळ्या वाजत नसत. प्रेक्षक थिजल्यासारखे बस��न राहायचे. त्यांना उठायचेसुद्धा भान राहात नसे. मला आठवतं, डॉ. श्रीराम लागू नाटकाला आले होते. नाटक संपल्यावर प्रेक्षक निघून गेले तरी ते एकटेच उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्याच दिवशी संध्याकाळी ‘पॉप्युलर’ प्रकाशनाचे रामदास भटकळ यांचा मला दूरध्वनी आला. तुमच्या नाटकावर डॉक्टरांनी पुस्तक काढायला सांगितलंय. स्क्रिप्ट पाठवा. ‘सविता दामोदर परांजपे’ या पुस्तकाला नंतर राज्य पुरस्कार मिळाला.\nएक नाटककार म्हणून ही व्यक्तिरेखा रंगवताना मी या व्यक्तिरेखेचा लाऊडनेस संपूर्णपणे दाबून ठेवला. जसा फुटलेला ज्वालामुखी आग ओकत असतो, तो पाहताना अंगावर येतो पण कुठेतरी खोल विवरात खदखदणारा ज्वालामुखी मात्र हादरवून टाकतो. मुळात जे माझ्या समोर प्रत्यक्ष घडले ते तसंच नाटकात मांडले असते तर ते अतिरंजित वाटले असते. पण तेच मी घुसमटवले आणि ते प्रेक्षकांच्या अंगावर आले. अर्थात यात माझे बंधू राजन ताम्हाणे यांच्या दिग्दर्शनाचा खूप मोठा वाटा आहेच. कुठलीही व्यक्तिरेखा विशेषत: स्त्रीची ही कॉलिडोस्कोप फिरवून पाहात राहावी लागते. एखादा प्रसंग तसाच घडलेला नसतो पण प्रसंग आवश्यकतेनुसार निर्माण करताना त्या प्रसंगात ती व्यक्ती कशी वागेल याचा विचार करावा लागतो. कधी कधी एखादी व्यक्तिरेखा मी या प्रसंगात अशी नाही वागणार असा हट्ट ही माझ्याशी करते मग मात्र हंटर घेऊन तिला तसे वागायला भाग पाडतो. ही सगळी नाटय़लेखन तंत्राची गंमत आहे.\n‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकातील ‘कुसुम’ या व्यक्तिरेखेकडे नाटककाराने (म्हणजे उदाहरणार्थ मी) त्याला काय वाटतं एवढाच विचार करून चालत नाही. तिच्या नवऱ्याला काय वाटतं, तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय वाटत असावं, याचा विचार करावाच लागतो त्यामुळे मी त्या घटनेत मानसिकदृष्टय़ा जोडला गेलो होतो तरी नाटक लिहिताना मात्र दूर तटस्थ राहून विचार केला. तरी ते सोपं नव्हतं. मी स्वत: त्या नाटय़ातील एक घटक होतो किंबहुना ती घटनाच माझ्यामुळे घडत गेली होती. कुसुम या व्यक्तिरेखेबरोबर मानसिकरीत्या गुंतलेल्या मला स्वत:ला मी नाटककार म्हणून पाहाणे भीषण होते. माझ्या गाजलेल्या ‘तू फक्त हो म्हण’ या नाटकात एक वाक्य आहे, ‘मी त्या पाण्यात माझा चेहरा पाहिला तेव्हा तो भीषण दिसला.. मग मी त्यात गंध मिसळलं आणि ते पाणी पूजेसाठी वापरलं.’ सर्वच नाटकांमध्ये बुद्ध���बळाच्या पटावरच्या सोंगटय़ा खेळवल्या जातात तशी रंगमंचावर नाटककाराला पात्रं खेळवायला लागतात.. निर्विकारपणे.. मात्र माझ्या नाटकांमध्ये त्या सोंगटय़ांतील राणी माझ्याकडे सतत रोखून पाहते. ती मला पाहते की माझ्या आरपार पाहतेय तेच कळत नाही.. आणि तेच हादरवणारं असतं. माझ्या प्रत्येक नाटकात हे असंच घडत असतं मी कितीही निर्विकारपणाचा आव आणला तरी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-10-march-2018/articleshow/63239316.cms", "date_download": "2019-03-25T08:56:30Z", "digest": "sha1:TBUGSPEN2KCYS5GJ2VL644E55676TMT7", "length": 12290, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bhavishya", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nआजचं राशी भविष्य: दि. १० मार्च २०१८\nआजचं राशी भविष्य: दि. १० मार्च २०१८\nमेष: आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल.\nवृषभ: अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. संताप वाटेल आणि त्यामुळे कामे बिघडतील.\nमिथुन: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मित्रमंडळी, भावंडांसोबत वेळ चांगला जाईल. प्रतिस्पर्ध्यांची चाल निष्फळ होईल.\nकर्क: आजचा दिवस शांततेत घालवाल. आकस्मिक खर्च होईल. न���्या कार्याची सुरूवात करण्यासाठी चांगला दिवस. मित्रमंडळी, भावंडांसोबत वेळ चांगला जाईल.\nसिंह: प्रसन्न दिवस. व्यवसायात यश लाभेल.एखादी चांगली वार्ता कानी पडेल. एखाद्या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहाल.\nकन्या: घरात वाद होतील. घरातील लोकांचे मन दुखावल्याने तुम्ही दु:खी व्हाल. आरोग्य चांगले राहील. मन चिंतेत राहील. नकारात्मक विचार तुम्हाला अस्वस्थ करतील.\nतुळ: धार्मिक यात्रा घडेल. नव्या कार्याचा शुभारंभ होईल. विदेशातून एखादी चांगली वार्ता कानी पडेल. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लाभदायी दिवस. तब्येत बिघडण्याची भीती.\nवृश्चिक: आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असेल. नकारात्मक विचारामुळे नैराश्य येईल.अनावश्यक खर्च जास्त होईल. विद्यार्थ्यांसाठी तितकासा चांगला दिवस नाही.\nधनु: व्यवसाय करणाऱ्यांसाठी लाभदायी दिवस. घरातही सुख-शांती नांदेल. व्यवसायाच्या ठिकाणी सहकारी आपले सहाय्यक बनतील. दुपारनंतर भरपूर मनोरंजनाचा योग आहे.\nमकर: धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरातील सदस्यांशी भांडण होण्याची शक्यता. अस्वस्थता वाढेल. वाणीवर संयम ठेवा.\nकुंभ: कार्यात यश येईल. घरात सुख-शांतीचं वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील.आकस्मिक धनलाभ होईल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस.\nमीन: लाभदायक दिवस. खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. सामाजिक क्षेत्र, नोकरी-व्यवसायात लाभ होईल.वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आरोग्य चांगले राहील.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० मार���च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २३ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २४ मार्च २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचं राशी भविष्य: दि. १० मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. ९ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. ८ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. ०७ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. ०६ मार्च २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%80-2/", "date_download": "2019-03-25T07:54:40Z", "digest": "sha1:BCEH5DEQ7LWGJT5VHSM7533JLVO3BA7X", "length": 7012, "nlines": 81, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "जिथे जिथे मी . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nजिथे जिथे मी . .\nवा. न. सरदेसाई November 1, 2018 अक्षरगणवृत्तातील, गझल\nगण : | लक्षणे : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा\nगण : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा\nजिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . .\nनिघून आलो जरी इथे मी, हवा तिथे पोचलोच नाही \nघरे तुम्हांसारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे . .\nमुक्या कड्यांना बघून माझ्या मनातले बोललोच नाही \nखुशाल , चिंधी म्हणून जो तो , मला जरी ठोकरून गेला ,\nअसून मी फूल जायबंदी , तसा कुणा वाटलोच नाही \nतुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहर्यांचा . .\nखरे हसू मातिमोल येथे , म्हणून मी हासलोच नही \nउरी उमाळ्याशिवाय दिंडया कितीक दारावरून गेल्या . .\nदुरून मी फक्त पाहिल्या अन् मधे कधी नाचलोच नाही \nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/tula-pahte-re-marriage/", "date_download": "2019-03-25T07:57:41Z", "digest": "sha1:6TTNCA3KPUUXUVNGU56BRWZWWSVPFXJZ", "length": 1862, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " tula pahte re marriage - मराठी कलाकार", "raw_content": "\nविक्रांत आणि ईशाच्या लग्नसोहळ्याची पत्रिका तब्बल दीड लाखांची\nअभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार ही वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळली...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/major-fire-at-a-chemical-factory-in-thane/articleshow/63224727.cms", "date_download": "2019-03-25T08:59:09Z", "digest": "sha1:DQS6ASGUKCVCZHQBVT6KYTBDEAJBG75P", "length": 13164, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: बोईसर एमआयडीसीत भीषण आग; ३ ठार - major fire at a chemical factory in thane | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nबोईसर एमआयडीसीत भीषण आग; ३ ठार\nपालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील एका कारखान्यात काल रात्री बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीनजण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. आगीची झळ एमआयडीसीतील इतर तीन केमिकल कारखान्यांना बसल्यानं एकामागोमाग एक अनेक स्फोट झाले.\nभारताचा POKमध्ये हल्ला; १०...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींच...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट...\nपालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील एका कारखान्यात काल रात्री बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीनजण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. आगीची झळ एमआयडीसीतील इतर तीन केमिकल कारखान्यांना बसल्यानं एकामागोमाग एक अनेक स्फोट झाले. सुमारे दीड तास स्फोटांचे आवाज सुरू होते. या स्फोटांमुळं पालघर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांनाही हादरे बसले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्यानं स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली होती.\nबोईसर एमआयडीसीतील झोन सातमध्ये असलेल्या नोवाफिन केमिकल कंपनीच्या कारखान्यात रात्री साडेअकराच्या सुमारास पहिला स्फोट झाला. कारखान्यातील बॉयलरचा हा स्फोट होता. या स्फोटामुळं कारखान्यात भीषण आग लागली. संपूर्ण कारखाना आगीत खाक झाला आणि बघता बघता संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. ही आग शेजारच्या तीन केमिकल कारखान्यांमध्ये पसरल्यानं स्फोटांची मालिकाच सुरू झाली. या दुर्घटनेत आरती कंपनीतील पिंटू कुमार गौतम, जनू अडारिया आणि अलोक नाथ या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. आग नियंत्रणात आणण्यात यश आलं असलं तरी मधूनच धुमसणाऱ्या आगीवर अग्निशमन दलाचे जवान लक्ष ठेवून आहेत.\n...आणि लोक घरं सोडून पळाले\nबोईसर एमआयडीसीत झालेले स्फोट इतके भीषण होते की त्यामुळं सुमारे २० किलोमीटरचा परिसर हादरून गेला. पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणीसह अनेक गावांत हादरे जाणवले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्यानं लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागी जमा झाले. सर्वत्र एकच घबराट उडाली होती. मात्र, हा भूकंप नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.\n>> संजय जावडे (वय २५)\n>> कैलास कुमार (२०)\n>> दिनेश कुमार (२१)\n>> सुनिल कुमार (२१)\n>> सचिन राठोड (१९)\n>> कैलास सोनावणे (२५)\n>> उदय यादव (४��)\n>> वक्सेत सिंग (६०)\n>> मुकेश रावत (२४)\n>> सुनिल यादव (२१)\n>> उरविंद विश्वकर्मा (२०)\nIn Videos: बोईसर एमआयडीसीत भीषण आग\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:बोईसर एमआयडीसी|बोईसर आग|पालघर|boisar midc blast|Boiler Blast\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nवसई: समुद्रात बुडालेल्या पाचही जणांचे मृतदेह सापडले\nभालचंद्र कोल्हटकर यांचे निधन\nदुबईच्या मॉलमध्ये डोंबिवलीची पुरणपोळी\nमोखाडा घाटात बस कोसळून ४ ठार, ४५ जखमी\nअर्नाळाच्या समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबोईसर एमआयडीसीत भीषण आग; ३ ठार...\nरेल्वे सुरक्षा दलातील महिलेला धक्काबुक्की...\nमहिला दिनाला आरोग्याचा मंत्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.farmguru.in/new-blog/2015/12/30/--1", "date_download": "2019-03-25T08:14:23Z", "digest": "sha1:4QMPDDJTAR4GLIRFAPSN4PJDX5SAYMVD", "length": 2684, "nlines": 34, "source_domain": "www.farmguru.in", "title": "सीड्स ग्रुप कॅम्पेन — farmguru", "raw_content": "\n२९ डिसेंबर २०१५ पर्यंत\nफार्मगुरू घेऊन येत आहे \"सीड्स ग्रुप कॅम्पेन \" विश्वसनीय ब्रॅण्ड सिंजेन्टाचे. यामध्ये सर्वात्तम विक्री असलेले टोमॅटो बियाणे समाविष्ट आहेत . अभिनव सेमी-डिटरमीनेट व्हेराइटी आणि १०५७ डिटरमीनेट व्हेराइटी, हे दोन्ही फळे चांगली ठेवणे गुणवत्ता , चांगले गरम संच आणि उच्च उत्पन्न क्षमता असलेले व्हेराइटी आहेत. या व्हेराइटीज मध्ये पिवळे पान वलय व्हारस (TYLCV ) पर्यंत सहन करण्याची क्षमता आहे आणि लांब अंतर वाहतुकीसाठी योग्य आहेत.\nसिंजेन्टा कलिंगड मध्ये सुगर क्वीन एक उच्च उत्पन्न, उत्कृष्ट गुणवत्ता फळ व्हेराइटी असून कलिंगड मध्ये सगळ्यात जास्त विक्री होणारी व्हेराइटी आहे.\n१०० % मूळ उत्पादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/nachate-kahi/", "date_download": "2019-03-25T07:46:15Z", "digest": "sha1:ZGTCE5OW2SIRAQKLGKZRDUMJSTWQTWYD", "length": 6109, "nlines": 69, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nनाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे\nनाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे\nप्रेम त्याचे नाव, माझ्या तेच रे हृदया हवे, तेच रे हृदया हवे\nकोठुनी येते कळेना ही सुगंधी भावना\nभावनेच्या पूजनाने पूर्णता ये जीवना\nवाटते प्रेमात न्हावे, प्रीतीने बेहोष व्हावे\nमी मला विसरून जावे अन् तुझ्या हृदयी रहावे\nचंद्रमा गगनात येत विश्व सारे धवळते\nप्रीत हृदयी प्रकट होता द्वैत सारे वितळते\nआई मला क्षमा कर\nफिल्मिस्तानमध्येच आठवले यांच्या एका सहकार्याने दिग्दर्शित केलेल्या आई मला क्षमा कर' या चित्रासाठी त्यांनी गीते लिहिली आणि त्यात एक ख्रिश्चन पाद्र्याची भूमिकाही केली. राम कदम यांचेच संगीत होते. त्यातील सुधीर फडके यांच्या आवाजातील 'आई आई ए आई' हे गाणे ऐकलेच पाहिजे असे आहे. त्यातील 'नाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे' हे द्वंद्वगीत अतिशय वेगळे आणि म्हणून वैशिष्ठ्यपूर्ण आहे. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी ते गायले आहे.\nआई आई, ए आई\nनाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2019-03-25T07:24:14Z", "digest": "sha1:Z56XUHLHRPGSTO3DI7IIFEM7OEARCRBU", "length": 9524, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘बबन’चे सिंगापूरमध्ये होणार खास स्क्रीनिंग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘बबन’चे सिंगापूरमध्ये होणार खास स्क्रीनिंग\nभाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित चित्रपट ‘बबन’ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मराठी लोकांना चित्रपटाचा आस्वाद घेता यावे यासाठी तेथील स्थानिक सिनेरसिकांनी ‘बबन’च्या खास स्क्रीनिंगची मागणी केली आहे. यानुसार सिंगापूरमध्ये ‘बबन’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी दाखविण्यात येणार आहे.\nया चित्रपटात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव हे मध्यवर्ती भूमिकेत आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या कथेसोबत यातील गाणीही सुपरहिट ठरली आहेत. महाराष्ट्रातील यशानंतर बबन आता सिंगापूरमध्येही आपली कमाल दाखवणार हे निश्चित आहे.\nसलग दुसऱ्यांदा अक्षय कुमारच्या सिनेमाला पायरसीचे ग्रहण\n‘कोण होणार करोडपती’ मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक\nकतरिनाने घेतली 65 लाखांची कार\nअजय देवगण आणखी एका युद्धपटाचा नायक\nधर्मेंद्र यांनी केली शेती करायला सुरुवात\nआलिया भटकडून ड्रायव्हर आणि हेल्परला घराची भेट\nट्रोल करणा-यांना करिना कपूरचे सडेतोड उत्तर\n“आरआरआर’मध्ये झळकणार अजय देवगण\nसायनाच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूरची एक्झिट\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Debris-of-toilets-in-Majalgaon/", "date_download": "2019-03-25T07:46:39Z", "digest": "sha1:XXP5QM4DSJZUULFSPS4WEWXTYLFNGOWE", "length": 5035, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजलगावमध्ये शौचालयांचा बोजवारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › माजलगावमध्ये शौचालयांचा बोजवारा\nमाजलगाव : सुभाष नाकलगावकर\nशहर पाणंदमुक्त करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहेत. या शौचालयांचा आता बोजवारा उडाल्याने हे शौचालय केवळ राज्य व केंद्राच्या पथकाला दाखविण्यासाठी बांधले होते का असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.\nशहरातील काही नागरिकांनी शौचालय न बांधता केवळ अनुदान उचलल्याचीही चर्चा आहे. सर्वांना शौचालय बांधावयास लावण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांचा पालिकेला तगादा आहे. यामुळे काहींचे कागदोपत्रीच शौचालय पूर्ण दाखविण्यात आल्याचीही चर्चा आहे.पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले आहे. यावर लाखोंची उधळण झाली आहे. आता हे शौचालय केवळ शोभेची वास्तू झाले आहेत. प्रभाग क्र.2 मध्ये बांधण्यात आलेल्या दोन शैचालयात पाण्यासह नळाच्��ा तोट्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या होत्या. मात्र आज त्या ठिकाणी हे सर्व गायब झाले आहे. बोरवेल मधील पाण्याची मोटारसह सर्व वस्तूही गायब आहेत. या शौचालयाची मोडतोड केल्यामुळे शौचालयाचा बोजवारा उडाला आहे. या कडे लक्ष देण्यास न. प. ची सक्षम यंत्रणा नसल्याने याच पद्धतीने शहरातील सर्वच सार्वजनिक शौचालयाची अशी दुरवस्था झाली आहे. केवळ कागदावरच माजलगाव शहर हगणदारी मुक्त झाले आसल्याचे यामुळे दिसून येत आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/vinit-bonde-movie-kalas/", "date_download": "2019-03-25T08:34:13Z", "digest": "sha1:6DGXKNVRQRTC3SBGRLMD4RKYW3ARSHSJ", "length": 1834, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": "vinit bonde movie kalas - मराठी कलाकार", "raw_content": "\nबरेच दिवस सिनेमापासून दूर असणारा विनीत सध्या “हे” करतोय.वाचा अधिक बातमी.\nअभिनेता विनीत भोंडेचे ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पदार्पण झाले, अगदी अचानक...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-03-25T07:40:43Z", "digest": "sha1:5ZKHBAOHPE6SCXO6CVZGNANMHA3AQ7XF", "length": 4869, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जागतिक एड्स दिन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इत��� विस्तार विनंत्या पाहा.\nदरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे.\nहे सुद्धा पहा : जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय दिवस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१९ रोजी ०८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/china-making-600-projects/", "date_download": "2019-03-25T07:43:38Z", "digest": "sha1:CBI4ENLLFGFPX6LYDOTQFHWMTBFNW2CX", "length": 24341, "nlines": 135, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून चीन अख्ख्या जगाला कवेत घेतंय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून चीन अख्ख्या जगाला कवेत घेतंय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nजगाला नेहमीच कुतूहल असणारा देश म्हणजे चीन. आज चीनची वाटचाल महासत्ता म्हणून वेगाने होत आहे. चीन या देशाबद्दल जगभरात विविध मतमतांतरे आहेत. त्यामुळे चीन बद्दल जाणून घेण्यास सारेच उत्सुक असतात.\nचीनने अनेक क्षेत्रात आज जे काही यश मिळवले आहे त्यात विशेष नमूद करण्यासारखे एक कारण म्हणजे त्यांची प्रयोगशीलता\nक्षेत्र कुठलेही असो अगदी सुरुवातीपासून बघायचे झाल्यास शेती,लोकसंख्या, पायाभूत सुविधा ते आजचे तंत्रज्ञान, आपले लक्ष्य साध्य करताना त्यांनी जी पावले उचलली त्याची चर्चा नेहमीच होत आली आहे.\nजगाचे उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणारा चीन आता जगभरात आपले स्थान निर्माण करत आहे.\nजगातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात चीन आपले योगदान देत आहे. अर्थात यामागे काही परोपकार ही भावना नाही. जगभरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी केलेला हा पद्धतशीर प्रयत्न आहे.\nगेल्या दशकभरापासून चीनने जगभरात आपले हातपाय पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहे. त्यामुळेच की काय जगातील एकमेव महासत्ता म्हणून बिरूद मिरवणारी अमेरिका या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहे.\nकाही दिवसांपूर्वी द न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकेतील वृत्तपत्रात चीन जगाला कसं कवेत घेत आहे, याविषयी एक लेख आला होता. “द वर्ल्ड, बिल्ट बाय चायना” हे लेखाचं शिर्षकच बरंच काही सांगून जाणारं होतं.\nअत्यंत अभ्यासपूर्ण आणि संशोधन करून डेरेक वॉटकिन्स, के के रेबेका लाय, केथ ब्रॅडशर यांनी चीनच्या वाढत्या प्रभावाविषयी लेख लिहिला होता. त्या लेखाचा सारांश हा पुढील प्रमाणे सांगता येईल.\nजागतिक व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये चीन आज अग्रेसर आहे. यामुळे चीनचे इतर देशांशी असलेले आर्थिक आणि भू-राजकीय संबंध बीजिंगच्या जवळ जाणारे निर्माण झाले आहेत.\nहा आधुनिक युगातला चीनचा मार्शल प्लान आहे जो चीनला अनुकूल असणाऱ्या सैनिकी आणि राजनैतिक आघाडी निर्माण करण्यासाठीचे एक साधन आहे.\nचीनने यासाठी जे तंत्र वापरले आहे, ते आक्रमक, महाग आणि मोठी जोखीम पत्करणारे आहे. चीनचा विविध देशांमध्ये येणारा हा पैसा काही विशिष्ट नियमांना अनुसरून येत नाही.\nअनुदान, कर्ज, गुंतवणूक अशा विविध मार्गांनी तो येत असतो, मात्र यामुळे संबंधित देशाचं सार्वभौमत्व कुठेतरी पणाला लागत असतं.\nया लेखाच्या अनुषंगाने अभ्यासकांनी गेल्या दशकभरातील चिनी उभारलेल्या सहाशे प्रकल्पांचा अभ्यास केला. ज्यात चीनने विविध मार्गाने आपला सहभाग नोंदवला.\nत्यातून निघालेला एकंदरीत निष्कर्ष म्हणजे हे प्रकल्प राबवण्यामागे चीनची प्रेरणा आणि चीनचे धोरण यात कमालीची पूरकता आहे.\nजगभरात चीनने राबवलेले काही महत्त्वाचे प्रकल्प\nचीनने सर्वप्रथम आजूबाजूंच्या देशांवर लक्ष केंद्रित करून गॅस आणि इंधन वाहून नेणाऱ्या ४१ पाईपलाईनचे काम हाती घेतले. एकप्रकारे त्यांनी यातून आपले इंधन स्त्रोत अधिक मजबूत केले.\nजगभरात दळणवळणासाठी २०३ पूल, रस्ते आणि रेल्वेमार्गांची निर्मिती हा यातील दुसरा टप्पा सांगता येईल. यामुळे संबंधित देशांची पायाभूत सुविधा विकसित झाले असे भासत असले तरी चिनी उत्पादन जगभरात वाहून नेण्यासाठी ही यंत्रणा तितकीच आवश्यक होती.\nजगभरातील विविध देशांमध्ये चीनने १९९ ऊर्जा प्रकल्प उभारले यात कोळशावर आधारित, नॅचरल गॅस, आण्विक आणि अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांचा समावेश होता.\nयासाठी संबंधित देशाला कर्ज पुरवठा करणे, त्यानंतर चीन मधील तंत्रज्ञान वापरून चीन मधील कंपन्यांच्या सहाय्याने हे प्रकल्प उभारले जातात. यामुळे एक प्रकारे चीनच्या बाजारपेठेचा विस्तार होत असतो.\nवन बेल्ट वन रोड हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तर सर्वांनाच ज्ञात आहे. यातून चीनच्या बाजारपेठेचा विस्तार आपल्या सीमेबाहेर अधिक सहज होणार आहे. चीनने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे तंत्र आपल्या देशात विकसित करून, त्यावर हुकूमत गाजवत जगभर नेण्याचे ठरवले आहे आणि यात ते यशस्वी होतांना दिसत आहे.\nकंबोडियामध्ये चींनने सात धरणांवर जलविद्युत प्रकल्प उभारले आहेत. शिवाय त्यासाठी अर्थपुरवठा देखील केला आहे. हे प्रकल्प किती मोठे आहे तर कंबोडियाची विजेची अर्धी गरज या प्रकल्पातून पूर्ण होते.\nआफ्रिकेमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पांची उभारणी केली आहे आणि त्यासाठी पैसाही पुरवला आहे.\nजगभरात चीनने असे ६३ प्रकल्प उभारले आहेत. तुलना करायची झाल्यास, यातून निर्माण होणारे प्रदूषण हे स्पेन या देशातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणापेक्षा अधिक आहे.\nअजून एक उदाहरण घ्यायचे झाल्यास, झंबिया या देशामध्ये चीन पन्नास हजार आसन क्षमतेचे फुटबॉल मैदान उभारत आहे. यातून चीन नक्की काय साध्य करतो आहे तर ते म्हणजे नवीन मित्र मिळवणे आणि आपल्या बाजारपेठेचा विस्तार करणे.\nजगभरातील विविध क्षेत्रात चीनला मित्रांची गरज आहे. त्यासाठी चीन मोठे प्रयत्न करताना दिसतो. पाकिस्तान,श्रीलंका, मलेशिया येथे उभारलेले मोठी बंदरे ही त्याचीच उदाहरणे आहेत.\nमध्य आशियातून येणारे तेल आणि आफ्रिकेत होणाऱ्या व्यापारासाठी तळ निर्माण करणे गरजेचे होते.ही त्यामागची रणनीती गुंतवणूक करून सहज साध्य होते आहे.\nयामध्ये असणारे काही धोके\nहे सर्व करत असताना चीन पतपुरवठा जरी करत असला तरी चीन आपल्या देशातील मजूर तिथे पाठवत असतो,यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला वाव राहत नाही. शिवाय सुरक्षा मालकांकडे देखील दुर्लक्ष केले जाते.\nप्रदूषण निर्माण करणारे कालबाह्य तंत्रज्ञान याला चीन मधील विरोध होताना दिसतो ते या देशांवर थोपवले जाते.\nशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर चीन भांडवल पुरवत असले तरी परतफेड न होण्याचा धोका आहेच. चीनच्या लोखंडी पडद्याआड या बाबी दिसत नसल्या तरी हा फुगा फुटला तर चीनच काय सारे जग यामुळे प्रभावित होईल.\nमहाकाय प्रकल्प आणि जोखीम\nइतक्या मोठ्या प्रमाणावर हे प्रकल्प राबवले जात असले तरी संबंधित देशांना त्याची परतफेड करणे गरजेचे होऊन जाते. श्रीलंकेतील हरबनटोटा बंदराचे उदाहरण अलीकडचे आहे.\nश्रीलंकन सरकार कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने चीनने ९९ वर्षांचा करार करत हे बंदर आपल्या ताब्यात घेतले. याचे श्रीलंकेत आणि जगभरातील अभ्यासकांमध्ये मोठे पडसाद उमटले.\nचीनने अवलंबलेल्या या नितीविरुद्ध जगभरातून टीकेचे सूर उमटत आहेत. अर्थात चीनला त्याची काही पर्वा नाही. न्यूयॉर्क टाइम्स मधील हा लेख अमेरिकेचा चीन प्रती असणारा दृष्टिकोनदेखील दर्शवतो.\nअमेरिकेने देखील यापूर्वी हेच केले आहे, पण चीन हे सर्व अधिक आक्रमकपणे, महाकाय पद्धतीने आणि मोठ्या गतीने करताना दिसतो आहे.\nज्यावेळेस अमेरिका आपल्या हितसंबंधांसाठी अशा प्रकारची शिष्टाई करत असे त्याला “चेकबुक शिष्टाई” असे म्हणत.\nचीन सध्या जगभर आपला प्रभाव वाढवण्यासाठी राजनैतिक सिद्धांताद्वारे जे साध्य होत नाही, त्या बाबी आर्थिक साह्य किंवा गुंतवणुकीच्या सहाय्याने साध्य करायचे, आपले प्रभाव क्षेत्र वाढवायचे हे धोरण राबवत आहे असा त्याचा अर्थ आहे.\nभारतीय दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास हे भारतासाठी ही चिंताजनक आहे. भारतावर परकीय आक्रमणांचा मोठा इतिहास आहे. त्याची अनेक कारण आजवर सांगितली गेलीत.\nत्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे आपल्याला विदेशी परिस्थितीचा व विदेशी राजकारणाचा पुरेसा अंदाज आला नाही.\nइतिहासाकडून आपण जर काही शिकलो असलो तर चीनचे वाढते प्रभावक्षेत्र आपल्या केवळ चिंतेचा विषय नाही तर अभ्यास आणि पर्यायी नीती विकसित करण्याकडे असला पाहिजे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो\nअटलजींच्या स्मृतींना आगळी सलामी देणारं १०० रुपयांचं नाणं →\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nधोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय\n‘अंडी’ देणाऱ्या एका खडकाने वैज्ञानिकांची झोप उडवली आहे\nनाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा\n‘��ंभोगवेड्या’ माणसासाठी – अरे वेड्या तू चुकीच्या गोष्टीत अडकला आहेस\nलढण्याची प्रेरणा देणारी आमची आजी\n“भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं” : नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं\n“कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत\n चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास : भाग १\nकंप्युटरइतक्याच जलद गतीने गणितं सोडवणाऱ्या शकुंतला देवींची कथा\nतमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील नेमका फरक समजून घ्या\nपुणे अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात असा रहस्यमयरित्या मारला गेला होता\nरुस्तम मागची कहाणी अन् कहाणी मागचा रुस्तम\nकोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल\nभगवान विष्णूचं “सर्वात मोठं मंदिर” भारताबाहेर आहे आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे\nअसा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास\nआता स्वर्गातही क्रिकेटचे तेज तळपेल.. कारण माझे गुरू आता तिथेही पोहचले आहेत.\nराफेलबद्दल अपप्रचार करणाऱ्याना सणसणीत चपराक देणाऱ्या न्यायालयाच्या ९ टिपण्या\n…आणि शोभा डेंची मुंबई पोलिसांनी ‘शोभा’ काढली\nरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायचा वापर करून कुली झालाय क्लास वन ऑफिसर \nहा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय\nअवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी\nतुम्ही वापरत असलेलं प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही- हे वाचा आणि सतर्क व्हा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/inquiry-into-the-palghar-evm-machine/", "date_download": "2019-03-25T08:12:13Z", "digest": "sha1:4F5EBTEMHB6MK7H43RFIJXXPIV4FKEFR", "length": 5306, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर ईव्हीएम मशीनप्रकरणाची सखोल चौकशी करा – नवाब मलिक", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टा���ाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nपालघर ईव्हीएम मशीनप्रकरणाची सखोल चौकशी करा – नवाब मलिक\nमुंबई – पालघर लोकसभा निवडणूकीमध्ये खाजगी गाडीमध्ये ईव्हीएम मशीन मिळाले याचा अर्थ काहीतरी गडबड झालेली असून याची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.\nपालघर लोकसभा निवडणूकीमध्ये मतदान प्रक्रियेनंतर एका खाजगी गाडीने ईव्हीएम मशीन नेण्याचा प्रकार समोर आल्यानंतर यामध्ये काहीतरी पाणी मुरते आहे असा संशय नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.\nखाजगी गाडीतून ईव्हीएम मशीन नेण्याबाबत जिल्हाधिकारी कितीही खुलासा करु देत परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सरकारी गाडीऐवजी एका खाजगी गाडीचा वापर केला आहे. ईव्हीएम खाजगी गाडीतून नेण्याचा प्रकार झाल्याने यातूनच काहीतरी गडबड झाली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nचाचा चौधरी पुस्तकातून पंतप्रधान मोदी चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाही – नवाब मलिक\n‘महात्मा गांधींच्या ऐवजी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हवा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ncp-leader-rameshwar-misal-arrested-by-police/", "date_download": "2019-03-25T08:11:00Z", "digest": "sha1:YWBYWAJFGXNRPWMQKBJ52BYSQDFOTE2I", "length": 5474, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी अटक", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nराष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी अटक\nपंढरपूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीवर पडलेल्या 70 लाखांच्या दरोडा प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे .रामेश्वर मासाळ यांच्यासह दरोडा प्रकरणातील 6 आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालच्या तपासात पोलिसांनी या आरोपींकडून 31 लाखांची रोकड जप्त केली आहे.\nअटकेत असलेला रामेश्वर मासाळ हा अजित पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखला जात होता.दरम्यान या दरोड्याचा बनाव रचल्याच्या कारणावरुन बँक व्यवस्थापक अमोल भोसले आणि दरोड्यातील आरोपी भाऊसाहेब कोळेकर याना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून मासाळ हा या गुन्ह्यातील तिसरा आरोपी बनला आहे.या बँक दरोडा प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले असून दरोड्यातील उर्वरित रकमेचा शोध आता पोलीस घेत आहेत.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nपुण्यात अज्ञातानं जाळल्या 8 दुचाकी\nव्हॉट्सअॅपवर नरेंद्र मोदींची खिल्ली उडविणे पत्रकारास पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-TomatoDBT6.html", "date_download": "2019-03-25T07:52:29Z", "digest": "sha1:QRKQJ62PDXMJFNG2R7JSZZM6456FG6NY", "length": 3690, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - धोधो पावसातही टोमॅटो प्लॉट निरोगी", "raw_content": "\nधोधो पावसातही टोमॅटो प्लॉट निरोगी\nश्री. दौलत काशिनाथ भवर, मु.पो. गणेशगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक\nनामधारी उत्सव ८ पाकिटे अर्धा लिटर पाण्यामध्ये जर्मिनेटर ३० मिली घेऊन त्याद्रावणात ६ तास भिजवुन नंतर वाफ्यावर टाकले. उगवण ९९% झाली. रोपे जळी पडणे (वाळून जाणे), मर होणे, गळ पडणे असे आमच्या वाफ्यावरती घडलेच नाही.\nरोपांची लागवड केल्यानंतर पाऊस जोरात चालू होता. त्यामुळे प्लॉटमध्ये पाणीच पाणी झाले होते. आता प्लॉट गेल्यात जमा होणार तेव्हा तिसऱ्या दिवशी १५ लिटर पंपास थ्राईवर ५० मिली, क्रॉपशाईनर ५० मिली व किटकनाशक घेऊन फवारणी केली. ही फवारणी चालू असताना आजूबाजूचे शेतकरी मला वेड्यात काढत होते की, तु विनाकारण खर्च करत आहे. शेजारील प्लॉटमधील रोपे पा��्यामुळे गेली. आमच्या प्लॉटमधील सर्व रोपे तरारून आली. थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ७५० मिली २०० लि. पाणी अशा १० दिवसाच्या अंतराने फवारण्या केल्या. एकंदर ४ फवारण्या झाल्या. टोमॅटोमध्ये फुटवा, बगल फुटी जोरात निघाल्या. फुलकळी मोठ्या प्रमाणात आली. पाने रुंद व रफ झाली. पत्तीचे पोषण चांगले झाल्यामुळे टोमॅटोची वाढ झपाट्याने झाली. तारेवर लवकर बांधण्यास आली. पानाला काळोखी चांगलंही आली. व्हायरस, नागआळी, घुबडया अजिबात आलेला नाही. फुलगळ झाली नाही. पुढच्या फवारणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर बरोबर फळाचे पोषण होण्यासाठी राईपनर घेत आहे. प्लॉटमध्ये दुरी निघेल (खोडवा घेता येईल) अशी अपेक्षा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-washim-jalayukta-shivar-helped-jamdara-village-and-rabbi-crops-4040", "date_download": "2019-03-25T07:29:42Z", "digest": "sha1:TO6OESD6TT2FVFVFMUL4QN5Y6QRUENRM", "length": 4045, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news washim jalayukta shivar helped jamdara village and rabbi crops | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nवाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nवाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nवाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nवाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nजलयुक्त शिवारमुळे झाली जलक्रांती; वाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nVideo of जलयुक्त शिवारमुळे झाली जलक्रांती; वाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nजलयुक्त शिवारमुळे झाली जलक्रांती; वाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nजलयुक्त शिवारमुळे झाली जलक्रांती; वाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/marath-action-movie-fight/", "date_download": "2019-03-25T08:29:11Z", "digest": "sha1:QSCEWOVBKPBSYXD4PGCJMMOL4B4PNPRB", "length": 8176, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "मराठी सिनेमातील हाय क्वालिटी ऍक्शनपॅक 'फाईट'.आगामी सिनेमा.", "raw_content": "\nमराठी सिन���मातील हाय क्वालिटी ऍक्शनपॅक ‘फाईट’.आगामी सिनेमा.\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nफॅन्स पसंत करतायत”ह्या”चौघांची जोडी.पहा व्हीडिओ.\nमराठी सिनेमातील हाय क्वालिटी ऍक्शनपॅक ‘फाईट’.आगामी सिनेमा.\nटिपिकल लव्हस्टोरीज, कॉमेडी, फॅमिली ड्रामा ह्या जॉनरची कित्येक दर्जेदार सिनेमे मराठी इंडस्ट्रीने प्रेक्षकवर्गांच्या भेटीस आणले आहेत. ऍक्शन जॉनरची गोष्ट आली कि मात्र त्यात अगदी सुमार सिनेमे आपल्याला बघायला मिळतात, मात्र इंडस्ट्रीतील हि भर भरून काढण्यासाठी आता एक नवाकोरा, करकरीत ऍक्शन सिनेमा आपल्या भेटीस येणार असून त्याचं नाव ‘फाईट’ असं आहे. सिनेमा अगदीच वेगळ्या प्रकारातील दिसत असून यातील ऍक्शन अगदी हाय क्वालिटी आहे.\nफ्युचर एक्स प्रोडक्शनची निर्मिती असलेला ह्या सिनेमातून डॅशिंग हिरो ‘जीत’ आपलं पदार्पण करणार आहे. सिनेमाचं टिझर पोस्टर अगदी ऍक्शन हिरो अवतारातील असून सिनेमाचे निर्माते ललित ओसवाल आणि सिनेमाची संपूर्ण टीम सिनेमाबद्दल विश्वासपूर्ण असल्याचं दिसत आहे. मराठी सिनेमातील हाय क्वालिटी फाईटिंग ऍक्शन असलेला हा सिनेमा सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस येईल असा विश्वास आहे.\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nफॅन्स पसंत करतायत”ह्या”चौघांची जोडी.पहा व्हीडिओ.\nप्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची” कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.\nचाहत्यांनी जिला डोक्यावर घेतलं होतं ती आर्ची आता बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा भेटीस येणार आहे. हो हो\nराधिका आपटे-नवाजुद्दिन”ह्या”सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र.\nनेटफ्लिक्स वरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’नंतर नवाजुद्दिन सिद्दीकी आणि राधिका आपटे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र...\n‘ह्या’मराठी अभिनेत्याला मिळालं क्रिकेटर वडिलांची भुमिका साकारण्याचं भाग्य.\nहल्ली ‘एटी थ्री’ हा रणवीर सिंगचा सिनेमा बराच चर्चेत आहे. भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा ‘८३’...\nएका स्मार्टफोन मध्ये शूट होतोय”हा”मराठी सिनेमा.वाचा अधिक.\nएक असाही चित्रपट आहे जो मोबाईल मध्ये शूट झाला आहे असं कळलं तर\n“दादा कोंडके”हे माझे आवडते कलाकार-नवाजुद्दीन.अनुभवा त्याचा वोचमेन ते ऍक्टर प्रवास.\n‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टीमने कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये हजेरी लावली. चित्रपट...\nकधीही न साकारलेल्या भूमिकेत दिसणार अभिनेता शरद केळकर. केला “माधुरी” चा टिझर शेअर.\nपु.लं च्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’. पहा टिझर\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2019-03-25T07:46:02Z", "digest": "sha1:JVPPJQGW3V7CFJD2OYRIWK2XWQVDBEIO", "length": 8003, "nlines": 50, "source_domain": "vicharpravah.in", "title": "मायक्रोसॉफ्ट ऑफिस कमीत कमी दरात कसे विकत घ्यावे? - विचारप्रवाह", "raw_content": "\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस कमीत कमी दरात कसे विकत घ्यावे\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस कसे विकत घ्यावे ते आपण पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने पाहणार आहोत.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस का विकत घ्यावे\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, वनड्राइव्ह अशा निरनिराळ्या अॅप्लिकेशन्सचा समावेश होतो. आपल्याला जर या साऱ्या ॲप्लिकेशन्सचे वेळोवेळी अपडेट्स हवे असतील किंवा जर अगदी स्वस्तात क्लाऊड स्टोरेज हवे असेल, तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घ्यावे लागते.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिसचा कोणता प्रकार विकत घ्यावा\nसर्वसाधारण ग्राहकासाठी ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस पर्सनल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम’ असे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस पर्सनलचा उपयोग केवळ एक जण करू शकतो, तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस होमचा वापर एकूण पाच जण करू शकतात. असे असले तरी या दोन प्रॉडक्टच्या किमतींमध्ये केवळ दीड हजार रुपयांचे अंतर आहे. तेंव्हा आपली एकंदरीत गरज लक्षात घेऊन आपण स्वतः योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांना मायक्रोसॉफ्ट ऑफिसची गरज ��सेल किंवा आपल्याला स्वतःला जर १ टीबी हून अधिक क्लाऊड स्टोरेज लागत असेल, तर ऑफिस होमची निवड करणे योग्य ठरेल.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस कुठून विकत घ्यावे\nथेट मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावरून, ऑनलाइन शॉपिंग साईट वरून किंवा दुकानातून आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घेऊ शकतो. पण आपणाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस अगदी स्वस्त दरात हवे आहे, तेंव्हा ते ऑनलाईन शॉपिंग साईट वरून विकत घ्यावे.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस कधी विकत घ्यावे\nजेंव्हा फ्लिपकार्टवर ‘बिग बिलियन डे’ किंवा ॲमेझॉनवर ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल’ सुरू असतो, तेंव्हा आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसची प्रत विकत घेऊन ठेवावी, कारण या काळात ती आपणाला सवलतीच्या दरात मिळेल. त्यानंतर आपल्याला गरज असेल, तेंव्हा मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍक्टिव्हेट करता येईल.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस कसे सुरु करावे\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍक्टिव्हेट करण्यापूर्वी आपले जर आधीचे सबस्क्रीप्शन असेल, तर ते संपू द्यावे आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस ‘लायसन्स की’ वापरून मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावरून ते नव्याने ऍक्टिव्हेट करावे. अशाने आपल्याला मायक्रोसॉफ्टकडून एक महिना अतिरिक्त मिळू शकेल. त्यामुळे आपली आणखी थोडी बचत होईल.\nआपणाला हेही वाचायला आवडेल\nसहज सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगणारा इंग्लिश – इंग्लिश शब्दकोश\n६ डिसेंबर २०१८ रोजी, म्हणजेच परवा दिवशी वर्डप्रेसची बहुप्रतिक्षित आवृत्ती ५.० जारी होत आहे ‘गुटेनबर्ग एडिटर’ हे या आवृत्तीचे प्रमुख आकर्षण असेल\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/reason-behind-supreme-courts-decision-of-making-national-anthem-compulsory-in-theatres/", "date_download": "2019-03-25T08:17:35Z", "digest": "sha1:H34AAZCHZVNZRXAWJ5ERBZXFP5S5F3OW", "length": 14601, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय\nनुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत चालवणे बंधनकारक आहे आणि सगळीकडे या निर्णयाची चर्चा सुरु झाली. या निर्णयावरून पुन्हा ‘त्या’ दोन गटांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले. पण हा निर्णय देशातील सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याकारणाने त्याचे पालन करणे बंधनकारकच आहे. संपूर्ण देशातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये पुढील १० दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याने चित्रपटगृहाच्या मालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.\nहा निर्णय आपण कोणत्या आधारावर देत आहोत हे स्पष्ट करताना सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले की,\nजेव्हा एखादा नागरिक आपल्या राष्ट्रगीताबद्दल आणि आपल्या तिरंग्याबदल आदर व्यक्त करतो तेव्हा त्या आदरातून त्याचे आपल्या देशावरील प्रेम दिसते. हा निर्णय लागू करण्याचे हे मुख्य कारण आहे. तसेच या निर्णयामुळे राष्ट्रगीताचे गायन केल्यास नागरिकांमध्ये देशभक्तीची आणि राष्ट्रहिताची भावना निर्माण होण्यास मदत होईल. संविधानामध्ये सांगितलेल्या मुलभूत तत्वांनुसार नागरिकांनी देशाच्या तिरंग्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण संविधानाचा आदर करतो त्यामुळे त्यात सांगितलेल्या नियमाचा आदर करणे देखील आपले कर्तव्य आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या संविधानात्मक राष्ट्रभक्तीचे प्रतिक असणाऱ्या राष्ट्रगीताचा सन्मान राखला गेला पाहिजे हे प्रत्येक नागरिकाच्या लक्षात येण्याची वेळ आली आहे. हा निर्णय नागरिकांवर थोपण्याचा किंवा त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा कोणताही हेतू नाही. हा निर्णय संविधानाच्या आधारावरच घेण्यात येत आहे.\nहा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने चित्रपटगृहांसाठी इतरही काही बाबींचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यापुढीलप्रमाणे:\nचित्रपटगृहात चालवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीताच्या माध्यमातून चित्रपटगृहाच्या मालकाने कोणताही व्यावसायिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये.\nदाखवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीताच्या चित्रफितीमध्ये कोणत्याही प्रकारचा उथळपणा वा अतिशयोक्ती असू नये, कारण ती कोणतीही मनोरंजनाची गोष्ट नसून देशाच्या एकात्मतेचे प्रतिक आहे त्यामुळे राष्ट्रगीताचा आदर राखला गेलाच पाहिजे. चित्रित केलेले किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने स्वत:हून बनवलेले राष्ट्रगीताचे व्हर्जन चित्रपटगृहात दाखवता येणार नाही.\nचित्रपटगृहामध्ये केवळ भारतीय तिरंगा स्क्रीनवर दाखवून राष्ट्रगीत चालवावे. इतर कोणत्याही प्रकारे राष्ट्रगीत चालवणे म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन समजले जाईल.\nजर चित्रपटगृहामध्ये चित्रफितीच्या माध्यमातून राष्ट्रगीत दाखवण्यात काही समस्या असेल तर राष्ट्रगीताचे गायन करणे बंधनकारक आहे.\nचित्रपटगृहामध्ये राष्ट्रगीत चालवण्यापूर्वी किंवा त्याचे गायन करण्यापूर्वी चित्रपटगृहाचे सर्व दरवाजे बंद असले पाहिजेत. जेणेकरून राष्ट्रगीत सुरु असताना कोणीही व्यक्ती बाहेरून प्रवेश करून राष्ट्रगीतामध्ये अडथळा उत्पन्न करणार नाही.\nआता या निर्णयाचा आनंदाने स्वीकार करावा किंवा त्यावर वाद घालत बसावा ही ज्याची त्याची choice \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.\n← ज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nजुन्या आणि खराब फोटोंना digital रूप देणारे गुगलचे नवीन photoscan app \nआपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो\nभारत विरुद्ध पाक + चीन युद्ध घडल्यास काय होईल एका अभ्यासकाने मांडलेलं भयावह चित्र\n‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील\nदेव कृपाळू खरा पण अपराध्यांची करूणा त्याला येत नसते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १९\nआयआयटीच्या परीक्षेत ३० पैकी २७ विद्यार्थ्यांना यश मिळवून देणाऱ्या एका शिक्षकाच्या संघर्षाची कथा\nघड्याळाचे काटे १०:१० या स्थितीमध्ये सेट असण्यामागचं ‘खरं’ कारण\nह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल\nअपघात होऊ नये म्हणून रेल्वेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nतुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या अमेरिकेबाबतच्या ‘खऱ्या’ गोष्टी\nया १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय\n“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते\n“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nह्या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देईल १५३ किमी प्रतीलिटर इतके एव्हरेज\nपाणीपुरीचे हे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या, आणि बिनधास्तपणे तिचा आस्वाद लुटा\nभारतातील सर्वाधिक विध्वंसक १० भूकंप, ज्यातून आजही लोक सावरले नाहीत..\nएक रंग सर्वांना एकसारखाच दिसतो का\nजगातील वाहतुकीचे १० भन्नाट नियम…\nअँड्रोईड स्मार्टफोन लॉक झालाय डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा डेटा न गमावता फोन पूर्ववत करा\n६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’\nयावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/baba-ram-rahim-cant-live-without-honeypreet-reveals-rakhi-sawant/", "date_download": "2019-03-25T08:11:24Z", "digest": "sha1:CA3PRJFOBO4VD6ZJYCM7HSZJ7O3ENLHE", "length": 5412, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ड्रामा क्वीन साकारणार हनिप्रीतची भूमिका", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nड्रामा क्वीन साकारणार हनिप्रीतची भूमिका\nगुरमीत राम रहीम सिंग अर्थात स्वतःला ‘मेसेंजर ऑफ गॉड’ म्हणवणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंगवर दोन अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीतला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nलवकरच गुरमीत सिंगच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्यात येणार असून या चित्रपटाच्या पात्राची निवड देखील करण्यात आली आहे.\nराजा मुराद हे राम रहीमची भूमिका साकारणार आहेत तर डेरा सच्चाची माणसकन्या म्हणून घेणाऱ्या हनिप्रीतच्या भूमिकेसाठी ड्रामा क्वीन, आयटम गर्ल राखी सावंतची निवड करण्यात आली आहे. मंगळवार पासूनया चित्रपटाची शुटींग सुरु होणार आहे.\nराखी सावंत नेहमीच काहीना काही कारणास्तव चर्चेत असते. अनेक दिवसांनी राखी तिच्या चित्रपटासाठी चर्चेत आली आहे. राखीचे करियर संपण्याच्या मार्गावर असताना राखीला हा चित्रपट मिळाल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nब्लॅक टी गुणकारी चहाचा एक कप\nVIDEO : ‘तुझ्या नजरेच्या ठिणगीणं वणवा पेटला’ ‘घुमा’चे पहिले गाणे प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/sachin-pilgaonkar/", "date_download": "2019-03-25T08:09:41Z", "digest": "sha1:JPU7Q52KJISJRXGUPIY3JRYSIZUWTBSH", "length": 3477, "nlines": 59, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Sachin Pilgaonkar - मराठी कलाकार", "raw_content": "\nएखाद्या तरुणाप्रमाणे एनर्जेटिक आहेत सचिन पिळगांवकर-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे\nअभिनय, नृत्य, संगीत अशा एक ना विविध कलेत पारंगत असणारे महाराष्ट्राचे महागुरू म्हणजेच जेष्ठ अभिनेते सचिन...\nविभक्त कुटुंबाची अनोखी कहाणी.पहा सोहळा सिनेमाचा ट्रेलर.\nआजवर विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीस आलेले आहेत. मात्र याच धाटणीवर काहीशी हटके...\nअभिनय बेर्डेची “अशी हि आशिकी” अभिनेत्री हेमल इंगळे करतेय सिनेमांत पदार्पण\nसचिन पिळगांवकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीचे चार महानायक\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2019-03-25T08:36:53Z", "digest": "sha1:H4ISCMIDOJ5UW2DFZQIXKGMFO5IU4XDC", "length": 5802, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुरुषत्व - विकिपीडिया", "raw_content": "\nपुरुषत्व किंवा मर्दानगी म्हणजे पुरुषांची ठरावीक वाग���ूक, भूमिका व वैशिष्टे ह्यांचा एकत्रित संच आहे. हा विचार मुळात पुरुषांशी व पुरुषी वागणुकीशी निगडित आहे. हा विचार सामाजिक आणि जैविक वस्तुस्थितीवरून निर्धारित होतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही ह्या विचारांचे वाहक असतात किंवा असू शकतात. काही संस्कृतींमध्ये पुरुषत्व हे शौर्य, शक्ती, सामर्थ्य, इत्यादींचे प्रतीक मानले जाते. या संस्कृतीने रुबाबदार, बलदंड शरीरयष्टी असणे म्हणजे पुरुष अशी समाजात प्रतिमा निर्माण केली आहे.\nशैक्षनिक क्षेत्रात, पुरुषत्व ही एक आंतरविद्याशाखीय संज्ञा असून त्यात पुरुष, पुरुषत्व, स्त्रीवाद, लिंगभाव, व राजकारण ह्यांचा समावेश असतो. पुरुषत्वाचा अभ्यास हा स्त्रीवादाशी निगडित आहे. पुरुषत्वामुळे पुरुषाला विशेष अधिकार प्राप्त होतात. आधुनिक काळात प्रसारमाध्यमांतून पुरुषत्वाचा विचार सातत्याने झिडकारला जात आहे. ह्या विषयाच्या अभ्यासात पुरुषांचे हक्क, स्त्रीवादी विचारसरणी, समलैंगिकता, मातृसत्ता, पितृसत्ता, अश्या वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासल्या जातात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१८ रोजी १४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/tourists-visit-jog-falls-karnataka-138561", "date_download": "2019-03-25T08:19:36Z", "digest": "sha1:64O2GIFGZXLVXXM6JRLGQHB5FU4ME2LO", "length": 12892, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tourists visit Jog Falls in Karnataka कर्नाटकातील जोग फाॅल्सकडे पर्यटकांचा आेढा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकर्नाटकातील जोग फाॅल्सकडे पर्यटकांचा आेढा\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nबेळगाव - भारतातील सर्वात उंचीवरून कोसळणारा जोग फॉल्स धबधबा यंदा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. यामुळे पर्यटकांनी सहलीसाठी आता जोगफॉल्सला प्राधान्य दिले आहे. \nबेळगाव - भारतातील सर्वात उंचीवरून कोसळणारा जोग फॉल्स धबधबा यंदा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. यामुळे पर्यटकांनी सहलीसाठी आता जोगफॉल्सला प्राधान्य दिले आहे. राज्यात झालेलेल्या दमदार पावसामुळे लिंगनमक्की जलाशयावर अस���ारा हा फॉल्स मागील अनेक वर्षानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळत असून अमेरीकेच्या नायगारा फॉल्सची झलक जोगफॉल्सवर पहावयास मिळत आहे.\nराजा, राणी, रॉकेट आणि रोअरर हे चार धबधबे याठिकाणी प्रवाहित झाले आहेत. धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटवरून पर्यटकांनी चित्रीत केलेले फोटोज आणि व्हीडीओज सामाजिक संकेतस्थळावरून शेअर करण्यास सुरवात केली असून शिमोग्यात झालेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम आहे. 13 ऑगस्टपासून धबधब्यात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्याआधी दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लिंगनमक्की जलाशय भरले आहे.\n1964 साली जलाशयाचे बांधकाम झाल्यानंतर आतापर्यंत 13 वेळा जलाशय भरले असून यापूर्वी 2014 साली जलाशय भरले होते. मात्र, इतक्या वर्षात यंदा प्रथमच हे जलाशय अधिक क्षमतेने भरले असून धबधब्यातून कोसळणारे पाण्याचे तुषार पर्यटकांसाठी बांधण्यात आलेल्या व्ह्यूपॉईंटपर्यंत उडत आहेत.\nरस्तेमार्गाने लागणारे अंतर : 5.20 तास\nमाजी आमदार पुत्राचा खून सिंगल बारच्या बंदुकीने\nबेळगाव - माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी यांचे पुत्र अरुण (वय ५३) यांचा खून सिंगल बारच्या बंदुकीने गोळी झाडून झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे...\nकर्नाटकातील माजी आमदाराच्या मुलाची हत्या\nबेळगाव - माजी आमदार परशुरामभाऊ नद्दीहळी यांच्या मुलाची मंगळवारी (ता. 20) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास गोळी घालून हत्या करण्यात आली. ...\nतंबाखूच्या बियांतून तेलही गळे...\nनिपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे...\nसेतू पुरुष : प्रशांत शेटये\n२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे...\nऐन उन्हाळ्यात कोसळतोय गोकाक धबधबा (व्हिडिओ)\nगोकाक - बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ व जमखंडी तालुक्यात नदीचे पात्र कोरडे पडून निर्माण झालेली पाणी समस्या दूर करण्यासाठी हिडकल धरणातून दीड टीएमसी पाणी...\nLoksabha 2019 : लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिल्लीचे निमंत्रण\nबंगळूर - बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. बेळगावातून सर्वसंमत उमेदवार देण्याच्या दृष्टीन��� माजी मुख्यमंत्री व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/11/25/rajgira-atta-laadoo/", "date_download": "2019-03-25T07:40:36Z", "digest": "sha1:JFEOGLJULVZ655IERO6UVAQ7KQJN4ONH", "length": 6894, "nlines": 125, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu | My Family Recipes", "raw_content": "\nराजगिरा पिठाचे लाडू मराठी\nराजगिरा लाह्यांचे लाडू तुम्ही नेहमी खात असाल. हे लाडू राजगिऱ्याचे पीठ वापरून केले आहेत. स्वादिष्ट दळदार लाडू बनवण्याची अगदी सोपी पाककृती आहे. साखरेचा / गुळाचा पाक करायचं झंझट नाही. हे लाडू उपासाला ही चालतात. नक्की करून बघा.\nराजगिरा पीठ २ कप\nभाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पाव कप\nबारीक चिरलेला गूळ १ कप\nसुक्या मेव्याची पावडर (किंवा तुकडे ) २ टेबलस्पून\nवेलची पावडर पाव चमचा\n१. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि राजगिरा पीठ घाला. मध्यम आंचेवर तपकिरी रंगावर भाजून घ्या.\n२. गरम असतानाच चिरलेला गूळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून एकत्र करा. मिश्रण थंड होऊ द्या.\n३. मिश्रण कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर, सुक्या मेव्याची पावडर, वेलची पावडर घाला आणि एकत्र करा .\n४. कोमट असतानाच लाडू वळून घ्या.\n५. राजगिऱ्याच्या पिठाचे स्वादिष्ट लाडू तयार आहेत.\n६. हे लाडू फ्रिज मध्ये न ठेवता ३ आठवडे चांगले राहतील.\nहे लाडू फक्त गुळाचे ही करू शकता. पण कधी कधी गूळ कडक निघाला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. थोडी साखर घातल्याने लाडू कडक होत नाहीत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-SSC-examination-1050-students-from-disadvantaged/", "date_download": "2019-03-25T08:05:11Z", "digest": "sha1:TSBM4X2V4GUOLE6LCJYQMRNCG4FB7KCP", "length": 6087, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहावी परीक्षेपासून 1050 विद्यार्थी वंचित ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दहावी परीक्षेपासून 1050 विद्यार्थी वंचित \nदहावी परीक्षेपासून 1050 विद्यार्थी वंचित \nदहावीच्या वार्षिक ��रीक्षेला बसण्यासाठी किमान 75 टक्के विद्यार्थ्याची हजेरी असणे बंधनकारक आहे. या निकषामुळे बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 1050 विद्यार्थी वार्षिक परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा पंचायत कार्यालयात शनिवारी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांच्या उपस्थितीत दहावी वार्षिक परीक्षेबाबत पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकार्यांना अनियमित विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करून अधिकार्यांना धारेवर धरले.राज्यात 23 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. याबाबत अधिकार्यांनी आढावा घेतला.\nजिल्हाधिकारी एस. झियाउल्ला म्हणाले, जिल्ह्यात अनियमित विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासाठी अधिकार्यांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक होते. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत माहिती देणे गरजेचे होते. केवळ शाळेचा निकाल चांगला लागण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य नव्हे. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन म्हणाले, मुलांचे भवितव्य शिक्षकांच्या हातात असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.\nदहावी परीक्षेसाठी चिकोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 228 परीक्षा केंद्रे आहेत. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून 32072 तर बेळगावमधून 49423 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकेची ने-आण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. राचमंद्रन यांनी दिली. यावेळी शिक्षणधिकार्याबरोबर पोलिस अधिकारीही उपस्थित होते.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर व��रुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Now-the-NBCC-company-will-redevelop-Dharavi/", "date_download": "2019-03-25T08:19:09Z", "digest": "sha1:LXE6OCQD2ZJR7ZOTTLCCOLN4VPJFQYDB", "length": 6171, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धारावीचा पुनर्विकास आता एनबीसीसी कंपनी करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीचा पुनर्विकास आता एनबीसीसी कंपनी करणार\nधारावीचा पुनर्विकास आता एनबीसीसी कंपनी करणार\nधारावीच्या पुनर्विकासासाठी पायघडया घालूनही चारवेळा काढलेल्या जागतिक निविदा प्रक्रियेमध्ये विकासक भाग घेत येत नसल्याने पुन्हा एकदा धारावीतील 1 ते 4 सेक्टरच्या पुनर्विकासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. मात्र यावेळीही विकासक कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये रस दाखवला नाही तर सरकारच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) कंपनीमार्फत पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.\nगेल्यावर्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर काढलेल्या निविदांना चार वेळा मुदतवाढ देऊनही एकाही कंपनीने निविदा दाखल न केल्याने पेच निर्माण झाला होता. आता पुन्हा निविदा प्रकिया सुरू करण्यात येणार असून जर यावेळी विकासक आले नाही तर शासन एनबीसीसी कंपनीमार्फत धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. धारावीमधील सेक्टर-5 च्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपवण्यात आले आहे. धारावीच्या सेक्टर-1 ते 4 चे काम धारावी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी अधिकाधिक विकासकांनी पुढे यावे यासाठी प्राधिकरणाने धारावीतील 1 ते 4 सेक्टरचे 12 सब सेक्टर करण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठवला, मात्र यानंतरही विकासक येण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेऊन सरकारने अखेर एनबीसीसीची मदत घेण्याचे ठरवले. कंपनीने सहकार्य केल्यास लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमुंबईत श्वास घेणेही धोक्याचे\nथर्टी फर्स्टला डीजे बंद\nमोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nपारसिक हिलवरील १५०० कोटींच्या भूखंडाचे वाटप पुन्हा वादात\nसायनमधील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा ��मेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/A-bonus-amount-of-200-rupees-in-base-price-for-grain-purchase/", "date_download": "2019-03-25T07:46:29Z", "digest": "sha1:HANHAO7USNW2UFE2IY6QKNHKN5MJ7VRD", "length": 7099, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्यांना २०० रुपयांचा बोनस! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शेतकर्यांना २०० रुपयांचा बोनस\nशेतकर्यांना २०० रुपयांचा बोनस\nयेवला : प्रसाद गुब्बी\nधान्य उत्पादक शेतकर्यांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून धान्य खरेदीवर आधारभूत किमतीत 200 रुपयांची बोनस रक्कम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.\nआधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून, ती शेतकर्यांसाठी आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते व आधारभूत किमतीचा लाभ होणाच्या दृष्टीने शेतकर्यांना हमी किमतीपेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे धान्याची खरेदी करण्यात येते. राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते. या महामंडळाच्या वतीने राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी राज्य शासन मान्यताप्राप्त अभिकर्ता संस्थेमार्फत करते. याबाबतचा शासन निर्णय शुद्धीपत्रसहित गुरुवारी (दि.19) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nहंगाम 2017-18 साठी केंद्र शासनाने आधारभूत किंमत साधारण धान्यासाठी 1550 रुपये व अ ग्रेडसाठी 1590 रुपये इतकी निश्चित आहे. चालू हंगामात अवकाळी पावसामुळे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर राशी मिळणे आवश्यक होते. केंद्र शासन यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत राज्य शासनाला करणार नाही. तरी राज्य शासनाने जबाबदारी स्वीकारून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आल्याची बाब लक्षात घेऊन खरीप पणन हंगाम 2017-18 मध्य��� प्रतिक्विंटलला 200 रुपये बोनस रक्कम धान्य उत्पादक शेतकर्यांना मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम खात्यात जमा होणार आहे.\nशेतकर्याने सादर केलेला 7/12 चा उतारा त्यावरील जमिनीचे क्षेत्रफळ व विक्रीकरिता आणलेले धान्य याचा सरासरी उत्पादिकतेशी ताळमेळ घालण्यात येईल. तसेच व्यापारी वर्गाकडून किंवा मिलर्सकडून धान्य येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. वरील प्रोत्साहनपर रक्कम 2017-18 या वर्षासाठी लागू राहील, असेही स्पष्ट केले आहे. शेतकरीव्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडून धान खरेदी केल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्याचेदेखील शासन निर्णयात नमूद केले आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/balgite/peshwe-udyan/", "date_download": "2019-03-25T08:04:15Z", "digest": "sha1:3NWKD7L6DSXZKHHFIVLEC4BUWHYA2EID", "length": 5007, "nlines": 67, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nबघ आई आभाळात बाळे ढगांची धावती\nरंगीबेरंगी पोशाख कसे त्यांचे लकाकती.\nआई, सहल तयांची चंद्रावर का गं जाते\nआगगाडी आभाळात कुठे कशी गं धावते\nउंची पोशाख करुन कोण जातो सहलीला\nफौज यांची चालली ही कुठेतरी फिरायला.\nजिथे निघाली नटून मेघ बाळे ही लहान\nआभाळीही आहे का गं एक 'पेशवे उद्यान\nचित्रकाराचा फलक आणि कोराच राहिला\nनाविका पल्याड ने रे मला\nवारा वाहतो वाहतो वारा दिसेना दिसेना\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आ���ि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/the-background-of-politics-we-never-come-to-know/", "date_download": "2019-03-25T08:19:00Z", "digest": "sha1:6JZSJ4OMTU34E64EPJHJ5PMUVXKS7ZZL", "length": 20203, "nlines": 113, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nनुकत्याच राज्यभरातील मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक पार पडल्या. मुंबई मनपाने ह्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं होतं. राजकीय पक्षांनी विविध वळणं घेत घेत राजकारणाचे गडद रंग दाखवायला सुरूवात केली आणि नेहेमीप्रमाणे फेसबुक आणि whatsapp वर राजकीय पंडितांचा फड रंगायला लागला. कुठल्या पक्षाने कुणाला कुठे उभा करावा इथपासून – कुठल्या राजकीय पक्षाचं भवितव्य काय आहे आणि किती वर्षांत एखादा नेता पंतप्रधान/मुख्यमंत्री होईल किंवा नामशेष होऊन जाईल – इथपर्यंत राजकीय भाकितं ह्या गप्पांमध्ये केली जातात. पूर्वी ह्या गप्पा आपापल्या मित्रमंडळीत, चार चौघात होत असत. शिवाय त्यांना वेळ-काळाची मर्यादा देखील असायची. आता फेसबुक मुळे मात्र लिमिटलेस डिस्कशन्स सुरू असतात.\nह्या वातावरणात – एक गोष्ट आठवली. २०१४ निवडणुकीच्या खूप आधी – जेव्हा भाजपचा पं प्र पदाचा अधिकृत उमेदवार घोषित झालेला नव्हता तेव्हाची गोष्ट.\nमोदींची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाली १३ सप्टेंबर २०१३ ला. त्या आधी साधारण ६-८ महिने देशभर घमासान होत होतं. मोदी समर्थक ठिकठिकाणी मोर्चे काढत होते, मोदींचे मास्क्स घालून फिरत होते. अडवाणींच्या घराबाहेर झालेला धिंगाणा सर्वांच्या लक्षात असेलच. ह्या सर्वाचं कारण होतं – “मोदींनाच पं प्र उमेदवार घोषित करावं” ही मागणी.\nहे सर्व प्रकरण माझ्या फार चांगलं लक्षात आहे, कारण ह्या मोमेंटमला वापरून, त्या वेळी आम्ही एक वेगळी मोहीम चालवत होतो.\nभाजपच्या एका अंतर्गत गोटातून मोदींना विरोध आहे हे स्पष्ट होतंच. मोदी समर्थक मात्र मोदीच उमेदवार असणार ह्या हिशेबात वावरत होते. पारदर्शक सूचना/तक्रार प्रणाली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी ह्या हेतूने आम्ही भाजप समर्थकांना सांगत होतो की ही सिस्टीम वापरून तुम्ही तुमची मागणी “अधिकृत” करा, ती ठोसपणे नोंदवा – म्हणजे पक्ष प्रमुखांवर मोदींनाच तो उमेदवार ठरवण्यासाठी दबाव वाढेल.\nआमच्यासाठी, अर्थातच, उमेदवार कोण ह्याने फरक पडत नव्हता – आम्हाला आमची सिस्टीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची होती.\nअसो, यथावकाश मोदींच्या नावाची घोषणा सप्टेंबरमध्ये झाली, मोदी निवडणुकीत निवडून आले पंतप्रधानही आले.\nह्या पार्श्वभूमीवर – नुकतंच एक पुस्तक वाचलं. War Room: The People, Tactics and Technology behind Narendra Modi’s 2014 Win नावाचं. त्यात कळालेली एक माहिती डोळे उघडणारी आहे.\nRSS च्या मोहन भागवतांना नरेंद्र मोदी फारसे आवडत नाहीत असं सर्वत्र बोललं जात असे. त्यामागे कारण काही का असेना पण मोदी-भागवत दुकलीमध्ये फारसं सौख्य नाही असं म्हणतात. तरीसुद्धा – भागवतांनी आपलं वैयक्तिक मत बाजूला ठेवून – २०१४ निवडणुकीच्या कित्येक महिने आधीच – नरेंद्र मोदी ह्या नावावर “भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान पदाचा उमेदवार” म्हणून मोहर उमटवली होती. गुप्तपणे झालेला हा निर्णय अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी लोकांना माहिती होता. संघाच्या विश्वासू लोकांवर हा निर्णय ठिकठिकाणचे कार्यकर्ते आणि “इच्छुक” भाजप नेत्यांच्या गळी उतरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.\nअनेकांना चांगलंच आठवत असेल की अडवाणींची महत्वाकांक्षा अजूनही जागृत होती.\nवयाच्या ८८ वय वर्षी त्यांना भारताचा पंतप्रधान म्हणून जगभर ओळख मिळव��यची होती. पक्षातर्फे घोषणा होण्याच्या फक्त १ दिवस आधी त्यांना मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळवलं गेलं आणि दुसऱ्याच दिवशी अधिकृत घोषणा झाली.\nम्हणजेच – सप्टेंबर महिना उजाडेपर्यंत, पक्ष आणि संघटनेतील प्रत्येक विरोधकावर साम-दाम-दंड-भेद वापरून निर्णयाचा पाया पक्का केला गेला. सर्वात शेवटी अडवाणींना “निर्णय घेतला गेला आहे” हे कळवलं गेलं आणि दुसऱ्याच दिवशी (१३ सप्टेंबर रोजी) अधिकृत घोषणा झाली.\nहा फक्त एक भाग झाला.\nदुसरीकडे, मोदींच्या नावावर फक्त अंतर्गत निर्णय झाल्या झाल्याच मोदींनी नेमकं कुठल्या मैदानात उतरायचं – कुठून निवडणूक लढवायची – ह्यावर विचारमंथन सुरू झालं होतं. विविध लोकसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू झाली होती. धर्म-जात ह्यांची आकडेवारी अभ्यासणं सुरू झालं होतं. कित्येक आठवड्यांच्या खलानंतर वाराणसी ची जागा मुक्रर झाली होती.\nदेशभर “भाजप चा पं.प्र.उमेदवार कोण” ह्यावर घमासान होत असताना – संघ-भाजपचा अंतर्गत निर्णय होऊन ही गेला होता आणि बॅकग्राऊंडवर काम सुरू देखील झालं होतं.\nही माहिती वाचताना आपले फेसबुकी राजनीती-तद्न्य आणि पक्ष कर्ते डोळ्यासमोर तरळून गेले. एकीकडे तज्ज्ञांची गंमत वाटली आणि पक्ष कार्यकर्त्यांबद्दल कीव आली.\nवॉर्डातल्या नागरसेवकापासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत – आम्हाला सर्वांचं राजकारण कळतं – हा भलताच ओव्हर कॉन्फिडन्स असतो ह्यांना. पण राजकारण फार वेगळ्या लेव्हलवर चालत असतं. त्याचा थांग आम्हाला कधीच लागत नाही. तरीही रेटून बोलतात\nदुसरीकडे, पक्ष कार्यकर्ते, “आपला पक्ष” म्हणून एखाद्या नेत्यासाठी किंवा ideology साठी त्या त्या पक्षाला खांद्यावर-डोक्यावर उचलून धरतात. पक्षासाठी, नेत्यासाठी लाठ्या खातात…\nपण महत्वाचे निर्णय त्यांच्या हाती अजिबात नसतात. मोजक्याच “श्रेष्ठींच्या” हाती असतात. केवळ जिंकण्याची शक्यता बघून नेता निवडला जातो – त्या मागे पक्ष समर्थकांचा विचार नसतो…हे केविलवाणं सत्य आहे.\nपण पक्ष समर्थक ही जमतच भोळी, आशावादी असते. कुठ्ल्याक पक्षाचे समर्थक असेना…ते असेच असतात. त्यामुळे त्यांच्याबाबतीत हे स्वाभाविक आहे. “राजकीय विश्लेषक” तर हुशार असतात () ना त्यांना देखील ह्या कटूसत्याचा विसर पडावा हे हास्यास्पद आहे\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची ���ैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← जातीआधारित आरक्षण : आजही अत्यंत आवश्यक आणि पूर्णपणे योग्यच\nयुयुत्सु: महाभारतामध्ये पांडवांच्या बाजूने लढणारा ‘अज्ञात कौरव’\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nभारतातल्या राजकारणी बाबूंनी नवीन वर्षाचे हे संकल्प घेतले तर भारतीय त्यांचे मनापासून आभार मानतील\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nफाशीची शिक्षा दिल्यानंतर जज साहेब पेनाची निब का तोडतात\nभारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग\nएखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते\nबुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही\nजिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग १)\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nहिंदुत्ववादावर विजय मिळवण्यासाठी पुरोगाम्यांनी “हा” मार्ग अवलंबायला हवा\nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nचीनच्या सर्वात गुढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार’\nज्यांना सारं जग नाकारतं, त्या अपयशी लोकांची येथे ‘किंमत’ केली जाते\nपानिपतच्या युद्धाने मराठा साम्राज्याला काय दिलं तुम्ही स्वत:च जाणून घ्या\nक्रिकेट मॅचची धुंदी, राष्ट्रगीताचा विसर\nअंबानींचं काय घेऊन बसलात हे आहेत जगातील सर्वात महागडे विवाह सोहळे\n स्त्री पुरूष समान नाहीतच \nमराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना नावं ठेवणं सोडून ह्या चुका सुधारायला हव्यात\nसमुद्रमंथनातून मिळालेला लसूण – रोज अंशापोटी खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे \nश्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे काय कारणं आहेत\nमाणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Cancel-the-registration-of-the-BRTS/", "date_download": "2019-03-25T07:45:10Z", "digest": "sha1:PASI3XPGI3MUGBHOURFNWWWYQIBU3KYQ", "length": 4627, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’\n‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’\nनिगडी ते दापोडी ‘बीआरटीएस’ मार्ग असुरक्षित, धोकादायक आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी सार्वजनिक वाहतूक सुधारणा समिती समन्वयक काशीनाथ नखाते यांनी केली.\nबुधवारी (दि.10) सार्वजनिक वाहतूक सुधारणा समितीने ‘बीआरटीएस’ मार्गात सुरक्षा, होणारा धोका याबाबत नागरिकांत जनजागृती केली. जनतेवर लादलेल्या ‘बीआरटीएस’चा निषेध यावेळी करण्यात आला. याप्रसंगी समिती समन्वयक काशीनाथ नखाते, समिती सदस्य संजय मालाडकर, विजय निकाळजे, इरफान चौधरी, संतोष गायकवाड, ओमप्रकाश मोरया, कासीम तांबोळी आदी उपस्थित होते.\nनखाते म्हणाले, जागतिक बँक आणि तत्सम संस्थांच्या मागणीनुसार केवळ ‘जेएनएनयूआरएम’चा निधी लाटायच्या उद्देशाने या मार्गाची निर्मिती केली.\nमहापालिकेच्या चुकांमुळे दररोज अपघात होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना न केल्यामुळे उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय मार्ग सुरू करण्यास प्रतिबंध घातला आहे.. या मार्गावरील अत्यंत धोकादायक म्हणजे ‘मर्ज इन’ आणि ‘मर्ज आऊट’ या मार्गातून बाहेरील रस्ता भेदून जात असल्याने दररोज अपघात होण्याची शक्यता आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Farmers-storm/", "date_download": "2019-03-25T07:45:52Z", "digest": "sha1:Y6QYQJN7JC5KXQRPDXENW3BDF73LRXWC", "length": 8824, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेततळ्याचं तुफान आलंय... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शेततळ्याचं तुफान आलंय...\nपुणे : दिगंबर दराडे\nपाऊस पडत नाही, शेत करपेल, जनावरांना चारा नाही, असे म्हणणारा पिचलेला शेतकरीच आता दुष्काळावर मात करण्यासाठी पुढे सरसावला असल्याचे वास्तव समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे साडेअकरा हजार शेतकर्यांनी आपल्या शेतात शेततळे घेऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे. रोजगार हमी विभाग आणि कृषी विभागाकडून राबविण्यात येणार्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्वाधिक प्रतिसाद सोलापूरच्या शेतकर्यांनी दिला असून, तब्बल 4,770 शेतकर्यांनी शेततळे घेतले आहे, तर त्या पाठोपाठ सांगली जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. या जिल्ह्यात 3 हजार 700 शेततळी खोदण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी विभागाचे उपआयुक्त अजित पवार यांनी दै. ‘पुढारी’ला बोलताना दिली.\n2015-16, 2017-18 या वर्षात तब्बल पुणे विभागात साडेअकरा हजार शेततळी खोदण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात 1990 शेततळी खोदण्यात आली आहेत, तर सातार्यामध्ये 960 शेततळी घेण्यात आली आहेत. सर्वात कमी कोल्हापूरला शेततळी बांधण्यात आली आहेत. 216 शेततळी इतका आकडा कोल्हापूरकरांनी गाठला आहे. अधिक शेततळ्यांची कामे पूर्ण केल्यामुळे आगामी काळात पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाचे अधीक्षक विनयकुमार आवटे यांनी व्यक्त केला आहे.\nपुणे विभागात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेतकर्यांना पिके जगविण्यासाठी शेततळ्यांशिवाय पर्याय नाही. यामुळेच शेतकर्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात पाऊस न झाल्यास पिकांवर ताण येतो. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जाते; मात्र आता शेततळ्यांमुळे पिकांना आधार मिळणार आहे. शेततळ्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. दुष्काळी भागातील शेतकर्यांच्या बरोबर आता सधन भागातील शेतकरीही शेततळी बांधण्यासाठी पुढे येत आहे.\nबारामती, इंदापूर, दौंड, कराड या परिसरातील शेतकर्यांनी शेततळी बांधण्याचा संकल्प सोडला आहे. दिवसेंदिवस बदलत असलेले शेतीचे स्वरूप, ठिंबक सिंचनाचा वापर, कमीत कमी पाण्यामध्ये पीक घेण्याची पद्धत विकसित होत आहे. राज्यातील पर्जन्यमानावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून उपलब्धता वाढविण्यासाठी माहाराष्ट्र शासनाने यापूर्वी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान पद्धतीने शे��तळे ही योजना राबवली होती.\nशासन ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची योजना राबवण्यात येत आहे. या योजनेला शेतकर्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी योजनेच्या धर्तीवर अनुदान पद्धतीने शेततळी बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. या योजनेत राज्यात 51 हजार 500 तळी बांधण्यात येणार आहेत. या योजनेला पुणे विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/10/12/chirote/", "date_download": "2019-03-25T07:30:26Z", "digest": "sha1:TEL375W5MMZ2JC2Z6OWQ35WTD2JIASIH", "length": 14196, "nlines": 195, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Chirote(चिरोटे) – Sweet Crispy Maharashtrian Delicacy | My Family Recipes", "raw_content": "\nखुसखुशीत चिरोटे सगळ्यांनाच आवडतात. आणि माझ्यामते हा पदार्थ घरीच बनवायला पाहिजे. बाहेर कुठेही मी चांगले चिरोटे बघितलेले नाहीत. कृती जरा कठीण आहे पण जेव्हा तुम्ही जिभेवर विरघळणारे चिरोटे खाता तेव्हा वाटतं की सगळ्या मेहनतीचं चीझ झाले. चिरोटे दोन प्रकारचे असतात – १. पुरीसारखे आणि २. लोडाचे चिरोटे. लोडाच्या चिरोट्यात पिठाची गुंडाळी तुकडे करून लाटत नाहीत. तसेच तळतात. पहिल्या प्रकारात ते तुकडे लाटून तळतात. गोडीसाठी चिरोटे साखरेच्या पाकात घालतात किंवा तळल्यावर वरून पिठीसाखर घालतात. माझी रेसिपी पुरीसारखे पिठीसाखर घातलेल्या चिरोट्यांची आहे. ही पण माझ्या आईची रेसिपी आहे. परफेक्ट आणि टेस्टेड.\nसाजूक तूप १ टेबलस्पून\nवनस्पती तूप २ टेबलस्पून किंवा साजूक तूप १ टेबलस्पून\nकॉर���न फ्लोअर २–३ टेबलस्पून\nवनस्पती तूप तळण्यासाठी (हवे तर साजूक तूप वापरू शकता )\n१. मैद्यात १ टेबलस्पून साजूक तूप (गरम न करता) आणि चिमूटभर मीठ घाला.\n२. थोडं थोडं दूध घालून घट्ट पीठ भिजवा.\n३. पीठ ८ तास झाकून ठेवा.\n१. २ टेबलस्पून वनस्पती किंवा १ टेबलस्पून साजूक तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.\n२. थोडं थोडं कॉर्न फ्लोअर घालून फेटा. साटा क्रिम सारखा व्हायला हवा.\nBeat till fluffy (हलकं होईपर्यंत फेटून घ्या)\n१. पीठ चांगलं मळून घ्या. टेनिस बॉल च्या आकाराचे गोळे करून घ्या.\n२. पिठाच्या ३ गोळ्यांच्या ३ पातळ पोळ्या लाटून घ्या. पोळी जेव्हढी पातळ तेवढे चिरोटे हलके आणि खुसखुशीत.\nRoll a roti (पातळ पोळी लाटून घ्या )\n३. एका पोळीवर पाऊण चमचा साटा पसरून घ्या. त्याच्यावर दुसरी पोळी ठेवा. साटा पसरून घ्या. तिसरी पोळी ठेवा. साटा पसरा.\nApply Paste on Roti (पोळीवर साटा पसरून घ्या)\n४. पोळ्या गुंडाळून घट्ट गुंडाळी (रोल) करा.\n५. रोल चे १ सेमी रुंदीचे तुकडे करा.\nMake a tight roll (पोळीची घट्ट गुंडाळी करा )\nCut 1 cm thick pieces (१ सेमी रुंदीचे तुकडे करा)\n६. आता प्लास्टिक च्या कागदामध्ये / बटर पपेरमध्ये ठेवून हे तुकडे लाटा. लाटताना पोळ्या गुंडाळलेली बाजू वरती घ्या आणि हलक्या हाताने पुरी लाटा. मधे फुलासारखे डिसाईन दिसेल.\nPlace a roll on a plastic sheet (एक तुकडा प्लास्टिक च्या कागदावर ठेवा )\nRoll it gently (हलक्या हाताने पुरी लाटा )\n७. गरम तेलामध्ये चिरोटे सोडून मंद गॅसवर चिरोटे तळून घ्या. तळताना झाऱ्याने चिरोट्यावर तूप उडवा म्हणजे चिरोटे वरच्या बाजूने तळले जातील. चिरोटे तळताना उलटायचे नाहीत.\nFried Chirote (तळलेला चिरोटा )\n८. छान खमंग तळल्यावर पेपर टिश्यू वर काढा आणि लगेच थोडी पिठीसाखर भुरभुरवा. चिरोट्याला गोडी फक्त ह्या साखरेचीच असते. त्यामुळे जरा सढळ हाताने साखर घाला.\nSprinkle Powdered Sugar while Chirote are Hot (गरम असताना चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरवा)\n९. चिरोटे गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.\n१. पोळीला किती साटा लावायचा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कमी साटा लावला तर चिरोटे कडक होतील. जास्त साटा लावला तर चिरोटे तळताना विरघळतील. त्यासाठी चिरोट्याचा एक छोटा रोल करून चिरोटे करून बघा. सगळे रोल आधीच एकदम करून ठेवले तर काही बदल करता येणार नाही. एका छोट्या रोल चे चिरोटे तळून ठरवा साटा किती लावायचा ते.\n२. चिरोटे तळताना एका वेळी जास्त तूप घालू नका. चिरोट्याचा साटा तुपात मिक्स होतो आणि तूप काळं हो��ं. म्हणून मधे मधे तूप मलमल च्या कापडाने गाळून घ्या आणि परत तळायला वापरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/%C2%A0kolhapur-hyderabad-bangalore-aircrafts-sunday-3886", "date_download": "2019-03-25T08:24:36Z", "digest": "sha1:22R3IC7PTMROIYQR5H5ANXYRQL2J2NUG", "length": 7161, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Kolhapur to Hyderabad, Bangalore aircrafts from Sunday | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर ते हैदराबाद, बंगळूर विमानसेवा रविवारपासून सुरु\nकोल्हापूर ते हैदराबाद, बंगळूर विमानसेवा रविवारपासून सुरु\nकोल्हापूर ते हैदराबाद, बंगळूर विमानसेवा रविवारपासून सुरु\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nकोल्हापूर - केंद्र सरकारच्या ‘उडान फेज टू’ या योजने अंतर्गत रविवार (ता. ९) पासून रोज कोल्हापूरहून हैदराबाद, बंगळूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यातून हैदराबाद-कोल्हापूर ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती; मात्र हवाई परवाना मिळाला नसल्यामुळं, तांत्रिक कारणामुळे त्याला विलंब झाला. त्यासाठी खासदार महाडिक यांनी दिल्ली इथे जाऊन नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन व्हीएफआर हा परवाना मिळावा, अशी मागणी केली. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी हा परवाना देण्यात आला.\nकोल्हापूर - केंद्र सरकारच्या ‘उडान फेज टू’ या योजने अंतर्गत रविवार (ता. ९) पासून रोज कोल्हापूरहून हैदराबाद, बंगळूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यातून हैदराबाद-कोल्हापूर ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती; मात्र हवाई परवाना मिळाला नसल्यामुळं, तांत्रिक कारणामुळे त्याला विलंब झाला. त्यासाठी खासदार महाडिक यांनी दिल्ली इथे जाऊन नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन व्हीएफआर हा परवाना मिळावा, अशी मागणी केली. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी हा परवाना देण्यात आला. त्यामुळं एटीआर हे ७२ आसनी विमान कोल्हापुरातून टेकऑफ करण्याचा मार्ग मोकळा झाला.\n९ डिसेंबरपासून अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून सुरळीतपणे ही सेवा सुरू राहील, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. त्यामु���े जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. या हवाई सेवेसाठी ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यात्रा डॉट कॉम, मेक माय ट्रिप आणि एअर इंडिया डॉट इन या वेब पोर्टलवर बुकिंग करता येणार आहे. लवकरच कोल्हापूर-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरू होईल. तसेच उडान फेज थ्रीसाठी हवाई मार्गनिश्चिती होणार आहे.\nपूर कोल्हापूर हैदराबाद खासदार महाड mahad पर्यटन tourism विकास एअर इंडिया kolhapur hyderabad bangalore\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090301/main.htm", "date_download": "2019-03-25T08:26:18Z", "digest": "sha1:S5K7Q7FZNF5LBVIGPLLML5EABQB3LJUK", "length": 28248, "nlines": 61, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार , १ मार्च २००९\nफकीरभाई प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शरद पवार यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी डावीकडून महापौर अपर्णा डोके, पवार, धर्माधिकारी, आझम पानसरे आणि अनिता धर्माधिकारी, तर दुसऱ्या छायाचित्रात या सोहळ्य़ासाठी राज्यभरातून आलेला लाखोंचा जनसमुदाय.\nराज्यात मात्र परिस्थितीनुसार निर्णय घेऊ\nपुणे, २८ फेब्रुवारी/ विशेष प्रतिनिधी\nराष्ट्रीय राजकारणात आम्ही काँग्रेसबरोबरच राहणार आहोत, अशी निसंदिग्ध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. पण राज्याच्या बाबतीत बोलताना मात्र राज्या- राज्यातील परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असे सांगून काँग्रेसवरील दबाव कायम ठेवण्याचा आपला इरादा त्यांनी पुन्हा स्पष्ट केला.\nवेस्टर्न अॅग्री फूड पार्क (प्रा.)लिमिटेडच्या पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.\nदक्षिण-मध्य मुंबईवरून कामत , गायकवाड यांच्यात जुंपली\nमतदारसंघ पुनर्रचनेनंतर काँग्रेससाठी सर्वाधिक सोपा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या दक्षिण-मध्य मुंबईची उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ईशान्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत यांच्यात जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे. आज ‘वर्ष���ं’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिल्लीहून आलेले निरीक्षक आसीफअली टाक यांच्यासमोर कामत व गायकवाड यांच्या समर्थकांनी हा मतदारसंघ आपल्या नेत्यालाच का सुटायला हवा याची बाजू जोरदारपणे मांडली. यात गायकवाड यांच्या बाजूने त्यांची मुलगी व धारावीच्या आमदार वर्षां गायकवाड आणि नगरसेवक महेंद्र शिंदे हे दोघेच समर्थक होते.\n‘.. अन्यथा ‘आरपीआय’ची वेगळी वाट ’\nबंधुराज लोणे, नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी\nआगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन लढवाव्यात, अन्यथा रिपब्लिकन पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरेल, असा ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची युती मान्य नसल्याचेच संकेत आज पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी दिले. रामलीला मैदानावर झालेल्या या अधिवेशनाला देशातील अनेक प्रदेशांतून रिपब्लिकन कार्यकर्ते आले होते.\nअजमल कसाबप्रकरणी नौदलप्रमुखांची निर्थक सारवासारव\nमुंबईवर हल्ला करणारे अजमल आमीर कसाब व अन्य पाकिस्तानी दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने भारतात आल्याचे कोणतेही पुरावे पाकिस्तानी नौदलाला मिळालेले नाहीत असे वादग्रस्त विधान करणारे पाकिस्तानी नौदलप्रमुख अॅडमिरल नोमन बशीर यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आज आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले. या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकेड आहे. या हल्ल्यांचा तपास पाकिस्तानी नौदलाकडे नाही. कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने मुंबईत गेल्याचे पुरावे गृहमंत्रालयाला मिळाले असण्याची शक्यता आहे मात्र तपासकामात सहभागी नसल्यामुळे पाकिस्तानी नौदलाकडे ते पुरावे नाहीत अशी तद्दन निर्थक सारवासारव अॅडमिरल नोमन बशीर यांनी आज केली.\nरस्त्यावरील राजकीय उद्रेकाची किंमत तीन कोटी\nअजित गोगटे, मुंबई, २८ फेब्रुवारी\nअठरापगड विचारसरणीच्या राजकीय पक्ष-संघटनांकडून उठसुठ पुकारले जाणारे ‘बंद’ आणि ‘हरताळ’ आणि याचा राग रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याची अंगवळणी पडलेली ‘सवय’ याची मुंबई, ठाणे व नाशिक या शहरांमधील परिवहन सेवांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास (एसटी) गेल्या सुमारे तीन वर्षांत तीन कोटी रुपयांह��न अधिक नुकसानीची झळ निष्कारण सोसावी लागल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झाली आहे.\n‘लिटिल चॅम्प्स’ लागले परीक्षेच्या तयारीला\nमुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nझी-मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठून सहभागी ‘लिटील चॅम्प्स’ना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. कार्यक्रम संपला असल्यामुळे आता हे सर्व लिटिल चॅम्प्स वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र या अभ्यासाबरोबरच ‘पंचरत्न’-भाग दोन या नव्या आल्बमची तयारी आणि राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही ते सर्व जण व्यस्त आहेत. ‘सारेगमप’च्या महाअंतिम फेरीच्या वेळेस युनिव्हर्सल कंपनी आणि झी-मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व लिटिल चॅम्प्सचा आल्बम ‘पंचरत्न’ या नावाने प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.\nसत्तेवर आल्यास वयोवृद्ध शेतक ऱ्यांना पेन्शन देऊ -अडवाणी\nमदनपल्ली ,आंध्र प्रदेश २८ फेब्रुवारी/पीटीआय\nनिवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी आता वातावरण तापू लागले असून एनडीए सत्तेवर आल्यास छोटय़ा शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न हमी योजना व वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्यात येईल ,असे आश्वासन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी काल सायंकाळी येथे विजय संकल्प यात्रेच्यावेळी जाहीर सभेत दिले. जर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते तर मग वयोवृद्ध शेतकऱ्यानाही ती का मिळू नये, असा सवाल करून ते म्हणाले की, उत्तम राज्यकारभार, सामान्य लोकांना सुरक्षा, सर्व आघाडय़ांवर विकास या मुद्दय़ांच्या आधारे आमचा पक्ष लोकसभा निवडणुका लढवित आहे, असे त्यांनी सांगितले. यूपीए आघाडी सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प सोडून दिला. ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष केले त्याचबरोबर नद्याजोड प्रकल्पाला रामराम ठोकला असा घणाघाती आरोप करून ते म्हणाले की, एनडीए सत्तेवर आल्यास हे चांगले प्रकल्प पुन्हा सुरू केले जातील. त्यामुळे मंदीत होरपळत असलेल्या लोकांना रोजगारही उपलब्ध होईल.\nलोडशेडिंग एक ते दीड तासाने कमी होणार\nखाजगी उत्पादकांकडून ५०० मेगॅवॅट वीज घेणार\nलोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता आचारसंहिता लागण्याच्या आधीच जनेताला सुखावणारे निर्णय घेण्याच्या आघाडी सरकारच्या धडाक्यात आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. नवे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी ऊर्जा खात्याचा कारभार सांभळल्यापासून या खात्यात बऱ्याच वर्षांनी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आता पुढील तीन महिने ५०० मेगॅवॅट वीज खाजगी उत्पादकांकडून घेण्याचे नक्की केले आहे.\nआदिक यांचा आज ‘राष्ट्रवादी’त प्रवेश\nऐन वेळी मंत्रिपद नाकारल्याने संतप्त झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार गोविंदराव आदिक यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. उद्या (रविवारी) नाशिक येथे कार्यकर्ता अधिवेशनात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आदिक यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत साडेतीन वर्षे होती. परंतु ते विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत. राज्यातील आदिक समर्थकही त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहेत. आदिक हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी त्यांचे नाव ‘हायकमांड’ने सूचविले. परंतु ऐन वेळी त्यांच्याऐवजी कट्टर विरोधक आमदार राधाकृष्ण विखे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या आदिकांनी कृषक समाजाचा मेळावा घेऊन काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. आदिक व पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकण्याचा इशारा दिला.\nमहाअधिवेशनात राष्ट्रवादी फोडणार प्रचाराचा नारळ\nनाशिक, २८ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महाअधिवेशनातच लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडायचा आणि तेथूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात तयारीनिशी उडी घ्यायची, अशा पद्धतीने या संपूर्ण अधिवेशनाची व्यूहरचना करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून तयार केलेला एक लघुपट शरद पवार यांच्या हस्ते रविवारच्या अधिवेशनातच प्रदर्शित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अधिवेशनानिमित्त सकाळी निवडक प्रतिनिधींची बंद दाराआड एक बैठकही होणार आहे.\n‘अडवाणींना पंतप्रधान बनण्यासाठी बरीच मजल मारायची आहे’\nभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान बनण्यासाठी अजून बरीच मजल मारायची आहे असे भाजपचे माजी सरचिटणीस के. एन. गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे. असे वक्तव्य करून गोविंदाचार्यानी पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावालाच अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. पंतप्रधान बनण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना अजून बरीच मजल मारावी लागणार आहे असे सांगून गोविंदाचार्य म्हणाले की, पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून एनडीएतर्फे लालकृष्ण अडवाणी यांचे नाव पुढे करण्यात आले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून अडवाणींचे नाव जाहीर करण्यात आले ही क्रूर खेळी होती. मात्र निवडणुका जिंकून देण्यात नरेंद्र मोदी हे जास्ती वरचढ आहेत असा टोला गोविंदाचार्यानी लगाविला. लालकृष्ण अडवाणी यांनी आपली वेबसाईट सुरू केली व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. त्यावर टीका करताना गोविंदाचार्य म्हणाले की, निवडणुकांमध्ये व्यवस्थापन तंत्राचा काहीही उपयोग होत नाही.\nगुजरात दंगलीतील २२८ बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करणार\nगोध्रा जळितकांडानंतर २००२ साली गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा त्यानंतर सात वर्षे उलटली तरी अद्याप शोध लागलेला नाही. बेपत्ता व्यक्तींचा सात वर्षांच्या काळात शोध न लागल्यास त्यांना मृत घोषित करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे गुजरात दंगलीतील बेपत्ता झालेल्या २२८ व्यक्तींना लवकरच मृत घोषित करण्यात येईल. त्यामुळे गुजरात दंगलीतील मृतांचा आकडा ९५२ वरून ११८० पर्यंत पोहोचणार आहे. यासंदर्भात गुजरातच्या गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव बलवंतसिंग यांनी सांगितले की, गुजरात दंगलीत बेपत्ता झालेल्या व सात वर्षांनंतरही शोध न लागलेल्या २२८ व्यक्तींची यादी आम्ही तयार केली असून ती महसूल विभागाकडे पाठविण्यात आली आहे. या बेपत्ता व्यक्तींना लवकरच मृत घोषित करण्यात येईल.\nपुणे-नाशिक मार्गावर अपघात ठाण्याचे सात यात्रेकरू ठार\nराज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आणि प्रवासी यात्रा करणारी जीप यांची धडक होऊन सात यात्रेकरू जागीच ठार तर जीपसह एसटीतील तेरा प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-नाशिक रस्त्यावरील कळंब (त���. आंबेगाव) नजीक सहाणेवस्ती येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता झाला. अपघातात मृत पावलेले सर्वजण शहापूर, जि.ठाणे येथील असून पिंपरी- चिंचवड येथे सद्गुरू दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांच्या पुरस्कार कार्यक्रमाहून माघारी परतताना हा अपघात झाला आहे.\nमहिंद्रा जीपमधील गोटीराम उंबरगोडे (वय ५५), त्यांची मुलगी सारिका उंबरगोडे (वय २५, रा. बिरवाडी, ता. शहापूर), भाऊ धलपे (वय ५५), त्यांची पत्नी धलपे काकू (वय ४०, रा. भातसानगर), गोपाळ धसाडे (वय ५०, रा. भातसानगर), चालक मुख्तार शेख (वय २६, रा. धसई, ता. शहापूर) व उंबरगोडे (पूर्ण नाव माहीत नाही, वय ४५, रा. आवरा) गाव असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मिहद्रा जीप (क्रमांक एमएच ०४ ई १५५९) ही शहापूर तालुक्यातील भाविकांना घेऊन पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमास हजर राहिले होते. या कार्यक्रमास हजर राहून हे सर्व भाविक मिहद्रा जीपने माघारी शहापूर येथे जाण्यासाठी माळशेज घाट मार्गे निघाले. पुणे नाशिक महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत नारायणगाव बाजूकडून धुळे ते पुणेही एसटी बस (क्रमांक एमएच २० डी ८४४१) ही पुण्याकडे चालली होती. महिंद्रा जीप व एसटीची सहाणेवस्तीजवळ भीषण धडक होऊन अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की एसटीला धडक बसल्यानंतर महिंद्रा जीप ७० फूट मागे जाऊन तिचे तोंड पुन्हा विरुद्ध मंचरच्या दिशेने झाले तर एसटीची चालकाकडची बाजू आत गेली. अपघातात महिंद्रा जीपचा चक्काचूर झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-50-with-18-55mm-f35-56al-wr-kit-black-price-prSVpj.html", "date_download": "2019-03-25T07:53:19Z", "digest": "sha1:VN3WRGPXIOBH5VNMKVDCIT56DYKK5TEY", "length": 13514, "nlines": 306, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक नवीनतम किंमत Mar 17, 2019वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 39,895)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.3 Megapixels\nऑप्टिकल झूम 16 X\nडिजिटल झूम 10 X\nस्क्रीन सिझे 3 Inches\n( 13928 पुनरावलोकने )\n( 6942 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 9220 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nपेन्टॅक्स K 50 विथ 18 ५५म्म फँ३ 5 ६ल वर किट ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-condom-ads-timing-tv-1337", "date_download": "2019-03-25T07:41:15Z", "digest": "sha1:MR457VQOIRGYWHGMEOIIZGD2A2O3MBAI", "length": 14038, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news condom ads timing on tv | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकंडोमच्या जाहिरीतांच्या वेळेत बदल हे कोणाचे अवघडलेपण \nकंडोमच्या जाहिरीतांच्या वेळेत बदल हे कोणाचे अवघडलेपण \nकंडोमच्या जाहिरीतांच्या वेळेत बदल हे कोणाचे अवघडलेपण \nकंडोमच्या जाहिरीतांच्या वेळेत बदल हे कोणाचे अवघडलेपण \nसोमवार, 5 मार्च 2018\nसरकारने कुठलाही निर्णय घेतला कि त्याची चर्चा बरीच दिवस चालते. काल रविवारी मित्रांशी गप्पा मारत असताना विषय निघाला तो कंडोमच्या – जाहिरातींवर लादलेल्या वेळमर्यादेचा. नैतिक नियम तयार करण्याचे काम सरकारने करावे की समाजाने स्वत:हून ते तयार करावेत हा तसा किचकट आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पण आधुनिक समाजात जेव्हा एखादा देश लोकशाही, व्यक्ती-मतस्वातंत्र्य यावर कायद्याचे राज्य स्वीकारतो तेव्हा समाजाला नैतिक पातळीवर दिशादिग्दर्शन करण्याचे काम सरकारला सोडून द्यावे लागते. ती जबाबदारी समाज स्वत:हून स्वीकारतो.\nसरकारने कुठलाही निर्णय घेतला कि त्याची चर्चा बरीच दिवस चालते. काल रविवारी मित्रांशी गप्पा मारत असताना विषय निघाला तो कंडोमच्या – जाहिरातींवर लादलेल्या वेळमर्यादेचा. नैतिक नियम तयार करण्याचे काम सरकारने करावे की समाजाने स्वत:हून ते तयार करावेत हा तसा किचकट आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पण आधुनिक समाजात जेव्हा एखादा देश लोकशाही, व्यक्ती-मतस्वातंत्र्य यावर कायद्याचे राज्य स्वीकारतो तेव्हा समाजाला नैतिक पातळीवर दिशादिग्दर्शन करण्याचे काम सरकारला सोडून द्यावे लागते. ती जबाबदारी समाज स्वत:हून स्वीकारतो.\nखरे तर स्मृती इराणी यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यावर काही तरी चांगले घडेल अशी अपेक्षा होती. कारण त्यांनी अनेक वर्षे हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केलेला असून, त्यातील काही अत्यंत लोकप्रियही होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीसंचिताचा उपयोग या खात्याचा कारभार पाहताना त्यांना झाला असता. परंतु मागील खात्याचा जसा त्याचा कारभार होता तो इकडे ही कायम राहिला. त्यांच्या माहिती व प्रसारण मंत्रालयानी कंडोमच्या जाहिराती दाखवण्याच्या वेळेत बदल केला. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत या जाहिराती टीव्हीवर दाखवता येणार नाहीत. कारण या जाहिराती लहान मुलांच्या दृष्टीने अयोग्य असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात ही यामागची भावना.\nया वेळेत बदल करण्याच्या निर्णयाची सुरुवात होते ती ‘अॅडव्हर्टायजिंग स्टॅण्डर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेपासून. देशातील जाहिरातींच्या दर्जाचे नियमन करणारी ही संस्था. एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातींमधून त्याबद्दलची चुकीची माहिती दिली जात नाहीत ना, यावर ही संस्था लक्ष ठेवते. अशा एखाद्या जाहिरातीबद्दल प्रेक्षक वा ग्राहक या संस्थेकडे तक्रार करू शकतो. कंडोमच्या काही जाहिरातींबाबत अनेक प्रेक्षकांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचे या संस्थेचे म्हणणे असून, त्याबाबत काय करावे अशी विचारणा संस्थेतर्फे माहिती-प्रसारण मंत्रालयाकडे केली आणि त्यावरून मंत्रालयाने सर्व वाहिन्यांना त्याबाबत सूचना केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्रालयाने त्या जाहिरातींवर बंदी घातली नसून, त्यांच्या प्रक्षेपणाची वेळ मर्यादित केली आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत आता त्या जाहिराती दाखविता येणार नाहीत. यातून काय होणार तर लहान मुलांच्या नजरेस त्या पडणार नाहीत व त्यांच्या मनावर विकृत परिणाम होणार नाहीत. हे सगळं विनोदी आहे कारण हे सर्व आपल्या अवघडलेल्यापणातुन बाहेर आलेले आहे. येथे भीती लहान मुलांच्या मनावर कोणते परिणाम होतात याची नसून, ती मुले आसपास वावरत असताना त्या जाहिराती पाहताना आपणा मोठय़ांना जो अवघडेलेलापणा येतो त्याची आहे. हे तथ्य मान्य करण्यास आपली मानसिक तयारी नसते.\nभारत हा तरुणांचा देश आहे आणि या देशात लैंगिकतेविषयी प्रचंड गैरसमज असल्याने लैंगिक गुन्ह्यांचे व आजारांचे प्रमाण अधिक आहे, असे अनेक अहवाल सरकारकडूनच प्रसिद्ध झाले आहेत. २०१५मध्ये ‘लॅन्सेट’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देशात सुमारे एक कोटी ५६ लाख गर्भपात नोंदले गेल्याची माहिती आहे. सरकारच्या मते देशातल्या जवळपास ५० टक्के विवाहित जोडप्यांना गर्भनिरोधकांची प्राथमिक माहितीही नसते. आपल्याकडे लैंगिक शिक्षणात गैरसमज, माहितीचा अभाव इतका प्रचंड आहे की, त्या ज्ञानाचा प्रसार कसा करायचा हा प्रश्न एक दशकापूर्वी असायचा. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. टेलिव्हिजन माध्यमे, मुद्रित माध्यमांचा विस्तार या दोन दशकांत कमालीचा झालेला आहे. सोशल मीडियाही झपाट्याने माहितीची देवाणघेवाण करत आहे. अशा काळात जाहिरातींवरच्या ब���दीमुळे सरकार काय साध्य करणार हा प्रश्न आहे.\nटीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या वेळेमध्ये बदल केवळ आपल्या अवघडलेल्यापणामुळे केले असेल तर आपल्या काळजी घ्यावी लागेल ते छुप्प्या पद्धतीने लैंगिकता प्रसिद्धीकरणाऱ्या जाहिरातींची. कारण ते आपण व आपल्या मुलांसाठी घातक आहे. याचा अर्थ या जाहिरातींवर सरसकट बंदी घालावी असा नाही. तर आपण त्या बाबत जागृत राहावे. कारण हा बाजारीकरणाचा एक भाग आहे. ग्राहकवादावर सर्वच माध्यमांचा, तंत्रज्ञानाचा वरचष्मा आहे. त्यांनी आपणा सर्वांच्या आयुष्यात केव्हाच खोलवर प्रवेश केला आहे. त्यामुळे नियंत्रण हे जवळपास अशक्य आहे.\nसरकार government स्मृती इराणी smriti irani मंत्रालय सकाळ टीव्ही आरोग्य health भारत शिक्षण education सोशल मीडिया\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2019-03-25T08:01:50Z", "digest": "sha1:QM6JV3DCFG3POU4XUKX2KLKIUADMRHHL", "length": 11751, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेठीच्या विकासावरून स्मृती इराणींचा पुन्हा कॉंग्रेसवर हल्लाबोल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअमेठीच्या विकासावरून स्मृती इराणींचा पुन्हा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nअमेठी – अमेठी विकासाच्या विषयावरून खूपच मागे पडली असून त्याला कॉंग्रेसचे येथील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत अशी टीका भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. गांधी कुटुंबाने गेली पाच दशके येथील जी विकास कामे दुर्लक्षित केली होती ती मोदी सरकारने चार वर्षात मार्गी लावली असा दावाहीं त्यांनी केला.\nराहुल गांधी यांच्या प्रस्तावित अमेठी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या की राहुल गांधी यांना या मतदार संघात जादा दौरे करायला आम्ही भाग पाडू असे जे आश्वासन आम्ही दिले होते ते आश्वासन आम्ही पुर्ण केले असून राहुल गांधी आता अमेठीचे वारंवार दौरे करू लागले आहेत असे त्या म्हणाल्या. माझ्यामुळेच ते येथे वारंवार येऊ लागतील असे आपण सन 2014 च्या निवडणुकीत म्हणालो होतो ते आता खरे ठरत आहे असेही त्या म्हणाल्या.\nअमेठीत चार वर्षात झालेल��या कामांची माहिती देताना त्या म्हणाल्या की स्वच्छ भारत योजने अंतर्गत येथे स्वच्छतेची मोठी कामे झाली आहेत. या मतदार संघातील 180 गावात शंभर टक्के शौचालये उभारली गेली आहेत. या कामांतून हा भाग विकास पासून आत्ता पर्यंत कसा वंचित राहिला होता हे आता उघडपणे दिसून येत आहे असे त्या म्हणाल्या. या मतदार संघात भाजपचा उमेदवार विजयी होत नसला तरी हा भाग विकासापासून मागे राहु नये अशी मोदींची इच्छा आहे त्यानुसार येथे विकासाचे काम मार्गी लागत आहे असे त्या म्हणाल्या.\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nस्वयंघोषित ‘विद्वान’ मंत्री देशातील बुद्धिवंताना शिकवणार – राहुल गांधी\nघराणेशाही कॉंग्रेसला महागात पडते आहे – अरुण जेटली\nचंद्रपुरात बांगडेंऐवजी धानोरकरांना उमेदवारी\nकॉंग्रेसचे नेते पाकिस्तानातून निवडणूक जिंकतील – राम माधव\n….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होती\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुस���इड नोट\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/other-accussed-regarding-sikh-riots-congress-giving-oath-him-today-jetley-3998", "date_download": "2019-03-25T07:30:06Z", "digest": "sha1:ZYO3YD2VH3KMQ3DL7TZCM2R7XFZIBMHR", "length": 7015, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Other Accussed Regarding Sikh Riots Congress Is Giving Oath To Him Today- jetley | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेस शीख दंगलीतील आरोपीला मुख्यमंत्रीपदाची शपथ, जेटलींची घणाघाती टिका\nकाँग्रेस शीख दंगलीतील आरोपीला मुख्यमंत्रीपदाची शपथ, जेटलींची घणाघाती टिका\nकाँग्रेस शीख दंगलीतील आरोपीला मुख्यमंत्रीपदाची शपथ, जेटलींची घणाघाती टिका\nकाँग्रेस शीख दंगलीतील आरोपीला मुख्यमंत्रीपदाची शपथ, जेटलींची घणाघाती टिका\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली- काँग्रेस नेते सज्जन कुमार याच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर 1984 मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. यांपैकी सज्जनकुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने आज दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, दुसऱ्या आरोपीला काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची शपथ देत असल्याची टीका केंद्रिय मंत्री अरूण जेटली यांनी केला आहे.\nनवी दिल्ली- काँग्रेस नेते सज्जन कुमार याच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर 1984 मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. यांपैकी सज्जनकुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने आज दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, दुसऱ्या आरोपीला काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची शपथ देत असल्याची टीका केंद्रिय मंत्री अरूण जेटली यांनी केला आहे.\nअरुण जेटली म्हणाले की, या दंगलप्रकरणात शीख समाज काँग्रेसच्या ज्या दुसऱ्या एका नेत्याला दोषी मानते त्या नेत्याला काँग्रेस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ देत आह���. शिक्षा सुनावण्यात आलेला सज्जन कुमार हा 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीचे प्रतिक आहेत. या प्रकरणात आता शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात आहे.\nपुढे ते म्हणाले की या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. न्यायालयाची ही खूप मोठी कामगिरी आहे. आमच्यापैकी अनेक जण या हत्याकांडाचे साक्षीदार होते. सर्वात भयंकर असे हे हत्याकांड होते. त्यावेळी काँग्रेस सरकार दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले होते.\nकाँग्रेस दंगल उच्च न्यायालय high court अरुण जेटली arun jaitley सरकार government riots congress\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1299", "date_download": "2019-03-25T08:30:36Z", "digest": "sha1:XLJSLWKJUP3FJ6OE6UXKDD2R7VXE4CT5", "length": 7798, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मोरारजींचा वाढदिवस… | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअत्रे टीका करताना विरोधकांची सालडी सोलत असले तरी त्यांच्या स्वभावात दीर्घ द्वेष नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पंडित नेहरूंची रेवडी उडवणारे अत्रे, नेहरूंच्या निधनानंतर अग्रलेखांची मालिका लिहितात, ज्यातून 'सूर्यास्त' सारखे ह्रदयस्पर्शी पुस्तक तयार झाले, पण अत्र्यांचा शेवटपर्यंत राग राहिला तो मोरारजी देसाईंवर.\nसंयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे यांना तुरुंगवास घडला. ते अडीच महिने तुरूंगात होते. 29 फेब्रुवारी हा मोरारजींचा वाढदिवस. मोरारजींचा साठावा वाढदिवस 1956 साली होता. 29 फेब्रुवारी ही तारीख दर चार वर्षांनी येते. त्यामुळे साठ वर्षांच्या आयुष्यात मोरारजींचे पंधरा वेळा वाढदिवस झाले. त्याचा अर्थ अत्र्यांनी काढला तो अफलातून. मोरारजींचे शरीर जरी साठ वर्षांचे असले, तरी बौध्दिक वय पंधरा वर्षोंचे आहे तेंव्हा त्यांचा वाढदिवस साजरा केलाच पाहिजे' असे अत्र्यांनी ठरवले. पण त्या वेळी ते ठाण्याच्या तुरुंगात होते. म्हणून अत्र्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी कावळ्यांना जिलबी खायला घालून वाढदिवस साजरा करायचे ठरवले\nत्याप्रमाणे तुरुंगाच्या कँटिनमधून ताटभर जिलेबी विकत आणली, त्यानंतर अत्र्यांनी त्या कावळयांसमोर जे भाषण केले ते वाचण्यासारखे आहे. (कावकाव, किलकिलटासह) त्या नंतर कावळ्यांच्या दिशेने जिलेब्या फेकल्या गेल्या. ताटभर जिलेबी त्या काक मंडळींनी फस्त करून टाकली.\nकेजचे पहिले साहित्य संमेलन\nजादूगार रंगसम्राट रघुवीर मुळगावकर\nसंदर्भ: कृतार्थ मुलाखतमाला, रामदास भटकळ, मुलाखत, रत्नाकर मतकरी, पॉप्युलर प्रकाशन\nसंदर्भ: शिलालेख, सोलापूर तालुका, सोलापूर शहर\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090530/main.htm", "date_download": "2019-03-25T08:22:23Z", "digest": "sha1:OF4PN6R6JOO62LYUQMKN3ZNJAGCOCXSI", "length": 19071, "nlines": 53, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ३० मे २००९\nधोनी ब्रिगेड निघाली पुन्हा विश्वचषक जिंकायला\nमुंबई, २९ मे / क्री. प्र.\nमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘ट्वेण्टी-२०’ क्रिकेटचे विश्वविजेतेपद राखण्यासाठीच्या मोहिमेवर भारतीय क्रिकेट संघ आज रवाना झाला. आयपीएल स्पर्धा खेळून दक्षिण आफ्रिकेहून नुकत्याच परतलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा उत्साहाचे उसने अवसान घेतले होते. जायबंदी झहीर खान स्पर्धेआधी तंदुरुस्त होणार या आशेने मात्र या संघात उत्साहाचे वारे संचारले होते.\nशिवस्मारक समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडेच\nमुख्यमंत्र्यांनी मेटे, खेडेकर यांना फटकारले\nमुंबई, २९ मे / खास प्रतिनिधी\nमुंबईतील नियोजित शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला असतानाच समितीचे अध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचे सांगून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला कोणी सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर आक्रमक झालेल्या विनायक मेटे व खेडेकर या मराठा संघटनांच्या नेत्यांना हाणला आहे.\n..तर राज ठाकरे यांना उभा महाराष्ट्र आडवा केल्याशिवाय राहणार नाही\nमुंबई, २९ मे / प्रतिनिधी\nसगळ्��ा महाराष्ट्राच्या हिताचा मक्ता घेतल्यागत बोलण्याची सवय लागलेल्या राज ठाकरे यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, म्हणजे आपण काय लायकीचे आहोत ते त्यांच्या लक्षात येईल. अध्र्या हळकुंडाने पिवळे पडल्यागत राज ठाकरे नको त्या गोष्टीत नाक खुपसून अपुऱ्या माहितीच्या आधारावर वाटेल ती बकबक करीत आहेत. खरे तर राज ठाकरे महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाच पर्यावरणाच्या व अन्य विकासाच्या नावाने तीव्र विरोध केला होता हे कदाचित ठाकरे महाशय विसरले असतील, पण शिवप्रेमी जनता विसरली नाही.\nमेटेंसारखी विषवल्ली जनतेने उखडून फेकावी- मधू चव्हाण\nछत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या अध्यक्षतेखाली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी करून जातीयवादाचे व विद्वेषाचे संतापजनक व हिडीस प्रदर्शन केले आहे ते केवळ निषेधार्ह नाही तर ही विध्वंसक विषवल्ली येथेच उखडून फेकून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनतेने एकत्र येणे आवश्यक आहे, अशा तीव्र शब्दांत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार मधू चव्हाण यांनी हल्ला केला. पुरंदरे यांची नियुक्ती सरकारने रद्द केली तर भाजप त्या विरोधात संघर्ष करील, असा इशारा प्रदेश सरचिटणीस आमदार विनोद तावडे यांनी दिला.\nशिवाजी महाराजांना कोणत्याही जातीत अडकवू नका -शरद पवार\nयुगपुरुषांना जातीच्या भिंतीत बंदिस्त करू नका, असे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना ठणकाविले. छत्रपती शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असा संकुचित विचार रुजणे, हे धोकादायक असून शिवरायांचा इतिहास संभाजी ब्रिगेड ठरविणार काय, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र आणून ज्यांनी एक मोठी ताकद निर्माण केली, अशा महापुरुषाला जातीच्या राजकारणात अडकविणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.\nपुरंदरेंकडून इतिहासाचे विद्रुपीकरण -दलवाई\nइतिहासाचे विद्रुपीकरण करून बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजीमहाराज मुस्लिमविरोधी होते, असा खोटा इतिहास समोर आणला. त्यामुळे मुंबईतील शिवस्मारक समितीवर त्यांची नेमणूक सरकारने करू नये. राज ठाकरे यांन��ही त्यास वादाचे स्वरूप देऊन राजकारण करू नये व हिंसेंची भाषा वापरू नये, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी केले. दलवाई म्हणाले की, शिवाजीमहाराजांचे स्मारक उभारण्यास आमचा पाठिंबा आहे. स्मारकासाठी सरकारने समिती स्थापन केली नसली, तरी नोकरशाहीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या माध्यमातून पुरंदरे यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावास आमचा विरोध आहे. पुरंदरेंपेक्षा अनेक चांगले इतिहासकार आहेत. त्यांना समितीवर घ्यावे. पुरंदरे यांच्यामुळे खोटा इतिहास लोकांसमोर जाईल. ‘जाणता राजा’च्या माध्यमातून त्यांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी बनवली.\nभारतीय विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियात ‘पेट्रोल बॉम्ब’चा हल्ला\nभारतीय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले वांशिक विद्वेषातून होत नसल्याचा कितीही दावा ऑस्ट्रेलियाई प्रशासन करीत असले, तरी हल्ल्यांचे प्रमाण मात्र वाढत आहे. ताज्या घटनेत काल सिडनीमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर ‘पेट्रोल बॉम्ब’ने हल्ला करण्यात आल्याचे उघडकीस आले. हल्ल्यात विद्यार्थी ३० टक्के होरपळला असल्याचे वृत्त येथील भारतीय समुदायाचे स्थानिक वृत्तपत्र ‘साऊथ एशिया टाइम्स’ने दिले आहे. या आठवडय़ात झालेला हा चौथा हल्ला आहे.\nअकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी जीआर जारी\nप्रवेश प्रक्रिया चालणार ३५ दिवस\nमुंबई, २९ मे / प्रतिनिधी\nयंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शासन निर्णय (जीआर) अखेर आज शालेय शिक्षण विभागाने जारी केला. एमएमआरडीए क्षेत्रातील (मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्य़ातील) अकरावीचे प्रवेश केवळ ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे महाविद्यालय स्तरावर अर्ज सादर करण्याचा पर्याय विद्याथ्यार्ंसाठी यंदा उपलब्ध असणार नाही. मात्र अल्पसंख्याक महाविद्यालयातील ५० टक्के व एमसीव्हीसी अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर होतील, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.\nगझल गायिका चित्रा सिंग यांच्या मुलीची आत्महत्या\nमुंबई, २९ मे / प्रतिनिधी\nप्रसिद्ध गझल गायिका चित्रा सिंग यांची मुलगी मोनिका चौधरी (४५) हिने गुरूवारी रात्री वांद्रे येथील घरी गळफास लावू�� आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र कौटुंबिक वादातून मोनिका हिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब अजमावणारी मोनिका वांद्रे येथील पेरी क्रॉस मार्गावर राहते. आज सकाळी तिचा मुलगा तिच्या खोलीमध्ये गेला असता त्याला गळफास लावलेला मोनिकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याने आरडाओरड केली. मोनिकाला तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण परंतु दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे उपायुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले. मोनिका ही सिंग यांची पत्नी चित्रा आणि देबो प्रसाद दत्ता यांची मुलगी होती. दत्ता यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर चित्रा यांनी जगजीत सिंग यांच्याशी विवाह केला. त्यानंतर सिंग यांनी मोनिकाचीही जबाबदारी स्वीकारली होती. काही वर्षांपूर्वी जगजीत सिंग यांचा मुलगा विवेक याचे अपघाती निधन झाले होते.\nउत्तर कोरियाने केली सहावी क्षेपणास्त्र चाचणी\nचालू आठवडय़ाच्या प्रारंभी केलेल्या अणुचाचणीनंतर क्षेपणास्त्रांची सहावी चाचणीही उत्तर कोरियाने शुक्रवारी पार पाडली. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अणुचाचणी केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने र्निबध लादले तर त्याचा आपण प्रतिकार करू असे आज उत्तर कोरियाने म्हटले आहे.उत्तर कोरियाने पूर्वी केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांपेक्षा चालू आठवडय़ात केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्या सर्वार्थाने वेगळ्या आहेत. १६० कि. मी. पर्यंतच्या पल्ल्यामध्ये लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या व भूपृष्ठावरून हवेत मारा करावयाच्या या क्षेपणास्त्राची सहावी यशस्वी चाचणी करण्यात आली. अणुचाचणी केल्याबद्दल आमच्यावर आंतरराष्ट्रीय दबावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने र्निबध लादले तर स्वसंरक्षणासाठी त्याचा प्रतिकार केला जाईल असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/category/g1%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-tags/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T08:51:39Z", "digest": "sha1:F73J7IH7C3KASDMBAXHTF25TML3XULSP", "length": 10073, "nlines": 147, "source_domain": "gangadharmute.com", "title": " नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nगंगाधर मुटे यांनी शनी, 09/07/2016 - 12:53 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nलाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nभेटला काय, न भेटला काय\nमी तरी आपलं जमवून\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nभ��टली काय, न भेटली काय\nमी तरी आपला खिसा भरून\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nRead more about मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2019/02/16/fanasachi-bhaaji/", "date_download": "2019-03-25T07:25:12Z", "digest": "sha1:PJBJVDBYGXCZN3GARRMV34REFJGNG6XJ", "length": 13126, "nlines": 162, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) - Raw Jackfruit Subji – Kathal Subji | My Family Recipes", "raw_content": "\nकच्च्या फणसाची भाजी मराठी\nही महाराष्ट्रीयन स्पेशालिटी भाजी खूप चविष्ट लागते. ज्यांना आवडते त्यांना खूप आवडते आणि बाकी लोकांना अजिबात आवडत नाही. ही ब्राह्मणी पद्धतीची रेसिपी आहे – कांदा लसूण न घालता. मी ह्यात शेंगदाणे आणि काजू घालते. काही जणी काळे वाटाणे, पावटे ही घालतात. रेसिपी सोपी आहे. पण कच्चा फणस चिरणं हे फार कटकटीचं काम असतं. मी पारंपारीक पद्धतीने ही भाजी करते – प्रेशर कुकर मध्ये न शिजवता. पण दुसरी एक सोपी पद्धत माहित आहे ज्यात फणसाचे ४ तुकडे करून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेतात. आणि नंतर त्याचं चारखंड (साल) आणि मधला घट्ट भाग काढून टाकतात. ह्या पद्धतीत फणस कापायला सोपा पडतो पण प्रेशर कुकर मध्ये शिजवल्यामुळे चव जरा बदलते. वेळ कमी असेल तर ही पद्धत वापरू शकता.\nकच्चा फणस १ लहान\nकच्चे शेंगदाणे पाव कप\nचिरलेला गूळ २ चमचे\nसुक्या लाल मिरच्या ५ मध्ये चीर देऊन\nलाल तिखट अर्धा ते १ चमचा\nताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून\nचिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून\n१. शेंगदाणे आणि काजू ४–६ तास भिजवून ठेवा.\n२. फणस धुवून घ्या. कटिंग बोर्ड / ताटली च्या खाली मोठं वर्तमानपत्र पसरून घ्या म्हणजे फणसाचा चीक ओट्यावर / फरशीवर पडणार नाही. कटिंग ��ोर्ड, सुरी, विळी ला व्यवस्थित तेल लावून घ्या. हातालाही तेल लावा. एका पातेलीत अर्धी पातेली पाणी घ्या आणि त्यात ताक मिक्स करा. चिरलेला फणस ह्या पाण्यात घातला की काळा पडत नाही.\n३. फणसाचे ४ तुकडे करा. पांढरा चीक बाहेर येईल तो टिश्यू कागदाने पुसून घ्या. फणसाचे चारखंड (साल ) आणि मधला घट्ट भाग काढून टाका. कच्च्या फणसात बिया नसतात / कोवळ्या असतात. त्या काढाव्या लागत नाहीत. फणसाचे छोटे १ सेमी चे चौकोनी तुकडे करा आणि पाणी, ताकाच्या मिश्रणात घाला. सगळे तुकडे बुडतील एवढं पाणी पातेलीत असू दे.\n४. शेंगदाणे आणि काजू वेगवेगळे प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. शेंगदाणे शिजायला जास्त वेळ लागतो.\n५. एका पातेल्यात तेल घालून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी करा. त्यात लाल मिरच्या घालून चिरलेला फणस घाला. पाणी घालू नका. ३–४ मिनिटं परता.\n६. पाणी न घालता ७–८ मिनिटं झाकण ठेवून शिजवा. ३–४ मिनिटांनी ढवळा.\n७. फणसाचे तुकडे बुडून थोडं वर येईल एवढं पाणी घाला. आणि झाकण ठेवून फणस मऊ होईपर्यंत शिजवा. अगदी पीठ करू नका .\n८. मीठ, गूळ, लाल तिखट, शेंगदाणे, काजू, नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा.\n९. जेवढा रस हवा असेल तेवढं पाणी घालून उकळी काढा. ह्या भाजीला फार रस नसतो. २–३ मिनिटं उकळून गॅस बंद करा.\n१०. फणसाची स्वादिष्ट भाजी तयार आहे. गरम भाजी पोळी बरोबर सर्व्ह करा.\n१. काळे वाटाणे / पावटे घालायचे असतील तर ८ तास भिजवून प्रेशर कुकर मध्ये शिजवून स्टेप ८ मध्ये भाजीत घाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/nagraj-manjule/", "date_download": "2019-03-25T07:37:01Z", "digest": "sha1:GI5L77PUCNWGIKKCJDILPK3OR2ZYJ3WQ", "length": 3967, "nlines": 55, "source_domain": "marathikalakar.com", "title": " nagraj manjule - मराठी कलाकार", "raw_content": "\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nआर्ची आणि परश्याच्या मुलाची कथा “सैराट२” मध्ये\nअभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा पहिलाच चित्रपट “सैराट” सुपरडुपर हिट ठरला होता. बॉक्स...\n‘जाऊ दे ना वं’ आगामी ‘नाळ’ सिनेमातील गाणं प्रदर्शित.\nकाही दिवसांपूर्वी अचानक दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमाची बातमी आली. ‘नाळ’ असं सिनेमाचं नाव असून प्रथमच...\nनागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ सिनेमाचा टिझर रिलीज. पहा झलक.\nसैराट आणि फॅन्ड्री सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर गेले कित्येक दिवस रसिक नागराज मंजुळेंच्या सिनेमाची आतुरतेने वाट...\nनागराज मंजुळेंचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस. झी स्टुडिओची घोषणा.\nदिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पणातच फॅन्ड्री सारखा जबरदस्त सिनेमा देणारे आणि पुढे सैराट सिनेमाने सर्वाना वेड लावणारे दिग्दर्शक...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/timuktvimukt-news/article-on-women-problem-and-struggle-from-different-section-of-indian-society-1172099/", "date_download": "2019-03-25T08:17:17Z", "digest": "sha1:AT26P7XRGSQJIGGUGLZ5L6AF2QJIV6KE", "length": 33096, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आशेचा किरण दिसू लागलाय.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nआशेचा किरण दिसू लागलाय..\nआशेचा किरण दिसू लागलाय..\nमल्लेशच्या इच्छेप्रमाणे एम.टेक. होण्यासाठी त्याला रोख पंचवीस हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली\n‘ती’ मुक्त विमुक्त’ सदराच्या वर्षभराच्या प्रवासात अनेक जातीजमातींचे दुर्लक्षित, प्रलंबित प्रश्न, निर्णय मार्गी लागले. अनेकांना आपल्या जातीचा इतिहास समजला तर काहींना आपल्या अधिकारांची माहिती मिळाली. अनेकांना आर्थिक मदत मिळाली, काहींच्या हाती जातीचे दाखले आले, काही गावांत दिवे आले, पेयजल योजना आली तसेच ‘भटक्यांचे प्रश्न आता नोकरशाही व आमच्याही लक्षात आलेले आहेत’, असं जाहीरपणे सांगण्यात आलंय. जवळजवळ प्रत्येक जातीजमातीला भरघोस आश्वासने तर मिळाली आहेत. ती आश्वासने प्रत्यक्षात उतरली, देशाच्या स्वातंत्र्याचा फायदा आज तरी या लोकांना मिळाला तरी या सदराचे सार्थक झाले असे होईल.\nभटक्या विमुक्त जाती-जमातींवर मी करत असलेल्या कामामुळे लिहिण्याची ही संधी मिळाली आणि ‘ती’ मुक्त-विमुक्त’ हे सदर सुरू झाले. तशी लिखाणाच्या क्षेत्रात मी नवखीच. या आधी माझ्याकडून जे काही थोडेफार लिहिले गेले होते ते स्वत:चा वेळ घेऊन व अदलबदल करत बंधनविरहित अवस्थेत. इथे नियमितपणे ठरावीक तारखेच्या आत लिखाण दिलेच पाहिजे असे बंधन पाळायचे होते. जबाबदारी तर स्वीकारली, विषयांतर्गत समस्यांची जाणही होती. पण मला भटक्या विमुक्तांच्या जिल्ह्य़ाजिल्ह्य़ातल्या वेगवेगळ्या वस्त्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन वर्तमान स्थितीचे, खासकरून स्त्रियांच्या संदर्भातले अनुभव व निरीक्षण लिहायचे होते. एकाच जमाती व पोटजमातीसाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवासास लागणारा वेळ, वस्तीवरच्या बेशिस्त पण प्रमुख भटक्या लोकांची प्रतीक्षा करण्याचा वेळ, ऐतिहासिक-समाजशास्त्रीय संदर्भासाठी करावा लागणारा अभ्यास, शिवाय स्वत:चा लिखाणातला मंद वेग लक्षात येऊन सुरुवातीच्या काळात माझी झोपच उडाली होती. पण आज सदर संपत असताना याचे समाधान आहे की या लेखांमुळे खूप काही विधायक गोष्टी घडल्या आहेत.\n‘बहुरुपी लिंगव्वा..’ हा लेख वाचून, पुण्याचे सॉफ्टवेअर इंजिनीयर उदय जोशी सोलापूरला स्वत: आले. भिक्षा मागणाऱ्या लिंगव्वाची आणि ‘बी टेक’च्या चौथ्या वर्षांत शिकणारा तिचा मुलगा मल्लेशची त्यांनी भेट घेतली. मल्लेशच्या इच्छेप्रमाणे एम.टेक. होण्यासाठी त्याला रोख पंचवीस हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली. पुढे गरजेप्रमाणे आणखी साहाय्य करण्याचे आश्वासनही दिले. त्या निमित्ताने सोलापुरातील जाणकार लोकांसह भटक्या जमातींची बैठक झाली. लिंगव्वा आणि मल्लेशच्या जिद्दीचे कौतुक झाले. उदय जोशींसह स्थानिक लोकांनीसुद्धा भटक्यांच्या गरीब व होतकरू मुलांमुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे घोषित केले. जमातीच्या लोकांत जाणीव जागृतीची लाट उसळली.\nया सदरामुळे प्रसिद्धी माध्यमांचे लक्षसुद्धा भटक्यांच्या समस्यांकडे वेधले गेले. एका वृत्तवाहिनीने आमच्या सहभागाने तयार केलेल्या ‘कडकलक्ष्मी’ जमातीवरच्या माहितीपटात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी घोषित केले आहे की, हा समाज आजही सर्व बाबतीत दुर्लक्षित आहे. त्यांना जातीचे दाखले व कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुलभपणे मिळण्याची गरज आहे. यांच्या आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढवले जाईल. भटक्��ा विमुक्तांसाठीचे महामंडळ, सामाजिक न्याय मंत्रालय आणि बार्टी (बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) या तिघांच्या साहाय्याने राज्यात ठिकठिकाणी कँप घेऊन यांच्या समस्या सोडविण्यात येतील. आजपर्यंत बार्टीमार्फत केवळ अनुसूचित जातीच्या संशोधन व प्रशिक्षणासाठीच पैसा खर्च केला जायचा. मंत्रीमहोदयांच्या वरील आश्वासनानंतर बार्टीने अनुसूचित जातींच्या उमेदवारांबरोबर भटक्या विमुक्तांच्या उमेदवारांसाठीसुद्धा शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी जाहिरात प्रथमच दिली आहे.\n‘जगणं मसणाच्या वाटेवरचं’ या लेखाने पोरक्या मसनजोगी जमातीकडे साऱ्याच समाज घटकांचे लक्ष वेधले गेले. खासकरून जिद्द व सचोटीच्या जोरावर जमातीत पहिली एम.बी.बी.एस. डॉक्टर होऊनही दुर्लक्षित राहिलेल्या कल्पना मारुती कोळी यांचे समाजातल्या सर्व घटकांनी कौतुक व सत्कार केले. जमातबाह्य़ सहानुभूतीदार मित्रांची वाढ झाली. सोलापुरात या जमातीची राष्ट्रीय परिषद झाली. घटनात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. मागण्यांचे पत्रक घेऊन नुकतेच त्यांचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटले आहे.\n‘आसवेच स्वातंत्र्याची’, ‘सोंगे धरिता नाना परी’ आणि ‘जगण्याचे हाल हीच प्रेरणा’ हे लेख अमरावती जिल्ह्य़ातल्या पालधारकांना बरेच लाभाचे ठरले आहेत. तेथील स्थानिक आमदार बच्चू कडू हे या माहितीने चिंतित होऊन जिल्ह्य़ातल्या प्रत्येक तालुक्यातील पालवस्तीची स्वत: पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक कार्यकर्त्यां बबिता व तिचे पती राजकपूर बहुरुपी यांच्या साथीने त्यांनी सात तालुक्यातील भटक्यांच्या सर्व पालवस्त्यांना भेटी देऊन त्यांची पाहणी केली आहे. आणखी सात तालुक्यातल्या वस्त्यांची पाहणी चालू आहे. पालधारकांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील सर्व तहसीलदारांची बैठक आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यातच बोलावली होती. सामाजिक कार्यकर्त्यां बबिता व राजकपूर या जोडप्याला त्या बैठकीचे निमंत्रण होते. बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रत्येक पालवस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी इंधन विहीर खोदून त्यावर हापसा बसविण्यात यावा, प्रत्येक पालवस्तीत अंगणवाडी सुरू करण्यात यावी, प्रत्येक पालवस्तीत सौरऊर्जेचे दिवे बसविण्यात या��ेत, प्रत्येक पालवस्तीत आरोग्य तपासण्यासाठी डॉक्टर नियमितपणे जातील अशी व्यवस्था करावी, खास पालवस्त्यांसाठी सोयीचे ठरेल अशा ठिकाणी शिबिरे घेऊन त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड व दाखले सुलभपणे मिळतील असे पाहावे, प्रत्येक तहसीलदाराच्या क्षेत्रातील पालांची पाहाणी त्यांनी करावी आणि त्यांना सरकारी योजनांप्रमाणे घरे देण्यासाठी सरकारी जागा कुठे उपलब्ध होऊ शकते त्याचा शोध घ्यावा, याशिवाय अमरावतीचे खासदार आनंदराव आडसूळ यांनी देशभरातल्या पोरक्या भटक्या विमुक्तांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडविणे आणि भटक्या विमुक्तांच्या राष्ट्रीय पातळीवर प्रलंबित असलेल्या इतर मागण्यांवर तातडीने विचार व्हावा यासाठी लोकसभेत नुकतेच खासगी बिल मांडले आहे.\n‘छप्पर हरवलेल्या पिढय़ा’ हा लेख वाचून छप्परबंद जमातीच्या राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या अनेक युवकांनी सांगितले की, आम्हालाच आमचा इतिहास विस्ताराने माहीत नव्हता. त्यांच्या वेगवेगळ्या गटांत, संघटनांत पुन्हा नव्याने संवाद सुरू झाला. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी पुण्यात छप्परबंद समाजाचा मेळावा झाला. राज्यातल्या अनेक शहरांतून लोक एकत्र आले होते. भटके विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भिकुजी(दादा) इदाते यांनी जमातीच्या व्यथा, समस्या समजून घेतल्या. राज्याचे समाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी, छप्परबंद समाजाला पुण्यात एक हजार लोक बसतील असे समाजमंदिर बांधून देण्याचे, रिक्षा चालविणाऱ्यांना रिक्षा देण्याचे, छप्परबंद समाजाला शासनाच्या वतीने बीपीएल कार्ड वाटप करण्याचे, नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आणि पर्यायी जागा व घरे मिळवून दिल्या शिवाय रेल्वे भरावावरच्या झोपडय़ा उठवू देणार नसल्याचे जाहीर आश्वासन दिले आहे.\n‘परंपरागत व्यवसाय हरवलेले भिल्ल गोसावी’ हा लेख वाचून जमातीतल्या युवकांनी व निरनिराळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी माझ्याशी चर्चा केली. नंतर एकत्र येऊन, जमातीच्या संदर्भात सखोल संशोधन व्हावे, जमातीकडे झालेले दुर्लक्ष नष्ट होऊन जमातीच्या वर्गीकरणाबाबत आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत जमातीला न्याय मिळावा या मागण्या घेऊन त्यांचे निवेदन शिष्टमंडळांद्वारे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, मुख्य��ंत्री, बार्टी यांना सादर करण्यात आले आहे. बार्टीतर्फे संशोधन सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n‘अभावग्रस्त गवलान’ हा लेख वाचून मेळघाटातल्या मागास व भूमिहीन गवलान व गवळी जमातीच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधून सांगितले की, आम्हाला पहिल्यांदा कळले की जंगलसंदर्भातल्या ‘पेसा’ कायद्यानुसार आम्हास वन जमिनीवर वारसा हक्क किंवा वहिवाटीचा हक्क सांगता येतो. त्यानुसार आवश्यक कागदपत्राचे पुरावे जमा करून ते आपला हक्क प्रस्थापित करू इच्छितात.\n‘जगणे झाले अवघड’ हा लेख वाचून यवतमाळ जिल्ह्य़ातील चिकणी-भंडारीच्या सरपंच चंद्रकला नारायण शिंदे यानी खूप आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘नव्याने वसवलेल्या आमच्या श्रीनाथ नगरचे काम ग्रामीण भागातल्या आडवाटेवर अंधारातच झाकले गेले होते. ते राज्यपातळीवर प्रकाशात आले. आम्हाला प्रतिष्ठा मिळाली. शहरातले नवनवीन लोक श्रीनाथ नगरला भेटी देऊ लागले. सहानुभूतीदार मित्रांची वाढ झाली. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा वेग वाढला. रस्त्यावर विजेचे दिवे लागले. पेयजल योजना आली. दोन गटांची एकूण ४० घरे बांधून पूर्ण झाली आहेत. इथे सरकारी शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे गुंडगिरीच्या भीतीने पळून गेलेल्या गरीब कुटुंबात निर्भयता आली. ते परतु लागले आहेत. आमच्याकडे बघण्याचा पोलिसांचा दृष्टिकोन बदलला आहे.’ चंद्रकलाबाई नव्याने निवडून आल्या आणि पुन्हा एकदा सरपंच झाल्या आहेत.\nकाशीकापडी जमातीवरचा ‘बेघरपणा आणि भूमिहीनता कायमचीच’ हा लेख आला. जळगाव येथे गेल्या पाच-सहा वर्षांपासून ज्यांना जातीचे दाखले मिळत नव्हते त्या काशी कापडी जमातीच्या पन्नास लोकांना पंधरा दिवसात जातीचे दाखले मिळाले. स्थानिक आमदार मामा भोळे म्हणाले, ‘भटक्यांचे प्रश्न आता नोकरशाही व आमच्याही लक्षात आलेले आहेत. जातीच्या दाखल्याबाबत भटक्या जमातीच्या कोणालाही अडचण आल्यास मला भेटायला सांगा. मी मदत करीन.’\nवर्षभर चालेल्या ‘ती’मुक्त-विमुक्त सदराने लोकांच्या पातळीवर वरीलप्रमाणे लाभ होण्यास सुरुवात झाली असली तरी वैयक्तिक पातळीवर माझा खूप लाभ झाला आहे. देश-विदेशातील ज्ञान-विज्ञान, कला, प्रशासन, राजकारण, प्रसिद्धी माध्यम, उद्योग आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार मंडळींनी माझे कौतुक करून माझ्या कामाला पाठिंबा जाहीर केला आहे. बऱ्याच प्रश���सकीय अधिकाऱ्यांनी योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांनी, समाजातल्या एका वेगळ्या वंचित व दुर्लक्षित समाजघटकांची माहीत नसलेली माहिती मिळाली असे सांगून कौतुक केले आहे. काही दानशूर लोकांनी या लोकांसाठी रचनात्मक काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे शासकीय जात पडताळणी समितीतील काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, उमेदवारांची जात समजून घेण्यातला गुंता व अडचणी सुटण्यास या लेखमालेमुळे बरीच मदत झाली आहे.\nएकूणच सामाजिक पातळीवर लोकांच्या समस्यापूर्तीस कारणीभूत ठरणारी, माझी स्वत:ची क्षमता वृद्धी करणारी आणि देशातले तथा सातासमुद्रापलीकडचे सहानुभूतीदार मित्र मिळवून देणारी लेखमाला लिहिण्याची संधी मिळाली आणि अनेकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले याचं समाधान आहे. मात्र हे काम असेच पुढे चालू राहणार आहे, हेही तितकंच खरं..\n‘असू एकटय़ा, पण एकाकी नव्हे’ या १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे पुण्यातील ‘एकी’ ग्रुप वीणा गोखले यांनी सुरू केला नसून सुर्वणा जोशी आणि गीता ग्रामोपाध्ये यांनी सुरू केला आहे. पुण्यातल्या आमच्या मैत्रिणींना त्या ग्रुप मध्ये सहभागी व्हायचं असेल तर ७५०६१९२३३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nका गं तुझे डोळे ओले\nत्यांची दु:खं जाणवायला हवी सहसंवेदना\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/2695851", "date_download": "2019-03-25T07:28:24Z", "digest": "sha1:RNSFKHQIQ7UCBZ255R5OQYP5MBNE3JAD", "length": 22468, "nlines": 62, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt: ईमेल मार्केटिंगसाठी सर्वोत्तम वारंवारिता काय आहे?", "raw_content": "\nSemalt: ईमेल मार्केटिंगसाठी सर्वोत्तम वारंवारिता काय आहे\nव्यवसाय किती वेळा आपल्या ग्राहकांना मेल करतात संशोधन मासिक संपर्क सरासरी संख्या मिळतो.\nहे ईमेल विपणकांसाठी क्लासिक 'कठीण प्रश्न' आहेत जे नेहमी खूप वादविवाद वाढवते. इव्हेंटच्या ईमेल रिमाइंडर वारंवारतेबद्दल आमच्या Semalt-गेट गटावर एक प्रश्न होता 20 टिप्पण्या.\nईमेल इ-मेल पाठविण्यासाठी सर्वोत्तम वारंवारता निवडणे आव्हानात्मक आहे कारण आम्ही प्रतिसाद वाढवू पाहत आहोत, परंतु 'अति-मेलिंग' टाळण्यासाठी जे अनसॉचुअर्सचे अस्वीकार्य पातळी गाठू शकते आणि निष्क्रियतेत वाढ होऊ शकते कारण आमच्या प्रेक्षकांना ते स्पॅम केले जात आहे असे वाटते . जरी ते सदस्यत्व रद्द करत नसले तरीही ते \"भावनिकरित्या रद्द\" होतील - wedding cocktail hats. तरीही मिमालिंग, ओव्हरलाइंगसह, व्यवसायात ईमेल वितरण समस्या असू शकतात आणि संदेश इनबॉक्समध्ये अजिबात मिळत नाहीत.\nदुसरीकडे 'अंडर मेलिंग' सह, योग्यता आणि जाहिरातींचे स्पष्टीकरण किंवा योग्य ग्राहक आणि विक्रीसमोर योग्य उत्पादन मिळवण्याच्या संधी गमावल्या जाऊ शकतात.\nडीएमएचे नॅशनल ईमेल क्लायंट रिपोर्ट आता 'मार्केटर ईमेल ट्रॅकर' म्हणून ओळखली जाते, असे आम्हाला आढळते, साधारणतया, मागील चार वर्षांमध्ये अशी एक प्रवृत्ती आहे जिथे कंपन्या मासिक आधारांवर कमी लोकांशी संपर्क साधत आहेत. ईमेलला त्यांच्या दृष्टिकोनातून अधिक धोरणात्मक बनण्याच्या दृष्टीने पाहावे जे सामग्रीस संबंधित असणे आवश्यक आहे आणि प्रोग्रामॅटिक समयबद्ध मोहिमेऐवजी वर्तणुकीवर आधारित आणि ट्रिगर केलेल्या विपणन आधारित अधिक वेगाने पुढे जाणे आवश्यक आहे. हे अतिशय स्पष्ट आहे की अप्रासंगिक, कमी गुणवत्ता ईमेल ब्रँडला हानी पोहोचवू शकतात आणि सदस्यता रद्द करण्याची संख्या वाढवू शकते.\nडीएमएच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 17% कंपन्या त्यांचे संपर्क, 8% 6-8 वेळा आणि महिन्यामध्ये 8 वेळा पेक्षा 8% जास्त दर महिन्याला 4-5 ईमेल पाठवत आहेत.\nदुसरीकडे, वारंवारता खूप कमी असू शकते आणि कंपन्���ांना अजूनही सावधगिरीची गरज आहे कारण ब्रँड जागरूकताबद्दल फारच थोडे संपर्क चांगला नाही. 2015 मध्ये 25% प्रतिसादक प्रत्येक संपर्कसाठी दरमहा फक्त एक ईमेल पाठवत होते\nअर्थात, हा डेटा क्रॉस-सेक्टर आहे, म्हणून आम्ही किरकोळ विक्रेते आणि प्रकाशकांसारख्या काही प्रकारचे व्यवसायांसाठी किमान साप्ताहिक, संभवतः दररोज ईमेल करण्याची अपेक्षा करू. रिसर्च आपल्यास स्वागत ईमेल, वैयक्तिकरण आणि डायनॅमिक सामग्रीसारख्या जीवनचक्राच्या ईमेलचा प्रभाव दर्शवित नाही जी सामग्री अधिक उपयुक्त आणि संदर्भित करण्यात मदत करतात परंतु सामग्री दर्शविणार्या सदस्यांना ईमेलद्वारे वारंवारता वाढवू शकते.\nएक्सपर्ट सदस्य स्त्रोत डाउनलोड करा - अॅडव्हान्स लाइफसायकल Semalt मार्केटिंग गाइड\nहे मार्गदर्शक अधिक संबंधित ईमेल वितरीत करण्यासाठी आणि ग्राहक जीवनचक्रात संपूर्ण वारंवारतेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पर्यायांमध्ये मदत करते.\nप्रगत जीवनचक्र ईमेल मार्केटिंग मार्गदर्शिका\nप्र. प्रतिसाद वाढविण्यासाठी सर्वोत्तम ईमेल वारंवारता काय आहे\nइष्टतम ईमेल वारंवारता आहे का तो एक ईमेल एक चतुर्थांश, आठवडा, महिना किंवा दिवस अगदी आहे तो एक ईमेल एक चतुर्थांश, आठवडा, महिना किंवा दिवस अगदी आहे अधिक कमी किंवा जास्त आहे का \nहा एक मूलभूत प्रश्न आहे ज्यामुळे प्रत्येक डिजिटल मार्केटरने अधिकतम कमाई नफा किंवा ईमेल क्रियाकलाप प्रतिसाद दर्शविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटले की मी काही चाचणी सूचना आणि केस स्टडी सामायिक करू जे आपणास ठरवू शकतील.\nसरासरी यूके ईमेल वारंवारता\nजेव्हा 2010 मध्ये मी यू.के. डीएमए नॅशनल क्लायंट बेंचमार्क अहवालासाठी निष्कर्ष लिहितो, तेव्हा जेव्हा मी हे पोस्ट लिहितो तेव्हा मूळ संशोधनाची त्याची तुलना करा. हा प्रश्न येथे होता: आपण एका महिन्यामध्ये आपल्या पत्त्यावरील पत्त्याशी किती वेळा संपर्क साधला आहे\nसेमॅट चालू ईमेल वारंवारता आणि ग्राहक प्रतिसाद वर्तन\nया प्रश्नाचे उत्तर देण्याचा पहिला टप्पा म्हणजे ग्राहकांच्या क्रियाकलाप आणि गृहीतकावरील आपल्या ईमेल विपणन प्रक्रियेच्या परिणामांचे मूल्यांकन करणे. वारंवारता खूप जास्त असल्यास, सदस्य ट्यून होईल. मापन करण्यासाठीची स्पष्ट गोष्ट एकुण उघडे आहे आणि क्लिक दर आणि बहुतेक ई-मेल प्रसारणाच्या प्रणाली या��ध्ये चांगले आहेत. मार्क ब्राउनलॉने ईमेल आवृत्तिच्या ग्राहक धारणांवर संशोधन केले आहे. अरेरे\nसेमॅट मापदंड आपण आणि आपल्या प्रतिस्पर्धी प्रति आठवड्यात, महिन्यासाठी किंवा वर्षांना पाठविलेल्या ईमेलच्या संख्येची सरासरी पाहण्यासारखे आहे.\nपरंतु आपल्याला त्यापलीकडे जावे लागेल आणि या उपायांचा वापर करावा लागेल जेणेकरून बहुतेक प्रणाली सहजपणे मापन करू शकणार नाहीत, म्हणून आपल्याला ओळखण्यासाठी आणखी काही विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे:\nवेगवेगळ्या सूची सदस्यांकरिता प्राप्त झालेल्या ईमेलची सरासरी वारंवारता आणि प्लॉट प्रोफाइल - ज्या सूचीमध्ये बरेच किंवा दोन ईमेल प्राप्त होत आहेत त्यांचा तपशील पाहण्यासाठी - चार्ट पहा.\nसूची क्रियाकलाप - आपल्या यादीमधील% उघडते, क्लिक करा आणि एका कालावधीत खरेदी करा, e. जी तिमाही किंवा वार्षिक\nपुनरावलोकनाची अलीकडील - अंतिम उघडण्यासाठीची सरासरी, क्लिक किंवा खरेदी - चांगली टिप म्हणजे विश्लेषणासाठी क्षेत्र म्हणून आपला ईमेल डेटाबेसमधील पुनरावृत्तीचा संग्रह करणे. वैकल्पिकरित्या क्रियाकलापाद्वारे सदस्यांची यादी करा आणि डेटाबेसमध्ये देखील हे संचयित करा.\nयादी प्रकारात बदल करा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सदस्यांची पुनरावृत्ती करा - हे वारंवारता काही विभागांसाठी कार्य करत आहे परंतु इतरांना नाही.\nसूचीमध्ये वेळोवेळी सूची क्रियाकलाप तोडून टाका - कॉमन्सेंस सुचवितो की, आता ते आपल्या यादीमध्ये आहेत, कमी प्रतिसाद आपले ईमेल होतील\nवर निर्णय घेण्याचे Semalt पर्याय\nआंत वृत्तीमुळे उत्तर देणे सोपे नाही, म्हणून तुम्हाला चाचणी घ्यावी लागेल. तर आपण वारंवारतेवर कसा निर्णय घेता येथे काही कल्पना आणि उदाहरण आहेत ज्यात आपण वारंवारतेच्या परीक्षणाशी संपर्क साधू शकता:\nविरुद्ध वारंवारित्या बदल तपासण्यासाठी यादृच्छिक नियंत्रण गट परिभाषित. येथे आपण नियंत्रण गटासाठी वर्तमान मेलिंग वारंवारतेसह पुढे चालू ठेवा आणि नंतर इतर गटांसाठी वारंवारता बदलू शकता आणि प्रतिसादांमध्ये बदलांचे पुनरावलोकन करा आणि विशेषत: प्रति 1000 ग्राहकांदरम्यान कमाईचे पुनरावलोकन करा. एका प्रकरणात एक बँक दर महिन्याला 1,2,3,4 वेळा फ्रिक्वेन्सीची प्रयत्न करते आणि योग्य वारंवारतेने असे आढळले आहे.\nसीन डफीने कळविले की कसे मिडलॅकने वाढीव वारंवारतेचा दीर्घ��ालीन परिणाम मोजला आणि दुसऱ्या पाठविलेल्या एका महिन्यात सामील झालेल्या अर्धा नवीन ग्राहकांसह एक नियंत्रण गट तयार केला.\nतीन महिन्यांपर्यंत या नियंत्रण गटास एकाच वेळी साइटवर सामील झालेल्या लोकांशी मोजले गेले परंतु अद्याप आठवड्यातून दोन ईमेल्सची डीफॉल्ट सेटिंग प्राप्त झाली नाही. खुल्या दर 86% जास्त आहेत, दर 57% निम्न रेट रद्द करतात.\nपण सर्वात जास्त ईमेल पाठविण्यामागील प्रमुख कारण दीर्घकालीन नुकसानदायी ठरते - जे त्या आठवड्यात केवळ एक ईमेल प्राप्त करीत होते 14% अधिक बुकिंग त्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन ईमेल प्राप्त करणार्यापेक्षा \nया प्रकरणात फॅशन ई-रिटेलर नेट-ए-पोर्टर. कॉमने ब्रँड रिपब्लिकुसार ग्राहकांना पाठवलेल्या ईमेल्सची संख्या 10 वरून आठवड्यातून दोनपर्यंत कमी केली.\nकाही ग्राहक आठवड्यातून 10 वेळा ईमेल करत होते जेनेटिक अद्यतने, ठराविक डिझाइनरचे हायलाइट्स आणि नवीन उत्पादनांचे तपशील यासह.\nनेट-अ-पोर्टर प्रयोग केल्यानंतर कॉम आता प्रत्येक वापरकर्त्याला एका आठवड्यात स्वयंचलितपणे व्युत्पन्न केलेले ईमेल पाठविते जे त्यांच्या विशिष्ट आवडी आणि प्राधान्ये विचारात घेतात. रुपांतरण दर वाढली आहे. साम्प्लेट अपडेट ईमेल्सना 10% पेक्षा जास्त आणि \"न्यूजलेटर ईमेल\" चा एक रूपांतरण दर प्राप्त होतात.\nअहवालात ई-मेल मार्केटिंगची वारंवारता मिळविण्याचा महत्त्व देखील दर्शविला आहे. कंपनी आठवड्यात सुमारे 300,000 ईमेल पाठविते. ईमेल मिडल विक्रीच्या 32% चालवतो आणि प्रत्येक महिन्याला महसूल 1 मि पेक्षा जास्त उत्पन्न करते.\nToptable उदाहरणामध्ये आपल्यास एक ईमेल न्यूजलेटर असल्यास, या उदाहरणांपेक्षा चाचणी अधिक जटिल आहे कारण वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल जसे की वृत्तपत्रे, प्रचारात्मक ईमेल आणि वैयक्तिकरित्या अनुरूप कार्यक्रम-ट्रिगर केलेल्या ईमेल आहेत. प्रत्येक विभागासाठी मिमलट ऑफर किंवा सर्जनशीलता देखील यावर भरून जाईल.\nफ्रिक्वेन्सी कोंडी सोडवण्यासाठी इतर पर्याय म्हणजे:\nअ. अॅमेझॉन या अंमलबजावणीमध्ये चांगला आहे आणि एखाद्या ब्राउजिंग, शोध किंवा खरेदीच्या प्रतिसादात पाठवलेल्या इव्हेंट-ट्रिगर केलेल्या इमेजेसद्वारे वारंवारता वाढविते - हे उत्कृष्ट दृष्टिकोन आहे\nबी विविध विभागांसाठी वारंवारता बदला . एक वारंवारता आकार कधीही सर्व फिट होणार नाही. म्हणून ज��� आपल्याला असे आढळले की खुल्या किंवा विशिष्ट सेगमेंट्ससाठी प्रतिसाद कमी आहे, तर ते निष्क्रिय असताना वारंवारता कमी करा.\nसी. ग्राहकांना वारंवारतेवर पर्याय द्या. आपण हे त्यांच्या प्रोफाइल किंवा \"संप्रेषण प्राधान्य केंद्र\" द्वारे करा. प्रोफाइल किंवा सर्वेक्षण (ई-मेल, डीएम) द्वारे सामग्री आणि वारंवारता पर्याय बदलण्यासाठी पर्याय द्या\nडी कमी ई-मेल प्रतिसादसह ग्राहकांसाठी थेट मेल किंवा एसएम वाढवा हे कधीकधी \"योग्य चॅनेलिंग\" म्हटले जाते हे मूल्य तपासण्यासाठी एक हँडआउट गट वापरा. या छोट्याशा समूहाने, कदाचित आपल्या यादीतील 5% किंवा विशिष्ट सेगमेंट ज्याला कॅटलॉग (किंवा आपण याचे परीक्षण करत असल्यास ईमेल) प्राप्त होत नाही.\nई. पुन्हा सहमती मोहिम ई-मेल सदस्यांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुन्हा सक्रियता मोहिम सामग्री किंवा सवलती वापरतात.\nआपण हे कशाचे परीक्षण केले ते आपल्याला काय वाटते हे ऐकण्यास स्वारस्य आहे, किंवा आपल्याला वाटते की एखाद्या क्षेत्रातील वारंवारता खूप उच्च आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/amritsars-miracle-baby-boy-flushed-down-train-toilet-recovered-alive-4043", "date_download": "2019-03-25T08:11:41Z", "digest": "sha1:4FGMUT3PXIM27ORRVTN2Q57XSCU3N2D7", "length": 6599, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Amritsars miracle baby boy: Flushed down train toilet recovered alive | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमोडमध्ये टाकलेले बाळ प्लशमध्ये अडकले आणि....\nकमोडमध्ये टाकलेले बाळ प्लशमध्ये अडकले आणि....\nकमोडमध्ये टाकलेले बाळ प्लशमध्ये अडकले आणि....\nसोमवार, 24 डिसेंबर 2018\nअमृतसरः रेल्वेच्या कमोडमध्ये एका बाळाला टाकून देण्यात आले होते. परंतु, ते प्लशमध्ये अडकले. बाळाला हात लावला तेंव्हा त्याचा श्वास सुरू होता. तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्यय आला आहे.\nअमृतसरः रेल्वेच्या कमोडमध्ये एका बाळाला टाकून देण्यात आले होते. परंतु, ते प्लशमध्ये अडकले. बाळाला हात लावला तेंव्हा त्याचा श्वास सुरू होता. तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ���ेव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्यय आला आहे.\nआई-वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ कमोडच्या फ्लशमध्ये अडकल्यामुळे एक दिवसाच्या बाळाचा जीव वाचू शकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हावडाहून अमृतसरला रेल्वे दाखल झाली होती. रेल्वेची साफ सफाई सुरू असताना एसी डी-३ डब्यात कर्मचाऱ्यांना कमोडमध्ये एक नवजात बाळ आढळले. बाळाला ओढणीने गुंढाळून कमोडमध्ये टाकले होते. परंतु, केवळ प्लशमध्ये अडकल्यामुळे खाली जाऊ शकले नाही. सफाई कर्मचाऱ्याने याबद्दलची माहिती तात्काळ अधिकाऱ्यांना कळवली. बाळाला कमोडमधून जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा बाळाचा श्वास सुरू होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भयंकर घटनेमुळे पंजाबमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.\nकडाक्याची थंडी आणि फक्त ओढणीमध्ये गुंढाळून बाळाला कमोडमध्ये टाकून देण्यात आले होते. दैव बलवत्तर म्हणूनच बाळ सुदैवाने बचावले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करणार असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.\nअमृतसर रेल्वे बाळ baby infant पोलिस train\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/lucky-movie/", "date_download": "2019-03-25T08:36:43Z", "digest": "sha1:7P6GHZKKI7W452ISNOWHEGKH7OUP4RLD", "length": 1869, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " lucky movie - मराठी कलाकार", "raw_content": "\n“हे”विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.\nनुकतंच ‘लकी’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तूफान...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B5-2/", "date_download": "2019-03-25T08:26:59Z", "digest": "sha1:DIJRBZYJGBACRN6MZI5JLD66RA7RE3MH", "length": 14997, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पशुसंवर्धन एक शेतीपूरक व्यवसाय, विविध योजना (भाग दोन) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपशुसंवर्धन एक शेतीपूरक व्यवसाय, विविध योजना (भाग दोन)\nपशुसंवर्धनातून रोजगार ही संकल्पना प्राधान्याने स्त्रियांसाठी पुढे येते. ही संकल्पना राबविताना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने त्यांच्या विविध पशुपालनाच्या योजनांमध्ये स्त्री लाभार्थीना 30 टक्के प्राधान्य दिले आहे. नेहमीच्या रुळलेल्या वाटांपलीकडे जाऊन काही तरी करण्याची ऊर्मी जोर धरत असताना त्यात शिक्षित तरुणीही मागे नाहीत.\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे स्त्रियांचा कल वाढतो आहे. या पाश्वभूमीवर शेतीपूरक व्यवसाय म्हणून ज्या ज्या गोष्टींकडे पाहिले जाते त्यात पशुसंवर्धनातून रोजगार ही संकल्पना प्राधान्याने पुढे येते. ही संकल्पना राबविताना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने त्यांच्या विविध पशुपालनाच्या योजनांमध्ये स्त्री लाभार्थीना 30 टक्के प्राधान्य दिले आहे.\nपशुसंवर्धन विभागाकडून काही जिल्हास्तरीय योजनांची अंमलबजावणीदेखील केली जाते. यामध्ये जिल्हास्तरीय अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना दोन दुभत्या जनावरांचे गट वाटप योजना, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकडील पशुधनासाठी दुभत्या जनावरांच्या भाकड काळासाठी खाद्यपुरवठा योजना, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना शेळी व बोकड अशा जनावरांचे गटपद्धतीने वाटप, एकात्मिक कुक्कुट विकास योजना, राज्यातील गाई तसेच म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम, कामधेनू दत्तक ग्राम योजना, वैरण विकास योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे. कुक्कुट पालन शेड, शेळी पालन शेड, गायी तसेच म्हशींसाठी गोठयात पक्के तळ, गव्हाण, मूत्रसंचय टाक्या, पूरक खाद्य यांसारखे काम मनरेगाअंतर्गत करता येते.\nजिल्हास्तरीय योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमार्फत होते. जिल्हास्तरीय योजनेचे काही लाभार्थी हे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून तर काही लाभार्थी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत निवडले जातात. योजनेसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा लागतो.\nराष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत काही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविल्या जातात. यामध्ये वैरण बियाणे उत्पादन- संकलन आणि वितरण योजना, वनक्षेत्र नसलेल्या नापिक जमिनी-गायरान जमिनी-गवत कुरण क्षेत्रातून वैरण उत्पादन योजना, हस्तचलित कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन योजना, मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करणे, उच्च क्षमतेच्या वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट स्थापन करणे, लहान क्षमतेचे ट्रॅक्टरला जोडता येणारे वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट, गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन तसेच वैरण कापणी यंत्राचे वितरण योजना, पशुखाद्य कांडी व पशुखाद्यनिर्मिती केंद्राची स्थापना, बायपास प्रोटीन उत्पादन केंद्राची स्थापना, परसातील कुक्कुट पालन यांचा समावेश आहे.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी\nहुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण (भाग १)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग ३)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग १)\nसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-२)\nसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-१)\nआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान शेती बनवू किफायतशीर\nगाजर गवताचं एकात्मिक पद्धतीनं निर्मूलन\nनारळ लागवडीचे तंत्र (भाग ३ )\nनारळ लागवडीचे तंत्र (भाग २ )\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-2/", "date_download": "2019-03-25T07:50:59Z", "digest": "sha1:CK4EGZHTTPZ54A2L24FYCAXGHSSXI5VZ", "length": 11663, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : म्हाळुंगे टीपी स्कीमबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : म्हाळुंगे टीपी स्कीमबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न\nपुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) म्हाळुंगे- माण येथे टीपी स्कीम योजना आखली आहे. त्यासाठीचा प्रारूप आराखडा प्रसिध्द करण्यात आला आहे. हा आराखडा संबधित ग्रामस्थांना मान्य नसून गावकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे लेखी हरकती नोंदविल्या आहेत. याची दखल प्राधिकरणाने न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा म्हाळुंगे ग्रामस्थांनी दिला.\nया टीपी स्कीमबद्दल ग्रामस्थांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ग्रामस्थ बोलत होते. हिंजवडी मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी म्हाळुंगे -माण रस्ता तयार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हिंजवडी एमआयडीसी कडे जाणाऱ्या प्रस्तावित रस्त्यावर घरे आणि व्यावसायिक इमारती बाधित होत आहे. हा रस्ता आराखड्यात 36 मी. रुंदीचा करू नये. शेतकऱ्यांना 50 टक्के जमिनीवर प्लॉट विकसित करून दिले जातील, असे प्रशासन सांगत असले तरी याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही.\nआराखड्यात अनेक ठिकाणी रह���वासी झोन आहेत. त्यातील रस्त्यालगतच्या जमिनीवर व्यावसायिक क्षेत्र असावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात गाव पालिकेत गेले तर पुन्हा भूसंपादन करून आरक्षण पडणार का, अशी शंकाही ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केली. टीपी स्कीम बारगळली तर काय असे प्रश्न उपस्थित केले असून या सर्व प्रश्नांची प्राधिकरणाने दखल घ्यावी आणि त्यांचे लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nपुणे – फळांच्या राजाच्या आगमनासाठी ‘रेड कार्पेट’\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\nपुणे – अपघाती मृत्यू रोखण्यासाठी आता नोडल अधिकारी\nपुणे – अंदाजपत्रकीय तूट 1,800 कोटींच्या घरात\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कं���नीचे डिझाईन चोरले’\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/files/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-03-25T08:09:57Z", "digest": "sha1:VLSLK3464WKRP6SXPWVEQPPYQF3GDNP2", "length": 2292, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जलयुक्त शिवारमुळे झाली जलक्रांती; वाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजलयुक्त शिवारमुळे झाली जलक्रांती; वाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\nVideo of जलयुक्त शिवारमुळे झाली जलक्रांती; वाशिमच्या जामदरा गावात प्रथमच रब्बी पेरणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/288-prayer-33880/", "date_download": "2019-03-25T08:15:38Z", "digest": "sha1:GACLGO75H7N33SX3QVW5ANZRRY4SSRRM", "length": 14234, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२८८. प्रार्थना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nआद्य शंकराचार्य यांनी अखेरच्या दिवसांत शिष्यांना एक संदेश दिला. ते म्हणाले, ‘एकच ब्रह्म आपल्या आत्मसामर्थ्यांने नानात्व धारण करते. याकरिता त्या शुद्ध, बुद्ध, मुक्त सच्चिदानंद स्वरुपाची\nआद्य शंकराचार्य यांनी अखेरच्या दिवसांत शिष्यांना एक संदेश दिला. ते म्हणाले, ‘एकच ब्रह्म आपल्या आत्मसामर्थ्यांने नानात्व धारण करते. याकरिता त्या शुद्ध, बुद्ध, मुक्त सच्चिदानंद स्वरुपाची उपासना सर्वानी करावी. परंतु हे जे नानात्व दिसते त्यातूनच या सृष्टीचे वैविध्य स्पष्ट होते. प्रत्येक प्राणिमात्राच्या रुच��तही वैविध्यता दिसून येते. या रुची वैचित्र्यामुळे प्रत्येकाच्या उपासना पद्धतीतही भिन्नता असते. या भिन्नतेचा आदर करावा. कोणत्याही कारणास्तव अशा विविधतेची हेटाळणी करू नये.’ शंकराचार्यानी विविध उपासनामते मोडीत काढून अद्वैत मत प्रस्थापित केले, असे आपण म्हणतो. प्रत्यक्षात उपासना पद्धतीच्या वैविध्याला त्यांनी नष्ट केले नाही तर त्या सर्वाचा जो एकसमान आंतरिक उद्देश आहे त्याला चिकटलेल्या भेदाभेदावर आणि विपरीत मान्यतांवर त्यांनी घाव घातला. साईबाबांनी अखेरच्या दिवसांत एकदा उग्र क्रोधावतार धारण करीत अंगावरची कफनी आणि डोईचं वस्त्र काढून शेकोटीत फेकलं अन् ओरडले, ‘‘कोणी मला खरं ओळखलं नाही. ज्या कारणासाठी मी आलो त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही.. मी खरा कोण आहे पाहायचं होतं ना पाहाआता’’ साई, शंकराचार्य, कबीर अशी अरुपाची अनंत रूपं अवतरली. त्यांचा अंतस्थ उद्देश आणि कळकळ एकच होती. आम्ही त्यांना जाती, धर्म, प्रांत, वेष या चौकटीत चिणून टाकण्याचाच प्रयत्न केला. आम्ही कितीही मोडतोड केली आणि आवरणं घालायचा प्रयत्न केला तरी सत्य त्याच्या मूळ लखलखीत स्वरूपात प्रकटल्यावाचून राहूच शकत नाही. त्या सत्याचा मार्ग दाखविणाऱ्या या अरुपांच्या रुपाचा बोध जाणून घ्यायचा हा अल्पसा प्रयत्न होता. समारोप करताना एक कळकळीची प्रार्थना आहे. दुर्बिणीतून आपण सृष्टीचं विराट रूप पाहातो. किती ग्रह, किती तारे, किती शब्दातीत आणि अद्भुत असं विराट रूप पण ते पाहाणं सोडून जर आपण दुर्बिणीकडेच पाहू लागलो तर काय उपयोग पण ते पाहाणं सोडून जर आपण दुर्बिणीकडेच पाहू लागलो तर काय उपयोग दुर्बिणीचं कौतुक वाटून तीच न्याहाळू लागलो तर विराटाचं दर्शन अंतरेल. अध्यात्माच्या क्षेत्रात आज दुर्बिणींचाच उदोउदो सुरू आहे. मूळ दर्शन बाजूलाच राहाते आहे. हे लिहिणाऱ्याची किंमतही त्या दुर्बिणीपेक्षा अधिक नाही. आणि जो ही विराट, अनंत कोटी ब्रह्माण्डांची सृष्टी उत्पन्न करतो आणि सांभाळतो त्याला काय अशा शेकडो कचकडी दुर्बिणी बनवता येणे कठीण आहे दुर्बिणीचं कौतुक वाटून तीच न्याहाळू लागलो तर विराटाचं दर्शन अंतरेल. अध्यात्माच्या क्षेत्रात आज दुर्बिणींचाच उदोउदो सुरू आहे. मूळ दर्शन बाजूलाच राहाते आहे. हे लिहिणाऱ्याची किंमतही त्या दुर्बिणीपेक्षा अधिक नाही. आणि जो ही विराट, अनंत कोटी ब्रह्माण्डांची सृष्टी उत्पन्न करतो आणि सांभाळतो त्याला काय अशा शेकडो कचकडी दुर्बिणी बनवता येणे कठीण आहे तेव्हा ओढ विराटाच्या दर्शनाची असू द्या. दुर्बीण पाहण्याची नव्हे. दुर्बिणीतून विराट सृष्टी पाहाताना केवळ तुम्ही आणि ती सृष्टी यांच्यातच एकरूपता निर्माण होते. विराटाचा वेध घेताना माध्यममात्र असलेल्या दुर्बिणीच्या अस्तित्वाचीही जाणीव जेव्हा लोपते ते पाहाणे खरे. आपण जे वाचतो त्यातील विचारांशी जेव्हा आंतरिक एकरुपता होते त्यातच खरा आनंद असतो. ते विचार पोहोचविणाऱ्या माध्यमाला मधे कडमडू देणं हा त्या विराटाचा अवमान आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउज्ज्वल भविष्यासाठी चिमुकल्यांनी केली दीपप्रार्थना\nबकर ईदनिमित्त पावसासाठी प्रार्थना\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/334", "date_download": "2019-03-25T08:41:01Z", "digest": "sha1:2QHAC2TF3T5DK6ADHKNK6ELCWFRC6SXE", "length": 14233, "nlines": 116, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nशेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको\nमुखपृष्ठ / कृषिजगत / संघटक शेतकरी / शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी सोम, 15/11/2010 - 23:30 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको\nदि. १० नोव्हेंबर २०१० रोजी शेतकरी सघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी संघटनेचा संतनगरी शेगावात स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शेतकरी महामेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग हे होते. मंचावर माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, दिनेश शर्मा, महिला आघाडीच्या जयश्री पाटील, हरीयाणाचे गुणीप्रकाश, कर्नाटकचे हेमंतकुमार, दिलीप भोयर, अनंत उमरीकर, सम्राट डोंगरदिवे, संजय कोले, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष नामदेवराव जाधव, रमेशसिंह राजपूत आदी उपस्थित होते.\nमेळाव्यात प्रख्यात कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'माझा बाप शेतकरी' या कवितांची सीडी प्रकाशित करण्यात आली तसेच शरद जोशी यांच्या 'भारतासाठी' व 'पोशिद्याची लोकशाही' या दोन पुस्तकाचे तर कवी गंगाधर मुटे यांच्या 'रानमेवा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन शरद जोशींच्या हस्ते करण्यात आले. रावेरी येथे सिता मंदिराचे बांधकाम करणाऱ्या रमेश पाटील यांचा यावेळी शरद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद जोशी यांना यावेळी कृतज्ञता निधी वामनराव चटप, कैलास पवार, रवि देवांग यांच्या हस्ते देण्यात आला.\nशरद जोशी यांना कवितेचे सन्मानपत्र\nशरद जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेच्या ओळी चांदीच्या तबकावर कोरून ते मानपत्र प्रदान करण्यात आले. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होई पर्यंत कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही अशी घोषणा केली होती मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जाणून मी हे सन्मानपत्र स्वीकारले असे जोशी यांनी स्पष्ट केले. मी शंभर वर्ष जगावे असे वाटत असेल तर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होण्याची लढाई जोमाने लढा माझ्यासाठी हीच उर्जा ठरेल असे भावनिक उदगार त्यांनी काढले. हे सन्मानपत्र जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ अप्पा बुरघाटे, बापुमामा थिटे, द्वारकाबाई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शरद जोशींनी आपल्या भाषणात धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.\nअमरावती-भुसावळ पॅसेंजर अडवितांना ठीय्या देऊन बसलेले शेतकरी.\nराज्यपालांना सादर करावयाच्या मागण्यांचा मसुदा तयार करताना रविभाऊ देवांग व अॅड वामनराव चटप.\nराज्यपालांमार्फ़त त्यांचे अप्पर सचिव दे.च.खाडे व स्विय सहाय्यक यांनी आंदोलनकर्त्या नेत्यांशी चर्चा केली. शेतकरी संघटनेच्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात शेतकरी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले जाईल असे लेखी पत्र राज्यपालांमार्फ़त देण्यात आल्याने तीन तास चाललेले आंदोलन स्थगित करण्यात आले.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/RPFs-Rekha-Mishra-in-10th-chapter/", "date_download": "2019-03-25T07:55:56Z", "digest": "sha1:L3VSXJZ7VKIBDLPV7HOKP3U2EZ5Y2AAH", "length": 5837, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरपीएफच्या रेखा मिश्रा दहावीच्या धड्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरपीएफच्या रेखा मिश्रा दहावीच्या धड्यात\nआरपीएफच्या रेखा मिश्रा दहावीच्या धड्यात\nकर्तव्य बजावत असताना रेल्वेस्थानकांवर चुकलेल्या मुलांना आई-वडीलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार्या आरपीएफ उपनिरीक्षक रेखा मिश्रा यांचा महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्य पुस्तकात धडा सामील केला आहे. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवत आज पर्यंत 953 मुलांना सुखरुप घरी पोहोचवल्याबद्दल केलेल्या कामाची पोहेचपावती यारुपाने रेखा मिश्रा यांना मिळाली आहे.यामुळे मुंबई रेल्वे व त्यांचे अधिकारी यांच्यापुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.\nमध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) महिला उप-निरीक्षक रेखा मिश्रा 2014 मध्ये आरपीएफमध्ये सामील झाल्या. 2016 मध्ये त्यांनी सीएसएमटी स्टेशनवर 434 मुलांचे, 45 मुलींना सुटका केली.आज अखेर आरपीएफचे पोलीस अधिकारी रेखा मिश्रा यांनी 953 मुलांचे बचाव करण्यासाठी मदत केली.बचावकार्य करताना बरेचदा आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागते.मुळची अलाहाबाद येथील राहणारी रेखा यांचे इंग्रजी विषयातून एम.ए.बी.एड शिक्षण झाले आहे.वडील भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त असून तिन्ही भाऊदेखील सध्या भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.त्यामुळे जन्मापासूनच रेखा यांना देशसेवेचा वारसा भेटला आहे.\nमहिला सक्षमीकरणाच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल अनेक मान्यताप्राप्त संस्था व शासनाने प्रशंसा केली व पुरस्कार दिले आहेत.जागतिक महिलादिनी 8 मार्च 2018 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात एका समारंभात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात आले. फिक्की फेडरेशनमार्फत दिल्ली येथे 30 मे 2018 रोजी पुरस्कार यासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळविण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sankalpdravid", "date_download": "2019-03-25T07:50:16Z", "digest": "sha1:6IVG2LZEKXIOVIXDAUCDJSTVNQGOLPRS", "length": 9984, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Sankalpdravid - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया याची दखल घ्यावी : मी विकिपीडियावरील बहुसंख्य संपादने, चर्चा, मतप्रतिपादन, अन्य सदस्यांसोबत चर्चा/वाद-प्रतिवाद/सूचना-सल्ले देणे-घेणे इत्यादी बाबी सर्वसाधारण सदस्य म्हणून करतो. पाने संरक्षित करणे किंवा वगळणे, काही प्रसंगी उत्पात माजवणाऱ्या अंकपत्त्यांवर किंवा सदस्यनामांवर निर्बंध लागू करण्यासारखी मोजकी कामेच प्रचालकाच्या भूमिकेतून करतो.\nभावे प्राथमिक शाळा, पुणे\nसर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे\nअभियांत्रिकीचे शासकीय महाविद्यालय, पुणे\n९ मे, इ.स. २००५ - सद्य\n६ सहभाग असलेले प्रकल्प\n८ हे केले पाहिजे\nमी संकल्प द्रविड. मी मराठी विकिपीडियावरील प्रचालकांपैकी एक आहे. काही मदत हवी असल्यास, सूचना करायची असल्यास आपण मला इथे संदेश लिहू शकता.\nmr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.\nहे सदस्य मराठी बोलू शकतात.\nen-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.\nही व्यक्ती मराठी विकिपीडियावर प्रचालक आहे. (तपासा)\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .\nहा सदस्य सिंगापुराचा मित्र असून सिंगापुरात राहतो.\nमायबोली मी संकल्प द्रविड या नावाने मायबोली संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर घातलेले लेख\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख\nमराठी विकिपिडीयावरील 'संपादन' योगदानाबद्दल\nमराठी विकिपिडियावर बौद्ध धर्म विषयक लेखन केल्याबद्दल हे विकिनिशाण सदस्य:Sankalpdravid यांना प्रदान करण्यात येत आहे\nविकिपीडिया:विकिप्रकल्प ���िंदू धर्म सुरुवात करून दिल्याबद्दल हे कमळ\nमराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे\nमराठी विकिपिडीयावर १,००००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा दहा हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे\nतुम्ही नेहमी मदतीचा हात दिल्याबद्दल तुमचे आभार\nनिनाद ०७:१७, ६ ऑगस्ट २०११ (UTC)\nअविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह\nआपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 09:14, 15 जानेवारी 2007 (UTC)\nस्वागत आणि साहाय्य चमूतील विकिपीडिया सदस्य\n१०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१८ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/489", "date_download": "2019-03-25T08:57:24Z", "digest": "sha1:3NYD377T77QDTZVJU55K4R6ULA4Y63FD", "length": 10233, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शब्दबेवडा | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 09/07/2013 - 21:44 ह्यावेळी प्रकाशित केले.\nआयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो\nपोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो\nहळवे अंतर खुणवत होते, \"संपव जगणे\" सांगत होते\nमग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो\nऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो\nअनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो\nव्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो\nआस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना\nपरमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो\nतुझे तडाखे सोसून काया झिजून गेली, सुकून गेली\n कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो\nविज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली\nपूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो\nदेण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी\nदुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/taxonomy/term/363", "date_download": "2019-03-25T08:50:06Z", "digest": "sha1:SYW2ICXTY2OD3PHG7M2H5OI6FIOMPBTN", "length": 9847, "nlines": 139, "source_domain": "gangadharmute.com", "title": " baliraja | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी रवी, 03/11/2013 - 21:54 ह्यावेळी प्रकाशित केले.\nआयुष्यभर \"दिवे\" नाही लावू शकलो\nमग आजच भरमसाठ पणत्या लावून असा कोणता प्रकाश पडणार आहे\nआयुष्यभर \"उजेड\" नाही पाडू शकलो,\nमग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने असा कोणता गगणभेदी उजेड पडणार आहे\nमग ऐका, आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी \"बॅंकेच्या मालकीची\" आहे. तीची पूजा केली काय नाही काय, तिला तसाही काय फ़रक पडणार आहे\nतिचा \"मालक\" तिची पूजा करेलच की\nRead more about द���वाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3175", "date_download": "2019-03-25T08:33:51Z", "digest": "sha1:P2ZJ5XM2WKOZBRPSOUQB3BV3WIBZ6C6A", "length": 10691, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आपोआप | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी होणारी आतड्यांची हालचाल, श्वासोच्छ्वास, पापण्यांची हालचाल वगैरे. ह्या क्रिया आपोआप घडतात.\n'आपोआप' हा शब्द कसा आला असेल, यावर विचार करताना 'ज्ञानेश्वरी'त आठव्या अध्यायात -\n मिळावया ॥ ८.९३ ॥’\nही ओवी वाचनात आली. तेथे 'आपेंआप' असा शब्द दिसला. त्या ओवीचा 'आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे.\n'आपेंआप' म्हणजे 'आपोआप' हे सरळ दिसत आहे. ज्ञानेश्वरांनी 'आपेंआप' असा शब्दप्रयोग का केला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा नंतरच्या काळात त्याचे 'आपोआप' हे रूप रूढ झाले असावे, असे मला वाटते.\nआपोआपला इंग्रजीत Automatic असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या 'हसवणूक' या पुस्तकातील 'मी आणि माझा शत्रुपक्ष' हा लेख आठवला.\nशिकारी हा पुलंच्या शत्रुपक्षातील आघाडीचा शत्रू. त्याच्यानंतर शत्रू नंबर दोन म्हणजे नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साईट दाखवणारे लोक. असा शत्रू नंबर दोन म्हणजेच एक घरमालक त्याने त्याच्या घरात केलेल्या विविध करामती पुलंना दाखवत होता. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट 'आपोआप' होत असे. त्याने ऑटोमॅटिक ग्राईंडर, ऑटोमॅटिक चूल अशा बऱ्याच ऑटोमॅटिक गोष्टी दाखवल्यानंतर, तो त्याच्या संडासच्या उंबऱ्यावर उभा राहून, ''आणि हा संडास'’ असे म्हणतो. तेव्हा, पुलंनी ''काहो येथेही ऑटोमॅटिक होतं, का कुंथावं लागतं येथेही ऑटोमॅटिक होतं, का कुंथावं लागतं’’ असे विचारून त्या शत्रूचा, घरातही नाही आणि परसातही नाही, खोली आहे पण रूंदी नाही अशा स्थळाच्या उंबऱ्यावर, हिरण्यकशिपूसारखा शब्दाने का होईना कोथळा बाहेर काढला.\nपुलंचे विनोद हे मुद्दाम जुळवलेले किंवा ठरवून केलेले नसतात. ते असे उत्स्फूर्त असतात. विनोद ही पुलंची सहज प्रवृत्ती होती. त्यामुळे ते असे आपोआप तयार होतात, जसा 'आपेंआप’पासून 'आपोआप' शब्द तयार झाला.\n('राजहंस ग्रंथवेध' मे 2018 मधून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: न्याय, अरूंधतीदर्शन न्याय, वसिष्ठ तारा, अरुंधती तारा\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्यप्रचार, भाषा\nसंदर्भ: भाषा, शब्दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/pune-ranked-one-ease-living-index-137594", "date_download": "2019-03-25T08:40:55Z", "digest": "sha1:LAPUXT3DO3PS7KQLTKE6EDNJC64AMZDP", "length": 14137, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune ranked one on Ease of Living Index राहण्यासाठी 'पुणे' देशात अव्वल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nराहण्यासाठी 'पुणे' देशात अव्वल\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nपश्चिम बंगालमधील हावडा, न्यू टाउन कोलकाता आणि दुर्गापूर या शहरांनी या पाहणीत सहभागी होण्यास नकार दर्शविला, तर नवीन रायपूर आणि अमरावती (आंध्र प्रदेश) ही शहरे या सर्वेक्षणाच्या निकषात बसू शकली नाहीत, अशी माहितीही पुरी यांनी दिली.\nनवी दिल्ली : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने आज देशात राहण्यासाठी सर्वात उत्तम अशा शहरांची यादी जाहीर केली असून, त्यात पुणे शहराने अव्वल स्थान पटकाविले आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nकेंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप पुरी यांनी आज \"इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स'मध्ये स्थान मिळविलेल्या शहरांची यादी प्रसिद्ध केली. यात पुणे शहराला सर्वाधिक पसंती दिली असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मुंबई व ग्रेटर मुंबई या शहरांची वर्णी लागली आहे. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे देशाची राजधानी दिल्लीचे स्थान मात्र या यादीत खूप खाली घसरले असून, दिल्ली या यादीत 65 व्या क्रमांकावर आहे.\nशहरांची निवड करताना प्रामुख्याने प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा हे चार निकष विचारात घेतले असून, त्यानुसार 111 शहरांची पाहणी करण्यात आल्याची माहिती पुरी यांनी या वेळी दिली.\nउत्तर प्रदेशच्या पदरी निराशा\nआज प्रसिद्ध झालेल्या यादीत देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील एकाही शहराला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळविता आले नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील रामपूर हे शहर या यादीत सर्वांत खालच्या स्थानावर आहे.\nपश्चिम बंगालमधील हावडा, न्यू टाउन कोलकाता आणि दुर्गापूर या शहरांनी या पाहणीत सहभागी होण्यास नकार दर्शविला, तर नवीन रायपूर आणि अमरावती (आंध्र प्रदेश) ही शहरे या सर्वेक्षणाच्या निकषात बसू शकली नाहीत, अशी माहितीही पुरी यांनी दिली.\n2 - नवी मुंबई\n3 - ग्रेटर मुंबई\n\"अपशकुनी' प्राणी असा पालींचा उल्लेख सर्रास होतो. मात्र पालींचे ���र्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्याजोगे आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या त्रासदायक...\n28 पैकी 10 राज्यांची हीच स्थिती; फळांचे 7 लाख टनांनी कमी उत्पादन नाशिक - देशात गेल्या वर्षी 2...\nLoksabha 2019 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; 56 उमेदवारांची घोषणा\nनवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली असून, 56 उमेदवारांची घोषणा केली आहे. याबरोबरच काँग्रेस आंध्र प्रदेश आणि ओडिशा...\nस्वबळाच्या वल्गना अन् मित्रांकडे याचना\nभारतीय लोकशाहीतील पंचवार्षिक जनमत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. लग्नाची तारीख ठरल्यानंतर सर्व साधनसामग्रीची जुळवाजुळव सुरू केली जाते त्याचप्रमाणे सर्व...\nLoksabha 2019 : दक्षिणेतील मनसबदारांचे भावनेचे राजकारण\nउत्तर आणि दक्षिण भारत यांच्यामधील राजकारणाचा पोतच वेगळा. भारतातील राजकारण नेहमीच भावनांच्या लाटांवर डोलत असते. दक्षिणेतील पाच राज्यांचाही त्याला...\nआंध्र प्रदेशात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nविशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) : येथे सुरक्षा दलांसोबत आज पहाटे झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागातून नक्षलवाद्यांची एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/crikcet-virat-kohli-indvsa-sports-crikcet-score-indian-won-8-wicket-51912", "date_download": "2019-03-25T08:12:35Z", "digest": "sha1:RSEXKT5UWYCWXYB3PMZGWMVWJNZFNXN7", "length": 17104, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "crikcet virat kohli indvsa sports crikcet score indian won by 8 wicket भारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nभारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश\nसोमवार, 12 जून 2017\nलंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.\nलंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.\nनाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरवला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून सुरेख साथ मिळाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४४.३ षटकांत १९१ धावांत आटोपला. त्यानंतर शिखर धवन (७८) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ७६) यांनी १२८ धावांची भागीदारी करत भारताचा विजय साकार केला. धवन बाद झाल्यावर युवराजने षटकार ठोकत थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ३८ षटकांतच लक्ष्य पार करताना २ बाद १९३ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सामन्याचा मानकरी ठरला. भारताची आता १५ जून रोजी बांगलादेशाविरुद्ध उपांत्य लढत होईल.\nनाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर पावसाळी हवामानात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्यापासून रोखले. भारताच्या पाचही गोलंदाजांनी अचूक दिशा आणि टप्पा राखून गोलंदाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनाही धावा काढण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यातच भारताचे क्षेत्ररक्षणही नजरेत भरण्यासारखे झाले. त्यांनी तीन फलंदाजांना धावबाद केले. या एकत्रित प्रयत्नांमुळेच दक्षिण आफ्रिकेचा धावफलक रोखला गेला. इथेच भारताने अर्धा सामना जिंकला होता. जेपी ड्युमिनी अखेरपर्यंत नाबाद राहिला; पण त्याला केवळ दुसऱ्या बाजूने होणारी संघाची पडझडच बघावी लागली.\nविजयासाठी १९२ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने आततायीपणे आपली विकेट गमावली. त्यानंतर धवन आणि कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना वरचढ ठरण्याची संधीच दिली नाही. सलग तिसऱ्या सामन्यात धवनने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण केले. कोहलीनेदेखील धवनला स्वातंत्र्य दिले आणि जम बसल्यावर स्वतः आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. शतक गाठण्याच्या घाईत धवन बाद झाला; पण कोहली आणि युवराज यांनी शांतपणे विजयावर शिक्कामोर्तब केले.\nदक्षिण आफ्रिका ४४.३ षटकांत सर्वबाद १९१ (क्विंटॉन डी कॉक ५३ ७२ चेंडू, ४ चौकार, डू प्लेसिस ३६, हशिम आमला ३५, जेपी ड्युमिनी नाबाद २०, भुवनेश्वर कुमार २-२३, जसप्रीत बुमरा २-२८) पराभूत वि. भारत ३८ षटकांत २ बाद १९३ (शिखर धवन ७८ -८३ चेंडू, १२ चौकार, १ षटकार, विराट कोहली नाबाद ७६ -१०१ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, युवरासिंग नाबाद २३).\nनितीन गडकरींनी पंतप्रधान व्हावे - सुलेखा कुंभारे\nनागपूर - नागपूरचे खासदार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात विकास केला. देशभरातील तथागताची पवित्र स्थळे बुद्धिस्ट टूरिस्ट सर्किटच्या नावाने...\nमुक्काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला....\nअसा अडकला नीरव मोदी जाळ्यात...\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर...\nनीरव मोदी अखेर जाळ्यात; २९ मार्चपर्यंत कोठडी\nलंडन : पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी...\nकेंब्रिज ऍनालिटिका : डेटा चोरीची फेसबुकला होती माहिती\nलंडन - केंब्रिज ऍनालिटिका कंपनीकडून फेबुकचा डेटा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले...\nनीरव मोदीला ब्रिटन सरकारकडून 'गोल्डन व्हिसा'\nलंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस���क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/lawyer-who-kidnapped-girl-punishment-three-years-138399", "date_download": "2019-03-25T08:45:00Z", "digest": "sha1:MNGYGBK3DPGLOFFDUN3ZNQBUJFFY264R", "length": 14756, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "The lawyer who kidnapped the girl punishment for three years युवतीचे अपहरण करणाऱ्या वकिलाला तीन वर्ष शिक्षा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nयुवतीचे अपहरण करणाऱ्या वकिलाला तीन वर्ष शिक्षा\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nनांदेड : एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिला दोन दिवस डांबून ठेवणाऱ्या वकिलाला येथील जिल्हा न्यायाधिश (तिसरे) ए एस सय्यद यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा शनिवारी (ता. १८) दुपारी ठोठावली.\nनांदेड : एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिला दोन दिवस डांबून ठेवणाऱ्या वकिलाला येथील जिल्हा न्यायाधिश (तिसरे) ए एस सय्यद यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा शनिवारी (ता. १८) दुपारी ठोठावली.\nशोभानगर भागात एका निवृत पोलिस अधिकाऱ्याची महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी वजिराबाद भागात काही शैक्षणीक साहित्य खरेदीसाठी ६ नोव्हेंबर २०१३ ला आली होती. खरेदी करून ती दुपारी चिखलवाडी येथे थांबली होती. यावेळी तिच्या ओळखीचा असलेला रोशन जाकीर सादुल्ला खान पठाण (३१) रा. पीरनगर हा तिच्याजवळ आला. तिला ॲटोत घेऊन ते तेथून पुढे निघाले. परंतु पिडीत मुलीच्या तोंडाला रुमालाद्वारे काही गुंगी येणारे पावडर लावले. त्यानंतर तीला घेऊन तो हैद्राबादकडे रवाना झाला. तिथे गेल्यानंतर सिकंदराबाद आदी ठिकाणी नेले. तसेच तिच्याजवळील तिचे सर्व महत्वाचे कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवले. त्यासोबतच तिच्याजवळील पाच हजार रुपये व पाच ग्राम सोन्याचे दागिणे काढून घेतले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी वजिराबाद ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मोबाईल लोकेशनद्वारे हैद्राबाद गाठले. परंतु कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या रोशन पठाण यांने हैद्राबाद सोडले. ते थेट नांदेडात येऊन जीएन एक्झीकेटीव्ह हॉटेलमध्ये तिला दोन दिवस डांबून ठेवले. त्यानंतर रोशन यांने ��ोभानगर भागात तिला आणून सोडले. भयभीत झालेल्या पिडीत मुलीने आपले घर गाठले. घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने आठ साक्षिदार तपासले. सध्या नांदेड न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या रोशन पठाण याला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू ॲड. नितीन कागणे यांनी मांडली.\nशिवाजीनगरवासींच्या त्रासाला सत्तेतील भाजपच जबाबदार : गुलाबराव देवकर\nजळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत....\nसमर्थ नेतृवाच्या हाती देश असल्याने भाजपत 'इनकमिंग’ सुरू : आमदार खडसे\nभुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते...\nLoksabha 2019 : पक्षातील मंडळींचे \"षड्यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील\nपारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या...\nपोलंडचे उच्चायुक्त, राजदूत उद्यापासून कोल्हापूर दौऱ्यावर\nकोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे, हे पाहण्यासाठी पोलंडचे...\nLoksabha 2019 : आता विरोधकांत दम राहिला नाही - राम शिंदे\nनगर - \"डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये आल्यानंतर झालेल्या भूकंपाच्या लहरी दिल्लीपर्यंत गेल्या. निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हतबल झालेले...\nLoksabha 2019 : अडथळा दूर झाल्याने जिल्ह्यात काँग्रेसची लाट - बाळासाहेब थोरात\nनगर - \"जिल्ह्यात काँग्रेसची लाट आली आहे. पक्षात अनेक तरुण प्रवेश करीत आहे. नवीन तरुणांना संधी प्राप्त होत आहे. पक्षाला ज्यांनी सोडले, ते फसले. सत्ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090714/main.htm", "date_download": "2019-03-25T08:30:32Z", "digest": "sha1:TGFZVVEY7G7Z5MUR5MKQVYNZHZQC6UJI", "length": 23506, "nlines": 73, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १४ जुलै २००९\nनिळू फुले पंचत्वात विलीन\n‘सिंहासन’, ‘पिंजरा’, ‘सामना’सारखा चित्रपट असो वा ‘जंगली कबूतर’, ‘बेबी’, ‘सखाराम बाईंडर’ सारख्या नाटकांतील भूमिकेत जीव ओतून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे, गेली पाच ते सहा दशके मराठी नाटक, चित्रपटसृष्टीवर खलनायकी, विनोदी, गंभीर वळणाच्या अभिनयाने अधिराज्य गाजविलेले समर्थ अभिनेते नीळकंठ कृष्णाजी तथा निळू फुले यांचे आज पहाटे येथे एका खासगी रुग्णालयात अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी रजनी, विवाहित कन्या गार्गी असा परिवार आहे. निळू फुले यांनी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांनाही देशभरातील रसिकांनी पसंतीची पावती दिली होती.\nबिल्डरांना जाब विचारा आणि वीज बिले भरणे बंद करा -उद्धव ठाकरे\nजुन्या चाळी, इमारती, झोपडपट्टय़ा, वस्त्या येथील पुनर्वसन योजनांत बिल्डरने लोकांना दिलेल्या आश्वासनांचे पालन केले नसेल तर तो बिल्डर कितीही मोठा असला तरी त्याला धरा आणि ‘गधडय़ा, कबूल केल्याप्रमाणे लोकांना देतोस की नाही’, असा जाब विचारा, असा आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. बेस्ट, रिलायन्स, टाटा अथवा महावितरण कुणाचीही वीज दरवाढ शिवसेनेला मान्य नाही. ही दरवाढ रद्द झाली नाही तर मुंबईकरांच्या पाठिंब्याने शिवसेना ‘वीज बिल बंद’ आंदोलन करील आणि वीज तोडणाऱ्यांच उरावर बसेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.\nराज्यातील ३० हजार प्राध्यापकांचे आजपासून काम बंद आंदोलन\nशासनाच्या दिरंगाईचा आणखी एक फटका\nपुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी\nसहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने केलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील तीस हजारांहून अधिक प्राध्यापक उद्या, मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनावर जाणार आहेत. वर्गातील अध्यापनापासून महाविद्यालय-विद्यापीठांचे कोणतेही काम प्राध��यापक करणार नसल्याने उच्चशिक्षण क्षेत्र ठप्प होईल. अकरावी प्रवेशाचा ९०:१० प्रश्न, मार्डच्या संपापाठोपाठ राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे बसणारा हा आणखी एक मोठा फटका आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये देशभरातील प्राध्यापकांसाठी सहावा वेतन आयोग मंजूर केला.\n‘मार्ड’ सात हजारांच्या वाढीवर ठाम : सहाव्या दिवशीही संप सुरूच\nमुंबई, १३ जुलै / खास प्रतिनिधी\nराज्य सरकारने सहा हजार रुपये विद्यावेतन देण्याची तयारी दर्शविली असली तरी ‘मार्ड’चे पदाधिकारी सात हजार रुपयांच्या मागणीवर ठाम राहिल्याने निवासी डॉक्टरांचा संप सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याची तयारी सरकारने दर्शविताच दंतवैद्यक, शिकाऊ डॉक्टर्स (इन्टर्न्स) यांनीही आपल्या वेतनांमध्ये वाढ करण्याची मागणी पुढे रेटली आहे.निवासी डॉक्टरांचा गेले सहा दिवस सुरू असलेला संप मिटावा म्हणून राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेले प्रयत्न फोल ठरले. वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री सुरेश शेट्टी, सचिव भूषण गगराणी आणि संचालक डॉ. वासुदेव तायडे यांनी आज सुमारे तीन तास मार्डच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.\nडॉक्टरांवरील खर्चाचे तुणतुणे वाजविणाऱ्या शासनाकडून ‘मार्ड’च्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्षच\nमुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी\n३० हजार रुपये विद्यावेतन, प्रत्येकाला स्वतंत्र निवासस्थान, सुरक्षा आणि कामाचे निश्चित तास, विमा योजना, आजारपण/बाळंतपणाची रजा आदी प्रमुख मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी शासनाकडून या डॉक्टरांवर केल्या जाणाऱ्या खर्चाचे तुणतुणे पुढे केले जात आहे. या डॉक्टरांवर सुमारे चार लाख रुपये खर्च होतो असा आकडा देणाऱ्या शासनाकडून या नेमक्या खर्चाचा तपशील देण्यास मात्र कांकू केली जात आहे.\nमक्केत नेमके कुणाला पत्र पाठवायचे\nमुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी\nमला मक्केत पत्र पाठवायचे आहे, मात्र ते कोणाला पाठवायचे आहे हे माहीत नाही, असा गेल्या शुक्रवार पासून सुरू केलेला धोशा अजमल कसाबने आजही कायम ठेवला. वकिलांशी त्याबाबत अर्धा तास चर्चा केल्यानंतरही आपल्याला मक्केत नेमके कुणाला पत्र लिहायचे आहे हे माहीत नसल्या���ा दावा कसाबने केला.\nसभरवाल खून खटला, सहाही आरोपींची निर्दोष सुटका\nनागपूर, १३ जुलै/ प्रतिनिधी\nउज्जन येथील गाजलेल्या प्रा. एच.एस. सभरवाल खून खटल्यातील सहाही आरोपींची नागपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन दळवी यांनी आज पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.\n३५ लाख विद्यार्थी, १७ परीक्षा.. आणि कर्मचारी फक्त १०\nराज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मापदंड ठरलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करणारी राज्य परीक्षा परिषद मात्र लालफितीच्या दुर्गुणाचा बळी ठरत आहे. अपुरा निधी, अत्यंत तोकडे मनुष्यबळ, दरवर्षी वाढणारा बोजा अशा परिस्थितीत प्रत्येक दिवस पुढे रेटण्याची वेळ परिषदेवर आली आहे. राज्यातील शाळा-शिक्षकांनी असहकार पुकारला, तर सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांशी संबंधित या परिषदेचा डोलारा क्षणाधार्थ कोलमडून जाण्यासारखी अवस्था आहे.\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा ‘एटीकेटी’ला ‘लाल बावटा’\nपुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी\nपदवीधरांच्या कारखान्यातील शैक्षणिक चक्कीत पिसून निघण्यापेक्षा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रोजगारक्षम कौशल्य प्राप्त करण्याच्या संधीचा लाभ ‘एटीकेटी’धारकांना यावर्षी तरी घेता येणार नाही. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी एका आदेशाद्वारे दहावीला ‘एटीकेटी’ देऊ केली असली, तरी केंद्रीय कामगार मंत्रालय व ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’च्या मान्यतेशिवाय औद्योगिक प्रशिक्षणाची दारे ‘एटीकेटी’धारकांना खुली होणार नसल्याचे स्पष्ट झाले.\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर २३ जुलैला\nपुणे, १३ जुलै/खास प्रतिनिधी\nराज्यातील लाखो विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिल्यानंतर चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर २३ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर ‘डेटा एन्ट्री’ करणाऱ्या संस्थेकडून झालेल्या चुकीमुळे हा विलंब झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहिलेला नाही, अशी शाश्वतीही राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. चौथी व सातवीची ���िष्यवृत्ती परीक्षा सालाबादप्रमाणे यंदाही फेब्रुवारीत घेण्यात आली. राज्यभरातील २० लाखांहून अधिक विद्यार्थी त्यासाठी बसले होते. प्रथेप्रमाणे जूनच्या पहिला आठवडय़ामध्ये किंवा उशिरात उशिरा दुसऱ्या आठवडय़ामध्ये शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर केला जातो. नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शाळा सुरू झाल्यानंतर होणारा तो पहिला आनंदोत्सव ठरतो. यंदा मात्र जुलै उजाडला, तरीही शिष्यवृत्तीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात न आल्याने शाळांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.\nपावसाने केला वाहतुकीचा खोळंबा\nमुंबई, १३ जुलै / प्रतिनिधी\nपाऊस आणि वाहतुकीचा खोळंबा हे जणू पक्के समीकरण होऊ लागले आहे. मुंबईकरांचा कालचा दिवस कोरडा गेल्यानंतर आज रात्री नऊच्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात आणि पाणी तुंबल्याने मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. पाणीकपातीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी नोकरदारांना मात्र तुंबलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. रात्री पावसाचा जोर एवढा वाढला की, अंधेरी आणि सांताक्रूझच्या भुयारी मार्गातील वाहतूक थांबविण्यात आली. मुसळधार पावसात मध्य आणि पश्चिम रेल्वेसेवा सुरळीत सुरू होती. रस्तेवाहतुक मात्र संथ झाली होती. महालक्ष्मीमधील कॅडबरी जंक्शन, वरळीतील अॅनी बेझंट मार्ग, वांद्रे (प.) येथील लीलावती रुग्णालयाजवळील रस्ते, हिंदमाता, बॅ. नाथपै मार्ग, शिवडी बस डेपो, देवनार वसाहत या ठिकाणी पाणी तुंबले होते. मौलाना शौकत अली मार्गावरील अहमद अमर अली मिल इमारतीच्या छताचा काही भाग पडल्याची घटनाही घडली. या घटनेते कोणीही जखमी झाले नाही. कांदिवली (प.) भागातही भिंत कोसळल्यामुळे साक्षी मोहिते (२७) ही महिला जखमी झाली तर कुल्र्यातही कंपाउंडची भिंत कोसळली. शहरात सात ठिकाणी झाडे पडल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमान्सूनचा अंदाज आशादायी; पिकेही चांगली येणार-शरद पवार\nनवी दिल्ली, १३ जुलै/पीटीआय\nमान्सूनच्या प्रगतीचे सादरीकरण आज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सरकारपुढे केले असून त्या आधारे यंदाच्या वर्षी चांगली पिके येतील; पण येत्या सात दिवसांत पाऊस कसा पडतो यावर सगळे अवलंबून आहे असे मत कृषिमंत्री शरद पवार यांनी आज व्यक्त केले.वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज मान्सूनच्या स्थितीचे सादरीकरण केले, त्यानुसार सगळा आठवडा चांगला आहे. जर त्यांचे भाकीत खरे ठरले तर आपल्यावरील संकट टळेल. १४० दशलक्ष हेक्टर जमिनीपैकी साठ टक्के जमीन ही पावसावर अवलंबून आहे, बाकी जमीन पाटबंधाऱ्यांच्या सोयीने ओलिताखाली आलेली आहे. दहा दिवसांपूर्वी जी परिस्थिती होती ती बघता आता परिस्थिती सुधारली आहे पण सध्या तरी ठोस असे काही सांगता येणार नाही. गेल्या आठवडय़ात भाताची लागवड ही ७५ टक्क्य़ांनी वाढली आहे, पण ती गेल्या वर्षीच्या पातळीला पोहोचलेली नाही. आम्ही अजूनही ‘अ’ योजनेला चिकटून आहोत अजून आपत्कालीन योजनेकडे वळलेलो नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पीक स्थितीचा आढावा घेतला व योजना ‘ब’ तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जुलैत मान्सून सुरळीत राहील असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे\n- डॉ. जब्बार पटेल\nत्यांचे हात ‘देणाऱ्याचे’ झाले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81/", "date_download": "2019-03-25T07:59:38Z", "digest": "sha1:VWAXGCJHZGUCGI5ON3QBMVH2BGWK7TJ4", "length": 20363, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल- उद्धव ठाकरे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n…अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल- उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात कशी प्रगती झाली, कृषी उत्पादनाचा टक्का कसा वाढला, शेतकरी कर्जमाफीची शतप्रतिशत अंमलबजावणी एका ‘पेन ड्राइव्ह’मध्ये कशी आहे या गोष्टी जोर देऊन सांगत असतात. हे बिनआवाजाचे ढोल त्यांनी जरूर पिटावे, मात्र कांदा, टमाटा, साखर आणि इतर शेतमालाच्या घसरलेल्या भावांकडेही जरा लक्ष द्यावे. हे गडगडणारे भाव आणि ‘कोसळणारा’ शेतकरी यांना सांभाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सामनातील अग्रलेखातून दिला आहे.\nकाय आहे सामनाच्य��� संपादकीयमध्ये \nसध्या देशभरातच एक प्रकारची अस्वस्थता आहे, अशांतता आहे. ही अशांतता वादळापूर्वीची आहे का हे भविष्यातच समजेल, पण महाराष्ट्रातील बळीराजाच्या अस्वस्थतेचे मात्र आता स्फोट होऊ लागले आहेत. फडणवीस सरकार म्हणते त्याप्रमाणे कर्जमाफीची ‘अंमलबजावणी’ होऊनही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे तडाखे बसत आहेत.\nगेल्या आठवड्य़ात अवकाळीने पिकांची नासाडी केली. रविवारी विदर्भ-मराठवाड्य़ाला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसला. वीज कोसळून यवतमाळ, सोलापूर आणि किल्लारी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात कांद्यापासून साखर आणि शेतमालापर्यंत अनेक पिकांचे भाव कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्य़ात त्याच वैफल्यातून काही शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर भाजीपाला फेकून आपला संताप व्यक्त केला होता. नगर जिल्ह्य़ातील नितीन गवारे या तरुण शेतकऱ्याने शेतमालाचे दर कोसळले म्हणून वाजंत्री लावून उभ्या पिकात मेंढ्य़ा सोडल्या आणि संपूर्ण भाजीपाला स्वतःच नष्ट केला.\nगवारे यांनी कोबी, फ्लॉवर, टमाटा असा भाजीपाला शेतात घेतला होता. मात्र बाजारभाव कोसळल्याने त्यांना तो कवडीमोल दराने विकावा लागला. उत्पादन खर्चही हातात मिळत नसल्याने वैतागून त्यांनी स्वतःच मेंढ्य़ांचा कळप वाजतगाजत शेतात सोडला आणि टमाट्य़ाचे उभे पीक नष्ट करून टाकले. नितीन गवारे यांनी जे केले ते अनेकांना पटणार नाही. उभे पीक स्वतःच जनावरांच्या तोंडात घालणे किंवा रस्त्यावर फेकणे तर्कसंगत वाटणार नाही. मात्र\nजो शेतकरी कर्जाचे ओझे, अस्मानी-सुलतानीचे तडाखे सहन करीत, काबाडकष्ट करून पीक काढतो, त्याच्यावर आपल्याच हाताने ते फेकण्याची, मेंढ्य़ांना खाऊ घालण्याची वेळ का आणि कोणामुळे आली याचा विचार कोणी करायचा शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले पीक एकतर लहरी निसर्ग हिरावून घेतो नाही तर शेतमालाचे दर पाडून बळीराजाची झोळी फाटकीच कशी राहील हे पाहिले जाते. केंद्र आणि राज्यातील सरकारांचे हमीभावाचे आश्वासन फोल ठरल्यानेच सामान्य शेतकऱ्यांची अशी परवड होत आहे.\nना त्याला कर्जमाफीचा लाभ झाला आहे ना त्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळत आहे. हमीभाव किंवा रास्त भाव सोडा, निदान उत्पादन खर्चाइतका दर तरी शेतमालाला मिळायला हवा, पण तोदेखील मिळत नसेल तर पीक रस्त्यावर फेकण्याशिवाय किंवा उभ्या शेतात मेंढ्य़ा घुसविण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय शेतकऱ्याला राहतो म्हणजे नापिकीमुळेही नुकसान आणि बंपर पीक आले तरी नुकसानच. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन देणारे सध्या सत्तेत आहेत. तरीही परिस्थिती तीच आहे.\nटमाट्य़ाला भाव नाही, कांद्याचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खूप झाल्याने रब्बी कांद्याचे भाव पडल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी ही वेळ तूरडाळ उत्पादकांवर आली होती. सध्या हरभरा उत्पादक शेतकरीही जास्त उत्पादनाच्या ‘चरकात’ पिळला जात आहे. त्यात सरकारच्या हरभरा खरेदी योजनेचा नेहमीप्रमाणे बोजवारा उडाला आहे. तिकडे साखरदेखील या वेळी साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रडवणार अशी भीती आहे.\nऊस लागवड आणि उत्पादन वाढल्याने साखर उत्पादन ४५ टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त झाला आणि लगेच साखरेचे भाव गडगडले. त्याचा परिणाम जसा साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर होणार आहे तसा ऊस उत्पादकांवरदेखील होईलच. निर्यात बंदीचे लांबलेले निर्णय हेदेखील साखरेचे दर कोसळण्यामागे एक कारण असल्याचे सांगितले जाते. कांदा असो की ऊस, दरवर्षी त्याच्या दराचा प्रश्न पेटतोच. साखर कारखान्यांचे ‘बॉयलर प्रदीपन’ होण्याआधी ऊस रस्त्यावर पेटतो. या वेळी तडजोडीनुसार ‘एफआरपी अधिक २००’ रुपये अशी दरनिश्चिती झाली असली तरी साखरेचे दर गडगडल्याने उसाला हा भाव देणेही साखर कारखान्यांना अशक्य होईल असे सांगण्यात येते.\nथोडक्यात, साखरेच्या कोसळलेल्या दरांची कुऱ्हाड ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याच पायावर पडू शकते. राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात कशी प्रगती झाली, कृषी उत्पादनाचा टक्का कसा वाढला, शेतकरी कर्जमाफीची शतप्रतिशत अंमलबजावणी एका ‘पेन ड्राइव्ह’मध्ये कशी आहे या गोष्टी जोर देऊन सांगत असतात. हे बिनआवाजाचे ढोल त्यांनी जरूर पिटावे, मात्र कांदा, टमाटा, साखर आणि इतर शेतमालाच्या घसरलेल्या भावांकडेही जरा लक्ष द्यावे. हे गडगडणारे भाव आणि ‘कोसळणारा’ शेतकरी यांना सांभाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल\nमहाआघाडीतल्या 56 पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे- मुख्यमंत्री\nकृपा करून शरद पवारांना भाजपा मध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे\nराष्ट्रवादी ही भष्ट्राचार मॅने��मेंट कंपनी ; मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीवादीवर कणखर टीका\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nमला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद पाहिजे- रामदास आठवले\nमराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात\nअभिवादन – समृद्ध पर्यावरण : शिवरायांची नीती\nशरद पवारांनीच सोडविला माढ्याचा तिढा \nकोल्हापूर, हातकणंगलेसाठी प्रचार समन्वय नियुक्त\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2016-KapoosToor.html", "date_download": "2019-03-25T07:49:37Z", "digest": "sha1:PH3PFEY5IXIKCPGSJU7R57HTV5YJPQXO", "length": 5295, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे कापूस एकरी १६ क्विंटल तर तूर ४ क्विंटल", "raw_content": "\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे कापूस एकरी १६ क्विंटल तर तूर ४ क्विंटल\nश्री. विलास नारायणराव श्रीराव, मु.पो. वरूड, ता.वरूड, जि. अमरावती- ४४४९०६. मो. नं. ९४२१७३८७०३\n२ वर्षापुर्वी मी बी. टी. कॉटन हे वाण ५' x १.५' या अंतरावर लागवड केली व त्यामध्ये तुरीचे १ तास (ओळ) लावले. जमीन मध्यम प्रतीची असून ठिबक पद्धतीने ओलीत असते. यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी सागर र. रेवस्कर हे माझ्याकडे येवून त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती दिली. त्यांच्या माहिती नुसार जर्मिनेटर, कॉटनथ्राईवर व प्रिझम हे पहिल्या फवारणीत वापरले व जमिनीतून १०:२६:२६ व कल्पतरू सेंद्रिय खत वापरले असता १५ दिवसातच रिझल्ट दिसायला लागले. त्यावेळी पांढऱ्या माशीचा सगळीकडे जास्त प्रादुर्भाव असताना माझ्या प्लॉटमध्ये कपाशीवर अजिबात पांढरी माशी व तुडतुडे नव्हते. तसेच सागर यांच्या सल्ल्यानुसार ४० दिवसानंतर तिसरी फवारणी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची केली असता कापशीला भरपूर पाती व बोंडे धरली. चौथी फवारणी ६० दिवसानंतर पाती गळ होऊ नये यासाठी कॉटन थ्राईवर व क्रॉपशाईनर वापरले. यासर्व फवारण्या केल्यानंतर असे निदर्शनात आले की, बाजुच्या शेतातील कपाशी लाल्या रोगाने ग्रासली होती व माझी कपाशी लाल्या रोगाने ग्रासली होती व माझी कपाशी ४ फुट उंच वाढून बोंडांच्या संख्येने व त्याच्या वजनाने कपाशी झाडे वाकली होती. पाने हिरवी करकरीत होती. तेव्हा आजुबाजुचे शेतकरी मला विचारी, भाऊ काय वापरीत आहे तेव्हा त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती देऊन कंपनी प्रतिनीधी रेवसकर यांची भेट घालून दिली. मला मागील वर्षी एकरी १६ ते १७ क्विंटल कापूस व तूर ४ क्विंटल झाली होती. यावर्षीही तेवढीच होईल अशी खात्री आहे. या पुर्वी मला कापूस एकरी फक्त ७ ते ८ क्विंटल पिकत होता. मात्र आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करीत असल्यामुळे हा चमत्कार घडत आहे. गेल्या २ वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा वापर मी करीत आहे व मला ते चांगले वरदान ठरले आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावे व अनुभवावे. तेव्हाच ते शेतकरी येणाऱ्या संकटावर मात करू शकतील असे मला वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ahmednagar-police-bought-fire-crackers-worth-60-lakh-rupees/", "date_download": "2019-03-25T08:01:44Z", "digest": "sha1:YFE2TBTLDCWW5L2C5XE24MESERS4JRLN", "length": 6425, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडून फटाके खरेदी करण्याचा फतवा ; ६० लाखांचे फटाके खरेदी", "raw_content": "\nसुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केलं\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nराज्यसभेचे आश्वासन, आठवलेंची दक्षिण मध्य मुंबईतून माघार\nअहमदनगर पोलीस अधीक्षकांकडून फटाके खरेदी करण्याचा फतवा ; ६० लाखांचे फटाके खरेदी\nअहमदनगर : एकीकडे सरकार प्रदूषणमुक्त दिवाळीचा नारा देत आहे तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस खातेच या सरकारच्या उपक्रमाला हरताळ फासत आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिवाळीसाठी एक हजाराचे फटाके खरेदी करण्याचा फतवाच काढला.\nनागपूरच्या उमसान एन्टरप्राईजेस कंपनीकडून तब्बल पाच हजार फटाका बॉक्स खरेदी करण्यात आले आहेत. या फटक्यांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल या पाच हजार फटाका बॉक्सची किंमत आहे तब्बल साठ लाख रुपये. आता या फटाक्यांची विक्री जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यातही करण्यात येणार आहे.\nया फटाक्यांची विक्री पोलिसांना एक हजार पन्नास रुपये, तर नागरिकांना एक हजार चारशे दहा रुपयाने अशी होणार आहे. पोलिसांच्या पगारातून यांचे पैसे कपात करण्यात येणार असून हा पैसा पोलीस कल्याण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nआता जे पोलीस फटाके वाजू इच्छित नाहीत वा पर्यावरण पूरक सणाचा संदेश देत आहेत त्यांना सुद्धा पोलीस अधीक्षकांच्या या फतव्यामुळे नाविलाजास्तव हे फटके खरेदी करावे लागणार आहेत.\nवाचा अहमदनगर पोलीस अधीक्षकांचा अजब फतवा\nसुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केलं\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nशेतमाल खरेदी करण्याची तारीख शेतकऱ्यांना क���णार आता थेट एसएमएसद्वारे\nगुवाहटीमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या बस वर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/sarpancha-exam-news/", "date_download": "2019-03-25T08:36:50Z", "digest": "sha1:C5CN6IZQXKS5ZNGVNSDQIVUA45XCLCYU", "length": 6603, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासनच घेणार", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nसरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासनच घेणार\nसोलापूर- थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयानंतर राज्यातील सुमारे साडेसात हजार सरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासन घेणार आहे. त्या परीक्षेत उत्तीर्ण सरपंचांना सह्याचे अधिकार व धनादेश मिळणार असल्याचे, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी जाहीर केले. त्या निर्णयामुळे सरपंचांमध्ये अस्वस्थतेचे चित्र आहे.\nत्यासंदर्भातील जिल्ह्यातील काही सरपंचांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मतदारांनी घेतलेल्या लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो. मग, आणखी कशाला परीक्षा असे प्रश्न काहींनी उपस्थित केले. तर, परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी असल्याचा आत्मविश्वास काहींनी व्यक्त केला. पण, ती संख्या अगदी नगण्य आहे.\nनुकतेच नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पवार म्हणाले, केंद्र सरकार पंचायत राजची दिशा ठरवण्याचा अभ्यासक्रम तयार करत आहे. सरपंचांना प्रशिक्षण दिल्यास विकासकामे करण्यास मदत होईल. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळत असल्याने सरपंचाला महत्त्व आले. आमदारकीच्या निवडणुकांसारखी स्थिती सरपंच निवडणुकांची आहे. पूर्वी काही हजारांमध्ये होणारा निवडणूक खर्च लाखोंच्या पुढे गेला असून विकासाच्या मुद्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत पवार ��ांनी चिंता व्यक्त केली होती.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपुढील वर्षी या इयत्तांचा अभ्यासक्रम बदलणार\nदौंड: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते ‘आरटीआय’ कार्यकर्त्याच्या आत्महत्येस जबाबदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/minal-patil/", "date_download": "2019-03-25T08:37:41Z", "digest": "sha1:UY6RI4NA53MFNISFWMYOEYVDWWOQRISJ", "length": 1948, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " minal patil - मराठी कलाकार", "raw_content": "\n‘चॉकलेट बॉय’ची इमेज पुसणार आहे ‘हा’ अभिनेता.आगामी मराठी सिनेमा’मुंबई आपली आहे’.\nमराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/sawantwadi-goa-railway-soon-says-suresh-prabhu.html", "date_download": "2019-03-25T07:42:13Z", "digest": "sha1:SZGHU5TYZG7QIGJRGGIGYDIH4QTYD5M6", "length": 7367, "nlines": 106, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कोकणवासियांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर. ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकोकणवासियांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर.\nसावंतवाडी - गोवा रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय.\nलवकरच, संसदेत रेल्वे बजेट 2015-16 सादर होणार आहे. त्याआधीच, रेल्वेमंत्र्यांनी कोकणवासियांना हे एक बहुप्रतिक्षित गिफ्ट दिलंय.\nसावंतवाडी रेल्वे स्टेशनला पसेंजर टर्मिनसचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल यांनी दिलीय. कोकण रेल्वेच्या डबल ट्रॅकचा मुद्दा विचारात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. शिवाय, सर्व रेल्वे लाईन्स इलेक्ट्रिक आणि पर्यायानं सोयीच्या होणार आहेत.\nसुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही महत्त्वपूर्ण घोषणा मानली जातेय. कोकणचे सुपुत्र असलेल्या सुरेश प्रभू यांनी नुकताच कोकणचा दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्यासमोर कोकणवासियांनी आपलं म्हणणं मांडलं होतं.\nतर रेल्वे टर्मिनसवरुण राणे-केसकर वाद रंगला होता. हा वाद सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मंजुरी मिळाल्यानं केसरकर यांनी जिंकल्याचं चित्र आहे. तर लाखो प्रवाशांच्यादृष्टीनं रेल्वेच्या डबल ट्रॅकचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-133/", "date_download": "2019-03-25T08:05:49Z", "digest": "sha1:MRAFK25DJM2YPCV6YRJQFAGY3AM23KHZ", "length": 7423, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजीएसटी आणि इतर कारणांमुळे यावर्षी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या मान्यतेवर व बोली सादरीकरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत 40 टक्के इतकी कमी वीज निर्माण होईल.\n– गिरीषकुमार कदम ,उपाध्यक्ष, इक्रा\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्र���त्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/the-intelligent-strategy-by-akhilesh-mulayam-singh-for-samajwadi-party/", "date_download": "2019-03-25T07:30:06Z", "digest": "sha1:ACJCH6CJDDVHT6H2RWBH4GZYVEGIR6PS", "length": 22433, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "उत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nउत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nउत्तर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील राष्ट्रीय राजकारणाची एक रोमहर्षक अन चित्तवेधक रणनीती सध्या रंगत आहे. भारतीय राजकारण हे नेहमीच अभूतपूर्व डावपेच अन मानसशास्त्रीय चालींचे एक अगम्य मिश्रण राहिले आहे. स्वातंत्र्य काळापासून या देशाने अनेक नेते बघितले, ज्यांनी आपल्या अनोख्या व रोमहर्षक खेळीने भारतीय समाज मनावर गरुड केले. या प्रचंड देशाचे नेतृत्व करणे काही सोम्यागोम्याचे काम नव्हे, आणि अश्या आव्हानांचा सामना करण्यासाठीच काही लोकांचा जन्म झालेला असतो, अन मग त्या पदावर आरूढ होण्यासाठी पटावरची प्यादी कशी अन कधी हलवायची हे जाणते व्यवस्थित जाणतात.\nनरेंद्र मोदींची रणनीती आणि त्याची यशवी सांगता याने भारतीय ���ाजकारणाचा पोतच बदलून टाकला. भारतीय समाजमनाला एक निडर, अन जगाला कवेत घेणारे नेतृत्व हवे ही जनतेची सुप्त इच्छा जर जाणत्या नेत्यांनी ओळखली नसती तर आश्चर्य होते.\nमुलायम सिंग हा असाच एक भारतीय मानस टिपणारा नेता, ज्याची या देशाचा पंतप्रधान बनण्याची तीव्र इच्छा कधीही लपून राहिली नाही. एका समाजवादी चळवळीच्या मुशीतून तयार झालेलं त्यांच नेतृत्व, आणि त्यावेळचा राजकारणाचा पोत बघून त्यांनी आपल्या राजकारणाच्या चाली रचल्या. पण आता समाजातील बदलांचा अचूक अंदाज त्यांनी हेरला आणी भारतीय राजकारणाचं पटलावर एक नवी चाल खेळावयास घेतली.\nमुस्लीम समाजाचा अनुयय ही आजवरची मुलायामसिंगांच्या समाजवादी पक्षाची मुख्य विचारधारा होती. त्याच्या आधारे आजवर अनेकदा त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभा जिंकली व लोकसभेतही बर्यापैकी खासदार जमवले, पण हे पुरेसे नव्हते. त्यांची हीच छबी आज त्यांचे कुंपण बनली आणि ते तोडणे इतके सहज नव्हते, व तीच छबी ठेवून आता बदललेल्या परिस्थिती राहणेही शक्य नव्हते. जर राष्ट्रीय स्तरावर अधिराज्य हवे तर बंधनमुक्त व्हावयाला हवे या जाणीवेतून एका अफलातून चालीची निर्मिती झाली.\nइकडे आड अन तिकडे विहीर अश्या परिस्थितीत, सध्या उत्तर प्रदेशात इलेक्शन च्या पार्श्वभूमीवर एक अतिशय उत्कंठावर्धक मानसशास्त्रीय खेळ समाजवादी पक्षातर्फे खेळला जात आहे. जो पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवरील आपले रंग दाखवेल.\nया खेळाचा केंद्रबिंदू आहे – अखिलेश यादव.\nअखिलेश यादवचे एक तरुण,तडफदार, प्रसंगी ताकतवर लोकांशी पंगा घेणारा कणखर, प्रामाणिक, स्वकर्तुत्ववान, उदयोन्मुख, प्रगतिशील नेता अशी प्रतिमा बनवणे – हा खेळाचा पहिला आणि प्रमुख हेतू आहे. तर दुसरा हेतू म्हणजे “मुस्लीम धार्जिणे असलेली आणि पित्याच्या पाठिंब्याने बनलेला नेता” अशी प्रतिमा मोडून काढणे.\nया कार्याचा मानस शास्त्रीय पैलू म्हणजे उत्तर प्रदेशातील जनमानसाचे फक्त आपल्यावर खिळवून विरोधकांना विस्मरणात टाकणे. या कारणाने मीडिया व लोकांच्या विचारात सातत्याने राहणे व आपण एक असामान्य अन प्रगतिशील नेतृत्व आहोत असे लोकांच्या मनात ठसवणे. असे होतांना इतर पक्षांची लोकमानसावरील पकड काही काळासाठी ढिली होते व सहानुभूतीचे वातावरण निर्माण होऊन लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. त्या कालावधीत काही परिणामकारक कामे क��ून प्रतिमा घट्ट करता येते.\nअसा खेळ शिवसेने तर्फे राज अन बाळासाहेब यांच्यात मनसे ने लढवलेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत रंगला होता. त्याचा परिणाम राज ठाकरेला पदार्पणात नेत्रदीपक यश तर शिवसेनेच्या आमदार संख्येत बरीच वाढ झाली होती. पण उद्धव अन राज दोघेही त्या मधल्या शिथिलतेचा फायदा घेऊ शकले नाहीत. उद्धव ने फक्त सेनेला फुटीपासून रोकले तर राज ने अक्षरशः या संधीची माती केली.\nया मार्गाने अँटीइन्काबंसी फॅक्टर वर मात करणे, हा तात्पुरता फायदा आहे – पण खरे पाहता हा खेळ लोकसभेसाठी एक कणखर प्रतिस्पर्धी उभा करणे हाच आहे.\nआज घडीला यातील पहिला भाग संपून दुसरा भाग सुरु झाला आहे, अखिलेश यादव व समाजवादी पक्ष हा मुलायमसिंग यांच्या छायेतून बाहेर आला असून आता दुसऱ्या अंकाची मांडणी सुरु झाली आहे, उद्देश समाजवादी पक्षाची मुस्लिम धार्जिणा म्हणून असलेली छबी बदलणे, व सर्वसमावेशक बनवणे, त्याच वेळी मुस्लिम मतदार दूर जाणार नाही याची काळजी घेणे.\nयासाठी फार काळजीपूर्वक शब्द पेरणी होत आहे, जसे “मोदी कडून अखिलेशने शिकावे, की आई वडिलांशी कसे वागावे”, “अखिलेश चे मुस्लिम धोरण चुकीचे आहे “, ” मी सदैव मुस्लिम समाजाचे हित बघितले” – इत्यादी सर्व वाक्ये वर वर अखिलेश विरोधी वाटली तरी त्याच्या प्रतिमेचे रूप बदलण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. आजवर मोदींवर केलेली जहरी टीका ही मोदींच्या फायद्याची ठरते हे मुलायमसिंगांना व्यवस्थित उमगले आहे. त्यामुळे मोदी विरोध करावयाचा नाही, पण अखिलेशला प्रगतिशील दाखवायचे व सर्वसमावेशक बनवावयाचे – त्याच वेळी काँग्रेस सोबत युती करून मोदी विरोधकांना आपल्या सोबत ठेवायचे. याला समाजवादी पक्षाचे सकारात्मक राजकारण म्हणता येईल. कारण यात काँग्रेसचे पूर्ण नुकसान आहे, निवडणूक जरी हरले तरी अखिलेशची प्रतिमा बनणार आणि राहुल आणखी मागे पडणार, अन जिंकले तरी राहुलला काहीही फायदा होणार नाही याची काळजी घ्यायची.\nयाच्या पुढची चाल म्हणजे देशात आपले अस्तित्व वाढवणे, कदाचित मधल्या काळात समाजवादी पक्ष, हा अनेक लहान पक्षांशी युती किंवा विलीनीकरणावर भर देईल व आपले संघटन सर्वव्यापी करण्याचा प्रयत्न करेल.\nव्यवस्थित बघितले तर लक्षात येईल की, समाजवादी पक्षाचे चिन्ह, त्यांचा नेता आज त्यांच्या कडेच आहे जे बदलले आहे ती फक्त प्रतिमा.\nभारतीय राजकारणात मुलायमसिंग यांचे नाव का आदराने घेतले जाते याचे उत्तर या राजकीय खेळ्या बघितल्या की लक्षात येत. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेचा बळी देऊन, आपल्या मुलाला राष्ट्रीय क्षितिजावर उजागर करणारा असामान्य बाप अशी प्रतिमा मुलायमसिंगांची नक्कीच बनेल.\nआमच्या कडे अश्या सकारात्मक खेळ्या करण्यापेक्षा ब्राह्मण विरुद्ध मराठा, बहुजन विरुद्ध धनगर अश्या चाली रचण्यात जास्त स्वारस्य आहे, त्यामुळे मोदींच्या नंतर देशाचे नेतृत्व करेल असा नेता म्हणून फक्त फडणवीस हेच दिसतात. बाकी पवार घराणे असे काही खेळ खेळून आपल्या नव्या नेतृत्वाला नवे आकाश देतील असे वाटत नाही.\nजर समाजवादी पार्टी यात यशस्वी ठरली तर अखिलेश यादव हा येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये समाजवादी पक्षातर्फे पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल.\nया नाटकाचा उत्तर प्रदेश जनमानसावर काय परिणाम काय होतो हे अभ्यास करण्या योग्य असेल. अर्थातच ममता बॅनर्जी व नितीशकुमार आपल्या खेळी खेळातीलच. पण राहुल गांधी व केजरीवाल आता फायनल्स मध्ये नसतील.\n2019 ची लढाई मोदी, अखिलेश, ममता आणि नितीश यांच्यात असणार. वरील पैकी मोदी यांचे पारडे सध्या जड आहे. बघूया काय होतंय.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← झायराची माफी – हे कट्टरवादाचं अस्तित्व नाकारणाऱ्या सर्वांचं पाप आहे\nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते →\nपाच राज्यांच्या निवडणूक निकालांचं कवित्व – आपण काय शिकायला हवं\nअवैध धंदे, गुंडगिरी आणि रक्तपात: उत्तर प्रदेशमधील रक्तरंजित राजकारणाचे थरारक वास्तव\nह्या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देईल १५३ किमी प्रतीलिटर इतके एव्हरेज\nखलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या बॅटमॅनमधल्या “जोकर” कडून या १० गोष्टी शिकल्याच पाहिजेत\nलक्षद्वीपच्या निळ्याशार समुद्रावरून आता तुम्ही घेऊ शकणार उड्डाण, तयार होत आहे नवीन रनवे\nकाहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी खरंच घातक आहे का\nकश्मीरातला वाढता इस्लामिक कट्टरवाद चिरडणे भारतासाठी महत्वाचे\nकैंची धाम : ज्याची ख्याती विदेशापर्यंत पसरलेली आहे\nसुरेश प्रभूंच्य��� रेल्वेचं मार्कशीट\nटॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा\nट्रेकिंग करताना, गड किल्ल्यांवर फिरायला जाताना – ह्या गोष्टी चुकुनही विसरू नका\nऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट/फुटबॉल इ वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात\nक्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन\nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\n“शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…”\nअसिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो\nआर्मी युनिफॉर्मबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी\n“वायग्रा”च्या मुख्य उपयोगाव्यातिरिक्तचे तुम्हाला माहित नसलेले आगळेवेगळे फायदे\nभारतीय संसदेवर झालेल्या एकमेव हल्ल्याची कहाणी\nझाडांना वाईट बोलल्याने ते खरंच सुकून जातात का\nभारतात नागरिकांना हे १२ अधिकार देण्यात आले आहेत, पण आपल्यापैकी अनेकांना ते माहीतच नाहीत\nबिअर बॉटल्स या सामान्यत: हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या का असतात\nभाषण, सादरीकरण यशस्वी होण्यासाठीच्या ५ खास पायऱ्या..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/Mhada-Lottery-in-May.html", "date_download": "2019-03-25T07:43:11Z", "digest": "sha1:WKFHLFSU3MVMQUDJP5WNZOINVQUCQZGP", "length": 6748, "nlines": 111, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "खुशखबर, म्हाडाच्या 4 हजार 468 घरांसाठी मे मध्ये लॉटरी ! ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nखुशखबर, म्हाडाच्या 4 हजार 468 घरांसाठी मे मध्ये लॉटरी \nमुंबईत घरं घेणाऱ्यांसाठी म्हाडाने खुशखबर दिली आहे. येत्या मे महिन्यात म्हाडाने तब्बल 4 हजार 468 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई म्हाडाच्या 785 आणि कोकण बोर्डाच्या 3 हजार 683 घरांचा समावेश आहे.\nम्हाडाच्या मुंबई आणि उपनगरातील 785 घरांसाठी म्हाडाने ही लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये\nगोरेगाव – 182 घरं - अत्यल्प उत्पन्न गट\nमानखुर्द - 66 घरं – अत्यल्प उत्पन्न गट\nमालाड- मालवणी – 232 घरं – अल्प उत्पन्न गट\nमुलुंड – 249- घरं – मध्यम उत्पन्न गट\nशीव (सायन)- 56 घरं – मध्��म उत्पन्न गट\nया ठिकाणी ही घरं उपलब्ध आहेत. मात्र उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडाने मुंबईत लॉटरी जाहीर केलेली नाही.\nदुसरीकडे कोकण बोर्डानेही 3 हजार 683 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या सर्व घरांची लॉटरी एकत्रच निघाणार आहे.\nत्यामुळे मुंबईकरांना घरांसाठी लॉटरीद्वारे आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2017-Kenichi.html", "date_download": "2019-03-25T07:55:26Z", "digest": "sha1:NAGQFA25RWETYTPNG7JTUJPHAQ6WUZ2V", "length": 6535, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - केळीची उन्हाळी लागवड ६ हजार खोड, घडांची रास ३५ किलो, १५ लाख, खोडवाही तितकाच जबरदस्त", "raw_content": "\nकेळीची उन्हाळी लागवड ६ हजार खोड, घडांची रास ३५ किलो, १५ लाख, खोडवाही तितकाच जबरदस्त\nश्री. सुनील भागवत पाटील, मु. जांभुळ, पो. वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव. मो. ९९२१२६२६९२\nमाझी जांभुळ शिवारात ५० एकर शेती आहे. त्यामध्ये केळी, कापूस, सोयाबीन, मका ही पिके घेतो. त्यामध्ये २८ एप्रिल २०१६ ला मी ४ एकर हलक्या मुरमाड जमिनीत ५ x ५ फुटावर ६००० केळी रोपांची (जैनच्या) लागवड केली. त्यावेळी मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी जर्मिनेटर या औषधाची फवारणी तसेच ८ - ७ दिवसांनी जर्मिनेटरची ३ वेळा ड्रेंचिंग केली असता रोपे तयार झाली व जोमदार वाढू लागली. सप्तामृत औषधांची फवारणी २० दिवसांनी सुरू केली. अशा ४ फवारण्या केल्या. त्यामुळे झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढून झाडाची वाढ लवकर व चांगली झाली. पाने हिरवीगार, लांब मिळाली. दर महिन्याला १००० झाडांना १ लि. जर्मिनेटर व साफ पावडर ५०० मिली ची ड्रेंचिंग जून महिन्यापर्यंत चालू ठेवली. त्यामुळे उन्हापासून बागेचं चांगल्या प्रकारे संरक्षण झाले. पांढऱ्या मुळांची वाढ होऊन झाडे जोमाने वाढू लागली.\nजुनमध्ये पाऊस झल्यानंतर ६००० केळीला युरीया ४ बॅगा १०:२६:२६ च्या १८ बॅगा, कल्पतरू १२ बॅगा दिल्या. यामुळे केळीची जोमाने वाढ होऊन निसवण लवकर व चांगल्याप्रकारे झाली. त्यानंतर घडांवर दर १५ दिवसांनी राईपनर ६० मिली + न्युट्राटोन ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली प्रति पंप घेऊन २ वेळा फवारणी केली. त्यामुळे केळीची लांबी आकार, वजन वाढून चमक आली. त्यामुळे मला सर्व क्षेत्रापासून जवळपास ३६ किलोची रस मिळाली. त्यावेळी १००० रु. भाव असल्याने मला त्या बागेचे १५,००,००० रु. झाले.\nत्याच आधारावर मी यावर्षी पिल बाग ठेवला, सुरूवातीपासून जर्मिनेटरची ड्रेंचिंग व सप्तामृत फवारण्या चालू आहेत. तसेच कल्पतरू ६००० झाडांना १२ बॅगा व नंतर कमळ निघतेवेळी पुन्हा १२ बॅगा असा डोस दिला आणि गेल्यावर्षी प्रमाणे सप्तामृताच्या फवारण्या केल्या. आतापर्यंत ७०% निसवण झाली आहे. निसवणीनंतर गेल्यावर्षीप्रमाणे राईपनर, न्युट्राटोनच्या घडांवर २ - ३ फवारण्या करणार आहे. तरी मला यावर्षी ४० किलोची रास अपेक्षीत आहे.\nआता यापुढेही मी हे तंत्रज्ञान चालू ठेवणार आहे. माझे प्लॉट पाहण्यासाठी आमच्या भागातील श्री. प्रल्हाद देशमुख (पहूर) तसेच दिलीप देशमुख (पहूर) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी श्री. रविंद्र चौधरी (मो. ७०३८२३१९४५) आमच्या शेतावर येऊन वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात, तसेच त्यांच्या मार्गदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी औषधे वापरल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते. हा माझा अनुभव आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरावी व भरघोस उत्पादन घ्यावे असे मला वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/swapnil-joshi-movies/", "date_download": "2019-03-25T08:03:06Z", "digest": "sha1:FRFO5RQVFK7XATCRIOEBMI56PTTKZ7E2", "length": 2222, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": " swapnil joshi movies - मराठी कलाकार", "raw_content": "\nक्रिकेटरच्या भूमिकेसाठी “चॉकलेट बॉय”स्वप्नीलची कठोर मेहनत.\nचॉकलेट बॉयची इमेज तोडत नवीन वर्षात स्वप्नील जोशी आपल्याला एका दमदार आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे....\nआणि स्वप्नील म्हणतो “आयला आला रे सचिन”.पहा का ते.\nयेत्या १ फेब्रुवारी रोजी ‘मी पण सचिन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्निल जोशी या...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्��लुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/marathi-drama-padgham-264142/", "date_download": "2019-03-25T08:18:06Z", "digest": "sha1:POMPJX6L7FOEYNIGNYFPLD6LACAWY2A2", "length": 27002, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘पडघम’चे दिवस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nसात जानेवारी १९८५ रोजी संध्याकाळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रतिभावंत लेखक अरुण साधू लिखित ‘पडघम’ नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या थिएटर अकादमीनं सादर केला.\nसात जानेवारी १९८५ रोजी संध्याकाळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रतिभावंत लेखक अरुण साधू लिखित ‘पडघम’ नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या थिएटर अकादमीनं सादर केला. पहिल्या प्रयोगाच्या या दिवसाच्या जवळपास सव्वावर्ष आधी म्हणजे १७ सप्टेंबर १९९३ पासून सुरू झालेल्या ‘पडघम’च्या दिवसांची सांगता त्या दिवशी झाली. पहिल्या प्रयोगानंतर उत्तररात्री बराच वेळपर्यंत मला झोप येईना. मन:चक्षुंपुढे साऱ्या स्मरणाचा पट उलगडत राहिला..\nनाटकाकरिता पुण्यातल्या विविध महाविद्यालयांतून आलेल्या युवक/ युवतींबरोबरची पहिली भेट संस्थेतल्या युवा कलाकारांनी आयोजित केली होती. काही गाणारे, काही नृत्य करणारे, काही अभिनयपारंगत.. अशी तरुणाईची मांदियाळी जमलेली. सुमारे २०-२५ युवक तर सुमारे तितक्याच युवती. ‘पडघम’ला रूढार्थाने कथा आहेही आणि नाहीही. समाजातील सत्ता गाजवणारी प्रस्थापित व्यवस्था. त्या सत्तेविरुद्ध बंडाचे निशाण फडकावत ती उलथून नवनिर्माणाची स्वप्न रंगवणारे युवा नेतृत्व आणि त्याला विविध रूपांनी दडपणारी आणि अंती त्याला आपल्यातच सामील करून घेणारी शक्तिशाली व्यवस्था. त्यातून पुन्हा नव्या असंतोषाचे फुटणारे धुमारे.. आणि पुन्हा नव्या युद्धाचे वाजणारे पडघम.\nथिएटर अकादमीच्या परंपरेला अनुसरून हेही संगीत/ नृत्यप्रधान नाटक. ‘तीन पैशाचा तमाश��’चे प्रयोग करताना १०-१२ वादकांच्या उपलब्ध होण्याच्या मर्यादांमुळे प्रयोगसंख्येवर बंधन पडे. या नाटकाचा विषय युवाशक्तीचा आविष्कार असल्यामुळे पूर्व ध्वनिमुद्रित संगीताच्या साथीनं सर्व कलाकार प्रयोगात प्रत्यक्ष गातील यावर दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि संगीतकार असलेल्या माझं याचं एकमत झालं. पुन्हा हा पाश्र्वसंगीतावकाश पूर्व ध्वनिमुद्रित करणार असल्याने व्हायोलिन्स, स्याक्सोफोन, की फ्लूट, ट्रम्पेट,ओबो, सनई, क्ल्यरिओनेट, चेलो, बेस गिटार, स्पॅनिश गिटार, ट्वेल्व्ह स्ट्रिंग गिटार, व्हायब्रोफोन, स्वर्णमंडळ, हार्मोनियम, सिंथेसायझर, पियानो या वाद्यांबरोबरच ड्रमसेट, कोंगो, तुंबा, बोंगो, चंडा, पखवाज, ढोल, तबला, ढोलक, ढोलकी, डफ, दिमडी, घुंगरू, मंजिरी, टाळ हलगी, मादल, डूग्गी अशा विविध तालवाद्यांचाही अतिशय समृद्ध/ संतुलित असा प्रयोग करता येणार होता आणि तसाच तो झालाही..\nअरुण साधूंनी या नाटकाच्या आरंभी एक प्रील्युड-ज्यात नाटकाच्या आशयाचे सूचन असते- लिहिले आहे-\nहे गाणं म्हणजे समग्र नाटकाचं जणू थीम साँगच. अरुण साधूंनी हे गाणं लिहिताना कुठेतरी ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ या कवी इक्बालच्या लोकप्रिय गीताचा छंद मनात धरला असावा.\nत्यामुळेच बहुधा मीही त्याच स्वरांचा वापर करत नव्या चाली रचल्या आणि ‘ये गुलसिताँ हमारा’च्या मूळ अवरोही चालीत ‘आम्ही नवे शिपाई’ अशी सुरावट-पंडित रविशंकरजींच्या सुप्रसिद्ध चालीचं स्मरण करून देणारी- जाणीवपूर्वक योजली. त्यापाठोपाठ अथ्थकचा एक तोडा. (तकीट तकदिम तकतकीट)३ तकीट तकीट तकीट धा २. आणि मग ‘आम्ही नवे पुढारी’ हे धृवपद.. प्रत्येक अंतऱ्याची शेवटची ओळ ‘ये गुलसिताँ हमारा’ची आठवण करून देणारी. या प्रील्युडमध्ये बुद्धिवंत, राजकारणी, धर्माधिकारी यांच्यावर टिप्पणी होत असताना हिंदू, बौद्ध, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनांचा प्रयोग करायला संस्कृत ॠचा (राया भावे), बुद्धं शरणं गच्छामि-त्रिशरण मंत्र (समूहस्वर) आणि अजान (नीलेश गोसावी) गाणारे कलाकार मिळाले. चर्चमधली प्रार्थना मिळवायला मला माझ्या पियानो शिक्षिका श्रीमती सुन्नु डॉक्टर यांची फार मोठी मदत झाली.\nन्य२रर माय गॉड टू दी. न्य२रर टू दी..\nइव्हन दो इट बी अक्रोस.. द्याट रेझथ मी\nही प्रार्थना वृंदगानाच्या शैलीतून गायली जाताना सारे कलाकार थरारून जायचे.\nहा���ाशी ३५-४० युवक/ युवतींचा गानवृंद लाभल्यानं मला एकसमयावच्छेदेकरून तीन संवादी सुरावटींतून उलगडणारी गाणी बांधताना फार आनंद मिळाला. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, ललित संगीत, पॉप संगीत अशा विविध शैलींचा नाटय़पूर्ण प्रयोग करत एकापाठोपाठ एक गाणी बांधत गेलो. पहिल्या दीड-दोन महिन्यांच्या तालमीना पेटीवादक संगीतकार अस्मादिक आणि कलाकारांमधलाच पोरसवदा राहुल रानडे (आजचा तरुण संगीतकार राहुलदा रानडे) ढोलकीवर ठेका धरायला.\nप्रथम घ्यावी डिग्री डिग्री डिग्री..\nमग धरावी नोकरी नोकरी नोकरी..\nअसं सारी तरुणाई गात असताना बेरकी मंत्री आणि त्यांचा सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत काळ्या झग्यातले उपकुलगुरू उच्चासनावर उभे राहून सुपाने डिग्य्रांची पखरण करतात. कोरसमधली मुले आनंदातिशयाने स्लो मोशनमध्ये डिग्री वेचतात, तर तिकडे प्राध्यापकांची दिंडी (राग दुर्गा) पगारवाढ मागताना कामाचे तास कमी करायची मागणी करायला विसरत नाहीत. नरेंद्र कुलकर्णीच्या सुंदर गायनानं गाण्यातलं व्यंग उठून दिसे.\nतरी गात रहावे रडगाणे\nशिक्षण पद्धतीची वर्षीय रचना १०+२+३ असावी की ४+७+४ की ४+६+१+३ यांवर बुद्धिवंत, मंत्री, सेक्रेटरी आणि उपकुलगुरू यांचा वाद रंगत असताना युवासमूह त्यांच्या आधुनिक नृत्यशैलीत जोशपूर्ण नाचत गायचा-\nएक दोन तीन चार\n एक लक्ष श्यांशी हजार\nएक दोन तीन चार\n एक लक्ष श्यांशी हजार\nएक दोन तीन चार\nसगळे मिळून अश्रू ढाळू एक लक्ष श्यांशी हजार\nअशा तिरकस टिप्पणीसह सादर होणारं हे गाणं आणि त्यापाठोपाठ उपकुलगुरूंना/ मंत्र्यांना घेराव घालणारे विद्यार्थी त्यातून पोलीस.. धुमश्चक्री. अश्रुधूर.. गोंधळ कळसाला जाताना दृश्य संपे.\nया नाटकातले तीन सूत्रधार- जाधव (श्रीरंग गोडबोले), व्हटकर (उमेश देशपांडे) आणि देशपांडे (चंद्रकांत काळे) हे पोलिसी यंत्रणेचे प्रतिनिधित्व करणारे. प्रास्ताविक करत पात्रांची ओळख करून दृश्य सुरू करून देणारे. दंगलीमधल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल पोलिसी प्रतिक्रिया व्यक्त करणारं गाणं-\nरोख होता पोलिसांवर दंगलीत परवाच्या\nतुफान मारा केला त्यांनी दगड, विटा अन् बाटल्यांचा.\nपोलीस बिचारे तसे निरूपद्रवी\nज्यांच्या हाती सत्ता त्यांचे राखणदार\nश्रीरंग गोडबोले (जाधव) पोलीस कोरससह मोठय़ा जोशात पेश करायचा. तसेच हे सूत्रधार जाधव प्रसंगी कमिशनर भावेंचीही भूमिका निभावणारे. तर देशपांडे हे प्राध्यापक हर्षेची (जे पुढे मंत्री होतात) भूमिका साकार करणारे.. विद्यार्थीनेता म्हणून उदयाला येणारा प्रवीण नेर्लेकर (प्रसाद पुरंदरे) त्याची प्रेयसी अंजू (सुरेखा दिवेकर) त्यांच्या दृश्यापूर्वीचं- रोमँटिक पाश्र्वभूमी निर्मिणारं ‘ग्रंथालयात विद्यापीठाच्या’ हे वाल्ट्झच्या संथझुलत्या लयीतलं गाणं युवासमूह गाताना जणू ‘तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज’ रंगमंचावर प्रत्ययाला येई. पहिल्या अंकात प्राध्यापक हर्षे आणि\nसौ. हर्षे यांची प्रत्येकी एक-अशी गाणी..\nआजकालच्या या शिक्षणाला म्हणावं तरी काय\nआमच्या वेळी असं नव्हतं.. आमच्या वेळी असं नव्हतं..\nअशा पालुपदाची.. चंद्रकांत काळे (प्रा. हर्षे) देस रागात नाटय़संगीताच्या शैलीतल्या या गाण्यात बहार आणत तर कल्पना देवळणकर (सौ. हर्षे) प्रभातकालीन चित्रगीताच्या शैलीतल्या गाण्यातला लडिवाळ भाव अधोरेखित करत..\nइलेक्शनला उभे राहणाऱ्या प्रा. हर्षेच्या ‘इलेक्शन इलेक्शन इलेक्शन’ या गाण्यासह प्रचारास्तव मिरवणुकीच्या, सभांमधल्या भाषणाच्या दृश्यांपाठोपाठ पोलिसांकडून प्रवीण नेर्लेकरची होणारी उलटतपासणी आणि त्याच्या शारीरिक छळाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस कमिशनर भावे (श्रीरंग गोडबोले)-\nचोर खुनी अन् लुटारू\nहेच आमचं काम असतं\nया गाण्यातून पोलिसी व्यवस्थेचं समर्थन करतात.\nपोलिसी छळानंतर प्रवीण नेर्लेकर धडपडत साऱ्या मुलामुलींपुढे समोर येत मोठय़ा कष्टानं पुन्हा उभा राहतो तेव्हा साऱ्या तरुणाईद्वारा पोलिसांच्या निषेधाच्या आणि ‘प्रवीण नेर्लेकर झिंदाबाद’च्या घोषणा टिपेला पोहोचताना पहिला अंक संपतो…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा विजय तेंडुलकरांनी बदलला’\nमहेश एलकुंचवार यांच्या लेखणीचा सलग नाटय़ानुभव\nराज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पध्रेत ‘डोण्ट वरी बी हॅपी’ विजयी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'ब��ोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-raut-criticize-on-bjp-chay-wala-publicity-pune/", "date_download": "2019-03-25T08:03:36Z", "digest": "sha1:H6Z3AS3EKNXDW6FUSBL5IBCPGYDK6ISH", "length": 4929, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींनी गरीबीच भांडवल करू नये: संजय राऊत", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nमोदींनी गरीबीच भांडवल करू नये: संजय राऊत\nपुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक चहा विकणारी व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला असं सांगतात, मात्र याचा पुरावा त्यांनी दाखवावा. अनेक राजकारणी गरिबीतून हालाकीच्या परिस्थितीचा सामना करून राजकारणात अनेक पदावर पोहचले आहेत. त्यामुळे भाजपने गरीबीच भांडवल करू नये अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक राऊत यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते\nभाजप सरकारने 3 हजार कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्च केले. मात्र सरकारने काय काम केल हेच यातून दिसत असल्याची टीकाही राऊत यांनी केली. गुजरात निवडणुका पाहिल्या तर राहुल गांधी यांच नेतृत्व उभारत आहे आणि त्याचा परिणाम गुजरात निवडणुकीत दिसेल असेही ते म्हणाले.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nशेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाच��या कामाला सहकार्य करा-लोणीकर\nरिंगरोडबाबत पर्यायी मार्गाचा विचार करू – श्रावण हर्डीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/bigg-boss-marathi-day-34-updates/", "date_download": "2019-03-25T07:36:22Z", "digest": "sha1:SOHJZBJHSISMYINSWUMODAMN6P356BAP", "length": 10464, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "राजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम", "raw_content": "\nराजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nबिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा नाडकर्णी.\nराजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम\nबिगबॉस मराठीचा कालचा भाग चांगलाच पैसावसुल राहिला. काल आपल्याला सर्व सदस्य चक्क आनंदी वाटत होते. आणि त्याला कारणही तसंच होतं कारण एकीकडे आस्तादचा बर्थडे होता आणि सरशेवटी आपल्याला बघायला मिळाली ती घराची नवी सदस्य बनलेली नवी पाहुणी पुढचं पाऊल फेम अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर आता इथून पुढच्या प्रवासात आपल्याला बघायला मिळणार आहे. घरातील सर्व आवाजांसोबत आता चाहत्यांना अक्कासाहेबांचा कणखर आवाज ऐकायला मिळणार आहे. आज सदस्यांच्या घरातील ३४ वा दिवस होता. नेहमीप्रमाणे आजही सदस्यांना टास्कही मिळालं आणि आपल्याला त्रुतुजा आणि हर्षदा खानविलकर ह्यांच्यात शाब्दिक चकमक बघायला मिळाली. हेच कमी कि काय तर आजच्या भागात आपल्याला बिगबॉसने राजेश आणि सुशांतला घरातील कामं करण्याची शिक्षा पण सुनावली म्हणे\nकाल नवीन पाहुणीचं स्वागत केल्यानंतर, आज सर्व नित्यनेमाप्रमाणे चालू झालं. आजच्या टास्कमध्ये आपल्याला दोन भागात विभागलेले मातीचे ढाचे दिसले. एका ग्रुपमधील सदस्य स्वतःच्या ढाच्यात फुलं रोवतांना तर आपल्या विरुद्ध ग्रुपच्या ढाच्यातील रोवलेली फुले उखडून फेकताना दिसले. दरम्यान हे टास्क चालू असतांना त्रुतुजा आणि हर्षदा खानविलकर ह्यांच्यात शाब्दिक चढाओढ झालेली आपल्याला दिसली. नेहमीप्रमाणे आक्रमक झालेल्या ऋतुजाला “राग आवर, टास्क आहे तर टास्कसारखं खेळ” असं भारदस्त आवाजात सुनावलं. पुढे मग सर्व सदस्य सोबत बसल्यानंतर बिगबॉसने घरातील सदस्यांचा समाचार घेतला. खेळातील आक्रमकता वाढत असून नुसतं शक्तीनिशी सदस्य टास्क करत असल्याचं बिगबॉसने सांगितलं. ह्या बद्दल राजेश आणि सुशांतला बिगबॉसने आपला पुढील आदेश येईपर्यंत घरातील कामं करण्याची शिक्षा दिली आहे. विशेष म्हणजे त्या दोघांना कामं करतांना इतर कोणाचीही मदत मिळणार नाहीये.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nबिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा नाडकर्णी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\nआजकाल जे क्षेञ बघावं त्यात चढाओढ सुरु आहे. त्या त्या क्षेत्रातील स्पर्धकांमध्ये कमालीची स्पर्धा आजच्या जमान्यात...\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\nबिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. वाद, विरोध, प्रेम,...\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n‘चॉकलेट बॉय’ स्वप्नील जोशी, ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री...\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“घाडगे & सून” ही कलर्स मराठीवरील मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत...\n‘इयर डाऊन’चा २ तासांचा विशेष चित्रपट.पुन्हा भेटीला येतोय जन्मेजय.\n‘इयर डाऊन’चे पहिले पर्व संपले असून या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. समीर...\nबिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\n‘तुम्ही पण ऍडल्ट शो करताय’ रेशमने व्यक्त केला रोष\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/shravana-bal/", "date_download": "2019-03-25T07:41:14Z", "digest": "sha1:ULPB6P2VEUSZZE3Q2CADATP35YM2CXBR", "length": 7871, "nlines": 80, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nश्रावणा बाळा पाणी आण\nजवळी आहे स्वच्छ सरोवर\nइथे विसावा घेऊ घडीभर\nसुकले अमुचे कंठ तृषेने\nश्रावणा बाळा पाणी आण.\nअरण्यात त्या क्षणात घुमले\nश्रावणा बाळा पाणी आण.\nआले श्वापद जल प्राशना\nसमजुनी ऐसे दशरथ राणा\nश्रावणा बाळा पाणी आण.\nफुटला टाहो आई आई\nदाही दिशांना भेदुनी जाई\nश्वापद म्हणुनी दशरथ मारी\nश्रावणा बाळा पाणी आण.\nतृषार्त माझे बाबा आई\nपाणी त्यांना आधी देई\nभ्रांत दशरथा विनवी श्रावण\nभ्रांत दशरथा विनवी श्रावण\nश्रावणा बाळा पाणी आण.\nनिर्माते ना बा कामत यांनी त्यावेळचे प्रसिद्ध ग्रामिण कथालेखक शंकर पाटील यांच्या एका कथेवर तमाशा नसलेला ग्रामिण चित्रपट तयार करण्याची योजना आठवले यांच्यासमोर ठेवली. आठवले यांनी फिल्म्स डिव्हिजन सोडली आणि ती जबाबदारी स्वीकारली आणि ती अशी काही पार पाडली की त्यांनी त्या कथेवर तयार केलेल्या 'वावटळ' या चित्राला पु.ल.देशपांडे, गजानन जहागीरदार आणि विश्राम बेडेकर यांसारख्या दिग्गजांनी १९६५ - १९६६ सालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान दिला. महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पारितोषिकातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पारितोषिक तर आठवले यांनी मिळालेच पण सर्वोत्कृष्ट संकलन इत्यादी दहाहून अधिक तांत्रिक अंगांची पारितोषिकेही या चित्राने मिळवली.\nयातील खास ग्रामिण बाजाच्या गाण्यांसाठी आठवले यांनी प्राध्यापक आनंद यादव यांना बोलावले. आठवले यांनी एकच गाणे लिहिले. 'श्रावणा बाळा पाणी आण' हे सुधीर फडके यांच्या आवाजातील गाणे राम कदम यांनी अतिशय परिणामकारक रीतीने स्वरबद्ध केले आहे. ते ऐकले आणि पहिले पाहिजे असेच आहे.\nश्रावणा बाळा पाणी आण\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चं��ेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/dhanjay-munde-comment-on-baba-ramdevs-patanjali-praoduct/", "date_download": "2019-03-25T08:12:32Z", "digest": "sha1:GV6AAYOX35EYULHMQR2G2K4ANMO6U6RQ", "length": 6799, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर उद्या शेतक-याला सातबा-या सोबत पतंजलीचा आवळाही घ्यावा लागेल – धनंजय मुंडे", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nतर उद्या शेतक-याला सातबा-या सोबत पतंजलीचा आवळाही घ्यावा लागेल – धनंजय मुंडे\nहिंगोली ( वसमत )- पतंजली सारख्या खाजगी कंपनीच्या आहारी गेलेल्या या सरकारमुळे उद्या शेतक-यालासेवा केंद्रातून साधा सात बारा घेताना तहसीलदाराने बळजबरीने दिलेला पतंजलीचा काढा, आवळा अन टूथ पेस्ट हि घ्यावी लागेल अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंड्स यांनी केली.\nतहसीलदाराकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला यापुढे पतंजलीचे प्रॉडक्ट्स विकले जातील, रामदेव बाबाचा व्यावसाय वाढावा यासाठी हे भाजप सरकार आपले मुलभूत अधिकार पणाला लावत आहे अशी खरमरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर केली.\nहल्लोबोल आंदोलानानिमित्ताने वसमत येथे आयोजित सभेत ते बोलत होते. राज्य सरकार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आपले सरकार’ नावाचे दोन केंद्र स्थापन करणार आहे. या केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सर्व सेवांचा समावेश होता मात्र सरकारने त्यात आणखी एका सेवेची भर पडली आहे ती म्हणजे बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ प्रोडक्ट्सची, माहिती व तंत्रज्ञान विभागाने शासनाचा हा निर्णय प्रसिद्ध केला आहे.\nयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना आपले अधिकार पणाला लावणाऱ्या या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लोबोल आंदोलनामार्फत रोष व्यक्त करा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी जनतेला केले.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nराजपथावर अवतरण्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ तयार\nसेल्फी काढण्याआधी रस्त्याची योग्य माहिती घ्या चंद्रकांत पाटलांचा मुंडे आणि पवारांना टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/o-p-jaisha-accusation-is-fake-1289264/", "date_download": "2019-03-25T08:15:48Z", "digest": "sha1:RKVNBXO37IELPOBFKCHE26S76T7AMNZB", "length": 13255, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "o p jaisha accusation is fake | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\n‘निराशाजनक कामगिरी लपवण्यासाठी जैशाचे आरोप’\n‘निराशाजनक कामगिरी लपवण्यासाठी जैशाचे आरोप’\nलंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताच्या खात्यातील चार पदके कमी झाली.\nएएफआयचे सचिव व्हॉलसन यांचा दावा; द्विसदस्यीस समिती स्थापन\n‘रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील ४२ किमीच्या मॅरेथॉन शर्यतीत आपल्याला पाण्यासारखी प्राथमिक सुविधाही पुरवण्यात आली नव्हती. त्यामुळे मला प्राण गमवावे लागले असते,’ असा आरोप करून भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या (एएफआय) कारभाराला लक्ष्य करणाऱ्य�� धावपटू ओ. पी. जैशाला महासंघाने घरचा आहेर दिला. ‘ऑलिम्पिक स्पध्रेतील निराशाजनक कामगिरी लपवण्यासाठी जैशा असे बिनबुडाचे आरोप करीत आहे,’ असा दावा एएफआयचे सचिव सी. के. व्हॉल्सन यांनी केला आहे.\nऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक खेळाडूंचे पथक घेऊन रिओत गेलेल्या भारताला अपेक्षेप्रमाणे यश मिळवण्यात अपयश आले. एक रौप्य आणि एक कांस्यपदकावरच भारताला समाधान मानावे लागले. लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताच्या खात्यातील चार पदके कमी झाली. या निराशाजनक कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर जैशाच्या आरोपांनी क्रीडा क्षेत्राला ढवळून काढले होते. मात्र मंगळवारी एएफआयने सडेतोड उत्तर दिले. ‘मॅरेथॉन शर्यतीत तिची कामगिरी चांगली झाली नाही. म्हणूनच कदाचित ती असे आरोप करीत सुटली आहे,’ असे व्हॉल्सन म्हणाले.\nत्यांनी पुढे सांगितले की, ‘खेळाडूंना पाणी आणि ऊर्जा पेय देण्याची जबाबदारी आयोजकांची असते. त्यासाठी शर्यतीच्या ठिकाणी पाण्याचे आणि पेयाचे थांबे उभारण्यात आले होते. आम्हीही खेळाडूंना पाणी आणि ऊर्जा पेय पुरवू शकलो असतो; परंतु त्यांच्या प्रशिक्षकांनी तशी मागणी आमच्याकडे केली नाही.’\nदरम्यान, मॅरेथॉनपटू कविता राऊतने परस्परविरोधी मत मांडले आहे. ती म्हणाली, ‘महासंघाने आम्हाला सर्व सुविधा पुरविल्या. मी केवळ माझ्याबद्दल बोलेन. मॅरेथॉन स्पध्रेपूर्वी अधिकाऱ्यांनी पाणी आणि ऊर्जा पेयसाठी विचारणा केली होती, परंतु मी ती नाकारली. जैशा आणि तिचे प्रशिक्षक यांनी सभेत सहभाग घेतला नव्हता, म्हणूनच त्यांना पाण्याची बाटली ठेवण्याबाबत माहीत नसावे.’+क्रीडा मंत्रालयाची द्विसदस्यीय समिती\nधावपटू ओ. पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी द्विसदस्यीय समिती स्थापन केल्याची घोषणा केली. ‘क्रीडामंत्री विजय गोयल यांनी द्विसदस्यीय समितीची घोषणा केली असून यामध्ये सरचिटणीस ओंकार केडिया आणि अधिकारी विवेक नारायण यांचा समावेश आहे. हे जैशाच्या आरोपांची चौकशी करतील,’ असे क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nमला खोटे बोलण्याची गरज काय रिओमध्ये पाण्याची सुविधा नव्हती. भारतीय क्रीडा प्राधिकरण किंवा संघटनेवर मी आरोप करीत नाही. २१ किलोमीटरनंतर मी इतकी दमले होते की, मी एक मीटरही चालू शकत नव्हते.\n– ओ. पी. जैशा\n(( सी. के. व्हॉल्स��� ))\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-loksabha-elections-2019-shivsena-starts-political-campaigning-4110", "date_download": "2019-03-25T07:30:42Z", "digest": "sha1:OMMDSW25NAUHDYIDAJSYIPLW7GTEMSCO", "length": 6082, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news loksabha elections in 2019 shivsena starts political campaigning | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही फुंकलं रणशिंग\nलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही फुंकलं रणशिंग\nलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही फुंकलं रणशिंग\nलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही फुंकलं रणशिंग\nबुधवार, 9 जानेवारी 2019\nलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही रणशिंग फुंकलंय. नरेंद्र मोदींनी सोलापुरातून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बीडमधून तर राहुल गांधींनी राजस्थानमधून प्रचाराचा नारळ फोडलाय.\nसोलापुरात भाजपकडून विकासकामांचा शुभारंभ केला गेलाय, तब्बल 3 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा आज सोलापुरात शुभारंभ केला गेलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बीडमधून दुष्काळ दौऱ्याला सुरुवात केलीय.\nलोकसभा ���िवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनंही रणशिंग फुंकलंय. नरेंद्र मोदींनी सोलापुरातून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बीडमधून तर राहुल गांधींनी राजस्थानमधून प्रचाराचा नारळ फोडलाय.\nसोलापुरात भाजपकडून विकासकामांचा शुभारंभ केला गेलाय, तब्बल 3 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा आज सोलापुरात शुभारंभ केला गेलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बीडमधून दुष्काळ दौऱ्याला सुरुवात केलीय.\nतिकडे राजस्थानमध्ये राहुल गांधींनी जयपूरमध्ये प्रचारसभा घेतली. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं कर्जमाफी केली तशीच कर्जमाफी २०१९ मध्ये सत्तेत आल्यानंतर करणार अशी घोषणाच राहुल गांधींनी केलीय.\nएकंदरीतच लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना प्रचाराचं बिगुल वाजलंय.\nलोकसभा राहुल गांधी rahul gandhi दुष्काळ shivsena\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/photos/page/5/", "date_download": "2019-03-25T08:29:30Z", "digest": "sha1:WIGOXVVT2RS77ROG6JVAWWDEOKPXZWBA", "length": 6000, "nlines": 64, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Photos - Page 5 of 9 - मराठी कलाकार", "raw_content": "\nव्हॅलेंटाईन डेच्या दिवशी येतोय रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा. पहा सिनेमातील लूक\nआपल्या सर्वांची आवडती आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्याला तिच्या आगामी सिनेमातून भेटीस येणार आहे. रिंकूची...\n‘अमलताश’ आगामी सिनेमाचा टिझर.\nबालगंधर्व, पुष्पक विमान या दोन सिनेमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडेने कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता...\n‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशाची आई आहे चित्रपटसृष्टीचे महान खलनायक निळू फुलेंची मुलगी\nखूपच कमी कालावधीत झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरली. मालिकेतील नवोदित...\nअनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा सोबत निमित्त आगामी सिनेमा “अबलख”.\nस्वप्ने माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. याच स्वप्नपूर्तीच्या धाटणीवर...\nचॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव अडकणार लग्नाच्या बेडीत. संपन्न झाला साखरपुडा.\nतब्बल एका दशकापूर्वी गाजलेल्या अल्फा मराठीवरील “नायक” मालिकेमुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता अनिकेत विश्वासरावचा साखरपुडा...\nपाहून कोणी म्हणणार नाही पण या अभिनेत्याचं वय वर्ष सत्तर आहे\nमराठी सिनेसृष्टीला अनेक दिग्गज ताऱ्यांची देणगी मिळाली आहे. विजय भाटकर हे त्यापैकीच एक मोठ्ठ नाव. आज...\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\nमिस अर्थ इंडिया-फायर हा किताब मिळवणारी महाराष्ट्राची लेक हेमल इंगळे. २०१६ साली तिने हा पुरस्कार मिळवला...\nथंडी संपतेय बरं का आणि हळूहळू आता सूर्य आग ओकून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल देतोय. पण सध्याच्या...\nकधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर कधी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/5-biggest-science-projects-of-china/", "date_download": "2019-03-25T07:32:26Z", "digest": "sha1:HIW64R3Y4JCX7JLZHA7PVL6BU6OQC6NY", "length": 13516, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'हे' ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nचीनने आपल्या आर्थिक विकासाची घोडदौड सुरुच ठेवली आहे. येथे तयार होणा-या वस्तूंची जगभरात विक्री होत आहे. भारत-चीनमधील सीमा प्रश्न सुटलेला नाही. सार्क राष्ट्रांमधील आपले स्थान चीन त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत करुन बळकट करत आहे. असे होत असताना चीनच्या काही विज्ञान आणि इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स हे या देशाच्या विकासात महत्त्वाचा वाट उचलत आहेत.\nआज आम्ही तुम्हाला चीनमधील पाच अशा महत्त्वाच्या सायन्स व इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्सविषयी सांगणार आहोत.\n1) डाया बे रिअॅक्टर न्युट्रीनो एक्सपेरिमेण्ट\nहा प्रकल्प दक्षिण चीनच्या गुआंगडांग प्��ांतात आहे. डाया बे रिअॅक्टर न्युट्रीनो एक्सपेरिमेण्ट न्यूट्रीनो मिक्सिंगच्या अभ्यासासाठी प्रसिध्द आहे. हा न्युट्रिनो फीजिक्सचा नवीन अभ्यासक्षेत्र आहे.\n2) शांघाय सिंक्रोट्रोन रेडिएशन फॅसिलिटी\nयात 1.2 बिलियन युआनची गुंतवणूक करण्यात आली. शांघाय सिंक्रोट्रोन रेडिएशन फॅसिलिटी (एसएसआरएफ) हा प्रकल्प 19 जून 2010 मध्ये कार्यान्वित झाला. एसएसआरएफ हे चीनमधील संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे प्लॅटफॉर्म आहे. सिंक्रोट्रोन प्रकाशाचे स्त्रोत असून ते वैज्ञानिक संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावतो.\n3) सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप\nचीन जगातील सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप उभारत आहे. हा अवाढव्य बांधकाम प्रकल्प असणार आहे. याचा आकार 30 फुटबॉल पिचस मावतील. विश्वाचे आकलन आणि दुस-या ग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी मानव जगासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सप्टेंबर 2016 मध्ये त्याचा वापर सुरु होईल. यामुळे संशोधकांना अब्जावधी प्रकाश वर्ष दूरच रेडिओ लहरी डिटेक्ट करु शकतील.\n४) नैऋत्य चीनमधील जर्मप्लाझम बँक ऑफ वाईल्ड स्पेशिज\nडाया बे रिअॅक्टर न्युट्रीनो एक्सपेरिमेण्ट हे चाइनीज अॅकेडमी ऑफ सायन्सेस(कॅस) अंतर्गत कार्य करते. चीनच्या युनान प्रांतात ही संस्था आहे. ही संस्था दुर्मिळ आणि संपण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींवर संशोधन आणि जतन करण्याचे काम करते. याची स्थापना 2008 मध्ये झाली होती.\n५) चीनचे मानवनिर्मित सन फ्युजन डिव्हाइस\nसध्या मानवी समाज ऊर्जा संकटाला तोंड देत आहे. अशा स्थितीत शाश्वत स्वच्छ ऊर्जा कुठून द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. द अर्टिफीशयल सन प्रोजेक्ट अशा प्रश्नांवर उपाय सुचवण्यासाठी प्रकल्प विकसित केला जात आहे. हा राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प असून त्याला द एक्सपेरिमेण्टल अॅडव्हान्स्ड सुपरकण्डक्टींग टोकामाक(इस्ट) नाव दिले आहे. त्याला अर्टिफीशयल सन असे संबोधले आहे.\nआहे की नाही भन्नाट\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘ह्या’ भारतीय शीख व्यक्तीने अवघ्या ‘कॅनडा’ सरकारला वेठीस धरले होते\nहे कोणतेही स्पेसशिप नाही, हे आहे स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘अॅप्पल पार्क’ \nअसे लग्न समारंभ कदचित तुम्ही कधीही बघ���तले नसणार\nशाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’\nचीनसारखी स्वस्त दरातील उत्पादने भारत का तयार करू शकत नाही वाचा डोळे उघडणारं उत्तर..\nव्हायग्राचा हा असा वापर होऊ शकतो असं ह्याच्या निर्मात्यालासुद्धा कधी वाटलं नसेल\nमोदींची अमेरिका भेट : नेमका काय फायदा झाला\nखराब फॉर्म सुधारण्यासाठी सचिनला एका वेटरने दिला होता सल्ला\nभुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले \nजळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (\nस्वातंत्र्यपूर्व काळातील, पानिपतची (न झालेली) ४ थी लढाई\nभारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास\nबहुचर्चित हिंदी चित्रपटांची ११ रंजक तथ्ये\n” : सातवीतला विद्यार्थी शिक्षिकेला विचारतो तेव्हा\nयुयुत्सु: महाभारतामध्ये पांडवांच्या बाजूने लढणारा ‘अज्ञात कौरव’\nभूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन \nकाही काळाने या कामांमध्ये माणसांची जागा रोबोट्स घेऊ शकतात मग माणसांनी काय करायचे\nशत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\n एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे\n‘सेक्स थेरेपिस्ट’ना सर्वात जास्त वेळा विचारले गेलेले हे प्रश्न तुम्हालाही पडतात का\nसमलिंगीयांना समजून घेण्यास आपण कमी पडतोय\nभीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू\nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते\nअमेरिकेच्या जन्माचा, हा देश घडण्याचा रंजक इतिहास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-July2015-BhagvaDalimb.html", "date_download": "2019-03-25T08:10:07Z", "digest": "sha1:CJHVCGWKCIOL4Y6O7B4JBSRLX5ULRXBD", "length": 17517, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - चुकली वाट सरांच्या तंत्रज्ञानाने गवसली !", "raw_content": "\nचुकली वाट सरांच्या तंत्रज्ञानाने गवसली \nश्री. बबन कृष्णा कामठे, मु. पठारवाडी, पो. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे, मोबा. ९६५७१०९७००\nआमची एकूण ८ एकर जमीन आहे. ३ वर्षाचा असतानाच वडील वारले. पुढे उपजिवीकेसाठी लहान वयातच पुण्याला आलो. त्यातून पुढे हॉटेल व्यवसाय सुरू केला. आता मुले हा हॉटेलचा व्यवसाय पाहतात. मला शेतीची आवड असल्याने गावाकडील ८ एकर जमीन करण्यासाठी गेलो. आमच्या गावात ७२ च्या दुष्काळात वसंतदादा मुख्यमंत्री असताना पाझर तलाव बांधला गेला आहे. त्याच्या खालच्या (पाणी पाझरणाऱ्या) भागात थोडी जागा घेतली. तेथून ४ किमी अंतरावर पाईपलाईनने शेतात पाणी आणले आणि प्रथम ८०० भगवा डाळींबाची रोपे जून २०१३ मध्ये लावली. जमीन मुरमाड आहे. लागवड १२' x १०' वर आहे. मला शेतीतील अनुभव फारच कमी त्यामुळे जाणकारांचा सल्ला घेऊन डाळींब पिकाची जोपासना करू लागलो. पुढे बहार धरताना बागेला उन्हाळ्यात पाणी कमी पडेल म्हणून शेताच्या वरच्या बाजूला डोंगरावर ५७ x ५४ मिटर लांबी, रुंदीचे आणि २० फूट खोल असे शेततळे बांधले. बागेला ठिबक केले आहे. शेततळे व ठिबकसाठी कोणतेही अनुदान घेतले नाही.\nया बागेचा पहिला बहार धरण्यासाठी ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१४ महिन्यात बागेस ताण देऊन पाणी दिले. मात्र ताण कालावधीतच पाऊस झाल्याने डिर निघाले. त्यानंतर छाटणी झाली. मात्र पावसामुळे कळी फारच कमी निघाली.\nत्यावेळी मार्केटयार्डला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये जाऊन डाळींबाविषयी माहिती घेतली. बहार फुटीसाठी जर्मिनेटर, प्रिझम ही औषधेही नेली. त्याची फवारणी केली असता फुट चांगली निघाली.\nझाडावर २५ - ३० फळे सेट झाली. मात्र त्यानंतर मुलाने डाळींब बागेचा अनुभव नसल्याने सल्लागार नेमला. त्याच्या सल्ल्यानुसार बागेस रासायनिक औषधे फवारू लागलो. पुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा गॅप पडला. या काळात फक्त 'कृषी विज्ञान' मासिक वाचत असे. आम्ही सल्लागाराच्या सल्ल्यानुसार सासवडवरून औषधे आणून फवारू लागलो. मात्र फळे १५० - २०० ग्रॅमची असताना बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. आता आम्ही खर्च करून हतबल झालो होतो. तरी त्यांच्या सल्ल्यानुसार तेल्या प्रतिबंधासाठी औषधे फवारली. औषधे महाग होती. शिवाय रोग आटोक्यात येईल अशी हमी दुकानदार देत नसे. गावातील जाणकार म्हणायचे तेल्या आटोक्यात येत नाही. बाग काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला काय करावे सुचेना.\nदुकानदाराने दिलेली औषधे ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारली. त्याने तेल्या रोग आटोक्यात येण्यापेक्षा आहे त्यातीलही बरीच फळे तडकली.\n३ वर्षापासून शेतात नुसता खर्च करीत आहे. शेततळे, ठिबक, विहीर, २ बोअर असा १० - १२ लाख रू. नुसता खर्च होऊन १ रू. ही प्रॉफिट आज तागायत नाही. त्यामुळे पुर्णता हतबल झालो आहे. आता भांडवलही संपले आहे.\nआज यावर काय मार्ग काढायचा यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे. सरांनी यावर सांगितले, \"कोणताही बहार धरताना ताण कालावधीत पाऊस होऊ नये. पाऊस जर झाला तर बागेस कळी न निघता नुसती फुट निघते. डीर निघतात. चौकी निघत नाही. जमिनीपासून घुमारे (फोक) वेगाने निघतात. भात टाकल्यावर जशी धाड उगवते तसे वेगाने डीर निघतात. पाऊस झाल्याने उष्णता व ओल यामुळे मुके डोळे जोराने फुटले. कळी व माल कमी लागण्याची हीच करणे आहेत. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने जी २५ - ३० फळे सेट झाली. त्यावर पुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या बंद केल्याने तसेच बागेतील झाडांचे अंतर जवळ (१२' x १०') असल्याने तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या भागातील जमिनी मी ३० वर्षापुर्वी पहिल्या आहेत. जमीन उताराची मुरमाड आहे. तेथे उताराला आडवे बांध घालून लागवड करायला पाहिजे होती तशी झाली नाही\".\nपुढे सरांनी सांगितले, \"आता तुम्ही प्रथम मातीचे पृथ्थ:करण करून घ्या. तसेच जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा जून अखेरीस एकदा आणि ऑक्टोबर (भाद्रपद) मध्ये एकदा ताग किंवा धैंच्या डाळींबाच्या मधल्या पट्ट्यात करून (एकरी ४० कीलो पेरून) तो १ महिन्याचा झाल्यावर फुलावर येण्यापुर्वीच जमिनीत गाडा. म्हणजे त्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढेल. जमिनीची भौतिक सुपिकता वाढेल, जमिनीत हवेची पोकळी वाढेल. जैवीक नत्राचे स्थिरीकरण होईल. तसेच आता प्रथम झाडावरील २५ - ३० फळे पोसण्यासाठी, तेल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थ्राईवर १ लि. क्रॉपशाईनर १ महिन्याचा झाल्यावर फुलावर येण्यापुर्वीच जमिनीत गाडा. म्हणजे त्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढेल. जमिनीची भौतिक सुपिकता वाढेल, जमिनीत हवेची पोकळी वाढेल. जैवीक नत्राचे स्थिरीकरण होईल. तसेच आता प्रथम झाडावरील २५ - ३० फळे पोसण्यासाठी, तेल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थ्राईवर १ लि. क्रॉपशाईनर १ लि. राईपनर अर्धा लि., न्युट्राटोन १ लि, प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून फवारणी करा आणि जर्मिनेटर १ लि., प्रिझम १ लि. कॉपरऑक्झिक्लोराईड १ लि. ची २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा आणि कल्पतरू सेंद्रिय प्रत्येक झाडास १ किलो द्या. \"\nबागेत मार रोगाने काही झाडे गेली आहेत. तसेच ख���्च करण्यास भांडवलही नाही तेव्हा सरांना विचारले या गेलेल्या जागी व संपुर्ण बागेत आंतरपीक 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावू का या शेवग्याविषयी 'कृषी विज्ञान' मधून खूप यशस्वी मुलाखती वाचल्या आहेत. त्यामुळे ७ व्या महिन्यापासून उत्पन्न चालू होऊन भांडवल उभे होईल. यावर सरांनी सांगितले, \"अगोदरच डाळींबाची लागवड जवळ (१२' x १०') आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून नाही घेता येणार, मात्र जी झाडे मेली आहेत. तेथे हमखास 'सिद्धीविनायक' शेवगा लावू शकता. त्यापासून खात्रीशीर उत्पन्न मिळेल.\" यावेळी सरांनी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील माळी यांनी दुष्काळात द्राक्षाच्या मेलेल्या वेलीच्या जागेवर 'सिद्धीविनायक' शेवगा लावला तर त्यापासून त्यांना द्राक्षापेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. केदा सोनवणे यांनी मर रोगाने गेलेल्या भगवा डाळींबाच्या बागेत 'सिद्धीविनायक' शेवगा लावला तर त्यांना भगवा डाळींबापेक्षा जास्त पैसे या शेवग्यापासून झाले. त्यानंतर त्यांनी डाळींबाची खूपच मर झालेल्या २ या शेवग्याविषयी 'कृषी विज्ञान' मधून खूप यशस्वी मुलाखती वाचल्या आहेत. त्यामुळे ७ व्या महिन्यापासून उत्पन्न चालू होऊन भांडवल उभे होईल. यावर सरांनी सांगितले, \"अगोदरच डाळींबाची लागवड जवळ (१२' x १०') आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून नाही घेता येणार, मात्र जी झाडे मेली आहेत. तेथे हमखास 'सिद्धीविनायक' शेवगा लावू शकता. त्यापासून खात्रीशीर उत्पन्न मिळेल.\" यावेळी सरांनी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील माळी यांनी दुष्काळात द्राक्षाच्या मेलेल्या वेलीच्या जागेवर 'सिद्धीविनायक' शेवगा लावला तर त्यापासून त्यांना द्राक्षापेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. केदा सोनवणे यांनी मर रोगाने गेलेल्या भगवा डाळींबाच्या बागेत 'सिद्धीविनायक' शेवगा लावला तर त्यांना भगवा डाळींबापेक्षा जास्त पैसे या शेवग्यापासून झाले. त्यानंतर त्यांनी डाळींबाची खूपच मर झालेल्या २ एकर प्लॉटमधील बाकी सर्व डाळींब झाडे काढून संपूर्ण 'सिद्धीविनायक' शेवगा लावला. त्यांच्या शेवग्याच्या शेंगा कुवेत व लंडनला निर्यात होऊन ५ - ६ ल���ख रू. झाल्याची मुलाखत 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीच्या पुस्तकात पान नं. ३९ वर प्रकाशित झाली आहे. तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही 'सिद्धीविनायक' शेवगा लावून उत्पन्न वाढवू शकाल.\" तेव्हा मेलेल्या डाळींबाच्या जागी तसेच एक डाळींबाचा वेगळा प्लॉट आहे. तो काढून त्याजागी 'सिद्धीविनायक' शेवगा लावणार आहे.\nबाकीच्या बागेतील सुत्रकृमी नियंत्रणाबद्दल सरांना विचारले असता सरांनी सांगिलते, यसाठी बागेस प्रत्येक झाडास १ - १ किलो निंबोळी पेंड व करंजपेंड देऊन मोकळे पाणी द्या. म्हणजे या पेंडीचा कडू अर्क सुत्रकृमीच्या भागात जिरेल व सुत्रकृमी मरतील. तसेच या बागेत झेंडू आता लावला तर सुत्रकृमी आटोक्यात राहून हा झेंडू गणपती, नवरात्र, दसरा या सणांत मार्केटला येऊन चांगले भाव सापडतील व पैसेही होतील. असाच प्रयोग सुरेश शेलार, वडगाव रासाई ता. शिरूर, जि. पुणे. मोबा. ८२७५०६७०१०/८६९८९०९७७९ यांनी केला. तर झेंडूचे पैसे चांगले झाले होते.\n७ - ८ महिन्याची नवीन १००० भगवा डाळींबाची वेगळी बाग आहे. तिची ३ - ४ वेळा छाटणी केली आहे. खोड हाताच्या अंगठ्यासारखे आहे. यावर सरांनी सांगितले \"प्रत्येक झाडाला ३ ते ४ खोडे ठेवा. तसेच या बागेवर तेल्याचा प्रादुर्भाव होऊ नये. पानांची कॅनॉपी होण्यासाठी थ्राईवर ५०० मिली, क्रॉपशाईनर १ लि., न्युट्राटोन ५०० मिली आणि प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. तसेच कल्पतरू प्रत्येक झाडास २५० ग्रॅम देऊन जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. आणि कॉपरऑक्झिक्लोराईड १ लि. ची २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा.\" आता मी यापुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बाग जोपासणार असून मला खात्री आहे की हेच तंत्रज्ञान मला शेती समृद्ध करून देईल.\n'सिद्धीविनायक' शेवग्याची ३०० रोपे जुनचा पाऊस झाल्यावर लावणार आहे. त्या अनुभवातून मग पुढे शेवगा १ ते १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-25T07:59:55Z", "digest": "sha1:M2E27QGBT444RZJKT32L74IUDFOBUVV3", "length": 7117, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "१६. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : शीतयुग आणि सत्ताबदल - विचारप्रवाह", "raw_content": "\n१६. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : शीतयुग आणि सत्ताबदल\nसाधारणतः १४व्या शतकापासून पृथ्वीवर अवतरलेले छोटे शीतय��ग १७व्या शतकात म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळात शिखरावर पोहचले. हवामान बदलाचा पिक-पाण्यावर विपरीत परिणाम झाल्याने महाराष्ट्रासह जगभर दुष्काळ पडला. त्यातून अन्नधान्याची विवंचना निर्माण झाली व रोगराई पसरली. अशाने जागतिक लोकसंख्या काहीप्रमाणात रोडावली. या सगळ्या घडामोडींची अप्रत्यक्ष परिणिती म्हणून जगभरात मोठे सत्ताबदल झाले.\nदरम्यान महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला असला, तरी महाराष्ट्रातील संत परंपरा अबाधित होती. कदाचित संतांच्या विचारांतूनच स्वातंत्र्याची उर्मी येथील लोकांच्या हृदयात निर्माण झाली असावी. १६४७ साली तोरणागड जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची तसेच सुराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजी महाराज पराक्रमाची शर्थ करत असताना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांद्वारे महाराष्ट्रातील समाजमन जागे करत होते. याच काळात समर्थ रामदास स्वामींनी देखील महाराष्ट्रात प्रबोधनात्मक कार्य केले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात उभारलेल्या स्वराज्याचे पुढे जाऊन मराठा साम्राज्यात रुपांतर झाले.\n१७व्या शतकात ब्रिटिशांनी भारतीय उपखंडातील विविध शहरांत व्यापाराकरिता वखारी उभारल्या. ते भारतीय उपखंडातील राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन होते. शिवाजी महाराजांनी गाजविलेल्या मोहिमांच्या बातम्या इंग्लंडमधील वृत्तपत्रातून छापून येत असत. याच काळात आयझॅक न्यूटन इंग्लंडमध्ये गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करत होते. हे काम करत असताना त्यांनी गतीविषयक काही मूलभूत नियमही मांडले. न्यूटन यांच्या कार्यामुळे वैज्ञानिक जगतास नवी कलाटणी मिळाली. त्याच शतकात मायक्रोस्कोपची देखील निर्मिती झाली. त्यामुळे संशोधकांसाठी एक नवे विश्व खुले झाले.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n२८. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : रेमिंग्टन टाईपरायटर : टायपिंग\n७०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : इलेक्ट्रॉनिक ब्रेन\n३६. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन : गुणवत्ता आणि प्रशिक्षण\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फार�� मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ekmake-news/chinmay-mandlekar-articles-on-production-manager-kemse-part-3-1583424/", "date_download": "2019-03-25T08:17:40Z", "digest": "sha1:4YAXGWI77BOM7E26BRYLBIVMTE46OTBE", "length": 24359, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chinmay mandlekar articles on production manager kemse part 3 | केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर (भाग ३) | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nकेमसे, प्रॉडक्शन मॅनेजर (भाग ३)\nकेमसे, प्रॉडक्शन मॅनेजर (भाग ३)\nमी आणि माझ्याबरोबरच्या काही सुज्ञ सहकलाकारांनी जनजागृतीचा निष्फळ प्रयत्न एकदा करून पाहिला.\n‘अत्याचार सहन होत नसेल तर त्यातून आनंद घ्यायचा प्रयत्न करावा..’ अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. केमसेंच्या आमदनीत त्या सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येकानं ही म्हण आपल्या अंगी बाणवली होती. एखादं विमान दरीत कोसळणार हे कळल्यावर त्यात बसलेल्यानं आपल्या जवळच्या शेवटच्या चॉकलेटचा रॅपर फोडून ते चॉकलेट तोंडात टाकून जिभेवर गोडवा घोळवावा तशी माझी अवस्था होती. या चित्रपटाचं विमान दरीत कोसळणार हे एव्हाना स्पष्टच झालं होतं. ‘ब्राझीलमध्ये गाणं उडवू’ असं आश्वासन देऊन उडून गेलेले निर्माते एखाद्या शनिवार-रविवारी दर्शन देत. त्यांच्या चकचकीत बीएमडब्ल्यूमधून ते उतरत. सोबत कुटुंबकबिला, मित्रपरिवार असे. एकूणच एखाद्यानं अलिबागला वगैरे रम्य ठिकाणी जागा विकत घ्यावी आणि सुटीच्या दिवशी आपल्या रिकामटेकडय़ा मित्रांना ती दाखवायला न्यावी, तसा त्यांचा वावर असे. नाही म्हणायला त्यांनी त्यांचा एक पुतण्या प्रतिनिधी म्हणून सेटवर मुक्कामाला ठेवला होता. पण तो गडी फक्त आपण काल कुठल्या ब्रॅण्डचे कपडे घेतले आणि आज कुठल्या ब्रॅण्डचा गॉगल घातला, एवढंच सांगण्यात मश्गूल असे. एकूणच सगळा कबिला ‘आपण सिनेमा बनवून ऱ्हायलोय’च्या नशेत गुंगला होता. ती नशा आता त्यांना किती कोटीला पडते, एवढाच प्रश्न उरला होता.\nमी आणि माझ्याबरोबरच्या काही सुज्ञ सहकलाकारांनी जनजागृतीचा निष्फळ प्रयत्न एकदा करून पाहिला. एकदा असेच आमचे निर्माते ‘व्हिजिट’ला आले असता आम्ही त्यांना एकूणच अनागोंदीची कल्पना द्यायचा प्रयत्न केला. पण सिनेनिर्मितीची नशा सगळ्यात पहिला हल्ला करते ती माणसाच्या कानांवर. ‘‘सर, आपल्या फॅमिली न्यूमेरोलॉजिस्टचं प्रेडिक्शन आहे.. ६ मेला रिलीज करा. कमीत कमी धा-बारा कोटींचा धंदा कमीत कमी हां आपल्याला ६ मे गाठायचीय फक्त. म्हणून वन स्ट्रेट शेडय़ूलमध्ये उडवून टाकायचा पिक्चर’’ कागदी विमान उडवावं तसं सिनेमा उडवण्याच्या बाता मारणाऱ्या या गणंगाला केमसेंसारखा प्रॉडक्शन मॅनेजर भेटला हे निसर्गनियमाला धरूनच होतं.\nबरं, एरवी तक्रार करण्यासारखं काही नव्हतं. व्यवस्था उत्तम होती. ठरलेले पैसे ठरलेल्या वेळी मिळाले होते. पण मूळ ज्या गोष्टीसाठी हा सगळा घाट घातला होता तो चित्रपट.. लग्नाच्या वरातीत वधूला जुनेरी पांघरायला लावून करवलीलाच नटवण्याचा प्रकार चालला होता. बरं, त्यातही केमसे कधी कधी अनपेक्षित चुणूक दाखवायचे.. नाही असं नाही. एका दृश्यासाठी घोडा हवा होता. खराखुरा जिवंत घोडा. शूटिंगच्या आदल्या रात्री आमच्यात पैजा लागल्या, की उद्या केमसे घोडा म्हणून काय आणणार लग्नाच्या वरातीत वधूला जुनेरी पांघरायला लावून करवलीलाच नटवण्याचा प्रकार चालला होता. बरं, त्यातही केमसे कधी कधी अनपेक्षित चुणूक दाखवायचे.. नाही असं नाही. एका दृश्यासाठी घोडा हवा होता. खराखुरा जिवंत घोडा. शूटिंगच्या आदल्या रात्री आमच्यात पैजा लागल्या, की उद्या केमसे घोडा म्हणून काय आणणार लाइटवाल्यांचा शिडीवाला घोडा आणतील, रस्त्यावरचं कुत्रं पकडून दिग्दर्शकाला सांगतील, ‘ऐका ना सर, यालाच घोडा समजा ना. तो सहकार्य करायला तयार आहे; मग तुम्ही का नाही लाइटवाल्यांचा शिडीवाला घोडा आणतील, रस्त्यावरचं कुत्रं पकडून दिग्दर्शकाला सांगतील, ‘ऐका ना सर, यालाच घोडा समजा ना. तो सहकार्य करायला तयार आहे; मग तुम्ही का नाही’ किंवा ते काहीच आणणार नाहीत. आणि ज्योकमधला शाळकरी मुलगा जसं कोऱ्या पानाचं चित्र मास्तरांना दाखवून सांगतो की, ‘माझा घो���ा गवत खाऊन निघून गेला’, तसं काहीतरी करतील. ज्याच्या कल्पनाशक्तीला जे सुचत होतं ते तो फेकत होता.\nपण दुसऱ्या दिवशी सगळे तोंडात मारल्यासारखे गप्प झाले. आमची गाडी शूटिंग लोकेशनला पोहोचली तेव्हा एक उंचापुरा करकरीत घोडा शेपूट हलवत आमच्या स्वागताला उभा होता. दिग्दर्शकाची अवस्था तर दीपिका पदुकोण शेजारच्या ब्लॉकमध्ये राहायला आलीय अशी बातमी कळलेल्या इसमासारखी झाली होती. तरीही काही लोकांनी खुसपट काढलं- ‘‘तो घोडा बसू देतो का पण बसू दिलं तर चालतो का बसू दिलं तर चालतो का केमसेंनी आणलेला घोडा आहे; काहीतरी झोल असणारच.’’ केमसेंनी आपल्या कार्यबाहुल्यामुळं असा लौकिक संपादन केला होताच केमसेंनी आणलेला घोडा आहे; काहीतरी झोल असणारच.’’ केमसेंनी आपल्या कार्यबाहुल्यामुळं असा लौकिक संपादन केला होताच पण त्या दिवशी घोडा अगदी सुतासारखा सरळ वागला. जिथं जायचं तिथं गेला. जिथं थांबायचं तिथं थांबला. बसणाऱ्यांना पाठीवरून खाली फेकलं नाही. शूटिंग संपताना दिग्दर्शक फक्त त्याचा मुका घ्यायचा बाकी राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर कृतकृत्य भाव होते. आणि त्या संपूर्ण दिवशी केमसे कॉलर उभी करून सेटवर हिंडत होते. एरवी दिग्दर्शकाचा आवाज चढला की केमसे नेमके त्याचवेळी हिशोब करायला मेकअप रूममध्ये निघून जायचे किंवा पुढच्या लोकेशनची परवानगी मिळवायला गायब व्हायचे. त्या दिवशी मात्र ते दिवाळीला नवी चड्डी मिळालेल्या शाळकरी मुलासारखे सगळ्यांच्या पुढय़ात वावरत होते. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ‘मी स्वत: चॉइस करून आणलाय घोडा..’ असं सांगत होते. जणू काय त्यांनीच तो घोडा जन्माला घातला होता\nतो रम्य दिवस संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी सेटवर पोहोचलो तेव्हा केमसे कुठेच दिसेनात. कालच्या यशाची धुंदी उतरली नसावी बहुधा, असं वाटून गेलं. पण लंच ब्रेकनंतरही केमसे दिसेनात तेव्हा मी त्या निर्मात्याच्या पुतण्याला विचारलं, ‘‘केमसे दिसले नाहीत आज.’’\n‘‘केमसेला काढला.’’ पानाची पिंक टाकावी तसा पुतण्या बोलला.\n’’ मला काहीच कळेना.\n‘‘वर लाथ मारून हाकलला काकांनी. पैशाचे झोल\nत्यानंतर दिवसभर सेटवर चर्चा सुरू होती. ‘केमसेंचं हेच होणार होतं. आपल्याला आधीच माहिती होतं.’ असं जो-तो शपथेवर सांगू लागला. या घटनेनंतर दोन दिवसांत ‘‘सर, आपण हे शेडय़ूल पॅकअप करतोय. पुढच्या तारखांचं कळवतो,’’ असं पुतण्यानं सांगितलं आणि आम्ही स्वगृही परतलो. शेडय़ूल संपताना मिळायचे पैसे मिळाले नाही. ‘काका क्लीयर करतील,’ असं म्हणून पुतण्यानं बोळवण केली. ते पैसे मी आजतागायत पाहिलेले नाहीत. ते देण्याचं वचन देणारे काकाही नंतर मला भेटलेले नाहीत. यांचेच पैसे घेऊन केमसे पळून गेले म्हटल्यावर हे तरी काय करतील, असा सात्त्विक विचार करून मीही कधी पिच्छा नाही पुरवला. सिनेमा डब्यात अडकून पडला तो कायमचा.\nमागच्या वर्षी मी नवी मुंबईत एके ठिकाणी एका समारंभाला गेलो होतो. तिथे ‘मान्यवर व्यासपीठ’ म्हणून माझ्या बाजूला केमसे ‘‘कसं काय सर’’ केमसे माझा हात दाबत म्हणाले.\n‘‘तुम्हाला कसं विसरेन केमसे’’ मला सगळ्यांसमोर केमसेंचं वस्त्रहरण करायचं नव्हतं. पण चहा पिताना संधी साधून मी वार केलाच- ‘‘त्या आपल्या सिनेमाचं काय झालं’’ मला सगळ्यांसमोर केमसेंचं वस्त्रहरण करायचं नव्हतं. पण चहा पिताना संधी साधून मी वार केलाच- ‘‘त्या आपल्या सिनेमाचं काय झालं तुम्ही गायबच झालात\nकेमसे खिन्न हसले. ‘‘तुम्हाला काय सांगितलं सर मी पैसे खाल्ले- असंच ना मी पैसे खाल्ले- असंच ना\nआता केमसेच छाती पुढे काढून ‘घाल गोळी’ म्हणतायत तर मी कशाला मागे हटणार होतो\n‘‘सगळेच शिव्या घालत होते तुम्हाला. सगळ्यांचेच पैसे बुडाले.’’\nकेमसे काही काळ शून्यात बघत राहिले. ‘‘मी काहीही सांगितलं तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही सर. त्यामुळं सांगून काय उपयोग’’ बऱ्याच वेळानं ते म्हणाले.\n‘‘म्हणजे तुम्ही पैसे खाल्ले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे’’ माझ्या आवाजात अजूनही तिखटपणा होताच.\n‘‘सर, अजूनही कायनेटिक घेऊन फिरतो. अजूनही वन रूम किचनमध्येच राहतो. जाऊ द्या, काय सांगायचं आपल्या हातून कलेची सेवा घडावी म्हणून या रगाडय़ात पडलो; पण खूप वाईट माणसं भेटली सर. त्यांचे हेतू वेगळे होते. आपण कलाकार आहोत सर.. दलाल नाही.’’ केमसे आता माझ्याशी बोलत नव्हतेच.. स्वत:शीच बोलल्यासारखे बोलत होते.\nकार्यक्रम संपला. केमसेंनी माझ्याकडे कार्ड दिलं- ‘साईकृपा इस्टेट एजन्सी.’ ‘‘इथं नवी मुंबईतच आहे सर आता. कधी फ्लॅटबिट बघायचा असेल तर सांगा. तुम्ही हाक मारलीत तर अर्ध्या रात्रीसुद्धा धावून येईन.’’ केमसे पुन्हा हसतमुख झाले होते. केमसेंना अर्ध्या रात्री हाक मारण्याचा प्रसंग अजून तरी माझ्यावर आलेला नाही. पण त्यानंतर केमसेंचा दररोज न चुकता पहाटे पाचला मे���ेज येतो. ज्यांची तुलना केवळ कागदाच्या निर्थक कचऱ्याशी होऊ शकते असे बंडल सुविचार त्या मेसेजमध्ये असतात. ते मी कधीच वाचत नाही. पण काही दिवसांपूर्वीच डिलीट करायच्या आधी त्यांच्या एका मेसेजमधले काही शब्द डोळ्यांवर झेपावलेच- ‘सत्य हे सापेक्ष असते..’ केमसेंच्या बाबतीत नेमकं सत्य काय, हा एक मनोरंजक संशोधनाचा विषय आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/contif-football-football-tournament-2-1-victory-over-indias-strongest-argentine/", "date_download": "2019-03-25T07:40:13Z", "digest": "sha1:LF4FWERESMU7C3XGMFG63AP6DZ5IX37R", "length": 14288, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉन्टिफ चषक फुटबॉल स्पर्धा : भारताचा बलाढ्य अर्जेंटिनावर 2-1 ने विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॉन्टिफ चषक फुटबॉल स्पर्धा : भारताचा बलाढ्य अर्जेंटिनावर 2-1 ने विजय\nव्हॅलेन्सिया (स्पेन): सहा वेळा विश्वविजेता राहिलेल्या अर्जेंटिना संघाला भारतीय संघाने स्पेनमध्ये सुरू असलेल्या कॉन्टिफ चषक 20 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात 2-1 ने पराभूत करताना खळबळजनक निकालाची नोंद केली. भारताच्या अनिकेत जाधव या खेळाडूला 50व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाल्याने बाहेर जावे लागल्यानंतर केवळ दहा खेळाडू मैदानात असूनही भारताने हा विजय खेचून आणला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून पुढील स्पर्धेत भारतीय संघ��ला याचा निश्चितच फायदा होईल.\nफ्लॉइड पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला याआधी म्युरसिया (2-0) आणि मॉरिटॅनिया (3-0) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता, तर त्यांनी व्हेनेझुएलाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. मात्र, सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी सहा वेळा 20 वर्षांखालील विश्वचषक उंचावणाऱ्या अर्जेंटिनाला नमवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.\nभारतीय संघ या सामन्यात पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेताना दिसला. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दीपक तनगीरने गोल करत भारताचे खाते उघडले. तर सामन्याच्या उत्तरार्धात 68व्या मिनिटाला अन्वर अलीने भारतीय संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाचा संघ दबावाखाली खेळताना दिसला. त्यानंतर 72 व्या मिनिटाला अर्जेंटिनाने आपला सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला.\nपहिल्या चार मिनिटांमध्येच गोल नोंदवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. संपूर्ण सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगला खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. ज्यामुळे अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर दडपण वाढत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर झालेला दिसून आला. परिणामी सामन्यात त्यांना केवळ एकच गोल नोंदवता आला.\nभारताचा गोलरक्षक प्रभाकरन गिलने 56व्या आणि 61व्या मिनिटाला दाखवलेल्या चपळाईमुळे अर्जेंटिना संघाला बरोबरी साधण्याची संधी मिळाली नाही. अर्जेंटिना संघाने केलेले अनेक प्रयत्न त्याने परतवून लावले. पाच मिनिटांच्या जादा वेळेमध्ये अर्जेंटिना संघाने सामना बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टवर आदळून बाहेर गेला. भारतीय खेळाडूंनी केलेल्या आक्रमक खेळामुळेच भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.\nकर्णधार अरमित सिंग कियाम याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला चकित करणाऱ्या या भा\nरतीय संघात गोलरक्षक प्रभाकरन गिलसह, आशिष राय, जितेंद्र सिंग, अन्वर अली, साहिल पन्वर, बोरिस सिंग तांगजाम, सुरेश सिंग वांगजाम, दीपक तनगीर, निथोनांबा मिथाई व अनिकेत जाधव या खेळाडूंचा समावेश होता.\n#IPL2019 : पंजाबसमोर आज राजस्थानचे कडवे आव्हान\nमहिला रेसर स्नेहा शर्मा मलेशियात दुसऱ्या स्थानी\nइंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी\nसंघटनांच्या वादाचा फटका राजस्थानच्या खेळाडूंना\nते बीसीसीआयला विचारा : स्टिव्ह स्मिथ\nकसोटी क्रिकेटच्या पोषाखात बदल होणार\n#IPL2019 : हरभजनच्या नावेही अनोखा विक्रम\nसुरेश रैनाच्या आयपीएलमधे 5 हजार धावा\nसीसीआय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-sadabhu-khot-vs-raju-shetty-politics-maharashtra-1288", "date_download": "2019-03-25T07:48:52Z", "digest": "sha1:ONOUGW5UUBCEI7ILPPYEOC3YYAR5OGQH", "length": 5956, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news Sadabhu Khot Vs Raju Shetty Politics Maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसदाभाऊ Vs राजू शेट्टी; एकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी..\nसदाभाऊ Vs राजू शेट्टी; एकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी..\nसदाभाऊ Vs राजू शेट्टी; एकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी..\nसदाभाऊ Vs राजू शेट्टी; एकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी..\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nएकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी झाल्याचं चित्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाहायला मिळतंय सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर असताना स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर गाजरफेक आणि दगडफेक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची खिल्ली उडवत आंदोलन करायचं त्या शाळेचा हेडमास्तरच सदाभाऊ खोत आहे. माझ्याकडे क्लास लावा असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय..तर दुसरीकडे मला माझ्या मतदार संघात संरक्षण घेवुन फिरायची वेळ येइल,त्यावेळी मी निवडणुक लढवायची बंद करेन असा पलटवार खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.\nएकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी झाल्याचं चित्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाहायला मिळतंय सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर असताना स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर गाजरफेक आणि दगडफेक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची खिल्ली उडवत आंदोलन करायचं त्या शाळेचा हेडमास्तरच सदाभाऊ खोत आहे. माझ्याकडे क्लास लावा असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय..तर दुसरीकडे मला माझ्या मतदार संघात संरक्षण घेवुन फिरायची वेळ येइल,त्यावेळी मी निवडणुक लढवायची बंद करेन असा पलटवार खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.\nसदाभाऊ खोत खासदार सोलापूर दगडफेक आंदोलन agitation\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/mahatma-gandhi-statue-vandalised-in-keralas-kannur/articleshow/63212929.cms", "date_download": "2019-03-25T09:01:39Z", "digest": "sha1:FL3ZYDTNW7K2A5OCKNTYOK662PENDKXU", "length": 11388, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mahatma gandhi statue vandalised: केरळमध्ये गांधीजींच्या पुतळ्याची नासधूस - mahatma gandhi statue vandalised in keralas kannur | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nके��ळमध्ये गांधीजींच्या पुतळ्याची नासधूस\nरशियन राज्यक्रांतीचे प्रणेते लेनिन, थोर द्रविडी विचारवंत पेरियार रामास्वामी नायकर, जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी आणि भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांपाठोपाठ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली आहे. कन्नूरच्या थालिपरंबा येथे काही अज्ञातांनी गांधीजींच्या पुतळ्याचा चष्मा तोडला असून पोलीस या समाजकंटकांचा शोध घेत आहेत.\nभारताचा POKमध्ये हल्ला; १०...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींच...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट...\nकन्नूर: रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते लेनिन, थोर द्रविडी विचारवंत पेरियार रामास्वामी नायकर, जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी आणि भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांपाठोपाठ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली आहे. कन्नूरच्या थालिपरंबा येथे काही अज्ञातांनी गांधीजींच्या पुतळ्याचा चष्मा तोडला असून पोलीस या समाजकंटकांचा शोध घेत आहेत.\nमहात्मा गांधी यांच्या पुतळ्याची नासधूस केल्याची घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या थिरुवोत्रियूर पेरियार नगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीवर अज्ञातांनी पेंट फेकल्याची घटना घडली असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या आधीही समाजकंटकांनी मेरठमध्ये बाबासाहेबांच्या मूर्तीची नासधूस केल्याची घटना उघडकीस आली होती.\nIn Videos: केरळमध्ये गांधीजींच्या पुतळ्याची नासधूस\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअ��्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\n220 club: भाजपमध्ये नरेंद्र मोदींविरोधात '२२० क्लब'\nair strike: हवाई हल्ला: मोदींचा पित्रोदांवर पलटवार\nNirav Modi : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला लंडनमध्ये ...\nपाकिस्तानच्या नागरिकांना PM मोदींच्या शुभेच्छा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकेरळमध्ये गांधीजींच्या पुतळ्याची नासधूस...\nफेसबुकवरील वादातून गोळीबार; तीन जखमी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिलांना सॅल्यूट\nपुरुषांच्या तुलनेत महिलांचा २०% पगार कमी...\nमोदींनी माझा फोनही घेतला नाही: नायडू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2016-Siddhivinayakshevaga.html", "date_download": "2019-03-25T07:52:33Z", "digest": "sha1:ZBDLU4JY37VAOQHAAVIIBVIJ6XH3KV6D", "length": 9043, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - 'सिद्धीविनायक' शेवग्याचा दूत व चिकित्सक अभ्यासू मार्गदर्शन", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' शेवग्याचा दूत व चिकित्सक अभ्यासू मार्गदर्शन\nश्री. बाळासाहेब महादेव शेलार, मु.पो. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे. मो. नं. ८६९८९०९७७९\n७ जून २०१५ ला २ एकरमध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा लावला आहे. जमीन मध्यम असून लागवड १० x ५ फूट अंतरावर आहे. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळच्यावेळी १५ दिवसाला फवारण्या करतो. कल्पतरू खत लागवडीच्या वेळी २५० ग्रॅम/झाड व नंतर फुलकळी लागल्यावर ५०० ग्रॅम दिले होते. त्याचबरोबर ३ फुटाचा असताना शेंडा खुडल्यानंतर फांद्या फुटतात. त्या फांद्या वाढीसाठी १३:४०:१३ एकरी ४ किलो देतो. याने शेंड्याचे आगरे जर जास्तच पळायला लागले तर ०:५२:३४ देतो, म्हणजे ते वाढ थोपवते व लगेच कळीसाठी १२:६१ ड्रिपमधून सोडतो. हे १५ दिवसाच्या अंतराने करतो.\nमग कळी गळू नये. वाध्या लागाव्यात, शेंगा पोसाव्यात म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची नियमित फवारणी घेतो. हा शेवगा नोव्हेंबर २०१५ ला चालू झाला. तो आज ही (११ मार्च २०१६) चालू आहे. दररोज १५० ते ३०० - ५०० किलो असा माल निघत आहे. शेंग १ फुटाचीच काढतो. त्यामुळे गावरानच्या भावात जाते. अजून २ महिने चालेल. आतापर्यंत ६ - ७ टन माल निघाला आहे. बाजारभाव कमी कमी होत गेला. सुरुवातीला (नोव्हेंबरमध्ये) ५० रू. नंतर ४० - ३० असा होत आता १२ ते १५ रू. भाव पुणे मार्केटला मिळत आहे. मागे ओडीसा जातीचा शेवगा लावला होता. तर त्यापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याचे उत्पादन जास्त मिळत असून शेंग हिरवीगार, मध्यम जाडीची गरयुक्त असल्याने भावही मार्केटमध्ये इतरांपेक्षा जादा मिळतो.\nशेवग्याच्या दरात चढ - उतार होण्याची कारणे\nसरांची सांगितले, \"शेवग्याचे बाजारभाव सहसा खाली येत नाहीत. बाजारपेठेतील अभ्यासातून असे निदर्शनास आले की, जेव्हा वाटाणा थंडीमध्ये येतो तेव्हा वाटाण्याचे भावही तेजीत ६० रू. च्या पुढे ते १५० रू. पर्यंत असतात. अशावेळी शेवग्याचे देखील भाव तेजीतच असतात. सासवड, पारनेर, वाई या भागातील वाटाण्याची शेंग हिरवीगार, चमकदार ६ ते ८ दाण्याची असते. यातील मधले ३ दाणे मोठे असतात तर दोन्ही बाजूचे २ - २ दाणे हे मध्यम ते बारीक (तुरीच्या दाण्यासारखे) असतात. खायला हा वाटाणा अतिशय गोड असतो. गोल्डन, बंदेलखंड वाटाण्याच्या शेंगेत साधारण १० दाणे असतात. याची साल पातळ, दाणे गच्च भरलेले असतात. यातील जी शेंग वरून हिरवीगार चमकदार असते. त्यातील दाणे गोड असतात, मात्र जी शेंग पांढरट पोपटी व त्यावर पांढरे डाग असतात अशा शेंगेतील दाणे तोंडात धरवत नाही. हा वाटाणा सासवड, पारनेर वाटाण्यापेक्षा स्वस्त असतो. या वाटाण्याची मार्केटमध्ये आवक जोपर्यंत मर्यादित असते. तोपर्यंत वाटाण्याचे भाव हे कडक (तेजीचे) असतात. मात्र जेव्हा या वाटाण्याची आवक वाढते, हा वाटाणा मोठ्या प्रमाणात मार्केटला येतो. तेव्हा सर्वचा वाटाण्याचे भाव सुरुवातीला ६० रू. वर खाली येतो. तेव्हा उच्चभ्रू लोक वाटाणा खातात. पुढे भाव कमी होत ४० रू . वर येतो तेव्हा मध्यमवर्ग ज्या धरात नवरा बायको दोघेही नोकरी करतात असे लोक वाटाणा खातात. वाटाणा ४० रू. असेपर्यंत सर्वसामान्य किंवा खालचा वर्ग वाटाणा खाऊ शकत नाही. तोपर्यंत शेवग्याचे भाव स्थिर असतात. मात्र जेव्हा ह्याच वाटाण्याचा भाव कमी - कमी होत जात २२ ते २८ रू. किलोपर्यंत खाली येतो, तेव्हा मजूर, खालचा वर्ग तसेच हॉटेलवाले हा माल घेतात. तेव्हा आपोआपच शेवगा खाणारा ग्राहक वर्गही वाटाण्याकडे वळतो आणि मग शेवग्याची मागणी कमी होऊन शेवग्याचे दर पडतात. अशावेळी ५० - ६० रू./किलो असणारा शेवग्याचा भाव २० ते १५ रू. वर खाली येतो. येथे चव, आवड, मागणी व भाव ���ाचा परिणाम शेवग्यावर होतो आणि आज मितीला मार्केटमध्ये तिच परिस्थिती असल्याने आपणास शेवगा १२ ते १५ रू. किलोने विकावा लागत आहे. मात्र हा निचांकी दर (मंद) फार काळ राहणार नाही. \" असे सरांनी सांगितले.\nमाझ्या मते भाव जरी कमी मिळत असला तरी माल भरपूर निघत असल्याने अशाही परिस्थितीत शेवगा परवडत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-kolhapur-maratha-reservation-maratha-kranti-karyakartas-under-arrest-3810", "date_download": "2019-03-25T07:33:15Z", "digest": "sha1:UVBRDMHGOBRFKMXEJC26I4WTQ32O4LV6", "length": 8268, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kolhapur maratha reservation maratha kranti karyakartas under arrest | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून 10 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून 10 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून 10 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून 10 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक\nरविवार, 25 नोव्हेंबर 2018\nकोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात उद्या (ता.26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत आणि हर्षल सुर्वे यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले\nकोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात उद्या (ता.26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत आणि हर्षल सुर्वे यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले\nसकल मराठा समाजातर्फे सोमवारी (ता..26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात ये��ार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यासाठी गेली अनेक दिवसापासून जय्यत तयारी सुरू आहे. नियोजनाच्या विविध बैठकाही घेण्यात आल्या. आज दुपारी दसरा चौकात मुंबईला मोर्चाला जाण्याची तयारी वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वेसह कार्यकर्ते करत होते. याठिकाणी पोलिस दाखल झाले. त्यांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले. येथे त्यांच्याशी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी चर्चा केली.\nयावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह-पोलिस उपअधीक्षक सतिश माने, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर आदी उपस्थित होते. चर्चेनंतर त्यांना पोलिस व्हॅनमधून अज्ञातस्थळी हलविण्यात आले. त्यावेळी त्यांनी एक-मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.\nदरम्यान सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चाैक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर आंदोलन सुरू केले आहे. अटक केलेल्या कार्यकर्यांना सोडत नाहीत तोपर्येत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95", "date_download": "2019-03-25T08:08:54Z", "digest": "sha1:FNS5A3VBJYA5WDITP3UCRRK67FIZU4H7", "length": 3021, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:सुबोध पाठक - विकिपीडिया", "raw_content": "\nसुबोध रवींद्र पाठक (जन्म १९७२) पुणे येथे. १९९५ पासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत. छायाचित्रण, नाणीसंग्रह याची आवड.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१७ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/precautions-for-pet-owners/", "date_download": "2019-03-25T08:23:00Z", "digest": "sha1:N2LOU2TFBEVE33W3L2AGMW4SI6GKGV76", "length": 21359, "nlines": 141, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुमच्याकडेही पाळीव प्राणी आहे? मग या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुमच्याकडेही पाळीव प्राणी आहे मग या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nअनेकांना प्राण्यांची आवड असते. जरा खोडकर, गोंडस पण वेळ आली तर मालकासाठी प्राणांची बाजी लावणारा एखादा तरी प्राणी आपल्याकडे असावा असे सगळ्यांनाच वाटते.\nपरंतु प्राण्यांची काळजी, सोय, त्यांना द्यावा लागणारा वेळ यामुळे बहुतांशी लोक पाळीव प्राणी घरी ठेवण्याचे टाळतात. असे लोक इतरांच्या प्राण्यांचे, बाहेर नजरेस पडणाऱ्या प्राण्यांचे मात्र भरपूर लाड करतात.\nकाही हौशी लोक मात्र प्राण्यांसाठी कितीही तडजोडी करायला तयार असतात. वेळात वेळ काढून जमेल तसे ते प्राण्यांची काळजी घेतातच. घरात एखादा पाळलेला प्राणी नसेल तर यांना करमत नाही.\nया प्राणी वेड्यांना तर कुत्रा, मांजर असं म्हटलेलं सुद्धा चालत नाही.त्यांच्या लाडो बाचं जे नाव असेल त्याच नावाने हाक मारावी लागते. थोडक्यात हे प्राणी म्हणजे कुटुंबाचा एक भाग झालेले असतात.\nआपल्या मुलाला जसं कुणी त्रास दिलेला आवडत नाही तसेच यांनाही कुणी काही म्हटलेलं चालत नाही.\nपण कुटुंबातील हे सदस्य पाळणे जेवढे मजेशीर वाटते तेवढीच त्यांची काळजी सुद्धा घ्यावी लागते. त्यातल्या त्यात जर तुम्ही पहिल्यांदाच प्राणी घरात आणत असाल तर तुम्हाला खूप गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. हे जीव मुके असल्याने त्यांना काय हवे काय नको हे ओळखणे अवघड असते. त्यामुळे आपली जबाबदारी अधिकच वाढते.\nजर तुमच्याकडेही हे सदस्य असतील किंवा नवीन सदस्य आणण्याचा तुमचा विचार असेल तर पुढील गोष्टींची खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे.\nघरात प्राणी आणण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्या. प्रत्येक प्रजातीच्या सवयी, आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुद्धा विविधता असते.\nत्यामुळे तुमच्या कुटुंबाशी मिळते जुळते वाटणारेच प्राणी आणा. म्हणजे त्यांना आणि तुम्हालाही जुळवून घ्यायला सोपे होईल.\nप्राणी विकत घेणे टाळा\nतुम्ही जर कुत्रा, मांजर असे मोठे प्राणी घरात ठेवण्याच्या विचारात असाल तर ते दुकानातून विकत घेणे टाळा. दुकानदार त्यांची भरपूर किंमत वसूल करणारच. पण तो प्राणी खात्रीलायक असेलच असे नाही.\nफायद्यासाठी बरेच व्यावस��यिक काही धोकादायक प्रजाती सुद्धा ठेवतात. ज्या कुटुंबात पाळण्यासाठी सुरक्षित नसतात.\nत्यापेक्षा अशा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना संपर्क करा. त्यांच्याकडील प्राणी गरजू आणि कुटुंबाच्या शोधात असतात.\nयात त्या संस्थेचा काहीच स्वार्थ नसल्याने त्यांनी तुम्हाला फसवण्याचाही विषय येत नाही. आणि इथून जर प्राणी दत्तक घेतले तर तुम्हालाही त्याला घर दिल्याचे समाधान नक्कीच मिळेल\nविश्वासू डॉक्टरची निवड करा\nखास प्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्य म्हणजेच व्हेटर्निटी डॉक्टर असतात. हे डॉक्टर निवडताना शक्यतो ओळखीचे किंवा जवळच्या कुणाच्या तरी माहितीतलेच निवडा.\nकारण तुम्हाला प्राण्यांची भाषा कळत नसल्याने त्याला काहीही झाले की डॉक्टर कडे न्यावे लागणार. डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणेच तुम्ही करणार.\nपण जर डॉक्टर अनुभवी नसतील आणि त्यांच्या सांगण्यात काही गडबड झाली तर तुमच्या प्राण्याला त्रास होऊ शकतो. प्राणी अतिशय संवेदनशील असतात. छोट्याशा गोष्टीने ही ते दुखावतात. याने त्यांना आणि प्रसंगी तुम्हालाही धोका उत्पन्न होऊ शकतो.\nप्राण्यांचे डोस आणि लसीकरण\nप्राणी जिथून घेताय त्यांना आजवर काय काय उपचार केले आहेत हे विचारून ठेवा. घेतल्यानंतरही डॉक्टरकडे जाऊन यापुढे कधी काय काय डोस देणे गरजेचे आहेत याची माहिती घ्या. सगळ्या डोसेसचे व्यवस्थित वेळापत्रक बनवा.\nएकही डोस चुकावणे खूप धोकादायक ठरू शकते. त्यातल्या त्यात प्राणी लहान असेल तर ते लवकर आजारी पडतात.\nआपल्याकडील प्रजातीला कोणत्या प्रकारचे अन्न द्यायला हवे हे तुम्हाला माहितीच असायला हवे. शिवाय याबाबत डॉक्टारचाही सल्ला घ्यायला हवा. अन्न खरेदी करताना कमी किंमतीचे असलेले, किंवा कुणीतरी काहीतरी नवीन सांगितले म्हणून घेऊ नका.\nसुरक्षितच अन्न घ्या, आणि प्राण्याला काहीतरी आवडले म्हणून कितीही खाऊ देऊ नका. ते ठरलेल्या प्रमाणातच द्या. शिवाय त्यांच्या खाण्याच्या वेळा पाळा. त्यांना वेळेतच जेवण हवे असते.\nजशी घरात तुमची रूम असते तशीच प्रण्यालही त्याची ठराविक जागा असावी. तिथे त्याच्या झोपण्याची आणि खाण्याची ही सोय असावी.\nएकदा की सवय लागली की त्यांना त्या जागेवर सुरक्षित वाटते. आणि ज्यावेळी तुम्हाला त्यांचा इतरत्र वावर नको असेल त्यावेळी ते या जागी थांबू शकतात. अशी काही जागा ���सेल तर प्राण्यांना जास्त सुरक्षित वाटते.\nत्यांना फिरायला नेण्याच्या वेळा\nतुमच्या सोयीनुसार या वेळा ठरवून घ्या. त्यांना नियमित फिरायला न्या. कारण एवढाच काय त्यांचा बाह्य जगाशी संपर्क येतो. या वेळेत ते ताजेतवाने होतात. जर अधिक काळ प्राण्यांना बाहेर नेले नाही तर ते आक्रमक होण्याचीही भीती असते.\nहे तुम्ही शिकुनाच घ्यायला हवे. तरच प्राण्यांचा घरातील वावर सुसह्य वाटतो. ते लहान मुलाप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांची भाषा शिकून घ्या.\nत्यांना योग्य सवयी कशा लावायच्या हे ही शिका. जेणेकरून तो प्राणी तुमच्या सूचना समजू शकेल. गरज पडल्यास तुम्हीही योग्य प्रकारे त्याला समजावून सांगू शकत.\nजर प्राणी ठेवत असाल तर लहान बाळ घरात येताना जेवढी तयारी आपण करतो तेवढीच यासाठीही करावी लागते. तुमची नजर चुकवून ते घराबाहेर पडू शकणार नाहीत याची खबरदारी घ्या.\nत्या दृष्टीने दरवाजा खिडक्या असाव्यात. कपाट, मोठी भांडी, ड्रॉवर यात त्यांनी जाऊ नये म्हणून ते सतत बंद असतील अशी काळजी घ्या.\nया गोष्टी कटाक्षाने उंचावर ठेवा किंवा उघड्यावर ठेवूच नका. आपले बरेच अन्नपदार्थ प्राण्यांना हानीकारक असतात. वर पडलेली औषधेही त्यांनी खाल्ली तर धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही अन्नपदार्थ, औषधे, स्वच्छतेची उत्पादने त्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.\nज्याप्रमाणे आपले साबण, शाम्पू, कंगवा ठरलेले असते तसेच प्राण्यांच्या बाबतीतही असावे. त्यांना योग्य ती उत्पादने खरेदी करा. त्यांचा योग्य आणि नियमित वापर करा जेणेकरून त्यांचे आरोग्यही चांगले राहील\nया काही कटाक्षाने पाळण्याच्या गोष्टी आहेत. यांचे पालन करून जर तुम्ही प्राणी पाळले तर निश्चितच ते अधिक सोपे आणि आनंददायी बनेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← चॅटिंग करताना नेहमी वापरल्या जाणाऱ्या या शॉर्टकटचे अर्थ अनेकांना माहितीच नसतात\nया १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय\nमोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले\n या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…\nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nबलात्काऱ्यांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणता�� – ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय\nआग ओकत उडणारे ड्रॅगन्स खरे असू शकतात का विज्ञानाचं थक्क करणारं उत्तर वाचा\nबहुगुणी वरई : आहारावर बोलु काही-भाग १३\nZ या इंग्रजी अक्षराचा उच्चार ‘झी’ असा का केला जातो\nनोकरी करत बिझनेस करायचाय ह्या १३ सिनेताऱ्यांनी जे केलं, ते तुमच्यासाठी दिशादर्शक ठरू शकेल\nTom Cruise: एवढं काय ग्रेट आहे ह्या माणसाबद्दल\nसूर्याचं मंदिर, जिथे सुर्याचीच पूजा करण्यास मनाई आहे\nनाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर\n“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे\nसरपंच निवडणुक : विरोधक आता तरी धडा शिकतील काय\nकम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य\nभाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार\n“मराठी शाळा की इंग्रजी शाळा” : चुकीच्या दिशेने होणारी विघातक चर्चा\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nमदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली\nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nजगातील ९ भयानक बेटं, जेथील प्रत्येक क्षण वैऱ्याचा आहे\nचित्रपटांच्या आठवणींचा चित्रपट – (Nuvuo) Cinema Paradiso\nप्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://halfpricebooks.in/products/abhiruchi-suchi-by-mrunalini-kamat", "date_download": "2019-03-25T08:11:44Z", "digest": "sha1:M4RPXEZVJHNCQFBMAKDBMKDUIBPS3FZ6", "length": 4192, "nlines": 79, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Abhiruchi Suchi by Mrunalini Kamat Abhiruchi Suchi by Mrunalini Kamat – Half Price Books India", "raw_content": "\nमराठी वाङ्मयाला नवे वळण देणारे आणि एकूणच मराठी वाङ्मयात ‘नवते’चे वारे निर्माण करणारे दमदार नियतकालिक म्हणून ‘अभिरुचि’ या नियतकालिकाचे महत्त्व फार मोठे आहे. ‘अभिरुचि’ने मराठी वाङ्मयात तर नवता प्रस्थापित केलीच, पण त्याहीपेक्षा वाचकांना प्रोत्साहित करणारी, जागृत करणारी, सजग करणारी नियनिराळी ‘सदरे’ चालवून वाङ्मय ही केवळ लेखक-कवींची, संपादक-प्रकाशकांची मक्तेदारी नसून,वाचकमनापर्यंत पोहोचणारी ती एक चळवळच आहे, ही धारणा प्रस्थापित केली. डॉ. मृणालिनी कामत यांनी ‘अभिरुचि’ मासिकाच्या वाङ्मयीन क��र्याचा सखोल व चिकित्सक अभ्यास केलेला आहे; तो यथावकाश ग्रंथरूपाने बाहेर येईलच. येथे त्यांनी ‘अभिरुचि’च्या अव्वल कालखंडातील म्हणजेच जोपर्यंत ते नियतकालिक बडोदे येथून प्रसिद्ध होत होते, त्या 1943 ते 1953 या अकरा वर्षाच्या कालखंडातील समग्र साहित्याची वाङमयप्रकारांनुसार सूची दिलेली आहे. मुख्य म्हणजे ‘अभिरुचि’चे वाङ्मयीन कार्य विशद करणारा सुदीर्घ लेखही डॉ.कामत यांनी या सूचिग्रंथास जोडलेले आहे. त्यामुळे हा सूचिग्रंथ अभ्यासकांना निश्चितपणे दिशादर्शक करणारा ठरेल. - डॉ. विद्यागौरी टिळक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/article-on-syria-crisis-1149035/", "date_download": "2019-03-25T08:13:53Z", "digest": "sha1:B3HMLGFLXYLPZWJT5GHRLX63OMCVQA3Y", "length": 25591, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सीरिया.. एक प्रश्नचिन्ह! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nकोणतंही युद्ध हे राजकीय सत्तासंघर्षांतून, अनेकदा अमानवी महत्त्वाकांक्षेतून होत असलं तरी ती हानीच असते.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | October 10, 2015 04:59 am\n‘इसिस’चा दहशतवाद आणि यादवी युद्धाने सीरिया जखमांनी भळभळतो आहे. किमान अडीच लाख लोक ठार, ५ लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित तर सुमारे ४ लाख लोक निर्वासित आहेत.\nदुसऱ्या देशात निवारा शोधणारे निर्वासीत\n‘इसिस’चा दहशतवाद आणि यादवी युद्धाने सीरिया जखमांनी भळभळतो आहे. किमान अडीच लाख लोक ठार, ५ लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित तर सुमारे ४ लाख लोक निर्वासित आहेत. बाई असल्याचा शाप इथलीही स्त्री भोगते आहे, पण त्यातूनही मार्ग काढून आपल्या देशवासीयांच्या पाठीशीही उभी राहते आहे. मार्ग काढते आहे..\nअसे दृश्य सीरियात सर्वत्र पहायला मिळतं\nकोणतंही युद्ध हे राजकीय सत्तासंघर्षांतून, अनेकदा अमानवी महत्त्वाकांक्षेतून होत असलं तरी ती हानीच असते. शहरांची, गावांची, माणसांची आणि मुख्य म्हणजे माणुसकीची सरेआम होणारी कत्तल, विध्वंस मागे ठेवते ते फक्त निराधारपण, वेदना आणि भरून न येणारी हानी\nछोटा मोठा उद्योग करून स्वत:च्या पायावर उभ्या रहाणाऱ्या सीरियातील मुली\nवायू आणि तेलाने संपन्न असलेल्या किंबहुना त्याचमुळे सीरियामध्ये गेली चार वर्षे हेच सुरू आहे. युद्ध सीरियातला जवळजवळ पाऊण भाग ‘इसिस’ दहशतवाद्यांनी व्याप्त आहे. इसिसच नव्हे तर कुर्द बंडखोर, अल नुसरा, अन्य बंडखोर आणि अध्यक्ष बशर-अल्-असद यांचं सीरिया सरकार यांच्यामधल्या यादवी युद्धानं अनेकांची आयुष्यं होत्याची नव्हती झाली आहेत.. होत आहेत.. बॉम्ब, क्षेपणास्त्र हल्ल्यांनी वस्त्याच्या वस्त्या उजाड होत आहेत. घरंच्या घरं जाळली जात आहेत. सुखी समाधानी कुटुंबावर आपल्याच घरातून, आपल्याच देशातून परागंदा व्हायची वेळ आली आहे. आत्तापर्यंत किमान अडीच लाख लोक ठार झाले आहेत, ५ लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत तर सुमारे ४ लाख लोक रेफ्यूजी वा निर्वासित म्हणून शेजारच्या जॉर्डन, लेबनॉन, तुर्की, इराक अगदी थेट ग्रीस, जर्मनी, अमेरिका आदी देशांत निवारा शोधताहेत..\nपुन्हा शिक्षणाकडे वळलेल्या मुली\nप्रत्येक युद्धाला एक काळी किनार असते ती बाईच्या वाटय़ाला आलेल्या भोगाची. बहुसंख्य वेळा मारला किंवा कैद केला जातो तो घरातला पुरुष आणि बाईच्या वाटय़ाला येतो तो जिवंत भोगवटा. एकटीने मुलांना सांभाळत जगण्याचा पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्याही अग्निदिव्याला सामोरं जाण्याचा पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्याही अग्निदिव्याला सामोरं जाण्याचा अशाच अनेक सीरियाच्या स्त्रिया कधी कुटुंबासह, कधी एकटय़ाच मुलांसह, जगण्याची जिद्द कायम ठेवत देशाच्या सीमा ओलांडताहेत. दुसऱ्या देशांचे पासपोर्ट नसल्याने चेक पॉइंट्स आणि अडवणाऱ्या पोलिसांना चुकवत रात्रीच्या भयाण अंधारात कधी शेत तुडवत, तर कधी बुडण्याची पर्वा न करता भरभरून वाहणाऱ्या बोटींमध्ये स्वत:ला लोटून देत, सीरियात जन्माला आलो या एकाच सत्यापायी ‘जगण्याला’ सामोरं जाताहेत.\nत्यातीलच एक हनन. बदललेलं नाव आणि सरेपाँव काळ्या बुरख्यातल्या उघडय़ा डोळ्यात साकळलेली मूर्तिमंत भीती- बोलकी तिच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द इसिसव्याप्त सीरियातील बाईच्या यातना व्यक्त करणारा. आई, वडील, भाऊ आणि तीन बहिणी असं कुटुंब. धुमश्चक्रीत भाऊ मारला गेला आणि त्याच्याकडची एके ४७ वडिलांनी सुरक्षा म्हणून स्वत:कडे ठेवली. त्याचा सुगावा इसिसला ((ISIS-Islamic State in Iraq and the Levant (syria) लागला आणि वडिलांना ते पकडून घेऊन गेले. जिवाच्या करारावर ती आणि आई शरीया पोलिसांकडे गेल्या. पुरुषाशिवाय स्त्रियांनी येणंच या पोलिसांना त्यांनाछळण्यासाठी पुरेसं होतं. शरिया पोलीस म्हणजे रस्त्यात पेट्रोलिंग करणारे, शरिया कायदा मोडणाऱ्यांना शिक्षा करणारे. अनेकदा विनंती केल्यावर ते तिच्या वडिलांना सोडायला तयार झाले.. अट होतीच, वरिष्ठ शरिया पोलिसाशी लग्न करण्याची. शरिया पोलीस हे इसिसचंच टोपण नाव. एका बाजूला स्वत:चं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला वडिलांचं आयुष्य. निर्णय घ्यायचा नव्हताच. हा ‘निकाह’ फक्त तडजोड होती. त्यामुळे पहिल्या रात्रीचा अनुभव भावनाशून्य होता. दोघं एकत्र राहात होते. पण तिला स्वातंत्र्य नव्हतंच. ती होती, घरातली कैदी, मोलकरीण आणि लैंगिक गुलाम. पण त्याचंही आयुष्य स्वस्थ नव्हतंच. सतत भीतीच्या छायेत आणि हाताशी बंदूक. दरवाजावर खट् वाजलं तरी बंदूक ताणून उभा राहायचा. चेहरा झाकून घ्यायचा. मनातलं\nदडपण सिगरेटींच्या धुरात विसरू पहायचा. त्याचाही शेवट ठरलेला होता जणू. महिन्याभरातच त्याला ठार मारण्यात आलं. आणि तिची पाठवणी घरी करण्यात आली.\nती घरी परतली होती, परंतु तिच्यातलं काहीतरी कायमचं हरवलं होतं. तिचं लग्नाशिवाय राहणं इसिस दहशतवाद्यांना मान्य नव्हतंच. दुसऱ्या एकाशी लग्न लावण्याचा घाट घातला गेला आणि तिला पळण्याशिवाय पर्याय नव्हता. इसिसव्याप्त सीरियातून ती लपतछपत सीरियात गेली आणि तिथून तुर्कीतल्या आपल्या नातलगांकडे. पण भीतीचा पगडा आजही कायम आहे. ती सांगते, सीरियातली मुलगी १८ ची झाली की तिचं घराबाहेर पडणं बंदच होतंय. लग्नाच्या नावाखाली दहशतवादी फक्त अत्याचार करताहेत. लग्न आणि घटस्फोट पोरखेळ झाला आहे. पण यातना फक्त मुलींना भोगावी लागतेय. तिथली प्रत्येक तिसरी मुलगी अशी बळी पडतेय. ज्यांना पळता येतंय.. ते पळताहेत जीव घेऊन. दुसऱ्या देशाकडे…रेफ्यूजी कॅम्प्स ओसंडून वाहताहेत. पण अनेकदा तिथेही स्थैर्य नसते. खाण्या-पिण्याचा पत्ता नसतो ना नागरी सुविधांचा.. अनेक जण तिथे पोहोचेपर्यंतच प्राण सोडताहेत. तर अनेक जण आपल्या कुटुंबापासून तुटताहेत. अनेक छोटी छोटी मुलं आई-वडील असूनही अनाथपण भोगताहेत. भीतीच्या छायेत असंख्य जीव श्वास चालतोय म्हणून जगताहेत..\nपण या काळ्या छायेलाही रुपेरी किनार आहेच. मानव अधिकार संघटना, काही एनजीओ, काही स्थानिक गट या निर्वासितांना शरण देत आहेत. तर काही निर्वासित स्त्रिया आता स्वत:च्या पायावर ���भं राहून आपल्या देशवासीयांना जगण्याचं भान देत आहेत. इतकंच नाही तर प्रत्यक्ष सीरियातही गेल्या चार वर्षांतल्या या दहशतवादी भयाला खुंटीवर टांगून अनेक जणी, त्यांचे गट आपल्या कामाचा सुगावा जरी दहशतवाद्यांना लागला तरी आपल्याला ठार केलं जाईल हे माहीत असूनही धाडसाने काम करीत आहेत.\nदहशतवाद्यांनी बंद केलेल्या सीरियातल्या शाळा सुरू करणं हे त्यातलं एक पाऊल. त्यासाठी त्यांनी आपल्या स्थानिक नेत्याला प्रथम विश्वासात घेतलं. शिक्षणाचं महत्त्व आणि ते कसं धर्माच्या विरोधात नाही हे गळी उतरवलं. आज तेथे दोन खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. अगदी गप्त रीतीने शेकडो मुलं शिकत असलेली ही शाळा फक्त दोन तास चालते कारण अन्य वेळी वीजच नसते.\nचार वर्षांच्या धुमश्चक्रीचा परिणाम म्हणजे सीरियातल्या २५ टक्के म्हणजे चारातील एक स्त्री एकटी आहे. वडील वा नवरा नसल्याने आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र नाही. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. म्हणूनच इथल्या कार्यकर्त्यां गटाने स्त्रियांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्यांना कम्प्युटर, फर्स्ट एड, इंग्रजी संभाषण, कुटिरोद्योग, हस्तकला, कपडे शिवणे आदी छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. ३०० जणींनी याचा फायदा घेतलाय. रोजगार मिळवत आहेत. इतकंच नव्हे तर गेल्या तीन महिन्यांत ५० बालविवाह या स्त्रियांनी थांबवले आहेत. तर तुर्की येथील निर्वासित भागातील एकल स्त्रियांसाठी स्वस्त हॉस्टेल्स सुरू करण्यात आलीत. उद्देश हाच की पैशांच्या गरजेपोटी त्या कुठल्याही वाममार्गाना जाऊ नयेत किंवा कोणी त्यांचा फायदा घेऊ नये.\nया आणि अशा असंख्य हृदयस्पर्शी कहाण्या रोजच्या रोज प्रसिद्ध होत आहेत. सीरियातील युद्धाने आता तमाम जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जागतिक पातळीवर राजकीय बैठका, उपाययोजनांवर चर्चा सुरू आहे. तरीही हे युद्ध संपणार का आणि कधी याबद्दल सीरियातील लोकांच्या मनात शंका आहेच. संपलं तरी झालेली हानी भरून निघणार आहे का देशवासी आणि देश सोडून गेलेल्या निर्वासितांना पुन्हा आपल्या देशाचं वैभव अनुभवता येईल का देशवासी आणि देश सोडून गेलेल्या निर्वासितांना पुन्हा आपल्या देशाचं वैभव अनुभवता येईल का.. विस्थापित झालेली कुटुंबं पुन्हा प्रस्थापित होतील का.. विस्थापित झालेली कुटुंबं पुन्हा प्रस्थापित होतील का.. जगण्याचा आनंद ते अनुभवू शकतील का.. जगण्याचा आनंद ते अनुभवू शकतील का .. सध्या तरी सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि म्हणूनच सीरियाचं भवितव्यही..\nसंदर्भ – बीबीसी, सीएनएन-लेखिका अरवा डेमॉने घेतलेली मुलाखत, पीआरआय, इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसीरियाविरोधात कारवाई तूर्त स्थगित\nसीरियावरील लष्करी कारवाई लांबणीवर\nरशिया, तुर्की व अमेरिकेच्या त्रिकोणाचे गणित\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/satpur-news-sinnar-news-mpcb-47964", "date_download": "2019-03-25T08:15:32Z", "digest": "sha1:TCZKGR47QCOSWHGNWFOALXDUOTG2LQPR", "length": 16840, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "satpur news sinnar news mpcb ‘जिंदाल’साठी वाजेंची बैठक निष्फळ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\n‘जिंदाल’साठी वाजेंची बैठक निष्फळ\nशुक्रवार, 26 मे 2017\nसातपूर/सिन्नर - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) कारवाईने बंद करण्यात आलेली सिन्नरची जिंदाल सॉ मिल कंपनी पुन्हा सुरू करण्याबाबत आज सिन्नर तहसील कार्यालयात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या प्रश्नावर विविध मुद्दे उपस्थित करीत तीव्र विरोध केल्याने बैठक निष्फळ ठरली. आज महावितरण कंपनीने व ‘एमआयडीसी’च्या पाणीपुरवठा विभागाने कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई केली.\nसातपूर/सिन्नर - ��हाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) कारवाईने बंद करण्यात आलेली सिन्नरची जिंदाल सॉ मिल कंपनी पुन्हा सुरू करण्याबाबत आज सिन्नर तहसील कार्यालयात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या प्रश्नावर विविध मुद्दे उपस्थित करीत तीव्र विरोध केल्याने बैठक निष्फळ ठरली. आज महावितरण कंपनीने व ‘एमआयडीसी’च्या पाणीपुरवठा विभागाने कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई केली.\nआज सिन्नर तहसील कार्यालयात आमदार वाजे यांच्या उपस्थितीत ‘जिंदाल’चे व्यवस्थापक आर. जे. हर्षवर्धन, महिंद्र शुक्ला, आर. के. कहाडळ, ‘एमपीसीबी’चे अधिकारी आर. यू. पाटील, ए. जी. कुडे, ‘एमआयडीसी’च्या विभागीय व्यवस्थापिका संध्या घोडके, तसेच तहसीलदार नितीन गवळी, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, प्रदूषण महामंडळाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अनंत कुडे, मापारवाडीचे शेतकरी शशिकांत गाडे, बाळासाहेब गाडे, ॲड. एन. एस. हिरे, श्री. उगले आदींसह अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या.\nकोल गॅसीफायर सिस्टिमऐवजी इको फ्रेंडली सिस्टिमचा वापर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत बैठकीत गदारोळ केला. शेतकऱ्यांनी प्रदूषणामुळे शेतीच्या होत असलेल्या नुकसानीचा मुद्दा लावून धरल्याने बैठकीत काहीही निर्णय झाला नाही.\nउद्योग सचिवांकडे बाजू मांडणार\nजिंदालचे युनिट हेड दिनेशचंद्र सिन्हा यांच्याशी ‘सकाळ’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी औद्योगिक महामंडळाने आज सकाळी पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगितले. कंपनीत उद्याचा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असून, तो संपल्यास उत्पादन बंद पडेल. कंपनीचे त्यामुळे दररोज दहा लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. प्रदूषण मंडळाने गेल्या वर्षी दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीला आम्ही योग्य उत्तर दिले होते. याबाबत कंपनी उद्या उद्योग सचिवांकडे बाजू मांडणार असल्याचे सांगून त्यांच्या समस्या सामंजस्याने सोडवू. सुमारे पाच हजार कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nअडीचशे कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम\nसिन्नरच्या प्रकल्पात हजारो कोटींची गुंतवणूक कंपनीने केली. सध्या तीन हजार कामगार आहेत. कंपनीला इतर कच्चा माल पुरविणारे शेकडो वेंडर असून, त्यात हजारो कामगार आहेत. कंपनीत दरमहा गॅस आणि ऑइलसा��ी लागणाऱ्या आठ ते दहा हजार टन पाइपचे उत्पादन केले जाते. कंपनीने नाशिकमध्ये अजून अडीच हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव आणलेला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ या योजनेत ‘एमओयू’ करण्यात आला होता. पण, नाशिकमध्ये विरोध होत असेल तर कंपनी ही गुंतवणूक अन्यत्र करेल, असे कंपनीच्या व्यवस्थापनाने आज स्पष्ट केले.\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nसुरेशदादांचे कट्टर समर्थक अण्णा भापसे राष्ट्रवादीत\nजळगाव ः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्याची रिघ सुरू आहे. यात जळगावमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...\nLoksabha 2019 : 'हुक्केरींच्या विरोधात कत्ती की जोल्ले\nनिपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता बरेच दिवस ताणली गेली. अखेर काँग्रेसने खासदार...\nमाजी आमदार पुत्राचा खून सिंगल बारच्या बंदुकीने\nबेळगाव - माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी यांचे पुत्र अरुण (वय ५३) यांचा खून सिंगल बारच्या बंदुकीने गोळी झाडून झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे...\nसमर्थ नेतृवाच्या हाती देश असल्याने भाजपत 'इनकमिंग’ सुरू : आमदार खडसे\nभुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-March2017-Kapoos1.html", "date_download": "2019-03-25T08:02:26Z", "digest": "sha1:6AX6BC4JHMRXB6GB6XCW43QKYTOGEMFN", "length": 7720, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वापराने प्रतिकूल परिस्थितीत कपाशी निरोगी. दर्जा, उत्पन्न व दर अधिक चांगला", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वापराने प्रतिकूल परिस्थितीत कपाशी निरोगी. दर्जा, उत्पन्न व दर अधिक चांगला\nश्री. लक्ष्मण हरिभाऊ भुरले, मु.पो. साकळी, ता. हिंगणा, जि. नागपूर\nमाझ्याकडे एकूण १२ एकर शेती आहे. त्यामधील १० एकरमध्ये कपाशीचे पीक घेत असतो आणि बाकी २ एकरमध्ये काकडी, टोमॅटो, कारली अशी भाजीपाला पिके घेतो. २ वर्षापुर्वी मी कारली विक्रीस नागपूरला जात होतो तेव्हा नागपूर येथून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी आणून वापरत होतो. तेव्हा उत्पादन चांगले मिळत होते. मात्र त्यानंतर वातावरण बदलले. रोगराई वाढून आमच्या भागात कारली पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव एवढा वाहू लागला की अनेक परकराची औषधे वापरूनही तो आटोक्यात येत नव्हता.\nकारण आपल्या प्लॉटवरील जरी व्हायरस कमी झाला तरी इतरांच्या प्लॉटवरून त्याचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असे. त्यामुळे उत्पादन खर्च (फवारण्या) वाढत होत्या. त्यामुळे पुढे कारली वर्गीय पिके घेणे बंद केले. मग नागपूर मार्केटला जाणे बंद झाले आणि डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी त्यावेळी आमच्या भागात मिळत नव्हते. खास नागपूरवरून आणावी लागत असे.\nगेल्यावर्षीपासून आमच्या भागात पार्थ अॅग्रो एजन्सी यांच्याकडे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची उत्पादने मिळू लागली. मग तेथून मी जर्मिनेटर वांगी आणि कारली लागवडीसाठी (बिजप्रक्रियेस) आणले. त्यानंतर जून महिन्यात कपाशी लागवड केली. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आमच्या भागातील प्रतिनिधी श्री. कुकडे यांची भेट झाली. मग आम्ही प्रथम त्यांना मार्गदर्शनासाठी वांगी, कारली व कपाशी पिके पाहण्यासाठी प्लॉटवर बोलाविले. त्यांनी कपाशीवर कॉटन थ्राईवर, मोनो क्रोटोफॉस, साप पावडर आणि १९:१९:१९ ची फवारणी करण्यास सांगितले. त्या फवारणीचा मला ६ - ७ दिवसातच फरक जाणवला. नंतर मग १५ ते १८ दिवसांनी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी व कपाशीची वाढ होण्यासाठी स्प्लेंडर ३० मिली + कॉटन थ्राईवर ४० मिली + जर्मिनेटर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली यांची (१५ लि. पंपातून) फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फवारणी केली असता. पांढरीमाशी आटोक्यात येऊन जुलै - ऑगस्टमध्ये कपाशीला ५० - ६० बोंडे लागली. मग त्यांनतर मी ३ री फवारणी कुकडे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार कॉटन थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + राईपनर ६० मिली + न्युट्राटोन ६० मिली या औषधांची (१५ लि. पंपातून) फवारणी केली. त्यामुळे सुरुवातीस लागलेली बोंडे पोसली, तसेच नवीन लागलेल्या पात्यांची, बोडांची गळ न होता त्यांचीही फुगवण झाली. अशा प्रकारे कापूस चांगला बहराला.\nसप्टेंबर महिन्यात पहिली वेचणी केली. १५ बॅगा बी लावले होते. तर त्यातील कमी पावसामुळे काही (५ बॅगा) वाळून गेल्या होत्या. उरलेल्या कापसापासून एका बॅगेला ७ ते ८ क्विंटल चा उतारा मिळाला. पहिल्याच वेच्याला २५ क्विंटल कापूस निघाला होता. त्याला ५४०० ते ५५०० रु. क्विंटल भाव मिळाला. त्यानंतर वेचलेला कापूस घरी आहे. तो ५६ क्विंटल आहे. अजून शेवटच्या वेच्याचा निघणारा कापूस पाहता एकूण ९० - १०० क्विंटल कापूस होईल असे मला वाटते. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्यांमुळे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळला नाही. शिवाय उत्पादनात वाढ झाली व कापूसाचा दर्जा चांगला असल्याने भाव अधिक मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090408/main.htm", "date_download": "2019-03-25T08:40:42Z", "digest": "sha1:LERV3AGWU5QWUWZ7XVNXZJXKIFFUEKO4", "length": 21600, "nlines": 54, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, ८ एप्रिल २००९\n२-० विजयात पावसाचा अडथळा\nसामना व मालिकेत गौतम गंभीर सर्वोत्तम\nवेलिंग्टन, ७ एप्रिल / पीटीआय\nअपेक्षेप्रमाणे आलेल्या पावसामुळे न्यूझीलंडमध्ये २-० फरकाने मालिका जिंकण्याच्या आणि भारताच्या क्रिकेट इतिहासातील १००वा कसोटी विजय मिळविण्याच्या ‘टीम इंडिया’च्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. पण हॅमिल्टनची पहिली कसोटी जिंकून घेतलेल्या १-० आघाडीच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी न्यूझीलंडच्या मातीत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास धोनीच्या भारतीय संघाने घडविला. १९६८मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या भारतीय संघाने ३-१ असा विजय साकारला होता, तशीच क्रांती धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये घडविली. अखेरच्या कसोटीत विजय हुकल्याची चुटपूट मात्र क्रिकेटरसिकांना लागून राहिली. अखेरच्या दिवशी पाऊस पडणार असल्याच��� अंदाज वर्तविण्यात आला होता आणि ती शक्यता अखेर खरी ठरली. भारताच्या ६१७ धावांचा पाठलाग करताना ८ बाद २८१ अशा कठीण स्थितीत असलेला न्यूझीलंड संघ पराभवापासून थोडक्यात बचावला.(सविस्तर वृत्त)\nअमर सिंह यांची पक्ष सोडण्याची धमकी\nजयाप्रदाच्या उमेदवारीवरून समाजवादी पक्षात राडा\nनवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी\nसिनेतारका जया प्रदा यांना उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून वतीने उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून पक्षाचे ज्येष्ठ व प्रभावी मुस्लीम नेते आझम खान यांचा विरोध असह्य झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे सर्वशक्तीमान सरचिटणीस अमर सिंह यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. मात्र, आझम खान यांच्या तुलनेत अमर सिंह यांची उपयुक्तता अधिक असल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.\nजगदीश टायटलर यांना क्लीन चिट दिल्याचा निषेध\nपत्रकाराने चिदंबरम यांच्या दिशेने बूट भिरकावला\nनवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी\nशीख विरोधी दंगलीत खासदार जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्याच्या निषेधार्थ उत्तर भारतातील प्रतिष्ठित हिंदूी वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’चा पत्रकार जर्नेल सिंग याने आज एका पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावून खळबळ उडवून दिली. जर्नेल सिंगला खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. जर्नेल सिंगला माफ केल्याचे जाहीर करून चिदंबरम व काँग्रेसने या घटनेवर पडदा टाकला, तर तुघलक रोड पोलीस ठाण्यात विचारपूस करून पोलिसांनी त्याला सोडून दिले.\n‘हत्ती’ कुणाचे मनसुबे उधळणार\nआज शिवाजी पार्कवर मायावतींची सभा\nमुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी\nआगामी लोकसभा निवडणुकांत परंपरागत समीकरणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता राखणाऱ्या बहुजन समाज पक्षाची जाहीर प्रचार सभा उद्या शिवाजी पार्कवर दुपारी दोन वाजता होत असून बसपच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहेन मायावती कोणता नारा देणार, या विषयी औत्सुक्य आहे. एकाही पदाधिकाऱ्याला देण्यात न आलेले तिकीट आणि शून्य टक्के बंडखोरी या पाश्र्वभूमीवर बसपचा ‘हत्ती’ या वेळी भल्याभल्यांचे अंदाज चुकवण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मुंबईतील मायावतींची ही सभा विक्रमी करण्याचा चंग बसपच्या महाराष्ट्र शाखेने बांधला आहे.\nमुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी\nखासगीत एकमेकांना कोपरखळ्या मारणारे आणि टीका करणारे शाहरूख आणि आमीर खान आज मात्र एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसले होते. एवढेच नव्हे तर एकमेकांशी चर्चाही करीत होते. त्यांच्या एकत्र येण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये उत्सुकता राहिली नसती तर नवलच हिंदी चित्रपटसृष्टीतील हे दोन प्रवाह एकत्र येण्याचे निमित्त होते हिंदी चित्रपट निर्माते व वितरकांनी मल्टिप्लेक्सविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचे. आज शाहरूख आणि आमीर खानने निर्माते-वितरकांची बाजू पत्रकारांसमोर मांडली. गेली सुमारे वीस वर्षे चित्रपटसृष्टीत राहूनही एकत्र चित्रपट न केलेल्या या दोन कलाकारांनी आज मात्र एकाच मुद्दय़ावरील आपली सारखी मते मांडून आपल्यात मतभेद नसल्याचे भासवले.\nमिलिंद देवरा यांच्यासाठी अरुण गवळींची माघार\nचिंचपोकळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले आमदार अरुण गवळी यांनी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलला आहे. गवळी यांची कन्या व नगरसेवक गीता गवळी यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, गवळी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. भायखळा विभागाचा विकास होणे महत्त्वाचे असून लोकसभेत मतविभाजनाचा काहीच फायदा होणार नाही. त्यापेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्यास काँग्रेस या विभागाचा विकास करील, असा आम्हाला विश्वास वाटत असल्याचे गीता गवळी म्हणाल्या. गवळी यांनी मिलिंद देवरा यांच्या समर्थनार्थ उमेदवारी मागे घेतल्याने आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील चित्र पुन्हा पालटले आहे. मोहन रावले यांच्यासारख्या मातब्बर शिवसैनिकामुळे मिलिंद देवरा यांना ही निवडणूक अत्यंत कठीण जाणार असे चित्र होते. मात्र आता गवळी यांनी देवरा यांच्या बाजूने उडी घेतल्याने चित्र पालटण्याची शक्यता आहे. देवरा यांच्या विरोधात बसपाचे महंमदअली उतरल्याने मुस्लिम मतांचे गणित नक्की कसे असेल हे सांगणे कठीण झाले होते. मात्र त्याचवेळी मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयाची समान संधी होती. मात्र गवळी यांनी अचानक उमेदवारी जाहीर केल्याने मिलिंद देवरा यांच्यासाठी ती मोठी डोकेदुखी ठरली होती. आता मात्र गवळी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतानाच काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याने देवरा यांना फायदा होऊ शकेल, असे बोलले जात आहे.\nटायटलर, सज्जनकुमार यांच्यावर टांगती तलवार\nनवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी\nशीखविरोधी दंगलींसाठी काँग्रेसचे खासदार जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लिन चीट दिल्याबद्दल पत्रकार जर्नेल सिंगने गृहमंत्री चिदंबरम यांच्या दिशेने बूट भिरकावून केलेल्या निषेधानंतर आता दिल्लीतील दोन्ही ‘कलंकित’ उमेदवार सज्जनकुमार आणि जगदीश टायटलर यांच्या उमेदवारीवर फेरविचार करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतून सज्जनकुमार आणि टायटलर यांना उमेदवारी देणार नाही, अशी घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी तीन महिन्यांपूर्वी अमृतसर येथे केली होती. पण राहुल गांधींच्या घोषणेकडे कानाडोळा करून शीखविरोधी दंगलीत आरोपी असलेल्या या दोन्ही नेत्यांना पुन्हा काँग्रेसची तिकीटे देण्यात आली. मात्र, आजच्या घटनेनंतर टायटलर आणि सज्जनकुमार यांचे ओझे काँग्रेसने आणखी किती काळ वाहायचे यावर पक्षात गंभीरपणे फेरविचार सुरु झाला आहे. शीख मतदारांसह काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा विरोध असूनही सज्जनकुमार आणि टायटलर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविले होते आणि यंदाही त्यांना विजयाची नामी संधी असल्याचे म्हटले जात आहे. जर्नेल सिंगने बूट भिरकविल्यानंतरही चिदंबरम आणि काँग्रेसने ज्या संयमाने हे प्रकरण हाताळले त्यामुळे जर्नेल सिंगचा उद्देश पूर्णपणे सफल झाला नाही. पण भाजप आणि अकाली दलाकडून होत असलेल्या राजकारणाला कायमचा पूर्णविराम देऊन शीखांचा विरोध संपुष्टात आणण्यासाठी टायटलर आणि सज्जनकुमार यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.\nप्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी लालूंविरुध्द गुन्हा दाखल\nकिशनगंज (बिहार), ७ एप्रिल / पी.टी.आय.\nमी देशाचा गृहमंत्री असतो तर वरुण गांधी यांना रोलरखाली चिरडले असते या प्रक्षोभक विधानाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने लालूप्रसाद यादव यांच्याविरुध्द किशनगंज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. किशनगंजचे जिल्हा दंडाधिकारी फारुख अहमद यांनी याबाबत बोलताना सांगितले की, लालू प्रसाद यादव यांनी केलेले हे वक्तव्य आपण ध्वनिचित्रफितीद्वारे पाहिले आहे. या वक���तव्याने जातीय सलोखा तसेच शांतता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे लालूंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालूंनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याची ध्वनिचित्रफित निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, असेही अहमद म्हणाले. दरम्यान, वरुण गांधी यांना रोलरखाली चिरडण्याची भाषा चिथावणीखोर नसून त्याचा अर्थ वरुणवर कडक कारवाई केली जाईल असा होतो, असे सांगत लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी लालूंची बाजू घेतली. लालूंची भाषणशैली ही वेगळ्या धाटणीची असून त्यामधून नेमका अर्थ समजून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.\nमोदींबरोबर प्रचार करण्यास नितीशकुमार यांचा नकार\nनवी दिल्ली ७ एप्रिल/पीटीआय\nनरेंद्र मोदी यांच्याबरोबर निवडणूक प्रचार करणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज सांगितले. मोदी यांच्याबरोबर सभा घेणार काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कधीच नाही, त्यांच्याबरोबर कशासाठी जाऊ. त्याची काही गरज नाही.आमच्या राज्यात जातीय सलोखा आहे. मोदींना आमचा आक्षेप नाही पण बिहारमधील भाजप नेते सक्षम आहेत शिवाय भाजप नेते लालकृष्ण अडवाणी बिहारमध्ये येणार आहेत, मी त्यांच्याबरोबर सभा घेणार आहे. आमच्याकडे भाजप नेते सुशील मोदी आहेत ते सक्षम आहेत.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/610", "date_download": "2019-03-25T08:58:23Z", "digest": "sha1:QPN7UTUUNOANAV6DOICJIDMRPEBRA7ND", "length": 10482, "nlines": 141, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी ���डका\nमुखपृष्ठ / मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी रवी, 22/06/2014 - 14:16 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका\nदेव तरी पावेल म्हणून\nपूजा अर्चा करायचा ....\nखडकू काही आले नाही\nडोकं काही चाले नाही\nअंती मात्र देवच आला\nप्राणज्योती घेऊन गेला ....\nनियोजनपंडितांना भयावह क्षय आहे\nपोशिंदा भयभीत; ऐद्यांना ’अभय’ आहे\nशेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही\nशेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही\n- गंगाधर मुटे ’अभय’\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%95/", "date_download": "2019-03-25T08:09:11Z", "digest": "sha1:7ANFP7XLWWS34LYBNXIXTPCKV25KXT3U", "length": 12463, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नैसर्गिक बायपासही आता शक्य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनैसर्गिक बायपासही आता शक्य\nआयुर्वेदात बायपास शस्त्रक्रियेला पर्याय नसल्याचे सांगितले जाते. मात्र, आयुर्वेद क्षेत्रात अनेक वर्षे काम करत असताना प्रदीर्घ आणि यशस्वी संशोधनानंतर नावीन्यपूर्ण अशा नैसर्गिक बायपास उपचारपद्धतीचा (थेरपीचा)शोध लावण्यात आलेला आहे. या उपचारपद्धतीचा वापर करून, हृदयामध्ये असलेले ब्लॉकेज आणि (हृदयाच्या) झडपेसंबंधीचे आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. नैसर्गिक बायपास उपचारपद्धती (थेरपी) ही एकदम नावीन्यपूर्ण असून, शुद्ध आणि खात्रीशीर आयुर्वेदिक औषधांचा आणि ज्ञानाचा वापर करूनच रुग्णाला संजीवनी दिली जाते. हजारो वर्षांपासून चालत आलेले हे ज्ञान म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे.\nनैसर्गिक बायपास आयुर्वेदिक उपचार पूर्णपणे सुरक्षित आहे. फुफ्फुसाचे दीर्घकालीन (जुनाट) आजार, मधुमेह आणि रक्तातील गुठळ्या यांसारख्या आजारांमुळे ज्यांचे हृदय कमकुवत झाले आहे, अशा लोकांसाठी ही उपचार पद्धती विशेष करून फायद्याची आहे. अशा प्रकारची गुंतागुंत असलेले रुग्ण कोणतीही मोठी शस्त्रक्रिया सहन करू शकत नाहीत. आजपर्यंत, हजारो रुग्णांनी या नैसर्गिक बायपास उपचाराचा फायदा घेतला असून त्यांचे आयुष्य अधिक दर्जेदार झाले आहे.\nभारतात हृदयरोगाचे प्रमाणे वाढतच चालले आहे, मग वय, लिंग किंवा आर्थिक स्थिती काहीही असू दे. एका नवीन संशोधनानुसार, सहा कोटींहून जास्त भारतीय हृदयरोगाने त्रस्त आहेत.अगदी आतापर्यंत, बायपास शस्त्रक्रीया हीच यावरची सर्वाधिक सर्वसामान्य उपचारपद्धती होती. तरीही, 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांना ती परवडू शकत नाही. बायपास शस्त्रक्रिया ही अजूनही प्रामुख्याने उच्च मध्यम आणि उच्चभ्रू वर्गलाच परवडण्याजोगी आहे. समाजात असे अनेक घटक आहेत ज्यावर ऍलोपथीची औषधे आणि शस्त्रक्रिया, उपचार करू शकत नाहीत. परवडणाऱ्या दरात लोकांना अधिक चांगल्या शारीरिक आरोग्याचा अनुभव द्यायचा असेल, तर आयुर्वेदाला पर्याय नाही. त्यामुळेच काळाच्या ओघात हरवून गेलेली आयुर्वेदाची कला पुनरुज्जीवित करण्यासाठी ही अभिनव नैसर्गिक बायपास उपचार पद्धती शोधण्यात आली आहे.\nजाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग\nनाळेतील रक्तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स\n मग ‘हे’ आसन करून पहाच…\n#आरोग्यपर्व: हाय एनर्जी सीड्स\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-central-railway-time-table-49852", "date_download": "2019-03-25T08:56:42Z", "digest": "sha1:3OK4H4QB3Y5WBKIFCH7PTNIDYSBN4JKI", "length": 17246, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai central railway time table मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाची ऐशीतैशी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमध्य रेल्वेच्या वेळापत्रकाची ऐशीतैशी\nशनिवार, 3 जून 2017\nवर्षभरात 56,899 लोकल फेऱ्यांचा वक्तशीरपणा बिघडला\nवर्षभरात 56,899 लोकल फेऱ्यांचा वक्तशीरपणा बिघडला\nमुंबई - मध्य रेल्वे आणि वक्तशीरपणा यांचे कधी जुळलेच नाही. विविध कारणांनी लोकल फेऱ्यांना होणारा उशीर आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप महिन्यातून बऱ्याचदा अनुभवण्यास मिळतो. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कितीही आश्वासने दिली तरीही 2016/17 मधील आकडे काही वेगळेच सांगत आहेत. या काळातील मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला तर तब्बल 56 हजार 899 लोकल फेऱ्यांचा वक्तशीरपणा चांगलाच बिघडला आहे. सर्वाधिक फटका हा रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी कामांबरोबरच रेल्वे फाटके आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सिग्नलमधील बिघाडांमुळे बसत असल्याचे समोर आले आहे.\nमध्य रेल्वेच्या मेनलाईन आणि हार्बरवर 121 लोकलच्या दररोज 1600 लोकल फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून दिवसाला 40 लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात; मात्र हा प्रवास करताना अनेकदा लोकल फेऱ्या विविध कारणांनी कधी पाच मिनिटे, तर कधी दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.\nरेल्वेकडून विविध कामांसाठी घेण्यात येणाऱ्या नियोजित मेगाब्लॉकबरोबरच काही वेळेला घेतले जाणारे छोटे-छोटे ब्लॉक, काही ठिकाणी असणारी वेगमर्यादा अशा अभियांत्रिकी कामांमुळे लोकल फेऱ्यांना तर मोठा फटकाच बसतो आहे. 2016/17 मध्ये 22 हजार 410 लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले. 2015/16 मध्ये 21 हजार 508 फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले होते.\nलोकल फेऱ्या बंद करून किंवा रात्रीच्या वेळी अभियांत्रिकी कामे होऊ शकत नाहीत. सकाळच्या वेळेतच अभियांत्रिकी कामे झटपट उरकता येतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापाठोपाठ मध्य रेल्वे, मेनलाईन आणि हार्बर मार्गावर असणाऱ्या रेल्वे फाटकांमुळेही वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो. मेनलाईनवर कळवा, दिवा, ठाकुर्लीबरोबरच कुर्ला, चुनाभट्टी येथे रेल्वेची फाटके आहेत. ही फाटके नेहमी दोन-तीन मिनिटे उघडतात आणि बंद होतात. त्याचबरोबर कधीकधी तांत्रिक समस्यांमुळे ही फाटके पाच ते सात मिनिटेही उघडी राहतात. त्यामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागतो. वर्षभरात 13 हजार 520 लोकल फेऱ्यांना फाटकांमुळे लेटमार्क लागला आहे. लोकलमधील आपत्कालीन चैन खेचणे, सिग्नल व ओव्हर���ेड वायरमधील बिघाड, लोकलमधील बिघाड व रूळ ओलांडताना प्रवाशांच्या होणाऱ्या अपघातांमुळेही लोकल फेऱ्या मोठ्या प्रमाणात विस्कळित झाल्याची नोंद मध्य रेल्वेकडे आहे.\nलांब पल्ल्याच्या गाड्यांची डोकेदुखी\nमध्य रेल्वेवरील काही मेल, एक्स्प्रेस गाड्यांमुळेही लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक चांगलेच बिघडते. मुंबईत येताच किंवा मुंबईतून जाताना प्रथम मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जाण्यासाठी प्राधान्य दिले जाते व लोकल फेऱ्यांना मागे ठेवले जाते. यात बहुतांश वेळी जलद लोकल फेऱ्यांचा समावेश असतो. काही वेळेला तर एखाद्या एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्यासही अन्य लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. 2016/17 मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे तब्बल चार हजार 712 फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले आहे.\n2016/17 मधील अन्य तांत्रिक बिघाड आणि फेऱ्यांवर झालेला परिणाम\nबिघाडाचे कारण फेऱ्यांवर झालेला परिणाम\nसिग्नलमधील बिघाड 5791 लोकल फेऱ्या\nलोकलमधील चैन खेचणे 3119 लोकल फेऱ्या\nओव्हरहेड वायरमधील बिघाड 2872 लोकल फेऱ्या\nलोकलमधील बिघाड 2750 लोकल फेऱ्या\nरूळ ओलांडताना अपघात 1725 लोकल फेऱ्या\nLoksabha 2019 : उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लढणार\nमुंबई : रंगिला गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, ती मुंबईतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे...\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nटेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून सुरुवात\nमुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून (ता.25) सुरुवात होत आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही...\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nशिवाजीनगरवासींच्या त्रासाला सत्तेतील भाजपच जबाबदार : गुलाबराव देवकर\nजळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत....\nLoksabha 2019 : अर्ज भरताना तरी 'युती की जय हो' म्हणा\nसोलापूर - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १९९३च्या पोटनिवडणुकीत आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोलाची मदत केली होती. त्यामुळे अनेकांना आमदारकीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.orientpublication.com/2015/05/blog-post_14.html", "date_download": "2019-03-25T08:10:45Z", "digest": "sha1:YUG7ERST3JUUXVBBB6HQCEUMBZCRQTKW", "length": 6831, "nlines": 31, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ मध्ये ‘रत्नागिरी टायगर्स’ संघाची सरशी", "raw_content": "\n‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ मध्ये ‘रत्नागिरी टायगर्स’ संघाची सरशी\n‘आयपीएल’ प्रमाणे ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग'ची घौडदौड कायम रहायला हवी, अशा शुभेच्छा देत अभिनेतासचिन पिळगावकर यांनी आगामी तिसऱ्या पर्वात आपलाही सहभाग असेल असं आश्वासन या वेळी दिलं. ‘रत्नागिरीटायगर्स‘च्या विजयात ‘आपली काही सेटिंग नव्हती’ अशी कोपरखळी मारत नितेश राणे यांनी जिंकलेल्या संघाचे कौतुककेले. निमित्त होते महाराष्ट्र कलानिधीचे प्रणेते नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मराठी बॉक्स क्रिकेटलीग’च्या पारितोषिक वितरणाचे.\nगेले तीन दिवस पाचगणीत सुरू असलेल्या या मराठी सेलिब्रिटींच्या बॉक्स क्रिकेट लीगचा अंतिम सामना रविवारी पार पडला. यानंतर झालेल्या पारितोषिक समारंभाला श्री. नितेश राणे व अभिनेता सचिन पिळगावकर यांची उपस्थिती लाभली. त्याआधी झालेल्या अंतिम सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने बाजीमारत ‘शिलेदार ठाणे’ संघाचा पराभव केला.\n‘रत्नागिरी टायगर्स‘ संघाने प्रथम फलंदाजी करत ४५ धावा काढल्या. त्याचा पाठलाग करताना ‘शिलेदार ठाणे’ संघाचा डाव ३५ धावांत आटोपला. ‘रत्नागिरी टायगर्सच्या सिध्दार्थ जाधवच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ने ही विक्���मी धावसंख्या उभारली. सिध्दार्थ जाधव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार नुपूर दुधवडकर यांना देण्यात आला. यालीगमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूंचा सत्कार ही यावेळी करण्यात आला.\nपुष्कर श्रोत्री यांच्या खुमासदार शैलीतल्या सुत्रसंचलनाने सामन्यांची रंगत आणखीनच वाढवली. त्याचप्रमाणे अनेक कलाकारांनी ही सामन्यांसाठी उत्स्फूर्तपणे समालोचनाची जबाबदारी स्वीकारली. प्रत्येक संघानेखिलाडूवृत्तीने हे सामने एन्जॅाय केले. लवकरच या रंगतदार सामन्यांचे प्रक्षेपण झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे.\nचिअर लिडर्स व विजेत्या संघाला सामन्यानंतर देण्यात आलेली नृत्याची सलामी, वेळोवेळी प्रत्येक संघांचे वाजवण्यात येणारे थीम साँग याने ही स्पर्धा अधिकाधिक रंगतदार झाली. ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग' चे आगामी तिसरं पर्व कोल्हापूर मध्ये रंगणार असल्याची घोषणा ही याप्रसंगी करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaon-Smart-City-to-be-completed-in-three-years-/", "date_download": "2019-03-25T07:42:41Z", "digest": "sha1:N2ZEXDEWC2X7FXTKPKP233P7D4UZBFCU", "length": 5909, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'स्मार्ट सिटी'चे काम तीन वर्षांत पूर्ण होणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › 'स्मार्ट सिटी'चे काम तीन वर्षांत पूर्ण होणार\n'स्मार्ट सिटी'चे काम तीन वर्षांत पूर्ण होणार\nबेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यापासून आतापर्यंत दोन टप्यात 400 कोटींचा निधी विकासासाठी वितरित झाला आहे. मात्र सरकारी कार्यालयात 2021 पर्यंत स्मार्ट सिटीच्या बेळगावमध्ये काय काय असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसे फलकदेखील लावण्यात आले आहेत. मात्र कागदावर आराखडा बनविणे व तो प्रत्यक्षात अमलात आणणे मोठे आव्हान मनपासह सर्वच खात्यासमोर आहे.\nतीन वर्षांत स्मार्ट सिटीअंतर्गत कामे पूर्ण होतील का\nबेळगावात 58 प्रभाग आहेत. सर्वच प्रभागात स्मार्ट सुविधा पुरवून बेळगाव शहर बंगळूरच्या पाठोपाठ स्मार्ट होणार आहे. त्यासाठी कामाला प्रारंभ झाला असून 2021 पर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत सर्व कामे पूर्ण होतील का, अशी शंका व्यक्त होत आहे. घरे, व्यवसाय, व्यापार, औद्योगिकरण राखीव खुल्या जागा, खेळाची मैदाने, रहदारीसाठी रस्ते, पाण्यासाठी मिळून 8 हजार 212.06 हेक्टर जागा वापरण्याचे उद्दिष्ट आहे. पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी 131.35 हेक्टर जमीनीचा वापर करण्यात येणार आहे. 800.19 हेक्टर जागेत मोकळी जागा, बाग, उद्याने, खेळाची मैदाने याचा सामावेश राहणार आहे. औद्योगिक विकासावर भर देण्यासाठी 839.75 एकर जमीन राखीव ठेवली आहे. घरासाठी 3795.85 हेक्टर जमीन म्हणजे 46.97 टक्के जमीन राखीव राहणार आहे. जीपीएसनुसार बेळगावचा नव्याने सर्व्हे करणे गरजेचे आहे. बेळगावातील मोकळ्या जागा, भंगीबोळात अतिक्रमण झाले असून त्यावर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत.\nमध्यंतरी नकाशाप्रमाणे अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमूर्र्लन पथकाने अशा प्रकारच्या गिळकृंत केलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचा सपाटा चालविला होता. त्यानंतर या मोहिमेत खंड पडला.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Ded-Teachers-agitation-hint/", "date_download": "2019-03-25T08:08:52Z", "digest": "sha1:JKQOHVGE4F7UQD7MLAI4P4O6R5LBKOQN", "length": 4894, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएड शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › डीएड शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा\nडीएड शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा\nडी.एड शिक्षकांना सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनाची सरकारने त्वरित पूर्तता न केल्यास आंदोलन छेडू, असा इशारा डी.एड विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा गौरी जोशलकर यांनी पणजीतील आंबेडकर उद्यानात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.\nजोसलकर म्हणाल्या, डी.एड विद्यार्थ्यांसमोर रोजगाराची समस्या आहे. डी.एड शिक्षकांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे,अशी मागणी डिसेंबर 2017 मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन करण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी डी.एड शिक्षकांसाठी 200 पदे भरण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र अनेक महिने उलटले तरी अजूनही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे त्यांनी म्हटले. डी.एडच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यातच सरकारकडून एका बाजूला खासगी शाळांना परवानगी दिली जात असून सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अनेक सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची टीकाही त्यांनी केली.\nडी.एड विद्यार्थी संघटनेतर्फे आपल्या मागण्यांसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संघटनेचे सदस्य विठ्ठोबा नाईक, एकनाथ सावंत,रती गावकर यांच्यासह सुमारे 60 डी.एड. शिक्षक उपस्थित होते.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Aircraft-takeoff-from-Wednesday-For-Mumbai/", "date_download": "2019-03-25T07:46:47Z", "digest": "sha1:JOUCJHZT752DDBFOJZ7AW2P4ZRWXBQ6Z", "length": 8452, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईसाठी विमानाचे बुधवारपासून टेकऑफ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मुंबईसाठी विमानाचे बुधवारपासून टेकऑफ\nमुंबईसाठी विमानाचे बुधवारपासून टेकऑफ\nडेक्कन एअरवेजच्या संकेतस्थळावर मुंबई-पुण्यासाठीच्या विमान तिकिटांचे ऑनलाइन बुकींग सुरू झाले असून, विमान फेर्यांच्या नियोजनाप्रमाणे बुधवारी (दि. 11) पहाटे सहा वाजता मुंबईसाठी पहिले विमान उड्डाण घेणार आहे. दुसरीकडे पुण्यासाठीची तिकिटे 19 एप्रिलपर्यंत हाऊसफुल्ल दाखविण्यात येत आहे. त्यामुळेच महिनाभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा रन-वे वर येण्याची चिन्हे आहेत.\nउडान योजनेअंतर्गत ओझर विमानतळावरून सुरू करण्यात आलेल्या मुंबई आणि पुणे विमानसेवेला मागील महिन्यात ब्रेक लागला. प्रशिक्षित पायलट नसल्याचे कारण देत एअर डेक्कन कंपनीने विमानांच्या फेर्या रद्द केल्या. मात्र, वास्तविक पाहता मुंबई विमानतळावरच नाशिकच��या विमानाला टेकऑफ व लॅन्डींगचे स्लॉट उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव कंपनीला विमानसेवा बंद करावी लागल्याची चर्चा पडद्याआडून सुरू होती. दरम्यान, कंपनीने पुढील सूचना येईपर्यंत सेवा सुरू करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळेच विमानसेवेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते.\nएअर डेक्कनने त्यांच्या संकेतस्थळावर पुन्हा एकदा विमानाचे बुकींग सुरू केले आहे. मुंबईसाठी पहिले विमान येत्या बुधवारी पहाटे 6 वाजता टेकऑफ करणार आहे. परतीच्या प्रवासात मुंबईवरून दुपारी 4.55 ला टेकऑफ करणार असून, ओझरला ते पावणे सहा वाजता पोहोचेल. या प्रवासासाठी 1349 रुपये तिकिटदर ठेवण्यात आले आहे. पुण्याचे विमान गुरूवारी (दि. 12) सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ करेल व पावणे सातला पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात 7 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ करून 7.45 ला ओझरला पोहोचेल. या प्रवासात एका बाजूचा तिकिट दर 1470 रूपये असेल. विशेष म्हणजे मुंबईसाठी तिकिटे उपलब्ध असताना पुण्यासाठी 19 तारखेपर्यंत दोन्ही बाजूंची तिकिटे संकेतस्थळावर सोल्डआऊट दाखविण्यात येत आहे. कंपनीने दोन्ही मार्गावरील विमान फेर्यांचे नियोजन व तिकिट बुकींगची सोय संकेतस्थळावर दिल्याने ओझर येथून विमानसेवा पुन्हा एकदा दृष्टीक्षेपात आली आहे.\nखंडीत झालेली विमानसेवा बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याने नाशिककरांसाठी ही आनंदाची बाब आहे. दुसरीकडे विमानतळाच्या नामकरणावरून शिवसेना व राष्ट्रवादीत वाद पेटला आहे. ओझर विमानतळाला शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच साकडे घातले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी गत 26 मार्च रोजी विधानपरिषदेत विमानतळाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नावे द्यावे असा प्रस्ताव दिला आहे. 2 एप्रिलला आ. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नामकरणाचा प्रस्ताव पुढील अधिवेशनात सभागृहात ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामकरणाला आता वादाची किनार मिळाली आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यत��; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Rape-attempt-case/", "date_download": "2019-03-25T07:45:21Z", "digest": "sha1:2XQ65LXSX5OSFLXPJBCEWBZUZUJ67H7Z", "length": 6606, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उगार खुर्दच्या एकास ५ वर्षांची शिक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › उगार खुर्दच्या एकास ५ वर्षांची शिक्षा\nउगार खुर्दच्या एकास ५ वर्षांची शिक्षा\nमिरजेतील वसंत बंधारा येथे एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी उगार खुर्द (जि. बेळगाव) येथील एकास पाच वषार्ंची सक्तमजुरी व पन्नास हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी सोमवारी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.\nशाहनूर हाजीसाब शेख (वय 40) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 19 ऑक्टोबर 2016 रोजी पीडित महिला मिरजेतील वसंत बंधारा येथे कपडे धुण्यासाठी गेली होती. ती एकटीच असल्याचे पाहून शाहनूर तिच्याजवळ गेला. तो अश्लील शब्दात तिला बोलू लागला. त्यावर पीडित महिला रागावल्यानंतर त्याने तिचा गळा पकडून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला.\nत्यावेळी पीडित महिला आरडा-ओरडा करून बचावासाठी हाका मारत होती. त्याचवेळी तेथून मोटारसायकलवरून जाणारे थांबले. त्यांनी महिलेला शाहनूरच्या तावडीतून सोडविले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती.\nया प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीडित महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी, तपासी पोलिस अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यांच्या साक्षी, पुराव्याच्या आधारे न्या. काकतकर यांनी शाहनूरला पाच वर्षांची सक्तमजुरी, पन्नास हजार रूपये दंड व तो न दिल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.\nदरम्यान शाहनूर शेखला पन्नास हजारांच्या दंड न्यायालायाने सुनावल��� आहे. त्यातील पंचवीस हजार रूपये पीडित महिलेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.\nजिल्हा नियोजन बैठकीत अधिकारी धारेवर\nसांगलीत बंद बंगला फोडला\nनोकरीच्या आमिषाने सहा जणांना गंडा\nभाजपने फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग\nउगार खुर्दच्या एकास ५ वर्षांची शिक्षा\nमला २०१९ची काळजी नाही : आमदार बाबर\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Minister-Deshmukh-Against-Dalit-Community-Says-Opposition-Leader-Chandansive/", "date_download": "2019-03-25T07:46:03Z", "digest": "sha1:5GVCBEYCZEXKY6TE3COUWYGRYVNSAKEO", "length": 7283, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालकमंत्री देशमुख दलितविरोधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पालकमंत्री देशमुख दलितविरोधी\nदलितांमध्ये मिसळून काम करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला हरताळ फासण्याचे काम खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे करीत असून ते दलितविरोधी आहेत, असा घणाघाती आरोप करीत बहुजन समाज पक्षाचे मनपातील गटनेते आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ना. देशमुख यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्यांनी गेल्या 9 महिन्यांपासून मंडळाची बैठक घेतली नाही. यामुळे शहर-जिल्ह्याचा विकास रखडला आहे. एवढेच नव्हे तर दलित वस्ती योजनांसंदर्भात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री हे या योजनेचे काम राबविण्यास तयार नाहीत. मराठा मोर्चाला उपस्थिती दर्शविणार्या ना. देशमुखांनी बहुजन क्रांती मोर्चाला जाणे टाळले. गत महिन्यात झालेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोप मिरवणुकीत सहभाग टाळणेच पसंत केले. त्यांनी आजवर अस्थिविहार-भीमसृष्टीला भेट दिली नाही, अशी अनेक उदाहरणे ना. देशमुखांबाबत देता येतील, असे चंदनशिवे म्हणाले.\nना. देशमुख यांनी 119 कामे सूचविली. त्यापैकी 44 कामे हे दलित वस्तीशी संबंधित दाखविली; पण यापैकी एकही काम हे दलित वस्तीत नसल्याने तसेच अन्य कारणांवरून मनपाने रद्द केली आहेत. बुधवारी पालकमंत्री यांच्यानजिकच्या नगरसेवकांनी भिडे गुरूजींची सभा सोलापुरात घेतली. यामुळे दलितांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. कदाचित शहरात सामाजिक सलोखा बिघडवून जातीय दंगली भडकाविण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न असावा, असा आरोप चंदनशिवे यांनी केला.\nशहरातील दलित वस्त्यांमध्ये अनेक मूलभूत समस्या आहेत. ज्या दलित वस्त्यांच्या मतांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले त्या भागातही पालकमंत्र्यांनी अद्याप विकासकामे केली नाहीत. वास्ताविक दलित वस्ती संबंधित योजनांचे प्रस्ताव नगरसेवकांमार्फत जाणे अपेक्षित आहे, पण तसे होताना दिसत नाही. पालकमं त्री देशमुख यांना दलितांबद्दल कळवळा नाही. ते दुटप्पी वागतात. त्यांच्या या भूमिकेविरोधात दलित वस्त्यांबरोबरच शहरभरात सर्वत्र बसप सभा घेणार आहे. एवढेच नव्हे तर सर्वपक्षीय आंदोलनही उभारण्याचा विचार आहे, असे चंदनशिवे म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरसेवक गणेश पुजारी, ज्योती बमगुंडे, स्वाती आवळे आदी उपस्थित होते.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1527", "date_download": "2019-03-25T08:33:16Z", "digest": "sha1:Z2P4DGO6H6BUCUSO3XZ4GEVWU2CRRGYD", "length": 4704, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अभिनव कल्पना | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगेली काही वर्षे आपल्याकडे गणेशोत्सवाची चाहूल लागली की हा उत्सव प्रदूषणविरहित व कोलाहलमुक्त होण्याची कशी गरज आहे, याची चर्चा सुरू होते. या चर्चेत रहदारीस अडथळा आणणा-या सार्वजनिक गणेश���त्सव मंडळांच्या देखावे-मंडपांच्या आकारमानापासून तेथे दिवसरात्र वाजणा-या कर्कश्श, कंठाळी संगीतापर्यंत आणि आगमन-विसर्जन मिरवणुकांत गुलालासारख्या अनारोग्यकारक वस्तूंच्या होणा-या अतिवापरापासून गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे होणा-या पाण्याच्या प्रदूषणापर्यंत अनेक मुद्यांचा अंतर्भाव असतो.\nगणेश मूर्ती तयार करण्यासाठी विविध रंग व रसायने वापरली जातात. मूर्ती प्रामुख्या्ने ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’पासून तयार केल्या जातात. त्यांच्या विसर्जनानंतर रसायने विरघळल्यामुळे विहिरी, तलाव व नद्यांचे पाणी खराब होते. तो धोका टाळण्यासाठी काही उपाययोजना झाल्याही आहेत. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन त्या त्या घरातल्या बादली वा टबमध्ये करून ते पाणी दुस-या दिवशी झाडांना घालण्याचा पायंडा काही मंडळी अनुसरताना दिसतात. मात्र त्यामुळे सार्वजनिक विहिरी, तलाव व नद्यांचे पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण कितपत घटते हा प्रश्नच आहे.\nSubscribe to अभिनव कल्पना\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/fashion-funda-news/behind-lakme-fashion-week-1290083/", "date_download": "2019-03-25T08:43:47Z", "digest": "sha1:6EMVRHPF6ZU3KUT2L2QH674RBQG6BJDW", "length": 25346, "nlines": 238, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रॅम्पमागचा लॅक्मे फॅशन वीक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nरॅम्पमागचा लॅक्मे फॅशन वीक\nरॅम्पमागचा लॅक्मे फॅशन वीक\nवर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकित फॅशन शो आहे.\nवर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकित फॅशन शो आहे. आपल्याला काही सेकंदांसाठी रॅम्पवर चालत येणाऱ्या मॉडेल्स दिसतात, पण त्यासाठी केवढा तरी मोठा आटापिटा केलेला असतो..\nझगमगत्या दुनियेचं आकर्षण प्रत्येकालाच असतं आणि त्यातही आपल्या आवडत्या सेलिब्रेटीजना जवळून पाहण्याची संधी रॅम्पव�� होणाऱ्या फॅशन शोजमधून मिळते. भारतातल्या फॅशन शोजमधला सर्वात नामांकित फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक. या लॅक्मे फॅशन वीकचे वर्षांतून दोन सीझन होतात. एक म्हणजे समर रिसॉर्ट आणि दुसरा िवटर फेस्टिव्हल. लॅक्मे फॅशन वीक आला म्हणजे सेलिब्रेटीजच्या चाहत्यांना आठवडाभराची मेजवानीच असते. मोठमोठय़ा डिझायनर्सच्या कपडय़ांचं शोकेसिंग आठवडाभर मोठय़ा दिमाखात सादर होत असतं. याखेरीज शो स्टेजच्या बाहेरील आवारात शो पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लॅक्मे प्रेझेंट काही गेम्स, गिफ्ट्स व खाण्याच्या पदार्थाची सोय केलेली असते. रॅम्पवॉकसोबतच त्यांनी विविध गेम्सचा आनंद लुटावा व बाजारात येणाऱ्या काही नवीन प्रॉडक्ट्सची त्यांना माहिती उपलब्ध व्हावी किंवा लॅक्मे प्रॉडक्ट्स व त्याचे ऑफिशिअल पार्टनर असणाऱ्या दुसऱ्या काही कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सचे लाँचिंग लॅक्मे फॅशन वीकच्या माध्यमातून व्हावे हे उद्दिष्ट असते. शो सुरू व्हायच्या आधी प्रेक्षकांची अमाप गर्दी स्टेज परिसराच्या बाहेर होते. त्या प्रेक्षकांना बाहेर ताटकळत उभं राहावं लागू नये यासाठी आधी झालेले फॅशन शोज मोठय़ा स्क्रीनवर बघण्याची सोय असते. शिवाय लॅक्मेतर्फे प्रेक्षकांचा मोफत मेकअपदेखील केला जातो. परंतु हे सर्व व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियोजन केलेले असते. प्रेक्षकांची कुठल्याही प्रकारची गरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते.\nहजारो लोकांना घेऊन एक कार्यक्रम पार पाडायचा म्हटलं म्हणजे लग्नकार्यच उरकल्यासारखं आहे. मग इथे तर संपूर्ण आठवडाभर त्याच उत्साहात काम करायचे म्हटल्यावर पूर्वनियोजन अत्यंत आवश्यक आहे. झगमगत्या दुनियेतील तारेतारकांचे चेहरे तर आपल्याला पटकन दिसतात पण त्या चेहऱ्याची काळजी घेणाऱ्या, त्यांना हवं नको ते बघणाऱ्या, वेळप्रसंगी त्यांचे नखरे झेलणाऱ्या पडद्यामागील टीमचे कष्ट लोकांना दिसत नाहीत. पण या उत्कृष्ट टीमवर्कमुळेच आठवडाभराचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. हा ग्रँड कार्यक्रम सादर करण्यासाठी बॅकस्टेज मेंबर्सची एक मोठी टीम बनवण्यात येते. या टीममध्ये कोणाकडे कोणते काम असणार यासाठी मीटिंग आयोजित केली जाते. डिझायनर्सपासून ते स्टायलिस्ट, मेकअप आर्टस्टि, हेअर स्टायलिस्ट, को-ऑíडनेटर, त्यांचे असिस्टंट्स, वॉर्डरोब असिस्टंट्स, कॅटर्स प���्सन ते क्लीनअप पर्सनपर्यंत मोठ्ठीच्या मोठ्ठी टीम या लॅक्मे फॅशन वीकच्या जय्यत तयारीसाठी काही दिवस आधीपासूनच सज्ज असते. लॅक्मे शो ज्या आठवडय़ात असणार त्याच्या आधीच्या आठवडय़ापासून स्टेज शोबाहेरचा परिसर सजवणे, फिटिंग्ज घेणे, डिस्प्ले एरिया बनवणे वगरे तयारी सुरू होते. डिझायनर्सने बनवलेले गार्मेट्स मॉडल्सला फिट होतायत की नाही, कोणता शो कोणत्या दिवशी असणार, शोचं शेडय़ूल कसं असणार या साऱ्याची रंगीत तालीम आधल्या आठवडय़ात होते.\nरॅम्प वॉक करणे म्हणजे फक्त रॅम्पवर जाऊन गार्मेट प्रेझेन्ट करणे नव्हे तर त्या गार्मेटच्या आधारे डिझायनरला लोकांना काय संदेश द्यायचा आहे, त्याची थीम काय आहे, त्या गार्मेट अनुसार मॉडेलचा अॅटिटय़ूड, शो सिक्वेन्स या सगळ्यांचं भान मॉडल्सला असणं अत्यावश्यक आहे. प्रत्येक डिझायनरच्या गार्मेट थीमनुसार त्यांनी रॅम्पवर चालण्यासाठी एका म्यूझिकची निवड केलेली असते. त्या म्यूझिकवर गार्मेटचं प्रेझेन्टेशन कसं करायचं यासाठी एका कोरिओग्राफरची नेमणूक केलेली असते. त्यांच्या कोरिओग्राफीप्रमाणे, त्याच सिक्वेन्सनुसार मॉडेल्सला जावे लागते. कोणा मागे कोणती मॉडेल असणार हे आधीच ठरलेले असते, त्यात आयत्या वेळी बदल करू शकत नाही, प्रत्येक शोसाठी मॉडेल्सच्या पायाच्या नखापासून ते केसापर्यंतचा अखंड मेकओव्हर बदलत असतो. लॅक्मेसारख्या शोमध्ये दिवसातून चार-पाच वेळा मॉडेल्सना शोनुसार नवा मेकअप करावा लागतो. अगदी नेलपेंटदेखील बदलले जाते. या सगळ्यासाठी खास मेकअप आर्टस्टि, हेअरस्टायलिस्ट असतात. स्वत मॉडेल्ससुद्धा त्यांच्या मेकअप किंवा हेअरस्टाइलमध्ये फेरफार करू शकत नाही. सर्व मॉडेल्सना शोनुसार एकसारखाच मेकअप असतो, बहुतेकदा शो स्टॉपरचा मेकअप व हेअरस्टाइल वेगळी असते. मॉडेल्सला मदत करण्यासाठी, कोणता गार्मेट पहिला-कोणता दुसरा हे सांगण्यासाठी, डिझायनरने प्रत्येक ड्रेसवर दिलेली ज्वेलरी न विसरता त्याच ड्रेसवर त्या मॉडेलला घालण्यासाठी, मॉडेल्सना काही हवं नको ते पाहण्यासाठी प्रत्येक मॉडेल मागे एक असे वॉर्डरोब असिस्टंट नेमलेले असतात. मॉडेल व्यवस्थित तयार झाली आहे की नाही, चुकूनही (झीप लावणं, पदर पिनअप करणं ) काही राहिलं तर नाही ना, किंवा पेहराव परिपूर्ण झाला आहे की नाही याची जबाबदारी वॉर्डरोब असिस्टंटकडे असते. मेकअप, हेअर, ड्रेस झाल्यावर मॉडेल्स शोसाठी लाइनअप करतात. त्यांना वेळेत बाहेर काढणे, व्यवस्थित अरेंजमेंट करणे, बॅकस्टेज आणि फ्रंटस्टेजमधल्या घडामोडी जाणून घेऊन तसे फेरफार करणे याची जबाबदारी को-ऑर्डिनेटरकडे असते. त्याचप्रमाणे बॅकस्टेजला मॉडेल्स तयार होऊन आल्यावर फोटोग्राफर्स आपला कॅमेरा घेऊन सज्ज असतात. शिवाय रॅम्पच्या सगळ्यात पुढच्या बाजूलादेखील फोटोग्राफर आणि मीडियावाल्यांना जागा दिलेली असते. लॅक्मे फॅशन शो हा कमीतकमी अध्र्या तासाचा शो असतो, पण या अध्र्या तासाच्या शोसाठी लागलेली मेहनत अक्षरश: प्रचंड असते.\nलॅक्मे फॅशन शोचे एकच स्टेज सर्वाना माहीत असते, ज्याला ‘मेन स्टेज’ म्हणतात. पण इथे मेन स्टेज खालोखालच जबाँग प्रस्तुत लॅक्मे फॅशन शो असतो, त्याला जबाँग स्टेज म्हणतात. मेनस्टेज शोमध्ये नामवंत फॅशन डिझायनर्स, टॉप मॉडेल्स असतात, तर जबाँग स्टेजमध्ये नामवंत डिझायनर्ससोबतच होऊ घातलेल्या काही डिझायनर्स मॉडेल्सनाही वाव असतो. याचबरोबर आय.एन.आय.एफ.डी. प्रेझेन्ट जेन नेक्स्ट हा शो खास त्या कॉलेजच्या सर्व शाखांमधून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतो. आपल्या डिझाइन्स लोकांपुढे आणण्यासाठी एक चांगली संधी लॅक्मे स्टेज त्यांना देते. शिवाय डिझायनर म्हणून या क्षेत्रात आपलं स्थान वाढवण्यात लॅक्मे या विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना पडलेला मोठा प्रश्न- फॅशन शोमधले कपडे जातात कुठे हे कपडे आपण विकत घेऊ शकतो का हे कपडे आपण विकत घेऊ शकतो का त्या कपडय़ांचं पुढे काय त्या कपडय़ांचं पुढे काय तर या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे कपडे विकत घेण्यासाठी खास एक सोर्स एरिया असतो. लॅक्मे फॅशन वीक चालू आहे तोपर्यंत सोर्स एरिया किंवा डिस्प्ले एरियादेखील चालू असतो. शो सादर करणाऱ्या सर्व डिझायनर्सना एक एक गाळा देऊन त्यात त्यांच्या डिझायनर वेअरचे प्रदर्शन लोकांसाठी खुले असते. रॅम्पवर असलेले कपडे किंवा त्या डिझायनरचं इतर कलेक्शन आपल्याला तेथे बघायला मिळतं व तिथूनच आपण ते विकतही घेऊ शकतो. एकूणच धमाल, मस्ती, मनोरंजन आणि फॅशनविश्वात होणाऱ्या प्रगतीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन याने भरलेला लॅक्मे फॅशन वीक हा धंदा लोअर परेलच्या पॅलेडिअम मॉलमधल्या सेंट रेगीस हॉटेलमध्ये २४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान ��ार पडणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविश्वचषकाआधी भारताला मोठा धक्का पहिल्याच सामन्यात बुमराहला गंभीर दुखापत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://audeliver.com/podcast/uNxXhEgPXJS6", "date_download": "2019-03-25T07:33:45Z", "digest": "sha1:SVRYHXM4POC6ZJGMIPV56WANMFZIIKL7", "length": 4388, "nlines": 13, "source_domain": "audeliver.com", "title": "Audeliver demo podcast: 'Gulabachi Kali' Full Song With LYRICS | Tu Hi Re | Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Tejaswini Pandit | Audeliver", "raw_content": "\n चढते भिडते जादू नजरेची अशी चढते भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते मन विसरून वाट सैरवैर धावते अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली आली आली लाली लाली उतू उतू चालली… कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली नटून थटून लाजते जनू चांदनी नटून थटून लाजते जनू चांदनी गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली… २ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/pahu-re/", "date_download": "2019-03-25T07:42:51Z", "digest": "sha1:6AVM3TEOY7SQJYQ3QBPSR3RRB44OJVTK", "length": 6751, "nlines": 71, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nपाहू रे किती वाट\nपाहू रे किती वाट\nपाहू रे किती वाट\nहिंडते धुंडिते होई न भेटी\nप्रीतीचे निधान येई न हाती\nझाली बाला श्रांत, जिवलगा, पाहू रे किती वाट\nवन सळसळते, मन तळमळते\nप्राणसख्या तव चाहूल येते\nभेसूर घन तिमिरात, जिवलगा, पाहू रे किती वाट\nसागर खवळे, उसळती लाटा\nझुंजत तयांशी हासशी नाथा\nकाहूर मम हृदयात, जिवलगा, पाहू रे किती वाट\nहोईल केंव्हा मीलन अंती\nअवचित जुळतील प्रीति ज्योती\nविश्वाच्या प्रलयात, जिवलगा, पाहू रे किती वाट\nपाहीन तोवरी वाट, पाहीन तोवरी वाट,\nजिवलगा, पाहीन तोवरी वाट\n'माझा मुलगा' हा प्रभातचा सर्वस्वी सामाजिक, मध्यमवर्गीयांच्या नातेसंबंधांवरील कथा असलेले चित्र. या चित्रातील 'पाहू रे किती वाट' आणि 'उसळत तेज भरे गगनात' ही दोन गाणी शांता हुबळीकर यांच्या आवाजात लोकांच्या पसंतीस उतरली. 'उसळत तेज भरे गगनात' या गाण्याच्या वेळी त्या गाण्यात काय आशय हवा आहे हे आठवल्यांना सांगताना व्ही शांताराम म्हणाले होते की, \"मला या गाण्यात एखादा बैरागी गातो तसं वर वर जाणारं, आभाळाला भिडणारं काही तरी हवं आहे\" 'पाहू रे किती वाट' यातील समुद्राच्या लाटा वर उसळल्याचा आभास उत्पन्न करणारे विलक्षण ताकदीचे संगीत लक्षणीय आहे.\nमज फिरफिरुनी छळीसी का\nउसळत तेज भरे गगनात\nजीवा, तुझ्या मोहिनीने भारिले\nपाहू रे किती वाट\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञाने���्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/page/2/", "date_download": "2019-03-25T07:54:28Z", "digest": "sha1:X2QLODUHE4F5KIVB5ETKBI4NQXXX5WYX", "length": 9844, "nlines": 92, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "वा. न. सरदेसाई - Part 2", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nमावळतीपलीकडील आपल्या सात रंगांच्या विश्वात सप्तसुरांची मोहक झुंबरं टांगून ठेवावीत , म्हणून गुराख्याच्या अलगुजावर सूर्य टपलेला असतो . . अलगूज वाजंल की , पहाटहोते . . सूर्य जागा होतो . . . रानाला भुरळ घालतो . सोनेरी दान देतो .. . हळूहळू सुरांसाठी …\nरुजू जरी दिलेस तू . . .\nवृत्त : कलिंदनंदिनी गण : लगालगा लगालगा लगालगा लगालगा रुजू जरी दिलेस तू . . . फुलायचेच राहिले उन्हास श्रावणातल्या भिजायचेच …\nमी जुनी टाकून आलो\nवृत्त : मंजुघोषा गण : गाललगा गालगागा गालगागा मी जुनी टाकून आलो कात माझी जीवनाची ही नवी सुरवात माझी \nवृत्त : विधाता ( हिंदी ) गण : एकूण मात्रा २८ ( १४+१४ ) उपयोगच नव्हता तेव्हा , सांगून कुणाला काही नव्हताच कुणी घेणारा …\nमला तो गाणारा रानपक्षी कोणी आणून देता का – त्याच्या गळ्यात मला कोंडून घ्यायचय् . . त्याच्या जिवंत सुरात मला समाधी …\nइंगित . . .\nओवी / अभंग वा. न. सरदेसाई इंगित . . . माजं नाव वारकरी माज्या बापाचं इट्टल उब्या आयुक्षात बगा न्हाई आमचं पटलं . . झालं बांधून बाशिंग माजा संसार रंगला दोन पोरं फुलावाणी चार बैलबी मोटंला . . गेलो आखारी वारीत मायबापाला सांगाया …\nनिळ्याशार आभाळात पिवळं ऊन्ह घाला हिर्वागारा मळा बघा भेटायला आला . . निळ्या नदीत बुडवा ढग तांबडे-लाल पिक्की जांभळं बघून …\nवृत्त : प्रेय गण : गाललगा गालगा गाललगा गालगा ह्या नगरीच्या कशा आठवणी आजही पाहुणचारा उभ्या आठवणी आजही \nकोकणच्या पाळण्यात माझे बाळपण गेले झुल्यावर टांगलेले रनकुसुमांचे झेले . . लाल चौथर्याची चड्डी शर्ट पांढरा अंगात शाळा माझी वाट बघे …\nतू सोड मनातली उदास भावना\nगण – गागाल लगालगा लगालगा लगा तू सोड मनातली उदास भावना आयुष्य हवे तसे मिळेल का कुणा विघ्नांवर मात तू करत जा पुढे …\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nकविता रुचते अशी . . l\n– ‘कविता रुचते अशी . . ‘ ह्या शीर्षकांतर्गत ‘ कविता’ ह्या आपल्या काव्यसमीक्षेवरील पुस्तकात ‘ रंगांची जादू ‘ ह्या श्री. वा. …\nभक्तिगीत : वा. न. सरदेसाई सरळ रेखिली ओळ . . . घेऊनी भक्तिरंग निष्काम मनावर लिहिले ‘ विठ्ठल ‘ नाम . …\n” अंगाई ते गझल – रुबाई ” समग्र वा. न. सरदेसाई पुस्तक प्रकाशनसमारंभी : डॉ.श्री. राम पंडित\n” अंगाई ते गझल – रुबाई ” समग्र वा. न. सरदेसाई ह्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना डॉ.श्री. राम पंडित म्हणतात : _________ …\nहिर्वे सूर्य . .\nमाझ्या अंगावर एक झुपकेदार झाडफांदी हलकेच कललीय् . . हिरवेगार रानसूर्य माझ्याभोवती झुलतायत . . माझं मन मी आता त्यांनीच …\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/avengers-infinity-war-who-will-die/", "date_download": "2019-03-25T07:34:18Z", "digest": "sha1:ZWUN4BUKV4KGTMFEF66MKP3O65PPA4UT", "length": 16721, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Avengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nAvengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n आपल्या आवडत्या charactersचा मृत्यू बघण्यास तयार रहा\nजवळजवळ चाळीस फ्रेम असलेलं अव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर्सचं नवीन ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे. तुम्ही बघितलं असेलच. पण लक्षपूर्वक बघितलंत का जर बघितलं नसेल तर बऱ्याच महत्वाच्या गोष्टी तुमच्या नजरेतून सुटल्या असणार.\nआपण जरा खोलात जाऊन बघूया हे ट्रेलर आपल्याला काय सुचवतंय ते\nमार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स ( MCU )चा जवळजवळ १० वर्षांचा प्रवास, १८ सिनेमांचा संदर्भ…ज्यांनी आधी mcuतील सिनेमे बघितले नाहीत त्यांना जरा समजायला जड जाईल. पण hardcore fans आणि ज्यांनी हे सिनेमे बघितले आहेत त्यांच्यासाठी हे ट्रेलर मेजवानीच आहे\nपहिल्या फ्रेममध्ये गमोरा ज्या “स्नॅप”बद्दल बोलतेय तो स्नॅप actually इन्फिनिटी गौंटलेट या कॉमिक्समध्ये दाखवला गेलाय. ज्यात थॅनॉस खरोखर अर्ध युनिव्हर्स “चुटकी सरशी” नष्ट करून टाकतो (खालील चित्र बघा) गमोरासोबतची थॅनॉसची बॅकस्टोरीदेखील आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं ट्रेलरवरून दिसतंय (खालील चित्र बघा) गमोरासोबतची थॅनॉसची बॅकस्टोरीदेखील आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं ट्रेलरवरून दिसतंय कारण, एका फ्रेममध्ये थॅनॉस आणि त्याची आर्मी तिच्या प्लॅनेटवर हल्ला करतांनाचा प्रसंग आपल्याला दिसतो\nएबनी मॉ डॉक्टर स्ट्रेंजच्या मनावर ताबा मिळवून त्याला थॅनॉसचा प्यादा बनवणार असं एका फ्रेममध्ये आपल्याला दिसतंय. मॉ हा एक अत्यंत क्रूर व पॉवरफुल माईंड कंट्रोलर आहे हे कॉमिक बुक फॅन्सना माहित आहेच.\nथोरचा नवीन हातोडा अर्थातच ” स्टोर्मब्रेकर ” आपल्याला बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. एका awesome फ्रेममध्ये थोर विजांच्या कडकडाटांसकट दिसलाय आणि ग्रूट, रॉकेट त्याच्याकडे अचंबित होऊन बघतायत\nस्टॉर्मब्रेकर आपल्याला प्रत्यक्ष जरी दिसत नसला तरी अनेक खेळणी बाजारात दाखल झाली आहेत, त्यात असंच दिसतंय…\nपहिल्या ट्रेलरमध्ये आपल्याला व्हिजन च्या कपाळावर असलेला स्टोन थॅनॉसची “माणसं” बळजबरी काढताना दिसली होती. ह्या ट्रेलरमध्ये जर नीट निरीक्षण केलं तर कॅप्टन अमेरिका आणि इतर काही अव्हेंजर्स व्हिजनला व्हकांडा येथे घेऊन येत आहेत. आणि एका अगदी फास्ट फ्रेममध्ये व्हिजन आपल्याला टेबलवर आडवा पडलेलाही दिसत आहे\nहल्क हल्कबस्टर घालून लढणार असं आता निश्चित वाटतंय पहिल्या ट्रेलरमध्ये फक्त शक्यता वाटली होती पहिल्या ट्रेलरमध्ये फक्त शक्यता वाटली होती So very excited about that पण ए���ा फ्रेम मध्ये थॅनॉसची आर्मी त्या सूटचे पार चिथडे करताना दिसत आहे हल्क त्यातून बाहेर पडून सगळ्यांचा चेंदामेंदा करेल अशी आशा करूया\nएका अफलातून फ्रेममध्ये आयर्न मॅनचे फूट थ्रस्टर्स रॉकेट बस्टरमध्ये convert होतात\nट्रेलरमध्ये थॅनॉसच्या ग्रहावरचे अर्थात टायटनवरचेसुद्धा scenes दिसतायेत. तिथेही बॅकस्टोरी बघायला मिळणार आपल्याला. थॅनॉस ह्या characterबद्दल जरा खोलात जाणून घेता येईल त्यामुळे\nस्पायडर मॅन आयर्न सूटमध्ये दिसतोय…ते आपण पहिल्या ट्रेलरमध्येच बघितलं म्हणा फक्त मास्क आणि बाकी casual कपडे हा त्याचा कॉमिक बुक मधला टिपिकल अवतार सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय\nआता जरा अंगावर काटा आणणारा भाग …..आणि तो म्हणजे कुणाचा मृत्यु होणार\nसिनेमाचे दिग्दर्शक Russo भावांनी अनेक पात्र ह्या सिनेमांमध्ये मरण पावणार हे आपल्याला सुचवलच आहे\nमाझा guess – आयर्न मॅन\nकारण ह्या MCU ची सुरुवात त्यानेच केली आणि एका scene मध्ये थॅनॉस म्हणतो, “I hope they remember you”. शिवाय आयर्न मॅन त्याच्या फाटलेल्या सूटसोबत दिसतोय आणि खूप जखमीसुद्धा पण हि एक ट्रिक देखील असू शकते\nइन्फिनिटी गौंटलेट ह्या कॉमिक बुकमध्ये कॅप्टन अमेरिका मरतो हे बऱ्याच लोकांना माहित आहेच\nव्हिजन मरण पावण्याची सुद्धा शक्यता आहेच\nमार्क रफएलो अर्थात हल्क ह्याने एका interview दरम्यान सगळेच characters मरणारेत असं चुकून बोलल्यानंतर जीभ चावली होती\nत्यामुळे हा सिनेमा भावनिक असणार हे मात्र नक्कीच\n इतके सगळे पात्र हाताळणं किती कठीण काम आहे हे Russo भावंडांची कमाल आहे\nहे ट्रेलर बघून तर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सिनेमा कधी एकदाचा रिलीज होतोय असं झालंय\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तुमच्या wi-fi ची speed वाढवण्याच्या ५ सोप्या टिप्स\nऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या कलाकारांची “सॅलरी” चक्रावून टाकणारी आहे\nथॅनॉस ठरणार मैलाचा “स्टोन” : इन्फिनिटी वॉरच्या कमाईचे डोळे दिपवणारे आकडे\nटीव्ही रिमोटच्या शोधामागची अफलातून आश्चर्यजनक सत्यकथा…\nप्लॅस्टिक बंदीवर एवढा विचारात पाडणारा लेख तुम्ही वाचलाच नसेल\nप्रभू रामां व्यतिरिक्त ‘हे’ ६ शाप ठरले ‘रावणवधाचे’ कारण\nकिडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते \nपुतीन यांचे संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाउल: भारत यातून बरंच काही शिकू शकतो\nशाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nयेत्या ८ तारखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का\nसंपूर्ण अंडरवर्ल्ड हादरवून सोडणाऱ्या “त्या” एन्काउंटर स्पेशालिस्टची रीएन्ट्री…\nजगातील सर्वात महाग आईस्क्रीमच्या या किमती पाहूनच लोक तोंडात बोटे घालतात\nपाण्यात खोलवर दडलेल्या पाणबुड्या शोधण्यासाठी लढाऊ विमाने वापरतात ही जबरदस्त क्लृप्ती\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या\nभारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.\nपाकिस्तानातील हे १० विचित्र आणि मजेशीर कायदे तुम्हाला देखील बुचकळ्यात टाकतील\nमुंबईकर “बेशिस्त” का आहे वाचा डोळे पाणावणारं (आणि उघडणारं) उत्तर\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं\nकॅप्सूलवर दोन रंग असण्यामागचं ‘हे’ खरं कारण तुम्हाला माहित आहे का\nशेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी\nआंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही “नो बॉल” नं टाकणारे हे ५ दिग्गज गोलंदाज तुम्हाला माहित आहेत का\nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090427/main.htm", "date_download": "2019-03-25T08:24:22Z", "digest": "sha1:4ZRMVVB2YYZTWDYLQNKP6JB3JZYKWI4S", "length": 17334, "nlines": 50, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार , २७ एप्रिल २००९\nप्रादेशिक पक्षांना थारा देऊ नका\nभाषा आणि प्रांताच्या नावाखाली काही लोक जनतेला भडकविण्याचे काम करीत असले तरी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईला वाचविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून (एन.एस.जी. कमांडो) हात पुढे आले होते याची आठवण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज करून दिली.तसेच ही राष्ट्रीय निवडणूक असल्याने संकुचित प्रादेशिकवादाला थारा देऊ नका, असे आवाहन करीत शिवसेना व मनसेला चार हात लांबच ठेवा, असा अप्रत्यक्ष सल्ल�� दिला.\nजीते है दिलशान से\nपोर्ट एलिझाबेथ, २६ एप्रिल / वृत्तसंस्था\nतिलकरत्ने दिलशानने ४७ चेंडूत केलेल्या दोन षटकार व पाच चौकारांसह केलेल्या ६७ धावा आणि मिथुन मन्हासने त्याला १३ चेंडूंत २३ धावा करून दिलेली तोलामोलाची साथ यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. प्रथम फलंदाजी करताना बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने केलेल्या ७ बाद १४९ धावांना प्रत्युत्तर देताना दिल्लीने सहा विकेट्स शिल्लक राखून १५०धावा केल्या.दिलशानलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. बंगलोरला आज राहुल द्रविडची उणीव जाणवली.\n(किंग्ज XI पंजाब जीते है रॉयल से)\nलिट्टेने जाहीर केला शस्त्रसंधी; मात्र सरकारला हवी शरणागती\nसरकारने चोहोबाजूंनी कोंडी केली असल्याने अत्यंत नाईलाजाच्या परिस्थितीत लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळी इलमने (तामिळी वाघ) आज एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केला. मात्र सरकारने ही शस्त्रसंधी धुडकावून लावला आहे. सर्व तामिळी बंडखोरांनी प्रथम शरण यावे, असे सरकारने फर्मावले आहे. दरम्यान, २३ तामिळी बंडखोरांनी आज सकाळी श्रीलंकेच्या लष्करापुढे शरणागती पत्करली. तामिळी वाघांचे विशेष गणवेश फेकून साध्या पोषाखात हे बंडखोर शरण आल्याचे लष्करी प्रवक्ता उधव ननयाकर याने सांगितले. यापुढे आणखी तामिळी वाघ शरण येतील, अशी अपेक्षा प्रवक्त्याने व्यक्त केली.\nखुर्चीची भक्ती बुडविण्यासाठी देशभक्तीला विजयी करा- मोदी\nगेली साठ वर्षे सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेल्या खुर्चीभक्तीला उखडून टाकण्यासाठी देशाचे संरक्षण, बळकट अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणाऱ्या देशभक्तीला विजयी करा. यासाठी शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मते द्या, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार जगन्नाथ पाटील यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, भाजपचे राष्ट्रीय महासचिव गोपीनाथ मुंडे, आ. हरिश्चंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे, महापौर रमेश जाधव, सेनेचे उमेदवार आनंद परांजपे आदी उपस्थित होते. मोदी म्हणाले, साठ वर्षांत काँग्रेसच्या राजवटीमुळे जनता ग्रस्त झाली आहे. महागाई, बेरोजगाई, उद्योग बंद होत असल्याने नवे आर्थिक संकट रोखण्याची या राजवटीची हिंमत नाही, म्हणून जनतेने दोन टप्प्यांत सुमारे ६० टक्के मतदान करून काँग्रेसला झटका दिला आहे. देशात यामुळे परिवर्तनाची लाट आली आहे.\nमराठी टक्का कमी करण्याचे षड्यंत्र\nहाणून पाडा - राज ठाकरे\nउत्तर भारतातून महाराष्ट्रात लोंढेच्या लोंढे आणून आणि त्यांना येथे छटपूजेच्या नावाखाली संघटित करून मुंबई-ठाण्यातील मराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. ते वेळीच उद्ध्वस्त करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात केले. शिवसेनेच्या राजकारणावर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यातील सेंट्रल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी हे आवाहन केले. त्यावेळी व्यासपीठावर मनसेचे सतीश प्रधान, तिन्ही मतदारसंघातील उमेदवार राजन राजे (ठाणे), वैशाली दरेकर (कल्याण) आणि डी. के. म्हात्रे (भिवंडी) आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nगवळीपाठोपाठ पोलिसांनाही द्यावा लागला ‘प्रोटेक्शन मनी’\nमुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी\nसंघटित गुन्हेगारीतून आमदार बनलेल्या अरुण गवळीला ‘प्रोटेक्शन मनी’ देणाऱ्या अनेक बिल्डर्स, बुकी, मटकाकिंग, बारमालकांची नावे अंतर्भूत असलेली छोटी लाल डायरी सध्या चर्चेचा विषय असली तरी या डायरीत नावे आल्याने पोलिसांचा ससेमिरा चुकवितानाच या संबंधितांना पोलिसांनाही ‘प्रोटेक्शन मनी’ द्यावा लागल्याची उदाहरणे बाहेर येत आहे. अर्थात याबाबत कागदोपत्री पुरावा हाती लागणे शक्य नसले तरी अशा पद्धतीचा व्यवहार झाल्याची कुणकुण आपल्या कानावर आल्याचे एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना मान्य केले. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी हा त्याच्या साथीदारांसह सध्या ‘मोक्का’अंतर्गत तुरुंगात आहे. गवळीचा विश्वासू साथीदार सुरेश पाटील याच्याकडून गवळीच्या व्यवहाराची नोंद असलेली दोनशे पानांची लाल डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत स्फोटक माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे.\nपाकिस्तानमध्ये शाळेतील बॉम्बस्फोटात १३ विद्यार्थिनी ठार\nवायव्य सरहद्द प्रांतामधील दिर जिल्ह्यातील एका मुलींच्या शाळेबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात १३ विद���यार्थिनी ठार, तर ४० विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. हा बॉम्ब शाळेबाहेर एका खेळण्यामध्ये ठेवण्यात आला होता. शाळेतील मुली हे खेळणे हाताळत असताना भीषण बॉम्बस्फोट झाला. येथील लाकमान बंदा गावात ही प्राथमिक शाळा आहे. शाळेतील विद्यार्थिनींना हे खेळणे शाळेच्या आवारात सापडले. त्याच्याशी खेळत असताना त्यातील बॉम्बचा स्फोट झाला. यात १३ विद्यार्थिनी ठार झाल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला आहे. मात्र सरकारी अधिकाऱ्यांकडून मृत विद्यार्थिनींचा आकडा सात सांगितला जात आहे. ४० विद्यार्थिनी या स्फोटात जखमी झाल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. मृत विद्यार्थिनी ४ ते १२ वयाच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. मलकंद प्रांतामध्ये शरिया कायद्याला विरोध करणारी धोरणे या भागात लावल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेला हा अशाप्रकारचा पहिलाच हल्ला आहे.\nकसाबच्या खटल्याबाबत गांभीर्याचा अभाव -जेटली\nमुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याच्यावरील खटला पुरेशा गांभीर्याने हाताळला जात नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी आज येथे केली.\nकसाबचा चुकीचा डीएनए अहवाल पाकिस्तानला पाठविण्यात येतो. कसाबच्या आईला आपल्याला भेटण्याची इच्छा आहे, या परराष्ट्र व्यवहारमंत्री प्रणब मुखर्जी यांच्या विधानाचीही जेटली यांनी खिल्ली उडवली. कसाबच्या आईला व्हिसा दिल्याशिवाय ती कसाबला कशी भेटणार, असा सवालही या वेळी जेटली यांनी केला. दरम्यान, फ्रेण्डस ऑफ बीजेपी या कार्यक्रमात अभिनेत्री किरण खेर यांनी जेटली यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे महान प्रशासक आहेत, असा आपल्याला विश्वास आहे, असे या वेळी किरण खेर म्हणाल्या.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/614", "date_download": "2019-03-25T08:56:27Z", "digest": "sha1:LKRVIXUOIZQQKXZ42SMARG3RYSPQKY7K", "length": 9763, "nlines": 126, "source_domain": "gangadharmute.com", "title": " विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / विठ्ठलाला पिणारा पाहिजे..\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 09/07/2014 - 00:18 ह्यावेळी प्रकाशित केले.\nविठ्ठलाला पिणारा पाहिजे.. ॥धृ०॥\nवेडा कुंभार तो गोरा\nत्याला चढणारा पाहिजे.. ॥१॥\nत्याला भजणारा पाहिजे.. ॥२॥\nसात्विक धारा पाहिजे.. ॥३॥\n- गंगाधर मुटे ’अरविंद’\nपुंडलिका वरदे हरी विठ्ठल...\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा पर��वार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-center-give-agencies-petrol-pump-and-lpgs-poors-4126", "date_download": "2019-03-25T07:35:37Z", "digest": "sha1:THSCWQJOJDLXKKGPM653KJ5I6WH5JRFT", "length": 6582, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news center to give agencies of petrol pump and lpgs to poors | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nशनिवार, 12 जानेवारी 2019\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या आरक्षणाअंतर्गत गरीब सवर्णांसाठी राज्य सरकार संचलित तेल विपणन कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप आणि घरगुती गॅस एजन्सी देण्याबाबतचा विचार सुरु असल्याचे दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या आरक्षणाअंतर्गत गरीब सवर्णांसाठी राज्य सरकार संचलित तेल विपणन कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप आणि घरगुती गॅस एजन्सी देण्याबाबतचा विचार सुरु असल्याचे दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया आरक्षणांतर्गत घरगुती गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप गरीबांना दिले जाणार आहे. यातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की ''या कंपन्या केंद्र सरकारच्या आरक्षण योजनेचे पालन करणार आहे. या योजनेंतर्गत 10 टक्के आरक्षण वाढविण्याचा विचार केला जात आहे. नवा पारित केलेला कायदा लागू झाल्यानंतर आर्थिक मागास (ईडब्ल्यूएस) श्रेणीला 10 टक्के आरक्षण देण्यासाठी औपचारिक प्रस्ताव योग्यवेळी लागू होईल. आरक्षणाच्या या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर हे आरक्षण लागू केले जाणार आहे''.\nदरम्यान, या सरकारी अधिकाऱ्याने याबाबत सांगितल्यानंतर पेट्रोलिम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही.\nसरकार government शिक्षण education आरक्षण पेट्रोल पेट्रोल पंप गॅस gas मंत्रालय petrol petrol pump\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lekh-news/loksatta-durga-2018-swaryoginee-dr-prabha-atre-expressed-views-1782896/", "date_download": "2019-03-25T08:22:39Z", "digest": "sha1:UOZINIB2TWCUC2UQDAE2DRSHNEUHBBU4", "length": 16094, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta durga 2018 Swaryoginee Dr Prabha Atre expressed views | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nकलेचा प्रांत सर्वाना जोडणारा\nकलेचा प्रांत सर्वाना जोडणारा\nउत्कृष्ट काम केलेल्या नऊ स्त्रियांच्या सन्मानाबरोबरच ‘लोकसत्ता’ने स्त्रीशक्तीचाही उत्सव साजरा केला आहे\nयंदा प्रथमच सुरू केलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे. आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत.\nविविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम केलेल्या नऊ स्त्रियांच्या सन्मानाबरोबरच ‘लोकसत्ता’ने स्त्रीशक्तीचाही उत्सव साजरा केला आहे. या विश्वात ज्या वाईट शक्ती आहेत, जे अमंगल आहे, असुंदर आहे त्याचा नाश करणाऱ्या दुर्गाशक्तीचा हा पुरस्कार आहे.\nईश्वराची माझ्यावर मोठी कृपा आहे. त्याने मला सुरांचे दान दिले. संगीत हे माझे उपजीविकेचे साधन असले तरी व्यवसाय म्हणून मला संगीताकडे कधी पाहता आले नाही. त्यामुळे व्यावहारिक स्तरावर माझे खूप नुकसान मी करून घेतले आहे, याची मला जाणीव आहे. मात्र, श्रोत्यांच्या जीवनात मी आनंद निर्माण करू शकते याचे मला खूप समाधान आहे. प्रत्येक मै��लीनंतर मिळणारा आनंद हा एक पुरस्कारच असतो. मात्र, त्याचबरोबर ‘लोकसत्ता’सारख्या प्रतिष्ठित माध्यमाकडून जेव्हा आपल्या योगदानाची दखल घेतली जाते, सार्वजनिक स्तरावर त्याचा सन्मान केला जातो, तेव्हा निश्चितच अधिक बळ मिळते. आज किती तरी वेगवेगळी कार्यक्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यात कलेचा प्रांत मात्र वेगळा आहे. सर्वाना जोडणारा, या विश्वातील गोष्टीचे एकमेकांशी नाते आहे असे सांगणारा, या विश्वातील जे सुंदर, मंगल, शाश्वत आहे त्याची जाणीव करून देणारा आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर जीवन कसे जगावे हे कलाच माणसाला शिकवते. कुठलेही कार्य करण्यासाठी जे मानसिक संतुलन आवश्यक असते ते कलांच्या सान्निध्यातच मिळू शकते. विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवाचे भौतिक जीवन निश्चितच सुसह्य़, सुखमय केले. पण जीवनाला कलांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत माणूस एक यांत्रिक जीवन जगत राहतो. मानवी जीवन परिपूर्ण होण्यासाठी विज्ञान – तंत्रज्ञान आणि कला यांनी एकमेकांचा हात धरून सतत चालत राहायला हवे. चंद्रावर रॉकेट पाठवणारा शास्त्रज्ञ जितका महत्त्वाचा आहे, तेवढाच चंद्रावर काव्य लिहिणारा कवीही महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. दुर्दैवाने कलांकडे मनोरंजन म्हणून पाहिले गेले. मात्र, आज कला, कलाकार यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चालला आहे ही समाधानाची गोष्ट आहे. डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी जेवढा अभ्यास करावा लागतो, त्यापेक्षा किती तरी जास्त साधना कलेमध्ये यश मिळवण्यासाठी करावी लागते. एवढेच नाही तर मंचप्रदर्शनाची संधी, नाव, पैसा, सन्मान अशा गोष्टी मिळवण्यासाठी सध्या आणखी एक वेगळी साधना शिकावी लागते. नशिबाची साथ तर लागतेच लागते.\nउत्तम कलाविष्कार हे कोणत्याही कलेचे अंतिम ध्येय असते. परंतु या बिंदूपर्यंत पोहोचणाऱ्या मार्गावर ज्या घटना घडत असतात, जे घटक त्यात कार्यरत असतात त्यांचा अभ्यास केल्याने कलाविष्काराचा दर्जा वाढतो. त्यात शिस्त येते. विज्ञानाच्या कसोटीवरही काही गोष्टी तपासता येतात. परंपरा आणि शास्त्र यात जाणते-अजाणतेपणी शिरलेल्या कालबाह्य़, अनावश्यक गोष्टी आत्मविश्वासाने मागे टाकता येतात. वैश्विक मंचावर भारतीय संगीताला आज मानाचे स्थान मिळाले आहे, ते टिकवायचे असेल, अधिक मजबूत करायचे असेल तर शास्त्र, परंपरा आणि कलाविष्कार यांच्यात मेळ हवा, एकवाक्यता हवी. याच भूमिकेतून संगीत प्रस्तुतीबरोबरच संगीताच्या इतर पैलूंकडेही मी जाणिवेने लक्ष दिले आहे. भारतीय संस्कृतीची मूल्ये जपत, काळाबरोबर वाहत जाणे आज गरजेचे झाले आहे. मी त्या खडतर मार्गावर चालते आहे. आपले विचार ठामपणे मांडण्यासाठी अनेकदा टोकाचा विरोध सहन करावा लागतो. एकीकडे सुरांची साधना करत असताना, दुसरीकडे झगडण्याचीही तयारी ठेवावी लागते. पुरस्कारप्राप्त नवदुर्गाचे कार्य पाहून अभिमान वाटतो. त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते. प्रत्येक व्यक्ती आपल्यातील दुर्गाशक्तीची जोपासना करेल अशी आशा व्यक्त करते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T08:12:32Z", "digest": "sha1:GZQ43453LF4C4DNFMITHU7ZAS4IRGTX4", "length": 15446, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सजू लागले बाप्पा! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआले गणराय : पवनमावळात कारागिरांची लगबग\nपवनानगर – गणेश भक्तांना ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतो, हा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाही घडविण्यात कारागीर मग्न आहेत. गणपती उत्सवाला 13 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असला तरी बाप्पाच्या आगमनाची लगबग मूर्तीकारामध्ये दिसून येत आहे.\nगणपतीच्या मूर्त्या आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रेखीव रंगरंगोटी सुरू असून, मूर्तिकार मनोभावे बाप्पावर रंगाचा हात फिरवत आहेत. 64 कलांचा अधिपतीही हाच गणेश आणि या श्रीगणेशाच्या मूर्त्या घडविणारेही त्याच्याच भक्तांचे हात.\nएकीकडे मूर्तिकारांच्या कलेतून मूर्त्यांना आकर्षक रूप दिले जात आहे. तर दुसरीकडे मंडळांना आणि घराघरातही बाप्पाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागले आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे दिवसेंदिवस मूर्त्यांची किंमतही वाढली असली तरी एक गोष्ट मात्र अद्याप कमी झालेली नाही आणि ती म्हणजे गणरायाचे स्वागत करण्यासाठी ओसंडून वाहणारा उत्साह व बाप्पाबदल प्रेम.\nश्री गणेशाचे अगदी कोणतेही रूप मन मोहवून टाकते. मग तो बालगणेश असो किंवा मनोहरी गणेशाची मूर्ती… जसा बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ येऊ लागला, तसा मूर्तिकारांच्या हातांनीही वेग घेतला आहे. आपली पूर्ण मेहनत झोकून दिवस-रात्र मूर्तिकारांनी बाप्पाची वेगवेगळी रूपे साकारायला सुरुवात केली आहे, तसेच दुसरीकडे गणेश भक्तांची त्याच्या आगमनाच्या जय्यत तयारीसाठी मंडप, देखाव्यांकडे विशेष लक्ष दिले आहे.\nआपल्या इच्छेनुसार गणेशभक्त मूर्त्यांची ऑर्डर देतात आणि आपल्या नातलगांना, गणेश उत्सवाला मित्रपरिवाराला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आतूर आहे. लहान मुले असो, मोठी माणसे असो किंवा ज्येष्ठ वर्ग असो, सर्वांवर बाप्पाच्या आगमनाचा रंग आता चढू लागला आहे. तर दुसरीकडे मूर्त्यां घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर काही ठिकाणी मूर्तिकार रंगरंगोटी करीत बाप्पांवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न आहेत.\nइकोफ्रेंडली गणपतींची मागणीही वाढली…\nसणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे त्याची जाण ठेवत गेल्या काही वर्षांपासून अनेक गणेशभक्तांनी आपले पाय “इकोफ्रेंडली गणेश मूर्त्यांकडे वळवले आहेत. शाडूच्या मातीपासून साकारल्या जाणाऱ्या मूर्त्यांपासून पर्यावरणाची हानी होत नाही आणि विसर्जनही योग्यरित्या होत असते. त्यामुळे यावर्षीही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शाडूच्या मूर्त्यांची मागणी वाढली आहे; मात्र दुसरीकडे तुलनेने शाडूच्या मूर्त्यांची किंमत अधिक असल्याने आपल्याला ��व्या असूनही त्या घेता येत नसल्याची खंतही अनेक भक्तांनी व्यक्त केली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे पाण्यात विघटन होत नाही. त्या तुलनेने शाडूच्या मातीच्या मूर्त्यांचे पाण्यात योग्य प्रकारे विसर्जन होते.\nयंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करावा…\nयावर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संकल्प करुया. केवळ शाडूच्या मूर्ती घेऊन न थांबता ध्वनिप्रदूषण होणार नाही. निर्माल्य विसर्जन समुद्रात करणार नाही, याचीही काळजी घेऊया आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुया, असे आवाहन करण्यात आले आहे.\nकच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे मूर्त्यांच्याही किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या जाचातून बाप्पांचीही सुटका झालेली नाही. “देवाच्या मूर्त्यांची किंमत करणे आम्हाला आवडत नाही, मात्र मालाची किंमत वाढली, तर नाईलाज म्हणून आम्हाला मूर्त्यांची किंमत वाढवावी लागते आणि त्याचा फटका भक्तांनाही बसतो. मात्र असे असूनही वाढती मागणी पाहता भक्तांचा वाढलेला उत्साह आम्हालाही बाप्पाचे नवे रूप साकारायला बळ देतो, व बाजाराता नवनवीन मूर्ती घडवण्यास बळ मिळत आहे.\n– सुरेश कुंभार, मूर्तिकार.\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार क���ा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-January2015-Aale.html", "date_download": "2019-03-25T08:01:02Z", "digest": "sha1:AWTISL3CPQIJTD5TMRVVMBVU6HRB54PU", "length": 4641, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेणखत न वापरताही उत्कृष्ट आले, हार्मोनीमुळे आले 'लागत' नाही", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेणखत न वापरताही उत्कृष्ट आले, हार्मोनीमुळे आले 'लागत' नाही\nश्री. विठ्ठल बाबुराव सुतार, मु.पो. किन्हई, ता. कोरेगाव, जि. सातारा. मोबा. ९८६०४७२८७२\n१ जून २०१४ रोजी एक एकर क्षेत्रावर गादी वाफ्यावर आले लागवड केली. प्रथम बेणे प्रक्रिया करताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांचे जर्मिनेटर १ लि. + बाविस्टीन २५० ग्रॅम + १५० लि. पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून यामध्ये बेणे भिजवून लागण केली.\nउगवणीनंतर एक महिन्यांनी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + राईपनर २५० मिली + न्युट्राटोन २५० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + हार्मोनी २५० मिली + १५० लि. पाणी या प्रमाणात पहिली फवारणी केली. फवारणी केल्यामुळे आल्याची वाढ व फुटावा चांगला, निरोगी होऊन प्लॉटवर काळोखी आली. फवारणीनंतर २० दिवसांनी वरीलप्रमाणे सर्व औषधांनी ड्रीपमधून आळवणी केली. आळवणी नंतर एका रोपापासून कमीत - कमी २० ते २५ फुटवे आलेले दिसून आले. मुख्य म्हणजे आले पिकाकरिता शेणखत अजिबात न वापरता आल्याची लागण यशस्वी झाली. आळवणीनंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व फवारण्या केल्या असता शेवटपर्यंत एकसारखी काळोखी व आले लागण्याचा जो प्रादुर्भाव असतो तो हार्मोनी या औषधामुळे अजिबात झाला नाही.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आणि तंत्रज्ञानाचा वापरामुळे एका एकरमध्ये कमीत - कमी ६५ - ७० गाड्या आले निघेल अशी अपेक्षा आहे. हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा यशस्वी प्रयोग किन्हई गावामध्ये प्रथमच दिसून आला.\nरासायनिक खत व किटकनाशक, बुरशीनाशक अत्यल्प प्रमाणात वापरले आहे. या भागामध्ये प्रथमच उत्तम प्रत व अधिक उत्पादनाची हमी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे दिसून येते. शेजारील गावातील शेतकरी आले प्लॉट कुतूहलाने बघण्यासाठी येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-TomatoDBT2.html", "date_download": "2019-03-25T07:52:47Z", "digest": "sha1:IEPHYAJBQHRSHSVAKWTI6AWQUW25L4HV", "length": 2195, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - ७ - ८ हजार रु. खर्च करून ७० - ८० हजार रु. टोमॅटोचे उत्पन्न", "raw_content": "\n७ - ८ हजार रु. खर्च करून ७० - ८० हजार रु. टोमॅटोचे उत्पन्न\nश्री. मल्हारी वामन आरेकर, मु.पो. बहुळ, ता. खेड, जि. पुणे\nचार वर्षापुर्वी थंडीत येणारी इंडम टोमॅटो १ एकर केली होती. रोपे जर्मिनेटर वापरून तयार केली. कल्पतरू खत माहित नसल्याने रासायनिक खते वापरली. पंचामृताच्या २ फवारण्या केल्या. माल भरपूर लागला होता. फुट झाली. १२ टन माल निघाला. ४० - ५० रु. १० किलो असा भाव मिळाला. दीड महिना टोमॅटो चालला. ७ - ८ हजार रु. खर्च झाला. खर्च जाऊन ७० - ८० हजार रु. झाले.\nचालूवर्षी टोमॅटोची लागवड जुलै २००३ ला केली. आता फळे चालू झाली आहेत. मात्र फळे पिकात नाहीत. आहे तशीच हिरवी राहतात. सरांच्या औषधांनी माल भरपूर लागून लवकर पक्व होतात. त्यासाठी पंचामृत औषधे घेऊन जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.longtopmining.com/mr/bqsbqw-mining-pump.html", "date_download": "2019-03-25T08:16:21Z", "digest": "sha1:Z2C4LMRCLS4FMGBU4CVRBJJORILFUEHQ", "length": 4638, "nlines": 183, "source_domain": "www.longtopmining.com", "title": "BQS (BQW) खनन पंप - चीन टिॅंजिन Longtop खनन", "raw_content": "\nखाण वापरले शक्ती उपकरणे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nखाण वापरले शक्ती उपकरणे\nJPB मालिका घासण्याचे हातरहाटाने वर ओढणे किंवा काढणे\nहवेच्या दाबावर चालणारा छप्पर चाळण\nहवेच्या दाबावर चालणारा खडक धान्य पेरण्याचे यंत्र\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमागील: BQG कान पंप\nपुढील: BQ मालिका विजेचा पंप\nमिनी पाण्याखाली पाणी पंप\nमिनी पाणी पाण्याखाली पंप\nBQ मालिका विजेचा पंप\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: खोली 716, ब इमारत, 5 Lanyuan रोड, Nankai जिल्हा, टिॅंजिन, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-president-ramnath-kovind-signs-reservation-bill-economically-backward-people-general", "date_download": "2019-03-25T08:12:54Z", "digest": "sha1:3I42CSA3S3Y6NR3PMLM73XLBC4EDXNQA", "length": 5927, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news president ramnath kovind signs reservation bill for economically backward people of general quota | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nसवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nसवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nसवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nशनिवार, 12 जानेवारी 2019\nनवी दिल्ली : सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाले आहे.\nनवी दिल्ली : सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाले आहे.\nसवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. या घोषणेनंतर लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर हे विधेयक संसदेच्या या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आले होते. या विधेयकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे हे विधेयक पाठविण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.\nदरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आर्थिक मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते.\nआरक्षण राष्ट्रपती रामनाथ कोविंद विधेयक शिक्षण education लोकसभा निवडणूक ramnath kovind reservation quota\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींवि��ोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/welcome-zindagi/", "date_download": "2019-03-25T08:03:25Z", "digest": "sha1:VPAQ2HWDVT6ILDTSUMQHBHP5YUKDQYLS", "length": 1949, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Welcome Zindagi - मराठी कलाकार", "raw_content": "\nपहा अदिती येवलेच्या विवाहसोहळ्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.\nअभिनेत्री अदिती येवलेचा विवाहसोहळा ह्या २३ डिसेंबर रोजी पार पडला असून त्याचे फोटोज आता बाहेर आले...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/paisa-paisa-marathi-movie-trailer/", "date_download": "2019-03-25T07:36:37Z", "digest": "sha1:EYK3HG7MIWPP4VKOE7N47EZ7IL2LQ5BA", "length": 5752, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Paisa Paisa Marathi Movie Official Trailer", "raw_content": "\nश्रेयस तळपदे झळकतोय या आगामी मराठी सिनेमात.\nसावळ्या विठ्ठलरुपी भुमिकेतील सचित पाटीलचा लूक तुम्ही पाहिलात का\nश्रेयस तळपदे झळकतोय या आगामी मराठी सिनेमात.\nसावळ्या विठ्ठलरुपी भुमिकेतील सचित पाटीलचा लूक तुम्ही पाहिलात का\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nमराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी विविध विषयांच्या हटके मांडणीची मेजवानीच. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे विषय आणि...\nबघायलाच हवा असा हॉरर,थ्रिलर आणि प्रथम मराठी सायफाय सिनेमाचा ट्रेलर.\nलव्हस्टोरी अथवा एक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस बॉलिवूड किंवा...\nठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.\nशिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित मच अवेटेड असलेल्या “ठाकरे” सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात...\nपूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत रीलीझ होणार ‘भाई-व्यक्ती की वल्ली’.पहा ट्रेलर.\nमहाराष्ट्राचे भूषण असलेले लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व...\nभाऊ कदमच्या विनोदी तडाक्यांनी भरलेला वास्तववादी सिनेमा ‘नशीबवान’.पहा ट्रेलर.\nएक कुटुंबवत्सल सफाई कर्मचारी सर्वसामान्य आयुष्य जगताना अचानक त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/forest-management-in-china-1284510/", "date_download": "2019-03-25T08:14:36Z", "digest": "sha1:P2ZQSPVHBVFHA5HH26ZTLB4H4NQITYFD", "length": 26350, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चीनमधील वन व्यवस्थापन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nचीनच्या औद्योगिक विकासाने निर्माण केलेले पर्यावरणाचे प्रश्न सर्वश्रुत आहेत.\nचीनने २०५० पर्यंतचे वनधोरण निश्चित केले असून देशातील एकूण जंगल क्षेत्रापकी सुमारे ६० टक्के भागांमध्ये वृक्षतोडीवर कडक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. तसेच २००० पासून दरवर्षी सुमारे ४.७ दशलक्ष हेक्टर जमिनीवर झाडे लावण्यात आली. याची फळे आता बघावयास मिळत आहेत..\nचीनच्या औद्योगिक विकासाने निर्माण केलेले पर्यावरणाचे प्रश्न सर्वश्रुत आहेत. माओच्या काळात शेतीची सामूहिक मालकी आणि उद्योगांचे गाव-केंद्रीकरण या प्रक्रियेत स्थानिक पर्यावरणाची मोठी हानी झाली होती. उदाहरणार्थ, प्रत्येक गावात लोखंड तयार करण्याच्या अट्टहासाने गावाच्या सभोवतालच्या झाडांची कत्तल करून लोखंड तयार करण्याच्या भट्टीत वापरण्यात आली होती. माओनंतरच्या काळात झालेल्या उद्योगांच्या आधुनिकीकरणाचा भर केवळ आणि केवळ उत्पादन वाढवण्यावर होता. एकीकडे त्यात रोजगारनिर्मितीला दुय्यम स्थान होते, तर दुसरीकडे पर्यावरण दखलपात्रसुद्धा नव्हते. या प्रक्रियेचे भीषण परिणाम चीनला भोगावे लागले. हे परिणाम केवळ चीनपुरते मर��यादित नव्हते, तर जागतिक तापमानवाढीत त्याचा मोठा वाटा होता. जागतिक तापमानवाढीने होत असलेल्या हवामानबदलाचा फटका सर्व जगाला बसत असताना चीन त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. सन १९९०च्या दशकात चीनला अनेक नसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. विशेषत: सन १९९७ मधील दुष्काळ आणि त्यानंतर वर्षभरातच यान्गसे नदीला आलेल्या प्रलयकारी पुरामुळे चीनच्या राज्यकर्त्यांनी पर्यावरण ऱ्हासाचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. चीनच्या पहाडी प्रदेशांमध्ये आणि मोठय़ा नद्यांच्या खोऱ्यात झालेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडून दुष्काळ आणि पुरासारख्या समस्यांचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष चीनच्या सरकारने काढला. यातून राज्यकर्त्यांनी पर्यावरणाच्या मुद्दय़ाला प्राथमिकता देण्यास सुरुवात केली. पुढील धोके टाळण्यासाठी चीनने पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. आíथक नफा कमावण्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर बंदी आणत चीनने पर्यावरण रक्षणासाठी पहिले ठोस पाऊल उचलले.\nसन १९९८ नंतर यान्गसे नदीचे प्रवाह क्षेत्र असलेल्या नैर्ऋत्य चीनमधील अनेक प्रांतांनी नदीच्या खोऱ्यांमध्ये वृक्षतोडीवर संपूर्ण र्निबध लादले. यानंतर दोन वर्षांनी चीनच्या केंद्रीय सरकारने ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत देशातील इतर अनेक भागांमध्ये या र्निबधांचा विस्तार केला. सन २००० ते २०५० अशा ५० वर्षांकरिता चीनच्या एकूण जंगल क्षेत्रापकी सुमारे ६० टक्के भागांमध्ये वृक्षतोडीवर कडक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. या काळात वृक्षतोडीवरील र्निबधांना वृक्षलागवडीची साथ देण्यात आली आणि दरवर्षी सुमारे ४.७ दशलक्ष हेक्टर जमिनीवर झाडे लावण्यात आली. याची फळे आता बघावयास मिळत आहेत. सन २००० मध्ये चीनमध्ये एकूण भूभागाच्या १६.६ टक्के क्षेत्र जंगलाधीन होते, जे १० वर्षांनी १८.२ टक्के झाले होते. ही आकडेवारी चीनच्या सरकारने दिली असली तरी विश्व बँक आणि इतर जागतिक संस्थांनी त्याला दुजोरा दिला आहे.\nमात्र ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रमा’ने चीनच्या सरकारपुढे नवीन समस्या उत्पन्न झाली. जंगलांतून, विशेषत: वृक्षतोडीतून, आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी चीनमध्ये अनेक सरकारी कंपन्या कार्यरत होत्या. या कंपन्या बंद पडल्यामुळे देशभरातील अक्षरश: ल��खो मजूर एका फटक्यात बेरोजगार झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्याचा विशेष आर्थिक कार्यक्रम चीनच्या सरकारला राबवावा लागला. याहीपेक्षा मोठे प्रश्न उभे ठाकले ते सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण नसलेल्या जंगलांच्या बाबतीत अशा जंगलांमधील पर्यावरणाचा ऱ्हास कसा मर्यादित करायचा आणि नियंत्रणात नसलेल्या पण ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या जंगलांमध्ये वृक्षतोड कशी थांबवायची हे किचकट मुद्दे सरकारपुढे आले. ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत समाविष्ट जंगलांमध्ये ६० टक्के क्षेत्र हे सरकारी नियंत्रणातील आहे, तर उर्वरित ४० टक्के क्षेत्र हे सामुदायिक मालकीचे आहे. म्हणजे माओने ज्या प्रकारे शेतीच्या जमिनीचे सामुदायीकरण केले होते त्याच प्रकारे चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात जंगलांची मालकी सामुदायिक प्रकारात मोडणारी आहे. यामध्ये शतकानुशतके परंपरागतरीत्या तयार झालेली आदिवासी गटांची जंगलावरील सामुदायिक मालकी आणि माओच्या काळात ग्रामीण समुदायांनी स्थापन केलेली सामुदायिक मालकी या दोन्हींचा समावेश आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये जंगलांवर सामुदायिक मालकी असलेले जनसमूह त्यांच्या दैनंदिन निर्वाहासाठी मोठय़ा प्रमाणात या जंगलातील उत्पादनांवर अवलंबून होते. मात्र ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत या जनसमूहांना जंगलापासून कोणत्याही प्रकारचा फायदा घेण्यापासून वंचित करण्यात आले. साहजिकच लाखो लोकांना याचा फटका बसला. अखेर सरकारला याची दखल घ्यावी लागली आणि अशा समूहांसाठी सरकारने वार्षिक नुकसानभरपाई योजनेची सुरुवात केली. मात्र या योजनेंतर्गत देण्यात येणारा निधी अत्यंत अपुरा असल्याचे आणि वन विभागामार्फत हा निधी इतर कार्यक्रमांसाठी वापरण्यात येत असल्याचे काही अभ्यासांतून निष्पन्न झाले आहे.\nजी जंगले सामुदायिक मालकीची आहेत मात्र ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही तिथे गाव-समित्यांद्वारे समुदायांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. खरे तर हे स्वातंत्र्य त्यांना सुरुवातीपासून होते. मात्र प्रत्यक्षात साम्यवादी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाद्वारे या संदर्भातील सर्व निर्णय घेतले जात. सन २००० नंतर गाव-समित्यांच्या निवडणुकींच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर नवे नेतृत्व उदयास आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. काही सर्वेक्षणानुसार आपल्या मालकीच्या जंगलांचे काय करायचे याचा निर्णय गावकऱ्यांच्या बठकीत घेण्यात येत आहेत. याबाबतीतला प्रत्येक निर्णय किमान दोन तृतीयांश बहुमताने घेण्यात येतो आहे. महत्त्वाचे म्हणजे, सामुदायिक मालकी कायम राखत वैयक्तिक कुटुंबांना जंगलाच्या काही भागांवर हक्क द्यायचे की नाही याचा निर्णयसुद्धा गाव-सभेत घेण्यात येतो आहे. विश्व बँक आणि फोर्ड प्रतिष्ठानने चीनमध्ये संयुक्तपणे केलेल्या अनेक अभ्यासांमधून असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत, की जंगलावर सामुदायिक अधिकार टिकवलेल्या गावांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे तसेच त्यातील बहुतांश गावे अल्पसंख्याक वांशिक गटाच्या समुदायाची आहेत. या गावांच्या गरजा मर्यादित असून तथाकथित आधुनिक उपकरणांची/ वस्तूंची तिथे वानवा आहे. दुसरीकडे, ज्या गावांनी जंगलातील साधनसंपत्तीचे अधिकार वैयक्तिक कुटुंबांना देऊ केले आहेत तिथे या निर्णयाच्या परिणामी ती कुटुंबे गरिबी रेषेच्या वर येत आहेत. ज्याप्रमाणे शेतीत आता शेतकरी कुटुंबांना दीर्घकालीन मालकी हक्क(सार्वकालीन नव्हे) मिळाले त्याच दिशेने जंगलावरील अधिकाराची वाटचाल सुरू झाली आहे. ज्या समुदायांचा निर्वाह केवळ जंगलांवर अवलंबून आहे तिथे कुटुंबांना स्वतंत्र मालकी हक्क न देता सामुदायिक हक्क राखण्याकडे गाव-सभेचा कल आहे. मात्र जिथे रोजगाराची इतर साधने उपलब्ध आहेत तिथे गावातील कुटुंबांना, काही कुटुंबांच्या समूहाला किंवा बाहेरील कंत्राटदारांना हक्क देण्याचे प्रकार वेगाने वाढले आहेत. ज्याप्रमाणे शेतजमिनीबाबत वैयक्तिक कुटुंबांना परस्पर हस्तांतरणाचे अधिकार देण्यात आले आहेत त्याप्रमाणे काही गावांमध्ये कुटुंबांना जंगलावरील मालकीचे हक्क देण्यात आले आहेत. थोडक्यात, आजच्या स्थितीला चीनमध्ये जंगलावरील अधिकार एक तर सरकारच्या वन विभागाकडे आहेत किंवा गावांकडे सामुदायिक पद्धतीने आहेत. यामध्ये समुदायांनी आता एकत्रितपणे किंवा बहुमताने निर्णय घेत आपल्या अधिकारातील जंगलांच्या व्यवस्थापनाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यातून, गावाची जंगलावरील सामुदायिक मालकी, काही कुटुंबांच्या गटाची मालकी, वैयक्तिक कुटुंबांची मालकी आणि कंत्राटी पद्धत असे विविध प्रकार अस्तित्वात आले आहेत.\nचीनमध्ये जंगल व्यवस्थापनाची दोन ठळक वैशिष्टय़े आहेत. एक, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे सरकारने सक्रिय होत उपाययोजना सुरू केली आहे, ज्यात वरून खाली निर्णय सोपवले जात आहेत. दोन, शेतजमीन सुधारणेचा सरळ प्रभाव जंगल व्यवस्थापनावर पडलेला दिसतो आहे आणि जंगलावरील मालकीची वाटचाल शेतजमिनीवरील मालकी हक्काच्या दिशेने सुरू आहे. ही प्रक्रिया अद्याप विकसित होत असून ग्रामसभेच्या उत्क्रांतीशी संलग्न झाली आहे.\n– परिमल माया सुधाकर\nलेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/app", "date_download": "2019-03-25T08:46:26Z", "digest": "sha1:SAYJWDSTLC2B4UKQKELHTRNA3WMCP7FP", "length": 9690, "nlines": 109, "source_domain": "gangadharmute.com", "title": " युगात्मा परिवार मोबाईल अॅप | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारच�� दहन\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nमुखपृष्ठ / युगात्मा परिवार मोबाईल अॅप\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी सोम, 18/09/2017 - 19:11 ह्यावेळी प्रकाशित केले.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nगुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन युगात्मा परिवार मोबाईल ऍप अपडेट UPDATE करा.\nकृपया इथे क्लिक करा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/home", "date_download": "2019-03-25T08:57:49Z", "digest": "sha1:6AFGLBE7J6Q7R3IL4LL57SWPYSLI6SC2", "length": 18016, "nlines": 311, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ४ अंगारमळा 347 09-12-2017 0\nशेतकरी चळवळीसाठी समाज माध्यमांची उपयोगिता चित्रफ़ित Vdo 285 08-12-2017 0\nकवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी साहित्य संमेलन 431 29-11-2017 0\n४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन शेतकरी साहित्य चळवळ 2,585 01-07-2017 22\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी साहित्य संमेलन 896 21-11-2017 0\nलोकशाहीचे दोहे ||१|| काव्यधारा 307 15-11-2017 0\nये तू मैदानात : शेतकरी गीत 1,343 14-11-2016\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 1,030 28-08-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,216 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,192 16-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,182 15-07-2016\nप्रकाशात शिरायासाठी 570 10-02-2017\nसामान्य चायवाला 677 13-02-2017\nसोज्वळ मदिरा 525 10-02-2017\nमी मराठी - स्पर्धा विजेती गझल 2,996 10-09-2011\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 770 06-07-2016\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका 831 09-07-2016\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका 1,431 04-01-2016\nनाच्याले नोट : नागपुरी तडका 1,008 09-12-2015\nनागपुरी तडका - ई पुस्तक 42,433 23-02-2013\nपलंग मोड��न व्हता : नागपुरी तडका 3,233 15-02-2013\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\nरंगताना रंगामध्ये 1,800 15-07-2011\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 1,030 28-08-2016\nनिसर्गकन्या : लावणी 1,086 23-07-2014\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,260 15-06-2011\nभ्रष्टाचार्यास हाण पाठी : पोवाडा 1,943 23-08-2011\nगवसला एक पाहुणा 1,112 15-07-2011\nरंगताना रंगामध्ये 1,800 15-07-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ 759 18-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,216 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,192 16-07-2016\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,770 11-06-2011\nशेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 3,560 26-06-2011\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,109 27-07-2011\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 3,911 26-09-2011\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,443 24-05-2014\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच 1,946 29-02-2012\nभारतीय सणांचे अनर्थशास्त्र 2,022 29-02-2012\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,770 11-06-2011\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nभाषेच्या गमती-जमती : भाग-२ 638 10-11-2016\nभाषेच्या गमती-जमती : भाग-१ 715 25-07-2016\nअशीही उत्तरे-भाग- १ 2,411 30-06-2011\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,233 15-02-2013\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,150 14-01-2013\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,568 24-06-2014\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,431 14-09-2014\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,377 25-07-2012\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी) 861 19-04-2014\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन 1,093 09-10-2013\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 2,335 02-07-2011\nशहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 1,047 16-03-2016\nशेती, शेतकरी आणि गझल - अॅग्रोवन 1,679 12-05-2015\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 777 30-11-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 957 24-06-2014\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,443 24-05-2014\nविद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती 1,126 16-04-2013\nशेगाव आनंदसागर 1,169 15-09-2011\nडोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 1,175 15-09-2011\nसह्यांद्रीच्या कुशीत 1,179 11-09-2015\nचित्रकूट, वाराणसी, सारनाथ, हरिव्दार, ॠषिकेश 1,167 01-08-2011\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 2,822 23-05-2011\nनागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 3,258 16-08-2013\nरामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुपती 974 12-09-2011\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/ramesh-dev-images/", "date_download": "2019-03-25T07:41:51Z", "digest": "sha1:TNREH7PJKGS24L7JDQS5XJZC5GLXF2QW", "length": 1898, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " ramesh dev images - मराठी कलाकार", "raw_content": "\n९० वर्षांच्या “ह्या” जेष्ठ अभिनेत्याची “छत्रीवाली” मालिकेत एंट्री\nबऱ्याच कालावधीनंतर मराठी सिनेमातील दिग्गज अभिनेते रमेश देव यांची छोट्या पडद्यावर झलक आपल्याला स्टार प्रवाह वरील...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/bjps-suresh-pawar-becomes-laturs-mayor-46985", "date_download": "2019-03-25T08:11:14Z", "digest": "sha1:B2BBORHJ2KS3QDP5JIWYT2A6E7ZCDVDM", "length": 14457, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP's Suresh Pawar becomes Latur's Mayor लातूरच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nलातूरच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार\nसोमवार, 22 मे 2017\nभाजपचा एकही नगरसेवक कॉंग्रेसला फोडता आला नाही. नगरसेवकांच्या एकीमुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सुरेश पवार यांना 36 मते मिळाली. तर उपमहापौर पदाचे उमेदवार देविदास काळे यांना देखील तितकीच मते मिळाली. भाजपच्या विजयानंतर लातूर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला\nलातूर : महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार यांची तर उपमहापौरपदी भाजपच्याच देविदास काळे यांची निवड करण्यात आली. काठावरचे बहुमत असल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडणार, भाजपचे नगरसेवक कॉंग्रेसच्या गळाला लागणार अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या.\nप्रत्यक्षात भाजपच्या सर्व 36 नगरसेवकांमधील एकजूट शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे सुरेश पवार व देविदास काळे यांना निवडणुकीत 36 मते पडली. तर कॉंग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाच्या पांठिब्याने 34 मते मिळाली. भाजपच्या सुरेश पवार यांनी त्यांच्या 36 विरुद्ध 34 मतांनी पराभव केला.\nलातूर महापालिकेत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेली भाजप झिरो टू हिरो ठरली होती. 36 जागा जिंकत बहुमत मिळविल्यावरही महापौरपद आपल्याकडे राखण्यात भाजपला यश येते की नाही, कॉंग्रेस फोडाफोडीचे राजकारण करून पुन्हा सत्ता मिळविणार का याबाबत गेले काही दिवस लातुरात चर्चा रंगल्या होत्या.\nपण त्या हवेतील गोळीबारच ठरल्या. भाजपचा एकही नगरसेवक कॉंग्रेसला फोडता आला नाही. नगरसेवकांच्या एकीमुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सुरेश पवार यांना 36 मते मिळाली. तर उपमहापौर पदाचे उमेदवार देविदास काळे यांना देखील तितकीच मते मिळाली. भाजपच्या विजयानंतर लातूर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला.\nराष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मणियार यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ��मेदवार विक्रांत गोजमगुंडे यांना पाठिंबा देत मतदान केले. पण त्यानंतरही कॉंग्रेसचे संख्याबळ 34 एवढेच झाले. त्यामुळे चमत्काराची भाषा करणारी कॉंग्रेस चांगलीच तोंडघशी पडली.\nLoksabha 2019 : ईशान्य मुंबईत तिरंगी लढत\nभांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची...\nLoksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम...\nLoksabha 2019 : मुले पळवणारी टोळी मुंबईतही\nमुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत....\nLoksabha 2019 : अमित शहांविरोधात राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री लढणार\nगांधीनगर : गांधीनगर मतदारसंघातून लढत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गुजरातचे माजी...\nLoksabha 2019 : गडकरी, पटोलेंचे आज शक्तिप्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल करणार\nनागपूर - नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, सर्वच इच्छुक जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करतील...\nLoksabha 2019 : 'हुक्केरींच्या विरोधात कत्ती की जोल्ले\nनिपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता बरेच दिवस ताणली गेली. अखेर काँग्रेसने खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-lohgaon-airport-evaluation-88732", "date_download": "2019-03-25T08:49:10Z", "digest": "sha1:GYA2NXSP652BMUEYRFA2C2OFGY5H7Y5E", "length": 15987, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news lohgaon airport evaluation लोहगाव विमानतळाचे मूल्यांकन होणार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nलोहगाव विमानतळाचे मूल्यांकन होणार\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nपुणे - देशातील काही ठराविक विमानतळांवरील हवाई वाहतुकीत झालेल्या वाढीमुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी पुढील सात महिन्यांच्या हवाई वाहतुकीचे विशेष मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पुण्यातील लोहगाव विमानतळाचाही समावेश करण्यात आला आहे.\nपुणे - देशातील काही ठराविक विमानतळांवरील हवाई वाहतुकीत झालेल्या वाढीमुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी पुढील सात महिन्यांच्या हवाई वाहतुकीचे विशेष मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पुण्यातील लोहगाव विमानतळाचाही समावेश करण्यात आला आहे.\nविमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी या परीक्षणाचा फायदा होणार आहे. भारतीय विमान कंपन्यांनी एक हजाराहून अधिक नवीन विमानांची मागणी केली असून, येत्या काळात ती दाखल होतील.\nत्यामुळे भारतातील देशांतर्गत विमानसेवा ही जगातील तीन क्रमांकाची सेवा ठरणार आहे. त्या वेळी विमानतळांची क्षमता वाढविणे मोठे आव्हान असणार आहे. उपलब्ध टर्मिनलची क्षमता आणि प्रवासीवाढीचा अंदाज याचा विचार केला जाणार आहे. त्याबरोबरच विमानतळावर येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अन्य बाबींही तपासल्या जाणार आहेत. त्यामध्ये बॅगेज ट्रॉली, वाहन पार्किंग, काउंटर यांचा समावेश आहे. यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nइंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या (आयटा) अहवालानुसार हवाई वाहतुकीमध्ये भारत इंग्लंडला मागे टाकून 2026 पर्यंत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावेल. भारतातील विमान प्रवाशांची सध्याची वार्षिक संख्या सुमारे 12 कोटी आहे. 2035 पर्यंत ती 44 कोटी 20 लाखांच्या घरात पोचेल, असे या अहवालात म्हटले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकता या महानगरांतील विमानतळांवरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.\nत्याबरोबरच पुणे, जयपूर, श्रीनगर, लखनौ, डेहराडून आदी महत्त्वाच्या विमानतळांवरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत आहे. सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशनने (सीएपीए) देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. देशात अग्रस्थानी असलेल्या विमानतळांवरील प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ होणार आहे, असेही सीएपीएने म्हटले आहे.\nगेल्या तीन वर्षांत लोहगाव विमानतळावर प्रवासी संख्येत जवळपास 30 लाख प्रवाशांची संख्या वाढली आहे. येत्या काही वर्षांत ही संख्या जवळपास एक कोटीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नॉन मेट्रोच्या यादीत पुणे शहर येत असल्यामुळे आणि हवाई प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे लोहगावचा समावेश या योजनेत करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nLoksabha 2019 : पुण्यात रंगणार बापट विरुद्ध गायकवाड सामना\nपुणे : काँग्रेसकडून पुण्याच्या जागेवर अजूनही चर्चाच सुरु असताना, प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे...\nपुण्यातील गुंडाकडून आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार\nवाई (सातारा) - आनेवाडी टोलनाक्यावर टोल भरण्यावरून पुणे येथील सराईत गुंड रोहीदास उर्फ बापु चोरगे याने व त्याच्या एका साथीदाराने साताऱ्याहून पुण्याकडे...\n#WeCareForPune बंडगार्डन परिसरात पदपथावर अतिक्रमण\nपुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल...\nमिरज-कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण वेगात\nसांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे....\n#WeCareForPune कुठे आहे प्रथमोपचार पेटी\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील ताथवडे उद्यानजवळ प्रथमोपचार पेटी असल्याचा बोर्ड लावला आहे. पण तेथून प्रथमोपचार पेटी गायब झालेली आहे. तरी कृपया...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंट���\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-nanduramadhyameshwar-sanctuary-birds-80103", "date_download": "2019-03-25T08:57:06Z", "digest": "sha1:I3VOR7G25CFKFJIMUPSN4RMFQG6ILS2F", "length": 13105, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Nanduramadhyameshwar sanctuary birds नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात १९५२६ पक्षी दाखल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nनांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात १९५२६ पक्षी दाखल\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nनिफाड, नांदूरमध्यमेश्वर - नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश- विदेशातील पक्षी दाखल झाले आहेत. आज वन्यजीव विभागाने घेतलेल्या पक्षी गणनेत देश-विदेशातील १९ हजार ५२६ विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले.\nनिफाड, नांदूरमध्यमेश्वर - नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश- विदेशातील पक्षी दाखल झाले आहेत. आज वन्यजीव विभागाने घेतलेल्या पक्षी गणनेत देश-विदेशातील १९ हजार ५२६ विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले.\nऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हजारो मैलांचा प्रवास करीत पक्षी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. या धरण क्षेत्रात २४ प्रकारचे मासे, ४०० पेक्षा अधिक पानवनस्पती, २५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. दर वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात येथील तापमान ० ते १२ अंश सेल्सिअस असते. याच कालावधीत सैबेरिया, मंगोलिया, हिमालय, अफगाणिस्तान आदी ठिकाणांहून येथे पक्षी येतात. यातील काही पक्षी, तर येथेच स्थायिक झाले आहेत.\nअभयारण्यात आगमन झालेल्या पक्ष्यांची दर महिन्याला गणना करण्यात येते. आज झालेल्या गणनेत सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, (नाशिक), वनपरिमंडळ अधिकारी पी. के. आगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे, पक्षीमित्र गंगाधर आघाव, दत्ता उगावकर, डॉ. उत्तम डेर्ले, प्रा. आर. बी. पाटील, किरण बेलेकर, राहुल वडघुले, तसेच वनविभाग गाइड अमोल दराडे, प्रमोद दराडे, वनसमिती सदस्य शंकर लोखंडे, अमोल डोंगरे, रोशन पोटे, पंकज चव्हाण, शंतनू चव्हाण, ओमकार चव्हाण आदींनी गणना केली.\nभांबुर्डा वनक्षेत्रातील मोर���ंचे अस्तित्व धोक्यात\nपौड रस्ता - भांबुर्डा वनविहार क्षेत्रात सातशेहून अधिक मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे...\nटिपेश्वर अभयारण्यात वाघाचा मृत्यू\nपांढरकवडा : वन्यजीव विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७)...\nLoksabha 2019 : रावेर लोकसभा मतदारसंघ : खडसेंच्या वलयाने भाजपचे अबाधित वर्चस्व\nखानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे....\nचांगल्या छायाचित्रासाठी जंगलाशी समरस व्हावे रानभूल महोत्सवात\nपुणे : \"जंगलात गेल्यावर चांगले छायाचित्र मिळवायचे असेल, तर छायाचित्रकारांनी तेथील परिस्थितीशी समरस होणे महत्त्वाचे आहे. कॅमेऱ्यासमोर असलेल्या...\nवाघिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण\nदेवलापार - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे एका चार ते पाच वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला...\n‘रानभूल’ महोत्सव आजपासून सुरू\nपुणे - ‘रानभूल’ वन्यजीव महोत्सव येत्या शुक्रवारपासून (ता. ८) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृहात सुरू होत आहे. रविवारपर्यंत (ता. १०)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/618", "date_download": "2019-03-25T08:54:09Z", "digest": "sha1:CINAH6UYEMQBMGOEVPBIELQOMKMKSNRD", "length": 14124, "nlines": 132, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मढे मोजण्याला | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्���कारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / मढे मोजण्याला\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी सोम, 28/07/2014 - 04:28 ह्यावेळी प्रकाशित केले.\nससे वाकुल्या दावती पारध्याला\nनको पाडसा आज कळपास सोडू\nचुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला\nजवानीत होता उतावीळ श्रावण\nअता फ़ागही ना विचारीत त्याला\nतुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे\nकुणी येत नाही मढे मोजण्याला\nकरा की नका काम कोणी पुसेना\nबिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला\nइथे देवळाच्या चिखल भोवताली\nस्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला\n- गंगाधर मुटे \"अभय\"\nइथे देवळाच्या चिखल भोवताली\nस्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला\nहा शेर कळत नाहीये किंवा उलगडत नाहीये म्हणून हा शेर चुकला आहे, असे काहिंनी मत व्यक्त केले आहे. त्या निमित्ताने या शेराविषयी थोडासा उहापोह. (खरं तर कवीला आपल्या काव्याचा उलगडा करण्याची वेळ येऊच नये.)\nकच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप��रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे.\nशेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते.\nभारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यासारख्या शहरांना आणि शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय \"अभय\" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे......\n\"इंडिया\"ला शासकीय \"अभय\" आहे म्हणून \"तिथे\" स्मशाने चकाचक आहेत. \"भारत\" बेवारस आहे म्हणून \"इथे\" सारं काही बकाल आहे.\nअसा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधि��� माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rbi-launches-new-batch-rs-500-notes-52328", "date_download": "2019-03-25T08:44:22Z", "digest": "sha1:J2NOQRZQKER3BEZRBMRVFVR6R2H3VQMU", "length": 11466, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "RBI launches new batch of Rs 500 notes पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nपाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार\nमंगळवार, 13 जून 2017\nगेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नोटादेखील वैध राहतील. नव्या नोटांची रचनादेखील प्रचलित नोटांसारखीच आहे\nमुंबई: रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच पाचशे रुपयांची नवी नोट छापणार आहे.\nआरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणाऱ्या नव्या नोटेवर 'A' हे इनसेट अक्षर असेल, असे वृत्त आहे. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नोटादेखील वैध राहतील. नव्या नोटांची रचनादेखील प्रचलित नोटांसारखीच आहे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.\nगेल्यावर्षी 16 डिसेंबरला महात्मा गांधी (न्यू) श्रेणीत पाचशेच्या नव्या नोटा छापण्याची घोषणा करण्यात आली होती. या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनलवर 'E' अक्षर आणि मागील बाजूस स्वच्छ भारतचा लोगो छापण्यात आला होता. काही नोटांवर उपसर्ग आणि आकड्याच्या मध्ये * चिन्ह छापण्याविषयी सांगण्यात आले होते.\nसुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला,...\nLoksabha 2019 : तोफखाना सज्ज; बंदुकाही रोखल्या\nमोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या...\nLoksabha 2019: चौकीदारीची उठाठेव (श्रीराम पवार)\nप्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं ���दोउदो...\nखिशात पाचशे रुपये ठेवून व्यवसाय कसा करायचा\nनागपूर : निवडणूक आयोगाने पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बाळगल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. व्यापाऱ्यांनी पाचशे रुपये खिशात ठेवून व्यवसाय कसा...\nLoksabha 2019 : दहशतवाद्यांवर हल्ल्याचा सल्ला मी दिला - पवार\nचाकण - ‘पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीस जवान मृत्युमुखी पडले. त्यानंतर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ‘...\nप्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय चर्चेचा ओघ आपल्याला हवा तिकडे वळविण्याचा प्रयत्न करून सत्ताधारी आपली सोय पाहात असतात. अशावेळी ही चर्चा योग्य मार्गावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/asian-games-2018-india-team-135391", "date_download": "2019-03-25T08:18:07Z", "digest": "sha1:A3FMKDZPV5MZHOJEARWXKX7DJ2FAQNIG", "length": 12393, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Asian Games 2018 India Team फुगवलेल्या भारतीय संघास टाचणी? | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nफुगवलेल्या भारतीय संघास टाचणी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nनवी दिल्ली / मुंबई - सातत्याने फुगवल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पथकास अखेर संयोजकांनी टाचणी लावली आहे. मुदत संपल्यानंतर पाठवलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यास संयोजकांनी नकार दिल्याचे समजते.\nनवी दिल्ली / मुंबई - सातत्याने फुगवल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पथकास अखेर संयोजकांनी टाचणी लावली आहे. मुदत संपल्यानंतर पाठवलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यास संयोजकांनी नकार दिल्याचे समजते.\nन्यायालयात धाव घेत तायक्वांदोच्या तीन खेळाडू, तसेच बोट रेस संघाने भारतीय ऑलिंपिक संघटनेस आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपली निवड करण्यास भाग पाडले. भारतीय ऑलिंपिक संघटनेने त्यांची नावेही पाठवली, पण संयोजकांनी अद्याप ती स्वीकारली��� नसल्याचे समजते. ‘आयओए’ने यास दुजोरा दिला आहे, पण क्रीडा मंत्रालयास अद्याप याची काहीही कल्पना नाही.\nप्रथम अश्वारोहक त्यानंतर तायक्वांदो स्पर्धक न्यायालयात गेले.\nन्यायालयाच्या आदेशानुसार यांचा संघात समावेश करण्यात आला. हेच बोट रेसिंग संघाबाबत घडले. आता या सर्व प्रवेशिकांबाबतची संदिग्धता ११ ऑगस्टपर्यंत कायम राहील. त्यादिवशी जकार्तामध्ये सदस्य नोंदणी समितीची बैठक आहे. त्या वेळी अंतिम निर्णय होईल.\nLoksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम...\nLoksabha 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी 26 लाख शाईच्या बाटल्यांची ऑर्डर\nम्हैसूर - निवडणुक आयोगाने लेकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शाई. मतदान...\nLoksabha 2019 : नाट्यमयरित्या सुटला रामटेकचा तिढा\nनागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर उत्तमराव गजभिये यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून...\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nजगज्जेता पंकज अडवाणी बिलियर्डस निवडणुकीत पराभूत\nबंगळूर, ता. 24 : पंकज अडवाणीस भारतीय बिलियर्डस् आणि स्नूकर महासंघाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली. महासंघाचे उपाध्यक्ष होण्यात अपयशी ठरल्यावर...\nबाजारासाठी निवडणूक किती महत्त्वाची\nआता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pune-municipal-border-and-34-gaon-54283", "date_download": "2019-03-25T08:31:42Z", "digest": "sha1:RLX6ZVD33AAP24Y4X4VRR6QEVJNQCS2Q", "length": 14254, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pune municipal border and 34 gaon 'महपालिका हद्दीलगतची 34 गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\n'महपालिका हद्दीलगतची 34 गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत'\nबुधवार, 21 जून 2017\nपुणे : महपालिका हद्दीलगतची 34 गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत सामावून घेण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, यासंदर्भातील सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर ते निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले आहे.\nपुणे : महपालिका हद्दीलगतची 34 गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत सामावून घेण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, यासंदर्भातील सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर ते निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले आहे.\nहद्दीलगतची गावे महापालिकेत घेण्याबाबत हवेली तालुका कृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही गावे सामावून घेण्याबाबत येत्या तीन आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांच्यासमवेत मुंबईत बुधवारी बैठक झाली. पुण्यातील आमदारांसह, राज्य सरकार आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nगावे सामावून घेण्याबाबत लोकप्रनिधी आणि अधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. गावे घेण्यासंदर्भात दोन वेगवेगळी मतप्रवाह बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला. मात्र, ही गावाने टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेतली जाईल, असे बापट यांनी बैठकीनंतर सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा\nजिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nयोगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीना��ा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\n#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद\nLoksabha 2019 : पुण्यात रंगणार बापट विरुद्ध गायकवाड सामना\nपुणे : काँग्रेसकडून पुण्याच्या जागेवर अजूनही चर्चाच सुरु असताना, प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे...\nLoksabha 2019 : भाजप वॉर रूम अद्यापही थंडच\nपुणे - सोशल मीडियावरून आक्रमकपणे प्रचारासाठी ‘वॉर’ रूमचे महत्त्व असले तरी, भाजपने अद्याप ती सुरूच केलेली नाही. शहर भाजपच्या अधिकृत फेसबुकवर...\nLoksabha 2019 : पुण्यातील निवडणूक प्रतिष्ठेची - गिरीश बापट\nपुणे - ‘‘गेल्या दहा-वीस वर्षांपासून शहरात केवळ डीपी, मेट्रोसह इतर कामांची चर्चा होती. परंतु गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्याचा विकास आराखडा मंजूर...\nLoksabha 2019 : बापट यांचा सामना कोणाशी\nपुणे : भाजपने अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कॉंग्रेस आता कोणाला उमेदवारी देणार, याबाबतची उत्सुकता वाढली...\nLokSabha 2019 : पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल यांना भाजपची उमेदवारी\nपुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भाजपने या...\nLoksabha 2019 : शिरोळेंची उमेदवारी का नाकारली\nकामात चोख, वक्तशीरपणा, पक्षाची शिस्त पाळणारा लोकप्रतिनिधी म्हणून पाच वर्षात प्रतिमा तयार करून ही खासदार अनिल शिरोळे यांनी उमेदवारी भाजप नेतुत्वाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/spine-road-work-stop-139227", "date_download": "2019-03-25T08:42:10Z", "digest": "sha1:AE52AQYBO2GTHR7AHJ4F2K4TSHMSRVE3", "length": 19187, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "spine road work stop स्पाइन रस्त्याला ३०० मीटरचा ‘खोडा’ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nस्पाइन रस्त्याला ३०० मीटरचा ‘खोडा’\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nपिंपरी - पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता उभारला आहे. मात्र, महापालिका आणि प्राधिकरण यांच्या त्रिवेणीनगर येथील डीपी प्लॅनमध्ये फरक आहे. त्यामुळे काही नागरिकांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील केवळ तीनशे मीटरचा रस्ता सुमारे पंधरा वर्षांपासून रखडला असून, स्पाइन रस्त्याच्या मार्गात तो मोठा अडथळा ठरत आहे.\nपिंपरी - पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता उभारला आहे. मात्र, महापालिका आणि प्राधिकरण यांच्या त्रिवेणीनगर येथील डीपी प्लॅनमध्ये फरक आहे. त्यामुळे काही नागरिकांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील केवळ तीनशे मीटरचा रस्ता सुमारे पंधरा वर्षांपासून रखडला असून, स्पाइन रस्त्याच्या मार्गात तो मोठा अडथळा ठरत आहे.\nऔद्योगिक, व्यापारी आणि निवासी क्षेत्रांसाठी दळणवळण सोयीचे व्हावे, यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रोडची आखणी केली होती. पुणे-नाशिक, पुणे-मुंबई आणि मुंबई-बंगळरू (देहूरोड-कात्रज बाह्यवळण) महामार्ग जोडण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यासाठी प्राधिकरण व महापालिका यांनी १९८६-९६ असा संयुक्त डीपी प्लॅन तयार केला होता. त्यानुसार ७५ मीटर स्पाइन रस्ता विकसित करण्याचे नियोजन होते. प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीतील रस्त्याची उभारणी पूर्ण केली आहे. त्याचे काम दहा वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, त्रिवेणीनगर येथे सुमारे तीनशे मीटरचा रस्ता रखडला आहे. हा भाग महापालिकेच्या हद्दीत येत आहे. या ठिकाणी महापालिकेच्या डीपी प्लॅननुसार स्पाइन रस्ता प्राधिकरणाच्या १९८६च्या डीपीपेक्षा सुमारे ३० मीटरने दक्षिणेकडे दर्शविलेला आहे. त्यानुसार सुमारे ४० मिळकतधारक जास्त बाधित होत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी हरकत घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त डीपीनुसार किंवा उपलब्ध जागेतच रस्ता करावा. मात्र, महापालिका स्वतःच्या डीपीवर ठाम राहिल्यामुळे रस्ता रखडला आहे.\nत्रिवेण���नगर येथील तीनशे मीटर रस्ता पूर्ण झाल्यास वाहनचालकांना थेट जाणे सोयीचे होणार आहे. सध्या वाहनचालकांना कस्तुरी मार्केट, थरमॅक्स चौक, यमुनानगर या रस्त्यांचा किंवा कृष्णानगरमधील छोट्या गल्लीचा वापर करावा लागतो. स्पाइन रस्ता पूर्ण झाल्यास वाल्हेकरवाडीमार्गे औंध-रावेत बीआरटी रोड व बाह्यवळण मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हाच रोड एचसीएमटीआर (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) म्हणून ओळखला जात आहे.\nप्राधिकरणाच्या डीपीनुसार बाधित मिळकती ९२ असून, एकूण क्षेत्र २८० गुंठे आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार बाधित मिळकती १२८ असून, एकूण क्षेत्र ३६० गुंठे आहे. त्यामुळे जवळपास ३६ मिळकती आणि ८० गुंठे जागा जास्त बाधित होत आहेत.\nप्राधिकरणाच्या डीपीनुसार बाधित मिळकती ९२ असून, एकूण क्षेत्र २८० गुंठे आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार बाधित मिळकती सुमारे ७६ आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या डीपीनुसार जवळपास १६ मिळकती जास्त बाधित होत आहेत. त्यामुळे महापालिकेचा डीपी योग्य आहे.\nसेक्टर ११ मध्ये स्थलांतर\nस्पाइन रस्त्यामुळे त्रिवेणीनगर येथे बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना प्राधिकरणातील सेक्टर ११ मध्ये पर्यायी जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी १.४५ हेक्टरचा भूखंड राखीव आहे. प्रत्येक मिळकतधारकास १२५० चौरस फुटांचा भूखंड दिला जाणार आहे. त्यापोटी महापालिकेने १६ कोटी ६५ लाख रुपये प्राधिकरणाला दिले आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सेक्टर ११ मधील भूखंड प्राधिकरणाच्या डीपीमुळे बाधित होणाऱ्या ९२ मिळकतधारकांसाठी पुरेसा आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार जादाचे सुमारे ३६ मिळकतधारक बाधित होत असल्यामुळे आणखी ७५ गुंठ्यांची आवश्यकता आहे. तशी मागणीही महापालिकेने प्राधिकरणाकडे केली आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार रस्ता झाल्यास त्याला दोन ठिकाणी वळणे येणार असून, वाहतुकीस तो धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे प्राधिकरणाच्या डीपीनुसारच स्पाइन रस्ता झाला पाहिजे.\nअसा आहे स्पाइन रस्ता\nएकूण लांबी ९.१ किलोमीटर\nरस्त्याची रुंदी ७५ मीटर\nएमसीएमटीआर रुंदी ३० मीटर\nदोन्ही बाजूचा रस्ता २२.५ मीटर\nदेशात यंदा अन्नधान्य उत्पादनात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी घट\nनाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग��च्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी...\nLoksabha 2019 : दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी\nवणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांचे...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील 'हाय व्होल्टेज' लढती कोणत्या\nमहाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या,...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nबिबट्याच्या डरकाळ्यांनी हादरले पाथर्डी\nइंदिरानगर,(नाशिक) : पाथर्डी शिवारात उसाच्या शेतातून डरकाळ्या फोडणार्या बिबट्यामुळे आज (गुरुवार) परिसरात दहशत पसरली. पाथर्डी गावातून वाडीचे रान...\nहोळीसाठी गावी परतणार्या नवदाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nसटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/shriram-pawar-write-nrc-article-saptarang-137178", "date_download": "2019-03-25T08:13:47Z", "digest": "sha1:IHBIQGABNY5RIJYV3MP5DH75Z57GKE5Q", "length": 41024, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "shriram pawar write nrc article in saptarang नागरिकत्वाचं आसामी कोडं... (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nनागरिकत्वाचं आसामी कोडं... (श्रीराम पवार)\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nआसाममध्ये परकी घुसखोरांवर म्हणजे बांगलादेशातून तिथं येऊन स्थायिक झालेल्यांवर स्थानिकांचा रोष आहे. त्यातून तिथं अनेक चळवळींच�� उगम झाला. कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं हे ठरवण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (एनआरसी) मोहीम राबवण्याचं सरकारनं ठरवलं.\nआसाममध्ये परकी घुसखोरांवर म्हणजे बांगलादेशातून तिथं येऊन स्थायिक झालेल्यांवर स्थानिकांचा रोष आहे. त्यातून तिथं अनेक चळवळींचा उगम झाला. कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं हे ठरवण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (एनआरसी) मोहीम राबवण्याचं सरकारनं ठरवलं.\nया नोंदणीतून तयार झालेल्या या याद्यांमध्ये आसामातल्या सुमारे 40 लाख लोकांची नावं नाहीत. कालपर्यंत देशाचे नागरिक म्हणून मतदान करण्यापासून रेशनकार्डापर्यंत सारे अधिकार असलेली ही माणसं अचानक \"नागरिक नाहीत' अशा सावटाखाली आली. \"ही यादी तात्पुरती आहे,' वगैरे खुलासा सरकारनं केला आहे. मात्र, या 40 लाखांच्या भारतातल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागलं आहे आणि ते सरकारनं अधिकृतपणे लावलं आहे. याप्रकरणी राजकारण केलं जाणं अटळच होतं, तसं ते केलं गेलंही.\n\"एनआरसी'नं टाकलेलं हे आसामी कोडं कोणत्याही सरकारची कसोटी पाहणारं आहे.\nआसाममध्ये परकीय नागरिकांना शोधण्यासाठीच्या मोहिमेतले नागरिकता नोंदणीचे तपशील जाहीर झाले आहेत. जो मुद्दा किमान 40 वर्षं तिथं चर्चेत आहे, ज्यावरून अनेकदा रणकंदन माजलं होतं, तो नव्यानं धुमाकूळ घालतो आहे. आसाममध्ये स्थलांतरितांची समस्या होती आणि आहे हे मुळातच नाकारण्यात अर्थ नाही. बांगलादेशी घुसखोर किंवा स्थलांतरितांचा प्रश्न दीर्घ काळचा आहे. या लोंढ्यांनी ईशान्येकडच्या राज्यांत मूळच्या संस्कृतीवरच घाला घातल्याची तिथली भावना आहे. यावरचा मार्ग म्हणजे \"घुसखोरांना शोधा आणि परत पाठवा'. मात्र, हे सांगणं जितकं सोपं आहे तितकं ते प्रत्यक्षात आणणं सोपं नाही. तसंच या नव्यानं आलेल्या आणि आता काही पिढ्या बस्तान ठोकलेल्या मंडळींच्या मतपेढ्या तयार झाल्या आहेत. साहजिकच यात राजकारणही शिरलं आहे. आता ज्या नागरिकांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत, त्यांत 60-70 वर्षं किंवा अधिकही वास्तव्य करणाऱ्या अनेकांची नावं गायब आहेत. यात लष्करी सेवेतून निवृत्त झालेले, खेळाडू, साहित्यिक अशा अनेक मान्यवर घटकांचा समावेश आहे. त्यावरून गदारोळ माजणं स्वाभाविकच. नागरिकता नोंदणीची मोहीम राबवण्यात भाजप सरकारचा पुढाकार आहे. यात दिसणाऱ्या त्रुटींवर बोट ठेवत विरोधक झोडपून काढू लागले आहेत. यात सर्वात आक्रमक आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. आसाममधले प्रश्न आणि त्यांतलं राजकारण अनपेक्षित नसलं तरी यानिमित्तानं देशात ध्रुवीकरणाला चालना देणारा जो कार्यक्रम सुरू झाला आहे तो चिंताजनकच.\nआसाममधला प्रश्न हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला असल्याचा एक सोईचा समज करून दिला जात आहे. यातला मुद्दा समजावून न घेता आरडाओरडा करत चालणाऱ्या चॅनेलचर्चांनी यात भरच टाकली आहे. हे सारं 2019 च्या निवडणुकीत मतांचं पीक काढण्याला उपयोगाचं असेलही; मात्र मूळ प्रश्न आसामी स्थानिक आणि नंतर आलेले बंगाली भाषा बोलणारे यांच्यातला आहे. यात बंगाली बोलणारे बहुसंख्य मुस्लिम असले तरी तो मुद्दा \"हिंदू विरुद्ध मुस्लिम' असा नाही. तो \"स्थानिक विरुद्ध बाहेरचे' असा आहे. या बाहेरच्यांमध्ये बांगलादेशातून आलेले मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, तसंच पश्चिम बंगालमधून आसामात आलेलेही आहेत. ईशान्येतल्या अन्य राज्यांतही हा \"बंगाली विरुद्ध स्थानिक' असा वाद आहेच. मुद्दा बाहेरून आलेले बांगलादेशी किंवा बंगालीभाषक हे मजुरीपलीकडं जाऊन सर्वच क्षेत्रांत जे वर्चस्व तयार करू लागले आहेत, त्याला स्थानिकांचा विरोध आहे. बांगलादेशातून आलेल्यांमध्ये मुस्लिम अधिक असले तरी सारेच मुस्लिम नाहीत, त्यात हिंदूही आहेत. मात्र, खुद्द अमित शहांसह भाजपचा सारा फौजफाटा ज्या रीतीनं या प्रश्नात बोलत आहे, तो निवडणुकीची रणनीती दाखवणारा आहे. आसामपुरता असलेला प्रश्न अन्य राज्यांतही नेऊन सोईची मतविभागणी करण्याचा हा प्रयत्न आहे. \"प्रश्नाला धार्मिक रंग फासायचा, त्यात आम्ही बहुसंख्याकांच्या बाजूनं उभे आहोत, बाकी सारे अल्पसंख्याकांचं कथित लांगूलचालन करणारे' असं चित्र तयार करायचं आणि पाठोपाठ त्याला देशभक्तीचा तडका द्यायचा, त्यात देशभक्त ते काय आम्हीच आणि आम्हाला विरोध करेल तो देशविरोधी अशी ढोबळ मांडणी करायची, हे यातलं तंत्र आहे. ममतांपासून कॉंग्रेससह डावेही या सापळ्यात अडकत चालले आहेत. हेच तर भाजपाला हवं असेल. निवडणुकीत मागच्या वेळी दिलेल्या आश्वासनांवर चर्चा होण्यापेक्षा जात, धर्म, कोण देशभक्त असल्या मुद्द्यांवर चर्चा घडवणं राज्यकर्त्यांसाठी लाभाचंच.\nआसाममध्ये परकी घुसखोरांवर म्हणजे बांगलादेशातून तिथं येऊन स्थायिक झालेल���यांवर रोष आहे. त्यातून तिथं अनेक चळवळींचा उगम झाला. कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं हे ठरवण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (एनआरसी) मोहीम राबवण्याचं सरकारनं ठरवलं.\nसर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. या नोंदणीतून तयार झालेल्या आसाममधल्या अधिकृततेचा शिक्का मिळालेल्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आणि नव्या गोंधळाला तोंड फटलं. या याद्यांमध्ये आसामातल्या सुमारे 40 लाख लोकांची नावं नाहीत. कालपर्यंत देशाचे नागरिक म्हणून मतदान करण्यापासून रेशनकार्डापर्यंत सारे अधिकार असलेली ही माणसं अचानक \"नागरिक नाहीत' अशा सावटाखाली आली. आता \"ही यादी तात्पुरती आहे, तीत सुधारणेला वाव आहे' वगैरे खुलासे केले जात आहेत. मात्र, या 40 लाखांच्या भारतातल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागलं आहे आणि ते सरकारनं अधिकृतपणे लावलं आहे. या साऱ्याचा अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना कोणत्याही अधिकारापासून वंचित करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं जाहीरही केलं आहे. मात्र, तोवरच त्यांना \"घुसपैठिये' ठरवण्याची अमित शहा आणि मंडळींची लगबग लक्षणीय आहे. यात घुसखोर असतीलही. मात्र, सारेच तसे नाहीत. अजून तसं सिद्धही झालेलं नाही.\nआसाम औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागास, तसेच महापुराचा सर्वाधिक धोका असणारं राज्य आहे. संधींचा अभाव आणि त्यात वाढणारे वाटेकरी यांतूनही तणावात भर पडली आहे. मूळ आसामी आणि बंगाली यांच्यातल्या संघर्षाचं मूळही यातच आहे. बंगालीभाषकांचा किंवा बांगलादेशींचा मोठा प्रवाह 1971 च्या युद्धाच्या वेळी आला हे खरं आहे. मात्र, त्याआधी सुमारे 150 वर्षं ब्रिटिशांनी आसामातल्या शेतीसाठी बंगाली मजुरांचं स्थलांतर केलं. त्याही आधी किमान 1500 वर्षं बंगाली लोक आसामच्या बराक, ब्रह्मपुत्रा खोऱ्यातून वास्तव्याला आहेत. सत्तरच्या दशकात बाहेरच्यांच्या विरोधातली खदखद लक्षणीय बनली आणि ऐंशीच्या दशकात त्यातून अत्यंत हिंसक आंदोलनं झाली. आसाममधल्या \"आतले आणि बाहेरचे' या वादातली स्थित्यंतरंही अभ्यासण्यासारखी आहेत. सुरवातीला \"ऑल आसाम स्टुडंट्स युनियन' आणि \"आसाम गणसंग्राम परिषद' यांचं आंदोलन \"बाहेरच्यां'विरोधात होतं, म्हणजे आसामबाहेरून तिथं गेलेल्या साऱ्यांविरोधात. नंतर ते परकीयांविरोधात झालं, म्हणजे अन्य देशांतून आसामात आलेल्यांना ��िरोध हे स्वरूप त्याला आलं, पुढं ते बांगलादेशींविरोधात एकवटलं. आता \"आसाममधले घुसखोर म्हणजे बागंलादेशी' अशीच कल्पना झाली आहे. बांगलादेशी मोठ्या प्रमाणात भारतात आले ते 1971 च्या युद्धाच्या वेळी. पूर्व पाकिस्तान किंवा आताच्या बांगलादेशात झालेल्या हिंसाचारातून आणि अत्याचारांतून मोठ्या संख्येनं लोक लगतच्या भारतीय राज्यांत आले. यात हिंदूंचा सहभाग मोठा होता. त्याही आधी बंगालीभाषकांचं आसाम आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांत स्थलांतर सुरू होतं. पश्चिम बंगालमध्ये भाषा आणि सांस्कृतिक साधर्म्यामुळं या स्थलांतराचा प्रश्न तितका गंभीर बनला नाही. तिथलं कम्युनिस्ट सरकारही याबाबतीत कधीच आक्रमक नव्हतं. आसाममध्ये मात्र बंगालीभाषकांना मूळच्या आसामी संस्कृतीवरचं आक्रमण मानलं गेलं. यातूनच तणाव सुरू झाला. याचं पर्यवसान अनेकदा हिंसाचारात झालं. \"बांगलादेशी घुसखोर' हा बहुतेक निवडणुकांतला राजकीय पोळ्या भाजायचा मुद्दा असतो. आता एनआरसीनंतर तर हा देशव्यापी मुद्दा बनवायची स्पर्धाच सुरू होईल. या नोंदणीसाठी आसाममधल्या तीन कोटी 29 लाख 91 हजार 384 लोकांनी अर्ज केला होता, त्यातल्या दोन कोटी 89 लाख 83 हजार 677 जणांचा दावा मान्य झाला आहे, तर 40 लाख 7707 लोक संशयित ठरले आहेत. भाजपनं त्यांना घुसखोर ठरवून टाकलं आहे. या मोहिमेचं नेतृत्व त्यांच्या पक्षाध्यक्षांनीच हाती घेतलं आहे. यावरून भाजपला राजकीयदृष्ट्या या मुद्द्याला देशभर हवा द्यायची आहे, हेच दिसतं. नागरिक शोधण्याच्या किंवा परकीय नागरिक वेचण्याच्या या मोहिमेत एकाच घरातले काही सदस्य नागरिक ठरले आहेत, तर काही नाहीत बाप-मुलगा, भाऊ-भाऊ यांच्यातल्या एकाचा दावा मान्य, दुसऱ्याचा अमान्य असे कित्येक प्रकार झाले आहेत. म्हणजेच जी काही प्रक्रिया राबवली गेली आहे ती त्रुटींनी भरलेली आहे. आता याकडं बोट दाखवेल तो घुसखोरांचा समर्थक असल्यासारखा कांगावा केला जातो आहे. तो मुळातच देशहितापेक्षा राजकारणातल्या लाभ-हानीची गणितं पाहणारा आहे. घुसखोर शोधण्याच्या प्रयत्नांना विरोधाचं कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही प्रक्रिया सुरू झाली ती कॉंग्रेसच्या सत्ताकाळात सुरू झाली हे खरंच आहे. मात्र, ती पूर्ण होऊन त्यावरच्या आक्षेपांचं निराकरण न्यायालय करत नाही, तोवर घुसखोरीचे शिक्के मारण्यात काय अर्थ आहे बाप-मुलगा, भाऊ-भाऊ यांच्यातल्या एकाचा दावा मान्य, दुसऱ्याचा अमान्य असे कित्येक प्रकार झाले आहेत. म्हणजेच जी काही प्रक्रिया राबवली गेली आहे ती त्रुटींनी भरलेली आहे. आता याकडं बोट दाखवेल तो घुसखोरांचा समर्थक असल्यासारखा कांगावा केला जातो आहे. तो मुळातच देशहितापेक्षा राजकारणातल्या लाभ-हानीची गणितं पाहणारा आहे. घुसखोर शोधण्याच्या प्रयत्नांना विरोधाचं कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही प्रक्रिया सुरू झाली ती कॉंग्रेसच्या सत्ताकाळात सुरू झाली हे खरंच आहे. मात्र, ती पूर्ण होऊन त्यावरच्या आक्षेपांचं निराकरण न्यायालय करत नाही, तोवर घुसखोरीचे शिक्के मारण्यात काय अर्थ आहे अर्थात ही वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि मधल्या काळात निवडणूक येऊ घातली आहे. साहजिकच एवढं थांबण्यापेक्षा जे हाती लागलं, त्यावरून एका समाजाला धोपटून ध्रुवीकरण करता येत असेल तर आणखी काय हवं अर्थात ही वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि मधल्या काळात निवडणूक येऊ घातली आहे. साहजिकच एवढं थांबण्यापेक्षा जे हाती लागलं, त्यावरून एका समाजाला धोपटून ध्रुवीकरण करता येत असेल तर आणखी काय हवं हेच तर राजकारणाचं सूत्र बनलं आहे.\n-मुद्दा आसामपुरता न ठेवता तो देशाच्या अन्य भागांत नेण्याचा प्रयत्न हा याच रणनीतीचा भाग आहे. घुसखोर प्रामुख्यानं मुस्लिम आहेत, त्यांना हाकलण्यात आडवे येणारे सारे मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारे, त्यासाठी देशाच्या संरक्षणाशी खेळणारे, देशहितविरोधी वगैरे ठरवायचा खेळ सुरू झाला आहे. बेकायदा राहणाऱ्यांवरून राजकीय रण माजणार हे तर दिसतंच आहे. यात भाजपनं जशी उडी घेतली आहे, तशीच तृणमूल कॉंग्रेसनं आणि कॉंग्रेसनंही घेतली आहे. यात कॉंग्रेसला \"स्थलांतरितांची उघड बाजू घेणं म्हणजे भाजपच्या डावपेचाला बळी पडणं आहे,' याची जाणीव झालेली दिसते. यातून कॉंग्रेसनं \"एनआरसी ही मुळातच कॉंग्रेसची कल्पना आहे आणि डॉ. मनमोहनसिंगांच्या कारकीर्दीत छाननीची सुरवात झाली' यावर भर द्यायला सुरवात केली आहे. एका बाजूला \"एनआरसीचं पितृत्व आमचंच' असं म्हणायचं आणि दुसरीकडं ममतांनाही साथ द्यायची, यातून कॉंग्रेसचा गोंधळच दिसतो. तृणमूलच्या ममता बॅनर्जी मात्र याप्रश्नी प्रचंड आक्रमक आहेत आणि त्यामागं बंगाली राजकरण आहे. घुसखोरांना हाकलून लावा म्हणून लोकसभेत आग्रह धरणाऱ्या ममता इतक्या का बदलल्���ा याचं कारण म्हणजे, आता आसाममधल्या वादाला \"आसामी विरुद्ध बंगाली' अशी किनारही आली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये काहीही करून शिरकाव करण्याचं भाजपचं धोरण आहे. त्यात आसाममधल्या बांगलादेशींचा मुद्दा पश्चिम बंगालमध्येही चालवून ममतांना हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्न होईल हे स्पष्ट आहे. त्याविरोधात तितक्याच आक्रमकपणे स्थलांतरितांची बाजू घेऊन रक्तपाताचे इशारे ममता देत आहेत. त्यात भाजप बंगालींना विरोध करतो आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या प्रचारनीतीचं सूत्र कुणाला तरी खलनायकाच्या रंगात रंगवण्याचं आहे. आसाममधल्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावर कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचे भाजपचे प्रयत्न असतील. मात्र, कॉंग्रेस ज्या सावधपणे प्रतिक्रिया देत आहे, ती पाहता \"ममता विरुद्ध भाजप' असं स्वरूप या लढाईला येऊ घातलं आहे. अर्थात भाजपला हा मुद्दा आसाम आणि पश्चिम बंगालपुरता न ठेवता देशभर आम्ही बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात आहोत, इतर पक्षांचं काय, असा करायचा आहे. यातून अप्रत्यक्षपणे ध्रुवीकरणाला बळ द्यायचं आहे.\nआसाममधल्या 40 लाख जणांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्हं लागलं आहे. आता त्यांना अपिलाची संधी दिली जाईल. पुन्हा कागदपत्रं जमा करायला सांगितली जातील. त्यानंतरही नागरिकत्व सिद्ध न झाल्यास न्यायालयात दादही मागता येईल. इतकं सारं झाल्यानंतर जे काही घुसखोर निष्पन्न होतील, त्यांचं काय करणार हा खरा मुद्दा आहे. यूपीएच्या कार्यकाळात बेकायदा राहणाऱ्या सुमारे 82 हजार जणांना परत पाठवण्यात आलं होतं, तर भाजप सरकारच्या काळात ही संख्या दोन हजारही नाही. बेकायदा राहणाऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठवावं हा झाला सरळ उपाय. मात्र, बांगलादेश त्यांना स्वीकारायला तयार नाही. बांगलादेशच्या परराष्ट्र खात्यानं हे स्पष्टच केलं आहे. या स्थितीत अशा लाखो माणसांचं करायचं काय हा मुद्दा आहे. घुसखोरांना परत मूळ देशात पाठवणं ही सोपी बाब नाही. अशा लाखोंच्या बंदिशाळा चालवणंही जिकिरीचं; शिवाय जगाची टीका ओढवून घेणारं ठरेल. त्यांना कामाचा परवाना द्यावा, नागरिकत्वाचे अधिकार देऊ नयेत असा एक मार्ग सांगितला जातो. तोही अमलात आणणं सोपं नाही. दुसरीकडं नागरिकत्व सिद्ध न करू शकलेल्या सगळ्यांना परत पाठवायचं की त्यात धर्माचा निकष लावायचा हाही पेच आहे. नागरिकत्वाच्या कायद्यात प्रस्तावित केलेले बदल स्थलांतरित परकी नागरिकांसाठी धर्मनिहाय वेगळी भूमिका घेणारे आहेत...जे मतगठ्ठ्यांच्या राजकारणाला लाभदायक असेलही; मात्र देश म्हणून आपण जे समन्यायाचं तत्त्व स्वीकारलं आहे त्याचं काय अल्पसंख्याकांचे मतांसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी लांगूलचालन किंवा फाजील लाड जसे वाईट, तसेच त्यावर उतारा म्हणून बुहसंख्याकवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही तितकाच वाईट आहे. राज्यघटनेनं धर्म, जात अशा कोणत्याही आधारावर वेगळी वागणूक देता येणार नाही, असं आपण राष्ट्र म्हणून ठरवलं आहे. आता मतांच्या बेगमीसाठी त्यालाही तिलांजली दिली जाणार काय हा मुद्दा आहे. या सगळ्या प्रक्रियेनंतरही जे बेकायदा वास्तव्य करणारे ठरतील, त्यांचं भवितव्य ठरवणं जिकिरीचं आहे. एनआरसीनं टाकलेलं हे आसामी कोडं कोणत्याही सरकारची कसोटी पाहणारं आहे.\nLoksabha 2019: चौकीदारीची उठाठेव (श्रीराम पवार)\nप्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो...\nवेळ हिशेब मांडण्याची (श्रीराम पवार)\nलोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येते दीड-दोन महिने प्रचाराची रणधुमाळी उडेल.सरकारनं दिलेली आश्वासनं किती प्रमाणात प्रत्यक्षात आली, याचा जमा-...\nम्युझिकल हीलिंगने जागवले सोलापूरकरांत चैतन्य\nसोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने \"सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या...\nफसलेलं 'डील' (श्रीराम पवार)\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग यांच्यातल्या दुसऱ्या शिखर बैठकीकडं जगाचं लक्ष होतं. सिंगापूरपाठोपाठ हनोईतल्या...\nहवाई धक्का, लक्ष्मणरेषा बदलणारा (श्रीराम पवार)\nपाकिस्तानी नागरिक अथवा लष्करावर हल्ले न करता दहशतवाद्यांविरोधात, मात्र प्रसंगी पाकच्या भूमीत हल्ले करू हा थेट इशारा भारतानं बालाकोटमधल्या कारवाईनं...\nखरोखरच कोल्हापूरचा नाद खुळा\nकोल्हापूर - खरोखरच कोल्हापूरचा नाद खुळा. येथील पांढरा-तांबडा जसा आहे, तसाच येथील गोडवा आहे. त्यामुळेच येथून पाऊल बाहेर पडत नाही, असे भावूक उद्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090322/main.htm", "date_download": "2019-03-25T08:18:19Z", "digest": "sha1:IE7V6JTZQA4T2ROJVVI56E3XAY52TFVC", "length": 15953, "nlines": 36, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार, २२ मार्च २००९\nविनायक दळवी, मुंबई, २१ मार्च\nन्यूझीलंडमध्ये आज इतिहास घडला. हॅमिल्टन कसोटी जिंकून भारतीय क्रिकेट संघाने ३२ वर्षांनी विजयाचा इतिहास घडविला. या इतिहासाचे कर्ते पुरुष होते सचिन तेंडुलकर, हरभजनसिंग, झहीर खान, इशान्त शर्मा, मुनाफ इत्यादी.. इत्यादी त्या सर्वामधला ज्येष्ठ होता सचिन तेंडुलकर. इतिहासाचे नवे पान लिहिता लिहिता या लिटिल मास्टरने त्या इतिहासावर नव्या आदर्शाची वेलबुट्टी काढली. सचिन तेंडुलकरने आपल्या सहकाऱ्यांसाठी एकमेकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची नवी परिमाणे निश्चित केली. पूर्वी राजे-महाराजे दर्जेदार कामगिरी करणाऱ्यांना आपला रत्नजडित कंठा बक्षीस द्यायचे. सचिनने आपल्या हातातले सोन्याचे ब्रेसलेट सहा बळी घेणाऱ्या हरभजनसिंगला बक्षीस दिले. सोन्याचे हे ‘ब्रेसलेट’ सचिनसाठी सुदैवी ठरले होते.\nमोहन भागवत नवे सरसंघचालक\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकपदी मोहन भागवत आणि सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांची आज नियुक्ती करण्यात आली. मावळते सरसंघचालक सुदर्शन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदत्याग करण्याची व्यक्त केलेली इच्छा मान्य करून भागवत यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. आज सकाळपासूनच संघ वर्तुळाला या बदलाचे वेध लागले होते. सकाळपासूनच नागपुरातील स्वयंसेवकांनी सायंकाळी संघ कार्यालयाच्या परिसरात जमावे, असे निरोप देण्यास सुरुवात झाली आणि संघातील संभाव्य बदलांची चाहूल लागली. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा सध्या रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरात सुरू आहे. या प्रतिनिधी सभेत नव्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. सरसंघचालक पदासाठी मात्र निवडणूक होत नसते. मावळते सरसंघचालक नवीन सरसंघचालकांच्या नावाची घोषणा करतात. मावळते सरसंघचालक कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन हे त्यांच्या पदावर कायम राहतील, असा अंदाज कालपर्यंत व्यक्त केला जात होता. परंतु आज सकाळी काही वेगवान घडामोडी घडल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग हे निवडणुकीतील व्यस्ततेमुळे प्रतिनिधी सभेत येणार नाहीत असे संघाच्या अ.भा. प्रचार प्रमुखांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. तथापि राजनाथसिंग आज सकाळी तातडीने येथे आले. त्यामुळे काहीतरी महत्त्वाची घडामोड होणार, याची चाहूल लागली.\nकाँग्रेसच्या अटींमुळे पवारांपुढे पेच\nनवी दिल्ली, २१ मार्च/खास प्रतिनिधी\nमहाराष्ट्रात जातीयवादी तत्त्वांविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेससोबत युती करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नाही, असे निसंदिग्धपणे जाहीर करावे तसेच लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला सोडून जाणार नाही याची हमी द्यावी, अशा अटी काँग्रेसश्रेष्ठींनी घातल्यामुळेच उभय पक्षांदरम्यानची जागावाटपाची बोलणी पुढे सरकत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.\nहॅमिल्टन, २१ मार्च / पीटीआय\nन्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज ऑफ स्पिनर हरभजनपुढे लोटांगण घातले. भज्जीने घेतलेल्या अर्धा डझन बळींमुळे भारताने न्यूझीलंडच्या मातीत तब्बल ३३ वर्षांंनंतर कसोटी विजय नोंदविला. न्यूझीलंडला १० विकेट्सनी पराभूत करून भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हरभजनने ६३ धावांच्या मोबदल्यात यजमानांचे ६ फलंदाज माघारी धाडले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात २७९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पहिल्या डावातही किवी संघाला एवढीच धावसंख्या गाठता आली होती. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात केवळ ३८ धावांची आघाडी घेतल्यानंतर राहुल द्रविड व गौतम गंभीर यांनी ही धावसंख्या ५.२ षटकांत पूर्ण करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने यापूर्वी १९७६मध्ये ऑकलंड येथे आठ विकेट्सनी न्यूझीलंडवर विजय मिळविला होता. ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. भारतीय संघ आता मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असून १९६८ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका जिंकली होती. सचिन तेंडुल��रने केलेल्या १६० धावांमुळे भारताने आपल्या पहिल्या डावात ५२०धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या डावात भारताला २४१ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडची अवस्था पाहता एका डावाने भारतीय संघ विजय मिळविल अशीच चिन्हे होती, पण ब्रेन्डन मॅकक्युलम (८४) आणि डॅनियल फ्लिन (६७) तसेच ओब्रायन यांनी केलेल्या चिवट खेळामुळे ३८ धावांची आघाडी घेण्यात न्यूझीलंडला यश आले. भारताची आता दुसरी कसोटी २६ मार्चपासून नेपियर येथे होणार आहे.\nआयपीएलचे भवितव्य आज ठरणार\nनागपूर, २१ मार्च/ प्रतिनिधी\nसुरक्षेच्या मुद्यावरून केंद्र सरकारने कोंडी केलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या इंडियन प्रिमियर लीगचे दुसरे पर्व दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यासाठी आयोजकांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. कुठल्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पार पाडायचीच, असा निर्धार बीसीसीआयच्या थिंकटँकने केला असून त्यासाठी हा पर्यायही त्यांनी खुला ठेवला आहे. यासाठीच उद्या, मुंबईला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्य समितीची बैठक तातडीने आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत आयपीएलचे भवितव्य ठरणार आहे. उद्या होणाऱ्या बोर्डाच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर दुपापर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे आयपीएलच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. एक तर स्पर्धेतील सामन्यांमध्ये कपात करणे, दुसरे म्हणजे, काही सामने भारतात आणि उर्वरित सामने परदेशात आयोजित करणे आणि तिसरे म्हणजे, स्पर्धाच रद्द करणे, असे तीन पर्याय आमच्यापुढे शिल्लक आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलचे दुसरे पर्व आयोजित करण्यासाठी सहर्ष सहमती दर्शवली असून बोर्डाचा ही स्पर्धा सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेल्या इंग्लंडमध्ये आयोजित करण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसोमालियन चाच्यांकडून १६ भारतीय ओलीस\nमुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी\nसोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी सोमालियन चाच्यांनी एका जहाजाचे अपहरण केले. या अपहृत जहाजावरील १६ भारतीयांना चाच्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती नौकानयन महासंचालकांनी दिली आहे. सोमालियन चाच्यांनी आज सकाळी साडेदहा वाजता सदर जहाजाचे अपहरण करुन त्यावरील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याचे नौकानयन महासंचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. भात, गहू, रिफाइण्ड तेल व अन्य प्रकारचा माल घेवून जाणारे हे जहाज दुबईहून मोगादिशूकडे जात असताना सोमालियन चाच्यांनी त्याचे अपरहण केले आहे. एडनच्या आखातातील भारतीय नौदलाच्या जहाजांसह मित्रराष्ट्रांच्या फौजांना याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांना ओलिसांच्या मदतीला जाण्यास सांगितले असल्याचे नौकानयन महासंचालकांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/news-morning-conversation-reached-137504", "date_download": "2019-03-25T08:23:27Z", "digest": "sha1:GNVULZVAOBKY5SK3TIBLH7FHXFNJV6F5", "length": 11275, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "News of the morning conversation reached संवादच्या बातमीची दखल ; पालिकेने कचरा उचलला | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसंवादच्या बातमीची दखल ; पालिकेने कचरा उचलला\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nकोथरुड : कोंकण एक्स्प्रेस हॉटेल येथील अनुपम कॉम्प्लेक्स प्रवेशद्वारा जवळील फुटवेअर विक्रेत्याचे बूथ स्थलांतिरत जागेवरच कचरा टाकला जातो. या कचऱ्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. अशी बातमी सकाळ संवाद मध्ये काल प्रसिध्द झाली. २४ तासात बातमीची दखल घेत महापालिकेने येथील कचरा उचलला. सकाळचे आणि महापालिकेचे आभार.\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nLoksabha 2019 : अर्ज भरताना तरी 'युती की जय हो' म्हणा\nसोलापूर - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १९९३च्या पोटनिवडणुकीत आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोलाची मदत केली होती. त्यामुळे अनेकांना आमदारकीची...\nLoksabha 2019 : महास्वामी म्हणाले, किती माताधिक्य द्या\nसोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. र��जकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर...\n#WeCareForPune बंडगार्डन परिसरात पदपथावर अतिक्रमण\nपुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल...\n#WeCareForPune फलक कोसळून अपघाताची शक्यता\nपुणे : कात्रज नऱ्हे रस्त्य़ावर भुमकर चौकात दिशादर्शक फलक धोकादायक अवस्थेत लटकत असून केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. तरी याकडे गांभीर्याने लक्ष...\nLoksabha 2019 : आघाडीत एकजूट; युतीत दिलजमाई बाकी\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/again-ats-take-action-aurangabad-138874", "date_download": "2019-03-25T08:47:43Z", "digest": "sha1:RA7TZ3WTGIWSHA5E2DPOBNGAY2JX2GLZ", "length": 11456, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Again ATS take action in Aurangabad औरंगाबादेत एटीएसची पुन्हा कारवाई | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nऔरंगाबादेत एटीएसची पुन्हा कारवाई\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nऔरंगाबादेतील सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर तपास यंत्रणा कसून झडतीसत्र राबवित आहे. त्यांनी मंगळवारी पहाटे देवळाईत एका घराची झडती घेतली हे घर सचिन अंदुरेच्या चुलत भावाचे असल्यासाचे समजते.\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर तपास यंत्रणा कसून झडतीसत्र राबवित आहे. त्यांनी मंगळवारी पहाटे देवळाईत एका घराची झडती घेतली हे घर सचिन अंदुरेच्या चुलत भावाचे असल्यासाचे समजते.\nसूत्रांनी माहिती दिली की एटीएसच्या पथकाने देवळाई भागात पहाटे कारवाईबाबतची कल्पना स्थानिक पोलिसांना दिली. स्थानिक पोलिसानी या कारवाईबाबत दुजोरा दिला आहे.\nबीडबायपास परिसरातील देवळाईच्या मनजीत प्राइड ये��े एका घरात झडती घेण्यात आली तिथे एटीएसला नेमके काय हाती लागले हे स्पष्ट कळू शकले नाही. दरम्यान तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत अाहे याला मात्र, अधिकृत दुजोरा मिळाला नाही.\nबारमधील उधळपट्टीवर ‘सत्कर्म’चा तोडगा\nमुंबई - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडदेवच्या इंडियाना बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोठडीत रात्र घालवायची नसेल, तर त्यांनी बदलापूरच्या सत्कर्म...\nपुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्या...\nसातारा - अनेक ठिकाणी बोकडाच्या मटणाने ५०० रुपयांचा टप्पा ओलांडला. अंडीही महागली. तरी आजही मटणाच्या दुकानांपुढील रांगा वाढतच असून, या पार्श्वभूमीवर...\nLoksabha 2019 : ...गंगाकी लहर किसके संग\nउत्तर प्रदेशातील धार्मिकतेचे वातावरण आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांची सांगड घालत मतदारांना आवाहन करण्याच्या हेतूने काँग्रेस नेत्या प्रियांका...\nआता लक्ष मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीकडे\nपाटण - कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणासह राज्यातील सात जिल्ह्यांत १३ ठिकाणी १२ फेब्रुवारीपासून कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू...\n#TrafficIssue पुणेकरांची होणार कोंडीतून सुटका\nपुणे - शहरातील वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून त्यावर आधारित उपाययोजनांचा आराखडा वाहतूक पोलिसांनी तयार केला आहे. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/interesting-history-behind-ind-pak-border/", "date_download": "2019-03-25T08:21:07Z", "digest": "sha1:RPP2HP3BLUIFUOFH3UTD3MPNNNG6KOWK", "length": 15158, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारत-पाक सीमा कश्याने बनली होती माहितीये? उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारत-पाक सीमा कश्याने ब��ली होती माहितीये उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nभारत आणि पाकिस्तानमध्ये आज खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. रोजच्या रोज दोन्ही देशांतील संबंध अजूनच बिघडत चालले आहेत. काश्मीरमध्ये उडणाऱ्या खटक्यांचे पडसाद आज दोन्ही देशांमध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि आता या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची लक्षणे खूपच कमी दिसून येत आहेत. मिडीया आणि राजकीय परिस्थितीने आज भारत आणि पाकिस्तानला एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू बनवले आहे. पण एक असा काळ होता, जेव्हा काही वर्षांपूर्वी हेच दोन देश बंधुभावाने एकत्र नांदत होते. १९४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण एका देशाचे दोन तुकडे झाले. ज्याने एकत्र बंधुभावाने राहणाऱ्या लोकांना दोन देशांमध्ये विभाजित केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तयार करण्यात आलेल्या या सीमेला रेडक्लिफ लाईन नाव देण्यात आले.\nया सीमेचे हे नाव ब्रिटीश अॅडव्होकेट सिरीयस रेडक्लिफच्या नावावर पडले, ज्यांना भारताच्या जमिनीला दोन तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचे काम दिले गेले होते. हा तोच अधिकारी होता, ज्याला भारताची कोणतीच भौगोलिक माहिती नव्हती, तरीदेखील लॉर्ड माउंटबेटनच्या दबावामुळे दोन महिन्यांतच ही सीमा बनवावी लागली. रेडक्लिफला स्वतः देखील हे माहित होते की, या विभाजनाचा भारत आणि पाकिस्तान या दोघांना देखील परिणाम भोगावा लागेल. पण नाईलाजाने ते असे करण्यास तयार झाले.\nयाच दबावाचा परिणाम असा झाला की, १५ ऑगस्ट १९४७ च्या फाळणीच्या वेळी गुरुदासपुर आणि फिरोजपुर हे प्रदेश पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. स्वतःची ही चूक लक्षात आल्यानंतर लॉर्ड माउंटबेटनने आदेश दिले की, या दोन्ही प्रदेशांना परत भारतामध्ये समाविष्ट करण्यात यावे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला परत एक रेषा आखली गेली. त्यामुळे परत एकदा अंतर्गत कलह आणि दंगल सुरू झाली.\n११ ऑक्टोबरनंतरच भारत आणि पाकिस्तानमध्ये अटारी – वाघा बोर्डर अस्तित्वात आली. या बोर्डरला तयार करण्यामध्ये भारतीय सेनेचे ब्रिगेडियर महिंदर सिंह चोप्रा आणि पाकिस्तानचे ब्रिगेडियर नसीर अहमदचे महत्त्वाचे योगदान होते. नुकतीच रेडक्लिफ लाईनने आपली ७० वर्ष पूर्ण केली आहेत, तेव्हा त्या कार्यक्��मात ब्रिगेडियर चोप्रा यांचा मुलगा पुष्पिंदर चोप्रा याने हजेरी लावली होती. पुष्पिंदरने सांगितले की,\nआठ ऑगस्टला त्यांच्या वडिलांना १२३ इंफेट्री ब्रिगेड सोबत येथे लक्ष ठेवण्याचे काम दिले गेले होते, त्याचबरोबर पाकिस्तानकडून त्यांचे ज्युनियर आणि पाक सैन्याचे ब्रिगेडियर नसीर अहमद आपल्या सीमेची देखरेख करत होते.\nपुष्पिंदर चोप्राने सांगितले की,\nजेव्हा फाळणी झाली, तेव्हा येथे कोणतीच सीमा नव्हती. त्यामुळे हे समजत नव्हते की, कोणत्या बाजूला भारताची सीमा संपते आणि कुठून पाकिस्तानची सीमा सुरू होते. यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक ठेवण्यात आली. त्यानंतर चुन्याची रेष आखून सीमा तयार करण्यात आली. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानच्या बाजूला एक – एक ड्रम ठेवण्यात आला. ज्याला दोन्ही देशांच्या पोस्टच्या स्वरुपात वापरण्यात आले.\nअश्या या भारत आणि पाकिस्तान सीमेमुळे खूप मोठमोठ्या घडामोडी घडल्या आणि दोन देशांतील एकत्रित असणारी माणसे मनाने देखील विभागली गेली.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← भारतीय न्यायव्यवस्थेने स्त्रियांसाठी बहाल केलेले ‘विशेष’ कायदे आणि अधिकार\nधनत्रयोदशी : कथा व सांस्कृतिक महत्व\nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं\nपाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nयंदा राष्ट्रपती भवनात रमझानची इफ्तार पार्टी होणार नाही, आणि त्याचं कारण फारच चांगलं आहे\nविमानातील खुर्च्या निळ्या रंगाच्याच का असतात\nगुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस ‘सायरन’ वाजवत का जातात\nउत्तर कोरियाचा किम जोंग “शहाणा” झालाय की चलाख खेळी खेळतोय\nमाओवादी चळवळ आदिवासी समाजाचा फक्त वापर करून घेतेय – माओवादी कमांडरचा खुलासा\nही आहेत २०१७ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली गाणी\nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते\nतुमच्या आमच्यासाठी शहीद असणारे ते ४० जण अधिकृतरित्या “शहीद” नसतील\nबॉलिवूडने चितारलेली तुमची आमची मैत्री ह्य��ंतील तुमचा दोस्त कोणता\nया मंदिरात जो रात्री थांबतो तो दगडाचा होऊन जातो\nक्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात जाणून घ्या यामागचं कारण\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nक्रूर, वेडा, तरीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘जोकर’ बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nसेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’\nविमानात “केबिन प्रेशर” नियमित ठेवला नाही तर प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्त का येतं\nलिओनार्डो दि कॅप्रीओ + अभिनयाचं अजब रसायन = प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nताजमहलशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत\nहिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी\nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/laptops/2016-latest-lenovo-thinkpad-yoga-2-in-1-convertible-116-inch-ips-touchscreen-laptop-tablet-intel-quad-core-processor-4gb-ddr3-120gb-ssd-hdmi-bluetooth-webcam-wifi-windows-10-home-32-lbs-price-pqRUnp.html", "date_download": "2019-03-25T07:47:34Z", "digest": "sha1:DJKJAD5EX2DA47ZZX4PNHCFI6FI24EBE", "length": 17597, "nlines": 303, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द���मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स\nवरील टेबल मध्ये 2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स किंमत ## आहे.\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स नवीनतम किंमत Feb 09, 2019वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स दर नियमितपणे बदलते. कृपया 2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स वैशिष्ट्य\nप्रोसेसर क्लॉक स्पीड 1.83 GHz\nलॅपटॉप ब्रँड Thinkpad Yoga\nस्क्रीन सिझे 11.60 Inches\nरॅम उपग्रदाबले 8 GB\nहद्द कॅपॅसिटी 120 GB\nलॅपटॉप वेइगत 1.5 Kg\nऑपरेटिंग सिस्टिम Windows 10 Home\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n2016 लेटेस्ट लेनोवो थिंकपॅड योग 2 इन 1 कॉन्व्हर्टिबल 11 6 इंच इप्स तौचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट इंटेल Quad चोरे प्रोसेसर ४गब द्र३ १२०गब संसद छ्द्मी ब्लूटूथ वेबकॅम वायफाय विंडोवस 10 होमी 3 ल्ब्स\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/taxonomy/term/107?page=5", "date_download": "2019-03-25T08:59:21Z", "digest": "sha1:MCFFWDOLU2WRFWBO6TD7JHFNYOJU55KI", "length": 8747, "nlines": 115, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी आंदोलन | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / शेतकरी आंदोलन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशेतकर्यांच्या समस्येवर चिंतन ; वर्धा\nगंगाधर म. मुटे यांनी बुध, 12/02/2014 - 21:45 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेची सभा : विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका\nRead more about शेतकर्यांच्या समस्येवर चिंतन ; वर्धा\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2016-Dalimb.html", "date_download": "2019-03-25T07:53:47Z", "digest": "sha1:ESWGZONWT6F7QONXLI4TR2BPWF2OSHHN", "length": 5148, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डाळींबासारख्या अपारंपारिक पिकानेही दिला आधार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नौकेने", "raw_content": "\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डाळींबासारख्या अपारंपारिक पिकानेही दिला आधार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नौकेने\nश्री. भिमराव आत्माराम माने, मु.पो. कोप्रा बु., ता. अमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६. मो. ९४२३३४०३०१\nमी २०१४ पासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे. आमच्या भागात मी २०१५ मध्ये कापूस या पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करून एकरी १६ क्विंटल उत्पादन घेतले आहे.\nतसेच डाळींबाला जर्मिनेटरची आळवणी केली असता झाडांची मर थांबून पांढरी मु���ी अधिक सक्षम होऊन झाडांची वाढ होण्यास मदत होत आहे. २३ जानेवारी २०१४ ला १४ x ८ फुटावर मध्यम प्रतीच्या ५० गुंठे जमिनीत लावलेल्या या डाळींबाचा १८ - १९ महिन्यानंतर पहिला बहार धरला. या हस्त बहाराची कळी व्यवस्थित निघण्यासाठी जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यातून फवारले आणि जर्मिनेटर १ लि. चे प्रती एकरी ड्रेंचिंग केले. कल्पतरू सेंद्रिय खत बागेस अगोदरच छाटणी केल्यानंतर दिलेले होते. वरील फवारणी व ड्रेंचिंगमुळे फुलकळी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लागली. त्यानंतर जर्मिनेटर, प्रिझम, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटची फवारणी केली असता झाडावर मधमाश्यांचे प्रमाण वाढून सेटिंग चांगले झाले. त्यानंतर फळांचा आकार वाढण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन व किडीसाठी स्प्लेंडरची फवारणी केली. त्यानंतर फळे साधारण १०० ते १५० ग्रॅमची असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन च्या २ फवारण्या केल्या असता फळांच्या आकारामध्ये वाढ होऊन फळांना कलर येऊ लागला. या वर्षी दुष्काळ असल्यामुळे फळे पोसण्यासाठी उन्हळ्यात पाण्याची गरज असताना पाणी देऊ शकलो नाहो. त्यामुळे खर्च ही निघतो की नाही असे वाटत होते पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करून मला खर्च वजा जाता ३५ हजार रु. मिळाले. शेवटचे २ - ३ पाणी जरी मिळाले असते तरी मला ४५० झाडांपासून किमान ६ टन माल निघाला असता. या अनुभवातून मी मृग बहारासाठी (जुलै २०१६) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:38:41Z", "digest": "sha1:GV2G4AOZ7I3MWN4W2T5XOXQWBGMCZXJF", "length": 4808, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅट्रिस लुमुम्बा - विकिपीडिया", "raw_content": "\nपॅट्रिस एमरी लुमुम्बा (जुलै २, इ.स. १९२५ - जानेवारी १७, इ.स. १९६१) हा काँगोचा स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वप्रथम पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. १९६१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/karti-chidambaram-inx-media-advanced-consulting-case/", "date_download": "2019-03-25T07:35:45Z", "digest": "sha1:YFMYSP32WAOBU4KZWGB25KQ5HPLHC4J4", "length": 30547, "nlines": 159, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "डिकोडिंग कार्ती चिदम्बरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nडिकोडिंग कार्ती चिदम्बरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nअखेर, CBI ने FIR फाईल केल्याच्या तब्ब्ल ९ महिन्यानंतर पी चिदंबरम ह्यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम ह्याला अटक झाली. आणि ह्यावेळी कार्तीचे ग्रह इतके फिरलेत की केवळ FIR वर भागलं नाही. नाहीतर आपल्याकडे FIR दाखल होऊन काही मिनिटांत जामिनावर मोकळीक होते. कार्तीला थेट कस्टडीत ठेवलं. पुढे कस्टडी वाढवलीसुद्धा\nथोडक्यात, सरकार एकूणच ह्या प्रकरणाबद्दल अत्यंत गंभीर आहे हे सर्व घटनाक्रमांतून दिसून येत आहे.\nएक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी. दाखल झालेली तक्रार कोणत्या ताज्या प्रकरणाबद्दल नाही. २००७ मध्ये घडवून आणलेल्या जबरदस्त किचकट अफरातफरीबद्दल आहे. ह्या धांदलीच्या मुळापर्यंत गेल्यावर दिसून येतो – भारतीय व्यवस्थेतील सिस्टिमॅटिक करप्शनचा भव्य खेळ.\nतुम्ही एका कंपनीचे दीड लाख शेअर्स १०० रूपयांना विकत घेता. लक्षात घ्या – १०० रूपयांना १ शेअर – ह्या दराने नव्हे. फक्त १०० रूपयांत दीड लाख शेअर्स… आणि ह्या दीड लाख शेअर्स पैकी, साठ हजार शेअर्स तुम्ही एका दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीला विकता. किती रूपयांत आणि ह्या दीड लाख शेअर्स पैकी, साठ हजार शेअर्स तुम्ही एका दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीला विकता. किती रूपयांत तब्ब्ल २२.५ कोटी रूपयांत.\nम्हणजे, ४० रूपयांत विकत घेतलेली वस्तू चक्क २२.५ कोटी रूपयांत विकली गेली…\nहा व्यवहार अर्थातच कागदोपत्री झालाय. टोटली ऑथेंटिक. पांढऱ्या पैश्यांतून. पण, कॉमन सेन्स हेच सांगतो की ह्यात गडबड आहे. ह्या व्यवहारात सामील असणाऱ्या लोकांनी एकमेकांना मदत करण्यापोटी केलेल्या पैश्यांच्या व्यवहाराला “अधिकृत��� रूप देण्याचा हा मार्ग आहे.\nह्याला म्हणतात – व्हाईट मनी करप्शन.\nवेलकम टू कार्ती चिदम्बरम केस…\nप्रकरण मुळातून समूज घेण्यासाठी स्टेप बाय स्टेप जाऊ या :\nINX Media PVT LTD ह्या कंपनीने १५ मार्च २००७ रोजी परदेशी गुंतवणूक उभी करण्याची परवानगी, Foreign Investment Promotion Board (FIPB) ला मागितली. तीनच दिवसांत – १८ मार्च रोजी FIPB ची मिटिंग झाली आणि परवानगी देण्यात आली. (INX Media ला हे पैसे देशभरातील हिंदी आणि इतर भाषिक वाहिन्या चालवण्यासाठी उभे करायचे होते.)\nCBI चे आरोप २ आहेत –\n१) INX ला FDI द्वारे ४.६२ कोटी रूपये उभे करण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र तब्बल ३०५ कोटींहून अधिक रूपये उभे करण्यात आले – FIPB च्या परवानगी शिवाय.\n२) INX ला हे पैसे उभे करण्याची परवानगी दिली होती, परंतु ते पैसे INX News ह्या सबडिव्हिजनमध्ये वापरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. प्रत्यक्षात ही रक्कम प्रचंड प्रमाणात (२६%) INX News कडे वळवण्यात आली.\nप्रकरण उघडकीस कसं आलं\nअनेकांच्या लक्षात असेल की INX Media चे इंद्राणी आणि पिटर मुखर्जी हे शीना बोरा हत्येत चर्चेत आले होते. (आता लक्षात आलं असेल कारण आजपर्यंत मोठ्या चलाखीने सर्व माध्यमांनी आपलं लक्ष मुख्य प्रकरणावरून उडवलं होतं कारण आजपर्यंत मोठ्या चलाखीने सर्व माध्यमांनी आपलं लक्ष मुख्य प्रकरणावरून उडवलं होतं) इंद्राणी आता अटकेत असायला अडीच वर्ष होऊन गेली. ह्या अडीच वर्षात अनेक गोष्टी उघड झाल्या, ज्या तपास यंत्रणेने व्यवस्थितपणे गोपनीय ठेवल्या आणि संपूर्ण प्रकरणात सिद्ध करता येण्याजोगे धागेदोरे हाती लागल्यावरच कार्ती कडे थेट मोर्चा वळवला.\nएक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुखर्जी दुकलीने घातलेला घोळ शीना बोरा हत्येमुळे उघडकीस आला. कारण हत्येच्या आरोपात अटक झालेल्या इंद्राणीने हत्येची कबुली तर उशिरा दिलीच (तपास यंत्रणेचे प्रमुख राकेश मारिया बदलल्या नंतर\nपण ही कबुली काढून घेत असताना यंत्रणेच्या हाती मोठीच स्फोटक माहिती लागली…\nमाध्यमसमूह आणि चिदंबरम पिता-पुत्रांच्या साटेलोटेची माहिती\nकार्ती चिदम्बरमची भूमिका :\nआता झालं असं, की मे २००८ मध्ये FIPB ने INX ला वरील दोन्ही गोष्टींबद्दल स्पष्टीकरण मागितलं. इथेच कार्ती कम्स इनटू पिक्चर. CBI चा आरोप आहे की FIPB ने स्पष्टीकरण मागताच, INX च्या इंद्राणी आणि पीटर मुखर्जीने चिदम्बरम पिता-पुत्रांबरोबर संधान साधलं. हे संधान ��ाधण्यात कार्ती इंटरमिजिएट होता – ज्याच्या Advantage Strategic Consulting Pvt Limited (ASCPL) ह्या कंपनीला INX ने “सेवा पुरवण्याबद्दल” १० लाख रूपये अदा केले. बदल्यात, पी चिदंबरमच्या “पावर” पोटी FIPB अधिकाऱ्यांनी INX च्या अफरातफरीकडे केवळ दुर्लक्षच केलं नाही, तर आणखी FDI साठी नवा अर्ज करण्याची सूचना केली…\nAdvance Consulting नावाचं पैश्यांच्या अफरातफरीचं महाकाय रॅकेट :\nवरील प्रकरणात कार्ती च्या कंपनीला “फक्त” १० लाख रूपये दिल्याचं दिसतंय. हा आकडा फारसा मोठा वाटत नाही…पण मेख त्या पुढे आहे.\nही कंपनी अश्या “डील्स” करून देऊनच पैसे कमावते. कमावलेल्या पैश्यांच्या जोरावर Advance Consulting ने जगभरात हजारो करोडच्या प्रॉपर्टीज विकत घेतलेल्या आहेत. ह्या प्रॉपर्टीजची लिस्ट अनेक वृत्तपत्रांनी उघड केली आहे. मग अश्या दहा-दहा लाख रुपयांवर हे शक्य आहे का अर्थातच नाही. इथेच आपण लेखाच्या सुरूवातीला बघितलेलं – शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचं गणित पुढे येतं.\nAdvance Consulting ह्या कंपनीने वासन आय केअर चे दीड लाख शेअर्स फक्त १०० रुपयांना विकत घेऊन, त्यातील ६०,००० शेअर्स “सिकोया कॅपिटल” ह्या परदेशी कंपनीला तब्ब्ल साडे बावीस कोटींना विकलेत. हीच माहिती समोर आणून – S Gurumurthi ह्यांनी सदर प्रकरण समोर आणलं आणि चिदम्बरम पिता पुत्रांवर संशयाची नजर तिखट झाली.\nकार्ती च्या Advance Consulting च्या मालकीचा घोळ :\nइंडियन एक्स्प्रेसमध्ये S Gurumurthi ह्यांनी मोठाले लेख लिहून Advance Consulting च्या अफरातफरीचं प्रकरण लावून धरलं. जसजसं वातावरण गरम झालं, तसतसा पी चिदम्बरम ह्यांचा “नकार” अधिकाधिक तीव्र झाला. हा नकार देताना, चिदंबरम ह्यांनी एक वाक्य वारंवार म्हटलं होतं –\n“आमच्या कुटुंबातील कुणाचाही सदर Advance Consulting ह्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. माझ्या मुलाच्या (कार्तीच्या) मित्रांची ही कंपनी आहे. आणि केवळ राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होऊन सरकार कार्तीच्या मित्रांना त्रास देत आहे.”\nचिदंबरम ह्यांनी वरील विधान पहिल्यांदा २ डिसेम्बर २०१५ रोजी केलं. १६ डिसेम्बर रोजी इंन्कमटॅक्स ने धाड टाकून काही महत्वाचे दस्तावेज हस्तकगत केले – ज्यातून Advance Consulting च्या मालकीची गुंतागुंत समोर आली. ही लक्षात घेतली की हे किती मोठं रॅकेट आहे ह्याची कल्पना येते.\n२००६ साली, एका “मोहन राजेश” नावाच्या माणसाच्या कम्पनीकडे, ह्या Advance Consulting चे ४०% शेअर्स होते. कार्ती ने २००६ मध्येच हे शेअर्स स्वतः विकत घेतले – आणि Advance Consulting चा १००% मालक झाला. ही मालकी २०११ पर्यंत व्यवस्थित होती. म्हणजे २००६ ते २०११, कार्ती चिदम्बरम हाच Advance Consulting चा पूर्ण मालक होता.\n२०११ साली कार्तीला आपली अफरातफर उघड होऊ शकते, ह्याची कुणकुण लागली. तश्या बातम्या प्रसिद्ध देखील झाल्या. लगेच कार्ती ने ४०% शेअर्स पुन्हा मोहन राजेशला विकले. हा मोहन राजेश आपला “शेजारी” आहे हे कार्तीनेच उघडपणे म्हटलं आहे.\nउरलेल्या ६०% शेअर्सचं काय झालं तर – कार्तीच्या ४ “जवळच्या” मित्रांच्या नावे हे शेअर्स केले गेले. ह्या मित्रांची नावं आहेत – सीबीएन रेड्डी, रवी विश्वनाथन, पद्मा विश्वनाथन आणि भास्कर रामन. मात्र गंमत पुढे आहे.\nह्या चारीच्या चारी मित्रांनी आपलं मृत्युपत्र तयार केलंय. ह्या मृत्यू पत्रांचे २ भाग आहेत. पहिल्या भागात ह्या चौघांनी आपापली संपत्ती, मालमत्ता आपल्या मुलांच्या नावे केली आहे. दुसऱ्या भागात – हे नीट वाचा – दुसऱ्या भागात, चौघाच्या चौघांनी, आपल्या मालकीचे Advance Consulting चे शेअर्स कार्तीच्या मुलीच्या नावे केले आहेत…\nआणि – ह्या मृत्यू पत्राचा “executioner” म्हणून कार्तीचं नाव नमूद केलं गेलं आहे.\nहे चारही मृत्युपत्र एकाच दिवशी तयार केले गेलेत. चारींवर त्याच त्याच साक्षीदारांच्या सह्या आहेत…\nह्यातून Advance Consulting ही कार्ती चिदम्बरम चीच कंपनी असल्याचं सिद्ध होतं. वेगवेगळ्या लोकांच्या नावाने शेअर्स फिरवणं हे फक्त वरवरचं फिरवाफिरवीचं काम आहे.\nपी चिदम्बरमचा रोल काय\nआता ह्या सगळ्यात पी चिदम्बरमचं नाव का गोवण्यात यावं – हा प्रश्न उपस्थित होतोच.\nखरंतर हा प्रश्न खुद्द चिदम्बरमनाच विचारायला हवा.\nकार्ती वरील आरोपांची उत्तरं देण्यास चिदम्बरम का पुढे येत आहेत अगदी सुरुवातीपासून कार्तीचा बचाव करण्यासाठी चिदम्बरम ह्यांनी वृत्तपत्रांना पत्र लिहिण्यापासून ते कोर्टात कार्तीची बाजू लढवेपर्यंत सर्वकाही केलं आहे. असं का बरं\nकार्ती हा चाळिशीतील, एका बिझनेसचा मालकी असणारा जबाबदार प्रौढ माणूस आहे. त्याचा बचाव करण्याची गरज स्वतः जबाबदार राजकारणी असणाऱ्या आणि देशाचे अर्थमंत्री होऊन गेलेल्या चिदम्बरम ह्यांना अजिबात नाही. पण तरी ते आक्रमकपणे लढाई लढत आहेत – ह्यावरूनच स्पष्ट कळतं की आपलं वजन वापरून सदर प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nपडद्यामागची महाभ्रष्ट गुप्त यंत्रणा :\n��ुरुमूर्तींनी असा उघड उघड आरोप केला आहे की विविध यंत्रणांवर – न्याय पालिकेसकट सर्वांवर – आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न चिदम्बरम करत आहेत. गुरुमूर्ती तर हे ही म्हणतात की ज्युडिशिअरीने हे प्रकरण शक्य तितकं दाबण्याचा, रद्द करण्याचा अफाट प्रयत्न केला आहे. हा अत्यंत गंभीर आरोप करताना, गुरुमूर्ती मद्रास हायकोर्टाने वेळोवेळी आणलेल्या “स्टे” चा, चौकशी रद्द करण्याच्या कृतीचा हवाला देतात.\nह्या सर्वामागे, गुरुमूर्तींच्या म्हणण्यानुसार – एक साधं लॉजिक आहे.\nजगभरात हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊ शकण्याची क्षमता Advance Consulting मध्ये येण्यासाठी तेवढ्या मोठ्या डील्स फक्त स्वतःच्या बळावर घडवून आणणं कार्तीला अशक्य होतं. ह्या सगळ्यात पी चिदंबमरच्या अर्थमंत्री असण्याचीच मदत झाली आहे. चिदम्बरम हे ओळखून आहेत की कार्ती पर्यंत आलेली चौकशी-शिक्षा ही ब्याद शेवटी त्यांच्यावरच येणार आहे. आणि म्हणूनच ते इतक्या हिरीरीने सदर प्रकरणात ढाल बनून उभे आहेत.\nहे प्रकरण पुढे किती तडीस जाईल हे येणारा काळच ठरवेल.\nपण काँग्रेसप्रणित यंत्रणा किती पोखरलेल्या आहेत, अगदी FIPB च्या अधिकाऱ्यांपासून थेट न्यायाधीशांपर्यंत – हे साटंलोटं, भ्रष्ट nexus किती खोलवर रुजलंय ह्याची कल्पना येते.\nगुरुमूर्ती म्हणतात, आपल्या ४०-५० वर्षांच्या राज्यात, काँग्रेसने “आपल्या” लोकांचीच विविध ठिकाणी नेमणूक केली आहे. अख्खी यंत्रणाच कह्यात घेतली आहे. ह्या यंत्रणेला गुरुमूर्ती “डीप स्टेट” म्हणतात.\nहेच “डीप स्टेट” भारताच्या मुळावर उठलं आहे. ज्याला उद्धवस्त करणं देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← या ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nकॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी →\nजेव्हा पी चिंदंबरम स्वतः ६००० लोकांना देशद्रोही ठरवतात\nभारतातील ‘या’ वकिलांची एका खटल्याची फी, नुसती ऐकूनच डोळे पांढरे होतात\n3 thoughts on “डिकोडिंग कार्ती चिदम्बरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ”\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्य�� मुद्द्यांची जाण आवश्यक\n‘बॉस’ असावा तर असा ; कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची मोफत ट्रीप\nव्ही पी मेनन- ह्यांच्यामुळेच स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध राहिला\nभारताच्या ह्या चलाख गुप्तहेरामुळे भारतात “रॉ” ची स्थापना झाली\nतुम्हाला माहित नसणारे काजुचे फायदे जाणून घ्या\nचंद्रावर “कुणीतरी” आहे – NASA च्या आणखी एका वैज्ञानिकाचा गौप्यस्फोट\nभूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन \nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nमेरठच्या डीएम बी चंद्रकला – लेडी सिंघम\nआयुर्वेदाच्या पंचामृतापैकी एक ‘दही’ : आहारावर बोलू काही – भाग १\nभारताने केलेल्या म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राईकची “ही” पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे\nमंगळ ग्रहाभोवती शनीसारख्या rings तयार होणार\nडॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…\nट्रम्प, पुतीन… ह्या सर्वांची विमानं कशी आहेत त्यांसमोर मोदींचं विमान कसंय त्यांसमोर मोदींचं विमान कसंय\n“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’\nजिंदगी ना मिलेगी दोबाराबद्दल ह्या गमतीशीर गोष्टी ह्या अप्रतिम चित्रपटाला अजूनच खास करतात\nएकाच वेळी अनेक औषधं घेणं धोकादायक असू शकतं का वाचा तज्ञ काय म्हणताहेत\nतडफदार हिमांशू रॉय ते अध्यात्मिक भय्युजी महाराज : आत्महत्येचा दुर्लक्षित अँगल\nकूटनीती आणि शौर्याची परीक्षा – मराठ्यांचा दिल्ली-तह\nहे १० पदार्थ सर्रास फ्रिजमध्ये ठेऊन आपण त्यांच्यावर (व आरोग्यावर) अनेक दुष्परिणाम ओढवून घेतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/taxonomy/term/107?page=6", "date_download": "2019-03-25T08:59:09Z", "digest": "sha1:3BLL7KN7R26VQWQZJLOIJ6LX24EBJN7E", "length": 9051, "nlines": 114, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी आंदोलन | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / शेतकरी आंदोलन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशेतकर्यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\nगंगाधर मुटे यांनी रवी, 24/11/2013 - 16:57 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकर्यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\n८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.\nRead more about शेतकर्यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/nishidini-haricha/", "date_download": "2019-03-25T07:40:10Z", "digest": "sha1:VYOA7R6TBUZNDIDSCE57H7LXAGL5XIFP", "length": 6379, "nlines": 60, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nनिशिदिनी हरिचा ध्यास जिवाला\nनिशिदिनी हरिचा ध्यास जिवाला\nव्याकुळ विरह करी हृदया\nभुलवुनी झाली राधा भोळी\nछळ हा दारुण का वनमाळी\nमृदु मंजुळ तव ऐकव मुरली\nया चित्रपटातील गीतांचा गौरव लोकमान्य टिळकांच्या केसरी या वर्तमानपत्राने २६ मार्च १९३० च्या अंकात, आपली शिस्त मोडून, मुद्दाम केला. \"पांडुरंगाच्या कृपेने शिवाजीमहाराज सुखरूप असल्याचे पाहून पागनीसांनी 'वानु किती रे सदया विठुराया, दीनवत्सला' या पदाच्या द्वारे झालेला आनंद इतक्या बहारीने व्यक्त केला आहे की त्याबद्दल पागनीसांचे अधिक अभिनंदन करावे की इतके नादमधुर व रसप्रचुर पद रचणारे श्री शांताराम आठवले यांचे करावे हेच कळेनासे होते --- श्री शांताराम आठवले यांनी केलेली पदेही रसपरीपोषक व नादमधुर अशीच आहेत. 'आधी बीज एकले' हे त्यांचे पद्य पोरासोरांच्याही तोंडी झाले आहे. या वरून त्या पदाची योग्यता कळून येईल. असे उदात्त, उपदेशपर बोलपट वारंवार पहावयास मिळतील तर बोलपटसृष्टीवरील आक्षेप आपोआपच गळून पडतील.\"\nनिशिदिनी हरीचा ध्यास जीवाला\nवानु किती रे सदया विठुराया, दीनवत्सला\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अ��ा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/maharashtra-javli-trek-1351970/", "date_download": "2019-03-25T08:18:48Z", "digest": "sha1:O2IXGZPAO5HG5ZHMIX6CLBQDLBLRP47W", "length": 61069, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra javli trek | येता जावळी, जाता गोवळी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nयेता जावळी, जाता गोवळी\nयेता जावळी, जाता गोवळी\nहिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं.\nहिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं. जुन्या रानवाटा तुडवताना स्पर्श झाला होता रसरशीत इतिहासाचा, शूरांच्या कथा उरी जपणाऱ्या काळजांचा आणि शिव-प्रतापाच्या पाऊलखुणांचा\nरविवार दुपारची निवांत वेळ. घरातलं ‘शिवचरित्र’ हाती घेतलं. त्या दिवशी थबकलो होतो ‘जावळी प्रकरणा’पाशी.\n..कसे ते जावळीचे अजस्र पहाड-दुर्ग आणि किर्र्र अरण्य कसे ते चंद्रराव मोरे आणि त्यांचा रुबाब कसे ते चंद्रराव मोरे आणि त्यांचा रुबाब कशी ती थरकाप उडवणारी निसणीची वाट आणि जंगलातला रडतोंडी घाट कशी ती थरकाप उडवणारी निसणीची वाट आणि जंगलातला रडतोंडी घाट कशी आपलीशी केली महाराजांनी ही जावळी आणि त्यातली बावनकशी सोनं असलेली माणसं कशी आपलीशी केली महाराजांनी ही जावळी आणि त्यातली बावनकशी सोनं असलेली माणसं कशी ती अरण्यात वसलेली महाबळेश्वर – वरदायिनी- कालभरव – भवानीची पुरातन राऊळं कशी ती अरण्यात वसलेली महाबळेश्वर – वरदायिनी- कालभरव – भवानीची पुरातन राऊळं किती ती दूरदृष्टी भोरप्याच्या डोंगरावर बेलाग प्रतापगड बांधून घेण्याची किती ती दूरदृष्टी भोरप्याच्या डोंगरावर बेलाग प्रतापगड बांधून घेण्याची किती भयंकर ते स्वराज्यावर रोंरावत आलेलं वादळ – क्रूर-कपटी अफझलखानाच�� किती भयंकर ते स्वराज्यावर रोंरावत आलेलं वादळ – क्रूर-कपटी अफझलखानाचं अन, किती थरारक कूटनीती राजांची, खानाला जावळीत खेचून आणून नेस्तनाबूत करणारी\nकित्येक तास अक्षरश: हरवून गेलो होतो जावळीच्या थरारात. हा इतिहास दरबार-महालांमध्ये नाही, तर सह्यद्रीच्या दुर्ग-डोंगरांमध्ये आणि नद्यांच्या खोऱ्यांमध्ये घडलाय. त्यामुळे, एव्हाना ट्रेकर मावळ्यांच्या हंटरशूजचे घोडे िखकाळू लागलेले. शिध्याची शिदोरी सोबत घेतली. हॅवरसॅकचं खोगीर चढवलं. हायकिंग हॅटचं मुंडासं चढवलं आणि कूच केलं ‘जावळी’कडे -रोमांचक इतिहासाच्या पाऊलखुणांचं दर्शन घेण्यासाठी\nमध्यरात्री अडनिडय़ा वेळी निघून, पुणे -सातारा रस्त्यावर टोल भरून वर खड्डय़ांचा मार सहन करत प्रवास केलेला. वाई फाटय़ावर गाडी वळली, तसं हायवेवर कुरकुरणारे अजस्र ट्रक्स आणि हॉर्न्स मागे पडले. पसरणी घाटातून लपेटदार वळणं घेताना, कारच्या टेपवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द घुमू लागले- ‘जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी, जी बुद्धि पांच शाह्यंस शत्रुच्या झुलवी, जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी, जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी..’ शिवचरित्रातली ही यशोगाथा खोलवर जपून ठेवणाऱ्या अरण्य – दुर्ग – राऊळ – नद्या -रानवाटांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चौघेजण जावळीच्या ट्रेकला निघालेलो..\nट्रेकच्या पहिल्या दिवशी महाबळेश्वरच्या पश्चिमेला कोयनेच्या खोऱ्यात डोंगरझाडीतल्या जावळीला उतरायचं होतं. ट्रेकच्या पूर्वार्धात महाबळेश्वरपासून ऐतिहासिक रडतोंडी घाटाने उतरून पुढे प्रतापगड चढाई आणि पुढे मुक्कामाला जावळी गावातल्या चंद्रराव मोरेंच्या कुलदैवताच्या राऊळापाशी पोहोचायचं होतं. हे सगळं अर्थातच कारने नव्हे, तर वाटांवरून पायगाडीने करायचं होतं. दुतर्फा गर्द झुकलेल्या झाडोऱ्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून मुंबई टोकाकडे चालत निघालो. पश्चिमेकडून तरंगत येणारे ढग हलकेच स्पर्श करून सुखावत होते, गारठवत होते. पोलादपूर नाक्यावरच्या शेकोटीच्या उबेचा मोह टाळला, अन् ढगात हरवलेल्या रस्त्यावरून झपाझप निघालो. खॅखॅ असा आवाज आसमंताला चिरत गेला, म्हणून थबकलो. डोक्यावरच्या जांभळाच्या झुकलेल्या फांद्यांवर काटक्यांनी बांधलेल्या मोठय़ा घरटय़ापाशी हालचाल जाणवली. खोडाच्या एका बाजूने लालचुटूक गोंडस त��ंड डोकावलं. हा होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ (इंडियन जायंट स्क्विरल). गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असा हा शेकरू हे सह्यद्रीच्या जैववैविध्याचं प्रतीकच\nएरवी मुंबई टोकापासून कोयनेच्या कुशीतल्या जावळी – प्रतापगडचं सुरेख दृश्य दिसतं. आत्ता मात्र सगळंच ढगात गुरफटलेलं. रडतोंडी घाट गाठण्यासाठी मुंबई टोकाच्या शेजारून पश्चिमेला उतरणारी मोठ्ठी रुंद पाऊलवाट गवसली. उंचच उंच झाडांमधून, मळलेल्या झक्क वाटेवरून, ढगांमुळे ओलसर झालेल्या खडकांवरून निसटत आणि उभा उतार उतरत दीडशे मीटर उतराई केली. पोलादपूरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटाचा डांबरी रस्ता पार केला आणि हिरडा-गेळ-जांभळाच्या झाडोऱ्यामधून वळणं घेत पायवाटेने मेटतळे गावापाशी पोहोचलो. हायवेने ५०० मीटर चालल्यावर मोठ्ठया वळणावर घाटाच्या संरक्षक िभतीमधून बाहेर पडलं, की रडतोंडी घाटवाटेची सुरुवात झाली..\nरस्त्यावरच्या हॉर्न्सचा आवाज मागे पडला. भर्राट वारा आला. ढगांची चादर दूर होऊ लागली. आसमंत उलगडू लागला. महाबळेश्वरपासून प्रतापगड मकरंदगडापर्यंत पसरलेल्या उभ्या-आडव्या पहाडांचं, गर्द दाट झाडीचं, कोयनेचं, ‘जावळी’च्या खोऱ्याचं प्रथमच दर्शन होत होतं. आणि कानांत घुमू लागला घोडय़ांच्या टापांचा आवाज.. भास का भासच तो. पण हे नक्की की जावळी आम्हाला वेढून घेऊ लागलेली, आम्हीही ‘गोवले’ जाऊ लागलेलो. कारण ‘येता जावळी, जाता गोवळी’, असंच म्हटलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवरायांना. स्वराज्यवृद्धीसाठी महाबळेश्वर रायरी परिसरातलं घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचं खोरं अतिशय मोक्याचं. त्यामुळे, महाराजांना मोऱ्यांसोबत एकतर मत्री किंवा संघर्ष अटळ होता. दुर्गम जावळीवर सत्ता करणाऱ्या चंद्रराव मोरेंचं घराणं वीरांचं, शिवभक्तांचं आणि जावळीचा सार्थ अभिमान असणारं. त्यामुळे चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य होणारं नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, ‘‘..तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले भासच तो. पण हे नक्की की जावळी आम्हाला वेढून घेऊ लागलेली, आम्हीही ‘गोवले’ जाऊ लागलेलो. कारण ‘येता जावळी, जाता गोवळी’, असंच म्हटलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवरायांना. स्वराज्यवृद्धीसाठी महाबळेश���वर रायरी परिसरातलं घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचं खोरं अतिशय मोक्याचं. त्यामुळे, महाराजांना मोऱ्यांसोबत एकतर मत्री किंवा संघर्ष अटळ होता. दुर्गम जावळीवर सत्ता करणाऱ्या चंद्रराव मोरेंचं घराणं वीरांचं, शिवभक्तांचं आणि जावळीचा सार्थ अभिमान असणारं. त्यामुळे चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य होणारं नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, ‘‘..तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी’’ अखेरीस इ. स. १६५६ ला महाराज स्वत जातीने जावळीवर चालून आले. महाबळेश्वरवरून जावळीत उतरण्यासाठी मोठी तुकडी दक्षिणेच्या ‘रडतोंडी घाटा’ने उतरली आणि तिथे मोऱ्यांच्या सन्याने प्रतिकार केला. त्याच वेळी खुद्द राजे छोटी तुकडी घेऊन उत्तरेच्या ‘निसणीच्या घाटा’ने महाबळेश्वरवरून जावळीत उतरले आणि जावळी जिंकून घेतली. जावळी स्वराज्यामध्ये आली, म्हणजे – अत्यंत मोलाचे दुर्ग (रायरी, चंद्रगड, मकरंदगड, मंगळगड, सोनगड, चांभारगड), दुर्गम घाटवाटा (वरंध, ढवळेघाट, पारघाट), डोंगरी देवस्थानं (महाबळेश्वर, चकदेव, पर्वत), ताकदीचे डोंगर (भोरप्या. ज्यावर प्रतापगड बांधला), थेट सिंधुसागरापर्यंत झेप घेता येणं अन् मुख्य म्हणजे जावळीतले तालेवार हिरे (मुरारबाजी देशपांडे, तानाजी-सूर्याजी मालुसरे) गवसणं अशा खूप गोष्टी साधल्या होत्या. शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर आसमंतात घोडय़ांच्या टापा, नगारे, तुताऱ्या आणि तोफांचा आवाज निनादत राहिला.\n..जावळीच्या इतिहासाचा हा थरार काळजात जपणाऱ्या ‘रडतोंडी’ आणि ‘निसणी’ या घाटवाटांचं दर्शन आम्ही घेत होतो. गच्च कारवीच्या टप्प्याखाली रानात उतरणारी मंद उताराची डोंगरसोंड आणि त्यावरून उतरणारी रडतोंडी घाटाची वळणावळणांची प्रशस्त वाट आता दिसू लागली. वाईकडून प्रतापगडाकडे जाताना अफझल���ान याच वाटेने गेलेला. खानाला चक्रव्यूहात खेचण्यासाठी राजांनी आसपासच्या डोंगरवाटा बंद करून, रडतोंडी घाट मात्र खास बांधून घेतलेला असणार, अशा खुणाच सामोऱ्या होत्या. व्यवस्थित बांधून काढलेली फरसबंदीची निवांत लांबचलांब वळणं घेत जाणारी वाट होती. आधी फारशी झाडी नसलेल्या डोंगरसोंडेवरून वाट शंभर मीटर उतरली, पण मग मात्र टेपावरून उतरताना दाट झाडीचे टप्पे सुरू झाले. गर्द झाडोऱ्यातून सळसळ करत जाणारी बारीक रानवाट सुरू झाली. अंधाऱ्या रानाला चिरत जाणारी वाट क्वचित मोकळवनात आली, की समोर मकरंदगड आणि प्रतापगड खुणावायचे. कधी कधी उंचच उंच वृक्षांचा, गच्च पाचोळ्याचा आणि अजस्र वेलींचा गुंता इतका दाटत गेला, की वाट सपशेल हरवायची. ‘रडतोंडी’ हे आपलं नाव सार्थक करणाऱ्या घाटवाटेचा चपखल उपयोग करून, महाराजांनी खानावर मानसिक दृष्टय़ादेखील कशी कुरघोडी केली असेल, हे चांगलंच जाणवलं. झाडांना बांधलेल्या भगव्या फिती आणि वाटेच्या कडेला बसवलेले दगड शोधत उतरत गेलो. आंब्याच्या खोडांवर वाऱ्यावर झुलणाऱ्या ऑíकडच्या झुबक्यांना दाद दिली. मंद उताराची लांबच लांब आडवी वाट शेवटी गोगलेवाडीपाशी डांबरी रस्त्यावर पोहोचली. महाबळेश्वर बाजारपेठेपासून निघून रडतोंडी घाटाची ६५० मीटर उतराई करायला तीन तास लागलेले.\nगोगलेवाडीपासून डांबरी रस्त्यावरून प्रतापगडाच्या पायथ्याच्या ‘पार’ गावाकडे निघालो. वाटेत कोयना नदीवरचा कमानींचा दगडी पूल लागला. हा पूल शिवकालीन, म्हणजे कदाचित अफझलभेटीसाठी बांधलेला. ऋतुचक्राचा आणि कोयनेच्या तुफान प्रवाहाचा तडाखा सोसूनही, पूल भक्कम आणि आजही वापरात आहे. पुलाजवळच्या गणेशाचं दर्शन घेतलं. आंब्या-फणसाच्या दाट सावलीतून चालत ‘पार’ गावात पोहोचलो. गाव प्रतापगडाच्या कुशीत. मुळचं नाव ‘पार्वतीपूर’. कोकणात उतरणाऱ्या पारघाटाच्या माथ्यावरचं हे गाव. गावात काळ्या पाषाणातल्या ‘आदिशक्ती श्रीराम वरदायिनी’चं देखणं राउळ. टुमदार ‘पार’ गाव आम्हांला फार आवडून गेलं.\nपार गावातला राजांचा पुतळा पाहिला. आता मात्र वेध लागलेले प्रतापगडाचे गावातून उंच डोंगरझाडीमुळे गड एकदम लपून गेलेला. पाण्याच्या पाइप्सच्या साथीने जाणाऱ्या वाटेवरून गडाची चढाई सुरू केली. वाट सुरेख मळलेली. दाट झाडोऱ्यातून चढताना आणि आसमंतात दूरवर नजर टाकताना, गडाचं भौगोलिक महत्त्व चांग���ंच लक्षात येत होतं. मूळ सह्य़ाद्रीधारेपासून थोडक्या अंतरावर सुटावलेल्या ‘भोरप्या’ (तथा ‘रानआडवा गौड’)डोंगरावर, जावळीच्या जंगलात, कोयनेच्या काठावर आणि पार घाटाच्या माथ्यावरचं हे अत्यंत मोक्याचं स्थान. राजांना कल्पना होतीच, की जावळी जिंकणं म्हणजे थेट आदिलशहाला डिवचणं आणि त्याचा दुष्परिणाम आपण ओढवून घेणार आहोत. त्यामुळे दूरदृष्टीने त्यांनी मोरोपंत िपगळ्यांकरवी जावळीत बेलागदुर्ग बांधून घेतला. गड पाहून राजे खूश झाले आणि त्यांनी नाव ठेवलं – ‘दुर्गप्रतापगड’\n.. पार गावातून निघाल्यावर दाट झाडीतून अन् उंच कारवीमधून चढाई होती. वळणावरच्या गेळाच्या झाडावर मुंग्यांनी चिखलाचे घरटे बांधलेले, तर पायथ्याशी गडमुंगीच्या वारुळाची चिरेबंदी. उभ्या दांडावरच्या चढाईनंतर आता थोडी निवांत आडवी वाट होती. पाचोळा चुबुक-चुबुक तुडवत निघालो. महाराजांना भेटायला आतुर झालेला अफझलखान ज्या वाटेने पार गावातून प्रतापगडाकडे गेला, त्याच वाटेने आम्ही निघालेलो. अशक्य-अतक्र्य वाटावा अशा इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या मातीचं-मुलखाचं दर्शन आम्ही घेत होतो.\nमहाराजांनी जावळी जिंकली होती, ती बळापेक्षा युक्तीने त्यामुळे, आदिलशहाचा तिळपापड झाला होता. शिवाजीराजांना विजापूर दरबारात जिवंत किंवा मृत हजर करण्याचा विडा अफझलखानाने उचलला. अफाट घोडदळ, पायदळ, बंदूकधारी, हत्ती, उंट, तोफा घेऊन खान चालून येऊ लागला. पूर्वी पुरंदरजवळ खळद-बेलसरच्या पठारावर फत्तेखानशी लढतानाच राजांनी जोखलेलं, की राजधानीचा राजगड बेलाग, पण पठारी भागाकडून वेढा देण्यास सोप्पा. म्हणून, अफझलखानासोबतच्या संघर्षांसाठी ठिकाण राजांनी ठरवलं – जावळी त्यामुळे, आदिलशहाचा तिळपापड झाला होता. शिवाजीराजांना विजापूर दरबारात जिवंत किंवा मृत हजर करण्याचा विडा अफझलखानाने उचलला. अफाट घोडदळ, पायदळ, बंदूकधारी, हत्ती, उंट, तोफा घेऊन खान चालून येऊ लागला. पूर्वी पुरंदरजवळ खळद-बेलसरच्या पठारावर फत्तेखानशी लढतानाच राजांनी जोखलेलं, की राजधानीचा राजगड बेलाग, पण पठारी भागाकडून वेढा देण्यास सोप्पा. म्हणून, अफझलखानासोबतच्या संघर्षांसाठी ठिकाण राजांनी ठरवलं – जावळी खानाने पायथ्याच्या वाईमध्ये छावणी टाकली आणि राजांना खलिता धाडला, ‘शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावाचा जावळी प्रदेश तू मला प���त कर’. खानाने वाईस बोलावल्यावर राजांनी आपण फार घाबरलो असल्याचे भासवून समझोत्यास तयार आहोत असं कळवलं, ‘तुम्ही तर पृथ्वीतलावरचा एक दागिना आहात. तुमच्याबरोबर युद्ध म्हणजे आगीशी खेळ. तुम्ही खरंच येथे या आणि मन भरून जावळीचे दर्शन घ्या. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल. जावळीच्या या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.’ आणि १० नोव्हेंबर १६५९ ला प्रतापगडच्या पायथ्याशी खानाची आणि राजांची भेट ठरली. प्रतापगडाच्या कुशीतल्या जननीच्या टेंब्यावर शाही शामियाना उभारला गेला होता. भेटीची घटका जवळ आलेली. त्या रोमांचक इतिहासाच्या विचारांनी आणि डोंगरचढाईने आता धाप लागलेली\nपार गावातून निघून पाऊण तास झालेला. गड एखादवेळा झाडोऱ्यातून किंचित डोकावलेला, पण किती लांब याचा अंदाज येईना. वाऱ्याचा पत्ता नाही. घशाला कोरड पडलेली. पाठीवरचं ओझं जड झालेले. एकसमान लयीमध्ये चढाई चालू ठेवली. झाडीतून चढणाऱ्या उभ्या वाटेने मोठ्ठं वळण घेतलं आणि आम्ही अक्षरश थबकलोच. डावीकडे निळ्या आभाळाच्या पाश्र्वभूमीवर तुरळक विखुरलेल्या ढगाच्या पुंजक्यांमधून उंचावलेला प्रतापगडाचा माथा आणि उजवीकडे पोलिस बंदोबस्तीत असलेली खानाच्या कबरीची वादग्रस्त वास्तू. हीच.. हीच ती जागा, जिथे जावळीच्या इतिहासातला थरार घडला. शामियान्यात खानाच्या कपटाची चाहूल लागताच, ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडलं, तसं राजांनी वाघनखांनी खानाची आतडी बाहेर काढली. कवी भूषण यांनी लिहिलं, ‘एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है’. ज्या युद्धशैलीला समर्थ रामदासांनी वृक्युद्ध (लांडगेतोड) म्हटलंय, त्या गनिमी काव्याने राजांनी शत्रूला आपल्या मोक्याच्या जागी खेचून आणलं आणि नामशेष केलं. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, शके १५८१, गुरुवार १० नोव्हेंबर १६५९ आजही, मार्गशीर्ष षष्ठीला जावळी-प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा होतो. इतिहासातल्या अनोख्या युद्धांचा अभ्यास करताना आजही आमची भारतीय सेना जावळी-प्रतापगडाच्या युद्धाचा अभ्यास करते..\nगडावर डांबरी रस्त्याने येणाऱ्या गाडय़ांचे हॉर्न्स सुरू झाले आणि आधुनिक जगात परतलो. चिलखती बांधणीच्या टेहळणी बुरुजावरच्या भगव्या झेंडय़ाला मुजरा करून गडावर दाखल झालो. महाबळेश्वरपासून निघाल्यापासून पाच तासांत (रडतोंडी घाटाची ६५० मी. उतराई, पार गावातून ४०० मी. चढाई आणि १३ किमी चाल झाल्यावर) गडावर पोहोचलेलो. राजांनी बांधून घेतलेलं – पण आता गर्दीत आणि नव्या वास्तूंमधून हरवलेलं- दुर्गस्थापत्य शोधायचा प्रयत्न केला. महिषासुरमर्दनिी रूपातील भवानीमातेसमोर नतमस्तक झालो. गडावर कितीही गर्दी असली तरी भवानीमाता, केदारेश्वर आणि राजांचं भव्य अश्वारूढ शिवशिल्प नि:संशय शक्तिपीठे आहेत, याची अनुभूती घेतली. राजांच्या वीररसयुक्त पुतळ्याच्या चौथऱ्यावर कोरलेले शब्द ‘माझ्या मायभूमीचे रक्षण, हे माझे परम कर्तव्य’ उरात साठवले. गडावरून चौफेर दर्शन घडलं जावळीच्या अथांग सह्य़ाद्री मंडळाचं\nचढाई आग्नेयेच्या पार गावातून केलेली, तर आता उतराईसाठी ईशान्येच्या वाडा कुंभरोशी गावाकडची पाऊलवाट तुडवू लागलो. गडाचा डांबरी रस्ता बनायच्या आधी हीच मुख्य वापरातली वाट होती, त्यामुळे ठिकठिकाणी बांधून काढलेली. समोर महाबळेश्वरचं झाडीभरलं पठार नजरेसमोरचं सारं क्षितिज व्यापून टाकत होतं. घनदाट झाडीतली मस्त मळलेली वाट आणि सुरेख प्रसन्न चाल होती. उभा उतार उतरणारी वाट उतरून तासाभरात वाडा कुंभरोशीला पोहोचलो. पोलादपूर हायवेवरचं छोटंसं गाव. ‘अद्रकवाली चाय’चं इंधन मिळालं. आमचं गंतव्य होतं जावळी खोऱ्यातलं एक ऐतिहासिक ठिकाण – चंद्रराव मोरेंच्या वास्तव्याचं मुख्य स्थान – ‘जावळी’ गाव\nमहाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून लांबच लांब रटाळ चाल चालत राहिलो. चालून चालून पायाला ब्लिस्टर्स आलेले. अखेरीस डावीकडे ‘जावळी’ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा फाटा आला. मावळतीचे सूर्यकिरण आता महाबळेश्वरच्या एलफिस्टन टोक ते लॉडविक टोक ते मुंबई टोक अशा जबरदस्त कातळभिंतींना उजळवू लागलेले. कोयनेच्या चिंचोळ्या पात्राच्या काठाने वळणं घेत जाणारा रस्ता जावळी गावातल्या काळभरव मंदिरापाशी थबकला. प्रतापगडापासून निघून सहा किमी चाल झाली होती, तर दिवसाभरात १९ किमी. पाराखाली विसावलो. काळभरवनाथ आणि कुंभळजाआई हे जावळीच्या मोरेंचं कुलदैवत देवळात हरणाची िशगे लटकवलेली. चंद्रराव मोरे आणि शिवरायांनी पुजलेली ही दैवते. या देवतांसमोर नतमस्तक होताना कुठेतरी जावळीच्या इतिहासाची जवळून भेट झाल्यासारखं वाटलं. देवळामागच्या टेकाडावर मोऱ्यांच्या ��ाडय़ाचे अवशेष – जोत्याची जागा दाखवतात.\nकाळभरवनाथ मंदिराबाहेर आलो. परिसरातल्या जुन्याजाणत्या वृक्षांवर बागडणाऱ्या मोराने आणि भल्यामोठ्ठय़ा िशगचोच्या धनेशाच्या (हॉर्नबिल पक्षी) जोडीने आमची दखल घेतलेली. अंधार दाटू लागला. मुक्कामाची तयारी सुरू केली. (मंदिरात मुक्कामास परवानगी नाही). पूर्वेला पौर्णिमेच्या निखळ चांदण्यात महाबळेश्वरच्या पहाडाची उंच कड उजळून निघालेली, तर पश्चिमेच्या धारेवर गूढ रानवा दाटलेला. गरम सूपचा आस्वाद घेत गप्पाष्टक जमलं. गावकऱ्यांनी देवळाजवळ येणाऱ्या गव्यांची-रानडुकरांची भीती घातलेली. त्यामुळे एकीकडे सावध नजर; तर दुसरीकडे एका दिवसात गप्पांसाठी होता जावळीचा इतिहास, जावळीचा भूगोल आणि अधूनमधून अंगावर येणारा आधुनिकतेचा कोलाहल गारवा दाटत गेला. रुचकर जेवण झालं. जावळीच्या कुशीत असल्याच्या भावनेनेच मनात आनंद दाटलेला\n.. जावळीच्या कुशीतल्या झक्क मुक्कामामुळे मंडळी ताजीतवानी झालेली. ट्रेकच्या उत्तरार्धात जावळीमधल्या इतिहासाची साक्षीदार असलेली ‘निसणी’ची अवघड वाट चढून महाबळेश्वरला जायचं होतं. तांबडफुटीआधीच दमदार न्याहारी करून कूच केलं. डांबरी रस्त्याने चालत कोयनेच्या गूढरम्य खोऱ्यात शिरू लागलो. ‘खालच्या जावळी’च्या वाडीतून ‘मधल्या जावळी’च्या वाडीत आणि पुढे ‘वरच्या जावळी’च्या वाडीत पोहोचलो. उजवीकडचं लॉडविक टोक, समोरचं एल्फिन्स्टन टोक आणि महाबळेश्वरचा झाडीभरला माथा ढगात हरवलेला. आता डांबरी रस्ता किंचित उजवीकडे पूर्वेला वळू लागलेला – लॉडविक आणि एलफिस्टन टोकांदरम्यान पसरलेल्या कोयनेच्या दरीच्या कुशीत शिरू लागलेला. किनाऱ्याकडे येणाऱ्या, विखुरत जाणाऱ्या, फुटत जाणाऱ्या लाटा असाव्यात, अशा असंख्य डोंगरवळ्यांच्या सह्य़ाद्री-सागराकडे आम्ही निघालेलो. बाजूचं वळणवेडय़ा कोयनेचं पात्र, आंबा-फणस-बांबूचा गच्च रानवा, वीरघराण्यातल्या मोरे वंशजांची घरं, डोंगरउतारांवर विखुरलेल्या शेताडीची नक्षी, फडफड असा विलक्षण मोठ्ठा आवाज करत दरीच्या पोटात खोलवर पल्ला मारत जाणारे हॉर्नबिल्स, गच्च झाडीवेलींनी नटलेले डोंगरउतार, उभ्या घसरडय़ा डोंगरसोंडा, माथ्याखालची सलग कातळिभत आणि गच्च रानाचे टप्पे आणि त्यासोबत रेंगाळलेले तुरळक ढग अशा चित्ताकर्षक पॅनोरमानं आम्हाला भारावून टाकलेलं.\nचिंचोळ्या होत गेलेल्या जा���ळी खोऱ्यातलं दरीच्या पोटातलं शेवटचं गाव – ‘दरे’ इथून महाबळेश्वरमाथा ५०० मी. उठवलेला. महाबळेश्वरला चढण्यासाठी – एल्फिन्स्टन टोकाजवळ चढणारी ‘निसणीची वाट’ आणि दुसरी – बाजारपेठेची वाट. निसणीच्या वाटेचं आकर्षण होतं, कारण याच वाटेने जावळीत उतरवून महाराजांनी जावळी जिंकलेली.\nदरे गावातल्या फणसाच्या झाडाखाली विसावलो. वाटेचा अंदाज घेऊ लागलो. डावीकडे (उत्तरेला) उतरत आलेल्या उभ्या डोंगरसोंडेवरून वाट असणार होती. कोयनेचं पात्र पार करून शेताडी पार केली. आंब्याच्या डेरेदार झाडापासून पाठीमागे दरे गाव आणि पाठीमागची लॉडविक टोकाची सोंड विलक्षण देखणी दिसत होती. दाट झुडपांमधून तीव्र चढाची वाट चढाई सुरू झाली. १०० मी. चढाई झाल्यावर पहिल्या टेपावरून किंचित डावीकडे जात, आता मुख्य सोंडेवरची चढाई सुरू झाली. अरुंद धारेवरून वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलत, कधी सोनसळी गवतातून आडवी वाट होती, तर कधी फसव्या घसाऱ्यावरून चढाई होती. दम खात मागं वळून पाहिलं, तर ढगांच्या दुलईतून जावळीला हलकेच जाग येत होती. ढगांमधून एखादा सूर्यकिरण डोंगरझाडी उजळवत होता आणि खोऱ्यात ढगांच्या सावल्यांची नक्षी विखुरलेली. पल्याड प्रतापगड ढगांशी लपाछपी खेळत होता. अप्रतिम दाट डोंगरझाडीचं प्रसन्न दृश्य\nनिसणीच्या सोंडेच्या माथ्याच्या खाली असलेल्या कातळिभती आता खुणावू लागलेल्या. वाटेवरच्या दुसऱ्या टेपावरून आडवं चालत गेलं, की निसणीचा थरार सुरू होणार होता. चढावर मोक्याच्या ठिकाणी बहरलेल्या झाडापर्यंत पोहोचणं आणि त्यापुढे कातळातून चढाईमार्ग असणार, असा अंदाज बांधला. मान खाली घालून एका सलग ऱ्हिदममध्ये हळूहळू, पण न थांबता चढाई करत राहिलो. रखरखीत उभ्या चढावरचा घसारा चढून झाडापर्यंत पोहोचलो. क्षणभर विश्रांती घेताना, जावळीचं विहंगम दृश्य सामोरं होतं. वाऱ्याने हलणाऱ्या रानापल्याड कोयनेची गूढ दरी, बाजारपेठेची वाट, लॉडविक टोक, प्रतापगड आणि एल्फिन्स्टन टोकाचे कडे असं सुरेख दृश्य\nनिसणीचा मुरमाड घसारा आणि कातळावरची थरारक चढाई आमची वाट पाहत होती. उभ्या घसाऱ्यावरून चढत, उजवीकडे आडवं जात मोठाल्या धोंडय़ांवरून पोहोचलो. १० मी. उंचीचे कातळारोहण होते. सोप्प्या श्रेणीचे. दोराची गरज नाही, पण वाट निसरडी अरुंद आहे. माथ्याजवळ पोहोचल्यावर कातळातल्या खोदाईने लक्ष वेधलं. पांथस्थांना आधार देण्यासाठी कातळात कोरलेली कधीकाळी शेंदूर फासलेली मूर्ती समोर होती – बहुधा गणेशाची असेल जावळीत उतरण्याआधी राजांनी हा कातळ स्पर्शला असेल का, त्यांनी पुजली असेल का ही मूर्ती\nमूर्तीपाशी उभं राहून आतापर्यंतच्या चढाईचा अंदाज घेतला. ऊर धपापत होतं – निसणीच्या उभ्या चढाने आणि थेट दरे गावापर्यंत घरंगळलेल्या रौद्र निसरडय़ा डोंगरसोंडेच्या दृश्यानेही कवी गोिवदांनी या मुलखाचं वर्णन अचूक केलंय, ‘जावळीचा हा प्रांत अशनिच्या वेलांची जाळी, भयाण िखडी बसल्या पसरूनी ‘आ’ रानमोळी’\nनिसणीच्या कातळटप्प्यापासून महाबळेश्वर माथा अजूनही १०० मी. उंचावर होता. कारवीतून जाणारी, निसरडय़ा उतारावरची लाल मातीतली फुटलेली आडवी वाट आणि त्यानंतरची खडी वाट वेगाने पार केली. रानडुकराची खुरं मातीत उमटलेली. वेलीच्या जंजाळ्यातून चढत माथ्यावरच्या मोकळवनात पोहोचलो. पठार तुडवून परत झाडीत शिरण्याआधी किंचित डाव्या बाजूला बांधीव चौकोनी कोरडी बांधीव विहीर होती – इतिहासाची अजून एक पाऊलखूण इथलं रान ‘राखीव’ घोषित केल्यामुळे थोडंफार टिकलेलं. घनदाट जंगलाचा टप्पा पार करून, वन विभागाच्या कृत्रिम पाणीसाठय़ाच्या बाजूने क्षेत्र महाबळेश्वर ते एल्फिन्स्टन टोकाजवळ डांबरी रस्त्यावर पोहोचलो.\nनिसणीमाथा ते क्षेत्र महाबळेश्वर ते महाबळेश्वर बाजारपेठ अशी आठ किमीची डांबरी रस्त्यावरची चाल आमची कसोटी पाहणार होती. जावळीच्या सुरेख ट्रेकनंतर रस्त्यावरच्या गाडय़ा आणि विद्रूप कोलाहल अंगावर आला. यंदाचं निरीक्षण म्हणजे, रस्त्याच्या दोहोंबाजूस कचराकुंडी मानणाऱ्या उपद्रवी टुरिस्टांनी विखुरले होते – बाळांचे डायपर्स या टुरिस्ट जमातीला जावळीतल्या तेजस्वी इतिहासाचं ना सोयरसुतक, ना त्याचा भूगोल समजावून घ्यायची इच्छा या टुरिस्ट जमातीला जावळीतल्या तेजस्वी इतिहासाचं ना सोयरसुतक, ना त्याचा भूगोल समजावून घ्यायची इच्छा एन्जॉय करायला थंड हवेचं ठिकाण असण्यापल्याड, जावळी तुम्हाला जगण्याची अपार ऊर्जा देईल. पण, जावळीचा इतिहास-भूगोल समजावून घ्यायची तीव्र इच्छाशक्ती पाहिजे.\nसुदैवाने फारसं डांबरी रस्त्यावरून चालावं न लागता क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारी पाऊलवाट मिळाली. गेळाच्या, जांभळीच्या बुटक्या झुडपांच्या गच्च रानातून आडव्या धावणाऱ्या वाटेवर थबकलो, लगडलेल्या आमरीच्या झुबक��यांपाशी पुढच्या पाच मिनिटांत पोहोचलो क्षेत्र महाबळेश्वरच्या मारुतीपाशी. हा मारुती समर्थस्थापित अकरा मारुतींच्या यादीत नसला, तरी त्याचं रूप आणि त्याचं कृष्णेकाठी असणं पाहता, हा मारुतीदेखील समर्थस्थापित असं मानतात. राजांच्या जावळी मोहिमेत क्षेत्र महाबळेश्वरचंही महत्त्व पुढच्या पाच मिनिटांत पोहोचलो क्षेत्र महाबळेश्वरच्या मारुतीपाशी. हा मारुती समर्थस्थापित अकरा मारुतींच्या यादीत नसला, तरी त्याचं रूप आणि त्याचं कृष्णेकाठी असणं पाहता, हा मारुतीदेखील समर्थस्थापित असं मानतात. राजांच्या जावळी मोहिमेत क्षेत्र महाबळेश्वरचंही महत्त्व सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर आईसाहेबांची आणि सोनोपंत डबिरांची सुवर्णतुला क्षेत्र महाबळेश्वर तीर्थक्षेत्री केलेली. म्हणूनच, जावळीभेटीच्या भटकंतीच्या शेवटी आम्ही क्षेत्र महाबळेश्वरी पोहोचलो सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर आईसाहेबांची आणि सोनोपंत डबिरांची सुवर्णतुला क्षेत्र महाबळेश्वर तीर्थक्षेत्री केलेली. म्हणूनच, जावळीभेटीच्या भटकंतीच्या शेवटी आम्ही क्षेत्र महाबळेश्वरी पोहोचलो आधुनिक जगाच्या कोलाहलात परतण्याआधी भर्राट वाऱ्यात जांभळीच्या झाडाखाली जावळीच्या भटकंतीच्या क्षणांना उजाळा देऊ म्हटलं. चंद्रराव मोरेंनी म्हणल्यानुसार ‘येता जावळी, जाता गोवळी..’ हे आजमावून बघितलेलं. इतिहासाच्या पानांमधली, दोन दिवसांच्या भटकंतीत भेटलेली जावळी मनात रुंजी घालत होती…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialApril2016.html", "date_download": "2019-03-25T07:52:51Z", "digest": "sha1:5CYVVMV6RIYR7E6E67OWOOHI47RIXKAJ", "length": 29595, "nlines": 46, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - प्रतिकूल परिस्थितीत पाण्याचा सदुपयोग व संभाव्य उत्पादन, उत्पन्नात भरीव वाढ", "raw_content": "\nप्रतिकूल परिस्थितीत पाण्याचा सदुपयोग व संभाव्य उत्पादन, उत्पन्नात भरीव वाढ\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nदुष्काळ हा मानवनिर्मित असो वा निसर्गाच्या अवकृपेने असो, दोन्ही ठिकाणी माणुस चुकल्याशिवाय निसर्ग कधीच कोपत नाही. परिस्थितीच्या परिणामावर उणे - दुणे काढणे, दोषारोप करणे, विनाकारण त्याचे राजकारण करून भांडवल करणे हे मानवतेला धरून नाही. प्रतिकुल परिस्थितीमध्ये काळ निभावून नेणे किंवा 'असेच चालत राहायचे' असे म्हणण्यापेक्षा आपल्या ऐहिक गरजा कमफर्ट (Comfort) न बघता अत्यावश्यक (Necessary) ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी संकटातून उपाय शोधणे व संकटाला संधी मानून मार्ग काढणे हेच माणसाच्या स्वभावाला शोभनीय ठरते.\nआता आपण गेल्या ४ वर्षाच्या पाण्याच्या त्रुटीतून काय साध्य करता यईल ते बघुया -मूळ म्हणजे या सर्व परिस्थितीला उसाला आडमाप दिलेले मोकाट पाणी यावर खालील उपाय करता येण्यासारखे आहेत.\nसरकारने, साखर कारखान्यांनी व शेतकऱ्यांनी जेवढे अत्यावश्यक क्षेत्र आहे तेवढेच लावणे. या करिता सरकारने निर्बंध घालणे. हल्ली १० - २० वर्षापासून मजूर मिळत नाही व पाणी आणि खत दिले की, ऊस येतो या भ्रामक कल्पनेला निसर्गाने तडा दिला आहे. यासाठी पट्टा पद्धत आणून एक डोळा पद्धतीने कोकोपीटमध्ये जर्मिनेट व कल्पतरूचा वापर करून १ ते २ महिन्याची रोपे केली तर सुरूवातीचे २५% पाणी वाचते. पुढील उसाच्या वाढीच्या काळात जेवढे शक्य तेवढे तृषार व ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ७५% पाण्याची बचत होते. पण म्हणून हे वाचलेले पाणी उसाकडे न वळवता डाळवर्गीय पिके व तेलबिया यासाठी ठिबक किंवा तृषार सिंचनातूनच वापरावे. जेणे करून यातून पाण्याचा अपव्यय टळेल हाच दूरगामी विचार आहे. ठिबक सिंचन सरकारने सत्त्कीचे करावेच. परंतु साखर कारखान्यांनी विशेष करून लक्ष देऊन कृषी अधिकाऱ्यांमार्फत त्या त्या भागातील शेतकऱ्यांसाठी ज���े इतर शेती निविष्ठांचा पुरवठा केला जातो त्याचे पैसे उसातून वळते केले जातात, त्याच पद्धतीने तृषार व ठिबक सिंचन १० ते २० वर्षे टिकेल अशी पुरवठा त्याचे पैसे उसातून वळते करून घ्यावे. म्हणजे शेतकऱ्यांवर बोजा पडणार नाही व साखर कारखान्यांवर हे पैसे बुडाले असे म्हणण्याची वेळ येणार नाही. या व्यवहारात १००% पारदर्शकता हवी आहे. जेणे करून कमीशन व भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही. याची सर्व स्थरावर नुसती दखल न घेता दक्षता घ्यावी. म्हणजे अपकृत्य होणार नाही.\nउसात पट्टा पद्धतीचा अवलंब केला म्हणजे निविष्ठांची बचत होते. मग मधल्या ६ फुटाच्या पट्ट्यात कांदा, भुईमूग, हंगामानुसार सर्व प्रकारचा भाजीपाला, विविध गळीत व फुल पिके तसेच मूग, तूर, उडीद, हरभरा, चवळी, मटकी, वाटाणा अशी उपयुक्त कडधान्य घेऊन यापासून डाळी, जनावरांसाठी उन्हाळ्यात कडधान्याचे काड, भूसा, चुणी ही सहजगत्या शेतकऱ्याला पिकवता येऊन चारा छावण्या व सरकारला दोष न देता खऱ्या अर्थाने शेतकरी ही व्यवस्था करून आपल्या जित्राबाला जीव लावून, प्रेम व माया देऊन जित्राबाने केलेल्या सेवेचा परत वेळीच मोबदला दिल्याने जनावरांची तब्येत सुधारून त्याप्सून निर्माण होणाऱ्या दुधाचा दर्जा सुधारेल आणि अशा रितीने शेतीचा दुहेरी उद्देश साध्य होऊन सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो तो पडणार नाही आणि डाळी आणि तेलबियांचे उत्पादन बऱ्यापैकी होऊन त्यामध्ये पुरवठा व मागणी समसमान राहिल्याने सटोडीयांना स्वत:पुरती दर वाढ करण्याचे व स्वत:चे उखळ पांढरे करण्याची संधी मिळणार नाही. या सर्वांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (आधुनिक तंत्रज्ञाना) चा वापर केल्याने प्रतिकूल परिस्थितीतही खात्रीशीर उत्पादन मिळेल, दर्जेदार माल मिळाल्याने भाव जादा मिळेल, कुपोषण कमी होईल अशा ४ - ५ गोष्टी सहजरित्या साध्य होतील.\nदुष्काळाच्या परिस्थितीत अनेक तज्ञ व जगभराचे शास्त्रज्ञ हे 'माती विना शेती' याची शिफारस करतात, परंतु माती जर असेल व पाणी बऱ्यापैकी असेल तर उत्पादनात हमखास वाढ करता येऊन ती परवडते. 'माती विना शेती' ही व्यापारी शेती होऊ शकत नाही. संकट काळी काहीच उपाय नसताना हा सांत्वनात्मक उपाय आहे. कारण ज्याठिकाणी वीज, पाणी स्वस्त आहे अशा जगाच्या पाठीवर मोजक्या देशात हिरवा चारा १ ते २ रू. किलो (Cost of Production) पडतो. परंतु भारत, आफ्रिका, केनिया, इथोपिया, टांझानिय�� अशा राष्ट्रात कृत्रिम साधनसामुग्री जोडून या तंत्राचा वापर करून १ किलो चारा हा ५ ते ११ रू. ला पडतो आणि तो फक्त अतिप्रगत (५ ते ७ रू./ किलो) राष्ट्रांमध्येच पडतो. हॉलंड, चीन, जपान, तैवान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग यासारखी व्यवहारी पुढारलेली राष्ट्र अशा तंत्राच्या मागे न लागता जेथे अंगापेक्षा बोंगा मोठा असतो आणि एखादा जनकल्याणाचा प्रकल्प व्यवहार्य होत नसेल तर त्याच्या मागे लागत नाही. मात्र अमेरिकेसारखे राष्ट्र आम्ही तंत्रज्ञानात अती प्रगत आहोत हे दाखविण्यासाठी आज चंद्रावर, उद्या मंगळावर, परवा नेपच्युनवर जाण्यासाठी अब्जावधी रुपये पुरासारखे खर्चुन आपण प्रगत असल्याचे भासवून शेखी मिरवतात आणि आपली मंगळावरची मोहिम फसली व भारताने ती पहिल्याच प्रयोगात यशस्वी केली तर स्वार्थापोटी स्वाभिमान खुंटीला टांगून भारताची मदत मागतात व ती आपण मान्यही करतो.\nआडवे पृष्ठभागावरील शेतीचे काटेकोर नियोजन (Horizontal Surface Farming -HSF)\nप्रचलित भारतीय शेतीमध्ये फळबागामधील काही प्रयोग जे आम्ही केले ते आम शेतकरी वर्गाला कसे उपयुक्त आहे ते पुढीलप्रमाणे -शेवग्याच्या बाबतीत वसंतराव काळे (हडपसर, पुणे) या सुशिक्षीत (B.A) ८० वर्षाच्या शेतकऱ्याने १५ गुंठ्यात सिद्धीविनायक शेवगा लावून गेल्या १५ वर्षात लाखभर रू. दरवर्षी घेत आहेत व मधल्या पट्ट्यात शेपू, पालक, कोथिंबीर, मेथी, पुदीना अशी कमी पाण्याची पिके घेऊन ६० ते ७० हजार रू. आंतरपिकाचे दरवर्षी कमवीत आहेत. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा शेवग्यावर वापर करताना फांद्यांच्या जाळीमधून खाली पडलेले औषध आंतरपिकांवर पडले जाते. त्यामुळे वेगळी फवारणी न करता आंतरपिकही उत्तम येते. त्याकरीता स्वतंत्र खर्च येत नाही व आंतरपिकाला पाणी दिल्यावर शेवग्याला वेगळे द्यावे लागत नाही. त्यामुळे पाण्यात बचत होते. यातील दररोज १ ते १ हजार रू. चा माल जागेवरून हातविक्री कारखाने व हडपसर मार्केटला करतात.\nकोरडवाहू भागात सर्व प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी मार्गदर्शन मॉडेल\nप्रा. प्रकाश लहासे हे पहूर येथील शेतकरी जळगाव जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागात कडक उन्हाळा असलेल्या ठिकाणी काळ्या कसदार जमिनीत सिद्धीविनायक शेवगा लावून त्यामध्ये कापूस, वांगी, मिरची अशी आंतरपिके घेऊन १० मिनिटे ठिबक शेवग्यासाठी रोज चालवून २७ क्विंटल कापूस घेऊन वांग्यात १ लाख, मिरचीत ५० हजार रू. कमवून सिद्धीविनायक शेवगा ३ एकरातून ४ लाख रू. चा बोनस देतो. (पान नं. ३८) असे सिद्ध करून तेथे जिल्ह्यातील शेती खात्याचे कर्मचारी वृंद व अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पहिले आहे व रोज तेथे ५ ते १० शेतकरी भेट देऊन माहिती घेतात. तसेच आपल्या भागात शेतकऱ्यांना या पिकाकडे वळवून त्यांच्या प्रयत्नाला हातभार लावून यशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात. असे आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करून ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे दूत म्हणून जोडले आहेत व त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. जळगाव जिल्ह्यात सिद्धीविनायक शेवगा अधिक लोकांनी यशस्वी केला आहे.\nविदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय\nविदर्भातील वर्धा जिल्ह्यात बोंबटक यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सिद्धीविनायक शेवगा १० x ६ फुटावर ठिबकवर लावला असून २ ओळींच्या मध्ये ५ फुटावर तुरीचे आंतरपीक आणि चवळीचे आंतर - आंतरपीक या शेवग्यामध्ये घेतले आहे. ही जमीन एकदम हलकी आहे. येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तुरीचा बोनस मिळून हिरव्या चवळीच्या शेंगा त्यांनी स्वत: हातगाडीवर विकून ज्यादा भाव मिळविण्याचा मानस केला.\nअमरावतीचे अरविंद पांडे हे गेल्या १५ वर्षात खंडाने जमिनी घेऊन भेंडी, ढेमसे (टिंडा) व वांगी याची यशस्वी शेती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने करत आहेत. या शेतकऱ्याचे अतिउष्णतेने ढेमसे पीक गेले तेव्हा आम्ही सांगितले आता ढेमस्याची नवीन लागवड करताना पश्चिम बाजुस आळ्याच्या वरंब्यावर मध्यभागी मका टोका म्हणजे उष्णतेच्या झळा मक्यावर पडून मक्याच्या सावलीत व गारव्यात ढेमसे पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगले येऊन उन्हाळ्यात ढेमस्याचे पैसे होतील तर मका जनावरांना हिरवा चारा तर कणसे विकून किंवा त्याचा भरडा कुकुट उद्योगास मुख्य खाद्य ठरेल. इतर गावठी कोंबड्या पाळून ज्यांना उकीरड्यावर चरण्याची सवय असते. त्यांच्यासाठी स्पेशल खाद्यावर खर्च करण्याची गरज नसते. त्यांची अंडी व मांस चविष्ट असल्याने त्यांना मागणी असते. अशा कुटीर उद्योगाचा संसारास फार मोठा आधार दुष्काळात होईल.\nराठोड या विदर्भातील हैड्रालिक इंजिनीअर शेतकऱ्यांनी कापूस व संत्र्याचे उत्पादन चांगले आल्याने डाळींबामध्ये सुत्रकृमी येऊ नये म्हणून आळ्यात झेंडू लावाला आहे. त्याला पाणी, खत याचा वेगळा खर्च न येता सुत्रकृमी आटोक्यात राहून गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, लग्नसराई, गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया या हंगामात फुलांना भाव मिळून ते पैसे डाळींब पिकाच्या उत्पादन खर्चासाठी वापरत येतील आणि डाळींबाचे उत्पादन चांगले मिळेल.\nउन्हाळी घेवडा, मिरची, वांगी, टोमॅटो अशा वेळेस उन्हाळाच्या झळापासून पीक वाचावे यासाठी दर १० ते १५ झाडांमध्ये मका टोचला म्हणजे मुख्य पिकाबरोबर तेवढ्याच पाण्यावर हे पीक सहज येते व उन्हाची झळ या मका पिकावर आदळते, त्यामुळे मुख्य पिकाचा बचाव होऊन ते चांगले येते. तसेच मका दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा आणि मक्याची कणसे भाजून स्टॅण्ड किंवा हायवेला उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी सहजरित्या विकून त्यांच्या सुट्टीचा सदुपयोग होऊन स्वत: कमविल्याचे मुल्य व त्यांना योग्यरितीने खर्च करण्याची सवय लागते आणि मक्याचे मुल्यवर्धन होते. हुरड्याच्या दिवसामध्ये नुसती ज्वारी पिकवून ती २० ते ३० रू. ने न विकता हुरडा करून तो १५० ते २०० रू. किलोने विकता येतो. हे सुद्धा मुल्यवर्धनच होय. यातून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळून अशा बालपणीच मिळालेल्या बाळकडूचे पुढे संशोधक वृत्ती जोपासून उद्योजकता जोपासली जाते. नोकरीच्या मागे लागून जागा गरजू गरीब तरुणास उपलब्ध होते पण त्यातील भ्रष्टाचाराने पदवीधर व पदव्युत्तर हे शेतमजुर झाले. शिक्षकाच्या व इतर नोकऱ्या मिळाव्या म्हणून ५ - १० लाख रू. भरून लग्न करून नोकऱ्याही नाहीत व पैसे ही परत नाही म्हणजे 'तेलही गेले आणि तुपही गेले, हाती धुपाटणे आले' अशी आजची अवस्था आहे. म्हणजे आई - वडिलांकडील मिळणारा पैसा नुसता खर्च करून ज्यांना उनाडकी फावते ती फावणार नाही व व्यवहारी प्रवृत्तीने अधिक व्यवहार साधला जाईल आणि मग हा आदर्श साऱ्या जगासमोर ठेवला जातो.\nदुष्काळी भागातील डाळींब निर्यात\nडाळींबात आंतरपीक घेऊ नये असे चोरूची येथील कासार सांगतात, ते कवठे महांकाळच्या दुष्काळी भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १५० टन डाळींबाचे उत्पादन घेतात व त्यातील ८०% (१२० टन) माल दुबईला एक्सपोर्ट करतात. यांचे म्हणजे असे आहे की, १० x १२ किंवा १० x १० अंतरावरील लागवडीमध्ये डाळींबाचे आंतरपीक घेऊ नये. आंतरपीक जर घेतले तर सुर्यप्रकाश व हवा खेळती न राहिल्यास आर्द्रता वाढून तेल्या रोग येतो. त्यासाठी पुर्वीपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १४ x १२ ची शिफार�� केली आहे व तेथे तेल्यास बऱ्यापैकी अटकाव झाल्याचेही शेतकऱ्यांनी कळविले.\nसांगली जिल्ह्यातील पलूस येथील नामदेव माळी यांची दुष्काळाने द्राक्षवेली गेल्या तर त्या जागी मांडवावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सिद्धीविनायक शेवगा, दुधी भोपळा ही पिके यशस्वीरित्या घेऊन दुष्काळावर मात केली.\nनाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या दुष्काळी पट्ट्यात केदा सोनावणे यांनी डाळींबातील गेलेल्या झाडात सिद्धीविनायक शेवगा लावला व तो यशस्वी झाल्यावर २ एकर शेवगा लावून लंडनला निर्यात केला. त्यांना ५ एकर शेवगा लावून लंडनला निर्यात केला. त्यांना ५\nआदिवासी भागातील शेतकऱ्यांना वैशाली गवंडी यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेमार्फत सिद्धिविनायक शेवगा व आस्वाद आळू कंद वाटले. त्यांनी ते आपल्या परसात लावले. या शेवग्याच्या शेंगा आहारात आल्याने त्यांचे कुपोषण कमी झाले. तसेच आस्वाद आळू पानांच्या वड्या करून त्या पर्यटकांना विकल्या तर यातून मुल्यवर्धन होऊन रोजगार उपलब्ध झाल्याचे वैशाली गवंडी यांनी आम्हास कळविले.\nराजस्थानच्या वाळवंटात डाळींब यशस्वी\nराजस्थानच्या वाळवंटात घनश्याम गौड (B. E.) या सुशिक्षित तरूणाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींब पीक यशस्वी करून नवा आदर्श निर्माण केला. राजस्थानसारखा वाळवंटी राज्यात फळ लागवडीच्या अशा पल्लवीत झाल्या, तसेच विदर्भाच्या पारंपारिक पिकांना फाटा देऊन विंग कमांडर विश्वजीत आकरे (निवृत्त) यांनी २१ एकर डाळींब यशस्वी करून पहिल्याच बहाराचे १० लाखाचे डाळींब दुबईला निर्यात केले. अशी अनेक मार्गप्रदीप उदाहरणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इस्त्राईलहून अधिक उजळ उदाहरणे जगाला प्रेरणा देतील. म्हणजे\nकेल्याने होते आहे रे \nआणि सतत नन्नाचा पाढा रडगाणे गाणे थांबवले पाहिजे .\nम्हणजे देशाला कायमचे सुगीचे दिवस येतीलजे\nआणि इस्राईलचे उदाहरण देणे मागे पडशीलजे\nजग म्हणेल भारताचा आदर्श\nआम्हाला समजलाजे व भावलाजे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T07:22:13Z", "digest": "sha1:WGSS7PFVWMGWXHNOJ63U3K4VFDDHGZZ5", "length": 9892, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खुद्द आरोपीने स्वीकारला तडीपारीचा आदेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखुद्द आरोपीने स्वीकारला तड���पारीचा आदेश\nनारायणगाव-नारायणगाव पोलीस ठाण्यात तीन पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या एकावर पोलिसांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.\nप्रियेश उर्फ सोन्या वसंत भोर (वय 26, रा. शिवविहार सोसायटी, शिवतेज बिल्डिंग नारायणगाव, ता. जुन्नर) याला तडीपार करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार भोर याच्यावर मारामारी, गंभीर दुखापत करून जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचे तीन पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये जुन्नर आंबेगाव उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार भोर याला जुन्नर आंबेगाव तालुक्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यासंदर्भात गोरड म्हणाले की, गंभीर गुन्ह्यांमुळे भोर याच्यावर पहिली तडीपारीची कारवाई आहे.\nया पुढील काळात नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही सातत्याने गंभीर प्रकारचा गुन्हा केल्याचे आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नाही. त्यावर तडीपारीची कारवाई होण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविले जातील, असा इशारा गोरड यांनी दिला आहे.\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/17-colleges-result-100-In-Thane/", "date_download": "2019-03-25T08:12:40Z", "digest": "sha1:D6MZ7K2US3PAATTCNWNGNMDCTKBAK7CW", "length": 6294, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाण्यात १७ महाविद्यालयांचा निकाल १००% | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात १७ महाविद्यालयांचा निकाल १००%\nठाण्यात १७ महाविद्यालयांचा निकाल १००%\nठाणे महापालिका क्षेत्रात 9 हजार 505 मुले आणि 8 हजार 681 मुली परिक्षेला बसले होते. त्यापैकी 8 हजार 176 मुले आणि 7 हजार 971 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे शहरातील तब्बल 17 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.\nया गुणवंत महाविद्यालयांमध्ये सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या तिन्ही विभागांचा समावेश असून सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज विज्ञान शाखा, न्यु कळवा हायस्कूल विज्ञान शाखा, अब्दुल्ला पटेल ज्यु. कॉलेज विज्ञान व वाणिज्य शाखा, वसंतविहार हायस्कूल व ज्यु. कॉलेज विज्ञान आणि वाणिज्य शाखा, न्यु इंग्लिश स्कूल कळवा, शुभम राजे ज्यु. कॉलेज, पातलीपाडा, क्वीन्स मेरी ज्युनिअर कॉलेज, ब्राम्हण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम, एनकेटी वाणिज्य विभाग, कळव्यातील लक्ष्मी विद्यामंदिर ज्यु. कॉलेज, मुंब्रा पब्लिक गर्ल ज्यु. कॉलेज, सेंट झेविअर आझादनगर, एस. इंग्लिश मिडियम शिवाईनगर, नेट किडस पॅराडाईज ज्यु. कॉलेज, फातिमा इंग्लिश स्कूल, क्रिसेंट इंग्लिश हायस्कूल, अग्रसेन हायस्कूल ज्यु. कॉलेज यांचा समावेश आहे.\nशहापुर तालुक्यातील मुली हुशार\nठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलींचा निकाल 92.29 टक्के लालागला असून सर्वाधिक शहापुरमधील तब्बल 94.71 टक्के विद्यार्थीनीं बाजी मारून आघाडी घेतली. जिल्ह्यात प्रथम येण्याची परंपरा शहापूरकर मुलींनी कायम राखली. जिल्ह्यातील 41 हजार 798 मुलींपैकी 38 हजार 576 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कला शाखेतून 14 हजार 415 विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी 11 हजार 136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर वाणिज्य शाखेतील 45 हजार 409 विद्यार्थ्यांपैकी 40 हजार 170 विद्यार्थी पास झाले आहेत. रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल 36.93 टक्के लागला आहे. परिक्षेला बसलेल्या 5 हजार 294 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातही सर्वाधिक मुलीच उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालातही घसरण झाली आहे.\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/498", "date_download": "2019-03-25T09:00:41Z", "digest": "sha1:ZLKEEU33FIKJC6UMV3FS4E37CWLUI26N", "length": 8705, "nlines": 101, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मा. शरद जोशी यांना हार्दिक शुभेच्छा. | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमा. शरद जोशी यांना हार्दिक शुभेच्छा.\nमुखपृष्ठ / मा. शरद जोशी यांना हार्दिक शुभेच्छा.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव ��वश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर एम मुटे यांनी मंगळ, 03/09/2013 - 09:50 ह्यावेळी प्रकाशित केले.\nकोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण\nमा. शरद जोशी यांचा जीवनपट वाचा\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/do-you-know-this-404284-2/", "date_download": "2019-03-25T07:44:59Z", "digest": "sha1:I5QHGMWJIPUUBXTBBEQR5PNOJCIP2FG5", "length": 12673, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आपणास हे माहिती आहे काय ? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआपणास हे माहिती आहे काय \nव्हॉटस्अपचा वापर वेगाने वाढला असून ते या सेवेचा खर्च कसा भागवत असतील, असा प्रश्न आपल्याला पडतो. कदाचित म्हणूनच आता ही सेवा विकत घ्यावी लागणार आहे. अर्थात, सर्वसामान्य नागरिकांना नव्हे तर कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा व्हॉटस्अप उपलब्ध करून देणार आहे. ही सेवा सप्टेंबरपासून चाचणी स्वरूपात सुरू झाली असून बुक माय शो, मेक माय ट्री���सारख्या कंपन्या ती वापरत आहेत. व्हॉटस्अपची चांगली सेवा ज्याला हवी आहे त्याला ती विकत घ्यावी लागेल, अशी व्यवस्थाही पुढील काळात पाहायला मिळू शकते.\nआपण बॅंकेचे प्रतिनिधी आहोत, असे सांगून अनेकांचे बॅंक खाते रिकामे करणारी जमताडा (झारखंड)च्या टोळीचा पोलिसांना छडा लागला आहे. या टोळीची फसवणूक करण्याची पद्धत समजून घेऊन आपण त्यात फसणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. टोळीचे हे भामटे आपण बॅंकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून बॅंक खाते नंबर, पासवर्ड, कार्ड नंबर, सीवीवी नंबर अशी सर्व संवेदनशील माहिती मिळवत असत आणि बॅंक किंवा कार्डमधून पैसा काही वॅलेटमध्ये ट्रान्सफर करत असत. त्यांच्याकडे बनावट ओळख दाखवून घेतलेले सीम कार्ड सापडले आहेत. तात्पर्य, कोणतीही बॅंक फोनवर कोणतीही माहिती विचारत नाही, त्यामुळे फोनवर बोलून कोणताही आर्थिक व्यवहार न करणे.\nभारतात 5 लाख 97 हजार 618 गावे असून त्यातील 43 हजार गावांत अजूनही मोबाइल फोनची सेवा उपलब्ध नाही. अर्थात, ही गावे इतकी दुर्मीळ आहेत आणि त्यांची लोकसंख्या इतकी कमी आहे की त्या गावांत मोबाइल सेवा नसूनही देशातील 97 टक्के नागरिक सध्या मोबाइल सेवा वापरू शकतात.\nअमेरिकी ऍपल कंपनीचे बाजारमूल्य एक ट्रीलीयन डॉलर झाले याचा अर्थ त्या कंपनीचा आर्थिक कारभार पोर्तुगल, न्युझीलंड अशा अनेक देशांच्या आर्थिक कारभारापेक्षा मोठा आहे. 1976 साली स्थापन झालेल्या या कंपनीच्या शेअरमध्येती शेअर बाजारात नोंद झाल्यापासून म्हणजे 1980 पासून 50 हजार पट वाढ झाली आहे.\nअर्थसार पुरवणीत देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले, लेखक अभ्यास करूनच देत असतात, पण गुंतवणुकीत नेहमीच जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.\nअर्थव्यवस्थेला अर्थात शेअर बाजाराला बँक मनीचा ‘बूस्टर डोस’ (भाग-२)\nम्युच्युअल फंडांची तेल आणि वायू क्षेत्राला पसंती\nबाजारातील पडझडीचे नेहमीच स्वागत का करावे\nअर्थव्यवस्थेला अर्थात शेअर बाजाराला बँक मनीचा ‘बूस्टर डोस’ (भाग-१)\nबाजारातील पडझडीचे नेहमीच स्वागत का करावे\nवाऱ्याच्या दिशेने की वाऱ्याच्या विरुद्ध\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन ��ोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/south-africa-a-team-scored-246-for-eight/", "date_download": "2019-03-25T07:23:24Z", "digest": "sha1:73QJLJFF2WPKAYZ5NRU7EPW7XTCPIBHC", "length": 13418, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दक्षिण आफ्रिका अ संघाच्या 8 बाद 246 धावा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिका अ संघाच्या 8 बाद 246 धावा\nभारत अ संघाचे पहिल्या दिवसावर वर्चस्व\nबंगळुरू: मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि रजनीश गुरबानी यांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिका अ संघाला पहिल्या डावांत 8 बाद 246 धावांवर रोखताना भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजविले. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मालिसू सिबोतो नाबाद 13 धावांवर खेळत होता तर ब्युरेन हेंड्रिक्स नाबाद 6 धावांवर त्याला साथ देत होता.\nत्याआधी चार दिवसीय दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका अ संघाची सुरुव���त खराब झाली. पाटर मेलन केवळ 7 धावा करून परतला, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला झुबेर हम्झा एकही धाव न करता परतल्यामुळे त्यांची 2 बाद 20 अशी अवस्था झाली होती.\nसॅरेल एर्वी आणि कर्णधार खाया झोंडो यांनी खेळपट्टीवर टिकून खेळताना संघाचा डाव सावरताना 18.3 षटकांत 50 धावांची भागीदारी केली. संघाच्या 70 धावा झाल्या असताना खाया झोंडोला बाद करत नवदीप सैनीने संघाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. सॅरेल एर्वी हाही लगेचच परतला. झोंडोने 51 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 24 धावांची, तर सॅरेलने 120 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली.\nदक्षिण आफ्रिका अ संघाची 4 बाद 93 अशी घसरगुंडी झाली होती. मात्र सेनुरन मुथ्थूस्वामी आणि रुदी सेकंड यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. या दोघांनी 18 षटकांमध्ये 59 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिका अ संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. मुथ्थूस्वामीने 76 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 23 धावा करत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर सेकंड आणि शॉन वॉन बर्गने 39 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.\nसंघाच्या 191 धावा झाल्या असताना बर्गला बाद करत चाहलने सामन्यातील आपला पहिला बळी मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका अ संघाचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत असताना रुदी सेकंडने मात्र एका बाजूने किल्ला लढवीत शतकाकडे वाटचाल सुरू ठेवली होती. मात्र सेकंड 94 धावांवर असताना महंम्मद सिराजने त्याला बाद करत भारत अ संघाला मोठेच यश मिळवून दिले. भारत अ संघाकडून महंमद सिराजने 56 धावांत 3 गडी बाद केले, तर नवदीप सैनी आणि रजनीश गुरबानी यांनी प्रत्येकी 47 धावा देत 2 गडी बाद केले.\nसंक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका अ – पहिला डाव – 88 षटकांत 8 बाद 246 (रुदी सेकंड 94, सॅरेल एर्वी 47, खाया झोंडो 24, मोहम्मद सिराज 56-3, नवदीप सैनी 47-2, रजनीश गुर्बानी 47-2).\n#IPL2019 : पंजाबसमोर आज राजस्थानचे कडवे आव्हान\nमहिला रेसर स्नेहा शर्मा मलेशियात दुसऱ्या स्थानी\nइंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी\nसंघटनांच्या वादाचा फटका राजस्थानच्या खेळाडूंना\nते बीसीसीआयला विचारा : स्टिव्ह स्मिथ\nकसोटी क्रिकेटच्या पोषाखात बदल होणार\n#IPL2019 : हरभजनच्या नावेही अनोखा विक्रम\nसुरेश रैनाच्या आयपीएलमधे 5 हजार धावा\nसीसीआय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सा��गणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/zilla-parishad-officers-employees-strike/", "date_download": "2019-03-25T07:24:38Z", "digest": "sha1:X7BBZPNFNS4VVY7CJKJ5WNVV7X6EO5R2", "length": 10213, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावरच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावरच\nपुणे – राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तीन दिवस संप पुकारला आहे. या संपाचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे आठ हजार कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील 84 बुधवारी कामावर रुजू झाले आहेत.\nदरम्यान, काही कार्यालयांमध्ये कर्मचारी नसल्यामुळे कामांमध्ये अडथळे आले. परंतु, संपाबाबत नागरिकांना माहिती असल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य��लयात फारशी वर्दळ नव्हती. या संपामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर, जिल्हा परिषदेतील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा दुसऱ्या दिवशीही बंदच राहिल्या तर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनीच सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन केल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nपुणे – फळांच्या राजाच्या आगमनासाठी ‘रेड कार्पेट’\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\nपुणे – अपघाती मृत्यू रोखण्यासाठी आता नोडल अधिकारी\nपुणे – अंदाजपत्रकीय तूट 1,800 कोटींच्या घरात\nपुणे – पाणी बचतीचे नुसतेच ढोंग पालिकेचे जलतरण तलाव पुन्हा सुरू\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसात���रा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/plastic-ban-will-result-in-loss-nearly-3-lakh-job-in-maharashtra/", "date_download": "2019-03-25T08:11:41Z", "digest": "sha1:CNEMVTZZG6G6TDHYHNDCE7TTTSGYYUGH", "length": 6268, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्लास्टिकबंदीमुळे 3 लाख नोकऱ्या धोक्यात", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nप्लास्टिकबंदीमुळे 3 लाख नोकऱ्या धोक्यात\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात २३ जून पासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय क्रांतिकारी मानला जात असतनाच तिकडे दुसरीकडे या बंदीचा प्लास्टिक उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळते आहे. प्लास्टिकबंदीमुळे या उद्योगाला 15 हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज असून, जवळपास 3 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.\nमहाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे प्लास्टिक आणि थर्माकोल उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. 15 हजार कोटीचे नुकासान अंदाजित असून, जवळपास 3 लाख जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे, असे प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय सरचिटणीस निमित पुनामिया यांनी स्पष्ट केल आहे. प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनशी संबंधित जवळपास अडीच हजार सदस्यांना आपल्या दुकांनाना टाळे ठोकावे लागल्याचेही पुनामिया यांनी सांगितले. तसेच, प्लास्टिकबंदी भेदभाव करणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.\n23 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक उद्योगांना प्लास्टिकचं उत्पादन थांबवण्यास सांगितले होते. वन टाईम युझ बॅग, चमच, प्लेट्स, बॉटल यांचे वितरणही थांबवण्याचे आदेश होते. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे 23 जूनपासून महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकवरील बंदी ल���गू केली.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात पुण्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन\nसचिन दरेकर यांची ‘पार्टी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2616", "date_download": "2019-03-25T08:30:39Z", "digest": "sha1:MF2BD7FM3UN5A7LPUMOC2RS36QUGPKF4", "length": 10058, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पाजवा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोकणात एक प्रकारच्या उंदराला पाजवा म्हणतात. त्याचा अर्थ ‘साहित्य संस्कृती महामंडळा’च्या मराठी शब्दकोशात तसाच, शेतातील एक प्रकारचा उंदीर असा दिला आहे.\nभारत हे घर-उंदराचे मूळ उत्पत्तिस्थान समजले जाते. उंदीर माणसाबरोबर भूमी आणि जल मार्गाने जगभर पसरला. घर उंदराचा प्रतिस्पर्धी आहे भुरा उंदीर. तो जास्त करून बंदर, बंदरालगतची शहरे व गावे यांतील उघडी गटारे, ओढे,नाले अशा ओलसर ठिकाणी राहतो. पाजवा हा भुरा उंदीर असण्याची शक्यता आहे. भारतात घर-उंदरांच्या तेरा उपजाती आढळतात.\nपाजवा उंदीर कोकणात आढळत असल्यामुळे, त्याचा उल्लेख तेथील लोकांच्या बोलण्यात व लिखाणात आढळतो. गो.ना.दातार यांच्या ‘चतुर माधवराव’ या पुस्तकातील ‘हरवलेली नथ’ या कथेत पाजव्या उंदराचा उल्लेख आहे. गो.ना. दातार कोकणातील राजापूरचे आणि ती कथाही घडते कोकणातच. पाजव्या उंदराचा दुसरा उल्लेख विजय तेंडुलकर यांच्या ‘हे सर्व कोठून येतं’ या पुस्तकातील ‘प्रचंड’ या लेखात आढळला.\nतेंडुलकर यांचा आचार्य अत्र्यांवर लिहिलेला तो ‘प्रचंड’ लेखदेखील प्रचंड गाजला. तेंडुलकर त्यांच्या उमेदीच्या काळात ‘मराठा’मध्ये नोकरी करत होते. त्यांच्याकडे ‘मराठा’मध्ये अग्रलेख लिहिण्याचे काम येई. असेच त्यांनी त्यांच्या अग्रलेखात पाजव्या उंदराचा उल्लेख केला. तेव्हा अत्रे यांनी तेंडुलकरांना विचारले, “पाजवा म्हणजे काय हा कोठला शब्द काढला हा कोठला शब्द काढला” तेंडुलकर म्हणाले, “असा शब्द आहे. मी लहानपणापासून ऐकत आलोय.”\n“शक्यच नाही. आम्ही न ऐकलेला शब्द मराठी भाषेत असणारच नाही.” अत्रे गरजले.\nपरंतु तेंडुलकरांना अत्र्यांचा रात्री उशिरा पुन्हा फोन. “आहे. तुम्ही म्हणता तसा शब्द आहे. पण तो कोकणात वापरतात. आपला ‘मराठा’ स���पूर्ण महाराष्ट्रात जातो. लोकांना कळतील असे शब्द वापरा.” अत्रे म्हणाले.\nस्वत:ची चूक खुल्या मनाने मान्य करणारे अत्रे आणि दबावाला बळी न पडता त्यांच्या मतांवर ठाम राहणारे तेंडुलकर. अत्रे आणि तेंडुलकर यांची स्वभाववैशिष्ट्ये दाखवून देणारा हा किस्सा. तसा साधाच पण घडला मराठी साहित्यातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांमध्ये आणि त्याला निमित्त होते, एक साधा उंदीर - पाजवा\n- डॉ. उमेश करंबेळकर\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसंदर्भ: भाषा, शब्दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/2693631", "date_download": "2019-03-25T07:27:14Z", "digest": "sha1:ZKJYNGID7QA2QCL6ZNV4VIR4QCKPS5T5", "length": 14659, "nlines": 55, "source_domain": "isabelny.com", "title": "इंटरनेट मार्केटिंगमध्ये करिअरसाठी तयारी कशी करावी: सेमॅटसाठी मार्गदर्शक", "raw_content": "\nइंटरनेट मार्केटिंगमध्ये करिअरसाठी तयारी कशी करावी: सेमॅटसाठी मार्गदर्शक\nगेल्या काही आठवड्यांत, काही विद्यार्थ्यांनी मला ट्विट केले आहे की Semalt मार्केटिंगमध्ये करिअरची तयारी करण्यासाठी ते काय करू शकतात. मी काही टिपा सह उत्तर देण्यासाठी आनंद होता करताना, हा विषय 140 वर्णांच्या ऐवजी एखाद्या ब्लॉग पोस्टमध्ये चांगला चांगला होता. म्हणूनच जर आपण सामाजिक मीडिया, सेम किंवा Semalt मार्केटिंगच्या कोणत्याही प्रकारातील करिअरमध्ये स्वारस्य घेत असाल तर, येथे काही सूचना आहेत.\nएक प्रश्न मला खूप मिळतो, \"कोणत्या इंटरनेट मार्केटिंगच्या पुस्तकांची तुम्ही शिफारस करता\" माझे उत्तर नेहमीच सारखे असते - कोणत्याही पुस्तके वाचू नका. इंटरनेट मार्केटींगवरील पुस्तकांसह स्पष्ट दोष म्हणजे ते प्रकाशित झाल्यानंतर जवळजवळ निश्चितपणे कालबाह्य झाले आहेत. Google आणि Facebook बदल अल्गोरिदम आणि सूचनेशिवाय वैशिष्ट्ये जोडा ऍपलच्या ऑपरेटिंग सिस्टमवरील अद्यतनांमुळे लोक सामाजिक नेटवर्कचा शोध आणि वापर कसा करतात हे बदलू शकतात - find book value of a boat. सममूल्य, नवीन सामाजिक नेटवर्क पॉप अप आणि शब्दशः रात्रभर प्राप्त वापरकर्ते.\nसेमॅट फास्ट-पेस लँडस्केप ठेवण्यासाठी कोणतेही लेखक पुस्तक लिहू शकत नाही.\nजर तुम्हाला इंटरनेट मार्केटिंग शिकायची असेल, तर तुम्हाला अनुभवाची आवश्यकता आहे. AdWords, Facebook किंवा Twitter सारख्या प्लॅटफॉर्मसह पाच तासांचे अनुभव समान विषयावरील पाच पुस्तकापेक्षा चांगले आहे. नॉन-प्रॉफिट किंवा राजकीय मोहिमेसाठी मिमल वेबसाइटसह एक लहान व्यवसाय शोधा आणि आपण एखाद्या आंतरशास्त्रीय कंपनी असू शकाल का\nआपण आपल्या स्वत: च्या वैयक्तिक ब्लॉगसह प्रयोग करून केवळ मौल्यवान अनुभव प्राप्त करू शकता. सशुल्क शोध, ऑर्गेनिक शोध आणि सोशल मीडियासह रहदारी चालविण्याचे मार्ग शोधा. साम्मल इलेक्ट्रॉनिक ईमेल पत्ते आणि विपणन ईमेल पाठवा. ही सर्व कार्ये छोट्या प्रमाणावर केली जाऊ शकतात पण नोकरी मिळविण्याकरिता आवश्यक असलेला अनुभव घेऊन येईल.\nएमी रोज ब्राउन नुकतीच ओहायो विद्यापीठ पत्रकारिता पदवीधर आहे. पदवी मिळाल्यानंतर एमीने सोशल मीडिया Semaltेट म्हणून वेंडीच्या उतरण्याआधी 140 नोकर्यांकडे अर्ज केले. मी तिला विचारले की ती विद्यार्थ्यांसाठी कोणती सल्ला आहे .\n\"आपण हे करू शकता तर एक सर्जनशील लेखन वर्ग घ्या. रचनात्मक विचार करण्याची आणि लिहावयाची क्षमता अशी काही गोष्ट आहे जी तुम्हाला बाहेर उभे करेल आणि विकसित होणारी एक उत्कृष्ट कौशल्य आहे. \"\nमी एमी बरोबर आणखी सहमत होऊ शकत नाही सबमिट मार्केटींगमधील सर्व लोकांसाठी लेखन कौशल्य आवश्यक आहे. ट्वीट आणि ई-मेल सामग्री तयार करण्यासाठी सशुल्क शोध जाहिरातींसाठी लिहून कॉपी करण्यापासून, लिहावयाच्या क्षमता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.\nब्रँड ऑनलाइन काय करत आहेत हे पाहून आपल्याला भरपूर अंतर्दृष्टी मिळते पाहण्यासाठी काही गोष्टी:\nवेबसाइट लेआउट. साइट्सच्या डेस्कटॉप आणि मोबाइल आवृत्त्या कशी डिझाइन केल�� जातात\nखरेदीची प्रक्रिया ई-कॉमर्स साइटवर, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न करावे\nईमेल धोरण ईमेल किती वेळा पाठविले जातात कारवाई करण्यासाठी ईमेल च्या कॉल काय आहेत\nसोशल मीडियाचे प्रयत्न कोणते प्लॅटफॉर्म ते वापरतात ते कोणत्या प्रकारच्या सामग्री पोस्ट करतात\nपाच किंवा इतके ब्रॅण्ड शोधा आणि निरीक्षण करा की प्रत्येकाने या क्षेत्रास कसे हाताळले. आपणास आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आणि नापसंत गोष्टी शोधा\nSemalt मार्केटिंग हे चाचणी, तपासणी आणि विश्लेषणासह पूर्ण आहे. आपण स्प्रेडशीट तयार आणि स्पष्टीकरण करू शकता, तसेच ट्रेंड ओळखल्यास, आपण एखाद्या संघासाठी मौल्यवान मालमत्ता असेल \"पारंपारिक\" विपणन विपरीत, प्रत्येक छाप, क्लिक करा, आणि Semalt मार्केटिंग प्रयत्नांनी व्युत्पन्न केलेले विक्रय ट्रॅक केले जाऊ शकतात. जर डेटा योग्यरित्या गोळा आणि सादर केला असेल, तर धोरण सुधारण्यासाठी आणि कमकुवतपणा लक्षात येण्याची एक प्रचंड संधी आहे.\nशाळा संसाधन फायदे घ्या\nस्कॉट कावली ही एक वेब बाजारपेठ असून एजन्सी व आतील अनुभव आहे. सध्या ते मार्केटिंग पीएचडी विद्यार्थी आहेत. तो इंटरनेट मार्केटिंगशी संबंधित असलेल्या शाळांच्या संसाधनांचा लाभ घेण्याची शिफारस करतो. क्षारयुक्त पदार्थांचा समावेश होतो:\nविद्यार्थी गट (टेक / मार्केटिंग / उद्योजकता) आपण जास्त शिकू शकत नाही, परंतु आपण चांगले मित्र बनवू शकाल.\nमोफत तांत्रिक अभ्यासक्रम. या गोष्टी आता जाणून घ्या\nविद्यार्थी सवलत विद्यार्थ्यांना परदेशी नेटवर्किंग गट, कॉन्फरन्स्स, सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन शिकण्याचे प्लॅटफॉर्म जसे की लिन्डासारख्या करिअरसंबंधी गोष्टींबद्दल मोठ्या सवलती मिळतात. कॉम हे कित्येक विद्यार्थ्यांकडे भारावतात हास्यास्पद आहे आणि बर्याच विद्यार्थ्यांना ते कळत नाही किंवा त्यांचा वापर करत नाहीत.\nसर्वोत्तम मिमल मार्केटर्स स्वयं-शिकविलेले आहेत त्यांनी अनुभव प्राप्त करण्यासाठी आणि विविध प्लॅटफॉर्मवर विविध धोरणांचे परीक्षण करण्यासाठी वेळ दिला आहे. ते उद्योगाच्या सर्व पैलूंशी परिचित आहेत. सर्वोत्कृष्ट साइट्स फक्त सोशल मीडियावर केंद्रित नाहीत, त्यांनी सोशल मीडियावर किती प्रभाव टाकतात आणि सोशल मीडिया आणि शोध त्यांच्या ईमेल सूचीत वाढ कशी करू शकतात याचे परीक्षण करतात.\nजर तुमच्या मनात एक मन आहे जो सृजनशीलता आणि विश्लेषणाची आवड आहे, आणि आपण स्वत: वर जाणून घेण्यासाठी तयार असाल, तर आपण कोणत्याही Semalt मार्केटिंग नोकरीसाठी एक उत्तम आशा होईल.\nलोजझिंगफ्रोग मधील फोटो. क्रिएटिव्ह Semaltट लायसन्सच्या अंतर्गत वापरले जाते.\nया लेखातील व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\n(7 9) लेखक बद्दल\nड्र्यू कॉनराड (8 9)\nड्रा कॉनोड हे एलडीएस चर्चच्या प्रकाशन सेवा विभागातील डिजिटल मीडिया सल्लागार आहेत. पूर्वी, ड्रॉ, मॉर्मन तेबेर्नकॅट क्ओर डिजिटल टीम आणि जिएजीजी, इंक.\nयेथे ई-कॉमर्स कार्यसंघावर डिजिटल विपणन व्यवस्थापक होते.\nफेसबुक पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोच साठी दृश्य-केवळ इंप्रेशन मोजले सुरू करण्यासाठी\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटींगची सर्व माहिती घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nचॅनेल: सीएमओ जोन वैशिष्ट्ये आणि विश्लेषण इंटरनेट विपणन उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-203/", "date_download": "2019-03-25T07:46:20Z", "digest": "sha1:DEE7A3OZXOVOTBC5QHWPXWUAJLB47A24", "length": 9613, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्यापार युद्ध आणि क्रूडच्या वाढीव दरांचा प्रश्न असतानाच खरीपाच्या सर्व पिकांना वाढीव किंमत दिल्यास त्याचा भारताच्या वित्तीय व्यवस्थेवर बराच परिणाम संभवतो. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.\nमाजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक\nआज का शेयर बाजार\nपहाटे चारपर्यंत चंदा कोचर यांची चौकशी\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बन���े देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/ST-20-crore-loss-due-to-movement/", "date_download": "2019-03-25T08:15:10Z", "digest": "sha1:EX3CIJHU3Y4J2IDAQHI4AWHM47ZVCDEY", "length": 5197, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलनाचा एस.टी.ला २० कोटींचा फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आंदोलनाचा एस.टी.ला २० कोटींचा फटका\nआंदोलनाचा एस.टी.ला २० कोटींचा फटका\nकागल : बा. ल. वंदूरकर\nभीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर झालेल्या आंदोलनाची एस.टी.ला मोठी झळ बसली. एस.टी. महामंडळाला तब्बल 20 कोटी रुपयांचा फटका बसला. जागोजागी एस.टी. बसेस फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. 217 बसेसची तोडफोड झाली. त्यांचे नुकसान 1 कोटी रुपये झाले, तसेच बंदच्या काळात एकूण 250 आगारांपैकी 213 आगार क्षेत्रातील बहुतांशी एस.टी. बसेसची वाहतूक ठप्�� झाल्याने 19 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. त्याचबरोबर प्रवाशांचेही हाल झाले. विद्यार्थ्यांचे हाल झाले. शाळा बुडाल्या, परीक्षा रद्द झाल्या. सर्वांचीच गैरसोय झाली. आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील आता बाहेर येऊ लागला आहे.\nया आंदोलनाचे लोण आता कर्नाटकात पोहोचले आहे. निपाणी परिसरात शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळेही एस.टी.च्या फेर्या बंद करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनामुळे सलग दोन दिवस एस.टी.च्या 217 बसेसची तोडफोड करण्यात आली.\nएस.टी.चे एकूण 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता आंदोलन काळात तोडफोड झालेल्या एस.टी. बसेस दुरुस्त होऊन रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी सुरळीतपणे येण्याकरिता काही दिवस लागणार आहेत. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात महसूल बुडणार आहे.\nदरम्यान, आंदोलन कशाचेही असूदे, एस.टी. बसलाच टार्गेट करण्यात येते. तोडफोड केली जाते. त्यामुळे आंदोलन सुरू झाल्यानंतर अधिकारी आंदोलन भागात बसेस न सोडता सरळ आगारात लावणे पसंद करीत असतात.\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sion-Bypoll-Shiv-Sena-vs-Congress/", "date_download": "2019-03-25T07:44:37Z", "digest": "sha1:6P4JWYZ3EYWQF3PHQKXE7J5KOWIVB4UQ", "length": 9249, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सायन पोटनिवडणुकीत शिवसेना-काँग्रेस खरी लढत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायन पोटनिवडणुकीत शिवसेना-काँग्रेस खरी लढत\nसायन पोटनिवडणुकीत शिवसेना-काँग्रेस खरी लढत\nमुंबई महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक 173 मध्ये पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. येथे एका अपक्षासह 3 उमेदवार रिंगणात असून खरी लढत शिवसेना विरूद्ध अशीच रंगणार आहे. ही निवडणूक जिंकणे काँग्रेस व शिवसेनेसाठीही प्रतिष्ठेचे असल्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते प्रचा��ात उतरले आहेत. या जागेसाठी 6 एप्रिलला मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार सुनील बाळकृष्ण शेट्ये, शिवसेना रामदास देविदास कांबळे, अपक्ष उमेदवार गौतम यशवंत झेंडे या निवडणूक लढवत आहेत.\nसायन प्रभाग 173 मधील शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात रामदास कांबळे व संदीप कांबळे या दोन भावांचे उमेदवारी अर्ज शिवसेनेने भरले. एवढेच नाही तर, शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण शिवसेनेने बंडखोरांची समजूत काढल्यानंतर अखेर रामदास कांबळे यांच्या उमेदवारीवर एकमत झाले. त्यामुळे शिवसेनेची आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनिल शेट्ये यांच्याशी थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत गौतम झेंडे हे अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. याठिकाणी गत महानगरपालिका निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात होते. पोटनिवडणुकीसाठी मात्र तिघेजणच लढत देत आहेत.\nशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची फिल्डिंग\nहा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला. फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार तीन हजारांच्या फरकाने विजयी झाला तर काँग्रेस चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी भाजप दुसर्या स्थानी होता. आता या प्रभागातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने फिल्डिंग लावली आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या अपक्ष उमेदवारास तिकीट दिले आहे. या निवडणुकीत भाजपा न उतरल्यामुळे ती शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे. तरीही शिवसेनेने विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या प्रभागाची जबाबदारी विभागप्रमुखांसह ज्येष्ठ नगरसेवकांवर सोपवली आहे. ही निवडणूक काँगेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ वाढवण्यासाठी तर शिवसेनेसाठी संख्याबळ जैसे थे ठेवण्यासाठी निवडणूक महत्वाची आहे.\nशिवकोळीवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पावसाळी नाले, संक्रमण शिबिरातील गैरसोयी या समस्यांच्या मुद्यावर सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. भाजप, रिपाइं (ए), शिवसेनेबरोबर तर पिपल रिपब्लिकन पार्टी, रिपाइं (गवई) यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आह��. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तटस्थ राहिल्याने याचा फायदा नक्की कुणाला, अशी चर्चा आतापासूनच प्रभागात सुरू झाली आहे.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Chief-Ministers-visit-Decision-after-the-funicular-report/", "date_download": "2019-03-25T07:43:23Z", "digest": "sha1:L5DZAMZSMXZFLH5GMBSE46KVYO43IS4X", "length": 6678, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांच्या दौर्याचा फ्युनिक्यूलर अहवालानंतर निर्णय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांच्या दौर्याचा फ्युनिक्यूलर अहवालानंतर निर्णय\nमुख्यमंत्र्यांच्या दौर्याचा फ्युनिक्यूलर अहवालानंतर निर्णय\nसप्तशृंगगडावर उभारण्यात आलेल्या फ्यूनिक्यूलर ट्रॉलीचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिर परिसराच्या ट्रॉलीच्या वरच्या बाजूला लॉजिंगचे काम, लिफ्टचे किरकोळ काम अद्यापही बाकी असून, ही कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यंंत्रणांना दिले. दरम्यान, तांत्रिक टीमने दोन ते तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.\nसाडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगदेवी गडावर भगवती दर्शन सुलभ व्हावे. यासाठी देशातील पहिला फ्यूनिक्यूलर ट्रॉली प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण 4 मार्चच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गडावर मंगळवारी (दि. 27) प���हणी केली. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन व रेस्क्यू टीमचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी यावेळी फ्यूनिक्यूलर ट्रॉलीच्या कामकाजाची, हेलिपॅडच्या जागेची पाहणी, क्राऊड मॅनेजमेंट, भाविकांचा मार्ग निश्चिती, ट्रॉलीतून जाण्याचा मार्ग याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी ट्रॉलीमधील काही छोट्या तांत्रिक बाबींबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी आपत्ती व्यवस्थापन व रेस्क्यू टीमला दिले आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी सरकारने 4 मार्चचा मुहुर्त काढला आहे. मात्र, तरीही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अंतिम अहवालानंतरच मुख्यमंत्र्यांच्या दौर्याचे नियोजन केले जाणार आहे.\nयाप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, कळवणचे प्रांतधिकारी अमित मित्तल, तहसीलदार कैलास चावडे, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, सप्तश्रृंग देवस्थानचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, गडाचे सरपंच राजेश गवळी आदी उपस्थित होते.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Traffic-collision-at-Nashik-Phata-Chowk/", "date_download": "2019-03-25T08:07:05Z", "digest": "sha1:CMRZO7LQCUVRQDRQ5XKEU6H5B5MTVSJQ", "length": 8087, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक फाटा चौकात वाहतूक कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नाशिक फाटा चौकात वाहतूक कोंडी\nनाशिक फाटा चौकात वाहतूक कोंडी\nकासारवाडीतील नाशिक फाटा चौक आणि परिसराला दुकानदारांनी गराडा घातला आहे. बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर थांबत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्याने या कोंडीत भर पडली आहे. त्���ामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असे असूनही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. परिणामी वाहनचालक वैतागले आहेत.\nनाशिक फाटा चौक परिसरात चारही बाजूने जुनी मोटार वाहने आणि स्पेअर पार्ट विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे थेट रस्त्यावर मोटारी उभ्या केल्या जातात. मोटारीचे दुहेरी पार्किंग करून बिनदिक्कतपणे कामे केली जातात. तसेच, बेशिस्तपणे रिक्षा थांबविल्या जात आहेत. त्याचबरोबर खासगी ट्रॅव्हलसच्या बसेसही या रस्त्यावर उभ्या असतात. बसमध्ये प्रवासी भरण्यासाठी या बसेस थेट रस्त्यावर उभ्या असतात. तसेच, हॉटेल, खाद्यपदार्थ व चहाचे स्टॉलही येथे मोठ्या संख्येने आहेत. या ठिकाणी येणार्या ग्राहकांची वाहनेही रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केली जातात. ही परिस्थिती या परिसरात बाराही महिने कायम आहे.\nमहामेट्रोचे कासारवाडी आणि नाशिक फाटा चौकातून शंकरवाडीच्या दिशेने जाणार्या मार्गावर काम सुरू आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच, पावसामुळे शंकरवाडी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अशी स्थिती असतानाही, वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. पिंपरीहून दापोडीच्या दिशेने जाताना मार्गावर असंख्य वाहने तसेच अवजड वाहने अचानक पिंपरीच्या दिशेने वळण घेत असल्याने कोंडीत भर पडत आहे.\nदरम्यान, सकाळच्या सुमारास वाहतूक पोलिस हजर असतात. मात्र, ते वाहतूक नियंत्रण सोडून आडोशाला थांबून पावत्या फाडण्यात व्यस्त असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. परिसरातील मोटार व स्पेअर पार्ट दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, विक्रेत्यांवर कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांकडून केली जात आहे.\nपोलिस, पालिका, मेट्रो झटकत आहेत आपली जबाबदारी\nमनुष्यबळ कमी असल्याचे उत्तर वाहतूक पोलिस विभागाकडून दिले जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत, असे उत्तर महापालिकेचे अधिकारी देत आहेत. लवकरच अनधिकृत व अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई केली जाईल, असे अधिकार्यांचे अनेक महिन्यांपासून उत्तर ठरलेले आहे. महामेट्रोचे अधिकारी सांगत आहेत की, चौकात द��न वॉर्डन नेमले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ते सहाय्य करीत आहेत. अशा तर्हेने सर्व विभाग आपापली जबाबदारी झटकून हात वर करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या मूळ प्रश्नाला बगल दिली जात आहे.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/opponent-split-Before-the-convention/", "date_download": "2019-03-25T07:46:07Z", "digest": "sha1:FYSAWLWBU7U5KCFMFYE7SOWNG25XPW26", "length": 5114, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिवेशनापूर्वीच विरोधकांत फूट? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › अधिवेशनापूर्वीच विरोधकांत फूट\nनागपूर : चंदन शिरवाळे\nपावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करू, मंत्र्यांच्या भानगडी बाहेर काढू, असे आव्हान देत सत्ताधार्यांपुढे दंड थोपटणार्या विरोधकांमध्ये अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फूट पडली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे यांनी निमंत्रित केलेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्ष, माकप, समाजवादी पक्ष, लोकभारतीसह अपक्ष आमदारांनी पाठ फिरवली.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते व जोगेंद्र कवाडे यांचा अपवाद वगळता इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दांडी मारल्यामुळे विरोधकांच्या तंबूत चिंतेचे वातावरण पसरले. पहिल्याच दिवशी लहान पक्षांनी दिलेल्या झटक्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था कोमात गेल्यासारखी झाली. मित्रपक्षांच्या गैरहजेरीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधार्यांवर टीका केली.शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावरही विखे यांनी टीका केली. ते म्हणाले, 89 लाख कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्यांची नावे मोजून घेऊ अशी बोलणारी शिवसेना आज गप्प आहे. शिवसेनेने हातात शिवबंधन बांधण्याऐवजी गळ्यात भाजपाचे मंगळसूत्र बांधावे. नाणार हमखास जाणार असे शिवसेना बोलत होती, पण नाणार काही गेले नाही, शिवसेनेची अब्रू मात्र गेली, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T08:11:35Z", "digest": "sha1:H6NYOGQ3UT2YU4DCQIKABY7WF2OIRANR", "length": 16176, "nlines": 189, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "अनुक्रमणिका - गझला व वृत्ते | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nवा.न.सरदेसाई ह्यांनी हाताळलेली अक्षरगण-वृत्ते .\n०२. संयुत ललगालगा x २\n०३. राधा गालगागा x ३ + गा\n०४. कामिनी गालगाल x २ + गा\n०५. देवप्रिया गालगागा x ३ + गालगा\n०६. आनंदकंद गागाल गालगागा x २\n०७. कलिंदनंदिनी लगालगा x ४ रुजू जरी दिलेस तू . . .\n०८. प्रमीला लगागा x ३\n०९. देवराज गालगाल x ३ + गालगा\n१०. प्रमाणिक लगालगा x २\n११. व्योमगंगा गालगागा x ४\n१२. कलापति गालगाल x ३ + गा एक जे सुरेख फूल . . . आहे\n१३. रागिणी गालगा ललगालगा x २ ते वसंत जरी किती . . . आहे\n१४. मेनका गालगाल x २ + गालगा हा जरी रस्ता चुकीचा आहे\n१५. पाणिबंध गालगाल गाललगा x २\n१६. सौदामिनी लगागा x ३ + लगा\n१७. मानसभंजनी गाललगा लगालगा x २ आज नटून का हवा . . . आहे\n१८. मदिराक्षी ललगागा ललगागा ललगा\n१९. स्रग्विणी गालगा x ४\n२०. वसुंधरा लगालगा गागागा x २\n२१. विभावरी लगालगा x ३\n२२. वियत् गंगा लगागागा x ४ असे सामान / मना[पासून आहे\n२३. मंजुघोषा गालगागा x ३\n२४. वैशाख गागाल गालगाल लगागाल गालगा\n२५. वीरलक्ष्मी ��ालगा x ३\n२६. हिमांशुमुखी लगाललगा x ४\n२७. महामाया लगागागा x २\n२८. शालिनी गागागागा गालगा गालगागा\n२९. श्येनिका गालगाल गालगाल गालगा\n३०. प्रसूनांगी लगागागा x ३\n३१. वनमाला ललगागा लगालगा ललगा\n३२. भुजंगप्रयात लगागा x ४\n३३. स्नेहलता गाललगा x २ + गालगा\n३४. शुभकामी गागालल x ३ + गा गा\n३५. सारंग गागाल x ४\n३६. मयूरसारिणी गालगा लगालगा लगागा\n३७. दंद्रवंशा गागालगागा ललगालगा लगा\n३८. भामिनी गालगा गालगा गालग गा\n३९. रम्याकृति गागाल लगागाल लगागा\n४०. सुकामिनी द्विरावृत्ता गालगाल गालगा x २\n४१. जलोद्धतगती लगालललगा x २ वसंत नयनांत . . . आहे\n४२. उपेंद्रवज्रा लगालगागा ललगालगागा\n४३. मंदाकिनी गागालगा x ४\n४४. विबुधप्रिया गालगा + ललगालगा x ३ गोड ओझरते . . . आहे\n४५. रंगराग गालगाल गागागा x २\n४६. प्रेय गाललगा गालगा x २ ह्या नगरीच्या कशा . . . आहे\n४७. मयूरी गागागा गागागा गागागा गा( गणः म,म.म.ग)\nवा.न.सरदेसाई ह्यांनी हाताळलेली – एका गुरुएवजी दोन लघू अशी सवलत घेतलेली अक्षरगणवृत्ते .\nलगालगा x ३ + लगा\nपुन्हा न चांदणे आहे\n०२. कामदा गालगालगा x २\n०३. मंजुघोषा गालगागा x ३ ध्येय माझे / गझलवेडी / हीच चर्चा / मी जुनी ४ आहेत\n०४. वैखरी गागालगा x ३\n०५. कादंबरीद्विरावृत्ता गालगागा गालगा x २\n०६. तोटक ललगा x ४\n०७. सोमराजी लगागा x २\n०८. विद्द्युल्लता गागाल गालगागा गागाल गालगा कोणी म्हणेल आहे\n०९. भामिनी गालगा गालगा गालगागा\n१०. कल्याण गागागागा x ३\n११. शुद्धकामदा लललगालगा गालगालगा\n१२. रुक्मवती गाललगागा x २\n१३. प्रमद्धरा गागालगा लगा x २\n१४. लज्जिता गालगागा लगालगा गागा\n१५. स्वानंदसम्राट गागाल गागा x २\n१६. माल्यश्री गागागागा x २ + गागागा\n१७. श्येनिका गालगाल x २ + गालगा\n१८. सुकेशी लगागागा लगागा\n१९. रंगारंग गालगाल गागागा x २\n२०. मातंगी गागागा गागागा\n२१. सती +जलौघवेगा लगालगागा x ३\n२२. राधा गालगागा x ३ + गा\n२३. मृगाक्षी लगागागा x २ + लगागा\n२४. मेनका गालगागा x २ + गालगा रडत मी होतो जरी आहे\n२५. मेधावी गागागाल गागागाल गागागा\n२६. श्रीलीला गागागा x ४\n२७. मानसहंस ललगालगा x ३ जितता न ये आहे\n२८. पद्मावर्त गागागा गागा x २\nवा.न.सरदेसाई ह्यांनी हाताळलेली मात्रावृत्ते .\nवृत्त क्र. वृत्ताचे नाव —————\nएकूण मात्रा २२ ( ८+८+६ )\n०२. मध्यरजनी गालगागा गालगागा गालगागा गालगागा( व्योमगंगा अक्षरगण वृत्ताप्रमाणे )\nवाकण्यापेक्षा /धोरण्यांशी / कागदी आहे\n०३. लवंगलता एकूण मात्रा २८ .एकूण ५ मात्रागणांपैकीकोणताही गण .\nअसे एकूण ७ गण.\n१६व्या मात्रेवर अवसान .\nओळीअंती गुरू अक्षर ( – ) हवे. वासंतिक देहावर आहे\n०४. जीवकलिका लगागागा लगागागा लगागागा लगागागा(वियतगंगा ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे ) जरासे घाव आहे\n०५. मालीबाला एकूण मात्रा १९ .( – प – + – u + )( – = गुरू ,\nप = एकूण आठ मात्रा ,\n+ = आवश्यक गुरू , u= लघू )\n०६. वरमंगला गालगा गालगा गालगा गालगा( स्रग्विणी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे ) बोट लावून आहे\n०७. रसना गागाल गालगागा x २( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे ) कलहात मी\n०८. कालगंगा गालगागा गालगागा गालगागा गालगा(देवप्रिया ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे ) जोडण्यासाठी जरी आहे\n०९. दिंडी लगावली : एकूण मात्रा १९ . ( ९ + १० ) .|लक्षणे : मात्रांची रचना :\nपहिल्या भागात प्रथम ३ मात्रांचा एक गण .\nत्यापुढे ६ मात्रांचा गण .\nदुसर्या भागात ३+३=६ मात्रा .\nशेवटी दोन गुरू असावेत. हे दुटप्पी आहे\n१०. विधाता ( हिंदी ) एकूण मात्रा २८ ( १४+ १४) जे कधी न जमले मजला, उपयोगच २ आहेत\n११. विनोद ( एकूण मात्रा १२ ) गागाल गालगागा गावात आज हे ते\n१२. वल्लभा गागालगा x ४\n( मंदाकिनी ह्या अक्षरगण वृत्ताप्रमाणे ) सवयीमुळे तर\n१३. वीणावती लगागा x ३+ लगा(सौदामिनी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे ) तुझ्या पापणीचा\n१४. दासी एकूण मात्रा २४ (६+६+ ६+६) ओळ जुन्या गाण्याची\n१५. भुवनसुंदर उ प म्हणजे १४ किंवा १५ मात्रा.( उ = ४ किंवा ५ मात्रा .प = ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू ) बोल काहीतरी\n१६. अनलज्वाला एकूण २४ मात्रा ( ८ + ८ + ८ ) इतके सुंदर / बीजामधले\n१७. पादाकुलक एकूण १६ मात्रा .प्रत्येकचरणात ‘यति’ ८ व्या मात्रेवर ओढाळ कसे\n१८. वंशमणी एकूण मात्रा २० ( प प + + )( प = ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू ) हवा कैफ\n१९. कर्णफुल्ल एकूण मात्रा १६(विद्युन्माला ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे ) आभाळाशी जुळल्या\n२०. भूपति एकूण मात्रा २२ (१० + १२ ) का तुझ्या स्मृतींना\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्ता���तील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/latest-truth-of-matter-in-letter-of-devendra-fadanvis-to-rajesh-pawar-changed-by-unknown-persons/", "date_download": "2019-03-25T08:09:15Z", "digest": "sha1:BXQFXOIYNYP2IQIKUF2AGTZU2JFETAXZ", "length": 5124, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या शोक संदेशाच्या झाल्या शुभेच्छा", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nमुख्यमंत्र्यांच्या शोक संदेशाच्या झाल्या शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा – भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे १ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून एक पत्र पाठवण्यात आले. शुभेच्छांनी सुरुवात झालेल्या या शोकसंदेशाच्या पत्राचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने मुख्यमंत्र्यांवर सोशल मिडीयामध्ये टीका होत होती मात्र हा सगळा प्रकार खोडसाळपणातून करण्यात आल्याचं समोर आलं आहे.मूळ पत्रामध्ये शुभेच्छा हा संदेश नसल्याचं राजेश संभाजी पवार यांच्या फेसबुक पोस्टवरून स्पष्ट झालं आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा सध्या शोध घेतला जात आहे.\nराजेश संभाजी पवार यांची फेसबुक पोस्ट\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nअखेर हिंदी सैराटच्या शूटिंगला मुहूर्त मिळाला\nशिक्षकांच्या मागण्यांची दखल, पण गुणवत्ता हवीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/rohit-sharma-hits-3rd-double-century-in-mohali/", "date_download": "2019-03-25T08:02:46Z", "digest": "sha1:5OESEP5G5CLL3A7GXZL2MVWP6SIZ2L7A", "length": 5547, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोहालीमध्ये रोहितचा 'हिट शो';भारताचा धावांचा डोंगर", "raw_content": "\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nराज्यसभेचे आश्वासन, आठवलेंची दक्षिण मध्य मुंबईतून माघार\nमी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाचं नाही : सपना चौधरी\n‘सोनिया गांधी या इटलीत आधी सपना चौधरीसारखचं काम करायच्या’\nमोहालीमध्ये रोहितचा ‘हिट शो’;भारताचा धावांचा डोंगर\nमोहाली – कर्णधार रोहित शर्माच्या डबल सेंचुरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 392 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता .मागच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या रोहितने लकमल, फर्नाडोच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.फर्नाडोच्या 10 षटकात 106 धावा वसूल केल्या. श्रेयस अय्यरनेही जोरदार फटकेबाजी करत रोहित शर्माबरोबर दुस-या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने (88) धावा फटकावल्या. एमएस धोनी (7) धावांवर पायचीत झाला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत शानदार शतक झळकावले. कारकीर्दीतील रोहितचे हे 16 वे शतक असून, कर्णधार म्हणून पहिलेच शतक आहे. रोहितच्या बरोबरीने श्रेयस अय्यरही दमदार फलंदाजी करत असून त्याचेही अर्धशतक पूर्ण झाले आहे.रोहित शर्मा २०८ धावांवर नाबाद राहिला त्याने केवळ १५३ चेंडूंचा सामना केला या वादळी खेळीत करताना 13 चौकार १२ षटकार ठोकले\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nरोहितचा अनुष्काला मजेशीर सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/nana-patekar-comment-about-raj-thackeray-aapla-manus/", "date_download": "2019-03-25T08:10:19Z", "digest": "sha1:7D3KHVURAAAXQY45VSUSRPSIKEZ5L67W", "length": 7448, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरे माझे मित्र,ते 'आपला माणूस' नक्की पाहतील-नाना पाटेकर", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nराज ठाकरे माझे मित्र,ते ‘आपला माणूस’ नक्की पाहतील-नाना पाटेकर\nपुणे – अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने विधान केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेचा सामना जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना करावा लागला होता मात्र राज ठाकरे माझे मित्र आहेत आणि ते माझा ‘आपला माणूस’ चित्रपट नक्की पाहतील असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला आहे . आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते .\nअभिनेता अजय देवगण याची निर्मिती असलेला ‘आपला माणूस’ हा सिनेमा येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे .अभिनेते नाना पाटेकर , सुमित राघवन, इरावती हर्षे या सगळ्या कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे सिनेमा हिट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे .या सिनेमाच्या प्रमोशन साठी नाना पाटेकर पुण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांच्यात वितुष्ट आल्याच चित्र होतं मात्र आज नाना पाटेकरांनी राज ठाकरेंचा उल्लेख मित्र असा करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.दरम्यान या पत्रकार परिषदेत आपण राजकारणात जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.\nकाय म्हणाले नाना पाटेकर \nमी कुठल्या ही राजकीय पक्षात जाणार नाही जर पक्षात गेलो तर पक्षप्रमुखाला शिव्या घालाल व आठवडा भरात सर्व राजकीय पक्ष फिरून घरी बसेल. त्यामुळे राजकीय पक्षात जाणार नाही. राज ठाकरे माझे मित्र आहेत आणि ते माझा ‘आपला माणूस’ चित्रपट नक्की पाहतील . राजकीय व्यासपीठ वेगळं असत आणि हेवेदावे वेगळे असतात .जातीय तेढ सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. राजकीय नेते नोकऱ्या वर बोलत नाहीत त्यांना फक्त मतदार संघ वाढवायचे आहेत. सत्ताधरी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रशांवर बोलत नाहीत ,विरोधत असताना सर्व राजकीय पक्षांना शेतकरी दिसतात मात्र सत्तेत आल्यावर कोणी काही बोलत नाहीत ही शोकांतिका आहे. राजकारणात जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nयेणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय नसणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nचिमुकला म्हणतो, राजे तुम्ही असताना आम्हाला कसली अडचण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/shiv-jayanti-celebrate/", "date_download": "2019-03-25T08:04:55Z", "digest": "sha1:CYW2QWNZ4DCWPWJBRJ6ZZ3P6MPQ4MHF6", "length": 7127, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बहुजनांच्या विविध संघटना एकत्र साजरी करणार शिवजयंती", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nबहुजनांच्या विविध संघटना एकत्र साजरी करणार शिवजयंती\nसोलापूर : महात्मा फुले यांनी कुळवाडीभूषण म्हणून गौरवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी बहुजनांच्या विविध संघटना एकत्र येणार आहेत. १९ फेब्रुवारी रोजी ३० पेक्षा अधिक संघटना एकत्र येत आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी होणार आहे. समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, यासाठी शिवजयंती उत्सव राज्यभर बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून होणार आहे.\nशिवजयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, इंडियन लॉयर्स असोसिएशन, भीम आर्मी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीसह ३० हून अधिक संघटनांचा समावेश असेल. फारूख शेख, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड : छत्रपती शिवाजी महाराज हे एकतेचे प्रतीक अस���न समाजामध्ये एकता नांदली पाहिजे. त्यामुळे बहुजनांच्या विविध संघटनांकडून एकत्रित शिवजयंती साजरी केली जाणार आहे.\nयामध्ये मुस्लिम संघटनाही सहभागी होणार आहेत. बापू मस्के, बामसेफ : भीमा कोरेगाव प्रकरणानंतर समाजामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. तो दूर करू एकोपा निर्माण करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर शिवजयंती साजरी होणार आहे. मराठा व दलित यांच्यामधील तणाव कमी होण्यास मदत होईल. युवराज पवार, अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती शिवजयंतीची सुरुवात महात्मा फुले यांनी केली.\nतसेच अण्णा भाऊ साठे यांनी शिवाजी महाराजांचा पराक्रम रशियात जाऊन सांगितला. शिवाजी महाराजांनी लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांना सुभेदार ही पदवी दिली होती. हा इतिहास बहुजनातील तरुणांना कळावा.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nउन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेचे जादा गाड्याचे नियोजन\nvideo-‘मैदान’ भाड्याने देऊन विद्यापीठाने केली मनमानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/for-joy-7096/", "date_download": "2019-03-25T08:18:00Z", "digest": "sha1:IWEQ6GH5TNIPO4NGLJMVUUK72N44ZKDI", "length": 26108, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निर्व्याज, उत्कट आनंदासाठी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nइव्हेंट, सेलिब्रेशन यांची साथ आनंदाला हवीच असते असं कुठेय काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही\nइव्हेंट, सेलिब्रेशन यांची साथ आनंदाला हवीच असते असं कुठेय काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही असा उत्कट आनंद टिकाऊ असतो, त्यात पुनप्रत्ययाची शक्यता असते. केवळ जाणिवेनंही त��� मिळवता येतो. मात्र त्यासाठी आपल्याला स्वत:ची तयारी करायला लागते..\nदिवाळी आता सुरू होईल. सगळी बाजारपेठ त्याची साक्ष आहे. रोषणाई आणि रंगीबेरंगी झगमगाटाने काही तरी शुभ घडणार आहे, असं उगीचंच वाटायला लागतं आहे. प्रत्यक्षात तसं काही शुभ घडेलच, याची अजिबात शाश्वती नसणारा हा काळ. जणू कपडे फक्त दिवाळीतच खरेदी करतात लोक, अशा समजानं त्यांना आकृष्ट करण्याची ही स्पर्धा बाजारात चैतन्य आणतही असेल कदाचित. पण प्रत्यक्ष जगण्यात दिवाळीच्या चार दिवसांशिवाय येणाऱ्या तीनशे एकसष्ट दिवसांत काहीच घडत नाही, असं नाही. घडायचंच असेल, तर ते बहुधा त्याच काळात घडत असतं. आता तर सगळी दुकानं वर्षभर खच्चून माल भरत असतात. गिऱ्हाईकांना वेगवेगळी आमिषं दाखवून त्यांना खरेदी करायला भाग पाडत असतात. गिऱ्हाईकंही दिवाळीची खरेदी अशा भाकड काळात करून ठेवत असतात आणि स्वस्तात खरेदी झाल्याचं समाधान मिळवत असतात. असलं समाधान कितीही मिळालं, तरी ते टिकाऊ नसतं. दिवाळी आली, की काहीतरी खरेदी करायचीच असा ‘पण’ आपण सारे का करतो जास्त पैसे हाती खेळतात म्हणून की सणाचा आनंद लुटायचाच अशी आपली मनोवृत्ती असते जास्त पैसे हाती खेळतात म्हणून की सणाचा आनंद लुटायचाच अशी आपली मनोवृत्ती असते फक्त सणच आपल्याला आनंद देतात आणि तेव्हाच आपण तो स्वीकारण्याच्या मन:स्थितीत असतो, असं आपण सगळ्यांनी मनाशी पक्कं धरून ठेवलं असावं. दसरा, दिवाळी, नवरात्र, गणेशोत्सव, नाताळ, ईद अशा काळातच आपण आनंदी का म्हणून राह्य़चं फक्त सणच आपल्याला आनंद देतात आणि तेव्हाच आपण तो स्वीकारण्याच्या मन:स्थितीत असतो, असं आपण सगळ्यांनी मनाशी पक्कं धरून ठेवलं असावं. दसरा, दिवाळी, नवरात्र, गणेशोत्सव, नाताळ, ईद अशा काळातच आपण आनंदी का म्हणून राह्य़चं सणाचा आनंद नवे कपडे, दागदागिने, अत्तरं, फराळ अशा इंद्रियांना सुख वाटणाऱ्या गोष्टीतच का साठवून ठेवायचा\nगेल्या दोन दशकांत सगळ्याच गोष्टींचा इतका अतिरेक झाला आहे, की त्यातली चिमूटही बोटांमध्ये पकडता येत नाही. वर्षांकाठी काहीशे चित्रपट निर्माण करणाऱ्या भारतात आता कोणत्याही चित्रपटाचे भवितव्य तीन दिवसातल्या गल्ल्यावरच ठरायला लागलं आहे. या चित्रपटांमधली गाणी तो येण्यापूर्वीच फक्त ऐकायला मिळतात. चित्रपटगृहातून चित्रपटाची गच्छंती होईपर्यंत मागील रांगेमध्ये गाण्यांची स्पर्धा सुर��� झालेली असते. तीन तास आणि काहीशे रुपये खर्चून जो चित्रपट पाहायचा, तो पाहून बाहेर पडेपर्यंत त्याची मजा संपलेली असते. त्यातलं काहीच आठवेनासं होतं. नट-नटय़ांच्या भाऊगर्दीत कोणाचं कोण, हेही समजेनासं होतं. चार घटका करमणूक, म्हणावी, तर ती होईलच, याची शाश्वती नाही. टीव्हीवरच्या मालिकांमध्ये बरोबर दिवाळीचा मुहूर्त साधून त्यातली सगळी पात्रं फटाके, फुलबाज्या उडवतात. एकमेकांना शुभेच्छा देतात आणि जगाच्या आनंदात आपणही कसे सहभागी आहोत, याचं दर्शन घडवतात. इतक्या साऱ्या मालिका आणि त्यातली कितीतरी पात्रं रोज काही ना काही नवं नाटय़ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. एखाद दिवस चुकला, की सगळी गोष्टच बदलल्यासारखं वाटतं. तीच भुताटकी आणि तेच प्रेमाचे त्रिकोण, चौकोन. वेळेचं काय करायचं, असा प्रश्न पडल्यागत लोकं आपली रोज टीव्हीसमोर बसून असतात. मग त्यांना तिथल्याच फटाकेबाजीचा आनंद अपूर्व वाटायला लागतो.\nसणांच्याच दिवशी खोटंखोटं आनंदी राहायची ही कल्पना आता बाद करायला हवी. एरवीही आनंदी राहण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, यावर विश्वास ठेवला, तर कदाचित तसंही घडू शकेल. मुळातच सणांचं वाढतं महत्त्व ही आता बाजारपेठीय कल्पना म्हणून स्वीकारली जाऊ लागली आहे. तुम्हाला ठरवून आनंदी करण्याचं एक नवं तंत्र विकसित करण्यासाठी जगातले सगळे उद्योग नवनव्या कल्पना लढवायला लागले आहेत. सुखी बनण्यासाठीचं हे नवं तंत्र लोकांच्या माथी मारण्यासाठी माध्यमांचा अतिरेकी वापर होऊ लागला आहे. चोवीस तास आनंदी राहायचं, म्हणजे नेमकं काय करायचं, याचं सोपं उत्तर, गाईड्स वाचून परीक्षा देण्याच्या सवयीमुळे, सहसा कोणी शोधत नाही. सगळ्यांना आता झटपट आनंदी होण्याचे मार्ग हवे आहेत. ते शारीरिक आनंद देणारे हवे आहेत. त्यापलीकडे आनंदाच्या काही परी असतात, याचं भान या नव्या बाजारपेठीय दबावामुळे हळूहळू नष्ट व्हायला लागलं आहे.\nअसा काही आनंद असू शकतो, याची आठवण आता होईनाशी झाली आहे. त्यामुळे मिळेल, त्या गोष्टीतून आनंद ओरबाडून घेण्याची एक नवी प्रवृत्ती दिसायला लागली आहे. शांतपणे, छानपैकी चहाचा एकेक घोट घेण्यातली किंवा चहा बशीत ओतून फुर्रफुर्र करत पिण्यातली मौज आता कुणी घेताना दिसत नाही. गुळगुळीत कागदावर थांबून थांबून सुवाच्य अक्षरं काढण्यातली मजा जशी आपण हरवून बसलो, तशीच निव्र्याज म��ानं गाणं ऐकण्याचंही आपण जवळजवळ थांबवलेलं आहे. हातातला मोबाईल, मांडीवरचा लॅपटॉप, कानातला आयपॉड आपल्याला स्वस्थ म्हणून बसू देत नाही. आपण शांतताच विसरतो आहोत बहुधा त्यामुळे संवादात यांत्रिकता आली आणि भेटण्याची असोशीही नाहीशी झाली. जुजबी वागणं आणि गरजेपुरतं बोलणं अशी नवी संस्कृती निर्माण झाली. मोबाईलमधला तोच एसेमेस शेकडोंना पाठवण्यानं आपलं संवादाचं काम हलकं होऊ लागलं. ई-मेलमधून शुभेच्छा देण्यानं अगदी मनाच्या गाभ्यातलं असं काही पोचवल्याचं तकलादू समाधानही मिळू लागलं. चॅट करतानाच्या शब्दांचे नवे अर्थ शोधत बसण्यात जसा वेळ जाऊ लागला आणि या अर्थाना खरंच आणखी काही पदर असतात का, याचा शोध घेण्याची गरजही वाटेनाशी झाली. हा संवाद कसा शारीर बनून राह्यला लागला. असं काही बदलतं आहे, बदललं आहे, हे लक्षात येण्याएवढी फुरसतही मिळेनाशी झाली आहे. हे सगळं अगदी नकळत झालं. कळूनही फार फायदा झाला असता असं नाही. पण कळण्याची गरजही कधी वाटली नाही. गोडधोड खायला मिळण्यासाठी सणांचीच वाट पाहण्याचे दिवस संपले. हे चितळे बंधू आणि हल्दीराम यांच्यासारख्यांमुळे हे घडलं. उत्तम वेष्टणात, खात्रीशीर चवीचं गोड खाणं सहजसाध्य झालं. त्यामुळे सणाच्या दिवशीही गोड खाणं, एवढाच उपचार राहिला. आता हॉटेलात जाऊन खाणं, याचा अर्थ घरात स्वयंपाक केला नाही, असा घेतला जाण्याचा काळही संपला. उलट घरात चूल न पेटवता, मुद्दामहून बाहेर खाण्याचेच दिवस आले.\nउत्कटता हा मानवी मेंदूला मिळालेला वर आहे. तो वर आहे, हे ज्यांना कळलं, त्यांना जगण्यातला उत्साह, त्यातून मिळणारी ऊर्जा आणि त्या ऊर्जेतून निर्माण होणारा आनंद यांची साखळी बनवता येते. जीवनातला असा उत्कट आनंद टिकाऊ असतो, त्यात पुन:प्रत्ययाची शक्यता असते. केवळ जाणिवेनंही तो मिळवता येतो. मात्र त्यासाठी आपल्याला स्वत:ची तयारी करायला लागते. ही तयारी पाठय़पुस्तकातून किंवा क्लासमधून होत नाही. आनंद मिळवण्याच्या क्षमता वाढवण्यातूनच हे घडू शकतं. त्यासाठी गृहपाठ नाही, की परीक्षा नाही. उत्तीर्ण होण्याचंही बंधन नाही. हवी फक्त मनाची तयारी. मेंदूच्या मदतीनं आनंद मिळवायला लागलं, की मग तो किती अक्षय्य असतो, हे सहजपणे लक्षात यायला लागतं. नव्या मोटारीतून, नवे कपडे घालून, उंची हॉटेलात जाऊन, चमचमीत खाऊन मिळणारा आनंद आणि उत्कटतेतून मिळणारा आनंद यातला फरक म��� सहजपणे जाणवायला लागतो. आजूबाजूला दिसणाऱ्या बाजारपेठीय कल्पनांना धुडकावून लावण्याची क्षमता आपोआप तयार होते. एकदा हे साध्य झालं, की त्या कल्पनांचे आपण दास बनत नाही आणि आपल्या हुकमावर त्या कल्पनांना नाचवण्याची ताकद आपोआप मिळायला लागते. काय हवं, ते कळण्यासाठी एवढी तरी तयारी करायलाच हवी. संपन्नता केवळ इंद्रियांतून मिळत नाही. त्यापलीकडे असलेल्या सृजनाचा अनुभव संपन्नता देतो. इंद्रियांना होणारा आनंद त्यामुळे अधिकच खुमासदार होतो. सुवास, चव, स्पर्श या प्रत्यक्ष आनंदाच्या तर श्रवण आणि दर्शन या अप्रत्यक्ष आनंदाच्या गोष्टी. त्यातलं तारतम्य कळलं की सगळंच सोपं होऊन जातं. प्रत्यक्षातल्या आनंदाला जेव्हा उत्कटतेची झालर येते, तेव्हा तोच आनंद निर्मम बनतो आणि आपल्याला संपन्न बनवतो. असं संपन्न बनण्याची इच्छा नसलेला समाज आता वाढणं हा खरा धोका आहे. समाजाला त्यातला खरेपणा समजणं आवश्यक अशासाठी आहे, की त्यामुळे त्याला भवतालाचं खरं भान प्राप्त होतं. इंद्रियांच्या आनंदाला या उत्कटतेची जोड मिळण्यासाठी पाश्चात्त्य देशात केवढे काही प्रयत्न होत असतात. आपण मात्र तिकडे ढुंकूनही पाहात नाही. मग इतिहासाची उपेक्षा होते, भूगोल ऑप्शनला पडतो, कला विषयांना उत्पन्नाची साधने उरत नाहीत, नागरिकशास्त्र तर पाठय़पुस्तकापुरतंच उरतं. असं जगायचं, तर त्याला दिवाळी कशाला हवी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशनिवारची मुलाखत : पादचारी धोरण.. चालण्यातल्या आनंदासाठी\nअनाथ मुलांनी लुटला मनमुराद खरेदीचा आनंद\nमहाबळेश्वरमध्ये नववर्षाचे उत्साहात स्वागत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर ��ेश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-vinodi-kavita-mi-marathi-majhi-marathi.html", "date_download": "2019-03-25T07:42:18Z", "digest": "sha1:IGGMBS2HK7UPD42SG6X57GO5PDCTG5MH", "length": 5751, "nlines": 113, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "देवा इतकंच दे! ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nत्याला पूर्ण बाटली दे, मला माझी चपटी दे\nनशीब नाही दिलं तरी, एक रिती धोपटी दे\nकाळी गोरी बुटकी दे, जाड अथवा लुकडी दे\nनाकावर राग नसावा, बायको मज नकटी दे\nपोळी भाजी नको मला, केवळ प्रेमळ साथ दे\nभात खाइन नुसताच मी, पाण्याची आमटी दे\nभाज्या डाळी महागले , चूल कधीची बंद रे\nभिक मागायला सरकार, बस एक करवंटी दे\nचहा पितो टपरीवर मी, ही माझी अवकात रे\nशान मारायला खोटी, मिटिंगमधे ग्रीन टि दे\nसंसारात रमलोय मी, वेळ नाही भजनाला\nनाम घेईन देवा मी, बस थोड्या कटकटी दे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2014-Kapoos.html", "date_download": "2019-03-25T08:03:34Z", "digest": "sha1:R6NP5SL7LSUWUCF7RTZYPQIYZMB4YKQN", "length": 11796, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चालू व फरदड कपाशीचे अधिक व दर्जेदार उत्पादन!", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चालू व फरदड कपाशीचे अधिक व दर्जेदार उत्पादन\nश्री. अंकुश चिंतुजी धाबेकर, मु.पो. नांदा, ता.कोरपणा, जि.चंद्रपूर- ४४२९१७ मोबा. ९९७०४५३७१५\nमी एक साधा���ण शेतकरी आहे. माझे शिक्षण जेमतेम १० वी पास आहे. मला शेतीमध्ये खूप आवड आहे. मी माझ्या शेतात आधुनिक पद्धतीच्या नव - नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. त्यामध्ये मी एकदा नागपूरच्या अॅग्रो व्हिजन प्रदर्शनला गेलो असता मला डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे सल्लागार श्री. अंकुश वराडे यांची स्टॉलवर भेट झाली. त्यांना मी तंत्रज्ञानाबद्दल विचारपुस केली व माझ्या शेतीवर नांदा, जि. चंद्रपूर येथे बोलावून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनातून मी मागच्या वर्षी टरबुज व खरबुज लागवड केली. मला खूप चांगले उत्पादन झाले. त्यामुळे मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान पुर्ण शेतीमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला व प्रथम कपाशीमध्ये वापर करण्यास सुरुवात केली.\nमी २९ मी २०१४ ला कपाशीची पारस ब्रह्या या वाणाची निवड करून ५ x २ फुटावर ठिबकवर लागवड केली. त्याला एकरी १ बॅग कल्पतरू + १ बॅग डि.ए.पी. असा डोस दिला. त्यानंतर मी कपाशीची लागवड केली. उगवणीनंतर ८ दिवसांनी एकरी ७०० मिली जर्मिनेटर + ३ किलो १९:१९:१९ याप्रमाणे ठिबकमधून सोडले. त्यानंतर उगवून आल्यावर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान कॉटनथ्राईवर ७०० मिली + कॉपशाईनर ७०० मिली + जर्मिनेटर ७०० मिली + प्रिझम ५०० मिली + प्रोटेक्टंट ३०० ग्रॅमची २०० लि. पाण्यातून पहिली फवारणी केली.\nत्यानंतर कपाशी खूप जोमाने वाढायला सुरुवात झाली. त्याचबरोबर हिरवीगार झाली. मला शेत बघून समाधान वाटले. त्यानंतर वातावरणाच्या बिघाडामुळे व पावसाच्या कमतरतेमुळे माझ्या कपाशीवर पिठ्या ढेकूण येण्यास सुरुवात दिसू लागली. त्यामुळे मी कंपनी प्रतिनिधी श्री. अंकुश वराडे यांना फोन केला. त्यांनी मला मोनोक्रोटोफॉस ३० मिली + निरमा ६ ग्रॅम + स्प्लेंडर १५ मिली याप्रमाणे फवारणी करण्यास सांगितले. त्यानुसार मी कपाशीवर फवारणी केली. त्यामुळे कपाशीवरील पिठ्या ढेकूण गेला. त्यानंतर मी लागवडीपासून ३० दिवसांच्या अंतरांनी दुसरी फवारणी घेतली. त्यामध्ये जर्मिनेटर १ लि. + कॉटनथ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रिझम ७०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर २०० मिली + राईपनर ५०० मिली + २०० लि पाणी याप्रमाणे मी दुसरी फवारणी केली. त्याचबरोबर १०० लि. पाण्यातून १२:६१ विद्राव्य खत ३ किलो + १ किलो मॅग्नेशिअम + १६:१६:१६ हे १० किलो प्रती एकरी ३ वेळा सोडले. त्यानंतर कपाशीची वाढ पण चांगली होण्यास सुर���वात झाली व पात्या लागण्यास सुरुवात झाली. कपाशी खूप चांगली दिसत होती. त्यानंतर मी तिसरी फवारणी अॅसाटामाप्राईड २५० ग्रॅम + कॉटनथाईवर १ लि. + न्युट्राटोन ७०० मिली + राईपनर ७०० मिली + हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली अशाप्रमाणे तिसरी फवारणी केली. माझ्या कपाशी वर इतरांच्या कपाशी वरील प्लॉटपेक्षा कमी रोग व कीड, त्याचबरोबर जास्त हिरवीगार व झाडांचा घेर मोठा, उंची व्यवस्थित, झाडांचे स्टेम (खोड) चांगले असल्यामुळे भरपूर शेतकरी विचारपूस करण्यासाठी माझ्या शेतावर येवू लागले. मला हे सर्व शक्य झाले ते डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळेच. आता माझी कपाशी खूप चांगली आहे आणि मी डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे मी भरपूर उत्पादन घेईल याची मला खात्री आहे. आता माझी कापूस वेचणी सुरू झालेली आहे. कापूस हा एकदम मऊ व जड स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर कापसाचे बोंड हे पुर्णपणे उमललेले असल्यामुळे फडकी (नकटी) कापसाचे माझ्या प्लॉटवर प्रमाण फारच दुर्मिळ. कापूस हा पांढरा शुभ्र आहे. कमीत कमी एका झाडाला २५ ते ३० बोंडे फुटलेले तर ५० ते ६० बोंडे पक्की पुर्ण फुटण्याच्या अवस्थेत तर ९० ते १३० पर्यंत फुले व पात्या लागलेली आहेत. तसेच पुढे कपाशीला चांगली चाल आहे. मला एकरी आतापर्यंत १० ते १२ क्विंटल कापूस वेचणी झाली. यानंतरची वेचणी झाल्यानंतर एकूण जवळपास मला कमीत कमी एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन होईल अशी आशा आहे. सध्याच्या पीक परिस्थिती वरून वाटते त्यापेक्षाही जास्त कापूस होऊ शकतो. मला डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा खूप मोठा फायदा होत आहे आणि माझ्या भागात मी निश्चितच विक्रम करणार असे सांगतो. यानंतर या कापसावर पुन्हा कॉटन थ्राईवर + प्रिझम फवारून फरदड घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nकपाशीच्या चांगल्या अनुभवातून टरबूज, खरबूज व मिरचीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nत्याचबरोबर मी माझ्या शेतावर मिरची या पिकावर पण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत असल्यामुळे माझ्या मिरची पिकावर अजूनपर्यंत बोकड्यासारखा रोग (व्हायरस) आलेला नाही. मला खूप अभिमान वाटतो की मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरात आहे. यानंतर मी डिसेंबर महिन्यामध्ये खरबुज आणि टरबुजची लागवड करत आहे. त्यामध्ये मी सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निश्चय व निर्धार केला आहे. डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे मी चांगली यशस्वी खरबुज आणि टरबुजची ���ागवड करून विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करील.\nमला असे वाटते की, प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरून आपले उत्पादन वाढवून स्वत: प्रगतीशील शेतकरी बनण्याचा मान आप - आपल्या भागातून मिळविला पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/zp-marathi-school-closed-in-new-mumbai/", "date_download": "2019-03-25T08:20:41Z", "digest": "sha1:VI5YGGB6ZK3F6XQLQ5ARADBJFPP4U4CP", "length": 5187, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवी मुंबईतील जिपच्या 10 शाळा यंदापासून बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईतील जिपच्या 10 शाळा यंदापासून बंद\nनवी मुंबईतील जिपच्या 10 शाळा यंदापासून बंद\nनवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागा देण्यास प्रकल्पग्रस्तांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नाराज झालेल्या राज्य सरकारने परिसरातील जिल्हापरिषदेच्या 10 शाळा मे महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे परिसरातील प्रकल्पग्रस्तांना पुष्पक नोडमध्ये स्थलांतर करणे भाग पडणार आहे. जेथे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी दोन नव्या शाळा बांधण्यात आल्या आहेत.\nआतापर्यंत 10 गावांतील 3 हजार प्रकल्पग्रस्तांपैकी अवघ्या 40 टक्के लोकांनी पुष्पक आणि उलवे नोडमध्ये स्थलांतर केले आहे. ज्यात विकसित केलेले भूखंड, दोन शाळा आणि इतर सोयीसुविधांचा समावेश आहे. हे नोड्स प्रकल्पामुळे बाधित होणार्या पाच गावांपासून खूप दूर अंतरावर आहेत. प्रकल्पबाधित 10 गावांत जिल्हा परिषदेची प्रत्येकी एक शाळा आहे. या शाळांत शिकणार्या विद्यार्थ्यांचे 2017 हे शाळेतील शेवटचे शैक्षणिक वर्ष असेल. यासंबंधीचे पत्र मार्चमध्ये ग्रामीण विकास सचिवांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना लिहिले आहे. बंद होणार्या या शाळांत 1 हजार मुले शिक्षण घेत आहेत.\nया वृत्ताला सिडकोचे प्रवक्ते मोहन निनावे यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, शाळा बंद होतील आणि त्यामुळे मुलांना नव्या शाळेत प्रवेश घेणे सोयीचे होईल. जिल्हा परिषदेच्या समितीनेही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यम��त्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/how-black-money-got-white-4-9-months-congress/", "date_download": "2019-03-25T08:03:55Z", "digest": "sha1:6PVW6JCSYXVQWGNGD7BCVLS7C33OAZHU", "length": 4986, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पैसा काळ्याचा पांढरा झाला की काय ? राहुल गांधींचा मोदींना सवाल", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nपैसा काळ्याचा पांढरा झाला की काय राहुल गांधींचा मोदींना सवाल\nटीम महाराष्ट्र देशा : स्विस बँकेत २0१७ साली जमा झालेल्या भारतीय पैशावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी २0१४ पर्यंत स्विस बँकेत काळा पैसा आहे, सत्तेत आल्यावर आपण तो परत आणू, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे सांगत होते. आता स्विस बँकेतील भारतीयांचा सारा पैसा काळा नाही, असे सांगत असून, ४९ महिन्यांत काळा पैसा पांढरा कसा झाला, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.\n२0१७ मध्ये तर ७000 कोटी जमा झाले. आता मात्र तुम्ही हा सारा पैसा काळा नाही, असे सांगता. त्यामुळे पैसा काळ्याचा पांढरा झाला की काय, याचे उत्तरही द्या. असा थेट प्रश्न कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nडार्विनचा सिद्धांत खोटाच केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा साक्षात्कार \nएकाच घरात ११ मृतदेह सापडल्याने दिल्ली हादरली, आत्महत्या कि हत्या गूढ कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/page/8/", "date_download": "2019-03-25T07:56:02Z", "digest": "sha1:JHDRH7J5ASSWXLSDGDHKB3ZB5AYG7NPI", "length": 19509, "nlines": 187, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Marathi Kalakar - Marathi Movies & Marathi Television News", "raw_content": "\n९० वर्षांच्या “ह्या” जेष्ठ अभिनेत्याची “छत्रीवाली” मालिकेत एंट्री\nबऱ्याच कालावधीनंतर मराठी सिनेमातील दिग्गज अभिनेते रमेश देव यांची छोट्या पडद्यावर झलक आपल्याला स्टार प्रवाह वरील...\nबरेच दिवस सिनेमापासून दूर असणारा विनीत सध्या “हे” करतोय.वाचा अधिक बातमी.\nअभिनेता विनीत भोंडेचे ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पदार्पण झाले, अगदी अचानक...\nपहा अदिती येवलेच्या विवाहसोहळ्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.\nअभिनेत्री अदिती येवलेचा विवाहसोहळा ह्या २३ डिसेंबर रोजी पार पडला असून त्याचे फोटोज आता बाहेर आले...\nसावनी रवींद्रच्या ‘ह्या’ हॉट अदा करतायत फॅन्सना घायाळ.पहा फोटोज.\nबॉलिवूडच्या सगळयाच आघाडीच्या गायिकांना कॉन्सर्ट्स, रिएलिटी शो आणि सोशल मीडियाव्दारे आपण कॅज्युअल लुक्समध्ये पाहत आलोय,पण मराठीतल्या...\nपतीसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय प्रार्थना.पहा गोड कपल्सचे रोमँटिक फोटोज.\nमितवा फेम अभिनेत्री प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं...\nस्वप्नील जोशीचा ग्रामीण अंदाज तुम्ही पाहिलात कापहा’मी पण सचिन’सिनेमाचा टीझर.\n‘डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’ अशी टॅगलाईन असलेल्या आगामी ‘मी पण सचिन’ चित्रपटात स्वप्नील जोशी क्रिकेटपटूची...\nदुनियादारी नंतर २०१९ च्या व्हॅलेंटाईन वीकला रसिकांना मिळणार “हे” मल्टीस्टारर सरप्राईझ\nसंजय जाधव दिग्दर्शित तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा, दुनियादारी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर...\n‘चॉकलेट बॉय’ची इमेज पुसणार आहे ‘हा’ अभिनेता.आगामी मराठी सिनेमा’मुंबई आपली आहे’.\nमराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार...\nआर्ची आणि परश्याच्या मुलाची कथा “सैराट२” मध्ये\nअभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा पहिलाच चित्रपट “सैराट” सुपरडुपर हिट ठरला होता. बॉक्स...\nठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.\nशिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित मच अवेटेड असलेल्या “ठाकरे” सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nमराठीतील गुणी अभिनेत्री पूजा सावंतने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली...\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“घाडगे & सून” ही कलर्स मराठीवरील मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत...\nअतुल कुलकर्णी साकारत आहेत”हि”थ्रिलर वेबसिरीज.वाचा अधिक.\nअप्रतिम परफॉर्मन्स आणि कलाकारीसाठी ओळखले जाणारे ख्यातनाम अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अनेक भाषांमध्ये आजवर काम केले...\nग्लॅमरस अंदाजात अभिनेत्री दिप्ती देवी.पहा फोटोज.\nहिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दीप्ती देवीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. ‘कंडिशन्स...\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nसस्पेन्स आणि रहस्यमयी “मिरांडा हाऊस”चा टिझर.\nसध्या मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोग होत आहेत. आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत...\nपहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.\nसिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी...\nआणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.\n“अजूनही चांद रात आहे ” या मालिकेतील रेवा फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे....\nसाऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.\nसामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या ‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित...\nफॅन्सच्या लाईक्स मिळतायंत सोनालीचे कुलकर्णीचे”हे”फोटोज.\nगेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही...\nयुथफूल “आम्ही बेफिकर”२९ मार्चला प्रदर���शित होणार.\nखूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर...\nअ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८\nशिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट आगामी फर्जंद मराठी सिनेमा\nमहाराष्ट्राला इतिहासाची उजवल परंपरा लाभली आहे. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. शिवकालीन पराक्रमी मावळे...\n‘बकेट लिस्ट’ मराठी मूवी ट्रेलर\nमाधुरी दिक्षितला पडद्यावर पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. बराच वेळ ग्लॅमरपासून दूर असलेली माधुरी आता लवकरच...\nभाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ह्रिषिकेश जोशी स्टारर सायकल होतोय ४ मे ला प्रदर्शित\nसायकल वर आधारित एक भावपूर्ण कथा आगामी सायकल हा सिनेमा घेऊन येत आहे. सिनेमाचं ट्रेलर नुकतंच...\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nपोस्टर आणि टिझर लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित शिकारी शेवटी ह्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. वेगळ्या...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nमराठी सिनेमाने वेगवेगळ्या विषयांवर दमदार भाष्य केलं आहे. साचेबद्धपणा सोडून प्रशंसनीय सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत....\nवास्तववादी भाष्य करतोय अट्रॉसिटी\nवास्तववादी सिनेमा समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतो. अशाच वास्तववादी धर्तीवर बनलेला अट्रॉसिटी हा...\nनेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात\nछोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही....\nआणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.\n“अजूनही चांद रात आहे ” या मालिकेतील रेवा फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे....\nएक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं\nमोठी उत्कंठा, चर्चा आणि गाजावाजा झाल्यानंतर महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांचा आगामी शिकारी 20 एप्रिल रोजी...\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\nमिस अर्थ इंडिया-फायर हा किताब मिळवणारी महाराष्ट्राची लेक हेमल इंगळे. २०१६ साली तिने हा पुरस्कार मिळवला...\nथंड�� संपतेय बरं का आणि हळूहळू आता सूर्य आग ओकून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल देतोय. पण सध्याच्या...\nआता प्रेक्षकांच्या मनासारखं करू विश्व् दौरा फसलाच भाऊ कदम, कुशलची कबुली\nतुम्हा आम्हा सगळ्यांना खळखळून हसवणारा एक कॉमेडी शो, महाराष्ट्रातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात जागा करून...\nकधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर कधी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसाऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.\n“वेडींगचा शिनेमा”तील नवं गाणं प्रदर्शित.”माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हा”.\nप्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची” कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.\n“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/did-jinnah-ever-regret-his-demand-for-pakistan-that-caused-partition/", "date_download": "2019-03-25T08:24:57Z", "digest": "sha1:H42D24UZ2BOYACNDRF2E4FC4CSBZ42Q6", "length": 16917, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा पश्चाताप वाटला होता का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा पश्चाताप वाटला होता का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमोहम्मद अली जिना हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर त्या माणसाची प्रतिमा उभी राहते ज्याने भारताच्या फाळणीची मागणी केली. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा माणूस लढला त्याच देशाचे तुकडे करण्याची भाषा या व्यक्तीच्या तोंडून निघाली आणि अखंड भारत अस्वस्थ झाला. स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानपदाची आकांक्षा जिना पूर्वी पासूनच बाळगून होते. परंतु त्या जागी पंडित नेहरुंना पंतप्रधानपदासाठी मिळत असलेला पाठींबा त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी वेगळ्या मुस्लीम देशाची मागणी केली.\nभारताच्या फाळणीचा इतिहास तसा खूपच खोल आहे. त्यात जितकं जास्त खोल जाऊ तितकी जास्त रहस्ये उलगडणारी प्रकरणे आहेत. पण आपण तितक्या खोलात न जाता सरळ मूळ प्रश्नावर येऊ की – ज्या ईर्ष्येने मोहम्मद जिनांनी पाकिस्तानचा हट्ट धरला आणि अखंड भारताची फाळणी करवून घेतली, त्या कृत्याचा त्यांना कधी पश्चाताप वाटला का\nत्यां���ा असे कधी वाटले का, की अखंड भारतात राहणेच आपल्या आणि आपल्या नागरिकांच्या हिताचे होते किंवा पाकिस्तानला जन्माला घालून आपण मोठी चूक तर केली नाही ना\nया सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत –\n’ मोहम्मद जिनांना फाळणीच्या कृत्याचा पश्चाताप वाटला होता, पण त्यांना आपली चूक मरणाच्या दारावर असताना लक्षात आली हेच दुर्दैव\nब्रिटीश इतिहासकार Alex von Tunzelmann यांनी लिहिलेल्या Indian Summer: The Secret History of the End of an Empire’ या पुस्तकामध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे.\nया पुस्तकाच्या मते जिना असे म्हणाले होते की “फाळणीची मागणी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक ठरली.”\nटीबी, फुफ्फुसाचा कर्करोग आणि न्यूमोनिया या तिन्ही व्याधींनी ग्रस्त असलेले जिना ११ सप्टेंबर १९४८ रोजी क्वेटा वरून कराचीच्या दिशेने विमानप्रवास करत होते. यावेळी त्यांची बहिण फातिमा देखील त्यांच्या सोबत होती. आजाराने थकलेल्या जिनांनी ग्लानीच्या अवस्थेत आपल्या बहिणीच्या कानात सांगितले की,\n“काश्मीर त्यांना परत द्या. मी स्वत: ही गोष्ट माझ्या हाताने पूर्ण करेन. पिडीत लोकांना साहाय्य करा…”\nकराची विमानतळावर पोचल्यावर त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री लियाकत अली खान यांना पाहिले. त्यांना पाहताच जिना म्हणाले, “पाकिस्तानची मागणी करणे ही माझ्या हातून घडलेली सर्वात मोठी चूक होती.” पुढे ते असेही म्हणाले की,\nजर मला पुन्हा संधी मिळाली तर मी दिल्लीला जाऊन नेहरूंची भेट घेईन आणि त्यांना सांगेन, झालं गेलं सगळ विसरा आपण पुन्हा मित्र होऊ.\nया दरम्यान जिनांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना गव्हर्नर जनरलच्या बंगल्यात हलवण्यात आले. त्या रात्री पुन्हा ते आपल्या बहिणीच्या कानात शेवटचे शब्द कुजबुजले –\nफाति, खुदा हाफिज..ला इलाहा….इल्लाल्लाहा..मुहम्मदूर…रसुलुल्लाह…\nयाचा अर्थ आहे की – ‘माझ्यासाठी सर्वात प्रथम कोण आहे तर माझा अल्लाह आणि मुहम्मद त्या अल्लाहचे प्रेषित आहेत. त्यांचा मी आदर करतो.’\nइस्लाममधील सर्वात मुलभूत तत्व म्हणून या प्रार्थनेची शिकवण दिली जाते. परंतु आपलं संपूर्ण आयुष्य ज्या जिनांनी नास्तिक म्हणून व्यतीत केलं त्या माणसाने मरणाच्या दारावर असताना परमेश्वराची आराधना करणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.\nमरताना तरी कोणतंही ओझं आपल्या मनावर राहू नये तसेच केलेल्या चुकांची कबुली देण���यासाठी म्हणून सहसा माणूस मरणाच्या उंबरठ्यावर परमेश्वराचे नाव घेतो. मोहम्मद जिनांनी देखील तेच केलं आणि त्याच रात्री त्यांनी अखेरचा श्वास सोडला.\nजिनांची बहिण फातिमा हिच्या म्हणण्यानुसार, जिनांना मरताना देखील अखंड भारताच्या फाळणीची गोष्ट सतत खात होती. आपली चूक त्यांना काही केल्या विसरता येत नव्हती. ते सतत त्याबद्दलच बोलत असत. केलेली चूक सुधारण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा होती.\nकेवळ वैयक्तिक स्वार्थापोटी घेतलेला निर्णय किती मोठी उलथापालथ करू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जिनांचा हट्ट आणि अखंड भारताची फाळणी होय. त्याचे परिणाम आजही कित्येक निष्पाप जीव भोगत आहेत यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता\nजगात पहिल्यांदाच लागू होणार Syllabus नसलेली शिक्षणपद्धती →\nहिमालयाच्या कुशीत वसलेले भारतातील शेवटचे शहर\nभारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत\nरुपयाचं “अवमूल्यन” झालेलं पाहून वाईट वाटतंय थांबा ही खरंतर “गुडन्यूज” आहे\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\nतब्ब्ल ५ महिने समुद्रात “अडकलेल्या” २ तरुणींचा थरारक अनुभव\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\nया गणेशोत्सवादरम्यान विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे विघ्न टाळावे…\nइंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत\nएलीयन्सच्या शोधासाठी नासाला मदत करणाऱ्या एका भारतीयाची गोष्ट…..\n“ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर \nरेल्वे स्थानकं स्वच्छ हवी आहेत… मग गाड्या एसी करा…\nती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी\nसचिन – तुझं चुकलंच \n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे\nअसं म्हणतात, हे आठ जण हजारो वर्षांपासून जीवित आहेत आणि त्यांना कधीही मृत्यू येणार नाही\nअल्पावधीत लोकप्रिय झालेल्या “whatsapp”च्या न���र्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी\nजगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत\nपत्नीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्याची शपथ घेणाऱ्या लढवय्या पतीची कथा..\nभारतात राहून, घराच्या बाल्कनीत भारत-पाकिस्तान दोन्ही झेंडे लावणारी, मोहम्मद जीनांची मुलगी\nअनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका फार मोठ्या दुर्गुणाने ग्रासलेले आहेत\nहिटलरच्या सैन्याला आपल्या “जादू” ने हरवणारा अचाट, अज्ञात “जादूगार”\n“स्वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_89.html", "date_download": "2019-03-25T08:20:40Z", "digest": "sha1:4WM7BBREAIPSDSTVV6BD43QRX2ETD2EE", "length": 5913, "nlines": 124, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आता तीच्यावर कवीता मला सुचतच नाही.... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nआता तीच्यावर कवीता मला सुचतच नाही....\nआता तीच्यावर कवीता मला सुचतच नाही....\nकारण ती मला आजकाल\nदिसतच नाही. सतत मी फक्त तीलाच\nपण ती दिसल्यावर तीला\nन पाहिल्या सारखे भासवतो.\nअसे मी का केलं म्हणुन\nतर मी खुप करतो.\nपण तीला हे सांगायला\nपण ती नाही बोलली\nयोग्य वेळेची वाट पाहत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/havas-maj-tu/", "date_download": "2019-03-25T07:42:01Z", "digest": "sha1:CU2EH5D7QQEDS6QFXPNRRXXPLA2SBCI5", "length": 6999, "nlines": 73, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nहवास मज तू हवास सखया\nहवास मज तू हवास सखया\nहृदयी माझ्या भाव उसळती\nरचावया परि कविता पंक्ती\nहवास मज तू हवास रे.\nभुलवित्ती खुलविती रसिक मनाला\nसुमनांचा मी संचय केला\nगुंफाया परी मोहक माला\nहवास मज तू हवास रे.\nअसे कुंचली रंगही असती\nधवल फलकही आहे पुढती\nरेखाया परी रम्य आकृती\nहवास मज तू हवास रे.\nस्नेहही आहे, आहे पणती\nहवास मज तू हवास रे.\n'दहा वाजता' ही रोज रात्री दहा वाजता एकमेकांची आठवण काढण्याचा संकेत पाळणाऱ्या दोन प्रेमिकांची आगळी प्रेमकथा. या चित्रपटातील गीते आधी लिहिली गेली आणि नंतर चाली लावण्यात आल्या. त्यामुळे यातील सर्व गीतांच्या रचना उत्कृष्ट झाल्या आहेत. 'हवास मज तू हवास सखया', 'गोड गुपित कळलंय मला', 'तो म्हणाला, ती म्हणाली', 'चल थरकत मुरकत डौलात रे' या गीतांत गोडवा तर आहेच पण नाविन्यही आहे.\nनायकाच्या गीतांसाठी सुप्रसिद्ध भावगीतगायक गजाननराव वाटवे आणि नायिकेच्या गीतांसाठी लीला पाठक यांनी पार्श्वगायन केले आहे. त्यामुळे गाण्यातील कृत्रिमपणा कमी झाला आणि शब्दोच्चार रसानुकुल आणि भावव्यक्ती परिणामकारक झाली आहे. ती खास भावगीते वाटतात. यातील 'तो म्हणाला, ती म्हणाली' या गीतावरून त्या चित्रपटाची जाहिरात 'तो आणि ती यांचे 'ते\" अशी केली होती.\nहवास मज तू हवास सखया\nगोड गुपित कळलंय मला\nतो म्हणाला, सांग ना गे मी तुझा\nचल थरकत मुरकत डौलात रे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली ��ुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/rajinikanth-in-himachal-for-shiv-darshan/rajinikanth-in-himachal/photoshow/63281110.cms", "date_download": "2019-03-25T08:48:28Z", "digest": "sha1:XWNA4H7E2MD4NFBRK4IFTW3TOHY5KFKY", "length": 39989, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Palampur:rajinikanth in himachal for shiv darshan- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुख..\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थ..\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं ..\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल..\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय क..\nपाहा: प. बंगालमधील बेलूर मठाच्या ..\nदक्षिणी सिनेसृष्टी गाजवून राजकारणाच्या मैदानात उतरलेले सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रत्येक हालचालींवर सध्या देशाची नजर आहे. त्यामुळंच रजनीकांत यांचा हिमाचल दौरा सध्या चर्चेत आहे. नेमके कशासाठी गेले आहेत रजनीकांत हिमाचलमध्ये चला जाणून घेऊ या...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर ��ागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/6देवा तुझ्या दारी आलो...\nरजनीकांत हे देवदर्शनासाठी हिमाचल प्रदेशात गेले आहेत. पालमपूर येथील शिव मंदिरात जाऊन त्यांनी नुकतंच भगवान शंकराचं दर्शन घेतलं. घोड्यावर स्वार होऊन मंदिराच्या दिशेनं निघालेले रजनीकांत जणू एखाद्या चित्रपटाचं शूटिंग करत असावेत, असंच भासत होतं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nचित्रपटाच्या कॅमेऱ्यासमोरून बाजूला झाल्यानंतर कुठलाही स्टारडम मिरवायचा नाही, हे रजनीकांत यांचं वैशिष्ट्य आहे. पालमपूर दौऱ्यातही सर्वांना त्याचा प्रत्यय आला. चित्रपटाच्या पडद्यावर एरवी एकावेळी अनेक गुंडांना लोळविणाऱ्या रजनीकांत यांनी मंदिराच्या गुंफेतून जाताना कसलाही संकोच न बाळगता अन्य यात्रेकरूंचा आधार घेतला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरजनीकांत यांचा हा देवदर्शन दौरा येथील यात्रेकरूंसाठी व त्यांच्या चाहत्यांसाठी दुहेरी देवदर्शनाचा सोहळा ठरला. रजनीकांत आल्याचं समजताच लोकांनी त्यांना अक्षरश: गराडाच घातला आणि सेल्फीच्या लकलकाटानं गुंफाही उजळून निघाली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयते��े धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/6जय जय शिव शंकर\nरजनीकांत यांचे अध्यात्मिक गुरु योगीराज अमर ज्योती महाराज हेही यावेळी त्यांच्यासोबत होते. अध्यात्मिक राजकारणाची मांडणी करणारे रजनीकांत येत्या काळात विविध अध्यात्मिक गुरूंची भेट घेणार असून त्यांच्याकडून भावी राजकारणाविषयी मार्गदर्शन घेणार आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nकुंडली 25 मार्च 2019\nअमेझॅन फॅब फोन विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/everything-you-need-to-know-about-patent-and-its-registration/", "date_download": "2019-03-25T07:36:22Z", "digest": "sha1:KX3D7YHZNE6XE7N6WA5WUPENIDFBSWR2", "length": 17222, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "एखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय ? आणि ते कसे मिळवाल ? - जाणून घ्या !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय आणि ते कसे मिळवाल आणि ते कसे मिळवाल \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nचोरी करणे हा गुन्हा आहे, हे तर तुम्हाला माहित आहेच. काहीजण वस्तूंची चोरी करतात, तर काही पैशांची. पण असे ही काही लोक आहेत जे लोकांच्या कल्पनांची चोरी करतात. एखाद्याची कल्पना चोरून त्याची नक्कल करणे हा सुद्धा एक गुन्हाच आहे. आता तुम्ही विचाराल, कल्पनांची चोरी म्हणजे नक्की कसली चोरी, अहो म्हणजे एखाद्याने जर नवीन शोध लावला असेल तर तसाच शोध किंवा वस्तू बनवून ती आपली म्हणून सांगायची. यावेळी जर तुम्ही त्या गोष���टीचे पेटेंट केले असाल, तर तुम्ही त्या व्यक्तीवर खटला टाकून त्याच्याविरुद्ध कारवाई घडवून आणू शकता. असे हे पेटेंट आपल्या खूप उपयोगाचे असते, ज्याच्या माध्यमाने तुम्ही तुमची कल्पना सत्यात उतरवू शकता. याच पेटेंटविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.\nभारतीय पेटेंट कार्यालयाला पेटेंट डिझाईन आणि ट्रेड मार्क्स (सीडीपीडीटीएम) चे नियंत्रक जनरलच्या कार्यालयद्वारे प्रशासित केले जाते. याचे मुख्यालय कोलकात्यामध्ये आहे आणि हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतात.\nपेटेंट एक अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही एकदम नवीन सेवा, तांत्रिक, प्रक्रिया, उत्पादन किंवा डिझाईनसाठी दिले जाते, कारण कोणीही त्याची नक्कल तयार करू शकत नाही. पेटेंट एक असा अधिकार आहे, जो मिळाल्यानंतर जर कोणीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही उत्पादनाचा शोध करते किंवा बनवते तर ते त्या उत्पादनाला बनवण्याचा एकाधिकार प्राप्त करते.\nजर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीऐवजी इतर कोणी व्यक्ती किंवा संस्था याच उत्पादनाला बनवते, तर ते बेकायदेशीर मानले जाते आणि जर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीने त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवल्यास पेटेंटचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण जर कोणी या उत्पादनाला बनवू इच्छित असेल तर त्याला पेटेंट मिळालेल्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून परवानगी घ्यावी लागेल आणि त्याला रॉयल्टी देणे गरजेचे आहे.\nआता वर्ल्ड ट्रेड संघटनेने पेटेंट लागू राहण्याचा कालावधी २० वर्ष केला आहे, जो पहिले प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा होता.\nपेटेंटचे दोन प्रकार असतात\nयाचा अर्थ हा आहे की, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था एखाद्या उत्पादनाची एकदम हुबेहूब नक्कल करू शकत नाही, म्हणजे दोन उत्पादनांची डिझाईन सारखी असू शकत नाही. हे अंतर उत्पादनाची पॅकिंग, नाव, रंग, आकार आणि चव इत्यादीचा असतो. हेच कारण आहे की, तुम्ही बाजारामध्ये कितीतरी प्रकारचे टूथपेस्ट बघितले असाल, परंतु त्यामधील कोणत्याही दोन कंपनीचे उत्पादन एकदम एकसारखे बघितले नसाल. असे उत्पादन पेटेंटमुळेच केले जाते.\n२. प्रक्रिया उत्पादन :-\nयाचा संबंध नवीन औद्योगिकाशी आहे. कोणत्याही नवीन तांत्रिक पद्धतीवर सुद्धा पेटेंट घेतला जाऊ शकतो. या प्रकारच्या पेटेंटचा अर्थ कोणताही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही उत्पादनाला बनवण्यासाठी त्याच पद्धतीचा वापर करू शकत नाही, ज्या प्रक्रियेचा वापर करून एखाद्या उत्पादनाला पहिलेच बनवले असेल. म्हणजेच प्रक्रिया पेटेंटमध्ये कोणतेही उत्पादन बनवण्याची पद्धत चोरी करू शकत नाही.\nपेटेंट कसे मिळवले जाते\nप्रत्येक देशामध्ये पेटेंट कार्यालय असते. आपले उत्पादन किंवा प्रक्रियचे पेटेंट मिळवण्यासाठी पेटेंट कार्यालयामध्ये अर्ज द्या आणि आपल्या नवीन शोधाचे वर्णन केलेला अहवाल द्या. त्यानंतर पेटेंट कार्यालय त्याची पडताळणी करेल आणि जर ते उत्पादन किंवा प्रक्रियेचा विचार नवीन असेल, तर पेटेंट देण्याचा आदेश दिला जातो. येथे ही गोष्ट जाणून घेणे खूप गरजेचे आहे की, उत्पादन किंवा सेवेसाठी घेण्यात आलेले पेटेंट फक्त त्याच देशासाठी लागू झालेला असतो, ज्या देशामध्ये पेटेंट केले गेले असेल. जर ऑस्ट्रेलियाचा किंवा इतर कोणत्याही देशाचा व्यक्ती भारतामध्ये पेटेंट केलल्या उत्पादनाची किंवा प्रक्रियेची नक्कल बनवत असेल, तर त्याला चुकीचे मानले जात नाही. याचप्रकारे भारतामध्ये पेटेंट करणारी कंपनी जर याच पेटेंटचा ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणत्याही देशामध्ये एकाधिकार पाहिजे असल्यास त्या देशातील पेटेंट कार्यालयाला वेगळा अर्ज देणे गरजेचे आहे.\nआहे की नाही कामाची माहिती, चला तर मग तुमच्या मित्रमंडळींसोबत देखील ही माहिती शेअर करा म्हणजे त्यांच्या देखील कामी येईल.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← औषधांविना वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय ट्राय करा – १००% फरक जाणवेल\nइतिहासजमा होणाऱ्या ‘खाकी’ वर्दीमागील खाकी रंगाची कहाणी…\nOne thought on “एखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय आणि ते कसे मिळवाल आणि ते कसे मिळवाल – जाणून घ्या \n“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nहे ५ प्रोब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले असतात\nया पाच पत्रकारांनी आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणले होते\n‘ताजमहल’ व्यतिरिक्त जगातील ‘ह्या’ वास्तू प्रेमाचे प्��तिक म्हणून ओळखल्या जातात\nसाबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nजी कधी स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती, आज ती जगाला ‘योगा’चे धडे देते\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nलग्नाच्या निर्णयामुळे एकट्या पडलेल्या इरोम शर्मिलाच्या पाठीशी रेणुका शहाणे\nस्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\nसंजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते\nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल\nचहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय\nतुमच्या असह्य वेदनांवरचा अत्यंत सोपा उपाय तुमच्याच घरात दडलाय आणि त्याची तुम्हाला कल्पनाही नाही\nआता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन \nशेटजी-भटजींच्या हातून सुटत चाललेलं राजकारण – थँक्स टू सोशल मीडिया\nनामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल\nविमानाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना तुलनेने जास्त वेळ का लागत असावा\nव्यवसायात नफा असो वा नोकरीत प्रमोशन – हे १० गुण असल्याशिवाय शक्य नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/tamil-nadu-librarian-donated-rs-30-crore-to-the-uneducated-poor-1119330/", "date_download": "2019-03-25T08:14:51Z", "digest": "sha1:WJWMFOIKHENZTIA6TMV7B7E6W2DHP2SZ", "length": 29761, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पालम मातृत्व आणि दातृत्वाचा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nपालम मातृत्व आणि दातृत्वाचा\nपालम मातृत्व आणि दातृत्वाचा\nआपल्या पगारातला पै न् पै समाजकार्याला देणारे, इतकंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर आलेले दहा लाख रुपये आणि पुरस्काराचे ३० कोटी रुपयेसुद्धा समाजाच्या विकासासाठी देणारे पालम कल्याणसुंदरम.\nआपल्या पगारातला पै न् पै समाजकार्याला देणारे, इतकंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर आलेले दहा लाख रुपये आणि पुरस्काराचे ३० कोटी रुपयेसुद्धा समाजाच्या विकासासाठी देणारे पालम कल्याणसुंदरम. आज त्यांची ‘पालम’ (पूल अथवा दुवा) ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते आहे. त्या दानशूर अवलियाविषयी..\nदानाची सर्वसंमत व्याख्या म्हणजे आपलं पोट भरल्यावर उर्वरित संपत्तीतील छोटा-मोठा भाग समाजासाठी देणं. या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत आपल्या ३५ वर्षांच्या नोकरीत दरमहा कमावलेली पै न् पै समाजासाठी देणारा एक देवदूत म्हणजे पालम कल्याणसुंदरम. चेन्नईजवळील सैदापेट या भागातल्या या अवलियाने दर महिन्याच्या पगाराबरोबरच निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचे दहा लाख रुपये आणि त्यावरही कडी म्हणजे पुरस्कारांचे ३० कोटी रुपयेही समाजाच्या विनियोगासाठी दिले आहेत. अभिनेता रजनीकांत यांनी तर त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं असून बिल क्लिंटन यांनाही भारतात आल्यावर त्यांची भेट घेण्याचा मोह आवरला नाही.\nयाचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या पगारातला सर्व पैसा दानासाठी देणाऱ्या पालम यांनी आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे दोन वेळचं जेवण आणि इतर अल्प गरजांसाठी आयुष्यभर एका हॉटेलात वेटर म्हणून पार्ट-टाइम काम केलं, इतकंच नव्हे तर आपल्या मिळकतीला अन्य वाटा फुटायला नकोत म्हणून लग्नही केलं नाही. सानेगुरुजींच्या श्यामच्या आईचं मातृत्व आणि कर्णाचं दातृत्व एकवटलेल्या या संताची ही स्फूर्तिदायी कहाणी.\nतिरुनेलवेल्ली जिल्ह्य़ातील मेलाकारू वेलांगुलम या छोटय़ाशा खेडय़ात त्यांचं बालपण गेलं. हे गाव जेमतेम ३० उंबऱ्यांचं. वीज नाही.. रस्ते नाहीत.. शाळा नाही.. साधं काडेपेटीचंही दुकान नाही. सगळय़ात जवळची शाळाही १० कि.मी. दूर. हे जाऊन-येऊनचं २० कि.मी.चं अंतर रोज एकटय़ाने चालण्याचा त्यांना खूप कंटाळा येई. अशा वेळी एकदा त्यांच्या मनात आलं, ‘गावातील मुलं जर आपल्याबरोबर शाळेत आली तर हा प्रवास हसत खेळत संपेल. बाकीची मुलं शाळेत न जाण्याचं कारण होतं गरिबी. त्या वेळची महिना ५ रुपये फीदेखील कोणाला परवडणारी नव्हती. तेव्हा कल्याणसुंदरम या ९-१० वर्षांच्या मुलाच्या मनात एक वेगळाच विचार आला आणि त्याने आईकडे त्या मुलांच्या फीच्या पैशासाठी हट्ट धरला. कल्याणसुंदरम यांचे वडील ते दहा महिन्यांचे असताना निवर्तले होते. त्यामुळे आईचा आणि आजीचा या बापविना लेकरावर भारी जीव. त्या दोघींनी आपल्या मुलाचा हा जगावेगळा हट्ट तर पु��वलाच, शिवाय त्या मुलांच्या युनिफॉर्मची व वह्य़ा-पुस्तकांची सोय केली. कल्याणसुंदरम यांनी पुढे जो दानाचा इतिहास रचला, त्याचा पाया हा असा रचला गेला असावा.\nमात्र यावर त्यांचं म्हणणं, ‘माझ्या त्या कृत्याला स्वार्थाचा वास होता. मात्र दुसऱ्यासाठी काही तरी करण्याची खरी जाणीव मला झाली ती पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारत-चीन युद्धाच्या वेळी राष्ट्राला उद्देशून घातलेली साद ऐकली तेव्हा. कल्याणसुंदरम त्या वेळी कॉलेजात शिकत होते. नेहरूंनी रेडिओवरून संरक्षण निधीसाठी केलेलं आवाहन ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या गळय़ातली सोन्याची चेन त्या वेळचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कामराज यांना नेऊन दिली. एका तरुण मुलाने देशसेवेसाठी उचललेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि त्यांनी या देशभक्ताचा खास गौरव केला.\nबी. ए. नंतर कल्याणसुंदरम यांना तमिळ साहित्यात एम. ए. करण्याची इच्छा होती, परंतु या विषयासाठी दुसरा विद्यार्थी नसल्याने कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना अन्य विषय घेण्यास सुचवलं. पण त्यांनी तमिळचा आग्रह सोडला नाही. त्यांच्या या मातृभाषेवरील प्रेमाने एम.टी.टी. कॉलेजचे संस्थापकही प्रभावित झाले आणि त्यांनी या एका मुलासाठी ती सोय उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. तमिळ साहित्यातील मास्टर्स डिग्रीबरोबर त्यांनी लायब्ररी सायन्समध्ये सुवर्णपदक मिळवले आणि गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरवला.\nशिक्षण पूर्ण झाल्यावर कल्याणसुंदरम यांनी कुमारकारुपा आर्ट्स कॉलेजमध्ये सलग ३५ वर्षे ग्रंथपाल अर्थात लायब्ररियन म्हणून नोकरी केली आणि पहिल्या पगारापासून शेवटच्या पगारापर्यंतचा एकूण एक पैसा समाजाच्या सेवेसाठी अर्पण केला. वयाबरोबर त्यांची देण्याची मनोकामना अधिकच तीव्र होत गेली. वडिलोपार्जित घर विकून आलेले पैसे असोत की पगारवाढीमुळे मिळणारी थकबाकी असो किंवा फंडाची एकहाती मिळालेली दहा लाख रुपयांची रक्कम असो, सगळा ओघ गोरगरिबांच्या, अनाथांच्या उद्धाराच्या दिशेने जात राहिला. गरिबांचा त्यांना एवढा कळवळा की त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ते रेल्वे फ्लॅटफॉर्मवर आणि दुकानांच्या पायऱ्यांवरही झोपलेले आहेत.\nकल्याणसुंदरम यांच्या परोपकारी विचारसरणीचा उगम त्यांच्या आईच्या संस्कारात आहे. सुखी होण्यासाठी आईने सांगितलेले तीन नियम त्यांनी हृदयावर कोरून ठेवलेत. पहिली गोष्ट म्हणजे कशाचाही लोभ धरू नकोस. दुसरं म्हणजे जे काही तुझ्या हातात आहे त्याचे दहा समान भाग कर आणि त्यातील एक भाग सत्कार्यासाठी दे आणि आईचं तिसरं सांगणं म्हणजे किमान एका जिवाला आनंद दिल्याशिवाय रात्री झोपू नको. त्यांची आई म्हणायची एवढय़ा तीन गोष्टी जरी तू आचरणात आणल्यास तरी कोणत्याही परिस्थितीत सुखी राहशील आणि खरंच आज जगात कल्याणसुंदरम यांच्याइतका सुखी व समाधानी माणूस दुसरा कोणी नसेल\nएवढं उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करताना त्यांच्या वाटय़ाला दु:ख आलंच नाही, असं मात्र नाही. आपल्या किनऱ्या, चिरक्या आवाजाच्या न्यूनगंडाने त्यांना एके काळी एवढं पछाडलं होतं की आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात घोळत होता. परंतु व्यक्तिमत्त्व विकासावर पुस्तकं लिहिणारे थामिझवानम त्यांना भेटले आणि त्या लेखकाने कानमंत्र दिला, ‘आपल्या बोलण्याची चिंता करण्यात तू वेळ दवडू नकोस. त्यापेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल चांगलं बोलावं यासाठी प्रयत्नांची शर्थ कर.’ त्यानंतर मात्र तो न्यूनगंड त्यांनी मनाआड करून टाकला.\nमानवतेच्या या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने देशातील सर्वोत्तम ग्रंथपाल म्हणून त्यांना गौरवलं. ‘युनो’ने २०व्या शतकातील एक असामान्य व्यक्ती या शब्दात त्यांचा सन्मान केला. इंटरनॅशनल बायोग्राफिक सेंटर, केंब्रिजतर्फे त्यांना जगातील सर्वात दयाळू व्यक्ती म्हणून घोषित केलं. एका अमेरिकन संस्थेने तर त्यांना ‘मॅन ऑफ मिलेनियम’ ही पदवी बहाल केली तर रोटरी इंटरनॅशनलने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. ‘मॅन ऑफ मिलेनियम’ या पुरस्कारांपोटी मिळालेली ३० कोटी रुपयांची गंगाजळी समाजार्पण झालीच.\nआणखी एक विशेष सन्मानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी दोन भारतीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातील एक म्हणजे डॉ. अब्दुल कलाम आणि दुसरे पालम कल्याणसुंदरम. क्लिंटन यानी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रातील शब्द असे होते.. ‘एक मध्यमवर्गीय माणूस ज्याने संपूर्ण हयातीत कधीही एक कोटी रुपये बघितलेले नाहीत, त्याने मिळवलेले ३० कोटी रुपये सहज दान केले, अशा त्या व्यक्तीला मला भेटायचंय.’ ही भेट कल्याण���ुंदरम यांच्या मनात चांदणं बनून राहिलीय.\nत्यांचा दानाचा केंद्रबिंदू गरीब व अनाथ मुलांचं शिक्षण हा होता. आहे. त्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर (१९९८) ‘पालम’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते. (पालम या शब्दाचा अर्थच पूल अथवा दुवा) इथे फक्त पैशांची मदत मिळते असं नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गरजूंना वैद्यकीय सल्ला दिला जातो. रक्तदान शिबिरं भरवण्यात येतात. वृद्ध, आजारी, बेरोजगार व अपंग व्यक्तीचं पुनर्वसन केलं जातं. चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पालमचा मदतीचा हात नेहमी पुढे असतो. निराधार गरीब मुलांच्या मदतीसाठी त्यांनी ‘अॅन्ड्रय़ू पालम’ नावाचं मासिक सुरू केलंय. ज्यात सामान्यातील असामान्यांच्या कथा/बातम्या दिल्या जातात. ७३ वर्षांचे कल्याणसुंदरम आजही चेन्नईतील अडयार येथील आपल्या कार्यालयात रोज येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या कार्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं हे पालम यांचं ध्येय आहे. म्हणूनच या संस्थेची महिना सभासद वर्गणी आहे रुपये १ ते १०. (ज्याला जशी परवडेल तशी) आणि आजीव सभासत्वाची फी शंभर रुपये. ‘पालम’ने सर्वसामान्यांनाही प्रेरित केलंय याचं एक उदाहरण म्हणजे अरुप्पु कोत्ताई या गावातील एका अशिक्षित, रोजंदारीवर काम करणाऱ्या तमिळ मणी नावाच्या माणसाने ‘पालम’साठी गेल्या १५ वर्षांत २० लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे हा माणूस त्या छोटय़ा गावाच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता आणि त्या गावातील कोणाचीही दहा रुपयांच्या वर देण्याची ऐपत नव्हती तरीही.\nदक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत तर कल्याणसुंदरम यांच्या निरपेक्ष सेवेने एवढे भरावले की या अभिनेत्याने त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं. पण त्यांच्या आलिशान बंगल्यात, तिथल्या उच्च जीवनशैलीत ते रमू शकले नाहीत. त्यामुळे दोनच महिन्यात ते पुन्हा आपल्या आठ-बाय-आठच्या खोलीत राहायला आले. मात्र या दोघांमध्ये एक जिव्हाळय़ाचा बंध निर्माण झालाय एवढं खरं\n३० कोटी रुपयांचं दान केल्याच्या बातमीने कल्याणसुंदरम एकदम प्रकाशझोतात आले. ३०० मासिकांतून आणि १५ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. पण त्यांचे पाय मात्र कायम जमिनीवरच राहिले.\nजाताना माणूस काहीच बरोबर घे��न जात नाही, हे माहीत असलं तरी मिळवलेल्या सर्वस्वाचं दान करणारे पालम कल्याणसुंदरम यांच्यासारखा एकमेवच. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष असं म्हटलं जातं. यानुसार इहलोकातच मोक्ष मिळवणाऱ्या या तपस्व्याकडे पाहताना कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात..\nकिरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी\nकाळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबाबासाहेब पुरंदरेंकडून पुरस्काराची रक्कम मंगेशकर रुग्णालयाला\nमहामंडळाला मोठे दान; फुकटय़ांचीच केवळ शान\n‘जलयुक्त शिवार’साठी आमीरचे ११ लाख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/artists-said-pleasant-memories-of-the-house-on-occasion-of-diwali-1783170/", "date_download": "2019-03-25T08:25:09Z", "digest": "sha1:C6X6ZKHYHGPCGZOJTVTOVKW564MDM5RG", "length": 33219, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Artists said Pleasant memories of the house on occasion of Diwali | दिवाळीनिमित्त कलाकारांनी सांगितल्या घरातील आनंददायी आठवणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nदिवाळीनिमित्त कलाकारांनी सांगितल्या घरातील आनंददायी आठवणी\nदिवाळीनिमित्त कलाकारांनी सांगितल्या घरातील आनंददायी आठवणी\nपूर्ण नीट मेंदी नाही काढता आली तरी सुरुवात तरी करून देतो. मग त्याही आमच्या हातावर मेंदी काढतात.\nदिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. रोजच्या नोकरीतून दगदगीतून जसा आपल्याला विरंगुळा, वेगळेपण हवं असतं तसं ते कलाकारांनाही हवंच असतं. दोस्त, नातेवाईकांना भेटण्यातून पडणारा आनंदाचा प्रकाश सर्वानाच हवाहवासा असतो. आपल्या आवडत्या मालिकांमधल्या लाडक्या कलाकारांनाही दिवाळीच्या निमित्ताने हा घरगुती माहौल खुणावतो आहे. दिवाळीनिमित्त या कलाकारांनी सांगितलेल्या घरातील या आनंददायी आठवणी खास ‘वास्तुरंग’च्या वाचकांसाठी\nमाझ्साठी दिवाळी हा सण नसून एक सुंदर अनुभव असतो. मी छोटय़ा कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. लहानपणी दिवाळीच्या सुटय़ांमध्ये खूप धमाल करायचो. सुट्टया म्हणजे मजेशीर अनुभवांची पोतडीच त्यातही दिवाळी म्हणजे थंडीचे दिवस आणि मला ते खूप आवडतात. पुण्याला आजोळच्या घरी गेल्यावर तिथे मामा-मावशा भेटायचे. माझ्यासाठी दिवाळी म्हणजे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येणं. कधी आजी आणि घरचे सगळे परभणीला यायचे, कधी आम्ही पुण्याला जायचो. आजीच्या हातचे अनारसे मला खूप आवडतात. तसंच पाटोदा लाडू मला खूप आवडतो. पाटोदा हे बीड जिल्ह्यातील एक गाव आहे. आमची आजी आधी बीडला राहायची, हा बेसनच्या लाडवाचाच एक प्रकार ती तिथे शिकली. त्यामुळे त्या लाडूच्या प्रकाराला पाटोदा लाडू हे नाव पडलं. हा लाडवाचा प्रकार कुठल्याच मिठाईच्या दुकानात आजपर्यंत मी बघितला नाही. या लाडवांविषयी बोलतानाही माझ्या तोंडाला पाणी सुटतंय.\nगेली दोन वर्ष ‘विठुमाऊली’ मालिकेच्या चित्रीकरणामुळे मी मुंबईत राहायला आलो आहे. त्यामुळे गावी जाणं झालं नाहीय. पण यावर्षी मी दिवाळीत परभणीला जाणार आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस खूप धमाल करणार आहे. दिवाळीत आम्ही एकत्र धमाल करताना एक गोष्ट करतो. ती म्हणजे, घरचे सगळे पुरुष मिळून घरातल्या स्त्रियांच्या- आजी, आई, बहीण, काकू अशा सगळ्यांच्या हातावर मेंदी काढतो.\nपूर्ण नीट मेंदी नाही काढता आली तरी सुरुवात तरी करून देतो. मग त्याही आमच्या हातावर मेंदी काढतात. त्यामुळे एकमेकांच्या हातावर मेंदी काढण्याची रीत घरात अजूनही आहे.\nअजिंक्य राऊत (विठु माऊली)\nदिवाळीचा आनंद एकत्र येण्यातच\nमाझे दादा-वहिनी पुण्याला असतात. आई-बाबा नाशिकला असतात. मी आणि माझी पत्नी गिरिजा ठाण्यात राहतो. त्यामुळे आम्हा सगळ्यांना एकमेकांचा सहवास फार कमी लाभतो. त्यामुळे आम्ही सहसा सगळे मुख्य सण आमच्या नाशिकच्याच घरी साजरे करतो. ठरवून सगळे सुट्टी घेऊन एकत्र येतो. त्यानिमित्ताने भेटीगाठी होतात, समाजमाध्यमांमुळे संवाद साधत असलो तरी प्रत्यक्ष एकमेकांना भेटायला नेहमीच भारी वाटतं. आम्ही दिवाळीत फटाके कधीच फोडत नाही. आणि इतरांनाही सांगतो की फटाके फोडू नका. आम्ही घरीच फराळ बनवतो. आमच्याकडे फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष मंडळीही तितक्याच हिरिरीने फराळ तयार करण्यास मदत करतात. यावेळी एकमेकांसोबत राहून सुख-दु:खांची, आचार-विचारांची देवाणघेवाण होते, ती महत्त्वाची वाटते. घरातले सगळे माझी मालिका बघतात, त्यावर प्रतिक्रिया देतात. मी शेंडेफळ असल्यामुळे मलाच बकरा बनवतात. आणि मीही त्याचा आनंद पुरेपूर घेतो.\nचिन्मय उदगीरकर (घाडगे अँड सून)\nनाशिकच्या घरची पारंपरिक दिवाळी\nआमच्या नाशिकच्या घरी अगदी साग्रसंगीत दिवाळी साजरी होते. वसुबारसपासून लगबग सुरू होते. आजीच्या घरी बालपण गेल्यामुळे गाईची पूजा, गायीला नैवेद्य देणं असं सगळं नीट सगंतवार व्हायचं. मग दारासमोर गेरू लावून रांगोळीसाठी जागा करणं ते एकीकडे रांगोळीचे रंग खरेदी, आकाश कंदील- कपडय़ांची खरेदी होत असते. दिवाळीतली रोषणाई, मातीचे दिवे, अभ्यंग, उटणं, रांगोळीचे रंग, घरभर पसरलेला प्रकाश असं सगळं मला साधेपणानं केलेलं जास्त आवडतं. साध्या-सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने घरात दिवाळी साजरी करायला मला आवडतं. नाशिकच्या घरची एक आठवण सांगायची झाली तर ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या माझ्या पहिल्या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं आणि मला नाशिकला घरी जायला मिळत नव्हतं, पण एक दिवस सुटी मिळाली. सकाळी ४ वाजता शुटिंगचं पॅक अप झालं आणि माझा भाऊ मला घरी न्यायला आला. त्या दिवशी मी घरी जाऊन रात्री पुन्हा चित्रीकरणाला हजर झाले. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही.\nयंदा मी सासरी- पुण्याला दिवाळी साजरी करणार आहे. गेल्या वर्षी माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी अमेरिकेतल्या घरी साजरी झाली होती. पण यावर्षी मी दिवाळी पुण्याला सासरी साजरी करणार आहे. यावेळी माझा नवरा अमेरिकेला असल्याने माझ्यासोबत तो नसेल, त्यामुळे पाडव्याला त्याची खूप आठवण येईल.\nमृणाल दुसानिस (हे मन बावरे)\nकल्याणच्या घरी आम्ही आई-बाबा, भावंडं आणि आजी असे सगळे एकत्र दिवाळी साजरी करतो. वडील कामानिमित्त कतारला ��सतात, त्यामुळे त्यांना दरवर्षी आमच्याबरोबर दिवाळी साजरी करता येत नाही. पण आम्ही दिवाळीत खूप धमाल करतो. भाऊ कंदील बनवण्याच्या व्यवसायात आहे. त्यामुळे आमच्या घरीही आम्हीच कंदील बनवतो. मला स्वत:ला दिवाळीच्या फराळाचे सगळे प्रकार छान करता येतात. त्यामुळे मी उत्साहाने फराळ बनवण्यात भाग घेते. मी, आई आणि आजी आम्ही तिघी मिळून फराळ बनवतो. दिवाळीच्या दिवसांत घर आकर्षक दिवे, कंदील आणि दारासमोर रांगोळीने सजवतं. वेगवेगळ्या प्रकारचे कागद, टिश्यू पेपर वगैरे वापरून वेगळा कंदील बनवण्याकडे आमचा कल असतो. आम्ही दिवेही घरीच बनवतो. त्यांना मी छान रंग देते, ते सगळं सजावटीचं-रंगरंगोटीचं काम करायला मला खूप आवडतं. दिवाळीला आमच्या घरी गेट-टुगेदर असतं. तसंच एक दिवस वेळ काढून मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी डोंबिवली किंवा ठाण्याला ‘दिवाळीत पहाट’च्या कार्यक्रमाला जाते. तिथेच सगळेजण भेटतात. दिवाळी सणानिमित्ताने खरेदी, सजावट आणि फराळ करणं या सगळ्या गोष्टी करताना माझ्यात वेगळा उत्साह संचारतो. गेल्या वर्षीच्या दिवाळीतली एक आठवण इथे सांगावीशी वाटतेय. माझा पहिला पगार झाला होता, त्या पैशातून मी भावंडांसाठी त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू घेतल्या होत्या. त्यामुळे ते खूप खूश होते.\nसाताऱ्याचं घर आणि दिवाळी एक अतूट नातं\nसाताऱ्याला आमच्या घरी वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करून दिवाळीला सुरुवात होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण लवकर उठून उटणं अंगाला लावून अगदी मस्त मनसोक्त पहिली अंघोळ होते. त्यानंतर आमच्याइकडे साताऱ्याला कुर्णेश्वर इथं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. तिथे सगळेजण मिळून दर्शनाला जातो. ते ठिकाण अतिशय प्रसिद्ध असल्यामुळे तिथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी साताऱ्यातील भाविकांची भरपूर गर्दी असते. त्यानंतर शेजारच्या घरांत, मित्रांकडे, नातेवाईकांच्या घरी भेट देऊन येतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरी पूजा असते. त्या दिवशी आमच्याकडे लक्ष्मीच्या तसबिरीची पूजा करतो, त्याचबरोबर केरसुणी आणि घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा करतो. त्या दिवशी झेंडूच्या फुलांनी घराच्या सजावटीत नैसर्गिक शोभा वाढते. पाडव्याच्या दिवशी काही विशेष नाही, पण एखादी चांगली वस्तू घ्यायची (खरेदी करायची) असते असं वडीलधारी मंडळी सांगतात. आई-बाबा, दादा, मी, वहिनी आणि ���ीड वर्षांचा पुतण्या असे आम्ही एकत्र मिळून घरीच दिवाळी साजरी करतो.\nमालिकेचं चित्रीकरण साताऱ्याजवळच होत असलं तरी अलीकडे घरच्यांसाठी फारच कमी वेळ मिळतो. दिवाळीची एक वेगळी आठवण म्हणजे, ४-५ वर्षांचा असताना बाबा फटाके लावत होते. त्यांना वाटलं त्याची नीट वात पेटवली नाहीय, त्यामुळे ते पुन्हा बघायला गेले तेव्हा तो फटाका त्यांच्या हातातच फुटला. त्यामुळे त्यांचा हात भाजला ती रात्र मला अजूनही आठवते, ती विसरता येत नाही. तेव्हापासून फटाके वाजवायचे नाहीत, हे माझ्या मनावर कोरलं गेलं. आतापर्यंत मी दिवाळी माझ्या साताऱ्याच्याच घरी साजरी केली आहे, अन्यत्र कुठेही नाही. फराळाबरोबर पोह्यच्या गोड पाककृती बनतात आणि बाकरवडीही असते. पण घरात सगळ्यांना बेसनाचा लाडू प्रिय आहे, त्यामुळे बेसनाचे लाडू जरा जास्तच बनवले जातात. आमच्याकडे आजूबाजूला घरोघरी जाऊन फराळ वाटण्याची पद्धत आहे, ती अजूनही जपली आहे. गेल्या वर्षी ‘लागीरं झालं जी’ मालिकेची टीम आमच्या घरी आली होती, यावर्षीही दिवाळीला त्यांना घरी घेऊन जाणार आहे.\nनितीश चव्हाण (लागीरं झालं जी)\nदिवाळीत घर सजवायला मला खूप आवडतं. लहानपणापासून मी आणि माझा भाऊ कंदील घरीच बनवतो. नुकतंच दादाचं लग्न झालंय, त्यामुळे आमच्या जोडीला यंदा वहिनीही आहे. आम्ही यावर्षी खूप धमाल करणार आहोत. माझे बाबा आणि दादा र्मचट नेव्हीमध्ये असल्याने आम्हाला फार कमी वेळा एकत्र दिवाळी साजरी करायला मिळते.\nपुण्याच्या घरी एकत्र जमून आम्ही दिवाळी साजरी करतो. यावर्षी ‘मी तुला पाहते रे’ मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त मुंबईत आहे. पण आता सुट्टी घेऊन दिवाळीत घरी जाणार आहे. दिवाळीत रांगोळी काढायला मला खूप आवडतं. दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी दारासमोर रांगोळी मीच काढते. आमच्या बिल्डिंगमधली मंडळीही खूप उत्साही आहेत. आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन धमाल करतो, पण फटाके फोडणे हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. मी लोकांनाही सांगते, ‘फटाके फोडू नका.’\nदिवाळीत घरातील लाइटिंग करण्याची जबाबदारीही माझ्यावर असते. स्वत:चं डोकं लढवून घराची सजावट करायला खूप आवडतं. सजावटीसाठी मी काचेच्या बाटल्या घेते. त्यांना वेगवेगळे गडद रंग देते. मग आतून एलईडी लाइटिंगची माळ सोडते किंवा पणत्या पेटवून त्यात त्या लावते. त्यामुळे घरात छान रंगीबेरंगी प्रकाश पडतो.\nदिवाळीच्या दिवसांमध्ये आईची स्वयंपाकघरामध्ये फराळाची लगबग सुरू असते. तिला माझ्याकडून फारशी मदत होत नाही. कारण मदतीऐवजी फराळवर ताव मारण्यात मी पुढे असते. दिवाळीत घरातच एकत्र मिळून आम्ही धमाल करतो. पुण्यात दिवाळीच्या दिवसांत मस्त वातावरण असतं.\nगायत्री दातार (तुला पाहते रे)\nसोलापूरच्या घरची धमाल दिवाळी\nसोलापूरच्या घरी दिवाळी साजरी करतानाच्या लहानपणीच्या असंख्य आठवणी आहेत. माझे आई-वडील आणि दोन आत्या, त्यांची मुलं असे सगळे मिळून दिवाळी साजरी करायचो. ते चार दिवस अतिशय आनंदाचे असायचे. आता त्या सगळ्याची खूप आठवण येते. दिवाळीनिमित्ताने एकत्र जमल्यावर वर्षभरातील गोष्टींवर चर्चा व्हायची, मोठय़ांचं मार्गदर्शन मिळायचं. माझी मोठी आत्या सगळ्यांना मार्गदर्शन करायची. काय केलं पाहिजे, काय नाही हे ती समजावून सांगायची. आता आत्याची मुलं परदेशात असतात, माझा भाऊ लातूरला असतो आणि मी गेली १० वर्ष मुंबईत आहे; त्यामुळे सगळेजण एकमेकांपासून खूप दूर आहोत. माझे सोलापुरातील मित्रही कामानिमित्ताने बाहेर असतात. त्यामुळे सगळ्यांच्या भेटीगाठी होत नाहीत. पण मी सगळ्यात लहान आणि सगळ्यांचा लाडका असल्यामुळे माझी जबाबदारी आहे की, सगळ्यांना एकत्र आणणं. मला माझ्या घरच्यांना दिवाळीच्या दिवसात एकत्र आणून सोलापूरच्या घरी धमाल करायची आहे. ही जबाबदारी माझीच आहे असं मी मानतो. मला सगळ्यांचीच खूप आठवण येते. यावेळी मीच पुढाकार घेऊन सगळ्यांना सोलापूरच्या घरी एकत्र आणणार आहे. आत्याचे मार्गदर्शक बोल ऐकण्यासाठी आतुर झालोय.\nसोलापूरच्या घरी फेणी हा नमकीनचा प्रकार बनतो. तो मैद्यापासून बनतो आणि मेतकुटाबरोबर खाल्ला जातो. माझी आईच बनवते, तो इतरत्र कुठेही मिळत नाही. तो माझा सगळ्यात\nआवडता पदार्थ आहे. माझ्या घरच्यांप्रमाणेच मी माझ्या मित्रांसाठीही आवर्जून वेळ काढतो. सोलापूरला गेलो की एक दिवस फक्त मित्रांसोबत घालवतो.\nअक्षर कोठारी (छोटी मालकीण)\nशब्दांकन : भक्ती परब\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआपलं दिवाळीचं अभ्यंगस्नान सुगंधी करणाऱ्या आदिवासी महिला\nआली माझ्या घरी ही दिवाळी\n#BhaiDooj : जाणून घ्या भाऊबीजेचं महत्त्व\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र ���ाष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-03-25T07:29:21Z", "digest": "sha1:TAM6JTRSHB7CJEDR7TYSWZ7ZXD6T22MI", "length": 4916, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १७४० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १७४० च्या दशकातील जन्म\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७१० चे १७२० चे १७३० चे १७४० चे १७५० चे १७६० चे १७७० चे\nवर्षे: १७४० १७४१ १७४२ १७४३ १७४४\n१७४५ १७४६ १७४७ १७४८ १७४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.च्या १७४० च्या दशकातील जन्म\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७४१ मधील जन्म (२ प)\n► इ.स. १७४७ मधील जन्म (२ प)\nइ.स.चे १७४० चे दशक\nइ.स.च्या १८ व्या शतकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१५ रोजी २०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/ujani-dam-will-100-present-full-138977", "date_download": "2019-03-25T08:31:03Z", "digest": "sha1:Y7WSP4RC7J6KJSYO6XQLNP67UKB7TR36", "length": 13754, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ujani Dam will 100 present full उजनीची वाटचाल शंभरीकडे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, म���र्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nअकलूज : आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणात 65.39 टक्के पाणीसाठा झाला असून दौंड येथून उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. याचा विचार करता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.\nउजनीच्या वरील धरणे भरली आहेत आणि भीमा खोऱ्यात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनीत मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे.\nअकलूज : आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणात 65.39 टक्के पाणीसाठा झाला असून दौंड येथून उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. याचा विचार करता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.\nउजनीच्या वरील धरणे भरली आहेत आणि भीमा खोऱ्यात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनीत मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे.\nदौंड येथून 53,990 क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी येत आहे. याचवेळी बंडगार्डन येथून 36,608 क्युसेक्सचा विसर्ग उजनीच्या दिशेने येत आहे. उजनीच्या वरील धरणांची साठवण क्षमता संपली आहे या परिस्थितीत तेथे पडणाऱ्या पावसाचे पाणी उजनीत येत आहे. पुणे परिसरात सद्या चांगला पाऊस सुरु आहे. उजनीत मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ही परिस्थिती पाहता उजनी धरण लवकरच 90 टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य पूर नियंत्रणाची स्थिती लक्षात घेता उजनीतून कोणत्याही क्षणी भीमा नदीत पाणी सोडले जाईल अशा इशारा धरण प्रशासनाने दिला असून नदीकाठावर ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nभीमेला पूर येण्याची शक्यता\nनिरा खोऱ्यातील देवधर, भाटघर, गुंजवणी व वीर ही चार ही धरणे भरली आहेत. त्या परिसरात चांगला पाऊस सुरु आहे त्यामुळे सायंकाळी सहा वाजता वीर धरणातून 23,185 क्युसेक्सचा विसर्ग निरा नदीत सोडला जात आहे. हे पाणी संगम (ता. माळशिरस) येथून भीमा नदीत जात आहे. निरेतील प्रवाहामुळे सद्या भीमा नदी दुथडी भरुन वहात आहे. अशातच उजनीतून पाणी सोडावे लागले तर भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.\nज्वारीच्या कोठारात स्वप्नांचा पाचोळा\nऔरंगाबाद : दुष्काळामुळे बागा जळाल्या, जनावरे उपाशीपोटी दावणीला बांधावी लागताहेत, लेकींची लग्ने राहिली ईतकेच नव्हे तर आता जगायचं कसं अशी चिंता लागली...\n#PunekarDemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आत�� मतदारांना विविध आश्वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील...\nअभिनेते अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश: बदलली राजकीय समीकरणे\nपुणे : संभाजीराजांच्या प्रभावी आणि बाणेदार भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील राष्ट्रवादी...\n\"त्या' मायलेकरांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार\nअंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत...\nनर्मदा नदीत बोट उलटली; 5 जणांचा मृत्यू\nनंदूरबार : प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नर्मदा नदीत उलटून आज (मंगळवार) दुर्घटना झाला. या बोटीत एकूण 66 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. यातील 5 जणांचा...\nचौथ्या आरोपीची कारागृहात रवानगी, बिबट्याचा बछडा मृत्यू प्रकरण\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) : शेंडाजवळील जंगल परिसरात झालेल्या बछड्याच्या मृत्यू प्रकरणातील चौथा आरोपी नीलेश हिरालाल मेश्राम (वय 25, रा. प्रधानटोला)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/32-thousand-electricity-workers-elgar-47224", "date_download": "2019-03-25T08:54:23Z", "digest": "sha1:NEZ5WBLNXJF266BWTX4LW2QZEWUL35E6", "length": 15444, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "32 thousand electricity workers Elgar ३२ हजार वीज कामगारांचा एल्गार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\n३२ हजार वीज कामगारांचा एल्गार\nमंगळवार, 23 मे 2017\nयवतमाळ - ‘समान काम, समान वेतन’ या मुख्य मागणीसह अन्य मागण्या कंत्राटी वीज कामगारांच्या आहेत. अजूनही या मागण्यांसंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्या (ता.२३ ) कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपात राज्यातील जवळपास ३२ हजार कामगार सहभागी झालेले आहेत. मागण्यांवर लवकरच तोडगा न निघाल्यास येणाऱ्या दिवसांत वीजनिर्मितीवर संपाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nयवतमाळ - ‘समान काम, समान वेतन’ या मुख्य मागणीसह अन्य मागण्या कंत्राटी वीज कामगारांच्या आहेत. अजूनही या मागण्यांसंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्या (ता.२३ ) कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपात राज्यातील जवळपास ३२ हजार कामगार सहभागी झालेले आहेत. मागण्यांवर लवकरच तोडगा न निघाल्यास येणाऱ्या दिवसांत वीजनिर्मितीवर संपाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nमहानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीन कंपन्यांतील कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यात समान काम, समान वेतन, आठ दहा वर्षांतील ज्येष्ठता यादी तयार करून ज्येष्ठ कंत्राटी कामगारांना कायम करणे, कंत्राटदार बदलले तरी कामगारांना कमी न करता त्यांनाच कामावर घेणे अशा मागण्या आहेत. यासंदर्भात आंदोलन केल्यानंतर मनोज रानडे समिती गठित करण्यात आलेली होती. समितीने शासनाला अहवाल दिला.\nपरंतु, त्यावर चर्चा नाही. त्यानंतर पुन्हा अनुराधा भाटिया समिती नेमण्यात आलेली आहे. त्यांना सहा मार्च २०१७ पर्यंत अहवाल सादर करावयाचा होता. मात्र, अजूनही अहवाल सादर झालेला नसल्याचा आरोप वीज कामगार कृती समितीने केला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कामगार महासंघ, तांत्रिक कामगार संघटना, भारतीय कामगार सेना (वीज युनिट), वीज कामगार पावर फ्रंट, इंटक, कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, पारस या पावर स्टेशनमधील स्थानिक कामगार पाच संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज कामगार कृती समिती स्थापन करून आंदोलन सुरू केलेले आहे. एकाचवेळी राज्यातील विविध भागांतील ३२ हजार वीज कंत्राटी कामगार संपावर गेलेले आहे. यावर लवकर तोडगा न निघाल्यास वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nकंत्राटी वीज कामगारांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर लवकर निर्णय होणे आवश्यक आहे. या प्रश्नांवर लवकर निर्णय न झाल्यास वीज कंपनीच्या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संपात सहभागी होतील.\n- कृष्णा भोयर, सरचिटणीस, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन.\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nLoksabha 2019 : पक्षातील मंडळींचे \"षड्यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील\nपारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या...\nकोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात\nचिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे...\n#WeCareForPune धोकादायक वीज पेटी हटवा\nकोथरुड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे मुख्य गेट जवळचे खांबावर हा वीज पेटी धोकादायक अवस्थेत आहे. तसेच कमी उंचीवर झाकण नसलेल्या अवस्थेत आहे. बॉक्समधील...\nमिरज-कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण वेगात\nसांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhis-speech-insulting-country-says-bjps-sambit-patra-139378", "date_download": "2019-03-25T08:15:46Z", "digest": "sha1:JGHU53UQ6EOI4IY6F624GLIJJR4O4K2C", "length": 13301, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhis speech is insulting the country says BJPs Sambit Patra राहुल गांधींचे भाषण देशाचा अपमान करणारे : संबित पात्रा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nराहुल गांधींचे भाषण देशाचा अपमान करणारे : संबित पात्रा\nगुरुवा��, 23 ऑगस्ट 2018\nभारतातील वाढती बेरोजगारी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गाला रोजगार मिळाला नाही. मोदी ते देऊ शकले नाहीत. तर दुसरे कोणीतरी उभे राहील, असे उदाहरण दिले. त्यांनी दिलेले उदाहरण अत्यंत चुकीचे आणि आपल्या देशाचा अपमान करणारे आहे.\n- संबित पात्रा, भाजपचे प्रवक्ते\nनवी दिल्ली : राहुल गांधी यांचे भाषण खोटे आणि देशाचा अपमान करणारे होते. त्यामुळे त्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे आणि संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज (गुरुवार) केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी जर्मनीतील हॅमबर्ग येथे केलेल्या भाषणाच्या मुद्यावर पात्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.\nहॅमबर्ग येथे असताना राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. पात्रा म्हणाले, बुधवारी ज्या मंचावर राहुल गांधी बोलत होते. त्याठिकाणी 23 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तिथे राहुल गांधींनी दहशतवादाचे समर्थन केले. इसिसबाबत जे स्पष्टीकरण देण्यात आले, ते अत्यंत चिंताजनक आणि भीतीदायक आहे. भारतात जी राजकीय स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, असे वक्तव्य तुम्ही केले होते.\nदरम्यान, भारतातील वाढती बेरोजगारी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गाला रोजगार मिळाला नाही. मोदी ते देऊ शकले नाहीत तर दुसरे कोणीतरी उभे राहील, असे उदाहरण दिले. त्यांनी दिलेले उदाहरण अत्यंत चुकीचे आणि आपल्या देशाचा अपमान करणारे आहे, अशा शब्दांत पात्रा यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.\nसुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला,...\nLoksabha 2019 : राहुल गांधींच्या विराट सभेचे 'सामना'कडूनही कौतूक\nलोकसभा 2019 मालदा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पश्चिम बंगाल येथील मालदा येथे झालेली कालची सभा चांगलीच गाजली. नुकताच राहुल गांधी यांनी...\nLoksabha 2019 : अमेठीसह 'या' मतदारसंघातून लढणार राहुल गांधी\nनवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी सोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली आहे. कॉंग्रेसने...\nLoksabha 2019: चौकीदारीची उठाठेव (श्रीराम पवार)\nप्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काह��� ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील 'हाय व्होल्टेज' लढती कोणत्या\nमहाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या,...\nएअरस्ट्राईकचे पुरावे मागणे दुर्दैवी बाब : अमित शहा\nनवी दिल्ली : ''जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जेव्हा भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसकडून त्या गोष्टींना अभिव्यक्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/upsc-candidates-should-carry-identity-proof-48483", "date_download": "2019-03-25T08:14:01Z", "digest": "sha1:FKRG7UW63IHXHXLOSX46RBTSDYR72ZK7", "length": 12947, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "UPSC candidates should carry identity proof यूपीएससी पूर्वपरीक्षेवेळी ओळखपत्र सोबत ठेवा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nयूपीएससी पूर्वपरीक्षेवेळी ओळखपत्र सोबत ठेवा\nसोमवार, 29 मे 2017\nप्रवेशपत्रावरील छायाचित्राची गुणवत्ता चांगली नसेल, तर अशा परीक्षार्थींनी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची पत्र आणि दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत आणावीत, असे आयोगातर्फे स्पष्ट केले आहे.\nनवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 18 जून रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षेच्या प्रवेशपत्रावरील उमेदवाराच्या छायाचित्राची गुणवत्ता चांगली नसल्यास अशा परीक्षार्थींनी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची प्रत, तसेच दोन छायाचित्रे परीक्षेवेळी बरोबर ठेवावीत, अशी सूचना आयोगातर्फे देण्यात आली आहे.\nयूपीएससीतर्फे 18 जून रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासाठीची ई-प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रवेशपत्र��वरील छायाचित्राची गुणवत्ता चांगली नसेल, तर अशा परीक्षार्थींनी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची पत्र आणि दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत आणावीत, असे आयोगातर्फे स्पष्ट केले आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल, तसेच उमेदवारांना परीक्षेवेळी प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे.\nयूपीएससीतर्फे दरवर्षी तीन टप्प्यांत परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय प्रशासकीय सेवा (आयपीएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आदीं सेवांसाठी निवड करण्यात येते.\nबारमधील उधळपट्टीवर ‘सत्कर्म’चा तोडगा\nमुंबई - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडदेवच्या इंडियाना बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोठडीत रात्र घालवायची नसेल, तर त्यांनी बदलापूरच्या सत्कर्म...\nबुद्धीची निर्यात म्हणजे \"ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या...\nएमपीएससीच्या परिक्षेत वेळेआधीच फुटल्या प्रश्नपत्रिका\nजालना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात रविवारी (ता. 24) जिल्हा केंद्रावर अराजपत्रित (गट-ब) पूर्व परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात...\nहळद रुसली... (संदीप काळे)\nदृष्टिदोषामुळं लग्न ठरत नाही, अशा समस्येमुळं अनेक मुलींचं आयुष्य होरपळलं आहे. एकीकडं दृष्टिदोषांबाबत असलेलं कमालीचं अज्ञात आणि त्यात भर गरिबीची. या...\nमेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)\nहळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून...\nकोल्हापूर : गिरगावातील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू\nकोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील जवान सुरज साताप्पा मस्कर याचा डिंजान आसाम येथे सेवा बजावत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्य��ंसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-raveena-tandon-ambassador-sanjay-gandhi-national-park-139186", "date_download": "2019-03-25T08:45:12Z", "digest": "sha1:A6TRVV3EBBLITP6IH66IHXCYNY22EXYP", "length": 12377, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Actress Raveena Tandon is ambassador of Sanjay Gandhi National Park अभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 'पार्क अॅम्बेसिडर' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nअभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 'पार्क अॅम्बेसिडर'\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑगस्ट 2018 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची राजदूत होण्याची रविना टंडन यांना पत्रान्वये विनंती केली होती.\nमुंबई : अभिनेत्री रविना टंडनने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 'उद्यान राजदूत आणि पार्क अॅम्बेसिडर' म्हणून काम स्वीकारले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑगस्ट 2018 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची राजदूत होण्याची रविना टंडन यांना पत्रान्वये विनंती केली होती. काल (ता. 22) मुनगंटीवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 274 पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात. प्राण्यांच्या 35 आणि वृक्षांच्या 1100 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. उद्यानात सिंह आणि व्याघ्र सफारीमुळे पर्यटकांचे हे विशेष आकर्षण आहे.\nवनमंत्री मुनगंटीवार यांनी लिहीलेल्या पत्रात त्यांनी 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पुर्ण झाल्याचे सांगून संकल्प काळात राज्यात लोकसहभागातून 15 कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड झाल्याचे नमूद केले होते.\nभाजपमध्ये काही \"चौकीदार', काही बेखबर\nनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"मै भी चौकीदार' या अभियानाचा बिगुल वाजविल्यानंतर देशभरातून भाजप व चाहत्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या नावापुढे...\nसंजय गांधी निराधार योजनेचे रखडले अनुदान\nचुंचाळे, (ता. यावल) : संजय गांधी निराधार योजनेंर्तगत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व...\nउधाण नुकसान भरपाई मिळणार\nमालवण - समुद्राच्या उधाणामुळे शेतपीकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा...\nमुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि विविध समाज घटकांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने हंगामी अर्थसंकल्प मांडताना...\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी अर्थसंकल्पात घोषणा नाही\nमुंबई - पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत सध्या दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. मात्र कोडवाहू भागात शेतकऱ्यांकडील धारण क्षेत्र हे...\nखुल्या गटातील मागासांनाही योजना लागू\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-ambabai-temple-cctv-79288", "date_download": "2019-03-25T08:21:29Z", "digest": "sha1:7AFE2TIVITIW32RYHWHLNQ4SE2PMIUBE", "length": 14788, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news: ambabai temple cctv अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यातील सीटीव्ही अखेर खुले | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nअंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यातील सीटीव्ही अखेर खुले\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nबैठकीत समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह इतर सदस्य आणि पुजाऱ्यांत वाद झाला. अखेर सीसीटीव्ही सुरू करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा जाधव यांनी दिला. पोलिस बंदोबस्तानंतर येथील ताणावपूर्ण वातावरण निवळले. दुपारनंतर पुजाऱ्यांनी सीसीटीव्हीवर बांधलेले कापड काढले. यानंतर या वादावर पडदा पडला\nकोल्हापूर - अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यातील सीसीटीव्ही आज पुन्हा खुले केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात पुजारी आणि विश्वस्त यांच्यात झालेल्या बैठकी नंतर हा निर्णय झाला. समितीने दोन दिवसापूर्वीच गाभाऱ्यात सीसीटीव्ही लावले होते. त्यानंतर पुजाऱ्यांनी त्यावर कापड झाकले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी आज समितीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दोन दिवसापूर्वी गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसविले होते. गाभाऱ्याचा ताबा पुजाऱ्यांकडे आहे, त्यामुळे पुजाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवू नये असे सांगितले होते. तरीही कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर पुजाऱ्यांनी सीसीटीव्हीवर कापड लावले होते. येथे वाद निर्माण होऊ नये म्हणून देवस्थान समिती आणि पुजारी यांची आज समिती कार्यालयात बैठक झाली. येथे पुजाऱ्यांनी देवस्थान समितीच्या अध्यक्षांना निवेदन ही दिले. निवेदनात म्हटले आहे,की मंदिराच्या सुरक्षेविषयी व कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी श्रीपुजक संवेदनशील आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेचे कॅमेरा बसविताना श्रीपजूकांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविण्याचे कोणतेही प्रयोजन उरत नाही. आमचा कायदेशीर ताबा असलेल्या जागेत आपण बळजबरीने व बेकायदेशीर रित्या सदरचे कॅमेरे बसवून आमच्या कायदेशीर अधीकारास बाधा येईल अशा प्रकारचे वर्तन केले आहे. सबब आपण हे कॅमेरे त्वरीत काढून घ्यावेत, अन्यथा ना ईलाजाने आपल्या विरुद्ध आम्हास योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल, याची दखल घ्यावी.\nबैठकीत समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह इतर सदस्य आणि पुजाऱ्यांत वाद झाला. अखेर सीसीटीव्ही सुरू करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा जाधव यांनी दिला. पोलिस बंदोबस्तानंतर येथील ताणावपूर्ण वातावरण निवळले. दुपारनंतर पुजाऱ्यांनी सीसीटीव्हीवर बांधलेले कापड काढले. यानंतर या वादावर पडदा पडला\nपुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्या...\nकुत्र्याच्या पिल्लांवर बलात्कार करणारा सीसीटीव्हीत कैद\nचेन्नईः एका विकृताने कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार केला असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेने प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतर...\nमाणूस पारखीतून उलगडला दरोडा\nकऱ्हाड - सीसीटीव्हीची नजर पोचत नाही अशा गुन्ह्यात पोलिसांचे कसब पणाला लागते. शेणोलीतील बॅ��क ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्यात तसेच झाले. तपासातील पूर्वानुभव...\nपत्नीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली चोरी\nपिंपरी : पत्नीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पतीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक दुचाकी आणि 1 लाख 22 हजारचा ऐवज या इसमाने लंपास...\nकौतुक कोणाचं होतंय तर ते 'चोराचं'...\nबीजिंगः जगभरात वेगवेगळ्या कारणांवरून अनेकांचे कौतुक सोहळे आपण पहात असतो. कौतुक करण्यासाठी काही तरी कारण हवे असते. पण... चोराचे कौतुक झालेले कोणी...\nडिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/sakal-furniture-and-kitchen-expo-139845", "date_download": "2019-03-25T08:45:50Z", "digest": "sha1:QWDVOEWWHFP6MMSZLB6ICYTYON6P66EL", "length": 13346, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Furniture and Kitchen Expo फर्निचर, किचन एक्स्पोचा आज अखेरचा दिवस | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nफर्निचर, किचन एक्स्पोचा आज अखेरचा दिवस\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nपुणे - गृहसजावटीचे साहित्य, किचन फर्निचरसोबत कपडे, विविध विद्युत उपकरणे अशा गृहोपयोगी वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या पुणेकरांना खरेदीसाठी ‘सकाळ फर्निचर ॲण्ड किचन एक्स्पो २०१८’मध्ये आज अखेरची संधी आहे.\nपुणे - गृहसजावटीचे साहित्य, किचन फर्निचरसोबत कपडे, विविध विद्युत उपकरणे अशा गृहोपयोगी वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या पुणेकरांना खरेदीसाठी ‘सकाळ फर्निचर ॲण्ड किचन एक्स्पो २०१८’मध्ये आज अखेरची संधी आहे.\nफर्निचरपासून ते गॅजेट्सपर्यंत... गृहसजावटीच्या वस्तूंपासून खाद्यपदार्थांपर्यंत विविध वस्तू एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध झाल्या आहेत. ‘लाइव्ह डेमो’सह एक्स्चेंज ऑफर्स आणि विविध सवलतींचा लाभ ग��राहकांना घेता आला. या एक्स्पोमध्ये सागवानी लाकूड ते लोखंडापासून तयार केलेले फर्निचर खरेदी करता येईल. झोपाळा, डायनिंग सेट्स, सोफा कम बेड, बेडरूम सेट, दिवाण सेट, मिनी सीटिंग सेट, सोफा सेट्स, वॉडरोब्ज, अँटिक फर्निचर असे विविध प्रकार येथे पाहायला मिळतील. सोफा सेटपासून बेडरूम सेटपर्यंतचे प्रकार सागवानी लाकडापासून तयार केले आहेत. फोल्डिंग सोफा विथ बेड, मॅट्रेसेस, बीन बॅग्ज, ऑफिस खुर्ची असे विविध प्रकारही खरेदीसाठी उपलब्ध आहेत.\nघराला नवे रूप देण्यासाठी डिझायनर फर्निचरचा समावेश केला आहे. त्यात आकर्षक पडदे, चादरी, कुशन्स, कार्पेट्सही आहेत. शंभरहून अधिक स्टॉल्सद्वारे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. खवय्यांसाठी खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत. हा एक्स्पो रविवारपर्यंत (ता. २६) खुला आहे.\nकालावधी - रविवारपर्यंत (ता. २६)\nवेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ\nस्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट\nसुविधा - प्रवेश विनामूल्य\nसांस्कृतिक उद्योजकतेचा मनोरम अविष्कार (प्रा. क्षितिज पाटुकले)\nकंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो....\nग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या कथा (एकनाथ खिल्लारे)\nअलीकडंच अयूब पठाण-लोहगावकर यांचं नाव वाङ्मयीन क्षेत्रात पुढं येत आहे. त्यांचा \"पाणक्या' हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. \"पाणक्या' या...\n‘श्रीमंत’ करणारा भाषांचा अभ्यास\nभाषेचे दार उघडले, की आपल्यासाठी जगाचे अंगण मोकळे असते. भाषेतून भूतकाळातील संचित आपल्यापर्यंत पोचते आणि भविष्यातील रहस्यमयी मार्गही खुणावू लागतात....\nLoksabha 2019 : 'इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावरील राजकीय जाहिरात प्रसारणासाठी एमसीएमसीचे प्रमाणपत्र बंधनकारक\nकोल्हापूर - बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही, केबल, चॅनेल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ-व्हिज्युअल...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nकुणीच तसा ‘ढ’ नसतो\nबालक-पालक स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्री. शंकर यांनी ‘अज्ञात विवेकानंद’ या त���यांच्या पुस्तकात स्वामीजींचं महाविद्यालयीन शिक्षणाचं ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-vidarbha-zp-elections-94191", "date_download": "2019-03-25T08:28:15Z", "digest": "sha1:BNE76BI6IPF3X3XF7F5GQU2DSA2LKP3L", "length": 14840, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news vidarbha zp elections चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतीत निवडणुक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nचिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतीत निवडणुक\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nचिमूर - राज्य निवडणुक आयोगाने घोषित केलेल्या सार्वत्रिक पोटनिवडणुक कार्यक्रमाअंतर्गत चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींमध्ये एकुण पंचवीस ग्रामपंचायत सदस्य निवडीकरीता पोटनिवडणुक २५ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली. यामुळे आवडीच्या उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.\nचिमूर - राज्य निवडणुक आयोगाने घोषित केलेल्या सार्वत्रिक पोटनिवडणुक कार्यक्रमाअंतर्गत चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींमध्ये एकुण पंचवीस ग्रामपंचायत सदस्य निवडीकरीता पोटनिवडणुक २५ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली. यामुळे आवडीच्या उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.\nमहाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे ग्रामपंचायती निवडणुकांचे आठ टप्पे पाडण्यात आले आहेत. त्याप्रमाणे निवडणुक नोटीस प्रसिद्धी २५ जानेवारीस, नामनिर्देशन पत्रे घेणे व सादर करण्याची मुदत ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी, १२ जानेवारीला छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत, निवडणुक चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी १५ फेब्रुवारी, मतदान दिनांक २५ फेब्रुवारी, मतमोजणी २६ फेब्रुवारी आणि निवडणुक निकाल जाहीर करण्याची मुदत २७ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. या निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे चिमूर तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतीमध्ये २५ ग्रामपंचायत सदस्याकरीता पोटनिवडणुक होणार आहे.\nराजीनामा दिल्यामुळे सात ग्रामपंचायत सदस्याकरीता मुरुपार तुकुममधील प्रभाग २, सावर्ला येथील प्रभाग २, बोथली सीरपुर येथील प्रभाग ३, बोथली वहानगाव येथील प्रभाग ३, बोरगांव बुटी येथील प्रभाग २, भीसी येथील प्रभाग ४, सोनेगाव वन येथील प्रभाग २ करीता निवडणुक होणार आहे. नामनिर्देशीत पत्र प्राप्त न झाल्यामुळे रिक्त असलेल्या मुरपार (तु), सिरसपुर, लोहारा, वाघेडा, वाकर्ला, येरखेडा, कन्हाळगाव, कळमगाव, नविन जामणी दोन प्रभागात, पिंपळगाव, कपर्ला (खुर्द), गोंदेडा येथील दोन प्रभाग, आंबेनेरी, कीटाळी (तु) अशाप्रकारे सोळा ग्रामपंचायत सदस्याकरीता निवडणुक होणार आहे.\nसदस्यत्व अपात्र घोषित झाल्यामुळे अडेगाव देश प्रभाग १ मधील अनुसुचित जाती पुरुष व स्त्री दोन जागेकरीता निवडणुक होणार आहे. अशा प्रकारच्या निवडणुक कार्यक्रमाविषयी माहिती तहसीलदार चिमूर संजय नागटिळक यांनी दिली.\nLoksabha 2019 : पावणेनऊ कोटी महाराष्ट्रात मतदार\nमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात...\nLoksabha 2019 : ‘वंचित बहुजन’चे ३७ उमेदवार जाहीर\nमुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून...\nLoksabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अनिल जाधव यांनी उमेदवारी\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर...\nLokSabha 2019 : विदर्भात बहुरंगी लढतींची शक्यता कमीच\nनागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला...\nनापिकी, कर्जापायी शेतकऱ्याची आत्महत्या\nचिमूर : चिमूर तालुक्यातील वाहानगाव येथील शेतकरी मधुकर विठोबा थुटे (वय 70) यांनी आज सकाळी नऊ वाजता दरम्यान शेतातील विहिरीत नापिकी आणि...\nअन्न, पाण्याचे नमुने पाठवले प्रयोगशाळेत\nभंडारा : आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना शन��वारी मळमळ, डोकेदुखीचा त्रास झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या चमूकडून त्यांची तपासणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/basaveshwar-maharaj/", "date_download": "2019-03-25T07:39:55Z", "digest": "sha1:VQPDDCP2JD5LAM4YAQI26DAIRLZAG5I4", "length": 22804, "nlines": 141, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "महात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमहात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपल्या भारताचा इतिहास तसा खूपच रंजक आणि गौरवशाही राहिलेला आहे. अश्या इतिहासात अनेक समाजसुधारक, युगपुरुष होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य हे सहज नव्हते, आज ही भले भले त्यांच्या सारखं कार्य करू शकत नाहीत, असेच एक महापुरुष ९०० वर्षांपूर्वी होऊन गेले ते म्हणजे विश्वगुरु जगतज्योति महात्मा बसवेश्वर. आज त्यांची ९१२ वी जयंती…त्यानिमित्त थोडक्यात त्यांच्या कार्याचा परिचय.\n१२व्या शतकामध्ये भारतीय समाज विशेष करून दक्षिण भागातील समाज हा अनेक परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्री दास्यत्व, जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला, मरगळलेला होता. अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले. मान, अपमान, कष्ट, टीका सहन करीत त्यांनी प्रस्थापितां विरुद्ध मोठा संघर्ष उभा केला. यासाठीच बरेचजण त्यांना १२व्या शतकातील पुरोगामी तर काहीजण विद्रोही महात्मा असेही म्हणतात.\nमहात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परि��र्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. महात्मा बसवेश्वरांनी चातुवर्णाला विरोध केला. वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली.\nमहात्मा बसवेश्वर यांचा जन्म ११०५ मध्ये बागेवाडी (जि. विजापूर) कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला. (जन्म तारीख आणि वर्ष या विषयी मतभेद आहेत पण खूप संशोधना अंती इतिहास संशोधक डॉ पी बी सावंत यांनी ११०५ हेच वर्ष ठरवले आहे)\nदरसाल त्याच दिवशी देशभरात बसवजयंती साजरी केली जाते, खास करून कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक) येथे ही जयंती जोरदार साजरी केली जाते. १९१३ मध्ये कर्नाटक गांधी म्हणून ओळखले जाणारे हर्डेकर मंजप्पा यांनी दावणगेरे (कर्नाटक) येथे पहिली सार्वजनिक बसव जयंती साजरी केली.\nमहात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.\nमनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.\nश्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी (दासोह ) मांडल्यामुळे बसवेश्र्वरांची वृत्ती समाजवादी, समतावादी होती, असे दिसून येते. दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पूरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.\nबसवेश्र्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.\nबसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रीयांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.\nतत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.\nअसा आंतरजातीय विवाह तो ही १२ व्या शतकात हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी होतं कारण आजही म्हणजे ९०० वर्षांनंतरही आपल्या समाजाची असा विवाह स्वीकारण्याची पूर्ण मानसिकता झालेली नाही.\nबसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. हे त्या काळातील पहिले लोकशाहीचे संसद होते. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. तत्कालीन शिवशरण-शरणींची अशी वचने पुढे संग्रहीत करण्यात आली. मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरूपी विचार पेरले.\nदोन वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठी बसवण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरन संध्येच्या भाषणात याच गुणांचा जगासमोर जाहीर गौरवही केला होता.\nआता परत हे मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्या नुकतेच २३ भाषेत रूपांतरित झालेलं असून येत्या २८ एप्रिल २०१७ रोजी बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे “वचन साहित्य” देशाला समर्पित करण्यात येत आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘दयावान अमर’ ची अनपेक्षित ए��्झिट\nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\n5 thoughts on “महात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय\nआपण कृपया इतिहास पुन्हा एकदा वाचवा. वीरशैव हा धर्म नसून तो पंथ आहे. जे लोक शिव म्हणजे शंकराची आराधना करतात ते. जसे की वैष्णव पंथ म्हणजे विष्णुची आराधना करणारे.\nआज लिंगायत धर्मात अनेक साधू किंवा स्वामी तसेच कथित जगदगुरू यांनी आपल्या सोयीनुसार बसवेश्वरांना मांडले असून भोळ्याभाबड्या समाजाने ते स्वीकारले आहे. त्यामुळेच हे मतभेद होत आहेत.\nआनि यामुळेच बसवेश्वरांना अनेकजण ते देवच होते असे मानतात. तर त्यांचे विचार महत्वाचे आहेत जे त्यांनी स्थापित केलेल्या लिंगायत धर्माचे आहेत.\nबाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू\nही कथा महादेवाच्या भक्तांनासुद्धा माहिती नसेल: शंकराची अज्ञात बहीण…\nएका चिमुरड्याच्या हत्येमुळे वादात अडकलेल्या ‘रायन इंटरनॅशनल स्कुल’ची धक्कादायक पार्श्वभूमी\nसर्जिकल स्ट्राईक “खरंच” झाली का व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले\nलाडकी लेक वयात येताना : भाग २\nआपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४१\nरोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास\nपुरुषांच्या नाजूक समस्यांवर जालीम उपाय ठरलेल्या वियाग्राच्या अपघाती जन्माची कहाणी\nतमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर\nजेव्हा एक मुस्लिम लैंगिक विकृत माणूस “हिंदू ऋषी” म्हणून दाखवला जातो…\nजर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे\nगावसकर, सचिन आणि विराट – “किलर इन्स्टींक्ट” गमावलेले विरोधक : भाऊ तोरसेकर\nही आहेत घटस्फोटाची मुख्य १० कारणे\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nBuy One Get One Free ऑफरमागचं धक्कादायक सत्य\nराग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो\n“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”\nबलाढ्य देशांची सुरक्षा मोजक्याच स्त्रियांच्या मुठीत आहे – आणि आपल्याला त्याची कल्पनाच नाहीये\nर��नीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये वाचा “2.0 ची गंमत”\nतथाकथित “साजूक तुपातले प्रस्थापित” आणि मराठी चित्रपटसृष्टी : इनमराठी वरील लेखास प्रतिवाद\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialJune2016.html", "date_download": "2019-03-25T07:49:59Z", "digest": "sha1:GB7LCIDKJTR6M6ARIKRCWY7YBBMQ7XVC", "length": 41062, "nlines": 89, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - मेक इन इंडिया असा ही होऊ शकतो !", "raw_content": "\nमेक इन इंडिया असा ही होऊ शकतो\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nडाळीचे भाव कसे वाढतात \nदुष्काळाची चाहूल ही सगळ्यात अगोदर निसर्गानंतर हवामान खात्याला न लागता ती सटोडिया व्यापाऱ्यांना लागते आणि मग त्या दृष्टीने ते खरेदी व साठवणीचे नियोजन करतात. त्यांना माहीत असते जुन ते सप्टेंबर मध्ये पाऊसमान कमी झाले तर कडधान्यांच्या उत्पादनात ४०% पासून ६०% पर्यंत घट येते. म्हणजे अशा तऱ्हेने त्या जमिनी काळ्या कसदार आणि पाणी धारण क्षमता (W.H.C.) जास्त आहे अशा जमिनीत संरक्षीत पाण्यावर स्प्रिंक्लर किंवा ठिबकवर बऱ्यापैकी सधन शेतकरी ही तुरीच्या उत्पन्नात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु असे सधन, दुरदृष्टी व नियोजनबद्ध असे शेतकरी देशामध्ये फक्त १०% आहेत आणि नियतीचा नियम असा आहे की ज्या लोकांकडे पैसा आहे तिकडेच आपोआप पैसा जातो. कारण कारखानदारीत पैसा लावला की त्याचा गुणाकार होतो. त्याच पद्धतीने शेती हा भांडवली खर्च प्रथम करून येणारे उत्पन्न हे निसर्गाच्या भरवश्यावर असल्याने हा थोडा लॉटरीसारखा विषय ठरतो तेव्हा सटोडिया काय करतात हलक्या जमिनी, मराठवाडा तसेच पुर्व विदर्भातील भाग इथे पाऊसमान कमी आहे तेथे तूर डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत काढली जाते. ही तूर व किंवा व दर्जाची असते. त्यामधील ६०% ही ब दर्जाची तर ३०% क दर्जाची मुकण्यावजा असते. यात डाळीचा उतारा हा २० ते ३०% कमी मिळतो आणि ए ग्रेड जी तूर असते ती कसदार जमिनीतील १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत येते. ती पश्चिमेकडील विदर्भाचा भाग, पाऊसमान अधिक आहे अशा ठिकाणी तुरीचे पीक हे डवरते. त्याला बहार चांगला येतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १० ते १२ क्विंटल उतारा घेतल्याच्या खान्देश, विदर्भ, नगरच्या काही भागातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. जिथे फुल लागताना व तूर भरताना २ - ३ ��ंरक्षित पाणी शेवटचे १० ते १५ दिवसांच्या अंतराने दिले आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले तर उत्पादनात ४० ते ५० % वाढ होते व ती तूर अ दर्जाची लोखंडाच्या मण्यासारखी वजनदार मिळते. त्यामुळे डाळीचा उतारा ७५ ते ८०% पेक्षा अधिक मिळतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संशोधन केंद्रावर अशा दर्जाची १४८ किलो तूर उत्पादन होऊन त्यापासून १२१ किलो तूर डाळ झाली. (ही तूर लिंबोनीत शेवगा व त्यात आंतरआंतर पीक तूर असे होते.) अशा रितीने ८१ ते ८२% तुरीच्या डाळीचा उतारा मिळाला. अशा रितीने जर शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तुरीचे उत्पादन घेऊन पंजाबराव कृषी विद्यापीठाने तयार केलेले डाळ तयार करण्याचे मशीन (मिनी डाळ मिल) आणून स्वतः डाळ तयार केली तर तुरीचे मुल्यवर्धन होऊन प्रक्रिया उद्योगासाठी रोजगार मिळेल.\nव्यापाऱ्याला कळते कि १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी हा खरेदीचा काळ व हाच काळ शेतकऱ्यांचा तंगीचा असतो. व्यापाऱ्यांना चांगली तूर केव्हा, कुठे, कशी मिळते ही त्यांना स्थानिक खरेदीदार, जिल्हा पातळीवरील डाळ करणारे कारखाने असतात. त्यांचे लागेबांधे असतात त्यांच्याकडून माहिती मिळते आणि पहिली खरेदी जी ब किंवा क दर्जाची तूर ५० रु. पासून सुरू झाली तर ती ७० रु. वर थांबते व ही तुरीची डाळ १०० रु./किलो जाते. परंतु १ नंबर या दर्जाची तुरीची खरेदी ही संक्रांतीनंतर आणि फेब्रुवारी अखेर ते मार्चचा पहिला आठवडा या काळात होत असल्याने या अगोदर खरीपातील पिके निट आलेली नसतात. काही ठिकाणी पाऊस चांगला झालेला नसतो. नंतर दिवाळी सण आलेला असतो. बॅंकांचे हप्ते भरायचे असतात. लग्न, शाळांची फी भरायची असते तेव्हा व्यापारी ९० ते १०० रु. किलो सरसकट खरेदी करतात. शेतकरी मात्र पहिल्या निकृष्ट दर्जाच्या ५० ते ७० रु./किलो दरापेक्षा बरा दर मिळाला व रोखीचे पैसे मिळण्यासाठी तो मोठ्या मार्केटमध्ये तुरीचे पैसे लगेच मोकळे करून देतो व अशा रितीने मिल मालक यापासून निर्माण करावयाची डाळ ही ८० ते १०० रु. पर्यंत विक्री करतो. नंतर जसा उन्हाळा वाढतो आणि लग्नसराई येते आणि जगभर जे भारतीय आणि आशियाटीक लोक आहेत यांना ही डाळ आवडते व जगभर १५० ते २०० रु. ने निर्यातीचा दूर मिळतो आणि म्हणून धनाढ्य व्यापाऱ्यांना ५ - १० रु. नी कमी - अधिक करून मोठ्या प्रमाणत खरेदी करून तुरीची डाळ हजारो टन तयार केली जाते व तिची साठवण केली जाते. निर्���ातीच्या ऑर्डर ह्या जून मध्येच म्हणजेच (पेरणी होते तेव्हाच) आलेल्या असतात. म्हणजे निर्यातीचे दर वाढले म्हणजे चांगल्या डाळीची १०० रु. दर हे काही काळ म्हणजे सुरुवाती चे (१५ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत) ८ - १० दिवस असतात. त्यानंतर ह्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागतात. नंतर १५ दिवसात १२० रु. किलो होऊन एप्रिल - मे मध्ये दर दिवसाला ५ - १० रु. वाढून अशी वाढ १३७ पासून दर वाढले रे वाढले अशी हाकाटी येईपर्यंत ते १४५ - १४७ रु. मध्यम व उच्चमध्यम वर्गीयांसाठी ते स्थिर केले जातात आणि मग ही बातामी पेपरमध्ये येते की, डाळीचे भाव मध्यमवर्गीयांना परवडण्या जोगे नाहीत आणि मग या भावाचा बडगा निघतो.\nव्यापारी व सटोडियांनी याच भाव वाढवून १७० रु. वर जातात. मग आपण तुरीची डाळ आयात करण्याचे धोरण आखतो, परंतु हे धोरण सटोडीयांसारखे ६ - ८ महिने अगोदर आखले तर याची खरेदी ही ७० ते ९० रु. किलोने नाफेड व पणन मंडळ आणि अन्नधान्य महामंडळ यांच्या मार्फत जर केली तर ती सुलभ आणि परवडण्यासारखी होऊन त्याचे वितरण फक्त ५ रु./किलोला वाढवून उत्कृष्ट डाळ १०० ते १२० रु. ला देऊन तीच डाळ सरकारला मोठ्या प्रमाणात निर्यात करता येईल व जी डाळ १०० रु. च्या आत माध्यम दर्जाही डाळ सामान्य लोकांना मिळेल म्हणजे तिन्ही चारीही थरातील लोकांना अपेक्षेप्रमाणे सुलभ व सहज उपलब्ध होऊन जनता समाधानी होईल.\nडाळीच्या संदर्भात धोरण आखण्याची वेळ, नियोजनाचा दर्जा, समाधानाचा दर्जा हे कनिष्ठ -मध्यम व मध्यम - मध्यम या वर्गामध्ये समाधानाची कसुर दिसून येते. भाव वाढल्यावर त्याची चर्चा चॅनेल व वर्तमान पत्रात आल्यावर सरकारला जाग येते. म्हणजे साप गेल्यावर भुई धोपटल्यासारखे होते. तेव्हा तत्पर्ता, सावधानता, संकटांवर मत करण्याची धमक व पात्रता ही सगळ्यांनी हरणापासून शिकण्याची गरज आहे. संकटांचा वाघ किंवा सिंह जरी सुयोग्य धोरणाच्या (हरणाच्या) मागे लागला तरी हरीण संकटांतून बचाव करून वाघ किंवा सिंहावर धाप टाकण्याची नामुष्की आणतो हे आपण 'नॅशनल जिऑग्रॉफीवर' बऱ्याच वेळा पाहिले आहे. हा खरा आदर्श होय. मानवतेच्या दृष्टीकोनातून जर सुसंगत विचारसरणी, माणुसकी, गरीबांसाठी कंपनतेची भावना याचा विचार जर व्यापारी वर्ग व सटोडियांनी केला तर एरवी दरामध्ये भाव वाढ करून बालाजी किंवा शिर्डीच्या साईबाबांना किंवा अशी श्रद्धास्थाने, देवस्���ाने असणाऱ्या देवांना आपल्या नफ्यातील १०% ची भागीदारी देऊन वर्षातून २ वेळा त्याचे दान गुप्त हंडीत टाकणे यात समाधान मानून देव आपल्याला प्रसन्न झाला असा सौदा साधतात आणि तेवढ्यावरच थांबतात. परंतु खरा देव हा नफेखोरांकडून नफ्यात भागीदारी ठेवणारा कोत्या मनासारखा नसतो. कारण ही श्रद्धा स्थाने तेव्हांच निर्माण झाली जेव्हा त्यांनी गरीबांच्या अंत:करणाचा ठाव घेऊन सेवा करून त्यांच्यातच त्यांनी देवत्व पाहिले आणि म्हणून सारे महापुरुष झाले. दैवत झाले. हे जर ओळखले, जाणले व अंगीकारले आणि दरिद्रीनारायणाची सेवा दैवतांना साक्षी ठेवून केली त्यापेक्षा ही Alternate Current (A.C.) देवाला मध्ये घेऊन या पद्धतीने करण्यापेक्षा Direct Current (D.C.) प्रत्येक्ष गरीबाची सेवा या द्वारे केली तर हे श्रद्धास्थान परमेश्वराच्या लिलेने तुम्हाला तो किती लिलया बहाल करतो हे तुम्हाला दृष्टांत, साक्षात्कार व अनुभुती या रुपातून पहावयास मिळेल. म्हणून व्यापाऱ्यांनी प्रवृत्ती बदला म्हणजे जग बदलेल आणि गरीबी हटेल. मिटेल आणि समृद्धी निपजेल आणि मग गौतम बुद्धाला स्वर्गात शांत झोप लागेल व तुम्हालाही शांत झोप लागेल.\nभारतातील कडधान्ये लागवड व उत्पादनाचा २०१३ व २०१४ मधील आढावा\nभारतातील तूर उत्पादक राज्यामध्ये क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये २०१३ मध्ये १० लाख ९६ हजार हेक्टर इतके क्षेत्र तुरीखाली होते. तर २०१४ मध्ये १० लाख ३७ हजार हेक्टर इतके क्षेत्र होते. म्हणजेच मागील २०१३ पेक्षा ५% क्षेत्र कमी झाले. उत्तरप्रदेशामध्ये मात्र २०१३ मध्ये ३ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र तूर लागवडीखाली होते. मात्र २०१४ मध्ये ३ लाख २० हजार हेक्टरवरतीच तुरीचे पीक घेतले गेले. म्हणजे २९ हजार हेक्टर क्षेत्र (८% घट) कमी झाले.\nउत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्रात २०१३ मध्ये प्रती हेक्टर ८२८ किलो होते तर २०१४ मध्ये ५६६ किलो/हेक्टरी उत्पादन मिळाले. त्यामुळे ३२% उत्पादनात घट आली. तसेच उत्तरप्रदेशमध्ये २०१३ मध्ये ६९० किलो/हेक्टरी उत्पादन मिळाले होते. ते २०१४ मध्ये ७३० किलो/हेक्टरी उत्पादन आले. म्हणजेच उत्तरप्रदेशमधील हवामानाची परिस्थिती अनुकूल राहून उत्पादनात ६% वाढ झाली. महाराष्ट्रामध्ये २०१३ मध्ये एकूण उत्पादन ९ लाख ७ हजार टन झाले होते. तर २०१४ मध्ये ५ लाख ८७ हजार टन उत्पादन झा���े. म्हणजेच येथील उत्पादनात ३५% घट झाली.\nराज्यावर तूर लागवड, हेक्टरी उत्पादन व एकूण उत्पादनाचा आढावा\n२०१३ २०१४ २०१३ २०१४ २०१३ २०१४\nमहाराष्ट्र १०९६ १०३७ ८२८ ५६६ ९०७.४९ ५८६.९४\nकर्नाटक ८१८ ७०३ ८५० ६४० ६९५.३० ४४९.९२\nमध्यप्रदेश ५३२ ५२१ ७८० ८२० ४१४.९६ ४२७.०१\nआंध्रप्रदेश ४३५ ३७६ ७८० ६३५ ३३९.३० २३८.७६\nउत्तरप्रदेश ३४९ ३२० ६९० ७३० २४०.८१ २२३.७२\nइतर ६२४ ६०६ ७२५ ६५० ४५२.४० ३९३.९०\nपुर्ण भारत ३८५४ ३५६३ ७९१ ६५४ ३०५०.३ २३३०.२५\nउडीदाच्या संदर्भामध्ये भारताचे २०१३ मध्ये २३ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र उडीदाखाली होते. यात महाराष्ट्रातील क्षेत्र ३ लाख ३० हजार हेक्टर होते. मध्यप्रदेशमधील सर्वात जास्त म्हणजे ६ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र होते. तर आंध्र व तेलंगणाचे सर्वात कमी ३८ हजार हेक्टर क्षेत्र होते. २०१४ मध्ये मात्र मध्यप्रदेशमध्ये काहीशी वाढ होऊन ती ८ लाख ६२ हजार हेक्टर झाली तर महाराष्ट्रात मात्र घट होऊन २ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र झाले. सर्वात कमी आंध्र - तेलंगणात २९ हजार हेक्टर म्हणजे लागवडीच्या क्षेत्रात २४% घट झाली.\nउडीद उत्पादनामध्ये २०१३ मध्ये सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रात ५६६ किलो/ हेक्टरी आले. त्यामानाने २०१४ मध्ये प्रतिकूल परिस्थिती असूनही ५४० किलो/हेक्टरी आले. तरी इतर राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त आले. उत्तरप्रदेशमध्ये मात्र २०१३ मध्ये सर्वात जास्त २ लाख ३० हजार टन उत्पादन झाले आणि त्यामानाने आंध्र आणि तेलंगणा मिळून सर्वात कमी म्हणजे फक्त १६ हजार टन आले. तर महाराष्ट्रा १ लाख ८६ हजार टन आले. २०१४ मध्ये मात्र मध्यप्रदेशने आघाडी घेतली असून ३ लाख ५३ हजार टन आले. त्यामानाने महाराष्ट्रात १ लाख ३८ हजार टन आले.\nराज्यावर उडीद लागवड, हेक्टरी उत्पादन व एकूण उत्पादनाचा आढावा\n२०१३ २०१४ २०१३ २०१४ २०१३ २०१४\nमध्यप्रदेश ६४० ८६२ २७५ ४१० १७६ ३५३.१४\nउत्तरप्रदेश ५७७ ५६१ ४०० ३६० २३०.८० २०१.९६\nमहाराष्ट्र ३३० २५६ ५६६ ५४० १८६.७८ १३८.२४\nराजस्थान १५७ १७९ ४५० ४०० ७०.६५ ७१.६०\nकर्नाटक ८४ ६० ४५० ४२५ ३७.८० २५.५०\nआंध्र व तेलंगण ३८ २९ ४२५ ४०० १६.१५ ११.३०\nइतर ५६१ ५५३ ४०८ ४०३ २२८.८० २२२.९०\nपुर्ण भारत २३८७ २५०० ३९७ ४१० ९४६.९८ १०२५.२२\nमूग लागवडीच्या बाबतीत राजस्थान राज्य सर्वात अग्रेसर असून २०१३ मध्ये ९ लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होती. तर तीच २०१४ मध्ये ८ लाख ५० हजार हेक्टर होती. महाराष्ट्र राज्य क्षेत्रामध्ये दुसऱ्या स्थानी असून २०१३ मध्ये ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र होते. तर २०१४ मध्ये प्रतिकूल हवामानामुळे ३ लाख १९ हजर हेक्टर क्षेत्र होते. म्हणजे क्षेत्रामध्ये २९% घट झाली. सर्वात कमी क्षेत्र उत्तरप्रदेशमधील असून ते २०१३ मध्ये ७५ हजार हेक्टर क्षेत्र होते. तर २०१४ मध्ये ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली. म्हणजे येथेही १५% घटच झाली.\n२०१३ मध्ये सर्वात जास्त मूग उत्पादन महाराष्ट्रात ६०० किलो/हेक्टरी आले. २०१४ मध्ये मात्र थोडे कमी होऊन ५५० किलो/हेक्टरी आले. तर २०१३ मध्ये सर्वात कमी मध्यप्रदेशचे ३०० किलो/हेक्टरी झाले असून २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन ४३५ किलो/हेक्टरी झाले. तर उत्तरप्रदेशमध्ये २०१४ मध्ये सर्वात कमी ४०० किलो/हेक्टरी झाले.\nएकूण मूग उत्पादनामध्ये राजस्थानचा पहिला क्रमांक असून २०१३ मध्ये ४ लाख ८६ हजार टन एवढे उत्पादन झाले तर २०१४ मध्ये त्यामध्ये घट होऊन ३ लाख ६१ हजार टन उत्पादन झाले. म्हणजे २६% उत्पादनात घट झाली. मुगाच्या उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी असून २०१३ मध्ये २ लाख ६८ हजार टन उत्पादन झाले असून २०१४ मध्ये मात्र हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन १ लाख ७५ हजार टन एवढे मूग उत्पादन झाले. मुगाचे २०१३ मध्ये सर्वात कमी उत्पादन मध्यप्रदेशमध्ये झाले असून ते ३३ हजार टन एवढे होते तर २०१४ मध्ये हवामान अनुकूल असल्याने त्यात वाढ होऊन ७० हजार टन उत्पादन झाले. २०१४ मध्ये उत्तरप्रदेश सर्वात कमी असून तेथे २५ हजार टन एवढे झाले आहे. तेच २०१३ मध्ये ३३.७५ हजार टन एवढे उत्पादन झाले होते.\nराज्यवार मूग लागवड, हेक्टरी उत्पादन व एकूण उत्पादनाचा आढावा\n२०१३ २०१४ २०१३ २०१४ २०१३ २०१४\nराजस्थान ९२३ ८५० ५२५ ४२५ ४८६.१५ ३६१.२५\nमहाराष्ट्र ४८८ ३१९ ६०० ५५० २६८.८० १७५.४५\nकर्नाटक २९८ २४४ ५५० ४७५ १६३.९० ११५.९०\nमध्यप्रदेश ११२ १६३ ३०० ४३५ ३३.६० ७०.९१\nआंध्र व तेलंगणा १४१ ९० ५०० ४५० ७०.५० ४०.५०\nउत्तरप्रदेश ७५ ६४ ४५० ४०० ३३.७५ २५.६०\nइतर ४०० ३५५ ४१५ ३६७ १६६.१३ १३०.१३\nपुर्ण भारत २४०० २०८५ ५१० ४४१ १२२२.८३ ९१९.७३\nहरभऱ्याच्या लागवडीमध्ये मध्यप्रदेश आघाडीवर असून २०१४ मध्ये ३३ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड होती. मात्र २०१५ मध्ये यात घट येऊन २९ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र हरभरा लागवडीखाली होत��. महाराष्ट्र राज्य हरभरा लागवडीमध्ये राजस्थानच्या थोडे खालोखाल असून देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात हरभऱ्याखाली १६ लाख ५० हजार हेक्टर तर राजस्थानचे १६ लाख ७५ हजार हेक्टर होते. २०१५ मध्ये मात्र या दोन्ही राज्यातील लागवडीच्या क्षेत्रात १५% घट होऊन महाराष्ट्रात १४ लाख हेक्टर तर राजस्थानात १४ लाख २० हजार क्षेत्र हरभरा लागवडीखाली होते. सर्वात कमी क्षेत्र आंध्रप्रदेशचे असून ते २०१४ मध्ये ५ लाख ८० हजार हेक्टर तर २०१५ मध्ये ४ लाख ७० हजार क्षेत्र हरभरा लागवडीखाली होते.\nडाळवर्गीय (कडधान्यांचे) उत्पादन वाढण्यासाठी उपाय\n१९६४-६५ साली देशाची लोकसंख्या ४७.४ कोटी होती तेव्हा कडधान्याचे उत्पादन १ कोटी २४ लाख २० हजार टन एवढे होते व आता देशाची लोकसंख्या १२६ कोटी असून ३ कोटी २० लाख टन कडधान्याची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात १ कोटी ८५ लाख टन उत्पादन होते. याचे कारण असे की, बऱ्याच अंशी ६० च्या दशकापर्यंत शेतकऱ्यांनी लागवड धान्यपिकांवर होती आणि नंतर फळबागांना जेव्हा सरकराने जिवदान दिले तेव्हा डाळी व तेलबिया पिकांखालील क्षेत्र घटले व त्यामुळे ही संभाव्य तूट झाली.\nपुढे १९८० नंतर फळबागांच्या व्यापारी पिकास अनुदान, सरकारचा आधार (Support) मिळाल्याने द्राक्ष, डाळींब, संत्री, मोसंबी, केळी या पिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पन्न वाढले आणि त्यामुळे सरकार व शेतकऱ्यांचे या डाळ व प्रथिनयुक्त पदार्थाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही तूट आपल्याला सहन करावी लागत आहे.\nकोरडवाहू पिकांवर व डाळवर्गीय, तृणधान्य, तेलबिया पिकांवर हैद्राबाद येथील इक्रीसॅट संस्थेने (ICRISAT) फार मोठे काम गेल्या ३० - ३५ वर्षात केले. डाळीचे उत्पादन झपाट्याने वाढवायचे असेल तर खालील उपाय करणे गरजेचे आहेत. १) प्रथम सर्व डाळवर्गीय पिके ही ठिबक व तृषार सिंचनावर आणली पाहिजेत.\n२) दुसरे याला रासायनिक खतापेक्षा संद्रिय खतांचा (कल्पतरू, शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खतांचा) परिणाम चांगला होत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो व मुलताच यांच्या मुळांमध्ये जैविक नंतर स्थिरीकरणाची क्षमता असल्याने व हे कार्य अजून वेगाने करण्याचे काम डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर व सप्तामृत करत असल्यामुळे उत्पन्न आणि दर्जामध्ये भरीव वाढ होते व दुष्काळावर मत करता येते असे अनेक शेतकऱ्यांनी देशभर अनु���वले आहे. म्हणून भौतिक सुपिकतेबरोबर जैविक सुपिकता (जैविक नत्र) मुळांवरील गाठींमुळे वाढल्याने रासायनिक नत्र खताचे प्रमाण नगण्य होते व जमीन खराब न होता ती खरी सुपीक व पर्यावरण समृद्ध होते. आणि ही पिके तृणधान्याबरोबर अथवा मुख्य पिकाबरोबर मिश्रपिके अथवा आंतरपिके घेऊन मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असल्याने देशभर शेतकरीवर्गाने या डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनाकडे सुरुवातीपासूनच जून ते सप्टेंबर व वैशाखी मुगाच्या काळात लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या पिकांचा काळ हा ४५ दिवसापासून १२० ते १४५ दिवसाचा असून पीक वाढीला व उत्पादन, दर्जा वाढीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे व कल्पतरूचे योगदान हे फार अर्थपूर्ण, किफायतशीर व उपयुक्त ठरत आहे. म्हणजे असे केल्याने देशाची हल्लीची उत्पादकता तुरीसारख्या पिकामध्ये रोपे तयार करून मग लागवड केली आणि उडीद, मूग व हरभरा या अत्यावश्यक पिकांना प्राधान्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला तर अनुकूल परिस्थितीत जवळ - जवळ दुप्पट व प्रतिकूल परिस्थितीत दीडपट उत्पादन होते असे अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. इतर फळबागा, भाजीपाला, ऊस पिकांमध्ये ही कडधान्ये मिश्रपीक किंवा आंतरपीक (कापूस + तूर व सोयाबीन + तूर) म्हणून ठिबक किंवा तृषारवर घेतल्यास डाळीचा तुटवडा होणार नाही आणि देश निर्यातक्षम उंबरठ्यावर येऊन पोहचेल आणि ५ वर्षांमध्ये एखादे वर्ष हे अति संवेदनशील (हवामानाच्या बाबतीत) असले तरीही ठिबक व तुषार किंवा फुलोरा व शेंगा भरतानाचे संरक्षित पाणी देऊन उत्पादनातील घट सावरण्यास मदत होईल व अशारितीने देश कडधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होईल आणि या कडधान्याच्या आयातीवर जो दरवर्षी २५ हजार कोटी रूपये परकीय चलन खर्च होतात ते वाचून हा पैसा शाश्वत विकासाकडे वळविता येईल. हे करण्याकरीता हवी जिद्द, सुयोग्य नियोजन व त्याची काटेकोर अंमल बजावणी. या आंतरराष्ट्रीय डाळीच्या वर्षात प्रत्येक भारतीयाने विश्वासपुर्वक 'पण' केला पाहिजे की आपण आपल्या देशाची कडधान्याची गरज स्वयंपुर्णतेने पुर्ण करू शकू. अशी गोष्ट प्रत्येक पिकात आपणास करता येईल. यासाठी आपल्याकडील निसर्ग, बुद्धीसंपदा, चिकाटी, परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असल्याने हे १००% शक्य आहे. यामुळे साऱ्या देशामध्ये समृद्धी होईल आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची प्रवृत्ती नष्ट होईल व खऱ्या अर्थाने 'मेक इन इंडिया होईल' \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/news-about-kedgoan-murder-case/", "date_download": "2019-03-25T08:09:32Z", "digest": "sha1:HIQ4LEDLWGB4PMY7XRKEXWRDTV6MBGL5", "length": 5369, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संदिप कोतकर व सुवर्णा कोतकर सीआयडीच्या रडारवर", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसंदिप कोतकर व सुवर्णा कोतकर सीआयडीच्या रडारवर\nअहमदनगर / स्वप्नील भालेराव : संदीप कोतकर हा कारागृहात असतानाच मोबाईल संभाषण झाल्याने तेथील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेर्यात अडकणार आहेत. पोलिसांनी ही बाब चव्हाट्यावर येऊ दिलेली नव्हती. हा प्रकार रेकॉर्डवर आलेला असल्याने संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य आता ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.\nनगर पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे आता माजी महापौर संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे.खुनापूर्वी भानुदास कोतकर याचे सून सुवर्णा कोतकर हिच्यासोबत बोलणे झाले होते. मात्र, सासरेच नव्हे, तर पती संदीप कोतकर याच्याशी मोबाईलवरून संभाषण झाले होते. त्याला मोबाईल व सीमकार्ड कसे पुरविण्यात आले, हेही चौकशीतून समजते\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nबबनराव पाचपुते यांचा भाजपावरच हल्लाबोल, मंत्रीमंडळाच्या कामकाजावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह \nकर्नाटकात आता उपमुख्यमंत्री पदावरून वादाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/karve-road-traffic-pune-news-94194", "date_download": "2019-03-25T08:31:17Z", "digest": "sha1:WTWYD656ODGTIB3Q227D3U6LSRVPZXTI", "length": 19197, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "karve road traffic pune news कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nयापूर्वी ही योजना दोन वेळा राबविण्यात आली होती.मात्र स्थानिक नागरीकांच्या विरोधामुळे प्रशासनाला ही योजना बंद करावी लागली आहे. 2006 साली आठ दिवस आणि 2017 साली 1 दिवस महापालिका प्रशासनाने कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग राबवीला होता. मात्र या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याएवजी प्रचंड वाढल्याने नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागला\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुढील 10 महिन्यांसाठी पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक योजना राबविण्यात येणार असल्याचा मेट्रो, वाहतूक पोलिस, महापालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.\nमेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप (अभिनव) चौकात वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे. यावर उपाययोजना म्हणून एसएनडीटी चौक ते अभिनव चौक या अंतरामध्ये चक्राकार वाहतूक योजना राबविण्यात येणार आहे. पुढील पंधरा दिवसानंतर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. कर्वे रस्त्यावर फ्लायओव्हर ते नळस्टॉप या दरम्यान मेट्रो पिलरचे काम सुरु होत आहे.त्यामुळे या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. हा वाहतूक बदल कसा असेल याचा निर्णय आज (बुधवारी) सकाळी पाहणी करुन घेण्यात आला.\nयावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे,महामेट्रो चे रितेश गर्ग,एन सी सी चे नामदेव गव्हाणे, महापालिका उपायुक्त श्रीनिवास बोनाला, स्थायी समीती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,नगरसेवीका माधुरी सहस्त्रबुद्धे,मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका हर्शाली माथवड, वासंती जाधव, संदीप खर्डेकर, संदीप मोकाटे आदी उपस्थित होते.\nयापूर्वी ही योजना दोन वेळा राबविण्यात आली होती.मात्र स्थानिक नागरीकांच्या विरोधामुळे प्रशासनाला ही योजना बंद करावी लागली आहे. 2006 साली आठ दिवस आणि 2017 साली 1 दिवस महापालिका प्रशासनाने कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकामध्ये चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग राबवीला होता. मात्र या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याएवजी ���्रचंड वाढल्याने नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागला. आणि नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर ही योजना गुंडाळावी लागली होती.\nयावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर वाहतूकीची मोठी कोंडी होते. येत्या पंधरा दिवसांत पदपथाची रुंदी कमी करणे, वीजेचे खांब हटविने, बॅरीगेटिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडीतुणतुन दिलासा देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे.\nयावेळी मेट्रो अधिकाऱयांनी वाहतूक पोलिसांशी सल्ला मसलत करुन वाहतूकीत केल्या जाणाऱ्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार कोथरूड कडुन येणारी वाहतूक एसएनडीटी शेजारील कॅनाल रस्त्यावर वळविली जाणार असून सदर वाहतूक आठवले चौकातून नळस्टॉप चौकाकडे जाईल.नळस्टॉप ते पौडफाटा उड्डाण पुलापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येणार असुन या रस्त्याचा 9 मीटर चा भाग हा मेट्रो पिलर उभारणी साठी वापरला जाणार आहे.\nमात्र हा वाहतूक बदल अमलात आणण्यापूर्वी कर्वे रस्त्यावरील आवश्यक बदल तातडीने पूर्ण करावेत अशी सूचना वाहतूक पोलिस सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले व प्रतिभा जोशी यांनी केली. तर यापूर्वी ठरल्याप्रमाणे संपूर्ण कर्वे रस्ता नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करण्याबाबतचे फलक अद्याप लावले नाहीत; तसेच पदपथ छोटा करणे, हलविलेल्या बसस्टॉपबाबतचे माहिती फलक उभारले नसल्याबद्दल संदीप खर्डेकर व माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली.\nमेट्रो चे काम वेगाने पूर्ण करत असताना नागरिकांची सुरक्षितता याला आम्ही प्राधान्य देणार असून वाहतूक कोंडी कमीतकमी व्हावी यासाठी दक्षता घेतली आहे असे मुरलीधर मोहोळ व संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.\nप्रयोग करा पण हट्ट नको\nवाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग करण्यास हरकत नाही. मात्र नागरिकाना त्रास होता कामा नये. योजना असफल झाल्यास कोणाच्या हट्टासाठी सुरू ठेवू नये. तसेच कर्वे रस्त्यावरील पदपथाची रुंदी कमी केल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. याबाबतीत मी मेट्रो आणि महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करणाऱ आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे स्थानिक नगरसेवक जयंत भावे यांनी सकाळशी बोलताना दिली.\n\"जलयुक्त'चे 18 कोटी परत गेल्याची नामुष्की\nजळगाव ः जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाकडून जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीबरोबरच गेल्या वर्षी शासनाकडून सिंचनासाठीची आवश्यक कामे...\n#WeCareForPune धोकादायक वीज पेटी हटवा\nकोथरुड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे मुख्य गेट जवळचे खांबावर हा वीज पेटी धोकादायक अवस्थेत आहे. तसेच कमी उंचीवर झाकण नसलेल्या अवस्थेत आहे. बॉक्समधील...\nचाळीसगाव : अभोणे तांडावासीयांची पाण्यासाठी भटकंती\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे...\nपांचाळांची 28 वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती\nजळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोहार, पांचाळ वस्तीला सन 1991 मध्ये स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून आजवर या लोकांना पाण्यासाठी वणवण...\nसकाळची कोल्हापूर पॅसेंजर आजपासून हातकणंगलेपर्यंतच\nमिरज - मिरज - कोल्हापूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने आज (ता. २४)पासून पुढील रविवार (ता. ३१) पर्यंत सकाळी साडेआठच्या...\nनितीन गडकरींनी पंतप्रधान व्हावे - सुलेखा कुंभारे\nनागपूर - नागपूरचे खासदार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात विकास केला. देशभरातील तथागताची पवित्र स्थळे बुद्धिस्ट टूरिस्ट सर्किटच्या नावाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.farmguru.in/new-blog/2015/9/25/-", "date_download": "2019-03-25T07:39:42Z", "digest": "sha1:EJ2YOFYLXBIRVVXMYI5KLNY6YG5YNB6L", "length": 3126, "nlines": 48, "source_domain": "www.farmguru.in", "title": "ए-वन कॅम्पेन — farmguru", "raw_content": "\n२६ सप्टेंबर २०१५ पर्यंत\nएकात्मिक कीड व्यवस्थापन प्रत्यक्ष व प्राप्य पीक उत्पन्न दरी कमी होण्यास मदत करते. ह्या मान्सून कॅम्पेनमध्ये फार्मगुरू ने आणले आहे कीड आणि रोग पासून हल्ला टाळण्यासाठी ६ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. ही सर्वाधिक विकली जाणारी उत्पाद��े व्यापक रोग नियंत्रण करतात आणि रोपांच्या वाढीला चांगले प्रोत्साहन देते.ह्या मुळे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पादन वाढून जास्त उत्पादन आणि भरपूर नफा होतो.\n१०० % मूळ उत्पादन\n१ झाईमगोल्ड प्लस गोदरेज ५०० मि.ली. ५०८ ४२५ १६%\n२ रिडोमील गोल्ड सिंजेंन्टा ५०० ग्रॅम १००० ७२० २८%\n३ अॅन्ट्राकॉल बायर ५०० ग्रॅम ३२६ २७० १७%\n४ लॅमडेक्स सुपर अदामा ५०० मि.ली. २६८ २२५ १६%\n५ कॉन्फिडॉर बायर २५० मि.ली. ७९१ ५४५ ३१%\n६ अॅक्टरा सिंजेंन्टा १०० ग्रॅम ४७५ ३२५ ३२%\nएकूण ३३६८ २५१० २५. ४८%\nबास्केट किंमत ३३६८ २३५० ३०.२३%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/woman-behind-halli-mane-rotties-mangaluru-s-popular-food-truck/", "date_download": "2019-03-25T07:32:03Z", "digest": "sha1:7YDABF5CFY2TL3DKCQV5Y4N6MYHA6HRL", "length": 16537, "nlines": 114, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'ह्या' महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमंगळूरू शहरातील ३४ वर्षीय शिल्पा या ‘Halli Mane Rotties’ नावाने एक फूड ट्रक चालवतात. त्यांची कहाणी जेवढी रंजक आहे तेवढीच प्रेरणादायी देखील आहे. Hassan येथील शिल्पा या एका शेतकरी कुटुंबातून येतात. २००५ साली त्या त्यांच्या पती सोबत मंगळूरू येथे स्थायिक झाल्या.\nसुरवातीला सर्व ठीक सुरु होते, पण २००८ च्या फेब्रुवारी महिन्यात शिल्पाचा पती बंगळूरूला काही कामा करिता गेले आणि ते तिथे हरवले. सर्वांनी खूप शोधलं पोलिसांत तक्रार देखील दाखल केली पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.\nपतीच्या न भेटल्याने शिल्पा हताश-निराश झाल्या. त्यांच्या आई-वडिलांची तब्येत खालवायला लागली. आता आई-वडील, तिचा भाऊ आणि ३ वर्षाच्या मुलाच्या पालन-पोषणाची जबाबदारी शिल्पावर येऊन ठेपली.\n४ लोकांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असल्याने शिल्पाने आधी एका सायबर कॅफेमध्ये नोकरी केली, त्यानंतर तिने एका कॉस्मेटिक स्टोअरमध्ये नोकरी केली पण तिचे वय जास्त असल्या कारणाने तिला तिथे काम करता आले नाही.\nएकेदिवशी घरचे सर्व बोलत बसले होते तेव्हा सर्व शिल्पाच्या हातच्या जेवणाची स्तुती करत होते. त्यातही तिच्या हातचे उत्तरी कन्नड जेवणाची. तेव्हा शिल्पाला Food Joint सुरु करण्याची कल्पना सुचली.\nतिने तिच्या भावा���ा समजावले आणि दोघांनी मिळून Food Joint सुरु केले. विना पैश्याने कुठलाही बिसनेस सुरु होत नाही. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी शिल्पाने १ लाखाची बचत केली होती. शेवटी तिला ते एक लाख रुपये काढावे लागले आणि त्यातून त्यांनी महिंद्रा बोलेरो पिक-अप ट्रक घेतला आणि त्यातच आपलं Food Joint सुरु केलं.\nतुम्ही चांगल काम करा किंवा वाईट लोकं तुम्हाला काही ना काही कारणावरून सुणावनारच, शिल्पाला देखील लोकांचे बोलणे सहन करावे लागले, त्या सांगतात की,\nसर्वात जास्त आम्हाला या गोष्टीसाठी ऐकाव लागलं की आम्ही दक्षिण कन्नडमध्ये उत्तरी कन्नड खाण्याचे दुकान लावत आहोत. एवढच नाही तर आम्हाला देखील आमच्या या Food Jointच्या आयडियावर संशय होताच पण आमच्याकडे आणखी कुठलाही पर्याय नव्हता. कारण मला केवळ उत्तरी कन्नड जेवणच बनवता यायचे.\nशिल्पाने २०१५ साली आपलं Food Joint व्यवसाय सुरु केला आणि हा व्यवसाय एवढा चालला की स्वतः शिल्पाला देखील यावर विश्वास झाला नाही. शिल्पा या सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत आपलं Food Joint सुरु ठेवतात. यादरम्यान त्यांचा रोजचा ३ ते ७ हजार रुपयांची कमाई होते.\nत्यांच्या Food Joint वर येणाऱ्या ग्राहकांबद्द्ल सांगताना शिल्पा सांगतात की,\n“येथे येणारे ८० टक्के ग्राहक हे दक्षिणी कन्नड असतात. त्यात डॉक्टर, विद्यार्थी अश्या प्रत्येक क्षेत्रातील लोकं असतात. जे माझ्या Food Joint वर घरचे जेवण खायला येतात.”\nत्यांच्या येथे येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या Food Joint ला गुगल मॅप्स वर टाकले ज्यामुळे शिल्पाला ऑनलाईन ओळख देखील मिळाली.\nशिल्पा यांच्या Food Joint मिळणारी प्रत्येक वस्तू ही तिच्या घरून येते. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते. शिल्पा यांचा भाऊ चिरंजीवी याने देखील त्याची सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडून शिल्पाची मदत करण्याचा निश्चय केला.\nआता शिल्पा यांचा फेब्रुवारी महिण्यात आणखीन एक नवीन Outlet उघडण्याच्या विचारात आहे.\nमहिन्द्रा काम्पिनीचे सीईओआनंद महिन्द्रा यांची नजर शिल्पावर पडली आणि त्यांनी शिल्पाच्या फूड ट्रकमध्ये इन्वेस्ट करण्याचा निर्णय घेतला.\nयासंबंधी आनंद महिन्द्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर लिहिले की,\nया आठवड्यात मला Entrepreneurship ची एक छान कहाणी वाचायला मिळाली. आम्ही महिन्द्रामध्ये याला ‘Rise Story’ म्हणतात. मी खूप आनंदी आहे की, बोलेरोने त्यांच्या व्यवसायात एक छोट��शी भूमिका निभावली. काय कोणी त्यांना हे सांगेल की मी त्यांच्या व्यवसायात इन्वेस्ट करण्यास इच्छुक आहे.\nआनंद महिन्द्रा यांनी हे देखील सांगितले की, शिल्पा यांना कुठल्याही प्रकारच्या चॅरीटीची गरज नाही. त्या स्वतः एक यशस्वी Entrepreneur आहेत. मी तर केवळ त्यांच्या व्यवसायात इन्वेस्ट करण्यास इच्छुक आहे.\nखरच शिल्पा यांची ही कहाणी आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १\nकैंची धाम : ज्याची ख्याती विदेशापर्यंत पसरलेली आहे →\nतमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील नेमका फरक समजून घ्या\n“धंदा यशस्वी कसा करावा”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स\nह्या “गुज्जू उबर टॅक्सी ड्रायव्हर” ची कथा प्रत्येक मराठी माणसाने वाचायला हवी\nOne thought on “‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल”\nह्या ११ अंधश्रद्धा वाचून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nरावणाची बाजू मांडणारी, “पराभूताचा” इतिहास दाखवणारी कादंबरी – “रावण : राजा राक्षसांचा”\nलग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nतुकोबांनी विचारलं: “तुम्हाला माझे म्हणणे पटले नाही का” : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १२\nनिरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nकळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर\nपुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशवादी हल्ल्यातील ह्या हुतात्म्यांचा विसर पडू नये म्हणून….\nहे वाचल्यावर तुम्ही कधीही लघवी थांबवून ठेवणार नाही..\nमनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं\nबराक ओबामा सध्या काय करतात : उत्तर वाचून थक्क व्हाल\nवरुथीणी एकादशी : मोदींचा आत्मक्लेश\nएकाच वेळी अनेक औषधं घेणं धोकादायक असू शकतं का वाचा तज्ञ काय म्हणताहेत\nजगात भारत “शंभर नंबरी”…\nएक सामान्य रिक्षाचालक उद्योगनगरीचा महापौर कसा झाला : असामान्य प्रवासाची कथा\nतिशीच्या पूर्वी भारतातील ह्या साहसी रोड ट्रिप्सची मजा जे लुटतात, तेच खरे भटके\nभारताचं राष्ट्रगीत अभिमानाने गाताहेत – भारताचे स्पोर्ट-स्टार्स \n“सूटबूट की सरकार”च्या भीतीने कर्जबुडव्या कंपन्यांच्या तोंडाला फेस: तब्ब्ल १.१ लाख कोटींची वसुली\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/marathi-articles-on-childrens-development-and-music-1511823/", "date_download": "2019-03-25T08:14:15Z", "digest": "sha1:5LWPOHKS2GHO2QLTRXHPHHYBXDCLHQZV", "length": 25797, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on Childrens development and Music | आत्मानंद अन् विकासही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nआपल्याला संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच.\nआपल्याला संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच. अंगाईगीताने धरलेलं आपलं संगीताचं बोट मग आयुष्यभर अधिकाधिक घट्ट होत जातं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हे संगीत आपल्या वाढण्यात भर टाकत जातं. याचा फायदा संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. म्हणूनच लहानपणातच संगीत शिकलं, ऐकलं तर त्याचे अनेक फायदे असतात. मुलांच्या विकासातले संगीताचे महत्त्व सांगणारे चार लेख दर पंधरवडय़ाने.\nमानसी केळकर-तांबे या संगीत, नृत्य, नाटय़, समुपदेशन या क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक आहेत. ‘संगीतातून समुपदेशन’ या क्षेत्रात १५ वर्षांचा अनुभव असून ‘एनिबडी कॅन सिंग’ हे घोषवाक्य असलेल्या ‘स्वरमानस’ या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. अडीच वर्षे ते पंचाहत्तर वर्षांपर्यंतच्या वयोगटात सुगम संगीत शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे. आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्व त्यांनी केले असून सुवर्णपदकांच्या मानकरी आहेत. रूपारेल महाविद्यालयाचा ‘आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे.\nअभिनेत्री रेखाचा ‘खूबसूरत’ हा चित्रपट बहुतेकांनी पाहिला असेलच. त्याचा मुख्य आशय होता की, जगात वेगवेगळ्या स्वभावांची, वेगवेगळ्या परिस्थितींतून घडलेली माणसं असतात. संगीत ही अशी एक कला आहे जी सर्वाना एकत्र आणते. या चित्रपटात रेखा म्हणते की, ‘‘रोजच्या शिस्तबद्ध, घाई-गडबड, तणावाच्या आयुष्यात संगीत, नाटय़, नृत्य हे आपल्याला ‘निर्मळ आनंद’ देतात.’’ ते अगदी खरं आहे. थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की, आपल्या आयुष्याला या संगीताने व्यापून टाकलेले आहे. आपल्याला या संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच. अंगाईगीताने धरलेलं आपलं संगीताचं बोट मग आयुष्यभर अधिकाधिक घट्ट होत जातं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हे संगीत जादू करत जातं. आपल्या वाढण्यात भर टाकत जातं. या सदरातील पुढील चार लेखांतून आपण तेच पाहाणार आहोत, संगीत, गाणं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं योगदान देतं ते..\nसंगीताची भुरळ पडत नाही, असं फारच क्वचित कोणी असतील. संगीत आसमंत व्यापून उरलं आहे. पावसाची रिमझिम असो वा पक्ष्यांची कुहुकुहु, पानांची सळसळ असो की नदीचं वाहणं असो, एक ताल, लय साऱ्या चराचरात विरघळलेली जाणवते. निसर्गाने अगदी मुक्तहस्ताने उधळलेलं हे वरदान. या संगीताची जादूच अशी आहे की, ती आपल्याला सतत आनंदी तर ठेवतंच, पण निराश झालेलं मन सहजी आनंदी करतं. मला आठवतंय, मी लहान असताना जर रुसले तर माझी आई मला एखादं मजेशीर गाणं ऐकवायची अन् मला खुद्कन हसू फुटायचं. मोठी झाल्यावर, महाविद्यालयात असताना तर माझा मूड गेला की, मी हमखास गझलांचा आधार घ्यायचे. आशाबाई, गुलाम अली, त्यातही त्यांची ‘मिराजे गझल’ किंवा जगजीत सिंग यांच्या गझला मला एका वेगळ्याच विश्वात नेऊन सोडायच्या की, माझा मूड गेला होता हेही आठवायचं नाही. मला खात्री आहे तुमचंही अगदी माझ्यासारखंच होत असणार थोडक्यात काय, तर ‘म्युझिक वर्क्स अॅज अ थेरेपी’\nसंगीतात अनेक प्रकार आहेत. त्यातले दोन प्रकार जे अगदी सर्वानाच माहीत आहेत. ते म्हणजे शास्त्रीय संगीत व सुगम संगीत. सुगम संगीताची ओळख मला वाटतं प्रत्येकाला आपल्या बालपणीच होते. वर म्हटल्याप्रमाणे, बाळाला झोपवण्यासाठी आई जे हळुवारपणे गाते, मग ते ‘लिंबोणीच्या झाडामागे’ असेल वा ‘नीज माझ्या नंदलाला’ आपल्या आयुष्यातली गाण्यांची, संगीताची ओळख या सुगम संगीतामुळे तिथूनच व्हायला सुरुवात होते, तर दुसरा प्रकार शास्त्रीय संगीत. त्यामध्ये वेगवेगळे राग असतात, ज्याच्यासाठी मात्र कान तयार करावा लागतो. प्रत्येक रागाला एक ठरावीक सुरावट असते आणि हे संगीत विशेष शिक्षण (संगीतात) घेणाऱ्यालाच येतं.\nमाझी आई, उत्तरा केळकर सुप्रसिद्ध गायिका असल्याने माझ्या जन्माप���सून गाणं माझ्या अवतीभोवती आहे. संगीतातच मी वाढले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संगीताचा मी वेगवेगळा अनुभव घेतलाय. मी हेही अनुभवलंय की, संगीत ऐकल्यामुळे, मग ते गाण्यामुळे असो वा वादनामुळे, आपल्यात विशेष गुणकारक असे म्हणजे ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात जे आनंदी राहायला भाग पाडतात. जसं आपल्या (विशेषत: मुलांच्या) शारीरिक वाढीसाठी आपल्याला प्रथिने लागतात. तसंच आपल्या मानसिक प्रबळतेसाठी संगीत आवश्यक असते आणि त्यामुळे जर अगदी लहान वयापासून हे संगीत आपण आपल्या मुलांना ऐकवलं तर बाळाच्या मेंदूवर त्याचा विशेष चांगला परिणाम नक्कीच होतो. शास्त्रीय संगीतामधले विशिष्ट राग तर विशिष्ट व्याधींवर गुणकारक ठरतात. उदाहरणार्थ मधुमेह, अस्थमा, अतितणाव, स्थूलता, इनसोमनिया (झोप न लागणे) इत्यादी. अन् हे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध होऊन त्याचा ‘पर्यायी औषधोपचार’ (अल्टरनेटिव्ह मेडिसिन) म्हणून वापर केला जातो आहे.\nलहानपणातच संगीत शिकलं, ऐकलं तर त्याचे अनेक फायदे असतात. त्याचा फायदा मेंदूच नव्हे तर मुलांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. वर सांगितल्याप्रमाणे साधारणपणे प्रत्येक आई अंगाईगीत तर गातेच. पूर्वीच्या काळी तर श्लोक म्हणणे, प्रार्थना म्हणणे सक्तीचं वाटत असलं तरी त्याचा उच्चारांवर होणारा दीर्घ परिणाम महत्त्वाचा होता. श्लोकांमुळे वाचा शुद्ध होण्यास मदत होते. त्याशिवाय बालगीतांमध्ये तात्पर्य दडलेलं असतं. त्यामुळे चांगलं काय, वाईट काय यातलाही फरक कळायला मदत होते. अलीकडे तर पाढेसुद्धा एका विशिष्ट चालीत आणि लयीत बांधलेले असतात. कारण नुसतं वाचण्यापेक्षा त्याची सुरावट, चालीमुळे ते पाढे लक्षात राहायला मदत होते. लहान वयात स्मरणशक्ती विकसित करता येते. वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ऐकली तर असं म्हणतात की, आपली भाषाही चांगली होते अन् शाळेत तर विषयांमध्ये ही विशेष प्रगती झालेली जाणवते. इतकंच नव्हे तर बोलण्यात जर अडथळा असेल जसा की तोतरेपणा तर तोही दूर होतो, गाणं शिकल्यामुळे.\nमाझ्या गेल्या पंधरा वर्षांच्या सुगम संगीत शिकवण्याच्या कारकीर्दीत मला दोन मुलांची उदाहरणं आठवत आहेत. माझ्याकडे एक आठ वर्षांची मुलगी गाणं शिकायला यायची अन् ती ‘सा रे ग म’ असं गाण्याऐवजी ‘ता रे ग म’ असं म्हणायची. त्यामुळे शाळेतली मुलं तर हसायचीच त्याशिवाय सर्वच आपल्याला हसत��ल या विचाराने ती नेहमीच दुखावलेली दिसायची. तिच्यात न्यूनगंड तयार झाला होता. त्यामुळे ती एरवी जास्त बोलत नसे. चेहऱ्यावरची सगळी रयाच गेली होती तिच्या. खरं तर या वयातली मुलं किती मोकळी असतात. हे तर तिचं बागडायचं वय मी गाणं शिकवलं की प्रत्येकाकडून म्हणून घ्यायचं ही माझी पद्धत. त्याप्रमाणे तिला गाणं म्हणायला सांगितलं की, ती खाली मान करून गाणं म्हणायची. बरेच डॉक्टर, स्पीच थेरपी करून ती माझ्याकडे आली होती. मी ठरवलं, तिच्या या उच्चारांकडे लक्ष न देता तिला एखाद्या सर्वसामान्य मुलीसारखंच वागवायचं. तिला अवास्तव महत्त्व किंवा सहानुभूती न दाखवता तिच्या गाण्यावर काम करायला सुरुवात केली. म्हणजेच तिच्या उच्चारांवर नाही तर सूर, ताल, लय यावरच बोलायचं. जी वागणूक इतरांना तशीच तिला. गाण्याबरोबर भरपूर हसणं, सकारात्मक बोलणं, विनोद सांगणं हेसुद्धा असायचंच. ज्यामुळे मूल सकारात्मक तर होतातच, पण मनमोकळीपण होतात. तशीच तीही मोकळी झाली, व्यक्त व्हायला लागली अन् काही दिवसांत तिचं तिलादेखील कळलं नाही की, तिच्या ‘ता’चा कधी ‘सा’ झाला ते मी गाणं शिकवलं की प्रत्येकाकडून म्हणून घ्यायचं ही माझी पद्धत. त्याप्रमाणे तिला गाणं म्हणायला सांगितलं की, ती खाली मान करून गाणं म्हणायची. बरेच डॉक्टर, स्पीच थेरपी करून ती माझ्याकडे आली होती. मी ठरवलं, तिच्या या उच्चारांकडे लक्ष न देता तिला एखाद्या सर्वसामान्य मुलीसारखंच वागवायचं. तिला अवास्तव महत्त्व किंवा सहानुभूती न दाखवता तिच्या गाण्यावर काम करायला सुरुवात केली. म्हणजेच तिच्या उच्चारांवर नाही तर सूर, ताल, लय यावरच बोलायचं. जी वागणूक इतरांना तशीच तिला. गाण्याबरोबर भरपूर हसणं, सकारात्मक बोलणं, विनोद सांगणं हेसुद्धा असायचंच. ज्यामुळे मूल सकारात्मक तर होतातच, पण मनमोकळीपण होतात. तशीच तीही मोकळी झाली, व्यक्त व्हायला लागली अन् काही दिवसांत तिचं तिलादेखील कळलं नाही की, तिच्या ‘ता’चा कधी ‘सा’ झाला ते तिच्या आईवडिलांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.\nमाझ्याकडे गाणं शिकायला एक साधारण ५-६ वर्षांचा मुलगा यायचा. तो तोतरं बोलायचा. त्याची आई मोठय़ा हुद्दय़ावर असल्यामुळे तिची नोकरी फिरतीची असे. त्यामुळे कदाचित त्यांच्यातही संवाद कमी होता, पण संगीताच्या मदतीने त्याचा तोतरेपणा जायला मदत झाली. ���ारण असं की, मुलांना गाणी पाठ होतात व त्यामुळे ते ती घडाघडा म्हणतात. त्यासाठी विचार करावा लागत नाही, त्यामुळे मेंदूवर ताण येत नाही, पण तेच एखाद्याचं मन जर काही कारणांनी अस्थिर असेल, तर विचारांना दिशा मिळत नाही. शब्दांची जुळवाजुळव करायला लागते. मेंदूवर ताण येतो आणि त्यामुळे बोलताना अडखळणे म्हणजेच तोतरेपणा ही प्रक्रिया घडते.\nतर या दोन्ही मुलांना संगीतामुळे, गाणं शिकल्यामुळे त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी उपयोग झाला. थोडक्यात, संगीत ही थेरपी पर्यायी औषधासारखी लागू पडली. आज त्या दोन्ही मुलांना मजेत गाताना, वावरताना पाहून मला फार आनंद होतो. त्यामुळे गुणवत्ता, आवड, आवाज याचा कसलाही विचार न करता लहान वयातच तुमच्या पाल्याला गाणं भरपूर ऐकवा व शिकवा आणि त्यांचं एक छान व्यक्तिमत्त्व घडताना अनुभवा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2017-Dr.M.S.Swaminathan.html", "date_download": "2019-03-25T08:05:58Z", "digest": "sha1:S4LS4SUKCVOYO2ABG2MLA6AF3MW2UZXI", "length": 24651, "nlines": 65, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - हरित क्रांतीचे प्रणेते - प्रा.डॉ.एम.एस.स्वामिनाथन", "raw_content": "\nहरित क्रांतीचे प्रणेते - प्रा.डॉ.एम.एस.स्वामिनाथन\nहरित क्रांतीचे प्रणेते - प्रा.डॉ.एम.एस.स्वामिनाथन\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nगेल्या अनेक वर्षापासून कृषि व ग्रामीण विकास क्ष��त्रामध्ये बहुमोल कार्य करीत असलेले डॉ. एम. एस. स्वामिनाथन व त्यांच्या एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या कार्याविषयी 'कृषी विज्ञान' वाचकांना परिचय व्हावा या हेतूने १७ वर्षापुर्वी नुतन सहस्त्रकाचे निमित्त साधून त्यांना मुलाखतीसंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी याकरिता २ ते ६ ऑक्टोबर २००० दरम्यान चेन्नईला मुलाखतीकरिता येण्यास आमंत्रित केले होते.\nमी ३ तारखेला संध्याकाळी चेन्नईला पोहोचून दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी डॉ. बावसकर टेक्नॉलॉजी संदर्भात आवर्जुन चर्चा केली. या भेटीनंतर मी विविध विभागांना भेट देऊन माहिती घेतली. तेथील काम करणारे शाश्त्राज्ञ व सहकारी ऑकेस्ट्राप्रमाणे एका सुरात तन्मयतेने काम करताना आढळून आले. या दौऱ्यामध्ये मी त्यांची कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रदीर्घ मुलाखत घेतली. ही प्रश्नोत्तरवजा मुलाखत खास 'कृषी विज्ञान' च्या वाचकांसाठी देत आहोत.\nसर, आपण वयाची ७५ वर्षे पुर्ण केलीत. ७५ व्या वाढदिवसानिमित्त आपले अभिष्ठचिंतन, आपण स्वतंत्र भारताच्या प्रगतीशील घडामोडींचे साक्षीदार आहात.\n* डॉ. बावसकर : इंग्रजांच्या राजवटीमध्ये आपल्या शेतीचे काय स्थान होते \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : इंग्रजांच्या राजवटीमध्ये कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर फक्त एक टक्का होता. त्यांनी तृणधान्य, भाजीपाला पिकाकडे दुर्लक्ष करून फक्त चहाच्या मळ्यांकडे लक्ष केंद्रित केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा अभाव होता.\n* डॉ. बावसकर : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यामध्ये कोणता बदल झाला \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये सिंचन व्यवस्था नवहती. फक्त जिरायती पिके. पारंपरिक शेतीमध्ये कापूस, कडधान्ये व तेलबिया पिके घेतली जात होती.\n* डॉ. बावसकर : या काळामध्ये सरकारने शेतीला पुरेसे संरक्षण व प्राधान्य दिले होते काय \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : या कालावधीमध्ये १०५ लक्ष कुटुंबातील शेतकरी स्वतंत्रपणे जमीन कसुन शेतीमालाचे उत्पादन घेत होते व या उत्पादनावर ७०० लक्ष लोकसंख्या अवलंबुन होती. तरीही शेतीप्रधान देश असतानाही सरकारने याचा गांभीर्याने सुरुवातीस विचार केला नाही.\n* डॉ. बावसकर : शेतीस औधोगिक दर्जा देण्यासंदर्भातील उपाय सुचावावेत \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : सरकारने या बाबत विचार क��ला नाही. या संदर्भात खालील प्रमाणे विश्लेषण करून सुधारणा करता येतील.\nउपलबध साधनांची जोपासना, संवर्धन : जमिनीचे ओर्गय सुधारणारे तंत्रज्ञान, पाणीसाठी व्यवस्थापन, सौर ऊर्जा निर्मिती, एकात्मिक व्यवस्थापन यामध्ये अजून सुधारणा करता येतील.\nसुधारित तंत्रज्ञान: कमी पाणी व उपलब्ध साधनांचा वापर करून संद्रिय शेती व पडीक जमिनीच्या विकासाचे प्रकल्प अनेक भागांमध्ये उभारता येतील.\nआधुनिक तंत्रज्ञान : आपण सुचविल्याप्रमाणे उच्च मुल्ये (Value Added) असणाऱ्या पिकांची लागवड करून, त्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचे कारखाने, कुटीरोद्योग उभारल्यास अशा प्रक्रिया उधोगातून तरुण, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक व सामाजिक विकास साधता येईल.\n* डॉ. बावसकर : भारतामध्ये लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे दिवसेंदिवस धान्याचा तुटवडा भासत आहे. यावर काय उपाययोजना करता येतील \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : खराब व पडीक जमिनीमध्ये पिकांची लागवड, पारंपरिक शेतीमध्ये बदल व अधिक, दर्जेदार उत्पादन देणारे आधुनिक कृषी तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.\n* डॉ. बावसकर : सद्यपरिस्थितीमध्ये रासायनिक खतांचा वापर कितपत योग्य आहे\nप्रा. डॉ. स्वामिनाथन : शाश्वत, सेंद्रिय शेतीमध्ये तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक, मुलद्रव्ये, सेंद्रिय खते, कंपोस्ट हे महत्त्वाचे घटक आहेत. रासायनिक खतांचा समतोल वापर होणे आवश्यक आहे. अतिरिक्त वापराने जमिनी कालांतराने कायमच्या बाद होतात.\n* डॉ. बावसकर : हवामान खात्यामार्फत दिले जाणारे पिकांचे नियोजन चुकीचे ठरत आहे. यावर उपाय सुचवावा.\nप्रा. डॉ. स्वामिनाथन : योग्य मान्सुन पीक व्यवस्थापन योजना शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. हवामानाचा अंदाज देतेवेळी पिकांने नियोजनही दिता आले पाहिजे. एकूण पर्जन्यमान तसेच खराब हवामानाचा अंदाज सुरुवातीसच शेतकऱ्यांना दिल्यास पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय शेतकऱ्यांना करता येइली.\n* डॉ. बावसकर : तेलबिया व कडधान्ये पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : (Water Shade Management) घेतली पाहिजेत. सोयाबीनच्या विविध उपयोगामुळे ह्या पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे.\n* डॉ. बावसकर : भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे काय स्थान आहे \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : सेंद्रिय शेतीस भरपूर वाव आहे. उदा. आसामसारख्या भागामध्ये भातशेती मोठ्या प्रमाणात होते, परंतु अतिपावसमळे दिलेली खते वाया जातात. तसेच खते देणेही अवधड होते, दिलेले घटक वाहून जातात. अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय शेती उपयुक्त ठरते.\n* डॉ. बावसकर : सद्यपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाबाबत काय करता येईल \nविविध पिकांसाठी व कृषी उद्योगासाठी देण्यात येणाऱ्या कर्जाचे व्याज ४ ते ६% पर्यंत खाली आणता येईल का\nप्रा. डॉ. स्वामिनाथन : पुरेसे व वेळेवर शेतकऱ्यांना कर्ज पुरविता आहे पाहिजे . पीक विमा योजना पुर्णतः राबविणे आवश्यक आहे. काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्यात यावे व अनेक लोकांनी आधुनिक तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणत उत्पादन करणे महत्त्वाचे असून अशा शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून हे उत्पादन गरीब लोकांनाही परवडेल अशा दरातच उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.\n* डॉ. बावसकर : दर्जेदार भाजीपाला पिके, फळे, फुले लागवडी संदर्भात आपला दृष्टिकोन काय आहे \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : अधिक उत्पादन व दर्जा असणाऱ्या पिकांची लागवड करताना पीक, लागवडीचा हेतू व अर्थशास्त्र ध्यानात घेतले पाहिजे. अशा पिकांच्या लागवडीकरिता योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अशा पिकांचे रोगप्रतिबंधक सत्य बियाण्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करणे आवश्यक आहे. उदा. वेलदोडा (Cardaman) पिकामध्ये 'कट्टे' (Katte Disease) रोग फार नुकसानकारक आहे. अॅझेरडिक्टीन (Azardictin)सारख्या उपयुक्त घटक असणाऱ्या कडुनिंबाची लागवड मोठ्या प्रमाणत करावी.\n* डॉ. बावसकर : उती संवर्धन व पॉलिहाऊस तंत्रज्ञान भारतीय शेतीसाठी उपयुक्त आहे काय \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : आयुर्वेदिक वनस्पतीसारखी उच्चं मुल्ये (Value Added) असणाऱ्या पिकांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. परंतु ऊस किंवा केळी सारख्या पिकांसाठी याचे अर्थशास्त्र जमविता आले पाहिजे.\n* डॉ. बावसकर : शेतकऱ्याने स्वतःचे स्वतंत्र मार्केट उभे करण्याविषयी आपले मत काय \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : चांगली योजना आहे. अशा योजना राबविल्यानंतर पुर्णत्वास नेणे आवश्यक आहे. हाताळणी, वाहतूक व असा उत्पादित माल ग्रहकापर्यंत योग्य वेळेत पोहोचविता आला पाहिजे. या करिता सुसंवाद असणे आवश्यक आहे.\n* डॉ. बावसकर : जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महाम��र्गावर किरकोळ विकीचे स्टोल्स शेतकऱयांच्या मुलांना देण्यात यावे, असे आम्ही सुचविले आहे. यावर आपले मत काय आहे\nप्रा. डॉ. स्वामिनाथन : चांगली कल्पना आहे. मी कृषी सहकार व ग्रामीण विकास खात्याचा सचिव असताना ग्रामीण गोडाऊन स्कीम (Rural Godown Scheme) १९७९ मध्ये सुचविली होती. ती योग्य पद्धतीने पुढे नेता आली नाही.\n* डॉ. बावसकर : सर्व उच्च मुल्य असणारी शेती उत्पादने, प्रक्रिया उद्योगातील सुधारणेस वाव आहे काय \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : प्रत्येक पिकामध्ये उच्च मुल्ये आहेत. कच्च्या मालाची निर्यात करण्याऐवजी अशा कच्च्या मालावर प्रक्रिया करून, असे प्रक्रिया पदार्थ निर्यात करावेत. दुध- दुभत्या जनावरांना चाऱ्यामध्ये मळी मिसळून दिल्यास दुधाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळू शकते.\n* डॉ. बावसकर : भारतीय शेती उत्पादनांच्या निर्यातीचा भविष्यकाळाचा दृष्टिकोन काय आहे \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : सध्या शेतीमालाच्या निर्यातीमध्ये खुपच कमतरता आहे. कारण औद्योगिक उत्पादनाच्या निर्यातीच्या तुलनेत शेती उत्पादनास कमी सबसिडी दिली जाते. परकीय देशामध्ये Infrastructure (सर्व सुविधा) चांगले आहे. हवाई वाहतुकीच्या भाड्यामध्येही शेती उत्पादनास आपल्या देशात कमी सबसिडी दिली जाते.\n* डॉ. बावसकर : पर्यायी व्यवस्थापन न करता साखर कारखान्यांना परवानगी देणे कितपत योग्य आहे भारतीय शेतीत ऊस हे पीक खरोखरच फयदेशीर आहे काय \n* प्रा. डॉ. स्वामिनाथन : पाण्याचा कमी वापर, पाण्याच योग्य वापर, कार्यक्षमतेचे प्रयोग महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटकसारख्या राज्यात राबविणे आवश्यक आहे. ऊसासारखी C4 पिके सुर्यप्रकाशाचा चांगला वापर करतात.\n* डॉ. बावसकर : शीतगृह, शीतकक्षच्या बाबतीत आपले मत काय \nप्रा. डॉ. स्वामिनाथन : अधिक महत्त्वाचे आहे. बटाटा उत्पादनामध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सत्य बटाट्याचे बियाणे शेतकऱ्यांना पुरविता आले पाहिजे. क्लोरो - फ्युरो - कार्बन टेक्नॉलॉजीमुळे ओझोन थरावर परिणाम होऊन Ultra violet rays सौरऊर्जेमार्फत सरळ (Direct) येतात.\nडॉ. स्वामिनाथन यांनी या मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर यांच्यानंतर आशिया खंडातील तिसरी महान व्यक्ती बनल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले.\nह्या नंतर डॉ. स्वामिनाथन सरांनी \"तुमचे तंत्रज्ञान भारतामध्ये कृषी क्षेत्���ात क्रांती निर्माण करेल\" असा गौरवोद्गारपर आशीर्वाद दिला. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन राष्ट्र उभारणीसाठी हे तंत्रज्ञान तरुण पिढीस मार्गदर्शक ठरून याचा प्रसार कृषी विज्ञान मंडळे. कृषी ग्रंथालये प्रत्येक १० किमी. परिसरामध्ये उभारण्याचे कार्य आम्ही चालवित आहे.\nयाच चर्चेदरम्यान सेंद्रिय शेती व आयुर्वेदिक वनस्पतींचा उल्लेख निघाला असता यु. पी. कॅडर मधून राजीनामा दिलेल्या व सध्या त्यांच्या फाउंडेशन अंतर्गत चेन्नईतील खेड्यामध्ये 'जैवतंत्रयज्ञानाच्या' वृद्धीचे कार्य करीत असलेल्या महिला आय.एस.एस. अधिकारी श्रीमती लक्ष्मी बोहरा यांचा परिचय करून दिला. या दोघांनीही या विषयामध्ये रुची दाखवून शेवटी डॉ. स्वामिनाथन यांनी 'आपले तंत्रज्ञान (डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी) फळबाग क्षेत्रामध्ये क्रांती घडवेल.' असे गौरवोद्गार काढले.\nडॉ. स्वामिनाथन सर हे गेल्या ३० वर्षापासून (आता ४५ वर्षापासून) ते आमचे मार्गदर्शक आहेत. ते आशिया खंडातील महान व्यक्तिमत्व असून शाश्त्रज्ञ या नात्याने त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचे कार्य आशिया खंडातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी बहुमोल आहे. सध्या त्यांचे पाँडेचरी मधील कार्य तिसऱ्या जगातील लोकांना वरदान ठरणारे आहे.\nया त्यांच्या सामाजिक व ग्रामीण विकास कार्यासाठी 'नवीन सहस्त्रकातील नवीन वर्षामध्ये आपण नोबेल पुरस्काराचे मानकरी व्हाल.' अशी प्रार्थना करून मुलाखत संपविली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/photos/page/6/", "date_download": "2019-03-25T08:29:18Z", "digest": "sha1:RGRE7HACYXI777TNG6JMW7D2LCHCYXIW", "length": 2507, "nlines": 57, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Photos - Page 6 of 9 - मराठी कलाकार", "raw_content": "\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nझी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार विनीत भोंडेचे लवकरच दोनाचे चार...\n‘हंपी’ मराठी मूवी ट्रेलर लाँच\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/sagar-deshmukh/", "date_download": "2019-03-25T08:11:10Z", "digest": "sha1:DMFEOONI33ZTFGMAJAPTYT3SDPZHIULX", "length": 3139, "nlines": 51, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Sagar Deshmukh - मराठी कलाकार", "raw_content": "\nभाईंचा ‘विग’आणि तिरुपतीहून मागवले केस\nभाई व्यक्ती कि वल्ली सिनेमाचा पूर्वार्ध प्रेक्षकांना भावून गेला. येत्या ८ फेब्रुवारीला भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज...\nपूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत रीलीझ होणार ‘भाई-व्यक्ती की वल्ली’.पहा ट्रेलर.\nमहाराष्ट्राचे भूषण असलेले लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व...\nपु.लं च्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’. पहा टिझर\nमहाराष्ट्राचे भूषण असे लेखक, अभिनेते, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, बहुआयामी व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/what-after-indian-art-296831/", "date_download": "2019-03-25T08:18:15Z", "digest": "sha1:7GQNBMODEHCR7ZN4LOPIHQZMSSVIGPXX", "length": 29681, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘भारतीयते’नंतर काय? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nमराठीत लोक दृश्यकलेचा विचार करत होते, लिहीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात तर, ‘भारतीय कला’ आणि ‘भारतीयांनी अंगीकृत केलेली पाश्चात्त्य\nमराठीत लोक दृश्यकलेचा विचार करत होते, लिहीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात तर, ‘भारतीय कला’ आणि ‘भारतीयांनी अंगीकृत केलेली पाश्चात्त्य चित्रणशैली’ हा मोठाच चर्चाविषय ठरला होता. त्या वेळच्या नियतकालिकांमधून जे कलाविषयक लिखाण होई, त्याचा आढावा अभ्यासकांनी घेतलेला आहे. तसाच स्वातंत्���्योत्तर काळाचा आढावा आपण घेतला, तर काही हाती येईल का\nसोबतच्या चौकटीत चित्राऐवजी छापलेलं अवतरण हे ‘मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार’ या नावाचं, मोठय़ा आकाराच्या २१४ पानांच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. हे पुस्तक म्हणजे रमेशचंद्र पाटकर यांनी एकंदर १२६ लेखांचा अनेक संदर्भग्रंथांच्या मदतीने साकारलेला सखोल अभ्यास. या पुस्तकाचा गाभा आणखी वेगळा आहे.. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘हिंदी कला’ किंवा ‘भारतीय’ कला अस्तित्वात यावी आणि वाढावी- म्हणजेच पाश्चात्त्यांचं अनुकरण करू नये आणि इथल्या कलेचा संबंध इथल्याच संस्कृतीशी असावा असं किती मोठय़ा संख्येनं लेखकांना (चित्रकला-समीक्षकांना) वाटत होतं, याची कल्पना यावरून येते. रावबहादूर धुरंधर, शिल्पकार वि. पां. करमकर, शं. वा. किलरेस्कर, ज. द. गोंधळेकर, नी. म. केळकर, भाई माधवराव बागल, हे सारे जण मराठीत नियमितपणे लिहीत होते, तर शि.म. परांजपे, आचार्य अत्रे, दत्तो वामन पोतदार यांनीही चित्रकलाविषयक मते एकदा तरी व्यक्त केलेली आहेत. यापैकी अनेक जण आधुनिक कला (किंवा पाश्चात्त्य ‘मॉडर्न’ कला) समजून घेण्याचा प्रयत्न अगदी एकांडेपणानं करत होते. त्या वेळच्या त्या लेखकांपाशी अभ्यास करण्यासाठी फार साधनं नव्हती. युरोपात कुणी जाऊन आलं, बरीच पुस्तकं वाचली, एवढाच स्रोत. आज इंटरनेट दिमतीला असतं, तसं अजिबात नाही. तरीही हे सारे लेखक बहुश्रुत होते, अभ्यासू होते आणि मुख्य म्हणजे भारतीय कलेचा स्वतंत्रपणे- म्हणजे पाश्चात्त्यांवर अवलंबून न राहाता- विकास झाला पाहिजे ही (राष्ट्रवादी) भूमिका अनेकांनी आपापल्या लिखाणांतून मांडलेली होती.\nया पुस्तकापासून थोडे दूर, स्वातंत्र्योत्तर काळात जाऊ. साधारण १९६० च्या दशकापर्यंत मराठीत कलाविषयक लिखाणाची परंपरा कायम होती. याच साठच्या दशकात कलेसंदर्भात स्वायत्ततावादी भूमिका मांडणारे अनेक जण होते आणि चित्रकारांपैकी त्यात संभाजी कदम हे अग्रणी होते. साठच्या दशकात मराठीत तरी जे समकालीन कलाविषयक लिखाण झालं त्यात व्यक्तिवादी विचाराला प्राधान्य आहे. त्यामुळे देश, भारतीयता यांचे संदर्भ वाचकाला फारच दूरान्वयानं समजून घ्यावे लागतील. शिवाय, समाजाला कलेचा मार्ग दाखवून सुसंस्कृतपणाची नव्यानं फेरमांडणी करू पाहणारे वारे या दशकात जगभर वाहात होते. या नव्या सुसंस्कृतीचे ‘अव्हां गार्द’ ���्हणजेच ‘अग्रदूत’ होण्याची रग या दशकात दिसत होती.\nभारतातल्या कलेनं भारतीय असावं, तसं झाल्यास ती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, अशी सदिच्छा मांडणारं संचित अगदीच लयाला गेलेलं नाही. आपल्या देशाला सामायिक सौंदर्यदृष्टी असायला हवी, अशा अर्थाचं अपेक्षावजा मत (जिथं समान नागरी कायदाही आणणं अशक्य आहे, त्या आपल्या देशाबद्दल) हल्ली जेव्हा रवी परांजपे व्यक्त करतात, तेव्हा ते या भारतीयतावादाचंच पुढलं पाऊल टाकू पाहात असतात. सुहास बहुळकर जेव्हा चित्रकारांच्या रंगवेल्हाळ आठवणी सांगतात, तेव्हा जेजेच्या शिक्षणाला भारतीयांनी कसं अंगीकृत केलं आणि अखेर त्याचं भारतीयीकरणच कसं झालं, याचा पट वाचकासाठी उलगडतो. हे काम बहुळकरांच्या आधी महाराष्ट्रीय चित्रकारांबद्दल स्फुटलेख लिहू लागलेल्या बाबूराव सडवेलकरांनी, त्या व्यक्तिचित्रवजा लेखांमधून केलं होतं. याच सडवेलकरांनी ‘वर्तमान चित्रसूत्र’ या पुस्तकात जपानी वा अन्य देशांतील कलेचेही संदर्भ दिले आहेत. पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीच्या भारतीयीकरणाबद्दलचा आणखी निष्कर्ष वाचकाला काढता येईल, असे अभ्यासू दुवे दीपक घारे यांच्या लिखाणातून वाचकापर्यंत पोहोचतात. पण घारे काही भारतीयतावाद्यांचे उत्तराधिकारी नव्हेत.\nज्यांनी भारतीयता हे ‘साध्य’ मानलेलं नाही, अशा समीक्षकांचा भूतकाळ आणि वर्तमानही मराठीत सशक्त आहे. यापैकी दोन महत्त्वाची नावं इथं घेणं आवश्यक आहे. पहिलं नाव ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचं. जर कधी त्यांनी स्वतंत्रपणे लिखाण केलं, तर ते भारतीयता काय किंवा अन्य काही काय, कुठल्याच वैचारिक भूमिकेचा बडिवार न माजवता थेट चित्रकाराच्या नैतिकतेकडेच पाहायचे आणि तिचं फक्त आरस्पानी दर्शन घडवून, कोणतीही भूमिका न घेता थांबायचेच. एरवी त्यांची समीक्षा काय दिसतंय यावर अवलंबून असायची. नाडकर्णीच्या त्या रूपवादी समीक्षेवर, त्यांनी आधी किती काय काय पाहिलंय याचा पगडा असायचा. मग, कुणी निसर्गचित्र काढताना जरा फराटेबाजी केली तर नाडकर्णीना लगेच ऑस्कर कोकोश्का आठवायचा आपल्या या निसर्गचित्रकाराला तोवर कोकोश्का कदाचित माहीतसुद्धा नसायचा.. असो.\nदुसरं नाव प्रभाकर कोलते यांचं. कलेबद्दल देशीवादी भूमिका यापूर्वी अनेकदा घेणारे प्रभाकर कोलते हे रूढार्थाने भारतीयतावादी ठरत नाहीत, असं त्यांच्या लिखाणातून लक्षात य��ईल. भारतीयतेपेक्षा मोठी आशियाई- पौर्वात्य मूल्यं कोलते यांना माहीत आहेत. ‘भारतीयांनी अंगीकृत केलेला पाश्चात्त्य कलाशिक्षण संस्कार’ हा काही कोलते यांच्या कौतुकाचा भाग नाही. उलट, दीनानाथ दलालांसारख्या लोकप्रिय चित्रकारांबद्दल अगदी स्मृतिलेख लिहितानाही दलाल कधीच ‘समकालीन कलावंत’ का ठरले नाहीत, याचं कठोर परीक्षण कोलते करतात. अव्वल मॉडर्निस्टांनी सौंदर्यतत्त्वांचा जसा विविधांगी आणि रसरसून विचार केला, तसं कार्य प्रत्येकाला आपापल्या देशकालसंदर्भात करता येईल आणि यावं, असा कोलते यांचा अपेक्षाव्यूह असावा असं त्यांच्या लिखाणातून लक्षात येतं. यावर खुद्द कोलते यांचं म्हणणं निराळं असू शकतं. पण कोलते यांची समदृष्टी लक्षात घेता, ‘आमची कला भारतीयच’ अशा अस्मितेशी कोलते सहमत होणार नाहीत.\nकलेचा इतिहास त्या-त्या कालखंडातल्या घडामोडी, त्या-त्या वेळची विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती यांच्या संदर्भात पाहिला पाहिजे असं मत वारंवार व्यक्त करणारे आणि मांडणशिल्पांच्या (इन्स्टॉलेशन आर्टच्या) इतिहासाबद्दल मराठीतला पहिलावहिला लेख १९९८ मध्ये लिहिणारे दिलीप रानडे आणि ‘लोकसत्ता’त अनेक र्वष चित्रसमीक्षा करणारे माधव इमारते, विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यांचा धांडोळा सुमारे ५० लेखांच्या मालिकेतून १९९९ सालीच घेणारे (पण हल्ली फार काहीच न लिहिणारे) नितीन कुलकर्णी, सध्या नितीनप्रमाणेच कलाशिक्षणात कार्यरत असलेले परंतु अवचित कधी समीक्षाही करणारे महेंद्र दामले, इंग्रजी साहित्य वा चित्रपटांबद्दल अधिक आणि चित्रकलेबद्दल मोजकंच लिहिणारे शशिकांत सावंत, अशा काही जणांना आणखी निराळं काढावं लागेल. यांना कलाशिक्षणानंतर विचारांच्या/अभिव्यक्तीच्या जगात कलाकार काय करतो, हे अधिक महत्त्वाचं वाटतं आणि आपण कलेबद्दल बोलत असू तर भारतीयता वगैरेसारखे मुद्दे फार तर अनुषंगानं यायला हरकत नाही, अशा मताचं साधम्र्य यांच्या लिखाणांत आणि विचारांत आहे. मेक्सिकन कला किंवा अन्य विषयांवर चित्रकार सुधीर पटवर्धन जेव्हा मराठीत लिहितात, तेव्हा त्यांचाही मतप्रवाह हा असाच असतो. पटवर्धन यांना ‘कलाप्रयत्नांचा सामाजिक उपयोग’ म्हणजे काय हे उमगलेलं आहे, हे तर त्यांच्या चित्रांप्रमाणेच त्यांच्या मराठी लिखाणातूनही जाणवतं.\nथोडक्यात, ‘मराठी नियतकालिकां���ील (आणि वर्तमानपत्रांतील) दृश्यकलाविचारा’चा स्वातंत्र्योत्तर काळातला आढावा कुणी घेतलाच, तर चित्रकलेतल्या भारतीयतेविषयी जेवढी चर्चा स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्याच्या उष:कालात (सन १९४६ ते ५०) होत होती, तेवढी नंतर उरली नाही, असं ठाशीवपणे लक्षात येईल.\nपण मग, स्वातंत्र्योत्तर काळात जो काही ‘दृश्यकलाविचार’ झाला असेल त्याचं एखादं वैशिष्टय़ सांगता येईल का स्वातंत्र्यपूर्व काळात किमान ‘हिंदी कला’ (कलेतली भारतीयता) हा मोठा विषय होता आणि चित्रकलेतलं स्त्रीदेहदर्शन, चित्रकलेचा उदात्त हेतू, असे उपविषय त्याच्याशी जुळलेले होते. ‘संवेदना’ या शब्दाचा साठच्या दशकापासून भरपूर प्रमाणात झालेला वापर किंवा ‘अमूर्तचित्र’ याविषयी मराठीत लिखाणाचा गुंफला गेलेला गोफ हे वगळता मराठीत वर्षांनुवर्षांना व्यापणारा ‘डिस्कोर्स’ (भले तो विद्वत्तापूर्ण नसेना का.. स्वातंत्र्यपूर्व काळात किमान ‘हिंदी कला’ (कलेतली भारतीयता) हा मोठा विषय होता आणि चित्रकलेतलं स्त्रीदेहदर्शन, चित्रकलेचा उदात्त हेतू, असे उपविषय त्याच्याशी जुळलेले होते. ‘संवेदना’ या शब्दाचा साठच्या दशकापासून भरपूर प्रमाणात झालेला वापर किंवा ‘अमूर्तचित्र’ याविषयी मराठीत लिखाणाचा गुंफला गेलेला गोफ हे वगळता मराठीत वर्षांनुवर्षांना व्यापणारा ‘डिस्कोर्स’ (भले तो विद्वत्तापूर्ण नसेना का..) मराठीतल्या चित्रकलाविषयक लिखाणात नाही.\nगोंधळेकर यांनी आपला समाज आणि कला यांच्या स्थितीचं जे निदान केलेलं आहे, ते आजही वा आधीच्या कोणत्याही काळात लागू पडणारं आहे. साठच्या दशकात मर्मज्ञ अधिक होते, म्हणू. मात्र दुखणं आहे आणि त्याची कारणं ही आहेत हे पक्कं आहे. गोंधळेकरांच्या वेळी भारतीयतेचा विषय तरी लोकांना- फक्त लेखकांनाच नव्हे तर वाचकांनाही- चित्रकलेबद्दलच्या चर्चेसाठी होता. आज तसा सामायिक विषय आहे का नसल्यास का नाही तुम्हाला उत्तरं सुचताहेत का\n(१) चित्रकार व सामान्य जनता यांच्यातील अंतर वाढले आहे. चित्रकार व त्यांच्या कलाकृति आणि सामान्य जनता यांच्यांत अेक समान भूमिका राहिली नाही हें सत्य आहे.\n(२) .. सामान्य जनाता अजून जीवनापेक्षा नुसत्या जगण्याच्या प्रश्नातील अवघडपणामुळें कलेसारख्या जीवनातील आवश्यक अशा आनंदाबद्दल आस्था दाखवेनाशी झाली आहे.\n(३) या दोन्हींतील (म्हणजे कलावंत व ���ामान्य जनता) दुवा म्हणून असावयास पाहिजे असलेला कलामर्मज्ञांचा वर्ग अजून वस्तुत अस्तित्वात यावयाचा आहे.\n(४) .. सामाजिक परिस्थिती ही नेहमीच कलाप्रकारावर नकळत पण हमखास ठसा उमटवित असतें आणि ज्यावेळीं हे अन्योन्य संबंध तुटता किंवा दुरावतात त्यावेळीं चित्रकला ही निव्वळ तांत्रिक व प्रयोगात्मक होअूं लागते. पण हें अंतर एका विवक्षित मर्यादेपेक्षा ताणले गेल्यास चित्रकार हा समाजघटक ही आपली भूमिका सोडून देतो आणि त्याच्या कलाप्रयत्यांचा सामाजिक उपयोग (निव्वळ अैहिक उपयोग नव्हे) नाहीसा होतो.\n– ज. द. गोंधळेकर, ‘मनोहर’ मासिकाच्या डिसेंबर १९४९च्या अंकातील ‘संधिकालातील चित्रकला’ हा लेख (शुद्धलेखन मूळ उताऱ्याप्रमाणे), संदर्भ- पान ८२, ‘मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार’- रमेशचंद्र पाटकर, ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगाच्या बाजारी, कलेच्या संसारी..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://devanaguide.huertatipografica.com/glyph.php?nombre=uu-deva", "date_download": "2019-03-25T08:38:20Z", "digest": "sha1:V3FM4TCGMACZRTEGTD7FPF6CM4I4CNAP", "length": 2426, "nlines": 41, "source_domain": "devanaguide.huertatipografica.com", "title": "Devanaguide- uu-deva", "raw_content": "\nउपजाऊपन रिझाऊ उपजाऊ बचाऊ बचाऊ नाऊ हंसाऊ दिखाऊ चिऊंटी अनुपजाऊ चलाऊ उडाऊपन नाऊ उडाऊ उपजाऊ धसाऊ उडाऊ हंसाऊ टिकाऊ रिझाऊ बचाऊ अनुपजाऊ बचाऊ ठहराऊ ठहराऊ लुभाऊ बचाऊ ठहराऊ जडाऊ उपजाऊपन उडाऊपन खडाऊं बदलाऊ झाऊ उपजाऊ उडाऊपन ठहराऊ खाऊ चलाऊ दिखाऊ थकाऊ लुभाऊ जडाऊ नाऊ जडाऊ चिऊंटी उडाऊपन रिझाऊ हंसाऊ चिऊंटी हंसाऊ उडाऊ खाऊ फैलाऊ लुभाऊ फैलाऊ जडाऊ खाऊ टिकाऊ उपजाऊ धसाऊ थकाऊ अनुपजाऊ अनुपजाऊ झाऊ नाऊ बचाऊ दिखाऊ उपजाऊ ठहराऊ नाऊ लुभाऊ खडाऊं अनुपजाऊ खडाऊं नाऊ खाऊ दिखाऊ दिखाऊ जडाऊ धसाऊ रिझाऊ रिझाऊ उपजाऊपन अनुपजाऊ उडाऊ फाडखाऊ खडाऊं दिखाऊ झाऊ अनुपजाऊ नाऊ चिऊंटी धसाऊ उपजाऊ रिझाऊ उडाऊपन खाऊ चिऊंटी झाऊ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:57:24Z", "digest": "sha1:3DPQUQOZR6LC4VNIWLNGKFI3QWWMSCZC", "length": 5547, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोमाली भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nसोमालिया, सोमालीलँड, जिबूती, इथियोपिया, येमेन, केनिया\nसोमाली ही पूर्व आफ्रिकेच्या सोमालिया, जिबूती व इथियोपिया देशांमध्ये वापरली जाणारी एक आफ्रो-आशियन भाषा आहे.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nमृत दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ११:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/172093-", "date_download": "2019-03-25T07:39:21Z", "digest": "sha1:5LXPZ2VUM3YEWML76ULZV3WC5XVWFGKI", "length": 7297, "nlines": 21, "source_domain": "isabelny.com", "title": "आपण मला विक्रीसाठी उच्च पीआर बॅकलिंक्स शोधण्यात मदत करू शकता?", "raw_content": "\nआपण मला विक्रीसाठी उच्च पीआर बॅकलिंक्स शोधण्यात मदत करू शकता\nमी ओळखतो की विक्रीसाठी उच्च पीआर बॅकलिंक्सची ऑफरिंग योग्य आणि सुरक्षित ठिकाण शोधणे सोपे नाही. आणि नक्कीच, उच्च डोमेन प्राधिकरण, पेजरॅंक आणि पृष्ठ प्राधिकरण स्कोअरसह पर्याप्त बॅकलिंक्स तयार करणे जवळजवळ अशक्य आहे - पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने, कोणत्याही देय डीलशिवाय. आदर्शपणे, दर्जेदार बॅकलिंक्स मिळविण्याकरिता फक्त आपल्या साइट किंवा ब्लॉगच्या वेबपेज दर्शविणार्या वैध स्रोतांचा वापर करणे. आणि आपल्यासाठी उच्च पीआर बॅकलिंक विक्रीसाठी आपल्याजवळ काही ठिकाणे आहेत - आशेने Google ला आपल्याकड��न रँकिंग दंड जमिनीवर आणणे शक्य असलेल्या किमान जोखमीसह.\nउच्च पीआर बॅकलिंक्ससह विक्रीसाठी योग्य ठिकाण\nआपल्याला उशीर झालेला स्मरणपत्र देऊन आपला वेळ वाया घालण्याची आवश्यकता नाही - एसइओसाठी पेड लिंकचा समावेश असलेल्या कोणत्याही कृती एक निश्चितपणे धोकादायक प्रयत्न असू - benefits of using cat5e. म्हणूनच मी तुम्हाला काही वापर-सिद्ध आणि अधिक किंवा कमी सुरक्षित ठिकाणे त्याऐवजी दर्शविणार आहे. आपण पुरेसे धाडसी (किंवा निष्काळजी - कोण माहीत आहे) असल्यास, येथेच आपण आपल्या एसइओला प्रोत्साहन देऊ शकता - कमीत कमी Google बरोबर लाल ध्वज न घेता.\nलिंक व्यवस्थापन - या स्रोतास आपल्या एसइओला स्केल वाढविण्यासाठी प्रथमतः नैसर्गिक गुणवत्तेचे पेड बॅकलिंक्स मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून शिफारस करता येईल.आपण विविध डीए, पीए, आणि पेजरेंक स्कोअरसह विविध दुव्यांची विस्तृत उपलब्धता शोधू शकता. आपले बजेट खूप कडक आहे हे दिलेले टीप, विक्रीसाठी उच्च पीआर बॅकलिंक्सची वागणूक असलेल्या उर्वरित वापर-सिद्ध ठिकाणामध्ये कदाचित स्वस्त किंमतीच्या टॅग्जची ऑफर करणे - हा पर्याय तुमची सर्वोत्तम निवड असेल.\nब्लॅकहॅट लिंक्स- दोन प्रकारचे बॅकलिंक्स किंवा मोठ्या प्रमाणावरील मोठ्या प्रमाणात येणारी खरेदी आणि सवलत किंमत. परंतु आपण किमान 50-60 दुवे विकत घेण्यासाठी तयार असाल तर मी दिलेली लिंक इमारत या स्त्रोत विचारात घ्या. आणि या ठिकाणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आपण खरेदी करू शकता जवळजवळ प्रत्येक बॅकलिंक तेथे उपलब्ध DoFollow विशेषतासह येते.\nफिवर - जरी या साइटला डिजिटल मार्केटिंग आणि संलग्न विपणन समुदायांमध्ये सुप्रसिद्ध आहे तरीही ते उच्च पीआर बॅकलिंक्सची विक्री करणा-यांकडून खूप चांगला पर्याय बनू शकतात.लक्षात घ्या, तथापि, काळजीपूर्वक वापरतानाच Fiverr आपल्याला केवळ एसईओ मध्ये मोजता येणारी प्रगती देईल. मला असे म्हणायचे आहे की तेथे बरेच भिन्न स्वयंचलित साधने उपलब्ध आहेत, म्हणून शक्य तितक्या जास्त दुवे मिळविण्यासाठी आपण कधीही धावू नये. लक्षात ठेवा की लिंक बिल्डिंगमध्ये अति जलद गती लाभ नेहमीच Google च्या नजरेत संशयास्पद दिसतील.\nबॅकलिंक्स हब - मी एसइओ साठी गुणवत्ता बॅकलिंक्स खरेदी करण्याचा प्रयत्न शिफारस शिफारस अंतिम पर्याय आहे. बॅकलिंक्स हबवर खरेदी केलेल्या प्रत्येक बॅकलिंकसह ���िळणारी वार्षिक गॅरंटी आहे. आणि हे स्त्रोत परवडण्याजोग्यापेक्षा गुणवत्तेवर अधिक सट्टा लावत आहे. तथापि, सामान्य किंमत टॅग थोडा जोरदार वाटते कदाचित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://excelcityindia.com/search/category,mess/sShowAs,list", "date_download": "2019-03-25T08:09:37Z", "digest": "sha1:RQCRDDSSO2AZZZPD6CHBMZB73BBT5AXJ", "length": 4931, "nlines": 87, "source_domain": "excelcityindia.com", "title": "Mess - ExcelCity India", "raw_content": "\nअतिग्रे मेस उत्कृष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय उपलब्ध. डबे नेण्याची सोय. पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. एक वेळेचा जेवणाचा मासिक खर्च ९०० रुपये. दोन वेळेचा जेवणाचा मासिक खर्च १८०० रुपये. राजारामपुरी मध्ये डबे पोहचवण्याची सोय उपलब्ध. पत्ता: संजय अतिग्रे. १५५२,राजारामपुरी २ री गल्ली मोबाईल:...\nअवधूत पोळी भाजी सेंटर व कोकणी मेवा शॉपी * फक्त पार्सलची सेवा * घरपोहोच सेवा * शुभकार्याच्या ओर्डरस स्वीकारल्या जातील. * हॉस्पिटल व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जागेवर जेवण पोहोच करण्याची सेवा * सर्व सणासुदीचे तयार पदार्थ मिळतील. * दर संकष्टी व गणेश चतुर्थी निमित्त स्वादिष्ट उकडीचे व तळलेल्या मोदकांच्य...\nअन्नपूर्णा फूड्स आम्ही अन्नपूर्णा या नावे स्वादिष्ठ व रुचकर असे veg आणि non veg पदार्थ घरगुती पद्धतीने बनवून घरपोच देण्याची एक संकल्पना सुरु केली, आणि आपण सर्वानी यांस खूप उस्फूर्थ असा प्रतिसाद दिला, या बद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आम्ही आपल्या आवडी प्रमाणे चवीप्रमाणे सर्व पदार्थ बनवतो, आमची ...\nआठवड्यातून 4 वेळा चिकन व अंडाकडी, शाकाहारींसाठी 4 वेळा Sweet मिळेल, रात्री भाकरी व चपाती मिळेल. शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळेल. मासिक मेंबरशिप स्विकारली जाईल. डबे पोहोचवण्याची खास सोय. एक वेळ आवश्यक भेट द्या...\nवेदांत मटन खानावळ खास घरगुती पद्धतीचे बोल्हाईचे मटन व चुलीवरील भाकरी मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/censor-board-decided-to-give-it-ua-certificate-along-with-some-modifications/", "date_download": "2019-03-25T08:33:10Z", "digest": "sha1:2CNX4WVDBMYVXJZKM6YQQLWK5V7JDGNS", "length": 5394, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पद्मावतीला सेन्सॉर बोर्डचा दिलासा; मात्र नाव बदलाव लागण्याची शक्यता?", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद कर�� की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nपद्मावतीला सेन्सॉर बोर्डचा दिलासा; मात्र नाव बदलाव लागण्याची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा: सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरलेल्या पद्मावती सिनेमाच्या अडचणी अखेर संपल्याच दिसत आहे. काही अटींसह सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा सिंगल दाखवला आहे. २८ डिसेंबरला एका कमिटीकडून सिनेमाचा रिव्हू घेण्यात आला होता. त्यानंतर आता काही बदल सुचवत यूए सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र चित्रपटाचे नाव बदलेले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nपद्मावातीमध्ये राजपूत समाज आणि राणी पद्मावतीचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आक्षेप आहे. राजस्थानात करणीसेनेने या विरूद्ध आंदोलनही केली होती. त्यानंतर राजस्थान ,गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर आधीच बंदी घातलेली आहे. मात्र आता सेन्सॉर बोर्डाकडून दिलासा मिळाल्याने चित्रपट कधी सिनेमा गृहांमध्ये येणार हे पहाव लागणारे.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nप्रतिभाताईंचे ते ‘पद’ मी हिरावले – शरद पवार\nदहा आमदार घेवून या; हार्दिक पटेलची गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2278", "date_download": "2019-03-25T08:33:02Z", "digest": "sha1:DXUTLB5PEYPRZZX5YMI6BJV6EBGFI5GU", "length": 8437, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रजाचा गज करणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘रजाचा गज करणे’ हा जुना वाक्प्रचार. रज म्हणजे मातीचा कण, गज म्हणजे हत्ती. रजाचा गज करणे याचा शब्दश: अर्थ मातीच्या कणाचा हत्ती करणे. वाक्प्रचार दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जाई.\nविद्याधर वामन भिडे यांच्या ‘मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी’ या कोशात अतिशयोक्ती करणे, छोटी गोष्ट मोठी करून सांगणे असे त्याचे अर्थ दिले आहेत. त्या अर्थाचा ‘राईचा पर्वत करणे’ हा वाक्���्रचार मराठीत आहे.\nरजाचा गज करणे याचा दुसरा अर्थ लहानाचा मोठा करणे, संस्कार करून घडवणे असा मोल्सवर्थच्या शब्दकोशात आहे. तो पूर्वी मुलांना वाढवणे, घडवणे या अर्थाने वापरला जाई. लहान मूल म्हणजे एक प्रकारे मातीचा गोळा. आई-वडील त्याचे लालन-पालन करतात, त्याच्यावर चांगले संस्कार करतात. अशा त-हेने मुलांचा ‘रजाचा गज’ करतात अनंत फंदी यांचे ‘माधवाख्यान’ नावाचे पेशव्यांच्या कारकिर्दीवरील एक काव्य आहे. त्यामध्ये -\nमी केले रजाचे गज |\nआता सोडुनि जाताति मज |\nडोळां अश्रु आले सहज |\nअसे वर्णन आहे. राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी त्यांची अमृतराव व बाजीराव ही मुले नानांच्या हवाली केली, त्या वेळच्या प्रसंगात राघोबादादांच्या तोंडचे ते वाक्य आहे.\nगुजराथी भाषेत ‘रजनुं गज करवुं’ असा वाक्प्रचार आढळतो.\n- डॉ. उमेश करंबेळकर\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्यप्रचार, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%82/", "date_download": "2019-03-25T07:22:37Z", "digest": "sha1:F5QSJJ5NV2VHIEHH3XDVRWHWBOY2Y4AF", "length": 11211, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बंदला शिरवळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबंदला शिरवळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद\nशिरवळ ः व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवत मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.\nशिरवळ, दि. 9 (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी शिरवळमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळला. गुरुवारी व्यापारी व नागरिकांनी बंद पुकारत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.\nमराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्यानंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चाची जागा मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली.\nयावेळी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या शिरवळ बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिरवळसह परिसरात बंदच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक परिसरातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक सुट्टी जाहीर करत आजची सुट्टीचा दिवस रविवार रोजी कामासाठी ठेवल्याने औद्योगिक परिसराबरोबर आशियाई महामार्गावर वाहतूक नसल्याने निरव शांतता पसरली होती.\nयावेळी शिंदेवाडीसह मराठा समाजबांधवांनी ग्रामपंचायतीलगत ठिय्या आंदोलन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शिरवळ, पळशी,खंडाळा, लोणंद, विंग या प्रमुख गावांसह संपूर्ण खंडाळा तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शिरवळहद्दीवरील एक खाजगी कंपनी सुरु असल्याने आंदोलक युवकांनी कंपनी बंद करण्याकरीता गेले असता त्याठिकाणी कंपनी सुरक्षारक्षक, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर वातावरण तप्त झाले होते. यावेळी शिरवळ पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. यावेळी चौकाचौकात पोलीसांचा व महामार्गावर मोठ्या प्रमाणात शिरवळ पोलिसांनी शिरवळ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त नेमण्यात आला होता.\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणा���च\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/sairat2-marathi-movie-nagraj-manjule-rinku-rajguru-asa/", "date_download": "2019-03-25T08:09:09Z", "digest": "sha1:POFOZZISFCOK227X7EHLZ7CI2WWX54AC", "length": 1890, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " sairat2-marathi-movie-nagraj-manjule-rinku-rajguru-asa - मराठी कलाकार", "raw_content": "\nआर्ची आणि परश्याच्या मुलाची कथा “सैराट२” मध्ये\nअभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा पहिलाच चित्रपट “सैराट” सुपरडुपर हिट ठरला होता. बॉक्स...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:27:57Z", "digest": "sha1:2OTJNTWMGAPKUZQPILEVPO2BTNTQGWGQ", "length": 6036, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अम्हारिक भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nअम्हारिक भाषेमधील इथियोपियाचे राष्ट्रगीत\nअम्हारिक ही इथियोपिया देशाची राष्ट्रभाषा आहे. सुमारे २.५ कोटी भाषिक असलेली अम्हारिक ही अरबीखालोखाल सामी भाषासमूहामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. अ��्हारिक भाषेची स्वतंत्र लिपी असून ती रोमन अथवा इतर लिप्यांमध्ये रूपांतरित करणे शक्य नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1432", "date_download": "2019-03-25T08:32:27Z", "digest": "sha1:VFB42GY5V7XXKMU463EZ6L5UIORO36UH", "length": 6080, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "राहता गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलांवर नगर - मनमाड रस्त्यावर राहाता हे गाव असून 1872 व 1881 सालची लोकसंख्या अनुक्रमे 2209 व 2389 इतकी होती. कोपरगाव उपविभागातील प्रमुख बाजारपेठ तेथे असून प्रवाशांसाठी बंगला बांधलेला आहे. राहता ही कोपरगाव उपविभागातील धान्याची मुख्य बाजारपेठ आहे. तेथे श्रीमंत- धनवान व्यापारी अनेक राहतात. दौंड-मनमाड ही रेल्वे सुरू झाल्यानंतर मालाची निर्यात करणार्या पेनिनसुला रेल्वे मार्ग लासलगांव येथून वळवून चितळी व पूणतांबा पर्यंत जोडला गेला. आठवडा बाजार गुरूवारी भरतो. राहता येथे 1 जानेवारी 1851 पर्यंत कनिष्ठ न्यायाधीशांचे कोर्ट होते. शासकीय शाळा या जुन्या कोर्टाच्या इमारतीत भरते.\n'असे होते कोपरगाव' या पुस्तकातून (पान क्रमांक 97)\nसंयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था\nसंदर्भ: महाराष्ट्रातील मंदिरे, वैराग गाव, मल्लिकार्जुन मंदिर, गावगाथा\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nनाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच\nसंदर्भ: नाडण गाव, देवगड तालुका, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/bhima-koregaon-violence-police-raid-on-shoma-sens-house-at-nagpur/", "date_download": "2019-03-25T08:11:45Z", "digest": "sha1:2RTCB4WWSHH2EUTRH2XCT43G5EKQ6AFJ", "length": 9362, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Bhima Koregaon Violence : नागपूर विद्यापीठातील शोमा सेन यांच्या घरी पोलिसांचा छापा", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nBhima Koregaon Violence : नागपूर विद्यापीठातील शोमा सेन यांच्या घरी पोलिसांचा छापा\nटीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी आज पोलिसांची धडक कारवाई सुरु असून नागपूर विद्यापीठातील शोमा सेन यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली आणि त्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर महेश राऊत यांनाही नागपुरातून अटक करण्यात आली आहे. पहाटेपासूनच ही कारवाई सुरू आहे.\nराणा जेकब नावाच्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल च्या मदतीने अटक केली आहे. पटियाला कोर्टाने त्याला दोन दिवसांच्या ट्रांजिक्ट रिमांडवर रवानगी करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.\nसुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.\nभीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.परिषदेत चिथावणीखोर भाषणं आणि गाण्यांमुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकल्याचा आरोप होता. या आयोजनामागे माओवाद्यांचा काही संबंध आहे का याची चाचपणी पुणे पोलिस करत आहेत. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथर कार्यकर्त्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले होते. पुण्याचे सह-पोलीस आयुक्त आणि नक्षलविरोधी अभियानाचे माजी पोलिस महानिरिक्षक रविंद्र कदम यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरु आहे.\nकाय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण\nपुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये ता.1 जानेवारी 2018 रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nडोनाल्ड ट्रम्प किम जोंग उन यांची ‘या’ ठिकाणी घेणार भेटणार\nअमित शहा १०० टक्के उद्धव ठाकरेंची भेट घेणार -भाजप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ncp-leader-vandana-chavhan-news-pune/", "date_download": "2019-03-25T08:12:00Z", "digest": "sha1:EPEORPAKYGUWBR3OERB76BNL7DG2PQO3", "length": 9186, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'डॉक्टर्स डे' निमित्त डॉक्टरांच्या ' सख्खे शेजारी ' नाटकाने मिळवली वाहवा !", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\n‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉक्टरांच्या ‘ सख्खे शेजारी ‘ नाटकाने मिळवली वाहवा \nपुणे : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल’ पुणे च्या वतीने डॉक्टरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉक्टरांचा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . डॉक्टरांनी एकत्र येऊन सादर केलेल्या ‘सख्खे शेजारी ‘ या नर्मविनोदी नाटकाने उपस्थितांची वाहवा मिळवली . डॉ दीपक मांडे दिग्दर्शित या नाटकात पुण्यातील दंतरोगतज्ज्ञांनी भूमिका केल्या .\nहा सन्मान सोहळा रविवार, दिनांक १ जुलै २०१८ रोजी रात्री १०:३० वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे . आयोजित करण्यात आला होता . खासदार वंदना चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या . ‘साई स्नेह हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल’चे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी प्रास्ताविक केले .\nखासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला . डॉ . जयंत नवरंगे ,डॉ . ओमप्रकाश जाधव ,डॉ . ज्ञानेश्वर दुसाणे ,डॉ . श्रीहरी ढोरे -पाटील ,डॉ . सुनील घागरे ,डॉ . प्रकाश महाजन ,डॉ . विलास पाठक ,डॉ . दीपाली पाठक ,डॉ . रमेश भानगे ,डॉ . कल्पना भानगे यांचा सन्मान स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या . राहुल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले . कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ . नरेंद्र काळे ,चेतन तुपे ,एड . भगवानराव साळुंखे ,रुपाली चाकणकर ,उमेश पाटील ,डॉ . दत्तात्रय गायकवाड ,नगरसेवक योगेश ससाणे ,\nडॉ. अजितसिंह पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव – (राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष), डॉ. राजेश पवार (कार्याध्यक्ष), डॉ. हेमंत तुसे – (राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, सचिव) उपस्थित होते .\nयावेळी बोलताना खा . वंदना चव्हाण म्हणाल्या ,’रुग्णांच्या दृष्टीने डॉक्टर हा परमेश्वर असतो . मात्र ,डॉक्टरांच्याच समस्या निर्माण होतात ,वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या निर्माण होतात,तेव्हा त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर सेलने प्रयत्न केलेले आहेत . ‘\nडॉ . नरेंद्र काळे म्हणाले ,’आरोग्य क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर सेलच्या पाठपुराव्या���ुळे अनेक चांगले निर्णय झाले . डॉक्टर संरक्षण कायदा ,पॅरामेडिकल कौन्सिल ,होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथी उपचारास परवानगी असे अनेक निर्णय घेतले गेले . मात्र ,सध्याच्या काळात डॉक्टरांवरील हल्ले वाढत चालली असून ती काळजीची बाब आहे ‘\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nसर्व वस्तूवर समान जीएसटी आकारणे अशक्य – नरेंद्र मोदी\nहोऊन जाऊ द्या ‘दूध का दूध पानी का पानी’, दानवेंचे खोतकर आणि विरोधकांना खुले आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/update-facebook-is-testing-a-facial-recognition-feature-to-verify-users-identities/", "date_download": "2019-03-25T08:10:38Z", "digest": "sha1:XKDUYW6KON4Q25FB7DWVYZF5A346OIJX", "length": 6029, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फेशियल रेकग्निशन - तुमचा चेहराच असेल फेसबुकचा पासवर्ड", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nफेशियल रेकग्निशन – तुमचा चेहराच असेल फेसबुकचा पासवर्ड\nफेसबुक आपल्या युजर्सला सतत अपडेट ठेवत असतो. युजर्सला त्याचे अकाऊंट सुरक्षित राहावे या करिता नेहमीच काहीना काही नवीन पर्याय उपलब्ध करून देत असतो. लवकरच फेसबुक असे एक नवीन फिचर आणार आहे ज्यामुळे फेक अकाऊंट पकडले जाऊ शकतात.\nफेक अकाऊंटवर कारवाई करण्यासाठी फेसबुकने फेस रिकग्नेशन या फिचरची चाचणी सुरु केली आहे. त्यामुळे युजर्सना आपला चेहरा स्कॅन करून फेसबुक अनकलॉक करता येणार आहे. ‘टेकक्रंच’ने फेसबुकच्या या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे. फेसबुकसाठी फेशियल रेकग्निशन हे तंत्र काही नवं नाही. तुमच्या सोबत फोटोमध्ये इतर मित्र मैत्रीणी असतील तर त्यांची नाव काय आहेत हे फेसबुक अगदी अचूक ओळखतो. तेव्हा एखाद्या मित्राला टॅग करताना तुम्हाला त्याच्या ना��ाची शोधाशोध करावी लागत नाही. आता याच फीचरचा वापर लॉग इन करण्यासाठी होऊ शकतो का, याची चाचणी सुरू आहे. हे फीचर कधी येईल याची तुर्तास तरी माहिती उपलब्ध नाही. अॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल x हा फोन लाँच केला होता. यात फेशियल रेकग्निशनचे फीचर देण्यात आलं आहे. अशाच प्रकारचं फीचर फेसबुकमध्येही उपलब्ध होणार याची चर्चा असल्याने अनेकांना याबद्दल उत्सुकता आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nबेशिस्त वागतो म्हणून खडसावल्यामुळे विद्यार्थाचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला\nशाहरूखच्या रेड चिलीजवर पालिकेचा हातोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/television/page/2/", "date_download": "2019-03-25T07:37:05Z", "digest": "sha1:NJOCNTVXSLSG6FSD5QDK6RODUSGHIZ4W", "length": 6523, "nlines": 65, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Television - Page 2 of 6 - मराठी कलाकार", "raw_content": "\n९० वर्षांच्या “ह्या” जेष्ठ अभिनेत्याची “छत्रीवाली” मालिकेत एंट्री\nबऱ्याच कालावधीनंतर मराठी सिनेमातील दिग्गज अभिनेते रमेश देव यांची छोट्या पडद्यावर झलक आपल्याला स्टार प्रवाह वरील...\nस्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची धमाल.निमित्त ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमाचं.\nमहाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने...\n तुमच्या आवडत्या मालिकांचं टीआरपी रेटिंग बघितलेत का\nरोज संध्याकाळी आपल्या घरात मालिका बघणं हा बहुतेकांचा नित्यनियमचं म्हणावा लागेल. त्यात घडणऱ्या रंजक गोष्टी आणि...\nमराठी ‘बिग बॉस’ विजेती मेघा धाडेची हिंदी ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री\nबिगबॉसच्या चाहत्यांसाठी आलेली एक नवी खुशखबर म्हणजे लवकरच ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे...\nस्मिताच्या पार्टीच्या निमित्ताने बिगबॉस मराठीची सगळी मंडळी पुन्हा एकत्र पण पुष्कर,सई आणि मेघाची पार्टीला अनुपस्थिती\nबिगबॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर तिसऱ्या क्रमांकाची विजेती बनली. याच निमित्ताने तिच्या मैत्रिणींनी स्मितासाठी...\nमेघा धाडे पहिली मराठी बिगबॉस विजेती. अठरा लाख रुपये बक्षीस मिळणार\nआणि शेवटच्या लढाईची धकधक आज बिगबॉसचा सीझन पहिला संपला आणि ह्या सिझनची विजेती ठरली ती...\n मैत्रीच्या त्रिकुटात का रे दुरावा\nबिगबॉसच्या घरात सध्या राहिलेत ते केवळ सहा सदस्य ह्या सहांमधून आठवड्याच्या शेवटी अजून एका सदस्याला घरची...\nबिगबॉसच्या मनात मोठा प्लॅन तर रेशम म्हणते राजेशने थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या\nबिगबॉस मराठी मध्ये सध्या तडक्यावर तडके लागताना आपल्याला दिसत आहेत. नुकतीच घरातून बाहेर पडलेली रेशम सध्या...\nसई आणि रेशममध्ये वाद कोण होणार नवा कॅप्टन\nबिगबॉस मराठीचा शो आता झपाट्याने पुढे सरकत असून टास्कमागे टास्क घरातील सदस्यांना मिळतं असल्याचं आपल्याला हल्ली...\nनंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री\nशर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर नंतर बिगबॉसच्या घरात आता वेळ आलीय अजून एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीची. होय...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-blog-pune-facing-issues-helmet-and-water-samrat-phadnis-4122", "date_download": "2019-03-25T08:31:21Z", "digest": "sha1:72BEJP5BETUJKM3GRKSTBJ354YNJ6FEI", "length": 14804, "nlines": 103, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news blog pune facing issues of helmet and water by samrat phadnis | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहेल्मेट, पगडी आणि पुण्याचे पाणी\nहेल्मेट, पगडी आणि पुण्याचे पाणी\nहेल्मेट, पगडी आणि पुण्याचे पाणी\nहेल्मेट, पगडी आणि पुण्याचे पाणी\nहेल्मेट, पगडी आणि पुण्याचे पाणी\nशनिवार, 12 जानेवारी 2019\nहेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात. त्यामुळे, आजच्या प्रश्नांवर भूमिका घेताना राजकीय दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे.\nहेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात. त्यामुळे, आजच्या प्रश्नांवर भूमिका घेताना राजकीय दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे.\nडोके वापरून सोडविण्याचे तीन विषय पुणे शहरात सध्या चर्चेत आहेत. हेल्मेट, पगडी आणि पाणी. तिन्ही विषयांवर समाजातल्या कर्त्या-धर्त्या सामाजिक, राजकीय धुरीणांनी भूमिका घेताना डोके वापरण्याची नितांत आवश्यकता आहे. दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट घालू नये म्हणून पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले राजकीय कार्यकर्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवीदान समारंभात पाहुण्यांच्या डोक्यावर महात्मा जोतिराव फुलेंच्या विचाराचे प्रतीक असलेली पगडी चढवावी की पुणेरी म्हणून प्रसिद्ध असलेली पगडी आणि पुण्याला नेमके किती पाणी द्यावे, या तिन्ही विषयांवरच्या भूमिकांमध्ये तात्कालिक कुरघोडीचा, आततायीपणाचा प्रभाव आहे. पुणेकरांच्या रोजच्या प्रश्नांबद्दल उदासीनता आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची घाई पुणेकरांना समजते आहे.\nदुचाकीवरून प्रवास करताना अपघातापासून सुरक्षितता म्हणून हेल्मेट वापरावे, हा सर्वसाधारण आग्रह. त्यासाठी कायदा करावा लागणे ही आपल्या देशाची व्यवस्था. अगदी संकुचित दृष्टीने फक्त शहराचा विचार केला, तरी पटेल की या महानगरात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जाताना दुचाकीवर जीव सुरक्षित नाही. अपघात होतात आणि अपंगत्व, मृत्यू येतो. व्यक्ती, त्याचे/तिचे कुटुंब उद्ध्वस्त होते. या साऱ्याचा परिणाम शहराच्या सामाजिक, आर्थिक आरोग्यावर होतो. त्यामुळे हेल्मेट वापरा, असे नागरिकांना सांगण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागणे हेच मुळात आपले अपयश. त्याहीपेक्षा मोठे अपयश म्हणजे, रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांच्या कारवाईविरोधात आंदोलन करणारे कार्यकर्ते. कुणी रास्ता रोको केला. कुणी हेल्मेटचा दशक्रिया विधी केला. माध्यमांमध्ये फोटो-व्हिडिओ झळकल्याने कार्यकर्त्यांचा जीव सुखावला. \"नागरिकांच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका', म्हणून उद्या कुठल्या तरी निवडणुकीत एखादा कार्यकर्ता हे आंदोलन अहवालात छापेलही. ज्याच्या घरातली व्यक्ती दुचाकी अपघातात दगावली आहे, ज्याला ��ुचाकी अपघातात अपंगत्व आलेले आहे, त्याच्या दृष्टिकोनातून ही आंदोलने पाहिली तर चाललेला प्रकार \"स्मार्ट' नाही, हे नक्की. हेल्मेट वापरले पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नसताना \"आधी रस्ते करा... खड्डे भरा...', वगैरे मागण्या सुरू आहेत. जीवावर बेतणाऱ्या बेशिस्तीचे उदात्तीकरण सुरू आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष हिरिरीने उतरले आहेत. पुण्यासाठी हे चांगले नाही.\nविचार सलामत तर पगडी पचास\nअसाच प्रकार पगडी प्रकरणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चर्चेमध्ये आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून फुले पगडीचा आग्रह धरल्यापासून पगड्यांवरून ध्रुवीकरण सुरू आहे. पवार जाता जाता कधी टिप्पणी करत नाहीत. अनेकदा ते भूमिका टिप्पणी स्वरूपात मांडतात. टिप्पणी असल्याने प्रतिक्रिया आजमावता येतात आणि गरज पडेल, तशी सुधारित भूमिका मांडता येते. फुले पगडीचा आग्रह त्यांनी धरल्यानंतर अचानक पगडी या प्रतिकाला अनन्यसाधारण महत्व आले. \"ते फुले पगडी मागतात, तर आम्ही पुणेरी पगडीच मागणार,' अशी ध्रुवीकरणाची भूमिका समोर आली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणे शहराचे प्रतीक म्हणून पाहुण्यांचा सन्मान म्हणून त्यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी चढवली जाते. ती पगडी फुले पगडी असावी की पुणेरी असा ताजा वाद आहे. प्रतीके उभी करणे, त्यांच्याभोवती वलय निर्माण करणे आणि त्या वलयातून प्रतीके अधिकाधिक घट्ट करत नेणे असे काम समाजात सुरू असते. सारेच आज प्रतीकांमध्ये इतके गुरफटले आहेत, की पगडीखाली डोके आहे याचाही विसर पडतो आहे. पदवीदान समारंभ उद्याच्या विद्वानांना शाबासकी देण्यासाठी असतो, याबद्दल बोलले पाहिजे. विद्यापीठात पाहुण्यांचा सन्मान पुणेरी पगड्यांनीच होतो, हे कोणी ठरवले, हा प्रश्नही विचारला पाहिजे.\nगळती, टॅंकर लॉबीबद्दल बोला\nपुण्याला नेमके किती पाणी हवे, यावरून होणारी चर्चा, आंदोलने आणि टीका-टीप्पणीही अशीच टोकाची आहे. येत्या सहा महिन्यांत पाणीटंचाई वाढेल. अशा वेळी पाणी जपून वापरण्याचा संदेश द्यायलाच हवा. मात्र, लोकानुनय करणाऱ्या 'पुण्याला पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे,' अशा घोषणा राजकीय नेत्यांना सोयीच्या वाटतात. पाणी पुरेसे म्हणजे किती याचे काही निकष आहेत. ते निकष कधी तपासणार कागदोपत्री अधिकचे पाणी मिळत असेल, तर टंचाई का कागदोपत्री अधिकचे पा���ी मिळत असेल, तर टंचाई का गळतीवर वर्षानुवर्षे कुणी टॅंकर लॉबी पोसली गळतीवर वर्षानुवर्षे कुणी टॅंकर लॉबी पोसली पुणेकरांच्या मनात रोजच हे प्रश्न पडतात. पाच वर्षांतून एकदा ही उत्तरे नागरिक शोधतातच. त्यामुळे, आज याबद्दलची भूमिका घेताना दूरदृष्टी ठेवलीच पाहिजे. पाणी कमी नाही; गळती-चोरी अधिक आहे, हे मान्य केले पाहिजे आणि ते रोखण्यासाठी काम केले पाहिजे.\nहेल्मेट पाणी water पुणे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राजकारण आरोग्य health आंदोलन खड्डे राजकीय पक्ष political parties शरद पवार sharad pawar पाणीटंचाई\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-25T07:22:41Z", "digest": "sha1:X46DWNWKAXX3RGBXLQVZI67NWEPKPHKF", "length": 8455, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "३२. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : कॅश रजिस्टर - विचारप्रवाह", "raw_content": "\n३२. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : कॅश रजिस्टर\nनॅशनल कॅश रजिस्टरची कथा जेम्स रिटी यांच्यापासून सुरु होते. ऐन तारुण्यात रिटी यांनी अमेरिकन गृहयुद्धात सहभाग नोंदवला होता. युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी दारुचे एक सलून उघडले. परंतु त्या सलूनमध्ये काम करणारे काही नोकर ग्राहकांकडून मिळालेले पैसे परस्पर लाटत असत. त्यामुळे रिटी यांना त्यांच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागत होते. एकदा ते समुद्रमार्गे युरोपच्या प्रवासावर निघाले. तेंव्हा त्यांना जहाजावर एक वैशिष्टपूर्ण असे यंत्र दिसले. जहाजाच्या तळाशी जहाजाला पुढे ढकलण्यास सहाय्य करणारा एक पंखा असतो. हा पंखा एकंदरीत किती वेळा फिरला याची नोंद जहाजावरील ते यंत्र ठेवत होते. त्या यंत्राचे कार्य पाहून रिटी यांना एक कल्पना सुचली. त्यातून त्यांना एक पूर्णतः नवे यंत्र बनवण्याची प्रेरणा मिळाली.\nआपल्या दुकानातील दैनंदिन व्यवहाराची नोंद रहावी अशी रिटी यांची ईच्छा होती. तेंव्हा अमेरिकेस परतताच त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. रिटी यांचे बंधू एक मेकॅनिक होते. त्यामुळे याकामी त्यांनी आपल्या भावाची मदत घेतली. मनासारखे यंत्र तयार करण्यासाठी त्यांस बरेच कष्ट घ्यावे लागले. परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न करुन रिटी यांनी आपली कल्पना अखेर प्रत्यक्षात उतरवली. १८७९ साली त्यांनी आपल्या शोधाचे पेटंट घेतले. रिटी यांचे यंत्र विक्रीच्या व्यवहाराची कौशल्याने नोंद करु शकत असे. परंतु सुरुवातीला त्यांच्या यंत्रात पैसे जमा करुन ठेवता येतील असा गल्ला नव्हता.\nजेम्स रिटी यांचे पहिले कॅश रजिस्टर\nपेटंट घेतल्यानंतर जेम्स रिटी यांनी एक छोटासा कारखाना उघडून ‘कॅश रजिस्टर’ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या कंपनीस ‘जेम्स रिटीज् न्यू कॅश रजिस्टर अँड इंडिकेटर’ असे नाव दिले. पण इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे समकालिन लोकांना कॅश रजिस्टरचे महत्त्व चटकन लक्षात आले नाही. शिवाय एकाहून अधिक उद्योग सांभाळणे ही रिटी यांच्याकरिता जणू तारेवरची कसरत ठरत होती त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वीच्याच व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले व कॅश रजिस्टरचा आपला हा व्यवसाय विकून टाकला. पुढे १८८४ साली रिटी यांच्या कंपनीचे ‘नॅशनल कॅश रजिस्टर कंपनी’ असे नामांतरण करण्यात आले. तेंव्हा जॉन पॅटरसन हे या कंपनीचे मुख्य मालक म्हणून काम पहात होते. एखादी वस्तू कशी विकावी त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वीच्याच व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले व कॅश रजिस्टरचा आपला हा व्यवसाय विकून टाकला. पुढे १८८४ साली रिटी यांच्या कंपनीचे ‘नॅशनल कॅश रजिस्टर कंपनी’ असे नामांतरण करण्यात आले. तेंव्हा जॉन पॅटरसन हे या कंपनीचे मुख्य मालक म्हणून काम पहात होते. एखादी वस्तू कशी विकावी याचा वस्तुपाठ पुढे जॉन पॅटरसन यांनी जगासमोर घालून दिला. आयबीएम कंपनीला उत्कर्षावर नेणारे थॉमस जे. वॉटसन हे देखील त्यांना आपला आदर्श मानत असत.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n५४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ट्युरिंग मशिन : भाग २\n१६. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : शीतयुग आणि सत्ताबदल\n६४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : प्रकल्पास सुरुवात\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार ��वार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/intelligent-traffic-monitoring-system-pune-mumbai-express-way-consultant-appoint-cm-devendra-fadnvis/", "date_download": "2019-03-25T07:49:33Z", "digest": "sha1:IFIPIPNBXHS44CX73MP6ZOZTZHILM24Z", "length": 12285, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हे सुद्धा नसे थोडके…! निर्णयाच्या दोन वर्षांनी सल्लागाराची नेमणूक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहे सुद्धा नसे थोडके… निर्णयाच्या दोन वर्षांनी सल्लागाराची नेमणूक\nपुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर “इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ उभारणार\nपुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग अर्थात एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी “इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ उभारण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला. आता शासनाने ही यंत्रणा राबविण्यासाठी सल्लागार नेमला आहे. विशेष म्हणजे, निर्णयाच्या तब्बल दोन वर्षांनी सल्लागार नेमला जाणार आहे.\nद्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर 7 जून 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये द्रुतगती महामार्गावर वरील अपघात रेखण्यासाठी “इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यामध्ये इंजिनीअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट, आणि इमर्जन्सी या चार गोष्टींवर भर देण्याचे ठरले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर ही यंत्रणा उभारण्यासाठी सल्लागार समिती नेमली आहे.\nराज्य रस्ते वाहतूक महामंडळाने यासंबंधीची पहिली बैठक शनिवारी बांद्रा येथे आयोजित केली होती. यामध्ये महामंडळ, सल्लागार नेमलेल्याया संस्थेच्या अधिकाऱ्यांसह, परिवहन आयुक्तालय, राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), सेव्ह लाइफ फाउंडेशन, आयआरबी आदीचे अधिकारी उपस्थित होते. ही पहिलीच बैठक असल्याने यामध्ये प्राथ��िक चर्चा करण्यात आली. येत्या काळात आणखी बैठका होणार आहेत. द्रुतगती महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याचा निर्णय, त्या अंतर्गत कमांड सेंटरसह संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारली जाणार आहे.\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nपुणे – फळांच्या राजाच्या आगमनासाठी ‘रेड कार्पेट’\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\nपुणे – अपघाती मृत्यू रोखण्यासाठी आता नोडल अधिकारी\nपुणे – अंदाजपत्रकीय तूट 1,800 कोटींच्या घरात\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नग��मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/sanjay-jadhav/", "date_download": "2019-03-25T08:33:09Z", "digest": "sha1:N77AS3KRUDY2VCGFWXWOEG2QZMO3RKB7", "length": 2778, "nlines": 51, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Sanjay Jadhav - मराठी कलाकार", "raw_content": "\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nमराठी मनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्का, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर...\n“हे”विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.\nनुकतंच ‘लकी’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तूफान...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/books/nadigrantha-ek-abhyas/", "date_download": "2019-03-25T07:43:47Z", "digest": "sha1:K3ITIHOLTBXDKPG2VBTYB5ZATUMSTL5Q", "length": 8229, "nlines": 60, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nनाडीग्रंथ एक अभ्यास (१९६८)\nआठवले यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास होता. ते या शास्त्राकडे का वळले याची कथा मजेशीर आहे. व्ही शांताराम आणि प्रभात हे भिन्न नाहीत अशी खात्री असताना ते प्रभात सोडून जाणार अशी अफवा पसरली असताना आठवले प्रभात, व्ही शांताराम आणि प्रभातचे इतर भागीदार यांच्या कुंडल्या घेऊन होराभूषण दीक्षित यांच्याकडे गेले आणि ग्रहांचे काही कारस्थान आहे का याचा शोध घेतला. पण होराभूषण यांनी वर्तवलेले भविष्य खोटे ठरले आणि व्ही शांताराम १३ एप्रिल १९४२ रोजी प्रभात सोडून गेले. अशक्य ते शक्य करणारे दैव माणसापेक्षा श्रेष्ठ आहे याचा पडताळा आला. आठवले यांनी याच्या मुळाशी जायचे ठरवले आणि त्यांनी बाजारात जाऊन ज्योतिष शास्त्रावरील पुस्तके विकत आणली. 'Astrological Magazine' नावाच्या बंगलोरहून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकाचे ते वर्गणीदार झाले. हस्तरेखा आणि कुंडली पाहून भविष्य सांगता येण्याइतके ज्ञान त्यांनी प्राप्त केले.\nत्यांचे एक मित्र श्री, भडसावळे यांच्यामुळे त्यांचा 'नाडीग्रंथ' या ज्योतिष शास्त्रातल्या चमत्काराशी परिचय झाला. प्राचीन ऋषींनी ताम्र पट्ट्यांवर आगामी कैक पिढ्यांचे भविष्य लिहून ठेवले आहे. जन्म वेळेप्रमाणे एकेक पट्टी असते. या पट्टीवर आयुष्यात घडून गेलेला प्रसंग वर्णन केलेला असतो. ते वर्णन जर भूतकाळाशी जुळले तर योग्य ती पट्टी गवसली आहे असा निष्कर्ष काढून मग त्यावरचे भविष्य जाणून घेता येते. भडसावळे यांच्या पट्टीवर त्यांच्या सोबत आलेल्या गृहस्थांचे म्हणजेच आठवले यांचे अचूक वर्णन आलेले पाहून ते आश्चर्याने थक्क झाले. या चमत्काराचे डोळस संशोधन करायला प्रवृत्त झाले. विषयाचा पाठपुरावा करुन तसे तेरा ग्रंथ असल्याचे त्यांनी शोधले. त्या संशोधनावर आधारित पुस्तक लिहिले ते 'नाडीग्रंथ- एक अभ्यास'. हे 'मनोहर ग्रंथमाले'चे प्रकाशन होते.\nसाधा विषय मोठा आशय\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/dhanagar-reservation-monday-agitation-sun-137329", "date_download": "2019-03-25T08:35:00Z", "digest": "sha1:IGMLN7NLOA4W2JOIS4X6C3G6EHWACYBO", "length": 14350, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "For the Dhanagar reservation, on Monday the agitation by the Sun धनगर आरक्षणासाठी सोमवारी सनदशीर मार्गाने आंदोलन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nधनगर आरक्षणासाठी सोमवारी सनदशीर मार्गाने आंदोलन\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nभिगवण : धनगर आरक्षणासाठी सोमवारी (ता.13) सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असुन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भिगवण बंद न करण्याचा निर्णय येथील पोलिस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. सोमवारी बंद न करता धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधींना देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.\nभिगवण : धनगर आरक्षणासाठी सोमवारी (ता.13) सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असुन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भिगवण बंद न करण्याचा निर्णय येथील पोलिस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. सोमवारी बंद न करता धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधींना देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.\nधनगर समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.13) महाराष्ट्र बंद व भिगवण बंद राहणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरत होत्या. त्या पार्श्वभुमीवर येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींची बैठक पोलिस ठाण्यामध्ये आयोजित केली होती. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अॅंड. महेश देवकाते, धनाजी थोरात, रामहरी चोपडे, तानाजी पाटील, कुंडलीक बंडगर, तेजस देवकाते, तुषार झेंडे, महेश शेंडगे,अण्णा धवडे पोलिस पाटील तनुजा कुताळ उपस्थित होते.\nयावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड म्हणाले, बंदमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांचे हाल होतात. आंदोलनावेळी अऩेकदा समाजातील युवकांवर गुन्हे दाखल होतात व युवकांचे करिअर अडचणीत येते. धनगर समाजाच्या वतीने भिगवण बंद न ठेवण्याचा निर्णय स्तुत्य आहे. यावेळी महेश देवकाते, हनुमंत बंडगर, रंगनाथ देवकाते, धनाजी थोरात, संपत बंडगर, आबा बंडगर, तुकाराम बंडगर,धनाजी थोरात दादा थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.\nLoksabha 2019 महाआघाडीचं जमलं\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०��ा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात...\nमेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)\nहळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून...\nसांस्कृतिक उद्योजकतेचा मनोरम अविष्कार (प्रा. क्षितिज पाटुकले)\nकंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो....\nLoksabha 2019 : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक\nसांगली - येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक...\nकोल्हापुरातील गगनगिरी पार्क 14 वर्षांपासून पाण्यापासून वंचित\nकोल्हापूर - फुलेवाडी रिंग रोडपासून केवळ एका किलोमीटरवर असलेल्या आणि शहराच्या पश्चिमेस बोंद्रेनगर परिसरात वसलेल्या गगनगिरी पार्कमधील नागरिकांना तब्बल...\nLoksabha 2019 : गोपीचंद पडळकर यांची सांगली लोकसभा लढण्याची घोषणा\nविटा - संजयकाका आता याच मैदानात, कोण लायकीचं आहे ठरवू, असे उघड आव्हान देत धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/vaya-maza-sola/", "date_download": "2019-03-25T07:44:12Z", "digest": "sha1:3QTMB7FU2PDPHQKU7SBHLHD6QDOIKQQL", "length": 6811, "nlines": 74, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २�� जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nगोरे गोरे गाल, ओठ माझे लाल\nमुसमुसला हो कसा मुसमुसला.\nशुक शुक, शुक शुक करता\nटक मक टक मक बघता\nवाट चुकला हो पंछी वाट चुकला.\nदारी होते उभी, पाहिली तुमची छबी\nचंद्र जसा नभी, चंद्र नभी\nझगमगला हो कसा झगमगला.\nनिमिषाचा खेळ, झाला हृदयाचा मेळ\nलाऊ नका वेळ आता लाऊ नका वेळ\nसंग घेऊन चला मला संग घेऊन चला.\nवय माझं सोळा, जवानीचा मळा\nमंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nनका बोलू असे दूर दूर बसून\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/in-nagpur-bjp-leader-kamlakar-pohankar-and-five-others-of-his-family-were-murdered-36986-2/", "date_download": "2019-03-25T08:17:14Z", "digest": "sha1:U77TMTG3FKNF3IFHXR6BIIAUEUX6O6XN", "length": 5701, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धक्कादायक! नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\n नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या\nनागपूर : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडलाय, नागपुरातील दिघोरी येथे भाजप नेते कमलाकर पोहनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची आज पहाटे हत्या करण्यात आलीये. दरम्यान या प्रकाराने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून, तर्क – वितर्कांना उधान आलय.\nकमलाकर पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. कमलाकर पोहनकर, वय ५१ वर्ष, वंदना पोहनकर, वय ४० वर्ष, वेदानी पोहनकर, वय १२ वर्ष, मीराबाई पोहनकर, वय ७२ वर्ष, कृष्णा पालटकर, वय २ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.\nदरम्यान, कमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. कमलाकर पोहनकर आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमाधुरीने भाजपची खासदारपदाची ऑफर नाकारली\nअहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ करा – संभाजी भिडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2016-Papai.html", "date_download": "2019-03-25T07:54:11Z", "digest": "sha1:ZLUL6W5RH5JJ75V4A6RU7N6PS2GVMYS3", "length": 8406, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - व्हायरसने ग्रासलेला (वेढलेला) २ एकर पपई प्लॉट रोगमुक्त ३० टन, दर १५ ते २२ रु./किलो, खर्च १।। लाख, उत्पन्न ५ लाख, अजून १५ ते २० टन अपेक्षीत", "raw_content": "\nव्हायरसने ग्रासलेला (वेढलेला) २ एकर पपई प्लॉट रोगमुक्त ३० टन, दर १५ ते २२ रु./किलो, खर्च १ लाख, उत्पन्न ५ लाख, अजून १५ ते २० टन अपेक्षीत\nश्री. अशपाक प्यारूसाहेब पाटील, मु.पो.औंज (म.), जि. सोलापूर. मो. ९७३०९७११८४/९७३०४६२७७६\nमी अशपाक पाटील मुळचा मंगळवेढ्याचा. पण तेथे पाणी कमी असल्याने शेती व्यवसाय अडचणीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही सर्व परिवारासह मामाच्या गावी म्हणजे औंज (म.), ता. दक्षिण सोलापूर येथे आलो. त्याठिकाणी आम्ही मामाच्या शेतामध्ये बटाईने म्हणजे वाट्याने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि २ एकर पपई लागवड करण्याचे ठरविले.\nआम्ही ८ ऑक्टॉबर २०१५ रोजी २ एकरमध्ये पपईची लागवड केली. आम्हाला २००० रोपे लागली. खुप अडचणीमधून हा निर्णय घेतला होता. लागवड ७' x ६' वर आहे. वाण - तैवान ७८६ निवडला. मात्र लागवडीपासून ३ महिन्यामध्येच आमचा प्लॉट हा पुर्ण व्हायरस रोगाने वेढला. आम्ही औंज भागातील बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्लॉट दाखविला. मात्र रोगाचा प्रादुर्भाव फारच असल्याने त्यांनी आम्हाला हा प्लॉट काढून टाकण्याच्या सल्ला दिला. त्यावेळी खूप दु:खी झालो. योगायोगाने इंटरनेटवर माहिती सर्च करत असताना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे ऑफिसला फोन केला असता आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी नागेश पाटील यांची माहिती मिळाली. त्यानंतर नागेश पाटील (मो.९६८९५०९९७६) यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्लॉटवर बोलावून मार्गदर्शन घेतले. त्यांनी मला हा प्लॉट न काढण्याचा सल्ला दिला व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पपई व्हायरस मुक्त करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ असा आशावाद व्यक्त केला.\nत्यानंतर व्हायरस नियंत्रणासाठी नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ८ - ८ दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, हार्मोनीच्या २ फवारण्या केल्या आणि जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले. एवढ्यावर १५ - २० दिवसात पुर्ण व्हायरसमुक्त बाग झाली. त्यानंतर गरजेप्रमाणे १५ दिवस ते १ महिन्याच्या अंतराने नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या आजतागायत चालू आहेत.\nजून २०१६ मध्ये पपईचे तोडे चालू झाले. आठवड्याला २ ते ३ टन माल निघत होता. सुरुवातीला पाऊस नसल्याने उष्णता अधिक होती. त्यामुळे फळे लवकर पोसत होती. २ ते ३ टन माल निघत होता. सुरुवातीला पाऊस नसल्याने उष्णता अधिक होती. त्यामुळे फळे लवकर पोसत होती. २ - ३ महिने याप्रमाणे उत्पादन मिळत गेले. नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असल्यामुळे मालाचा दर्जा वाढला. आकर्षक कलर व एकसारखी फुगवण यामुळे मुंबईचे व्यापारी जागेवरून १८-२०-२२ रु./किलो भावाने पपई घेत असे. ५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत ३० टन माल निघाला आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज परतीचा पाऊस (अतीवृष्टी) पडत असल्याने माल कमी झाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत बाग डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्यांमुळे सुस्थितीत आहे. सध्या भाव १५ - १६ रु./किलो मिळत आहे. अजून ३ महिने पपई चालेल. तेव्हा अजून किमान १५ ते २० टन उत्पादन सहज मिळेल.\nआमच्या बागेच्यासोबत परिसरात जवळपस २० एकर पपई लागवड झाली होती. मात्र आपल्या बागेतील झाडांवर लागलेला माल पाहता तसा इतरांच्या कोणाच्याच बागेवर दिसत नाही, असे व्यापाऱ्यांचे देखील म्हणणे आहे. विशेष म्हणजे व्हायसर रोगाच्या अती प्रादुर्भावाने प्लॉट काढण्याची वेळ माझ्यावर आली होती, मात्र अशा परिस्थितीतून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने नुसता प्लॉट वाचला नाही तर दर्जेदार माल निघून भावही १८ ते २२ रु./किलो मिळाल्याने आम्हाला ५ लाख रु. उत्पन्न मिळाले असून अजून ३ महिने फळांचे तोडे चालतील. या प्लॉटला एकूण खर्च १ लाख रु. आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/rajasthan-high-court-questions-centres-decision-to-broadcast-condom-ads-at-night-latest-updates/", "date_download": "2019-03-25T08:12:28Z", "digest": "sha1:EWG3LJHDCCF5YU2WZVZTYY4FEQIRRLDG", "length": 6598, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कंडोमच्या जाहिराती फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच का दाखवाव्यात?-हायकोर्ट", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्याव���ून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nकंडोमच्या जाहिराती फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच का दाखवाव्यात\nटीम महाराष्ट्र देशा- कंडोमच्या जाहिराती या दिवसा न दाखवता फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच का दाखवाव्यात असा रोकठोक सवाल राजस्थान उच्च न्यायालयाने केंद्र सरकारपुढे उपस्थित केला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कंडोमच्या जाहिराती दिवसा दाखवण्यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर केंद्र सरकारवर समाज माध्यमातून मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे याप्रकरणी उच्च न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे.\nयाआधी टीव्ही सुरू असताना अचानक कंडोमची जाहिरात लागली आणि ती मुलांनी बघायला सुरुवात केली की वयस्कांना प्रचंड अवघडल्यासारखं होतं, या जाहिरातींचे मुलांवर वाईट परिणाम होतात, या जाहिराती बघून मुलं पालकांना हे काय आहे असे प्रश्न विचारायला लागतात अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या जाहिराती दाखवायच्या असतील तर त्या रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतच दाखवू शकता असे आदेश या मंत्रालयाने जारी केले होते. उच्चन्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह केंद्र सरकारचे मुख्य सचिव व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव यांनाही नोटीस जारी केली आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nसंघाच्या केशव भवनमध्ये झाडू मारणारा कार्यकर्ता ते देशाचा पंतप्रधान: नरेंद्र मोदींचा थक्क करणारा प्रवास \nमोदी आता म्हातारे झालेत त्यांनी सन्यास घेवून हिमालयात जाव – जिग्नेश मेवाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/591", "date_download": "2019-03-25T08:32:48Z", "digest": "sha1:EDVP2ECQAJJXRIBW76KCRZW3U5LX6UYU", "length": 3255, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nताडाच्या (borassus flabellifer) जगाच्या पाठीवर शंभर जाती आहेत. हा वृक्ष आफ्रिकेच्या उष्ण कटिबंध विभागातील आहे. त्याचा प्रसार भारतात (बंगाल, बिहार, पश्चिम व पूर्व द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी), श्रीलंकेत व ब्रह्म��ेशात आहे. भारतात त्यापैकी महत्त्वाचे चार प्रकारचे नीरा देणारे वृक्ष आढळतात. त्यांना ताड, शिंदी, भैरली, माड किंवा नारळी नावाने ओळखले जाते. विशेषत:, या झाडाचा गोड स्वादिष्ट रस आंबवून ताडीच्या स्वरूपात विकला जातो. म्हणून त्यांना ताडीची झाडे म्हणूनसुद्धा ओळखतात. ताड हा नारळीसारखा उंच वाढतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/page/3/", "date_download": "2019-03-25T07:22:09Z", "digest": "sha1:L3UPNGNW5LFZ366XATAVDFF7S5IFVB6D", "length": 9482, "nlines": 92, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "वा. न. सरदेसाई - Part 3", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nतुझ्या पापणीचा . .\nवृत्त : वीणावती गण : लगागा x ३+ लगा (सौदामिनी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे ) तुझ्या पापणीचा इशारा नको . . मला आश्रितांचा सहारा नको कसे शब्द माझे करू …\nएकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे . . फक्त माझे गीत माझ्यासोबती येणार आहे . . मी तुम्हाला घ्या म्हणालो …\nहा असा चंद्र अशी रात फिरायासाठी रोहिणीची पण ना सोबत रायासाठी मेणबत्तीस पुसा त्याग कसा असतो ते . . जाळणे जन्म …\nतिमिरात कोरले मी . .\nतिमिरात कोरले मी हे चंद्र सूर्य तारे उच्छवास श्वास माझे झाले दिगंत वारे . . मी जागवीत जातो स्वप्नातल्या कळीला …\nपुन्हा न चांदणे असे . .\nवृत्त : प्रभाव गण : लगालगा लगालगा लगालगा लगा पुन्हा न चांदणे असे पडायचे कधी . . पुन्हा न ह्रदय एवढे …\nआम्ही कोल्याची पोरं पितो दर्याचं वारं .. सरा सकाली शेंदरी कुनी वाटंनं टाकला लाल मंगलोरी कौलावं कसा गुलाल फाकला पिवल्या उन्हाच्या कांडीनं …\nजितता न ये . .\nवृत्त : मानसहंस गण : ललगालगा x ३ जितता न ये , हरता न ये , कसले जिणे रण सोडुनी फिरता न ये …\nवृत्त : मध्यरजनी गण : गालगागा गालगागा गालगागा गालगागा (व्योमगंगा प्रमाणे ) कागदी तुमच्या फुलांना महकता मकरंद आहे रोज हा तोंडात माझ्या ठिबकता गुलकंद …\nहे दुटप्पी वागणे बरे नाही . .\nवृत्त : दिंडी गण : एकूण मात्रा १९ ( ९ + १० ) .मात्रांची रचना हे दुटप्पी वागणे बरे नाही . . फुंकरीने जाळ्णे बरे नाही तू दिले नाहीसही जरी …\nत्याला म्हणतात . .\nटुणकन् नाकतोडया उडी मारतो आपला अंदाज साफ चुकतो मग आपण चोळतो गाल त्याला म्हणतात . . स्पिन बॉल आधाशी कावळा कर्कश …\nबाबा पुस्तक वाचतात त्याची कोण गंमत त्यांच्याजवळ जायची नाही बाई हिंमत . . इतका जाड चष्मा एवढे मोट्ठे डोळे वाचताना त्यांची …\nआज नव्यानं लाजते . . .\nकाळजाची धडधड कोणी चोरून ऐकते सोळा वरसांत यंदा आज नव्यानं लाजते . . आलं लावणीचं दीस झाला चिखलमाखल शेतामधे विरघळे लाल …\nगोड ओझरते तसे स्मित\nवृत्त : विबुधप्रिया गण : गालगा ललगालगा गालगा ललगालगा गालगा ललगालगा गोड ओझरते तसे स्मित सांडुनी बघतेस का शिंपल्यावर चांदणे , मज …\nना ये कामी वित्ताची श्रीमंती\nगण -गागागा गागागा गागागा गा ना ये कामी वित्ताची श्रीमंती हाती लागे माती जन्माअंती त्रैलोक्याचा राणा तोची जाणा ज्याच्यापाशी चित्ताची श्रीमंती \nश्री. वा. न. सरदेसाई दिग्दर्शित नाटक – फोटो क्र.15\n‘ रंगश्री ‘ नाट्यसंस्था (शहादा ) – नाटक : तेथे पाहिजे जातीचे दिग्दर्शन व अभिनय – श्री. वा. न. सरदेसाई भूमिका …\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/31-days-movie-review-in-marathi/moviereview/65061875.cms", "date_download": "2019-03-25T08:56:12Z", "digest": "sha1:6DFDNQF5JIB3OBOQMEEOI3LL7SW3TRVL", "length": 31781, "nlines": 224, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "31 Days Review, ३१ दिवस सिनेरिव्ह्यू, 31 Days Review in Marathi", "raw_content": "\nपुष्कराज धनवडे या चिमुरड���याची सुख..\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थ..\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं ..\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल..\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय क..\nपाहा: प. बंगालमधील बेलूर मठाच्या ..\nइब्राहिम अफगाण, महाराष्ट्र टाइम्स, Fri,20 Jul 2018 12:52:08 +05:30\nआमचं रेटिंग: 2 / 5\nवाचकांचे रेटिंग :2.5 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतशशांक केतकर,मयुरी देशमुख,रीना अगरवाल,राजू खेर\nकालावधी2 hrs. 15 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\nकाही संकल्पना अशा असतात की कोणीही त्याच्या मोहात पडावं. अशा विलक्षण, आऊट ऑफ द बॉक्स संकल्पनासाठी चित्रपट उद्योगच नव्हे तर प्रेक्षकदेखील वाट पहात असतात. मात्र ती एका सफल चित्रपटात रुपांतरीत करण्यासाठी, ती संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याचे कथेत रूपांतर करण्याचे कसब नसेल तर त्याचे मूल्य शून्यच.\n\"३१ दिवस\" हा चित्रपट एक आंधळा दिग्दर्शक चित्रपट दिग्दर्शित करतो अशी आहे. ही असंभवनीय वाटणारी गोष्ट असली तरी उत्तम चित्रपटासाठी प्रत्यक्षात आणण्याकरिता लागणारी मेहनत न घेतल्याने, कथेतील प्रारंभापासून शेवटापर्यंतच्या कालप्रमाणाचे भान न ठेवल्याने आणि मूळ संकल्पनेला केवळ शेवटी कामी आणल्याने त्यापूर्वीचा सगळा प्रपंच व्यर्थ ठरला आहे.\nकथातंत्राच्या जाणिवेचा अभाव, अवास्तविक कल्पना आणि निकामी (कथा कथानकात काहीही भूमिका किंवा काम नसलेली) पात्रे याचीच रेलचेल असलेला हा चित्रपट चांगली संकल्पना असूनही वाया गेला आहे.\nकॉलेजमध्ये एकांकिका बसवणाऱ्या एका तरुणाला सिनेमाचा दिग्दर्शक व्हायचे असते. त्यासाठी तो फक्त घरी स्क्रिप्ट लिहीत बसतो. पण वडील गेल्यावर त्याला दिग्दर्शक होण्यासाठी केवळ स्क्रिप्ट लिहिण्यापलिकडे जायला हवे असे वाटते, असे म्हणून तो वडिलांच्या बॅंकेत खाते व त्यांच्याशी ओळख असलेल्या निर्मात्याकडे ती देतो.\nदरम्यान, कॉश्च्युम असिस्टंट म्हणून सिरियलसाठी काम करू लागतो. एक दिवस डिरेक्टर येत नाही तेव्हा त्याला डिरेक्टर बनायची संधी मिळते आणि त्याचवेळी त्याची स्क्रिप्ट आवडल्याने त्याला चित्रपटाचे दिग्दर्शन करायची संधी मिळते. मात्र त्याच वेळी अपघात होऊन त्याला अंधत्व येते. तरीही तो हा चित्रपट कसा पूर्ण करतो अशी ही कथा आहे.\nकथा खूप उशीरा सुरू होत असल्याने निम्मा चित्रपट हा नेमका कशाबद्दल आहे, याचाच विचार करण्यात जातो. (त्या अर्थाने तो विचार करायला लावणारा चित्रपट म्हणू शकतो.) गोष्टी सोप्या करत गेल्यामुळे त्याच्यातील संघर्ष गायब झाला आहे आणि असंभवनीय गोष्टी दाखवण्याच्या नादात अविश्वसनीयता निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे मिळत नाहीत. म्हणून यातील तांत्रिक दर्जा व कलाकार या महत्वाच्या जागाही उत्तम असूनही त्याचा उपयोग झालेला नाही.\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृ��या त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबॉलिवूड क्वीन कंगना रणौत\nमर्द को दर्द नहीं होता सिनेमाचा पब्लिक रिव्ह्यू\n'केसरी' सिनेमाचा पब्लिक रिव्ह्यू\nछोट्या हत्तीची धमाल-मस्ती, 'जंगली' चित्रपटाची उत्सुकता शिगेला\nअक्षय कुमारने धरला सैनिकांसोबत ताल\n...आणि अक्षयला महिला सैनिकाने उचलून आपटले\nकतरिनाने स्वत:लाच दिलं 'हे' गिफ्ट\n'टाइम्स म्युझिक मराठी'ने आणलं 'वारा पहाटवारा'\nम्हणून आलिया स्लिम अँड ट्रिम आहे\nबॉलीवूडची स्लिम-ट्रिम अभिनेत्री आलिया\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\nफ्लिपकार्ट मोबाईल बोनान्झा विक्री\nकुंडली 25 मार्च 2019\nअमेझॅन फॅब फोन विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/dr-babasaheb-ambedkar-marathwada-university-vice-chancellor-inquiry-ordered/", "date_download": "2019-03-25T08:10:56Z", "digest": "sha1:4REGZGGUYFWGYDEVLFONKX4ZA3QS3BFL", "length": 6229, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या चौकशीचे आदेश", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या चौकशीचे आदेश\nऔरंगाबाद: उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची चौकशी समिती नेमण्याची घोषणा विधानपरिषदेत केली. ही समिती दोन महिन्यात वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्यपालांना सादर करणार आहे. घोषणेनंतर लगेचच याविषयीचा शासन निर्णयही काढण्यात आला असून या शासन निर्णयात विविध समितीच्या कामकाजाविषयी स्पष्टीकरण देण्यात आले.\nका दिले चौकशीचे आदेश \nविद्यापीठात शासकीय कामकाज विद्यापीठ कायद्यानुसार होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींनी केल्या होत्या. याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांच्या शिष्टमंडळानेही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत कुलगुरूंनी केलेल्या अनियमिततेविषीयी निवेदन दिले होते. यानंतर आमदार चव्हाण यांनी विधानपरिषदेत नियम २६० अन्वये झालेल्या चर्चेत विद्यापीठाचा कारभार आणि कुलगुरूंच्या आर्थिक भ्रष्टाचारांची मुद्देसुद मांडणी केली होती.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nकोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना ५ वर्षांची शिक्षा\nVideo- देसाई,एकबोटे,भिडेंवरील खोटे गु��्हे मागे घ्या; राज्यभर संभाजी भिडेंंचे समर्थक रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/girish-bapat-is-clear-about-corruption-in-the-state-dhananjay-munde/", "date_download": "2019-03-25T08:11:50Z", "digest": "sha1:CIU7J3KPAP3KFBPS45GCUABDBXUGUWBG", "length": 4948, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गिरीश बापट यांनी राज्यात तुरडाळीत भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट- धनंजय मुंडे", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nगिरीश बापट यांनी राज्यात तुरडाळीत भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट- धनंजय मुंडे\nपुणे: हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सरू आहे. आज यात्रेचा दहावा दिवस असून पुण्यात वारजेत झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. तूरडाळीच्या भ्रष्टाचारावरून त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला.\nधनंजय मुंडे म्हणाले, गिरीष बापट यांच्याविरोधात मी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते, की धनंजय मुंडे यांचे आरोप खोटे आहेत. आज कॅगच्या अहवालात स्पष्ट होत आहे. की राज्यात तुरीच्या डाळीत भ्रष्टाचार झाला. असा आरोप मुंडे यांनी केला.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nचेन्नई सुपर किंग्जचे होमग्राऊंडवरील सर्व सामने रद्द,सामने इतरत्र खेळवले जाणार\nकालच्या गळाभेटीनंतर धनंजय मुंडेनी चिक्की घोटाळ्यावरून आज बहिणीवर साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/updated-muslims-are-large-hearted-they-did-not-take-objection-mughal-e-azam-says-azma-khan-on-padmavati-issue/", "date_download": "2019-03-25T08:03:24Z", "digest": "sha1:M2N3TJ6N5QXBHI3XFAZIOVMF5AUOTWJR", "length": 6456, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्लिम समाज मोठ्या मनाचा ;‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाला मुस्लीम समाजाने विरोध केला नाही.", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nमुस्लिम समाज मोठ्या मनाचा ;‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाला मुस्लीम समाजाने विरोध केला नाही.\nटीम महाराष्ट्र देशा – ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उडी घेतली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड असणाऱ्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टी ऐतिहासिक संदर्भाशी मिळत्याजुळत्या नव्हत्या.\nमात्र, मुस्लिम समाज मोठ्या मनाचा असल्यामुळे त्यांनी चित्रपटाला विरोध केला नाही, असे आझम खान यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.पद्मावती हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, करणी सेनेसारख्या संघटनांच्या विरोधामुळे सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करत निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यास भाग पाडले होते. या पार्श्वभूमीवर आझम खान यांनी मंगळवारी जाहीर कार्यक्रमात भाष्य केले.\nसध्या देशात एका चित्रपटाच्या कथानकावरून वाद निर्माण झाला आहे. भारतीय सिनेसृष्टीतील ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटात अनारकलीला सलीमची प्रेयसी दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही नव्हते. तरीही कोणत्याही मुस्लिमाने या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. मुस्लिम समाज मोठ्या मनाचा आहे, त्यांना ही गोष्ट माहिती आहे की, एखादा चित्रपट आपला इतिहास बिघडवू शकत नाही, असे आझम खान यांनी म्हटले.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकोपर्डी निकाल: फाशी की जन्मठेप..\nकामाच्या ठिकाणी महिलांचे नव्हे तर पुरुषांचही लैगिक शोषण होते – सनी लिऑन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/a-day-when-first-independence-day-celebrated/", "date_download": "2019-03-25T07:34:23Z", "digest": "sha1:GUFO3FO5TVZ3H4LJNZ5LAWE37WREYFQQ", "length": 15192, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "प्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागचे तुम्हाला माहित नसलेले कारण!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागचे तुम्हाला माहित नसलेले कारण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआपण भारतीय उत्सवप्रिय माणसे आहोत, म्हणूनच इतर धार्मिक सणांप्रमाणे आपण राष्ट्रीय सण आणि उत्सव साजरे करतो. तसाच २६ जानेवारी- आपला प्रजासत्ताक दिन\nह्या दिवसाशी निगडीत आपल्या शाळेच्या दिवसाच्या खूप आठवणी असतात. आपण शाळेत झेंडावंदनासाठी पांढरा गणवेश, पांढरेशुभ्र शूज घालून जायचो, देशभक्तीपर गीतांवर नाच करायचो, समूहगीते म्हणायचो. काही उत्साही कार्यकर्ते भाषण द्यायचे.\nसगळा कार्यक्रम झाला की शाळेतून तिळगुळाची वडी मिळायची. मग घरी आल्यावर टीव्हीवर आपण पंतप्रधानांचे लालकिल्ल्यावरचे झेंडावंदन आणि भाषण बघायचो.\nमग २६ जानेवारीची राजपथावरील भव्य दिव्य परेड बघायचो. सेनेची अद्भुत प्रात्याक्षिके बघायचो. टीव्हीवर देशभक्तीपर चित्रपट आवर्जून दाखवला जायचा. तर एकूण २६ जानेवारी हा दिवस निदान लहानपणी तरी मस्त जायचा.\nपण मोठे झाल्यावर मात्र आपण २६ जानेवारी ह्या दिवसाकडे एक सुट्टी ह्याच दृष्टीने बघतो. २६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, ह्या दिवसापासून भारताची राज्यघटना अंमलात आली इतकेच आपल्याला माहित असते.\nपण २६ जानेवारी हि भारतासाठी एक ऐतिहासिक तारीख सुद्धा आहे हे बऱ्याच लोकांना माहित नसते.\n१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य तर मिळाले पण देशाचा कारभार अजूनही ब्रिटीशांच्याच नियमानुसार चालत होता. ह्या आधी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या भगत सिंग ह्यांनी १९२७ मध्येच कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये वक्तव्य केले होते की\nदेशाला जर पूर्ण स्वराज्य हवे असेल तर देशाचे स्वत:चे संविधान असायला हवे.\nभगत सिंग ह्यांचे हे विचार कॉंग्रेसचे युवा नेते नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनाही पटले.\nम्हणूनच कॉंग्रेसने ब्रिटीश सरकार समोर पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि देशाचे संविधान लागू करण्याविषयी सूचना केली. पण १९२८ मध्ये ब्रिटीश सरकारने हे अमान्य केले व ह्याचे कारण असे दिले की हिंदुस्थान हे सध्या स्वातंत्र्य मिळण्यायोग्य झाले नाही.\n१९२९ रोजी पंडित नेहरू ह्यांना कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष घोषित करण्यात आले. तेव्हा त्यांनी परत पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि १९३० मधील जानेवारीच्या एका रविवारी लाहोरच्या रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि योगायोगाने तो दिवस २६ जानेवारी हा होता.\nहा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिनासारखा साजरा करण्यात आला.\nह्यानंतर ब्रिटीशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध ह्यामुळे भारताला स्वातंत्र्यासाठी जास्त काळ लढा द्यावा लागला आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.\nस्वातंत्र्याच्या मागणीसोबतच स्वाधीनतेची मागणी सुद्धा ब्रिटिशांनी मान्य केली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान तयार झाले.\nपण ते अंमलात कधीपासून आणायचे ह्यावर नेत्यांची चर्चा झाली आणि त्यांच्या मनात २६ जानेवारी ही तारीख आली, कारण पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोरच्या अधिवेशनामध्ये लाहोरच्या रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवला होता तसेच तेव्हाच त्यांनी पूर्ण स्वराज्याची घोषणा सुद्धा केली होती.\nत्या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हाच दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडला आणि २६ जानेवारी 19५० पासून भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← RAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…\nIPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी – ‘बॅट विरुद्ध बॅट’ ते ‘बॉल विरुद्ध बॅट’ →\nजे भल्या भल्या देशांना जमलं नाही, ते ‘अक्षयपात्र’ भारताने निर्माण केलंय\nइंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं\nकुठे बोलल्या जाते ‘संस्कृत’ तर कुठे आहेत ‘सोलर इंजिनीअर्स’, अशी आहेत भारतातील ही ८ गावं\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\n२०१६ वर्षात ७६ वाघांची शिकार; Save Tigers अभियान ठरले फेल\nधावत्या रेल्वे इतक्या सफाईने रूळ ओलांडण्यामागे ही जबरदस्त यंत्रणा आहे\nकथा भारताच्या विश्वविजयाची आणि – शॅम्पेन उधार घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची…\nऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात\nप्रणयाचा आनंद स्त्री अधिक घेते की पुरुष वाचा पुराण काय सांगतात\nया देशात फक्त २७ लोक राहतात\nअनेक आरोग्याच्या समस्यांवर सर्वात सोपा उपाय : फ्रीजऐवजी माठात ठेवलेले पाणी प्या\nवडील करतात मोलमजुरी आणि मुलगा गुगल मध्ये करतो नोकरी\nसर्वात अपयशी करोडपती IPL खेळाडू : दर रन-विकेट-कॅच मागे लाखो रुपयांचा चुना\nजगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २\nहिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा ‘हंबीरराव मोहिते’\nमोदी सरकारकडून “शिक्षणाच्या आईचा…”\nराफेल: अंबानीला कंत्राट मिळालं HAL चं काम काढलं HAL चं काम काढलं कोर्टाने काय म्हटलं\nस्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nआईसलंडच्या नव्या पंतप्रधानांबद्दल तुम्हाला माहित आहे का\nतुमचापण रक्तगट O-निगेटिव्ह आहे का\nभारतीयांनी रोजच्या जीवनात आत्मसात केलेल्या ह्या ७ गोष्टी चक्क पाश्चात्यांच्या कॉपी आहेत\nमराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090612/main.htm", "date_download": "2019-03-25T08:23:02Z", "digest": "sha1:W5MIFTG3YAH6Y22WC3PVKZVKCXOU3XPT", "length": 18753, "nlines": 58, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १२ जून २००९\nनवी दिल्ली, ११ जून/खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांचे निकाल लागून १६ जूनला महिना होईल. पण दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील अस्वस्थता, खदखद आणि अंतर्गत धुसफूस कमी होण्याऐवजी आणखीच वाढली आहे. केंद्रातील सत्ताधारी आघाडीत तसेच भाजप-रालोआ आणि डाव्या आघाडीसारख्या विरोधकांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून तणाव निर्माण झाला आहे. सारेच राजकीय पक्ष व आघाडय़ा आपली ‘स्वच्छ’ प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून धडपडत आहेत.\nराज्याच्या एटीएस प्रमुखपदी के. पी. रघुवंशी\nकोर्टाच्या तंबीनंतर गृह विभागाला आली जाग\nमुंबई, ११ जून / प्रतिनिधी\nराज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून रेल्वेचे अतिरिक्त पोलीस मह��संचालक के. पी. रघुवंशी यांची आज नियुक्ती करण्यात आली. गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज सायंकाळी उशिरा विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. उच्च न्यायालयाने आजच एका आदेशाद्वारे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद येत्या चार आठवडय़ात भरण्याचे आदेश दिले होते.\nमुंबई, ११ जून / खास प्रतिनिधी\nविधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये आज मराठीचा पुकारा झाला. रोजगारांमध्ये मराठी टक्का कमी होऊन परप्रांतीयांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. मात्र उद्योग खात्याने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील खासगी आस्थापनांमध्ये मराठी टक्का ८० टक्के असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वे, टपाल खाते यासह विविध केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य मिळावे म्हणून राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून, बिगर मराठी भाषकांवरील हल्ल्याचे निमित्त करून राज्यातील केंद्रीय सेवेची भरती केंद्रे व परीक्षा रद्द करण्याचा डाव कुणी रचला तर तो उधळून टाकू, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.\nपदपथावर झोपलेल्या दोघींना डम्परने चिरडले\nमृतांमध्ये पाच महिन्यांची मुलगी\nमुंबई, ११ जून / प्रतिनिधी\nभरधाव वेगातील डम्पर पदपथावर चढून झालेल्या दुर्घटनेत पाच महिन्यांच्या एका चिमुरडीसह एक महिला ठार झाली. ही दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री गेट वे ऑफ इंडिया येथे घडली. अपघातात अन्य चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजश्री मायकल डिसोझा (२०) आणि निर्मला दत्तू काळे (पाच महिने) या दोघी अपघातात मृत्यूमुखी पडल्या.\nसमुद्रमार्गे अतिरेकी हल्ल्याची खबर पोलिसांकडे जुलैपासूनच\nअतिवरिष्ठांच्या अनुत्साहामुळे टेहळणीत शिथीलता\nमुंबई, ११ जून / प्रतिनिधी\nदक्षिण मुंबईतील विशिष्ट ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होती तसेच समुद्रमार्गे अतिरेकी हल्ला होणार असल्याबाबतची विशिष्ट माहिती कनिष्ठ अधिकाऱ्यांना जुलै महिन्यापासूनच मिळालेली होती आणि त्यानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. मात्र त्या प्रयत्नांना अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फारशी दाद दिली नाही, अशी धक्कादायक माहिती बाहेर येत आहे.\nऐन महत्त्वाच्या वेळीच वैद्यकीय ��णि नागरी सेवा कोलमडल्या..\nदहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांना नवीन नाही; तसेच नागरी आणि तातडीच्या, आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्या यंत्रणांनासुद्धा ही बाब नवी नाही. आपत्ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो, त्यांनी यापूर्वीही अशा प्रसंगांना तोंड दिलेले आहे; परंतु २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याबरोबरच नागरी आणि वैद्यकीय सेवा संस्थांचीही अकार्यक्षमता प्रत्ययास आली.२६ जुलै २००५ चा जलप्रलय, ११ जुलै २००६ चे उपनगरी गाडय़ांमधील बॉम्बस्फोट, दरवर्षी होणारे इमारती कोसळण्याचे प्रकार यापासून या संस्थांनी काहीच बोध घेतला नसल्याचे जाणवते. प्रत्येक वेळी नेतृत्वाचा अभाव, निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे उडणारा गोंधळ कायम आहे. (उर्वरित वृत्त )\nभारत वेस्ट इंडिजशी आज भिडणार\nलंडन, ११ जून/ पीटीआय\n‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या म्हणीनुसार भारताने अ गटातील साखळी सामन्यात अव्वल स्थान राखले. पण ‘सुपर एट’ फेरीमध्ये भारताची अव्वल संघांशी गाठ पडणार असल्याने आता ट्वेन्टी-२० विश्वचषक गतविजेत्यांची खरी अग्निपरीक्षा असेल. आर्यलड आणि बांगलादेश सारखे सोपे पेपर आत्तापर्यंत भारताच्या वाटय़ाला आले होते. पण उद्या भारताचा पहिला ‘सुपर एट’ मधील पहिला सामना ख्रिस गेलच्या वेस्ट इंडिज संघाविरूद्ध होणार असून त्यांनी ऑस्ट्रेलियाला नमविल्याने शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात ‘धोनी ब्रिगेड’चा कस लागेल. बांगलादेश आणि आर्यलडला सहज नमविल्याने भारतीय संघाचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असेल. सेहवागची जागा रोहित शर्मा चांगल्या पद्धतीने भरून काढताना दिसत आहे. त्याला गंभीरची चांगली साथ लाभत असून ही जोडी भारताला चांगली सलामी देण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. पण चांगली सुरूवात दिल्यानंतर मात्र धावांची गती ‘पॉवर प्ले’नंतर दोन्हीही सामन्यात कमी होताना दिसली आहे आणि त्यावर योग्य तोडगा काढायला हवा.\nराणा जगजीतसिंह यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा -अण्णा हजारे\nलोहा, ११ जून /वार्ताहर\nसुसंस्कृत व प्रगत अशा महाराष्ट्राला पद्मसिंह पाटील यांच्या प्रकरणाने कलंकित केले आहे. लोकशाहीची शाश्वत मूल्ये जपायची असतील तर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राज्यमंत्री राणा जगजितसिंह यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. जनजागरण मोहिमेअंतर्गत अण्णा हजारे लोहा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्रगत व सुसंस्कृत आहे. या राज्यात खासदार पद्मसिंह पाटील यांच्या प्रकरणाने कलंक लावला. पुरोगामी विचाराच्या राज्याने विविध क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले आहे. राजकारणातील गुन्हेगारी थोपविण्याची आज गरज आहे. प्रभावी आंदोलने होतात तरीही भ्रष्ट लोक निवडून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार पद्मसिंह पाटील यांची हकालपट्टी केली पण त्यांच्या मुलाला मंत्रिमंडळात ठेवले. लोकशाहीचे पावित्र्य जपायचे असेल तर राणा जगजीतसिंह यांनी स्वत: राजीनामा द्यावा.\nराजकारणात चांगले लोक येत आहेत; परंतु त्यांचे काही चालत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला येत आहेत; त्यामुळे ठेवीदारांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. लवकर तीन नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. तीन जण कोण हे मात्र वेळ आल्यानंतर सांगू असे अण्णा म्हणाले.\nपद्मसिंह पाटील यांची नार्को चाचणी\nमुंबई, ११ जून / प्रतिनिधी\nकाँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते आणि खासदार पद्मसिंह पाटील यांची ‘केंद्रीय अन्वेषण विभाग’ (सीबीआय) नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणी करण्याची शक्यता आहे. पाटील हे चौकशीत सहकार्य करीत नसून त्यांचे वर्तन पुढेही असेच राहिले तर त्यांची नाकरे अॅनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी करण्यात येईल, असे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निंबाळकर यांची ज्या गाडीमध्ये हत्या करण्यात आली ती गाडी आणि त्यांचे मारेकरी ज्या गाडीतून पळून गेले, अशा दोन गाडय़ांच्या तपासणीसाठी दिल्ली येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक आज मुंबईत दाखल झाले.\nपोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन\nमुंबई, ११ जून / प्रतिनिधी\nशौचाला जाण्याच्या बहाण्याने एका आरोपीने व्ही. पी. रोड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आज पलायन केले. शेर मोहम्मद जमीर खान असे या आरोपीचे नाव असून ३ जून रोजी त्याला नसीम खान नावाच्या इसमाला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र शौचाला जाण्याचा बहाणा करून मोहम्मद गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ तो न आल्याने पोलिसांनी त्याला शोधले. मात्र त्याने हातावर तुरी देऊन पलायन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.\nमहाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ashok-chavhan-comment-on-aashish-shelar/", "date_download": "2019-03-25T08:04:31Z", "digest": "sha1:6QM7VTHLFFNHT6RJTBAZRYFEBX7GXWHZ", "length": 5542, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलारांकडून बिनबुडाचे आरोप - अशोक चव्हाण", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nसरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलारांकडून बिनबुडाचे आरोप – अशोक चव्हाण\nमुंबई: कमला मिल दुर्घटनेला सरकार आणि मुंबई महापालिकेचे भ्रष्ट प्रशासन जबाबदार असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. आयटी पार्कला सवलती देण्याचे शासनाचे धोरण होते. या सवलतींचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे.\nएफएसआयचा गैरवापर होत होता तर, मुंबई महापालिका व राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात कारवाई का केली नाही असा प्रश्न खा. चव्हाण यांनी केला. महापालिका आणि सरकारमधील लोकांनी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातल्यामुळेच ही दुर्घटना घडली असून याला राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजप नेते विरोधीपक्षांवर बिनबुडाचे आरोप करित आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nशक्तिशाली नवमहाराष्ट्र बनवण्याचा संकल्प: मुख्यमंत्री\nपद्मावती वर सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला राजघराण्यातील सदस्यांचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/congress-will-win-in-state-says-chandrakant-pati/", "date_download": "2019-03-25T08:04:20Z", "digest": "sha1:QU456WK253EXAJBIOVB2LXBZRZL3KOUZ", "length": 6332, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "... तर राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार - चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\n… तर राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार – चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करावी यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरूच असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. शिवसेना आणि भाजप युती न झाल्यास कॉंग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल, असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.\nचंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या 4 वर्षात भाजप-शिवसेना यांनी एकही निवडणूक एकत्र लढलेली नाहीये. त्याचा फटका दोन्ही पक्षाला बसतो आहे. पालघर पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी चुकीचं राजकारण केलं असून, युतीमध्ये कटुता निर्माण केली आहे. दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबातून एकास उमेदवारी देण्याचे भाजपने निश्चित केले होते. पण याबाबत कसलीच खातरजमा न करता उद्धव ठाकरे यांनी वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून तिकीट दिले. हे त्याचं चूकीचं राजकारण होतं.\nदरम्यान उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्ययाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मात्र अद्यापही भाजप नेते युतीसाठी आशावादी असून, त्यांच्याकडून सातत्याने युतीसाठी शिवसेनेला चुचकारण्याचे काम सुरु आहे. आता शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार की भाजपसोबत पुन्हा एकदा युती करणार शिवसेनेच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nसलग १५ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुचं\nपालघर आणि भंडारा – गोंदिया पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/prohibition-of-the-chief-minister-who-called-the-broker-for-the-prosperity-highway-protesters/", "date_download": "2019-03-25T08:05:43Z", "digest": "sha1:6QFZMCSXGNRDKR6CPKDUNTCZLUMKUP43", "length": 8506, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समृद्धी महामार्ग बाधीत आंदोलक शेतक-यांना दलाल म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nसमृद्धी महामार्ग बाधीत आंदोलक शेतक-यांना दलाल म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध\nनाशिक: समृद्धी महामार्ग बाधीत जे शेतकरी आंदोलन करत होते ते आता दलाल बनले आहेत, अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या विरोधात मुख्यमंत्री जेव्हा १० जिल्ह्यात येतील तिथे जावून काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्णय समृद्धी बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने घेतला आहे.\nआंदोलक शेतक-यांना भेटी व चर्चासाठी गेल्या १६ महिन्यापासून मुख्यमंत्री वेळ देत नाहीत तसेच शरद पवार यांनी प्रयत्न करून लावलेली बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केली होती. नाशिक जिल्हयात शिवडे येथील शेतक–यांनी रक्ताचे पत्र लिहून भेटीसाठी प्रयत्न केला तरी चर्चासाठी व समृद्धी महामर्गातील विरोध करत असलेल्या गावांना मुख्यमंत्र्यांनी भेटी द्याव्यात. बागायती जमिनी पहाव्यात ही माफक अपेक्षा ही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही. उलट आंदोलक शेतकरी आता द���ाल बनले असल्याचे विधान करून शेतक-यांचा अपमान केला असल्याची भावना वाढीस लागत आहे.\nराज्याच्या प्रमुखानी शेतकरी आंदोलन संदर्भात दलाल म्हणून उल्लेख केला आहे. या दलालांना दलाली महाराष्ट्र शासनामार्फत अधिकारी देत आहे.दलाली करणा-या व जनतेच्या पैशाची दलाल देणा-याची न्यायालयीन चोकशी करावी. अशी मागणी समृद्धी बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे . मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय सांगत आहेत. शेतक-यावर जमिनीसाठी बळजबरी करीत नाही.मात्र १ वर्षांत ठाणे, नाशिक,औरंगाबाद,जालना,अमरावती येथील मोजणीस विरोध करणा-या शेतक-यांवर केसेस झालेल्या दिसत कश्या नाहीत असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे .शासना विरोधात ४० केसेस औरंगाबाद, मुंबई, नागपूर उच्च न्यायालयात चालू आहेत. समृद्धी बाधीत शेतक-याचा लढा न्यायालयीन व लोकशाही मार्गाने सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्र्यानी पत्रकर परिषद घेऊन आरोप करण्यापेक्षा बाधीत शेतक-याच्या प्रश्नासाठी शेतकरी परिषद घ्यावी, असे आवाहन समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रचे समन्वय कॉ. राजू देसले, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, अॅड. रतनकुमार, तुकाराम भस्मे, भाऊसाहेब शिंदे, विनायक पवार, शहाजी पवार, दौलत दुभाषिक, रावसाहेब हारक, संतोष ढमाले, सदानंद वाघमारे, शिवाजी भोसले, कपिल धामणे, पांडुरंग मोकाशी, रमेश सहारे आदींनी केले आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nघराला घरपण देणारे डी एस कुलकर्णी फरार \nटू जी घोटाळ्याप्रकरणी ए राजा आणि कनिमोळीसह सर्व आरोपी निर्दोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/vishwas-taunts-on-arvind-kejriwal-and-aam-aadmi-party-after-announcement-of-rajya-sabha-mp-candidates/", "date_download": "2019-03-25T08:37:10Z", "digest": "sha1:H7PPD6UQZN3D7DAIJEZL4TU7P2CEKNKK", "length": 5983, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कुमार विश्वास आम आदमी पार्टीला राम राम ठोकण्याच्या तयारीत", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुस���नेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nकुमार विश्वास आम आदमी पार्टीला राम राम ठोकण्याच्या तयारीत\nआम आदमी पार्टीला (आप) अखेर राज्यसभेसाठी उमेदवार मिळाले असून पक्षाचे नेते संजय सिंह, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्यसभेचे तिकीट हुकल्याने तसेच अरविंद केजरीवाल यांच्याशी सुरु असलेल्या मतभेदांवरून नाराज असलेले आप नेते कुमार विश्वास पार्टी सोडण्याच्या तयारीत आहेत.\nआप कडून राज्यसभेसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर कुमार विश्वास यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला मोठं करण्यासाठी ज्यानी काम केलं त्यांनाच डावलण्यात आल्याचा आरोप विश्वास यांनी केला आहे. बुधवारी राज्यसभा उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाची बैठक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, कुमार विश्वास आणि अशुतोष यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले नव्हते.पक्षनेतृत्वावर हल्लाबोल करताना विश्वास यांनी पक्ष उभा करताना जी मदत केली त्याच मला हे बक्षीस मिळालं असल्याचं म्हटलं आहे.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\n2018 मध्ये या नवीन जोड्या प्रेक्षकांना भेटणार\nभीमा कोरेगावमध्ये कोणी हिंसाचार घडवला, हे मुख्यमंत्र्यांना माहिती: प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/reality-behind-fidget-spinner/", "date_download": "2019-03-25T08:12:46Z", "digest": "sha1:Q4EGSRI3UCBJBP2BMJNRSMV27RAA7R6U", "length": 16707, "nlines": 103, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "फिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nफिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमध्यंतरी पोकीमॉन गो सारखा धमाकेदार गेम मार्केटमध्ये आला होता. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत या गेमने एवढे वेडे लावले होते की, पोकीमॉन पकडण्यासाठी ते कुठेही घुसत असत. आता लोकांना असेच वेड लावले आहे एका चक्रीने या चक्रीला फिजेट स्पिनर असे म्हणतात.\nही चक्री प्लास्टिकची असते. काहींमध्ये मेटल सुद्धा वापरलेले असते. चक्रीच्या मधील बेरिंगवाला भाग एक अंगठा आणि मधल्या बोटाने गोलगोल फिरवला जातो. लहान मुलांमध्ये तर सध्या याची भयंकर क्रेझ आहे. तुम्हाला देखील या फिजेट स्पिनरने वेड लावले असेल. बरं तर याचा उपयोग काय असं विचारलं, तर प्रत्येकजण हेच सांगतो की, यामुळे स्ट्रेस कमी होते, मन एकाग्र होते वगैरे वगैरे पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फिजेट स्पिनर यासाठी बनवले गेलेले नाहीच आहे मुळी पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फिजेट स्पिनर यासाठी बनवले गेलेले नाहीच आहे मुळी अहो ही फिजेट स्पिनर बनवणाऱ्या कंपनीची सेल्स स्ट्रेटजी आहे जी बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे.\nया चक्रीने चिंतेवर उपचार होतो हे अजूनही वैज्ञानिक संशोधामध्ये सिद्ध झाले नाही आहे आणि कोणत्याही डॉक्टरने हा मानसिक समस्येवरचा उपचार आहे हे कबुल केलेलं नाही. कोणत्याही मानसिक आजारासाठी ही चक्री किती उपयुक्त आहे, हे अजूनही कोणालाही सिद्ध करता आलेले नाही. याचा स्पष्ट अर्थ असा की चिंता दूर करण्याच्या नावाखाली एक खोटे प्रोडक्ट ग्राहकांच्या गळी उतरवले जात आहे.\nया खेळण्याचा वाढता अतिरेक पाहून पाश्चिमात्य देशातील शाळांनी यावर बंदी घातली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे खेळणे मुलांची एकाग्रता वाढवण्याऐवजी त्यांची एकाग्रता नष्ट करत आहे. त्यांची एकाग्रता अभ्यासावरून बाजूला होऊन या खेळण्यावर येऊन थांबली आहे. विद्यार्थ्यांचे आई – वडील सुद्धा खूप नाराज आहेत, कारण मुले सगळी कामे सोडून फक्त चक्री फिरवत बसलेली असतात.\nमेडिकल रिसर्च जे सांगते ते खरे आहे की, मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी फिजिकल मुव्हमेंट गरजेची असते, परंतु ही एवढीशी वस्तू फिजिकल मुव्हमेंटचा स्त्रोत असूच शकत नाही. हे खेळणे फिरवण्यासाठी फक्त एका बोटाचा वापर होतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्थितीमध्ये म्हणावा तितका प्रभाव पडत नाही, उलट त्य��त मन गुंतले जाते.\nफ्लोरिडाचा एक सायकॉलॉजिस्ट मार्क रपोर्टच्या मते,\nआतापर्यंत फिजेट स्पिनरवर कोणतेच संशोधन करण्यात आले नाही आहे आणि याच्या प्रभावाविषयी शास्त्रज्ञ अजूनही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचू शकलेले नाहीत. त्यांचे म्हणणे होते की, याचा वापर फायद्यापेक्षा मानसिक नुकसान जास्त करू शकते.\nया चक्रीचा अनधिकृत शोध लावणारी व्यक्ती आहे- कॅथरीन हेटिंगर अनधिकृत यासाठी की, त्यांच्याकडे याचे पेटंट नाही आहे. हेटिंगरने १९९३ मध्ये या डिवाइसच्या पेटंटसाठी अर्ज दिला होता. पेटंट मिळाले सुद्धा पण २००५ मध्ये ते रद्द करण्यात आले, कारण त्यांना कोणताच कमर्शियल पार्टनर मिळाला नव्हता.\nहेटिंगरने एका मुलाखतीमध्ये सांगितले की,\nफिजेट स्पिनरची कल्पना मुलांना त्यांचे बालपण आनंदाने जगू द्यावे यासाठी होती. कोणत्याही प्रकारची चिंता किंवा मेंटल हेल्थची समस्या सोडवणे हे फिजेट स्पिनरचे उद्दिष्ट बिलकुल नव्हते.\nकॅथरीन हेटिंगर एकदा इस्राइलला गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी लहान मुलांना पोलिसांवर दगडफेक करताना पाहिले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, यांच्या हातून दगड काढून काहीतरी वेगळे द्यावे, जेणेकरून त्यात त्यांचे मन रमेल आणि वाईट गोष्टींच्या हरी ते जाणार नाहीत, पण मानसिक शांतीसाठी हे डिव्हाइस रामबाण उपाय असल्याचे सांगून कंपनीने लोकांची दिशाभूल केली आणि आज कित्येक जणांना या खेळण्याची नाश चढली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. लहान मुलेच नाही तर मोठी माणसे सुद्धा यात वेड्यासारखी गुंतली आहेत. ज्या प्रमाणे लोक २-२ मिनिटांनी आपला फोन चेक करत असायचे, तसे आता फिजेट स्पिनर फिरवत असतात.\nतर मंडळी, तुम्हीही जर मन एकाग्र होण्यासाठी वगैरे हे खरेदी केले असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा याचा उलटा परिणाम दिसून येईल.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← जेव्हा मार्क झुकरबर्ग फेसबुकच्या यशासाठी भारतीय मंदिरात नतमस्तक होतो\nबॅरीस्टर आणि लॉयर यांमध्ये नेमका फरक काय\nआयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ\nकॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या\nमराठी सिरियल्स आम��्या खऱ्या जीवनातल्या खऱ्या विषयांना कधी हाताळणार\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nतुझ्याकडे सुख फार झाले का मग आता देवापाशी दुःख माग : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २९\n‘रंग दे बसंती’मधला पडद्यावरचा हिरो – चेन्नईमध्ये खरा हिरो बनतोय\nभारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का – उत्तर वाचून तुम्हाला अभिमान वाटेल\nदिवंगत कादर खान ह्यांचा हा जीवन प्रवास प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायक आहे…\nपहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो\nजमिनीवरून आकाशात बाणांचा वर्षाव करणाऱ्या या भयंकर जमातीनेच ‘त्या’ अमेरिकन नागरिकाला मारले\nरतन टाटा आणि सायरस मिस्त्रींच्या वादाची तुम्हाला माहिती नसलेली नेमकी कारणे\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nरुस्तम मागची कहाणी अन् कहाणी मागचा रुस्तम\nसर्व जीन्स चाहत्यांसाठी : जीन्स बद्दलचे काही इंटरेस्टिंग “जुगाड”\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nअँड्रॉइड फोन्समध्ये नेहेमी निर्माण होणाऱ्या ६ समस्या आणि त्यावरील उपाय..\nबिडी में तंबाकू है, कॉंग्रेस वाला डाकू है : भारतीय निवडणुकांतील काही मजेशीर नारे\nफेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून “©” चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सला “अनुभव नसूनही” UPA ने दिले हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स\nजातीय राजकारण : मराठी माणूस गुजरात्यांकडून धडा शिकेल काय\nस्त्रीयांनी लावलेल्या या शोधांमुळे आपलं आयुष्य सुखकर झालं आहे\nह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात शिक्षक\n६००० वर्षापूर्वीचे “दोन सूर्य” : प्राचीन भारतीयांच्या कुतूहलबुद्धीचा अविष्कार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/280-love-27506/", "date_download": "2019-03-25T08:16:12Z", "digest": "sha1:Q4W2J5JWE53IJGG7VFNSYWRP67WGKXZI", "length": 13498, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२८०. प्रेम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nहमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या प्रेमात मी मस्त झालो आहे, बुडून गेलो आहे आता मला होशियारी कुठली प्रेमात मी मस्त झालो आहे, बुडून गेलो आहे आता मला होशियारी कुठली जो प्रेमात आकंठ बुडाला आहे\nहमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या प्रेमात मी मस्त झालो आहे, बुडून गेलो आहे आता मला होशियारी कुठली प्रेमात मी मस्त झालो आहे, बुडून गेलो आहे आता मला होशियारी कुठली जो प्रेमात आकंठ बुडाला आहे त्याला कसला होश असणार जो प्रेमात आकंठ बुडाला आहे त्याला कसला होश असणार जिथे प्रेम आहे तिथे होशियारी नाही. प्रेमाच्या जगातला हा पहिला, अखेरचा आणि एकमेव कायदा आहे. होशियारी म्हणजे चतुराई, भान, व्यावहारिक आडाख्यांनुसारचं आचरण, छक्केपंजे. आपलं प्रेम असं असतं का जिथे प्रेम आहे तिथे होशियारी नाही. प्रेमाच्या जगातला हा पहिला, अखेरचा आणि एकमेव कायदा आहे. होशियारी म्हणजे चतुराई, भान, व्यावहारिक आडाख्यांनुसारचं आचरण, छक्केपंजे. आपलं प्रेम असं असतं का गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ (अभंगानुवाद -ऋग्वेदी, प्रकाशक- व्ही. प्रभा आणि कंपनी, १९२८) मधील एका कवितेची पहिलीच ओळ आहे, ‘पूर्ण जे संसारी प्रेम दर्शवीति गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ (अभंगानुवाद -ऋग्वेदी, प्रकाशक- व्ही. प्रभा आणि कंपनी, १९२८) मधील एका कवितेची पहिलीच ओळ आहे, ‘पूर्ण जे संसारी प्रेम दर्शवीति ते मज बांधीति घोर पाशें ते मज बांधीति घोर पाशें’ या पूर्ण जगात प्रेम म्हणजे एकमेकांना घोर पाशात बांधून टाकणं एवढाच अर्थ आहे’ या पूर्ण जगात प्रेम म्हणजे एकमेकांना घोर पाशात बांधून टाकणं एवढाच अर्थ आहे याचं कारण आपण ‘प्रेम’ म्हणून जे काही करतो त्यात होशियारी असते याचं कारण आपण ‘प्रेम’ म्हणून जे काही करतो त्यात होशियारी असते मोबदल्याकडे लक्ष ठेवूनच जगात प्रेमाचा बहुतांश व्यवहार चालतो. असं असूनही दुसऱ्याकडून मात्र माणसाला शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाचीच अपेक्षा असते. याचं एकमेव कारण असं की, माणूस हा प्रेमस्वरूप भगवंताचाच अंश आहे. त्या भगवंतापासून तो दुरावला आहे आणि त्यामुळे प्रेमासाठी तो तळमळत आहे. जगण्यातील प्रत्येक धडपडीत माणूस म्हणूनच प्रेम शोधण्याचा, प्रेम मिळवण्याचा आणि प्रेम टिकविण्याचाच प्रयत्न करतो. त्यासाठीच तो दुसऱ्यावर प्रेम ‘करतो’ आणि दुसऱ्याकडून प्रेमाची ‘परतफेड’ही अपेक्षितो मोबदल्याकडे लक्ष ठेवूनच जगात प्रेमाचा बहुतांश व्यवहार चालतो. असं असूनही दुसऱ्याकडून मात्र माणसाला शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाचीच अपेक्षा असते. याचं एकमेव कारण असं की, माणूस हा प्रेमस्वरूप भगवंताचाच अंश आहे. त्या भगवंतापासून तो दुरावला आहे आणि त्यामुळे प्रेमासाठी तो तळमळत आहे. जगण्यातील प्रत्येक धडपडीत माणूस म्हणूनच प्रेम शोधण्याचा, प्रेम मिळवण्याचा आणि प्रेम टिकविण्याचाच प्रयत्न करतो. त्यासाठीच तो दुसऱ्यावर प्रेम ‘करतो’ आणि दुसऱ्याकडून प्रेमाची ‘परतफेड’ही अपेक्षितो ‘मी इतरांसाठी आजवर इतकं केलं’, हा हिशेब बोलण्यात म्हणूनच डोकावतो. माणसाचं प्रेम स्थूल, स्वार्थप्रेरित असलं तरी ‘प्रेम’ हाच माणसाच्या जगण्याचा आधार असतो आणि प्रेमाच्या आशेवरच माणूस जगत असतो, यात शंका नाही. पू. बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात, ‘‘प्रेम करणे हा मानवी मनाचा सहजस्वभाव आहे. आईच्या पोटात असल्यापासून- म्हणजे जन्माला येण्याच्या आधीपासूनच माणसाचा जीव प्रेमावर पोसला जातो. शिवाय जन्मास आल्यानंतर तो प्रेमावरच जगतो. म्हणून प्रेम माणसाच्या हृदयापर्यंत खोल जाते. माणूस प्रेमाला भुलतो व प्रेमाने त्याचा जीव तृप्त होतो. त्या तृप्तीच्या ओढीने प्रत्येक माणूस कोणावर तरी प्रेम करतो आणि दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो. पण प्रत्यक्ष जीवनात असे आढळते की प्रत्येक माणूस कोणावर तरी आणि कशावर तरी प्रेम करतो. असे असून प्रेमापासून मिळणारे समाधान त्याच्या वाटय़ास येत नाही.’’ (भगवंताचे अनुसंधान, प्र. – त्रिदल, १९९३) हे समाधान माणसाला लाभत नाही याची अन्य कारणं बाबा देतात पण खरं प्रेमही माणूस करीत नाही, हेच खरं कारण आहे. स्वार्थप्रेरित हेतूने, व्यवहारी विचाराने दुसऱ्याशी प्रेमाच्या नावाखाली जो व्यवहार केला जातो त्यातून खरे टिकाऊ समाधान कसे लाभणार ‘मी इतरांसाठी आजवर इतकं केलं’, हा हिशेब बोलण्यात म्हणूनच डोकावतो. माणसाचं प्रेम स्थूल, स्वार्थप्रेरित असलं तरी ‘प्रेम’ हाच माणसाच्या जगण्याचा आधार असतो आणि प्रेमाच्या आशेवरच माणूस जगत असतो, यात शंका नाही. पू. बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात, ‘‘प्रेम करणे हा मानवी मनाचा सहजस्वभाव आहे. आईच्या पोटात असल्यापासून- म्हणजे जन्माला येण्याच्या आधीपासूनच माणसाचा जीव प्रेमावर पोसला ज���तो. शिवाय जन्मास आल्यानंतर तो प्रेमावरच जगतो. म्हणून प्रेम माणसाच्या हृदयापर्यंत खोल जाते. माणूस प्रेमाला भुलतो व प्रेमाने त्याचा जीव तृप्त होतो. त्या तृप्तीच्या ओढीने प्रत्येक माणूस कोणावर तरी प्रेम करतो आणि दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो. पण प्रत्यक्ष जीवनात असे आढळते की प्रत्येक माणूस कोणावर तरी आणि कशावर तरी प्रेम करतो. असे असून प्रेमापासून मिळणारे समाधान त्याच्या वाटय़ास येत नाही.’’ (भगवंताचे अनुसंधान, प्र. – त्रिदल, १९९३) हे समाधान माणसाला लाभत नाही याची अन्य कारणं बाबा देतात पण खरं प्रेमही माणूस करीत नाही, हेच खरं कारण आहे. स्वार्थप्रेरित हेतूने, व्यवहारी विचाराने दुसऱ्याशी प्रेमाच्या नावाखाली जो व्यवहार केला जातो त्यातून खरे टिकाऊ समाधान कसे लाभणार प्रेमाचं खरं, व्यापक, शुद्ध, खोल स्वरूप आपण जाणत नाही. स्थूल, भौतिक दुनियेतही आपण खरं प्रेम करीत नाही मग भगवंतावरील प्रेमाची गोष्टच दूर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://forum.quest.org.in/content/discussions", "date_download": "2019-03-25T08:24:55Z", "digest": "sha1:7PNRBWTYN6NTPXPUPVXCOYFWCWNNSHGG", "length": 2879, "nlines": 49, "source_domain": "forum.quest.org.in", "title": "Discussions | शिक्षक अभ्यास मंडळाचे व्यासपीठ....", "raw_content": "\nशिक्षक अभ्यास मंडळाचे व्यासपीठ....\nsuresh.karande फोरमचा वापर : नोंदणी न करता फोरम पाहता येईल का \nnetradipak.kuwar ग्रामीण भागातील मराठी शाळांवर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा परिणाम......14 Replies Tags: सर्वसामान्य गट 13 Apr 2012 - 16:54 updated 5 years 19 weeks ago\nadmin फ़ोरमचा वापर : आपला फोटो प्रोफाईल मध्ये टाकणे 3 Replies Tags: फोरमचा वापर व्यासपीठ कसे वापरायचे 5 Feb 2012 - 19:55 updated 6 years 45 weeks ago\nganeshpatil मुलोद्योगी शिक्षण.........महात्मा गांधीजींच्या विचारांची शैक्षणिक गरज...20 Replies Tags: सर्वसामान्य गट 20 Oct 2011 - 14:26 updated 6 years 46 weeks ago\nफोरमचा वापर देवनागरी लिपी वाचन लेखन पोस्टर मराठी शाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090324/main.htm", "date_download": "2019-03-25T08:14:40Z", "digest": "sha1:WXBFNU6ADAHBHMN4SPBURKG5MDPJUDZD", "length": 16488, "nlines": 48, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, २४ मार्च २००९\nमुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी\nसर्वसामान्यांची मोटार म्हणून सर्व भारतीयांच्या मनात घर करून राहिलेली आणि रतन टाटा यांचे सर्वसामान्यांसाठी एक लाख रुपयांमध्ये मोटार देण्याचे वचन असलेल्या टाटा मोटर्सच्या ‘नॅनो’चे आज मुंबईत एका दिमाखदार समारंभात उद्घाटन झाले. आपले वचन आपण पाळले आहे, आणि त्याचा अतिशय आनंद होत आहे, असे नॅनोच्या पत्रकार परिषदेत ‘टाटा सन्स’ आणि ‘टाटा मोटर्स’चे अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले. नॅनो खरेदीदारांसाठी देशभरात ९ ते २५ एप्रिल या दरम्यान नोंदणी (बुकींग) करता येणार असून स्टेट बँकऑफ इंडिया व टाटा मोटर्स यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार बँकेच्या १३५० शाखांमध्ये नॅनोचे बुकींग करता येणार आहे. नॅनोची एकंदर तीन मॉडेल्स बाजारात आणली असून त्यातील बेस मॉडेल एक लाख रुपयांचे आहे.\nमोहम्मद अजमल कसाबची कबुली\nमुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी\nआतापर्यंत मला पाकिस्तानी वकिलच हवा असा घोषा लावणाऱ्या दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने आज अखेर विशेष न्यायालयाकडे त्याची बाजू लढविण्यास तयार असलेला किंवा सरकारने नेमलेला वकील चालेल, असे सांगून वकिलाबाबतची समस्या सोडवली. संपूर्ण सुनावणीदरम्यान न्या. तहलियानी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना कसाबच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा कोणतेही भाव नव्हता. उलट छदमीपणे हसून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या कसाबचा निर्दयीपणा न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी या वेळी अनुभवला. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्चपर्यंत स्थगित केली.\nनरेंद्र मोदी, जेटली, शशांक मनोहर यांच्यावर\nनवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी\n��ारतात क्रिकेट हा कमालीचा लोकप्रिय खेळ असला तरी आयपीएलची ट्वेंटी-२० स्पर्धा म्हणजे केवळ क्रिकेट नव्हे. खेळ आणि व्यवसाय यांचे ते ‘धूर्त’ मिश्रण आहे. त्यात राजकारणाची भर पडण्याचे काही कारण नाही, असा आक्रमक पवित्रा घेत आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही स्पर्धा भारताबाहेर खेळवावी लागत असल्याबद्दल होणाऱ्या अनावश्यक टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले. आयपीएलच्या सुधारित वेळापत्रकावर अंतिम निर्णय होण्यापूर्वीच ही स्पर्धा भारताबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेताना बीसीसीआयने घाई तर केलीच, शिवाय सुरक्षेच्या मुद्यावर दुटप्पीपणा दाखविल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.\n२६-२२ वर तिढा सुटला\nदोन महिने आणि डझनभर चर्चेच्या फेऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला केवळ अमरावतीची अतिरिक्त जागा\nनवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी\nराज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानचा जागावाटपाचा अखेर आज सुटला. तब्बल दोन महिने जोरदार घासाघीस केल्यानंतर आज काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अनुसूचित जातींसाठी राखीव अमरावती ही एकमेव जास्तीची जागा पदरी पाडून घेणे शक्य झाले. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस २६, तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर लढणार आहे. उभय पक्षांनी समविचारी मित्रपक्षांसाठी आपल्या कोटय़ातून जागा सोडण्याचे ठरविले आहे. २००४ साली काँग्रेसने २७, तर राष्ट्रवादीने २१ जागा लढविल्या होत्या.\nआयकॉन्सची कौंटीजसाठी ‘पसंद अपनी अपनी’\nभारताच्या किनाऱ्यावरून निघालेले आयपीएल क्रिकेटचे तारू इंग्लंडच्या किनाऱ्यावर स्थिरावण्याची शक्यताोहे. त्या दृष्टीने हालचालींना रातोरात वेग आला असून आयपीएल संघाच्या आयकॉन्सनी आपल्या पसंतीच्या कौंटीज्ची फर्माईश पेश केली आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सना आपला डेरा इंग्लंडच्या दक्षिणेकडील भागात टाकावा असे सुचविले आहे. मुंबईच्या खेळाडूंना इंग्लंडच्या उत्तर भागातील थंड हवामानापेक्षा दक्षिणेकडील उष्ण हवामान लाभदायक ठरू शकेल, असे सचिन तेंडुलकरला वाटते. युवराजसिंग या पंजाब संघाच्या आयकॉनला आपल्या संघाचे बस्तान लिस्टरशायरमध्ये बसवावे असे वाटते.\nपिलभीतमध्ये आपले चुलत बंधू वरुण गांधी यांनी केलेल्या मुस्लिमविरोधी भाषणाबद्दल त्यांच्��ावर टीका करताना प्रियांका गांधी यांनी वरुणचे हे उद्गार गांधी घराण्याच्या तत्वांच्या विरोधात असून त्याने आधी श्रीकृष्णाने सांगितलेली भगवत्गीता व्यवस्थित वाचावी आणि मगच बोलावे असे म्हटले आहे. टीव्ही वाहिन्यांवरून वरुणला हे सर्व बोलताना पाहून खूप दु:ख झाले असेही प्रियांका म्हणाल्या. सध्या प्रियांका आपली माता सोनिया गांधी निवडणूक लढवत असलेल्या रायबरेली मतदारसंघात प्रचारासाठी दाखल झाल्या असून त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. वरुणने आधी गीता वाचावी आणि मगच गीतेत जे सांगितले आहे त्यावर भाष्य करावे. गांधी घराण्यातील सर्व माणसे ज्या आदर्शांसाठी जगली व ज्यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले त्या आदर्शांनाच वरुणचे उद्गार छेद देणारे आहेत, असेही प्रियांका यांनी स्पष्टपणे नमूद केले. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्यामध्ये झालेल्या समझोत्याबद्दल सर्व काही निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. आपण काँग्रेसच्या अन्य उमेदवारांचा प्रचार करणार नाही, फक्त आई आणि भाऊ राहुल यांचाच प्रचार आपण करू, असेही त्या म्हणाल्या.\nवरुण गांधींच्या उमेदवारीवर भाजप ठाम\nनवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी\nपिलीभीतमधून वरुण गांधी हेच पक्षाचे उमेदवार असतील आणि त्यांच्यासाठी आम्ही सारे प्रचारही करू, असे आज भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. पिलीभीतमध्ये चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने वरुण गांधी यांना दोषी ठरविले असून भाजपने त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी सूचनाही केली आहे. निवडणूक आयोगाच्या या ‘शिफारशी’मुळे भाजपमध्ये संतप्त पडसाद उमटले आहेत.\nअशा सूचना करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, असे भाजपने म्हटले आहे, तर वरुण गांधी निर्दोष आहेत, हे सिद्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ‘उलटा चोर कोतवालको डाटे,’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केली. वरुण गांधी यांची उमेदवारी रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आज भाजपचे प्रवक्ते बलबीर पूंज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राजकीय पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी वा देऊ नये, याविषयी हे सांगण्याचा आयोगाला अधिकारच नाही, असे भाजपचे सरचिटणीस अरुण जेटली यांनीही ��्हटले आहे. पिलीभीत मतदारसंघात चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल ताशेरे ओढताना निवडणूक आयोगाने दाखविलेल्या अनावश्यक घाईबद्दल वरुण गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगावर राजकीय दडपण आले असावे, असाही आरोप त्यांनी केला आहे. आपली बाजू मांडून निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी आयोगाने पुरेशी संधी दिलेली नाही, असा आरोपही वरुण गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीस दिलेल्या उत्तरात केला आहे. प्रक्षोभक भाषणाविषयीचे सत्य पडताळून न पाहताच आयोगाने आपल्याविषयी अंतिम निष्कर्ष काढल्याबद्दलही वरुण गांधी यांनी निराशा व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2016-Santra.html", "date_download": "2019-03-25T07:50:41Z", "digest": "sha1:S4FIDZVA76QWAW6SWNFEKEBZ7OTGLOKJ", "length": 6306, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - नरखेडच्या बाजारात संत्र्याचा २१ हजार रू./टन भाव असताना आम्हास मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे २५ हजार रू./टन", "raw_content": "\nनरखेडच्या बाजारात संत्र्याचा २१ हजार रू./टन भाव असताना आम्हास मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे २५ हजार रू./टन\nश्री. विजय आप्पाजी घोडे, मु.पो. नरखडे, ता. नरखेड, जि. नागपूर - ४४१३०४. मो. ७७१९८०३०५८\nमी एकदा आमचे मित्र श्री. ज्ञानेश्वर बांदरे यांच्या शेतीमध्ये कामासाठी गेलो होतो. या आधी पण मी त्यांची संत्राची बाग पाहिली होती, परंतु यावेळी मात्र बाग, एकदम आकर्षक वाटत होती. बहार खुप लागला होता. त्यांच्या परिसरात कोणत्याही शेतकऱ्याची इतकी छान बाग दिसत नव्हती. मग मी त्यांना विचारले, तुमची बाग इतकी छान फुटलेली आणि फुटवे व पत्ती एकदम हिरवीकच्च भरपूर प्रमाणात आहे, याचे रहस्य काय तेव्हा त्यांनी मला सांगितले, \"मी यावर्षी संत्रा फुटीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर व प्रिझम वापरले आहे. त्यामुळे माझ्या संत्रा बागेची फुट तर झालीच शिवाय झाडाची क्वालिटीपण सुधारली. मी संपूर्ण स्प्रे डॉ.बावसकर तंत्रज्ञानानुसार करत आहे. तसेच कपाशीवर पण हे तंत्रज्ञाना वापरतो \".\nत्यांनी मला आपल्या कंपनीचे प्रतिनिधी श्री. सागर रेवसकर यांच्याशी संपर्क करून दिला व लगेच दुसऱ्या दिवशी रेवसकर माझ्या शेतावर आले. माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून ३ एकरमध्ये ८ वर्षापूर्वी १५' x १५' वर संत्र्याची झाडे लावलेली आहेत. या बागेचा मृग बहार धरला होता, मात्र झाडांची वाढ व पत्ती खुपच कमी असल्याने झाडे निस्तेज दिसत होती. बाग फारच कमी फुटला होता. त्यामुळे झाडावर १० ते १५ % च फळे लागली होती. मग ऑक्टोबरमध्ये मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाल्यावर रेवसकरांच्या सल्ल्यानुसार (मो. ८६००२९१२०१) फवारण्या करू लागलो. त्यामुळे फळांचे पोषण होऊन आकार व वजनात वाढ झाली. सालीला आकर्षक चमक आली. खरी कमाल तर तेव्हा झाली जेव्हा मी ही संत्रा नरखेडच्या मंडीमध्ये (मार्केटमध्ये) विकण्यास नेली तेव्हा भरपुर प्रमाणात इतर शेतकऱ्यांचाही माल विक्रीस आला होता. मात्र आमचा संत्रा इतर शेतकऱ्यांनी पाहिल्यावर ते म्हणू लागले. तुमचा संत्र आकाराने एवढा मोठा, एकसारखा, आकर्षक खुपच चांगला आहे. मंडीमध्ये आमच्या संत्र्याचा जेव्हा लिलाव सुरू झाला तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त २१ हजार रू./टनाने संत्रा विकेलेले असताना आमचा माल मात्र २५ हजार रू./टनाने विकला गेला. परंतु सुरुवातीस बहार कमी फुटल्याने ३ एकरात माल कमी निघाला, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मात्र फळांचा आकार व दर्जा सुधारल्याने बाजारभावाच्या बाबतीत हा माझ्यासाठी मीठा चमत्कारच घडला. कारण यापुर्वी आम्हाला सर्वसाधारणच भाव मिळत होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/car-fire-news-aurangabad/", "date_download": "2019-03-25T08:11:28Z", "digest": "sha1:4PN75LRXXM22KYOINI27PPFI45B6ZMYD", "length": 6549, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO - कचऱ्यामुळे कारने घेतला पेट !", "raw_content": "\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nराज्यसभेचे आश्वासन, आठवलेंची दक्षिण मध्य मुंबईतून माघार\nमी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाचं नाही : सपना चौधरी\nVIDEO – कचऱ्यामुळे कारने घेतला पेट \nऔरंगाबाद – शहागंज परिसरातील मोहन टॉकीजच्या मागच्या बाजूस सोमवारी (ता. 12) इंडिका कार (एमएच 20 बीवाय 4096) जळून खाक झाली. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळल्याची माहिती परिसरातील नागरीकांनी दिली. या घटनेची सिटीचौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आज शहरातील कचऱ्याच्या समस्येला 25 दिवस झाले , मनीषा म्हैस्कर यांना येऊन दोन दिवस झाले तरी सुध्दा महानगरपालिकेने कचरा समस्येबद्दल कोणतीही पावले उचलली नसल्याचे समोर येत आहे.\nपहाटे सराफा भागातील मोहन टाकीजच्या मागे असलेल्या कचेऱ्याला अचानक आग लागली. यामुळे कचऱ्याच्या बाजूलाच उभी असलेली कारने पेट घेतला व ती जाळून खाक झाली. नागरिकांनी बोलावलेल्या अग्निशमन पथकाने आग विझवली. शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून, शहरभर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 6.25 च्या सुमारास परिसरातील नागरीकांनी अग्नीशमन विभागाला कार जळत असल्याची माहिती दिली. मात्र, अग्नीशमन बंब पोहोचेपर्यंत इंडिका कार (एमएच 20 बीवाय 4096) जळून खाक झाली होती. अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणली. त्यात कारचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप कारण स्पष्टं होऊ शकले नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी कार उभी होती. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\n“राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला”\nशेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा संघर्ष वणव्यासारखा पसरेल- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/article-on-ganesh-chaturthi-1297973/", "date_download": "2019-03-25T08:21:16Z", "digest": "sha1:ILRUYXSV3V2ZHUCI5B4PCDLGGQHZKDHR", "length": 19244, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Ganesh Chaturthi | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nगणेश उत्सव २०१६ »\nमति दे मज लाघवी\nमति दे मज लाघवी\nगणेश उपनिषदात त्याचे महत्त्व वर्णिले आहे. सर्वाच्या नित्य परिचयाचे गणपती अथर्वशीर्ष आहे.\nभारतीय संस्कृतीत श्रीगणेशाचे महत्त्वाचे स्थान आहे. तो विघ्नहर्ता आहे म्ह��ून त्याची पूजा कोणत्याही मंगलकार्यात होते. तो बुद्धीचा दाता आहे. त्याच्या कर्तृत्वाला सीमा नाही. गणेश उपनिषदात त्याचे महत्त्व वर्णिले आहे. सर्वाच्या नित्य परिचयाचे गणपती अथर्वशीर्ष आहे. यात गणपतीचे महत्त्व सांगितले आहे. वैदिक काळात सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी गणपती हे नाव येते. सुमारे दोन हजार वर्षांपासून गणपतीची पूजा भारतात चालत असावी. कदाचित गणपतीचा आकार बदलत असावा. यादृष्टीने विविध उल्लेख वेदकाळात मिळतात. ‘ऋग्वेदात गणानां त्वा गणपतीं हवामहे..’ हे प्रख्यात सूक्त आहे. शुक्ल यजुर्वेदात याचा उल्लेख येतो. हा गणपती गणांचा अधिपती आहे. तत्तिरीय संहितेत गणपती म्हणजे पशुपती. उपनिषदात गणपतीच्या सगुण रूपाचे रूपांतर ओमकाररूपात झाले आहे. हे परब्रह्माचे सुंदर रूप आहे. इथे विविध पारमाíथक रूपके गणपतीवर केलेली आहेत. गणेशपुराणात अनेक संदर्भ वैशिष्टय़पूर्ण आहेत. यात गणेशसंप्रदायाची विविध माहिती आहे. यात गणेश सहस्रनाम दिले आहे.\nज्ञानाच्या उपासनेतून गणेश प्रसन्न होतो. त्याच्या मूर्तीचा आकार ज्ञाननिष्ठ आहे. त्याच्या डोळय़ांत उपनिषदांची प्रभा आहे. त्याचे कान श्रवणाच्या वेदांची पाने आहेत. त्याचे मस्तक सत्याचे स्वरूप आहे. त्याचे आसन ओंकाराचे अधिष्ठान आहे. त्याचा एक हात सदैव नव्यानव्या अक्षरांसाठी अधीर आहे. दुसरा हात निसर्गाला जपण्यासाठी तत्पर आहे. म्हणून त्याच्या हातात पूर्णयोगी कमळ आहे. असुरी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी त्याच्या हातात परशू तयार आहे. त्याचा आणखी एक हात सहकार्यासाठी तत्पर आहे. त्याचे चार हात म्हणजे चार प्रकारची कर्तव्ये आहेत. ज्ञान, चिंतन, कर्तव्य, अभय ही चार कर्तव्ये सांगितली आहेत. त्याने ज्ञानाचा केलेला अंगीकार सार्थ आहे. म्हणून गणपती अथर्वशीर्षांत ‘ओम गं गणपतये नम:’ हे ज्ञानाचे महत्त्वाचे सूत्र दिले आहे. याचा अर्थ ज्ञानातून विज्ञानाकडे आणि विज्ञानातून आत्मज्ञानाकडे गेले पाहिजे. हा प्रवास विद्या आणि कला यांच्या सहवासातून होतो. आपण कोणतीही विद्या घ्या किवा कोणतीही कला घ्या. त्यात एकाग्रता असली तरच ती आपलीशी होते. ही एकाग्रता ध्यानातून येते. ध्यानातून अभ्यास येतो. अभ्यासातून क्रियाशीलता अंगी बाणली जाते. यातून अभ्यास नवीन होतो. आपल्याला नवीन होण्याचा आनंद वाटतो. हा आनंद संवादातून आपण सहजपणे इतरांना देतो. य���ला मोदक देणे म्हणतात. गणेशाला मोदक प्रिय आहेत. मोदकाला पाच कळय़ा असतात. म्हणजे पंचेन्द्रियांच्या एकीकरणातून हा आनंद मोदकाचा आकार घेतो. हे ज्ञान एकवीस प्रकारे देता येते आणि घेता येते. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कम्रेन्द्रिये = दहा. गुणिले मन + बुद्धी= दोन. वीस + वृत्ती= एकवीस. एकवीस मोदकाची पाळ गणेशाला नवेद्य म्हणून दाखवावयाचे असते.\nगणपतीची मानसपूजा प्रसिद्ध आहे. ती अवघड आहे म्हणून लोक सगुण पूजा करतात. मनातील जळमटे निघून जावीत किंवा ती दूर व्हावीत म्हणून गणेशाला दूर्वा वाहतात. पंचखाद्याचा नवेद्य दाखवितात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही इंद्रिये शुद्धरूपाने गणपतीला अर्पण करावयाची म्हणून हे पंचखाद्य असते. कोणत्याही ज्ञानाला मुळात बठक असावी लागते म्हणून गणपती नेहमी आसनस्थ आहे. त्यातून तो असे सुचवितो, ज्याचे ध्यान स्थिर असते त्याचे ज्ञान स्वच्छ असते. त्याला कशाचेही भय नसते. म्हणून गणपतीच्या आसनाची प्रतिमा पूजा करताना आपल्या मनात शुद्ध भावना निर्माण करावयाची असते. ही शुद्ध भावना ज्या तिथीला येते, तिला चतुर्थी म्हणतात. चतुर्थी याचा अर्थ ज्ञानविज्ञानातून आत्मसंवाद हा आहे. म्हणून गणेश चतुर्थी ही चतुर्थी महत्त्वाची मानतात.\nमहाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली सरदार कृष्णाजी काशिनाथ खाजगीवाले यांनी सुरू केला. तेव्हापासून हा उत्सव मोठय़ा प्रमाणात सुरू झाला. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले, ‘‘कर्तबगारी व करारीपणा प्रत्येकाने दाखविला पाहिजे. राष्ट्रीय गुण अंगी बाणावयाचे असतील तर शिस्त पाहिजे, एकी पाहिजे, प्रत्येक माणसाने आपला हेका सोडून भोवतालच्या लोकांशी मिळतेजुळते वागण्यास शिकले पाहिजे. जुटीने कसे वागावे, शिस्त उत्पन्न करून ती कशी पाळावी, आत्मसंयमन कसे करावे हे गणपती उत्सवापासून शिकता येते.’’ हा उद्देश अर्थपूर्ण होता म्हणून या उद्देशाने लोकमान्यांनी या उत्सवाला महत्त्व दिले. समाजात चतन्य निर्माण करण्यासाठी हा उत्सव होता म्हणून त्या काळात कीर्तने, व्याख्याने, प्रवचने, राष्ट्रीय मेळे असे विविध सुसंस्कृत कार्यक्रम होत सामान्य माणसांशी विद्वानांचा संपर्क येण्याचे गणेशोत्सव हे उत्कृष्ट व्यासपीठ होते. त्यामुळे गणेशोत्सव म्हणजे ज्ञानाची आणि कलेची पर्वणी होय.\nमराठी संतांमध्ये ज्ञानेश्व���ांपासून समर्थ रामदासापर्यंत सर्वानी गणेशाचे वर्णन केले आहे. साधू मोरयागोसावी, चिंतामणी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी, कवी मुक्तेश्वर, कवी श्रीधर, सरस्वती गंगाधर, मध्वमुनिश्वर, कवी मोरोपंत, शाहीर प्रभाकर, शाहीर राम जोशी, शाहीर होनाजी बाळा यांनीही गणेशाचे वर्णन केले आहे. समर्थ रामदासांनी गणेशाला आपल्यासाठी मनापासून केलेली सुंदर प्रार्थना लक्षणीय वाटते. ती आपल्या पठणात सक्रिय राहिली तर बाहेरचे आवाज बंद होऊन मनातले आवाज एकमेकांना साहाय्य करतील. अशी बुद्धी श्रीगणेशाने द्यावी. ही गणेशाच्या चरणी दोन हात जोडून प्रार्थना.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.steelprotectionpack.com/mr/vci-pp-woven-wrap-film.html", "date_download": "2019-03-25T07:28:25Z", "digest": "sha1:72O6YEDJVOWP3ANHV7WPYVDUWYKMPIHG", "length": 9088, "nlines": 212, "source_domain": "www.steelprotectionpack.com", "title": "VCI प.पू. विणलेल्या ओघ चित्रपट - चीन मा अंशान स्टील पॅकेजिंग", "raw_content": "\nVCI सुरकुत्या असलेले तलम पेपर\nVCI चित्रपट लॅमिनेटेड सुरकुत्या असलेले तलम पेपर\nपीई सह सुरकुत्या kraft कागद\nऑटो headliner साठी सुरकुत्या पेपर\nन विणलेल्या फॅब्रिक PE चित्रपट अस्तर\nVCI प.पू. विणलेल्या चित्रपट\nस्टील गुंडाळी मशीन पॅकेजिंग\nऑटो छप्पर रेषा सामुग्री\nऑटो व मशिनरी, भाग संरक्षण\nस्टील गुंडाळी / पत्रक हातात-ऑपरेट पॅकेजिंग\nVCI सुरकुत्या अ���लेले तलम पेपर\nVCI चित्रपट लॅमिनेटेड सुरकुत्या असलेले तलम पेपर\nपीई सह सुरकुत्या kraft कागद\nऑटो headliner साठी सुरकुत्या पेपर\nन विणलेल्या फॅब्रिक PE चित्रपट अस्तर\nVCI प.पू. विणलेल्या चित्रपट\nफेरस मेटल साठी VCI कागद\nतांबे साठी VCI कागद\nVCI कागद विणलेल्या फॅब्रिक लॅमिनेटेड\nपीई गरजेचे न विणलेल्या\nVCI प.पू. विणलेल्या ओघ चित्रपट\nVCI प.पू. विणलेल्या चित्रपट थंड-आणले पत्रक (थंड-आणले कार्बन पत्रक, जस्ताचा पत्रक, सिलिकॉन स्टील शीट, इ) गंज विरुद्ध संरक्षित करण्यासाठी डिझाइन विणलेल्या फॅब्रिक, एका बाजूला VCI चित्रपट लेप आहे. VCI प.पू. विणलेल्या चित्रपट गंज संरक्षण, जलरोधक वैशिष्ट्य आणि शारीरिक शक्ती चांगल्या कामगिरी पुरवते, आणि संपर्क, अडथळा आणि अस्थिर गंज इनहिबिटर (VCI) सुमारे एक वर्ष साठ्याची स्थिती अवलंबून संरक्षण प्रदान करते. उत्पादन गुणधर्म उत्कृष्ट वाफ टप्प्यात गंज inhi ...\nपुरवठा योग्यता: 2,000 दरमहा टन\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nVCI प.पू. विणलेल्या चित्रपट थंड-आणले पत्रक (थंड-आणले कार्बन पत्रक, जस्ताचा पत्रक, सिलिकॉन स्टील शीट, इ) गंज विरुद्ध संरक्षित करण्यासाठी डिझाइन विणलेल्या फॅब्रिक, एका बाजूला VCI चित्रपट लेप आहे. VCI प.पू. विणलेल्या चित्रपट गंज संरक्षण, जलरोधक वैशिष्ट्य आणि शारीरिक शक्ती चांगल्या कामगिरी पुरवते, आणि संपर्क, अडथळा आणि अस्थिर गंज इनहिबिटर (VCI) सुमारे एक वर्ष साठ्याची स्थिती अवलंबून संरक्षण प्रदान करते.\nउत्कृष्ट वाफ टप्प्यात गंज इनहिबिटर क्षमता;\nउच्च शारीरिक शक्ती आणि अडथळा;\nआकर्षक देखावा, पॅक ऑब्जेक्ट प्रतिमा सुधारणा;\nवापरकर्ता अनुकूल, पॅकेजिंग कार्यक्षमता वाढविण्यासाठी;\n, सुरक्षित पर्यावरणास अनुकूल आणि कचरा;\nVCI प.पू. चित्रपट // प.पू. विणलेल्या फॅब्रिक // प.पू. चित्रपट\nमागील: VCI सुरकुत्या कागद\nपुढे: VCI ताणून चित्रपट\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\nफेरस मेटल साठी VCI कागद\nउच्च शक्ती ताणून चित्रपट\nपीई गरजेचे सुरकुत्या कागद\nVCI कागद विणलेल्या फॅब्रिक लॅमिनेटेड\nतांबे साठी VCI कागद\nमल्टी धातूची VCI कागद\nकंपनी: मा अंशान स्टील पॅकेजिंग सामुग्री तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nसेलिना: हाय, आमच्या वेबसाईटला भेट द्या आपले स्वागत आहे.\nसेलिना: मी तुला मदत करू शकतो का\nकोणत्याही धन्यवाद आता चॅट\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/punenagar-news/immersion-in-river-in-sangamner-1145354/", "date_download": "2019-03-25T08:23:19Z", "digest": "sha1:ETA4Z2PR7JYDZT4YA7LO7C2I54BMCW4Q", "length": 12674, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संगमनेरला नदीपात्रातच गणेश विसर्जन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nसंगमनेरला नदीपात्रातच गणेश विसर्जन\nसंगमनेरला नदीपात्रातच गणेश विसर्जन\nप्रवरा पात्रात धरणातून पाणी सोडल्याने अखेर शहरातील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.\nप्रवरा पात्रात धरणातून पाणी सोडल्याने अखेर शहरातील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. मात्र नदीतील डोहात बुडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या प्रशांत कोकाटे (वय-२१) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने विसर्जनाच्या आनंदात विरजण पडले. अचानक पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने ऐनवेळी मिरवणुकीची तयारी करताना कार्यकर्त्यांची मोठी कसरत झाली.\nजोपर्यंत नदीला पाणी येत नाही तोवर विसर्जन न करण्याच्या निर्णय सर्वपक्षीय गणेशोत्सव मंडळांनी घेतला होता. त्यामुळे संगमनेरचे गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार नसल्याचे निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर वेगाने सूत्रे फिरली आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरून शनिवारी रात्री बाराच्या सुमारास निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. रविवारी सकाळपर्यंत अनेकांना पाणी सोडण्यात आल्याबाबत कल्पना नव्हती. अखेर पाणी सेाडल्याची खात्री पटल्यानंतर सर्वाची एकच धावपळ उडाली. दरम्यान पाणी सोडणार नसल्याची खात्री झालेल्या नगरपालिकेने किमान घरगुती गणपतींचे विसर्जन करता यावे यासाठी शनिवारी रात्री जेसीबी लाऊन नदीपीत्रात मोठमोठे खड्डे खोदले. पालिकेचा लाखो रूपयांचा खर्च प्रवरेला आलेल्या पाण्यात वाहून गेला.\nशनिवारी मध्यरात्री सोडलेले पाणी रविवारी दुपारी चार वाजता शहराच्या हद्दीत पोहोचले. तोवर वाट पाहून थकलेल्या छोटय़ा-छोटय़ा मंडळांनी व घरगुती गणरायाचे पात्रात असलेल्या डोहात विसर्जन करून घेत��े. दरम्यान आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते सकाळी मानाच्या गणपतींची विधिवत पूजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर एकेक करत सगळे गणपती विसर्जन मार्गावर दाखल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावर्षी प्रथमच डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून संगमनेरकरांना मुक्ती मिळाली. गुलालाचाही वापर झाली नाही. रात्री दहानंतर एकेक गणपती नदीपात्राकडे मार्गस्थ होऊन मिरवणुकीची सांगता झाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nSonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’\n‘भारताच्या भवितव्यासाठी नदीजोड प्रकल्प आवश्यक’\nरत्नागिरीत कारचा टायर फुटून इनोव्हा नदीत कोसळली, चौघे बेपत्ता\nकार्यकर्त्यांचा उत्साह अन् उत्सवाचा ‘इव्हेंट’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/26-iot-botnets", "date_download": "2019-03-25T07:24:18Z", "digest": "sha1:2UQWJO5DZCA4WIRW4GMNPBF44VABQYN5", "length": 7602, "nlines": 30, "source_domain": "isabelny.com", "title": "IoT Botnets - आपल्या संगणकाचे संरक्षण कसे करण्यासाठी वर मिडल एक मार्गदर्शक", "raw_content": "\nIoT Botnets - आपल्या संगणकाचे संरक्षण कसे करण्यासाठी वर मिडल एक मार्गदर्शक\nयात काहीच शंका नाही की झ्यूस, टायगरबोट आणि डूडर ड्रीम हा मोबाइल बोटंटाची सर्वात सामान्य उदाहरणे आहेत जे त्यांचे काम करतात आणि जवळजवळ दररोज इतर प्लॅटफॉर्मचे नुकसान करता��. तथापि, बोओनेट फील्डमध्ये आयओटीची उदय एक वास्तविक घटना बनला, ज्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात उपकरणांवर परिणाम झाला. गोष्टींची इंटरनेटची सुरक्षा (आयओटी) ही दिवस मुख्य चिंता आहे. आयओटी बोनेटट्सची उत्क्रांती आजकाल सायबर सिक्युरिटीजचा ज्वलंत विषय आहे. आणखी बॉटनेटबद्दल सांगायचं आहे की मीराई बॉटनेटने विविध उच्च-प्रोफाइल डीडीओएस हल्ले लाँच केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात तांत्रिक आणि गैर-तांत्रिक उपकरणांवर परिणाम झाला - pillbox hats for mother of the bride. IoT साधने व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ते कडक सुरक्षा नियमांचे पालन करतात परंतु ते अद्यापही कार्य करत नाहीत.\nआयओटी बॉटनेट हल्ले कसे शोधतात आणि ते कसे टाळावेत\nआयओएआर गमनेंको, द Semaltटट ग्राहक यशस्वी व्यवस्थापक:\nदेऊ केलेल्या खालील पद्धतींसह आपण आयओटी हल्ल्यांना सहज ओळखू शकतो आणि रोखू शकता\nपद्धत №1: मूलभूत सायबर सुरक्षा उपाय:\nही वेळ आहे जेव्हा आपण आयओटी बोनेटनेटच्या हल्ल्यांचा शोध लावून त्यावर प्रतिबंध करण्याचा विचार केला पाहिजे. मूलभूत सायबर सुरक्षा उपाय पुरेसे नाहीत, ज्याचा अर्थ आहे की आपण पारंपारिक तंत्रांव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा विचार करावा लागतो..\nपद्धत № 2: निष्क्रीय आणि सक्रिय यंत्रणा:\nबोनेटट आणि आयओटी हल्ल्यांच्या तपासणीसाठी वेगवेगळ्या निष्क्रिय आणि सक्रिय यंत्रणा आहेत. बोतमास्टर्स आणि सांगकामे यांच्यातील वाहत्येचे मूल्यांकन आणि विश्लेषणावर सर्वोत्तम बॉटनेट ओळख पद्धती आधारित आहेत.\nपद्धत №3: HTTP सेवा:\nत्यांच्या कार्य आणि संप्रेषणासाठी HTTP सेवांवर अवलंबून असलेले बोनेटस शोधणे कठीण आहे. याचे कारण असे की बोटमास्टर आणि बॉट्स यांच्यातील संवाद नेहमीच एनक्रिप्टेड स्वरूपात असतो.\nपद्धत 4: सामूहिक प्रयत्न\nबॉटनेट हल्ले रोखण्यासाठी तुम्ही उद्योजक, सुरक्षा तज्ञ, उत्पादक कंपन्या, डोमेन रजिस्ट्रार, डोमेन रजिस्ट्रार, क्लाऊड सर्व्हिसेस् पुरवठादार आणि स्थानिक व आंतरराष्ट्रीय कायदे अंमलबजावणी करणाऱया कंपन्यांचे सामूहिक प्रयत्न करावे.\nपद्धत №5: कोऑर्डिनेटेड तंत्र आणि बोनेटचे आक्रमण काढण्याचे:\nआपण बोनेट अॅटॅक शोधणे, दूर करणे, सूचित करणे, आणि सुधारणा करणे यासाठी एकत्रित आणि सामूहिक प्रयत्न करणे संशयास्पद वेबसाइट आणि ब्लॉग टाळत आहे. IoT botnets आणि cybersecurity बद्दल जागरुकता आपल्याला ऑनलाइन जगण्यासाठी आवश्यक आहे. तसेच, आपण cybersecurity धमक्या आणि जोखीम विषयी जागरूक असले पाहिजे जेणेकरून आपण इतर वापरकर्त्यांना देखील मदत करु शकता. सायबर सुरक्षा अधिका-याच्या देखरेखीखाली धमक्या शोधून काढा आणि संरक्षित करा. आयओटी बोनेटचे आक्रमण शोधून काढण्याचे एकमेव उपाय आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात.\nआपण नेहमी लक्षात ठेवावे की बोतनेट व आयओटी हल्ल्यादरम्यान, आपला संगणक व्हायरसद्वारे स्पॅम पसरविते आणि वापरकर्त्यांना फिशिंग ईमेल पाठविते. संशयास्पद दुव्यांवर क्लिक करा आणि अजीब फाइल्स डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांना हे सापळावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/unsolved-murder-mysteries-in-india/", "date_download": "2019-03-25T07:26:16Z", "digest": "sha1:X32FNU5HDY3VRKETEHR5OZ74XGOBOP3R", "length": 30491, "nlines": 184, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतात सिनेस्टार, क्रिकेटपटू आणि राजकीय व्यक्ती नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतात. सामान्य व्यक्तींना यांच्याविषयी नेहमीच औत्सुक्य असते. त्यामुळेच की काय नाक्या-नाक्यापासून ते आजच्या समाजमाध्यमांपर्यंत अखंड चर्चा झडतांना दिसतात.\nअसाच त्यापैकी एक विषय म्हणजे लोकप्रिय व्यक्तींचे मृत्यू आणि त्यामागे काही खऱ्या तर बराचश्या काल्पनिक कथा\nराजकीय नेत्यांचे मृत्यू आणि कट कारस्थान यांचं तर समीकरण अतूट आहे. या लेखात अशाच काही राजकीय व्यक्तींच्या मृत्यूला असलेली गूढतेची किनार दिसून येते.\nया राजकीय व्यक्तींमध्ये अगदी स्वातंत्र्य तोंडावर असतांना विमान अपघातात मृत्यू पावलेले सुभाषचंद्र बोस आहेत त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळवल्यानंतर विरोधी पक्षात असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी ते फुटीरतावादी नेता अब्दुल घणी लोन अशा अनेक प्रवाहातील नेत्यांचा समावेश आहे.\nया नेत्यांचे मृत्यू जनतेला स्वीकारणे कधी जड गेले तर कधी ते नाकारले गेले. अशाच काही राजकीय नेत्यांच्या गूढ मृत्यूंबद्दल….\nमृत्यू : १८ ऑगस्ट १९४५\nभारत स्वतंत्र होण्यात दुसऱ्या महायुद्धाने देखील महत्व��ची भूमिका बजावली होती. या काळातच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने जनतेच्या शोकाला अंत राहिला नाही. अनेकांनी तो स्वीकारालाच नाही. तत्कालीन ब्रिटिश सरकारने नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा तेपई येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याचे जाहीर केले.\nत्यांच्या मृत्यूच्या अनेक वेगवेगळ्या कथा समोर येत होत्या. त्यात कुठेच साम्य नव्हते. जनतेला देखील कुठेतरी आशा होती की नेताजी जिवंत आहेत.\nते नक्की अपघातात वारले की त्यामागे काही घातपात होता इथपासून ते त्यावेळी रशियन सरकारच्या ताब्यात होते असे अनेक निष्कर्ष काढले गेले.\nभारतात मौनी बाबा या नावाने असलेले एक संन्यासी हेच नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत अशीही एक वदंता होती. पुढे १९५६ मध्ये नेताजींच्या मृत्यूबद्दल सत्य शोधण्यासाठी शाह नवाज समिती स्थापन करण्यात आली. अंतिम निष्कर्ष काही निघाला नाही त्यानंतर अनेक समिती नेमण्यात आल्या. आजही नेताजींच्या मृत्यूबद्दल गूढ कायम आहे.\n२. श्यामा प्रसाद मुखर्जी\nमृत्यू : २३ जून १९५३\nपंडित जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेले श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मृत्यूचे गूढ उकलले गेले नाही. काशमीरच्या मुद्द्यावरून पंडित नेहरुंसोबत मतभेद झाल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनसंघाची स्थापना केली. काशमीरचे कलाम ३७०, वेगळे संविधान आणि ध्वज यांवरून त्यांनी मतभेद दर्शवले.\n“एक देश में दो निशाण, दो विधान, दो प्रधान नही चलेगा, नही चलेगा” अशी त्यांची घोषणा होती.\nआपला विरोध दाखविण्यासाठी त्यांनी १९५३ मध्ये काशमीर खोऱ्यात प्रवेश केला आणि त्यांना लगेच अटक करण्यात आली. कोठडीत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.\nवर्तमानपत्रात मृत्यू हृदयविकाराने झाला असे सांगण्यात आले पण त्याला काही आधार नव्हता. त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन देखील करण्यात आले नाही.\nत्यांचे प्रेत सरळ कोलकाता येथे पाठवण्यात आले. हा सगळाच प्रकार संशयास्पद असाच आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आईने वारंवार विनंती करून देखील पंडित नेहरू यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.\nअटल बिहारी वाजपेयी यांनी देखील पंडित नेहरूंच्या दुर्लक्षामुळे अशी दुर्दैवी घटना घडल्याचे आरोप केले. हा मृत्यू म्हणजे एक गूढ आहे की सत्य दिसत असूनही त्याकडे हितसंबंध राखण्यासाठी कानाडोळा करण्यात आला हा प्रश्न कायम आहे.\n३. लाल बहादूर शास्त्री\nमृत्यू : ११ जानेवारी १९६६\nपंतप्रधान असतांना लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद झाल्याने झाला असल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्यांच्यावर विषप्रयोग झाला असा कयास लावण्यात येत होता.\nशास्त्रीचें ताश्कंद ला तसेच दिल्ली ला शवविच्छेदन न झाल्याने विषप्रयोगाच्या आरोपाला बळ मिळालं.\nत्यांचे शरीर निळे पडले होते मात्र मृतदेह ताश्कंदहून भारतात आणतांना कुजू नये म्हणून प्रक्रिया केली असल्याचे सांगण्यात आले होते. २००९ मध्ये माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता सरकारनं लोकहिताच्या दृष्टिकोनातून माहिती देणं नाकारलं.\n४. एल. एन. मिश्रा\nमृत्यू : ३ जानेवारी १९७५\nइंदिरा गांधींचे पाठीराखे असलेले एल. एन. मिश्रा हे बिहारमधील मोठे राजकीय प्रस्थ होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे मंत्री म्हणून कार्यरत होते. समस्तीपूर – मुजफ्फरपूर ब्रॉड गेज रेल्वे लाईनच्या उद्घाटनासाठी ते त्याठिकाणी गेले असता कार्यक्रमाच्या मंचावरच बॉम्बस्फोट करण्यात आला.\nजखमी अवस्थेतही त्यांनी आपल्याला रेल्वेच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचे निर्देश दिले. मात्र दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nतपासादरम्यान संशयाची सुई “आनंदमार्गी” या गटाकडे होती. मात्र हा कट व्यापक होता त्यात अजूनही दुसरे कोणी असण्याची शक्यता होती. सीआयए कडे देखील बोट दाखवण्यात येत होते. एल. एन. मिश्रा यांच्या कुटुंबियांनी देखील ही राजकीय हत्या असल्याचे सांगितले.\nमृत्यू : २३ जून १९८०\n१९७९ मध्ये जनता पक्षाला हरवून इंदिरा गांधींनी सत्तेत पुनरागमन केलं होतं. त्यांचा मुलगा आणि सत्तेच्या वर्तुळातील मोठं नाव म्हणजे संजय गांधी यांनी देखील अमेठी मधून विजय प्राप्त केला होता. गांधी घराण्याने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली होती.\nमात्र अशातच २३ जून ला संजय गांधी विमान अपघातात मृत्यू पावले. ते स्वतः विमान उडवत होते आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रशिक्षकाचा देखील यात मृत्यू झाला.\nआश्चर्य म्हणजे या विमानाचा अपघात झाल्यानंतर त्या विमानाने पेट घेतला नाही जसे इतर अपघातांच्या वेळी होते. अपघाताच्या ठिकाणी त्यांचे घड्याळ आणि अंगठी देखील सापडले नाही.\nत्यामुळेच संशयाला जागा निर्माण झाली आणि आजही तो संशय घेतला जातो. संजय गांधी सत्तेच्या अशा स्थानी होते की त्यांना शत्रू असणे अपरिहार्य होते. त्यांचा स्वभावही बेधडक होता. तेव्हा त्यांचा मृत्यू जसा मनाला चटका लावणारा होता तसा गूढही होता.\n६. सरदार बेअंत सिंह\nमृत्यू : ३१ ऑगस्ट १९९५\nखलिस्तान या दहशतवादी चळवळीचा पंजाब मधून अंत करण्यात ज्यांनी मोठे योगदान दिले, असे पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार बेअंत सिंह यांची हत्या ही राजकीय हत्या होती. मंत्रालयाच्या बाहेर बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला.\nया स्फोटात इतर १४ लोकांना देखील जीव गमवावे लागले. यांत ३ सुरक्षा रक्षकांचा देखील समावेश होता. पंजाब मध्ये शांतता नांदत असतांना अशी दुर्दैवी घटना घडली. नंतर या कटात सामील असलेले आरोपी पकडण्यात आले.\nमृत्यू : ३१ मार्च १९९७\nआपले जेएनयू मधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिहारमधील सिवान येथे कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) चा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून चंद्रशेखर प्रसाद दाखल झाला होता.\nसिवान मधील एका सभेला संबोधित करत असतांना थेट गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.\nत्यावेळेस बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत होता. त्याच पक्षातील बाहुबली नेते मोहम्मद सोहराबुददीन यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या घडवण्यात आली असा आरोप झाला.\nयाविरुद्ध डाव्या संघटनांच्या विद्यार्थी चळवळीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले तेव्हा सुद्धा साधू यादव यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. ही राजकीय हत्या राजकारण ढवळून काढणारी होती.\nमृत्यू : २५ जुलै २००१\nचंबळची दरोडेखोर म्हणून आपला मोठा दबदबा निर्माण करणारी फूलनदेवी राजकीय जीवनात सक्रिय झाली होती. तिला समाजवादी पक्षाकडून खासदारकीची उमेदवारी मिळाली होती.\nमिर्झापूर या मतदारसंघातून तिने निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. १९८१ मध्ये ठाकूर जातीच्या २१ लोकांची हत्या करून तिने आपल्या क्रूरतेची साक्ष दिली होती.\nतिच्यावर ४८ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. अखेरीस तिने शरणागती पत्करली आणि ११ वर्षे तुरुंगात काढली. पुढे तुरुंगातील चांगल्या वागणुकीवरून तिला मुक्त करण्यात आले.\nआता राजक���य प्रवास सुरु झाला होता. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर दिल्लीतील बंगल्याबाहेर शेर सिंह राणा, धीरज राणा आणि राजबीर यांनी तिची गोळी घालून हत्या केली.\nपुढे या सर्व आरोपीना अटक झाली. मात्र यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे यावर मात्र कोणाकडे उत्तर नाही.\n९. अब्दुल घनी लोण\nमृत्यू : २१ मे २००२\nकाश्मिरी फुटीरतावादी नेता अब्दुल घनी लोण हा पेशाने वकील होता. मोठ्या जमावासमोर आणि पुरेशी सुरक्षा उपलब्ध असतांना त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.\nयावेळी पाकिस्तानी बाजूने घोषणाही देण्यात आल्या. तो स्वतंत्र काशमीरच्या बाजूने होता.\nयाआधीही एका हल्ल्यातून हा काश्मिरी नेता वाचला होता. या हत्येमागे भारत आणि पाकिस्तान दोन्ही असल्याचा आरोप त्याचा मुलगा सज्जाद लोण याने केला.\nमृत्यू : २६ मार्च २००३\nगुजरात चे गृहमंत्री हरेन पंड्या हे सकाळी बाहेर फिरण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचा मृतदेह कार मध्ये आढळून आला.\nही राजकीय हत्याच आहे असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आणि त्यासाठी मोठा लढा त्यांनी दिला.\nयामागे राजकीय नेते आणि वरिष्ठ नोकरशाही आहे असा आरोप मोठ्या प्रमाणावर झाला. त्याच्या जीविताला धोका असल्याचा आधीच खुलासा संजीव भट या त्यांच्या विश्वासातील पोलीस अधिकाऱ्याने केला होता.\nगुजरातमधील २००२ साली उसळलेल्या दंगलींनंतर ही हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.\nभारतात लोकशाही असून त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात या राजकीय हत्या मोठा अडथळा निर्माण करतात. या घटना दुर्दैवी आहेत.\nयात सहभागी असलेले अनेक नावं उजेडात येत नाहीत हे अधिक धोकादायक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून लोकशाही मूल्ये अधिक प्रमाणात प्रबळ होणे गरजेचे आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← शेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या मराठमोळ्या परमवीर चक्र विजेत्या सैनिकाची थरारक कथा\nभारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल \nभारतातील या ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्सच्या थरारक कथा अंगावर काटा आणतात\nजगातील अश्या विचित्र गोष्टी, ज्या कोठून उत्पन्न झाल्या, ते कोणालाच माहित नाही\nगुन्हेगारांचीच ‘सिरीयल क��लिंग’ करणाऱ्या या क्रूर खुन्याची कथा अंगावर काटा आणते\n3 thoughts on “भारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही”\nया लेखात राजीव दिक्षीत यांच्या death चा समावेश व्हायला हवा होता\nमुलींचे हे कॉमन “फॅशन ट्रेंड्स” मुलांना अजिबात आवडत नाहीत\n“जंगल जंगल बात चली है” – नाना पाटेकर, इरफान, ओम पुरी आणि प्रियांका चोप्राची \nअवैध धंदे, गुंडगिरी आणि रक्तपात: उत्तर प्रदेशमधील रक्तरंजित राजकारणाचे थरारक वास्तव\nराज ठाकरेंची “प्लास्टिक” पत्रकार परिषद\nचिनी स्त्रियांच्या सुंदर नितळ त्वचेचं काय आहे रहस्य\nचीडलेल्या धोनी ने दिलं पत्रकाराला आक्रमक उत्तर\nभारत-इस्त्रायल संबंध : “पॅन-इस्लामचा” चा अडथळा\nTom Cruise: एवढं काय ग्रेट आहे ह्या माणसाबद्दल\nन्यायमूर्ती अभय ओक आणि भाजपा सरकारची स्वार्थी भूमिका\nया तुरुंगात कैदी बनून जाण्यासाठी चक्क पैसे भरावे लागतात\n“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती\nभारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग\nस्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं करताना ऊर्जा आणि वेळ वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स\nश्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे फार काही नको – फक्त ह्या १३ क्वॉलिटीज असायला हव्यात\nहैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत\nजम्मू काश्मीरमध्ये सार्वमत (रेफ्रंडम) घेणं चुकीचं का आहे\nबाहुबलीमध्ये दाखवलेले ‘महिष्मती साम्राज्य’ खरंच प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होते\nयाच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…\nमनाला भुरळ घालणारा मोती तयार कसा होतो\nतुमच्या नकळत, भारतात घडतीये एक सुप्त क्रांती : तिचे लाभ मिळवून घेणं अत्यंत आवश्यक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85/", "date_download": "2019-03-25T07:45:43Z", "digest": "sha1:WULKV5DUUSL2QDTKM4VJURYB7TERTRF7", "length": 9115, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : रायगाव फाट्यावर अपघात;एक ठार;तीन जखमी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : रायगाव फाट्यावर अपघात;एक ठार;तीन जखमी\nसातारा: आनेवाडी टोलनाक्यानजीक रायगाव फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहुन सातारच्या दिशेने निघालेली पिकअप गाडी रायगाव फाट्यावर कंटेनरला पाठीमागुन धडकल्याने एक जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nहात नसलेली अर्चना सोडविते 10 वीचे पेपर\nभुईंज पोलीसांना कायद्यापेक्षा आयजी मोठा \nपवारांनी साताऱ्याची द ग्रेट सर्कस केली; पंजाबराव पाटलांची घणाघाती टिका\nमोदीनंतर आता पवारांची साताऱ्यात व्हिडीओ कॉन्फरन्स\nपक्षाने उमेदवारी दिल्यास खासदारकी ताकदीने लढू\nखासदार उदयनराजेंनी पुन्हा कॉलर उडवली\nछ. उदयनराजेंचे चिन्ह कोणते याचीच उत्सुकता\nसातऱ्यात राष्ट्रवादीचा दबावाच्या सर्जिकल स्ट्राईकशी सामना\n#व्हिडीओ : भारतीय वायूसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शर��� पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/node/2145", "date_download": "2019-03-25T07:43:18Z", "digest": "sha1:LX7B76WIBESN4EFXFDCD4M42DTIG6ELD", "length": 6895, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news nagpur rainy session adjourned | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपुरात कोसळधार ; पावसामुळे विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित\nनागपुरात कोसळधार ; पावसामुळे विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित\nनागपुरात कोसळधार ; पावसामुळे विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित\nनागपुरात कोसळधार ; पावसामुळे विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nनागपूर : पावसाळी अधिवेशन अट्टहासाने नागपूरला घेतल्यानंतर आज पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करावे लागले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे विधानभवनच्या पॉवर हाऊसमधे पाणी साचले आणि त्यामुऴे संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अधिवेशन बंद करावे लागले.\nपॉवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला त्यामुळे विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती.\nनागपूर : पावसाळी अधिवेशन अट्टहासाने नागपूरला घेतल्यानंतर आज पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करावे लागले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे विधानभवनच्या पॉवर हाऊसमधे पाणी साचले आणि त्यामुऴे संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अधिवेशन बंद करावे लागले.\nपॉवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला त्यामुळे विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती.\nविरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टिका केली. अजित पवार यांनी संताप व्यक्त करत कशाला केला होता अट्टहास मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय असा सवाल केला. नागपूर महापालिकेची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना आमदाराने केली. विधानभवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधानभवन आवारात विचारत होते.\nनागपूर nagpur अधिवेशन वीज महाराष्ट्र maharashtra अजित पवार\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/maj-phirphiruni/", "date_download": "2019-03-25T07:41:35Z", "digest": "sha1:ZCSIFI7M6JLQ5HQZUYEGDI4PKY5CI3HH", "length": 6084, "nlines": 64, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nमज फिरफिरुनी छळीसी का\nमज फिरफिरुनी छळीसी का\nगुणगुणुनी कानी का वदे फुलराणी\nमज फिरफिरुनी छळीसी का\nही गुढ गीते गासी कशाला\nतू भृंग काळा, मी गौर बाला\nवनी रानी नसे कोणी\nमज फिरफिरुनी छळीसी का\n'माझा मुलगा' हा प्रभातचा सर्वस्वी सामाजिक, मध्यमवर्गीयांच्या नातेसंबंधांवरील कथा असलेले चित्र. या चित्रातील 'पाहू रे किती वाट' आणि 'उसळत तेज भरे गगनात' ही दोन गाणी शांता हुबळीकर यांच्या आवाजात लोकांच्या पसंतीस उतरली. 'उसळत तेज भरे गगनात' या गाण्याच्या वेळी त्या गाण्यात काय आशय हवा आहे हे आठवल्यांना सांगताना व्ही शांताराम म्हणाले होते की, \"मला या गाण्यात एखादा बैरागी गातो तसं वर वर जाणारं, आभाळाला भिडणारं काही तरी हवं आहे\" 'पाहू रे किती वाट' यातील समुद्राच्या लाटा वर उसळल्याचा आभास उत्पन्न करणारे विलक्षण ताकदीचे संगीत लक्षणीय आहे.\nमज फिरफिरुनी छळीसी का\nउसळत तेज भरे गगनात\nजीवा, तुझ्या मोहिनीने भारिले\nपाहू रे किती वाट\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत र��हू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2016-Draksh.html", "date_download": "2019-03-25T08:09:57Z", "digest": "sha1:E3YWR2CLYKOMVXLGUJ6RGN2EVWYXW75Y", "length": 3006, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - द्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी संजीवनीच", "raw_content": "\nद्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी संजीवनीच\nश्री. विश्वास बाबुराव पाटील, मु.पो. नागाव (कवठे एकंद), ता. तासगाव, जि. सांगली. मो. ९०९६१४०५०२\nमाझ्याकडे १२ वर्षाची ३ एकर सोनाका व थॉमसन बाग आहे. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे गेली ११ वर्षापासून वापरात आहे. मी चालू वर्षी एप्रिल छाटणी १० एप्रिल २०१६ रोजी घेतली. द्राक्षबाग फुटण्यासाठी वातावरण अनुकूल नव्हते. तेव्हा जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी प्रमाणे घेऊन ओलांडे पुर्णपणे धुऊन (दाट फवारणी) घेतले. तर माझी द्राक्ष बाग एकसारखी फुटली. तसेच ५ पानांवरती असताना व तेथून पुढे प्रत्येक १० दिवसांनी याप्रमाणे थ्राईवर ३ मिली + क्रॉपशाईनर ३ मिली/लि. पाणी याप्रमाणे ३ फवारण्या केल्या. त्यामुळे पानांची कॅनॉपी चांगल्या प्रकारे मिळाली. काडीच्या पक्वतेला चांगला प्रतिसाद मिळाला. एप्रिल छाटणीनंतर ६० दिवसांनी १० - १० दिवसांच्या अंतराने राईपनर ४ मिली/लि. पाणी याप्रमाणे २ फवारण्या घेतल्या. त्यामुळे काडी एकसारखी पिकण्यास मदत झाली. अशाप्रकारे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे द्राक्ष बागायतदारांना एक संजीवनीच ठरत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090718/main.htm", "date_download": "2019-03-25T08:19:07Z", "digest": "sha1:FTOWJAOFK7ZUP37XI26FJYRMMKNS7BPS", "length": 15677, "nlines": 43, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, १८ जुलै २००९\nअनधिकृत नर���सिग होम्सचा सुळसुळाट\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास पालिका प्रशासनाची टाळाटाळ\nसंदीप आचार्य, मुंबई, १७ जुलै\nराजकारणी आणि बिल्डर यांच्या साटय़ालोटय़ातून कधी नियमात बसवून तर कधी नियमांना बगल देत बांधकाम क्षेत्रासह ट्रस्टची अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय महाविद्यालये काढली जातात. या साऱ्यात नियम वाकवणे, नियमांना बगल देणे अथवा नियमात फेरबदल करून ते ‘बसवून’ घेण्याचे ‘कौशल्या’चे काम करतात ते सनदी अधिकारी. मुंबईत ‘विकास नियंत्रण नियमावली १९९१’ (डिसी रुल) मधील तरतुदी धाब्यावर बसवून किमान १२०० नर्सिग होम आज बेकायदा व्यवसाय करत आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांमध्ये ही नर्सिग होम्स बंद करावीत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही मुंबई महापालिका प्रशासनातील उच्चपदस्थ या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याऐवजी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईचे आदेश काही विशिष्ट कालावधीसाठी स्थगित ठेवावेत अशी अजब अपेक्षा गटनेत्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे.\nएरंडोलजवळ भीषण अपघातात १० ठार\nजळगाव, १७ जुलै / वार्ताहर\nमुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल जवळ आज सकाळी मारूती ओम्नी टॅक्सी आणि टँकरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात १० प्रवासी ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी हे जळगाव जिल्ह्य़ातील आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकरचालकास अटक करण्यात आली आहे. जळगाव येथील काही युवकांचा गट गणेश मूर्ती घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. सकाळी प्रवासी घेवून जाणाऱ्या टॅक्सीने ते निघाले होते. ही व्हॅन एरंडोल गावाजवळ एका हॉटेलजवळ पोहोचली असताना समोरून भरधाव येणाऱ्या टँकरने तिला जोरदार धडक दिली.\nशासन निर्णयाची कुऱ्हाड म. गांधींच्या शाळेवरही\nशुभदा चौकर , मुंबई, १७ जुलै\nअनुदानाचा भार नको म्हणून नव्या मराठी शाळांना मान्यता न देण्याच्या राज्य शासनाच्या करंटेपणाची कुऱ्हाड प्रयोगशील खासगी मराठी शाळांनाही बसली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या महात्मा गांधीजींनी भारताचे पहिले शैक्षणिक धोरण आखले त्यांच��याच ‘नई तालिम’ संस्थेच्या ‘आनंद निकेतन’ शाळेलाही गेली पाच वर्षे प्रयत्न करूनही अद्याप परवानगी मिळालेली नाही. ‘आनंद निकेतन’ नावाचीच नाशिक येथील प्रयोगशील शाळाही मान्यतेअभावी कचाटय़ात सापडली आहे. मुख्य म्हणजे या शाळांना शासनाचे अनुदान नकोच आहे. कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळा चालविण्याची त्यांची नीती आहे. असे असतानाही राज्य शासनाने त्यांना शाळा चालविण्याची परवानगी देऊ नये याचा खेद वाटून हे शाळाचालक अत्यंत उद्विग्न झाले आहेत.\nएअर इंडियाच्या अध्यक्षांचेच कर्मचाऱ्यांपुढे महाघोटाळ्याचे सूतोवाच \nसमर खडस, मुंबई, १७ जुलै\nतब्बल ७००० कोटींचा तोटा झाल्याने आता कर्मचाऱ्यांनी चांगले व अधिक काम करावे, असे सांगणाऱ्यांची तोंडे बंद व्हावी, असे महाघोटाळ्याचे धक्कादायक सूतोवाच एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव यांनी केबीन क्रू असोसिएशनच्या बैठकीत केले. एअर इंडियाच्या विमानांच्या तिकीटांच्या आरक्षणात महाघोटाळा सुरू असल्याची माहिती अध्यक्षांनी स्वत:च दिल्याने कर्मचारी अवाक झाले. हा घोटाळ्याची पाळेमुळे शोधून काढून त्याचे उच्चाटन करण्याचे आश्वासनही जाधव यांनी कर्मचाऱ्यांसमोर दिले. मात्र ७००० कोटींचा हा तोटा कर्मचाऱ्यांच्या आळशीपणामुळे झाल्याचा गेल्या इतक्या दिवसांचा ‘एअर इंडिया’तील विविध ‘साहेबां’चा आरोप पूर्ण चुकीचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.\nपाईप गॅस आणि सीएनजी महागला\nमुंबई, १७ जुलै / प्रतिनिधी\nमहानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) उद्या शनिवारपासून मुंबईसह ठाण्यात सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. सीएसजीखेरीज लाखो घरांमध्ये पाईपलाईनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या ‘पीएनजी’च्या दरामध्येही वाढ होणार आहे. सीएनजी व पीएनजीच्या या दरवाढीमुळे शहरातील टॅक्सी, रिक्षा व बसप्रवास महागण्याची शक्यता आहे. नव्या दरानुसार प्रति किलो सीएनजीसाठी वाहनधारकांना मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये अनुक्रमे २४.६५, २५.२१, २४.७७ आणि २४.८८ रुपये मोजावे लागणार आहेत. याखेरीज प्रति किलो ‘पीएनजी’साठी मुंबईत १३.६० रु., ठाण्यात १३.६५ रु. आणि मीरा-भाईंदरमध्ये १३.६७ रुपये मोजावे लागणार आहेत. उद्या शनिवारपासून ही दरवाढ लागू होईल, असे एमजीएलच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.\nपावसाळ्यात साथी��्या रोगांचे आजवर ३६ बळी\nमुंबई, १७ जुलै / प्रतिनिधी\nपावसाळ्याच्या सुरुवातीपासून साथीच्या रोगांमुळे आजवर मुंबईत ३६ जण दगावले आहेत. त्यापैकी १६ जण या महिन्यात दगावले असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. हिवताप, ताप, ग्रॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या रोगांमुळे १ ते १७ जुलै या काळात दगावलेल्या १६ रुग्णांपैकी सर्वाधिक ११ रुग्ण तापाच्या साथीमुळे व त्याखालोखाल तीन रुग्ण हिवतापामुळे मरण पावले आहेत. ग्रॅस्ट्रो व डेंग्यूमुळे प्रत्येकी एकेक रुग्ण दगावला आहे. मागील वर्षी या कालावधीत साथीच्या रोगांनी १४ जणांचा बळी घेतला होता, अशी माहिती महापालिकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मुंबईत आज दिवसभरात साथीच्या आजारांमुळे सुमारे ३५० जणांना रुग्णालयांत दाखल केले होते. त्यापैकी ताप आणि हिवतापामुळे प्रत्येक एकेकजण दगावला आहे. हिवतापाचे रुग्ण आढळून आलेल्या भागांत धुम्र फवारणी तसेच अळी नाशक उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चार सदस्यीय समिती\nराज्यातील येत्या विधानसभा निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षाने चार केंद्रीय निरीक्षकांची समिती नेमली असून या समितीमध्ये दिग्विजय सिंग, मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश व रहेमान खान यांचा समावेश आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेस पक्षाची युती होणार असल्याचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. या बाबत दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यात बोलणी सुरू आहेत. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेच्या पाश्र्वभूमीवर काही जागांची अदलाबदल तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की किती जागा सोडण्यात याव्यात याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेणे बाकी आहे. या समितीची औपचारिक घोषणा येत्या एक-दोन दिवसांमध्ये झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस पक्षातील हालचालींना वेग येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/madhi-mashindranath-pilgrims-in-millions-of-devotees-present/", "date_download": "2019-03-25T07:42:46Z", "digest": "sha1:ONMWQT4RRVRKE5M2MSU3MKYMMCIP6YJC", "length": 6474, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाखो भाविकांकडून मच्छिंद्रनाथांचे द���्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › लाखो भाविकांकडून मच्छिंद्रनाथांचे दर्शन\nलाखो भाविकांकडून मच्छिंद्रनाथांचे दर्शन\nनाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी समाधी सोहळ्यास मायंबा (ता. आष्टी) येथे प्रारंभ झाला असून, लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसर नाथांच्या जयजयकाराने दुमदुमुन गेला होता.\nमच्छिंद्रनाथ गडावर कालपासून (दि.16) सोहळ्यास प्रारंभ झाला. या महोत्सवाची सांगता शुक्रवारी धर्मनाथ बीज उत्सवाने होणार आहे. मच्छिंद्रनाथांनी पौष अमवस्येच्या दिवशी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे दरवर्षी या दिवशी राज्यभरातून लाखो नाथ भक्त येथे दर्शनाला येतात. नाथांनी समाधी घेण्यापूर्वी काहीकाळ सावरगाव येथे वास्तव केले. त्यावेळी त्यांनी भिक्षा मागून शुद्ध तुपात रोट बनविले होते. त्यामुळे आजही प्रसादासाठी रोट बनविण्याची परंपरा कायम आहे. यात्रेपूर्वी गावातून शिधा जमा करून गडावरील देव तलावाजवळ रोट तयार केले जातात. हा प्रसाद भाविक घरातील धान्यात किवा पैशाच्या कपाटात ठेवतात.\nआज (दि.17) कुस्त्यांचा हगामा भरणार असून, त्यास परराज्यातील मल्ल उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. सोहळ्यास दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व सरपंच राजेंद म्हस्के यांनी दिली. ग्रामस्थांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. मंदिर परिसर नाथांच्या जयजयकाराने दुमदुमुन गेला होता. देवस्थान समितीकडून पिण्याचे पाणी, दर्शनबारी, मोफत निवास व्यवस्था करण्यात आली होती. मढी येथेही कानिफनाथांच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. वृद्धेश्वर, मोहटा देवी, हनुमान टाकळी येथेही भाविकांनी हजेरी लावली. माजी मंत्री तथा मायंबा देवस्थानचे सल्लागार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनबारीचे दुसर्या टप्प्याचे काम वेगात सुरू असून, पर्यटनस्थळ म्हणूनही मायंबा क्षेत्राचा विकास होत आहे. देवस्थानचे सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी स्वागत केले.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्��ात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-prisoner-attempt-to-flee-by-jumping-over-18-feet-of-prison-in-Beed/", "date_download": "2019-03-25T07:46:36Z", "digest": "sha1:LNJMBI4BY6XHARQ2MXMWTZW2FX2YTRJV", "length": 6129, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीड : कारागृहाच्या १८ फूट भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्याचा कैद्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बीड : कारागृहाच्या १८ फूट भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्याचा कैद्याचा प्रयत्न\nबीड : कारागृहाच्या १८ फूट भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्याचा कैद्याचा प्रयत्न\nबीड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याने १८ फुट भिंतीवरून खाली उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यात हा कैदी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर त्याच्या साथीदाराने त्याची अवस्था पाहून थेट कारागृहातच जाणे पसंत केले. आज गुरूवारी बीड कारागृहात ही धक्कादायक घटना घडली. कैदी पळून जाण्याच्या या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. ज्ञानेश्वर बालाजी जाधव (३० रा.रूपचंद नगर तांडा ता.रेणापूर जि.लातूर) असे या जखमी कैद्याचे नाव आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर बालाजी जाधव याला अंबाजोगाई येथील एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कारागृहात असताना तो स्वयंपाकी म्हणून काम करायचा. गुरूवारी पहाटे ज्ञानेश्वर याने कारागृहातच बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या विकास देवकते याच्यासोबत कारागृहातून पळून जाण्याचा कट रचला.\nआज गुरूवारी पहाटे कारागृहात पाणी आणण्याचे काम करत असताना ज्ञानेश्वर हा साथिदार विकाससोबत १८ फुट उंची वरील भिंत वर चढून पळून जाण्याच्या प्रयत्नात १८ फुट उंचीवरून कारागृहाबाहेर उडी मारली. यात तो जोराने जमिनीवर आदळला. यात त्याचा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला. तर असह्य वेदनेने तो बेशुद्ध पडला. आरोपी पळून गेल्याचा हा प्रकार काही वेळा���ंतर कारागृह प्रशासनाला लक्षात आला. कारागृह पोलिसांनी तातडीने कैद्याची शोध मोहिम सुरू केली. तर जखमी ज्ञानेश्वर हा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी ज्ञानेश्वर यास तातडीने ताब्यात घेतले.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Rape-of-a-woman-forcibly-abortion-one-has-filed-a-crime/", "date_download": "2019-03-25T07:43:11Z", "digest": "sha1:YRNVWZSOOXJAYXO3CHMIEX6YILCULZQW", "length": 4897, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युवतीवर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपातही : एकावर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › युवतीवर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपातही : एकावर गुन्हा दाखल\nयुवतीवर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपातही : एकावर गुन्हा दाखल\nशहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील एका युवतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पाच महिने सातत्याने बलात्कार करण्यात आला. त्याशिवाय तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी एकावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली.\nइम्रान पठाण (रा. पाकिजा मस्जिदमागे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. पीडित युवती शंभर फुटी रस्ता परिसरात राहण्यास होती.\nत्यावेळी त्याने तिच्या घरी जाऊन ओळख वाढविली. त्यानंतर त्याने जूनमध्ये ती घरी एकटीच असताना तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत सातत्याने तो अत्याचार करीत होता.\nयामुळे तिला गर्भ राहिला होता. ते समजल्यानंतर इम्रानने जबरदस्तीने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्याने सातत्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने आतापर्यंत फिर्याद दिली नव्हती अ���े पीडितेने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी इम्रानवर बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/do-not-want-pawar-to-have-a-maratha-reservation-says-narayan-rane/", "date_download": "2019-03-25T08:09:55Z", "digest": "sha1:QPDOUQPKMIZG76HDFYYTXXK6F2W5DTAX", "length": 5268, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पवारांना मराठा आरक्षण नको आहे का ? - नारायण राणे", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nपवारांना मराठा आरक्षण नको आहे का \nटीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाबाबतचा प्रश्न शरद पवारांनी आताच का उपस्थित केला, याचा विचार व्हायला हवा. याआधी शरद पवारांनी आर्थिक निकषाचा कधीच उल्लेख केला नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत आताच का चर्चा होतेय आता जे आरक्षण लागू आहे त्या समाजाची आर्थिक परिस्थिती बघूनच ते देण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण हे शैक्षणिक, आर्थिक निकषाच्या आधारावरच मागतोय. पवारांना मराठा आरक्षण नको आहे का हे त्यांनी सांगाव असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांना लगावला आहे.\nसध्या चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीची. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दा गाजत असतानाच आता नारायण राणे यांनीही पवार यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nअसा नरपुंग गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही; आ अनिल गोटेंचे पवारांवरील व्हायरल झालेले पत्र\nप्रतिष्ठा वाचवायची असेल तर अधिवेशनाच्या आधी मंत्रीपदाचा निर्णय घ्या- राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/karnatakas-victory-celebrates-in-pune/", "date_download": "2019-03-25T08:03:03Z", "digest": "sha1:7UT6HINBOQU6BJJOHV7K7P5MP3QUD3JF", "length": 5282, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election : कर्नाटकच्या विजयाचा पुण्यात महापौरांनी वाजवला ढोल !", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nKarnataka Election : कर्नाटकच्या विजयाचा पुण्यात महापौरांनी वाजवला ढोल \nपुणे: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने विजय हस्तगत करण्याकडे वाटचाल केली आहे. या विजयानंतर पुण्यामध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यापुढे विजयाचा जल्लोष केला आहे. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी ढोल वाजवत तर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ताशाचे वादन करत विजय साजरा केला आहे.\nसध्या भाजपा १२० जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा पार केलेल्या भाजपाकडून देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर (जेडीएस) किंगमेकर ठरण्याची शक्यता सर्वच मतदानोत्तर चाचणीत दिसून आली होती. परंतु, देवेगौडा यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बहुमताकडे वाटचाल करत असलेल्या भाजपाने आम्हाला जेडीएसची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nजाणून घ्या दक्षिणेत भाजपला अच्छे दिन दाखवणाऱ्या येडियुरप्पांचा जीवन प्रवास\nKarnataka Election : आता भारतात ‘काँग्रेस खोजो’ अभियान चालेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/you-do-not-want-shivsena-it-hurts-uddhav-thackeray-expressed-his-regret/", "date_download": "2019-03-25T08:08:52Z", "digest": "sha1:XRKYDFBQNA73C2C4PTWTKQ64HOCI24AG", "length": 5546, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत", "raw_content": "\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nराज्यसभेचे आश्वासन, आठवलेंची दक्षिण मध्य मुंबईतून माघार\nमी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाचं नाही : सपना चौधरी\n‘सोनिया गांधी या इटलीत आधी सपना चौधरीसारखचं काम करायच्या’\nतुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत\nटीम महाराष्ट्र देशा: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करतांना खंत व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना २५ वर्षे तुमच्यासोबत असताना तुम्हाला जरा अच्छे दिन आले आणि तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.\nभाजपला टीका करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना नेहमीच भाजपच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. सत्ता आल्यावर आमच्या पदरात काही देत नाही; किमान धोंडे तरी टाकू नका. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.\nयावेळी प्रकाशन सोहळ्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते.\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nहिंदुत्व टिकून आहे तो��र देशात हुकूमशाही, यादवी कदापि येणार नाही- सुनील देवधर\nआता बोलायचीच सोय राहिली नाही; मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/bangladesh-plane-carrying-71-people-crashes-in-nepal/articleshow/63268848.cms", "date_download": "2019-03-25T08:55:07Z", "digest": "sha1:IASHDELHBAKAFJNTR4O6QJV6THHOIO6S", "length": 11733, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Plane Crash: काठमांडू विमानतळाच्या रनवेवर विमान कोसळले - bangladesh plane carrying 71 people crashes in nepal | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nकाठमांडू विमानतळाच्या रनवेवर विमान कोसळले\nनेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना एक विमान कोसळलं आहे. विमानात ६७ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर होते. हे विमान यूएस-बांगला एअरलाइनचे होते. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पूर्वेकडील भागात जाऊन हे विमान कोसळल्याची माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे.\nकाठमांडू विमानतळाच्या रनवेवर विमान कोसळले\nनेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना एक विमान कोसळलं आहे. विमानात ६७ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर होते. हे विमान यूएस-बांगला एअरलाइनचे होते. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पूर्वेकडील भागात जाऊन हे विमान कोसळल्याची माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. जळालेल्या अवस्थेतील काही मृतदेह विमानाच्या अवशेषांतून बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, या दुर्घटनेत किमान ५० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने सैन्याच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने दिले आहे.\nहे विमान ढाकाहून काठमांडूला येत होते. लँडिंगच्या वेळी विमान रनवेच्या दिशेने झुकले आणि जवळच्या फुटबॉल मैदानावर जाऊन आदळले. विमानातून धुराचे लोट निघत आहेत. या अपघातानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांचे बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.\nअद्याप १७ जखमी प्रवाशांना वाचवण्यात आलं आल्याची माहिती पर्यटन मंत्रालयाचे सहसचिव सुरेश आचार्य यांनी दिली. बचावकार्यात नेपाळच्या सैन्याचीदेखील मदत घेण्यात आली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्य�� मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nus warns pakistan: भारतात पुन्हा हल्ला झाल्यास पाकला महागात ...\nNirav Modi: बँक खाते उघडतानाच नीरव मोदीला पकडलं\nपाकिस्तानात २ अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण\nworld happiness day: भारतीयांहून पाकिस्तानी अधिक आनंदी: UN\nसहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाठमांडू विमानतळाच्या रनवेवर विमान कोसळले...\nपगडीधारक शीखास पबमधून हुसकावले...\nवडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं: राहुल गांधी...\nराफेल खरेदीवरून काँग्रेसचे पुन्हा शरसंधान...\nटकलाच्या पासपोर्टची चौकशी होणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/explanation-meaning-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-03-25T07:36:52Z", "digest": "sha1:7XLTAQGSVMP3LWVJ23JSNIMG7W6ZMKTJ", "length": 3697, "nlines": 47, "source_domain": "vicharpravah.in", "title": "Explanation (एक्सप्लनेशन) - स्पष्टीकरण - विचारप्रवाह", "raw_content": "\nExplanation (एक्सप्लनेशन) – स्पष्टीकरण\nExplanation (एक्सप्लनेशन) म्हणजे काय\nएखादी गोष्ट समजण्यास सोपी जावी, ती स्पष्ट व्हावी यासाठी ‘Explanation’ (एक्सप्लनेशन) अर्थात ‘स्पष्टीकरण’ दिले जाते. एखादया गोष्टी मागील कारण, जवाब देण्यासाठी देखील ‘Explanation’ वा ‘स्पष्टीकरण’ दिले जाते.\nExplanation (एक्सप्लनेशन) – स्पष्टीकरण\nExplanation (एक्सप्लनेशन) शब्दाचा उच्चार\nExplanation (एक्सप्लनेशन) शब्दाचा वाक्यात उपयोग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\nSympathy (सिम्पथी) – सहानुभूती\nनासाकडून भविष्यातील मंगळ मोहिमेवरील अंतराळवीरांमधील मतभेदांची च��चपणी\nAvenge (अव्हेंज) – प्रतिशोध\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/ek-hota-raja/", "date_download": "2019-03-25T07:45:47Z", "digest": "sha1:H6PX6PDUO677CRNKML77BHXUMDY32JPG", "length": 7421, "nlines": 70, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nएक होता राजा, एक होती राणी\nअचल तयांची अनुपम प्रीती\nदिव्य तयांची सुंदर नगरी\nदु:ख न तेथे वास करी\nविटुनि आपुल्या सदना उतरे\nबोले राणी – 'मन्मन मोती'\nराजा बोले – 'मी मनचोर'\nराणी बोले – 'चंद्रिकाच मी'\nराजा बोले – 'मीहि चकोर'.\nनाचती लतिका, फुले, झरे.\nजरठविवाह ही सामाजिक समस्या हाताळण्यासाठी चित्रपटाच्या तंत्राचा अत्यंत कुशलतेने वापर करुन व्ही शांताराम यांनी 'कुंकू' ही अप्रतिम कलाकृती दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटातील 'अहा भारत विराजे' आणि 'भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे' या दोन गाण्यात वाद्यमेळ वापरलेला नाही. तांब्यावर काठीने आघात करुन दिलेला ठेका आणि शांता आपटे आणि वासंती यांचे सहजसुंदर आवाज यांनी ही गाणी श्रवणीय झाली आहेत. ही दोन गाणी चित्रपटातील असून त्या काळातील शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली होती. 'मन सुद्ध तुझं, गोस्त हाये प्रिथ्वीमोलाची' हे मास्टर परशुराम यांच्या आवाजातील गाणे आजही लोकप्रिय आहे. व्ही. शांताराम यांनी या चित्रपटात Longfellow लॉंगफेलो या कवीची 'Psalm of Life' साम ऑफ लाईफ ही इंग्लिश कविता शांता आपटे यांच्याकडून एका एंग्लो इंडियन संगीततज्ञाच्या मार्गदर्शनाखाली गाऊन घेतली आहे. त्याच पद्धतीचे गीत आठवले यांनीही लिहिले. \" विशाल हे विश्व भल्या बुऱ्यांचे, नसे फुलांचे नच कंटकांचे\".\nविशाल हे विश्व भल्या बुऱ्यांचे\nभारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावित सतत रूप आगळे\nमन सुद्ध तुझं गोस्त हाये\nअहा भारत विराजे,जगा दिपवीत तेजे\nप्रभुराया रे – हो संकट हे अनिवार\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/umalali-ek/", "date_download": "2019-03-25T08:14:49Z", "digest": "sha1:CIZEQXC6YTWKWC5ZFU3I3GWSFQFG3I3F", "length": 5922, "nlines": 70, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nउमलली एक नवी भावना\nनसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना\nउमलली एक नवी भावना\nअघटीत गेले अवचित होऊन\nविसरुनी गेले मी माझेपण\nरेशिमधागे गुंतविणाऱ्या प्रीतीच्या या खुणा\nउमलली एक नवी भावना\nएक आगळी रसरसलेली प्रकटे नवचेतना\nउमलली एक नवी भावना\nहात असावे असेच हाती\nअचल ध्रुवापरी अपुली प्रीती\nमुक्ती नको मज प्रीतीसाठी जन्म पाहिजे पुन्हा\nउमलली एक नवी भावना\nआठवले यांनी होमी वाडिया यांनी निर्मिलेल्या 'सुभद्राहरण' या चित्रासाठी लिहिलेली आणि वसंत पवार आणि प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेली गीते आजही अत्यंत लोकप्रिय आहेत.'आला वसंत ऋतु आला, 'उमलली एक नवी भावना' 'कुणाला सांगू माझी व्यथा', एकटी मी एकटी', 'बघत राहू दे तुझ्याकडे' ही सर्वच्या सर्व गाणी श्रवणीय आहेत.\nआला वसंत ऋतु आला\nउमलली एक नवी भावना\nकुणाला सांगू माझी व्यथा\nबघत राहू दे तुझ्याकडे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-June2017-Tomato.html", "date_download": "2019-03-25T07:50:28Z", "digest": "sha1:AXOR7QWYTDN25P4LCMRU3RJQ7GW4DDXS", "length": 12206, "nlines": 27, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व टोमॅटो पुस्तकाप्रमाणे टोमॅटो १ एकर ९ हजार रोपे, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २० - २२ हजार, उत्पन्न ४ लाख ७५ हजार, नफा २।। लाख", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व टोमॅटो पुस्तकाप्रमाणे टोमॅटो १ एकर ९ हजार रोपे, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २० - २२ हजार, उत्पन्न ४ लाख ७५ हजार, नफा २\nश्री. आकाश दत्तात्रय पाडळे, मु.पो.ता. वाई, जि. सातारा, मो. ९१४५११७८२५\nअभिनव टोमॅटो १ मार्च २०१६ ला ४ फुट रुंदीच्या बेडवर बेडच्या मधोमध ड्रीपलाईनच्या दोन्ही बाजुने ४ - ४ बोटावर १ - १ फुट अंतरावर झिगझॅग प��्धतीने लावले. तयार रोपे १.२० रु. प्रमाणे आणली होती. १ एकरमध्ये ९ हजार रोपे लावली होती. शेणखत ४ ट्रॉली संपूर्ण रानात टाकले होते आणि बेडवर २ ट्रॉली कोंबडखत आणि १२:३२:० च्या ३ बॅगा, पोटॅश २ बॅगा, झिंकसल्फेट १५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो, बोरॉन ३ किलो, निंबोळी पेंड १०० किलो, गंधक १० किलो, फर्टीगो (हुमणी प्रतिबंधक) १० किलो, सिलीकॉन १०० किलो तसेच धर्ती अॅग्रोचे अंकुर फार्ट १० किलो, ह्युसेल ४ किलो, कॅल्बोम १० किलो, वसुंधरा १० किलो, झायमो १० किलो एवढा बेडवर डोस दिला होता. खते बेडवर मातीआड झाकल्यानंतर ठिबक लाईन अंथरून बेड भिजवले. नंतर मल्चिंग पेपर अंथरून होल पडून लागवड केली. रोपे ट्रेमधील होती. त्यामुळे कोकोपीटच्या गटटूसह लावून नंतर दुसऱ्या दिवशी लगेच जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले.\nत्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या टोमॅटो पुस्तकात दिल्याप्रमाणे १५ दिवसाला फवारण्या घेत होतो. मध्ये गरजेपुरते रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशक फवारत होतो. तसेच ठिबकवाटे विद्राव्य खते सोडत होतो.\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या एकूण ४ फवारण्या केला. तसेच जर्मिनेटरचे ३ वेळा ड्रेंचिंग केले. अशाप्रकारे पीक व्यवस्थापन केले, तर झाडे ४ फुटापर्यंत वाढली होती. ४ फुटाचा बेड पुर्ण झाकला होता. पानोपान कळ्या व फळे लागली होती. २ बेडमध्ये जाण्या - येण्यासाठी (औषधे फवारणीसाठी, फळे तोडण्यासाठी) १ फुटापर्यंत वाढली होती. ४ फुटाचा बेड पुर्ण झाकला होता. पानोपान कळ्या व फळे लागली होती. २ बेडमध्ये जाण्या - येण्यासाठी (औषधे फवारणीसाठी, फळे तोडण्यासाठी) १ फुट जागा होती, तेथेही फांद्या आल्या होत्या. त्या सुतळीने पुन्हा तारेला बांधल्या. नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या आणि किटकनाशक व बुरशीनाशकांच्या गरजेपुरत्या फवारण्या करत होतो. त्यामुळे पिकावरील रोग - किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. पिकाची रोगमुक्त सुद्दढ वाढ होत होती.\n७५ ते ८० दिवसात टोमॅटो चालू झाला. १ एकरमधून १४०० क्रेट टोमॅटो मार्केटला विकला. १५ - २० मे २०१६ ला चालू झाला. तेव्हा ३०० - ४०० रु./क्रेट भाव मिळाला. नंतर पुढे ७००- ८०० रु. /क्रेट भाव मिळाला. ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये १०० रु./ क्रेट भाव झाल्यावर २०० - २५० क्रेट माल बाकी असतानाच प्लॉट काढून टाकला. सरासरी १४०० क्रेट व ४०० रु. सरासरी भाव मिळाला. सर्व टोमॅटो वाई मार्केटला विकला.\nमशागत खते, औषधे, ठिबक, मल्चिंग यावर १ लाख ६५ हजार रु. व मजुरीवर ६० हजार असा जवळपास २.२५ लाख रु. एकूण खर्च आला. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर २० - २२ हजार रु. खर्च केला. एकूण ४ लाख ७५ हजार रु. उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता एकरातून २ लाख रु. नफा मिळाला.\n एकर प्लॉटमध्ये १० ऑगस्ट २०१६ ला वरील पद्धतीने झेंडू लावला. खते, औषधे (टोमॅटो प्रमाणे बेडेवर) वापरली.\n एकरात २२ टन झेंडू खर्च १ लाख ८० हजार, नफा २ लाख २० हजार\nझेंडूची १०,००० रोपे २.८० रु. प्रमाणे आणली होती. झेंडू ५० दिवसात २५ सप्टेंबर २०१६ ला चालू झाला. २२ टन झेंडू विकला. गेल्यावर्षी वाई (लोकल मार्केट), खेड, रत्नागिरी, दापोली, महाड या भागात हारवाल्यांना मागणीप्रमाणे झेंडू पाठवत होतो. तेथे चांगले पैसे झाले. जास्तीचा माल पुणे मार्केटला आणत होतो. मात्र पुण्याला भाव फारच कमी ५ - ६ रु. किलो होते. त्यामुळे १ टन झेंडूचं पट्टी २ - ३ हजार रु. होत असे. त्यामुळे पुणे मार्केटला काही पैसे झाले नाही.\nलोकल मार्केटला व कोकणात हारवाल्यांना जो मागणीनुसार झेंडू पाठवित होतो त्यामध्ये ५०० किलो मालाचे १२ - १५ हजार रु. होत असत. याच मालाचे पैसे झाले. एकूण २२ टन माल विकला. उरलेला ३ टन माल सोडून दिला. असे १००० काडीपासून २५ टन उत्पादन आले. एकूण खर्च १ लाख ८० हजार रु. आला होता. तर ४ लाख रु. उत्पन्न मिळाले होते. खर्च वजा जाता २ लाख २० हजार रु. मिळाले.\nया अनुभवातून चालूवर्षी आम्ही टोमॅटो ५ मार्च २०१७ ला १ एकर लावला आहे. त्यासाठी बेडवर वरीलप्रमाणे खतांचा वापर केला आहे. जर्मिनेटरचे २ ऱ्या दिवशी ड्रेंचिंग केले आणि १५ दिवसाचा प्लॉट असताना पुन्हा एकदा ड्रेंचिंग केले. १ एकर लावला आहे. त्यासाठी बेडवर वरीलप्रमाणे खतांचा वापर केला आहे. जर्मिनेटरचे २ ऱ्या दिवशी ड्रेंचिंग केले आणि १५ दिवसाचा प्लॉट असताना पुन्हा एकदा ड्रेंचिंग केले. १ एकरात १३००० काडी (रोपे) लावली होती. त्यातील कडक उन्हाळा असतानाही फक्त १७० काडी मेली. ती १७ मार्च २०१७ ला सांधली (नांगी भरली) आहेत. एरवी इतरांच्या १३,००० काडी लागवडीमध्ये १५०० ते २००० काडीची कडक उन्हामुळे मर होते.\n१९ मार्च २०१७ ला १९ दिवसाचा प्लॉट ६ - ७ पानांवर असताना त्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ४ ही फवारण्यांची औषधे (थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणि प्रोटेक्टंट, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणि प्रोटेक्टंट २ किलो, हार्मोनी २ लि., स्प्लेंडर ३ लि. प्रिझम १ लि.) घेऊन गेलो होतो. त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या केल्या असून आज (८ मे २०१७) रोजी प्लॉट सव्वा दोन महिन्याचा ३ - ४ फुटापर्यंत उंच असून पुर्णपणे बहारात आहे. हा माल साधारण १५ मे २०१७ दरम्यान चालू होईल. झाडे फळा - फुलांनी लगडलेली आहेत. वरील सप्तामृत औषधांच्या फवारण्या नियमित चालू असल्याने प्लॉट निरोगी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/if-there-is-no-alliance-with-shiv-sena-bjp-will-be-harmed-anil-shirole/", "date_download": "2019-03-25T08:05:52Z", "digest": "sha1:OCBDEFSKXK563ZK6SNHOIY6HGQSFNWXI", "length": 5444, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजपला नुकसान- खा.अनिल शिरोळे", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nशिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजपला नुकसान- खा.अनिल शिरोळे\nपुणे: भाजप-शिवसेना युती व्हावी अशी इतर भाजपमधील नेत्यांप्रमाणे माझी देखील इच्छा आहे. जर शिवसेनेसोबत युती झाली नाही तर पुणे शहरात तसेच राज्यभरात भाजपला फटका बसणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले\nअनिल शिरोळे म्हणाले, शिवसेनेसोबत युती न झाल्यास पुणे शहरात मतांच विभाजन होऊन भाजपा फटका बसणार. कारण दोन्ही मतं एकमेकांना पूरक असतात. तसेच माझ्या मते कॉंग्रेस माजी आमदार मोहन जोशी यांना उमदेवारी देईल. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांना उदेवारी दिली तरी काही हरकत नाही. असे शिरोळे म्हणाले.\nशहराच्या विकास संदर्भात बोलताना शिरोळे म्हणाले, केंद्रातून निधी मिळत असून तो खालच्या स्थरापर्यंत पोहचत आहे. तसेच समस्यामुक्त शहराच्या दिशेने गेल्या ४ वर्षात काम सुरु असून पुढील काळात पुणे स्मार्ट झालेले दिसेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे .\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेची सूत्रे प्रादेशिक पक्षांच्या हाती असतील – चंद्राबाबू नायडू\nउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/new-after-16-days-petrol-prices-went-down-by-60-paise/", "date_download": "2019-03-25T08:12:09Z", "digest": "sha1:XBPNIEXZ7JCKQ5IOULTYZUF7IUEXI7OA", "length": 6082, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सर्वसामान्यांना दिलासा; अखेर १७ व्या दिवशी पेट्रोल - डिझेल झाले स्वस्त", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसर्वसामान्यांना दिलासा; अखेर १७ व्या दिवशी पेट्रोल – डिझेल झाले स्वस्त\nमुंबई : वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. १६ दिवसानंतर आज अखेर पेट्रोल ६० पैसे तर डिझेल ५६ पैशांनी स्वस्त झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल – डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर पेट्रोलचे दर गगनाला भिडले.\nपेट्रोल-डिझेल दरवाढीवरून देशभरात सरकारवर टीकेची झोड उठत असतानाही, तब्बल १६ दिवस पेट्रोल – डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होतं होती. मात्र आज १७ व्या दिवशी अखेर पेट्रोल ६० पैसे तर डिझेल ५६ पैशांनी स्वस्त झाले आहे.\nआज दिल्लीत पेट्रोल ७७ रूपये ८३ पैसे प्रति लिटर तर डिझेल ६८ रूपये ७५ पैसे प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल ८५.६५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ७३.२० रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान मंगळवारी लखनऊ येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. तसेच इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं देखील ते म���हणाले होते.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nस्टारलाईट कॉपर प्रकल्पावरील बंदीने ८०० लघु, मध्यम उद्योगांवर संक्रांत\nकॉंग्रेसच्या ‘त्या’ ४८ वर्षांपेक्षा भाजपची ४८ महिन्यातली कामगिरी उत्तम – गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/union-cabinet-clears-amendment-in-pocso-act-seeking-death-sentence-for-child-rapists/", "date_download": "2019-03-25T08:10:34Z", "digest": "sha1:NYJTNK4PQ4V7Y3WICHX553ILHN7ZN6MS", "length": 5537, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आता फाशीच !", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nअल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आता फाशीच \nटीम महाराष्ट्र देशा : १२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता सरकार यासाठी अध्यादेश जारी करणार आहे.\n“अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी मी आणि माझं मंत्रालय पॉक्सो कायद्यात बदल करणार आहे” असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी काही दिवसांपूर्वीच म्हणाल्या होत्या.\nकाश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर केंद्र मंत्रिमंडळाने ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स’ अर्थात पोक्सो कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजप���ध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nबलात्काराच्या घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जाते ; हेमा मालिनी यांनी उधळले मुक्ताफळे\nकॉंग्रेसला पाठींबा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात उभी फुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/youths-beaten-up-for-battling-against-forced-virginity-tests-by-kanjarbhat-community-youths-in-pimpari-chinchwad/", "date_download": "2019-03-25T08:10:47Z", "digest": "sha1:FGT3TESKLXWN3M3KMOZRDBUNFCMYNX22", "length": 9088, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कौमार्य चाचणी प्रथे विरोधात आवाज उठविणा-या तरुणांना बेदम मारहाण", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nकौमार्य चाचणी प्रथे विरोधात आवाज उठविणा-या तरुणांना बेदम मारहाण\nपिंपरी चिंचवड : कंजारभाट समाजातील नववधूची कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्हॉट्स अपच्या माध्यमातून आवाज उठविणा-या तरुणांना समाजातीलच अन्य तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशांत अंकूश टिंबरेकर (वय 25, रा. येरवडा), याने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांसह त्यांच्या अन्य 40 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nकंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही समाजात कायम आहे. या समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्याची चाचणी केली जाते. प्रथेला समाजातीलच काही तरुणांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. यासाठी तरुणांनी # Stop The "V"Ritual या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे.\nप्रशांत इंद्रेकरसह त्याचे काही मित्र या ग्रुपचे सदस्य आहेत. ही प्रथा बंद व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मो���िमेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचं हे कृत्य त्यांच्याच समाजातील अन्य तरुणांना पटलं नाही.\nदरम्यान, आरोपी सनी मलके याच्या बहिणीचा विवाह होता. फिर्यादी प्रशांत व त्याचे मित्र सौरभ आणि प्रशांत तामचिकर यांना लग्नाचे निमंत्रण देऊन सनी याने बोलावले होते. काल (दि.21) रात्री हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रथेनुसार नंतर जातपंचायत भरली. जात पंचायत संपल्यानंतर प्रशांत हा आपल्या आई व बहिणीला घेण्यासाठी लग्न मंडपात गेला असता तिथे आरोपी सनी व त्याचे साथीदार हे सौरभ मछले याला मारहाण करीत होते. तुम्ही कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून जात विरोधी कृत्य करीत आहात असे म्हणत त्याला मारहाण सुरू होती. कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून, टीव्हीवर बातम्या देऊन तुम्ही समाजाची बदनामी करत आहात असं म्हणत मारहाण सुरु होती. यानंतर प्रशांत आणि त्याचा आणखी एक मित्र दुसऱ्या मित्राला सोडवायला गेले. परंतु आरोपी सनी मलके आणि त्याच्या साथीदारांनी प्रशांतलाही मारहाण केली.यामध्ये सौरभ मछले याची सोन्याची चैन आणि घड्याळ चोरीला गेले आहे .\nयाविरोधात प्रशांत टिंबरेकर याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सनी मलके विनायक मलके, अमोल भाट, रोहित रावळकर, मेहूल तामचिकर त्यांचे अन्य 40 साथीदार यांच्या विरोधात कलम 143,147, 149, 323, 506, 427 अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nघटलेल्या उत्पन्नाचा पुणे महापालिकेच्या बजेटला फटका\nकर्नाटक गौरव गीत गाणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा-अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1713", "date_download": "2019-03-25T08:30:06Z", "digest": "sha1:3JPQ4XQJXXCBM7H5MJ3BP533DMZPHS45", "length": 19757, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "साने गुरुजी- मी पाहिलेले! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसाने गुरुजी- मी पाहिलेले\nआम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाचे वेड होते. तेव्हा मुलांसाठी पुस्तके म्हणजे इसापच्या नीतिकथा, बालबोध मेवा जोडाक्षरविरहित (मी वाचायच�� जोडाक्षर विहिरीत) असायची. आमच्या समाजात दरवर्षी दसर्याला सोने लुटण्याबरोबर पुस्तके वाटायचाही समारंभ व्हायचा. म्हणजे जी मुले त्या वर्षी एखादी शालेय परीक्षा पास झाली असतील त्यांना अध्यक्षांच्या हस्ते छानपैकी गोष्टीचे पुस्तक बक्षीस मिळत असे. नुसते पास झाले की, पुरे शाबासकी म्हणून आणि वाचनाची आवड लागावी म्हणून पुस्तक मिळे. किती टक्के शाबासकी म्हणून आणि वाचनाची आवड लागावी म्हणून पुस्तक मिळे. किती टक्के कितवा नंबर असे प्रश्न कोणी विचारत नसे.\nएका वर्षी, आम्हा लहान मुलांना वेगळीच नवीन पुस्तके मिळाली. साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी.’ नेहमीपेक्षा वेगळा आशय, छोटी छोटी सोपी वाक्ये, रंजक – अकृत्रिम शैली अशी ती पुस्तके आम्हाला (मी जेव्हा आम्ही म्हणते तेव्हा शरयू (ठाकूर) माझी बहीण मनात असते.) इतकी आवडली, की आपले पुस्तक संपवून दुसर्याचं घेऊन वाचू लागलो. साने गुरुजींची ती पहिली ओळख\nत्यानंतर ‘श्यामची आई’ वाचली. वाचताना डोळ्यांत पाणी येई. दादा (आमचे वडील) रागवत. कशाला तो रडका साने गुरुजी वाचता, असे म्हणत. पण, मुलांच्या निरागस मनाला कळे, की हे हताश अश्रू नाहीत. निर्मळ प्रेमाचा झरा वाहत आहे. आणखी पुढे मग ‘भारतीय संस्कृती’, ‘राष्ट्रीय हिंदुधर्म’ वगैरे वाचले आणि प्रभावित झाले. कधी जर गुरुजी मुंबईत आले, त्यांचे कोठे व्याख्यान असले तर ऐकायला जायचेच. कॉलेज प्रॅक्टिकल बुडाली तर बुडू देत तो काळच असा होता, की स्वत:च्या उन्नतीपेक्षा देशाचे भवितव्य, समाजाची उन्नती अधिक महत्त्वाची वाटत होती. मी त्या दृष्टीने जमेल तशी धडपड करत होते. पण, कुणाचे तरी अनुभवी मार्गदर्शन हवे होते. त्या दृष्टीने साने गुरुजींचा प्रत्यक्ष परिचय व्हावा असे फार फार वाटत होते. गुरुजींची पट्टशिष्य कुसुम कुलकर्णी (हेगडे) आमच्या बरोबर ‘रुईया’त होती. तिला आम्ही आमची मनीषा पुष्कळदा बोलून दाखवली.\nएकदा साने गुरुजी कुठूनतरी कुठेतरी जाताना वाटेत दादर स्टेशनवर अर्धा तास थांबणार होते. कुसुम आम्हाला त्यांना भेटायला घेऊन गेली. आम्हाला कोण आनंद पण ते फार काही बोलले नाही. मी म्हणाले, “देशासाठी, समाजासाठी काहीतरी भरीव काम करण्याची तीव्र इच्छा आहे. तर काय, कसे ते सांगा.”\nगुरुजींनी विचारले, “सध्या तुम्ही काय करता\n“सध्या कॉलेजमध्ये इंटरला आहोत. मागासवस्तीत थोडे काम करतो. सुट्टीत नेवाळकरांकडे काम करतो.”\n“पुष्कळ झाले. सध्या हेच चालू ठेवा. त्यातच काहीतरी दुवा तुम्हाला आपोआप सापडेल.” गुरुजी हसून म्हणाले. आमची थोडी निराशाच झाली. ‘आता उठा आणि देश पेटवा’ असे ते सांगतील असे आम्हाला वाटले होते.\nआमचं शिक्षण पुढे चालू राहिले. गुरुजींची पुस्तके वाचणे, त्यांचे मुंबईत कुठे व्याख्यान असले तर ऐकायला जाणे वगैरे पण जोमात चालले होते आणि एकदा गुरुजींचे भाषण आमच्या घरातून जवळच असलेल्या वनिता समाजात होते. इतकी उत्तम संधी कोण दवडणार मी ते ऐकायला आजीला घेऊन गेले. आई मुंबईत नव्हती. आमची आजी निरक्षर, पण सुसंस्कृत व प्रेमळ होती. बुद्धिमान असावी. वटपौर्णिमेचा दिवस जवळ आला होता. गुरुजी त्याविषयास अनुसरून बोलले. ते म्हणाले, “मला तर वाटतं, की आपण वटपौर्णिमा हे व्रत न ठेवता, सण जगवला आहे. त्या दिवशी म्हणे उपवास करायचा, सकाळी उठून उत्तम साडी नेसून, नथ, पाटल्या, तोडे, वाकी वगैरे असतील-नसतील ते दागिने, सौभाग्यलंकार अंगावर चढवून पूजेचे तबक हातात घेऊन मैत्रिणींच्या घोळक्यात मंदिरात जायचे. गुरुजी (भटजी) तेथे वटवृक्षाखाली बसलेले असतात व बायकांची ही गर्दी जमलेली असते. गुरुजी (भटजी) सांगतील त्याप्रमाणे त्या वटवृक्षाची पूजा करायची. त्याला एक रायवळ आंबा मुद्दाम पूजेसाठी घेतलेला- पाच जांभळे, फणसाचे गरे, केळी, मूठभर कडधान्य- नैवेद्य दाखवायचा. गुरुजींना दक्षिणा द्यायची आणि रायवळ आंबा पण द्यायचा. मग तिथे जमलेल्या सुवासिनींपैकी ज्या आपल्या विशेष परिचित असतील किंवा सहजपणे आवडतील (रंग-रूप, कपडे, दागिने इत्यादीवरून) त्यांना सवाष्णींना वाण द्यायचे. ते मात्र, हापूस आंब्याचे मी ते ऐकायला आजीला घेऊन गेले. आई मुंबईत नव्हती. आमची आजी निरक्षर, पण सुसंस्कृत व प्रेमळ होती. बुद्धिमान असावी. वटपौर्णिमेचा दिवस जवळ आला होता. गुरुजी त्याविषयास अनुसरून बोलले. ते म्हणाले, “मला तर वाटतं, की आपण वटपौर्णिमा हे व्रत न ठेवता, सण जगवला आहे. त्या दिवशी म्हणे उपवास करायचा, सकाळी उठून उत्तम साडी नेसून, नथ, पाटल्या, तोडे, वाकी वगैरे असतील-नसतील ते दागिने, सौभाग्यलंकार अंगावर चढवून पूजेचे तबक हातात घेऊन मैत्रिणींच्या घोळक्यात मंदिरात जायचे. गुरुजी (भटजी) तेथे वटवृक्षाखाली बसलेले असतात व बायकांची ही गर्दी जमलेली असते. गुरुजी (भटजी) सांगतील त्याप्रमाणे त्या वटवृक्षाची पूजा करायची. त्याला एक रायवळ आंबा मुद्दाम पूजेसाठी घेतलेला- पाच जांभळे, फणसाचे गरे, केळी, मूठभर कडधान्य- नैवेद्य दाखवायचा. गुरुजींना दक्षिणा द्यायची आणि रायवळ आंबा पण द्यायचा. मग तिथे जमलेल्या सुवासिनींपैकी ज्या आपल्या विशेष परिचित असतील किंवा सहजपणे आवडतील (रंग-रूप, कपडे, दागिने इत्यादीवरून) त्यांना सवाष्णींना वाण द्यायचे. ते मात्र, हापूस आंब्याचे पूजेच्या वटवृक्षाला रायवळ आंबा आणि सग्यासोयऱ्यांना हापूस पूजेच्या वटवृक्षाला रायवळ आंबा आणि सग्यासोयऱ्यांना हापूस कुठला देव प्रसन्न होईल या पूजेने कुठला देव प्रसन्न होईल या पूजेने जरा विचार करा भगिनींनो, श्रद्धा असेल तर व्रत अवश्य पाळा, नसेल तर आनंदाने सण साजरा करा. पण, धर्माच्या नावाखाली त्या महान वृक्षाची अवहेलना करू नका. त्याहून वाईट म्हणजे पूजेसाठी फांदी तोडून घरी आणू नका. अखेरीस धर्म म्हणजे काय जरा विचार करा भगिनींनो, श्रद्धा असेल तर व्रत अवश्य पाळा, नसेल तर आनंदाने सण साजरा करा. पण, धर्माच्या नावाखाली त्या महान वृक्षाची अवहेलना करू नका. त्याहून वाईट म्हणजे पूजेसाठी फांदी तोडून घरी आणू नका. अखेरीस धर्म म्हणजे काय खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...”\nमाझी आजी प्रभावित झाली, ते सर्व ऐकून म्हणाली, “किती खरे बोलतोय गं हा बाबा कुठे मिळवले एवढे ज्ञान कुठे मिळवले एवढे ज्ञान आणि किती, साधा आहे. पुराणिकबुवांसारखे कपडेसुद्धा नाही. खरा ज्ञानी पुरुष.”\nथोडे दिवस गेले. भारताला ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाले. सर्वसामान्य जनता आनंदाने बेहोष झाली. पण, दुर्दैव आपले की, वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये मतभेद झाले. विकोपाला जाऊ लागले. विशेषत: भारताचे पोलादी पुरुष गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व तरुण रक्ताच्या प्रजा समाजवादी पार्टीचे पुढारी जयप्रकाश नारायण यांच्यात तीव्र स्वरूपाचे तांत्रिक मतभेद होते. साने गुरुजींनी प्रजा समाजवादी पक्षाची भूमिका प्रांजळपणे मांडणारे पत्र, मध्यस्थी करण्याच्या हेतूने गृहमंत्र्यांना पाठवले होते. त्याला त्यांनी जळजळीत उत्तर दिले होते. ते नायगाव (दादरच्या) मैदानावर सभा घेऊन गुरुजी वाचून दाखवणार होते. त्या गच्च भरलेल्या सभेत आम्ही होतोच. गुरुजी गृहमंत्र्यांचे पत्र वाचू लागले. पत्रात होते-\nएखादे युद्ध विजयी झाले की थाटामाटात विजययात्रा निघते. शृंगारलेला भव्य रथ असतो. वारू जोडलेले असतात. वाद्ये वाजत असतात आणि लोक रस्त्यावर उभे राहून प्रशंसा करत असतात. मोठा सोहळा असतो. त्यामुळे रस्त्यावरची कुत्री प्रभावित होतात. तीही मोठमोठ्याने भुंकत रथाबरोबर धावत असतात. थोड्या वेळाने त्या कुत्र्यांना वाटू लागते की आपल्या धावण्या व भुंकण्यामुळेच विजयरथाला ऊर्जा मिळत आहे व ती अधिकच जोराने भुंकू लागतात. तुमच्या पक्षाची अवस्था त्या कुत्र्यापेक्षा निराळी नाही...\nगुरुजींनी थरथरत्या हातात ते पत्र धरून संतप्त सूरात वाचून दाखवले आणि फाडून त्याचे बारीक बारीक तुकडे करून हवेत फेकून दिले. शेकडो प्रेक्षकांसमोर म्हणाले, “हेच या पत्राला उत्तर. निराळे उत्तर देण्याची गरज नाही. एवढा अहं... निष्ठावंत कार्यकर्त्यांची ही कदर म्हणाले, “हेच या पत्राला उत्तर. निराळे उत्तर देण्याची गरज नाही. एवढा अहं... निष्ठावंत कार्यकर्त्यांची ही कदर\nहा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवताना आमच्या शरीरावर सरसरून काटा आला.\nदादर स्टेशनवर कोरलेले ते साने गुरुजींचे बुझरे रूप, वनिता समाजाच्या प्रौढ सुरक्षित स्त्रियांना वटपौर्णिमेच्या निमित्ताने ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ म्हणून परखड शब्दांत सांगणारे मायाळू आईचे स्वरूप आणि आज घोर अन्यायाशी सामना करायला उभे ठाकलेले, लढाऊ रुद्र स्वरूप. त्यांची ही सर्व रूपे आयुष्यभर माझ्या मन:पटलावर कोरलेली आहेत.\nसाने गुरूजी यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nसंयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसंदर्भ: शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बंदर, रत्नदुर्ग किल्ला\n‘श्यामची आई’ म्हणजे मधाचं पोळं\nश्यामची आई आणि आजची मुले\n‘श्यामची आई’ पुस्तकाची जन्मकथा\nसंदर्भ: पुस्तके, साने गुरुजी, श्यामची आई\nसंदर्भ: साने गुरुजी, श्यामची आई\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2019-03-25T07:50:45Z", "digest": "sha1:KH5AELP4KYHNM7727MEXXQHIYHF3G5DY", "length": 5053, "nlines": 41, "source_domain": "vicharpravah.in", "title": "मंगळ मोहिमेवरील 'इनसाइट मार्स लँडर'ने आपले यांत्रिक हात वापरून स्वतःचा सुरेख सेल्फी घेतला आहे. - विचारप्रवाह", "raw_content": "\nमंगळ मोहिमेवरील ‘इनसाइट मार्स लँडर’ने आपले यांत्रिक हात वापरून स्वतःचा सुरेख सेल्फी घेतला आहे.\nसध्या सगळीकडे सेल्फीचे चलन असताना नासाचे ‘इनसाइट मार्स लँडर’ देखील त्याला अपवाद राहिलेले नाही. २६ नोव्हेंबर रोजी मंगळावर उतरलेले ‘इनसाईट’ आता तेथे स्थिरस्थावर झाले असून त्याने आपले यांत्रिक हात लांबवून स्वतःचा पहिला सेल्फी घेतला आहे या सेल्फीमध्ये आपण मंगळावरील तांबडी माती, इनसाइटचे सौरबाहू आणि वैज्ञानिक उपकरणे पाहू शकतो.\nइनसाइट मार्स लँडरने घेतलेला सेल्फी\nइनसाइट वरील उपकरणांच्या सहाय्याने मंगळाच्या अंतरंगाचा व्यवस्थित अभ्यास करता यावा याकरिता इनसाइटला एका सपाट आणि दगड विरहित अशा सुरक्षित जागी उतरवण्यात आले होते. उल्कापातानंतर निर्माण झालेल्या विवरामध्ये कालांतराने वाळू भरली जाऊन अशाप्रकारची सपाट जागा त्या ठिकाणी निर्माण झाली होती.\nआपणाला हेही वाचायला आवडेल\nसर्न मधील शास्त्रज्ञांनी ‘नेक्स्ट’ (NeXT) वेब ब्राऊजरची पुनर्निर्मिती केली\n‘ओमुआमुआ’ प्रत्यक्षात परग्रहवासीयांचे अंतराळ यान असण्याची शक्यता हार्वर्ड मधील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे\n‘न्यू होरायझन’ अंतराळयान १ जानेवारी २०१९ रोजी ‘अल्टिमा थुली’ या सूर्यमालेतील दूरस्थ पिंडाजवळ पोहचत आहे.\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://devanaguide.huertatipografica.com/glyph.php?nombre=four-deva", "date_download": "2019-03-25T08:37:49Z", "digest": "sha1:6REWUJKJEHOLOUHMF6G6SXZ4M2A547A5", "length": 2684, "nlines": 41, "source_domain": "devanaguide.huertatipografica.com", "title": "Devanaguide- four-deva", "raw_content": "\nरिहाई४ १४ रिहाई४ कानून४ कानून४ ८४० १४ ८४० १४पौंड रिहाई४ १४४संख्या १४४संख्या १४ १४४संख्या रिहाई४ १४पौंड १४४संख्या कानून४ कानून४ १४ रिहाई४ कानून४ कानून४ ८४० रिहाई४ रिहाई४ १४ १४ १४ १४४संख्या रिहाई४ रिहाई४ कानून४ ८४० १४४संख्या १४ १४४संख्या कानून४ रिहाई४ ८४० १४४संख्या १४पौंड १४ १४४संख्या ८४० रिहाई४ कानून४ १४पौंड कानून४ १४पौंड १४पौंड कानून४ रिहाई४ रिहाई४ १४पौंड ८४० रिहाई४ १४पौंड ८४० रिहाई४ ८४० ८४० रिहाई४ १४४संख्या १४४संख्या १४४संख्या कानून४ रिहाई४ रिहाई४ १४४संख्या कानून४ १४पौंड ८४० ८४० कानून४ कानून४ ८४० १४पौंड ८४० १४पौंड कानून४ रिहाई४ रिहाई४ १४४संख्या रिहाई४ १४पौंड १४पौंड ८४० १४४संख्या १४ कानून४ १४पौंड रिहाई४ १४४संख्या ८४० १४पौंड ८४० १४पौंड १४पौंड कानून४", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://vslibrary.easyanduseful.com/v_opac.aspx", "date_download": "2019-03-25T08:25:47Z", "digest": "sha1:QLCJ7RVCYV6GWSENGHJFR5NAHJV7ZJIB", "length": 1632, "nlines": 11, "source_domain": "vslibrary.easyanduseful.com", "title": "VidyaSagar", "raw_content": "\nविद्यासागर सॉफ्टवेअरसंबंधी माहिती घेण्या-देण्यासाठी कोणीही व्यक्ती आपल्याकडे आल्यास ईझी अँड युजफूल कंपनीला त्वरीत माहिती कळवावी.\nईझी अँड युजफूल कंपनीकडून अशी कोणतीही व्यक्ती पाठवली जात नाही. अनोळखी व अनाधिकृत व्यक्तीला सॉफ्टवेअर दाखवू नये व हाताळण्यास देऊ नये.\nकाही महाविद्यालयांमध्ये असा प्रकार घडल्याचे आढळले आहे. विद्यासागर सॉफ्टवेअरमधील सर्व डेटाची जबाबदारी संबंधित ग्रंथालयाची असते.\nकोणत्याही प्रकारे चुकीचा डेटा बदल व नुकसान झाल्यास ईझी अँड युजफूल कंपनी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2016-Kanda.html", "date_download": "2019-03-25T08:07:27Z", "digest": "sha1:I5NVT7VNRFPKJZ37RDOYY7CDWEWLKDML", "length": 7328, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - जर्मिनेटरच्या नाविण्यपूर्ण प्रयोगातून व डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरून दर्जेदार प्रतीचा कांदा", "raw_content": "\nजर्मिनेटरच्या नाविण्यपूर्ण प्रयोगातून व डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरून दर्जेदार प्रतीचा कांदा\nश्री. नानाभाऊ सिताराम झिंजुर्के, मु.पो. धामणगाव, ता.आष्टी, जि. बीड, मो. ९४०५००३०७०/९९६०९०६९८०\nमाझ्याकडे एकूण ८ एकर जमीन आहे. त्यामधील १ एकरमध्ये मी ठिबक वरती गरवा कांदा लागवड केली होती. लागवड करते वेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू एकरी ३ बॅग बेडमध्ये टाकून ठिबक अंथरूण नंतर कांदा लागवड केली. ३ फुटाचा गाडी वाफा केला होता. या वाफ्याच्या मधून इनलाईन ठिबकची १ लाईन आहे. वाफ्यामध्ये साधारण १ इंच रुंदीच्या ४ ओळी आणि २ रोपात ४ - ५ इंच अंतर याप्रमाणे लागवड केली होती. एकदा ठिबकने व एकदा वाफ्याच्या कडेने सरीतून पाणी देत असे. ठिबकने मधल्या २ ओळीची जागा चांगली ओली होत असे बाजुच्या ओळी अर्धवट ओल्या व्हायच्या तेव्हा सरीतून पाणी दिले की गाडीवाफ्याच्या कडेच्या दोन्ही ओळी भिजायच्या. लागवडीनंतर दुसऱ्या पाण्याला पोटॅश १८:४६:०० ची १ गोणी आणि २०:२०:०० ची १ गोणी खतामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेट १ लि. कालवून खताचा डोस दिला. त्यामुळे निमकोटेड युरीया जसा असतो त्याप्रमाणे जर्मिनेटर कोटेड हे दाणेदार खत तयार होऊन एरवी ड्रेंचिंगने दिलेले जर्मिनेटर ड्रिपर जवळ पडते. मात्र येथे हे दाणेदार खत सर्वत्र समप्रमाणात टाकले गेल्याने सर्व कांद्याला मिळाले. शिवाय केशाकर्षक मुळ्या ह्या जर्मिनेटर व खताकडे आकर्षित होऊन त्यांची वाढ नेहमीपेक्षा जोमाने झाली. परिणामी पात वाढ होऊन हिरवीगार कॅनॉपी मिळाल्याने कांदा अधिक पोसतो. जर्मिनेटरमुळे नेहमीपेक्षा खताची मात्रा निम्मी लागत असून रिझल्ट दुप्पट मिळतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सरांनी सांगितले, असे प्रयोग विविध पिकांमध्ये प्रायोगिक तत्वावर करून त्यांची निरीक्षणे आम्हास कळवावीत. म्हणजे त्यावर भाष्य करून इतर शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील.\nनंतरच्या पाण्याला आम्ही ठिबकमधून १ लि. जर्मिनेटर सोडले. लागवडीनंतर २० दिवसांनी जर्मिनेटर, थाईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिली/पंप याप्रमाणे फवारणी केली. या फवारणीमुळे कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे झाली व कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कांद्याला दरवर्षी ४ ते ५ फवारण्या कराव्या लागत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ च फवारण्यात कांदा काढणीस आला. दुसऱ्या फवारणीत थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ६० मिली, राईपनर ४० मिली आणि प्रोटेक्टंट ५० ग्रॅम/ पंपास घेतले. त्यामुळे माना जाड होऊन पातीची उंची वाढून कंबरेला लागत होती. पात हिरवीगार रोग, कीड मुक्त होती. त्यामुळे कांदा पोसण्यास मदत झाली. तिसऱ्या फवारणीत थ्राईवर, क्रोपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ७० मिली आणि राईपनर ६० मिली/पंपास घेतले. त्यामुळे फांद्याचे पोषण होऊन एकसारखा घट्ट डबल पत्तीचा २० टन कांदा उत्पादन मिळाले. या पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आम्हाला कंपनी प्रतिनिधी श्री. बाळासाहेब कर्डीले (मो. ९४०३६९९२२८) यांचे मार्गदर्शन मिळाले. सध्या बाजारभाव कमी असल्याने हा कांदा साठवला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/bigg-boss-marathi-launch/", "date_download": "2019-03-25T07:37:37Z", "digest": "sha1:2U7Z374VC36TRS4DGDEXQSI2WSSLLQPU", "length": 9624, "nlines": 82, "source_domain": "marathikalakar.com", "title": "बिगबॉस मराठी लॉन्च सोहळा", "raw_content": "\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\nभाईंचा ‘विग’आणि तिरुपतीहून मागवले केस\nमहेश माजरेकरांचा हा भन्नाट अवतार बघितलात का\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nमहाराष्ट्रात संगीत, नाच, किंवा इतर धर्तीवर आधारित कित्येक रिऍलिटी शोज् वाहिन्यांवर येऊन गेले. पण यापेक्षा सर्वात वेगळा असा आणि 92हुन अधिक देशांत पर्व गाजवलेला ‘बिग बॉस’ प्रथमच मराठीत प्रेक्षकांसाठी भेटीस येतो आहे. हिंदी तामिळ, तेलगू असे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये पार पडलेल्या बिगबॉसचं मराठमोळं रूप ह्या 15 एप्रिलपासून चाहत्यांना कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे. आत्ताच बिग बॉस मराठीचा लॉंचिंग सोहळा सर्व टीमच्या उपस्थितीत पार पडला. शोची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये ह्यातील सहभागी मराठी ऍक्टर्सबद्दल तसेच सूत्रधाराबद्दल उत्सुकता होती. महेश मांजरेकर हे बिगबॉस मराठीचे सूत्रधार असून 15 कलाकारांवर कॅमेऱ्यातून ते पाळत ठेवतील.\nअनेक भाषांमध्ये दमदार सिझन्स गाजवल्यानंतर बिगबॉसने एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. आता बिगबॉसची टिम हेच आव्हान मराठीत घ्यायला तयार झाली आहे. बिगबॉसच्या घरातील सर्व सदस्यांमध्ये समन्वय राखायला जबाबदार आणि अनुभवी होस्ट असायला हवा होता, महेश मांजरेकर हि जोखीम पेलताना आपल्याला दिसणार आहेत. सलमान खान, कमल हसन, सुदिप, एनटीआर सारख्या दिगग्ज लोकांनी हा शो होस्ट केलेला असल्याने आपल्याला पूर्वतयारी करणं थोडं अवघड चालल्या���ं ह्यावेळी महेश मांजरेकर म्हणाले.\nसहभागी कलाकार 25 ते 65 वयोगटातील असून संपूर्ण घरातील सदस्यांना हा शो पाहता यावा हा यामागचा उद्देश आहे. बिग बॉसच्या घरामध्ये 15 कलाकारांचा 100 दिवसांचा प्रवास आपल्याला अनेक पाळत ठेऊन असलेल्या कॅमेऱ्यातून दिसणार आहे. इतर स्पर्धकांनी नॉमिनेट केल्यानंतर कुण्या एका स्पर्धकाला बाहेर पडावं लागणार असून शेवटपर्यंत जो कलाकार ह्या घरात टिकेल तोच ठरेल बिगबॉस मराठीचा विजेता\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\nभाईंचा ‘विग’आणि तिरुपतीहून मागवले केस\nमहेश माजरेकरांचा हा भन्नाट अवतार बघितलात का\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\nआजकाल जे क्षेञ बघावं त्यात चढाओढ सुरु आहे. त्या त्या क्षेत्रातील स्पर्धकांमध्ये कमालीची स्पर्धा आजच्या जमान्यात...\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\nबिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. वाद, विरोध, प्रेम,...\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n‘चॉकलेट बॉय’ स्वप्नील जोशी, ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री...\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“घाडगे & सून” ही कलर्स मराठीवरील मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत...\n‘इयर डाऊन’चा २ तासांचा विशेष चित्रपट.पुन्हा भेटीला येतोय जन्मेजय.\n‘इयर डाऊन’चे पहिले पर्व संपले असून या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. समीर...\nउषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-actress-richa-chadda-talks-about-her-career-and-me-too-movement/articleshow/66471770.cms", "date_download": "2019-03-25T08:51:19Z", "digest": "sha1:ESRZS27DEID6EN7CQCBL3I5LRDT6HLTB", "length": 11669, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "रिचा चढ्ढाricha chaddha: #मीटू: कॉम्प्रोमाइज केलं असतं तर मी खूप पुढे गेले असते.. - bollywood-actress-richa-chadda-talks-about-her-career-and-me-too-movement | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\n#मीटू: कॉम्प्रोमाइज केलं असतं तर मी खूप पुढे गेले असते..\nसिनेजगतात जर मी कॉम्प्रोमाइज केलं असतं तर खूप पुढे गेले असते असा खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने केला आहे. शकीला या सिनेमाच्या निमित्ताने टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत तिला #मीटूचा अनुभव आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.\n#मीटू: कॉम्प्रोमाइज केलं असतं तर मी खूप पुढे गेले असते..\nसिनेजगतात जर मी कॉम्प्रोमाइज केलं असतं तर खूप पुढे गेले असते असा खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने केला आहे. शकीला या सिनेमाच्या निमित्ताने टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत तिला #मीटूचा अनुभव आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.\n३१ वर्षांच्या रिचा चढ्ढाने #मीटू चळवळीबद्दल आनंद व्यक्त करत असतानाच सिनेजगतातील कॉम्प्रोमाइज करण्याची अपरिहार्यता स्पष्ट केली. ' मला #मीटूचा अनुभव कधी आलेला नाही. पण मी कॉम्प्रोमाइज केलं असतं तर करिअरमध्ये खूप पुढे केले असते. तेवढी माझी पात्रता आहे. पण सरळ मार्गाने जाणाऱ्यांना पटकन संधी मिळतच नाही.' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. याचवेळी आलोकनाथ यांचा खरा चेहरा समोर आल्यानंतर आपल्याला धक्का बसल्याचंही तिने सांगितलं .' विन्ता नंदाच्या हिंमतीची दाद द्यायला हवी. संध्याचं प्रकरण वाचून माझ्या अंगावर काटे आले. या प्रकरणामुळे अनेक दिग्गजांचे खरे चेहरे समोर आले आहेत. तरी यातील सगळ्याच मुली खरं बोलत आहेत असं म्हणता येणार नाही' असं ती म्हणाली.\nमल्याळम अभिनेत्री आणि अॅडल्ट स्टार शकीला हिच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात रिचा चढ्ढा सध्या काम करते आहे.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी ���ंबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nsavi sidhu: 'गुलाल'च्या अभिनेत्याची दुर्दशा\nbigg boss marathi 2: मुंबईत उभं राहणार 'बिग बॉस'चं घर\ndisha vakani: शोमध्ये परतण्यासाठी दयाबेनला ३० दिवसांचा अल्टि...\naamir khan: आमीर खान झाला वृद्ध; लूक व्हायरल\nvicky kaushal: कतरिना नाही, 'हिच्या'मुळे झाले विकी कौशलचे ब्...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n#मीटू: कॉम्प्रोमाइज केलं असतं तर मी खूप पुढे गेले असते.....\nतनुश्रीविरुद्ध दावा; राखीला हवेत फक्त २५ पैसे\nसोनालीच्या तब्येतीत सुधारणा; लवकरच मायदेशी परतणार...\n...म्हणून जेपी दत्तांनी फाडले होते अॅशचे कॉस्ट्यूम...\n#MeTooवर अमिताभ गप्प का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/gajendra-ahire/", "date_download": "2019-03-25T07:36:53Z", "digest": "sha1:2ONTWDJXFI7V5WX35MLVX2QEMCV644E7", "length": 2325, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": "gajendra ahire - मराठी कलाकार", "raw_content": "\nएखाद्या तरुणाप्रमाणे एनर्जेटिक आहेत सचिन पिळगांवकर-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे\nअभिनय, नृत्य, संगीत अशा एक ना विविध कलेत पारंगत असणारे महाराष्ट्राचे महागुरू म्हणजेच जेष्ठ अभिनेते सचिन...\nविभक्त कुटुंबाची अनोखी कहाणी.पहा सोहळा सिनेमाचा ट्रेलर.\nआजवर विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीस आलेले आहेत. मात्र याच धाटणीवर काहीशी हटके...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tarun-valli-news/keeping-a-balance-in-your-behavior-1242528/", "date_download": "2019-03-25T08:13:21Z", "digest": "sha1:RXZT7RADPH57TDZE7UAZ4TMFUDCWXPDC", "length": 24787, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "keeping a balance in your behavior | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nतरुणवल्ली : समतोल साधताना…\nतरुणवल्ली : समतोल साधताना…\nदीपाली पदवीधर झाली आणि एका बडय़ा कॉर्पोरेट कंपनीत कामाला लागली.\nकाही लोक वर्चस्व गाजवणारे असतात, तर काही समजून घेणारे. त्याचा परिणाम काय होतो ते आपण आपल्या रोजच्या जगण्यात बघत असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.\nदीपाली पदवीधर झाली आणि एका बडय़ा कॉर्पोरेट कंपनीत कामाला लागली. ऑफिस- नवीन वातावरण, नवीन काम, नवीन जागा आणि नवीन माणसं या नवलाईबरोबर दीपालीला या सगळ्याची सवय होईपर्यंत धास्तीही वाटत होती. सुरुवातीला नवीन जॉब लागलेल्या कुणालाही अशी थोडी भीती वाटणं अगदी साहजिकच आहे पण तशी अबोल, कष्टाळू, शांत स्वभावाची दीपाली हळूहळू नवीन ऑफिसमध्ये ओळख करून घेऊ लागली. बाकीच्यांशी ओळख करून घेण्याआधी तिची तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. आधीच जरा टेन्शनमध्ये असलेल्या दीपालीच्या नशिबात टेंशन देणारा अजून एक घटक आला:- ‘एक रागीट बॉस’ पण तशी अबोल, कष्टाळू, शांत स्वभावाची दीपाली हळूहळू नवीन ऑफिसमध्ये ओळख करून घेऊ लागली. बाकीच्यांशी ओळख करून घेण्याआधी तिची तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. आधीच जरा टेन्शनमध्ये असलेल्या दीपालीच्या नशिबात टेंशन देणारा अजून एक घटक आला:- ‘एक रागीट बॉस’ खरे तर ‘बॉस’ या नावातच एक ‘आदरयुक्त भीती’ दडलेली असते, पण बरेचदा बॉसच्या ‘बॉसगिरीमुळे’ त्यातला आदर जाऊन उरते ती नुसतीच भीती खरे तर ‘बॉस’ या नावातच एक ‘आदरयुक्त भीती’ दडलेली असते, पण बरेचदा बॉसच्या ‘बॉसगिरीमुळे’ त्यातला आदर जाऊन उरते ती नुसतीच भीती तसंच काहीसं दीपालीचं तिच्या बॉसमुळे होऊ लागलं आणि शांत, अबोल असलेली बिचारी दीपाली भीती आणि दरारा यांच्या ओझ्याखाली येऊ लागली. अगदी पहिल्या एक-दोन दिवसांतच तिच्या ‘छोटय़ा’ चुकीवरून तिला ‘मोठा’ ओरडा मिळाला; सगळ्यांच्या समोर ही गोष्ट घडल्याने तिचा आधीच कमी असलेला आत्मविश्वास अधिकच ढासळला. पुढे याच भीतीमुळे साध्या साध्या गोष्टींतसुद्धा तिच्याकडून चुका व्हायला लागल्या. साहजिकच याचा परिणाम म्हणून तिला (शांतपणे बसवून चुका समजावून शिकवण्याऐवजी) ‘रागीट बॉसचा’ रुद्रावतार बघावा लागला तसंच काहीसं दीपालीचं तिच्या बॉसमुळे होऊ लागलं आणि शांत, अबोल असलेली बिचारी दीपाली भीती आणि दरारा यांच्या ओझ्याखाली येऊ लागली. अगदी पहिल्या एक-दोन दिवसांतच तिच्या ‘छोटय़ा’ चुकीवरून तिला ‘मोठा’ ओरडा मिळाला; सगळ्यांच्या समोर ही गोष्ट घडल्याने तिचा आधीच कमी असलेला आत्मविश्वास अधिकच ढासळला. पुढे याच भीतीमुळे साध्या साध्या गोष्टींतसुद्धा तिच्याकडून चुका व्हायला लागल्या. साहजिकच याचा परिणाम म्हणून तिला (शांतपणे बसवून चुका समजावून शिकवण्याऐवजी) ‘रागीट बॉसचा’ रुद्रावतार बघावा लागला नुकताच लागलेला चांगला जॉब तिला सोडायचा नव्हता आणि बॉसबद्दल तक्रार करण्याची तिच्यात हिंमत नव्हती. अशा परिस्थितीला शरण जाऊन तिने बॉसच्या बॉसगिरीपुढे हार मानली आणि मुकाटय़ाने त्याचा ओरडा, अपमान सहन करत राहिली. हे दीपालीचं उदाहरण काही आपल्याला नवीन नाही. अशा अनेक दीपाली आणि बॉसच्या जोडय़ा आपल्याला आपल्या आजूबाजूला सतत बघायला, ऐकायला मिळत असतात आणि कधीकधी आपणसुद्धा दीपाली किंवा तिच्या बॉसच्या भूमिकेत असतो\nपण नेहमी हे उदाहरण ‘ऑफिसमधला बॉस आणि त्याच्या /तिच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी’ या रूपातच असेल, असं नाही, कारण ‘डॉमिनेटिंग आणि सबमिसिव्ह’ हे दोन व्यक्तिमत्त्वाचे प्रकार आहेत. ‘एक जंगल में एकही शेर होता है’ तसंच एका नात्यात या दोन व्यक्तिमत्त्वांचा चांगला मेळ साधण्यासाठी दोघंही डॉमिनेटिंग किंवा सबमिसिव्ह असून चालत नाही. बरेचदा नात्यातील एक व्यक्ती डॉमिनेटिंग (वर्चस्व दाखवणारी) असते, तर दुसरी सबमिसिव्ह (समजून घेणारी). तर कधीकधी हे रोल (भूमिका) बदलत असतात. एका प्रसंगात डॉमिनेटिंग असलेला माणूस दुसऱ्या प्रसंगात सबमिसिव्ह होऊ शकतो. ऑफिसमध्ये कुणाला सांगून खरं नाही वाटणार, पण हा दीपालीचा ‘बॉस’ घरी बायकोसमोर मात्र लाचार नवऱ्यासारखा वागतो म्हणे’ तसंच एका नात्यात या दोन व्यक्तिमत्त्वांचा चांगला मेळ साधण्यासाठी दोघंही डॉमिनेटिंग किंवा सबमिसिव्ह असून चालत नाही. बरेचदा नात्यातील एक व्यक्ती डॉमिनेटिंग (वर्चस्व दाखवणारी) असते, तर दुसरी सबमिसिव्ह (समजून घेणारी). तर कधीकधी हे रोल (भूमिका) बदलत असतात. एका प्रसंगात डॉमिनेटिंग असलेला माणूस दुसऱ्या प्रसंगात सबमिसिव्ह होऊ शकतो. ऑफिसमध्ये कुणाला सांगून खरं नाही वाटणार, पण हा दीपालीचा ‘बॉस’ घरी बायकोसमोर मात्र लाचार नवऱ्यासारखा वागतो म्हणे घरी बायको म्हणेल ती ‘पूर्व दिशा’ असा नियम आणि ऑफिसमध्ये मात्र हिटलरसारखा वागणारा माणूस एकच व्यक्ती आहे यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण आहे. एकाच माणसाच्या इतक्या विरुद्ध दोन बाजू कशा असू शकतात हे कोडं पडणं साहजिक आहे; पण विचार केला तर उत्तर या प्रश्नातच सापडतं बरेचदा घरी बायको म्हणेल ती ‘पूर्व दिशा’ असा नियम आणि ऑफिसमध्ये मात्र हिटलरसारखा वागणारा माणूस एकच व्यक्ती आहे यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण आहे. एकाच माणसाच्या इतक्या विरुद्ध दोन बाजू कशा असू शकतात हे कोडं पडणं साहजिक आहे; पण विचार केला तर उत्तर या प्रश्नातच सापडतं बरेचदा आपला स्वभाव आणि आपलं व्यक्तिमत्त्व यांचा खूप निकट संबंध असतो. या दोन्ही गोष्टी सहसा बदलत नाहीत. एका विशिष्ट वयानंतर या गोष्टींमध्ये बदल घडून येणं फारच कठीण असतं, पण बदलत असतं ते आपलं वर्तन- जरी आपल्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्त्वाला धरून आपलं वर्तन असलं तरी परिस्थिती, काळ-वेळ, आजूबाजूची माणसं यावरसुद्धा आपलं त्या वेळचं वागणं अवलंबून असतं आपला स्वभाव आणि आपलं व्यक्तिमत्त्व यांचा खूप निकट संबंध असतो. या दोन्ही गोष्टी सहसा बदलत नाहीत. एका विशिष्ट वयानंतर या गोष्टींमध्ये बदल घडून येणं फारच कठीण असतं, पण बदलत असतं ते आपलं वर्तन- जरी आपल्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्त्वाला धरून आपलं वर्तन असलं तरी परिस्थिती, काळ-वेळ, आजूबाजूची माणसं यावरसुद्धा आपलं त्या वेळचं वागणं अवलंबून असतं दीपालीच्या बॉसचा खरा स्वभाव फार रागीट किंवा डॉमिनेटिंग नाही; पण त्याच्या बायकोचा स्वभाव मात्र फार डॉमिनेटिंग आहे. तिला तिच्या कामात बाकी कुणी लुडबुड केलेली आवडत नाही, त्यामुळे ‘‘बॉस असशील तो ऑफिसमध्ये, घरी मात्र मीच ‘बिग बॉस’ आहे हे विसरू नको’’ असे डायलॉगसुद्धा त्याला कधीकधी ऐकावे लागतात. त्यामुळे त्याच्���ासाठी आपलं म्हणणं लोकांना ऐकायला लावायचं हक्काचं ठिकाण म्हणजे त्याचं ‘ऑफिस दीपालीच्या बॉसचा खरा स्वभाव फार रागीट किंवा डॉमिनेटिंग नाही; पण त्याच्या बायकोचा स्वभाव मात्र फार डॉमिनेटिंग आहे. तिला तिच्या कामात बाकी कुणी लुडबुड केलेली आवडत नाही, त्यामुळे ‘‘बॉस असशील तो ऑफिसमध्ये, घरी मात्र मीच ‘बिग बॉस’ आहे हे विसरू नको’’ असे डायलॉगसुद्धा त्याला कधीकधी ऐकावे लागतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपलं म्हणणं लोकांना ऐकायला लावायचं हक्काचं ठिकाण म्हणजे त्याचं ‘ऑफिस’ तिथे त्याच्या पोस्टमुळे तरी त्याला लोकांवर हक्क गाजवता येतो. त्यातही तो त्याच ऑफिसमध्ये ज्युनिअर होता तेव्हा त्याचा आधीचा बॉस रागीट आणि असाच फटकळ स्वभावाचा होता. त्यामुळे आधी तेव्हा दीपालीच्या बॉसला ‘सबमिसिव्ह’ राहावं लागत होतं. त्यामुळे आता तो बॉस झाल्यापासून एका प्रकारची ‘कॉम्पेन्सेशन’ स्ट्रॅटेजी त्याच्या वागण्यात दिसून येत आहे. आधीच्या बॉसची जागा घेताना त्याच्यासारखं जरा शिस्तीचं वागलो नाही तर लोक आपल्याला मिळमिळीत बॉस म्हणतील आणि आपला गरफायदा घेतील असा त्याचा समज’ तिथे त्याच्या पोस्टमुळे तरी त्याला लोकांवर हक्क गाजवता येतो. त्यातही तो त्याच ऑफिसमध्ये ज्युनिअर होता तेव्हा त्याचा आधीचा बॉस रागीट आणि असाच फटकळ स्वभावाचा होता. त्यामुळे आधी तेव्हा दीपालीच्या बॉसला ‘सबमिसिव्ह’ राहावं लागत होतं. त्यामुळे आता तो बॉस झाल्यापासून एका प्रकारची ‘कॉम्पेन्सेशन’ स्ट्रॅटेजी त्याच्या वागण्यात दिसून येत आहे. आधीच्या बॉसची जागा घेताना त्याच्यासारखं जरा शिस्तीचं वागलो नाही तर लोक आपल्याला मिळमिळीत बॉस म्हणतील आणि आपला गरफायदा घेतील असा त्याचा समज आणि एवढे र्वष घरात आणि ऑफिसमध्ये ‘सबमिसिव्ह’ भूमिका घेतल्याने तो दाबून ठेवलेला राग, नाराजी या नवीन बॉसच्या भूमिकेतून, त्याच्या वागण्यातून बाहेर येत आहे. त्यातही नवीन कामाला लागलेले शिकाऊ म्हणजे बॉसगिरी करायला अजूनच वाव- त्यामुळे दीपालीला बॉसच्या अशा वागण्याला समोरं जावं लागतंय..\nपण दीपालीचा स्वभाव मात्र यापेक्षा वेगळा. सगळ्याच नात्यांमध्ये तिची ‘नम्र’ भूमिका असते. घरी पालकांसमोर, कॉलेजमध्ये शिक्षकांसमोर, बाहेर मित्रमत्रिणींसमोर आणि आता तर ऑफिसमध्ये बॉससमोरसुद्धा दुसऱ्याचं ऐकून घेणारी, वर्चस्व स्वीका���णारी दीपाली ‘सबमिसिव्ह’ व्यक्तिमत्त्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. स्वत:हून निर्णय घेण्यापेक्षा समोरच्याने घेतलेला निर्णय मान्य करून त्याप्रमाणे ती वागते. काही पटलं नाही तर लगेच समोरच्याला तसं तोंडावर सांगणं तिला जमत नाही आणि कुठल्याही प्रसंगात वाद टाळणं दीपालीला चांगलं जमतं कधीकधी अशा वागण्याचा परिणाम ‘कमी आत्मविश्वासामध्ये’ होऊ शकतो. डॉमिनेटिंग (वर्चस्व गाजवणारा) आणि सबमिसिव्ह (नम्र) यापकी दोन्ही व्यक्तिमत्त्वांमध्ये काही चूक किंवा बरोबर नाही. कुठल्याही ठिकाणी, प्रसंगात काम सुरळीत आणि व्यवस्थित होण्यासाठी अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा समतोल असणं आवश्यक असतं. ऐकून फॉलो करणारं कुणी नसेल तर फक्त नियम आणि प्लान्स बनवण्याला काही अर्थ नाही; तसंच निर्णय घेण्याची क्षमता किंवा आत्मविश्वास नसलेल्या व्यक्ती फक्त एकत्र काम करत असतील तर त्या कामाची दिशा ठरवायला आणि सिद्धीस न्यायला फार कठीण जाईल कधीकधी अशा वागण्याचा परिणाम ‘कमी आत्मविश्वासामध्ये’ होऊ शकतो. डॉमिनेटिंग (वर्चस्व गाजवणारा) आणि सबमिसिव्ह (नम्र) यापकी दोन्ही व्यक्तिमत्त्वांमध्ये काही चूक किंवा बरोबर नाही. कुठल्याही ठिकाणी, प्रसंगात काम सुरळीत आणि व्यवस्थित होण्यासाठी अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा समतोल असणं आवश्यक असतं. ऐकून फॉलो करणारं कुणी नसेल तर फक्त नियम आणि प्लान्स बनवण्याला काही अर्थ नाही; तसंच निर्णय घेण्याची क्षमता किंवा आत्मविश्वास नसलेल्या व्यक्ती फक्त एकत्र काम करत असतील तर त्या कामाची दिशा ठरवायला आणि सिद्धीस न्यायला फार कठीण जाईल त्यामुळे यापकी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आणि संपूर्ण अभाव या दोन्ही गोष्टी घातक आहेत. समतोल साधण्यामध्येच समाधान आणि यशाची गुरुकिल्ली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही त्यामुळे यापकी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आणि संपूर्ण अभाव या दोन्ही गोष्टी घातक आहेत. समतोल साधण्यामध्येच समाधान आणि यशाची गुरुकिल्ली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही तसंच भूमिका, वेळ, प्रसंगानुरूप या दोन्ही व्यक्तिमत्त्व शैलींचा हुशारीने वापर करणं योग्य असलं तरी आपलं वर्तन दोन टोकांचं असू नये, कारण तसं वागणं आपल्यालाही कठीण जातं आणि त्यामध्ये ‘कॉम्पेन्सेशन’ स्ट्रॅटेजीचा जास्त वापर होत असेल तर असं वर्तन फायद्यापेक्षा ज��स्त नुकसान करू शकतं; याची काळजी घेणं आवश्यक आहे. अखेर कधी आपण बॉस, कधी चाकर, कधी डॉमिनेटिंग आणि कधी सबमिसिव्ह राहणं आपल्या फायद्याचं आहे हे ज्याचं त्यालाच चांगलं माहिती असतं तसंच भूमिका, वेळ, प्रसंगानुरूप या दोन्ही व्यक्तिमत्त्व शैलींचा हुशारीने वापर करणं योग्य असलं तरी आपलं वर्तन दोन टोकांचं असू नये, कारण तसं वागणं आपल्यालाही कठीण जातं आणि त्यामध्ये ‘कॉम्पेन्सेशन’ स्ट्रॅटेजीचा जास्त वापर होत असेल तर असं वर्तन फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतं; याची काळजी घेणं आवश्यक आहे. अखेर कधी आपण बॉस, कधी चाकर, कधी डॉमिनेटिंग आणि कधी सबमिसिव्ह राहणं आपल्या फायद्याचं आहे हे ज्याचं त्यालाच चांगलं माहिती असतं तराजूचं कुठलं पातं कधी जड, कधी हलकं आणि कधी दोन्ही बरोबरीची असणं आवश्यक असतं; फक्त ते आपल्याला योग्य वेळी समजणं अधिक आवश्यक आहे…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफॅशन पॅशन : शूजमध्ये पर्याय कुठले\n‘भागवतातून वाणी आणि वर्तनातील समन्वयाची शिकवण’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-March2016-Anbaa.html", "date_download": "2019-03-25T07:58:02Z", "digest": "sha1:GROF43O7Q5PG5FJDUHSMXSJ2UUJ42NTX", "length": 7272, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - आंबा निर्यातीसाठी आवश्यक बाबी", "raw_content": "\nआंबा निर्यातीसाठी आवश्यक बाबी\nआंब्याचे जगतील उत्पादनाच्या निम्मे उत्���ादन हे भारतात होत असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला वाटा जेमतेम ६ टक्के आहे. जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता निर्यातीस मोठा वाव असून त्यासठी विशिष्ट गुणवत्तेचे फळ लागते. निर्यातक्षम आंब्याला केवळ परदेशी नव्हे तर देशांतर्गत बाजारपेठेतही चांगली मागणी असते. त्याकरिता निर्यातक्षम आंब्यासाठी पायाभुत गुणवत्ता ही खालीलप्रमाणे हवी.\n* भौतिक प्रमाण : यात आब्याच्या बाह्यारूपाचा समावेश होतो. आंबा दिसायला कसा आहे. ही बाब महत्त्वाची असते. तो पूर्ण परिपक्व असावा. निरोगी, कडक आणि खाण्यायोग्य असावा. आंबा स्वच्छ आणि ठिपके विरहित असला पाहिजे. आंब्यावर कोणत्याही प्रकराचे ओरखडे नसावेत आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी. फळ जीवजंतुपासून मुक्त असले पाहिजे व त्यावर जीवजंतुंचा प्रादुर्भाव नसावा. फळ बाहेरच्या उष्णतेपासून मुक्त असले पाहिजे. शीतगृहातून आंबा काढल्यानंतर त्यावर पाण्याचे थेंब नसावेत. फळाचे देठ १ सें. मी. हुन अधिक लांब देठ नसावे. तसेच ते निरोगी असावे आणि ते फळ करपा रोगापासून मुक्त असावे. फळ पूर्ण विकसित आणि पिकलेले असावे.\n* आकार, वजन, रंग : निर्यातक्षम आंब्यासाठी आकार जाणीवपूर्वक तपासाल जातो. त्यामुळे योग्य आकाराची व शक्यतो एकसारखी फळे असावीत. निर्यातीसाठी केशर आंबा फळाचे वजन २५० ग्रॅम असावे. त्यात फार तर १० टक्के घट चालते. आंबे पाठविताना पेटीतून पाठवावे लागतात. एकसारखी फळे एका पेटीत ठेवावीत. निर्याती साठी रंग महत्त्वाचा घटक आहे. निर्यात केलेला आंबा ग्राहक किंवा बाजारपेठेत पोहोचतो, तेव्हा तो एकसारखा पिवळ्या रंगाचा असावा.\n* रासायनिक प्रमाण : आंब्यावर किंवा झाडावर अनेक प्रकारची किटकनाशके आणि औषधे फवारावी लागतात. त्यांचा अंश अपरिहार्यपणे फळांत येतो. असे अंश किती व कोणत्या प्रमाणात असावेत, याचे निकष आयात करणाऱ्या देशाने निश्चित केले आहेत. ज्या देशात निर्यात करायची आहे. तेथील निकषांच्या अधीन राहूनच आपले फळ असले पाहिजे. समजा त्या देशात बंदी घातलेले कीटकनाशक आपल्या फळांत असले तर तो देश आंबा स्वीकारणार नाही. फळातील सर्व प्रकारची भारी तत्त्वेही त्या देशाने निश्चित केल्यानुसार असावीत.\n* निर्यातीसाठी महत्त्वाचे मुद्दे :\n* फळ पेटीत भरताना ते एकसारखे असावे. प्रत्येक फल सारख्या गुणवत्तेचे व दर्जाचे असावे. एका पेटीत एकाच जातीची फळे असावीत.\n* निर्यात करताना आंबा सुरक्षित त्या देशात पोहोचला पाहिजे, अशा प्रकारे त्याचे पॅकिंग करावे लागते. पेटीला करण्यता येणाऱ्या पेकिंगला बारीक छिद्रे असावीत. त्यामुळे हवा खेळती राहते. पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचे असले पाहिजे.\n* प्रत्येक पॅकिंगवर ओळख चिन्ह, पळाचे नाव आणि माहिती, उत्पादनाचे स्थळ, वजन, पॅकिंग केल्याची तारीख आणि कोड नंबर असावा.\n* निर्यातीची दिशा : योग्य प्रकारे नियोजन केल्यास नजीकच्या काळात भारतातून दरवर्षी ४४ हजार टन आंबा निर्यात होऊ शकतो. ही निर्यात समुद्रामार्ग किंवा विमानाने शक्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/naka-bolu-ase/", "date_download": "2019-03-25T08:25:18Z", "digest": "sha1:OAYG2H4CYW4QBID64ULX35UUHTG77UCL", "length": 7600, "nlines": 84, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nनका बोलू असे दूर दूर बसून\nनका बोलू असे दूर दूर बसून\nमाझ्यावर रुसून माझ्यावर रुसून\nघ्या जवळ जवळ मला हसून\nराया मनापासून हो मनापासून\nनका बोलू असे दूर दूर बसून\nमाझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.\nतुमच्या डोळ्यातली मदिरा प्याले\nगेले जिव्हारी आरपार भाले\nगेले कुणीतरी उरी माझ्या डसून\nनका बोलू असे दूर दूर बसून\nमाझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.\nमाझ्या जीवाची मंजुळ मैना\nराया करू नका तिची अशी दैना\nहो तिची अशी दैना\nसोनं बावनकशी घ्या हो तुम्ही कसून\nनका बोलू असे दूर दूर बसून\nमाझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.\nघ्या हो तांबुल घालते मुखी\nहो सांगा माझी चुकी\nहो सांगा माझी चुकी\nअहो रसिक रत्नपारखी, रत्नपारखी\nशालू बुट्ट्याचा आज आले नेसून\nनका बोलू असे दूर दूर बसून\nमाझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.\nमंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nनका बोलू असे दूर दूर बसून\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-Death-of-the-bull-falls-on-electric-wire/", "date_download": "2019-03-25T07:43:15Z", "digest": "sha1:HZXYWXWBM57GSGDOFS7KTHUSTKDNWXHS", "length": 4563, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : विद्युत तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विद्युत तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू\nऔरंगाबाद : विद्युत तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू\nसिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शिवारातील अजिज बशीर पटेल यांच्या शेतातील कपाशी वखरणी करताना विद्युत तार बैलांच्या अंगावर पडल्याने एक बैल मृत्युमुखी पडला तर एक बैल व मुलगा सुदैवाने वाचले.\nही घटना शनिवारी ( दि.४ ) सकाळी आठच्या सुमारास घडली. अंधारी शिवारात राहणारे अजिज बशीर पटेल यांच्या घरासमोरील शेतात त्यांचा नातू अलीम हा कपाशी वखरणी करत होता. त्याचवेळी शेतातून जाणारी पोलवरील विद्युत तार तुटून अचानक वखरणी करत असलेल्या बैल जोडीतील एका बैलाच्या अंगावर पडल्याने बैल जागीच मृत्युमुखी पडला. तर लोखंडी वखर असल्यामुळे त्यात विद्युत प्रवाह उतरला गेल्याने वखर हाकत असलेल्या मुलाला जोराचा शॉक बसल्याने बाजूला फेकला गेल्यामुळे तो सुदैवाने वाचला.\nया घटनेची माहिती पोलिस पाटील दिनेश खराते यांनी तलाठी काथार व महावितरणचे अभियंता प्रदीप निकम यांना दिली. या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच विजय गोरे यांनी केली आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Farmer-murders-in-Kalyan/", "date_download": "2019-03-25T07:46:00Z", "digest": "sha1:YY7RQS6LJPRSVO7IZF57GWEOH7OHGJEF", "length": 5554, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कल्याणात शेतकर्याची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणात शेतकर्याची हत्या\nकल्याणजवळच्या मोहने गावात घराबाहेर झोपलेल्या एका 92 वर्षीय शेतकर्याची अज्ञातांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. महादेव जाधव असे या मृत शेतकर्याचे नाव असून ते आपल्या पत्नीसह यादवनगर येथील शेतातील घरात राहात होते. त्यांची पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या रात्री झोपेत असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. शेतकर्याच्या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nकल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशननजीक मोहने यादव नगर येथे शेतात बांधलेल्या घरात मनोहर जाधव हे आपल्या पत्नीसह राहात होते. त्यांची तीन मुले याच गावात राहतात. म��गळवारी रात्रीच्या सुमारास पत्नी घरात, तर महादेव हे व्हरांड्यात झोपले होते. अज्ञातांनी महादेव जाधव यांचा अत्यंत निर्घृण खून केला. त्यांचे डोळे फोडण्यात आले. तर त्यांच्या डोके, तोंड, कान, गळ्यावर वार करण्यात आले. बुधवारी सकाळी महादेव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळताच खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी महादेव यांचा मुलगा हरिभाऊ जाधव (47) यांच्या जबानीवरून खडकपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवला.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dombivali-marathi-bhasha-sanvardhan-saptah-news/", "date_download": "2019-03-25T07:46:18Z", "digest": "sha1:UIF4G6XKVKXGB4TNVLOHRJ7A26P5SXZL", "length": 7079, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप स्मशानभूमीत (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप स्मशानभूमीत (Video)\nमराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप स्मशानभूमीत (Video)\nअखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व मराठी भाषा जोपासण्यासाठी तसेच अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी, मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या साप्ताहाचा समारोप डोंबिवली पूर्व शिवमंदिर रोड वरील स्मशाभूमीच्या दारात करण्यात आला. 'मराठी भाषेला अभिजात दर्जा' मिळत नाही म्हणून निषेध करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप या प्रकारे करण्यात आला.\nयावेळी ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या \"टवाळकी\"या काव्यसंग्राहाचे प्रकाशन केले. यावेळी साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासनाच्या अनास्थेच्या भूमिकेबाबत टीका करीत निषेध केला .\n२७ फेब्रुवारीला राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धन आणि मराठी भाषा जोपासण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने गत आठवडाभर कल्याण, अनगाव भिवंडी, अंबरनाथ, भिवंडी पडघा, मुरबाड टिटवाळा, मोहने येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.\nआज सकाळी मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप डोंबिवली पूर्व शिवमंदिर रोड वरील स्मशाभूमीच्या दारात करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर यांनी महाराष्ट्भर जागो जागी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असतानाच मसाप, कोमसाप अखिल मराठी साहित्य परिषद मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याला शासन दरबारातील काही अधिकारी उदासीन असून भाषेची गळचेपी होताना दिसत आहे. म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप समारंभाचे आयोजन डोंबिवलीतील शिव मंदिर वैकुठ्वास येथे करण्यात आले. यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राधान्याने द्यावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. नुकत्याच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी इंग्रजीत केलेल्या भाषणाचे अनुवादित भाषण मराठी ऐवजी गुजराती मध्ये झाल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/news-about-kolhapur-mahanagarpalika/", "date_download": "2019-03-25T08:29:19Z", "digest": "sha1:POJQKXTXPWTUU4RHRINQVENJH3PEVKUE", "length": 8156, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोल्हापूर महापालिका : वाचा काँग्रेससाठी शिवसेनेने एवढी उदारता का दाखवली ?", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nकोल्हापूर महापालिका : वाचा काँग्रेससाठी शिवसेनेने एवढी उदारता का दाखवली \nटीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेससाठी शिवसेनेनं त्याग केल्याची चर्चा कोल्हापुरात व महापालिका वर्तुळात चालली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा ताराराणी आघाडी व शिवसेना यांनी उमेदवार उभे केले होते, परंतु ऐनवेळेस शिवसेनेनं माघार घेतली व त्यांचे नगरसेवक मतदान प्रक्रियेपासून तटस्थ राहिल्याने जाणकार राजकीय विश्लेषकांच्या मते ही काँग्रेस व शिवसेनेमधील आपापसातील सेटिंग आहे.\nकोल्हापूर महापालिकेत पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ४४ नगरसेवक आहेत, तर भाजपा ताराराणी आघाडीचे ३३ नगरसेवक आहेत व शिवसेनेचे ४ नगरसेवक आहेत. भाजपा ताराराणी आघाडीला शिवसेना मदत करेल असे वाटत होते व काही नाराज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक मदत करतील असेही वाटत होते. परंतु राज्यात आणि देशातही शिवसेना भाजपासोबत आहे, पण त्यांच्यातील मतभेद सर्वज्ञात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेचे चार नगरसेवक गेल्या अडीच वर्षापासून काँग्रेस आघाडीसोबतच होते. या बदल्यात शिवसेनेला सलग दोनवेळा परिवहन समितीचे सभापती पद देण्यात आले. यावेळी मात्र महापौर पदासाठी शिवसेनेकडूनच सौ. प्रतिज्ञा उत्तुरे-निल्ले यांचा व उपमहापौर पदासाठी अभिजित चव्हाण यांचा अर्ज दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.\nपरंतु शिवसेनेच्या जागा कमी असतानाही आमदार सतेज पाटील यांनी गेली अडीच वर्षे दिलेल्या सन���मानाच्या जाणिवेतून शिवसेनेनं या निवडणुकीत त्यागाची भावना दाखवून काँग्रेसला मदत करत भाजपला इशारा केला असून येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत कडवं आव्हान आत्ताच निर्माण करून माईंड गेम खेळायला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. आता या खेळात आमदार सतेज पाटील कसा फायदा उचलतात हे पाहणे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत औत्सुक्याचे असणार आहे, की भाजप नेते चंद्रकांत पाटील काही नवीन डाव टाकत आमदार पाटील यांना शह देतात हेही पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nलातूर-उस्मानाबाद-बीडच्या मतमोजणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : अजित पवार\nभूलथापांना बळी न पडता वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहा : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/celebs-made-their-glamorous-presence-in-the-hello-hall-of-fame-awards-2018/418366", "date_download": "2019-03-25T08:38:36Z", "digest": "sha1:SSK4HBJ5NVO7TFVHLSSTNSSZV4GPB6VN", "length": 4609, "nlines": 82, "source_domain": "zeenews.india.com", "title": "हॅलो हॉल ऑफ द फेम पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रेटींचा जलवा... | News in Marathi", "raw_content": "\nहॅलो हॉल ऑफ द फेम पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रेटींचा जलवा...\nबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारी रात्री हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्सला हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्यात ती व्हाईट गाऊनमध्ये दिसली. तिला तेथे इंटरटेनर ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nया पुरस्कार सोहळ्याला रणवीर सिंग देखील उपस्थित होता. त्याला देखील इंटरटेनर ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nया सोहळ्यात कतरिना कैफची बहिण इजाबेल कैफने देखील वर्णी लावली होती. शोमध्ये ती व्हाईट गाऊनमध्ये दिसली.\nब्लू कार्पेटवर शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर...\nया शोमध्ये रेखा देखील उपस्थित होत्या. गोल्डन रंगाच्या साडीत ही एव्हरग्रीन अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत होती.\nसिद्धार्थ मल्होत्रा आणि कृती सेनन एकत्र पोज देताना...\nपुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत आला होता.\nफिल्ममेकर करण जोहर देखील या सोहळ्यात सहभागी झाला.\nबांगलादेशच्या विमान अपघाताचे धक्कादायक फोटोज\nमुंबईत मोठी दुर्घटना, सीएसए���टी येथील पादचारी पूल कोसळला\nएका ईव्हीएम मशीनची किंमत किती यंदा काय आहे खास\nआकाश अंबानी, श्लोका मेहताच्या लग्नात बॉलिवूडची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-7-%E0%A4%A0%E0%A4%BF/", "date_download": "2019-03-25T08:12:15Z", "digest": "sha1:WUSTSHELO27OWGAFU4LEHWVFKQMDJMDF", "length": 10870, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“एनआयए’कडून हैदराबादेत 7 ठिकाणी छापे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“एनआयए’कडून हैदराबादेत 7 ठिकाणी छापे\nहैदराबाद – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने आज हैदराबादमध्ये 7 ठिकाणी छापे घातले. हे छापे 2016 मधील इसिसच्या प्रकरणाशी संबंधित होते, असे “एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले. हैदराबादेतील संशयितांवरील आजच्या छाप्यांदरम्यान “एनआयए’ने काही डिजीटल उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्यही जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याने या प्रवक्त्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला.\n2016 साली हैदराबादमधील काही युवकांनी अन्य काही गुन्हेगारांबरोबर मिळून देशाविरोधात युद्ध पुकारण्याचा कट केल्याची खात्रीशीर माहिती “एनआयए’ला मिळाली होती. सार्वजनिक घातपात करण्यासाठी या युवकांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठाही जमा केला होता.\nते देशभरातील काही धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींनाही लक्ष्य करणार होते. या प्रकरणाचा तपास “एनआयए’ने पूर्ण केला असून 11 जणांविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या 11 जणांपैकी तिघेजण फरार होते. या प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे मिळाले असल्याने आज ठिकठिकाणी छापे घालण्यात आले.\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमुलायम सिंहांच्या जागेवर अखिलेश निवडणूक लढवणार\nभाजपच्या उपाध्यक्षपदी उमा भारती यांची नियुक्ती\n….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होती\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले\nभाजपकडून सहावी यादी जाहीर ; भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा\nमी कोणतीही निवडणूक लढवणार नाही- सपना चौधरी\nभारताचा जपानवर दणदणीत विजय\nसलग पाचव्यांदा भारतीय महिलांनी जिंकला सॅफ चषक\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n���छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-3-november-2018/articleshow/66482355.cms", "date_download": "2019-03-25T08:56:55Z", "digest": "sha1:YOEA6QE4KP4BTNJXPV3U5FADBTPXXITP", "length": 17920, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आजचं राशी-भविष्य: Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ नोव्हेंबर २०१८ - rashi bhavishya of 3 november 2018 | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ नोव्हेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ नोव्हेंबर २०१८\nराग आणि हट्टीपणावर संयम ठेवा. परिश्रम करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. शारीरिक आरोग्यही यथा-तथाच राहील. प्रवासासाठी वेळ अनुकूल नाही. मुलांची चिंता राहील. एखाद्या गोष्टीत विचारपूर्वक निर्णय न घेता उच��लेले पाऊल नुकसान करणारे ठरू शकते. सरकारी कामात यश मिळेल.\nप्रत्येक कार्य दृढ आत्मविश्वासाने आणि उत्तम मनोबलाच्या सहाय्याने पूर्ण कराल तसेच त्यात यश मिळवाल. वडिलधाऱ्यांकडून लाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल. सरकारी कामात यश मिळेल किंवा लाभ होईल. मुलांसाठी पैसे खर्च होतील. कलाकार किंवा खेळाडू यांना त्याच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी वेळ उत्तम आहे. मालमत्तेसंबंधीचे कायदाविषयक दस्ताऐवज आज करू नका.\nदिवसाची सुरूवात उत्तम होईल. भाग्योदयाच्या संधी येतील. सतत बदलणाऱ्या विचारांमुळे द्विधा मनस्थिती होईल. नवीन कार्याचा शुभारंभ करू शकाल. मित्र, सगे-सोयरे आणि शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग आहेत.\nमन हताश झाल्याने निराश व्हाल. परिवारातील सदस्यांसोबत गैरसमज किंवा रुसवे-फुगवे होतील. अहंकारामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. पैसे खर्च होतील. असमाधानी भावनेत मन गुंतून राहील. अनैतिक कामांमध्ये पडू नका.\nआत्मविश्वासाने तात्काळ निर्णय घेऊन कामांत पुढे जात राहाल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. वाणी आणि व्यवहारात रागाच्या भरात किंवा एखाद्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. वडील किंवा वडिलधाऱ्यांकडून लाभ होईल. आरोग्याबाबत थोडी चिंता राहील. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. सरकारी कामे त्वरेने पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nशारीरिक आणि मानसिक चिंतेत गुंतून राहाल. एखाद्यासोबत वाद विवादाला तुमचा अहंकार कारणीभूत ठरेल. अचानक पैसे खर्च होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. हाताखालील माणसे किंवा नोकरदारवर्गाकडून त्रास होईल.\nआज विविध क्षेत्रात लाभ झाल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्टीने स्वस्थ आणि प्रफुल्लित व्हाल. मित्रांसोबत भेटीगाठी, रमणीय स्थळांचे पर्यटन, प्रवासाचे आयोजन कराल. गृहस्थ जीवनात सुख-शांती लाभेल. स्त्री मित्रांची भेट होईल. उत्पन्नात वाढ होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहितांचे विवाह जुळतील.\nआज तुमची सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडतील. गृहस्थजीवनात आनंद राहील. मान प्रतिष्ठा वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ आणि वडिलधाऱ्यांकडून लाभ होईल. ���नलाभ होईल. व्यापाऱ्यांचे येणी वसूल होतील. मुलांच्या प्रगतीने मन आनंदी राहल. आरोग्य चांगले राहील. मित्र-नातेवाईकांकडून लाभ होईल.\nआज आरोग्य यथा-तथाच राहील. शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल. मानसिक चिंता राहील आणि मन एखाद्या गोष्टीत गुंतून राहील. व्यावसायात विघ्ने येण्याची शक्यता आहे. हानिकारक विचारांपासून शक्यतो दूर राहा. कोणत्याही कार्याचे नियोजन संभाळून करा. वरिष्ठांसोबत वादाचे प्रसंग उपस्थित होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी आणि विरोधकांसोबत शक्य असल्यास वाद टाळा.\nआहार विहारावर नियंत्रण ठेवा नाहीतर आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. रुग्णाची चिकित्सा आणि प्रवास किंवा व्यापारातील कामांसाठी पैसे खर्च होतील. नकारात्मक विचार आणि रागाला दूर ठेवल्यास संकटांपासून वाचू शकाल. भागीदारांसोबत मतभेद होतील. नोकरी-धंद्यात प्रतिकूल वातावरण राहील. नवीन संबंध जोडताना सावधानता बाळगा.\nभरपूर आत्मविश्वास आणि दृढ मनोबलासह प्रणय आणि रोमांस आजचा दिवस आणखी सुखद करतील. भिन्न लिंगी व्यक्तींशी ओळख आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील. आनंददायक प्रवास, पर्यटन आणि रुचकर भोजन, नवीन वस्त्र यामुळे आनंद द्विगुणित होईल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान वाढेल. दांपत्य जीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल.\nघरात सुख-शांती आणि आनंदाचे वातावरण तयार झाल्याने दैनंदिन कामे आत्मविश्वासाने आणि योग्यरितीने पूर्ण कराल. स्वभावातील राग आणि जिभेच्या आक्रमकतेवर संयम ठेवायला हवा. नोकरीत सहकारी आणि हाताखालील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पा��मध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २३ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २४ मार्च २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ नोव्हेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २ नोव्हेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १ नोव्हेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३१ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३० ऑक्टोबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2019-03-25T08:13:26Z", "digest": "sha1:W5QD7V456UYRTB6TPJDZ57WZZKU3ICJI", "length": 28008, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:साच्यांचे दस्तऐवज - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानाचे नाव साच्यांचे दस्तएवज असे हवे\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nसाचे मिडियाविकिचे अंत्यंत प्रभावी वैशिष्ट्य आहे, परंतु अधिक क्लिष्ट असलेल्यां साचांचा अर्थ लावणे कठीण जाऊ शकते, काही असे साचे नव्या सदस्यांना आणि अनुभवी सदस्यांना सुद्धा, गोंधळात टाकु शकतात .म्हणून साच्यांच्या सोबत उपयोग���ता सुधारण्याकरिता कागदपत्र असावे .\nसाचा कागदपत्र एखादा ”’साचा काय करतो आणि तो कसा काय वापरावा\"’ ते स्पष्ट करण्यास वापरावे.साचाकागदपत्र असे पुरेसे सोपे असावे की क्लिष्टता साच्यातील वाक्यविन्यासाच्या पूर्ण ज्ञानाशिवाय एखादा उपयोगकर्त्याकडून – असे असंख्य अनुभवी योगदानकर्ते जे त्यांचे लक्ष इतरत्र केंद्रीत करतात ते, असे साचे समाविष्ट करु शकतात – ते बरोबर वापरले जाऊ शकतात .खासकरून नेहमी खूप वापरल्या जाणार्र्या साचांच्या बाबतीत हे खरे आहे.\n१ कशाचा अंतर्भाव करावा\n२ कागदपत्र उपपान कसे तयार करावे\n३ वर्गीकरणे आणि आंतरविकिदुवे\n५ /धूळपाटी आणि /टेस्टकेसेस\n६ बरेचसे साचे, एक कागदपत्र पान\nसाचा कागदपत्रात खालील मुद्यांचा अंतर्भाव करावा :\nसाच्याचा मुळ उद्देश : जर लगेच लक्षात आणून देणारा नसेल, तो काय करतो आणि त्याने तसे कां करावयास हवे . जर का इतर साचे सारख्या नावाचे किंवा उद्दीष्टाचे उपलब्ध असतील तर, चुकीचे वापरले जाण्यापासूनची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने, साच्याचे मुळ उद्देश उल्लेखित करणे ही एक चांगली कल्पना आहे .\nसाच्याची पॅरामीटर्स :प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) क्रमीत, नावे दिलेले की ऐच्छिक आहेत आणि जर ऐच्छिक असतील तर, अविचल मुल्ये काय आहेत आणि त्यांचा काय परिणाम असेल. जर का एखादे प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) केवळ मुल्यांचा मर्यादित संचच घेऊ शकत असतील किंवा कोणत्याही प्रकारे बंधनात असतील,- उदाहरणार्थ, जर ते केवळ : “हो”, “नको” ”’येस”’,’नो’ किंवा संख्या, इत्यादींचाच उपयोग करू शकत असतील-तर ते तेथे स्पष्ट नमुद केलेले असे असावे .\nउपयोगाची उदाहरणे: नेमका विकिमजकुर नमुद करावा जेणे करून त्याचा उपयोग कसा असावा आणि त्याचा परिणाम कसा असेल हे लक्षात येईल. विकिमजकुर त्याला स्पष्ट करण्याकरिता …
आणिया प्रमाणे, नक्कलण्यास सोप्या अशा धारकात घेरलेला असु शकतो . जर का एखादा साचा वैकल्पिक प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) सोबत किंवा त्याशिवाय विविध पद्धतीने वापरता येत असेल तर ,निवडक उदाहरणे उपलब्ध करावीत. उदाहरणार्थ -तसे करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तो साचाच कागदपत्र पानावर काही वेळा आंतर्न्यासित करणे (म्हणजे., उपयोजित उदाहरणे दाखवणे). प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रचल हेतुकांच्या (पॅरामीटर्स) सोबत आणि प्रत्येक स्थितीत वापरलेला प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) दर्शविणे.\nसंबधीत साचे: साचा जर का साचे शृंखले पैकी एक असतील तर ,त्यांना दुवे अंतर्भूत केल्याची खात्री करा – विशेषतः, जेणे करून प्रत्येक साचा शृंखलेत परस्परांना दुवा दिलेला असेल , ह्याने सुचालन सोपे होते. (एक स्वतंत्र सुचालन साचा या उद्देश्याकरिता उपयोगी ठरू शकेल, पहा: साचा:सुरक्षा साचे).\nवर्गीकरणे आणि आंतरविकिमीडिया दुवे, जेथे लागु असतील. जसे, कागदपत्रे, हे सर्व … धारकातच असावेत. अनेक साचावर्गिकरणे उपलब्ध आहेत,त्यांना न्याहाळण्याच्या दृष्टीने : वर्ग:विकिपीडिया साचे पहा .\nसाचा कागदपत्र बहूतांश वेळा साचाच्या उपपानामध्येच ठेवले जातात, त्या नंतर ते साच्याचे पानाचे शेवटी आंतरन्यासित केले जातात . यामुळे क्लिष्ट साच्याचा वाक्यविन्यास आणि माहिती दस्तएवज(कागदपत्रे) वेगळे ठेवण्याने संपादन आणखी सुटसुटीत होते. जेथे आवश्यकता असेल तेथे साच्याची सुरक्षीतता पातळी सांभाळून, कागदपत्र कुणालाही संपादीत करण्यास मोकळीक देण्यात येते आणि सुरक्षित कां ठेवले त्या बद्दल माहिती देता येते.या पद्धतीला बर्याचदा “ कागदपत्रपान पद्धती साचा” असे म्हणतात.\nकोणत्याही प्रकारचे कागदपत्र साचापानावर नेहमी … या धारकाने घेरलेले असावे , म्हणजे दुसर्या पानावर साचा वापरला असता साच्याचा केवळ मुख्य दिसावयाचा तेवढाच मजकुर दिसतो पण कागदपत्रसंबंधीत साचा सोडून ईतर साचा वापरला गेलेल्या पानात तो दिसत नाही. साचा पानावरील मसुदा हा साच्याचा,प्रदर्शीत केल्यावर,किती मजकुर दिसावा, हे त्यातच दाखविते. साचा, जे मर्यादीत येथे त्याची कती (परफ़ॊर्मन्स) दाखविते. कागदपत्रे उपपानात ठेवल्याने हे टाळता येते.(मिडियाविकि (मिडियाविकिच्या डेव्हलपर्स नी ची शिफ़ारस याच कारणासाठी केली आहे).\nकागदपत्र उपपान कसे तयार करावे[संपादन]\nसाचा कागदपत्र उपपाने कसे असावे नावे आणि सारखेपणाकरिता खालील प्रमाणे सर्वसाधारण पद्धतिचे असावे.\nअसे गृहीत धरा की, तुमच्या साचाचे नाव साचा:क्ष असे असेल तर,साचा:क्ष/कागदपत्र अश्या नावाने असे उपपान तयार करा. अधिक माहिती {{कागदपत्र उपपान}} येथे पहा किंवा तुमच्या कागदपत्राच्या सुरवातीस खालील विकिमजकुर डकवा :\n-- कृपया वर्गीकरणे आणि आंतरविकि दुवे या पानाच्या तळाशी द्या -->\n-- वर्गीकरणे आणि आंतरविकि दुवे, धन्यवाद -->\nशिर्षक ओळ सद्य पानाबद्दल ���ाहिती देणारा संदेश आणि साचा या पानास दुवा देईल.\nशिर्षक ओळीखाली कागदपत्रे भरा त्याच प्रमाणे वर्गिकरणे आणि आंतरविकिदुवेही. सुयोग्य सूचना ओळीखाली लिहा – सूचना जागेवरच ठेवून, जेणे करून जेंव्हा भविष्यात पान संपादीत होईल तेव्हा त्याची आखणी जतन होउन राहील. उपपान साचा हा तयार करतो {{DEFAULTSORT:{{PAGENAME}}}}, ही खात्री करून की साचा:क्ष हा योग्य तर्हेने \"क्ष\" आणि न की \"ट\",येथे निवडल्या जाइल. म्हणून वर्गीकरणांना लावण्यास {{PAGENAME}} सॉर्टकी (निवडकळ) अनुपयूक्त किंवा अयोग्य आहे.\nउपपान जतन करा आणि साचा कडे वापस जा, साचा:क्ष, या उदाहरणात. साचा संपादा आणि साच्याचे कोडच्या(संकेताच्या) शेवटी खालील माहिती जोडा:\n-- कृपया या साच्याची वर्गीकरणे आणि आंतरविकिदुवे /कागदपत्र उपपानात भरावेत, धन्यवाद -->\nते साचापानाचे तळाशी {{कागदपत्र}} असे आंतरन्यासित होईल.\nमहत्त्वाचे: ही खात्री करा की उघडणारे हे त्याच ओळीत सुरू होते ज्यात साच्याचे शेवटले कोड (संकेत) किंवा अक्षर आहे,नवीन ओळीत नव्हे.नाहीतर,साचाचे खालील बाजुस जास्त जागा सोडली जाइल, जे शक्यतोवर नको आहे.\nजर कां साचा आधीच सुरक्षीत असेल तर, संचालकाला हे करण्याबाबत विचारणा करा किंवा संपादनासाठी साच्याच्या चर्चा पानावर हे {{संपादनसुरक्षीत}} टाकुन विनंती करा. जर का कागदपत्रे, वर्गिकरणे आणि आंतरविकि दुवे आधीच विद्यमान असतील,व विभाग हा साच्याच्या within a … धारकात (container) मधे घेरलेला असेल तर, त्यांना कागदपत्र उपपानावर स्थलांतरीत करा,कारण कागदपत्रे दोन वेगवेगळ्या पानांवर विभागलेली नकोत.\nजर का साचा पानावर कोड(संकेत) आधीच टाकला आहे तर कोणास preload यापासुन कागदपत्र पानाच्या बाह्यरेषा आयते भरुन मिळण्याचा फायदा मिळु शकतो; जर कागदपत्रपान काय करते हे नसेल तर साचा:कागदपत्र/preload साचापानाच्या संपादन दुव्यावर टिचकी मारुन चे केलेल्या /कागदपत्र उपपान तयार करता येते. आपली ईच्छा असेल तर,’चर्चापान’ चे /कागदपत्र उपपान याचे चर्चापान चे साच्यावरच, त्याचे पुनर्निर्देशन करु शकता. मग चर्चा साचा आणि त्याची संबंधीत कागदपत्रे चर्चापानावरच राहतील. उदाहरणार्थ, पुनर्निर्देशन साचा चर्चा:X/कागदपत्र ला साचा चर्चा:X.\nवर्गिकरणात हा साचा टाकण्यासाठी, हा संकेत (कोड) [[वर्ग:वर्ग नाव]] ... या विभागात कागदपत्र उपपानावर टाकावा.\nसाच्यासाठीच आंतरविकि दुवा तयार करण्यासाठीहा संकेत (कोड) [[Languagecode:साचा नाव]] ... या विभागात कागदपत्र उपपानावर टाकावा.\nकागदपत्र उपपान हे वर्गिकरणात टाकण्यासाठी हा संकेत (कोड) , [[वर्ग:वर्ग नाव]] हे पुढील ... या विभागात टाकुन तो कागदपत्र उपपानावर टाकावा.\nवर्गिकरण करावयास साच्याला भाग पाडण्यासाठी ( जेव्हा लेख साच्यातच अंतर्भूत असेल,), [[वर्ग:वर्ग नाव]] हे पुढील ... 'यात टाकुन तो 'कागदपत्र उपपानावर टाकावा.\nजास्तित जास्त वापरण्यात येणारा साचा:Cite web साचा कागदपत्राच्या उदाहरणासाठी बघा. ही नोंद घ्या की हा साचा स्वतःच सुरक्षीत आहे, परंतु कागदपत्र उपपान, साचा:Cite web/doc हे असुरक्षीत आहे आणि संपादल्या जाउ शकते.\nटेस्टकेसेस[मराठी शब्द सुचवा](कसोटी प्रकरणे)\nसाच्याच्या काही बदलापुर्वी,साचा संकेत(कोड)हा धुळपाटीवर अंकीत केलेला बरा,व त्यावर काही कसोटीप्रकरणे चालवून बघावी, असे होउ शकते कि हा साचा असंख्य/हजारो पानांवर दिसत असेल. जर का आपण \"/sandbox\" आणि \"/testcases\" उपपान नावे बनविली तर मग साच्याचे वर असलेल्या हिरव्या रंगाची {{कागदपत्र}} चौकट ही ते आपोआप शोधते व त्या पानाचा दुवा त्याच्या शिर्षात दाखविते.अधिक माहितीसाठी बघा विकिपीडिया:साचा test cases\nबरेचसे साचे, एक कागदपत्र पान[संपादन]\nजेंव्हा अनेक साचे हे एकत्र काम करत असतात किंवा बरेच सारखे असतात,मग एकच कागदपत्रपानाचे सुचालन करणे हे सुस्पष्ट व सोपे आहे, जे सर्वांना एकत्र बांधते. हे करण्याचा सोपा मार्ग असा की पुर्ण कागदपत्रपानाचे साचे करणे आणि मग ईतर साच्यावरुन 'सोपी पुनर्निदेशने' (\"soft redirects\") करणे.म्हणजेच, इतर साच्यांवर केवळ एक वा दोनच वाक्ये लिहीलेली, खूप छोटी कागदपत्रपाने राहतील, ज्यात त्याचा दुवा व नमुद असेल कि,पुर्ण कागदपत्रे कोठे शोधता येतील आणि . उदाहरणादाखल बघा{{wrap}}.\nतोकडे साचे हे क्वचितच आढळणारा असा साच्याचा एक प्रकार आहे, ज्यास कागदपत्र नसतात.ज्याप्रमाणे, तोकडे साचे एकसारख्याच प्रकारे काम करतात,त्यास कोण्या एक कागदपत्र पानास दुव्याने जोडता येते. This is, however, regarded as superfluous, since all stub साचे आधीच contain a दुवा to WP:STUB, which more thoroughly covers all the information that would normally be covered एखाद्या दस्त एवज पानाने.\n{{कागदपत्र}} – कागदपत्र साचा पानात आंतर्न्यासित होते, आणि कागदपत्र दाखवुन , संपादन आणि इतिहास दुवे देते.\n{{कागदपत्र उपपान}} – याने पुढील भाग कागदपत्र आणि संबंधीत कागदपत्रपानाचे दुवे आ���ेत हे कळते.\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१६ रोजी २०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/2164736", "date_download": "2019-03-25T07:37:06Z", "digest": "sha1:G37RN5P5MABF2MVA6SAWFEUS7VJR5EU4", "length": 2751, "nlines": 19, "source_domain": "isabelny.com", "title": "#SMSSummit शिकागो 2014 संक्षेप: एक यशस्वी सामाजिक मीडिया स्वीपस्टेक्स अंमलबजावणी मिमल", "raw_content": "\n#SMSSummit शिकागो 2014 संक्षेप: एक यशस्वी सामाजिक मीडिया स्वीपस्टेक्स अंमलबजावणी मिमल\nस्पर्धांमध्ये आणि स्वीपस्टेकसाठी जे वापरकर्त्यांना सामग्री तयार करण्यासाठी आवश्यक (उदा. Instagram फोटो किंवा द्राक्षांचा वेल सादर) त्यांच्याकडे हॅशटॅग असणे आवश्यक आहे हे उघड करणे की ते एखाद्या स्पर्धेत भाग घेत आहेत त्या कामामध्ये साम्लाचा समावेश होतो: #ad #sweeps, #sponsored, #contest, आणि #paidad एफटीसीने म्हटले आहे की मोहिमेसाठी / स्वीपटेकवर एक अद्वितीय हॅशटॅग आणि न ही हॅशटॅग # स्पॉन आहे.\nमोहिमेअंतर्गत उपभोक्ता-व्युत्पन्न सामग्रीचे पुन: वापर करणे म्हणून, ड्रेकने सांगितले की त्यांनी अधिक प्रतिबद्धता आणि नोंदी चालविण्याकरिता एएस स्पर्धा चालू ठेवण्यासाठी ते वापरला आहे - aspire triton coils 5 pack.\nSemalt, कार्यशाळेत भरपूर संपत्ती होती ज्यामुळे महत्वाच्या कायदेशीर बाबी विचारात घेण्यात मदत झाली, तसेच यशस्वी सोशल मीडिया स्पर्धांचे केस केस स्टडी आणि स्वीपस्टेक्स मिळवून प्रेरणा मिळाली.\nएसईजेने तयार केलेली वैशिष्ट्यीकृत प्रतिमा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Diploma-admission-Extension-for-Caste-Validity-Certificate/", "date_download": "2019-03-25T07:44:19Z", "digest": "sha1:MXBQWJUBIRGABEWVWR3FNSLIJQMVGUVS", "length": 7300, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डिप्लोमा प्रवेश; जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › डिप्लोमा प्रवेश; जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ\nडिप्लोमा प्रवेश; जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ\nअभियांत्रिकी पदविका (इंजिनिअरिंग ��िप्लोमा) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या राखीव प्रवर्गातील राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तंत्र शिक्षण संचालकांनी जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार 25 ऑगस्टपर्यंत हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सादर करता येणार आहे.\nदहावीनंतर डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 16 जुलैपर्यंत किमान जात पडताळणी कार्यालयात वैधतेसाठी प्रस्ताव दाखल केल्याबद्दलचे टोकण आणि दि. 20 जुलैपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले होते. हे वेळापत्रक 19 जून रोजी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. इतक्या कमी वेळात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे शक्य नसल्याने 24 जून रोजी राज्यपालांनी अध्यादेश काढून प्रमाणपत्र सादरीकरणाला मुदतवाढ दिली होती.\nराज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून प्रवेश प्रक्रिया संपण्यापूर्वीची तारीख जाहीर करतील, असे स्पष्ट केले आहे. जाहीर केलेल्या दिनांकापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, तर संबंधित विद्यार्थ्याला त्या राखीव जागेवर मिळालेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल, असेही त्यात स्पष्ट केले आहे. मात्र, या अध्यादेशानुसार कारवाई झाली नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून 20 जुलैपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे सांगण्यात येत होते. यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक गर्भगळीत झाले होते.\nआता मात्र त्यात सुधारणा करण्यात आली असून 30 ऑगस्ट रोजी प्रवेश प्रक्रिया संपत असल्याने त्यापूर्वी दि.25 ऑगस्टपर्यंत तसेच थेट द्वितीय वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना दि. 23 ऑगस्टपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.\nराज्याच्या तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी नव्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी, असे आदेश सर्व सहसंचालकांना दिले आहेत. या निर्णयाने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्���ेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/jayanti-nala-issue-in-kolhapur/", "date_download": "2019-03-25T07:44:51Z", "digest": "sha1:QHERZI5YMZ6O33YW33O6VXVWOTPYLY3Z", "length": 6766, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जयंती नाला पाईपलाईनचे काम पूर्णत्वास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जयंती नाला पाईपलाईनचे काम पूर्णत्वास\nजयंती नाला पाईपलाईनचे काम पूर्णत्वास\nपंचगंगा प्रदूषणास कारणीभूत ठरणार्या जयंती नाल्यातील सांडपाणी उपसा पाईपलाईनचे काम बुधवारी पूर्णत्वास आले. काही किरकोळ कामे शिल्लक असून ती गुरुवारी पूर्ण करून चाचणी घेण्यात येणार आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याने थेट पंचगंगेत जाणार्या सांडपाण्याची समस्या कायमची संपुष्टात आली आहे.\nशहरातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी जयंती नाला येथे संकलित केले जाते. तेथून ते पाणी उपसा करून कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेण्यात येते. मात्र, गेल्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जयंती नाल्यातील ही पाईप नादुरुस्त झाली होती. त्यामुळे चार महिने मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिळसत आहे. सांडपाणी नदीत मिसळत असल्याच्या निषेधार्थ शहरातील विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन करून महापालिका प्रशासनास धारेवर धरले आहे. ही पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना क्रेन थेट नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेवर कारवाई म्हणून महापालिकेचा वीजपुरवठा एक तास खंडित केला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दहा तारखेपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण करा, अन्यथा आयुक्तांवरच कारवाई करू, असा इशारा दिला होता.\nविभागीय आयुक्तांच्या इशार्यानंतर गेली दोन ते तीन दिवस महापालिका अधिकारी कर्मचार्यांनी अहोरात्र काम चालू ठेवले आहे. बुधवारी सकाळपर्यंत हे काम अंतिम टप्प्यात होते. बुधवारी दिवसभर शीघ्र गतीने काम करून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होता. बुधवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरूच होते. मात्र, काही किरकोळ कामे उरली असून ही कामे गुरुवारी सकाळी पूर्ण करून गुरुवारीच नव्याने बसविण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे सांडपाणी उचलण्याची चाचणी होण्याची शक्यता आहे.\nपाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर जयंती नाल्यातून सांडपाणी थेट कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया के्ंरद्रात नेण्यात येणार आहे. त्यामुळे गेली चार महिने पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी कायमस्वरूपी बंद होणार आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thirty-First-30-thousand-police-in-Mumbai/", "date_download": "2019-03-25T07:43:58Z", "digest": "sha1:IFVJOYGHIYRDO2JKZU6TPPXRJAMAUYG5", "length": 7059, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थर्टीफर्स्टला मुंबईत ३० हजार पोलीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्टीफर्स्टला मुंबईत ३० हजार पोलीस\nथर्टीफर्स्टला मुंबईत ३० हजार पोलीस\nनववर्षाचे जल्लोषामध्ये स्वागत आणि थर्टीफर्स्टच्या रात्री होणार्या सेलिब्रेशनसाठी मुंबापुरी सज्ज झाली असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलीस दलातील 30 हजार पोलीस जवान बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले असून यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.\nअतिरेक्यांच्या कायम टार्गेटवर असलेल्या मंत्रालयासह शहरातील सर्व शासकीय मुख्यालये, मंदिरे आणि प्रार्थनास्थळे, मोठ्या बाजारपेठा आणि चौपाट्या, तसेच विदेशी पर्यटकांच्या गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.\nथर्टीफस्टचे सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात होणार्या गर्दीला टार्गेट करत अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून तपास यंत्रणांसह राज्य दहशतवादविरोधी विभाग (एटीएस), केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या, शीघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्बशोधक व नाशक पथकेही मुंबई पोलिसांच्या दमतीला तैनात ठेवण्यात आली आहेत.\nशहराच्या प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत संशयित व्यक्ती, सामान आणि वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सोबतच हॉटेल्स आणि लॉज यांचीही कसून तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सी-फेस, दादर चौपाटी, शिवाजी पार्क, वांद्रे बँडस्टँड, जुहू चौपाटी, मढ-मार्वे याठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन येथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.\nशहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले असून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हवर वाहतूक पोलिसांनी विशेष करडी नजर ठेवली आहे. गेट वे ऑफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. जल्लोष साजरा करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nडॉ. आंबेडकरांचा भूखंड बळकावला\nथर्टीफर्स्टला मुंबईत ३० हजार पोलीस\nमाझ्या मनातले दादांच्या कानात सांगितले : खडसे\nतुमच्या ‘सुप्रमा’ हा भ्रष्टाचार नाही का\nजागतिक वित्तीय केंद्र गुजरातच्या झोळीत\nप्रेमप्रकरणातून ठाण्यात तरुणाची हत्या\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Vasai-Malcolm-Dias-became-Flying-Officer/", "date_download": "2019-03-25T07:48:47Z", "digest": "sha1:2K7SQCQFUZ2JPXWMOZKUVKUGQGNXWTSO", "length": 5794, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसईचा माल्कम डायस बनला फ्लाईंग ऑफिसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसईचा माल���कम डायस बनला फ्लाईंग ऑफिसर\nवसईचा माल्कम डायस बनला फ्लाईंग ऑफिसर\nलष्कर आणि भारतीय वायुसेनेचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वसई तालुक्यातील भुईगाव येथील माल्कम एलिस डायस याची वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. यामुळे भुईगावासह तालुक्यातून आनंद व्यक्त होत असून माल्कम व त्याच्या आई-वडिलांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nचार वर्षांपूर्वी माल्कम डायस याची संरक्षण क्षेत्रात मानाच्या म्हणून ओळखल्या जाणार्या एन. डी. ए (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी) मध्ये निवड झाली. ही निवड होणारा माल्कम हा तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी ठरला होता. त्यानंतर तो पुण्यातील खडकी येथील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये लष्कराचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला. सलग तीन वर्षे तेथील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची गेल्यावर्षी हैद्राबाद येथील भारतीय वायुसेनेच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.\nतेथील एक वर्षाचे खडतर प्रशिक्षणही त्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेत मानाच्या म्हणून ओळखल्या जाणार्या फ्लाईंग ऑफिसरपदी माल्कमची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून माल्कमने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. त्याच्या या यशाने भुईगावसह वसई तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.\nजव्हार, वाड्यात शिवसेनेचा झेंडा\nशेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल\nआंबेडकर स्मारक कंत्राट; अंतिम निर्णय उद्या होणार\nठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात\nकोळीवाड्याची नोंद झोपडपट्टी म्हणून केली\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-growth-in-open-promotion-ban-lifted/", "date_download": "2019-03-25T08:14:40Z", "digest": "sha1:AZZ2NMJFUANZJNHOCAGMIYTRVRZ6Q4NS", "length": 6109, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खुल्या गटातील बढतीवरील बंदी उठविली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › खुल्या गटातील बढतीवरील बंदी उठविली\nखुल्या गटातील बढतीवरील बंदी उठविली\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nउच्च न्यायालयाने मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्यानंतर एकंदर पदोन्नतीची प्रक्रियाच बंद करण्यात आली होती. मात्र, खुल्या गटातील सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येणार्या पदोन्नतीला कोणतीही अडचण नसल्याने या पदोन्नतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला.\nमागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2004 मध्ये घेतला होता. मात्र, हा निर्णय उच्च न्यायालयाने अवैध ठरवून या निर्णयाला स्थगिती दिली. या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाला 12 आठवड्यांची स्थगिती दिली. राज्य सरकारने या कालावधीत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्यांचे पदोन्नतीचे आदेशही काढले. मात्र, 27 ऑक्टोबर 2017 रोजी स्थगितीचा कालावधी संपुष्टात आला आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात स्थगितीही मिळाली नाही. त्यामुळे मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात आले.\nसर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. परंतु, 27 ऑक्टोबरपासून पदोन्नतीची सर्व प्रक्रिया ठप्प पडली आहे. न्यायालयाने मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण रद्द केले आहे. मात्र, खुल्या गटातील पदोन्नतीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याने या पदोन्नत्या देण्याची मागणी होत होती. त्यानुसार पदोन्नत्यांवरील बंदी उठविण्यात आली आहे.\nपाकिस्तानचा झेंडा जाळला; शिवसेना पदाधिकार्यांना अटक\nगच्चीवरील पबला आग;11 महिलांसह 14 ठार\nपबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्यांची भागीदारी\nखुल्या गटातील बढतीवरील बंदी उठविली\nअनधिकृत बांधकामाने केला घात\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्���े प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/bhai-vyakti-ki-valli-movie/", "date_download": "2019-03-25T07:37:33Z", "digest": "sha1:LAJBN46TMEDXK4PAOM32MEUQ6ZXFVJ2S", "length": 1962, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " bhai vyakti ki valli movie - मराठी कलाकार", "raw_content": "\nपूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत रीलीझ होणार ‘भाई-व्यक्ती की वल्ली’.पहा ट्रेलर.\nमहाराष्ट्राचे भूषण असलेले लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/rural-development-department/detail-65e7fb05-b526-4312-8e28-93578441d189", "date_download": "2019-03-25T08:16:35Z", "digest": "sha1:NBKQNZZB5NPYJAVPWFLBMIMB7I62SIPI", "length": 11140, "nlines": 120, "source_domain": "bidassist.com", "title": "13/2018-19 - Construction Of Concrete Road Near Idgah At Bhosare Tal- Madha Dist- Solapur", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासन ग्राम विकास ि जलसधंारण विभाग ग्रामपचंायत भोसर.ेता.माढा वज.सोलापूर ई – वनविदा अतंगगत खुली वनविदा सुचना कं्र.१३/२०१८-१९ गट विकास अवधकारी (िगग-1) आवण ग्रामविकास अवधकारी ग्रामपंचायत भोसर ेता.माढा वज.सोलापुर हे जजल्हा पररषद बाांधकाम जिभाग सोलापूर कडील , योग्य ्या िगाातील नोंदणीकृत मके्तदाराकडून,दोन जलफाफा पद्धतीने खालील कामाांची ई-जनजिदा मागजित आहेत.ई-जनजिदेचा कोरा नमनुा “http://www.mahatenders.gov.in” सकेंतस्थळािर वद.०५/०३/२०१९ रोजी सकाळी ११:०० िाजलेपासून वद.११/०३/२०१९ रोजी सायकंाळी १८:०० िाजेपयंत उपलब्ध राहील.पररपूणगररत्या भरलेल्या ई-वनविदा वद.११/०३/२०१९ रोजी सायकंाळी १८:०० िाजेपयंत िा त्यापूिी स्िीकारण्यात येतील. ई-वनविदा प्रवक्रया करून घेत असताना offline चा पयागय उपलब्ध होत नसल्याने वनविदेची वनविदा फी ि बयाना रक्कम online पद्धतीने सादर करण्यात याव्यात. ��� क्र. कामाचे नाि अांदाजजत रक्कम रु.लाखात बयाना रक्कम काम पूणा करणेचा कालािधी कोऱ्या जनजिदा सांचाची जकां मत रु. अजधकृत ठेकेदाराचा िगा १ २ ३ ४ ५ ६ ७ दवलत िस्ती सुधार योजना ता- माढा वज-सोलापूर १ मौजे.भोसर े येथे ता.माढा येथे इदगाह जिळ क कं्रीट रस्ता करणे. २,९९,२२६/- ------- ३ मजहने २००/- स.ुबे.अ १. उपरोक्त सिा कामाबाबत जनजिदा अटी ि शती इ.बाबतचा सिा तपशील जनजिदा सांचामध्ये नमूद केलेला असून कोऱ्या जनजिदा “http://www.mahatenders.gov.in” या सांकेतस्थळािर वद.०५/०३/२०१९ रोजी सकाळी ११:०० िाजलेपासून वद.११/०३/२०१९ रोजी सायकंाळी १८:०० िाजेपयंत ऑनलाईन पहाियास जमळेल. २. उपरोक्त तक्त्यातील कामाच्या नािासमोर रकाना क्र.४ ि ६ मध्ये नमदू केलेली अनामत रक्कम ि वनविदा फी रक्कम स्टेट बकँ ऑफ इंवडयाच्या नेट बवँकंग द्वारचे भरणे बधंनकारक आह े इतर कोणत्याही मागागने भरलेली रक्कम ग्राय ध धरली जाणार नाही.नेट बजँकां गद्वारे भरलेल्या रकमेची स्लीप अथिा ऑनलाईन तयार झालेल्या ररजमटन्स स्लीपद्वारे एसबीआई एनईएफटी ने सादर केलेली स्लीप ताांजिक लखोट्यासोबत अपलोड करण्यात यािी.सदरची जनजिदा वद.०५/०३/२०१९ रोजी सकाळी ११:०० िाजलेपासून वद.११/०३/२०१९ रोजी सायकंाळी १८:०० िाजेपयंत DOWNLOAD करता येईल ि सादर करता येईल. ३. कामासाठी िापरण्यात येणाऱ्या सिग सावहत्यांचे दक्षता ि गुणवनयतं्रक प्रयोग शाळा /वजल्हा प्रयोगशाळा पंत प्रधान ग्राम सडक योजना यांचे कडील चाचणी अहिाल . ४. जनजिदेच्या अटी शतीमध्ये बदल करणे,रापात न जनजिदापीकए एक जकां िा सिा जनजिदा कोणतेही कारण न देता नाकारनेचा हक्क जनम्न स्िाक्षरीत याांनी राखून ठेिला आहे. ----------sd-------------- ---------sd-------------- ग्रामविकास अवधकारी गट विकास अवधकारी (िगग-१) ग्रामपंचायत भोसर ेता.माढा. पंचायत सवमती कुडूगिाडी ता.माढा . सविस्तर वनविदा सचुना ग्रामपचंायत भोसर.ेता.माढा वज.सोलापूर ई – वनविदा अतंगगत खुली वनविदा सुचना कं्र.१३/२०१८-१९ १. सदर सांपूणा जनजिदा रापजक्रया ई-जनजिदाद्वार े ऑनलाईन पद्धतीने सांगणकएय आज्ञािलीत होईल. सदर नोटीस, रापजसद्धी, सचुना, शदु्धीपिके इ्यादीची माजहती “http://www.mahatenders.gov.in” या सांकेतस्थळािर उपलब्ध आहे. २. िरील कामाची जनजिदा रापजक्रया ई-जनजिदा रापजक्रयेद्वार े “http://www.mahatenders.gov.in” या सांकेतस्थळािर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर जनजिदा रापपि, अटी, शती इ. सदर सांकेत स्थळािरून वद.०५/०���/२०१९ रोजी सकाळी ११:०० िाजलेपासून वद.११/०३/२०१९ रोजी सायकंाळी १८:०० िाजेपयंत अजधग्रहीत (Download)करता येतील. ३. िरील कामाची जनजिदा रापजक्रया ई-जनजिदा रापजक्रयेद्वार े “http://www.mahatenders.gov.in” या सांकेतस्थळािर वद.०५/०३/२०१९ रोजी सकाळी ११:०० िाजलेपासून वद.११/०३/२०१९ रोजी सायकंाळी १८:०० िाजेपयंत ऑनलाईन पद्धतीने सादर (Upload) करता येतील. ४. जनजिदा सोबत खालील बाबी सादर करणे आिश्यक आहे, अ) सदर कामाची जनजिदा डाऊनलोड (download) करणेसाठी जनजिदा रक्कम online द्वार ेभरण्यात यािी ि भरलेल्या रापमाणपिाची रापत स्कॅन करून अपलोड(up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/vinit-bhonde/", "date_download": "2019-03-25T07:56:27Z", "digest": "sha1:YRWLRK2XC6V3HC73GMILVS7YMMY3UCTZ", "length": 2241, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Vinit Bhonde - मराठी कलाकार", "raw_content": "\nबरेच दिवस सिनेमापासून दूर असणारा विनीत सध्या “हे” करतोय.वाचा अधिक बातमी.\nअभिनेता विनीत भोंडेचे ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पदार्पण झाले, अगदी अचानक...\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nझी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार विनीत भोंडेचे लवकरच दोनाचे चार...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-03-25T07:29:25Z", "digest": "sha1:YSMNPCU5JDMLXYNUEZ2AYDBXZFAMUULV", "length": 3112, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सामाजिक बदलाचे विचार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सामाजिक बदलाचे विचार\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१८ रोजी २०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंत���्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2015-Draksha.html", "date_download": "2019-03-25T07:59:53Z", "digest": "sha1:ONZL4BB543YQ5F223MLC76N355AFTZ34", "length": 5155, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - प्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया", "raw_content": "\nप्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया\nश्री. संजय मुक्ताजी पगार, मु.पो. जोपुळ, ता. दिंडोरी, जि. नाशिक, मोबा. ९७६३८०९५४०\nमाझ्याकडे थॉमसन जातीची २ एकर द्राक्ष बाग आहे, मागील वर्षी अति पावसामुळे बाग आलीच नाही. त्यामुळे हाती काही उत्पन्न मिळालेच नाही. योगायोगाने पिंपळगाव येथे आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी ईश्वर शिंदे यांची भेट झाली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्याचे ठरविले.\nप्रथम ऑक्टोबर छाटणी केली. पेस्टमध्ये १० लि. ला ३५० मिली जर्मिनेटर घेतले. परिणामी डोळे एकसारखे लवकर व फुटी जोमदार निघाल्या. माझ्या बागेत शेंडा वाढीचा प्रॉब्लेम होता. पोंग्यात असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. चा २०० लि. पाण्यातून वापर केला. त्यामुळे शेंडा वाढू लागला. फुट चांगली व निरोगी सशक्त निघाली. नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीचा वापर केला. त्यामुळे घडांची साईज पण वाढली. गळ झाली नाही. हार्मोनीमुळे भुरी व करपा आलाच नाही.\nनंतर १० ते १२ दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रत्येकी १ लि. + हार्मोनी ३०० मिलीचा २०० लि. पाण्यातून वापर केला. कुजवा, मणीगळ जाणवली नाही.\nघडाचे पोषण होऊन लांबी वाढण्यासाठी क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन चे २ स्प्रे १० ते १२ दिवसांनी दिले, परिणामी मण्यांचे पोषण होऊन लांबी वाढली, तसेच शॉर्टबेरीज, पिंकबेरीज, सनबर्न झाले नाही.\nपाणी उतरल्यानंतर क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनचे दोन स्प्रे दिले. परिणामी रंग, गोडी फुगवण चांगली मिळाली. ह्या वर्षी अति थंडीमुळे कलर व गोडी अनेकांच्या प्लॉटला आलीच नाही, पण मी क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन वापरल्यामुळे मला तो प्रॉब्लेम जाणवला नाही. शेजारच्या प्लॉटपेक्षा माझ्या मालावर चमक व गोडी अधिक आहे. मी डॉ.बाव��कर टेक्नॉंलॉजीचा वपार केल्यामुळे अधिक समाधानी आहे. सरांच्या टेक्नॉंलॉजीमध्ये प्रतिकुल परिस्थितीत उत्पन्न मिळवण्याची खरोखर किमया आहे. हे मी स्वत: अनुभवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090201/main.htm", "date_download": "2019-03-25T08:18:52Z", "digest": "sha1:SYGBRQPKKSJBTZFXFA2NSJPNKEKZVDQG", "length": 22052, "nlines": 61, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..\nउमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..\nकालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..\nजातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..\nएकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,\nतर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..\nतिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..\nअसा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..\nवाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..\nबदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..\nपण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..\nतो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..\nसोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..\nअचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..\n(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)\nकोलंबो , ३१ जानेवारी / वृत्तसंस्था\nएका बाजूला श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज कन्डाम्बी तर दुसरीकडे सलग दुसरा विजय मिळविण्यासाठी आसुसलेला भारतीय संघ असे भारताच्या बाजूने एकतर्फी चित्र दिसत असतानाही भारत आणि श्रीलंका यांच्यातील येथे झालेला एकदिवसीय सामन्यातील रोमांचकतेने टोक गाठले. अखेर भारताने १५ धावांनी विजय मिळवून सुटकेचा निश्वास सोडला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आता भारत २-० असा आघाडीवर आहे. तिसरा सामना कोलंबोतच ३ फेब्रुवारीला खेळविला जाणार आहे.\nमराठय़ांना राजकीय आरक्षण दिल्यास मोठे आंदोलन: ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा\nमराठा आरक्षण महामेळावा उद्या दुपारी शिवाजी पार्क येथे होणार आहे. या मेळाव्याचे कर्ते करविते राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार विनायक मेटे आहेत. मात्र या मेळाव्यासाठी राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभर शक्तीशाली मंत्र्यांनी रसद पुरविली आहे. या पाश्र्वभूमीवर आज सह्याद्री शासकीय विश्���ामगृह येथे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री प्रितमकुमार शेगावकर यांना भाजप नेते गोपीनाथ मुंडे, माजी आमदार सुधाकर गणगणे, शेकापचे नेते आ. जयंत पाटील आदींच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांचे एक शिष्टमंडळ भेटले. या शिष्टमंडळाने मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली राजकीय आरक्षण दिल्यास त्यातून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा मोठा आगडोंब उसळण्याचा इशारा दिला आहे.\nविजेतेपद मिळविल्यानंतर भांब्री याने सांगितले, आज मला वर्चस्व राखण्याची खात्री होती. मी परतीचे फटके व सíव्हस यावर चांगले नियंत्रण ठेवू शकलो. या विजेतेपदामुळे मला खूप आनंद झाला आहे. आणखी ग्रॅन्ड स्लॅम मला जिंकायच्या आहेत. भारताच्या युकी भांब्री याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील कुमार मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. त्याने एकतर्फी लढतीत जर्मनीच्या अॅलेक्झांद्रोस फर्निनादोसला ६-३,६-१ असे हरविले. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच भारतीय ज्युनियर खेळाडू आहे.\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अंदाधुंदी कारभाराचे वाभाडे\nमुंबई, ३१ जानेवारी / प्रतिनिधी\nलाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अंदाधुंद कारभाराची लक्तरे आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे वेशीवर टांगली. या स्टिंग ऑपरेशनमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनविसेचा एक कार्यकर्ता प्राध्यापक बनून परीक्षा विभागात गेला व त्याने चक्क ‘एमसीए’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या. एवढेच नव्हे तर त्यातील काही उत्तरपत्रिका तो बाहेरही घेऊन गेला.\nभारत आणि पाकिस्तान यांचे संघराज्य होईल: डॉमिनिक लॅपियर यांचे भाकित\nनवी दिल्ली, ३१ जानेवारी/पीटीआय\nभारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रे एकाच मातेची मुले असून हे दोन्ही देश आपल्यातील सर्व मतभेद दूर करून शेवटी एकत्र येतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार होईल.. भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रे एकाच मातेची मुले असून हे दोन्ही देश आपल्यातील सर्व मतभेद दूर करून शेवटी एकत्र येतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अखंड भारता��े स्वप्न साकार होईलच असा ठाम विश्वास प्रसिध्द फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिअर यांनी व्यक्त केला. या दोन्ही देशांचा इतिहास आणि संस्कृती समान आहे. त्यांचाच अखेर विजय होईल आणि दोन्ही देश पुन्हा एकत्र येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.\nनिवडणूक आयुक्तालयाचा वाद चव्हाटय़ावर\nमुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांची नवीन चावलांना हटविण्याची शिफारस\nनवी दिल्ली, ३१ जानेवारी/पी.टी.आय.\nमुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी आपले सहकारी आयुक्त नवीन चावला यांना पदावरून हटविण्याची मागणी केली असून यामुळे निवडणूक आयुक्तालयातील वाद ऐरणीवर आले आहेत. चावला हे आयुक्तालयात पक्षपातीपणा करतात अशी तक्रार भाजपाने केली होती. त्यानंतर एन. गोपालस्वामी यांनी ही मागणी केली आहे. चावला यांचे काँग्रेस पक्षाशी साटेलोटे असल्याचा आरोप करून भाजपाने ही मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी हे आपल्या पदावरून २० एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्याआधी तीन महिने त्यांनीच ही अशी मागणी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. आपण आपले पद सोडण्याचा कोणताही विचार केलेला नाही. राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील निवडणुका व्यवस्थित कशा घ्यावयाच्या याचा आपण सध्या विचार करीत असल्याचे चावला यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले.\nउपनगर खो-खो संघटनेमुळे मुंबई महानगरपालिका अडचणीत\nबरखास्त संघटनेला मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेची खिरापत\nप्रशांत केणी , मुंबई , ३१ जानेवारी\nराज्य संघटनेकडून जिल्हा संघटनेची कार्यकारिणी बरखास्त झालेली असताना त्यावर नियुक्त करण्यात आलेल्या निमंत्रकाकडे स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविल्यामुळे २००६-०७ची महापौर चषक खो-खो स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही जबाबदारी सोपविल्यामुळे मुंबई महानगरपालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदाच्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेच्या घोषणेलाही विलंब होत आहे. २००६-०७मध्ये झालेली मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा क्रीडाविषयक नियम आणि घटनेला धाब्यावर बसवून आयोजित करण्यात आल्याचे निष्पन्न होत आहे. राज्य संघटनेने २००६-०७मध्ये मुंबई उपनगर जिल्हा खो-खो संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती आणि त्यावर प्रशांत पाटणकर यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर पाटणकर यांच्यावर त्या वर्षीच्या महापौर चषक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविली गेली. पण अडीच लाख रुपये अनुदानाची स्पर्धा प्रशांत पाटणकर या निमंत्रकाकडे देणे योग्य नाही , असे आक्षेप घेणारे पत्र मुंबई उपनगर खो-खो संघटनेचे तत्कालिन उपाध्यक्ष अनिल पाटणकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख लेखापाल (वित्त) यांच्याकडे दिले होते. पण महापालिकेकडून याबाबत कोणताही गांभीर्याने विचार झाला नाही आणि स्पर्धा विनासायास पार पडली. नुकतेच माहिती अधिकाराखाली शिवछत्रपती पुरस्कार विजेते संघटक साईनाथ देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नांना बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक प्रकाश पुना चऱ्हाटे यांनी दिलेल्या उत्तरांमुळे मुंबई महानगरपालिका अडचणीत आली आहे. दरम्यान , गुरुवार २९ जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने प्रशांत पाटणकर आणि साईनाथ देसाई यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. परंतु आंतरविद्यापीठ स्पध्रेसाठी मुंबई विद्यापीठाचे प्रशिक्षक म्हणून देसाई मुंबईबाहेर असल्यामुळे या चर्चेला हजर राहू शकले नाहीत.\n( यंदाच्या महापौर चषक स्पध्रेला ‘ खो ’ \nपतियाळामध्ये रुग्णालयात लागलेल्या आगीत पाच अर्भके जिवंत जळाली\nयेथे एका रुग्णालयामध्ये आज पहाटे लागलेल्या आगीत पाच अर्भके जिवंत जळाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे सांगण्यात येते. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अर्भकांचे वय अवघे तीन ते सात दिवसांचे होते. तसेच या दुर्घटनेत दोन अर्भके गंभीर जखमी झाली. पतियाळाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या राजेंद्र रुग्णालयामध्ये कावीळग्रस्त १० अर्भकांवर उपचार सुरू होते. या अभकांना फोटो थेरपी युनिटमध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आले होते. आज पहाटे येथील इनक्युबेटर या वैद्यकीय उपकरणाच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली व त्यामध्ये पाच अर्भके जिवंत जळाली. त्यामध्ये तीन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. राजेंद्र रुग्णालयामधील या अग्निकांडाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी आज दिले. ही चौकशी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. सी. गुप्ता हे करणार आहेत. त्या आधी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचेही प्रकाशसिंग बादल यांनी जाहीर केले होते. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या जसविंदरपाल कौर शेरगील यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. पतियाळातील रुग्णालयात आज पहाटे घडलेल्या या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर पंजाबमधील सर्व रुग्णालयांच्या कारभाराची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat/vavtal/", "date_download": "2019-03-25T08:33:47Z", "digest": "sha1:74VCQJWVBIL3LEMNQOPU2RTCSP352N46", "length": 6858, "nlines": 71, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Vavtal - Movie - Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nनिर्माते ना बा कामत यांनी त्यावेळचे प्रसिद्ध ग्रामिण कथालेखक शंकर पाटील यांच्या एका कथेवर तमाशा नसलेला ग्रामिण चित्रपट तयार करण्याची योजना आठवले यांच्यासमोर ठेवली. आठवले यांनी फिल्म्स डिव्हिजन सोडली आणि ती जबाबदारी स्वीकारली आणि ती अशी काही पार पाडली की त्यांनी त्या कथेवर तयार केलेल्या 'वावटळ' या चित्राला पु.ल.देशपांडे, गजानन जहागीरदार आणि विश्राम बेडेकर यांसारख्या दिग्गजांनी १९६५ - १९६६ सालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान दिला. महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पारितोषिकातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पारितोषिक तर आठवले यांना मिळालेच पण सर्वोत्कृष्ट संकलन इत्यादी दहाहून अधिक तांत्रिक अंगांची पारितोषिकेही या चित्राने मिळवली.\nयातील खास ग्रामिण बाजाच्या गाण्यांसाठी आठवले यांनी प्राध्यापक आनंद यादव यांना बोलावले. आठवले यांनी एकच गाणे लिहिले. 'श्रावणा बाळा पाणी आण' हे सुधीर फडके यांच्या आवाजातील गाणे राम कदम यांनी अतिशय परिणामकारक रीतीने स्वरबद्ध केले आहे. ते ऐकले आणि पहिले पाहिजे असेच आहे.\nश्रावणा बाळा पाणी आण\nआई मला क्षमा कर\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अ��ीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2017-Germinator.html", "date_download": "2019-03-25T08:18:56Z", "digest": "sha1:3VRGDNW7MCJ4R4QOORL5RYTNIXMFEFL5", "length": 6039, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - जर्मिनेटर कापसाठी वरदान/जीवनदान !", "raw_content": "\nश्री. संदीपान बाबासाहेब जाधव, मु.पो. मनुबाईजवळा, ता. गेवराई, जि. बीड. मो. ९१६८११८८६१\nमी एक सामान्य परंतु नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग आत्मसात करणारा शेतकरी आहे. मी नेहमी टरबूज, झेंडू, कापूस, खरबुज ही पिके घेतो. खरतर कापूस हे आमचे मुख्य नगदी पीक. मात्र मागच्या काही दिवसापासून या कापसावीरल नैसर्गिक संकटे वाढतच चालली आहेत. त्यामध्ये गुलाबी बोंड आळी, लाल्या, करपा इ. रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्यामुळे कापसाचे सहज वाटणारे पीक दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालले आहे.\nचालू वर्षीच्या हंगामामध्ये मी झेंडू तसेच कापूस पीक घेतले. लागवड केल्यापासून सुरुवातीला कापसाचे चांगले पीक असल्यासारखे वाटले, परंतु नंतर काही दिवसांनी माझ्या कापसाची प्रचंड प्रमाणात मर चालू झाली व कापसाची उंची, वाढ थांबली. काय करावे सुचत नव्हते. मग मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. कंपनीचे बीड जिल्हा प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) यांना फोन केला. त्यांचा आणि माझा अगोदरपासूनचाच परीचय असल्यामुळे मी त्यांना कापसावर होत असलेला प्रकार सां���ितला व त्यांनी मला जर्मिनेटर एकरी १ लि. ड्रेंचिंगमधून सोडण्यास सांगितले व ते स्वतः हिंदुस्थान अॅग्रो एजन्सी, गेवराई येथे आले आणि त्यांनी कापसावर पुन्हा कापसाचे पीक घेतल्यामुळे जमिनीतील बुरशी वाढत जाते व बुरशीच्या प्रादुर्भावाने पीक निस्तेज दिसून त्या पिकांना नवीन मुळ येत नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे सांगितले. मग मी ड्रीपमधून ३ लि. जर्मिनेटर २ एकर क्षेत्रात पंपाच्या साह्याने सोडले. सोडताना विश्वास बसत नव्हता की हे तर औषध साधे, कोणताही वास व रंग नसणारे दिसत आहे आणि बुरंगे साहेबांनी आपल्याला फसवले असे वाटले.\nमात्र जर्मिनेटर सोडल्यापासून माझ्या कापसाची मर दुसऱ्या दिवशी बंद झाली व आठ दिवसामध्ये कापसाची उंची अपेक्षा वाढली. व्हेन्च्युरी नसल्यामुळे मी चार्जिंगच्या पंपाने जर्मिनेटरचे द्रावण सोडले. त्यामुळे ज्या ठिकाणी ठिबक लाईनला पंपाची नळी जोडली त्या लाईनला जर्मिनेटर पोहचले नाही तर त्या लाईनची मर झाली व इतर कापसाच्या तुलनेत त्या ओळीची उंची ही कमी दिसली आणि माझा गैरसमज दूर झाला व आता माझा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांवरील विश्वास प्रचंड वाढला आहे.\nयानंतर मी माझ्या शेतीतील इतर पिकांवरही वापर करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीन व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कर्मचाऱ्याकडून अशीच सहकार्याची अपेक्षा करतो व धन्यवाद देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-04-march-2018/articleshow/63152128.cms", "date_download": "2019-03-25T08:49:04Z", "digest": "sha1:KGCLHTEW7QX5PYXKCH77E53PTFTHASPY", "length": 13669, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: आजचं राशी भविष्य: दि. ०४ मार्च २०१८ - today-rashi-bhavishya-in-marathi-for-04-march-2018 | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nआजचं राशी भविष्य: दि. ०४ मार्च २०१८\nआजचं राशी भविष्य: दि. ०४ मार्च २०१८\nमेष : दिवस आनंदात जाईल. आर्थिक योजना सफल होतील. व्यवसायिक क्षेत्रातही यश मिळेल. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क होईल. बौद्धिक गोष्टीत रुची दाखवाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही असाल.\nवृषभ : संभाषणाने इतरांना प्रभावित कराल. कष्टाचे योग्य फळ मिळाले नाही तरी त्या क्षेत्रात प्रयत्न करण्याची चिकाटी कायम राहील. पचनाशी संबंधित विकार उद्भवण्याची शक्यता आहे.\nमिथुन : द्विधा मन:स्���िती असेल. अधिक भावूक झाल्याने मन अस्वस्थही राहील. चर्चेत सहभागी व्हा, मात्र वादविवादाचे प्रसंग टाळा. आत्पेष्टांसोबत तणावाचे प्रसंग उद्भवू शकतात. आज प्रवास टाळा.\nकर्क : मित्र आत्पेष्ट यांच्यासोबत दिवस आनंदात जाईल. प्रवासाचा योग संभवतो. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सन्मान प्राप्त होईल.\nसिंह : जास्त विचारांनी मनात द्वंद्व निर्माण होईल. तरीही कुटुंबीयांमुळे आनंदी राहाल. दूरच्या संबंधांतील व्यक्तींशी स्नेह वाढेल. भविष्यात त्याचा फायदा होईल. अधिक खर्च होणार नाही याची काळजी घ्या.\nकन्या : दिवस आनंदात जाईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रसन्न राहाल. लक्ष्मीची कृपा राहील. आत्पेष्ट आणि मित्रांच्या भेटीगाठी होतील. प्रवासही आनंददायी होईल.\nतूळ : रागावर नियंत्रण ठेवा. वादविवादांपासून दूर राहा. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. डोळ्यांचे आरोग्य जपा. न्यायालयीन कामांमध्ये सतर्कता दाखवा. अपमान होईल असे प्रसंग टाळा.\nवृश्चिक : आज लाभदायक दिवस आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायिक क्षेत्रातही लाभ संभवतो. वरिष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. मित्रांशी भेटीगाठी होतील. प्रवासही संभवतो.\nधनु : आजचा दिवस शुभ आहे. परोपकाराच्या भावनेतून इतरांना सहकार्य कराल. व्यापारातही योग्य नियोजन कराल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास संभवतो. वरिष्ठांची मर्जी राहील. बढती मिळण्याची शक्यता.\nमकर : बौद्धिक आणि लिखाणाशी संबंधित गोष्टींमध्ये सक्रियता दाखवाल. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. त्यामुळे थकवा आणि आळसही जाणवेल. विनाकारण खर्च टाळा.\nकुंभ : नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मानसिकदृष्ट्या थकवा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक गोष्टींपासून दूर राहा. अध्यात्माची कास धऱा. मन:शांती लाभेल.\nमीन : आजचा दिवस मनोरंजनात्मक असेल. कलाकार, लेखक इत्यादींना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी आज योग्य दिवस. व्यवसायिक भागीदारीसाठी चांगली वेळ. प्रवासाचा आनंद घ्या. प्रतिष्ठा वाढेल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKम��्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २३ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २४ मार्च २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचं राशी भविष्य: दि. ०४ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. ०३ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. ०२ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. ०१ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. २८ फेब्रुवारी २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/television/page/3/", "date_download": "2019-03-25T08:21:28Z", "digest": "sha1:26XMQAXDWIVANLZY4DPGG3GZE6LNXTG7", "length": 6418, "nlines": 65, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Television - Page 3 of 6 - मराठी कलाकार", "raw_content": "\nसई आणि रेशम, जुई आणि आस्तादमध्ये होणार वाद “बाबागाडी घराबाहेर काढी” टास्क\nबिगबॉसच्या घरात होत काय तर काही सदस्य इथे राहायला येतात. त्यांना काही टास्कस बिगबॉसने दिलेले असतात....\nमर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार बिगबॉसने दिले SR चे संकेत\n नाव एवढं गूढ मात्र आजवरच्या बिगबॉसच्या घरातील टास्क्सपैकी धक्काबुक्की, शाब्दिक चकमक न होता पार...\nअभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\nबिगबॉस मराठीमध्ये सध्या बऱ्याच घटना वातावरण ढवळून काढतायत. बिगबॉसने दिलेलं मर्डर मिस्टरी टास्क, त्रुतुजाचं घर सोडून...\nबिगबॉस मराठीमध्ये आता मर्डर मिस्टरी\nएका फ्रेश टास्कसोबत आपल्याला बिगबॉसच्या नव्या आठवड्याची सुरुवात होताना आज दिसली. घरातील आजवर पार पडलेली टास्कस...\n‘तुम्ही पण ऍडल्ट शो करताय’ रेशमने व्यक्त के��ा रोष\nआठवड्यामागून आठवडे सरवता सरवताना त्यात मागील एका आठवड्याची भर पडली. बऱ्याचश्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळाल्या....\nराजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम\nबिगबॉस मराठीचा कालचा भाग चांगलाच पैसावसुल राहिला. काल आपल्याला सर्व सदस्य चक्क आनंदी वाटत होते. आणि...\nबिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\nनुकतीच बिगबॉस मराठीच्या ह्या आठवड्याची नॉमिनेशन लिस्ट जाहीर झाली असून ह्यात तब्बल 7 सदस्यांची नावं आहेत....\nथेंबे थेंबे तळे साचे टास्क – पाण्यासाठी नळावर होणार भांडण\nबिगबॉसच्या घरापासून दूर तब्बल आठवडाभर सिक्रेट रूम मध्ये राहिल्यानंतर राजेश सोमवारी बाहेर आलेला दिसला. त्याच्या बाहेर...\n‘बिगबॉसच्या घरात परत न्या’ सिक्रेट रूम मधील राजेश ढसाढसा रडला\nगेल्या आठवड्यातील टास्कमुळे बिगबॉसच्या घरात बरीच वादावादी, बाचाबाची आणि खेळातील रंगत वाढत चालली असल्याचं दिसतंय. हे...\nभूषणने प्यायली १२ कच्ची अंडी तर सईने बनवले शेणाचे लाडू\nदिवसेंदिवस बिगबॉसच्या घरातील सदस्यांना मिळणारी टास्कची लेव्हल सध्या हळूहळू वाढत चाललेली दिसत आहे. बिगबॉसने दिलेली टास्कचं...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-fuel-prices-drop-continues-last-three-weeks-3681", "date_download": "2019-03-25T08:20:13Z", "digest": "sha1:HNFIZOLLG3GMXRB45PGOXCOQIGMWVAJM", "length": 6639, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news fuel prices drop continues since last three weeks | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी महागला\nसलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी महागला\nसलग तिसऱ्या आठवड्यात इंधन द���कपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी महागला\nसलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी महागला\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nसलग तिसऱ्या आठवड्यात देशभरात इंधन दरकपात सुरू आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 17 पैशांनी स्वस्त झालंय. त्यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 83.40 रुपये तर डिझेलसाठी 76 रुपये 5 पैसे मोजावे लागत आहेत.\nगेल्या 24 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल साडे चार रुपयांनी कमी झालेत. दसऱ्यापासून सुरु झालेले इंधनाच्या दरकपातीचं सत्र सुरुच आहे. मागील 24 दिवासांत पेट्रोल 4 रुपये 81 पैसे तर डिझेल 3 रुपये 21 पैशांनी स्वस्त झालंय. सलग उतरणाऱ्या दरांमुळे राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी पेट्रोलचे दर 85 रुपये प्रति लीटरच्या खाली आलेत.\nसलग तिसऱ्या आठवड्यात देशभरात इंधन दरकपात सुरू आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 17 पैशांनी स्वस्त झालंय. त्यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 83.40 रुपये तर डिझेलसाठी 76 रुपये 5 पैसे मोजावे लागत आहेत.\nगेल्या 24 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल साडे चार रुपयांनी कमी झालेत. दसऱ्यापासून सुरु झालेले इंधनाच्या दरकपातीचं सत्र सुरुच आहे. मागील 24 दिवासांत पेट्रोल 4 रुपये 81 पैसे तर डिझेल 3 रुपये 21 पैशांनी स्वस्त झालंय. सलग उतरणाऱ्या दरांमुळे राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी पेट्रोलचे दर 85 रुपये प्रति लीटरच्या खाली आलेत.\nअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला\nअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला आहे. केंद्र सरकारने एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी ही दरवाढ केल्याचं कळतंय. या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 505.05 रुपये झाली आहे.\nइंधन पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस gas सिलिंडर\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090220/main.htm", "date_download": "2019-03-25T08:15:30Z", "digest": "sha1:X4VUVZLQFQZXYTCLU2TVJZNTWKQZEPFN", "length": 24413, "nlines": 58, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nराधाकृष्ण विखे-पाटील आणि नसीम खान यांचीही मंत्रिमंडळात वर्णी\nकाँग्रेसमधील घोळाचा आदिक, कोळंबकरांना फटका\nमुंबई, १९ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी\nथेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीकेचे जबरदस्त प्रहार करणाऱ्या नारायण राणे यांच्या विरोधातील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये त्यांचा राज्य मंत्रिमंडळात आज पुन्हा समावेश करण्यात आला. याशिवाय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राधाकृष्ण विखे-पाटील आणि नसीम खान यांचीही वर्णी लावण्यात आली आहे. तत्पूर्वी दिवसभर सुरू राहिलेल्या काँग्रेस पक्षातील शह-काटशहाच्या खेळात गोविंदराव आदिक यांचा पत्ता ऐनवेळी कापण्यात आला तर राणे आणि विलासराव देशमुख यांच्या शीतयुद्धात शपथ घेण्याच्या तयारीत आलेले राणे समर्थक कालिदास कोळंबकर यांच्या पदरी निराशाच आली.\nमराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर धुडगूस\nमराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड संघटनांच्या शिवनेरीवर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सोहळ्याला हिंसक वळण लागले. त्यामुळे उत्सव सोहळ्याच्या पावित्र्याला गालबोट लागले. शिवजन्मोत्सव सोहळ्यापूर्वी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस तर जवळपास दहा कार्यकर्ते जखमी झाले. वळसे पाटील आलेल्या हेलिकॉप्टरवरही दगड लागून काच फुटल्याने हे हेलिकॉफ्टर नादुरुस्त झाले.\nनाशिक, १९ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख कधी या दिशेने तर कधी त्या दिशेने झुकत असल्याचे सांगताना होकायंत्र तरी निश्चित दिशा दाखविते मात्र हे ‘धोकायंत्र’ दिशाहीन असल्याचा टोला मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शरद पवारांचा थेट नामोल्लेख न करता लगावला. मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आज येथे आयोजित बेरोजगार मेळाव्यात एकिकडे मराठी युवकांना कामाची टाळाटाळ करण्याच्या सवयीवरून फैलावर घेणाऱ्या राज यांनी दुसरीकडे शरद पवारांवर टीका करण्याची संधी साधून घेतली.\nआदिनाथ आव्हाड धावला ७८ किलोमीटर\nबुधिया व अनास्ता बरेलिया (ओरिसा) या धावपटूंचा विक्रम आज एका मराठमोळ्या मुलाने मोडला आदिनाथ राधाजी आव्हाड (वय ११) असे या नव्या विक्रमवीराचे नाव आहे. शहराजवळच असलेल्या त्रिधारा येथील ओंकारेश्वर विद्यामंदिरचा आदिनाथ हा विद्यार्थी आहे. जेव्हा त्याने हा विक्रम पूर्ण केला आणि सलग ७८ किलोमीटर धावण्याच्या ऐतिहासिक पराक्��माचा झेंडा रोवला तेव्हा त्याचे शिक्षक रणजित काकडे यांचे डोळे आनंदाश्रुंनी तुडुंब भरले होते. हा आनंद व्यक्त करताना त्यांना शब्दही फुटत नव्हते. ओंकारेश्वर विद्यामंदिरात सहावीत शिकणाऱ्या आदिनाथने ७८ किलोमीटरचे हे अंतर ७ तास ३६ सेकंदात पूर्ण केले.\nजि. प. शाळांतील शेकडो हृदरोगी विद्यार्थ्यांना मिळणार जगण्याची आशा\nजिल्हापरिषदेच्या शाळांमधील अनेक मुलांना हृदरोगासारखा गंभीर आजार झाल्याचे आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने ‘जीवनदायी योजने’च्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील विशेष बाब म्हणजे उपचारासाठी दाखल होणाऱ्या या रुग्ण विद्यार्थ्यांना पिवळी शिधापत्रिका अथवा तहसिलदाराच्या अल्प उत्पन्नाच्या दाखल्याचीही गरज राहणार नसल्यामुळे तात्काळ उपचार मिळणे शक्य होणार आहे. याबाबतचा शासकीय आदेश काल जारी करण्यात आला असून प्रतिवर्षी अडीच हजार मुलांना गंभीर आजारासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांपर्यंतची मदत उपलब्ध होणार आहे.\nसंपूर्ण हिवाळ्यात राज्यात केवळ सात दिवसच थंडी\nहिवाळ्याचा काळ साडेतीन-चार महिन्यांचा मानला जात असला तरी या वेळच्या हिवाळ्यात महाराष्ट्रात केवळ सहा-सात दिवसच खरीखुरी थंडी अनुभवायला मिळाली या काळातील सौम्य स्वरूपाच्या गारव्याचा कालावधी विचारात घेतला तरी राज्यात फक्त २९ दिवसच दिलासा मिळाला, तर उरलेले अडीच-तीन महिने उकाडाच सहन करावा लागला. पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेकडून उपलब्ध झालेल्या तापमानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यावरून हा हिवाळा गेल्या काही दशकांमधील अपवादात्मक ठरला आहे.\nविलासराव निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष\nनवी दिल्ली, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी\nकाँग्रेसने पक्ष संघटनेत व्यापक व महत्त्वपूर्ण फेरबदलांची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलामनबी आझाद अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून पक्ष संघटनेत परतले आहेत. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनाही पक्षसंघटनेत स्थान देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची महाराष्ट्राच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून खासदार प्रिया दत्त यांना अ. भा. काँग्रेस सचिवपदावरून हटविण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नारायण राणे यांचे कॅबिनेट मंत्रीपद देऊन पुनर्वसन केल्यानंतर आज रात्री काँग्रेसश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विलासराव देशमुख यांची नियुक्ती करीत संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पदांना फारसे महत्त्व नसल्यामुळे या नियुक्तीमुळे देशमुख यांचे कितपत समाधान होईल, याविषयी शंकाच आहे.\nपवार शिरुरमधून निवडणूक लढणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते त्रिपाठी यांनी सांगितले. याविषयीची अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल.\nउद्धव ठाकरे यांचा २५ फेब्रुवारीपर्यंत ‘अज्ञातवास’\nनवी दिल्ली, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी\nशिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पाच-सहा दिवसांसाठी ‘अज्ञातवासा’त जाणार आहेत. या काळात आपल्याशी कुणी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असे निर्देश त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती शक्यच नाही, असे पवार यांनी ठाम प्रतिपादन केले असले तरी ही युती होईलच, अशी खात्री शिवसेनेचे बरेच खासदार व्यक्त करीत आहेत. या युतीची चर्चा स्थानिक पातळीपर्यंत पोहोचली असून येत्या दोन-तीन दिवसात काही तरी घडेल, असे त्यांचे म्हणणे आहे. या तर्काला राष्ट्रवादीचे काही खासदारही दुजोरा देत आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा होईपर्यंत युती झाली नाही तर निवडणुकांच्या काळात होईल आणि तेही शक्य झाले नाही तर लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतरही राष्ट्रवादी-शिवसेना युती शक्य आहे, असा आशावाद आज संसद भवनात शिवसेनेचे खासदार व्यक्त करीत होते. दरम्यान, आपल्याशी २५ फेब्रुवारीपर्यंत कुणीही संपर्क करू नये, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना दिल्याचे समजते. संसदेच्या अधिवेशनाला २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान सुटय़ा असल्यामुळे मुंबईत या कालावधीत काही राजकीय उलाढाली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात ���ेत आहे. उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत २६ फेब्रुवारी रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. तोपर्यंत महत्त्वाचे निरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्याकडे द्यावे, अशा सूचना उद्धव यांच्या वतीने ज्येष्ठ नेत्यांना देण्यात आल्या आहेत.\nमुंबई, १९ फेब्रुवारी/ व्यापार प्रतिनिधी\nसप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रिझव्र्ह बँकेतील कर्मचारी संघटनेने पुकारलेला लाक्षणिक संप आणि सोमवारच्या सार्वजनिक सुष्ीमुळे बँकांमधील धनादेशांचे क्लियरिंग आणि सेटलमेंट व्यवहारांना मात्र सहा दिवसाच्या ‘ब्रेक’ला सामोरे जावे लागणार आहे.\nभारतीय रिझव्र्ह बँकेत कार्यरत असलेल्या चार संघटनांपैकी कारकून, टायपिस्ट आणि अटेंडंट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉइज असोसिएशन’ने पेन्शनसंदर्भातील मागणीबाबत सरकारकडून सुरू असलेल्या हयगयीचा निषेध म्हणून शुक्रवारी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळेल आणि देशभरातील रिझव्र्ह बँकेच्या ७,००० कार्यालयांमधील कामकाज त्यामुळे पूर्णपणे ठप्प होईल. परिणामी धनादेश वठणावळ व सेटलमेंट व्यवहारही स्थगित होतील. शुक्रवारच्या संपाचा सर्वाधिक फटका हा शेअर बाजार व कमॉडिटी बाजारातील व्यवहारांच्या सेटलमेंट्सना (सौदापूर्ती) बसेल. गुरुवारी (१९ फेब्रुवारी) होणाऱ्या शेअर्सच्या खरेदी वा विक्री व्यवहारांवर प्रत्यक्षात पैशांच्या भरणा हा सहा दिवसांनी म्हणजे बुधवारी २५ फेब्रुवारीलाच पूर्ण होऊ शकेल. कारण शनिवारी जरी बँकांनी नियमित कामकाज सुरू केले तरी त्या दिवशी बहुतांश सहकारी बँका आणि वाणिज्य बँकांमध्येही क्लियरिंग व्यवहार केले जात नाही. शिवाय शनिवारी शेअर बाजार आणि कमॉडिटी बाजारातील व्यवहारही बंद असतात. रविवारची साप्ताहिक सुष्ी तर सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त पुन्हा सार्वजनिक सुष्ी त्यामुळे धनादेश वठणावळीसाठी मंगळवारी बँकांकडे येईल आणि प्रत्यक्षात बुधवारी पैशांचा व्यवहार पूर्ण होईल.\nदेशातील २२ विद्यापीठे बोगस\nपुणे, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी\nविद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील २२ विद्यापीठे बोगस असल्याचे जाहीर केले असून, नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एकाच विद्यापीठाचा या यादीमध्ये समावेश असून, उत्तर प्रदेशमधील नऊ आणि दिल्लीतील सात संस्थांना हा ‘मान’ देण्यात आला आहे. देशभरातील संलग्न विद्यापीठे व विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेल्या संस्थांची ‘यूजीसी’तर्फे पाहणी करण्यात येते. आयोगासह अन्य कायद्यांच्या अखत्यारित राहून संबंधित विद्यापीठ-संस्था कार्यरत आहे की नाही, याचा शोध घेतला जातो. या पाहणीच्या माध्यमातून देशभरातील बोगस विद्यापीठांची यादी प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये किमान एकदा तरी जाहीर केली जाते. या वेळची यादी आयोगाने १९ जानेवारीला अद्ययावत केली आहे. त्यामध्ये या २२ विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वेळच्या यादीप्रमाणे यंदाही नागपूरच्या राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/782", "date_download": "2019-03-25T08:41:36Z", "digest": "sha1:YVZ4V36QTJVEZIWIYOLGR37T4ZQOV7IJ", "length": 10376, "nlines": 121, "source_domain": "gangadharmute.com", "title": " पाहून घे महात्म्या | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / पाहून घे महात्म्या\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 21/04/2015 - 15:51 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपाहून घे महात्म्या, इथली शिवार राने\nकेला भकास भारत, शोषून इंडियाने\nतुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला\nतुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने\nचाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या\nजितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने\nसंपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले\nभुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने\nआसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही\nपण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने\nवृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते\nगायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने\nइतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्या\nबदलेल भाग्य निव्वळ, तू घाम गाळल्याने\nमुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही\nहकनाक तूच मरशिल, गळफास घेतल्याने\nशेती कसून दाखव, विद्याप्रचूर तज्ज्ञा\nसुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने\nलक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे\nनांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने\nडोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी\nकाही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने\n- गंगाधर मुटे 'अभय'\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato16.html", "date_download": "2019-03-25T08:04:31Z", "digest": "sha1:7BCN6EEPAFELRUCQSALJRNDAU2OE2FWH", "length": 5049, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - टोमॅटोच्या दूरीला ९० ते ११० फळे, बाजारभाव ६० ते ७० मात्र आमचे मालास १०० ते ११०", "raw_content": "\nटोमॅटोच्या दूरीला ९० ते ११० फळे, बाजारभाव ६० ते ७० मात्र आमचे मालास १०० ते ११०\nश्री. हरिश्चंद्र विठ्ठल कांडेकर, मु.पो. जातेगाव, ता.जि. नाशिक.\nआम्ही नागपंचमीच्या वेळेस ३० गुंठे एन. एस. २५३५ ची लागवड केली. सुरुवातीस मला डॉ.बावसकर सरांच्या पंचामृत औषधांची माहिती नव्हती. त्यामुळे प्लॉट निघेपर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर करत आला नाही. 'कृषी विज्ञान' मासिक विकत घेतल्यानंतर या औषधांचा वापर करण्याचे ठरविले. या अगोदर प्लॉटमधून ७ ते ८ जाळी (कॅरेट) माल निघत असे व झाडे घुबडया, व्हायरस रोगांनी जाम झाली होती. दुरी खोडवा घेण्याचे ठरवून डॉ.बावसकर सरांच्या नाशिक शाखेतून पुर्ण माहिती घेतली. १ लि. जर्मिनेटरची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. फुटवा चांगला झाला. थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर व प्रोटेक्टंट यांच्या एकंदरीत ४ फवारण्या प्रत्येकी ५०० मिली/२०० लि. पाणी या प्रमाणात दर १० दिवसांनी केल्या. झाडांची वाढ जोमदार, रोगमुक्त होऊन फुलकळी वाढली. सुरूवातीस झाड बारीक होते. ते मोठे होऊन तारेच्या वर गेले. करपा, व्हायरस आला नाही. फळांना शाईनिंग फारच चांगली मिळाली. दरीत झाडाला ९० ते ११० फळे आहेत. ६० ते ७० रु. असतानाही २७/१२/२००३ रोजी मालाला १०० ते ११० रु. कॅरेट असा दर मिळाला. दिवसाआड २३ - २५ कॅरेट माल निघतो.\nऑक्टोबरमध्ये रोहिणी टोमॅटोची अर्धा एकरमध्ये लागवड केली होती. प्लॉट दीड महिन्याचा असताना पंचामृत औषधांच्या फवारण्या सुरू केल्या. कल्पतरू २० किलो/अर्धा एकरासाठी दिले. सुरुवातीस पाने पुर्ण पिवळी झालेली व घुबडया व्हायरसने जमा झाली होती. ती पंचामृत औषधांच्या प्रत्येकी ५०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारण्या दर १० दिवसाच्या अंतराने केल्यामुळे पाने पुर्णपणे हिरवीगार झाली. फळांची संख्या वाढली. शेंडा वाढून फुटवा मोठ्या प्रमाणात झाला. फळांना शाईनिंग मोठ्या प्रमाणात आहे. फुलकळी वाढली, माल मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. करपा, पाने पिवळी पडणे हे प्रमाण आटोक्यात आले. जमिनीत कस नसताना झाडांवर १२० ते १४० फळे मिळाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/editorial-need-of-prevension-of-hysteria/articleshow/63219838.cms", "date_download": "2019-03-25T08:54:16Z", "digest": "sha1:LX3EQYZ67EKACVTZASDXPWZP4PXUBURO", "length": 18295, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "editorial: उन्माद आवरा - editorial-need-of-prevension-of-hysteria | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nईशान्येकडील त्रिपुरा या छोटेखानी राज्यात दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला थेट पराभूत केल्याने भारतीय जनता पक्षाकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून साजरा होत असलेल्या विजयोत्सवाचे रूपांतर उन्मादात झाले आहे. डाव्यांचा वैचारिक प्रेरणास्रोत असलेल्या लेनिनचे पुतळे पाडून त्यांनी या उन्मादाचे दर्शन साऱ्या जगाला घडविले आहे.\nईशान्येकडील त्रिपुरा या छोटेखानी राज्यात दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला थेट पराभूत केल्याने भारतीय जनता पक्षाकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून साजरा होत असलेल्या विजयोत्सवाचे रूपांतर उन्मादात झाले आहे. डाव्यांचा वैचारिक प्रेरणास्रोत असलेल्या लेनिनचे पुतळे पाडून त्यांनी या उन्मादाचे दर्शन साऱ्या जगाला घडविले आहे. त्रिपुरात दोन ठिकाणी लेनिनचे पुतळे पाडल्यानंतर भाजपचे; तसेच हिंदुत्ववादी संघटनांनचे कार्यकर्ते आणि डावे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत. त्यामुळे तिथे हिंसाचारही सुरू झाला आहे. डाव्यांवरील ऐतिहासिक विजयाची हवा भाजपच्या डोक्यात मोठ्या प्रमाणावर गेली आहे, असाच याचा अर्थ. पुतळा पाडण्याचा प्रकार तद्दन मूर्खपणाचा असून, तो निषेधार्ह आहे. मूलतत्त्ववादी आणि संकुचित विचारांतूनच असे प्रकार घडतात. ईशान्येकडील राज्यांतील अल्पसंख्याकांना आणि आदिवासींना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीत वारेमाप आश्वासन देत आपण स्वीकारार्ह बनत असल्याचे दाखविणाऱ्या भाजपने पुतळे पाडून आपला संकुचितपणा सिद्ध केला आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यवाह राम माधव यांच्यासह अन्य काही नेत्यांनी लेनिनचा पुतळा जमीनदोस्त करण्याच्या घटनेचे समर्थन केले आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनीही आपल्यावरील घटनात्मक जबाबदारीचे भान विसरत भाजप नेत्यांचीच री ओढली आहे. त्रिपुरामधील लेनिनच्या पुतळा पाडल्यानंतर तमिळनाडूतील भाजप नेता एच. राजा याने पेरियार यांचे पुतळे पाडण्याची धमकी दिली आणि काही तासांतच वेल्लोरमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड केली गेली. लेनिन आणि पेरियार यांच्या कार्यातील भेदही न ओळखता भाजप कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य त्यांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करणारे आहे. पुतळे पाडण्याच्या प्रकरणाचे पडसाद पश्चिम बंगालमध्येही उमटले असून, तिथे काही माथेफिरूंनी भाजपचा पूर्वावतार असलेल्या जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची नासधूस केली आहे. या सर्व प्रकरणांना वेळीच आळा न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लेनिनचे पुतळे पाडण्याच्या घटनेचा नि:संदिग्धपणे निषेध केला आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या हे चांगले झाले. घटना घडल्यानंतर ४८ तासांनी पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली असली, तरी ती दिली हे महत्त्वाचे. हिंदुत्ववादी संघटनांकडून वेळोवेळी होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबाबत पंतप्रधान सोयीस्करपणे मौन धारण करतात, असा अनुभव आहे. त्यामुळे ताज्या प्रकरणात त्यांनी किंचित उशिरा का होईना, पण योग्य पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही राज्यपालांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती घेतली आहे. यामुळे त्रिपुरा भाजपमधील विजयोन्माद कमी होऊ शकेल. लेनिनचा पुतळा पाडून भाजपने काय साधले असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो. रशियन राज्यक्रांती शताब्दी यंदा साजरी होत असून, लेनिन या क्रांतीच्या अग्रस्थानी होता. क्रांतिनायकांना वलय प्राप्त होते आणि अनेकांसाठी ते प्रेरणास्रोत असतात. शंभर वर्षांपूर्वीच्या काळात लेनिनने मांडलेले विचार, विश्वबंधुत्वासाठी घेतलेला पुढाकार यांमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही क्रांतिकारक त्याच्याकडे आकर्षित झाले होते. साम्यवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी तर लेनिन वंदनीयच होता. त्यामुळे साम्यवादी पक्षाच्या राजवटीत त्याचे पुतळे उभारले गेले. जागतिकीकरणाची आणि उदारीकरणाची प्रक्रिया गतिमान झाल्यानंतर आणि वाढत्या मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा समजून न घेता डाव्यांनी आपला पोथीनिष्ठपणा कायम ठेवल्याने भारतासह जगभरात त्यांचा अवकाश संकुचित होत गेला. लेनिनचा प��तळा प्रतीकात्मकच होता; कारण त्याचा विचार आणि एकूणच डावा विचार कालबाह्य ठरतो आहे. त्याला पूरक असा कौल त्रिपुरातील जनतेने निवडणुकीद्वारे दिला होताच. असे असताना लेनिनचा पुतळा पाडून भाजपच्या कार्यकर्ते एक प्रकारे लेनिनबाबत चर्चा घडवून आणत आहेत. पुतळे उभारणे जसे प्रतीकात्मक; तसेच ते पाडणेही प्रतीकात्मक. या प्रतीकांमध्ये न अडकता जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्ती करण्यावर भाजपने भर द्यायला हवा. जनतेनेही त्यासाठीच निवडून दिले आहे. निवडणूक संपताच आश्वासनांकडे पाठ फिरवून सूडबुद्धीच्या राजकारणातच भाजपला रस असेल, तर त्रिपुरातील जनतेची निराशा व्हायला वेळ लागणार नाही. देशपातळीवर अशी निराशा निर्माण होत आहेच. सत्ताधाऱ्यांना उलथवून टाकण्याचे सामर्थ्य जनतेच्या निराशेत असते, हे भाजपने लक्षात ठेवलेले बरे.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:संपादकीय|उन्माद आवरा|tripura issue|Hysteria|editorial\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\n'भाई' बद्दल आम्ही समाधानी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/lava-iris-fuel-20-with-4400mah-battery.html", "date_download": "2019-03-25T08:02:53Z", "digest": "sha1:MDO45AYUXKMRUOXA6J6VFQZ3P523GDOV", "length": 5659, "nlines": 107, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "Lava Iris Fuel 20 with 4400mAh battery launched at Rs 5,399 ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्��, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "http://www.ghanshyam.marathifanbook.com/category/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87marathi-caricatures/", "date_download": "2019-03-25T09:26:41Z", "digest": "sha1:UZW3K3XP3KEYEWLGWLKHOVVMWD2DZL27", "length": 3827, "nlines": 68, "source_domain": "www.ghanshyam.marathifanbook.com", "title": "सर्व व्यंगचित्रे(Marathi Caricatures) | बोलक्या रेषा", "raw_content": "\nव्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषा\nसर्व व्यंगचित्रे एकामागून एक पाहायची असतील तर या दुव्याचा वापर करा\nसाईट वरील विविध विषयावर आधारित व्यंगचित्रे पाहण्यासाठी मेनू बार मधील\nव्यंगचित्रे विभागावर तुमच्या संगणकाचा माउस न्या आनि मग dropdown मेनूबार\nमधून तुम्हाला जो विभाग पाहायचा असेल त्या विभागावर टिचकी द्या असे केल्याने\nतुम्हाला त्या त्या विभागातली विषयावार मांडणी केलेली व्यंगचित्रे पाहता येतील.\nत्याच प्रमाणे मुख्य मेनूबार मध्ये इतर विभागांना भेट देवून तुम्ही त्या त्या विषयाला अनुसरून माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-mathadi-worker-wages-issue-49862", "date_download": "2019-03-25T08:24:33Z", "digest": "sha1:5KDO2BDHH6RZNZXDYEBVWUDTA4KYQNAF", "length": 12455, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news mathadi worker wages issue माथाडी कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमाथाडी कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न\nशनिवार, 3 जून 2017\nनाशिक - शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील 19 कृषी उत्पन्न बाजार समित्यांत शेतमाल येणे बंद झाल्याने पाच हजार माथाडी कामगारांना कोणतेही काम राहिले नाही. त्यांना रोज 25 लाखांच्या हमाली, तोलाईवर पाणी सोडावे लागत आहे. यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nनाशिक - शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील 19 कृषी उत्पन्न बाजार समित्यांत शेतमाल येणे बंद झाल्याने पाच हजार माथाडी कामगारांना कोणतेही काम राहिले नाही. त्यांना रोज 25 लाखांच्या हमाली, तोलाईवर पाणी सोडावे लागत आहे. यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nनाशिक जिल्ह्यातील 19 बाजार समित्यांत कार्यरत असलेले पाच हजार माथाडी कामगार रोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात. मनमाड, येवला, लासलगाव, पिंपळगाव व उमराणे या बाजार समित्यांत सर्वाधिक काम असते. त्यामुळे तेथे कमाईसुद्धा चांगली होते. मात्र, कालपासून शेतमाल येणे बंद झाल्याने या माथाडी कामगारांना केवळ बाजार समितीत जाऊन बसावे लागत आहे. सरासरी प्रत्येकी पाचशे रुपयांची रोजची कमाई बुडत असल्याने माथाडी कामगारांचे एकूण 25 लाखांचे या संपामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nदेशात यंदा अन्नधान्य उत्पादनात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी घट\nनाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी...\nसमर्थ नेतृवाच्या हाती देश असल्याने भाजपत 'इनकमिंग’ सुरू : आमदार खडसे\nभुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते...\nकोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात\nचिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे...\nचाळीसगाव : अभोणे तांडावासीयांची पाण्यासाठी भटकंती\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे...\nLoksabha 2019 : दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी\nवणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांचे...\nकोयनेचे पाणी कृष्णाला देण्यास शासनाची समिती अनुकूल\nचिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/what-after-indianness-306758/", "date_download": "2019-03-25T08:22:04Z", "digest": "sha1:YXDUDRTCYOBCOZX7M6N7VI3XCJP2MCQS", "length": 28624, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारतीयतेनंतरचं काय? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nआपली चित्रकला भारतीय असेल तरच लोकांना ती 'आपली' वाटेल, असं स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगितलं जात आहे. आज ते कुणी ऐकत नाही असं दिसतं, म्हणून मग 'भारतीयते'ऐवजी\nआपली चित्रकला भारतीय असेल तरच लोकांना ती ‘आपली’ वाटेल, असं स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगितलं जात आहे. आज ते कुणी ऐकत नाही असं दिसतं, म्हणून मग ‘भारतीयते’ऐवजी असा कोणता मुद्दा आहे की जो समाज आणि चित्रकार या दोघांना समान भूमीवर आणू शकतो आजकालचं ‘बाजारकेंद्रित्व’ हा तसा मुद्दा ठरू शकतो का आजकालचं ‘बाजारकेंद्रित्व’ हा तसा मुद्दा ठरू शकतो का की ‘दृश्यानुभवाच्या भारतीय रीती’ कुठे-कशा सापडतात, याची चर्चा आजही महत्त्वाचीच आहे की ‘दृश्यानुभवाच्या भारतीय रीती’ कुठे-कशा सापडतात, याची चर्चा आजही महत्त्वाचीच आहे याबद्दलचे हे दोन दृष्टिकोन..\n’ या लेखाच्या अखेरीस (कलाभान, ९ डिसेंबर) एक आवाहनवजा प्रश्न होता : चित्रकलेबद्दलच्या चर्चेसाठी आज असा कोणता विषय आहे की ज्याला ‘वाचक आणि लेखक’ या दोघांचाही सामायिक विषय मानता येईल ‘चित्रकलेतली भारतीयता’ हा विषय अगदी १९५० पर्यंत तसा सामायिक विषय होता. तसं आज मराठीत काय आहे\nयावर महेंद्र दामले यांनी उत्तर लिहिलं. ते लेखवजाच आहे. म��हणून आजच्या ‘कलाभान’मध्ये, सदराचा शिरस्ता मोडून – काहीसा शिस्तभंगच करून- या लिखाणाला स्थान दिलं आहे. ‘पाश्चात्त्य कलासंस्कार नाकारून मुळांचा शोध घेणं’ म्हणजे भारतीयता आणि स्वातंत्र्योत्तर काळात कलावंत म्हणून आत्मशोध घेताघेता, स्वत:बद्दल स्वत:ला जे कळलं त्याचा संबंध व्यापक भारतीयतेशी आहे का हे पडताळून पाहणं, हे दोन प्रकार असल्याचं दामले यांचं म्हणणं, हा मुद्दा इथं पहिल्यांदा येतो आहे.\nपण दामले यांनी भारतीयता आणि स्वातंत्र्योत्तर काळातली कला याबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडून झाल्यावर, १९९०च्या भारतीय कलेचं वर्णन ‘गुंतवणुकीवर आधारित कलाबाजार’ असं केलं आहे. त्याची चर्चा (त्यांनीच नव्हे, इतरांनीही) करायला हवी. ‘बाजारकेंद्रित्व’ हा प्रकार खरोखरच आपणा सर्वाना- एक समाज म्हणून- विचार करायला लावतो आहे. इतका की, ‘मी स्वत: बाजारकेंद्रित्वापासून किती अंतरावर आहे बाजारकेंद्रित्व मी कितपत स्वीकारलंय आणि कुठे-कधी नाकारलंय बाजारकेंद्रित्व मी कितपत स्वीकारलंय आणि कुठे-कधी नाकारलंय’ असे प्रश्न प्रत्येकाला पडू शकतात’ असे प्रश्न प्रत्येकाला पडू शकतात मग हेच प्रश्न चित्रकारांनाही पडत नसतील का\nआजच्या यशस्वी चित्रकारांना विद्यार्थीदशेपासून पाहात आलेले काही जण सांगतील की होय, आज बाजाराशी सख्य असलेले हे चित्रकार ‘आपापल्या संवेदनांचं, सांस्कृतिकतेचं आणि सामाजिकतेचं भान आपल्या कलेतून जपलं गेलं पाहिजे,’ अशा विचाराचेसुद्धा (अजूनही) आहेत. हे आज कुणाला पटणार नाही. पण ‘बाजार’ नावाची जी काही व्यवस्था आज आहे, तिच्या संदर्भात (उदाहरणार्थ) कृष्णम्माचारी बोस, अनंत जोशी, यशवंत देशमुख, रियाज कोमू, हे सारे- १९९०च्या दशकारंभी कलाक्षेत्रात नवतरुण असलेले (म्हणजेच आता बऱ्यापैकी मुरलेले) चित्रकार कुठे आहेत, हे मोजताना आपण – म्हणजे अन्य कलांप्रमाणेच चित्रकलेबद्दलही आकर्षणयुक्त कुतूहल (रस) असलेल्या मराठी भाषकांनी- फक्त बाजारातलं त्यांचं यश मोजून गप्प बसावं, अशी सक्ती आपल्यावर अजिबातच नाही. कारण आपण त्या कलाबाजाराचे कुणीच नाहियोत. हे सारे चित्रकार किती प्रमाणात स्वत्व टिकवून आहेत, याची चर्चा आपण करू शकतोच. ती चर्चा करणं, हे आपलं कलाभान सतत ताजं ठेवण्यासाठी आव्हानच ठरेल.\n‘भारतीयतेनंतर काय’ या लेखाने स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेत वर्तमानपत्रं आणि नियतकालिकं यांतील चित्रकलाविषयक लिखाणाचा एक व्यूह घेतला. हा व्यूह घेताना चित्रकार- समाज- समीक्षक यांच्या जिव्हाळय़ाचे विषय कोणते होते, याची नोंद घेत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील चित्रकलेमधील संकल्पनांचा प्रवास याबद्दलही चर्चा लेखात झाली. या चर्चेत दोन मुद्दे ठळकपणे समोर येतात..\n१. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदी कला, भारतीयतेचे प्रतिबिंब चित्रकलेत असावं असं चित्रकार, समीक्षक, विचारवंतांना वाटत असे. हे प्रतिबिंब तत्कालीन कलेत नाही, याची त्यांना खंत होती. भारतीयतेचं प्रतिबिंब निर्माण व्हावं यासाठी विचारदृष्टीने दिशेचा शोध घेणं चालू होतं.\n२. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र चित्रकार भारतीयतेचं प्रतिबिंब चित्रकलेत नाही याची खंत न बाळगता त्यांची कला ही पौर्वात्य किंवा भारतीय आशयमूल्यांशी कशी जुळलेली आहे, याविषयी भूमिका घेत होते.\nया दोन मुद्दय़ांनंतर स्वातंत्र्योत्तर काळातली महत्त्वाची संकल्पना कोणती, असा प्रश्न विचारत महाराष्ट्रातील कलेमध्ये काही नवीन संकल्पनात्मक घडत होते/आहे का, अशीही एक शंका उपस्थित केली गेली आणि या सर्व परिस्थितीमुळे मराठीत चित्रकलेवर सकस लिखाण होत नाही असाही मंद सूर लावला गेला.\nसमकालीन मराठी चित्रकार, विचारवंत, समीक्षक यांच्या विश्वाची आज जी काही स्थिती आहे, तिला भारतीयता या संकल्पनेभोवती चर्चा सतत फिरत राहणेच कारणीभूत आहे, असा निष्कर्ष लेखातून खुणावतो. परिणामी भारतीयतेचा मुद्दा कुतूहल निर्माण करतो.\nभारतीयता म्हणजे काय, त्याचं चित्रकलेत प्रतिबिंब म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पिढीसाठी वेगळं होतं. परिणामी, भारतीयता शोधण्याची दिशाही वेगळी होती. आपल्या व्यक्तिगत कलेची नाळ आपल्या भूमीच्या सांस्कृतिक ओळखीशी जोडली जावी, हे वाटणं साहजिक आहे. चिनी, जपानी लोकांना तसं वाटतंच. अमेरिकेतल्या चित्रकारांनाही दुसऱ्या महायुद्धानंतर तसंच वाटलं की\nभारतात स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढी आर्टस्कुलात युरोपीय (फ्रेंच) कलेवर आधारित धडे गिरवून तयार झालेली. शिकलेली कलाशैली सोडून भारतातील परंपरागत कलाशैली – पोथीचित्रं, अजिंठा, लोककलेवर दम्ृश्यभाषेवर – त्यांनी भर दिला. पण हा फरक बऱ्याच प्रमाणावर वरवरचा होता. स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीने असे पृष्ठभागावरील बदल स्वीकारण्यापेक्षा जर्मन एक्स्प्रेशनिझमच्या अंगाने माहिती झालेला कांट, फ्रॉइड- त्याची सुप्त मनाची संकल्पना तसेच अशा अनेक तत्त्ववेत्त्यांच्या आधारे स्वत:च्या मानसिक प्रक्रियेत भारतीयतेचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. यातूनच पुढे भारतीय दर्शनं, त्यातील तत्त्वज्ञान, विश्वाकडे पाहायची दृष्टी, तंत्र- मंत्र- यंत्र असा प्रवास होत झेन बुद्धिझम, जे. कृष्णमूर्ती, तुकाराम, ओशो, रमणमहर्षी इथवर येऊन पोहोचला. ‘आतून’ उत्स्फूर्तपणे व्यक्त होणाऱ्या कलानिर्मिती प्रक्रियेची चर्चा होऊ लागली. यातून भारतीयतेचं प्रतिबिंब चित्रकलेत पडलं का, भारतीयतेशी नाळ जोडली गेली का, हे खरंच तपासायला पाहिजे. पण एक मात्र खरं : १९६०-७०च्या दशकात अनेक साहित्यिक आणि विचारवंतांनी चित्रकलेवर बरंच साहित्य मराठीत निर्माण करून ठेवलं. एक महत्त्वाचा मुद्दा येथे लक्षात घ्यायला हवा तो असा की, महाराष्ट्रातील अनेक पिढय़ा आर्टस्कूलमध्ये शिकल्या त्यांनाच भारतीयतेच्या मुद्दय़ाने पछाडले (जिव्या सोमासारख्या चित्रकारांना भारतीयतेचा मुद्दा त्रास देत नाही). याचं कारण, आर्टस्कूलमध्ये चित्रकलेचं शिक्षण घेतलं की, माध्यमं, त्यांना हाताळण्याची तंत्रं, पद्धती, त्याचा सराव, चित्रप्रकार, विषय, त्याबद्दलचे काही शब्दसमूह, विचार करायची भाषा, अशा अनेक पातळय़ांवर पाश्चात्त्य कलेचा प्रभाव पडतो. हा प्रभाव अनेकांगी असल्यामुळे संसर्गासारखा असतो. त्या प्रभावापासून दूर जाऊन विचार करणं सहज शक्य होत नाही. त्यातही १९६०-७० पासून विचार करायला शिकवण्यापेक्षा व्यक्तिकेंद्रित अभिव्यक्तीवर आधारित कलानिर्मितीचं शिक्षण देण्यावर भर आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीयतेचं प्रतिबिंब निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष चित्ररूपात बदल करण्यापेक्षा चित्रकारांनी हा प्रश्न बौद्धिक पातळीवर सोडवण्यातच धन्यता मानली. अर्थातच, याला छेद देणारे अनेक चित्रकार आहेत. प्रभाकर बरवे, सुधीर पटवर्धन ही नावं लगेच समोर येतात. यांच्या चित्रांमधील वास्तवाकडे पाहणारी काहीशी मराठी मध्यमवर्गीय संवेदनशील दृष्टी खूप वेगळी आहे- आर्टस्कूलमधील युरोपीय वास्तववादापेक्षा (यथातथ्य चित्रणापेक्षा) थेट वास्तवाच्या अनुभवातून उमलणारी व त्या अनुभवांना चित्ररूप देऊ पाहणारी. थोडय़ा व्यापक दृष्टीनं प���हिलं तर गीव्ह पटेल, भूपेन खक्कर, तय्यब मेहता, जे. स्वामीनाथन, मनजीत बावा, असे कित्येक चित्रकार पुढे येतात. पण ते असो.\nमूळ प्रश्न असा आहे की, भारतीयतेचं मूळ कसं व कुठे शोधायचं आणि हे करण्यासाठी संस्कारित चित्रकला-शिक्षणातील अनुभव किती व कसा वापरायचा. आणि त्याहून महत्त्वाचं- ते संस्कार सोडून विचार करण्याचं धारिष्टय़ कसं दाखवायचं.\nअनेक परिचितांना आठवत असेल की यासंबंधात बरवे चर्चा करताना चित्रकाराच्या हेतुशुद्धतेबद्दल नेहमीच बोलायचे. कारण कदाचित शुद्ध हेतूनेच आपल्या दैनंदिन जीवनातील दृश्यानुभव, दृश्यसंबंधित अनेक सवयी, वृत्ती यांचा शोध घेता येईल. ज्यामध्ये भारतीयत्वाची मुळं असतील. उदाहरणार्थ, आपल्या धार्मिक सवयीतून दृश्याला समांतर राहून अनुभव घेणं- ‘दर्शन घेणं’ याची पद्धत/सवय यांचा संबंध काही प्रमाणात लघुचित्रांच्या द्विमितीला लागू होतो. आणि युरोपीय संस्कारांतून उमललेल्या आपल्याकडील अमूर्त चित्रकलेलाही. पण या समांतर राहून (आमोरासमोर) थेट भिडण्याच्या दृश्यसवयीबाबत कुणी अमूर्तचित्रकार बोलत नाहीत. फक्त तत्त्वज्ञानाचीच चर्चा होते.\nअत्यंत वेगाने बदलणाऱ्या वास्तवात अशा प्रकारचा शोध घेणं, भारतीयतेला निरनिराळय़ा प्रकारे समजून घेऊन तिची पाळंमुळं खोदून त्यांचा आपल्या कामाशी संबंध पडताळणं- हे सर्व करणं खूप कठीण आणि दुर्मीळ आहे.\n१९९० नंतर ‘गुंतवणुकीवर आधारित कलाबाजारा’मध्ये भारतीयता ही आकर्षक विक्रीयोग्य संकल्पना होणं शक्य नव्हतं. त्यामुळे भारतीयतेच्या मुद्दय़ाला बगल दिली गेली. पण हे मुळावरचं दुखणं आहे. दुर्लक्ष हे त्याचे औषध नव्हे. त्यामुळे भारतीयतेनंतरचं काय यापेक्षा, भारतीयतेचं काय याचीही चर्चा होत राहिली पाहिजे.\n* लेखक हे कलासमीक्षक व चित्रकार असून गेले दशकभर कला-महाविद्यालयांशी संबंधित आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरच�� सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/category/g2%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-tags/%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2019-03-25T09:01:38Z", "digest": "sha1:Q2UVG4ENQZXSXD6WCC5Z774BCSHH43MY", "length": 9735, "nlines": 139, "source_domain": "gangadharmute.com", "title": " भक्तीगीत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची ���ाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 09/07/2014 - 00:18 ह्यावेळी प्रकाशित केले.\nविठ्ठलाला पिणारा पाहिजे.. ॥धृ०॥\nवेडा कुंभार तो गोरा\nत्याला चढणारा पाहिजे.. ॥१॥\nत्याला भजणारा पाहिजे.. ॥२॥\nRead more about विठ्ठलाला पिणारा पाहिजे..\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-03-25T08:20:51Z", "digest": "sha1:Q35SCFHCQC5V7OWXZ5HSBGEDZFN5YLWO", "length": 11750, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारताने २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थचे २५० कोटींचे बिल थकवले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभारताने २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थचे २५० कोटींचे बिल थकवले\nलंडन : सध्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय खेळाडू यशस्वी कामगिरी करत असताना, मात्र भारत सरकारने २०१० दिल्ली कॉमनवेल्थचे बिल थकवण्यात आल्याने ब्रिटीश कंपनीने भारत सरकारला अत्यंत तिखट शब्दांत पत्र लिहिले असून नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील सॅटेलाइट आणि ब्रॉडकास्ट कंपनी स्पोर्ट इन्फर्मेशन सर्व्हिसेसने (SIS) केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांना हे दोन पानांचे पत्र लिहिले आहे. SIS कंपनीकडे २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे ग्लोबल कव्हरेज करण्याची जबाबदारी होती. आमचे २५० कोटींचे बिल तात्काळ चुकते करावे अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.\nस्पोर्ट इन्फर्मेशन सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड अॅमेस यांनी हे पत्र लिहिलं आहे. पत��रात त्यांनी भारतीय सरकारने आम्हाला ज्याप्रकारे वागणूक दिली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रसारण विभागात भारताची प्रतिमा डागाळली असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय खेळ आणि प्रसारण भागात भारताच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\n२०१० मध्ये ३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स पार पडले होते. यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. ‘आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रसारमाध्यमांचे कॉमनवेल्थ गेम्सकडे लक्ष असताना मी एक कठीण आणि लाजिरवाणी गोष्ट तुमच्या (राज्यवर्धन राठोड) निदर्शनास आणू इच्छितो ती म्हणजे भारताने अजून आमचं २५० कोटींचे बिल चुकते केलेले नाही. व्याज पकडले तर ही रक्कम २८० कोटींपर्यंत गेली आहे’, असं अॅमेन यांनी पत्रात लिहिले आहे.\n#IPL2019 : पंजाबसमोर आज राजस्थानचे कडवे आव्हान\nमहिला रेसर स्नेहा शर्मा मलेशियात दुसऱ्या स्थानी\nइंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी\nनवाझ शरीफ यांची प्रकृती खालावली\nजबरदस्तीच्या धर्मांतरांची चौकशीचे इम्रान खान यांचे आदेश\nसंघटनांच्या वादाचा फटका राजस्थानच्या खेळाडूंना\nते बीसीसीआयला विचारा : स्टिव्ह स्मिथ\nकसोटी क्रिकेटच्या पोषाखात बदल होणार\n#IPL2019 : हरभजनच्या नावेही अनोखा विक्रम\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/super-dancer-maharashtra/", "date_download": "2019-03-25T08:39:19Z", "digest": "sha1:FKAONXBQAFBBBQEUYPDD5KUEKQB7YZSQ", "length": 2410, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": " super dancer maharashtra - मराठी कलाकार", "raw_content": "\nख्रिसमस विशेष: स्पेशल चाईल्डस सोबत केला अमृताने ख्रिसमस सेलिब्रेट.पहा फोटोज.\nएखादा सण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करून सेलिब्रेट केला तर काहीसा अविस्मरणीय होऊन जातो नाही का\n…आणि रणवीरने दिलं अमृताला ‘असं’ सरप्राईझ\nबॉलिवूडचा हॉट अभिनेता रणवीर सिंगच्या रापचिक अंदाजामुळे सर्वत्र त्याची फॅनफॉलोविंग बघायला मिळते. अनेक तरुणी त्याच्या अदांनी...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/balgite/navika-palyad-ne-re-mala/", "date_download": "2019-03-25T07:42:46Z", "digest": "sha1:TO4EAD44CUJYKWLCLHLJP5KWQEDK5K5I", "length": 5606, "nlines": 94, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nनाविका पल्याड ने रे मला \n\"बघ दिवस बुडू लागला\nनाविका, पल्याड ने रे मला.\"\n\"दे मोल मला रोकडे\nमी क्षणात लंघुनि जला\nबघ डोळे माझे निळे\nजग सगळे म्हणते मला.\"\nकाळे की डोळे निळे\nते मला न काही कळे\nदे द��म रोकडा भला\nमी पल्याड नेईन तुला.\"\n\"चल, पल्याड घेउनी मला.\"\nचित्रकाराचा फलक आणि कोराच राहिला\nनाविका पल्याड ने रे मला\nवारा वाहतो वाहतो वारा दिसेना दिसेना\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2017-Halad.html", "date_download": "2019-03-25T07:48:35Z", "digest": "sha1:Z7MMRFYBOPTIAIMKJ3FTDP2HZCZNFLZN", "length": 6787, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - \"हळद अशी शेतात कधीच पिकली नाही,\" शेजारचे शेतकरी म्हणत, हरभरा, ऊस पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर", "raw_content": "\n\"हळद अशी शेतात कधीच पिकली नाही,\" शेजारचे शेतकरी म्हणत, हरभरा, ऊस पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nश्री. सुभाष दिवेकर (से.नि.D.Y.S.P.) उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२0६. मो. ९८९२३३३८३८\nमाझ्याकडे एकूण १५ एकर जमीन आहे . मी ठाणे येथे D.Y.S.P. होतो. मला शेतीची आवड असल्याने निवृत्तीनंतर आपणही शेती करू याकारणाने गावी उमरखेड येथे आलो. मात्र सुरूवातील शेतीचा अनुभव नसल्याने कोणते पीक कसे घ्यावे, याबद्दलचे ज्ञान नव्हते. तेव्हा मला आमच्या पाहुण्यांनी उमरखेड येथील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी श्री. सतीश दवणे यांचा मो. नं. (९४२३६६२६५१) दिला व भी त्यांना फोन केला असता त्यांनी मला भेट देऊन सांगितले की, साहेब तुम्ही हळद, सोयाबीन व तूर हे पीक डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने घ���या. मी ३ एकर हळद लावली. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला लागवड करण्याच्या वेळेस मी मुंबई येथे असल्याने बिजप्रक्रिया केली नाही. पण हळद लागवड झाल्यानंतर १ महिन्यानंतर मी सुरुवातीला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + ३ किलो १९:१९:१९ ची एकरी आळवणी केली असता पांढऱ्या मुळ्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊन हळदीची वाढ निरोगी एकसारखी दिवस होती. त्यानंतर प्रतिनिधींनी पिकाची पाहणी करून केलेल्या शिफारशीनुसार जर्मिनेटर २५० मिली + थ्राईवर २५० मिली + क्रॉपशाईनर २५० मिली + हार्मोनी २०० मिली + प्रोटेक्टंट-पी १५० ग्रॅम + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे पहिली फवारणी केली. त्यामुळे पाने व फुटव्याच्या जाडीत वाढ होऊन पिकाची जोमदार वाढ दिसत होती. अशाप्रकारे मी प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार आजपर्यंत सप्तामृताच्या ५ फवारण्या व २ वेळेस कल्पतरूचा त्यामुळे आमच्यासारख्या नवख्या शेतकऱ्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी ही वरदानच ठरत आहे व शेती करण्यास आत्मविश्वास निर्माण करीत आहे. तसेच आमच्या आजुबाजुचे सर्व शेतकरी म्हणत आहेत की, \"साहेब तुमच्या शेतात आतापर्यंत अशा पद्धीचे पीक कधीच बहरून आले नव्हते, असे तुम्ही केले तरी काय आम्हालापण सांगा.\" आजची पिकाची परिस्थिती पाहता माझ्या हळदीचे सरासरी ३० क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. कारण लागवड करून आज ७ महिने झाले असून या ७ महिन्यात पिकावर कुठल्याही प्रकारचा करपा, टिक्का, डाग तसेच हुमणी, अळी किंवा कंद माशीचा अजिबात प्रादुर्भाव नाही, हळदीची पाने ही केळीच्या पानासारखी मोठी दिसत आहेत. आपल्या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे झाडाचा बुंधा मजबुत, जाड होत आहे. गड्डे सुद्धा चांगले धरले आहेत. ५ ते ६ फुटवे आहेत. शिवाय कल्पतरूचा एकरी ४ पोटे वापर केल्यामुळे जमिनीत गारवा निर्माण होऊन जारवा तयार झाला आहे. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे गड्डे चांगल्या प्रकारे भरत आहेत. त्यामुळे मी हरभरा व ऊस या पिकासाठी देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/mother-death-dahava-school-equipment-gift-school-motivation-4092", "date_download": "2019-03-25T07:35:13Z", "digest": "sha1:2Z4YQWVVMMUUC4NAKOXFDH4X4EWZEROU", "length": 7688, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Mother Death Dahava School Equipment Gift to School Motivation | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्य�� महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआईच्या दहाव्याऐवजी शाळेला साहित्य\nआईच्या दहाव्याऐवजी शाळेला साहित्य\nआईच्या दहाव्याऐवजी शाळेला साहित्य\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nबीड - हिंदू धर्माच्या परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहावा तर करावाच लागतो; पण त्यात विविध विधी आणि दानधर्म करावा लागतो. मात्र, आपल्या आईच्या दहाव्याच्या दिवशी तीन विवाहित मुलींनी दहाव्याचा विधी टाळून शाळेला ई-लर्निंगचे साहित्य भेट दिले. याचा रांजणी (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या दीडशे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.\nबीड - हिंदू धर्माच्या परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहावा तर करावाच लागतो; पण त्यात विविध विधी आणि दानधर्म करावा लागतो. मात्र, आपल्या आईच्या दहाव्याच्या दिवशी तीन विवाहित मुलींनी दहाव्याचा विधी टाळून शाळेला ई-लर्निंगचे साहित्य भेट दिले. याचा रांजणी (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या दीडशे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.\nरांजणी येथील करांडे परिवार हा राजकारण, समाजकारण, व्यवसाय क्षेत्रात गावात आणि तालुक्यात प्रतिष्ठित आहे. या परिवारातील गंगासागर लक्ष्मणराव करांडे यांचे ३० डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी (ता. सात) त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम होता. सुरवातीला विधिवत दहावा करण्याबाबत घरात चर्चा झाली. मात्र, त्यांच्या विवाहित मुली मीना शिवाजी लाखे, कल्पना दीपक घोरपडे व अर्चना राज पाटील यांनी जुन्या परंपरेला फाटा देत या विधीचा खर्च टाळून काहीतरी विधायक उपक्रम हाती घ्यावा, अशी कल्पना मांडली. त्यासाठी खर्चही आम्ही करणार या भूमिकेला करांडे कुटुंबीयांनी होकार दिला. यानुसार सोमवारी गावातीलच जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंगचे साहित्य भेट देण्यात आले. ३२ इंचाचा टीव्ही संच व सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा संपूर्ण प्रोग्राम शाळेला भेट देण्यात आला. यामुळे शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांना ई-लर्निंगमुळे शिक्षणातील विविध पद्धती शिकण्यास मदत होणार आहे. या वेळी तिन्ही मुलींसह राज पाटील, शिवाजी लाखे, महादेव महाराज पुरी, बळिराम कदम, भारत करांडे, भागवत करांडे, शिवाजी निकम, विक्रम करांडे, कल्याण करांडे, मुख्याध्यापिका श्रीमती गर्जे, सहशिक्षक मकरध्वज जगताप, श्री. मराठे, श्री. केदार, श्री. चौधरी, श्री. साळवे उपस्थित होते.\nबीड beed साहित्य literature जिल्हा परिषद राजकारण politics व्यवसाय profession गंगा ganga river उपक्रम शिक्षण education राम कदम ram kadam भारत कल्याण school gift\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/clasesh-for-water/articleshow/63291020.cms", "date_download": "2019-03-25T09:00:07Z", "digest": "sha1:GZ55WY6BUPTROWU2RSB5GF4XEPU7YQHP", "length": 11235, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "water shortage: पाण्यावरून हाणामारी - clasesh for water | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nउन्हाळा तीव्र होत असताना ग्रामीण भागात पाणीसमस्या उग्र होऊ लागली आहे. सोमवारी रात्री भोपर गावात पाणी मिळवण्यासाठी दोन गटांत आपापसात वाद होऊन हाणामारी झाली आहे. कल्याण शिवसेना ग्रामीण विभागाचे तालुका प्रमुख एकनाथ पाटील यांनी ही माहिती दिली.\nकल्याण : उन्हाळा तीव्र होत असताना ग्रामीण भागात पाणीसमस्या उग्र होऊ लागली आहे. सोमवारी रात्री भोपर गावात पाणी मिळवण्यासाठी दोन गटांत आपापसात वाद होऊन हाणामारी झाली आहे. कल्याण शिवसेना ग्रामीण विभागाचे तालुका प्रमुख एकनाथ पाटील यांनी ही माहिती दिली. भोपरमध्ये पाणीप्रश्न गंभीर बनत असून रोज ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सात-आठ महिन्यांपूर्वी हजारो नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा आणला होता. मात्र प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाणीप्रश्नामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.\nकल्याण : नाशिक येथील आदिवासी व शेतकरी यांच्या अभूतपूर्व लाँग मार्चला मिळालेल्या यशानंतर आता महाराष्ट्रातील फेरीवाले येत्या १५ मार्चला मंत्रालयावर मोर्चा नेणार आहेत. डोंबवली कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी ही माहिती दिली. १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानात महाराष्ट्रातील फेरीवाले एकत्र येणार आहेत. शहर फेरीवाला शहर समिती स्थापन करा, फेरीवाल्यांना हक्क व सन्मान द्या, फेरीवाल्यां���रील कारवाई थांबवा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:हाणामारी|पाण्यावरून हाणामारी|water shortage|Water|clasesh for water\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nRanjitsinh Mohite-Patil: रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध...\nRaj Thackeray-Sharad Pawar: मुंबई: राज ठाकरे शरद पवार यांच्य...\nलोकसभा: सेनेची पहिली यादी जाहीर; सातारा, पालघरबाबत निर्णय ना...\nमुंबईः प्रवीण छेडा यांची भाजपत 'घरवापसी'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुंबईत ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी...\nराणे यांच्या राज्यसभा उमेदवारीवर शिवसेनेचा आक्षेप...\nछगन भुजबळ यांना केईम हॉस्पिटलमध्ये हलवले...\nकोरेगाव-भीमा हिंसाचारातील गुन्हे मागे घेणारः CM...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1611", "date_download": "2019-03-25T08:32:00Z", "digest": "sha1:QFCBYST6C2HJNNS6B26OUXIYFWPLRDQC", "length": 5375, "nlines": 44, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ना.सी. फडके | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nत्रिवेंद्रमची सफर – कमला फडके\nकमला फडके आणि प्रसिद्ध मराठी लेखक ना.सी. फडके यांनी त्रिवेंद्रम येथे भरलेल्या एका ‘फिलॉसॉफी’ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने डिसेंबर १९४५ मध्ये प्रवास केला. परिषदेत ना.सी. फडके हे ‘फिलॉसॉफी ऑफ जॉग्रफी’ या विषयावर स्वत: लिहिलेला एक प्रबंधही वाचणार होते. (पृष्ठ २) “प्रथम लॉजिकची विद्यार्थिनी व नंतर एका फिलॉसॉफरची सहधर्मचारिणी यामुळे फिलॉसॉफी या गहन विषयासंबंधी माझ्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली होती; परंतु मी त्रिवेंद्रमला जायचे ठरवले ते केवळ त्या जिज्ञासेमुळे नव्हे; तर एकदा त्रावणकोरचं सौंदर्य पाहण्याची इच्छा होती म्हणून.” (पृष्ठ २)\nसुरुवात अशी झाल्यामुळे त्या लेखनात निसर्गसौंदर्याची बरीच वर्णने असतील असे वाटले. पण प्रत्यक्ष लेखनात निसर्गवर्णन कमी व इतर अनेक गोष्टी येतात.\nकमलाबार्इंचे वय प्रवासाच्या वेळेस एकोणतीस वर्षें होते. त्यांचा ना.सी. फडके यांच्याशी बहुचर्चित विवाह झाल्यावर त्यांना एक मुलगीही झालेली होती आणि तरीही लग्नाची नव्हाळी टिकून असलेले त्यांचे ते दिवस होते असे म्हणता येईल. कमलाबार्इंच्या नावावर काही पुस्तके आहेत – ‘जेथे ना उमलती शब्दफुले’, ‘तेरी चूप मेरी चूप’, ना.सी. फडके यांच्याबरोबर संयुक्त लेखक म्हणून ‘बाजुबंद’ आणि ‘अत्तर गुलाब’. प्रस्तुतचे पुस्तक १९४७ च्या सुमारास प्रसिद्ध झाले असावे. मला ते विलेपार्ल्याच्या ‘लोकमान्य सेवा संघा’च्या वाचनालयात वाचण्यास मिळाले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-03-25T07:22:42Z", "digest": "sha1:CG44DPH36I3HQUEZOCMYCZEVGBAKSTUA", "length": 17953, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यात कडकडीत बंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातारा तालुक्यातील मराठा बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आदोंलन केले. मराठा मुलींनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी आई तुळजाभवानीचा जागर घालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मारला. यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरातील सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. मराठा समाजाने केलेला बंद शांतेत व यशस्वी झाल्याचे संयोजकांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहाच्या सुमा��ास मराठा बांधव सातारा तालुक्यातील ठिकठिकाणावरून जमले. त्यानंतर जिजाऊ वंदना करून ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी आकरा वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मराठा समाजाच्या मुलींनी मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत मराठा बांधवांनी जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यासारख्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत मराठा बांधवांनी भजन करत सरकारचा निषेध केला. दुपारी तीन वाजता मराठा मोर्चा आंदोलनातील शहीद मराठा बांधवाना श्रध्दांजली वाहुन तसेच राष्ट्रगिताने आंदोलानाची सांगता झाली.\nसातार्यात गुरूवारी सकाळपासूनच व्यावसायिकांनी बंदला पांठीबा देत बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवली होती. आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली होती. शहरातील व परिसरातील एसटी व खासगी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. एस टी बंद असल्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट होता. बंद दरम्यान कोणाताही हिंसक प्रकार घडु नये म्हणुन जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक विजय पवार यांनी बंदोबस्ताचे बारकाईने नियोजन केले होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील पेट्रोलपंप, बँकाचे व्यवहार, शाळा, कॉलेजेस बंद होती. मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला सातार्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातार्यातून एसटी डेपोतून एकही बस बाहेर न पडल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले.\nपश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात महाराष्ट्र बंदला पुन्हा हिंसक वळण लागलेले असताना सातारा जिल्ह्यात मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी ठिकठिकाणी शिस्तबध्द रित्या ठिय्या आंदोलन केले. जावलीत बैलगाडी मोर्चा सातार्यात भजन कीर्तन फलटणमध्ये मुंडण आंदोलन तर तासवडे टोलनाक्यावर रास्ता रोको करत आंदोलकांनी बंदची ताकत दाखवून दिली . पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही . जिल्ह्यात झालेल्या कडकडीत बंदचा फटका दळणवळण व तातडीच्या सेवा बंद राहिल्याने सर्वसामान्यांना बसला . मात्र आंदोलकाच्या आडून वित्तहानी करणार्यांवर पोलिसांची करडी नजर राहिल्याने ठिय्या आंदोलन शांततेत पार पाडले .\nमे महिन्याच्या ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व पोलीस यांनी बारकाईने होमवर्क करत बंदोबस्त व समायोजनाचे नियोजन केले होते . जिल्हयाच्या प्रत्येक उपविभागाचे उपअधीक्षक व प्रांत यांच्याशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक देशमुख यांनी संपर्क करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या . सातारा जिल्हयाचा कडकडीत बंद निषेधाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी गाजला . खटाव तालुक्यात मायणी ते वडूज हे सत्तावीस किलोमीटरचे अंतर चालत जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . त्यानंतर वेगवेगळ्या खेळांचे डाव रंगले . सातार्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी भजन, कीर्तन करत आरक्षणासाठी शासनाचे लक्ष वेधले . तसेच फोडजाई मंदिराच्या प्रांगणात चक्क देवीचा गोंधळ घालण्यात आला . नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले . कराडमध्ये कोल्हापूर नाक्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको करण्यात आला . महामार्ग रोखण्यात आल्याने बराच काळ वाहतूक मंदावली होती . खबरदारीच्या दृष्टीकोनातून या रास्ता रोको चे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले . कराड तालुक्यातील काशीळ हद्दीतील तास व डे टोल नाक्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने महामार्ग वाहतूक विस्कळीत झाली . कराड – विटा राज्यमार्गही दीड तास रोखून धरण्यात आल्याने तीन तास टॅफिक जॅमचा प्रचंड गोंधळ झाला . जावली तालुक्याचे मुख्य केंद्र असणार्या मेढा येथे तहसील कार्यालयावर चक्क बैलगाडी मोर्चा काढण्यात येउन शासनाचा निषेध करण्यात आला .फलटणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने जनजीवन ठप्प झाले होते . येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या देत प्रशासनाला निवेदन सादर केले . खंडाळा व वाई तालुक्यात मोर्चात राजकीय प्रतिनिधी सहभागी झाले . आमदार मंकरंद पाटील यांनी वाईत तर पुरूषोत्तम जाधव यांनी खंडाळ्यात मोर्चात सहभाग नोंदवला पण कटाक्षाने भाषणबाजी टाळली.\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-girish-mahajan-inquiry-47890", "date_download": "2019-03-25T08:44:47Z", "digest": "sha1:QFIOIGXK4USH4U6SOTHDDK4HOMIP3CHE", "length": 12640, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news girish mahajan inquiry मंत्री गिरीश महाजन यांची चौकशी व्हावी ! - सचिन सावंत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमंत्री गिरीश महाजन यांची चौकशी व्हावी \nशुक्रवार, 26 मे 2017\nमुंबई - दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाइकाच्या लग्न समारंभाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून, या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दाऊदप्रकरणी एकनाथ खडसेंना एक न्याय असेल तर गिरीश महाजन यांना वेगळा न्याय कशासाठी अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nज्या लग्नसमारंभाला भाजपचे नेते उपस्थित राहिले ते दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नात्यातील आहेत. या लग्न समारंभाला भाजप नेत्यांबरोबरच अनेक पोलिस अधिकारीही उपस्थित असणे हे धक्कादायक होते. यातून दाऊदचे हितसंबंध किती खोल���र रुजलेले आहेत, हे दिसून येते. या लग्नसमारंभाला उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असून, याचबरोबर आयबीचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. यातूनच या विषयाचे गांभीर्य लक्षात येते. आयबीची चौकशी सुरू होणे याचा अर्थ सदर दाऊदचे नातेवाईक हे आयबीच्या रडारवर आहेत, हे स्पष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन सदर नातेवाईक हा बेटिंगच्या व्यवसायात अग्रगण्य असून, या समारंभाला अंडरवर्ल्डमधले अनेक गुंड, बुकी उपस्थित होते, असा संशय असल्याचा दावा सावंत यांनी केला.\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nटेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून सुरुवात\nमुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून (ता.25) सुरुवात होत आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही...\nLoksabha 2019 : ईशान्य मुंबईत तिरंगी लढत\nभांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची...\nLoksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम...\nLoksabha 2019 : मुले पळवणारी टोळी मुंबईतही\nमुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत....\nबारमधील उधळपट्टीवर ‘सत्कर्म’चा तोडगा\nमुंबई - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडदेवच्या इंडियाना बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोठडीत रात्र घालवायची नसेल, तर त्यांनी बदलापूरच्या सत्कर्म...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळव���ण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-marathwada-news-farmer-betrayal-loanwaiver-order-53226", "date_download": "2019-03-25T08:16:37Z", "digest": "sha1:YEPWUTJQ6G3MHUBPZD63YA7F3MSABEKQ", "length": 14275, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur marathwada news farmer betrayal in loanwaiver order कर्जमाफीच्या आदेशात शेतकऱ्यांचा विश्वासघात - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकर्जमाफीच्या आदेशात शेतकऱ्यांचा विश्वासघात - अजित पवार\nशनिवार, 17 जून 2017\nलातूर - कर्जमुक्तीसंदर्भातील आदेशात निकष टाकून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शब्दांचा खेळ करीत शेतकऱ्यांत भेदभाव केला आहे. या आदेशामुळे गरजू शेतकरीही वंचित राहतील. सरसकट कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.\nलातूर - कर्जमुक्तीसंदर्भातील आदेशात निकष टाकून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शब्दांचा खेळ करीत शेतकऱ्यांत भेदभाव केला आहे. या आदेशामुळे गरजू शेतकरीही वंचित राहतील. सरसकट कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.\nपवार म्हणाले, 'कर्जमाफीमुळे बॅंकांचा फायदा होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का ठराविक विभागालाच फायदा मिळेल, शाश्वत शेती कशी करता येईल याचा प्रयत्न केला जाईल, अशा वल्गना सरकारकडून करण्यात आल्या. संपाच्या वेळी फूट पाडण्याचाही प्रयत्न सरकारने केला; पण शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारचे डोळे उघडले, त्यातून कर्जमुक्तीची घोषणा केली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाईल, असे जाहीर केले होते; पण दहा हजार रुपये देण्यासंदर्भात एक आदेश काढला आहे. त्यात अनेक निकष टाकण्यात आल्याने गरजू शेतकरीही त्यापासून वंचित राहतील. हे निकष ठरविताना विरोधी पक्ष, शेतकरी संघटनांना विश्वासात घेतलेले नाही.''\n'सत्तेत राहून शिवसेना भाजपला सातत्याने धमकी देत आहे. राजकीय सभ्यताच राहिलेली नाही. पंधरा वर्षांनंतर हे दोन्ही पक्ष सत्तेत आलेले, हे गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. त्यामुळे ते सत्तेच्या बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे मध्यावधी निवडणूक होईल असे वाटत नाही. मध्यावधी निवडणूक झाली तर आमचा पक्ष सज्ज आहे,'' असे अजित पवार म्हणाले.\nLoksabha 2019 : लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत\nउदगीर : लातूर राखीव लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसने शुक्रवारी (ता.२२) रात्री उशिरा मच्छिंद्र गुणवंतराव कामंत - कासराळकर यांना उमेदवारी जाहीर...\nबी. कॉमच्या परीक्षेत प्रश्नच चुकीचे\nनांदेड : गेल्या आठवड्यात शनिवारपासून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरु...\nलग्नातील बचतीतून अंगणवाड्यांना एलईडी\nकेळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग...\nअमरावती : बारदान्यांच्या समस्येने डोके वर काढल्याने शासकीय तूरखरेदीत खोडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अकरा केंद्रांवर तूरखरेदी सुरू करण्यात...\nउदगीरला सहा टन प्लॅस्टिक जप्त\nउदगीर - लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवारी (ता. १३) धडक कारवाई करीत सहा टनांहून अधिक प्लॅस्टिक जप्त केले आहे...\nराऊत बंधू - कांदा बीजोत्पादनातील मास्टर\nकांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/how-things-looked-in-old-times-and-now/", "date_download": "2019-03-25T08:18:30Z", "digest": "sha1:T7WBMQRMOI2BF2BCDJRJYATEJFLGFKSF", "length": 13737, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास - १० वस्तूंच्या रूपांतरातून", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nटेक्नोलॉजीच्या भरवश्यावर आज मानवाने जीवनात खूप प्रगती केली आहे. त्याने अनेक असे शोध लावले आहेत ज्याचा काही वर्षांपूर्वी कोणी विचार देखील करू शकत नव्हते. आज आपण इंटरनेटच्या सहाय्याने घर बसल्या जग फिरू शकतो, मोबाईलच्या मदतीने दूरवरच्या व्यक्तीशी संवांद साधू शकतो. आता तर आपण या सोशल मिडिया नावाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला वाटेल ते टाकू आणि लिहू शकतो. या टेक्नॉलॉजीमुळे मानवाचे जीवन खरच सुकर झाले आहे.\nपण तरी आजही एक प्रश्न मात्र नेहेमी मनाला भेडसावत असतो की, काय खरच टेक्नोलॉजी आपल्यासाठी वरदान आहे की शाप भलेही यामुळे आज आपले जीवन अधिक सोयीस्कर झाले असेल तरी या टेक्नोलॉजीचे काही तोटे देखील आहेतच.\nपण ही टेक्नोलॉजी काही एका दिवसात उदयाला आलेली नाही. तर ती हळूहळू अधिक प्रगत होत गेली आहे. जसे की आपला संगणक, जेव्हा याचा शोध लागला तेव्हा एक संगणक एक खोली एवढा मोठा होता तर आज बघा तो किती कॉमपॅक्ट झाला आहे… आज आपण अश्याच काही वस्तूंवर नजर टाकणार आहोत.\nमाऊस हा कॉम्पुटर युगातील सर्वात अनोखा शोध आहे. आधीच्या काळात माऊस हा अश्या प्रकारचा होता आणि तर अनेक प्रकारचे माऊस आपल्याला बघायला मिळतात.\nबेंज पेटंट- मोटरवॅगन ला जगातील पहिली कार मानल्या जाते. आधीच्या काळातील कार आणि आताच्या काळातील कार यात खूप फरक आहे.\nआधीच्या काळात एक संगणक एका खोलीची जागा व्यापून घ्यायचा पण आता त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.\nआधीच्या काळात लोखंडाच्या इस्त्रीमध्ये कोळसा टाकून कपड्यांना इस्त्री केल्या जायची, पण आता तर अनेक प्रकारच्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असlलेल्या इस्त्री बाजारात उपलब्ध आहेत.\nआधीच्या काळात ज्या व्यक्तीच्या घरी टीव्ही असायचा तो सर्वात श्रीमंत मानल्या जायचा. त्यानंतर हळूहळू सर्वच घरात हा दिसू लागला. तसा आधीचा टीव्ही आणि आताचा टीव्ही यात देखील बराच फरच आढळून येतो.\nआधीच्या काळातील कॅमेरा हा फोटो तर काढायचा पण पण ते ब्लॅक अॅण्ड व्हाईट असायचे, आता तर DSLR ने आपल्याला हवे तसे हवे त्या अँगलने फोटो काढू शकतो.\nआधीच्या काळातील विमान हे आतापेक्षा खूप वेगळे होते. ��ता तर आपण त्या काळातील विमानात बसण्याची कल्पना देखील करू शकत नाही.\nआधीच्या काळातील मोबाईल आणि आताच्या काळातील मोबईल याच देखील खूप बदल घडलेला आहे. आधीच्या काळातील मोबाईल हा वापरण्यास जेवढा किचकट होता आताच्या काळातील मोबईल हा तेवढाच सोयीस्कर झाला आहे.\nभलेही आता आपण मोबाईलवरच रेडीओ ऐकत असू पण तरी आधीच्या काळातील रेडीओ आणि आताच्या काळातील रेडीओत खूप फरक आहे.\nआधीच्या काळातील बेबी वॉकर देखील खूप वेगळे होते.\nया होत्या त्या काही काही वस्तू ज्यांचा शोध भलेही आधीच्या काळात लागला असेल पण टेक्नॉलॉजी आणि वेळेने त्यांच्यात जो बदल घडवून आणला आहे तो खरच अविश्वसनीय आहे…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← पाचगणीच्या ‘या’ गेस्ट हाऊसमध्ये ‘फ्री’मध्ये रहा पण एका अटीवर\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा →\nआता वायफाय पेक्षा १०० पट जलद इंटरनेट तेही एका भारतीय उद्योजकाच्या शक्कलमुळे\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\nसिक्कीमच्या अत्यंत दुर्गम भागातल्या विमानतळासाठी या अफलातून तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय..\nडॉक्टरकी न केलेले डॉक्टर: केशव बळीराम हेडगेवार\nलग्नाआधी प्रत्येक मुलीने हे ५ प्रश्न मुलाला विचारायलाच हवेत\nचीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृत्त\nत्या खऱ्या ‘रईस’ची कहाणी ज्यासोबत शाहरुखच्या ‘रईस’ची तुलना होतेय \nपांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले\nखुशखबर: आता भारतात होणार आयफोनचे उत्पादन\nपर्यावरण बदल: आर्थिक पाहणीत धोक्याचा इशारा- संजय सोनवणी\nउघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांचा “सत्कार” अपमान – जाणीवशून्यतेचा कलंक\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास\nनोटबंदीच्या घोषित कारणांचा उहापोह\nएकेकाळी क्रिकेट विश्वचषक गाजवणारा ‘तो’ आज पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय\nड्रग्ज, बंदुका आणि “आझादी” : धगधगत्या काश्मीरचे अज्ञात वास्तव\nइतर देशांच्या “भारताला मदत�� देण्यामागचं चाणाक्ष आंतरराष्ट्रीय राजकारण\nहे दहा उपाय तुम्हाला गरोदरपणात होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून वाचवतील\nया प्रणालीचा वापर करून फेसबुक थांबवू शकते लोकांच्या आत्महत्या\nचीडलेल्या धोनी ने दिलं पत्रकाराला आक्रमक उत्तर\nमहाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांचं भविष्य बदलतंय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/thugs-of-hindostan-show-cancelled-in-cinepolis-pune-people-get-angry-1786262/", "date_download": "2019-03-25T08:22:19Z", "digest": "sha1:G5PERSYOIK4G3PNJ2GDDQ4UCKSCAIO7J", "length": 12214, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thugs of hindostan show Cancelled in cinepolis pune people get angry | ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा शो रद्द, संतप्त प्रेक्षकांचा मल्टीपेक्समध्ये गदारोळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा शो रद्द, संतप्त प्रेक्षकांचा मल्टीप्लेक्समध्ये गदारोळ\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा शो रद्द, संतप्त प्रेक्षकांचा मल्टीप्लेक्समध्ये गदारोळ\nजवळपास ४०० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या मल्टीप्लेक्समध्ये 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चा ९.१५ चा शो होता.\nमल्टीप्लेक्सनं काही प्रेक्षकांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत केले तर काहींना दुसऱ्या शोचं तिकीट देण्यात आल्याचं समजत आहे.\nबॉलिवूडमधला बहुप्रतिक्षीत असा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी अनेक चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली. मात्र औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्समध्ये अचानक शो रद्द झाल्यानं संतप्त प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. तर काही प्रेक्षकांनी शिवाळीगाळ केल्याचाही प्रकार समोर आला आहे.\nऔंधमधल्या वेस्टएंड मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये हा प्रकार घडला आहे. आठ स्क्रीन असलेल्या मल्टीप्लेक्समधल्या एका स्क्रीनमध्ये हा प्रकार घडला. जवळपास ४०० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या मल्टीप्लेक्समध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चा ९.१५ चा शो होता. दिवाळीनिमित्त प्रेक्षकांची गर्दी होती. मात्र शोची वेळ निघून गेल्���ानंतरही शो सुरु न झाल्यानं प्रेक्षक अस्वस्थ झाले.\nमल्टीप्लेक्सकडून तांत्रिक अडचणीचं कारण देण्यात आलं. तसेच प्रेक्षकांकडून अडचण सोडवण्यासाठी काही वेळ मागण्यात आला. तीन वेळा मल्टीपेक्सच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडचण असल्याचं कारण सांगत प्रेक्षकांना थांबवून ठेवलं. मात्र दिलेली मुदत संपूनही शो सुरु झाला नाही हे पाहून संतप्त प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. अखेर मल्टीपेक्सच्या कर्माचाऱ्यांनी तांत्रिक अडचणी सोडवण्यात आपण असमर्थ असल्याचं सांगत माफी मागितली, मात्र काही प्रेक्षकांनी शिवीगाळ करत गोंधळ घातला.\nमल्टीप्लेक्सनं काही प्रेक्षकांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत केले तर काहींना दुसऱ्या शोचं तिकीट देण्यात आल्याचं समजत आहे. आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट देशभरातील ५ हजारांहून अधिक स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/meeting-18023/", "date_download": "2019-03-25T08:25:31Z", "digest": "sha1:PNDACFK6C2HTQX546ZTN5HP3RGEA5KBC", "length": 28529, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गाठी-भेटी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n ��ोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nकाळ बदलला, तशी पत्रकारिताही. मूल्ये बदलली, तशी माणसेही. बातमी ही खरेदी-विक्री करता येणारी वस्तू झाली आणि त्यामुळे ती देणाऱ्याच्याही हेतूंबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या. प्रश्न\nकाळ बदलला, तशी पत्रकारिताही. मूल्ये बदलली, तशी माणसेही. बातमी ही खरेदी-विक्री करता येणारी वस्तू झाली आणि त्यामुळे ती देणाऱ्याच्याही हेतूंबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या. प्रश्न आहे बातमीचे व्यापारीकरण होण्याचा आणि त्याबाबतच्या तारतम्याचा. पत्रकारितेतले हे बदलते पदर भविष्याविषयी अधिक जागरूक होण्यासाठी चिंतनाचे आहेत.\nतेव्हा पत्रकार परिषदा फार कमी व्हायच्या. पत्रकारांची संख्याही कमी असायची. साधं बॉलपेन मिळालं, तरी त्याचं केवढं अप्रूप वाटायचं. पत्रकारांना एकत्र बोलावून त्यांना माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा परिषदांमध्ये लेखी स्वरूपात सारी माहिती आधीच दिली जाते. ती वाचून मग पत्रकारांनी त्याबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. प्रश्न विचारण्यासाठी तो विषय समजावून घ्यायला लागायचा किंवा गृहपाठ करावा लागायचा. वृत्तपत्रातील वार्ताहरांची संख्या कमी असल्यानं सगळे विषय हाताळायला लागायचे. गुन्हेगारीच्या बातम्या मिळवून झाल्यानंतर राजकारण, शिक्षण याही क्षेत्रांतल्या बातम्या मिळवायला लागायच्या. त्या सगळ्या बातम्या कागदावर लिहून उपसंपादकाकडे वाचायला द्याव्या लागायच्या. तो उपसंपादकही अगदी डोळ्यात तेल घालून त्या वाचायचा आणि त्याला जरा जरी शंका आली, तरी धारेवर धरायचा. वार्ताहराला बातमी कळली आहे की नाही, याचा तो खरा थर्मामीटर असायचा. एखादं बॉलपेन मिळालं, म्हणून बातमीत कौतुकाचे चार शब्द चुकून जास्त आले, तर तो ते कठोरपणे कापून काढायचा. दिवसाच्या आणि रात्रीच्या पत्रकार परिषदा असा एक सरळ फरक तेव्हा असे. दिवसाच्या अशा परिषदांना बहुधा नवशिक्या वार्ताहराला पाठवलं जायचं. त्याच्या ज्ञानात भर पडावी, तो बहुश्रुत व्हावा, असा उदात्त दृष्टिकोन त्यामागे असायचा. रात्रीच्या परिषदा क्वचित, पण रंगीबेरंगी असायच्या. आधीपासूनच त्याचे ढोल वाजत असले, तरी त्याबद्दल सगळे जण आपापसात दबक्या आवाजात बोलत. मग उशिरा घरी परता��च्या योजनाही आखल्या जायच्या. दुचाकी चालवता येईल किंवा नाही याची खात्री नसणारे, कुणाच्या तरी मागे बसण्याची व्यवस्था करायचे. वार्ताहराकडे मोटार वगैरे असण्याची शक्यता कल्पनेतही नसल्याने एखाद्या मालक संपादकाकडे किंवा इंग्रजी पत्रकाराकडे असलेल्या मोटारीतून वार्ताहर सुखरूप घरी परतायचे. पत्रकारांना दारू पाजून त्यांना खूश करायचं आणि आपल्याला हवं ते छापून आणायचं, असं हे षड्यंत्र आहे, याची जाम खात्री तिथे उपस्थित नसलेल्या अन्य पत्रकारांना वाटायची. त्यासंबंधीच्या बातम्यांवर लक्ष ठेवण्याच्या खास सूचना कुजक्या शब्दात उपसंपादकांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. बहुतेक वेळा आयोजकांकडून थर्मास, पेनस्टँड, शोभेची तसबीर यांसारख्या कुचकामी वस्तू भेट म्हणून मिळायच्या. अनेकांच्या घरी असे इतके थर्मास जमा व्हायचे, की घरातले सगळे जण सतत आजारीच असतात की काय अशी कुणालाही शंका यावी. एरवी दोन खोल्यांच्या घरातल्या ‘दिवाणखान्यात’ देखणी तसबीर ठेवली की ती उठून दिसायची. त्यामुळे तिलाही लपवून ठेवावं लागे. आता थर्मासची जागा मोबाइल, आयपॅड, लॅपटॉप, उंची घडय़ाळांनी घेतल्याचं समजतं.\nआठवतं, की एकदा धीरुभाई अंबानी यांनी पत्रकारांना सूट शिवण्यासाठी चक्क ‘सूटपीस’ भेट दिले. लग्नात शिवलेला सूट परत घालण्यासाठी संधीच नसल्यानं (आणि दरम्यानच्या काळात देहाचा आकारही बदलल्यानं) त्या सूटचं काय करायचं, अशा विवंचनेत असलेल्या सगळ्यांचे डोळे कसे लकाकले होते सूपपासून ते डेझर्टपर्यंतचं जेवण घेतल्यानंतर बाहेर पडताना रांगेत उभं राहून प्रत्येकाला मिळणारी ही अनोखी भेट म्हणजे केवढी प्रचंड गोष्ट होती. आमच्यासारख्या नव्या दमाच्या चारदोन पत्रकारांनी अशी भेट घ्यायला विनम्रपणे नकार दिल्यानंतर उर्वरितांनी नंतर आमची केलेली ‘कानउघाडणी’ आजही कानात घुमते. भेटवस्तू घेण्यात फारसं काही गैर नाही. त्यामुळे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला वगैरे पडत नाही. इतकी र्वष आम्ही बातमीदारी करतोय, आम्ही कधी कुणाला विकले गेलो नाही. अशा एखाद्या भेटीनं आपण आपलं शील घालवत नाही, असं बरंच मोठं व्याख्यान ऐकायला लागायचं. त्यातही न बोलून कृतीतून विरोध करणारे होतेच. काही काळानं जेव्हा त्यांचंच बहुमत झालं, तेव्हा बातमी देण्यासाठी कुणी काही देणं याबद्दलची चर्चाच थांबली. तोपर्यंत या ���ेटी बातमीदारांपर्यंतच पोहोचायच्या. नंतर त्या उपसंपादकांपर्यंतही पोहोचू लागल्या. त्यांनाही कधी तरी जेवणाचं निमंत्रण मिळायचं. बातमी देण्यासाठी मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त कारण नसताना मिळणाऱ्या अशा लाभाचं इतरांना कौतुक वाटायचं. रांगेत उभं न राहता गॅस मिळणारा हा बातमीदार पॉवरफुल आहे, असं आजूबाजूच्यांना वाटायचं. बातमीदाराची खरी शक्ती काय असते, याची जाणीव नसल्यानं असेल कदाचित; पण त्या सगळ्यांना बातमीदार म्हणजे कुणी तरी फार मोठ्ठा असावा, असं जाणवत असावं, असं त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसायचं. तीन आकडी पगारात कुटुंब चालवता चालवता मारामार होणारे हे सगळे पत्रकार तेव्हा घराबाहेर वाघ असायचे. सामान्यत: राजकारणी, समाजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सततचा संबंध असल्याने अनेकदा मैत्री आणि व्यवसाय यातील सीमारेषा पुसट होत असे. व्यावसायिक संबंधांच्या पलीकडे मैत्र जुळावे, असे या क्षेत्रात फारच थोडे; परंतु अशी मैत्री सांभाळता सांभाळता त्या पत्रकाराला तारेवरची कसरत करावी लागत असे. आता पत्रकारांशी सतत संपर्क ठेवणारी व्यावसायिक यंत्रणा ‘पब्लिक रिलेशन्स’ या नावाने भरभराटीला आली आहे.\nभेटवस्तूंच्या स्वरूपात काळागणिक फरक होत गेला. अशा वस्तू घेणाऱ्यांचे आणि न घेणाऱ्यांचे प्रमाणही बदलत राहिले. हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जगात अशा पत्रकार परिषदा हाही एक ‘इव्हेन्ट’ बनून गेल्याने त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं. कॉर्पोरेट जग गेल्या पंचवीस वर्षांत माध्यमांच्या बाबतीत अधिक सक्रिय झालं आणि त्यातून नवी समीकरणं निर्माण झाली. बातमीदारांना बातम्या देण्यापेक्षा जाहिराती आणण्याची सक्ती माध्यमांमधूनच करण्यात येऊ लागली. वार्ताहरांना मिळणारी पैशाची पाकिटं थेट कंपनीलाच का मिळू नयेत, असा विचार केला जाऊ लागला आणि त्यातून बातमी ही एक खरेदी-विक्री करता येऊ शकणारी वस्तू झाली. आपोआप काही निवडक माध्यमांनी सामाजिक बांधीलकीची भाषा करणं बंद केलं आणि लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणंही. ‘लोकसत्ता’सारखी अगदी थोडी वृत्तपत्रं वगळता सर्वत्र हे असं अगदी जाहीरपणे आणि विनासंकोच सुरू आहे. आता मालकांच्या वतीनं उद्योगपतींची बोलणी करण्याचं कामही पत्रकारांवर सोपवण्यात येतं. एकदा एका प्रसिद्धीपत्रकाबरोबर चक्क शंभ�� रुपयाची नोट टाचणीनं जोडली गेली होती. (घटना अर्थातच जुनीपुराणी, कारण तेव्हा शंभर रुपयांना चांगलाच भाव होता) त्या वार्ताहरानं ते पत्रक पाठवणाऱ्याला झाप झाप झापलं आणि ताबडतोब पत्रक नेलं नाही तर उलट बातमी देण्याची धमकी दिली. कंपनीचा तो अधिकारी धावत आला. क्षमायाचना करू लागला. सगळीकडे असंच चालतं, असंही सांगत राहिला, पण शेवटी त्याची ती बातमी आली नाहीच. हितसंबंध आणि मैत्री, व्यावसायिकता आणि धंदेवाईकपणा, नैतिकता आणि नियम यांच्या सीमारेषा किती पुसट झाल्या आहेत आता.\nतेव्हा कार्यालयात कोण येतं, कोणाशी बोलतं, काय बोलतं, यावर वरिष्ठांची बारीक नजर असायची. वृत्तपत्रात येणारा सगळा मजकूर जास्तीत जास्त ‘शुद्ध’ असावा, असा कटाक्ष तेव्हाही होता. समाजात काही चांगलं, भलं घडावं, यासाठी माध्यमाचा उपयोग करण्याची वृत्ती अधिक प्रमाणात होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गावभरच्या बातम्या गोळा करून त्या लिहीत बसणारे वार्ताहर आणि त्यांच्या बातम्यांवर संपादकीय संस्कार करणारे उपसंपादक यांना आपण काही वेगळं करतो आहोत, याचा आनंद असायचा. चैन हा शब्द तेव्हा फक्त शब्दकोशातच असायचा. स्पर्धा वाढली तसे पगार वाढले, पण खर्चही वाढला. सततच्या ताणाखाली राहायची नवी सवय जडवून घ्यावी लागली. साहजिकच अभ्यास केव्हा करणार आणि त्याचा उपयोग केव्हा करणार, असं स्वत:ला समजावण्याची नवी रीतही लोकमान्य होऊ लागली. जमिनीपासून चार सहा इंच वर चालण्याची सवय अंगी बाणवली जाऊ लागली. त्याचा परिणाम असा होऊ लागला की, सगळं काही उंचावरून पाहण्याची सवय जडली आणि जमिनीवर काय आहे आणि समोर काय दिसतं आहे, याची काळजी घेण्याचं कसबच विसरलं जाऊ लागलं. आपणच वेगळे का, याचं उत्तर शोधत बसण्याचे कष्ट घेण्याचीही गरज वाटेनाशी झाली. आपल्याला कुणी उपकृत करतो आहे, यापेक्षा आपण किती जणांना उपकृत करू शकतो, याची जाणीव हरवली आणि व्यावसायिकतेच्या नावावर फक्त नोकरी शिल्लक राहिली. दररोज सकाळ- संध्याकाळ चमचमीत जेवणाची निमंत्रणं नित्याची झाली. ती देणाऱ्याचे हेतू समजावून घेण्याची आवश्यकताही उरली नाही. तारतम्यच हरवत चाललं.\nमूठभरांसाठी का होईना, सगळ्या विश्वाला कवेत घेण्यासाठी ज्ञानाच्या मार्गानं जाण्याचे दिवस अजूनही संपले नाहीत. सारेच दीप काही मंदावलेले नाहीत. समुद्रात नाव हाकताना दिसणारे दूरचे दिवे अजून��ी प्रकाशमान आहेत. निष्ठा, समर्पण या शब्दांचे अर्थही बदललेले नाहीत अजून. प्रश्न आहे तो हे सारं समजून घेण्याची क्षमता वाढवण्याचा आणि टिकवण्याचा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबत ओबामांना कल्पना-ट्रम्प\n‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान’\n‘या घाणीत आम्हाला प्रयोग करायचाय’, सुमित राघवनने काढले औरंगाबादमधील नाट्यगृहाचे वाभाडे\nउत्सवांचं बाजारीकरण थांबवा, राज ठाकरेंचा सल्ला\nसुवर्ण मंदिरातल्या लंगरवर जीएसटीमुळे १० कोटींचा अतिरिक्त बोजा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://govbharti.in/CurrentAdvDetails.aspx?id=CA111", "date_download": "2019-03-25T07:23:38Z", "digest": "sha1:H3XOZ7TZWVDQBWYIDLW7E7JZTHUGKBDM", "length": 1648, "nlines": 39, "source_domain": "govbharti.in", "title": "Welcome", "raw_content": "\nभारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक (ITI आणि Diploma In Engineering) पदांच्या एकूण ६८२ जागा\nभारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक (ITI आणि Diploma In Engineering) पदांच्या एकूण ६८२ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६पर्यंत\nजाहिरातीची PDF वेबसाईट लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/nandachya-pora/", "date_download": "2019-03-25T07:45:52Z", "digest": "sha1:GDNYKNL7KEKBJSZNWC4KS5ZGOL6UEJ4F", "length": 7166, "nlines": 72, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nरे रीत नव्हे चांगली\nसोड मला सोड, तुला भलती खोड लागली\nरे भलती खोड लागली\nएकटीला गाठुनिया धरलासी हात रे\nपदराला झोम्बताना फोडीलासी माठ रे\nलाडी गोडी पुरे तुझी, साडी माझी भिजली\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nवेळ आली काळी आज माझ्यावर पाळी\nसाजुक मी नार बाई नवी खुळी भोळी\nखोड तुझी मोडणारी एक तरी भेटली\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nझाला बाई घात, तुझी वाजताच वेणू\nअमृतात न्हाला माझा नाचे अणू रेणू\nवेडी झाले वेडी, वेडी झाले गोविंदाची गोडी मला लागली\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nमंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nनका बोलू असे दूर दूर बसून\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कव��ता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2019-03-25T08:09:39Z", "digest": "sha1:YJVZU6VDD4QBMRPJNGS36GDJDP4W4DNV", "length": 10958, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्यापासून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा होणार सुरु | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउद्यापासून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा होणार सुरु\nकोल्हापूर : गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आता उद्यापासून सुरु होणार आहे. मुंबई-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उद्या उडान योजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.\nकोल्हापूरची विमानसेवा गेल्या 6 वर्षांपासून रखडली होती. अनेक वेळा या विमानसेवेच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या. मात्र कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.\nमुंबईतून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील. खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत नियोजन केलं आहे. कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.\nमहाआघाडीतल्या 56 पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे- मुख्यमंत्री\nराष्ट्रवादी ही भष्ट्राचार मॅनेजमेंट कंपनी ; मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीवादीवर कणखर टीका\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nमला उद्धव ठाकरे��चा आशीर्वाद पाहिजे- रामदास आठवले\nमराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात\nअभिवादन – समृद्ध पर्यावरण : शिवरायांची नीती\nशरद पवारांनीच सोडविला माढ्याचा तिढा \nकोल्हापूर, हातकणंगलेसाठी प्रचार समन्वय नियुक्त\nआमदार संग्राम थोपटे कोल्हापुरातील वाद मिटवणार \nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-july2016-Moringa.html", "date_download": "2019-03-25T07:52:18Z", "digest": "sha1:GHFHLIRCIMSRE6PT5A3LD2TVIDSLYZRR", "length": 7138, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - दुष्काळात पैसे देणारे पीक - 'सिद्धीविनायक' शेवगा, एकरी ७५ हजार नफा", "raw_content": "\nदुष्काळात पैसे देणारे पीक - 'सिद्धीविनायक' शेवगा, एकरी ७५ हजार नफा\nश्री. पांडूरंग कदम, मु.पो.कारखेड, ता.उमरखेड, जि.यवतमाळ, मो. ८९७५८०८३०७\nमी २०१५ मध्ये पुण्यात प्रदर्शन पाहण्यास आलो असताना आपल्या स्टॉलला भेट दिली. त्यावेळेस मला शेवगा लागवड करायचे होते म्हणून मी आपल्या स्टॉलवरून 'सिद्धीविनायक' शेवगा बियाणे आणले व १ एकर शेवगा लागवड केली. त्यावेळेस मी बियाण्यासोबत जर्मिनेट, प्रिझम, हार्मोनी, थ्राईवर, क्रॉपशाईन, प्रोटेक्टंट ही औषधे सुंद्धा घेवून आलो. मी शेवगा बियाण्यास जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली. त्याने ८०% उगवण क्षमता झाली. पण उगवाणीनंतर काही झाडे वानरांनी मोडून टाकली. त्यामुळे मी पुन्हा आपले 'सिद्धीविनायक' मोरिंगचे बी 'सहारा कृषी केंद्र ब्राम्हणगाव' यांचेकडून आणले तर आज रोजी माझ्याकडे एक एकर शेवगा आहे.\nशेवगासाठी आपल्या कंपनीचे आमच्या भागातील प्रतिनिधी सतिश दवणे यांनी मला वेळोवेळी येवून मार्गदर्शन केले. मी सुरुवातीला लागवड केल्यानंतर जर्मिनेटर व प्रिझम प्रत्येकी १ लि. याप्रमाणे ड्रिपद्वारे आळवणी केली आणि आपल्या वेळापत्रकाप्रमाणे फवारणी केली. सप्तामृतच्या दोन फवारण्या केल्या. तर माझ्या शेतात ४ थ्या महिन्यात शेवग्याला फुल लागण्यास सुरुवात झाली. आमच्या भागातील 'सिद्धीविनायक' मोरिंगाचा हा पहिलाच प्लॉट आहे. ज्या लोकांकडे इतर जातीचं शेवगा होता ते माझ्या शेतातील 'सिद्धीविनायक' शेवगा झाडे पाहण्याकरिता येत होते. बहरलेली झाडे पाहून \"तुम्ही काय केले, ते आम्हाला सांगा\" असे म्हणत असत. मी त्यांना सांगितले, हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'सिद्धीविनायक' शेवगा आहे व त्यांची टेक्नॉंलॉजी या शेवग्याला मी वापरतो. कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीमध्ये हे शेवगा पीक घेतले आहे. आमच्या भागात दुष्काळ असतानासुद्धा 'सिद्धीविनायक' शेवगा हा हिरवागार, रसाळ व चवदार खाण्यायोग्य मिळत आहे. या शेवग्याची पहिली तोडणी ७ व्या महिन्यात केली. या बहारापासून मला एकूण ४० क्विंटल शेवगा शेंगा मिळाल्या. सुरुवातील ३३ ते ३४ रु./किलो भाव मिळाला. पुढे मार्कटमध्ये शेवग्याचे भाव कमी झाले तरी इतरांपेक्षा ३ ते ४ रु./किलो भाव जास्त मिळत होता. सरासरी २४ रु./किलो भाव मिळाला. माझ्या गावातील लग्नकार्यासाठी गावातील लोकांनी १० - १० किलो शेवगा नेला. खते, बियाणे, औषधे यांवर १२ हजार रु. खर्च आला होता. सर्व खर्च वजा जाता मला एक एकरातून ७५ ���जार रु. निव्वळ नफा मिळाला. त्यामुळे 'दुष्काळात पैसे देणारे पीक' म्हणून 'सिद्धीविनायक' शेवग्याची नवी ओळख निर्माण झाली.\nमाझ्याकडे जून २०१५ मध्ये लावलेले अॅप्पल बोर आहे. आता या शेवग्याच्या अनुभवातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर अॅप्पल बोरला चालू केला आहे. तसेच चालू पावसाळ्यात मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २ एकर हळद लागवड करणार आहे. याबद्दल आमच्या भागातील प्रतिनिधी श्री. सतिश दवणे यांनी हळद पिकासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच ऊस, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांनादेखील कल्पतरू सप्तामृत वापरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-june2016-Kanda.html", "date_download": "2019-03-25T07:48:13Z", "digest": "sha1:HEKHUI7LQHTUMQPGNM3AHJPOGPAZSVA7", "length": 5095, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - जुने कांद्याच्या बियापासून २० गुंठे कांदा लागवडीतून ७० गोण्या कांदा १।। लाख", "raw_content": "\nजुने कांद्याच्या बियापासून २० गुंठे कांदा लागवडीतून ७० गोण्या कांदा १\nश्री. सचिन दिनकर बांगर, मु.पो. रायतेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर. मो. ९७६५८०२६१३\nमाझ्याकडे घरगुती जुने २ वर्षापूर्वीचे २ किलो कांद्याचे बियाणे होते. ते मी २ लिटर पाण्यामध्ये ५० मिली जर्मिनेटर घेवून ५ ते ६ तास भिजवून व नंतर सावलीत सुकवून वाफ्यामध्ये टाकले व त्याला सावली केली. ६० ते ७०% उगवण झाली. त्यानंतर जर्मिनेटर व थ्राईवरचे २ स्प्रे घेतले. त्यामुळे जळणी व मर झाली नाही. जे रोप ४५ दिवसात तयार होते ते ३० दिवसात लागवडीला आले. लागवड करताना रोपे पूर्ण जर्मिनेटरमध्ये भिजवून लागवड केली. त्यामुळे रोपे सतेज व टवटवीत झाली. खत म्हणून डी.ए.पी. १ बॅग, सुक्ष्म, अन्नद्रव्ये व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत एकत्र करून वापरले. पावसाचे ढगाळ वातावरण, दमट हवामान व अनियमीत पावसामुळे गाभ्यामध्ये मावा व शेंडे करपले होते. त्यासाठी थाईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + स्प्लेंडर २० मिली + १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केली. १५ ते २० दिवसात फरक जाणवला . परत तीच फवारणी रासायनिक किटकनाशकाबरोबर घेवून ३ ते ४ वेळा केली. पातीच्या पिळकुटीसाठी (पात पिवळी पडून वाकडी होणे यावर) थ्राईवर व क्रॉपशाईनचा उत्तम रिझल्ट आला. शेवटपर्यंत शेतात पिळकुटी दिसली नाही व कांद्याला पोसण्यासाठी व उत्तम कलर येण्यासाठी क्रॉपशाईनर, राईपनर व न्युट्राटोन तसेच बोरॉन, कॅल्शिअम, १३:००:४५ या सर्वांची फवारणी केली. पातीची मान जाड झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढली. ढगाळ व दमट वातावरणात सुद्धा पात रुंद व तेजदार राहिली. ऑकटोबरच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे सडून गेले. पण आपला प्लॉट टिकून राहिला व भिग्यामध्ये (२० गुंठे) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७० गोण्या कांदा निघून संगमनेरच्या मार्केटला बाजारभाव चांगला असल्यामुळे प्रति क्विंटल ४.५ ते ५ हजार रु. बाजारभाव मिळाला. अशा रितीने २० गुंठ्यांतून १ लाख ५० हजार रु. उत्पन्न मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/m-chandra-babu-naidu-tdp-warns-bjp-to-quite-nda-for-insufficient-amount-to-andhra-pradesh-in-budget/", "date_download": "2019-03-25T08:06:01Z", "digest": "sha1:4EF2WMX4PHAPGKX4V2GD4IH4TXQFLJKN", "length": 5793, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तर मी नमस्कार करून माझ्या मार्गाने जाईल ; भाजपच्या जुन्या मित्राचा निर्वाणीचा इशारा", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\n…तर मी नमस्कार करून माझ्या मार्गाने जाईल ; भाजपच्या जुन्या मित्राचा निर्वाणीचा इशारा\nटीम महाराष्ट्र देशा : मी कधी मित्र धर्म सोडलेला नाही..जर त्यांनी माझे ऐकले नाही तर मी नमस्कार करून माझ्या मार्गाने जाईल, अशा शब्दांत प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन सदस्य पक्ष भाजपा आणि तेलुगू देशम पक्षात (टीडीपी) गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केल्याने ते नाराज आहेत.\nदरम्यान, केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण होत नसल्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत असल्याचे काही दिवसांपूर्वी चंद्राबाबूंनी म्हटले होते. सीआयआयच्या परिषदेत त्यांनी हे वक्तव्��� केले होते. टीडीपीने अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला जास्त महत्व न दिल्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा आणला होता. आता टीडीपीच्या नाराजामुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पानंतर आंध्र प्रदेशसाठी वाढीव निधी मंजूर केला होता. पण त्यावर टीडीपी समाधानी नसल्याचे दिसते\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nमी दोनवेळा उपोषणाला बसलो.. दोन्ही वेळेस तेथील सरकार पडले – अण्णा हजारे\nपी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-water-scarcity-ghotagawadi-girode-82425", "date_download": "2019-03-25T08:53:27Z", "digest": "sha1:6KPL6XWJ7F5JSDJJ5VOMCMSB3FQQ335H", "length": 15285, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News water scarcity in Ghotagawadi, Girode गिरोडे, घोटगाचीवाडीत पाण्यासाठी वणवण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nगिरोडे, घोटगाचीवाडीत पाण्यासाठी वणवण\nबुधवार, 15 नोव्हेंबर 2017\nदोडामार्ग - वझरे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळयोजनेचे दोन्ही मोटारपंप बंद पडल्याने गिरोडे आणि घोटगाचीवाडी येथील ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गिरोडे आणि घोटगाचीवाडी यथील ग्रामस्थांसाठीचा पाणी पुरवठा गेले पाच दिवस बंद असल्याने वस्तीपासून खूप दूर जंगल भागात असलेल्या विहिरीवरुन दगडधोंडे तुडवत अडचणीच्या वाटेतून पाणी आणावे लागते आहे.\nदोडामार्ग - वझरे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळयोजनेचे दोन्ही मोटारपंप बंद पडल्याने गिरोडे आणि घोटगाचीवाडी येथील ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गिरोडे आणि घोटगाचीवाडी यथील ग्रामस्थांसाठीचा पाणी पुरवठा गेले पाच दिवस बंद असल्याने वस्तीपासून खूप दूर जंगल भागात असलेल्या विहिरीवरुन दगडधोंडे तुडवत अडचणीच्या वाटेतून पाणी आणावे लागते आहे.\nगिरोडे गावातील ग्रामस्थांनी त्यासंदर्भात आज गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गिरोडे येथे सार्वजनिक नळयोजनेची उपसा विहीर आहे. तेथून साठवण टाकीत पाणी नेऊन ते गिरोडे आणि घोटगाचीवाडी येथील ग्रामस्थांना वितरीत केले जाते. गेले पाच दिवस त्या वाडीवरील ग्रामस्थांचा पाणी पुरवठा बंद आहे. उपसा विहिरीवरील दोन��ही मोटारपंप बंद आहेत. पहिल्यांदा एक पंप बंद पडला होता; मात्र दुसरा पंप सुरु असल्याने ग्रामपंचायतीने नादुरुस्त पंप दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दुसरा पंपही बंद पडताच लोकांना पाणी पुरवठा बंद होवून गावकऱ्यांवरच पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.\nगावातील पुरुष, महिला, मुली, वृद्धा सगळ्यांना आता पाण्यासाठी जंगल भागातील सार्वजनिक नळयोजनेच्या उपसा विहिरीवर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. विहिरीवर जाणारा रस्ता दगडधोंड्यांचा, चिंचोळा, जंगलभागातून जाणारा आणि तीव्र चढ उताराचा आहे. पाण्याच्या भरलेल्या कळशा घेऊन दगडधोंडे चुकवत, तीव्र चढ आणि निसरड्या पाऊलवाटेने चढून घर गाठणे जीकिरीचे काम आहे; पण पाण्यासाठी गावकरी जीव मुठीत घेऊन गेले पाच दिवस त्या वाटेवरुन चालत आहेत. वयोवृद्ध महिलांना चढण चढताना धाप लागते. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, बंद पडलेला पंप दुरुस्त करण्यामधील बेपर्वाई गावकऱ्यांसाठी त्रासदायक ठरली आहे. त्यामुळे नादुरुस्त पंप तात्काळ दुरुस्त करुन पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी होत आहे.\nगिरोडेतील प्राथमिक शाळेजवळ अंगणवाडी इमारत बांधकाम सुरु आहे. त्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यस्था ठेकेदाराने करायला हवी; पण ती न करता त्याने सार्वजनिक नळयोजनेचे पाणी सातत्याने वापरले त्याबद्दल लोकांची तक्रार आहे. त्याविरोधात कारवाईची मागणी होत आहे.\nचाळीसगाव : अभोणे तांडावासीयांची पाण्यासाठी भटकंती\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे...\nLoksabha 2019 : काटा मारण्यासोबत जाणाऱ्यांचा काटा काढू\nकोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा...\nलंडन कॉलिंग मी गेले बरेच दिवस एका डाएटवर आहे. खरंतर गेली अनेक वर्षं डाएटवरच आहे. माझं निम्मं वय स्वतःला आणि स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करण्यात...\nघोलवडमधील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याने पाण्यासाठी वणवण\nडहाणु : डहाणु तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायत क्षेत्रातील टोकेपाडा भागतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. अवघ्या...\nअंतराळातील स्त्रीशक्ती (श्वेता चक्रदेव)\nनासातर्फे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या मंगळ मोहिमेत महिलांचा मोठा वाटा असणार आहे. नंतर होणाऱ्या मंगळावरच्या मानवी मोहिमेत तर पहिलं पाऊल कदाचित महिलेचं...\nदोन टोकं आणि भारत (संदीप वासलेकर)\nजगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/interesting-facts-and-benefits-of-beard/", "date_download": "2019-03-25T08:22:04Z", "digest": "sha1:BRJEDCZGH7TYXPN2ZZQ4FFWIE6T27H3S", "length": 15536, "nlines": 129, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'नो शेव नोव्हेंबर' विसरा. दाढी ठेवण्याचे हे फायदे बघा, वर्षभर दाढी ठेवाल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘नो शेव नोव्हेंबर’ विसरा. दाढी ठेवण्याचे हे फायदे बघा, वर्षभर दाढी ठेवाल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआधीच्या काळात जरा जरी दाढी वाढलेली दिसली की येणारा जाणारा प्रत्येक जण टोकायाचा. त्यासोबतच दाढी केल्याशिवाय घरात यायचं नाही अशी ताकीदच घरच्यांकडून मिळायची.\nपण वेळ बदलली, काळ बदलला.. आता लोकांना दाढी जास्त भावू लागली. आजतर दाढी हा ट्रेंड झालायं. ज्याला बघावं तो आता दाढी ठेवू लागला आहे.\nमागील वर्षी तर संपूर्ण नोव्हेंबर महिनाच ‘नो शेव नोव्हेंबर’ म्हणून एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. यातच ज्यांना दाढी ठेवायला आवडते त्यांच्यासाठी तर हे वरदानच ठरले…\nआता तर लोकांचं दाढी प्रेम एवढं वाढलंय की त्याला बघून शेविंग प्रोडक्ट्सच्या कंपनीनी देखील त्यांच्या जाहिरातींमध्ये क्लीन शेव ऐवजी दाढी वाला मुलगा दाखवण्यास सुरवात केलीए\nतर अश्या या दाढीचे तुम्हाला कुल लुक देण्याव्यतिरिक्तही आणखीन काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ… त्याचबरोरबर दाढीबद्दल काही गमतीजमती देखील बघू.\nदाढी ही तुम्हाल�� केवळ चांगले दिसण्यासाठीच मदत करत नाही. एका रिसर्च नुसार, दाढी, अल्ट्रावायलेट किरणांपासून देखील तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करते. सोबतच ती तुमच्या वाढत्या वयाला देखील लपवते.\nतुमची दाढी ही केवळ मुलींना इम्प्रेस करत नाही. (ते तर होतंच… शिवाय – ) तुम्हाला धुळीमुळे होणाऱ्या एलर्जीपासून देखील वाचवते.\nसहजच – दाढी रात्री जास्त जोमाने वाढते असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण आपलं संपूर्ण शरीरच रात्री, आपण झोपेत असताना, “वाढीस” लागतं. अर्थात, हे अनेकांचं म्हणणं आहे खरं काय, ह्यावर मतभेद आहेत.\nकल्पना करा की, तुम्ही जर शेविंग करणे बंद केल तर काय होईल जर तुम्ही शेविंग करणे बंद केलं तर तुमची दाढी ७.५ मीटर पर्यंत लांब होऊन जाईल. पण तसे करू नका – नाहीतर तुमची प्रेयसी तुम्हाला बेबी/बाबू नाही बाबा म्हणायला लागेल.\nपोगोनोफोबिया हा दाढी संबंधित एक फोबिया – भीती – आहे. ज्यामध्ये व्यक्तीला दाढी ठेवण्याची भीती वाटत असते.\nज्यांची लांब दाढी असते त्यांच्यापैकी अनेकांना क्लीन शेव करण्याची भीती वाटत असते.\nआधीच्या काळात तत्वज्ञानी दाढी ठेवायचे ते त्यांच्या व्यवसायाचं प्रतिक मानल्या जायचं.\nलोकांमध्ये एक गैरसमज खूप प्रचलित आहे की क्लीन शेव केल्याने दाढी लवकर वाढते. पण तसं मुळीच नाही. हा निव्वळ एक गैरसमज आहे. त्यामुळे या गैरसमजात उगाचच आपले गाल सोलून घेऊ नका.\nएका रिसर्चनुसार – मुलींना दाढी असणारे मुलं जास्त आवडतात. मुलींना दाढी असलेले मुलं हे दाढी नसलेल्या मुलांच्या तुलनेत जास्त मॅच्युअर्ड वाटतात, म्हणून लॉन्ग टर्म रिलेशनशिपसाठी त्या दाढी असलेल्या मुलांना जास्त प्राधान्य देतात.\nदाढी जलद गतीने वाढवण्याचा एक उपाय मोठा गमतीशीर आहे – सेक्स भरपूर करणे 😀\nसर्व पोगोनॉलॉजिस्ट (दाढीचे अभ्यासक हो, हा पण एक प्रकार आहे हो, हा पण एक प्रकार आहे) चं ह्यावर एकमत आहे की मैथुनाशी संबंधित टेस्टोस्टेरॉनमुळे दाढीची (किंवा पुरुषांच्या एकूणच केसांची) वाढ अधिक होते.\nआणखी एका रिसर्च नुसार – एक व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात ३,३५० तास हे फक्त शेविंग करण्यात वाया घालतो. जर तुम्ही दाढी केली नाही तर विचार करा तुमचा किती वेळ आणि पैसे वाचू शकता.\nआहे ना ही भन्नाट माहिती…\nमग वाट कसली बघताय… आपलं दाढी प्रेम कुठेही कमी होऊ देऊ नका…आता तर बिनधास्त दाढी वाढवा \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← काही लोकांना उंचीची जास्त भीती का वाटते\n या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल\nएका चिमुरड्याच्या हत्येमुळे वादात अडकलेल्या ‘रायन इंटरनॅशनल स्कुल’ची धक्कादायक पार्श्वभूमी\nमहाभारतातील अत्यंत महत्वाचे ५ अज्ञात प्रसंग, जे आपल्याला मानवी मुल्यांची शिकवण देतात\nदेशातील सर्वात भयानक घटनांपैकी एक लातूर भूकंपाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\n2 thoughts on “‘नो शेव नोव्हेंबर’ विसरा. दाढी ठेवण्याचे हे फायदे बघा, वर्षभर दाढी ठेवाल”\nहे आहेत ते लोक ज्यांनी यशाला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केलं\nरक्तातील प्लेटलेट्स कमी होणं म्हणजे नेमकं काय\nस्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज\nया आहेत क्रिकेटच्या इतिहासातल्या सगळ्यात “स्लो इनिंग्स”\n“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा\nअस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना\nतब्बल ३० वर्षे अकबराला झुंझवणाऱ्या ‘महाराणा प्रताप’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\n“मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”\nपोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्हे उलगडतात त्यांच्या पदाची ओळख\nमायकल जॅक्सनचा चाहता ट्रॅफिक पोलिस बनला आणि चौकात “निस्ता राडा” झाला\nजवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबटन : अनैतिक म्हणून हिणवलं गेलेलं मैत्रीचं हृद्य नातं\n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nग्रेनेड लॉन्चर ते मशीन गन्स: शहरी नक्षलवाद्यांचा अंगावर काटा आणणारा पत्रव्यवहार\nकौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है\n“आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४\nस्पृहा चा वादग्रस्त फोटो आणि अवधुत गुप्तेची चपराक\nगुजरातजवळील समुद्रात सापडला समुद्रमंथनातील मंदाराचल पर्वत \nडॉक्टरांचं हस्ताक्षर इतकं वाईट का असतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satyamargadarshak-287-navneet-33511/", "date_download": "2019-03-25T08:21:59Z", "digest": "sha1:LZ7ZSSCSXXCFKBH5KWYF2XUH5E2UQVKO", "length": 14494, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८७. नवनीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८७. नवनीत\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८७. नवनीत\nआज जीवनातील ताणतणावांत आध्यात्मिक विचार मनाला बरेचदा शांतीचा अनुभव देतात. आपली जिथे श्रद्धा आहे अशा स्थानी नतमस्तक होतानाही आपल्याला काही प्रमाणात निश्चिंतीचा अनुभव येतो. पण\nआज जीवनातील ताणतणावांत आध्यात्मिक विचार मनाला बरेचदा शांतीचा अनुभव देतात. आपली जिथे श्रद्धा आहे अशा स्थानी नतमस्तक होतानाही आपल्याला काही प्रमाणात निश्चिंतीचा अनुभव येतो. पण त्याचबरोबर या क्षेत्रातही स्वार्थ, संकुचित वृत्ती, किर्तीचा मोह अशा गोष्टींमध्येही वाढ होत आहे. जो तो आपला झेंडा गाडून आपलंच मत खरं, आपलाच मार्ग खरा असा डांगोरा पिटत असतो. त्यामुळे आपण भांबावून जातो आणि अशा परिस्थितीत सत्याचा साक्षात्कार आपल्याला होणं कठीण आहे, असं मानतो. एक गोष्ट खरी की सत्य शाश्वत आहे, त्याकडे जाण्याचा मार्गही शाश्वतच आहे आणि जो सत्यस्वरूप आहे तोच त्या मार्गावरून मला चालवू शकतो. आज असा सत्यस्वरूप सद्गुरू मला लाभला नसेल तरीही साईबाबा, शंकराचार्य, कबीर अशा सत्यमार्गदर्शकांच्या बोधानुरुप चालण्याचा मी प्रयत्न करू लागलो तर आज अरूप ज्या रूपात आहे असा सत्यस्वरूप मार्गदर्शक स्वतच माझ्याकडे येईल. त्याच्या वर्तनातच सत्याचा असा लखलखता स्पर्श असेल की त्याची वेगळी ओळख मला पटावी लागणार नाही. तोवर मी जे सत्यमार्गदर्शक होऊन गेले त्यांच्याच बोधाचा आधार घेतला पाहिजे. नाहीतर जत्रेत फसण्याचाच संभव फार. त्यासाठी जो अभ्यास आहे त्याचं भरपूर मार्गदर्शन संतसत्पुरुषांनी करून ठेवलं आहे. आपण त्यातलं थोडंथोडं वाचावं आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत राहावं. जे वाचलं ते आचरणात आणता येतं का, याचाही आढावा मनात घेत राहावं. त्यातूनच अनुभवांची प्राप्ती होत जाईल. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत की, संसारी माणसानं अ��ेमधे निर्जन जागी राहून साधना केली पाहिजे. आता निर्जन जागा कुठे शोधावी निर्जन म्हणजे जिथे माणसांचा सहवास कमी असेल आणि त्यांच्याविषयीचे विचारही मनात येण्यास कमी वाव असेल असे ठिकाण. आता आपण आजारी असलो आणि कामावरून दोन-तीन दिवस सुटी घेतली तरीही लोकांचा सहवास कितीतरी कमी होतो. आपल्याला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले तरी अनोळखी प्रांतात असल्याने लोकांच्या सहवास आणि संवादावर मर्यादा येतात. अशी संधी मिळाली तर तिचा आपण उपयोग करतो का निर्जन म्हणजे जिथे माणसांचा सहवास कमी असेल आणि त्यांच्याविषयीचे विचारही मनात येण्यास कमी वाव असेल असे ठिकाण. आता आपण आजारी असलो आणि कामावरून दोन-तीन दिवस सुटी घेतली तरीही लोकांचा सहवास कितीतरी कमी होतो. आपल्याला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले तरी अनोळखी प्रांतात असल्याने लोकांच्या सहवास आणि संवादावर मर्यादा येतात. अशी संधी मिळाली तर तिचा आपण उपयोग करतो का दिवसभरातही कितीतरी वेळ आपला असाच जातो. नोकरीनिमित्त जो प्रवास होतो, त्यातही कितीतरी वेळ मिळतो. त्या वेळात नामासारखी उपासना सहजशक्य असते. कार्यालयातही काही आपण क्षणोक्षणी कामात मग्न असतोच असं नाही. दिवसभरात अधेमधे उसंत मिळते तो क्षण आपण भगवंताच्या स्मरणाकडे वळविला तरी संत सांगतात की नामाच्या राशी पडतील दिवसभरातही कितीतरी वेळ आपला असाच जातो. नोकरीनिमित्त जो प्रवास होतो, त्यातही कितीतरी वेळ मिळतो. त्या वेळात नामासारखी उपासना सहजशक्य असते. कार्यालयातही काही आपण क्षणोक्षणी कामात मग्न असतोच असं नाही. दिवसभरात अधेमधे उसंत मिळते तो क्षण आपण भगवंताच्या स्मरणाकडे वळविला तरी संत सांगतात की नामाच्या राशी पडतील रामकृष्ण म्हणतात की लोणी काढून घेतलं आणि नंतर ते पाण्यात टाकलं तरी पाण्यात विरघळत नाही तर तरंगतं. तसंच संसारातून मन आधी काढून घेतलं आणि मग साधक संसारात कितीही वावरला तरी त्यात तो बुडत नाही, त्यातून तरंगत भगवंताच्याच विचारात क्षणोक्षणी राहातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nबिल्डरच्या हत्येचा कट फसला गुरु साटम गँगच्या पाच जणांना अटक\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T07:26:57Z", "digest": "sha1:6ZTPOBJCJMVVWH57CWYAECGUIF2PXSIY", "length": 15065, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करवसुलीच्या ठेक्यावर बागवान यांचा आक्षेप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकरवसुलीच्या ठेक्यावर बागवान यांचा आक्षेप\nबागवान यांच्या समयसुचकेतेने पालिकेला दोन कोटींचा फायदा\nमहाबळेश्वर, दि. 4 (प्रतिनिधी) – पलिकेच्या प्रवासी कर व प्रदुषण कर वसुलीचा ठेका प्रकरणात होत असलेल्या भ्रष्टाचारावर कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सलिम बागवान यांनी समय सुचकता दाखवुन वेळीच आक्षेप घेतल्याने पालिकेला सुमारे दोन कोटींचा फायदा झाला आहे. सलिम बागवान यांनी केलेल्या कामगिरीवर पालिकेतील सत्ताधारी गट कमालीचा नाराज असला तरी शहरातील सुज्ञ नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.\nपालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रवासीकर व प्रदूषणकर या विभागाचा महत्वाचा वाटा असतो. या दोन्ही कराची पालिकेच्यावतीने वसुली केली जाते. यासाठी पालिका तीन वर्षाच्या वसुलीसाठी खाजगी ठेकेदाराची नेमणुक करीत असते. यासाठी निविदा मागविल्या जातात. मागील वर्षी 3 कोटी 79 लाख 50 हजार रूपये देकार रक्कम निश्चित करून निविदा मागविल्या होत्या. तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. यापैकी जादा रक्कमेची निविदा मंजुर करण्याऐवजी पालिकेने तांत्रिक चुका काढुन देकार रक्कमेपेक्षा कमी दराची निविदा मंजुर केली. पालिकेने कायदा धाब्यावर बसवून व कायद्याची चौकट मोडुन घेतलेल्या या निर्णयामुळे पालिकेला साधारण सव्वा कोटी रूपयांचे नुकसान होणार होते. एकीकडे केलेल्या ठरावाप्रमाणे 9 फेब्रुवारी 2017 रोजी ठेकेदाराच्या ताब्यात नाके देण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू करताच सलिम बागवान यांनी या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेवुन ठेकेदाराच्या ताब्यात नाका देण्यास पालिकेला मनाई केली. खाजगी ठेकेदाराच्या ताब्यात देण्यापूर्वी केवळ दोन तास जिल्हाधिकारी यांनी मनाई केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. पुढील तीन महिने जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली व पालिकेने नियम डावलुन केलेला ठराव अखेर 308 अन्वये रद्दबातल केला. जिल्हाधिकारी यांनी आपल्या निर्णयात पालिकेच्या गैरकारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. सत्ताधारी गटाला सहकार्य करणारे तत्कालिन मुख्याधिकारी यांच्यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलेच ताशेरे ओढल्याने पालिकेची अब्रुच चव्हाट्यावर आली होती. खाजगी ठेकेदाराने हे प्रकरण उच्च न्यायालयात नेले. परंतु, तेथेही जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम करण्यात आला व या प्रकरणी पुन्हा निविदा मागविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.\nकाही महिने पालिकेने या करांची वुसली केली. दरम्यान कर वसुलीसाठी पालिकेने पुन्हा निविदा मागविल्या यावेळी पालिकेने चार कोटी पेक्षा अधिक देकर रक्कम निश्चित केली होती. पूर्वी पालिकेने ज्या ठेकेदाराला हा ठेका देण्याचा निर्णय घेतला होता त्याच ठेकेदाराने पुन्हा निविदा भरली होती. यावेळी त्या ठेकेदाराने देकार रक्कमेपेक्षा अधिक रक्कम आपल्या निविदेमध्ये भरली होती. त्यामुळे पालिकेने याच ठेकेदारची निविदा पालिकेने मंजुर केली. पूर्वी पालिकेने हा ठेका 3 कोटी 41 लाखाची निविदा मान्य करून वसुली ठेका देण्याचे मान्य केले होते. परंतु, आता पालिकेला एका वर्षासाठी 4 कोटी पेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. याचा अर्थ पालिकेला पहिल्या वर्षासाठी 60 लाखांपेक्षा अधिक फायदा होणार आहे आणि पुढील दोन वर्षासाठी ठरविक टक्के वाढ गृहीत धरली तर तीन ��र्षात पालिकेला या ठेक्यामुळे सुमारे दोन कोटी रूपयांचा फायदा होणार आहे. सलिम बागवान यांनी वेळीच या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतल्याने आणि जिल्हाधिकारी यांनी देखील वेळीच या गैरकारभाराची गांभिर्याने दखल घेतल्याने पालिकेला दोन कोटींचा फायदा झाला आहे. या बाबत सलिम बागवान यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-03-25T08:16:51Z", "digest": "sha1:EN6NLYERWNNCOWNQ57H36SMGRBWZR6SY", "length": 10077, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजुरी यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराजुरी यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या\nअणे -जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात श्री खंडेराया भैरव��ाथ यात्रोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन केले होते. कुस्त्यांसाठी कोल्हापूर, नगर, पुणे, नाशिक अशा विविध जिल्ह्यातून नामांकित मल्ल आले होते. या वर्षीची चांदीची गदा गत वर्षाचा विजेता मल्ल दत्ता जगदाळे वासुंदे (ता. पारनेर) याने पटकावली.\nसध्याच्या काळात व्यसनाधीनते कडे चाललेल्या तरुणांना कुस्त्यांची आवड लागली पाहिजे, या उद्देशाने या कुस्त्यांचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, लहान मोठे मल्ल, ग्रामस्थ व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nबारामती नगरपरिषद उपनराध्यक्षपदासाठी “फिल्डिंग’ ; अजित पवारांकडे इच्छुकांच्या येरझाऱ्या\nयुती, आघाडी तर झाली; पण जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा\nतब्बल १५ तासांच्या प्रयत्नांनंतर बोअरवेलमधील चिमुरड्याला बाहेर काढण्यात यश\nआंबेगावमध्ये 200 फूट बोअरवेलमध्ये चिमुरडा पडला\nशिरूर लोकसभा मतदार संघ भाजपनेच लढवण्याची मागणी \nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nप्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार : गिरीश बापट\n“दृकश्राव्य अध्ययन अधिक काळ टिकते’\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialNovember2017.html", "date_download": "2019-03-25T08:28:07Z", "digest": "sha1:7OXFUQQ5BGGHDUO7PHCSKDONT736BGM2", "length": 20780, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - खरीप गेला तरी रब्बी व उन्हाळी हंगाम तारेल !", "raw_content": "\nखरीप गेला तरी रब्बी व उन्हाळी हंगाम तारेल \nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nयंदाचे वर्षे २०१७ - १८ चा हंगाम हा वैविध्यपुर्ण पाऊसामानाच्या पडझडीचा व कमी - जास्त उघडीपीचा गेला. सुरुवातीच्या काळामध्ये विदर्भ, मराठवाडा विशेषता अकोला, बीड, उस्मानाबादचा भाग श्रावणी पोळ्यापर्यंत कोरडा गेला. परंतु उर्वरीत पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे याठिकाणी पाऊस हा बऱ्यापैकी व वेळेवर पडला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोकणातील सुरुवातीचे खरीप भात लागवडीच्या वेळी पाऊस पडला त्याने भात पीक चांगले आले परंतु पालघर जिल्ह्यात भात काढणीच्या वेळेस जो पाऊस पडला त्याने कापलेले भात कापलेल्या अवस्थेत जागीच उगवण झाल्याने सारे भात वाया गेले. अशा प्रकारे नुसत्या पालघर जिल्ह्यात ७६ हजार एकर भात पुर्ण वाया गेले. देशातील उत्तरेकडील अर्ध्या भारतातील खरीप हंगाम हा अति पावसाने जवळ जवळ नामशेष झाला आहे. काही भागातील तुरळक भाग राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचा पुर्व व काही भाग याठिकाणी पाऊसमान कमी असते. पुर्ण उत्तर भारतापर्यंत म्हणजे राजस्थानच्या सिमेपासून ते थेट बिहार - बंगालच्या सिमेपर्यंत पावसाचे थैमान हे विद्द्ध्वंसक असते. ईशान्य भारतातील ६ ही राज्य येथे बाराही महिने पूर असतो. येथे पाऊसच इतका असतो की खरीप, रब्बी, उन्हाळी अशा मोसमांची वर्गवारीच करता येत नाही. येथील मुख्य पीक भात आहे. बिहार, बंगालमध्येही भात हेच मुख्य पीक ���सते. उत्तर भारतातील परिस्थिती ही भात पिकास अनुकूल होती. त्यामुळे येथील भाताचे उत्पादन यंदा वाढेल. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथेही पाऊसमान चांगले होते. तेथे धान पिके, सोयाबीन, कडधान्य यांचे उत्पादन बऱ्यापैकी यावे. पण तिच गोष्ट विदर्भाच्या पुर्वेकडील भाग येथे पावसाने ताण दिल्याने घान पिके, तेलबिया, कडधान्ये यांचे उत्पादन कमी प्रमाणात येईल. विदर्भाच्या काही भातात पावसाची सुरुवात उशीरा झाली. काही ठिकाणी वेळेवर पडला तेथे कमी प्रमाणात पडला. ज्यांनी कापसाच्या लागवडी केल्या त्यातील ज्यांना पाणी उपलब्ध होते तेथे संरक्षित पाणी देऊन कापसाचे पीक चांगले आले. पण बहुतांशी कापसाचे पीक म्हणावे तसे येणार नाही व रोगराईमुळे फरदड समाधानकारक घेता येणार नाही.\nमा. वसंतराव नाईक हे मुखमंत्री असताना CSH -१, ५, ६ ह्या ज्वारीच्या संकरीत जाती घेतल्या जात असत. याचे उत्पन्न चांगले होते. या जाती कमी दिवसाच्या होत्या पण याचे पोषणमुल्य कमी होते. याचा चारही कमी दर्जाचा निकृष्ट असे. पण त्या अगोदर ऐसपुरी, दगडी, गुडघी, मालदांडी -३५ , सांगलीची शेणोली - ४ ह्या ज्वारीच्या जाती गावरान, टपोरे दाणे असलेले व भरपूर उत्पादन देणाऱ्या होत्या. ही ज्वारी खाण्यास अतिशय रुचकर, पचणारी होती. ह्या ज्वारीच्या जाती पावसाच्या थोडया पाण्यावर, मध्यम काळ्या ते भारी कसदार मगदुराच्या जमिनीवर रासायनिक खताची वाट न पाहणाऱ्या, किड, रोगास बळी न पडणाऱ्या, केवळ घराच्या शेणखतावर धान्याचे भरघोस उत्पादन तर देत होत्याच, शिवाय याचा कडवा ८ फुट उंचीचे ताट येऊन यामध्ये प्रत्येक पेऱ्याला खालपासून शेंड्यापर्यंत जाड, रूंद पानांचा, हिरवागार कसदार चारा दुभत्या व काम करणाऱ्या जनावरांना फार आवडत असे. या ज्वारीचे ताट (धांडा) जरी जाड असला तरी तो गोड असल्याने वाळल्यानंतर कामाची व दुभती जनावरे त्याकाळी कडबा कुटी मशीन नव्हती तरी कुऱ्हाडीने ९ ते १० इंचाचे तुकडे करून जनावरे आवडीने खात असत. याच्या १२ ते १५ - २० ताटांची पेंढी बांधली जात. ही पेंढी वनदार असे. ती एका जनावराला २ ते ३ वेळा पुरत. ही पेंढी संकरीत ज्वारीच्या ३ ते ४ पट असे. त्यामुळे ही ज्वारी त्याकाळी घरटी होत असे आणि त्यामुळे जनावरांना पोषक चारा मिळून पशुधन तंदुरुस्त राहत असे. दुष्काळाची छाया त्या काली सहसा नव्हती. हे वाण त्याकाळातील अनुकूल - प्रतिकूल हवामाना��ा पिके तरुन जात असत. हा या वाणाचा खास गुण होता. हीच गत जरीला व बोरीला कापसाची होती. ह्या देशी वाणांच्या जाती ह्या कमी खर्च व मध्यम उत्पादन आणि धोका जवळजवळ नाहीच अशा होत्या. त्याविरोधात पुढे आलेल्या संकरित व बीटी जाती ह्या जाहिरातबाजी व अधिक उत्पादन देतात या नावाखाली त्यांच्यावरील उत्पादन खर्च हा विशषेकरून किड - रोगाचा प्रभाव जास्त असल्याने त्यावर अधिक विषारी औषधे फवारून धोका निर्माण होऊन अजुनही म्हणावे तसे उत्पादन मिळत नाही. याचे कारण म्हणजे एकतर भारतातील हवामान हे या जातील ओळखू शकले नाही किंवा या जाती भारतातील हवामानाला कळल्या नाहीत आणि कदाचीत शोध लावणाऱ्यांनी ह्या जाती भारतातील हवामानाला कितपत रुजु शकतील हे प्रश्नचिन्ह आजही मनात तसेच आहे. म्हणून मोठे उत्पन्न येण्याच्या आशेवर शेतकरीवर्ग भरमसाठ खर्च करून किड - रोगाचा धोका त्याच्या जिवाशी जिवनमरणाचा खेळ खेळत आहे.\nसंकरीत वाणाच्या मागे लागल्यामुळे किंवा त्याचे आंधळ्यापणाने अनुकरण केल्याने शेतकरी कुंटुंबाची आर्थिक, मानसिक, सामाजिक व्यवस्था ही जवळजवळ जळवांनी रक्त प्यावे इतकी बिघडली आहे. ती गंभीर अवस्थेत असून समाजाची अवस्था ही अनाथासारखी झाली आहे. खरीपातील कडधान्याची परिस्थिती ही महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणाची, महाराष्ट्रापेक्षा वेगळी नाही. मागच्या वर्षी उडीद, मूग, सुर्यफुल, तूर, सोयाबीन याचे उत्पादन चांगले आले. त्यामानाने यावर्षी जुलै ते १९ ऑगस्टपर्यंत पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरण्या वाया गेल्या. त्यामुळे अर्धा भाग कोरडा आणि १९ ऑगस्टपासून आलेला मोसमी पाऊस हा अजूनपर्यंत म्हणजे जवळजवळ १ ते २ महिने कोसळतोच आहे. तेथे या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. उडीद, तुरीसारख्या काटक पिकास १९ ऑगस्टच्या पावसाने आधार दिला परंतु मूग, सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे त्याचे उत्पादनात वाढ होण्यापेक्षा तूटच संभवते. तसेच १९ ऑगस्टतरच्या सततच्या पावसाने तूर, उडीदाचेही उत्पादन चांगले येईल का ते २ महिने कोसळतोच आहे. तेथे या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. उडीद, तुरीसारख्या काटक पिकास १९ ऑगस्टच्या पावसाने आधार दिला परंतु मूग, सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे त्याचे उत्पादनात वाढ होण्यापेक्षा तूटच संभवते. तसेच १९ ऑगस्टतरच्या सततच्या पावसाने तूर, उडीदाचेही उत्पादन चांगले येईल का याबद्दल शंकाच आहे. अशा रितीने भारतातील सुरुवातीचा अर्धा खरीप हा पाऊस न आल्याने वाया गेला तर उरलेला खरीप अधिक पावसाने नामशेष झाला.\nदुःखात सुख एवढेच आहे की, या पावसाने चाऱ्याचे उत्पादन भरपूर होऊन पशुधनाची परिस्थिती वर्षभर चांगली राहील आणि दुधाचे उत्पादन व प्रक्रिया पदार्थांचे उत्पादन वाढेल. तसेच दूध व दुधाचे पदार्थ कसदार होतील. छावण्या किंवा विकतचा चारा घेण्याचा प्रसंग शेतकऱ्यावर येणार नाही.\nदेशातील धरणे २ - ३ वेळा भरून त्याचा विसर्ग सोडण्यात आला. महाराष्ट्रातील १००% धरणे १००% भरली. उजनी, जायकवाडी ही धरणे जी बरीच वर्षे कधीच भरत नसत ती धरणे सुदैवाने पुर्ण भरली. ही अवस्था १५ ऑक्टोबरची आहे.\nप्रत्यक्षात रब्बी हा कोरडवाहू भागात १५ सप्टेंबरपासून सुरू होतो व माध्यम काळ्या, भारी जमिनीत हा रब्बी थोडा उशीरा १ ते १५ ऑक्टोबरला जरी सुरू झाला तरी आस्मानीचा जसे अकाली पाऊस, पूर, गारांचा पाऊस, चक्री वादळे याचा तडाखा जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत बसला नाही तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, मोहरी, जवस, रब्बी बटाटा, कांदा, ज्वारी (दादर, शाळू), तुरीचा खोडवा ही पीके यशस्वी होतील. ज्या राज्यामध्ये धान, विदर्भातील नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर, गोंदिया येथे खरिपाचे धान गेले पण रब्बीचे काय होते ते कळेल. बिहार, महाराष्ट्रात बटाटा चांगला येऊ शकतो. ढगाळ वातावरणाने आणि प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर भुरी व डावणी तसेच डाळींबावर तेल्या रोगाची शक्यता वाढली आहे. तेव्हा आम्ही सुचविलेले डाळींबासाठी १४ x १४ फुट किंवा १५ x १५ फुट हेच अंतर ठेवावे. पुढील अवस्थेत द्राक्षावर घेतलेल्या फवारण्या, लिंबाचा हस्त बहार, डाळींबाचा आंबे बहार यास वातावरण अनुकूल आहे.\nलिंबाच्या हस्तबहारासाठी ऑक्टोबरमध्ये कल्पतरू देऊन ज्यांनी जर्मिनेटर व कॉपर-ऑक्सीक्लोराईडचे आळवणी केले त्यांचे लिंबास फुलकळी निघण्यास अनुकूल आहे. फुल लागल्यानंतर जर हस्ताचा विजांच्या कडकडाटांचा पाऊस झाला तर फुलगळ व गुंडीगळ होते. त्यामुळे उन्हाळी बहार येत नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदाच्या वर्षी संत्रा, मोसंबीचा आंबिया बहार चांगला घेता येईल.\nयंदाचा खरीप हा ७० ते ८० % जरी गेला तरी खरिपाचे भाव व्यापाऱ्यांनी पाडू नयेत व अधिक तेजीची करू नये. म्हणजे टोमॅटोसारखीही स्थिती करू नये. कारण टोमॅटो हा कांद्याच्या रांगेत जाऊन बसेल. सर्व रब्बी भाजीपाला, धान्यपिके, गळीतधान्य, कडधान्य, फुल व फळपिके यांच्या नुसत्या आशा पल्लवीत न होता फलद्रुप होतील. विहिरींना पाणी वाढेल. नद्या, नाले, ओढे, धरणे यांना प्रत्येक्षात २२ जून २०१८ पर्यंत चिंता करण्याचे कारण नाही असे वाटते. म्हणून असे म्हणतात की, कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ हा परवडला, कारण पशुधन व ग्रामीण जनतेच्या पाण्याचा, अस्तित्वाचा, रोजगाराचा, अकाली व मानव निर्मित संकटाशी झगडण्याचा प्रसंग ओल्या दुष्काळाने येत नाही. परंतु त्यापुढे जाऊन आम्ही असे सुचवितो की, अशी अभुतपुर्व पावसाची परिस्थिती व मोसमी पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू भागातील जनतेवर अशी अनुकूल अवस्था सहसा आली नाही. तेव्हा नंतरच्या सततच्या पावसाने धरणे, तलाव, शेततळे गच्च भरल्याने सर्व फळपिकांना, रब्बी, उन्हाळी पिकांना आवश्यक तेवढे पाणी देता येईल व खरीप वाया गेल्याची भर रब्बी व उन्हाळी हंगामात चतुराईने भरून काढता येईल. तेव्हा त्याचा फायदा सर्वांनी करून घ्यावा आणि आपले उत्पादन व उत्पन्नाची सांगड घालावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/amruta-khanvilkar-instagram/", "date_download": "2019-03-25T08:34:45Z", "digest": "sha1:5DMGD2XXDHMI4IRM3FBQNCX6TDMNDETZ", "length": 1851, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": "amruta khanvilkar instagram - मराठी कलाकार", "raw_content": "\nख्रिसमस विशेष: स्पेशल चाईल्डस सोबत केला अमृताने ख्रिसमस सेलिब्रेट.पहा फोटोज.\nएखादा सण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करून सेलिब्रेट केला तर काहीसा अविस्मरणीय होऊन जातो नाही का\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/defeat-the-power-of-fanatic-forces/", "date_download": "2019-03-25T08:07:02Z", "digest": "sha1:RWYVJIVCS5GF4HHYGI7ZWZ35KAYCPFMR", "length": 6521, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शांतता व संयम राखून समाजविघातक, धर्मांध शक्तींचा कुटील डाव हाणून पाडाः खा. अशोक चव्हाण", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिक��प्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nशांतता व संयम राखून समाजविघातक, धर्मांध शक्तींचा कुटील डाव हाणून पाडाः खा. अशोक चव्हाण\nमुंबई- औरंगाबाद शहरातील हिंसाचाराची घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करित आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक,धर्मांध शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.\nकाही समाजकंटकांनी औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून हिंसाचार घडवला आहे. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. दंगेखोरांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. जाळपोळीत 100 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली असून कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. रात्रभर समाजकंटक हैदोस घालत असताना पोलीस काय करत होते इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होईपर्यंत पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होईपर्यंत पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केली नाही सरकारचा दंगेखोरांना पाठिंबा आहे का सरकारचा दंगेखोरांना पाठिंबा आहे का असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.\nराजकीय फायद्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करित आहेत, हे गेल्या काही दिवसातील घटनांमधून स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की अशा घटना घडतात हे दिसून आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता व संयम राखून या समाजविघातक धर्मांध शक्तींचे मनसुबे उधळून लावावेत असे आवाहन औरंगाबादच्या नागरिकांना करून सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nद���ीगाव उपसा सिंचनच्या पाण्यात विरोधक जाणार वाहून \nराजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का : खा. अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/maggi-vari-news-for-solpaur/", "date_download": "2019-03-25T08:07:57Z", "digest": "sha1:YH32PDCCZQW6C4OQULFYYZYJOJ5JKB5Y", "length": 7589, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंढरीत चार लाख भाविकांची मांदियाळी", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nपंढरीत चार लाख भाविकांची मांदियाळी\nसोलापूर : माघी एकादशीनिमित्त पंढरीत सुमारे चार लाख भाविकांनी हरिनामाचा गजर करीत उपस्थिती लावली. राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या भाविकांनी पदस्पर्श व मुखदर्शन घेतले. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे पंढरीनगरी दुमदुमली आहे. यंदा माघी यात्रेला लक्षणीय गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.वर्षातील चार प्रमुख यात्रांपैकी माघी यात्रा एक मानली जाते.\nमाघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याहस्ते, तर रुक्मिणीची महापूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यात्रेकरिता राज्याच्या कानाकोपर्यातून तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.\nचंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. नदीपात्रात मुबलक वाहते पाणी असल्याने भाविक स्नान करून मुखदर्शन, त्याचबरोबर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी जात होते.चंद्रभागेत स्नान, नगर प्रदक्षिणा, मुखदर्शन, मंदिराचे कळस दर्शन करून भाविक परत जात होते. दर्शन रांगेतही सुमारे 70 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली होती.\nचंद्रभागेच्या पैलतीरावर 65 एकर येथे लहान-मोठ्या दिंड्या, पालख्या यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. तंबू, राहुट्यांतूनही हरिनामाचा गजर सुरू असून प्रत्येक भाविक भजन, कीर्तन व प्रवचन रंगले आहे. मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.\nचोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 74 सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यांची नजर असल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत सुरू आहे. दर्शन रांग रविवारी सकाळी पत्राशेडपर्यंत झाली होती. दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासामठी 10 ते 12 तासांचा कालावधी लागत आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nसातत्यपूर्ण यशासाठी अधिक मेहनत घ्या- अजित पवार\nरिक्षात विसरलेले १० तोळे दागिने परत मिळाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/updated-hardik-patel-criticises-bjp-congress/", "date_download": "2019-03-25T08:09:41Z", "digest": "sha1:BRRVUIC6VEGHNKHL3G5O3K42BTEQFFCT", "length": 5331, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप आणि कॉंग्रेस एका माळेचे मणी- हार्दिक पटेल", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nभाजप आणि कॉंग्रेस एका माळेचे मणी- हार्दिक पटेल\nटीम महाराष्ट्र देशा – भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच असल्याची टीका काल हार्दिक पटेलने केली आहे. तो अहमदाबाद जिल्ह्यात एका सभेत बोलत होता.’तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे. 4-5 जागांसाठी शहीद झालेल्या पाटीदार बांधवांना आपण विसरलं नाही पाहिजे असं ही त्याने सांगितलं.\nतसंच इतके दिवस काँग्रेसशी वाटाघाटी करणार हार्दिक पटेल आता क��णाचं तिकीट नकोच, असा दावा करतोय. ‘मला कुणाचंही तिकीट नको. मला फक्त पाटीदार समाजाचं भलं हवं आहे’ असंही हार्दिकने यावेळी स्पष्ट केलं.\nसध्या काँग्रेस-हार्दिक पटेलमध्ये जागांवरून वाद सुरू आहे. अशी बातमी आली होती की हार्दिकला ११ जागा हव्या आहेत, तर राहुल गांधी फक्त ४ जागा देण्यास तयार आहेत.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nफडणवीस-अजित पवारांचा एकत्र हवाई प्रवास\nव्हिडीओ: आरोपींनी केलेली याचना मोठी की त्यांनी केलेले दुष्कृत्य मोठे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/would-have-kept-bjp-away-from-power-hardik-patel/", "date_download": "2019-03-25T08:03:40Z", "digest": "sha1:7PNKI5POVZSKACEB2BTJBVBTQQIVHAME", "length": 5595, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असते- हार्दिक पटेल", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\n…तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असते- हार्दिक पटेल\nमुंबई: गुजरात निवडणुकीपूर्वी मी राहुल गांधीची भेट घ्यायला पहिजे होती. जर ती भेट झाली असती, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असते. तसेच, गुजरातमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असते, असे पाटीदार नेता हार्दिक पटेल याने स्पष्ट केले. तो इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होता.\nहार्दिक पटेल म्हणाला, जर मी ममता बँनर्जी, नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीरपणे भेटू शकतो. तर राहुल गांधीची भेट घेण्यात मला काहीही अडचण नव्हती. पण मी ती भेट टाळली. राहुल गांधींची भेट टाळणं ही सर्वात मोठी चूक होती. तसेच जर ती भेट झाली असती तर भाजपला ९९ ऐवजी ७९ जागांवरच समाधान मानावे लागले असते.\nमोदींवर टीका करत हार्दिक पटेल म्हणाला, २०१४ च्या लोकसभा निवडणुकी�� भाजपने नरेंद्र मोदींचं नाव जाहीर केले, त्यावेळी आम्हाला वाटलं की, या देशातील तरुणांना रोजगार मिळेल. या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हामीभाव मिळेल. पण त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nशेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन\nउपोषणामुळे मी मरणार नाही आणि मला मरू देण्याची हिंम्मत सरकारमध्ये नाही – अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/terror-in-usmanabad-dr-padamsinh-patil-1049432/", "date_download": "2019-03-25T08:13:39Z", "digest": "sha1:HVUZQNLM2XIQYY6JEWG4VBXX4VVCEPBM", "length": 50154, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उस्मानाबादेतील भयपर्व | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nदिवाळी अंक २०१४ »\nडॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या...\nडॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदीलाटेत शेवटी ती भुईसपाट झाली. सरंजामशाही पद्धतीने या भागावर सत्ता गाजविणाऱ्या पद्मसिंह पाटलांनी आपल्या सत्तेच्या दहशतीची प्रतीकं खुबीने वापरत निरंकुश सत्ता उपभोगली.\nत्या दिवशी काही गुढीपाडवा नव्हता, तरीही ‘गुढी उभारा’ असे आदेश आले होते. कार्यकर्त्यांनी चौकात रांगोळ्या काढल्या. प्रत्येकाने ‘त्यांच्या’ जंगी स्वागतासाठी पुष्पहार आणलेला होता. दुपारपासून त्यांच्या आगमनाची तयारी सुरू होती. चुलतभावाच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेने ‘त्या’ नेत्याला अटक केली होती. न्यायालयाने जामीन दिल्यानं ते आता गावात परत येणार होते. गावातली स्वागताची ही जय्यत तयारी त्याकरताच होती. लांबून येणारी आपल्या नेत्याची गाडी कार्यकर्त्यांनी पाहिली आणि नेहमीची कडकडीत घोषणा दिली.. ‘डॉक्टर ऽऽऽ पद्मसिंह पाटलांचा..’\nया माणसाची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी जाणीवपूर्वक ती घडवलेली. देहबोलीदेखील तशीच. बलदंड बाहू, करारी नजर. किंचितशी छाती पुढे. नजर न झुकणारी. चालण्याचा झपाटा एवढा, की सोबत चालणाऱ्या माणसाची दमछाक नक्की ठरलेली. कार्यकर्त्यांची बठक घ्यायला जमिनीवर बसले तरी वज्रासन घालण्याची सवय. कमावलेलं शरीर. आपल्या मनाचा थांगपत्ता चेहऱ्यावर दिसू नये, यासाठीचं अंगभूत असलेलं कौशल्य.\nमुंबईच्या महालक्ष्मी परिसरात त्यांचा ‘रॉयल स्टोन’ नावाचा मोठा शाही बंगला आहे. काहीसा त्याच पद्धतीचा एक बंगला नंतर उस्मानाबादेत त्यांनी बांधला. या शाही बंगल्यासमोरच्या पोर्चमध्ये चारचाकी गाडीबरोबर एक बुलेटही ऐटीत उभी असते. तिचा उपयोग फक्त ‘डॉक्टर’ करतात. डॉक्टर म्हणजे पद्मसिंह पाटील विधानसभा वा लोकसभा निवडणूक लागली, की डॉक्टरांची बुलेटफेरी शहरभर निघते. फेरीत सहभागी त्यांचे उत्साही कार्यकत्रे मोठमोठय़ानं हॉर्न वाजवीत फिरतात. तेव्हा समोरून कुणी रस्तादेखील ओलांडत नाही. डॉक्टरांच्या भोवती कार्यकर्त्यांचा अक्षरश: गराडा असतो. पक्षाचे झेंडा मिरवणारे कार्यकर्ते सतत घोषणा देत असतात.\nअशाच एका निवडणुकीपूर्वी एका बुलेटफेरीत डॉक्टरांसमवेत मनोगत शिनगारे नावाचा कार्यकर्ता होता. हा तोच- ज्याने पवन राजे िनबाळकरांच्या हत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या मोर्चावर दगडफेक केली होती. दगडफेक करणारा कार्यकर्ता मागे आणि डॉक्टर पुढे अशी शहरभर फेरी निघते. पद्मसिंह पाटील यांच्या राजकारणाचे मनोविश्लेषण या बुलेटफेरीत दडलेले आहे. शिनगारे हा डॉ. पाटील यांचा अलीकडच्या काळातील कार्यकर्ता. पण अशा कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे फौजच्या फौज आहे. त्यामुळे राजकीय पटावर डॉक्टरांना चितपट करताना विलासराव देशमुखांसारख्या कसलेल्या राजकारणी व्यक्तीचीही मोठी पंचाईत व्हायची. अगदी एकमेकांना इरसाल शिव्या देण्यापासून ते कार्यकत्रे पळविण्यापर्यंत नाना उद्योग पद्धतशीरपणे करणे म्हणजेच राजकारण- अशी धारणा व्हावी; किंबहुना तशीच राजकारणाची व्याख्या बनावी अशी इथे गत असल्याने उस्मानाबादकर या वातावरणाला आता सराईत झाले आहेत.\n‘वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या पांढऱ्याशुभ्र घोडय़ावर मांड ठोकलेले पद्मसिंह पाटील’ हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे आवडते चित्र. ज्यांच्या दारात सदासर्वकाळ गाडय़ांचा ताफा उभा असतो. त्यांनी घोडय़ावर मारलेली हे रपेट नक्की काय सांगून जाते अर्थात अशी घोडय़ावरून रपेट मारणारे ते एकमेव नेते नाहीत, हे मान्य; पण अशा बहुतांश नेत्यांची मानसिकता एकसारखीच असते. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ अमावस्या नावाचा सण साजरा होतो. या दिवशी सगळेजण शेतात जेवायला जातात. नेमकी याच दिवशी डॉक्टरांनी गावातून घोडय़ावरून रपेट मारली. या भागातील सत्ता माझ्याकडेच आहे, याचा तो संदेश होता. त्यांच्या समर्थकांना त्याचं एवढं कौतुक, की नंतर ती छायाचित्रे चौका-चौकांत लावली गेली. तेव्हा त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आले होते. मतदार मोठे हुशार असतात. त्यांना प्रतीकांचे अर्थ लवकर समजतात. बुलेट व घोडा ही प्रतीके सत्तेचा परीघ अधिक गडद करणारी आहेत, हे नक्की.\n२००४ ची विधानसभेची निवडणूक होती. मतदानाचा दिवस उजाडला. त्या दिवशी गावातल्या प्रत्येकाच्या घरात ‘जनप्रवास’ दैनिकाचा अंक फुकट टाकण्यात आला होता. गावोगावी वर्तमानपत्राचे गठ्ठे पोहोचलले. त्यात एक बातमी होती : ‘डॉ. पद्मसिंह पाटील यांना पवन राजे िनबाळकरांचा पािठबा..’ शीर्षकासमोर मात्र प्रश्नचिन्ह होते. गावागावात मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला. सकाळच्या पहिल्या टप्प्यात डॉ. पाटील तेर येथे मतदान करण्यासाठी आलेले. सकाळीच त्यांना बातमीदारांनी गाठले तेव्हा त्यांनी असे काही झाल्याचे आपणास माहीत नसल्याचे सांगितले. पुन्हा त्यांना कोणी या प्रकरणी काही विचारले नाही. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना पहिल्यांदाच पवन राजे िनबाळकर यांनी आव्हान दिले होते. या बातमीने त्यांच्या गोटात अस्वस्थता होती. सकाळी आठ वाजता ते गावोगावी जाऊन खुलासा करीत होते. त्यांचे कार्यकत्रे बसवर, ऑटोरिक्षांच्या काचांवर खडूने मजकूर लिहिण्यासाठी धावले.. ‘पद्मसिंह पाटील यांना पािठबा दिलेला नाही, रेल्वे इंजिन चिन्हालाच मत द्या.’ रेल्वे इंजिन हे पवन राजे िनबाळकरांचे निवडणूक चिन्ह होते. त्या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील केवळ ���८४ मतांनी विजयी झाले.\nहा प्रसंग घडला तेव्हा ‘पेड न्यूज’ हा शब्दही नव्हता. बातम्यांमुळे निवडणुकांचे निकाल बदलतात, हे आयोगाला माहीत नव्हते असे मात्र नाही. पण त्यावर अंकुश ठेवण्याची वा त्यासंबंधीच्या नियमांत बदल करण्याची तेव्हा कुणाचीच इच्छा नव्हती. एका बातमीने मिळवलेला तो विजय ‘माध्यमांना आम्ही वाकवू शकतो,’ हे सांगण्यासाठी पुरेसा होता. याच घटनेचा पूर्वार्धही मोठा रोचक आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी विरोधी उमेदवार पसे वाटत असल्याने त्याच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची अफवा पसरविली गेली. क्षणात ती बातमी गावात सर्वत्र पसरली. गावात काहीतरी ‘गडबड’ झाल्याचे व्यापाऱ्यांना लगेचच कळले. काहींनी दुकाने बंद केली. वातावरणात तणाव निर्माण झाला. तोवर संबंधितांना जो संदेश द्यायचा होता तो मात्र देऊन झाला होता.\nअशा दहशतवादी क्लृप्त्यांनी समूहाची मानसिकता घडविण्याचे, किंवा ती बदलविण्याचे असे अनेक हातखंडा प्रयोग उस्मानाबादच्या मतदारांवर नेहमी केले गेले.. आजही केले जातात. कधी ते मतदारांना कळतात, कधी कळतदेखील नाहीत. आपली जरब बसविण्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरून मारामारीच केली पाहिजे असे नाही. निवडणुकांच्या राजकारणात नेमके हेच होत असे. मतदार सकाळी रांगेत उभा राहायचा तेव्हा हात जोडून उभा असलेला कार्यकर्ता ओळखीचे हसू ओठी आणायचा. त्यामुळे घडलेले प्रकार मनाच्या सांदीकोपऱ्यात ढकलून शांततेत मतदान होत असे. त्यामुळे प्रशासनही, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असा अहवाल द्यायला मोकळे होत असे. एखाद्या वेगवान चित्रपटातील घटना-प्रसंगांचा पट जसा वेगाने डोळ्यांसमोर बदलत जातो, तसे दिवस उस्मानाबादकरांनी आजवर अनुभवले आहेत. त्याचे भय कधी कोणाच्या नजरेत दिसले नाही, कारण प्रत्येकाला आपली बाजू निवडणे अपरिहार्यच होते.\nपद्मसिंहांचे वक्तृत्व तसे जेमतेमच. सभा गाजविण्यासाठी रेटून खोटे बोलणे, असले कृत्य त्यांनी कधी केले नाही. सिंचनमंत्री असताना आपण कसे व किती कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले, कशी विकासकामे मार्गी लावली, याची ते देत असलेली ठराविक जंत्री बातम्या लिहिणाऱ्यांना एकेकाळी तोंडपाठ होती. भारत गजेंद्रगडकरांसारखा एखादा पत्रकार वगळता त्यांच्या भाषणाविषयी आणि कृतीविषयी फारसे कुणी टीकात्म लिखाणही कधी केले नाही. त्यामुळे ‘���ागील पानावरून पुढे’ असा उस्मानाबादचा विकास पुढे पुढे जात राहिला. अलीकडे तर रस्त्यावर सिग्नलसुद्धा बसविले गेले आहेत. त्याचे उस्मानाबादकरांना कोण कौतुक ‘कपडे घ्यायला सोलापूरला नि शिक्षणासाठी लातूरला’ ही मनोवृत्ती इथल्या लोकांच्या अंगवळणी पडलेली असल्याने त्यांच्यात निवांतपणा तसा ठासून भरलेला. त्यामुळे विरोध केला तरी एखाद्या पत्रकावर भागून न्यायचं, असंच त्यांच्या विरोधकांचं राजकारण असे.\nपद्मसिंहांच्या विरोधात कुणी उभे राहणे तसे अवघडच. या माणसाचे प्रचार करण्याचे तंत्रही निराळे. कार्यकर्त्यांना जवळ करण्याची तऱ्हाही न्यारी. त्यांच्या भाषेत उद्दामपणा अजिबात नसतो. विशेषत: सरकारी अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी कधी वावगा शब्द वापरल्याचे ऐकिवात नाही. परंतु त्यांची प्रतिमाच अशी, की अधिकाऱ्यांना सांगितलेले काम त्यांना नाही म्हणता येत नसे. चोकिलगम् यांच्यासारख्या एखाद्या अधिकाऱ्याचे नाव अजूनही घेतले जाते. पण पद्मसिंहांच्या प्रतिमेचा हा खेळ पद्धतशीरपणे जोपासला गेला. पद्मसिंह पाटील यांचे अनेक किस्से आजही गावोगावी चच्रेत असतात. त्यांच्या मोठेपणाचे कौतुक करताना त्यात आदर, प्रेम, दयाबुद्धी, कणव आणि औदार्य या भावना तशा कमीच असतात. शौर्य, पराक्रम असल्या शब्दांतच त्यांची स्तुती अधिक होते.\nकाही वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांना ऊस न देण्याचे आंदोलन छेडले होते. त्यावेळी त्याविरोधात डॉक्टर उभे राहिले. म्हणजे काय केले असेल तर ऊसाच्या ट्रकच्या पुढे डॉक्टर दुचाकीवरून निघाले. त्यामुळे कोणी दगड मारला नाही की कोणी आंदोलन केले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील छगन भुजबळांच्या प्रवेशाचा किस्साही रंगवून सांगितला जातो. तेव्हा शिवसेनेशी द्रोह म्हणजे राष्ट्रद्रोहच असे मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग अस्तित्वात होता. गद्दार ठरवून भुजबळांवर हल्ला होईल, हे गृहीत धरून त्यांची व्यवस्था पद्मसिंह पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. यावरूनच त्यांच्या बाहुबलाची कल्पना यावी.\nपवन राजे िनबाळकरांच्या हत्येच्या आरोपाखाली सीबीआयच्या अटकेत असताना डॉक्टर इअरफोन लावून जॉिगग करतानाचे छायाचित्र त्यांची मानसिकता दर्शविणारे आहे. पद्मसिंहांना राग आल्यावर ते उजव्या हाताची मूठ डाव्या तळहातावर व डाव्या हाताची मूठ उजव्या हाताव�� आपटतात, हे उस्मानाबादकरांना माहीत आहे. एखाद्याकडे ते जर टक लावून पाहू लागले तर दुसऱ्या एखाद्याने त्यांची नजर बाजूला वळवेपर्यंत ते तसेच रोखून पाहू शकतात. वेळप्रसंगी ते समोरच्याच्या अंगावर धावून जाऊ शकतात. अशा त्यांच्या अनेक सवयी सांगितल्या जातात. अगदी मतदान केंद्रातील मतमोजणीच्या दिवशी काढलेल्या ‘टिप्स’ अनेकांनी पाहिल्या आहेत. संदेश देण्यासाठी शारीरिक ताकद किती व कशी वापरावी, हे ते आवर्जून कळवीत असत. ज्यांनी त्यांचे हे रूप प्रत्यक्ष पाहिलेले नाही, अशांना बुलेट, घोडा ही प्रतीके पुरेशी ठरतात.\nप्रतीकांची भीती दूर करण्यासाठी कोणीतरी पाय रोवून उभे ठाकावे लागते. अशी धमक असणारी दोन माणसे : एक नानासाहेब पाटील व दुसरे केरबा गाढवेगुरुजी. गुरुजींचा अवतार म्हणजे शर्टाची कॉलर मानेवर विरलेली. पांढरी खुरटी दाढी वाढलेली. अधूनमधून ब्रिस्टॉलचा झुरका घेत हा माणूस तेरणा कारखान्याच्या कारभारातील त्रुटी, त्यासंबंधीची कागदपत्रे कापडी पिशवीतून काढायचा. त्यांच्या आधारे तक्रार करायचा. परिणामी तेरणा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला. तर नानासाहेब पाटील यांनी या लढय़ाला राजकीय व्यापकता दिली. लेख लिहून आणि निवडणुकांमध्ये प्रश्न विचारणाऱ्या या मंडळींच्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चाचपडायला होई. त्यांनी सहकार क्षेत्रातील चुकांवर अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित केले. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत, हे कबूल करणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे समर्थक आजही भेटतात.\nपवन राजे िनबाळकरांची हत्या झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना सहानुभूती मिळत गेली. त्यांनी केलेल्या व न केलेल्या कामांनाही सहानुभूतीची झालर आपसूकच मिळाली. याचा अर्थ त्यांचा कारभार चांगला होता असे नाही. पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय संघटनाची मूस त्यांच्या आक्रमक शैलीत असावी असे वाटणाऱ्यांमध्ये ते एक होते. तशी रचना लावून देताना त्या आक्रमकतेचा तेही एक भाग होते. या नात्यातील गुंता कसाही असला तरी त्याची धाटणी सारखीच होती. विशेष म्हणजे भयकारक होती, हे निश्चित.\nतेव्हा तेरणा कारखाना पूर्ण क्षमतेने चालू होता. राज्याच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांचा दबदबा होता. त्यांचा शब्द जवळपास अं��िम मानला जात असे. त्यांच्या विरोधात ब्र काढण्याची कोणाची िहमत नव्हती. याचा अर्थ त्यांचा कारभार स्वच्छ, पारदर्शी होता असे नाही. जिल्हा बँकेत नोकरभरतीत घोटाळा झाला होता. तत्कालीन आमदार महारूद्र मोटे यांच्या कारभारावरून जिल्ह्यात प्रश्न विचारले जात होते. ते पद्मसिंहांचे जवळचे नातलग. तुलनेने फटकळ समजले जाणारे त्यांचे दुसरे नातेवाईक जीवनराव गोरे जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आपली घट्ट पकड ठेवून होते. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे तेव्हा मोठे कौतुक होत होते. ऊर्जामंत्री आणि गृहमंत्री म्हणून पद्मसिंह पाटील कार्यरत असताना त्यांच्या नात्याबाहेरील व्यक्तीकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कधीच दिल्या गेल्या नव्हत्या. गावागावातून येणाऱ्या माणसांनी डॉक्टरांचे गुणगान तेवढे करावे, एवढेच त्यांच्या हाती. कोणाच्या घरात लग्न असो वा आजारपण- पसे देण्याची व्यवस्था असणारी यंत्रणा पवन राजे िनबाळकरांच्या हातात होती. परिणामी जिल्ह्यातील राजकारण नातलगांकडे आणि राज्याच्या राजकारणात मात्र डॉ. पद्मसिंह पाटील- असेच चित्र होते. जिल्ह्यातील विकासकामांच्या कोनशिला तपासल्यास याची प्रचीती येते. त्यातही मोजक्याच नातलग पदाधिकाऱ्यांची नावे दिसतील. जिल्ह्यातील अन्य नेत्यांनाही त्यात कधी स्थान नव्हते. डॉ. पद्मसिंह पाटील आणि विलासराव देशमुखांचे संबंध कायम ताणलेलेच होते. परंतु शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील सुशीलकुमार िशदं यांनाही कधी राजकीय कार्यक्रमास बोलवावे असे त्यांना वाटले नाही. एकहाती कारभार असतानाही पाटलांच्या काही नातलगांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेली. घरातील वाद पराकोटीला गेले. परिणामी उस्मानाबादच्या राजकारणातील भीतीपर्व आणखीनच वाढत गेले.\nडॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रतिमेला जबरदस्त तडा गेला तो कारगिल निधी प्रकरणात. कारगिल युद्धातील सनिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत सर्व साखर कारखान्यांनी मदत करण्याचे ठरवले होते. शेतकरी सभासदांकडून घेतलेली ही रक्कम कारखाना प्रशासनाने या निधीत भरली नाही. तेव्हापासून एकेक भानगडी बाहेर येऊ लागल्या. या प्रकरणी न्या. सावंत आयोग नेमला गेला. त्यासमोर साक्ष देणाऱ्या केरबा गाढवे आणि अन्य शेतकऱ्यांना धमक्या देण्यात आल्या. तशातच या आंदोलनात अण्णा हजारेही उतरले आणि डॉक्टरांच्या प्रतिमेस तडा जाऊ लागला. तेरणा कारखान्यात तेव्हा साखर निर्यात घोटाळा झाला होता. त्यातील प्रमुख आरोपी पवन राजे िनबाळकर हे होते. त्याचवेळी झालेल्या ३० कोटी रुपयांच्या होम ट्रेड घोटाळ्यातही तेच प्रमुख आरोपी होते. ज्या पद्मसिंहांसाठी पवन राजे िनबाळकर काम करायचे, ते पुढे त्यांच्यापासून वेगळे झाले. तेव्हा प्रश्न उपस्थित केला गेला की, पवन राजे िनबाळकर न विचारता एवढे मोठे निर्णय घेत असतील का याचे उत्तर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या समर्थकांना नीटपणे देता आले नाही. आजही या प्रश्नावर ते चाचपडतात. प्रश्न निर्णय चूक होते की बरोबर, हा नाही; तर कारभार करताना डॉक्टरांनी जवळ केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नंतर मोठय़ा गुन्ह्यात नाव आले, याचा अर्थ काय याचे उत्तर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या समर्थकांना नीटपणे देता आले नाही. आजही या प्रश्नावर ते चाचपडतात. प्रश्न निर्णय चूक होते की बरोबर, हा नाही; तर कारभार करताना डॉक्टरांनी जवळ केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नंतर मोठय़ा गुन्ह्यात नाव आले, याचा अर्थ काय त्यांची पारख एवढी कच्ची होती त्यांची पारख एवढी कच्ची होती ज्यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडूनही विरोधकांना मोदी लाट येईपर्यंत वाट पाहावी लागली, त्यांची निर्णयप्रक्रियेची वीण एवढी कच्ची कशी, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.\nसाखर कारखाना, जिल्हा बँक या माध्यमांतून अनेकांना मदत करणारे डॉक्टर आपल्यावर नाराज असणाऱ्यांच्या घरी आवर्जून जातात. आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांची ‘काय बेटा, कसे काय,’ अशी विचारणाही करतात. परंतु राजकीय अस्तित्वाची लढाई असते तेव्हा मात्र त्यांची भाषा बदलते. आता ते स्वत: फारसे काही करीत नाहीत. त्याचे चेलेचपाटे असले उद्योग करतात. पण एक मात्र मान्य करायला हवं, की आपल्यावरील टीका त्यांनी कधी रोखली नाही. टीका रोखण्याचे काही फुटकळ प्रयत्न पेड न्यूजच्या स्तरावर होतात; पण त्याचा फारसा परिणाम होत नाही. विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात कधी राजकारण केले असे नाही. पवन राजे िनबाळकर हत्या प्रकरणात सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केली तेव्हाच त्यांच्यावर आरोप झाले.\nएकदा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. वेळ संपली तेव्हा किती जागांवर निवडणूक होणार आहे, याच�� माहिती पत्रकारांना देण्यात आली. सगळ्यांनी निवडणूक होणार असे प्रकाशित केले. दुसऱ्या दिवशी काही संचालकांना वेळ संपल्यानंतरही अर्ज मागे घेण्याची मुभा अधिकाऱ्यांनी दिली. ती का आणि कशी, असे प्रश्न विचारले गेले. मा. गो. मांडुरके या निवडणूक अधिकाऱ्याची चौकशी झाली. पुढे मात्र काहीच घडले नाही. नंतर याच बँकेत ३० कोटी रुपयांचा होम ट्रेड घोटाळा झाला. बँकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. त्यात तत्कालीन अध्यक्ष पवनराजे िनबाळकर यांच्यासह संचालक मंडळाकडून ५२ कोटी ७२ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. पण ते पसे काही वसूल झाले नाहीत. कारण सहकारमंत्र्यांनी त्यात बहुतेकांना निर्दोष ठरवले. या घडामोडी सुरू असताना पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यात सत्ता होती. महत्त्वाच्या संस्थांवर त्यांनी ठरवलेल्याच व्यक्तींची नेमणूक होत होती. पुढे कायद्याचा गुंता वाढत गेला, तसे राजकीय घडामोडींचे वळण बदलले. याचं कारण अहंकार व राजकीय महत्त्वाकांक्षेने परिसीमा गाठली होती. याचीच परिणती म्हणून पारसमल जैन, मोहन शुक्ल यांच्यासह उत्तर प्रदेशातील काही गुंडांची नावे उस्मानाबादकरांना ज्ञात झाली. जो राजकारणापासून दूर राहू इच्छित होते त्यांच्यासाठी हे भयपर्वच होते.\nपद्मसिंह पाटलांच्या साम्राज्याला हादरे देण्याचे प्रयत्नही एकीकडे सुरू होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत एकेकाळी त्यांचे चेले असलेल्या पवन राजे निंबाळकरांनीच त्यांच्या तोंडाला भलताच फेस आणला होता. तर २००९ च्या निवडणुकीत पवन राजेंच्या खुनाच्या आरोपामुळे पद्मसिंह पाटलांना शिवसेनेच्या रवी गायकवाड यांनी नाकी नऊ आणले. त्यावेळी ते कमी मतांनी निवडून आले. त्यांची सद्दी संपुष्टात येत चालल्याचंच हे द्योतक होतं. अखेर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी नावाच्या त्सुनामीचा लाभ उठवत याच रवी गायकवाडांनी पद्मसिंह पाटलांचा गड प्रचंड मताधिक्याने उद्ध्वस्त केला. इथून पुढे उस्मानाबादचं राजकारण कोणतं वळण घेतं हे आता पाहायचं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएसटी संपाला हिंसक वळण, जाणून घ्या कुठे काय स्थिती\nकोकणातील धरणे तुडुंब; मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध्ये सापडले ६० विषारी साप\nशेतकऱ्यांना प्रति लिटर तीन रुपये दरवाढ मिळणार – रणजीत सिंह नाईक निंबाळकर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/bhavkavita/tuze-maze-man/", "date_download": "2019-03-25T08:06:33Z", "digest": "sha1:BNIJNZL73N3V4QDZ6OYU7XAOQEX3DCR5", "length": 5892, "nlines": 78, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nतुझे माझे मन - जणु यमुनेचे तीर\nतुझी माझी प्रीत - वेणू वाजे मनोहर.\nतुझे माझे मन - सारवले वृंदावन\nप्रीत आपुली साजिरी - तुळशीची गं मंजिरी.\nतुझे माझे मन - उंच निर्मळ गगन\nतुझी माझी प्रीत - सूरसरितेचा स्त्रोत.\nतुझे माझे मन - उमलले पद्मदळ\nतुझी माझी प्रीत - दरवळे परिमळ.\nतुझे माझे मन - रानीवनीचे हरीण\nप्रीत आपुल्या अंतरी - मृगापोटीची कस्तुरी.\nतुझे माझे मन - प्रतिभेचा दिव्य क्षण\nतुझी माझी प्रीत - अलौकिक भावगीत.\nतुझे माझे मन - गगनीचा कृष्णघन\nतुझी माझी प्रीत - झरे भूवरी अमृत.\nतुझे माझे मन - मन – फुलला मोगरा\nतुझी माझी प्रीत – प्रीत – गुंफिला गजरा.\nतुझे माझे मन - पाणी भरलेली मोट\nतुझी माझी प्रीत - झुळुझुळु वाहे पाट.\nतुझे माझे मन - ब्रह्म अनंत निर्गुण\nतुझी माझी प्रीत - मूर्त साकार सगुण \nआई व मूल (ओव्या)\nआई आणि मूल (कविता)\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षां���ंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/", "date_download": "2019-03-25T07:23:32Z", "digest": "sha1:DMVO5DD2SLSDLD2YQ6QFA4UZPLUMP2CQ", "length": 7055, "nlines": 42, "source_domain": "vicharpravah.in", "title": "या विश्वात पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचा अंदाज तर्कसुसंगत असून येत्या दशकात येऊ घातलेल्या अत्याधुनिक दुरदर्शिका पाहता २०३० सालापर्यंत परग्रहवासीयांचा मागोवा लागण्याची दाट शक्यता आहे. - विचारप्रवाह", "raw_content": "\nया विश्वात पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचा अंदाज तर्कसुसंगत असून येत्या दशकात येऊ घातलेल्या अत्याधुनिक दुरदर्शिका पाहता २०३० सालापर्यंत परग्रहवासीयांचा मागोवा लागण्याची दाट शक्यता आहे.\nएखादी गोष्ट प्रत्यक्ष परिक्षणाने सिद्ध झाल्याशिवाय शास्त्रज्ञ त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. सूर्याभोवती जसे ग्रह आहेत, तसे इतर ताऱ्यांभोवती देखील ग्रह असू शकतात ही गोष्ट अगदी तर्काला धरून होती, पण प्रत्यक्ष केपलर दुरदर्शिकेने अशा बाह्यग्रहांचा मोठ्या प्रमाणावर वेध घेण्यास सुरुवात करेपर्यंत शास्त्रज्ञांनी त्या तर्कास खऱ्या अर्थाने मान्यता दिली नाही. अर्थात एखादी गोष्ट सिद्ध होण्याकरिता तर्काला पुराव्याची जोड मिळणे अत्याश्यक असते\nजेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच�� कल्पनाचित्र\nमला वाटतं बाह्यग्रहांबाबत जसे घडले, तसेच परग्रहवासीयांबाबतही घडेल. विश्वाच्या अनंत पसाऱ्यात पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र जीवसृष्टी असावी असे वाटणे अगदी तर्कसुसंगत आहे, पण त्यानुषंगाने अजून एकही ठोस पुरावा हाती आलेला नाही. असे असले तरी येत्या काळात ‘एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप’, ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ अशा काही अत्याधुनिक दुरदर्शिका पृथ्वीवरून, तसेच अवकाशातून अंतराळ निराक्षणासाठी रुजू होत आहेत. काही विशेष संकेतांना हेरून ते एखाद्या बाह्यग्रहावर जीवसृष्टी आहे किंवा नाही हे निश्चित करू शकतील.\nअत्याधुनिक दुरदर्शीकांसोबतच सध्या सुरू असलेली मंगळ, तसेच चंद्रमोहिमांची एकंदरीत तयारी पाहता २०२५ पुढील कालखंड हा खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत रोमहर्षक कालखंड असेल हे निश्चित\nआपणाला हेही वाचायला आवडेल\nसर्न मधील शास्त्रज्ञांनी ‘नेक्स्ट’ (NeXT) वेब ब्राऊजरची पुनर्निर्मिती केली\nचीनमध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) वृत्तनिवेदक\nसापडलेल्या बाह्यग्रहांचा अधिक सखोलतेने अभ्यास करण्यासाठी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ पुढील वर्षी ‘कॅरॅक्टरायझिंग एक्झोप्लॅनेट सॅटेलाईट’ (CHEOPS) नावाची दुरदर्शिका अंतराळात सोडणार आहे.\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/taxonomy/term/514", "date_download": "2019-03-25T08:47:23Z", "digest": "sha1:DN6F3D3NAKZ5A7V7IWHPNKZVOFNP5WER", "length": 9798, "nlines": 130, "source_domain": "gangadharmute.com", "title": " स्पर्धा विजेता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानम���वा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / स्पर्धा विजेता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nमरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 30/04/2013 - 16:32 ह्यावेळी प्रकाशित केले.\nजगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले\nशोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले\nना राहिले जराही विश्वासपात्र डोळे\nझुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले\nहंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले\nहा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले\nकलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे\nपंचांग गावराणी पिकणे कठीण झाले\nबाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या\nमातीत ओल नाही, तगणे कठीण झाले\nRead more about मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्याम���ळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.orientpublication.com/2015/05/blog-post_4.html", "date_download": "2019-03-25T07:58:48Z", "digest": "sha1:DLRGX4LX53VYDDEHUB2UKJS2UROPWTRP", "length": 5057, "nlines": 34, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: अरिजित सिंगचा मधाळ स्वर मराठीतही", "raw_content": "\nअरिजित सिंगचा मधाळ स्वर मराठीतही\n‘क्यों की तुम ही हो..., मेरी आशिकी’,\n‘मुस्कुराने की वजह तुम हो’,\n‘में रंग शरबतों का’,\n‘कभी जो बदल बरसे’...\nएकाचवेळी रोमँटीक, जोषपूर्ण गाण्यांसोबतच सुफी लहेजाचा आविष्कार करीत आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज... अरिजित सिंग.\n‘आशिकी २’ च्या यशाला अरिजित सिंगने एक वेगळी उंची गाठून दिली. छोट्या-मोठ्यांच्याही ओठांवर रुळणाऱ्या या गाण्यांनी अरिजित सिंगची मोहिनी सर्वच वयोगटांत पसरवली आहे. ही स्वरमयी जादू आपल्याला लवकरच मराठीतही अनुभवता येणार आहे. जिगवी प्रोडक्शन प्रस्तुत ‘येस आय कॅन’ या मराठी चित्रपटाद्वारे अरिजित सिंगचा आवाज मराठीतही ऐकायला मिळणार आहे. ‘पावलांना मार्ग कळे ना...’ या अक्षय खोत यांनी लिहिलेल्या गीताला अरिजित सिंगने आपल्या मधाळ आवाजाने चारचाँद लावलेत. नुकतेच या गीताचे ध्वनिमुद्रण पार पडलं.\nअमित शाह यांच्या कथेवर आधारलेला 'येस आय कॅन' हा चित्रपट वडील आणि मुलाचे नातेसंबंध अधोरेखित करतो. दिग्दर्शिका संगीता राव आणि अभिजीत गाडगीळ या द्वयींनी मिळून पटकथा लिहिली असून संवाद अभिजीत गाडगीळ यांचे आहेत. 'येस आय कॅन' चे छायांकन नरेन गेडीया यांचे आहे. अक्षय खोत यांच्या गीत-संगीताने सजलेला 'येस आय कॅन' हा नक्कीच विशेष ठरेल.\n'येस आय कॅन' चित्रपटात राजेश शृंगारपुरे, नीना कुलकर्णी, मिहीर सोनी, मृणाल ठाकुर, परेश गणात्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘येस आय कॅन’ लवकरच चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/08/03/aamboli-with-ras/", "date_download": "2019-03-25T07:28:49Z", "digest": "sha1:ZMNMS7PM75JOJJ6JYKPBQQ4OO7J2OWFH", "length": 10323, "nlines": 160, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस) – Rice and Black Gram Pan Cake served with sweet coconut milk | My Family Recipes", "raw_content": "\nAamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)\nआंबोळी आणि नारळाचा रस मराठी\nAamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)\nAamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)\nआंबोळी आणि नारळाचा रस\nहा तळ कोकणातला खास पदार्थ आहे. आंबोळी ही उत्तप्पा सारखी असते पण जरा पातळ. ही आंबोळी नारळाच्या गोड रसात बुडवून खातात. लहानपणी आम्ही कोकणात जायचो तेव्हा एकदा तरी आंबोळी चा बेत असायचाच.\nनारळाचा रस आवडत नसेल तर आंबोळी चटणी बरोबर ही खाऊ शकता.\nसाहित्य (४ जणांसाठी जेवण म्हणून)\nउडीद डाळ १ कप\nमेथी दाणे २ मोठे चमचे\nपोहे २ मोठे चमचे\nतेल आंबोळ्या बनवताना तव्यावर लावण्यासाठी\nताजा खवलेला नारळ ३ कप\nचिरलेला गूळ २/३ कप (चवीनुसार कमी / जास्त करा)\nवेलची पूड पाव चमचा\n१. आंबोळीचं पीठ बनवण्यासाठी उडीद डाळ धुवून पाणी घालून भिजत ठेवा. दुसऱ्या पातेल्यात तांदूळ धुवून त्यात पाणी घाला. तांदुळाच्या पातेल्यात मेथी दाणे आणि पोहे घाला. डाळ व तांदूळ ८ तास भिजवा. उडीद डाळ जुनी नसावी. जुनी असेल तर पीठ आंबत नाही.\n२. ८ तासानंतर डाळ आणि तांदुळाचं पाणी उसपून घ्या.\n३. मिक्सर मध्ये डाळ वेगळी वाटा. डाळ वाटताना फ्रिज चं थंड पाणी घाला. डाळ वाटताना फार गरम झाली तर पीठ आंबत नाही.\n४. तांदूळ, मेथी, पोहे एकत्र वाटून घ्या. ह्यात साधं पाणी घाला. पीठ फार पातळ करू नका कारण आंबल्यावर पीठ थोडं पातळ होतं.\n५. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करून जड झाकण ठेवून झाकून ठेवा. थंड हवामानात बंद कपाटात / ओव्हन मध्ये – ओव्हन चालू न करताना ठेवा. ८ तासात पीठ छान आंबेल.\n६. पीठ मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करा.\n७. रसासाठी मिक्सर मध्ये नारळाचा रस काढून घ्या. त्यात गूळ घालून विरघळवून घ्या. मीठ, वेलची पूड घाला. नारळाचा रस तयार आहे.\n८. आंबोळीसाठी तवा गरम करून घ्या. गॅस बारीक करून तव्यावर पाणी शिंपडून कपड्याने पुसून घ्या. दीड मोठा चमचा पीठ तव्यावर घालून नीट पसरा. उत्तप्प्यापेक्षा पातळ पसरा.\n९. झाकण ठेवून एक – दीड मिनिटं भाजा. आता आंबोळी परतून घ्या. आंबोळीवर थोडं तेल सोडा. दोन्ही बाजू छान भाजल्या की गरमागरम सर्व्ह करा.\n१०. आंबोळी खाताना आंबोळीचे तुकडे रसात १ मिनिट बुडवून ठेवायचे आणि नंतर रससकट तुकडा तोंडात टाकायचा. अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ मन लावून खायचा.\nनारळाचा रस ३–४ तासात संपवावा लागतो.\nAamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)\nAamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/abhang", "date_download": "2019-03-25T08:52:02Z", "digest": "sha1:WTD5GLGW2VBY7IYTG2S4GKBKCIVFKVP6", "length": 9194, "nlines": 114, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अभंग-भक्तीगीत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / अभंग-भक्तीगीत\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशुभहस्ते पुजा 1,259 20-06-2011\nमाझी मराठी माऊली 1,067 15-07-2011\nरंगताना रंगामध्ये 1,800 15-07-2011\nहे जाणकुमाते - भजन 1,117 16-08-2011\nतुला कधी मिशा फुटणार\nलोकशाहीचा अभंग 1,542 14-08-2013\nलोकशाहीचा सांगावा 1,013 28-03-2014\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,182 15-07-2016\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://jsyog.org/yogabhyasi-mandals-yog-courses-exams-get-ycmou-recognition/", "date_download": "2019-03-25T07:25:56Z", "digest": "sha1:5NLO6K5IPYFVU6LINGA6BLLTHEBK4SQH", "length": 14158, "nlines": 55, "source_domain": "jsyog.org", "title": "Yogabhyasi Mandal’s Yog Courses & Exams get YCMOU recognition - JANARDANSWAMI YOGABHYASI MANDAL, NAGPUR", "raw_content": "\nजनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर\nमानवाला जीवनात समाधान, सुख व निरोगत्व प्राप्त व्हावे ह्या उदात्त आणि महन्मंगल ध्येयाने प्रेरित झालेले योगमूर्ती परमपूज्य परिव्राजकाचार्य श्री जनार्दन स्वामी महाराज यांनी १९५१ मध्ये योगाभ्यासी मंडळाची ( सध्याचे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची ) स्थापना केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना भाषा, लिंग, जात, धर्म, आर्थिक स्थिती यांचा कोणताही विचार न करता निःशुल्क आणि निरपेक्षपणे योग शिकवण्याचे महान कार्य त्यांनी प्रारंभ केले. लोकांना योगा विषयी आकर्षण वाटू लागल्यावर जनार्दन स्वामिंना योगशिक्षकांची अनिवार्यता जाणवू लागली. स्वामिंनी स्वीकारलेल्या ध्येयानुकुल शिक्षकांची फळी उभारण्यासाठी त्यांनी १९५६ पासून योगाभ्यासी मंडळाच्या प्रमाण पत्र अभ्यासक्रमास सुरुवात केली. योग शिक्षकांसाठी योगाची परीक्षा जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाने गेली ६५ वर्षे अखंडपणे आणि अत्यंत उत्साहात अक्षुण्ण ठेवली आहे.\nविश्वयोग दिनाच्या संकल्पने पासून संपूर्ण जगात योगाचे शिक्षण देणाऱ्या लोकांची मागणी वाढतच आहे. अशा प्रसंगी योगाभ्यासी मंडळाला परिस्थितीने एक मोठे आव्हान दिल्या सारखी स्थिती निर्म���ण झाली आहे. कारण पूर्णपणे समर्पण भावनेने निःशुल्क योग शिक्षण देणाऱ्या योग शिक्षकांची फारच मोठया प्रमाणावर कमतरता जाणवू लागली आहे. मात्र प्रोफेशनल पद्धतीने योग शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची संख्या भरपूर वाढत आहे. अशा प्रसंगी मिशन मोडवर योग शिक्षण देणाऱ्या अधिकृत शिक्षकांची संख्या वाढावी ह्या हेतुने मंडळाच्या आजपर्यंतच्या योग परीक्षांना शासकीय मान्यता प्राप्त व्हावी या प्रयत्नातून अवचित पणे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सहकार्य आणि आपुलकी प्राप्त झाली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या कार्याची – त्या कार्यातील उदात्त हेतुची दखल घेऊन शुद्ध, सात्विक आणि सुसंघटित समाजाची बांधणी करण्यासाठी योग हाच एकमेव उपाय आहे व तोही समर्पण भावना, निःशुल्क शिकवण्याची इच्छा आणि नराचा नारायण करण्याची धारणा या त्रयी बरोबर मानवी जीवनात प्रत्येकाला समाधान, सुख, निरोगत्व देण्याच्या हेतुने योग शिकविणाऱ्या शिक्षकांची सेना उभी करण्यासाठी मंडळाने स्वीकारलेली विचारसरणी आणि कार्य पद्धती या दोहोंचाही गौरव आणि आदर करीत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाने आज पर्यंत स्वीकारलेल्या मिशनरी भावाच्या ध्येय धोरणांना किंचितही धक्का लागू न देता मंडळाच्या योग अभ्यासक्रमाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी पदविका आणि प्रगत पदविका अशा दोन अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचे निश्चित केले आहे. एवढेच नव्हे तर त्यासंदर्भात आवश्यक असलेले मेमोर्रंडम ऑफ अंडरस्टडिंग ( MOU ) च्या करार पत्रावर स्वाक्षरी करण्याचा मुहूर्तही साधण्यात आला आहे.\n“योग प्रवेश” या प्रथम पदविका अभ्यासक्रमसाठी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या योगपरिचय ह्या प्रमाण अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, तर प्रगत योग पदविका “योग प्रवीण” साठी “योग प्रवेश” परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एकूण अभ्यासक्र तीन वर्षांचा राहील. हा संपूर्ण अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू श्री डॉ. वायुनंदन यांच्या समाजाभिमुख आणि उदात्त विचारसारणी मुळेच साकार होऊ शकला त्याच बरोबर विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ दिनेश भोंडे, डॉ प्रकाश अतकरे, डॉ सोनोने या सुस्वभावी त्रयींचाही सहभाग फार महत्वाचा ठरला, त्या बद्दल जनार्दन स्वामी योगा��्यासी मंडळ, डॉ वायुनंदन, डॉ भोंडे, डॉ अतकरे व डॉ सोनोने या सर्वां विषयी अंतःकरण पूर्वक कृतज्ञता भाव प्रकट करीत आहे.\nनागपूरच्या योगप्रेमी व समाजहितैशी, कर्तृत्व संपन्न जनतेला जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळा तर्फे आवाहन करण्यात येत आहे की ह्या निरलस, निरपेक्ष, निःस्वार्थ व निःशुल्क भावनेने योग शिक्षण देण्यासाठी योग शिक्षक तयार करणाऱ्या या परीक्षांना प्रतिसाद द्यावा.\nजनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर\nप. पू. जनार्दनस्वामींचा संदेश\nसमाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने \nयोगमेवाभ्यसेत्त् प्राज्ञ: यथाशक्ति निरन्तरम् \nजनार्दनस्वामी पादुकाभवन वास्तुशांती समारोहाचे निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/shetikawya", "date_download": "2019-03-25T08:44:41Z", "digest": "sha1:BRXVZJBHXNVDI7M7J3XCPX4JR5VKXVOZ", "length": 8438, "nlines": 110, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी काव्य | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / शेतकरी काव्य\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 1,030 28-08-2016\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका 831 09-07-2016\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका 1,431 04-01-2016\nबरं झाल देवा बाप्पा...\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,049 29-05-2015\nशेती, शेतकरी आणि गझल - अॅग्रोवन 1,679 12-05-2015\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका 820 03-02-2015\nआयुष्य कडेवर घेतो 2,069 29-07-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/daiva-tula/", "date_download": "2019-03-25T08:31:01Z", "digest": "sha1:6C3RPOS6UTMZRL7A45MCD55LMKWD366G", "length": 7143, "nlines": 82, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nदैवा तुला जोडीले हात\nदैवा तुला जोडीले हात\nया जगतावर तुझीच सत्ता देव तुझ्या धाकात\nदैवा तुला जोडीले हात.\nसुमने सुंदर तूच फुलाविशी\nमने मनाला तूच मिळवीशी\nतूच कठोरा करिसी त्यावर अग्नीची बरसात\nदैवा तुला जोडीले हात.\nधावे मानव मृगजळ प्याया\nतुझा निर्दया तोच अचानक घुसतो तीर उरात\nदैवा तुला जोडीले हात.\nजगात माणुस लुळा पांगळा\nडोळे असुनी खुळा आंधळा\nअज्ञानाची अखंड यात्रा चाले अंधारात\nदैवा तुला जोडीले हात.\nचिकणमातीच्या अप्रतीम कलाकृती निर्माण करणाऱ्या एका कलावंताची ही कथा. त्याला व्यवहार जमत नाही. कुटुंब हलाखीत दिवस काढीत असतानाच मुलगा मरण पावतो. सुनेला सांभाळतो, नातीला शिकवतो पण दैवाच्या झंझावातापुढे 'दैवा तुला जोडीले हात' या आठवले यांच्या शब्दात हात जोडून हार मानतो. आठवले यांनी मातीची महती सांगणारी एक उत्तम कविता या चित्रपटासाठी लिहिली. त्याची ध्वनीमुद्रिका उपलब्ध नाही पण ती वाचण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल :\nमातीतुनी जन्म घेती जगताच्या रम्यकृती\nमातीतुनी अवतरती सुंदर सुकुमार फुले\nमातीतुन मानवास खावयास अन्न मिळे \nनटलेली ही नगरे ही तिचीच श्रीमंती\nमातीच्या मंदिरात मातीचा देव उभा\nमातीच्या पणतीतून फाकतसे दिव्यप्रभा\nमाती ही मानवास शिकवितसे प्रभूभक्ती\nजन्म ज्यास मृत्यू त्यास - नियतीचा नियम अटळ\nन कळे हा कोणाचा - का - कशास - दिव्य खेळ \nमातीतुन जन्म आणि शेवटही माती \nदैवा तुला जोडीले हात\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-kavita-mi-marathi-majhi-marathi_87.html", "date_download": "2019-03-25T07:46:33Z", "digest": "sha1:TYFMYYJBTPQJC2OKCMM4PULRPKNXYOEX", "length": 6061, "nlines": 121, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nआयुष्याची वाट आहेच थोडी निराळी\nआयुष्याची व���ट आहेच थोडी निराळी,\nकेला घात की लागे माती काळी\nवेदनांना जीवनात आहेच नाहि जागा,\nअपयशाला हरविण्याच्या कामाला लागा\nविचार करुन वाट चालताना\nशिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,\nआल्या कितीही अडचणी जरी,\nयशासाठी थोडी वाट पहावीच\nजगण्याची वाट थोडी अवघड असते,\nकधी सखोल तर कधी नागमोडी वळते\nवळताना जगण्याची रितही कळते,\nआपन नसलो तरी वाटही जगते\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://marathichitrapatshrushti.blogspot.com/2015/08/blog-post_17.html", "date_download": "2019-03-25T07:42:47Z", "digest": "sha1:PFGKXCFHSSHJU4BUV4IDHZA2Z5XMDQPI", "length": 8656, "nlines": 175, "source_domain": "marathichitrapatshrushti.blogspot.com", "title": "मराठी चित्रपट सृष्टि: सचिन पिळगावकर", "raw_content": "\nमराठी चित्रपट सृष्टि विषयी सर्व काही ....\nमराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे सचिन पिळगावकर. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी ''हाच माझा मार्ग'' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. आज (१७ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nसचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट\nही पोरगी कुणाची (२००६)\nनवरा माझा नवसाचा (२००४)\nआयत्या घरात घरोबा (१९९१)\nआमच्या सारखे आम्हीच (१९९०)\nअशी ही बनवा बनवी (१९८८)\nमाझा पती करोडपती (१९८८)\nनवरी मिळे नव-याला (१९८४)\nसचिन पिळगावकर यांनी अभिनय केलेले चित्रपट\nही पोरगी कुणाची (२००६)\nनवरा माझा नवसाचा (२००४)\nऎसी भी क्या जल्दी है (१९९६)\nआयत्या घरात घरोबा (१९९१)\nअभी तो मैन जवान हू (१९८९)\nअशी ही बनवा बनवी (१९८८)\nमाझा पती करोडपती (१९८८)\nनवरी मिळे नव-याला (१९८४)\nसत्ते पे सत्ता (१९८२)\nनदिया के पार (१९८२)\nअखियों के झरोकोंसे (१९७८)\nगीत गाता चल (१९७५)\nहा माझा मार्ग एकला (१९६२)\nगेली ४६ वर्षे आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व न्हणजे अशोक सराफ, आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित...\nआज मराठीतील सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा मकरंद अनासपुरे यांनी ''सरकारनामा'\u0003...\nसप्टेंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस\n''३.५६ किल्लारी'', ''ढिंच्यॅक एंटरप्राइज'', ''न्या...\nनितीन सरांची नवीन ओळख\n''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''...\nऑगस्ट महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस\n''देऊळ बंद'',''जाणिवा'' आणि ''ओळख''\nसारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा\nआमच्या ब्लॉगचे जगभरातील वाचक\n''तनु वेड्स मनु रिटर्न्स''\nदूर दृष्टीचा जाणता नेता शरद पवार\nआम्हाला तुमचा संदेश पाठवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म वापरा\nमराठी चित्रपटांबद्दल नव-नवीन मिळवण्याकरीता येथे तुमचा ई-मेल आयडीची नोंद करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2019-03-25T07:23:43Z", "digest": "sha1:7CZYJFYLWFEVNKUM5SEIS4M7QS3437Y3", "length": 11801, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेता इरफान खानवर 4 केमो पूर्ण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअभिनेता इरफान खानवर 4 केमो पूर्ण\nआजारानंतर पहिल्यांदाच दिली उपचाराची माहिती\nमुंबई – बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्यावर लंडन येथे न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर या कॅन्सरच्या आजारावर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर 4 केमो पूर्ण झाल्या असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यानंतर इरफान खानने नुकतीत एका मुलाखतीतून आपल्या प्रकृती आणि उपचारांविषयी माहिती दिली.\nया मुलाखतीत इरफान खान याने सांगितले की, केमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. जेव्हा सहा सेशन पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा कॅन्सर स्कॅन होईल. मात्र तिसरे सेशन पूर्ण झाल्यावर पॉजिटिव्ह रिझल्ट आला आहे. तरीही सहाव्या सेशनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि तेव्हाच आजाराबाबत स्पष्टपणे समजेल. मग पाहूया आयुष्य मला कुठे घेऊन जाते, असे इरफान म्हणाला.\nआजार आणि उपचारांबद्दल इरफान म्हणाला की, आजारपणात मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याला पाहिले आहे. आयुष्यात तुमच्यासमोर अनेक आव्हाने येतात, पण मला वाटतं की, हा माझ्यासाठी कठीण परीक्षेचा काळ आहे. मी आता एका वेगळ��या अवस्थेत आहे. सुरुवातीला मला आजाराबाबत समजले तेव्हा धक्का बसला. पण मी आता स्वत:ला जास्त ताकदवान, प्रोडक्टिव्ह आणि निरोगी समजत आहे.\n“मी या आजारातून बरा होईन की नाही असं सुरुवातीला लोकांना वाटत होते. कारण माझ्या हातात काही नाही. आयुष्याला जे मंजूर असेल तेच होईल. पण जे काही माझ्या हातात आहे, ते मी सांभाळू शकतो. आयुष्याने मला एवढं काही दिले की, त्याच्याप्रति कृतज्ञ असायला हवी. उपचारादरम्यान माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी आता अशा स्थितीत आहे की, मी 30 वर्षे जरी मेडिटेशन केले असते तरी इथे आलो नसतो, असे इरफान म्हणाला.\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\n….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होती\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले\nभारताचा जपानवर दणदणीत विजय\nसलग पाचव्यांदा भारतीय महिलांनी जिंकला सॅफ चषक\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nसत्तेबाजी : ओळख दिग्गजांची\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर २-० ने मात\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/aditi-is-not-organizer-of-shivpunyatithi-programme-on-raigad-says-ncp-leader-sunil-tatkare/", "date_download": "2019-03-25T08:08:01Z", "digest": "sha1:GIY642DOJO77NEUAP3K7IQAF7BQZLZA6", "length": 7770, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nअदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव\nटीम महाराष्ट्र देशा- ‘जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रायगड पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेकडून पूजा निधीला कार्यक्रमासाठी दरवर्षी निधी दिला जातो. जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने अदिती तटकरे यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत आहे. अदिती तटकरेंनी हा कार्यक्रम आयोजित केलेला नाही. यावरुन विपर्यास केला जातोय असं म्हणत सुनील तटकरे यांनी शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थिती लावण्याच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादातबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.\nशिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सरसंघचालकांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याने बरेच तर्क-वितर्क लावले जाऊ लागले होते. सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर सुनील तटकरे तसेच अदिती तटकरे यांच्यावर टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी ट्वीटरवरून हे स्प्ष्टीकरण दिलं आहे.\nकाय म्हणाले सुनील तटकरे\nछत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार पुण्यतिथी गेली १२३ वर्षे छत्रपती शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने साजरी केली जाते. या का���्यक्रमाला आजवर अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष हे पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हा कार्यक्रम शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्यावतीने आयोजित केलेला आहे. फक्त पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे अदिती तटकरे यांचे नाव निमंत्रक पत्रिकेवर नमूद केलेले आहे. आदिती तटकरे या कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत. याबद्दल जाणिवपूर्वक जो अपप्रचार सुरु आहे तो विपर्यस्त आहे, असे मला वाटते.\nछत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार पुण्यतिथी गेली १२३ वर्षे छत्रपती शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने साजरी केली जाते. या कार्यक्रमाला आजवर अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे. (1/3) pic.twitter.com/WdxQ2iOw9z\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमहाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: भैय्याजी जोशी घेणार भाजपमधील असंतुष्ट बहूजनांची भेट\nसंघ-भाजप कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून तुरुंगात डांबू – अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2637", "date_download": "2019-03-25T08:33:44Z", "digest": "sha1:RCY4TX7JWZEVFTN54C3SQG64FYHZS7DT", "length": 22504, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बळीराजाची मुले, झाली ‘अशोक’वनातील फुले | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबळीराजाची मुले, झाली ‘अशोक’वनातील फुले\nदुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर चर्चा-परिसंवाद एवढी वर्षें होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा वेळी अशोक देशमाने या तंत्रशिक्षित तरुणाने थेट ‘निष्काम कर्मयोग’ स्वीकारला अशोकने आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या भावी पिढीला उज्ज्वल भवितव्य देण्याचा ध्यास घेतला आहे. त्याचे मन पुण्यात हडपसर येथे आयटी कंपनीत नोकरी करत असतानाही गावाकडे धाव घेत असे. तो एकदा दिवाळीच्या सुट्टीत परभणी जिल्ह्यातील त्याच्या मंगरूळ गावी गेला असताना तेथील स्थानिक शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. तो त्या बातमीने अंतर्बाह्य हेलावून गेला. त्याचे गाव-गावकरी-शेजारीपाजारी दुःखात असताना शहरात तो सुखात राहत आहे या विचाराने अ��्वस्थ झाला. त्याला त्याचा भूतकाळ आठवला. त्याने तशी परिस्थिती अन्य मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षणयज्ञ सुरू केला.\nभीषण दुष्काळामुळे, लोक गाव सोडून शहरांकडे जाऊ लागले होते; पडेल ते काम स्वीकारत होते. दोन वेळचे अन्न मिळवणे कठीण असलेल्या कुटुंबांना मुलांच्या शाळेचा खर्च भागवणे अशक्य होऊ लागले. अशोकला ते चित्र पाहिल्यानंतर सर्वात जास्त वाईट वाटले ते मुलांचे शिक्षण अर्धवट सुटत असल्याबद्दल अशोकने स्वतः प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. वडिलांची शेती होती, पण अपेक्षित उत्पन्न नव्हते. अशोकने त्याच्या आईच्या मदतीने शिवणकामही केले आणि कसाबसा घरखर्च भागवला. आईने दोन मुलींची लग्ने लावून दिली. अशोकने त्याचे पुढील शिक्षण शेतीकाम करून पूर्ण केले. त्यामुळे त्याला वेळेची, पैशांची आणि शिक्षणाची किंमत कळली. अशोकने दुष्काळग्रस्त कुटुंबांतील मुलांची आबाळ तशी होऊ नये म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा निश्चय केला.\nअशोकने ‘स्नेहवन’ नावाची संस्था डिसेंबर २०१५ मध्ये रजिस्टर केली. त्याने गावागावात फिरून गरजू , गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला, त्यांच्या पालकांची मनधरणी केली, त्या मुलांचा शैक्षणिक भार उचलण्याचे आश्वासन दिले. अनेक पालकांनी ‘स्नेहवन’च्या वास्तूला भेट देऊन आधी खातरजमा करून घेतली. बऱ्याच प्रयत्नांनंतर, अशोकला सतरा विद्यार्थी सापडले. त्यांना शोधण्यात त्याला त्याच्या मित्रपरिवाराची मदत झाली.\nअशोकमधील संवेदनशील कवीचे चाहते अनेक आहेत. तेदेखील या कारणासाठी पुढे सरसावले. अनिल कोठे नामक सद्गृहस्थांनी जागेचा मुख्य प्रश्न सोडवला. त्यांनी त्यांचा पुण्यातील भोसरी येथील पाच खोल्यांचा रिकामा बंगला अशोकला ‘स्नेहवन’साठी दिला. रिकामा बंगला मुलांच्या आवाजाने दुमदुमून गेला. मुले सुरुवातीला राहण्यास राजी नव्हती. परंतु अशोकने त्यांचे मन त्यांना समजावून, उमजावून, शिक्षणाचे महत्त्व पटवून वळवले. मुलांची ‘अशोककाकां’शी गट्टी जमली पण अशोकला नोकरी सांभाळून मुलांना पूर्ण वेळ देता येणे शक्य नव्हते. त्याचे आई-वडीलही त्याची समाजसेवा पाहून, ‘स्नेहवना’त येऊन राहू लागले. एकूण पंचवीस मुले ‘स्नेहवना’ची निवासी झाली आहेत.\nअशोकने पाच वर्षें केलेल्या नोकरीतून साठवलेले पैसे ‘स्नेहवना’च्या कामी ये�� असले, तरी ते अपुरे पडत आहेत. अशोकला नोकरी सांभाळून मुलांसाठी वेळ देताना त्याची ओढाताण होऊ लागली. त्याच्या वरिष्ठांनी त्याला रात्रपाळी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, अशोक जेमतेम दोन तासांची झोप दिवसाकाठी घेऊन, दिवसाचा वेळ मुलांना तर रात्री ऑफिसच्या कामाला देऊ लागला. त्याने तारेवरची अशी कसरत सलग आठ महिने केल्यावर त्याच्या लक्षात आले, की त्याचा ‘राम’ आयटी क्षेत्रात नाही, तर दुसऱ्यांसाठी काही करण्यात त्याला जास्त आनंद आहे. अशोकने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी नोकरी सोडली आणि त्याने त्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतले.\nअशोकचे शिक्षण, नोकरी पाहता त्याला लग्नासाठी बरीच स्थळे सांगून येत होती, नोकरी सोडल्यानंतरही स्थळांचा ओघ कायम होता. तेथील प्रथेनुसार वधुपक्षाची हुंडा देण्याचीही तयारी होती. परंतु अशोकचा त्या प्रथेलाच विरोध होता. बहुतांश शेतकरी त्यांच्या मुलींच्या लग्नात भरमसाठ हुंडा देण्याच्या धडपडीत कर्जबाजारी होतात आणि ते फिटले नाही की मृत्यूला कवटाळतात. त्याच विचाराने अशोकने हुंडाविरोधी चळवळ सुरू केली. लोकांना त्याच्या कृतीतून आदर्श घालून दिला. त्याने गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न साधेपणाने करण्याचे ठरवले. त्याची एकच अट होती, की येणाऱ्या मुलीने आई होऊन ‘स्नेहवना’तील मुलांचा सांभाळ करावा. अशोकची ती इच्छाही अर्चनाच्या रूपात पूर्ण झाली. ती दोघे मिळून ‘स्नेहवना’तील मुलांचा सांभाळ करत आहेत.\nअशोकसमोर बाबा आमटे यांच्या समाजकार्याचा आदर्श कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून होता. तो विविध समाजकार्यात भाग घेत असे, पाड्यावरच्या मुलांना मोफत शिकवत असे, नोकरीत रुजू झाल्यावर पगाराचा दशांश भाग समाजकार्यासाठी देत असे, त्याच्या मनात रुजलेल्या त्या बीजाचा पुढे ‘स्नेहवना’च्या रूपात वटवृक्ष झाला. त्याने मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. ‘स्नेहवना’तील विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचा मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना श्लोक शिकवणे, त्यांचा व्यायाम करवून घेणे, त्यांनी सूर्यनमस्कार घालणे, गाणी शिकणे, त्यांना चित्रकला-तबला-हार्मोनियमचे प्रशिक्षण देणे हे भाग बनून गेले आहेत.\nअशोक मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून रोज संध्याकाळी मोकळ्या मैदानात गोलाकार बसवून 'रिंगण' नामक खेळ घेतो. त्यात प्रत्येकाने दररोज काही ना काही सादर करायचे असते. चारचौघांत बोलण्यास घाबरणारी मुले त्या उपक्रमामुळे शे-दोनशे लोकांसमोर कथा-कवितांचे सादरीकरण बेधडक करू लागली आहेत.\nअशोकने त्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्याची आर्थिक गणित जुळवताना तारांबळ उडते. तो सांगतो, ‘भरपूर काम करण्याची इच्छा आणि तयारी असली, तरी जागेचा आणि पैशांचा मुख्य प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. निवासी विद्यार्थ्यांचा एका मुलामागे खर्च साधारण अडीच हजार रुपये येतो. आजारपणाचा खर्च वेगळा असतो, तर जवळच्या पाड्यावरील नंदी समाजातील वीस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च एका मुलामागे पंधराशे रुपये आहे.’ अशोक अशा एकूण पंचेचाळीस मुलांचा सांभाळ करत आहे.\nएका अमेरिकन दांपत्याने ‘स्नेहवना’ला तीन संगणक भेट दिले. त्यांचा वापर करून तिसरीतील विद्यार्थीदेखील सफाईने मराठी टायपिंग करू लागला आहे. अशोकची धडपड तशा अनेक गरजू मुलांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी सुरू आहे. तो सांगतो, ‘माझ्या मार्गात अडथळे अनेक येत असले, तरी ध्येय स्पष्ट दिसत आहे आणि त्या दृष्टीने माझी घौडदौड सुरू आहे.’\nअशोकला गावागावांतून, जिल्ह्याजिल्ह्यांतून शेतीशाळा सुरू करण्याची इच्छा आहे. तो सांगतो, ‘भारत कृषिप्रधान देश आहे. तरी भारतीय अभ्यासक्रमात कृषी विषयाचे ज्ञान मुलांना दिले जात नाही. आमचे शेतकरी पारंपरिक शेती करतात, विकसित तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाहीत, कारण ते त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही. ते योग्य पद्धतीने पोचावे यासाठी शेतीशाळांची गरज आहे.\nअशोकच्या प्रगत विचारांनी काही तरुण भारावले गेले आहेत. त्यांनीही अशोकप्रमाणे लग्न हुंडा न घेता करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण ‘स्नेहवना’साठी हातभारही लावत आहेत. काही आजी/आजोबा मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार दर्शवत आहेत. हा सकारात्मक बदल अशोकच्या कृतीमुळे घडत आहे\nअशोक देशमाने - 8796400484\nसंस्थेचा पत्ता : स्नेहवन, हनुमान कॉलनी-२, हनुमान मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे-११०३९.\n(मार्मिक २१ मे २०१७ वरून उद्धृत)\nअशोक देशमाने आपले कार्यास सलाम.आपले कार्य असेच चालू राहो ही सदिच्छा\nज्योत्स्ना गाडगीळ 'मार्मिक' साप्ताहिकात उप-संपादक/ वार्ताहर म्हणून २०११ पासून कार्यरत आहे. त्यांनी 'मुक्तांगण' आणि 'रंग माझा वेगळा' या सदरांतून वैशिष्ट्यपूर्ण क��मगिरी करणाऱ्या मंडळींच्या मुलाखती प्रकाशित केल्या आहेत. गाडगीळ मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर असून त्यांनी एम. ए राज्यशास्त्र तसेच शास्त्रीय संगीतात संगीत विशारद या पदवी मिळवल्या आहेत. त्यांनी आवड म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी नारदीय कीर्तनाचे पाचशेहून अधिक कीर्तन प्रयोग केले आहेत.\nबळीराजाची मुले, झाली ‘अशोक’वनातील फुले\nराजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय\nपुणे शहरातील पहिला पुतळा: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nसंदर्भ: लोकमान्य टिळक, पुतळा, पुणे शहर\nसुरंजन खंडाळकर - गाणारा मुलगा\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)\nसंदर्भ: स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, पुणे शहर, धायरी गाव, Pune City, Pune, Schizophrenia, Mental Illness\nशुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था\nसंदर्भ: स्त्री सक्षमीकरण, पुणे शहर, Pune, Pune City\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AC/", "date_download": "2019-03-25T08:17:56Z", "digest": "sha1:4TRM3Y242GSYKJNOJHKF6OFXS6W452TN", "length": 5345, "nlines": 41, "source_domain": "vicharpravah.in", "title": "६२. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : व्हॅक्युम ट्यूब - विचारप्रवाह", "raw_content": "\n६२. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : व्हॅक्युम ट्यूब\nसप्टेंबर १९४१ साली मॉकली यांनी ॲटॅनॅसऑफ यांना एक पत्र पाठवले. त्यात ॲटॅनॅसऑफ यांच्या काही कल्पना वापरण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. ॲटॅनॅसऑफ यांनी मॉकली यांना पेटंट घेईपर्यंत काही काळ थांबण्यास सांगितले. या पत्रावरुन जॉन मॉकली यांना ॲटॅनॅसऑफ यांच्या इलेक्ट्रॉनिक संगणकातून प्रेरणा मिळाल्याचे दिसते. तरी संगणकाकडे पाहण्याचा मॉकली यांचा स्वतःचा असा एक निराळा दृष्टीकोन होता\nऑगस्ट १९४२ मध्ये मॉकली यांनी वेगवान गणनेसाठी व्हॅक्युम ट्युबचा वापर करण्याची कल्पना सर्वांसमोर मांडली. पण व्हॅक्युम ट्युब या त्याकाळी अत्यंत महाग मिळत असत, शिवाय त्या नाजूकही असत. मॉकली यांची कल्पना सत्यात उतरवण्यास एकंदरीतच खूप मोठा खर्च आला असता. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या प्रस्तावाकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. परंतु तत्कालीन मेकॅनिकल संगणकाचे काम अत्यंत संथ गतीने चालत असे. त्यामुळे वेगवान असा नवा इलेक्ट्रॉनिक संगणक तयार करणे सर्वांकरिता निकडीचे होते. परंतु महायुद्धाच्या अपरिहार्यतेने अखेर मॉकली यांच्या कल्पनेस आवश्यक ते आर्थिक पाठबळ मिळवून दिले.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n७२. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग १\n३४. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन – भाग २\n२५. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2415", "date_download": "2019-03-25T08:31:14Z", "digest": "sha1:C3MHKXLV4ZWXMFHUI2PTJMNV3HN6NDAO", "length": 36085, "nlines": 163, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "यादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nयादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर)\nमहाराष्ट्राधीश असे स्वतःला अभिमानपूर्वक म्हणवून घेणारे एकमेव राजघराणे यादवांचे होय. त्या घराण्याने सुमारे पाचशे वर्षें (शके ७७१ – इसवी सन ८५० ते शके १२३३ – इसवी सन १३११) महाराष्ट्रावर राज्य केले. वैभवशाली राष्ट्र म्हणून त्या राज्याचा लौकिक आहे. यादव राजवटीतच ‘मराठी’ भाषा समृद्ध होऊन अनेकोत्तम साहित्यकृतींनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले.\nयादव राजे स्वतःस अभिमानाने श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवकुळाचा प्रारंभ पौराणिक दृष्टीने श्रीकृष्ण – प्रद्युम्न (मदन) – अनिरुद्ध – वज्र – प्रतिबाहु – सुबाहु असा आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या पहिला ज्ञात यादवराजा म्हणजे ‘द्दढप्रहार’. (शके ७७२ – इसवी सन ८५० ते शके ८०२ – इसवी सन ८८०). द्दढप्रहाराने स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर त्याचे स्वतःचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात निर्माण केले. ‘चंद्रादित्यपूर’(चांदवड, जिल्हा नासिक) ही त्याच्या राजधानीची पहिली नगरी.\nनासिक जिल्हा, खानदेश व नगर जिल्ह्याचा काही भाग याला मध्ययुगात ‘सेऊण देश’ असे म्हणत. सेऊणदेश ही यादवांची पहिली भूमी. यादव हे गुजरातेतील द्वारकेहून आले. तसा उल्लेख जिनप्रभु ह्या जैन तीर्थंकारांनी लिहिलेल्या ‘नासिक्यकल्प’ ह्या ग्रंथात आलेला आहे. त्यात असे म्हटले आहे, की ‘द्वारकेच्या वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाच्या स्त्रीला जैन तीर्थकार चंद्रप्रभसाधु यांनी आश्रय दिला, तिचा पुत्र ‘द्दढप्रहार’ हा सामर्थ्यवान योद्धा झाला. त्याला लोकांनी ‘तलारपद’ (नगररक्षक, कोतवाल) दिले.’ नगररक्षक ‘द्दढप्रहार’च पुढे स्वपराक्रमावर स्वतंत्र राजा झाला.\nयादवांचे सुमारे बत्तीस कोरीव लेख उपलब्ध आहेत. यादवांचा इतिहास समजावून घेण्याची साधने म्हणजे यादवराजांनी केलेले ताम्रपट, कोरलेले शीलालेख, हेमाद्री पंडिताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या संस्कृत ग्रंथातील ‘राजप्रशस्ती’ हा खंड व मध्ययुगीन मराठी ग्रंथसंपदा (उदाहरणार्थ, लीळाचरित्र, स्थानपोथी, ज्ञानेश्वरी).\nद्दढप्रहाराने त्याच्या राज्याचा विस्तार चंद्रादित्यपूर (चांदवड) नगराच्या परिसरापासून थेट अंजनेरीपर्यंत (तालुका त्र्यंबकेश्वर) व चांदवडच्या दक्षिणेस सिंदीनेरपर्यंत (सिन्नर) केला. त्याच्या नंतर राजपदावर आला त्याचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम). तो वडिलांसारखाच पराक्रमी निघाला. त्याने त्याच्या राज्याच्या कक्षा आश्वी, संगमनेर (जिल्हा नगर)पर्यंत विस्तारल्या व त्याची राजधानी राज्यकारभाराच्या सोयीसाठी चंद्रादित्यपुराहून ‘सिंदीनेर’ म्हणून त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या नगरात आणली. सिन्नरचा प्राचीन साहित्यात ‘श्रीनगर’ असा उल्लेख आहे. सेऊणचंद्र (प्रथम) - (शके ८०२ ते ८२२) पासून त्याच्या नंतर धाडियप्प, भिल्लन (प्रथम), श्रीराज, वादुगी, धाडियप्प (द्वितीय), भिल्लम (द्वितीय), वेसुगी, अर्जुन, भिल्लम (तृतिय), वादुगी (द्वितीय), वेसुगी, भिल्लम (चतुर्थ), सेऊणचंद्र (द्वितीय), सिंघणदेव, मल्लुगी, भिल्लम (पंचम) याच्यापर्यंत (शके ११०७ ते १११५) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ येथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरी (आताचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथे नेली व प्रसिद्ध देवगिरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.\nयादवांचे राज्य उत्तरेस थेट नर्मदेपासून दक्षिणेस कृष्णा-कावेरीपर्यंत व पूर्वेस थेट नागपूर (विदर्भप्रांत) ते पश्चिमेस महिकावती (ठाणे, कोंकणप्रांत) पर्यंत विस्तारले होते. यादव राजांनी संपत्ती, वैभव, भूविस्तार निर्माण करून वैभवशाली राष्ट्र म्हणून महाराष्ट्रास हिंदुस्थानच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, वापी (बारव), प्रचंड सैन्य, सोने, मोती, राजवस्त्रे यांचे वर्णन हा स्वतंत्र ग्रंथाचा, लेखनाचा विषय आहे. राजधानी देवगिरी व देवगिरीचा किल्ला या संदर्भातही विस्तृत लेखन झालेले आहे.\nसिन्नर शहराच्या दक्षिणेस ‘शिव’ नदी आहे. त्या शिवनदीकाठी सिंदीची झाडे होती. ती सद्य काळात तुरळक आढळतात. सिंदीच्या बनाशेजारी उत्तर बाजूस उंचावर वसलेले गाव म्हणजे ‘सिंदर’ होय. ‘गावठा’ म्हणून सिन्नरमध्ये जो भाग ओळखला जातो तो भाग म्हणजे सिन्नरची मूळ वस्ती होय. सेऊणचंद्राने ‘सेऊणपुरा’ या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वसती निर्माण केली असे वसई व आश्वी येथील ताम्रपटात म्हटले आहे.\nश्रीमत्सेऊणचंद्रनाम नृवरतस्मादभूदभमिपः नित्यंदेशपदिधराजविषये स्वं नाम संपादनयन्\nयेनाकारि पुरं च सेऊणपुरं श्रीसिंदीनेरे वरे तत्पुत्रः कुलदीपको गुणानिधी श्रीधाडियप्पस्त्रतः\nअसे अश्वी ताम्रपटात (शके १०२०) म्हटले आहे.\nयादवांना ते सेऊणदेशाचे आहेत याचा अभिमान होता. शिवनदीचा उत्तर काठ ते सरस्वतीनदीचा दक्षिण काठ; तसेच, पूर्वेस सरस्वती नदी ते पश्चिमेस थेट शिवाजीनगर (बसस्टँड जवळचे) तेथपर्यंत पश्चिमेस असलेल्या त्यावेळच्या पारापर्यंत प्राचीन सिन्नर नगरीचा विस्तार होता. स्वतंत्र पेठा (पुर), वसाहती (राजवाडे, सामंतांचे राजवाडे, सैन्यतळ, हत्ती, घोडे यांचे हत्तीखाने व तबेले) यांनी यादवांची राजधानी गजबजलेली होती. त्याचे वर्णन ‘लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील ग्रंथात (शके १२००) म्हाईमभट सराळेकर यांनी केलेले आहे.\n‘श्रीनगर’मधील श्री म्हणजे संपत्ती, वैभव. श्रीनगर म्हणजे संपत्ती व वैभव यांनी संपन्न असलेले नगर. ‘ततः राजा नजराजधानी मधिष्ठितं श्रीनगरं गरीयः’ असे व्रतखंडाच्या राजप्रशस्ती श्लोक – २२ मध्ये सिन्नरला म्हटलेले आहे.\nयादव राजे सुसंस्कृत व प्रजाहितदक्ष होते. त्यांनी राज्यविस्ताराबरोबरच भव्य राजप्रासाद, किल्ले, मठ, मंदिरे, वापी (बारव), तडाग (तळे) यांच्या निर्मितीकडे लक्ष दिले. ते राजे गेले पण त्यांनी, त्यांच्या सामंतांनी निर्माण केलेल्या वास्तू त्यांच्या कार्याची आठवण देत आहेत.\nश्रीचक्रधरस्वामी व भिल्लममठ ही मंदिरसदृश पक्क्या दगडांमध्ये बांधलेली वास्तू सिन्नर शहरात चौदाचौकाचा वाडा (राजे फत्तेसिंहवाडा) या भागात आहे. महानुभव पंथ संस्थापक भगवान श्रीचक्रधरस्वामी यांचे या भिल्लममठात शके १९९०-९१ मध्ये दहा महिने वास्तव्य झाले. त्यामुळे ते महानुभाव पंथीयांचे देवस्थान ठरले आहे. वास्तू उत्तराभिमुख आहे. ती महानुभव श्रीदत्तमंदिर किंवा श्रीकृष्णमंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीनगरी भिलमठी अवस्थान (लीळा पूर्वार्ध – २३६) या लीळेत ते वर्णन आहे. मंदिराचा भव्य गाभारा व दगडी खांबांची ओसरी अशी ती भक्कम वास्तू यादव राजा, भिल्लम (तृतीय) याने शके ९४८ (इसवी सन १०२६) मध्ये निर्माण केली. त्याच्या नावावरून ते मंदिर ‘भिल्लममठ’ या नावाने प्रसिद्ध आहे. मठाला चारही बाजूंनी दगडी परकोट होता व पूर्वाभिमुख प्रवेशद्वार होते. त्याच मठात मराठी भाषेची आद्यस्त्री कवयित्री महदंबा व महानुभव पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचे रामसगाव (जिल्हा जालना) येथून आगमन झाले. त्यांनी शके ११९१ मध्ये चैत्र महिन्यांत ‘दवणा’ ह्या सुगंधी झाडाची पाने, फुले श्रीचक्रधरस्वामींना अर्पण करून ‘दमणक पर्व’ साजरे केले.\nश्रीचक्रधरस्वामींनी केलेले तत्त्वनिरूपण, त्यांच्या दहा महिन्यांच्या काळातील लीळा यांचे वर्णन मराठी भाषेचा आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र यामध्ये (पूर्वार्ध लीळा क्रमांक २३५ ते २४६) आलेले आहे; तसेच, त्या काळात स्वामी सिन्नरच्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणी (मठ, मंदिरे आदी) गेले त्यांचे वर्णन ‘स्थानपोथी’ (शके १२७५) या ग्रंथात आलेले आहे. भिल्लममठ माद्री (शके ११९२ ते १२३५) याच्या आधीपासून होता. त्यामुळे त्याला हेमाडपंथी देऊळ म्हणता येत नाही. ‘भिल्लममठ’ किंवा श्रीदत्तमंदिर सुस्थितीत असून त्या मूळ वास्तूस धक्का न लावता सभामंडपासह मंदिरनिर्म��ती करण्यात आली आहे. ते मंदिर श्रीचक्रधरस्वामींच्या निवासाने, आसनाने व लीळांनी पावन झाले आहे. तेथे स्थान निर्देशक ओटे (पंथीय भाषेत स्थान) असून मुख्य स्थानाच्या जागी श्रीकृष्णमूर्तीची स्थापना केलेली आहे. भिल्लममठाचे पट्टीशाळेत (दगडी पडवी) शके १४१५ मध्ये कवी संतोषमुनी यांनी ‘रुक्मिणीस्वयंवर’ या ग्रंथाची पूर्णता केली.\nगोंदेश्वर मंदिर ही ‘पंचायतन’ पद्धतीची भव्य वास्तू यादवांचे सामंत गोविंदराज यांनी शके ९९० च्या दरम्यान निर्माण केलेली आहे. गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरचे वैभव आहे. शांत, एकांतस्थळी असलेल्या या मंदिरात श्रीचक्रधरस्वामी गेले होते. चौकात डावीकडे त्यांचे आसन झाले व मंदिरापुढे असलेल्या मंदिराच्या निर्मितीची कथा (पद्मेश्वर मंदिर, आताचे मुक्तेश्वर मंदिर, सिन्नर-शिर्डी रस्ता) त्यांनी भक्तांना सांगितलेली आहे (पूर्वार्ध लीळा क्रमांक २४५ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरू कथन).\nसरस्वती नदीच्या दक्षिण काठावर असलेले आवेश्वर मंदिर प्राचीन पूर्वाभिमुख मंदिर, हल्ली ऐश्वरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या उत्तर पट्टीशाळेत श्रीचक्रधारस्वामींचे आसन झालेले आहे.\nयादवकालीन चतुर्विधांचे मंदिर या नावाची प्राचीन वास्तू सरस्वती नदीच्या दक्षिणकाठी होती. चतुर्विधाचा मठ मातीत दबलेला होता. तेथे स्वामींचे आसन झालेले आहे. मठाच्या ठिकाणी ‘पट्टीशाळा मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर व चतुर्विधाच्या मठाची उर्वरित वास्तू आहे.\nवैजनाथाचे मंदिर ही यादवकालीन वास्तू शीव नदीच्या दक्षिण काठावर होती. तेथे स्वामींचा तीन दिवस निवास झालेला आहे. मूळ वास्तूच्या चौकाच्या ठिकाणी ‘भोजनता मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर आहे. तेथेच यादवसम्राट महादेवराय यादव हा पुढे देवगिरीहून मुद्दाम घराण्याच्या मुळच्या राजधानीच्या ठिकाणी आला होता (शके ११९०). त्याचा उल्लेख लीळाचरित्र, पूर्वार्ध लीळा क्रमांक २३७ मध्ये आलेला आहे. महादेवराय यादवाने श्रीचक्रधरस्वामींच्या दर्शनाच्या हेतूने भिल्लममठात त्याचा सेवक पाठवला होता. तेव्हा स्वामी पट्टीशाळेत खांबाजवळ गुजराती भाषेत त्या सेवकाशी बोलले. तो पवित्र खांब वंदनीय झाला तेथे व जेथे श्रीनगरदेवाचार्य व महदाईसा यांना स्वामींचे प्रथम दर्शन झाले त्या ठिकाणी पवित्र स्थानांचे ओटे आहेत. भिल्लममठ ही पवित्र वास्तू व श्रीचक्रधरस्वामींचे ‘महास्थान’ यांना वंदन करण्यासाठी भारतभरातून भक्त येतात.\nचिंचोली (तालुका सिन्नर) हे गाव सेऊणचंद्र - द्वितीय (शके ९७२ ते १००२) याने सर्वदेवाचार्य या राजगुरूस दान दिले होते. त्या दानाचे व चिंचोली गावाच्या चतुःसीमांचे वर्णन वसईचा ताम्रपट यात आलेले आहे.\n‘सकलपरिग्रह विदितं सिंहिग्रामद्वादसके चिंचुली ग्रामः प्रदत्तः तस्य आघाटनानि पूर्विदग्भागे डोंगर दत्तं... दक्षिणे चिंचाला नाम तडागः\nपश्चिमे तलेठिलीपर्यंतः उत्तरोत्तु सिंसि ग्रामीयडोंगर दत्तं तथा वटवृक्षर्चः’\nवडगाव (पिंगळा, तालुका सिन्नर), शिंदे (तालुका जिल्हा नासिक) ही गावे चिंचोली गावाच्या भोवताली आहेत. ताम्रपटामुळे त्या गावांचेही प्राचीनत्व लक्षात येते.\nयादवकाळापासून सिन्नरशी असलेले महानुभाव पंथाचे अनुबंध पुढेही टिकले. केशिराजबास यांनी लीळाचरित्रातील लीळांचे ‘रत्नमाळास्तोत्र’ या नावाने संस्कृतमध्ये काव्यरूपाने शके १२१० मध्ये वर्णन केले. मुरारीमल विद्वांस या आचार्यांची सिन्नर येथे एका गुजराती स्त्री भक्ताने शके १५०० मध्ये पूजा केली असे ‘वृद्धाचार’ या ग्रंथात वर्णन आलेले आहे.\nश्रीचक्रधरस्वामींनी सिंघण, कृष्णदेवराय, महादेवराय, आमणदेव, रामदेव अशा पाच राजांची राजवट (शके ११४० ते ११९६) पाहिलेली आहे. स्वामींचा त्या राजांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. कृष्णदेव (शके १९८०) व महादेव (शके ११८३) यानी तर स्वामींची आदरपूर्वक पूजा केलेली आहे. श्रीचक्रधरस्वामी व त्यांचा महानुभव पंथ अशा रीतीने यादवकाळाशी संबंधित आहे.\n(अभ्यासाची साधने – लीळाचरित्र, स्थान पोथी, देवगिरीचे यादव – लेखक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, प्राचीन मराटी कोरीव लेख – लेखक डॉ. शं.गो. तुळपुळे, महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास – डिखळकर)\nअप्रतिम. इतिहास नविन पिढीसाठी मराठीत भाषांतरीत करून सांगितल्याबद्दल\nआभार. सिन्नरच्या इतिहासाची अलौकीक माहिती दिल्याबद्दल.\n'थिंक महाराष्ट्र डॉट काॅम'ला हार्दिक शुभेच्छा. सिन्नर शहराचे ऐतिहासिक व पौराणिक गोंदेश्वर मंदिराविषयी माहिती घेण्याचे सौभाग्य मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.\nमला अभिमान आहे. मी ह्या गावात जन्माला आलो आणि बाहेर शहरात जाऊन देखील मला पुन्हा ह्याच गावात येऊन यश प्राप्त झाले. खूप धन्यवाद थिंक महाराष्ट्र आणि श्री अंजनगवकर यांचे\nमी स्वतः बर्याचदा चौदा चौकाचा राजवाडा पाहिला आहे,श्री.चक्रधर स्वामींच्या पंथाचे अनुयायीना भेटुन माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.पण आज ऐतिहासीक माहिताचा हा ठेवा जाणुन धन्य झालो आहे.\nआपल्या सिन्नर शहराचा ईतिहास जतन करुन,पुढिल पीढीस कळला पाहिजे.\nआपल्या ह्या निरंतर मेहनती साठी,अभिनंदन करावे व आभार मानावे हे थोडेच आहे.\nछान अप्रतीम,सिन्नरचा इतिहास वाचून छान वाटले.\nछान माहिती दिली मी सिन्नरकर\nप्राध्यापक बाळकृष्ण अंजगावकर हे नाशिककर. त्यांनी एम.ए.बी.एड ची पदवी मिळवली. अंजनगावकर कनिष्ठ महाविद्यालय ना.सा.का. पळसे येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. ते लहानपणापासून महानुभाव पंथाशी संलग्न आहेत. वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षापासून त्यांनी महानुभाव पंथ समितीमध्ये सह कार्यवाह व अ.भा. महानुभाव परिषदेचे सचिव म्हणून काम केले. त्यांनी पंथीयदृष्ट्या तीन वेळा भारतभ्रमण पदयात्राचे आयोजन केले. व्याख्याने दिली.\nयादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर)\nसंदर्भ: सिन्नर तालुका, सिन्नर शहर, गावगाथा\nसंजय क्षत्रिय - सूक्ष्म मुर्तिकार\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: सिन्नर तालुका, सिन्नर शहर, गणपती, सूक्ष्म मूर्तीकार, संग्रह, प्रदर्शन, Ganpati, Miniature, sinnar tehsil, Sinnar city\nमहानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: श्रीचक्रधर स्वामी, खोपडी गाव, सिन्नर शहर, महानुभाव पंथ, सिन्नर तालुका\nलेखक: मधुकर मुरलीधर जाधव\nसंदर्भ: सिन्नर तालुका, सिन्नर शहर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nसिन्नरचा उद्धार सहकारी औद्योगिक वसाहतीत\nसंदर्भ: सिन्नर तालुका, sinnar tehsil, सिन्नर शहर\nसंदर्भ: डुबेरे गाव, सिन्नर तालुका, सिन्नर शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/mother-kiddney-give-son-humanity-motivation-137037", "date_download": "2019-03-25T08:38:42Z", "digest": "sha1:3MPRQK7Z45NAXBW5NEHQP76FYZMXPVYT", "length": 12487, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "mother kiddney give to son humanity motivation आईने दिले मुलाला मूत्रपिंड | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nआईने दिले मुलाला मूत्रपिंड\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nपुणे - सलग वीस वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराशी लढणाऱ्या तरुणाला त्याच्या आईने मूत्रपिंड दान केले. त्यामुळे तरुणाला जीवदान मिळाले आहे. हडपसर येथील महंमदवाडीमध्ये राहणाऱ्या फल्ले कुटुंबातील मयूरवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. खासगी रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात करण्यात आली.\nपुणे - सलग वीस वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराशी लढणाऱ्या तरुणाला त्याच्या आईने मूत्रपिंड दान केले. त्यामुळे तरुणाला जीवदान मिळाले आहे. हडपसर येथील महंमदवाडीमध्ये राहणाऱ्या फल्ले कुटुंबातील मयूरवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. खासगी रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात करण्यात आली.\nबी. जे. वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयातील ही आठवी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासारखी आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यापर्यंत ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचा दर्जा वाढला आहे. डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. अभय सदरे, डॉ. धनेश कामेरकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी यांनी ही शस्त्रक्रिया केली.\nLoksabha 2019 : शिरूरला हायटेक प्रचार\nमंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार...\nपुणे : बेकायदा वाळु विक्री प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल\nपुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nपुणे - तरुणाई देशाचे भविष्य असेल, तर तो लोकशाहीचा आधारही आहे. त्यामुळे लोकशाही सुदृढ होण्यासाठी आमचे कर्तव्य बजावण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे म्हणत...\nLoksabha 2019 : तरुण नवमतदार ठरविणार खासदार\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदारांपैकी तिशीच्या आतील वयोगटातील तरुणांची संख्या साडेबारा लाखांहून अधिक आहे. त्यात १८ ते १९ वर्षे या...\nशहरीकरणात वनांच्या संरक्षणाचे आव्हान\nपुणे - आपल्यापासून तास-दीड तासाच्या अंतरावर असणारा हडपसर, सोलापूर हा गवताळ प्रदेश होता. तेथे चित्ता, चिंकारा, लांडगा यांचे वास्तव्य होते. पण, या...\nLoksabha 2019 : ...तेव्हा जात का आठवली नाही - अजित पवार\nपुणे - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.farmguru.in/new-blog/2015/7/23/72fkiypyyvlt0k9a6fr5gssvzuk0d9", "date_download": "2019-03-25T07:54:30Z", "digest": "sha1:YY3EXPJMP42BGS7KWIUKVYW22FQMZY3X", "length": 1856, "nlines": 29, "source_domain": "www.farmguru.in", "title": "जुलै बटाटा कॅम्पेन — farmguru", "raw_content": "\nबटाटा उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.\nकृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.\n\" फार्मगुरू \" ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात \nजुलै कॅम्पेनमध्ये सभासद होऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2528?page=1", "date_download": "2019-03-25T08:35:48Z", "digest": "sha1:SHPKOO7PWQILSROUZ42JVWN2DTTTDBUK", "length": 14087, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अविनाश दुसाने - शब्द कमी कार्य मोठे! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअविनाश दुसाने - शब्द कमी कार्य मोठे\nचंद्राचे चांदणे शीतल व आल्हाददायक असते. त्याला तेज असते पण त्याने डोळे दीपून जात नाहीत. तसे विंचूरचे अविनाश दुसाने. अगदी शांत, साधे व मितभाषी. त्यांना ते विशेष, वेगळे, दखल घेण्याजोगे काही करतात ह्याची दखल आहे असेदेखील त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही. असे ऋजू, निगर्वी व संयत व्यक्तिमत्त्व.\nअविनाश दुसाने नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावाचे रहिवासी. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते दहावीला उत्तर महाराष्ट्रात ‘मराठी’मध्ये पहिले आले होते. दहावीला ८६ टक्के मार्क होते. पण त्यांनी त्यांना व्यापाराची व समाजकार्याची आवड असल्याने शिक्षण सोडले आणि ते पिढीजात चालत आलेल्या सराफ व्यवसायात लक्ष देऊ लागले. ते एक मंगल कार्यालयही चालवतात. ते अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त, स्वच्छ व वाजवी दरात उपलब्ध होते, ही त्याची प्रसिद्धी. अविनाश लोकांना रोजगार मिळावा म्हणून कार्यालय चालवतात असे लोक सांगतात.\nअविनाश यांना सामाजिक कामाचे वेडच आहे. त्यांनी समविचारी मित्रांनी एकत्र घेऊन ‘स्वातंत्र्य वीर सावरकर मित्र मंडळ’ १९९३ मध्ये स्थापन केले. रक्तदान शिबिरे घेणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे अशी कामे मंडळामार्फत केली. त्यांनी सहकारी पतसंस्था २००२ मध्ये स्थापन केली. पतसंस्था नावारूपाला आली आहे. पतसंस्थेकडे सहा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने लेखापडताळणीत सातत्याने ‘अ’ वर्ग कायम राखला आहे. अविनाश दुसाने यांनी त्यांच्या छोट्या गावात इंग्रजी माध्यमाची सोय व्हावी म्हणून ‘सरस्वती एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली आहे. संस्थेची इंग्रजीबरोबर मराठी माध्यमाची देखील शाळा आहे. तिची पटसंख्या साडेतीनशे आहे. दुसाने यांनी आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या दिवसकार्यात गाव जेवण देण्याऐवजी आजोबांच्या स्मृती प्रीत्यर्थ गावाला रुग्णवाहिका घेऊन दिली. तीवर स्वखर्चाने वाहन चालक ठेवला आहे.\nत्यांनी आजीच्या स्मृती जतन करण्याकरता वाचनालय सुरू केले आहे.\nअविनाश दुसाने यांचा स्वच्छतेवर विशेष भर आहे. ते दीड वर्षें विंचूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी होते. त्यांनी ग्रामस्वच्छतेची अनेक कामे केली. भुयारी गटारे बांधली; गावातील सत्तर गटारे भुयारी आहेत. स्मशानभूमीचे सुशोभीकरण केले. स्वच्छतेसाठी जनजागृती केली. माध्यमिक शाळेत स्वच्छता अभियान राबवले. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेमागे उकिरडा होता. तेथे कोणतेही शासकीय अनुदान न घेता लोकवर्गणीतून सार्वजनिक उद्यान तयार केले.\nत्यांनी सरपंचपदावर असताना रस्त्यांच्या कडांनी एक हजार ���ाडे लावली. त्यांनी सरपंचपद सोडल्यावर झाडांना पाणी देऊन ती झाडे स्वत: खर्च करून जगवली.\nत्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात एक रूपयाचा सुद्धा अपहार होऊ दिला नाही. उलट, त्यांनी त्यांना स्वत:ला मिळणाऱ्या दरमहा एक हजार मानधनातून कचरापेट्या घेऊन त्या सार्वजनिक ठिकाणी ठेवल्या. ते स्वत: आर्थिक भार सोसून सार्वजनिक कामे करत असतात. त्यांनी ग्रामस्वछतेचा ध्यासच घेतला आहे.\nते गावातील व्याख्यानमालेसारख्या अनेक सार्वजनिक उपक्रमांत सक्रिय सहभाग देतात. त्यांचे काम निरपेक्ष भावनेने चालू असते.\nभल्याची दुनिया उरली नाही अशी वाक्ये अविनाश दुसाने यांच्यासारखी माणसे खोटी ठरवत असतात\nअनुराधा काळे या मूळच्या चिपळूणच्या. त्यांनी पुण्यात येऊन मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 'स्टेट गव्हर्नर स्टॅटिस्टीस्क डिपार्टमेन्ट' (Economics) मध्ये रिसर्च ऑफिसर या पदावर काम केले. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्न आहेत.\nअकोला - पेरूंचे गाव\nसंदर्भ: शेती, शेतकरी, पेरू, डाळींब\nडॉ. कृष्णा इंगोले - माणदेशाच्या साहित्यिक जडणघडणीचे शिल्पकार\nसंदर्भ: साहित्यिक, नरहाळे गाव, ग्रामीण साहित्य, शिक्षक, सांगोला तालुका, सांगोला शहर\nभागवत नखाते - हाडाचे शेतकरी\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, अकोला गाव, कबड्डी\nशहाजी गडहिरे - सामाजिक न्यायासाठी अस्तित्व\nसंदर्भ: स्त्री सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, शेती\nमैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी\nसंदर्भ: आदिवासी, मेळघाट, कुपोषण, बचावकार्य\nरवी गावंडे - अवलिया ग्रामसेवक\nसंदर्भ: शेती, जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, नेर तालुका, पाथ्रड गाव, ग्रामविकास\nनईमभाई पठाण - पुरातन वस्तूंचे संग्राहक\nसंदर्भ: संग्राहक, जुनी नाणी, कॅमेरा, पोस्टाची तिकिटे, घड्याळ, दुर्मीळ, निफाड तालुका, निफाड गाव\nमंदिर जीर्णोद्धारप्रसिद्ध सुभाष कर्डिले\nसंदर्भ: निफाड तालुका, निफाड गाव\nजनकल्याण समिती - आपत्ती विमोचनासाठी सदा सिद्ध\nसंदर्भ: ग्रामविकास, जलसंवर्धन, जल-व्यवस्थापन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दुष्काळ\nप्रल्हाद पाटील-कराड - प्रगतशील शेतकरी\nसंदर्भ: निफाड गाव, निफाड तालुका, जळगाव (निफाड), प्रयोगशील शेतकरी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्���ा\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A5%B2%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T07:23:11Z", "digest": "sha1:FHI7JO3LHM7AQHYLVYQ37UZPT5P4A3PQ", "length": 8836, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "३१. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : बोरोज ॲडिंग मशिन - विचारप्रवाह", "raw_content": "\n३१. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : बोरोज ॲडिंग मशिन\nडॉर फेल्ट १८८०च्या दशकात जेंव्हा ‘कॉम्पटॉमिटर’ या आपल्या ‘ॲडिंग मशिन’वर काम करत होते, तेंव्हा त्याच सुमारास विल्यम बोरोज हे देखील स्वतःची ‘ॲडिंग मशिन’ तयार करत होते. विल्यम बोरोज यांचे वडील एक मेकॅनिक होते. त्यामुळे लहानपणापासूनच बोरोज यांना त्या क्षेत्रात गती होती. तरुणपणी त्यांनी बँकेत क्लर्क म्हणून काही काळ काम केले. परंतु बोरोज यांना ते काम फारच जड गेले. कामातील ताणतणावाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. तेंव्हा त्यांनी बँकेतील नोकरी सोडली व आपल्या वडिलांप्रमाणे मेकॅनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. बँकेतील एकंदरीत अनुभव लक्षात घेता त्यांनी बँकेसाठी अँडिंग मशिन तयार करण्याचे मनावर घेतले. त्यासाठी काही सहकार्यांच्या मदतीने १८८६ साली त्यांनी ‘अमेरिकन अरिदमॉमिटर कंपनी’ स्थापन केली. पुढे १९०५ साली या कंपनीचे नाव बदलून ‘बोरोज ॲडिंग मशिन कंपनी’ असे करण्यात आले.\nआपल्या कामात अचूकता असावी असा बोरोज यांचा आग्रह होता. त्यामुळे यंत्र तयार करत असताना त्याबाबत ते अगदी काटेकोर असत. बोरोज यांच्या ॲडिंग मशिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रिंटरची सोय होती. त्यामुळे या मशिनमार्फत करण्यात आलेली गोळाबेरीज ही छापिल स्वरुपात उपलब्ध होत असे. त्याकाळी ही एक अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट होती. तरी देखील पहिल्या दशकात या यंत्राला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हळूहळू या यंत्राची गुणवत्ता व्यवसायिकांच्या लक्षात येऊ लागली. त्यामुळे बोरोज यांचा व्यवसाय वृद्धिंगत होऊ लागला. परंतु त्याच सुमारास म्हणजे १८९८ साली वयाच्या ४३व्या वर्षी विल्यम बोरोज यांचे निधन झाले.\n२०व्या शतकाच्या सुरुवातीला ‘बोरोज ॲडिंग मशिन कंपनी’चा व्यवसाय हा खर्या अर्थाने वाढीस लागला. परंतु त्या यंत्रावर काम करण्याकरिता कुशल मनुष्यबळाची आवश्यकता होती. तेंव्हा त्यादृष्टीने प्रशिक्षण देण्याकरिता अनेक शाळा निर्माण झाल्या. १९०८ साली बोरोज कंपनीने ५८ प्रकारच्या ॲडिंग मशिन्स तयार केल्याचे समजते. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय नजरेसमोर ठेवून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे बाजारात आणली. दरम्यान ॲडिंग मशिन्सची निर्मिती करणार्या इतर काही लहान कंपन्या बोरोजने विकत घेतल्या. पहिले महायुद्ध सुरु होण्यापूर्वी एक वर्ष आधी म्हणजेच १९१३ साली अमेरिकेत प्राप्तीकराची फेररचना करण्यात आली. त्यामुळे त्यासंदर्भातील कामकाजात वाढ झाली. परिणामी ‘बोरोज ॲडिंग मशिन’च्या मागणीत भर पडली. साधारणतः पहिल्या महायुद्धापासून दुसर्या महायुद्धापर्यंत बोरोजच्या ॲडिंग मशिन्सना चांगली मागणी होती. दुसर्या महायुद्धानंतर मात्र संगणक युगाची खर्या अर्थाने सुरुवात झाली.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n७४. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग ३\n२३. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : हर्मन हॉलरॅथ\n१०. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : खगोलशास्त्र\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/famous-persons-wives/", "date_download": "2019-03-25T07:52:09Z", "digest": "sha1:K5XCUA63YFCMFIHES2CY6QZSZIQZWZVH", "length": 14474, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कर्तबगार बायका!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कर्तबगार बायका\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nअसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण यशस्वी पुरुषांच्या पत्नी ही यशस्वी होतात. तसंच त्या स्वतःच्या पतीच्या नावाचा वापर करत नाहीत. स्वतः वेगळा व्यवसाय करतात आणि त्यात आपली छाप पाडतात. त्या फक्त पैशासाठी या गोष्टी करतात असं नाही. तर त्यांना काहीतरी करण्याची हौस असते. त्यांनाही त्यांची स्वप्न असतात म्हणून त्या त्यांचे छंद जोपासतात त्यांना हवा तो व्यवसाय करतात. यातल्या अनेक कर्तबगार महिलांना त्यांच्या पतीने त्यांचे कर्तुत्व बघून तर नाही ना निवडले इतक्या त्या त्यांच्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत.\nअक्षय कुमारची पत्नी होण्याआधीही ट्विंकल खन्ना ही एक प्रसिद्ध अभिनेत्री तर होतीच, त्याशिवाय ती इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभ लेखिका, लेखिका म्हणून कार्यरत आहेच. तसंच ट्विंकल अक्षयच्या दोन मुलांची आई देखील आहे. अलीकडे अटक झालेल्या रामरहीमविरोधात तीने ट्विट केले होते. त्यावरून तिला राम रहीमच्या भक्तांनी धमकावले देखील होते.\nअरबाझ खान पासून विभक्त झाल्यानंतरही फिल्मइंडस्ट्रीमध्ये मलायकाचं नाव चर्चेत असतं. ती एक उत्कृष्ट डान्सर, अभिनेत्री तर आहेच. तीने तिच्या करिअरची सुरवात व्हिजे म्हणून केली होती. आज मलायकाला १५ वर्षांचा मुलगा आहे. तिच्याकडे बघून विश्वास बसतो का \nचित्रपट निर्माते बोनी कपूर यांची पत्नी होण्याआधी ही श्रीदेवी या सिनेअभिनेत्री होत्या, त्या आजही सिनेअभिनेत्री आहेत. बोनी कपूरशी लग्नहोण्यापूर्वी त्या अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्या पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लीश विंग्लीश चित्रपटात त्यांनी उल्लेखनीय भुमिका केली होती.\nगौरी खान ही किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या तीन मुलांची आई आहे. तसेच तिचा स्वतःचा इंटिरिअर डिझाईनचा बिझनेस असून ती शाहरूखच्या रेड चिली प्रोडक्शनची प्रोड्यूसर देखील आहे.\nअर्जून रामपाल याच्यासोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी मेहेरची आपली स्वतःची ओळख आहे. ती एक यशस्वी सुपर मॉडेल तर आहेच, त्याशिवाय तिने १९८० साली फेमिना मिस इंडिया किताबही जिंकला होता. सध्या मेहर दोन मुलींची आई आहे.\nमिस्टर परफेक्शनिस्ट ची पत्नी किरण राव ही स्वतः चित्रपट दिग्दर्शक आहे. धोबीघाट हा तीने दिग्दर्शीत केलेला पहिला चित्रपट. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच किरण आणि आ��ीरची ओळख झाली. पुढे दोघे विवाह बंधनात अडकले. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.\nहृतिक रोशन ची एकेकाळी पत्नी असलेली सुझॅन स्वतःचा इंटिरीअर डिझायनींगचा व्यवसाय करते. तिच्या कंपनीचे नाव आहे चारकोल प्रोजेक्ट जो सध्या व्यवस्थित सुरू आहे. चित्रपट आणि फेम यांपासून ती जरा दूरच असते.\nतर अश्या या सेलिब्रिटींच्या बायका केवळ “Celebrity Wives” म्हणूनच नाही ओळखल्या जात तर त्यांची स्वतःची स्वतंत्र अशी एक ओळख आहे. जी त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने कमावली आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत\n“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न →\n‘ह्या’ चित्रपटांच्या शुटिंगसाठी तुमच्या आवडत्या कलाकारांनी दिले त्यांचे स्वतःचे घर\n“तू कधी प्रेम केलं आहे का” : वडिलांचा अनपेक्षित प्रश्न आणि गीतकाराचा असामान्य प्रवास\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\nवर्ल्ड फेमस ‘पटियाला पैग’च्या जन्माची कथा \n“गेम ऑफ थ्रोन्स” : हा राजगादीचा खेळ एवढा लोकप्रिय का झालाय\nजीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास\n२७५ लहान धबधब्यांपासून तयार होणारा महाप्रचंड धबधबा\n…आणि कचरा वेचणारा बनला अत्युत्कृष्ट प्रोफेशनल फोटोग्राफर\nएक पत्र- प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या Ex-Boyfriend साठी लिहिलेलं\nदिग्दर्शक एस. राजामौली यांनी स्वत: बाहुबलीमध्ये काम केले आहे तुम्ही त्यांना ओळखलं होतं का\nतुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे जमिनीखालील अचाट सुंदर स्वर्गलोक \nGST वर बोलू काही-भाग ४ – अप्रत्यक्ष करप्रणालीमाधल्या त्रुटी\nMcDonald’s ला भारतात प्रवेश केल्यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर नफा झालाय\nबाबासाहेबां इतकेच संविधान निर्मितीचे श्रेय ‘ह्या’ व्यक्तीला देखील द्यायला हवे\nफ्रिक्वेंटली विहंगम : विमानातून फोटोग्राफी करण्याचा रोचक अनुभव\nदोन्ही बाजूंनी उत्तम आवाज येतो, मग इयरफोनवर Left/Right का बरं लिहिलेलं असतं\nतुरुंगाची कडेकोट सुरक्षा भेदून पळून गेलेले भारतातील हे ५ अट्टल गुन्हेगार तुम्हाला माहित आहेत का\nयावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nचीनचं काय घेऊन बसलात आपल्या भारताची ही ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/why-makarsankranti-falls-on-14-jan-every-year/", "date_download": "2019-03-25T07:48:12Z", "digest": "sha1:PJPWAVAQ44LQQXQGJW5EBB6MLGRSNJM3", "length": 15059, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मकरसंक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते? ह्यादिवशी पतंग का उडवतात? - जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमकरसंक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते ह्यादिवशी पतंग का उडवतात ह्यादिवशी पतंग का उडवतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n इंग्रजी वर्षाच्याऐन सुरुवातीला येणारा सण. आणि तोही न चुकता १४ जानेवारी किना एखाद्या वर्षी क्वचितच १५ जानेवारीला. पतंगबाजी, गुळपोळी यांच्यासाठी प्रसिद्ध असणारा सण. विशेष म्हणजे वर्षभरातील इतर सर्व भारतीय सण पहा. इंग्रजी दिनदर्शिकेतील त्यांच्या तारखा हिंदू दिनदर्शिकेच्या संदर्भाने दरवर्षी बदलेल्या असतात. पण मकरसंक्रांतीची तारीख बदलत नाही. हे जरा कोड्यात टाकणारं आहे.\nकाय आहे या गोष्टीमागचे कारण\nजाणून घेऊयात आणि त्याचबरोबर पाहूयात – मकर संक्रांतीच्या बाबतीत काही माहित नसणाऱ्या इंट्रेस्टिंग गोष्टी…\nमकर संक्रांत १४ जानेवारीलाच का येते\nसर्व हिंदू सण लुनार दिनदर्शिका म्हणजेच चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येतात. पण चंद्राच्या अनियमित गतीमुळे त्यांची इंग्रजी वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते. संक्रांतीचे तसे नाही.\nमकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका (सोलर कॅलेंडर) म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकाच असतो.\nतो दिवस म्हणजे १ जानेवारी. पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही, दार आठ वर्षांतून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस एका दि��साने पुढे ढकलला जातोय. म्हणजे काही वर्षी संक्रांती १५ तारखेला येते.\nशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, साधारण २०५० पासून मकरसंक्रांती दरवर्षी १५ तारखेला येईल.\nमकरसंक्रांतीच्या दिवशी दिवस आणि रात्र यांची वेळ सारखी असते.\nमकरसंक्रांतीच्या आधीचा काल म्हणजे हिवाळा, आणि नंतरचा म्हणजे उन्हाळा. हिवाळ्यात दिवस लहान होतो आणि उन्हाळ्यात तो मोठा होतो असे आपण बरेचदा ऐकले असेल. असे का होते याचे कारण म्हणजे या दिवशी आधी चालू असलेल्या दक्षिनायानातून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो.\nआणि प्रवेश करतेवेळी म्हणजे १४ जानेवारी या दिवशी तो बरोबर विषुववृत्तावर असतो. इथून पुढे तो हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. म्हणून या दिवशी रात्र आणि दिवस यांच्या वेळा एकसारख्या असतात.\nमकरसंक्रांतीची भारतात कितीतरी नावे आहेत.\nभारतात सांस्कृतिक विविधता अनन्यसाधारण आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक निकषानुसार, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार सण साजरे केले जातात. मकरसंक्रांती या एकाच दिवशी भारतभरात साजरा होणाऱ्या सणाची प्रत्येक ठिकाणी वेगळी नावे आहेत.\nदक्षिणेत हाच दिवस ‘पोंगल’ या नावाने साजरा करतात. तर उत्तर भारतात यालाच ‘लोहरी’ असे नाव आहे. उत्तरायण, माघी, खिचडी अशी विविध नावे अनेक भागात आहेत.\nमकरसंक्रांतीला पतंग का उडवला जातो\nमकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक रंजक कारण आहे.\nजुन्या काळी सकाळच्या वेळी अंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा. सूर्याची कोवळी किरणे म्हणजे ड जीवनसत्वाचा स्त्रोत पतंग उडवताना सण साजरा करत आरोग्य राखले जावे म्हणून ही पद्धत आहे.\nहिवाळ्याच्या गार हवेत त्वचेला अनेक इन्फेक्शन्स होतात. हे विषाणू सूर्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या उष्णतेमुळे जास्त काल जगू शकत नाहीत. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.\nनवीन वर्षाची सुरुवात गोड बोलून करायला शिकवणारा आणि एकतेचा संदेश देणारा असा हा भारतीय सण. इन मराठी टीमच्या वतीने आमच्या तमाम वाचकांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “मीडिया ट्रायल” : शब्द प्रयोगाची रोचक उत्पत्ती आणि भा���तातील स्वयंघोषित न्यायालये\nभारतीय वायुसेनेतील महत्वपूर्ण “बहादुर” चा – आखरी सलाम\nमोदींच्या कॅबिनेटचा गर्भित अर्थ – राजकारण आणि बरंच काही \nहृदयात धडकी भरवणाऱ्या, जगातील १० सर्वात धोकादायक रेल्वे लाईन्स \nअॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ\nहे दहा उपाय तुम्हाला गरोदरपणात होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून वाचवतील\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nउत्तर कोरियाचा किम जोंग “शहाणा” झालाय की चलाख खेळी खेळतोय\nअश्वत्थामा डोक्यावर जखम घेऊन आजही या किल्ल्याच्या मंदिरामध्ये पूजा करतो…\nमनात जनांत कृष्णमय व्हा, त्यानेच तुम्ही हा संसार सहज तरून जाल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २१\nएक असाही मराठी माणूस जो भारतातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो\nजगातील अश्या विचित्र गोष्टी, ज्या कोठून उत्पन्न झाल्या, ते कोणालाच माहित नाही\nहिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरवादाची हळुवार उकल कोण करणार\n“खिलजी” आणि “मुघल” – दोघेही मुस्लिम शासकच, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते\nदोन्ही हात जोडून “सलाम” : मंगेश पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली\nहॉस्पिटल्स मधल्या “ऑर्गनाइस्ज्ड फसवणूक” विरुद्ध लढा उभा रहातोय – तुम्ही सामील व्हाल का\nपहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो\nयुयुत्सु: महाभारतामध्ये पांडवांच्या बाजूने लढणारा ‘अज्ञात कौरव’\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nFebruary 16, 2018 इनमराठी टीम Comments Off on “बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\n“आधार” लिंक्ड बँक खातं आणि गॅस सबसिडी : सरकारी यंत्रणेचा “असाही” मनस्ताप\nह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/171694-", "date_download": "2019-03-25T07:24:39Z", "digest": "sha1:EACSKSKPVKXMKQ7YZFYSBUOUCC5YBMFV", "length": 9143, "nlines": 21, "source_domain": "isabelny.com", "title": "आपण एसइओ साठी नवीन बॅकलिंक्स मिळण्यासाठी सर्वोत्तम पध्दती दर्शवू शकता?", "raw_content": "\nआपण एसइओ साठी नवीन बॅकलिंक्स मिळण्यासाठी सर्वोत्तम पध्दती दर्शवू शकता\nलिंक बिल्डिंग पूर्वीपेक्���ा पूर्वीपासूनच शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ) मध्ये आणखी महत्वाचे बनले आहे असे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच नवीन बॅकलिंक्स मिळविणे - प्रत्येक वेबमास्टर आणि साइट मालकांसाठी एसईओ मध्ये उत्तम प्रगती व्हावी यासाठी आवश्यक आहे - शीर्ष ऑनलाइन शोध परिणामांमधील त्यांच्या ऑनलाईन प्रोजेक्टसह. चला हे समजू द्या - चांगल्या ऑनलाइन जाहिरातीसाठी खरोखर नवीन बॅकलिंक्स प्राप्त करणे केवळ त्यांच्या ट्रस्ट किंवा लोकप्रियतेबद्दल नाही. मला असे म्हणायचे आहे की नैसर्गिक दुवा इमारत प्रत्यक्षात आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगसह वास्तविक मूल्य वितरित करण्यासाठी आहे - शेवटी, आला प्रतिस्पर्ध्यांच्या वर आघाडी घ्यावी आणि आपल्या स्वत: च्या प्रोजेक्टची किंमत सामायिक करणे, उल्लेख करणे आणि यासह दुवा साधणे. त्यामुळे, जास्तीतजास्त नवीन बॅकलिंक्स मिळवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही - servidores dns en mexico. त्यांचे गुणवत्ता आणि सेंद्रीय निसर्गावर जोर देण्यासाठी ते अधिक चांगले ठरतील - पहिले आणि महत्त्वपूर्ण. असे करत असताना, मी आपल्याला नवीन बॅकलिंक्सची सर्वोत्तम नैसर्गिक मार्ग शिकण्याबद्दल काही वापर-सिद्ध पध्दती दर्शवू देतो - आपल्या सामग्रीसह.\nअनन्य सामग्री जे अधिक मूल्य वितरीत करते\nकशासही आधी, प्रत्येक वेबसाइट किंवा ब्लॉगमध्ये एक ठोस पृष्ठ सामग्री असावी जे स्वारस्य प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट मूल्य देते. वापरकर्ते किंवा संभाव्य ग्राहकांच्या लक्ष्य ठिकाणांना खर्या ग्राहकांमधून रूपांतरीत करणे अपेक्षित आहे. त्या मार्गाने, विशेषतः आपल्या वेब पृष्ठांना Google द्वारे ओळखले जाऊ शकते कोणत्याही अन्य वेबसाइट्स किंवा विषय चर्चाशी संबंधित ब्लॉग किंवा समान व्यावसायिक उद्योगांऐवजी व्यापक ऑनलाइन प्रदर्शनासाठी अधिक प्राधान्य.काय अधिक आहे - एक अद्वितीय आणि उच्च-दर्जाच्या सामग्रीसह नवीन बॅकलिंक्स कमावणे म्हणजे आपल्याला प्रासंगिक संदर्भांपासून लाभ होईल, ज्यास व्हाईट-टोट एसइओमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वे असेही म्हटले जाते.\nसामग्री ऑप्टिमायझेशन आणि व्हिज्युअलायझेशन\nआपल्या मजकूर लेखन (किंवा कमीत कमी सर्वात वाईट बोअरिंग) च्या काही भागाचे दृश्यमान सामग्रीच्या काही सुप्रसिद्ध आणि निश्चितपणे अधिक आकर्षक माध्यमांमध्ये पुनर्स्थित करणे विचारात घ्या. मला असे म्हणायचे आहे की आपण सामग्रीच्या उच्च लोकप्रिय प्रकारांची निर्मिती करण्यासाठी आपला वेळ गुंतविण्याची शिफारस केली आहे ज्यामुळे आपण वेब ट्रॅफिक वाढवू शकता आणि एकाच वेळी सर्वाधिक बॅकलिंक्स आकर्षित करू शकता - जवळजवळ स्वयं-चालविलेल्या पद्धतीने. या प्रकारे, आपण आकर्षक आकर्षक इन्फोग्राफिक्स, स्प्रेडशीट्स, जोडलेल्या मूल्यासह ग्राफिक्स तयार करण्यावर अधिक चांगले फोकस लावू इच्छित असाल ज्यामुळे आपण मध्यकालीन व्यवसायाद्वारे अधिक बॅकलिंक्स तयार करता.\nगेस्ट ब्लॉग्जिंग बिल्डस अॉॉस्ट्रेशन\nआपल्या व्यवसायाशी निगडीत काही लोकप्रिय ब्लॉगर्स किंवा आपल्या प्रभावशाली उद्योगातील टॉप-इफेक्टर्सना बाहेर जाणे अद्याप एक उत्तम मार्ग आहे केवळ एक फार मजबूत PageRank सह दोन बॅकलिंक्स मिळविण्याकरिताच नव्हे तर वापरकर्त्यांमध्ये आपले स्वत: चे अधिकार आणि विश्वास निर्माण करणे.शेवटी - क्षेत्रातील तज्ञ ज्ञानाचा अग्रगण्य स्त्रोत बनण्यासाठी, त्यामुळे आघाडी घेतली जात आहे आणि आपली वेबसाइट किंवा ब्लॉग शोध स्पर्धेतून बाहेर पडणे. त्याच वेळी, तथापि, हे विसरू नका की जेव्हा प्रत्येक वेळी आपण आपल्या सोबती ब्लॉगर्सना दर्जेदार अतिथी पोस्ट वितरीत कराल - तेव्हा आपण आपल्या स्वत: च्या पृष्ठांवर आणखी एकनिष्ठ अभ्यागतांचे नेतृत्व करण्यासाठी त्या योग्य बॅकलिंक्सची कमाई करत आहात.फक्त योग्य उद्देशाने पाहुणे लेख आणि योग्य उद्देशासाठी केवळ आकर्षक ब्लॉग पोस्ट आपण लिहित आहात हे सुनिश्चित करा - आणि आपण पूर्ण केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/videos/page/3/", "date_download": "2019-03-25T07:34:58Z", "digest": "sha1:VE2ECCBTETA5TGO6NX4G7J4FXGGUO3G5", "length": 6578, "nlines": 65, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Videos - Page 3 of 13 - मराठी कलाकार", "raw_content": "\n‘जाऊ दे ना वं’ आगामी ‘नाळ’ सिनेमातील गाणं प्रदर्शित.\nकाही दिवसांपूर्वी अचानक दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमाची बातमी आली. ‘नाळ’ असं सिनेमाचं नाव असून प्रथमच...\nअवधूत गुप्तेंचा रॉकिंग अंदाज ‘गॅटमॅट होऊ देना’.\nबऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आगामी ‘गॅटमॅट’च्या निमित्ताने ऑनस्क्रीन झळकणार असून सर्वांना तालावर थिरकवणारे त्यांचे...\n“आराराsss राss राss… खतरनाक” गाणं सर्वत्र घालतंय धुमाकूळ. पहा व्हीडीओ.\nहल्ली ‘आराराsss राss राss… खतरनाक’ हा मह��राष्ट्रात सगळ्यांच्याच ओळखीचा शब्द परिचय बनला असून नुकतंच त्यावर आधारित...\nबॉईज २ चा ट्रेलर: मजा आणि धमाल करत मिळवतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद\nबॉईज १च्या यशानंतर आता निर्माते सिनेमाच्या सिक्वेल कडे निघाल्याचं बघायला मिळतंय. नुकताच बॉइज २ चा ट्रेलर...\nअभिनेता ह्रिषिकेश जोशी करतोय दिग्दर्शन तर दिवंगत अभिनेत्री रीमा लागूंचा अखेरचा सिनेमा “होम स्वीट होम”.\nमच अवेटेड आणि मल्टीस्टारर सिनेमा होम स्वीट होमचा ट्रेलर यूट्यूबवर लॉन्च झाला आहे. ह्रिषिकेश जोशी, मोहन...\nडॉल्बीवाल्या, आवाज वाढव डीजे, नंतर धमाकेदार मराठी पार्टी सॉन्ग ‘भावड्या’ फिवर व्हायरल. पहा व्हीडिओ.\nभावड्याची उत्कंठा आता संपली असून तो आता आपल्या सर्वांसमोर आला आहे. भावड्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स चांगल्याच...\nएक अनोख्या धाटणीची, स्त्रीप्रधान कथा ‘बोगदा’. पहा ट्रेलर.\nनितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित, दिग्दर्शित ‘बोगदा’ सिनेमाचा नुकताच टीझर लाँच करण्यात आला असून...\nसत्य घटनेवर आधारित ‘टेक केअर गुड नाईट’ आगामी सिनेमा विशेष. पहा ट्रेलर\nमराठी सिनेमात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो,हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी...\nरहस्यमयी “सविता दामोदर परांजपे”चा ट्रेलर लॉन्च. जॉन अब्राहम करतोय मराठी सिनेमा निर्मिती. पहा ट्रेलर.\nबॉलिवूड सिनेमांतून यशाची शिखरे गाठल्यानंतर आता अभिनेता जॉन अब्राहमला मराठी सिनेमाचे वेध लागल्याचं दिसतंय. कारण कि...\nआर्ची येतेय पुन्हा भेटीला आगामी सिनेमातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल.\nपदार्पणातचं ब्लॉकबस्टर हिट सिनेमा सैराटमधून आपल्या भेटीस आलेली आणि सर्वांना जवळची झालेली आर्ची पुन्हा एकदा तिच्या...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/ramesh-dev/", "date_download": "2019-03-25T08:38:35Z", "digest": "sha1:7J7DBVG2BCTSP4LKVLNP7RRYCVVPKOZ3", "length": 1966, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " ramesh dev - मराठी कलाकार", "raw_content": "\n९० वर्षांच्या “ह्या” जेष्ठ अभिनेत्याची “छत्रीवाली” मालिकेत एंट्री\nबऱ्याच कालावधीनंतर मराठी सिनेमातील दिग्गज अभिनेते रमेश देव यांची छोट्या पडद्यावर झलक आपल्याला स्टार प्रवाह वरील...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-savantwadi-railway-terminal-politics-90668", "date_download": "2019-03-25T08:52:04Z", "digest": "sha1:S25MKKCIPF62SWTFPQKOPWU6NW5PKKHX", "length": 17212, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Savantwadi Railway Terminal Politics सावंतवाडी रेल्वे टर्मिनन्सचा वाद चिघळला | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसावंतवाडी रेल्वे टर्मिनन्सचा वाद चिघळला\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nसावंतवाडी - मळगावात मंजूर झालेले रेल्वे टर्मिनन्स मडुर्यात नेण्यासाठी नारायण राणे यांच्या आड राहून राजन तेली हेच खरे सुत्रधार होते. त्यामुळे त्यांनी आता दिखाउपणा करु नये. त्यावेळचा विरोध स्थानिक ग्रामस्थ आजही विसरले नाहीत, अशी प्रतिटिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.\nसावंतवाडी - मळगावात मंजूर झालेले रेल्वे टर्मिनन्स मडुर्यात नेण्यासाठी नारायण राणे यांच्या आड राहून राजन तेली हेच खरे सुत्रधार होते. त्यामुळे त्यांनी आता दिखाउपणा करु नये. त्यावेळचा विरोध स्थानिक ग्रामस्थ आजही विसरले नाहीत, अशी प्रतिटिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.\nआम्हाला केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा आदर आहे. आम्ही त्यांच्यावर टिका केलेली नाही; मात्र कोणाच्या पुढाकाराने का होईना टर्मिनलचे थांबलेले काम मार्गी लागणे गरजेचे आहे, असेही श्री. राऊळ यांनी सांगितले. तेली यांनी काल (ता.3) येथे पत्रकार परिषद घेवून ज्या प्रभूंनी टर्मिनन्स मंजूर करुन आणले. त्यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टिका दुदैवी असल्याचे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री. राऊळ यांनी येथे पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी विलास जाधव, चंद्रकांत कासार, मेघःश्याम काजरेकर, दिलीप सोनुर्लेकर आदी उपस्थित होते.\nयावेळी श्री. राऊळ म्हणाले, “मळगाव येथे मंजूर झालेले टर्मिनन्स मडुर्यात नेण्याचा डाव त्यावेळी तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी आखला होता. त्यात नारायण राणे यांच्या आड राहून सुत्रधाराची भूमिका राजन तेली करीत होते. हे येथील जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आता दिखाउपणाचा आव आणू नये. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने टर्मिनन्सचे काम पुर्ण होणे गरजेचे आहे; मात्र सद्यःस्थिती लक्षात घेता काम थांबले आहे. त्यामुळे त्याला योग्य ती गती मिळण्यासाठी आम्ही क्षेत्रीय प्रबंधकांच्या नावाने निवेदन दिले. त्यात गैर काय आमच्या पालकमंत्री, खासदारांच्या माध्यमातून सुध्दा हे काम सुरु होण्यासाठी आमचे प्रयत्न निश्चितच आहे आणि यापुढे आमची आंदोलनाची तयारी आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र आमची ही भूमिका दुदैवी असे म्हणणारे श्री. तेली हे सत्ताधारी पक्षात असताना पाटबंधारे विभागातील अधिकार्यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार त्यांना पत्रकार परिषदेत का मांडावा लागला. त्यांनी आपल्या पक्षाचे खाते असलेल्या जलसंपदा किंवा मुख्यमंत्र्याकडे का तक्रार केली नाही आमच्या पालकमंत्री, खासदारांच्या माध्यमातून सुध्दा हे काम सुरु होण्यासाठी आमचे प्रयत्न निश्चितच आहे आणि यापुढे आमची आंदोलनाची तयारी आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र आमची ही भूमिका दुदैवी असे म्हणणारे श्री. तेली हे सत्ताधारी पक्षात असताना पाटबंधारे विभागातील अधिकार्यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार त्यांना पत्रकार परिषदेत का मांडावा लागला. त्यांनी आपल्या पक्षाचे खाते असलेल्या जलसंपदा किंवा मुख्यमंत्र्याकडे का तक्रार केली नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे.” ते पुढे म्हणाले, “प्रभू्ंबाबत आम्हाला आदर आहे आणि तो निश्चितच पाळणार आहोत. मात्र त्यांच्याच हस्ते ज्या कामाचे भूमिपुजन झाले ते काम बंद होणे म्हणजे कमीपणाचे नाही का याचे उत्तर त्यांनी द्यावे.” ते पुढे म्हणाले, “प्रभू्ंबाबत आम्हाला आदर आहे आणि तो निश्चितच पाळणार आहोत. मात्र त्यांच्याच हस्ते ज्या कामाचे भूमिपुजन झाले ते काम बंद होणे म्हणजे कमीपणाचे नाही का असा प्रश्न करुन याबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली होती. त्यात आम्हाला काही गैर वाटत नाही.”\nतेलींनी त्यावेळी शेतकर्यांना धमक्या दिल्या. यावेळी दिलीप सोनुर्लेकर यांनी श्री. तेलींवर टिका केली. मळगाव टर्मिनन्सला विरोध करण्यासाठी जमिनी देणार्या शेतकर्यांना जमिनी देऊनका, असे सांगून तेली यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या, ही वस्तूस्थिती आहे. स्थानिक लोक अजून हा प्रकार विसरलेले नाहीत. हे तेलींनी ध्यानात ठेवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nशिवाजीनगरवासींच्या त्रासाला सत्तेतील भाजपच जबाबदार : गुलाबराव देवकर\nजळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत....\nमिरज-कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण वेगात\nसांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे....\nदारू वाहतुकीचे गोवा-गुजरात कनेक्शन\nरत्नागिरी - रेल्वेच्या बाथरूममधील प्लायवूडमागे गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवून होणाऱ्या अनधिकृत वाहतुकीचा प्रकार रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला...\nमाथेरान राणी मिनीट्रेनसाठी नवीन इंजिनाचा साज\nनेरळ (रायगड) : पर्यटकांच्या लाडक्या माथेरान राणी म्हणजे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मार्च 2019 मध्ये आणखी एक नवीन इंजिन नेरळ येथे येऊन...\nसकाळची कोल्हापूर पॅसेंजर आजपासून हातकणंगलेपर्यंतच\nमिरज - मिरज - कोल्हापूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने आज (ता. २४)पासून पुढील रविवार (ता. ३१) पर्यंत सकाळी साडेआठच्या...\nइंटरनेट ऑफ थिंग्ज (अच्युत गोडबोले)\nकुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-high-court-80323", "date_download": "2019-03-25T08:50:48Z", "digest": "sha1:VVXIZKRLCKJWLNJJPX4UEOX6CYLBBBJX", "length": 18163, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news: high court 'मलबार हिलमध्ये असलेले अग्निशमन केंद्र हटवा' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\n'मलबार हिलमध्ये असलेले अग्निशमन केंद्र हटवा'\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nमुंबई - सिटीझन फोरमने मलबारहिल येथील प्रियदर्शिनी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राला विरोध केला होता. पण या विरोधाला डावलुन प्रियदर्शनी पार्कमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने खडसावले आहे, कारण \"मुंबईत ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे प्रवाशाना त्रास होत असून, ह्यावर काही उपाय काढण्याऐवजी, पालिका प्रशासनाला फायर ब्रिगेडची पडली आहे,'' अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले तात्पुरते अग्निशमन केंद्र ताबडतोब हटवण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.\nमुंबई - सिटीझन फोरमने मलबारहिल येथील प्रियदर्शिनी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राला विरोध केला होता. पण या विरोधाला डावलुन प्रियदर्शनी पार्कमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने खडसावले आहे, कारण \"मुंबईत ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे प्रवाशाना त्रास होत असून, ह्यावर काही उपाय काढण्याऐवजी, पालिका प्रशासनाला फायर ब्रिगेडची पडली आहे,'' अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले तात्पुरते अग्निशमन केंद्र ताबडतोब हटवण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.\nसकाळी अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश\nप्रियदर्शनी पार्कमध्ये १९ जून २०१७ ला उभारण्यात आलेले अग्निशमन केंद्र हटवण्याचे निर्देश हायकोर्टाकडुन देण्यात आले होते. तरी देखील अजुनही का हटण्यात आले नाहीत असा प्रश्न करत हायकोर्टाने मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तात्पुरते अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश दिलेत. बुधवारी मलबार हिल रहिवाशी संघटनेच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.\nपालिकेकडुन का उभारण्यात आले अग्निशमन केंद्र\nप्रियदर्शनी पार्कचा भूखंड हा अग्निशमन केंद्रासाठी राखीव होता. नियमानुसार 50 हजार लोकसंख्या असलेल्या विभागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणं आवश्यक आहे. याआधी मलबार हिल परिसरात नाना चौकातून अग्निशमन सेवा पुरवली जायची. मात्र ट्राफिकमुळे घटनास्थळी तात्काळ पोहचणं कठीण होत असल्यामुळे प्रियदर्शनी पार्क इथे एक छोटेखानी अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nअग्निशमन केंद्राला सीटीजन फोरमचा का होता विरोध\nप्रियदर्शिनी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राला सीटीजन फोरमनी विरोध केला होता, कारण फायर ब्रिगेडमुळे प्रियदर्शनी पार्कमध्ये जॉगिंगला येणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याचे सांगत स्थानिक रहिवाशी संघटनेने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.\nअग्निशमन दलाच्या बंबाना पार्कमध्ये प्रवेश करता यावा याकरिता पार्कचे प्रवेशद्वार आणि पार्कमधील बरीच झाडे तोडण्यात आल्याचा आरोप रहिवाश्यानी केला. शिवाय या अग्निशमन केंद्रामुळे पार्कचे प्रवेशद्वार रात्रीच्या वेळेसही खुले ठेवावे लागतात. परिणामी, कोणीही रात्रीच्या वेळेस पार्कमध्ये येतात आणि तेथील बाकडय़ांवर झोपतात त्यामुळे पार्कमध्ये स्वस्छता राहत नाही. तात्पुरते अग्निशमन केंद्र हटवण्यात येणार असल्यामुळे रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.\nलढाई झिंकली पण युद्ध बाकी \nमुंबई हाय कोर्टच्या ऑर्डरनुसार प्रियदर्शनी पार्कमधून अग्निशमन बंब हा आज बाहेर काढण्यात आला हे एक छोटेसे पण संघटित विजय आहे. मलबार हिलच्या सर्व रहिवाश्यांसाठी, सदर समस्येला लढा देण्याकरिता, सोशल मीडियावर #SavePDP च्या माध्यमातून भरपूर जनजागृती आणि माहिती पुरवठे केले गेले. change.org वर ऑनलाइन पेटिशन सुरु केले जिथे जवळ जवळ ३००० सह्या मिळवल्या.\n'आपल्या मेहनतीचे थोडे यश रंगले, याबद्दल खूप बरं वाटलं. आता घोडा मैदान लांब नाही.. न्याय हे आपले हक्कच आहे', असे दुर्गा शिंदे यांचे म्हणणे आहे.\nLoksabha 2019 : उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लढणार\nमुंबई : रंगिला गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, ती मुंबईतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे...\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारच��� संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nटेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून सुरुवात\nमुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून (ता.25) सुरुवात होत आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही...\nLoksabha 2019 : कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात माघार - आठवले\nमुंबई - केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट...\nमुंबई - रविवारी कमाल तापमानात वाढ होवून थेट 36.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले. थंडीनंतर पहिल्यांदाच कमाल तापमान 36.7 अंशापर्यंत वाढल्याने रविवारचा...\nवाशीतील धोकादायक इमारती रडारवर\nनवी मुंबई - मुंबईतील रेल्वेस्थानकाला जोडणारा पादचारी पूल गेल्या आठवड्यात कोसळला. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई पालिकेने वाशीतील अतिधोकादायक म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2014-Kapoos-KalpataruOrganic.html", "date_download": "2019-03-25T07:48:31Z", "digest": "sha1:UWYUDRVE6W6P5Z7OZUU536FXC3SCFU6S", "length": 8703, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - कल्पतरू व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने कापसाचे डवरलेले पीक पाहून समाधान !", "raw_content": "\nकल्पतरू व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने कापसाचे डवरलेले पीक पाहून समाधान \nश्री. राहुल सुधाकर वाघ, मु.पो. सिलोरी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर, मोबा. ९८८११८९०५१\nयंदा ३५ एकर कपाशी आहे. अजीत -१५५ वाणाची २० पाकिटे १० एकरमध्ये ठिबकवर ५' x २' वर ४, ५, ६ जून १४ ला पाऊस नसल्याने पाणी सोडून लावली. जमीन मध्यम प्रतीची आहे. उगवल्यानंतर १० - १२ दिवसांनी खूप ऊन तापले. त्याने झाडे सुकल्यासारखी दिसू लागली. खाली मातीत ओल होती मात्र अति उष्णतेने शेंडा, पाने सुकू लागली. म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर ३० मिली + क्रॉपशाइनर ३० मिली/पंपास घेऊन फवारले. त्याने झाडे ताजीतवानी झाली. नंतर जर्मिनेटर एकरी १ लि. ड्रिपवाटे दिली. त्यामुळे झाडांची उंची चांगलीच वाढली. पाऊस उशीरा सुरू झाला तोपर्यंत ३ पाण्यावर कपाशीचे पीक जोमदार आले. जुलै महिन्यात पाऊस झाल्यावर उर्वरित क्षेत्रात जय १० एकर, मल्लिका गोल्ड ६ एकर, कावेरी जादू ३ एकर, एम-५५ ची २ एकर आणि साधी ४ एकर कपाशी १८ ते २० जुलै २०१४ रोजी उशीरा लावली.\nया सर्व कपाशीसाठी मी कल्पतरू सेंद्रिय खताच्या १०० बॅगा घेतल्या होत्या. अजीत -१५५ वाणाच्या १० एकर कपाशीला लागवडीनंतर १ महिन्यांनी कल्पतरू सेंद्रिय खत १५ बॅगा, युरीया ४ पोती आणि डी.ए.पी. ५ बॅगा असा खताचा डोस दिला. त्यानंतर पुन्हा १ महिन्यांनी (म्हणजे लागवडीनंतर २ महिन्यांनी) कल्पतरू सेंद्रिय खत १५ बॅगा, डी.ए.पी. ५ बॅगा, १२:३२:१६ च्या २ बॅगा आणि पांढरे पोटॅश ५ बॅगा याप्रमाणात खताचा डोस दिला व या डोसाच्या तिसऱ्या दिवशी मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो आणि थायग्रीन २५ किलो ड्रीपवाटे दिले.\n२ - ४, डी फवारल्याने कपाशीवर आलेली विकृती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने गेली\nअजीत-१५५ वाणाच्या १० एकर कपाशीला मात्र कल्पतरू देवून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सुरूवाती पासून फवारण्या केल्या. माझ्या कपाशीमध्ये २-४, डी फवारल्याने झाडांवर विकृती आली होती. तर लगेच २ - ३ दिवसात म्हणजे कपाशी ५० दिवसांची असताना कॉटनथ्राईवर, क्रॉप शाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन प्रत्येकी ६०० मिली २०० लि. पाणी याप्रमाणे दुसरी फवारणी केली. तर पाने टवटवीत होऊन शेंडा वाढ चालू झाली. आता ७० दिवसाची कपाशी असताना तिसरी फवारणी कॉटनथ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. तर कपाशी आज मितीस (२५ सप्टेंबर १४) पुर्णपणे निरोगी असून झाडांची उंची ५ - ६ फूट झाली आहे. फुट भरपूर आहे. ५' x २' हे लागवडीतील अंतर पुर्णपणे झाडांनी व्यापले आहे. झाडांवर ४० - ५० बोंडे व नवीन फुलपात्या भरपूर आहेत.\nया १० एकर कपाशीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एका फवारणीसाठी २० हजार रू. खर्च येत होता. त्यामुळे इच्छा असूनही बाकीच्या २५ एकर क्षेत��रावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी घेऊ शकलो नाही. ही २५ एकरातील कपाशी १ महिना उशीरा लागवडीची असून हिला फक्त रासायनिक किटकनाशकाच्या २ फवारण्या केल्या आहेत. या कपाशीला फुलपात्या लागल्या असून बोंडं थोडी थोडी (१० -२०) दिसत आहेत.\nअजीत - १५५ वाणाच्या कापसाचा मात्र दसऱ्यानंतर वेचा चालू होईल. चालू पीक परिस्थतीनुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. या कापसास एकरी १० हजार रू. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर खर्च झाला असून सुरूवातीच्या वेचणीस किलोला ५ - ६ रू. आम्ही पुढे २ वेचण्या झाल्यावर ८ ते १० रू. किलो कापूस वेचणीची मजुरी द्यावी लागते. जरी पारंपारिकतेपेक्षा थोडा खर्च डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर वाढला तरी उत्पादनात मात्र भरीव वाढ होईल असे वाटते. यावर्षीच्या अनुभवानंतर व पुरेसे भांडवल तयार झाल्यावर पुढील वर्षी सर्व कापसावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा मानस आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-ability-to-change-desasthiti-mahitipatata/", "date_download": "2019-03-25T08:33:02Z", "digest": "sha1:SQQTSP354JXZFXPURBPL3OAQFGWFREZL", "length": 5382, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशस्थिती बदलण्याची माहितीपटात क्षमता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › देशस्थिती बदलण्याची माहितीपटात क्षमता\nदेशस्थिती बदलण्याची माहितीपटात क्षमता\nमाहितीपट संवाद साधण्याचे एक उत्तम साधन आहे. देशाची स्थिती बदलण्याची क्षमता महितीपटात आहे. त्यामुळे देशात केवळ माहितीपट दाखवणार्या काही वाहिन्या हव्यात, असे मत प्रसिद्ध माहितीपट निर्माते माईक पांडे यांनी व्यक्त केले.\n48व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.\nवन्यजीवांवर माहितीपट बनवण्यासाठी सरकारने आजपर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाला निधी दिलेला नाही. वन्यजीवांवर माहितीपट काढण्यासाठी निधी मिळाला पाहिजे, असेही पांडे म्हणाले.\nपांडे म्हणाले की, सत्य दाखवण्याचे माहितीपट प्रभावी माध्यम आहे. माहितीपट लोकांच्या मनाला आणि मस्तकाला भिडते. त्यामुळे माहितीपट निर्मितीची देशाला आवश्यकता आहे. एक माहितीपट देशाची स्थिती बदलू शकतो. आपण स्वत: याचा अनुभव घेतला आहे, असे पांडे यांनी स्पष्ट केले. देशात वन्यजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दिल्लीतील प्रदूषणाने मर्य���दा ओलांडली आहे. अशा अनेक समस्या आहेत ज्यावर कोणी भाष्य केलेले नाही, असे मुद्दे माहितीपटातून देशासमोर आले पाहिजेत, असेही पांडे म्हणाले.\nपरराज्यांत जाणार्या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री\nनिवृत्त मुख्य सचिव डॉ. जे. सी. आल्मेदा यांचे निधन\nहॉस्पिसियोत प्रसूत महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ\n‘दिव्यांग’ना पेन्शन देणारे गोवा पहिले राज्य\nपर्यटन क्षेत्रात गोव्याच्या स्थानात घसरण\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Gutka-ban-in-district-in-Ichalkaranji/", "date_download": "2019-03-25T07:44:07Z", "digest": "sha1:7VLRQ3KESTBBISTK4NKV2AM6SIS766XW", "length": 11588, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात गुटखा बंदीचा उडालाय फज्जा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यात गुटखा बंदीचा उडालाय फज्जा\nजिल्ह्यात गुटखा बंदीचा उडालाय फज्जा\nराज्यात सर्वत्र लागू करण्यात आलेल्या गुटखाबंदीचा फज्जा उडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. इचलकरंजीत पोलिसांनी केलेल्या सलग कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. यामुळे जिल्ह्यात गुटखाबंदीचा फज्जा उडाल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. परिणामी कागल, कोगनोळी, आप्पाचीवाडी, हुपरीसह आता वस्त्रनगरीतही या व्यवसायाने आपले जाळे पसरले आहे. त्यामुळे गुटखा रॅकेटचा पर्दाफाश पोलिस करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत असून नवे पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nतंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आणि अशा आजारांना तरुण पिढी बळी पडत चालल्याने राज्य सरकारने राज्यात सर्वत्र गुटखाबंदी लागू केली. याचा परिणाम म्हणून राज्यातील गुटखा उत्पादकांच्या कारखान्यांना टाळे लागले. परंतु, उत्पादकांनी आपले कारखाने शेजारच्या राज्यात हलवून तेथून गुटख्याची विक्री सुरूच ठेवली आहे. राज्यात गुटखा बंदी असल्याने शौकिनांची तलफ भागवण्यासाठी गुटखा उत्पादन करण्याचा नवा फंडा वस्त्रनगरीतील एका तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादकाने अवलंबला.\nगुटख्याच्या उत्पादनातून या उद्योजकाने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. या उद्योजकाच्या कारखान्यावर अनेकवेळा धाडी टाकण्यात आल्या; परंतु त्याचा उद्योग काही थांबला नाही. त्याची सांपत्तीक प्रगती अनेकांच्या डोळ्यात भरू लागली. त्यामुळे गुटखा उत्पादनातून कोट्यवधींची माया जमवता येते, असा संदेश गुन्हेगारी वर्तुळात पोहोचला. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात दबदबा असलेल्या काही बड्या धेंडांनी गुटखा उत्पादनाकडे मोर्चा वळवला आहे. यातून बड्या धेंडांनी लाखो रुपयांची माया जमवण्यास सुरुवात केली आहे.\nएकामागून एक बडी धेंडे या उद्योगात पाय रोवत असल्याने बाजारात त्यांच्या उत्पादनांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे.\nआपल्याच ब्रँडचा गुटखा खपावा, यासाठी दहा रुपयांमध्ये काहींनी चार तर काहींनी पाच पुड्या विक्रीचा फंडा अवलंबला आहे. महाराष्ट्रात गुटखा निर्मितीवर वॉच असल्याने काहींनी नामी शक्कल लढवत पोलिसांना गुंगारा दिला आहे. काहींनी शेजारच्या राज्यातील गावांमध्ये त्याचे उत्पादन सुरू ठेवले आहे. काही घरांमध्ये मिक्सर (गुटखा बनवण्याचे एक यंत्र) दिले असून तेथे फक्त गुटखा तयार करण्याचे काम केले जाते. नंतर हा माल पॅकिंगसाठी अन्य ठिकाणी पाठवला जातो. पॅकिंगचे ठिकाण वारंवार बदलले जाते. त्यामुळे गुटखा निर्मिती कोठे सुरू आहे, याचा शोध लावणे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे.\nवस्त्रनगरीतील ज्या बड्या धेंडांनी गुटखा निर्मितीत पाय रोवले आहेत, त्यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. त्यामुळे गुटखा उत्पादनातील बडी धेंडे कोण, याचा शोध पोलिसांना लागला नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. गुटखा उत्पादनातील बडे धेंडे कोण, याची इत्यंभूत माहिती पोलिस दल व अन्न-औषध प्रशासनाला आहे. परंतु, त्यांच्याकडे फक्त कारवाईचे धाडस नसल्याने गुटखा निर्मिती सुरूच असून हा बनावट गुटखा अनेकांचे आयुष्य पोखरत आहे. त्यामुळे अशा बड्या धेंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘मोक्का’सारखी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nघातक रसायनांचा होतोय वापर ...\nबनावट गुटख्यामध्ये शरीराला पोखरणार्या घातक रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे. याशिवाय नारळाच्या बाह्य आवरणाचा कूट, सडकी सुपारी, नशिले पदार्थ आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गुटखा बंदीतून काय साधले, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. विक्रेत्यांनाही गुटखा विक्रीतून मोठी कमाई होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रीसह गुटखा निर्मितीच्या रॅकेटचाही पर्दाफाश करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nजिल्ह्यात गुटख्याचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे उघड उघउ बोलले जात आहे. शिवाय तोकडी कारवाई होत असल्याने सामान्यांतून याबाबत पोलिसांवरच आरोप केले जातात. त्यामुळे पोलिसच गुन्ह्याचे धनी ठरत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुखपदी नवीन रूजू झालेल्या डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मराठा आरक्षण क्षमल्यानंतर यावर कारवाई होईल, असेही पोलिस दलातून बोलले जात आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Plane-collapse-accident-issue/", "date_download": "2019-03-25T08:28:46Z", "digest": "sha1:HB4LHOI3I27HJF7E5GMAGFFCODSI6T6C", "length": 5437, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गरज पडल्यास विमानमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गरज पडल्यास विमानमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nगरज पडल्यास विमानमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nविमान कोसळून झालेल्या दुर्घटनेची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल लवकर मिळावा म्हणून राज्य सरकारकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. गरज भासल्यास विमान मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हादेखील दाखल करण्यात येईल, अशी ग्वाह��� मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.\nघाटकोपर येथील जागृती पार्क परिसरात 28 जून रोजी चार्टर्ड विमान कोसळून अपघातात झाला होता. या अपघातात पायलटसह पाचजणांचा मृत्यू झाला. याशिवाय नाशिक, रायगड, धुळे आणि गोंदीया येथेही विमान कोसळून अपघात झाले होते. या विमान अपघातांबाबत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या दुर्घटनेची डीजीसीएकडून चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर आवश्यकता भासल्यास विमानाचे मालक दीपक कोठारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.\nशिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे काम हे अत्यंत सुमार असल्याचा आरोप केला. हा आरोप फेटाळत मुंबई एटीसी हा जगातील अत्याधुनिक नियंत्रण कक्ष असून जगातील आघाडीच्या आणि सर्वोत्तम कक्षांमध्ये त्याची गणना होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई विमानतळाच्या आसपासच्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला आहे. येथील झोपडीधारकांना त्याच ठिकाणी घरे दिली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Due-to-the-death-of-two-people-drowning-in-the-Malangao-dam/", "date_download": "2019-03-25T08:07:00Z", "digest": "sha1:OE7KQ5GLDQ7HQZTCFKKJRLLHXHJI26UZ", "length": 5832, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मळणगाव बंधार्यात बुडून दोघांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मळणगाव बंधार्यात बुडून दोघांचा मृत्यू\nमळणगाव बंधार्यात बुडून दोघांचा मृत्यू\nतालुक्यातील मळणगाव येथील अग्रणी नदीतील बंधार्यात सख्ख्या चुलत भावाला पोहण्यास शिकवताना दोघांचा बुडून अंत झाला. ही घटना दुपारी घडली. दिनेश रमाकांत पोतदार (वय 32), त्यांचा सख्खा चु���त भाऊ अनंतकुमार पोतदार (13, दोघेही रा. अंजनी) अशी मृतांची नावे आहेत.स्थानिकांनी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावळज (ता. तासगाव) येथील रत्नाकर पोतदार यांनी मळणगाव येथील अग्रणी नदीच्या काठावर असलेली शिंदे यांची जमीन कसण्यासाठी घेतली आहे. आज दुपारी पोतदार यांच्या कुटुंबातील दिनेश पोतदार आणि त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनंतकुमार यांनी उकाडा असल्यामुळे अग्रणी नदीतील बंधार्यात पोहण्याचा निर्णय घेतला.\nअनंतकुमार यास पोहता येत नव्हते. दिनेश यांनी त्याला पोहण्यास शिकवण्याचे ठरविले. दोघेही बंधार्याच्या खोल पाण्यात गेले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर अनंतकुमार घाबरून बुडू लागला. त्यावेळी दिनेश यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अनंतकुमारने घाबरून त्यांना मिठी मारली. त्यामध्ये दोघेही बुडाले.चुलते रत्नाकर यांनी दोघेही अजून का परत आले नाहीत, म्हणून नदीपात्राच्या कडेला पाहिले. त्यावेळी दोघांचे कपडे बाजूला आढळून आले. त्यानंतर त्यांनी आरडा- ओरडा केला. नदीच्या काठावर असलेल्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अण्णासाहेब मलमे, नंदकुमार सरवदे, भाऊसाहेब मलमे, विकास मलमे, नचिकेत पाटील यांनी पाण्यातून अनंतकुमार याचा मृतदेह बाहेर काढला. दिनेश यांचा मात्र शोध लागत नव्हता. दीड तासाच्या प्रयत्नानंतर दिनेश यांचाही मृतदेह सापडला.\nअग्रणी नदी पत्रातील यल्लमा मंदिरानजीक मळणगाव येथील नागरिकांनी गर्दी केली. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Tobacco-Marathon-for-Tobacco-Liberation-in-satara/", "date_download": "2019-03-25T08:09:47Z", "digest": "sha1:KVP3GEP35GAPT6RASQJ6P7I7JON75T2P", "length": 7386, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तंबाखूमुक्तीसाठी ‘नो टोबॅको’ मॅरेथॉन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तंबाखू���ुक्तीसाठी ‘नो टोबॅको’ मॅरेथॉन\nतंबाखूमुक्तीसाठी ‘नो टोबॅको’ मॅरेथॉन\nक्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रूग्णालय, वात्सल्य सामाजिक संस्था, पिपल्स सामाजिक संस्था व कुपर फौंडेशनच्या सहकार्याने सातार्यात रविवारी सकाळी नो टोबॅको मॅरेथॉन (तंबाखू मूक्त दौड) काढण्यात आली.\nक्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रूग्णालयापासून सकाळी 6 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ, डॉ. अशोक मोरे, डॉ. योगिता शहा, शशिकांत पवार, अजय गायकवाड, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ उमेश मुंडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसमाजात दिवसेंदिवस होत असलेले कर्करोगाचे बळी, तंबाखूच्या व्यसनाला आळा बसावा आणि तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नो टोबॅको मॅरेथॉन विक साजरा केला जात आहे. यानिमित्ताने 3, 5 व 10 किलोमीटर अशी नो टोबॅको मॅरेथॉन (तंबाखू मूक्त दौड) काढण्यात आली. या रनमध्ये सुमारे 1 हजार 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.\nडॉ. उज्वला माने यांनी स्पर्धकांना तंबाखू विरोधी शपथ दिली. यावेळी पुढील आयुष्यात तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. यावेळी सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल व ई प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.\nरुग्णांजवळ डीजे लावून ‘वका वका’चा ठेका..\nसातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाने नो टोबॅको याचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचा राबवलेला उपक्रम निश्चित चांगला आहे. मात्र मुख्य उद्देशानंतर थेट डॉल्बीवर धागडधिंगाणा लावून सिव्हील आवारातच बिभत्स डान्स झाल्याने त्याला गालबोट लागलेे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रकारचे रुग्ण आतमध्ये उपचार घेत आहेत. यामध्ये नुकतेच जन्मलेली मुले, गर्भवती स्त्रिया, वृध्द नागरिक यांचा समावेश आहे. मात्र रविवारी सकाळी नो टोबॅको रनच्या नावाखाली डॉल्बी लावून पाश्चिमात्य ‘वका..वका..’ हे गाणे मोठ्या आवाजात लावले गेल्याने रुग्णांचा कोणताही विचा��� केला गेला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासन, आयोजक खरच संवदेनशील आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे. घडलेले कृत्य असंवेदनशील असून याबाबत कारवाई करण्याची मागणीही होत आहे.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/failure-in-the-judicial-magistrate-says-high-court-1786516/", "date_download": "2019-03-25T08:19:28Z", "digest": "sha1:4MWUSR6WY5CFZR36AQE6AWTXEHNSAQL6", "length": 15400, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Failure in the judicial magistrate says High Court | न्यायदंडाधिकारी न्यायदानात अपयशी – उच्च न्यायालय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nन्यायदंडाधिकारी न्यायदानात अपयशी – उच्च न्यायालय\nन्यायदंडाधिकारी न्यायदानात अपयशी – उच्च न्यायालय\nउच्च न्यायालयाने सर्व प्रकरण हाताळल्यानंतर प्रकरण मूळ सुनावणीसाठी पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परत पाठवले.\nन्यायालयांवर न्यायदानाची जबाबदारी आहे. त्याकरिता न्यायाधीशांना अनेक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. मात्र, एका फौजदारी प्रकरणाचा लवकर निपटारा करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्याय प्रक्रियेलाच फाटा दिल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध न होता पीडित व्यक्ती न्यायापासून वंचित राहिली. यात सरकारी पक्षासोबत न्यायदंडाधिकारीही न्यायदान करण्यात अपयशी ठरले, असे रोखठोक मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले.\nअमरावती जिल्ह्य़ातील वलगाव तालुक्याचे रहिवासी मधुकर नामदेवराव काकडे हे पत्नी विमलाबाई आणि मुलगी शोभासह २४ ऑगस्ट २००१ ला सकाळी रामगोपाल बंसीलाल व्यास यांच्या शेतावर कामासाठी जात होते. त्यावेळी कामुंजा फाटय़ाजवळ एमएच-२७, ड���-४७६ क्रमांकाच्या जीपने शोभाला जोरदार धडक दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी जीप चालक माजीदखान मियाखान पठाण रा. चांदूरबाजार याच्याविरुद्ध धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अमरावती येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष खटला चालवण्यात आला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष सुटका केली. या प्रकरणात सरकारने उच्च न्यायालयात दाद मागितली. याचिकेवर न्या. झका हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू ऐकली व पुरावे तपासल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. प्रकरणात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान एकही साक्षीदार तपासले नाही. साक्षीदार उपस्थित न राहात असल्याने एकदा न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावला होता. त्यानंतर ते उपस्थित न राहिल्याने सरकारी वकील किंवा न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट बजावून त्यांना उपस्थित राहण्याचा इशारा दिला नाही, तर केवळ प्रकरणाचा लवकर निपटारा करण्यासाठी पीडित व्यक्तीवर अन्यायकारक असा निकाल दिला. कायद्यानुसार प्रकरणाची सुनावणी पूर्ण न करताच हा खटला निकाली काढण्यात आला. न्यायदानाची जबाबदारी न्यायालयांवर असून त्यासाठी न्यायाधीशांना असामान्य अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्याचा वापर करून पीडित व्यक्तीला न्याय देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांनी अधिकारांचा वापरच केलेला नसल्याचे दिसून येते. यात सरकारी पक्षासोबत न्यायदंडाधिकारीही न्यायदानाच्या प्रक्रियेत अपयशी ठरल्याचे रोखठोक मत उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात नोंदवले आहे.\nसहा महिन्यात पुन्हा सुनावणीचे आदेश\nउच्च न्यायालयाने सर्व प्रकरण हाताळल्यानंतर प्रकरण मूळ सुनावणीसाठी पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परत पाठवले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी पुढील सहा महिन्यात या प्रकरणाची सुनावणी घेऊन व प्रत्यक्षदर्शीची साक्ष नोंदवून निकाल देण्याचे आदेश दिले.\nया आदेशाची प्रत मुख्य न्यायमूर्तीसमोर ठेवण्यात यावी. तसेच उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी (न्याय) प्रकरणासंदर्भात सर्व दस्तावेज न्यायमूर्तीना सादर कराव��त व संबंधित न्यायदंडाधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची शिफारस उच्च न्यायालयाने केली. तर तत्कालीन सरकारी वकिलांची चौकशी विधि व न्याय विभागाच्या प्रॉसिक्युसन संचालकांनी करावी. शिवाय पोलीस अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणासंदर्भात अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशात नमूद आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/home?page=2&order=comment_count&sort=asc", "date_download": "2019-03-25T08:48:45Z", "digest": "sha1:HJNMBXCFUVSSEBCLLMNQRPUIMTYG656J", "length": 16230, "nlines": 289, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nबोल बैला बोल : नागपुरी तडका काव्यधारा 1,632 18-09-2013 0\nसाप गिळतोय सापाला छायाचित्र 1,075 30-09-2013 0\nनागपूर कराराची होळी विदर्भराज्य 959 29-09-2013 0\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन समारंभ 1,093 09-10-2013 0\nशेतकर्यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन शेतकरी संघटना 1,214 24-11-2013 0\nविदर्भ विधानसभा प्रथम अधिवेशन - २०१३ शेतकरी संघटना 1,582 06-12-2013 0\nवेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको शेतकरी संघटना 1,032 13-12-2013 0\n'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत काव्यधारा 1,662 16-12-2013 0\nश्री ब.ल.तामस्कर यांना धनश्री पुरस्कार शेतकरी संघटना 1,426 26-12-2013 0\nरे जाग यौवना रे....\nआता उठवू सारे रान 2,563 25-05-2011\nडोंगरी शेत माझं गं 1,678 16-07-2011\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 1,030 28-08-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,192 16-07-2016\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे 771 09-03-2014\nतोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण - श्री तुळशीराम बोबडे 857 09-03-2014\n\"माझी गझल निराळी\" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम 1,108 10-03-2014\nमरण्यात अर्थ नाही 1,075 12-07-2011\nवरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये 735 13-04-2014\nगाव ब्रम्हांड माझे 808 08-03-2013\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,049 29-05-2015\nनाच्याले नोट : नागपुरी तडका 1,008 09-12-2015\nविदर्भाचा उन्हाळा 954 18-06-2011\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं 1,783 19-06-2011\nनाकानं कांदे सोलतोस किती\nधोतर फ़ाटेपाव्तर 1,462 15-07-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,216 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ 759 18-07-2016\nतुला कधी मिशा फुटणार\nलोकशाहीचा सांगावा 1,013 28-03-2014\nरूप सज्जनाचे 882 17-06-2011\nभावात्म काव्यात्मकतेचा 'गोडवा’ 1,330 23-06-2011\nविलाप लोकसंख्येचा .. 897 20-06-2011\nरानमेवाची दखल 1,377 24-06-2011\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,443 24-05-2014\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,109 27-07-2011\nशेतकरी पात्रता निकष 1,984 23-05-2011\nहत्या करायला शीक 2,102 29-05-2011\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 3,911 26-09-2011\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 2,072 14-09-2011\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,150 14-01-2013\nअशीही उत्तरे-भाग- १ 2,411 30-06-2011\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,233 15-02-2013\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,770 11-06-2011\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,443 24-05-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 957 24-06-2014\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 777 30-11-2014\nशेती, शेतकरी आणि गझल - अॅग्रोवन 1,679 12-05-2015\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,817 30-12-2011\nशहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 1,046 16-03-2016\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 1,893 23-06-2011\nचंद्रभागेच्या तिरी : पंढरपूर 577 28-06-2014\nस्व. किशोरकुमार स्मारक, खंडवा 585 28-09-2011\nडोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 1,175 15-09-2011\nचित्रकूट, वाराणसी, सारनाथ, हरिव्दार, ॠषिकेश 1,167 01-08-2011\nशेगाव आनंदसागर 1,169 15-09-2011\nसह्यांद्रीच्या कुशीत 1,179 11-09-2015\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialSeptember2016.html", "date_download": "2019-03-25T08:21:27Z", "digest": "sha1:GONTOEH2B5OZSIOJJCSVXQPBONCVIWTD", "length": 23880, "nlines": 34, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - भात पिकाचा इतिहास व विविध पिकांचे पावसानंतरचे नियोजन", "raw_content": "\nभात पिकाचा इतिहास व विविध पिकांचे पावसानंतरचे नियोजन\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nजगातील ६ अब्ज लोकसंख्येमधील ४ ते ५ अब्जहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न भात हे आहे. भात या महत्त्वाच्या अन्नधान्य पिकाचा इतिहास पाहिला तर भात या पिकाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती कायम धूसर किंवा अंधारात राहिली आहे. भात या पिकाचा शोध केव्हा लागला हे आज तागायत निश्चित माहित नाही. तसे पाहता भात हे उष्ण कटीबंधातील पीक नव्हे, परंतु ओलसर आणि आर्द्र हवामान लाभलेल्या आशिया खंडामध्ये कोठेतरी या जंगली गवताचा (भात पिकाचा) उदय झाला असावा आणि नंतर काळाच्या ओघात या पिकाचा प्रसार साऱ्या जगभर झाला. विचारवंतांच्या दृष्टीकोनातून भात पिकाचा उगम अनुक्रमे म्यानमार आणि ब्रम्हदेशामध्ये असलेल्या इरावेट्टी आणि मिकॉग या नद्यांच्या सुपीक जमिनीच्या प्रदेशात झालेला आढळतो. तर काही विचावंतांच्या तर्कानुसार भात या पिकाची उत्पत्ती दक्षिण भारतात होऊन नंतर त्या पिकाचा प्रसार उत्तरेत पसरला. भारतातून नंतर या पिकाचा प्रसार अनुक्रमे चीन, कोरीया, फिलिपाईन्स येथे इ.स.पूर्व २००० वर्षापुर्वी आणि इ.स. पूर्वे १००० वर्षापूर्वी जपान व इंडोनेशिया येथे या जंगली गवत (भात) पिकाची आयात करीत असत.\nपुर्वीच्याकाळी मानव दगड आणि लोहापासून बनविलेल्या तिक्ष्ण हत्यारापासून मांस तोडून कच्चेच खात असत. त्यानंतर जंगलात गारगोटीवर गारगोटी घासली जाऊन त्यातून ठिणगी पडली व वणवा पेटला. त्यामध्ये काही वन्यप्राणी भाजून मेले व ते मांस त्यांच्या खाण्यात आल्यावर त्याची चव कच्च्या मांसापेक्षा रुचकर लागल्याने भाजून अन्न खाण्याचा शोध लागला. ज्यावेळेस कापसाचा शोध नव्हता तेव्हा काठशेवराचा (बुढ्ढी के बाल) याचा कापूस अतिशय मुलायम असून हा शे - दिडशे वर्षापासून आखाती राष्ट्रात प्रसिद्ध आहे. म्हणजे यापासून ज्या अशा बनवितात त्यामध्ये सतत गारवा राहतो. ती उशी मऊ, मुलायम असल्याने डोक्याखाली घेतली असता डोक्याचा आकार घेते. त्यामुळे आखाती राष्ट्रात जेथे वर्षातील नऊ महिने ५० हून अधिक तापमान असते व तेथे मसालावर्गीय व मांसाहार प्रचलित असल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. तेव्हा काठशेवराच्या उश्या, गाद्या - गिर्द्या ह्या गारवा निर्माण करत असल्याने त्या आखाती राष्ट्रात वरदान ठरल्या आहेत. उन्हाळ्यात या उशा, रजया, गाद्या गारवा देतात. पण भारतात ह्या थंडीत वापरल्यास सर्दी होते. अशा या काठशेवराचा कापूस जेव्हा २ गोरगोटीवर ठेवून गारगोटीवर गारगोटी घासली की अग्नीचा शोध लागला व त्यावरून अग्नीचा वापर मानव अन्न शिजविण्यासाठी करू लागला. त्याकाळी तृणधान्यवर्गीय भात हे पीक जंगलात पडणाऱ्या पावसावर येत असत. विशेषेकरून भात हा विस्तवावर उकळलेल्या गरम पाण्यावर शिजविला जात असे व त्याकाळी हा भात नुसताच खात असतील किंवा त्याबरोबर एखाद्या पशुपक्ष्याचे मांस खात असत. भाताचे जगात सर्वात जास्त क्षेत्र आशिया खंडात आहे. भारतात बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि दक्षिण भारतात असून येथील लोकांचे मुख्य अन्न भात, सांबार व रसम आहे. दक्षिण भारतात थाळी घेऊन भात खाण्याची सवय आहे. आपल्याकडे जेवण वाढत असताना अन्न पुरेसे वाटल्यावर नको असल्यात ताटावरून हात आडवा हालवतात, तर दक्षिण भारतात ताट, प्लेट अथवा थाळीपासून आपल्या उजव्या हाताचा तळवा ज्या उंचीवर ठेवला जातो तिथपर्यंत भाताची शिग लावली पाहिजे एवढा भात वाढावा अशी पद्धत आहे. आपल्याकडील एका कुटुंबाचा भात तेथील एका माणसाचे खाद्य असते.\nबऱ्याच शतकापूर्वी दक्षिण भारतमध्ये गरीब लोकांचे प्रमाण जास्त व रोजगार कमी असल्याने रोजगाराच्या बदल्यात तेथे भात देत असत. शक्यतो जाडा - भरडा (Coarse) भात न पॉलिश केलेला असा परंतु जीवनसत्त्वयुक्त असा बालमजूर व पालक आई वडीलांना १ ते २ शेर उकडा तांदूळ उकळून त्याची पेज सकाळी नाष्टा म्हणून घेतात. हे लोक फटाका किंवा काडीपेटीच्या कारखान्यात काम करीत असत व दुपारी राहिलेला अर्धवट शिजलेला भात पेज काढल्यानंतरचा त्यावर थोडे पाणी टाकून पुन्हा शिजवून दुपारी खात. हाच उदर निर्वाह रात्री होत असे. अशारितीने दक्षिण भारतातील भात हे 'मुख्य अन्न' आहे.\nउत्तर भारतातील ४० ते ५० कोटी लोकांचे मुख्य अन्न गहू हे आहे. म्हणजे देशातील जवळजवळ ९० कोटी लोक हे भातापासून विविध प्रकारचे अन्नपदार्थ करून आपल्या जेवणात आहार म्हणून समाविष्ट करतात. तिच गत जगातील ९०% (५४० कोटी) लोक आपल्या आहारात भाताचे निरनिराळे पदार्थ (उप्पम, इडली, डोसा, उताप्पा, पापड, कुरडया) तयार करून वापरतात. अशाच प्रकारे ७ ही खंडात भाताचे पीक हे मुख्य पीक आहे. तेव्���ा जगामध्ये सर्वात अधिक संशोधन भातावर होणे गरजेचे आहे. असे युनो (United Nations Organization) व जागतिक अन्न व कृषी संघटना (F.A.O. - Food and Agriculture Organization Of the United nations) या जागतिक संस्थांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी फिलीपाईन्स येथील मनीला येथे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राची १३ एप्रिल १९६० साली स्थापना केली. हे सारे लक्षात घेऊन भारतामध्ये ओरिसातील कटक येथे भाताचे संशोधन केंद्र ५ मार्च १९७४ साली स्थापन केले. येथे भातात असणारे पोषणमुल्य पिष्टमय पदार्थ, शर्करा व प्रथिने यामध्ये वाढ होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केला जातो. तसेच लवकर येणाऱ्या जाती, विविध हवामानात व वेगवेगळ्या जमिनीत अधिक उत्पादन देणाऱ्या जातींवर तसेच कीड, रोग अशा अनेक बाबींवर जगभर भातावर संशोधन चालते. भारतामध्ये ओरिसा, बिहार, बंगाल, उत्तरप्रदेशचा काही भाग हे पारंपारिक भात निर्मिती करणारे प्रदेश आहेत. स्वातंत्र्याच्यापुर्वी अखंड पंजाब म्हणजे आताचा पश्चिम पाकिस्तान आणि पुर्व पंजाब हे प्रामुख्याने उत्कृष्ट गहू पिकविणारे राज्य होते. स्वातंत्र्यानंतर म्हणजे २० व्या शतकाच्या ५ - ६ व्य दशकात बासमती या वाणाची निर्मिती झाली. थोडक्यात माणसाला उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसे भाताचे विविध प्रकार, त्याच्या दाण्याची लांबी, जिवनसत्वे, त्याची चव, आरोग्य आणि अन्नातील प्रमुख घटक जसे पिष्टमय पदार्थ, शर्करा, जिवनसत्व यातील होणारे बदल हे संशोधनातून नवनिर्मितीकडे वळतील व मानवाची गरज भागेल.\nअशा या मानवाच्या मुख्य अन्न असलेल्या भातासाठी आम्ही 'धान थ्राईवर' ची निर्मीती केली. देशातील भाताच्या विविध जातीसाठी मग त्या पेर भात असो. लागणीच्या भात असो, सुगंधी भात असो, लांब दाण्याचा वा विविध सुगंधी जाती अथवा ज्यांना जी. आय. ही संज्ञा प्राप्त झाली आहे अशा जाती आणि विविध राज्यातील जाती यासाठी उपयुक्त आहे. त्याचे माहितीपत्रक व फवारणीपत्रक आम्ही गेल्या २ महिन्यापासून कृषी विज्ञानमध्ये समाविष्ट केले आहे ते आपण पाहिले असेलच व आपल्या भात पिकासाठी धान थ्राईवरचा व डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केला असेलच, नसल्यास भातासाठी त्याचा जरूर वापर करावा. हवामान व पावसाचे मान जर चांगले असेल व विशेषेकरून ओंबी भरताना आवश्यक असणारा पाऊस झाला आणि वेळच्यावेळी या धान थ्राईवरचा वापर केला असता चांगले उत्पादन येते. तेव्हा विशेषेकरून को���ण, कोल्हापूर, विदर्भातील भात पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी धान/भात पिकासाठी त्याचा वापर करावा. त्याच्या प्रमाणाचा टेबल याच अंकांत पान नं. २६ - २७ वर दिला आहे. तसेच भारतातील भात पिकविणाऱ्या राज्यांनी त्याचे अवलंबन तथा अनुकरण करावे. डॉ. एम. एस. स्वामिनाथन फाऊंडेशन चेन्नई येथे प्रयोगशील संशोधन प्रक्षेत्रासाठी हे 'धान (भात) थ्राईवर' आम्ही त्यांना पाठविले आहेत.\nभारताच्या विविध भागामध्ये विपुल आणि विस्तृत असा पाऊस झालेला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत चालूवर्षी भात, कडधान्य तृणधान्ये, तेलबिया यांच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.\nखरीप लागवड (लाख हेक्टरमध्ये)\nअधिक पाऊस पडल्यावर पिकाची घ्यावयाची काळजी व निगा\nबऱ्याच ठिकाणी पूर आणि महापुराने तृणधान्य आणि कडधान्ये ही पिके पावसाने पिवळी पडली आहेत. पावसाने जमिनीतील पोकळी कमी होऊन पाणी साठले आहे. हीच गोष्ट द्विवर्षीय, बहुवर्षीय फळ पिके, खरीपातील तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिके, वार्षिक फुलपिके यांच्या देखील समस्या एकच आहेत. पाऊस जास्त झाल्याने जमितीतून पाण्याचा निचरा न झाल्याने पांढरी मुळी झाली आहे. तेव्हा त्या मुळीची वाढ होण्यासाठी आळवणीमध्ये ठिबकमधून १०० लि. पाण्यातून जर्मिनेटर १ लि. आणि २०० ते ३०० मिली हार्मोनी यांचा बुरशीजन्य व इतर जिवाणूयुक्त रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक इलाज करावा. म्हणजे मुकी झालेली पांढरी केशाकर्षक मुळी मोकळी होऊन पाण्याचा निचरा होईल. अशारितीने सर्व पिकांमध्ये हरितद्रव्य चांगले वाढून कॅनॉपी चांगली वाढेल. त्यामुळे रोगराई प्रतिबंधात्मक स्थिती निर्माण होईल. जमिनीतील निचरा वाढल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यासाठी कल्पतरू खत फळझाडांना प्रतिझाड १ ते २ किलो ते बहूवर्षिय (१५ वर्षाच्या पुढील) उदा. आंबा झाडांना ५ किलो वापरावे व सप्तामृताची १ फवारणी घ्यावी. म्हणजे याने कॅनॉपी वाढेल व काडी तयार होईल. फुल व मोहोर निघण्यास उपयुक्त होईल. बुरशी येऊ नये म्हणून तसेच आले - हळदीचे गड्डे सडू नयेत म्हणून जर्मिनेटर १ लि., प्रिझम १ लि., कॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. सोबत हार्मोनी २०० ते ३०० मिलीचा आळवणीमध्ये १०० लि. पाण्यातून वापर करावा. व फवारणीमध्ये सप्तामृतात हार्मोनी ३०० मिली घेणे.\nद्राक्षाला डिसेंबरमधील निर्यात मार्कट मिळण्यासाठी अर्ली छाटणी घेतात. या अर्ली छा���णीमध्ये मात्र घड जिरतात. म्हणून छाटणी केल्यावर १२ व्या दिवशी थ्राईवर व न्युट्राटोन प्रत्येकी ५ मिली/लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारावे. म्हणजे घड जिरण्याची संभाव्य विकृती येणार नाही.\nविविध प्रकारच्या १०० हून अधिक पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ आणि विक्रेते प्रतिनिधी यांना आपल्या प्लॉटवर बोलावून प्रत्येक्ष पीक पाहणी करून आणि जमल्यास त्याचे फोटो मुख्य कार्यालयास Whats app द्वारे पाठवून तसेच जमिनीचे (मातीचे) पृथ्थ:करण करून ८ दिवस अगोदर वेळ घेऊन अहवाल प्रत्यक्ष घेऊन भेट घ्यावी, म्हणजे योग्य प्रकारे मार्गदर्शन करता येईल. अशारितीने खरीप पिके लवकर येतील व रब्बी पिके वेळेवर घेता येतील.\nशेतकरी, विकास अधिकारी, शाश्त्रज्ञ, सेवाभावी संस्था, कृषी विकास शिक्षण, जंगल, सहकार यामधील तज्ञ मंडळींसाठी 'पहाट' या नावाने मराठीत व 'The Dawn Of Life' हे इंग्रजी सदर ७ ते १० - १२ मिनिटांचे दर गुरुवारी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वेबसाईटवर (www.drbawasakar.com) आपणास नवनवीन अत्यंत उपयुक्त अशी व्यवहारी माहिती ही आपल्या रोजच्या कामामध्ये व व्यवहारात उपयुक्त ठरावी व देशकल्याण होण्यासाठी मुद्दाम सुरू केले आहे. ते आपण ऐकावे व त्यातील केलेल्या सुचनांचा वापर व कृषी क्षेत्रात अवलंब करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/web-title-jaggery-deals-close-kolhapur-3963", "date_download": "2019-03-25T07:53:42Z", "digest": "sha1:HQ7JKSJY7C3NS3A6AYMJZSATKDW5EMFS", "length": 10878, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Web Title: jaggery deals close at Kolhapur | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर बाजार समितीच्या हस्तक्षेपानंतर बंद गुळ साैदे पुन्हा सुरू\nकोल्हापूर बाजार समितीच्या हस्तक्षेपानंतर बंद गुळ साैदे पुन्हा सुरू\nकोल्हापूर बाजार समितीच्या हस्तक्षेपानंतर बंद गुळ साैदे पुन्हा सुरू\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nकोल्हापूर - येथील बाजार समितीत तोलाईदारांनी काम करण्यास सलग दुसऱ्या दिवशीही नकार दिल्याने गुळ सौदे बंद पडले, त्यामुळे संतापलेल्या गुळ उत्पादकांनी शाहू मार्केट यार्डाची दोन्ही प्रवेशव्दारे बंद केली. यानंतर बाजार समितीने तोल���ईदारांची समजूत काढून सौदे सुरू केले, पण काही वेळात एक दोन माथाडीनी काम करण्यास नकार दिला. तेव्हा व्यापारी अडते सौदे सोडून निघून गेले तसा वाद टोकला गेला. तेव्हा शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालय टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. दुपारी दिड वाजे पर्यंत वाद घुमत राहीला अखेर बाजार समितीने हस्तक्षेप करीत गुळ सौदे पूर्ववत सुरू केले.\nकोल्हापूर - येथील बाजार समितीत तोलाईदारांनी काम करण्यास सलग दुसऱ्या दिवशीही नकार दिल्याने गुळ सौदे बंद पडले, त्यामुळे संतापलेल्या गुळ उत्पादकांनी शाहू मार्केट यार्डाची दोन्ही प्रवेशव्दारे बंद केली. यानंतर बाजार समितीने तोलाईदारांची समजूत काढून सौदे सुरू केले, पण काही वेळात एक दोन माथाडीनी काम करण्यास नकार दिला. तेव्हा व्यापारी अडते सौदे सोडून निघून गेले तसा वाद टोकला गेला. तेव्हा शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालय टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. दुपारी दिड वाजे पर्यंत वाद घुमत राहीला अखेर बाजार समितीने हस्तक्षेप करीत गुळ सौदे पूर्ववत सुरू केले.\nयासर्व प्रकारात शाहू मार्केट यार्डात गुळ उत्पादकांची पळापळी, व्यापारी माथाडी, बाजार समिती, यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. अखेर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व घटकांची समजूत घातल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास बंद पडलेले गुळाचे सौदे पुन्हा सुरु झाले.\nतोलाईदारांनी शेतकऱ्यांकडून तोलाईची रक्कम घेवू नये, असे आदेश पणन विभागाने दिले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी तोलाईदार व माथाडी कामगारांनी बुधवारी (ता.12) काम बंद आंदोलन केले होते. गुरूवारी सौदे पून्हा सुरू होतील अशा अपेक्षेने गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी गुळ शाहू मार्केट यार्डात आणला होता.\nत्यानुसार गुरुवारी सौद्याची तयारी सुरु असतानाच काही तोलाईदारानी काम करण्यास नकार दिल्याने सौदे बंद पडले. माथाडी कामगारांनी कामाच्या वेळाही वाढविण्याची मागणी केली. यामुळे गोंधळ वाढला. सौदे सुरु होण्यास वेळ होत असल्याने या ठिकाणी आलेले गुळ उत्पादक अस्वस्थ झाले. गुळाची निर्गत करण्याऐवजी हे घटकच भांडत बसल्याने जिल्ह्यातून आलेल्या गुळा उत्पादकांचा संताप अनावर झाला.\nतोलाईदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न\nप्रवेशव्दारावर गोंधळ सुरू असताना गल्लीनंबर सहामध्ये तोला���दार एकत्र आले त्यांनी तिथे बैठक घेतली. येथे बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड, सचिव मोहन सालपे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी शेतकरी सर्व तुमच्या मागणीच्या बाजूने असतील पण गुळाचे सौदे बंद पाडून शेतकऱ्याचे नुकसान करु नका, सौदे तात्काळ सुरु करा असे आवाहन केले. व्यापारी व अडते हेही तिथेच थांबून होते.यावेळी तोलाईदारांनी मात्र आम्हाला कामच मिळणार नसेल तर आम्ही आंदोलन करायचे नाही का असा प्रतिप्रश्न केला. त्यावर बाजार समितीने सर्वच संबधीत घटकांची सोमवारी बैठक घेऊन मार्गाकाढून आता बाजारपेठेत गुळ आहे त्याचे सौदे सुरू होण्यासाठी तोलाईदारांनी काम सुरू करावे असे सचिव मोहन सालपे यांनी सांगितले.\nतोलाईदारांची सोमवारी बैठक घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर सर्वच घटकांना सौदे स्थळी आणणेत आले. दुपारी दीडच्या सुमारास व्यापाऱ्यांना सौदे स्थळी आणले. अखेर एकच्या सुमारास सौद्यास सुरवात झाली.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/senior-congress-leader-former-maharashtra-minister-patangrao-kadam-dies-in-mumbai/articleshow/63251336.cms", "date_download": "2019-03-25T09:00:31Z", "digest": "sha1:QMMETOUDE6U5EZRJLKCACEAFLLDIZ3IR", "length": 13852, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Former Maharashtra minister: कर्तबगार नेता - senior congress leader, former maharashtra minister patangrao kadam dies in mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nडॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकारणाची आणि शिक्षणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या दोन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे पतंगराव कदम यांची वाटचाल थक्क करायला लावणारी आहे. एखाद्या आडगावात जन्मून, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत शिक्षण घेत, वयाच्या विशीतच विद्यापीठ स्थापनेचे स्वप्न केवळ उराशी न बाळगता ते प्रत्यक्षात आणणे ही बाब तशी अशक्य कोटीतील; परंतु पतंगरावांनी अशक्य ते शक्य करून दाखविले.\nडॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकारणाची आणि शिक्षणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या दोन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे पतंगराव कदम य��ंची वाटचाल थक्क करायला लावणारी आहे. एखाद्या आडगावात जन्मून, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत शिक्षण घेत, वयाच्या विशीतच विद्यापीठ स्थापनेचे स्वप्न केवळ उराशी न बाळगता ते प्रत्यक्षात आणणे ही बाब तशी अशक्य कोटीतील; परंतु पतंगरावांनी अशक्य ते शक्य करून दाखविले. समाजकारण आणि राजकारण करताना शिक्षणाची कास धरून त्याच्या खासगीकरणाचे आगळे प्रारूपच पतंगरावांनी विकसित करून दाखविले. या खासगीकरणाला आज तद्दन बाजारू स्वरूप प्राप्त झाले असून, चांगले आणि करिअर घडवू शकणारे शिक्षण ही पैसेवाल्यांची मक्तेदारी बनू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर पतंगरावांनी केलेल्या शैक्षणिक कार्य जाणून घ्यायला हवे. 'भारती विद्यापीठा'ची स्थापना त्यांनी केली तेव्हा, त्यामागे केवळ पैसे कमावण्याची प्रेरणा नव्हती. साठच्या त्या दशकात शिक्षणाचा विस्तार झालेला नव्हता. बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी गणित आणि इंग्रजी हे विषय म्हणजे कर्दनकाळ होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून पतंगरावांनी या विषयांसाठी पूरक परीक्षा सुरू करीत 'भारती विद्यापीठा'ची मुहूर्तमेढ रोवली. हळुहळू त्यांच्या संस्थेचा विस्तार होत गेला- शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि अभिमत विद्यापीठ अशी चढत्या भाजणीने प्रगती होत गेली. राजकारणातही काँग्रेसचा सदस्य, आमदार, मंत्री, वजनदार नेते अशी त्यांची प्रगती होत गेली. शिक्षण क्षेत्राला पूरक अशी धोरणे घेण्यासाठी त्यांना राजकारणात असल्याचा नक्कीच फायदा झाला. त्यांनी विनाअनुदान तत्त्वावरील व्यावसायिक महाविद्यालये जशी काढली, तशीच खेड्यात, दुर्गम आदिवासी भागांत शाळाही काढल्या. गरीब, वंचित, उपेक्षित विद्यार्थ्यांना आधारही दिला. बेरोजगार तरुणांनाही हात दिला. समाजकारण, राजकारण आणि शिक्षणाचे अर्थकारण यांचा समतोल साधण्याची किमया त्यांना साधली. म्हणूनच या तिन्ही क्षेत्रांत ते यशस्वी झाले. ते रोखठोक बोलत. अशा बोलण्याचा फटकाही काहीवेळा त्यांना बसला. मात्र, अंतर्यामी ते मृदू होते. त्यामुळेच शैक्षणिक संस्थांचे, बँकांचे आणि मुख्यत: माणसांचे एवढे मोठे जाळे ते विणू शकले. त्यांच्या जाण्याने एका कर्तबगार नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासा���ी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nधावते जग याा सुपरहिट\nअसीमानंद सुटले; प्रश्न कायम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2016-Kapoos.html", "date_download": "2019-03-25T07:50:31Z", "digest": "sha1:ET2QEWIYO4575GL73ZPIZVLEU5BEDTEF", "length": 4340, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कापसाचे पीक चांगले म्हणून हळद, लिंबोणी, संत्रा पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर", "raw_content": "\nकापसाचे पीक चांगले म्हणून हळद, लिंबोणी, संत्रा पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nश्री. रावसाहेब आश्रोबा जोरवर, मु.पो. हाटकरवाडी, ता. मानवत, जि. परभणी. मो. ८६०५८४१६८\nमाझी हाटकरवाडी येथे ७५ एकर शेती आहे. त्यातील २ एकर शेतीत मी कापूस पीक घेतले व बाकीच्या शेतीत संत्रा, लिंबोणी, हळद, सोयाबीन हे पीक आहे. मी कापसाची व्हरायटी बायरची सरपास निवडली व मी त्याची लागवड ५.५' x १' वर केली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे नाव मी ऐकून होतो आणि माझे दाजी यांनी मला टरबुजासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे दिली. माझा टरबुजाचा प्लॉट पुर्ण गेला होता. मात्र त्यावर मी सप्तामृत स्प्रे केला तर माझा टरबुजाचा गेलेला प्लॉट आला.\nनंतर मी कापूस या पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृत श्री. बालाजी अॅग्रो ट्रेडर्स, वडगाव (स्टे.) यांच्याकडून आणले व कापूस या पिकावर स्प्रे केला. स्प्रे केल्यानंतर दहा दिवसांतच मला माझ्या कापसात बदल वाटला. कारण लोकांच्या कापसात आणि माझ्या कापसात बराच���ा फरक जाणवला, आज आमचे शिवारामध्ये पुर्ण कापूस लालसर व थ्रिप्सच्या प्रादुर्भावाने गेल्याचे दिसत असताना माझा प्लॉट अजुनही फ्रेश निरोगी आहे. तरी माझ्या मते सप्तामृतमुळे माझ्या कापसाचा एकरी उतारा १५ ते २० क्विंटल येईल अशी आशा वाटते. आज रोजी १५/१०/२०१६ मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी सय्यद फिरोज (मो. ९१६८२११३१६) त्यांच्याशी भेट झाली व मी आजपासून यांच्या मार्गदर्शनाखाली हळद, लिंबोणी, संत्रा या पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत आहे आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, एकवेळ अवश्य डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरा व प्रतिकूल परिस्थितीतही खात्रीशीर उत्पादन घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B2.-%E0%A4%B0%E0%A4%BE.-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-03-25T08:59:14Z", "digest": "sha1:GRW7C53JUXIPVH6LSWDG2HDDJOZISSNW", "length": 17365, "nlines": 268, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ल. रा. पांगारकर: Latest ल. रा. पांगारकर News & Updates,ल. रा. पांगारकर Photos & Images, ल. रा. पांगारकर Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nतोट्यातील एअर इंडियात महाभरती\nस्वस्त चॅनेलसाठी मुंबईत ‘केबल १९९ ओन्ली’ म...\nखाण्यात बीफ... मानसिक छळही\nजेटने रद्द केल्या सहा परदेशी सेवा\nनौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये खांदेपालट\n‘बोइंग मॅक्स’साठी जेटच्या अभियंत्यांची गळ\nसपना चौधरी नक्की कोणत्या पक्षात जाणार\n‘ब्रँड मोदी’ मजबूत; पण नोकऱ्यांचं काय\nintel inputs: मुंबई, दिल्ली, गोवा अलर्टवर;...\nchowkidar: मोदींना चौकीदाराची टोपी आणि शिट...\nपाकमध्ये हिंदू मुलींचे सक्तीने धर्मांतर, एकाला अटक...\nइस्लामिक स्टेटचा भस्मासूर संपला\nपाकिस्तानात २ अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण...\nन्यूझीलंड: हल्ल्यानंतर संहारक हत्यारांवर ब...\nसहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण\nक्षयाचे निर्मूलन २०४५पर्यंत शक्य\nजेट एअरवेजला 'या' बँंका आपत्कालीन कर्ज देणार\nउन्हाळ्याच्या तोंडावर एसी फ्रिजच्या किमती ...\nशत्रू शेअर्सच्या विक्रीतून ७०० कोटींची बेग...\nPNB: पंजाब बँक करणार १० हजार कोटींची वसुली...\nGold Imports: सोन्याच्या आयातीत ५.५ टक्क्य...\nहिंदुजा ब्रिटनमधील श्रीमंत आशियाई\nठाण्याचा नील, मुंबईची समीक्षा चमकले\nrishabh pant: पंतने झोडला मुंबईचा पाहुणचार...\nअमरावती जिल्हा संघाला विजेतेपद\nRasik Salam Dar: काश्मीरच्या रसिकनं केलं आ...\nipl 2019 : आंद्रे रसेल बरसला \n'भाई' बद्दल आम्ही समाधानी\nजयललीतांवर बायोपिक; कंगनानं घेतले २४ कोटी\n'सूर्यवंशी'मध्ये जॅकलिनऐवजी कतरिनाची वर्णी...\nजंगलाचा नवा रक्षक; 'जंगली'चं पोस्टर आलं\n'छपाक' मधील दीपिकाचा फर्स्ट लूक व्हायरल\nप्रेग्नन्सीच्या चर्चेबद्दल ऐश्वर्या राय म्...\n'या' दिवशी अजयचा 'तानाजी' प्रेक्षकांना भेट...\n‘कॉमर्स’चा जुळावा नोकऱ्यांशी ताळेबंद\nबिलिंगसाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार...\nकोणती परदेशी भाषा शिकू\nनिवडणुकांमुळे CAची परीक्षा पुढे ढकलली\nपोटगी द्यावी लागेल का\nती मिरवतेय सौंदर्याचे ‘कोड’\nटीव्ही, जाहिरात आणि चेहरे\nओळख का होतेय क्रॉस\nपोटगी द्यावी लागेल का\nती मिरवतेय सौंदर्याचे ‘कोड’\nटीव्ही, जाहिरात आणि चेहरे\nओळख का होतेय क्रॉस\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुख..\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थ..\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं ..\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल..\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय क..\nपाहा: प. बंगालमधील बेलूर मठाच्या ..\nसत्कार्योत्तेजक सभा : महाराष्ट्राचे सांस्कृतिक तीर्थ\nसंजय झेंडे संशोधन क्षेत्रातील एक मानदंड असलेल्या धुळ्यातील 'सत्कार्योत्तेजक सभे'ला गेल्या मे महिन्यात सव्वाशे वर्षे पूर्ण झाली...\nरसाळ वाणीचे ल. रा. पांगारकर\nआयुष्याचा उत्तरार्ध नाशिक या तीर्थक्षेत्री घालवून शहराला सधन करणारे अनेक अवलिये होऊन गेले, ज्यांच्या लेखणीची ताकद आतापर्यंत जनमानसात रुजली आहे आणि पुढेही अनेक वर्षे ती तशीच राहील. अशा या अवलियांपैकीच एक म्हणजे ल. रा. पांगारकर.\nअभिजात दर्जा दिल्यास मराठी जागतिक भाषा\nकेंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यास मराठी ही जागतिक भाषा होईल. त्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे समितीने सादर केलेला मराठी ही अभिजात भाषा असल्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारने मंजूर करावा, अशी सूचना भाषा अभ्यासकांकडून करण्यात आली.\n‘तू माझा सांगाती’बाबत आक्षेप\nसध्या ‘ई-टीव्ही’वर प्रसारित होत असलेल्या ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या जीवन चरित्राशी संबंधित प्रसंग विसंगत आणि अवास्तव असल्याचा आक्षेप घेऊन देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानने या मालिकेचे पुढील भाग प्रसारित करू नयेत, अशी मागणी केली आहे.\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पूर्तता रंग��ाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली असून, त्यानुसार मराठी भाषा संस्कृतोद्भव नसून ती संस्कृतपूर्व वैदिक भाषेच्याही आधीची लोकभाषा असल्याचे सिद्ध झाले आहे.\nपंचांग गुरूवार, २९ नोव्हेंबर\nमुंबई, दिल्ली, गोव्यात अलर्ट; दहशतवादी हल्ल्यांचा कट उघड\n'काँग्रेसनेही घटना बदलण्याचा प्रयत्न केला'\nजेट एअरवेजला तारण्यासाठी सरसावल्या बँका\nनिवडणूक आयोगाने विकत घेतली ३३ कोटींची शाई\n'भाजपमध्ये जाणार नाही, शुक्रवारी निर्णय घेणार'\nसपना चौधरी नक्की कोणत्या पक्षात जाणार\nपुणे: पैशांवरून आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार\nअनीस अहमद यांचा काँग्रेसला घरचा अहेर\nहवाई दलात अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर दाखल\nफोटोः IPLचीअरलीडर्सला किती पैसे मिळतात\nफ्लिपकार्ट मोबाईल बोनान्झा विक्री\nकुंडली 25 मार्च 2019\nअमेझॅन फॅब फोन विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-subramanyam-swami-sridevis-death-1293", "date_download": "2019-03-25T08:18:04Z", "digest": "sha1:PB6YF5L3X7QKCEIY5RWYUEGUVSGY4GQ5", "length": 6086, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news subramanyam swami on sridevis death | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'माझ्या मते, श्रीदेवींची हत्याच..'\n'माझ्या मते, श्रीदेवींची हत्याच..'\n'माझ्या मते, श्रीदेवींची हत्याच..'\n'माझ्या मते, श्रीदेवींची हत्याच..'\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nमुंबई : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याचे अनेक नवनवीन पैलू देखील समोर येत आहेत. या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनीही हा मृत्यू बॉलीवूड व अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन मधून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.\nमुंबई : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याचे अनेक नवनवीन पैलू देखील समोर येत आहेत. या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनीही हा मृत्यू बॉलीवूड व अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन मधून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.\n'माझ्या मते श्रीदेवी जास्त प्रमाणात मद्य पीत नसून, कधीतरी काही अंशी बीअरचे सेवन करत होत्या, त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून ही हत्या आहे', असा अंदाज एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या मृत्यूचा संबंध त्यांनी बॉलीवूड व अंडरवर्ल्ड कनेक्शनशी जोडला.\nयाबाबत बोलताना, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज का तपासले नाही असाही सवाल त्यांनी केला. कुटूंबातील लग्नसमारंभासाठी दुबईत गेलेल्या श्रीदेवी हॉटेलच्या रूममधील बाथरूमच्या बाथटबमध्ये बेशुध्दावस्थेत सापडल्या. त्यावेळी त्यांचे पतीही तेथे उपस्थित होते. पण अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/siddharth-jadhav-birthday-ceclebration/", "date_download": "2019-03-25T07:35:17Z", "digest": "sha1:2UI5N6MXMGAS5XF2ED3VMR72UK5KERH6", "length": 8378, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "सिद्धार्थ जाधवचं धमाल बर्थडे सेलिब्रेश पाहिलंत का?", "raw_content": "\nसिद्धार्थ जाधवचं धमाल बर्थडे सेलिब्रेश पाहिलंत का\nएक दोन नव्हे तर तब्बल अकरा मराठी कलाकार झळकणार “सिम्बा”मध्ये\n‘हा’ अभिनेता देतोय अभिनेत्री सैयामीला ग्रामीण मराठीचे धडे.बिहाईंड द सीन्स माऊली\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा पडला थाटात पार. पहा फोटोज.\nअजय देवगनचा आगामी तानाजी येतोय. शूटिंगला झाली सुरवात.\nसिद्धार्थ जाधवचं धमाल बर्थडे सेलिब्रेश पाहिलंत का\n मराठीतील आपल्या सर्वांच्या अभिनेत्यांपैकी एक. नुकताच 23 ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ जाधवचा 37 वा वाढदिवस झाला असून या निमित्ताने आपल्या सर्वांना मोठी धमाल बघायला मिळाली आहे. त्याचं झालं असं कि सिद्धार्थ सध्या आगामी सिम्बा सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आणि त्याचा वाढदिवसही त्याने सिनेमाच्या टीमसोबतच सेलिब्रेट केला. यावेळी अभिनेता रणवीर सिंह, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सिम्बाची संपूर्ण टीम उपस्थित होती.\nसेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या व्हिडिओची सुरूवात ‘बार बार दिन ये आए…’ या गाण्याने झाली आहे. या गाण्यावर सिद्धार्थ आणि रणवीर सिंह नाचताना दिसत आहे. “हा माझ्यासाठी खास दिवस आहे. 13- 14 वर्षांनतर मी पुन्हा एकदा रोहित शेट्टी सरांसोबत काम करत आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे.. I Love You Sir..” असं सेलिब्रेशननंतर सिद्धार्थ आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाला.\nएक दोन नव्हे तर तब्बल अकरा मराठी कलाकार झळकणार “सिम्बा”मध्ये\n‘हा’ अभिनेता देतोय अभिनेत्री सैयामीला ग्रामीण मराठीचे धडे.बिहाईंड द सीन्स माऊली\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा पडला थाटात पार. पहा फोटोज.\nअजय देवगनचा आगामी तानाजी येतोय. शूटिंगला झाली सुरवात.\n“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.\nमधुरा साने आठवतेय का ती काही महिन्यांपूर्वीच आपल्याला एका छानशा मराठी सिनेमातून भेटीला आली होती. नाही...\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nपहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.\nसिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी...\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nमराठी मनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्का, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर...\n‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला\nअभिनेते सुनिल बर्वे यांनी आपल्या सुबक नाट्यसंस्थेच्यावतीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातील...\n‘रंगीला गर्ल’ अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा मराठी सिनेमा ‘माधुरी’.\n‘नटसम्राट’चा पोस्टर आऊट. पुन्हा एकदा रंगमंच गाजवायला तयार.\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/author/vaibhav-deodhar/", "date_download": "2019-03-25T07:23:14Z", "digest": "sha1:3VM56M525FWB6J2BFAYWXTVKPYKRIKIC", "length": 9033, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Vaibhav Deodhar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nGST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल (GST वर बोलू काही – भाग ६)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आधीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. आज आपण\nGSTवर बोलू काही – भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पूर्वीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा. पहिल्या चार\nGST वर बोलू काही-भाग ४ – अप्रत्यक्ष करप्रणालीमाधल्या त्रुटी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भाग ३ ची लिंक: VAT आणि इनपुट टॅक्स क्रेडीट\nGSTवर बोलू काही – भाग ३ – VAT आणि इनपुट टॅक्स क्रेडीट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आधीचा भाग : GST वर बोलू काही: भाग २\nGST वर बोलू काही: भाग २ – अप्रत्यक्ष कर म्हणजेच Indirect Taxes\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पहिल्या बघाची लिंक: GST वर बोलू काही: भाग १\nGST वर बोलू काही – भाग १\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === It is not difficult to meet taxes, they\nभेटा पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्तीला\n११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी \nप्लॅस्टिक बंदीवर एवढा विचारात पाडणारा लेख तुम्ही वाचलाच नसेल\nइतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताकदिनी “शौर्य पुरस्कार” दिले जाणार नाहीत\nभारतातल्या राजकारणी बाबूंनी नवीन वर्षाचे हे संकल्प घेतले तर भारतीय त्यांचे मनापासून आभार मानतील\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\n‘नेकी की दुकान’- येथे कोणतीही वस्तू केवळ १० रुपयाला मिळते\nकाशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…\nनेमकं कैलास मानसरोवरचं रहस्य आहे तरी काय\nतुम्हाला हे अत्यंत कठीण कोडं सोडवता येईल का\nमराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं\nसूर्यावर पाणी अस्तित्वात आहे, ही बातमी म्हणजे अफवा आहे का\nपहिल्या नजरेत प्रेम- “Love at first sight” खरंच असतंय काय रे भाऊ\nबिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ ���० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील\nगाढवावर बसलेला अमीर खान – कॅप्टन जॅक स्पॅरोचं भारतीय व्हर्जन\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\n…आणि तिने गगनभरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले\n ह्या ५ सोप्या युक्ती वापरा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा\nयापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या हस्ते दिला गेलाय\n“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2019-03-25T07:28:53Z", "digest": "sha1:52Q7WLJJMRCC6VG6EIL6J3DUZE4U47TT", "length": 3532, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुर्जर - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख गुर्जर ही जमात याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गुर्जर (निःसंदिग्धीकरण).\nगुर्जर ही जमात राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रात आढळते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१५ रोजी ०८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95", "date_download": "2019-03-25T07:36:24Z", "digest": "sha1:PNMNQMDKTCT4KDFSPQHE6PREKUU4BEUO", "length": 8317, "nlines": 373, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषेप्रमाणे विकि संपादक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४१ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४१ उपवर्ग आहेत.\n► सदस्य mr (५ क, ८५ प)\n► मराठी भाषा न येणारे सदस्य (१२६ प)\n► सदस्य en (३ क, ३० प)\n► सदस्य hi-3 (२० प)\n\"भाषेप्रमाणे विकि संपादक\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१८ रोजी २१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध ��हेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T07:22:56Z", "digest": "sha1:XKQMREUL3OMV5Q7MTKASWIW4ENWS5PJO", "length": 7011, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "समोरच्या माणसाला ताडण्यामध्ये पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळातील माणसांची समज वाढली आहे. - विचारप्रवाह", "raw_content": "\nसमोरच्या माणसाला ताडण्यामध्ये पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळातील माणसांची समज वाढली आहे.\nकाही वेळापूर्वी मी युट्युबवर ट्रम्प आणि हिलरी यांच्यातील वादविवादाची एक फित पहात होतो. त्यात प्रेक्षकांमधील एकाला त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. त्याने त्यांना प्रश्न विचारला, जर तुम्हा दोघांना एकमेकांतील एखादा सकारात्मक गुण सांगायचा असेल तर तो तुम्ही काय सांगाल\nपरीक्षकांनी उत्तर देण्याबाबत ट्रम्प यांच्याकडे इशारा केला, पण हिलरी यांनी स्वतःच बोलण्यास सुरुवात केली आणि त्यांनी म्हटले की, ‘ट्रम्प यांनी आपल्या मुलांना ज्या प्रकारे वाढवले त्याचे मला कौतुक वाटते’. या उत्तरात अपरिहार्यतेचा सूर होता. पण एव्हढे बोलून त्या थांबल्या नाहीत, तर निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीच्या अनुषंगाने पुढे स्वतः बद्दल बोलत राहिल्या.\nडॉनल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन – प्रश्नोत्तरातील एक क्षण\nहिलरी यांचे बोलणे झाल्यानंतर ट्रम्प यांनी बोलण्यास सुरुवात केली. ‘हिलरी कितपत मनापासून बोलल्या ते मला माहित नाही, पण तरी मी ही गोष्ट चांगलेपणाने घेतो’, असे सांगत ते पुढे म्हणाले, ‘हिलरी मधली मला भावणारी गोष्ट म्हणजे त्या हार मानत नाहीत’. त्यांनी अशाप्रकारे अगदी छोटे, स्पष्ट आणि प्रांजळ उत्तर दिले.\nया फिती खालील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की, जे लोक ट्रम्प यांचे विचार मानत नाहीत त्यांना देखील त्यांचे प्रांजळ उत्तर आवडले कारण त्यांच्या लक्षात आले की, हिलरी यांच्या उत्तरामध्ये एक प्रकारची कृत्रिमता होती. थोडक्यात सांगायचे, तर आजकाल लोकांना कृत्रिमता आवडत नाही. त्यांना तुम्ही जसे आहात तसे पाहायला आवडते, आणि तुम्ही जर कृत्रिमता दाखवली, तर ती त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही.\nआपणाला हेही वाचायला आवडेल\nमाऊली : रितेशच्या नव्या चित्रपटाची झलक आणि रितेशची ‘स्टार पॉवर’\nअर्थपूर्ण कथामालांचा चित्रपट पहायचा असेल, तर नेटफ्लिक्सवर ‘The Ballad of Buster Scruggs’ हा चित्रपट नक्की पहा\nआत्ताच नेटफ्लिक्सवर ‘आउटलॉ किंग’ हा चित्रपट पाहिला. स्कॉटलंडमधील १४व्या शतकाच्या सुरुवातीच्या राजकीय परिस्थितीवर हा चित्रपट बेतलेला आहे.\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/precautions-to-be-taken-while-travelling-in-own-car/", "date_download": "2019-03-25T07:22:50Z", "digest": "sha1:A7MB3TMOQK3QYD2Y5OQRWN5JBEA2JXF6", "length": 21088, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nपावसाळ्यात भिजण्याचा आनंद काही औरच असतो. भर पावसात बाईकवरुन आपल्या पार्टनरसोबत लॉंग ड्राईव्हला जाणे असो किंवा आपल्या फोर व्हिलरमधून मित्रपरिवार, घरच्यांसोबत फिरणे असो, या गोष्टी सर्वांनाच आवडतात. मनाला ताजतवानं करून जातात. पावसातील हे आनंदाचे क्षण आपण भरभरून जगत असतो.\nपण हे जगताना आपल्या जिवाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.\nवादळी वातावरणात रस्त्यावरील इतर वाहने, रस्त्यावरील चिन्हे आणि रस्ताही दिसणे अवघड होऊन बसते. अशा पावसाळी वातावरणात गाडीने फिरताना पुढील काळजी घ्याल.\n१. पावसाळ्यात रस्त्यावर ओलाव्यामुळे गाड्या घसरण्याची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे वेगाने गाडी चालविण्याचा मोह ��ाळावा. वाहनाचा वेग ताशी ६०-७० किमी असेल तर अचानक ब्रेक मारण्याची परिस्थिती उद्भवल्यास वेग कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता कमी होते.\n२. गाडी रस्त्याच्या मध्यभागी चालवा, कारण पाणी रस्त्याच्या बाहेरील बाजूस साचते. ऑफ रोड ड्रायव्हिंग टाळा. रस्त्याबाहेरील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज करणे अवघड असते.\n३. पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा. तुमची गाडी ही पुढच्या वाहनापासून पुरेशी दूर असेल तर ती तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या मागच्या गाडीला पावसाळी धुरकट रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये योग्य तेवढा reaction time देऊ शकते.\n४. पावसात गाड्यांचा अंदाज येत नसल्याने सिग्नल फॉलो करुन गाडी चालवा. शक्यतोवर तुमच्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा. यामुळे समोरची गाडी मार्गातील पाणी सारत पुढे जात असल्याने तुम्हाला पुढच्या पाण्याचा अंदाज घेऊन चालवणे सोपे होते. तसेच गाडीची लेन चेंज करायची झाली तर सिग्नल द्यायचा लक्षात ठेवा.\n५. गाडीचे ब्रेक, टायर, हेडलाईट आधीच चेक करुन घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात होणारी फसगत यामुळे टळू शकते.\n६. मोठी वाहने जसे ट्रक अथवा बसेस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका. ह्या वाहनांची चाके मोठी असल्याने रस्त्यावरील खड्डे चाकाखाली आल्यावर मोठे फवारे उडतात, चिखल उडतो. यामुळे रस्त्यावरील इतर गोष्टी दृष्टीस पडणे अवघड होते.\n७. पावसाळी अथवा निसरड्या परिस्थितीत वाहन चालवितांना जास्त सतर्क रहा. तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष ठेवा.\n८. करकचून ब्रेक लावल्यास वाहनाची चाके एकदम लॉक होतात आणि वाहन घसरू शकते. त्यामुळे एकदम वेग वाढविणे आणि एकदम ब्रेक दाबणे टाळावे. ब्रेकचा वापर करण्यापेक्षा, तुमच्या गाडीचा वेग हळू ठेवावा. तसेच, अचानक वळू नये. यामुळे वाहन पल्टी होऊ शकते. वळणा-वळणाच्या रस्त्यावर अधिक सावधान राहावे आणि वाहन हळू चालवावे. तसेच, स्टिअरिंग हळूहळू फिरवावे.\n९. जरी तुम्ही गाडी दिवसा चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाईट चालू ठेवा. ते तुम्हाला तर रस्त्यावर दिसण्यास मदत करतीलच, शिवाय इतर वाहनांनाही तुमच्या वाहनाची जाणीव करून देईल. कित्येक राज्यांमध्ये दिवसासुद्धा गाड्यांचे हेड लाईट्स चालू ठेवणे बंधनकारक आहे.\n१०. तुमच्या गाडीच�� windshield wipers हे उत्तम अवस्थेत असू द्या. ते वेळीच तपासून पहा. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जीर्ण झालेले ठिसूळ वायपर्स बदलून टाका.\n११. वाहत्या पाण्याखाली जमीन दिसत नसल्यास त्यातून गाडी चालवू नका.पावसामुळे दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज पटकन लागू शकत नाही. रस्त्याचा अंदाज नसेल तर अतिउत्साहात गाडी चालवू नका.\n१२. अनिश्चित खोलीच्या डबक्यांमधून वाहन चालवितांना सावकाश जा. डबक्याची खोली जर तुमच्या वाहनाच्या दरवाजाच्या तळापेक्षा जास्त असेल, तर दुसरा मार्ग शोधा. डबकी वा साठलेल्या पाण्यामुळे हायड्रोप्लेनिंगची शक्यता अधिक वाढते. गाड्या पावसात खूप वेगाने जात असतात त्यावेळी हायड्रोप्लेनिंगची समस्या उद्भवते.\nजेव्हा गाड्या खूप वेगाने जात असतात तेव्हा गाड्यांचे टायर्स आणि रस्ता यांच्या मध्ये पाण्याचा एक thin layer तयार होतो. यामुळे गाडी रस्त्यालगत चालत नसते.\nअशा परिस्थितीत, गाडीवर नियंत्रण मिळवणे अधिकच अवघड जाते. जर तुमच्या कारला हायड्रोप्लेनिंगचा धोका निर्माण झाला तर abruptly ब्रेक मारू नका किंवा गोंधळून जाऊन steering wheel फिरवू नकायामुळे तुमची गाडी पलटी होण्याची शक्यता असते.\nगाडीचा वेग कमी करून तिचा रस्त्याशी संपर्क होईल असं बघा. मग वाटल्यास ब्रेक मारा. हायड्रोप्लेनिंगची समस्या उद्भवू नये म्हणून पाऊस पडायला लागल्यावर निर्माण होणाऱ्या डबक्यांपासून सावधान रहा. त्याचप्रमाणे साचलेले पाणी हे कित्येक खड्डे आणि डबक्यातील चिखल आपल्याला दिसू देत नाही.\nअशा चिखलातून गाडी चालवली तर ती आपल्या वाहनांच्या ब्रेकची परिणामकारकता कमी करते.\n१३. आपल्या कारचे वा वाहनाचे सर्व टायर चांगले आहेत ना म्हणजे टायर ट्रेड वा त्यावरील नक्षी झिजलेली नाही ना, हे तपासून घ्या. चांगल्या टायर कंपन्यांचे उच्च दर्जाचे टायर वापरण्यावर भर द्या. कारण आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे.\n१४. पावसात गाडीच्या काचा बंद केल्यावर काचेवर बाष्प जमा होते, त्यामुळे कोणत्याच काचेतून स्पष्ट दिसत नाही. अशावेळी मोठ्याप्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. अशावेळी घाबरुन न जाता गाडीची पार्किंग लाईट सुरु करुन गाडी एका बाजूला घ्यावी. काच बंद करुन एसी किंवा फॅन सुरु केल्यास काचेवरील बाष्प निघून जाते.\n१५. एखाद्याशी स्पर्धा करणे, दोन गाड्यांमधून कट मारण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी जिवावर बेतू शकतात. हे टाळावे.\n१६. पावसाळ्यात टॉप गिअरवर वाहन चालविण्याऐवजी एक गिअर कमी करून वाहन चालवावे. यामुळे टायरची रस्त्यावरील ग्रिप कमी होणार नाही आणि वेगही नियंत्रणात राहू शकतो.\n१७. गाडीवर योग्य प्रकारे ताबा मिळविण्यासाठी गाडीचं steering wheel दोन्ही हातांनी धरा. याचाच दुसरा अर्थ की तुमचा मोबाईल खाली ठेवा. लक्षात ठेवा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणं हे ३५ राज्यांमध्ये बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. असे करून तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.\nवरील गोष्टी लक्षात घेऊन गाडी चालवलीत तर पुढे येणारी संकटे मोठ्या प्रमाणावर टाळू शकतात आणि तुमचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि चांगल्या अर्थाने संस्मरणीय होऊ शकतो. त्यामुळे एवढं कराच \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मराठा आरक्षण आंदोलन – खरी राजकीय खेळी काहीतरी वेगळीच आहे\nअटल सरकार केवळ १ मताने का हरलं अविश्वास ठराव इतिहासाचा असाही एक धांडोळा →\nशंभू राजे आणि कवी कलश ह्यांची हृद्य मैत्री जगासाठी एक वस्तुपाठ आहे\nसर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स\n“लोक मोदींकडून जितक्या जास्त दिवस आशा ठेवतील, तितकेच अधिक निराश होतील”\nअपंग असूनही त्याने कसे पूर्ण केले ‘डीजे’ होण्याचे स्वप्न – जाणून घ्या एक थक्क करणारी कहाणी\n“सैन्य नसलेल्या” आंतरराष्ट्रीय सीमा: जागतिक शांततेची धूसर आशा\nयेत्या ८ तारखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का\nजॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…\nसाप आणि मगरीसारख्या भयानक जनावरांना लळा लावणारा अवलिया\nशंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही पाहायला मिळते आपल्या भारतात\nआज भारत वा बांग्लादेश कोणीही जिंको, पण खरा विजय भारतीय नौदलाने मिळवला आहे\nइंग्लंडला भारताकडून घ्यायचेत धडे – “ऑपरेशन राहत” मधून शिकायचं आहे रेस्क्यू ऑपरेशन\nमहाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे वाचून कंबर कसून तयारीला लागलं पाहिजे\nहिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा ‘हंबीरराव मोहिते’\nप्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना\nफुकटात मिळणाऱ्या जिओ��्या 4G फोन बद्दल जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेल्या सर्व गोष्टी\nतुषार दामगुडेंचा मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं\nराष्ट्रपतींना मिळालेल्या जातीय वागणुकीची किळसवाणी समर्थनं: ‘देशभक्त’ घटनानिष्ठ कधी होणार\nजाणून घ्या: भाडे करार (Rent Agreement) फक्त ११ महिन्यांचाच असण्यामागचं “चलाख” कारण..\nलता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं\n“राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २)\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/Samsung-confirms-wireless-charging-for-Galaxy-S6.html", "date_download": "2019-03-25T08:18:11Z", "digest": "sha1:3SQUI3APVFDZW647PWQL7Q4WEAHGWMYI", "length": 9578, "nlines": 109, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "सॅमसंग गॅलक्सी S6 मध्ये असेल वायरलेस चार्जिंगची सुविधा! ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nसॅमसंग गॅलक्सी S6 मध्ये असेल वायरलेस चार्जिंगची सुविधा\nसॅमसंगच्या गॅलक्सी S6 या फोनची गॅझेटप्रेमींना मोठी उत्सुकता आहे. गॅलक्सी S6 ची वैशिष्ट्ये काय असतील, याविषयी दररोज नव नवी माहिती लीक होत असते. त्याच मालिकेत आता सॅमसंगच्या गॅलक्सी S6 या फोनला वायरलेस चार्जिंगचा पर्याय असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.\nसॅमसंगचा हा नवा फ्लॅगशिप फोन 1 मार्च रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.\nस्वतः सॅमसंगनेच आगामी गॅलक्सी फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल, असं सूचित केलंय. आगामी स्मार्टफोनबाबत उत्सुकता वाढवण्यासाठी त्यातील फीचर्सची अनधिकृतपणे चर्चा घडवून आणली जाते. त्यामुळे नव्या उत्पादनाविषयी जास्तीत जास्त उत्सुकता वाढते. एरवी अशा फीचर्सविषयी कंपनीक़ून काहीही अधिकृत माहिती दिली जात नसली तरी वायरलेस चार्जिंगबाबत मात्र सॅमसंगच्या ब्लॉगमधून सुतोवाच करण्यात आलंय. यापूर्वीच सॅमसंगने गॅलक्सी S6 चा कॅमेरा हा हायएन्ड कॅटेगरीतील सर्वोत्कृष्ट असेल, असं जाहीर केलं होतं.\n2015 हे वर्षच वायरलेस चार्जिंगची सुविधा असलेल्या गॅझेटचं असेल, असं जाणकारांना वाटतं. कॉलकॉम स्नॅपड्रॅगन या आजच्या मितीला जगातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन प्रोसेसर उत्पादक कंपनीच्या प्रमुख इंजिनीयर सेहो पार्कच्या मते या वर्षात अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या वायरलेस चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देतील. त्यामध्ये सॅमसंग गॅलक्सी S6 हा फ्लॅगशिप फोन पायोनियर ठरण्याची शक्यता आहे.\nसॅमसंगचे तंत्रज्ञ 2000 सालापासूनच म्हणजे तब्बल 15 वर्षांपासून वायरलेस चार्जिंगवर संशोधन करत आहेत. सेहो पार्क यांच्या ब्लॉगमधूनच पहिल्यांदा सॅमसंग गॅलक्सी S6 मध्ये वायरलेस चार्जिंगचं तंत्रज्ञान वापरणार असल्याचं जाहीर झालंय.\nसॅमसंगने यापूर्वीच न्यूझिलंडची पॉवरबायप्रॉक्झी ही कंपनी विकत घेतलीय. या कंपनीकडे वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाचं पेटंट आहे.\nसॅमसंगने वायरलेस चार्जिंगचा एक भाग म्हणून गॅलक्सी S4, गॅलक्सी S5 तसंच गॅलक्सी नोट 3 आणि गॅलक्सी नोट 4 या स्मार्टफोनसाठी बॅटरी बॅकपॅकची विक्री करायला सुरूवात केलीय.\nसॅमसंगचा नवा फोन 1 मार्चला म्हणजे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या दोन दिवस अगोदर लाँच केला जाणार आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/wangmaysheti?page=3", "date_download": "2019-03-25T08:54:56Z", "digest": "sha1:7KRZC72SKJZOAO6YP3R2CGUA3HROG6XD", "length": 8105, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " वाङ्मयशेती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nचाहूल नवःउषेची 1,029 20-06-2011\nविलाप लोकसंख्येचा .. 897 20-06-2011\nहे गणराज्य की धनराज्य\nशुभहस्ते पुजा 1,259 20-06-2011\nऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,667 22-06-2011\nजरासे गार्हाणे 806 22-06-2011\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/custom-duty-gst-intelligence-solar-power-equipment-evacuated-tube-siddhala-renewable-energy-systems-limited-vishal-kumbhardhare/", "date_download": "2019-03-25T07:45:53Z", "digest": "sha1:66I6WDY6VVKGQLTBJMXA5JSRB4IP6NU2", "length": 12475, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीमा शुल्क बुडविल्याप्रकरणी उद्योजकाला अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीमा शुल्क बुडविल्याप्रकरणी उद्योजकाला अटक\n1 कोटी 7 लाखांचा कर : जीएसटी इंटेलिजन्सची क���रवाई\nपुणे – सौरउर्जा उपकरणात वापरण्यात येणाऱ्या आयात इव्हॅक्युएटेड ट्युबचे सीमाशुल्क बुडवून खुल्या बाजारात विक्री करून तब्बल एक कोटी सात लाख रुपयांचा सीमा शुल्क कर बुडविल्याप्रकरणी उद्योजकावर कारवाई करण्यात आली आहे. यात या उद्योजकाला जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सोमवारी (दि.30) रात्री अटक केली.\nसिद्धकला रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विशाल कुंभारधरे (वय 38, रा.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे. मुख्य न्यायदंडाधिकऱ्यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.\nही कारवाई द डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाच्या उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी सुनील यादव आणि पांडुरंग देशमुख यांच्या पथकाने केली. कुंभारधरे यांची सौरउर्जेवरील पाणी तापविण्याचे यंत्र तयार करण्याची सिद्धकला रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स लिमिटेड ही कंपनी आहे. केंद्र सरकारकडून सौरउर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी उपकरणांमध्ये वापरण्यात येणारे इव्हॅक्युएटेड ट्युबचे सीमा शुल्क भरण्यासाठी सवलत दिलेली आहे. परंतु कुंभारदरे यांनी ती परदेशातून आयात करून त्याचे सीमाशुल्क न भरता उलट विक्री खुल्या बाजारात करून 1 कोटी 7 लाख रुपयांचा नफा कमविला होता. तसेच त्याचे व्यवहारांच्या नोंदी देखील ठेवल्या नाहीत. सीमाशुल्क कायद्यांचा भंग केल्याप्रकरणी तसेच सरकारचा महसूल बुडविल्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी जीएसटीचा भरणा प्रामाणिकपणे करा, तसेच जे व्यावसायिक किंवा उद्योजक जीएसटीचा भरणा करीत नसतील, त्यांना देखील या प्रक्रियेत सामील होण्याचे आवाहन द डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सकडून करण्यात आले आहे.\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nपुणे – फळांच्या राजाच्या आगमनासाठी ‘रेड कार्पेट’\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\nपुणे – अपघाती मृत्यू रोखण्यासाठी आता नोडल अधिकारी\nपुणे – अंदाजपत्रकीय तूट 1,800 कोटींच्��ा घरात\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/artical-on-sadiman-by-vinit-vartak-in-marathi/", "date_download": "2019-03-25T08:12:51Z", "digest": "sha1:5TSTNWL6DLEMKBCUHSZHQXDOVKY4VX56", "length": 13420, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सादिम्यान... एक अवलिया", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nपाणी अडवा पाणी जिरवा ह्या उक्तीला प्रत्यक्षात आपण खूप कमी वेळा बघतो. झाड किती लावली ह्यावर न अवलंबून राहता त्यांची देखभाल करून हि उक्ती प्रत्यक्षात उतरवणारा एक हिरो आपल्या देशात नाही पण आपल्या बाजूच्या देशात म्हणजे इंडोनेशियात आहे. त्याने अस काही कार्य केल आहे आणि अजून करत आहे कि ज्यामुळे पूर्ण गावाचा नक्षा बदलून गेला आहे. झाड लावली म्हणजे सगळ संपल अस होत नाही. तर त्याची वाढ करून पाण्याला मातीत जिरवणारा ह्या हिरोच नाव आहे सादिम्यान.\nदाली हे छोटस गाव वोनोगिरी जिल्ह्यात जावा प्रांतात, इंडोनेशिया इकडे वसल आहे. माउंट लावू च्या उतारावर वसलेल हे गाव गेन्डोल जंगलाचा भाग आहे. संपूर्ण जंगलातील ह्या गावाला निसर्गाचा आणि वृक्षवल्लीचा परीस्पर्श झाल्यामुळे एक सुंदरता होती. गावात कधीच पाण्याची वानवा नव्हती. पण १९६४ साली लागलेल्या आगीत ह्या गावातील जंगल पूर्णपणे भस्मसात झाल. वाढणारी लोकसंख्या आणि जमिनीची होणारी धूप ह्यामुळे इथल्या निसर्गाच्या ठेव्याला वाळवी लागली. उन्हाळ्यात पाण्याच दुर्भिक्ष तर पावसाळ्यात येणारे पूर ह्यामुळे इथल्या गावातील लोकांच जगण अतिशय कठीण झाल.\nसादिम्यान ह्या गावातला एक साधारण शेतकरी. हातावर कमावून दोन वेळच पोट भरणारा. दरवर्षीच्या ह्या सुका दुष्काळ आणि ओल्या दुष्काळाने हतबल झालेला. पण म्हणून कर्जाच्या ओझ्याखाली दबून आपल जीवन संपवून टाकणाऱ्या मधला तो नव्हता. त्याच मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हत. स्वतःची आणि गावाची परिस्थती बदलण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार त्याच्या मनात सतत सुरु होता. सादिम्यान ने विचार केला कि काय वेगळ झाल. १९६४ आणि आता असा काय फरक पडला कि आपल्या गावाच आयुष्य बदलवून गेल. निसर्गाचा प्रकोप झाला कि आपण निसर्गापुढे झुकलो. नक्की काय\nविचारांच्या ह्या साखळीत त्याला जे समजल ते पुढल्या काही वर्षात त्याच आयुष्य बदलवणार होत. जंगलातील आगीने पूर्ण वृक्षसंपदा नष्ट केली होती. वृक्ष नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी आणि माती वाहून जाऊन पूर यायचा तर पाणी न मुरल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याच दुर्भिक्ष जाणवायच. त्याला मूळ समस्या कळली पण आता करायचं काय सरकार काहीतरी करेल ह्यापेक्षा आपण काय करू शकतो का सरकार काहीतरी करेल ह्यापेक्षा आपण काय करू शकतो का ह्या विचाराने त्याची झोप उडवली. त्याला उत्तर मिळाल होत पण ��ता गरज होती ते जमिनीवर निर्माण करण्याची. सादिम्यान ने ठरवलं आपण बदल घडवायचा. त्याने बघितल होत कि वडाच झाड हे प्रचंड पाणी मुरवू शकते. तसेच त्याची मूळ जमिनीची धूप कमी करू शकतात. पण समस्या होती कि वडाच्या झाडाच्या बियांची किंमत होती ५०,००० इंडोनेशियन रुपया म्हणजे जवळपास ४ अमेरिकन डॉलर ( ३०० भारतीय रुपये ). एका गरीब शेतकऱ्याला हे पैसे कसे परवडणार\nसादिम्यान हार मानणाऱ्या मधला नव्हता त्याने युक्ती लढवली. आपल्या शेतात लवंगी च्या झाडाच बी निर्माण केल. १० लवंगीच्या झाडाच्या बिया म्हणजे १ वडाच्या झाडाची बी अस करत त्याने माउंट लावू च्या भकास जागेवर एक एक करत झाड लावायला सुरवात केली. नुसत झाड लावून तो थांबला नाही तर त्याची निगा राखायला सुरवात केली. नेहमीप्रमाणे जगरहाटीच्या विरुद्ध तुम्ही काही केल कि नाक वाकड करणारे असतात. सादिम्यान ला अनेकांनी मुर्खात काढल. त्याने पेरलेल्या बिया जमिनीतून काढून टाकून अनेकांनी कुत्सिक मानसिकतेच दर्शन दिल. पण सादिम्यान थांबला नाही. आपल्या लक्षावर काम करत राहिला. एक, दोन नाही तर तब्बल २० वर्ष. न थकता, न घाबरता, लोकांच्या नजरांना तोंड देत आपल काम करत राहिला. १०० हेक्टर च्या त्या जमिनीवर त्याने मोजदाद केली नसेल पण ११,००० पेक्षा जास्त झाड लावली आणि जगवली.\nत्या ११,००० पेक्षा जास्त विपुल वृक्षांनी जेव्हा २० वर्षांनी आपली फळे द्यायला सुरवात केली तेव्हा सादिम्यान फक्त इंडोनेशियात नाही तर जगभरात जाऊन पोहचला. ह्या निर्माण झालेल्या वृक्षसंपत्तीने पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरवायला सुरवात केली. पाणी मुरल्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आणि साठे कमालीचे वाढले. जमिनीची धूप थांबली आणि पावसाळ्यात येणारे पूर थांबले. वोनोगिरी जिल्ह्यातील अजून ३० पेक्षा जास्ती गाव पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करत असताना दाली मात्र पाण्याने भरून गेल. आजही सादिम्यान ने आपल कार्य सुरूच ठेवल आहे. इतर गावाने हि ह्याच अनुकरण केल.\nएकेकाळी वेडा म्हणून हिणवला गेलेला सादिम्यान आज जगाच्या नकाशावर आपल्या कर्तुत्वाने हिरो ठरला आहे. त्याच साधेपण इतक कि त्याच्या शब्दात “I don’t want to be treated as a special person. All I want is to do everything in my power to make people having a better life.” पाण्याला जिरवणारा सादिम्यान कडून आपल्याला खूप काही शिकण्यासारख आहे. त्याच्या ह्या असामान्य कर्तुत्वास माझा सलाम.\nऐका��ं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nनेते स्टेजवर तर महापुरुषांच्या प्रतिमा खाली; हा महापुरुषांचा अपमान नव्हे का\nमुख्यमंत्र्यांच्या शहरात पत्रकाराच्या आई व मुलीची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/members-of-the-pune-municipal-corporations-sub-committee/", "date_download": "2019-03-25T08:04:11Z", "digest": "sha1:2PRMI7WCSJXPM6354QU6Y2SQRWEDWYMX", "length": 6304, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nपुणे महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड\nपुणे : पुणे महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची मुदत 30 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे आगामी सदस्यांची निवड आज करण्यात आली. यामध्ये विधी समिती, महिला बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा समितीचा समावेश आहे.\nभाजप : माधुरी सहस्त्रबुद्धे, शीतल सावंत, श्रीकांत जगताप, मंजुश्री खर्डेकर, विरसेन जगताप, स्वप्नाली सरकार, मंगला मंत्री, विजय शेवाळे\nराष्ट्रवादी: प्रकाश कदम, संजीला पठारे, रत्नप्रभा जगताप\nशिवसेना : बाळा ओसवाल\nभाजप : मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, सुशील मेंगडे, नीता दांगट, अजय खेडेकर, राणी भोसले, संदीप जराड, सोनाली लांडगे\nराष्ट्रवादी : भैय्यासाहेब जाधव, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर\nशिवसेना : विशाल धनवडे\nमहिला व बालकल्याण समिती\nभाजप : वृषाली चैधारी, रुपाली धाडावे, गायत्री खडके, सुनीता गलांडे, मनीषा लडकत, दिशा माने, राजश्री नवले,फराजना शेख\nराष्ट्रवादी : अमृता बाबर, अश्विनी भागवत, परवीन शेख\nकाँग्रेस : चांदबी हाजी नदाब\nशिवसेना : श्वेता चव्हाण\nभाजप : योगेश समेळ, राहुल भंडारे, राजश्री शिळीमकर, धनराज घोगरे, आनंद रिठे, जयंत भावे, हरिदास चरवड,अर्चना पाटील\nराष्ट्रवादी : वनराज आंदेकर, नंदा लोणकर, अशोक कांबळे\nकाँग्रेस : अजित दरेकर\nशिवसेना : प्राची आल्हाट\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nमिटमिटा प्रकरणात पाच पोलिस दोषी\nराज ठाकरेंची टीका गडकरींना झोंबली;‘कृष्णकुंज’वर पाठवली रस्ते विकास कामांची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/what-app-facebook-now-on-one-click/", "date_download": "2019-03-25T08:06:44Z", "digest": "sha1:I7C7NGNWCRDWDKWPZI3DMQCWKFKHPUNV", "length": 6820, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फेसबुक व व्हॉट्सअॅप आता एका क्लिकवर", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nफेसबुक व व्हॉट्सअॅप आता एका क्लिकवर\nसोशल माध्यमावर वेळ घालविताना अनेक अडचणी येतात. कित्येक टॅब एकाच वेळेस ओपन कराव्या लागतात.यामुळे फोनवर फार लोड येतो.अनेक लोक एकापेक्षा अनेक सोशल माध्यमे वापरतात.अशा वेळी एका सोशल साईड वरून दुसऱ्या सोशल माध्यमावर जाणे फार जिकरीचे होते.\nफेसबुक वरून व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट जाता आले तर किती बरे होईल नाफेसबुकने अगदी काही दिवसापूर्वी इन्स्टाग्राम व फेसबुक जोडले होते. आता त्याप्रमाणे व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे.\nफेसबुकच्या अॅपवरच आता व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या फेसबुककडून चाचणी घेण्यात येत आहे. या बटणाच्या मदतीने फेसबुक वापरकर्त्यांना एका क्लिकवर व्हॉट्सअॅप सुरु करता येईल.\nअमेरिकेतील प्रसिद्ध संकेतस्थळ असलेल्या ‘द नेक्स्ट’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार, फेसबुक अॅपच्या मेन्यूमध्ये व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण दिले जाणार आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. फेसबुकचे अँड्रॉईड ���ॅप वापरणाऱ्या काहींसाठी सध्या हे फिचर उपलब्ध आहे.\nसध्या हे बटण डॅनिश भाषेत आहे. मात्र फेसबुकने या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.\nफेसबुकवर व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण दिले गेल्यास त्याचा मोठा फायदा दोन्ही सुविधांचा वापर करणाऱ्यांना होईल. यामुळे फेसबुक अॅप बंद न करता फक्त एका क्लिकवर व्हॉट्सअॅपवर जाता येईल. याचा फायदा फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही सेवांना होणार आहे.\nया फिचरमुळे फेसबुक आपली सहयोगी कंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते वाढवू शकते. याशिवाय केवळ व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनाही फेसबुककडे वळवण्याचा कंपनीचा प्रयत्न असू शकतो.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nअशी ही बनवाबनवीची यशस्वी ३ दशक .\nखडसेंवरील खटले मागे घ्या दाऊद चा अंजली दामानियांना फोन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/884", "date_download": "2019-03-25T08:33:06Z", "digest": "sha1:2K56F6O5KJA37PSUG55TQDUJSUTE44RT", "length": 29412, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आदरांजली | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nद.रा. पेंडसे- आर्थिक उदारीकरणाचा उद्गाता\nगेली सुमारे तीन दशके भारत देश उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण ह्या संक्रमणातून जात आहे. ‘स्पर्धात्मकता’, ‘विदेशी गुंतवणूक’, ‘खाजगी क्षेत्राला प्राधान्य’ ही दैनंदिन व्यवहाराची परिभाषा बनली आहे. भारतीय आर्थिक धोरणात व अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल 1990-91 नंतर होत गेले. त्यांचे प्रतिबिंब देशाच्या आर्थिक प्रगतीत उमटत राहिले आहे. नव्या रूढ बऱ्याच संज्ञा आणि संकल्पना पूर्वीच्या काळात ‘त्याज्य’, ‘गैरलागू’ आणि म्हणूनच निषिद्ध ठरवल्या गेल्या होत्या. तो माहोलच बंदिस्त अर्थव्यवस्थेचा, असंख्य (आणि असह्य) नियंत्रण-परवान्यांचा किंवा केवळ सार्वजनिक-क्षेत्राला पूजणारा असा होता (सुमारे 1965 - 1985). मात्र, त्या काळातही, काही मोजके अर्थतज्ज्ञ कंठशोष करून सांगत होते, की भारतीय अर्थव्यवस्था व आर्थिक धोरण जरा ‘खुले’ करणे हे अत्यावश्यक आहे व तसे केल्यास आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर होईल. तशा अर्थतज्ज्ञांतील बिनीचे शिलेदार म्हणून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व टाटा समूहाचे माजी आ��्थिक सल्लागार द.रा. पेंडसे ह्यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल.\nपेंडसे ह्यांचे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी जून 2018 मध्ये निधन झाले आणि टाटांसारख्या उद्योग-महर्षींना आर्थिक सल्ला देणारे; आर्थिक धोरणांवर अविरत, अभ्यासपूर्ण भाष्य करणारे व अर्थकारणावर लोकमत जागृत करणारे एक व्यक्तिमत्त्व कायमचे लोप पावले.\nभास्कराचार्यांनी स्वतःचे जन्मवर्ष आणि ग्रंथलेखनाचे वर्ष ‘गोलाध्याय’ या ग्रंथाच्या ‘प्रश्नाध्याय’ या प्रकरणात अठ्ठावन्नाव्या श्लोकात दिले आहेत. ते लिहितात -\nरसगुणवर्षेण मया सिद्धांतशिरोमणी रचित:||\nया श्लोकातील अंक असे आहेत : रस- षडरस = 6, गुण - त्रिगुण = 3\nपूर्ण- शून्य =0, मही – पृथ्वी = 1\n‘अंकानां वामतो गति:’ हा असा एक नियम आहे, की त्यानुसार अंक उजवीकडून डावीकडे लिहायचे. त्याप्रमाणे भास्कराचार्यांचे जन्मवर्ष येते शालिवाहन शके 1036. शालिवाहन शकाचा प्रारंभ ख्रिस्ताब्द 78 या वर्षी झाला. त्यामुळे शक वर्षात 78 मिळवले, की भास्कराचार्यांचे ख्रिस्ताब्द जन्मवर्ष (साल, इंग्रजी वर्ष) मिळेल. भास्कराचार्यांचे जन्मवर्ष ख्रिस्ताब्द 1036+78= 1114\n‘रसगुणवर्षेंण मया सिध्दांतशिरोमणी रचित:’ असे भास्कराचार्य लिहितात.\n‘अंकानां वामतो गति:’ या नियमानुसार भास्कराचार्यांनी ‘सिद्धान्तशिरोमणि’ हा ग्रंथ वयाच्या छत्तिसाव्या वर्षी म्हणजे, ख्रिस्ताब्द 1114+36=1150 या साली लिहिला.\nभास्कराचार्यांचा ‘सिद्धांतशिरोमणि’ हा ग्रंथ भारतीय गणित व खगोलशास्त्र या विषयांचा मुकुटमणी आहे. ‘सिद्धांतशिरोमणि’ या ग्रंथात चार उपग्रंथ आहेत:\n१. लीलावती, २. बीजगणित, ३. गणिताध्याय, ४. गोलाध्याय हे दोन शुद्ध गणिताचे ग्रंथ आहेत.\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1920) - टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील ‘चिखलगाव’. टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणही पुणे येथे झाले. टिळकांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोलाची कामगिरी केली. त्यांनी चिपळूणकर, आगरकर यांच्या मदतीने पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही मुलांची शाळा सुरू केली. फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी लोकजागृती करण्यासाठी ‘केसरी’, ‘मराठा’ ही दैनिके व शिवजयंती आणि गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. टिळक हे राष्ट्रीय काँग्रेसचे देशपातळीवरील महत्त्वाचे नेते होत. त्यांनी ‘गीतारहस्य’, ‘रामायण’, ‘आर्क्टिक्ट होम इन द वेदाज’, ‘वेदांग ज्योतिष’ हे ग्रंथ लिहिले. त्यांचा खगोल व गणित या विषयांचा गाढा अभ्यास होता. कोकणपट्ट्यात काही कुटुंबे ‘टिळक पंचांगां’प्रमाणे मुहूर्त काढतात व सण साजरे करतात. टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याला ‘स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार’ या चतु:सुत्रीची देणगी दिली.\nमहर्षि धोंडो केशव कर्वे\nकर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तेथे ते गणित शिकवत. त्यांनी 1891 मध्ये, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला. विधवांसाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था 1896 साली हिंगणे येथे स्थापन केली. त्यांनी त्या संस्थेला उर्जितावस्था आल्यानंतर 1916 साली महिला विद्यापीठ स्थापन केले. नंतर ते त्या दोन्ही संस्थांतून निवृत्त होऊन त्यांनी ग्रामशिक्षणाची चळवळ हाती घेतली. त्यांनी जगातील मानवसमाजात सर्व प्रकारची समता नांदावी या उद्देशाने समता संघ 1944 साली काढला. त्यांचे ‘आत्मवृत्त’ हे पुस्तक अनेकांना सामाजिक काम करण्याची प्रेरणा देऊन गेले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभुषण’ पुरस्कार दिला. त्यांना ‘भारत रत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार 1958 साली मिळाला.\nहिंदकेसरी गणपत आंदळकर - महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्मपितामह\nमहाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंदकेसरी गणपत आंधळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे. लोक त्यांना आबा म्हणून हाक मारत. तीन बटणांचा चमकदार ढगळ कुर्ता, पांढरे-शुभ्र धोतर, पायात कोल्हापूरी पायताण आणि डोक्याला तुऱ्याचा सुंदर फेटा... अशा वेशात भारदस्त पिळदार मिशांच्या रुबाबाने तरुणांनाही लाजवेल असे तेजस्वी गोरेपान देखणे रूप, तब्बल सहा फूट उंचीचा, बुरुजबंध ताकदीचा आणि पहाडासारखा दिसणारा माणूस\nआबा मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून दाखल झाले, की कुस्तीशौकिन मंडळींच्या नजरा त्यांच्याकडे वळायच्या. फडात सुरू असणार्या पैलवानांच्या लढती सोडून सर्वजण आबांकडे पाहत बसायचे. त्यांना त्यांच्या तेजस्वी बलदंड रूपात जणू प्रती हनुमान दिसायचा मैदानात हलगी वाजायची, आबांचा हारतुऱ्यांनी सत्कार-सन्मान व्हायचा आणि आबा त्यांचे दोन्ही हात उंचावत कुस्तीशौकिनांना अभिवादन करायचे, की प्रेक्षकांमधून आबांच्या सन्मानार्थ टाळ्याचा कडकडाट व्हायचाच.\nधर्मांतर सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या धम्मकाठीची रंजक कहाणी\nनागपूरकरांनी नागपुरातील दीक्षाभूमीव 14 ऑक्टोबर 1956 रोजी पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काही स्मृती जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेली धम्मकाठी. ती कर्नलबागेतील मेंढे कुटुंबीयांकडे सुखरूप आहे. ती लोकांच्या दर्शनासाठी कर्नलबागेतील आंबेडकर वाचनालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती वा अन्य तशा प्रसंगी ठेवली जाते. लोक मोठ्या जमावाने पुष्पार्पण करून धम्मकाठीपुढे नतमस्तक होतात.\nकविपण मिरवणारे सुधीर मोघे\nप्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता सजवणारा कलंदर कवी आपल्यातून निघून गेला सुधीर मोघे यांचा जन्म सांगली जिह्यातील किर्लोस्करवाडीचा. वडील कीर्तनकार असल्याने त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी पंडिती कवींच्या उत्तम रचना पडल्या होत्या. घरच्या संस्कारांचा भाग म्हणून त्यांचे दररोजचे परवचा म्हणणे न चुकल्याने शुद्ध शब्दोच्चार आणि पाठांतर झाले, अनेक स्तोत्रे, कविता, अभंग आदी मुखोद्गत झाली होती. त्यांना त्यांच्या पुढील लिखाणात त्या सगळ्याचा उपयोग झाला. त्यांच्या कविता त्यामुळे शब्द, ताल, सूर आणि लय घेऊन येत असत. त्यांनी किर्लोस्करवाडीला, शाळेच्या दिवसांत शाळेत होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतला, पण त्यांचा साहित्यिक म्हणून कालखंड सुरू झाला तो पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर. त्यांचे वडील बंधू श्रीकांत मोघे यांचे रंगभूमीशी संबंध असल्यामुळे, सुधीर मोघे यांना रंगभूमीचे आकर्षण लहाणपणापासून होते, पण त्यांच्यातील कवी हा लपून राहू शकत नव्हता. सुधीर मोघे यांचे ‘कविता सखी’ हे पुस्तक कविता संग्रह नसून कवीच्या लेखक म्हणून झालेल्या प्रवासाचे एक धावते वर्णणात्मक पुस्तक आहे. कविता सखी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो,\nस्वामी स्वरूपानंद यांचा जन्म र��्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी 15 डिसेंबर 1903 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. ते पुढील शिक्षणाकरता मुंबईला ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले. त्यांचे वाङ्मयविशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या ‘टिळक महाविद्यालया’त झाले. त्यांच्यावर घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरू होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारून गेली होती. तशात त्यांनीदेखील गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यांनी शाळा सोडली.\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nगौतम चंद्रभान … 09/12/2018\nलोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.\nवामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.\nसोनोपंत द��ंडेकर – ‘मी’ पण लोपलेले व्यक्तिमत्त्व\nइसवी सन 1857 हे मध्ययुगातील अंतिम वर्ष, कारण तलवार व घोडा ह्या, ज्या मध्ययुगीन काळाच्या प्रमुख निशाण्या आहेत त्या दोन्ही गोष्टींचे महत्त्व त्या वर्षीच्या युद्धानंतर जवळजवळ संपले. हिंदुस्थानात रेल्वे धावू लागली, शिक्षणपद्धत बदलून गेली. ब्रिटिशांच्या आधुनिक व्यवस्थापनाची चढती कमान सुरू झाली. त्या आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 20 एप्रिल 1896 रोजी सोनोपंत दांडेकर यांचा पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम येथे जन्म झाला. तोपर्यंत इंग्रजी शिक्षणाचा दबदबा निर्माण झालेला होता. सोनोपंतांच्या वडिलांनी त्यांना व त्यांच्या मोठ्या भावाला माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुण्याला पाठवले. कर्मधर्म संयोगाने, सोनोपंत वारकरी संप्रदायाचे प्रमुख, लोकमान्य टिळकांचे मित्र, आत्मज्ञानी विष्णुपंत जोग महाराज ह्यांच्या घरासमोरच वास्तव्याला आले. सश्रद्ध माणसाला तो ईश्वरी इच्छेचा संकेतच वाटतो. जोगमहाराजांमुळे सोनोपंतांना अगदी लहान वयात वारकरी संप्रदायाची ओळख झाली व ज्ञानेश्वरीची गोडी लागली. ईश्वरीय संकेताच्या कल्पनेला बळकटी आणणारी दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे सोनोपंतांना तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर म्हणून फर्ग्युसन कॉलेजात गुरुदेव रानडे ह्यांच्यासारखे आत्मज्ञानी, विद्वान व्यक्तिमत्त्व लाभले. गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून सोनोपंतांनी एम.ए.ला वेस्टर्न फिलॉसफी हा विषय घेतला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2298", "date_download": "2019-03-25T08:34:19Z", "digest": "sha1:5OI72UJIWAZAQJDR5Q5AN5D4KM4FAFQX", "length": 11834, "nlines": 109, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भाऊबीज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो. भाऊबीज हा सण दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; वस्तुत: तो एक वेगळा सण आहे.\nद्वितियेचा चंद्र (ज्योतिष) आकर���षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या (चंद्राच्या) कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भावना आहे.\nपुराणातल्या कथेप्रमाणे त्या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला. म्हणून त्या दिवसाला यमद्वितिया म्हणूनही संबोधले जाते. त्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे; सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितले आहे.\nभाऊबिजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत, त्यांतील दोन कथा पुढीलप्रमाणे –\n१. एक दिवस यमाने त्याच्या दूतांना आज्ञा केली, की ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या. यमदूत तशा व्यक्तीचा शोध घेत पृथ्वीवर फिरू लागले. एका बहिणीला ती बातमी कळली. तिच्या भावाला अद्यापपर्यंत कोणीही शिवी दिली नाही हे तिला माहीत होते. मग ती तिच्या भावाच्या संरक्षणासाठी त्याला शिव्या देत रस्तोरस्ती फिरली व त्याच्या घरी गेली. तिच्या माहेरच्या माणसांना वाटले, की तिला वेड लागले असावे. पण तिने वस्तुस्थिती सांगताच, सर्वांनी तिचे कौतुक केले. मग भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस कार्तिक द्वितियेचा होता. त्या दिवसापासून भाऊबीजेचा सण सुरू झाला.\n२. या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.\nयमद्वितीया हे एक व्रतही आहे. यात यमधर्म, यमदूत, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर यांचे पूजन करायचे असते. श्रावण, भाद्रपद, आश्विन व कार्तिक महिन्यांतील शुद्ध द्वितीयांना अनुक्रमे चुलतबहीण, मामेबहीण, आते-मावसबहीण आणि सख्खी बहीण यांच्या हातचे अन्न घ्यायचे असते.\nउत्तरप्रदेशातील स्त्रिया त्या दिवशी दारावर कावेने भाऊ-भावजय यांच्या प्रतिमा काढून त्यांची पूजा करतात. मग बाहेर अंगणात शेणाने चौकोन सारवून त्याच्या चारही कोनांवर चार व मध्ये एक अशा पाच शेणाच्या बाहुल्या मांडतात. त्यांच्यापुढे जाते, मडके, चूल इत्यादी वस्तू शेणाच्याच करून ठेवतात. मग त्यांची पूजा करतात. त्यानंतर पूजा करणारी स्त्री मुसळ जमिनीवर आपटून म्हणते, की जो कोणी माझ्या भा��ाचा द्वेष करील, त्याचे तोंड मी मुसळाने फोडीन.\nब्रजमंडलात भाऊबीजेचा (यमद्वितीया) दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानतात. त्यासाठी तेथे लाखोंच्या संख्येने यात्रा भरते. तेथील स्नानोत्सव सर्वांत मोठा उत्सव होय. त्या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा होते.\nसंदर्भ: लक्ष्मीपूजन, दिवाळी, दीपावली, Lakshmipujan, Deepawali, Diwali\nमला स्वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगभूमीवर यावं असंच वाटत राहिलं – अरूण काकडे\nसंदर्भ: कृतार्थ मुलाखतमाला, अरुण काकडे, एकांकिका\nरोहिडा ऊर्फ विचित्रगड - शिवकाळाचा साक्षीदार\nसंदर्भ: बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज, शिलालेख\nसंदर्भ: भाऊबीज, दिवाळी, दीपावली, व्रत, Bhavubij\nसंदर्भ: दिवाळी, दीपावली, वसुबारस, गोवत्सद्वादशी, गाय, व्रत, कथा, Vasubaras, Deepawali, Diwali\nसंदर्भ: नरक चतुर्दशी, दिवाळी, दीपावली, व्रत, अभ्यंगस्नान, Narak Chaturdashi\nसंदर्भ: अभ्यंगस्नान, दिवाळी, दीपावली, Abhyag Snan\nदिवाळी अंक आणि आपण\nसंदर्भ: दिवाळी अंक, दिवाळी, दीपावली\nदिवाळी आणि करुणरम्य संस्कृती\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-shirala-news-nagarpanchayat-election-maharashtra-news-congress-bjp", "date_download": "2019-03-25T08:47:31Z", "digest": "sha1:AOLWLZL2IEV272SSCDNTWQXUEJLCNFG7", "length": 19818, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news shirala news nagarpanchayat election maharashtra news congress bjp ncp सांगलीतील शिराळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेसचे पानिपत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसांगलीतील शिराळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेसचे पानिपत\nशुक्रवार, 26 मे 2017\nशिराळा (सांगली) - शिराळा नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर 6 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगर पंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. तर एकही उमेदवार विजयी न झाल्याने काँग्रेसचे पानिपत झाले आहे.\nशिराळा (सांगली) - शिराळा नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर 6 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगर पंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता ��ली आहे. तर एकही उमेदवार विजयी न झाल्याने काँग्रेसचे पानिपत झाले आहे.\nसकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीत नऊ टेबलवर 1,3,5,7,11,13,15,17 या प्रभागाची तर दुसऱ्या फेरीत 2,4,6,8,10,12,14,16 या प्रभागाची मतमोजणी सुरु झाली. पहिल्यांदा 1 प्रभागाचा निकाल जाहीर झाला.त्यामध्ये भाजपाच्या उत्तम डांगे यांनी विजयाची सलामी दिली. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आपला उमेदवार विजयी होताच गुलालाची उधळण करण्यात आली.\nसविस्तर निकाल (कंसात मिळालेली मते)\nमहादेव बाबुराव गायकवाड, (काँग्रेस) 88\nउत्तम हिंदुराव डांगे (भाजप).17\nसंभाजी हिंदुराव नलवडे (राष्ट्रवादी) 163\nविश्वप्रतापसिंग भगतसिंग नाईक (राष्ट्रवादी), 20\nसम्राटसिंह पृथ्वीराज शिंदे (काँग्रेस), 42\nअभिजित विजयसिंह नाईक (भाजप) 318\nप्रभाग 3: नागरिकांचा मागास प्रवर्ग:\nसंजय काशिनाथ हिरवडेकर (राष्ट्रवादी), 201\nसम्राट विजयसिंह शिंदे (काँग्रेस),100\nसुनील पांडुरंग कुंभार (भाजप).15\nप्रभाग 4: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री\nरंजना प्रताप यादव (राष्ट्रवादी) 166\nचित्रा शंकर दिवटे (काँग्रेस) 62\nराजश्री सचिन यादव (भाजप) 1\nप्रभाग 5: सर्व साधारण स्त्री\nसुनीता चंद्रकांत निकम (राष्ट्रवादी) 26\nमनस्वी कुलदीप निकम (काँग्रेस) 253\nकुसुम दिनकर निकम (भाजप) 166\nप्रभाग,6: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:\nज्योती प्रवीण शेटे (राष्ट्रवादी) 266\nरहिमतली हिरालाल मुल्ला (काँग्रेस) 22\nसीमा प्रदीप कदम (भाजप) 348\nप्रभाग,7: सर्व साधारण स्त्री\nप्रतिभा बजरंग पवार (राष्ट्रवादी) 220\nनयना बाबुराव निकम (काँग्रेस)14\nलक्ष्मी तुकाराम कदम (भाजप) 17\nमीनाक्षी विश्वासराव यादव (अपक्ष) 65\nप्रभाग 8: सर्व साधारण स्त्री\nअर्चना बसवेश्वर शेटे (राष्ट्रवादी) 247\nनंदाताई दिलीपराव कदम (भाजप) 73\nअर्चना महादेव कदम (काँग्रेस) 230\nप्रभाग 9: सर्व साधारण स्त्री:\nसुनंदा गजानन सोनटक्के (राष्ट्रवादी) 267 सावित्री रणजित नलवडे (काँग्रेस) 2\nमंगल अर्जुन कुरणे (भाजप) 260\nप्रभाग 10: सर्व साधारण :\nदीपक भीमराव गायकवाड (अपक्ष) 162\nकिर्तिकुमार वसंतराव पाटील (राष्ट्रवादी) 272\nअभिजित प्रतापराव यादव (काँग्रेस) 63\nविद्याधर विजयराव किलकर्णी (भाजप) 234\nप्रभाग 11: सर्व साधारण:\nमेहबूब युसूफ मुल्ला (राष्ट्रवादी) 171\nमंदार मोहन उबाळे (अपक्ष)2\nरमेश आनंदराव शिंदे (काँग्रेस)61\nवैभव रमेश गायकवाड (भाजप) 188\nप्रभाग 12: अनुसूचित जाती स्त्री\nआशाताई लक्ष्मण कांबळे (राष्ट्रवादी) 217\nकविता सचिन कांबळे (काँग्रेस) 75 सविता नितीन कांबळे (भाजप) 164\nप्रभाग 13: सर्व साधारण स्त्री\nसुजाता महादेव इंगवले (राष्ट्रवादी) 218\nछायाताई शंकर कदम (काँग्रेस) 154\nपूनम संतोष इंगवले (भाजप)2\nप्रभाग 14: सर्व साधारण\nमोहन आनंदा जिरंगे (राष्ट्रवादी) 341\nरामचंद्र विजय जाधव (अपक्ष) 28\nराहुल शिवाजी पवार (काँग्रेस) 26\nअनिल बाबुराव माने (अपक्ष) 11\nप्रभाग 15:नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री\nराणी प्रल्हाद चव्हाण (राष्ट्रवादी) 147\nस्नेहल संजय जाधव (काँग्रेस) 182\nनेहा नरेंद्र सूर्यवंशी (भाजप)185\nप्रभाग 16: अनुसूचित जाती:\nविजय रघुनाथ दळवी ( राष्ट्रवादी) 307\nदिलीप नरसु घाटगे (अपक्ष)127\nआनंदा रंजाना कांबळे (काँग्रेस) 22\nसंदीप शामराव कांबळे (भाजप)18\nप्रभाग 17: नागरिकांचा मागास प्रवर्ग:\nगौतम दत्तात्रय पोटे (राष्ट्रवादी) 146\nरत्नाकर जगन्नाथ कुंभार (काँग्रेस) 1\nसंतोष आनंदा लोहार (भाजप) 80\nमोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:\nमोदींचा करिष्मा अजूनही कायम\nकाळा पैशाला आळा; आता रोजगारनिर्मिती हवी\nस्मार्ट सिटी मिशनला गती मिळेना\nदिशाभूल करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी\nघोषणांचा महापूर, शेतकरी कोरडाच\nहायस्पीड रेल्वेला आता द्यावे प्राधान्य\nआणखी ताज्या बातम्या वाचा:\nनाशिकमधील गडकरी चौकात अपघात; तीन ठार\nपनवेलमध्ये भाजप, मालेगावात शिवसेना; भिवंडीत काँग्रेस आघाडीवर\nविरोधी पक्षाच्या नेत्यांना सोनियांचे मेजवानीचे निमंत्रण\nमुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ अपघात; तीन ठार\n#NarendraModi सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खास वॉलपेपर्स डाऊनलोड करा\nLoksabha 2019 : उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लढणार\nमुंबई : रंगिला गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, ती मुंबईतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे...\nLoksabha 2019 : ईशान्य मुंबईत तिरंगी लढत\nभांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची...\nLoksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम...\nLoksabha 2019 : मुले पळवणारी ��ोळी मुंबईतही\nमुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत....\nLoksabha 2019 : पुण्यात रंगणार बापट विरुद्ध गायकवाड सामना\nपुणे : काँग्रेसकडून पुण्याच्या जागेवर अजूनही चर्चाच सुरु असताना, प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे...\nLoksabha 2019 : अमित शहांविरोधात राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री लढणार\nगांधीनगर : गांधीनगर मतदारसंघातून लढत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गुजरातचे माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/indian-rock-python-found-lohagaon-140295", "date_download": "2019-03-25T08:45:24Z", "digest": "sha1:AVFOKNKE3TRZZEMHRSFSY2MHKZIHDE6Z", "length": 12152, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian rock Python found at Lohagaon लोहगाव येथे आढळला मोठा इंडियन राॅक पायथन अजगर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nलोहगाव येथे आढळला मोठा इंडियन राॅक पायथन अजगर\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nनागरीवस्ती जवळ हा अजगर आढळून आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. तो शेळी, कुत्रा किंवा मांजराच्या शिकारीसाठी आला असावा असा अंदाज आहे.\nवडगाव शेरी (पुणे) : लोहगाव येथील गोठणवढा भागात मोठा अजगर आढळून आला. नागरीवस्ती जवळ हा अजगर आढळून आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. तो शेळी, कुत्रा किंवा मांजराच्या शिकारीसाठी आला असावा असा अंदाज आहे.\nया ठिकाणचे नागरिक अतुल खांदवे, मयुर खांदवे यांनी सर्पमित्र अजय कोंढावळे व शुभम अधिकारी यांनी रात्री बारा वाजताच्या सुमारास बोलावून हा आठ फुटी अजगर पकडला. त्यानंतर आज वनविभागाचे अधिकारी विष्णू गायकवाड, हवालदार शितल फुंदे, वनरक्षक दया डोमो यांचे मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी लक���ष्मण टिंगरे यांचे समक्ष व सर्पमित्र सारंग देवकर, धनंजय जाधव, श्रीधर गायकवाड, गजानन टिंगरे, निलेश खांदवे, सचिन मासुळकर यांनी हा अजगर वनविभागाच्या धानोरीच्या हद्दीमध्ये सोडला.\nनागरिकांनी साप किंवा वनप्राणी आढळले आसता ते न मारता सर्पमित्र किंवा वन कर्मचारी यांना कळवावे. पर्यावरण समतोलासाठी सर्प व प्राणी महत्वाचे आहेत, असे सर्पमित्र अजय कोंढावळे व शुभम अधिकारी यांनी सांगितले.\nअस्तिक बनण्याची गोष्ट (प्रवीण तरडे)\nनिर्मात्यांचा फोन येईपर्यंत डोक्यात चित्रपटाचा कुठलाच विषय नव्हता. कारण बाकीच्या कामांच्या व्यापात मी हे काम विसरून गेलो होतो. अचानक त्यांचा फोन...\nमित्राच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात...\nतळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील...\nमहानायकाने केला 'शिवशाही'ने प्रवास\nनागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी महाविद्यालयीन जीवनात तसेच सुरुवातीच्या संघर्षकाळात बस व ट्रामने प्रवास केल्याचे अनेकांनी ऐकले आणि वाचलेही....\nराजकारण करू नका भाऊ, हा दुष्काळ आहे....\nनागपूर - जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा तालुका म्हणून काटोलची ओळख आहे. राजकीय असो किंवा सांस्कृतिक काटोलने सर्वच बाबतीत आघाडी कायम ठेवली आहे....\nदिवाळीच्या पर्वावर चार गावातील तरूणांना प्रबोधनाची भेट\nगोंडपिपरी : दिवाळीत गावाकडे यायचे फटाके फोडायचे,नातेवाईकांची भेटभलाई घ्यायची,गोळधोळ खाउन पुन्हा आपले ध्येय गाठण्यासाठी पुणे मुंबईला परतायचे.असा...\n... 'या' मराठी कलाकाराची तानाजी सिनेमात वर्णी\nमुंबई : अभिनेता अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या 'तानाजी' या सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090510/main.htm", "date_download": "2019-03-25T08:19:41Z", "digest": "sha1:PXB4JVRKQMLLJ7QD7XRDO76Z4QJYKWBD", "length": 13001, "nlines": 46, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार, १० मे २००९\nवीरप्पा मोईली यांची हकालपट्टी\nनितीशकुमार यांच्यावर केलेली टीका भोवली\nनवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांच्या प्रारंभी संयम बाळगणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचत असताना आपल्या जीभेवरील नियंत्रण गमावले आहे. परिणामी निवडणुकांनंतरच्या संभाव्य राजकीय समीकरणांची पर्वा न करता सध्या विरोधात असलेल्या नेत्यांवर जाहीर टीका केल्याबद्दल काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख वीरप्पा मोईली तसेच पक्षाचे अन्य प्रवक्ते अश्विनीकुमार यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची मोईलींना शिक्षा मिळाली तर अश्विनीकुमार यांना तेलगू देसमवर केलेली टीका भोवल्याचे म्हटले जात आहे.\nकिंबर्ले, ९ मे / वृत्तसंस्था\nमॅथ्यू हेडनची ४८ धावांची आधार देणारी खेळी आणि एस. बद्रिनाथच्या नाबाद ५९ धावा या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयलचे कडवे आव्हान मोडीत काढून इंडियन प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात १३ गुणांसह अव्वल स्थान मिळविले आहे. राजस्थान रॉयलने ठेवलेल्या १४१ धावांच्या आव्हानाचा सामना करताना चेन्नईला फारसे कष्ट पडले नाहीत. बद्रिनाथला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळाला. त्याआधी, राजस्थानने ग्रॅमी स्मिथ (३०), अस्नोडकर (२६), जडेजा (२७) यांच्या जोरावर कसाबसा १४०चा टप्पा गाठला.\nकिम्बर्ले, ९ मे / पीटीआय\nडेक्कन चार्जर्सने ठेवलेले १६९ धावांचे आव्हान पेलताना दमछाक होत असतानाही किंग्ज इलेव्हन पंजाबने अखेरच्या षटकातील एक चेंडू शिल्लक ठेवून ही रोमहर्षक लढत तीन विकेट्सनी जिंकली आणि इंडियन प्रीमियर लीगमधील आपला उपान्त्य फेरीतील दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला.\nपित्याच्या धोरणाचे वरुणकडून समर्थन, भाजप असहमत\nनवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी\nदिवंगत संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राबविलेली सक्तीच्या कुटुंब नियोजनाच्या अतिशय वादग्रस्त धोरणाची पुन्हा अंमलबजावणी करण्याच्या वरुण गांधी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे आज भाजपला स्पष्ट करावे लागले. आणीबाणीच्या काळात मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी संजय गांधी यांनी ही योजना सक्तीने राबविली होती. हेच धोरण पुन्हा लागू करण्याचे आपण समर्थन करतो, असे वरुण गांधी म्हटले आहे.\nजयंत का ‘राज’ क्या था\nमुंबई, ९ मे / खास प्रतिनिधी\nगृहमंत्री जयंत पाटील यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले आहेत. उत्तर भारतीयांच्या विरोधातील हिंसक आंदोलनप्रकरणी ७० ते ८० गुन्हे दाखल असलेल्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्रीच गेल्याने चुकीचा संदेश गेल्याचे बोलले जाऊ लागले आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दादापुता करावे लागले असतानाच दुसरीकडे गृहमंत्रीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेल्याने पक्षातील उत्तर भारतीय नेत्यांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली आहे.लोकसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिक पट्टय़ात मनसेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nदेशात सर्वाधिक जागा भाजपला\nराज्यात युतीला ३३ तर आघाडीला १३ जागा\nमुंबई, ९ मे / खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी सर्वाधिक ३३ जागा शिवसेना-भाजप युतीला मिळतील; तसेच देशात सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील, असा अंदाज प्रबोधन रिसर्च ग्रूपने व्यक्त केला आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळून केंद्रात भाजपप्रणित आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असेही अंदाजित करण्यात आले आहे.\nतेलंगण राष्ट्रसमिती रालोआच्या व्यासपीठावर\nनवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होण्यापूर्वीच डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्रसमितीने तिसऱ्या आघाडीशी दोस्ती सोडून रालोआच्या तंबूत सामील होण्याची तयारी केली आहे. उद्या लुधियाना येथे होणाऱ्या संयुक्त प्रचार सभेत चंद्रशेखर राव भाजप-रालोआच्या व्यासपीठावर अवतरणार असल्याचे तेलंगण राष्ट्रसमितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nकाँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत डावे नरमले\nसरकारस्थापनेच्या वेळी यंव करू आणि त्यंव करू, अशी बेलगाम वक्तव्ये गेले काही दिवस करण��ऱ्या डाव्यांनी आज काँग्रेसबाबत उजवी भूमिका घेतली. काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देणार काय, या प्रश्नावर भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात म्हणाले की, ‘आधी निवडणुका होऊ देत, निकाल लागू देत मग काय ते ठरविता येईल’. डावे पक्ष काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणार नाहीतच उलट केंद्रात बिगरकाँग्रेसी व बिगरभाजप सरकार स्थापन करणारी आघाडी आम्ही स्थापन करू, अशी वक्तव्ये करात यांनीच गेल्या आठवडय़ात केली होती. अर्थात माकपचे नेते व पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी मात्र या प्रश्नावर संयमित प्रतिक्रिया दिली होती. या प्रश्नावर सर्व पर्याय खुले आहेत आणि निवडणुकीच्या निकालानंतर त्याबाबतचा निर्णय घेता येईल, असे ते म्हणाले होते.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2016-PKV-2-Chana.html", "date_download": "2019-03-25T07:52:11Z", "digest": "sha1:GJOIYARMPNXOT4ORTMBCE2FPWDO2TSOG", "length": 5778, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - ६ एकर डॉलर व PKV - २ चना, निव्वळ नफा २ लाख ७६ हजार रु.", "raw_content": "\n६ एकर डॉलर व PKV - २ चना, निव्वळ नफा २ लाख ७६ हजार रु.\nश्री. रमेश रामराव नलावडे, मु.पो. कृष्णापूर, ता. अमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०७ मो. ९५२७१३१०४०\nमाझ्याकडे एकूण १० एकर जमीन आहे. त्यातील ६ एकरमध्ये आम्ही रब्बी हंगामात चना हे पीक घेतले होते. त्यामध्ये आम्ही डॉलर व P.K.V.-२ या वाणाची निवड केली. पेरणीपुर्वी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटची बिजप्रक्रिया केली. नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली. या ट्रॅक्टरला टोकण पद्धतीने बी पडण्याची पद्धत होती. यामुळे बियाण्याला इजा होत नाही व त्याचे टोक फुटत नाही. पेरणीच्या वेळी सोबतच २०:२०:० व दाणेदार सिंगल सुपर फॉर्सफेट १ + १ पोते दिले. पेरणीनंतर ६ ते ८ दिवसांनी हरबरा उगवून कोंब वर येऊ लागले. जर्मिनेटरच्या बिजप्रक्रियेमुळे उगवण एकसारखी झाल्यामुळे तासे एकसारखी व एकसमान दिसत होती. बिजप्रक्रियेचा चांगला फरक जाणवला, कारण ज्यांनी जर्मिनेटर वापरले नव्हते त्यांच्या शेतात मला उगवण ६० ते ६५ टक्के एवढी कमी दिसत होती. माझी मात्र उगवण शक्ती ९५ टक्के झाली. मी उगवाणीनंतर १५ दिवसांनी पहिली डवरणी पाळी दिली. त्यानंतर ६ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम व क्रॉंपशाईनर प्रत्येकी पंपास ६० मिली वापरले व त्यानंतर हरबऱ्याची वाढ चांगली व निरोगी होऊन हिरवेगार पीक दिसत होते. पीक फुलाच्या अवस्थेमध्ये असतांना मी खताचा दुसरा डोस सुक्ष्म अन्नद्रव्याची एकरी बॅग याप्रमाणे ६ बॅगा दिल्या व पाणी सोडले. त्यानंतर पिकाला ताण दिला व फुल लागण्यास सुरुवात झाल्यावर पाणी दिले. तिथून १५ दिवसांनी सप्तामृताची फवारणी घेतली. मग पिकाला घाटे येण्यास सुरुवात झाली व नंतर तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन व प्रोफेक्स सुपर या किटकनाशकाची केली. त्यामुळे आळीचा प्रादुर्भाव कमी झाला व घाटे गळ सुद्धा थांबली. घाटे पोसण्यास सुरुवात झाली. मग हरबरा वाळण्यास सोडून दिला व हरबरा काढणीस आला. काढल्यानंतर मार्केटला नेला. मला डॉलरचा भाव ५,६०० रु प्रती क्विंटल व P.K.V. - २ ला भाव ४,२०० रु. प्रती क्विंटल मिळाला. मला पूर्ण ६ एकरामध्ये ६३ क्विंटल एवढे उत्पादन झाले व निव्वळ नफा २,७६,४०० रु. मिळाला. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची उत्पादने व इतर खते वापरली. त्यामुळे मला समाधानकारक उत्पादन मिळाले. या अनुभवातून मी चालू हंगामात कापूस, सोयाबीन, हळद या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करत असून इतरांना पण सांगत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2299", "date_download": "2019-03-25T08:30:16Z", "digest": "sha1:5RWBDAU2W5A7WN3BJDUOZUJJMK2BBTVO", "length": 21192, "nlines": 127, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे.\nपुराणकथेनुसार, प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना बंदी केले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे त्रिपादभूमीची याचना केली. बळीने ती मान्य केली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने त्याचे स्वत:चे मस्तक ��मवून त्यावर तिसरे पाऊल ठेव असे वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकी पाय ठेवून त्याला पाताळात ढकलले. ते सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडले. नंतर वामनाने बळीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘देवा, केवळ लोककल्याणासाठी मी एक वर मागतो. या तीन दिवसांत जो कोणी यमाप्रीत्यर्थ दीपदान करील, त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य असावे.’ त्यावर वामनाने ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हापासून या दिवसांत दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीचा दिवस मानून लोक त्याही दिवशी आनंदोत्सव करू लागले. बळीराजा देवांचा शत्रू असला, तरी तो दुष्ट नव्हता. अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता याविषयी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते. म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावे असी आकांक्षा वरील लोकाचारांत प्रकट झालेली दिसते. म्हणूनच ‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.\nया दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांच्या शिंगांना रंग लावून व त्यांच्या गळ्यात माळा घालून त्यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे. त्या आनंदोत्सवाचे हे महत्त्वाचे अंग मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.\nपूर्वी, बलिप्रतिपदेच्या पहाटे घरातील एखादी व्यक्तीे सर्व घर झाडून स्वच्छ करी. मग सगळा केर एका टोपलीत जमा करून त्या टोपलीवर जुनी केरसुणी, एक पणती व पैसा-सुपारी ठेवण्यात येई. ती टोपली घरातील प्रत्येक खोलीपुढे ओवाळली जाई. त्या वेळी ती व्यक्ती ‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो.’ असे मागणे मागत असे. मग एक स्त्री सूप वाजवत त्या व्यक्तीच्या मागोमाग दरवाजापर्यंत जात असे. पुढे चालणारी व्यक्ती मागे न पाहता घराबाहेर जाऊन सर्व केर रस्त्याच्या कडेला टाकी. नंतर ती व्यक्तीत घरात येऊन कोणालाही न शिवता अंगाला तेल लावून गरम पाण्याने स्नान करत असे.\nया दिवशी शेतकरी पहाटे स्नान करतात. मग ते एका मडक्यात कणकेचा दिवा पेटवतात. डोक्यावर घोंगडी घेतात आणि शेतात जातात. ते मडके शेताच्य�� बांधावर खड्डा करून पुरतात. नवविवाहित दांपत्य हा दिवस पत्नीच्या माहेरी साजरा करतात. त्याचा उल्लेख दिवाळसण असा केला जातो. यानिमित्ताने जावयाला आहेर दिला जातो.\nबळीची पूजा करताना जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने बळीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे –\nबलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो |\nभविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम् ||\nअर्थ – हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बळीराजा, तुला नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असूरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर.\nत्यानंतर बळीप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवताचा वर्षारंभदिन मानला जातो. त्या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया त्यांच्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात. दिवाळीतील हाच दिवस प्रमुख समजला जातो. त्या दिवशी लोक नवी वस्त्राभरणे लेऊन दिवस आनंदात घालवतात. त्या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले आहे. पार्वतीने शंकराला त्याच दिवशी द्यूतात हरवले होते. त्यावरून या प्रतिपदेला ‘द्यूतप्रतिपदा’ असेही नाव मिळाले आहे. या तिथीला द्यूत खेळण्याचे विधान धर्मशास्त्राने सांगितले आहे. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून अत्यंत लक्षपूर्वक द्यूतक्रीडा करावी. त्यामुळे पुढील वर्ष बरेवाईट कसे जाईल त्याची ठीक कल्पना येते, असे शास्त्रवचन आहे. त्या विषयीची एक कथा अशी आहे –\nएकदा बलिप्रतिपदेच्या दिवशी शंकराने पार्वतीसह द्यूत खेळायला प्रारंभ केला. शंकर त्या खेळात सर्वस्व हरला आणि वल्कले परिधान करून गंगातीरी जाण्यासाठी घराबाहेर पडला. कार्तिकेयाला हे समजल्यावर त्याने त्याच्या पित्याकडून द्यूत शिकून घेतले आणि पार्वतीबरोबर द्यूत खेळून शंकराने पणात हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या व त्या शंकराला नेऊन दिल्या. त्यानंतर गणेशाने शंकर व कार्तिकेय यांच्याबरोबर द्यूत खेळून त्या वस्तू पुनश्च जिंकल्या व आईला नेऊन दिल्या. अशा प्रकारे पुन:श्च सर्वस्व हरल्यावर शंकर हरिद्वार येथे गेला. तेथे त्याने विष्णूच्या सूचनेवरून त्र्यक्षविद्या (तीन फाशांची विद्या) निर्माण केली. त्या तीन फाशांपैक�� एका फाशाचे रूप साक्षात विष्णूनेच धारण केले होते. ही नवी द्यूतविद्या घेऊन शंकर घरी गेला आणि त्याने पार्वतीला खेळात हरवले.\nशिव-पार्वतींच्या या द्यूतक्रीडेची स्मृती म्हणून या दिवशी द्यूत खेळण्याची प्रथा पडली.\nबलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा- फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ती पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिकमासातील सर्व कृत्ये निष्फल होतात, असे सांगितले आहे.\nपूर्वी गावागावांमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. या प्रथेच्या पालनातून सामाजिक एकात्मता, बंधुभाव वाढीस लागावा असा या सोहळ्यामागील उद्देश होता.\nठाणे जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी अंगणात शेणाचा किंवा तांदळाच्या पिठाचा बळीराजा काढून त्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी त्या आकृतीजवळच कडू जिरे, झेंडू किंवा अंबाडीचे झाड लावतात.\nराजस्थांनात प्रतिपदेला ‘खेंखरा’ असे म्हणतात. त्या दिवशी गोवर्धनपूजा व अन्नकूट करतात. सायंकाळी बैलांची पूजा करतात. महाराष्ट्रातील बैल-पोळा सणाप्रमाणेच तो सण असतो. त्यात बैलांच्या टकरीही लावतात. बैलांना घेऊन गाणी म्हणत शेतकरी घरोघर जातात. त्याच दिवशी नाथद्वारा येथे मिष्टान्नाचा प्रचंड अन्नकूट करून तो गरीब लोकांकडून लुटवण्याची प्रथा आहे.\n‘खेंखरा’च्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते. नवीन वर्षासाठी नवीन वह्यांत जमाखर्च मांडण्यास प्रारंभ करतात.\nकेरळमधील ‘ओणम’ हा उत्सव आश्विनमासात बळीच्या स्मरणार्थच साजरा होतो.\n‘चाळेगत’ - नेमाडेपंथातील नवी पिढी\nसंदर्भ: हाेळी, धुलीवंदन, धुळवड, रंगपंचमी\nसंदर्भ: देवस्थान, महाराष्ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, Sagareshwar\nसंदर्भ: नरक चतुर्दशी, दिवाळी, दीपावली, व्रत, अभ्यंगस्नान, Narak Chaturdashi\nसंदर्भ: दिवाळी, दीपावली, वसुबारस, गोवत्सद्वादशी, गाय, व्रत, कथा, Vasubaras, Deepawali, Diwali\nसंदर्भ: लक्ष्मीपूजन, दिवाळी, दीपावली, Lakshmipujan, Deepawali, Diwali\nसंदर्भ: अभ्यंगस्नान, दि��ाळी, दीपावली, Abhyag Snan\nसंदर्भ: देवदिवाळी, दिवाळी, दिपावली, वेळा अमावस्या, नवरात्र, Diwali, Deepawali, Dev Diwali\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/majhe-jug-news/tourism-in-sri-lanka-1594294/", "date_download": "2019-03-25T08:13:47Z", "digest": "sha1:PRAO2WPE625G3N2O3OUMYS3XA27YUUTT", "length": 26050, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tourism in Sri Lanka | द्वीपाचा रमणीय अनुभव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nप्रत्येकाला मोहून टाकणारे समुद्राखालचे जीवन दाखवणारे प्रवाळ.\nअनुराधापूर येथील पहुडलेल्या बुद्धाचे शिल्प\nभारतात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रवाशांपैकी एक समजल्या जाणाऱ्या मार्को पोलोने श्रीलंकेला या आकारमानाचे जगातील सर्वोत्तम बेट म्हटले आहे. आणि खरेच मलाही वाटते की श्रीलंका हा देश रमणीय प्रदेश आहे- पावसाने स्वच्छ धुतली जाणारी विषुववृत्तीय वने, ऐतिहासिक शहरे, प्राचीन वास्तू, चहाच्या मळ्यांतून येणारा सुगंध, पर्वतांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी धुक्यात दडलेली रिसॉर्ट्स, मोत्यासारखे शुभ्र समुद्रकिनारे आणि येणाऱ्या प्रत्येकाला मोहून टाकणारे समुद्राखालचे जीवन दाखवणारे प्रवाळ.\nभूतकाळाच्या स्मृती जागवणारी ही भूमी आहे असे मला वाटते. मी श्रीलंकेत अनेकदा गेले आहे. प्रत्येक वेळी मला असे वाटले की या बेटावर येऊन काळ शांत, मूक होऊन उभा आहे. शहरे औद्योगिक आणि आर्थिक हालचालींनी उसळत आहेत आणि लोकही आधुनिक घरांमध्ये राहून तंत्रज्ञानावर आधारित कामे करत आहेत; तरीही समृद्ध इतिहासाचा नॉस्टॅल्जिया वातावरणात सर्वत्र दरवळत आहे- प्राचीन गुंफांतील भित्तिचित्रांमध्ये, प्रार्थनेचे सूर निनादत असलेल्या बौद्धकालीन मंदिरांमध्ये, जादूई विहारांमध्ये आणि गेल्या काही शतकांमध्ये युरोपीय राज्यकर्त्यांनी पर्वतांवरील शहरांमध्ये बांधलेल्या वसाहती शैलीतील बंगल्यांमध्ये. मला तर असे वाटते की, श्रीलंका एकाच वेळी इतिहासातील अनेक कालखंडांचे प्रतिनिधित्व करते. हे कालखंड एकीकडे झपाटून टाकणारे आहेत, तर दुसरीकडे नाटय़मयही आहेत. म्हणूनच युनेस्कोने श्रीलंकेतील अनेक प्राचीन वास्तूंना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिले आहे\nसमुद्राच्या लाटांनी धुतली जाणारी आणि पावसाच्या धारांनी शांत होणारी ही भूमी आहे. मी श्रीलंकेचा अनुभव प्रत्येक ऋतूत घेतला आहे दक्षिण टोकापर्यंत पसरलेल्या विशाल समुद्रातील एक बेट असल्याने श्रीलंकेतील हवामान गरम आणि आद्र्र आहे. या छोटय़ाशा बेटावरील प्रचंड जैववैविध्य तर अवाक करणारे आहे. प्रति चौरस किलोमीटर भागातील जैववैविध्यावरून संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेल्या यादीत श्रीलंका बेट दहाव्या क्रमांकावर आहे. संपूर्ण वर्षभर पावसाच्या सरी या भूमीला हिरवीगार आणि सुपीक ठेवतात. गवताळ प्रदेश, वनातील पर्वत, पावसाळी राने, मोठाले समुद्रकिनारे, दलदली, टेकडय़ा आदी ठिकाणीही हवामान बदलत राहते. म्हणूनच श्रीलंकेमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे वैविध्य आढळते. फळा-फुलांबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. नद्यांमध्ये भरपूर सुपीक गाळ आहे. त्यामुळे त्या खजिना पिकवतात. मोठा वनप्रदेश लाभलेल्या या बेटावरील डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याचा आनंद लुटणाऱ्या निसर्गप्रेमींना स्वप्नवत भासेल अशी समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परिसंस्था (इको-सिस्टम) येथे आहे.\nपुराण आणि इतिहासाची जादूई मिसळण इथे पाहायला मिळते साहजिकच श्रीलंकेमुळे माझ्या मनात महाकाव्य रामायणाच्या स्मृती जाग्या होतात. अनेक दक्षिण आशियाई देशांप्रमाणेच श्रीलंकाही एकाच वेळी इतिहासाच्या विविध कालखंडांत जगणारा देश आहे. पुराण आणि इतिहासाच्या सरमिसळीतून या देशाचा भूतकाळ उलगडला जातो. हे बेट भारताच्या जवळ असल्याने येथील इतिहास आणि संस्कृतीमध्ये मला खूप रस वाटत आला आहे. अगदी पूर्वीच्या दस्तावेजांमध्ये श्रीलंकेचे वर्णन रावणाचे सुवर्णसाम्राज्य म्हणून करण्यात आले आहे. उत्तर भारतातील अयोध्येचा राजपुत्र राम आणि त्याच्या पत्नीचे- सीतेचे अपहरण करणारा लंकेचा राजा रावण यांच्यात दहा दिवस झालेल्या युद्धाची भूमी म्हणून रामायणात श्रीलंकेचे वर्णन आहे.\nश्रीलंकेच्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर मला अनेक गोष्टींची रसप्रद माहिती मिळाली. बौद्ध भिक्खूंनी लिहिलेल्या लेख��ंचा संग्रह असलेल्या ‘महावम्स’ (Mahavamsa)या ग्रंथात श्रीलंकेचा प्राचीन इतिहास दिलेला आहे, असे सर्वसाधारणपणे समजले जाते. यामध्ये श्रीलंकेचा इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासूनचा ते इसवी सन १८१५ पर्यंतचा इतिहास आला आहे. या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, विजय नावाचा एक हिंदू राजपुत्र इसवी सनपूर्व ५०४ मध्ये ईशान्य भारतातून हिंदुस्तानी आर्य समुदायाच्या ७०० लोकांना घेऊन श्रीलंकेत आला. वेदाह नावाच्या स्थानिक आदिवासी समाजाचा पराभव करून त्याने स्वत:ला या बेटाचा राजा म्हणून प्रस्थापित केले आणि या बेटावर राहण्यासाठी तो त्याच्या लोकांना घेऊन आला. नंतर त्याने स्थानिक भटक्या जमातीतील एका राजकन्येशी लग्न केले आणि थाम्मण्मा किंवा तांबापन्नी नावाच्या शहरातून राज्यकारभार बघितला. या लोकांना काही शतकांनी सिंहल म्हटले जाऊ लागले. आजही या देशात सिंहली लोक बहुसंख्येने आहेत.\nयानंतर अडीचशे वर्षांनी, इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात पूर्व भारतातील मगध साम्राज्याचा सम्राट अशोक याचा मुलगा महिंद श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गेला, तेव्हा श्रीलंकेच्या इतिहासाने एक नाटय़मय वळण घेतले. बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली बसले असता ज्ञानप्राप्ती झाली होती, त्या वृक्षाच्या काही फांद्या सोबत घेऊन महिंद आणि सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा यांनी बेटावर प्रवेश केला. बौद्धधर्माच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक म्हणून हे रोप अनुराधापूर येथे लावले गेले. या रोपाचे झालेले झाड आजही त्या जागी आहे आणि आता ते जगातील सर्वात जुने झाड आहे. माझ्यासाठी अनुराधापूर हे श्रीलंकेतील विस्मयकारी शहर आहे, जिथे आल्यावर काळ एका जागी थिजून उभा राहतो, असे मला वाटते अनेक विहारांमध्ये भूतकाळात घेऊन जाणारी बुद्धाची पहुडलेल्या अवस्थेतील शिल्पे आहेत. या मंदिरांमध्ये म्हटल्या जाणाऱ्या बौद्धधर्मातील पवित्र मंत्रांचा आवाज मला आध्यात्मिक औषधासारखा भासतो, मला आणि या जादूई देशाला भेट देणाऱ्या कोणाही तणावाने ग्रासलेल्याला\nबौद्धधर्म श्रीलंकेतच फुलला. श्रीलंकेत बौद्धधर्माचा विकास होत असतानाच इसवी सनपूर्व २०० ते इसवी सन १००० या काळात एक वैभवशाली संस्कृती आकाराला आली आणि स्मारके व मंदिरांचे सुंदर शहर अनुराधापूर ही सिंहली राज्यकर्त्यांची राजधानी झाली. राजा पांडुकाभ्यय ते रा��ा अग्रबोधी (नववा) यांच्यापर्यंत अनेक शक्तिशाली राजांनी अनुराधापुरातून राज्याचा कारभार पाहिला. नंतर, पोलोन्नारुवा हे मोठे शहर झाले आणि राजा सेनापासून ते राजा कलिंग मागापर्यंत सर्वानी १२०० पर्यंत येथून राज्य केले. १९व्या शतकापर्यंत श्रीलंकेत अनेक राजांनी अनेकविध शहरांतून राज्य केले. इतिहासातील नोंदींनुसार १४व्या शतकात दक्षिण भारतातील चोल राजवट श्रीलंका बेटावर प्रबळ झाली होती आणि त्यांनी तमिळ राजवट स्थापन केली. जवळच्या हिंदुस्तानी प्रदेशातून- म्हणजे सध्याच्या तमिळनाडूतून अनेक तमिळ श्रीलंकेत राहावयास गेले. श्रीलंकेत आजही मोठय़ा प्रमाणात तमिळ लोक का आहेत, याचे उत्तर या घटनाक्रमातून मिळते.\n१६व्या आणि १७व्या शतकात, पोर्तुगीज आणि डच लोकांनी या सुंदर बेटाचा ताबा घेतला. ब्रिटिशांनी या लोकांचा १७९६ मध्ये पराभव केला आणि १८०२ मध्ये ब्रिटिशांच्या भाषेत सिलोन ही ब्रिटिश वसाहत झाली. ब्रिटिशांनी कोलंबो ही वसाहतीची राजधानी म्हणून प्रस्थापित केली. हे शहर आजही श्रीलंकेची राजधानी आहे. सिलोन १९४८ मध्ये एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र झाले आणि १९७२ मध्ये त्याचे नाव बदलून श्रीलंका करण्यात आले. १९८०च्या दशकात श्रीलंकेत सिंहली आणि तमीळ (यांचे नेतृत्व लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम अर्थात एलटीटीईकडे होते) यांच्यात भीषण वांशिक संघर्ष पेटला. त्यानंतर दोन दशके चाललेल्या हिंसाचारानंतर २००१ मध्ये झालेल्या नॉर्वेच्या मध्यस्थीनंतर श्रीलंकेत युद्धबंदी लागू झाली. हा युद्धबंदीचा करार एलटीटीईने दहा हजारांहून अधिक वेळा मोडल्याचा आरोप करत २००८ मध्ये हा करार मोडीत काढल्याची घोषणा केली आणि आक्रमक पवित्रा घेत अखेर २००९ मध्ये एलटीटीईला पराभव मान्य करण्यास भाग पाडले. पुढचा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच.\nआज माझ्यासारखी प्रवासाची उत्कट आवड असलेली व्यक्ती श्रीलंका नावाच्या रमणीय देशात भ्रमंती करते, तेव्हा एक आधुनिक देश दिसतो. साक्षरतेचे चांगले प्रमाण, वेगवान औद्योगिक वाढ, विस्तारणारे पर्यटनक्षेत्र, हत्तींसाठी अनाथाश्रमासारखे पर्यावरणपूरक उपक्रम, कॅण्डीजवळच्या ऑर्किड्सच्या बागा, नुवारा एलियाची घनदाट आणि शीतल अरण्ये, कॅण्डीतील टेम्पल ऑफ द टूथसारख्या अप्रतिम वास्तू किंवा सिगिरियामधील भित्तिचित्रे, कॅण्डी पेराहेरासारखे रंगतदार उत्��व- ही सगळी श्रीलंकेची वैशिष्टय़े आहेत आणि अविस्मरणीय अनुभव देणारा हा देश माझ्या सर्वात आवडत्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ashok-chavan-is-not-safe-from-bjp-leaders/", "date_download": "2019-03-25T08:11:19Z", "digest": "sha1:4IE66KCQPKZ2YP3JTN423SV2W63PNJYJ", "length": 5994, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नाहीत- अशोक चव्हाण", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nभाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नाहीत- अशोक चव्हाण\nसांगली: काँग्रेस प्रवक्ते खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप म्हणजे भारत जलोओ पार्टी असून भाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नाहीत. भाजपच्या हातात देशाची सूत्रे जाणे म्हणजे हे देशाचे दुर्दैव आहे. अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसच्यावतीने महापालिका निवडणुकीसाठी मिरजेतील किसान चौकात आयोजित सभेत चव्हाण बोलत होते.\nअशोक चव्हाण म्हणाले, “शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करत ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा मुख्यंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. मात्र फडणवीस यांनी ते सिद्ध करून दाखवावे, आम्ही निवडणुका सोडून देऊ” केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं अशी सध्याची अवस्था असल्याचे चव्हाण म्हणाले.\nमहाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा याचे देवेंद्रजींनी उत्तर द्यावे, सांगलीत काँग्रेसचीच सत्ता राहायला हवी. काँग्रेसचे सरकार येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\n‘महानेट’साठी खाजगी नेटवर्कच्या वापराची सूचना – देवेंद्र फडणवीस\nइंदापूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार अजित पवारानंतर धनंजय मुंडेंच वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/television/page/4/", "date_download": "2019-03-25T07:38:10Z", "digest": "sha1:7VMJWWFMUVNYFYFAETQCUW6WL2K7EK27", "length": 5794, "nlines": 65, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Television - Page 4 of 6 - मराठी कलाकार", "raw_content": "\nपुष्कर आणि आस्तादमध्ये बाचाबाची कालच्या खेळण्यांनी आज घेतला बदला\nमराठी बिगबॉस दिवस २५. आजचा घरातील दिवस नुसता बदला घेण्यासाठीचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं...\nरेशमने केलं मेघाला हैराण \nमराठी बिगबॉसचा दिवस २४ वा. नेहमी जसा काही ना काही टास्क सदस्यांना मिळतो तसाच आज पण...\nमेघाला वाचवायला सईने केलं फॅमिली फोटो आणि आवडत्या वस्तूंचं बलिदान\nबिगबॉसच्या घरातील दिवस २३ वा. सर्व कार्य नित्यनेमाप्रमाणे चाललेली. ह्या घरात आजवर खुप वादविवाद, भांडणं झाली....\nस्मिताला वाचवण्यासाठी आस्तादने केलं टक्कल राजेश सिक्रेट रूम मध्ये\nविनीत भोंडे आणि आरती सोळंकी बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून बिगबॉसचा कॉमेडी एन्टरटेनमेन्ट फॅक्टर थोडासा कमी झालेला...\nबिगबॉसच्या घरातील १९ वा दिवस उजाडला. सुरुवातीला सर्व काही काही सुर��ीत चालू असतांना पुढे दिवसभरात असं...\nबिगबॉस मराठी…झलक मागील आठवड्याची\nबिगबॉस मराठीला सुरु होऊन आता १५ दिवसांपेक्षाही जास्त दिवस होत आहेत. खरा खेळ आता रंगात येऊ...\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nनेहमीप्रमाणे बिगबॉस मराठीचा प्रथम एपिसोड चांगलाच गाजला. बिगबॉसच्या घरात सर्व मंडळींचा गृहप्रवेशही झाला. सर्वाना तब्बल १०० दिवस...\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉसच्या घरातील पहिला दिवस तो जरा थोडा उशिरानेच सुरु झाला होता. सर्व मंडळींनी आरामात दिनचर्या...\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\n‘मराठी बिग बॉस’ आजपासून सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता हा एपिसोड कलर्स...\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nमहाराष्ट्रात संगीत, नाच, किंवा इतर धर्तीवर आधारित कित्येक रिऍलिटी शोज् वाहिन्यांवर येऊन गेले. पण यापेक्षा सर्वात...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/feature-artical-about-prabhakar-burve-painting-consideration-284716/", "date_download": "2019-03-25T08:38:43Z", "digest": "sha1:PPPOBE553REERNLZL46YZK6JT2HO2VGV", "length": 24881, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बरवेंनंतरचं सज्ञानवर्ष | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nचित्रकार प्रभाकर बरवे यांचा स्मृतिदिन गेल्या १७ वर्षांत फार कुणी साजरा केला नव्हता, पाळला नव्हता. पण यंदाचं वर्ष निराळं आहे.\nचित्रकार प्रभाकर बरवे यांचा स्मृतिदिन गेल्या १७ वर्षांत फार कुणी साजरा केला नव्हता, पाळला नव्हता. पण यंदाचं वर्ष निराळं आहे. त्यांच्या स्मृतिदिनी यंदाही काही कार्यक्रम नसतील, पण बरवे यांचा चित्रविचार जगाला कळण्याची शक्यता दुणावली असल्याचं समाधान इतक्या वर्षांनी प्रथमच मिळतं आहे. ते समाधान ��ा आणि बरवे यांचा चित्रविचार म्हणजे काय, याबद्दलचा हा मजकूर..\n६ डिसेंबर ही तारीख कुणाला चैत्यभूमीसाठी आठवत असते तर कुणाला अयोध्येसाठी. या दोन्हीच्या पलीकडे, अगदी थोडय़ा जणांना ही तारीख प्रभाकर बरवे यांचा स्मृतिदिन म्हणून आठवते. बरवे हे महाराष्ट्रातले (आणि सर्वार्थानं महाराष्ट्रीय म्हणता येईल असे) महत्त्वाचे चित्रकार म्हणून १९८६ ते १९९५ या काळात सर्वपरिचित झालेले होते. त्यामुळे बरवे यांच्या मृत्यूची नेमकी तारीख (६ डिसेंबर १९९५) फार कुणाला लक्षात नसली, तरी पुष्कळ जणांना बरवे आठवत असतातच. बेंगळुरूत किंवा दिल्लीतही एखादा अभ्यासू चित्रकार, समोरचा माणूस महाराष्ट्रातून आलाय हे कळल्यावर विचारतो : अरे वो बरवेसाहब थे न मुंबई में.. उनका कुछ कलेक्शन वगैरा अभी हैं किसी के पास कहां देखने मिलेगा उनका काम\nबरवे यांच्याविषयीचं अभ्यासू कुतूहल कायम राखणाऱ्या या अमराठी प्रश्नांवर आपण मराठी माणसं आजवर निरुत्तर होत होतो. पण आता तसं होणार नाही.\nयाची कारणं दोन : एक- प्रभाकर बरवे यांनी लिहिलेलं ‘कोरा कॅनव्हास’ हे मराठीतल्या सवरेत्कृष्ट १०० पुस्तकांपैकी एक मानलं जाणारं पुस्तक आता इंग्रजीत आलं आहे आणि बरवे यांना जे म्हणायचं होतं ते या पुस्तकात नीटसपणे (शांता गोखले यांचं भाषांतर आणि जेरी पिंटोकृत संपादन अशा दुहेरी संस्कारानिशी) मांडलं गेलं आहे. बरवेंची या पुस्तकातली रेखाचित्रं मराठीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे छापली गेली आहेत. इंग्रजी वाचणाऱ्या, चित्रकलेबद्दल नावड नसणाऱ्या (पण या कलेची फार माहिती नाही, अशासुद्धा) कुणालाही कळेल, भिडेल अशी सोपेपणाची पातळी या पुस्तकानं राखली आहे. मात्र, मराठी न समजणाऱ्या अभ्यासकांनाही बरवे यांचं कलागुज नेमकं काय होतं, हे समजून घेण्यासाठी आता इंग्रजीचा उपयोग होईल.\nआणि दुसरं कारण : बरवे यांच्या मृत्यूनंतरचं सर्वात मोठं प्रदर्शन सध्या मुंबईत भरलं असून ते पुढले तीन महिने- २८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत सुरू राहणार आहे. लोअर परळच्या फिनिक्स मिलशेजारच्या रघुवंशी मिलचा पुनर्जन्म म्हणून जो काही अवतार झालाय, तिथल्या एका जागेत जरी हे प्रदर्शन भरलेलं असलं, तरी त्याचा दर्जा एखाद्या कलासंग्रहालयात उचित गांभीर्यानं मांडल्या गेलेल्या प्रदर्शनापेक्षा अजिबात कमी नाही. देशातले किंवा आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी ‘बरवे क्य��� चीज थी’ याचं उत्तर मिळवण्यासाठी पुढल्या तीन महिन्यांत कधीही मुंबईत येऊ शकतात, ही स्वागतार्ह घडामोड ठरेल.\nया मजकुराचं शीर्षक ‘बरवेंनंतरचं सज्ञानवर्ष’ असं यासाठी आहे की, बरवे यांच्या मृत्यूला आता १८ र्वष होताहेत आणि १८ पूर्ण हे आपल्या देशात ‘सज्ञान होण्याचं वय’ मानलं जातं- कायदेशीरदृष्टय़ा. तो कायदा बरवे यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षांना लागू असण्याचं काहीही कारण नव्हतं. बरवे यांचं भारतीय चित्रकलेच्या स्वातंत्र्योत्तर प्रवासातलं योगदान काय आहे, बरवे यांच्या निकट संपर्कातून त्यांच्या विचारांच्या जवळ आलेले इनेगिने चित्रकार, बरवे यांच्यासारखाच विचार आपापल्या परीनं करणारे (पण हा विचार बरवे यांनी ज्यांच्या आधी केला, असे) काही चित्रकार आणि मग बरवे यांनी रेखाचित्रांतून आणि रंगचित्रांमधून मांडलेला दृश्यविचार पुढे नेऊ पाहणारे पुढल्या पिढीतले अनेक तरुण, अशी बरवे यांची प्रभावळ दाखवता येते. कलाक्षेत्रात अनुयायांनी नेत्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर कला गोठून राहते. तसं बरवे यांच्याबाबत झालं नाही, हेही खरं आहे. बरवे यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे, त्यात यशस्वी झालेले चित्रकार हे बरवे यांच्याशी आजही कसं नातं सांगतात, याची चर्चा त्यामुळे अधिक सखोलपणे होऊ शकते. गिरीश शहाणे यांनी हा वारसा दाखवणाऱ्या एका प्रदर्शनाचं विचारनियोजन दिल्लीच्या एका गॅलरीसाठी काही वर्षांपूर्वी केलं होतं. त्याहीपेक्षा अधिक विस्तृत आढावा अभिजीत गोंडकर यांनी मुंबईतल्या ताओ आर्ट गॅलरीसाठी आणखी मोठय़ा प्रदर्शनातून घेतला होता, त्यात बरवे-विचार मानणाऱ्या अनेकांच्या चित्रांसोबत स्वत: बरवे यांचीही तीन-चार चित्रं होती. मात्र, बरवे यांचा वारसा- त्यांची ‘लीगसी’- फक्त मराठी भाषकांपुरती राहते आहे की काय, अशी शंका अधूनमधून येत राहिली. मध्यंतरी सतीश नाईक यांच्या ‘चिन्ह’ कलावार्षिकानं प्रभाकर बरवे यांच्या डायऱ्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात असा प्रयत्न केला. त्याला अल्प यश आल्यावर मग बरवे कुटुंबीयांबद्दल व्यर्थ नापसंतीचे उद्गारही काढण्याची फॅशनच आली. पण ज्या मूळ डायऱ्यांवरून अख्खं एक मराठी पुस्तक झालं होतं, तेही मध्यंतरी ‘आउट ऑफ प्रिंट’ होतं मराठी पुस्तकाला ‘पुस्तकरूप’ देताना बरवे यांच्या डायऱ्यांचं ललित अंगानं सादरीक���ण झालं आहे आणि ते टाळायला हवंच, असं ज्यांनी बरवे यांच्या डायऱ्या पाहिल्या होत्या, अशा काही जणांचं मत होतं. या मताला आता शांता गोखले यांनीही दुजोरा दिलेला आहे.\nबरवे यांचा चित्रविचार म्हणजे काय, असा प्रश्न मराठीतही अनेकांना पडेल. चराचराबद्दल (म्हणजे उदाहरणार्थ- सजीव मेंढी, ढग, डोंगर, वाळकी पानं अशा नैसर्गिक ‘वस्तू’ आणि लोणच्याची बरणी, इमारत, घडय़ाळ अशा मानवनिर्मित वस्तू यांबद्दल) समभावनेनं विचार करण्याची रीत बरवे यांच्या चित्रांनी रुळवली. वस्तूबद्दलच्या व्यक्तिगत भावना चित्रकाराकडे असू शकतात, पण त्या भावना चित्रात आल्यानंतर मात्र निव्वळ व्यक्तिगत असू शकत नाहीत. व्यक्तिगत अवकाश (स्वत:चं भावविश्व आणि बाहेरच्या जगाचा विचार करण्याच्या पद्धती यांचा मिळून बनलेला) आणि चित्रावकाश (चित्रकलेची तांत्रिक अंगं आणि चित्रकलेच्या इतिहासाचं आणि त्यातून आलेल्या कलाविचाराचं साद्यंतरूप या तिन्हीच्या संचितात भर घालू इच्छिणारा कोरा कॅनव्हास) यांचा मेळ चित्रकार घालत असतो. तो आपण कसा घातला, हे शब्दांत सांगताना बरवे यांनी मराठी भाषेला कामाला लावलं. या ग्रथित विचारामुळे पुढल्या पिढय़ांना, भावना- संवेदना यांचा चित्राशी संबंध काय हे आपल्या मातृभाषेतून उमगलं. त्या अर्थानं मराठीला ज्ञानभाषा करण्यात बरवे यांनी वाटा उचलला. त्याखेरीज, चित्रांची भाषा आणि मुख्यत: चित्रातली मोकळी जागा (यालाही अवकाश असाच रूढ शब्द आहे; पण बरवे यांनी एक छान शब्द दिला- ‘अचित्र’ ) आणि या अचित्राचा चित्राशी संबंध, चित्रात जे आकार दिसू शकतात, त्यांमधून दिसणारा विचार-भावनांचा प्राधान्यक्रम, त्या आकारांना रूढ अर्थापेक्षा मोठे- व्यापक अर्थ देण्याची बरवे यांची रीत, हे सारं चित्रामधून उरलं.\nबरवे यांची चित्रभाषा कुणाहीपर्यंत पोहोचू शकली असती, पण ती महाराष्ट्रातच अधिक राहिली (अपवाद दिल्लीकर मंजुनाथ कामथचा) याचं कारण बरवे यांच्या मृत्यूनंतर बाहेर कुठे त्यांची प्रदर्शनं वगैरे झाली नाहीत. मुंबईत आत्ता भरलेलं प्रदर्शन जर अन्यत्र गेलं, किमानपक्षी दिल्लीच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’नं या प्रदर्शनाला दिल्ली-बेंगळुरूमध्ये स्थान दिलं, तरीही विद्यार्थिदशेपासून अखेरच्या दिवसांपर्यंतचा बरवे यांचा चित्रप्रवास त्या शहरांत उलगडेल. त्याहीपेक्षा, बरवे यांचा ग्रथित चित्रव���चार कधीही- कुठेही वाचू शकण्याची सोय आजवर फक्त मराठीच भाषेत होती, ती आता स्वत:ला ‘जगाची ज्ञानभाषा’ म्हणवणाऱ्या इंग्रजीतही झाली आहे, हे बरं झालं. या दोन कारणांमुळे, बरवे यांच्यानंतरचं अठरावं वर्ष जगाला बरवेंबद्दल अधिक सज्ञान करणारं ठरलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nरेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/bhavkavita/aastik-aani-nastik/", "date_download": "2019-03-25T08:06:15Z", "digest": "sha1:2J734BOUBXY5DKGBXCXUBPYVKAZU7YLP", "length": 5278, "nlines": 74, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nदेवावर ठेवा पुरता विश्वास\nकिंवा अविश्वास पूर्ण हवा\nभले काही होता देवाजीची स्तुती\nदोष त्याचे माथी संकटात |\nदेवाचे खेळणे करितो मानव\nभक्ती ऐसे नाव त्यास देई\nबापासंगे जणू खेळतो बालक\nविश्वाचा पालक पाहतसे |\nस्वार्थासाठी ज्यांचा देवावर भाव\nआस्तिक हे नाव त्यांचे नव्हे\nमाझ्यामध्ये आहे इंधन स्पंदन\nतोडीन बंधन आत्मबळे |\nमीच आहे माझा तारक मारक\nसत्य हेच एक त्यास ठावे\nभासमय देव ज्याने अव्हेरीला\nनास्तिक त्याला म्हणो नये |\nआई व मूल (ओव्या)\nआई आणि मूल (कविता)\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/wangmaysheti", "date_download": "2019-03-25T08:47:46Z", "digest": "sha1:YS6GBALMF2MMABKJLVGDWPP6UJGNJA7K", "length": 8378, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " वाङ्मयशेती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरी��� कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशेतकरी पात्रता निकष 1,984 23-05-2011\nआता उठवू सारे रान 2,563 25-05-2011\nहत्या करायला शीक 2,102 29-05-2011\nमीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे 1,874 30-05-2011\nस्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा 2,289 30-05-2011\nउषःकाल होता होता 1,277 31-05-2011\nपराक्रमी असा मी 1,401 11-06-2011\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,770 11-06-2011\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nमग हव्या कशाला सलवारी 1,914 15-06-2011\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,260 15-06-2011\nहे रान निर्भय अता 984 16-06-2011\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/wangmaysheti?page=7", "date_download": "2019-03-25T08:57:36Z", "digest": "sha1:KTKYGGHYXSWN6BIXHKJL7VQLTWQC4ED7", "length": 8363, "nlines": 120, "source_domain": "gangadharmute.com", "title": " वाङ्मयशेती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्ष��� कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nस्वप्नरंजन फार झाले 1,262 15-07-2011\nमाझी मराठी माऊली 1,067 15-07-2011\nनव्या यमांची नवीन भाषा 1,845 15-07-2011\nआयुष्याची दोरी 1,175 15-07-2011\nरंगताना रंगामध्ये 1,800 15-07-2011\nगवसला एक पाहुणा 1,112 15-07-2011\nडोंगरी शेत माझं गं 1,678 16-07-2011\nस्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 1,909 22-07-2011\nआम्ही शेतकरी बाया 1,532 26-07-2011\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,109 27-07-2011\nआयुष्य कडेवर घेतो 2,069 29-07-2011\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट 5,724 05-08-2011\nमाझी ललाटरेषा 1,443 15-08-2011\nवादळाची जात अण्णा 2,453 18-08-2011\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:48:22Z", "digest": "sha1:V7HV275OL3U4OW7NOPM23QC2AHI7D7QP", "length": 11216, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ला लीगा - विकिपीडिया", "raw_content": "\nएफ.सी. बार्सेलोना (२२वे विजेतेपद)\nरेआल माद्रिद (३२ विजेतेपदे)\nप्रिमेरा दिव्हिजियोन (स्पॅनिश: Primera División) म्हणजेच ला लीगा ही स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. स्पेनमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये स्पेनमधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी सेगुंदा दिव्हिजियोन ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर सेगुंदा दिव्हिजियोनमधील सर्वोत्तम ३ संघांना ला लीगामध्ये बढती मिळते.\n१९२९ सालापासून खेळवल्या जात असलेल्या ला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३२ तर एफ.सी. बार्सेलोनाने २२ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.\n२०१३-१४ ला लीगा हंगामामधील संघांचे स्थान\nअॅथलेटिक बिल्बाओ बिल्बाओ San Mamés 53,332\nॲटलेटिको माद्रिद माद्रिद Vicente Calderón स्टेडियम 54,960\nएफ.सी. बार्सेलोना बार्सिलोना कँप नोउ 99,786\nसेल्ता दे व्हिगो व्हिगो Balaídos 31,800\nआर.सी.डी. एस्पान्यॉल बार्सिलोना Estadi Cornellà-El Prat 40,500\nसी.ए. ओसासूना पाम्पलोना El Sadar स्टेडियम 19,553\nरेआल माद्रिद माद्रिद सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम 85,454\nरेआल सोसियेदाद सान सेबास्तियन Anoeta स्टेडियम 32,076\nवालेन्सिया सी.एफ. वालेन्सिया Mestalla स्टेडियम 55,000\nव्हियारेआल सी.एफ. व्हियारेआल El Madrigal 24,890\nयुरोपीय देशांमधील सर्वोत्तम फुटबॉल लीग (युएफा)\nइंग्लंड • फ्रान्स • जर्मनी • इटली • नेदरलॅंड्स • पोर्तुगाल • रशिया • स्पेन • स्कॉटलंड\nयू.डी. आल्मेरिया • अॅथलेटिक बिल्बाओ • अॅटलेटिको माद्रिद • एफ.सी. बार्सेलोना • रेआल बेटीस • सेल्ता दे व्हिगो • एल्के सी.एफ. • आर.सी.डी. एस्पान्यॉल • गेटाफे सी.एफ. • ग्रानादा सी.एफ. • लेव्हांते यू.डी. • मालागा सी.एफ. • सी.ए. ओसासूना • रायो व्हायेकानो • रेआल माद्रिद • रेआल सोसियेदाद • सेव्हिया एफ.सी. • वालेन्सिया सी.एफ. • रेआल बायादोलिद • व्हियारेआल सी.एफ.\nराष्ट्रीय फुटबॉल प्रिमियर लीग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१६ रोजी ०३:०६ वाज���ा केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2019-03-25T07:38:24Z", "digest": "sha1:TZDF6BZOUCIJVQSCP27BDPCZBJTSZKFR", "length": 8186, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : धातूची रहस्यमय वस्तू - विचारप्रवाह", "raw_content": "\n७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : धातूची रहस्यमय वस्तू\nतरी या सर्व प्राचीन कलाकृतींमध्ये अशी एक रहस्यमय वस्तू होती जिचा अजूनही उलगडा व्हायचा होता. अँटिकिथरो बेटानजीक समुद्रतळाशी सापडलेल्या या वस्तूला तज्ञांनी ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ असे नाव दिले. ब्रांझ धातूपासून बनलेली ही रहस्यमय वस्तू पुरती गंजून गेली होती. त्यामुळे लवकरच तिचे तुकडे झाले. त्यातील मोठ्या तुकड्यांचे एक्स-रे छबीच्या सहाय्याने जवळून परिक्षण केले असता, तज्ञांना त्यात घड्याळात असतात, तसे लहान आकाराचे गिअर दिसून आले. त्यावरुन हे एखादे प्राचीन यंत्र असावे असा त्यांनी कयास बांधला. परंतु ही गोष्ट आजवरच्या समजूतीला तडा देणारी होती. असा विचारही जणू तोपर्यंत कल्पनातीत होता तेंव्हा तज्ञांनी या यंत्राचे रहस्य उलगडण्याचे मनावर घेतले व ‘त्याकाळी नेमके काय घडले असावे तेंव्हा तज्ञांनी या यंत्राचे रहस्य उलगडण्याचे मनावर घेतले व ‘त्याकाळी नेमके काय घडले असावे’ याचा ठाव घेण्यास सुरुवात केली. त्याकरिता अगदी भगिरथ प्रयत्न केले’ याचा ठाव घेण्यास सुरुवात केली. त्याकरिता अगदी भगिरथ प्रयत्न केले परिणामी मानवी इतिहासाचे विस्मृतीत गेलेले तुकडे एक एक करुन जुळू लागले.\nधातूची रहस्यमय वस्तू : अँटिकिथरो मेकॅनिझम\n१९७६ साली अँटिकिथरो येथील त्याच समुद्रतळाशी पुन्हा एकदा एक शोधमोहीम काढण्यात आली. त्यावेळी तिथे काही पुरातन नाणी व मद्याची भांडी सापडली. त्यावरुन तज्ञांनी जलसमाधी मिळालेल्या जहाजाची कालनिश्चिती केली. शिवाय ते जहाज कुठून कुठे जात असावे याचा देखील अंदाज बांधला. या जहाजास जलसमाधी मिळाली तो काळही मोठा वादळी होता\nग्रीक हे उत्कृष्ट दर्यावर्दी होते. अडीच त��� तीन हजार वर्षांपूर्वी त्यांनी जवळपासच्या प्रदेशात आपल्या वसाहती निर्माण करण्यास सुरुवात केली होती. टर्कीच्या पूर्वेस व इटलीच्या दक्षिणेस त्यांच्या अशाच काही वसाहती होत्या. पुढे सुमारे २१०० वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याचा उदय होऊ लागला. इटलीतील सत्तेने ग्रीक वसाहती ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. याच काळात तेंव्हाच्या मानाने भलेमोठे असे एक रोमन जहाज टर्कीच्या पूर्व किनार्यावरील वसाहतीतून प्रवासास निघाले असावे. या व्यापारी जहाजास इटलीच्या दक्षिण किनार्यावरील वसाहतीपर्यंत पोहचायचे होते. परंतु अँटिकिथरो बेटानजीक त्यास समुद्री वादळाने घेरले व दूर्देवाने त्याला तिथेच जलसमाधी मिळाली. मात्र जहाजावरील मानवी संस्कृतीचा ठेवा हा समुद्राने शेकडो वर्षं आपल्या उरी जतन करुन ठेवला.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n११. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : आर्किमिडीज आणि ॲलेक्झांड्रिया\n३३. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन\n६. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : समुद्रतळाशी ग्रीक संस्कृतीचे अवशेष\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/john-shepherd-barron-the-inventor-of-atm/", "date_download": "2019-03-25T07:51:43Z", "digest": "sha1:4MVZ5QT2RZCJB7UR52OKWOZOB3BBQ5WP", "length": 14136, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "एटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे? जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्वि��र\nजस-जश्या मानवाच्या गरजा वाढतात तस-तश्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांतून तो असे काही शोध लावतो ज्यामुळे मानवी जीवन अधिक सोयीस्कर आणि सुखद बनते. याच गरजेतून आज जगात एवढे जास्त शोध लावले गेले आहेत.\nएक वेळ अशी होती जेव्हा लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रागेत उभे राहावे लागत होते, पण त्यानंतर आला एटीएम… या मशीनने माणसांना कधीही कुठेही पैसे काढण्याची मुभा दिली.\nज्यामुळे जर कधी बँकेला सुट्टी असली किंवा आपण बँकेपर्यंत जाण्यात असमर्थ असलो तर आपण या मशीनद्वारे पैसे काढू शकतो.\nआजच्या या आधुनिक युगात जवळपास सर्वच कामे ही मशीनद्वारेच केली जातात. या मशीन आपले जीवन सोयीस्कर करण्यास मदत करत आहेत. त्यातच एटीएम मशीन तर मानवी इतिहासात सर्वात उपयोगी आणि सोयीस्कर मशीन ठरली.\nआज आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पैश्याची गरज भासली तर आपण या मशीनचा वापर करतो. त्यासाठी आपल्याला आता बँकेत जायची गरज भासत नाही.\nपण काय तुम्ही कधी विचार केला आहे की, या एटीएम मशीनचा शोध कसा लागला असेल आणि तो कोणी लावला असेल पहिल्यांदा या मशीनचा वापर कुठे झाला असेल पहिल्यांदा या मशीनचा वापर कुठे झाला असेल पहिली एटीएम मशीन ही कशी दिसत असेल\nतुमच्या मनात कधी असे प्रश्न आलेत… आज आम्ही याच सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊन आलो आहोत..\nजगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला लंडनच्या बार्कलेज बँकेने केला होता,\nया मशीनचा शोध स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन यांनी लावला होता.\nतुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल की, जॉन शेफर्ड यांचा जन्म भारतात झाला होता. २३ जून १९२५ साली मेघालय येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्कॉटीश होते, त्याचं नाव विलफ्रिड बॅरन होते. जॉन यांच्या जन्मावेळी ते चिटगाव पोर्ट कमिश्नरेट चे चीफ इंजिनीअर होते.\nएटीएम मशीनची कल्पना जॉन शेफर्ड यांना कशी सुचली यामागे देखील एक रंजक कहाणी आहे.\nएकदा जॉन पैसे काढण्यासाठी बँकेत गेले पण बँकेत पोहोचताच बँक बंद झाली, तेव्हा जॉन यांना वाटले की, काश अशी एखादी मशीन असती ज्यातून आपण हवे तेव्हा पैसे काढू शकलो असतो.\nमग काय त्यांना जशी ही कल्पना सुचली त्यांनी या मशीनला बनविण्याचे काम सुरु केले. त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीने अखेर त्यांच्या या कल्पनेने मूर्त रूप घेतले ���णि जगात एटीएम मशीनचा जन्म झाला. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या एका शाखेत लावण्यात आली.\nभारतात सर्वात पहिली एटीएममशीन १९८७ मध्ये लागली. हे पहिले एटीएम हाँगकाँग अॅण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने मुंबईत लावली होती.\nया एटीएम मशीनचा शोध लावून जॉन शेफर्ड यांनी सर्व मानवजातीचे कल्याण केले आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.. पण आज जॉन शेफर्ड आपल्यात नाही. एटीएम मशीनच्या या शोधकर्त्याचा १५ मे २०१० साली मृत्यू झाला…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← विंग कमांडर अभिनंदन पाकच्या हाती लागण्याचा घटनाक्रम भारतीय सैनिकांच्या शौर्याची खात्री देतो\n“यात्रीगण कृपया ध्यान दे…” हा कुणाचा आवाज आहे माहित आहे\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nतुम्ही वापरत असलेलं प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही- हे वाचा आणि सतर्क व्हा\nतुमच्या चॅटिंगमध्ये इमोशन्सचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची आणि प्रवासाची रोचक कथा\n3 thoughts on “एटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे\nहा “माओवाद” नेमका आहे तरी काय खरा आहे की खोटा खरा आहे की खोटा आज सगळं काही समजून घ्या\nभ्रष्टाचाराशी लढणाऱ्या ह्या ४ जणांचे खून झालेत, पण कुणाला त्याची फिकीर नाही…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य\n भारतात सैन्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच एक महिला ‘लीड’ करणार एका सैन्य दलाला\nउर्जित पटेल – RBI Governor की राजकीय पंचिंग बॅग\nकाय आहे आपल्या देशातील राज्यांच्या नावामागील लॉजिक\nआता सायकल कधीही पंक्चर होणार नाही\nहॉटेलमधील बेडवर नेहमी पांढरंच बेडसीट असण्यामागचं हे आहे चलाख कारण\nप्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर\nSamsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड\nही व्यक्ती मानवी राखेला देते हिऱ्याचे स्वरूप\n“फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा”\nबलात्काऱ्यांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणतात – ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून कराच\nवस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी : सकारात्मकतेची गरज\nरशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा हा रोमहर्षक प्रवास पाहून जगात काहीच अशक्�� नसल्याची खात्री पटते\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\nमोदींनी निवडणूक प्रचारात छातीठोकपणे दिलेली ही १० वचने अजूनही अपूर्णच आहेत\nडोळा मारणाऱ्या “सावळ्या” मुलीची मार्केटिंग आणि “धोक्यात”ली संस्कृती\nमोदी सरकारचा “असा ही” बदल… मेरा देश “खरंच” बदल रहा है वाटतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/wangmaysheti?page=8", "date_download": "2019-03-25T08:40:14Z", "digest": "sha1:RLKSKJ3IL5SRIBDSPPJEH2ZVWKIIUQBE", "length": 9071, "nlines": 120, "source_domain": "gangadharmute.com", "title": " वाङ्मयशेती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक - १ 1,710 19-08-2011\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ 1,649 20-08-2011\nराखेमधे लोळतो मी (हजल) 1,202 21-08-2011\nभ्रष्टाचार्यास हाण पाठी : पोवाडा 1,943 23-08-2011\nच्यायला बुडवा हा सहकार 1,433 25-08-2011\nउद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ......\nमा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 3,982 03-09-2011\nअस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक 1,176 06-09-2011\nमी मराठी - स्पर्धा विजेती गझल 2,996 10-09-2011\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 2,071 14-09-2011\nबत्तीस तारखेला 1,425 21-09-2011\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 3,911 26-09-2011\nक्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११ 1,255 11-11-2011\nकापसाचा उत्पादन खर्च. 15,505 18-11-2011\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,817 30-12-2011\nहृदय तोड दे - दगा जर दिला - कारावके 1,868 31-12-2011\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/node/2431", "date_download": "2019-03-25T07:58:03Z", "digest": "sha1:QMOB5OSE6YF4HJIELFKNES2FYV2SS6XP", "length": 5814, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maratha reservation agitation 9th august maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार\nमराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार\nमराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार\nमराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनावेळी हिंसाचार होऊ शकतो अशी माहिती गुप्तवार्ता विभागाला मिळाली आहे. दिल्लीहून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १६ तुकड्यांची कुमक मागवली असल्याचे राज्य गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनावेळी हिंसाचार होऊ शकतो अशी माहिती गुप्तवार्ता विभागाला मिळाली आहे. दिल्लीहून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १६ तुकड्यांची कुमक मागवली असल्याचे राज्य गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी सांगितले.\nपोलीस दलाकडे राखीव राज्य पोलिसांच्या तुकड्या आहेत, पण राज्यभरात एकाच वेळी, एकाच दिवशी आंदोलन झाले तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी या तुकडय़ा अपुऱया असल्यामुळे आम्ही केंद्राकडे पत्र लिहून अतिरिक्त तुकडय़ांची मागणी केली आहे, असे पोरवाल यांनी सांगितले. एका तुकडीत ८० ते १५० सशस्त्र जवान आणि महिला असतात.\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण आंदोलन agitation हिंसाचार sections दिल्ली पोलीस\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%83%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T08:17:07Z", "digest": "sha1:C5SFJH4UJYLHM7NH63DTIVPNXLH7SSCL", "length": 8551, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "१४. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : अंधःकार युग आणि पुनरुत्थान - विचारप्रवाह", "raw_content": "\n१४. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : अंधःकार युग आणि पुनरुत्थान\nरोमन साम्राज्याच्या अस्तानंतरचा काळ हा ‘अंधःकार युग’ म्हणून ओळखला जातो. साधारणतः इसवी सन ५०० ते इसवी सन १००० या कालखंडात मानवी प्रगतीला खिळ बसली. अरब जगत मात्र यास अपवाद होते. त्यानंतर १२ व्या शतकाच्या सुरुवातीला इटलीमध्ये परिवर्तनाची एक नवी लाट आली. अगदी त्याचवेळी महाराष्ट्रातही वैचारिक दृष्टीकोनातून चिरंतर तत्त्वज्ञानाची मांडणी होऊ लागली होती. वैश्विक चैतन्याने जोडलेल्या या जगात सर्वत्र नव्या विचारांची पालवी फुटत होती\nत्याकाळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. १���व्या व १२व्या शतकात चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची कास धरली. सर्वसामान्य लोकांपर्यंत आपले ज्ञान पोहचावे यासाठी त्यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला. त्यानंतर १२९०च्या सुमारास ज्ञानेश्वारांनी ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान मराठी भाषेत आणले. ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक समकालीन संतांनी त्यावेळी समाजप्रबोधनाचे कार्य केले. विशेष म्हणजे याकाळातच पुढे यादव साम्राज्याचा अस्त झाला व महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला.\nपुनरुत्थानाच्या काळातील इटली मधील एक कलाकृती\nत्यावेळी इटलीमध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आधाराने नाविण्यपूर्ण विचार रुजण्यास सुरुवात झाली होती. इटली, ग्रीस हे देश युरोपच्या प्रवेशद्वारावर आहेत. चीन पासून युरोप अंतर्गत रेशिम मार्गाने जो व्यापार चालायचा तो प्रामुख्याने याच भागातून होत असे. त्यामुळे इटलीतील शहरांना व्यापारी केंद्रांचे स्वरुप प्राप्त झाले. व्यापार वाढल्याने इटलीतील व्यापारी श्रीमंत होऊ लागले; तसे त्यांनी आपापल्या शहरांची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. याचदरम्यान १३५०च्या सुमारास युरोपला ‘ब्लॅक डेथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामारीने घेरले. परिणामी युरोपची लोकसंख्या कमालीची घसरली. अशाने शेती तसेच व्यवसायात कामगारांची कमतरता निर्माण झाली. कामगारांची मागणी वाढल्याने समाजातील भेदभावाचे बंध आपसुकच ढिले झाले, शिवाय लोकांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारली. त्याकाळी अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने कदाचित माणसास जीवनाचीही किंमत उमगली असावी. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याने प्राचीन तत्त्वज्ञानाने बहुदा पुनःश्च नव्याने जन्म घेतला. येथूनच खर्या अर्थाने ‘रिनेसॉन्स’ म्हणजेच ‘पुनरुत्थान’ होण्यास प्रारंभ झाला असे म्हणता येईल.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n५२. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : कॉन्रॅड जुजा : झेड ३ संगणक\n१०. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : खगोलशास्त्र\n२०. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : ॲनॅलिटिकल इंजिन : भाग १\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकाल���न\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/indias-best-special-forces/", "date_download": "2019-03-25T08:01:20Z", "digest": "sha1:NSOL2S4FZBYBYK3DWT6LQYLLE5LUW7T6", "length": 14053, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "शत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nभारताच्या स्पेशल फोर्सेस या थेट भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली असतात आणि स्पेशल ऑपरेशन्ससाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. भारताच्या याच स्पेशल फोर्सेसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.\nमरीन कमांडोजचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे मार्कोस हे भारतीय नौदलाचे स्पेशल युनिट म्हणून ओळखले जाते. ही फोर्स कोणत्याही दुर्गम भागामध्ये ऑपरेशन पूर्णत्वास नेऊ शकते परंतु मरीन एनव्हाररमेंटमध्ये त्यांचे स्पेशलायझेशन आहे. १९४७ पासून मार्कोस देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. दहशतवाद्यांशी लढणे, नौदला सोबत युद्धात सहभाग आणि संकटात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये मार्कोसने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. शत्रू देश आणि दहशतवाद्यांमध्ये मार्कोसची मोठी भीती आहे. वेळोवेळी मार्कोस इतर देशांसोबत स्पेशल ट्रेनिंगमध्ये देखील सहभागी होते.\nभारताच्या सर्वोत्तम स्पेशल फोर्सपैकी एक फोर्स म्हणजे पारा कमांडोज भारतीय लष्कराचे युनिट म्हणून १९६५ मध्ये या फोर्सची स्थापना करण्यात आली. होस्टेज रेस्क्यू, काउंटर टेररिज्म, पर्सनल रिकवरी यांसारख्या परिस्थिती हाताळण्यामध्ये त्यांनी महारथ संपादन केली आहे. या फोर्समधील जवळपास सर्वच कमांडोजना भारतीय लष्कराच्या पॅराशुट रिजिममधून निवडले जाते. या फोर्समधील कमांडोजना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फीट राहण्यासाठी अतिशय खडतर ट्रेनिंग मधून जावे लागते. १९७१ आणि १९९९ च्या पाकिस्तान सोबतच्या युद्धामध्ये पारा कमांडोजने लक्षणीय कामगिरी केली होती. १९८४ मधील कुप्रसिद्ध ब्ल्यू स्टार ऑपरेशनमध्ये देखील या फोर्सचा सहभाग होता.\nनावाप्रमाणेच ही फोर्स अतिशय घातक आहे. आपल्या पायदलातील सर्वात खतरनाक सैनिकांची ही फौज आहे. घातक फोर्स शत्रूच्या गोटात शिरून तेथील माहिती मिळवून आणण्यासाठी प्रसिद्ध आहे.\nफोर्स वन ही भारताची नुकतीच बनवण्यात आलेली स्पेशल फोर्स आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने फोर्स वनची स्थापना केली. या फोर्सचं काम आहे मुंबई शहराला संरक्षण देणे. जगातील सर्वात चपळ आणि शक्तिशाली फोर्स मध्ये फोर्स वनचा समावेश केला जातो कारण ही फोर्स केवळ १५ मिनिटांत कोणतेही परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली आणू शकते.\nनक्षलवादी दहशतीला ठेचून काढण्यासाठी बनवण्यात आलेली ही स्पेशल फोर्स सी.आर.पी.एफ. चे विशेष युनिट आहे. The Commando Battalion for Resolute Action(COBRA) ची स्थापना २००८ साली करण्यात आली होती. दाट जंगलात, डोंगररांगत नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी यांना विशेष ट्रेनिंग देण्यात येते.\nभारताच्या या शूर फोर्सेसची ताकद आहेत त्यामध्ये असलेले भारताचे शूर वीर त्यांच्या धाडसाला आणि कर्तुत्वाला सलाम \nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← वास्को द गामाचे ऐतिहासिक जहाज ५०० वर्षांनी सापडले\n” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू →\nवातावरणाचा अंदाज लावतानाच्या ‘या’ अंधश्रद्धा चक्क वैज्ञानिक दृष्टीने योग्य आहेत \nजाणून घ्या चक्रीवादळांना नावे देण्यामागचं नेमकं कारण \nOne thought on “शत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces\nPingback: जगातील ११ जबरदस्त स्पेशल फोर्सेस | मराठी pizza\nब्रिटिशांचे क्र १ चे शत्रू शेवटपर्यंत “मराठे”च होते मुघल नव्हे ज्वलंत परंतु अज्ञात इतिहास\nयुद्ध संपलं…पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला\nस्वयंपाक घरातील छोट्या-छोट्या तापदायक गोष्टींवर सोपे उपाय\nक्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात जाणून घ्या यामागचं कारण\nदेशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी\nमाने साहेब मुली कोणाच्याही असोत त्यांना ‘नाचायला’ नव्हे तर ‘वाचायला’ शिकवा\nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\nशीख हत्याकांड घडण्यामागे कारणीभूत असणारी…हीच ती ऐतिहासिक घटना…\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \nसृष्टीसौंदर्याचा अप्रतिम नमुना : जगातील १० सर्वात सुंदर सापांच्या प्रजाती \nचाफेकर बंधूंचे नाव इंग्रजांना सांगणाऱ्या दोन फितुरांचा ‘असा’ धाडसी बदला घेण्यात आला होता..\nगेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे\nशाहजहानची शेवटची इच्छा “काळा ताजमहाल” का नाही बनू शकला\nकोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल\nलोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल ह्या ८ महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nवॉलपेपर आणि वास्तुशास्त्र मिळुन सुधारा आपल्या घराचं स्वास्थ्य\nकमी पैश्यात भारत बघायचा आहे, तर हे ‘बॅकपॅकर्स हॉस्टेल्स’ तुमच्यासाठीच आहेत\n‘ह्या’ प्रसिद्ध राजकारण्यांना तुम्ही ह्या रुपात कधी पाहिलं आहे का\n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\n‘ह्या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/bhairavi-memorable-music-322585/", "date_download": "2019-03-25T08:45:13Z", "digest": "sha1:UNQUTNFDUO4O52G4YVNPZDX62P6L33HX", "length": 27973, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्मरणस्वरांची भैरवी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\n‘अफलातून.. अमुचे गाणे’ हा लेख मी मागच्या गुरुवारी रात्री पूर्ण करून, शुक्रवारी त्यावर अखेरचा हात फिरवून ‘लोकसत्ता’च्या\n‘अफलातून.. अमुचे गाणे’ हा लेख मी मागच्या गुरुवारी रात्री पूर्ण करून, शुक्रवारी त्यावर अखेरचा हात फिरवून ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयाला तो मेल केला. ताज्या लिहिलेल्या लेखाच्या विषयांशी संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला ��ी विशेष उत्सुक असतो. त्यानुसार दिलीप प्रभावळकर, दिलीप कोल्हटकर, ‘अफलातून’ची टीम आणि माझा सुहृद विनय आपटेची प्रतिक्रिया ऐकायला मी उत्सुक होतो. आणि शनिवारी अकस्मात विनयच्या दु:खद निधनाची बातमी कळली. आणि दोन दिवसांपूर्वी लेख लिहिताना जगलेले ते क्षण पुन्हा एकदा मनात रुंजी घालू लागले. अनेकदा मुंबई दूरदर्शन केंद्रावरून विलेपाल्र्यापर्यंत त्याच्यासोबत त्याच्या मोटरबाइकवर बसून केलेला झंझावाती प्रवास आठवत राहिला. आणि ‘अफलातून’च्या तालमींचे झपाटलेले दिवस. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या मराठी युवदर्शन कार्यक्रमांतर्गत मराठी पॉप गाणी करताना संकल्पनेपासून ध्वनिमुद्रणापर्यंत त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या सुंदर स्मृती.. कलेच्या क्षेत्रात स्वत:ला अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून शोधताना स्वत:बरोबरच भोवतालच्या छोटय़ा-मोठय़ा धडपडणाऱ्या कलाकारांना निरपेक्ष बुद्धीनं सदैव मदतीचा हात देणारा, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा विनय आपटे हा एकमेवाद्वितीयम. केवळ स्वत:च्याच उत्कर्षांकरता सदैव धडपडणारे कलाकार खूप असतात. पण विनयसारखा ‘समस्तांसी आधारू’ मित्र वाटय़ाला येणं हे आम्हा सर्वाचं परमभाग्य.\nसुमारे वर्षां-सव्वा वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयातून मला फोन आला. २०१३ मध्ये वर्षभर ‘लोकरंग’ पुरवणीत मला सदर लिहिण्याविषयी सुचवलं. ‘दर आठवडय़ाला लिहिणं माझ्या संगीतकार कारकीर्दीमुळे मला शक्य होणार नाही. पण पंधरवडय़ातून एकदा लिहू शकेनसे वाटते,’ अशा पुष्टीसह मी होकार कळवला. सदराविषयी विचार करताना स्तंभाचं शीर्षक सुचलं.. स्मरणस्वर. वा.. स्मरणस्वर म्हणजे स्वरांची स्मरणे किंवा स्मरणांचे स्वर. माझा संगीतप्रवास- संगीताचा एक अभ्यासक आणि एक संगीतकार म्हणूनसुद्धा. ‘स्मरणस्वर’ या सदरातून मांडायचं ठरवलं. प्रत्येक पंधरवडय़ाच्या सदराकरिता वेगवेगळ्या विषयांची एक कच्ची यादीच तयार केली. सुमारे पस्तीसेक विषय यादीमध्ये होते. अकोल्यापासून सुरू झालेली स्वरांची स्मरणे पुढे पुण्यात येऊन रुजल्यावर आजपर्यंतचा प्रवास मांडत राहिली. सव्वीस भागांच्या ‘स्मरणस्वर’मध्ये संगीतकार म्हणून पन्नासहून अधिक चित्रपट, खासगी ध्वनिफिती, म्युझिक अल्बम्स आणि शब्दवेध या संस्थेच्या माध्यमातून सादर झालेले अभिजात कवितेचे सांगीति��� रंगमंचीय आविष्कार अशा विविध माध्यमांतील माझ्या (संगीतकार रूपातल्या) मुशाफिरीचा समावेश करता आला नाही. त्याचप्रमाणे चित्रपटगीतांचे चित्रपटातील प्रभावी दृश्यात्म रूप आणि योजन, प्रतिभावंत म्युझिक अरेन्जर्स, आवडते संगीतकार, चित्रपट संगीतातले एतद्देशीय आणि विदेशी संगीतप्रवाहांचे योगदान, मराठी भावसंगीत १९४०-२०१३, चित्रपटगीतांतले नवे प्रयोग असे अनेक विषय अभ्यासक म्हणून डोळ्यांसमोर होते. त्यावरही लिहायचे राहून गेले. तरीसुद्धा तुमच्याशी ‘स्मरणस्वर’मधून संवाद करता करता निरोपाची वेळ कधी आली कळलंच नाही. जैन धर्मामध्ये एक छान परंपरा आहे. ती म्हणजे क्षमायाचना दिवस. तर तुम्हा सर्वाचा निरोप घेताना सर्वप्रथम (केवळ स्मरणांवर विसंबून राहिल्यानं) कुंदनलाल सैगलऐवजी कृष्णलाल सैगल किंवा ‘चांदनी आई घर जलाने’ (गीतकार हसरत जयपुरीऐवजी शैलेंद्र) आणि ‘घर से चले गये थे खुशी की तलाश में’ (गीतकार राजेंद्र कृष्णऐवजी साहिर लुधियानवी) असे चुकीचे नामनिर्देश माझ्याकडून झाले. (त्यानंतर मात्र मी अधिक काटेकोरपणे सर्व तपशिलांची खातरजमा करूनच मग लेख पाठवले.) अर्थात तुमच्यातल्या जाणकार सुहृदांनी मला ई-मेलद्वारा अगर एसेमेसद्वारा ते माझ्या निदर्शनाला आणून दिलं. त्याबद्दल त्या सर्वाचे आणि तुम्हा साऱ्यांचेही मन:पूर्वक आभार. मात्र, माझ्या ‘सर्वव्यापी यमन’ या लेखात चित्रपटगीतात दुरान्वयेही- म्हणजे एखाद्या ओळीमध्ये जरी पाऊसविषयक प्रतिमा वा प्रत्यक्ष संदर्भ असेल तर मल्हार रागात ते गीत स्वरबद्ध करणाऱ्या एका ज्येष्ठ संगीतकारांचा (त्यांच्याविषयी वाटणाऱ्या निखळ आदरभावनेपोटी त्यांचा नामनिर्देश न करता) संदर्भ दिला असता त्यांच्या काही मनस्वी चाहत्यांच्या भावना अतिशय दुखावल्यानं अत्यंत तीव्र व असंस्कृत पद्धतीनं त्यांनी ई-मेलद्वारा त्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या. त्यामध्ये ‘त्यांच्या लाडक्या संगीतकारांच्या तुलनेत मी किती फालतू आणि सुमार संगीतकार आहे’ इथपासून ते ‘दोन-चार प्रसिद्ध कलाकारांनी माझे विनाकारण स्तोम माजवले आहे,’ इथपर्यंत- तसेच ‘साऱ्या महाराष्ट्राला माझं एकही गाणं माहीत नाही इतका मी नगण्य आहे’ अशा शब्दांत माझ्या लायकीची आवर्जून जाणीवही मला करून द्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पण मी अगदी अंत:करणपूर्वक सांगतो की, साऱ्या संगीतकार पूर्वसुरींची गाणी- यात ‘ते’ही संगीतकार आले- ऐकताना मला नेहमी वाटत राहतं, की इतकं सुंदर गाणं माझ्या हातून कधी होईल मी स्वत:ला नेहमी त्यांच्या पायाशीच ठेवतो. मी त्या मनस्वी चाहत्यांच्या भावनांचा त्यांच्या लाडक्या संगीतकारांइतकाच आदर करतो. त्या ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकारांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा संपूर्णत: आदर करताना त्यांच्या एखाद्या न पटलेल्या गोष्टींविषयी प्रतिकूल मत व्यक्त करण्याचा एक सच्चा अभ्यासक म्हणून असलेला माझा अधिकार कुणीही नाकारू नये. ‘स्मरणस्वर’चे सर्व लेख लिहिताना माझे मन वर्तमानातून भूतकाळात झेपावताना तो- तो काळ.. ते- ते क्षण.. ती गाणी पुन्हा नव्यानं जगण्याचा, अनुभवण्याचा आनंद मिळाला. पाच मे’च्या ‘लोकरंग’मध्ये प्रकाशित ‘गाये लता.. गाये लता’ या लेखानंतर नेहमीप्रमाणे रसिकांच्या, मित्रांच्या कौतुकभरल्या प्रतिक्रिया सोमवार-मंगळवार येत राहिल्या. आणि बुधवार, आठ मे रोजी दुपारी एक फोन आला.. ‘नमस्कार. मी लता मंगेशकर बोलतेय..’ साक्षात् लतादीदी फोनवर होत्या. लतादीदींनी माझ्या लेखाचं खूप कौतुक केलं. सुमारे दहा मिनिटे त्या माझ्याशी बोलत होत्या. मी त्यांना म्हणालो, ‘माझ्यासाठी आजचा हा दिवस मी तुम्हाला ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ गाताना ज्या दिवशी अनुभवलं, त्या दिवसाइतकाच भाग्याचा आहे..’ आदरणीय लतादीदींच्या अशा सुंदर दादेपेक्षा मोठा पुरस्कार तो कोणता\n‘स्मरणस्वर’मधील लेखांच्या विषय-आशयाच्या अनुषंगाने अनुरूप चित्रे-रेखाटनांद्वारे लेखांच्या प्रस्तुतीत रंग भरणारे चित्रकार निलेश जाधव यांचाही मला कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावासा वाटतो.\nखंत एकच राहिली. ती म्हणजे माझे हे लेख वाचायला माझ्या आईला फार आवडले असते. तिनेच शाळेच्या पहिल्या इयत्तेत मी जाण्यापूर्वी मला लिहायला, वाचायला शिकवले. वाचन व संगीताची आवड जोपासली. तसेच माझ्या आजवरच्या प्रवासातले संगीतवेडे सुहृद.. माझा मितवा मोहन गोखले, अलूरकर म्युझिक हाऊसचे सुरेश अलूरकर, सुरेल दोस्त अजित सोमण यांच्या ‘स्मरणस्वर’वरच्या प्रतिक्रिया मला कधीच मिळणार नाहीत. त्यांची उणीव प्रकर्षांनं जाणवते.\nसंगीत ही ईश्वरानं मनुष्यप्राण्याला दिलेली अमोल अशी देणगी आहे. मानवी जीवन अनेक अर्थानी संगीतानं समृद्ध केलंय. प्रतिभावंत गायक, गायिका, वादक यांच्या कलाविष्कारांनी क���टय़वधी माणसांची आयुष्यं समृद्ध केली आहेत. अजूनही उत्तररात्रीपर्यंत यू-टय़ूबवर जगातल्या नाना संगीतशैलींतल्या संगीताचा आस्वाद घेताना मी मनोमन ईश्वराचे आभार मानतो. बेथोवन, मोत्झार्त, शुबर्ट यांच्यासारख्यांच्या अभिजात सिम्फनीज् किंवा बीटल्स, आब्बा, स्टीव्ही वंडर्स, जीम रीव्ह्ज कारपेंटर्स, व्हिटनी ह्युस्टन, बेलाफोंटे, नील डायमंड अशा पाश्चात्त्य लोकप्रिय गायकांच्या गाण्यांबरोबरच आफ्रिकन/ लॅटिन अमेरिकन तसेच मध्यपूर्वेतले संगीत तसेच अतिपूर्वेकडील थाई, इंडोनेशियन, जपानी व चिनी संगीताचाही आस्वाद घेत राहतो. आणि आपल्या भारतातले विविध प्रांतांतील प्रादेशिक लोक/सुगम/चित्रपट संगीत तर केवढेतरी वैविध्यपूर्ण. त्याच्याच जोडीला बडे गुलाम अली खॉं साहेबांपासून अजय चक्रवर्तीपर्यंत.. केसरबाई केरकरांपासून आरती अंकलीकपर्यंत.. कुमार गंधर्वापासून उल्हास कशाळकरांपर्यंत.. उस्ताद अल्लाउद्दिन खॉं साहेबांपासून शहीद परवेझपर्यंत.. बिस्मिल्ला खॉंसाहेबांपासून हरिप्रसाद चौरासियांपर्यंत.. उस्ताद नजाकत अली/ सलामत अलींपासून उस्ताद रशीद खानपर्यंत आणि उस्ताद अहमदजान तिरखवा साहेबांपासून ते उस्ताद झाकीर हुसेनपर्यंत भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा वैविध्यपूर्ण अनमोल खजिना.. हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने माझ्या अक्षरश: हाताच्या बोटाशी उपलब्ध आहेत. विज्ञानाची ही केवढी मोठी देणगी आहे. साऱ्या वाटचालीत मी जमेल तेव्हा, जमेल तिथून सुरांची भिक्षा मागत आलोय. अजूनही मागतोय. आणि त्यातूनच समृद्ध होतोय. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुरेल वळणावर.. जुन्या स्मरणांच्या नव्या स्वरावलींसह. तूर्त तुम्हा सर्वाना येणाऱ्या नव्या वर्षांत उत्तम आरोग्य, मन:स्वास्थ्य व उज्ज्वल भविष्यासाठी माझ्यातर्फे अनेकोत्तम सुरेल शुभेच्छा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसृजनशीलतेअभावी सध्याचे संगीत यांत्रिक\n#WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/panvel-girl-cycles-1800-kilometers-to-kanyakumari-alone-in-19-days-1218984/", "date_download": "2019-03-25T08:17:26Z", "digest": "sha1:VQHQL5JLIYKCFQCV5WTCMYUGKNG6ADIO", "length": 34972, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सुहाना सफर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nएक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते\nतुमच्या आमच्यासारख्या घरातलीच एक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते- एकटीने..\nअगदीच लहान म्हणजेच पाच-सहा महिन्यांची असल्यापासून आई-बाबांनी मला डोंगरदऱ्यांमध्ये भटकवलं. तेवढेच नाही तर सायकल चालवता येत नव्हती तेव्हा तर जुन्या घोडासायकलच्या मागे किंवा पुढच्या छोटय़ाशा सीटवर बसवून पनवेलच्या ३०-४० किमीच्या आसपास असलेल्या गावात किंवा ठिकाणी फिरवलं आणि याच सगळ्याबरोबर मला निसर्गात कसं वागावं, कसं राहावं हे सगळं शिकवलं. या सगळ्या गोष्टींमुळे मला निसर्ग समजला. मुळात फिरायला प्रत्येकाला आवडतं. तसंच आमचं एक कुटुंब. त्यामुळे मला आपल्या देशातल्या काही ठिकाणांबद्दल तर चांगलंच माहिती होतं. कारण ते फिरून झालं होतं.\nया सगळ्या आवडींमुळेच माझे मग माउंटेनिअरिंगचे बेसिक व अॅडव्हान्स कोर्स पूर्ण झाले आणि मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन, पण या काळात माझं थोडंफार सायकलिंगसुद्धा चालू होतं. पनवेलच्या आसपासच्या ठिकाणी जाणं रोजचे ७०-८० किमी सायकलिंग करणे. सर्वात पहिलं मी मनाली ते खारदुंगला हा ६०० किमीचा प्���वास केला. वायएचएआयने (यूथ होस्टेल) २०११ मध्ये आयोजित केलेला. तेव्हा कळालं की आपण जास्त किमीचं सायकलिंगपण करू शकतो. मग २०१५ मध्ये आम्ही सहाजण, मी एकटी मुलगी ग्रुपमध्ये असे निघालो. पनवेल ते ओडिसा एकूण २२०० किमी झाले. त्यात सायकलवरून. या सगळ्या गोष्टी करताना माझा स्वत:वरचा विश्वास वाढत होता. माझ्यातल्या बारीकसारीक गोष्टी मला कळत होत्या आणि हे सगळं करताना मला समजलं की माझ्या ओळखीतल्या दोन जणांनी सोलो सायकलिंग केलंय. एकाने भारत परिक्रमा तर दुसऱ्याने पनवेल ते सियाचीन बेसकॅम्प. आणि काही परदेशी मुलींनीपण केलंय. मग सगळी चक्रं फिरायला लागली. आपण असा प्रवास करू शकतो का कसा करायचा आणि का करायचा हे सगळं चालू असताना ठरलं, पनवेल ते कन्याकुमारी असा एकटीने प्रवास सायकलवर आणि कुठलीही मदतनीस गाडी न घेता हा प्रवास करायचा. नाव दिलं ‘आय प्राइड’.\nआता हे नुसतं ठरवून चालत नाही. कारण एकटय़ाने बाहेर पडणं म्हणजे मागे बऱ्याच गोष्टी लागतात. ते म्हणजे नियोजन करणं. स्वत:ची मानसिक आणि शारीरिक तयारी करणं. त्यातूनपण सर्वात महत्त्वाचं घरच्यांची परवानगी मिळणं आणि हे सगळं करणारी मुलगी असेल तर अजून बऱ्याच गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी माझ्या प्रवासाची तयारी करत होते. पण घरातून सगळ्यांचा होकार मिळणं महत्त्वाचं होतं आणि तो पूर्ण होकार मला दिवस अगोदर मिळाला. मुळात प्रवासाची तयारी मी दोन महिने अगोदरच चालू केली होती. तयारीत महत्त्वाचा म्हणजे रस्ता. दिवसाचं गणित जुळवणं, एका दिवसात किती किमी जायचं ठरवणं, प्रॅक्टिस हे सगळंच. गोष्टींची जमवाजमव हे सगळंच आणि मग आला तो निघायचा दिवस. घरातून बरीच माणसं होती. मित्रमंडळी, सगळीच तयारी चालू होती, त्यामुळे आई-बाबांशी बोलायला मिळत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत सगळे होते आणि मग मिळाला तो वेळ बोलायला. नेहमी गप्पा मारणारे माझे आई-बाबा खूप शांत होते. पण शेवटी भावना व्यक्त करणं गरजेचं होतं. बोलणं चालू झालं आणि बाबांच्या डोळ्यांत पटकन अश्रू आले. मलाही राहवलं नाही. कारण हे सगळं करताना मला काही झालं तर याची भीती होती. पण मानसिक तयारी पूर्ण होती. झालेल्या प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडून परत आयुष्य जगायची मुळात हा सगळा प्रवास कम्फर्ट झोन सोडून काहीतरी वेगळं करण्यासाठी होता. स्वत:ला शोधण्यासाठी होता. त्यामुळे निघणं भागच हो��ं. मनावर दगड ठेवून पहिल्या दिवशी पॅडलिंग करायला सुरुवात केली आणि मी जीवनाला नवीन अर्थ देत गेले. आता वाटेत येणाऱ्या गोष्टींवर मात करत मला पुढे जायचं होतं.\nआता प्रवास चालू झाला हाता. माझ्यासाठी महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे पनवेल ते गोवा घाट मार्ग आणि उतार. पूर्ण दिवसात मला माझ्या ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मार्गक्रमण करायचं होतं. सकाळी लवकर उठणं-आवरणं. बॅग भरणं, ती सायकलला लावणं, मध्येच नाष्टा आणि जेवणाच्या वेळा पाळणं आणि संध्याकाळचं राहायच्या जागा शोधणं आणि माझा ब्लॉग रोज अपडेट करणं. या ब्लॉगमुळे मी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत होते. यामुळेच लोक आता माझ्या नजरेतून जग पाहणार होते. आणि याच ब्लॉग आणि फेसबुक पेजमुळे मला काही राहायची ठिकाणं मिळत गेली.\nमी सायकलवर होते. प्रवास आता माझा आणि सायकलचा होता. त्यामुळे आम्हा दोघींची काळजी घेणं मला गरजेचं होतं. सायकल हे असं माध्यम आहे की जे लोकांना जोडतं. मला आता माणसं मिळत चालली होती. मला लोकांमधले बदल जाणवत होते. माती बदललेली जाणवत होती. रस्ते, निसर्ग सगळंच. मी माझ्या रोजच्या वेळापत्रकाचे पालन करायचे. त्यामुळे वेळेत त्या ठिकाणी पोचायचे. रोजच्या प्रवासात मी खूप लोकांना भेटायचे. त्यांच्याशी गप्पा मारायचे. हे गप्पा मारणं महाराष्ट्रात असेपर्यंत ठीक होतं. कारण मराठी हे आमच्यातलं साम्य होतं. पण आता गोव्यापर्यंतचा कठीण टप्पा मी पार केला होता आणि एका नवीन राज्यात आले होते ते म्हणजे कर्नाटक. कर्नाटकातपण काही ठिकाणी कोकणी किंवा मराठी बोललं जातं. पण पुढे केरळात तर फक्त इंग्रजी, पण एकदम बेसिक. पण गप्पा असायच्याच. लोकांना मला बघून काय बोलावं हे सुचायचं नाही, पण माझा त्यांच्यावरचा विश्वास बघून मग ते बिनधास्त बोलायचे. मुळात आपल्याकडे कधी मुली एकटय़ा फार कमीच जातात; त्यामुळे मी कोणीतरी परदेशी मुलगी असावीअसं पहिलं मत. त्यात माझं नावही तसंच प्रिसिलिया. मग त्यांचे ते टिपिकल प्रश्न- एकटीच आहेस एकटीच का कशाला करतेस वगैरे वगैरे. या सगळ्यांची समाधानकारक उत्तरं मिळाली की त्यांना कळायचं की मुलीपण एकटय़ाने फिरू शकतात. अशी ही भेटलेली माणसं. माझं हे सगळं ऐकल्यावर ज्यूस, जेवण अशा गोष्टी ऑफर करायचे. काहींना तर त्यांच्या घरी माझ्याबद्दल सांगावंसं वाटायचं. मग मला फोन देऊन बोलायला सांगायचं असं काहीही\nया पूर्ण ��्रवासात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. वाईट म्हणजे मुलींना नेहमी कमी लेखणारे, सायकलला कमी लेखणारे अनुभव आले. पण चांगले अनुभव एवढे होते की मी ते वाईट अनुभव विसरूनपण गेले. प्रवासात रस्ता जसा बदलत गेला तशी माणसंही. पण मला वाईट एकच वाटे ते बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचं जे जोरदार वाहनांच्या धक्क्यांनी मेलेले आणि चिरडले गेलेले. मी राइडमध्ये काय चांगलं काम केलं तर त्या सगळ्या मृत प्राण्यांना रस्त्याच्या बाजूला काढलं.\nमला या सगळ्या प्रवासात एक जाणवलं की, आपण जेवढे साधे राहतो तेवढेच लोक आपल्याला त्यांच्यातलाच एक मानतात आणि मी साध्या कपडय़ात असल्यामुळे मला बरेच जण स्वत:हून हात करायचे आणि बोलायचे.\nया प्रवासात माझ्या सायकलचं मी एकही पंक्चर नाही काढलं किंवा तिचं इतर काही कामपण नाही. फक्त एकदा मागच्या ब्रेकचं काम करावं लागलं तेवढंच. बाकी तिचं आणि माझं छानच जुळलं होतं. मुळात मी उन्हात जास्त सायकल चालवायचे नाही. कारण दोन, एकतर मला जास्त उन्हात थोडा त्रास होतो आणि दुसरं आपल्याकडे एनएच १७ मार्गाचं खूप मोठय़ा प्रमाणावर काम चालू आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हाच्या वेळी बसायला किंवा नुसतं थांबायला जागा नसायची म्हणून मग मी जिथे मिळेल तिथे थांबायचे. जास्त वेळ नाही, पण उन्हाच्या वेळी एक-एक तासानी ५-१० मिनिटांचा ब्रेक. त्यामुळेच आम्ही दोघी एकदम मजेत असायचो. (मी, सायकल)\nआता बोलायचं निसर्गाबद्दल, तर केरळ म्हटल्यावर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर सुंदर निसर्ग उभा राहतो. तेच मला जाणवलं. अप्रतिम निसर्ग आणि तशीच छान माणसं. केरळमध्ये तर मला खूप प्रसिद्धी मिळाली असं म्हणता येईल. कारण अगदी चार-पाच वर्तमानपत्रांनी माझ्याबद्दल लिहिलं होतं जे पत्रकार मला वाटेत भेटले होते त्यांनीच.\nमाझ्यासाठी केरळातला अनुभव काही औरच होता. ते म्हणजे या बातम्या बघून मला काही कॉलेजांत बोलावलं होतं, असंच त्यांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला. मग काय मला तर तेव्हा मी सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटत होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं भाषण ऐकायला जवळजवळ ५००-६०० मुलं-मुली हजर होती. हे झाल्यावर माझ्याबरोबर फोटो काढणं आणि सगळंच. मुळात त्यांच्यासाठी मी एक आयडॉल होते. एक २२ वर्षीय तरुणी आपला अभ्यास सांभाळून हे असं करते. मुळात त्यांच्या शिक्षकांनीच मला त्यांच्या या विषयावर बोलायला सां��ितलं होतं आणि माझा कलच हा आहे की आपल्याला आवडेल त्या गोष्टी करा, तरच तुम्हाला अनुभव मिळतील आणि आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी माणूस कसा तरी वेळ काढतोच ना. कॉलेज लेक्चरनंतर माझ्यात जास्त आत्मविश्वास आला. आणि या सगळ्यातूनच फक्त माझी राइड वेगळं वळण घेत गेली. लोकांपुढे चांगलं उदाहरण देत गेली आणि लोक मला प्रचंडपणे पाठिंबा देत राहिले. यातूनच मी पूर्ण केरळात पोचले. प्रत्येक माणूस मला ओळखत होता. यातूनच माझ्या जीवनाला अजून नवनवीन दिशा मिळाल्या.\nआता काहीच दिवस राहिले होते माझं स्वप्न पूर्ण व्हायला. हा पूर्ण प्रवास कसा पटकन झाला हे कळलंच नव्हतं. निघायच्या अगोदरची मी आणि प्रवासात आता असलेली मी यातील फरक मला जाणवत होता. उजाडला तो दिवस ज्या दिवशी मी कन्याकुमारीला पोचणार होते. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आणि सोप्पा नसतो हे त्या दिवसात खूप जाणवलं. शेवटच्या दिवशी तर प्रचंड उलटा वारा जो माझ्या स्वप्नांना रोखत होता. त्यातच मी रस्त्याच्या कडेला पडणं सगळंच. पण त्यातूनपण पूर्ण क्षमता लावली व पोचले ते थेट त्रिवेणी संगमावर दुपारी चार वाजता. तो दिवस जीवनातला एक आनंदाचा दिवस. स्वत:च्या क्षमतेवर जेव्हा एखादं ठिकाण आणि धैर्य गाठतो त्याचा आनंद काही औरच आणि त्यात ते एकटय़ाने साजरं करणं अजूनच काही नवीन. मी तिकडे पोचल्यावर फोटो काढण्याच्या धडपडीत होते. अशी धडपड तिकडे पोचणारा प्रत्येक माणूस करत असतो. पण जो सायकलने तिथे पोचतो त्याला ते खूपच महत्त्वाचं असतं. माझी ही फोटो काढायची धडपड तिथले दुकानदार बघत होते. त्यांनीच शेवटी माझी सायकल त्या सगळ्या १७ किलोच्या सामानासकट अगदी समुद्राजवळ नेऊन दिली आणि काढले फोटो. आता माझ्याकडे सूर्यास्तासाठी बराच वेळ होता. त्यामुळे मी एक शांत जागा शोधत तिथे बसले. सूर्यास्त बघायला आणि त्याचबरोबर अथांग समुद्राकडे बघत. हे मला नेहमी करायला आवडतं. आता समुद्राकडे बघत मी माझी नवीन स्वप्नं बघत होते. मला नेहमीच समुद्रासारखं मोठं व्हायला आवडेल. एवढा मोठा समुद्र सगळ्या व किती मोठय़ा दु:खाच्या गोष्टी पोटात घालतो आणि किनाऱ्याला माणसांना भेटतो तिथे अगदी नम्रपणे आणि शांत असतो. मी तिकडे किनाऱ्यावर बराच वेळ होते. नंतर तिथले काही पत्रकार मला भेटायला आले. त्यांनीपण दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात माझ्याबद्दल लिहिलं. तिथेपण एका कॉलेजमध्ये बोलावलं होतं. तिकडे तीन दिवस गेले. नंतर दुसऱ्या दिवशी विवेकानंद स्मारक पाहणं आणि सगळं. असेच माझे तीन दिवस गेले. आता परतीचा प्रवास चालू होणार होता ट्रेनने. ट्रेनमध्ये सायकल लगेजमध्ये न्यावी लागते. त्यासाठी तिची पॅकिंग चालू झाली. मग पॅकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी मला शोधाव्या लागल्या. पेपर, गोणपाट, वगैरे आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला तो कन्याकुमारी एक्स्प्रेसने.\nट्रेनच्या प्रवासातपण आजूबाजूच्या लोकांनी मला ओळखलं होतं, कारण त्यांनीही माझ्याबद्दल वाचलं होतं. या प्रवासात जवळजवळ तीन दिवस मला गाडीत काढायचे होते. मग तेव्हाच वेळ मिळाला मला माझ्याबद्दल पूर्ण विचार करायला.\nया सगळ्या एकटीने केलेल्या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं. आपण जर लोकांवर विश्वास ठेवला तर तेही आपल्यावर विश्वास ठेवतात आणि चांगलंच वागतात. काही प्रसंगांनंतर मी सगळ्यांशीच बोलायला आणि विश्वास ठेवायला लागले. मी आता खूप जास्त पॉझिटिव्ह झाले आहे. हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. ठामपणे नाही म्हणायला शिकवलं आणि नाही स्वीकारायलापण. ठिकाण कुठलंही असो, महत्त्वाचा असतो तो त्यासाठी केलेला प्रवास आणि लावलेली क्षमता. याच्यातूनच मी स्वत:ला गवसत गेले आणि मिळाले मी मला.\nया एकूणच प्रवासात मला अनेक जणांनी मदत केली. मग ती राइडला निघायच्या अगोदर, प्रवासात व नंतरही त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. हीच सगळी लोकं महत्त्वाची होती. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आणि माझं एक स्वप्न पूर्ण झालं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nध��कादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/shyama-prasad-mukherjee-idol-in-kolkata-trying-to-break-soak/articleshow/63197878.cms", "date_download": "2019-03-25T08:51:03Z", "digest": "sha1:ORQ3AAKI6FVDQVFKZXAUVPHISSLM2Q3Q", "length": 12680, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shyama prasad mukherjee idol: श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची नासधूस - shyama prasad mukherjee idol in kolkata trying to break soak | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nश्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची नासधूस\nरशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याचा बदला म्हणून कोलकाता येथे जनसंघाचे नेते दिवंगत श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याचीही नासधूस करण्यात आली आहे. मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळंही फासण्यात आलं असून याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.\nभारताचा POKमध्ये हल्ला; १०...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींच...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट...\nकोलकाता: रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याचा बदला म्हणून कोलकाता येथे जनसंघाचे नेते दिवंगत श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याचीही नासधूस करण्यात आली आहे. मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळंही फासण्यात आलं असून याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.\nकोलकातामधील टॉलीगंज येथे केवायसी पार्कमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा अर्ध पुतळा उभारण्यात आला आहे. आज सकाळी ८ च्या सुमारास श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा पुतळ्याला काळं फासून या पुतळ्याची नासधूस करण्यात आली. जाधवपूर विद्यापीठाच्या सहा विद्यार्थ्यांनी या मूर्तीची नासधूस केली असावी असा पोलिसांचा संशय असून या सहाही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सहा विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थीनीचा समावेश आहे. मुखर्जी यांच्या पुतळ्याची नासधूस केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी तिथे एक पोस्टर लावले असून लेनिनचा पुतळा तोडण्याचा बदला घेतल्याचं त्यावर लिहिलेलं आहे. हे विद्यार्थी कडवे मार्क्सवादी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी मुखर्जी य��ंच्या पुतळ्याची साफसफाई सुरू केली आहे. कोलकाता भाजपने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. भाजपचे प्रदेश सचिव शांतनू वसू यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयानेही गंभीर दखल घेतली आहे. देशात पुतळे तोडण्याच्या घटना घडत असून या घटना रोखण्याचे निर्देशच गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.\nIn Videos: श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची नासधूस\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\n220 club: भाजपमध्ये नरेंद्र मोदींविरोधात '२२० क्लब'\nair strike: हवाई हल्ला: मोदींचा पित्रोदांवर पलटवार\nNirav Modi : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला लंडनमध्ये ...\nपाकिस्तानच्या नागरिकांना PM मोदींच्या शुभेच्छा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nश्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची नासधूस...\nपुतळ्यांची तोडफोड रोखा, मोदींचे निर्देश...\nतामिळनाडूत भाजप कार्यालयावर बॉम्ब हल्ला...\nमी हिंदू आहे, ईद साजरी करत नाही: योगी...\nएअरसेल प्रकरणात चिदंबरम सामील : ईडीचा दावा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/punenagar-news/satara-karmala-st-bus-major-accident-1275259/", "date_download": "2019-03-25T08:24:14Z", "digest": "sha1:4LTSPTLRWPWOO4QCLZUL3S4Y74AH6YLL", "length": 8832, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "satara karmala st bus major accident | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअकलूजजवळ ‘एसटी’च्या भीषण अपघातात ३ ठार, तर २२ जण जखमी\nअकलूजजवळ ‘एसटी’च्या भीषण अपघातात ३ ठार, तर २२ जण जखमी\nमृतांची ओखळ पटविण्यात देखील अडचण येत आहे\nसातऱयाहून करमाळ्याला जाणाऱया एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीर ठार झाले असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अकलूजजवळ हा अपघात झाला असून, एका दुचाकीला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, एसटीचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मृतांची ओखळ पटविण्यात देखील अडचण येत आहे. अपघातात ठार झालेल्या तीन जणांपैकी आतापर्यंत एकाची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/795", "date_download": "2019-03-25T08:42:23Z", "digest": "sha1:F5GJI5JLVVMPW2W45EBK6J4PFBUALOVW", "length": 10673, "nlines": 130, "source_domain": "gangadharmute.com", "title": " नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते? | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण म��झ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\nमुखपृष्ठ / नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 24/06/2015 - 08:39 ह्यावेळी प्रकाशित केले.\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\nगरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते\nसरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते\nहिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं\nअस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं\nटोणग्याच्या पाठीवर मलमली झूल\nम्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल\nसाल बदललं तरीबी हाल बदलत नसते\nसातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला\nसामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला\nअकलेचे कांदे बदबद पिकले\nनाकाचे नकटे प्रवचन शिकले\nसमज ना उमज पण खुर्चीत धसते\nजुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते\nशेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते\nशोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे\nतीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे\nशेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते\nउठसूठ होयनोय पाखुरा करते\n'मुक्या'च्या चुलीपाशी झाडलोट करते\nगावातला 'मुका' इथं फास घेऊन मरते\nपोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते\n'अभय'तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते\n- गंगाधर मुटे 'अभय'\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/maratha-kranti-morcha-kakasaheb-shinde-jump-in-godavari-river/", "date_download": "2019-03-25T07:44:55Z", "digest": "sha1:Z3UAIH7BNMF2CIEHTMGUTDWDCOS33V6M", "length": 6350, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर काकासाहेबचे प्राण वाचले असते ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ...तर काकासाहेबचे प्राण वाचले असते \n...तर काकासाहेबचे प्राण वाचले असते \n‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर सोमवारी कायगाव येथे गोदावरी नदीत उड्या घेऊन आम्ही सामूहिक जलसमाधी घेऊ’ असा इशारा सकल मराठा समाजाने रविवारीच रीतसर निवेदन देऊन दिला होता. मात्र, या इशार्याकडे आणि निवेदनाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळे काकासाहेब शिंदे या युवकाचे प्राण गेले, हे आता स्पष्ट झाले आहे.\nमराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्र पेटलेला आहे. ठिकठिकाणी हिंसक आणि उग्र आंदोलने होत आहेत. गंगापूर येथेही गेल्या चार दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत होते. रविवारीच या कार्यकर्त्यांनी जर आरक्षणाबाबत शासनाने ठोस भूमिका घेतली नाही तर सोमवारी आम्ही कायगाव येथे सकाळी ठिय्या मांडू आणि दुपारी तीन वाजता गोदावरी नदी��� उड्या मारून सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला होता.\nरोखण्याची व्यवस्थाच केली नाही\nमराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या सामूहिक जलसमाधीच्या इशार्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळे कायगाव येथे हे आंदोलन रोखण्यासाठी किंवा काही दुर्घटना घडल्यास तिचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कोणतीच व्यवस्था केली नव्हती. वास्तविक पाहता कायगाव येथे प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तेथे सकाळी केवळ 15 ते 20 पोलिस कर्मचारी होते. वरिष्ठ एकही अधिकारी नव्हता. प्रशासनाकडून एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही. जर आंदोलकांनी गोदावरीत उड्या मारल्या तर त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि पाणबुडे तेथे तैनात ठेवणे गरजेचे होते. तीही व्यवस्था प्रशासनाने केली नव्हती. प्रशासनाची हीच चूक आणि हलगर्जीपणा भोवला. जर प्रशासनाने येथे मोठा पोलिस बंदोबस्त, अग्निशमनचे जवान, पाणबुडे ठेवले असते तर कदाचित आंदोलनकर्त्या काकासाहेब शिंदेचे प्राण वाचू शकले असते.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/result-12-th-class-loss-karnatka/", "date_download": "2019-03-25T07:43:32Z", "digest": "sha1:AYUUNC33X4OXGTDVAOH6QVDUK7BXV2TB", "length": 7704, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावी निकाल: बेळगाव, चिकोडीची घसरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बारावी निकाल: बेळगाव, चिकोडीची घसरण\nबारावी निकाल: बेळगाव, चिकोडीची घसरण\nबारावी निकालात यंदा बेळगाव आणि चिक्कोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांची घसरण झाली आहे. बेळगाव जिल्हा 25 वरून 29 व्या स्थानी घसरला आहे. तर चिकोडी जिल्हा तिसर्या स्थानावरून चक्क तळाशी म्हणजे 34 व्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, राज्याच्या एकूण निकाल 59 टक्��े असून, त्यातही मुलींनीच बाजी मारली आहे.\nबारावीचा निकाल सोमवारी सकाळी 11 पासून वेबसाईटवर जाहीर झाला. तो निकाल मोबाईलवर पाहण्यात विद्यार्थी दंग होते. मंगळवार 1 मे रोजी कॉलेजमध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहे.\nराज्याचा निकाल 59.56 टक्के लागला असून विद्यार्थिनींचे उत्तीर्ण प्रमाण 64.11 टक्के तर, विद्यार्थ्यांचे 52.30 टक्के आहे. राज्यात मंगळूर जिल्हा प्रथम स्थानावर (91.49 टक्के), उडपी (90.67 टक्के) द्वितीय, कोडगु (83.94 टक्के) तिसर्या स्थानी आहे. परीक्षेला बसलेल्या 6 लाख, 85 हजार 713 विद्यार्थ्यांपैकी 4 लाख, 8 हजार 421 विद्यार्थी उत्तीणर्र् झाले आहेत.\nगतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nबेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात केवळ 54.28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.\nचार वर्षापूर्वी चिकोडी शैक्षणिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता. तो दोन वर्षापूर्वी तिसर्या क्रमांकावर आला. यंदा जिल्हा 52.2 टक्के निकालासह शेवटच्या 34 व्या स्थानी आहे.\nउच्च श्रेणीमध्ये 54, 692 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. 60 टक्के ते 85 टक्के गुण मिळवणार्यांची संख्या 2, 13, 611 तर 60 टक्क्यांहून कमी गुणधारकांची संख्या 82, 532 आहे.\n25 सरकारी महाविद्यालये, 2 अनुदानित महाविद्यालये व 41 विनाअनुदानित अशा एकूण 68 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला असून या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाकडे शिफारस करण्यात आली असल्याची माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका पी.शिखा यानी दिली.\nकला शाखेत सर्वाधिक गुण स्वाती कोट्ठुरू 595 गुण, रमेश 593 गुण व काव्यांजली गोरवर 588 गुण मिळवून अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले आहेत. हे तिघेही बळ्ळारी जिल्ह्याच्या कोट्टूर येथील हिंदू महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.\nउत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 14 मे आहे. प्रत्येक विषयासाठी 1670 शुल्क आहे. शुल्क भरण्यासाठी 15 मे अखेरची मुदत असेल. उत्तरपत्रिकेची स्कॅनिंग प्रत मिळविण्यासाठी प्रत्येक विषयाला रु.530 शुल्क असेल. पुरवणी परीक्षा 8 ते 20 जूनपर्यंत होईल, अशी माहिती संचालिका शिखा यानी दिली.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sambhaji-Bhide-assembly-in-Chiplun-protested-against-14-organizations/", "date_download": "2019-03-25T08:33:21Z", "digest": "sha1:ZCWHJJS6L7HIYVJXK4IXM53JR5N4BSAA", "length": 7467, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिडे गुरुजींच्या बैठकीदरम्यान तीव्र निदर्शने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भिडे गुरुजींच्या बैठकीदरम्यान तीव्र निदर्शने\nभिडे गुरुजींच्या बैठकीदरम्यान तीव्र निदर्शने\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nशिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चिपळुणात बुधवारी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. एका बाजूला गुरुजींच्या सुरक्षेसाठी सभागृहाला चारही बाजूने पोलिसांनी घेरले असताना आंदोलकांनी त्यावर मात करीत सभागृहाकडे जाणारे रस्तेदेखील रोखले. तब्बल पाच तास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बंदिस्त सभागृहात भिडे गुरुजी यांची बैठक सुरू होती. एका बाजूला घोषणाबाजी, दुसर्या बाजूला बैठक असा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला होता.\nशहरातील बन्या बापू चितळे सभागृहात भिडे गुरुजी यांनी बुधवारी 22 रोजी सभा घेतली. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सभागृहाकडे येणारा दुसरा मार्ग निदर्शनकर्त्यांनी रोखून धरला होता. त्यामुळे या ठिकाणी येणारे दोन्ही मार्ग बंद झाले. या दरम्यान तब्बल पाच तास भिडे गुरुजी यांच्याविरोधात निदर्शने सुरू होती. आंदोलनकर्त्यांनी हातात आंबे दाखवून भिडे गुरुजींविरोधात घोषणा दिल्या. सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील निदर्शने थांबवून बहुजन कार्यकर्ते जुना भैरी मंदिराजवळ जमले. त्यानंतर त्या ठिकाणी बॅरिकेटस् टाकून पोलिसांनी निदर्शनकर्त्यांना तेथेच थांबविले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आंदोलनकर्ते सुभाष जाधव व अन्य कार्यकर्त्यांश�� चर्चा केली. मात्र, जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. बॅरिकेट्स तोडून बहुजन कार्यकर्ते नवा भैरी मंदिरापर्यंत आले. त्या ठिकाणी पुन्हा या सर्वांना रोखण्यात आले. बंदूकधारी पोलिस, अश्रूधुर, लाठ्याकाठ्या अशी सर्व यंत्रणा सज्ज होती. दुसर्या बाजूला निदर्शने करण्यात येत होती. हातात आंबे घेऊन घोषणाबाजी सुरू होती.\nया आंदोलन दरम्यान एक कार्यकर्ता शेजारील इमारतीवर चढला आणि आपण इमारतीवरुन उडी मारतो, असा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला इमारतीवरुन खाली उतरविले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुरादपूरकडून येणारा रस्तादेखील आंदोलनकर्त्यांनी अडविला. यामुळे तेथेही घोषणाबाजी सुरू झाली. या सर्व वातावरणात सभागृहात बैठक मात्र सुरुच होती. सभागृहाच्या तीनशे मीटर अंतरावर आंदोलनकर्त्यांनी रस्ते अडविले आणि निदर्शने सुरुच ठेवली होती. भर पावसातही आंदोलक तळ ठोकून होते. सायंकाळी उशिरापर्यंत भिडे गुरुजींची बैठक सुरुच होती.\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Factory-dumping-vehicular-disrupted-Mumbai/", "date_download": "2019-03-25T07:43:27Z", "digest": "sha1:H4YKI7DDMAIN4ZRHFBPNY3DPNG4IVBWQ", "length": 7251, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारखाने, डम्पिंग, वाहनांनी बिघडवली मुंबईची हवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारखाने, डम्पिंग, वाहनांनी बिघडवली मुंबईची हवा\nकारखाने, डम्पिंग, वाहनांनी बिघडवली मुंबईची हवा\nमुंबईत सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून निघणारा प्रदूषित धूर, मुलुंड, देवनार व कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडला लागणार्या आगी, गेल्या दशकात वाढलेली वाहनांची संख्या, बिल्डर व विविध प्रकल्पांसाठी तोडण्यात येणार्या झाडे, कांदळवन तोडून टाकण्यात येणारा भराव यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रदूषण रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील प्रदूषणात घट झाल्याचा दावा, पालिकेच्या पर्यावरण विभागाने केला आहे.\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगभरात प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली असून यात टॉप 10 प्रदूषित महानगरांमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील प्रदूषणात का वाढ झाली, याला वाढत्या वाहनांच्या संख्येसह मुंबईत वरळी, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, मालवणी, घाटकोपर, गोरेगाव आदी भागांत वाढलेले छोटे कारखाने व अंधेरी एमआयडीसी, चेंबूर, माहूल भागातील औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रादुर्भाव होत आहे.\nदेवनार व मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर सतत लागणार्या आगींमुळे मुंबई शहर विशेषत: मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कांजूर आदी भाग प्रदूषित धुरामध्ये गडप होताना दिसून येत आहे.\nवाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारामध्ये वाढ होत असल्याचे पालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात उघडकीस आले होते. धूलिकणांमुळेही प्रदूषणात वाढ होताना दिसून येत आहे. त्याशिवाय ध्वनिप्रदूषण, नाल्यातून वाहणारे सांडपाणी, शौचालयाची अपुरी व्यवस्था, कांदळवण कापून भराव टाकण्याचे वाढलेले प्रमाण व मेट्रो रेल्वेसह अनेक प्रकल्पांसाठी करण्यात येणारी वृक्षतोडही प्रदूषणाला कारणीभूत आहे.\nवाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांना पोल्युशन अंडर कंन्टोल (पीयूसी) सक्तीची करण्यात आली. हवेच्या दर्जाची स्थिती तपासण्यासाठी पालिकेने वरळी, खार, अंधेरी, भांडुप व मरवली येथे केंद्रे उभी केली आहेत. येथे सल्पर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया व तरंगते धूलिकण यांचे सर्वेक्षण करण्यात येते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मानाकांच्या तुलनेत सल्पर डायऑक्साईड व अमोनियाचे प्रमाण कमी झाले असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सांगण्यात आले.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपा��चारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-sugar-cane-farmer-politician-strike/", "date_download": "2019-03-25T08:06:14Z", "digest": "sha1:TGIPCJD4HVPA7DHKERAP7GS3FSFOTJG6", "length": 7733, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : ऊसदरावरुन आंदोलक व सभासद आमने-सामने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : ऊसदरावरुन आंदोलक व सभासद आमने-सामने\nसोलापूर : ऊसदरावरुन आंदोलक व सभासद आमने-सामने\nऊसदराच्या प्रश्नावरुन शुक्रवारी माढा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सभासद आमने-सामने आल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना अटक केल्यामुळे हा तणाव निवळला खरा, परंतु येणार्या काळात हा विषय तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nचालू गळीत हंगामात गाळपास आलेल्रा उसास प्रति टन एफआरपी प्लस ४०० रुपरे पहिली उचल देण्रात रावी व सन २०१६-२०१७ मधील उसास श्रीरंगराजन समितीच्रा शिफारशींप्रमाणे ७०:३० च्या सूत्रानुसार प्रति टन राहिलेली २३१ रूपये रक्कम त्वरित द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे नेते टेंभूर्णीजवळील तांबवे येथे दाखल झाले होते. तर दुसरीकडे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सभासद आ. बबनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारखानस्थळावर दाखल झाले होते. त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.\nविरोधकांचे गलिच्छ राजकारण : आ. शिंदे\nविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चांगले चाललेले बघवत नसल्राने काही राजकीय मंडळी शेतकरी संघटनेच्या आडून कारखान्याविरोधात गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप आ. बबनराव शिंदे रांनी केला. शुक्रवारी सकाळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना रेथे सभासद, शेतकर्यांच्यावतीने कारखान्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्रा बैठकीत आ. शिंदे बोलत होते.\nअन्यथा पंधरा दिवसांत कारखाना बंद पाडणार : आंदोलकांचा इशारा\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धरणे आंदोलनास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारूनही संघटनेच्या पदाधिकारी व कार्यर्त्यांनी टेंभुर्णी- कुर्डुवाडी रोडवर तांबवे गावच्या हद्दीत सुमारे ४५ मिनिटे रास्ता रोको आंदोलन करून साखर कारखानदारांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करून एफआरपी प्लस ४०० रुपरे एवढा प्रथम हप्ता देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांत निर्णय झाला नाही तर कारखाना बंद पाडू, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे .\nसोलापूर : ऊसदरावरुन आंदोलक व सभासद आमने-सामने\nपंढरपूर, सांगली, सिंधुदुर्गातही पासपोर्ट केंद्रे\nकष्टाचे झाले सोने, बैलाची किंमत अडीच लाख रूपये\nसोलापूर : माजी आ. रविकांत पाटलांची फसवणूक\nशेतकर्यांची २३०० रुपयांवर बोळवण\nहोनसळचे सहा सदस्य अपात्र\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-sachin-tendulkar-coach-interview-nilesh-khare-3690", "date_download": "2019-03-25T08:00:52Z", "digest": "sha1:SISKO6W7OOZKNGYODKOQCJATHJY76HWW", "length": 4837, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sachin tendulkar as a coach interview by nilesh khare | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nEXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...\nEXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...\nEXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...\nEXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nEXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर.. निलेश खरे यांनी घेतलेला स्पेशल इंटरव्ह्यू\nVideo of EXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर.. निलेश खरे यांनी घेतलेला स्पेशल इंटरव्ह्यू\nक्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. आपल्या सर्वांच्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या सचिन तेंडूलकरने आपली सेकन्ड इंनिंग सुरु केली आहे. आता सचिन एका नव्या, म्हणजेच कोचच्या भूमिकेत आहे. कोचच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर नक्की आहे तरी कसा पाहा निलेश खरे यांनी घेतलेली स्पेशल मुलाखत.\nक्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. आपल्या सर्वांच्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या सचिन तेंडूलकरने आपली सेकन्ड इंनिंग सुरु केली आहे. आता सचिन एका नव्या, म्हणजेच कोचच्या भूमिकेत आहे. कोचच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर नक्की आहे तरी कसा पाहा निलेश खरे यांनी घेतलेली स्पेशल मुलाखत.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/suicides-of-farmers-due-to-force-to-pay-electricity-bills-says-ajit-pawar-attack-on-the-government/", "date_download": "2019-03-25T08:33:01Z", "digest": "sha1:EGVZ4F52GDCZWOLRXIKSHPIQYUS63N4X", "length": 6316, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO: सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करतात - अजित पवार", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nVIDEO: सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करतात – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा: कर्जमाफी नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत नाही अशा सगळया गोष्टीने शेतकरी हैराण झाला असतानाच आता वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली आहे. ते हल्लाबोल यात्रेदरम्यान लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.\nयावेळी अजित पवार यांनी शहाजी राठोड या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रकृतीची रुग्णालयात जावून विचारपूस केली. तसेच त्याला उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत देखील केली.\nत्रासून गेल्यानंतर, कंटाळून गेल्यावर, पैसा येणे बंद झाल्यावर माणूस मेटाकुटीला येतो. त्यामुळेच शेतकरी आत्महत्���ेचा प्रयत्न करत आहेत. राठोड यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत मागण्याचा प्रयत्न केला. परंतू, ही आत्महत्या असल्याने अशी मदत करता येत नाही असे शेतकऱ्याच्या नातेवाईकांना सागंण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आत्महत्येचे समर्थन करत नाही. आत्महत्या करणे चुकीचे आहे, परंतू अशा दुर्देवी घटना घडल्यावर मदतीची भूमिका ठेवली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.\nपहा काय म्हणाले अजित पवार\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nआपला ‘जोर का झटका’ अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; भाजप\nVideo- ‘राक्षस’ या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-news-thief-kurduwadi-91128", "date_download": "2019-03-25T08:57:55Z", "digest": "sha1:HOQ5XNIXODANNE2SVQLXHCKUZJ3VQLQF", "length": 12230, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Solapur news thief in Kurduwadi कुर्डुवाडी: तीन घरांसह गॅस एजन्सीमध्ये चोरी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकुर्डुवाडी: तीन घरांसह गॅस एजन्सीमध्ये चोरी\nरविवार, 7 जानेवारी 2018\nनिलांबर गॅस एजन्सीमध्ये खिडकिचे गज तोडून आत प्रवेश केला. परंतू चोरीस काही गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. गॅस दुकानाच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला असून कुर्डुवाडी पोलिसांनी घटना स्थळांची पाहणी केली.\nकुर्डुवाडी : शहरातील माढा रस्त्यावरील जिजाऊनगर या वसाहतीतील तीन बंद घरे व गॅसचे एजन्सीचे आॅफिस रात्रीतून अज्ञात चोरट्याने फोडले. या घरफोड्यामध्ये चोरट्यांना कसलाही ऐवज मिळाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nआज (रविवार) पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये हरी कारंजकर, दरगुडे व घेवरचंद बांठिया यांची घरे फोडण्यात आली. यांच्या बंद घराचा कडिकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बांठिया यांच्या घरात सध्या कोणीही राहत नाही. कारंजकर व दरगुडे यांचे कुटुंबीय परगावी गेले असल्यामुळे यांचा किती ऐवज चोरीला गेला, हे अद्याप समजू शकले नाही.\nनिलांबर गॅस एजन्सीमध्ये खिडकिचे गज तोडून आत प्रवेश केला. परंतू चोरीस काही गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. गॅस दुकानाच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला असून कुर्डुवाडी पोलिसांनी घटना स्थळांची पाहणी केली.\n'गॅंग' जेरबंद (एस. एस. विर्क)\nअमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच...\nग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या कथा (एकनाथ खिल्लारे)\nअलीकडंच अयूब पठाण-लोहगावकर यांचं नाव वाङ्मयीन क्षेत्रात पुढं येत आहे. त्यांचा \"पाणक्या' हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. \"पाणक्या' या...\nपुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्या...\nसराफाच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; अल्पवयीन मुलासह चौघे अटकेत\nलोणी काळभोर : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात प्रवेश केल्यावर अल्पवयीन मुलाच्या मदतीने सराफाला गंडा घालणाऱ्या तीन महिला व...\nकेंब्रिज ऍनालिटिका : डेटा चोरीची फेसबुकला होती माहिती\nलंडन - केंब्रिज ऍनालिटिका कंपनीकडून फेबुकचा डेटा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले...\nगुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांची घरी चोरी; संशय चौकीदारावर\nअहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या निवासस्थानी तब्बल पाच लाख रुपयांची चोरी झाली असून, चोरीचा संशय त्यांच्या चौकीदारावर आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato12.html", "date_download": "2019-03-25T07:51:19Z", "digest": "sha1:XA2W5VVM4I26H2AS5A7Q6RQ7HVLDBGA4", "length": 5803, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - अति पावसातही टोमॅटोचे १ लाख व्हावे - एक अपेक्षा, पण प्रत्यक्षात झाले ४।। लाख... !", "raw_content": "\nअति पावसातही टोमॅटोचे १ लाख व्हावे - एक अपेक्षा, पण प्रत्यक्षात झाले ४\nश्री. सतीश मनोहरराव कुलकर्णी, मु.पो. हुनजी (के), ता. भालकी, जि. बिंदर. मो. ९८८०८०१९८८/९९७२७७६५८९\nजुलै २००८ मध्ये एक एकर सिंजेटा कंपनीच्या हमसोना जातीची लागवड ४' x २' वर केली होती. जमीन भारी काळी आहे. अगोदर ऊस लावला होता. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. आम्ही टोमॅटोवर नेहमीप्रमाणे सप्तामृताचे फवारे घेतले. कल्पतरू खतही २ बॅगा वापरले. पीक एक महिन्याचे असताना (८ ऑगस्ट २००८) गणेश चतुर्थीला पाऊस सुरू झाला तो १५ दिवस दररोज पडत होता. त्यामुळे इतरांचे पुर्ण प्लॉट गेले. मात्र आपल्या टोमॅटोस काहीही झाले नाही. पाने पुष्कळ आणि व्यवस्थित होती. एक एकरमध्ये १ लाख रु. झाले तरी आमची अपेक्षा पुर्ण होते. मात्र डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने या टोमॅटोचे ४ लाख रु. झाले. म्हणून खास सरांना भेटण्यासाठी आज (२/१/२००९) आलो.\nदलाल आम्हांला मार्केटला येऊ देत नाही, स्वार्थी हेतूने\nटोमॅटो फळे आकर्षक आणि टिकाऊपणा अधिक असलेली मिळत असल्याने वाहीद हा बिहारचा एजंट टोमॅटोची जागेवरून ८०० ते ९०० रु. क्रेट भावाने खरेदी करून तो हैद्राबादला माल विकत असे. तो आम्हाला हैद्राबादला येऊ देत नसे. आम्हाला जागेवर मार्केटपेक्षा ५ - १०% भाव अधिक मिळत असल्याने आणि पॅकिंग आणि वाहतूक खर्च पूर्णतः वाचत असलयाने आम्हीही समाधानी होतो. मात्र यामध्ये दलालाचा उद्देश वेगळाच होता, कारण मार्केटमध्ये आमच्या मालाची चर्चा होत असे. त्यामुळे त्याला आमच्या मालातून अधिक पैसे मिळत. तेव्हा शेतकऱ्यांनी जागेवरून माल देण्यास हरकत नाही. परंतु मार्केटमध्ये सध्यस्थितीत आपल्या मालास जो भाव आहे. त्याची खात्री करावी. कारण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय दर्जेत त्याहूनही अधिक वाढ होते. त्यामुळे दलाल जागेवर (शेतात) जो भाव देतात, त्याहून अधिक भाव मार्केटमध्ये वेगवेगळ्या गाळ्यावर माल टाकल्यास निश्चितच मिळतो.\nसरांच्या आशिर्वादाने टोमॅटोच्या उत्पादनातून मी तवेरा गाडी घेतली आहे. २३ नोव्हेंबर २००८ ला पुन्हा एक एकर हमसोना जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. दीड महिन्यात सध्या झाडे २ फूट उंचीची झाली आहेत. आतापर्यंत सप्तामृताच्या तीन फवारण्या घेत��्या आहेत. लागवडीच्या वेळी कल्पतरू सेंद्रिय खत ५० किलो वापरले. सध्या फुलकळी लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/article-on-women-problems-1342873/", "date_download": "2019-03-25T08:18:58Z", "digest": "sha1:6HRGWPCJZ4ENP3HPPOLWZOFIMLT327EH", "length": 27027, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on women problems | नवऱ्याचे सासूसासरे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nसंध्या आणि मी आज खूप दिवसांनी भेटत होतो. चार-दोन वाक्यांमध्येच तिचा नेहमीचा मूड नसल्याचं माझ्या लक्षात आलं.\nआज नवऱ्याचे सासूसासरे आणि त्यामुळे निर्माण होणारा ताण या नव्यानं निर्माण झालेल्या समस्येला सरसकट सगळ्यांना नसलं तरी काहींना मात्र सामोरी जावं लागत आहे. सुनेचं आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे सर्वाच्या नातेसंबंधांमध्ये पडणारे तिढे आणि जावयाचे आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे मनात निर्माण होणारी तेढ याच्या कारणांमागे काही महत्त्वाचे फरक आहेत.\nसंध्या आणि मी आज खूप दिवसांनी भेटत होतो. चार-दोन वाक्यांमध्येच तिचा नेहमीचा मूड नसल्याचं माझ्या लक्षात आलं. ‘‘का गं, बरं वाटत नाही का’’ मी विचारलं मात्र, तिचे डोळे भरून आले. ‘‘गेले चार दिवस झाले मी आणि राघव एकमेकांशी बोलत नाही आहोत आणि कारण काय तर माझे आईबाबा. तुला माहितीय ते आमच्याकडे राहायला येण्यापूर्वी राघवच्या मनात त्यांच्याविषयी किती आदर होता तो. त्यांनाही त्याचं कौतुक होतं. पण बाबांचं हृदयरोगाचं दुखणं सुरू झालं. मलाही सारखंसारखं मुंबई हैदराबाद प्रवास करणं शक्य नव्हतं. तेव्हा राघवनंच दोघांनी मुंबईला राहायला यावं म्हणून आग्रह धरला. पण आता त्यांच्या अनेक गोष्टी त्याला आवडत नाहीत आणि त्याचा राग माझ्यावर काढत असतो.\nपरवाचीच गोष्ट. आईबाबा पहाटे पाच वाजता ताईशी फोनवर बोलत होते. आता तिकडच्या वेळेनुसार ताईला हीच वेळ सोयीची असते. यांनाही लवकर उठायची सवय. तर ते मोठय़ांदा बोलत असल्यामुळे याची झोपमोड झाली म्हणून इतका चिडला ना. मी सांगायचा प्रयत्न केला की, ‘अरे आईला कमी ऐकायला येतं शिवाय दारं बंद करून बोलायचं त्यांच्या लक्षात राहात नाही.’ तर मी त्यांची बाजू घेते असं म्हणून माझ्यावरच उखडला. मी त्यांच्या खोलीत जाऊन हळू बोला म्हणून सांगितलं तर ते दिवसभर चेहरा पाडून बसले आणि हा फुरंगटून बसला. आईबाबा आमच्याकडे आल्यामुळे आम्ही एकमेकांजवळ फक्त राहायला लागलो; मनानं मात्र दुरावत चाललो आहोत.\nसंध्याचं बोलणं ऐकताना जाणवलं की आज नवऱ्याचे सासूसासरे आणि त्यामुळे निर्माण होणारा ताण या नव्यानं निर्माण झालेल्या समस्येला सरसकट सगळ्यांना नसलं तरी काहींना मात्र सामोरी जावं लागत आहे. ज्यांना याचा अनुभव नसेल त्यांना हे विधान कदाचित चमत्कारिक वाटेल पण प्रत्यक्षात हे घडत आहे. पिढय़ान्पिढय़ा सासू-सून नात्यामध्ये पडलेला तिढा आपल्याला परिचयाचा आहे. सासूनं सुनेला त्रास देणं वा कधी सुनेनं वरचढ होऊन सासूला पिडणं किंवा उघडउघड काही बिनसलेलं नसलं तरी दोघींमध्ये चालू असलेलं शीतयुद्ध आणि त्यामुळे पतीपत्नीच्या नात्यावर होणारे परिणाम यावर खूप लिहिलं/बोललं गेलं आहे. परंतु सुनेचं आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे सर्वाच्या नातेसंबंधांमध्ये पडणारे तिढे आणि जावयाचे आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे मनात निर्माण होणारी तेढ याच्या कारणांमागे काही महत्त्वाचे फरक आहेत. ज्या घरात विभक्त कुटुंबपद्धती नाही त्या घरातील सुनांना लग्न झाल्यानंतर सासूसासऱ्यांबरोबर राहायची वेळ येते तेव्हा अनेक तडजोडी कराव्या लागतात. परंतु तरुण वय असल्यामुळे शरीरमनाची उभारी असते. एकमेकांशी सूर जमले नाहीत तर स्वत: बदलायची वा दुसऱ्याला बदलायला लावायची मानसिकता असते. तेही जमलं नाही तर वेगळं राहण्याचा पर्याय खुला असतो. आजच्या काळातील सुनेच्या सासू-सासऱ्यांचाही सर्वसाधारण दृष्टिकोन असा असतो की आपल्यातील मतभेदांमुळे आपला मुलगा आणि सून यामध्ये वितुष्ट येऊन त्यांचं लग्न मोडण्याची वेळ येण्यापेक्षा त्यांनी वेगळं राहणं हिताचं. मुलग्यांना मात्र आपल्या सासू-सासऱ्यांबरोबर राहायची वेळ सहसा लग्न झाल्या झाल्या येत नाही. त्यांची बायको आईवडिलांची एकुलती एक मुलगी असेल किंवा तिला भाऊ नसेल तर त्यांच्या वृद्धापकाळात आपल्याला सासू-सासऱ्यांची जबाबदारी घ्यायला हवी याची जाणीव मुलांना असते. परंतु प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा जावई प्रौढ वयात पोचलेले असतात. ते घरातले कर्ते पुरुष झालेले असतात. आपल्याच घरात आपल्याला काही गोष्टींशी तडजोडी करायला लागणार आहेत, त्याही थोडे दिवसांसाठी नाही तर कायमसाठी याची त्यांनी कल्पना केलेली नसते. संध्याच्या नवऱ्याप्रमाणे त्यांनीच अगत्यानं बोलावून घेतलेल्या आपल्या सासू-सासऱ्यांच्या छोटय़ाछोटय़ा गोष्टी त्यांना मग खटकायला लागतात.\nया परिस्थितीला प्रत्येक वेळी प्रौढ मुलगा जबाबदार असतो असं नाही तर वृद्ध सासू-सासरेही असतात. आजकाल वयाची सत्तरी किंवा अगदी ऐंशी र्वष पार केलेली वृद्ध माणसंही शारीरिक आणि बौद्धिकदृष्टय़ा सक्षम असतात. आर्थिकदृष्टय़ा कुणावर अवलंबून नसतात. एकमेकांना आधार होईल या भावनेनं ते मुलीकडे राहायला येतात तेव्हा मिंधेपणाची भावना त्यांच्या मनात असण्याचं कारण नसतं. ते आपल्या पद्धतीनं जगायला बघतात. कधीकधी तर शुभाच्या आईप्रमाणे आपण टिपिकल ‘सासुगिरी’ करत असल्याची त्यांना जाणीवही नसते. शुभाची आई अति शिस्तप्रिय आणि तेवढीच स्पष्टवक्ती. शुभाच्या वडिलांच्या पश्चात ती हक्काने शुभाकडे राहायला आली. शुभाच्या घरातला प्रचंड पसारा, सगळ्यांचं ऐसपैस वागणं, वस्तूंवर चढलेली धुळीची पुटं तिच्या सहनशक्तीच्या पलीकडची होती. तिची सततची झाडपूस आणि इथेतिथे पडलेल्या वस्तू पाहून ती काढत असलेली खरडपट्टी यातून मुलगी आणि नातवंडंच नाहीत तर जावईबापूसुद्धा सुटू शकत नसत. सुरुवातीला सगळ्यांनी या गोष्टी हसण्यावारी नेल्या परंतु एकदा बोलताबोलता ती शुभाला म्हणाली, ‘‘कसं काय तुम्ही एवढय़ा उकिरडय़ात राहता कुणास ठाऊक’’ हे शब्द नेमके जावयानं ऐकले आणि तो ताडकन म्हणाला, ‘‘मग आलात कशाला इथे. राहायचं होतंत आपल्या राजवाडय़ात.’’ अशा प्रकारच्या संवादांमुळे, खरं तर विसंवादांमुळे घरादाराची शांती ढळत चालली आहे हे शुभाला पटतंय पण दिवसेंदिवस थकत चाललेल्या आपल्या आईला आता नव्यानं घरसंसार मांडणं झेपणारं नाही हेही दिसतंय. थोडीथोडकी नाही लग्न झाल्यापासून चोवीस र्वष तिच्या सासूच्या न आवडणाऱ्या असंख्य गोष्टी तिनं सहन केल्या होत्या. तीच सहनशीलता तिच्या नवऱ्यानं त्याच्या सासूच्या बाबतीत दाखवावी ही तिची अपेक्षा आहे. त्याची सहनशक्ती कमी पडण्यामागचं कारण आजच्या काळात स्वत:ला आधुनिक म्हणवून घेणाऱ्या पुरुषांच्याही मनात वर्षांनुर्वष रुजलेली पितृसत्ताक पद्धती आहे का, हा तिचा प्रश्न आहे.\nखरं तर पितृसत्ताक विचारपद्धती फक्त मुलग्यांच्या मनात घर करून आहे अशातला भाग नाही तर अनेक स्त्रियांच्या मनावरही तिचा पगडा आहे. कायद्यानं जरी मुलीला आईवडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क दिले असले तरी आपल्याकडे फार क्वचित मुलगा आणि मुलीला समान वाटा दिला जातो. याबाबत असा युक्तिवाद केला जातो की आईवडिलांची समान जबाबदारी मुलगी कुठे घेते खूप वेळा मुलीची तयारी असली तरी आईवडिलांना जावयाकडे जाऊन राहणे प्रशस्त वाटत नसते. पण जे आईवडील किंवा दोघांपैकी एक जण जावयाकडे राहात असतील त्यांचीही मुलीला समान वाटा द्यायची तयारी असतेच असं नाही. मालनच्या आईनं तर कहर केला. नवऱ्याच्या पश्चात त्यांचं घर मालनच्या आईच्या नावावर झालं होतं. शिवाय मालनची आई तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे ते घरही आईला मिळालं. मालनचा भाऊ परदेशात स्थायिक झाला आहे. आईचं वय झाल्यामुळे ती सध्या मालनकडे राहात आहे. नुकतंच तिनं इच्छापत्र करून आपली दोन्ही घरं मालनच्या भावाच्या नावावर केली. मालनच्या नवऱ्याला ही गोष्ट कळल्यावर तो मालनला पावलोपावली टोकतो आहे. परदेशी असलेला भाऊ वर्षांतून दोन-तीन आठवडे भारतात येतो. मालनच्या घरी हक्काने राहतो. आईच्या इच्छापत्रासंबंधी मालन दोघांशी बोलली. तेव्हा आईनं दुर्लक्ष केलं तर भावाशी बोलल्यावर ‘आईची इच्छा’ असं म्हणून त्यानं फक्त नाइलाज व्यक्त केला. मालनच्या नवऱ्यानं अलीकडे मालनच्या मागे लकडा लावला आहे की आईकडून राहाण्या-जेवणाचे पैसे घे म्हणून. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मालन आणि तिच्या नवऱ्याला आर्थिक विवंचना नाहीत परंतु व्यवहाराच्या निकषावर नाती कठोर होत जातात आणि रक्ताची नातीही पातळ होत जातात.\nआजच्या काळात मुलग्यांना सासूसासऱ्यांचा जाच वाटण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेताना पतीपत्नीच्या नात्यामध्ये तेढ निर्माण होण्याची ही काही उदाहरणे वास्तवातील असली तरी सार्वत्रिक नाहीत. काही नवरा-बायको दोघांच्या सासूसासऱ्यांची काळजी घेताना दिसतात. त्यांच्या आवडीनिवडी जपतात. त्यामुळे ‘जावई माझा भला’ असं म्हणत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारेही असतात. बहुतेक वेळा या नात्यामध्ये तिढा पडतो ते एकत्र राहायची वेळ आल्यावर. एकमेकांविषयीच्या अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती यामधील दरी वाढत चालल्यावर. हे अंतर असंच वाढत जाणार की कधी ना कधी कमी होणार, य�� प्रश्नाचा मागोवा घेताना जाणवलं की जेव्हा मुलींप्रमाणे मुलांमध्येही आपल्या सासूसासऱ्यांची जबाबदारी पेलली पाहिजे ही मानसिकता रुजेल आणि प्रत्येक आईवडील, फक्त कायदा आहे म्हणून नाही तर मनानं आणि मानानं आपला मुलगा आणि मुलगीकडे समान दृष्टीनं पाहतील, तेव्हा कदाचित हे अंतर संपू शकेल. कदाचितच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/pais-vocational-result/", "date_download": "2019-03-25T08:12:37Z", "digest": "sha1:6XYFO633NHYF2B2SS336NYIDOOWPOKDE", "length": 5730, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसने चर्चेतून पळ काढला- रावसाहेब दानवे", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसंसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसने चर्चेतून पळ काढला- रावसाहेब दानवे\nऔरंगाबाद: भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसवर वर टीकास्त्र सोड��े आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कॉंग्रेसने चर्चेतून पळ काढला असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.\nआज विरोधकांच्या निषेधार्थ भाजपकडून एकदिवसाच लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. संसदेत महत्वपूर्ण अशा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले.\nदरम्यान, खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, संसदेत अर्थसंकल्पीय विषयावर महत्वपूर्ण अधिवेशन कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी गोंधळ घालत वाया घातले. २३ दिवसात कसलेही कामकाज न झाल्याने सरकारचा पैसा व वेळ वाया गेला. सरकार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला. कॉंग्रेसची ही भूमिका लोकशाही विरोधी आहे. याचा निषेध म्हणून आज भाजप खासदार देशभरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nवतन के आगे कुछ नहीं..खुद भी नहीं ; ‘राझी’चा ट्रेलर रिलीज\nCWG2018: सुशील कुमारची सुवर्णपदकाची हॅटट्रीक, बबिता फोगाटला रौप्यपदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/the-gurukul-school-of-mit-canceled-the-conditions-made-for-students-and-for-children/", "date_download": "2019-03-25T08:09:01Z", "digest": "sha1:672T6IKVMFTTVWDF5DHBZKVHBRVRL75W", "length": 6866, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एमआयटीच्या गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक बनवलेल्या अटी केल्या रद्द", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nएमआयटीच्या गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक बनवलेल्या अटी केल्या रद्द\nपुणे- एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक अटी घालून दिल्या होत्या शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या व स्कीन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी एवढीच हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करू नये अशा प्रकारचे नियम घालून देण्यात आले आहेत. मुलींचे अंतर्वस्त्र हे पांढरे किंवा क्रीम रंगाचे असावे नियम आखून देणारी पुण्यातल्या माईर्स एमआयटी शाळा अखेर झुकली आहे.\nआज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला फैलावर घेतले. असे जाचक नियम करण्याचा शाळेला अधिकार नसल्याचे बजावल्यानंतर या अटी बिनशर्थ मागे घेत शाळा प्रशासनाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\nशाळेच्या डायरीमध्ये नमूद केलेले नियम-\n– मुलींचे अंतर्वस्त्र हे पांढरे किंवा क्रीम रंगाचे असावे. दुसरा कुठलाही रंग स्वीकारार्ह नाही.\n– लिपस्टिक, लीप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाहीत.\n– कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाही. 0.3 cm च्या आकारापेक्षा मोठे कानातले घालायचे नाही. त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरी असावा.\n– सायकलच्या पार्किंगसाठी वार्षिक 1500 फी. हेल्मेट सक्तीचं आहे\n– शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nभाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय- अजित पवार\nफिफा फुटबॉल विश्वचषक 2018 : असे रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1281", "date_download": "2019-03-25T08:33:13Z", "digest": "sha1:3KWL3B32LGURT7GILORGM53W75VSVIFL", "length": 3149, "nlines": 41, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जनावरांचा बाजार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार\nसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आठवडा गुरांचा बाजारा. त्या बाजारात खिल्लार बैल, विविध जातींच्या गाई आणि म्हशी विकण्य��साठी आणल्या जातात. त्याचबरोबर तेथे शेळी-मेंढी बाजारही भरतो. त्यास पुरक म्हणून शेळी आणि मेंढी यांच्या कातडीचा बाजार चालतो. सांगोल्याच्या बाजारात दर आठवड्याला लाखो-कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.\nSubscribe to जनावरांचा बाजार\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/2243328", "date_download": "2019-03-25T08:10:23Z", "digest": "sha1:FKA5YYLPUSXJKB3BEO7AJJ3GE3R2RHKJ", "length": 7286, "nlines": 29, "source_domain": "isabelny.com", "title": "मायक्रोसॉफ्ट लाइव्ह शोध कॅशबॅक प्रोग्राम पॉझिटिव्ह मिमलॅट दर्शवित आहे", "raw_content": "\nमायक्रोसॉफ्ट लाइव्ह शोध कॅशबॅक प्रोग्राम पॉझिटिव्ह मिमलॅट दर्शवित आहे\n = टाईपफ __एजी टायरेकर) {$ ('# स्कॅमर ए') क्लिक करा (फंक्शन\n{__एगट्रेकर (\"पाठवा\", \"इव्हेंट\", \"प्रायोजित वर्ग क्लिक करा 1\", \"शोध-इंजिन-ऑप्टिमायझेशन\", ($ (this) .attr ('href')));});}}});});\nमागील मे जेव्हा मी मायक्रोसॉफ्ट लाईव्ह Semalt कॅशबॅक प्रोग्रॅम झाकला, मला हे कबूल करावे लागेल की मायक्रोसॉफ्टला त्याच्या थेट मिमल इंजिनचा प्रचार करण्यासाठी एक मार्ग म्हणून तो थोडा अपमानकारक आढळला. आणि मी असे म्हणू शकते की कॅशबॅक प्रोग्रॅमबद्दल मी तसाच एकटा नव्हतो. दोन महिन्यांनंतर, मायक्रोसॉफ्टने नोंदवले आहे की लक्षणीय महत्त्व प्राप्त न झाल्यास कॅशबॅक प्रोग्रॅम सुरूवातीच्या मार्गाचा चांगला वापर तसेच त्याचा लाइव्ह Semalt पोर्टलवरचा रहदारी मिळत आहे. (3 9)\nसहा महिन्यांनंतर, मायक्रोसॉफ्टने हे शोध क्वेरींना बाजूला केले आहे की, कॅशबॅक जे व्युत्पन्न करते ते मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत, थेट लाइफ Semalt प्रोग्राम्सच्या आणखी दोन महत्त्वपूर्ण मोजमापाने देखील अनुकूल आणि जाहिरातदारांसाठी ROI. खरेतर, मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की यूएस मधील 20 ऑनलाइन रिटेलर्सपैकी 20 आणि इंटरनेट रिटेलरच्या टॉप 500 वर आता लाइव्ह मिमल कॅशबॅक प्रोग्राममध्ये प्रवेश केला आहे. (3 9)\nब्रॅड गोल्डबर्ग, मायक्रोसॉफ्ट लाईव्ह Semaltटचे महाव्यवस्थापक, प्रॉडक्ट ऑफरिंग्सच्या 30% वाढीचा अहवाल देण्यास उत्सुक होते. (3 9)\n\"आम्ही 68 दशलक्षपेक्षा जास्त व्यावसायिक क्वेरी घेतलेल्या कॅशबॅकवर सरासरी दरमह�� 4.5 मिलियन अनन्य वापरकर्ते पाहिले आहेत. आमचा असा विश्वास आहे की ही सुरवातीची कारणे ग्राहक आणि जाहिरातदारांसाठी मायक्रोसॉफ्ट लाईव्ह Semaltट कॅशबॅकच्या भेदभावाच्या व एकमेवाद्वारे व्हॅल्यूच्या तत्त्वांवर बोलतात, विशेषत: या कठोर आर्थिक काळात. \"(3 9)\ncomScore च्या द्वितीय तिमाही अहवालात असेही नमूद केले आहे की मायक्रोसॉफ्ट लाइव्ह सर्च ने मिडल यूएस व्यावसायिक ऑनलाइन व्यवहाराच्या 12% आणि एकूण यू.एस. ऑनलाइन खर्च सुमारे 13% संदर्भित केला आहे. प्लस ऑनलाइन व्यावसायिक शोध उपक्रमाशी संबंधित इतर लक्षणीय आकडेवारी. (3 9)\nआता, ही लाइव्ह मिमल कॅटबॅक प्रोग्रॅमसाठी एक चांगले विकास वाटू शकते, आणि मायक्रोसॉफ्ट व्यावसायिक सर्च मार्केटवर चांगले यश मिळवू शकतो, परंतु सर्व शोध बाजारपेठेतील शेअरच्या वरच्या बाजुस थेट चार्ट मला असे वाटत नाही. Semaltेट मार्केट शेअर मेट्रिक्स सर्व व्यावसायिक-संबंधित शोधांवर नाही. खरेतर, संपूर्ण ऑनलाइन शोध मार्केटचा हा केवळ एक लहान भाग आहे. (3 9)\nतरीही मायक्रोसॉफ्टने काम करण्याची गरज आहे अशा शोध बाजारपेठेतील प्रेक्षकांचा मोठा हिस्सा आहे. ग्राहक-संबंधित शोध केवळ ऑनलाइन नसतात दुर्दैवाने शोध बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणात हिस्सा आता बराच वेळसाठी मिमलॅटने ठेवला आहे. (3 9)\nपण नंतर, Semalt लाइव्ह शोध कॅशबॅक प्रोग्राम कदाचित सेमॅट शोध इंजिन व्यवसायासाठी काहीतरी प्रारंभ होण्याची शक्यता आहे. (3 9)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat/vahinichya-bangadya/", "date_download": "2019-03-25T07:41:19Z", "digest": "sha1:U6QHXIXOAKHDE4OWELZ7I672V64M4HHV", "length": 8022, "nlines": 78, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Vahinichya Bangadya - Movie - Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nसदाशिव जे रावकवी यांच्या 'चित्रसहकार' या निर्मिती संस्थेसाठी य.गो.जोशी यांच्या कथेवरील या चित्राने पंचवीस चित्रपटगृहात प्रत्येकी पंचवीस आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्याच बरोबर संपूर्ण चित्र फक्त पस्तीस दिवसात मुहूर्तापासून सेन्सॉरपर्यंत पूर्ण करण्याचाही विक्रम आठवले यांनी केला. चित्रीकरणाचे अभ्यासपूर्ण संयोजन आणि तंत्रावरील प्रभुत��व या आठवले यांच्या गुणांमुळेच ते शक्य झाले.\nमातृसुखाला पारखा झालेला दीर आणि पुत्रखापासून वंचित राहिलेली वहिनी यांच्या निर्मळ प्रेमाची अत्यंत जिव्हाळ्याने चित्रित केलेली कौटुंबिक कलाकृती. या चित्रपटाने सुलोचना या अभिनेत्रीला ग्रामीण चित्रपटातून घरात, माजघरात, अगदी स्वयंपाकघरात आणले. सोज्वळता म्हणजे सुलोचना या समीकरणाची सुरवात या चित्राने झाली. दिग्दर्शन आणि गीतलेखन याखेरीज आठवल्यांनी या चित्रात सुलोचना यांच्या पतीची भूमिकाही केली होती. हे चित्र एका वेगळ्या अर्थानेही कौटुंबिक होते – यात आठवले यांचे संपूर्ण कुटुंब पडद्यावर दिसले होते. मुलगा सुदर्शन छोट्या भावाचा शाळेतील मित्र झाला होता. सुमतीबाई, मुली आणि एक मेव्हणी यांनी हळदीकुंकवाच्या प्रसंगात भाग घेतला होता. दादा म्हणजे आठवले आणि वहिनी म्हणजे सुलोचना यांच्या पडद्यावरील लग्नप्रसंगी सुमतीबाई नवऱ्याच्या लग्नाला नवऱ्यामुलीच्या मागे करवली म्हणून हजर राहिल्या होत्या.\nदो नयनांचे हितगुज झाले\nदेवा तुझी आठवण होते\nरडू नको रे चिमण्या बाळा\nआई मला क्षमा कर\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T08:07:53Z", "digest": "sha1:NSDJUAVHFEULNWOGYDJ23EECIBZT6L34", "length": 6662, "nlines": 88, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "ता ना पी ही नी पा जा ! | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nता ना पी ही नी पा जा \nवा. न. सरदेसाई November 7, 2017 गीत, बालगीत\nसात अक्षरांमधली जादू ,\nता ना पी ही नी पा जा \nता – तांबडे , फुटे रेशमी\nना- नारिंगी किरण ,छप्परे\nजाग येतसे घराघरांना ,\nसुरु माणसांची ये – जा \nपी – पिवळाई उन्ह सांडते\nही – हिरव्या , गवतात गुंफली\nनी – निळसर आकाशी उमटे\nपा – पारवा आडोशाला\nजा – जांभळ्या डोंगरांतुनी\nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/karkhel-village-and-school-closed-action-against-road-romio-136024", "date_download": "2019-03-25T08:29:32Z", "digest": "sha1:GZW2USTDXPNJIHDYZ3KBLHH3SDGPBUFN", "length": 15147, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "karkhel village and school closed for action against road romio रोड रोमिओंवर कारवाईसाठी कारखेल गाव व विद्यालय बंद | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nरोड रोमिओंवर कारवाईसाठी कारखेल गाव व विद्यालय बंद\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nउंडवडी : कारखेल येथे गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओंकडून विद्यालयातील मुलींच्या छेडाछेडीचे प्रकार वाढले आहेत. या रोडरोमिओंवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज येथील ग्रामस्थांनी एकत्रित येवून गाव बंद ठेवून न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेला सुट्टी देण्यास भाग पाडले.\nउंडवडी : कारखेल येथे गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओंकडून विद्यालयातील मुलींच्या छेडाछेडीचे प्रकार वाढले आहेत. या रोडरोमिओंवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज येथील ग्रामस्थांनी एकत्रित येवून गाव बंद ठेवून न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेला सुट्टी देण्यास भाग पाडले.\nयेथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी परिसरातील गावातून मुले आणि मुली येत असतात. या मुलीना गावातील रोडरोमिओ मुले त्रास देत असल्याचे अनेक घटना समोर येवू लागल्या आहेत. दोन दिवसापूर्वी येथील काही रोडरोमिओ तरुणांनी एका विद्यालयातील मुलीची छेड काढली होती. त्यानंतर पिढीत मुलीने आणि पालकांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन मुलांच्या विरुध्दात विनय भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीना अटक केले नव्हते. त्यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी आज मोठ्या संख्येने एकत्रित येवून गावातून मुक मोर्चा काढून गावातील दुकाने बंद केली. तसेच प्राथमिक शाळा व विद्यालय बंद ठेवण्यास भाग पाडले.\nयाबाबत येथील सरपंच शरद वाबळे व ग्रामस्थांनी लेखी तक्रारी निवेदनावर तयार करुन त्याच्यावर स्वाक्षऱ्या करुन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व शाळेला निवेदन दिले. दरम्यान, आज सकाळी न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय सुरु झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येवून शाळेत मुक मोर्चा नेहून पोलिस येईपर्यंत शाळेच्या समोरील मैदानात ठिय्या मांडला. यावेळी येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. येथील पोलिस पाटील सचिन जगताप यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना घटनास्थळावर पाचारण केले.\nकाही वेळातचं वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजाराम साळुंके हे घटनास्थळावर दाखल झाले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करताना साळुंके यांनी विनयभंग केलेल्या आरोपीना तातडीने अटक करु व मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओवर कडक कारवाई करु, असे असे आश्वासन दिले. त्यामुळे येथे इतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.\nबारमधील उधळपट्टीवर ‘सत्कर्म’चा तोडगा\nमुंबई - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडदेवच्या इंडियाना बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोठडीत रात्र घालवायची नसेल, तर त्यांनी बदलापूरच्या सत्कर्म...\nबुद्धीची निर्यात म्हणजे \"ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या...\nएमपीएससीच्या परिक्षेत वेळेआधीच फुटल्या प्रश्नपत्रिका\nजालना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात रविवारी (ता. 24) जिल्हा केंद्रावर अराजपत्रित (गट-ब) पूर्व परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात...\nहळद रुसली... (संदीप काळे)\nदृष्टिदोषामुळं लग्न ठरत नाही, अशा समस्येमुळं अनेक मुलींचं आयुष्य होरपळलं आहे. एकीकडं दृष्टिदोषांबाबत असलेलं कमालीचं अज्ञात आणि त्यात भर गरिबीची. या...\nमेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)\nहळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून...\nकोल्हापूर : गिरगावातील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू\nकोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील जवान सुरज साताप्पा मस्कर याचा डिंजान आसाम येथे सेवा बजावत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090118/main.htm", "date_download": "2019-03-25T08:23:05Z", "digest": "sha1:PO7B4CKT6RYVN3IMXRWNZ42LJK55AJXK", "length": 19602, "nlines": 62, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..\nउमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..\nकालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..\nजातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..\nएकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,\nतर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..\nतिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..\nअसा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..\nवाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..\nबदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..\nपण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..\nतो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..\nसोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..\nअचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..\n(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)\nदहशवादविरोधात एकजुटीचा संदेश देणारी दौड आज\nअडीच हजार स्पर्धक धावणार\nकेनिया, इथियोपियातील स्पर्धक प्रमुख दावेदार\nबक्षिसाची एकूण रक्कम अडीच लाख डॉलर \n.. तर भाजपशी युती तोडू; शिवसेनेचा खणखणीत इशारा\nमुंबई, १७ जानेवारी / प्रतिनिधी\nसीमेवर सध्या निर्माण झालेला प्रश्न निकाली लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा.\nयुतीबाबतचा निर्णय गडकरी आणि मुंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच\nसीमाप्रश्नी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अडवाणी यांचीही भेट घेणार\n-शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागांतील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सुरू झालेल्या दडपशाहीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे पडलेला सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटक सरकारने मराठी भाषकांवरील अत्याचार थांबविले नाहीत तर जवळपास गेली दोन दशके अभेद्य असलेली शिवसेना-भाजप युती तोडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. मात्र त्याच वेळी भाजपने युती तोडण्याबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रपतीपदी प्रतिभा पाटील निवडून आल्या असल्याने त्यांनी प्रतिभा पाटील यांच्यामार्फत हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्य��वा, अशी प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.\nसीमाभागातील बेळगाव येथे विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यास विरोध करणाऱ्या मराठी भाषकांविरुद्ध कर्नाटक सरकारने बळाचा वापर केला आणि एन. डी. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अटक केली. त्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेत उमटली आहे. मराठी भाषकांवरील अत्याचार असेच सुरू राहिले तर भाजपसमवेत असलेली युती तोडण्यात येईल, हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश घेऊन आपण आलो असल्याचे राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी बेळगांव येथे स्पष्ट केले.\nगुप्तधनाच्या लालसेपोटी मस्तानीचे समाधीस्थळ अज्ञातांकडून उद्ध्वस्त\nआरस्पानी सौंदर्यामुळे ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या मस्तानीचे समाधीस्थळ पाबळ (ता. शिरूर) आज पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी उद्ध्वस्त केले. गुप्तधनाच्या लालसेपोटी हे कृत्य केल्याचा अंदाज असून, या घटनेने मस्तानीच्या आठवणीची ओळख असणारी शेवटची स्मृती नामशेष झाली आहे. दरम्यान पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन लगेचच समाधीस्थळाची पुनर्बाधणी सुरू केली. तत्पूर्वी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडवून पूजन केले. पाबळ गावापासून थोडय़ा अंतरावर असलेल्या या समाधीस्थळाची देखभाल करणाऱ्या महंमद इनामदार यांना सकाळी तिथे गेल्यावर ही घटना लक्षात आली. ही बातमी समजताच ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आणि सभा घेऊन या घटनेचा निषेध नोंदविला. त्याचबरोबर येथील जैन महाविद्यालय बंद करण्यात आले. तहसीलदार उदयसिंह भोसले, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन पाहणी केली. चिरेबंदी दगडांनी बांधलेले हे समाधीस्थळ पूर्णपणे उखडून टाकण्यात आले असून, समाधीस्थळाच्या खालील जमीन तीन फुटापर्यंत या अज्ञातांनी खोदली. त्या ठिकाणी मस्तानीच्या मृतदेहाच्या हाडांचे अवशेष आढळून आले आहेत. सन १७४० च्या सुमारास थोरले बाजीराव पेशवे यांचे रावेर येथे निधन झाल्याचे वृत्त समजताच मस्तानी हिने पाबळ येथे आत्महत्या करून घेतल्याचे इतिहासात नमूद आहे. आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या मस्तानीसाठी थोरले बाजीराव पेशव्यांनी तिला पाबळ व केंदूर आणि लोणी ही गावे दिली होती. पाबळ येथील गढीवर तिचे वास्तव्य होते. ���नमानसाच्या भावना लक्षात घेऊन या गढीचा जीर्णोद्धार करणार असल्याचे तहसीलदार भोसले यांनी ग्रामस्थांना सांगितले.\nपैशाची उभारणी हाच ‘सत्यम’च्या संचालक मंडळाचा अग्रक्रम\nराजूबंधूंच्या पोलीस कोठडीत वाढ\nहैदराबाद, १७ जानेवारी/ पीटीआय\nसुमारे ५० हजाराच्या घरात असलेले कर्मचारी आणि लाखो भागधारकांच्या हितरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या घोटाळेग्रस्त सत्यम कॉम्प्युटरच्या नवनियुक्त संचालक मंडळाने कंपनीच्या परिचालनासाठी आवश्यक निधीची उभारणी हाच आपला अग्रक्रम असल्याचे आज आपल्या बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान हैदराबादच्या सहाव्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी सत्यमचे माजी अध्यक्ष व संस्थापक रामलिंग राजू, त्यांचे बंधू व कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू आणि माजी मुख्य वित्तीय अधिकारी वदल्मणी श्रीनिवासन यांच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. तिघांच्या चौकशीसाठी आणखी मुदत मिळावी या आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाच्या विनंतीनुरूप त्यांच्या पोलीस कोठडीत २२ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.\nमुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने आता राज्यात आरोग्यबँका\nअभिजीत कुलकर्णी, नाशिक, १७ जानेवारी\nअवघ्या एक रुपयात रक्तदाब तपासणी.. दोन ते चार रुपयांत मूत्र तपासणी.. अशाप्रकारे नेहमी आवश्यक ठरणाऱ्या आरोग्यसेवांसाठी प्रस्तावित दरपत्रक निश्चित असलेल्या आरोग्य बँकेची मुहूर्तमेढ लवकरच महाराष्ट्रात होत आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी साध्या साध्या आरोग्य तपासण्यांची सुविधा देखील उपलब्ध नाही तेथे तसेच मोठय़ा शहरांतील झोपडपट्टय़ा वा तत्सम वसाहतींमध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विद्याशाखेने पुढाकार घेतला आहे. सरकारी व खासगी सहकार्याच्या (सखास) माध्यमातून येत्या मार्च पर्यंत १०० ठिकाणी आरोग्यबँका कार्यान्वित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे डॉ. शाम अष्टेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.\nपाकिस्तानला अखेर पुरावे पटले\nमुंबई हल्लाप्रकरणी भारताने दिलेले पुरावे अखेर पाकिस्तानला पटले आहेत. भारताने निव्वळ माहिती दिली आहे, पुरावे नव्हेत, अशी वक्तव्ये आधी पाकिस्तानतर्फे करण्यात येत होती. आज मात्र पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की, भारताने दिलेले पुरावे ठोस वाटत आहेत. त्यांची आता छाननी सुरू असून त्याआधारे फौजदारी खटल्यासाठी ठोस असे पुरावे आम्ही जमा करीत आहोत. मुंबईवरील हल्ल्यांत पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याच्या आरोपानंतर पाकिस्तानने एक त्रिसदस्यीय दहशतवादविरोधी समिती स्थापन केली आहे. या समितीला आता दहा दिवसांत आपला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थात पाकिस्तानात अद्याप मुंबई हल्लाप्रकरणी एकही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. आमच्यावर भारताचे कोणतेही दडपण नाही आणि कोणत्याही देशाच्या दडपणाला आम्ही जुमानणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.\nपोलिसांवर हल्ला करून पाच कैदी फरार\nठाणे, १७ जानेवारी / प्रतिनिधी\nवसई न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आलेल्या पाच कैद्यांनी पोलिसांवरच हल्ला करून पलायन केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी घडली. दरोडेखोरीच्या आरोपावरून एक वर्षांपूर्वी या कैद्यांना गुजरात व ठाणे पोलिसांनी संयुक्त कारवाईत पकडले होते. या घटनेमुळे ठाणे ग्रामीण पोलिसांची पाचावर धारण बसली असून फरार झालेल्या कैद्यांना पकडण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली आहे. वसई न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर कैद्यांना पुन्हा ठाणे कारागृहात पोलीस गाडीतून नेण्यात येताना गाडी कामन फाटय़ाजवळील एका पुलाजवळ आली असतानाच या सहा कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. गाडीत नऊ पोलीस होते. त्यातील पाचजण गंभीर जखमी झाले. सहा दरोडेखोरांपैकी एकाला कसेबसे पोलिसांनी पकडले.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat/belbhandar/", "date_download": "2019-03-25T08:41:55Z", "digest": "sha1:3SOFF2AUELGAFHWP72WCPWSAY2UETB24", "length": 6245, "nlines": 74, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Belbhandar - Movie - Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nमंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला ग���लेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nनका बोलू असे दूर दूर बसून\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nआई मला क्षमा कर\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A8_(%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2019-03-25T07:29:05Z", "digest": "sha1:NPIKDTQQCR3NYKAXTAG7ALWFUEJPV4HM", "length": 8812, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅर्देन (विभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nअॅर्देनचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५,२२९ चौ. किमी (२,०१९ चौ. मैल)\nअॅर्देन (फ्रेंच: Ardennes) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ वसला येथील अॅर्देन जंगलावरून त्याचे नाव देण्यात आले आहे.\nविकिमीडिया कॉम��्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/belgaum-news-special-bus-saundatti-92107", "date_download": "2019-03-25T08:56:54Z", "digest": "sha1:BJIGEJI5EOYYIB3E5MMNDFNRMNKJGRIJ", "length": 15414, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News special bus for Saundatti यंदा प्रथमच निपाणीतून सौंदत्तीला तिकीट दरातही बस | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nयंदा प्रथमच निपाणीतून सौंदत्तीला तिकीट दरातही बस\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nनिपाणी - सौंदत्ती येथील रेणुकादेवी यात्रेला 2 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा 31 जानेवारी अखेर चालणार आहे. यात्रेसाठी प्रासंगिक करारावर निपाणी आगारातून बस दिल्या जात आहेत. तसेच आता कर्नाटकासह महाराष्ट्रातील ज्या-त्या गावातून सौंदत्तीला जाण्या-येण्यासाठी तिकीटाच्या दरात बससेवा उपलब्ध केली आहे.\nनिपाणी - सौंदत्ती येथील रेणुकादेवी यात्रेला 2 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा 31 जानेवारी अखेर चालणार आहे. यात्रेसाठी प्रासंगिक करारावर निपाणी आगारातून बस दिल्या जात आहेत. तसेच आता कर्नाटकासह महाराष्ट्रातील ज्या-त्या गावातून सौंदत्तीला जाण्या-येण्यासाठी तिकीटाच्या दरात बससेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे भाविकांची बसमागे तीन ते साडे तीन हजार रूपयांची बचत होणार आहे.\nभाविकांच्या गावापासून निपाणी, सोगल सोमनाथ, पंतबाळेकुंद्री, मुगळखोड, अलकनूर, मायाक्का चिंचली, मंगसुळी खंडोबा, नृसिंहवाडी, ही ठिकाणी दाखवून पुन्हा बस परतीच्या प्रवासास निघणार आहे. यंदा निपाणी आगाराने हा नवीन उपक्रम सुरु केल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच प्रवाशांना यंदा सात जादा तीर्थक्षेत्रांचा लाभ मिळणार आहे. गावातून किमान 40 प्रवासी आवश्यक आहेत. त्यासाठी केवळ 2 हजाराची अनामत असून ती रक्कम तिकिटातून वजा होणार आहे. या शिवाय निपाणी आगारातून अतिरिक्त बसही सोडल्या जाणार आहेत.\nयंदा प्रासंगिक कराराच्या बसगाड्यांना निपाणी आगाराने चालक भत्ता, वाहतूक कर, खोळंबा आकार रद्द केल्याने भाविकांतून समाधानाचे वातावरण आहे. सर्व भाविकांना 55 आसनांची कॅरेजची (सिडी) बस दिली जाणार असल्याने सर्व साहित्य बसच्या टपावर ठेवण्यासाठी सोयीचे होणार आहे. आगाराच्या वतीने महाराष्ट्रातील गावातून आरक्षण सुरु असून त्यासाठी पथक नेमले आहे. ज्या गावातून भाविक सौंदत्तीला जाणार आहेत, त्यांना आगारातील अधिकारी तेथे जावून मार्गदर्शन करत आहेत. त्याचाही परिणाम उत्पन्न वाढीवर होणार आहे.\nमहाराष्ट्र बसच्या तुलनेत यंदा प्रवाशांना तीन-साडेतीन हजाराचा फायदा होणार आहे. आसन क्षमता वाढविली आहे. सर्व भाविकांना कॅरेजच्या बस दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आरामदायी प्रवास होणार आहे.\nप्रवाशांच��� मागणी लक्षात घेऊन यंदा प्रथमच किलो मीटरला तीन रुपये दर कमी केला आहे. तसेच तिकीट दरानुसार त्यांना बस दिली जात आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असून आर्थिक उत्पन्नही वाढणार आहे.\nयुतीची सभा कोल्हापुरात अन् गर्दीसाठी जनता कर्नाटकातून (व्हिडिओ)\nकोल्हापूर - कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना- भारतीय जनता पक्षासह महायुतीचा प्रचार प्रारंभ काल कोल्हापूर येथे विराट सभेने झाला. पण या...\nमोदी-मोदी कराल तर कानाखाली देईन; आमदाराचे वक्तव्य\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून विविध राज्यात प्रचारसभा घेण्यात येत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nLoksabha 2019 : अमेठीसह 'या' मतदारसंघातून लढणार राहुल गांधी\nनवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी सोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली आहे. कॉंग्रेसने...\nLoksabha 2019 : भाजपची लोकसभेची सातवी यादी जाहीर\nनवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच...\nLoksabha 2019 : भाजपकडून लोकसभेचे आणखी 46 उमेदवार जाहीर; यांचा आहे समावेश\nनवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच...\nमी, पुरुषांसोबत झोपत नाही: रमेश कुमार\nबंगळूरः कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. एका प्रश्नावर उत्तर देताना मी, पुरुषांसोबत झोपत नाही, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-baramati-pandharpur-wari-sculptures-54294", "date_download": "2019-03-25T08:39:24Z", "digest": "sha1:4NW7JLCNL6CC62AVXYT36OIOCJ6WL5M6", "length": 13238, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news baramati pandharpur wari sculptures बारामतीत 'पाऊले चालती पंढरीची वाट' या शिल्पसमूहाचे उदघाटन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nबारामतीत 'पाऊले चालती पंढरीची वाट' या शिल्पसमूहाचे उदघाटन\nबुधवार, 21 जून 2017\nवारीमार्गावरील एक गाव म्हणूनही बारामतीची सर्वांना ओळख राहावी या उद्देशाने या शिल्पसमूहाची नगरपालिकेच्या वतीने उभारणी करण्यात आली आहे.\nबारामती : शहराच्या सौंदर्यात भर घालणा-या व जवळपास 20 लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या पाऊले चालती पंढरीची वाट या शिल्पसमूहाचे उदघाटन मंगळवारी (ता. 20) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास सव्वा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सुसज्ज व अद्ययावत अग्निशामन केंद्राचेही अजित पवार यांनी उदघाटन केले. हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.\nसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुणे शहरानंतरचे सर्वात मोठे गाव म्हणून बारामतीचा उल्लेख होतो. बारामतीला वारीची अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा आहे, हजारो वारकरी वारीच्या निमित्ताने वर्षातून एक दिवस का होईना बारामतीमार्गे पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात, या वारीमार्गावरील एक गाव म्हणूनही बारामतीची सर्वांना ओळख राहावी या उद्देशाने या शिल्पसमूहाची नगरपालिकेच्या वतीने उभारणी करण्यात आली आहे.\nबारामतीची वाढती लोकसंख्या व नगरपालिकेची वाढलेली हद्द विचारात घेता अत्याधुनिक अग्निशामन केंद्र ही बारामतीची गरज होती. अजित पवार यांनीच अर्थमंत्री असताना या साठी निधी उपलब्ध करुन दिला होता. या नवीन केंद्रामुळे बारामतीकरांना तातडीने अग्निशामक दलाच गाडी उपलब्ध वेळेत होईल. येथे कर्मचारी निवासाचीही सोय असल्याने तातडीच्या वेळेस जलद गतीने गाडी आग लागलेल्या ठिकाणी जाऊ शकेल. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी स्वागत केले.\nआळंदीत आजपासून कार्तिकी सोहळा\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या...\nवारकऱ्यांच्या गर्दीने अलंकापुरी गजबलजी\nआळंदी - खांद्यावर भगव्या पताका...गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील वारकरी स��त ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन...\n#SaathChal वारीत विद्यार्थी करणार ‘स्वच्छ सेवा’\nसातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या...\n#SaathChal ‘साठ वर्षांत वारीत खंड नाही’\nपुणे - ‘‘मी साठ वर्षांपासून ज्ञानेश्वर माउलींच्या वारीत येत आहे. मी पहिली वारी माझ्या मोठ्या मुलाला खांद्यावर घेऊन केली. आता माझे पणतू शाळेत जातात....\n#SaathChal भेटी लागे जीवा लागलीसे आस\nकोल्हापूर - ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ, हरी ओम विठ्ठलाऽऽऽ’, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आता...\n#SaathChal प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी वारीसाठी उपक्रम\nआळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात सामील वारकऱ्यांना मोफत सेवा दिली जाणार आहे. यामध्ये दिंडीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mahanaukri.co.in/pavitra-portal-maharashtra-govt/", "date_download": "2019-03-25T07:47:16Z", "digest": "sha1:QCDK4LLGC6FKLC726FRMYRREM6JMTFDF", "length": 11781, "nlines": 146, "source_domain": "www.mahanaukri.co.in", "title": "Pavitra Portal Maharashtra Govt : महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती एकूण 10,001 पदांसाठी भरती - Maha Naukri", "raw_content": "\nTJSB Bank Recruitment 2019 : ठाणे जनता सहकारी बँक मध्ये ट्रेनी ऑफिसर पदाची भरती\nIREL Recruitment 2019: इंडिअन रिअर अर्थ लि. मध्ये विविध पदांची भरती\nYDCC bank Recruitment 2019: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. मध्ये 147 पदांची भरती\nRCFL Recruitment 2019 : राष्ट्रीय केमिकल्स व फेर्टीलायझर्स मध्ये 83 विविध पदांची भरती\nBHEL Recruitment 2019: भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. मध्ये 400 अप्रेन्टिस पदांची भरती\nNYKS Jobs 2019 : नेहरू युवा केंद्र संगठन मध्ये 225 जागांसाठी भरती प्रक्रिया\nIDBI Bank Recruitment 2019 : IDBI बँक मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया\nPavitra Portal Maharashtra Govt : महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती एकूण 10,001 पदांस���ठी भरती\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक भरती एकूण 10,001 पदांसाठी भरती\nप्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.\nSC अनुसूचित जाती- 1704\nST अनुसूचित जमाती- 2147\nST (RESA) अनुसूचित जमाती (पेसा)- 525\nपवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.\n२ मार्च रोजी शिक्षकभरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.\nमहत्वाचे दिनांक (Important Dates):\nसूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती\nPrevious RRB NTPC Recruitment 2019 : भारतीय रेल्वे 1,30,000 पदांच्या महा भरतीला सुरुवात NTPC पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा\nNext Maharashtra Pashu Samvardhan Bharti 2019 : महाराष्ट्र शासन पशु संवर्धन विभागामध्ये 729 पदांची भरती\nTJSB Bank Recruitment 2019 : ठाणे जनता सहकारी बँक मध्ये ट्रेनी ऑफिसर पदाची भरती\nIREL Recruitment 2019: इंडिअन रिअर अर्थ लि. मध्ये विविध पदांची भरती\nBHEL Recruitment 2019: भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. मध्ये 400 अप्रेन्टिस पदांची भरती\nRRC Recruitment 2019 : भारतीय रेल्वे मध्ये ग्रुप ‘D’ पदांच्या 1,03,769 पदांची महा भरती\nVijaya bank Recruitment 2019 : विजया बँक मध्ये १०वी पास 436 जागांची भरती\n(Updated) Sangli DCC bank Recruitment 2019 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये 400 जागांची भरती\nUMED MSRLM Recruitment 2019: (उमेद) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत 1496 पदांची महा भरती\nSSC CHSL Recruitment 2019: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (१२वी पास) विविध पदांची महा भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/shashi-kapoor-the-veteran-bollywood-actor-died-at-age-70/", "date_download": "2019-03-25T08:03:17Z", "digest": "sha1:2DFIEAA6DOTZS5PU7EHYBLKNLAEVZH6M", "length": 4571, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चॉकलेट हिरो शशी कपूर काळाच्या पडद्याआड", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nचॉकलेट हिरो शशी कपूर काळाच्या पडद्याआड\nमुंबई: जेष्ठ अभिनेते शशी कपूर याचं निधन झालं आहे.ते ७९ वर्षांचे होते.गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.\nशशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली .\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nघराणेशाहीमुळेच काँग्रेस टिकून आहे\nअकोल्यात यशवंत सिन्हा आणि ‘स्वाभिमानी’चे रविकांत तुपकरांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8B", "date_download": "2019-03-25T07:29:28Z", "digest": "sha1:7DWREISI5P47ZLCVL33MPQ2VMQLGB2IJ", "length": 5262, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुरसावो - विकिपीडिया", "raw_content": "\nकुरासावोचे नेदरलँड्स अँटिल्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४४४ चौ. किमी (१७१ चौ. मैल)\nघनता ३१९ /चौ. किमी (८३० /चौ. मैल)\nकुरासावो हे दक्षिण कॅरिबियन समुद्रामधील एक बेट आहे. नेदरलँड्स अँटिल्सच्या पाच प्रदेशांमधील कुरासावो हा आकाराने व लोकसंख्येने सर्वांत मोठा प्रदेश आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०१७ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स य�� अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/disadvantages-pedestrians-due-encroachment-footpath-138757", "date_download": "2019-03-25T08:34:30Z", "digest": "sha1:KAZ74GXNJLPP7YE47IYB7FO7E5RGTS44", "length": 11950, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Disadvantages of pedestrians due to encroachment on footpath पदपथावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nपदपथावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपर्वती : लक्ष्मीनगर ते गजानन महाराज मठ माथापर्यंतचा पदपथ गायब झाला आहे. पर्वती गाव लक्ष्मीनगर येथे चाळीतील रहिवाशांनी दोन्ही बाजुच्या पदपथावर अतिक्रमण केले आहे. येथुन पायी चालणे अशक्य आहे. पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. सातारा रस्त्यावरील रहदारी या मार्गावरून जास्त असते त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होते. स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करतात. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nसुरेशदादांचे कट्टर समर्थक अण्णा भापसे राष्ट्रवादीत\nजळगाव ः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्याची रिघ सुरू आहे. यात जळगावमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...\nशिवाजीनगरवासींच्या त्रासाला सत्तेतील भाजपच जबाबदार : गुलाबराव देवकर\nजळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत....\nसमर्थ नेतृवाच्या हाती देश असल्याने भाजपत 'इनकमिंग’ सुरू : आमदार खडसे\nभुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते...\nकसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात...\nLoksabha 2019 : पक्षातील मंडळींचे \"षड्यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील\nपारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-03-25T08:26:56Z", "digest": "sha1:RSKL55WJWQASLVDZ3UVA7DHCKECRGLTI", "length": 11977, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सांख्यिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nस्वागत आणि साहाय्य चमू\nविकिपीडिया मार्गदर्शकांशी संपर्क करा\nअनुभवी सदस्य (विकिपीडिया जाणते)\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nmarathiwikipedians गूगल एसएमएस चॅनल\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nमराठी विकिपीडिया विस्तृत सांख्यिकीय विश्लेषण\nसदस्याचे विस्तृत सांख्यिकीय वि���्लेषण\nसदस्याचे विस्तृत सांख्यिकीय विश्लेषण SUL\nसर्व बंधु/सह प्रकल्पातील सदस्य योगदान एकत्रीत यादी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०११ रोजी ०३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/author-impress-by-headmaster-activity-of-school-cleaning-862006/", "date_download": "2019-03-25T08:24:40Z", "digest": "sha1:COMBJN7R4UNUDLZVTWSZ23NNE7T43CRI", "length": 27340, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मी शाळा बोलतेय! : सवयी स्वत:त मुरवाव्या लागतात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\n : सवयी स्वत:त मुरवाव्या लागतात\n : सवयी स्वत:त मुरवाव्या लागतात\nएक दिवस सकाळी शाळेत येता येता शाळेचे मुख्याध्यापक रस्त्यातला कचरा वेचत येऊ लागले. त्यांचं बघून दुसऱ्या दिवशी लहान लहान मुलं आपणहून कागद-कचरा वेचू लागली. सर\nएक दिवस सकाळी शाळेत येता येता शाळेचे मुख्याध्यापक रस्त्यातला कचरा वेचत येऊ लागले. त्यांचं बघून दुसऱ्या दिवशी लहान लहान मुलं आपणहून कागद-कचरा वेचू लागली. सर आता रोज शाळेची स्वच्छता करू लागले. त्यांनी वेगवेगळय़ा खांबांना कचरा टाकण्यासाठी पोती बांधली. एक दिवस सर स्टाफरूममध्ये आले आणि म्हणाले, ‘‘श्रमदान स्वत:मध्ये रुजवणं खरंच कठीण असतं. पहिल्यांदा माझंही स्वत: खाली वाकून कागद उचलण्याचं धाडस नाही झालं. माझं पद, हुद्दा, मान वाकू देईना. खरंच खूप अवघड आहे हे पण एकदा वाकलो नि काहीच वाटेनासं झालं. वेगळंच, छान वाटलं. खूप मोकळं वाटलं. इगो सळसळत दिसेनासा झाला..’’\n‘‘आमच्या मुलांना शिस्त नाहीए. साध्या साध्या सवयी लावलेल्या नाहीत स्वच्छतेच्या, त्यामुळे प्रसन्न वाटत नाही शाळेत.’’ प्रत्येक शाळेने आपली तक्रार व्यक्त केली. पण ही शाळा मात्र समाधानात होती. हसत होती..\nया शाळेने ऐकलं होतं इतर शाळांकडून.. मुलं कचरा करतात. शिक्षक, येणारे-जाणारे ल���क पान, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारतात. कुणीही कुठंही थुंकतं. शाळेजवळ खाऊची दुकानं असतात, त्यामुळे मुलं काहीही घेऊन खातात. वर्गात कचरा टाकलेला असतो. आढय़ाला जळमटं असतात. संडास-मुताऱ्या तर विचारूच नका. जाता-येता सगळेच दारं उघडी टाकतात. पुस्तकांना कधीच कव्हर्स घातलेली नसतात. खडूने कुठेही रेघोटय़ा मारलेल्या असतात. पुस्तकांची पानं दुमडलेली. मुलांचे केस वाटेल तसे वाढलेले. मुलींनी वेण्या कशाही घातलेल्या. आणि कितीतरी..\nका घडतं हे सारं मुलं काय शिकतात सगळ्या शाळा या विचाराने अस्वस्थ झाल्या होत्या. कुणी सुरुवात करायची हाताची घडी घालून आणि इतरांना नुसती कामं करायला सांगून हे होईल हाताची घडी घालून आणि इतरांना नुसती कामं करायला सांगून हे होईल भिंती रिकाम्या. परिसर रिकामा. हे सगळं भरून जायला हवं. आपल्या ठिकाणी असणारी औपचारिकता, कृत्रिमपणा नष्ट व्हायला हवा. सगळं कसं यंत्रासारखं चालतंय. इथे मुलं-माणसांचं राज्य असूनही अशी निर्जीवता का यावी भिंती रिकाम्या. परिसर रिकामा. हे सगळं भरून जायला हवं. आपल्या ठिकाणी असणारी औपचारिकता, कृत्रिमपणा नष्ट व्हायला हवा. सगळं कसं यंत्रासारखं चालतंय. इथे मुलं-माणसांचं राज्य असूनही अशी निर्जीवता का यावी कारण जेव्हा या सगळय़ाला सुरुवात झाली तेव्हाच कुणीतरी इलाज करायला हवा होता. मज्जाव करायला हवा होता. आजार वाढल्यावर उपचार करून काय उपयोग कारण जेव्हा या सगळय़ाला सुरुवात झाली तेव्हाच कुणीतरी इलाज करायला हवा होता. मज्जाव करायला हवा होता. आजार वाढल्यावर उपचार करून काय उपयोग\nही शाळा सगळय़ांच्या दु:खाचा पोत जाणून घेत होती. तिला कारणं समजली होती. तिच्या बाबतीत असं घडत नव्हतं. कारण येणारा जेव्हा तिला बघायचा तेव्हा म्हणायचा, ‘‘किती सगळं स्वच्छ आहे. कागदाचा साधा तुकडाही सापडायचा नाही. येणारं प्रत्येक मूल गेट बंद करतं जाता-येता. इतकंच नाही तर अगदी मोठय़ा माणसांनी, कुणीही गेट उघडं टाकलं तरी त्या व्यक्तीला परत बोलावून मुलं गेट बंद करायला लावतात. मुलांच्या हाताला ही सवय लागलीय. मुलं कुठंही जाताना रांगेनं जातात. शिस्त नुसतीच नाही तर समजून पाळली जातेय. या दोन्हींच्या सवयीमुळे ही मुलं बाहेर जातात तेव्हा वेगळी ठरतात.’’ हे सगळं झालं कारण एकदा शाळेने ठरवलं मुलांच्या सवयींवर काम करायचं.. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत..\nमुलं मग त्यांना येणारे वेगळे अनुभव एकमेकांना सांगतात. एका मुलाला ‘‘अरे दोस्ता गेट काय बंद करायचं असतं गेट काय बंद करायचं असतं लावतील की मागून येणारे लावतील की मागून येणारे चल उगाच फार व्यवस्थित आहेस असं दाखवू नकोस.’’ असं कुणी म्हणालं तेव्हा या मुलाला आपल्या शाळेची आठवण होते. कारण कितीही घाई असली, उशीर झाला असला, मागून कुणी येताना दिसत असलं तरी या शाळेतला मुलगा गेट बंद करूनच आत येतो. गेट उघडं टाकल्यावर काय घडतं हे त्याला माहीत असतं. शाळेला माहीत होतं की अशा अनेक गोष्टींच्या सवयी मुलांना लावाव्या लागतात. घराचं जसं गेट बंद केलं जातं तसंच कुठलंही गेट बंद करायचं असतं. येता-जाता ही साधी गोष्ट कुणी आचरणात आणत नाही. सवय लावल्यावर लागते. नि सवय लावण्यासाठी सर्वानी जाणीवपूर्वक ठरवावं लागतं.\nया शाळेत कुठेच कागदाचा तुकडाही टाकलेला दिसायचा नाही. त्याचीही गोष्टच आहे. एक दिवस सकाळी शाळेत येता येता शाळेचे मुख्याध्यापक रस्त्यातला कचरा वेचत येऊ लागले. एका पिशवीत कचरा साठवू लागले. मुलं बघत होती. पटकन कुणी पुढं आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी लहान लहान मुलं म्हणजे ५ वी, ६ वीतली मुलं आपणहून कागद-कचरा वेचत होती. ८ वीच्या पुढची मुलं काहीशी हसत होती. पण सर काहीच बोलले नाहीत. हा विषयच त्यांनी टाळला. कारण हे एक दिवसाचं नाटक नव्हतं तर रोज स्वत: ते शाळेची स्वच्छता करू लागले. वेगवेगळय़ा खांबांना त्यांनी कचरा टाकण्यासाठी पोती बांधली. खोल परिणाम झाला याचा. काही शिक्षकही हे काम करू लागले. एक दिवस सर स्टाफरूममध्ये आले आणि म्हणाले, ‘‘आपण मुलांना सांगतो, श्रमदान करा. तासही असतो श्रमदानाचा. पण ते स्वत:मध्ये रुजवणं खरच कठीण असतं. पहिल्यांदा माझंही स्वत: खाली वाकून कागद उचलण्याचं धाडस नाही झालं. माझं पद, हुद्दा, मान वाकू देईना. खरंच खूप अवघड आहे हे पण एकदा वाकलो नि काहीच वाटेनासं झालं. वेगळंच, छान वाटलं. खूप मोकळं वाटलं. इगो सळसळत दिसेनासा झाला..’’\nएका शिक्षकांनी विचारलं, ‘‘सर.. अचानक कसं घडलं हे\nसर म्हणाले, ‘‘इतके दिवस प्रतिष्ठेच्या वल्गना होत्या. कदाचित हा टीकेचा विषय होईल तसा चेष्टेचाही. गांधींच्या एका आश्रमात गेलो होतो. सकाळी सर्वजण स्वच्छता करत होते. प्राचार्य, संस्थाप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थीही. तेव्हा कुणाचं पद माहीत नव्हतं. आपोआप झाडू उचलला गेला. कुणीच बघत नव्हतं माझ्याकडे. मी कोण.. इतरही कोण होते हे दिवस सुरू झाल्यावर समजलं. इथे आल्यावरही असंच वागावंसं वाटलं. माझी कुणावर सक्ती नाही बरं का.. इतरही कोण होते हे दिवस सुरू झाल्यावर समजलं. इथे आल्यावरही असंच वागावंसं वाटलं. माझी कुणावर सक्ती नाही बरं का. मला वाटतं, आपल्या गोष्टीसुद्धा आपण करण्याची सवय नाही आपल्याला, मग सार्वजनिक गोष्टी कशा करणार. मला वाटतं, आपल्या गोष्टीसुद्धा आपण करण्याची सवय नाही आपल्याला, मग सार्वजनिक गोष्टी कशा करणार’’ असं म्हणून ते निघाले. कुणीतरी चेष्टा केली. ‘‘आजपासून शिपायांना सुट्टी.’’ सर फक्त हसले. म्हणाले, ‘‘कुणावर काय परिणाम होतो ते उद्या बघू. ज्यांच्यावर परिणाम होणं अपेक्षित आहे तेवढा झाला तरी पुष्कळ.. आणि खरं तर तीही अपेक्षा नाही. मला स्वत:ला खूप बरं वाटतंय या स्वच्छतेमुळे..’’\nसरांच्या स्वत:च्या उदाहरणामुळे पडलेले कागद उचलायची मुलांना सवयच झाली. इतकंच नव्हे तर वाचनालयात पुस्तकं न नोंदवता जागेवरून बाहेर येऊ लागली नि परत जागेवर जाऊ लागली. गुलजार, रश्दी यांच्या पुस्तकांबद्दलच्या कवितांची सुलभ भाषांतरं फळय़ावर दिसू लागली. पुस्तकांची पानं दुमडणं, पुस्तकांना गुंडाळणं सवयीनं कमी कमी होऊ लागलं. मात्र त्यासाठी मुलांशी बोलावं लागलं, त्यांना उदाहरणं द्यावी लागली. प्रात्यक्षिकं करून घ्यावी लागली. ‘‘आपला एक हात आज दोन तास दुमडून राहू या.’’ या प्रयोगावर मुलं म्हणाली, ‘‘पुस्तकं निर्जीव आहेत. त्यांना दुमडून रहायचा काय त्रास असतो. आणि शिवाय फाटलं पुस्तक तर आपण नवं आणू शकतो..’’\nपुस्तकाचं सजीवपण सांगायला, हे घडायला मात्र वेळ गेला. एका कार्यानुभवाच्या तासाला बाईंनी ‘बुकमार्कस्’ करून घेतले. गोष्टी वाटेल तशा वापरल्या तरी चालतात या समजुतीला तडा जाऊ लागला. याने शाळा सुखावली होती. अशा अनेक गोष्टींची सवय फक्त मुलांना लागून चालत नाही. सगळय़ांनाच लागावी लागते. त्याचा प्रयोग सुरू झाला.. प्रार्थनेला येताना मुलं काही नोंदी करून घेण्यासाठी वह्य़ा आणायची. राष्ट्रगीत-प्रतिज्ञा झाल्यावर बसायला सांगितलं जायचं. त्याआधी ‘सावधान’मध्ये उभं राहताना मुलं उभ्यानं वह्य़ा खाली टाकायची. धडाधड आवाज व्हायचे. कुणालाच काही वाटायचं नाही. मग एके दिवशी प्रार्थनेनंतर बाई म्हणाल्या, ‘‘आपण आता वह्य़ा हातात घेणार आहोत आणि आवाज न करता खाली ठेवू सगळय़ांनी, अलगद. कारण वह्य़ांना पण लागतं. आपल्याला लागेल ना कुणी फेकल्यावर. तुम्ही म्हणाल, ‘‘वह्य़ा निर्जीव, बाकं निर्जीव, पुस्तकं निर्जीव. पण मग त्याच्याबरोबर असं वागणारी आपण माणसंपण निर्जीवच ना तुम्ही म्हणाल, ‘‘वह्य़ा निर्जीव, बाकं निर्जीव, पुस्तकं निर्जीव. पण मग त्याच्याबरोबर असं वागणारी आपण माणसंपण निर्जीवच ना’’ हळूहळू मुलांच्या कृतीत बदल झाला. आणि आता मुलं सभागृहात येतात नि प्रार्थनेसाठी वह्य़ा जमिनीवर ठेवतात तेव्हा अजिबात आवाज येत नाही.\nहा सगळा बदल ही शाळा बघत होती नि समाधानाने श्वास घेत होती. शाळा बघायला येणारे विचारत, तुम्ही हे सगळं कसं करता मुलं इतक्या ओळीने कशी जातात मुलं इतक्या ओळीने कशी जातात वर्गातून ओळीत कशी बाहेर पडतात वर्गातून ओळीत कशी बाहेर पडतात गेट बंद करतात. आणि कितीतरी सवयी आम्ही बघतोय. आम्हाला त्या जाणवतायत. आमचा प्रश्न आहे, हे कसं शक्य आहे गेट बंद करतात. आणि कितीतरी सवयी आम्ही बघतोय. आम्हाला त्या जाणवतायत. आमचा प्रश्न आहे, हे कसं शक्य आहे तेव्हा त्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं, ‘तुमच्या मते चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या’ असा प्रश्न विचारून मुलांना आम्ही चक्क यादीच करायला सांगितली. आम्हालाही नवल वाटलं. मुलांना चांगलं वाईट यातला फरक किती स्पष्ट कळतो. मग एकदम सगळं काम नाही करायला घेतलं. नियोजन केलं. कोणत्या पद्धतीनं काम करायचं यावर विचार केला. ‘आनंद’ हा गाभा ठेवून. आपण चांगले वागतो यावर विश्वास ठेवायला शिकायचंय असं ठरवलं. मग वेगवेगळय़ा उपक्रमांतून, कार्यक्रमांतून, दैनंदिन घटनांतून अनेक वाईट सवयी बाजूला केल्या.\nशाळेतून जेव्हा मुलं बाहेर पडतात तेव्हा ‘नजरियाँ’ बदलतो पाहणाऱ्याचा. कधी कधी चांगल्या सवयींचा त्रास होतोच. झाला तर समोरच्यात बदल होतोही..\nऐकणाऱ्या शाळा अवाक् झाल्या होत्या नि शाळा मनापासून समाधानाने हसत होती..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-03-25T07:33:52Z", "digest": "sha1:TEBXBBYUGZUU5O3UXZK42RYCDPUV7UFC", "length": 12935, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्याध्यापक गायकवाड यांनी प्रवरेला कुटुंब मानून सेवा केली – शालिनिताई विखे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुख्याध्यापक गायकवाड यांनी प्रवरेला कुटुंब मानून सेवा केली – शालिनिताई विखे\nसंगमनेर – पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेले प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे रोपटे वाढत असताना पद्मभुषन बाळासाहेब विखे पाटील यांनी जातीपातीच्या राजकारणाला कोठेही थारा दिला नाही. त्याच्याचं मार्गदर्शनाखाली शिर्डी मतदार संघात ३२ वर्ष संस्थेला आपले कुटुंब मानून प्रामाणिक सेवा करत विद्यार्थी घडवण्याचे काम मुख्याध्यापक मधुकर गायकवाड यांनी केले आहे. असे गौरोउदगार जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी काढले आहेत.\nसंगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे मुख्याध्यापक मधुकर विठ्ठलराव गायकवाड यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ भुसाळ होते. विखे पाटील कारखाण्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते, शैलजाताई नावदंर, मुख्याध्यापक मधुकर गायकवाड, विजयाताई गायकवाड, संचालक भागवंत उंबरकर, उद्योजक विलास उंबरकर, माजी पंचायत समिती सदंस्य सरुनाथ उंबरकर, संचालक हरिभाऊ आहेर, सचिव भारत घोगरे, सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, शिक्षणाधिकारी एस. आर. रेठरेकर, केद्रं प्रमुख वाघ, अण्णासाहेब सारबंदे, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, ���िजय शेळके, मुख्याध्यपक गिरी व दिवेकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक मधुकर गायकवाड यांचा सपत्नीक सत्कांर मान्यंवराच्या हस्तें करण्यात आला.\nशालिनीताई विखे पुढे म्हणाल्या की, गावामध्ये विकास कामे करत असताना ग्रामस्थाना विश्वासात व बरोबर घ्यावे. ‘ खेकडा प्रवृत्ती ’ सोडून दुरदृष्टी व ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केल्यास विकास कामाला कोणीही थांबवू शकणार नाही. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून गावासाठी २० लक्ष रुपयाचे डाबंरी रस्ते, भुसाळ वस्तीवरील शाळेसाठी एक खोली व स्मशान भूमीसाठी ७ लक्ष रुपये निधी मंजुर झाला असून, लवकरचं कामे सुरु होतील अशी माहिती शालिनीताई विखे पाटील यांनी याप्रसंगी दिली.\nपालकमंत्री, आ.कर्डिलेंच्या तालावरच झेडपी चालते\nनेवासा पोलीस वसाहतीचे भाग्य कधी उजळणार ; भंगार साहित्याचा पडला खच\nकोपरगावात क्रीडा, कला महोत्सवाचे आयोजन – विवेक कोल्हे\nमहापालिकेची मतमोजणी शहरात ; मोठा पोलीस बंदोबस्त\nशिवसेना शहरप्रमुखांची प्रतिष्ठा पणाला ; नवख्या कोतकरांमुळे सामना अटीतटीचा\nअर्बनमधील अफरातफरीची सुनावणी 15 डिसेंबरला\nविकासासाठी नागरिक परिवर्तन करतील- दिलीप गांधी\nकेडगाव भूकंपानंतर लोणीकरांची शहराकडे पाठ\nनगर महापालिका रणसंग्राम: निवडणुकीतून माघारीसाठी उमेदवाराला चौघांनी धमकावले\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \n��दय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-saam-tv-news-crosses-mark-five-lacks-subscriv-4035", "date_download": "2019-03-25T08:14:27Z", "digest": "sha1:3CU6MLSTSAGOCQTSP7BS62P6ZDMFWCQW", "length": 9821, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news saam tv news crosses mark of five lacks subscriv | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसकाळ माध्यम समूहाच्या 'साम टीव्ही न्यूज'ची डिजीटल भरारी\nसकाळ माध्यम समूहाच्या 'साम टीव्ही न्यूज'ची डिजीटल भरारी\nसकाळ माध्यम समूहाच्या 'साम टीव्ही न्यूज'ची डिजीटल भरारी\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nमराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा डिजीटल माध्यमांमध्येही उमटवण्यास सुरुवात केली आहे. समाज उपयोगी, positive त्याचबरोबर निष्पक्ष बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यत कायम पोहोचवणाऱ्या साम टीव्हीचा youtube वरचा subscriber बेस गेल्या वर्षभरात तब्बल साडेचार लाख subscribers बेस वाढलाय. साम टीव्हीच्या Youtube Subscribers ची संख्या पाच लाखांच्या वर गेलीये.\nसाम टीव्हीच्या youtube.com/saamtv चॅनलवर आहे तरी काय \nमराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा डिजीटल माध्यमांमध्येही उमटवण्यास सुरुवात केली आहे. समाज उपयोगी, positive त्याचबरोबर निष्पक्ष बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यत कायम पोहोचवणाऱ्या साम टीव्हीचा youtube वरचा subscriber बेस गेल्या वर्षभरात तब्बल साडेचार लाख subscribers बेस वाढलाय. साम टीव्हीच्या Youtube Subscribers ची संख्या पाच लाखांच्या वर गेलीये.\nसाम टीव्हीच्या youtube.com/saamtv चॅनलवर आहे तरी काय \nसमाजात घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवरील इन डेप्थ रिपोर्ट्स. ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बातमीच्या दोन्ही बाजू.\n#ViralSatya - व्हायरल सत्य-असत्य म्हणजेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओची आम्ही करतो पडताळणी. काय खरं, काय खोटं याबद्दल पडताळणी करून कुठल्या व्हायरल व्हिडीओ खऱ्या कुठल्या खोट्या, याबद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते.\nशेतीच्या बातम्यांवर कायमच आमची असते नजर. शेतीच्या दररोजच्या Top 20 बातम्यांसोबत आम्ही पोहोचवतो शेतकऱ्यांच्या यशोगाथा.\nBest Of Marathi - बेस्ट ऑफ मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रात, मराठी समाजात जे जे उत्तम आहे, उत्तुंग आहे त्या व्यक्तींच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील.\nतुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या 'इथे नोकरी मिळेल' या टॅबखालील बातम्यांवर नक्की नजर ठेवा. 'इथे नोकरी मिळेल'च्या माध्यमातून आम्ही समाजातल्या तरुणांपर्यंत नोकरीच्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.\nतुम्ही अजून आमच्या सोशल मीडियावर नसाल तर या आहेत आमच्या सोशल मीडियाच्या लिंक्स\nYoutube वर आम्हाला SUBSCRIBE करा www.youtube.com/SaamTV या लिंकवर. आमच्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा\nFacebook वरही तुम्हाला आमच्या बातम्या पाहायला मिळतील www.facebook.com/SaamTV या लिंकवर\nTwitter वरही झपाट्याने प्रेक्षकांची आम्हाला साथ लाभतेय. आमच्या बातम्या Twitter वर पाहण्यासाठी भेट द्या www.twitter.com/saamTVnews\nआम्ही नुकतंच तुमच्या आवडत्या instagram वरही आलो आहोत. Insta वर आमच्याशी जोडले जाण्यासाठी तुम्ही सर्च करू शकतात saam Tv News किंवा भेट द्या www.instagram.com/saamtvnews लिंकवर.\nयाचसोबत तुम्ही www.saamtv.com या संकेतस्थळावर आमच्या सर्व बातम्या पाहू शकता. मोबाईलवर आमच्या बातम्या पाहण्यासाठी Android Play Store वरुन नक्की डाऊनलोड करा, साम टीव्हीचं Mobile Tv App.\nगेल्या एक वर्षभरात कुठलंही पेड प्रमोशन न करता फक्त कंटेंटच्या जोरावर साम टीव्हीने उल्लेखनीय कामगिरी केलीये. यामुळे प्रेक्षकांनी साम टीव्हीच्या निष्पक्ष पत्रकारितेवर शिक्कामोर्तब केलाय. प्रेक्षकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2015-Santra2.html", "date_download": "2019-03-25T07:48:56Z", "digest": "sha1:ZKMZZYJOWUNQUZZDHMTJMCF7GLPCKKHI", "length": 4295, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने जुन्या संत्रा बागा व पन्हेरीसून ५ वर्षापासून उत्पन्न व दर्जा दोन्हीही उत्तम !", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने जुन्या संत्रा बागा व पन्हेरीसून ५ वर्षापासून उत्पन्न व दर्जा दोन्हीही उत्तम \nश्री मनोहरसिंग ठाकूर, मु.पो. पांढुर्णा, जि. छिंदवाडा. (म.प्र.) मोबा. ०९४२५८९९४५५\nमी गेल्या ५ वर्षापासून आमच्याकडील १००० संत्रा व १,५०,००० पन्हेरीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर व प्रिझमचा वापर करत आहे.\nसंत्रा झाडे १५ ते १६ वर्षाची आहेत व पन्हेरी जुलै २०१४ ला लावली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून संत्र्याची लागवड १५' x १६' वर आहे व पन्हेरी १' x १' अशा पद्धतीची आहे. दोन्ही बाजूला डबल लाईनचे ठिबक केले आहे व विहीरीला पाणी भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये मी झाडांना पाटाने पाणी सोडतो. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने संत्र्याचा आंबे बहार व मृग बहार असे दोन्ही बहार घेतो.\nसंत्रा झाडांची फूट व नवती काढण्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर, प्रिझम, क्रॉपशाईनरची फवारणी केली. त्यामुळे मला संत्रा आणि पन्हेरीवरील नवती व फूट चांगली निघाली. नंतर संत्रा झाडावर व पन्हेरीवर बुरशी व मररोग आला होता, तेव्हा मी हार्मोनी, जर्मिनेटर, प्रिझमची फवारणी केली व फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी मर रोग पुर्णपणे आटोक्यात आला.\nसंत्रा फळांची साईज व आकार वाढण्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे राईपनर व न्युट्राटोनची फवारणी केली, तर काही दिवसांतच माझ्या झाडांवरील फळांची साईज वाढली व क्वॉलिटीही सुधारली.\nमाझ्या शेतात गेल्या ५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरत आहे व मला खूप चांगले रिझल्ट आले आहेत. मी यापुढेही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीनेच शेती करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://excelcityindia.com/healthcare/wellness-club/herbalife-wellness-centre_i9721", "date_download": "2019-03-25T07:21:54Z", "digest": "sha1:NMDNGKBOTSNF2JYWY2K6RV5PO26KDRDP", "length": 4327, "nlines": 72, "source_domain": "excelcityindia.com", "title": "Herbalife Wellness Centre Tasgaon - ExcelCity India", "raw_content": "\nवजन कमी करा अथवा वाढवा,तेही विना डायट, विना औषध,व खात्रीशीर...\nखरच आपण निरोगी आहात काय जाणून घ्या मोफत तुमच्या शरीराची रचना आणि समजून घ्या\nस्वतःच्या आरोग्यासाठी फक्त १० मिनिटे वेळ द्या.\nवजन कमी असणे किंवा चरबी जास्त असणे ,हे दोन्हीही शरीरासाठी धोकादायक आहे.\nवजन कमी असणे म्हणजे : भूक न लागणे,गॅसेस व पित्ताचा त्रास,लो.बी.पी,अशक्तपणा, उत्साह नसणे, पचनाच्या तक्रारी, थकवा येणे, मनावर ताण येणे,चिंता वाटणे, इत्यादी..\nचरबी जास्त असणे म्हणजे: थकवा, पचनाच्या तक्रारी, कंबर-गुडघेदुखी, रक्तवाहिन्यातील अडथळे, हाय.बी.पी,मधुमेह, लकवा मारणे,हृदयरोग, फॅटी लिव्हर, पित्ताशयातील खडे, कोलेस्ट्रॉल, इत्यादी..\nहे सर्व तुम्ही योग्य वेळी टाळू शकता...जपान टेक्नॉलॉजिच्या बॉडी कंपोज़िशन मॉनिटर द्वारे तुमचे बॉडी फॅट ऍनालिसिस करुण घ्या आणि निरोगी अरोग्यासाठी काय करायचे याचा सल्ला घ्या.\nलहान मुलांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीसाठी योग्य सल्ला व मार्गदर्शन.\nम्हणून आपल्या शरीर चिकेत्सेसाठी एकवेळ अवश्य भेट द्या.. आणि आरोग्य संपन्न राहण्याचा मार्ग निवडा.\n(फोनवरुन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ashwini-bidre-missing-case-police-officer-abhay-kurundkar-detained/", "date_download": "2019-03-25T08:11:36Z", "digest": "sha1:3A42CTPJVINDIEPSAU67I42KYRAEMWKA", "length": 6081, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर अटकेत", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर अटकेत\nनवी मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे – बिद्रे बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक केली. सदर कारवाई नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. १५ एप्रिल २०१६ पासून अश्विनी कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ���च्च न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस तपासात टाळाटाळ करीत असल्याची तक्रार अश्विनी यांचे वडिल जयकुमार बिद्रे यांनी केली होती. अभय कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी ही कारवाई करत अभय कुरुंदकर यांना अटक केली आहे.\nदरम्यान अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनी यांच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे उघड झाले होते.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nनागपूर विद्यापीठाची ‘व्हॉट्स अॅप’ अॅडमिनला कायदेशीर नोटीस\nमणिशंकर अय्यर यांच्या विरोधात संगमनेरमध्ये फौजदारी गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/files/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-st-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:28:07Z", "digest": "sha1:NG2RWXDK72QEYBUXTRVL6ZM6FN3QWG5H", "length": 2289, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\nVideo of जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1951", "date_download": "2019-03-25T08:31:56Z", "digest": "sha1:5RCPNDGWPAQ4IMJD2X7FSB6PUESJV6IB", "length": 31635, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नाझरे – संतांचं गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n��ाझरे – संतांचं गाव\nनाझरे गावाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही लाभले आहेत. ती संतमहात्म्यांची भूमी, तशीच संगमाची. नाझरे म्हटले की संतकवी श्रीधरस्वामींचे नाव पुढे येते. जुने लोक ‘श्रीधरस्वामींचं नाझरं’ असेच म्हणतात. गावाला वळसा घालून वाहणारी माणनदी. तिला वरच्या अंगाला गोंदिरा ओढा मिळतो आणि खालच्या अंगाला बोलवण नदी. अशा दोन दोन संगमांवर विराजमान झालेले गाव - नाझरे ते सोलापूर जिल्ह्याच्या सांगोले तालुक्याच्या काठावर आहे. गावाची हद्द संपते तेथे ग.दि.माडगुळकरांच्या गावाची सीमा सुरू होते. मात्र ते आहे सांगली जिल्ह्यात. नाझरे गावापासून खाली पंधरा–सोळा कोसांवर विठ्ठलाची पंढरी तर बाराएक कोसांवर दामाजीपंतांचे मंगळवेढे.\nसोलापूर-कोल्हापूर हमरस्त्यावर सांगोल्यापासून दहा मैलांवर फाटा फुटतो, तो नाझरे मठ. मठापासून दोन मैलांचे अंतर तुडवले, की बेलवणचा पूल लागतो. ते आले नाझरे गावात शिरताना महार, मांग, चांभार यांची घरे तोंडालाच. ती ओलांडून, एस.टी. पाहुण्याला गावाच्या बाजारपेठेतील भरचौकात आणून सोडते. आठवड्याचा बाजार दर शुक्रवारी भरतो. तो चौक म्हणजे गावाचे नाक. चौकातच चावडी पोलिस गेट आहे. गेटला डावी मारून थेट नाकासमोर चालू लागावे. सरळ आखलेला रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हरत-हेची दुकाने. पुढे थोडी नागमोडी वळणे घेत घेत रस्ता दीडशे पावलांवर थांबतो, तो कासारांच्या माडीपुढील मोठ्या चौकात. गावातील तो मोठा चौक. चौकातून एक रस्ता डावीकडे वीरभद्राच्या देवळाकडे जातो तर दुसरा उजवीकडील महादेव, मारुती, विठ्ठल-रखुमाईच्या देवळांकडे वळतो. मारुतीचे देऊळ हे गावचे शेवटचे टोक. त्या देवळाला लागून दगडी बांधणीची मोठी वेस आहे. वेशीच्या उंचच उंच कमानीवर शिळा टाकलेल्या आहेत. तसेच, नदीत उतरणारा दगडी घाट आहे. वेशीच्या आत, दोन्ही बाजूंला दोन देवडी आहेत. वेशीच्या डाव्या अंगाला लागून पुरुष-दीड पुरुष उंचीचा, दगडी बांधणीचा हुडा – (नदीच्या काठी बांधलेली तटबंदी) आहे. पुराचे पाणी गावात शिरू नये म्हणून ती खबरदारी.\nवेशीच्या वरच्या पायरीवर उभे राहून नजर लावली, की पैलतीरावर झाडाने वेढलेला परिसर दिसतो. तो ऐसपैस पसरलेला दत्त मंदिराचा परिसर आणि तेच श्रीधरस्वामींचे आजोबा दत्तानंद यांच्या समाधीचे स्थान. दत्ताचे मंदिर छोटे असले तरी मंदिराला सन्मुख होऊन ध्यानस्थ बसावे ��से दत्तानंदांचे समाधी-स्थळ आहे. दत्तानंद, ब्रह्मानंद आणि श्रीधरस्वामी अशी परंपरा आहे. ब्रह्मानंदांनी आत्मप्रकाश हा चौदा हजार ओव्यांचा ग्रंथ १६८२ साली लिहिला. त्यामध्ये सुरुवातीसच\nनाझरे नाम नगरि l माणगंगेचिये तिरि \nआनंदमठा अंतरि l समाधिस्थ दत्तानंद\nअसा त्यांनी नाझरे गावी दत्तानंदांनी जिवंत समाधी घेतल्याचा उल्लेख आहे.\nदत्तानंद, ब्रह्मानंद आणि श्रीधरस्वामी यांची परंपरा श्रीधरस्वामींचे चुलते निजानंद रंगनाथस्वामी यांच्यापासून सुरू होते. रंगनाथस्वामी हेही अधिकारी पुरूष. त्यांचा जन्म १६१२ चा. ते चारीधाम करत नाझरे येथे स्थायिक झाले. श्रीधरस्वामी हे त्यांचे पुतणे, ते सर्व देशपांडे कुळातील असले तरी आडनाव नाझरेकर असे लावत. रंगनाथस्वामींनी ‘योगवसिष्ठसार’ नावाचा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. नाझरेकर सर्व संतांमध्ये शिरोमणी ठरले ते श्रीधरस्वामी. त्यांनी शिवलीलामृत, पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय इत्यादी विपुल रचना केली. त्यांनी सर्व लेखन अशिक्षित समाज डोळ्यांपुढे ठेवून साध्या, सोप्या व रसाळ भाषेत केले. त्यामुळे त्यांच्या ग्रंथांची पारायणे जितकी होतात तितकी अन्य कुणाच्याही ग्रंथांची होत नसावीत. नाझरे येथे संतांच्या मांदियाळीत भक्तिमार्ग जोपासून ग्रंथरचनाही केली असे घोडके कुळातील संत म्हणजे रंगनाथ स्वामी (१६१२), दत्तानंद आणि श्रीधरस्वामी (१६५८). रंगनाथ स्वामी हे राजयोगी आणि दास पंचायतनातील एक गणले गेले. त्यांच्या योगवासिष्ठ सारटीका, राजेंद्र मोक्ष, शुकरंभासंवाद या प्रसिद्ध रचना. त्यांनी बाहत्तरव्या वर्षी समाधी घेतली.\nदत्तानंद स्वामी हे रंगनाथ स्वामींचे चुलते आणि श्रीधरस्वामींचे आजोबा. त्यांनी ‘आत्मप्रकाश’ ग्रंथ लिहिला. शेवटी, त्यांनी दत्तमंदिराच्या आवारात समाधी घेतली. घराण्याचे मूळ पुरूष राघोपंत घोडके (खडके). ते चवसाळा महालातील खडकी गावचे म्हणून खडके. ते विजापूरच्या दरबारी अश्वपरीक्षक होते, म्हणून घोडके झाले आणि त्यांना नाझरे महालाचे देशपांडे वतन मिळाले. राघोपंतांचा मुलगा चंद्राजी पंत. त्यांना नागेश व दत्तोपंत ही दोन मुले. दत्तोपंतांना रंगोपत हा मुलगा. त्यांचा वंशविस्तार होऊन रामजी, बोपाजी (निजानंद), कृष्णाजी आणि दत्तानंद ही चार मुले झाली. दत्तानंदांचा ब्रह्माजीपंत हा मुलगा. ते संतश्रेष्ठ श्रीधरस��वामींचे पिता. दत्तानंदांचे बंधू निजानंद यांना तीन मुले झाली. रंगनाथस्वामी हे दोन नंबरचे अपत्य. अशा त-हेने रंगनाथस्वामी आणि श्रीधर स्वामी या काका-पुतण्यांच्या जोडीने मराठी सारस्वतात मोलाची भर घातली. श्रीधरस्वामींनी साठ हजार रचना केल्या. त्यांच्या सहज सुलभ कवितेने महाराष्ट्राच्या कानाकोप-यात भक्तिसंप्रदायाची पताका रोवली. त्या घराण्याला सातत्याने दोनशे वर्षे साधुत्वाची व ग्रंथनिर्मितीची परंपरा लाभली आहे. त्यांच्या एका रचनेत नाझरे या कर्मभूमीचा\nअसा गौरवात्मक उल्लेख आहे.\nपुढे, तीनशे वर्षे त्या गावाची संतपरंपरा खंडित झाली, ती संजीव स्वामींच्या रूपाने पुनरुज्जीवित झाली. (ऋणनिर्देश : डॉ. प्रा. कृष्णा इंगोले. माणदेश; स्वरूप आणि समस्या.)\nनाझरे येथील संतांच्या मांदियाळीत कर्नाटकातील बेंडवारेकडील लिंगायतवाणी समाजातील पदम नामशेट्टी या कन्नड भाषिकाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी दत्तसंप्रदायाची परंपरा जोपासली आणि अडीचशे–तीनशे वर्षे पडिक स्थितीतील दत्त मंदिर परिसराचा जीर्णोद्धार केला. ते पुढे संजीव स्वामी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचे देहावसान १९८२ मध्ये झाले. त्यांनी सुरू केलेला दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.\nनाझरे गावाचा सामाजिक पोत अनेक जाती-धर्मांच्या लोकांनी विणला गेला आहे. त्यांत लिंगायत प्रमुख आहेत. लिंगायतांमध्ये रेड्डी, वाणी, जंगम हे कट्टर शैवपंथी आहेत. ब्राह्मणांची घरे त्यांची स्वतंत्र अस्मिता राखून आहेत. मराठा, माळी, परीट, कोष्टी, सुतार, लोहार, सोनार, कासार हे बहुजन समाजातील लोक आहेत. तद्वत वाघ, डवरी, बुरूड, रामोशी, घिसाडी, कैकाडी, वडार हे लोक गावाच्या विशिष्ट भागात घरे करून राहिले आहेत. महार, मांग, चांभार, ढोर हे गावाच्या सुरुवातीस वस्ती करून आहेत. गावात पेठेच्या बाजूला मशीद आहे. तिला लागून काझी, तांबोळी, मुलाणी आहेत. गावापासून एक मैलावर काझींची मोठी वसाहत आहे. गावाचे स्वरूप निखळ कॉस्मापॉलिटन असे आहे. विशेष म्हणजे खेर या मागासलेल्या समाजातील तायाप्पा हरी सोनवणे म्हणून खासदारही तेथून होऊन गेले. असे सगळे असले तरी गावावर पकड आहे ती रेड्डी समाजाची.\nपंचक्रोशीत नाझरे गावाचे महत्त्व असे आहे, की ब्रिटिशांच्या राजवटीत जिल्हा लोकल बोर्डातर्फे एक प्राथमिक सेंटर आणि शाळा सुरू झाल्या. आता गावी दो�� कनिष्ठ महाविद्यालये, इंग्रजी माध्यमाची शाळा, जिल्हा परिषदेची शाळा सुरू आहेत. शिकलेला आणि नोकरदार वर्ग मात्र गावात रमत नाही, त्याचा ओढा तालुक्याच्या गावी आहे. त्यामुळे तालुक्याकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. मी त्यांतील पंधरा–वीस लोकांना भेटलो, त्यावेळी ‘शेतीवाडी गावी असताना तालुक्याला राहायला आलात ते कोणत्या कारणासाठी तेही सर्व कुटुंबकबिला घेऊन तेही सर्व कुटुंबकबिला घेऊन’ असे विचारले. त्यावर त्यांची उत्तरे मजेशीर पण न पटणारी होती. कुणी सांगितले की मुलांच्या शिक्षणासाठी. कुणी म्हटले, की मुलांना इथे चांगलं वळण लागते. कुणी काही, कुणी काही. थोडे पटणारे, बरेचसे न पटणारे. हे मात्र खरे, की खेडी आता पांढरपेशांची राहिलेली नाहीत.\nगावाच्या राजकारणाची सूत्रे लिंगायत रेड्डी समाजाच्या हाती एकवटली आहेत. कारण वाड्यावस्त्या मिळून त्यांचा तीस-एक उंबरा आहे. ते आहेत म्हणून त्यांचे गुरू जंगम समाजही तेथे एकवटला आहे. त्यांचीही दहा घरे आहेत. साहजिकच सर्वांचे दैवत वीरभद्र यांचे देऊळ आहे. लिंगायत समाजात मुलाच्या लग्नानंतर नवस म्हणून अग्निहोम घालतात. देवळात लागूनच अग्निहोमासाठी जागा मुक्रर केलेली असते. त्यामध्ये साधारण ५ x १० फुटांचा खड्डा खोदला जातो. त्यात लाकडाचे ओंडके टाकून ते पेटवले जातात. संध्याकाळपर्यंत त्याचे रसरशीत निखारे पडतात. संध्याकाळी सर्व स्वामी लोक अग्निहोमाच्या पूर्वमुखी उभे राहून मंत्रोच्चार करत बेलाची पाने अग्निहोमात टाकत राहतात. ज्याक्षणी पाने जळायची बंद होतात त्याक्षणी अग्नी शांत झाला असे समजून, स्वामीलोक वीरभद्राची काठी उभी धरून त्यातून चालत जातात. त्यानंतर नवरदेव त्या इंगळावरून चालत जातो. ज्यांना कुणाला जायचे आहे तेही जातात. प्रस्तुत लेखकाने अग्निहोमातून चालत जाण्याचा अनुभव घेतला आहे इतकेच की, चाल एकदम गतिपूर्ण होती.\nगावाला कोरडवाहू जमिनीचे प्रमाण मोठे आणि पावसाचे प्रमाण कमी आणि बरेचसे अनियमित. पूर्वी विहिरीच्या पाण्यावर बागा पोसायच्या. पण नंतरच्या काळात इलेक्ट्रिक पंप आले, उपसा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि जमिनीतील पाण्याची पातळी खोल खोल होत गेली. विहिरींची जागा बोअर वेलने घेतली आणि जमिनीखालच्या पाण्याला कॅन्सरच लागला आता बोअरवेलही निकामी होत आल्या. मग नदीच्या पात्रात विहिरी घेऊन उपसा ��ुरू झाला. ज्यांना ज्यांना हे शक्य आहे आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे त्यांनी दूरवरपर्यंत पाईपलाईन टाकून पाणी शेतात नेले आहे. नेहमीची ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा ही पिके मागे पडली आणि त्यांची जागा डाळिंबे, बोरे या नगदी पिकांनी घेतली. कमी पाण्यावर पोसणारी ही पिके. सारी माळराने त्या बागांनी फुलली. ठिबक सिंचन पद्धत वापरून कमी पाण्यावर अधिक क्षेत्र फळबागांखाली आले. पण माणदेशी पाऊस इतका बेभरवशाचा आहे, की पुन्हा बागा उजाड होऊ लागल्या. काही काळाकरता सुबत्ता आली आणि बघता बघता, निघून चालली. जी सुबत्ता आली ती मोजक्यांच्या वाटेला. बहुसंख्य शेतकरी वर्षानुवर्षे जेथे आहे तेथेच पाहायला मिळतो.\nलिंगायत रेड्डी हे कर्नाटकात बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या पंथाचे अनुयायी आणि कट्टर शिवभक्त, शाकाहारी जीवनपद्धतीने बसवेश्वरांनी दिलेले आचारविचार पाळतात. पुरुष आणि स्त्रियाही शंकराचे प्रतीक म्हणून एक छोटी काळी पिंड चांदीच्या गोल डबीत ठेवून ती जानव्यासारखी घालतात. तेच ते पवित्र लिंग. कपाळावर गंधाच्या पांढ-या विभूतीचे आडवे पट्टे ओढतात.\nकर्नाटकाच्या महाराष्ट्राला लागून असणा-या भागातील काही कुटुंबे नाझरे व पंचक्रोशीतील चार-पाच गावांत स्थलांतर करून राहिली, त्यांचा भर नाझरे येथे शेतजमीन खरेदी करण्यावर राहिला. काहींनी मोक्याच्या जमिनी मुबलक प्रमाणात घेतल्या. शेतीवर मात्र आलेल्या घराण्याकडे पोलिस, मुलकी पाटील ही वतने आली. ती परंपरेने त्याच घराण्यांकडे राहिली. पुढच्या पिढीने असणा-या अधिकाराच्या बळावर धूर्तपणे सरपंच, तालुका-जिल्हा पातळीवरील सभासद अशी सत्तेची पदे काबीज केली. संपत्ती, सत्ता यांची सूत्रे हाती आल्यामुळे एकमत वाढून वर्चस्व प्रस्थापित झाले.\nस्वामी किंवा जंगम हे या समाजाचे पुरोहित वा गुरू. छोटेमोठे सर्व प्रकारचे धार्मिक विश्वी, अंत्यसंस्कार जंगम गुरूच करतात. लिंगायतांमध्ये दहन न करता दफन करण्याची पद्धत आहे. माजी उपराष्ट्रपती बी. डी. जती हे लिंगायत. त्यांनी या जमातीचा भटक्या जातींमध्ये समाविष्ट करून त्यांना भटक्या समाजाला मिळणा-या सवलतींचा लाभ मिळवून दिला.\nसुंदर वर्णन माझ्या जन्म गावाचे. धन्यवाद\nमाहिती सुंदररीत्या लिहीलेली आहे. आत्ताच्या पिढीला या माहितीच्या आधारे आपल्या गावाची ओळख होईल. पण,यामध्ये आमच्या होलार समाजाचा उल्लेख नाही याची खंत वाटते. कृपया,या माहितीमध्ये आमच्या जातीचा उल्लेख करावा. ही नम्र विनंती.\nनाझरे – संतांचं गाव\nसंदर्भ: नाझरे गाव, श्रीधर स्वामी, समाधी, महाराष्ट्रातील संत, सांगोला तालुका, गावगाथा\nसंदर्भ: महाराष्ट्रातील संत, श्रीधर स्वामी, कर्नाटक, समाधी, सज्जनगड, Shridhar Swami\nसंदर्भ: महाराष्ट्रातील मंदिरे, महाराष्ट्रातील संत, दंतकथा-आख्यायिका, समाधी\nचिंचवडचा श्री मोरया गोसावी\nलेखक: विघ्नहरी भालचंद्र देव\nसंदर्भ: मोरया गोसावी, महाराष्ट्रातील संत, गणपती, महाराष्ट्रातील मंदिरे, समाधी, पेशवे, चिंचवड\nसंदर्भ: सिंदखेड राजा तालुका, जिजाबाई भोसले, सिंदखेड राजा गाव, महाराष्ट्रातील वाडे, समाधी, विहीर, महाराष्ट्रातील धरणे, गावगाथा\nसंत सावता माळी आणि त्यांची समाधी\nसंदर्भ: समाधी, महाराष्ट्रातील संत, अभंग, अरणभेंडी गाव, महाराष्ट्रातील मंदिरे, दंतकथा-आख्यायिका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-03-25T07:24:32Z", "digest": "sha1:JXJQWHS7FTIANT5ELEKWMIEN6AEBNRTT", "length": 6450, "nlines": 42, "source_domain": "vicharpravah.in", "title": "६७. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : एडवॅकची संकल्पना - विचारप्रवाह", "raw_content": "\n६७. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : एडवॅकची संकल्पना\nदरम्यान जॉन वॉन नॉयमन यांनी एडवॅक प्रकल्पाशी निगडीत काही माहिती लिहिली. त्यांच्या लिखाणाला अजून अंतिम स्वरुप मिळायचे होते. परंतु ३० जून १९४५ रोजी त्यांनी लिहिलेली माहिती प्रकल्पांतर्गत वर्तूळात वितरित झाली. त्यात त्यांनी नवीन प्रकारच्या संगणकाची संकल्पना मांडली होती. सोबतच ‘संगणक कसा असावा’ याचे तार्किक विश्लेषण देखील केले होते. नवीन संगणकाच्या आत अज्ञावली साठवता येणार होती. यात संगणकाचे पाच प्रमुख भाग विषद करण्यात आले होते. इनपुट, मेमरी, कंट्रोल युनिट, अरिदमॅटिक युनिट आणि आऊटपुट असे ते पाच भाग होत. आज प्रत्येक संगणक मूळतः याच पाच भागांच्या आधारे काम करतो.\nजॉन वॉन नॉयमन यांचा एडवॅक संदर्भातील रिपोर���ट\nवॉन नॉयमन यांनी जी माहिती प्रकाशित केली, त्यावर केवळ त्यांचे एकट्याचे नाव नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आज अनेक लोक संगणकाच्या संकल्पनेचे श्रेय हे केवळ वॉन नॉयमन यांना देतात. परंतु खरं तर त्यात त्यांच्या इतर सहकार्यांचे देखील योगदान होते. वॉन नॉयमन यांनी लिहिलेली माहिती प्रथम प्रकल्पांतर्गत वर्तूळात वितरित करण्यात आली होती. परंतु नंतर ती त्या वर्तूळाच्या बाहेर पडली. वॉन नॉयमन व गोल्डस्टाईन यांना असे वाटत होते की, इनिॲक व एडवॅकचा खर्च सरकारने केला आहे, त्यामुळे या संकल्पना सर्वांसाठी खुल्या असाव्यात. परंतु एकर्ट व मॉकली मात्र त्या प्रकल्पांकडे व्यक्तिगत दृष्टीकोनातून पहात होते. त्यांना त्या प्रकल्पांचे पेटंट हवे होते. वॉन नॉयमन यांनी लिहिलेली माहिती प्रकल्पाच्या वर्तूळाबाहेर पडल्याने एकर्ट व मॉकली यांना पेटंट मिळवणे अवघड बनले.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n३. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : ॲबॅकस\n७५. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग ४\n५४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ट्युरिंग मशिन : भाग २\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2015-Tomato.html", "date_download": "2019-03-25T08:21:34Z", "digest": "sha1:CRNVB7J2ESFS6MO2WX3SNWJIUYG47YTU", "length": 18345, "nlines": 26, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - १० वी नंतर इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करून सरांच्या तंत्रज्ञानाने यशस्वी शेती करतो", "raw_content": "\n१० वी नंतर इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करून सरांच्या तंत्रज्ञानाने यशस्वी शेती करतो\nश्र���. देविदास सदाशिव यादव, मु.पो. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे. मो. ९७३०६९२८१४\nमाझ्याकडे माळशिरस येथे मध्यम प्रतीची १० गुंठे जमीन आहे. त्या जमिनीमध्ये टोमॅटो - ८११ वाणाची लागवड २८ मे २०१५ ला केली आहे.\n ते ३ फूट उंचीचा असून १५ दिवसापासून पाऊस नाही. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ फवारण्यावर हे पीक आले आहे. आज ४ वी फवारणी करण्यासाठी औषधे नेण्यास आलो आहे. टोमॅटोला ड्रीप आहे. बोअरला सिंगलफेज मोटर आहे. ८ - १० दिवसांनी रात्रभर पाणी देतो. १० गुंठे टोमॅटोला सध्या बुरशी लागली आहे. सरांनी सांगितले, \"पाऊस नसतांना बुरशी लागण्याचे कारण असे की टोमॅटो हे संवेदनशील पीक असून पानांवर लव असते. रात्री आर्द्राता असते व रात्रभर ड्रीप चालले तर असे वातावरण बुरशीला अनुकूल ठरते. तेव्हा सप्तामृत ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारणे. नंतर आलटून पालटून बावीस्टीन व स्ट्रेप्टोसायक्लीन फवारणे आणि रात्रभर ठिबक चालवू नये ही दक्षता घेणे. कारण आता पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर रात्रभर ठिबक चालले तर कोवळ्या फुटीवर अर्लीब्लाईट, करपा, बुरशी येण्याची शक्यता आहे. तसेच फळांवर देवीच्या आकाराची टीक (ब्राऊनरॉट) पडण्याची शक्यात आहे. ही होऊ नये म्हणून सप्तामृत टोमॅटो अंकात दिल्याप्रमाणे फवारावे. पावसचे मान, ढगाळ हवा, हवेतील आर्दता ही फळांच्या ब्राऊनरॉटला अनुकूल ठरते. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वरील सुचण केली आहे. \"\nपावसाळ्यात पाऊस नसल्यावर फवारणी कधीही चालते. फवारणीनंतर २ तासाने पाऊस पडला तरी चालते. फक्त उन्हाळ्यात संध्याकाळी फवारणी करावी. फळे जास्त लागण्याकरीता सप्तामृत २५० मिली किंवा ५०० मिली आणि हार्मोनी १०० ते २०० मिली/ १०० लि. पाणी असे दर ८ ते १० दिवसांनी फवारणे. दरम्य रासायनिक फवारणी करू नये. हे प्रतिबंधात्मक उपाय पुरेसे ठरतील. टोमॅटोला ६०० ते ७०० रू. प्रति क्रेट बाजारभाव मिळाला. मी टोमॅटो शेवाळवाडी, हडपसर मार्केटमध्ये विक्रिला आणतो. या सर्व तंत्रज्ञानाने झाडाची वाढ झपाट्याने होते. फुलकळी जास्त प्रमाणावर लागून भरपूर फळधारणा होते. माल इतका लागतो की दोरी तुटते, तारा वाकतात, माल वजनाने खाली पडतो. सरांनी सांगितले की, \"३ ते ४ फुट उंचीवर दोरी बांधावी, तंगुस वापरू नये, त्याने फांदीला कड पडते त्यासाठी टोमॅटो बांधण्याची सुतळी वापरणे. यापद्धतीमुळे चौफेर हवा खेळती राहून चौफेर वारा लागतो. फळाचे व झाडाचे पोषण एकसारखे होईल. फळाचे वजन, गोडी, चमक, रंग वाढेल. क्रेटमध्ये माल भरल्यावर त्याचे वजन २० किलो ऐवजी २५ किलो भरते. रोगराई व कीड कमी राहते.\" इथे सरांनी एक किस्सा सांगितला की, \"सांगलीच्या मार्केटमध्ये एका शेतकऱ्याने टोमॅटोचे उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेतले होते. तेव्हा एवढ्या उत्कृष्ट क्वालिटीच्या मालाचे उत्पादन झाले होते की गाळ्यावरच्या दलालाने एक टोमॅटो १५ फुटावरून ट्रकच्या चाकावर फेकुन मारला आणि ते टोमॅटोचे फळ तेथून उचलून पाहिले तर त्या टोमॅटोला काहीही झाले नव्हते. तो इतका कडक (टणक) रसरशीत व पोसलेला होता, हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वैशिष्ट्ये आहे. हे मार्केटमधल्या लोकांनी पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. अशा मालाला तेथे चांगला भाव मिळाला.\nदुसरा अनुभव सरांनी असा सांगितला, \"सतिश पाटील, भालकी (जि. बीदर) कर्नाटक यांनी गावातल्या शेतकऱ्यांबरोबर ५ वर्षापूर्वी टोमॅटो केला होता. टोमॅटो त्यावेळेस दोन महिने सारखा पाऊस असल्याने गावातल्या लोकांचे प्लॉट सडून गेले. सतिशने मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या, त्यामुळे त्यांचा प्लॉट वाचला, तेव्हा त्याने सरांना फोन करून विचारले सर गावातले सर्व शेतकऱ्यांचे टोमॅटोचे प्लॉट अधिक पावसाने गेले. तर आपला प्लॉट वाचलाय. तेव्हा आपल्याला टोमॅटोचे पैसे होतील का टोमॅटो एक एकर आहे. त्यावर सरांनी सांगितले एक ते दीड लाख रुपये सहज होतील. पण आपले तंत्रज्ञान व कल्पतरू हे शिफारशी प्रमाणे वापरले पाहिजे. यावर सतिश पाटलांनी उत्तर दिले की तसे झाल्यास पुण्याला तुमची भेट घेऊन परिस्थिती सांगेन. प्रत्यक्षात दोन महिन्यानंतर सतिश पाटील यांचे टोमॅटोच्या १ एकर प्लॉट मधील मालाचे ४ लाख रू. झाले. सतिश पाटील यांनी पुन्हा कर्नाटक मधून सरांना फोन करून विचारले, सर टोमॅटो किती पैसे झाले असतील टोमॅटो एक एकर आहे. त्यावर सरांनी सांगितले एक ते दीड लाख रुपये सहज होतील. पण आपले तंत्रज्ञान व कल्पतरू हे शिफारशी प्रमाणे वापरले पाहिजे. यावर सतिश पाटलांनी उत्तर दिले की तसे झाल्यास पुण्याला तुमची भेट घेऊन परिस्थिती सांगेन. प्रत्यक्षात दोन महिन्यानंतर सतिश पाटील यांचे टोमॅटोच्या १ एकर प्लॉट मधील मालाचे ४ लाख रू. झाले. सतिश पाटील यांनी पुन्हा कर्नाटक मधून सरांना फोन कर���न विचारले, सर टोमॅटो किती पैसे झाले असतील त्यावर सरांनी उत्तर दिले की, तुमच्या टोमॅटोच्या पिकाचे २ लाख रू. पर्यंत उत्पादन झाले असेल. यावर सतीश पाटलांनी हसत सांगितले की, सर टोमेटोचे मला ४ लाख रुपये केवळ आपल्या तंत्रज्ञानामुळे झाले. \"\nपाऊस नसल्याने व तापमानातील बदलाने बऱ्याच जणांच्या टोमॅटोची वाढ खुंटली आहे व प्लॉट गेले आहेत. त्यामानाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे आमचा प्लॉट उत्कृष्ट आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे टोमॅटोवर पाचवी फवारणी पंपाला जर्मिनेटर ३० - ४० मिली, थ्राईवर ५० मिली, क्रॉपशाईनर ६० - ७० मिली, राईपनर ४० - ५० मिली, प्रोटेक्टंट दोन काडेपेटी, न्युट्राटोन ४० मिली, प्रिझम ३० मिली, हार्मोनी ३० मिली, १५ लिटर पाण्यातून पानांच्या दोन्ही बाजुने फवारणी करणार आहे, पाऊस पाणी नसल्याने टोमॅटोला उठाव चांगले आहेत. सध्या (१९ जुलै २०१५) ३०० ते ४०० रुपये/ क्रेट भाव मिळत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मात्र टोमॅटोचे दर प्रचंड खाली म्हणजे ५० रू. प्रति क्रेट (२० किलो) झाल्याने परवडत नाही.\nमागच्या वर्षी टोमॅटो ५ गुंठ्यात ४० हजार रुपये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे झाले होते. त्यानंतर पाऊस जास्त झाला, बागेत पाणी साठले. त्याने पांढरी मुळी मुकी झाली आणि अचानक मर झाली. अशा अवस्थेत सरांनी सांगितले, \"मर काढून टाकून जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करून सप्तामृत व हार्मोनी, स्ट्रेप्टोसायक्लीन फवारणे, म्हणजे ड्रेंचिंगमुळे पांढरी मुळी मुकी झालेली पुन्हा जोमाने चालते व फवारणी मुळे नवीन फुट निघुन फुलकळी लागते. अशा पद्धती ने खोडवा पीक देखील कमी खर्चात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगले उत्पादन मिळवून देते.\nमी सध्या कासुर्डी, ता दौंड येथे १० वी नंतर (७२%) इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचा अभ्यास तथा कोर्स करित आहे. तसेच आता कॉलेज करून मी वडीलांच्या सोबत शेतीदेखील करत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे रिझल्ट विषयी कृषी विज्ञानमध्ये वाचण्यात आल्याने माझे वडील निर्घास्त झाले आहेत. माझ्या आत्मविश्वासामुळे त्यांना खात्री नि विश्वास आहे. अशा प्रकारे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून जर प्रयोग यशस्वी केले तर मालाची निर्यात होऊ शकते. सार्क राष्ट्रामध्ये चांगल्या दराने कुठेही निर्यात करून बक्कल पैसे होऊ शकतात.\nसध्या सरांनी सांगितलेली औषधे घरी पुरेशी असल्यामुळे पुन्हा १५ दिवसांनी येणार आहे व दोन वर्षाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मला पुन्हा आत्मविश्वास व उमेद आली आहे. मी माझा तीन वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर माझा धाकटा भाऊ सध्या ५ वी त शिकत असल्याने मी नोकरी करून शेती सांभाळणार आहे. माझी एकूण ७ एकर शेती आहे, परंतु ती जमीन पडीक आहे. चालू जमिनीत सध्या कापरी, बाजरीचे पीक घेतल्याने त्याचा मला फायदा होतो.\nमी हायब्रीड तुळजापुरी २.५ महिन्यात येते ती करतो. सरांचे तंत्रज्ञाना वापरून ती चांगली येते. सध्या आषाढात मार्केट हवे तसे मिळत नाही. श्रावणात फुलाला मार्केट चांगले असते. त्यावेळेस ७० ते ८० रू. प्रति किलो अशा दराने तुळजापुरी विकली जाते. गेल्यावर्षी मी ५ गुंठ्यातून ४० हजार रू. ची तुळजापुरी विकली होती.\nपुण्याच्या भुलेश्वर जवळील अर्वषण प्रवण भागात माळशिरस अशा ठिकाणी बाकीची जमीन आहे तशीच सोडून दिली. त्यामुळे कमी खर्चात, कमी जमिनीवर दर्जेदार उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेत आहे. सरांनी मला मार्च २०१५ चा अंक दिला. त्या अंकात गुजरातच्या एका शेतकऱ्याने सांगितले आहे की, कृषी विज्ञान म्हणजे 'गिता' व कृषी मार्गदर्शिका म्हणजे 'बायबल' आहे. कारण सरांचा असा दंडक आहे की खेड्यातील तरुण मुलांनी शेती सोडू नये, उलट त्यांनी कमी शेती असताना नवनवीन प्रयोग करावेत. जर भारतातील तिसऱ्या जगातील तरुणांनी योग्य रितीने नियोजन करून जर शेती केली तर हे तंत्रज्ञान देशाला तारक ठरेल आणि देशाला सुवर्णकाळ प्राप्त होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/thakre-movie-hindi/", "date_download": "2019-03-25T08:07:18Z", "digest": "sha1:7C4OXRXNDK5QJNUTCULPZIWYGTYD2RIU", "length": 1875, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " thakre movie hindi - मराठी कलाकार", "raw_content": "\nठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.\nशिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित मच अवेटेड असलेल्या “ठाकरे” सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-interrupts-municipal-corporations-work-vishwanath-mahadeeshwar/", "date_download": "2019-03-25T08:05:01Z", "digest": "sha1:5GKKJUPDRL5YLRZTY3J7SLNPQYJWR36O", "length": 5018, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात- विश्वनाथ महाडेश्वर", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nमुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात- विश्वनाथ महाडेश्वर\nमुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या कामात ढवळाढवळ असा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. महापालिकेच्या कामात हस्तक्षेप करण्यामागे मुख्यमंत्र्यांचा नेमका हेतू काय आहे असा प्रश्न देखील महाडेश्वर यांनी उपस्थित केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.\nविश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, आतापर्यंत ९० टक्के नाल्यांची साफसफाई झाली आहे. पावसाळ्यात समुद्राला भरती आली आणि ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यावर मुंबई तुंबणार आहे. बचावासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. अतिवृष्टीसाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असून, मुंबईकरांना त्रास न होण्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nआरोग्य खात्यातील वरिष्ठ बांबूचा अजब कारभार; स्वतःचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून केले ६०वर्षे\nप्रेरणादायी ‘झिपऱ्या’चा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा रंगला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/difference-between-2stroke-and-4stroke-engine/", "date_download": "2019-03-25T07:55:59Z", "digest": "sha1:PMWHVKCZCZRPBYPHYNTHFIQLSTYCI3XS", "length": 21195, "nlines": 141, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"फोर स्ट्रोक\" आणि \"टू स्ट्रोक\" इंजिनमधील हे फरक प्रत्येक वाहन-चालकास माहिती असावेत", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“फोर स्ट्रोक” आणि “टू स्ट्रोक” इंजिनमधील हे फरक प्रत्येक वाहन-चालकास माहिती असावेत\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n मग तुमच्या वाहनात कोणत्या प्रकारचे इंजिन आहे हे तुम्हाला अर्थातच माहीत असेल. आणि ते टू स्ट्रोक आहे की फोर स्ट्रोक हे सुद्धा माहीतच असणार. बरोबर ना बरं, आता सांगा, या दोन्हीतील फरक तुम्हाला माहीत आहे का\n हरकत नाही… आम्ही आहोत ना या लेखात आपण टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन म्हणजे काय, त्यांच्यात फरक काय आणि त्यांचे फायदे तोटे काय याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.\nहा लेख वाचून तुम्ही अभिमानाने सांगू शकाल, “भावा… माझ्या गाडीच्या प्रत्येक भागाची ओळख मला आहे”\nतसे पाहता आपली गाडी म्हणजे आपला जीव की प्राण असते. आधुनिक विज्ञानाने जे शोध लावले त्यात स्वयंचलित वाहनाचा शोध फार वरच्या क्रमांकावर आहे.\nआज आपण वाहनाविना जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.वाहतूक, दळणवळण, प्रवास सुखकर करणारी वाहने आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहेत.\nआता वळूया मुख्य विषयाकडे. मानवी शरीरात जे महत्व हृदयाचे आहे तेच महत्व वाहनांमध्ये इंजिनाचे आहे. चारचाकी गाड्यांची इंजिने अनेक प्रकारची असली तरी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी गाड्यांमध्ये मुख्यतः टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक हे दोन प्रकार वापरले जातात.\nपूर्वी फक्त टू स्ट्रोक इंजिन बनायची. आठवा, एम 80, बजाज स्कुटर, कायनेटिक, लुना इत्यादी गाड्या.\nभारतात पहिली फोर स्ट्रोक गाडी ‘रॉयल एनफिल्ड’ ने आणली… ती म्हणजे बुलेट पण बुलेट ही सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हती, आताही नाहीच म्हणा. कारण बुलेट 350cc आणि 500cc अश्या दोनच मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.\nफोर स्ट्रोक इंजिन लोकप्रिय करण्याचे खरे श्रेय जाते ‘हिरो होंडा’ कंपनीकडे.\n१९८९ साली लाँच केलेल्या सीडी 100 मॉडेलमध्ये हे इंजिन बसवले होते. त्या मॉडेलला मिळालेल्या अफाट यशानंतर फोर स्ट्रोकचे दिवस आले आणि टू स्ट्रोक अर्थातच मागे पडले. प्रत्येक कंपनी आपल्या दुचाकी मध्ये फोर स्ट्रोक इंजिन बसवू लागली.\nआता जाणून घेऊया यांचे कार्य कसे चालते.\nइंजिनची रचना बरीच गुंतागुंतीची असते. इंजिनमधला मुख्य भाग म्हणजे पिस्टन आणि क्रांकशाफ्ट. हा पिस्टन एका उभ्या दांड्यासारखा असतो जो इंजिन सुरू असताना कायम वर खाली हालचाल करतो आणि सोबत क्रांकशाफ्टला फिरवतो. या दोन्हीच्या दबावामुळे इंधनाचे रूपांतर ऊर्जेत होते आणि गाडीला गतिमानता प्राप्त होते.\nटू स्ट्रोक इंजिनमध्ये शाफ्ट दोन वेळा फिरल्यास एक ऊर्जेचा स्ट्रोक मिळतो आणि फोर स्ट्रोक इंजिनमध्ये शाफ्टच्या एका वेळी फिरण्याने ऊर्जा मिळते.\nदोन्हींमधील फरक अश्या प्रकारे आहेत –\n१. टू स्ट्रोक इंजिनमध्ये शाफ्ट एक चक्र पूर्ण करण्यासाठी दोन वेळा फिरते तर फोर स्ट्रोक इंजिनमध्ये एक चक्र पूर्ण करण्यासाठी एक वेळ फिरते.\n२. पिस्टनने चार स्ट्रोक दिल्यावर एकदा ऊर्जेची निर्मिती फोर स्ट्रोक इंजिनमध्ये होते तर पिस्टनच्या दोन स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण टू स्ट्रोक इंजिन मध्ये होते.\n३. फोर स्ट्रोक इंजिनची रचना टू स्ट्रोक इंजिनच्या मानाने बरीच जटिल असते.\n४. फोर स्ट्रोक इंजिन मध्ये इंधनासोबत ऑईल वापरणे गरजेचे नाही पण टू स्ट्रोक गाड्यांना इंधनासोबत ऑईल मिसळणे गरजेचे आहे.\n५. फोर स्ट्रोक मध्ये पिस्टनची वरील बाजू सपाट असते तर टू स्ट्रोक मध्ये ती अर्धगोलाकार असते.\n६. वजनाचा विचार केला तर फोर स्ट्रोक इंजिन टू स्ट्रोकच्या तुलनेत जड असतात.\n७. फोर स्ट्रोक इंजिनचा आवाज टू स्ट्रोक पेक्षा कमी असतो.\n८. फोर स्ट्रोक इंजिन लवकर गरम होत नाही तर टू स्ट्रोक इंजिन त्यामानाने लवकर गरम होते.\n९. फोर स्ट्रोक इंजिनासाठी जागा जास्त लागते तर टू स्ट्रोक इंजिन कमी जागेत मावू शकते.\nडीझेल वर चालणारे रेल्वे इंजिन कधीच बंद केले जात नाही का\n“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत\nफोर स्ट्रोक इंजिनाचे फायदे –\n१. टू स्ट्रोक इंजिनच्या तुलनेत कमी आरपीएम (Revolutions per minute) मध्ये अधिक टॉर्क मिळतो.\n२. यात चार स्ट्रोक मागे एकदाच इंधन वापरले जात असल्याने कमी इंधन लागते आणि इंधनाची बचत होते.\n३. चार स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण होत असल्याने आणि इंधनामध्ये ऑईल वापरले जात नसल्याने प्रदूषण सुद्धा कमी होते.\n४. आपल्याला माहीत आहेच, जर इंजिनाचा जास्त वापर केला तर त्याची लवकर झिज होते. पण फोर स्ट्रोक इंजिन कमी आरपीएम मध्ये जास्त ऊर्जा देत असतात म्हणून टू स्ट्रोकच्या तुलनेत जास्त दिवस टिकून राहू शकतात.\n५. इंजिनाच्या विशिष्ट रचनेमुळे यात इंधनात ऑईल मिसळण्याची गरज पडत नाही. मात्र फिरणाऱ्या, घर्षण होणाऱ्या भागांना त्याची आवश्यकता असतेच.\nफोर स्ट्रोक इंजिनाचे तोटे –\n१.यामध्ये व्हॉल्व्ह वापरलेले असतात. तसे�� गिअर आणि चेन सुद्धा असते. या गुंतागुंतीच्या रचनेमुळे फोर स्ट्रोक इंजिन तयार करण्यात आणि प्रसंगी दुरुस्त करण्यात अडचणी येतात आणि जास्त वेळ लागतो.\n२.टू स्ट्रोकच्या मानाने कमी ऊर्जा मिळते. कारण तिथे दोन स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण होते तर इथे चार स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण होते.\n४. या इंजिन मध्ये अनेक लहान मोठे भाग वापरावे लागतात. सगळ्या भागांचे एकत्रीकरण करणे कठीण जाते आणि जास्त सामुग्री वापरल्याने किंमत सुद्धा महाग होते.\nटू स्ट्रोक इंजिनाचे फायदे –\n१. यात व्हॉल्व नसल्याने निर्मितीसाठी आणि दुरुस्त करण्यासाठी सोपी रचना असते.\n२. फोर स्ट्रोकच्या मानाने टू स्ट्रोक इंजिनमध्ये अधिक ऊर्जेची निर्मिती होते.\n४. ऑईलचा वापर होत असल्याने कुठल्याही वातावरणात काम करण्याची क्षमता असते.\nटू स्ट्रोक इंजिनाचे तोटे –\n१. अधिक ऊर्जा निर्माण केली जात असल्याने जास्त इंधनाचा वापर.\n२. इंधनासोबत ऑईल टाकावे लागत असल्याने किंमतीत वाढ.\n३. जास्त इंधनाचा वापर केला जात असल्याने प्रदूषण सुद्धा जास्त होते.\n४. पूर्ण इंधनाचा वापर होत नाही. बरेच इंधन वाया जाण्याची शक्यता असते.\n५. बाहेर टाकले जाणारे वायू कधी कधी चेंबरमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे इंजिनाचे काम सुरळीत चालू शकत नाही.\nतर मित्रहो, ही माहिती आपल्याला आवडली असल्यास कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.\nगाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय \nह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← प्रभू येशूचा आशीर्वाद इतरांना मिळवून देणारा पास्टर, स्वतःला मात्र वाचवू शकला नाही\nसमलिंगीयांना समजून घेण्यास आपण कमी पडतोय →\nOne thought on ““फोर स्ट्रोक” आणि “टू स्ट्रोक” इंजिनमधील हे फरक प्रत्येक वाहन-चालकास माहिती असावेत”\nकंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nतुमच्या लहानग्याला पाळणाघरात ठेवताय त्याच्या या फायद्यांचा आणि तोट्यांचा विचार केलाय का\nमाने साहेब मुली कोणाच्याही असोत त्यांना ‘नाचायला’ नव्हे तर ‘वाचायला’ शिकवा\nह्या बॉलीवूड कलाक��रांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे\nमहाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग\nअर्जुनाची दुर्दैवी बहीण, जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केलं होतं…\n३१ डिसेंबर साजरे करण्याच्या ह्या कल्पना अगदी बोअरिंग माणसाला सुद्धा उत्साहित करतील\nह्या अमेरिकास्थित भारतीय दाम्पत्याच्या ऐश्वर्याचा अख्खी अमेरिका हेवा करत असेल\nपाकिस्तानची ऑफर धुडकावून भारतीय सैन्यात आलेले भारताचे पहिले मुस्लीम एअर चीफ मार्शल\nहे हिंदू शौर्य का लपवलं जातं : जेव्हा हिंदू राजांनी गझनीच्या सैन्याची धूळधाण उडवली\nमृत्युदंड देण्याच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती बघून “कोणती सर्वोत्तम” हा प्रश्न पडतो…\nरणबीर कपूर खाजगी जीवनात कसा आहे उत्तर त्याच्या आणखी प्रेमात पाडणारं आहे\nफडणवीस सरकारच्या “स्वच्छ” प्रतिमेवर प्रश्न निर्माण करणारं आव्हान नेमकं काय आहे – जाणून घ्या\nह्या इकोफ्रेंडली सायकलची किंमत एकूण तुम्ही नक्कीच चक्रवाल\nBanned नोटांचं काय करावं ही चिंता वाटतीये\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nपाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ\n“बाबा…थांब ना रे तू…” मनाला भिडणारी प्रियांका चोप्राची हळवी साद\nअसा झाला तब्बल ६०० कोटी रुपयांच्या “रेडबस’चा जन्म\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/radu-nako-re/", "date_download": "2019-03-25T08:31:29Z", "digest": "sha1:N6OSNVCDPHZHVUBSNMR2RKPQBSFMZXID", "length": 8587, "nlines": 74, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nरडू नको रे चिमण्या बाळा, चिमण्या बाळा\nरडू नको रे चिमण्या बाळा, चिमण्या बाळा\nफुले गोजिरी कधी न रडती, कधी न रडती\nनभी पाखरे हासत उडती, हासत उडती\nपहा विचारूनि आभाळाला, आभाळाला\nनिळ्या अंगणी हसती तारे\nहासत रिंगण धरती वारे\nसदैव हसतो चंद्र चिमुकला, चंद्र चिमुकला\nदु:ख कुणाला कधी न टळते\nजो हसला तो अमृत प्याला, अमृत प्याला\nसदाशिव जे रावकवी यांच्या 'चित्रसहकार' या निर्मिती संस्थेसाठी य.गो.जोशी यांच्या कथेवरील या चित्राने पंचवीस चित्रपटगृहात प्रत्येकी पंचवीस आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्याच बरोबर संपूर्ण चित्र फक्त पस्तीस दिवसात मुहूर्तापासून सेन्सॉरपर्यंत पूर्ण करण्याचाही विक्रम आठवले यांनी केला. चित्रीकरणाचे अभ्यासपूर्ण संयोजन आणि तंत्रावरील प्रभुत्व या आठवले यांच्या गुणांमुळेच ते शक्य झाले.\nमातृसुखाला पारखा झालेला दीर आणि पुत्रखापासून वंचित राहिलेली वहिनी यांच्या निर्मळ प्रेमाची अत्यंत जिव्हाळ्याने चित्रित केलेली कौटुंबिक कलाकृती. या चित्रपटाने सुलोचना या अभिनेत्रीला ग्रामीण चित्रपटातून घरात, माजघरात, अगदी स्वयंपाकघरात आणले. सोज्वळता म्हणजे सुलोचना या समीकरणाची सुरवात या चित्राने झाली. दिग्दर्शन आणि गीतलेखन याखेरीज आठवल्यांनी या चित्रात एक सुलोचना यांच्या पतीची भूमिकाही केली होती. हे चित्र एका वेगळ्या अर्थानेही कौटुंबिक होते – यात आठवले यांचे संपूर्ण कुटुंब पडद्यावर दिसले होते. मुलगा सुदर्शन छोट्या भावाचा शाळेतील मित्र झाला होता. सुमतीबाई, मुली आणि एक मेव्हणी यांनी हळदीकुंकवाच्या प्रसंगात भाग घेतला होता. दादा म्हणजे आठवले आणि वहिनी म्हणजे सुलोचना यांच्या पडद्यावरील लग्नप्रसंगी सुमतीबाई नवऱ्याच्या लग्नाला नवऱ्यामुलीच्या मागे करवली म्हणून हजर राहिल्या आहेत.\nदो नयनांचे हितगुज झाले\nदेवा तुझी आठवण होते\nरडू नको रे चिमण्या बाळा\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांतार���म आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-03-25T07:30:00Z", "digest": "sha1:GMXHFXQ2QS6QSJNDJFIM5NJK5VGTJCL5", "length": 7109, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रात्स - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १२७.५६ चौ. किमी (४९.२५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,१५८ फूट (३५३ मी)\nलोकसंख्या (१ जानेवारी २०१२)\n- घनता २,०७९.९५ /चौ. किमी (५,३८७.० /चौ. मैल)\nग्रात्स (जर्मन: Graz; स्लोव्हेन: Gradec; हंगेरियन: Grác) हे ऑस्ट्रिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना खालोखाल) व ऑस्ट्रियाच्या श्टायरमार्क राज्याची राजधानी आहे. येथील ऐतिहासिक बरोक वास्तूशास्त्राच्या इमारतींसाठी व श्लोसबर्ग ह्या किल्ल्यासाठी ग्रात्स युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २००३ साली ग्रात्स युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.\n↑ a b c d e f g h चुका उधृत करा: [ चुकीचा कोड; Graz नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nविकिव्हॉयेज वरील ग्रात्स पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nसंदर्भ चुका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/story-of-baba-harbhajan-singh/", "date_download": "2019-03-25T07:56:05Z", "digest": "sha1:P254XOIKNY6IDUMDDCYGPC6DLUE2IWDE", "length": 18997, "nlines": 117, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हा भारतीय सैनिक मृत्यूनंतर देखील चिनी सैनिकांच्या छातीत धडकी भरवतोय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहा भारतीय सैनिक मृत्यूनंतर देखील चिनी सैनिकांच्या छातीत धडकी भरवतोय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआपल्या देशात देवांची किंवा मंदिरांची आजिबात कमी नाही.. पण देवतांची मंदिरे सोडून तुम्ही कधी कोण्या माणसाच्या किंवा “भुताच्या” मंदिराबद्दल ऐकलं आहे का निश्चितच ऐकलं नसेल. असे एक मंदिर आहे जे भा��त आणि चीनच्या सीमेवर सिक्कीम राज्यात आहे. जिथे दूरवरून अनेक लोक दर्शन घेण्यासाठी येतात.\nहो.. हे मंदिर सिक्कीमच्या राजधानी गंगटोक मधील जेलेप्ला आणि नथूलापासच्या मध्ये जवळपास १३ हजार फूट उंचीवर वसवले गेले आहे. हे मंदिर कोणा देवाचे नसून ते आहे एक मृत भारतीय सैनिक “हरभजन सिंह” यांचे\nते आता फक्त सैनिक नसून “बाबा हरभजन सिंह” आहेत. मरणाला ४८ वर्षे उलटून सुद्धा ते आजही रक्षकाच्या ड्युटीवर आहेत. कामावर असताना एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला व त्यानंतर त्यांचा आत्मा आजही कोणत्या ना कोणत्या प्रकारे सीमेचे रक्षण करतो असे मानण्यात येते.\nकोण आहेत हे हरभजन सिंह\nहरभजन सिंह कोणी साधू किंवा महात्मा नव्हते तर ते एक भारतीय सैन्यातील सैनिक होते.\nज्यांचा जन्म ३ ऑगस्ट, १९४१ ला पंजाब (सध्याचे पाकिस्तान) मधील कथपूर मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले आणि त्यांनी १० वी १९५५ मध्ये डी व्ही हायस्कुल मधून पूर्ण केली. जुने,१९५६ मध्ये हरभजन सिंह अमृतसर मधून सैनिक म्हणून भारतीय सैन्य दलात सिग्नल कोर मध्ये दाखल झाले.\n३० जुने,१९६५ ला त्यांना एक कमिशन प्रदान केले गेले आणि ते ‘१४ राजपूत रेजिमेंट’ मध्ये तैनात झाले. १९६५ मधील भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वपूर्ण अशी कामगिरी केली त्यानंतर त्यांची ‘१८ राजपूत रेजिमेंट’ मध्ये बदली केली गेली.\n४ ऑक्टोबर, १९६८ ला खेचरांचा कळप टुकूला ते डोन्गचुईला नेत असताना, पाय घसरल्या मुळे हरभजन सिंह दरीमध्ये पडले व दरीत खोलवर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण दरीतून वाहत्या नदीत पडल्या कारणाने त्यांचे पार्थिव ३ दिवसांनी किमान २ किलोमीटर दूरवर सापडले.\nअसं म्हटलं जातं की त्यांचे मित्र व सहकारी प्रीतम सिंह यांच्या स्वप्नात येऊन हरभजन सिंह यांनी स्वतः त्यांचे पार्थिव कुठे आहे हे सांगितले आणि आपली समाधी असावी अशी इच्छा प्रकट केली. सुरुवातीला प्रीतम सिंह यांचा यावर विश्वास बसला नाही. पण त्यांनी सांगितलेल्या जागीच पार्थिव सापडल्यामुळे त्यांनी आश्चर्यचकित होऊन झालेल्या साक्षात्काराबद्दल बाकी सहकाऱ्यांना सांगितले.\nसेनेच्या अधिकाऱ्यांनी “छोक्या छो” येथे त्यांची समाधी बनवली आणि पर्यटकांची सोय लक्षात घेऊन ११ नोव्हेंबर,१९८२ ला “बाबा हरभजन सिहं” यांचे मंदिर नाथूला पास जवळ स्थापन केले गेले.\nआजही असे म्हटले जाते की ते त्यांच्या सहकाऱ्यांना स्वप्नात येऊन चिनी सैनिकांच्या डावपेचांनी माहिती देत असत जी नेहमी खरी असायची. त्यामुळे त्यांना आजही त्यांच्या या देशसेवेसाठी भारतीय सैन्यात ठेवले गेले आहे. गेल्या ४८ वर्षात त्यांचे पद आता शिपाई पासून कॅप्टन पर्यंत जाऊन पोहोचले आहे.\nअसे म्हटले जाते की आजही ते सीमेचे रक्षण करण्यात कुसूर करत नाहीत. याचे दाखले फक्त भारतीय सैनिकच नाही तर चिनी सैनिक देखील देतात.\nत्यांच्या मते त्यांनी देखील “बाबा हरभजन सिहं” यांना बऱ्याचवेळा घोड्यावरून रपेट करत असताना सीमेलगत पहिले आहे. बाकी सैनिकांप्रमाणे त्यांना देखील दरवर्षी १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर अशी २ महिन्यांची सुट्टी जाहीर केली जात असे. जिथे त्यांच्या नावचे तिकीट देखील काढले जाई आणि त्यांचे सामान म्हणजे टोपी, कपडे, वर्षभराचा पगार आणि बूट हे त्यांचा गावी त्यांच्या आईकडे सहकार्यांमार्फत पोहोचवले जाई.\nतिथे जल्लोषात त्यांचे स्वागत होत असे आणि नंतर त्याच ट्रेनने ते परत नथूलाला जात असत.\nपण काही लोकांनी यावर आक्षेप घेऊन कोर्टात धाव घेतली की भारतीय सेना अंधश्रद्धा मानत नसताना असे प्रकार का होत आहेत. तेव्हा पासून “बाबा हरभजन सिंह” यांच्या सुट्टीला सुट्टी देण्यात आली आणि नंतर ते वर्षभर ऑन ड्युटी असत.\nआता ते रिटायर झाले आहेत. भारत चीन फ्लॅग मिटिंग मध्ये आजही त्यांचे अढळ स्थान आहे आणि त्यांच्या नावाची मोकळी खुर्ची आजही त्याच्या पदानुसार ठराविक जागी त्यांना प्रदान केली जाते. हा बाकी सैनिकांचा त्यांचा प्रति असलेला विश्वास आणि आदर आहे.\nया मंदिरात बाबांची एक खोली देखील आहे जिथे त्यांचे सर्व सामान असून एक पलंग देखील आहे. रोज या जागेची स्वच्छता करूनही नवल वाटेल अशी गोष्ट म्हणजे रोज त्यांच्या बुटांना चिखल लागलेला असतो. शिवाय चादरीला घड्या पडलेल्या असतात असे सफाई करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.\nतसेच या मंदिरात ठेवलेले पाणी काहीसे भरून जाते ज्याचे २१ दिवस रोज प्राशन केल्याने त्या व्यक्तीची रोगराई पासून सुटका होते असा काहींचा विश्वास आहे.\nभारतीय सैनिकांना त्यांचा आधार वाटतो तिथेच चिनी सैन्य मात्र त्यांना टरकून असते.\nनाथूला पास हिवाळ्यात बर्फाच्छादनामुळे जवळपास पूर्णपणे बंद असतो अश्या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. येथील सैनिक व बाकी लोकांचा हा विश्��ास आहे की बाबा हरभजन सिह त्यांच्या सोबत असून त्यांची उमेद कायम वाढवतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← फटाके तयार करण्यामागची (आणि फुटण्यामागची) “अमेझिंग” प्रक्रिया समजून घ्या\nतासनतास काम करून, थकून देखील झोप येत नसेल तर हे उपाय आवर्जून करून पहा →\nभारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\nकाश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात\nकांती सतेज करणारे स्वयंपाकघरातील गुणकारी औषध\nप्रणयाचा आनंद स्त्री अधिक घेते की पुरुष वाचा पुराण काय सांगतात\nमनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई\nजात लपवून “सोवळे मोडले” म्हणून पोलीस केस – जातीयवाद की व्यक्तिस्वातंत्र्य\nगौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धाचा खरंच काही संबंध आहे का जाणून घ्या काय आहे सत्य\nअमेरिकेला “अंकल सॅम” हे नाव कसं पडलं जाणून घ्या रंजक कथा\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nरामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८\nफास्टफूडची पॅकेजिंग – कॅन्सरला निमंत्रण\n कठीण प्रसंगात मन शांत, एकाग्र ठेवण्यासाठी हे करा\nमोदींना पर्याय म्हणून “हा” माणूस २०१९ साली पुढे केला जाऊ शकतो\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात – मंदिरं, मूर्तींच्या संक्रमणाचा इतिहास\nएके काळी मंदिरात भिक मागणारा ‘तो’ आज फुटबॉलमध्ये नाव गाजवतोय\nनरेंद्र मोदींच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nमुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का\nRAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…\nविदर्भाव्यतिरिक्त भारतातील असे काही प्रदेश जे वेगळ्या राज्यासाठी आग्रही आहेत\nचीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)\nदोन्ही बाजूंनी उत्तम आवाज येतो, मग इयरफोनवर Left/Right का बरं लिहिलेलं असतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/zar-zar-zar/", "date_download": "2019-03-25T07:44:00Z", "digest": "sha1:5ZAYZJVZNGSZC7DA6MQAJKA5G6OAQYH6", "length": 6319, "nlines": 66, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nझर झर झर झर धार झरे\nझर झर झर झर धार झरे\nभर भर भर भर कलश भरे.\nनंदनवन सम गमते गोकुळ\nवैभव धन हे अमोल येथिल\nहरीची मुरली वाजे मंजुळ\nप्रमुदित करिते गोकुळ सारे.\nराधा कृष्ण यांची प्रीती, कृष्णाचे बालपण, गाई आणि गोपाल यांच्याबरोबरचे गोकुळातील दिवस, कृष्णाच्या चमत्कारकथा, कंसाचा नि:पात आणि राधा, गोकुळजन आणि संपूर्ण विश्वाला वेड लावणारी कृष्णाची मधुर मुरली यांनी नटलेले 'गोपालकृष्ण' हे चित्र विशेषत: त्यातील सुमधुर गाण्यांमुळेच लोकप्रिय झाले. प्रशंसा पत्रांचा पाऊस पडला.\nगोव्याचे दिगंबरदास कामत नावाचे तत्वज्ञानाचे अभ्यासू यांना 'वंदित राधाबाला' या गाण्यातील \"ब्रह्म सानुले हे साकार\" हा चरण इतका आवडला की \"कवीला कडकडून भेटावे\" म्हणून ते गृहस्थ प्रभात मध्ये आले. त्यांनी \"राधामातेच्या चरणाची धूळ\" म्हणून जेथे चित्रीकरण झाले होते तिथली धूळ कपाळावर लावून घेतली.\nझर झर झर झर धार झरे\nवंदित राधाबाला, गोप सख्या घननिळा\nहासत नाचत जाऊ, जाऊ चला गोकुळाला\nशिशुपण बरवे हृदया वाटे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जी���न ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-03-25T08:00:38Z", "digest": "sha1:ECG4KFUOKYJ6UL2V6ABHFZLITS52MD6D", "length": 11168, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रतापगडमधील महिला गृहातून 26 महिला बेपत्ता | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रतापगडमधील महिला गृहातून 26 महिला बेपत्ता\nप्रतापगड, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील महिला आश्रमामधून किमान 26 महिला बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने अचानक या महिला आश्रमाची तपासणी केल्यावर ही बाब उघड झाली.\nप्रतापगड जिल्ह्यातील अष्टभुजा नगरमधील जागृती निवारा गृह हे भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा रमा मिश्रा यांच्यावतीने चालवला जाते. या निवारा आश्रमामध्ये 15 महिलांची नोंदणी केली गेली आहे. मात्र प्रत्यक्ष्यात एकच महिला आश्रमामध्ये उपस्थित होती, असे जिल्हा दंडाधिकारी शंभू कुमार यांच्या निदर्शनास आले. आश्रमातील इतर महिला कामानिमित्त बाहेर गेल्याचे व्यवस्थापकाने सांगितले.\nयाच जिल्ह्यातील अचलपूर येथील अन्य महिला आश्रमामधून 12 महिला बेपत्ता असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी सत्य प्रकाश सिंह यांना निष्पन्न झाले. तेथे 15 महिलांची नोंदणी झाली होती. या आश्रमाला बाह्यनिधी उपलब्ध होत नसल्याने आपल्या स्वतःच्या उत्पन्नाच्या स्रोतातून आश्रम चालवला जात असल्याचे केअर टेकर महिलेने सांगितले. एकूण 26 महिला बेपत्ता असल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले असून या सर्व प्रकरणांची चौकशी केली जात आहे.\nउत्तर प्रदेशातील देओरिया आणि बिहारमधील मुझफ्फरनगर येथील महिला आश्रमांमधील गैरप्रकार उघड झाल्यानंतर या महिला आश्रमांची अचानक तपासणी करण्यात आली.\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\n….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होती\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले\nभारताचा जपानवर दणदणीत विजय\nसलग पाचव्यांदा भारतीय महिलांनी जिंकला सॅफ चषक\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nसत्तेबाजी : ओळख दिग्गजांची\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर २-० ने मात\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/dabar-profit-hiked-in-the-tough-market-conditions/", "date_download": "2019-03-25T08:01:45Z", "digest": "sha1:LAEGCJEBKF6F2F2C4W6JIX7NOBQJYX34", "length": 10229, "nlines": 200, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डाबर कंपनीचा नफा वाढला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडाबर कंपनीचा नफा वाढला\nनवी दिल्ली: आयुर्वेदिक उत्पादनात मोठी स्पर्धा निर्माण होऊनही डाबर इंडियाच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात 25 टक्के वाढ होऊन तो 330 कोटी रुपयांवर गेला आहे. निर्यातीबरोबरच देशातील विक्रीतही वाढ होत असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दुग्गल यांनी सांगितले. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला 264 कोटी रुपयाचा फायदा झाला होता. या तिमाहीत कंपनीचा महसूल ��ाढून 215 कोटी रुपये इतका झाला आहे. जो की गेल्या वर्षी 1871 कोटी रुपये इतका होता. ग्राहकांचा आमच्या उत्पादनावरील विश्वास वाढत असल्यामुळे आम्ही उत्पादन\nआज का शेयर बाजार\nपहाटे चारपर्यंत चंदा कोचर यांची चौकशी\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2016-Papai.html", "date_download": "2019-03-25T07:49:33Z", "digest": "sha1:LCGB6UYS6PR7757ZITSGNEBQK7WPJRQB", "length": 6147, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पपईतील आंतरपीक कलिंगड १।। लाख नफा, पपईचे २।। लाख अजून २५ टन मालाची अपेक्षा", "raw_content": "\nपपईतील आंतरपीक कलिंगड १ लाख नफा, पपईचे २ लाख नफा, पपईचे २ लाख अजून २५ टन मालाची अपेक्षा\nश्री. भाऊसाहेब संपतराव निकस, मु.पो. खिर्डी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर. मो. ८४२२९५९६८४\nमी प्रथमच आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. माझ्याकडे १ एकर क्षेत्रामध्ये पपई तैवान ७८६ ह्या जातीची लागवड डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने करण्याचे ठरविले. सुरुवातीला नांगरणी करून चांगले कुजलेले शेणखत ६ ट्रेलर व कल्पतरू ४ बॅग टाकून प्रथम वरंबा करून ठिबक सिंचन व नंतर मल्चिंग पेपर टाकला. नंतर ६' x ५' अंतरावर पपई १३५० रोपांची १८ नोव्हेंबर २०१५ ला लागवड केली व नंतर १ एकर क्षेत्रामध्ये पपई तैवान ७८६ ह्या जातीची लागवड डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने करण्याचे ठरविले. सुरुवातीला नांगरणी करून चांगले कुजलेले शेणखत ६ ट्रेलर व कल्पतरू ४ बॅग टाकून प्रथम वरंबा करून ठिबक सिंचन व नंतर मल्चिंग पेपर टाकला. नंतर ६' x ५' अंतरावर पपई १३५० रोपांची १८ नोव्हेंबर २०१५ ला लागवड केली व नंतर १ फुटावर मल्चिंगला छिंद्र (होल) पाडून कलिंगडाची १४/१२/१५ ला लागवड केली. दोन्ही पिकाला मल्चिंग असल्यामुळे आणि सुरुवातीला जर्मिनेटरची आळवणी केल्यामुळे पीक जोमदार होते आणी कलिंगडाला फवारणी करताना पपईवरही फवारणी होत होती. त्यामुळे पपईच्या फवारणी खर्चात बचत झाली. कलिंगडाला १५ ते २० दिवसांच्या अंतराने एकूण ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या केल्या. पहिल्या २ फवारण्यांनी पिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच वेलांची वाढ चांगल्याप्रकारे होऊन फुलकळीचे सेटिंग चांगले झाले. त्यानंतर फळधारणा झाल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोन फवारल्याने फळांचे पोषण एकदम चांगल्या प्रकारे झाल्यामुळे या १ फुटावर मल्चिंगला छिंद्र (होल) पाडून कलिंगडाची १४/१२/१५ ला लागवड केली. दोन्ही पिकाला मल्चिंग असल्यामुळे आणि सुरुवातीला जर्मिनेटरची आळवणी केल्यामुळे पीक जोमदार होते आणी कलिंगडाला फवारणी करताना पपईवरही फवारणी होत होती. त्यामुळे पपईच्या फवारणी खर्चात बचत झाली. कलिंगडाला १५ ते २० दिवसांच्या अंतराने एकूण ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या केल्या. पहिल्या २ फवारण्यांनी पिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच वेलांची वाढ चांगल्याप्रकारे होऊन फुलकळीचे सेटिंग चांगले झाले. त्यानंतर फळधारणा झाल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोन फवारल्याने फळांचे पोषण एकदम चांगल्या प्रकारे झाल्यामुळे या १ एकरातील आंतरपिकाचे २४ टन उत्पादन मिळाले. त्यातील १८ टन कलिंगड १० रु. प्रमाणे विकले तर त्याचे १,८०,००० रु. झाले व लहान ६ टनाचे २०,००० रु. झाले. तसेच कलिंगड खर्च वजा जाता १,५०,००० नफा मिळाला. पपईला सुरुवातीला कलिंगडासोबत फवारणी होत होती आणि कलिंगड काढणीनंतर दर महिन्याला सप्तामृत फवारत होतो. त्यामुळे व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही. ४ थ्या महिन्यातच फुलकळी लागून ५ - ६ व्या महिन्यात फळधारणा सुरू झाली. या काळात फळांचे पोषण होण्यासाठी राईपनर व न्युट्राटोन फवारत होतो. तसेच विद्राव्य खते ठिबकवाटे देत होतो. या सर्वांमुळे फळांचे पोषण अतिशय चांगले होऊन पपई ऑगस्टमध्ये काढणीस आली व ३० सप्टेंबर पर्यंत ११ टन माल निघाला. भाव १२ रु. पासून २५ रु./किलो पर्यंत मिळाले. आता पर्यंत २,५०,००० रु. झाले असून अजून २५ टन माल निघण्याची अपेक्षा आहे. हे सर्व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उत्पादन निघाले आहे. ही औषधे अमृता फर्टीलायझर यांच्याकडून घेतली. तसेच या सर्व कामामध्ये भाऊ निकम आणि डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. बाळासाहेब कर्डीले (मो. ९६०३६९९२२८) यांची मोलाची साथ लाभली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2015-Jambori.html", "date_download": "2019-03-25T08:14:53Z", "digest": "sha1:WJC3JIGEX5LVNWID2HXK2VQFLW5AQV6D", "length": 7970, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - अवकाळी पावसातही जंबोरीची पन्हेरी सुद्दढ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा फायदा", "raw_content": "\nअवकाळी पावसातही जंबोरीची पन्हेरी सुद्दढ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा फायदा\nश्री. अरुणराव सितारामजी डोईजोड, मु.पो. मलकापूर, ता. वरूड, जि. अमरावती - ४४४९०७. मोबा.९७६४१९६०५३\nआम्ही दरवर्षी संत्र्याची पन्हेरी करतो. प्रथम ५ ते ६ वर्षाच्या ईडलिंबाच्या झाडांवरील फळांपासून बी काढून ते नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात वाफ्या��� टाकले जाते. त्याची ७० ते ७५ % पर्यंत उगवण होते. अशा रोपांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम, क्रॉपशाईनर, फवारणी करतो. त्यामुळे रोपांची निरोगी वाढ होते. मध्ये गरजेनुसार खत व पाणी देत असतो. नंतर जुलैमध्ये जमीन तयार करून ही रोपे ८ x ८ इंचावर चऱ्या पाडून चौफुलीवर रोप बसेल असे खड्डे करून त्यात ही ईडलिंबूची रोपे लावतो. या रोपांची नोव्हेंबरपर्यंत पेन्सिलहून जाड, पेनच्या आकाराची काडी झाल्यावर साधारण ५ ते ७ वर्षाच्या नागपूरी संत्रा बागेतील डोळे काढून बानकरी (बडींग करतो. म्हणजे ईडलिंबाची साधारण १ ते १ फुटाची रोपे असताना पेनच्या जाडीच्या आकाराच्या, जमिनीपासून ८ ते १० इंचावरील रोपाच्या भागावरील साल काढून डोळा भरून त्यावर पट्टी बांधतो. ही पट्टी २१ दिवसांनी सोडतो. याकाळात डोळा हिरवा होऊन बारीक फूट दिसू लागते. मग खुंट रोपाचा शेंडा (ज्या ठिकाणी डोळा भरला आहे त्याच्या वरील) कट करतो. त्यानंतर मग हा कलम केलेला डोळा जोमाने वाढीस लागतो. या रोपांना गरजेनुसार खत - पाणी देतो. अशी रोपे पुढील जुलै महिन्यात १ ते २ फूट उंचीची लागवडीयोग्य तयार मिळतात. ही रोपे पाऊसकाळ चांगला झाल्यास रोपांना मागणी वाढली की १५ रू. पासून २५ रू. पर्यंत दराने विकली जातात. अशा पद्धतीने आम्ही मागील ३ वर्षापासून संत्र्याची पन्हेरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची उत्पादने वापरून करीत आहे.\nरोपे तयार करताना मी सुरूवातीला अनुभवासाठी जर्मिनेटर व प्रिझमची ड्रेंचिंग व फवारणी केली. त्यामुळे माझ्या नर्सरीमध्ये असलेला पिवळसरपणा कमी झाला व पन्हेरीची नवतीसुद्धा साफ झाली. नवतीची चाल चालू राहिली. माझी बानकरी (बडींग) उशीरा होवून सुद्धा अगोदर केलेल्या पारंपारिक बडींगच्या रोपांच्या बरोबरीत आली. ह्या पहिल्या अनुभवानंतर मी सतत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची उत्पादने वापरत आहे.\nयावर्षी जुलै २०१४ पर्यंत पाऊस न झाल्याने मला पन्हेरी नर्सरीची लागवड जुलैनंतर उशीरा करावी लागली त्यामुळे जंबोरीची वाढ उशीरापर्यंत झाली. लागवड उशीरा झाल्याने पुढे बानकरी (डोळे भरणे/बंडिग) सुद्धा उशीरा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात झाली. त्यामध्ये मी जर्मिनेटर, प्रिझमची दर १५ दिवसांनी ड्रेंचिंग सुरू केली. त्यामुळे माझ्या नर्सरीमधील पन्हेरी ही मजबूत बनली आणि नवती सफ होवून तिने जोरात चाल पकडली. मार्च महिन्य���त झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळीकडे मुळकूज व इतर बुरशीजन्य रोग पसरले. परंतु मी जर्मिनेटर व प्रिझमचे ड्रेंचिंग केल्यामुळे माझ्या नर्सरीमध्ये त्या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. वातावरण खराब असल्यामुळे मी क्रॉपशाईनरचा वापर केला. त्यामुळे अवकाळी पाऊस व धुवारीचा माझ्या नर्सरीवर काहीही वाईट परिणाम झाला नाही.\nया वर्षी गेल्या दोन महिन्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी ह्या भागामध्ये नर्सरीची पाहणी करत असून त्यांनी वेळोवेळा माझ्या पन्हेरी नर्सरीला भेट देवून मला योग्य ते मार्गदर्शन केले आहे व त्याचा मला पुरेपूर फायदा झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-i-have-not-seen-leader-indira-gandhi-says-nitin-gadkari-4086", "date_download": "2019-03-25T07:32:51Z", "digest": "sha1:6MM454SPPCY7HUW637WHJQ7QWJ667OO6", "length": 10463, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news i have not seen leader like indira gandhi says nitin gadkari | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही - नितीन गडकरी\nइंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही - नितीन गडकरी\nइंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही - नितीन गडकरी\nइंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही - नितीन गडकरी\nसोमवार, 7 जानेवारी 2019\nनागपूर : इंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही. महिला असूनही त्यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवीले. त्यांना आरक्षण मिळाले होते काय असा सवाल करीत भाजप नेते नितीन गडकरी यांनी स्वकर्तृत्वाने वजन वाढविले पाहिजे, असा सल्ला महिलांना दिला.\nनागपूर : इंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही. महिला असूनही त्यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवीले. त्यांना आरक्षण मिळाले होते काय असा सवाल करीत भाजप नेते नितीन गडकरी यांनी स्वकर्तृत्वाने वजन वाढविले पाहिजे, असा सल्ला महिलांना दिला.\nनागपूर महापालिकेने दिव्यांगांना ई-रिक्षाचे वितरण केले. शोषितांचे अश्रू पुसणे हे सर्वोत्तम काम असून राजकारणाऐवजी मी हेच करतो, असे नमुद करीत केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी समाजातील मागासलेल्या��ना सवलती दिल्याच पाहिजे, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वकर्तृत्वाने आपले वजन वाढविले पाहिजे, असा सल्लाही महिलांना दिला.\nमहापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने रेशिमबाग मैदानावर आयोजित उद्योजिका मेळाव्याचे थाटात उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर कोहळे, सुनील अग्रवाल, नागेश सहारे, दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, रुपाली ठाकूर यांच्यासह इतर नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी गडकरींच्या हस्ते एका महिलेसह चार दिव्यांगांना ई-रिक्शा वितरित करण्यात आले.\nगडकरी म्हणाले, कुठलीही वस्तु, पदार्थ तयार करताना त्याचा योग्य फॉर्म्युला तयार करणे आवश्यक आहे. नागपूरच्या सावजी मटनची चव स्वर्गीय सुखाचा आनंद देते. कुठलीही वस्तू तयार करण्याचा अचूक 'फॉर्म्युला' म्हणजेच कौशल्य असून ते आत्मसात करणे ज्याला जमले, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. अशा वस्तु तयार करा, त्या खरेदीसाठी रांगा लागल्या पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी महिलांना केले. महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु काही दिवसांपूर्वी पत्नीपिडीत भेटले, असे सांगताच हशा पिकला. घरी जशी सांबारवडी तयार होते, तशी चव कुठेही चाखायला मिळाली नाही, असे नमुद करीत गडकरी यांनी यावेळी सौभाग्यवतींची स्तुती केली. नुकताच अनिल कपूर, जॅकी श्रॉफ घरी आले असता त्यांनी जेवणाऐवजी सांबारवडीवरच ताव मारला, असेही गडकरी म्हणाले. यश व पुस्तकी ज्ञानाचा संबंध नाही, अनुभवातून मोठे होता येते. महिलांना अनुभवाची संधी दिली तर त्यांचे सक्षमीकरण होईल, असेही ते म्हणाले. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी महिला उद्योजिका झाल्यास मुलेही उद्योजक होतात व कुटुंबाचे नाव होते, असे सांगितले. प्रास्ताविकातून प्रगती पाटील यांनी महिला व बालकल्याण समितीच्या महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.\nयावेळी शहरातील पाच महिलांचा गौरव गडकरींच्या हस्ते करण्यात आला. यात बेवारस श्वानांची सुश्रूषा करणाऱ्या स्मिता मिरे, साहसी खेळात तरबेज गौरी डोळस, मुस्लिम महिलांसाठी काम करणाऱ्या रुबीना पटेल, महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या संगीता राऊत व इंजिनिअरिंग झालेली मूक बधिर विद्यार्थिनी श्रीया खानझोडे यांचा समावेश आहे.\nनागपूर nagpur महिला women आरक्षण भाजप नितीन गडकरी nitin gadkari राजकारण politics समाजकल्याण\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/bhagyawati-mi/", "date_download": "2019-03-25T07:56:06Z", "digest": "sha1:UXPJHQMR6MHPZM5IRPMUJAFVXEJP2F6D", "length": 8724, "nlines": 80, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nगं भाग्यवती मी भाग्यवती.\nगं भाग्यवती मी भाग्यवती.\nतसे सुखाने भरलेले घर\nप्रीती शांतीची हसरी कमळे\nगं भाग्यवती मी भाग्यवती.\nचंद्र नभीचा खाली आला, खाली आला\nतिलक कपाळी माझ्या झाला\nमहती सांगू किती किती\nगं भाग्यवती मी भाग्यवती.\nदु:ख माझिया दारी येते\nथबकुनी दबकुनी उभे राहते\nगंध सुखाचा पिउनी त्याचे\nगं भाग्यवती मी भाग्यवती.\nसदाशिव जे रावकवी यांच्या 'चित्रसहकार' या निर्मिती संस्थेसाठी य.गो.जोशी यांच्या कथेवरील या चित्राने पंचवीस चित्रपटगृहात प्रत्येकी पंचवीस आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्याच बरोबर संपूर्ण चित्र फक्त पस्तीस दिवसात मुहूर्तापासून सेन्सॉरपर्यंत पूर्ण करण्याचाही विक्रम आठवले यांनी केला. चित्रीकरणाचे अभ्यासपूर्ण संयोजन आणि तंत्रावरील प्रभुत्व या आठवले यांच्या गुणांमुळेच ते शक्य झाले.\nमातृसुखाला पारखा झालेला दीर आणि पुत्रखापासून वंचित राहिलेली वहिनी यांच्या निर्मळ प्रेमाची अत्यंत जिव्हाळ्याने चित्रित केलेली कौटुंबिक कलाकृती. या चित्रपटाने सुलोचना या अभिनेत्रीला ग्रामीण चित्रपटातून घरात, माजघरात, अगदी स्वयंपाकघरात आणले. सोज्वळता म्हणजे सुलोचना या समीकरणाची सुरवात या चित्राने झाली. दिग्दर्शन आणि गीतलेखन याखेरीज आठवल्यांनी या चित्रात एक सुलोचना यांच्या पतीची भूमिकाही केली होती. हे चित्र एका वेगळ्या अर्थानेही कौटुंबिक होते – यात आठवले यांचे संपूर्ण कुटुंब पडद्यावर दिसले होते. मुलगा सुदर्���न छोट्या भावाचा शाळेतील मित्र झाला होता. सुमतीबाई, मुली आणि एक मेव्हणी यांनी हळदीकुंकवाच्या प्रसंगात भाग घेतला होता. दादा म्हणजे आठवले आणि वहिनी म्हणजे सुलोचना यांच्या पडद्यावरील लग्नप्रसंगी सुमतीबाई नवऱ्याच्या लग्नाला नवऱ्यामुलीच्या मागे करवली म्हणून हजर राहिल्या आहेत.\nदो नयनांचे हितगुज झाले\nदेवा तुझी आठवण होते\nरडू नको रे चिमण्या बाळा\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/172234-", "date_download": "2019-03-25T07:29:13Z", "digest": "sha1:CYODDPOYMFNKW5EXKLAELRSRNN2E3EF4", "length": 7846, "nlines": 25, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt एक्सपर्ट शेअर्स वेब एक्सट्रॅक्शन टूल लिस्ट", "raw_content": "\nSemalt एक्सपर्ट शेअर्स वेब एक्सट्रॅक्शन टूल लिस्ट\nतुम्हाला वेबसाइट बनवायची असेल किंवा आरएसएस फीड आणण्याची गरज आहे का\nअचूक, उपयुक्त आणि अस्सल डेटासह, आपण स्क्रीन स्क्रॅपिंग आणि डेटा निष्कर्षण प्रोग्रामची एक श्रेणी वापरू शकता.\nजर आपण नियमितपणे वेबसाइटवरून उत्पादन डेटा हस्तगत करू इच्छित असाल तर आपण Mozenda साठी निवड करणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रवासी पोर्टल्स, सोशल मीडिया साइट्स आणि न्यूज आउटलेट्सची निदर्शने करण्याची आवश्यकता असेल, तर यूपीथ आणि किमोनो तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत - buy fake id canada.\nया 3 साधनांसह, आपण फॉर्म भरणे प्रकल्प स्वयंच��ित करू शकता आणि इंटरनेटवर संशोधन करू शकता.\nकिमोनो एक प्रसिद्ध वेब डेटा उतारा आणि स्क्रीन स्क्रॅपिंग ऍप्लिकेशन आहे. ज्या लोकांना त्यांचे डेटा थेट लाइव्ह डेटासह सक्षम करायचे आहे त्यांच्यासाठी हे आदर्श आहे आणि आपल्याला किमोनोचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कोडींग कौशल्याची आवश्यकता नाही. हे आपला वेळ वाचवू शकते आणि स्मॅश करत असलेल्या डेटासह आपल्या वेबसाइटवर भरते. आपल्याला फक्त हे साधन डाउनलोड आणि स्थापित करावे लागेल, आपल्या पृष्ठ घटक हायलाइट करा आणि काही उदाहरणे द्या जेणेकरून किमोनो योग्यरितीने त्याचे कार्य करू शकेल. हे विविध वैशिष्ट्यांसह एक विनामूल्य प्रोग्राम आहे आणि उपक्रम आणि फ्रीलांसरसाठी योग्य आहे. किमोनो आपल्या डेटाला JSON आणि CSV स्वरुपात लेबल करून आपल्या वेब पृष्ठांसाठी API तयार करतो, जे नंतरच्या वापरासाठी त्याच्या डेटाबेसमध्ये संग्रहित करतात. हे कोणत्याही पृष्ठ नेव्हिगेशनची आवश्यकता नाही आणि आपला डेटा निष्कर्ष कार्य गती वाढवितो.\nमोझ्ंडा एक विनामूल्य डेस्कटॉप अॅप्लिकेशन आणि स्क्रीन स्क्रॅपिंग प्रोग्राम आहे. हे आम्हाला अमर्यादित वेब पृष्ठांवरील सर्व डेटा निभावण्यास मदत करते. ही सेवा सर्व वेब पृष्ठांना संभाव्य डेटा स्रोत म्हणून हाताळेल आणि Mozenda कडून आपल्याला लाभ घेण्यासाठी कोणतीही प्रोग्रामिंग कौशल्ये आवश्यक नाहीत. मोठ्या प्रमाणावर प्रोग्रामर आणि एसइओ तज्ञांनी याची शिफारस केली आहे. आपण फक्त आपले वेब पृष्ठ सबमिट आणि Mozenda त्याच्या कार्ये द्या करण्याची आवश्यकता आहे. आपण Mozenda च्या API वर सहजपणे प्रवेश करू शकता आणि अचूक माहिती मिळवू शकता. तो स्क्रीन स्क्रॉप्सच्या माध्यमातून स्क्रीन स्क्रॅपिंग प्रक्रियेद्वारे आपले मार्गदर्शन करेल आणि एका तासाच्या आत शेकडो हजार वेब पृष्ठांवर प्रक्रिया करू शकते. हा कार्यक्रम वापरण्यास सोपा आहे आणि कोणत्याही तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही. काहीवेळा Mozenda हे डेटा पृष्ठावर 24 तासांपर्यंत डेटा आणि प्रक्रिया करू शकते आणि हे केवळ या साधनाचा दोष.\nUipath विविध वेब पृष्ठे तयार आणि वापरकर्त्यांसाठी प्रक्रिया बरेच वेबसाइट्स मध्ये specializes. हे सर्वात विश्वसनीय आणि उत्तम स्क्रीन स्क्रॅपिंग आणि डेटा निष्कर्षण कार्यक्रमांपैकी एक आहे. हे दोन्ही coders आणि वेब डेव्हलपर करीता योग्य आहे आणि पृष्ठ नॅव्हि���ेशन सारख्या सर्व डाटा निष्कर्षण आव्हाने सहजपणे पार करू शकते. हे केवळ आपल्या वेब पृष्ठांवरच नाही तर विविध पीडीएफ फाइल्स भंगते. आपल्याला फक्त हे वेब स्क्रॅपिंग विझार्ड उघडण्याची आवश्यकता आहे आणि आपण निसर्गास आवश्यक असलेली माहिती हायलाइट करा. यूपीथ आपणास संबंधित स्तंभांमध्ये अचूक आणि अद्ययावत डेटा देऊन एका तासात हजारो वेब पृष्ठे गुंतागुंतीत करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-assembly-election-results-dream-congress-free-india-shattered-3939", "date_download": "2019-03-25T07:29:54Z", "digest": "sha1:DS7VPZID37UESTP4KUUS7G3XYYPF7IKP", "length": 9123, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news assembly election results dream of congress free india shattered | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न धुळीस\nकाँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न धुळीस\nकाँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न धुळीस\nकाँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न धुळीस\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nदेशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाचपैकी तीन राज्यांमध्ये वर्चस्व मिळवीत देशात आणखी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे देशात आता पाच राज्यांत काँग्रेसची सत्ता असणार हे निश्चित आहे.\nदेशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाचपैकी तीन राज्यांमध्ये वर्चस्व मिळवीत देशात आणखी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे देशात आता पाच राज्यांत काँग्रेसची सत्ता असणार हे निश्चित आहे.\nवर्षभरापूर्वी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला होता. आता आज याच अध्यक्षांना वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसने तीन राज्यांतील सत्तेचे गिफ्ट दिले आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींना लगेच गुजरातमध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. पण, गुजरातमध्ये मिळालेली लोकप्रियता नरेंद्र मोदींसारख्या गुजराती माणसासमोर राहुल गांधी हा सक्षम पर्याय म्हणून उभा राहण्यास पुरेशी ठरली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींना अपयश मिळाले असूनही काँग्रेसने गांधी घरण्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. आता या तीन राज्यांत मिळालेल्या यशानंतर हे निश्चित झाले आहे, की भाजपचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशाला काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर यांच्यावर टीका झाली होती. पण, आता देशातील जनतेनेच काँग्रेसच्या बाजूने कौल देत सुरवातीला पंजाबमध्ये सत्ता दिली होती. त्यानंतर कर्नाटकमध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊन धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. मिझोराममध्ये काँग्रेस यापूर्वीच सत्तेत होते. पण, आता त्यांच्या हातातून ते राज्य गेले आहे. अगदी एक-दोन राज्यांत अस्तित्वात असलेली काँग्रेस आता मोठ-मोठ्या राज्यांतही सत्ता काबीज करत आहे.\nशेतकऱ्यांचे प्रश्न, नोटबंदी, बेरोजगारी, राफेल करार यासारख्या मुद्द्यांवरून भाजपला जेरीस आणणाऱ्या राहुल गांधींनी तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवून भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. भाजपचे हे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/node/2863", "date_download": "2019-03-25T07:40:40Z", "digest": "sha1:4K25IH7BXGDUY7HLQEU7IIFZ2FQ4BXZB", "length": 8810, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news State transport of maharashtra privatisation | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nमुंबई : वातानुकूलित शिवशाही खाजगी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर व्यवस्थापनाने आता खाजगीकरणाची व���ट धरली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांची दुरुस्ती खाजगी कार्यशाळेतून करण्यासाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ करणारे परिपत्रक महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.\nमुंबई : वातानुकूलित शिवशाही खाजगी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर व्यवस्थापनाने आता खाजगीकरणाची वाट धरली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांची दुरुस्ती खाजगी कार्यशाळेतून करण्यासाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ करणारे परिपत्रक महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये व्होलवो व स्कँनिया बनावटीच्या हायटेक वातानुकूलित शिवनेरी, अश्वमेध व शिवशाही बसेसचा समावेश झाला आहे. सदर बस अपघातामध्ये नादुरुस्त झाल्यास त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था आपल्या कार्यशाळेत नसल्याने त्या बसेस खाजगी कार्यशाळेत दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.\nएसटीच्या मालकीचे पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे गाड्या निर्मिती व दुरुस्ती कार्यशाळा आहेत. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये नादुरुस्त गाड्या दुरूस्त करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तरीही महामंडळाने एसटी गाड्या दुरूस्त करण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात व्यवस्थापनाने कार्यशाळा व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांच्या खाजगी कार्यशाळातून दुरुस्ती खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. विभागीय नियंत्रकांना यापूर्वी खाजगी कार्यशाळेत वाहन दुरुस्त करण्यात खर्चाची मर्यादा 15 हजार होती ती वाढवून एक लाखापर्यंत करण्यात आली आहे तर कार्यशाळा व्यवस्थापनात यापूर्वी खर्चाची मर्यादा 45 हजारांपर्यंत होती ती मर्यादा वाढवून दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे आता एसटी गाड्या खाजगी कार्यशाळांमध्ये दुरुस्ती केल्याचे चित्र दिसल्यास नवल वाटणार नाही. त्याचबरोबर आता दुरुस्तीची सर्व यंत्रणा असणाऱ्या एसटी महामंडळाने खाजगी कार्यशाळेकडे जाण्याचा मार्ग पत्करल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.\n-एसटीचा संचित तोटा 2829 कोटी\n-एसटीकडील एकूण वाहने - 19016\n-एकूण कर्मचारी - 101226\n-एकूण आगारे - 250\n-एकूण बसस्थानके - 609\n-वार्षीक प्रवाशी संख्या - 245 कोटी\n-दररोजचे प्रवाशी - 67 लाख\nखासगीकरण वैगेर नसून शि��शाही गाड्यांसारख्या गाड्या आहेत. त्यांचे काही पार्ट आपल्याकडे नाहीत. त्यामुळे अशा वेळी मंजूरीला प्रत्येकवेळी प्रस्ताव मुख्यालयाकडे येवू नये म्हणून मंजूरीसाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे.\n- रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष एसटी महामंडळ\nएसटी महाराष्ट्र maharashtra अपघात औरंगाबाद aurangabad नागपूर nagpur तोटा खासगीकरण\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/videos/page/4/", "date_download": "2019-03-25T07:34:54Z", "digest": "sha1:UMDATLXY6MRGF6SLJKAK7LND6U2KFIOX", "length": 5688, "nlines": 65, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Videos - Page 4 of 13 - मराठी कलाकार", "raw_content": "\nअ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८\nशिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट आगामी फर्जंद मराठी सिनेमा\nमहाराष्ट्राला इतिहासाची उजवल परंपरा लाभली आहे. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. शिवकालीन पराक्रमी मावळे...\n‘बकेट लिस्ट’ मराठी मूवी ट्रेलर\nमाधुरी दिक्षितला पडद्यावर पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. बराच वेळ ग्लॅमरपासून दूर असलेली माधुरी आता लवकरच...\nभाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ह्रिषिकेश जोशी स्टारर सायकल होतोय ४ मे ला प्रदर्शित\nसायकल वर आधारित एक भावपूर्ण कथा आगामी सायकल हा सिनेमा घेऊन येत आहे. सिनेमाचं ट्रेलर नुकतंच...\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nपोस्टर आणि टिझर लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित शिकारी शेवटी ह्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. वेगळ्या...\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nमराठी सिनेमाने वेगवेगळ्या विषयांवर दमदार भाष्य केलं आहे. साचेबद्धपणा सोडून प्रशंसनीय सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत....\nआदर्श सुनबाई साकारतायत आरजे ची भूमिका\nअभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणजे आता एक आदर्श सुनबाईच झालीये. हो ना ‘होणार सून मी ह्या घरची’...\nवास्तववादी भाष्य करतोय अट्रॉसिटी\nवास्तववादी सिनेमा समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतो. अशाच वास्तववादी धर्तीवर बनलेला अट्रॉसिटी हा...\nनेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात\nछोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही....\nछत्रपती शिव��जी महाराजांवरचा ऍनिमेशनपट लवकरच येतोय आपल्या भेटीला\nछत्रपती श्री शिवाजी महाराज म्हटलं कि डोळ्यांसमोर येतं तो गर्वाने छाती फुलवणारा इतिहास आणि एक दैदिप्यमान...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/the-victory-of-the-opposition-parties-along-with-shiv-sena-across-the-state/", "date_download": "2019-03-25T08:07:13Z", "digest": "sha1:55WQ6C7LHM4P5L6Q3PGGVREIFZJRSYSY", "length": 5540, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यभरात भाजपला पराभवाचा दणका; पोटनिवडणुकीत शिवसेनेसह विरोधीपक्षांचा विजय", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nराज्यभरात भाजपला पराभवाचा दणका; पोटनिवडणुकीत शिवसेनेसह विरोधीपक्षांचा विजय\nटीम महाराष्ट्र देशा : स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत धडकी भरवणारे शक्ती प्रदर्शन करणाऱ्या भाजपला आज राज्यभरातील पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई, पुणे, नाशिक तसेच सोलापूर महापालिकेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेसह विरोधीपक्षांनी विजय संपादन केले आहे.\nमुंबई महापालिका पोटनिवडणुकीत सायनमधील प्रभाग क्रमांक १७३ चा गड राखण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे ६११६ मतांनी विजयी झाले. तर पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार सुकन्या गायकवाड यांचा प्रभाव केला.\nसोलापूर महापालिकेच्या प्रभाग 14 मधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तौफीक हत्तुरे यांनी विजय मिळवत काँग्रेसचा गड राखला. तर नाशिकमध्ये मनसेचे इंजिन चालले असून मनसे उमेदवार वैशाली भोसले यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nशिवसेना खासदार संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत\nशरद पवार आजपर्यंत का पंतप्रधान झाले नाहीत…काही कळत नाही- नाना पाटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2016-Halad-kapoos-Soyabin.html", "date_download": "2019-03-25T07:51:15Z", "digest": "sha1:63QVPNCXXLN4ZDTU7Q3AE67TYIFQUCXZ", "length": 5253, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने हळदीची मर ना होता व हळद न लागता एकरी २७ क्विंटल म्हणून यावर्षी हळद, ऊस, कापूस, सोयाबीनला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने हळदीची मर ना होता व हळद न लागता एकरी २७ क्विंटल म्हणून यावर्षी हळद, ऊस, कापूस, सोयाबीनला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nश्री. आनंदराव उत्तमराव सुरोशे, मु.पो. शिंदगी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६. मो. ९६८९१५९७५१\nमाझ्याकडे एकूण २२ एकर जमीन आहे. मी दरवर्षी हळद पीक घेत आहे. पण ते पारंपारिक पद्धतीने घ्यायचो. यावेळी आमच्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कंपनी प्रतिनिधींची भेट झाली आणि त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी बद्दल माहिती दिली. त्यामुळे यावर्षी माझ्याकडील हळदीचे पीक पारंपारिक पद्धतीने न घेता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने घेत आहे. तर मी हळद लागवड करण्याआधी बेडवर एकरी S.S.P. ३ पोते व कल्पतरू खत २ पोटे टाकले आणि जर्मिनेटर + क्लोरोपायरीफॉस + साफ यांची बेणेप्रक्रिया केली. त्यानंतर माझी हळद २० व्या दिवशी दिसायला सुरुवात झाली. उगवण चांगली झाली. उगवणीनंतर जर्मिनेटर २५० मिली + थ्राईवर २५० मिली + क्रॉपशाईनर २५० + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे पहिली फवारणी केली. नंतर १ महिन्यानंतर ५ फवारण्या करण्यात आल्या. त्यामुळे उगवून आलेल्या कोंबाला मर रोगापासून संरक्षण मिळाले. पिकाची वाढ निरोगी व पाने हिरवीगार दिसत होती.\nदुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत न्युट्राटोन, राईपनरचा वापर केला तर पानाला चमकदारपणा, तजेलदारपणा आला. हळदीच्या फुटव्यात वाढ होऊन कंद न कुजता, न सडता पोषण चांगले झाले . जर्मिनेटर व प्रिझममुळे हळदीच्या वाढीस मदत होते तसेच मर लागणे, हळद लागणे (सडणे) याला प्रतिबंध होतो. थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीमुळे पानावर येणारा करपा, ठिपके हे प्रकार दिसत नाहीत. पाने वेडी वाकडी न होता सरळ व टवटवीत होतात. राईपनर, न्युट्राटोनने हळदीच्या फण्यांची संख्या वाढली. चांगल्या प्रतीची हळद झाली आहे. मला एकरी २७ क्विंटल उत्पादन मिळाले. चालू वर्षी मी हळद, ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/uddhav-thackeray-criticized-maharashtra-government-over-farmers-successful-long-march/articleshow/63278760.cms", "date_download": "2019-03-25T08:55:38Z", "digest": "sha1:NBEMORFDK6ADCYNRE2JVR45AZF4EUO6E", "length": 14725, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kisan long march: 'थप्पड की गुंज' सत्ताधाऱ्यांना कायम आठवेल - uddhav thackeray criticized maharashtra government over farmers successful long march | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\n'थप्पड की गुंज' सत्ताधाऱ्यांना कायम आठवेल\n'मुंबईवर धडकलेल्या शेतकरी वादळाचा तडाखा असा जबरदस्त आहे. अर्थात त्याहीपेक्षा शेतकऱ्यांनी कालबद्ध पूर्ततेच्या वचनासह लेखी आश्वासन द्यायला राज्यकर्त्यांना भाग पाडले हे त्याहीपेक्षा मोठे आणि दूरगामी यश आहे. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील आणि अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचे धाडस ते यापुढे तरी करणार नाहीत,' अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.\n'थप्पड की गुंज' सत्ताधाऱ्यांना कायम आठवेल\nमुंबई: 'मुंबईवर धडकलेल्या शेतकरी वादळाचा तडाखा असा जबरदस्त आहे. अर्थात त्याहीपेक्षा शेतकऱ्यांनी कालबद्ध पूर्ततेच्या वचनासह लेखी आश्वासन द्यायला राज्यकर्त्यांना भाग पाडले हे त्याहीपेक्षा मोठे आणि दूरगामी यश आहे. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील आणि अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचे धाडस ते यापुढे तरी करणार नाहीत,' अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.\nदैनिक 'साम��ा'तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर आसूड ओढले आहेत. 'शेतकऱ्यांच्या आणखी एका तडाख्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणले आहे. नाशिक येथून हजारो शेतकऱ्यांचे वादळ सोमवारी मुंबईवर आदळले. त्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून जाईल अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही सरकारसमोर राहिला नाही. कालपर्यंत जे सरकार शेतकऱ्यांच्या मोर्चाबद्दल ढिम्म होते ते सोमवारी एकदम ‘संवेदनशील’ झाले. मोर्चेकरी शेतकऱ्यांचा आक्रोश ज्यांच्या कानावरही पडत नव्हता ते त्यांच्या मागण्यांबाबत ‘सकारात्मक’ झाले,' असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.\nउद्धव ठाकरे यांची टीका...\n>> ३० जून २०१७ पर्यंतचे कर्ज माफ होणार असून २००९ ऐवजी २००१ पासूनच्या शेतकरी कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेत केला जाणार आहे. इतरही काही जाचक अटी शिथिल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आणखी हजारो कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.\n>> ‘रयतेचा राजा’ छत्रपती शिवरायाचे नाव घेत सत्तेत आलेल्यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षांत फक्त घोषणाबाजीच केली आणि ‘रयते’लाच न्याय्य मागण्यांसाठी शेकडो किलोमीटर पायपीट करायला लावली. त्या बळीराजाने राज्यकर्त्यांना दिलेली ही शेवटची संधी आहे. मागण्यांच्या पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळा. अन्यथा शेवटची संधी ‘शेवटची काडी’ ठरेल.\n>> कर्जबाजारी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याच्या शिवसेनेच्या मागणीचेच ‘ऐतिहासिक’ रूप गेल्या वर्षी शेतकरी संपात दिसले होते. या मागणीसाठी शिवसेनेने जे रान पेटवले त्या आगीची झळ बसल्यानेच सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत घातलेल्या ‘अटी व शर्तीं’मुळे ही कर्जमाफी म्हणजे एक फार्सच ठरला होता.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nRanjitsinh Mohite-Patil: रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध...\nRaj Thackeray-Sharad Pawar: मुंबई: राज ठाकरे शरद पवार यांच्य...\nलोकसभा: सेनेची पहिली यादी जाहीर; सातारा, पालघरबाबत निर्णय ना...\nमुंबईः प्रवीण छेडा यांची भाजपत 'घरवापसी'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'थप्पड की गुंज' सत्ताधाऱ्यांना कायम आठवेल...\nसम-विषम विचार एकसाथ भावूक होतात तेव्हा......\nआंतरराष्ट्रीय शाळांसाठी समित्यांची स्थापना...\nआयुक्तांच्या तक्रारीला न्यायालयात आव्हान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/social-media-municipal-elections-publicity-13605", "date_download": "2019-03-25T08:27:44Z", "digest": "sha1:6KEWL3L5PXOLTGUWM2MR3E4U3SGJL2SK", "length": 11696, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Social media on municipal elections publicity सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nउस्मानाबाद - सोशल मीडियावर पालिका निवडणुकीचा बोलबाला सुरू झाला आहे. ‘नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण’ यावरच चर्चा रंगल्याने सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे.\nउस्मानाबाद - सोशल मीडियावर पालिका निवडणुकीचा बोलबाला सुरू झाला आहे. ‘नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण’ यावरच चर्चा रंगल्याने सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे.\nनगरपालिकेची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या बुधवारी (ता. पाच) नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच सोशल मीडियावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सांगा कोण असेल नगराध्यक्षपदाचा उमेदवार, यावर प्रतिक्रिया मागविल्या जात आहेत. त्यावर आपला पठ्याच नगराध्यक्ष, यंदा फक्त भैय्याच, नगराध्यक्ष केवळ आमचाच, आमचा नाद करायचा नाही, दादाचा नाद खुळा अशा प्रतिक्रिया आल्याने नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फटाके फोडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे कार्यकर्ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह झाले आहेत. दररोज नवीन पोस्ट टाकल्या जात आहेत. संपूर्ण वर्षात केलेल्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासोबतच आश्वासनांची खैरातही होत आहे. वेगळ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांचा फोटो पेस्ट करून आता आमचेच पारडे जड आहे, अशा पोस्टही काहींनी टाकल्या आहेत. आरक्षणातून जातीची गणिते मांडली जात आहेत. विकासाचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे काही जाणकार सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. व्हॉट्सअप, फेसबुकवर दररोज पालिका निवडणुकीच्या नवनवीन पोस्ट पडत असल्याने सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध चांगलेच रंगात आल्याचे दिसून येत आहे. उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. एकदा उमेदवार निश्चित झाल्यानंतर मात्र यामध्ये चांगलीच रंगत येणार असल्याचे संकेत यातून मिळू लागले आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/hockey-sticks/kargil-fighter+hockey-sticks-price-list.html", "date_download": "2019-03-25T07:52:36Z", "digest": "sha1:ICSX6RBWAR3JBJVQ5ZFVK4TENY5PVOVT", "length": 12319, "nlines": 248, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कारगिल फिघाटर हॉकी स्टिकस किंमत India मध्ये 25 Mar 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफ���\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकारगिल फिघाटर हॉकी स्टिकस Indiaकिंमत\nIndia 2019 कारगिल फिघाटर हॉकी स्टिकस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकारगिल फिघाटर हॉकी स्टिकस दर India मध्ये 25 March 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण कारगिल फिघाटर हॉकी स्टिकस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कारगिल फिघाटर गोली 5660 गोलकीपर स्टिक 37 इंच मुलतीकोलोर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Homeshop18, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कारगिल फिघाटर हॉकी स्टिकस\nकिंमत कारगिल फिघाटर हॉकी स्टिकस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कारगिल फिघाटर टायगर हिल्स हॉकी स्टिक 37 इंच मुलतीकोलोर Rs. 1,500 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.699 येथे आपल्याला कारगिल फिघाटर गोली 5660 गोलकीपर स्टिक 37 इंच मुलतीकोलोर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. विल्डकराफ्ट Hockey Sticks Price List, उंब्रन्डेड Hockey Sticks Price List\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10कारगिल फिघाटर हॉकी स्टिकस\nताज्याकारगिल फिघाटर हॉकी स्टिकस\nकारगिल फिघाटर टायगर हिल्स हॉकी स्टिक 37 इंच मुलतीकोलोर\n- उडेल फॉर Senior\nकारगिल फिघाटर गोली 5660 गोलकीपर स्टिक 37 इंच मुलतीकोलोर\n- उडेल फॉर Senior\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संप���्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/prajaktachya-payghadya/", "date_download": "2019-03-25T08:49:51Z", "digest": "sha1:7IAHXY5D2RMXJUBRKSCCCJV6QC4MGZVZ", "length": 9356, "nlines": 79, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nप्राजक्ताच्या पायघड्या हळू हातांनी पसरा\nजाई जुईच्या कळ्यांची वर अब्दागीर धरा\nअमृताचे सरोवर, कुबेराचे गं भांडार\nतुझ्या रूपे आला घरी इवलासा विश्वंभर.\nपाखरांची किलबिल वाजे सनई देवाची\nसोनकळी उमलली झोप झाली राघवाची.\nअंगणीच्या सोनचाफ्या करू नको उगा तोरा\nपहा माझ्या सोनुल्याचा रंग कसा गोरा गोरा.\nतीट काजळ करिते करू नको दांडगाई\nलक्ष नक्षत्रांची दृष्टी बाळा तुझ्यावर जाई.\nसदा उघडे नागडे निळे आभाळ सुंदर\nतसा खेळतो गोविंद वस्त्र नको अंगावर.\nरानीच्या रे गार वाऱ्या नको आणूस झुळुका\nकरू देई रे अंगाई माझ्या शिणल्या बालका.\nमाझ्या की गं ओसरीला आले आकाश पाहुणे\nम्हणे पाहू दे गं डोळा तुझे नक्षत्र देखणे\nवद्य पक्षीचा चंद्रमा माझ्या की गं दारी उभा\nपहा मागतो उसनी सोनुल्याची मुखप्रभा.\nसदाशिव जे रावकवी यांच्या 'चित्रसहकार' या निर्मिती संस्थेसाठी य.गो.जोशी यांच्या कथेवरील या चित्राने पंचवीस चित्रपटगृहात प्रत्येकी पंचवीस आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्याच बरोबर संपूर्ण चित्र फक्त पस्तीस दिवसात मुहूर्तापासून सेन्सॉरपर्यंत पूर्ण करण्याचाही विक्रम आठवले यांनी केला. चित्रीकरणाचे अभ्यासपूर्ण संयोजन आणि तंत्रावरील प्रभुत्व या आठवले यांच्या गुणांमुळेच ते शक्य झाले.\nमातृसुखाला पारखा झालेला दीर आणि पुत्रखापासून वंचित राहिलेली वहिनी यांच्या निर्मळ प्रेमाची अत्यंत जिव्हाळ्याने चित्रित केलेली कौटुंबिक कलाकृती. या चित्रपटाने सुलोचना या अभिनेत्रीला ग्रामीण चित्रपटातून घरात, माजघरात, अगदी स्वयंपाकघरात आणले. सोज्वळता म्हणजे सुलोचना या समीकरणाची सुरवात या चित्राने झाली. दिग्दर्शन आणि गीतलेखन याखेर���ज आठवल्यांनी या चित्रात एक सुलोचना यांच्या पतीची भूमिकाही केली होती. हे चित्र एका वेगळ्या अर्थानेही कौटुंबिक होते – यात आठवले यांचे संपूर्ण कुटुंब पडद्यावर दिसले होते. मुलगा सुदर्शन छोट्या भावाचा शाळेतील मित्र झाला होता. सुमतीबाई, मुली आणि एक मेव्हणी यांनी हळदीकुंकवाच्या प्रसंगात भाग घेतला होता. दादा म्हणजे आठवले आणि वहिनी म्हणजे सुलोचना यांच्या पडद्यावरील लग्नप्रसंगी सुमतीबाई नवऱ्याच्या लग्नाला नवऱ्यामुलीच्या मागे करवली म्हणून हजर राहिल्या आहेत.\nदो नयनांचे हितगुज झाले\nदेवा तुझी आठवण होते\nरडू नको रे चिमण्या बाळा\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/radhika-chatur/", "date_download": "2019-03-25T08:11:41Z", "digest": "sha1:ZYBYXWOAO3SGVFW6W55GIKVIOCL2VM4C", "length": 7628, "nlines": 66, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\n'तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा.'\nचल, प्रीतिपंख पसरू, गगनी स्वैर फिरू\nगिरिशिखर सागरांना लंघुनि मेघांना. नवलाख दिव्य रमणी, मंगलमय गाणी\nमधि कांत शांत हसरा, करिती फेर पुरा.\nही तेजाची गंगा, चल चल श्रीरंगा घालु इथे पिंगा\nकरू प्रेम अमर अपुले\nतुझी माझी प्रीत जुळे, कान्हा\nहिंदु मुसलमान ऐक्य या संवेदनशील विषयावरील 'शेजारी' या चित्रपटाच्या प्रत्येक गीतासाठी व्ही शांताराम यांनी अतिशय परिणामकारक प्रसंगांची निवड केली होती. \"शब्दात जेवढे लालित्य, चित्रमयता आणि वैविध्य आणता येईल तेवढे आणा\" अशी सूचना त्यांनी आठवल्यांना केली होती. मास्टर कृष्णराव यांच्याकडून आगळ्या वेगळ्या चाली काढून घेतल्या होत्या आणि बहारदार पार्श्वसंगीताची योजना केली होती. नायक नायिकांचे प्रेमप्रसंग खुलवणारी 'हासत वसंत ये वनी', राधिका चतुर बोले', अशी गोड प्रेमगीते आठवल्यांनी लिहिली. त्यात 'अलबेला; यासारखे अनवट शब्द वापरून ती खुलवली. 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' हे मशालींचे नृत्यगीत तर अजरामर आहे. आजही, सत्तर वर्षांनंतर ते अनेक कार्यक्रमात सादर होते आणि नव्या गाण्यांहून जास्त गाजते. धरण फुटून प्रलय होतो. गाव वाहून जाते असे दृश्य खरे वाटावे म्हणून ही शांताराम यांनी खास प्रल्हाददत्त नावाचा स्पेशल इफेक्ट्सचा तज्ञ आणला होता. त्या प्रसंगानंतरचे 'सारे प्रवासी घडीचे' हे समूहगीत त्यातल्या अर्थपूर्ण शब्दांनी चित्रपटाचा शेवट वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nहासत वसंत ये वनी अलबेला\nराधिका चतुर बोले, तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा\nजिवाचं मैतर तुम्ही माज्या\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले य��ंचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T07:23:33Z", "digest": "sha1:4Y3TQO4OFAIFVYFLRMTBG25A4VRGYKPR", "length": 12902, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कथाबोध : गुरुदक्षिणा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडॉ. न. म. जोशी\nसम्राट अकबराच्या दरबारी नवरत्ने होती. बिरबलासारखा चतुर प्रधान आणि तानसेनासारखा गायक हे त्या नवरत्नांपैकी होते. अकबर बादशहा गुणवतांचे कौतुक करणारा रत्नपारखी होता. तानसेनाचे गुरू होते स्वामी हरिदास ते तपस्वी गायक होते. तानसेनाने आपली संगीतविद्या त्यांच्याकडून प्राप्त केली होती. तानसेन अकबराच्या दरबारी होता. त्याला त्यासाठी दरबारी इनाम मिळत असे. स्वामी हरिदास मात्र स्वतःच्या पर्णकुटीतच रहात होते. त्यांचीही संगीतसाधना अविरत सुरू होती.\nएकदा अकबराच्या मनात आलं की तानसेन आणि त्याचे गुरू स्वामी हरिदास या दोघांचंही गायन दरबारात ठेवावं. पण स्वामी हरिदास दरबारात येऊन गायले नसते. म्हणून त्यांच्या कुटीच्या पलीकडेच शामियाना उभारून त्यात तानसेन गायला. त्या दिवशी तानसेन खूप समरसून गायले. गुरूंकडून घेतलेलं सारं कौशल्य त्यांनी पणाला लावलं होतं. अकबर खूष\nआता यानंतर स्वामी हरिदास आपल्या पर्णकुटीतूनच गाणार होते. गाणं सुरू झालं. सम्राट अकबर, दरबारी लोक, रसिक मंडळी, स्वतः तानसेन स्वामी हरिदासांचं गायन ऐकत होते. लोक तल्लीन झाले होते.\nत्यादिवशी स्वामी हरिदास उत्कृष्ट गायलेच. पण तानसेनही आपल्या गुरुइतकेच छान गायले. गुरू आणि शिष्य दोघांच्याही स्वरसौरभानं सारं वातावरण सुगंधित झालं होतं. दरबार संपला. आता दोघांचाही सत्कार होणार होता. सम्राट अकबर यांनी तानसेन यांना पुढं बोलावलं. महावस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला आणि सुवर्णमोहरांनी भरलेलं एक तबक तानसेन यांना दिलं. आता स्वामी हरिदास यांचा सत्कार. सम्राट अकबरानं स्वामींचा महावस्त्र देऊन सत्कार केला आणि त्यांना सुवर्णमोहोरांनी भरलेली दोन तबकं भेट दिली. तानसेनाच्या मनात प्रश्न आला. आपणही आपल्या गुरूइतकंच छान गायलो. पण त्यांना दोन तबकं… आणि मला एकच तबक\nबिरबलानं तानसेनाच्या मनातील खळबळ ओळखली. विरबल म्हणाला,\n तुम्ही द��घंही छान गायलात. त्याबद्दल प्रत्येकी एक तबक पण तुझ्या गुरूंनी तुझ्यासारखा उत्तम शिष्य निर्माण केला त्याबद्दल त्यांना दुसरे तबक पण तुझ्या गुरूंनी तुझ्यासारखा उत्तम शिष्य निर्माण केला त्याबद्दल त्यांना दुसरे तबक तुम्ही शिष्य कुठे निर्माण केलात तुम्ही शिष्य कुठे निर्माण केलात’ या उत्तरानं तानसेन काय समजायचं ते समजले.\nगुरुने केवळ स्वतः ज्ञानी होऊन चालत नाही. त्यांनी शिष्यपरंपरा निर्माण करावी. ज्ञान परंपरा मोठी करणं हेच गुरूचे महान कार्य होय.\nतुकारामबीज: संत तुकारामांचे संतमहात्म्य\nलक्षवेधी: गोव्यातील स्थैर्य स्थायी की आभासी\nबंडोबांचे झेंडे सर्वच पक्षात (अग्रलेख)\nजीवनगाणे : मी… तू… आपण…\nसंडे स्पेशल : रायडिंग टू द टॉप ऑफ द वर्ल्ड (भाग-1)\nविज्ञानविश्व : पोर्ट्रेट एडमंड डी बेलामीचं…\nप्रेरणा : अंध युवकाची प्रशासनसेवा\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमतदार य��दीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato10.html", "date_download": "2019-03-25T07:50:38Z", "digest": "sha1:MRZE7TDNPCT3KBIVEHVUX2IWBEFSDVT3", "length": 4619, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - टोमॅटोस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उत्पादन खर्च कमी पण फायदा मात्र अधिक", "raw_content": "\nटोमॅटोस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उत्पादन खर्च कमी पण फायदा मात्र अधिक\nश्री. दयाराम तुळशिराम पवार (पाटील), मु.पो. भडाणे, ता. बागलाण, जि. नाशिक\nआम्ही टोमॅटो १० गुंठे शिवाजी या जातीची लागवड केली होती. सुरुवातीस जर्मिनेटर ३० मिली अर्धा लि. कोमट पाणी याप्रमाणे बिजप्रक्रिया केली. त्यामुळे बियांची उगवण फारच उत्तम झाली. रोपांवर असताना जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी ३० मिली १५ लि. पाणी या प्रमाणात दोन वेळेस फवारणी केली. रोपे जोमदार वाढली.\nपानांना काळोखी मिळून रोपे सरळ वाढली. रोपे लावताना जर्मिनेटर २५० मिली + १० लि. पाण्यात रोपे बुडवून लावली. त्यामुळे मर झाली नाही किंवा गळ पडली नाही. लागवडीनंतर दहा दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर व प्रोटेक्टंट प्रत्येकी ५० मिली + १५ लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. टोमॅटोची वाढ चांगली झाली. १५ दिवसांनी दुसरी फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर यांची प्रत्येकी ६० मिली १५ लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. फुलकळी मोठ्या प्रमाणात वाढली. फुलगळ झाली नाही. फुटवा चांगला झाला. व्हायरस, घुबड्या, करपा रोगांचा अजिबात त्रास नाही. तिसरी व चौथी फवारणी ५०० मिली पंचामृत १०० लि. पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने केली. फले भरपूर लागून टोमॅटोच्या फळांच्या संख्येत वाढ मोठ्या प्रमाणात झाली. या औषधासोबत किटकनाशकाचा वापर फारच कमी प्रमाणात केला. अळीचा प्रादुर्भाव कमी होता. पानावरील नागअळी इतरांच्या प्लॉटपेक्षा नगण्यच होती. बदला (२ नंबरचा) माल कमी निघाला. फवारण्या शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करीत असत. टोमॅटोस शाईनिंग अतिशय चांगली असल्याने इतरांपेक्षा कॅरेटमागे १० ते १५ रु. फरक पडून बाजार जास्त मिळत होते. उत्पादनखर्च कमी होऊन टोमॅटो मध्ये पैसे चांगले झाले. एकंदरीत ५० हजार रुपये झाले. हा अनुभव अतिशय चांगला वाटला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/social-media-madhay-pradesh-marathi-news-farmer-strike-51785", "date_download": "2019-03-25T08:49:23Z", "digest": "sha1:L6GRPB6YXGGEHMYTLG7DLQFFXWUAJWMR", "length": 14852, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "social media madhay pradesh marathi news farmer strike मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे सोशल मीडियावर उठले रान | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे सोशल मीडियावर उठले रान\nरविवार, 11 जून 2017\nमध्य प्रदेशातील मंदसौर येथील शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती तरुणांकडून सोशल मीडियावर दिली जात आहे.\nमंदसौर - मध्य प्रदेशातील मंदसौर येथील शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती तरुणांकडून सोशल मीडियावर दिली जात आहे. एकूणच मध्य प्रदेशामध्ये नेतृत्वविना सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने सोशल मीडियावर रान उठविले आहे.\nमध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाला नेतृत्व मिळाले नसले, तरी आंदोलनाचा मात्र राज्यभर विस्तार झाला. विशेषत: मंदसौर आणि त्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. या भागामध्ये प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. यामागे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाचे उठविलेले रान होय. सोशल मीडियाद्वारे शेतकरी आंदोलनाचे व्हिडिओ, मेसेजेस आदींच्या माध्यमातून आंदोलनाचे लोण वाढविण्यात येत आहे. मंदसौर येथील आंदोलनामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक आंदोलक 16 ते 30 वयोगटातील असून, या तरुणांमुळेच शेतकरी आंदोलन अधिक व्यापक झाले आहे. तरुण आंदोलकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाचे स्वरूप व भूमिका लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. यामुळे राज्यभरातून या आंदोलनाला बुद्धिजिवींचा पाठिंबा मिळाला. याचसोबत सर्वसामान्यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन तरुणांचे मनोधैर्य वाढविले. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सऍप आदी माध्यमातून वेगवेगळ्या ट्रेंड्सद्वारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.\nसोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून प्रशासनाला मात्र धडकी भरली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन आणखी चिघळू नये, याकरिता मंदसौर व लगतच्या जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.\nशे���करी आंदोलनाच्या इतिहासात पहिल्यांदा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची भूमिका यशस्वी झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळाला.\n- केदार सिरोही, नेते, आम किसान युनियन\nLoksabha 2019 : भाजपची लोकसभेची सातवी यादी जाहीर\nनवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच...\nदोन टोकं आणि भारत (संदीप वासलेकर)\nजगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत...\nLoksabha 2019 : सुषमा स्वराज यांच्या उमेदवारीचे काय होणार\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेकांना संधी...\n12 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन शिरच्छेद; भाऊ, काकाला अटक\nसागर (मध्य प्रदेश) : एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणार असल्याचे...\nLoksabha 2019 : रावेरची जागा आणि यशही कॉंग्रेसलाच मिळेल : ऍड. संदीप पाटील\nजळगाव : लोकसभेचा रावेर मतदारसंघ मिळण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. आमचे वरिष्ठ नेतेही त्यासाठी चर्चा करीत आहेत. तो आम्हाला मिळेलच, याची शंभर टक्के...\nLoksabha 2019 : माकपतर्फे दिंडोरीतून जीवा पांडू गावित\nनवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी घोषित केली. राज्यातून दिंडोरी मतदारसंघातून जीवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/justice-caste-and-religion-constitution-47471", "date_download": "2019-03-25T08:45:37Z", "digest": "sha1:NCG7IYV46PHKYW54MIEJYAQ4RSP4KQRC", "length": 19309, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Justice of the caste and religion by Constitution 'संविधानाद्वारे सर्व जाती-धर्मांना न्याय' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\n'संविधानाद्वारे सर्व जाती-धर्मांना न्याय'\nबुधवार, 24 मे 2017\nजायकवाडी - ‘‘ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी लढा दिला. संविधान लिहिताना त्यांनी सर्व जाती-धर्मांना न्याय देण्याचा दृष्टिकोन ठेवला,’’ असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.\nपैठण औद्योगिक वसाहत परिसरातील मुधलवाडी गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, लोकार्पण मंगळवारी (ता.२३) दुपारी श्री. आठवले यांच्या हस्ते झाले.\nजायकवाडी - ‘‘ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी लढा दिला. संविधान लिहिताना त्यांनी सर्व जाती-धर्मांना न्याय देण्याचा दृष्टिकोन ठेवला,’’ असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.\nपैठण औद्योगिक वसाहत परिसरातील मुधलवाडी गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, लोकार्पण मंगळवारी (ता.२३) दुपारी श्री. आठवले यांच्या हस्ते झाले.\nयावेळी पैठणचे आमदार संदीपान भुमरे, मुर्डेश्वर संस्थानचे महंत बालयोगी काशिगिरी महाराज, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, बाजार समितीचे संचालक कारभारी लोहकरे, सरपंच भाऊ लबडे, सरपंच साईनाथ सोलाट, जिल्हा परिषद सदस्य अक्षय जायभाय, दादा बारे, माजी सरपंच संतोष मगरे, ब्रह्मानंद चव्हाण, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, एस.डी.मगरे, अरविंद अवसरमल, दौलत खरात, बळिराम औटे, सुंदरराव निसर्गंध, तहसीलदार एम. डी. मेंडके, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.\nश्री. आठवले म्हणाले, ‘‘ केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. त्यांना कर्जमाफी देण्याला आमच्या रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. जर शेतकरी जगला तरच महाराष्ट्र व देश जगेल. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित पन्नास टक्क्यांच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. आगामी दोन वर्षांत सामाजिक न्याय विभागाची रखडलेली कामे पूर्ण केली जातील.’’\nआमदार भुमरे म्हणाले, ‘‘मुधलवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. डॉ.आंबेडकरांनी घालून दिलेला सामाजिक आदर्श तरुण पिढीसाठी स्फूर्तीदायक राहील. पैठण औद्योगिक वसाहतीमधील मोडकळीस आलेल्या औद्योगिक वसाहतीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून सहकार्य करावे. औद्योगिकीकरण झपाट्याने वाढण्याच्या दृष्टीने मदत करावी. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी याचा उपयोग होईल.’’ अण्णासाहेब लबडे, बाबूराव कदम यांची भाषणे झाली.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच भाऊ लबडे, सोमनाथ जाधव, दिलीप गोटे, प्रकाश लबडे, भरत मुकुटमल, काकासाहेब बर्वे, अनिल जाधव, माजी सरपंच शिवाजी जाधव, उपसरपंच सुरेश शिंदे, दादा मुळे, अनिल रोडे, गणेश बोंबले, ग्रामसेवक अशोक आहेर, अनिल आढाव, अशोक जाधव, दीपक गव्हाणे, प्रमोद सातपुते, राहुल धायजे, विजय सुते, जीवन गोटे , प्रा.कल्याण खरात, संकेत सूर्यनारायण, उत्तम मिसाळ, अशोक मिसाळ, बंडू आगळे, सतीश साळवे, नितीन चाबुकस्वार, शिवाजी आगळे, जयेश गोटे आदींसह ग्रामस्थांनी मदत केली. भाऊ लबडे यांनी आभार मानले.\nदिलीप गोटे, निसर्गंध यांचा सत्कार\nमुधलवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गोटे यांच्यासह ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून, लोकवर्गणीतून डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी झाली. त्यानंतर पुतळ्याचे अनावरण, लोकार्पण अद्याप प्रलंबित होते. परंतु आमदार भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे ठरले. त्या अनुषंगाने श्री. आठवले या कार्यक्रमास उपस्थित राहिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सुंदरराव निसर्गंध यांचाही सत्कार झाला.\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्���ा पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nLoksabha 2019 : पक्षातील मंडळींचे \"षड्यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील\nपारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या...\nतुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले\nकोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का\nLoksabha 2019 : कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात माघार - आठवले\nमुंबई - केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट...\nLoksabha 2019 : काटा मारण्यासोबत जाणाऱ्यांचा काटा काढू\nकोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/about", "date_download": "2019-03-25T08:49:20Z", "digest": "sha1:A6CIRW4AKEWVERJQAXRPYIRNJISAFZVA", "length": 15657, "nlines": 168, "source_domain": "gangadharmute.com", "title": " संक्षिप्त परिचय | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / संक्षिप्त परिचय\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 26/11/2013 - 22:51 ह्यावेळी प्रकाशित केले.\nनाव : गंगाधर महादेवराव मुटे\nजन्म : २७ फ़ेब्रुवारी १९६२\nशिक्षण : बी. एससी (गणित)\nव्यवसाय : मुक्त पत्रकार, शेती, शेतीविषयक संशोधन, बिजोत्पादन आणि विपणन,\nकापसाच्या अनेक संकरित वाणांची निर्मिती\n: प्रकाशित साहित्य :\n१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०\n२) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) जुलै २०१२\n३) “नागपुरी तडका” E-book (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१३\n४) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) नोव्हेंबर २०१३\n५) “नागपुरी तडका” (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१६\n६) महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, पुण्यनगरी, तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, देशोन्नती व अन्य विविध वृत्तपत्रातून\nसातत्याने लेखन. विविध नामांकित दिवाळी अंकातून अनेक कविता व लेख प्रकाश���त.\nऔरंगाबाद येथून प्रकाशित होणार्या शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या पाक्षिक “शेतकरी संघटक” मध्ये २०१४ पर्यंत “वाङ्मयशेती” हे सदर लेखन.\n१) स्टार माझा/ए.बी.पी माझा या लोकप्रिय\nमराठी TV वृत्तवाहिनीतर्फ़े आयोजित “ब्लॉग माझा” या जागतिक पातळीवरील स्पर्धेत २०१० आणि २०१२ मध्ये gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला सलग दोनदा पुरस्कार\n२) मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मी मराठी डॉट\nनेट संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजालीय स्पर्धेत “वांगे अमर रहे” या ललितलेखाला पारितोषिक\n३) मी मराठी डॉट नेट, व्दारा आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील कविता स्पर्धा - २०११ या स्पर्धेत “कुठेलुप्त झाले फ़ुले भिम बापू” या कवितेस प्रथम पुरस्कार\n४) २०१३ मध्ये दर्यापूर येथे भरलेल्या ५२\nव्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल\n“अंकूर वैभव” पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव.\n५) ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाला अंकूर वाङ्मय पुरस्कार\n- सन २०१३ चा अ.भा. अंकूर साहित्य संघाचा स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार.\nचळवळीमध्ये ३५ वर्षे सर्वंकष व बहुआयामी योगदान देऊन शेतकर्यांच्या प्रश्नांच्या\nसोडवणुकीसाठी अविरत प्रयत्न करून शेतीक्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ठाणे\nयेथील दै. जनादेशच्यावतिने `जनादेश गौरव-२०१६’ पुरस्कार\n१) १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग.\n२) १० जुलै २०१४ पासून स्वतंत्र भारत\nपक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर कार्यरत\n३) जुलै २०१० पासून शेतकरी संघटनेचे वर्धा\nजिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत\n४) नोव्हेंबर २०१४ पासून अ.भा.शेतकरी मराठी\nसाहित्य चळवळीच्या संस्थापक अध्यक्षपदी कार्यरत.\n५) २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च रोजी वर्धा\nयेथे आयोजित पहिल्या व २०,२१ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे आयोजित\nदुसर्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार.\n६) ABP माझाच्या अनेक\nकवीसंमेलन आणि गझल मुशायर्यात काव्यवाचन.\n१) १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त\nअधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या “पुन्हा एकदा उत्तम शेती”\nस्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग.\n२) वर्धा येथे आयोजित पहिल्या अ.भा.शेतकरी\nसाहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित \"सारस्वताचा एल्गार\" स्मरणिकेचे\n३) नागपूर येथे आयोजित दुसर��या\nअ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित \"शेतकर्यांचा\nस्वातंत्र्यसूर्य\" युगात्मा शरद जोशी गौरवविशेषांकाचे आणि \"कणसातली\nमाणसं\" या प्रातिनिधीक शेतकरी काव्यसंग्रहाचे संपादन.\n४) त्रैमसिक ’अंगारमळा’चे संस्थापक संपादक.\nनिर्मिती आणि त्यावर सातत्यपूर्ण लेखन.\nसंपर्क पत्ता : मु. पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि.\nभ्रमणध्वनी : 8788735875, ९७३०७८६००४\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2017-Halad.html", "date_download": "2019-03-25T08:01:27Z", "digest": "sha1:TPET36JLOT5F5PH7ND2YXR3WUDFEQ35H", "length": 5656, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची पुस्तके अत्यंत उपयोगी, ३५ गुंठे हळद डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टवटवीत", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची पुस्तके अत्यंत उपयोगी, ३५ गुंठे हळद डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टवटवीत\nश्री. आदिनाथ बाबूराव शेवाळे, मु.पो. टाळगाव (शेवाळवाडी), ता. कराड, जि. सातारा. मो. ९९२२९६८७२१\nनोव्हेंबर २०१६ ला कऱ्हाड येथे भरलेल्या कृषी पदर्शनात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो ) प्रा. लि. यांच्या स्टॉलवर 'कृषी विज्ञान' मासिकाचा वार्षिक वर्गणीदार झाल्यानंतर आपली शेती विषयक विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यात आली. त्यावेळी प्रदर्शनातून घेतलेला हळद विशेषांक वाचल्यानंतर पहिल्यांदाच हळद लागवडीचा प्रयोग केला.\n७ जून २०१७ ला हळदीची लागण केली. लागण ३५ गुंठे आहे. लागणीवेळी १०० लिटर पाण्यात १ लिटर जर्मिनेटर + २०० ग्रॅम बाविस्टीन व २५० मिली क्लोरोपायरिफॉस (२०%) यामध्ये हळदीचे बेणे ५ - १० मिनिटे बुडवून लागण केली. त्यामुळे १५ व्या दिवसापासूनच उत्तम उगवण झाल्याचे दिसू लागले. लागणीनंतर १५ दिवसांनी १ लिटर जर्मिनेटर + ५०० मिली हार्मोनी व १९:१९:१९ ह्या विद्राव्य खताची २०० लिटर पाण्यातून आळवणी केली. परत १५ दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा १ लिटर जर्मिनेटर व १२:६१:०० या वि���्राव्य खताची आळवणी केली. याचबरोबर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यांचे जर्मिनेटर सह थ्राईवर + क्रॉपशाईनर + प्रोटेक्टंट + प्रिझम + हार्मोनी + राईपनर + स्प्लेंडर या सप्तामृताची आतापर्यंत एक फवारणी घेतली आहे. तर आज रोजी हा प्लॉट पाहत राहण्याजोगा आहे. एकूण पाहता ३५ गुंठ्यातून ओल्या हळदीचे १२० क्विंटल व वाळवून तयार २५ - ३० क्विंटल उतपन्न अपेक्षीत आहे.\nभाव नसल्याने आल्याच्या जुन्या प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची आळवणी फायदेशीर\nतसेच माझा आले खोडवा १२ महिने वयाचा प्लॉट असून त्यास कंदकुज लागत असताना मी जर्मिनेटर व हार्मोनीचे आळवणी केले व दुसऱ्यांदा ००:५२:३४ व हार्मोनी यांची आळवणी केली. तर कंदकुज आटोक्यात आली. गड्डे सड थांबून प्लॉट परत हिरवा झाला आहे. सध्या भाव कमी आहे तेव्हा बाजार भावासाठी त्याची सप्टेंबरमध्ये काढणी करणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे हा प्लॉट आहे तसा टिकून आहे व लागणीपेक्षा सरस दिसत आहे.\nवरील हळद व आलेसाठी कऱ्हाड व पाटण तालुक्यासाठी असलेले डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कंपनीचे प्रतिनिधी श्री. समीर पाटील मो. ९५५२५४१८०५ यांचे मार्गदर्शन घेत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato20.html", "date_download": "2019-03-25T08:28:49Z", "digest": "sha1:3ZIPC5FKBCG7LCQDH24TCND6F4KBAEO6", "length": 3391, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - १० गुंठे टोमॅटोपासून ५० हजार", "raw_content": "\n१० गुंठे टोमॅटोपासून ५० हजार\nश्री. भास्कर तुकाराम आवटे, मु.पो. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे. फोन (०२१३३) २८५३१३\nमी गेले ४ वर्षापासून (२००२) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत असून यावर्षी मी टोमॅटो अभिनव जातीची रोपे तयार केली. नंतर ३ एप्रिलला जर्मिनेटर ४० मिली + प्रोटेक्टंट पी २० ग्रॅम + १० लि. पाणी बादलीमध्ये घेऊन त्यामध्ये रोपे बुडवून लागण केली, त्यामुळे रोपांची मर झाली नाही व वाढ जोमाने झाली. नंतर ८ दिवसांनी १० लि. पाण्यामध्ये ३० मिली जर्मिनेटर घेऊन द्रावण थोडे - थोडे रोपांच्या मुळाशी सोडले. त्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३० मिली प्रति पंपाला घेऊन २० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. त्यामुळे झाडांची वाढ जोमाने चालू झाली. फुट वाढली, रोग किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. नंतर फुलकळी लागल्यावर गळ झाली नाही. मालाची ��ुगवण चांगली झाली. पहिला तोडा ३ जूनला झाला. ३५५ रु. कॅरेटला भाव मिळाला. एकूण २१० कॅरेट माल निघाला. अजून ५ - ६ तोडे होतील. हा प्लॉट श्री मंगेश दगडू आवटे यांनी अर्धोलिने केला आहे. या टोमॅटोचे आतापर्यंत ४१,००० रु. झाले आहेत, खर्च ६५०० रु. आला. झाडावर अजून मागे माल शिल्लक आहे. त्याचे ५ ते ७ हजार रु. होतील, हे उत्पन्न फक्त १० गुंठ्यामध्ये मिळाले, ते केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळेच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/updated-cooling-cap-invented-in-america-for-cancer-patient/", "date_download": "2019-03-25T08:15:14Z", "digest": "sha1:P2GHWE4Q4EY6MFN3GOEB6RWWOID4NKYK", "length": 5584, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कूलिंग कॅप- गळणारे केस रोखता येणार,कॅन्सरग्रस्तांना दिलासा", "raw_content": "\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nराज्यसभेचे आश्वासन, आठवलेंची दक्षिण मध्य मुंबईतून माघार\nमी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाचं नाही : सपना चौधरी\nकूलिंग कॅप- गळणारे केस रोखता येणार,कॅन्सरग्रस्तांना दिलासा\nकॅन्सरच्या उपचारांमध्ये प्रामुख्यानं केमोथेरपी आणि रेडिएशनचा पर्याय डॉक्टर अवलंबतात. हे उपचार प्रभावी असले तरीही त्यामुळे शरिरातील उष्णतेचं प्रमाण वाढतं. परिणामी त्यामुळे डोक्यावरील केसांचं गळण्याचं प्रमाण वाढतं. बहुतांश रुग्णांचे डोक्यावरचे सर्व केस या उपचारांमुळे निघून जातात.\nपण आता कॅन्सरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील संशोधकांनी एका संशोधनाअंती स्कॅल्प कूलिंग कॅपची निर्मिती केली आहे. या कॅपमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना केमोथेरपी आणि रेडिएशनमुळे जाणाऱ्या केसांचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी होणार आहे.\nकॅन्सरग्रस्तांसाठी सुरु असणाऱ्या दोन संशोधनांचा फेब्रुवारी 14 मध्येच जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला हे तंत्रज्ञान अमेरिकेत संशोधीत झालं असलं तरीही भारतात ते लवकरच उपलब्ध होणार आहे.\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचार��पूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\n‘झिरो पेन्डसी’च्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी घेण्यात आली कार्यशाळा\nपिंपरी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/disadvantages-of-doing-office-work-continuously-for-7-8-hrs/", "date_download": "2019-03-25T07:42:07Z", "digest": "sha1:RGTXZDB4FCDNLPRC6D72EF6ORMDXISUQ", "length": 16389, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ऑफिसमध्ये ७-८ तास बसून काम करणाऱ्या प्रत्येकाने 'हे' नक्की वाचलंच पाहिजे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nऑफिसमध्ये ७-८ तास बसून काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘हे’ नक्की वाचलंच पाहिजे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआरामदायी काम करायला कोणाला नाही आवडणार.\nअगदी मस्तपैकी बसून, ए.सी.ची हवा खात, चहा-कॉफीचा झुरका घेत, बाहेरचा गोंगाट विसरायला लावणाऱ्या वातावरणात काम करायला मिळावे, किंबहुना तशी कंपनी मिळावी ही आजकाल प्रत्येक नोकरी शोधणाऱ्याच्या मनातील स्तुत्य इच्छा असते.\nकुठे त्या फिल्डवरच्या कामात उन्हा-तान्हात फिरा, त्यापेक्षा हे बरंय, बसल्या जागी, जास्त काही हालचाल न करता आपल्यासमोर असणाऱ्या कॉम्प्यूटरवर फक्त ठाकठाक करायची.\nमंडळी तुमच्यापैकी देखील बरेच जण मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर कामाला असतील, जेथे सकाळी गेलं की थेट संध्याकाळी काम संपल्यावर बाहेर पडायचं. फेरफटका मारायचा म्हटला तर ऑफिसातल्या ऑफिसात किंवा जास्तीत जास्त ऑफिस बाहेरील प्रीमायसेसमध्ये\nतुमच्या दृष्टीने देखील असं काम मिळालं म्हणून तुम्ही देवाचे आभार मानत असाल. पण मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे की कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते.\nएखादी गोष्ट जेवढी उपयुक्त तेवढाच त्या गोष्टीचा अतिरेकही वाईट. असाच वाईट अतिरेक होतो बसून काम करण्याचा.\nचला जाणून घेऊया काय होतं एकाच जागी खूप वेळ बसून काम केल्याने\nखूप वेळ एकाच ठिकाणी बसणे आणि शारीरिक हलचाली न करणे यामुळे शरीराच्या आतील कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार उदभवण्याची दाट शक्यता असते.\nजर, तुम्ही चार तासाहून अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहत असाल तर ह्रदयरोग होण्याची १२५ टक्के खात्री आहे. आठवड्यातून ५५ तासांपेक्षा अधिक बैठे काम ��रत असाल तर, धोका दुप्पट वाढू शकतो. त्यामुळे कामातून थोड्या-थोड्या वेळानंतर ब्रेक घेतलाच पाहिजे.\nएकाच ठिकाणी बसून राहिल्याने डोक्याच्या हिप्पोकॅम्पस् या भागावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या भागाला मानवी शरिरातील मेमरी संबोधले जाते.\nशरीराची हालचाल न झाल्यामुळे हिप्पोकॅम्पस आकुंचन पावते आणि त्याचा आकार कमी होतो. यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होते.\nतासनतास बसून राहिल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे पायांच्या खालच्या भागात सुज येण्याची समस्या उदभवते. हा त्रास होणारी व्यक्ती रात्री झोपल्यानंतर सुज मानेपर्यंत पोहचते.\nयामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते. जे लोक वेळ वाचवण्यासाठी डेस्कवरच लंच करतात, त्यांचे शरीर कॅलरी बर्न करू शकत नाही. त्यामुळे शरीरात फॅट सेल्सचे प्रमाण दुपटीने वाढते.\nबसताना किंवा झोपताना फॅट सेल्सवर वजन पडले तर ट्रायग्लेसराइडचे प्रमाण वाढते. अशा व्यक्तिंना ह्रदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता निर्माण होते.\nदिवसभर बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे पल्मोनरी इंबोलिज्म अर्थात फुफ्फूसामध्ये ब्लड क्लॉटिंग होण्याची शक्यता असते. बैठ्या कामामुळे ब्लड सर्क्यूलेशनची गती मंदावते यामुळेही असे होण्याची शक्यता असते.\nजेवणानंतर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे जेवण झाल्याबरोबर खुर्चीत बसल्याने कॅलरी वाढतात. याचा परिणाम असा होतो की, व्यक्तीमध्ये लठ्ठपणा वाढतो. यामुळे टाईप २ डायबिटीजचीही शक्यता वाढते.\nआता बरेच जण म्हणतील आम्हीही ७-८ तास बसून काम करतो, पण आम्हाला नाही अजून त्रास झाला कसला\nतर मंडळी हा त्रास काही लगेच सुरु होत नाही, काही वर्षांनी तुम्हाला वर सांगितलेले बदल नक्की जाणवायला लागतील.\nम्हणूनच या अपायांपासून बचाव व्हावा म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे की, जेवणानंतर लगेचच खुर्चीत बसू नये. थोडा वेळ चालले पाहिजे. प्रत्येक अर्ध्या तासानंतर जागेवरून उठले पाहिजे.\nकुठे जाणे-चालणे शक्य नसेल तर चार-पाच मिनीट किमान उभे राहिले पाहिजे.\nजर, तुम्ही अधिकारी पदावर काम करत असाल तरीही काही कामे ही स्वतः करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होईल आणि तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फे���बुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← साउथ इंडस्ट्रीचा मास, डॉन आणि भाई म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार ‘नागार्जुना’\nयशस्वी होण्यासाठी “फक्त मेहनत” घेऊ नका. त्या सोबत महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा\nवीजबचतीसाठी वरदान ठरलेल्या “एलइडी”च्या घातक परिणामांनी शास्त्रज्ञांनाही चिंतेत टाकलंय.\nतुम्हाला कल्पनाही नसेल : हे १२ घरघुती उपाय ऍसिडिटी पासून कायमची मुक्ती देतात\nकंपनी राहिलेला पगार वेळेत देत नसेल तर कायदेशीर मदत घेता येते का\nजाणून घ्या रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींमागचा माहित नसलेला रंजक इतिहास\nचौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले\n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\nब्राह्मण वर्चस्ववाद विरोधी चळवळीचा आणखी एक बुरूज ढासळला\n….आणि चीनने अख्खं मंदिर उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\nतुम्ही मनापासून प्रेम करता, ती व्यक्ती खरंच त्या लायक आहे\nमनसे सरचिटणीसांचा स्वानुभव : बलात्काराचे “असेही” कोवळे आरोपी\nकधी प्रेडिक्टेबल, तर कधी परिणामकारक : मुक्काबाज चा रसास्वाद\nआभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास\nखास स्त्रियांसाठी, स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र – आवर्जून वापरा, इतरांना वापरण्यास प्रोत्साहित करा\nकाही काळाने या कामांमध्ये माणसांची जागा रोबोट्स घेऊ शकतात मग माणसांनी काय करायचे\nभारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत\n‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण\nसोने आपण खरेदी करतो पण खिशे मात्र विदेश्यांचे भरतात कसे\nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\nएखादं गाणं/चाल आपल्या डोक्यात सतत घोळत राहण्यामागचा मेंदूचा “विचित्र” घोळ\nमतनोंदणी आणि मतमोजणी प्रकिया कशी असते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-July2017-Bhuimoog-Santra.html", "date_download": "2019-03-25T07:52:08Z", "digest": "sha1:FNS53VFP2TMESNM6OGSYDCZW62WN3NBV", "length": 7804, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - उन्हाळी भुईमूग व संत्र्यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी अत्यंत, फायदेशीर उत्पादन व भावही अधिक", "raw_content": "\nउन्हाळी भुईमूग व संत्र्यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी अत्यंत, फायदेशीर उत्पादन व भावही अधिक\nश्री. सुरेशराव उत्तमराव फरकाडे, मु.पो. मांडवा, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती - ४४४६०२. मो. ८४१२०४६४६२\nमाझ्याकडे वडिलोपार्जित १० एकर जमीन आहे. 'कृषी विज्ञान' मासिकामधील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून मी २०१६ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे ठरवले. तेव्हा मी आमच्या भागातील विक्रेते विश्वकर्मा ट्रेडर्स यांची थेट भेट घेतली आणि तेव्हापासून मी सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे घेतली. त्यावेळेस त्यांनी आमच्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधींचा मोबाईल नंबर दिला. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला माझ्या शेतावर भेट देऊन भुईमूग पिकाबद्दल माहिती दिली. मला पेरायचा आधी कल्पतरू खत टाकण्यास सांगितले. मग मी एकरी २ बॅगा कल्पतरू खत टाकले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला जर्मिनेटर + प्रोटेक्टंट- पी ची बीजप्रक्रिया केली. एकरी ४० किलो बियाणे याप्रमाणे ट्रॅक्टरने पेरणी केली. त्याच दिवशी स्प्रिंकलरद्वारे १ शीप (४ तास पाणी) दिले व तेथून १० ते १२ दिवसांनी भुईमूग उगवत असल्याचे दिसू लागले.\nतेथून २२ दिवसांनी १०:२६:२६ एकरी १ बॅग याप्रमाणे खत टाकले. त्यांनतर दुसरा डोस फुलावर असताना कल्पतरू ५० किलो + पोटॅश ५० किलोचा दिला. खत दिल्यावर जर्मिनेटर २५० मिली + प्रिझम २५० मिली + पॉलीफ्युवर + हार्मोनी १०० मिली यांचा १०० लि. पाण्यातून स्प्रे दिला. या स्प्रेमुळे पानातील पिवळेपणाचे प्रमाण कमी झाले व भुईमूग टवटवीत दिसू लागला व तेथून १५ दिवसांनी पुन्हा ०:५२:३४ + रेडोमिल + थ्राईवर याचा स्प्रे घेतला. त्यामुळे फुले जोमाने येऊ लागली.\nत्यावर २ घंटे प्रमाणे स्प्रिंकलरने पाण्याच्या पाळ्या चालू होत्या. पाणी देणे झाल्यावर २० दिवसांनी फाटे सुटण्यास सुरुवात झाल्यावर पाणी देणे बंद केले व त्याला १२ दिवसांनी तळण दिली व त्यानंतर पुन्हा पाणी चालू केले. पाणी देणे झाल्यावर अंडे पकडण्याच्या (आऱ्याल��� लहान शेंगा लागण्याच्या) अवस्थेत १३:०:४५ + राईपनर + थ्राईवर + न्युट्राटोनचा प्रतिनिधींच्या सांगण्याप्रमाणे स्प्रे केला. त्यामुळे शेंगा भरण्यास सुरुवात झाली व मे च्या २१ तारखेला भुईमूग उपटण्यास (काढण्यास) सुरुवात केली. तेथून ८ दिवस आम्हाला भुईमूग उपटण्यास लागले. त्यानंतर शेंगांना दोन दिवसांचे ऊन देऊन मार्केटला न्यायची इच्छा होती, पण भाव अतिशय कमी असल्याने आम्ही माल पोती भरून ठेवला. जवळपास ४ एकरात आम्हाला ३२ क्विंटल भुईमुग (शेंगा) झाला. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पीक पण चांगले आले. त्यामुळे हल्ली २३०० रु. प्रती क्विंटल या भावाने सुद्धा आम्हाला घाटा (तोटा) झाला नाही. बाकीच्या लोकांना या भावात त्यांचा खर्च सुद्धा निघाला नाही. कारण त्यांचे उत्पादन आपल्या तुलनेत फार कमी होते. कोणाला एकरी ४ - ५ क्विंटल तर क्वचित लोकांना ६ क्विंटल उत्पादन मिळाले.\nमाझ्याजवळ २५० संत्रा झाडे आहेत. त्यावर सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे स्प्रे चालू आहेत. मागील वर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फक्त ४ स्प्रेमध्ये संत्रा काढला. फळ पण चांगले होते व जास्त दिवस बगीचा टिकला. भाव पण त्यामुळे चांगला मिळाला. याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आभार मानतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/dabholkar-murder-case/", "date_download": "2019-03-25T08:05:11Z", "digest": "sha1:ZK2HFWSE6REU7KOFKBHLPYQL3UAPU7Z7", "length": 6671, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दाभोलकरांचे मारेकरी ५२ महिन्यानंतरही मोकाट, अंनिसचे 'जवाब दो' आंदोलन", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nदाभोलकरांचे मारेकरी ५२ महिन्यानंतरही मोकाट, अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची शहरातील ओंकारेश्वर पुलाजवळ अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येनंतर ५२ महिने उलटूनही पोलीस, सीबीआय आणि तपास यंत्रणा मारेकऱ्यांना पकडण्यासाठी चाचपडत आहे. मारेकऱ्यांना पकडण्यात यावे, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ओंकारेश्वर पूलाजवळ ‘जवाब दो’ आंदोलन केले.\nदर महिन्याला दाभोलकरांचा खून झालेल्या ठिकाणी ओंकारेश्वर पूलाजवळ अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येते. आजही अनिंसच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही दाभोलकर’ म्हणत शांततामय आंदोलन केले. अंनिसचे कार्यकर्ते म्हणाले, की न्यायालयाने दाभोलकर खून प्रकरणाच्या सीबीआय तपासाबाबत अनेक वेळा ताशेरे ओढूनसुद्धा आरोपींना पकडण्यात आले नाही. सशंयित सारंग आकोलकर, विनय पवार हे अजुनही फरार आहेत.\nखून तपासाला वेगळे वळण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सरकारने १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले. तरीही आरोपी मोकाट असल्याने विचारवंतावर टांगती तलवार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत दाभोलकरांचा विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान दाभोलकर खूनप्रकरणाबाबत नागपूर शहरात अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही आंदोलन केले आहे. या आंदोलनात त्यांनी सरकारची इच्छाशक्ती कमी पडत असल्याचा आरोप केला आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\n`देवा’ चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन; मात्र अत्यल्प ठिकाणी प्राईम टाईम\nकर्जमाफीचा अर्ज न भरताच शेतकरी ‘लाभार्थी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/never-take-someone-for-granted-1580234/", "date_download": "2019-03-25T08:42:02Z", "digest": "sha1:5DOVN72SO6RC4W5Y2MDJUJ3L3MYT4FDH", "length": 23667, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Never Take Someone For Granted | गृहीत धरून जगताना..! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nआपलं आयुष्य, अगदी दैनंदिन जीवनही अनेक गोष्टी गृहीत धरून-गृहीतकांवर चालतं.\nआपलं आयुष्य, अगदी दैनंदिन जीवनही अनेक गोष्टी गृहीत धरून-गृहीतकांवर चालतं. साध्या बोलीभाषेत आपण एखादी गोष्ट गृहीत धरून, मानून पुढचा व्यवहार करतो, तेच हे गृहीतक अशी गृहीतकं आपल्याला आयुष्यात मदत करतात, पण वेळी नुकसानही घडवून आणतात. बरं, ती अजिबात टाळावी तर तेही शक्य नसतं. म्हणून त्यावर थोडा वि करू या.\nगृहीतकं ही आपल्या मनात इतकी मुरलेली असतात की, ती वेगळी आठवून आपण कुठला व्यवहार करतो, अशातलाही भाग नाही. आपल्या व्यवहारांमागं अनेक गृहीतकं काम करीत असतात, हे विचार केला तर लक्षात येईल. त्यांच्याविषयी सावध नसल्यामुळं अनेकदा अनपेक्षित घटना, ठरलेली कामं न होणं, अपयश, समज- गैरसमज – अशा अनेक गोष्टींना ती कारणीभूत ठरतात. त्यामुळं हा विचार गरजेचा आहे.\nऑफिसमध्ये एखाद्याबरोबर अनेक र्वष काम केलेलं असतं. स्वभाव माहिती असतात, विश्वास असतो. एकमेकांची कामं केलेली असतात. एखाद्या दिवशी आपण आजारपणामुळं घरी असतो. एखाद्या माणसाचा कामासाठी फोन येतो. त्याला माहिती असतं की, हे काम एरवी एकदोन दिवसांनी होईल. पण आपल्याला सांगितलं तर, आपण त्याची निकड लक्षात घेऊ आणि ते शक्यतो लगेच करू. आपण आज ऑफिसला जाणार नाही, हे कळल्यावर तो मनुष्य उद्या येतो, असंही सांगतो. पण ऑफिसमधले सहकारी काम करतील, हे गृहीत धरून आपण आत्मविश्वासानं सांगतो, ‘तुम्ही काळजी करू नका. त्या अमक्यांना भेटा, मी नसलो तरी, मी सांगितलं आहे म्हणून सांगा, ते तुमचं काम अवश्य करतील.’ तो मनुष्य उत्साहानं जातो. त्यांना भेटतो. पण त्यांचा प्रतिसाद तर लगेच मदत करण्याचा नसतोच. उलट ‘उद्या या’ या पद्धतीचा असतो. तो परत गेल्याचं कळतं. आपण एवढय़ा खात्रीनं होईल म्हणून सांगितलेलं काम सहकाऱ्यांनी केलं नाही, याचा थोडा रागही डोक्यातून जात नाही. त्यांची चूक आहे, असं वाटत राहातं.\nमूळ चूक आपल्याकडेच असते. ती घडायला कारणीभूत असतं, ते ‘त्यांचे आपले एवढे संबंध आहेत, तर ते हे काम नक्की करतील’ हे ‘गृहीतक’ कालच नव्हे तर, कालपर्यंत जर माणूस तसा वागला तर, आज तो आपल्याशी, इतरांशी तसाच वागेल, असं आपण गृहीत धरतो. ते खरं ठरलं नाही म्हणून त्रास होतो. हे एवढंच नाही तर, कालपर्यंत जरी माणूस आपल्याशी जसा वागला, तसाच तो आज वागेल, असंही गृहीत धरण्यात अर्थ नसतो. कदाचित, त्याची आजची भूमिका वेगळी असू शकते. त्याची कारणं तशी साधी असली किंवा पारदर्शकता असली तर, आपल्याला काही वेळा कळतात. पण अनेकदा ते घडत नाही आणि समज- गैरसमज मनात मूळ धरतात, ते एका खोल रुतलेल्या काटय़ासारखे. कधी विरघळले, कधी प्रसंगानं निघाले तर, पुढं तो त्रास कमी होऊ शकतो. पण ते घडलं नाही तर, आतच राहिलेला काटा नुसतं कुरूपच निर्माण करीत नाही तर, कायम सलत राहणारं दुखही आपल्यामागं लावून देतो.\nयाच उदाहरणात थोडं पुढं गेलं तर, असंही घडू शकतं की आपण सांगूनही त्या सहकार्यानं आपल्या माणसाचं काम केलं नाही, याची त्याला जाणीव असते कधीतरी तो ती जाणीव, क्षमा मागून चांगल्या शब्दांत व्यक्तही करतो. त्यानं तशी वेगळी भूमिका का घेतली, याचीही आपल्या लक्षात न आलेली कारणं तो आपल्याला समजावून सांगतो. त्यांत पूर्वी त्या व्यक्तीचा त्याला चांगला अनुभव आलेला नसतो, कुठं कधी त्याची अरेरावी, स्वभाव, झालेली फसवणूक- अशा काही गोष्टी त्याच्या लक्षात असतात. कधीकधी काही कारणं तशी साधी असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणं ती मनावर घेतली जातात. असंही कळतं की, ते सहकारी तिथं असताना, काम करायला तयार असतानासुद्धा, त्यांना डावलून ती व्यक्ती दरवेळी आपल्याकडं येते, एवढंसंही कुठं त्यांच्या मनात राहून गेलेलं असतं. अशी विघातक गृहीतकं टाळण्यासाठी असं करावं की, आत्मविश्वासानं ते तुमचं काम करतील असं म्हणण्याऐवजी, कुठलं गृहीतक मनाशी न धरता, ‘त्यांना भेटून विनंती करा, वाटलं तर मी फोन करतो, काम होतंय का पाहा कधीतरी तो ती जाणीव, क्षमा मागून चांगल्या शब्दांत व्यक्तही करतो. त्यानं तशी वेगळी भूमिका का घेतली, याचीही आपल्या लक्षात न आलेली कारणं तो आपल्याला समजावून सांगतो. त्यांत पूर्वी त्या व्यक्तीचा त्याला चांगला अनुभव आलेला नसतो, कुठं कधी त्याची अरेरावी, स्वभाव, झालेली फसवणूक- अशा काही गोष्टी त्याच्या लक्षात असतात. कधीकधी काही कारणं तशी साधी असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणं ती मनावर घेतली जातात. असंही कळतं की, ते सहकारी तिथं असताना, काम करायला तयार असतानासुद्धा, त्यांना डावलून ती व्यक्ती दरवेळी आपल्याकडं येते, एवढंसंही कुठं त्यांच्या मनात राहून गेलेलं असतं. अशी विघातक गृहीतकं टाळण्यासाठी असं करावं की, आत्मविश्वासानं ते तुमचं काम करतील असं म्हणण्याऐवजी, कुठलं गृहीतक मनाशी न धरता, ‘त्यांना भेटून विनंती करा, वाटलं तर मी फोन करतो, काम होतंय का पाहा’- असं मोकळेपणानं सांगितलं तर, पुढचा बराचसा त्रास वाचेल.\nमाणसं जर आणखीच बेसावध असतील, गृहीतकांच्या या दुसऱ्या गफलती घडवण्याऱ्या बाजूची त्यांना कल्पना नसेल तर, अशी माणसं ठामपणे हे काम होईल, ते घडेल, तुम्ही अमक्यांना भेटा, ते काय सहज होईल – असं म्हणताना आणि तशा समजुतीत वावरताना आपल्याला दिसतील. असली गृहीतकं ही अर्थातच, अनेकदा भ्रामकच असल्यामुळं खरी ठरत नाहीत. त्या माणसाची निराशा होतेच, पण त्यांचा आपल्या शब्दांवरचा विश्वासही उडायला ती कारणीभूत ठरतात. गृहीतकांच्या बाबतीतल्या या दोन्ही बाजूंचं खरेपण आपण आपल्या, इतरांच्या आयुष्यातल्या घटनांवरून जरूर तपासून घेऊ शकतो.\nमग गृहीतकांशिवाय जगलं तर चालेल का तर तेही तसं पूर्णपणे शक्य नाही. आधी म्हटलं तसा आपला बराचसा व्यवहार एक प्रकारे गृहीतकांवर चाललेला असतो. म्हणजे असं की, जगताना काही अनुभव येतात. त्यानुसार विचारांचा आकार तयार होतो. तो स्मरणात राहतो. त्यावरून स्वाभाविकच, आजच्या किंवा भविष्यातल्या गोष्टी आपण ठरवतो. हे लक्षात घेण्याची गरज आहे की, त्यांतले काही भाग तांत्रिक असतात. तशा स्वरूपाची गृहीतकं आज किंवा भविष्यातही उपयोगी पडू शकतात. एक अधिक एक किंवा पाच गुणिले चार हे शिकल्यावर, मेंदूनं साठवलेलं उत्तर पुढं बदलत नाही, त्यानुसार सोडवत गेलेली किचकट गणितांची उत्तरंही बरोबर येतात, अपेक्षेप्रमाणं असतात.\nअधिक पाहिलं तर, माणसाचा इतर संबंधातला व्यवहार, मंडईतल्या नेहमीच्या भाजीवाल्याकडून येणाऱ्या भाजीच्या बिलाचा अनुभव, त्यातलं गणित गृहीत धरल्याप्रमाणं बरोबर येतंच, पण पूर्वीप्रमाणेच आजच्या भाजीचा दर्जा तसाच असेल, असं गृहीत धरणं कदाचित चूक ठरू शकतं. कमी दर्जाची भाजी मिसळली जाऊ शकते, दुसरी एखादी भाजी आपल्याला नको असली तरी, शिल्लक आहे म्हणून, तिची भलावण करून आपल्या पदरात टाकली जाऊ शकते. एरवीचा त्यांच्याशी असलेला व्यवहार गृहीत धरण्यावर बरोबर चालला असला तरी त्यांची मर्यादा लक्षात घेऊनही वागावं लागतं.\nयात गृहीत धरण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी आणि आपली सावधानता यांचा मेळ घालावा लागतो.\nघर बांधायला निघाल्यावर ते अमुक दिवसांनी पूर्ण होणार, वर्षांअखेर परीक्षा होणार, अभ्यास केला की पास होणार, चालायला लागल्यावर आपण ठरलेल्या ठिकाणी पोचणार, विशिष्ट पसे मिळाले की आपल्या गरजा पूर्ण होणार- अशा असंख्य गृहीतकांवरच आपला व्यवहार रोज करता येतो. ती गृहीत न धरली तर, व्यवहारही अवघड होईल. जगण्याला, व्यवहाराला गृहीतकांची गरज आहे, तशीच ती त्यांच्या मर्यादा ओळखण्याचीही आहे.\nकाळ्या ढगांनी आकाशात दाटी केली, म्हणजे आता प्रचंड पाऊस पडणार, हे जरी काही पूर्वीच्या अनुभवांवरून गृहीत धरलं असलं तरी, पुढची जी पळापळ – कामांतले घाईगर्दीचे बदल आपण करतो, ते तसे करावे लागतीलच, असं नसतं. कारण, गृहीतकांच्या पलीकडे निसर्गही वागू शकतो आणि माणूसही हे लक्षात असेल तर, मनुष्य दोन्ही गोष्टींच्या तयारीत राहील पण, गोंधळून चुका करणार नाही, धावपळ उडवणार नाही, अस्वस्थ होणार नाही. कारण, जोराचा वारा सुटून काही वेळात ते सारे ढग निघून जातात. पाऊसही पडत नाही. तसंच, आज माणूस चांगला आहे, उद्या असेल पण असेलच असं नाही, हे जसं खरं, तसंच तो आज वाईट आहे म्हणून उद्या वाईट असेल असंही नाही. तीच गोष्ट कामं, व्यवहार, संबंध, नातेवाईक, आयुष्यातल्या घटना- अशा असंख्य बाबतीत असते.\nआपल्याला जगताना गृहीत धरण्याची गरज आणि त्यांच्या मर्यादा यांची जर सतत सावध जाणीव असेल तर, आपण स्वस्थ राहू शकू. कुठलीही गोष्ट शांतपणे घेऊ शकू\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविश्वचषकाआधी भारताला मोठा धक्का पहिल्याच सामन्यात बुमराहला गंभीर दुखापत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-on-cm/", "date_download": "2019-03-25T08:06:39Z", "digest": "sha1:76EL5XM6QWRPW4QXXUXBCIMVV6RAAVS7", "length": 4778, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकांच्या मनात मी अजूनही राज्यकर्ता – शरद पवार", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nलोकांच्या मनात मी अजूनही राज्यकर्ता – शरद पवार\nचंद्रपूर: चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार राज्यातील जनतेच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहेत. आता सत्तेत जरी नसले तरी लोकांचा विश्वास मात्र शरद पवारांवर आहेच, हे आम्ही नाही तर दस्तुरखुद्द शरद पवार हेच म्हणाले आहेत.\nशरद पवार म्हणाले, ”राज्यात कुठेही फिरत असताना प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे मी अजुनही राज्यकर्ता आहे, अशी भावना लोकांमध्ये जाणवते, राज्यात मी जिथं कुठे जातो, तिथं अजूनही लोक माझ्याकडे समस्या सोडवण्यासाठी घेऊन येतात, त्यांच्या मागण्यांची निवेदनं देतात. यावरून राज्यातलं फडणवीस सरकार अजूनही आपल्या कामाचा ठसा उमटू शकलेलं नाही, हेच सूचित होतंय.” ते चंद्रपूर मध्ये बोलत होते.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nजो निभा ना सका पत्नी से दुसरो की सीडी बनवाएगा\nआज अनुभवायला मिळणार उल्कावर्षावाचा दुर्मिळ आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-03-25T08:13:45Z", "digest": "sha1:Q7AW2M3G2UPI46EJWX66QBXACBRQJZB2", "length": 4772, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन - विकिपीडिया", "raw_content": "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्त��र विनंत्या पाहा.\nफेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१३ रोजी २३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2019-03-25T07:39:08Z", "digest": "sha1:E2AV65JLKSYAVGLXBQOIXJ75C5PDJCXX", "length": 5212, "nlines": 41, "source_domain": "vicharpravah.in", "title": "'न्यू होरायझन' अंतराळयान १ जानेवारी २०१९ रोजी 'अल्टिमा थुली' या सूर्यमालेतील दूरस्थ पिंडाजवळ पोहचत आहे. - विचारप्रवाह", "raw_content": "\n‘न्यू होरायझन’ अंतराळयान १ जानेवारी २०१९ रोजी ‘अल्टिमा थुली’ या सूर्यमालेतील दूरस्थ पिंडाजवळ पोहचत आहे.\nनासाचे ‘न्यू होरायझन’ अंतराळयान सूर्यमालेतील एका दुरस्त पिंडाजवळ लवकरच पोहोचत आहे. या पिंडाला ‘अल्टिमा थुली’ असे नाव देण्यात आले असून तो वॉशिंग्टन शहराच्या आकाराचा आहे. केपलर बेल्ट मधील हा पिंड प्लुटो पासून सुमारे एक अब्ज मैल अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.\nन्यू होरायझन अंतराळयानाने ‘अल्टिमा थुली’चे घेतलेले पहिले छायाचित्र\n‘न्यू होरायझन’ अंतराळयान १ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी ‘अल्टिमा थुली’ जवळून जाईल. त्यानंतर तो पिंड नक्की कसा दिसतो आणि नेमका कशापासून बनला आहे आणि नेमका कशापासून बनला आहे ते कळू शकेल. अंतराळयानावरील कॅमेरे सध्या झूमइन केले जात आहेत, जेणेकरून या पिंडाचा आकार अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेल. न्यू होरायझन अंतराळयान ताशी ५१ हजार ५०० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने अंतर कापत असून २०१५ साली त्याने प्लुटो या लघुग्रहाची सुरेख छायाचित्रे घेतली होती.\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n२०२१ साली दोन पर्यटक अंतराळ स्थानकाला भेट देणार\nमंगळ मोहिमेवरील ‘इनसाइट मार्स लँडर’ने आपले यांत्रिक हात वापरून स्वतःचा सुरेख सेल्फी घेतला आहे.\n‘Where is my Train’ अनुप्रयोग विकसित करणारी ‘Sigmoid Labs’ ही कंपनी आता गुगलने विकत घेतली आहे.\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/bbmarathi/", "date_download": "2019-03-25T08:00:51Z", "digest": "sha1:6EUOKHYGG5H3YHE2ISO3O4W7QMSFWVH5", "length": 6220, "nlines": 76, "source_domain": "marathikalakar.com", "title": "BBmarathi - मराठी कलाकार", "raw_content": "\nस्मिताच्या पार्टीच्या निमित्ताने बिगबॉस मराठीची सगळी मंडळी पुन्हा एकत्र पण पुष्कर,सई आणि मेघाची पार्टीला अनुपस्थिती\nबिगबॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर तिसऱ्या क्रमांकाची विजेती बनली. याच निमित्ताने तिच्या मैत्रिणींनी स्मितासाठी...\nपुष्कर आणि आस्तादमध्ये बाचाबाची कालच्या खेळण्यांनी आज घेतला बदला\nमराठी बिगबॉस दिवस २५. आजचा घरातील दिवस नुसता बदला घेण्यासाठीचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं...\nरेशमने केलं मेघाला हैराण \nमराठी बिगबॉसचा दिवस २४ वा. नेहमी जसा काही ना काही टास्क सदस्यांना मिळतो तसाच आज पण...\nमेघाला वाचवायला सईने केलं फॅमिली फोटो आणि आवडत्या वस्तूंचं बलिदान\nबिगबॉसच्या घरातील दिवस २३ वा. सर्व कार्य नित्यनेमाप्रमाणे चाललेली. ह्या घरात आजवर खुप वादविवाद, भांडणं झाली....\nस्मिताला वाचवण्यासाठी आस्तादने केलं टक्कल राजेश सिक्रेट रूम मध्ये\nविनीत भोंडे आणि आरती सोळंकी बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून बिगबॉसचा कॉमेडी एन्टरटेनमेन्ट फॅक्टर थोडासा कमी झालेला...\nबिगबॉसच्या घरातील १९ वा दिवस उजाडला. सुरुवातीला सर्व काही काही सुरळीत चालू असतांना पुढे दिवसभरात असं...\nबिगबॉस मराठी…झलक मागील आठवड्याची\nबिगबॉस मराठीला सुरु होऊन आता १५ दिवसांपेक्षाही जास्त दिवस होत आहेत. खरा खेळ आता रंगात येऊ...\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nनेहमीप्रमाणे बिगबॉस मराठीचा प्रथम एपिसोड चांगलाच गाजला. बिगबॉसच्या घरात सर्व मंडळींचा गृहप्रवेशही झाला. सर्वाना तब्बल १०० दिवस...\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉसच्या घरातील पहिला दिवस तो जरा थोडा उशिरानेच सुरु झाला होता. सर्व मंडळींनी आरामात दिनचर्या...\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\n‘मराठी बिग बॉस’ आजपासून सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता हा एपिसोड कलर्स...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/balance-in-drama-as-a-director-i-have-learnt-it-7036/", "date_download": "2019-03-25T08:19:52Z", "digest": "sha1:A7OHUTDS5654RLJLPDCXWZLED54XFNUT", "length": 38293, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\n‘वन मॅन टू गव्हर्नर्स’\n‘वन मॅन टू गव्हर्नर्स’\nदिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर\nदिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर नाटक हुकतं. कालरे गोल्दोनी या नाटककाराने ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ या मूळ नाटकाची संरचना करताना फॉर्म आणि कन्टेन्ट यांचं उत्तम भान ठेवलं होतं. पण रिचर्ड बीनच्या रंगावृत्तीत आणि निकोलास हायटनरच्या प्रयोगात हे भान सुटलं असं मला वाटलं. म्हणून मला हे नाटक आवडलं नसावं. पण सबंध नाटय़गृहात असं मत असणारा कदाचित मी एकटाच होतो, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यामुळेच हे नाटक करून बघावं असा विचार मनात सारखा सारखा येतो आहे.\n‘कॉमेडिया द��� लार्त’ हा नाटय़प्रकार इटलीमध्ये चौदाव्या शतकात सुरू झाला. ‘कॉमेडिया दे लार्त’ या नाटय़प्रकाराला ‘कॉमेडी ऑफ आर्ट’ किंवा ‘कॉमेडी ऑफ दी प्रोफेशन’सुद्धा म्हणतात. १४ ते १८ वे शतक अशी चार शतकं हा नाटय़प्रकार इटलीमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जात होता. या नाटय़प्रकारामध्ये लिखित संहिता असतेच असं नाही. उत्स्फूर्तपणे जे आणि जसं सुचेल तसं प्रयोगात सादर केलं जातं. त्यामुळे नाटकाच्या विषयापेक्षा त्याच्या सादरीकरणावर भर असतो. इटलीमध्ये हा नाटय़प्रकार १६ व्या शतकात अधिक फुलला आणि लोकप्रिय झाला. काही वर्षांपूर्वी पृथ्वी थिएटरच्या नाटय़महोत्सवात इटलीहून एक ग्रुप आला होता. त्यांनी सादर केलेलं ‘कॉमेडिया दे लार्त’ मी पाहिलं होतं आणि त्या प्रयोगाचं परीक्षणही लिहिलं होतं. मला आठवतं त्याप्रमाणे इटालियन कलाकारांसोबत काही भारतीय कलाकारांनीही त्यात कामं केली होती. या नाटय़प्रकारात लिखित संहिता नसली तरी विषय, व्यक्तिरेखा, प्रवेशांची मांडणी, अंकांची रचना हे सगळं पक्कं ठरलेलं असतं. प्रत्येक नाटकाला पूर्वरंग असतो. प्रत्येक प्रवेशात काय घडणार, ते आधीच ठरवलेलं असतं. अभिनेत्यांना हे सर्व सांगितलं जातं. त्यांच्याबरोबर चर्चा केली जाते. अभिनेत्यांना बरोबर घेऊन संहिता बांधली जाते आणि त्यानंतर तालमींमध्ये संवाद ठरवले जातात. धमाल प्रकार असतो. १६ व्या शतकात इटलीत जी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती होती त्यावर भाष्य करणे, हा कॉमेडिया हे लार्तचा प्रमुख उद्देश असायचा. हा नाटय़प्रकार खूप लोकप्रिय झाला आणि त्यातूनच पुढे व्यावसायिक नाटकांची निर्मिती होऊ लागली. त्यामुळे इटालियन रंगभूमीच्या इतिहासात ‘कॉमेडिया दे लार्त’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nकॉमेडिया दे लार्तचे प्रयोग कार्निव्हल्समध्ये होत असत आणि मोठमोठे सेट्स लावले जायचे. ज्या शहराच्या बाहेरच्या भागात नाटकाचे प्रयोग व्हायचे, त्या शहरातून प्रयोग सादर करायला पैसे मिळायचे. नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांसाठी विनामूल्य असायचा. प्रयोग संपल्यावर हॅट कलेक्शन केलं जायचं. राजे-महाराजांसमोरही नाटकांचे प्रयोग व्हायचे. त्यातून पैसे उभे केले जायचे. कॉमेडिया दे लार्तमध्ये ‘स्टॉक’ व्यक्तिरेखा असायच्या आणि आजही असतात. नाटकांचे विषयही ठरलेले असतात. परंपरेने जे विषय चालत आले आहेत त्यामध्ये प्रेम, म्हातारपण, असूया आणि विवाहबाह्य़ संबंध हे प्रामुख्यानं असतात. संगीत आणि नाच हा कॉमेडिया दे लार्तच्या प्रयोगाचा महत्त्वाचा भाग असतो. तसेच विनोदनिर्मितीसाठी निर्माण केलेले अडथळे- ज्याला ‘लाझी’ असं म्हणतात- म्हणजे नाटक सुरू असताना मध्ये येऊन विनोद सांगणे, एखादा छोटा जगलरीसारखा आयटम करणे किंवा पॅन्टोमाइम करणे; कधी कधी सर्कसमध्ये असतात तसे अॅक्रोबॅटिक्स करणे.. या मधल्या अडथळ्यांचा मूळ नाटकाशी संबंध असतोच असं नाही. पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘तियात्र’ या नाटय़प्रकारातसुद्धा अशा प्रकारचे कॉमिक रीलिफ्स असतात. भारतात गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात कोकणी भाषेत तियात्रे केली जातात. या तियात्रांमध्ये सादर होणाऱ्या लाझीला ‘साइड शो’ म्हणतात. गोव्यात तियात्र बघायला जाणारा प्रेक्षकवर्ग साइड शो बघायलाच गर्दी करतो. कॉमेडिया दे लार्तमध्ये वापरली जाणारी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क (मुखवटे). विविध पात्रांप्रमाणे हे मुखवटे वापरले जातात. हे मुखवटे चार किंवा पाच प्रकारचे असतात. पॅन्टालोन आणि डॉक्टर (दोन्ही म्हातारी माणसं), कॅप्टन, एक धाडसी तरुण, विदूषक, कुबड असलेला माणूस आणि दुसरा एक म्हातारा माणूस. हे मुखवटे घातले की प्रेक्षकांच्या लक्षात येतं की, कुठली कुठली पात्रं नाटकात वापरली जाणार आहेत. कॉमेडिया दे लार्त या नाटय़प्रकारात काही लिखित संहिताही आहेत. त्यातली महत्त्वाची, अत्यंत गाजलेली संहिता म्हणजे कालरे गोल्दोनी लिखित ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स.’ हे नाटक खूप गाजलं. त्याचे जगभर प्रयोग झाले आणि यापुढेही होत राहतील.\nनॅशनल थिएटरला ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ या ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’चं रिचर्ड बीन या नाटककाराने केलेल्या नव्या रंगावृत्तीचे प्रयोग सुरू होते. मला मूळ नाटक माहीत होतं. त्याचं हिंदी रूपांतर ‘दो गश्तीयों का सवार’ आणि प्रवीण भोळे यांनी केलेले त्याचं मराठी रूपांतर ‘मी एक आणि माझे दोन’ ही दोन्ही मी वाचली होती. शिवाय कॉमेडिया दे लार्त या फॉर्मविषयीचं मला आकर्षण होतंच. त्यामुळे मी नॅशनल थिएटरला जाऊन ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ बघायचं ठरवलं. नॅशनल थिएटरच्या लिटिलटन या कमानी मंच असलेल्या नाटय़गृहात प्रयोग होता. मी तिकीट काढायला गेलो. मला एका आठवडय़ानंतरचं तिकीट मिळालं. म्हणजे नाटक लोकप्रिय झालेलं होतं, हे वेगळं सांगायल�� नको. नॅशनल थिएटरमध्ये नाटक बघायला मला आवडतं. तिथलं वातावरणही नाटकाला पोषक असतं, हे मी वारंवार नमूद केलं आहे. ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ हे कालरे गोल्दोनीने १७४३ साली लिहिलेलं नाटक. रिचर्ड बीनने त्यात बदल करून ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ या नावाने त्याचं पुनर्लेखन केलं. नॅशनल थिएटरने त्याचा प्रयोग केला. समीक्षकांनी या प्रयोगाची खूप स्तुती केली असावी. कारण मी विकत घेतलेल्या ब्रोशरमध्ये नाटय़परीक्षणांच्या हेडलाइन्स छापल्या होत्या; ज्या वाचून समीक्षक नाटय़प्रयोगावर खूश असावेत, हे सूचित होत होतं. मी माझ्या सीटवर जाऊन बसलो आणि नाच, गाणी, विनोद यांनी भरलेला प्रयोग पाहायला सज्ज झालो.\nनॅशनल थिएटर वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे जुनी क्लासिकल बघायला मिळतात, त्याचबरोबर ‘वॉर हॉर्स’ किंवा ‘हॅबिट ऑफ आर्ट’सारखी उत्तम नवीन नाटकंही बघायला मिळतात. हा विचार डोक्यात घोळत असतानाच जोरात म्युझिक सुरू झालं आणि त्याच्यासोबत गाणं. ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’चा प्रयोग सुरू झाला होता. गमतीशीर पूर्वरंग झाला आणि नाटक पुढे सरकायला लागलं.\nरिचर्ड बीन या नाटककाराने नाटकातला काळ बदलून १९६० केला होता. आणि जागा होती- ब्रायटन. दोन गुंडांची कुटुंबं लग्नाच्या बंधनात अडकणार असतात. मूळ नाटकात जी दोन कुटुंबं आहेत ती गुंडांची नाहीत. पण रॉस्को हा जुळ्या भावांपैकी एक भाऊ मारला जातो. म्हणून पाओलिन ही चार्ली या गुंडाची मुलगी अॅलनशी लग्न करायचं असं ठरवते- जो चार्लीच्या वकिलाचा मुलगा असतो. त्याला अॅक्टर व्हायचं असतं. हे सगळं होत असताना फ्रान्सिस हा रॉस्कोचा नोकर येतो. त्याच्या आगमनामुळे गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात होते. रॉस्को मेला नसल्याचं कळतं. त्यामुळे रॉस्को आणि पाओलिनचं लग्न होऊ शकतं. पण अॅलन आणि पाओलिनला आता ते मान्य नाही होत. फ्रान्सिस एका पबमध्ये जातो- जिथे त्याला दुसरी नोकरी मिळते. त्यामुळे आता त्याचे दोन मालक आहेत. त्याला दोन्ही मालकांची चाकरी करायची आहे; पण एकमेकांना कळू न देता. इथून पुढे फ्रान्सिसची दोन्ही मालकांना खूश करण्याची जी धडपड चालते त्यावर नाटकाचा पुढचा डोलारा उभा राहतो.\nनाटकाच्या अगदी सुरुवातीला ‘दि क्रेझ’ नावाचा बॅण्ड वाजायला सुरुवात होते. काही विनोदी गाणी गायली जात होती. नाटकात मधे मधे हा बॅण्ड वाजत होता. नाटकातील पात्रं वेगवेगळी वाद्यं वाजवून गात होती. नाटकाच्या कथानकात मधे मधे ही गाणी म्हटली जात होती- ज्यातून विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न होत होता. प्रेक्षक नाटक तुफान एन्जॉय करीत होते. भरपूर हशे आणि टाळ्या. नाटकातला प्रत्येक विनोद ते उचलून धरत होते. नाटकाच्या दुसऱ्या भागात खूप चढउतार होते. फ्रान्सिस हा नोकर सर्व समस्यांना तोंड देत, मार्ग काढत होता. शेवटी सगळं सुरळीत होतं आणि फ्रान्सिसला तो दोन मालकांकडे काम करीत असल्याची कबुली द्यावी लागते.\nमाझ्यासमोर जे नाटक म्हणून चाललं होतं त्याला प्रेक्षक दाद देत होते, पण मी मात्र अलिप्त होतो. काही केल्या ते नाटक माझ्यापर्यंत पोहोचेना. मी अगदी निकराचा प्रयत्न करीत होतो नाटक एन्जॉय करायचा; पण नाही.. मला आस्वादच घेता येत नव्हता- समोर जे काही चाललंय त्याचा. मध्यंतरात मला वाटलं की दुसऱ्या अंकात तरी मजा येईल. पण नाही. उलट, दुसरा अंक खूपच लांब आणि कंटाळवाणा वाटायला लागला. वास्तविक मला विनोद नाटक बघायला खूप आवडतं. अगदी साध्या साध्या विनोदांवरही मला हसू येतं. पण इथे मला सगळा आचरटपणा चाललाय असं वाटत होतं. इतकं नावाजलेलं प्रॉडक्शन मीही मला आवडेलच, अशा भ्रमात. पण घडलं होतं ते भलतंच. मनात असाही विचार येऊन गेला की, इतके सगळे चांगलं म्हणताहेत या नाटकाला, प्रयोगाला.. प्रेक्षकही उत्स्फूर्त दाद देताहेत, तर ते परत एकदा पाहावं. पण मला धाडस नाही झालं.\nमाझं असं का झालं असेल, याचं कारण मी शोधायला लागलो. कदाचित मी कॉमेडिया दे लार्त शोधत होतो त्या प्रयोगात. मला तो फॉर्म हाताळायला हवा होता असं वाटत राहिलं. आणि माझं माझ्यापुरतं मला ते पूर्णपणे पटलेलं होतं. रिचर्ड बीनने मूळ नाटकाची पुनर्रचना करताना कॉमेडिया दे लार्त या नाटय़प्रकाराला बगल देऊन एक फार्स त्यातल्या कथानकाच्या आणि व्यक्तिरेखांमधील वैचित्र्याचा आधार घेऊन मांडायचा असं ठरवलं असावं. खरं म्हणजे असे प्रयोग करून बघणं मला स्वत:ला मान्यच आहे, पण इथे मात्र बीन यशस्वी झाला आहे असं मला वाटलं नाही. एकापुढे एक शाब्दिक विनोदांची भेंडोळी माझ्यासमोर फेकली जात होती. तीही या नाटकाची गरज नसताना. निकोलास हायटनर या प्रसिद्ध दिग्दर्शकानेही प्रयोग असा बांधला होता, की आपलं लक्ष सतत जेम्स कॉर्डन या नोकराचं काम करणाऱ्या अभिनेत्याकडे जावं. जेम्स कॉर्डनने काम छान केलं होतं; परंतु तो ज्या पद्धतीचा अभिनय करीत होता- आणि एखाद् दुसरा अपवाद वगळता इतर जे करीत होते त्यात खूप तफावत होती. रिचर्ड बीनने आणि निकोलास हायटनरने मिळून एक गोष्ट सांगायचं ठरवलं आणि सांगताना ती पसरट होऊ नये याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या अंकात कंटाळा आला. नाटक आता लवकर संपेल तर बरं, असं वाटत राहिलं. नाटकाची गोष्ट गंमतीशीर असली तरी इतकी वेगळी नव्हती, की त्यात मी गुंतून ती एन्जॉय करीन. अर्थात मला गोष्ट माहीत असल्यामुळेही तसं झालं असेल. नाटक तांत्रिकदृष्टय़ा नेहमीप्रमाणे चांगलंच होतं. नाटकाचं नेपथ्य इन्टरेस्टिंग होतं. लोकेशन्सचे मोठमोठे कटआऊटस् सरकून रंगमंचावर येत होते. पण ते सगळे थोडे थोडे खोटे वाटावेत, हा नाटकाचा सेट आहे बरं का, याची जाणीव व्हावी असे होते. मला हे खूपच आवडलं. कारण प्रयोगात अभिनेते प्रेक्षकांशी बोलत होते, नोकराचं काम करणारा जेम्स कॉर्डन तर नाटय़गृहात उतरून प्रेक्षकांशी संवाद साधत होता. थोडक्यात काय, तर चौथी भिंत पाडून हे नाटक सुरू आहे बरं का, याची जाणीव दिग्दर्शकाला करून द्यायची होती. प्रकाशयोजना अतिशय साधी. काळ-वेळाचं सूचन करणारी. आणि मुख्य म्हणजे ब्राइट. रंगमंचावरचं सगळं लख्ख दिसेल अशी व्यवस्था करणारी. विनोदी नाटक लख्ख प्रकाशात खेळलं जावं, यावर दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकाराचा विश्वास असावा. वेशभूषेतील रंगसंगतीसुद्धा जरा भडक. पात्रं एखाद्या चित्रातल्यासारखी दिसत होती. थोडी खरी, थोडी खोटी. ‘क्रेझ’ हा बॅण्डही चांगला होता. गाणारी मंडळी छान गात होती. नाटकाच्या सुरुवातीला आणि शेवटी गाणं होतं. अगदी आपल्या नांदी- भरतवाक्याची आठवण व्हावी असं.\nकॉमेडिया दे लार्तचा मास्क, जगलरी, रंगीबेरंगी कॉस्च्यूम्स यांचा वापर करून प्रयोग केला असता तर अधिक मजा आली असती असं वाटलं. म्हणजे मग रिचर्ड बीनची रंगावृत्ती आणि फॉर्म मात्र ओरिजिनल अशानं नाटकाचं दृश्यस्वरूप भन्नाट झालं असतं. गोष्ट त्यातल्या चढउतारांसकट पोहोचवायची; पण त्याबरोबर दृश्यस्वरूपही ‘लार्जर दॅन लाइफ’ करून पोहोचवायला हवं होतं. हे म्हणणं कदाचित पारंपरिक वाटेल, पण माझं असं ठाम मत झालं की, नुसती गोष्ट सांगण्याच्या, शाब्दिक कोटय़ा आणि अंगविक्षेप करण्याच्या नादात एका उत्तम नाटकाची वाट लागली. कुठेतरी ते अर्धकच्चं राहिलं. मी खूपच अस्वस्थ झालो. फ्रान्सिसचं काम करणारा जेम्स कॉर्डन, पाओलिनचं काम करणारी जेमिमा रूपर आणि ख्रिसचं काम करणारा डॅनियल रिग्बी हे तिन्ही कलावंत खूप छान होते; पण इतर कामं करणारी नटमंडळी तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे बोट कलंडली होती. तमाशाच्या बतावणीमध्ये विनोदाची जुगलबंदी असते, पण बतावणी हा तमाशाचा एक भाग असतो. पुढे धमाल वगनाटय़ येणार असतं. वगनाटय़ामध्ये छानशी गोष्ट सांगितलेली असते. पण आपण वगनाटय़ामध्येही जर खूप वेळ बतावणीच करीत राहिलो तर त्या वगनाटय़ाची गंमत कमी नाही का होणार अशानं नाटकाचं दृश्यस्वरूप भन्नाट झालं असतं. गोष्ट त्यातल्या चढउतारांसकट पोहोचवायची; पण त्याबरोबर दृश्यस्वरूपही ‘लार्जर दॅन लाइफ’ करून पोहोचवायला हवं होतं. हे म्हणणं कदाचित पारंपरिक वाटेल, पण माझं असं ठाम मत झालं की, नुसती गोष्ट सांगण्याच्या, शाब्दिक कोटय़ा आणि अंगविक्षेप करण्याच्या नादात एका उत्तम नाटकाची वाट लागली. कुठेतरी ते अर्धकच्चं राहिलं. मी खूपच अस्वस्थ झालो. फ्रान्सिसचं काम करणारा जेम्स कॉर्डन, पाओलिनचं काम करणारी जेमिमा रूपर आणि ख्रिसचं काम करणारा डॅनियल रिग्बी हे तिन्ही कलावंत खूप छान होते; पण इतर कामं करणारी नटमंडळी तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे बोट कलंडली होती. तमाशाच्या बतावणीमध्ये विनोदाची जुगलबंदी असते, पण बतावणी हा तमाशाचा एक भाग असतो. पुढे धमाल वगनाटय़ येणार असतं. वगनाटय़ामध्ये छानशी गोष्ट सांगितलेली असते. पण आपण वगनाटय़ामध्येही जर खूप वेळ बतावणीच करीत राहिलो तर त्या वगनाटय़ाची गंमत कमी नाही का होणार तसंच काहीसं मी बघितलेल्या नॅशनल थिएटरच्या ‘वन मॅन टू गव्हर्नर्स’ या नाटकाचं झालं होतं. त्यातली बतावणी संपेचना. त्यामुळे वगनाटय़ाचा आस्वाद- ते चांगलं असूनही घेता आला नाही.\nदिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर नाटक हुकतं. कालरे गोल्दोनी या नाटककाराने ‘सव्र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ या मूळ नाटकाची संरचना करताना फॉर्म आणि कन्टेन्ट यांचं उत्तम भान ठेवलं होतं. पण रिचर्ड बीनच्या रंगावृत्तीत आणि निकोलास हायटनरच्या प्रयोगात हे भान सुटलं असं मला वाटलं. म्हणून मला हे नाटक आवडलं नसावं. पण सबंध नाटय़गृहात असं मत असणारा कदाचित मी एकटाच होतो, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यामुळेच हे नाटक करून बघावं असा विचार मनात सारखा सारखा येतो आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकाचे गाव.. अविन्यो त्याचे नाव\nनाटक : गेले ते दिन गेले…\nजयललितांच्या भाचीचा पोएस गार्डनबाहेर ड्रामा\nMarathi Drama: चिमुरडय़ाच्या बडबडीने ‘दोन स्पेशल’मध्ये मीठ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/mns-chief-raj-thackerays-cartoon-on-the-decision-to-haj-subsidy/", "date_download": "2019-03-25T08:07:47Z", "digest": "sha1:UGBBJ5ODDXV3TXAUJLMJEXRE4RNPYJLP", "length": 5744, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंचे फटकारे आता घुसखोरी आणि मदरसे यांच्यावर !", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nराज ठाकरेंचे फटकारे आता घुसखोरी आणि मदरसे यांच्यावर \nटीम महाराष्ट्र देशा: नुकताच केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्याला हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत व्यंगचित्र काढत यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरे या��नी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रकाशितही केलं आहे. ‘(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म’ असे शीर्षक देऊन हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.\nभारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधते आहे असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे भारतीय हज यात्रेकरू उभे आहेत असेही दाखवण्यात आले आहे. तसेच भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे, ते अनुदान काढून घेतलेत ते योग्यच आहे. देशात इतरही खूप फुटकळ अनुदाने आहेत. तीपण काढून घ्या. त्याचप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानातील घुसखोर यांनाही हाकलून द्या असेही भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे. तर या घुसखोरांच्या मागे ‘भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे’ असे चित्रही रेखाटण्यात आले आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nअंगावर आले तर शिंगावर घेण्याचे शिवसेनेला चांगले माहिती आहे – अर्जुन खोतकर\n‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा मिळाला’ – धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/a-schools-that-start-activities-to-reach-out-to-people-1036049/", "date_download": "2019-03-25T08:23:43Z", "digest": "sha1:3JPAD4WVPSFGL63GEG4V5LJN7WFQ4XUR", "length": 27744, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मी शाळा बोलतेय! : आम्ही समाजाचे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\n.. त्या एका घटनेने मुलांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. ‘आपण अजून काय करू शकतो’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण काही करायचंय’ नि ‘आपण\n.. त्या एका घटनेने मुलांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. ‘आपण अजून काय करू शकतो’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण काही करायचंय’ नि ‘आपण काही करू या’ हे विचार मनात रुजायला लागले, याचाच शाळेला आनंद झाला. खरंच समाजाचं भान शाळेला यायलाच हवं. मुलांना शाळेत कोंडून ठेवून हे साध्य नाही होणार’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण क���ही करायचंय’ नि ‘आपण काही करू या’ हे विचार मनात रुजायला लागले, याचाच शाळेला आनंद झाला. खरंच समाजाचं भान शाळेला यायलाच हवं. मुलांना शाळेत कोंडून ठेवून हे साध्य नाही होणार शाळा लोकांपर्यंत पोचायला हवी. म्हणूनच या शाळेने अशा सहशालेय उपक्रमांची सुरुवात केली..\nआजूबाजूला निर्माण झालेले अनेक प्रश्न शाळा पाहात होती. परिसरातले बदललेले वातावरणही शाळा अनुभवत होती. कारण माणसांपेक्षाही शाळेचे वय जास्त होते. दोन पिढय़ातल्या चर्चा शाळेच्या कानावर पडत होत्या. ‘‘आमच्या वेळी असं नव्हतं. किती तळमळीने कामं व्हायचं. मुलं पण किती आज्ञाधारक, शिस्तपालन करणारी होती. लोकांच्यातही किती आदर होता..’’ अशा प्रतिक्रिया ते ‘‘आजकाल पाहा मुलांना वाचता येतं मुलांचा नि लोकांचा काही संबंध आहे आदरातिथ्य, लोकांशी संपर्क या गोष्टी राहिल्याच नाहीत. मुलं फक्त स्क्रीनवर..’’ अशा तक्रारी शाळेने ऐकलेल्या होत्या.\nही शाळा अशी वाक्यं ऐकून शाळा विचारात पडायची, कारण तिला ही गोष्ट चिंताजनक वाटत होती. म्हणूनच तिने ठरवले की आपल्या घरी घडणाऱ्या घटना आपल्या इतर मैत्रिणींना सांगायच्या. शाळा समाजजीवनाचा अभ्यास करायची. काळानुसार काय-काय बदल केले पाहिजेत हेही तिनं ठरवलं होतं. म्हणूनच प्रत्येक वर्ग संगणकाने सजला आणि डोक्यावर गवताचा भारा उचलणाऱ्या मुली संगणकासमोर दिसू लागल्या. इतकंच नाही तर शाळेनं हार्डवेअर आणून दिलं नि मुलांनी कॉम्प्युटर्सची जोडणी केली. ही गोष्ट संगणकतज्ज्ञांनी कौतुकानं गौरवली. आता मुलं मोबाइलही सहज वापरत होती. केवळ मेसेजसाठी नि गेम्ससाठी नाही तर निसर्गातले वेगवेगळे आवाज त्यांनी रेकॉर्ड केले, वेगवेगळ्या दृश्याचं चित्रीकरणही केलं आणि त्यावर मुलं चर्चा घडवून आणत होती. शाळेत टी.व्ही. आलाच होता, त्यावरचे शेती, आरोग्यविषयक कार्यक्रम मुलांच्या चर्चेचा भाग होते. नि शाळेतल्या गणित विषयाच्या मुलांचा ‘फिल्म क्लब’ही होता. पडद्याकडे पाहण्याची दृष्टीही मुलांना द्यायलाच हवी हा शाळेचा हेतू होता. मग ही फिल्म कधी ‘जिंकी रे जिंकी’ असेल किंवा ‘आनंदवन’वरची असेल. कधी इटालियन फिल्म असेल. मुलांना भाषा समजत नव्हती, नि इंग्रजीतील सबटायटल्स् वाचायची सवय नव्हती. मुलांना चित्र पाहून जो अर्थ समजायचा त्यावर मुलं बोलायची. अशा विविध देशातले चित्रपट मुलं पाहायची. शाळेला वाटायचे अशा उपक्रमातूनच मुलांच्यात ‘नेमके तेवढे निवडून घ्या’ हा दृष्टिकोन निर्माण होईल. तंत्रज्ञानाची गुलाम बनलेली मुलं शाळेला नको होती तर ‘मित्र’ बनलेली हवी होती. फक्त मित्र नाही तर ‘तंत्रज्ञान मुलांच्या हाती’ हे घडणं शाळेला अपेक्षित होतं. शाळेने केलेल्या बदलाची ही एक दिशा होती.\nएका बाजूला शाळा बघत होती. मुलं आपल्या कोशात गुरफटतायत, लोकांपासून दूर जातायत. मुलांना शेतात जायला आवडत नाही, आणखी काय-काय करायला आवडत नाही. कुणीच सांगत नाही-मला शेतकरी व्हायचंय. गावात काय चाललंय मुलांना माहीत नाही. शेतात कोणत्या प्रकारचं भात पेरतात हे मुलांना माहीत नाही. उलट शेतात जायची मुलांना लाज वाटतेय. असं होऊन कसं चालेल मातीशी नाळ तुटून चालेल मातीशी नाळ तुटून चालेल काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच एक वेगळंच काम शाळेत सुरू झालं.\n८ वी ते १० वीच्या मुलांनी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून आल्या. तशा शेतकऱ्यांतल्या गैरसमजुतीही लक्षात आल्या. ‘प्रगत शेती’ विषयीचे वेगवेगळ्या देशातले प्रयोग मुलांनी समजून घेतले होते. खते, बी-बियाणे, माती, पाणी याविषयीची नेहमीपेक्षा वेगळी माहिती मुलांनी जमवली होती, इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेतली होती. वाडीवाडीत ही माहिती द्यायचं ठरलं. शेतकरी काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मुलं नाराज झाली, पण धीर सोडला नाही.\nकाही शेतकऱ्यांच्या घरातली सगळी माणसं शहराकडे गेली होती. जुन्या पिढीला वाईट वाटत होतं. शेतातलं उजाडपण डोळ्यात थिजत होतं. मुलांच्या एका गटाला हे जाणवलं. मुलं शिक्षकांना म्हणाली, ‘‘सर, आपण एक दिवस तरी त्यांचं शेत करायला जाऊ.’’ ‘‘एका दिवसानं काय होणार’’ ‘‘काय करू या’’ ‘‘काय करू या’’ ‘‘गावचा पण सहभाग होता. आपल्याला सगळी मदत करता येणार नाही. थोडी फार तर करू या.’’\nविचार होत होता, पण नक्की काय करायचं याची दिशा मिळेना. तेव्हा शिक्षक वाडीवाडीतल्या प्रमुखांना भेटले. ही कल्पना तर लोकांना खूप आवडली. मुलांचे गट पाडायचे ठरले. मदत हा तर हेतू होताच, पण त्याहीपेक्षा श्रमानुभव हा हेतू होता. लोकांनाही असं वाटता कामा नये. फुकटात काम होतंय आणि मुलांनाही वाटता कामा नये आमच्याकडून काम करून घेतायत. शारीरिक श्रमाची सवय आणि शेतकऱ्यांच्या श्रमाची जाणीव हा हेतू रुजवण्यासाठी मुलांशी खूप बोलावं लागलं.\nगटागटाने मुलं वाडीवस्तीत कामाला गेली. ऐन धो-धो पावसात चिंब भिजत काम करताना मुलांना मजा आली. हा अनुभवच वेगळा होता. शाळेत सगळे जमले. पालकांनी मुलांबद्दल कौतुकोद्गार काढले. आपण इतरांसाठी चांगले काम करतो हा विश्वास मुलांना वाटला. जाणवलेल्या उणिवांवर चर्चा झाली. सुरुवातीला पालकांनी थोडा विरोध केला, ‘‘आमची मुलं दुसऱ्यांच्या घरी कामाला का पाठवणार’’ पालकांना समजून सांगावं लागलं. ज्यांना पटलं नाही त्यांना कार्यानुभव, समाजसेवा व क्षेत्रभेट या नावाखाली हा अभ्यासाचाच भाग कसा आहे, हे सांगावं लागलं नि यासाठीही गुण असतात हे पटवून द्यावं लागलं. अभिव्यक्ती फलकावर मुलांची मतेही जाणून घेता आली. खरेच ज्यांच्या घरी मदतीला कुणी नव्हतं त्यांना मदत झाली. सुरुवातीचा विरोध मावळला आणि मुलांच्या सामाजिक जाणिवेत बदल झाला. सर म्हणाले, ‘‘खरंच मुलांनो, तुमच्यातली ऊर्जा वायाच जाते. पण अशा उपक्रमातून श्रमाचा अनुभवही येतो आणि आपण लोकांसाठी कामही केले पाहिजे असं वाटतं..’’\nया एका घटनेने मुलांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. ‘आपण अजून काय करू शकतो’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण काही करायचंय’ नि ‘आपण काही करू या’ हे विचार मनात रुजायला लागलं, याचाच शाळेला आनंद झाला. खरंच समाजाचं भान शाळेला यायलाच हवं. मुलांना शाळेत कोंडून ठेवून हे साध्य नाही होणार’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण काही करायचंय’ नि ‘आपण काही करू या’ हे विचार मनात रुजायला लागलं, याचाच शाळेला आनंद झाला. खरंच समाजाचं भान शाळेला यायलाच हवं. मुलांना शाळेत कोंडून ठेवून हे साध्य नाही होणार शाळा लोकांपर्यंत पोचायला हवी. म्हणूनच या शाळेने अशा सहशालेय उपक्रमांची सुरुवात केली होती. शाळेचा विश्वास होता की यातून होणारे संस्कार मनावर होतात. हाताने मदत होते तशी शब्दांनी होते, सहवासाने होते, सोबतीने होते. या सगळ्या मार्गाची दिशा ही शाळा मुलांना दाखवत होती. याचा संदर्भ समाज वेगवेगळा लावत होता.\nबदलत्या काळाच्या ठळक गोष्टी तक्रारींच्या स्वरूपात शाळा ऐकत होती. ‘आजकाल कुणी कुणाशी बोलत नाही.’ ‘कुणी कुणाकडे जात येत नाही..’ ‘आजारी कुणी पडलं तर मदतीला कुणी नसतं..’ ‘वृद्ध पिढीशी बोलायला वेळ नसतो.’ ‘मुलांना एकेकटं राहावं लागतं. घरात कुणीच नसतं..’ याला उत्तरं हवी असताना आणि ती उत्तरं फक्त ���ब्दातून नको असतात. तीच उत्तरं या शाळेने शोधली. उत्तरं प्रत्यक्ष पाहण्यातही मजा असते आणि ही उत्तरे मग प्रत्यक्षातही येतात.\nमुलांना शिक्षकांनी एक स्वाध्याय दिला. अभिव्यक्ती फलकावर एक वाक्य लिहिलं- ‘माझ्या आजूबाजूच्या माणसांसाठी मी..’ बरेच दिवस फळा रिकामा होता. कारण काय लिहावं हेच मुलांना समजेना. संध्याकाळी सगळी मुलं घरी गेल्यावर सरांनीच लिहिली.. ‘मी गोष्टी सांगेन.’ ‘फोन लावून देईन.’ ‘पुस्तक वाचून दाखवेन.’ ‘ वेगवेगळी माहिती सांगेन..’ जराशी वाट दाखवणं गरजेचं होतं. मुलांच्या मनातला आशय किती पटकन वाचता येतो गणित सुटल्यावर मुलं कशी चुटकी वाजवून जिंकल्याचा आनंद दाखवतात, हे शाळा पाहत होती. मुलांचा चेहरा आरशासारखा लख्ख असतो. निदान या वयात तरी गणित सुटल्यावर मुलं कशी चुटकी वाजवून जिंकल्याचा आनंद दाखवतात, हे शाळा पाहत होती. मुलांचा चेहरा आरशासारखा लख्ख असतो. निदान या वयात तरी फक्त वाचता नि पाहता यायला हवं. त्या चेहऱ्यावरचे भाव वाचणं, मनातलं ऐकणं, त्या संदर्भानं त्यांच्याशी बोलणं आणि मग आपण लिहितं होणं.. मुलांच्यात निर्माण करायच्या या श्रवण, भाषण, वाचन, लेखन क्षमता अशा पद्धतीनं शिक्षकांतही शाळेनं निर्माण केल्या होत्या. म्हणूनच सामाजिकतेचं वेगळं भानही शाळा सर्व उपक्रमांतून निर्माण करत होती.\nशाळेला आनंद झाला होता. कारण प्रत्येक मुलात कमी-जास्त प्रमाणात हे भान आले होते. सगळे जण एकमेकांना सावरून घेणं, कुणी कुणाला वही देणं, घर नाही त्याला आपल्या घरी नेणं, वाढदिवसाला कुणाला कपडे देणं, दवाखान्यात वस्तूंची ने-आण करणं, कुणाच्या आजोबांना बँकेत नेणं, देवळात नेणं अशी कितीतरी कामं सहज होऊ लागली. यात अगदी सहजता होती, म्हणून आनंद होता आणि मुलं आनंदी म्हणजे शाळा आनंदीच. शिवाय कोणतीच गोष्ट कुणीतरी सांगतंय म्हणून घडत नव्हती तर मनापासून घडत होती. त्यामुळे ‘आम्ही कुणाला मदत करतोय. आम्ही कुणासाठी तरी काम करतोय ही भावना मुलांच्या मनात निर्माण नाही झाली; उलट यातला आनंद, समाधान यात मुलं मग्न होती आणि त्यांना पाहून शाळेला कृतार्थ वाटत होतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून मुक्त करणारी ग्रामीण शाळा\nगेल्या वर्षी १५ टक्के शुल्कवाढ केलेल्या शाळांना यंदा वाढ नाही\n७० शाळा बंद होण्याच्या मार��गावर शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली\nशाळांनी लोकवर्गणीतून ५० कोटींची देणगी जमा केली\nबहुतांश स्कूल बस पुन्हा नियमबाह्य़तेच्या मार्गावर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/swayampakgharatil-vidnyan-news/importance-of-sugar-in-the-human-body-1783138/", "date_download": "2019-03-25T08:41:25Z", "digest": "sha1:NOFXCRDQLWSD4MFXLMHKZDSY373CDA3R", "length": 12783, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Importance of Sugar in the Human Body | साखर आपली सखी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nआपल्या रोजच्या आहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात बहुसंख्य पदार्थात साखर असते.\nसाखरेबद्दल आपणास बरीच शास्त्रीय माहिती आधीच्या लेखातून दिली गेली आहे. मात्र दैनंदिन जीवनात, रोजच्या आहारात तिचा योग्य उपयोग करून घेणे महत्त्वाचे ठरेल. प्रकृतीनुसार नीट उपयोग केल्यास ती आपली सखी ठरेल.\nएनसीडी (रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार)चे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे आणि त्याला आहारातील साखर आणि भात हेच ‘फक्त’ जबाबदार आहेत, अशी एकारलेली भूमिका अयोग्य ठरू शकते. कारण हे विकार होण्याची विविध कारणे असतात (जसे आनुवंशिकता/ जीवनशैली इ.), ती समजून घेतली पाहिजेत. केवळ गोड आणि पिष्टमय पदार्थाना दोष देणे, ते पूर्णपणे टाळणे, यामुळे ऊर्जा व उत्साह कमी होऊ शकतात. अशा वेळी झटपट उत्साह मिळण्याचा दावा करणारी पेये प्यायली जातात, त्याने तात्पुरते काम होते. मात्र त्यातील सगळीच आरोग्यस्नेही असतील असे नाही.\nआपल्या रोजच्या आहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात बहुसंख्य पदार्थात साखर असते. आपण जाणताच की साखर, पिठीसाखर, गूळ, मध, काकवी यामध्ये ती प्रत्यक्ष स्वरूपात असते. अप्रत्यक्ष स्वरूपात साखर मिळते ती सर्व पिष्टमय पदार्थाद्वारे. जसे : तांदूळ, गहू, मका इत्यादीपासून बनलेले पदार्थ. शिवाय पिष्टमय कंदांमध्ये अप्रत्यक्ष रूपात असणाऱ्या साखरेचे प्रमाण कंदाप्रमाणे बदलते, जसे बटाटा, रताळी, बीट किंवा टॅपिओका (साबुदाणा उत्पादनासाठी वापरतात) यामध्ये जास्त प्रमाणात तर गाजर, तिखट कांदा-मुळा यामध्ये तुलनेने कमी प्रमाणात असते. या अप्रत्यक्ष थोडय़ाशा साखरेची चव, शिजवलेल्या कांदा अगर मुळ्यातून आपल्याला जाणवते. शिवाय फळांमध्ये आणि सुक्या मेव्यात सुद्धा जास्त/कमी प्रमाणात साखर असतेच. म्हणून प्रत्यक्ष साखर कमी/वर्ज्य केली, तरी अशी अप्रत्यक्ष साखर आपल्या आहारातून मिळत राहते.\nमुख्य म्हणजे शरीरातील विविध महत्त्वाच्या संस्थाचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक ऊर्जा साखरेतूनच मिळत असते. थकवा आला असता साखर/गूळ घेण्याने ताजेतवाने वाटते. इतकेच नव्हे तर मधुमेही व्यक्तीला सुद्धा रक्तातील साखर प्रमाणापेक्षा कमी होणे धोक्याचे ठरू शकते. मेंदूचे कार्य सुविहितपणे सतत चालण्यासाठी तर प्राणवायू आणि साखर (ग्लुकोज) हेच दोन कळीचे घटक आहेत. हे सर्व लक्षात घेऊन साखरेशी योग्य तेवढी मैत्री ठेवायला नको का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविश्वचषकाआधी भारताला मोठा धक्का पहिल्याच सामन्यात बुमराहला गंभीर दुखापत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/television/page/5/", "date_download": "2019-03-25T08:32:33Z", "digest": "sha1:FMRNHO6YSND4QAHG6QEY74OJFR4E7JAW", "length": 5920, "nlines": 65, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Television - Page 5 of 6 - मराठी कलाकार", "raw_content": "\nउषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी\nअनेक चर्चा, बातम्यांना वाव देत बिगबॉस मराठी येत्या 15 एप्रिल पासून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. असं...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nबिगबॉस मराठी १५ एप्रिल पासून भेटीला महेश मांजरेकर करतायत होस्ट\n‘बिगबॉस चाहते है’ हे वाक्य कानावर पडताच काहीतरी औत्सुक्याचं घडणार हे निश्चित आता आपल्याला हे मराठीत...\nमहेश मांजरेकर होस्ट करणार बिगबॉस मराठी\nबिगबॉस म्हणजे सतत चर्चेत राहणारा रिएलिटी शो. सलग 11 सिझन्स पार पाडलेल्या ह्या शोचा होस्ट सलमान...\nसंग्राम आणि खुशबूने बांधली लग्नगाठ\n‘तुमच्यासाठी काय पण’ ह्या आयकॉनिक टॅगलाईनचा जनक संग्राम साळवी आणि बऱ्याचशा हिंदी, मराठी मालिकांमधून भेटीस आलेली...\nलवकरच येणार बिगबॉस मराठी कलर्स मराठीने केलं टिझर रिलीझ\nमतभेद, भांडणं, वादविवाद ह्या सगळ्या करामती चालतात तो रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस\nझी गौरव २०१८ पुरस्काराची नामांकने\nझी गौरव पुरस्कार हा मराठी नाटक आणि चित्रपट विभागांत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांपैकी एक महत्वाचा पुरस्कार. नुकतीच...\nआता प्रेक्षकांच्या मनासारखं करू विश्व् दौरा फसलाच भाऊ कदम, कुशलची कबुली\nतुम्हा आम्हा सगळ्यांना खळखळून हसवणारा एक कॉमेडी शो, महाराष्ट्रातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात जागा करून...\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nझी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चल�� हवा येऊ द्या’ मधील कलाकार विनीत भोंडेचे लवकरच दोनाचे चार...\nसोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन आता घेऊन येतंय ‘सोनी मराठी’\nहल्ली मराठी टीव्ही चॅनल्सची चलती चांगलीच जोरात असून सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन यात कसे बरे मागे राहील\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/rinku-rajguru/", "date_download": "2019-03-25T08:07:37Z", "digest": "sha1:GVHYE5ZPT6X7ESO3W4S2TFLYKK6PLR3U", "length": 3361, "nlines": 51, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Rinku Rajguru - मराठी कलाकार", "raw_content": "\nआर्ची आणि परश्याच्या मुलाची कथा “सैराट२” मध्ये\nअभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा पहिलाच चित्रपट “सैराट” सुपरडुपर हिट ठरला होता. बॉक्स...\nव्हॅलेंटाईन डेच्या दिवशी येतोय रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा. पहा सिनेमातील लूक\nआपल्या सर्वांची आवडती आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्याला तिच्या आगामी सिनेमातून भेटीस येणार आहे. रिंकूची...\nआर्ची येतेय पुन्हा भेटीला आगामी सिनेमातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल.\nपदार्पणातचं ब्लॉकबस्टर हिट सिनेमा सैराटमधून आपल्या भेटीस आलेली आणि सर्वांना जवळची झालेली आर्ची पुन्हा एकदा तिच्या...\nसैराट फेम रिंकू राजगुरु मोठ्या स्क्रीनवर परत\nसुपरहिट मराठी चित्रपट ‘सैराट’ चित्रपटात आरिचचे पात्र केलेली रिंगू राजगुरू तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे....\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/ranmewa?page=1", "date_download": "2019-03-25T08:55:53Z", "digest": "sha1:ZC7GS67FNXMRYWLW236ZPISAVBRGCH4E", "length": 8228, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगोचिडांची मौजमस्ती 900 17-06-2011\nसत्ते तुझ्या चवीने 865 17-06-2011\nकान पिळलेच नाही 885 17-06-2011\nसूडाग्नीच्या वाटेवर 908 17-06-2011\nप्राक्तन फ़िदाच झाले 1,011 18-06-2011\nअंगार चित्तवेधी 868 18-06-2011\nस्मशानात जागा हवी तेवढी 1,132 18-06-2011\nकसे अंकुरावे अता ते बियाणे\nतरी हुंदक्यांना गिळावे किती\nखाया उठली महागाई 1,296 18-06-2011\nविदर्भाचा उन्हाळा 954 18-06-2011\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,448 18-06-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच��या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/shetkarisanghatana?page=4", "date_download": "2019-03-25T08:47:11Z", "digest": "sha1:IWPCUWIZHP3PCYBQ3O7ZPRL64OMNYQDK", "length": 9160, "nlines": 115, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी संघटना | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / कृषिजगत / शेतकरी संघटना\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशेतकर्यांची प्रति विधानसभा 2,485 30-11-2011\nशेतकरी संघटक ६ डिसेंबर २०��१ 1,286 06-12-2011\nकापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली 1,906 27-11-2011\nशेतकरी संघटक २१ नोव्हेंबर २०११ 1,515 22-11-2011\nवायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन 1,770 20-11-2011\n१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक 2,380 14-11-2011\nराजू शेट्टींनी उस आंदोलनाचे नुकसान केले 1,424 16-11-2011\nकापूस उत्पादक परिषद नांदेड 1,011 15-11-2011\nकापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत 1,966 09-11-2011\nहिंगणघाट रेल्वेरोको 3,148 13-11-2011\nशेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको 2,766 15-11-2010\nशरद जोशीवर गुन्हा दाखल 888 12-11-2011\nशेतकरी संघटक ६ नोव्हेंबर २०११ 999 12-11-2011\nशेतकरी संघटना कार्यकारीणी 3,955 11-11-2011\nकापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 2,528 16-10-2011\nवैद्यनाथ साखर कारखाना - शेतकरी आक्रमक 1,210 22-10-2011\nशेतकरी संघटक २१ ऑक्टोबर २०११ 1,028 21-10-2011\nशेतकरी संघटना लोगो, बिल्ला 6,887 15-10-2011\nशेतकरी संघटक ६ ऑक्टोबर २०११ 2,788 07-10-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%AC", "date_download": "2019-03-25T07:37:11Z", "digest": "sha1:OABCB7HOUPZPOWCFB54Q2SOZBO7JLE7Q", "length": 5590, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २८६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २६० चे - २७० चे - २८० चे - २९० चे - ३०० चे\nवर्षे: २८३ - २८४ - २८५ - २८६ - २८७ - २८८ - २८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या २८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक म���हितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/shetkarisanghatana?page=5", "date_download": "2019-03-25T08:42:11Z", "digest": "sha1:XIWFZOOH34QTPRACIUNGUSEFU67I4PAI", "length": 8940, "nlines": 115, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी संघटना | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / कृषिजगत / शेतकरी संघटना\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nपुणे कृषिआयुक्त कार्यालयावर मोर्चा 1,720 20-09-2011\nशेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 1,196 21-09-2011\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी 964 18-09-2011\nशेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन 904 17-09-2011\nकर्जमुक्ती आंदोलन - फॉर्म्स 909 15-09-2011\nमहाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 4,843 14-09-2011\nशेतकरी संघ��क-६ सप्टेंबर २०११ 1,573 08-09-2011\nस्वामी रामदेव बाबा आणि शेतकरी संघटना बैठक 1,286 16-08-2011\nश्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार 1,075 29-08-2011\nशेतकरी संघटक २१ ऑगस्ट २०११ 1,179 21-08-2011\n२१ एप्रिल २०११ - अंक २ - वर्ष २८ 1,643 23-05-2011\nशेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 2,191 21-07-2011\nसंवाद - ईटीव्ही - शरद जोशी 1,335 11-07-2011\nप्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 2,697 01-06-2011\n२१ जून २०११ - अंक ६ - वर्ष २८ 984 22-06-2011\n६ जून २०११ - अंक ५ - वर्ष २८ 1,324 22-06-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/shetkarisanghatana?page=6", "date_download": "2019-03-25T08:39:14Z", "digest": "sha1:WBH6V2FB2YCK7YEMSRGOFKMM7NKOHIG6", "length": 7336, "nlines": 100, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी संघटना | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / कृषिजगत / शेतकरी संघटना\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घे��े आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nरामदेवबाबांना पाठींबा 1,297 08-06-2011\n२१ मे २०११ - अंक ४ - वर्ष २८ 952 07-06-2011\nशेतकरी प्रकाशन 4,248 23-05-2011\n६ एप्रिल २०११- अंक १ - वर्ष २८ 967 23-05-2011\n२१ मार्च २०११ - अंक २४ - वर्ष २७ 969 23-05-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2019-03-25T07:22:53Z", "digest": "sha1:QJQFEIKJC6PXXFMIBNMNH44VDKRCO6KC", "length": 6726, "nlines": 82, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "फक्त खोट्यालाच . . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nफक्त खोट्यालाच . . .\nवा. न. सरदेसाई November 1, 2018 अक्षरगणवृत्तात- सवलत घेतलेल्या, गझल\nगण : | लक्षणे : गालगागा गालगागा गालगागा\nगण : गालगागा गालगागा गालगागा\nफक्त खोट्यालाच झाला त्रास माझा\nअन् जगाने टाळला सहवास माझा \nवेळच्या वेळीच आम्ही प्रेम केले . .\nवाजणारा फोन हा हमखास माझा \nलाख श्रीमंती इथे मिळते , तरीही\nका विकू गरिबीतला उल्हास माझा \nमानतो स्वातंत्र्य मी माझे असे की ,\nना कुणी माझा धनी . . ना दास माझा .\nमी कुठे अमक्या ऋतूतच बहरणारा \nग्रीष्मही असतो कधी मधुमास माझा \nफू��� ह्यांनी फेकले . . जा , त्या ठिकाणी\nआजही मातीस येतो वास माझा \nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/gruhasthachya-anganat/", "date_download": "2019-03-25T07:46:07Z", "digest": "sha1:AQQC63W6WPLWVJBPVP4XDVVWMXAFOMUB", "length": 8109, "nlines": 66, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nगृहस्थाच्या अंगणात हवे तुळशीचे रोप\nपाय ठेविता पापाचा तिथे होई थरकाप\nतुळशी गं माझे आई तूच आमुची पुण्याई\nपूजा तुझी केल्याविण अन्न मुखी घालु नाही\nतुळशीच्या आसपास कोटी देवतांचा वास\nवारंवार नमस्कार, माझा तुळशी मातेस.\nसदाशिव जे रावकवी यांच्या 'चित्रसहकार' या निर्मिती संस्थेसाठी य.गो.जोशी यांच्या कथेवरील या चित्राने पंच��ीस चित्रपटगृहात प्रत्येकी पंचवीस आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्याच बरोबर संपूर्ण चित्र फक्त पस्तीस दिवसात मुहूर्तापासून सेन्सॉरपर्यंत पूर्ण करण्याचाही विक्रम आठवले यांनी केला. चित्रीकरणाचे अभ्यासपूर्ण संयोजन आणि तंत्रावरील प्रभुत्व या आठवले यांच्या गुणांमुळेच ते शक्य झाले.\nमातृसुखाला पारखा झालेला दीर आणि पुत्रखापासून वंचित राहिलेली वहिनी यांच्या निर्मळ प्रेमाची अत्यंत जिव्हाळ्याने चित्रित केलेली कौटुंबिक कलाकृती. या चित्रपटाने सुलोचना या अभिनेत्रीला ग्रामीण चित्रपटातून घरात, माजघरात, अगदी स्वयंपाकघरात आणले. सोज्वळता म्हणजे सुलोचना या समीकरणाची सुरवात या चित्राने झाली. दिग्दर्शन आणि गीतलेखन याखेरीज आठवल्यांनी या चित्रात एक सुलोचना यांच्या पतीची भूमिकाही केली होती. हे चित्र एका वेगळ्या अर्थानेही कौटुंबिक होते – यात आठवले यांचे संपूर्ण कुटुंब पडद्यावर दिसले होते. मुलगा सुदर्शन छोट्या भावाचा शाळेतील मित्र झाला होता. सुमतीबाई, मुली आणि एक मेव्हणी यांनी हळदीकुंकवाच्या प्रसंगात भाग घेतला होता. दादा म्हणजे आठवले आणि वहिनी म्हणजे सुलोचना यांच्या पडद्यावरील लग्नप्रसंगी सुमतीबाई नवऱ्याच्या लग्नाला नवऱ्यामुलीच्या मागे करवली म्हणून हजर राहिल्या आहेत.\nदो नयनांचे हितगुज झाले\nदेवा तुझी आठवण होते\nरडू नको रे चिमण्या बाळा\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख क��ून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/how-perfumes-are-made/", "date_download": "2019-03-25T07:38:30Z", "digest": "sha1:G3CR363XXR6ELKHNKBACK7IIYSLG4DPR", "length": 15645, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "परफ्युम कसे तयार केले जातात?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nपरफ्युम कसे तयार केले जातात\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nपरफ्युम म्हणजे आपल्या नट्टापट्टा करण्याच्या संचातील अविभाज्य भाग जसं हृदयाशिवाय शरीर अपूर्ण तसं परफ्युम शिवाय नटणं अपूर्ण असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परफ्युम तुमच्या नखशिखांत नटण्यावर हलकासा सुवासाचा साज चढवतं, जो गरजेचा आहे म्हणा आणि त्यामुळेच की काय जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हा परफ्युम मनुष्य शरीराची सोबत करतो आणि मनुष्य देखील त्याच्या सोबतीशिवाय सौंदर्याची कल्पना करू शकत नाही. सकाळी सकाळी अंघोळ करून बाहेर आलं की परफ्युम किंवा डिओडरण्ट वापरल्याशिवाय तयारी पूर्ण होत नाही आणि तोवर दिवसाची सुरुवात होत नाही. तर हे अतिमहत्त्वपूर्ण परफ्युम नेमके बनवले कसे जातात याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का जसं हृदयाशिवाय शरीर अपूर्ण तसं परफ्युम शिवाय नटणं अपूर्ण असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परफ्युम तुमच्या नखशिखांत नटण्यावर हलकासा सुवासाचा साज चढवतं, जो गरजेचा आहे म्हणा आणि त्यामुळेच की काय जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हा परफ्युम मनुष्य शरीराची सोबत करतो आणि मनुष्य देखील त्याच्या सोबतीशिवाय सौंदर्याची कल्पना करू शकत नाही. सकाळी सकाळी अंघोळ करून बाहेर आलं की परफ्युम किंवा डिओडरण्ट वापरल्याशिवाय तयारी पूर्ण होत नाही आणि तोवर दिवसाची सुरुवात होत नाही. तर हे अतिमहत्त्वपूर्ण परफ्युम नेमके बनवले कसे जातात याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का नाही ना चला तर मग आज जाणून घ्या.\nकोणतीही गोष्ट बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे कच्चा माल परफ्युम बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुवासिक पाने, फुले, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, सुवासिक वनस्पती अर्थात Herbs आणि प्राण्यांचे सुवासिक अवयव इत्यादी. हा कच्चा माल गोळा करून त्याचा साठा केला जातो. या कच्च्या मालापासून सुवास वे��ळा करण्याच्या विविध पद्धती आहेत. कच्च्या मालाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार आवश्यक ती पद्धत वापरली जाते.\nउर्ध्वपतनाने अर्क काढणे (Distillation)\nयात कच्चा माल एका भट्टीमध्ये (कंटेनर) टाकून त्याला उकळवलं जातं. उकळवण्यासाठी गरम वाफेचा उपयोग होतो. त्या उष्णतेने त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे बाष्प म्हणजे oil तयार होते. मग एका नळीवाटे हे बाष्प एका बंद भांडय़ात साठवून त्याला थंड करून त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर केले जाते. हा द्रव म्हणजेच सुगंधी तेल अर्थात concentrated oil \nद्रावकामध्ये विरघळणे म्हणजे (Mixing)\nपेट्रोलियमजन्य द्रावक किंवा बेंझिन असलेल्या मोठया फिरत्या भांडयात कच्चा माल टाकून तो घुसळला जातो. तो कच्चा माल त्या द्रावकात विरघळला की, एक मेणासारखा पदार्थ मागे उरतो. त्यात इथिल अल्कोहोल मिसळवले जाते व पुन्हा हे मिश्रण गरम केले जाते. त्या उष्णतेने मिश्रणातील अल्कोहोल उडून जाऊन मागे उरते सुगंधी तेल.\nदाब देणं म्हणजे (Pressing)\nया प्रकारात कच्च्या मालावर दाब देऊन त्यातून सुगंधी तेल काढलं जातं. अशा विविध पद्धतीने मिळालेली सुगंधी तेलं ठरावीक मापात घेऊन, त्यांच्या सुगंधाची जातकुळी ओळखून, ती एकत्रित केली जातात. मग ही एकत्रित केलेली सुगंधी तेलं मुरवण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी काही महिने वा वर्षे इतका कालावधी लागू शकतो. या सुगंधी तेलांमध्ये पुढे अल्कोहोल मिश्रित केला जातो. त्यामुळे त्याची घनता कमी होते. अल्कोहोल मिश्रित या परफ्युममधल्या सुगंधी तेलाच्या प्रमाणानुसार त्याचे खालील वेगवेगळे प्रकार पडतात. वापरासाठी तयार होणारं ‘Finished Good परफ्युम हे तीन थरांचं असतं. त्या प्रत्येक थराला ‘नोट’ असं म्हणतात.\nटॉप नोट- परफ्युम फवारताच जो गंध दरवळतो, तो सेंट्रल वा हार्ट नोट- परफ्युम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो, तो सेंट्रल वा हार्ट नोट- परफ्युम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो, तो बेस नोट- परफ्युम फवारल्यानंतर बराच काळ दरवळणारा गंध असतो, तो\nबऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येत असेल की परफ्युम आणि डिओडरण्ट मध्ये फरक काय\nपरफ्युम आणि डिओडरण्टमधला नेमका फरक म्हणजे परफ्युम हा फक्त सुगंध देणारा आहे. परफ्युममध्ये घामाचा स्त्राव रोखण्यासाठी आवश्यक असलेले काही गुणधर्म नसतात. शरीराला सुवास देणं इतकंच त्याचं कार्य तर शरीरातील घामाचा स्त्राव रोखण्यासाठी डिओडरण्ट काम करते. घामामध्ये असलेल्या जीवाणूंमुळे घामाला एक दुर्गंधी येते. त्या घामाचा स्त्राव रोखून त्या दरुगधापासून मुक्ती मिळवून देण्याचं काम डिओडरण्ट करतात. त्यामुळे जिथे घाम येतो तिथे शरीरावर डिओडरण्ट फवारले जातात. बरेच डिओ हे सुगंधरहितसुद्धा असतात. त्यांचं काम घामाचा स्त्राव रोखणं इतकंच असतं.\n एवढासा परफ्युम पण तो बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते.. म्हणूनच परफ्युम इतके महाग असावेत\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३\nझायराची माफी – हे कट्टरवादाचं अस्तित्व नाकारणाऱ्या सर्वांचं पाप आहे →\nजाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nकेरळसाठी धावून आलेल्या मानवतेची १२ उदाहरणं तुम्हाला लढण्याची उमेद देतील\nगाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे \nदहशतवाद्यांशी लढत, वयाच्या २२व्या वर्षी बलिदान देऊन ३६० लोकांचे प्राण वाचवणारी शूर भारतीय\nआपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय\nसमुद्रावर राज्य करणारी तरंगती स्वप्ननगरी : ‘हार्मनी ऑफ द सीज’\nकाँग्रेसचा आमदार : ‘मत देणाऱ्यांचाच विकास करू, धोका देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू’\nगांधी प्रेम ते गांधी द्वेष – ते – गांधी प्रेम : दुटप्पी प्रचारकांचं पाप\nराग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो\nबाबा सिद्दिकी ह्या बांद्र्याच्या “व्हाईट कॉलर गुंडाची” पडद्यामागे लपवली गेलेली सत्यकथा\nप्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा”\n“गेम ऑफ थ्रोन्स” : हा राजगादीचा खेळ एवढा लोकप्रिय का झालाय\nफेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरून व्हिडीओज डाऊनलोड करायचे आहेत\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nचीनच्या दक्षिणेस असणाऱ्या समुद्रावर नेमका हक्क कुणाचा\nमोदींना “पर्याय नाही” म्हणून ते २०१९ जिंकतील – हे कितपत सत्य आहे\nअमेरिकेच्या हेरगिरीवर मात करत जगातल्या सर्व देशांना भारताने ‘अशी’ जरब बसवली होती..\nकॉमर्स/आर्टसच्या तरुणांसाठी खास असलेल्या अज्ञात करिअरच्या संधी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/lakh-lakh-chanderi/", "date_download": "2019-03-25T07:43:15Z", "digest": "sha1:HZPCK6TQENLLO7PGWILLOPHWNOBSHBWM", "length": 7925, "nlines": 70, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nझळाळती कोटी ज्योती या – हां – हां हां.\nचला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून\nआकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण\nनाचती चंद्र तारे वाजती पैंजण\nछुन छुन झुम झुम, हां हां.\nझोत रुपेरी भूमिवरी, गगनात\nधवळली सारी सृष्टी, नाचत डोलत\nकणकण उजळीत, हासत हसवीत\nकरी शिणगार, हां हां.\nआनंदून रंगून, विसरुनि देहभान\nमोहरली सारी काया हरपली मोहमाया\nकुडी चुडी पाजळून प्राणज्योती मेळवून\nएक होऊ या, हां हां.\nहिंदु मुसलमान ऐक्य या संवेदनशील विषयावरील 'शेजारी' या चित्रपटाच्या प्रत्येक गीतासाठी व्ही शांताराम यांनी अतिशय परिणामकारक प्रसंगांची निवड केली होती. \"शब्दात जेवढे लालित्य, चित्रमयता आणि वैविध्य आणता येईल तेवढे आणा\" अशी सूचना त्यांनी आठवल्यांना केली होती. मास्टर कृष्णराव यांच्याकडून आगळ्या वेगळ्या चाली काढून घेतल्या होत्या आणि बहारदार पार्श्वसंगीताची योजना केली होती. नायक नायिकांचे प्रेमप्रसंग खुलवणारी 'हासत वसंत ये वनी', राधिका चतुर बोले', अशी गोड प्रेमगीते आठवल्यांनी लिहिली. त्यात 'अलबेला; यासारखे अनवट शब्द वापरून ती खुलवली. 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' हे मशालींचे नृत्यगीत तर अजरामर आहे. आजही, सत्तर वर्षांनंतर ते अनेक कार्यक्रमात सादर होते आणि नव्या गाण्यांहून जास्त गाजते. धरण फुटून प्रलय होतो. गाव वाहून जाते असे दृश्य खरे वाटावे म्हणून ही शांताराम यांनी खास प्रल्हाददत्त नावाचा स्पेशल इफेक्ट्सचा तज्ञ आणला होता. त्या प्रसंगानंतरचे 'सारे प्रवासी घडीचे' हे समूहगीत त्यातल्या अर्थपूर्ण शब्दांनी चित्रपटाचा शेवट वेगळ्याच उंचीवर नेऊ�� ठेवते.\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nहासत वसंत ये वनी अलबेला\nराधिका चतुर बोले, तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा\nजिवाचं मैतर तुम्ही माज्या\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%B8", "date_download": "2019-03-25T07:29:34Z", "digest": "sha1:7JA5NJ3WQU5L66GUPKQJ7PVYFGBSYEKA", "length": 6474, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्युसाफलस - विकिपीडिया", "raw_content": "\nब्युसाफलस अलेक्झांडर द ग्रेटचा घोडा होता.\nआख्यायिकेनुसार हा घोडा संपूर्ण काळ्या रंगाचा असून त्याच्या कपाळावर पांढरा ठिपका असल्याने तो सुलक्षणी गणला जात असे. तो फिलिपकडे विकावयास आणला असता अचानक उधळला आणि कोणाच्याही ताब्यात येईना. त्यामुळे फिलिपने त्याला विकत घ्यायचा विचार रहित करण्याचे ठरवले.\nत्या घोड्याचे वागणे बारकाईने निरखणाऱ्या अवघ्या दहा वर्षांच्या अलेक्झांडरने तो घोडा आपण काबूत करू असा विश्वास आपल्या वडिलांना दिला आणि थोड्यावेळातच त्या घोड्याला काबूत आणले. उन्हात उभा असलेला हा घोडा आपली सावली पाहून बिथरत असल्याचे अलेक्झांडरच्या लक्षात आल्याने त्याने ब्युसाफलसला सावलीत नेऊन शांत केल्याचे सांगितले जाते. त्याच्या या धाडसावर खूश होऊन फिलिपने त्याला हा घोडा भेट दिला. \"पुत्रा, तुझ्या पराक्रमाला साजेसे राज्य तुला शोधावे ल��गेल, कारण माझे मॅसेडोनिया तुझ्यासाठी फार लहान आहे.\" हे ग्रीक इतिहासातील प्रसिद्ध वाक्य फिलिपने या ठिकाणी उद्धृत केल्याचे प्लूटार्कच्या इतिहासाप्रमाणे सांगितले जाते.\nपुढे अनेक लढायांत अलेक्झांडरने या घोड्यावरूनच स्वारी केली.\nपुरू राजाशी झालेल्या भारतातील लढाईत हा घोडा जबर जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ झेलम नदीच्या काठावर अलेक्झांडरने ब्युसाफलस नावाचे शहर उभारल्याचे सांगितले जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A5%82/", "date_download": "2019-03-25T08:25:54Z", "digest": "sha1:6ED3M34MY6YYD3YVWHYYX3BUOQKANBGG", "length": 8704, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्मला ढोले यांना शरद भूषण पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनिर्मला ढोले यांना शरद भूषण पुरस्कार\nमाळशिरस- पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील अंगणवाडी सेविका निर्मला विलास ढोले यांना शरद भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्मला ढोले यांनी अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम राबविले आहेत. बोलक्या चित्रांच्या माध्यमातून त्या मुलांना शिक्षण देतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री भुलेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरसचे उपसरपंच माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, दत्तात्रय डोंबाळे, सारिका यादव, अनिसा शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-walase-car-tempo-accident-two-death/", "date_download": "2019-03-25T08:30:27Z", "digest": "sha1:PXZKAUTVBSO4RBIEZPBVF4RB3J34LC35", "length": 4209, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : कार-टेंपोच्या अपघातामध्ये दोघे ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : कार-टेंपोच्या अपघातामध्ये दोघे ठार\nसातारा : कार-टेंपोच्या अपघातामध्ये दोघे ठार\nवळसे, ता. सातारा अजिंक्यतारा सूतगिरणीसमोर कार व टेंपो अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोघे ठार, तर तीनजण जखमी झाले आहेत.\nपुण्याहून कार (क्र. एमएच १४ पीएक्स ८६५) कराडकडे चालली असताना पहाटे ५.३० वाजता वळसे हद्दीत आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी डिव्हायडर तोडून पलिकडील लेनवर जाऊन आयशर टेंपोवर (क्र. एमएच ११ एएल ६४०३) आदळल्याने टेंपोही सर्व्हीस रस्त्यावर जावून कोसळला. कार टेंपोवर आदळल्याने कारमधील अतुल अशोक जाधव (वय ३०) व मंदाकिनी अशोक जाधव (वय ५५) या मायलेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nसातारा : कार-टेंपोच्या अपघातामध्ये दोघे ठार\nसातारा : खटावमध्ये भीषण अपघातात आठजण जखमी (व्हिडिओ)\nखंडाळा : पं.स. बैठकीत सदस्य-सभापतींमध्ये जोरदार खडाजंगी (व्हिडिओ)\nकराड : धोकादायक गतीरोधक हटवले (व्हिडिओ)\nसैनिकांच्या साताऱ्यात भरतीस प्रारंभ(व्हिडिओ)\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/senior-actor-tom-alter-passed-away/", "date_download": "2019-03-25T08:04:41Z", "digest": "sha1:6JU7OBQUMBDSSUQUWOWHCN3OQBH3XDW5", "length": 5815, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nअभिनेते टॉम अल्टर यांचे निधन\nवेब टीम :हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी अंगदुखीच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.\nटॉम अल्टर यांनी वीर-झारा, भेजा फ्राय, विरुद्ध, अलग, बोस, यासारख्या तीनशेहून अधिक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातह�� अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं.\n80 च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले होते. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं. कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुण्यात चार कोटींची रक्कम घेवून एटीएम व्हॅनचा चालक फरार\nआदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/updated-aniket-kothale-murder-5-cops-including-psi-yuvraj-kamte-suspended-for-police-forc/", "date_download": "2019-03-25T08:02:51Z", "digest": "sha1:PAZQ45IZHKDN6HC5ZDSL2BLLA5F2HLHB", "length": 5720, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोथळे प्रकरणी नांगरे पाटलांची धडक कारवाई ; पोलिस उपनिरीक्षकासह अन्य पाच पोलीस बडतर्फ", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nकोथळे प्रकरणी नांगरे पाटलांची धडक कारवाई ; पोलिस उपनिरीक्षकासह अन्य पाच पोलीस बडतर्फ\nटीम महाराष्ट्र देशा – सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीत अनिकेत कोथळेचा मृत्यू आणि प्रकरण दडपून टाकण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी, निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह आणखी पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.\nकोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईचा अहवाल राज्याचे पोलिस महासंचालक यांनाही सादर करण्यात आला आहे.\nपीएसआय युवराज कामटेसह हवालदार अ��िल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावं आहेत. लाड, टोणे, शिंगटे आणि मुल्ला यांना बडतर्फ करण्याचे अधिकार जिल्हा पोलिस प्रमुखांना असल्याने नांगरे-पाटील यांनी पोलिसप्रमुख शिंदे यांना बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तर पोलिस उपनिरीशक युवराज कामटेच्या बडतर्फीचे आदेश स्वतः काढले.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nसरसकट कर्जमाफी नको हा ठाकरे आणि पवारांचाच सल्ला ; सुभाष देशमुखांचा गौप्यस्फोट\nअब्दुल सत्तारांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता कमीच :- रावसाहेब दानवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nashik-north-maharashtra-news/nashik/malegaon-married-rape-on-marriage/articleshow/63206430.cms", "date_download": "2019-03-25T08:53:00Z", "digest": "sha1:KKPPAPLFEUKPA2EG7NK3ZWBKAGSANCNX", "length": 10683, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: मालेगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार - malegaon married rape on marriage | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nमालेगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार\nखंडणीसाठी पैसे न दिल्याने तरुणास मारहाण करून त्याच्यासोबत असलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना खड्डाजीन येथील नवीन बसस्थानकाजवळील बोरीचा मळा येथे घडली आहे.\nमालेगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार\nम. टा. वृत्तसेवा, मालेगाव\nखंडणीसाठी पैसे न दिल्याने तरुणास मारहाण करून त्याच्यासोबत असलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना खड्डाजीन येथील नवीन बसस्थानकाजवळील बोरीचा मळा येथे घडली आहे. याप्रकरणी ४ आरोपींविरुद्ध मालेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.\nमाजीद कुरेशी इकबाल कुरेशी (वय २२) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सोहेल, सलमान, असिफ या उर्वरित संशियतांचा शोध घेतला जात आहे. शहरातील गोल्डननगर भागातील १९ वर्षीय विवाहिता तिच्या बहिणीच्या पतीसोबत दुचाकीवर बसून मंगळवारी (दि. ६) दुपारी उपचारासाठी रुग्णालयात जात होती. याचवेळी खड्डाजीन भागात चार तरुणांनी दुचाकी अडवून दुचाकीस्वार तरुणाकडे २० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्याने नकार दिल्याने चौघांनीही तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच विवाहितेला रमझानपुरा भागातील बोरचा मळा येथे जबरदस्तीने नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर संशयितांनी तरुणाची दुचाकी व मोबाइल फोन हिसकावून पळ काढला.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nमतदान न केल्यास ३५० रुपये वजा होणार नाहीत\nवाहनांवरील 'दादा', भाऊ अन् आप्पा होणार हद्दपार\nसहा महिन्याच्या बाळाने विक्सची डबी गिळली\nज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते व शिक्षणतज्ञ अरुण ठाकूर यांचे नि...\nबहात्तरपैकी वीस सराईत बनलेत रिक्षाचालक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमालेगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार...\nनाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार...\nशेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च सुरू...\nकिसान सभेचा नाशिकहून लाँग मार्च...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2019-03-25T08:05:24Z", "digest": "sha1:UNWFXO4XX4OM54J73JLPOVRVYWTZSUNM", "length": 25988, "nlines": 413, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१२ - विकिपीडिया", "raw_content": "\n< विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन\nसर्वसाध��रण माहिती. (संपादन · बदल)\nमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\nकौल कसा घ्यावा चर्चा\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमुखपृष्ठ सदर लेख विभाग (संपादन)\nविषय वर्गानूसार निवड झालेले लेख\nनिवड झालेले लेख २००९\nनिवड झालेले लेख २००८\nनिवड झालेले लेख २००७\nनिवड झालेले लेख २००६\nनिवड झालेले लेख २००५\nनिवड झालेले लेख २००४\nनिवड न झालेले लेख\nउदयोन्मुख लेख विभाग (संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष\nनिवड झालेले लेख २०१०\nनिवड झालेले लेख २०११\nनिवड झालेले लेख २०१२\nनिवड झालेले लेख २०१३\nनिवड झालेले लेख २०१४\nनिवड झालेले लेख २०१५\nनिवड न झालेले लेख\nदालन:विशेष लेखनचा दालन:विशेष लेखन/सद्य हा विभाग अद्ययावत करण्यात साहाय्य हवे.\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nप्रचालक कौल विभाग' (संपादन)\nप्रचालक पदांकरिताचे चालू प्रस्ताव कौल\nप्रचालक पदांकरिताचे अनिर्वाचित प्रस्ताव\nWikipedia:प्रतिपालकांनी नियूक्त केलेले प्रबंधक\nWikipedia:सध्या कार्यशील नसलेले प्रबंधक\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nस्वागत आणि साहाय्य चमू\nविकिपीडिया मार्गदर्शकांशी संपर्क करा\nअनुभवी सदस्य (विकिपीडिया जाणते)\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nmarathiwikipedians गूगल एसएमएस चॅनल\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nहे पान मराठी विकिपीडियावर एखाद्या लेखाची २०१२ साली उदयोन्मुख लेख म्हणून निवड झालेली असल्यास वापरावे. एखाद्या लेखाचे उदयोन्मुख लेखांसाठीच्या पात्रता निकषांनुसार नामनिर्देशन करण्यासाठी उदयोन्मुख लेख हे पान वापरावे.\n१ निवड झालेले लेख\n१.१ १ जानेवारी, इ.स. २०१२\n१.२ फेब्रुवारी १, इ.स. २०१२\n१.३ मार्च १, इ.स. २०१२\n१.४ १३ नोव्हेंबर, २०१० >> ३ जून, इ.स. २०१२\n१.५ २०११ >> १० जून, इ.स. २०१२\n१.६ २०१२ >> १७ जून, इ.स. २०१२ >> २४ जून, इ.स. २०१२\n१.७ २४ जून, इ.स. २०१२ >> ८ जुलै, इ.स. २०१२\n१.८ १ जुलै, इ.स. २०१२ >> २२ जुलै, इ.स. २०१२\n१.९ ५ ऑगस्ट, इ.स. २०१२\n१.१० १९ ऑगस्ट, इ.स. २०१२ >> २० ऑगस्ट, इ.स. २०१२\n१ जानेवारी, इ.स. २०१२[संपादन]\nफेब्रुवारी १, इ.स. २०१२[संपादन]\nपाठिंबा- जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुका फेब्रुवारीत आहेत. - मनोज\nविरोध- टिप्पणी येथे लिहा.. - आपले सदस्यनाव येथे लिहा\nमार्च १, इ.स. २०१२[संपादन]\nपाठिंबा - अभय नातू\nपाठिंबा - मंदार कुलकर्णी\n१३ नोव्हेंबर, २०१० >> ३ जून, इ.स. २०१२[संपादन]\nपाठिंबा- पाठिंबा. - Sankalpdravid\nविरोध- टिप्पणी येथे लिहा.. - आपले सदस्यनाव येथे लिहा\n२०११ >> १० जून, इ.स. २०१२[संपादन]\nपाठिंबा- पाठिंबा. - अभय नातू\nपाठिंबा- पाठिंबा. - Mvkulkarni23\n२०१२ >> १७ जून, इ.स. २०१२ >> २४ जून, इ.स. २०१२[संपादन]\n२४ जून, इ.स. २०१२ >> ८ जुलै, इ.स. २०१२[संपादन]\n१ जुलै, इ.स. २०१२ >> २२ जुलै, इ.स. २०१२[संपादन]\nगॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्स\n५ ऑगस्ट, इ.स. २०१२[संपादन]\nपाठिंबा - अभय नातू\n१९ ऑगस्ट, इ.स. २०१२ >> २० ऑगस्ट, इ.स. २०१२[संपादन]\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१२ रोजी ०९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/501", "date_download": "2019-03-25T08:49:31Z", "digest": "sha1:DNV2U27VKWPP7XFRVYPRNCQ77637X7FR", "length": 10416, "nlines": 131, "source_domain": "gangadharmute.com", "title": " बोल बैला बोल : नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n���) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nबोल बैला बोल : नागपुरी तडका\nमुखपृष्ठ / बोल बैला बोल : नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 18/09/2013 - 09:34 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबोल बैला बोल : नागपुरी तडका\nबोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे\nबांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...\nनांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले\nकोणी तरी आला का रे हाल पुसायाले\nज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य\nआहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य\nफ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....\nथंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस\nवादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस\nतेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई\nतरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई\nलुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...\nइच्छाधारी गायवासरे राजबिंडे नवी\nखुर्चीसाठी त्यांना तुझी हाडंकुडं हवी\nतुझे कष्ट त्यांचे लेखी भिक्षापात्रतेचे\nऐद्यांना देणार 'अभय' अन्न सुरक्षेचे\nजागा हो बैलोबा तू जागलंच पाह्यजे...\n- गंगाधर मुटे 'अभय'\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-yawatmal-akhil-bharatiy-sahitya-samelan-starts-4113", "date_download": "2019-03-25T08:02:36Z", "digest": "sha1:XHZLEWPF77QUON5QYTS2M2JTBRXBK3DS", "length": 6767, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news yawatmal akhil bharatiy sahitya samelan starts | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात\nयवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात\nयवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात\nयवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nयवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झालीय. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष मदन येरावार, संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे, मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उद्घाटक वैशाली येडे आदी मान्यवर उपस्थित संमेलनस्थळी उपस्थित आहेत.\nयवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झालीय. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष मदन येरावार, संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे, मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उद्घाटक वैशाली येडे आदी मान्यवर उपस्थित संमे��नस्थळी उपस्थित आहेत.\nसंमेलनात कविकट्टा, चर्चासत्र, परिसंवाद, वऱ्हाडी कविता, टॉक शो, काव्यवाचन, असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतील. साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. यात ग्रंथांच्या पालखीसह विविध संतदर्शन देखावे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर यांच्या जीवनदर्शनावरील देखावे, लेंगी नृत्य, गोंडी नृत्य, कोलामी नृत्य, अशा लोकसंस्कृतीवर समूहाचे सादरीकरण झालं.\nतब्बल 45 वर्षांनंतर यवतमाळात होणारे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी 300 स्वयंसेवकांचे हात राबत आहेत. सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय आणि प्रतिसाद फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांचा यात समावेश आहे. पाहुण्यांची विनम्रपणे मदत, शिस्तपालन, गैरसोय होणार नाही, याची काळजी स्वयंसेवक घेणार आहेत.\nभारत साहित्य literature अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन marathi sahitya sammelan यवतमाळ विनोद तावडे पु. ल. देशपांडे महात्मा फुले\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.world-starter.com/mr/", "date_download": "2019-03-25T08:11:34Z", "digest": "sha1:FJRCSYPRB224LCLPBY6CYGT2QJXZMA3G", "length": 4464, "nlines": 172, "source_domain": "www.world-starter.com", "title": "स्टार्टर मोटर, ऑटो स्टार्टर, आल्टरनेटरचे भाग, स्टार्टर भाग, KB स्टार्टर - बोया", "raw_content": "\nव्यावसायिक रोटर उत्पादन ओळ उत्पादन क्षमता सुधारते आणि उत्पादन गुणवत्ता खात्री.\nव्यावसायिक उत्पादन उपकरणे उत्पादन गुणवत्ता आणि उत्पादकता सुनिश्चित करते.\nआमच्या कंपनी 100 कारखान्याच्या उत्पादने% पात्र आहेत याची खात्री करण्यासाठी चाचणी उपकरणे प्रगत आहे.\nDeutz इंजिन 1013 24v स्टार्टर 01180999 बॉश यष्टीचीत ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: No.26 Shuangjian पूर्व रोड, Luquan जिल्हा, शिजीयाझुआंग शहर, हेबेई चीन\n© कॉपीराईट - 2003-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/what-are-generic-medicines-and-why-are-these-available-at-low-prices/", "date_download": "2019-03-25T07:40:19Z", "digest": "sha1:4E2OPOJAXZZTVGSJEO4VXGGYZ76734JC", "length": 19972, "nlines": 146, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जेनेरिक औ��धे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार,\nडॉक्टर्स जर रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यायला लागले तर विकसित देशांमध्ये आरोग्य खर्च ७०% ने आणि विकसनशील देशांमध्ये त्याहूनही कमी होऊ शकतो.\nजेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या तुलनेत १० ते १२ टक्केच विकली जातात. जेनेरिक औषधांमुळे मिळणारा कमी नफा आणि कमिशन यांमुळे औषध कंपन्या, मेडिकल स्टोर आणि डॉक्टर यांपैकी कोणालाच जेनेरिक औषधांची मागणी वाढावी असे वाटत नाही.\nआज बाजारात जवळपास सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी असून गरीब माणूस देखील सहज ही औषधे विकत घेऊ शकतो.\nजेनेरिक औषधे कशाला म्हणतात\nजेनेरिक औषधांना ‘इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन’ देखील म्हटले जाते, ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधांसारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘एसेंशियल ड्रग’लिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात.\nज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.\nएखाद्या आजाराच्या उपचारासाठी रिसर्च आणि स्टडी केल्यानंतर एक रसायन (साल्ट) बनवले जाते. जे सहजरीत्या उपलब्ध करण्यासाठी त्यांना औषधांचे रूप दिले जाते. ह्या औषधांना प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या नावाने विकते. काही कंपन्या महाग किंमतीत विकतात तर काही कंपन्या स्वस्त दरात विकतात.\nजेनेरिक औषधे स्वस्त का असतात\nब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. पण या कंपन्या जेनेरिक औषधांची किंमत कशीही ठरवू शकत नाही. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते.\nतुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्याच साल्ट मधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात. महाग औषधे आणि त्याच साल्ट मधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी पाच ते दहा पट अंतर असते. काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये ९०% फरक असतो.\nजेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते. हे देखील कारण आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा होते त्या कारणाने सुद्धा किंमत कमी होते.\nसर्वात मोठे कारण हे आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या या औषधांची जाहिरात करत नाहीत. त्यामुळे ह्या औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात.\nआंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात.\nया आजारांची जेनेरिक औषधे स्वस्त असतात-\nकाहीवेळा डॉक्टर फक्त साल्टचे नाव लिहून देतात, तर कधी कधी फक्त ब्रँडेड औषधांचे नाव लिहून देतात. काही खास आजार आहेत ज्यांची जेनेरिक औषधे उपलब्ध असतात परंतु त्याच साल्टची ब्रँडेड औषधे महाग असतात.\nजसे – न्युरोलोजी, युरीन, हार्ट डिजीस, किडनी, डायबिटीज, बर्न प्रोब्लेम, या आजारांच्या जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमध्ये खूप जास्त अंतर दिसून येते. एकाच स्लाटच्या दोन औषधांच्या किंमतीमधील मोठा फरकच जेनेरिक औषधांचा पुरावा आहे.\nजेनेरिक औषधे कशी प्राप्त करू शकता\nजेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोर्सवर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा. तसेच ही औषधे Healthkart Plus आणि Pharma Jan Samadhan यांसारख्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही सहज स्वस्तात मिळवू शकता.\nजेनेरिक औषधे न मिळण्यामागची मुख्य समस्या\nडॉक्टर्सने जेनेरिक औषधे लिहून दिली असतील तरी सुद्धा मेडिकल स्टोर्स रुग्णाला दुसऱ्या महागड्या कंपनीची औषधे देतात. ही चलाखी करताना ते रुग्णाला हे कारण सांगतात की त्यांच्याकडे लिहून दिलेली औषधे नाही आहेत.\nहे सर्व करून त्यांना केवळ फायदा मिळवायचा असतो. कित्येकवेळा डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतात आणि ती मेडिकल स्टोर्स मध्ये मिळतात सुद्धा, परंतु त्या औषधांमध्ये कंपोजिशन आणि साल्ट त्या प्रमाणात नसते ज्या प्रमाणात ते असायला पाहिजे, त्यामुळे रुग्णाला त्य�� औषधांचा पूर्णपणे लाभ मिळत नाही.\nयासाठी सरकारने कायदा करून त्याचा सक्तीने पालन करण्यास डॉक्टरांना सांगितले पाहिजे म्हणजे डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतील आणि मेडिकल स्टोर्सवाले काही कारण न सांगता ती औषधे लोकांना सहज उपलब्ध करून देतील.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← देव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६\nकोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय →\nगुगलवर या काही गोष्टी सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते \nआयुर्वेदिक म्हणजे काय रे भाऊ \nएकाच वेळी अनेक औषधं घेणं धोकादायक असू शकतं का वाचा तज्ञ काय म्हणताहेत\n6 thoughts on “जेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य\nया महत्त्वाच्या आणि सुंदर लेखाबद्दल धन्यवाद आणि\nमी फेसबुकचा पहील्यांदा च वापर करीत आहे म्हणून काही चूक असल्यास क्षमस्व gn\nसुंदर माहिती आहे लोकांनी जेनारिक औषधी वापराव्यात\nखुपच चांगली माहिती आहे. या जनेरीक औषधी मेडिकल वर ठेवणे व डॉक्टर नी लिहुन देणे सक्तीचे करावे\n“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर\nदेशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…\nजेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण\nएकेकाळी आपल्या खेळाने मैदान गाजवणाऱ्या जयसूर्याला आता आधार घेऊन चालावं लागत आहे\nसेक्स : अध्यात्मिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठण्याचा प्राचीन मार्ग\nया राजाने तहाची मागणी धुडकावून लावत अवघ्या ४ तासात मुघल सैन्याची दाणादाण उडवली होती\nमोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती\nया लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nअवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी\nस्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री\nलैंगिक आकर्षणाचे हे १० प्रकार तुम्हाला माहित असायलाच हवेत…\nपेनाच्या टोपणाला छिद्र का असतं\nदुबईच्या आकाशात उडणार फ्लाईंग टॅक्सी\nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nतुम्ही बाहुबली-२ चा २५ वा ट्रेलर पाहत आहात विश्वास बसत नाही\nमधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक\nह्या देशात १९९३ सालापासून नागरिकांना पाणी, गॅस आणि वीज अगदी मोफत दिले जाते\nविश्वंभर चौधरी सांगताहेत “लवासा” चा विशेष नियोजन प्राधिकरण हा दर्जा काढण्याचं महत्व\nविमानातील विष्ठा नेमकी जाते कुठे\nअजित धोवालांच्या मुलाचा कारवान मॅगझीन आणि जयराम रमेश यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/baroda-dynamite-conspiracy-1196651/", "date_download": "2019-03-25T08:30:44Z", "digest": "sha1:TXDF5LJJXNPBH6SAKTPZVJ5IXLN277QZ", "length": 133550, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बडोदा डायनामाइट कट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nदिवाळी अंक २०१५ »\nजगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा गौरव केला जातो.\nआणीबाणीच्या कालखंडात जॉर्ज फर्नाडिस यांच्या पुढाकाराने घडलेले ‘बडोदा डायनामाइट कट’ प्रकरण प्रचंड गाजले. त्यातील दोन आरोपी जी. जी. पारीख आणि बच्चूभाई शहा यांच्याशी थेट बातचीत करून तयार केलेला वृत्तान्त..\nजगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा गौरव केला जातो. साधारण आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेल्या आशियातील अन्य शेजारी देशांत आज लोकशाहीची जी अवस्था आहे ती पाहता भारतातील परिस्थिती आलबेल नसली तरी निश्चितच चांगली आहे. पाकिस्तान या शेजारी देशात त्याच्या स्वातंत्र्यानंतर साधारण अर्धा काळ लष्करी हुकूमशाही होती. भारताने त्या दिशेची वाटचाल अगदीच अनुभवली नाही असेही नाही. भारतात १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पावले त्याच दिशेने पडत होती. ‘इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा’ अशीच तेव्हा परिस्थिती होती. त्यास विरोध करताना दुसरा स्वातंत्र्यलढा असल्यासारखी एकजूट जनतेने दाखवली. हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी तुरुंगवास पत्करला. जॉर्ज फर्नाडिस तसेच अन्य राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधींच्या या दमनशाहीविरुद्ध उभे ठाकण्याचे अन्य मार्ग बंद झाल्याने ‘जनतेला बंडाचा अधिकार आहे’ हा विचार शिरोधार्य मानून केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी देशभरात मुंबईसह अन्य ठिकाणी काही स्फोटही घडवून आणले. बडोदा डायनामाइट कट म्हणून हे प्रकरण देशभर गाजले.\nदेशातील जुन्या पिढीने लोकशाही टिकवण्यासाठी खाल्लेल्या त्यावेळच्या खस्तांची आजच्या नव्या पिढीला अभावानेच माहिती असेल. ज्या पिढीने हा प्रत्यक्ष हा काळ अनुभवला त्यांच्या स्मृतीही आता धूसर होऊ लागल्या आहेत. आणीबाणीविरोधात आवाज उठविण्यासाठी योजलेल्या बडोदा डायनामाइट कटात प्रत्यक्ष सहभाग असलेले समाजवादी नेते बच्चुभाई शहा आणि डॉ. जी. जी. पारीख यांच्याशी या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. या कटातील एक प्रमुख आरोपी सी. जी. के. रेड्डी यांनी लिहिलेले ‘बडोदा डायनामाइट कॉन्स्पिरसी- द राइट टू रिबेल’ या आज दुर्मीळ झालेल्या पुस्तकाचा अनुवादही हाती लागला. त्याआधारे हा धगधगता कालखंड पुन्हा जिवंत करण्याचा हा प्रयत्न..\nडॉ. जी. जी. पारीख यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये आजच्या राजकीय परिस्थितीवरही बोलणे झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची ज्या तऱ्हेने वाटचाल सुरू आहे त्यावरून देशात पुन्हा एकदा आणीबाणी येण्याची शक्यता आहे का, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या या शक्यतेचा विचार करणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठल्यासारखे होईल. देशात आता पुन्हा आणीबाणी येण्याची शक्यता कमी आहे. कारण याआधीच्या आणीबाणीत जनतेने आणि प्रसारमाध्यमांनी योग्य तो धडा घेतलेला आहे. पण सध्याची स्थिती त्या दिशेने जाणारी आहे, हे खरं. मोदी सरकार विरोधकांना अडचणीत आणण्याबरोबरच लोकशाही आणि घटनात्मक संस्थांचा ढाचा खिळखिळा करू पाहते आहे. ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.\nजॉर्ज फर्नाडिस, जी. जी. पारीख, बच्चूभाई शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बडोदा डायनामाइट कट अमलात आणताना नागरिकांचा दमनकारी राजवटीविरुद्ध बंडाचा अधिकार प्रमाण मानला होता. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला यंदा ४० वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा काल���ंड तमोयुग म्हणून ओळखला जातो.\n१९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर ताश्कंद कराराच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे अकाली निधन झाले आणि इंदिरा गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. प्रारंभी ‘गुंगी गुडिया’ म्हणून जरी त्यांची संभावना झाली असली तरी पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली १९७१ साली बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील त्यांच्या दुर्गावताराने एक कणखर नेत्या म्हणून त्या प्रस्थापित झाल्या. स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावल्याने मार्च १९७१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिराजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला दोन-तृतीयांश बहुमत मिळून त्यांचे आसन दृढ झाले. दरम्यान त्यांची पक्षांतर्गत वाटचालही अनभिषिक्त सम्राज्ञीच्या मार्गाने सुरू झाली. परंतु या दुर्गेची काळी बाजूही लवकरच पाहायला मिळणार होती.\nत्यांच्या निरंकुश सत्तेला वाढती महागाई, भ्रष्टाचार, जनतेतील असंतोषाची किनार होती. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या भ्रष्ट राजवटीविरुद्ध नवनिर्माण आंदोलन जोर धरत होते. बिहारमध्ये छात्र संघर्ष समितीने तरुणांच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली होती. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभे राहिले आणि त्यांनी जनतेला संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. तशात जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली १९७४ साली झालेल्या रेल्वेसंपाने सगळा देश ढवळून निघाला.\nदेशातील अशा अराजकसदृश परिस्थितीत\n१२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. इंदिरा गांधींनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सुटीच्या काळातील न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्ण अय्यर यांनी २४ जून रोजी इंदिरा गांधींच्या याचिकेनुसार निकालास स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत त्या पंतप्रधानपदी राहू शकतात; पण त्यांना संसदेत मतदानाचा अधिकार राहणार नाही, असा निर्णय त्यांन��� दिला. हा निर्णय इंदिरा गांधींचे पंतप्रधानपद धोक्यात आणणारा होता.\nबिथरलेल्या इंदिरा गांधींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्पूर्वी १९७१ च्या बांगलादेश मुक्तीयुद्धापासून देशात बाह्य़ आणीबाणी लागू होतीच. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या ३५२ (१) कलमानुसार २५ जूनच्या रात्री आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि आणीबाणी लागू झाली. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या हाती अर्निबध सत्ता एकवटली.\nविरोधकांच्या धरपकडीची योजना आधीपासूनच तयार होती. त्यानुसार विरोधी नेत्यांना अटक झाली. प्रसारमाध्यमांची सेन्सॉरशिपच्या माध्यमातून मुस्कटदाबी सुरू झाली. लोकशाही अधिकारांचा संकोच झाला. ‘मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट’ (मिसा) या दमनकारी कायद्यानुसार कोणालाही नुसत्या संशयावरून काहीही पुरावा न देता अटक करता येऊ लागले. इंदिरा गांधींचे चिरंजीव संजय गांधी आणि त्यांच्या निकटवर्ती चौकडीच्या सल्ल्याने इंदिरा गांधी कारभार हाकू लागल्या. सक्तीची नसबंदी आणि झोपडपट्टी हटवून शहरे सुशोभित करण्याच्या मोहिमेत लोकांवर जुलुम-जबरदस्ती होऊ लागली. खुली माहिती मिळणे दुरापास्त झाले. परिणामी लोकांमध्ये भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीच्या या संभ्रमावस्थेतून बाहेर येत हळूहळू काही विरोधाचे सूरही उमटू लागले. त्यांना यथावकाश संघटित रूप येऊ लागले. सरकारविरोधी प्रतिकारात नेते, कार्यकर्ते, सामान्यजन, कलाकार, बुद्धिवादी असे सारेच सामील होऊ लागले. एक चळवळ उभी राहू लागली. सर्व स्तरांतून आणीबाणीला विरोध होऊ लागला. भूमिगत नेत्यांकडून विरोधाच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. केवळ सरकारविरोधी पत्रके वाटणे, त्यातून जनजागृती आणि सत्याग्रह करणे यावरच विसंबून न राहता अधिक प्रखर प्रतिकाराचे बेत आखले जाऊ लागले. या धगधगत्या भावनेतूनच बडोदा डायनामाइट कट आकारास आला.\nसरकारविरुद्धच्या जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी जॉर्ज फर्नाडिस आणि त्यांच्या काही साथीदारांनी बडोद्याजवळील हलोल येथील दगडाच्या खाणीत वापरले जाणारे डायनामाइट मिळवले. त्याद्वारे रेल्वे-रूळ उडवणे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा बेत आखण्यात आला. वाराणसी येथे इंदिरा गांधी यांच्या सभास्थळी ती सुरू होण्याच्या काही तास आधी स्फोट घडवून सार्वजनिक स्वच्छतागृह आणि व्यासपीठ उडवून देण्याचा कट रचण्यात आला. तसेच पिंपरीहून मुंबईला शस्त्रे घेऊन जाणारी रेल्वे लुटण्याचाही कट योजण्यात आला. या स्फोटांनी कुणाच्या जिवाला इजा पोचवण्याचा कटकर्त्यांचा हेतू नव्हता, तर इंदिरा गांधींना इशारा देणे, इतकाच त्यांचा हेतू होता. या कटातील आरोपी म्हणून पुढे जॉर्ज फर्नाडिस, उद्योगपती वीरेन शहा, सी. जी. के. रेड्डी, समाजवादी नेते जी. जी. पारीख, देवी गुजर, गांधीवादी कार्यकर्ते प्रभुदास पटवारी आदी २५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली. यापैकी बहुतेकांना दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणी संपल्यावर झालेल्या निवडणुकीत जनता सरकार सत्तेवर आले आणि या सर्वावरील आरोप मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.\nआणीबाणी जाहीर झाली तेव्हा जॉर्ज फर्नाडिस ओरिसाच्या किनाऱ्यावरील गोपालपूर या गावी त्यांच्या सासुरवाडीला होते. रेडिओवर त्यांनी ही बातमी ऐकली आणि त्यांना पुढील अरिष्टाची जाणीव झाली. त्यांनी आपली पत्नी लीला आणि नवजात मुलासाठी एक पत्र लिहून ठेवले आणि स्थानिक मच्छिमाराचा वेश करून ते भूमिगत झाले. पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी ते एकाच जागी फार काळ राहत नसत. भूमिगत असताना त्यांनी दाढी वाढवून आणि पगडी बांधून शीख वेश धारण केला होता. याच वेशात ते फिरायचे. आपली वस्तीची ठिकाणे ते सतत बदलत राहायचे. एखाद्या ठिकाणी वस्तीला असले की ते साधूचा वेश करीत असत. दूरध्वनीवरून बोलणे, अनोळखी व्यक्तींना भेटणे टाळत असत. प्रवासात कुणाला त्यांचा संशय येऊ नये म्हणून बऱ्याचदा एखादी महिला त्यांच्या सोबतीला असे.\nजॉर्ज फर्नाडिस यांनी पुढे अटक झाल्यानंतर खटल्यादरम्यान दिल्लीच्या चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात १० फेब्रुवारी १९७७ रोजी एक निवेदन केले होते. त्यातील काही भाग असा- ‘त्या घातकी दिवशी.. २६ जून १९७५ रोजी मी ओरिसाच्या किनारपट्टीवरील गोपालपूर नावाच्या एका दूरच्या गावात होतो. आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे असे मी ऐकले तेव्हा श्रीमती गांधींनी हिटलरचा झगा अंगावर पांघरला आहे अशी माझी तत्काळ प्रतिक्रिया झाली. आणि मी तिथल्या तिथे निर्णय घेतला, की या हुकूमशाहीचा आपण सर्वशक्तिनिशी मुकाबला करायचा.\n‘वेसण घातलेली न्यायालये, मुस्कटदाबी केलेली वृत्तपत��रे, नसबंदीग्रस्त जनता, विरोधकांचा रानटी छळ, हत्या, तुरुंगात तसेच तुरुंगाबाहेर होणाऱ्या गोळीबाराच्या घटना, जयप्रकाश नारायण आणि इतर नेत्यांविरुद्ध बदनामीकारक व असत्य प्रचार, मक्तेदारांना सवलती, कामगारांच्या हक्कांची पायमल्ली आणि आणीबाणीतील तथाकथिक फायद्यांसंबंधी धडधडीत खोटे दावे- हे सर्व आम्ही पाहिले. घटनात्मक सत्तेच्या आवरणाखाली देशावर हुकमत चालवू पाहणाऱ्या हुकूमशहाविरुद्ध मी माझ्या निश्चयाप्रमाणे लढलो. मी तिच्याविरुद्ध तसेच देशात भविष्यकाळात डोके वर काढणाऱ्या कोणत्याही हुकूमशाहीविरुद्ध यापुढेही असाच लढत राहीन असे मी येथे जाहीर करतो. देशातील प्रत्येक नागरिकाचे हेच कर्तव्य आहे असा माझा विश्वास आहे. माणसातील आत्मचैतन्यच हुकूमशाही नष्ट करत असते. हुकूमशाही कधीच कायदेशीर, घटनादत्त वा नैतिक असू शकत नाही. हुकूमशाहीत जनतेला त्याविरुद्ध लढण्याचा कायदेशीर व घटनात्मक मार्ग शिल्लक नसतो. आणि त्याही परिस्थितीत हुकूमशाहीविरुद्ध लढणे हा मानवाचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा व पावित्र्य यांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे अशांचा हिरावून घेता येणार नाही असा अधिकार आहे. दुष्टतेचा हिंसक मार्गाने प्रतिकार करणे किंवा भेकडपणाने तिच्यापुढे मान तुकवणे, यांत निवड करायची झाली तर मी हिंसेचा मार्ग पत्करायला बिनदिक्कत तयार होईन आणि जनतेलाही त्या मार्गाचा अवलंब करायला सांगेन. महाशय, श्रीमती गांधी हुकूमशहा बनल्या तेव्हा मी व माझे सहकारी ‘माणसा’सारखे (येथे ‘मर्दा’सारखे असा अर्थ अभिप्रेत आहे.) वागलो, हे सांगताना मला खरोखरच अतिशय अभिमान वाटतो.’\nबडोदा डायनामाइट कटात सामील असल्याबद्दल अटक झालेले सी. जी. के. रेड्डी यांनी आपले अनुभव सप्टेंबर १९७७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘बडोदा डायनामाइट कॉन्स्पिरसी- राइट टू रिबेल’ या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकाचा इंदुमती केळकरकृत मराठी अनुवाद ‘बडोदा डायनामाइट कट- अर्थात बंडाचा अधिकार’ या शीर्षकाने ऑगस्ट १९७८ साली प्रसिद्ध झालेला आहे. सी. जी. के. रेड्डी दक्षिण भारतातील ‘हिंदू’ या दैनिकाचे व्यवस्थापकीय सल्लागार आणि जॉर्ज फर्नाडिस यांचे निकटचे सहकारी होते. ते १९५२ मध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते. डॉ. राममनोहर लोहिया यांचे ते निकटवर्ती सहकारी होत. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातही त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात ते नाविक दलात (र्मचट नेव्हीमध्ये) ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीत ज्युनियर इंजिनीयर म्हणून नोकरी करत होते. १९३८-४० दरम्यान कलकत्त्यात असताना ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घराजवळ राहत होते. काही वेळा त्यांची सुभाषबाबूंशी भेटही झाली होती. दुसऱ्या महायुद्धात रेड्डी मरिन इंजिनीयर म्हणून काम करत असलेले ‘चिल्का’ हे जहाज १९४२ मध्ये जपान्यांनी हिंदी महासागरात बुडवले. त्यातून वाचून रेड्डी सुमात्राच्या किनाऱ्यावरील एका बेटावर पोहोचले. त्याचदरम्यान हिंदी स्वातंत्र्य लीग स्थापन होऊन आग्नेय आशियात भारतीय स्वातंत्र्योत्सुक तरुणांना संघटित केले जात होते. रेड्डी त्यात सामील झाले. सुभाषबाबूही तेव्हा या भागात आझाद हिंद फौजेची उभारणी करण्यासाठी येणार होते. लीगतर्फे जी वीसजणांची पहिली तुकडी भारतात पाठवली गेली, त्यात रेड्डी होते. त्यांनी ब्रह्मदेश (आताचा म्यानमार) सीमेजवळील चितगाव जिल्ह्य़ातील टेकनाफ येथे (हे ठिकाण आता बांगलादेशमध्ये आहे.) सप्टेंबर १९४२ मध्ये प्रवेश केला. तेथून कलकत्त्याला जात असताना त्यांना आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना ब्रिटिशांनी अटक करून दिल्लीच्या लाल किल्ल्यात आणि नंतर मद्रास (आता चेन्नई) किल्ल्याच्या अंधारकोठडीत ठेवले. राजाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली १९ जणांवर एनिमी एजन्ट्स ऑर्डिनन्सखाली खटला चालवून त्यातील चारजणांना फाशी देण्यात आली. रेड्डी तीन वर्षे तुरुंगात होते. डिसेंबर १९४५ मध्ये त्यांची सुटका झाली.\nदेशातील तत्त्वहीन राजकारणाचा कमालीचा उबग आल्याने आणीबाणीपूर्वी अनेक वर्षे ते सक्रिय राजकारणापासून बाजूला झाले होते. तथापि आणीबाणीबद्दल त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे- ‘२६ जून १९७५ ने माझ्यात आणि माझ्या जीवनात बदल घडवून आणला. स्वार्थ, बेपर्वा वृत्ती आणि अर्थशून्यता जाऊन माझे जीवन पुन्हा ध्येयनिष्ठ, साहसी आणि सश्रद्ध बनले. हे सर्व गुण व भावना पूर्वीही माझ्यात होत्या; परंतु पुढे त्या नाहीशा झाल्या. त्यांचे माझ्यात पुनरुज्जीवन केल्याबद्दल मी श्रीमती गांधींचा ऋणी आहे. तसेच आत्ममुक्तीची संधी मला दिल्याबद्दल मी जॉर्ज फर्नाडिस यांचाही कृतज्ञ आहे.’\nआणीबाणी ला��ू झाली तेव्हा ते ‘हिंदू’च्या कामानिमित्त दिल्लीत असत आणि महिन्यातून एखाद्या वेळी मद्रासला जात. २६ जूनला आणीबाणीच्या घोषणेची बातमी ऐकून त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांना वाटत होते की, इंदिरा गांधी यांच्या या हुकूमशाही लादण्याच्या प्रयत्नांपुढे देशाची जनता शरणागती पत्करणार नाही. परंतु दिल्लीत त्यांना कोठेच प्रतिकाराचे किंवा निषेधाचे साधे चिन्हही दिसले नाही. परंतु या परिस्थितीला आपण मात्र शरण न जाण्याचा निश्चय त्यांनी केला. आता त्यांचे फारसे राजकीय संबंध उरले नव्हते. आणीबाणीविरोधी सत्याग्रहात भाग घेऊन स्वत:ला अटक करवून घेऊन तुरुंगात जाणे त्यांना शक्य होते. पण त्याने काहीच साध्य होणार नाही, हे पत्नीच्या सल्ल्यानंतर त्यांना पटले. मग त्यांनी भूमिगत असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले.\nबडोदा डायनामाइट कटामागची वैचारिक भूमिका मांडताना रेड्डी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, ‘१९४२ ची ब्रिटिशविरोधी चळवळ जेव्हा शिगेला पोहोचली होती तेव्हा देशात फक्त ४०,००० लोक तुरुंगात होते. त्या तुलनेत आणीबाणीत एक वेळ अशी आली की, दीड लाखापेक्षा जास्त लोक ‘मिसा’ किंवा भारत संरक्षण कायद्याखाली स्थानबद्ध म्हणून वा क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील अन्यायी तरतुदीखाली आरोपी म्हणून तुरुंगात होते. जयप्रकाश नारायण यांनी संघटित केलेल्या लोकसंघर्ष समितीतर्फे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू होते. अनेक नेते भूमिगत, तर कित्येक जण अटकेत होते. पण त्याचा म्हणावा तसा परिणाम झाल्याचे जाणवत नव्हते. या मार्गाने हुकूमशाही प्रवृत्तीच्या इंदिरा गांधींना पदभ्रष्ट करण्यास खूप वेळ लागला असता.\n‘हुकूमशहाची हत्या करणे हा एक सोपा मार्ग होता. पण हुकूमशहाची हत्या करून प्रश्न सुटत नाहीत असे आमचे मत होते. हत्येच्या मार्गाने हुकूमशहाला नष्ट करता येते, पण हुकूमशाहीला- ज्यामुळे हुकूमशहाला आणि त्याच्या छोटय़ा गटाला सत्ता बळकावणे शक्य झाले, ती व्यवस्था बदलता येत नाही. हुकूमशहाच्या यशस्वी हत्येच्या प्रयत्नामागोमाग सैनिकी सत्ता येण्याची स्पष्ट शक्यता होती. त्यामुळे हत्येचा मार्ग तुलनेने सोपा असला तरी तो योग्य नाही असे आमचे मत झाले.\n‘जनमानसात भय पसरवून जनतेला पंगू करण्यात आले होते. म्हणून जनतेला निर्भय बनवणे हे सर्वप्रथम आणि प्रमुख काम होते. सत्ताधाऱ्यांच्या मनात भय निर्माण करणे- हाच लोकांच्या मनातील भय दूर करण्याचा सर्वोत्तम व प्रभावी मार्ग होता. आपल्याविरुद्ध एक कृतनिश्चयी व धाडसी व्यक्तींची संघटना काम करीत आहे, हे जर हुकूमशहाला व त्याच्या हुजऱ्यांना कळले तर इतर गुंडांप्रमाणे तेही भयभीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रतिकार होत आहे आणि त्याला पाठिंबाही मिळत आहे, ही गोष्ट जनतेच्या स्पष्टपणे नजरेस येणे जरूर होते. ज्या प्रकारचे आंदोलन सुरू करण्याचा आमचा विचार होता ते टिकाऊ व्हायचे असेल तर ते परिणामकारक झाले पाहिजे. त्यासाठी त्या आंदोलनात मनुष्यहत्या व माणसाला शारीरिक इजा होणार नाही, तसेच लक्ष्ये काळजीपूर्वक निवडणे व कमीत कमी घातपात होईल याची काळजी घेणे जरूर होते. आमच्या कार्यक्रमात गुप्तपणे विध्वंस करण्याच्या कार्यक्रमाला अपरिहार्य स्थान असले तरी तो विध्वंस अविवेकी असणार नाही, तसेच त्यामुळे जनतेची फार गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे जरूर होते. सुरुंगकांडय़ांच्या (डायनामाइट्स) साह्य़ाने लोकांच्या नजरेत भरतील अशी विध्वंसक कृत्ये करणे सहज शक्य आहे, असे जॉर्जचे त्याची- माझी भेट होण्यापूर्वी एक महिना आधी- म्हणजे जुलै १९७५ मध्ये मत झाले होते.’\nरेड्डींनी पुढे नमूद केले आहे की, ‘आमच्या भूमिगत चळवळीचे सामान्यपणे तीन-सूत्री उद्दिष्ट होते : (१) इंदिरा गांधींना खराखुरा आणि व्यापक विरोध आहे हे जनतेच्या प्रत्ययास आणून देणे आणि तिला त्या हुकूमशाहीविरुद्ध उठवणे. (२) परदेशातील व्यक्ती आणि संघटना यांच्याशी सतत संपर्क ठेवणे. श्रीमती गांधींच्या मार्गात सतत अडथळे निर्माण करणे. आमच्या कार्यास परदेशातील व्यक्तींची व संघटनांची सहानुभूती व पाठिंबा मिळवणे; आणि (३) इंदिरा गांधी आणि त्यांचे सरकार यांची सत्ता खिळखिळी करून अखेरीस तिचे पतन घडवून आणण्यासाठी बद्धपरिकर असलेली एक जिवंत भूमिगत चळवळ देशात अस्तित्वात होती, हे दाखवून देण्यासाठी प्रतिकाराचा देदीप्यमान कार्यक्रम संघटित करणे. अर्थातच ही चळवळ पूल व वीजघरे सुरुंगाच्या दारूने उडवण्यापुरती व विध्वंस करण्यापुरती मर्यादित नव्हती. तसा एक समज आणीबाणीच्या काळात लोकमानसात होता व आजही आहे.’\nसी. जी. के. रेड्डी यांनी आणीबाणी लागू होताच जॉर्ज फर्नाडिस यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू केला. बंगलोर (आता���े बेंगळुरू) हे त्यांचे एकेकाळचे राजकीय जीवनाचे केंद्र होते. तेथे समाजवादी पक्षाचे माजी सहचिटणीस वेंकटरामन, अभिनेत्री स्नेहलता रेड्डी आणि त्यांचे पती- तेलगू कवी आणि चित्रपट निर्माते पट्टाभि हे त्यांच्या परिचयाचे होते. ते डॉ. राम मनोहर लोहिया यांचे दीर्घकाळचे स्नेही होते. त्यांचा जॉर्जशी संपर्क असेल असा रेड्डी यांचा होरा होता. त्यामुळे आणीबाणी लागू होताच दोनच दिवसांनी रेड्डी बेंगळुरूला गेले. पण तेथील कोणालाच जॉर्जचा पत्ता माहीत नव्हता. रेड्डी यांनी आपला पत्ता देऊन ठेवून त्यांना अधेमधे आपल्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर बरेच दिवस काही उत्तर आले नाही म्हणून ते ऑगस्टच्या मध्यावर पुन्हा बंेगळुरूला जाऊन आले. तेव्हा त्यांना जॉर्ज दक्षिणेत आले की कळवू, असे उत्तर मिळाले.\nजॉर्जच्या भेटीच्या किस्सा रेड्डी यांनी रंजकपणे सांगितला आहे. ते लिहितात की, ‘२२ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांना वेंकटरमन यांचा निरोप दिल्लीत मिळाला : ‘घाईघाईत लग्न ठरवले आहे. लग्नास हजर राहा..’ असा तो निरोप होता. ‘लग्न- समारंभाच्या व्यवस्थेची शेवटची पाहणी तुम्हाला करावयाची आहे. म्हणून तुम्ही लगेचच्या विमानाने मद्रासला या,’ अशी सूचनाही त्यात होती. जॉर्जच्या भेटीसंबंधीचा हा सांकेतिक निरोप होता. लंडनमध्ये स्थापन झालेल्या जयप्रकाश नारायण मुक्ती समितीचे प्रमुख कार्यकर्ते एस. के सक्सेना योगायोगाने तेव्हा त्यांच्यासमवेत होते. त्यांच्यासह रेड्डींनी मद्रासला जाऊन जॉर्जची भेट घेतली. त्यावेळेपासून रेड्डी यांना २८ मार्च १९७६ रोजी अटक होईपर्यंत ते सतत जॉर्जच्या निकट संपर्कात होते. त्या काळात झालेल्या जवळजवळ सर्व चर्चा आणि योजनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.\nसी. जी. के. रेड्डी यांनी परदेशात जाऊन आणीबाणीच्या विरोधात बरेच कार्य केले. ते विविध वृत्तपत्रांच्या सल्लागार मंडळांवर आणि अनेक संस्थांत विविध पदांवर असल्याने त्यांना परदेश दौरे करणे सोपे गेले. त्यात त्यांनी लंडनमधील ‘फ्री जेपी कॅम्पेन कमिटी’ (जयप्रकाश नारायण मुक्ती समिती) तसेच अमेरिकेत कार्यरत असलेल्या ‘इंडियन्स फॉर डेमोक्रॅसी’ या गटांशी संपर्क साधून इंदिरा गांधींनी चालविलेल्या अपप्रचाराला चोख उत्तर दिले आणि आंतरराष्ट्रीय जनमतावर बराच प्रभाव पाडला. नोव्हेंबर १९७५ मध्ये ब्रुसेल्स येथे झालेल्या इंटरनॅशनल सोशालिस्ट ब्युरोच्या अधिवेशनात भाग घेऊन त्यांनी भारतातील सत्य परिस्थिती जगासमोर मांडली. तसेच सोशालिस्ट इंटरनॅशनलचे सेक्रेटरी जनरल हॅन्स जॅनिट्सचेक यांच्या विनंतीवरून त्यांनी सभेला संबोधित केले आणि ‘इंदिराज् इंडिया- अॅनॉटॉमी ऑफ ए डिक्टेटरशिप’ नावाची पुस्तिका वाचून दाखवली. त्यांनी बनवलेल्या या पुस्तिकेचा जर्मन, फ्रेंच, इटालियन, जपानी आदी भाषांत अनुवाद होऊन मोठय़ा प्रमाणावर तिचे वितरण झाले. त्यांनी विदेशातील आपले संपर्क वापरून भारतात भूमिगत चळवळीच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी रेडिओ केंद्र उभारण्याची योजनाही आखली होती. तसेच त्यासाठी ट्रान्समीटर मिळवण्याचे त्यांचे प्रयत्नही सुरू होते.\nबडोदा डायनामाइट कटात मुंबईतील काही समाजवादी नेते व कार्यकर्तेही सहभागी होते. त्यात जी. जी. पारीख, बच्चुभाई शहा, सोमनाथ दुबे, लक्ष्मण जाधव, महाबळ शेट्टी आदींचा समावेश होता. पेशाने डॉक्टर असलेले जी. जी. पारीख १९४२ च्या छोडो भारत आंदोलनापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. ते रायगड जिल्ह्य़ातील तारा येथील युसूफ मेहेरअली सेंटर नावाची सेवाभावी संस्था सध्या चालवतात. आज वयाच्या ९२ व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि कामाप्रतीची श्रद्धा तरुणांना लाजवील अशी आहे. अशा लढवय्या जी. जी. पारीख यांनी बडोदा डायनामाइट कटाच्या सांगितलेल्या काही आठवणी..\n‘२५ जून १९७५ च्या रात्री आणीबाणी लागू झाली आणि मला अंदाज आला, की आपल्यालाही अटक होऊ शकते. त्यामुळे मी २६ जूनच्या सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर पडलो आणि सरळ भूमिगत झालो. त्यानंतर साधारण १५ दिवसांनी पुण्यात एस. एम. जोशी यांच्यासह समाजवाद्यांची एक बैठक झाली. त्यात मी आणि सदाशिव बागाईतकर यांच्यावर गुजरातमध्ये जाऊन गुप्त पत्रके वाटण्याची कामगिरी सोपवण्यात आली. त्यानुसार गुजरातमध्ये जाऊन आम्ही अनेक ठिकाणी फिरलो. तेथील समाजवाद्यांच्या भेटी घेतल्या. चिमणभाई पटेल यांचे सरकार जाऊन बाबुभाई पटेल यांचे गैरकाँग्रेसी सरकार तेव्हा तिथे आले होते. त्यामुळे आणीबाणीचा जाच तिथे फारसा जाणवत नव्हता.\n‘एके दिवशी आम्हाला बातमी कळली की जॉर्ज फर्नाडिस अहमदाबादला येणार आहेत. साधारण जुलैचा महिना असेल. त्याप्रमाणे एसएसपीचे नेते डॉ. अशोक मेहता यांच्या घरी जॉर्ज आले. त्या दिवशी आम्ही खरे तर मुंबईला परतणार होतो. पण बागाईतकर परत गेले आणि मी तिथेच राहिलो. जॉर्जना भेटलो. मी डॉ. देवेंद्र महासुखराम सुरती यांच्या घरी जॉर्जची राहण्याची व्यवस्था केली. तिथे जॉर्ज साधारण महिनाभर राहिले. त्या काळात ते त्यांच्या ओरिसा ते अहमदाबाद प्रवासाच्या सुरस कथा सांगत असत. ते पंधराएक दिवसांतून एकदा समाजवाद्यांसाठी हस्तलिखित पत्रे पाठवीत. इथेच बडोदा डायनामाइट कटाची आखणी झाली. डायनामाइट मिळवण्याची तजवीज झाली. डायनामाइट आल्यानंतर गांधीवादी नेते प्रभुदास पटवारी यांच्या घरी गॅरेजमध्ये ते उतरवून घेतले गेले. ते उतरवून घेण्यात मृणाल गोरे यांचाही सहभाग होता. प्रभुदास पटवारी यांना मात्र आपल्या घरी डायनामाइट ठेवले जात आहे याची कल्पना नव्हती. मी त्यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवले होते. आम्ही एका उद्योगपतीकडून ते डायनामाइट मिळवले होते. (मृणाल गोरे यांच्यासंबंधी रोहिणी गवाणकर यांनी लिहिलेल्या ‘पाणीवाली बाई’ या पुस्तकाच्या पान क्र. १२३-१२४ वर उल्लेख आहे की, गोरे यांना डायनामाइट वापरण्याचा मार्ग पटला नव्हता आणि त्यावरून त्यांचे जॉर्जबरोबर मतभेतही झाले होते. ही बाब त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये नोंदवली होती. पुढे बडोदा डायनामाइट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका सीबीआय अधिकाऱ्याने मृणाल गोरे यांना सांगितले, की त्यांच्या डायरीतील त्या नोंदीमुळेच त्या वाचल्या. अन्यथा त्यांनाही पकडण्यात आले असते.)\n‘काही दिवसांनी आम्ही ते डायनामाइट पटवारींकडून अन्य एका समाजवाद्याकडे हलवले. त्यावेळी आमच्याबरोबर लाडली मोहन निगम हेदेखील राहायचे. त्यांना डायनामाइटबद्दल माहीत होते. काही दिवसांनी जसवंतसिंग चौहान यांनी त्यातील काही डायनामाइट आपल्याबरोबर गुजरातबाहेर.. बिहारला नेले.\n‘त्यानंतर मी अहमदाबादमध्ये एका मित्राकडे जॉर्जना हलवले. इतर लोकांना सांगितले की, जॉर्ज गुजरात सोडून गेलेत. मात्र, जॉर्ज पुढील आठवडाभरही तिथेच होते. त्यानंतर पीएसपीचे कार्यकर्ते राघवेंद्र शेणॉय हे आले आणि ते गाडीतून जॉर्जना अहमदाबादहून बडोद्याला आणि नंतर कर्नाटकला घेऊन गेले.\n‘सप्टेंबर १९७५ मध्ये मला पक्षाकडून भूमिगततेतून बाहेर येण्याचे आदेश मिळाले. त्यानंतर मी मुंबईला येऊन मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली. पण ऑक्टोबर १९७५ मध्ये मला अटक झाली आणि येरवडा तुरुंगात माझी रवानगी करण्यात आली. ���ेथे मी दहा महिने होतो. त्याचदरम्यान माझी पत्नी मंगला पारीख आणि प्रमिला दंडवते यांनाही अटक होऊन त्यांनाही येरवडा कारागृहातच ठेवले होते. नंतर काही काळाने मृणाल गोरे यांनाही मुंबईत वांद्रे येथे अटक झाली.\n‘येरवडा कारागृहात पोलिसांनी मला डायनामाइट प्रकरणासंबंधी आरोपपत्र वाचून दाखवले. दरम्यान मला हृदयविकाराचा त्रास होत असल्याने माझी रवानगी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या तुरुंगात केली गेली. नंतर तेथून मला दिल्लीच्या तिहार कारागृहात पाठवण्यात आले. तिहारमध्ये माझ्यासह बडोदा डायनामाइट खटल्यातील अन्य आरोपी वीरेन शहा, जॉर्ज फर्नाडिस, के. व्ही. राव, सी. जी. के. रेड्डी, सोमनाथ दुबे, लक्ष्मण जाधव, महाबळ शेट्टी, सुरेश वैद्य, प्रभुदास पटवारी आदीही होते. आम्हाला तिथे मारहाण वगैरे काही झाली नाही. शांतीभूषण यांच्यासह सध्या भाजप सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी आमचे वकीलपत्र घेतले होते. तेथे मी साधारण वर्षभर होतो. आणीबाणी संपून जनता सरकार सत्तेत आल्यावर आमच्यावरील खटले रद्द करून आम्हाला मुक्त करण्यात आले. त्यानंतर मी मुंबईत परतून माझी वैद्यकीय प्रॅक्टिस पूर्ववत सुरू केली.’\n८७ वर्षांचे बुजुर्ग समाजवादी नेते बच्चुभाई शहा यांचा १९४२ चे छोडो भारत आंदोलन, १९५६ साली भाषावार प्रांतरचना आयोगाच्या स्थापनेनंतर सुरू झालेले संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, १९७४ चा रेल्वेसंप, आणीबाणीतील बडोदा डायनामाइट कट या सगळ्यांत सक्रिय सहभाग होता. या कटाचा बच्चुभाई शहा यांनी कथन केलेला वृत्तान्त..\n‘देशातील आणीबाणी आणि तत्पूर्वीचा काळ अत्यंत उलथापालथींचा होता. सर्वत्र असंतोष खदखदत होता. सामान्य जनता भ्रष्टाचार, महागाई आदी प्रश्नांनी पिचली होती. विरोधी पक्षांतर्फे देशभर आंदोलनांच्या माध्यमातून जनतेच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली जात होती. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांनी मोठे आंदोलन उभे करून इंदिराविरोधी एकच राळ उडवून दिली होती. गुजरातमधील चिमणभाई पटेल यांच्या भ्रष्ट सरकारविरोधात आंदोलन सुरू होते.\nमुंबईत १९६० च्या दशकापासून जॉर्ज फर्नाडिस यांचे तडफदार नेतृत्व उदयाला आले होते. जॉर्ज आणि बाळ दंडवते आदींचे म्युनिसिपल मजदूर युनियन, रेल्वे मजदूर युनियन आदी माध्यमांतून जोरात कार्य सुरू होते. सर्व समाजवाद्यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यावेळी मी प्रजा समाजवादी पक्षाच्या मुंबईतील लालबाग-परळ शाखेचा सक्रिय कार्यकर्ता होतो. रेल्वे कामगारांचे वेतन महागाईच्या प्रमाणात वाढले नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. सनदशीर मार्गाने वाटाघाटी करूनही त्यांच्या मागण्या मान्य होत नव्हत्या. त्यामुळे जॉर्ज यांनी ८ मे १९७४ रोजी देशव्यापी रेल्वेसंपाची हाक दिली आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. १५ दिवस देशातील ७० टक्क्य़ांहून अधिक रेल्वे बंद राहिल्या. मुंबईतही दोन-तीन दिवस लोकल (उपनगरी रेल्वे) बंद होत्या. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेगाडय़ाही बंद होत्या. संपकऱ्यांच्या मागण्या न्याय्य होत्या आणि त्यांना जनतेतून प्रचंड पाठिंबा होता.\n‘संपाच्या दुसऱ्या दिवशी (९ मे १९७४) आम्ही मुंबईतील मोटरमेन, गार्ड्स यांना गोळा करू लागलो. माझ्याजवळ त्याकाळी एक फियाट मोटार होती. त्यातून त्यांना गोरेगावला नेत होतो. तेथे मृणाल गोरे यांचे पती केशव (बंडू) गोरे यांच्या शाळेच्या सभागृहात त्यांची व्यवस्था करत होतो. त्यांना पोलिसांच्या धरपकडीपासून वाचवण्याचा हा प्रयत्न होता. त्यावेळी मुंबई सेट्रल येथे तात्पुरते न्यायालय उभे करण्यात आले होते. तेथे संपकऱ्यांना पकडून उभे केले जात असे आणि शिक्षा सुनावून तुरुंगात टाकले जायचे. आम्ही कार्यकर्त्यांनी सांताक्रूझ रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या लोकांना त्यावेळी मदत केली.\n‘२५ जून १९७५ रोजी रात्री आणीबाणी लागू झाली आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी (२६ जून) रेडिओवरून ही बातमी समजली. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींची काँग्रेस (आर) आणि अन्य नेत्यांची काँग्रेस (ओ) अशी दुफळी झाली होती. इंदिरा गांधींनी देशभर विरोधकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी आदी नेत्यांना अटक झाली. अटक टाळण्यासाठी अनेक नेते भूमिगत झाले. या दमनकारी राजवटीला विरोध करणे आणि त्यासाठी इंदिरा गांधी यांना सत्तेवरून हटवणे आम्हाला गरजेचे वाटत होते. आम्ही प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते लालबाग-परळ भागातील नेते वासू देसाई, लक्ष्मण जाधव यांच्यासह एकजूट होऊन कामाला लागलो. जे कार्यकर्ते पकडले गेले होते त्यांच्या घरी आम्ही आर्थिक मदत पोहोचवत असू. यावेळी आमचे नेते डॉ. जी. जी. पारीख, नारायण तावडे, जगन्नाथ जाधव यां���ा येरवडा कारागृहात ठेवले होते. आम्ही कार्यकर्ते दर शनिवारी मुंबईतून बस करून त्यांना भेटायला जात असू.\n‘प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे होते. जॉर्ज भूमिगत राहून आंदोलनाला प्रोत्साहन द्यायचे. प्रा. सदानंद वर्दे वांद्रा येथे राहायचे. ते, जाधव, मृणाल गोरे भूमिगत राहून मार्गदर्शन करत असत. भूमिगत असतानाही ते कार्यकर्त्यांच्या बैठकी घ्यायचे. मी मृणाल गोरे आणि वर्दे यांना माझ्या फियाटमधून बैठकीच्या स्थळी न्यायचो. एक दिवस (२३ जुलै १९७५ रोजी) लालबागला वर्दे यांची बैठक आयोजित केली होती. तेथे त्यांनी लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ या सुप्रसिद्ध वचनाचा उल्लेख करून प्रभावी भाषण केले. त्यावेळी काही पोलीस अधिकारीही तेथे उपस्थित होते. दुसऱ्याच दिवशी वर्दे यांना त्यांच्या घरातून अटक झाली आणि त्यांची येरवडा तुरुंगात रवानगी झाली. त्यानंतर दोन-चार दिवसांनी जाधव यांनाही अटक झाली. त्यावेळी मी मृणाल गोरे यांना माझ्या गाडीतून ठिकठिकाणी बैठकीच्या ठिकाणी पोहोचवत असे.\n‘मी प्रजा समाजवादी, तर जॉर्ज समाजवादी पक्षात होते. माझी आणि जॉर्ज यांची पहिली भेट साधारण १९७४ च्या दरम्यान रेल्वेसंपाच्या वेळी जॉर्जचे मित्र हिम्मत जव्हेरी यांच्या घरी झाली. त्यावेळी इंदिरा गांधी यांना हटवलेच पाहिजे यावर आमचे एकमत होऊन निर्धार पक्का झाला. माझा लालबागमधील कामगार चळवळीतले नेते लक्ष्मण जाधव यांच्याशी पूर्वीपासूनच परिचय होता. ते जॉर्जच्या समाजवादी पक्षातले. त्याचदरम्यान जॉर्जच्या खास मर्जीतील सोमनाथ दुबे आणि देवी गुज्जर यांच्याशीही माझा परिचय झाला. लक्ष्मण जाधव यांच्याकडून मला प्रथम बडोदा डायनामाइट कटाबद्दल कळले. दुबे जॉर्जशी सतत संपर्कात असत. ते आम्हाला माहिती देत. लढय़ाचा भाग म्हणून हा मार्ग स्वीकारण्यास मी तयार होतो. माझ्या गाडीचा त्यांना वाहतुकीला उपयोग होणार होता. त्यामुळे मी लगेचच त्या योजनेत सहभागी झालो. त्यांनीही मला सहभागी करून घेतले. त्यावेळी शिवसेनेचे दादरचे कार्यकर्ते श्री. वैद्य (त्यांचे पूर्ण नाव बच्चुभाईंना आठवत नाही.) यांनाही या योजनेची कल्पना दिली होती. पण त्यांनी शिवसेनेचे असल्याने या कटात सामील होण्यास नकार दिला.\n‘मी, जाधव, दुबे आणि जाधवांचे मित्र प्रभाकर मोरे या योजनेचे तपशील ठरवण्यासाठी दादरचे शिवाजी ���ार्क, पारसी कॉलनीतील फाइव्ह गार्डन येथे गुप्तपणे भेटत असू. याची माहिती मी माझ्या अन्य सहकाऱ्यांना दिली नव्हती. ते दोन्ही गट वेगवेगळे होते. दुबे काळाचौकीला राहायचे. त्यांच्याकडे डायनामाइट आले. (निश्चित तारखा बच्चुभाईंना आठवत नाहीत. सीबीआय आरोपपत्रानुसार व रेड्डींच्या पुस्तकानुसार मुंबईतील कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या पहिल्या स्मृतिदिनी- म्हणजे २६ जून १९७६ रोजी काही स्फोट घडवण्याचे ठरवून तसे केले होते.) डायनामाइटची चार बंडले होती. त्यातील पहिले बंडल आम्ही मालाड येथील मढ आयलंड येथे चाचणीकरता वापरले. एका संध्याकाळी चार ते सहाच्या सुमारास आम्ही तेथे जाऊन आसपास कोणी नाही याची खात्री करून घेऊन एका खडकात डायनामाइट लावले. त्याची वात पेटवून सुरक्षित स्थळी लपलो. काही वेळानंतर त्याचा स्फोट झाला आणि दगड साधारण २० ते २५ फुटांवर उडाले. त्यातून आम्हाला स्फोटाच्या ताकदीचा आणि परिणामाचा अंदाज आला. (सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात मात्र थोडी वेगळी माहिती आहे. त्यानुसार ऐनवेळी काही लोक जवळपास आल्याने हा स्फोटाचा बेत रद्द करण्यात आला. बच्चुभाईंनी मात्र खात्रीशीरपणे हा स्फोट झाल्याचे सांगितले.)\nत्यानंतर पहिला स्फोट ब्लिट्झ साप्ताहिकाच्या कार्यालयात घडवला गेला. रुसी (आर. के.) करंजिया हे साप्ताहिक चालवायचे. त्यांचे कार्यालय आणि छापखाना मुंबईतील फोर्ट भागात हॉर्निमन सर्कलजवळ होता. ते इंदिरा गांधी यांच्या बाजूचे लेख छापायचे. त्यामुळे तेथे स्फोट करण्याचे ठरले. ठरल्यानुसार प्रथम दीनानाथ डिचोलकर यांनी त्या परिसराची टेहळणी केली. नंतर देवी गुजर आणि प्रभाकर मोरे यांनी ब्लिट्झच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहात डायनामाइट लावले. संध्याकाळी सात वाजल्यानंतर वात पेटवली. साधारण १० ते २० मिनिटांनी त्याचा स्फोट झाला.\n‘डायनामाइटचा दुसरा स्फोट बच्चूभाईंच्या म्हणण्यानुसार एक्स्प्रेस () टॉवरमध्ये (तर सीबीआयच्या आरोपपत्रानुसार बांद्य््रााच्या एक्स्प्रेस वेवरील रेल्वेपुलाजवळ), तर तिसरा मुंबई सेंट्रल स्टेशनच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात केला. साधारण चार-सहा दिवसांच्या अंतराने हे तिन्ही स्फोट आम्ही घडवले. त्यात कोणालाही इजा झाली नाही. अर्थात आमचा तसा हेतूही नव्हता. आम्हाला फक्त इंदिरा गांधी यांना इशारा द्यायचा होता.\n‘काही दिवसा���नी पोलिसांना ही बातमी लागली. प्रथम प्रभाकर मोरे आणि सोमनाथ दुबे यांना घरातून अटक झाली. त्याचदरम्यान वासू देसाई आणि लक्ष्मण जाधव यांनाही अटक झाली होती. सोमनाथ दुबे यांना पोलिसांनी भरपूर मारहाण केली. अखेर कटाची माहिती फुटली आणि चौकशीत माझेही नाव पुढे आले.\n‘मला माझ्या सांताक्रुझच्या घरातून मुंबई पोलिसांच्या सीआयडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तेथून क्रॉफर्ड मार्केट पोलीस ठाण्यात नेऊन माझा जबाब नोंदवला. काही वेळाने त्यांनी सोमनाथ दुबे यांची माझ्यासोबत भेट करून दिली आणि त्यांना कशी मारझोड होत आहे ते विचारा, म्हणाले. दुबे यांना मारहाण झाल्याच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. मला धाक दाखवून दबाव टाकण्याचाच हा प्रयत्न होता. दुबे मला म्हणाले की, जे काही असेल ते सांगून टाका. मीही भीतीपोटी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मला सोडले. पण नंतर रोज सकाळ-संध्याकाळ मला पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागत असे. मला मुंबईबाहेर काय कारवाया झाल्या ते माहीत नव्हते.\n‘त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. साधारण महिनाभरानंतर मला पकडून मुंबईच्या फोर्ट भागातील किताब महल इमारतीत नेण्यात आले. तेथे सीबीआयचे कार्यालय होते. तेथे बडोद्याहून सीबीआयचे इन्स्पेक्टर पटेल आले होते. (यांचे पहिले नाव बच्चूभाईंना नीटसे आठवत नाही.) त्यांनी माझ्याकडून माहिती घेऊन चौकशी केली. मुंबई पोलिसांकडून प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याने मुंबई पोलीस सीबीआयला सहकार्य करत नव्हते. माझ्याकडून पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व माहिती घेतली. मढ आयलंड स्पॉटवर (घटनास्थळी) नेले. आम्ही चाचणी घेतली त्यावेळी मी वाटेत मालाड येथील एका पेट्रोलपंपावर गाडी थांबवून पेट्रोल भरले होते. सीबीआय अधिकारी तेथेही मला घेऊन गेले आणि माझ्याकडून मिळालेल्या माहितीची त्यांनी खातरजमा करून घेतली. साधारण महिना- दोन महिने ही चौकशी चालली. त्या काळात मला बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. पोलीस सतत धमकी द्यायचे. अधिकाधिक माहिती काढण्याचा प्रयत्न करायचे.\n‘एके दिवशी- माझ्या आठवणीप्रमाणे तो शनिवार होता- सीबीआय इन्स्पेक्टर पटेल यांनी मला माझी गाडी घेऊन किताब महलच्या कार्यालयात बोलावून घेतले. तेथून आम्ही दोघे एका नेत्याच्या घरी गेलो. तो नेता जॉर्ज फर्नाडिस यांच्या खास मर्जीतील होता. त्याने पटेल यांना टेपरेकॉर्डर आणि म्युझिकचे काही सामान भेट दिले. त्यानंतर पटेल यांनी मला त्यांना मुंबई सेंट्रल रेल्वे-स्थानकावर सोडावयास सांगितले. तेथून ते बडोद्याला गेले. नंतर मात्र ही चौकशी बंद झाली. त्यानंतर मला वाटू लागले की, काही पुढारी आपली कातडी बचावण्याचे धोरण अवलंबत आहेत. मात्र हा मानवी स्वभाव आहे, भलेबुरे लोक सगळीकडेच असतातच- अशी मी माझ्या मनाची समजूत घालून घेतली. पुढे आणीबाणी उठल्यानंतर निवडणुका होऊन जनता सरकार आले. बडोदा डायनामाइट खटला मागे घेऊन सर्व आरोपींना मुक्त करण्यात आले.’\nया कटातील काहीजणांना ९ मार्च १९७६ रोजी अटक झाली. त्यामागोमाग २८ मार्च रोजी सी. जी. के. रेड्डी व कॅप्टन हुइलगोल यांना आणि ७ एप्रिल रोजी कमलेश शुक्ल व पालिवाल यांना अटक झाली. हे सर्वजण दिल्लीत पोलिसांच्या हाती लागले होते.\nत्याबद्दल रेड्डी यांनी म्हटले आहे की, ‘या धरपकडीचे श्रेय सीबीआय, आयबी किंवा रॉ या सरकारी गुप्तचर संघटनांच्या तपास करण्याच्या किंवा हेरगिरी करण्याच्या कौशल्याला नाही. घटनाच अशा काही घडत गेल्या- आणि शिवाय शरद पटेल याने कच खाल्ली. त्यामुळेच या प्रकरणाचा पोलिसांना सुगावा लागला.’\nया खटल्यात पुढे माफीचा साक्षीदार बनलेल्या भरत पटेल याने जॉर्ज आणि बडोद्यातील कार्यकर्त्यांशी शरद पटेल याची ओळख करून दिली होती. शरद पटेल हा व्यापारी होता. आयात परवान्याचा दुरुपयोग केल्याबद्दलचे त्याचे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी होते. त्यासंदर्भात त्याच्यावर खटला भरला जाणार होता.\nयाबद्दल रेड्डींनी नमूद केले आहे की, ‘बडोद्यातील कार्यकर्त्यांनी थोडीशी सावधगिरी दाखवली असती आणि शरद पटेलविषयी माहिती मिळवली असती, तर त्याच्यापासून अतिशय धोका आहे हे त्यांच्या लक्षात आले असते. ज्यांच्यावर कामाची जबाबदारी टाकायची त्या व्यक्तीत धैर्य आणि ध्येयनिष्ठा आहे की नाही, हे पाहणे जरूर असते. तसेच त्याच्यावर सरकारचे दडपण तर येणार नाही ना, याचाही विचार करावा लागतो. तसे काहीही न करता शरदला जॉर्जच्या हालचालींविषयी माहिती देण्यात येत होती. भरत पटेलने दिलेले डायनामाइटही त्याच्याजवळ ठेवण्यात आले होते. कामाला लवकर सुरुवात झाली पाहिजे, अशी बडोद्यातील कार्यकर्त्यांना घाई झाली होती. त्यामुळेच शरद पटेलविषयीची ही गंभीर चूक त्यांच्या हातून घडली. कार्यकर्त्यांना वाटे की ��ार सावधगिरीने काम करत बसलो तर कामच होणार नाही.\nजानेवारी १९७६ मध्ये गुजरात सरकारचे आसन अस्थिर होऊ लागले होते. बाबुभाई पटेल यांच्या संयुक्त सरकारला लवकरच इंदिरा सरकार पदच्युत करणार असे स्पष्टपणे दिसू लागले होते. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्याशी लगट करण्यास व्यापारधंद्यातली मंडळी सदैव उत्सुक असतात. त्यामुळे आपण इंदिरा सरकारला आपला पाठिंबा व निष्ठा असल्याचे वेळेवर दाखवून द्यावे असा त्यांनी विचार केला. अशा परिस्थितीत गुजरात हे भूमिगत कार्याला सुरक्षित स्थान आहे असे समजणे धोक्याचे होते. म्हणून डायनामाइट्सचे सर्व साठे बडोद्याबाहेर हलवावेत असा निरोप जॉर्जनी कार्यकर्त्यांना पाठवला होता. त्यानुसार काही साठा वाराणसीला व काही पाटण्याला रवाना करावा असे सुचवले होते. परंतु दुर्दैवाने बडोद्यातील कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे केले नाही. मार्चच्या सुरुवातीपर्यंत शरद पटेलपाशीच डायनामाइटचा सर्व साठा त्यांनी राहू दिला.\nपट्टाभि-स्नेहलता रेड्डी हे दाम्पत्य आणि वेंकटरामन यांनी दक्षिणेतील कारवायांची जबाबदारी पार पाडली. ऑक्टोबर १९७५ मध्ये वेंकटरामन यांना अटक झाली. त्यानंतर स्नेहलता यांनी ती धुरा वाहिली. स्नेहलता यांची मुलगी नंदना हिच्या नेतृत्वाखाली युवकांचा एक गट काम करत होता. त्यांनी आणीबाणीत कर्नाटकात भूमिगत कार्य केले.\nस्नेहलता मद्रास दौऱ्यावर असताना पोलिसांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा कोणार्क याला पकडले. पोलिसांनी बेंगळुरूमध्ये मध्यरात्री त्यांच्या घरी धाड टाकून स्नेहलता यांच्या ८४ वर्षीय वडिलांची झडती घेतली. त्या घटनेने बावरलेल्या स्नेहलता आणि पट्टाभि लगेच मद्रासहून बेंगळुरूला आले. मुलाच्या वियोगाने कष्टी झालेल्या स्नेहलता यांनी मुलाला सोडल्यास पोलिसांच्या स्वाधीन होण्याची तयारी दाखविली. त्यांना १ मे १९७६ रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. पण त्यांनी पोलिसांचा दबाव झुगारून कोणाचीही नावे घेतली नाहीत. स्नेहलता यांना अस्थम्याचा विकार होता. बंगलोरच्या तुरुंगातील कोंदट आणि अस्वच्छ वातावरणात तो अधिकच बळावला. सरकारने त्यांना व्यवस्थित औषधपाणी तर दिलेच नाहीच; वर अतोनात हाल केले. त्यांचा विकार बळावून अखेर त्या मरणासन्न अवस्थेत असताना १३ डिसेंबर १९७६ रोजी त्यांची पॅरोलवर सुटका केली. त्यानंतर लगेचच २० जानेवारी १९७७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\nत्याचवेळी मधु दंडवते हेदेखील बेंगळुरूच्या तुरुंगात ‘मिसा’खाली कैद होते. ते स्नेहलता आणि जॉर्जचा भाऊ लॉरेन्स फर्नाडिस यांच्या कण्हण्याचा आवाज ऐकत असत. दंडवते यांनी या दोघांना चांगली वागणूक मिळावी म्हणून तुरुंगात उपोषणही केले होते. जॉर्ज हाती लागत नाही म्हटल्यावर पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर उट्टे काढण्यास सुरुवात केली. जॉर्जचे धाकटे बंधू लॉरेन्स यांना १ मे १९७६ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास बेंगळुरूमध्ये घरातून पोलिसांनी उचलले. मात्र त्यासंबंधी पोलिसांच्या दफ्तरी काहीही नोंद केली नाही. जॉर्ज आणि लॉरेन्सचे वडील जे. जे. फर्नाडिस यांनी तक्रार दाखल करूनही त्यांना लॉरेन्सचा ठावठिकाणा सांगितला गेला नाही. लॉरेन्स यांना खायला-प्यायला काहीही न देता अमानुषपणे मारहाण केली. त्यात त्यांच्या पायाचे हाड आणि जबडा मोडला. ३ मे रोजी त्यांची परिस्थिती फारच खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण पोलिसांनी ७ मे रोजी त्यांना बेंगळुरूतील मल्लेश्वरम् पोलीस ठाण्यापासून के. सी. जनरल हॉस्पिटलमध्ये साध्या टॅक्सीतून नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून परिचारिकेला काही औषधे देण्याच्या सूचना केल्या आणि ते हात धुण्यासाठी पलीकडच्या खोलीत गेले. डॉक्टर परत येऊन पाहतात तर रुग्णासह पोलीस गायब झाले होते. लॉरेन्स यांना ९ मे रोजी दावणगिरी एक्स्टेंशन पोलीस ठाण्यात डास आणि झुरळांनी भरलेल्या तुरुंगात ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांनी त्यांचे म्हणणे विचारले असता ‘मी काय बोलू शकतो’ इतकेच कसेबसे ते पुटपुटले. तिथून त्यांना भरउन्हात तापलेल्या वाळूच्या रस्त्यावरून अनवाणी चालत पोलीस ठाण्यात परत नेण्यात आले. पोलिसांच्या अधिकृत नोंदीनुसार लॉरेन्स यांना दावणगिरी येथील बसस्टॉपवरून १० मे रोजी अटक केल्याचे दाखवण्यात आले होते. बेंगळुरू तुरुंगात त्यांना अत्यंत वाईट अवस्थेत ठेवले गेले. आणीबाणी संपण्याच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची अवस्था अतिशय गंभीर असून त्यांना शारीरिक व मानसिक उपचारांची नितांत गरज असल्याचे सांगित��े.\nइकडे जॉर्ज फर्नाडिस यांनाही १० जून १९७६ रोजी कलकत्त्यातून अटक झाली. त्यापूर्वीच्या धरपकडीमुळे त्यांना धोक्याची कल्पना आलीच होती. त्यामुळे त्यांनी १० मार्च १९७६ रोजी दिल्लीतून पहिले विमान पकडून कलकत्त्याला प्रयाण केले होते. तेथे त्यांनी आपल्या हालचाली बंद ठेवून शांत बसणे अपेक्षित होते. परंतु तो त्यांचा स्वभाव नव्हता. पोलिसांना ते दिल्लीतून कलकत्त्याला गेल्याचा सुगावा लागला होता. कलकत्त्यात जॉर्जना फादर रुडॉल्फ यांनी चर्चच्या एका लहानशा खोलीत आश्रय दिला होता. अखेर एका व्यक्तीने पोलिसांना खबर दिली आणि त्या आधारे जॉर्जना अटक झाली. त्यांना दिल्लीत आणून प्रथम हिस्सार येथील तुरुंगात ठेवले गेले आणि नंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.\nमद्रासमध्ये जुने समाजवादी नेते एम. एस. अप्पाराव आणि त्यांची मुलगी अमुक्ता हे जॉर्ज आणि सहकाऱ्यांचे प्रमुख शक्तिकेंद्र होते. त्यांनी तरुणांचा एक निष्ठावंत आणि सक्रिय गट स्थापन केला होता. या दोघांनाही पुढे अटक झाली. ते जानेवारी १९७७ पर्यंत स्थानबद्धतेत होते. पण सरकारने त्यांना तसेच स्नेहलता रेड्डी यांनाही बडोदा डायनामाइट खटल्यात गोवले नाही.\nनवी दिल्लीतील वसंत विहार येथे राहणाऱ्या कॅप्टन आर. पी. हुइलगोल आणि त्यांची मुलगी डॉ. (कुमारी) गिरिजा हुइलगोल यांनीही जॉर्जच्या सहकाऱ्यांना दिल्लीत मोठी मदत केली होती. त्यांनाही नंतर अटक झाली, पण बडोदा डायनामाइट खटल्यात त्यांना गुंतवले गेले नाही. सरकारला कदाचित महिलांचा कटातील सहभाग दाखवून आरोपी आणि त्यांच्या आंदोलनाबद्दल जनतेत सहानुभूती मिळू द्यायची नसावी, असे रेड्डींनी म्हटले आहे.\nबडोदा डायनामाइट खटल्यात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार बडोदा येथील मेसर्स रोड लिंक ऑफ इंडिया या कंपनीच्या गोदामावर बडोदा शहर पोलिसांनी ८-९ मार्च १९७६ च्या मध्यरात्री छापा घातला आणि आवाराची झडती घेतली. राज्याबाहेर घेऊन जाण्यासाठी या गोदामात काही स्फोटक वस्तू ठेवलेल्या आहेत अशी विश्वासार्ह माहिती पोलिसांना मिळाली होती. झडतीत पोलिसांनी गोमिया येथील इंडियन हाय एक्स्प्लोझिव्हज् लिमिटेड या कंपनीच्या मशाल छाप (एस. जी. ८०) ८३६ नायट्रोग्लिसरीन कांडय़ा असलेल्या सात लाकडी पेटय़ा आणि फ्यूज वायरची ८५ भेंडोळी हस्तगत केली. या झडतीनंतर रावपुरा पोलीस चौकीवर रीतसर केस नोंदवण्यात आली. सीबीआयने मागोमाग गुजरात सरकारच्या सूचनेवरून २३ मार्च १९७६ रोजी पुढील तपासाला सुरुवात केली. पुढे स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट, नवी दिल्लीच्या सी. आय. यू. शाखेत केस (क्रमांक आर. सी. २/७६) नोंदवण्यात आली.\nयापैकी एक केस पोलिसांना सापडलेल्या ३७ स्फोटक (डायनामाइट) कांडय़ा, ४९ सुरुंग व सेफ्टी फ्यूज वायरची आठ भेंडोळी यांच्याशी संबंधित आहे. बडोदा येथे सापडलेल्या स्फोटक सुरुंगकांडय़ांचे प्रकरण आणि दिल्ली पोलिसांनी तपास केलेली दुसरी दोन प्रकरणे ही एकमेकांशी संबंधित आहेत असे आढळून आले. त्यामुळे बडोदा पोलिसांनी तपास केलेली दोन प्रकरणेही सीबीआयने दिल्ली प्रशासनाच्या सूचनेवरून अधिक तपासासाठी स्वत:च्या हाती घेतली.\n२६ जून १९७६ रोजी मुंबईतील किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळील पुलावर एक स्फोट झाला. या गुन्ह्य़ाची नोंद (क्रमांक २८१/७६) डी. सी. बी. सी. आय. डी., मुंबई यांनी केली आणि या खटल्यातील आरोपींपैकी काहींना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींनी स्फोटक कांडय़ा आणि आनुषंगिक इतर स्फोटक पदार्थ बडोद्यात मिळवले होते असे निदर्शनास आले. ही माहिती मिळाल्यानंतर सीबीआयचे पथक पुढील तपासासाठी मुंबईला गेले. मुंबई स्फोट प्रकरणाच्या चौकशीत आढळून आलेल्या गोष्टींचे बडोदा सुरुंग प्रकरणातील गोष्टींशी बरेच साम्य असल्याचे या पथकाला दिसून आले. म्हणून ही तिन्ही प्रकरणे (म्हणजे वर उल्लेखिलेले मुंबईचे क्रमांक २८१/७६ चे प्रकरण, बांद्रा रेल्वे पोलीस चौकीवर नोंदवलेले क्रमांक ३४५७/७५ हे प्रकरण आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यावर नोंदवलेले क्रमांक ३३७६/७५ हे प्रकरण) महाराष्ट्र सरकारच्या संमतीने केंद्र सरकारने सीबीआयकडे सोपवली आणि आर. सी. ६/७६ ते ८/७६ या तीन केसेस एस. पी. ई.च्या ई. आय. यू. (ए) शाखेत दाखल करण्यात आल्या. सीबीआयने चार केसेस दाखल केल्या होत्या. तरी तपासाअंती असे आढळून आले की या चारही केसेसमधील घटना व गुन्हे आरोपी व्यक्तींनी आपल्या कटाच्या सिद्धीसाठी जी बेकायदेशीर कृत्ये केली त्यापैकीच होत्या. या कटाचा तपास आर. सी. २/७६ सी. आय. यू. (ए) या केससाठी चालू होता. त्यामुळे या चारही केसेसचे आरोप एकत्रित करून एकाच आरोपपत्रात देण्यात आले.\nवेगवेगळ्या ठिकाणी पकडलेल्या आरोपींवर भारत संरक्षण कायद्याच्या ४३ ���्या कलमाखाली आणि भारतीय दंड विधानाच्या १२० ब कलमाखाली बडोदा, दिल्ली आणि बेंगळुरू येथील न्यायालयांत खटले भरण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात हा खटला आपण कशा रीतीने हाताळणार आहोत, हे फिर्यादी पक्ष- म्हणजे सरकार उघड करू इच्छित नव्हते. शिवाय आरोपींच्या बेकायदा हालचालींची वर्गवारी कशी करावी, हेही त्यांना कळत नव्हते. म्हणून पुढे त्यांच्यावर जे निश्चित आरोप सरकारला ठेवायचे होते त्या सर्वाचा समावेश होईल असा कट केल्याचा व्यापक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. दिल्ली येथे भरलेल्या खटल्याचे नाव होते- ‘सरकार विरुद्ध सी. जी. के. रेड्डी आणि इतर.’ जॉर्ज १० जून रोजी कलकत्त्याला पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याचे नाव बदलून ‘सरकार विरुद्ध जॉर्ज फर्नाडिस आणि इतर’ असे केले गेले.\n२३ सप्टेंबरला बडोद्याचे आणि मुंबईचे कार्यकर्ते तिहार तुरुंगात आणले गेले. त्यानंतर लवकरच खटल्याचे काम सुरू झाले. दिल्लीच्या चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात २४ सप्टेंबरला आरोपींना आरोपपत्र देण्यात आले. भारतीय दंड विधानाच्या १२१-अ कलमाखाली त्यांच्यावर पुढील आरोप ठेवण्यात आला : कायद्याने प्रस्थापित झालेले सरकार गुन्हेगारी मार्गाने उलथून टाकण्याचा प्रयत्न करणे आणि कलम १२०- सी प्रमाणे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे करण्यासाठी कट करणे, हे आरोप दाखल करण्यात आले. याशिवाय इंडियन एक्स्प्लोझिव्हज अॅक्टच्या ५ व १२ या कलमांप्रमाणे (स्फोटक पदार्थ बेकायदेशीरपणे जवळ बाळगणे आणि वापरणे) आणि एक्स्प्लोझिव्ह सबस्टन्सेस अॅक्टच्या ४, ५ व ६ या कलमांखाली पूरक आरोप ठेवण्यात आले. कटाच्या व्यापक आरोपाखाली पुढील गुन्हे केल्याची नोंद केली गेली होती : बनावट नावाने व वेश बदलून वावरणे, सरकारविरुद्ध प्रतिकार संघटित करणे, भूमिगत वाङ्मय प्रसिद्ध करणे व वाटणे, निरनिराळ्या लोकांना बंड करण्याची चिथावणी देणे, आपल्या प्रचारासाठी रेडिओ ट्रान्समीटर्स आणण्याची खटपट करणे (हा आरोप विशेषत: सी. जी. के. रेड्डी यांच्याविरुद्ध होता.), सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्याची योजना आखण्याच्या हेतूने बैठका घेणे. इराणच्या आखातात आणि दिएगो गार्सिया बेटावर रेडिओ ट्रान्समिशन केंद्र चालू करण्याचा प्रयत्न करणे आणि परराष्ट्रांतील व्यक्तींशी व संघटनांशी संबंध वाढवणे व चालू ठेवणे. फिर्यादी पक्षाने (सरकारने) वरील आरोपांच्या पुष्टय़र्थ जवळजवळ ५०० कागदपत्रे व ५७५ साक्षीदारांची यादी दाखल केली होती.\nयावर रेड्डी यांनी म्हटले आहे की, ‘आमच्याविरुद्ध एवढय़ा ठामपणे सरकारने आरोप केले होते याचा अर्थ आम्हाला दोषी ठरवून वीस वर्षे तुरुंगात डांबण्याचा सरकारने निश्चयच केला होता. न्यायालये संपूर्णपणे नीतिभ्रष्ट झाली असल्यामुळे आम्हाला ती शिक्षा ठोठावणार हे नि:संशय होते. म्हणजे आमच्यापैकी ज्यांनी चाळिशी ओलांडली होती ते तुरुंगाबाहेर जिवंत येण्याची शक्यता नव्हती.’\nहा खटला देशात आणि देशाबाहेरही बराच गाजला. आरोपींनी दिल्लीतील देशी-विदेशी पत्रकारांशी संपर्क साधून त्याचे कामकाज आणि आपली भूमिका जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यास त्याचा उपयोग करून घेतला. आरोपींच्या बाजूने मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश वि. म. तारकुंडे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांचे मंडळ काम करत होते, तर आचार्य कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली आरोपींची बचाव समिती स्थापन झाली होती.\nजॉर्जना अटक होऊन खटला भरला तेव्हा तुरुंगात जॉर्जना हालअपेष्टा करून मारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण सोशलिस्ट इंटरनॅशनल, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, तत्कालीन पश्चिम जर्मनीचे चॅन्सेलर विली ब्रांड, ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर ब्रुनो क्रेईस्की आणि स्वीडनचे पंतप्रधान ओलॉफ पाम यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारला कळवले होते की, ‘जॉर्जचे जर काही बरेवाईट झाले तर इंदिरा गांधींना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.’\nहा खटला सुरू असतानाच इंदिरा गांधी आणि विरोधकांत समझोत्याची बोलणीही सुरू होती. विरोधी पक्षांच्या वतीने चरणसिंह आणि बिजू पटनाईक यांनी ४ डिसेंबर १९७६ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहराज्य मंत्री ओम मेहता यांची भेट घेऊन समझोत्याच्या मसुद्यावर चर्चा केली. बिजू पटनाईक यांनी ओम मेहता यांना लिहिलेले पत्र त्यावेळी बरेच गाजले. तसेच विरोधी नेते अशोक मेहता यांच्या पत्राला इंदिरा गांधी यांनी सकारात्मक उत्तर देऊन १८ जानेवारी १९७७ रोजी मार्चमध्ये देशात लोकसभा निवडणूक घेण्याची घोषणा केली.\nमोरारजी देसाई आणि लालकृष्ण अडवाणी यांची तुरुंगातून सुटका झाली. २० जानेवारी १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली. १६ ते २० मार्च १९७७ रोजी लोकसभा निवडणुकीस���ठी मतदान झाले. जॉर्ज फर्नाडिस यांनी तुरुंगात असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना प्रचारात सहभागी होता आले नाही तरी त्यांच्या तुरुंगातील बेडय़ा ठोकलेल्या चित्रांच्या साहाय्याने त्यांच्या समर्थकांनी प्रचार केला आणि तो खूपच प्रभावी ठरला. जॉर्ज मोठय़ा मताधिक्याने ही निवडणूक जिंकले. इंदिरा गांधी आणि संजय गांधीही पराभूत झाले. काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली होती.\n२१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली. त्यानंतर २४ मार्चला देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता सरकार सत्तेत आले. आरोपींना २२ मार्च रोजी जामिनावर सोडण्यात आले. तर २६ मार्च १९७७ रोजी बडोदा डायनामाइट खटला मागे घेऊन सर्व आरोपींना मुक्त केले गेले.\nइंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकार कुमी कपूर यांनी त्याकाळी आणीबाणीसंबंधांत दिल्लीत वार्ताकन केले होते. आजही त्या याच वृत्तपत्र समूहात कार्यरत आहेत. त्यांचे आपल्या अनुभवांवर आधारित ‘द इमर्जन्सी- अ पर्सनल हिस्टरी’ हे पुस्तक याच वर्षी प्रकाशित झाले. त्यात त्यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकताना म्हटले आहे की, ‘जॉर्ज आता आजारी असून शारीरिक आणि मानसिकरीत्या सक्षम राहिलेले नाहीत. पण राहुल रामगुंडम् त्यांचे चरित्र लिहिण्यासाठी अभ्यास करीत आहेत.’ कुमी कपूर यांनी आपल्या पुस्तकात त्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, ‘प्रत्यक्षात डायनामाइट कटाने फारशी विघातक कृत्ये घडविण्यात आली नाहीत. कट करणाऱ्यांनी सात ते आठ महिने कटाचे नियोजन करणे, कार्यकर्ते व आवश्यक सामानाची जुळवाजुळव करणे, ते विविध ठिकाणी पाठवणे आणि कार्यकर्त्यांना कामासाठी प्रशिक्षण देणे यावरच खर्च केले. हे लोक जॉर्जच्या व्यक्तिमत्त्वाने आकर्षित झाले होते आणि त्यांचा प्रतिकारावर विश्वास होता. पण प्रत्यक्षात त्यांच्या हातून फारसे काही घडले नाही.’\nकुमी कपूर यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे- ‘आणीबाणी उठल्यानंतर मोरारजी देसाई यांनी मनात द्वेषभावना न ठेवता इंदिरा गांधी सरकारला माफ करण्याची आणि झाले-गेले विसरून जाण्याची गरज असल्याचे आवाहन केले. मात्र, जॉर्ज फर्नाडिस यांची त्याला तयारी नव्हती. जॉर्ज म्हणाले होते, ‘जेपींच्या किडनी, माझा भाऊ लॉरेन्सच्या हालअपेष्टा, स्नेहलता रेड्डी यांचा मृत्यू हे सगळे मी कसे विसरू ���कतो\nआपल्या पुस्तकातील जॉर्जसंबंधीच्या प्रकरणाचा शेवट करताना कुमी कपूर यांनी नमूद केले आहे की, ‘मार्च १९७७ च्या निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले की जॉर्ज फर्नाडिस यांच्याप्रमाणेच देशाचे लाखो नागरिक इंदिरा आणि संजय गांधी यांना माफ करण्यास किंवा त्यांनी आणीबाणीच्या काळात केलेल्या अत्याधिक दडपशाहीला विसरण्यास तयार नव्हते.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/satpaatridaan-news/article-on-nirgudkar-foundation-1162058/", "date_download": "2019-03-25T08:16:27Z", "digest": "sha1:SLEOYBBYFIPTEYDVYBJ4FBIWU7C7YTCB", "length": 27150, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कीर्तिरूपी उरावे.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nआनंद वाटूनच उपभोगायचा हे सुधीर निरगुडकर यांचं तत्त्व.\nही गोष्ट १९७६-७७ ची. व.पुं.च्या कथाकथनाचा कार्यक्रम सुरू होता.\nआनंद वाटूनच उपभोगायचा हे सुधीर निरगुडकर यांचं तत्त्व. आपल्या मिळकतीचा जास्तीत जास्त हिस्सा गरजूंना दान करण्यासाठी ‘निरगुडकर ‘फाऊंडेशन’ या ट्रस्टची त्यांनी स्थापना केली. गेली चार दशकं हा दानयज्ञ शिक्षण, आरोग्य, क्रीडा, ��ला व संगीत, अध्यात्म आदी क्षेत्रात अव्याहतपणे सुरू आहे.\nही गोष्ट १९७६-७७ ची. व.पुं.च्या कथाकथनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यांनी त्यांच्या खास शैलीत काळजाला हात घालणारी एक कथा सांगितली. गोष्टीतल्या मुलीच्या बाबांना तिला महाविद्यालयात पाठवायचं होतं. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मोठय़ा आशेने श्रीमंत नातेवाईकांकडे गेल्यावर त्याने मदत न करता उलट अवहेलनाच केली.. अशी ती गोष्ट ऐकून सर्व श्रोते सुन्न झाले, हेलावून गेले आणि अचानक व. पु. म्हणाले, गोष्टीतला गरीब बाबा आज इथे उपस्थित आहे. कोण करेल का त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी हजार रुपयांची मदत एक अवघडलेली शांतता..आणि काही क्षणातच एक तरुण मुलगा उठला आणि म्हणाला, ‘माझ्याकडे आता पैसे नाहीत, पण पुढच्या २/३ महिन्यांत मी तेवढे पैसे कमवून देईन..’ खरं तर त्या मुलाने स्वत:ची महाविद्यालयाची फीदेखील उसने पैसे घेऊन भरलेली. पण आत्मविश्वास उदंड. थोडय़ाच दिवसात त्याच्या इंजिनीयरिंगच्या शेवटच्या परीक्षेचा निकाल लागला. लगेचच त्याला छोटी छोटी कामंही मिळाली आणि दिलेलं वचन त्याने पूर्ण केलं.\nगोरगरिबांविषयीची कणव अशी रक्तातच असलेल्या या मुलाचं नाव सुधीर गणेश (राजाभाऊ) निरगुडकर. पुढे त्याने बांधकाम व्यवसायापासून हिरे उद्योगापर्यंत आणि शेतीपासून केटरिंगपर्यंत अनेक व्यवसाय केले. भरघोस यश मिळवलं. कमाईच्या पहिल्यावहिल्या कामापासूनच मिळकतीचा जास्तीत जास्त हिस्सा गरजूंना दान करण्यासाठी ‘निरगुडकर ‘फाऊंडेशन’ या ट्रस्टची स्थापना केली आणि एका दानयज्ञाला प्रारंभ झाला. तेव्हापासून जवळजवळ चार दशकं हा यज्ञ शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला व संगीत, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत अव्याहतपणे सुरू आहे.\nअडल्या-नडल्यांना मदत करण्याची पहिली गुढी राजाभाऊ व लीलाताईंनी (आई-वडील) १९४६ मध्ये दादरच्या विसनजी चाळीतील आपल्या दीडखणी जागेत उभारली. राजाभाऊंच्या बेताच्या मिळकतीत घरातल्या चार माणसांबरोबर एक शिकणारा विद्यार्थी आणि मुंबईत उपचारांसाठी आलेल्या गावाकडचा एखाददुसरा रुग्ण कायम मुक्कामाला असे. एक वेळ घरातल्या मुलांना कमी पडलं तरी चालेल, पण पाहुण्यांची गैरसोय होता कामा नये ही घराची शिस्त होती. घरातल्या एकुलत्या एक पलंगावर पाहुणा रुग्ण झोपायचा आणि मुलं खाली सतरंजीवर नाही तर गॅलरीत.\nआपल्या घराचं हे वेगळेपण सुध���रच्या मनात लहानपणीच वसलं. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही आईवडिलांनी केलेली कर्करोग रुग्णांची शुश्रूषा डोळ्यांसमोर असल्याने ‘फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी कर्करोग रुग्णांना भरीव मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेपासून केमोथेरपीपर्यंत सर्व खर्चाची जबाबदारी घेऊन आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त रुग्णांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यात आलेय. याचबरोबर रुग्णांचं समुपदेशन व मानसोपचार सेवा देण्यासाठीही मदत देण्यात आलीय, येतेय.\nआळंदीजवळील फुलगावचा सुधीर निरगुडकरांचा संपर्क आला तो त्यांच्या शेतकरी मामामुळे. या फुलगावात धोत्रे कुटुंबाची एक प्राथमिक शाळा होती. ही शाळा वाढवून गावात माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सरकारकडून परवानगी मिळत नव्हती. मामाच्या इच्छेखातर सुधीर यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि मंत्रालयात असंख्य चकरा मारून, नाना लटपटी-खटपटी करून परवानगी तर मिळवलीच, शिवाय शाळेसाठी दहा एकर जागाही पदरात पाडली. त्यानंतरही शाळा उभारणीसाठी निधी उभा करताना पहिल्या घसघशीत देणगीवर ‘निरगुडकर ‘फाऊंडेशन’चं नाव होतं. मात्र शाळेला स्वत:चं किंवा ‘फाऊंडेशन’चं नाव लागणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली गेली. १३ जून १९८३पासून ‘हरी उद्धव धोत्रे विद्यालय’ या नावानेच फुलगावमध्ये माध्यमिक शिक्षणाची कवाडं खुली झाली.\nशिक्षणाविना विकास अशक्य हे जाणून ‘फाऊंडेशन’ दूरदूरच्या गावातील आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, चपला, पौष्टिक आहार यासाठी मदत देतं. आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. शाळांना भेट देताना सुधीर निरगुडकरांची चौकस नजर हेरते..कुठे सुसज्ज असं गं्रथालय नाही, कुठे प्रयोगशाळा नावापुरतीच आहे, कुठे पिण्याच्या पाण्याची सोय नाही.. त्यानुसार त्या त्या गरजांची पूर्तता करण्यात येते. शाळेच्या पक्क्या बांधकामापासून स्वच्छतागृहे, बगीचे, मैदाने, व्यायामशाळा..अशा सर्व सुविधा गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी ‘फाऊंडेशन’ दक्ष असतं.\nकबड्डी, मल्लखांब व खोखो या खास भारतीय खेळांचा विकास हे आपल्या संस्कृती संवर्धनाचं एक अंग आहे असा निरगुडकर ‘फाऊंडेशन’चा विश्वास आहे. म्हणूनच या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्त्या व इतर मदत देण्यात ‘फा��ंडेशन’चा पुढाकार असतो.\nगरजू व्यक्ती मदतीसाठी ‘फाऊंडेशन’कडे येतच असतात, पण कित्येक वेळेला ‘फाऊंडेशन’च चांगली कामं शोधून, त्यांना मदत करतात. अष्टविनायक मंदिराजवळच्या प्रसाधनगृहांबाबत असंच घडलं. मुंबई महापालिकेतील पु. मा. काळे व काही सेवानिवृत्त अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी ‘अष्टविनायक यात्रा सुविधा प्रकल्प’ नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुधीर निरगुडकरांवर सोपवली. हा प्रकल्प अवघ्या दहा महिन्यांत आकाराला आला. यातील मोरगावच्या सर्वात प्राचीन अशा मंदिरातील स्वच्छता-सुविधांची व्यवस्था पूर्णपणे निरगुडकर ‘फाऊंडेशन’तर्फे करण्यात आलीय.\nअष्टविनायक प्रकल्प मार्गी लागल्यावर वडिलांच्या अंतिम इच्छेनुसार निरगुडकर कुटुंबीयांनी तुळापूरचं श्री संगमेश्वर मंदिर व धर्मवीर संभाजी राजे यांची समाधी व सभोवतालचा परिसर यांच्या कायापालटाची जबाबदारी स्वीकारली व पार पाडली. ज्यामुळे तुळापूरचं ऐतिहासिक महत्त्व जगाच्या नजरेसमोर आलं.\nएखाद्या गोष्टीचा प्रामाणिक ध्यास घेतला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कशा शक्य होतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुधीर निरगुडकरांचा ‘अनाहत यात्रा’ हा प्रकल्प. या प्रकल्पासाठी आपल्या २०/२२ पिढय़ांची माहिती मिळवताना त्यांनी संपूर्ण भारत उभा-आडवा पालथा घातला आणि अथक प्रयत्नांनी पूर्वजांची साडेनऊशे वर्षांची माहिती शोधली. ही अनाहत यात्रा सफल संपूर्ण झाल्यावर शोधलेल्या सर्व निरगुडकरांना वर्षांतून किमान दोनदा म्हणजे वाढदिवस, गुढीपाडवा आदी निमित्ताने शुभेच्छापत्रं पाठवण्याचा त्यांनी वसा घेतला. का, तर जगभरातील साडेचारशे निरगुडकरांशी जोडलं गेलेलं आपुलकीचं नातं टिकून राहावं म्हणून. निरगुडकर कुटुंब कलाप्रेमी आहे. आपल्या घरी एखाद्या गुणी कलाकाराचा कार्यक्रम ठेवायचा आणि शंभर- सव्वाशे परिचितांना त्यासाठी बोलवायचं हा या मंडळींचा छंद आहे. पं. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, पं. सी. आर. व्यास, पं. प्रभाकर कारेकर अशा ज्येष्ठ कलाकारांपासून पं. संजीव अभ्यंकर, अश्विनी भिडे-देशपांडे, पं. गणपती भट, आरती अंकलीकर अशा आजच्या पिढीतील दमदार गायकांपर्यंत अनेक स्वरवंतांच्या मैफिली त्यांच्या वास्तूत रंगल्या आहेत.\nगाण्याचं आणि देण्याचं सोडलं तर सुधीर निरगुडकरा��ना दुसरं कुठलंही व्यसन नाही. आनंद वाटूनच उपभोगायचा हे त्यांचं तत्त्व. या सगळ्यांसाठी त्यांना मिळणारी पत्नीची- चारुशीलाची साथ लाखमोलाची. तिच्याविषयी बोलताना त्यांचे शब्द होते.. सासूसासऱ्यांकडून मिळालेला कमीत कमी गरजांचा संस्कार तिने मुलांना दिल्यामुळेच मला निरगुडकर ‘फाऊंडेशन’चा डोलारा उभा करता आला. जेथे राघव तेथे सीता हा तिचा धर्म आहे.\nनिरगुडकर दाम्पत्याच्या या विचारसरणीमुळे पुढील पिढीलाही दानाचं महत्त्व पुरेपूर उमगलंय. वाढदिवस साधेपणाने करून ते पैसे ‘फाऊंडेशन’ला द्यायचे हे तर त्यांच्या मुलांनी- मंदार व मंजिरीने समज आल्यापासूनच सुरू केलंय. कमवायला लागल्यापासून तर गेली ७/८ वर्षे ही दोघं व सून प्रियंका आपल्या मिळकतीतील ठरावीक हिस्सा नियमितपणे अन्नदानासाठी खर्च करत आहेत.\nआतापर्यंत सुधीर निरगुडकरांची मराठी व इंग्रजीत मिळून एकूण दहा पुस्तकं प्रकाशित झालीत. या पुस्तकांच्या मानधनाची रक्कमही अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतून पुस्तकं बनविण्याच्या कामी येते.\nनिरगुडकर ‘फाऊंडेशन’ने गेल्या ४० वर्षांच्या वाटचालीत अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केला, पण कुठेही आपल्या नावाच्या पाटय़ा लावाव्यात असा विचारदेखील त्यांच्यातील कोणाच्याच मनाला शिवला नाही. हजारो विद्यार्थ्यांना, रुग्णांना आधार देण्यात आला- त्यांच्या मनात आपलं नाव जपलं जाईल याची या परिवाराला खात्री आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती’ या पुस्तकातील समर्थाचं एक वचन हेच तर सांगतं..\nऐसी कीर्ती करून जावे\nआणि हेच निरगुडकर कुटुंबाच्या जगण्याचं सूत्र आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी ���रकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/a-staff-worker-stills-aeroplane-and-crashes-it-on-an-lonely-island/", "date_download": "2019-03-25T07:22:08Z", "digest": "sha1:K2X54RHP47TS4YVO4KEOBR2FXACEG3XQ", "length": 11521, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘त्याने’ चक्क विमानच चोरले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘त्याने’ चक्क विमानच चोरले\nन्यूयॉर्क: आजपर्यंत तुम्ही सायकल चोरी, बाईक चोरी, कार चोरी, इत्यादी चोऱ्यांबद्दल ऐकले असेल पण जर एखाद्याने विमानच चोरले तर अतिशयोक्ती वाटते ना पण ही अतिशयोक्ती नसून अमेरिकेतील सीएटल विमानतळावरुन विमान कंपनीच्याच यांत्रीकी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने विमान चोरल्याची घटना घडली आहे. हे चोरीचे विमान काही वेळाने जवळच्याच एका बेटावर कोसळले यावेळी विमानात एकही प्रवासी नसल्याने कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही.\nअशा या आगळ्या वेगळ्या चोराने एअर ट्रॅफीक कंट्रोल रूम सोबत संपर्क साधत मागणी केली की, मला तुमच्या कंपणीमध्ये पायलट म्हणुन नौकरी देत असाल तरच मी हे विमान सुरक्षीत रित्या उतरवेल मी खुप निराश झालेलो असून त्या निराशे पोटी आपण हे कृत्य केले असल्याचे देखील त्याने सांगितले. यानंतर त्याने विमानातील इंधन संपायला आले आहे अशी माहिती दिल्याने काही काळ त्या ठिकाणी तनावाचे वातावरण होते.\nयावेळी विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे “एका व्यक्तीने बेकायदेशीररित्या विमानाचा ताबा घेऊन विमानाचे उड्डाण केले. यामुळे सीएटल ताकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करावे लागले.” विमान कोसळल्यानंतर विमानचोर कर्मचारी त्यातून वाचला आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. स्थानिक शहराच्या शेरिफ ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार विमान पळवणारा माणूस 29 वर्षांचा होता त्याचे नाव अजुन उघड केले गेले नसले तरी त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून ही एक चोरीची घटना आहे असेही त्यांनी पुढे सांगितले.\nनवाझ शरीफ यांची प्रकृती खालावली\nजबरदस्तीच्या धर्मांतरांची चौकशीचे इम्रान खान यांचे आदेश\nसिरीयात इस्लामि�� स्टेटवर विजय मिळवल्याची घोषणा\nभारतावर अधिक दहशतवादी हल्ले झाल्यास गंभीर स्थिती : अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा\nचीनमध्ये रसायनांच्या कारखान्यात स्फोट; 6 ठार 30 जखमी\nनीरव मोदीची होळी तुरुंगातच\nतीन दिवसांची जागतिक संस्कृत परिषद नेपाळमध्ये सुरू\nमालीत 21 लष्करी जवानांची हत्या\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-03-25T07:28:59Z", "digest": "sha1:UVOY3KE34KKNN3UO76URDFQBEGTMRMNX", "length": 11957, "nlines": 307, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\n\"पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण २३६ ��ैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nमार्टिन ल्यूथर किंग, जुनियर\nबडे गुलाम अली खान\nपाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\nशिवयोगी श्री सिद्धरामेश्वर सोलापूर\nयश पाल (शिक्षणतज्ज्ञ )\nवसंत कुमार शिवशंकर पादुकोण\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१३ रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-03-25T07:29:53Z", "digest": "sha1:FWHUTEOCHINSW6XLRPLZUCGGNXQSA2NE", "length": 5554, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सावंतवाडी संस्थान - विकिपीडिया", "raw_content": "\n[[मराठा साम्राज्य|←]] इ.स. १६२७ – इ.स. १९४७ →\nसर्वात मोठे शहर सावंतवाडी\nअंतिम राजा: शिवराम सावंत भोसले (इ.स. १९३७-४७)\nअधिकृत भाषा मराठी भाषा\n–घनता 104.6 प्रती चौरस किमी\nसावंतवाडी संस्थान हे ब्रिटिश काळात मुंबई इलाख्यातील बेळगाव एजन्सीमधील एक संस्थान होते. या संस्थानाचे संस्थानिक खेम सावंत भोसले हे होते. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते.[१]\nसावंतवाडी संस्थानच्या प्रदेशाला लागून उत्तरेला व पश्चिमेला तत्कालीन रत्नागिरी जिल्हा म्हणजेच सध्याचा मालवण व कणकवली तालुक्यांचा काही भाग, दक्षिणेला गोवा, पूर्वेला कोल्हापूर संस्थान व बेळगाव जिल्हा होता.\nभारत स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान भारतात विलीन झाले. सावंतवाडी हा सध्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nसावंतवाडी संस्थान हे लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध होते.\nडेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखालील संस्थाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१८ रोजी २३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीस��ठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2580", "date_download": "2019-03-25T08:29:23Z", "digest": "sha1:NNZPLZVAVQF3D2KGUPURWYNRPESLV7SN", "length": 10080, "nlines": 94, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "केळवण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठी घरात लग्न किंवा मुंज यांसारखे मंगल कार्य ठरले, की लगेच केळवणाची आमंत्रणे येण्यास सुरुवात होते. केळवण हा लग्न, मुंज यांसारख्या मंगलकार्यापूर्वी होणारा समारंभ आहे. त्यामध्ये वधू आणि वर यांच्या स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे थाटाने मेजवानी करून नातेवाईकांना जेवायला घातले जाते. तसेच, नातलगही त्यांच्या त्यांच्या घरी वधूला किंवा वराला मेजवानी देतात आणि भोजनोत्तर घरचा अहेरही देतात. त्याला यजमानांनी केळवण केले असे म्हटले जाते. ते सहसा वधुवरांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांजकडून होत असते. लग्नासाठी तयार (वॉर्मअप) करण्याचा हा प्रकार\nकेळवण याचा एक अर्थ काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे असाही आहे. केळीच्या पिकाची काळजी घेऊन मशागत करावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी जशी काळजी घेतली जाते तशीच सासरीही घेतली जावी हाही केळवण करण्यामागचा हेतू असावा.\nकेळवणाला गडगनेर असेही म्हटले जाते. गडगनेरचा गडंगनेर किंवा गडंगणेर असे दोन्ही उच्चार आढळतात. गडू आणि नीर यांपासून गडगनेर हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. परंतु गडगनेर याचा शब्दशः अर्थ नुसता पाणी भरलेला तांब्या असा धरला जात नाही तर तो शब्द पाहुण्यांना देण्याची मेजवानी अशा अर्थाने येतो.\nमहाराष्ट्रात जेवणाच्या पंगतीसाठी केळीची पाने वापरण्याची प्रथा आहे. मुळात केळीचा उगम भारतात, विशेषतः पश्चिम घाट आणि ईशान्य भारत येथे झाला. मुसा ऍक्युमिनाटा आणि मुसा बाल्बिसिआना ह्या प्रजाती केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. जगातील केळीच्या उत्पादनाचा अठरा टक्के वाटा भारताचा आहे.\nकेळवण झालेल्या मुलीस केळवली असे म्हणतात. तिला सासरचे वेध लागलेले असतात. तिचे मन सासरी धाव घेऊ लागते. केळवली नवरीची ती भावावस्था ज्ञानेश्वरांनी एका ओवीत टिपली आहे. त्यांनी ज्ञानी व्यक्तीचे वर्णन करताना म्हटले आहे - केळवली नवरी माहेराविषयी जशी उदासीन असते तसा ज्ञानी माणूस जगण्याविषयी उदासीन असतो आणि तो त्याच्या अंतःकर��ाला न मरताच मृत्यूची सूचना देतो. ज्ञानेश्वरीतील ती ओवी अशी –\nना तरी केळवली नोवरी |\nकां सन्यासी जियापरी |\nतैसा न मरतां जो करी |\nमृत्युसूचना || 13.451 ||\nकेळवण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांच्या आधी काही शतके रूढ होती एवढे त्यातून दिसून येते. केळवण हा अस्सल मराठी शब्द आहे.\n- डॉ. उमेश करंबेळकर\nधन्यवाद डॉ. अत्यंत सुरेख माहिती मिळाली.\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nकशाचा पन्हाळा रिघे खानदेशा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/movie-dashkriya-cannes-47196", "date_download": "2019-03-25T08:30:50Z", "digest": "sha1:QD6AGGDNHPVIG2BPAYC2J3CNQOB4LWWE", "length": 14197, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "movie Dashkriya in Cannes कान्समध्ये रंगला 'दशक्रिया'चा खेळ! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकान्समध्ये रंगला 'दशक्रिया'चा खेळ\nमंगळवार, 23 मे 2017\nजगातल्या सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' सोमवारी संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा पहिला खेळ झाला. फ्रान्सच्या ग्रे या प्रेक्षागृहात हा विशेष खेळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.\nमुंबई: जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' सोमवारी संजय पाटील लिखित आणि संदीप पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा पहिला खेळ झाला. फ्रान्सच्या ग्रे या प्रेक्षागृहात हा विशेष खेळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आयोजि�� करण्यात आला होता. या सोहळ्याचा 'आँखो देखा हाल' पाहण्यासाठी या चित्रपटाची टीम उपस्थित होती.\nया चित्रपटाचा दुसरा खेळही लवकरच होणार आहे. 'दशक्रिया' या चित्रपटास आधी राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासन पुरस्कार, संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार अशा विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे.\nनुकत्याच जाहीर झालेल्या नवव्या 'निफ' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दशक्रिया' चित्रपटाला तब्बल 11 विभागांमध्ये नॉमिनेशन जाहीर झाले आहे. यामध्ये बेस्ट अनरिलीज फिल्म निर्मिती व दिग्दर्शन, तसेच डेब्यू दिग्दर्शन, प्रमुख अभिनेता, सहाय्यक अभिनेता, बालकलाकार, सर्वोत्कृष्ठ कथा, पटकथा, गीते, छायाचित्रण, संगीत, गायक, गायिका तसेच आपली वेगळी ओळख तयार करण्यात यशस्वी झाल्याबद्दल 'विशेष पुरस्कार' अशा विभागांचा समावेश आहे.\nया चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, प्रशांत तपस्वी, अनिल रबाडे, उमेश बोलके, संस्कृती रांगणेकर, बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर यांच्यासोबत आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nLoksabha 2019 : पक्षातील मंडळींचे \"षड्यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील\nपारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या...\n'फिल्मफेअर 2019' मध्ये रंगला प्रेमाचा सोहळा; 'हे' ठरले मानकरी\nफिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प���रत्येक...\nसुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला,...\nतुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले\nकोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat/zanzawaat/", "date_download": "2019-03-25T07:45:02Z", "digest": "sha1:3PBCNSUWVLA27VU5VI2FCDDUNT3UUIOM", "length": 6593, "nlines": 85, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Zanzawaat - Movie - Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nचिकणमातीच्या अप्रतीम कलाकृती निर्माण करणाऱ्या एका कलावंताची ही कथा. त्याला व्यवहार जमत नाही. कुटुंब हलाखीत दिवस काढीत असतानाच मुलगा मरण पावतो. सुनेला सांभाळतो, नातीला शिकवतो पण दैवाच्या झंझावातापुढे 'दैवा तुला जोडीले हात' या आठवले यांच्या शब्दात हात जोडून हार मानतो. आठवले यांनी मातीची महती सांगणारी एक उत्तम कविता या चित्रपटासाठी लिहिली. त्याची ध्वनीमुद्रिका उपलब्ध नाही पण ती वाचण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल :\nमातीतुनी जन्म घेती जगताच्या रम्यकृती\nमातीतुनी अवतरती सुंदर सुकुमार फुले\nमातीतुन मानवास खावयास अन्न मिळे \nनटलेली ही नगरे ही तिचीच श्रीमंती\nमातीच्या मंदिरात मातीचा देव उभा\nमातीच्या पणतीतून फाकतसे दिव्यप्रभा\nमाती ही मानवास शिकवितसे प्रभूभक्ती\nजन्म ज्यास मृत्यू त्यास - नियतीचा नियम अटळ\nन कळे हा कोणाचा - का - कशास - दिव्य खेळ \nमातीतुन जन्म आणि शेवटही माती \nदैवा तुला जोडीले हात\nआई मला क्षमा कर\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Farmer-Suicides-in-Nifad/", "date_download": "2019-03-25T08:28:15Z", "digest": "sha1:OXOYDXF3SKDYB6V7OV4RFAEYUJXJ4RXG", "length": 5412, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निफाडला शेतकर्याची आत्महत्या; त्र्यंबकमध्ये एकाचा बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › निफाडला शेतकर्याची आत्महत्या; त्र्यंबकमध्ये एकाचा बुडून मृत्यू\nनिफाडला शेतकर्याची आत्महत्या; त्र्यंबकमध्ये एकाचा बुडून मृत्यू\nनिफाड तालुक्यातील नारायणगाव येथे विषप्राशन करून शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महेश सीताराम संगमनेरे (42) असे या शेतकर्याचे नाव आहे. दुसर्या घटनेत त्र्यंबकेश्वरमध्ये विहिरीत बुडून एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील यंदाची शेतकरी आत्महत्येची ही 103 वी घटना आहे. संगमनेरे यांनी शुक्रवारी (दि. 22) आत्महत्या केली. संगमनेरे यांच्याकडे शेती असून, कर्जही असल्याची माहिती प्रशासनास मिळाली आहे. मदत देण्याबाबत तालुका समितीकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा समितीवर हे प्रकरण ठेवले जाईल.\nत्र्यंबकेश्वर तालुक्��ातील मौजे टाकेदेवगाव येथील काशिनाथ भागा झोले (62) या शेतकर्याच्या मंगळवारी (दि. 26) विहिरीत बडून मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार झोले यांच्या नावावर 7/12 असून त्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही.\nकांदा निर्यातमूल्य वाढविण्याचा घाट\nनाशिकमध्ये नारायण राणे यांचा आरोप\nशहर बसवाहतुकीसाठी मनपाला सहकार्य करू\nत्र्यंबकच्या नियोजनासाठी खास बैठक घेऊ\nसमृद्धीच्या कामाला फेब्रुवारीत सुरुवात\nनिफाडला शेतकर्याची आत्महत्या; त्र्यंबकमध्ये एकाचा बुडून मृत्यू\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/bjp-leader-madhav-bhandari-program/", "date_download": "2019-03-25T08:12:18Z", "digest": "sha1:4Q5XZBJUZW7ROGTDF4MGFKW2VMHEZSFB", "length": 8563, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नोटाबंदीवर आक्रोश करणा-या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर लोटांगण - माधव भंडारी", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nनोटाबंदीवर आक्रोश करणा-या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर लोटांगण – माधव भंडारी\nसांगली : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नोटाबंदी व जीएसटी अशा ऐतिहासिक निर्णयाबाबत रस्त्यावर आक्रोश करणारी राजकीय नेतेमंडळी वर्षा बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे गोडवे गाऊन आमची कोणतीही प्रकरणे बाहेर काढू नका, अशी विनंती कर���ात, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त सांगली जिल्हा भाजपच्यावतीने येथील कच्छी जैन भवनात आयोजित काळा पैसा व भ्रष्टाचार विरोधी दिन या विषयावरील व्याख्यानात माधव भंडारी बोलत होते.\nनोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीला केवळ आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच विरोधक जनआक्रोश करीत आहेत. त्यासाठी सांगली जिल्ह्यात सुमारे दीड कोटी रूपये खर्चाची डिजीटल फलक उभारली गेली आहेत. मात्र या डिजीटल फलकांवरील कॉंग्रेस नेत्यांचे हसरे चेहरे पाहता छायाचित्रात कोठेही त्यांचा आक्रोश दिसत नाही. या नेत्यांचा हा आक्रोश सर्वसामान्य जनतेसाठी नव्हे, तर नोटाबंदी निर्णयामुळे त्यांना सहन कराव्या लागल्या त्रासाचा आक्रोश आहे. या जनआक्रोश मेळाव्यावर जितका पैसा विरोधकांनी खर्च केला, तोच पैसा सांगली जिल्ह्यातील शेतक-यांच्या बँक खात्यावर भरला असता, तर हजारो शेतकरी कुटुंबियांचा आक्रोश काही प्रमाणात का होईना थांबला असता, असा टोलाही माधव भंडारी यांनी लगावला.\nया निर्णयामुळे सुमारे ६६ लाख बँक खात्यांवर दोन लाख रूपयाहूनही अधिक रक्कम भरली गेली. या सर्व बँक खात्यांची सध्या पडताळणी केली जात आहे. दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम भरण्यात आलेली २० लाख बँक खाती आहेत, तर साडे तीन लाख बँक खात्यांवर एक कोटी रूपयापेक्षा अधिक रकमेचा भरणा झालेला आहे. आजअखेर तीन लाख कंपन्यांनी केवळ नोंदणी केली होती, त्यावर कोणतेही व्यवहार झाले नव्हते. मात्र या निर्णयानंतर या कंपन्यांच्या बँक खात्यावर कोट्यवधी रूपये जमा झाले. यातील ५६ हजार संशयास्पद कंपन्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे. नोटाबंदी निर्णयानंतर बँकांच्या ठेवीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी विविध कर्जांचे व्याजदर उतरले आहेत. या निर्णयामुळे लघु उद्योग वाढला असून अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळाली आहे, असा दावाही माधव भंडारी यांनी केला.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nसमृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांमध्ये एकजूट महत्वाची – राज ठाकरे\nसुपारी देऊन अनिकेत कोथळे याचा ख��न झाल्याचा कुटुंबियांचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/while-talking-about-triple-divorce-thrown-at-the-rally-in-asaduddin-owaisi/", "date_download": "2019-03-25T08:08:43Z", "digest": "sha1:S2OXCSMDMX5BPKSUIMIG6EQLOCMMXBYT", "length": 6632, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "असदुद्दीन ओवैसींवर भर सभेत फेकली चप्पल", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nअसदुद्दीन ओवैसींवर भर सभेत फेकली चप्पल\nमुंबई: मुंबईतील नागपाडा भागामध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींच्या सभेत राडा झाला आहे. मंगळवारी रात्री एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांच्या उपस्थितीत असदुद्दीन ओवैसींचं भाषण सुरु होतं. त्याचवेळी ओवैसींच्या दिशेनं काही जणांनी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही काळ गोंधळीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ओवैसींना काही काळ भाषण थांबवावं लागलं.\n”तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत रखडल्यामुळे निराश झालेल्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आला. तलाकवर सरकारचा निर्णय जनतेने विशेषत: मुस्लिमांनी स्वीकारला नाही. पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना घाबरत नाही. अशा हल्ल्यांनी आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही”, असे या हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवेसी यांनी सांगितले.\nचप्पल फेकणाऱ्याबाबत बोलताना ओवैसी म्हणाले की, हे लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचं अनुकरण करणारे आहेत. तसेच तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत मांडले जात असताना काँग्रेससह सर्व तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते गप्प होते. केवळ एमआयएमनेच या मुद्द्यावर मुस्लिमांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत ओवेसी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. या वेळी एमआयएमचे आमदार वारिस पठाण, इम्तियाज जलि�� यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nपोलिस असल्याचे सांगून ६० हजार रुपयांचे दागिने लुटले\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग आणण्याची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/transgender-way-of-celebrating-ganesh-festival-1299378/", "date_download": "2019-03-25T08:16:48Z", "digest": "sha1:YJCJSAJQWY6A3BUMJIBCGTF5TZ3QHSRR", "length": 13470, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "transgender way of celebrating ganesh festival | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nगणेश उत्सव २०१६ »\nगणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : गणेशोत्सवातून तृतीयपंथीयांच्या दातृत्वाची प्रचीती\nगणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : गणेशोत्सवातून तृतीयपंथीयांच्या दातृत्वाची प्रचीती\nगेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाकरिता, त्यांच्या हक्कांकरिता विविध स्तरांवर लढाई सुरू आहे.\nगणरायासोबत यल्लमा, दूर्गा, कालीचीही आराधना\nतृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमीच दूषित राहिला आहे. लोकलमध्ये, सिग्नलवर दानासाठी हात पुढे करणाऱ्या तृतीयपंथीयांबद्दल अनेकांच्या मनात चीड असते. मात्र हेच तृतीयपंथीय गणेशोत्सवाच्या काळात आपल्या दातृत्वाची प्रचीती देतात. इतरांच्या दातृत्वावर आपले पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांतर्फे गणेशोत्सवात दररोज अन्नदान करण्याची प्रथा आहे. अगदी हलाखीची परिस्थिती असली तरी या प्रथेत खंड पडू दिला जात नाही, हे विशेष.\nगेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाकरिता, त्यांच्या हक्कांकरिता विविध स्तरांवर लढाई सुरू आहे. समाजाच्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेला धक्का देऊन शिक्षणाबरोबरच रोजगारासाठी प्रयत्न करणारे तृतीयपंथीय हिंदू धर्मातील आद्य दैवत गणरायाची सेवा अतिशय प्रेमाने आणि मनोभावे करतात. तृतीयपंथीय सुरुवातीपासून देवीची पूजा करीत आले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील वेगवेगळ्या धर्माच्या आणि पंथांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तृतीयपंथी गणपती या देवतेची स्थापना आणि पूजा करीत आहेत. घराघरांमध्ये तृतीयपंथीयांच्या देव्हाऱ्यात यल्लमा, दूर्गा, काली यांच्याबरोबर गणपती या देवाचा सहभाग वाढत चालला आहे.\nतृतीयपंथीयांच्या प्रथेप्रमाणे गणेशाला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात ‘जाईचा मोहरा’ या भाजीचा अंतर्भाव असणे गरजेचे असते. ‘जाईचा मोहरा’ हा जंगलांमध्ये येणाऱ्या भाजीचा प्रकार असून गणेशोत्सवाच्या काळात ही भाजी बाजारात मिळते. गावरान मेवा, देवरूपी भाजी आणि गणपतीचा आवडता पदार्थ म्हणून याची ख्याती आहे. त्याचबरोबर पाच लहान मुलांना जेवणासाठी बोलावले जाते. तृतीयपंथीयांमध्ये गणेशोत्सव काळात दान करणे महत्त्वाचे मानले जाते. गणपतीच्या रूपाने पाच मुले आपल्या घरी जेवून जातात ही त्यामागची भावना आहे. त्याचबरोबर या सात दिवसांत देव जागविण्याची प्रथा आहे. या सात दिवसांच्या जागरणात एका दिवशी तृतीयपंथीयांना बोलावून नाच सादर केला जातो, तर उरलेल्या दिवसांमध्ये राहत असलेल्या ठिकाणी भंडारा भरविला जातो.\nचेंबूरमध्ये राहणाऱ्या पायल या तृतीयपंथीयाकडे सात दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गेली १२ वर्षे त्यांच्याकडे गणपतीची स्थापना केली जाते. यासाठी भटजीला न बोलवता गणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजा तृतीयपंथीयच करतात. शंभर भटजींचे पुण्य एका तृतीयपंथीय व्यक्तीमध्ये असते, असा समज असल्याने प्रतिष्ठापना ही स्वत:च्या हातांनीच केली जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चा��त नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/art-society-and-society-in-general-235677/", "date_download": "2019-03-25T08:36:46Z", "digest": "sha1:6NTD34RZ2BPOVLFPRYO2JXKLTCNBVF6F", "length": 28639, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कलासमाज आणि मोठा समाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nकलासमाज आणि मोठा समाज\nकलासमाज आणि मोठा समाज\nसमाजमान्य कलावंत आणि इतिहासमान्य कलावंत हे निरनिराळे असू शकतात. कलेचा इतिहास काय, हे ठरतं कलासमाजात. त्याबाहेरच्या मोठय़ा समाजाला हा इतिहास मान्य असेलच, असं नाही.. मुक्त\nसमाजमान्य कलावंत आणि इतिहासमान्य कलावंत हे निरनिराळे असू शकतात. कलेचा इतिहास काय, हे ठरतं कलासमाजात. त्याबाहेरच्या मोठय़ा समाजाला हा इतिहास मान्य असेलच, असं नाही.. मुक्त अभिव्यक्तीबद्दल विचार करताना हा भेद लक्षात घ्यायला हवाच असं मोठय़ा समाजाचा इतिहास सांगतो आहे..\n‘द्रोह’ हा शब्द फार कडक आहे आणि सोवळाही. सोवळा एवढय़ाचसाठी की, काय म्हणजे द्रोह नाही, याच्या कल्पना बऱ्याच जणांच्या मनांमध्ये कदाचित पिढय़ान्पिढय़ा घट्ट झालेल्या असल्या, तरच एखादी कृती ‘द्रोह’ ठरते. काय म्हणजे द्रोह नाही, याच्या कल्पनांना कलावंताच्या कल्पनाशक्तीचा ‘विटाळ’ सोसत नाही अजिबात. ‘भारतमातेला विवस्त्र दाखवणं, सीतामाईचा पदर ढळलेला दाखवणं यात कसली आल्येय कल्पनाशक्ती’ हा प्रश्न अखिल भारतीय स्तरावर बावनकशी सोन्यासारखा खणखणीत वाजला आणि एका वयस्कर भारतीय चित्रकाराचं प्रेतसुद्धा मायदेशात आणणं मुश्कील झालं, हा आपला सर्वाचा अगदी एकविसाव्या शतकातलाच इतिहास असल्यामुळे ‘कल्पनाशक्तीचा विटाळ’ हा शब्द गैर वाटू नये. चित्रकलेतलं ज्यांना समजतं किंवा चित्रकलेशी ज्यांचा या ना त्या प्रकारे संबंध आहे अशा भारतीय ‘कलासमाजा’पेक्षा किती तरी मोठा समाज भारतात आहे. या मोठय़ा समाजाचं कलासमाजानं ऐकलंच पाहिजे, असे प्रसंग एकदा नव्हे तर अनेकदा आलेले आहेत.\nइथे लक्षात घ्या की, आ���ण मघाशी द्रोहाबद्दल बोलत होतो. बंडखोरीबद्दल नव्हे. बंडखोरी वगैरे करणाऱ्या चित्रकारांचं कवतिक दृश्यकलेच्या इतिहासाला असतं. छानपैकी चित्रंबित्रं काढून, लोकांची दाद मिळवून साताठ पुस्तकांचे लेखक झालेला आणि वर विचारवंतसुद्धा ठरू घातलेला एखादा मराठी चित्रकार असतो, पण त्याला कलेचा जागतिक इतिहास मोजतच नाही. हा कलेचा इतिहास ‘कलासमाजा’तले कोणी ना कोणी लिहितात, तो इतिहास ज्यांना मान्य असतो किंवा ‘हा कलेचा इतिहास म्हणजे आपला इतिहास आहे’ असं जे मानतात, ते ‘कलासमाजा’चा भागच बनतात अनेकदा, असं भारतात तरी आहे. बाकीच्या ‘मोठय़ा समाजा’ला जागतिक कलेतिहास वगैरे माहीत नसला तरी चालतो, असं मानण्याची जनरीत भारतात गेल्या २०० वर्षांत (म्हणजे पाश्चात्त्य आधुनिक कला आपल्याकडे शिकवली जाऊ लागली, त्याच्या आधीच्या थोडय़ा आणि नंतरच्या सर्व काळात) दिसून येते. त्यामुळे उदाहरणार्थ, दिवंगत मकबूल फिदा हुसेन यांनी कलेच्या इतिहासाच्या मते कसलीच बंडखोरी केली नसेल आणि त्यांनी नुसतीच त्यांच्यापरीनं त्यांची कल्पनाशक्ती लढवून पाहिली असेल, तरी ‘यात कसली आल्येय डोंबलाची कल्पनाशक्ती’ अशी- किंवा यापेक्षा काही तरी जहाल प्रतिक्रिया देणारा मोठा समाज तयार होता. या मोठय़ा समाजाचा अर्थ फक्त ‘(धार्मिकदृष्टय़ा) बहुसंख्याक समाज’ इतका संकुचित अजिबात नाही. या मोठय़ा समाजात एका धर्माशी बांधलं जाऊच न शकणारं (मग ते खऱ्या धर्मनिरपेक्ष नेत्यांचं असो की स्यूडो सेक्युलर मुखंडांचं) सरकारही येतं. ‘कलासमाजाची बाजू घ्यायची की मोठय़ा समाजाची,’ असा अटीतटीचा प्रश्न कोणतंही सरकार/ कोणतीही सरकारी यंत्रणा एकतर येऊच देत नाही, किंवा आला तरी तो अस्फुटच ठेवून, सरकारी यंत्रणा मोठय़ा समाजाचीच बाजू अप्रत्यक्षपणे मान्य करतात.\nहे इतकं सगळं ठरलंच असेल, तर मोठय़ा समाजाला आवडेल असाच इतिहास रचला जायला हवा होता. पण तसं तर दिसत नाही. कलासमाज (कलाबाजार, कलाव्यवहार आणि कलासंकल्पनांचा प्रदेश) जागतिक स्तरावर व्यवस्थित वाढत गेलेला असल्यानं दृश्यकलांचा इतिहास हा दृश्यकलासमाजानं ठरवलेला असतो. चित्रपटाच्या किंवा नाटय़लेखनाच्या इतिहासातही हे आहेच. उदाहरणार्थ आपल्याकडे, कालिदासापेक्षा शूद्रक मोठा, हे नाटय़लेखकांनी ठरवलेलं आहे. कालिदास म्हटल्यावर किमान दोन काव्यं अनेकांना आठवतील, शूद्रक म्हणजे मृ��्छकटिकाच्या लेखकाचं टोपणनाव, याची आठवण द्यावी लागेल.. अशी त्यांची आजच्या ‘मोठय़ा समाजा’तली किंमत असली, तरी कलेतिहास रचणारे लोक ‘मोठय़ा समाजा’पेक्षा निराळे राहिल्यामुळेच मोठय़ा समाजातल्या अनेकांना ‘बोअरिंग’ वाटू शकणारे काही शब्दप्रयोग आजही आपापलं सत्त्व टिकवून आहेत : अभिव्यक्ती, सर्जनशीलता, कलासंकल्पनेला पुढे नेणं, प्रायोगिकता, कालसापेक्षता, बंडखोरी ही अशा शब्दप्रयोगांची काही उदाहरणं.\nत्या शब्दांच्या जंजाळात शिरण्यापेक्षा, आत्ता- आजकालच्या काळात कलेतिहासात शिरू पाहणाऱ्या दोन कलाकृतींची उदाहरणं आपण पाहू. या दोन कलाकृती अद्याप तरी कलेच्या इतिहासाचा भाग झालेल्या नाहीत. त्या ‘मोठय़ा समाजा’च्या कलाविषयक आडाख्यांना धक्का देणाऱ्या आहेत. पण तेवढय़ासाठी नव्हे तर कलाकृतीची कालसापेक्षता आणि प्रायोगिकता या मुद्दय़ांवर या कलाकृती कलेतिहासात स्थान मिळवू शकतात. सोबतचं चित्रं त्यापैकी एका कलाकृतीचं आहे. ब्राझीलच्या गिल व्हिसेन्ते या चित्रकाराची ‘एनिमीज’ ही ती कलाकृती, सुमारे डझनभर चित्रं मिळून बनलेली. हा चित्रसमूह ‘साओ पावलो बिएनाले’ नावाच्या द्वैवार्षिक महा-प्रदर्शनात मांडण्यात आला होता. म्हणजे मानाचं स्थान. साओ पावलो बिएनाले महत्त्वाची आहेच, कारण ही कलेच्या युरोपीय इतिहासाला आव्हान द्यायचं म्हणून सुरू झालेली, भांडवलशाहीला शरण न जाता कलेची अभिव्यक्ती होऊ शकते यावर विश्वास ठेवणारी आणि तो विश्वास गेल्या अनेक वर्षांत सार्थ ठरवणारी अशी एक संस्थाच (‘व्यक्ती नव्हे संस्था’वाल्या अमूर्त अर्थानं) बनली आहे. साओ पावलो बिएनालेचा हा संस्था-पणा गेल्या ५० वर्षांतल्या कलेतिहासानं (म्हणजेच तो इतिहास लिहिणाऱ्या कलासमाजानं) मान्य केला आहे. दुसरी कलाकृती तितकी महत्त्वाची नसेल, पण उदाहरणादाखल तिचा उल्लेख भारतीय संदर्भात अत्यावश्यक आहे. शायना आनंद, अशोक सुकुमारन् यांच्या ‘कॅम्प’ आणि ‘पद(डॉट) मा’ या कलासंघटनांची ही निर्मिती (किंवा ‘न-निर्मिती’ म्हणूया.. कारण इथं नव्यानं काहीसुद्धा निर्माण झालेलं नाही..) ‘राडिया टेप्स’ म्हणून जी दूरध्वनी-संभाषणं इंटरनेटमुळे ‘पब्लिक डोमेन’मध्ये आली, तीच संभाषणं आर्ट गॅलरीत मांडून ‘प्रेक्षकां’ना ती वाचायला आणि ऐकायला उपलब्ध करून देणं, हे या कलाकृतीचं ढोबळ वर्णन (पण कलाकृती कशी ही केवळ आर्ट गॅल��ीत आली म्हणून केवळ आर्ट गॅलरीत आली म्हणून). आपण दोन्हींना सध्या तरी कलाकृतीच म्हणू.\nया दोन्ही कलाकृतींचा संबंध ‘मोठय़ा समाजाला माहीत असणाऱ्या माणसां’शी आहे. ही माणसं राजकारणाशी संबंधित आहेत (किंवा तथाकथित ‘राडिया टेप्स’मध्ये चर्चेचा विषय राजकारण हाच आहे). एरवीच्या ज्या ‘राजकीय जाणिवेच्या कलाकृती’ असतात, त्यापेक्षा या दोन्ही कलाकृती फार वेगळय़ा आहेत. पाहाताय ना सोबतच्या चित्रात एक माणूस ब्रिटनच्या राणीसाहेबांवर पिस्तूल रोखतोय. त्याच माणसानं त्याचं पिस्तूल अन्य एका चित्रात जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या अगदी डोक्याला टेकवलंय. व्हॅटिकनचे राष्ट्रप्रमुख आणि ख्रिस्ती धर्मातील रोमन कॅथलिक पंथाचे सर्वोच्च अधिपती पोप (२०१० साली सोळावे बेनेडिक्ट हे या पदावर होते), इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदीनेजाद यांच्याहीसोबत या पिस्तूलखोर चित्रकाराची चित्रं आहेत. चित्रातला पिस्तूलधारी जो आहे, तो स्वत चित्रकार गिल व्हिसेन्ते.\n‘कलेतून हा माणूस हिंसाचाराला प्रोत्साहनच देतोय’ अशी चर्चा इंटरनेटवरल्या समाजमाध्यमांतून सुरू झाली. समाजमाध्यमं हे छोटय़ा गटांचंही हत्यार असू शकतं पण ‘मोठय़ा समाजा’ची मान्यता मिळाली तर मात्र ‘गँग्नम’, ‘कोलावेरी’च्या लाटा जगभर कुठेही येऊ शकतात. आपल्या भारतस्थ महाराष्ट्रीय मराठीभाषक समाजापर्यंत गिल व्हिसेन्तेवरली चर्चा पुरेशी पोहोचली नाही, पण इंटरनेटवर ही चित्रं पाहाताना ती चर्चादेखील सापडेलच कुणालाही.\nयाउलट, ‘यात कसली आल्येय कला’ असा प्रश्न जिच्याबद्दल निर्माण होतो, ती ‘(तथाकथित) राडिया टेप्स’वर आधारित ‘पल.. पल.. पल.. पल..’ ही नावाची कलाकृती’ असा प्रश्न जिच्याबद्दल निर्माण होतो, ती ‘(तथाकथित) राडिया टेप्स’वर आधारित ‘पल.. पल.. पल.. पल..’ ही नावाची कलाकृती आधी कोलकात्याच्या ‘एक्स्पेरिमेंटर’ या नवमाध्यम-कलेला प्राधान्य देणाऱ्या गॅलरीत, मग ‘स्कोडा प्राइझ’ नावाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाच्या निवड-प्रक्रियेचा भाग म्हणून भारतभरच्या अव्वल चार प्रदर्शनांतल्या निवडक कलाकृतींचं जे प्रदर्शन भरतं, त्यात या ‘पल.. पल.. पल.. पल..’चा समावेश होता. आत्ता मुंबईच्या केमोल्ड प्रिस्कॉट रोड गॅलरीच्या सुवर्ण-महोत्सवी प्रदर्शनातही हीच कलाकृती आहे. हे तपशील मुद्दाम अशासाठी की, ‘आर्ट गॅलऱ्यांत लागणं’ ही पायरी ���पल.. पल.. पल.. पल..’नं बऱ्याचदा गाठली आहे. तिचं कौतुकही याच पायरीवर झालेलं आहे. ‘पल.. पल.. पल.. पल..’ हा नीरा राडिया यांचा कॉलर-टोन होता. तसा तो (गॅलरीतल्या या कलाकृतीच्या श्राव्य भागातून) ऐकूही येतो. भिंतीवरल्या फ्रेमांमध्ये ‘ए-४ साइझ’च्या कागदांवर या राडिया-संभाषणाचा काही भाग उतरवून घेऊन टाइप केलेल्या स्वरूपात पाहायचा, फोन उचलून टेपमधले आवाज ऐकायचे, अशी या कलाकृतीची रचना आहे आणि ‘साउंड आर्ट’च्या व्याख्येत ती चपखल बसते आहे.\nपण.. पण.. पण.. पण.. मोठय़ा समाजाला या कलाकृती ‘कलाकृती’ म्हणून पटणार आहेत का या कलाकृतींनी अगदी निक्षून, मोठय़ा समाजात चर्चेचा विषय ठरलेल्या राजकारणाची याद जागवली आहे. गिल व्हिसेन्तेची कलाकृती पाहिल्यावर आपल्याकडे विजय तेंडुलकरांचं ‘.. तर मोदींना गोळी घालेन’ हे जे विधान तेंडुलकरांची छीथू करण्यासाठी पुरेसं असल्याचा जो माहौल खडम झाला होता, त्याचीही आठवण देणारं ठरू शकतं.\nनाही झाली आठवण, तर मोठा समाज जिंकला. तो तसाही जिंकत असतो नेहमीच. पण म्हणून ‘कलासमाज हरला’ असं होत नसतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजीवन रणधीर यांचे निधन\nनवोदितांच्या चित्रांसाठी ‘ऑनलाइन’ आर्ट गॅलरी\nकलावंताने लेखन करणे आवश्यक – डॉ. जब्बार पटेल यांचे मत\nव्हिडीओ कलाकारांसाठी यूटय़ूबकडून हक्काची जागा\nमूर्तिकारांना दिलेल्या नोटिसा मागे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’���ा निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/l-rahul-gandhi-tweet-against-budget-and-bjp-government/", "date_download": "2019-03-25T08:24:43Z", "digest": "sha1:FXZXGYTLOZ3TJKQAAFUIUFGQ72TXM5WR", "length": 4927, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुदैवानं, या सरकारचं आता एकच वर्ष उरलं आहे - राहुल गांधी", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसुदैवानं, या सरकारचं आता एकच वर्ष उरलं आहे – राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा: केंद्रिय अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी ट्विटरवरून टीका केली आहे. ४ वर्षं उलटून गेली तरी सरकार हमीभावाचं आश्वासनच देते आहेत. फक्त दिखाऊ योजना, त्याच्या जोडीला निधी नाही. अशी टीका राहुल गांधींनी ट्विटरवरून केली आहे.\n‘4 वर्षे उलटून गेली पण तरी हे सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतं आहे. ४ वर्षं उलटून गेली तरी हमीभावाचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. 4 वर्ष झाली तरी तरुणांना नोकऱ्या नाहीत. सुदैवानं, या सरकारचं आता एकच वर्ष उरलं आहे’. या आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केल आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nअर्थसंकल्प म्हणजे विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..\nसरकारच्या अधोगतीची वेळ आली आहे- अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2019-03-25T07:30:09Z", "digest": "sha1:O2QLBCBAU4F2PI4IFUNMJS2JWOTDRIV2", "length": 7694, "nlines": 228, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स दि गॉल - विकिपीडिया", "raw_content": "\n८ जानेवारी इ.स. १९५९ – २८ एप्रिल इ.स. १९६९\n१ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९\n१ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९\n२२ नोव्हेंबर इ.स. १८९०\n९ नोव्हेंबर इ.स. १९७० (वय ७९)\nचार्ल्�� आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (फ्रेंच: Charles André Joseph Marie de Gaulle ;) (नोव्हेंबर २२, इ.स. १८९० - नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हा फ्रांसचा सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होता. दुसर्या महायुद्धात फ्रांस पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्त्व केले व नंतर फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. हा इ.स. १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होता.[१]\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nचार्ल्स दि गॉल प्रतिष्ठान (फ्रेंच मजकूर)\nपाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष\nचार्ल्स दि गॉल · जोर्ज पाँपिदु · व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें · फ्रांस्वा मित्तराँ · जाक शिराक · निकोला सार्कोझी · फ्रांस्वा ऑलांद · इमॅन्युएल मॅक्राँ\nइ.स. १८९० मधील जन्म\nइ.स. १९७० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T07:33:17Z", "digest": "sha1:SXFT3N5KMGOJFGIAGD77IBOQUIN4PT6J", "length": 10229, "nlines": 45, "source_domain": "vicharpravah.in", "title": "१९. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : डिफरन्स इंजिन - विचारप्रवाह", "raw_content": "\n१९. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : डिफरन्स इंजिन\nबॅबेज यांच्या काळात आकडेमोड ही माणसांमार्फत केली जायची. विशेष म्हणजे आकडेमोड करणार्या या माणसांना त्याकाळी ‘कंम्प्युटर’ म्हणत. उद्योग-व्यवसायाच्या वाढीसोबतच आकडेमोड ही अधिक किचकट व गुंतागुंतीची होऊ लागली. त्यामुळे गणित सोडवत असताना त्यातील मानवी चुका वाढू लागल्या.\nअगदी केंब्रिज विद्यापिठात शिक्षण घेत असतानापासून बॅबेज या समस्येवर विचार करत होते. गणित सोडवण्याचे काम यंत्रामार्फत करुन घेतल्यास मानवी चुकांची समस्या उद्भवणार नाही, असे त्यांना मनोमन वाटत होते. १९व्या शतकात यांत्रिकीकरणाने वेग पकडला होता. तेंव्हा त्यांची ही कल्पना देखील त्या काळास अनुरुप अशीच होती. त्याकाळी वीजेच���या क्षेत्रातील शोधकार्य हे अगदीच प्राथमिक टप्यात सुरु होते. त्यामुळे बॅबेज यांचे यंत्र पूर्णतः ‘मेकॅनिकल’ स्वरुपाचे असणार होते. अर्थात त्या यंत्रास वीजेची आवश्यकता नव्हती. बॅबेज यांचे ‘डिफरन्स इंजिन’ चालवण्याकरिता मानवी शक्तिचा वापर होणार होता.\nचार्ल्स बॅबेज यांचे डिफरन्स इंजिन\n१८२० साली ‘ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’च्या स्थापनेत बॅबेज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. खगोलिय गणितांत प्रमाण निर्माण करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यादिशेने कार्य करत असताना चार्ल्स बॅबेज यांनी १८२२ साली ‘डिफरन्स इंजिन’ची कल्पना मांडली. डिफरन्स इंजिनच्या माध्यमातून एखादे उत्तर छापिल स्वरुपात प्राप्त होऊ शकणार होते. कारण यात प्रिंटरचा समावेश होता. या यंत्रामुळे गणितातील मानवी चुका दूर झाल्या असत्या. बॅबेज यांनी स्वखर्चातून या यंत्राचा काही भाग पूर्ण केला. पण हा एक खूप मोठा प्रकल्प होता. त्यामुळे पुढील कामासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडून आर्थिक मदत मिळवली. पैशांची तजवीज होताच त्यांनी याकामी एका कुशल व्यक्तीस नियुक्त केले. बॅबेज यांच्या घरातील एका खोलीत डिफरन्स इंजिनचे काम सुरु झाले. पण लवकरच त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागले.\nचार्ल्स बॅबेज यांच्या काळात अवजार घडवणारी साधणे आणि हाताखाली काम करणारे लोक फारसे कुशल नव्हते. त्यामुळे त्यांनी या अडचणीवर मात करण्याकरिता उत्पादन क्षेत्राचा आभ्यास केला. त्यानंतर ‘डिफरन्स इंजिन’चे भाग निर्माण करण्यास आवश्यक अशी साधने स्वतः घडवली. याचा अनायसे इंग्लंडमधील उत्पादन क्षेत्रास मोठा लाभ झाला. पण ‘डिफरन्स इंजिन’मागील शुक्लकाष्ट काही संपले नाही. दरम्यानच्या काळात याकामी नियुक्त केलेल्या व्यक्तीसोबत बॅबेज यांचे खटके उडत होते. १८२९ साल उजाडेपर्यंत सरकारने पुरवलेली मदत आणि बॅबेज यांनी स्वतः केलेली पदरमोड संपत आली असली, तरी त्यांचे ‘डिफरन्स इंजिन’ मात्र अर्धवटच होते. त्यामुळे त्यांच्यावर सर्वबाजूंनी टीका होऊ लागली. अखेर १८३२ सालापर्यंत ‘डिफरन्स इंजिन’चा काही भाग पूर्ण झाला व या यंत्राने सरतेशेवटी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली.\nपरंतु मागील १० वर्षांत डिफरन्स इंजिनचा केवळ काही भागच पूर्ण झाला होता. हे यंत्र पूर्ण करायचे झाल्यास अजून बराच खर्च येणार होता. शिवाय चार्ल्स बॅबेज यांना दरम्यानच्या काळात ‘डिफरन्स इंजिन’हून सुधारित व चांगल्या अशा ‘ॲनॅलिटिकल इंजिन’ची कल्पना सुचली होती. या सार्या गोष्टींचा विचार केला असता ब्रिटिश सरकारने या प्रकल्पातून आपला हात आखडता घेतला. अशाप्रकारे चार्ल्स बॅबेज यांचा हा प्रकल्प अंततः मागे पडला.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n२५. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज\n३८. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन : योगदान\n४४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर : जॉन विंसेंट ॲटॅनॅसऑफ\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2015-Kaapus.html", "date_download": "2019-03-25T07:51:56Z", "digest": "sha1:7WH2VQGD4ODVM3YCOKLTIAUIDAUOOVQW", "length": 61931, "nlines": 98, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कापसावरील विविध किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन", "raw_content": "\nकापसावरील विविध किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nपांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस हे एक भारतातील महत्त्वाचे पीक आहे. देशातील एकूण कृषी उत्पन्नाच्या २८.८% वाटा हा कपाशीचा आहे. परंतु असे असताना या पिकाच्या उत्पादनात घट येण्यात किडीचा प्रादुर्भाव ही एक जटील समस्या शेतकऱ्यांना कायम भेडसावत असते. कपाशीवर भारतात १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर महाराष्ट्रात २५ प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यापैकी १० ते १२ किडी ह्या कपाशीचे जास्त प्रमाणात नुकसान करतात. बी. टी. कपाशीमुळे कपाशीच्या क्षेत्रात व उत्पादनात चां��ल्या प्रमाणात वाढ झाली आहे. बी. टी. कपाशीवरील बोंडअळ्यांच्या फवारण्यांचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याकरिता पिकाच्या अवस्थेनुसार आणि किडीनुसार फवारणी व व्यवस्थापनाची आवश्यकता आहे.\n* रस शोषणाऱ्या किडी:\n१) मावा : मावा किडीचा पौढ लांबट असून, रंगाने पिवळसर ते गडद, हिरवा किंवा काळा आणि १ ते २ मिलीमिटर लांब असतो. या किडीच्या वर्षभरात अनेक पिढ्या निर्माण होतात. मावा किडीच्या पोटातील वरच्या भागावर दोन सुक्ष्म नलिका असून त्याद्वारे ही कीड चिकट, गोड द्रव बाहेर टाकते. हा द्रव खाण्यासाठी मुंग्या रोपावर आढळतात. ह्या मुंग्यांच्या पाठीवर पिल्ले बसून ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात. मावा कीड अंडी घालत नाही. तिचे प्रजनन संयोगाशिवाय होत असते. माद्या बिना पंखाच्या, आकाराने मोठ्या, फिक्कट रंगाच्या असतात. एक मादी दररोज ८ ते २२ पिल्लांना जन्म देते.\nपिल्ले ४ वेळा कात टाकून प्रौढावस्थेत जातात. ७ ते ९ दिवसात मावा किडीची पूर्ण वाढ होऊन प्रौढ मावा १५ ते २१ दिवस जगतो. वर्षभरात १२ ते १४ पिढ्या उपजतात.\nथंड हवामान आणि अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीस पोषक असल्याने अशा वातावरणात मावा किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. प्रामुख्याने पिकाच्या रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव आढळतो. कोरडवाहू कपाशीमध्ये जुलै महिन्याच्या मध्यानंतर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत आणि पिकाच्या शेवटच्या अवस्थेतील प्रादुर्भाव हा डिसेंबर - जानेवारी या थंडीमध्ये आढळतो. ज्याप्रमाणे थंड हवामान आणि अधिक आर्द्रता या किडीचा वाढीस पोषक ठरते. तसे जोराचा पाऊस झाला की मात्र मावा किडी घुवून जातात व त्यांची संख्या कमी होते.\nमाव्यामुळे होणारे नुकसान : पिल्ले व प्रौढ किडी पानांच्या खालच्या बाजूने आणी कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून त्यातील रस शोषतात. अशी पाने कमजोर होऊन आकसतात व मुरडतात. पानांचा रंग फिक्कट होतो. झाडाची वाढ खुंटते. मावा शरीरातून चिकट गोड द्रव बाहेर टाकतो. त्यामुळे पानाचा भाग ��िकट बनतो. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानांवर काळा थर जमा होतो. परिणामी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो. माव्याचा प्रादुर्भाव शेवटच्या अवस्थेत झाल्यास बोंड उमलण्यात अडथळा येतो.\n२) तुडतुडे : तुडतुडे हे फिक्कट हिरव्या रंगाचे प्रौढ किटक २ ते ४ मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुड्यांच्या समोरच्या पंखावर प्रत्येकी १ काळा ठिपका आणि डोक्याच्या भागावर २ काळे ठिपके असतात. ते पानांवर तिरकस चालतात. मादी पानांच्या शिरेमध्ये १ - १ पिवळी अंडी घालते. एक मादी ३० ते ४० अंडी घालते. अंडी घालण्यासाठी ३५ ते ४० दिवसांच्या कपाशीची पाने आवडतात. ४ ते ११ दिवस अंडी अवस्था राहते. पिल्ले पानांच्या खालील पृष्ठभागावरून रस शोषतात व २१ दिवसांत त्यांची वाढ पूर्ण होते. मादीशी संगम झालेले तुडतुडे उन्हाळ्यात ५ आठवड्यापेक्षा व हिवाळ्यात ७ आठवड्यापेक्षा अधिक काळ जगत नाहीत.\nतुडतुड्यामुळे होणारे नुकसान : पौढ तुडतुडे व पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने रस शोषतात आणि पानांच्या पेशीत ओली विषारी लाळ टाकतात. त्यामुळे पाने कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात. प्रादुर्भाव वाढल्यास पाने लालसर होऊन कडा मुरगळतात. पानांचा रंग बदलून पाने वाळू लागतात व गळतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते. अशा झाडांवरील फुलांची व बोंडांची संख्या घटते. कापसाचे एकूण उत्पादन कमी, वजन कमी भरून कापसाची प्रत ढासळते. ही कीड पानांच्या शिरेमध्ये सुईसारखी सोंड खुपसून पानांतील रस शोषते.\nया किडीचा प्रादुर्भाव जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो. तो साधारण १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणात फैलावतो. मधून - मधून होणारा हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण या किडीच्या वाढीस पोषक ठरते. त्याचबरोबर कपाशींची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो. अलिकडच्या काळात बी.टी. कपाशीवरही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे.\nतुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी सप्तामृतासोबत स्प्लेंडर २०० ते २५० मिली/१०० लि. पाण्यातून प्रादुर्भाव जाणवताच ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारावे.\n३) फुलकिडे : फुलकिडे हे अत्यंत लहान असतात. ते भिंगाच्या सहाय्याने पहावे लागतात. त्याची लांबी १ मिलीमीटर किंव�� त्यापेक्षाही थोडी कमी व पिवळसर रंगाचे असतात. यातील पिवळसर रंगाच्या फुलकिड्यांना 'क्रॅक्लीनिओन शुल्टझी' म्हणातात. तर दुसऱ्या प्रकारातील काळ्या रंगाचे जे फुलकिडे असतात. त्याला 'कॅलिओथ्रिप्स इंडिकस' असे म्हणतात.\nमादी कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूने त्यांच्या पेशीत अंडी घालते. काळ्या फुलकिड्यांमुळे झाडांच्या खालच्या पानांवर वरच्या बाजूने अतिशय पांढरे ठिपके पडतात. तर पिवळसर पांढऱ्या रंगाच्या फूल किड्यांमुळे खालच्या बाजूने पाने काळपट तर वरच्या बाजूने कोकडल्यासारखी व कडक होतात. पानांचे बारकाईने निरिक्षण केल्यास त्यावर काळ्या रेघा किंवा जळाल्यासारख्या भाग दिसतो. कोरडवाहू परिस्थितीत अधिक तापमान, कमी पाऊस किंवा पावसाची उघडीप असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.\nफुलकिड्यांमुळे होणारे नुकसान : या किडीचे पौढ व पिले पानांच्या मागील भाग खरवडून त्यात निघणारा रस शोषतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात. झाडांची वाढ खुंटते. ह्या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या शेवटी आणि उघडीप पडल्यावर वाढतो. सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात तर रुद्र रूप धारण करतो. अलिकडच्या ४ - ५ वर्षात बी टी कापसावरही या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.\n४) पांढरी माशी : कापसाच्या कोवळ्या पानांवर खालच्या बाजूने पांढरी माशी अंडी घालते. अंडी घालताना मादी मेणासारखा पांढरा पदार्थ पानावर सोडते. त्यामुळे अंडी पानांवर चिकटतात. अंडी जास्त घातलेली असल्यास पाने खालच्या बाजूने पांढरट दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो. पौढ माशी लहान असून २ ते ३ मि.मी. लांब असते. पांढऱ्या माशीची पिल्ले पानांतील रस शोषून तेथेच कोषावस्थेत जातात. कोषावस्था २ ते ८ दिवस असते. पांढऱ्या माशीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास हवामानानुसार १४ ते १०७ दिवस लागतात.\nपांढऱ्या माशीमुळे होणारे नुकसान : पांढऱ्या माशीची पिल्ले तसेच पौढ पानांच्या खालच्या बाजूने राहून रस शोषतात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडून पान जळाल्यासारखे दिसते. शेवटी पाने वाळून गळून जातात. पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. पाने व झाड चिकट व काळसर होते आणि झाडाची वाढ खुंटते. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो तो नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.\nनियंत्रण : पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी सप्तामृतासोबत सप्लेंडर २५० मिली १०० ते १५० लि. पाण्यातून फवारावे तसेच आलटून पालटून कडू निंबाचे तेल आणि निंबोळी अर्क प्रत्येकी ५०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारावे. त्यामुळे मावा, तुडतुडे, फुलकिड्यांचादेखील बंदोबस्त होतो.\n५) पिठ्या ढेकूण : या किडीच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी कपाशीवर आढळणारी पिठ्या ढेकणाची फेनोकोकस सोलेनोप्सीस ही प्रजात आहे. या जातीचे शरीर लांबट गोलाकार व रंग हिरवट काळा असतो. या किडीच्या शरीरावर चिकट, मेणचट पांढऱ्या रंगाचे अवरण असते. पिठ्या ढेकणाची एक मादी साधारणत: १५० ते ६०० अंडी घालते. ती पुंजक्यात असतात व त्याभोवती कापसासारखे पांढरे अवरण असते. पिठ्या ढेकणाचा जीवनक्रम १५ ते २७ दिवसांचा असून एका वर्षामध्ये १५ पिढ्या तयार होतात.\nपिठ्या ढेकणापासून होणारे नुकसान : पिठ्या ढेकणाची पिल्ले व पौढ ही दोन्ही अवस्थेतील कीड कपाशीची पाने, कोवळे शेंडे, पात्या, फुले व बोंडे यातून रस शोषतात. त्यामुळे तो भाग सुरुवातीला सुकून नंतर वाळून जातो. हे ढेकूण आपल्या शरीरातून मेणचट गोड रस स्त्रवतात. त्यावर बुरशी वाढून झाडे फिक्कट आणि काळपट पडतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते व झाडे वाळून जातात. या किडीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात २००७ - २००८ या वर्षी मोठ्या प्रमाणात झाला होता.\nपुढे या किडीच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक शत्रू उदा. प्रोम्युसिडी, अनॅसियस, अनॅगायरस यांचा वापर केला गेल्याने अलिकडे या किडीचा प्रादुर्भाव काही प्रमाणातच आढळतो.\n* कापसावरील बोंड अळी : या बोंड अळीमध्ये ३ प्रकार आढळून येतात.\n१) अमेरिकन बोंडअळी : ही बहुभक्षी कीड असून कापसाप्रमाणेच इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करते. बी.टी. कपाशीमुळे या किडीचे नियंत्रण झाले आहे. असे जरी असले तरी भविष्यात ह्या किडीमध्ये बी.टी. ला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होऊ शकते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी सुरूवातीला कोवळी पाने, कळ्या, पाती, फुले यांवर तोंड खुपसून आतील भाग खाते. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळ्या गळून जातात किंवा पावसाच्या पाण्याने झाडावरच ���डतात. सततचे पावसाळी वातावरण, हवेत ७५% पेक्षा जास्त आर्द्रता, कमी सुर्यप्रकाश या बाबी या किडीच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात.\n२) शेंदरी बोंडअळी : या बोंड अळीचा प्रादुर्भाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बोंडामध्ये आढळून येतो. सध्या बी.टी. कपाशीवर विशेषेकरून १ जनुक असलेल्या वाणावर शेंदरी बोंडअळी आढळून येते. उष्ण व ढगाळ हवामानात थोडा पाऊस असल्यास अळीची वाढ झपाट्याने होते. अळी कळ्या, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र पाडून आत शिरते. प्रादुर्भाव ग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेल्या पाती, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळ्या बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.\n३) ठिपक्याची बोंडअळी : या किडीची अळी प्रथम झाडाच्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलोऱ्यावर येताच ती कळ्यांत शिरून नंतर बोंडात शिरून त्याचे नुकसान करते. कीड लागलेल्या कळ्या व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो.\nकापसावरील इतर किडी :\n१) तंबाखूवरील पाने खाणारी अळी : ही कीड विविध पिकांवर जगणारी असून सध्या बीटी कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरूवातीच्या काळात अळ्या समुहाने राहून पानांचा मागील भाग खरवडून खातात. त्यानंतर एकएकट्या राहून संपुर्ण पाने खातात. पानांच्या फक्त शिरा व उपशिराच तेवढ्या शिल्लक ठेवतात. ह्या अळ्या फुले, कळ्या व बोंडावरसुद्धा प्रादुर्भाव करून खूप नुकसान करतात.\n२) पाने पोखरणारी अळी : ह्या किडीचा प्रादुर्भाव हा ज्या शेतात अगोदरचे वेलवर्गीय पीक आहे आणि त्यानंतर कपाशी लावली आहे. तेथे आढळून येतो. ह्या किडीची अळी पानांच्या आत शिरून हिरवा भाग खाते. त्यामुळे पानांवर नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.\n३) तांबडे ढेकूण : ही कीड वर्षभर कार्यरत असते, मात्र सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. पिल्ले व प्रौढ ढेकूण सुरूवातीच्या अवस्थेत पानांतून, कोवळ्या शेंड्यातून रस शोषतात. नंतर पक्व बोंड व उमललेल्या बोंडावर बहुसंख्येने राहून सरकीतील रस शोषतात.\n४) करडे ढेकूण : करडे ढेकूण ही कीड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कार्यक्षम असते. प्रौढ व पिल्ले अर्धवट उमललेल्या बोंडातील सरकीतील रस शोषूण घेतात. त्यामुळे तेलाचे प्रमाण कमी होते. बियाण्याची प्रत घसरते. यंत्रामधून सरकी काढताना हे ढेकून चिरडून रुईवर डाग पडतात.\n५) लाल कोळी : ही कीड इतर किटकांपेक्षा वेगळी असते. रंगाने लालसर असून त्यांना आठपाय असतात. पिल्ले व पौढ कोळी कोवळ्या पानातील रस शोषतात, त्यामुळे पानांवर फिक्कट पांढरे, पिवळे चट्टे पडतात. पुढे पाने तपकिरी होऊन वाळतात. अलिकडे या किडीचादेखील प्रादुर्भाव काही ठिकाणी भेडसावट आहे.\n* एकात्मिक कीड व्यवस्थापन : किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक किटकनाशकांचाच वापर न करता मशागतीय, यांत्रिक, जैविक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.\nएकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे वातावरणाचे संतुलन राखून माहित असलेल्या कीड नियंत्रणाच्या निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करणे. जेणे करून हानीकारक किडी आटोक्यात आणता येऊन पर्यावरणाचा समतोल साधता येतो.\nह्या पद्धतीमुळे पीक संरक्षण होऊन ते आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. रासायनिक किटकनाशकांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम कार्यक्षमरित्या कमी होऊ शकतो.\nएकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती:\n१) मशागतीय पद्धत : मशागतीय पद्धतींना एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये फार महत्त्वाचे स्थान असून त्या बिनखर्चाच्या किंवा कमी खर्चाच्या असतात. यांचा वापर योग्यवेळी व विशिष्ट प्रकारे केल्यास अतिशय फायदेशीर ठरते.\n२) त्याकरिता कपाशीची शेवटची वेचणी संपल्याबरोबर शेतातील पऱ्हाट्या उपटून शेताबाहेर काढाव्यात. म्हणजे झाडावरील रोग - किडींच्या अवस्था नष्ट होतील.\n३) शक्य असल्यास जमिनीची खोल नांगरणी करावी, म्हणजे जमिनीतील किडींच्या अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपतील.\nकपाशीची धसकटे व इतर पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. म्हणजे त्यावरील किडींची अवस्था नष्ट होईल.\n४) कपाशीचे तंतूविरहीत बियाणे पेरणीसाठी वापरावे.\n५) कापूस पिकाची योग्य फेरपालट करावी\n६) कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी. डी. एच. वाय २८६, पी के व्ही हाय २. पी के व्ही हाय या पानांवर लव असलेल्या जाती तुडतुड्यांना प्रतिकारक आहेत.\n७) माती परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून २ ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य ठेवून अधिकतम नत्राचा वापर टाळावा. म्हणजे पिकाची प्रमाणापेक्षा दाटी होणार नाही, म्हणजे किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.\n८) कपाशीत चवळीचे आंतरपीक घ्यावे. म्हणजे कपाशीवरील किडींचे शत्रु किटकांचे चवळीवर पोषण होईल. तसेच आंतरमशागतीच्या पद्धतीने शेत सतत तण विरहीत ठेवावे. म्हणजे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल.\n९) कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी पक्षीथांबे उभारावेत. त्यावर चिमण्या, निळपक्षी, मैना, कावळे, कोतवाल असे पक्षी बसून शेतातील अळ्या/किडी टिपतील .\n२) यांत्रिकी पद्धत : बोंड अळ्यांसाठी कपाशीच्या शेतात फेरोमेन सापळे लावून त्यात जमा होणारे नर पतंग दररोज काढून मारावेत.\nपिवळ्या पत्र्याचे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावेत. याकरिता टिनच्या पिवळ्या पत्र्याच्या डब्यावर तेल किंवा ग्रिस लावून ते शेतात लावावेत. म्हणजे डब्याला माशा चिकटून अडकून राहतात व मरतात. चिकटलेल्या माशा पुसून घेऊन डब्यांना पुन्हा तेल लावून ठेवावे.\n१) प्रादुर्भाव ग्रस्त गळलेली पाने, पात्या आणि लहान बोंडे जमा करून नष्ट करावीत.\n२) गुलाबी बोंडअळीग्रस्त डोम कळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.\n३) हिरव्या बोंड अळीच्या अळ्या मोठ्या झालेल्या असल्यास त्या वेचून माराव्यात.\n३) जैविक पद्धत : कापसावरील किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा अवास्तव वापर केल्याने मित्र किटकही मारले जातात. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडतो. जैविक नियंत्रणासाठी उपयोगी असणारे निवडक परोपजीवी, भक्षक किटक, विषाणू आणि जिवाणू प्रयोगशाळेत वाढविता येतात. त्यांचा वापर किडीच्या नियंत्रणासाठी करता येते.\nट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकाचा, क्रायसोपा बी.टी. या जिवाणूचा वापर करता येतो.\nट्रायकोग्रामा: ट्रायकोग्रामाची माशी अति सुक्ष्म असते. ती दुसर्या किडीच्या अंड्यात आपली अंडी घालते. त्यामुळे अंडी अवस्थेतच या किडींचा नायनाट होतो. असे ट्रायकोग्रामाची अंडी असलेली ट्रायकोकार्ड आपणाला विकत मिळू शकतात. एका कार्डवर ४०,००० अंडी असतात आणि १ कार्ड १ एकरसाठी पुरेसे होते. कपाशीच्या शेतात बोंड अळ्यांची अंडी दिसू लागल्यावर किंवा उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी या पट्ट्या लावाव्यात. या पट्ट्यावरील अंड्यातून ७ ते ९ दिवसात ट्रायकोग्रामाचा प्रौढ बाहेर पडून बोंडे अळ्यांच्या अंड्यांचा शोध घेतो व त्यात आपली अंडी घालतो. अशा तऱ्हेने अंडी अवस्थेत बोंड अळ्यांचा नायनाट होतो.\nक्रायसोपा : क्रायसोपाची अळी ही मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच बोंड अळ्यांची अंडी व त्याच्या लहान अळ्या भक्षण करते. क्रयासोपाचा पतंग पोपटी हिरवा व निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग कपाशीच्या पानांवर किंवा देठावर एके - एक अशी अंडी घालते. अंडे हिरव्या रंगाचे असून पांढर्या तंतुच्या टोकावर चिकटलेले राहते. या अंड्यातून ४८ तासात अळी बाहेर पडते व भक्षाच्या शोधात फिरते. अळी अवस्था १५ ते २७ दिवसांची असते. क्रायसोपाची अंडी हेक्टरी १० हजार या प्रमाणात कपाशीच्या शेतात एकसारख्या प्रमाणात पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यावर ३० दिवसच्या अंतराने २ वेळा सोडवीत.\nएच. एन. पी. व्ही. विषाणू : घाटे अळीचा विषाणू हा एच. एन. पी. व्ही. या नावाने ओळखला जातो. एच. एन. पी. व्ही. ची पहिली फवारणी हेक्टरी २५० ते ५०० एल. इ. या प्रमाणात हिरव्या बोंडअळीच्या अगदी लहान अळ्या दिसू लागताच करवी. या १० लिटर फवारणीच्या द्रावणात १ ग्रॅम राणीपाल टाकावे. हे फवारणीयुक्त खाद्य अमेरिकन बोंडअळीने खाल्ल्यानंतर अळीला व्हायरोसीस नावाचा रोग होऊन अळी झाडाला उलटी लटकून मरते. महत्त्वाचे म्हणजे एच. एन. पी. व्ही. इतर मित्रकिटकांना अपायकारक नाही.\nएच. एन. पी. व्ही. मुळे फक्त अमेरिकन बोंडअळीचेच नियंत्रण करता येते. बी.टी. या जीवाणुमुळे सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण करता येते.\nलेडी बर्ड बीटल : लेडी बर्ड बीटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्यान मावा किडीवर जगतात. लेडी बर्ड बीटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबूळकी असून समुहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी ६ ते ७ मि.मी. लांब असून रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ अवस्थेतील लेडी बर्ड बीटल हे तुरीच्या दाण्यासारखे पण खालून चपटे व फुगीर असतात. रंग पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असातात. काही प्रजातीमध्ये पंखावरील रेषा किंवा ठिपके नसतात. अळी प्रती दिवशी २५ मावा तर प्रौढ भुंगा ५० -५५ मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडी बर्ड बीटल जास्त आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर पूर्णपणे टाळावा.\nसीरफीड माशी : ही देखील मित्रकीडी असून मावा कि���ीचा भक्षक किटक आहे. सीरफीड माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडील भाग टोकदार असतो. या अळीला पाय नसतात. दिवसभरात सर्वसाधारणपाने एक अळी १०० मावा कीड खाते. या किटकाची माशी घरातील माशीसारखीस असून पाठीवर लाल पिवळे काळे पट्टे असातात. माशीचे डोके लालसर रंगाचे असते.\nपेंट्याटोमीड ढेकूण : हे ढेकूण ढालीच्या आकाराचे काळपट काथ्याच्या रंगासारखे असून कापूस पिकावर सर्वत्र पाहायला मिळतात. ओरिअस ढेकूण हे छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकूण फुले तसेच पानांच्या बेचक्यात आसतात. हे ढेकूण आपली सोंड अमेरिकन बोंडअळी, उंटअळी तसेच इतर अळ्यांच्या शरीरात खुपसून शरीरातील द्रव शोषूण घेतात. त्यामुळे अळ्या मरतात. पेट्याटोमीड ढेकणाची पिल्ले पिवळसर चकचकीत रंगाची असून ती लहान अळ्यांच्या शरीरात आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषूण घेतात.\n४) कीड नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप फेरोमोन्स म्हणजे काय \nकिटक आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारची रसायने / रसायनांची मिश्रणे बाहेर टाकतात व रसायनांच परिणाम त्यांच्याच प्रजातीतील बंधावामध्ये होऊन त्यांच्या विशिष्ट प्रतिकिया निर्माण होतात. थोडक्यात अशी रसायने संदेश वहनाचे काम करतात. यांनाच 'फेरोमोन्स' असे म्हणतात. किटकांच्या शरीरात अत्यंत अल्प प्रमाणात अशी फेरोमोन्स उपलब्ध असतात. वातावरणात ती फारच अस्थिर असतात. दुसर्या संयोगामध्ये (पदार्थामध्ये) त्यांचे चटकन रूपांतर होते. फेरोमोन्स अनेक रासायनिक संयोगाच्या मिश्रणातून तयार झालेले असल्यामुळे, त्यांचे गुणधर्म ओळखणे आणि तशाच प्रकारची फेरोमोन्स कृत्रिमरित्या तयार करणे ही मोठी अवधड, कष्टप्रद, आणि खर्चिक बाब आहे, स्वजातीय किटकांवर फेरोमोन्सचे जे परिणाम, प्रतिक्रिया दिसून येतात, यावरून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. उदा. ऐक्य, मार्गदर्शन, विखुरणे, लिंगविषयक, अंडी घालणे आणि भिती इत्यादी. आपल्याला अनेकदा मुंग्या एका मागोमाग चालताना दिसतात, तर हे केवळ फेरोमोन्सपैकी लिंग विषयक संदेश देणारे फेरोमोन्स कीड व्यवस्थापनात जास्त उपयुक्त आहेत.\nफेरोमोन्सचे कार्य : बहुतांशी मादी नराला आकर्षित करण्यासाठी आपल्या शरीरातून फेरोमोन्स रसायने सोडतात, तर काही प्रजातीमध्ये नर आपल्या शरीरातून हे फेरोमोन्स मादीस आकर्षित करण्यासाठी सोडतो. त्यामुळे दोन्ही लिंगी किडी एकत्र येऊन समागम साधू शकतात. फेरोमोन्स परिणाम फक्त स्वजातीय किटकांवरच होतात. विरुद्ध लिंगीय उमेदवार आकर्षिण्यासाठी वातावरणात सोडावी लागणारी मात्र आश्चर्यकारक आणि महत्त्वपुर्ण असतो.\nफेरोमोन्सचे उपयोग : कीड व्यवस्थापनात फेरोमोन्सचा उपयोग तीन प्रकारे करण्यात येतो -\n१) सापळ्याद्वारे किडींचे संनियंत्रण करणे,\n२) मोठ्या प्रमाणावर किडी सापळ्यात पकडणे, आणि\n३) किटकांच्या मिलनात अडथळा उत्पन्न करणे.\nमोठ्या प्रमाणात किडी पकडणे : फेरोमोन्सचा वापर करून कीड नियंत्रण होऊ शकेल का यावर बरेचसे संशोधन झाले आहे. किडींचे प्रमाण ज्या वेळी कमी असते, अशाच वेळी त्यांना पकडण्यासाठी फेरोमोन्सचा मोठ्या प्रमाणावर चांगला उपयोग होतो, असे संशोधनावरून दिसून आले आहे. साधारणपणे जो भाग किडग्रस्त नसतो, त्या ठिकाणी सुरुवातीला किडींचे प्रमाण कमी असते, अशा वेळी फेरोमोन्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर किटक पकडले जाऊ शकतात. जेणेकरून त्यांचे प्रमाण खूपच कमी करता येते. हंगामाच्या सुरुवातीस फेरोमोन्स सापळ्याद्वारे मोठ्या प्रमाणात किडी पडदाल्यास त्यांची संख्या मर्यादित ठेवता येते.\nफेरोमोन ट्रॅपचा वापर : कपाशीवरील बोंड अळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी असे फेरोमोन ट्रॅप्स कपाशीच्या शेतात लावावेत. हे ट्रॅप लावताना ते पिकापेक्षा १ फूट उंच असावेत. ठिपक्याच्या बोंड अळीसाठी व्हीटल्युर, अमेरिकन बोंडअळीसाठी हेक्झाल्युर आणि गुलाबी बोंडअळीसाठी गॉसीप्ल्युर याप्रमाणे ज्या त्या बोंड अळीसाठी ते ते फेरोमोनमध्ये बसवावेत. एकाच प्रकारच्या दोन फेरोमोन ट्रॅप्सूमधील अंतर ५० मीटर ठेवावे. प्रत्येक बोंडअळीसाठी हेक्टरी ४ ते ५ फेरोमोन ट्रॅप्स लावावेत. या फेरोमोन ट्रॅप्समध्ये त्या त्या बोंडअळीचे जर पतंग आकर्षिले जाऊन त्यामध्ये अडकून पडतात. अडकून पडलेले नर दररोज काढून मारून टाकावेत. या फेरोमोन ट्रॅप्समध्ये प्रत्येकी कमीत कमी ८ ते १० नर पतंग सतत २ ते ३ दिवस दररोज सापळ्यात आढळून आल्यास त्या त्या बोंडअळीसाठी नियंत्रणाची उपाययोजना करावी.\n५) वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर : कडुनिंबामध्ये असणार्या कीड प्रतिबंधक अनके घटकामुळे भक्षणरोधक, भक्षणप्रतिसारक, वासप्रतिसारक, प्रजनन रोधक गुणधर्म आढळत आहेत. त्यामुळे कीड आटोक्यात आणण्यासाठी कडुनिंबाल अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ५% निंबोळी अर्काची फवारणी कपाशीवरील बोंड अळीसाठी परिणामकारक ठरल्याचे आढळले आहे. निंबोळी अर्काचा परोपजीवी व परभक्षी किटकांवर विपरीत परिणाम होत नाही. याशिवाय निंबोळी अर्क घरच्या - घरी तयार करता येत असल्याने शेतकर्यांना निंबोळी अर्काचा वापर करणे किफायतशीर ठरते.\n५% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी ५ किलो वाळलेल्या निंबोळ्या फवारणीच्या आदल्या दिवशी बारीक कुटून हा कुट १० लि. पाण्यात रात्रभर भिजत ठेवाव. अधून - मधून ते ढवळावे. सकाळी निंबोळी अर्काचे द्रावण वस्त्रगाळ करून कापडाची पुरचुंडी चांगली पिळून घ्या. जेणेकरून जास्तीत - जास्त अर्क निघेल. या अर्कात २०० ग्रॅम साबणाचा चुरा किंवा निरमा पावडर टाकून ढवळावे. त्यानंतर या द्र्वाणात पाणी टाकून संपूर्ण द्रावण १०० लि. तयार करावे. अशाप्रकारे तयार केलेल्या निंबोळी अर्काची बोंडअळ्यांचा नियंत्रणासाठी फवारणी करावी. यामध्ये किटकनाशकाची अर्धी मात्र मिसळलयास अधिक प्रभावी नियंत्रण होते.\nडॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर :\nडॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा पुढील प्रमाणे सुरूवातीपासूनच वापर करणे कीड - रोगच्या बंदोबस्ताबरोबरच उत्पादन व दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.\n* बीजप्रक्रिया : १ किलो बियाण्यास १ लि. पाण्यामध्ये ३० मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात बियाणे ३ ते ४ तास भिजत ठेवून नंतर सावलीत सुकवावे. नंतर प्रोटेक्टंट पावडर २५ ते २० ग्रॅम बियाण्यास चोळून लागवडीसाठी बी वापरावे.\nजर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे बियाची कमी दिवसात चांगल्याप्रकारे उगवण होऊन पीक पाण्याचा पावसाचा काही प्रमाणातील ताण सहन करते. त्यामुळे पाण्याचा थोडा ताण जरी पडला तरी रोपे तग धरतात. कपाशीचे रोपातील मर (फ्युजेरियम वील्ट) होत नाही. प्रोटेक्टंटमुळे कापसाची कीड प्रतिकारशक्ती वाढते.\n* सप्तामृत फवारणी :\n१) पहिली फवारणी -(उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) - २५० मिली जर्मिनेटर + २५० मिली कॉटनथ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + १०० मिली प्रिझम + १०० मिली हार्मोनी + १०० मिली स्प्लेंडर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० लि. पाणी.\n२) दुसरी फवारणी - (उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी)- ५०० मिली जर्मिनेटर + ५०० मिली कॉटन थ्राईवर + ५०० मिली क्रॉंपशाईनर + २५० ग्रॅम प्रोटेक्टंट + २५० मिली प्रिझम + २५० मिली हार्मोनी + २५० मिली स्प्लेंडर + १०० लि. पाणी.\n३) तिसरी फवारणी - (उगवणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी ) - ७५० मिली कॉटन थ्राईवर + ७५० मिली क्रॉंपशाईनर + ३०० मिली राईपनर + ५०० मिली न्युट्राटोन + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ३०० मिली हार्मोनी + ३०० ते ४०० मिली स्प्लेंडर + २०० लि. पाणी.\n४) चौथी फवारणी - (उगवणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी ) - १ लि. कॉटन थ्राईवर + १ लि. क्रॉंपशाईनर + ७५० मिली राईपनर + ७५० मिली ते १ लि. न्युट्राटोन + ७५० ग्रॅम प्रोटेक्टंट + ५०० मिली हार्मोनी + ५०० मिली स्प्लेंडर + २५० लि.पाणी.\n५) पाचवी फवारणी - (उगवणीनंतर ९० ते १०५ दिवसांनी ) - १ लि. कॉटन थ्राईवर + १ लि. कॉटन थ्राईवर + १ लि. क्रॉंपशाईनर + १ ते १ लि. क्रॉंपशाईनर + १ ते १ लि. राईपनर + १ ते १ लि. राईपनर + १ ते १ लि. न्युट्राटोन + ५०० मिली हार्मोनी + ५०० मिली स्प्लेंडर + ३०० लि.पाणी.\n* फरदड घेण्यासाठी वरील फवारणी क्रमांक ३ ते ५ या ३ फवारण्या सुरूवातीचा कापूस वेचण्या संपत आल्यावर दर १५ दिवसांनी घ्याव्यात.\n* कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर : बी लावतेवेळी प्रत्येक बियाजवळ २५ ते ५० ग्रॅम गाडून द्यावे. त्यानंतर पहिली खुरपणी झाल्यावर चहाच्या कपाएवढे खोडाजवळ (एकरी १५० ते २०० किलो) गाडून द्यावे.\nकल्पतरू खतामुळे जमीन भुसभूशीत राहून आवर्षण भागात कमी पाण्याच्या उपलब्धतेत हवेतील गारवा मुळाजवळ खेचून गारवा निर्माण होतो. जारवा वाढतो. जमिनीतील हवा, पाणी, अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राहतो. जमिनीची भौतिक सुपिकता वाढून पोत सुधारतो. पांढरी मुळी पाण्याचा शोध घेत पुढे चाल करते.\nअधिक माहितीसाठी आपल्याजवळच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून कापसाचे पान, फुलपात्या, बोंड दाखवून त्यानंतर योग्य मार्गदर्शनानुसार तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Water-storage-in-the-Kundalika-Dam-is-contaminated/", "date_download": "2019-03-25T07:49:30Z", "digest": "sha1:AV7VL56T3HSN26O6XNKVNDOHWYS5LQW3", "length": 5495, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुंडलिका धरणातील पाणीसाठा दूषितच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › कुंडलिका धरणातील पाणीसाठा दूषितच\nकुंडलिका धरणातील पाणीसाठा दूषितच\nतालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणाचे पाणी दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. बीड येथील प्रयोगशाळेतील मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी पाणी तपासणी करून पाठवि���ेला अहवाल वडवणी तालुका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.\nवडवणी तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणात मासे मोठ्या प्रमाणावर मृत झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. तहसीलदार सुनील पवार यांनी या धरणातील मासेमारी बंद करण्याचे आदेश देऊन आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकार्यांमार्फत धरणातील पाणी आणि मृत मासे प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांमार्फत तपासणी करण्यासाठी पाठविले होते. त्यानुसार बीड येथील मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी कुंडलिका धरणातील पाण्याची तपासणी करून पाणी तपासणी अहवाल वडवणी प्रशासनाला पाठविला आहे. या अहवालात धरणातील पाणीसाठ्यात अनेक घातक घटक असल्याचे नमूद करून पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.\nजो पर्यंत धरणातील पाणी शुद्ध होणार नाही तो पर्यंत मासेमारीसाठी परवानगी मिळणार नसल्याचे संकेत तहसील प्रशासनाने दिले आहेत. मंगळवारी व बुधवारी उपळी येथील मासेमारी करणार्या नागरिकांनी वडवणी येथील तहसीलदार सुनील पवार व नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे मासेमारीसाठी परवानगी मागितली मात्र थोड थांबावे लागेल. पाणी जलशुद्धीकरण करण्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील ते अगोदर पाहिले जाईल अन् नंतरच मासेमारीसाठी परवानगी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Charity-Hospital-for-treatment-Increase-income-limit/", "date_download": "2019-03-25T08:35:56Z", "digest": "sha1:C52R5MCMSOCWRPI2363F67DCO4FFA4FM", "length": 5959, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धर्मादाय रुग्णालयातील उपचारासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मादाय रुग्णालयातील उपचारासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ\nधर्मादाय रुग्णालयातील उप���ारासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nआर्थिक उत्पन्नाच्या मर्यादेवर बोट ठेवुन राज्यातील धर्मादाय रुग्णालये गोरगरीबांना उपचार नाकारत असल्याची गंभीर दखल घेत विधि व न्यायराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आर्थिक दुर्बल घटकांची उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या रुग्णालयांतील उपचारासाठी असलेली उत्पन्न मर्यादा 85 हजार रुपयांवरुन 1 लाख 60 हजार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी विधानपरिषदेत दिली.\nराज्यातील धर्मादाय रुग्णालये गरीबांवर उपचार करण्यास चालढकल करत आहेत, असा औचित्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जयदेव गायकवाड यांनी उपस्थित केला होता. मुंबई, पुण्यामधील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचाराआधीच रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेतल्या जातात. रुग्णाचे निधन झाल्यानंतर सपुर्ण बील दिल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत नाहीत. उत्पन्नाची मर्यादा फार कमी असल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे ही मर्यादा आणखी वाढविण्याची सूचना गायकवाड यांनी केली.\nधर्मादाय रुग्णालयांमधील 10 टक्के खाटा गरीबांसाठी राखीव आहेत. परंतू ग्रामीण भागांमधुन येणार्यांना कोणत्या रुग्णालयांमध्ये किती खाटा शिल्लक आहेत, याची माहिती दिली जात नव्हती. त्याचा फायदा घेऊन काही रुग्णालयांचे प्रशासन खाटा शिल्लक नसल्याचे सांगत होते. आता मुंबई, पुणे व मोठ्या शहरांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये धर्मादाय रुग्णालयांमधील रिकाम्या खाटांची माहिती बोर्डावर लावली जात आहे. यापुढे राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील रुग्णालयांमध्येही अशा प्रकारची सुविधा उपलब्घ केली जाईल. - डॉ. रणजीत पाटील, विधि व न्यायराज्यमंत्री\nआमखासवर 29 मार्चला जनता दाखवणार सत्तारांना दिशा\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rahul-gandhi-press-conference-In-mumbai/", "date_download": "2019-03-25T07:43:49Z", "digest": "sha1:7E5PDMJD36GD7Z5ANPUXMPIU47W3JZXZ", "length": 7322, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकार श्रीमंत लोकांसाठी काम करतं : राहुल गांधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकार श्रीमंत लोकांसाठी काम करतं : राहुल गांधी\nमोदी सरकार श्रीमंतांचे खिसे भरतंय : राहुल गांधी\nदेशातील सर्वात श्रीमंत लोकांसाठीच सरकार काम करत असून त्यांना सामान्य जनतेशी काही देणंघेणं नाही. श्रीमंतांच लाखो करोडो रुपयांचं कर्ज माफ केले जात आहे, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून गरीब लोकांच्या खिशातुन पैसा काढून तो श्रीमंतांच्या खिशात टाकण्याचं काम मोदी सरकार करत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली.\nमनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते, आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होताना दिसत नाही.\nदररोज पेट्रोल का महागतंय हा पैसा कुठं जातोय हा पैसा कुठं जातोय गरिबाचे पैसे घेऊन डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या मद्यमातून 15-20 श्रीमंताचे खिसे भरण्याच काम केल जात आहेत. त्यामुळेच आम्ही पेट्रोल-डिझेल जीएस्टीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली, मात्र पंतप्रधानांना त्यात इंटरेस्ट नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.\nनोटबंदीचा निर्णय घेऊन मुंबईवर आक्रमण केलं, त्यात मुंबईतील छोटेछोटे व्यवसायिक दुकानदार भरडले गेले, लेदर, कापड व्यवसायिकांच नुकसान झालं. गब्बरसिंह टॅक्स लागू केला. त्यामुळे सर्व देश नाराज आहे. छोटा व्यापारी दु:खी आहे. त्यासाठीच आमची लढाई सुरु असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.\nमंगळवारी मुंबई दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी बुधवारी मुंबईतुन जाण्यापूर्वी अवघ्या अडीच मिनिटांच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.\nराहुल गांधी कालपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येत आरएसएसचा सहभाग असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत केले होते. त्याची सुनावणी काल भिवंडी कोर्टात झाली. कोर्टातील कामकाजानंतर त्यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 2019 मध्ये मुंबई, महाराष्ट्र, संपूर्ण देशात काँग्रेस आणि विरोधक ���ाजपाला निवडणुकीत हरविल्याशिवाय राहणार नाहीत, असा आत्मविश्वास व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी निवडणूक प्रचाराचे रणशिंग मुंबईत फुंकले.\nकाल मुंबईत दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर ते चंद्रपूरला रवाना झाले आहेत. तेथे दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/381", "date_download": "2019-03-25T08:56:39Z", "digest": "sha1:SOLBESYWY3EXHGPSHVWJBYBWXNDFFQ6I", "length": 9029, "nlines": 104, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अंगारमळा - आत्मचरित्र | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / अंगारमळा - आत्मचरित्र\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंव��� मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर म. मुटे यांनी रवी, 12/02/2012 - 21:48 ह्यावेळी प्रकाशित केले.\nवाचण्यासाठी पानावर क्लिक करा.\nपाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.\nनेट स्लो असेल तर पाने दिसायला थोडा वेळ लागू शकतो. प्रतिक्षा करा.\nपीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी\nयेथे किंवा चित्रावर क्लिक करा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://lokayat.org.in/category/pamphlets/", "date_download": "2019-03-25T08:51:30Z", "digest": "sha1:SHZQZHMM7FPNXEH2KF7W2CESDHPVW5PE", "length": 3072, "nlines": 66, "source_domain": "lokayat.org.in", "title": "Pamphlets – Lokayat", "raw_content": "\nना कांदा मुळा न भाजी कशी होइल अवघी विठाई माझी \nकांदा, मूळा, भाजी, अवघी विठाई माझी अस म्हणणारा आपला माऊली, सावतामाळी याने शेतात विठ्ठल पाहिला. पण त्याच शेतात राबणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून ते फेकून देण्याची परिस्थिती त्यांच्यावर सरकारने आणलीय. २०१४ च्या निवडणूकीत सरकारन शेतकऱ्यांना हमीभावाचं नुसतं गाजर दाखवलं. आजपर्यंत अच्छे दिन काही त्यांच्या पदरात पडले नाहीत. महाराष्ट्रात हमीभावासाठी आणि कर्जमाफीसाठी\n . . . पर्याय आहेत\n आजकाल तर पेपर वाचून टेंशनच येतं. आबिदा: काय झालं रे काय आलंय आज पेपरमध्ये काय आलंय आज पेपरमध्ये समीर: अगोदरच एवढी बेरोजगारी आणि त्यात आणखी लोकांना नोकऱ्यांवरून काढलंय . . . बघतीयेस का समीर: अगोदरच एवढी बेरोजगारी आणि त्यात आणखी लोकांना नोकऱ्यांवरून काढलंय . . . बघतीयेस का वर्ष ८ श्रमप्रधान उद्योगातील रोजगार वाढ २००९ १२.५६ लाख २०१६ २.३१ लाख अंजली: म्हणजे आणखी बेरोजगारी वाढणार . . . समीर: अरे आपली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/balgite/vara-vahto-vahto/", "date_download": "2019-03-25T08:04:38Z", "digest": "sha1:7BPHCOYVKV34QATI7B7LSGN5VCP4RMU3", "length": 5563, "nlines": 78, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nवारा वाहतो वाहतो, वारा दिसेना दिसेना\nपुसा ओळख वाऱ्याची सळसळत्या पानांना.\nगातो गोड गोड गाणी, गोष्टी सांगतो कानात\nफुलांसंगे पानांसंगे वारा खिदळे रानात\nकधी वाऱ्याची पालखी येते डुलत डुलत\nकधी येतो धडाधडा रथ रागात वेगात\nभूमीवर लोळणारी डेरेदार दाट दाट\nआकाशाशी खेळणारी उंच उंच ताठ ताठ\nझाडे झुकविती माथा वाऱ्यापुढे वाकतात.\nवारा वाहतो वाहतो वारा दिसेना दिसेना\nवारा वाहिल्यावाचून सृष्टी हलेना, हासेना\nचित्रकाराचा फलक आणि कोराच राहिला\nनाविका पल्याड ने रे मला\nवारा वाहतो वाहतो वारा दिसेना दिसेना\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/farmers-protest-2018-highlights/articleshow/63264453.cms", "date_download": "2019-03-25T08:58:13Z", "digest": "sha1:36JLJACMYDTYYID4DDESPCOMDDZBWOFK", "length": 14792, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: लाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा - farmers protest 2018 highlights | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nलाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा\nकिसान लाँग मार्च मुंबईतील आझाद मैदानात मध्यरात्रीच पोहोचला आहे. आम्हाला सरकारने गोळ्या झाडल्या तरी, मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तसंच शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.\nलाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा\nकिसान लाँग मार्च मुंबईतील आझाद मैदानात मध्यरात्रीच पोहोचला आहे. आम्हाला सरकारने गोळ्या झाडल्या तरी, मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तसंच शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. हे सरकार शेतकऱ्यांचं असून त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.\nशेतकऱ्यांचे मन वळवण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रयत्न, विधानभवनातील बैठक संपली\nकाँग्रेस नेते अशोक चव्हाण, संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश, कृपाशंकर सिंह, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांनी आझाद मैदानात घेतली शेतकऱ्यांची भेट\nमुंबई: आम्ही राजकीय फायदा घ्यायला इथे आलेलो नाही; शेतकऱ्यांसाठी आलो आहोत: अशोक चव्हाण\nखासदार पूनम महाजन यांनी माफी मागावी\nपूनम महाजन असंवेदनशील; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका\nशेतकरी मोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय; भाजप खासदार पूनम महाजन यांचं ��जब तर्कट\nशेतकऱ्यांचे शिष्टमंडळ विधानसभेत पोहोचले; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार\nशेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत थोड्याच वेळात मुख्यमंत्री करणार चर्चा\nमुंबई: सरकारने दगाबाजी केली तर अन्नत्याग करू; शेतकरी नेत्यांचा इशारा\nगिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर , विठ्ठल घाग आझाद मैदानात दाखल; गिरणी कामगारांच्या वतीने दिला पाठिंबा\nमुंबई: विधानसभेत शेतकरी प्रश्नांवर चर्चा सुरू; विरोधक आक्रमक\nशेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय मंत्रिगटासोबत विधिमंडळात बैठक सुरू\nफडणवीस सरकार बेजबाबदारपणे वागतेय : अजित पवार, राष्ट्रवादी नेते\nआम्हाला सरकारने गोळ्या झाडल्या तरी आम्ही इथेच राहणार; मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत : आंदोलक शेतकरी\nमुंबईतील किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये आज दुपारी सीताराम येच्युरी करणार भाषण\nकेरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दर्शवला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा\nकिसान लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत आणि अन्य मंत्री मुंबईत दाखल\nदहावी, बारावी परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी आंदोलक शेतकऱ्यांची मध्यरात्री आझाद मैदानाकडे पायपीट\nभायखळा परिसरात मुस्लिम बांधवांनी बळीराजाला पाणी, खजूर वाटप केले\nदुपारी १२ वाजता सरकार मोर्चेकऱ्यांशी चर्चा करणार\nआझाद मैदानावर आज शेतकर्यांची होणार सभा; किसान सभा, कम्युनिस्ट नेत्यांचा सहभाग\nकिसान सभेचा विराट मोर्चा आझाद मैदानात दाखल\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nRanjitsinh Mohite-Patil: रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध...\nRaj Thackeray-Sharad Pawar: मुंबई: राज ठाकरे शरद पवार यांच्य...\nलोकसभा: सेनेची पहिली यादी जाहीर; सातारा, पालघरबाबत निर्णय ना...\nमुंबईः प्रवीण छेडा यांची भाजपत 'घरवापसी'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nलाँग मार्च: मुख्यमंत्र्यांची मंत्रिगटासोबत चर्चा...\nशेतकऱ्यांच्या 'लाँग मार्च'ला डबेवाल्यांचा पाठिंबा...\n'शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला बेचिराख करेल'...\nकिसान लाँग मार्च: दिवसभरात काय घडले\nविराट कोहलीच्या घराचे महिन्याचे भाडे १५ लाख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-gst-council-meet-gst-33-goods-and-services-reduced-says-fm-arun-jaitely-4041", "date_download": "2019-03-25T07:29:30Z", "digest": "sha1:Q25EDMXANJFI6BMN2BBAKL33U6D3XIYF", "length": 6746, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news GST council meet gst on 33 goods and services reduced says FM arun jaitely | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nGST काउंन्सिलच्या बैठकीत ३३ वस्तूंवरील GST मध्ये कपात\nGST काउंन्सिलच्या बैठकीत ३३ वस्तूंवरील GST मध्ये कपात\nGST काउंन्सिलच्या बैठकीत ३३ वस्तूंवरील GST मध्ये कपात\nGST काउंन्सिलच्या बैठकीत ३३ वस्तूंवरील GST मध्ये कपात\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nआज जीएसटी परिषदेची 31 वी बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडली. GST परिषदेच्या या बैठकीत 33 वस्तुंवरच्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. टीव्ही, संगणक, टायर, १०० रुपयांवरील सिनेमाची तिकिटं यावरच्या जीएसटीत कपात करण्यात आलीय. हा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. दरम्यान, जनधन खात्यांवरील सेवा कर जीएसटीमधून वगळण्यात आला आहे.\nजीएसटी १८ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या वस्तू\nआज जीएसटी परिषदेची 31 वी बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडली. GST परिषदेच्या या बैठकीत 33 वस्तुंवरच्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. टीव्ही, संगणक, टायर, १०० रुपयांवरील सिनेमाची तिकिटं यावरच्या जीएसटीत कपात करण्यात आलीय. हा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. दरम्यान, जनधन खात्यांवरील सेवा कर जीएसटीमधून वगळण्यात आला आहे.\nजीएसटी १८ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या वस्तू\nधार्मिक यात्रांवरचा GST 12 टक्के असेल\nफूटवेअरवरचा GST 12 ते 5 टक्के असा करण्यात आलाय\nथर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचा GST 12 टक्क्यांवर आणला गेलाय टक्के\nफ्रोझन भाज्यांवरील GST हटवण्यात आलाय\n२८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर आलेल्या वस्तू\nमॉनिटर्स आणि ३२ इंचापर्यंतचा टीव्ही\n१०० रुपयांवरचे सिनेमा तिकिट\nस्नूकर आणि बिलियर्ड्स टेबल्स\nजीएसटी परिषदेच्या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली. दोन समित्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली, असंही जेटली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mega-recruitment-railways-railways-recruit-over-thirteen-thousand-employees-4076", "date_download": "2019-03-25T07:44:31Z", "digest": "sha1:BNOEBODGQR5OTY7WOLLK2RN62B4PT2L4", "length": 5847, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mega recruitment in railways railways to recruit over thirteen thousand employees | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेल्वेमध्ये 13487 जागांसाठी भरती\nरेल्वेमध्ये 13487 जागांसाठी भरती\nरेल्वेमध्ये 13487 जागांसाठी भरती\nरेल्वेमध्ये 13487 जागांसाठी भरती\nबुधवार, 2 जानेवारी 2019\nरेल्वेमध्ये 13,487 जागांसाठी भरती.. जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी आहे ही भरती\nVideo of रेल्वेमध्ये 13,487 जागांसाठी भरती.. जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी आहे ही भरती\nरेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये तब्बल 13 हजार जागांसाठी भरती करण्यात येतेय. यासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. 31 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डानं पहिल्यांदाच ज्युनिअर इंजिनिअरच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून त्यासंबधी जाहिरात काढली आहे. खास ���रुन फ्रेशर्ससाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येतेय. इंजिनिअर आणि आयटी इंजिनिअरर्ससाठी रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही एक सुर्वण संधी आहे.\nरेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये तब्बल 13 हजार जागांसाठी भरती करण्यात येतेय. यासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. 31 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डानं पहिल्यांदाच ज्युनिअर इंजिनिअरच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून त्यासंबधी जाहिरात काढली आहे. खास करुन फ्रेशर्ससाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येतेय. इंजिनिअर आणि आयटी इंजिनिअरर्ससाठी रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही एक सुर्वण संधी आहे.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-sanjay-raut-exclusive-interview-ayodhya-and-uddhv-thackerays-ayodhya-visit-3785", "date_download": "2019-03-25T07:34:02Z", "digest": "sha1:OUN5WJ5GSHOTTNL3BL4ZDKRULJ5ILBHL", "length": 4119, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sanjay raut exclusive interview on ayodhya and uddhv thackerays ayodhya visit | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nEXCLUSIVE :: अयोध्येला अशा गोष्टींची सवय आहे - संजय राऊत\nEXCLUSIVE :: अयोध्येला अशा गोष्टींची सवय आहे - संजय राऊत\nEXCLUSIVE :: अयोध्येला अशा गोष्टींची सवय आहे - संजय राऊत\nEXCLUSIVE :: अयोध्येला अशा गोष्टींची सवय आहे - संजय राऊत\nशुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018\nEXCLUSIVE :: अयोध्येत कोणीही घाबरलेलं नाही, अयोध्येला अशा गोष्टींची सवय आहे - संजय राऊत\nVideo of EXCLUSIVE :: अयोध्येत कोणीही घाबरलेलं नाही, अयोध्येला अशा गोष्टींची सवय आहे - संजय राऊत\nEXCLUSIVE :: अयोध्येत कोणीही घाबरलेलं नाही, अयोध्येला अश्या गोष्टींची सवय आहे - संजय राऊत.. पाहा संपूर्ण व्हिडीओ\nEXCLUSIVE :: अयोध्येत कोणीही घाबरलेलं नाही, अयोध्येला अश्या गोष्टींची सवय आहे - संजय राऊत.. पाहा संपूर्ण व्हिडीओ\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2019-03-25T07:46:04Z", "digest": "sha1:FCTAKNQ3ZXXBT653S5N2S6J5I4LQQNIW", "length": 8031, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्थर बॅलफोर - विकिपीडिया", "raw_content": "\n११ जुलै १९०२ – ५ डिसेंबर १९०५\n१९ मार्च, १९३० (वय ८१)\nआर्थर बॅलफोर, बॅलफोरचा पहिला अर्ल (इंग्लिश: Arthur Balfour, 1st Earl of Balfour; २५ जुलै, इ.स. १८४८ - १९ मार्च, इ.स. १९३०) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०२ ते १९०५ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीत त्याने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे सांभाळली होती.\nयुनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील आर्थर बॅलफोर ह्याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १८४८ मधील जन्म\nइ.स. १९३० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१५ रोजी ०१:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2654", "date_download": "2019-03-25T08:34:12Z", "digest": "sha1:4BHJYJWZBD67UX5LOWXUHKMMQZAO6PEU", "length": 27131, "nlines": 85, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कॉण्टिनेण्टलचा अमृतवृक्ष! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘कॉण्टिनेण्टल’ प्रकाशन प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य प्रकाशित करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्याचे काम गेली पंचाहत्तरहून अधिक वर्षें निष्ठेने करत आहे. गोपाळ पाटणकर, जनार्दन महाजन आणि अनंतराव कुलकर्णी या जुन्नरच्या न्यू स्कूलमधील मित्रांनी १ जून १९३८ रोजी ‘कॉण्टिनेण्टल’ची स्थापना केली. त्यांनी दत्त रघुनाथ कवठेकर यांचा ‘नादनिनाद’ हा कथासंग्रह प्रथम प्रकाशित केला. साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांच्या हस्ते त्या कथासंग्रहाचे १ जानेवारी १९३९ रोजी प्रकाशन झाले. त्यावर दीनानाथ दलाल यांचे चित्र होते. पहिली आठ पाने दोन रंगांत छापलेली होती. पृष्ठसंख्या एकशेशहात्तर. किंमत दीड रुपया. पुस्तकाच्या एक हजार प्रतींच्या पहिल्या आवृत्तीला साडेतीनशे रुपये खर्च आला होता. न.चिं.केळकरांनी ‘कॉण्टिनेण्टल’ ‘हे तुमचे पहिले पुस्तक अंतर्बाह्य चांगले झाले आहे’ अशी शाबासकी जाहीर समारंभात दिली आणि तिघे मोठ्या उत्साहाने कामाला लागले. तिघांपैकी अनंतरावांचा उत्साह टिकून राहिला. अनंतरावांनी साहित्याची उत्तम जाण व आवड, सकस साहित्याचा शोध घेण्याची वृत्ती, दर्जेदार पुस्तकनिर्मितीसाठी अपार कष्ट घेण्याची तयारी, उमदा स्वभाव आणि साहित्यिकांशी मैत्र जोडण्याचे कसब या गुणांच्या बळावर अल्पावधीतच ‘कॉण्टिनेण्टल’ला मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवून दिले. ‘कॉण्टिनेण्टल’ने वि.स. खांडेकर, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, श्री.ना.पेंडसे, वि.वि. बोकील, चिं.वि.जोशी, पु.ग. सहस्रबुद्धे, पं. महादेवशास्त्री जोशी, श्री.म.माटे, नाथमाधव, ना.सं. इनामदार, शंकरराव खरात, केशव मेश्राम, द.मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शिवाजी सावंत, गंगाधर गाडगीळ, वामनराव चोरघडे, शांता शेळके, संजीवनी मराठे, दिपा गोवारीकर, शशिकला जाधव, प्रतिभा रानडे, विजया देशमुख आदि नामवंत साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित केले. अनेक मान्यवर लेखक ‘कॉण्टिनेण्टल’शी जोडले गेले आहेत. ‘कॉण्टिनेण्टल’ची धुरा अनंतरावांनंतर अनिरुद्ध कुलकर्णी आणि रत्नाकर कुलकर्णी या त्यांच्या पुत्रांनी समर्थपणे पुढे नेली आणि प्रकाशनाच्या प्���तिष्ठेत मोलाची भर घातली. देवयानी अभ्यंकर, देवेश अभ्यंकर, ऋतुपर्ण कुलकर्णी व अमृता कुलकर्णी ही ‘कॉण्टिनेण्टल’ची तिसरी पिढी ‘कॉण्टिनेण्टल’च्या नावलौकिकात भर घालत प्रकाशन परंपरा पुढे नेत आहे.\nअनंतरावांनी प्रकाशन व्यवसायाला आरंभ केला तो काळ ललित साहित्याचा होता. त्यामुळे ‘कॉण्टिनेण्टल’तर्फे ललित साहित्याची पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाली. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी नंतरच्या काळाची गरज लक्षात घेऊन शेती, बागा, वनविज्ञान, प्राणी-प्राणीपालन, पर्यावरण अशा विषयांवरची पुस्तकेही प्रकाशित केली. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी दोस्तोवस्की, गॉर्की, चेकॉव्ह या रशियन लेखकांचे साहित्य मराठीत आणण्याचे काम केले. मराठी प्रकाशनविश्वात अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होताना दिसते. ‘कॉण्टिनेण्टल’ने तत्पूर्वीच ते प्रकाशित केले आहे. ‘कॉण्टिनेण्टल’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या सोळाशेहून अधिक आहे.\nजीवनाच्या सर्व क्षेत्रांत ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. वाचकांमध्ये प्रत्येक नवी गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे. ती गरज लक्षात घेऊन ‘कॉण्टिनेण्टल’ने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, आहार, आरोग्य, व्यायाम, परदेशप्रवास, भाषा अशा अनेक विषयांवरची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.\nवाढते शहरीकरण, रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी, शहरापासून दूर विकसित होऊ लागलेली उपनगरे या साऱ्या गोष्टींचा विचार करून ‘कॉण्टिनेण्टल’ने वाचकांपर्यंत पुस्तके पोचवण्यासाठी ‘बुक्स ऑन व्हील्स’ ही अभिनव कल्पना राबवली. ‘कॉण्टिनेण्टल’ने इ-बुक्स निर्मितीतही पाऊल टाकले आहे. ‘कॉण्टिनेण्टल’ मराठी विश्व साहित्य संमेलन अमेरिका, दुबई, लाहोर बुक फेअर, फ्रँकफर्ट बुक फेअर, अबुधाबी बुक फेअर यांसारख्या उपक्रमांत सहभागी होऊन नवे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यांचा साहित्य संमेलनांत आणि महाराष्ट्रभर होणाऱ्या ग्रंथोत्सवांत सहभाग असतोच. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’, ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’, ‘अखिल भारतीय प्रकाशक संघ’ यांसारख्या संस्थांनी ‘कॉण्टिनेण्टल’ला सन्मानित केले आहे. भारत सरकारचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार ना.सं. इनामदारांच्या ‘शहेनशहा’ या ‘कॉण्टिनेण्टल’ प्रकाशित ग्रंथाला मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाड्मयनिर्मितीच्या पुरस्कारांत ‘कॉण्टिनेण्टल’च्या लेखकांनी नेहमी बाजी मारलेली दिसते. ‘कॉण्टिनेण्टल’ने पुस्तके प्रकाशित करणे आणि विकणे एवढेच ध्येय कधीच ठेवले नाही. ती प्रकाशन संस्था साहित्य व्यवहाराकडे गांभीर्याने पाहते. नव्या लेखकांचा शोध, आवश्यकता वाटल्यास पुनर्लेखन-संपादन, पुस्तकनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण कामगिरी व्हावी यासाठी नियोजन, विक्री आणि वितरण यांचे योग्य व्यवस्थापन या गोष्टींना ‘कॉण्टिनेण्टल’ने प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पाठीशी विश्वासार्हतेची मोठी पुण्याई आहे. म्हणूनच संस्थेने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. ’कॉण्टिनेण्टल’ने केवळ लेखक घडवले नाहीत तर ते जोडलेही. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन लेखकांशी जोडलेले स्नेहबंध ही ‘कॉण्टिनेण्टल’ची श्रीमंती आहे.\nश्री.ना.पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’ ‘कॉण्टिनेण्टल’ने प्रकाशित करण्याचे ठरवले. श्री.ना.पेंडसे त्या काळात दीड महिना अनंतरावांच्या घरी मुक्कामाला होते. अनंतराव आणि ते यांच्यामध्ये वादही होत. कादंबरीतील कोकणी शिव्यांवरून दोघांमध्ये असाच वाद झाला. पेंडसे रागाने म्हणाले, ‘मी येथे थांबणार नाही. हस्तलिखित घेऊन जाणार आहे.’ त्यावर अनंतराव म्हणाले, ‘तुम्ही जा, पण जेवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही.’ पेंडसे विरघळले. अशी जिवाभावाची नाती कुसुमाग्रज, चिं.वि.जोशी तशाच धाग्यांनी अनंतरावांशी जोडले गेले होते.\nशिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’सारखी अजरामर ठरलेली महाकादंबरी वयाच्या तेविसाव्या वर्षी लिहिली. गदिमांनी कादंबरीतील काही भाग वाचून अनंतरावांना ‘कॉण्टिनेण्टल’तर्फे ती कादंबरी प्रकाशित करण्याचे सुचवले. अनंतरावांनी ती प्रकाशित केली. सावंतांच्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या कादंबऱ्यांनी मराठी व हिंदीदेखील प्रकाशन जगात इतिहास घडवला. शिवाजीरावांना लेखक म्हणून उभे करण्यात अनंतरावांचे मोठे योगदान होते. सावंत त्याची जाणीव व्यक्त करत. अनंतरावांचा वाढदिवस अनंत चतुर्दशीला. शिवाजी सावंत महाराष्ट्रात कोठेही गेलेले असले तरी त्या दिवशी शिवाजीराव पुण्यात हजर असत. ते अनंतरावांच्या शेवटच्या आजारात दिवसच्या द���वस दवाखान्यात जाऊन बसत. लेखक-प्रकाशकमधील असा स्नेह विरळाच ना.सं. इनामदार आणि अनंतराव सर्व साहित्य समेलनांना मिळून जात. अनंतरावांच्या पत्नी अंजनीबाई आणि इनामदारांच्या पत्नी मालुताई या बरोबर असत. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्या संस्थेची परंपरा बाजारू जगातही टिकून आहे.\nअनंतरावांनी लावलेल्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. वटवृक्षाच्या सावलीत सर्जनाची पूजा होत राहवी, लेखकांच्या प्रतिभेला मोहोर यावा, वाचकांचा गाव उजळून जावा आणि साहित्याचा प्रांत अधिक श्रीमंत व्हावा\n‘कॉण्टिनेण्टल’च्या साऱ्या कामावर १९६१ साली जुलै महिन्यात पानशेत धरण फुटल्यामुळे शब्दशः पाणी पडले. छापखान्यात असलेली ‘कॉण्टिनेण्टल’ची पुस्तके, ब्लॉक्स, कागद सारे नष्ट झाले होते. गोडाऊनमधील पुस्तकांचा लगदा झाला होता. धरणग्रस्त व्यावसायिकांना मदत मिळावी यासाठी अनंतरावांच्या अध्यक्षतेखाली समिती तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटली. धरणग्रस्त व्यावसायिकांना मदत मिळाली. त्या संकटाच्या प्रसंगीही ज्या ज्या छापखान्यातील जी जी कामगार मंडळी धरणग्रस्त झालेली होती, त्या प्रत्येकाला थोडी थोडी का होईना, रोख रक्कम देऊन मदतीचा हात ‘कॉण्टिनेण्टल’ने पुढे केला होता.\nअनंतराव आणि पंडित नेहरू यांची भेट होण्याचाही योग आला. अनंतरावांनी ‘Discovery of India’च्या मराठी अनुवादासाठी पंडितजींकडे संमती मागितली. नेहरूंनी विचारले, ‘रॉयल्टी किती देणार’ अनंतराव म्हणाले, ‘जास्तीत जास्त पंधरा टक्के देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त देणे परवडत नाही.’ अनंतरावांच्या त्या बोलण्यावर पंडितजी खळखळून हसले आणि म्हणाले, ‘At least you know your business. परवा एक प्रकाशक मला तेहतीस टक्के रॉयल्टी द्यायला निघाला होता’ अनंतराव म्हणाले, ‘जास्तीत जास्त पंधरा टक्के देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त देणे परवडत नाही.’ अनंतरावांच्या त्या बोलण्यावर पंडितजी खळखळून हसले आणि म्हणाले, ‘At least you know your business. परवा एक प्रकाशक मला तेहतीस टक्के रॉयल्टी द्यायला निघाला होता’ ते पुस्तक ‘कॉण्टिनेण्टल’ने प्रकाशित केले.\nरविप्रकाश कुळकर्णी यांनी पुढे जोडून लिहिले :\nसुरुवातीच्या तिघा भागीदारांपैकी पाटणकर व महाजन हे दोघे प्रकाशन सोडून का गेले ते कधी स्पष्ट झाले नाही, परंतु अनंतरावांनी स्वत:च्या हिंमतीवर प्रकाशन व्यवसायात बैठक निर्माण केली. त्यांनी स्वत:चे नॉर्म्स मराठी प्रकाशन विश्वात प्रस्थापित केले. ते जसे पुस्तक लेखनाच्या, पुस्तक निर्मितीच्या बाबतीत होते तसेच व्यावसायिक बाबतीतही होते. त्यांनी विक्रीचे कमिशन ठरावीक पंचवीस टक्क्यांच्या वर कधी जाऊ दिले नाही. खरे तर, प्रकाशकांनी मिळून तसा ठराव केला होता. पण बाकी प्रकाशक विक्रीच्या मोहाने पाघळले, अनंतराव नाही.\nअनंतरावांचे वजन फार मोठे होते व त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांच्या सांगण्यावरून पु.ग.सहस्रबुद्धे यांच्यासारख्या विद्वानाने गाइड लिहिले होते\nदोन मुलगे अनिरुद्ध व रत्नाकर. अनिरुद्ध उच्चशिक्षित. त्याने उत्तम पुस्तके अनुवादित केली. तो थोडा स्वत:त रमलेला असे. रत्नाकरकडे वितरण असल्याने तो मिळून मिसळून राही. साहित्यपरिषदेच्या कामकाजात आस्थेने सहभागी होई. अनिरुद्धने व्यवहारोपयोगी पुस्तके निर्माण करणे आरंभले. त्यामुळे योग, शेती अशी पुस्तके मराठीत येऊ लागली. नंतर त्या प्रकारच्या प्रकाशनात खंड पडला होता, तो धागा अनिरुद्धचा मुलगा ऋतुपर्ण याने जोडून घेतला आहे. देवयानी फ्रेंच भाषेची जाणकार आहे. ती फ्रेंच क्लासेस घेते. खूप ‘बिझी’ असते. ऋतूची पत्नी अमृता देखील आता या व्यवसायात आली आहे. ती पुस्तके संपादनात विशेष लक्ष घालते. अनंतरावांची ही तिसरी पिढी त्याच व्यवसायात आली आहे. ढवळे वगळता असे दुसरे उदाहरण मराठी प्रकाशन उद्योगात नाही.\n(३ जून २०१२ लोकसत्ता (लोकरंग पुरवणी) वरून उद्धृत)\nउत्तम पिढ्यांन पिढ्यांनी हे प्रकाशन चालू टेवावे जसे सोनार आपल्या दुकानात जन्मसाल देतात तसे काॅनटिनेटल प्रकाशन 1938\nमिलिंद जोशी हे पुण्याचे रहिवासी. ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने इंजिनीयर, परंतु त्यांना साहित्यात विलक्षण गोडी. त्यामुळे त्यांनी विविध त-हेची साहित्य संपदा निर्माण केली आहे. ते साहित्यविषयक कार्यक्रमांच्या संयोजनात पुढाकार घेतात. मिलिंद जोशी उत्तम वक्ते आहेत.\nसंदर्भ: प्रकाशन संस्था, कॉण्टिनेण्टल प्रकाशन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन���या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-03-25T07:23:07Z", "digest": "sha1:6WBX35F5VXZKP667QBBOIZVSL7N5LRM3", "length": 12030, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फेसबुकच्या ओळखीतून महिलेची फसवणूक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nफेसबुकच्या ओळखीतून महिलेची फसवणूक\nपुणे – फेसबुकवर महिलेशी ओळख करत तीला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेली महिला वडगावशेरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी अमर सिंग, अश्फाक खान, अमिना खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या वडगाव शेरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. दोन वर्षांपूर्वी अमिना खान नावाच्या महिलेने फिर्यादींना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. अमिना खान हिने इंग्लडमध्ये राहत असल्याचे फिर्यादींना सांगितले होते.\nयामाध्यामातून गेल्या दोन वर्षापासून फिर्यादी या तिच्या संपर्कात होत्या. त्याच्यात चांगली ओळख झाल्यानंतर अमिना खानने फिर्यादीला भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी 27 हजार रुपये ऑनलाइन मागून घेतले. त्यानंतर विमानतळावर भेटवस्तूचे पाकिट पाठवले आहे त्यात सोन्याचे दागिने असून ते सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडल्याचे सांगत ते पाकिट कस्टमच्या ताब्यातून सोडविण्यासाठी काही रक्कम भरावी लागणार असल्याचे फिर्यादीला सांगितले.\nत्यानुसार फिर्यादीला अश्फाक खान, गुप्ता फॅब्रिक्स, अमर सिंग या नावाने असलेल्या दोन बॅंकांच्या खात्यात पैसे भरण्याची सूचना आरोपी अमिनाने केली होती. त्यानुसार फिर्यादीने पैसे भरले. मात्र, एकूण 3 लाख 2 हजार 200 रुपये भरुनदेखील भेटवस्तूंचे पाकीट न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिकचा तपास येरवडा पोलीस करत आहेत.\nएक्सेल व्हेईकल्सची विक्रमी ट्रक विक्री\nअवैध दारू अड्ड्यांवर उंब्��ज पोलिसांची कारवाई\nस्नुकर अजिंक्यपद स्पर्धा : वाडेश्वर विझार्डस संघाचा बाद फेरीत प्रवेश\nपुना क्लब, सनी इलेव्हन उपांत्य फेरीत दाखल\nप्रचाराबरोबर गुन्ह्यांचीही जाहिरात करणे बंधनकारक\nअरुण गवळीच्या संचित रजेवर सोमवारी निर्णय\nदारू पिण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला\nपंधरा लाखांची वीज चोरी; तिघांवर गुन्हा\nनशेत दुचाकी पेटवली, आरोपीला अटक\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/the-life-story-of-chris-benoit-part-three/", "date_download": "2019-03-25T07:22:02Z", "digest": "sha1:T2SWG2QDINM5A6RFAT7QZ65ZN4XBSMER", "length": 16851, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "WWE स्टारचा गूढ मृत्यू - ज्यामुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली (भाग ३)", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nWWE स्टारचा गूढ मृत्यू – ज्यामुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली (भाग ३)\nआ���च्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nजिवंत असताना सुद्धा त्याने लाखो फॅन्स कमावले आणि त्याच्या मृत्यूने अख्खं प्रोरेसलिंग विश्व ढवळून निघालं. WWE आणि इतर मोठ्या प्रमोशन्सना आपल्या पोलिसीज मध्ये मोठे बदल करावे लागले. मृत्युनंतर सुमारे ७ वर्षे होऊन गेली तरी अगदी आजदेखील त्याच्या मृत्यूबद्दलच्या चर्चा, Conspiracy theories थांबलेल्या नाहीत. फॅन्स आजदेखील त्याला मिस करतात. WWE ने शक्य त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कंपनीशी संबंधित असलेले त्याचे उल्लेख, त्याचे विक्रम पुसण्याचा प्रयत्न केला असला तरी एक टेक्निकल प्रोरेसलर म्हणूनही अजूनही त्याचं स्थान फॅन्स च्या मनात अढळ आहे.\nकोण होता हा ख्रिस बेनवॉ काय केलं होतं त्याने\n(मागील (दुसऱ्या) भागाची लिंक: पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या WWE स्टार ची शोकांतिका-भाग २)\nपोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये बेनवॉच्या मेंदूवर बरेच आघात असल्याचं दिसून आलं. Sports Legacy Institute च्या डॉ ज्युलिअन बेल ह्यांनी केलेल्या चाचण्यांनुसार बेनवॉचा मेंदू हा अल्झायमर झालेल्या ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या मेंदूप्रमाणे वाटत होता. तज्ज्ञांच्या मते रेसलिंग करत असताना बरेचदा डोक्यावर घेतलेल्या चेयरशॉट्स मुळे हे होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.\nWWE ने ह्यासाठी आपली सिस्टीम काही प्रमाणात कारणीभूत असल्याचं कधीही मानलं अथवा कबूल केलं नाही. मात्र, त्यांच्या पॉलीसीजमध्ये लक्षणीय बदल घडून आला.\nConcussions ला कारणीभूत होतील असे डोक्यावर मारले जाणारे चेयरशॉट्स पूर्णपणे बंद करण्यात आले. रक्त आणि इतर हिंसा असलेली दृश्ये (निदान काही वर्षांकरता) एडीट करण्यात येऊ लागली. तसंच, WWE शोज हे TV-14 वरून TV-PG रेटिंग वर यायला लागले, म्हणजेच हिंसाचार आणि इतर भडक कंटेंट कमी होऊन लहान मुलांना जास्त सुट होईल असं कंटेंट WWE ने दाखवायला सुरवात केली. ख्रिस बेनवॉचा उल्लेख WWE ची वेबसाईट आणि इतर ठिकाणांहून शक्य तितका वगळण्यात आला. Drug Testing आणखी कडक करण्यात आलं.\nमात्र काही प्रश्न हे अनुत्तरीतच राहिले.\n२५ जून,२००७ च्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटाने ख्रिस बेनवॉचं इंग्लीश विकीपेडिया पेज एडीट करण्यात आलं आणि त्यात पत्नी नॅन्सीच्या मृत्यूमुळे बेनवॉ शोला येऊ न शकल्याचं आणि त्याच्याजागी जॉनी नायट्रो ह्याला घेण्यात आल्याचं लि���िलं गेलं.\nमात्र, पोलिसांना तीनही मृतदेह हे सुमारे साडेचौदा तासांनंतर म्हणजे दुपारी २.३० च्या सुमारास सापडले. त्यापूर्वी कुणाच्याही मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नव्हती. मग ह्यांचे मृतदेह सापडण्यापूर्वी किंवा कुणाच्याही मृत्यूची बातमी बाहेर येण्यापूर्वी हे पेज कसं काय एडीट करण्यात आलं\nएका वेबसाईटनुसार काही तासांत पेजवर वेगवेगळे एडीट करण्यात आले. ह्यातल्या एका एडिटरचा IP address हा Stamford, Connecticut येथे लोकेट झाला आणि त्याच शहरात WWE चं हेडक्वार्टर आहे.\nतसंच, ज्या रात्री त्याला पुन्हा Championship टायटल मिळणार होतं, त्याच्या काही तास आधी तो असं काही करेल असादेखील प्रश्न बऱ्याच फॅन्सकडून विचारल्या जातो.\nरिपोर्ट मध्ये बेनवॉने आधी नॅन्सी आणि मग डॅनिएल चा खून करून मग आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला असला तरी वर नमूद केलेल्या ह्या सगळ्यां घटनांचा बेनवॉ परिवाराच्या खूनाशी काही संबंध असल्याचं होता का ह्याबद्दल अनेक लोकं अजूनही साशंक आहेत. कित्येक लोकांच्या मते बेनवॉ निरपराध असून कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तिघांनाही संपवून बेनवॉच्या आत्महत्येचा देखावा तयार केला. इंटरनेट वर अजूनही या विषयावर चर्चा होतात आणि मते, मतांतरे मांडली जातात.\nलवकरच ह्या प्रसंगावर Crossface ह्या नावाने एक मुव्ह येत आहे. ( हे त्याच्या सिग्नेचर सबमिशन मुव्हचं नाव होतं आणि हीच मुव्ह वापरून त्याने लहानग्या डॅनिएलचा खून केल्याचं मानलं जातं). Lifted, Punisher: War Zone फेम लेक्सी अलेक्झांडर ही मुव्ही डायरेक्ट करणार आहेत.\nआशा आहे हयात काहीतरी नवीन बघायला मिळेल किंवा आणखी प्रकाश पडेल. एक मात्र खरं की ह्या घटनेनंतर Pro wrestling चं विश्व हे कायमसाठी बदललं.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३\n ट्रेलर तर छान वाटतंय\nमृत्युनंतरही त्याची चर्चा थांबत नाही – ख्रिस बेनवॉ ची शोकांतिका-भाग १\nपंजाबी ड्रेस घालून WWE च्या रिंगमध्ये लढणारी पंजाबी महिला\nएक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…\nOne thought on “WWE स्टारचा गूढ मृत्यू – ज्यामुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली (भाग ३)”\nPingback: पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या WWE स्टार ची शोकांतिका-भाग २ | मराठी pizza\nरुळांवर शेकडो माणसे दिसत असून देखील लोको पायलट ट्रेन का थांबवू शकत नाहीत\n“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत\n या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल\nमोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\nउन्हाळ्यात फळांचा रस पिताय मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत \nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\nदेशाच्या विकासावर कब्जा करून बसलेल्या “सनातनी पुरोगामी” धर्माचे निरूपण : भाऊ तोरसेकर\nजाणून घ्या चक्रीवादळांना नावे देण्यामागचं नेमकं कारण \nजगातील most wanted महिला दहशतवादी \nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\n“लोकशाही” चांगली की वाईट – समजून घ्या महान तत्ववेत्ता सॉक्रेटिस काय म्हणतो\nडोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू\nपाकिस्तानच्या हद्दीत घुसून तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी\nशेतकऱ्याला कर्ज माफी का कर्जमुक्ती\nसमुद्रमंथनातून मिळालेला लसूण – रोज अंशापोटी खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे \nकाही दिवसांत जीव घेणारा हा बॅक्टेरिया पसरण्याची संधी आपण रोजच्या सवयींतून देतोय का\nपोट्टेहो आनंदाची बातमी- नागपूर होतंय भारतातील पहिलं इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे शहर\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\n“सामने शेर है, डटे रहीयो” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090101/main.htm", "date_download": "2019-03-25T08:37:41Z", "digest": "sha1:3WVXAFSUBG3KJ6Y3BU5GN4RTEHFTCY4M", "length": 20897, "nlines": 51, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\n‘थर्टी फर्स्ट’ कडक सुरक्षेतला\nमुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी\nजुने वर्ष सरते आणि नवीन वर्ष येते.. हा दरवर्षीचाच शिरस्ता आहे.. सगळेजण जुन्या वर्षांतील कडू-गोड आठवणींना मागे ठेवून जल्लोषपूर्ण वातावरणात नव्या उमेदीने नव्या वर्षांचे स्वागत करतात.. यंदा मात्र नववर्षांच्या स्वागतावर दहशतवादाची काळी छाया होती.. दहश���वाद्यांनी मुंबईकरांच्या मनावर खोलवर क्रुरतेचे व्रण उमटवले आहेत.. पण या व्रणांना कवटाळत न बसता त्यावर फुंकर घालत मुंबईकरांनी या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस आणि निष्पाप नागरिकांचे स्मरण करून सरत्या वर्षांला निरोप दिला व २००९च्या नव्या, उमेदपूर्ण आणि सप्तरंगी पिसाऱ्यांनी फुललेल्या पहाटेचे स्वागत केले\nमात्र नववर्षांचे स्वागत करताना रस्त्या-रस्त्यावर पोलीस होते. थर्टी फर्स्टसाठी फेव्हरिट असलेल्या गेट वे ऑफ इंडियाला मेटल डिटेक्टरमधून जावे लागत होते. कुलाबा, जुहू परिसरात काही ठिकाणी पार्किंगसाठीही बंदी घालण्यात आली होती.. दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर रस्त्यावरील जल्लोषासाठी पोलिसांनी रात्री साडेबाराची मुदत घातल्याने अनेकांनी घराबाहेर पडण्याऐवजी घरच्या घरीच नववर्षांचे स्वागत करणे पसंत केले.\nआधीच जागतिक मंदी आणि त्यातच गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे नव्या वर्षांच्या स्वागताला बाहेर पडलेल्या मुंबईकरांमध्ये दरवर्षीचा जोश दिसत नव्हता. ३१ डिसेंबरच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी ही ठिकाणे माणसांनी फुलून गेलेली असतात. या वर्षी मात्र सर्वत्रच गर्दीचे प्रमाण कमी होते. मुंबईत विविध लहान-मोठय़ा पबमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडमधील कलाकारांनीही ३१ डिसेंबर घरच्यांचासमवेत साजरा केला तर काही जण कामानिमित्त परदेशात होते. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने कार्यालयातून लवकर बाहेर पडल्याने दुपारपासूनच लोकलला गर्दी होती. दरवर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री पूर्व आणि पश्चिम उपनगरांतून माणसांचे जथ्थेच्या जथ्थे दक्षिण मुंबईच्या दिशेने येतात. यंदा मात्र दक्षिणमुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या रोडावली होती.\nमुंबईवर हल्ला ‘लष्कर’नेच केला\nझरार शाहची स्पष्ट कबुली\nमुंबईवरील हल्ल्यात ‘लष्कर-ए-तैय्यबा’ या अतिरेकी संघटनेचा हात होता आणि मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलेला अतिरेकी अजमल कसाब याने जबानीत दिलेली माहिती खरी आहे, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या ‘लष्कर’च्या एका अतिरेक्याने दिली आहे. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात ही माहिती दिली आहे.\nकाळ, क���म आणि वेगाचे गणित साधत पुन्हा सत्तेवर येणार\nमुंबई , ३१ डिसेंबर\nकोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे याची पूर्ण जाणीव आहे. हाती असलेला कार्यकाळ लक्षात घेऊन काम, काळ आणि वेगाचे गणित साधण्याचा प्रयत्न राहणार असून त्यामुळे काँग्रेस आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेपर्यंत त्याचा थेट लाभ पोहोचविण्याचा आपला नववर्षांचा संकल्प असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्यातील विजेच्या टंचाईपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तसेच वाढती बेरोजगारी, सिंचनाचे प्रकल्प, विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष भरून काढणे अशी अनेक आव्हाने सरकारसमोर आहेत.\nपांडेने दिलेल्या जबानीमुळे पुरोहित अडकणार\nमुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी\nमालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याच्या आरोपावरून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेला स्वयंघोषित धर्मगुरू दयानंद पांडे याने या कटाची कबुली देताना दिलेल्या जबानीत सध्या भारतीय लष्करात असलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह आणखीही काही सूत्रधारांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) उपायुक्तांनी पांडेची जबानी नोंदविल्यामुळे ती न्यायालयातही ग्राह्य धरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास पुरोहितला लष्करी कारवाईला सामोरे जावेच लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.\nस्वयंघोषित धर्मगुरू म्हणविणाऱ्या दयानंद पांडे याने या कटाची संपूर्ण माहिती दिल्याचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. मात्र याबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आहे. पांडे याच्याकडील लॅपटॉपवर सापडलेल्या एका ध्वनिचित्रफितीमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट उघड झाला आहे. या चित्रफितीत नाशिक येथे २००७ मध्ये झालेल्या बैठकीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या बैठकीला आठजण उपस्थित होते. या बैठकीला पांडे मार्गदर्शन करीत होता. त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अन्य आठजण कोण ��ोते याचीही ओळख पटली असून या जबानीचा योग्यवेळी वापर केला जाणार असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. दहशतवादी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या करकरे यांनी त्याचवेळी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला होता आणि मोक्का कायद्यानुसार आरोपींच्या जबानी नोंदविण्यास सुरूवात केली जाणार होती. त्यानुसार एकेक आरोपीची जबानी नोंदविली जात असून पांडेची जबानी हादेखील त्याचाच भाग असल्याचे सांगण्यात येते.\nआयसीआयसीआयने केली अर्धा टक्क्याची कपात\nमुंबई, ३१ डिसेंबर/ व्यापार प्रतिनिधी\nदेशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या गृहकर्जदारांना नव्या वर्षांचे सहर्ष स्वागत करता येईल. विद्यमान त्याचप्रमाणे नव्या गृहकर्जदारांना आता व्याज दरात अर्धा टक्क्यांच्या कपातीचा लाभ नवीन वर्षांपासून आयसीआयसीआय बँकेने देऊ केला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वाहनांसाठी तसेच घरासाठी ‘फ्लोटिंग’ प्रकारातील कर्ज घेतलेल्या ग्राहकांना आजपासून १४.२५ टक्क्यांऐवजी नवीन १३.५ टक्के व्याजाचा दर लागू होईल, असे बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे बँकेने मुदत ठेवींवरील व्याजाच्या दरातही अर्धा ते पाऊण टक्क्यांनी कपात लागू केली आहे. दरम्यान एचडीएफसीनेही १ जानेवारीपासून घरांसाठी व गृहप्रकल्पांसाठी कर्जावर अर्धा ते सव्वा टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. तर स्टेट बँकेनेही नव्या वर्षांत आपल्या प्रधान ऋण दरात पाऊण टक्क्यांची कपात केली जाईल, असे सूचित केले आहे.\nधुळ्यानजीक अपघातात पाच महिला ठार\nधुळे, ३१ डिसेंबर / वार्ताहर\nतालुक्यातील कावठी येथून लोणखेडीकडे निघालेल्या अॅपे रिक्षाला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील पाच महिला जागीच ठार झाल्या. कुसुंबा गावाच्या पुढे लोंढी नाल्याजवळ झालेल्या या अपघातातील सर्व मृत महिला कावठी येथील रहिवासी होत्या. अपघातात अन्य सहा महिला गंभीर जखमी झाल्या असून अपघाताच्या वृत्ताने परिसरावर शोककळा पसरली आहे. शेतमजुरीसाठी या महिला अॅपे रिक्षातून लोणखेडीकडे निघाल्या होत्या. सकाळी साडे दहाच्या सुमारास झालेल्या या भिषण अपघातात शोभा चतुर पाटील (२९), सुनंदाबाई पाटील (३२), मीराबाई पाटील (५०), मोणबाई पाटील (२८) व बेबीबाई पाटील (३९) या ज���गीच ठार झाल्या तर विमलबाई पाटील, मालुबाई पाटील, विमलबाई पारधी, सुनंदाबाई सापीट, भागाबाई धोबी व सुनंदा पाटील या गंभीर जखमी झाल्या.\nधुळे व नगरमध्ये महापौरपदे पटकावली\nमुंबई, ३१ डिसेंबर / खास प्रतिनिधी\nनंदुरबार जिल्हा परिषदेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने धुळे आणि नगर महापालिकांची महापौरपदे आज पटकावली. राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पद्धतशीर व्यूहरचना सुरू केली आहे.\nनगर आणि धुळ्यात सर्वाधिक जागाजिंकल्यानंतर काँग्रेस व अन्य छोटय़ा पक्षांची मोट बांधून दोन्ही शहरांमध्ये राष्ट्रवादीने महापौरपदे पटकावली आहेत. जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमध्ये चांगले यश मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकांमध्ये पीछेहाट झाली होती. या पाश्र्वभूमीवर धुळे आणि नगरमध्ये महापौरपद पटकावून राष्ट्रवादीने शहरी भागात जम बसविण्याच्या दृष्टीने सुरुवात केल्याचे मानले जात आहे. नगरमध्ये महापौरपद मिळविण्यासाठी १० पेक्षा जास्त नगरसेवकांची गरज असताना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला. धुळे व नंदुरबार हे वर्षांनुवर्षे काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसचा धुव्वा उडविला. यापाठोपाठ धुळे महापालिकेचे महापौरपद पटकावून उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा निश्चितच फायदा होईल.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/2639616", "date_download": "2019-03-25T07:51:34Z", "digest": "sha1:2JUT453S3AP7GGYYDDU4C47LSNKVMLNU", "length": 4316, "nlines": 25, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt एसइओ प्रशिक्षण बंडल", "raw_content": "\nSemalt एसइओ प्रशिक्षण बंडल\nया पॅकेजसह, आपण आपली साइट रँक चांगली करण्यासाठी सज्ज व्हाल हे आपल्या एसइओ ज्ञान आणि कौशल्ये वाढविण्यासाठी सहा अभ्यासक्रम समाविष्टीत आहे. आपण एसइओ ची मूलभूत तत्त्वे शिकाल, आम्ही आपल्याला शोध इंजिन आणि आपल्या प्रेक्षकांसाठी कसे चांगले कसे लिहावे हे शिकवतो, आपण आपल्या पूर्ण प्रमाणात Yoast एसइओ कसे वापरावे हे जाणून घेता येईल आणि आम्ही आपल्याला Google मध्ये उच्च रँकिंग करण्��ासाठी योग्य साइट संरचना प्राप्त करण्यास मदत करते. त्यावरील, आपण Google साठी आपली साइट क्रॉल करण्यायोग्य करण्याबद्दल सर्व जाणून घेता. आणि शेवटचे पण कमीत कमी नाही, आपण आपल्या साइटवर संरचित डेटा कसा जोडावा ते शिकू शकाल.\nएफवायआय: या प्रशिक्षण बंडलमध्ये Semalt एसइओ प्रशिक्षण समाविष्ट नाही.\nया कोर्समध्ये, आपण Google आणि इतर शोध इंजिने कसे कार्य करतील ते जाणून घ्याल - apply for romanian passport. हे आपल्या साइटवर कसे ऑप्टिमाइझ करावे त्या सर्व मूलभूत तत्त्वांवर स्पर्श करते: तांत्रिक एसइओ, कीवर्ड संशोधन, साइट संरचना आणि काही उपयुक्तता सूचना व्हिडिओंच्या मदतीने, क्विझ आणि पार्श्वभूमी सामग्री वाचण्यासाठी आम्ही आपल्याला एसईओ समजण्यास मदत करतो\nवर्डप्रेस प्रशिक्षण साठी Yoast एसइओ\nतांत्रिक एसइओ 1 प्रशिक्षण\nआपण आपल्या शोध परिणामांना स्पर्धेपासून दूर राहावे असे इच्छिता मग आपल्याला श्रीमंत स्निपेटची आवश्यकता आहे मग आपल्याला श्रीमंत स्निपेटची आवश्यकता आहे या झलकीमध्ये आपल्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल अतिरिक्त माहिती असते जेणेकरून लोक त्यावर लवकरच क्लिक करतील आपण आपल्या साइटवर संरचित डेटा जोडल्यास Google हे दर्शवू शकते या झलकीमध्ये आपल्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल अतिरिक्त माहिती असते जेणेकरून लोक त्यावर लवकरच क्लिक करतील आपण आपल्या साइटवर संरचित डेटा जोडल्यास Google हे दर्शवू शकते या प्रशिक्षणात आपण संरचित डेटा कसे कार्यान्वित करावे ते शिकू शकाल.\n(3 9) हे बंडल आता मिळवा € 69 9 अर्थात, प्रमाणपत्र आणि बॅज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/jiva-tuzya/", "date_download": "2019-03-25T08:18:46Z", "digest": "sha1:2HODBTY3IYC35RWWOWKPBMRTQCLWOTFV", "length": 6466, "nlines": 66, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nजीवा, तुझ्या मोहिनीने भारले\nजीवा, तुझ्या मोहिनीने भारले\nउफाळूनी येती भाव चित्ती दाटले\nजीवा, तुझ्या मोहिनीने भारले.\nगूज मन्मनीचे केले खुले तुझ्यापाशी\nतुझ्या अंतरीचे गूढ चित्ता नाकळे.\nकरी पुरी आशा, पदरी टाक वा निराशा\nफिरायची मागे ही न आता पाऊले.\nधरी शिरी अ��ुरागे, वा दुरी फेक रागे\nसुको मुको प्राणा, पुष्प पायी वाहिले.\nलपंडाव हा जिवाला गमे पापदायी\nकधी व्हायचे हे उमाळे मोकळे\n'माझा मुलगा' हा प्रभातचा सर्वस्वी सामाजिक, मध्यमवर्गीयांच्या नातेसंबंधांवरील कथा असलेले चित्र. या चित्रातील 'पाहू रे किती वाट' आणि 'उसळत तेज भरे गगनात' ही दोन गाणी शांता हुबळीकर यांच्या आवाजात लोकांच्या पसंतीस उतरली. 'उसळत तेज भरे गगनात' या गाण्याच्या वेळी त्या गाण्यात काय आशय हवा आहे हे आठवल्यांना सांगताना व्ही शांताराम म्हणाले होते की, \"मला या गाण्यात एखादा बैरागी गातो तसं वर वर जाणारं, आभाळाला भिडणारं काही तरी हवं आहे\" 'पाहू रे किती वाट' यातील समुद्राच्या लाटा वर उसळल्याचा आभास उत्पन्न करणारे विलक्षण ताकदीचे संगीत लक्षणीय आहे.\nमज फिरफिरुनी छळीसी का\nउसळत तेज भरे गगनात\nजीवा, तुझ्या मोहिनीने भारिले\nपाहू रे किती वाट\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/sundar-narayan-temple-1784983/", "date_download": "2019-03-25T08:25:14Z", "digest": "sha1:ZNBTFKDPNA4ARYKKLBEIAYCUG5YJYWEN", "length": 15045, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sundar Narayan Temple | सुंदर नारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम संथपणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडी��ा लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nसुंदर नारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम संथपणे\nसुंदर नारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम संथपणे\nपुरातन वास्तू असलेल्या येथील सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने सुरू आहे.\nपुरातन वास्तू असलेल्या येथील सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. या कामास सहा महिन्यापेक्षा अधिक दिवस झाल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शास्त्रीय पद्धतीने काम सुरू असल्याने वर्षभरापेक्षा अधिक वेळ काम सुरू राहणार असल्याचे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर हे काम काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.\nमंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक पुरातन मंदिरे आहेत. कालौघात तसेच पर्यावरणातील काही बदलामुळे काही मंदिरांची झीज सुरू झाली आहे. या मंदिरांच्या यादीत पुरातन काळातील अहिल्यादेवी होळकर पुलालगत असलेल्या श्री सुंदर नारायण मंदिराचा समावेश आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर १७५६ साली बांधण्यात आले आहे. सद्यस्थितीत झीज आणि अन्य कारणाने धोकादायक स्थितीत पोहचल्याने पुरातत्त्व विभागाच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धार कामास सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र सरकारकडून १२ कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून सहा महिन्यापूर्वी प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. जवळील एका इमारतीत सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले आहे.\nया कामासाठी पुरातत्त्व विभागास तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. यातील सहा महिन्याहून अधिक कालावधी झाला असला तरी प्रत्यक्षात कामाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पुरातत्त्व विभागाला अडथळ्यांची शर्यत पार करत काम करावे लागत आहे. सुरुवातीला प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली, तेव्हा या ठिकाणी विद्युत वितरणच्या रोहित्रामुळे काम रखडले. नंतरच्या काळात मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडावरून काही वाद झाले. काम संथपणे सुरू असल्या���े तसेच मंदिराचे बांधकाम साहित्य त्याच आवारात असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होते. यामुळे काही नागरिकांनी कामास विरोध केला, परंतु पुरातत्त्व विभागाकडून काम कसे सुरू राहील, याची माहिती देण्यात आल्याने नागरिकांचा विरोध काही अंशी मावळला आहे.\nसध्या मंदिराचा कळस उतरवूनत्यावर काम सुरू झाले आहे. एक दगड मंदिराच्या रचनेप्रमाणे तयार करण्यासाठी साधारणत सहा दिवसांचा कालावधी लागतो. मंदिराच्या कळसाचे सहा थर पूूर्ण झाले असून त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने विशिष्ट आवरण टाकण्यात येत असल्याने काम झालेच नाही, असे लोकांना वाटत असल्याचे पुरातत्त्व नाशिक विभागाचे प्रमुख विलास वाहणे यांनी सांगितले. मंदिराचा सज्जा पूर्णपणे नव्याने तयार करायचा आहे. या सर्वाचा परिणाम कामावर होत आहे. काही दिवसांपासून कामगार दिवाळीनिमित्त सुटीवर गावी गेल्याने हे काम थांबले आहे. १५ तारखेनंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. पुढील पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे वाहणे म्हणाले.\nसुंदर नारायण मंदिराची बांधणी पाषाणात आहे. महाराष्ट्रात अशी पाषणातील मंदिरांची संख्या कमी आहे. दक्षिणेकडे अशीच मंदिरे असल्याने या मंदिराच्या बांधकामासाठी कारागीर आणि ठेकेदार दक्षिणेतून आले आहेत. त्यांना या मंदिर बांधकामाचा सराव असल्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने दगडावर त्यांचा हात सुरू असतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धू��्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/385", "date_download": "2019-03-25T08:54:32Z", "digest": "sha1:5GA2LSYNNS5IYLCGIEIPX563OX7TPMYL", "length": 10895, "nlines": 138, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी संघटक २१ फेब्रुवारी २०१२ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nशेतकरी संघटक २१ फेब्रुवारी २०१२\nमुखपृष्ठ / शेतकरी संघटक २१ फेब्रुवारी २०१२\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nGangadhar M Mute यांनी सोम, 20/02/2012 - 13:40 ह्यावेळी प्रकाशित केले.\nकापसाची शेती सापशिडीचा खेळ\nनिवडणुकीत ‘रस’ असणार्या मतदारांसाठी...\nकेंद्रीय अंदाजपत्रक उद्योजक आणि\nशेतकर्यांना मोकळे करणारे हवे\nअंधेर ��गरी चौपट राजा\nमाधवराव खंडेराव मोरे, नाना तुम्हीसुद्धा...\nक्लिक करा आणि अंक वाचा.\nपाने पलटण्यासाठी पानाच्या कीनारीवर/ काठावर क्लिक करा म्हणजे पाने पलटतील.\nतुमचे नेट स्लो असेल तर पाने दिसायला थोडा वेळ लागू शकतो. त्यासाठी प्रतिक्षा करा.\nशेतकरी संघटकचे यापुर्वीचे अंक - येथे वाचा\nअंक वाचण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090330/main.htm", "date_download": "2019-03-25T08:23:30Z", "digest": "sha1:V3P7I3D62J7J6JQX23BCUQWNULABJSJS", "length": 20757, "nlines": 54, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, ३० मार्च २००९\nबचेंगे तो और भी लडेंगे\nनेपियर, २९ मार्च / पीटीआय\nआणखी एक दिवस झुंजण्याचे\nभारतापुढे आव्हान; गंभीरचे शतक\nपहिल्या डावातील घसरगुंडीनंतर ३१४ धावांची प्रचंड मोठी पिछाडी पाठीवर घेऊन झुंजायला निघालेला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी वाचवू शकेल की यजमानांपुढे शरण जाईल, याचे उत्तर या कसोटीच्या उद्याच्या अखेरच्या दिवशी मिळणार आहे. पहिल्या डावातील खेळाच्या तुलेनत फॉलोऑननंतर केलेल्या ‘गंभीर’ खेळामुळे भारतीय संघाने चौथा दिवस निभावून नेला आता अखेरचा दिवस शिल्लक आहे. २ बाद २५२ अशा स्थितीनंतर भारतीय संघ अजूनही ६२ धावांनी मागे आहे. ही पिछाडी भरून काढण्याबरोबरच न्यूझीलंडला फलंदाजीस उतरण्याची संधी नाकारणे आणि मालिकेत १-१ अशा बरोबरीपासून परावृत्त करणे हे आव्हानही पाहुण्यांना पेलायचे आहे.\nभारतीय संघाला एकीकडे न्यूझीलंडविरुद्धचा किल्ला लढविताना एकेक फलंदाज मोलाचा असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे राहुल द्रविडच्य��� रूपात भारतीय संघाला महत्त्वाच्या क्षणी मोठा धक्का बसला. चहापानाला २७ मिनिटे शिल्लक असताना पंच इयन गोल्ड यांनी राहुल द्रविड झेलचित असल्याचा निर्णय दिला. पण द्रविडच्या पॅडला स्पर्श करून चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेगला जॅमी हाऊच्या हातात गेला होता. रिप्लेत द्रविड चुकीच्या निर्णयाचा बळी ठरल्याचे स्पष्ट झाले. द्रविड आणि गंभीर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी वाढवून किवींना धोबीपछाड देण्याचे स्वप्न मात्र द्रविड दुर्दैवीरित्या बाद झाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही.\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्यावर केलेली टीका आणि पिलीभीतमध्ये घडत असलेल्या वरुणनाटय़ाविषयी आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारू नका, त्यांची उत्तरे आपण पुढच्या वेळी देऊ, अशी अडवाणींनी स्वतहूनच पत्रकारांना विनंती केली. स्वीस बँकेतील काळ्या धनाचे वृत्त राष्ट्रीय महत्त्वाचे आहे. त्याला न्याय मिळायला हवा, असे ते म्हणाले. पण वरुण गांधींच्या मुद्यावर टिप्पणी केल्यावाचून त्यांना राहवले नाही. वरुण गांधी प्रकरणी कायद्यातील तरतुदींनुसार भाजपने घेतलेल्या ‘योग्य’ भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. मूळात पिलीभीतमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचे वरुण गांधींवरील आरोप खरे आहेत की खोटे हेच सिद्ध झालेले नाहीत. पण सीडीमध्ये त्यांच्या तोंडी ज्या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत, त्यापासून भाजपने स्वतला दूर केले आहे, असे अडवाणी म्हणाले.\nमालेगावचे आरोपी पकडल्यापासून देशात\nएकही बॉम्बस्फोट नाही - पवार\nमुंबई, २९ मार्च / खास प्रतिनिधी\nकाँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा इशारा मुंबईतील उलेमांनी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी या हिंदुत्ववादी नेत्यांना लक्ष्य करतानाच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या अटकेनंतर अद्याप देशात एकही बॉम्बस्फोट झाला नसल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुस्लिम मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. आघाडी आणि जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या कटुतेच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण���यात आला होता. या वेळी बोलताना पवारांनी शिवसेना, भाजप व रा. स्व. संघावर जोरदार टीका केली. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वरुण गांधी यांचे लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग हे समर्थन करतात. अशा लोकांच्या हातात देशाची सत्ता देणार का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना, भाजप व रा. स्व. संघाच्या मंडळींकडे सत्ता सोपविल्यास देश ५० वर्षे मागे जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nशिवसेनेच्या गडातून इच्छुक पळविण्याच्या\nभाजपच्या प्रयत्नाने युती पुन्हा संकटात\nसंदीप प्रधान, मुंबई, २९ मार्च\nभिवंडी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेतला. परंतु भाजपकडे उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या गडातून कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांना पळविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याने शिवसेना भाजपवर प्रचंड कोपली आहे. पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी दिली तर युती तुटेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. धुळ्यातही असाच शिवसेनेतील उमेदवार पळविण्याचा प्रयत्न भाजपने करून पाहिला. पण त्यांची डाळ शिजली नाही. आता ‘चलो दिल्ली’चा नारा देत प्रचाराची रणधुमाळी सुरू करायला सज्ज असलेल्या युतीमध्ये नवे भांडण पेटले आहे.\nमहाराष्ट्रात समाजवादी पक्ष अनेक ठिकाणी उमेदवार उभे करणार\nनवी दिल्ली, २९ मार्च/पीटीआय\nउत्तर प्रदेशात काँग्रेसबरोबर जागावाटपाचा समझोता होऊ न शकल्याने आता समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात अनेक मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. वायव्य मुंबई मतदारसंघाची जागा समाजवादी पक्षाला देण्यास काँग्रेसने नकार दिल्याने आता तेथे समाजवादी पक्षाचा उमेदवार उभा केला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी सांगितले की, वायव्य मुंबई मतदारसंघाची जागा समाजवादी पक्षासाठी सोडता येणार नाही, असे आजच काँग्रेसने आम्हाला रीतसर कळवले असून, त्यामुळे आम्हाला वाईट वाटते. आता नाईलाजाने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आम्हाला उभे करावे लागणार आहेत.\nपुणे विद्यापीठातील शिक्षक तपासतो दिवसाला ६२४ उत्तरपत्रिका\nपुणे, २९ मार्च/खास प्रतिनिधी\nऑस्ट्रेलियाच्या एकाच दिवसात ४०० धावा, सर डॉन ब्रॅडमन यांचे पहिल्याच दिवशी त्रिशतक.. पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनीही असेच विक्रम केले आहेत. क्रिकेटच्या खेळपट्टीवर नव्हे, ���र केंद्रीय मूल्यमापन प्रक्रियेमध्ये उत्तरपत्रिका तपासणीच्या कामामध्ये अनोख्या ‘कार्यक्षमते’चा प्रत्यय देत विद्यापीठातील प्राध्यापकांनी एका दिवसात तब्बल ६२४ उत्तरपत्रिका तपासल्या आहेत.\nभारतीय दूतावासाच्या संगणकातील माहितीचे चिनी गटांकडून हॅकिंग\nचीनच्या नियंत्रणाखालील एका मोठय़ा सायबर हेरगिरी यंत्रणेने भारताच्या वॉशिंग्टनमधील दूतावासासह किमान १०३ देशातील सरकारी व खासगी संगणकातील माहिती चोरली आहे. तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्या संगणकातही घुसखोरी करण्यात आल्याचे वृत्त आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कॅनेडियन संशोधकांनी केलेल्या तपासणीनुसार चीनमधील संगणकांकडून नियंत्रित करण्यात आलेल्या हॅकर्सच्या गटाने ही सर्व माहिती संगणकांमधून चोरली आहे. त्यात चीन सरकारचा हात असल्याचे मात्र स्पष्टपणे म्हटलेले नाही.\nवरुणविरुद्ध दंगल, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा\nभाजपचे पिलिभीत येथील उमेदवार वरुण गांधी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल माजविणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरुण गांधी यांनी निवडणूक प्रचारात मुस्लिम समाजाविरुद्ध केलेल्या आगखाऊ भाषणासाठी काल त्यांना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र या अटकेच्या वेळी पिलिभीतमध्ये त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमकी झडल्या. समर्थकांनी तुफान दगडफेक केली तर पोलिसांनीही लाठीमार केला. या साऱ्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी वरुण गांधी यांच्यावर दंगल माजविणे, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, इतरांचे जीवित धोक्यात आणणे आदी गुन्हे दाखल केले. वरुण यांच्यासह भाजपचे उत्तर प्रदेश अध्यक्ष कलराज मिश्र, स्थानिक आमदार सुखलाल आणि माजी आमदार बी. के. गुप्ता तसेच अनेक कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कालच्या अटकनाटय़ाच्या वेळी एका मुस्लिम अधिकाऱ्याने वरुण यांच्या समर्थकांवर बेछुट लाठीहल्ला करून अनेक कार्यकर्त्यांना जखमी केले, असा आरोप वरुण यांची आई मनेका गांधी यांनी केला. मात्र हा आरोप निखालस असत्य आणि निराधार असल्याचा दावा पिलिभीतचे जिल्हा न्यायाधीश अशोक चौहान यांनी केला.\nनवी दिल्ली, २९ मार्च/पीटीआय\nएका समाजाविरुद्ध भडक वक्तव्ये करून जाती��� तणाव निर्माण केल्याच्या आरोपाखाली भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने आज ‘रासुका’ लावला.त्यापूर्वी वरुण गांधी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल माजविणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरुण गांधी यांनी निवडणूक प्रचारात मुस्लिम समाजाविरुद्ध केलेल्या आगखाऊ भाषणासाठी काल त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र या अटकेच्या वेळी पिलिभीतमध्ये त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमकी झडल्या. या साऱ्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी वरुण गांधी यांच्यावर दंगल माजविणे, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, इतरांचे जीवित धोक्यात आणणे आदी गुन्हे दाखल केले.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2017-Kalingad.html", "date_download": "2019-03-25T07:49:52Z", "digest": "sha1:HGEWHUC7Z2TOJORF536GABKLBXAXA2UJ", "length": 10770, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे कलिंगड उत्पादनात १।। पट वाढ, नफ्यात १ लाख २० हजारची वाढ", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे कलिंगड उत्पादनात १ पट वाढ, नफ्यात १ लाख २० हजारची वाढ\nश्री. साळीकराम सखाराम फपाळ, मु.पो. आलापूर, ता. माजलगाव, जि. बीड- ४३११२८. मी. ९७६४३६५९००\nमला एकूण १२ एकर जमीन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला व इतर हंगामी पिके घेतो. यावर्षी पर्जन्यमान चांगले राहिले. मात्र माझे शेत सरस्वती नदीच्या काठावर असल्यामुळे ८ एकर क्षेत्र जमिनीसहित वाहून गेले. मागच्या २ ते ३ वर्षापासूनचा सतत दुष्काळ आणि यावर्षी अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे नैराश्य आले, परंतु ऐकले होते जिथे हरवले तिथेच सापडते' अशा विचार चक्रामध्ये टरबूज लागवड करण्याचा निर्णय घेतला.\nलागवडीसाठी मी सिंजेंटा कंपनीचे शुगरक्वीन हे वाण निवडले. दि. ३ डिसेंबर २०१६ रोजी ७ पॉकीटे (५० ग्रॅमची) बी आणि जर्मिनेटर १०० मिली २ लि. पाणी या द्रावणामध्ये टाकून १२ तास बियाणे भिजवत ठेवले. त्यानंतर बी बाहेर काढून सावलीत सुकवले व कोकोपीट -ट्रे मध्ये बियाण्याची लागवड केली. डिसेंबर महिन्याची थंडी असतानाही बिज प्रक्रिया केल्यामुळे बियाणे ७२ तासांमध्ये उगवले व ९९% जर्मिनेशन झाले. त्या दरम्यान (रोपे लागवडीस तयार होईपर्यंत) मी शेतीची तयारी केली. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी २००७ पासून वापरत आहे. मात्र कलिंगडचे अधिक उत्पादन घेण्याकरिता मी कंपनी प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) यांना भेटलो व नियोजन केले.\nत्याकरित सुरुवातीचा डोस (बेसल डोस) १०:२६;२६ १२५ किलो निंबोळी पेंड ७५ किलो, कल्पतरू १५० किलो, दाणेदार ३०० किलो सुक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो बेडमध्ये भरले व ५ फुटाच्या अंतराने बेड ओडले आणि ड्रीप टाकून वर मल्चिंग पेपरने बेड झाकून घेतले. बी लागवडीपासून १६ व्या दिवशी रोपांची ४४ गुंठ्यामध्ये लागवड केली व त्याच दिवशी जर्मिनेटर १०० मिली १५ लि. पाण्यामध्ये टाकून ड्रेंचिंग केली. नंतर १६ व्या दिवशी सप्तामृताची फवारणी (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी, स्प्लेंडर) केली त्यानंतर २६ व्या दिवशी जर्मिनेटर २ लि. ड्रीपमधून सोडले. त्या दरम्यान बोल्लो १५ मिली (नागअळी करिता) व थायमोथोक्सान १० ग्रॅम घेवून प्रति पंप फवारणी केली. त्याच दरम्यान १९:१९:१९ एका वेळेस ३ किलो याप्रमाणे एकूण १८ किलो सोडले.\n३० व्या दिवशी हार्मोनी ३० मिली, प्रिझम ४० मिली व थायमोथोक्सान १० ग्रॅम प्रति पंप वापरून फवारणी केली. नंतर ३५ व्या दिवशी सप्तामृताची फवारणी केली व अमोनिअम सल्फेट ३ वेळा ५ - ५ किलो प्रति दिवसाप्रमाणे १५ किलो ड्रीपमधून सोडले.\nलागवडीपासून ४० व्या दिवशी फुल चालू झाले असताना जर्मिनेटर २ लि. ड्रीपमधून सोडले व ४० व्या दिवशी चौथी फवारणी थ्रीप्स व पांढऱ्या माशीकरिता कोडा लॅबॉरेटरिजचे ड्रॅगन ३० मिली, थ्रिलर ३० मिल १५ लि. पाण्यामध्ये टाकून फवारणी केली. ४२ व्या दिवशी फुलगळ होऊ नये म्हणून १३:४०:१३ ३ किलो २ वेळा ड्रिपमधून सोडले व कॅल्शियम नायट्रेट ३ किलो व बोरॉन १ किलो २ दिवसाआड असे एकूण १८ किलो कॅल्शियम नायट्रेट व ६ किलो बोरॉन ड्रिपमधून सोडले. ४४ व्या दिवशी प्रोटेक्टंट -पी ५० ग्रॅम + हार्मोनी ३० मिली + जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + स्प्लेंडर २० मिली अशी सप्तामृताची फवारणी केली. ४६ व्या दिवसानंतर १२:६१:०० ३ किलो आणि ००:००:५० १ किलो एक दिवसा आड ६ वेळेस सोडले. ५० व्या द��वशी बी.एस.एफ. चे हेडलाईम ८ ग्रॅम + थायमोथोक्सान १० ग्रॅम + ड्रॅगन ३० मिली + थ्रिलर ३० मिली/पंप अशी फवारणी केली. ६५ व्या दिवशी ब्ल्युकॉपर ३० ग्रॅम + फिप्रोनिल ३० मिली + थायमोठोक्सान १० ग्रॅम फवारणी केली. ६८ व्या दिवसापासून ००:५२:३४ ३ किलो प्रमाणे ८ वेळेस असे एकूण २५ किलो सोडले व ७० व्या दिवशी राईपनर २ लि. ड्रीपमधून सोडले. ८० व्या दिवशी फॉस्फेरिक अॅसिड १ लि. ड्रीपमधून सडोले व फॉलीक्युअर ८ ग्रॅम + ड्रॅगन ३० मिली + अॅडव्हाजर ३० मिली प्रति पंप टाकूण फवारणी केली. ८० व्या दिवसापासून ००:००:५० दिवसाड ३ किलो प्रमाणे १५ किलो सोडले. अशा तऱ्हेने माझा एकूण खर्च ७०,००० रु. झाला व मला एकूण ४४ गुंठ्यामध्ये ४८ टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले. त्यामध्ये ३३ टन माल ए- ग्रेडचा निघाला. (साईज ३ ते ६ किलोच्या दरम्यान होती.) ३३ टन मालाला ७५५५ रु./टन भाव मिळाला. त्याचे २,४९,३१५ रु. झाले व १५ टन मालास ४००० रु./टन भाव मिळाल्याने त्याचे ६०,००० रु. असे एकूण मला ३,०९,३१५ रु. उत्पन्न झाले. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी नियोजनबद्ध वापरल्यामुळे माझ्या उत्पादनामध्ये दीडपट (१५ ते १८ टन) वाढ झाली. त्यामुळे मला किमान १,२०,००० रु. चा अधिक फायदा झाला. त्यामुळे मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो व धन्यवाद देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/friendship-with-child/articleshow/63265710.cms", "date_download": "2019-03-25T08:56:06Z", "digest": "sha1:NO27PXWQDMXMADFHGL7437AQYV2ZXEV6", "length": 17831, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "friendship with child: पाल्याशी करा दोस्ती - friendship with child | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपालकांना बऱ्याचदा असं वाटतं, की तुलना केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि मुलं अधिक मेहनत करायला लागतील; पण थांबा, असा विचार करा, की ही तुलना तुमच्यासाठी हेल्दी(पोषक) वाटत असेल; पण मुलं तुमच्यासारखाच विचार करतात का\nपालकांना बऱ्याचदा असं वाटतं, की तुलना केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि मुलं अधिक मेहनत करायला लागतील; पण थांबा, असा विचार करा, की ही तुलना तुमच्यासाठी हेल्दी(पोषक) वाटत असेल; पण मुलं तुमच्यासारखाच विचार करतात का मुलांशी दोस्ती करा आणि मग त्यांच्या बाजूनं विचार करा.\nखोलीतल्या घडाळ्याची टिकटिक ऐकून तुम्हाला भीती वाटत आहेनाही ना; पण ज्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत वा होणार आहेत, त्यांच्यासाठी पुढं सरकणारा हा घडाळ्याचा काटा खूप महत्त्वाचा आहे. परीक्षा जवळ आल्या, की प्रत्येक विद्यार्थी दडपणाखाली असतो. अभ्यास म्हणजेच सर्वकाही असं मानणाऱ्या समाजात आपण राहतो, त्यामुळे परीक्षेच्या काळात फक्त स्वतःच्याच नव्हे, तर पालकांच्या प्रतिष्ठेसाठी मुलांवर वेगळंच दडपण असतं. कधीकधी असं वाटतं, की विद्यार्थी हे स्वतःसाठी नाही, तर समाजाच्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात.\nसध्याच्या एक पेयपदार्थ कंपनी #रिलीजदिप्रेशर ही मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत शुजीत सरकार यांनी दिग्दर्शित केलेली शॉर्टफिल्म तयार करण्यात आली आहे. परीक्षेत चांगल्या मार्कांचं दडपण हा या शॉर्टफिल्मचा विषय. ओळखीतल्या समवयीन मित्राशी किंवा भावंडांशी होणारी तुलना ही मुलांसाठी खूप भीतीदायक आहे. मग तो वर्गात पहिला क्रमांक पटकवणारा असो वा काठावर पास होणारा विद्यार्थी असो, दडपण येतंच. पालकांना बऱ्याचदा असं वाटतं, की अशी तुलना केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि मुलं अधिक मेहनत करायला लागतील; पण थांबा असा विचार करा, की ही तुलना तुमच्यासाठी हेल्दी(पोषक) वाटत असेल; पण मुलं तुमच्यासारखाच विचार करतात का\nपालकांना बऱ्याचदा स्पर्धा म्हणजे नकळतपणे आपण मुलांना प्रोत्साहन देतोय असं वाटतं; पण खरंच हे तितकं सोपं आहे का मुळात हे जास्तच हानिकारक आहे. याद्वारे तुम्ही मुलांच्या नकारात्मक विचारांना नकळतपणे खतपाणी घालताय. या शॉर्टफिल्ममध्ये हेच दर्शवलं आहे, की या तुलनेचा मुलांवर उलटा परिणाम होतो. आपल्यामुळे पालकांना शरमेनं मान खाली घालावी लागेल, माझ्या शिक्षणावर पैसे खर्च करणं म्हणजे पैसे वाया घालवणं किंवा माझ्याकडून आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही... असे निराशेचे विचार मुलांच्या डोक्यात येतात. हाच या सगळ्याचा शेवट असं नाही. यातून नैराश्य, मानसिक खच्चीकरण या समस्या उद्भवतात. हे एकदम सूचकपणे या लघुपटात दाखवलं आहे.\nप्रत्येक पालकानं हे लक्षात घेतलं पाहिजे, की उच्च शिक्षण घेऊनच माणूस मोठा होतो असं नाही. अभ्यासाची जबरदस्ती करू नका. अशी दुसरी गोष्ट असेल, जी करण्यात त्याला मनापासून आवडेल आणि ते करण्यासाठी तुम्हाला कुठलीही जबरदस्ती करावी लागणार नाही. त्याला अभ्यास करणं आवडत नसेल, असं तुमच्या ब���बतीतही होऊच शकतं. तुम्हालाही कितीतरी गोष्टी करायला आवडत नसतील; पण याचा अर्थ असाही नाही, की तुम्ही मुलांना वाऱ्यावर सोडून द्या. त्यांना वाईट सवयी लागणार नाहीत, त्यांचा वेळ वाया जाणार नाही यावर लक्ष द्या. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, तर मूलभूत शिक्षण गरजेचं आहे. पाल्याच्या इतर गुणांकडे लक्ष द्या. त्यांना प्रोत्साहन द्या, बघा तो नक्की यशस्वी होईल.\nगेल्या कित्येक महिन्यांपासून अशाच आशयाची जाहिरात टीव्हीवर प्रदर्शित होत आहे. या जाहिरातीमध्ये शाळेतल्या मुख्याध्यापिका सगळ्या पालकांशी येणाऱ्या परीक्षांबद्दल चर्चा करत असतात. त्या एका पालकाला विचारतात, की तुम्हाला या इयत्तेत किती मार्क्स होते आठवतंय त्यावर पालक म्हणतात, की मला कॉलेजमध्ये किती मार्क्स होते हेही आठवत नाही. त्यावर मुख्याध्यापिका हसत सांगतात, ‘मला फक्त ५९ टक्के होते, तरीही मी आज तुमच्या मुलांची मुख्याधापिका आहे. हे गुण कुठल्याही पाल्याची गुणवत्ता ठरवत नाहीत. त्यांची शोभा गुणपत्रिकेवरच\nमुलांची कधीच तुलना करू नका. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या परीने वेगळा आहे आणि हीच त्याची ताकद आहे. घरातलंच उदाहरण घ्या, कुटुंबात चार व्यक्ती असतील, तर प्रत्येकजण स्वयंपाकात तरबेज असेल असं नाही. प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमता असतात. जे क्षेत्र निवडशील त्यात सर्वोत्तम राहायचा प्रयत्न कर असं प्रोत्साहन त्याला द्या.\nसध्या जागतिकीकरण, सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे करिअरच्या अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. तुमच्या मुलाची आवड शोधा आणि ती त्याला जोपासू द्या.\nसंकलन : निकिता नवले\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\nओळख का होतेय क्रॉस\nनिर्मळा करी प्रेमाची आर्ती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n... कारण तुम्ही प्रेमात पडलाय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/bjp-corporator-arrested-fighting-mims-mattin-138747", "date_download": "2019-03-25T08:46:40Z", "digest": "sha1:KPWNSUG4NUZUDCTRIB2XVNEDID7WXYIP", "length": 14479, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP corporator arrested for fighting with MIMs Mattin एमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसमांतर जलवाहिनीबाबतच्या निर्णयासाठी सतरा ऑगस्टला महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी मांडला.\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी (ता.17) बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात भाजपचे उपमहापौर विजय औताडे व अन्य चार नगरसेवकांना सिटीचौक पोलिसांनी सोमवारी (ता. 20) अटक केली.\nसमांतर जलवाहिनीबाबतच्या निर्णयासाठी सतरा ऑगस्टला महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी मांडला. त्यानंतर वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित अर्ध्या तासाची चित्रफीत दाखवली गेली. श्रद्धांजलीनंतर नगरसेवक वाजपेयी यांच्याबद्दल भाव व्यक्त करताना सय्यद मतीन यांनी श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर महापौरांसह भाजप नगरसेवक संतप्त झाले. दरम्यान भाजपचे उपमहापौर विजय औताडे, भाजप गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे यांनी नगरसेवक मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.\nतसेच अॅड. माधूरी अदवंत यांनी त्यांना चपलेने चोप दिला होता. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान मतीन यांना 18 ऑगस्टला अटक झाली होती. मतीन यांच्या तक्रारीनूसार, सिटीचौक पोलिस ठाण्यात उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे, माधूरी अदवंत यांच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर भाजपचे उपमहापौर औताडे यांना मयुरपार्क भागातील संपर्क कार्यालयातून सिटीचौक पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर उर्वरित संशयित नगरसेवकांना अटक झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली.\nLoksabha 2019: चौकीदारीची उठाठेव (श्रीराम पवार)\nप्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो...\nभाजपची सावध चाल (अग्रलेख)\nभारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा...\nLoksabha 2019 : 'अडवानी यांचे तिकीट कापलेले नाही तर…'\nनवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य...\nLoksabha 2019 : अडवानींना अर्ज भरायला मदत करणारे आणि तिकीट कापणारे मोदी\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना...\nअझहरच्या सुटकेची कल्पना सोनिया गांधींनाही : अमित शहा\nनवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या सुटकेवरून काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे....\nLoksabha 2019 ः कोणीच कोणाचे ऐकेना\nमहाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग से��टर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ajit-wadekar-memory-138476", "date_download": "2019-03-25T08:25:57Z", "digest": "sha1:RWYYN5JW4DK2LMCZ6Z2TVML6NMXTL25D", "length": 14898, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ajit Wadekar Memory वाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना जोशी, विजय हजारे यांच्यासारखे क्रिकेटपटू सांगलीने दिल्याबद्दल त्यांना अभिमान वाटायचा.\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना जोशी, विजय हजारे यांच्यासारखे क्रिकेटपटू सांगलीने दिल्याबद्दल त्यांना अभिमान वाटायचा. कर्णधार वाडेकरांचे सांगलीत असंख्य चाहते होते. नाना जोशी बेनिफिशरी क्रिकेट सामन्यात वाडेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर खेळलेही होते.\nअजित वाडेकर यांचे आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. अकरा वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल २००७ ला ते येथे आले होते. निमित्त होते बुद्धिबळातील भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या सत्काराचे. भाऊसाहेबांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने गौरवले गेले होते. त्यानिमित्ताने वाडेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.\nत्यावेळी वाडेकर म्हणाले होते, की नाना जोशी, विजय हजारे यांच्यासारखे क्रिकेटपटू, नंदू नाटेकरांसारखा महान बॅडमिंटनपटू सांगलीने देशाला दिला. भाऊसाहेबांच्या रूपाने बुद्धिबळाची सेवा करणारी महान व्यक्ती सांगलीनेच दिली. त्यामुळे सांगलीबद्दल मला खूप आत्मीयता आहे.’’\nकर्णधारपदाविषयी ते म्हणाले होते, की ‘क्रिकेटचे मैदान बुद्धिबळ पटासारखेच असते. मला वजीर (कर्णधार) बनण्याची संधी मिळाली. विजय मर्चंट यांनी पूर्णपणे व्यावसाय���कता दाखवत माझ्यावर विश्वास टाकला. चंदू बोर्डे आणि मन्सूर अली खान पतौडीला डावलून माझ्याकडे नेतृत्व आले. ते मी निभावले. एव्हरेस्टसारखे उंच ध्येय ठेवले, की जिंकायची स्फूर्ती येते, हे मी तेव्हा शिकलो.’\nवाडेकर यांना क्रिकेटइतकीच अन्य खेळांविषयी आपुलकी होती. ते म्हणाले होते, की ‘भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकला. जंगी स्वागत झाले. भरघोस बक्षिसे मिळाली. असाच सत्कार आशिया चषक विजेते हॉकीपटू, नेहरू चषक विजेते फुटबॉलपटू यांना मिळायला हवा होता. १६८ देशांत\nभारी ठरलेला विश्वनाथन आनंदही अशा सत्काराचा हक्कदार आहे.’\n'चौकीदारांच्या पक्षानेच चोरले आमच्या वेबसाईटचे डिझाईन'\nहैद्राबादः भारतीय जनता पक्षाची वेबसाइट हॅक झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, या नवीन वेबसाइटच्या डिझाइनवरून नवीन वाद निर्माण झाला...\nLoksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम...\nLoksabha 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी 26 लाख शाईच्या बाटल्यांची ऑर्डर\nम्हैसूर - निवडणुक आयोगाने लेकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शाई. मतदान...\nLoksabha 2019 : नाट्यमयरित्या सुटला रामटेकचा तिढा\nनागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर उत्तमराव गजभिये यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून...\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nजगज्जेता पंकज अडवाणी बिलियर्डस निवडणुकीत पराभूत\nबंगळूर, ता. 24 : पंकज अडवाणीस भारतीय बिलियर्डस् आणि स्नूकर महासंघाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली. महासंघाचे उपाध्यक्ष होण्यात अपयशी ठरल्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/eye-opening-visit-to-itali/", "date_download": "2019-03-25T08:13:25Z", "digest": "sha1:I5ZA4SV2NS7QTGGNUOOEXYG7E34GN5YT", "length": 19698, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभटकंती मुसाफिर हूं यारो\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nइटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी रिजन. माझ्या युरोप प्रवासात मला या प्रदेशात मनसोप्त फिरण्याची संधी मिळाली.\nपॅरिस वरून मी भल्या पहाटे पोहोचलो ते फ्लोरेंसला. फ्लोरेंसच्या टुमदार आणि सुबक रेलवे स्थानकावरून जेंव्हा मी हॉटेलला पोहोचलो तेंव्हा मला फक्त झीट यायची बाकी होती. हॉटेल मध्ये फक्त एक माणूस तो ही सकाळी ७ ते १०. त्याने मला माझ्या खोलीच्या आणि मुख्य दरवाजाच्या किल्ल्या दिल्या आणि ग्रात्झी म्हणत निघून गेला. नाश्ता पण सकाळी आपल्या हातानीच घ्यायचा. माझी खोली आणि हॉटेलचा मुख्य दरवाजा बंद करून मी फ़्लोरेस दर्शनाला निघालो.\nफ्लोरेंस हे इटालियन कलाकारांचे माहेरघरच. इटलीचा कोणताही कलाकार घ्या त्याची पाळेमुळे तुम्हाला फ्लोरेंसमध्ये सापडतील. शहर टुमदार आणि मोठ्या मनानी स्वागत करण्याऱ्या लोकांचे. तसे बघितला तर संपूर्ण इटलीला इंग्लिशचा तिटकारा पण पर्यटकांना मदत करतांना मात्र हा द्वेष हे लोक बाजूला ठेवतात.\nफ़्लोरेस बघितल्या वर मला माझ्या आजीची प्रचंड आठवण आली. माझ्या आजीकडे तिच्या आईच्या दोन बांगड्या होत्या त्या तिनी माझ्या आईला दिल्या, मग माझ्या आईनी माझ्या बहिणीला दिल्या आणि माझी बहिण ती तिच्या मुलीला देणार आहे. या चारही पिढ्यांमध्ये बांगड्यांचे स्वरूप काही बदलले नाही.\nएका पिढीनी द्यावे आणि पुढच्या पिढीनी ती चीज आपण विश्वस्त आहोत समजुन वापरावी आणि येणाऱ्या पिढीला द्यावी.\nफ्लोरेंस अगदी असंच आहे.\nपिढ्या नी पिढ्या फ्लोरेंसवासियांनी मीकेल अन्जेलोच्या या शहराला जसं च्या तसं ठेवले आह��. त्याच जुन्या इमारती, खिडक्या, बारीक बोळी आणि मीकेल अन्जेलोच्या अप्रतिम कलाकृती. मीकेल अन्जेलोच्या पुतळ्यापासून रात्रीच्या झगमगाटात हे छोटेसे शहर सगळ्या प्रेक्षकांची अक्षरशः नजरबंदी करत.\nफोरेन्सला पैरिस किंवा रोमा सारखी भव्यता नाही पण नजाकत मात्र सगळीकडे ठासून भरली आहे. जुनं शहर असून सगळ्या आधुनिकतम सुविधा पण आहेत. अतिशय भव्य असा फ्लोरेंसचा डोमो मनात कुठे तरी आदराची भावना निर्माण करून जात. फ्लोरेंसच्या पुलावरून या शहराचे जे दर्शन होते ते खरंच मनाचा ठाव घेऊन जाते.\nटीपीकल इटालियन माणूस तुम्हाला फ्लोरेंस मध्ये बघायला मिळेल. फ्लोरेंस मध्ये इटालियन जेवण पण फारच सुंदर मिळत. खवय्याची खरी मेजवानी होते इथे. रोमामध्ये इटालियन जेवणात सरमिसळ झाली आहे. आपण नाही का चायनिज खाद्य पदार्थ गरम मसाला आणि चाट मसाला टाकून खातो तसे. निव्वळ साठ प्रकारचे व्हेज पिझ्झा बघून मी केवळ वेडा व्हायचा राहिलो होतो.\nसैन मार्को, डेविडचा पुतळा, उफिझी गैलरी ऐतिहासिक फ़्लोरेसचा केंद्रबिंदू अश्या अनेक ठिकाणी जाऊन आल्यावर मी रात्री ८ वाजता मिकेल अंजेलोला आलो आणि तेथून होणारया फ्लोरेंस दर्शनानी माझी नजरबंदी झाली. रात्री ११ वाजता शेवटची सिटी बस होती आणि इच्छा नसूनही फ़्लोरेसच्या त्या नजाऱ्याचा निरोप घेऊन मला हॉटेलला परतावं लागलं.\nदुसऱ्या दिवशी भल्या पहाटे माझी बस निघाली ती पिसा, सैन गिमिअनो आणि सिएन्ना साठी. फ्लोरेंस शहरातून बाहेर पडताच दर्शन होते ते अतिसुंदर आणि अतिशय टापटिपीत ठेवलेल्या इटलीचे. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पिसाला पोहोचलो. पिसाचा झुकता मनोरा खरंच अचंबित करणारा आहे. या मनोऱ्यावर चढतांना आपल्याला नेहमी असे वाटत राहता कि हा मनोरा आत्ता पडणार आहे. अतिशय कठीण आणि अरुंद पायरया चढून आल्यावर जे पिसा शहराचे दर्शन होते त्याला तोड नाही.\nतसे बघितले तर हा मनोरा म्हणजे आर्किटेक्ट चूक आहे. पाया गंडला म्हणून मनोरा तिरपा झाला. पण त्याचे भांडवल केले इटालियन लोकांनी. आपण मात्र कुतुबमिनारवर, आर्चे आय ल्ब्यू असे लिहून येतो. इथलं कॅथेड्रल देखील अतिशय सुंदर आहे. पिसाच्या मनोऱ्यावरून घेतेलेला फोटो बघून आपणास याची कल्पना येईल.\nपिसाला टाटा करत आम्ही निघालो ते जगप्रसिद्ध इटालियन वायनरीला भेट द्यायला पंधरा वीस प्रकारच्या वाइन आणि वर्जिन ओलिव ऑइल मध्���े बनवलेले जेवण सगळ्यांनी मनसोप्त हाणल. जपून प्या असे पन्नास वेळा सांगून देखील काही बहादारांनी आपले वायनिश रंग दाखवलेच. वायनरीची संपूर्ण माहिती आणि काही खरेदी करून आमची बस निघाली ती सैन गिमिअनोला. अख्खं च्या अख्खं गाव कसा काय वर्ल्ड हेरीटेज साइट असू शकते हे बघण्यासाठी मी प्रचंड उत्सुक होतो.\nक्षेत्रफळात ७० व्या क्रमांकावर असलेला इटली वर्ल्ड हेरीटेज साइटसच्या बाबतीत मात्र जगात प्रथम क्रमांकावर आहे. इतिहासातला दगड आणि दगड या लोकांनी सांभाळून ठेवला आहे. त्यांनी दगडाचे सोने केले आणि आपण मात्र सोन्यासारखे गड आहेत त्याची माती कशी करता येईल याची काळजी घेतली. आता परिस्थिती बरीच सुधारली आहे यात वाद नाही पण सुधारणेला अजून बराच वाव आहे.\nजुन्या काळात जेंव्हा श्रीमंती आणि समृद्धी दाखवण्यासाठी मोठ्या कार्स, विदेश यात्रा अश्या गोष्टी नव्हत्या तेव्हा या लोकांनी उंचच उंच इमारती बांधायला सुरुवात केली. आजही जवळपास सगळ्या उंच इमारती या वैयतिक मालमत्ता आहेत. चर्चचा आसमान दाखवणारा जिना चढून वर आलो आणि चारी बाजूनी टस्कनीच्या समृद्धीची दर्शन झाले. अप्रतिम ही एकच उपमा मला या प्रदेशसाठी योग्य वाटली. खाली आल्यावर जगप्रसिद्ध इटालियन आइसक्रीम खात खात आम्ही निघालो ते सिएन्नाला.\nसिएन्नाला बघितला ते जगप्रसिद्ध ऐतिहासिक सुपर मार्केट. सिएन्नाचे चर्चेस म्हणजे युरोपियन कलाकृतींचे नमुनेच. अस म्हणतात की सगळ्याच चांगल्या गोष्टी लवकर संपतात. टस्कनी प्रवासाचे देखील असेच झाले.\nटस्कनी सोडतांना पण मनात हीच आशा होती की परत एकदातरी या भागात यायला मिळावा. इटलीची रोमा आणि वेनिस हि शहर पण मी पुढील टप्प्यात बघितली पण त्यावर पुन्हा कधितरी \nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← २० रुपयात १ GB इंटरनेट जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप\nयेथे १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होते मुलींची विक्री →\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\n“मराठी शाळा की इंग्रजी शाळा” : चुकीच्या दिशेने होणारी विघातक चर्चा\nमुंबई महानगरपालिकेचं हे पाऊल स्त्रियांचं आपल्या समाजातील स्थान अधिकच ���ंचावणार आहे\nविमानातील खुर्च्या निळ्या रंगाच्याच का असतात\nसमुद्री लुटारू – ज्याने फक्त “सर्वांच्या हॅट” चोरण्यासाठी जहाजावर हल्ला चढवला होता\nसमाजवादी भों(ग)ळेपणा : भारतीय राजकारणाचा आरसा – भाग-१\nरोहित शर्माने बीसीसीआयला धारेवर का धरलंय: एका प्रामाणिक खेळाडूचा “सात्विक” संताप\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\nप्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना\nयशस्वी जीवनासाठी चाणक्य चे १२ सूत्रं\nपहिल्या नजरेत प्रेम- “Love at first sight” खरंच असतंय काय रे भाऊ\nकाय आहे ‘१०८’ या अंकामागे लपलेले गुपीत…\nभारतातील या मंदिरांत चक्क पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे\nगेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे\nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं\nइंग्रजांच्या एका आदेशामुळे पारश्यांनी मुंबईत दंगल पेटवली होती\nगणिताची उगाचच वाटणारी भीती संपवण्यासाठी अफलातून टिप्स\nगुगलमधील जबरदस्त नोकरी सोडून हा पठ्ठ्या लोकांना श्रीमंत होण्याच्या टिप्स देत सुटलाय\nमध्य अमेरिकेतील चमत्कारिक आणि गूढ माया संस्कृतीबद्दल काही रोचक गोष्टी\nपाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ\nबेबंद राजेशाहीला दणका आणि घटनात्मक राज्याची पायाभरणी : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/space-railway-by-nasa/", "date_download": "2019-03-25T07:33:16Z", "digest": "sha1:Q37IHRGS7MH326ZCPKLVHFRKUP67MY2A", "length": 13656, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नासा तयार करतेय अंतराळात उडणारी रेल्वे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनासा तयार करतेय अंतराळात उडणारी रेल्वे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nरेल्वेने अंतराळात प्रवास करण्याचे स्वप्न तुमच्यापैकी कोणाला कधी पडलंय का जर असं स्वप्न तुम्ही पाहत असाल किंवा हे स्वप्न सत्यात साकार व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर अभिनंदन जर असं स्वप्न तुम्ही पाहत असाल किंवा हे स्वप्न सत्यात साकार व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर अभिनंदन कारण ही स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात साकार होण्याची आशा आहे.\nफार लांब नाही, पण 2032 पर्यंत ��ुम्ही एखाद्या रेल्वेमध्ये बसून अंतराळ पर्यटनासाठी निघू शकता. ‘स्ट्रारट्रॉम’ नावाच्या वाहनामुळे ते शक्य होणार आहे. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेतील शास्त्रज्ञांसह अनेक नामांकित शास्त्रज्ञ या प्रकल्पावर काम करीत आहेत. चुंबकीय शक्तीवर चालणारी रेल्वे डिझाइन करणारे शास्त्रज्ञ डॉ. जेम्स पॉवेल यांनी ही संकल्पना पूर्णत: शक्य असल्याचे म्हटले आहे.\nचुंबकीय शक्तीवर चालणाऱ्या रेल्वे प्रमाणेच ही स्टारट्रॉम अंतराळात उड्डाण घेईल. सर्वात आधी एका लांब धावपट्टीवर ही ट्रॉम पळवली जाईल. त्यानंतर 10 अंशाच्या कोणात सुमारे 8000 मीटर उंच ट्यूबमध्ये ती पाठवली जाईल.\nही ट्यूब पृथ्वीवरील एखाद्या उंच डोंगरावर असेल. तिथूनच ही ट्रॉम अंतराळात प्रवेश करील आणि त्याच मार्गाने परतही येईल.\nचुंबकीय रेल्वेचे डिझाइन तयार झाल्यानंतरच या प्रकल्पाच्या संकल्पनेचा आराखडा करण्यात आला होता. 1960 मध्ये जेम्स आर. पॉवेल आणि गार्डन डॅन्बी यांनी मॅग्लेव्ह रेल्वेची डिझाइन तयार केली होती. त्यानंतर पॉवेल यांनी स्टारट्रॉम कंपनी स्थापन केली. त्यात अंतराळ अभियंता डॉ. जॉर्ज मॅसेही सहभागी झाले. 2001 मध्ये पहिल्यांदाच या प्रकल्पाचे दस्तऐवजाच्या स्वरूपात प्रेझेंटेशन करण्यात आले. त्यानंतर नासाच्या शास्त्रज्ञांनी त्याचे आधुनिक संगणकीय मॉडेल तयार केले.\nपहिल्या टप्प्यात कार्गो आणि पुनर्वापर करता येण्यासारख्या आवश्यक वस्तू अंतराळात पाठवण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात पर्यटक पाठवले जातील. 1000 किलोमीटर लांबीच्या ट्यूबमध्ये 8 किलोमीटर प्रतिकिलोमीटर वेगाने धावल्यानंतर स्ट्रारट्रॉम उड्डाण घेईल. 20 किलोमीटर उंचीवरून स्ट्रारट्रॉमचे लाँचिंग होईल. त्यासाठी स्वतंत्र उड्डाणस्थळ बांधण्यात येणार आहे.\nअमेरिका माऊंट सेंट अॅलियास, अलास्का 5489 मीटर, रशिया क्लायउदेवस्काया, कामचाट्का 4750 मीटर, चीन गोंगा शान, शेजवन प्रांत 7556 मीटर, ग्रीनलँड बर्फाचा सर्वात उंच सुळका 3220 मीटर या ठिकाणांवरून स्ट्रारट्रॉम उड्डाण घेऊ शकते.\n40 डॉलर/ किलोग्रॅम म्हणजेच सुमारे 2000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका प्रवासाचा खर्च येऊ शकतो. सध्याच्या अंतराळ प्रवासाच्या तुलनेत हा प्रवास खूपच स्वस्त असल्याचे म्हटले जाते.\nही कल्पना जर खरोखर अस्तित्वात आली तर तो जगासाठी एक अद्भुत अनुभव ठरेल हे मात्र नक्की\nआमचे इतर लेख वा��ण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← कम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य\nनेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ते का गरजेचे आहे ते का गरजेचे आहे\nयावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार\nएलीयन्सच्या शोधासाठी नासाला मदत करणाऱ्या एका भारतीयाची गोष्ट…..\nनासामध्ये नोकरी करायचे स्वप्न असेल, तर जाणून घ्या त्यासाठी ‘पात्रता’ काय असायला हवी\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nकॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’\n“#TenYearsChallenge” चे हे १० भन्नाट फोटोज हसून हसून डोळे ओले करतील\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nसूर्यास्ताच्या वेळी पश्चिम क्षितिजावर तांबडा-लाल रंग का पसरतो\n“नक्षलवाद हा दहशतवादच आहे” – हे समजून घेण्यासाठी…\nForeign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २\nहृदयात धडकी भरवणाऱ्या, जगातील १० सर्वात धोकादायक रेल्वे लाईन्स \n“स्वच्छतेचे बळी” : जातीयवाद आणि दुर्लक्षितता भोगणारे सफाई कामगार\nआयफोनने चक्क कॉपी केलेत अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे पाच फीचर्स\nगुगलने दखल घेतलेला पण आम्हां भारतीयांना माहित नसलेला भारतीय सांख्यिकीचा जनक\nदुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास\nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\n“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास\nएक अत्यंत दुर्दैवी विमान अपघात: फुटबॉलच्या इतिहासातली भळभळती जखम\nघटस्फोट घेणं, वेगळं होणं एवढं वाईट आहे का काय चूक आहे त्यात\nधक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती\nहिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी\nकौन बनेगा करोडपतीमधील हे ७ कोट्याधीश – सर्वांचं डोळे उघडणारं वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/indian-musical-instrument-shehnai-180738/", "date_download": "2019-03-25T08:22:44Z", "digest": "sha1:LHRRT7NCHZXXGPP2EXEM2TB3RIRWAUF5", "length": 26775, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तेरे सूर और मेरे गीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nतेरे सूर और मेरे गीत\nतेरे सूर और मेरे गीत\nसारंगी हे वाद्य हिंदी चित्रपटसंगीतात अनेक वर्षे वाजवणाऱ्या पंडित रामनारायणसाहेबांचं योगदान फार अनमोल आहे. मग ते संगीतकार दत्तारामांचं ‘आंसू भरी है ये जीवन की राहे’\nसारंगी हे वाद्य हिंदी चित्रपटसंगीतात अनेक वर्षे वाजवणाऱ्या पंडित रामनारायणसाहेबांचं योगदान फार अनमोल आहे. मग ते संगीतकार दत्तारामांचं ‘आंसू भरी है ये जीवन की राहे’ (परवरीश) असो किंवा शंकर-जयकिशन यांचं ‘मनमोहन बडे झुठे’ (सीमा), रोशनसाहेबांची ‘बरसात की रात’ची ‘ये इश्क़ इश्क़ है’ ही कव्वाली असो किंवा पंडित रविशंकरांची ‘सांवरे सांवरे’ (अनुराधा), कोठीवरली गाणी किंवा उपशास्त्रीय ठुमरी, दादरा वगरे प्रकारांवर आधारीत गाण्यांत सारंगीचा भरपूर वापर होत राहिला. पण रामनारायणसाहेबांच्या सारंगीचा अतिशय प्रणयोत्सुक, तरल भावाविष्काराकरिता प्रयोग केला तो ओ. पी. नय्यरसाहेबांनी. ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ (सी. आय. डी.), ‘आंखो से जो उतरी है दिल में’, ‘बंदा परवर थाम लो जिगर’ (फिर वही दिल लाया हूं), ‘रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना’ (मुहब्बत जिंदगी है), ‘दीवाना हुआ बादल’ (काश्मीर की कली), ‘ये क्या कर डाला तूने’ (हावडा ब्रिज), ‘आज कोई प्यार से’ (सावन की घटा), ‘फिर मिलोगी कभी’ (ये रात फिर ना आयेगी) अशा कितीतरी गाण्यांत त्यांनी सारंगीचा अनोखा अंदाज पेश केला आहे… (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)\nशहनाई या अस्सल भारतीय मंगल वाद्याचा िहदी चित्रपटसृष्टीत अतिशय सढळपणे प्रयोग होत राहिला. कारण भारतीय संस्कृतीतल्या सर्व मंगल प्रसंगांत शहनाई आणि (दक्षिण भारतात शहनाईचंच भावंडं असणारं) नादस्वरम् हे वाद्य अनिवार्यपणे सहभागी असतं. पंडित रामलाल, शरदकुमार असे नामवंत शहनाईवादक सातत्यानं वर्षांनुवष्रे गाण्यांत, पाश्र्वसंगीतात अनमोल अशी कामगिरी करत राहिले.\nसी. ��ामचंद्र या श्रेष्ठ संगीतकारानं ‘नवरंग’ या चित्रपटामध्ये ‘तू छुपी है कहां..’ या गाण्यातील संगीतखंडातल्या शहनाईच्या सुरावटीतून दिलेली आर्त हाक, तसेच पंचमदा बर्मननी ‘पडोसन’मधल्या ‘शर्म आती है मगर’ या गाण्यातल्या दुसऱ्या अंतऱ्यापूर्वीचा मुग्ध प्रेमाची ग्वाही देणारा शहनाईचा संगीतखंड आणि शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीनं ‘दिल एक मंदिर’ या चित्रपटाकरिता ‘रुक जा रात ठहर जा रे चंदा’ या लतादीदींच्या गाण्यात शहनाईचा अतिशय सुंदर प्रयोग केला आहे. पहिल्या अंतऱ्याच्या ‘पहले मीलन की यादें लेकर’ या ओळींच्या पाश्र्वभागी शहनाईवरची संवादी सुरावट उलगडत पहिल्या रात्रीच्या आठवणी ताज्या करते, तर दुसऱ्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात आरंभीची रोमॅन्टिक सुरावट भविष्यातल्या संभाव्य दु:खाच्या चाहुलीत विरघळून जाते..\nपण ‘भारतरत्न’ उस्ताद बिस्मिल्ला खांसाहेब यांच्या शहनाईचं गारुड अनुभवायला मिळालं ते ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार वसंत देसाईसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘गूँज उठी शहनाई’ या संगीतप्रधान चित्रपटाकरिता ध्वनिमुद्रित झालेल्या गाण्यांमधून आणि पाश्र्वसंगीतातूनही. ‘तेरे सूर और मेरे गीत’, ‘दिल का खिलौना हाय टूट गया’, ‘जीवन में पिया तेरा साथ रहे’, ‘कह दो कोई ना करे यहां प्यार’, ‘तेरी शहनाई बोले’, ‘हौले हौले घुंघट पट खोले’ यांसारख्या अप्रतिम गाण्यांतून बिस्मिल्ला खांसाहेबांची शहनाई रसिकांच्या मनभर व्यापून राहिली… (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)\nसारंगी कुळातलं अजून एक वाद्य तारशहनाई. दक्षिणामूर्ती टागोर नावाचे चित्रपट संगीत क्षेत्रात एकमेवाद्वितीयम असे तारशहनाईवादक होऊन गेले. त्यांच्या वाद्याच्या दु:खी, आर्त नादवैशिष्टय़ामुळे त्यांना वादकांनी टोपणनाव दिलं होतं ‘दुखीदा’ या टागोरदांच्या तारशहनाईनं अनेक गाण्यांत करुणेचे, दु:खाचे, वेदनेचे गहिरे रंग भरले. संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्या ‘बम्बई का बाबू’- मधलं मुकेशजींच्या भिजलेल्या स्वरांतलं ‘चल री सजनी.. अब क्या सोचे’मधले संगीतखंड किंवा बर्मनदांच्याच ‘इश्क पर जोर नहीं’ या चित्रपटातल्या लतादीदींच्या स्वरातल्या ‘तुम मुझसे दूर चले जाना ना..’ या गाण्यातल्या संगीतखंडातला सहभाग गाण्याला आर्त करून जातो. संगीतकार ओ. पी. नय्यरसाहेबांनी मात्र अनेकदा रोमॅन्टिक गाण्यांत सारंगीऐवजी चक्क तारशहनाईचा प्रयोग करत गाण्यांत मस्त रंग भरले. उदा. ‘फिर वोही दिल लाया हू’मधलं ‘अजी किबला.. मोहतरमा’ या गाण्याचा आरंभीचा संगीतखंड. पण मदनमोहनसाहेबांच्या संगीतात जुन्या- देव आनंद अभिनित ‘शराबी’ या चित्रपटाकरिता रफीसाहेबांनी अतिशय उत्कटतेनं गायलेलं, पण फारसं लोकप्रिय नसलेलं अप्रतिम गाणं ‘मुझे ले चलो आज उस गली से..’ या गाण्यातली दुखीदांची तारशहनाई रफीसाहेबांच्या सुराइतकीच आर्त होत गात राहते. (यू-टय़ूबवर अवश्य हे गाणं ऐका. ऐकाच; मात्र बघू नका. कारण बरीचशी सुंदर गाणी ही बघण्याकरता नसतातच.) … (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)\nपाश्चिमात्य अभिजात संगीतातील व्हायोलिन समूहात डबल बास, चेलो, व्हीयोला आणि व्हायोलिन या चार प्रकारच्या वाद्यांचा समावेश होतो. ही चारही प्रकारची वाद्य्ो ग्रांड पियानोचा साताहून अधिक सप्तकांचा अवकाश कवेत घेतात. िहदी चित्रपट संगीतात संपूर्ण व्हायोलिन कुटुंबाचा फार वैविध्यपूर्ण प्रयोग होत राहिला आहे. ‘मेरा नाम चिन् चिन् चू’ या गाण्यात मेंडोलिनच्या साथीत डबल बासच्या तारा छेडून वाजलेले संगीतखंड त्या गाण्यातल्या नृत्यातली लचक अधोरेखित करत साऱ्या प्रसंगाला मादक उत्तेजकता प्रदान करतात.\n‘चेलो’ या वाद्यांचा अतिशय तरल वापर करून सचिनदा बर्मननी गुरुदत्तच्या ‘कागज के फूल’ या चित्रपटाकरिता ‘वक्तने किया क्या हंसी सितम’ या गाण्यात नायक-नायिकेची होणारी घुसमट ज्या तरलतेनं मांडलीय ते एकमेवाद्वितीयच. चेलोच्या तारा दबक्या बोटांनी छेडत निर्माण होणाऱ्या छोटय़ा छोटय़ा तुटक स्वरावली, संगीतखंडात व्हायोलिन्सच्या साथीत वाजलेल्या चेलोवरील सुरावटी.. अंतऱ्यातल्या ओळीमधले अर्थपूर्ण स्वरावकाश, नायक-नायिकेची अगतिकता आणि एकटेपण पडद्यावर साकार होताना साक्षात् चित्रकाव्य बनलेल्या दृश्याला विलक्षण आर्त करतात. एरवी खर्जातल्या स्वरावली मांडणाऱ्या गंभीर चेलोचा अतिशय प्रणयरम्य भावाविष्कारासाठी संगीत संयोजक अमर हळदीपूर यांनी ‘ज्युली’ चित्रपटात राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘ये राते नई पुरानी’ या गाण्याच्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात अप्रतिम प्रयोग केलाय. तसाच रहस्यमय चित्रपटांच्या गूढ गाण्यांमध्ये आणि पाश्र्वसंगीतातही चेलोज्चा भरपूर वापर केला गेलाय. उदा. ‘कोहरा’ चित्रपटातल्या हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘झूम झूम ढलती रात’ या गाण्याच्या संगीतात चेलोज्चा व्हायोलिन- सोबतचा प्रयोग वाद्यवृंद संयोजक सॅबेस्टियन यांनी कथानकातील गूढता आणि भयाची भावना गडद करण्यासाठी मोठय़ा प्रभावीपणे केला आहे. व्हियोला हे सदैव व्हायोलिनच्या साथीत वापरले गेलेय. संगीतकार\nसज्जादसाहेबांच्या ‘रुस्तुम सोहराब’मधल्या ‘ऐ दिलरुबा’पासून पंचमदांच्या ‘कारवां’मधल्या ‘दिलवर दिल की प्यारे..’पर्यंत व्हायोलिनसमूह वेगवेगळ्या संगीतकारांनी आपापल्या शैलीत अत्यंत वैविध्यानं आविष्कृत केलाय. शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीनं तर जास्तीत जास्त व्हायोलिनवादकांचा वापर करत गाण्यांना समृद्ध स्वरसंगतीची जोड दिली. विशेषत: राज कपूरसाहेबांच्या चित्रपटांकरिता केलेल्या त्यांच्या गाण्यांमधले व्हायोलिनसमूहानं वाजवलेले संगीतखंड अत्यंत रिच न् रॉयल. त्यातला आवेग आणि झोत विलक्षणच…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)\nत्यांचे अनुकरण मग बरेच संगीतकार करत राहिले. पण सचिनदेव बर्मन, रोशन, मदनमोहन आणि राहुलदेव बर्मन यांनी मात्र आवश्यक तेव्हाच आणि तोसुद्धा मोजक्याच- म्हणजे विसापेक्षाही कमी व्हायोलिनवादकांच्या ताफ्याचा आपल्या गाण्यात प्रयोग केला. सचिनदांनी ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतात व्हायोलिनच्या अत्यंत कल्पक प्रयोगाने त्या अत्रंग गाडीच्या धावण्याच्या, रुसून बंद पडण्याच्या सर्व लीलांत धमाल आणली. तर ‘तीन देवीयां’मधल्या लता-किशोर यांनी गायलेल्या ‘उफ् कितनी थंडी है..’ या गाण्यात व्हायोलिनसमूहातून थंडीची शिरशिरी साकारली. रोशनसाहेबांच्या ‘चित्रलेखा’तल्या ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ या अतिशय सुंदर गाण्यात सरोद आणि बासरीबरोबर व्हायोलिनवर वाजणाऱ्या छोटय़ाशाच, पण अर्थपूर्ण संवादी स्वरावली गाण्यातली विरक्ती इतकी सूक्ष्म संयतपणे अधोरेखित करतात, की वाद्यवृंद संकल्पक मास्टरजी सोनिकसाहेबांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो. याच मास्टरजींनी मदनमोहनसाहेबांच्या ‘हकीकत’मधल्या ‘खेलो ना मेरे दिलसे’ या गाण्यात रचलेले व्हायोलिनसमूहाचे संगीतखंड हे अतिशय विस्मयचकित करणारे आहेत आणि भाववाहीसुद्धा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nस��जनशीलतेअभावी सध्याचे संगीत यांत्रिक\n#WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_16.html", "date_download": "2019-03-25T07:44:06Z", "digest": "sha1:TKT43MVKOOYDCWH5THWGRYN6I7YDNJPE", "length": 5830, "nlines": 119, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "प्रेमात तूझा ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nप्रेमात तूझा काही कळेना ग......\nप्रेमात तूझा काही कळेना ग.....\nओठात ही हा शब्द जूळेना ग....\nतूझे दूर जाण्यचे गूज मला कळाले ग...\nओठांवरती हासू ठेऊन मन माझे जळाले ग....\nतू दूर गेल्यावर आसे का झाले ग....\nडोळयातले आश्रू गालावरती का ओझरले ग....\nतुला का हे नाही कळाले ग....\nप्रेमात तूझा काही कळेना ग......\nप्रेमात तूझा काही कळेना ग......\nमनास हि हे कळेना ग .....\nतुझ्यावीन हा मार्ग ही वळेना ग....\nहे स्वप्न आहे का सत्य हेच कळेना ग ...\nप्रेमात तूझा काही कळेना ग......\nप्रेमात तूझा काही कळेना ग.....\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/australia-beat-india-by-eight-wickets/articleshow/63273735.cms", "date_download": "2019-03-25T08:53:48Z", "digest": "sha1:AXRV35ZCQL2ETIDQV32TNHAMN3GB4E3D", "length": 21371, "nlines": 415, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Women cricket: ऑस्ट्रेलियापुढे भारताची शरणागती - australia beat india by eight wickets | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nबडोदाः फिरकी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर निकोल बोल्टनने केलेल्या नाबाद शतकामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिकेतील पहिल्या वनडेत भारतावर ८ विकेटनी सहज मात केली. ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाला २०० धावांत रोखत विजयी लक्ष्य ३२.१ षटकांत २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.\nबडोदाः फिरकी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर निकोल बोल्टनने केलेल्या नाबाद शतकामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिकेतील पहिल्या वनडेत भारतावर ८ विकेटनी सहज मात केली. ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाला २०० धावांत रोखत विजयी लक्ष्य ३२.१ षटकांत २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.\nरिलायन्स स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत भारताची कर्णधार हरमनप्रीतकौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पूनम राऊत आणि स्मृती मंधाना यांनी सावध सुरुवात केली. मात्र, मोठी सलामी देण्यात या जोडीला अपयश आले. दहाव्या षटकात स्मृती बाद झाली. या जोडीने ३८ धावांची सलामी दिली. यानंतर पदार्पणाची लढत खेळत असलेली जेमिमा रॉड्रिग्जची झटपट माघारी परतली. एका बाजूने किल्ला लढविणारी पूनम राऊतला वेलिंग्टनने पायचीत टिपून रोखले. हरमनप्रीत कौरलाही अधिक वेळ मैदानावर टिकाव धरता आला नाही. एक षटकार आणि एक चौकार मारून आक्रमक सुरुवात करणाऱ्या दीप्ती शर्मालाही मोठी खेळी करता आली नाही. यामुळे भारताचा निम्मा संघ २३.२ षटकांत ८७ धावांत माघारी परतला हो���ा. वेदा कृष्णमूर्ती आणि शिखा पांडेही झटपट बाद झाल्याने भारताची ७ बाद ११३ अशी बिकट स्थिती झाली. सुष्मा शर्मा आणि पूजा वस्त्रकार यांनी भारताचा डाव सावरला. या जोडीने आठव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केल्याने भारताला दोनशे धावा तरी फलकावर लावता आल्या. सुष्माने ७१ चेंडूंत ३ चौकारांसह ४१, तर १८ वर्षीय पूजाने ५६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या. पूजाचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. फिरकी गोलंदाज जोनासेनने चार, तर वेलिंग्टनने तीन विकेट घेतल्या.\nलक्ष्याचा पाठलाग करताना बोल्टन आणि अॅलीसा हिलीने ६० धावांची सलामी दिली. हिलीने २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारसह ३८ धावा केल्या. यानंतर बोल्टनने मेग लॅनिंगला साथीला घेत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप नेले. विजयासाठी ६८ धावांची गरज असताना लॅनिंग बाद झाली. यानंतर बोल्टनने एल्सी पेरीला साथीला घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बोल्टनने १०१ चेंडूंत १२ चौकारांसह नाबाद १०० धावा केल्या. बोल्टनचे हे वनडेतील चौथे शतक ठरले. मालिकेतील दुसरी वनडे लढत गुरुवारी होणार आहे.\nस्कोअरबोर्ड: भारत ५० षटकांत २०० (पूजा वस्त्रकार ५१, सुष्मा वर्मा ४१, जोनासन १०-१-३०-४, वेलिंग्टन ६-०-२४-३) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ३२.१ षटकांत २ बाद २०२ (बोल्टन नाबाद १००, शिखा पांडे ७-१-३८-१).\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपहिल्याच सामन्यात दिल्लीकडून मुंबईचा पराभव\nकाश्मीरच्या रसिकनं केलं आयपीएल पदार्पण\nपंतनं केली 'मुंबई'ची धुलाई; २७ चेंडूत ७८ धावा\nआंद्रे रसेल बरसला, हैदराबाद पराभूत\n...तरीही स्मिथ, वॉर्नरला वर्ल्डकपमध्ये संधी\n3/25/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n3/26/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n3/27/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n3/28/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n3/29/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n3/30/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n3/30/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n3/31/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n3/31/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/1/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/2/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/3/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/4/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/5/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/6/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/6/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/7/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/7/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/8/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/9/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/10/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/11/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/12/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/13/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/13/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/14/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/14/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/15/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n4/16/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n4/17/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/18/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/19/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/20/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/20/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/21/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/21/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/22/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/23/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/24/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n4/25/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/26/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n4/27/2019 - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर\n4/28/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n4/28/2019 - ईडर्न गार्डन्स, कोलकाता\n4/29/2019 - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद\n4/30/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n5/1/2019 - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\n5/2/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\n5/3/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n5/4/2019 - फिरोजशाह कोटला, दिल्ली\n5/4/2019 - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू\n5/5/2019 - पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली\n5/5/2019 - वानखेडे स्टेडियम, मुंबई\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालां��डून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nvirat-Gambhir: विराट चतुर कॅप्टन नाही; धोनी, रोहितशी तुलना न...\nविल जॅक्सने २५ चेंडूंत ठोकले शतक\nआयपीएलचा रणसंग्राम आजपासून, चेन्नई विरुद्ध बेंगळुरू भिडणार\nIPL: 'आयपीएल'च्या थेट प्रक्षेपणावर पाकमध्ये बंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभारताचा श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय...\nदक्षिण आफ्रिकेची सामन्यावर पकड...\nभारत पराभवाची परतफेड करेल आज श्रीलंकेविरुद्ध टी-२० लढत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/videos/page/5/", "date_download": "2019-03-25T07:34:44Z", "digest": "sha1:CQRZDV5LELNJEUBC6FQK5IMZ352NGVMN", "length": 4888, "nlines": 65, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Videos - Page 5 of 13 - मराठी कलाकार", "raw_content": "\nमैत्रीच्या नात्यातील अव्यक्त भावना – ओढ \nजगातील सर्वात पवित्र व शुद्ध नातं म्हणजे मैत्री चं नातं. ती हि एक मुलगा आणि एका...\nएका रहस्यमय मृत्यूची उकल करणारा चित्रपट “आपला मानूस”\nमित्रांनो, नाना पाटेकर हे नाव सिनेविश्वाला चांगलचं सुपरिचित आहे. ९ फेब्रुवारीला नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका...\nVIDEO : आम्ही दोघी टीझर ट्रेलर – मुक्ता बर्वे, प्रिया बापट\nमुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची एक झलक. हा चित्रपट 16 फेब्रुवारी...\nपहा ‘न्यूड’ सिनेमाचे टीजर\nरवी जाधव यांचा आगामी चित्रपट ‘न्यूड’ने मुंबई – गोवा येथे होणाऱ्या ४८ व्या (IFFI)आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन...\n‘दशक्रिया‘ या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचं वास्तव दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना पाहायला...\nहम्पी मराठी मूवी ट्रेलर | सोनाली कुलकर्णी | ललित प्रभाकर | प्राजक्ता माली\nपहा हम्पी मूव्हीचे अधिकृत ट्रेलर. हम्पी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्टार...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळ��.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/389", "date_download": "2019-03-25T08:51:04Z", "digest": "sha1:2OCDO76Z5SBBUR5NDRN2XYVJ7BG26424", "length": 23914, "nlines": 116, "source_domain": "gangadharmute.com", "title": " गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच\nमुखपृष्ठ / गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 29/02/2012 - 08:59 ह्यावेळी प्रकाशित केले.\n(वांगे अमर रहे पुस्तकात प्रकाशित)\nगरिब��� निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच.\nशेती व्यवसायातील गरिबी संपवायची असेल तर शेतीव्यवसायातून अतिरिक्त मनुष्यबळ कमी केले पाहिजे, असे वक्तव्य मागे एकदा एका शेतकरी मेळाव्यात बोलताना एका मंत्र्याने केले होते. त्याच दिवशी दुसर्या एका सभेत बोलताना शेतीव्यवसायाला बरकत येण्यासाठी शेतकर्यांनी जोडधंदे करायला हवेत, त्यासाठी शेतकर्यांना मदत करायला सरकार निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, असेही जाहीर करून ते मोकळे झाले होते. दोन्ही वक्तव्यातून शेतीमध्ये प्रत्यक्ष कामाच्या गरजेपेक्षा अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे ध्वनित होते.\nपरंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. जे प्रत्यक्ष शेतीव्यवसायात आहेत किंवा ज्यांची नाळ प्रत्यक्ष शेतीव्यवसायाशी जुळलेली आहे त्यांना पक्के ठाऊक आहे की, शेतीमध्ये मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. अनेकवेळा शेतीची कामे एकाच हंगामात एकाच वेळी येत असल्याने मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवतो. पेरणी, लागवड, खुरपणी किंवा पिक काढणी सारखी कामे योग्य त्या वेळी करणे शक्य होत नाही. शेतीतील कामाच्या वेळापत्रकाला अनन्य साधारण महत्त्व असल्याने व वेळची कामे वेळेत न आटोपल्याने मग उत्पन्नात जबरदस्त घट येते. उत्पादन वाढीसाठी जिवाचा आटापिटा करणे हा उत्पादकवर्गाचा मूलभूत पैलू असल्याने व शेतकरी हा उत्पादक वर्गामध्ये मोडत असल्याने वेळची कामे वेळेत उरकण्यासाठी प्रयत्न करणे हा गुण त्याच्या रक्तामांसातच भिनला असतो. उत्पादन वाढविण्यासाठी मजुरांची मदत घेणे क्रमप्राप्त ठरल्याने मग मजूर कमी आणि गरज जास्त अशी परिस्थिती उद्भवताच अकस्मात मजुरीच्या दरात प्रचंड उलथापालथ होते. शेतमजूरीची दरनिश्चिती सरकारच्या नियोजनामुळे ठरत नाही किंवा शेतमजुरांच्या युनियनने संप पुकारला म्हणून शेतमजुरीच्या दरात वाढ होत नाही तर शेतमजुरीच्या दरातील बदल मागणी-पुरवठ्याच्या सिद्धान्तानुरूप बदलत असते.\nआजपर्यंत कामाच्या शोधात खेड्याकडून पावले शहराकडे धावायचीत. पण आता गेल्या काही वर्षापासून अकस्मातच काळ बदलला आहे. गंगा उलटी वाहायला लागून वळणीचे पाणी आड्यावर जायला सुरुवात झाली आहे. मोलमजुरी आणि कामधंदा शोधण्यासाठी शहरातील पावले गावाकडे वळायला लागली आहेत. आम्ही शाळा शिकत असताना आम्हाला सांगितले जा���चे की, अमेरिकेतील मोलकरीण स्वतःच्या चारचाकी गाडीने भांडी घासायला मालकाच्या घरी जात असते, एवढा तो देश समृद्ध आहे. आम्हाला ते ऐकताना मोठे कुतूहल वाटायचे. एक दिवस भारतातील शेतमजूरही चारचाकी गाडीमध्ये बसून शेतावर काम करायला जाईल असे जर भाकीत त्याकाळी कुणी वर्तवले असते तर त्याची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात केली गेली असती मात्र; अगदी पंधरावीस वर्षाच्या काळातच इतिहासाला कलाटणी मिळाली असून शहरातील मजू्रवर्ग चारचाकी वाहनात बसून थेट खेड्यात येऊन शेतीच्या बांधावरच उतरायला लागला आहे. फरक एवढाच की अमेरिकेतील मोलकरीण भांडी घासायला मालकाच्या घरी स्वतःच्या चारचाकी गाडीने जात असते, आमचा मजूरवर्ग मात्र किरायाच्या गाडीने जातो. त्यासोबतच परप्रांतीयाचे लोंढेही आता गावामध्ये उतरायला लागले आहेत.\nमुंबई-पुण्यासारख्या शहरांना परप्रांतीयाचे लोंढे नकोनकोसे होत असताना आणि त्यांना हुसकावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत असताना खेड्यात मात्र याच परप्रांतीयाचे दिलखुलासपणे स्वागत केले जात आहे. खेड्यातील शेतकरी परप्रांतात जाऊन तेथील कामगारांना आपल्या गावात येण्याचे निमंत्रण देऊ लागला आहे. गावामध्ये आल्यानंतर त्यांची निवासाची व्यवस्था राजीखुशीने करायला लागला आहे.\nशेतमजुरीचे सतत वाढते दर आणि शेतकरी वर्गाकडून परप्रांतीयांचे स्वागत ह्या दोनही बाबी शेतीव्यवसायात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे, हे अधोरेखित करणार्या आहेत. पण आमच्या शासनकर्त्यांचे पाय जमिनीला लागत नसल्याने वास्तविक स्थितीपासून ते बरेच लांब असतात. १९९० मध्ये जे वाचले, पाहिले त्या आधाराने ते २०१० मध्ये बोलत असतात. काळाचा प्रवाह सतत बदलत असतो, याचाही त्यांना विसर पडायला लागतो. त्यामुळेच मग त्यांना शेतीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा साक्षात्कार व्हायला लागतो.\nऔद्योगिक विकासासाठी शेतीमध्ये तयार होणारा कच्चा माल स्वस्तात स्वस्त भावाने उपलब्ध होईल अशाच तर्हेने स्वातंत्र्योत्तर काळात ध्येयधोरणे राबविली गेलीत तरीही बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही कारण भारतासारख्या प्रचंड जनसंख्या असलेल्या देशाला गरजे एवढा रोजगार पुरविण्याची क्षमता औद्योगिक क्षेत्राकडे कालही नव्हती, आजही नाही व उद्याही असणार नाही, हे जेवढे लवकर नियोजनकर्त्यांना कळेल तेवढे ल���कर भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने पाऊल पडण्यास सुरुवात होईल. शहरातील मनुष्य कामधंद्याच्या शोधात खेड्याकडे वळायला लागला, ही घटनाच मुळात शेतीव्यवसायामध्ये रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचे द्योतक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांतील श्रमशक्तीचे शोषण करून शहरे फ़ुलविणार्या धोरणात्मक नियोजनकर्त्यांच्या मुस्कटात काळाच्या महिमेने सणसणीतपणे हाणलेली ही चपराक आहे.\nस्वातंत्र्योत्तर काळात शेतीकडे जर अक्षम्य दुर्लक्ष झाले नसते तर आज देशात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते. शेतीमध्ये जर भांडवलीबचत निर्माण व्हायला लागली तर शेतीमध्ये रोजगाराचे अमाप दालन खुले होऊन देशाचा कायापालट होऊ शकतो. देशांतर्गत दूध आणि मांसाची आवश्यक गरज जरी पूर्ण करायची म्हटले तरी पशुपालन व्यवसायामध्ये प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शेती करून किंवा शेतीशी निगडित व्यवसाय करून जर सन्मानजनक जीवन जगता आले तर सुशिक्षित बेरोजगारांची पावले एमआयडीसी ऐवजी रानमाळाकडे वळू शकतात. एका घरात दोन भाऊ असतील तर एक भाऊ शेती आणि दुसरा भाऊ पशुपालन अशी विभागणी होऊन एका घरात दोन स्वतंत्रपणे व्यवसाय उभे राहू शकतात. उद्योगात किंवा कारखान्यात एक रोजगार निर्माण करायला कोट्यवधीची गुंतवणूक करावी लागते त्याउलट शेतीनिगडीत व्यवसायात केवळ दोन तीन लक्ष रुपयाच्या भांडवली गुंतवणुकीत आठ-दहा लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यातूनच ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. गरिबी आणि दारिद्र्याचा समूळ नायनाट होऊ शकतो. हजारो कोटी रुपये खर्चाच्या भिकेच्या अनुदानात्मक योजना राबविण्याची गरजही संपुष्टात येऊ शकते.\nआणि एवढे सगळे घडून येण्यासाठी शासनाला तिजोरीतून एक दमडीही खर्च करण्याची गरज नाही. एका दाण्यापासून हजार दाणे निर्माण करण्याचे सामर्थ्य मातीला आणि गवत-कडब्यापासून दूध निर्माण करण्याची कला गाई-म्हशीला निसर्गानेच दिलेली आहे. केवळ शेतीतून किंवा शेतीशी निगडित व्यवसायातून उत्पादित होणार्या मालावर शासनकर्त्यांनी निष्कारण निर्बंध लादणे तेवढे थांबवले पाहिजेत.\n.... बस्स एवढेच पुरेसे ठरेल शेतीच्या विकासासाठी.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T07:24:58Z", "digest": "sha1:GSEX7YRHRMWEAIDU5AZNNFXC257YIYQA", "length": 12569, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी विरोधकांतर्फे वंदना चव्हाण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्यसभा उपाध्यक्षपदासाठी विरोधकांतर्फे वंदना चव्हाण\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांची उमेदवारी निश्चीत करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीने संयुक्त जनता दलाचे हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्ये सध्या चुरस निर्माण झाली आहे. 57 वर्षीय वंदना चव्हाण या पुण्याच्या माजी महापौर असून त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या निवडणुकीविषयी मोठे औत्स्युक्य आहे.\nयेत्या गुरूवारी ही निवडणूक होणार आहे. विरोधकांकडे सध्या एकूण 119 मतदार आहेत. 245 सदस्यांच्या सभागृहात विजयासाठी 123 मतांची आवश्यकता आहे. वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीला आम आदमी पार्टी, तेलगु देसम, वायएसआर कॉंग्रेस, पीडीपी आणि डीएमके या पक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजप पुरस्कृत उमेदवाराला अकाली दल, तेलंगणा राष्ट्रीय समिती, अद्रमुक या पक्षांच्या सदस्यांचा पाठिंबा मिळू शकतो.\nतथापी त्यांना उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना बरेच झगडावे लागणार आहे. सकाळी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग, भाजप अध्यक्ष अमित शहा या नेत्यांनी राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी चर्चा केली.\nभाजप प्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेला अकाली दलाने या निवडणुकीसाठी नरेश गुजराल यांना उभे करण्याचे ठरवले होते. सुरूवातीला भाजपने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबाही दर्शवला होता परंतु नंतर मात्र त्यांनी त्यांच्या ऐवजी संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.\nत्यामुळे अकाली दल नाराज झाला आहे. त्यांनी या निवडणुकावर बहिष्कार घालण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. त्यामुळे ही नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमुलायम सिंहांच्या जागेवर अखिलेश निवडणूक लढवणार\nभाजपच्या उपाध्यक्षपदी उमा भारती यांची नियुक्ती\n….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होती\nसुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले\nभाजपकडून सहावी यादी जाहीर ; भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा\nमी कोणतीही निवडणूक लढवणार नाही- सपना चौधरी\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nभारताचा जपानवर दणदणीत विजय\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://jsyog.org/2019/", "date_download": "2019-03-25T07:57:37Z", "digest": "sha1:YRUJL5HBLTGL5TVO7YBJGXT2C4GKYAYZ", "length": 4727, "nlines": 48, "source_domain": "jsyog.org", "title": "2019 Archives - JANARDANSWAMI YOGABHYASI MANDAL, NAGPUR", "raw_content": "\nजनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर\nजनार्दनस्वामी पादुकाभवन वास्तुशांती समारोहाचे निमंत्रण\nआपण सर्व स्वामीभक्तांनी गेली कित्येक वर्षे जोपासलेले एक स्वप्न, कि पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जनार्दनस्वामी महाराज यांच्या पादुकांचे अत्यंत सुरेख आणि भव्य मंदिर उभारावे, प्रत्यक्षात साकार होण्याचा मुहूर्त कळविण्यासाठी आणि याची देही याची डोळा साकार झालेले पादुकाभावनाचे व पाच माळ्यात योगाभ्यास उपयुक्त अशा भव्य दालनात विस्तारलेले शिल्प प्रत्यक्ष पाहण्यासाठी वास्तुशांतीचा सोहळा शनिवार दिनांक ९/०३/२०१९ रोजी सकाळी […]\nदिनांक १२ फेब्रुवारी २०१९ ला जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर, आयोजित रथसप्तमी उत्सव ट्रॅफिक पार्क, धरमपेठ, नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयाच्या वेळी प्रारंभी शंखनादाने तसेच सूर्याला अर्घ्य देऊन सूर्योपासनेला सुरुवात झाली. हजारो योगसाधकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये १०० हून अधिक सर्व वयोगटातील योग साधकांनी कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेतला व १४४ अखंड सूर्य […]\nप. पू. जनार्दनस्वामींचा संदेश\nसमाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने \nयोगमेवाभ्यसेत्त् प्राज्ञ: यथाशक्ति निरन्तरम् \nजनार्दनस्वामी पादुकाभवन वास्तुशांती समारोहाचे निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/sanjay-dutt-producing-marathi-movie/", "date_download": "2019-03-25T07:55:42Z", "digest": "sha1:WEF4CWCNXJJ77UAEVZ5AI54GEVU7EL2A", "length": 9262, "nlines": 87, "source_domain": "marathikalakar.com", "title": "अभिनेता संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत! 'संजय दत्त प्रोडक्शन'हाऊसचा मराठी सिनेमा.", "raw_content": "\nअभिनेता संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत ‘संजय दत्त प्रोडक्शन’हाऊसचा मराठी सिनेमा.\n‘तत्ताड’ सिनेमाचा इंटरेस्टिंग पोस्टर तुम्ही पाहिलात का\nपु.लं च्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’. पहा टिझर\nप्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासरावची जोडी लवकरच झळकणार एकत्र.\n‘अमलताश’ आगामी सिनेमाचा टिझर.\nअभिनेता संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत ‘संजय दत्त प्रोडक्शन’हाऊसचा मराठी सिनेमा.\nहल्लीच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने स्वतःचे संजय दत्त प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची बातमी आली आहे. खुद्द संजूबाबानेच याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. आमीर खान, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरूख खान या बॉलिवूड स्टार्सनीही अनेक वर्षे बॉलिवूड मध्ये गाजवल्यानंतर स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालू केले आहेत आता त्या यादीत संजय दत्तचे नाव सामील झालं आहे.\nत्याची निर्मिती असलेला पहिलावहिल्या सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असतील. याविषयी माहिती देताना शेअर केलेल्या पोस्टमध्ये संजय दत्तने लिहिलंय की,’संजय दत्त प्रोडक्शन अंतर्गत पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती करतो आहे, हे सांगताना खूप आनंद होत आहे. अद्याप सिनेमाचे शीर्षक ठरलेले नाही. ब्लूमस्टांग क्रिएशन्स सहनिर्मिती करीत असून या सिनेमाचे दिग्दर्शन राज गुप्ता करणार आहेत. यात दीपक डोबरियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्रांजन गिरी व आर्यन मेघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे’.\n‘तत्ताड’ सिनेमाचा इंटरेस्टिंग पोस्टर तुम्ही पाहिलात का\nपु.लं च्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’. पहा टिझर\nप्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासरावची जोडी लवकरच झळकणार एकत्र.\n‘अमलताश’ आगामी सिनेमाचा टिझर.\n“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.\nमधुरा साने आठवतेय का ती काही महिन्यांपूर्वीच आपल्याला एका छानशा मराठी सिनेमातून भेटीला आली होती. नाही...\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nपहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.\nसिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी...\nआता अभिनयाची जुगलबंदी र���गवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nमराठी मनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्का, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर...\n‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला\nअभिनेते सुनिल बर्वे यांनी आपल्या सुबक नाट्यसंस्थेच्यावतीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातील...\nझी मराठी अवॉर्ड्स २०१८पुरस्कार सोहळा पडला पार. पहा पुरस्कारांची यादी\nलवकरच आई होणार आहे क्रांती रेडकर. पहा डोहाळे जेवणाचे फोटोज.\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/mi-pan-sachin/", "date_download": "2019-03-25T07:37:21Z", "digest": "sha1:MSVZQT6IOXGD2F3POA7HCUYKUQ5ZAFLZ", "length": 2291, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": " mi pan sachin - मराठी कलाकार", "raw_content": "\nआणि स्वप्नील म्हणतो “आयला आला रे सचिन”.पहा का ते.\nयेत्या १ फेब्रुवारी रोजी ‘मी पण सचिन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्निल जोशी या...\nस्वप्नील जोशीचा ग्रामीण अंदाज तुम्ही पाहिलात कापहा’मी पण सचिन’सिनेमाचा टीझर.\n‘डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’ अशी टॅगलाईन असलेल्या आगामी ‘मी पण सचिन’ चित्रपटात स्वप्नील जोशी क्रिकेटपटूची...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/bhavkavita/udabatti/", "date_download": "2019-03-25T07:40:50Z", "digest": "sha1:YOTTSU6F6WSRDYUEIY3SNUX5OATU3CS2", "length": 4638, "nlines": 66, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदा��ा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nएक चिमुकली पेटी हाती\nगोड लाघवी भाषा ओठी\nवृद्ध – उलटली ज्याची साठी.\nपाहुनी दाटे सुगंध चित्ती\nजळती फिरती ती उदबत्ती \nआई व मूल (ओव्या)\nआई आणि मूल (कविता)\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/logic-behind-the-hole-on-bagpack/", "date_download": "2019-03-25T07:21:41Z", "digest": "sha1:NL7THV3SFWWQAZLTTQUXJGBAMFQMB6PJ", "length": 10078, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुमच्या bag वर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुमच्या bag वर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nनवीन Bagpack विकत घेतल्यावर आपण त्याची स्टाईल, तिचा कपडा, तिची ठेवण वगैरे गोष्टी अगदी तपासून घेतो. जेणेकरून पाठीवर चढवल्यावर ती आपल्याला सूट झाली पाहिजे. या इतर गोष्टी तपासताना Bagpack वरच्या एक गोष्टीकडे मात्र अजिबात लक्ष जात नाही.\nया Bagpack वर एक लहानशी फट असते, जिच्यावर क्वचितच कोणाचं लक्ष जात असेल.\nतुमच्यापैकी अनेकांचं लक्ष गेलही असेल, पण उगाच स्टाईल म्हणून काय तरी दिलं असेल असा विचार करून तुम्ही तिला निरुपयोगी ठरवलं असेल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल ही छो���ीशी गोष्ट फारच फायद्याची आहे.\nया छोट्याश्या फटीच्या माध्यमातून तुम्ही फोनला एयरफोन कनेक्ट करून, फोन तुमच्या Bag मध्येच ठेवून गाणी एकूण शकता.\nयामुळे तुमचा फोन तुमच्या Bag मध्ये सुरक्षित राहतो आणि तुम्ही एयरफोनची वायर Bag ची चैन उघडल्याविना फोनला कनेक्ट करू शकता.\nजर तुम्ही ट्रेकिंग वगैरे करत असाल तर उंच उंच पर्वतांवर चढताना तुम्ही कितीही उड्या मारा किंवा धावा, तरीही तुमचा फोन Bag मध्ये सुरक्षित राहील आणि ट्रेकिंग करता करता तुम्ही गाण्यांचा आनंद देखील लुटू शकाल.\nगोष्ट लहान असली तरी तिचे काम मात्र फारच उपयोगी आहे. हो की नाही\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← दुबईच्या आकाशात उडणार फ्लाईंग टॅक्सी\nनिसर्गाची रहस्यमयी किमया: बेलीज देशातील अद्भुत ब्लू होल\nलता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं\nपायाच्या बुटामध्ये मावणारा पोर्टेबल टेन्ट\nMP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय\nबलाढ्य अमेरिकेच्याही छातीत धडकी भरवतोय इराणचा मिसाईल कार्यक्रम \n‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण: सुरेश भटांचे दिव्यार्थी गाणे: मालवून टाक दीप\nहोंडा, हिरो या कंपन्यांनी बाईक्सवर तब्बल १०-१२ हजारांची सुट देण्यामागचं गौडबंगाल\nदहशतवाद्यांशी लढत, वयाच्या २२व्या वर्षी बलिदान देऊन ३६० लोकांचे प्राण वाचवणारी शूर भारतीय\nकरोडो रुपयांना विकल्या गेलेल्या ह्या पेंटींग्ज पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही\nव्ही पी मेनन- ह्यांच्यामुळेच स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध राहिला\nआता चंद्रावरही लागणार आहे 4-G नेटवर्क\n‘दिल दोस्ती दोबारा’ : मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा D3 चा सिक्वेल\nमराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा\nभारतातून नक्षलवाद न संपण्यामागचं कारण आहे – एक व्यापक “कारस्थान”\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\n : इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी\nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nTest Batting चे नविन चार शिलेदार\nएकदाचं प्राचीन कोडं सुटलं अंडे हे शाकाहारी आहे की मांसाहारी – शास्त्रज्ञांनी उलगडलं उत्तर\nथंडीच्या दिवसात तोंडातून वाफ का न��घते\nMAN vs Wild वाल्या ‘बेअर ग्रिल्स’ नामक भटक्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nTakeshi’s Castle येतोय पुन्हा एकदा तुमच्या भेटीला, चला मग खदखदून हसण्यासाठी तयार व्हा\nभारताने साध्य केलेल्या ह्या अभिमानास्पद गोष्टी कितीतरी विकसित देशांनासुद्धा जमलेल्या नाहीत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/telephones/expensive-orpat+telephones-price-list.html", "date_download": "2019-03-25T08:25:11Z", "digest": "sha1:PDYA75XBADUUTEHLIC2QMLI6FE7YRNLO", "length": 13225, "nlines": 301, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग ओरपत टेलेफ़ोन्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive ओरपत टेलेफ़ोन्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,165 पर्यंत ह्या 25 Mar 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग टेलेफ़ोन्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग ओरपत टेलेफोन India मध्ये ओरपत 1500 ई कॉर्डेड लांडलीने फोन्स ब्लू Rs. 499 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी ओरपत टेलेफ़ोन्स < / strong>\n7 ओरपत टेलेफ़ोन्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 699. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,165 येथे आपल्याला ओरपत 1820 कॉर्डेड लांडलीने फोन्स प्स ग्राय उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 12 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nओरपत 1820 कॉर्डेड लांडलीने फोन्स प्स ग्राय\nओरपत 3862 कॉर्डेड लांडलीने फोन���स सिल्वर\nओरपत 3565 कॉर्डेड लांडलीने फोने\nओरपत 3565 कॉर्डेड लांडलीने फोन्स C ब्लू\nओरपत 3565 कॉर्डेड लांडलीने फोन्स प्स ग्रे\nओरपत 3665 कॉर्डेड लांडलीने फोने\nओरपत 3862 कॉर्डेड लांडलीने फोने\nओरपत 1410 कॉर्डेड लांडलीने फोने\nओरपत 1500 ई कॉर्डेड लांडलीने फोन्स ब्लॅक\nओरपत 1600 कॉर्डेड लांडलीने फोने\nओरपत 1500 ई कॉर्डेड लांडलीने फोने\nओरपत 1500 ई कॉर्डेड लांडलीने फोन्स ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2019-03-25T07:28:03Z", "digest": "sha1:UL6AYYYQ6OQFMQG2DWUMCFW26HIFUW5Y", "length": 22795, "nlines": 274, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाबा कदम - विकिपीडिया", "raw_content": "\n(वीरसेन आनंदराव कदम या पानावरून पुनर्निर्देशित)\n४ मे इ.स. १९२९\n२० ऑक्टोबर, २००९ (वय ८०)\nवीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम (मे ४, १९२९ : अक्कलकोट, महाराष्ट्र - ऑक्टोबर २०, २००९) हे मराठी लेखक होते.\nनिष्पाप बळी (संकीर्ण लेखसंग्रह)\nप्रलय (१ली कादंबरी- १९६५)\nशाळा सुटली पाटी फुटली\nकादंबरीकार बाबा कदम यांचे निधन - मराठीमाती\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काश���बाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडे��र • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर ��ाडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. २००९ मधील मृत्यू\nइ.स. १९२९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-zilla-hospital-viral-video-and-police-report-93823", "date_download": "2019-03-25T08:20:03Z", "digest": "sha1:XT45ITIMI46XUVMZVYFNWECMSHPMCIDV", "length": 13450, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news zilla hospital viral video and police report रुग्णालयातील व्हायरल चित्रफित प्रकरणाचा मागविला अहवाल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nरुग्णालयातील व्हायरल चित्रफित प्रकरणाचा मागविला अहवाल\nसोमवार, 22 जानेवारी 2018\nसातारा ः क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुगणालयातील प्रिझनर्स वॉर्डमधील संशयित आरोपींचा नृत्य करतानाचा व्हायरल झालेल्या चित्रफितीची अनुषंगाने पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी त्या दिवशी कामावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. तो मिळताच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. त्याच बरोबर नृत्य करणारे हे रुग्ण नाहीत असे प्रथम दर्शनी वाटते असे न्यायालयास कळविणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.\nसातारा ः क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुगणालयातील प्रिझनर्स वॉर्डमधील संशयित आरोपींचा नृत्य करतानाचा व्हायरल झालेल्या चित्रफितीची अनुषंगाने पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी त्या दिवशी कामावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. तो मिळताच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. त्याच बरोबर नृत्य करणारे हे रुग्ण नाहीत असे प्रथम दर्शनी वाटते असे न्यायालयास कळविणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.\nसुरुची धुमश्चक्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यातील काही संशियत आरोपी हे छाती दुखत असल्याचे सांगत अनेक दिवसांपासून जिल्हा रुगणालयातील प्रिझनर्स वॉर्डमध्ये दाखल होते. त्यातील काहीजण नृत्य करीत असल्याची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल झाली. यामध्ये काही जण मोबाईलद्वारे व्हिडिओ क्लिप काढत असल्याचे दिसत आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nजिवंत पत्नीला मृत दाखवून केले दुसरे लग्न\nनागपूर - जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावरून एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी मृत पावल्याची खोटी माहिती दुसऱ्या घटस्फोटित महिलेला देत तिच्याशी लग्न केले...\nमाजी आमदार पुत्राचा खून सिंगल बारच्या बंदुकीने\nबेळगाव - माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी यांचे पुत्र अरुण (वय ५३) यांचा खून सिंगल बारच्या बंदुकीने गोळी झाडून झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे...\nचिमुरडीच्या डोळ्यादेखत बापाचा विहिरीत बुडून अंत\nसांगली - सुमारे सत्तर ते ऐंशी फूट खोल विहीर. रात्र झाल्याने विहिरीत काळाकभिन्न अंधार. दुपारी विहिरीत उतरलेलेले अनिल सुरगौंडा पाटील पाय घसरून पाण्यात...\nLoksabha 2019 : सर्व्ह��स मतदारांपर्यंत पोचणार ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका\nमुंबई - लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स), तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात...\nपरळीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा निर्घृणपणे खून\nपरळी वैजनाथ : शहरातील भीमवाडीभागातील माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/1st-chavan-free-colony-plan-in-jamkhed/", "date_download": "2019-03-25T08:02:00Z", "digest": "sha1:VZZOXMEMGKMRHVSBA2XMERZODX4YULNM", "length": 9012, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पहिली वसाहत जामखेडमध्ये - प्रा. राम शिंदे", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पहिली वसाहत जामखेडमध्ये – प्रा. राम शिंदे\nमुंबई : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत मौजे खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथील मदारी वसाहत योजनेअंतर्गत सर्व मुलभूत सुविधेसह एकूण 88 लाख 10 हजार रुपये एवढ्या रकमेला आज मान्यता देण्यात आली. अशी माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.\nयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मौजे खर्डा (मदारी वसाहत) अंतर���गत 20 कुटुंबासाठी घरे उपलब्ध करुन देण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. प्रा. शिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मौजे खर्डा मदारी वसाहत येथील प्रस्तावास राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती याप्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांन स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गासाठी राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती योजनेअंतर्गत 20 कुटुंबांना घरे देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकी 70 हजार रुपये पाच गुंठे जागा विकसित करुन देण्यात येणार आहे. यासाठी 88 लाख 10 हजार रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यावेळी प्रा.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टिकोनातूनअनेक वर्षापासून मदारी समाज वंचित दुर्लक्षित राहिला आहे. समाज मुख्य प्रवाहात येऊ शकलेला नाही. या समाजाची राहणी उंचावेल, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता उपलब्ध व्हावी म्हणून त्यांना जमीन उपलब्ध करुन तेथे वसाहत उपलब्ध करुन देणे व त्याठिकाणी त्यांना संपूर्ण आर्थिक सक्षम बनवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल असा विश्वासही यावेळी श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.\nविजा, भज या घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु या योजनेतील काही बाबींमुळे ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. ही बाब विचारात घेऊन या योजनेत काही सुधारणा करुन विजा, भज समाजास या योजनेचा लाभ होण्याकरिता व त्यास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या योजनेच्या मूळ योजनेत सुधारणा करुन ही योजना राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेच्या धर्तीवर तथा प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत त्रुटीच्या अधीन राहून तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहेत.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रम���्यम स्वामी\nहल्लाबोल आंदोलनातून सरकारचा नाकर्तेपणा समोर आणु\nमिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/farmers-owned-sugar-factories-will-not-let-go-of-robbers-raju-shetty/", "date_download": "2019-03-25T08:07:34Z", "digest": "sha1:NFASHOJQD77CKMYXUOFWWZ2OQ7QNU2XM", "length": 5619, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने लुटणाऱ्यांना सोडणार नाही: राजू शेट्टी", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nशेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने लुटणाऱ्यांना सोडणार नाही: राजू शेट्टी\nनाशिक: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या लिलाव व हस्तांतरणात सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी येत्या दोन दिवसात होईल तसेच हा प्रश्न शेवटपर्यंत तडीस नेणार असुन राज्यातील राजकीय व्यवस्था बदलली तरी कारखाने लुबाडणारे सुटणार नाहीत, असे राजू शेट्टीनी विरोधकांना ठणकावून सांगितले.\nराज्यातील सहकारी साखर कारखान्यांची मुल्यांकण व लिलावाची किंमत कमी दाखवुन विविध राजकीय नेत्यांना त्याचे हस्तांतरण झाले तसेच यामध्ये सुमारे एक हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. हि सदर माहिती खासदार राजू शेट्टी यांनी माहितीचा अधिकार मार्फत माहिती मिळवली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची येत्या एक दोन दिवसांत सुनावणी होणार असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुण्यातील अतिहुशार माणसांमुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला विलंब – गडकरी\nराज्य सरकार पंतजली वर मेहरबान का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/the-rickshaw-puller-is-on-strike/", "date_download": "2019-03-25T08:08:21Z", "digest": "sha1:HIGIZSEVSR7HBIC2KNMSQ5VB6VXYBCY3", "length": 6466, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघरमध्ये रिक्षाधारक बेमुदत संपावर", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nपालघरमध्ये रिक्षाधारक बेमुदत संपावर\nमुंबई : पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांचे ‘पासिंग’ पालघरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो रिक्षाधारकांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनात पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, डहाणू आदी भागातील हजारो रिक्षा बंद राहणार असल्याने रिक्षावर अवलंबून असणारे कामगार, विद्यार्थी, छोटे-मोठे विक्रेते, मत्स्यव्यवसायिक आदीवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे.\nप्रवाशांचा मोठा भर एसटीला उचलावा लागणार आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सर्व विभागांची कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर मुख्यालयात सुरू करणे गरजेचे असताना ते विरार येथे सुरू करण्यात आले. विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पासिंगची चाचणी प्रक्रिया कल्याण येथे हलविण्यात येणार आहे असे, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक-मालक सेनेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले.\nत्यामुळे पालघर-डहाणू येथून १२५ किमी लांब कल्याण येथे गाड्या पासिंगला घेऊन जाणे त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे ऑटो टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय पालघरमध्येच सुरु करावे अ��ी मागणी केली.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nपुढील वर्षात नोकरदारांच्या पगारात १० टक्क्यांची वाढ \nरत्नागिरी जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2019-03-25T07:30:26Z", "digest": "sha1:27EDD5QDANWRRZCC5ATNEL6YBT7QFWLA", "length": 7516, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मर्सिडीज जीपी - विकिपीडिया", "raw_content": "\nमर्सिडीज जीपी पेट्रोनास फॉर्म्युला वन संघ\nबर्कली नॉर्थ हॅम्पटनशायर,युनायटेड किंग्डम\n२०१४ फॉर्म्युला वन हंगाम\nमर्सिडीज हाय परफॉर्मन्स इंजिन\n२०११ अबु धाबी ग्रांप्री\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकारनिर्माते आणि चालक - २०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nस्कुदेरिआ फेरारी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मर्सिडीज-बेंझ\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेनोल्ट सौबर-स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ टोरो रोस्सो विलियम्स-मर्सिडीज-बेंझ\n५५. कार्लोस सेनज जेआर\nईतर चालक: २२. जेन्सन बटन (मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१), २६. डॅनिल क्वयात (स्कुदेरिआ टोरो रोस्सो), ३०. जॉलिओन पामर (रेनोल्ट), ३६. अँटोनियो गियोविन्झी (सौबर-स्कुदेरिआ फेरारी), ४०. पॉल डि रेस्टा (विलियम्स-मर्सिडीज-बेंझ).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-03-25T07:47:38Z", "digest": "sha1:VQTWWK66SJH7JVLOBK4QS6ALZ4AHQA2T", "length": 9490, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशनला जोडलेली पाने\n← विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nमिडियाविकी:Recentchangestext (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:All system messages (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:निर्वाह (← दुवे | संपादन)\nगुढीपाडवा (← दुवे | संपादन)\nमराठा साम्राज्य (← दुवे | संपादन)\nसाचा:मुखपृष्ठ निवेदन (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सफर (← दुवे | संपादन)\nचर्चा:गोविंद विनायक करंदीकर (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:अपूर्ण लेख विकास (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कौल (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी (← दुवे | संपादन)\nबौद्ध धर्म (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:अशुद्धलेखन (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कौल/जुने कौल १ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:निवेदन/फेब्रुवारी ७, २००७ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठ (← दुवे | संपादन)\nराणी लक्ष्मीबाई (← दुवे | संपादन)\nमिडियाविकी चर्चा:Recentchangestext (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/धूळपाटी1 (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी/१ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कौल/जुने कौल २ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी2 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १४ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १७ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Nitin.kunjir (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:वनस्पती/सूचना (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २२ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/करावयाच्या गोष्टींची यादी (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कौल/जुने कौल ३ (← दुवे | संपादन)\nसाचा:कौल सुचालन (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२००९ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२००८ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कौल/प्रचालक (← दुवे | संपादन)\nसाचा:निर्वाह सुचालन (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:निर्वाह/मुखपृष्ठ नित्य (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/अवश्य पहा (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१० (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/अनिर्वाचित (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१० (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २६ (← दुवे | संपादन)\nसाचा:अलीकडील बदल लेख विनंत्या (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०११ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-government-office-51554", "date_download": "2019-03-25T08:36:22Z", "digest": "sha1:FSOUYINYOKXWW2S6HMRBQ24COHEKCCLG", "length": 13193, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news government office सरकारी कार्यालयांचे छत ताडपत्र्यांचे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसरकारी कार्यालयांचे छत ताडपत्र्यांचे\nशुक्रवार, 9 जून 2017\nनेरळ - कर्जत तालुक्यात पावसाळ्यापूर्वी सरकारी कार्यालयाच्या छपरांवर प्लास्टिकचे आच्छादन टाकून तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचे चित्र आहे.\nनेरळ - कर्जत तालुक्यात पावसाळ्यापूर्वी सरकारी कार्यालयाच्या छपरांवर प्लास्टिकचे आच्छादन टाकून तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचे चित्र आहे.\nतालुक्यात बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, पोलिस निरीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, आयटीआय, महावितरण, कृषी अधिकारी कार्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण कार्यालय, सरकारी आश्रमशाळा आदींची कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांची देखभाल आणि दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. कर्जत तालुक्यात प्रांत अधिकारी कार्यालयाची उभारणी करण्यात आली. त्याशिवाय तालुक्यात कुठेही बांधकाम विभागाकडून सरकारी कार्यालय नव्याने बांधण्यात आले नसल्याची माहिती आहे.\nदर वर्षी पावसाळ्यात अनेक सरकारी कार्यालयांत पावसाचे पाणी गळते. ते थांबविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली जात आहे. गळक्या सरकारी कार्यालयांच्या छपरावर प्लास्टिकचे आच्छादन टाकले जात आहे. तहसील कार्यालय आणि पोलिस उपअधीक्षक यांची कार्यालये सर्वाधिक गळकी असून, त्यांच्या छपरावर प्लास्टिक टाकण्यात आले आहे.\nआमच्याकडे शासकीय कार्यालयांच्या देखभाल-दुरुस्ती आणि नव्याने कार्यालये उभारणी करण्याची जबाबदारी असते. निधी मिळाल्यास त्याप्रमाणे कामे करून घेतली जातात. सध्या पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीची कामे केली जात आहेत.\n- सी. एम. सनहाल, उपअभियंता, कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग\nसुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला,...\nतुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले\nकोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का\nशुद्धिकरणाची बुरसट बुद्धी (मर्म)\nज्या माणसाने आयुष्यभर कर्मकांड, अंधश्रद्धा याला फाटा देत केवळ \"कर्म' हेच आपले जीवन मानले, त्याच मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याच्या कला अकादमी...\nआदरणीय हायकमांड यांना शतशत प्रणाम. मी नांदेडचा एक साधासुधा, सिंपल आणि निष्ठावान कार्यकर्ता असून, कर्मधर्म संयोगाने सध्या प्रदेशअध्यक्षदेखील आहे. काही...\nLoksabha 2019 : हे फक्त श्रीमंतांचे चौकीदार; प्रियांका गांधींचे टीकास्त्र\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनी आज जोरदार टीका केली. \"हे 'चौकीदार' फक्त...\nज्वारीच्या कोठारात स्वप्नांचा पाचोळा\nऔरंगाबाद : दुष्काळामुळे बागा जळाल्या, जनावरे उपाशीपोटी दावणीला बांधावी लागताहेत, लेकींची लग्ने राहिली ईतकेच नव्हे तर आता जगायचं कसं अशी चिंता लागली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/dhangar-community-road-reservation-amravati-agitation-137478", "date_download": "2019-03-25T08:27:04Z", "digest": "sha1:SQUIJSUS6R2CR7JCLLJU4XVV4TL6CF5M", "length": 13734, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhangar community on the road for reservation Amravati Agitation धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर; अमरावतीत आंदोलन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nधनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर; अमरावतीत आंदोलन\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर धनगर समाज बांधवानी दुपारी 12 वाजता अमरावती-नागपूर हा महामार्ग रोखून धरला. धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात स्थानिक गौरी इन हॉटेल समोर आंदोलन करण्यात आले.\nअमरावती : धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज बांधवानी आज सोमवारी राज्य महामार्ग क्रमांक सहा रोखून धरला. आंदोलनकर्त्यांनी येळकूट येळकूट जय मल्हारच्या घोषणा देऊन महामार्ग दणाणून सोडला होता.\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर धनगर समाज बांधवानी दुपारी 12 वाजता अमरावती-नागपूर हा महामार्ग रोखून धरला. धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात स्थानिक गौरी इन हॉटेल समोर आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संतोष महात्मे यांचेसह जानराव कोकरे, डॉ. मेघश्याम करडे यांचेह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर घोगडे, योगेश पराडे या दोन तरुणांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.\nआंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास 30 मिनिटे ठप्प झाली होती. महामार्गावरील दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर समाजाची सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nLoksabha 2019 महाआघाडीचं जमलं\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात...\nमेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)\nहळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून...\nसांस्कृतिक उद्योजकतेचा मनोरम अविष्कार (प्रा. क्षितिज पाटुकले)\nकंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो....\nLoksabha 2019 : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक\nसांगली - येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक...\nकोल्हापुरातील गगनगिरी पार्क 14 वर्षांपासून पाण्यापासून वंचित\nकोल्हापूर - फुलेवाडी रिंग रोडपासून केवळ एका किलोमीटरवर असलेल्या आणि शहराच्या पश्चिमेस बोंद्रेनगर परिसरात वसलेल्या गगनगिरी पार्कमधील नागरिकांना तब्बल...\nLoksabha 2019 : गोपीचंद पडळकर यांची सांगली लोकसभा लढण्याची घोषणा\nविटा - संजयकाका आता याच मैदानात, कोण लायकीचं आहे ठरवू, असे उघड आव्हान देत धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/bhavkavita/bhau-bahin-ovya/", "date_download": "2019-03-25T07:50:10Z", "digest": "sha1:WIPUVI6AMN7CVB5EIIFEEVZZZJCQC3WA", "length": 5720, "nlines": 76, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nलाविता बाळ स्तनी अमृत पाझरते\nबैसता जात्यावरी ओवी मंजुळ स्फुरते.\nपावसावाचुन आखाड गेला सुना\nकुठे माझा गं गुंतला, पाठचा भाऊराणा\nशेतात जोंधळ्याचे कणीस भरदार\nतसे मानस उदार भाऊरायाचे \nधावते लगबगा, गंगा भेटाया सिंधुला\nमनी मी गं उतावीळ, मिठी घालाया बंधूला \nघेउनिया सुधाकुंभ गगनात चंद्र आला\nअमृताची ओवाळणी धरणीला घालायाला.\nबिलोरी आरशात बिंब उमटे गोमटे\nभेटता भाऊराया प्रीती अंतरी दाटते.\nदीपाची काजळी झडू झडू दूर झाली\nपाहता भाऊराया, चिंता सारी ओसरली.\nपतीच्या परीस भावाची माया मोठी\nद्रौपदीला पाच पती, कृष्ण सोडवी संकटी \nदारी आला भाऊराया, अयोध्येचं रामराज्य\nत्रिभुवना लाजवील, आज माझी भाऊबीज \nआई व मूल (ओव्या)\nआई आणि मूल (कविता)\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-03-25T08:02:43Z", "digest": "sha1:NDXTJU2NIDEPOCV5XYUW26OWBEJRCZRB", "length": 13287, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आज महाराष्ट्र बंद… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशांतता व अहिंसेच्या मार्गाने बंद करण्याचे आवाहन\nऔरंगाबाद – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने म्हणजेच आज 9 ऑगस्ट रोजी “महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचे निमीत्त साधून मराठा आरक्षणासाठी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला बंदमधून वगळण्यात आले आहे.\nमराठा क्रांती मोर्चाची सुरूवात दोन वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट या क्रांती दिनी झाली होती. मराठा समाजाने दोन वर्षांत 58 मोर्चे शांततेत काढले. तरीही सरकार दखल घेत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गुरूवारी क्रांती दिनी महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र दोन दिवसांपासून बंदविषयी संभ्रम निर्माण केला होता. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादेतील विंडसर कॅसेल हॉटेलमध्ये बुधवारी राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुंबई, ठाणे पसिरातील समन्वयकांशीही भ्रमणध्वनीवर संवाद साधण्यात आला.\nया बंदमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाणार नाही. अहिंसेच्या मार्गाने बंद पुकारण्यात येत आहे. वैद्यकीय, वाहतुक, ऍम्ब्यूलन्स, शाळेची बस अशा अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येणार नाही. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, अशा पद्धतीचे वर्तन मराठा क्रांती मोर्चाकडून होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी आमच्या न्याय मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी समन्वयकांनी केले.\n15 ऑगस्टला “चुलबंद’ आंदोलन\nमराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंद, 10 ऑगस्टनंतर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलनात जाळपोळ, हिंसा करतो असा आरोप राज्यकर्त्यांनी लावला असल्यामुळे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला स्वत:लाच आत्मक्लेश करून घेण्यासाठी चुलबंद आंदोलन केले जाणार असल्याचेही समन्वयकांनी सांगितले.\nमहाआघाडीतल्या 56 पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे- मुख्यमंत्री\nराष्ट्रवादी ही भष्ट्राचार मॅनेजमेंट कंपनी ; मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीवादीवर कणखर टीका\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nमला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद पाहिजे- रामदास आठवले\nमराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात\nकाँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा; अपक्ष लोकसभा लढवण्याचा निर्धार\nअभिवादन – समृद्ध पर्यावरण : शिवरायांची नीती\nशरद पवारांनीच सोडविला माढ्याचा तिढा \nकोल्हापूर, हातकणंगलेसाठी प्रचार समन्वय नियुक्त\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेच�� – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/8-lavish-prisons/", "date_download": "2019-03-25T08:00:47Z", "digest": "sha1:4TCYQG76SDNEWPL5EBPZPENMWRAG5Z4I", "length": 20097, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ही ८ तुरुंगं - पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nतुरुंग म्हटले की, आपल्यासमोर चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारे विविध तुरुंग आठवतात. चित्रपटांमध्ये आपल्याला दाखवण्यात येते की, तुरुंगवासामध्ये राहणाऱ्या लोकांना खूप समस्यांचा सामना करावा लागतो. तुरुंग, अर्थातच शिक्षा देण्यासाठी असतात. त्यामुळे तिथलं जीवन कठोर असणं स्वाभाविक आहे. परंतु अनेक तुरुंगांमध्ये कैद्यांचे हाल होतात. त्यांना खाण्यासाठी अन्न देखील चांगले मिळत नाही. त्यामुळे कधीही तुरुंगाचा विषय काढला तर जनसामान्यांच्या मनामध्ये धडकी भरते. जे चित्रपटांमध्ये तुरुंगाविषयी दाखवले जाते, ते काही प्रमाणात खऱ्या जीवनात घडते. चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे काही तुरुंग आहेत, पण काही तुरुंग यांच्यापेक्षा खूप वेगळे आहेत.\nआज आम्ही तुम्हाला अशा काही तुरुंगांविषयी सांगणार आहोत, जे एखाद्या बंगल्याप्रमाणे आहेत आणि तेथील कैद्यांना खूप मोकळीक दिली जाते.\nचला तर मग जाणून घेऊया, या अलिशान तुरुंगांबद्दल…\n१. बेस्तॉय तुरुंग, नॉर्वे (Bastoy Prison, Norway)\nबेस्तॉय बेटावर बनवले गेलेले तुरुंग खूप वेगळे आहे. नॉर्वेच्या या तुरुंगामध्ये खूप कमी सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. हे तुरुंग जगातील सर्वात पहिले इकोलॉजिकल तुरुंग बनण्याच्या मार्गावर आहे. या तुरुंगामध्ये राहणारे कैदी एका लाकडाच्या बॉक्समध्ये राहतात.\nतसेच, त्यांना येथे शेतामध्ये काम देखील करावे लागते.\nआपल्या उरलेल्या वेळेमध्ये येथील कैदी आपल्या इच्छेनुसार, घोडेस्वारी, फिशिंग किंवा टेनिस खेळून आपला वेळ घालवतात. खासकरून, या तुरुंगामधून सुटणाऱ्या कैद्यांद्वारे परत एखाद्या गुन्ह्यात सामील असल्याचे प्रकरणे फक्त १६ टक्के आहेत. हा आकडा युरोपियन देशांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे यावरून हे समजते की, हे तुरुंग कैद्यांमध्ये चांगल्याप्रकारची सुधारणा करते.\nहल्डेन तुरुंग हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्थित आहे. या तुरुंगाच्या आजूबाजूचा परिसर निसर्गाने वेढलेला आहे. या कारागृहात कैद्यांसाठी आरामशीर क्वार्टर्स बनवल्या आहेत, जिथे ते एकांतामध्ये राहू शकतात. त्यांच्या मनोरंजनासाठी येथे खूप गोष्टी आहेत, त्याचबरोबर सर्व सुविधा असलेले जिमदेखील आहे. येथील कैदी व्हिडियो गेम्स खेळणे, चित्रपट पाहणे आणि इतर काही गोष्टी करून आपला वेळ घालवतात.\nस्वित्झर्लंडच्या जेनेव्हामध्ये असलेले हे तुरुंग पहिल्यापासून इतके आरामदायी नव्हते. युरोप अँटि-टॉर्चर कमिटीने २००८ मध्ये या तुरुंगाला खूप खराब रिव्ह्यू दिला होता. यानंतर स्विस सरकारने या तुरुंगाची परिस्थिती सुधारण्याचे ठरवले.\nआज या तुरुगातील सुविधा कोणत्याही थ्री स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. या तुरुंगाच्या प्रत्येक रुममध्ये ३ कैदी राहतात. त्याचबरोबर रुममध्ये प्रायव्हेट बाथरूम देखील आहेत.\n४. एचएमपी अॅडीव्हेल, स्कॉटलॅंड (HMP Addiewell, Scotland)\nया तुरुगांमध्ये कैद्यांना खूप काही शिकवले जाते. एचएमपी अॅडीव्हेल या दक्षिणी स्कॉटलॅंडमधील तुरुंगाच्या मॅजेस्टीने आठवड्यातील ४० तास कैद्यांमध्ये असलेले कौशल्य वाढवण्यासाठी वाटून दिलेले आहेत. आपल्या नागरी जीवनामध्ये उपयुक्त असे बदल कसे करावे, यावर विशेष भर दिला जातो. अॅडीव्हेल असणाऱ्या ७०० हून अधिक कैद्यांना एका चांगल्या हाताखाली आपण महत्त्वपूर्ण बाबी शिकत आहोत, असे वाटते.\nदिवसभर तुरुंगातील एका रुममध्ये बसून राहणे खूपच कांटाळवाणे असेल. फिलिपिन्सच्या या तुरुंगातील कैदी डान्स ग्रुप ज्वाइन करू शकतात. सुरुवातीला हा डान्स ग्रुप कैद्यांचे दररोजच्या कवयतीसाठी होता. पण काही काळाने याला खऱ्या डान्स ग्रुपसारखे चालवण्यात येऊ लागले.\n६. अरानज्यूझ तुरुंग, स्पेन (Aranjuez Prison, Spain)\nस्पेनचे हे तुरुंग जगातील एकमेव असे तुरुंग आहे, जिथे कैद्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी देखील रूम आहेत. सामान्यपणे जर एखाद्या कैद्याला मूल झाल्यास त्याला इतर कुटुंबाजवळ किंवा फोस्टर केयरमध्ये पाठवण्यात येते, येथे कैद्यांबरोबर त्यांची छोटी मुले वयाच्या तीन वर्षापर्यंत सोबत राहू शकतात. येथे लहान मुलांसाठी खूप सुंदर रूम आहेत. त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी येथे अजून काही लहान मित्र देखील भेटतात. हे जगातील खूप वेगळे आणि आकर्षक आहे.\nतुरुंगामध्ये राहताना कैदी आपल्या शरीराकडे लक्ष देऊ शकत नाही. पण ही समस्या स्वीडनमधील या जेलमध्ये होणार नाही, कारण या तुरुंगात कैद्यांसाठी आधुनिक जिम बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर, येथे कैदी किचनमध्ये स्वतःचे जेवण स्वतः तसेच त्यांच्या खोलीमध्ये बसून आरामात टीव्ही बघू शकतात.\n८. जस्टीस सेंटर लोबेन, ऑस्ट्रिया (Justice Center Leoben, Austria)\nऑस्ट्रियाच्या या तुरुंगामध्ये कैद्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे समान अधिकार प्राप्त होतात. येथे कैद्यांना नागरिकांप्रमाणे सन्मानाने वागवले जाते. इतर तुरुंगांपेक्षा वेगळे – या तुरुंगाच्या भिंती लाकडाच्या आणि शटरप्रूफ काचेने बनवली गेली आहे. येथे काही कैद्यांचे सेल्समध्ये बाल्कनी देखील आहे. पण सुरुक्षेसाठी त्यांना ग्रील्स लावण्यात आलेल्या आहेत. काही रुममध्ये किचन देखील आहेत.\nयेथील कैद्यांना कोणत्याही प्रकारचा गणवेश नाही. त्यांना स्वतःच्या आवडीचे कपडे घालण्याची सूट आहे. याबद्दल येथील वॉर्डनचे म्हणणे आहे की, येथून बाहेर गेल्यानंतर येथील कैद्यांना बाहेरच्या वातावरणामध्ये लगेच रमता यावे, यासाठी येथे एवढी सूट दिली जाते.\nअशी ही तुरुंगे खूपच वेगळी आणि कोणत्याही कैद्याला येथे राहण्यास आवडेल अशी आहेत. अर्थात, शिस्त या तुरुंगांमध्ये देखील तेवढीच पाळली जाते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← या महेंद्रसिंग धोनीचं करायचं काय\nह्या ८९ वर्षीय आजीबाईचे गमतीशीर फोटो तरूणांना लाजवतील असे आहेत →\nSEX शिकवणारी जगातील पहिली ‘शाळा’…\nवयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी हा तरुण ‘संपूर्ण देश’ सांभाळताना दिसू शकतो \nह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nजगाला एकहाती अणुयुद्धाच्या सर्वनाशापासून वाचवणाऱ्या माणसाची अज्ञात कथा\nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nइस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय\nचहा विकून १२ लाख कमवतो आहे हा चहावाला…\nGST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल (GST वर बोलू काही – भाग ६)\nमहाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा होणार कमी\nग्राहकांचे “हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील\n“#TenYearsChallenge” चे हे १० भन्नाट फोटोज हसून हसून डोळे ओले करतील\n5 इंग्लिश टीव्ही सिरीयल्स, ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजेत \nएका विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी\n“उरी”वरील हल्ला : आपण ह्यातून कधी शिकणार\nया भारतीय फुटबॉल संघाने इंग्रजांना हरवून भारतीयांवरील अन्यायाचा असा बदला घेतला होता\nअसिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो\nया शूर सैनिकाच्या शौर्यामुळे आज काश्मीर भारताकडे आहे पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा\nते गोमुत्राने अंघोळ करतात, इतकचं काय तर तिचं रायफल घेऊन रक्षणही करतात\n“हवाई सर्जिकल स्ट्राईक ” करणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही अभिमानास्पद व रंजक गोष्टी\nया चार ‘गंभीर’ चुकांमुळे गौतम गंभीर सारखा जबरदस्त खेळाडू आज मागे राहिला आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090514/main.htm", "date_download": "2019-03-25T08:42:04Z", "digest": "sha1:WLSJKKCUFFRS4RG67OSSLA3BBVUYU3VV", "length": 16078, "nlines": 39, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १४ मे २००९\nएनडीएला बहुमत न मिळाल्यास पवारांना पाठिंबा- मनोहर जोशी\nलोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)ला बहुमत प्राप्त झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदी बसविण्याकरिता शिवसेना त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असे उद्गार शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आज काढले. याच विषयावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात अलीकडेच दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. त्या पाश्र्वभूमीवर जोशी यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जोशी म्हणाले की, लोकसभा निकालानंतर रालोआला बहुमताकरिता आवश्यक २७२ चा जादूई आकडा गाठता आला नाही तर लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शरद पवार यांना पंतप्रधान करण्याक��िता पाठिंबा देईल. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात दूरध्वनीवरून संभाव्य राजकीय पाठिंब्याबाबत अलीकडेच चर्चा झाली.\nनवी दिल्ली, १३ मे/खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपताच आज सायंकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’च्या निष्कर्षांंनुसार केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आणि भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआमध्ये कमालीची चुरस असून काँग्रेस-युपीएला किंचित आघाडी असल्याचे दिसून आले आहे. तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता क्षीण झाली असली तरी विविध प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व वाढणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे. ‘इंडिया टीव्ही’ वृत्तवाहिनीच्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला १९५ ते २०१ जागाजिंकण्याची संधी आहे. त्यात राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पार्टीचा समावेश केल्यास युपीएचे संख्याबळ २२७ ते २३७ घरात जाईल. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचे संख्याबळ १८९ ते १९५ दरम्यान असेल, तर तिसऱ्या आघाडीतील घटक पक्ष ११३ ते १२१ जागाजिंकतील, असा अंदाज ‘इंडिया टीव्ही’च्या एक्झिट पोलने वर्तविला आहे. ‘हेडलाईन्स टुडे’ वाहिनीने काँग्रेस आणि मित्रपक्ष १९१ जागाजिंकतील, असे भाकित वर्तविले आहे. भाजप-रालोआला १८० जागा मिळतील, तर डाव्या आघाडीला ३८ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे या वाहिनीने म्हटले आहे. बसपसह इतर पक्षांना १३४ जागा मिळतील, असा अंदाज या वाहिनीने व्यक्त केला आहे.\nशेवटच्या टप्प्यात ६२ टक्के मतदान\nनवी दिल्ली, १३ मे/वृत्तसंस्था\nमागील तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेली रणधुमाळी आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर संपुष्टात आली आजच्या पाचव्या टप्प्यातील शेवटच्या मतदानाच्या प्रक्रियेत प. बंगालमध्ये उत्तर २४ परगणा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात एक ठार झाला असून १०जण जखमी झाले आहेत. तामीळनाडूमध्ये तीन ठिकाणी झालेल्या हिंसाचारामध्ये एक ठार झाला असून १३जण जखमी झाले आहेत. अखेरच्या टप्प्यामध्ये ६२ टक्के एवढे विक्रमी मतदान झाल्याचे वृत्त आहे.\nबनावट जात प्रमाणपत्र : निलंबित नगरसेवक नारायण पवार यांना अटक\nमुंबई, १३ मे / प्रतिनिधी\nबनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी दोषी ठरलेले कुर्ला येथील निलंबित अपक्ष नगरसेवक नारायण जानू पवार (४२) यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज कुर्ला पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पवार यांना अटक करण्यात आली असून त्यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पवार यांनी २००७ साली कुर्ला येथील विभाग क्र. १५८ मधून अपक्ष म्हणून नगरसेवकाची निवडणूक लढवली होती. काँग्रेस उमेदवार मसूर अन्सारी यांचा पराभव करून ते निवडूनही आले होते. मात्र पवार यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे ही निवडणूक लढविल्याची तक्रार अन्सारी यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केल्यावर याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. २९ सप्टेंबर २००८ रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पवार यांना दोषी ठरवून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस केली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर डिसेंबर २००८ मध्ये कुर्ला पोलीस ठाण्यात पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक होण्याच्या भीतीने पवार यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यावर पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळून लावत १३ मेपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज पवार यांनी कुर्ला पोलिसांसमोर शरणागती पत्करली.\nवीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा\nजीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहक अगोदरच मेटाकुटीला आला असताना महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीमुळे ग्राहकाचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे महावितरणने दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा , अशी मागणी शिवसेनेने केली आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला गेला तर शिवसेना आंदोलन करील, असा इशाराही दिला आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस अरुण जगताप यांनी सांगितले की, महावितरण व नियामक आयोगाची भेट घेऊन दरवाढीला असलेला विरोध स्पष्ट केला जाणार आहे. त्यानंतरही दरवाढ लागू केली तर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल.\nअमेरिकेत���ल ‘येस’ स्पर्धेत भारतीय वंशाचे विद्यार्थी चमकले\nअमेरिकेतील यंग एपिडेमिऑलॉजी स्कॉलर्स स्पर्धेत (येस) तीन भारतीय विद्यार्थ्यांसह ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावली आहे. एकूण ५६० प्रवेशिका या स्पर्धेसाठी आल्या होत्या. त्यात अमृता सेहगल हिला ५० हजार अमेरिकी डॉलर, अॅलन जोसेफ व विशाखा सुरेश यांना अनुक्रमे ३५ हजार व १५ हजार अमेरिकी डॉलरची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. एपिडेमिऑलॉजी म्हणजे साथीच्या रोगांचे शास्त्र असून त्यात या रोगांचा मुकाबला करण्याच्या तंत्राचा अभ्यास केला जातो. अमृता सेहगल ही मेन्लो -आथरटन हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिने मुलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा प्रतिबंध या विषयावर प्रकल्प सादर केला आहे. ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडे ठिसूळ होतात. अॅलन जोसेफ याने स्टडी ऑफ हायस्कूल अॅथलेटिक अँटेरियर क्रुशिएट लिगॅमेंट या विषयावर प्रकल्प केला आहे. विशाखा ही प्लानो वेस्ट सीनियर हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिने आरोग्यास पोषक अन्नाची उपलब्धता व व्यायामाची व्यवस्था या विषयावर प्रकल्प सादरीकरण केले आहे.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/hindu-liberalism-liberal-hindu-manifesto-hindu-dharma-definition-1785560/", "date_download": "2019-03-25T08:47:51Z", "digest": "sha1:DO5FS7GA3NN3YUDQACGNDQKY4RTVAGKV", "length": 28420, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hindu liberalism liberal Hindu Manifesto Hindu Dharma definition | इहवाद्यांना हिंदुत्व का ‘चालते’? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nइहवाद्यांना हिंदुत्व का ‘चालते’\nइहवाद्यांना हिंदुत्व का ‘चालते’\nइहवाद कधी ‘बाटत’ नसतो पण इहवाद म्हणजे जडवादच असे नकळत गृहीत धरले जाते.\nऐहिक जीवनात धर्मसंस्थेने निवाडे देऊ नयेत. तिचा हस्तक्षेप हटवला पाहिजे; पण याचा अर्थ असा नव्हे की कोणीच ‘भाविक’ असता कामा नये\nहिंदू या नावाने भारतात जो संप्रदाय-समुच्चय नांदत आहे, तो इहवादाला कमी घातक का ठरतो, हे प्रथम पाह��. राजकीय हिंदुत्ववादामुळे जे धोके संभवतात ते हिंदुत्ववाद्यांतील व हिंदुत्वविरोधकांतील बदलत्या वैशिष्टय़ांमुळे सौम्य कसे ठरत गेले, ते उत्तरार्धात पाहू.\nइहवाद कधी ‘बाटत’ नसतो पण इहवाद म्हणजे जडवादच असे नकळत गृहीत धरले जाते. जडवाद मानला की धर्मउच्छेद हे उद्दिष्ट बनते, पण जडवादात जी अंगभूत मूल्य-उदासीनता आहे, ती लवकर लक्षात येत नाही. विशेषत: समता हे तत्त्व जडवादानुसार अजिबातच टिकत नाही. सोशल-डार्वििनझममध्ये काय चूक आहे पण इहवाद म्हणजे जडवादच असे नकळत गृहीत धरले जाते. जडवाद मानला की धर्मउच्छेद हे उद्दिष्ट बनते, पण जडवादात जी अंगभूत मूल्य-उदासीनता आहे, ती लवकर लक्षात येत नाही. विशेषत: समता हे तत्त्व जडवादानुसार अजिबातच टिकत नाही. सोशल-डार्वििनझममध्ये काय चूक आहे या प्रश्नाला जडवादात उत्तर नसते. आपण समतावादीही आहोत आणि जडवादीही आहोत, यात काही तरी विसंगती आहे, असे कित्येकांच्या ध्यानातच आलेले नसते; किंबहुना समतावादी असण्यासाठी जडवादी असणे आवश्यकच आहे, असेही अनेकांना वाटत असते. याला एक तार्किक कारणही आहे. कर्मविपाक (भाग्य हे शिक्षा/ बक्षीसच असते) आणि स्वर्ग/नरक याद्वारे मिळणारी ‘भरपाई’ या गोष्टी मानल्या की मानवनिर्मित न्यायाला महत्त्व उरत नाही, हा जडवाद्यांना वाटणारा धोका खराच आहे. जडवाद न मानण्यामुळे मानवनिर्मित न्याय दुर्लक्षित होतो, हे जरी खरे असले तरी जडवाद मानण्याने आपोआपच मानवनिर्मित न्यायकल्पना सापडेल, हा व्यत्यास चुकीचा आहे. पारलौकिक मानल्याने न्याय ‘आपोआप’ झाल्यासारखा वाटतो हेही खरेच या प्रश्नाला जडवादात उत्तर नसते. आपण समतावादीही आहोत आणि जडवादीही आहोत, यात काही तरी विसंगती आहे, असे कित्येकांच्या ध्यानातच आलेले नसते; किंबहुना समतावादी असण्यासाठी जडवादी असणे आवश्यकच आहे, असेही अनेकांना वाटत असते. याला एक तार्किक कारणही आहे. कर्मविपाक (भाग्य हे शिक्षा/ बक्षीसच असते) आणि स्वर्ग/नरक याद्वारे मिळणारी ‘भरपाई’ या गोष्टी मानल्या की मानवनिर्मित न्यायाला महत्त्व उरत नाही, हा जडवाद्यांना वाटणारा धोका खराच आहे. जडवाद न मानण्यामुळे मानवनिर्मित न्याय दुर्लक्षित होतो, हे जरी खरे असले तरी जडवाद मानण्याने आपोआपच मानवनिर्मित न्यायकल्पना सापडेल, हा व्यत्यास चुकीचा आहे. पारलौकिक मानल्याने न्याय ‘आपोआप’ झाल्यासारखा व���टतो हेही खरेच परंतु जडजगताच्या गतिनियमात न्याय हा प्रश्नच उद्भवत नाही याचे काय परंतु जडजगताच्या गतिनियमात न्याय हा प्रश्नच उद्भवत नाही याचे काय नैतिक भूमिका तर घ्यावीच लागते. मग मात्र समतावादी अचानक, आपण जाणीववान आणि जडापासून स्वतंत्र असल्याचे (जे खरेच आहे) लक्षात घेऊन (आणि समता तर मानायचीच हे गृहीत धरून) नैतिक भूमिका घेतात.\nजोपर्यंत इहलोक म्हणजे मानवी-भावविश्व (त्याचा द्रव्यमय आधार भले ‘जड’ का असेना) हे मान्य होत नाही आणि इहवाद म्हणजे याच जन्माचा सत्कृत्य/दुष्कृत्य हिशेब, हे स्पष्ट होत नाही; तोवर हा जड-घोटाळा सुटणार नाही. भावविश्व मानण्याचा दुसरा फायदा असा की बिगर-भाविकांना, भाविकांकडे बघताना, त्यांच्या उपासनेला ‘त्यांचा मान्यताधारित मानसोपचार’ म्हणून समजून तरी घेता येते. बिगर-भाविक आणि भाविक यांच्यात संघर्ष उभा न राहता, मांडणी भाविकांच्या संज्ञांमध्ये पण मूल्ये प्रागतिक, अशी जुळणी शक्य होते. धर्मसंस्थेला निवाडय़ांतून बाहेर ठेवणे, पण त्याच वेळी भाविकांना ‘अभ्युदया’साठी उद्युक्त करणे शक्य होते. धर्मसंस्थेला विरोध म्हणजे भाविकांचा द्वेष नव्हे हे तत्त्व सर्वच धर्माना लागू असले, तरी इस्लामबाबत ते विशेष अगत्याचे आहे. कारण धर्मसंस्थेने भाविकांना गुलाम करणे हे इस्लाममध्ये तीव्र आहे.\n‘साधना करण्याचे बहुविध प्रकार आणि उपास्य कोणते याला नियम नाही’ अशी हिंदू धर्माची व्याख्या लोकमान्य टिळकांनीही केलेली आहे. श्रमण/ वैदिक/ भक्ती या तीनही परंपरांचा मिलाफ प्रत्यक्षात आणि दर्शनांतही करणे हे हिंदू-वैशिष्टय़ राहिलेले आहे. टोळी-देवता, ग्राम-देवता यांना सामावून कसे घेता येईल असेच हिंदूंचे धोरण नेहमी राहिलेले आहे. तुर्यावस्थावाद (युडेमोनिझम) व स्वीकारवाद (स्टोइक) ही खास वैशिष्टय़ आन्हिकांना महत्त्व (रिच्युअलिझम) पण देशकालमानाने मॉडिफिकेशन्स करण्याची मोठी परंपरा आहे. काहीही प्रमाद घडला तरी त्यावर ‘उपाय आहे’ असाच निर्वाळा पुरोहित देत आलेले आहेत. सौम्य स्वरूपाची प्रायश्चित्ते ही गोष्ट एका बाजूने दंभाला वाव देणारी असली तरी ‘धसका’ कमी करणारी आहेत. आधुनिक अर्थाने स्वातंत्र्य जरी मानलेले नसले तरी लवचीक मुभा (लॅटिटय़ूड) राखण्याची काळजी घेतली गेलेली आहे.\nज्यांना एकच जन्म असतो आणि ज्यांचा एक तर उद्धार (स्वर्ग) तरी होईल किंवा नष्टचर्य (नरक) तरी येईल, असे असते, त्यांना ‘मरणोत्तर चिंता’ फारच तीव्र असते. कर्मविपाक आणि प्रचंड संख्येने जन्म मिळणे याचा एक फायदा असा असतो की, नेहमी थोडा थोडा वाव राहतो. एटीकेटी मिळत असल्याने हिंदू अटीतटीवर येत नाही.\nमुख्य सिद्धांत असाच आहे की, प्रत्येक जीवाची बहुजन्म-कहाणी खास करून त्याचीच असते. हे लायबनित्झच्या मोनॅड्ससारखे व्यक्तिकेंद्री आहे. इतरांना उद्धाराकडे खेचून नेणे हे माणसालाच काय, पण खुद्द ईश्वरालाही शक्य नसते. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: नादत्ते कस्यचित्पापं न चव सुकृतं विभु: नादत्ते कस्यचित्पापं न चव सुकृतं विभु: (गीता ५.१४-१५). यामुळे निष्ठिहिनांना निष्ठावान बनवणे किंवा नष्ट करणे, हे ग्रांथिक-धर्म-कर्तव्य (विशेषत: इस्लामिक) हिंदू माणसाला नसतेच. स्वत:साठी मोक्षसाधना महत्त्वाची असते. मोक्षकेंद्रीपणामुळे इतर पुरुषार्थाकडे दुर्लक्ष होते हा दोषच (गीता ५.१४-१५). यामुळे निष्ठिहिनांना निष्ठावान बनवणे किंवा नष्ट करणे, हे ग्रांथिक-धर्म-कर्तव्य (विशेषत: इस्लामिक) हिंदू माणसाला नसतेच. स्वत:साठी मोक्षसाधना महत्त्वाची असते. मोक्षकेंद्रीपणामुळे इतर पुरुषार्थाकडे दुर्लक्ष होते हा दोषच पण मोक्षवादामुळेच पारमार्थिक सत्-ता वेगळी आणि व्यावहारिक सत्-ता वेगळी ठरते. यात आत्मिक साधनेचे इहलौकिक बाबींपासून डी-कपिलग (जोड तुटणे) होते. इहलोकात काय घडते आहे याविषयी उदासीनता वाईटच; पण संबंध न उरणे हे चांगलेही आहे. कारण त्यामुळे कायदे पुरवणे हे कार्य करण्यात हिंदू परंपरा अभिनिवेशी राहत नाही.\nत्या त्या काळातील समाजव्यवस्थांचे समर्थन करणे हे धर्मसंस्थांचे कार्य असतेच. भारतीय ग्राम-जातिव्यवस्थेला ‘वर्ण’ कल्पनेतून समर्थन मिळते, जे की त्याज्यच आहे. आधुनिकतेला कलियुग म्हणणे वाईटच पण निदान त्रेता/द्वापार नाही आणि त्यामुळे तत्कालीन पुराणे आता लागू नाहीत, हे म्हणायला अडचण राहात नाही. यज्ञ ही गोष्ट आता अप्रस्तुत ठरली आहे. वेदातील कर्म-कांड म्हणजे यज्ञ कसे करावेत व निसर्ग-दैवतांना कसे वश करावे, याच्या मेथड्स वेदांतच राहून गेल्या आहेत. उपनिषदे आणि त्यातील काव्यात्म तत्त्वज्ञान यांचा प्रभाव नक्कीच आहे; पण त्यात अनेक अर्थ लावले जाऊन कोणतेच मत (डॉक्ट्रिन) निर्णायक राहिलेले नाही. संतवाङ्मयाद्वारे उपनिषदांचे लिबरलाइझ्ड सारच सर्वत्र पसरले आहे. यामुळेच ‘सनातनी’ (ऑर्थोडॉक्स) आणि भाविक (प्रॅक्टिसिंग) यांच्यातील संबंध विरलेला आहे. भाविक हिंदू हा सनातनी ‘उलेमांचा बंदा’ असत नाही.\nस्वातंत्र्यपूर्वकाळात जो इस्लामिक-अर्ध-राष्ट्रवाद (एकाच राष्ट्रात अध्रेराज्य) उभा राहिला त्याला विरोध करण्यासाठी, मुळात भारतात राजकीय हिंदुत्व हे प्रकरण निर्माण झाले. फाळणीची प्रक्रिया जरी हिंसात्मक व दु:खद झाली असली, तरी फाळणीमुळे इस्लामिक-अर्ध-राष्ट्रवादाचा कायमस्वरूपी पराभव झाला. भारताला इहवादी राज्यघटना मिळाली. पूर्वी झालेल्या आक्रमणांच्या इतिहासामुळे, हिंदूंमध्ये स्वत:च्या दौर्बल्याविषयी स्वत:चाच जळफळाट, हा एक दुर्गुण शिरून बसला. हा दुर्गुण काढून टाकून, आता जे सामर्थ्य हवे आहे ते हिंसेचे नसून विकासाचे आहे, याकडे हिंदूंना वळवणे ही महत्त्वाची गरज आहे.\nआधुनिकता टाकून धर्मजीवनाकडे परत चला, ही दिशा हिंदुत्ववाद्यांत गोळवलकर गुरुजींच्या रूपांत व हिंदुत्व-विरोधकांत महात्मा गांधीजींच्या रूपात सामाईक होती. परंतु मुस्लीम प्रश्नाच्या संदर्भामुळे हे साम्य झाकले गेले. इहवादी आणि आधुनिकतावादी राष्ट्रनिर्मिती करायची आहे, ही दिशा सावरकर आणि आंबेडकर यांच्यात सामाईक होती; परंतु सावरकरांचे जातिनिर्मूलन दुर्लक्षित राहिल्याने व आंबेडकरांचे फक्त जातिनिर्मूलनच लक्षात राहिल्याने, हेही साम्य झाकले गेले. ख्रिश्चन मिशनऱ्यांशी स्पर्धा म्हणून का होईना, पण विवेकानंदांच्या प्रभावाने हिंदुत्ववाद्यांनी विधायक कार्यात भरीव कामगिरी केली आहे, ही गोष्टही राजकीय चच्रेत न आल्याने लक्षात राहिली नाही. काँग्रेस व पुरोगामी एनजीओजनी त्या कार्याकडे द्वेषभावनेनेच पाहिले. कारण हिंदुत्ववादात मनुवाद दडलेला असणारच आणि ब्राह्मण हा वर्गशत्रू आहे, या दोन गैरसमजुती काँग्रेस व पुरोगामी घट्ट धरून राहिले. शहा, कुरुंदकर, दलवाई, असे दोन्ही बाजूंना जोडणारे घटक उपेक्षित राहिले.\nकोणाही इहवाद्याच्या मनात, धर्मसंस्थेमुळे सर्वाधिक ग्रस्त असलेल्या मुस्लिमांविषयी अपार सहानुभूती असणे स्वाभाविकच आहे; परंतु मुस्लिमांचे कल्याण आणि इस्लामिक सनातन्यांचे तुष्टीकरण यातला फरक काँग्रेसला व पुरोगाम्यांना नेमकेपणाने करता आला नाही. इस्लामविषयी सावधगिरी म्हणजे मुस्लिमद्वेषच, असा प्रसार ते करत रा��िले.\n‘इस्लाम हे जागतिक संकट’ या मूळ विषयापेक्षाही ‘काँग्रेस व पुरोगामी यांनी आम्हाला कधीच समजून घेतले नाही, अस्पृश्य ठरवले’, याचा संताप हा हिंदुत्ववाद्यांचा जास्त निर्णायक- ‘प्रेरक’ आहे नेहरूप्रणीत समाजवादाशी कोणाचेही कशाहीमुळे भांडण होवो नेहरूप्रणीत समाजवादाशी कोणाचेही कशाहीमुळे भांडण होवो असे लोक पर्यायी ध्रुव म्हणून हिंदुत्ववादाचे सहानुभूतीदार बनतात असे लोक पर्यायी ध्रुव म्हणून हिंदुत्ववादाचे सहानुभूतीदार बनतात उत्कृष्टतेचा दुस्वास आणि सत्प्रवृत्तीबाबत तुच्छता यांचा उबग आलेल्या कोणालाही आपलेसे वाटेल, असे प्रतीक, ‘हिंदुत्व’ हे बनले. याचा धार्मिक-विवादांशी खरे तर संबंधच नाही.\nअर्थकारणामध्ये नरसिंह राव यांनी सुरू केलेल्या आर्थिक-सुधारणांपासून अटलजी वा मोदीजी यांच्या सरकारांनी कधीच फारकत घेतली नाही. मेक इन इंडिया, गव्हर्नन्स व विकास हे केंद्रिबदू बनल्यानंतर, भाजप म्हणजे सध्याची ‘कार्यक्षम प्रतिकाँग्रेस (मध्यममार्गी)’, असे तिच्याकडे बघितले जाऊ लागले आहे. हिणकस वक्तव्ये करणाऱ्या आचरटांपेक्षा फडणवीस/गडकरीसदृश परफॉर्मर्स लक्षणीय ठरत आहेत.\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविश्वचषकाआधी भारताला मोठा धक्का पहिल्याच सामन्यात बुमराहला गंभीर दुखापत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान ���ाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/raosaheb-danve-used-notebooks-for-his-political-advertisement/", "date_download": "2019-03-25T08:05:56Z", "digest": "sha1:3HRFDSUZD2B72JREHATQY33EI5QNVMG3", "length": 6319, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वस्त मिळतात तर घेऊ आणि कव्हर लाऊन वापरू ; दानवेंच्या प्रचाराला विद्यार्थ्यांनी मारलं फाट्यावर", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nस्वस्त मिळतात तर घेऊ आणि कव्हर लाऊन वापरू ; दानवेंच्या प्रचाराला विद्यार्थ्यांनी मारलं फाट्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे राजकीय नेते आपल्या प्रचारासाठी नामी शकला लढवत आहेत. त्यात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर हद्दच ओलांडली आहे. रावसाहेब दानवेंनी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरच आपल्या जाहिराती छापल्या आहेत. दानवेंनी या वह्यांची किंमत 18 रुपये प्रति नग, म्हणजेच 216 रुपये डझन अशी ठरवून दिली आहे. आता दानवेंच्या या कृतीवर सगळ्याच्या स्तरातून टीका होत आहे.\nदानवेंनी या वह्यांचा वापर एकप्रकारे राजकीय प्रचारासाठी केला आहे. शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या कामाचा लेखाजोखा कळावा, या उद्देशाने गेल्या चार वर्षातील कामाची यादीच त्यांनी वह्यांच्या पुठ्ठ्यांवर छापली आहे. दानवे महाशयांनी हजार दोन हजार नाही तर तब्बल एक लाख वह्या छापल्या आहेत.\nमात्र, दानवेंच्या या आयडियाच्या कल्पनेला विद्यार्थ्यांनी अक्षरशः फाट्यावर मारलं आहे. दानवे जरी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरून प्रचार करण्याचा विचार करत असले तरी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या एक पाउल पुढे जात विद्यार्थ्यांनी या वह्यांना कव्हर लावत वापरण्याचा निर्णय केला आहे. स्वस्त वह्या मिळतात तर घेऊ आणि कव्हर लाऊन वापरू असे विद्यार्थी म्हणत आहेत.\nनाद करा की.. पण आम���ा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nफणसाचे हे गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर…\n‘त्या’ मध्यरात्रीला एक वर्ष पूर्ण; केंद्र सरकार देशभरात साजरा करणार ‘जीएसटी’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/diwali-speical-types-of-rangoli/", "date_download": "2019-03-25T08:07:38Z", "digest": "sha1:AZGQS3OCS2GPEZSNMUMJ2MUTYEVFZU7R", "length": 5755, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिवाळी स्पेशल - रांगोळीचे विविध प्रकार", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nदिवाळी स्पेशल – रांगोळीचे विविध प्रकार\nटीम महाराष्ट्र देशा-रांगोळी आणि दिवाळी हे पक्क समीकरण आहे. अनेक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने रांगोळी काढली जाते. आधी ठीपक्याच्या रांगोळी काढली जात त्यानंतर संस्कार भारती रांगोळीचा ट्रेंड सुरु झाला. आता अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. अशाच वेगवेगळ्या रांगोळ्यांचे प्रकार पुढील प्रमाणे\nफुलांची रांगोळी- साऊथ इंडिया मध्ये फुलांच्या मोठ्या प्रमाणात वापार करत रांगोळी काढली जाते. याकरता विविध रंगाच्या फुलांचा वापर केला जातो. झेंडू, गुलाब,अशा फुलांचा वापर करून कमी वेळेत तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.\nलाकडाच्या भूशाची रांगोळी- लाकडाच्या भूशामध्ये विविध रंग मिसळून सुंदर रांगोळी बनविता येते. सुक्या भुशा मध्ये ओले रंग मिसळून ते सुकून चांगली रांगोळी बनविता येते.\nप्लायवूच्या तुकड्यापासूनची रांगोळी- प्लायवूडच्या तुकड्याचे अनेक शेफ मिळतात त्यावर विविध मनी, मोती चिटकून सुंदर रांगोळी बनविता येते. ही रांगोळी वर्षभर कधीही वापरता येते.\nदिव्यांची रांगोळी- दिव्यांचा वापर करीत सुंदर रांगोळी बनविता येते. दिव्यांच्या जागी मेणबत्तीचा वापर करीत करून करीत चांगली रांगोळी ब��विता येते.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nदिवाळी स्पेशल – असे दिसा दिवाळीत सुंदर\nदिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या वड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ebc-problems-like-students-were-shot-of-1500-students/", "date_download": "2019-03-25T08:10:24Z", "digest": "sha1:PC6NDUEH5KXOURNWJSOUZ2ZPG2GJWKW2", "length": 7489, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विद्यार्थांच्या ईबीसीच्या समस्या जैसे थे ! १५०० विद्यार्थांना फटका", "raw_content": "\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nकारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार\nराज्यसभेचे आश्वासन, आठवलेंची दक्षिण मध्य मुंबईतून माघार\nमी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाचं नाही : सपना चौधरी\nविद्यार्थांच्या ईबीसीच्या समस्या जैसे थे \nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालय प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे विद्यार्थांना ईबीसीच्या समस्यांना सामोरे जाव लागत आहे. १५०० पेक्षा जास्त विद्यार्थांना याचा फटका बसला आहे. याबाबत अभाविपने तंत्र शिक्षण संचालनालय पुणे यांना निवेदन दिले होते. मात्र काहीच निर्णय न झाल्याने अभाविपकडून आज आंदोलन कराण्यात आले.\nशिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये जेएसपीएम, सिंहगड इन्स्टिट्यूट येथे मागील महिन्यात विद्यार्थ्यांकडून ईबीसी अर्ज भरून घेतले. त्यांमध्ये अनेक विद्यार्थांचे अर्ज अपुऱ्या कागदपत्राभावी रद्द करण्यात आले. तर काही अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र त्यानंतर विद्यार्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता ईबीसी अर्ज रद्द करण्यात आले. याचा आर्थिक फटका सामान्य विद्यार्थांना बसला आहे.\n“या विषयात लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. तसेच संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करू व या सर्व विद्यार्थ्यांना ईबीसी मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल.”\nप्रा.गायकवाड सर,तंत्�� शिक्षण संचालनालय पुणे\n“ईबीसी ही गोर गरीब घरातील विद्यार्थ्यांकरिता शासनाने उपलब्ध करून दिलेली मदत आहे. आणि ही विद्यार्थ्यांना मिळावी कारण ही त्यांच्या हक्काची आहे. आम्ही आज आंदोलन हे प्राथमिक स्वरूपात केले आहे. शासनाला आम्ही त्वरित ईबीसी द्यावी, अशी मागणी केलेली असून मागणी मान्य न केल्यास आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढेल. सोबतच या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची ईबीसी भेटावी यासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांना देखील भेटू.”\nयोगेश्वर पुरोहित, अभाविप मंत्री (गणेश खिंड भाग)\nमामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू\nसुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी\nतोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी\nआंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका \nरेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्स,सब इन्स्पेक्टरच्या ९७३९ जागांसाठी अशी होईल भरती प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/nawab-malik-protests-against-modi-government/", "date_download": "2019-03-25T08:06:34Z", "digest": "sha1:PFI5C56EUGVK6REVJPQBDIDLZLBQDSU4", "length": 8223, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसचं पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन...साखर वाटून सरकारचा केला निषेध", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nराष्ट्रवादी काँग्रेसचं पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन…साखर वाटून सरकारचा केला निषेध\nमुंबई – मोदी सरकार होश मे आओ… फेकू सरकार हाय हाय…नरेंद्र मोदी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय… पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो… अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अणूशक्तीनगर-चेंबुर आणि गोवंडी परिसर दणाणून सोडला…\nकेंद्रसरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईने डोके वर काढले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज अणूशक्तीनगर-चेंबूर विधानसभा मतदार संघात चेंबूरच्या पांजरापोळ सर्कलपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हातात सरकारचा निषेध करणारे फलक घेवून आक्रोश रॅली काढत आंदोलन केले.\nसरकारचा निषेध म्हणून बैलगाडी आणि हातात मोटारसायकल घेतलेले कार्यकर्ते होते तर बैलगाडीमध्ये बसून राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सारथ्य केले. सरकारचा निषेध करत मोर्चाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोवंडीच्या पेट्रोलपंपावर येवून सरकारचा निषेध म्हणून आणि पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत अच्छे दिन आणल्याबद्दल चारचाकी आणि दुचाकी वाहनचालकांना नवाब मलिक यांनी साखर वाटली.\nत्यानंतर मोटारसायकलला फुले आणि पुष्पहार वाहून प्रतिकात्मक अंत्यससंस्कार करण्यात आले. यावेळी नवाब मलिक यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या आंदोलनामध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विभागीय युवकचे अध्यक्ष अँड. निलेश भोसले, युवकचे जिल्हाध्यक्ष सुनिल गिरी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णू गायकवाड, सेक्रेटरी मधुकर शिरसाट, मुंबई तालुका अध्यक्ष नितीन पराडे, अल्पसंख्यांक सेलचे मुंबई तालुका अध्यक्ष नाजीम मुल्ला आदींसह राष्ट्रवादीचे अणुशक्तीनगर-चेंबुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nजोपर्यंत पेट्रोल-डिझेल- गॅस सिलेंडरचे भाव कमी होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही- नवाब मलिक\nराज्यातील स्वस्त धान्य दुकानांत आता 35 रुपये किलो दराने तूरडाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/nawazuddin-siddiqui/", "date_download": "2019-03-25T08:08:00Z", "digest": "sha1:HAHDS7JBXV5CU6FJUE23XTAE7MQY6USG", "length": 3019, "nlines": 47, "source_domain": "marathikalakar.com", "title": " nawazuddin siddiqui - मराठी कलाकार", "raw_content": "\nनवाझुद्दीन नाही तर”हा”अभिनेता साकारणार होता”ठाकरे”.\nकालच बॉक्स ऑफिसवर नवाजुद्दीन सिद्दिकी स्टारर ‘ठाकरे’ मराठी आणि हिंदीत रिलीज झाला. चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी...\n“दादा कोंडके”हे माझे आवडते कलाकार-नवाजुद्दीन.अनुभवा त्याचा वोचमेन ते ऍक्टर प्रवास.\n‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टीमने कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये हजेरी लावली. चित्रपट...\nतुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल ‘या’ अभिनेत्याने दिलाय बाळासाहेबांचा आवाज.आगामी सिनेमा ‘ठाकरे’\nज्यांच्या भाषणाने श्रोते रोमांचित होऊन जात असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्यांचे विचार आणि ते...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/punenagar-news/warning-to-work-close-by-irrigation-engineering-1138622/", "date_download": "2019-03-25T08:23:50Z", "digest": "sha1:V4R3CZRKOGRIOU6B7SQI3UCAW3MWJTCL", "length": 12741, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nपाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा\nपाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा\nशेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे.\nसध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्य़ात, धरणांच्या आवर्तन काळात लाभधारक शेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना ��िवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे.\nकनिष्ठ अभियंता तसेच अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. पाटबंधारे विभागाच्या, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा उपविभागातील उपअभियंता डी. आर. खोसे यांना शुक्रवारी कार्यालयात कोंडून मारहाण करण्यात आली. तसेच कार्यालयातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले व उपअभियंत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही देण्यात आली, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापुर्वीही राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात प्रवरा उजवा तट कालवावरील वीज पुरवठा बंद करण्यास गेलेल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली व वीज वितरण कंपनीच्या वायरमनला मारहाण करण्यात आली. अशा घटना निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.\nसध्याच्या दुष्काळी परिस्थितीत लाभधारकांना एकाच वेळी आवर्तनाचे पाणी मिळावे, अशी अपेक्षा आहे. परंतु कालव्याची वहन क्षमता व इतर तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होत नाही, अशावेळी लाभधारकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. परंतु तसे न होता, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणे, कार्यालयात कोंडणे, असे प्रकार होत आहतेच यंदा मात्र अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा घटनांमुळे पाटबंधारे खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता राहिली नाही, त्यांच्यामध्ये भिती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, याची पुनरावृत्ती झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकेंद्राकडून सिंचनाचे २१ पैकी सहा प्रस्ताव मंजूर\n.. तर वाघोलीसारख्या हिंसक घटनेची पुनरावृत्ती\nFIFA WC 2018 : खेळावर फोकस करा, ललनांवर नाही, ‘फिफा’ची चॅनेल्सना तंबी\nपरभणी-जालन्याचे सिंचन वाढणार, मराठवाडय़ाचे अन्य जिल्हे कोरडेच\n‘सिंचनातील भौतिक अनुशेषाची चौकशी करा’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी ��ेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/mi-nandanvani/", "date_download": "2019-03-25T07:47:47Z", "digest": "sha1:AQBMFR355ZWWON4YDSOI2YZEKAPRVRIB", "length": 6765, "nlines": 75, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nजागेपणी अन् उघड्या नयनी\nधनुष्य भंगुनी विजयी झाला\nघनश्याम मज राम भेटला\nनिळ्या सागरा गंगा मिळली\nरामाची मी निळी साउली\nपतिव्रतेला पती हा ईश्वर\nकुरवंडीन मी प्राण तयावर\nपतीच्या चरणी सुख स्वर्गीचे\nमंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nनका बोलू असे दूर दूर बसून\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख ल��� चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-agriculture-poultry-farming-and-care-take-winter-4129", "date_download": "2019-03-25T08:11:37Z", "digest": "sha1:FB2TPPJIW53T3RUFKVEJUH6X4GTBKD4H", "length": 5547, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news agriculture poultry farming and care to take in winter | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी \nथंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी \nथंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी \nथंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी \nशनिवार, 12 जानेवारी 2019\nथंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी \nVideo of थंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी \nमागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय. त्याचा परिणाम मानवा बरोबरच पशु-पक्ष्यांवरही होतोय. त्यामुळे काळजी घेणं आवश्य आहे. विषेश करुन कुक्कुटपालन करणाऱ्यांनी विषेश काळजी घेणं गरजेचं आहे. पक्ष्यांचं तापमान कमी होऊ नये यासाठी खुराड्यात तापमान वाढ करावी, शेडच्या चारी बाजुला कापड लावून 30ते 31 डिग्री तापमान करावं, आणि कोणत्या प्रकारचं खाद्य द्यावं या सर्वांविषयी मार्गदर्शन केलंय बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर रतन जाधव यांनी. सविस्तर बातमीसाठी पाहा व्हिडीओ\nमागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय. त्याचा परिणाम मानवा बरोबरच पशु-पक्ष्यांवरही होतोय. त्यामुळे काळजी घेणं आवश्य आहे. विषेश करुन कुक्कुटपालन करणाऱ्यांनी विषेश काळजी घेणं गरजेचं आहे. पक्ष्यांचं तापमान कमी होऊ नये यासाठी खुराड्यात तापमान वाढ करावी, शेडच्या चारी बाजुला कापड लावून 30ते 31 डिग्री तापमान करावं, आणि कोणत्या प्रकारचं खाद्य द्यावं या सर्वांविषयी मार्गदर्शन केलंय बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर रतन जाधव यांनी. सविस्तर बातमीसाठी पाहा व्हिडीओ\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/8-smart-ways-of-savings/", "date_download": "2019-03-25T08:01:26Z", "digest": "sha1:3NN5IAP5QOYNEP76H4Y7J32ZTO7VZKWP", "length": 21168, "nlines": 141, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "खिशात पैसे टिकत नाहीत? या \"हमखास\" यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nखिशात पैसे टिकत नाहीत या “हमखास” यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nदिन है सुहाना आज पहिली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है\nप्रत्येक मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस महिन्याच्या पहिल्या तारखेची वाट बघत असतो. “Your salary has been credited to your account” हा मेसेज आला की माणसाला आनंद होतो आणि आता त्या पगारातून सगळी देणी संपल्यावर आपल्या पाकिटात काय उरेल ह्याची चिंता मात्र डोक्याचा भुगा करते.\nमहिन्याच्या शेवटी तर सतत धास्ती असते की कुठला इमर्जन्सी खर्च नको यायला, नाहीतर पंचाईत व्हायची\nदर महिन्याला आपण ठरवतो की पुढच्या महिन्यापासून सगळे वायफळ खर्च बंद आणि बचत सुरु करू. पण ते काही जमत नाही आणि बचतीचं गणित काही जुळत नाही\nअशा वेळी जर कुणी बचतीच्या सध्या सोप्या टिप्स घेणे दिल्या तर थेंबे थेंबे करता करता आपण बचतीची मोठी गंगाजळी साठवू शकतो.\nकाही काही खर्च हे अनावश्यक असतात आणि आपण ते थोड्या खबरदारीने नक्कीच टाळू शकतो. बचतीच्या बाबतीत एकदम मोठी उडी घेणे जरी जमले नाही तरी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपल्या खिशाला लागणारी कात्री नक्कीच वाचवू शकतो.\nपुढील पैकी सगळ्या नाही, पण थोड्या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या, तर तुमच्या अकाउंट बॅलन्स मध्ये नक्कीच भर पडेल ह्याची आम्ही खात्री देतो.\n१. कार्ड पेमेंट करणे कमी करा\nही सूचना वाचून खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हल्ली सगळ्या लोकांचा कॅशलेस व्यवहार करण्याकडे कल असतो.\nआपण सुद्धा कॅश जवळ बाळगायला नको म्हणून कार्डनेच व्यवहार करायला प्राधान्य देतो. अशा वेळी आपण किती आणि काय खर्च करतोय ह्याचा ट्रॅक ठेवणे कठीण जाते.\n“नाहीतरी कार्डनेच पेमेंट करायचं आहे”, असा विचार करून बऱ्याच वेळा अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाते. अनावश्यक खर्च होतो.\nक्रेडीट कार्ड जर व्यवस्थित वापरता आलं नाही तर सगळा पगार त्याचे बिल भरण्यातच जातो. म्हणूनच कार्ड वापरणे कमी केल्यास तुमचा अनावश्यक खर्च होणे काही प्रमाणात कमी होऊन तुमची बचत होण्यास मदत होईल.\n२. विजेची उपकरणे वापरात नसताना त्याचे प्लग काढून ठेवा.\nकाही विजेची उपकरणे बंद असताना सुद्धा जर चार्जरने विजेशी कनेक्टेड असतील तर त्याने तुमच्या बिलाची रक्कम वाढू शकते. तुमच्या दर महिन्याला वाढत्या विजेच्या बिलाचे हे ही एक कारण असू शकते.\nम्हणूनच वापरात नसलेल्या विजेच्या उपकरणांचे चार्जर/प्लग काढून ठेवा जेणे करून ते वीज अनावश्यक खर्च करणार नाहीत. म्हटलं तर गोष्ट एकदम छोटीशी आणि साधी आहे. पण ह्याने तुमच्या विजेच्या बिलात फरक पडून तुमची बचत होऊ शकते.\n३. काही नव्या आणि इंटरेस्टिंग ऑफर्स विषयी तुमच्या बँकेकडे चौकशी करा\nतुम्ही जर तुमच्या बँकेचे जुने कस्टमर असाल तर बँक तुम्हाला काही स्पेशल ऑफर देऊ शकते. त्याबद्दल तुमच्या बँकेतल्या लोकांकडे वेळोवेळी चौकशी करा.\nतुमची बँक जर तुम्हाला तुम्ही घेतलेल्या लोन वर किंवा क्रेडीट कार्ड वर किंवा इएमआय वर जर व्याज दर कमी करून देत असेल तर तुमचे बरेच पैसे वाचू शकतात. ह्याने तुमचा बँक बॅलन्स कमी न होता हळू हळू वाढू शकेल.\n४. वापरात नसलेल्या गोष्टी विकून टाका\nहल्ली काही ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईट ‘6 months break-up challenge’ देत आहेत.\nम्हणजेच महिनोंमहिने तुम्ही ज्या गोष्टी वापरत नाहीये, त्याकडे बघत सुद्धा नाहीये अशा चांगल्या कंडीशन मध्ये असलेल्या गोष्टी त्यांच्या मोहात न पडता विकून टाका.\nखरं तर आपण घेतलेल्या गोष्टींसाठी आपल्या हृदयात स्पेशल जागा असते. त्या अशा सहजासहजी विकून टाकणं कठीण काम आहे.\nपण जर त्यातून तुमचा फायदाच होत असेल तर हे करायला काय हरकत आहे\nतुमचाही फायदा होईल आणि ज्याला त्या वस्तूंची खरी गरज आहे त्याला त्या वापरायला मिळतील आणि वस्तू सुद्धा भंगारात पडून राहणार नाहीत.\n५. व्हाउचर आणि सेलचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या\nसेल मधल्या वस्तूंची क्वालिटी चांगली नसते, व्हाउचरचा काही उपयोग नसतो असा विचार करू नका. ह्या दोन गोष्टी बचतीसाठी तुम्हाला कायम मदत करतील.\nएखाद्या वस्तूची सेल मध्ये किंमत कमी असेल आणि ती तुम्ही घेतली तर तुमचेच पैसे वाचतात. तुमचे महिन्याचे किराणा सामान जर सेल सुरु असलेल्या दुकानातून घेतले तर तुमचाच फायदा होतो.\n६. अनावश्यक सदस्यत्व / सभासदत्व बंद करा\nकधीतरी कुठल्यातरी ऑफरला भुलून जर कुठल्याही पेपर, मॅगझीनचे सदस्यत्व घेतले असेल किंवा कुठल्यातरी कम्युनिटी क्लब किंवा जिमचे मेंबर असून तुम्ही तिकडे कधीच जात नसाल तर ही सगळी सदस्यत्व रद्द करा.\nत्यापेक्षा ह्या सगळ्यात उगाच खर्च होत असलेला पैसा जर दुसऱ्या कुठल्या आवश्यक गोष्टीत कामी येत असेल तर तो तिकडे वापरा.\nह्याने तुमचा पैसाही वाचेल आणि अनावश्यक खर्चाला सुद्धा काही प्रमाणात आळा बसेल.\n७. तुमचा फोन कॉलिंग व इंटरनेट प्लान बदला\nतुमच्या घरी आणि ऑफिसमध्ये जर २४ तास अनलिमिटेड वायफायची सुविधा असेल तर तुमच्या मोबाईलचा अनलिमिटेड नेटप्लान बदलून घ्या.\nजर तुम्ही तो प्लान फारसा वापरतच नसाल तर कशाला त्यावर पैसे घालवायचे\nतसाच कॉलिंगचा प्लान सुद्धा अनलिमिटेडचा असेल आणि तुम्ही फारसे कुणाशी फोनवर बोलत नसाल तर कशाला त्यावर पैसे घालवायचे\nह्या अनलिमिटेड प्लानचे चार्जेस बरेच असतात. त्याचा तुम्ही हवा तसा उपयोग करत नसाल तर ते भरमसाठ बिल कशाला भरायचे\nतुमच्या वापराप्रमाणे तुम्ही प्लान बदलून घेतले तर तुमच्या फोनच्या बिलाच्या रकमेमध्ये फरक पडेल आणि तुमची बचत होऊ शकेल.\n८. नेहमी नेहमी बाहेरचे खाणे\nसतत बाहेरचे खाऊन पोटाला सुद्धा त्रास होतो आणि खिशाला सुद्धा म्हणूनच कितीही इच्छा झाली तरी रोज रोज बाहेरचे खाणे चांगले नाही.\nतुम्ही बाहेर जाताना घरातूनच काही खाऊन निघा. किंवा ऑफिसला जाताना घरून डबा घेऊन बाहेर पडा.\nम्हणजे बाहेर खाण्याची गरज पडणार नाही. बाहेरचे खाऊन आजारी पडल्यावर सुद्धा खर्च वाढू शकतो.\nम्हणूनच बाहेरचे खाणे टाळा आणि पैसे व शरीर दोन्ही वाचवा.\nह्या ८ गोष्टी तुम्ही केल्यात तर नक्कीच तुमची बचत होण्यास मदत होईल.\nजास्त कठीण नसल्याने तुम्ही ह्या गोष्टी सहज करू शकता व जास्त खर्च होणे टाळू शकता.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← इंटरनेटवरील “कुकी” फाईल्स काय असतात त्याने काय होतं\nवीस वर्षांत एकदाही सुट्टी न घेतलेला, निवृत्तीनंतरही काम करणारा पोलीस अधिकारी →\nपैसे काढताना एटीएम मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे\nऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळायचीय मग या खबरदाऱ्या प्रत्येकाने घेतल्याच पाहिजेत\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\nसकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील\nअलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक\nमिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का\n पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)\nजो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही\n“आता मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा\nभारतीय खाद्यसंस्कृतीतील अनन्यसाधारण ‘साखर’ : आहारावर बोलू काही – भाग २\nपाकच्या शास्त्रज्ञांना चीन ने प्रक्षेपण बघायला बोलावले..\n“भारत एक “राष्ट्र” नाही” असं म्हणणाऱ्यांनी एकदा विचार करून पहावा\nनासाच्या भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञांचा नवा प्रकल्प : भारताची मान अभिमानाने उंचावणार\nवेळेचा परफेक्ट सदुपयोग करून १००% यशस्वी होण्याच्या ७ टिप्स\nसह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या ह्या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं\nहॉटेलमधील बेडवर नेहमी पांढरंच बेडसीट असण्यामागचं हे आहे चलाख कारण\n“आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४\nयुरोपातील यहुदी विरोधी लाट आणि झायोनिस्ट विचारधारेचा उगम : इस्रायल- संक्षिप्त इतिहास २\nचार्जशीट म्हणजे नेमकं काय ती दाखल व्हायला एवढा वेळ का लागतो ती दाखल व्हायला एवढा वेळ का लागतो\nस्पेशल लोकांसाठी स्पेशल जेल – चक्क फाईव्ह स्टार हॉटेलचं केलं जेल मध्ये रूपांतर\nसाबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nजम्मू काश्मीरमध्ये सार्वमत (रेफ्रंडम) घेणं चुकीचं का आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090331/main.htm", "date_download": "2019-03-25T08:14:04Z", "digest": "sha1:IHJE6ZOAP4IK5BEWA2ZHEJV2B33BQT2N", "length": 19597, "nlines": 55, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ३१ मार्च २००९\nलाहोरच्या पोलीस अॅकॅडमीवर दहशतवादी हल्ला, १३ ठार\nपाकिस्तानी कमांडोजच्या कारवाईत आठ अतिरेकी ठार, तर सहा जणांना जिवंत पकडले\nगेल्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा जणू पुढील भाग वाटावा, असा हल्ला आज सकाळी लाहोरजवळच्या मनावन येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर केला. सुमारे १० अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकत या केंद्रात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आतील शेकडो प्रशिक्षणार्थ्यांना ओलीस धरले. आठ तासांच्या चकमकीनंतर पाकिस्तानी कमांडोंनी चार अतिरेक्यांना ठार केले तर सहाजणांना जिवंत पकडण्यात यश मिळविले. हल्ल्यात १३ पोलीस ठार तर किमान ९० जण जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.\nठाण्यात युतीच्या मेळाव्यात राडा\n*राजाराम साळवी यांची भाजपवर आगपाखड * खुच्र्यांची फेकाफेक * उमेदवारही हवालदिल\nशिवसेनेला पाठिंबा देणारे आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांनी केलेल्या भाजपउद्धाराने आज युतीच्या मेळाव्यात चांगलाच राडा झाला. युतीच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी झालेल्या या निर्धार मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे एकच गोंधळ उडाला आणि साळवी यांना सभागृहातून काढता पाय घ्यावा लागला. पहिल्याच बैठकीत झालेल्या या राडय़ाने युतीचे उमेदवारही हवालदिल झाले.\nराष्ट्रवादीचा एक पाय युपीएच्या तर एक डाव्या आघाडीच्या दगडावर \nराजकारणाच्या कुरुक्षेत्रात शत्रुला नमवण्यासाठी विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि व्यूहरचना कराव्या लागतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण मात्र भल्याभल्यांना चकित करणारे आहे. त्याचे उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर हातात हात घालून शिवसेना भाजप युतीविरोधात लढणार आहे. मात्र महाराष्ट्र वगळता देशभरात राष्ट्रवादीने घरोबा केलेले मित्रपक्ष पूर्णत: वेगळे असून त्यांची युती काँग्रेसविरोधात उभी ठाकणार आहे.\nसारंगी महाजन यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे पूनम यांना उमेदवारी नाकारली\nईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते प्��मोद महाजन यांची कन्या पूनम यांना उमेदवारी दिली असती तर विरोधी पक्षांनी प्रमोद यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेले त्यांचे बंधू प्रविण यांच्या पत्नी सारंगी महाजन यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट भाजपच्या एका नेत्याने ‘लोकसत्ता’कडे केला. पूनम विरुद्ध सारंगी असा सामना आरोप-प्रत्यारोपांनी रंगला असता व त्याचा भाजपला देशभरात फटका बसला असता अशी भीती या नेत्याने व्यक्त केली व पूनम यांना उमेदवारी नाकारण्याची जी अनेक कारण आहेत त्यामधील हेही महत्वाचे कारण असल्याचा दावा केला.\nअभियांत्रिकी आणि आयटीची यंदाची ‘प्लेसमेंट’ लांबणीवर\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदीसदृश स्थितीमध्ये अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमधील यंदाची ‘प्लेसमेंट’ पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ‘शैक्षणिक पाया विकसित करण्याची संधी,’ अशा शब्दांत ‘प्लेसमेंट’ टाळण्याचे समर्थन केले जात असले, तरी ‘आहे त्याच नोकऱ्या टिकविण्याचे आव्हान असताना नवीन भरती करणार तरी कशी,’ असा सवाल उद्योगविश्वातून उपस्थित करण्यात येत आहे. अभियांत्रिकी-आयटी महाविद्यालये, शिक्षणसंस्थांमध्ये अंतिम वर्षांच्या अगोदरच्या वर्षांमधील मुला-मुलींच्या मुलाखती घेऊन ‘प्लेसमेंट’ देण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे.\nरामदास आठवले शिर्डीतूनच लढणार\nमुंबई, ३० मार्च / खास प्रतिनिधी\nशिर्डीपेक्षा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढायला उत्सुक असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना काँग्रेस पक्षाने शिर्डीतूनच निवडणूक लढविण्यास सांगितले आहे. पंढरपूर (राखीव) मतदारसंघातून निवडणूक लढविताना आठवले यांनी ‘विमान’ हे चिन्ह घेतले होते. या वेळी ‘विमान’ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी असल्याने ‘कपबशी’ या चिन्हाला ते प्राधान्य देणार आहेत. ‘विमान’ चिन्ह मिळाले असते तर नवी दिल्लीला लवकर पोहचलो असतो, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी व्यक्त केली. आठवले यांचा हा लोकसभेचा तिसरा मतदारसंघ आहे. योगायोग म्हणजे दरवेळी त्यांना देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघ लाभला आहे. उत्तर-मध्य मुंबईत सिद्धिविनायक, पंढरपूरमध्ये विठोबा तर आता शिर्डीत साईबाबांचा आशीर्वाद लाभणार असल्याचे मार्मिक व���धान राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आठवले यांच्याबाबत केले होते. या वेळी आठवले यांचा आग्रह दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी होता. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांकडे फिल्डिंगही लावली होती. मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा मतदारसंघ आठवले यांच्यासाठी सोडण्यास नकार दिला. त्यानुसार शिर्डीतून निवडणूक लढण्याचे आठवले यांनी जाहीर केले आहे.\nनवी दिल्ली, ३० मार्च/खास प्रतिनिधी\nसोलापूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढणार आहेत. शिंदे यांच्या उमेदवारीवर आज काँग्रेसश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. पाच वर्षांंनंतर शिंदे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उतरले असून उद्या ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अनुसूचित जातींसाठी राखीव झालेल्या या मतदारसंघात शिंदे यांची लढत भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांच्याशी होणार आहे. २००४ साली सोलापुरात झालेल्या लढतीत शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला यांना भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पाच हजार मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता.\nसंजय दत्तच्या अर्जावर निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला\nनवी दिल्ली, ३० मार्च / पी. टी. आय.\nलोकसभेची निवडणूक लढविता यावी म्हणून १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आपली शिक्षा रद्द करावी म्हणून बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याने केलेल्या याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. सरन्यायाधीश जी. के. बालकृष्णन यांच्या खंडपीठापुढे आज या अर्जावर सुनावणी झाली. सीबीआयने संजयच्या मागणीला विरोध दर्शविला. संजय दत्तचा बॉम्बस्फोटात संबंध नव्हता हे टाडा कोर्टाने मान्य केलेले आहे, असा युक्तिवाद संजयचे वकील हरिष साळवे यांनी केला.\nवरुण गांधी यांना जामीन\nपिलभीत, ३० मार्च / पी. टी. आय.\nभाजपचे वादग्रस्त युवा नेते वरुण गांधी यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात येथील स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र वरुण गांधी यांना रासुका लावण्यात आल्याने ते तुरुंगातच राहतील. मुख्य न्याय दंडाधिकारी विपिनकुमार यांच्या न्यायालयात ४५ मिनिटांच्या वादी व प्रतिवादींचे म्हणणे ऐकल्यानंतर २० हजार रुपयांचे प्रत्येकी दोन वैयक्तिक जातमुचलके भरण्यास सांगण्यात आले. रासुकाविरुद्ध वरुण गांधी हे अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.\nपोलिसांवर हल्ला; ११ दरोडेखोरांना अटक, ४५ जणांविरुध्द गुन्हा\nकारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ४५ दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील मालठाणा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली होती. मूर्तीजापूर तालुक्यातील सोनेरी शिवारातील ६० हजारांच्या दरोडय़ाचे धागेदोरे बुलढाणा जिल्ह्य़ातील मालठाणा येथील पारधी समाजाच्या वस्तीशी जुळत असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा आणि मूर्तीजापूर पोलिसांचे पथक दरोडेखोरांना पकडण्यासाठी शनिवारी रात्री मालठाणा येथे पोहोचले होते. दरोडेखोरांना पकडण्यापूर्वीच त्यांच्यावर चहूबाजूंनी दरोडेखोरांनी हल्ला केला होता. दरोडेखोरांनी केलेल्या दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले होते, त्यापैकी दोघांना जास्त मारला होता. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संकेत भोसले, जुगल भोसले, सागर भोसले, जुगनू भोसले, राहूल भोसले, वंदू पवार, सुकन्या पवार, कामिनी भोसले, ज्योती भोसले, राजकन्या पवार, चंदा पवार यांचा समावेश आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार दीपक पवार पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/ss/061211", "date_download": "2019-03-25T09:00:18Z", "digest": "sha1:2BM67SGTVYP2EHB43QSVWSYBQ3PAMBLR", "length": 11151, "nlines": 141, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी संघटक ६ डिसेंबर २०११ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nशेतकरी स��घटक ६ डिसेंबर २०११\nमुखपृष्ठ / शेतकरी संघटक ६ डिसेंबर २०११\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nGangadhar M Mute यांनी मंगळ, 06/12/2011 - 01:17 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटक ६ डिसेंबर २०११\nकापसाची दशा, दिशा आणि दुर्दशा\nकापसाचा तिढा : एक होऊन लढा\nवॉलस्ट्रीट ते लाल किल्ला व्हाया वॉलमार्ट\nअण्णांच्या देवळात अराजकाची पूजा\nवो सुबह अब तो आएगी\nक्लिक करा आणि अंक वाचा.\nपाने पलटण्यासाठी पानाच्या कीनारीवर/ काठावर क्लिक करा म्हणजे पाने पलटतील.\nतुमचे नेट स्लो असेल तर पाने दिसायला थोडा वेळ लागू शकतो. त्यासाठी प्रतिक्षा करा.\nशेतकरी संघटकचे यापुर्वीचे अंक - येथे वाचा\nपीडीएफ अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, ���पेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/06/29/poha-idli/", "date_download": "2019-03-25T08:20:36Z", "digest": "sha1:L2NUS7A5SGUJJXEHT3DHYAPO4STDMKAV", "length": 10145, "nlines": 152, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Instant Poha Idli (इन्स्टंट पोहा इडली) - Steamed Cake using Flattened Rice (No fermentation required) | My Family Recipes", "raw_content": "\nइन्स्टंट पोहा इडली मराठी\nनेहमीच्या इडली पेक्षा जरा वेगळी इडली हवी असेल तर ही पोहा इडली करून पहा. ह्याला काही वाटायला लागत नाही. अर्ध्या तासात इडल्या वाफवायला ठेवू शकता. पोह्याच्या इडल्या छान फुलतात, लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात. मी पालक घालून ही थोड्या इडल्या बनवल्या. थोड्या डिझायनर इडल्या बनवल्या. तुम्ही साध्या किंवा दुसरी काही भाजी घालून ही बनवू शकता.\nसाहित्य (२४–२५ इडल्यांसाठी )\nजाडे पोहे १ कप\nइडली रवा १ कप\nबेकिंग सोडा १ चिमूट\nतेल इडलीच्या साच्याला लावायला\nपालक ची पानं १०–१२ – कोवळे देठ असतील तर तेही घ्या\nमिरची ठेचलेली अर्धा चमचा\n१. पोहे धुवून घ्या. त्यात अर्धा कप दही घाला. मिक्स करा. पोहे बुडतील एवढं पाणी घाला. १५ मिनिटं झाकून ठेवा.\n२. आता पोहे छान नरम झाले असतील.\n३. पोहे मॅश करा / मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.\n४. त्यात इडली रवा घाला. उरलेलं दही घाला. मिश्रण बुडेल एवढं पाणी घाला. १५ मिनिटं झाकून ठेवा.\n५. मीठ घालून एकत्र करा.\n६. पालक इडली साठी – पालक धुवून मायक्रोवेव्ह मध्ये ४ मिनिटं शिजवून घ्या. पाणी घालू नका. झाकण ठेवू नका. देठ असतील तर तेही पालकाच्या पानांबरोबर घाला. मायक्रोवेव्ह नसेल तर कमीत कमी पाणी घालून पालक शिजवून घ्या.\n७. गार झाल्यावर मिक्सर मध्ये पालक ची पेस्ट करून घ्या.\n८. त्यात जिरे पूड आणि मिरची घाला.\n९.तुम्ही अर्ध्या इडल्या साध्या , थोड्या पालकाच्या आणि थोड्या मिक्स डिझायनर इडल्या बनवू शकता. त्यानुसार इडलीचं पीठ आणि पालकची पेस्ट मिक्स करा.\n१०. इडलीपात्रात पाणी गरम करून घ्या. इडलीच्या साच्याला तेल लावा.\n११. इडलीच्यामिश्रणात सोडा घालून मिक्स करा. लगेच साच्यात घालून वाफवायला ठेवा.\n१२. १२–१५ मिनिटात इडल्या तयार होतील.\n१३. चटणी, सांबार बरोबर गरम इडल्या सर्व्ह करा.\nइडलीच्या साच्यामध्ये सगळ्या इडल्या एकदम होणार नसतील तर जेवढ्या इडल्या साच्यात मावतील तेवढ्या पिठातच सोडा घाला. उरलेल्या इडल्या करायच्या आधी त्या पिठात सोडा घाला. सोडा घालून लगेच वाफवायला ठेवलं नाही तर इडल्या घट्ट होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "http://www.cnxh-electric.com/mr/", "date_download": "2019-03-25T07:25:17Z", "digest": "sha1:PEZRQNLDS6UKOGCPQMUQRUWOZCXRDUB6", "length": 6446, "nlines": 161, "source_domain": "www.cnxh-electric.com", "title": "एसी Contactor, वेळ विलंब ब्लॉक, थर्मल ओव्हरलोड रिले - XinHong", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nZhe जियांग XinHong इलेक्ट्रिक कंपनी, Xiangyang औद्योगिक क्षेत्र, Liushi, Yueqing, वेन्झहौ, Zhejiang, चीन मध्ये स्थित Ltd.is. Liushi कमी-अनियमित उपकरणे inChina राजधानी आहे. Xinhong शांघाय Kangji विद्युत उपकरण को एकत्र केली आहे ,. लिमिटेड आणि शांघाय Dikai इलेक्ट्रिक उपकरण को ,. संशोधन, विकास, उत्पादन, विक्री आणि सेवा व्यावसायिक करण्यासाठी लिमिटेड. साठी OEM सुप्रसिद्ध देशांतर्गत आणि परदेशी मोठ्या आणि मध्यम आकाराच्या उपक्रम अनेक सहकार्य .. आणि शांघाय Kangji विद्युत उपकरण को ,. लिमिटेड आणि शांघाय Dikai इलेक्ट्रिक उपकरण कंपनी, लिमिटेड Songjiang, शांघाय प्रांतात स्थित आहेत.\nCNC1-आर मालिका विशेष forwater बॉयलर 12 ~ 32R\nCNC1-एन, न्यूझीलंड आंतरबध्द contactor 09 ~ 95A\nRoHS तुरुंग पुरवणे वर उबदार अभिनंदन ...\nआंतरराष्ट्रीय बाजारात उत्पादन गुणवत्ता आमच्या आवश्यकता सुधारणा करण्यासाठी, आमच्या कंपनीच्या यांत्रिक आंतरबध्द यंत्रणा उत्पादने अलिकडे यशस्वीरित्या Delixi RoHS चाचणी पूर्ण झाली, आणि चाचण्या उत्तीर्ण झाले आहेत ...\nएसी contactor स्ट्रक्चरल वैशिष्ट्ये\n1, संरक्षण प्रकार contactor, क्रिया रचना थेट गती प्रकार आहे, संपर्क बिंदू दुहेरी ब्रेक पॉईंट आहे, लहान आकार, प्रकाश वजन, कमी वीज वापर, लांब वैशिष्ट्ये आहे ...\nउष्णता रिले प्रती तत्त्व काम\nथर्मल रिले काम तत्त्व चालू गरम घटक मध्ये वाहते व्युत्पन्न उष्णता आहे, तो एक क पोहोचते विकृत रूप तेव्हा bimetal, विस्तार विकृत रूप विविध गुणांक आहे ...\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत.\nआता आम्हाला कॉल करा: 0577-62756010\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-dangerous-journey-school-students-latur-4115", "date_download": "2019-03-25T07:44:41Z", "digest": "sha1:7KSNFCSS2IFAPKGDVVZDA6H7H7DMAFHY", "length": 5736, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news dangerous journey of school students at latur | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(VIDEO जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\n(VIDEO जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\n(VIDEO जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\n(VIDEO जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nजीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\nVideo of जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..\nशाळेत जाण्यासाठी लातूरमधील विद्यार्थी जीव धोक्यात घालून कसा प्रवास करतात याचा एक व्हिडिओ समोर आलाय. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हा व्हिडिओ असून निलंगा तालुक्यातल्या केळगाव, निटूर, राणी, अंकुलगा, खड़क उमरगा या मार्गावर एसटीच्या फे-या कमी आहेत. एसटीत जागा नसल्याने ड्रायव्हर एसटी थांबवत नाही. त्यामुळं शाळेत जाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागते.\nशाळेत जाण्यासाठी लातूरमधील विद्यार्थी जीव धोक्यात घालून कसा प्रवास करतात याचा एक व्हिडिओ समोर आलाय. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हा व्हिडिओ असून निलंगा तालुक्यातल्या केळगाव, निटूर, राणी, अंकुलगा, खड़क उमरगा या मार्गावर एसटीच्या फे-या कमी आहेत. एसटीत जागा नसल्याने ड्रायव्हर एसटी थांबवत नाही. त्यामुळं शाळेत जाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागते.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day/articleshow/66704559.cms", "date_download": "2019-03-25T08:55:11Z", "digest": "sha1:WNSSAVRMCH32YPE6D5CQS5TNHVU4YMMB", "length": 6852, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jokes in marathi News: बसून घ्यावं - joke of the day | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा सं��ली...आता सुट्टीत काय कराल\nजर दोन माणसं हाणामारी करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की,...\nखाली बसून घ्यावं. म्हणजे तुमच्या मागे असणाऱ्यांनाही नीट दिसेल.\nमिळवा हसा लेको बातम्या(jokes in marathi News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njokes in marathi News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपाहा: प. बंगालमधील बेलूर मठाच्या घाटाला लाटांचा जोरदार तडाखा\nहसा लेको याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/dead-loan-solution-reserve-bank-india-140180", "date_download": "2019-03-25T08:29:20Z", "digest": "sha1:E5NCNYOHGWWTQVLGUUBUTUJ7G4TH2UAB", "length": 11954, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "dead loan solution reserve bank of india बुडीत कर्जांच्या तोडग्यासाठी मुदतवाढ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nबुडीत कर्जांच्या तोडग्यासाठी मुदतवाढ\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nमुंबई - बुडीत कर्जांवर तोडगा काढण्यासाठी बॅंकांना आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.\nरिझर्व्ह बॅंकेने दिलेली १८० दिवसांची मुदत सोमवारी (ता.२७) संपुष्टात आली. त्यामुळे बुडीत कर्जखाती दिवाळखोरीसाठी वर्ग करावी लागणार होती. मात्र, आता १५ दिवसांची वाढीव मुदत मिळाली असल्याने बॅंकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बॅंकांनी कायदेशीर सल्लागार आणि बुडीत कर्जांबाबत तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून बुडीत कर्जांवर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.\nमुंबई - बुडीत कर्जांवर तोडगा काढण्यासाठी बॅंकांना आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.\nरिझर्व्ह बॅंकेने दिलेली १८० दिवसांची मुदत सोमवारी (ता.२७) संपुष्टात आली. त्यामुळे बुडीत कर्जखाती दिवाळखोरीसाठी वर्ग करावी लागणार होती. मात्र, आता १५ दिवसांची वाढीव मुदत मिळाली असल्याने बॅंकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बॅंकांनी कायदेशीर सल्लागार आणि बुडीत कर्जांबाबत तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून बुडीत कर्जांवर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.\nआश्रमशाळा, महिला बचत गटांना कमी दरात साखर\nपुणे - राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहे, आश्रमशाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, कारागृहे आणि प्रशिक्षण...\nकारखान्यांकडून एकरकमी ‘एफआरपी’बाबत मौन\nकाशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम...\nमच्छीमारांची जाळी पाच महिने रिकामी\nमालवण - विनाशकारी एलईडी मासेमारीला बंदी असतानाही जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी तसेच हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे मासेमारी सुरू आहे. यामुळे...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्चितच...\nमुंबई - आर्थिक संकटाच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या ‘जेट एअरवेज’ला सावरण्यासाठी बॅंकांनी पुन्हा एकदा कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘जेट एअरवेज’चे...\nधगधगत्या आगीत होरपळतोय आम्ही\nपिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/fasting-various-demands-behalf-dhangar-community-136953", "date_download": "2019-03-25T08:33:49Z", "digest": "sha1:AZVNHFYNVTO5OEYZ4XX5TB22R3A6ULN2", "length": 9938, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fasting for various demands on behalf of Dhangar community धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nधनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nबारामती: धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) पुण्यातील विधानभवनापुढे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच आता धनगर बांधवही आपल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणार आहेत. येत्या 8 सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य न झाल्यास चौंडी येथे धनगर समाजाच्या वतीने महामेळावा घेण्यात येणार आहे.\nबारामती: धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) पुण्यातील विधानभवनापुढे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच आता धनगर बांधवही आपल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणार आहेत. येत्या 8 सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य न झाल्यास चौंडी येथे धनगर समाजाच्या वतीने महामेळावा घेण्यात येणार आहे.\nआज झालेल्या लाक्षणिक उपोषणास विश्वास देवकाते, रामराव वडकुते, रमेश शेंडगे, बाळासाहेब गावडे, रामदादा गावडे, मदनराव देवकाते, बाळासाहेब करगळ, सुभाष खेमणार, किशोर मासाळ, शशिकांत तरंगे यांच्यासह अनेक प्रमुख उपस्थित होते.\nगेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून या बाबत वेळोवेळी आश्वासने दिली जातात, प्रत्यक्ष कार्यवाही काही होत नसल्याने आज पुण्यात विधानभवनाबाहेर उपोषण करुन सरकारला इशारा देण्यात आला आहे. धनगर समाज हा घटनेने दिलेल्या अधिकारानुसार अनुसूचित जमातीत असतानाही अन्याय होत असून विविध मागण्या मान्य होत नसल्याची तक्रार धनगर बांधवांकडून केली गेली.\nसरकारला जो पर्यंत जाग येत नाही तो पर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आ���ण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/alibaba-founder-jack-ma-is-resigning-his-company-for-teaching/", "date_download": "2019-03-25T07:22:07Z", "digest": "sha1:DQIKADPG3XZT3ADMTHDWUO7H757IXDBF", "length": 22760, "nlines": 129, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nचीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतात पूर्वी राजे महाराजे एका विशिष्ट वेळी आपलं भलं मोठं साम्राज्य त्यागून ते आपल्या पुत्रांच्या अथवा वारसांच्या हाती सोपवून आपलं उर्वरित आयुष्य हे शांततेत तपश्चर्या आणि देवाचं नामस्मरण करण्यात घालवायचे. योग्य वेळी ते स्वतःला रिटायर करायचे.\nप्राचीन भारतीय संस्कृतीचा हा ट्रेंड आज कोणी भारतात फॉलो करतंय का नाही माहिती नाही. पण चीनचा एका जगप्रसिद्ध उद्योजकाने ह्या मार्गाचा अवलंब करत आदर्श घालून दिला आहे.\nनुकताच चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने त्याच्या ५४ व्या वाढदिवशी त्याच्या जगप्रसिद्ध कंपनीच्या कार्यकारी अधिकारी पदावरून २०२० च्या वर्ष अखेर पर्यंत पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे जॅक मा आणि त्याच्या प्रसिद्ध कंपनीचे नाव आहे “अलिबाबा”. जी सध्याच्या घडीला जगातल्या काही सर्वश्रेष्ठ ऑनलाइन रिटेल मार्केट जायंट्स पैकी एक आहे.\nजॅक मा हे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. ते खूप मोठे वक्ते देखील असून जागतिकीकरण तसेच अनेक आर्थिक विषयांवर त्यांचा जागतिक चर्चासत्रात सहभाग असतो.\nजॅक माँ यांचा अलिबाबाच्या मोठ्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय त्यांच्या ४२० दशलक्ष डॉलर इतक्या किंमतीच्या कंपनीसाठी नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे. ह्या जगातल्या काही मोठ्या कंपनीपैकी एक असलेल्या कंपनीला जॅक मा यांनी स्वतः उभारलं आहे.\nजॅक माँ यांच्या कथेची सुरुवात हाँगझोऊ शहरात झाली, जे चीनच्या पौर्वात्य सीमेवर असून जिथे १० दशलक्ष लोक वास्तव्यास आहेत. जॅक माँ यांचा जन्म १९६४ साली एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या शारिरीक वाढीवर त्यांचे शाळकरी सवंगडी चिडवायचे, मा त्या पोरांसारखे धष्टपुष्ट नव��हते. परंतु मा कधीच बिथरले नाही, ना त्यांनी कधी मित्रांच्या धमक्यांना भीक घातली.\nमा ह्यांना इंग्रजी भाषा अवगत नव्हती. त्यांच्या शहराला भेट देणाऱ्या परदेशी प्रवाश्यांना ते संपूर्ण शहराचे दर्शन इंग्रजी शिकवण्याचा अटीवर करत होते. त्यांनी त्यानंतर एक रेडियो विकत घेतला व त्यावर चालणाऱ्या प्रोग्राममधून आपला इंग्रजी भाषेवरील प्रभाव वाढवला. त्यांनी मैत्री केलेल्या एका प्रवाशानेच त्यांना ‘जॅक’ हे नाव दिले.\nशालेय शिक्षण झाल्यावर मा यांनी महाविद्यालयीन शिक्षणाला अर्ज केला. त्यांना गणितात कमी मार्क्स मिळाल्यामुळे ते एकदा नव्हे तर दोनदा चीनच्या महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेत फेल झाले. तिसऱ्या प्रयत्नात ते पास झाले. त्यांनी १९८८ ला हाँगझोऊ टीचर्स इन्स्टिट्यूट मधून पदवी संपादन केली.\nमा यांनी त्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जॉब्ससाठी अर्ज केला. पण निराशा पदरी पडत होती. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यापासून वेटर पर्यंतच्या नोकरीला अर्ज केला होता. ह्या संपूर्ण अनुभवातून जॅक मा एक धडा शिकले ज्याने त्यांना त्यांचा उद्योजकतेच्या युगासाठी तयार केले.\nतो धडा होता ” अपयशाची सवय करून घेणे आणि त्यातून शिकणे”.\nत्यानंतर मा यांना एका शाळेत इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची नोकरी मिळाली. ज्यातून त्यांना महिन्याला १३ डॉलर अर्थात २००० रुपयांची कमाई होत होती.\n१९९५ ला त्यांनी अमेरिकेला भेट दिली आणि त्यांचा संबंध इंटरनेटशी आला. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडत, हजार रुपयांचे कर्ज घेत इंटरनेटवर चायनीज पेज चालू केले. ती पेजेस चीन मधील पहिली इंटरनेटवर व्यवहार करण्याचं साधन होती. त्यासाठी मा ने हाँगझोऊ टेलिकॉमसोबत करार केलेला. पण नंतर त्यावर बंदी घालण्यात आली.\nजॅक मा यांनी पुढे अलिबाबाची स्थापना केली. त्यांनी न्यू यॉर्क स्टोक एक्सचेंज मध्ये नोंदणी केली. पण तिकडे ही त्यांना निराशा पदरी पडली. मग त्यांनी त्यांच्या १७ मित्रांना तयार करत त्यांच्याकडून निधी घेऊन आपल्या कल्पनेला नावारूपाला आणलं.\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा”\n५५०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २४ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा\nत्यांनी ६०००० डॉलरची उभारणी अलिबाबा.कॉमच्या माध्यमातून केली. मा ने त्याच्या कंपनीचे नाव सॅन फ्रान्सिस्क���च्या कॅफेत अलिबाबा आणि चाळीस चोर ह्या कथेला वाचत असताना दिलं होतं.\nकाही महिन्यात अलिबाबाची प्रगती होत गेली. जॅपनीज टेलिकॉम कंपनी आणि गोल्डमन सॅक कडून त्यांच्या प्रकल्पाला २५ दशलक्ष डॉलरचा निधी मिळाला. २००३ ला अलिबाबाने त्यांची कॉम्पिटेटर असलेल्या इबेला मागे टाकलं. अलिबाबाची प्रगती बघता याहूला त्यांनी ४०% स्टॉक विकत घ्यायला भाग पाडले. ते सुद्धा १ अब्ज रुपयांच्या अवाढव्य किमतीला\nसुरुवातीच्या काळात केलेल्या चांगल्या कार्यामुळे अलिबाबाला लाखो ग्राहक मिळाले आणि जगातील सर्वात मोठी टेक कंपनी म्हणून अलीबाबाचा उदय झाला. व्यापाऱ्यांना याद्वारे त्यांचे सामान विकणे सोपे झाले. जगभर अलिबाबाचे जाळे विस्तारले.\n२०१४ ला कंपनी पब्लिक झाली. त्यातून त्याने २५ बिलियन डॉलरची संपत्ती वॉल स्ट्रीट वर उभी केली. जी आजवरच्या इतिहासात सर्वोच्च होती.\nअलिबाबा आज जगातील खूप मोठी कंपनी असून तिचा व्यापार जगभर विस्तारला आहे. अमेझॉन जी अलिबाबाची प्रतिस्पर्धी आहे तिने आता व्हिडिओ, ऑनलाइन पेमेंट आणि क्लाउड सर्व्हिसच्या क्षेत्रात धाव घेतल्याने अलिबाब देखील तिकडे इन्व्हेस्ट करणार आहे.\n२०२० ला मा अलिबाबच्या प्रमुख पदावरून पाय उतार होतील. त्यांचे जवळचे सहकारी असलेले डॅनियल झंग यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. जॅक मा यांनी सूचक विधान करत स्वतःच्या थांबण्याची घोषणा केली. ते विधान होतं ” No Company Can Rely Solely On Its Founders”. त्यांनी हे वाक्य अलिबाबाच्या ग्राहकांना व शेयर धारकांना उद्देशुन म्हटलं व आपल्या निर्णयाची त्यांना कल्पना दिली.\nजॅक मा हे यापुढे काय करणार असं विचारलं असता ते पुन्हा टिचिंग प्रोफेशनकडे वळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवू इच्छित आहेत.\nयाउपर अजून ते स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेणार आहेत. ह्यासाठी त्यांनी उघडलेल्या जॅक मा फाउंडेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहेत. सामाजिक समस्या, पर्यावरण आणि आरोग्य ह्या विषयात लक्ष घालणार आहेत.\nजॅक मा हे खरंच आदर्शवत असून त्यांनी केलेलं असामान्य कार्यच नव्हे तर कुठे थांबावं याचा घालून दिलेला परिपाठ खूप काही शिकवणारा आहे.\n६२ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात +१००९ वेळा आलेलं अपयश = जगप्रसिद्ध फूड चेन\nचहाच्या प्रे��ापायी नोकरी सोडून टाकले चहाचे दुकान; ज्यातून उभा झाला २२७ कोटीचा व्यवसाय\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारतातील ‘ह्या ‘ठिकाणी मेल्यानंतरही भरावा लागतो ‘टॅक्स’, त्याशिवाय होत नाही अंतिम संस्कार\nरुपयाचं “अवमूल्यन” झालेलं पाहून वाईट वाटतंय थांबा ही खरंतर “गुडन्यूज” आहे\nनेदरलँडच्या पंतप्रधानांचा आदर्श भारतातील प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवा..\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा”\n2 thoughts on “चीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय\nरशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा हा रोमहर्षक प्रवास पाहून जगात काहीच अशक्य नसल्याची खात्री पटते\nकंडोमचा शोध लागला नव्हता तेव्हा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या गेल्यात या विचित्र पद्धती \nसह्याद्री मधला माजोरडा झिंगाट\n“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग\nतुमच्या नखावर असलेले अर्धचंद्र तुमच्याबद्दल काय गुपित सांगत असतात\nकारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या ‘शेर शाह’ची गोष्ट\nराजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’\nसामोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे कसे ओळखाल \nकंटाळवाणं काम रंजक करण्याचा वस्तुपाठ : हा विमानतळ कर्मचारी सर्व प्रवाश्यांचं मन जिंकतोय\nअहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती\nविमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई का करण्यात येते\nप्रत्येक विमानात राखीव असणाऱ्या या ‘खास’ सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\n“प्रिये” ट्रेंड मागची प्रेरणा तुम्हाला माहितीये का\nकाशिनाथ घाणेकरांच्या “कडsssक” वरूनच अनिल कपूरच्या “झकाsssस” चा जन्म झाला होता\nकाश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर आणि भारतीय जनमानस १\nमोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\nकेरळ मध्ये उभं राहतंय त्रेता युगाची सफर घडवून आणणारं ‘जटायू पार्क’\n“इस्लामबाह्य” म्हणून क्रूरपणे उध्वस्त केलेल्या बामियान बुद्धांच्या मूर्त्यांबद्दल जाणू�� घ्या..\nपावसाळ्यात रस्ते खराब होण्यामागचं खरं कारण हे आहे…\n“मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/blog-post_86.html", "date_download": "2019-03-25T07:46:26Z", "digest": "sha1:KOXAIXTUX2EAJPOKYKQQF3OJ4JRDJVIZ", "length": 6428, "nlines": 135, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तू , मी अन पाऊस ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतू , मी अन पाऊस\nतू , मी अन पाऊस\nसोबत छत्री नको घेऊस\nबरसू दे थेंबांना अंगावर\nनिथळू दे त्यांना गालावरून\nमाझ्याकडे तू पहात असतांना\nओघळू दे त्यांना पापण्यांवरून\nहे अनमोल क्षण प्रितीचे\nनको तू हिरावून घेऊस\nतू , मी अन पाऊस\nसोबत छत्री नको घेऊस\nझोंबेल वारा झोंबू दे\nगारवा मनात पसरू दे\nगंध मातीचा तुझ्या सवे\nमनात माझ्या भिनू दे\nघेण्या हातात हात माझा\nआज तू नको लाजूस\nतू , मी अन पाऊस\nसोबत छत्री नको घेऊस\nजवळ जराशी ये जरा\nअधून मधून खेट जरा\nतुझ्या त्या मोहक स्पर्शाने\nअंगी वीज चमकेल जरा\nगारवा दूर पळून जाईल\nनको तू भानावर येऊस\nतू , मी अन पाऊस\nसोबत छत्री नको घेऊस\nस्पर्श कधी नजरेचा तुझा\nबेधुंद करेल माझ्या मना\nबेभान होऊन जा तूही\nओंजळीत घे या क्षणा\nया क्षणांना उरांत भरुनी\nजन्मो जन्मीच्या शपथा घेऊ\nतू , मी अन पाऊस\nसोबत छत्री नको घेऊस..\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/anand-anand/", "date_download": "2019-03-25T08:43:29Z", "digest": "sha1:NLBHSBKVKUFESYIVNRTIIW4AZECJPIZY", "length": 5825, "nlines": 61, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nआनंद आनंद अवघा आनंद आगळा\nआनंद आनंद अवघा आनंद आगळा\nगोविंद गोविंद अवघा मुकुंद सावळा\nबहुता दिसांचे तप ये फळाला\nआनंद आनंद अवघा आनंद आगळा.\nधावुनी भक्तासाठी घननीळ वोळला, कृष्णघन वोळला\nबाहेरी भीतरी अवघा आनंद सोहळा\nआनंद आनंद अवघा आनंद आगळा\n'संत ज्ञानेश्वर' या संत पटात जास्त करुन ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचाच उपयोग केला गेला होता. तरीही 'आनंद आनंद अवघा' हा आठवल्यांनी लिहिलेला अभंग चपखल बसला आणि 'आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे' ह्या खास ग्रामीण थाटाच्या बैलगाडी हाकतानाच्या गाडीवानाच्या गाण्याने मजा आणली.\nया चित्रपटाचे वेळी ज्ञानेश्वरीशी झालेली ओळख आठवल्यांनी वाढवली, जोपासली. इतकी की पुढे त्यांनी ज्ञानेश्वरीच्या त्यांच्या अभ्यासातून \"ज्ञानदेवीची आराधना\" या नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहिला.\nआम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे\nआनंद आनंद अवघा आनंद आगळा\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/page/28/", "date_download": "2019-03-25T08:09:35Z", "digest": "sha1:ZXFDNANY6HOT3R7A4AXVQSSIZBUH5OJW", "length": 16176, "nlines": 187, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Marathi Kalakar - Marathi Movies & Marathi Television News", "raw_content": "\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nमराठीतील गुणी अभिनेत्री पूजा सावंतने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली...\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“घाडगे & सून” ही कलर्स मराठीवरील मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत...\nअतुल कुलकर्णी साकारत आहेत”हि”थ्रिलर वेबसिरीज.वाचा अधिक.\nअप्रतिम परफॉर्मन्स आणि कलाकारीसाठी ओळखले जाणारे ख्यातनाम अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अनेक भाषांमध्ये आजवर काम केले...\nग्लॅमरस अंदाजात अभिनेत्री दिप्ती देवी.पहा फोटोज.\nहिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दीप्ती देवीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. ‘कंडिशन्स...\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nसस्पेन्स आणि रहस्यमयी “मिरांडा हाऊस”चा टिझर.\nसध्या मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोग होत आहेत. आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत...\nपहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.\nसिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी...\nआणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.\n“अजूनही चांद रात आहे ” या मालिकेतील रेवा फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे....\nसाऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.\nसामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या ‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित...\nफॅन्सच्या लाईक्स मिळतायंत सोनालीचे कुलकर्णीचे”हे”फोटोज.\nगेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही...\nयुथफूल “आम्ही बेफिकर”२९ मार्चला प्रदर्शित होणार.\nखूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर...\nअ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८\nशिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट आगामी फर्जंद मराठी सिनेमा\nमहाराष्ट्राला इतिहासाची उजवल परंपरा लाभली आहे. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. शिवकालीन पराक्रमी मावळे...\n‘बकेट लिस्ट’ मराठी मूवी ट्रेलर\nमाधुरी दिक्षितला पडद्यावर पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. बराच वेळ ग्लॅमरपासून दूर असलेली माधुरी आता लवकरच...\nभाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ह्रिषिकेश जोशी स्टारर सायकल होतोय ४ मे ला प्रदर्शित\nसायकल वर आधारित एक भावपूर्ण कथा आगामी सायकल हा सिनेमा घेऊन येत आहे. सिनेमाचं ट्रेलर नुकतंच...\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nपोस्टर आणि टिझर लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित शिकारी शेवटी ह्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. वेगळ्या...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nमराठी सिनेमाने वेगवेगळ्या विषयांवर दमदार भाष्य केलं आहे. साचेबद्धपणा सोडून प्रशंसनीय सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत....\nवास्तववादी भाष्य करतोय अट्रॉसिटी\nवास्तववादी सिनेमा समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतो. अशाच वास्तववादी धर्तीवर बनलेला अट्रॉसिटी हा...\nनेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात\nछोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही....\nआणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.\n“अजूनही चांद रात आहे ” या मालिकेतील रेवा फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे....\nएक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं\nमोठी उत्कंठा, चर्चा आणि गाजावाजा झाल्यानंतर महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांचा आगामी शिकारी 20 एप्रिल रोजी...\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\nमिस अर्थ इंडिया-फायर हा किताब मिळवणारी महाराष्ट्राची लेक हेमल इंगळे. २०१६ साली तिने हा पुरस्कार मिळवला...\nथंडी संपतेय बरं का आणि हळूहळू आता सूर्य आग ओकून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल देतोय. पण सध्याच्या...\nआता प्रेक्षकांच्या मनासारखं करू विश्व् दौरा फसलाच भाऊ कदम, कुशलची कबुली\nतुम्हा आम्हा सगळ्यांना खळखळून हसवणारा एक कॉमेडी शो, महाराष्ट्रातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात जागा करून...\nकधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर कधी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसाऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.\n“वेडींगचा शिनेमा”तील नवं गाणं प्रदर्शित.”माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हा”.\nप्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची” कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.\n“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/dr-bharat-patankar-comment-on-sambhaji-bhide-guruji-1/", "date_download": "2019-03-25T08:02:16Z", "digest": "sha1:KZMD26SK2V3TPV4XQOKACMB3LMPOBKHR", "length": 5802, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे अन्यायग्रस्तांची क्रूर चेष्टा झाली - डॉ. भारत पाटणकर", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nभिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे अन्यायग्रस्तांची क्रूर चेष्टा झाली – डॉ. भारत पाटणकर\nटीम महाराष्ट्र देशा: देवाने, संतांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही. मात्र, सद्यःस्थितीत त्याउलट कारभार सुरू असून, देवाला वंदन करतानाही जातीभेद केला जातो, असा दावा करत यापूर्वीच्या सरकारसह आत्ताच्या सरकारसोबत यासाठी लढा सुरू आहे. मात्र, पत्रव्यवहाराची भाषा सरकारला समजत नाही. त्यामुळे आता आंदोलन करून विशिष्ट लोकांमधून देवाला मुक्त केले जाणार आहे. त्यासाठीच कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक घेऊन गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल��याची सांगत मनोहर भिडे गुरुजींनी अट्रॉसिटीबाबत चुकीचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे अन्यायग्रस्तांची क्रूर चेष्टा झाली आहे. त्यामुळेच त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.\nसावरघर (ता. पाटण) येथील श्रमिक मुक्ती दलाचे 21 व्या अधिवेशनावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष वाहरू सोनावने, संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, सुभेदार मेजर बन यावेळी उपस्थित होते.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nआपण भारतात राहतो का बनाना रिपब्लिकमध्ये; शॉटगनने पुन्हा डागली भाजपवर तोफ\nगांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-lekh-mi-marathi-majhi-marathi_20.html", "date_download": "2019-03-25T07:44:53Z", "digest": "sha1:BZVM4G2C46CVAVCFYDEANE734HQNJILW", "length": 13387, "nlines": 150, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आम्ही लाजा विकल्या...???? ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nआत्मसन्मान कधीचाच सोडून दिला,\nशिवराय हे नाव स्वतःच्या गरजेपुरतेच वापरतो हे परत सिद्ध केलं आम्ही,\nषंढपणाच्या पांघरुणात आम्ही सुखनैव निद्राधिन झालोय.\nछत्रपती शिवाजी महाराज हे नाव आम्हाला कधीच पेललं नव्हतं आणि पुढेही ते पेलवणार नाहीच हे आता तरी जगजाहीर मान्य करूया.\n\"शिवाजी महाराज की जय\" असं बेंबीच्या देठापासून तारस्वरात ओरडलं की आमचा आत्मा स्वर्गात पोहोंचतो.\nमहाराज माझ्या जातीचे, माझ्या धर्माचे म्हणून माझे आवडते, बाकी तसं राजांशी आमचं काही देणं घेणं नाही.\nखरंच महाराजांना, त्यांच्या दूरदृष्टीला मानणारे आम्ही असतो तर ज्या राजाच्या नावाने आम्ही छाती फुगवतो, गाड्या रंगवतो, मिजाशी करतो, त्या राजाची राजधानी शिवतीर्थ रायगड अशी प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्याच्या खचात खितपत पडलेली असताना अन्न-पाणी तरी आमच्या घश्याखाली कसं उतरलं असतं.\nमि���्रहो हाच तो किल्ले रायगड ज्याने महाराजांच्या राज्याभिषेकाचे सारथ्य केले, पोलादी पंखाखाली स्वराज्य रक्षिलं, गडपती शिवछत्रपतींनी स्वतःचा चंदन देह ठेवला तोही ह्याच गडावर. स्वतःच्या कातड्याचं आवरण जरी रायगडला घातलं तरी त्यांचे उपकार फिटायचे नाहीत.\nजगाच्या पाठीवर कुठेही असा राजा आणि त्यांची अशी बुलंद राजधानी असती तर तिथल्या लोकांनी ती सोन्याने मढवली असती.\nआणि तुम्ही आम्ही असे कपाळकरंटे- कर्मदरिद्री.\n\"महाराज, पुन्हा जन्माला या.\" म्हणून,\nकश्याला यायचं परत महाराजांनी त्यांच्या प्राणप्रिय गडांची ही अशी विकलांग अवस्था पाहायला\nप्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यात भेसूर बनलेला रायगड टाहो फोडतोय \"मला वाचवा\" म्हणून.\nसाला आपणच षंढ झालोय,\nनाहीतर रायगडावर दारू नेण्याची कोणा भ्याडाची हिम्मतच कशी झाली असती.\nमागे रायगडी महाराजांच्या मूर्तीवर अंधार असतो म्हणून महाराष्ट्रभरातील काही शिवभक्त संघटनांनी मिळून आंदोलन छेडलेलं, एका दिवसात गडावर महाराजांच्या मूर्तीबाजूला विजेची सोय झाली, पण पुन्हा \"पहिले पाढे पंचावन\" अशी अवस्था झालीय. होळीच्या माळावरची मूर्ती परत अंधारात लोटली गेलीय.\nमहाराजांच्या गडावर महाराजांनाच उपरं करतोय आपण.\nमहाराजांची समाधी अक्ख्या देशाचं शक्तीपीठ,\nतिथला वीजपंप गेली कित्त्येक महिने बंद आहे, समाधीस्थळाभोवतीची सगळी हिरवळ केंव्हाच सुकून गेलीय.\nआणि या उलट बाजारपेठेमागे हत्तीखाण्यात पुरातत्वखात्यातील ऑफिससमोर मात्र पाणी कायम खेळतं आहे. बाग बनवली जातेय तिथे. पंचतारांकित हॉटेल वाटावं असं ऑफिस बांधलंय गडावर. फरशीला रेड कार्पेट अंथरलीय, काचेचे विविध आकाराचे ग्लास ठेवलेत रायगडावर, कशाला म्हणून विचारल्यास सांगतात पाणी प्यायला. आता पाण्यात काय मिसळत असतील हे सांगायलाचं नको.\nबिनदिक्कत प्लास्टिक कचरा जाळला जातो गडावर.\nरोपवे तर शाप आहे रायगडाला लागलेला,\nसगळी दारू तिकडूनच गडावर येते.\n\"तपासणी करा\" म्हणून सांगितलं तर म्हणतात ते आमच्या हातात नाही. चार पैसे जास्त मिळावे म्हणून बिनदिक्कत गडावर दारू जाऊ दिली जाते.\nआता वेळ दडवून फायदा नाही.\nआपल्यात थोडंही स्वत्व आणि महाराजांप्रती आदर शिल्लक असेल तर गटा-तटाचे राजकारण दूर लोटून सर्व ताकदीनिशी हे कार्य ऐरणीवर घ्यायला हवं.\nपुरातत्व खात्याकडून नको तिथे नियम दाखवले जा��ात,\nसरकारकडून नको तिथे पोलिस यंत्रणा ठेवली जाते. मग दोन पोलिस रोपवे जवळ का नसावेत\nतिथे पिशव्यांची तपासणी का होऊ नये\nरोप-वे सांभाळणाऱ्या संस्थेकडून रोप-वे मधून दारूची वाहतूक होणार नाही असं लेखी का घेतलं जाऊ नये\nमित्रहो परत एकदा ऐकीची वज्रमुठ आवळायची वेळ आली आहे.\nही छायाचित्र बिनदिक्कत वापरा,\nसोशल मिडियावर वादळ उठवा,\nभटक्यांनी या विषयावर ब्लॉग लिहा,\nआता हा विषय असा हवेत सोडायचा नाही. याचा तुकडा पाडायचाच.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.bharatavani.in/bharatavani-knowledge-through-indian-languages/", "date_download": "2019-03-25T07:42:00Z", "digest": "sha1:6ZSJQPKTUB2L4AV5CIWPLRVGHK7KDWRX", "length": 5696, "nlines": 146, "source_domain": "marathi.bharatavani.in", "title": "Bharatavani: Knowledge Through Indian Languages | भारतवाणी (Marathi)", "raw_content": "\nभारतवाणी | भारतवाणी | Bharatavani\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूरु द्वारा कार्यान्वित\nभारतीय भाषाओं द्वारा ज्ञान\nराष्ट्रीय सल्लागार समिती (सामग्री)\nराष्ट्रीय सल्लागार समिती (तंत्रज्ञान)\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nभारतवाणी एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश मल्टिमिडीयाचा (पाठ, ध्वनी, दृश्य आणि चित्र) उपयोग करून भारतातील सर्व भाषांबाबत आणि भारतीय भाषांमध्ये उपलब्ध ज्ञानाला एका पोर्टलवर (प्रवेशद्वार)उपलब्ध करून देणे आहे. हे संकेतस्थळ समावेशी, संवादात्मक आणि गतिशील असेल. डिजिटल इंडियाच्या या युगात भारताला मुक्त ज्ञानाचा समाज बनवण्याची ही कल्पना आहे.\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूर द्वारा कार्यान्वित, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार की एक परियोजना\nभारतवाणी अॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-girish-bapat-app-information-technology-88851", "date_download": "2019-03-25T08:31:55Z", "digest": "sha1:ZILR2UNE7F3OQ3SEIVXPG3OQ4MSXYVCK", "length": 20466, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Nagpur News Girish Bapat App Information Technology मंत्री बापट यांच्या तीन वर्षांच्या अहवालाचे व अॅपचे अनावरण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमंत्री बापट यांच्या तीन वर्षांच्या अहवालाचे व अॅपचे अनावरण\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nनागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार आहेत.\nनागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार आहेत.\nया अॅपचे उदघाटन आज नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर येथे कार्यरत असणारे 'जय महाराष्ट्र' या वृत्त वाहिनीचे ज्येष्ठ कॅमेरामन दिनेश सातपुते यांच्या हस्ते झाले. हे अॅप ड्रीमवेअर्झ कंपनीचे रोनीत वाघ व पुष्कर गायकवाड यांनी तयार केले आहे. यावेळी मंत्री श्री. गिरीश बापट यांच्या तीन वर्षाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या‘तीन वर्षाचा सार्थक प्रवास: सर्वांगीण विकास’ या अहवालाचे प्रकाशनही जगन्नाथ बाजीराव बोरकुटे रा. गडचिरोली तसेच नानाजी माधवराव बेले (रा.अंबाडा, ता.नरखेड, नागपूर) या दोन सर्वसामान्य ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श मंत्री श्री. बापट यांनी समाजापुढे मांडला.\nमंत्री श्री. बापट हे आमदार असल्यापासूनच त्यांची मुंबई व पुणे येथील कार्यालये सीसीटीव्हीने जोडली आहेत. याद्वारे त्यांच्या भेटीसाठी येणारे लोक तसेच कार्यालयातील कामकाजावर ते लक्ष ठेवतात. मात्र आता या अॅपमुळे श्री. बापट यांना आपल्या मतदारांशी व जनतेशी कायम ‘कनेक्ट’ राहता येईल तसेच नागरिकांनाही आता मंत्र्यांना भेटण्याची वेळ घेणे सोपे जाईल पर्यायाने, त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. याविषयी अधिक माहिती देताना वाघ यांनी सांगितले की, या अॅपच्या माध्यमातून संबंधित नागरिकाला मंत्री बापट यांना भेटीसाठी वेळ घेता येईल. वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस याबाबत 'एसएमएस' द्वारे माहिती दिली जाईल. काही कारणास्तव भेट रद्द झाल्यास त्याबद्दल ही त्या व्यक्तीला कळविण्यात येईल. एखाद्या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक नियोजित केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती कळवली जाईल.\nकार्यक्रमाला अथवा बैठकीला जाणे मंत्री बापट यांना शक्य होत नसल्यास त्याबाबत संबंधितांना कळविण्यात येईल. एकंदरीतच कार्यालयीन तसेच दैनंदिन कामकाजातही सुसूत्रता आणण्यासाठी या अॅपचा प्रचंड फायदा होईल. हे अॅप ‘Girish Bapat’ या नावाने प्ले स्टोरवर उपलब्ध असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमाचा हा एक भाग आहे. नागरिकांशी संवाद वाढविण्याबरोबरच आपल्या खात्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे, हा देखील अॅप सुरू करण्यामागील मंत्री बापट यांचा उद्देश असल्याचेही वाघ यांनी सांगितले. अॅप प्रमाणेच गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची सविस्तर माहिती जनतेला ‘तीन वर्षाचा सार्थक प्रवास: सर्वांगीण विकास’ या अहवालाच्या माध्यमातून पालकमंत्री गिरीश बापट जनतेला देणार आहेत.\nया अहवालात प्रामुख्याने पुण्याच्या विकासासाठी केलेली कामे तसेच अन्न, औषध, प्रशासन व नागरी पुरवठा खात्यात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यामध्ये पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोड, पुणे मेट्रो, यासारखे निर्णय, इंडस्ट्रीयल हब हिंजडी येथील समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पीएमआरडीए, जलव्यवस्थापन, विकास आराखडा ,घनकचरा व्यवस्थापन, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मृतिस्थळ करणे, देहू- आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकास, पुणे आणि पिंपरी चिंचवड 'स्मार्ट सिटी' करण्याबाबत केलेले प्रयत्न आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.\nअन्न व नागरी पुरवठा तसेच अन्न व औषध प्रशासन आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून त्यांनी हृदय शस्त्रक्रिया साठी लागणारे स्टेंट स्वस्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, तीन वर्षात सुमारे 64 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करून गुटखा बंदी आणखी प्रखर करण्यासाठी करण्यासाठी केलेले प्रयत्न, स्टेट स्पेसिफिक चार्ज कमी करून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्याकडे पाठपुरावा, केरोसीन मुक्त जिल्हे करण्यासाठी केलेले प्रयत्न, रेशनचा भ्रष्टाचार कमी करण्याबाबत केलेल्या उपाययोजना, रेशन दुकानदारांचे मानधन वाढवण्याबाबत घेतलेले निर्णय तसेच संसदीय कार्यमंत्री म्हणून या तीन वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा या अहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.\nबुद्धीची निर्यात म्हणजे \"ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या...\nछतावरून पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू\nनागपूर : घराच्या छतावर खेळत असताना तोल गेल्याने खाली पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी मसाळा गावात उघडकीस आली....\nनाट्यबीजाची 'पेरणी' (प्रवीण तरडे)\nआमची उंब्रजमधल्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत...\nLoksabha 2019 : 'काँग्रेसने पैसे घेऊन उमेदवारी दिली'\nनागपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हतबल झाल्याचे दिसत असताना येथे पक्षाने आर्थिक...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्चितच...\nLokSabha 2019 : आता आणखी दणदणीत विजय मिळविणार : नितीन गडकरी\nनागपूर : 'पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आता मी गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन जिंकेन', असा विश्वास केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-2/", "date_download": "2019-03-25T08:24:40Z", "digest": "sha1:4PHJRQYVY7AV7RIVB6B4UCPGSNEH7HYT", "length": 13369, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक (भाग- २ ) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक (भाग- २ )\nजीवनसत्त्व-अ आणि बीटाकेरोटीन : हे संसर्गाशी लढा देणाऱ्या पेशींच्या संख्येमध्ये वाढ करतात. आपले शरीर बीटाकेरोटीनला जीवनसत्त्व-अ मध्ये बदलतात. जीवनसत्त्व-अ मध्ये ऍण्टीऑक्सिडण्ट गुणधर्म असून ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. कॅरोटेनॉड्स असलेली विविध फळे व भाज्यांचे सेवन करा, जसे आंबा, पपई, खरबूज, कलिंगड, गाजर, टोमॅटो, खजूर, ड्राईड ऍप्रीकोट्स, रताळे, राजगिरा पाने, बथुआ पाने, बीट पाने, खाण्याचे पान, अरबीची पाने, शेंगांची पाने, मेथीची पाने, सलाड, मोहरीची पाने, ओवा, मुळ्याची पाने व पालक.\nजीवनसत्त्व-ब : जीवनसत्त्व-ब आपण सेवन करणा-या खाद्यपदार्थामधून ऊर्जा देते आणि आरोग्यदायी त्वचा, डोळे, यकृत व मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते हिमोग्लोबिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवनसत्त्व-ब च्या अभावामुळे ऍनेमिया होण्यासोबतच थकव्यासारखी लक्षणे जाणवू लागतात. मुलांमध्ये ऊर्जा व अवधानाची कमतरता असेल तर त्याच्यामध्ये या जीवनसत्त्वाचा अभाव असू शकतो.\nमाशांमध्ये जीवनसत्त्व-बचे सर्वाधिक प्रमाण असल्यामुळे त्यांना माशांच्या सेवनामधून पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व-ब द्या. तसेच केळी, सूर्यफूल बिया, शेंगदाणे, पिस्ता, मांस व अंडी यामध्ये देखील जीवनसत्त्व-ब पुरेशा प्रमाणात असते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे सतत आजारी पडणे, कमी प्रमाणातील ऊर्जा पातळी, अपचन, निस्तेज त्वचा, चिडचिड ही फोलेटचा अभाव असल्याची काही लक्षणे आहेत. फोलेटचे संश्लेषक रूप फोलिक आम्ल (जीवनसत्त्व-ब 9) म्हणून ओळखले जाते.\nमाशांमध्ये फोलेट उच्च प्रमाणात असते आणि इतर उत्तम स्रेत आहेत मोहरीची पाने, पालक, कढीपत्त्याची पाने, ओवा, पुदिन्याची पाने, शतावरी, ब्रोकोली, बीट, आंबा, लिमा बीन्स (सेम्फली), डाळी व शेंगा, सोयाबीन, तीळ, मोहरी बिया, शेंगदाणे व अंडयातील पिवळा बलक.\nमॅग्नेशिअम : मॅग्नेशिअम शरीरातील विविध रासायनिक क्रियांवर नियंत्रण ठेवते. ते मुलांचे पोट व पचनसंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे असून रोगप्रतिकार प्रणालीचे संरक्षण करते. या मिनरलकडे अनेकदा दुर्लक्ष केल��� जाते, पण त्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या आहारामध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी, गव्हाचे पीठ, मक्याचे पीठ, सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ, गार्डन क्रेस सीड्स, काळीमिरी, मोहरी बिया, शेंगदाणे, जिरे, कोंथिबीर बिया, वेलची, लवंग, ओवा, बदाम, काजू, अक्रोड, राजमा, छोले, चवळी, सोयाबीन, मटकी, उडीद डाळ, मूगडाळ, राजगिरा/रामदाना, राजगिरा पाने, कढीपत्ता पाने यांचा समावेश करा.\nदातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)\nतुम्ही पण कानात तेल घालता का मग हे नक्की वाचा\nकाळजी डोळ्यांची (भाग २)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nअवयवदान म्हणजेच जीवदान (भाग १)\nपायाचे धोकादायक विकार( भाग १)\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/first-test-the-draw-for-the-selection-of-batsmen-in-front-of-the-batsmen/", "date_download": "2019-03-25T07:58:17Z", "digest": "sha1:PDO4XQDPKIBM43DHSESSA3557TQBV5MF", "length": 10993, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिला कसोटी सामना: भारातोसमोर फलंदाजांच्या निवडीचा पेच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपहिला कसोटी सामना: भारातोसमोर फलंदाजांच्या निवडीचा पेच\nलंडन: विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या संघनिवडीवर बरीच टीका झाली आहे. विराटने चेतेश्वर पुजाराला बाजूला ठेवून शिखर धवनची निवड केली. तसेच लोकेश राहुलला संघात स्थान दिले. परंतु हा जुगार भारतावर उलटला. शास्त्री-कोहली जोडीने अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकाबाबत जुगार खेळण्याची ही पहिील वेळ नाही. 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत शास्त्री-कोहली यांनी पुजाराच्या जागी रोहित शर्माला खेळविले होते.\nदोन कसोटींनंतर रोहितला खालच्या क्रमांकावर पाठविण्यात आले व अजिंक्य रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुजारा पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आला व सहा कसोटींनंतर त्याला पुन्हा वगळण्यात आले. विंडीजविरुद्ध कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळला.\nयंदाच्या कौंटी मोसमात पुजारा खेळला असूनही तो संघात असावा असे शास्त्री-कोहली यांना वाटते की नाही हाच खरा प्रश्न आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 36 कसोटी सामन्यांत प्रत्येक वेळी वेगवेगळे 11 खेळाडू खेळले आहेत. त्यामुळे ठराविक खेळाडू वगळता बाकीच्यांना पुढच्या कसोटीत आपण असणार की नाही हेही माहीत नसते. आता इंग्लंड दौऱ्यात तरी शास्त्री-कोहली जोडीने संघनिवडीत थोडे सातत्य राखावे आणि त्याला तर्कशास्त्राची जोड द्यावी अशी अपेक्षा आहे.\n#IPL2019 : पंजाबसमोर आज राजस्थानचे कडवे आव्हान\nमहिला रेसर स्नेहा शर्मा मलेशियात दुसऱ्या स्थानी\nइंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी\nसंघटनांच्या वादाचा फटका राजस्थानच्या खेळाडूंना\nते बीसीसीआयला विचारा : स्टिव्ह स्मिथ\nकसोटी क्रिकेटच्या पोषाखात बदल होणार\n#IPL2019 : हरभजनच्या नावेही अनोखा विक्रम\nसुरेश रैनाच्या आयपीएलमधे 5 हजार धावा\nसीसीआय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकी���ार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/cm-devendra-fadnavis-clarification-supreme-court-issues-notice-criminal-cases-3961", "date_download": "2019-03-25T07:57:03Z", "digest": "sha1:APLDFDCDBSSEWXDOTLAUDQNDGCURL3OU", "length": 7595, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Cm Devendra Fadnavis Clarification on Supreme Court Issues Notice Of Criminal Cases | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने होते. त्यावर लवकरच योग्य ते उत्तर सादर केले जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्ष दिले आहे.\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने होते. त्यावर लवकरच योग्य ते उत्तर सादर केले जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्ष दिले आहे.\n2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात याच याचिकाकर्त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ती उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. याच याचिकाकर्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयाने न्यायालय अवमाननेची कारवाई सुद्धा प्रारंभ केली आणि सतत खोडसाळ याचिका दाखल करीत असल्याबद्दल कारवाई का करू नये, असेही विचारले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील असल्याचे सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.\nदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा समावेश केला नाही. या दोन प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी मुद्दाम लपवून ठेवली. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे.\nनिवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय high court devendra fadnavis supreme court court criminal cases\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_14.html", "date_download": "2019-03-25T07:46:12Z", "digest": "sha1:GPHYA4FXBQMXRW24P3TCIFDL5HC54HW4", "length": 6479, "nlines": 138, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "का कुणास ठावूक ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nम��� मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतू माझ्याशी कमी बोलते\nमी समोर दिसलो की\nमुद्दाम दूसरी कड़े वळ ते\nहसुनी तुझ ते माझ्याशी बोलन\nकिती ग छान असायच\nतुला तुझच भान नसायच\nभान ही आता तुझे\nतुला आहे कळ ते\nतू माझ्याशी कमी बोलते\ninbox ओपन करून पहिला की\nफ़ोन ही आता असून\nतू माझ्याशी कमी बोलते\nतू जरा सोबत असली की\nजग माझ्या मुठीत असायच\nनात हे जणू आपलं\nबंद एका गाठित असायचं\nनात्याची ही गाठ आता\nतू माझ्याशी कमी बोलते\nपण अजुन नहीं हाल लाय\nआठव हा तुझा येता\nअश्रु डोळ्या तुनी वाहते\nतू माझ्याशी कमी बोलते\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.orientpublication.com/2017/11/blog-post_30.html", "date_download": "2019-03-25T07:32:14Z", "digest": "sha1:5JZFQALJDN2MT6AIOD5355YYDPHZ7OVB", "length": 6609, "nlines": 29, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ८ डिसेंबरला चित्रपटगृहात ‘धिंगाणा’", "raw_content": "\n८ डिसेंबरला चित्रपटगृहात ‘धिंगाणा’\nसमाजातील अनेक गोष्टीचं प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असत. आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न मनोरंजनाच्या माध्यमातून करतानाच त्यावर तिरकसपणे भाष्य करणाऱ्या चित्रपटाने नेहमीच त्या विषयाची व्याप्ती दाखवून दिली आहे. ८ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘धिंगाणा’ हा विनोदी धाटणीचा चित्रपटही चीट फंड घोटाळ्यासारख्या मह्त्त्वाच्या विषयावर भाष्य करतो. ममता प्रोडक्शन हाऊसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते समीर सदानंद पाटील असून दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर याचं आहे.\nकोणत्याही गोष्टीचा मोह हा वाईट असतो. झटपट पैसे कमवण्याच्या नादात फसव्या स्कीमला ब���ी पडणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. हाच धागा पकडून ‘धिंगाणा’ या चित्रपटात एका स्कीममध्ये अडकलेलं गाव व त्यातून गावकऱ्यांना बाहेर काढणाऱ्या राजाराम या युवकाची धडपड दाखवली आहे. राजारामची ही धडपड यशस्वी होणार की तोच या जाळ्यात अडकणार याची मनोरंजक कथा म्हणजे ‘धिंगाणा’ हा चित्रपट. या चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे रझा मुराद, शाहबाझ खान, अवतार गिल, कुनिका या हिंदीतल्या खलनायकांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हिंदीतल्या या कलाकारांसोबत प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर, प्रकाश धोत्रे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.\nजय अत्रे, वैभव जोशी, सचिन पाठक (यो) यांच्या लेखणीतून यातील गाणी सजली आहेत. आनंद शिंदे, आदर्श शिंदे, राज्ञी त्यागराज यांनी या चित्रपटातील गाणी गायली असून संगीतकार अमित राज व शशांक पोवार यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. आय. गिरीधरन यांनी छायांकन केलं असून, फैझल महाडीक यांनी संकलन केलं आहे. सुजीत कुमार यांनी या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. संदिप इनामके यांनी कलादिग्दर्शन केलं आहे, तर संजय कांबळे प्रोडक्शन डिझाइनर आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला ‘धिंगाणा’ हा सिनेमा ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/books/kundalini-jagdamba/", "date_download": "2019-03-25T07:45:08Z", "digest": "sha1:3E4LXW4AXO3W2FLOMLD4NDJIKGWH6ZIO", "length": 5507, "nlines": 59, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\n\"संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण चैतन्य यांची प्राप्ती करुन घेण्यासाठी 'कुंडलिनी' जागृत करुन घेणे हा एकच उपाय आहे\" असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. त्या कुंडलिनी विषयीची समग्र माहिती गोळा करुन तिला साधकांच्या अनुभवांची जोड देऊन हे पानांनी छोटे (एकशे पंचवीस पानांचे) पण ज्ञानाने मोठे पुस्तक आठवले यांनी लिहिले. अशा योगविषयक तांत्रिक पुस्तकात ग्रेटा गार्बो (Greta Garbo) या हॉलीवूड मधील जुन्या गाजलेल्या नटीचा उल्लेख आला असेल यावर विश्वास बसणे अशक्य आहे पण तसे झाले आहे. कसे ते प्रत्यक्षातच वाचले पाहिजे.\nसाधा विषय मोठा आशय\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-03-25T08:22:34Z", "digest": "sha1:E4O7MRV7UP6F7FMUNH6TEL2UI3HHSR7K", "length": 15309, "nlines": 408, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोर्तुगाल - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nब्रीद वाक्य: O Bem Da Nação (पोर्तुगाली)\nराष्ट्रगीत: आ पोर्तुगीजा (A Portuguesa)\nपोर्तुगालचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) लिस्बन\n- राष्ट्रप्रमुख आनिबाल काव्हाको सिल्व्हा\n- पंतप्रधान पेद्रो पासुस कुएलू\n- स्वातंत्र्य दिवस जून २४, ११२८(प्राप्ती)\n- एकूण ९२,३९१ किमी२ (११०वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.५\n-एकूण १,०���,९५,००० (७६वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २०३.४ अब्ज अमेरिकन डॉलर (४१वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १९,३३५ अमेरिकन डॉलर (३७वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन युरो (EUR)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + ०)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५१\nपोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nपोर्तुगाल हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nपोर्तुगालच्या उत्तर व पूर्वेस स्पेन तर पश्चिम व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहेत.\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप���रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१९ रोजी २०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/kerala-floods-kill-174-people-138197", "date_download": "2019-03-25T08:36:46Z", "digest": "sha1:AMG5XPNWYF5IP6FEAKKQSJ2HECAKDH3A", "length": 12019, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kerala floods kill 174 people केरळमधील पुरात 174 जणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकेरळमधील पुरात 174 जणांचा मृत्यू\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nराज्यातील पथनमतित्ता या जिल्ह्यातील कोझेनचेरी, अरनमुला आणि रन्नी या गावातील लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे या गावांतील लोक घरातच अडकून पडले आहेत.\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत सुमारे 174 जणांचा मृत्यू झाला. तर 8 हजार कोटींचे नुकसान झाले. या बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत.\nकेरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, आत्तापर्यंत 174 जणांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीपासून बचावासाठी 'एनडीआरएफ'च्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची आणखी एक तुकडी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील पथनमतित्ता या जिल्ह्यातील कोझेनचेरी, अरनमुला आणि रन्नी या गावातील लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे या गावांतील लोक घरातच अडकून पडले आहेत. तसेच राज्यातील काही जिल्ह्यातील पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक गेली आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे मदतीची विनंती केली आहे.\nमल्याळम चित्रपटनिर्मातीचा तिच्याच घरात आढळला मृतदेह\nतिरुअनंतपुरम : युवा मल्याळम चित्रपटनिर्माती नयना सूर्यन हिचा मृतदेह तिच्या घरातच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वेल्लमबला जवळील अल्थरा येथील...\n'ते' व्हायरल करणाऱ्यांना अटक\nतिरुअनंतपुरम : सोशल मिडियावर एखाद्या फोटोवर कमेंट करणे, एखद्याची खिल्ली उडवणे ही नेहमीचीच गोष्ट आहे. परंतु, हिच गोष्ट काही जणांना महागात पडली आहे....\nशबरीमाला मंदिर आज उघडणार\nतिरुअनंतपुरम : मासिक पूजेसाठी उद्या (ता. 12) शबरीमाला मंदिर उघडण्यात येणार आहे. मात्र यावरून मंदिर परिसरात अस्वस्थता पसरली आहे. अलीकडेच वार्षिक...\nविमान इंधनावरील करात केरळ सरकारकडून कपात\nतिरुअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यात सेवा देणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या २८.७५ टक्के असलेला हा कर ५...\nनऊ दिवसांनी बेस्टला \"स्टार्टर'\nसंप मिटला; कर्मचाऱ्यांना सात हजारांची वेतनवाढ मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनात...\nकेरळमध्ये राजकीय संघर्षाला धार\nकन्नूर/तिरुअनंतपुरम- शबरीमला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशानंतर बुधवारपासून (ता. 2) केरळमध्ये हिंसाचार भडका उडाला. महिला प्रवेशविरोधी आंदोलनात राजकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/space-myths/", "date_download": "2019-03-25T08:30:29Z", "digest": "sha1:USGEIGBARYGNHLWTM6NNBAUPS43DFX47", "length": 17145, "nlines": 121, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ 'मिथके' आहेत", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nअंतराळ, स्पेस हा असा विषय आहे, ज्याबाबत लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना रस आहे. सर्वांना ह्या आपल्या पृथ्वीच्या बाहेरच्या जगात म्हणजेच अंतराळात नेमकं काय असेल ते कसं असेल हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता असते. आणि ह्या उत्सुकतेतूनच अंतराळाबद्दल काही मिथकांनीही जन्म घेतला.\nया मिथकांना आपण आजवर खरं मनात आलो आहोत. पण ह्यात काहीही सत्य नसून ते केवळ आणि केवळ एक मिथक आहे. आज आपण अंतराळा संबंधी असेच काही मिथक आणि त्यामागचे सत्य पाहणार आहोत.\nअंतराळातून चीनची भिंत दिसते…\nअंतराळा संबंधी हे सर्वात प्रचलित मिथक आहे. भलेही चीनची भिंत ही जगातील सर्वात लांब भिंत असेल, तर ती अंतराळातून दिसते हे काही खरे नाही. चीनची भिंतच काय अंतराळातून पृथ्वीवर बनलेली कुठलाही इमारत किंवा इतर काही वस्तू दिसत नाहीत.\nसूर्य पिवळ्या रंगाचा आहे…\nपृथ्वीवरून जरी आपल्याला सूर्य हा पिवळा दिसत असला तरी त्याचा रंग पिवळा नाही. तो केवळ पृथ्वीवरील वातावरणामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा दिसतो. सूर्यप्रकाश हा पृथ्वी भोवती असणाऱ्या वातावरणाच्या थर पार करत येतो.\nत्यामुळे सूर्य किरणे आपल्याला लाल, केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या दिसतात. पण सूर्य किरणे पिवळी दिसतात म्हणून सूर्यही पिवळा असेल असं नाही. तर आपला सूर्य हा पांढऱ्या रंगाचा आहे. जर टीमही अंतराळातून सूर्याला बघितले तर तो तुम्हाला पांढरा दिसेल.\nएका दिवसात चंद्र पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करतो…\nचंद्र हा इतर ग्रहांच्या तुलनेत अतिशय वेगाने फिरतो. पण तो एका दिवसात पृथ्वी भोवती एक परिक्रमा पूर्ण करतो, हे साफ खोटे आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा पूर्ण करायला २७ दिवस लागतात. आपल्याला रोज ज्या चंद्राच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात त्या ह्यामुळेच.\nअंतराळात कुठल्याही वस्तूच्या धडकण्याचा मोठा आवाज येतो…\nआपण चित्रपटांत तसेच कार्टून्समध्ये देखील बघितले असेल की, जेव्हा केव्हा अंतराळातील कुठली फाईट दाखविली जाते तेव्हा कुठल्याही दोन्ही गोष्टी एकमेकांवर आदळल्या की, जोरदार धमाका होतो आणि आवाज येतो असे दाखवले जाते.\nपण हे सर्व स्पेशल इफेक्टमुळे होत असते. पण वास्तवात असे शक्य नाही. कारण आवाजाला प्रवास करण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज असते, म्हणजेच हवा. अंतराळात हवा नसल्याने आवाजाचा प्रवास होत नाही आणि त्यामुळे आवाजही येत नाही.\nजर स्पेस सूट नाही घातला तर अंतराळवीराचा विस्फोट होऊन जातो…\nहे खरे आहे की, विना स्पेस सूट कुठलाही अंतराळवीर जिवंत राहू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यात विस्फोट होतो. असा स्फोट होण्याची कारणे काही वेगळी असतात. जर अंतराळ यानात कुठला विस्फोट झाला तर ठीक पण असा स्पेस सुत घातला नाही म्हणून अ��तराळवीरांमध्ये विस्फोट होत नाही. फक्त स्पेस सूट न घालता अंतराळयांच्या बाहेर निघाले तर त्यांच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबून जाईल आणि शरीर फुगेल.\nअंतराळात हवा आणि पाणी नाही हे तर १०० टक्के खरे आहे. पण म्हणून तिथे गुरुत्वाकर्षण नाही हे खरे नाही, हे केवळ एक मिथक आहे. अंतराळात प्रत्येक ठिकाणी थोडंफार गुरुत्वाकर्षण असतं, म्हणूनच चंद्र हा पृथ्वीभोवती परिक्रमा घालतो. जर गुरुत्वाकर्षण नसते तर चंद्र कधीचाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेला असता.\nबुध हा ग्रह सर्वात उष्ण ग्रह आहे…\nबुध हा ग्रह सर्वात जास्त उष्ण ग्रह आहे हे देखील एक मिथक आहे. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने तो इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात उष्ण आहे असं म्हणतात. पण असे नाहीये.\nकुठलाही ग्रह हा सूर्यापासून जवळ असेल किंवा दूर त्यांच्या त्या ग्रहाच्या उष्णतेवर काहीही फरक पडत नाही. ग्रहावर ज्या प्रकारच्या वायू असतात त्यावर त्याची उष्णता अवलंबून असते. कारण बुध पेक्षा जास्त उष्ण शुक्र हा ग्रह आहे. कारण ह्या ग्रहावर कार्बनडाय ऑक्साईड हा वायू मोठ्या प्रमाणात आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतातील बेरोजगारीबद्दल बरंच वाचलं असेल, ह्या देशांतील “अति-रोजगारी” बद्दल वाचून दंग व्हाल\n“माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही\nही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस\nजाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल\nचंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा\nOne thought on “अंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत”\n“राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २)\n‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\nमराठीचा “भाषिक स्व-क्युलॅरिझम” : निजामशाहीपासून आजपर्यंतचा प्रवास\n क्रिकेटर्स की बॉलिवूड स्टार्स\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nइस्रायलने तयार केली सुरक्षा भिंत\nटीम उरी ते अमिताभ बच्चन : गलिच्छ राजनीती होताना दुसरीकडे मानवता दाखवणारे चेहरे आश्��ासक आहेत\nपाकिस्तानी राजकारण्यांच्या सौंदर्याच्या चर्चा करणारे, हे देशी सौंदर्य बघून चाट पडतील\nअप्सरा- उर्वशी – आपल्या सौंदर्याने कित्येकांना वेड लावणाऱ्या ह्या अप्सरेच्या जन्माची अज्ञात कथा\nप्रेमात पाडतील असे भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग\nचे ग्वेरा : गरिबांसाठी तिसऱ्या महायुद्धाची योजना आखणारा साम्यवादी क्रांतिकारी\n या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल\nकेरळातील अख्खं गाव “नशेडी” झालं असताना, बुद्धिबळाच्या पटाने सगळं चित्र पालटलं\nमोदींची अमेरिका भेट : नेमका काय फायदा झाला\nभारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता\nरामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण\nतरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – “टू मिनिट्स मॅगी” चं हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का\nह्या लोकांना कुठल्याच माध्यमातून एड्सचा संसर्ग होऊ शकत नाही \nविमान प्रवासातल्या या महत्वाच्या गोष्टी विमान कंपनीने तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090803/main.htm", "date_download": "2019-03-25T08:30:10Z", "digest": "sha1:ZSVRLI6WZHQ2IVHPBMXHC7QYR3OQTQQA", "length": 19814, "nlines": 42, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, ३ ऑगस्ट २००९\nमहागाईच्या निषेधार्थ शिवसेनेचा जागर\nअन्नधान्याच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने आज राज्यव्यापी रस्ता रोको आंदोलन केले. दादर येथील शिवसेना भवनासमोर पाच ते दहा हजार शिवसैनिकांनी दुपारी रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोलमडली. राज्यातील प्रमुख शहरे, जिल्ह्याची ठिकाणे येथील मुख्य रस्ते शिवसैनिकांनी अडवल्याने ठिकठिकाणी या आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दादर शिवसेना भवन येथे सकाळपासून हजारो शिवसैनिक भगवे झेंडे व आपापल्या शाखांचे बॅनर घेऊन मोर्चाने दाखल होत होते. महागाई विरोधातील घोषणा व राज्याच्या सत्तेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला खाली खेचण्याचा निर्धार शिवसैनिक व्यक्त करीत होते.\nपवारांच्या आदेशाला ‘राष्ट्रवादी’ नेत्यांकडूनच केराची टोपली\nदिलीप शिंदे, ठाणे, २ ऑगस्ट\nहोर्ड���ग्ज आणि पोस्टर्स यांच्यावर स्वत:चे मोठ-मोठे फोटो झळकावून नेतेगिरी करणे बंद करा आणि प्रत्यक्ष लोकांची कामे करीत प्रतिष्ठा मिळवा. जंगी होर्डिग्ज लावून शहर व परिसर विद्रुप होतातच, पण त्यावर असलेल्या प्रतिमा देखिल अधिक विकृत होतात, असा काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढलेल्या पक्षाध्येशासह उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत राष्ट्रवादीचे सर्वच नेते इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणेच आपापली मोठ मोठी होर्डिग्ज लावून स्वत:च्या नसलेल्या कर्तृत्वाची दवंडी पिटवत आहेत. खुद्द उच्च न्यायालयानेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, पर्यावरणावर आघात करणाऱ्या, तसेच शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्या अशा होर्डिग्जवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले असूनही राज्यभरातील तमाम पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदी नोकरशहा राजकारण्यांना घाबरून त्या होर्डिग्जना हात लावत नाहीत.\nमुंबई, २ ऑगस्ट / क्री.प्र.\nवर्ल्ड अॅन्टी डोपिंग एजेन्सीच्या (वाडा) नियमातील वादग्रस्त ठरलेला ‘ठावठिकाणा’ कळवण्याबाबतचा भाग फेटाळून लावत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज अॅन्टी-डोपिंग मुद्यावरून भारतीय खेळाडूंची पाठराखण केली आहे. मुंबईला आज झालेल्या बीसीसीआयाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी २००९ पासून आयसीसीने लागू केलेला खेळाडूंच्या खाजगी आयुष्यावर घाला घालणाऱ्या वाडाच्या या नियमात बदल करण्याचे सुचवून हा वादग्रस्त मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कोर्टात ढकलून दिल्यामुळे आयसीसीची पुरती कोंडी झाली आहे. आयसीसीचे कार्यकारी बोर्ड आता हा मुद्दा पुन्हा चर्चेद्वारे निकाली काढणार आहे. ठावठिकाणा, एकांतता आणि व्यावहारिक बाब, याबाबत मनात किंतू असतानाही भारताच्या ११ खेळाडूंचा अपवाद वगळता सर्व देशांच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आयसीसीच्या अॅन्टि-डोपिंग चाचणीसाठी सहमती दर्शवली आहे. आयसीसीचे कायदेविषयक सल्लागार यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार धोनी, हरभजन व युवराज हे आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित होते.\n‘आरे’च्या मलईदार जमिनींवर राजकारणी, बिल्डरांची नजर\nसंदीप आचार्य, मुंबई, २ ऑगस्ट\nदूधात पाणी घालून विकणाऱ्यांपेक्षा पाण्यात दूध घालून ‘धंदा’ करणाऱ्यांची स���ख्या दिवसेदिवस वाढत आहे. याचा अनुभव शासनाचे विविध विभाग घेत असून कोटय़वधी रुपयांच्या मोक्याच्या जागांचे व्यावयायिकीकरण करण्याचे काम अत्यंत पद्धतशीरपणे होताना दिसत आहे. यासाठी प्रथम विभागाचे आर्थिक खच्चीकरण करण्यात येते व तोटय़ातील व्यवसाय सावरण्याच्या नावाखाली जमिनी विकण्याचा घाट घातला जातो. शासनाचा दुग्ध विकास विभाग याच प्रक्रियेतून गेली काही वर्षे जात असून आरेच्या मुंबईतील हजारो कोटी रुपयांच्या जागांच्या ‘मलई’वर डोळा ठेवून ‘आरे’ला संपविण्याचे काम काही राजकारण्यांकडून सुरू आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५१ साली ‘आरे’च्या वरळी डेअरीचे उद्घाटन केले होते. पंडित जवाहरालाल नेहरूंसारख्या द्रष्टय़ा नेत्याने उद्घाटन केलेल्या जागेवरच आज पंचतारांकित हॉटेल उभारण्याची स्वप्ने काही बडे नेते व बिल्डरांकडून पाहिली जात आहेत. राजकीय रंगमंचावर घडय़ाळाचे ‘काटे’ फिरवणारे काही नेते सहकाराच्या माध्यमातून ‘आरे’च्या मुंबईतील मोक्याच्या जागांचा ‘लोण्याचा गोळा’ मटकाविण्यासाठी शासकीय दुग्ध व्यवसायाचाच ‘काटा’ काढण्यास सरसावल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी गेल्या दशकात शासकीय दुग्ध व्यवसाय मोडीत निघेल अशा प्रकारचे धोरण अवलंबण्यात येत आहे. यामुळे एनर्जी, तूप, दही, आरे बटर, लस्सी अशी एकापेक्षा एक ‘आरे’ची उत्पादने अडचणीत येत आहेत.\nसंप सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून\nसहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तंतोतंत लागू कराव्यात या मागणीकरिता महाराष्ट्रातील २२ लाख सरकारी कर्मचारी ४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचाही समावेश आहे. महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यापीठातील सुमारे ३० हजार शिक्षक १४ जुलैपासून सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकरिता बेमुदत संपावर असताना आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरूवात होण्याची चिन्हे दिसत असल्याने राज्यात अनागोंदी व निर्नायकी माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने परवापासून बंदची हाक दिली आहे. कर्णिक यांनी सांगितले की, शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर १३ मे २००९ च्या सरकारी आदेशाने कुऱ्हाड कोसळली आहे. घरभाडेभत्ता, प��रवासभत्ता व अन्य काही भत्ते हे जुन्या वेतनश्रेणीवर दिले जाणार असल्याने शिक्षक व कर्मचारी यांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे.\nमुंबई, २ ऑगस्ट / प्रतिनिधी\nवेतन कराराच्या मुद्दय़ावरून उद्याच्या (३ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून सुरु होणारा एसटीतील नियोजित संप येत्या ११ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ‘ग्रेड पे’च्या मुद्दय़ावर १० तारखेपर्यंत समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कृती समितीने हे पाऊल उचलले. औद्योगिक न्यायालयाने शनिवारी एसटीतील नियोजित संप बेकायदेशीर ठरवून, संपावर जाण्यास मनाई करणारा हंगामी आदेश जारी केला. तेव्हापासून संपाबाबत निर्णय घेण्यासाठी कृती समितीची सातत्याने खलबते सुरू होती. त्याचाच एक भाग म्हणून ‘ग्रेड पे’च्या मुद्दय़ावरून वेतन करारबाबत सुरू झालेला तिढा सोडविण्यासाठी कृती समितीने आज राष्ट्रवादी भवनात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कृती समितीची बाजू ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली व त्यांना एसटीच्या वेतन कराराचा प्रश्न तातडीने धसास लावण्यास सांगितले. १० ऑगस्टपर्यंत वेतन कराराचा तिढा न सुटल्यास स्वत: या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. संप लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे नेते शिवाजीराव चव्हाण यांनी दिली.\nसंप ‘खासगी एअरलाइन्स’चा रद्द\nनवी दिल्ली, २ ऑगस्ट/पीटीआय\nदररोज सुमारे १ लाख प्रवाशांची ने-आण करणाऱ्या खासगी विमान कंपन्यांनी येत्या १८ ऑगस्ट रोजी पुकारलेला संप अखेर आज रद्द केला. स्पाईसजेट व एमडीएलआर या दोन विमान कंपन्यांनी आज या संपात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे संपाच्या रिंगणात जेट एअरवेज व किंगफिशर या दोनच मोठय़ा खासगी विमान कंपन्या उरल्या होत्या. तिथेच सर्व चक्रे फिरली व संप रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. संप केल्यास कडक कारवाई करण्याचा केंद्र सरकारने दिलेला इशारा ही टांगती तलवारखासगी विमान कंपन्यांच्या डोक्यावर होतीच. हा संप फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्स (एफआयए) या संघटनेच्या माध्यम���तून पुकारण्यात आला होता. जनतेच्या संतप्त भावना व सरकारने चर्चेची दाखविलेली तयारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आम्ही संप रद्द करीत आहोत असे एफआयएचे महासचिव अनिल बजाज यांनी आज जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. विमानाचे इंधनावर आकारण्यात येणारे कर व विमानतळविषयक भाडे यांच्या अव्वाच्या सव्वा प्रमाणातील वाढीच्या निषेधार्थ खासगी विमान कंपन्यांनी हा संप पुकारला होता. किंगफिशर, जेट, गो एअर, स्पाईसजेट, इंडिगो या विमान कंपन्यांच्यावतीने एफआयएने या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकार आमच्या प्रश्नांवर चर्चेच्या माध्यमातून योग्य तोडगा काढेल असा आम्हाला विश्वास वाटतो.\nअरेरावीचे पर्व - अग्रलेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/wangmaysheti?order=title&sort=asc", "date_download": "2019-03-25T08:50:41Z", "digest": "sha1:ZHGULXFAC2T5FMVH7IIRBPF6YBHI2YYZ", "length": 8959, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " वाङ्मयशेती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,568 24-06-2014\nअभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य 1,055 23-06-2011\n\"आप\" चा धूर्तपणा अंगलट येतोय\n\"माझी गझल निराळी\" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम 1,108 10-03-2014\n'ब्लॉग माझा-२०१२' स्पर्धा - विजेता रानमोगरा 1,518 27-10-2012\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,377 25-07-2012\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,049 29-05-2015\n'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीत' 'रानमेवा' ची दखल 1,874 23-06-2011\nअ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर 2,566 11-03-2013\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन 1,093 09-10-2013\nअंगार चित्तवेधी 868 18-06-2011\nअच्छे दिन आनेवाले है - १ 617 29-05-2014\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ 1,649 20-08-2011\nअनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी 1,118 23-06-2011\nअन्नधान्य स्वस्त आहे 954 28-05-2013\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/port-raigad-one-death-two-injured/", "date_download": "2019-03-25T07:45:48Z", "digest": "sha1:BMOOY6KXWAN5N32CTHSOG3NDDKVT37NI", "length": 3036, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रायगडवर दगड मानेवर पडून युवक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रायगडवर दगड मानेवर पडून युवक ठार\nरायगडवर दगड मानेवर पडून युवक ठार\nरायगड : पुढारी ऑनलाईन\nरायगड येथे शिवराज्याभिषकासाठी आलेल्या बरडतरी हनुमंत वारे (वय १८, बरामपूर ता. भूम, जि. उस्मानबाद) याचा हिरकणी बुरुजाजवळ मानेवर दगड पडून मृत्यू झाला.\nयावेळी हर्शल विजयराव पराते (रा. महाला, जि. नागपूर) हे ही पायऱ्या उतरताना किरकोळ जखमी झाले आहेत. अमित संपत महागरे (वय २४ रा. नार खेड शिवापूर, ता. हवेली जि. पुणे) किरकोळ जखमी आहेत. जखमींवर महाड ग्रामीण रुगणालायत उपचार सुरू आहेत.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/objectionable-behaviour-from-prison-employee/", "date_download": "2019-03-25T07:44:03Z", "digest": "sha1:4ABDMJ2I2CGQROTGLSCFFFGL3DQLG4Z6", "length": 5383, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारागृहात कर्मचार्यांचे आक्षेपार्ह वर्तन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › कारागृहात कर्मचार्यांचे आक्षेपार्ह वर्तन\nकारागृहात कर्मचार्यांचे आक्षेपार्ह वर्तन\nसेवा बजावत असताना रात्रीच्या वेळी कारागृहाबाहेर ये-जा करणार्या दोन कर्मचार्यांचे अधीक्षकांनी निलंबन केले आहे. अधीक्षकांनी बजावलेली नोटीस कारागृहातील कर्मचार्यांनी घेण्यास नकार दिला असून, वरील कर्मचार्यांनी अधीक्षकांविरोधात बंड पुकारत अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे दाद मागितली आहे.\nरात्रीच्या वेळी कारागृहात सेवा बजावत असताना आवक-जावक वहीत नोंद करून कारागृहाबाहेर गेल्याप्रकरणी कारागृहातील कर्मचारी अनिल पवार (शिपाई) आणि बाळू पालवे (हवालदार) यांना निलंबित करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. मात्र, या कर्मचार्यांना हे आरोप मान्य नसून, त्यांनी आपली बाजू अपर पोलीस महासंचालकांकडे मांडली आहे. यावर वरिष्ठ निर्णय घेणार असून, कारागृहाच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कर्मचार्यांना पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून अधीक्षकांना देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, याला अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकला नाही.\nबँकेच्या रोखपालाने लाटले खातेदारांचे अडीच कोटी\nनाशिकमध्ये रंगतोय फ्लड लाइट क्रिकेट, फुटबॉलचा थरार\nघिसाडी कुटुंबाला गाव सोडून जाण्याचा आदेश\nकारागृहात कर्मचार्यांचे आक्षेपार्ह वर्तन\nपायावर गोळीबार करीत दोन लाखांची लूट\nछगन भु��बळ म्हणतात, ‘माझ्या गावाचे रस्ते दुरूस्त करा’\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Rajgegaon-environmental-degradation-by-economics/", "date_download": "2019-03-25T08:05:00Z", "digest": "sha1:DE5QY2TUIGNFEQYMGDO3F37CG3YCT4XB", "length": 7415, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वन विभागाच्या ‘अर्थकारणा’ने पर्यावरणाचा र्हास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वन विभागाच्या ‘अर्थकारणा’ने पर्यावरणाचा र्हास\nवन विभागाच्या ‘अर्थकारणा’ने पर्यावरणाचा र्हास\nपर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन योग्य राखण्यासाठी 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे; मात्र वृक्षतोड केल्यामुळे वनाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळल्याचे भयानक चित्र राजेगाव वन विभागाच्या क्षेत्रात दिसून येत असून, याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाबीला वन विभागातील ‘अर्थकारण’ कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.\nराजेगाव (ता. दौंड) येथे वन विभागाचे विस्तीर्ण क्षेत्र पसरले असून, हा परिसर उजनी जलाशयाच्या सान्निध्यात असल्यामुळे येथे वर्षभर विविध प्रकारची हिरवीगार झाडे पाहायला मिळतात. राजेगाव येथील वनक्षेत्र हे कागदावर रिझर्व्ह फॉरेस्ट या नावाने नोंदीत असून, याची देखभाल दौंड वनपरिक्षेत्र यांच्या अधिकाराखाली आहे. या वनात रानडुक्कर, कोल्हे, ससा, सायाळ, रानबोके, मोर, कोकीळ, पोपट, साप आणि इतर सरपटणारे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असत. मात्र गेल्या काही वर्षापासून वन क्षेत्रात मानवाचा सहवास वाढल्यामुळे हे वन्य प्राणी नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.\nदौंडच्या पूर्व पट्ट्यातील राजेगाव येथील वनक्षेत्र हे मोर आणि जंगली रानडुक्कर या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणा��� दिसणारा रंगबेरंगी मोर हा पक्षी येथे पाहायला मिळत नाही. रानडुकरांची शिकार केल्यामुळे हा प्राणीदेखील नामशेष झाला आहे. एकीकडे वन्य प्राण्यांची शिकार केल्यामुळे वन्य प्राणी नामशेष झाले आहेत; तर दुसरीकडे या वन क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट झाली आहे. वनातील लाकूड, सुपीक माती, मुरूम यांची कित्येक वर्षांपासून चोरी केली जात आहे. साधारणतः 15 ते 20 एकर क्षेत्रातील कित्येक हजार ब्रास माती चोरली आहे. त्यामुळे वनात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या संपत्तीची अशी होणारी लूट कोणाच्या परवानगीने झाली अशी दबकी चर्चा राजेगाव परिसरात सुरू आहे. वन विभागाच्या संपत्तीची खुलेेआम होणारी लूट वन विभाग भकास होण्याला कारणीभूत ठरत आहे.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/gulzar-book-dyodhi-story-of-damu-65256/", "date_download": "2019-03-25T08:23:26Z", "digest": "sha1:UQ44KOHTEJNLVRTVTEBYDRTTMUKMBOOE", "length": 31374, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "झड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nदिवाळी अंक २०१२ »\nपाऊस असा लागला होता मुंबईला; अन् तसंच दामूचं पिणंसुद्धा. पाच दिवस झाले. दिवस-रात्र सतत पीत होता दामू. आणि पाच दिवस झाले- आकाशसुद्धा बरसत होतं. दोघांना\nपाऊस असा लागला होता मुंबईला; अन् तसं��� दामूचं पिणंसुद्धा. पाच दिवस झाले. दिवस-रात्र सतत पीत होता दामू. आणि पाच दिवस झाले- आकाशसुद्धा बरसत होतं. दोघांना चढलीये असं वाटत होतं. आणि थांबायला कुणी तयार नाही. हट्टाला पेटल्यासारखे..\nदामूचं हे नेहमीचंच. असाच होता दामू. पिणार म्हटलं की त्याला कुणी रोखू शकणार नाही. वीस-वीस दिवस सकाळ-संध्याकाळ दारू. फक्त दारू. दारू पुरवण्याचं काम लक्ष्याचं. दामूची बायको लक्ष्याला मना करायची. तर हा बेटा कुठनं कुठनं दारू मिळवायचा. बिछान्याखाली असलेल्या सतरंजीतनं, डाळीच्या डब्यातनं, छपराच्या फळकुटांमधून. आणि दामूची दारू रिचवण्याची ताकद प्रचंड. प्यायला की गडी खूश व्हायचा. इतरांप्रमाणे भांडणतंडण नाही. आणि सोडली म्हटल्यावर तीन-तीन महिने, चार-चार महिने, तर कधी अगदी सहा-सहा महिनेसुद्धा दारूला हात लावत नसे. अन् त्या न पिण्याच्या काळात दामूसारखा माणूस नाही उभ्या वस्तीत. मग त्याच्यासारखा बाप नाही, त्याच्यासारखा नवरा नाही, अन् ना त्याच्यासारखा कारागीर.\nपरंतु हे घडणार सटीसामासी. यावेळी तर असं झालं की, पहिल्या पावसाबरोबर दामू सुरू झाला- आणि पाऊससुद्धा. काय पाऊस गेल्या शंभर वर्षांत असा पाऊस पडला नाही.\nपहिला दिवस गेला. जाऊ दिला अंगावरनं. नेहमीप्रमाणे मुंबईच्या लोकल गाडय़ा बंद पडल्या, सुरू झाल्या आणि पुन्हा बंद पडल्या. दुसऱ्या दिवशी बाहेरगावचे ट्रक्स मुंबईला आले नाहीत. भाजीपाला, तेल वगैरेची आवक थांबली. वस्तुमालाचे भाव सशाच्या कानाप्रमाणे वाढत गेले. रस्त्यांवर ट्रकांच्या रांगा दिसू लागल्या. पाऊस सुरूच होता. मुसळधार आणि एका वेगात. अन् त्याच गतीत सुरू होतं दामूचं पिणं.\nतिसऱ्या दिवशी संकटाची चाहूल लागली. पाऊस, पावसासोबत वारा. गल्लीबोळात पाणी भरू लागलं. दामूची बायको बाहेरचं सामान खोलीत आणू लागली. वीतभर खोलीत दामू, त्याची बायको शोभा आणि मुलगी कृष्णा असे तिघेजण. पुढच्या महिन्यात कृष्णाचं लग्न आहे. तीन माणसं खोलीत जेमतेम मावतात- न मावतात तो शोभानं बकरीला धरून घरात आणलं. दामू चिडला.\n‘‘च्यायला ह्य़ा भेन..ला घरात आणण्याची गरज काय\n‘‘बाहेर उभ्या उभ्या किती वेळ अशी भिजत राहणार ती\n‘‘अगं, एवढा जाडा लोकराचा कोट चढवलायन् ना तिनं अंगावर.. दोन तास भिजू शकत नाही\n दोन दिवस झाले पावसाला. आज तर गल्ली सगळी भरून गेली आणि नाला तुडुंब भरून वाहतोय. पुनियाची सगळी झोपडपट्टी पाण्याखा��ी जाणारेयसं वाटतं.’’\nदामू गप्प. उजव्या हातातल्या चिमटीतलं थोडं मीठ त्यानं चाटलं आणि डाव्या हातातला अर्धा पेला पोटात रिता केला. दारूतलं नवसागर थेट दामूच्या काळजाला भिडलं. त्यानं भट्टीवाल्याला एक शिवी हासडली.\n‘‘साला, एवढा नवसागर टाकतो दारूत. बॅटरीतलं अॅसिड टाकलंय असं वाटतं.’’\nशोभा काहीच बोलली नाही. एका कडेला तिनं बकरीला बांधलं आणि कृष्णाला म्हणाली, ‘‘ऊठ बाळा, जमिनीवरचं सामान उचलून वर ठेव. पलंगावर ठेवून दे. थोडं पाणी खोलीत भरणारेयसं वाटतं. पाऊस थांबण्याची लक्षणं दिसत नाहीत. उलट वाढलाय..’’\nएवढं शोभा म्हणतेय न् तोच गल्लीत एकच गलका सुरू झाला.\n‘‘पुनियाचं झोपडं गेलं वाटतं.’’\nशोभानं दारात जाऊन पाहिलं. मुकादमच्या घराचं आख्खं छप्पर कोसळून गल्लीत पडलं होतं. लोक छप्पर उचलायला धावले. आता काय उपयोग गल्लीतलं पाणी घरात शिरत होतं ते राहिलं बाजूला; आता थेट आकाशातलं पाणी घरात शिरू लागलं, अन् घरभर झालं. आकाशसुद्धा ना हट्टाला पेटलं होतं\nकृष्णाला खरं तर बाहेर जायचंय. शोभानं तिला थांबवलं. ‘‘तू बैस. पुढच्या महिन्यात लग्न आहे तुझं. हात-पाय तुटलेबिटले तर..’’ असं बरंच काहीतरी सांगत सांगत शोभा बाहेर गेली. मुलीशी दोन शब्द बोलावेत असं दामूला वाटलं. घरात आता तिघेजण. दामू, कृष्णा आणि बकरी.\n‘‘कांदा आहे का बाळा एक कांदा कापून, मीठ लावून दे.’’\nकृष्णा शांतपणे कांदा कापू लागली. खिडकीवर ठेवलेली बाटली दामूनं उचलली आणि पुन्हा ग्लास भरला.\n‘‘माठातनं पाणीसुद्धा दे गं मुली.’’\nएक चकार शब्द न बोलता कृष्णानं पाण्याचा मग दामूपुढे ठेवला. अर्धा ग्लास दारू, अर्धा ग्लास पाणी. कृष्णा जाण्यासाठी वळली तर दामूनं आपला थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला. काही वेळ दामूचा हात वाऱ्यावर झुलत राहिल्यासारखा. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे. आणि दामूनं कृष्णाला आशीर्वाद दिला..\n‘‘काळजी करू नकोस, बेटा. खूप थाटामाटात करीन तुझं लग्न. पंचवीस हजारांची खोली, पंचवीस हजारांचे कपडे, दागिने आणि पंचवीस हजार तुझ्या नवऱ्याला. पूर्ण एक लाख रुपये आणीन. सगळे तुझ्या लग्नासाठी.’’\nमग दामूनं स्वत:च हिशेबात दुरुस्ती केली.\n‘‘एक लाख जास्त झाले काय.. चल, पन्नास हजार आणीन.’’ नशेत असताना दामूनं ही गोष्ट पंचवीस हजारदा तरी सांगितली असेल. आणि दर खेपेला शोभा त्याला दरडवायची-\n रेसला जाणार की काय क��� चोरी करणार’’ प्रत्येक वेळी शोभा असं म्हणायची- आणि दारू प्यायल्यानंतर दामू निदान एकदा तरी कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून एवढंच म्हणायचा : ‘‘तू काळजी करू नकोस..’’\nकांदा आणि मीठ दामूपुढं ठेवून कृष्णा पुन्हा सामान हलवण्याच्या कामाला लागली. पाणी एव्हाना खोलीत आलं होतं. किचनच्या छपराखाली ठेवलेल्या बादलीत पाण्याचा आवाज सतत. इतका वेळ शांत बसून राहिलेली बकरी उभी राहिली.\nबराच वेळ झाला तरी शोभा परतली नाही म्हणताना कृष्णा तिला शोधायला बाहेर पडली. तर तीसुद्धा अर्धा तास गायब. दामूला घरातल्या सामानाची काळजी वाटू लागली. सगळ्यात आधी आपली एक लिटर दारू त्यानं नीटपणे वर ठेवून दिली. डाळीच्या डब्यात लपवलेली ती वेगळी. मग पाण्याचा एक मोठा जग दामूनं भरून ठेवला. कपडय़ांच्या दोन पेटय़ा माळ्यावर ठेवल्या. तिसरी पेटी जड होती. ओढताना दामूच्या पायाला लागली. त्यानं तिथंच ठेवून दिली ती पेटी.\nबकरी एकदम कोपऱ्यात घुसली अन् उभी राहिली. हात बांधून नमाजासाठी उभी असल्याप्रमाणे. एका डब्यात कुरमुरे भरलेले होते. दामूनं थोडे खिशात भरले. थोडे मुठीत. आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. खोलीत पाणी भरू लागलं.\nशोभाला शोधायला बाहेर पडलेली कृष्णा परत आली नाही. शोभा आली. तिनं साडी गुडघ्यापर्यंत वर खोचली होती अन् आरडाओरडा करत होती : ‘‘हे पाहा, आज घरी रांधणं जमणार नाही. खालच्या हॉटेलात र्अध पाणी भरलंय. लोक वरच्या गॅरेजांना पळताहेत.’’\nदारूच्या नशेत होता दामू. आठवण मात्र पक्की\n घर भरून गेलं असेल ना त्याचं\n‘‘सगळं सामान वर पाठवतोय बिचारा. हीरो, गोपाळ, सुलेमान.. सगळे जुंपलेत कामाला. पण काय करायचं म्हाताऱ्याकोताऱ्यांना, मुलाबाळांना सांभाळायचं की सामानाची काळजी करायची म्हाताऱ्याकोताऱ्यांना, मुलाबाळांना सांभाळायचं की सामानाची काळजी करायची\nशोभा खाण्यापिण्याच्या वस्तू वर ठेवत होती. वडा-पाव आणला होता तिनं. तो दामूसाठी तयार करता करता म्हणाली, ‘‘केवढी मुलं जन्माला घालतात वस्तीतले लोक एका साइजची दहा-दहा मुलं सहज सापडतील. आपलं एकच आहे ते बरं एका साइजची दहा-दहा मुलं सहज सापडतील. आपलं एकच आहे ते बरं\nबायकोघरी परत आली म्हणताना दामूच्या जीवात जीव आला. डोकं पुसता पुसता म्हणाला, ‘‘तुझं पोट पडू नसतं लागलं तर आतापावेतो इथंसुद्धा लाइन लागली असती.’’\nमानेला एक झटका देत शोभा म्हणाली, ‘‘देव आहे न���, तो वाचवतो. घे.. खाऊन घे.’’\nदामूनं तिचा दंड धरला.\n‘‘तो काय तुझ्या नात्यात लागतो\n‘‘हात सोडा,’’ शोभा करडय़ा सुरात म्हणाली. ‘‘इथनं निघण्याची तयारी करा. खाली किती पाणी भरलंय ते पाहा.’’\nशोभानं दोन पेटय़ांवर खुर्ची ठेवली. दामू उठला आणि आस्ते आस्ते खुर्चीवर चढून बसला. ‘‘इतक्या उंचावर तर तुझे नातेवाईकसुद्धा यायचे नाहीत. पाणी कसलं येतंय\n‘‘खुर्चीतून पडूबिडू नकोस. उचलायला कुणी नाहीए इथं,’’ शोभा म्हणाली.\n‘‘गॅरेजच्या गच्चीवर. थोडी मदत करते कामात. कृष्णा तिथंच आहे.’’\n‘‘पाणी थोडं ओसरलं की आम्ही सगळे परत येऊ.’’\nपरंतु ओसरलं तर कुणीच नाही. ना पाऊस, ना दामू. गल्लीतला प्रवाह वेगानं वाढत राहिला. नाल्याचा झाला समुद्र. मुकादमचा लहान मुलगा पाण्यात पडला आणि गटांगळ्या खात खात वाहून गेला. लोक त्याला वाचवायला धावले. हाती लागला नाही. या पळापळीत काहींना इजा झाली. जिथं पाण्याचा भोवरा झाला, तिथलं एखादं मॅन-होल उघडं असणार. अन् तिथंच मुकादमच्या मुलाला पाण्यानं खेचून नेलं, असं अनेकांचं म्हणणं.\nघरात वीज नाही. किंवा विजेचं कनेक्शन मुद्दाम बंद करण्यात आलं असेल. नाही तरी शॉर्टसर्किटचा धोका होताच वस्तीला. संध्याकाळ होता होता आख्खं शहर पाण्यासकट काळोखात बुडालं.\nवस्तीच्या वरच्या बाजूला तीन गॅरेजं. तिथं सहा फूट पाणी भरलं होतं. दुरुस्तीसाठी इंजिन काढलेल्या गाडय़ांचे सांगाडे कबरीत असल्याप्रमाणे पाण्यावर तरंगत होते. काहींनी छपरांच्या खाचांमधलं सामान पाण्यात फेकून दिलं आणि मोकळ्या खाचांमध्ये आश्रय घेतला. पाऊस थांबत नाही अन् पाणी ओसरत नाही तोवर ती माणसं खाली उतरण्याची शक्यता नाही.\nबादलीसुद्धा थेंबे थेंबे भरून पाण्यावर हेलकावे खात होती. बाहेरचा कोलाहल आता निवळला होता. वस्ती रिकामी होत होती. कधीमधी मोठय़ानं आरडणं-ओरडणं, बस्स क्रिकेटची मॅच सुरू असल्याप्रमाणे. विकेट गेली म्हणा किंवा कुणी षट्कार ठोकला की कसा गलका होतो- तसा गलका अधनंमधनं ऐकू येत होता. तेवढं सोडलं तर सगळीकडे आवाज छपराचा, पावसाचा, पाण्याच्या प्रवाहाचा. जणू आकाश अंगाईगीत ऐकतंय.. आणि डोळे जड जड होत होते.\nज्यांना बाहेर पडणं शक्य झालं ते बाहेर पडले आणि दूरच्या इमारतींच्या गच्च्यांच्या, हॉस्पिटलच्या आवाराच्या आणि शाळांतल्या वर्गाच्या आसऱ्याला गेले. कृष्णा हॉस्पिटलच्या व्हरांडय़ात स्वत:ला घट्ट आवरून बसली ��ोती. तिला कुणी सांगितलंच नाही. वस्तीतल्या लोकांनी शोभाला पाण्यात बुडताना पाहिलं होतं. काहींचं म्हणणं की, शोभाला साप चावला. पाण्यात ठिकठिकाणी साप वळवळत होते.\nसंध्याकाळ होण्यापूर्वी दोन तरुणांनी कंबरेला दोरखंड बांधून दामूच्या खोलीपर्यंत जाण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पाणी मानेपर्यंत आलेलं. बकरी दारात उलटी अडकलेली. मेली होती. भिंतीलगतचं पाणी खूप वेगानं खालच्या दिशेनं वाहत होतं. मागची खिडकी पाण्यात बुडाली होती. दामूनं महत्प्रयासानं भांडी ठेवण्याचं टेबल वरच्या फळकुटावर खेचून त्यावर खुर्ची ओढून घेतली. काही भांडी पाण्यावर तरंगत होती, काही पाण्यात वाहून गेली. कान फाटतील की काय असा पावसाचा, पाण्याचा आवाज. त्या दोन तरुणांनी दामूला खूप हाका मारल्या.\nएका हातात दारूची बाटली अन् दुसऱ्या हातात एक लांबच्या लांब दांडी. दामू दांडीनं पाण्यात तरंगणारे टोमॅटो पकडत होता. घराच्या बाहेर पडण्याविषयी ना त्यानं कुणाचं ऐकलं, ना कुणाला सांगितलं. कदाचित तो विचारसुद्धा त्याच्या मनाला शिवला नसेल. दामू पाण्याच्या वर होता. आणि त्यानं आकाशाकडे एकच हट्ट धरला होता-\nही झड आधी कोण बंद करणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘संशोधन लेख व ग्रंथाचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा’\nपुस्तक दिंडीच्या माध्यमातून पाणी बचतीचा संकल्प करण्याची गुढी\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/arun-nalawade/", "date_download": "2019-03-25T08:24:22Z", "digest": "sha1:CKXLNBCDPS5LYIUJ4XX6CJLMXOWCC5ZZ", "length": 2674, "nlines": 47, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Arun Nalawade - मराठी कलाकार", "raw_content": "\n‘चॉकलेट बॉय’ची इमेज पुसणार आहे ‘हा’ अभिनेता.आगामी मराठी सिनेमा’मुंबई आपली आहे’.\nमराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार...\nस्वप्नपूर्तीसाठीचा खडतर प्रवास, पहा ‘तू तिथे असावे’ संगीतमय सिनेमाचा ट्रेलर.\nगाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या एका युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास आगामी ‘तू तिथे...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/empty-spaces-in-a-medicine-strips/", "date_download": "2019-03-25T08:13:34Z", "digest": "sha1:VQ2W5S7SYOXTLNJGGVZSL6P4VO3SHKHJ", "length": 11557, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "औषधी गोळ्यांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा का सोडण्यात येते? तुम्हाला माहित नसलेलं कारण!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nऔषधी गोळ्यांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा का सोडण्यात येते तुम्हाला माहित नसलेलं कारण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nऔषध कशामध्ये मिळतात हो तुम्ही म्हणालं लहान डब्बीमध्ये, बॉटल्समध्ये आणि चौकोनी, आयताकृती पॅकेट्समध्ये तुम्ही म्हणालं लहान डब्बीमध्ये, बॉटल्समध्ये आणि चौकोनी, आयताकृती पॅकेट्समध्ये आज आपण याच गोळ्यांच्या पॅकेट्सबद्दल रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत, जी तितकी महत्त्वपूर्ण वाटत नाही, पण त्यामागे देखील एक लॉजिक आहे, एक कारण आहे\nतर डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन नुसार आपण मेडिकल वाल्याकडून औषधांच्या गोळ्यांची पॅकेट्स घेतो. सहसा ही पॅकेट्स म्हणजे दहा गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) असते. पण बहुतेक गोळ्यांच्या पॅकेट्सची वेगळ्या प्रकारे देखील पॅकिंग केलेली असते. पण कोणतही पॅकेट्स पहा, एक गोष्ट तुमच्या नक्की लक्षात येईल की त्यावर खूप रिकामी जागा (space) आहे.\nआज आपण जाणून घेऊया अशी रिकामी स्पेस देण्यामागचे कारण काय\nजेव्हा गोळ्यांची पॅकिंग केली जाते तेव्हा फक्त एकाच ठिकाणी ती गोळी असते, सभोवताली रिकामी जागा यासाठी असते जेणेकरून गोळी मध्ये असलेले रसायन हे इतर गोळ्यांमध्ये मिसळु नये व मिसळून हानिकारक प्रक्रिया (रीअॅक्शन) होऊ नये.\nजर रसायनांचे मिश्रण झाले तर त्याचा उलट परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होऊ शकतो. तसेच अश्या प्रकारे पॅकिंग केल्याने वाहतूक करताना गोळ्यांचे नुकसान होत नाहीत, त्या तुटत नाहीत, त्यांच्यावर बाहेरील वातावरणाचा परिणाम होत नाही.\nहे झाले एक कारण, अजून एक कारण असे सांगितले जाते की, ज्या पॅकेट्समध्ये केवळ एकच गोळी असते.\nत्यावर रिकामी जागा यासाठी सोडली जाते जेणेकरून पाकिटाच्या मागे तपशीलवार माहिती माहिती प्रिंट केली जावी.\nआता तुमच्या लक्षात आलं असलेच की केवळ पॅकेजिंग आकर्षक दिसावी एवढच यामागे कारण नसून इतरही महत्त्वाची कारण आहेत.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← हा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहेर पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\n“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा\nगुगलवर या काही गोष्टी सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते \nएकाच वेळी अनेक औषधं घेणं धोकादायक असू शकतं का वाचा तज्ञ काय म्हणताहेत\nहोमिओपॅथी : एक फायदेशीर पण दुर्लक्षित उपचार पद्धती\nलंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय \nएलियन्स हल्ला करणारेत : ह्या दोघांच्या दाव्यांमुळे अमेरिका, रशिया चक्रावलेत\nजमीन प्रकरणात भारतीय लष्कराला ५ लाखांचा गंडा\nया भारतीय व्यक्तिमुळे गुगलचा जन्म झाला \nपाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जाणारा दुबळा संघर्ष : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ६)\nमानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून\nलग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण\nइशा फाउंडेशनचा हास्यास्पद शोध : कथित “कैलाश तीर्था”ची छोटीशी बाटली तीन हजारात विक्रीला \nडोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\nVLC प्लेयरचा उपयोग करून आता Youtube Videos डाउनलोड करा\nSkyDeck: Plane च्या टपावर बसून जगाचा हवाई view \nह्या १० फोटोग्राफी ट्रिक्स तुम्हाला तुमचा परफेक्ट शॉट क्रियेट करायला शिकवतील\nदेवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली\nशास्त्रज्ञांनी दावा केलाय की बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य त्यांनी उलगडलयं \nजगातील सर्वात जुन्या झाडाचे वय किती असेल हा आकडा थक्क करून टाकणारा आहे \nशाळेसाठी जागा नव्हती, म्हणून त्याने स्वत:च्या घरातच ‘शाळा’ थाटली\nभारतासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेत कसा गेला मोठ्या “घोळाची” रंजक कथा\nबॉलिवूडला ऋणी करणारा, चिरंतन “सरफरोश”\nजेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/books/dyandevichi-aradhana/", "date_download": "2019-03-25T07:56:49Z", "digest": "sha1:ZT2JYWTGCSG7I5GOFPSXRKMAUSFEDODC", "length": 7809, "nlines": 60, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nप्रभात फिल्म कंपनीत संत ज्ञानेश्वर हा चित्रपट तयार होत असताना आठवले यांची ज्ञानेश्वरीशी झालेली ओळख त्यांनी प्रयत्नपूर्वक वाढवली. त्यांनी त्या ग्रंथाची नुसती पारायणे केली नाहीत तर तिचा सर्वांगीण अभ्यास केला, काया वाचा मने करुन भक्तीभावाने आराधना केली. त्यांना ज्ञानेश्वर कवी म्हणून भावले, तत्ववेत्ते म्हणून थोर वाटले, ते आंधळ्या दंभाला आव्हान देणारे बंडखोर आहेत हे पटले, दृष्यकथा वाचकासमोर उभी करणारे आपल्यासारखे चित्रपट क्षेत्रातले कलाकार आहेत हे जाणवले आणि सर्वात महत्वाचे – जो खरा ज्ञानी असतो त्याची अशी जीवनदृष्टी तयार होते की वृत्तीत निर्भेळ व��नोद मुरतो, तसा तो ज्ञानेश्वरांच्यातही ओतप्रोत होता हेही कळले.\nही ईश्वरासारखी विविध रूपे असणारे ज्ञानेश्वर हेही ज्ञानाचे आणि शब्दसृष्टीचे ईश्वरच आहेत हे जे आपल्याला प्रतीत झाले आहे ते सकलांना सांगावे म्हणून आठवले यांनी ३५० हून अधिक पानांचा ग्रंथ लिहिला. गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायासारखे या ग्रंथातही अठरा लेख आहेत. ज्ञानेश्वरीतील ग्रामीण जीवन, स्त्री विश्व, आहारशास्त्र, पूर्वजन्म आणि गुप्तधन याचे विवेचन, श्रीकृष्णदर्शन असे सर्व पैलू उलगडून दाखवले आहेत. ज्या ज्या वेळी ज्ञानेश्वरांना काहीतरी पराकोटीचे, उत्कटतेने सांगायचे असते तेव्हां तेव्हां ते त्या ओवीत 'पतिव्रता' ही उपमा वापरतात असाही एक अत्यंत हृद्य आणि आठवले यांच्यासारख्या श्रेष्ठ कवीलाच दिसेल असा निष्कर्ष आठवले यांनी एकंदर त्रेपन्न उदाहरणे देऊन काढला आहे. त्यातील शेवटच्या लेखाचे शीर्षक आहे 'ज्ञानेश्वर महाराज होते तरी कसे\nसाधा विषय मोठा आशय\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/lal-killa/", "date_download": "2019-03-25T08:17:46Z", "digest": "sha1:5LRZE3KUBV4QBQ2QWDAIAYEPWDVOCTSI", "length": 13649, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लाल किल्ला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nमोदी, शहा आणि पात्रा\nसत्ताधारी असल्याने भाजपच्या उमेदवारांबाबत सर्वाधिक उत्सुकता होती.\nकेंद्रातील सत्ताधाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे राज्य आहे ते उत्तर प्रदेश.\nकाश्मीर खोऱ्यात शांततेचे नामोनिशाण नाही.\nराफेलबाबत केलेल्या आरोपांचे स्रोत उघड करण्याचे आव्हान भाजपने काँग्रेसला दिलेले होते.\nआर्थिक कमकुवत असलेल्या सवर्णाना आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे अन्य मागासवर्गीयांमध्ये असंतोष वाढलेला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एनडीए’ सरकारचा सहावा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर होणार आहे.\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nप्रादेशिक पक्षांचा काँग्रेसविरोध कायम असला तरी मोदीविरोधाची तीव्रता त्यापेक्षा अधिक असावी.\nभाजपने राष्ट्रीय परिषद घेऊन तीन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे.\nहिवाळी अधिवेशनातील पहिले तीन आठवडे काँग्रेसने ‘राफेल’वर संयुक्त संसदीय समितीच्या मागणीवर जोर दिलेला होता.\nतेलंगणा राष्ट्रीय समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी तिसरी आघाडी बनवण्याचा घाट घातला आहे.\nहिंदी पट्टय़ातील तीनही राज्ये गमावल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने कितीही नाकारले तरी मोठा दणका बसलेला आहे.\n‘बोफोर्स’ला हाताशी धरून व्ही. पी. सिंह यांनी राजीव गांधींच्या काँग्रेसचा पराभव केला.\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्या, मंगळवारपासून सुरुवात होत आहे.\nदिल्लीतील शेतकरी मेळाव्याने काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांना मोदी-भाजपविरोधात लढण्यासाठी ठोस राजकीय अजेंडा दिला आहे.\nभाजपच्या प्रसिद्धी विभागातील एका सदस्याला जम्मू-काश्मीरसंदर्भात जुजबी माहिती विचारली होती.\nकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हिंदुत्व या विषयावर चर्चा केली की, भाजपने त्यांची कशी कोंडी केलेली आहे.\n‘मोदी करिष्मा’ हळूहळू ओसरू लागला असून राम मंदिराची लाटही निर्माण होण्याची शक्यता अंधूक दिसते.\nराफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची पाठ सोडलेली नाही.\nकाँग्रेसवाल्यांना आंदोलने करण्याची अजिबात सवय नाही.\n‘शाहबानो’ प्रकरणात मुस्लीम धर्मात सुधारणा करून आधुनिक समाज घडवण्��ाच्या प्रक्रियेला काँग्रेसने मोडता घातला.\nनैतिक अधिष्ठानाचा मुद्दा भाजपसाठी महत्त्वाचा ठरायला हवा होता.\nमायावतींनी काँग्रेसशी घेतलेला काडीमोड अनपेक्षित नाही.\nभाजपला तलवारीऐवजी ढाल पुढे करावी लागावी हे कशाचे लक्षण आहे\nआठवडाभर भाजपवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/reserve-bank-of-india-7-1784140/", "date_download": "2019-03-25T08:32:41Z", "digest": "sha1:PBABUXPPECKTIK2WUMHCPFHD3DS2Y235", "length": 26528, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Reserve Bank of India | कधी सुप्त, कधी व्यक्त रिझव्र्ह बँक वि. सरकार संघर्ष | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nकधी सुप्त, कधी व्यक्त रिझव्र्ह बँक वि. सरकार संघर्ष\nकधी सुप्त, कधी व्यक्त रिझव्र्ह बँक वि. सरकार संघर्ष\nओसबोर्न स्मिथ (१९३५-१९३७) विरुद्ध सर जॉन ग्रिग\nएकीकडे धोरणात्मक स्वायत्तता आणि आपल्या उद्दिष्टांशी प्रतारणा न करण्याविषयीची रिझव्र्ह बँकेची आग्रही भूमिका; तर दुसरीकडे आपण आखून दिलेल्या धोरणांशी सुसंगत भूमिका घेण्याबद्दल रिझव्र्ह बँकेकडून असलेली सरकारची अपेक्षा या दोन काहीशा परस्परविरोधी प्रवाहांमधून या दोन अतिमहत्त्वाच्या संस्थांमध्ये (खरे तर त्यांच्या उच्चपदस्थांमध्ये) संघर्षांचे प्रसंग येतच असतात. आर्थिक शिस्त सांभाळत आर्थिक विकास साधायचा कसा, व्याजदर चढे ठेवून मागणीला चालना मिळणार कशी, व्याजदर वाढल्यास कर्जे महागून उद्यमशीलतेवर बंधने येणारच, परंतु पुरवठय़ाकडे योग्य ध्यान दिले नाही तर मागणी वाढल्यास चलनवाढ रोखणार कशी, खनिज तेलांच्या किमती, अनियमित पाऊस या बाह्य़घटकांचा प्रभाव कमी करायचा कसा, असे प्रश्न रिझव्र्ह बँक आणि सरकार जवळपास दररोज हाताळत असतात. दोन्ही संस्थांच्या भूमिका आणि कार्यशैली भिन्न असल्या, तरी र्सवकष आणि सातत्यपूर्ण आर्थिक विकासाचे त्यांचे उद्दिष्ट समान आहे. या उद्दिष्टांविषयी जाण आणि भान हेही दोहोंकडे समान असते. त्यामुळे सरसकट या संस्था एकमेकांविरुद्ध धुमसत नाहीत. तरीही मोजक्या प्रसंगी तशी वेळ आलेली होती. या प्रसंगांचा हा संक्षिप्त आढावा –\nओसबोर्न स्मिथ (१९३५-१९३७) विरुद्ध सर जॉन ग्रिग\nसर ओसबोर्न स्मिथ हे रिझव्र्ह बँकेचे पहिले गव्हर्नर. विनिमय दर आणि व्याजदराच्या मुद्दय़ावरून त्यांचे तत्कालीन ब्रिटिश सरकारशी नेहमीच खटके उडायचे. अर्थमंत्री सर जॉन ग्रिग यांच्याशी त्यांचे कधीही पटले नाही. भारतातून सोने इंग्लंडला नेण्याच्या निर्णयाला ओसबोर्न यांनी विरोध केला होता. तर ओसबोर्न यांच्या पसंतीच्या भारतीय डेप्युटी गव्हर्नरची नियुक्ती ग्रिग यांनी हाणून पाडली होती. ब्रिटिश सरकारच्या सततच्या हस्तक्षेपामुळे मरणयातना होतात, असे ओसबोर्न यांनी १९३६मध्ये लिहिले होते. ते अतिशय फटकळ होते. एकदा थेट व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांचीच संभावना त्यांनी ‘मूर्ख भित्रा’ अशा शब्दांत केल्यामुळे ओसबोर्न यांना जावे लागले.\nबेनेगल रामा राव (१९४९-१९५७) विरुद्ध टी. टी. कृष्णमाचारी\nबेनेगल रामा राव हे रिझव्र्ह बँकेचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले गव्हर्नर. व्याजदर निश्चितीवरून रामा राव यांचे तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांच्याशी मतभेद होते. योगायोगाने दोघेही मद्रास इलाख्यातील होते. पण हा दुवा त्यांच्यातील मतभेद दूर करू शकला नाही. व्याजदरांवर नियंत्रण कोणाचे राहील, या मुद्दय़ावर दोघांची स्वतंत्र मते होते. कृष्णमाचारी हे काहीसे हट्टाग्रही व्यक्तिमत्त्व होते आणि व्याजदर नियमन/नियंत्रण यांवर सरकारचा अंमल राहील, असे त्यांना वाटायचे. याउलट ही जबाबदारी रिझव्र्ह बँकेची असल्याचे रामा राव यांना वाटायचे. परंतु रिझव्र्ह बँक ही अर्थ मंत्रालयाच्य��� अधिकाराबाहेर नाही, असे सांगून कृष्णमाचारी यांनी उघड संघर्षांचा पवित्रा घेतला होता. एकदा संतप्त कृष्णमाचारींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आमंत्रित केलेल्या रामा राव यांचा जाहीर अपमान केला. त्यामुळे कंटाळून गव्हर्नरांनी राजीनामा दिला.\nमनमोहन सिंग (१९८२-१९८५) विरुद्ध प्रणब मुखर्जी\nकाँग्रेसच्या सरकारांमध्ये प्रणब मुखर्जी दरारा राजकीय आणि नोकरशाही वर्तुळात मोठा होता. मनमोहन सिंग हे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्या वेळी प्रणब मुखर्जी अर्थमंत्री होते. या दोघांचे काही मुद्दय़ांवर मतभेद होते, पण नेमस्त विद्वत्तेमुळे मनमोहन सिंग यांनी ते कधीही चव्हाटय़ावर आणले नाहीत. आता इतिहासजमा झालेल्या बँक ऑफ क्रेडिट अॅण्ड कॉमर्स इंटरनॅशनल या बँकेची एक शाखा मुंबईत उघडण्यात यावी याविषयी सरकारचा आग्रह होता. तो दबावात्मक वाटल्यामुळे मनमोहन सिंग यांनी त्यावेळी राजीनामा देऊ केल्याची चर्चा होती. आपण स्वत सिंग यांच्यावर कोणताही दबाव आणला नाही, असे मुखर्जी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले. गव्हर्नर आणि अर्थमंत्री यांचे नाते गुंतागुंतीचे असते आणि प्रत्येक मुद्दय़ावर त्यांचे एकमत होऊ शकत नाही, असे मुखर्जी म्हणाले होते.\nयागा वेणुगोपाळ रेड्डी (२००३-२००८) विरुद्ध पी. चिदम्बरम\nमाजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम हे त्यांच्या परखड मतप्रदर्शनाबद्दल ओळखले जातात. यूपीए-१ आणि यूपीए-२ सरकारांमध्ये बहुतेक काळ तेच अर्थमंत्री होते. या दरम्यान यागा वेणुगोपाळ रेड्डी, दुव्वुरी सुब्बाराव आणि रघुराम राजन अशा तीन गव्हर्नरांशी त्यांचा संबंध आला. रेड्डी आणि चिदम्बरम यांच्यात पतधोरणावरून काही वेळा जाहीर मतभेद झाले होते. बँकांची मालकी परदेशी गुंतवणूकदारांना देण्यावरूनही दोघांची परस्पर भिन्न मते होती. दोन आकडी विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेची सगळी इंजिने पूर्ण क्षमतेनिशी धावत आहेत, असे चिदम्बरम यांनी २००८मध्ये जाहीर केले होते. त्या वेळी रेड्डी यांनी मात्र व्याजदर स्थिर किंवा चढे ठेवण्याला पसंती दिली हे चिदम्बरम यांना मंजूर नव्हते. दोघांमधील मतभेद वाढल्यामुळे थेट मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप करून रेड्डी यांच्याकडे चिंता व्यक्त केली. रेड्डी यांनी चिदम्बरम यांच्याकडे माफी मागून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. मात्र गव्हर्नरपदाच्या दुसऱ��या टर्मची ऑफर स्वीकारली नाही.\nदुव्वुरी सुब्बाराव (२००८-२०१३) विरुद्ध पी. चिदम्बरम\nलेहमन ब्रदर्स बँकेच्या पतनानंतर लगेचच सुब्बाराव रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर बनले. अत्यंत कसोटीचा तो काळ होता. त्यांनी या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. रोखता परिपूर्ण राहावी यासाठी त्यांनी व्याजदर घटवले. मात्र कालांतराने या रोखतेचा परिणाम चलनवाढ फोफावण्यात होऊ लागला. मग सुब्बाराव यांनी व्याजदर वाढवायला सुरुवात केली. एप्रिल २०१०पासून सुब्बाराव यांनी १५ महिन्यांत विक्रमी १२ वेळा व्याजदर वाढवले. चिदम्बरम यांना नंतरच्या काळात हे अजिबात आवडेनासे झाले. चलनवाढीइतकेच महत्त्वाचे आव्हान वृद्धीचे असते. या प्रश्नावर आम्हाला एकटय़ाने वाटचाल करावी लागली, तरी आमची तयारी आहे, असे चिदम्बरम एकदा म्हणाले होते. त्यांनी स्वतहून पुढाकार घेऊन, स्वतच्याच अध्यक्षतेखाली रोखता व्यवस्थापन समिती स्थापली, जे सुब्बाराव यांनाही अजिबात आवडले नव्हते.\nरघुराम राजन (२०१३-२०१६) विरुद्ध अरुण जेटली\nयूपीए-२ च्या सरत्या काळात रघुराम राजन यांची नियुक्ती झाली. एनडीए सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी राजन यांचे काही मुद्दय़ांवर मतभेद होऊ लागले. सरकारी खर्चाला आटोक्यात ठेवण्यासाठी आणि चलनवाढीची संभाव्यता लक्षात घेऊन राजन पतधोरण आखताना सावध पावले उचलत होते. सरकारला विकासाची चिंता अधिक होती आणि यासाठी रोखतेची गरज होती. विकासदर ७.५ टक्के असल्याबद्दल स्वतची पाठ थोपटत असतानाच, तो अधिक वाढवण्याची आमची क्षमता आहे, असे जेटली सांगत होते. यावर ७.५ टक्के विकास हा ‘आंधळ्यांच्या दुनियेत एकाक्ष’ असल्यासारखा असल्याची टिप्पणी राजन यांनी केली, जी जेटलींसह अनेकांना झोंबली. राजन अनेकदा आर्थिकेतर मुद्दय़ावरही जाहीर मतप्रदर्शन करतात, ही त्यांच्या विरोधकांची तक्रार होती. राजन-जेटली संबंध उत्तरोत्तर बिघडत गेले. तशातच स्वामींसारख्या तोंडाळ नेत्याने राजन यांच्या उचलबांगडीची मागणी केल्यावर त्यांना आवरते घ्यायला मोदी सरकारमधील कोणीही सांगितले नाही. दुखावलेले गेलेले राजन त्यामुळे कार्यकाळ संपल्यानंतर अमेरिकेत पुन्हा निघून गेले.\nऊर्जित पटेल (२०१६-) विरुद्ध अरुण जेटली\nऊर्जित पटेल हे ‘सरकारच्या पसंती’चे गव्हर्नर म्हणून सुरुवातीला ओळखल�� जायचे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने घेतला. चलनविषयक इतका महत्त्वाचा निर्णय घेताना सरकारने गव्हर्नरांना विश्वासात घेतले होते का, याचा खुलासा मोदी, जेटली किंवा पटेल यांच्यापैकी कोणीही आजतागायत केलेला नाही. पटेल यांनी या निर्णयाला विरोध केला नाहीच, उलट काही व्यासपीठांवर त्याचे समर्थन केले. पण नंतरच्या काळात सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जाना आळा घालण्यासाठी घालून दिलेली सुधारणा चौकट (करेक्टिव्ह अॅक्शन फ्रेमवर्क), बिगरबँक वित्तीय संस्थांकडील रोखता आदी मुद्दय़ांवर पटेल आणि जेटली यांच्यातील मतभेद उघड होऊ लागले. रिझव्र्ह बँकेकडे असलेली प्रचंड रोकड योग्य प्रकारे वापरली गेली पाहिजे, असा सरकारचा आग्रह आहे. तर फुटकळ कारणांसाठी ती वापरता येणार नाही, असा रिझव्र्ह बँकेचा पवित्रा आहे. रिझव्र्ह बँक कायद्यातील अनुच्छेद ७ अंतर्गत रिझव्र्ह बँकेला ‘निर्देश’ देण्याचा विचार सरकार करत आहे. शिवाय स्वतंत्र प्रदान नियामक (पेमेंट रेग्युलेटर) नेमण्याचा विचार सरकारने सुरू केल्यामुळे रिझव्र्ह बँकेला हा स्वतच्या अधिकारातील अधिक्षेप वाटतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/kunala-sangu/", "date_download": "2019-03-25T08:19:58Z", "digest": "sha1:WMBDFR6KTWB6UONZXHHL3ZCIHVJZ7E5H", "length": 5987, "nlines": 70, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nकुणाला सांगू माझी व्यथा\nप्राजक्ताच्या प्रासादावर पडली विदुल्लता\nकुणाला सांगू माझी व्यथा\nप्रलयाचे हे भीषण तांडव\nथरथरत्या पृथ्वीवर नाचे तिमिरदैत्य एकटा\nकुणाला सांगू माझी व्यथा\nकशास जडल्या अपुल्या भेटी\nकशास जडली वेडी प्रीती\nमीलन अपुले ठरले आता स्वप्नामधली कथा\nकुणाला सांगू माझी व्यथा\nकोण निवारील घोर अनर्था\nतूच प्राण तू जीवन पार्था\nये विझवाया हा दावानल शिंपाया अमृता\nकुणाला सांगू माझी व्यथा\nआठवले यांनी होमी वाडिया यांनी निर्मिलेल्या 'सुभद्राहरण' या चित्रासाठी लिहिलेली आणि वसंत पवार आणि प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेली गीते आजही अत्यंत लोकप्रिय आहेत.'आला वसंत ऋतु आला, 'उमलली एक नवी भावना' 'कुणाला सांगू माझी व्यथा', एकटी मी एकटी', 'बघत राहू दे तुझ्याकडे' ही सर्वच्या सर्व गाणी श्रवणीय आहेत.\nआला वसंत ऋतु आला\nउमलली एक नवी भावना\nकुणाला सांगू माझी व्यथा\nबघत राहू दे तुझ्याकडे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-25T08:09:23Z", "digest": "sha1:GEFPXJVCCAU3PUMADQFT3RCBSJHNVPVT", "length": 7935, "nlines": 44, "source_domain": "vicharpravah.in", "title": "९. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : लिखित मजकूर - विचारप्रवाह", "raw_content": "\n९. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : लिखित मजकूर\nपरंतु या यंत्राभोवतालचे रहस्य अजूनही पुरते उलगडले नव्हते. या यंत्रात असे अनेक गिअर होते, ज्यांचे प्रयोजन समजणे बाकी होते. द्विआयामी एक्स-रे छबीमधून तज्ञांना या यंत्राबाबत अंशतः माहिती मिळाली खरी परंतु अधिक माहिती मिळविण्याकरिता आणखी प्रगत अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. त्याचवेळी एखाद्या वस्तूची त्रिमितीय एक्स-रे छबी तयार करु शकेल, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान इंग्लंडमध्ये विकसित करण्यात आल्याचे तज्ञांना समजले. परंतु हे तंत्रज्ञान जीर्ण अशा ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’पर्यंत पोहचवणे हे एक आव्हान होते. तज्ञांनी व तंत्रज्ञांनी त्यासाठी मोठा खटाटोप केला. अखेर ते खास त्रिमितीय एक्स-रे यंत्र ग्रीसमधील संग्रहालयापर्यंत प्रयत्नांती आणण्यात आले. तिथे ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ची त्रिमितीय छबी काढण्यात आली. त्यामुळे त्या प्राचीन यंत्राचे आणखी काही अज्ञात पैलू समोर आले.\nअँटिकिथरो मेकॅनिझम – त्रिमितीय एक्स-रे छबी\n‘अँटिकिथरो मेकॅनिझम’चा जवळपास अर्धा भागच त्यामितीस शिल्लक उरला होता. तरी त्यात एकून २७ गिअर असल्याचे त्रिमितीय छबीमध्ये दिसत होते. पूर्णस्वरुप यंत्रात कदाचित याहून अधिक गिअर असले असते. या छबीमुळे प्रत्येक गिअरची स्थाननिश्चिती करण्यास देखील मदत झाली. परंतु ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’बाबत अजूनही बर्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या होत्या. त्याकरिता त्यावरील अस्पष्टासा लिखित मजकूर उद्धृत करणे गरजेचे होते. त्यासाठी पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.\nअँटिकिथरो मेकॅनिझम – लिखित मजकूर\n‘अँटिकिथरो मेकॅनिझम’वरील अस्पष्ट मजकूर उधृत केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत झाली. याकामी प्राचीन ग्रीक भाषा तज्ञांची मदत घेण्यात आली. उपलब्ध मजकूराचा आभ्यास केला असता तज्ञांना जे आढळले, ते अगदी थक्क करणारे होते भविष्यात ‘चंद्रग्रहण’ व ‘सूर्यग्रहण’ कधी होईल भविष्य��त ‘चंद्रग्रहण’ व ‘सूर्यग्रहण’ कधी होईल याचा अचूक कयास ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या सहाय्याने त्याकाळी बांधता यायचा. एव्हढेच नव्हे याचा अचूक कयास ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या सहाय्याने त्याकाळी बांधता यायचा. एव्हढेच नव्हे तर ग्रहण किती वाजता होईल तर ग्रहण किती वाजता होईल ग्रहणाच्या सावलीची दिशा कोणती असेल ग्रहणाच्या सावलीची दिशा कोणती असेल चंद्रग्रहणाचा रंग कोणता असेल चंद्रग्रहणाचा रंग कोणता असेल ही सारी विस्तृत माहिती त्या यंत्राच्या सहाय्याने मिळू शकत असे.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n४२. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : आयबीएम अकांऊंटिंग मशिन : कंप्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनी\n७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : धातूची रहस्यमय वस्तू\n१८. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : चार्ल्स बॅबेज\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2019-03-25T08:15:46Z", "digest": "sha1:QIH6WJRFB33LI3L5OFJJ5DWAZBCZW4HG", "length": 8723, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "७२. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग १ - विचारप्रवाह", "raw_content": "\n७२. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग १\nदुसरे महायुद्ध सुरु असताना सांकेतिक संदेश भेदणे निकडीचे होते. त्यावेळी त्यात ब्रिटनने अगदी भरिव कामगिरी केली. सांकेतिक संदेश भेदण्याकरिता त्यांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रही विकसित केले होते. याशिवाय ‘युनिव्हर्सल मशीन’ची संकल्पना मांडनारे ॲलन ट्युरिंग हे देखील ब्रिटिश होते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक संगणक तयार करण्याच्या दृष्टीने त्या देशात बर्यापैकी पोषक वातावरण होते असे म्हणता येईल.\nमहायुद्ध संपल्यानंतर ॲलन ट्युरिंग यांनी ‘नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी’ येथे स्वतःचा इलेक्ट्रॉनिक संगणक प्रकल्प सुरु केला. त्यादृष्टीने त्यांनी एक संगणकीय रचना तयार केली. त्यांच्या सहकार्यांना मात्र ती रचना प्रत्यक्षात उतरवणे आव्हानात्मक वाटले. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला. दरम्यान मॅन्चेस्टर विद्यापिठात एक संगणक प्रकल्प सुरु करण्यात आला होता. कोलॉसिसच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे मॅक्स न्यूमन हे त्या प्रकल्पाचे प्रमुख होते. ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’मधील संकल्पनांचा यात विचार करण्यात आला होता.\nमहायुद्धानंतर मॅक्स न्यूमन मॅन्चेस्टर विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक बनले, तेंव्हा एडवॅक सारखा संगणक तयार कराण्याहेतूने त्यांनी विद्यापिठाकडून अनुदान मिळवले. त्यानंतर एफ. सी. विल्यम्स यांचा पाठपुरावा करुन त्यांनी त्यांस आपल्या प्रकल्पात सामावून घेतले. विल्यम्स कुशल रडार इंजिनिअर होते. मॅक्स न्यूमन यांनी विल्यम्स यांना ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ ही संकल्पना समजावून सांगितली. त्यानंतर विल्यम्स यांनी आपले कौशल्य वापरुन मेमरीशी निगडीत समस्या सोडवल्या. त्यामुळे संगणक निर्मितीचा मार्ग सुकर झाला. अशाप्रकारे २१ जून १९४८ रोजी मॅन्चेस्टर विद्यापिठाचा संगणक तयार झाला. हा ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ प्रकारातील पहिला संगणक होता. याचे नाव ‘स्मॉल स्केल एक्सपेरिमेंटल कंम्प्युटर’ (SSEC) असे ठेवण्यात आले. हा संगणक आकाराने लहान होता. त्यामुळे तो ‘मॅन्चेस्टर बेबी’ या टोपण नावाने देखील ओळखला जात असे. या संगणकाची कार्यक्षमता चांगली होती. त्यामुळे तो अधिक विकसित करायचे ठरवले गेले. त्यातूनच ‘मॅन्चेस्टर मार्क १’ या संगणकाची निर्मिती झाली. या संगणकातून प्रेरणा घेत पुढे याप्रकारचा व्यावसायिक संगणक तयार करण्यात आला. ‘फेरान्टी मार्क १’ हा व्यावसायिकदृष्ट्या विकण्यात आलेला पहिला ‘जनरल परपज संगणक’ होता. मॅन्चेस्टर विद्यापिठात ‘मॅन्चेस्टर मार्क १’ वर काम सुरु होते, त्यावेळी केंब्रिज विद्यापिठात देखील संगणक निर्मितीचे काम चालू होते. मॉरिस विल्क्स यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n६०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : जॉन प्रेसपर एकर्ट\n३४. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन – भाग २\n७१. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : पार्श्वभूमी\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.farmguru.in/campaigns-2/2016/3/14/r6szufg5xah6tb6u4j5gdrj3qrdamk", "date_download": "2019-03-25T08:02:45Z", "digest": "sha1:NJBGX5ODG6V3RGHQPRDJCWQAVQH6X47N", "length": 2293, "nlines": 41, "source_domain": "www.farmguru.in", "title": "Pomo Plus Campaign — farmguru", "raw_content": "\n२० फेब्रुवारी २०१६ पर्यंत\nभारतात महाराष्ट्र हा सर्वात जास्त डाळिंब उत्पादन करणार राज्य अहे. फार्मगुरू घेऊन आल आहे आपल्या सभासदांसाठी नवीन कॅम्पेन, टोमॅटो,डाळिंब आणि कांदा या पिंकासाठी . तज्ञांच्या सल्ला व मार्गदर्शनाखाली निवडलेल्या या बास्केटमध्ये कॅनन, नुवान, ट्रेसर या सारखी किटक नाशक आणि रिडोमिल गोल्ड , कॅब्रिओ टॉप, अॅनट्राकॉल हि बुरशी नाशक तसेच दर्जेदार उत्पादनासाठी झाईम गोल्ड प्लस ही उत्पादने आहेत.\nही उत्पादने पिकाला पूर्ण पीक संरक्षण प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहेत.\nफार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.\n१०० % मूळ उत्पादन\nपोमो मिनी बास्केट कॅम्पेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B6/", "date_download": "2019-03-25T08:22:41Z", "digest": "sha1:NAJAB3LE5WUV5NPO3PY4Z22QTQDSFAJA", "length": 16307, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा’\nमकरंद टिल्लू यांचे मत : गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांचा स्मृतिदिन\nपवनानगर – विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा, विद्यार्थ्यांचा अवघड विषय आपोआप आवडता होईल, असे मत हास्यतज्ज्ञ मकरंद टिल्लू यांनी तळेगाव येथे व्यक्त केले. तळेगाव येथील नूतन इंजिनिअंरिग कॉलेजमध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या 92 व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मकरंद टिल्लू प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.\nया सभेस अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे हे होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव दादा खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्यासह संस्थेचे आजी-माजी मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.\nया वेळी बोलताना टिल्लू म्हणाले की, शिक्षकांनी नेहमी सकारात्मक असले पाहिजे, कारण सकारात्मक पणामुळे आपले कोणतेही काम सहज होऊ शकते तसेच “प्रत्येकाने जगण्यासाठी हसा व हसण्यासाठी जगा’ या तत्वाचा अवलंब केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने हास्य विनोदाचा वापर शिक्षण पद्धतीत अवलंबविल्यास अध्यापन पद्धती व अध्ययन पद्धती सहज सोपी होईल.\nत्याचप्रमाणे पाणी गळतीवर भाष्य करताना मकरंद टिल्लू म्हणाले की, भविष्यात पाणी संकटाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागेल, त्यासाठी प्रत्येकाने पाणी बचतीची चळवळ उभी केली पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाना आपला वाढदिवस साजरा करताना गावातील परिसरातील अथवा आपल्या भागातील गळके व नादुरूस्त नळ दुरूस्त करून साजरा करावा, असे केल्याने मोठी समाजसेवा घडेल, असे त्यांनी सांगितले.\nप्रास्तविकात संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, भविष्यकाळात संस्थेला चांगले भविष्य असून त्यासाठी नवनवीन शैक्षणिक दालने उभारणे गरजेचे आहे. लवकरच सोशल मीडियाच्या या काळात टिकून राहायचे असेल, तर बदल आवश्यक आहे. लवकर संस्थेच्या सर्व शाळा, कॉलेज आयएसओ मानंकन प्राप्त होतील. त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे, तर संस्थेत स्कील डेव्हलपमेंट सुरू करून अनेकांना रोजगार प्राप्त देण्यासाठी संस्थापतळीवर प्रयत्न सुरू आहेत.\nअध्यक्षीय भाषणात आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले की, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेला एक ऐतिहासिक वारसा असून स्पर्धेच्या युगात टिकून राहाचे असेल, तर इतरांबरोबर बदल आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची गरज आहे. महाराष्टात संस्थेचे नावलौकिक होण्यासाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाशी सामंजस्य करार करून संस्थेतील अनेक मोठ्या कंपन्यांशी करार केला. येथे शिक्षण घेणाऱ्या तरूणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.\nया वेळी यावर्षी गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर शिक्षकेत्तर पुरस्कार पैसाफंड प्राथमिक शाळेतील लिपीक सुविधा नामजोशी यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार पवना विद्या मंदिर पवनानगर येथील प्राचार्या प्रीती जंगले यांनी प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक आदर्श शाळा पुरस्कार इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर या शाळेला प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी व बारावी या शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.\nसंपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पवना विद्या मंदिर व पवना ज्युनिअर कॉलेज पवनानगर शाळेने केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे भांडारप्रमुख पांडुरंग पोटे शाळेच्या प्राचार्या प्रीती जंगले, पर्यवेक्षिका निला केसकर यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन पवना विद्या मंदिराचे अध्यापक भारत काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले. सोनबा गोपाळे यांनी आभार मानले.\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ex-sbi-chief-at-baku-airport/", "date_download": "2019-03-25T08:20:09Z", "digest": "sha1:JDWAWUKJFSIZWHCVCNVDRQKVYNRYPYYP", "length": 5639, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जेट एअरवेजमुळे एसबीआयच्या माजी अध्यक्षांवर जमीनीवर झोपण्याची वेळ", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nजेट एअरवेजमुळे एसबीआयच्या माजी अध्यक्षांवर जमीनीवर झोपण्याची वेळ\nमुंबई : जेट एअरवेजचे विमान अचानक बाकू विमानतळावर उतरवल्यामुळे स्टेट बॅकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना संपूर्ण रात्र जमीनीवर झोपून काढावी लागली. जेट एअरवेजच्या मुंबई ते लंडन प्रवासादरम्यान विमानात धूर निघाल्याने विमान अजरबैजानच्या बाकू विमानतळावर उतरविण्यात आले.\nयामुळे भट्टाचार्यांसह अन्य प्रवाशांना १९ तास विमानतळावर ताटकळत रहावे लागले. १९ तासानंतर या प्रवाशांना दुसऱ्या विमानाने लंडनला पाठविण्यात आले. अरुंधती भट्टाचार्य या ‘बीए१९८’ या विमानाने मुंबईहून लंडनला जात होत्या. विमानात धूर आल्यानेे हे विमान तात्काळ बाकू विमानतळावर उतरविण्यात आले.\nमात्र पुढचे १९ तास या प्रवाशांची राहण्याची आणि खाण्याची कोणतीच व्यवस्था विमान कंपनीकडून करण्यात आली नाही. दरम्यान, जेट एअरवेजने झाल्याप्रकाराबाबत माफी मागितली असून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे सर्वच प्रवाशांना त्रास झाल्याचे म्हटलेे आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nग्रामपंचायत निवडणुकीत हिशोब सादर न केलेल्या 494 उमेदवारांना नोटीसा\nजनतेला वेठीस धरू नका…परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसे चा दम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/raju-shetti-comments-on-solapur-dcc-bank/", "date_download": "2019-03-25T08:08:12Z", "digest": "sha1:DPWPNFPUT7XRCJ6NQQH3HEFPZ7ARDR7W", "length": 14434, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका : शेट्टी", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nसोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका : शेट्टी\nपुणे – जिल्ह्यातील बडे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप तसेच थकबाकीची वसुली न करणे आदींसह इतर अनेक कारणांमुळं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आ���ेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांनी ज्यांनी सोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी हि मागणी केली.\nगेली अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांच्या कारखान्यांना देण्यात आलेले कर्ज वसूल करण्यात बँकेला अपयश आल्याच उघड झाले होते , तसेच बँकेच्या संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केल्याने नाबार्डने देखील नाराजी व्यक्त करत कारभार सुधारण्यास सांगितले होते मात्र कोणताच फरक पडत नसल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती या बँकेवर करण्यात आली. हे सगळे होत असताना स्वाभिमानी गप्प का असा सवाल शेट्टी यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली.\nनेमकं काय म्हणाले राजू शेट्टी \nज्यांनी ज्यांनी सोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका .गैरमार्गाने कर्ज घेणाऱ्या नेत्यांना तुरुंगात टाका ही आमची 10 वर्षांपासूनची मागणी आहे. स्वाभिमानीचा जरी कोणी कार्यकर्ता यात असेल तर त्याला ही अटक करा.काँग्रेस राष्ट्रवादी चे पुढारी यात जास्त आहेत म्हणून आम्ही शांत आहोत असं नाही.आम्ही तिकडेही याविरोधात आवाज उठवत आहोत.\nया बँकेचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, माजी मंत्री आमदार दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव शिंदे आदी दिग्गज नेते संचालक असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. मागील काही वर्षांपूर्वी बँकेच्या तत्कालीन सभापतींसह संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केले. तसेच बँकेच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. जिल्ह्यातील नेत्यांचे कारखाने व संस्थांकडे सुमारे ६५० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला. नाबार्डने वारंवार सूचना देऊनही या थकीत कर्जाची वसुली करण्यात आली नाही. अखेर रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनंतर शासनान�� सहकार खात्याच्या कलम ११० अ अन्वये संचालक मंडळ बरखास्त केले.\nजिल्हा बँकेतून हजारो कोटींचा मलिदा लाटणारे प्रमुख कर्जदार\n१) विजय शुगर्स, करकंब . –हा साखर कारखाना आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या परिवाराचा.कर्ज आहे सुमारे १४० कोटी रुपये.\n२) आर्यन शुगर्स, बार्शी . – राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपलांच्या पुतण्याचा हा कारखाना आहे. कर्ज आहे सुमारे १५७ कोटी रुपये.\n३) सिध्दनाथ शुगर्स, ति-हे. – हा कारखाना खुद्द बँकेचे चेअरमन आमदार दिलीप माने यांचा . त्यांनी १८१ कोटी रुपयांचं कर्ज उचलंलय.\n४) सांगोला सहकारी साखर कारखाना- या कारखान्याचे चेअरमन आहेत आमदार दिपक\nसाळुंके-पाटील कर्ज उचललंय. ३७ कोटी रुपये\n५) अदित्यराज गुळ उद्योग— पाणी पुरवठा मंत्री मंत्री दिलीप सोपल यांचे समर्थक अरुण कापसे यांचा कारखाना आहे. त्यांनी कर्ज उचललंय सुमारे ३२ कोटी रुपये.नुकताच अरुण कापसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\n६) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना—माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा कारखाना आहे. कर्ज उचललंय सुमारे २९३ कोटी रुपये.\n७) विठ्ठल कार्पोरेशन,म्हैसगाव—हा कारखाना आहे बँकेचे माजी चेअरमन आणि आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे याचा. त्यांनी सुमारे ११९ कोटी रुपयेचं कर्ज घेतलं आहे.\n८) शंकर सहकारी साखर कारखाना,शंकर नगर—काँग्रेसचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहीते-पाटलांचा हा कारखाना आहे.त्यांनी सुमारे ९९ कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय.\n९) सहकारमहर्षी शंकरराव मोहीते-पाटील सहकारी साखर कारखाना – मोहीते-पाटील यांचा कारखाना . सुमारे ३४५ कोटी रुपये कर्ज देण्यात आलंय.\n१०) लोकनेते बाबुराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रीज, अहमदनगर. —हा कारखाना आहे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा. त्यांनी सुमारे १५८ कोटी रुपयांचं कर्ज उचलंलय.\nयाशिवाय शैक्षणिक संस्थांना कर्ज देण्यासाठी खास नियमांत बदल करुन तरतूद कर्जाची तरतूद करण्यात आलीय.\n११) एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या पांडूरंग प्रतिष्ठानला २९ कोटी देण्यात आले आहेत.\n१२) मोहीते-पाटलांच्या शिवरत्न शिक्षण संस्थेला ७ कोटी .\n१३) चेअरमन दिलीप माने यांच्या ब्रम्हदेवदादा माने शिक्षण संस्थेला ९ कोटी.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nडीएसके प्रकरणात पोलिसांनी केली बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी- माजी अध्यक्षांना अटक\nसायबी टोपी घाला, हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-court-slum-50528", "date_download": "2019-03-25T08:35:30Z", "digest": "sha1:STLGPGUPZNQ7YPK6N7SQKOGVPHX5GYNH", "length": 13034, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news court slum पारसिक बोगद्यावरील झोपड्यांबद्दल भूमिका स्पष्ट करा! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nपारसिक बोगद्यावरील झोपड्यांबद्दल भूमिका स्पष्ट करा\nमंगळवार, 6 जून 2017\nमुंबई - मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकानंतर लागणाऱ्या पारसिक बोगद्याच्या डोंगरावरील 200 झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाबद्दल सरकारची काय भूमिका आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 5) केली. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.\nमुंबई - मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकानंतर लागणाऱ्या पारसिक बोगद्याच्या डोंगरावरील 200 झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाबद्दल सरकारची काय भूमिका आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 5) केली. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.\nपावसाळ्यात पारसिक बोगद्यावरील झोपड्या आणि दरडी रुळांवर कोसळून दुर्घटना होण्याची भीती लक्षात घेऊन तेथील झोपड्या हटवण्याबाबत मध्य रेल्वेने 2016 मध्ये एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. बोगद्यावर अशा झोपड्या असणे ही गंभीर बाब आहे. रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने केवळ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे नाही, तर डोंगरउतारावर राहणाऱ्या नागरिकांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे तेथील झोपड्या तातडीने हटवणे गरजेचे आहे, असे मत न्या. ओक यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी झोपड्या हटवण्यासाठी रेल्वेने नोटिसा बजावल्या होत्या; परंतु उच्च न्यायालयातून या कारवाईला स्थगिती मिळवण्यात आली होती. ती उठवण्यासाठी मध्य रेल्वेने अर्ज केला होता. यापैकी बहुतेक झोपड्या वन खाते आणि मध्य रेल्वेच्या जमिनीवर आहेत.\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nटेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून सुरुवात\nमुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून (ता.25) सुरुवात होत आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही...\nसुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला,...\nतुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले\nकोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का\nLoksabha 2019 : कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात माघार - आठवले\nमुंबई - केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट...\nशुद्धिकरणाची बुरसट बुद्धी (मर्म)\nज्या माणसाने आयुष्यभर कर्मकांड, अंधश्रद्धा याला फाटा देत केवळ \"कर्म' हेच आपले जीवन मानले, त्याच मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याच्या कला अकादमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/dhol-tasha-mahakarandak-136992", "date_download": "2019-03-25T08:37:46Z", "digest": "sha1:JZ4IAKQGR5SPQC7RBBE2GFI4YD4ABNMO", "length": 12976, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhol Tasha Mahakarandak ढोल-ताशांच्या गजरात ‘महाकरंडक’ सुरू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nढोल-ताशांच्या गजरात ‘महाकरंडक’ सुरू\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nपुणे - ‘ढोल - ता��ावादन ही एक कला आहे. त्यातील ताल व मात्रा यांनाही नियम आहेत. सध्या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये ढोल-ताशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे ढोल-ताशावादन आणि वादकांना उज्ज्वल भविष्य आहे,’’ असे मत संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केले.\nपुणे - ‘ढोल - ताशावादन ही एक कला आहे. त्यातील ताल व मात्रा यांनाही नियम आहेत. सध्या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये ढोल-ताशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे ढोल-ताशावादन आणि वादकांना उज्ज्वल भविष्य आहे,’’ असे मत संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केले.\nअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.वेंकीज उद्योग समूहाचे जगदीश बालाजी राव, भोला वांजळे, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सुनील गोडबोले, अशोक गावडे, मोहन ढमढेरे, बालकलाकार गौरी गाडगीळ, अपूर्वा देशपांडे, अनिल दिवाणजी, राजाभाऊ चव्हाण, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते.\nगुलाब कांबळे, राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, राजहंस मेहेंदळे हे स्पर्धेचे परीक्षक आहेत. उद्घाटनप्रसंगी स्वाती दातार यांच्या स्वरदा नृत्यसंस्थेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले.\nकलाकार वैष्णवी पाटील हिचे वडील विजय आणि आई ज्योती पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधी झाले. अभिनेत्री अश्विनी जोग आणि योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.\nशाळा, सरकारकडून बालरंगभूमीची उपेक्षा\nपुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात बालरंगभूमी अजूनही ‘प्रायोगिक’ अवस्थेत आहे. शाळा पातळीवर अनास्था आणि सरकारकडून होणाऱ्या...\nनाट्यबीजाची 'पेरणी' (प्रवीण तरडे)\nआमची उंब्रजमधल्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत...\n'स्वतःसाठी किमान 15 मिनिटं द्या' (श्रेयस तळपदे)\nप्रत्येकानं स्वतःसाठी रोज किमान 15 मिनिटं द्यावीत. स्वतःसाठी दिवसातून फक्त 15 मिनिटं काढणं काहीच अवघड नाहीये. आपण बसल्याबसल्या किंवा उभे राहूनही...\nभारताची 'खाद्यधानी' (विष्णू मनोहर)\nदिल्ली ही भारताची राजधानी आहेच, पण अनेक पदार्थांची रेलचेल ���सल्यानं ती भारताची \"खाद्यधानी'ही आहे. चाट मसाला घालून मिळणाऱ्या सॅलडपासून ते छोटे-भटुरे,...\nमेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)\nहळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून...\nसांस्कृतिक उद्योजकतेचा मनोरम अविष्कार (प्रा. क्षितिज पाटुकले)\nकंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/grape-producer-loss-138598", "date_download": "2019-03-25T08:18:32Z", "digest": "sha1:GRGE32H3O32P3RXRBOFN6CIWXUWBRT7I", "length": 14745, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Grape Producer loss द्राक्ष उत्पादकांना फटका | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे. मद्यार्क कंपन्यांचे घटलेले उत्पादन द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आले असून, बारामती व इंदापूर तालुक्यांतील या हंगामात उत्पादित होणाऱ्या ६ हजार टन द्राक्षाला नव्याने बाजारपेठ शोधण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत.\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे. मद्यार्क कंपन्यांचे घटलेले उत्पादन द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आले असून, बारामती व इंदापूर तालुक्यांतील या हंगामात उत्पादित होणाऱ्या ६ हजार टन द्राक्षाला नव्याने बाजारपेठ शोधण्याच��� वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाने राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर अंतरापर्यंत दारू दुकाने नको असा आदेश दिल्याने त्याची अंमलबजावणी होताना हजारो दुकाने बंद झाली. परिणामी या दुकानांकडून होणारी दारूविक्री घटली. त्याचा परिणाम मद्यार्क कंपन्यांवर झाला. त्यांनी उत्पादित केलेल्या लाखो लिटर दारूचा साठा तसाच शिल्लक राहिला. एकूणच दारूची मागणी त्या कालावधीत घटल्याने मद्यार्क कंपन्यांनी उत्पादित केलेले मद्यार्क टाक्यांमध्येच अडकून पडले. साहजिकच टाक्या पूर्ण भरल्याने नव्याने दारू तयार करण्यास मर्यादा आली. आता पुन्हा नियमात शिथिलता आल्याने तसेच महानगरपालिका, नगरपालिकांनी रस्ते आपल्या हद्दीत घेतल्याचे ठराव केल्यानंतर दारू दुकाने सुरू झाली आहेत, मात्र अजूनही काही कंपन्यांकडील शिल्लक मद्यार्क कायम आहे आणि बाजारपेठ पूर्ववत होण्यास काही काळ लागणार आहे. साहजिकच या स्थितीचा फटका मात्र सध्या द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.\nदरम्यान, बारामती तालुका फलोत्पादक संघ; तसेच द्राक्ष बागायतदार संघाच्या मदतीने या उर्वरित द्राक्षासाठी बाजारपेठ शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, या वर्षीच्या हंगामात अधिक गुणवत्तेची द्राक्षे उत्पादित करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.\nमहामार्गावरील विक्रेत्यांमुळे वारज्यात अपघाताचा धोका\nवारजे - वारजे येथील महामार्गावर फळविक्रेत्यांच्या हातगाड्या लागतात. ही फळे घेण्यासाठी ग्राहक रस्त्याच्या कडेलाच वाहने लावून फळे विकत घेत असल्याने...\nवडिलांच्या अपंगत्वानंतर धडाडीने सावरली घरासह शेती\nलोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना...\nकोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय सावंत\nदाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची...\nआडसाली उसाचे एकरी १२९ टन उत्पादन\nसांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प��रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक...\nबेदाणा विक्रीनंतर शेतकऱ्यांना २१ दिवसांत मिळावेत पैसे\nतासगाव - द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा...\nमहाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर\nअकोला: 'हर हर महादेव'च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुले अर्पण करत आज जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/easy-ayurveda-sago-1069173/", "date_download": "2019-03-25T08:20:14Z", "digest": "sha1:QDDNSUI7XPGPRTC3SDTIUQO5VC2HFAER", "length": 14434, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साबुदाणा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nशक्करकंदातील चिकापासून साबुदाणा बनविला जातो. केरळात हे गोड कंद मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून ते साधारणत ६ किलो ग्रॅम वजनाचे असतात.\nशक्करकंदातील चिकापासून साबुदाणा बनविला जातो. केरळात हे गोड कंद मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून ते साधारणत ६ किलो ग्रॅम वजनाचे असतात. बटाटा, रताळे यांच्यासारखे दिसणारे हे कंद जमिनीच्या खाली मुळ्यांमध्ये असतात. साबुदाण्याला इंग्लिशमध्ये tapioca म्हणतात.\nतामिळनाडूमध्ये सालेम परिसरात साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत. शक्करकंद हे प्रथमत: धुऊन त्यांची साल काढली जाते त्यानंतर त्यातील चोथा बाजूला काढून चिकट अशी पेस्ट बनवली जाते. ही पेस्ट एका मोठय़ा भांडय़ात घेऊन ८ ते १२ दिवस आंबवण्यासाठी ठेवली जाते यामुळे या पेस्टचा चिकटपणा आणखीनच वाढतो. ही पे��्ट पांढरी स्वच्छ दिसण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे ही पेस्ट नि:सत्त्व बनते. यानंतर मशिनमधील गोल चाळण्यांना वनस्पती तूप लावले जाते व त्यातून विविध मापांचा गोल आकाराचा साबुदाणा बनविला जातो. साबुदाण्याला कीड लागू नये म्हणून अनेक घातक परीरक्षकांचा वापर केला जातो.\nपेस्ट तयार करण्यासाठी शक्करकंदाची साल व चोथा काढल्याने त्यात असणारी प्रथिने, खनिजद्रव्ये, क्षार, जीवनसत्त्वे व कॅल्शियम नष्ट. होते उरतात ती फक्त कबरेदके (काबरेहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त उष्मांक मिळतात. साधारणत: शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये ९४ ग्रॅम कबरेदके असतात तर फक्त ०.२ गॅ्रम प्रथिने, ०.५ ग्रॅम फायबर, १० मिली गॅ्रम कॅल्शियम आणि १.२ ग्रॅम लोह असते. यामध्ये नसíगक जीवनावश्यक मूलद्रव्ये नष्ट झाल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे आमाशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा खाल्लेल्या एखाद्या व्यक्तीची सोनोग्राफी केली तर त्यात अख्खा साबुदाणा आढळतो. साबुदाणा चिकट व मऊ असल्यामुळे बरेच जण न चावताच गिळून टाकतात यामुळे तो पचविण्यासाठी शरीरातील इन्सुलिन हार्मोनवर जास्त ताण पडतो. पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात. अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळेला मधुमेह या आजाराची लागण झालेली दिसते. भारतात साबुदाणा उपवासाचे अन्न म्हणून खाण्याची पद्धत आहे; परंतु पचनास अतिशय जड असल्यामुळे आल्मपित्त, वात, मलावष्ठंभ, लठ्ठपणा हे विकार होतात. म्हणून साबुदाणा हा उपवासाच्या पदार्थातूनच पूर्णपणे वज्र्य करायला हवा.\nपाश्चात्त्य देशांमध्ये आíथकदृष्टय़ा मागासलेल्या वर्गामधील लोक साबुदाणा खातात; परंतु भारतात उपवासाचा पदार्थ म्हणून आवडीने साबुदाणा खिचडी, वडे खाल्ले जातात. मी तर अशी काही कुटुंबे पाहते की, घरातील एकाचा उपवास असला की, स्वयंपाक न करता सर्वच जण साबुदाणा खिचडी खातात. मोठय़ा प्रमाणात साबुदाणा, शेंगदाणे आणि तेही वनस्पती तुपात तळलेले पदार्थ खाणे आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. म्हणूनच साबुदाण्याच्या ऐवजी राजगिरा थालीपीठ, राजगिरा लाडू, गुळ, शेंगदाणे लाडू, ताक, फळे, फळांचा रस नारळपाणी, दूध आणि अगदी थोडय़ा प्रमाणात रताळे, बटाटा यांचे घरी बनविलेले विविध पदार्थ खावेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनल��ड करा.\nतुळशी बी वा सब्जा\nआयुर्वेदाची महती जगभरात पोहोचविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर सामंजस्य करार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090103/main.htm", "date_download": "2019-03-25T08:23:33Z", "digest": "sha1:E6EYCFTJXADQMRYDN2ROLMSLQWEV6HTL", "length": 35932, "nlines": 73, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंदीवर मात करण्यासाठी केंद्राचे\n२० हजार कोटींचे आणखी एक पॅकेज\nनवी दिल्ली, २ जानेवारी/खास प्रतिनिधी\nजागतिक मंदीमुळे आर्थिक अरिष्टाचा सामना करणारे निर्याताभिमुख उद्योग, गृहबांधणी आणि लघु उद्योगांना दिलासा देत भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्ववत गतिमान करण्यासाठी आज केंद्र सरकारने २० हजार कोटींच्या दुसऱ्या बहुप्रतिक्षित आर्थिक पॅकेजची घोषणा केली. एका महिन्याच्या अंतरात जाहीर करण्यात आलेल्या या दुसऱ्या पॅकेजमध्ये सार्वजनिक खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना आता भारतात पूर्वीपेक्षा जास्त गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. संकटात सापडलेल्या गृहबांधणी क्षेत्राला परदेशातून स्वस्त कर्ज मिळविणे शक्य व्हावे म्हणून केंद्राने बाह्य वाणिज्यिक उधारीचे धोरण शिथिल केले आहेत.\nरिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपात\nमुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी\nओसरत चाललेल्या महागाईच्या दराच्या पाश्र्वभूमीवर, भारतीय रिझव्���र्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे आपल्या अल्पमुदतीचे व्याजाचे दर अर्थात रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात प्रत्येकी एक टक्क्यांची घोषणा आज सायंकाळी केली. त्याचप्रमाणे वाणिज्य बँकांनी रिझव्र्ह बँकेकडे राखून ठेवावयाचा निधी अर्थात कॅश रिझव्र्ह रेशो (सीआरआर)मध्ये अर्धा टक्क्यांनी कपात जाहीर केली आहे. रिझव्र्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेत २०,००० कोटी रुपयांचा निधी चलनासाठी खुला होणार आहे. नव्या निर्णयानंतर रेपो दर ५.५ टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर चार टक्क्यांवर आले असून, नव्या दराची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. सीआरआरमधील अध्र्या टक्क्यांच्या कपातीनंतर हे प्रमाण पाच टक्क्यांवर आले असून, त्याची अंमलबजावणी १७ जानेवारीपासून केली जाणार आहे.\nसमर खडस, मुंबई, २ जानेवारी\nपाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन भारतात अतिरेकी कारवायांसाठी पाठविण्यात येणाऱ्या आयएसआयच्या एजंट्सना किंवा भारतात प्रत्यक्ष दहशतवादी कृत्यांसाठी आलेल्या फिदायीन अतिरेक्यांना आयएसआयने तयार केलेल्या सांकेतिक लिपीचा आधार घेत पुढील कारवाई करावी लागते. ही सांकेतिक लिपी गणिती असून त्याच भाषेतून इ-मेलद्वारे निरोप देण्याचे काम प्रत्येकाला करावे लागते. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाने नेपाळहून पकडलेल्या सबाउद्दीन व फईम अन्सारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये ही सांके तिक लिपी उघड झाली आहे.\nराणेंची राजकीय वाटचाल ६ जानेवारीला स्पष्ट होणार\nमुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी\nकाँग्रेस पक्षातून बाहेर न पडण्याबाबत माझे कुणी मन वळविण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस श्रेष्ठींपैकी कुणाशीही माझी चर्चा झालेली नाही तसेच माझ्याकडे कुणीही आलेले नाही, असे सांगत आज माजी महसूल मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या काँग्रेसमध्येच राहण्याच्या चर्चेला एका प्रकारे पूर्णविराम दिला. आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीविषयीची भूमिका आपण ६ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता जाहीर करू, असेही राणे यांनी स्पष्ट केले. ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. माणिकराव ठाकरे यांनी अलीकडेच ‘‘ज्यांच�� पक्षावर निष्ठा नाही ते पक्ष सोडून गेले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही’’ असे विधान केले होते, त्याबाबत ते म्हणाले की, हे प्रदेशाध्यक्ष गेल्या\nगुगल-मायक्रोसॉफ्ट वादाचा जी-मेल यूजर्सना फटका\nजीमेलच्या यूजर्सना गेल्या तीन दिवसांपासून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात यूजर आयडी इनव्ॉलिड दाखविणे, स्क्रिन काहीच न दिसणे आदी अडचणींचा समावेश आहे. इंटरनेट एक्सप्लोररच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करणाऱ्या यूजर्सचे जीमेल अकाऊंट सुरु होत नसल्याचा अनुभव येत आहे. याचे मूळ आहे ते मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्यातील व्यावसायिक वादामध्ये. मायक्रोसाफ्ट इंटरनेट एक्सप्लोजरच्या यूजर्सनी जीमेल सुरु केल्यास त्यांना ‘गेट फास्टर जीमेल, बॅड रीक्वेस्ट, एरर-४००’ असा संदेश येतो. मात्र एक्सप्लोरर न वापरता गुगलच्या ‘क्रोम’ किंवा मॉझिला कॉर्पोरेशनच्या ‘फायरफॉक्स’चा वापर केला तर जीमेल अकाऊंट सहज ओपन होते. यामुळे मागील वर्षांत रंगलेल्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक वादाचा हा फटका असल्याची चर्चा सर्वत्र आहे.\nहसन अलीला ५० हजार कोटी प्राप्तिकर भरण्याचा आदेश\nमुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी\nपासपोर्ट घोटाळ्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आल्यानंतर आता पुण्यातील व्यावसायिक आणि स्टड फार्मचा मालक हसन अली खान हा कर चुकवेगिरीच्या विळख्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. आयकर खात्याने हसन अली खान याला एका महिन्यांत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकर थकबाकी भरण्यास फर्मावले आहे. दरम्यान, बोगस दस्तऐवजाच्या सहाय्याने बेकायदेशीररीत्या दोन पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खान याची शिवडीच्या सत्र न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.\nआयसीसीच्या पहिल्या क्रिकेट ‘हॉल ऑफ फेम’मध्ये गावसकर, कपिल आणि बेदी\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या हॉल ऑफ फेम यादीतील ५५ माजी रथी-महारथी क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावसकर, कपिल देव आणि बिशनसिंग बेदी या तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आले आहे. आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यवाह हरून लॉर्गेट म्हणाले की, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या (एफआयसीए) सहकार्याने क्रि��ेटमधील महान व्यक्तींचा सन्मान करण्याची यानिमित्त संधी मिळाली आहे. आयसीसीच्या शतकमहोत्सवानिमित्त खेळातील हॉल ऑफ फेम जाहीर करण्याचा निर्णय हे पूर्णता योजनाबद्ध पाऊल आहे, असे लॉर्गेट म्हणाले.\nश्रीलंकेचा लिट्टेच्या बालेकिल्ल्यावर कब्जा\nलिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (लिट्टे)चा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या किलिनोच्छी भागावर आज श्रीलंकेच्या लष्कराने जोरदार हल्ला चढवून ताबा मिळविल्याचे राष्ट्राध्यक्ष महिंदूा राजपक्षे यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील विशेष प्रसारणात जाहीर केले. गेल्या दोन दिवसांच्या संघर्षांत लिट्टेचे १००हून अधिक तामिळी बंडखोर मारले गेले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून लिट्टेने तामिळींसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी लावून धरली असून त्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. परंतु आज लष्कराने किलिनोच्छीत मुसंडी मारून ते ताब्यात घेतल्याने लिट्टेला हादरा बसला आहे. किलोनोच्छीची चारी बाजूंनी कोंडी करून लष्कराने हा भाग ताब्यात घेतला. यापूर्वी श्रीलंकेच्या लष्कराने जाफना ताब्यात घेतले होते. आता मुल्लाहेतिवू ताब्यात घेण्यासाठी लष्कर पुढे सरकत आहे. राष्ट्रपतींच्या या घोषणेनंतर काहीवेळातच राजधानी कोलंबोतील हवाईदलाच्या मुख्यालयाजवळ घडवून आणण्यात आलेल्या स्फोटात २ ठार तर ३०जण जखमी झाले.\nज्ञानेश्वर आगाशे यांचे निधन\nपुणे, २ जानेवारी / प्रतिनिधी\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व माजी रणजीपटू ज्ञानेश्वर चंद्रशेखर आगाशे (वय ७२) यांचे आज रात्री ससून रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. श्री सुवर्ण सहकारी बँकेचे ते माजी अध्यक्ष होते. बँकेत नुकत्याच झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांना २२ नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. बारा दिवसांपूर्वी मधुमेहाचा विकार बळावल्याने त्यांना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच आज रात्री त्यांचे निधन झाले. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संघात रणजी क्रिकेट स्पर्धेत यष्टिरक्षक म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. वडील चंद्रशेखर आगा���े यांनी स्थापन केलेल्या बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट या कारखान्याची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली. त्यानंतर सुवर्ण सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. याच काळात बँकेत आर्थिक घोटाळा झाला. त्यात त्यांना अटक करण्यात आली होती.\nसत्यम कॉम्प्युटरच्या ‘सुवर्ण मयूर’ पुरस्काराबद्दल प्रश्नचिन्ह\nमुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी\nदेशातील आयटी उद्योगातील चौथ्या क्रमांकाची कंपनी सत्यम कॉम्प्युटर सव्र्हिसेस लिमिटेडला तीन महिन्यांपूर्वी ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’मधील सर्वोत्तमतेसाठी प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘सुवर्ण मयूर पुरस्कार’ ताज्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर परत घेतला जाण्याचे संकेत मिळत आहेत. उद्योगजगतात हे मानाचे सन्मान बहाल करणाऱ्या ब्रिटनस्थित जागतिक संस्थेने पुरस्काराबाबत फेरविचार सुरू केल्याचे विश्वसनीयरित्या कळत आहे. सत्यमचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग राजू यांनी ज्या प्रकारे कंपनीच्या राखीव गंगाजळीचा वापर स्वत:च्याच मालकीच्या दोन कंपन्यांच्या खरेदीसाठी करण्याचा प्रयत्न केला; त्याविरोधात देशभरात गुंतवणूक वर्तुळात झालेला गहजब आणि कंपनी खात्याकडून सुरू झालेली चौकशी पाहता, सत्यमच्या व्यवस्थापनाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर ब्रिटनस्थित ‘वर्ल्ड कौन्सिल फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स’च्या संचालक मंडळाने सत्यमला सप्टेंबर २००८ मध्ये बहाल केलेल्या सन्मानाबद्दल फेरविचार आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. किमानपक्षी कंपनीकडून या प्रतिष्ठेचा पुरस्काराची जाहिरातबाजी आणि ब्रॅण्डिंगसाठी बडेजाव तरी केला जाणार नाही, असे फर्मान येणे अपेक्षित आहे.\nबजाज कुटुंबियात अखेर तोडगा\nमुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी\nदेशातील आघाडीचा औद्योगिक समूह बजाज मध्ये गेली सहा वर्षे सुरु असलेल्या कौटुंबिक वादावर अखेर तोडगा निघाला असून बजाज कुटुंबियांमध्ये मालमत्तेची वाटणी करण्यात आली आहे. बजाज कुटुंबियांमध्ये झालेल्या तोडग्यानुसार, बजाज हिंदुस्थान व बजाज कन्झुमर केअर या दोन कंपन्या शिशिर बजाज यांच्याकडे आल्या असून या कंपन्यांच्या संचालक मंडळातून राहुल, शेखर, मधुर व निरज बजाज हे राजीनामा देतील. तर अन्य बजाज ऑटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, मुकंद आय��्न लि., बजाज फिनसव्र्ह, बजाज होल्डिंग, हक्युलस्ट हॉईस या कंपन्या राहुल बजाज यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाच्या ताब्यात येणार आहेत. या तोडग्यानुसार आज शिशिर बजाज व बजाज कुटुंबातील अन्य दोन सदस्यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स मधून आपल्या पदांचे राजीनामे दिले.\nधुळे आणि िपपळगाव-नाशिक-गोंडे टप्प्यांच्या चार व सहा पदरीकरणाला मंजुरी\nनवी दिल्ली, २ जानेवारी/खास प्रतिनिधी\nधुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या ६० किमी टप्प्याच्या तसेच िपपळगाव-नाशिक -गोंडे या ९७.५ किमी टप्प्याच्या चार आणि सहा पदरीकरण करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प टप्पा-३ अ अंतर्गत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील ३८० ते ४४० किमी दरम्यानच्या ६० किमी अंतराचे ७५१.६८ कोटी रुपये खर्च करून चार व सहा पदरीकरण करण्यात येत आहे. त्यात रस्त्याच्या बांधकामापूर्वी पूर्ण करावयाच्या भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनस्र्थापनेवरील ७६.६५ कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. िपपळगाव-नाशिक-गोंडे या १६८.५ ते २६५ किमीदरम्यानच्या ९७.५ किमी लांबीच्या टप्प्याच्या सहा पदरीकरणावर ७९९.६७ कोटी खर्च होणार आहेत. त्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनस्र्थापनेवर होणाऱ्या ४७.१९ कोटी रुपये खर्चाचाही समावेश आहे. सरकारच्या वतीने पुरविण्यात येणारी व्हायबिलीटी गॅप फंडिंग एकूण प्रकल्प खर्चाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दोन्ही टप्प्यांसाठी निविदा मागविण्यात येतील. टोल टॅक्स वसुलीसाठी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील महामार्गाच्या बांधकामाला १८ वर्षांंची, िपपळगाव-नाशिक-गोंडे महामार्गावरील बांधकामाला २० वर्षांंची सवलत देण्यात आली आहे.\nअमृतसरमध्ये १ अंश तापमान\nनवी दिल्ली, २ जानेवारी/पी.टी.आय.\nया आठवडय़ाच्या सुरुवातीला उत्तर भारतासह संपूर्ण देशभरात थंडीने जोर धरला असून गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांत थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. काल रात्रीपासून थंडीने गारठल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मोसमातील मृतांची संख्या सहा झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यात थंडीचा जोर वाढला असून पहाटे दाट धुक्यामुळे रस्ते वाहतूक, किमान व रेल्वेसेवांवरही त्याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. अमृतसरमध्ये मोसमातील सर्वाधिक कमी म्हणजे १ अंश से. इतके तापमान नोंदवले गेले तर चंदिगड ६.२, अंबाला- ३.५ हरियाणातील रोहटक येथे २ अंश से. इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वरसह ठाणे, मुंबई परिसरातही गारठा वाढू लागला असून पहाटे चांगल्या प्रकारे दव आणि धुके पडू लागले आहे.\n‘पाकिस्तानने ठोस कृती करावी’\nनवी दिल्ली : पाकिस्तानने आता नुसती पोकळ वक्तव्ये करण्याऐवजी ठोस कृती करावी, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी आज येथे केले. पाकिस्तानच्या हद्दीत आजही दहशतवाद्यांची ३३० प्रशिक्षणकेंद्रे सुरू आहेत. या छावण्या त्यांनी प्रथम समूळ उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.\n‘संशयितांना भारताच्या ताब्यात देणार नाही’\nइस्लामाबाद : मुंबईवरील हल्ल्यातील संशयितांना भारताच्या ताब्यात दिले जाणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ‘जिओ टीव्ही’ या वृत्तवाहिनीला सांगितले. भारताबरोबर गुन्हेगार हस्तांतरण करारच झाला नसल्याने या संशयितांना ताब्यात देणे आमच्यादृष्टीने घातक ठरू शकते, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.\nनॅशनल कॉन्फरन्स ‘युपीए’त सहभागी होणार\nनवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेससह आघाडी सरकार स्थापन करणार असलेला नॅशनल कॉन्फरन्स पक्ष केंद्रातील काँग्रेसप्रणीत ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ (युपीए)मध्ये सहभागी होणार आहे. कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी‘युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रातील आघाडीतही सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\nबंगारप्पा पुन्हा काँग्रेसवासी होणार\nनवी दिल्ली : कर्नाटकातून आधी भाजप आणि नंतर समाजवादी पार्टीच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून आलेले माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा आता लवकरच काँग्रेसमध्ये परतणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशपाठोपाठ कर्नाटकातही समाजवादी पार्टीला धक्का बसणार आहे. लवकरच ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपल्या नव्या इनिंग्ज���ी सुरुवात करतील, असे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.\nमुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी\nकेंद्र सरकार सध्याच्या मंदीवर उपाययोजना करण्यासाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता बाजारात व्यक्त झाल्याने सेन्सक्स शुक्रवारी ५५ अंशांनी बंद होऊन दहा हजारांवर मध्यंतरी स्थिरावला. बाजार बंद झाल्यावर केंद्राने आपले पॅकेज जाहीर केल्याने आता पुढील काही काळ बाजारात तेजीचे वातावरण राहील असा अंदाज आहे. आशिया व युरोपातील अनेक शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते त्यामुळे मुंबई शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण होते. ऑटो, रियल इस्ेटट, लहान व मध्यम आकारातील उद्योगांसाठी सरकार पॅकेज जाहीर करणार असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत होते.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2014-CharoliLagwad.html", "date_download": "2019-03-25T08:05:09Z", "digest": "sha1:5EAI2Z6VVKELA7QEFSPYN4JOJSL5JT2O", "length": 30690, "nlines": 51, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - चारोळी", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nमहाराष्ट्रातील दुष्काळी भागातील अल्पभूधारक गरीब जिरायत शेतकऱ्याला अल्प भांडवलात चारोळी पीक घेणे शक्य आहे. महाराष्ट्रा शासनाच्या फलोत्पादन विभागामार्फत रो.ह.यो. अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमात चारोळी या फळ पिकाचा समावेश आहे. नवव्या पंचवार्षिक योजनेत सदर कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील काही विभागांत फळपिकामध्ये आंतरपिके म्हणून मसाला पिके लागवड योजना तसेच काही जिल्ह्यांमध्ये भाताच्या खाचराच्या बांधावर फळझाड लागवडीची योजना राबविण्यात येत आहे.\nचारोळी हे व्यापारी दुष्ट्या फायदेशीर फळपीक आहे. त्यापासून विविध टिकाऊ पदार्थ तयार होतात. श्रीखंड, खीर, बासुंदी, पेढे, बर्फी, आईस्क्रिम व इतर मिठाईच्या पदार्थात आपण चारोळी वापरतो. त्यामुळे या फळझाडाच्या लागवडीस महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. शिवाय चारोळी बी वाळवून सोलून ठेवता येते व सुकामेवा टॉंनिक म्हणूनही त्याचा वापर होतो.\nचारोळी हे एक कोरडवाहू फळझाड असून दुष्काळी परिस्थितीतही संकटास तोंड देणारे काटक असे फळझाड आहे. चारोळी आयुर्वेदिक दृष्ट्या पित्त व रक्त दोषावर गुणकारी आहे. चारोळीच्या झाडाच्या सालीपासून डिंक व टॉंनिक मिळते. चारोळीच्या तेलाने केस काळे होतात. चारोळी अतिशय पौष्टिक आहे. महाराष्ट्रात कोकणातील उष्ण आणि दमट हवामानापासून विदर्भातील हिवाळ्यातील कडक थंडीतही चारोळीची झाडे चांगली वाढतात आणि भरपूर उत्पादन देतात. आदिवासी भागात या झाडाला 'चार' असे म्हणतात. तसेच काही ठिकाणी 'राजदाणा' किंवा 'चिरोंजी' असे म्हणतात. पोषण मूल्याच्या बाबतीत चारोळीची तुलना बदमाशी केली जाते.\n* उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार : चार, चिरंजी, चारोळी, राजदाणा, तपसप्रिया इत्यादी नावांनी ओळखले जाणारे हे झाड काजू कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड १५ ते २५ फूट उंच वाढत असून पाने काजूच्या पानासारखी, झाडाची साल काळी, करडी व ती चौकोनातून खवल विभागलेली असते. पिकवलेली फळे जांभळट काळसर असतात. फळात कठीण कवचाच्या आत बी असते. यालाच चारोळी व झाडाला चार म्हणतात.\nचारीळीच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु भारतातील विविध राज्यांत जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळून येतात. महाराष्ट्राच्या शहरी आणी ग्रामणी भागात चारोळी लोकप्रिय असून चारोळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भारतात चारोळीची सलग लागवड केली जात नव्हती, परंतु चारोळी 'बी' चे पोषण मूल्य लक्षात घेता महाराष्ट्रात राज्य शासनाने फलोत्पादन खात्यामार्फत रो. ह. यो. अंतर्गत १००% अनुदानावर या पिकाच्या लागवडीकरीता भरपूर अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. ह्यापूर्वी चारोळीचे उत्पादन केवळ जंगलात आणि अतिशय कमी प्रमाणात होते. म्हणून चारोळीच्या लागवडीस महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. चारोळीच्या १०० ग्रॅम बियांमध्ये खालील अन्न घटक असतात.\n* अन्नघटक व प्रमाण :\nकार्बोहायड्रेट्स - १७%, प्रोटिन्स - २२%, फॅटस (तेल) - ५२%, पिष्टमय पदार्थ - १२%, प्रथिने - २१%, साखर - ५%.\n* चारोळीच्या 'बी' चा उपयोग : चारोळी (बी) चा मोठ्या प्रमाणावर वापर दुधाच्या मिठाईचे पदार्थ - जसे बासुंदी, आईस्क्रिम, पेढे, बर्फी, श्रीखंड, खीर व इतर मिठाईमध्ये करतात. पौष्टिक सुकामेवा काजू + बदाम + खारीक + गोडंबी + चारोळी + खडीसाखर यांचे मिश्रण करून तयार करतात. झाडाच्या सालीपासून डिंक व टॉंनिन मिळते. चारोळीच्या पानांपासून गुरांना चारा उपलब्ध होतो. चारोळीच्या 'बी' पासून तेल निघते. त्या तेलामुळे केस काळे होतात. चारोळीची फळे करवंदाएवढी गोल येतात. फळे कच्च��� असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात. फळांचा गर गोड असून आत कठीण कवच असते. कवचाच्या आत गोडंबी असते. ह्या बियांनाच चारोळी म्हणतात. बिया गोल, चपट्या नरम व चवीला काजूप्रमाणे लागतात. त्या बियांत तेल असते. औद्योगिक दृष्ट्या या फळ पिकास फार महत्त्व असून, महाराष्ट्रात चारोळीच्या लागवडीस सध्या तरी फार मोठा वाव आहे.\n* क्षेत्र आणि उत्पादन : भारतात यापूर्वी या फळपिकाची स्वतंत्र लागवड केली जात नव्हती. तसेच चारोळी पिकाच्या आर्थिक फायद्याबद्दल व पौष्टिकतेबाबत लोकांना पुरेशा प्रमाणात माहिती नव्हती. त्यामुळे या फळपिकाखालीली उत्पादन क्षेत्रात वाढ झाली नाही, तसेच उत्पादनाबाबतची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. भारतात कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा तसेच महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नांदेड भागातील किनवट आणि विदर्भातील बुलढाणा, अकोट, वाशिम, रिसोड, लोणार, रामटेक व भंडारा तर कोकणातील रत्नागिरी, राजापूर, मालवण आणी ठाणे जिल्ह्यातील जंगलात, पडरानात, चढ उताराच्या डोंगराळ भागात नैसर्गिकरीत्या वाढ झालेली चारोळीची पुष्कळ झाडे आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने फलोत्पादन खात्यामार्फत रो. ह. यो. १००% अनुदान या कार्यक्रमात या फळ पिकाचा समावेश केला असल्याने या फळ पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.\n* हवामान आणि जमीन : डोंगराळ, हलकी व बरड जमीन चारोळी या झाडाला मानवते. या झाडाला फार पाणी नको असते. जास्त पाऊस , दलदलीच्या जमिनी या झाडाच्या वाढीस अयोग्य असतात. चारोळी ही कोकणातील तांबड्या जमिनीत, डोंगर उतारावरील जमिनीत, दुष्काळी भागातील हलक्या जमिनीत, मध्यम काळ्या अथवा काळ्या जमिनीत, पोयट्याच्या जमिनीत, नदी, नाले, ओढे यांच्या काठांवरील उंचसखल जमिनीत चांगली वाढते.\nचारोळीच्या झाडाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. उष्ण आणि दमट हवामानातही चारोळीची झाडे चांगली वाढतात. कमी पावसाच्या तसेच अति पावसाच्या प्रदेशात चारोळीची झाडे वाढलेली दिसून येतात. महाराष्ट्रात कृषी खात्याने शिफारस केल्याप्रमाणे\n* विदर्भात : अमरावती - (धारणी, चिखलदरा), अकोला -(पातूर, अकोट), वाशिम - (वाशिम, मालेगाव, रिसोड), बुलढाणा - (मेहकर, लोणार, चिखली, शेगाव, देऊळगावराजा), गडचिरोली - (सिरोंचा, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी), यवतमाळ - (माहूर, पुसद, पांढरकवडा आर्वी), नांदेड - (किनवट)\n* कोकणात : रत्नागिरी - (राजापूर, मालवण आणि ठाणे)\nइत्यादी जिल्ह्यांतील तालुक्यांत हे फळपीक लागवडीस अनुकूल वातावरण आणि पोषक जमीन आहे.\n* जाती - चारोळीची स्वतंत्रपणे लागवड केली जात नाही. तसेच चारोळीच्या जातीबाबत फारसे संशोधन झालेले नाही. चारोळीच्या जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती उपलब्ध नाहीत. चारोळीची लागवड करताना खात्रीशीर ठिकाणाहून जास्त उत्पादन देणाऱ्या झाडांचे बी मिळवून चारोळीची लागवड करावी किंवा जातीवंत रोपे, शासकीय रोपवाटिका, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका किंवा नोंदणीकृत खाजगी रोपवाटिका येथून पॉलीथिन पिशवीतील रोपे आणून लागवड करावी.\n* अभिवृद्धीच्या पद्धती : चारोळीची अभिवृद्धी बियांपासून करतात. चारोळीचे बियाणे योग्य प्रकारे उगवत नाही हा अनुभव बऱ्याच रोपवाटिकांमध्ये येतो. बियांची उगवण योग्य प्रकारे न होण्याचे कारण म्हणजे मिळणारे अपक्व बियाणे हे होय. चारोळीच्या फळाचा मुख्य हंगाम मार्च, एप्रिल, मे हा आहे. त्यावेळेस जर पूर्ण पक्व झालेली फळे निवडली आणि त्यापासून मिळणारे बी वापरले तर अशा बियाण्याची उगवण ५० ते ६०% पर्यंत होऊ शकते. चारोळीची फळे आकाराने करवंदापेक्षा लहान किंवा काही वेळा करवंदाएवढी असतात. चारोळीची फळे सुरूवातीला हिरव्या रंगाची असतात. नंतर काळसर रंगाची होतात. चारोळीच्या फळामधील कठीण कवच असणाऱ्या बियांना 'चारोळी' असे म्हणतात. या बियांचा उपयोग चारोळीची रोपे एप्रिल - मे महिन्यात पॉलीथिनच्या पिशव्यांमध्ये तयार करण्यासाठी केला जातो. १५ x २२ सेमी लांबीच्या पॉलीथिनच्या पिशव्या शेणखत आणि गाळाच्या मातीच्या मिश्रणाने भरून त्यामध्ये चारोळीचे बियाणे कठीण भागावर घासून किंवा गरम पाण्यामध्ये जर्मिनेटर ५० मिली प्रति लिटरप्रमाणे उगवणीसाठी वापरल्यास उगवण चांगली होऊ शकते. गादीवाफ्यार बिया पेरूनही चारोळीची रोपे तयार करता येतात. बियांची पेरणी करण्यासाठी फळामधील कठीण कवच फोडून आतील मऊ बी काढून ते पिशवीत अथवा गादीवाफ्यावर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून पेरावे. २५० ग्रॅम चारोळीपासून ४५० बी मिळते.\nबिया पेरल्यावर पिशव्यांना किंवा गादीवाफ्याला हलकेसे पाणी द्यावे. सुमारे ८ ते १० दिवसांत या बियांची उगवण होते. चारोळीची रोपे, आंबा, चिंच, बोर, काजू या कोरडवाहू फळझाडांच्या रोपांप्रमाणे जोमदारपणे वाढत नाहीत. रोपाची वाढ जोमदारपणे होण्यास��ठी पिशव्यांतील माती अधूनमधून हलवावी आणि अगदी थोडे थोडे नत्रयुक्त खत व कल्पतरू सेंद्रिय खत रोपांना देऊन ताबडतोब भरपूर पाणी द्यावे. ही रोपे पुढील वर्षीच्या पावसाळ्यात लागवडीसाठी योग्य होतात.\n* रोपे तयार करताना महत्त्वाच्या पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.\n१) ज्या बियाण्यांची उगवण करावयाची आहे ते बियाणे पक्व आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे.\n२) बियाणे स्वच्छ करून नंतर पेरावे.\n३) बियाणे सुधारित पद्धतीने आणि योग्य हंगामातच पेरावे.\n४) बियाण्याची बीजप्रक्रिया अगोदर करून नंतर बी पेरावे.\n५) बियाणे पॉलीथिन बॅग, परळी (मातीची कुंडी) किंवा गादीवाफ्यावरच पेरावे.\n६) नवीन लागवडीकरिता दर्जेदार रोपांची लागवड करावी.\n*लागवडीचा हंगाम आणि लागवड : चारोळीची लागवड चौरस पद्धतीने करावी. दोन झाडांमधील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४.५ किंवा ५ x ५ किंवा ६ x ६ किंवा ७ x ७ मीटर अंतरावर रोपांच्या लागवडीसाठी ०.६ x ०.६ x ०.५ मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत, खड्डे भरताना खड्ड्यांच्या तळाशी वाळलेला पाला पाचोळा, वाळलेले गवत, भाताचा पेंढा किंवा उसाचे पाचट यांचा वीतभर जाडीचा थर द्यावा. त्यात अधून - मधून लिंडेन १०% पावडर मिसळावी. खड्ड्यात ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत, १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेत यांचे मिश्रण भरावे. शेणखतात लिंडेन पावडर मिसळावि व खड्डे संपूर्ण भरावेत.\nचारोळीची लागवड ही पावसाळ्याच्या सुरवातीला जून - जुलै महिन्यात करावी. ही लागवड करीत असताना तांत्रिक पद्धतीने भरलेल्या खड्ड्यात पॉलीथिन पिशवी फाडून मातीचा गोळा ज्या स्थितीत आहे तसाच ठेवून लागवड करावी व लागवडीनंतर रोपांना लगेच पाणी द्यावे.\n* वळण आणि छाटणी : चारोळीची झाडाला लागवडीनंतर सुरूवातीच्या दोन - तीन वर्षात योग्य वळण देणे हे पुढील उत्पादनाच्या आणि झाडाच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे .\nचारोळीचे झाड १ मीटर उंचीचे असताना झाडाचे शेंडे खुडावेत व त्यापासून पुढे येणाऱ्या ५ ते ६ जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारी दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतील अशाप्रकारे ठेवाव्यात. झाडाची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर ५ वर्षापर्यंत वेड्या वाकड्या वाढणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. चारोळी या फळझाडाची दरवर्षी छाटणी करण्याची आवश्यकता नाही.\n* आंतर पिकाची लागवड : चारोळीच्या बागेमध्ये सुरूवातीची २ ते ३ वर्ष आंतरपिके चांगल्याप्रकारे घेता येतात. त्यामुळे बागेत तण न होता बाग स्वच्छ राहते. बागेमध्ये श्रावणघेवडा, गवार, भुईमूग, उडीद, मिरची, तीळ, वाटाणा, कारली, चवळी, झेंडू तसेच चारोळीची झाडे थोडी मोठी झाल्यावर तूर, करडई, एंरडी, शेवगा, कढीपत्ता इत्यादी आंतरपिके घ्यावीत.\n* तणाचे नियंत्रण : तणांची मुख्य पिकाबरोबर अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा होते आणि त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो म्हणून बागेतील तणांचा वेळेवर बंदोबस्त करणे आवश्यक आहे. हिरवळीची खते उदा. ताग, धैंचा दोन्ही झाडाच्या मधील पट्ट्यात पेरून तणांच्या वाढीस प्रतिबंध करावा. वेळोवेळी निंदणी, खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.\n* खतव्यवस्थापन : झाडांच्या जोमदार वाढीसाठी दरवर्षी जून महिन्यात प्रत्येक झाडास ५०० ग्रॅम कल्पतरू खत पहिली ५ - ६ वर्षे बहार लागेपर्यंत द्यावे. नंतर बहार लागल्यावर दरवर्षी जूनमध्ये ५०० ग्रॅम आणि डिसेंबर - जानेवारीमध्ये ५०० ग्रॅम खत द्यावे.\n* फवारणी : चारोळीच्या निरोगी वाढीसाठी लागवडीनंतर १ महिन्याच्या अंतराने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सप्तामृत ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून याप्रमाणे बहार लागेपर्यंत दरवर्षी ३ ते ४ फवारण्या कराव्यात.\nअधिक उत्पादनासाठी बहार धरल्यानंतर मार्च ते मे पर्यंत दर महिन्याला ५०० मिली, ७५० मिली आणि १ लिटरची २०० लिटर पाण्यातून सप्तामृताची फवारणी घ्यावी. म्हणजे मोहोर जादा लागून त्याची गळ न होता पोषण होईल आणी उत्पादन, दर्जात इतर पिकांप्रमाणेच या तंत्रज्ञाना ने निश्चित वाढ होईल. चारोळी पिकावर अद्याप प्रयोग झालेले नसले तरी व्यापारी तत्वावर उत्पादन घेण्याकरिता डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून निरीक्षणे आम्हाला कळवावीत.\n* काढणी, हाताळणी आणि प्रक्रिया : चारोळीच्या रोपापासून लागवडीनंतर ६ ते ७ वर्षानंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. साधारणपणे दहा वर्षानंतर चारोळीच्या झाडापासून १० ते १५ किलो फळे मिळतात व त्यापासून सुमारे १ ते २ किलो चारोळीचे बी मिळते. जास्तीत - जास्त उत्पादन २५ किलो फळे मिळू शकतात. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये चारोळीच्या झाडांना मोहोर येतो आणि एप्रिल, मे महिन्यात फळे पक्व होऊन चारोळी मिळण्यास सुरुवात होते. चारोळीच्या फळांचा रणग काळा झाल्यानंतर फळे पक्की झाली असे समजून फळाची काढणी जमिनीवरून काठीने झोडपून करतात. काढणीनंतर फळे पाण्यात सुमारे ३ ते ४ दिवस भिजत ठेवावीत. नंतर फळाचा काळा गर हाताने चोळून टाकावा आणी बी वेगळे करावे. हे कठीण कवच असलेले बी सावलीत वाळवितात.\nवाळलेली कठीण फळे जात्यावर अगदी हलकेशी भरडतात. त्यामुळे कठीण कवच फुटून आतील बी वेगळे होते. यालाच 'चारोळी' म्हणतात. चारोळीच्या चांगल्या वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सुमारे दोन किली चारोळी मिळते. जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे चारोळीचे उत्पादन वाढत जाते. चारोळी बी चा सध्याचा किरकोळी बाजार भाव सुमारे २२० ते २६० रू. किलो आहे. प्रत्येक झाडापासून ठोक उत्पन्न सुमारे ४०० ते ५०० रू. सहज मिळू शकते. झाडाचे आयुष्य ४० ते ५० वर्षे असते. जुन्या चारोळीचा भाव नवीन चारोळीपेक्षा जास्त असतो. ही झाडे ४० ते ५० वर्षे उत्पादन देतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2016-Bhendi1.html", "date_download": "2019-03-25T07:48:52Z", "digest": "sha1:LMZFJFVE3PYIVIWV2NJ5AURHHY36KZ32", "length": 9081, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - १० गुंठे भेंडीपासून १ लाख २० हजार", "raw_content": "\n१० गुंठे भेंडीपासून १ लाख २० हजार\nश्री. रमेशराव उत्तमराव फरकाडे, मु.पो. मांडवा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती - ४४४९०४. मो. ७२७९४४०९७३\nमी सर्वप्रथम फेब्रुवारी २०१६ ला भुईमुगाकरीता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरली. कंपनीचे प्रतिनिधी सुजित भजभुजे (९६६५२९०४९५) यांच्याशी माझी जानेवारी महिन्यात भेट झाली. त्यावेळेस कपाशीच्या फरदडसाठी भेट घेतली होती, पण वातावरण कपाशीसाठी पोषक नसल्यामुळे मी कपाशी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मग मी त्यांच्याकडून भुईमुगाचे नियोजन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने बीजप्रक्रिया पासून ते काढणीपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच वापरले. म्हणून एकरी १३ पोते म्हणजे (१३ क्विंटल) भुईमूग झाला. यावरून मी भेंडीवर सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले.\n१ एप्रिल २०१६ ला मी १० गुंठे भेंडी लावली. सुरुवातीला शेतात मी दोन ट्रॉली शेणखत विस्कटून दिले नंतर j.k.Seed चे ७३१५ ह्या जातीचे भेंडी बी लावले. सोबत सुरुवातीला १ बॅग १०:२६:२६ खत वापरले. बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटर वापरले. त्यामुळे ३ ते ४ दिवसांनी भेंडी दिसू लागली. ९६ ते ९८% भेंडीचे बी उगवले होते. त्यानंतर १० ते १५ दिवसां��ी त्यावर मी जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली/पंप याप्रमाणे वापरले. त्याने हलक्या प्रमाणात मर रोग जाणवत होता तो नाहीसा झाला. भेंडीला तुषार सिंचनाने पाणी दिले. नंतर १ महिन्यानंतर १०:२६:२६ व युरीया १ - १ बॅग मिक्स करून दिले. एवढ्यावर भेंडीची उंची झपाट्याने वाढू लागली. पिकाची निरोगी वाढ होण्यासाठी मी दुसऱ्या फवारणीमध्ये प्रिझम ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + थ्राईवर ६० मिली + न्युट्राटोन ५० मिली + राईपनर ६० मिली १५ लि. पंपास घेऊन फवारले. यामध्ये लिहोसीन वापरले. प्रिझममुळे भेंडीला फुट व फुलांची संख्या वाढली.\n२२ मे पासून भेंडीची तोडणी करायला सुरुवात केली. पहिल्या तोडणीला ८० किलो भेंडी निघाली. चांदूर रेल्वे येथे रविवारी बाजारात ४० रु./किलोने भेंडी विकली.\nत्यानंतर मी दर ८ - १० दिवसांनी प्रिझम ७५ मिली + थ्राईवर ७५ मिली + न्युट्राटोन ७५ मिली + राईपनर ७५ मिली + क्रॉपशाईनर ७५ मिली + १५ लि. पाण्याच्या पंपामधून फवारत गेलो. दर २ ते ३ दिवसांनी भेंडीची तोडणी करत असे. सोमवारला फुलगाव, बुधवारला धामणगाव आणि रविवारला चांदूर रेल्वे अशा ३ ही बाजारात मी भेंडी विकली. ४० ते ५० रु./ किलो प्रमाणे मला भाव मिळला.\nहुमणी, पांढरी माशी, मावा, तुडतुड्यांसाठी एक नवा प्रयोग\nमध्यंतरी हुमणी (White Grub) या किडीने भेंडीची काही झाडे दगावली. त्यासाठी आम्ही आपले घरगुती मीठ आणि जर्मिनेटर + प्रोटेक्टंटचे द्रावण तयार करून जमिनीतून दिले असता याचा सुद्धा प्रादुर्भाव कमी झाला. पांढरी माशी, मावा, तुडतुडे याकरीता स्प्लेंडर वापरले. सुरूवातीला ८० ते १०० किलो भेंडी निघत होती. नंतर तिचे प्रमाण वाढून ११० ते १३० किलो पर्यंत गेले.\nमला साधारणतः आतापर्यंत १,२०,०००/- रुपयांचे भेंडीचे उत्पन्न झाले असून भेंडीचे उत्पादन अजून देखील सुरू आहे. या भेंडीचे उत्पादन महालक्ष्मी पर्यंत मला मिळत राहील असा अंदाज आहे. भजभुजे यांच्या मार्गदर्शनामुळे मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा चांगला अनुभव आला. भेंडीवर शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्हायरस दिसला नाही. यापुर्वी दरवर्षी भेंडीवर यलो व्हेन मोझॅकचा प्रादुर्भाव दिसतो. यावर्षी तो मला दिसला नाही. भेंडीला शाईनिंग पण चांगली होती. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलासुद्धा मला चांगला भाव मिळाला. इतरांच्या तुलनेत भेंडी सरळ, कोवळी आणि ��कसारखी निघाली. नाहीतर ती वेडी - वाकडी पण येत असते. त्याचे प्रमाण फार कमी होते.\nअशाप्रकारे या टेक्नॉलॉजीमुळे मला फायदा झाला. मी कपाशी बियासाठी १ लि. पाण्यामध्ये ५० मिली जर्मिनेटर घेऊन त्यामध्ये बियाणे ३ तास भिजवून नंतर सुकवून डोबले (लावले), तर १०० % फुलीवर कपाशीची उगवण झाली आहे. त्यावर मी आता पहिली फवारणी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/rs-3-lakh-crore-contract-for-petrochemical-project/", "date_download": "2019-03-25T08:09:51Z", "digest": "sha1:FCYVOSLZGUUM7KG6A3MVGEZBSY4KSQE5", "length": 8489, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रत्नागिरी येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nरत्नागिरी येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार\nनवी दिल्ली : रत्नागिरी येथील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.\nरत्नागिरी जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री तथा एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या .\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरे���न लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागिदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे.\nउघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन\nपेट्रोकेमिकल प्रकल्पाचे असे होणार फायदे\nया प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर (क्रूड ऑईल) प्रक्रिया करण्यात येईल. तसेच, पेट्रोल , डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनेही या प्रकल्पातून करण्यात येणार आहेत. या सोबतच मोठ-मोठया प्रकल्पांसाठी कच्चा मालही या प्रकल्पातून पुरविण्यात येणार आहे.\nयापूर्वी ११ एप्रिल २०१८ रोजी १६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रीस्तरीय शिखर संमेलनात सौदी अरामकोने भारतासोबत आरआरपीसीएल प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला असून आज एडनॉक समूहाला सहगुंतवणूकदार केले आहे.\nगृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील अडचणीत\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\n‘त्या’ महिला पायलटने स्वतःचे प्राण देऊन वाचवले अनेकांचे जीव\nअति घाई थेंबा थेंबात जाई; पुणे महापालिकेत सर्वपक्षीय ‘छत्री’ आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/the-killers-should-be-hanged-ramdas-athavale/", "date_download": "2019-03-25T08:06:48Z", "digest": "sha1:65CFHCTAN4FAUDADS7YAK5ENJZUJ2MUO", "length": 9189, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे - रामदास आठवले", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nनितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे – रामदास आठवले\nमुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावात 11 विचा विद्यार्थी असणारा 17 वर्षांचा दलित युवक नितीन आगे याची भरदिवसा जातीवादातून क्रूररित्या हत्या करण्यात आली . मात्र साक्षीदार फितूर झाल्याने नितीन आगेचे मारेकरी जरी निर्दोष सुटले असले तरी त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय नितीन आगेला न्याय मिळणार नाही . या केस मधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी राज्यशासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे.\nतसेच दिवंगत नितीन आगेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत नितीन आगेच्या वडिलांना राजू आगेंना दिले.बांद्रा येथील संविधान निवासस्थानी नितीन आगेच्या वडिलांनी राजू आगेनी आठवले यांची भेट घेऊन दिवंगत नितीन आगेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली . राजू आगे यांच्या कुटुंबाला खर्डा गावात धोका आहे . त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे . तसेच आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा अशी तसेच आर्थिक स्थिती बिकट असल्याने समाजाने पाठबळ देण्याची आर्त हाक राजू आगे यांनी आठवले यांची भेट घेऊन समाजाला मारली.\nयावेळी रिपाइं तर्फे दिवंगत नितीन आगेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून अधिक 1लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आठवलेंनी राजू आगेना दिले.अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी च्या मुलीवर बलात्कार करूम खून करण्यात आल्याच्या अमानवी गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी रिपाइं आणि सर्व आंबेडकरी समाजाने मागणी केली होती . त्या केस मध्ये कमी पुरावे असून देखील त्यातील गुन्हेगारांना फाशीच शिक्षा झाली त्या निर्णयाचे आंबेडकरी जनतेने स्वागत केले मात्र त्याच जिह्यात खर्डा गावात नितीन आगे च्या अमानुष हत्येतील आरोपी सबळ पुरावे आणि साक्षीदार असताना निर्दोष सुटतात .\nएकाच जिल्ह्यातील या दोन्ही केस मधील वेगवेगळे निकाल आल्यामुळे समाजात संदेश चुकीचा जात आहे. त्यामुळे नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे.तसेच या केस मधील फुटीर साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ना रामदास आठवले म्हणाले .\nनितीन आगे हा केवळ राजू आगेंचा मुलगा नाही तर आता तो संपूर्ण आंबेडकरी समाजाचा मुलगा झाला आहे. सर्व समाज आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालायाचा राज्यमंत्री म्हणून आपण दिवंगत नितीन आगे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत असे आश्वासन आठवलेंनी राजू आगेना दिले आहे\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nVIDEO- महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप\nशिवरायांचे स्मारक अरबी समुद्राऐवजी प्रतापगडावर उभारावे – भिडे गुरुजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/buldhana-news-farmer-loan-supriya-sule-53837", "date_download": "2019-03-25T08:26:36Z", "digest": "sha1:APDATWQDPPGRLGCBECKA6XMFEKP7QWXE", "length": 13402, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "buldhana news farmer loan supriya sule कर्जमाफीचे निकष किचकटच - सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकर्जमाफीचे निकष किचकटच - सुप्रिया सुळे\nमंगळवार, 20 जून 2017\nबुलडाणा - फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफीचे निकष किचकट आणि अस्पष्ट आहेत. त्याचबरोबर हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवारी येथे केले.\nबुलडाणा - फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफीचे निकष किचकट आणि अस्पष्ट आहेत. त्याचबरोबर हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवारी येथे केले.\nबुलडाणा येथे पक्षसंघटनेच्या संदर्भात आयोजित या पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी आदी उपस्थित होते. \"\"या सरकारच्या काळात असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे. शेतकरी, शेतीमालाला भाव, कुपोषण, डॉक्टर, शिक्षकांचे प्रश्न, सर्वसामान्य कामगार, नोटाबंदीचे फटके अशा सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरले आहे, असे सांगून सधन शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतात, असे भाजपचे म्हणणे ��हे; परंतु त्यांनी उदाहरणासह हे दाखवून द्यावे,'' असे आव्हान सुळे यांनी दिले.\nराष्ट्रपती पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या,\"\"या विषयावर बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. आज त्या संदर्भात काही सांगता येणार नाही.'' मुदतपूर्व निवडणुकीसंदर्भात त्या म्हणाल्या की, राजकीय पक्ष म्हटल्यावर निवडणुकीसाठी केव्हाही तयार राहावेच लागते. जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा त्यांनी निषेध करीत अशा घटनांमध्ये महिलेची जात किंवा धर्म कोणता हे महत्त्वाचे नसून ती एक महिला आहे. याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nसुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला,...\nतुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले\nकोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का\nशुद्धिकरणाची बुरसट बुद्धी (मर्म)\nज्या माणसाने आयुष्यभर कर्मकांड, अंधश्रद्धा याला फाटा देत केवळ \"कर्म' हेच आपले जीवन मानले, त्याच मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याच्या कला अकादमी...\nआदरणीय हायकमांड यांना शतशत प्रणाम. मी नांदेडचा एक साधासुधा, सिंपल आणि निष्ठावान कार्यकर्ता असून, कर्मधर्म संयोगाने सध्या प्रदेशअध्यक्षदेखील आहे. काही...\nLoksabha 2019 : हे फक्त श्रीमंतांचे चौकीदार; प्रियांका गांधींचे टीकास्त्र\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनी आज जोरदार टीका केली. \"हे 'चौकीदार' फक्त...\nज्वारीच्या कोठारात स्वप्नांचा पाचोळा\nऔरंगाबाद : दुष्काळामुळे बागा जळाल्या, जनावरे उपाशीपोटी दावणीला बांधावी लागताहेत, लेकींची लग्ने राहिली ईतकेच नव्हे तर आता जगायचं कसं अशी चिंता लागली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्��ूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/fashion-funda-news/look-fashionable-in-monsoon-1255131/", "date_download": "2019-03-25T08:24:28Z", "digest": "sha1:NJWENDCHNVG5W5GFSG6Q7NWF733HQZGE", "length": 22014, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "look fashionable in monsoon | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nखास पावसाळ्यातल्या खरेदीसाठी दिलेल्या काही टीप्स...\nदिवाळी-दसऱ्याच्या खरेदीप्रमाणेच आता पावसाळ्याची खरेदीही तरुणांसाठी महत्त्वाची झाली आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी दोस्तहो, अजूनही वेळ गेलेली नाही. हे वाचा आणि खरेदीचे नियोजन करा. खास पावसाळ्यातल्या खरेदीसाठी दिलेल्या काही टीप्स..\nजून महिना आला की मार्केटमध्ये झुंबड उडते ती रंगीबेरंगी छत्र्यांची, पावसाळी चपलांची, रेनकोट्सची. सगळ्यांनाच वेध लागतात ते मान्सून शॉपिंगचे. मग मुंबईत पाऊस असो वा नसो, पण ‘रेनी शॉपिंग तो बनती है बॉस’ यंदाच्या पावसाळ्यात काय नवीन आलंय, कोणती फॅशन चलतीत असेल यावर जरा नजर टाकू या-\nया वेळी छत्र्यांमध्ये खूप वैविध्य पाहायला मिळणार आहे. मागच्या वर्षीप्रमाणे टू-फोल्ड किंवा थ्री-फोल्ड छत्र्यांची फॅशन या वेळीही असेल, कारण त्या कॅरी करायला सोप्या असतात; पण त्याचबरोबर मोठय़ा दांडय़ाच्या हटके छत्र्याही पाहायला मिळतील. बदक, हंस, मेंढी, तलवार, कुत्रा असे नानाविध प्रकार छत्रीच्या दांडय़ांमध्ये निघाले आहेत. छत्री हातात पकडूनही आपण मोबाइलवर सहज चॅट करू शकू यासाठी छत्रीच्या दांडय़ात आपली चार बोटं मावू शकतील अशी छत्रीदेखील बाजारात उपलब्ध असेल. शिवाय लहान मुलांसाठी छत्रीच्या दांडय़ाला कोणता तरी कार्टूनचा मुखवटा व छत्रीच्या टोकाला त्या कार्टूनचे पाय अशी हटके छत्रीदेखील पाहायला मिळेल. तसेच काही छत्र्यांच्या दांडय़ामध्ये आपण वॉटर बॉटल किंवा कॉफी कॅन ठेवू शकू अशी जागादेखील आहे. काही काही छत्र्या तर छत्र्याच वाटणार नाहीत अशा आहेत. म्हणजे कोल्ड ड्रिंक्स बॉटलच्या आकाराची छत्री, परफ्यूम, फ्लॉवर पॉटच्या आकाराची छत्री असे नानाविध प्रकार छत्र्यांमध्ये आढळून येतील. याशिवाय छत्र्याचे प्रिंट्सही खूप हटके असतील म्हणजे न्यूज पेपरप्रिंट्सच्या किंवा जॉमेट्रिकल शेप्स, फिल्स अशा एक ना अनेक छत्र्या बाजारात उपलब्ध असतील. अशा हटके छत्र्या तुम्हाला बांद्रय़ाच्या हिल रोड, लिंकिंग रोड किंवा कुलाबा कॉझवे अशा स्ट्रीट शॉपिंगमध्ये कमी दरात मिळतील.\nबाइकर्सना किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना पावसाळ्यात सगळ्यात सोयीस्कर ठरणाऱ्या रेनकोट्समध्येही सध्या नवनवीन डिझाइन्स आल्या आहेत. पोल्का डॉट, बिझी प्रिंट्सची फॅशन सध्या चलतीत आहे. ऑफिसला जाणाऱ्या तरुणींसाठी ट्रेंच कोटचा पर्यायसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. यात लाइट, पेस्टल शेड्स जास्त खुलून दिसतात. शॉट ए लाइन केप स्टाइल रेनकोट घालून बघायलाही काहीच हरकत नाही. पारदर्शक रेनकोटलाही एक वेगळाच लुक असतो. असे रेनकोट्स तुम्हाला दादर वेस्ट मार्केट किंवा कोणत्याही मॉलमध्ये सहज मिळू शकतील.\nफूटवेअरसाठी पावसाळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे रबरी फ्लिप-फ्लॉप. लेदर किंवा वेलवेटचे शूज पावसाळ्यात वापरणे शक्यतो टाळा. त्याच्याबदली तुम्ही ऑल सीझनचे शूज वापरू शकता. सॅण्डल्समध्येही पावसासाठी खास म्हणून रबराचा वापर केला असतो. नवीन प्रकारचे ‘बीच शूज’ ज्यावर वेगवेगळे डिजाइन असतील असे घालून बघायलाही काहीच हरकत नाही किंवा ‘गमबूट’मध्येही खूप नवनवीन प्रकारचे प्रिन्ट्स पाहायला मिळतील. आपल्या लुकला फॅशनेबल टच द्यायला गमबूट हा उत्तम पर्याय आहे. लेटेस्ट फॅशन म्हणून ‘रबरी स्नीकर्स’सुद्धा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही किंवा पावसाळ्यात हाय हिल्स घालायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे ‘किमोनो’ घालू शकतात. परंतु पावसाळ्यात जेव्हा कोणतेही फूटवेअर घ्याल तेव्हा काळजी घ्या की ते चांगल्या क्वॉलिटीचे असतील.\nयंदाच्या पावसाळ्यात ओवर साइज बॅग्जची फॅशन असेल. आपल्या नॉर्मल डेली यूजच्या बॅग्जच्या प्रोटेक्शनसाठी आणखी एक बॅग कव्हर म्हणून वापरली जाईल. यामध्ये पारदर्शक किंवा प्रिंटेड दोन्ही ऑप्शन असतील. काही प्लास्टिक बॅग्जमध्ये वेगवेगळ्या खास पावसासाठी तयार केलेल्या प्रिंट्स बघायला मिळतील म्हणजे पॅच् वर्क केलेली छत्रीची प्रिंट, पावसाची प्रिंट इ. प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध असतील. मागच्या वर्षांत फॅशनमध्ये असलेल्या मोठय़ा कापडी बॅग्ज निदान पावसाळ्यात तरी बाहेर काढू नयेत. पावसात भिजल्यावर त्या बॅग्ज पाणी शोषून घेतात आणि बॅगमधल्या सगळ्या वस्तू खराब होतात. यासाठी पावसाळ्यात नेहमीच प्लास्टिक बॅग्ज किंवा ऑल सिझन बॅग्ज वापराव्यात. या बॅग्ज तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये मिळू शकतात किंवा तुम्ही पावसाची कोणतीही शॉपिंग ऑनलाइनदेखील करू शकता.\nपावसाळयासाठी नेहमीच गडद रंग उत्तम. शक्यतो पावसाळ्यात सफेद, क्रीम अशा लाइट शेड्स वापरणे टाळावे, कारण या भिजल्यावर पारदर्शक दिसतात. चिखल उडाल्यास लगेच खराबदेखील होतात. तसेच पावसाळ्यात नेहमी हलके कपडे वापरावे. शिफॉन, जॉर्जेट, मलमल या कापडांना प्राधान्य द्यावं, कारण हे भिजल्यावर लगेच सुकतात. पावसाळा सुरू झाला म्हणजे लगोलग कॉलेज सुरू होतातच, परंतु काही कॉलेजमध्ये शॉर्ट कपडे घालण्यास परवानगी नसते. म्हणून त्या बदल्यात तुम्ही अँकल लेंथ जेगिन्स, केप्रिज, अँकल लेंथ स्कर्टस् घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही क्रॉप टॉप आणि केप्रीज घालून बघू शकता. ‘जर आपण क्रॉप टॉप घातला आणि आपलं पोट दिसलं तर यासाठी तुम्ही संकोचत असाल तर लाँग टाइट फिटेड टँक टॉपवर देखील क्रॉप टॉप घालू शकता. शिवाय तुम्ही लूज टी शर्ट्स, शॉर्ट ए लाइन वन पीस या आउटफिट्सचाही पावसाळ्यात वापर करू शकता.’\nत्वचेची आणि केसांची काळजी –\nपावसाळ्यात आपल्या त्वचेची आवर्जून काळजी घ्या. साधा-सोपा घरगुती उपाय म्हणजे मध आणि काकडी यांचं एकत्र मिश्रण करून त्वचेला लावा. यामुळे त्वचा तुकतुकीत दिसते व त्वचेचा कोरडेपणा निघून जातो. पावसाळ्यात मेकअप करतानादेखील वॉटर प्रूफ प्रॉडक्ट वापरावेत. काजळ, लाइनर वापरताना ते चांगल्या कंपनीचे असेल याची काळजी घ्यावी. लिपस्टिकसुद्धा पावसाच्या पाण्याने स्प्रेड होणार नाही अशीच घ्यावी.\nपावसाळ्यात केसांकडे मात्र दुर्लक्ष करू नये. पावसाच्या पाण्याने आपले केस रूक्ष व कोरडे होतात यासाठी केसांच्या मुळांना थोडे ऑलिव्ह ऑइल लावून केसांचा पोनिटेल बांधा किंवा फिशटेल वेणी बांधून तुमचा लुक फॅशनेबल बनवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्ये���्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-03-25T08:08:01Z", "digest": "sha1:2HAI5G4J6RLHWWYXQIYLU4RFW3EVR46J", "length": 8039, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बर्नी सँडर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे सदस्य\n३ जानेवारी, १९९१ – ३ जानेवारी, २००७\n८ सप्टेंबर, १९४१ (1941-09-08) (वय: ७७)\nब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क\nबर्नार्ड सँडर्स (इंग्लिश: Bernard \"Bernie\" Sanders, जन्म: ८ सप्टेंबर १९४१) हे एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सेनेटर आहेत. २००७ सालापासून सेनेटर असलेले सँडर्स १९९१ ते २००७ दरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे सदस्य होते. अमेरिकन काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अपक्ष राहिलेल्या सँडर्सनी २०१५ साली डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. स्वत:ला लोकशाहीवादी समाजवादी मानणाऱ्या सँडर्सनी मजूर वर्गाच्या हक्कांसाठी लढा दिला आहे तसेच समाजातील आर्थिक असमानतेबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यांची धोरणे व विचार प्रामुख्याने युरोपातील सोशालिस्ट पुढाऱ्यांच्या मतांसोबत मिळतीजुळती आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबद्दल नापसंदी व्यक्त करणाऱ्या सँडर्सनी पहिल्यापासूनच इराक युद्धाला विरोध केला आहे.\nएप्रिल २०१५ मध्ये सँडर्सनी २०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. २३ राज्यांमधील प्राथमिक निवडणुका जिंकून देखील त्यांना पुरेशी मते मिळवण्यात अपयश आले. हिलरी क्लिंटन ही डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार म्हणून नोव्हेंबर २०१६ मध्ये अध्यक्षीय निवडण���क लढवेल.\nइ.स. १९४१ मधील जन्म\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी ०२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090122/main.htm", "date_download": "2019-03-25T08:20:00Z", "digest": "sha1:VEKMJNGUC3YSLUT7HLSD626HMN3CKYH7", "length": 26024, "nlines": 72, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..\nउमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..\nकालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..\nजातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..\nएकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,\nतर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..\nतिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..\nअसा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..\nवाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..\nबदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..\nपण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..\nतो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..\nसोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..\nअचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..\n(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)\nओबामा यांचा पाकिस्तानला दणका\nअर्थसाह्यासाठी प्रामाणिकपणा ही अट\nसीमेलगतच्या अफगाणिस्तानी प्रदेशातील घातपाताबद्दल पाकिस्तानलाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा देतानाच दहशतवादिंवरोधी लढय़ातील सहभागानुसार पाकिस्तानला बिनलष्करी आर्थिक साह्य दिले जाईल, असे अमेरिकेतील नवनियुक्त ओबामा प्रशासनाने जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी लढय़ात पाकिस्तान किती प्रामाणिकपणे साह्य करतो, यावर त्यांना दिले जाणारे साह्य अवलंबून राहील, असे अमेरिकने स्पष्ट केले आहे. अध्यक्ष बराक ओबामा आणि उपाध्यक्ष जो बिडेन यांनी पाकिस्तानबाबतच्या धोरणाची आखणी केली आहे. बिडेन हे अफगाणिस्तान व पाकिस्तानविषयक तज्ज्ञ ��ानले जातात.\nपंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्या उमेदवारीचे संकेत\nनवी दिल्ली, २१ जानेवारी/खास प्रतिनिधी\nकेंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले. नव्या वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे पंधराव्या लोकसभेत पंतप्रधानपदाची शर्यत धूसर होत चालली असतानाच शरद पवार रिंगणात उतरले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांच्या पत्रकार परिषदेत पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीचा मुद्दा समोर आला.\nअकरावी प्रवेशासाठी आता ‘एमएमआरडीए’नुसार ७०:३० कोटा\nमुंबई, २१ जानेवारी / प्रतिनिधी\nअकरावी प्रवेशासाठी जिल्ह्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के कोटय़ाच्या गुंतागुंतीमधून मुंबई व परिसरातील विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. मुंबईतील प्रवेशासाठी जिल्ह्याऐवजी ‘मुंबई महानगर प्रदेशा’तील भौगोलिक कार्यक्षेत्र हेच युनिट मानून युनिटच्या अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांना ७० टक्के व युनिटबाहेरील विद्यार्थ्यांना ३० टक्के कोटा पद्धत लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री पतंगराव कदम यांनी काल शिक्षण सचिव संजयकुमार व अन्य काही अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या नव्या निर्णयानुसार आता ‘७०:३०’ कोटय़ाच्या मुळ शासन निर्णयात दुरूस्ती केली जाणार आहे.\nविलासरावांकडून गडकरींवर बदनामीचा खटला\nशीव-पनवेल रस्त्याचे चौपदरीकरण आणि त्यावर पथकर वसुलीसाठी पाच टोलनाक्यांचे व्यवस्थापन करण्याचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कंत्राट आपल्या मुलाची भागीदारी असलेल्या कंपनीस मिळावे यासाठी नियम गुंडाळून घाईघाईने निविदा काढल्या गेल्या, या महिनाभरापूर्वी नागपूर येथे केलेल्या आरोपाच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नितीन गडकरी यांच्यावर बदनामीचा फौजदारी खटला गुदरला आहे.बिनबुडाचे व धादांत असत्य आरोप करून गडकरी यांनी आपली अब्रुनुकसानी केली असल्याने त्यां���्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० अन्वये खटला चालवून कारवाई करावी, अशी विलासराव देशमुख यांची फिर्याद सोमवारी भोईवाडा येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली गेली होती.\nखाजगी वीज उत्पादक कारखान्यांना ५० टक्के वीज राज्यातच विकावी लागणार\nराज्यातील २५ विविध खाजगी वीज उत्पादक कारखान्यांनी उत्पादन केलेल्या वीजेपैकी ५० टक्के वीज ही राज्यालाच विकावी लागणार आहे. राज्याचे नवे ऊर्जा मंत्री सुनील तटकरे यांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर घेतलेला हा पहिला मोठा धोरणात्मक निर्णय आहे. मंत्रीमंडळाच्या उपसमितीसमोर हा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत येणार असून त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यात सुरू झालेल्या कारखान्यांमधील वीज बाहेरील राज्यांना विकल्यास त्यामुळे राज्यातील जनतेत मोठय़ा प्रमाणात असंतोष निर्माण होऊ शकतो, असे वाटल्यानेच राज्य सरकार या निर्णयाप्रत आले आहे. राज्यात एकंदर २५ खाजगी वीज उत्पादक कारखाने होऊ घातले असून त्यातून ३५,९६० मेगॅवॅट वीज निर्माण होणार आहे.\nराज्याचा विक्रीकर वाढविण्यासाठी ‘प्राइस वॉटरहाऊस कूपर’च सल्लागार\nकोटय़वधी रुपयांच्या ‘सत्यम कॉम्प्युटर’च्या घोटाळ्याकडे कानाडोळा करणारी ‘प्राईस वॉटरहाऊस कूपर’ हीच कंपनी गेल्या चार वर्षांंपासून राज्याचा विक्रीकर वाढविण्यासाठी सल्लागार म्हणून वावरत आहे. सल्ल्यासाठी कोटय़वधी रुपये आकारणाऱ्या या कंपनीच्या सल्ल्यानंतरही महसूलात अपेक्षित वाढ होण्याऐवजी कार्यप्रणालीतच कमालीचा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.\nराज्यात २००५ मध्ये वॉटप्रणाली लागू झाल्यामुळे सर्वच व्यापारी कराच्या जाळ्यात ओढले गेले. त्यामुळे कमालीच्या झपाटय़ाने विक्रीकर वाढण्याची अपेक्षा होती. कदाचित त्यामुळेच ‘प्राईस वॉटरहाऊस कूपर’वर सल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात आली असावी.\nनांदेडच्या विभागीय आयुक्तालयावरून पक्षश्रेष्ठींचे मुख्यमंत्र्यांना झुकते माप \nमुंबई, २१ जानेवारी / खास प्रतिनिधी\nनांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याने या निर्णयाला विरोध करणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर मात करण्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे यशस्वी झाले आहेत. नांदेडचा मुद्दा आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असला तरी या वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना झुकते माप दिल्याचे जाणवत आहे. नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यावरून लातूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरऐवजी नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्यास तीव्र विरोध दर्शविला होता.\nसरकारच्या घोटाळ्याच्या शंभर फायलींची एसआयटी नेमून चौकशी हवी- नितीन गडकरी\nझोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील गडबडीपासून भूखंडांची आरक्षणे बदलण्यापर्यंत एकूण १०० प्रकरणांच्या फाईल माझ्याकडे असून न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी माझ्या विरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेऊन मला या प्रकरणांना वाचा फोडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही गडकरी यांनी देशमुख यांना लगावला.शीव-पनवेल रस्त्यावरील टोल वसुलीच्या कंत्राटावरून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांत सुरू झालेला संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. गडकरी म्हणाले की, विलासरावांनी नोटीस पाठविल्याचे मी स्वागत करतो. यानिमित्ताने न्यायालयापुढे पुरावे मांडण्याची संधी मला प्राप्त झाली. ज्याची निविदा मंजूर करायची त्याला अनुकूल अशा अटी व शर्ती ठरवून काम दिले. या कामावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तंटा झाल्यामुळेच माझ्याकडे माहिती आली. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेपासून भूखंडांची आरक्षणे बदलण्यापर्यंत १०० प्रकरणातील घोटाळ्याच्या फायली माझ्याकडे असून त्या न्यायालयापुढे मांडण्यात येतील. तेलगी प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली जशी एसआयटी नियुक्त केली होती तशी ती या सर्व प्रकरणांत नियुक्त करून चौकशी करावी. शीव-पनवेल रस्त्यासंदर्भात मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून चुकीचा निर्णय रद्द करा अन्यथा मी न्यायालय��त जाईन, असा इशारा दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nपुणे, २१ जानेवारी / खास प्रतिनिधी\nदहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही त्याच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. मंडळाचे राज्य सचिव टी. एन. सुपे यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ६ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २६ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होईल. दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. लेखी परीक्षा ५ ते २३ मार्च या कालावधी होईल. मंडळाने या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या असल्या, तरी त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले नव्हते. मंडळाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. www.msbshse.ac.in या मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकाची माहिती मिळू शकेल. सव्र्हरसारख्या तांत्रिक समस्या उद्भविल्यास काही वेळा वेळापत्रक दिसण्यास अडथळे येऊ शकतात.\nमालेगाव बॉम्बस्फोट : मोक्काचा आज निर्णय\nमुंबई, २१ जानेवारी / प्रतिनिधी\nमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मोक्का कायद्यातील गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला असून त्याची दखल घेऊन त्यानुसार खटला चालवायचा की नाही, याबाबतचा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश वाय. डी. शिंदे हे उद्या देणार आहेत. दहशतवादविरोधी पथकाने काल मालेगाव स्फोटातील १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मोक्का, बेकायदेशीर कृत्य (प्रतिंबध), आयपीसी, शस्त्रे आणि स्फोटके कायदा आदी कलमे त्यामध्ये लावण्यात आली आहेत.बचाव पक्षाच्या वकिलांनी या वेळी असा युक्तिवाद केला की, राकेश धावडे या आरोपीवर दोन अन्य खटल्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर मोक्का लावण्यात आला. मालेगाव स्फोटानंतर धावडे याच्याविरुद्ध दोन आरोपपत्रे दाखल करण्यात आली. १५ नोव्हेंबर रोजी धावडेला अटक करून नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचदिवशी सरकारी पक्षाने त्याच्याविरुद्ध जालना येथे २००४ मध्ये झालेल्या स्फोटाच्या खटल्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.सरकारने २० नोव्हे��बर रोजी मालेगाव प्रकरणी मोक्का लावलेला असतानाही न्यायालयाने २८ नोव्हेंबर दाखल करण्यात आलेले आरोपपत्रच केवळ विचारात घेतले, असा युक्तिवादही बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/396", "date_download": "2019-03-25T08:56:04Z", "digest": "sha1:EXGMHN4HCYE3HTUE272N7S5PV5GVOXMJ", "length": 10279, "nlines": 130, "source_domain": "gangadharmute.com", "title": " पाक्षिक शेतकरी संघटक २१ मार्च २०१२ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nपाक्षिक शेतकरी संघटक २१ मार्च २०१२\nमुखपृष्ठ / पाक्षिक शेतकरी संघटक २१ मार्च २०१२\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nGangadhar M Mute यांनी मंगळ, 20/03/2012 - 13:56 ह्यावेळी प्रकाशित केल��.\nपीडीएफ अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.\nवस्त्रोद्योगांच्या ‘कल्याणा’ शेतकर्यांच्या विभूती\nनिर्यातबंदी ‘उठली-बसली’चा दरबारी खेळ\nकिरकोळ बाजारात थेट गुंतवणुकीचा उल्लेखही नाही\nखसखशीवर बंदी हीच गुन्हेगारीची जननी\nशेतकर्यांची हेटाळणी कधी थांबणार\nपराभव : कॉंग्रेस, भाजप आणि अण्णा आंदोलनाचा\nपीडीएफ अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.\nपाक्षिक शेतकरी संघटक २१ मार्च २०१२\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2019/02/25/kanda-paat-makyache-dhirde/", "date_download": "2019-03-25T07:25:19Z", "digest": "sha1:FEAMO4MVJUEVOE2KUUJ3X7QB6MF6SWC2", "length": 8348, "nlines": 142, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे ) – Spring Onion Cornmeal Savory Pan Cake | My Family Recipes", "raw_content": "\nकांदा पात आणि मक्याचे धिरडे मराठी\nकांदा पात आणि मक्याचे धिरडे\nब्रेकफास्ट साठी नवनवीन पदार्थ बनवताना असं धिरडे बनवायची कल्पना सुचली. कांदा पात आणि मक्याचं पीठ (जे भाकरी करायला वापरतो) वापरून हे धिरडे बनवलं आहे. बाकी साहित्य घरात नेहमी असणारंच आहे. पीठ मिळून येण्यासाठी गव्हाचं पीठ घातलंय आणि चवीसाठी हिरवी मिरची, लसूण आणि ओवा घातलाय. पटकन बनवता येणारा पौष्टिक आणि पोटभरीचा प्रकार आहे.\nचिरलेली कांद्याची पात दिड कप\nमक्याचं पीठ १ कप\nगव्हाचं पीठ १ कप\nलसूण ६–७ बारीक कापून\nठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा\nतीळ (पांढरे / काळे ) १ चमचा\nहळद अर्धा चमचा (हळद जास्त झाली तर रंग काळपट येतो)\nतेल/ तूप / बटर धिरडं भाजायला\n१. एका बाउल मध्ये वरील सर्व साहित्य (तेल / तूप / बटर वगळून ) मिक्स करा.\n२. थोडं थोडं पाणी घालून मध्यम ���ातळ पीठ भिजवा (भज्यांच्या पिठासारखं ). पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.\n३. नॉन स्टिक तवा गरम करून घ्या.\n४. गॅस मध्यम करून पाव कप पीठ तव्यावर ओता. ओतताना कप गोल फिरवा आणि हाताने पीठ सारखं करा.\n५. झाकण ठेवून २ मिनिटं भाजा. झाकण काढून बघा. ओलं पीठ ऑम्लेट वर दिसत असेल तर परत मिनिट भाजा.\n६. कडेनी थोडं तूप / तेल / बटर सोडा.\n६. धिरडं परतून दुसरी बाजू झाकण न ठेवता भाजून घ्या.\n७. कांदा पात आणि मक्याचे गरमगरम धिरडं चटणी / सॉस बरोबर खायला द्या. लोण्याबरोबर हे धिरडं अप्रतिम लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2019-03-25T07:24:25Z", "digest": "sha1:W3FCLTDM63WQIPSISREVRA76ZPCBDEQF", "length": 10523, "nlines": 128, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "अनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nरुदकी ह्यांची रुबाईवृत्ते .\nगागाल लगागागा गागाल लगा\nऐकू कसला ,वेलीवरती , हा जीव आहे\n०२. गागाल लगागागा गागल लगाल डोळ्यांत जसे , रस्त्यात कसा आहे\n०३. गागाल लगागागा गागागा लल / गा\n०४. गागाल लगागागा गागागा गाल खोटयास , मोठी जपली , आहे\n०५. गागाल लगालगा लगागाल लगा आले बघ , सार्याच ऋतूंना ,\n०६. गागाल लगालगा लगागाल लगाल होतीच कुठे , आहे\n०७. गागाल लगालगा लगागागा गा गालांवर फाकली\n०८. गागाल लगालगा लगागागा गाल\n०९. गागाल लगागाल लगागाल लगा सोशीत उन्हाचे चटके\n१०. गागाल लगागाल लगागाल लगाल तोडून , ओठावरचे ,\n११. गागाल लगागाल लगागागा गा दु:खात , त्यागाविण\n१२. गागाल लगागाल लगागागा गाल एकेक जरी भिन्न ,\n१३. गागाल लगागाल लगागागा लगा काळाचे\n१४. गागागा गागागा गागाल लगाल युध्दाचे ढग , ‘ माझे -माझे ‘ ,\n१५. गागागा गागागा गागागा गा ना ये कामी ,\n१६. गागागा गागागा गागागा गाल हा नाद ,\n१७. गागागा गालगा लगागाल लगाल ती माझी , थांबावी , आहे\n१८. गागागा गालगा लगागाल लगा तू एकांतात , सूर्याचा\n१९. गागागा गालगा लगागागा गा पायांना हाच एक ,\n२०. गागागा गालगा लगागागा गाल मी कोण \n२१. गागागा गागाल लगागाल लगा मी मेल्याचे ,\n२२. गागागा गागाल लगागाल लगाल मासोळी डोळ्यांत\n२३. गागागा गागाल लगागागा गा\n२४. गागागा गागाल लगागागा गाल\nहजरत इल्लाम सहर इष्क आबादी ह्यांची रुबाईवृत्ते .\nगागाल लगालगा लगालगा लगा\n०२. गागाल लगालगा लगालगा लगाल\n०३. गागाल लगागाल लगालगा लगा\n०४. गागाल लगागाल लगालगा लगाल\n०५. गागाल लगागागा गालगा लगा\n०६. गागाल लगागागा गालगा लगाल माझे घर नसता , कोठे उरली आहे\n०७. गागागा गालगा लगालगा लगा माझ्यामागून रंग , माझ्या दु:खांस आहे\n०८. गागागा गालगा लगालगा लगाल पाने शिशिरातली आहे\n०९. गागागा गागाल लगालगा लगा\n१०. गागागा गागाल लगालगा लगाल\n११. गागागा गागागा गालगा लगा संतांचे , पुष्पांचे सारखे आहे\n१२. गागागा गागागा गागागा लगाल बसलेला वाटे आहे\nडॉ. जार इल्लाम ह्यांची रुबाईवृत्ते .\nगालगा लगालगा लगागाल लगा\n०२. गालगा लगालगा लगागाल लगाल\n०३. गालगा लगालगा लगागागा गा\n०४. गालगा लगालगा लगागागा गाल\n०५. गालगा लगागाल लगागाल लगा थबकता जरासा आहे\n०६. गालगा लगागाल लगागाल लगाल जीवनातला शेवटचा\n०७. गालगा लगागाल लगागागा गा\n०८. गालगा लगागाल लगागागा गाल मी न एकदाही आहे\n०९. गालगा लगागागा गागाल लगा\n१०. गालगा लगागागा गागाल लगाल\n११. गालगा लगागागा गागागा गा उग्रशा फुलांपाशी आहे\n१२. गालगा लगागागा गागागा गाल\n१३. गालगा लगालगा लगालगा लगा\n१४. गालगा लगालगा लगालगा लगाल\n१५. गालगा लगागाल लगालगा लगा\n१६. गालगा लगागाल लगालगा लगाल मी इथेच माझे\n१७. गालगा लगागागा गालगा लगा\n१८. गालगा लगागागा गालगा लगाल\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , म��क्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/now-ambedkar-statue-vandalised-in-up-after-tripura-and-tamil-nadu-tesnion-in-the-area/articleshow/63201708.cms", "date_download": "2019-03-25T08:51:56Z", "digest": "sha1:627ZPTM4HBDZ2WKUTXSSYBGEMRP55AKC", "length": 11008, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ambedkar statue: आता मेरठमध्ये आंबेडकरांची मूर्ती तोडली - now ambedkar statue vandalised in up after tripura and tamil nadu tesnion in the area | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nआता मेरठमध्ये आंबेडकरांची मूर्ती तोडली\nआधी रशियन क्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन, नंतर थोर द्रविडी विचारवंत पेरियार रामास्वामी नायकर, त्यानंतर जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी आणि आता भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. मेरठ येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे मेरठमध्ये तणाव निर्माण झाला आहे.\nआता मेरठमध्ये आंबेडकरांची मूर्ती तोडली\nमेरठ: आधी रशियन क्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन, नंतर थोर द्रविडी विचारवंत पेरियार रामास्वामी नायकर, त्यानंतर जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी आणि आता भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. मेरठ येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे मेरठमध्ये तणाव निर्माण झाला आहे.\nमेरठच्या मदाना ठाणे परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याचं आढळून आलं. काही समाजकंटकांनी मंगळवारी रात्रीच मूर्तीची तोडफोड केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंबेडकरांची मूर्ती तोडण्यात आल्याचं समजताच स्थानिकांनी जोरदार निदर्शने करत रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण आणले. आंदोलन आणखी चिघळू नये म्हणून तिथे आंबेडकरांची नवीन मूर्ती बसविण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब ट��क...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\n220 club: भाजपमध्ये नरेंद्र मोदींविरोधात '२२० क्लब'\nair strike: हवाई हल्ला: मोदींचा पित्रोदांवर पलटवार\nNirav Modi : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला लंडनमध्ये ...\nपाकिस्तानच्या नागरिकांना PM मोदींच्या शुभेच्छा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआता मेरठमध्ये आंबेडकरांची मूर्ती तोडली...\nकर्नाटकमध्ये लोकायुक्तांवर चाकू हल्ला...\nजया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी...\nप्रवीण तोगडिया अपघातातून थोडक्यात बचावले...\nपुतळे तोडणारे वेडे; कारवाई करा: नायडू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2015-Dalimb.html", "date_download": "2019-03-25T08:10:44Z", "digest": "sha1:YYKXBH4YLA65AIPDXXGYUINHM2Y37TIH", "length": 4944, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - बीडच्या दुष्काळी भागात दर्जेदार भगवा", "raw_content": "\nबीडच्या दुष्काळी भागात दर्जेदार भगवा\nश्री. आत्माराम चंदनशीव, मु.पो. हनुमंत पिंप्री, ता. केज, जि. बीड. मो. ९८८१७१७७८८\nआम्ही ७ एकरमध्ये भगवा डाळींबाची मार्च २०१४ मध्ये लागावाद केली आहे. जमीन मुरमाड मध्यम प्रतीची आहे. लागवड १४ x १० वर असून ठिबक केले आहे. या झाडांना वर्षभर पारंपारिक पद्धतीप्रमाणे सेंद्रिय व रासायनिक खते, औषधे वापरली. मात्र त्यानंतर आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पुस्तके वाचली. त्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा अतिशय प्रभावी व प्रेरणादायक आहेत. प्रतिकुल वातावरण, पाऊस कमी - अधिक अशा परिस्थतीतही एकूण उत्पादन व उत्पादनाच्या दर्जाता वाढ झाल्याचे वाचण्यात आल्यावर आपणही या डाळींब बागेस डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे ठरविले. त्यानंतर मी स्वत: डॉ.बावसकर टे���्नॉंलॉजी, पुणे ऑफीस येथून व्यवस्थित फवारणीची माहिती घेतली. त्यानुसार फुलकळी लागतेवेळी ती चांगली निघावी, मादी कळीचे प्रमाण वाढून तिची गळ होऊ नये म्हणून ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर ५ लि. आणि फवारणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५ लि., प्रोटेक्टंट ३ किलो, हार्मोनी २ लि. घेऊन गेलो होतो. त्याची फवारणी केली असता झाडे १ वर्षाची असुनही फुलकळी भरपूर लागून मादी कळीचे प्रमाण वाढले. ९० - ९५% कळीचे सेटिंग झाले. सेटिंग झाल्यानंतर पुन्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि हार्मोनी ४०० मिली २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. झाडे लहान असूनदेखील फाद्यांमध्ये अन्नसाठा तयार झाल्यामुळे झाडांवर ५० ते ६० फळे धरलेली असतानाही फळांचे अतिशय चांगल्याप्रकारे पोषण झाले.\nसध्या प्रत्येक झाडांवरील फळे साधारण २५० ग्रॅमची आहेत. तेव्हा या फळांचे पोषण होण्यासाठी, फळांना आकर्षक कलर, दाण्यांना कलर व गोडी येण्यासाठी आज (१० - १० - १५) थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणि फळांवर बुरशीजन्य स्पॉट येऊ नयेत म्हणून हार्मोनी ३ लि. घेऊन जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95-2/", "date_download": "2019-03-25T07:50:07Z", "digest": "sha1:2XEOSPQILI25RYJZVF5KSFBKALYURMZG", "length": 17966, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग १) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग १)\nछातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे “हार्ट अटॅक’ असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू होतो विविध तपासण्यांचा भडीमार. अँजिओग्राफि, अँजिओप्लॅस्टी, आणि वेळ आली तर बायपास सर्जरीही. या उपचार पद्धतींबरोबर त्यांचे वाढते अवाढव्य खर्च या विचाराने रुग्ण नि त्याच्या संबंधित व्यक्तींचं आयुष्य विस्कळीत होतं.\nभारत 2020 पर्यंत सर्वाधिक हृदयरुग्ण असलेला देश होईल, असं भाकीत जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवलं आहे. त्यात 25 ते 30 वर्षे वय असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. 2002 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा हृदयविकाराशी संबंधित अहवाल जाहीर झाला. त्या अहवावालात असं म्हटलं होतं की, जगातील 12.5 टक्के मृत्यू हे हृदयाच्या का��्यात बिघाड झाल्याने होतात. अमेरिकेतील पाचांतील एक मृत्यू हा हृदयघाताने होत आहे. भारतात 2007 साली 32 टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे झाले होते. तर सन 2018 मध्ये त्याचे प्रमाण 45 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.\nएकंदरीत हृदयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत असल्याचं सातत्याने होणाऱ्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. दरवर्षी जगातील पावणेदोन कोटी नागरिक हृदयाच्या आजाराने दगावतात. एड्स, टीबी, मलेरिया, मधुमेह, सर्व प्रकारचे कर्करोग आणि श्वासरोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कैकपटीने जास्त आहे. काही दशकांपूर्वी तरुणाला आलेला हृदयविकाराचा झटका आश्चर्य व्यक्त करायला लावणारा होता. मात्र, आता चित्र बदललं आहे. देशातील एकूण हृदयरुग्णांपैकी 33 टक्के रुग्ण हे 45 पेक्षा कमी वयाचे आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. यात तरुणांची संख्याही वाढत आहे.\nसामान्य जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकारची कारणं अनेक आहेत. विद्यार्थ्यांमधील पहिलं कारण आहे, तरुण पिढीवर चारही बाजूने येणारं दडपण. त्यात भर पडते लहानपणापासूनच असणारं पुस्तकांचं ओझं, महाविद्यालयातील प्रवेश, परीक्षेचा ताण यांची. त्यानंतर करिअरविषयी वाढणाऱ्या चिंता, ध्येयपूर्तीसाठीचा दबाव, पुढे जाण्याच्या स्पर्धेत मागे पडण्याची चिंता. हृदयविकाराचे झटके येण्याच्या अनेक घटनांत हीच महत्त्वाची कारणं आढळून आली आहेत. धमन्यांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळेही हृदयविकार वाढतो. मात्र, ही बाब अचानक होत नाही. तर धमन्यांमध्ये अडथळ्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू होते. वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया अधिक वाढू लागते. आनुवंशिकतेमुळेही भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे. कारण भारतीयांमध्ये लो डेफिनेशन लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. तरीही संतुलित जेवण, योग्य जीवनशैलीचं पालन यांनी एलडीएलच्या प्रमाणाला नियंत्रित करता येऊ शकतं.\nहृदयाशी संबंधित आजार कोणते\nप्रमुख आजार आहे हृदयविकार. या संज्ञेत हृदयाच्या अनेक प्रकारच्या दुखण्यांचा समावेश होतो.\nऍनजायना पेक्टोरिस (अपक्षळपर झशलीीेंळी) हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणं आर्टिरिओ स्क्लेरॉसिस (अीींशीळे डलश्रशीीेळी) – शुध्द रक्तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी जाऊन त्या कडक होत जाणं कार्डिऍक अरेस्ट (उरीवळरल रीीशीीं)- हृदयक्रिया बंद पडणं, कॉरोनरी हार्ट डिसाज् (उीेपररू हशरीीं वळीशरीश- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येणं किंव्या त्या चिंचोळ्या होणं), व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज् (तरर्श्रीींश्ररी हशरीीं वळीशरीश) हृदयातील झडपेचा आजार\nही दुखणी हृदयविकार किंवा हृद्रोगात (कशरीीं वळीशरीश) येतात.\nहृदय बंद पडतं किंवा त्याच्या कार्यात बिघाड होतो म्हणजे काय होतं\nहृदयाचे स्नायू खराब होणं, बिघडणं. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे हृदयाकडे होणारी रक्ताभिसरणाची क्रिया थांबते. हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. जर हे रक्ताभिसरण सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्या भागात असणारे स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात. याला हृदयक्रिया बंद पडणं (हार्ट अटॅक) असं म्हणतात. हृदयाच्या स्नायूंमध्ये असणारी रक्ताची गुठळी होणं किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणं असंही म्हणतात. रक्तवाहिनीचं तोंड बंद झाल्याचा परिणाम हृदयाच्या थोड्या भागांवर झाला असेल छोट्या प्रमाणातील हार्ट अटॅक येतो आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला मोठ्या प्रमाणातील हार्ट अटॅक किंवा हृदयाचा तीव्र झटका असं म्हणतात.\nनेत्र रोग आणि आरोग्य\nजाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी\nया ‘पाच’ गोष्टी पाळल्यास होणार नाहीत डोळ्यांचे आजरा…\n मग ‘हे’ योगासन कराच…\nउत्साह वाढविण्यासाठी ‘हे’ आसन ठरेल उपयुक्त\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसात���रा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB/", "date_download": "2019-03-25T07:35:17Z", "digest": "sha1:LZJ7C64CQ3XESHHNKE4KEE5ZUEUV3V6M", "length": 11932, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हृदयात समथिंग समथिंगचे फस्ट लुक पोस्टर झाले रिलीज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहृदयात समथिंग समथिंगचे फस्ट लुक पोस्टर झाले रिलीज\nप्रेमात पडल्यावर सतत त्या व्यक्तिला भेटण्याची हूरहूर मनाला लागते. आपल्याला ज्या व्यक्तिबद्दल खास ‘फिलींग्स’ आहेत, ती व्यक्ति फक्त आपलीच व्हावी, ह्यासाठी नानाविध गोष्टी प्रेमवीर करत असतात. आणि त्या प्रेमातल्या ‘केमिकल लोच्या’मूळे मग ब-याच गंमतीजमतीही आयुष्यात घडतात. ह्यावरच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट आधारित आहे.\nपिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाची विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांनी निर्मिती केली आहे. तर सचिन नथुराम संत ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे ह्यांनी केले आहे.\nनुकताच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाचा फस्ट लुक सोशल मीडियावरून लाँच झाला. फस्ट लुक पोस्टर लाँच झाल्यावर चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणाले, “ प्रेमात पडल्यावर प���रत्येकाच्याच ‘हृदयात समथिंग समथिंग’ होतं. आयुष्यात एकदा तरी ह्या फिलींगची अनुभूती प्रत्येकानेच घेतलेली असते. तुम्ही प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करता-करता काही विनोदी घटना तुमच्या आयुष्यात घडल्या तर काय धमाल येते, ह्यावर हा चित्रपट आहे.\nदिग्दर्शक प्रविण राजा कारळे सिनेमाविषयी सांगतात, “ हा धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे. अनिल कालेलकर ह्यांनी लिहीलेल्या संवादांमूळे तुम्ही चित्रपटभर सतत हसत राहाल, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. ब-याच कालावधीत मराठी फिल्म इंडस्ट्रीत असा विषय सिनेरसिकांच्या समोर आला नाही. चित्रपट प्रेमाविषयी असला तरीही कुटूंबातल्या 90 वर्षांच्या आजीपासून ते 9 वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे.”\nसलग दुसऱ्यांदा अक्षय कुमारच्या सिनेमाला पायरसीचे ग्रहण\n‘कोण होणार करोडपती’ मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक\nकतरिनाने घेतली 65 लाखांची कार\nअजय देवगण आणखी एका युद्धपटाचा नायक\nधर्मेंद्र यांनी केली शेती करायला सुरुवात\nआलिया भटकडून ड्रायव्हर आणि हेल्परला घराची भेट\nट्रोल करणा-यांना करिना कपूरचे सडेतोड उत्तर\n“आरआरआर’मध्ये झळकणार अजय देवगण\nसायनाच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूरची एक्झिट\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउ��य चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/welcome-to-diwali-magazines-3-242818/", "date_download": "2019-03-25T08:21:38Z", "digest": "sha1:R5IIINCNKRHU7IJNKXEW33WGTJEMVNY7", "length": 17476, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कालनिर्णय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nदिवाळी अंक २०१२ »\nमहाराष्ट्राने गेल्या वर्षभरात अनेक थोर व्यक्ती गमावल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी कालनिर्णयकार जयंत साळगांवकर यांच्यापर्यंत.. यंदाच्या कालनिर्णय दिवाळी अंकाची सुरुवातच\nमहाराष्ट्राने गेल्या वर्षभरात अनेक थोर व्यक्ती गमावल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी कालनिर्णयकार जयंत साळगांवकर यांच्यापर्यंत.. यंदाच्या कालनिर्णय दिवाळी अंकाची सुरुवातच अशा थोर व्यक्तींना श्रद्धांजली वाहणाऱ्या विभागाने करण्यात आली आहे. यामध्ये, बाळासाहेब, गो.पु.देशपांडे, ज्योतिर्भास्कर साळगांवकर, नरेंद्र दाभोलकर, श्रीकांत लागू आदी व्यक्तींच्या स्मृतिचित्रांचा समावेश आहे. अंकात तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र, जागतिकीकरण – तेव्हा आणि आता, कला, कथा, कविता असे विभाग आहेत. आशीष जोशी यांचा ‘गुगलची दुनिया’ हा लेख माहितीपूर्ण आहे. पण या अंकाचे खरेखुरे वैशिष्टय़ मानता येईल असा लेख म्हणजे दीपक घैसास लिखित, ‘मानवाची कल्पनाशक्ती आणि प्रगती’. अनिल शिदोरे यांचा हरवत चाललेल्या ‘कट्टय़ांची’ उणीव व्यक्त करणारा ‘कुणी कट्टा देईल का, कट्टा’ हा लेखही वाचनीय झाला आहे. मामंजी यांनी पेरलेले विनोदही अगदी निरागस आणि निखळ\nपृष्ठे – २१२ ल्लमूल्य – १००रु.\nपरिवर्तन ��ा जीवनाचा शाश्वत पैलू आहे. ‘हेमांगी’ दिवाळी अंकाची हीच मध्यवर्ती संकल्पना आहे. पण परिवर्तनाची ही संकल्पना प्रामुख्याने कुटुंब संस्थेतील बदलांचा वेध घेणारी आहे. राजपूतांची कुटुंब व्यवस्था, ग्रामीण कुटुंब व्यवस्था, लिव्ह इन् रिलेशनशिप, कुटुब संस्था मोडकळीस आणणाऱ्या घटकांसमोर खरे आव्हान निर्माण करणारे मूल्य अशा विविध पैलूंचा वेध समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी घेतला आहे. याव्यतिरिक्त अंकामध्ये कन्नड लेखक मोगसाले यांच्या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, आठ दीर्घकथा, १७ कविता, प्रवास वर्णनं अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. डॉ. रुपा रेगे-नित्सुरे यांनी स्त्री आत्मवृत्तांवर लिहिलेला लेख निव्वळ अप्रतिम\nपृष्ठे -१९६ ल्लमूल्य – १२०रु.\n‘तारांगण’ हे मासिक पूर्णपणे सिनेमा या विषयाला वाहिलेले आहे. ‘दुनियादारी’ या यंदाच्या गाजलेल्या चित्रपटामुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे प्रसन्न छायाचित्र मुखपृष्ठावर असून तिच्याशी केलेल्या गप्पांबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी आपल्याला भेटलेली अलौकिक माणसं हा लेखही वाचनीय आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण होत असल्याची दखल अद्याप मराठी प्रसारमाध्यमांनी घेतलेली नसली तरी या अंकात या सुवर्णकमळ विजेत्या चित्रपटाची संपादकांनी आवर्जून दखल घेतली आहे. आशा भोसले यांच्यावरील युधामन्यू गद्रे यांचा वैशिष्टय़पूर्ण लेख, ऐतिहासिक चित्रपटांची वाटचाल असा वैविध्यपूर्ण मजकूर, देखणा ले-आऊट हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे.\nसंपादक – मंदार जोशी\nपृष्ठे – १३८ ल्ल मूल्य – १०० रु.\nखळाळून हसणे सध्या दुरापास्त झाले आहे. पण दिवाळी अंकाच्या माध्यामातून वाचकांना मनमोकळेपणाने हसविण्यासाठी कॉमेडी कट्टा तयार करण्यात आला आहे. या कट्टय़ावर आपणाला विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा भेटतात आणि हसवतातही. यामध्ये बॅटल ऑफ द रॉक (प्रवीण टोकेकर), ‘ढ’ वाहिनीचे ऑपरेशन चेंज (अशोक जैन), ये दोसती (सुधीर सुखटणकर) यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा मनमुरादपणे हसवितात. निलेश जाधव यांनी साकारलेले मुखपुष्ठ आकर्षक आणि अप्रतिम. विनोदांनी ठासून भरलेल्या या कट्टय़ावर जाण्यास काहीच हरकत नाही.\nसंपादक- सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी\nपृष्ठे- १३६ ल्लमूल्य- १०० रु.\nअंबरनाथहून गेली ��७ वर्षे नियमितपणे प्रकाशीत होणाऱ्या साप्ताहिक आहुतिच्या यंदाच्या दिवाळी अंकात विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख आहेत. डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘अणूऊर्जा भारतासाठी अपरिहार्य का’ हे सविस्तरपणे त्यांच्या लेखात नमूद केले आहे. आधुनिक काळात पाणी साठवणुकीचे साधे-सोपे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या डॉ. उल्हास परांजपे यांच्या कार्याची ओळख (थेंबे थेंबे तळे साचे), ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आदिवासींच्या हक्कांसाठी झटणाऱ्या श्रमिक मुक्ती संघटनेच्या अॅड. इंदवी तुळपुळे (आदिवासींची ताई) आदी व्यक्तिमत्त्वांचा परिचय अंकात आहे.\nपृष्ठे- १२० ल्लमूल्य-१०० रू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवाळी अंकांचे स्वागत शब्दस्पर्श\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/best-marathi-vijay-patil-interview-nilesh-khare-3947", "date_download": "2019-03-25T08:07:28Z", "digest": "sha1:AX543QOVLLDHSGQPICDAFXKINNONCBXW", "length": 4271, "nlines": 100, "source_domain": "www.saamtv.com", "title": "BEST OF MARATHI WITH VIJAY PATIL INTERVIEW BY NILESH KHARE | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिक���शनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडी वाय पाटीलचे शिल्पकार विजय पाटील यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा\nडी वाय पाटीलचे शिल्पकार विजय पाटील यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा\nडी वाय पाटीलचे शिल्पकार विजय पाटील यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा\nडी वाय पाटीलचे शिल्पकार विजय पाटील यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा\nडी वाय पाटीलचे शिल्पकार विजय पाटील यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nआंतरराष्ट्रीय दर्जाच्या डी वाय पाटील स्टेडीयमची निर्मिती करणारे विजय पाटील यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा. संपूर्ण मुलाखतीसाठी पाहा व्हिडीओ\nआंतरराष्ट्रीय दर्जाच्या डी वाय पाटील स्टेडीयमची निर्मिती करणारे विजय पाटील यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा. संपूर्ण मुलाखतीसाठी पाहा व्हिडीओ\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Big-encroachers-were-like/", "date_download": "2019-03-25T07:44:30Z", "digest": "sha1:4PRN5EMOJAG7FS2PK5RSTWPSCTLBFDED", "length": 10831, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिरवाजिरवीच्या राजकारणात बडी अतिक्रमणे ‘जैसे थे’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जिरवाजिरवीच्या राजकारणात बडी अतिक्रमणे ‘जैसे थे’\nजिरवाजिरवीच्या राजकारणात बडी अतिक्रमणे ‘जैसे थे’\nश्रीगोंदा : अमोल गव्हाणे\nअतिक्रमणाच्या मुद्द्यावर बड्या, बड्या गप्पा मारणार्या नगरपालिका प्रशासनाने आयत्यावेळी कचखाऊ भूमिका घेतल्याने रस्त्यालगतची अतिक्रमण काढणे हा एक फक्त फार्स झाला आणि नगरपालिकेचे चांगलेच हसू झाले. अतिक्रमण काढण्याची मोठी संधी असताना सुंदोपसुंदीच्या राजकारणात ही संधी गमावली गेली. श्रीगोंदा नगरपालिकेची पुढील वर्षी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. बहुचर्चित सतरा रस्त्यांची कामे मोठ्या विलंबानंतर सुरू झाली.त्यात सिद्धार्थनगर ते सरस्वतीनदी दरम्यानचा रस्ता मंजूर झाला. हा रस्ता मुख्य रस्ता असून रस्त्याच्या दुतर्फा मोठी अतिक्रमण असल्याने पालिका प्रशासनाने हा रस्ता मागे ठेवला होता. गेल्या महिनाभरापासून या रस्त्याच्या बाजूची अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा सुरू होती. अतिक्रमण का���ण्याबाबत तारीख निश्चित झाली. शहरात माहिती प्रसारित करण्यात आली. त्यानुसार मागीलआठवड्यात 3 जुलैचा दिवस ठरविण्यात आला. पालिका प्रशासनाने संभाव्य वाद लक्षात घेऊन श्रीगोंदा पोलिसांकडे बंदोबस्त मागितला होता. त्याचबरोबर पालिकेने पोलिस बंदोबस्तासाठी लागणारी रक्कम पोलिस ठाण्यात जमा केली.\nपण त्याच दरम्यान अतिक्रमण कशा पद्धतीने काढायचे यावर नगरपालिकेत चर्चा सुरू असताना विरोधकांनी व काही कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली पण बैठकीत कुठल्याही प्रकारची निर्णय होत नव्हता. रस्त्याचे सीमांकन झाले नसताना अतिक्रमण कसे काढणार या मुद्द्यावर पालिका प्रशासन हतबल झाले.आणि खर्या अर्थाने अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेची धार बोधट झाली.अतिक्रमण काढायचे की नाही अशीही परिस्थिती निर्माण झाली.पोलिस बंदोबस्तासाठी भरलेले पैसे परत मिळणार नसल्याने रस्त्याच्या बाजूची आवश्यक असणारे अतिक्रमण काढण्यावर एकमत झाले आणि दुपारी तीन वाजता अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. तोपर्यत टपरीधारकांनी आपापल्या टपर्या मागे हटवून घेतल्या होत्या.\nनगरपालिकेने दोन ते तीन तास जेसीबी चालवून रस्त्याच्या कामात अडसर येणारी अतिक्रमण बाजूला केली. नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली मात्र प्रत्यक्ष अतिक्रमण काढताना कचखाऊ भूमिका घेतल्याने शहरवासियांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मुळात नगरपालिका प्रशासनाने एवढा मोठा गाजावाजा करत असताना अतिक्रमणाबाबतची नियमावलीचा अभ्यास करणे आवश्यक होते मात्र तसे न केल्याने अतिक्रमणाची मोहीम एकप्रकारे अंगलट आली असेच म्हणावे लागेल. अतिक्रमण हटविण्याची ही मोठी संधी होती अन् अशी संधी परत परत येत नसते. याची जाणीव असतानाही पालिकेने योग्य नियोजन न केल्याने अतिक्रमण हटाव मोहीम एक फार्स ठरला.काम पूर्ण होइपर्यंत ही अतिक्रमण हटतील पण काम झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणार असून ते अतिक्रमण हटवता हटवता पालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ येणार आहे. राजकीय सुंदोपसुंदीमध्ये शहराचा श्वास मोकळा होण्याऐवजी तो अडकून पडला असेच म्हणावे लागेल.\nनगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे पालिकेत विरोधक आणि सत्ताधारी गटामध्ये सगळे काही आलबे�� आहे असे अजिबात नाही. त्यातच अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावर नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नसल्याने साहजिकच त्याचा फटका अतिक्रमण काढताना बसला असल्याचे बोलले जात आहे. ही गटबाजी शहराच्या विकासात आडवी येत असेल तर ती काय कामाची असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.\nशनीचौक परिसरातील अतिक्रमणाचे काय \n33 कोटी रुपयांची 17 रस्त्यांची कामे जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. जोधपूर मारुती चौक ते बायपास रस्त्याचे काम जवळपास झाले आहे. मात्र, या रस्त्यावरील उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी पालिका कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहे हे शहरवासियांना पडलेले एक कोडे आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/prathana-behere-marriage-photos/", "date_download": "2019-03-25T07:37:49Z", "digest": "sha1:3TEEJIMIGMPELLMPUMAMJOOXFCC4PWUP", "length": 9477, "nlines": 85, "source_domain": "marathikalakar.com", "title": "प्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार - पहा Photos", "raw_content": "\nप्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार – पहा Photos\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\nप्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार – पहा Photos\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरे लग्नगाठीत अडकण्यास सज्ज झाली आहे. तिने नुकताच इंस्टाग्राम वर फोटो अपलोड करून खालील कॅप्शन दिले आहे.\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर १४ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. ती म्हणते कि एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने अभिषेक आणि माझी ओळख झाली. “मी स्वत: एक अभिनेता बनण्याचा कधीही विचार केला नाही, मला लेखिका-दिग्दर्शक व्हायचे होते. मी बर्याच कलाकारांशी कनेक्ट करू शकत नाही, कारण ते फिटनेस आणि मेक-अप याबद्दल बोलतात. वास्तविक कार्यचित्रपट निर्मितीमधेच घडते असा माझा विश्वास आहे. मला दिग्दर्शक आणि लेखकांशी संवाद करणे आवडते.\nअभिषेक आणि माझ्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्याने तो चांगला जोडीदार ठरू शकतो असं मला वाटलं. त्यामुळे त्याला पसंत केलं.’ हा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार असून, डेस्टिनेशन वेडींग करण्याचे प्रार्थनाने ठरवले आहे.\nप्रार्थनाच्या लग्नाचे स्थळ ठरले असून ती गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका सुंदर हॉटेलमध्ये सुर्यास्ताच्या वेळी प्रार्थना व तिचा होणारा नवरा अभिषेक लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रार्थनाच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रार्थनाच्या मराठी इंड्स्ट्रीतील अनेक मित्रमैत्रिणी लग्नाच्या एक दिवस आधी गोव्याला रवाना होणार आहेत.\nपार्थना आणि अभिषेक यांचे अभिनंदन.\nपूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड\n सोबत आणल्या लाडक्या वस्तू\nबिगबॉसच्या घरातील पहिला दिवस कुठे गप्पा तर कुठे लगबग\nबिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक\n“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.\nमधुरा साने आठवतेय का ती काही महिन्यांपूर्वीच आपल्याला एका छानशा मराठी सिनेमातून भेटीला आली होती. नाही...\n‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट...\nपहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.\nसिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी...\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nमराठी मनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्का, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर...\n‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला\nअभिनेते सुनिल बर्वे यांनी आपल्या सुबक नाट्यसंस्थेच्यावतीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या ना��काची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातील...\nमराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nप्रार्थना बेहेरेचा ‘हॉस्टेल डेज’ २९ डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/subodh-bhave-gayatri-datar/", "date_download": "2019-03-25T08:08:49Z", "digest": "sha1:UMERTNB3VRVZGO33KLU42ZR7MSI4UWSQ", "length": 1870, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " subodh bhave gayatri datar - मराठी कलाकार", "raw_content": "\nविक्रांत आणि ईशाच्या लग्नसोहळ्याची पत्रिका तब्बल दीड लाखांची\nअभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार ही वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळली...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-03-25T07:50:03Z", "digest": "sha1:LNSLRL3WM5LRSCGQ6BM6FHS3ZNJZ77YP", "length": 4024, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुंटूर - विकिपीडिया", "raw_content": "\nगुंटूर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर राज्याची राजधानी अमरावतीपासून २४ किमी अंतरावर आहे.\nहे शहर गुंटूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१८ रोजी ०३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2019-03-25T07:28:13Z", "digest": "sha1:RUYQR4LLLSBJRMEZD574ZWSLSEZACHAM", "length": 10439, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सूचना फलक - विकिपीडिया", "raw_content": "\n१.१ विकिपीडिया लेख संपादन स्पर्धा\n१.२ विकिमीडियाचा भारतीय अध्याय (प्रस्तावित)\n१.५ तुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता\n१.६ मराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची\n३ विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे\nविकिपीडिया लेख संपादन स्पर्धा[संपादन]\nआपले नवीनतम सदस्य केदार सोमण यांनी सुचवल्यावरून मराठी विकिपीडियाने सर्वप्रथम लेख संपादन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याची रूपरेषा ठरवण्यासाठी आपली मदत अत्यावश्यक आहे. याबद्दल प्राथमिक माहिती विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा येथे आहे.\nआपले मत व मदत तेथे अपेक्षित आहे. धन्यवाद्\nविकिमीडियाचा भारतीय अध्याय (प्रस्तावित)[संपादन]\nनवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्यानंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दिक अभिनंदन Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\nमराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्यःच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नात मराठी विकिपीडिया खचितच महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.\nविकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो.\nतुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता[संपादन]\n१. माहिती आणि ज्ञान पुरवणे हे कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. तुमच्या क्षेत्रातले ज्ञान ह्या ज्ञानकोशाद्वारे तुम्ही लोकांना उपलब्ध करू शकता.\n२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्हाला भर घालता येईल.\n३. इतर लेखकांन�� पुरवलेल्या माहितीत लहानमोठ्या चुका तुम्हाला आढळल्या तर त्या चुका विकीच्या सर्वसाधारण तत्त्वांना धरून दुरुस्त करणे आपणास सहज शक्य आहे.\nमराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची[संपादन]\nमराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजीराजे भोसले, पु. ल. देशपांडे\nसंगणक टंक, ऑपरेटिंग सिस्टिम, मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स\nमहाराष्ट्र पर्यटन, भारत पर्यटन\nचावडीचा नवीन अवतार प्रकट झाला आहे. याच बरोबर विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे हे नवीन पानही अवतरले आहे. या पानावर विकिपीडियाची धोरणे, ध्येय आणि संबंधित विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०११ रोजी १०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/toronto-masters-tennis-tournament-stefanos-zverevere-sensational-triumph/", "date_download": "2019-03-25T08:25:07Z", "digest": "sha1:4TGAFIBJOTI6JBDVFYQTRGLBUWDBUHNL", "length": 15491, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा: स्टेफानोसचा झ्वेरेव्हवर सनसनाटी विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा: स्टेफानोसचा झ्वेरेव्हवर सनसनाटी विजय\nनदाल-खाचानोव्ह उपान्त्य लढत रंगणार\nटोरांटो: ग्रीसचा युवा खेळाडू स्टेफानोस सित्सिपासने द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हवर तीन सेटच्या कडव्या झुंजीनंतर मात करताना टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. स्टेफानोसने गतविजेत्या झ्वेरेव्हचे आव्हान 3-6, 7-6, 6-4 असे मोडून काढताना सलग दुसऱ्या फेरीत सनसनाटी विजयाची नोंद केली.\nझ्वेरेव्हने पहिला सेट 6-3 असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. इतकेच नव्हे तर दुसऱ्या सेटमध्ये 5-2 अशी निर्णायक आघाडी घेत झ्वेरेव्हने विजयाकडे आगेकूच केली होती. परंतु स्टेफानोसने तेथून सामन्याचे पारडे फिरविले. त्याने आठव्या आपली सर्व्हिस राखली आणि नवव्या गेममध्ये झ्वेरेव्हची सर्व्हिस भेदल्यावर दहाव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस राखताना हा सेट टायब्रेकरमध्ये नेला.\nटायब्रेकर���ध्ये दोन मॅचपॉइंट वाचविल्यानंतर स्टेफानोसने पाचव्या सेटपॉइंटला बाजी मारली व सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमधील तिसऱ्या गेममध्ये झ्वेरेव्हची सर्व्हिस भेदत स्टेफानोसने 2-1 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम राखताना त्याने 5-4 आणि 6-4 असा हा सेट जिंकून उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केले. प्रयत्नांना यश मिळतेच हे मला या विजयातून समजून चुकले, असे स्टेफानोसने या विजयानंतर सांगितले.\nस्टेफानोसने याआधीच्या फेरीत विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचचा धक्कादायक पराभव करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. झ्वेरेव्हवरील विजयामुळे स्टेफानोसने मास्टर्स-1000 दर्जाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच उपान्त्य फेरीत स्थान मिळविले आहे. तसेच त्याने सलग तिसऱ्या सामन्यात विश्वक्रमवारीतील टॉप-10 खेळाडूला पराभूत करण्याची स्वप्नवत कामगिरी बजावली आहे. माझ्या कामगिरीवर माझाच विश्वास बसत नाही, असे स्टेफानोसने म्हटले आहे.\nत्याने आधीच्या फेरीत डॉमिनिक थिएमला पराभूत करीत आपला पहिला बळी मिळविला होता. गेल्या रविवारीच आपला 20वा वाढदिवस साजरा केलेल्या स्टेफानोससमोर आता दक्षिण आफ्रिकेच्या चतुर्थ मानांकित केविन अँडरसनचे खडतर आव्हान आहे. विम्बल्डन स्पर्धेतील उपविजेत्या अँडरसनने दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात बल्गेरियाच्या पाचव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हचा प्रतिकार 6-2, 6-2 असा एकतर्फी लढतीत मोडून काढला.\nदरम्यान आधीच्या फेरीत स्टॅनिस्लास वॉवरिन्कावर मात करणाऱ्या नदालने सहाव्या मानांकित मेरिन सिलिचचे आव्हान 2-6, 6-4, 6-4 असे मोडून काढत अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. हार्डकोर्ट मोसमाच्या प्रारंभी होणाऱ्या स्पर्धेत उपान्त्य पेरी गाठल्याबद्दल नदालने समाधान व्यक्त केले. नदालने याआधी हार्डकोर्टवरील अखेरचे विजेतेपद 2013 मध्ये मिळविले होते. अमेरिकन ओपन स्पर्धा दोन आठवड्यांवर येऊन ठेपली असताना ही कामगिरी प्रेरणादायक असल्याचे नदालने सांगितले.\nपुरुष एकेरीतील दुसऱ्या उपान्त्य लढतीत अग्रमानांकित राफेल नदाल विरुद्ध बिगरमानांकित केरेन खाचानोव्ह अशी झुंज रंगेल. खाचानोव्हने अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात रॉबिन हॅसेचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करताना आपला दर्जा दाखवून दिला. रॉबिन हॅसेने आधीच्या फेरीत टीन स्टार डेनिस शापोव्हालोव्हचा पराभ” केला होता. परंतु खाचानोव्हविरुद्ध त्याला आज सूरच गवसला नाही.\n#IPL2019 : पंजाबसमोर आज राजस्थानचे कडवे आव्हान\nमहिला रेसर स्नेहा शर्मा मलेशियात दुसऱ्या स्थानी\nइंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी\nसंघटनांच्या वादाचा फटका राजस्थानच्या खेळाडूंना\nते बीसीसीआयला विचारा : स्टिव्ह स्मिथ\nकसोटी क्रिकेटच्या पोषाखात बदल होणार\n#IPL2019 : हरभजनच्या नावेही अनोखा विक्रम\nसुरेश रैनाच्या आयपीएलमधे 5 हजार धावा\nसीसीआय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ayodhya-verdict-supreme-court-ravishankar-prasad-shabarimaala-4059", "date_download": "2019-03-25T07:46:11Z", "digest": "sha1:GPFZCERRDET4XMZEYIAIDTAKPECKSI7T", "length": 7863, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ayodhya verdict supreme court ravishankar prasad shabarimaala | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा जलद गतीने निकाली काढावा - केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद\nसर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा जलद गतीने निकाली काढावा - केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद\nसर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा जलद गतीने निकाली काढावा - केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद\nसर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा जलद गतीने निकाली काढावा - केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद\nबुधवार, 26 डिसेंबर 2018\nलखनौ : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटला जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले असून, शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीमध्ये हे होऊ शकते, तर या बहुप्रलंबित प्रश्नावरदेखील अशाच पद्धतीने तोडगा काढायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. ते येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या पंधराव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.\nलखनौ : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटला जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले असून, शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीमध्ये हे होऊ शकते, तर या बहुप्रलंबित प्रश्नावरदेखील अशाच पद्धतीने तोडगा काढायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. ते येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या पंधराव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.\nप्रसाद म्हणाले, '' रामजन्मभूमीच्या वादाचा मुद्दा जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन मी माझ्या वैयक्तिक क्षमतेवर सर्वोच्च न्यायालयास करत आहे. शबरीमला मंदिराच्या बाबतीत हे होऊ शकते, तर मागील सत्तर वर्षांपासून रामजन्मभूमीचा विषय प्रलंबित का आहे\nविशेष म्हणजे या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयातील न्या. एम. आर. शहा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोविंद माथूर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यघटनेचा हवाला देताना प्रसाद म्हणाले की, ''यामध्येही राम, कृष्णाप्रमाणेच अकबराचाही उल्लेख आहे; पण बाबराचा कोठेही उल्लेख दिसत नाही. यामुळे आम्ही त्याची पूजा का करावी\nभविष्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी आखिल भारतीय न्यायीक सेवा व्यवस्था आणण्याचा आग्रहही प्रसाद यांनी केला. गरीब आणि होतकरू लोकांचे खटले तातडीने निकाली काढावेत, असे आवाहनही त्यांनी अधिवक्ता परिषदेकडे केले.\nसर्वोच्च न्यायालय रविशंकर प्रसाद ravi shankar prasad भारत उच्च न्यायालय high court न्यायाधीश\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-01-march-2018/articleshow/63116777.cms", "date_download": "2019-03-25T08:54:27Z", "digest": "sha1:77EU3QY6B5FGWLCXLHT2RHORLYDV4IA2", "length": 12508, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: आजचं राशी भविष्य: दि. ०१ मार्च २०१८ - today-rashi-bhavishya-in-marathi-for-01-march-2018 | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nआजचं राशी भविष्य: दि. ०१ मार्च २०१८\nआजचं राशी भविष्य: दि. ०१ मार्च २०१८\nरागावर नियंत्रण ठेवा. कठोर परिश्रमानंतरही फारसं यश हाती येणार नाही. घातक विचार, वर्तन आणि आयोजनापासून दूर राहा.\nकामात मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. मुलांची अभ्यासात रुची वाढेल. माहेरुन लाभदायी बातमी मिळेल.\nनव्या कामाचा शुभारंभ करू शकता. वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. विरोधकांवर विजय मिळवाल. आर्थिक बाबतीत सावध राहा.\nनकारात्मक मानसिकतेतून व्यवहार करू नका. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनात दुःख आणि असंतोषाची भावना असेल. अनैतिक गोष्टींपासून दूर राहा.\nआत्मविश्वास दुणावेल. कुठलाही निर्णय त्वरीत घ्याल. ज्येष्ठांकडून लाभ होईल. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.\nअहंकार दुखावेल असे वागू नका. चिंता सतावेल. रागीट आणि उग्र स्वभाव राहील. अचानक खर्च होऊ शकतो. भांडणापासून दूर राहा.\nआजचा दिवस शुभफलदायी असेल. उत्पन्नात वाढ होईल. विवाह इच्छुकांना अपेक्षित जीवनसाथी मिळण्याचा योग आहे.\nआजचा दिवस शुभफलदायी असेल. व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण कराल.\nप्रवास करू नका. थकवा जाणवेल. मन व्याकुळ आणि चिंतेत राहील. मुलांची चिंता सतावेल. धोकादायक विचार आणि वर्तनापासून दूर राहा. वाद टाळा.\nअचानक खर्च होईल. व्यवहारीक आणि सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावं लागेल. रागावर आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील.\nप्रणयासाठी अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम धैर्याने आणि आत्मविश्वासाने कराल. प्रवासाची शक्यता आहे. उत्तम भोजन आणि नवे कपडे परिधान कराल.\nशुभफलदायी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. घरात सुख-शांती असेल. स्वभाव आणि बोलण्यातील उग्रतेवर संयम ठेवा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २३ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २४ मार्च २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचं राशी भविष्य: दि. ०१ मार्च २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. २८ फेब्रुवारी २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. २७ फेब्रुवारी २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. २६ फेब्रुवारी २०१८...\nआजचं राशी भविष्य: दि. २५ फेब्रुवारी २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/strory-of-tanaji-malusare/", "date_download": "2019-03-25T07:46:46Z", "digest": "sha1:5MLHCB4HJSUMIQZSC5AKKPCDY4XL7FZC", "length": 26476, "nlines": 123, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nतानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण\nलहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते आणि त्या नरवीराचे शौर्य आपल्या मनात कायमचे घर करून बसते. त्याच शौर्यगाथेला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी हा छोटासा लेख\nवयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे\nजून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या.\nजे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते, जे किल्ले कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रूहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते. मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही.\nशिवाजी महाराजांना देखील जिजाऊ आईसाहेबांच्या मनातील सल कळत होती, परंतु त्यांचा देखिल नाईलाज होता. मोघलांच्या प्रचंड मोठ्या संरक्षण कवचामुळे कोंढाणा परत मिळवणे वाटत होते तितके सोप्पे नव्हते. परंतु मातेच्या हट्टासमोर राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा प्रण केला.\nशिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे कोंढाणा जिंकून आणण्यासाठी जी��ाची बाजी लावायला तयार होते, परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजांच्या मनात एकाच वीराचे नाव आले- तानाजी मालुसरे\nतानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी देखील तानाजींनी असीम शौर्य दाखवले होते.\nशाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी जेव्हा महाराज १०-१२ विश्वासू साथीदारांना घेऊन लाल महालात घुसले होते त्या १०-१२ जणांमध्ये देखील तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी तानाजींचा पराक्रम प्रत्येक वेळेस जवळून पाहिला होता त्यामुळे कोंढाणा फत्ते करण्याचा पराक्रम केवळ तानाजी करू शकतात याची त्यांना खात्री होती.\nतानाजी हे बारा हजार हशमाचे (पायदळ) सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पांच कर्ण्यांचा मान होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी तानाजींना तातडीने बोलावणे धाडले तेव्हा तानाजी उमरठे गावात आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. परंतु आपल्या राजाचे बोलावणे आल्याबरोबर हातची सर्व कामे सोडून त्यांनी थेट राजांची भेट घेतली.\nत्यांच्या सोबत शेलारमामा आणि बंधू सूर्याजी देखील होते. महाराजांनी आपला मनसुबा तानाजींना बोलून दाखवताच तानाजी धन्य झाले. महाराजांनी अत्यंत कठीण प्रसंगावेळी आपली आठवण काढली या पेक्षा मोठे भाग्य ते काय या विचाराने त्यांची छाती गर्वाने फुलून गेली.\nत्यावेळेस शेलार मामांनी सांगितलें की,\nआधी लग्न उरकून घेऊ. मग कामगिरीसाठी निघू.\nतेव्हा तानाजींनी उत्तर दिले,\nआधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे\nमहाराजांची भेट घेतल्यावर तानाजी जिजाऊ आईसाहेबांना जाऊन भेटले. जिजाई आईसाहेबांनी देखील तानाजींना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तानाजींनी आपला मुलगा रायबाची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या हाती दिली आणि म्हटलें की,\nजर कोंढाण्याहून परत आलो तर मी त्याचे लग्न लावून देईन, जर मेलो तर तुम्ही त्याचे लग्न लावून द्या\nमाघ वद्य अष्टमीला ४ फेब्रुवारी १६७० रोजी रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघाले���े मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. सिंहगडावर उदयभान नावाचा अतिशय शूर सरदार तैनात होता. हा उदयभान मूळचा राठोड रजपूत होता पण पुढे बाटून मुसलमान झाला होता. त्याच्या हाताखाली रजपूत सैन्य देखील बरेच होते.\nतानाजी आपल्या सैन्यासह गडाच्या कल्याण दरवाज्याखाली आले. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. तानाजींनी कोंढाण्यावर जाण्याचासाठी एक मार्ग निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा हा कडा उभा तुटलेला होता. त्यास साखळी, दोराची शिडी लावून तटावर चढता येणे शक्य होते.\nतानाजींनी आपली यशवंती घोरपड घेऊन तिच्या कमरेस साखळी बांधून तिला ठरविलेल्या कड्याच्या वर चढविले खरे, परंतु घोरपड माघारी आली. जणू ती पुढे घडणाऱ्या अशुभ प्रसंगाविषयी तानाजींना संकेत देत होती. परंतु त्या संकेताकडे दुर्लक्ष करीत तानाजींनी आपल्या साथीदारांसह किल्ल्यावर प्रवेश केला आणि शत्रू सैन्याला कात्रीत पकडले.\nपुढे दरवाजावर आपले लोक असावेत म्हणून तानाजींनी पुणे बाजूकडील पहिल्या दरवाजावर जाऊन तेथील पहारेकर्यांवर अचानक हल्ला केला त्यांना कापून काढले.\nदरवाजा ताब्यात घेतल्यावर दुसर्या व तिसर्या दरवाजांवर जाऊन तेथील पहारेकऱ्यांना यमसदनी पाठवून ते दरवाजे देखील ताब्यात घेतले. या अनपेक्षित गडबडीमुळे किल्ल्यावरील शत्रूची फौज जागी झाली. एव्हाना उदयभान देखील भानावर आला आणि त्याने सैन्य जमवण्यास सुरुवात केली. गडाचा सरनोबत सिद्दी हलाल हा सर्वप्रथम तानाजींना सामोरे गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि त्यात सिद्दी हलाल पडला.\nज्या साखळदंडाच्या सहाय्याने मराठे सैन्य गडावर चढत होते, तो तुटल्याने सर्वजण सुर्याजीच्या नेतृत्वाखाली गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ जमले आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले.\nतानाजी हळूहळू कल्याण दरवाज्याकडे सरकत होते. इतक्यात उदयभानाने सर्व शक्तीनिशी तानाजींवर हल्ला केला. रात्रीचा प्रवास, किल्ल्यावर चढाई-हल्ला आणि मुख्य म्हणजे मोहीम फत्ते करण्याचे दडपण या गोष्टींमुळे तानाजी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. याउलट उदयभान मात्र ताजातवाना होता.\nउदयभानाच्या जोरदार हल्ल्यामुळे तानाजींच्या शरीरावर जखमा झाल्या त्यांची ढाल देखील तुटली, परंत��� अश्या परिस्थितीत हार न मानता शेल्याने आपला हात बांधून त्यावर ते उदयभानाचे वार झेलीत होते. परंतु नियतीला जणू तानाजींचा हा प्रकाराम बघवत नव्हता आणि उदयभानाच्या एका जबरदस्त वाराने त्यांच्या प्राणांचा ठाव घेतला आणि तानाजी धारतीर्थी पडले.\nपण मरता मरता त्यांनी असंख्य शत्रूंना कापून काढले आणि आपल्या मावळ्यांसाठी पुढील वाट मोकळी करून दिली होती. आपले सुभेदार पडल्याचे पाहूनही ८० वर्षांचे शेलारमामा खचले नाहीत, त्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्वेषाने लढत ते कल्याण दरवाज्यापर्यंत येऊन पोचले. दरवाज्याजवळ पोचताच त्यांनी तेथील पहारा कापून बाहेर असलेल्या सूर्याजीला आणि इतर मावळ्यांना आत घेतले.\nसैन्याचा धीर खचू नये म्हणून तानाजी पडले ही वार्ता शेलार मामांनी मुद्दामच गुप्त ठेवली आणि पुढे सूर्याजीने उदयभानासह त्याच्या संपूर्ण सेनेचा फडशा पाडीत कोंढाणा ताब्यात घेतला. एका रात्रीत मराठ्यांनी स्वराज्याचे मौल्यवान रत्न ताब्यात घेतले. सूर्याजीने गवताच्या गंजीस आग लावून पाच तोफा केल्या, त्या महाराजांनी ऐकल्या. गड सर झाल्याचा तो संकेत होता.\nमहाराजांना अत्यानंद झाला. पण जेव्हा त्यांना बातमी कळली की त्यांचा सिंह तानाजी मात्र लढता लढता मेला तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत आणि त्यांच्या तोंडून तानाजींबद्दल ते ऐतिहासिक गौरवोद्गार निघाले,\nगड आला पण स्वराज्याचा सिंह गेला\nआजही कोंढाणा किल्ला ऊर्फ सिंहगड आणि त्याच्या आसपासचा परिसर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्याच्या पाऊलखुणा कणाकाणात साठवून इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभा आहे.\nधन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← उत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर\nरेल्वेच्या AC 1, 2 आणि 3 tier मधला नेमका फरक काय व्यवस्थित समजून घ्या\nछ. संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्याना “हे” सत्य दिसत नाही की मान्य करायचं नाही\nमराठीचा “भाषिक स्व-क्युलॅरिझम” : निजामशाहीपासून आजपर्यंतचा प्रवास\nथंडीत फिरायला आवर्जून गेलंच पाहिजे अशी महाराष्ट्रातील ही १० ठिकाणं\nभारतातील ‘ह्या ‘ठिकाणी मेल्यानंतरही भरावा लागतो ‘टॅक्स’, त्याशिवाय ह��त नाही अंतिम संस्कार\nशाह शरीफ दर्गा आणि महाराजांचे पराक्रमी भोसले घराणे यांचा परस्परांशी नेमका सबंध काय\nया ६४ वर्षीय भारतीय महिलेने रक्त संकलनाचे आजवरचे सर्व रेकॉर्ड्स तोडलेत \nएक मध्यमवर्गीय मराठी माणूस, भारत-नॉर्थ कोरिया संबंध दृढ करण्यासाठी भारताने पाठवलेला शिलेदार\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nफेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून “©” चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का\nदिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही जाणून घ्या इतर ९ कारणं\nराजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’\nतब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली \nभारतामध्ये दडलेल्या या मौल्यवान खजिन्यांचा शोध आजही अविरत सुरु आहे\nआणि तब्बल ६ वेळा भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचे दात त्यांच्याच घशात घातले\nभारतात खरे “चांगले दिवस” आणण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी\nस्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज\nनदीत फेकलेले निर्माल्य गोळा करून ते दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी\n“खिलजी” आणि “मुघल” – दोघेही मुस्लिम शासकच, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते\nपाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जाणारा दुबळा संघर्ष : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ६)\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nखान्देशच्या इतिहासातील “पहिले पारंपारिक वाद्य पथक”…\nभारतीयांच्या मनातील अमेरिकेबद्दलचे ३ सर्वात मोठे गैरसमज\nप्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/things-to-keep-in-mind-while-purchasing-life-and-health-insurance/", "date_download": "2019-03-25T08:29:15Z", "digest": "sha1:RXHNFPR2EJCUBPKJV4I4TREJGZBSVEMK", "length": 30860, "nlines": 133, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतीय बँकिंग क्षेत्र ज्या पद्धतीने विस्तारत चालले आहे आणि नवीन बँक साठी परवाना द्यायला आपली रिझर्व बँक ज्या पद्धतीने अनुकूल आहे ते पाहता भविष्यामध्ये बँक आणि तत्सम आर्थिक संस्थांसाठी भारतात आशादायक चित्र आहे.\nसर्वसाधारणपणे बँकेचा व्यवसाय आणि profit ratio ठरतो ते ती बँक देत असलेली कर्जे त्यावर मिळणारे व्याज. यामध्ये आता अजून नवीन एक सेवा अंतर्भूत आहे – ती म्हणजे इन्शुरन्स.\nइन्शुरन्स ग्राहकांना विकल्यानंतर मिळणारा फायदा आणि profit ratio मध्ये होणारा फायदा बघून बँका हिरीरीने ग्राहकांना policy देण्याच्या मागे असतात. परंतु एकदा policy दिल्यानंतर ती mature होवून ती त्या policy holder ने क्लेम करण्याच्या स्टेज पर्यंत फार कमी केसेस पोहोचतात. Policy देताना/दिल्यानंतर त्याबाबत खरी माहिती नं देणे, फक्त policy गळ्यात मारणे, ग्राहकाच्या अज्ञानाचा फायदा घेवून माहिती लपवून ठेवणे – क्लेम यशस्वी नं होण्यासाठी अश्या अनेक प्रकारच्या क्लृप्त्या बँकांकडून लढवल्या जातात. बँकाच्या आपापसातल्या स्पर्धा आणि हेवेदावे प्रचंड प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतात. परंतु याचा फटका बसतो तो सर्वसामान्य ग्राहकास.\nअनेक विमा एजंट आणि बँकेत काम करणारे सेल्स ऑफिसर हे केवळ बँकेने ग्राहकांना विमा पॉलिसी विकून प्रीमियम मिळवण्यासाठी नेमलेले असतात. अनेकदा हे लोक पॉलिसी विकतात आणि त्यानंतर नोकरी सोडून निघून जातात. त्यानंतर त्या विकलेल्या पॉलिसी चे काय होते याबाबत त्या विमा धारकास कधीही काहीही काळात नाही. बँकेमध्ये विचारणा केल्यानंतर कोणीही समाधान कारक उत्तर देत नाही आणि पॉलिसी अशा विविध कारणामुळे laps होवून जाते…भरलेले प्रीमियम अलगदपणे बँका आणि इन्शुरन्स कंपनीच्या profit account मध्ये येवून profit फुगवत राहतात.\nअनेकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावून देखील केवळ तांत्रिक कारणामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने निकाला दिला जातो. त्यामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपन्याचे जास्त फावले जाते. रिझर्व बँकेने बँकांच्या अशा पद्धतीच्या गैरकारभाराबाबत चिंता व्यक्त करून याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलेले आहे परंतु अजूनही त्याबाबत काही परिणामकारक चित्र पाहायला मिळत नाही.\nम्हणूनच आपणच सजग, सावध असणे गरजेचे आहे.\nभारतामधील सर्वात जास्त आढळणारे इन्शुरन्सच्या गैरकारभाराचे प्रकार :\nभारतामधील इन्शुरन्��� मध्ये सगळ्यात प्रकर्षाने आढळणारा गैरवाजवी प्रकार म्हणजे बँका आणि इन्शुरन्स कंपन्या यांच्या कडून निघणाऱ्या विविध प्रकारच्या स्कीम्स. वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या इन्शुरन्स स्कीम चा मारा जाहिरातीमधून, बँकांच्या मार्केटिंग ऑफिसर्स कडून, सोशल मीडिया मधून नेहमी होत राहतो. याबाबत कधीही खरी माहिती ही ग्राहक पर्यंत पोहोचत नाही. यामध्ये केले जाणारे फसवणुकीचे प्रकार म्हणजे :\nग्राहकाच्या गरजेचा विचार न करता अनावश्यक आणि गैरवाजवी सेवा पुरवणे.\nजी सेवा , जी स्कीम किंवा इतर कुठल्याही बाकीच्या अंतर्भूत ऑफर्स बद्दल पैसे घेणे ज्या कधीही दिल्या गेल्या नाहीत\nइन्शुरन्स स्कीम च्या अटी व शर्ती पूर्णपणे लपवून ठेवून ग्राहकास चुकीची माहिती देणे.\nअनेकांना आश्चर्य वाटेल – ग्राहक मंचामध्ये अगदी नवनवीन रोज निरनिराळ्या बँक आणि आर्थिक संस्थांविरुद्ध दावे दाखल होत राहतात ते प्रामुख्याने असल्या इन्शुरन्स स्कीम मध्ये फसवल्या गेलेल्या ग्राहकांचेच…\nआरोग्य विमा (health insurence) मध्ये चालणारे गैरप्रकार:\nआरोग्य विमा किती गरजेचा आहे असे सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवले जाते खरे परंतु असा आरोग्य विमा घेतल्यानंतर ही त्याचा फायदा मात्र त्या विमा धारकास होत नाही. ज्या दवाखान्यांबरोबर Tie Ups आहेत असे डॉक्टर्स केवळ विमा कंपन्या कडून जास्तीचे कमिशन मिळवण्या साठी त्यांनी पेशंट ला पुरवलेल्या सेवेसाठी वेगवेगळी बिले चार्ज करीत राहतात ज्यायोगे विमा धारकास घेतलेल्या आरोग्य विम्याचा फायदा मिळवता येत नाहीत. यामध्ये MIscoding आणि upcoding नावाचा आणखी एक प्रकार चालतो.\nMIscoding म्हणजे ज्यामध्ये आरोग्य विम्याची पॉलिसी घेताना त्यामध्ये अटी व शर्ती अत्यंत गिचमिड अक्षरात आणि पॉलिसी होल्डर च्या सारासार बुद्धीला समजण्याच्या पलीकडे असलेल्या गुंतागुंतीच्या भाषेत बनवलेल्या असतात ज्या त्याला कधीही समजत नाहीत. ती माहिती फक्त ज्यावेळी पॉलिसी क्लेम करायला गेल्यावर तुमची पॉलिसी का क्लेमेबल नाही असे जेव्हा समोरचा बँकेचा किंवा विमा कंपनीचा एजंट सांगतो त्यावेळी समजते. Upcoding म्हणजे एखाद्या व्यक्तीचं दवाखान्याचं जितकं बिल झालं असेल, त्या बिलावर त्यापेक्षा जास्त पैसे चार्ज करणे. वेगवेगळ्या प्रकारच्या अनावश्यक तपासण्या करणे – ते ही पॉलिसी होल्डर च्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून. ज्यामुळे त्याला घेतलेल्या विम्याचा लाभ मिळवता येणार नाही.\nआयुष्य विमा (Life Insurence) मध्ये चालणारे घोटाळे :\nनिरनिराळ्या प्रकारच्या आयुष्य विमा पॉलिसी आज बाजारात उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये ही समोरच्या ग्राहकाच्या कुठल्याही गरजांचा ताळमेळ नं घालता केवळ गळ्यात पॉलिसी मारणे आणि स्वतःचं कमिशन वसूल करणे, एवढीच कामे तत्सम बँक आणि इतर आर्थिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या सेल्स ऑफिसर कडून केली जातात.\nखाजगी बँका कडून अशा फसवल्या जाणाऱ्या घटनांचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. खाजगी क्षेत्रातील बँका ग्राहकांना फसवून त्यांचा प्रीमियम हडप करण्याच्या बाबतीत अत्यंत अग्रेसर आहेत. यावर रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष असूनही या बँका बाबत कुठल्याही कठोर कारवाई चे संकेत मिळत नाहीत ही आश्चर्य जनक बाब आहे.\nगृह कर्जे आणि इन्शुरन्स (Home Loan Policies) :\nसर्वसाधारण पणे नवीन घर अथवा इतर कुठलीही property घेण्यासाठी कर्ज काढण्याची आवश्यकता भासते. होम लोन हा असाच एक विषय.\nगृहकर्ज घेताना ते कर्ज कव्हर करण्यासाठी होम लोन इन्शुरन्स पॉलिसी घेण हा कर्जदाराच्या पसंतीचा प्रश्न आहे. कायद्यामध्ये गृहकर्जा बरोबर इन्शुरन्स पॉलिसी घेतली पाहिजे असा कुठलाही नियम नाही. परंतु कर्जदारास गृहकर्जा बरोबर होम लोन प्रोटेक्शन इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी बँका बेकायदेशीर पणे दबाव आणत आहेत. याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे –\nजरी गृहकर्जा बरोबर अशा पॉलिसी घेतल्या आणि कर्जदाराच्या मृत्यू झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनी ने उरलेल्या कर्जाच्या रकमेची भरपाई करणे अपेक्षित असते परंतु असे होत नाही.\nयाचं – कारण पॉलिसी मध्ये नमूद केलेल्या अटी या त्या पॉलिसी होल्डर ला कधीही सांगितल्या जात नाहीत. यासाठी Insurence Development Authority of India याविषयी कर्जादारासाठी खास IRDA Regulation (on the protection of the policy holder interest) rules 2002 जारी केलेले आहे.\nआता याबाबत कायदेशीर कारवाई चा बडगा उभारल्या नंतर बँकांना धडा बसतो का तर याचे उत्तर होकारार्थी आणि नकारार्थी असे दोन्ही आहे. अनेक वेळा ग्राहक कोर्टाने बँकांच्या अशा बेकायदेशीर धोरणांच्या विरोधात निर्णय दिले आहेत. तर कधी कधी फक्त तांत्रिक बाबींचा आसरा घेवून बँकेने आपला बचाव केल्यामुळे त्यांच्या बाजूने ही निकाल लागलेले दिसतात.\nडॉ. अजय सिंग वि. एक्सिस बँक लिमिटेड (Fa/881/2013)\nया केस मध्ये राष्ट्रीय ग्राहक मंचाने बँकेच्या बाजूने निकाल दे���ाना गृहकर्ज घेतल्या नंतर दोन महिन्यात मृत्यू पावलेल्या कर्जदाराच्या पत्नीचा सदर बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावर बँकेने दिलेल्या इन्शुरन्स पॉलिसी चा दावा फेटाळून लावलेला आहे. गृहकर्जावर जी पॉलिसी दिली होती त्याचे पैसे आपल्याला आपल्या पतीच्या निधना नंतर मिळावेत असा पत्नीचा दावा होता.\nतर सदर केस मध्ये कर्जदाराची वैद्यकीय तपासणी झाली नव्हती म्हणून आम्ही त्यांना पॉलिसी issue केलेली नव्हती असा बँकेचा बचाव होता.\nयाच्यावर “आम्हाला किंवा माझ्या पतीला तथाकथित वैद्यकीय तपासणी बद्दल कोणतीही कल्पना दिली नव्हती” असे मृत कर्जदाराच्या पत्नीने स्पष्ट केले होते. पण निकाल देताना “इन्शुरन्स पॉलिसी हा एक करार असून, सदर केस मध्ये ही पॉलिसी बँकेने कर्जदारास issue केलेली नसल्यामुळे हा करार पूर्ण होवू शकत नाही, म्हणून बँक आणि इन्शुरन्स कंपनीला कर्ज चुकवण्यास जबाबदार धरता येणार नाही” असे मत न्याय मंचाने नोंदविले आहे.\nसदर घटनेचा विचार करता कायद्याच्या अगदी तांत्रिक बाजू मुळे बँकेच्या पदरात निकाल पडला हे स्पष्ट आहे.\nकर्ज घेताना कुठल्याही बँकेला त्याच्या सोबत इन्शुरन्स देण्याची सक्ती करता येत नाही. तसेच जर पॉलिसी घ्यायची असेल तर त्याविषयी संपूर्ण खरी माहिती करून घ्यायचा ग्राहकास / कर्जदारास पूर्ण अधिकार आहे. बँकेच्या कुठल्याही फसव्या आमिषास बळी न पडता हा अधिकार ग्राहकाने वापरला पाहिजे.\nही गोष्ट फक्त गृह कर्जापुरती मर्यादित नसून सर्व प्रकारच्या जनरल आणि लाइफ इन्शुरन्स पॉलिसी बाबत लागू आहे. त्यामुळे तथाकथित Advisor आणि Financial Planeer च्या बोलण्यास बळी न पडता पूर्ण कायदेशीर आणि तांत्रिक बाजू लक्षात घेवून ग्राहकाने पॉलिसी घेणे श्रेयस्कर.\nविम्या बाबत ग्राहकांनी घ्यावयाची सावधगिरी:\nस्वतःच्या गरजांना लागू पडते त्याच प्रकारची विम्याची पॉलिसी निवडणे कधीही हितकारक. जर समोरचा तथाकथित आर्थिक सल्लागार अव्वाच्या सव्वा रिटर्न सांगत असेल किंवा अशक्य क्लेम सांगत असेल तर त्या ठिकाणी धोका असू शकतो.\nतुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या प्रत्येक पत्रास तत्काळ उत्तर देणे श्रेयस्कर.\nकुठलाही विमा घेताना सर्व कागदपत्रे लेखी स्वरुपात असणे गरजेचे. बँकेच्या आर्थिक सल्लागारा बरोबर झालेले पसर्व प्रकारचे correspondence, पत्र व्यवहार, मेल्स जपून ठेवणे गरजेचे आहे.\nसर्वात सामान्य आणि सर्वत्र आढळणारी चूक म्हणजे – कोऱ्या कागदपत्रावर सह्या देणे…\nविमा हा एक करार असून ज्या वेळी तुम्ही कागदपत्रांवर सही करता त्यावेळी हा करार तुम्हास मान्य आहे असा त्यांचा अर्थ होतो. कोर्टामध्ये अनेक वेळा इन्शुरन्स कंपन्यांना या गोष्टीचा प्रचंड फायदा होतो आणि विमाधारकाचा क्लेम नाकारला जातो. हे त्यावेळी घडते किंबहुना प्रत्येक वेळी घडते कारण विमा धारकाने काहीही न बघता न वाचता पॉलिसी च्या पेपर वर सह्या केलेल्या असतात.\nविम्याच्या कागदपत्रावर लिहिलेल्या अटी आणि शर्ती बिनचूक पणे दुर्लक्ष न करता वाचणे आणि समजावून घेणे अत्यंत श्रेयस्कर.\nइन्शुरन्स कंपनीच्या नावाने चेक लिहिताना त्याच इन्शुरन्स कंपनीचे नाव त्यावर टाका जिच्याकडून ती पॉलिसी मिळालेली आहे. चेक वर तुमचा पॉलिसी न. नमूद करणे आवश्यक आहे.\nप्रीमियम भरण्यासाठी नेट बँकिंग चा पर्याय हा उत्तम आहे. परंतु हे जर शक्य नसेल तर तुमच्या बँकेस ECS mandate सेवा देण्यासाठी तुम्ही सांगू शकता ज्यायोगे प्रीमियम तुमच्या बँक अकाऊंट मधून डेबिट होईल.\nपॉलिसी renew करताना तुमची महत्वाची कागदपत्रे (पासपोर्ट, PAN, ADHAR) कधीही बँकेच्या ताब्यात देवू नका.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारताची चिंता वाढवणारा : चिनी ड्रॅगनचा ५ वा अवतार\nरडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र →\nलाईफ इन्श्युरन्स घेण्यापूर्वी ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते\nशेतकरी संपाचं भयाण वास्तव\nखुद्द इंग्रजांना रणांगणात धूळ चारणाऱ्या मराठा वीराच्या शौर्याची अजरामर कहाणी\nस्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nना दिखाऊपणा, ना कोणावर जबरदस्ती….’ह्या’ गावात रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत\nतुम्हाला माहित नसणारे काजुचे फायदे जाणून घ्या\nडॉक्टरकी न केलेले डॉक्टर: केशव बळीराम हेडगेवार\nशिवरायांची ही अत्यंत धाडसी मोहिम मुघल साम्राज्याचे कंबरडे मोडणारी ठरली\nकर्णी सेनेचं नवं हिंसक आवाहन WhatsApp वर संदेश व्हायरल\nमनमोहन सिंगांच्या “त्या” बजेटमुळे भारतीय अर्थव्य��स्था कायमची बदलली\nभल्याभल्यांचे “मॅनेजमेन्ट गुरू ” – मुंबईच्या डब्बेवाल्याबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nबौद्ध भिक्खूच्या नजरेतून: नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसीत घडू शकणाऱ्या चुका व त्यांवरील उपाय\n“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)\nजगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय\nद वॉल “फ्रेंड फिलॉसॉफर गाईड” द्रविडच्या वाढदिवसानिमित्त संझगिरींचा अप्रतिम लेख\nसमजून घ्या टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन मधला फरक\n“फिशबेड व्हर्सेस फाल्कन” : जुन्या मिग २१ ने आधुनिक एफ-१६ विमानावर कशी मात केली\nसर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य\nविराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend\nअंदमान निकोबारच्या बेटांमधला ज्वालामुखी जागा झालाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/km2018", "date_download": "2019-03-25T08:39:50Z", "digest": "sha1:MZ7Z2VPXI5RGMPEJT32COLDQ3GWO6DAF", "length": 13915, "nlines": 114, "source_domain": "gangadharmute.com", "title": " कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nकवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी\nमुखपृष्ठ / कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही वि��ंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 29/11/2017 - 16:41 ह्यावेळी प्रकाशित केले.\n४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nदिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८\nस्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई\nकवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी\nनोंदणीची अंतिम मुदत : ५ डिसेंबर २०१७\nचवथ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये \"शेती आणि शेतकरी\" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायऱ्यात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या कवी आणि गझलकारांना याद्वारे सादर निमंत्रित करण्यात येत आहे.\nनियम, अटी आणि सूचना :\nशासकीय मदतीशिवाय वाटचाल करणाऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला लोकवर्गणीशिवाय अन्य आर्थिक स्रोत नसल्याने सहभागींना मानधन व प्रवासखर्च देणे शक्य होणार नाही, हे आम्ही प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.\nसर्व जिल्ह्यांना/विभागांना तसेच महिलांना प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सत्राची वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता नोंदणी केलेल्या सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असावे अशी आमची विनंती आहे.\nअ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ शेतीमातीशी बांधिलकी राखणार्यांची असावी, तिथे व्यक्तिगत अहंभावनेला थारा नसावा.\nअ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे सर्व कामकाज पारदर्शीपणाने व्हावे, असा आमचा प्रयत्न असतो.\nप्रतिनिधींना २ वेळ ��ोजन, २ वेळ चहा, अल्पोपहार, माहिती किट, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाईल.\nनिवासाची व्यवस्था करणे शक्य न झाल्याने दिलगीर आहोत.\nफॉर्म भरताना आपला प्रतिनिधी सहभाग नोंदणी क्रमांक लिहिणे आवश्यक असल्याने प्रतिनिधी सहभाग नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून घ्यावी. अधिक माहिती http://www.baliraja.com/rep-2018 येथे उपलब्ध आहे.\nकवीसंमेलन किंवा गझल मुशायर्यात सहभागी होऊ इच्छीणार्या कवी आणि गझलकारांनी खालील लिंकवर क्लिक करुन आपली नोंदणी करावी. काही तांत्रिक अडचण आल्यास abmsss2015@gmail.com या विरोपाव्दारे (इमेल) किंवा बळीराजावरील व्यक्तिगत निरोपाच्या माध्यमातून आमचेशी संपर्क साधावा.\nआपण सदस्य असल्यास लॉग इन LOG IN करा. सदस्य नसल्यास सदस्यत्व घेऊन SIGN IN लॉग इन करा.\nनंतरच खालील लिंकवर क्लिक करा.\nकवी आणि गझलकारांची नोंदणी\nआपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2018A या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/%C2%A0sarita-more-new-mayor-kolhapur-3908", "date_download": "2019-03-25T08:32:38Z", "digest": "sha1:VQE5Y3K4K4TYF3IP72YRX4QOSDV2XSGC", "length": 8516, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Sarita More New Mayor of Kolhapur | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर महापाैरपदी सरिता मोरे\nकोल्हापूर महापाैरपदी सरिता मोरे\nकोल्हापूर महापा��रपदी सरिता मोरे\nकोल्हापूर महापाैरपदी सरिता मोरे\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nकोल्हापूर - महापालिकेच्या बहुचर्चीत महापौर निवडीत कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे यांनी बाजी मारली. तर उपमहापौरपदी आघाडीच्या भुपाल शेटे यांची निवड झाली. महापौर निवड प्रक्रियेमध्ये मोरे यांना 41 तर ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांना 33 मते मिळाली.\nदरम्यान निवडीनंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश अखेरपर्यंत आला नाही. या निवडणूकीत शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहीले.\nकोल्हापूर - महापालिकेच्या बहुचर्चीत महापौर निवडीत कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे यांनी बाजी मारली. तर उपमहापौरपदी आघाडीच्या भुपाल शेटे यांची निवड झाली. महापौर निवड प्रक्रियेमध्ये मोरे यांना 41 तर ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांना 33 मते मिळाली.\nदरम्यान निवडीनंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश अखेरपर्यंत आला नाही. या निवडणूकीत शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहीले.\nदरम्यान, महापौर निवडीच्या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यास सत्तारुढ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना ओळखपत्राची सक्ती केली. ओळखपत्र असेल तरच आत सोडण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितल्याने आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी याला आक्षेप घेतला. यावेळी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व श्री. मुश्रीफ यांच्यात जोरदार वादावादी झाली. पोलिसांचा येथे संबंधच काय पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची दादागिरी सुरू आहे, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी नगरसेवकांना आत सोडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची जोरदार अटकाव केला. कायदा व्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणार, अशी कडक भुमिका पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली. या कारणावरून दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची झाली. मुश्रीफ यांनी पोलिस उपअधीक्षक गुरव यांना तुम्हाला गडचिरोलीला पाठवू अशी धमकी दिली. गुरव यांनी गडचिरोलीला काय घरी जायला तयार आहे. वर्दीचाच मान राखणार. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणार. ओळखपत्र पाहिल्या शिवाय आत सोडणार नाही, अशी ��ंबीर भुमिका श्री गुरव यांनी घेतली.\nमहापालिका आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलिस निरिक्षक तानाजी सावंत, पोलिस निरिक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला आहे.\nराष्ट्रवाद निवडणूक नगरसेवक पोलिस हसन मुश्रीफ सतेज पाटील satej patil गडचिरोली gadhchiroli महापालिका तानाजी सावंत mayor kolhapur\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/bamcef-and-sambhaji-brigades-hands-behind-the-riots/", "date_download": "2019-03-25T08:35:11Z", "digest": "sha1:Y25T32ODUWV4727LICVWQUDLXBXD4PR2", "length": 7335, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दंगली मागे बामसेफ व संभाजी ब्रिगेडचा हात- शिवप्रतिष्ठान", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nदंगली मागे बामसेफ व संभाजी ब्रिगेडचा हात- शिवप्रतिष्ठान\nमुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचरावरून राज्यात झालेल्या हिंसक घटनेमुळे महाराष्ट्र भर वातावरण बिघडल असून अनेक धार्मिक संघटना एकमेकांवर आरोप करीत आहेत. तसेच या हिंसाचारात नक्षलवादी संघटनांचा हात असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर हिंसाचारात बामसेफ व संभाजी ब्रिगेड आणि पुण्यातील एल्गार परिषदेच्या निमंत्राकांचा हात असल्याचा गंभीर आरोप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते चेतन बारस्कर यांनी केला आहे. जातीचे राजकारण संघटनेने केले आम्ही खुले दिलाने चौकशीस सामोरे जाण्यासाठी प्रतिष्ठान तयार आहे. सरकारची तपास यंत्रणा उत्तर देईल, असेही ते म्हणाले.\nजातीयवादी देशविघातक शक्तींना पुन्हा दंगल भडकविण्याची संधी मिळू नये म्हणून ७ जानेवारी रोजी मुंबईतील लालबाग येथे होणारा संभाजी भिडे यांच्या जाहीर व्यख्यानाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रवक्ते बलवंत दळवी यांनी सांगितले. मराठा, ब्राम्हण आणि दलित अशी फूट पाडण्याचा प्रयत्न समाजविघतक संघटना करत असल्याचे ते म्हणाले. गुरुजी विरुद्ध खोटी साक्ष देणाऱ्या साळवे यांचा बोलविता धनी कोण आहे. याची सरकारने लवकरात लवकर चौकशी करावी आणि खरे सत्य बाहेर लोकांसमोर मांडावे अशी मागणी संघटनेचे कार्यकर्ते चेतन बारस्कर यांनी केली.\nदरम्यान भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात माझे नाव नाहक गोवण्यात आले आहे तसेच हातातून सत्ता गेलेल्यांच्या मनात कौरवनिती शिरली आहे त्याच नीतीतून माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. अगदी यमाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली तरीही मी चौकशीलाही सामोरे जायला तयार आहे अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे गुरुजींनी पत्रकारांना आज दिली आहे.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nशिवाजी महाराजांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ\nमी लवकरच मंत्री मंडळात – नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/dr-deepak-sawant-visit-ghati-hospital-aurangabad-137881", "date_download": "2019-03-25T08:51:00Z", "digest": "sha1:QHLRA5EPSETFF55VBWY4BTVQEHVW7337", "length": 19114, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Deepak Sawant visit Ghati Hospital in Aurangabad औरंगाबादच्या मिनी घाटी महिनाभरात सुरू करू: डॉ. दीपक सावंत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nऔरंगाबादच्या मिनी घाटी महिनाभरात सुरू करू: डॉ. दीपक सावंत\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nज्या भागात ही इमारत बांधण्यात आली तेथील आमदार विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष तर खासदार हे भाजपाचे राज्याचे अध्यक्ष आहेत तर हे रुग्णालय शिवसेनेकडे असलेल्या आरोग्य खात्याकडे आहे. राजकीय पेचही यामागे असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री व शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याचा आरोग्य मंत्री यांचा मनोदय असल्याचेही बोलले जाते मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही नेते एका व्यासपीठावर येण्याची तूर्तास शक्यता नाही. तर हाफकीन कडून अनेक यंत्रसामुग्री व औषधींनाचाही ���ुरवठा नसल्याने सध्या सुरू असलेल्या दररोजच्या ओपीडीलाही औषधे पुरत नसल्याची परिस्थिती असल्याने औषधी तुटवड्यात रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करणेही शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे.\nऔरंगाबाद : येत्या महिनाभरात जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सुरू करू. त्याआधी राज्यातील औषधी पुरावठा सुरळीत करायचा आहे. हाफकीनकडून निविदा निघाल्या आता 15 ते 20 दिवसात पुरवठा होईल. व औषध कोंडी फुटेल. औरंगाबाद जिल्ह्यातही मोफत किमोथेरपी योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याने दोन्ही सोबतच सुरू करू असे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मिनी घाटीची पाहणी करतांना ते पत्रकारांशी बोलत होते.\nगेल्या दोन वर्षांपासून चिकलठाणा येथील 38 कोटी खर्चून उभारलेले दोनशे खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी)उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याची आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी पाहणी केली.\nयावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, अंबादास दानवे, ऍड अशोक पटवर्धन, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी उदय चौधरी, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, सहाय्यक संचालक डॉ सुनीता गोलाईत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.\nया रुग्णालयाच्या उद्घाटना संदर्भात आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ व्यास यांनी मंगळवारी (ता 14) पाहणी केली होती. मात्र, रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नव्हती. स्वातंत्र्यदिनी गुपचूप उद्घाटन उरकण्याचा घाट आरोग्य विभागाने घातला होता. त्यासाठी बुधवारी (ता 15) रुग्णालयाची अंतर्गत सुरेख सजावट करण्यात आली होती. मात्र, विमानतळासह महापालिकेच्या अग्निशमन विभागाने रुग्णालयाला नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. विविध शासकीय कार्यालयांची एनओसी मिळाल्याशिवाय कोणत्याही विकासकामाचे लोकार्पण करू नये, असे संकेत असल्याने हे उदघाटन होऊ शकले नाही. बुधवारी सकाळी ध्वजवंदन जुन्या कार्यालयात झाल्याने उदघाटनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले होते.\nमागील दोन वर्षांप��सून अनेक वादात ही इमारत सापडली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या व तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे पालकमंत्री डॉ सावंत यांच्या डेडलाईनने सुद्धा रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. शिवाय पाण्याची पुरेशी व्यवस्था अद्याप होऊ शकली नाही 87 लाखाची नवीन पाईप लाईनचे काम महापालिका सुरू करू शकली नाही.\nज्या भागात ही इमारत बांधण्यात आली तेथील आमदार विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष तर खासदार हे भाजपाचे राज्याचे अध्यक्ष आहेत तर हे रुग्णालय शिवसेनेकडे असलेल्या आरोग्य खात्याकडे आहे. राजकीय पेचही यामागे असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री व शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याचा आरोग्य मंत्री यांचा मनोदय असल्याचेही बोलले जाते मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही नेते एका व्यासपीठावर येण्याची तूर्तास शक्यता नाही. तर हाफकीन कडून अनेक यंत्रसामुग्री व औषधींनाचाही पुरवठा नसल्याने सध्या सुरू असलेल्या दररोजच्या ओपीडीलाही औषधे पुरत नसल्याची परिस्थिती असल्याने औषधी तुटवड्यात रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करणेही शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे.\nLoksabha 2019 : ईशान्य मुंबईत तिरंगी लढत\nभांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची...\nLoksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम...\nLoksabha 2019 : मुले पळवणारी टोळी मुंबईतही\nमुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत....\nLoksabha 2019 : अमित शहांविरोधात राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री लढणार\nगांधीनगर : गांधीनगर मतदारसंघातून लढत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गुजरातचे माजी...\nLoksabha 2019 : गडकरी, पटोलेंचे आज शक्तिप्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल करणार\nनागपूर - नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, सर्वच इच्छु��� जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करतील...\nLoksabha 2019 : 'हुक्केरींच्या विरोधात कत्ती की जोल्ले\nनिपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता बरेच दिवस ताणली गेली. अखेर काँग्रेसने खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090804/main.htm", "date_download": "2019-03-25T08:16:42Z", "digest": "sha1:XIYCYUOL7XNBOY5IBIF7DOARF3KQSW2R", "length": 19537, "nlines": 49, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ४ ऑगस्ट २००९\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, थोडा गम\nबेमुदत संप अखेर रद्द \nमुंबई, ३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी\nघरभाडे भत्त्यांमध्ये १० ते ३० टक्के वाढ, पुढील १ एप्रिलपासून वाहतूक भत्त्यांत दुप्पट वाढ, ग्रॅच्युइटी मर्यादेत सात लाख रुपयांपर्यंत वाढ तसेच महिलांना प्रसुतीसाठी १८० दिवस रजा, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग या मागण्या मान्य झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आज रात्रीपासून सुरू होणारा बेमुदत संप मागे घेण्यात आला. निवडणुका जवळ आल्याने सर्व घटकांना खुश करण्याचा सपाटा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लावला असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करून त्यांचीही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.\nमुंबईतील एकमेव हरितपट्टय़ावर डल्ला मारण्याचा डाव\nसंदीप आचार्य , मुंबई, ३ ऑगस्ट\nगोरेगाव येथील ‘आरे’ आरे कॉलनी हा मुंबईतील एकमेव हरितपट्टा असून, शेकडो एकरवर पसरलेल्या या मुंबईच्या ‘ग्रिन नेकलेस’वर डल्ला मारण्याचे प्रयत्न काही शक्तिशाली राजकारण्यांच्या मदतीने केले जात आहेत. यासाठी ‘आरे’ कॉलनीतील आदिवासी पाडे व झोपडपट्टय़ांतील गरिबांच्या नावे ‘एसआरए’ योजना राबविण्याचे काम सुरू आहे. यातूनच ‘आरे’च्या जमिनींवर डोळा असणारे प्रभावशाली लोक या जमिनी आपल्याला मिळाव्या यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी दुग्ध विकास विभागाकडे एकूण ६५ प्रस्ताव आल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.\nविलासराव आणि गोविंदराव राज्यसभेवर बिनविरोध\nमुंबई, ३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी\nशिवसेनेचे अॅड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही जागांवर भरलेले उमेदवारी अर्ज आज मागे घेतल्याने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस गोविंदराव आदिक यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. शिवसेनेचे अॅड. नार्वेकर यांनी देशमुख व आदिक या दोघांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यास अर्धा तासाचा अवधी असताना नार्वेकर यांच्या वतीने शिवसेनेचे आमदार अरविंद नेरकर यांनी माघारीचे पत्र सादर केले.\nपुण्यात शाळकरी मुलीचा स्वाइन फ्लूने मृत्यू\nलष्कर भागातील सेंट अॅन्स शाळेतील चौदा वर्षांची रिदा शेख ही मुलगी स्वाइन फ्लूने आज एका खासगी रूग्णालयात दगावली. स्वाइन फ्लूने घेतलेला देशातील हा पहिलाच बळी ठरला आहे. पुण्यात आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्य संचालक डॉ. डी. एस. डाखुरे यांनी याबाबत सांगितले, की रिदा हिला संशयित म्हणून एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची तपासणी करीत असताना तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. तिचे तपासणी नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. तेथेही स्वाइन फ्लूचेच निदान कायम झाले. तिला नायडू रूग्णालयात हलविण्यात येणार होते, मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला हलविण्यात आले नाही. तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. त्यानंतर तिला न्यूमोनिया झाला आणि फुफ्फुसांना संसर्गही झाला. तिची प्रकृती आज खूपच खालावत गेली. सायंकाळी पाचच्या सुमारास आज तिचा बळी गेला. याबाबत या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या तपासणीचा आदेश आपण दिल्याचेही डाखुरे यांनी सांगितले.नवी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस या संस्थेकडेही रिदा शेख हिच्या तपासणीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज संप\nराज्यातील सर्व विद्यापी���ांचा कारभार ठप्प होणार\nमुंबई, ३ ऑगस्ट / प्रतिनिधी\nसहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ देण्याच्या मागणीसाठी राज्यातील तीस हजार प्राध्यापक गेल्या वीस दिवसांपासून संपावर गेले असतानाच आता शिक्षकेतर कर्मचारीही उद्या, मंगळवारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व विद्यापीठांचा कारभार ठप्प होणार आहे. मुंबई विद्यापीठातील संपाला अधिकारी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. सहाव्या वेतन आयोगाबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या वीस दिवसांपासून चालू असलेल्या प्राध्यापकांच्या संप अधिकच चिघळला आहे. प्राध्यापक व समकक्ष पदांना विद्यापीठ अनुदान आयागाने निश्चित केलेली वेतनश्रेणी व महागाई भत्ता देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली असली तरी या वेतनश्रेणी व महागाई भत्त्याचे स्वरूप संदिग्ध असून त्यामुळे उच्च-तंत्र शिक्षण क्षेत्रात मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून आम्ही संप चालूच ठेवत असल्याचे ‘एमफुक्टो’ने म्हटले आहे. १९९१ ते १९९९ या कालावधीत नोकरीस लागलेल्या अधिव्याख्यात्यांना नेट-सेटच्या पात्रतेपासून सूट मिळावी याकरिता राज्य सरकारच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असेही टोपे यांनी आश्वासन दिले आहे. परंतु, यूजीसीच्या नियमावलीत ‘एक्झ्मशन’ देण्याची तरतूद आहे, सूट देण्याची तरतूद नाही. त्यामुळे राज्य सरकार शिक्षकांची दिशाभूल करीत असल्याचे ‘एमफुक्टो’ने म्हटले आहे.\nक्रिकेटपटूंनी ‘वाडा’चे नियम पाळावेत\nनवी दिल्ली, ३ ऑगस्ट / वृत्तसंस्था\nउत्तेजक सेवन विरोधी संस्थेने (वाडा) क्रिकेटपटूंवर घातलेल्या अटींविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या भूमिकेस केंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस. गिल यांनी विरोध दर्शविला आहे. ‘ वाडा’ ने घातलेल्या अटींचे क्रिकेटपटूंनी खळखळ न करता पालन करावे, असे गिल यांनी नमूद केले आहे.ते म्हणाले की, उत्तेजक सेवन विरोधी संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांना आपण मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भात कार्यवाहीसाठी घेतलेल्या न��र्णयांना खेळाडूंनी बांधील असले पाहिजे. ‘वाडा’च्या अटींबाबत भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केलेल्या असंतोषाबद्दल गिल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. क्रिकेट खेळणाऱ्या बहुतेक सर्व देशांच्या खेळाडूंनी वाडाच्या अटींना मान्यता दिली आहे. असे असताना फक्त भारतीय क्रिकेटपटूंनी त्या विरोधात उभे ठाकावे याचे आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले. दरम्यान, बीसीसीआयने मात्र, हे गिल यांचे वैयक्तिक मत असू शकते, भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यातील या मुद्यात क्रीडामंत्रालयाचा संबंध नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेशी ठाम आहे, असे म्हटले आहे.\nसईदच्या याचिकेवरील सुनावणी बेमुदत तहकूब\nमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप असणाऱ्या जमात उद् दवा संघटनेचा प्रमुख हाफिझ मुहंमद सईद याच्या सुटकेला आवाहन देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. सईद याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही असा पवित्रा गेल्याच आठवडय़ामध्ये पाकिस्तानमधील नेत्यांनी घेतला होता. त्यानंतर २६/११च्या हल्ल्यात सईदचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे भारताने स्पष्ट केले. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची सुनावणी पुढे ढकलून कांगावा केला आहे.\nसामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना ‘मॅगसेसे’\nकौलालंपूर/नवी दिल्ली, ३ ऑगस्ट/पीटीआय\nआशियातील नोबेल पारितोषिक समजला जाणारा मॅगसेसे पुरस्कार यंदा भारतातील सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांच्यासह इतर पाच जणांना जाहीर करण्यात आला. जोशी यांनी ग्रामीण समुदायांच्या विकासात मोठे कार्य केले आहे. रॅमन मॅगसेसे अॅवॉर्ड फाऊंडेशनच्या विश्वस्त मंडळाने म्हटले आहे की, जोशी यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी नवी दिशा दिली, त्यांच्या कामात शिस्त आणली. ‘हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद झाला. पण हा पुरस्कार कुणा एका व्यक्तीचा नाही, तर तो अभिनव कल्पनेला मिळालेला पुरस्कार आहे. ही कल्पना होती ग्रामीण जनतेच्या विकासाची. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुशिक्षित लोकांनी तिथे जायला पाहिजे, त्या लोकांच्या कल्याणाची कामे केली पाहिजेत,’ असे बासष्ट वर्षांच्या दीप जोशी यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/ashyprkare-pani-pya", "date_download": "2019-03-25T09:07:19Z", "digest": "sha1:PZTE5O3GAYPUQOKXJG3TTH2WLIKMMKG2", "length": 8229, "nlines": 214, "source_domain": "www.tinystep.in", "title": "निरोगी राहण्यासाठी अश्याप्रकारे पाणी प्या.. - Tinystep", "raw_content": "\nनिरोगी राहण्यासाठी अश्याप्रकारे पाणी प्या..\nनिरोगी आरोग्यासाठी जेवणाबरोबर पाणी पिण्याची वेळ,प्रमाण आणि प्रकार योग्य असणे गरजेचे असते. दिवसभरातून कमीत-कमी ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, याबाबतीतही बरेच गैरसमज आहेत. जेवताना थोडं थोडं पाणी प्यायलं तर ते पचनक्रियेमध्ये उपयुक्त आणि आरोग्यदायक ठरते. तसेच जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे पचनक्रियेमध्ये अडथळा आणते जे आरोग्यास हानिकारक असते. पुढील प्रकारे आणि प्रमाणात पाणी पिण्याने आरोग्यविषयक फायदे होतात.\n१. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर चांगल्या पद्धतीने आतून स्वच्छ, डिटॉक्स होते. आणि फॅटस कमी होण्यास मदत होते. हे पाणी तुम्ही सुर्योदयापूर्वी प्यायलास उत्तम\n२. बऱ्याचदा आंघोळ झाल्यावर थकल्यासारखे वाटते. विशेषतः महिलांना असे होते. त्यामुळे अंघोळीनंतर दररोज १ ग्लास पाणी प्यावे. यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होत नाही.\n३. जेवताना थोडे-थोडे पाणी प्यावे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कमीत-कमी ३०,४० मिनिटाने प्यावे.\n४. एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये. दर थोडा वेळाने थोडे-थोडे पाणी प्यावे.\n५. घाई-घाईत, उभ्या-उभ्या पाणी पिऊ नये, त्याने नळ फुगतात आणि पोट दुखते.\n६. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने हृदयरोगापासून सुटका मिळू शकते. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी अर्धा-तास आधी एक ग्लास पाणी प्यावे. (जास्त पिऊ नये)\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचक��त करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/latest-updates-against-mani-shankar-aiyar-sable-police-complaint/", "date_download": "2019-03-25T08:09:10Z", "digest": "sha1:V7ILEFJH3R23OCDAEQKZN2EEGT4SQCB7", "length": 10138, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मणिशंकर अय्यर विरोधात खा. साबळेंची पोलिस तक्रार", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nमणिशंकर अय्यर विरोधात खा. साबळेंची पोलिस तक्रार\nपुणे- विवादास्पद विधानातून संकटांना आमंत्रण देणारे माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी आहे. पुण्यातील राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे यांनी अय्यर यांच्या विरोधात स्थानिक निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या 7 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द उद्गारल्याबद्दल काँग्रेसमधून निलंबित झालेल्या अय्यर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या विरोधात खालच्या पातळीची भाषा वापरणा-या अय्यर यांच्या विरोधात 8 डिसेंबर रोजी खा. साबळे यांनी पोलिस तक्रार केलीय.\nया तक्रारीत नमूद केल्यानुसार काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पतंप्रधानांच्या विरोधात जातियवादी टीका करताना नरेंद्र मोदी नीच आदमी है असे म्हंटले होते. तसेच पंतप्रधानांबद्दल नींच आदमीआणि असभ्य अशा शब्दांचा प्रयोग अय्यर यांनी केला आहे. अय्यर यांच्या विधानाची देशभरात निंदा होते आहे. विशेषत: दलित समाजाच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या विवादास्पद विधानांमुळे समाजातील जातीय सलोखा बिघडून वातावरण दूषित होण्याची भीती आहे. त्यामुळे अय्यर यांच्या विरोधात भादंविचे कलम 298,499,500,120-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी खा. साबळे यांनी केली आहे. तक्रार दाखल करताना साबळे यांच्यासह आ. महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चाच्या सरचिटणीस उमा खापरे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष शैला मोळक, केशव घोळवे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, रसचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चाचे संभाजी फुगे, सुभाष सरोदे, मनोज तोरडमल, भाई सोनवणे, विशाल वालुंजकर, वैजनाथ शिरसाठ इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.\nयावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खा. साबळे म्हणाले की, अय्यर यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या विधानांची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे जगात पंतप्रधान मोदी आणि देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यासोबतच देशातीच दलित, उपेक्षित आणि वंचित घटकांबद्दल काँग्रेसच्या मनात काय भावना आहेत हे देखील स्पष्ट झाले आहे. पंतप्रधांनी गेल्या तीन वर्षात केलेला विकास पाहुन काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अय्यर सारखे लोक अशाप्रकारची घृणित वक्तव्ये करीत आहेत. तेव्हा यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील खा. साबळे यांनी केली. हीच काँग्रेसची खरी संस्कृती निगडी पोलिसात अय्यर यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हिंदुस्थान समाचारशी बोलताना खा. साबळे यांनी सांगितले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा छळ करणा-या काँग्रेसने गेल्या 70 वर्षात दलितांचा वापर केवळ सत्ताप्राप्तीसाठी केला आहे. वास्तवात दलितांचा द्वेष करणे ही काँग्रेसची मुळ प्रवृत्ती आहे. मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या घृणास्पद टीकेनंतर काँग्रेसचा खरा चेहरा जगापुढे आला आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nगोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती- पटोले\nउद्धव ठाकरेंनी माझ्यावर आरोप करू नये; अन्यथा मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढेन – नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/patanjali-mega-food-park-news/", "date_download": "2019-03-25T08:04:45Z", "digest": "sha1:2KUCVKIJV62GB6677LX6Y7OIANILSQMU", "length": 5051, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "योगी सर���ारचा रामदेव बाबांना दणका; पतंजली फूड पार्क दुसऱ्या राज्यात हलवावं लागणार", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nयोगी सरकारचा रामदेव बाबांना दणका; पतंजली फूड पार्क दुसऱ्या राज्यात हलवावं लागणार\nनवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांना उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारकडून दणका बसला आहे. ग्रेटर नोयडामध्ये बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ला मेगा फूड पार्कसाठी देण्यात आलेली जमीन रद्द करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. त्यामुळे पतंजली फूड पार्कला आता दुसऱ्या राज्यामध्ये प्रकल्प शिफ्ट करावा लागणार आहे. पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.\n‘उत्तर प्रदेश सरकारने जमीन देण्याचा निर्णय रद्द केला आहे, या सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचं जीवन बदलवणारा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, आता हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलवण्यात येईल’, अशी माहिती बालकृष्ण यांनी ट्विटरद्वारे दिली.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nवाचा- मंत्रिमंडळ बैठकीतील शेतीविषयक महत्वाचे निर्णय\nदहावीचा ऑनलाईन निकाल अकरा तारखेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/pdp-initiatives-form-government-collaboration-congress-jammu-kashmir-44557/", "date_download": "2019-03-25T08:05:17Z", "digest": "sha1:L5GMNIMACCB7RBRIURDLQ2RII3ZAR55Q", "length": 6358, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जम्मू - काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसचा पीडीपीला पाठींबा?", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nजम्मू – काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसचा पीडीपीला पाठींबा\nनवी दिल्ली : भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा 19 जूनला पाठिंबा काढून घेतला होता, त्यानंतर जम्मू – काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. मात्र आता भाजप सोबत काडीमोड घेतल्यानंतर पीडीपी आणि काँग्रेस एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत कॉंग्रेसकडून मिळत आहेत.\nत्यासाठी काँग्रेसच्या नियोजन समिती एक बैठकही होणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या काँग्रेसच्या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अंबिका सोनी, कर्ण सिंह आणि पी. चिदंबरमही सहभागी होणार आहेत.तसेच मंगळवारी काँग्रेस आमदारांची श्रीनगरमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत पीडीपीबरोबर सरकार स्थापनेसंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्यासाठी 44 आमदारांची आवश्यकता आहे. पीडीपीजवळ सद्यस्थितीत 28 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 12 आमदारांचं संख्याबळ आहे. पीडीपी आणि काँग्रेस एकत्र आले तरी त्यांना 4 आमदारांची गरज लागणार आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार 3 अपक्ष आमदार आणि 1 सीपीआयएम-जेकेडीऍफचे आमदारही त्यांच्यासोबत आहेत. तेसुद्धा सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्यास तयार आहेत. अपक्ष आमदार सरकार स्थापनेसाठी मदत करतील.\nकॉंग्रेसने आमदारांना कैद करून ठेवलं नसतं तर आम्ही सत्तेत आलो असतो – शहा\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nशेतकऱ्यांसाठी बातमी : दुष्काळाबाबतची नवीन नियमावली जाहीर…\nदेव तारी त्याला कोण मारी बस 20 फूट खोल ओढ्यात पडूनही सर्व प्रवासी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6/", "date_download": "2019-03-25T07:47:18Z", "digest": "sha1:CITPV4FUCZWZMQ4BQ2CZX3RCRV5A7LNI", "length": 9105, "nlines": 45, "source_domain": "vicharpravah.in", "title": "६६. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : मतभेद - विचारप्रवाह", "raw_content": "\n६६. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : मतभेद\n१९४४ सालच्या ऑगस्ट महिन्यात वॉन नॉयमन इनिॲक प्रकल्प पाहण्याकरिता आले. तेंव्हा इनिॲकच्या निर्मितीचे काम अगदी जोरात सुरु होते. तिथे काम करणार्या सर्वांनाच या भेटीबाबत उत्सुकता होती. वॉन नॉयमन यांनी त्या यंत्राच्या लॉजिकल स्ट्रक्चरबाबत पहिला प्रश्न विचारला. तेंव्हा ते प्रतिभावंत असल्याची एकर्ट यांना खात्री पटली. वॉन नॉयमन यांनी इनिॲकची व्यवस्थित पाहणी केली. त्यावेळी त्यांना त्यात फार कमी स्टोरेज असल्याचे दिसून आले. शिवाय त्यात खूप सार्या व्हॅक्युम ट्युब्जचा वापर करण्यात आला होता आणि त्याचे रिप्रोग्रॅमिंग करणे देखील अवघड होते.\nजॉन वॉन नॉयमन हे एक गणितज्ञ होते. त्यामुळे त्यांना ॲलन ट्युरिंग यांच्या कामाविषयी माहिती होती. ट्युरिंग मशिनमध्ये तर्कशास्त्राच्या आधारे प्रोग्रॅमेबल संगणकाचा विचार मांडण्यात आला होता. १९३७ साली ॲलन ट्युरिंग शिक्षणाकरिता अमेरिकेत आले असता वॉन नॉयमन यांनी त्यांना तिथेच थांबण्याबाबत सुचवले होते. परंतु १९३८ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले, तसे ॲलन ट्युरिंग यांना इंग्लंडमध्ये बोलवण्यात आले. इनिग्मा मशिनशी संबंधित ‘बेचली पार्क’ येथील गुप्त प्रकल्पात त्यांचा समावेश करण्यात आला होता.\nइनिॲकचा प्रकल्प अजूनही सुरुच होता. परंतु एकर्ट व मॉकली यांनी एव्हाना पुढील प्रकल्पावर विचार करण्यास सुरुवात केली होती. इनिॲकमध्ये स्टोरेज कमी असल्याने अज्ञावलीकरिता बाह्य जोडणीवर विसंबून रहावे लागत असे. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या समस्या सोडवण्यासच त्या यंत्राचा उपयोग होत होता. उर्वरीत सर्व प्रकारच्या समस्या सोडवायच्या असतील, तर त्यासाठी इनिॲकच्या अंतर्गत स्टोरेजमध्ये वाढ करणे गरजेचे होते. तेंव्हा एकर्ट व मॉकली यांनी त्यादिशेने प्रयत्न सुरु केले.\nइकडे जॉन वॉन नॉयमन इनिॲक प्रकल्पाचे सल्लागार बनले होते. त्यांनी त्या प्रकल्पातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला. सोबतच गणितीय व तार्किक दृष्टिकोनातून त्यांनी पुढील प्रकल्पाचा विचार करण्यास सुरुवात केली. वॉन नॉयमन यांचे इनिॲक प्रकल्पात आगमन झाले त्याच्या आसपासच संगणकाच्या आत अज्ञावली (Program) साठवण्याची संकल्पना पुढे आली. ती एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना होती. यामुळे एका बाजूला संगणकाची गती वाढीस लागली, तर दुसर्या बाजूला इलेक्ट्रॉनिक भागांची आवश्यकता कमी झाली.\nजॉन वॉन नॉयमन आणि हर्मन गोल्डस्टाईन\nभविष्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पाचे नाव ‘इलेक्ट्रॉनिक डिस्क्रिट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कंम्प्युटर’ म्हणजेच ‘एडवॅक’ असे निश्चित करण्यात आले. एकर्ट व मॉकली हे पुढील प्रकल्पाकडे ज्या दृष्टीकोनातून पहात होते, त्याहून वॉन नॉयमन व गोल्डस्टाईन यांचा दृष्टीकोन काहीसा निराळा होता. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n३९. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : आयबीएम अकांऊंटिंग मशिन : थॉमस जे. वॉटसन\n१२. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : आर्किमिडीज आणि सेरेक्यूज\n७३. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग २\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/10/17/poha-chivada/", "date_download": "2019-03-25T07:24:46Z", "digest": "sha1:EGQXSQSL36BRQRFTCTG43HOX7Y4YSQSE", "length": 8130, "nlines": 160, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Roasted Poha Chivada | My Family Recipes", "raw_content": "\nRoasted Poha Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा)\nPoha Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा )\nRoasted Poha Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा)\nपातळ पोह्यांचा चिवडा मराठी\nसाहित्य (अंदाजे १ किलो चिवड्यासाठी)\nपातळ पोहे / नायलॉन पोहे अर्धा किलो\nकच्चे शेंगदाणे २०० ग्राम\nखोबरे १०० ग्राम पातळ काप करून\nहिरव्या मिरच्या ५० ग्राम मध्यम आकाराचे तुकडे करून\nपिठीसाखर २ टेबलस्पून (ऐच्छिक – पण घातली तर चिवडा टेस्टी होतो)\nकाजू २५–३० तुकडे करून (हवे तेवढे घाला )\nबेदाणे (किसमिस) २५–३० (हवे तेवढे घाला )\n१. मोठ्या पातेल्यात पोहे तेल न घालता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. सगळे पोहे एकदम होत नसतील तर २–३ वेळा थोडे थोडे भाजा. भाजल्यावर कागदावर पसरून ठेवा म्हणजे वाफ धरणार नाही.\n२. कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि कागदावर पसरून ठेवा.\n३. पातेल्यात तेल घालून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घाला. मध्यम गॅसवर मिरच्या काळ्या होईपर्यंत ढवळत राहा.\n४. आता शेंगदाणे घाला. शेंगदाणे तपकिरी झाले की खोबऱ्याचे तुकडे घाला. मधे मधे ढवळत राहा.\n५. खोबरे तपकिरी झाले की काजूचे तुकडे आणि बेदाणे घाला. मधे मधे ढवळत राहा.\n६. बेदाणे फुलून आले की तीळ, हिंग, हळद, डाळं आणि मीठ घालून मिक्स करा. आणि गॅस बंद करा.\n७. थोडे थोडे पोहे घालून मिक्स करा. कुरमुरे घालून मिक्स करा. पिठीसाखर घालून मिक्स करा.\n८. चव घेऊन मीठ, साखर हवी असेल तर घाला आणि मिक्स करा.\n९. टेस्टी चिवडा तयार आहे.\n१०. गार झाल्यावर हवाबंद बरणी / डब्यात भरून ठेवा. चिवडा १५–२० दिवस टिकतो (पण बहुतेक वेळा त्याआधीच संपतो)\nPoha Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "http://www.resultshub.net/2014/11/zp-yavatmal-recruitment-written-exam.html", "date_download": "2019-03-25T07:49:50Z", "digest": "sha1:VKPPG6HLEROJQDLGZV6V7FOG7SQXXLYT", "length": 21327, "nlines": 278, "source_domain": "www.resultshub.net", "title": "ZP Yavatmal Recruitment Written Exam Cancelled ZP Yavatmal Recruitment Written Exam Cancelled - ResultsHub.net Place For All Results 2019", "raw_content": "\nजिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार संवर्गातील पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी घेतला.\nदरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी जिल्हाधिकार्यांची दुपारी तब्बल दीड तास चौकशी केली. पेपरफूटप्रकरणी जिल्हाधिकारी महिवाल यांनी परीक्षा रद्द केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यवतमाळ जिल्हा परिषदेतील चार संवर्गासाठी २ नोव्हेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर आपण स्वत: १ नोव्हेंबरला मध्यरात्री तयार केला. हा पेपर औरंगाबाद येथे फुटल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे ��ोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फॅक्सद्वारे दिली. याप्रकरणी मंगळवार दि. ३ नोव्हेंबरला औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात आले. त्यांनी आरोपींकडून जप्त केलेल्या उत्तरपत्रिकेची माहिती दिली. या प्रकरणासंदर्भात लेखी जबाबही घेतले. पोलिसांनी दिलेल्या उत्तरपत्रिकेशी विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता आणि तारतंत्री यांच्या उत्तरपत्रिका जुळत असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा निवड समितीच्या उत्तरपत्रिकेसोबत आरोपींजवळची उत्तरपत्रिका ७0 टक्के मिळतीजुळती असल्याचे आढळले आहे. मात्र पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली मूळ उत्तरपत्रिका दिलेली नाही. त्याची प्रत द्यावी, अशी लेखी मागणी आपण दुसर्यांदा करणार आहे.\nजिल्हा निवड समितीचा पेपर लिक झाल्याचे दिसून येते. जाहीर झालेल्या निकालामध्ये विस्तार अधिकारी संवर्गातील दोन विद्यार्थ्यांना २00 पैकी १६६ आणि १४२ असे गुण मिळाले आहेत. कनिष्ठ अभियंता या पदासाठी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ४५ टक्के म्हणजे २00 पैकी ९0 गुणही कुणी घेतलेले नाही. यावरून नेमका पेपर फुटला की नाही असाही संभ्रम निर्माण होतो. मात्र उत्तरपत्रिका मिळतीजुळती असल्याने ही परीक्षा रद्द केली आहे. उर्वरित १0 पदांसाठी असलेली परीक्षा ८ नोव्हेंबरपासून सुरळीत घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी महिवाल औरंगाबादमध्ये सीईओ असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तीने चुकीचा वापर केल्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता याबाबत तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, प्रभारी माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते.\nजिल्हा परिषद पदभरती प्रकरणातील पेपरफुटीचे तार जिल्हाधिकारी कार्यालयाशी जुळतात काय, याच्या चौकशीसाठी औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात तळ ठोकून आहे. या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या शासकीय निवासस्थानी जावून त्यांची तब्बल दीड तास चौकशी केली. तसेच जिल्हाधिकार्यांच्या दोन स्वीय सहायकांसह पाच जणांना औरंगाबाद येथे चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.\nदरम्यान, या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार लवकरच पोलिसांच्या जाळ्यात दिसतील, अशी माहिती औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.\nयवतमाळ जिल्हा परिषदेत विविध संवर्गासाठी पदभरती घेण्यात येत आहे. २ नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. मात्र औरंगाबाद येथे अटक झालेल्या ११ जणांच्या टोळक्यामुळे ही भरती प्रक्रियाच संशयाच्या भोवर्यात सापडली. या आरोपींजवळ उत्तर तालिका सापडल्या आहेत. दहा ते पंधरा लाख रुपयांमध्ये उमेदवारांना ही उत्तरतालिका परीक्षेपूर्वीच देण्यात आली.\nसुमारे ४0 जणांना ही उत्तर तालिका विकण्यात आल्याची कबुली अटकेतील विक्रीकर निरीक्षकासह ११ जणांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह आणि आर्थिक गुन्हे शाखेपुढे दिली. अद्याप या आरोपींनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव उघड केलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही परीक्षा प्रक्रिया राबविणार्या जिल्हा निवड समितीतील सदस्यांपैकी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या नेतृत्वातील पथक मंगळवारी सकाळी ११ वाजता यवतमाळात दाखल झाले.\nत्यांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या निवासस्थानी जावून त्यांची तब्बल दीड तास चौकशी केली. जिल्हाधिकारी महिवाल यांनी परीक्षा प्रक्रियेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.\n१ नोव्हेंबरला आपण स्वत: विविध संवर्गातील पदांच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या. या प्रश्नपत्रिका जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकार्याच्या कक्षात एका खासगी झेरॉक्स व्यावसायिकाकडून मशीन आणून पिंट्र काढल्या.\nत्यानंतर दोन स्वीय सहायक आणि शिपायांच्या मदतीने त्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या. त्यामुळे या घटनेत जिल्हा निवड समितीचा कुठलाही सहभाग नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सावंत यांनी ते दोन स्वीय सहायक, शिपाई आणि झेरॉक्स व्यावसायिक यांची नावे, मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला. तसेच या पाच जणांना चौकशीसाठी वेळोवेळी औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस बजावली.\nयवतमाळ जि.प.चा पदभरती पेपर पुन्हा फुटला | ZP Yeotm...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/4365-2/", "date_download": "2019-03-25T07:49:32Z", "digest": "sha1:W2KQLW3E7B4PJDJMD3EXM53KXFIZNCVD", "length": 6882, "nlines": 84, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "कलहात मी फुलांच्या . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nकलहात मी फुलांच्या . .\nवा. न. सरदेसाई March 18, 2018 मात्रावृत्तातील, गझल\nगण : | लक्षणे : गागाल गालगागा x २\nगण : गागाल गालगागा x २\n( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )\nकलहात मी फुलांच्या कोमेजणार होतो . .\nधोका नव्या ऋतूंना हा सांगणार होतो \nमज कल्पनाच नव्हती की , आज अवस आहे\nवेणीत चंद्र तुझिया मी माळणार होतो .\nका कायदा जगाचा मजला भिऊन गेला\nशपथेवरी खरे ते जर बोलणार होतो \nअद्याप त्या क्षणाचे उपकार मानतो मी . .\nते जिंकणार होते . . मी संपणार होतो \nधर्माविरुद्ध जाणे माझा स्वभाव नाही\nओल्यासही सुक्यासह मी जाळणार होतो .\nते दीप आरतीचे विझते न ऐनवेळी ,\nदारात वादळांना ओवाळणार होतो \nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chandrakant-patil-should-apologize-to-Marathi-people-says-Dhananjay-Munde/", "date_download": "2019-03-25T08:24:55Z", "digest": "sha1:43KJN7VMX5CIM3QUIBCZEZRM6UQSL7FS", "length": 5768, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चंद्रकांतदादांनी सीमावासीयांच्या पाठीत खंजीर खूपसला : मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › चंद्रकांतदादांनी सीमावासीयांच्या पाठीत खंजीर खूपसला : मुंडे\nचंद्रकांतदादांनी सीमावासीयांच्या पाठीत खंजीर खूपसला : मुंडे\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nबेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात एका मंदिराच्या उद् घाटन कार्यक्रमात कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महाराष्ट्रातून टीका सुरू झाली आहे. सीमाभागातील विविध संघटनांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nवाचा : चंद्रकांत पाटील गायले कर्नाटक स्तुती गीत; सीमाभागात संताप (Video)\nचंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री आहेत. त्यांनी आज, गोकाकमधील एका मंदिराच्या उद् घाटन कार्यक्रमास हजेरी लावली होती. त्यात त्यांनी एक कन्नड गीत गायले असून, जन्मावे तर कर्नाटकमध्येच, असा त्या गाण्याचा अर्थ आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे.\nट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणा-या चंद्रकांतदादा पाटील यांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी.\nमहाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणा-या @ChDadaPatil यांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी.\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T07:47:13Z", "digest": "sha1:EAFQWCZ2AX26EKAN4IXPQ7ILVR2OVL4T", "length": 7199, "nlines": 42, "source_domain": "vicharpravah.in", "title": "६५. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : गोल्डस्टाईन आणि नॉयमन यांची भेट - विचारप्रवाह", "raw_content": "\n६५. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : गोल्डस्टाईन आणि नॉयमन यांची भेट\n१९४४च्या उन्हाळ्यात हर्मन गोल्डस्टाईन एकदा फिलाडेल्फियाला जाणार्या रेल्वेची वाट पहात प्लॅटफॉर्मवर उभे होते. तिथे त्यांची जॉन वॉन नॉयमन यांच्याशी अगदी योगायोगाने भेट झाली. वॉन नॉयमन हे एक अत्यंत प्रख्यात गणितज्ञ होते. निरनिराळ्या क्षेत्रांत आपली छाप पडावी असा त्यांना मनोमन वाटत असे. त्यांनी क्वांटम मेकॅनिक्सशी निगडित मूलभूत गणिताची मांडणी केली होती. त्यामुळे सबंध जगात त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते. प्रिन्स्टन येथे अल्बर्ट आईन्स्टाईन व इतर काही विख्यात गणितज्ञ त्यांचे सहकारी होते. वॉन नॉयमन मूळतः हंगेरीहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. परंतु तरीही अमेरिकेच्या सरकारी व्यवस्थेत त्यांना मोठा मान होता. अनेक युद्धकालीन प्रकल्पांवर त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एकंदरितच जॉन वॉन नॉयमन यांचे व्यक्तीमत्त्व मोठे होते. त्यामुळे त्यांची अशी अनपेक्षित भेट झाल्याने गोल्डस्टाईन अगदी भारावून गेले.\nहर्मन गोल्डस्टाईन आणि जॉन वॉन नॉयमन\nगोल्डस्टाईन आणि वॉन नॉयमन यांच्यात सहज म्हणून गप्पा सुरु झाल्या. वॉन नॉयमन यांचे बोलणे मनमिळाऊ होते. बोलता बोलता त्यांनी गोल्डस्टाईन यांना त्यांच्या कामाबद्दल विचारले. गोल्डस्टाईन यांनी आपण एका वेगवान इलेक्ट्रॉनिक संगणकावर काम करत असल्याचे त्यांना सांगितले. वॉन नॉयमन यांना त्या विष��ात रुची वाटली. कारण ते त्यावेळी अणूबाँब प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम करत होते आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने त्यांना अशाप्रकारचा वेगवान संगणक गरजेचा वाटत होता. अणूबाँबचा प्रकल्प गुप्त असल्याने गोल्डस्टाईन यांना त्यावेळी त्याबाबत काही कल्पना नव्हती. वॉन नॉयमन यांनी गोल्डस्टाईन यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक संगणकाबाबत अधिक माहिती घेतली. तेंव्हा गोल्डस्टाईन यांनी वॉन नॉयमन यांची इनिॲक प्रकल्पासाठी भेट सुनिश्चित केली.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n२१. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : ॲनॅलिटिकल इंजिन : भाग २\n२९. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : अरिदमॉमिटर\n१७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : पास्कलाईन\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/takali-dhokeshwar-someshwar-caves-caves-history-1582016/", "date_download": "2019-03-25T08:22:54Z", "digest": "sha1:G2JVRMQQQEKY5ZKUNC642UOLOQ7SJRAW", "length": 18256, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "takali dhokeshwar someshwar Caves Caves history | टाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nटाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर\nटाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर\nटाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा.\nनेहमीच्या ठरावीक पर्यटन स्थळांऐवजी काही तरी वेगळं पाहण्यासाठी कायमच वाट वाकडी करण्याची गरज नसते. कधी कधी महामार्गालगतच थोडं धुंडाळल्यास काही पुरातन ठेवा सापडू शकतो.\nअनेक वेळा प्रसिद्ध लेणी, मंदिरं यांबद्दल खूप लिहिलं जातं. प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीतदेखील त्यांचा समावेश असतो. पण, अनेकदा मुख्य मार्गाच्या आसपासची अशी अनेक ठिकाणं असतात त्याबद्दल फारसं काही ऐकायला मिळत नाही. अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वरची लेणी, सोमेश्वर मंदिर आणि जामगावचा किल्ला ही अशीच काही ऐतिहासिक ठिकाणं मुंबई-पुण्याहून एका दिवसातही व्यवस्थित पाहता येणारी. कल्याण-नगर रस्त्यावर नगरच्या अलीकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करून पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेणींपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणींपासून पाऊण उंचीवर मध्य युगात बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो. येथूनच पुरावशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात. पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या अलीकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरं आहेत. त्यावर दगडी फुलं कोरलेली आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरभ शिल्प असणार, पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं. लेणींच्या पायऱ्या चढताना नक्षीकाम केलेले दगड पायऱ्यांसाठी वापरलेले आढळतात.\nटाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे. लेणीत शिरताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या दारावर द्वारपालाचं शिल्प आहे. गाभाऱ्यात िपड आणि सभामंडपात नंदी आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदीही आणि सर्पशिळा येथे ठेवलेल्या आहेत. मुख्य ले��्याच्या बाजूला पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. फुलझाडांची लागवड करून परिसर सुशोभित केलेला आहे.\nटाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा. टाकळी ढोकेश्वर ते पारनेर अंतर २५ किलोमीटर आहे. पारनेरच्या पुढे चार किमीवर दोन ओढय़ांच्या संगमावर सोमेश्वर मंदिर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पराशर ऋषींची तपोभूमी होती असं स्थानिक लोक मानतात. या जागेत सध्या असलेल्या सोमेश्वर मंदिराचं बांधकाम मात्र मध्य युगात झालेलं असावं. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ओढय़ावर बांधलेला पुल ओलांडावा लागतो. येथे दोन्ही ओढय़ांवर बांधारे बांधून पाणी अडवलेलं आहे. येथून मंदिराचं होणारं प्रथमदर्शन आपल्याला या जागेच्या प्रेमात पाडतं. मंदिरासाठी या जागेची योजना ज्याने केली तो खरेच निसर्गप्रेमी रसिक माणूस असणार. मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर बांधलेला एक घुमट आहे. घुमटाखाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून गेल्यावर छोटासा काळोखी गाभारा आहे. त्यात िपड आहे. गाभाऱ्यात हवा खेळती राहावी यासाठी छताला झरोके केले आहेत. हे मंदिर खास ध्यानधारणा करण्यासाठी बांधलेलं असावं असं वाटतं. मुख्य मंदिर दगडात बांधलेलं आहे. मंदिराच्या भिंतींवर कोणत्याही प्रकारचं कोरीव काम किंवा मूर्ती नाहीत. मात्र मंदिराच्या परिसरात अनेक जीर्ण मूर्ती व्यवस्थित ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्या जुन्या मंदिराच्या असाव्यात. मंदिर पाहून परत पुलापाशी येऊन मंदिराच्या विरुद्ध दिशेला गेल्यास दगडात बांधलेली सुंदर पुष्कर्णी आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या कमानदार ओवऱ्या पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत हा परिसर नितांतसुंदर दिसतो.\nपारनेर तालुक्यातील या दोन ठिकाणांबरोबरच पारनेरपासून १२ किमीवर असलेला जामगावचा भुईकोट किल्ला आणि त्यातील महादजी िशदे यांचा वाडा पाहण्यासारखा आहे. िशदेंनी हा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान केलेला आहे. या वाडय़ात सध्या डीएड कॉलेज भरते. त्यामुळे व���डा आणि किल्ल्याचा परिसर अजूनही टिकून राहिलेला आहे.\nएक दिवसाच्या भटकंतीत काही तरी वेगळं पाहायचं असेल तर हा एक चांगला आणि उत्तम पर्याय म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.ncpcpharma.com/mr/", "date_download": "2019-03-25T07:37:57Z", "digest": "sha1:X7E4MDJR5AMVPSEEA6B5IBVGXWN4BIS7", "length": 6107, "nlines": 167, "source_domain": "www.ncpcpharma.com", "title": "उत्तर चीन फार्मास्युटिकल्स कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nआ म्ही काय करू शकतो\nनवीन तयार करणे सामान्य generics\nहृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली\nस्नायू आणि skeletal प्रणाली\nरक्त आणि Hematopoietic प्रणाली औषधे\nकेफलोस्पोरियम कारखाना NCPC Huamin पुरवठा करू शकता युरोपियन युनियन-GMP उत्पादने\nव्यावसायिक Penicillins कारखाना NCPC उत्तर सर्वोत्तम Penicillins उत्पादने सर्व पुरवठा करू शकता\nNCPC नवीन तयार करणे अशा विरोधी MRSA, ऑन्कॉलॉजी, Immunosuppressants आणि इ सामान्य generics पुरवठा करू शकता\nउत्तम औषध एक आवड\nकाम करण्यासाठी उत्तम जागा,\nकाळजी प्राप्त करण्यासाठी उत्तम जागा\nइंजेक्शन साठी Piperacillin सोडियम\nउत्तर चीन फार्मास्युटिकल कंपनी, लिमिटेड प्रथम पंचवार्षिक योजनेत की बांधकाम प्रकल्प, तो 1953 मध्ये तयार सुरु होता आणि 1958 मध्ये ऑपरेशन गेला 2014 च्या अखेरीस, NCPC गट 18 अब्ज युआन एकूण संपत्ती होती 20,000 हून जास्त कर्मचारी आणि 40 पेक्षा अधिक शाखा किंवा subsidiaries.Northbest फॅक्टरी, Huamin फॅक्टरी आणि 10 कणा उपक्र�� सर्वात मोठा 3 म्हणून नवीन तयार करणे फॅक्टरी करू शकता, NCPC गट संबंधित intermediates, API, औषधे पूर्ण पासून पूर्णपणे उत्पादन ओळी आहेत, , उच्च दर्जाचे पेनिसिलीन, केफलोस्पोरियम, आणि immunosuppressants आणि नॉन β-lactam प्रतिजैविक समावेश सामान्य जेनेरिक औषधे उत्पादन आता जगभरातील भागीदार आणि वितरक शोध करीत आहेत.\nअधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा किंवा नियोजित भेट नोंदवा\nपत्ता: No.388, Heping पूर्व रोड, शिजीयाझुआंग शहर, हेबेई प्रांत, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialAugust2017.html", "date_download": "2019-03-25T07:52:58Z", "digest": "sha1:6GUJZ5MMWSQSKQ4JWIGORVTGOKTW7NGD", "length": 28878, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - ऊस शेतीस ठिबकचे अनुदान हा योग्य व क्रांतीकारी निर्णय !", "raw_content": "\nऊस शेतीस ठिबकचे अनुदान हा योग्य व क्रांतीकारी निर्णय \nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nगेल्या ५० वर्षपासून महाराष्ट्रामध्ये ऊस शेती ही सहकारी कारखान्यांमुळे अस्तित्वात आली व बहरू लागली. जसे काही खाजगी कारखाने होते. याच्या जोडीला महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रथम अस्तित्वात आणला आणि याचे आजपर्यंतचे काम अतिशय नियोजनबद्ध शेतकऱ्यांचे हित पाहून होत आहे. हा सहकारातील पहिला साखर कारखाना असल्याने पंडित नेहरूंना त्याची भुरळ पडली. मा. आण्णासाहेब शिंदे हे पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात होते. प्रथम ते पार्लमेंटरी सेक्रेटरी होते व नंतर कृषी राज्यमंत्री झाली. मा. आण्णासाहेब शिंदे हे काही काळ या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. तेव्हा पंडित नेहरूंनी या कारखान्याचे व्यवस्थापन पाहिजे आणि या धर्तीवर उत्तरप्रदेशमध्ये साखर कारखाने व्हावे असे त्यांना वाटले. महाराष्ट्रामध्ये १९८० च्या काळात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात उदयास आले. १९८० ते २००० या काळात महाराष्ट्रातील धरणांची कामे वेगाने सुरू झाली. त्यामुळे उसाखालील क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढले. परंतु ऊस हे पीक पाण्याच्या दृष्टीने खादाड असले तरी त्याकाळात बागायती पीक म्हणून ऊस हे एकमेव पीक असल्याने व साखर कारखान्यांची त्याकाळात भावाची हमी असल्याने तसेच त्���ाकाळात रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड सुरू झाली नसल्याने उसाचे क्षेत्र वाढले. म्हणजे प्रथमावस्थेत १९६५ ते ८० च्या काळात ज्या ठिकाणी पाण्याची भरपूर उपलब्धता होती उदा. सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यामध्ये उसाखालील क्षेत्र वाढू लागले. येथे आडसाली (१५ ते १८ महिने पिकाचा काळ) उसाचे उत्पादन जास्त येत असल्याने आणि ही लागवड पावसाळ्यात मान्सून सुरुवातीस होत असल्याने याचे उत्पादन ८० ते १०० टनापर्यंत मिळत होते. त्यामुळे या आडसाली उसाची लागवड प्रसिद्ध व प्रचलित झाली. परंतु याला पाणी जास्त लागत असल्याने व पुढील काळात महाराष्ट्रातीला अनेक जिल्ह्यामध्ये द्राक्षाची निर्यातीकरीता लागवड वाढल्याने व त्या बाग अधिक काळ जमिनीत राहत असल्याने याची पाण्याची मागणी वाढली. द्राक्ष बागेमध्ये ठिबक सिंचन लवकर आले. द्राक्ष पिकानंतर डाळींब या पिकाला मागणी येऊ लागली. डाळींब हे हलक्या, मुरमाड जमिनीत, उष्ण कटीबंधात कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने सोलापूर या दुष्काळी भागात डाळींबाने चांगले पाय रोवले आणि डाळींबाचा फळबाग लागवड योजनेत व रोजगार हमी योजनेमध्ये समावेश झाल्याने शेतकऱ्यांचा कल डाळींब लागवडीकडे वाढला. येथे डाळींब लागवडीचे अंतर १०' x ७' ते १०' x १०' हे रूढ झाले. या फळबागांसाठी सुरुवातीला मायक्रो ट्युब ठिबक सिंचन योजना अतिशय प्रचलीत झाली. या काळात हातावर मोजण्याइतक्याच ठिबक सिंचनाच्या कंपन्या होत्या. याचे जे तंत्र होते ते रूढी परंपरागत होते. आधुनिक नव्हते. यामध्ये डाळींबाला हवे तेव्हा हवे तेवढे पाणी विविध अवस्थेत देऊन ते देशांतर्गत व निर्यात मार्केट हळुहळु विकसित होऊ लागले आणि जागतिक मार्केटमध्ये तसेच दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये, रमजान, मोहरमध्ये याला भाव मिळू लागले. भगव्यासारख्या जाती आल्याने हे पिक शेतकऱ्यांना अधिकच परवडू लागले व त्याचा प्रसार नंतर महाराष्ट्राच्या आसपासच्या उदा. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यात होऊ लागला. ठिबक योजनेला बऱ्यापैकी चालना मिळाली. डाळींबाला भाव चांगले मिळाल्याने त्याचे क्षेत्र वाढले. डाळींब पिकाला ठिबकद्वारे नियोजनबद्ध पाण्याचा वापर झाल्याने कमी पाण्यात अधिक क्षेत्र बागायती झाले. याच्या विरोधात १९६० साली आडसाली उसाखाली क्षेत्र होते तेथे ते क्षेत्र वाढत गेले व १५ ��े १८ महिने मोकाट आडमाप पाणी देऊन रासायनिक खतांचा वापर अपरिमित करून क्षेत्र व उत्पादन वाढले. परंतु ज्याप्रमाणत उसाचा कालावधी वाढला त्याप्रमाणत उत्पादन कमी - कमी होत गेले. कारण त्याकाळात उसाला पाट पाणी व नुसते रासायनिक खत दिले जात, ही पद्धत प्रचलित होती.\n१९८० साली द्राक्षाखालील क्षेत्र अनेक राज्यात व जिल्ह्यात झपाट्याने वाढले. येथे द्राक्षाला अधिक खर्च येत असल्याने द्राक्ष बागायतदारांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्याने व द्राक्षाला पाण्यापासून ते अनेक निविष्ठा, ठिबक नियोजनाचे विविध प्रकार व प्रयोगांमुळे खर्चाच्या प्रमाणात वाढ झाली आणि उत्पन्नही अधिक येऊ लागले. येथे पाण्याचा वापर मर्यादित झाल्याने द्राक्षाचे पीक अधिक काळ जमिनीत राहूनही द्राक्षाच्या जमिनी खराब झाल्या नाहीत. त्या १५ ते २० - २५ वर्षापर्यंत उत्पन्न देऊ लागल्या. त्यामुळे जगभर निर्यात वाढली. सांगली,सोलापूर पट्ट्यातील व काही प्रमाणत नाशिक भागातील द्राक्ष बागायतदरांनी द्राक्षाचे बेदाणे बनवून ते कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवून नंतर त्याला दसरा, दिवाळी, नाताळ या काळात बऱ्यापैकी भाव मिळू लागले. गेल्या दोन वर्षात द्राक्षाच्या गुणवत्तेमुळे निर्यात वधारली.\nपुढे आले, हळद, केळी, पपई अशा पिकांना ठिबकने पाणी देण्याचा प्रघात सुरू झाला आणि बागायती क्षेत्र वाढले. धरणे कमी पडू लागली म्हणून लघुपाटबंधारे, कोल्हापूर टाईप बंधारे आले. १९७० च्या काळात जिल्हावार साखर कारखान्यांचे पेव फुटू लागले. उसाची उत्पादकता न बघता क्षेत्रानुसार कारखाने वाढले आणि या कारखान्यांची भुक भागावी म्हणून ऊस लागवड क्षेत्रात अमर्यादीत वाढ झाली. कारखान्यांना ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत ऊस पुरावा म्हणून सुरू व पुर्व हंगामी (जानेवारी व ऑक्टोबर) ऊस लागवड प्रचलित झाली. इनलाईन ड्रिप, मायक्रोट्यूब या पद्धतीचा अवलंब करू लागले. उसाची ३ डोळे पेरे, २ डोळे पेरे व १ डोळा पेर पद्धत अनुभवातून आली पण यात ऊस वाया जात असे. जमातीत ऊस उगवून २ महिन्याचा होईपर्यंत खर्च व वेळ जात असे. त्या ऐवजी पुढे १ डोळा उसाची रोपे कोकोपीटमध्ये तयार करून दोन महिन्याची रोपे ६' x १' किंवा ६' x २' वर लावल्याने व त्याला जर्मिनेटर व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने वाढविल्याने वेळ, खर्च, नुकसान टळून उत्पादन, दर्जा, उत्पन्न अधिक येते हे हजारो शेतकऱ्यां���ी अनुभवले आहे. त्यासाठी उसावरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे पुस्तक सुधारित दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. तरी ते आपणास निश्चित मार्गदर्शक ठरेल.\nतिन्ही लागवड पद्धतीत ठिबक सिंचन हे मर्यादीत स्वरूपात प्रचलित झाले. कारण त्याला अनुदान तितकेसे नव्हते. फक्त सुखवस्तु बागायतदार होते ते स्वखर्चातून ठिबक बसवू लागले. अती पाणी व रासायनिक खतांचा वारेमाप वापर याने साखर उत्पादन व दर्जात घट आली . खर्च वाढल्याने खताचा पुरवठा व काही निविष्ठांचा पुरवठा कारखान्यांमार्फत होऊ लागला. नंतर ठिबक योजना कारखान्यांमार्फत २५% पासून ५०% पर्यंत अनुदान तत्वावर राबवली जाऊ लागली. परंतु इतर काही राज्यात ठिबकचा फायदा लक्षात घेऊन तेथे ७५% पासून १००% पर्यंत अनुदान दिल्याने ते शेतकरी अधिक उत्पादन काढू लागले. पाण्याचा योग्य वापर होऊन उत्पादन, दर्जा, रिकव्हरी वाढली. त्यामुळे ठिबक खाली ऊस घेतला तर खर्चात बचत होऊन मशागतीचा खर्च वाचतो. गवत काढणीचा खर्च कमी होतो, रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे ठिबकला बागायती जमिनीत एक जमेची बाजू झाली. परंतु सर्वकषपणे पीक पद्धती, हवामानातील २० वर्षामध्ये झपाट्याने होणारे बदल याचा विपरीत परिणाम यामुळे शेती उत्पादन ३० ते ४०% वर आले. कोरडवाहू शेतकरी कंगाल झाला. कारण बागायती शेतीत ९०% पाणी वापर झाल्याने फक्त १०% पाणी कोरडवाहूला राहिले व त्यामुळे कोरडवाहू शेती आतबट्ट्याचा ठरली. त्यामुळे ऊस शेतीसाठी ठिबक योजना ही सरकारला इच्छा असुनही अवलंब करता आली नाही. कारण सततच्या दुष्काळाने नापिकी, आस्मानी गारपिटीने हाता - तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्ज फेडण्यासाठी सावकारांनी, बँकांनी लावलेल्या तगाड्यांमुळे आत्महत्या वाढल्या. त्यामुळे कृषी नियोजन हे पुर्णपणे कोलमडले. परंतु परिस्थितीच अशी झाली की ठिबकचा योग्य वापर करून अधिक दर्जेदार उत्पादन मिळून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील म्हणून सरकारने अनुभवातून उसासाठी २५% अनुदान देणे हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु हे अनुदान अपूर्ण पडत असल्याने २५% हून ते ५०% करावे व शेतकरी हा कर्जबाजारी असल्याने राहिलेले ५०% अनुदान साखर कारखान्यांकडे वर्ग करावे आणि ती रक्कम शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांकडे गेल्यावर २ ते ४ वर्षात बीनव्याजी कापून घ्यावी. म्हणजे १००% उसाखा���ील शेती ही ठिबकखाली येईल. निविष्ठांचा खर्च कमी होईल. जमिनी खराब होणार नाहीत. मशागतीचा खर्च वाचेल. व ती पिकाला वेळेत उपलब्ध होतील. हे करत असताना सेंद्रिय खतांचा व हिरवळीच्या खतांचा वापर करावा. म्हणजे जमिनीत पोकळी वाढल्याने जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपिकता वाढेल. म्हणून हा पॅटर्न उसासह इतर फळबागांमधील पिकांमध्ये राबवावा. म्हणजे उत्पादन खर्च कमी होऊन ४ ते ६ महिन्यात येणारी फळपिके कलिंगड, खरबुज तसेच फळभाजी पिके टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी अशा पिकांचे उत्पादन वाढवावे. याला देशांतर्गत मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे. मागणीनुसार पीक उत्पादन करण्याचे वेळापत्रक (Cycle) ठरवून पिकांचे नियोजन करावे आणि बागायती पिकांबरोबर गळीत पिके तीळ, भुईमूग, करडई, सुर्यफुल तसेच सोयाबीन सारखे तेल व प्रथिने देणाऱ्या आणि जैविक सुपिकता वाढवणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी कल वाढवावा. या सर्व पिकांसाठी आपण खरीप, रब्बी, उन्हाळी व सर्व बागायती पिकांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा ( डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा) योग्य वापर करावा.\nउसाच्या पुर्ण वाढीच्या कालावधीत १० हजार घनमीटर प्रती एकरी एवढी पाण्याची आवश्यकता असते. तेच ठिबक सिंचनाच्या वापराने प्रति एकरी ३ ते ५ हजार घनमिटर पाण्याची बचत शक्य आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस पिकाखाली सर्वसाधारण ९ लाख ४२ हजार हेक्तर क्षेत्रात आहे. त्यापैकी सुमारे २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आहे. पाटपाण्यामुळे महाराष्ट्रात जेवढे पाणी उपलब्ध आहे त्याच्या ७०% पाणी हे एकटे ऊस घेते. त्यामानाने उत्पादन, दर्जा, उत्पन्न फारच कमी असल्याने शेतकऱ्याला तोटाच होत आहे. तेव्हा संपुर्ण क्षेत्र जर ठिबकखाली आले तर हे ७०% पाणी वाचेल आणि ठिबकमुळे ५०% पाण्याची बचत होऊन या १४०% पाण्यावर तिन्ही हंगामातील वागायती क्षेत्र वाढेल. त्याने फळबागा, फुलशेती, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, गळीत पिकांचे उत्पादन, दर्जा वाढून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल.\nउसाखालील क्षेत्र वाढले तरी आवश्यक तेवढेच कारखाने काढावेत. जिल्हावार ४ - ५ च कारखाने असावेत. साखर निर्मितीबरोबरच प्रेसमड केक, स्पिरीट, अल्कोहोल, इथेनॉल व उपयुक्त कमी खर्चात प्रभावी अशी (Generic) औषधे अशी साखळी उत्पादने निर्माण करावीत. विजनिर्मितीची सहयोजना याला चालना मिळेल असे अनेक उद्योग तयार होत��ल. म्हणजे ऊस शेतीचे मुल्यवर्धन होईल व खऱ्या अर्थाने ऊस शेती बहरेल. उसाच्या चोयट्यांपासून हार्डबोर्ड तयार होतील. यासाठी प्रक्रिया उद्योग व जेनेरिक औषधांतून मुल्यवर्धन करण्यासाठी स्वतंत्र संशोधन संस्था, मानवी कौशल्य विकास संस्था निर्माण कराव्यात. याचा विचार सेवाभावी संस्थांनी, सरकारने करावा. सातारचा व कोल्हापूरचा गूळ जगभर प्रसिद्ध आहे. तेथे सेंद्रिय गूळ निर्मिती चालू ठेवावी. गूळ निर्मितीत विविध पदार्थ व मुल्यवर्धनात्मक प्रक्रिया पदार्थ करावेत. त्यांना जर्मनी, युरोप, अमेरिका, चीन, आस्ट्रेलिया, जपान अशी जगभर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशा रितीने ऊस शेती ही समृद्धीची पहात आणेल. अशाच प्रकारची योजना इतर १०० पिकांत राबवावी. शेततळ्याचा प्रयोग हा आणीबाणी म्हणूनच वापरता येईल. पारंपरिक पद्धतीने पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. परंतु हे तळ्यात पाणी झिरपू नये म्हणून तळाला प्लॅस्टीक पेपर टाकला जातो. त्या पाण्याचा १००% वापर होतो. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल जाते. तेव्हा पाणी पातळी वाढीसाठी ओढे, नाले, छोटे बंधारे, धरणे यातील गाळ काढून त्यांचे खोलीकरण करून सबलीकरण करणे म्हणजे जमिनीतील पाणी पातळी वाढेल. त्यामुळे १० ते १२ महिन्यापर्यंत बोअर, विहीरींना पाणी राहील आणि नवीन विहिरी खोदण्याचा खर्च वाचेल आणि टँकर संस्कृतीला आळा बसेल.\nमुल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग यालासुद्धा सरकारने प्रामुख्याने सवलत दिली तर कौशल्य विकास, उद्यमशिलता, उद्योगधंदे निर्मिती, रोजगार योजना, रोजगारीचे सबलीकरण होऊन एकूण उत्पादन खर्च कमी होऊन सर्वांना रोजगार मिळून देशाची समृद्धी वाढेल.\n'ब्रिटिश टाईप मेथड' अवलंबू नका. कारण शेतकरी जेव्हा संप, आंदोलन करतील तेव्हा हे करू नका. आपल्या व्यवस्थेनुसार उद्याची गरज काय आहे याची पुर्तता वेळीच केली तर वेळ वाया जाणार नाही. समृद्धी येईल. असंतोष निर्माण होणार नाही. सर्व गोष्टी वेळेत पुरविल्याने माणसांचे कामाचे तास कारणी लागतील. उत्पादकता वाढेल. उत्पादन खर्च कमी होईल. आवश्यक त्या गोष्टी निर्माण होतील आणि संप, मोर्चा, आंदोलने, आत्महत्या याला पुर्णविराम मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2019-03-25T07:30:06Z", "digest": "sha1:2F4VOBCOGJSSX7GIBOI7NDJMXGDQRBAK", "length": 5480, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:प्रतिपालक - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nप्रतिपालक हे सदस्य आहेत ज्यांना सर्व विकिमीडिया प्रकल्पात प्रवेश आहे.\nपूर्ण माहितीकरिता Stewards पहा.\nतक्रार नोंद करण्यास Stewards' noticeboard वापरा.\nविकिपीडिया प्रचालकांच्यापुढे विकिपीडिया अधिकारी(प्रशासक/Bureaucrats) पुढे विकिपीडिया प्रतिपालक(Steward) अशी पदावली असते.\nविकिपीडिया:प्रतिपालकांनी नियूक्त केलेले प्रबंधक\nविकिपीडिया:सध्या कार्यशील नसलेले प्रबंधक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०१९ रोजी १९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/200-firefighters-battle-massive-blaze-london-high-rise-52505", "date_download": "2019-03-25T08:55:38Z", "digest": "sha1:P44MTVGHMH5UJXB566YEWXL2KEGMWJI7", "length": 12397, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "200 Firefighters Battle Massive Blaze At London High-Rise VIDEO: लंडनमध्ये अग्नितांडव; किमान सहा मृत्युमुखी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nVIDEO: लंडनमध्ये अग्नितांडव; किमान सहा मृत्युमुखी\nबुधवार, 14 जून 2017\nरहिवाशी भागात ही आग लागल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आग लागलेली ग्रीनफेल टॉवर ही इमारत 1974 मध्ये उभारण्यात आली होती.\nलंडन - पश्चिम लंडनमधील ग्रीनफेल टॉवर या 27 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये सहा नागरिक मृत्युमुखी पडल्याचे निश्चित झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या आगीमुळे अक्षरश: हादरून गेल्याची प्रतिक्रिया लंडने महापौर सादिक खान यांनी व्यक्त केली आहे. या आगीत अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या 40 गाड्या आणि 200 जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.\nया इमारतीत एकूण 120 फ्लॅट असून, जवळपास सर्व इमारत जळून खाक झाली आहे. दुसऱ्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. स्थानिक वेळेनुसार आज (बुधवार) पहाटे दीडच्या सुमारास इमारतीला आग लागली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आग अटोक्यात आली नसून, अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.\nआग वाढतच चालली असून, ही आग इतकी मोठी आहे की आगीमुळे इमारत कलल्याची माहिती मिळत आहे. रहिवाशी भागात ही आग लागल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आग लागलेली ग्रीनफेल टॉवर ही इमारत 1974 मध्ये उभारण्यात आली होती.\nशिवाजीनगरवासींच्या त्रासाला सत्तेतील भाजपच जबाबदार : गुलाबराव देवकर\nजळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत....\nLoksabha 2019 : रावेर लोकसभेतून संतोष चौधरींची माघार\nभुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा...\nचार वर्षीय बालकाचा आगीत होरपळून मृत्यू\nनेरळ (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील एका चार वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाला. बंद असलेल्या गाडीने अचानक पेट घेतला....\nपन्हाळा - पावनगड परिसरात बिबट्याचा वावर (व्हिडिओ)\nपन्हाळा - पन्हाळगडाशेजारच्या पावनगड परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर लगेच सोशल मीडियावर पन्हाळ्यात ‘ब्लॅक पॅंथर’ आल्याची पोस्ट...\nअकोल्यात घराला भीषण आग; घरासह गोठा जळून खाक\nचतारी (अकोला) : पातूर तालुक्यातील सस्ती येथे राजेंद्र सदाशिव यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता.२१) दुपारी ४ वाजताच्या...\nवीज वितरणाच्या कार्यालयाला शॉर्टसर्कीटमुळे आग\nसोयगाव : येथील वीज वितरणच्या पारेषण विभागाच्या कार्यालयातील 132 वीज केंद्रात अचानक उच्च दाबाच्या वाहिनीमध्ये वीज तारांच्या घर्षणात शॉर्ट सर्किट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/ncp-will-show-strength-says-nimkar-140192", "date_download": "2019-03-25T08:23:03Z", "digest": "sha1:J4V3WQFLN53SYZLBEIQIXVP2TBEU6HTH", "length": 13706, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP will show strength says Nimkar राष्ट्रवादीची ताकत दाखवू- निमकर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nराष्ट्रवादीची ताकत दाखवू- निमकर\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nशासनाच्या हेकेखोर धोरणामुळे चहुकडे संतापच संताप आहे. शेतकरी, बेरोजगार, व्यावसायीक सारेच त्रस्त आहेत. करोडो तरूणांना रोजगार देण्याचा वादा करणारे हे फसवे सरकार आहे.\nगोंडपिपरी- शासनाच्या हेकेखोर धोरणामुळे चहुकडे संतापच संताप आहे. शेतकरी, बेरोजगार, व्यावसायीक सारेच त्रस्त आहेत. करोडो तरूणांना रोजगार देण्याचा वादा करणारे हे फसवे सरकार आहे.\nदेशात राज्यात अराजकता माजल्यासारखीच स्थिती आहे. अशा सरकारविरोधात हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस 5 सप्टेंबर रोजी राजुऱ्यामध्ये आपली ताकद दाखवेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव सुदर्शन निमकर यांनी दिला.\nगोंडपिपरी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा काल (ता.27) घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 5 तारखेला राजूरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळी, उपस्थित असणार आहेत. या मोर्चाला नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी निमकर क्षेत्र पिंजून काढीत आहेत. आज गोंडपिपरीत त्यांनी मेळावा घेतला.\nकेशवराव ठाकरे, मनोज धानोरकर, सूरज माडूरवार, नितेश मेश्राम, कुणाल गायकवाड, शामा चौधरी, शंकर उपासे, मारोती झाड़े, सुधाकर गौरकर, रमेश बोरकुटे, पुरषोत्तम हिंगाने, मारोती भोयर, विलास कुट्टरमारे, बाबूराव बोंडे, अशोक चन्देकर, प्रणय उमरे, अजय उमरे, केतन भोयर, समीर शेख, मयूर पोहनकर, सुरेश भसारकर, आकाश कुलमेथे, विलास सुर, सन्तोष धोडरे अादींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी, नीतिन भटरकर यांच्या मार्गदर्शनात, सूरज माडूरवार यांच्या नेतृतवात गोंड़पिपरी येथील समीर शेख, झाकिर शेक, सोनू मेश्राम, पंकज सोयाम, केतन भोयर, नैतेश मेश्राम यांनी केला प्रवेश केला.\nLoksabha 2019 : तोफखाना सज्ज; बंदुकाही रोखल्या\nमोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या...\nLoksabha 2019: चौकीदारीची उठाठेव (श्रीराम पवार)\nप्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो...\nLoksabha 2019 : भाजप-सेनेचे मंत्री जुमलेबाज : अशोक चव्हाण\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा...\nमहिला, मुलींमधील भय संपता संपेना\nपौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड,...\n'पराभूत झाल्यानंतर 'चौकीदारी'च करा'\nलखनौ : आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप पराभूतच होईल, निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर ते खुशाल चौकीदारी करू शकतात, पण आता सत्तेत असताना त्यांनी...\nLoksabha 2019 : तरुण नवमतदार ठरविणार खासदार\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदारांपैकी तिशीच्या आतील वयोगटातील तरुणांची संख्या साडेबारा लाखांहून अधिक आहे. त्यात १८ ते १९ वर्षे या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090228/main.htm", "date_download": "2019-03-25T08:16:03Z", "digest": "sha1:HMW27BDYKS2YFYU3MK2A6OGZALXWXDBH", "length": 19958, "nlines": 53, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\n‘सेलिब्रिटींना तिकीट देणार ��ाही’\nलोकसभा निवडणुकांबाबतचा निर्णय मनसे दोन दिवसांत घेणार - राज ठाकरे\nमुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष सेलिब्रिटींना निवडणुकीत उमेदवारी देण्याची धडपड करीत असले तरी मनसे मात्र अशा भाडय़ाच्या उमेदवारांना तिकीट देणार नाही, तर पक्षकार्यकर्त्यांनाच देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी आज केली. तसेच लोकसभा निवडणुकांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असेही राज यांनी स्पष्ट केले. पक्षातील सर्व संपर्कप्रमुखपदे रद्द करीत असल्याचा झटकाही राज यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला.\nपवारांची भलामण करीत आदिकांची काँग्रेसवर टीका\nमुंबई, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी\nशरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा व नंतर एकसंध झालेल्या काँग्रेस पक्षात पंतप्रधानपद पवारांकडे सोपवावे, अशी मागणी मंत्रीपद नाकारल्याने संतप्त झालेल्या गोविंदराव आदिक यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आज जाहीररीत्या केली. तसेच असा प्रयत्न न झाल्यास आपल्याला या दिशेने वाटचाल सुरू करावी लागेल, असे विधान करून काँग्रेस पक्षाला आपण रामराम करणार असल्याचेही जवळजवळ स्पष्ट केले.\nफेब्रुवारीतच पारा ४० अंशांजवळ\nया वेळचा उन्हाळा त्रासदायक ठरणार\nपुणे, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी\nफेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. परभणीत पारा ३९.८ अंशांवर गेला. त्यामुळे या उन्हाळय़ात उकाडा किती त्रासदायक ठरणार, याचीच उत्सुकता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहणार असल्याने असाच उकाडा सहन करावा लागणार आहे. राज्यातील सरासरी आकडे पाहिले तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ३४-३५ अंशांच्या आसपास असते. उन्हाळय़ात अतिशय उष्ण असणाऱ्या उत्तम महाराष्ट्रात किंवा विदर्भ-मराठवाडय़ातही फेब्रुवारी महिन्यात तापमान फारसे वाढत नाही.\nअरुण गवळी यांची ‘हत्ती’वर बसून दिल्लीस्वारी\n‘गली गली में एक ही शोर हाथी चला दिल्ली की ओर’ ही घोषणा बहुजन समाज पक्षात कांशीराम यांच्यापासूनच लोकप्रिय आहे. आता बहेन मायावती यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसविण्याच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी स्वत: अरुण गवळी उर्फ डॅडीच प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. या पराकाष्ठेचे बक्षिस त्यांना आगाऊच देण्यात आले आहे. मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची बसपाची उमेदवारी बसपाने डॅडींना बहाल केली आहे. बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास गरुड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, अरुण गवळी यांचा अखिल भारतीय सेना हा पक्षच बहुजन समाज पक्षात विलीन करण्याचे गवळी यांनी मान्य केले आहे.\n‘स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’चे संस्थापक टी. एन. शानभाग यांचे निधन\nमुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nसर्वसामान्य वाचक ते विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ पुस्तकप्रेमी आणि पुस्तके यांच्यातील लोकप्रिय दुवा असलेले स्ट्रॅण्ड बुक स्टॉलचे संस्थापक पद्मश्री टी. एन. शानभाग यांचे आज वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुस्तकांच्या दुकानाकडे शानभाग यांनी कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही. स्वत: शानभाग हे एक चांगले वाचक आणि साहित्यप्रेमी होते.\nबीएमएमच्या मराठीकरणाला अखेर मान्यता\nमुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nमुंबई विद्यापीठाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या ‘बॅचलर ऑफ मास मिडीया’ (बीएमएम) या इंग्रजाळलेल्या अभ्यासक्रमात महाराष्ट्र व मराठीशी संबंधित विषयांचा समावेश करण्याचा निर्णय आज विद्यापीठाच्या विद्वत परिषदेत घेण्यात आला. एवढेच नव्हे तर, मराठी भाषेतील स्वतंत्र आराखडय़ालाही विद्वत परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून मराठी भाषेतील अभ्यासक्रम विविध महाविद्यालयांतून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज योगायोगाने मराठी भाषादिनाच्या पाश्र्वभूमीवरच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील पदव्युत्तर पत्रकारिता विभागाचे प्रमुख संजय रानडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने ‘बीएमएम’चा सुधारीत मसुदा तयार केला आहे.\nपरीक्षा केंद्रांवर विजेची पर्यायी व्यवस्था करा\nमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या वेळी ज्या केंद्रांवर भारनियमनामुळे नियमित वीज पुरवठा उपलब्ध असणार नाही तेथे इन्व्हर्टर अथवा जनरेटर लावून विजेची पर्यायी व्यवस्था केली जावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. उच्च माध्य��िक परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली आहे तर शालान्त परीक्षा त्यानंतर मार्चमध्ये होणार आहे.\n१५ पैकी सहा मतदारसंघांवर उभय बाजूने दावा\nमुंबई, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी\nजागावाटपात काँग्रेस २७ व २१ तर राष्ट्रवादी निम्म्या जागांच्या मागणीवर ठाम असले तरी उभय बाजूने प्रत्यक्ष मतदारसंघनिहाय आजपासून चर्चा सुरू करण्यात आली. दुसऱ्या फेरीत १५ मतदारसंघांवर झालेल्या चर्चेत सहा मतदारसंघांवर उभय बाजूने दावा करण्यात आल्याने घोळ सुरूच राहिला. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी दोघेही एक पाऊल मागे घेतील अशीच एकूण चिन्हे आहेत.\nजागावाटपाच्या संख्याबळावरून काँग्रेस व राष्ट्रवादी माघार घेण्यास तयार नसल्याने गेले महिनाभर चर्चा पुढे सरकत नव्हती. त्यातच राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण तयार झाले होते. शेवटी राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार व प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसच्या वतीने ए. के. अॅन्टोनी व अहमद पटेल यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर राज्य पातळीवर जागावाटपाची बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुसरी फेरी आज रात्री पार पडली. राष्ट्रवादी २४ - २४ जागांच्या सूत्रावर ठाम असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने २७ व २१ जागांची मागणी कायम ठेवली. संख्याबळावर वाद न घालता प्रत्यक्ष मतदारसंघनिहाय चर्चा सुरू करण्यात आली. १ ते १५ मतदारसंघांवर आज चर्चा करण्यात आली.\nनंदुरबारची जागा १९६७ पासून सातत्याने काँग्रेसकडे असली तरी बदलत्या परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी राष्ट्रवादीकडून मागणी करण्यात आली. काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला. बुलढाण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनीही दावा केला. गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या तीन लोकसभा मतदारसंघांवर दोन्ही बाजूने दावा करण्यात आला. जळगावची जागा राष्ट्रवादीला तर रावेरची जागा काँग्रेसला सोडली जाईल. अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर या जागा काँग्रेसला तर भंडारा-गोंदिया ही जागा राष्ट्रवादीकडे राहणार आहेत. केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील यांच्या हिंगोली मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला. जा��ावाटपाची तिसरी फेरी येत्या सोमवारी मुंबईत होणार आहे.\nकसाबने सागरी मार्गाने भारतात प्रवेश केलाच नाही\nमुंबई हल्ल्यांच्या वेळी अजमल कसाब हा सागरी मार्गाने मुंबईत आल्याचा कोणताही पुरवा उपलब्ध नसल्याचे पाकिस्तानचे नौदलप्रमुख अॅडमिरल नोमान बशीर यांनी म्हटले आहे. दरम्यान, असे विधान करून पाकिस्तानी नौदलप्रमुखांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहारमंत्री रहमान मलीक यांनी दोन आठवडय़ांपूर्वी म्हटले होते की, मुंबईवरील हल्ल्यांची योजना काही प्रमाणात पाकिस्तानात आखली गेली होती. पण नौदलप्रमुखांच्या आजच्या वक्तव्याने पाकिस्तान पुन्हा एकदा मुंबई हल्ल्यातील आपला सहभाग नाकारण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. बशीर यांनी असाही दावा केला आहे की, आमच्या नौदलाची कडक सुरक्षा यंत्रणा भेदून पाकिस्तानी सागरी हद्द ओलांडणे या दहशतवाद्यांना अशक्य होते. दरम्यान, कसाबबाबत वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुराणी यांची उचलबांगडी केल्यानंतर झरदारी प्रशासनाने आता पाकिस्तानात मुंबई हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यातील विशेष सरकारी वकील सरदार महंमद गाझी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. कसाबला भारताने पाकिस्तानच्या ताब्यात द्यावे अशी विनंती पाकिस्तानने केली असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी गाझी यांनी केले होते. नंतर प्रशासनाला या विधानाचा इन्कार करावा लागला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_65.html", "date_download": "2019-03-25T07:45:01Z", "digest": "sha1:6J3HBXLZ7AOL7WOJXFS6DN672QX6KBIB", "length": 6555, "nlines": 129, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "त्या शिवाय कळत नाही ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nत्या शिवाय कळत नाही\nओढ म्हणजे काय ते जीव\n● प्रेम म्हणजे काय ते स्वतः\n● विरह म्हणजे काय ते प्रेमात\n● जिंकण म्हणजे काय ते\n● दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग\n● सुख म्हणजे काय ते दुसर्यांच्या हास्यात\n● समाधान म्हणजे काय ते आपल्���ात\n● मैत्री म्हणजे काय ते जीव\n● आपली माणस कोण ते\n● सत्य म्हणजे काय ते डोळे\n● उत्तर म्हणजे काय ते प्रश्न\n● जबाबदारी म्हणजे काय हे त्या\n● काळ म्हणजे काय हे तो निसटून\n● मृत्यू म्हणजे काय हे तो समोर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2019/03/01/mawa-cake/", "date_download": "2019-03-25T07:26:11Z", "digest": "sha1:JHRI46R2MCIC6CLWJ66VILW3SS2Y4FHA", "length": 8179, "nlines": 157, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Eggless Mawa Cake (एगलेस मावा केक) – Eggless Cake with Milk Solids | My Family Recipes", "raw_content": "\nएगलेस मावा केक मराठी\nग्रांट रोड च्या बी. मेरवान बेकरी चा मावा केक आम्हाला खूप आवडतो. पण अंड्याचा वास न आवडणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना त्या केकमध्ये अंड्याचा वास येतो. म्हणून मी अंडी न घालता मावा केक बनवते. चव मेरवान च्या केक सारखी पण अंड्याचा वास नाही. हा केक हलका, स्पॉन्जी नसतो तर मऊ आणि डेन्स असतो.\nबेकिंग पावडर दीड चमचा\nबटर / लोणी पाव कप\nवेलची पावडर अर्धा चमचा\nव्हॅनिला इसेन्स २–३ थेम्ब (नाही घातलं तरी चालतं कारण यात अंडी घालत नाहीत)\n१. मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र २–३ चाळून घ्या.\n२. एका बाउल मध्ये बटर हलकं होईपर्यंत फेटून घ्या.\n३. पिठीसाखर घालून परत फेटा.\n४. दही घालून परत फेटा.\n५. दूध आणि कुस्करलेला मावा घालून मिश्रण परत फेटा.\n६. ओव्हन १८० डिग्री ला गरम करून घ्या.\n७. एका वेळी २–३ चमचे मैदा घालून फेटत राहा. सगळा मैदा घालून मिश्रण फेटा.\n८. वेलची पावडर आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकत्र करा.\n९. तूप आणि मैदा लावलेल्या बेकिंग ट्रे मध्ये मिश्रण ओतून ट्रे २–३ वेळा हलकेच आपटून घ्या. मिश्रणातली हवेचे फुगे निघून जातील.\n१०. गरम ओव्हन मध्ये केक ५०–६० मिनिटं लालसर रंगावर भाजून घ्या. हा केक भाजायला बाकीच्या केक पेक्षा जास्त वेळ लागतो.\n११. केक मध्ये काडी घालून केक भाजला आहे का ते बघा. नस���ल तर आणखी थोडा वेळ भाजून घ्या.\n१२. गार झाल्यावर हव्या त्या आकाराचे तुकडे कापून स्वादिष्ट केक फस्त करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-March2017-Soyabin.html", "date_download": "2019-03-25T07:49:46Z", "digest": "sha1:POSUJHI423DKUTEJCE6G5OWRY4LLZPTM", "length": 6252, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - अती पावसातही अधिक, दर्जेदार सोयाबीन व तूर उत्पादन", "raw_content": "\nअती पावसातही अधिक, दर्जेदार सोयाबीन व तूर उत्पादन\nश्री. लक्ष्मणराव माणिकरावजी साखरकर, मु.पो.बेलोरा, ता.चांदुर बाजार जि. अमरावती - ४४४८०९, मो. ८८०६१७८८०५\nआमच्याकडे एकूण १० एकर जमीन आहे. त्यात आम्ही मागील वर्षी २८ जून २०१६ ला सोयाबीन व तूर १० एकरामध्ये ट्रॅक्टरने पेरणी केली. पाऊस भरपूर झाल्याने जमिनीत ओल असल्याकारणाने बियाणे ३ ते ४ दिवसातच उगवूण आल्याचे दिसू लागले, मात्र उगवण झाल्यावर वरचे पावसाचे पाणी भरपूर झाल्याने लहान सोयाबीन व तूर पिवळी पडू लागली होती. औषधे आणण्याकरीता मी प्रगती कृषी केंद्रमध्ये गेलो. तेथे माझी भेट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधींशी झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यांनतर त्यांना प्लॉट दाखविला व त्यांनी मला जर्मिनेटर + हार्मोनी + न्युट्राटोन + प्रिझम ची पहिली फवारणी करण्यास सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशीच फवारणी केली आणि तुरीला जर्मिनेटर + प्रिझमचे ड्रेंचिंग केली. तेथून ३ ते ४ दिवसांनी फरक जाणवू लागला. तेव्हापासून त्यांच्या सल्ल्यानुसार या दोन्ही पिकांना फवारण्या घेत आहे.\nफुले सुरू झाल्यावर पुन्हा प्रतिनिधींची भेट झाली व त्यांनी थ्राईवर + प्रिझम + जर्मिनेटर + प्रोफ्लेम ही औषधे फवारण्यास सांगितली. त्यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी स्प्रे केला व त्याचा फरक असा जाणवला की, फुले भरघोस लागली व फुलगळ न होता शेंगात (चलपात) रूपांतर होऊन शेंगा भरण्यास मदत झाली.\nत्यानंतर चलपात रूपांतर झाल्यावर त्यांनी पाणी द्यायला सांगितले व त्यावर पुन्हा न्युट्राटोन + प्रिझम + प्रोफ्लेम ही औषधे फवारण्यास सांगितले. त्यानुसार फवारणी केल्यावर पिकावरील अळी कमी होऊन शेंगा भरण्यास केल्यावर पिकावरील अळी कमी होऊन शेंगा भरण्यास मदत झाली. आम्हाला सोयाबीनचा एकरी १० क्विंटल उतारा मिळाला. शिवाय यावर्षी खर्च सुद्धा कमी आला. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. प्रतिनिधींच्या मार्गदर���शनाखाली चन्यालासुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे २ स्प्रे घेतले आहेत. चना घाटे भरण्याच्या तोंडावर आहे. खत काहीच न टाकता सुद्धा समाधानकारक पीक आहे. घाटे पोसण्यासाठी राईपनर + न्युट्राटोनच्या फवारण्या घेणार आहे. यावर्षी साहेबांच्या सांगण्यानुसार ३ एकर भुईमुगाला सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे. तुरीवर फक्त ३ स्प्रे घेतले आहेत. दरवर्षी आम्ही ५ स्प्रे घेत होतो पण यावर्षी ३ स्प्रेमध्ये तूर चांगल्याप्रकारे आली. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. मी अधिक माहितीकरीता 'कृषी विज्ञान' मासिक सुद्धा लावले आहे. त्यातून चांगली माहिती प्राप्त होत आहे. या सेवेकरिता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आभार मानतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/modi-government-approves-ten-percent-reservation-economically-backward-class-4088", "date_download": "2019-03-25T08:16:03Z", "digest": "sha1:XQUBBW7ZGIOJT666TZTHJXCOJ3D4QPT6", "length": 6717, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "modi government approves ten percent reservation to economically backward class | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १०% आरक्षण; आरक्षणाचा सर्वाधिक फायदा ब्राह्मणांनाच\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १०% आरक्षण; आरक्षणाचा सर्वाधिक फायदा ब्राह्मणांनाच\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १०% आरक्षण; आरक्षणाचा सर्वाधिक फायदा ब्राह्मणांनाच\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १०% आरक्षण; आरक्षणाचा सर्वाधिक फायदा ब्राह्मणांनाच\nसोमवार, 7 जानेवारी 2019\nआगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणावरून सरकार मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.\nआर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली असून, त्यासाठी आरक्षणाचा कोटा वाढवण्यासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्ती करणार आहे.\nआगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणावरून सरकार मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.\nआर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली असून, त्यासाठी आरक्षणाचा कोटा वाढवण्यासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्ती करणार आहे.\nकॅबिनेटने मंजुरी दिलेल्या निर्णयानुसार वार्षिक 8 लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या सवर्ण जातीतील व्यक्तींनी या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. अर्थात या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा ब्राह्मण समाजालाच होईल यात शंका नाही.\nमहाराष्ट्राचा विचार केला तर मराठा समाजाला यापूर्वीच आरक्षण मिळालंय. त्यामुळं सवर्णांना देण्यात येणाऱ्या या आरक्षणाचा लाभ सर्वाधिक प्रमाणात ब्राह्मण समाजालाच होणार आहे. त्यामुळं ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आरक्षणावरुन आणखी एक वाद पेटण्याची चिन्हं आहेत.\nलोकसभा आरक्षण सरकार government शिक्षण education घटना incidents उत्पन्न ब्राह्मण महाराष्ट्र maharashtra मराठा समाज maratha community\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-loan-waiver-amount-submitted-account-tomorrow-78258", "date_download": "2019-03-25T08:14:28Z", "digest": "sha1:FZCWOVBSQORDJCVB6WQWDTI7QE7IL5AO", "length": 16407, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Loan waiver amount submitted in account from tomorrow कर्जमाफीची रक्कम उद्यापासून होणार जमा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nकर्जमाफीची रक्कम उद्यापासून होणार जमा\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम सोमवार (ता. २३)पासून खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे व उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेकडे पात्र शेतकऱ्यांची यादी आज मागवली आहे. त्यानुसार जिल्हा बॅंकेतील यंत्रणा कामाला लागली.\nकोल्हापूर - शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम सोमवार (ता. २३)पासून खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे व उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेकडे पात्र शेतकऱ्यांची यादी आज मागवली आहे. त्यानुसार जिल्हा बॅंकेतील यंत्रणा कामाला लागली.\nशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५८५ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ह��� रक्कम थेट शेतकऱ्यांच्या नावावर जिल्हा बॅंकेत किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेत जमा केली जाणार आहे.\nजिल्ह्यातून २ लाख ७० हजार ५९० शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी अर्ज आले. या अर्जांपैकी १७ हजार ६२० शेतकऱ्यांना अपात्र ठरविले. २ लाख ५२ हजार ९७० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा बॅंकांत ५३ हजार २६२ थकबाकीदार आहेत. २२३ कोटी १७ लाखांची थकबाकीची रक्कम आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बॅंकांमधील ५४ हजार ७२९ थकबाकीदार आहेत. याचे ६५ कोटी १३ लाख रुपये थकीत आहेत. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील एकूण १ हजार ८४७ विकास कार्यकारी सहकारी संस्थांमधील २ लाख ५२ हजार ९७० सभासदांना मिळणार आहे.\nकर्जमाफीसाठी संस्था पातळीवर सभासद आणि कर्जनिहाय अर्ज ऑनलाईन भरले. शासनाने केलेल्या छाननीत कोल्हापुरातील १७ हजार ६२० शेतकरी कर्जमाफीला अपात्र ठरले. अपात्र ठरलेल्यांची यादी वगळून टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जात आहे. त्याच यादीनुसार कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा केली जाईल. दरम्यान, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची बॅंक व शाखानिहाय फोड करून ही रक्कम ज्या त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा केली जाईल. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी आज सुटीच्या दिवशीही कामाला\n१० हजारांपासून ते दीड लाख जमा होणार\nशासनाने पाठविलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांचे योग्य नियोजन झाले तर सोमवारपासून ज्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे; पण ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, सरकारी नोकरी आहे, खासगी, पण टॅक्स भरणारा कर्मचारी आहे, अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीला अपात्र ठरविले. तर, अटी-शर्थीत बसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर १० हजारांपासून दीड लाखांची रक्कम जमा केली जाईल. शासनाने याबाबतची माहिती देण्यासाठी आज जिल्हा निबंधक व जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेला माहिती कळविली.\nजिल्ह्यातील कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल. शासनाने मागितलेल्या सर्व माहितींची पूर्तता केली जात आहे. सोमवारपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते.\n- धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक.\nदोन हजार कोटींचे व्याज द्या\nसोलापूर - कर्जमाफीच्या माध्यमातू��� जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार १२५ कोटी रुपये वितरित करण्यात...\n'गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांगणाऱ्यांनी काहीच केले नाही'\nपाटोदा : या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक केली. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार...\nचाळीसगाव : पाच वर्षांत 94 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात’ सध्याच्या काळात शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी असेच चित्र दिसत आहे. चाळीसगाव तालुक्यात...\nसमाजकार्याचा वसा घेत होणार आयपीएस\nरोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद...\nLokSabha 2019 नोटाबंदीने बेरोजगारी वाढली\nअहमदाबाद (पीटीआय) : प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनावर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...\nपक्षाने मला माझी जागा दाखवली: नवज्योतसिंग सिद्धू\nचंदीगढ (पंजाब): काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोगा येथील रॅलीमध्ये पक्षाचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना बोलवण्यात न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sci-tech/100-times-faster-wifi-lifi-15763", "date_download": "2019-03-25T08:32:10Z", "digest": "sha1:HVW6WVXKM5AAQ757W6AFF3ZVEQLBQ6EE", "length": 13041, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "100 times faster than WiFi lifi वायफायपेक्षा 100पट वेगवान लायफाय | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nवायफायपेक्षा 100पट वेगवान लायफाय\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nवेगवान इंटरनेटसाठी वायफायचा वापर केला जातो. आता वायफाय पेक्षा तब्बल शंभरपट वेगवान \"लायफाय' हे वायरलेस इं���रनेट तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. इस्टोनियाची व्हेलमेन्नी ही कंपनी सध्या आपल्या कार्यालयामध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे.\nवेगवान इंटरनेटसाठी वायफायचा वापर केला जातो. आता वायफाय पेक्षा तब्बल शंभरपट वेगवान \"लायफाय' हे वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. इस्टोनियाची व्हेलमेन्नी ही कंपनी सध्या आपल्या कार्यालयामध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे.\nअत्यंत वेगाने चालूबंद होणाऱ्या एलईडी बल्बच्या साहाय्याने लायफाय काम करते. या आधुनिक तंत्रज्ञानातून एक जीबी प्रतिसेकंद या प्रचंड वेगाने माहिती पाठविता येते. पारंपरिक वायफाय तंत्रज्ञानापेक्षा हा वेग शंभर पटीने अधिक आहे. या वेगामुळे म्युझिक अल्बम, एचडी फिल्म्स आणि व्हिडिओ गेम्स काही सेकंदांत डाऊनलोड करता येतील. अर्थात, डाटा पाठविण्याच्या पद्धतीनुसार हा वेग कमीही होऊ शकतो. या अतिवेगवान तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा असून, ते प्रकाशावर अवलंबून असल्यामुळे भिंतीमधून प्रसारित होऊ शकत नाही.\n\"लायफाय'च्या प्रचंड वेगामुळे सध्याच्या तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या काही ऍप्लीकेशन्समध्येही मोठा फरक पडू शकतो. व्हेलमेन्नीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सोलंकी म्हणाले,\"\"येत्या तीन ते चार वर्षांमध्ये हे तंत्रज्ञान ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता त्याच्यामुळे वायफाय अडगळीत पडण्याची शक्यता नसून वायफायबरोबर इंटरनेटचा वेग आणि कार्य क्षमता वाढविण्यासाठी ते काम\n#WeCareForPune बंडगार्डन परिसरात पदपथावर अतिक्रमण\nपुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल...\n#WeCareForPune धोकादायक वीज पेटी हटवा\nकोथरुड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे मुख्य गेट जवळचे खांबावर हा वीज पेटी धोकादायक अवस्थेत आहे. तसेच कमी उंचीवर झाकण नसलेल्या अवस्थेत आहे. बॉक्समधील...\nLoksabha 2019 : शिरूरला हायटेक प्रचार\nमंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार...\nदृष्टिहीनांसाठी आता नोटा ओळखणे सोपे\nमुंबई : दृष्टिहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्या���, यासाठी रिझर्व्ह बॅंक मोबाईल ऍपची निर्मिती करणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने शुक्रवारी (...\nLoksabha 2019 : पार्थ विरुद्ध बारणेच\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या...\nमच्छीमारांची जाळी पाच महिने रिकामी\nमालवण - विनाशकारी एलईडी मासेमारीला बंदी असतानाही जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी तसेच हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे मासेमारी सुरू आहे. यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/fadnis-group-director-arrested-47372", "date_download": "2019-03-25T08:37:10Z", "digest": "sha1:YY4OBTGR6YI3XLSK244566N3OXRLBC4C", "length": 12096, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "fadnis group director arrested फडणीस ग्रुपच्या संचालिकेला अटक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nफडणीस ग्रुपच्या संचालिकेला अटक\nबुधवार, 24 मे 2017\nनाशिक - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी पुण्यातील फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर व फडणीस ग्रुपच्या संचालिका भाग्यश्री सचिन गुरव यांना काल (सोमवारी) पुण्यातून अटक करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना आज 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nनाशिक - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी पुण्यातील फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर व फडणीस ग्रुपच्या संचालिका भाग्यश्री सचिन गुरव यांना काल (सोमवारी) पुण्यातून अटक करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना आज 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nगेल्या महिन्यामध्ये ग्रुपचे मुख्य संचालक विनय फडणीस यांना मुंबईतून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 460 गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार फसवणुकीचा आकडा 17 कोटी 89 लाख रुपयांपर्यंत पोचला. आर्थिक ���ुन्हे शाखेने काल पुण्यातील फडणीस ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकून चौकशीदरम्यान भाग्यश्री गुरव यांना अटक केली. गुरव यांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना येत्या 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nजिवंत पत्नीला मृत दाखवून केले दुसरे लग्न\nनागपूर - जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावरून एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी मृत पावल्याची खोटी माहिती दुसऱ्या घटस्फोटित महिलेला देत तिच्याशी लग्न केले...\nदेशात यंदा अन्नधान्य उत्पादनात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी घट\nनाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी...\nमाजी आमदार पुत्राचा खून सिंगल बारच्या बंदुकीने\nबेळगाव - माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी यांचे पुत्र अरुण (वय ५३) यांचा खून सिंगल बारच्या बंदुकीने गोळी झाडून झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे...\nबाजारासाठी निवडणूक किती महत्त्वाची\nआता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना...\nचिमुरडीच्या डोळ्यादेखत बापाचा विहिरीत बुडून अंत\nसांगली - सुमारे सत्तर ते ऐंशी फूट खोल विहीर. रात्र झाल्याने विहिरीत काळाकभिन्न अंधार. दुपारी विहिरीत उतरलेलेले अनिल सुरगौंडा पाटील पाय घसरून पाण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/husband-murdered-wife-136974", "date_download": "2019-03-25T08:31:30Z", "digest": "sha1:VSCZNTFJBSGIPBMWOOLG55PUME37YHEW", "length": 13138, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "husband murdered wife गळा आवळून पत्नीचा खून; पतीला कोठडी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nगळा आवळून पत्नीचा खून; पतीला कोठडी\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nअमरावती : पत्नीला मारहाण करून तिचा गळा आवळूत खून केल्याची घटना अंजनगावसुर्जी तालुक्यात बोराळा गावात घडली. पोलिसांनी गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.\nअमरावती : पत्नीला मारहाण करून तिचा गळा आवळूत खून केल्याची घटना अंजनगावसुर्जी तालुक्यात बोराळा गावात घडली. पोलिसांनी गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.\nअवधूत रामभाऊ तायडे (वय 36; रा. बोराळा) असे अटक झालेल्या पतीचे नाव आहे. अंजनगावसुर्जी न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. 14) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. कविता अवधूत तायडे (वय 29) असे मृत महिलेचे नाव आहे. पती अवधूत हा व्यसनी होता. बुधवारी (ता. एक) सायंकाळी तो दारू पिऊन घरी आला. कविताला त्याने चहा करण्यास सांगून तिच्याशी वाद घातला. चहा करण्यास नकार देताच तिला त्याने जबर मारहाण केली. त्यातच गळा आवळल्याने कविताची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा गत गुरुवारी (ता. दोन) मृत्यू झाला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात कविताला जबर मारहाण झाली व तिचा गळा आवळला गेला, त्यामुळे गळ्याचे हाड तुटले. यातच तिचा मृत्यू झाल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे प्रदीप ज्ञानेश्वर मोहोड (वय 31; रा. बाभळी, दर्यापूर) यांनी अंजनगावसुर्जी ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याआधारे पती अवधूत तायडे याच्या विरुद्ध गुरुवारी (ता. नऊ) खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास अधिकाऱ्यांनी अवधूतला शुक्रवारी (ता. दहा) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\nमाजी आमदार पुत्राचा खून सिंगल बारच्या बंदुकीने\nबेळगाव - माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी यांचे पुत्र अरुण (वय ५३) यांचा खून सिंगल बारच्या बंदुकीने गोळी झाडून झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे...\nपरळीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा निर्घृणपणे खून\nपरळी वैजनाथ : शहरातील भीमवाडीभागातील माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड य���ंचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केल्याची...\nकोई मुर्गा नही काटेगा एैसा मेरे बच्चे के साथ हुवा है\nजळगाव - टोणगाव (ता. भडगाव) येथील बेपत्ता बब्बू सय्यद यांचा मुलगा इसम (वय ९) याच्या अपहरणानंतर खून करून मृतदेह शेतात फेकण्यात आल्याने खळबळ उडाली....\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nनागपूर - एकाच दिवसात दोन थरारक हत्याकांड घडल्याने उपराजधानी हादरली. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना उपराजधानीत गुंडांनी हैदोस घातल्यामुळे कायदा व...\nनेवरीत तरुणाचा भोसकून खून\nकडेगाव - नेवरी (ता. कडेगाव) येथील उमरकांचन वसाहतीमध्ये एका विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी राजेंद्र...\nपत्नीचा गळा आवळून शिरोळ तालुक्यात खून\nकुरुंदवाड - राजापूरवाडी (ता. शिरोळ) येथे नायलॉनच्या दोरीने गळा आवळून एकाने पत्नीचा खून केला. मंगल रमेश गायकवाड (वय ३८) असे मृत विवाहितेचे नाव आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-malnutrition-47993", "date_download": "2019-03-25T08:49:48Z", "digest": "sha1:CN6JRFLYCL7ISUZK2GHBLVNHUOV3OBWM", "length": 14132, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news vidarbha malnutrition उपराजधानीला कुपोषणाचा विळखा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nशुक्रवार, 26 मे 2017\nनागपूर - दुर्गम भागामध्ये हमखास आढळणाऱ्या कुपोषणाने ‘स्मार्ट’ होऊ घातलेल्या उपराजधानीलादेखील विळखा घातला आहे. शहरात वर्षागणिक कुपोषितांची संख्या वाढत असून, आजघडीला मध्यम प्रकारात मोडणाऱ्या कुपोषितांची संख्या २२ हजार ९९७, तर तीव्र कुपोषितांचा आकडा २ हजार ६७० इतका आहे.\nनागपूर - दुर्गम भागामध्ये हमखास आढळणाऱ्या कुपोषणाने ‘स्मार्ट’ होऊ घातलेल्या उपराजधानीलादेखील विळखा घातला आहे. शहरात वर्षागणिक कुपोषितांची संख्या वाढत असून, आजघडीला मध��यम प्रकारात मोडणाऱ्या कुपोषितांची संख्या २२ हजार ९९७, तर तीव्र कुपोषितांचा आकडा २ हजार ६७० इतका आहे.\nनागपूरप्रमाणेच अमरावती जिल्हादेखील कुपोषणाने पीडित आहे. कुपोषणबाबत नुकत्याच झालेल्या सर्वेनुसार नागपुरातील कुपोषितांचा आकडा वाढला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक संख्येने कुपोषित बालक शहरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यानुसार ही संख्या सुमारे ५ हजारांच्या घरात आहे. वर्षभरात १७ हजार व्यक्तींचा मृत्यू कुपोषणामुळे झाला. त्यात बालक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.\nशहरातील विविध वस्त्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण दिसून येत आहे. यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे म्हणणे आहे. प्रशासनाने तत्काळ आरोग्य केंद्रावर महिला आणि बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती करावी, केंद्रावर सकस आहार आणि आवश्यक त्या औषधांचा मुबलक पुरवठा करावा. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर माता आणि कुपोषित बालकांना त्यांचे नियमित वाटप करण्याची मागणी विदर्भ प्रदेश विकास परिषदेने केली आहे.\nशहरातील वाढलेल्या कुपोषणाबाबत महेमूद अन्सारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन दिले आहे. यामध्ये कुपोषणाची समस्या मुळासकट सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. याची गंभीर दखल घेत कुर्वे यांनी यंत्रणा लगेच कामाला लावण्यात येईल, असे आश्वासन दिले.\n\"जलयुक्त'चे 18 कोटी परत गेल्याची नामुष्की\nजळगाव ः जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाकडून जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीबरोबरच गेल्या वर्षी शासनाकडून सिंचनासाठीची आवश्यक कामे...\nसुमार बुद्धी आणि सवंगपणा यांचा जवळचा संबंध असतो. या वातावरणात परिपक्व आवाज दाबले जाऊन त्यांची गळचेपी होत असते. अशा वेळी कुणी सावधगिरीचा सल्ला दिला,...\n#WeCareForPune धोकादायक वीज पेटी हटवा\nकोथरुड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे मुख्य गेट जवळचे खांबावर हा वीज पेटी धोकादायक अवस्थेत आहे. तसेच कमी उंचीवर झाकण नसलेल्या अवस्थेत आहे. बॉक्समधील...\nपोलंडचे उच्चायुक्त, राजदूत उद्यापासून कोल्हापूर दौऱ्यावर\nकोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार ��णि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे, हे पाहण्यासाठी पोलंडचे...\nचाळीसगाव : अभोणे तांडावासीयांची पाण्यासाठी भटकंती\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे...\nतुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले\nकोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/salary-for-best-bus-workers-between-15th-of-the-month/articleshow/63291049.cms", "date_download": "2019-03-25T08:57:12Z", "digest": "sha1:FUBSN64FRMR4OXIXA3N5HV4D4EY4MXLD", "length": 12007, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "BEST bus: बेस्ट कामगारांना वेतन १५ तारखेच्या आत - salary for best bus workers between 15th of the month | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nबेस्ट कामगारांना वेतन १५ तारखेच्या आत\nबेस्टची आर्थिक स्थिती डबघाईला आली असल्याने कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेत मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठी बँकांवर अवलंबून असलेल्या बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेस वेतन देण्याची हमी घेतली आहे.\nबेस्ट कामगारांना वेतन १५ तारखेच्या आत\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nबेस्टची आर्थिक स्थिती डबघाईला आली असल्याने कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेत मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठी बँकांवर अवलंबून असलेल्या बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेस वेतन देण्याची हमी घेतली आहे.\nबेस्ट उपक्रमाने यापूर्वी १० तारखेस वेतन मिळेल, असे जाहीर केले होते. पण या महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन १० मार्च उलटून गेल्यानंतरही मिळालेले नाही. त्यावर बेस्ट समिती बैठकीत मांडल्या गेलेल्या तहकुबीवर प्रशासनाने १५ तारखेच्या आत वेतन देण्याची हमी दिली आहे. बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करताना निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या देणी शिल्लक असल्याचे नमूद करून सभा तहकुबीची सूचना मांडली. त्यास शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी समर्थन दिले. त्यावर बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दहा तारखेपर्यंत वेतन देण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासनाने १५ तारखेच्या आत वेतन देण्याची ग्वाही दिल्यानंतर तहकुबीची सूचना मागे घेण्यात आली.\nकोणत्याही प्रकारे खासगीकरण नाही\nबेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने बस येणार असल्याने बेस्टची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु उपक्रमाचे खासगीकरण होणार नसल्याचे स्पष्टीकरण बेस्ट समिती बैठकीत महाव्यवस्थापक बागडे यांनी दिले. बेस्टमधील एकाही कर्मचाऱ्यास नोकरीवरून कमी केले जाणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहनही महाव्यवस्थापकांनी केले.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nRanjitsinh Mohite-Patil: रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध...\nRaj Thackeray-Sharad Pawar: मुंबई: राज ठाकरे शरद पवार यांच्य...\nलोकसभा: सेनेची पहिली यादी जाहीर; सातारा, पालघरबाबत निर्णय ना...\nमुंबईः प्रवीण छेडा यांची भाजपत 'घरवापसी'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून न���टिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबेस्ट कामगारांना वेतन १५ तारखेच्या आत...\nबालमृत्यू रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2019-03-25T08:13:52Z", "digest": "sha1:X3262KWO5NQIBDIP324L5EZQ2VFK2BQA", "length": 5676, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५७० चे - ५८० चे - ५९० चे - ६०० चे - ६१० चे\nवर्षे: ५९५ - ५९६ - ५९७ - ५९८ - ५९९ - ६०० - ६०१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ५९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१५ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-breaking-news-bjp-amit-shah-press-conference-live-news-53311", "date_download": "2019-03-25T08:15:07Z", "digest": "sha1:CQ7TSSDPAKPWBHWELIBXUG64CDQ72DAD", "length": 20160, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai breaking news BJP Amit Shah press conference live news महाराष्ट्रात मध्यावधी झाली, तर लढू आणि जिंकूही : शहा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमहाराष्ट्रात मध्यावधी झाली, तर लढू आणि जिंकूही : शहा\nशनिवार, 17 जून 2017\nशहांची मुंबई वारी...पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे\nनरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत देशाला विश्वास दिला\nमहाराष्ट्र सरकार पाच वर्षे टिकेलच; मध्यावधी झाल्याच तर आम्ही लढू\nराष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवाराचे नाव सर्व मिळून ठरवू\nकाश्मीर प्रश्न सुटण्याच्या दिशेने सुरूवात\nशहांची मुंबई वारी...पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे\nनरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत देशाला विश्वास दिला\nमहाराष्ट्र सरकार पाच वर्षे टिकेलच; मध्यावधी झाल्याच तर आम्ही लढू\nराष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवाराचे नाव सर्व मिळून ठरवू\nकाश्मीर प्रश्न सुटण्याच्या दिशेने सुरूवात\nराजकारणात दोन वर्षे हा काही फार मोठा काळ नसतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हे पक्के ठावूक आहे. मुंबईत आज (शनिवार) शहा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याची थेट प्रचिती आली. दोन वर्षांवर असलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या आणि सुरू असलेली कामांची जंत्रीच शहा यांनी मांडली आणि भाजप येत्या लोकसभा निवडणुकीला याच बळावर सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.\nराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात शहा यांनी कोणतेही थेट विधान टाळले; त्याचवेळी 'महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर भाजप लढवेल आणि जिंकेल,' असे विधान त्यांनी केली. मात्र, 'महाराष्ट्र सरकारचे काम चांगले चालले आहे आणि ते सरकार पाच वर्षे टिकेल,' असेही शहा यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शहा म्हणाले, 'आमच्याकडे काही पर्याय आहेत. सहकारी पक्षांशी चर्चा करून, सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरवला जाईल.' शहा यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले. शिवसेनेने सुचविलेल्या नावांसंदर्भात विचारले असता, शहा यांनी हसत हसत प्रश्न बाजूला ठेवला आणि थेट उत्तर देणे टाळले. 'प्रत्येक नावाचा विचार करू,' असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने आधी उमेदवार जाहीर केला असता तर चालले नसते का, या प्रश्नावर ते म्हणाले, की आम्ही उमेदवार जाहीर केला, तर विरोधी पक्षांना ते नाव रुचेलच असे नाही.\nअमित शहा यांनी आज सकाळी केलेले ट्विट\nपरमवीर छत्रपति शिवाजी महाराज की जननी, राजमाता जीजाबाई का सारा जीवन साहस और त्याग से पूर्ण रहा, ऐसी महान वीरांगना को मेरा शत्-शत् नमन् | pic.twitter.com/O32hfTwWKj\nकाश्मीर प्रश्न पाच-सहा-सात महिन्यांत सुटणारा नाही, असे शहा यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. 'खूप वर्षांपासून चिघळलेला हा प्रश्न आहे. मात्र, आम्ही येत्या काही काळातच तो नियंत्रणात आणणार आहोत. त्याची सुरूवात झालेली आहे,' असे शहा यांनी सांगितले. सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण असताना पाकिस्तानशी त्रयस्थ ठिकाणीही क्रिकेट खेळणे योग्य आहे का, या प्रश्नावर शहा यांनी 'आंतरराष्ट्रीय सामने खेळावेच लागतील,' असे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन देवेंद्र फडणवीस सरकारने चांगल्या पद्धतीन�� हाताळले असल्याचे सर्टिफिकेटही शहा यांनी दिले.\nशहा यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामांचा पाढा वाचला. 'सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या सरकारने पाच कोटी गॅस सिलिंडर्स ग्रामीण भागात आणि महिलांना दिले. अर्थव्यवस्थेला आमच्या सरकारने वेग दिला. देशाविषयी जनतेची मानसिकता सजग केली. तीन वर्षांत भरघोस कामगिरी केली. आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही,' असे शहा यांनी सांगितले.\n'जीएसटीवर आतापर्यंत निव्वळ चर्चा होत होती. जीएसटी आम्ही प्रत्यक्षात आणले. देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. महिला, आदिवासी, गरीबांसाठी नव्या योजना आणल्या. वन रँक वन पेन्शन योजना आणली,' असेही त्यांनी सांगितले.\n'सर्जिकल स्ट्राईक'चा संदर्भ घेऊन शहा म्हणाले, 'देशाच्या राजकीय नेतृत्वाकडे असलेली दृढ इच्छाशक्ती आम्ही सर्जिकल स्ट्राईकमधून दाखवून दिली आहे.'\n■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या\nनगरजवळ 1 कोटींचा गांजा जप्त\nकुमार विश्वासांविरोधात 'आप' कार्यालयाबाहेर पोस्टर्स\nलग्नाच्या नाट्याची मनोरंजक कहाणी टी टी एम एम (तुझं तू माझं मी)\nपानसरे हत्या: 21 महिन्यांनी समीरला जामीन\nपुणे: उरूळीकांचनजवळ महिलेवर गाडीमध्ये सामुहिक बलात्कार\nलातूर जिल्ह्यात एटीएसचे छापासत्र; टेलिफोन एक्सेंजचा अड्डा उद्ध्वस्त\nकाश्मीर: बीजबेहरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला\nनाशिक: जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू\nमुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात\nइंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये\nसमर्थ नेतृवाच्या हाती देश असल्याने भाजपत 'इनकमिंग’ सुरू : आमदार खडसे\nभुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते...\nLoksabha 2019 : भाजप नेतेच म्हणतात, मी तर ब्राह्मण, चौकीदार नाही\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नावापुढे चोकीदार लावलेले नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी माझे नाव...\nआई अंबाबाई युतीची सत्ता येऊ दे, मोदी पंतप्रधान होऊ देत\nकोल्हापूर - \"आई अंबाबाई केंद्रात युतीची सत्ता येऊ दे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ देत.' अशी प्रार्थना आज मुख्यमंत्री दे���ेंद्र फडणवीस यांनी आज...\nमोदींना आणखी पाच वर्षे संधी द्या; माजी पंतप्रधानांच्या कन्येचे मत\nलातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. त्यांचे व्हिजन चांगले आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण आणखी एक टर्म...\nLoksabha 2019 : वारसदारांमध्ये प्रतिष्ठेची झुंज\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात दोन मातब्बर राजकारण्यांचे वारसदार विजयासाठी झुंजणार आहेत. सहकाराची पायाभरणी, दुधाचा महापूर, \"रोहयो' ते शेतीतील प्रयोगातून...\nमोदी-मोदी कराल तर कानाखाली देईन; आमदाराचे वक्तव्य\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून विविध राज्यात प्रचारसभा घेण्यात येत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2015-Dalimb.html", "date_download": "2019-03-25T07:52:00Z", "digest": "sha1:UE37BZKRWA3ISGGCA2IUBMXILRIKCVP5", "length": 5694, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - हस्त बहरातील डाळींब प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी", "raw_content": "\nहस्त बहरातील डाळींब प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी\nश्री. केरबा लक्ष्मण पळसकर, मु.पो. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे मो. ९९७०७४७२२३\nमाझ्याकडे २००९ मध्ये लावलेले २ एकर भगवा डाळींब आहे. मुरमाड जमिनीत १२' x ८' वर याची लागवड आहे. २ वर्षाची बाग झाल्यानंतर बागेचा बहार धरू लागलो. जुलै - ऑगस्ट महिन्यात बागेस ताण देतो. ताण नीट न बसल्यास इथ्रेलची फवारणी करून पानगळ करतो आणि हस्त बहार धरतो. २ एकर भगवा डाळींब आहे. मुरमाड जमिनीत १२' x ८' वर याची लागवड आहे. २ वर्षाची बाग झाल्यानंतर बागेचा बहार धरू लागलो. जुलै - ऑगस्ट महिन्यात बागेस ताण देतो. ताण नीट न बसल्यास इथ्रेलची फवारणी करून पानगळ करतो आणि हस्त बहार धरतो. २ एकरात १ हजार झाडे लावली होती, मात्र निमॅटोडचा प्रादुर्भाव होऊन यातील जवळपास २०० झाडे गेली. सध्या ८०० झाडे आहेत.\nहस्त बहार धरण्याचे कारण असे की, या बहाराचा माल मार्केटमध्ये लवकर (मे महिन्यातच) म्हणजे आंबे बहाराच्या मालाच्या अगोदर येत असल्याने याला भाव जादा मिळतो. मात्र यामध्ये मुख्य अडचण अशी येते की, बागेला विश्रांती (ताण) देण्याच्या अवस्थेत पाऊस जर पडला तर बागेस ताण बसत नाही. त्यामुळे पानगळ न होता फुट निघते. याचा परिणाम म्हणजे कळी पाहिजे तशी निघत नाही. आणि कळी जर की लागली तर उत्पादनात घट येते.\nयासाठी मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरतो. कळीसाठी प्रिझम, कळी सेटिंगसाठी प्रोटेक्टंट, अनावश्यक शेंडा वाढ थांबण्यासाठी थ्राईवर, शाईनिंगसाठी क्रॉपशाईनर आणि फळे पोसून वजन, दाण्याचा रंग, गोडी वाढीसाठी राईपनर व न्युट्राटोन फवारतो. जर्मिनेटरचे ड्रेंचिंग (आळवणी) माल निघेपर्यंत ३ - ४ वेळा करतो.\nपहिल्या बहारापासून खर्च वजा जाता १ लाख रू. मिळाले. दुसऱ्या बहारापासून १ लाख रू., तिसऱ्या बहारापासून २ लाख रू. नफा मिळाला. मात्र यावर्षीचा बहार प्रतिकूल वातावरण होते आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापरही करू शकलो नाही, त्यामुळे हा बहार फेल गेला. कळी अतिशय कमी म्हणजे कुठेतरी ५ ते १० लागली होती. छाटणीदेखील चुकली. यासाठी २३ एप्रिल २०१५ रोजी ४० पिशवी कांदा विक्रीस पुण्याला आलो होतो, तेव्हा सरांचे मार्गदर्शन घेऊन गेलो. त्यानुसार जुलै महिन्यात पानगळ केली आणि आता ऑगस्टमध्ये नवीन पालवी फुटत आहे. त्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर १ लि. + क्रॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. २०० लि. पाण्यातून/एकरी ड्रेंचिंग (आळवणी) करून फुटीसाठी प्रिझम १ लि. + जर्मिनेटर १ लि.ची २०० लि. पाण्यातून फवारणी करणार आहे. म्हणजे फूट चांगली निघून कळी चांगल्याप्रकारे निघेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/facts-about-goa-cm-manohar-parrikar/", "date_download": "2019-03-25T07:29:20Z", "digest": "sha1:QCNAS7YY62NZHM2UUFHRRZKVFSIPIGHJ", "length": 18639, "nlines": 120, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "निःस्वार्थी राजकारण दुर्मिळ असण्याच्या काळातही सचोटी टिकवून ठेवणारा नेता : मनोहर पर्रीकर", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nनिःस्वार्थी राजकारण दुर्मिळ असण्याच्या काळातही सचोटी टिकवून ठेवणारा नेता : मनोहर पर्रीकर\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फ��लो करा : फेसबुक | ट्विटर\nभारताचे माजी संरक्षणमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री मा. मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त काल संध्याकाळी आले आणि देशाच्या काळजाचा ठोका चुकला.\nसाधी राहणी आणि प्रामाणिक कामकाजाबद्दल प्रसिध्द असणाऱ्या मनोहर पर्रीकर यांनी आपल्या एकंदर कारकिर्दीत भारतीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे.\nत्यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे..\nपर्रीकर हे देशाचे पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री आहेत. पण फक्त हेच नाही तर अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना इतर नेत्यांहून वेगळ्या दाखवतात.\nत्यांच्यातील साधेपणा आणि नम्रता यांची अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे आपले नेते हे जनतेचे सेवक असल्याचे मानले जाते. त्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर.\n१३ डिसेंबर १९५५ साली गोव्याच्या मापुसा येथे जन्मलेले मनोहर पर्रीकर हे भारताचे पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री होते. त्यांनी मुंबई येथून आयआयटीची पदवी घेतली होती.\nपर्रीकर यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेतला आणि त्यांच्यातील कलागुणांना बघत केवळ २६ वर्षांच्या वयात त्यांना गोव्याचे आरएसएसचे संघचालक बनविण्यात आले.\n१९९४ साली ते पहिल्यांना आमदार बनले. १९९९ मध्ये पर्रीकर हे गोवा विधानसभेचे विरोधीपक्षाचे लीडर होते.\n१९९४ साली पर्रीकर जेव्हा पहिल्यांदा आमदार बनले तेव्हा राज्यात भाजप सरकारच्या केवळ ४ जागा होत्या. पण पर्रीकर यांनी ६ वर्षांत गोव्यात भाजप सरकारची सत्ता आणली.\nपर्रीकर यांच्या एडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑर्गेनाइजेशन स्किल्स मोदींना भावल्या. म्हणूनच मोदींनी २०१४ ला पर्रीकर यांना कॅबिनेटमध्ये घेत त्यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली.\nपर्रीकर यांच्या पत्नी मेधा यांची २००१ साली कॅन्सरच्या आजाराने निधन झाले, त्यांना उत्पल आणि अभिजात हे दोन मुलं आहेत.\nउत्पल याने अमेरिकेच्या मिशिगन स्टेट महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं आहे तर अभिजात हा लोकल व्यावसायिक आहे.\nत्यांच्या मुलाच्या लग्नात जिथे सर्व गेस्ट सूट-बूट मध्ये येत होते तिथे पर्रीकर हे त्यांची ओळख असणाऱ्या हाफ शर्ट आणि साध्या पॅन्ट मध्ये सर्वांचे स्वागत करत होते.\nमुख्यम���त्री असतानाही आपल्या कार्यालयात जाण्यासाठी ते दुचाकीचा वापर करत.\nत्यांच्यासाठी त्यांच्या कामापेक्षा जास्त काही नाही, ते दिवसाला १६-१८ तास काम करत असतात.\nएकदा अर्ध्या रात्री पर्यंत आपल्या ओएसडी गिरीराज वर्नेकर यांच्या सोबत एक प्रोजेक्टवर चर्चा करत होते. जाताना वर्नेकर यांनी विचारले की, उद्या कितीला येऊ, तेव्हा पर्रीकर म्हणाले की उद्या थोड्या उशिरा येऊ शकता, सकाळी ६:३० पर्यंत आलात तरी चालेल.\nजेव्हा वर्नेकर सकाळी ६:१५ ला मुख्यमंत्री बंगल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना कळाले की, पर्रीकर हे सकाळी ५:१५ वाजेपासूनच ऑफिसमध्ये काम करत आहेत.\nफिल्म फेस्टिवल २००४ च्या उद्घाटन समारंभात पर्रीकर पोलिसांसोबत आयोजन स्थळाच्या बाहेरील ट्राफिकला सांभाळण्याच्या कामात लागले होते.\n२०१२ साली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पर्रीकर यांनी त्या प्रत्येक व्यक्तीशी हात मिळविला जी त्यांना अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर आली होती.\nपर्रीकर जेवढे शिस्तबद्ध आहेत ते तेवढेच भावूक देखील आहेत. मार्च २०१२ साली गोव्याचे पर्यटन मंत्री मातनही सलदन्हा यांचा मृत्यू झाला तेव्हा पर्रीकर यांना अश्रू अनावर झालेले अनेकांनी बघितले.\nपर्रीकर हे नियमांचे पक्के होते. पण त्यांच्यातील माणुसकी देखील शिकण्यासारखी आहे. एकदा एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन साप्ताहिक जनता दरबार येथे पोहोचली आणि तिने तिच्या मुलासाठी लॅपटॉप मागितला तेव्हा तिथे असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की तो मुलगा त्या योजनेत येत नाही.\nतेव्हा पर्रीकरांना आठवले की, ते त्यांच्या जनसंपर्क अभियानावेळी त्या महिलेला भेटले होते आणि त्यांनी या योजने बद्दल सांगितले होते. त्यानंतर पर्रीकर यांनी लगेचच त्या मुलाला लॅपटॉप देण्याची व्यवस्था केली आणि त्याचे पैसे स्वतःच्या खिश्यातून दिले.\nपर्रीकर हे नेहेमी इकोनॉमी क्लास मधून प्रवास करतात. एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे आपलं समान स्वतः नेताना आणि प्रवाश्यांच्या रांगेत उभे राहून बोर्डिंग बस मधून जाताना त्यांना कित्येकांनी पहिले आहे.\nनिस्वार्थी राजकीय नेत्याची आणि सेवेच्या संस्कृतीची वानवा असणार्या सध्याच्या काळात साधेपणा आणि शिस्तीचा एकाच वेळी अवलंब करणारा पर्रीकर यांच्यासारखा नेता विरळाच.\nआदर्श राजकारणी कसा असावा याचे परिमाण प्र���्थापित करणाऱ्या मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात \nतांब्यापितळेच्या भांड्यांना चकाकी आणणाऱ्या “पितांबरी” ची चकचकीत कहाणी →\nभारतातल्या अश्या ५ जागा जेथे भारतीयांना entry नाही\nमुख्यमंत्री असूनही स्कूटरवर फिरणाऱ्या या कार्यमग्न जनसेवकाकडून भारतीयांनी आदर्श घ्यायला हवा..\nमनोहर पर्रिकरांची राफेल डील : हे बघा खरं गणित.\nराहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात\n९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…\nबाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतं अशा वेळी काय काळजी घ्याल अशा वेळी काय काळजी घ्याल \nदेशातल्या तिसऱ्या “तृतीयपंथी” जजचा प्रवास:\n“भारतीय” पद्धतीने जमिनीवर मांडी घालून जेवल्याने होतात हे ११ फायदे\nइतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत\nपाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा “अभेद्य” ठेवणारा भारताचा सुपर-स्पाय\nजाणून घ्या ‘हजार’चा संक्षिप्त उल्लेख करताना ‘K’ हे अक्षर का वापरतात\nबँक ग्राहकांना कर्ज देताना व्याजदर कसा ठरवते \nमोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं\nतुमच्या आमच्यासाठी शहीद असणारे ते ४० जण अधिकृतरित्या “शहीद” नसतील\nमूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का\nभोळ्या भाबड्या हिंदूंमध्ये अंधश्रद्धा पसरवून ख्रिश्चन धर्म परिवर्तन: धक्कादायक स्वानुभव\nIAS मुलाखतीमध्ये विचारलेल्या ह्या ८ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं\nविठोबाशी भांडायचे, त्याच्याशी रुसवेफुगवे करायचे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३९\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nराजधानी एक्स्प्रेस पेक्षा जलद ट्रेनची चाचणी यशस्वी\nगिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे\nकर्नाटक गोंधळात, पडद्याआड, मोदी सरकार २०१९ साठी ह्या मास्टरस्ट्रोकची तयारी करताहेत\nशेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090104/main.htm", "date_download": "2019-03-25T08:14:09Z", "digest": "sha1:AHXNYHF4SEJ3MJB7SYLOVQXWOF2WYWYJ", "length": 18321, "nlines": 46, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nपाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी चिदंबरम अमेरिकेकडे\nनवी दिल्ली, ३ जानेवारी/वृत्तसंस्था\nमुंबईमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील खरे सूत्रधार भारताच्या हवाली करण्याबाबत पाकिस्तान करीत असलेली टाळाटाळ आणि या हल्ल्यामध्ये आपल्या राष्ट्राचा कोणताही सहभाग नाही असा सातत्याने करीत असलेला कांगावा लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आता पाकिस्तानविरोधात असलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रे घेऊन अमेरिका भेटीला पुढील आठवडय़ात रवाना होत आहेत. मुंबईवरील हल्ल्यांना पाकिस्तानच जबाबदार आहे आणि हे शेजारी राष्ट्र आपली जबाबदारी टाळत आहे हे लक्षात घेऊन पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव संघटित करण्याच्या उद्देशानेच चिदंबरम हे अमेरिकेच्या भेटीवर जात आहेत. पुढील आठवडय़ात आपण अमेरिका दौऱ्यावर जात आहोत. मात्र अजून तारखा निश्चित व्हावयाच्या आहेत, असे चिदंबरम यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.\nदहशतवाद नष्ट करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ\nहातात शस्त्रे घेतलेल्यांशी कोणतीही तडजोड होणार नाही आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज दिली. पाकिस्तानी नेतृत्वात थोडा जरी समंजसपणा असेल तर त्यांनी मुंबई हल्ल्यातील संशयितांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणीही त्यांनी केली. अर्थात पाकिस्तानबरोबर युद्धाची शक्यता त्यांनी फेटाळली. मुंबई, दिल्ली आणि आसामातील दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वाढता दहशतवाद आणि नक्षलवाद्यांचा उच्छाद ही चिंतेची बाब आहे. सरकार या अतिरेक्यांशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले.\nआज मध्यरात्रीपासून वाहतूकदारांचा देशव्यापी बेमुदत संप\nमुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी\nडिझेलच्या दरात लिटरमागे दहा रुपये कपात करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट क���ँग्रेस’ने सोमवार, ५ जानेवारीपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स बस वाहतूक महासंघाने आज जाहीर केला. महासंघाने या संपामध्ये उतरण्याचा निर्णय घेतल्याने संपाची तीव्रता वाढली असून, त्याचा मोठा फटका राज्यातील मालवाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने पुकारलेल्या संपाला बॉम्बे गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिशएनने आधीच पाठिंबा दर्शविला होता. मात्र बीजीटीएचे वर्चस्व मुंबईपुरते मर्यादित असल्याने राज्यभर संपाचा तितकासा प्रभाव जाणवला नसता. मात्र आज मुंबईत शिवडी येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स अॅण्ड बस वाहतूक महासंघाने संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला.\nराष्ट्रवादीला हवी आता भूमिहीन व दुर्बल घटकांसाठी कर्जमाफी\nमुंबई, ३ जानेवारी / खास प्रतिनिधी\nनिवडणुका जवळ आल्याने मतांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने परस्परांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरूच ठेवले आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारांनी दिलेल्या कर्जमाफीनंतर आता विविध महामंडळांनी दुर्बल घटकांना दिलेले कर्ज माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तोटय़ातील विविध महामंडळांनी दिलेले सुमारे १८०० कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या दबावामुळे झालाच तर सहावा वेतन आयोग आणि सहा हजार कोटींच्या कर्जमाफीमुळे आधीच अडचणीत आलेल्या राज्य सरकारचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या कर्जमाफीचे श्रेय राष्ट्रवादीने लाटले होते. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नियमितपणे कर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांनाही सरकारने सवलती दिल्या आहेत.\nहिंदू दहशतवादाबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सोहळ्यात चिंता\nमुंबई, ३ जानेवारी/ प्रतिनिधी\nलष्करातील अधिकाऱ्यांना दहशतवादी म्हणून अटक केली जाते आणि त्यांच्यावरही काहीजण फुले उधळतात हे पाहून हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालला आहे की, इतिहासात मागे जात आहे अशी शंका निर्माण होते, हा या देशापुढील मोठा धोका आहे, असे मत असंघटित कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. हिंसेच्या मार्गाकडे जाणाऱ्या तरुण वर्गाविषयी महाराष्ट्र फाऊंडेशनचे सुनी��� देशमुख यांनीही चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले.\nनिवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा ‘बुश’ करा\nनाशिक, ३ जानेवारी / प्रतिनिधी\nआगामी निवडणुकीत मते मागण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री तुमच्यापर्यंत आल्यास त्यांचा ‘बुश’ केल्याशिवाय राहू नका, असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केले. अंतुले व शिवराज पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेतानाच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून शेतकऱ्यांना पॅकेजचे खिरापत वाटण्यात येत असून सातबारा अजूनही कोरा करण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता आगामी निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.\nयेथील उदोजी मराठा बोर्डिगच्या मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ग्रामीण भागात वीज व पाणीप्रश्न, खतांचा तुटवडा, बोगस बी-बियाणे अशा प्रकारांमुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून काँग्रेसचे सरकार सत्तेचा खेळ खेळण्यातच व्यस्त आहे. मुंबईसह देशात जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून दहशतवादी आपल्या घरापर्यंत पोहोचले असतानाही सरकार अजून त्यांच्याविरूध्द ठोस पावले उचलण्यात अयशस्वी ठरले आहे. शिवसेना मुसलमानांविरूध्द नाही, असे स्पष्ट करताना शिवसेनेत अनेक मुसलमान नेते व कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले. मुसलमानांच्या मतांसाठी अफजल गुरूच्या फाशी विषयाचे काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असतानाही त्यास फाशी देण्याचा निर्णय सरकार का घेऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.\nश्रीलंकेत लष्कराने ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’चा बालेकिल्ला असलेल्या किलिनोच्चीवर ताबा मिळविल्यानंतर अतिरेक्यांच्या वर्चस्वाखालील भागांत आगेकूच सुरूच ठेवली असून या संघटनेचा म्होरक्या प्रभाकरन हा मुलैथिवु या किनारपट्टीलगतच्या गावात लपल्याची खबर असल्याने त्याचा जोरदार शोध सुरू केला आहे. तामिळी अतिरेक्यांची सागरी सेना असलेल्या मुलैथिवु या किनारपट्टीवरील गावाभोवती वेढा टाकण्यास लष्कराने आता अग्रक्रम दिला आहे. याच गावात या संघटनेचा ५४ वर्षांचा म्होरक्या प्रभाकरन लपल्याची खबर आहे.\nतस्लिमा नसरीन आता पॅरिसमध्ये स्थायिक ��ोणार\nबांगलादेशच्या बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन या आता पॅरिसमध्ये स्थायिक होणार आहेत. नसरीन यांनी केलेल्या धर्मविरोधी लिखाणामुळे इस्लामी अतिरेक्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. नसरीन यांना जुलै २००८ मध्ये पॅरिसचे मानद नागरिकत्व बहाल करण्यात आले. त्यांनी घरासाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. त्यांना कलाकारांसाठी असलेले खास घर देण्यात येत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तस्लिमा यांच्या ‘लज्जा’ कादंबरीत बांगलादेशमध्ये मुस्लिमांकडून हिंदू कुटुंबाचा छळ होत असल्याचे वर्णन आहे. हे ईश्वरनिंदक कृत्य असल्याचा आरोप करून त्यांना धमकी देण्यात आली होती. युरोप, आणि संयुक्त संघराज्यांमध्ये काही काळ घालवल्यानंतर २००४ मध्ये त्या भारतात स्थायिक झाल्या होत्या.\nपूँछमध्ये आणखी एक जवान शहीद\nजम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील मेंढहर जंगलात एका चकमकीत विशेष पोलीस दलाचे अधिकारी नरेश कुमार हे शहीद झाले. या जंगलात दडलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी कारवाई होत असतानाच गुरुवारीच ही चकमक सुरू झाली होती. त्यात आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत .\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090411/main.htm", "date_download": "2019-03-25T08:18:09Z", "digest": "sha1:6KODSP4RDUQ7A77GDGEB4EKDWYQKUKZC", "length": 15343, "nlines": 46, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ११ एप्रिल २००९\nपारोळा येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट\nपारोळा, अमळनेर १० एप्रिल / वार्ताहर\nपारोळा, अमळनेर १० एप्रिल / वार्ताहर\nशहरालगतच्या फटाक्यांच्या कारखान्यात आज दुपारी अचानक झालेला जोरदार स्फोट व पाठोपाठ लागलेल्या भीषण आगीमुळे किमान २९ कामगार मृत्युमुखी पडले असून शेकडो जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, या आगीत काही बालकामगारांचा मृत्यू झाल्याचे येथील पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्याच्या आवाजाने तब्बल आठ किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरून गेला.\nपवारांच्या उपस्थितीत सोनियांची ‘मनमोहन’ स्तुती\nप्रफुल्ल पटेलांनी साधली मध्यस्थाची भूमिका\nसाकोली (भंडारा), १० एप्रिल\nदोन दिवसांपूर्वी काँग्रेसवि���ोधी तसेच, डाव्या नेत्यांबरोबर प्रचार केलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर आज व्यासपीठावर संयुक्तपणे प्रचार करून एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याची किमया साधली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मग संधी साधत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळीत पवारांना खिजविण्याचाच प्रयत्न केला.\nविधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता नाही - उद्धव\nकेंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी इतका भिकार कारभार केला असताना त्यांना पंतप्रधानपदाकरिता पाठिंबा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेनेचा ‘वचननामा’ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या केवळ वावडय़ा असून त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. शरद पवार यांच्या कारभाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे.त्यामुळे पंतप्रधानपदाकरिता त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाकरिता प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला.\nभारताच्या नकाशावर ठाणे बॅडमिंटनचे ठळक अस्तित्व\nसन्याल, देवलकर, प्राजक्ता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात\nमुंबई, १० एप्रिल / क्री. प्र.\nविविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतानाच ठाण्यात अविरत सुरू असलेल्या बॅडमिंटन प्रशिक्षणाचा ध्वज सातत्याने फडकत ठेवण्याचे काम जिष्णू सन्याल, अक्षय देवलकर, प्राजक्ता सावंत अशा खेळाडूंनी केले आहे. २१ एप्रिल ते ५ मे या कालावधीत व्हिएतनाम व थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या रूपात हे खेळाडू पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ठाण्यातील बॅडमिंटन चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण अकादमीच्या योजनेद्वारा अनेक गुणवत्तावान खेळाडू भारताला मिळाले. भविष्यातही अशीच ग���णवान खेळाडूंची पिढी अशा योजनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार आहे. या योजनेचे हे यश लक्षात घेऊनच केवळ ठाणे परिसरातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी खेळाडू येत असतात. आजच्या घडीला बॅडमिंटन हा खेळ खर्चिक बनला आहे. महागडी शटल्स, बूट, रॅकेट्स यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे हा खेळ मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरचा बनू लागला आहे.\nशिवसेनेवर न्यायालयीन बेअदबीचा खटला दाखल करण्याचा विचार\nमुंबई, १० एप्रिल / प्रतिनिधी\nमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हाती लागलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेण्यापासून अॅड. अंजली वाघमारे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवाय इतर कोणत्याही वकीलाने त्याचे वकीलपत्र घेवू नये, यासाठी आंदोलन, दगडफेक, धमक्या आदी माध्यमांतून रितसर प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेविरोधात न्यायालयीन बेअदबीचा खटला दाखल केला जावू शकतो का, याचा विचार सध्या शासकीय पातळीवर सुरू आहे. त्यासाठी काही कायदेतज्ज्ञांकडे चाचपणीही सुरू असल्याचे समजते. कसाबवर भारतीय न्यायालयातच खटला चालविला जाणार आहे. केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या दृष्टीनेही कसाबच्या खटल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nआसाममध्ये रेल्वेगाडीवर अतिरेक्यांचा गोळीबार\nजवान शहीद, १४ जखमी\nआसाममध्ये एका धावत्या रेल्वेगाडीवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एक सीआरएफ जवान शहीद झाला व १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. आसामच्या उत्तर कचर जिल्ह्यामध्ये वाद्रानडिसा स्थानकाजवळ बदरपूर-लुमडिंग बराक व्हॅली एक्स्प्रेसवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. दिमा हलाम दाओगा या संघटनेतून फुटून निघालेल्या ज्वेल गारसोला या गटाच्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला. या गटाच्या अतिरेक्यांना ब्लॅक विडो या नावानेही ओळखले जाते. काही प्रवाशांना उतरायचे असल्याने या रेल्वेगाडीने वाद्रानडिसा स्थानकापाशी येताच आपली गती धीमी केली, त्याचवेळी रेल्वे फलाटाच्या एका टोकाशी असलेल्या अतिरेक्यांनी या रेल्वेगाडीवर गोळीबार सुरू केला. वाया संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात अनिल तिवारी हा सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना तो मरण पावला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये दोन सुरक्षा जवान, तीन महिला, एका बालकाचा समावेश आहे. गोळीबार करून अतिरेकी घनदाट जंगलात पसार झाले. हफलाँग येथून पोलीस पथके घटनास्थळी रवाना झाले. गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांचा कसून शोध घेतला जात आहे. ज्वेल गारसोला या गटाच्या अतिरेक्यांनी गेल्या गुरुवारी उत्तर कचर जिल्ह्यामध्ये निवडणूक निरीक्षकांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने या गोळीबारात जिवीतहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. उत्तर कचर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांसाठी १६ एप्रिलला होणार आहे. आसाममध्ये गेल्या सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये १० जण ठार झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच आज रेल्वेगाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार करण्याचा प्रकार घडला.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/cold-and-aridity-1363900/", "date_download": "2019-03-25T08:31:50Z", "digest": "sha1:Y6WKIYCHDXZVPDDVUAV53IQTIGBPIJGJ", "length": 10643, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cold and aridity | थंडी आणि रूक्षता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nत्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो.\nथंडीमध्ये येणारी रूक्षता केस व त्वचेला जास्त जाणवते. कारण त्वचा व केस बा वातावरणाच्या जास्त संपर्कात येतात. त्वचेला, केसांना स्निग्धता मिळावी म्हणून जसे आपण तेल, क्रीम इत्यादी गोष्टींचा वापर करतो तसेच शरीराला आतूनही स्निग्धता मिळाली पाहिजे.\nकेस : या दिवसांमध्ये केसांची रुक्षता वाढते व कोंडय़ाचा प्रादुर्भाव होतो. केसांना आतूनही स्निग्धता मिळावी म्हणून बदाम, अक्रोड, जवस, तीळ, पिस्ता, साजूक तूप, खोबरे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आपण आपल्या आहारात अवश्य करावा. कढीपत्ता, आवळा, कांदा, टोमॅटो, डाळिंब, संत्री, मोसंबी इत्यादी रोजच्या आहारात ठेवावे. तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळावेत. जास्त प्रमाण��त शांपूचा किंवा रासायनिक पदार्थाचा अतिरेक टाळावा.\nत्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो. म्हणून स्थानिक उपचारांना आहारीय द्रव्यांची जोड जरूर द्यावी. बदाम, चारोळी, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणे, खोबरे, जवस, ऑलिव्ह ऑइल, आवळ्याचे सर्व पदार्थ, डाळिंब, खारीक, काजू, तीळ, साजूक तूप, लोणी इत्यादी अनेक पदार्थ त्वचा स्निग्ध ठेवण्यास मदत करतात. केसांप्रमाणेच त्वचेलाही साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा. चेहऱ्याची त्वचा हिवाळ्यात लवकर रूक्ष होते. सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे या रासायनिक पदार्थामुळे ती अधिक कोरडी पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि पाणी भरपूर प्यावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090123/main.htm", "date_download": "2019-03-25T08:27:01Z", "digest": "sha1:O5DOYSA5N7ENPO6YHERLEEF5PWUJIP2P", "length": 23201, "nlines": 69, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..\nउमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..\nकालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..\nजातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..\nएकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,\nतर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..\nतिसरी, च��थी, पाचवी... की दहावी..\nअसा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..\nवाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..\nबदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..\nपण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..\nतो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..\nसोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..\nअचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..\n(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)\nधारावीचा ‘मेकओव्हर’ ऑस्करच्या अंगणात\n‘स्लमडॉग मिलेनियर’ला सवरेत्कृष्ट चित्रपटासह १० नामांकने\nबेव्हर्ली हिल्स, २२ जानेवारी/पी.टी.आय.\nऑस्कर पुरस्कार मिळणे ही भारतासाठी नवलाईचीच गोष्ट राहिली आहे. परंतु त्याचे मानांकन मिळणेसुद्धा तसे अप्राप्यच मानले जाते. ‘रझिया सुलतान’, ‘गांधी’ या भारताशी संबंधित दोनच चित्रपटांना आजवर हे पुरस्कार मिळाले आहेत. तर अलीकडचा ‘लगान’ आणि मागील जमान्यातील ‘मदर इंडिया’ असे काही सन्माननीय अपवाद वगळता ऑस्करचे नामांकनही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी स्वप्नवतच राहिले आहे. परंतु या सगळ्याची जणू काही कसर भरून काढणारी तब्बल १० नामांकने ‘धारावी’त घडणाऱ्या कथानकावर बेतलेल्या ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाला मिळाली आहेत. विशेष म्हणजे आघाडीचा संगीतकार ए. आर. रहमान याला तीन पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले असून ऑस्करवर धडक देणारा तो पहिला भारतीय संगीतकार ठरला आहे.\nमुंडे यांच्या ‘शेतकरी संघर्ष अभियानास’ डोरलीतून सुरुवात\nवर्धा (डोरली), २२ जानेवारी\nसुमारे तीन वर्षांपूर्वी कर्जबाजारी, नापिकी, दुष्काळ याने गांजलेल्या डोरलीकरांनी ‘गाव विकणे आहे’ अशी जाहिरात दिली. या चमत्कारिक, वेदनादायी जाहिरातीमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्यापासून अनेकांची पावले या गावाला लागली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या आजपासून सुरू झालेल्या ‘शेतकरी संघर्ष अभियान’चा प्रारंभ डोरालीतून केला. शेतकऱ्यांची वेदना राष्ट्रीय ऐरणीवर आणणाऱ्या डोरलीकरांना मुंडे यांनी अभिवादन केले. त्या वेळी डोरलीकर एकमुखाने सांगत होते ‘गाव विकणे आहे’ अशी जाहिरात करूनही त्यांच्या पदरात आश्वासनांखेरीज काहीच पडले नाही. वर्धा जिल्ह्य़ात यंदा दुष्का�� पडला. दुबारा नव्हे तर तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती पीक आले नाही.\n‘हेल हिटलर’ च्या धर्तीवर मनसैनिकांची ‘राजवंदना’\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दैवत. त्यांच्यानंतर राज यांना आकर्षण आहे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अॅडॉल्फ हिटलर यांचे. हिटलरचे संघटनकौशल्य व शिस्त वादातीत होती. हिटलरच्या कोणत्याही सभेत अथवा कार्यक्रमात नाझी सैनिक ज्याप्रकारे हात अर्धा उंचावून कडक सलामी द्यायचे, त्याच प्रकारे यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत मनसेचे कार्यकर्ते राज यांच्या आगमनानंतर ‘जय महाराष्ट्र’ अशी मानवंदना देणार आहेत. याचे पहिले प्रात्यक्षिक येत्या २४ जानेवारी रोजी ठाणे येथे होणाऱ्या जाहीर सभेत पाहावयास मिळणार आहे. अर्थात अशी मानवंदना देण्यामागे मनसेच्या कार्यकर्त्यांना ‘हिटलरशाही’ अभिप्रेत नाही, तर केवळ एकसंधपणा व शिस्तीचे निदर्शक म्हणून ही पद्धत सुरू करण्यात येत असल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.\nकरकरे, कामटे, साळसकर, ओंबळे यांच्यासह १३ जणांना अशोकचक्र\nनवी दिल्ली, २२ जानेवारी/प्रतिनिधी\nमुंबई हल्ल्यातील अतिरेक्यांचा खंबीर मुकाबला करताना धारातीर्थी पडलेल्या १८ जणांपैकी सहा वीरजवान आणि पोलिसांना अशोकचक्र हा शांतताकाळातील सर्वोच्च वीरपुरस्कार बहाल केला जाणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. याबाबतची अधिकृत घोषणा दोन दिवसांत होणार आहे. अशोकचक्रासाठी यंदा १३ जणांची निवड झाल्याचे समजते. ‘एनएसजी’चे मेजर संदीप उन्नीकृष्णन व कमांडो गजेंद्र सिंग तसेच मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय साळसकर व अतिरेकी कसाबला जिवंत पकडताना प्राणांची आहुती देणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे या सहाजणांचा मरणोत्तर या वीरपुरस्काराने गौरव केला जाणार आहे.\n‘व्हाइट हाऊस इज पीपल्स हाऊस’\nअमेरिकेमध्ये चांगल्या बदलांची कास धरणारे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकालाच्या पहिल्याच दिवशी आता अध्यक्षांचे व्हाइट हाऊस हे जनतेचे कार्यालय म्हणजे ‘पीपल्स हाऊस’ असेल असे स्पष्टपणे जाहीर केले. व्हाइट हाऊसच्या कर्मचाऱ्य���ंना कामाच्या मूल्यांबाबत सूचना देताना यापुढे पारदर्शकता आणि कायद्याची बूज हे या कामकाजाची अनन्यसाधारण वैशिष्टय़े असतील असे ओबामा यांनी म्हटले. आपल्या धडाकेबाज कार्यपध्दतीला अनुसरून ओबामा यांनी व्हाइट हाऊसचे दरवाजे सर्वसामान्य अमेरिकींसाठी किलकिले केले. दुपारनंतर व्हाइट हाऊसमध्ये येणाऱ्या काही नागरिकांचे त्यांनी पत्नी मिशेलसोबत जोरदार स्वागत केले. लोकांचे, लोकांसाठी लोकांनी नियुक्त केलेले सरकार हे अब्राहम लिंकन यांचे प्रसिध्द वचन ओबामांनी प्रत्यक्षात अमलात आणण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्येही त्यांनी हेच अभिवचन जनतेसमोर दिले होते. या वचनाचा आपल्याला विसर पडलेला नाही हेच त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले.\nअमेरिकेसारख्या बलाढय़ लोकशाही देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेताना झालेल्या शाब्दिक चुकीपायी बराक ओबामा यांना दुसऱ्याच दिवशी पुन्हा शपथ घ्यावी लागली अमेरिकेच्या घटनेने राष्ट्राध्यक्षांची शपथ निश्चित केली आहे. मंगळवारी अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस् यांनी मात्र शपथ देताना मूळ प्रत न बाळगल्याने ‘फेथफुली’ या शब्दाची जागा चुकली आणि त्यातून त्यांचा तसेच ओबामा यांचाही किंचित गोंधळ उडाला. दोघांनीही त्या गोंधळावर मात करीत शपथविधी पार पाडला खरा पण तरीही कोणाच्याही मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून बुधवारी दुपारी अध्यक्षीय प्रासादात पुन्हा एकवार शपथविधी पार पाडला गेला\n‘महावितरण’पुढे आर्थिक संकट, विजेची दरवाढ अटळ\nमुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी\nबाहेरील स्रोतांकडून दामदुप्पट दराने विजेची खरेदी करून राज्यातील भारनियमन कमीत कमी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी ‘महावितरण’ कंपनी या चढय़ा दराच्या खरेदीमुळे आता आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेची दरवाढ करण्यावाचून कंपनीपुढे अन्य पर्याय उरला नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.\nगेल्या वर्षभरातील विजेच्या खरेदीपोटी ‘महावितरण’ला मोजावी लागलेली रक्कम पाहता विजेची दरवाढ न केल्यास जादा भावाची वीजखरेदी करणे दुरापास्त होणार असून पर्यायाने त्याचा फटका राज्यात नियोजित वेळापत्रकापेक्षाही अधिकचे भारनियमन करावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.गेल्या एप्रिल महिन्यांत विजेच्या खरेदीपोटी १३२२ कोटी रुपये, मे महिन्यांत १५३६ कोटी रुपये, ऑगस्ट महिन्यांत १५४२ कोटी रुपये, ऑक्टोबर महिन्यांत १६३६ कोटी रुपये, नोव्हेंबर महिन्यांत १६७३ कोटी रुपये आणि डिसेंबर महिन्यांत १७२३ कोटी रुपये अशा चढत्या दराने ‘महावितरण’ला रक्कम मोजावी लागली आहे.बाहेरील स्रोतांकडून घेण्यात येणाऱ्या विजेचे दर प्रतियुनिट नऊ ते १० रुपये इतके आहेत तर रत्नागिरी प्रकल्पातून ३.०५ ते ३.१० रुपये या दराने मिळणाऱ्या विजेसाठी आता प्रतियुनिट ३.७० ते ३.८० रुपये मोजावे लागत आहेत. ‘महावितरण’चा खर्च दरमहा वाढत चालला असल्याने विजेची दरवाढ करण्यावाचून अन्य पर्याय राहिलेला नाही. ही वाढ झाली नाही तर विजेचे वेळापत्रकच कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ११७ कोटी रुपये नफ्यात असलेली ‘महावितरण’ कंपनी आर्थिकदृष्टय़ा संकटात सापडण्याची लक्षणे दिसत आहेत.\nहाफिज कॉन्ट्रक्टर यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर खात्याच्या धाडी\nमुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी\nप्रसिद्ध वास्तुरचनाकार हाफिज कॉन्ट्रक्टर यांच्या मालकीच्या कार्यालयांवर आज ँप्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्या. कर चुकविल्याबाबत या धाडी टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. प्राप्तिकर विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत धाडी टाकल्या आहेत किंवा नाही याबाबत दुजोरा देण्यास नकार दिला. कॉन्ट्रॅक्टर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक चीनवाला तसेच फाईव्ह गार्डन येथील त्यांच्या अन्य कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत काय आढळले ते कळू शकले नाही. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या धाडी सुरू होत्या. याशिवाय नवी मुंबईतील एका बिल्डरच्या कार्यालयांवरही आज धाडी टाकण्यात आल्या. या बिल्डरचे नाव कळू शकले नाही.\nहिरे व्यापारी भरत शहाला अटक\nमुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी\nफसवणुकीच्या प्रकरणात सिल्वासा महानगर दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरून आज हिरेव्यापारी व चित्रपट निर्माता भरत शहा याला आज मलबार हिल पोलिसांनी अटक केली. त्याला आज जामीन मिळू न शकल्याने पोलीस कोठडीत राहावे लागले. शहा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याच्याविरुद्ध सिल्वासा महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट आज सकाळी आम्हाला मिळाले असून त��याद्वारे आम्ही कारवाई करीत शहाला दक्षिण मुंबईतील त्याच्या घरातून अटक केल्याचे मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इक्बाल शेख यांनी सांगितले. अटकेनंतर शहाने जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/dada-kondake-birthday/", "date_download": "2019-03-25T07:22:23Z", "digest": "sha1:W7ONU3CYGTSPOXCKLSKF5XOZFJL4MF27", "length": 12625, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#HBD सदाबहार अभिनेते दादा कोंडके यांची आज जयंती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#HBD सदाबहार अभिनेते दादा कोंडके यांची आज जयंती\nमराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय अभिनेते दादा कोंडके यांची आज ८६ वी जयंती आहे. दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके असून त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगावमध्ये झाला. दादा कोंडके मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रपट-निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या द्विअर्थी विनोदी संवादाने त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांच्या सर्वच भूमिकांनी त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.\n‘अपना बाजार’मध्ये दरमहा साठ रुपये पगारावर कामाला असताना दादा सेवा-दलाच्या बँडमध्ये काम करू लागले. परंतु कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे त्यांचे फावल्या वेळेतले छंद. सेवादलात असतानाच त्यांची भेट निळू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली. आणि दादा कोंडके सेवादलाच्या नाटकांमध्ये छोटी-मोठी कामे करू लागले. नंतर त्यांनी ‘खणखणपुरचा राजा’ यामधील भूमिका सोडून दादा कोंडके यांनी स्वत:चे कला पथक काढले व वसंत सबनीस-लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकातून दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली दादा कोंडके यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर सोंगाड्या (१९७१), आंधळा मारतो डोळा (१९७३), पांडू हवालदार (१९७५), राम राम गंगाराम (१९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (१९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते. ‘सोंगाड्या’ ही दादा कोंडके यांची पहिली चित्रपट निर्मिती होती. यानंतर दादा कोंडके यांनी स्वत:च्या कामाक्षी प्रोडक्शन अंतर्गत १६ मराठी चित्रपट काढले. व विशेष म्हणजे हे सर्�� चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे दादा कोंडके यांच्या नावाची गिनीज बुकात नोंद झाली. दादा कोंडके यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी व गुजराती भाषांमध्ये चित्रपटांची निर्मितीही केली.\n१४ मार्च १९९८ रोजी पहाटे ३. ३० वाजता मुंबईतील रमा निवास या दादरच्या निवासस्थानी दादा कोंडके यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. दादा कोंडके यांच्या जीवनावर ”एकटा जीव” हे पुस्तकही लिहिण्यात आले होते.\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nतानाजीचा रिलीज पुढे ढकलला\n“आरआरआर’मध्ये वरुण धवन आणि संजय दत्तची एंट्री\nसलमान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबरी\nआमिर खानचा व्हिडिओ व्हायरल\nएकही गीत न लिहीता मोदींच्या सिनेमात जावद अख्तर यांचे नाव\nअन् कुणाल खेमूचा पाय घसरला\nकंगणा आता जयललिताच्या रोलमध्येही\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\n��ातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-draught-situation-maharashtra-lack-rainfall-1339", "date_download": "2019-03-25T08:22:17Z", "digest": "sha1:24THTAMXVKYLQZCXO2RLI2HTDHYZ3IPK", "length": 6723, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news draught situation maharashtra lack of rainfall | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाडा, विदर्भातल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील 37% गावांवर दुष्काळाचे सावट..\nमराठवाडा, विदर्भातल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील 37% गावांवर दुष्काळाचे सावट..\nमराठवाडा, विदर्भातल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील 37% गावांवर दुष्काळाचे सावट..\nमराठवाडा, विदर्भातल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील 37% गावांवर दुष्काळाचे सावट..\nसोमवार, 5 मार्च 2018\nमराठवाडा, विदर्भातल्या काही भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील जवळपास 37 टक्के गावांवर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील एकूण 39 हजार 755 गावांपैकी 14 हजार 679 गावांची नोंद दुष्काळग्रस्त गावांमध्ये होऊ शकते. येणाऱ्या काळात संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता प्रशासनाने एप्रिल ते जून अखेरपर्यंत टंचाई आराखडा शासनदरबारी सादर केला आहे. राज्यातील पिकांच्या उत्पन्नाची मोजदाद पैसेवारी पद्धतीने केली जाते. गेल्या 10 वर्षांपैकी ही सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी आल्यास, तात्काळ दुष्काळ जाहीर केला जातो.\nमराठवाडा, विदर्भातल्या काही भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील जवळपास 37 टक्के गावांवर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील एकूण 39 हजार 755 गावांपैकी 14 हजार 679 गावांची नोंद दुष्काळग्रस्त गावांमध्ये होऊ शकते. येणाऱ्या काळात संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता प्रशासनाने एप्रिल ते जून अखेरपर्यंत टंचाई आराखडा शासनदरबारी सादर केला आहे. राज्यातील पिकांच्या उत्पन्नाची मोजदाद पैसेवारी पद्धतीने केली जाते. गेल्या 10 वर्षांपैकी ही सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी आल्यास, तात्काळ दुष्काळ जाहीर केला जातो. अमरावती विभागातील 90 गावं तर औरंगाबादमधील 42 टक्के गावांमध्ये यंदा 50 टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न झालं आहे. त्यामुळे या गावांचा दुष्काळसदृश्यं गावांमध्ये समावेश होऊ शकतो. याआधी केंद्राने आखून दिलेल्या निर्देशांनुसार गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.\nविदर्भ प्रशासन administrations दुष्काळ अमरावती विभाग sections उत्पन्न\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/doctor-killed-ex-wife-and-updating-her-social-media-account-hoodwink-cops-4044", "date_download": "2019-03-25T08:32:26Z", "digest": "sha1:J3QIWL54BJYKP6ON6RKO43DF7RNWVSL7", "length": 9649, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Doctor killed ex wife and updating her social media account to hoodwink cops | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपत्नीची हत्या करुन तिला ठेवले 'ऑनलाइन' जिवंत ठेवणारा पती अटकेत\nपत्नीची हत्या करुन तिला ठेवले 'ऑनलाइन' जिवंत ठेवणारा पती अटकेत\nपत्नीची हत्या करुन तिला ठेवले 'ऑनलाइन' जिवंत ठेवणारा पती अटकेत\nसोमवार, 24 डिसेंबर 2018\nगोरखपूर (उत्तर प्रदेश): एका प्रसिद्ध डॉक्टरने पत्नीची उंच कड्यावरून ढकलून हत्या केली. मात्र, या हत्येची कोणाला माहिती मिळू नये म्हणून तो तिचा मोबाईल वापरून ती जिवंत असल्याचे डॉक्टर दाखवत होता. अखेर, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंह याने नेपाळमध्ये उंच कड्यावरुन ढकलून पत्नी राखी श्रीवास्तव उर्फ राजेश्वरीची हत्या केली होती. मात्र, याबाबातची कोणालाही माहिती मिळू नये यासाठी तो सतत तिचे सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता.\nगोरखपूर (उत्तर प्रदेश): एका प्रसिद्ध डॉक्टरने पत्नीची उंच कड्यावरून ढकलून हत्या केली. मात्र, या हत्येची कोणाला माहिती मिळू नये म्हणून तो तिचा मोबाईल वापरून ती जिवंत असल्याचे डॉक्टर दाखवत होता. अखेर, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंह याने नेपाळमध्ये उंच कड्यावरुन ढकलून पत्नी राखी श्रीवास्तव उर्फ राजेश्वरीची हत्या केली होती. मात्र, याबाबातची कोणालाही माहिती मिळू नये य��साठी तो सतत तिचे सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता. सोशल मीडियावर अपडेट करत पत्नी अद्यापही जिवंत असल्याचे दाखवत होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा असून, डॉक्टर व त्याचे दोन सहकारी प्रमोद कुमार सिंह आणि देशदिपक निशाद यांना अटक करण्यात आली आहे.\nराखी गोरखपूरमधून बेपत्ता झाली होती. तिचा भाऊ अमर श्रीवास्तव याने शहापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान राखी 1 जूनला मनिषसोबत नेपाळला गेली असल्याची माहिती मिळाली. परंतु, मनिष परतला असतानाही ती तिथेच थांबली होती. पोलिसांना डॉ. सिंह याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याचे कॉल डिटेल्स तपासले असता राखी बेपत्ता झाली त्यावेळी तोदेखील नेपाळमध्येच होता अशी माहिती समोर आली. राखीचा दुसरा पती मनिष सिन्हा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. विशेष तपास पथकाने तपास हाती घेतला असता डॉ. सिंह याच्यापर्यंत पोलिस पोहोचले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.\nडॉ. सिंह याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की, 'राखी पैशांसाठी आणि संपत्तीसाठी ब्लॅकमेल करत होती, यामुळे आपण तिची हत्या केली. माझ्या दोन सहकाऱ्यांनी मनिष भारतात परतल्यानंतर राखीला आपल्यासोबत बाहेर नेले. तिला गुंगींचे औषध दिले आणि पोखरा येथे उंच कड्यावरुन खाली ढकलून दिले. राखीची हत्या केल्यानंतरही मोबाइलवरुन तिचं सोशल मीडिया अपडेट करत होतो.'\nदरम्यान, राखीचे मोबाइलचे शेवटचे लोकेशनदेखील 4 ऑक्टोबरला गुवाहाटी दाखवत होते. राखीच्या कुटुंबालाही ती गुवाहाटीत असावी असे वाटत होते. डॉ. सिंह याने चौकशीत आपण आपल्या सहकाऱ्यासोबत मोबाइल गुवाहाटीला पाठवला होता. त्याने तो तिथेच फेकून दिला, अशी माहिती पोलिसांना दिली. आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी कऱण्यात आली आहे.\nगोरखपूर gorakhpur पूर उत्तर प्रदेश मोबाईल धर्मेंद्र dharmendra सिंह सोशल मीडिया पोलिस भारत औषध drug doctor killed social media media\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/node/2463", "date_download": "2019-03-25T08:15:46Z", "digest": "sha1:EWO3V5ZBY746JXJEP7O7KZKLUUOWXXAC", "length": 6493, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news gatari in mumbai police | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्र���ईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोलिस ठाण्यात गटारी साजरी करू नये; मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना\nपोलिस ठाण्यात गटारी साजरी करू नये; मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना\nपोलिस ठाण्यात गटारी साजरी करू नये; मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nपोलिस ठाण्यात गटारी साजरी करू नये, अशा स्पष्ट सूचना मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत... पोलिस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल नको, असेही बजावण्यात आले आहे... प्रत्येक पोलिस उपायुक्तांना पोलिस ठाण्यांतील गटारी सेलिब्रेशनवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nपोलिस ठाण्यात गटारी साजरी करू नये, अशा स्पष्ट सूचना मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत... पोलिस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल नको, असेही बजावण्यात आले आहे... प्रत्येक पोलिस उपायुक्तांना पोलिस ठाण्यांतील गटारी सेलिब्रेशनवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nयंदा १२ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असून शनिवारी ११ ऑगस्ट आषाढी अमावास्या आहे. या दिवशी किंवा दोन-तीन दिवस आधी वार पाहून पोलिस ठाण्यांमध्ये गटारी साजरी केली जाते. पोलिस ठाण्यांबरोबरच विशेष शाखा, पोलिसांशी संबंधित इतर कार्यालयातही कोंबडी मटणाचे जेवण केले जाते. ही प्रथा बंद करावी, अशा सूचना पोलिस दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आल्या आहेत.\nपोलिस दलाची जनमानसांत वेगळी प्रतिमा आहे. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. प्राण्यांची पोलिस ठाण्यात कत्तल हे बेकायदेशीर कृत्य असून मुंबई महानगरपालिका कायदा १९९८, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुॲल्टी टू ॲनिमल ॲक्ट १९६०, मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत गुन्हा आहे. हा गुन्हा करू नका आणि प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करताना कुणी आढळल्यास कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.\nपोलिस ठाणे मटण मुंबई mumbai\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/shubh-bol/", "date_download": "2019-03-25T07:44:37Z", "digest": "sha1:KJKHZWSX6TQ7HMJXKMZUDYXVGZNK23XB", "length": 5369, "nlines": 60, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nशुभ बोल मुखे बोलावे\nशुभ बोल मुखे बोलावे\nइतरां न कधी सांगणे, जरि घरात काही उणे\nहासुनी सदा सोसावे, शुभ बोल मुखे बोलावे.\nश्री विठ्ठल विठ्ठल गावे.\nदुमदुमे घोष श्रीहरी, सुख दु:ख भेद हो दूरी\nविठ्ठलमय विश्व पहावे, श्री विठ्ठल विठ्ठल गावे.\n'संत सखू' हाही प्रभातच्या संतपटांच्या पठडीतील आणखी एक चित्रपट. भक्तीरसातील गीते हे त्या चित्राचेही वैशिष्ठ्य ठरले. या चित्रपटापासून गाण्यांना उसना आवाज देण्यात येऊ लागला. संत सखूचे काम करणाऱ्या हंसा वाडकर यांच्यासाठी विनोदिनी देसाई यांचा आवाज वापरण्यात आला.\nपांडुरंग भेटी वैष्णव निघाले\nभाव भुकेला हरी करीतसे भक्तांची चाकरी\nशुभ बोल मुखे बोलावे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/dewabappa", "date_download": "2019-03-25T08:48:10Z", "digest": "sha1:KMM6ZH5DZWXT4OV4EAOQDZZBHLPYF33G", "length": 42747, "nlines": 210, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा\nमुखपृष्ठ / मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शनी, 03/09/2011 - 09:20 ह्यावेळी प्रकाशित केले.\n(वांगे अमर रहे पुस्तकात प्रकाशित)\nदोन दिवसापूर्वी मी एका वृत्तपत्राच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे काही अनोळखी राजकीय मंडळी बसली होती. माझ्या छातीवरचा बिल्ला बघून चर्चेला तोंड फुटले. तसा हा नेहमीचाच प्रकार आहे. बिल्ला बघितल्य���बरोबर काही विशिष्ट लोकांच्या टाळक्यात प्रसुतीवेदनेच्या कळा उठायला लागतात आणि शेतकरी संघटना व शरद जोशी यांच्याविषयी काहीतरी खोचक वाक्य प्रसवल्याशिवाय त्यांचे मन काही शांत होत नाही. लालबिल्लेवालेसुद्धा शरद जोशी नावाच्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने तितक्याच ताकदीने त्यांचे वार परतवून लावत असतात. विषय आर्थिक असो की सामाजिक, मुद्दा धोरणात्मक असो की तार्किक, शेतकरी संघटनेच्या पाईकाजवळ शेतीच्या अर्थकारणाची जेवढी खोलवर जाणीव आहे तेवढी क्वचितच कुणाकडे असेल. चार वर्ग शिकलेले शेतकरी संघटनेचे पाईक मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांना निरुत्तर करू शकतात, हे जवळजवळ सर्वमान्य झाले आहे.\nतर झाले असे की, चर्चेला सुरवात झाली. खरं तर या चर्चेला चर्चेपेक्षा वादविवाद स्पर्धेचे नाव देणे अधिक योग्य राहील. केंद्रसरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहे, कापूस निर्यातबंदीचा निर्णय कसा ग्राहकांच्या हिताचा आहे, हे तो माझ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्या समर्थनार्थ तो ज्या मुद्द्याचा आधार घेत होता ते मुद्दे एवढे तकलादू होते की माझ्या एकाच उत्तराने तो गारद व्हायचा. त्या उत्तरावर प्रतिप्रश्न करण्यासाठी त्याच्या जवळ काहीच उरत नसल्याने मग तो लगेच दुसरा मुद्दा पुढे रेटायचा. सरतेशेवटी केंद्रसरकारच्या धोरणांची बाजू घेऊन आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर मग चक्क वैयक्तिक पातळीवर घसरणे आणि शरद जोशींवर टीका करणे ही बहुतेकांना सवयच असते तसाच तोही घसरला. पण इथेही त्याचा टिकाव काही लागला नाही. शेवटी युद्धात हार पत्करल्याच्या मानसिकतेने शस्त्र खाली ठेवावीत, अशा हावभावाने त्याने कान पाडले आणि चर्चा संपली.\nविचारांचे आदानप्रदान करण्यासाठी चर्चा करावयाची असते. चर्चेतून जे सकस, चांगले, अधिक तार्किक असेल ते स्वीकारायचे असते. आपल्या मनातील अर्धवट किंवा कोणत्याही निष्कर्षाप्रत न पोचलेल्या विचारांना अधिक तर्कसंगत करण्यासाठी किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी चर्चा हे प्रात्यक्षिकासारखे माध्यम ठरू शकते. वादविवादातून आपण जोपासलेल्या विचारांची खोली पडताळण्याची संधी निर्माण होते. चर्चा ही समुद्रमंथनासारखी असते. प्रचंड समुद्रमंथनानंतर जे काही विष किंवा अमृत निघेल तेव्हा त्यातील काय स्वीकारायच�� आणि काय अव्हेरायचे, याचा विवेकाच्या आधाराने सारासार विचार करून मग त्यापुढील निर्णय घ्यायचे असतात.\nपरंतु, दुर्दैवाने असे फारसे घडताना दिसत नाही. बहुतांश चर्चा एकतर जिंकण्याच्या, फड गाजवण्याच्या किंवा आपापले घोडे दामटण्याच्या उद्देशानेच केल्या जातात. विधानभवन आणि संसदही याला अपवाद नाही. एखाद्या विधेयकावर किंवा धोरणात्मक मसुद्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि त्या चर्चेला अनुरूप असे धोरण आखले गेले, असेही फारसे घडत नाही. संसदेतील चर्चा रंगणे म्हणजे आखाड्यात दोन पहिलवानांची कुस्ती रंगावी, अशासारखाच प्रकार असतो. सत्ताधारी पक्ष एका बाजूने तर विरोधी पक्ष दुसर्या बाजूने तावातावाने आपापले घोडे दामटत असतात. त्यात विषयाचे मूळ गांभीर्य कुठेच दिसत नाही किंवा उकल करण्याच्या उद्देशाने मुद्देसूद उहापोह होत आहे, असेही दिसत नाही. चर्चेच्या माध्यमातून एखादा जटिल किंवा सर्वसामान्य जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे फारसे कधीच घडत नाही आणि मग,\nझाले अता पुरेसे, ते बोलले बहू\nबाळंत होत ना ती, चर्चा झडू नये\nअसे म्हणायची वेळ येते.\nत्या दिवशी माझ्यावरही तीच वेळ आली होती. त्यामुळे मी केवळ उत्तरे तेवढे देत होतो. तो निरुत्तर होत असला तरी त्याला मात्र माझे म्हणणे पटवून घ्यायचेच नव्हते. त्याला त्याचे विचार, चर्चेच्या नावाखाली माझ्यावर लादायचे होते. विषय शेती आणि शेतकरी असला तरी शेतीचे बरे किंवा वाईट यापैकी काहीतरी व्हावे हा त्याचा उद्देशच नव्हता, केवळ मला हरवून जिंकायच्या ईर्ष्येनेच तो तावातावाने माझ्यावर तुटून पडत होता.\nफळाच्या अपेक्षेने केलेले कर्म म्हणजे सकाम कर्म आणि फळाची अपेक्षा न बाळगता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दोनच कर्मयोग सांगितलेत. पण काही माणसं अशीही असतात की \"कुठल्याही स्थितीत फळ मिळताच कामा नये, असा पक्का निर्धार करूनच कर्म करतात\" त्याला कोणता कर्मयोग म्हणावे, याचा उलगडा बहुतेक भगवान श्रीकृष्णाला सुद्धा झाला नसावा, म्हणून तर त्याने एवढी मोठी गीता कथन करूनही त्यात अशा कर्मयोग्याबद्दल अवाक्षर सुद्धा उच्चारले नाही.\nवृत्तपत्राच्या कार्यालयातील माझे काम आटोपून मी जेव्हा बाहेर पडत होतो. तेव्हा त्याने परत एकदा उचल खाल्ली अन म्हणाला, \"तू शरद जोशींचा आंधळा समर्थक आहेस.\" म��� मागे वळून पाहिले, स्मित केले, अन पुढे निघून आलो.\nशरद जोशींचे शिष्य, बगलबच्चे, पित्तू, चमचे ही विशेषणे संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी कुणी ना कुणी यापूर्वी वापरलेलीच आहेत. शेतकरी संघटनेचा मी पाईक आहे, हे प्रत्येक कार्यकर्ता अभिमानाने सांगतच असतो. पण आंधळा समर्थक हे विशेषण माझ्यासाठी नवीन होते. शेतकरी संघटनेच्या विचारांवर माझी श्रद्धा आहे, शरद जोशींनी दिलेल्या \"शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव\" या एककलमी कार्यक्रमाचा मी समर्थक आहे. मात्र डोळस समर्थक की आंधळा समर्थक, याचा मी कधी विचारच केला नव्हता. गावाच्या गरिबीचे शाळेतील गुरुजनांनी सांगितलेले कारण, महाविद्यालयात प्राध्यापकांनी आणि लायब्ररीतील पुस्तकांनी वर्णन केलेले कारण यापेक्षा शरद जोशींनी सांगितलेले कारण हे अधिक प्रामाणिक, तर्कशुद्ध आणि वास्तवाच्या जवळ जाणारे असल्याने ते मला पटले होते. याच कारणाने मी अल्पवयातच शेतकरी संघटनेकडे खेचल्या गेलो, हे मला माहीत होते. तरीही मी आंधळा समर्थक तर नाहीना या विचाराने मला ग्रासायला सुरुवात केली होती. श्रद्धा की अंधश्रद्धा, आंधळा समर्थक की डोळस समर्थक हे सिद्ध करण्यासाठी काही शास्त्रशुद्ध फूटपट्ट्याही उपलब्ध नाहीत. आपापल्या सोयीनुसार, कुवतीनुसार व आकलनशक्तीनुसार प्रत्येकजण यासंबंधात वेगवेगळ्या फूटपट्ट्या ठरवीत असतो. या फूटपट्ट्यांचे निकषही व्यक्तीसापेक्ष किंवा समूहासापेक्ष असतात. त्यामुळे या अशास्त्रीय फूटपट्ट्यांनी माझ्या गोंधळात आणखीच भर घातली. मग त्या रात्री काही केल्या झोपच येईना.\nआणि अचानकच मला एक फूटपट्टी गवसली. आंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे सूत्र गवसले.\nगेल्या तीस-बत्तीस वर्षातील शेतकरी संघटनेची वाटचाल ही एकखांबी तंबूसारखीच राहिली आहे. शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी आणि शरद जोशींचे विचार म्हणजेच शेतकरी संघटनेचे विचार. जेव्हा जेव्हा शेतकरी संघटनेला राजकीय स्वरूपाचे किंवा अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा शेतकरी संघटनेने अधिवेशन बोलावून खुलेपणाने चर्चा घडवून आणली. अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात शरद जोशींनी बीजभाषण करायचे आणि मग त्यावर प्रतिनिधींनी चर्चा करायची. शरद जोशींनी केलेले बीजभाषण शेतकरी प्रतिनिधींना खूप रुचायचे, शरद जोशींच्या शब्द���मध्ये शेतीची दशा पालटवण्याचे सामर्थ्य दिसायचे आणि मग त्या बीजभाषणाला एवढे समर्थन मिळायचे की शरद जोशींचे वाक्य हेच ब्रह्मवाक्य ठरायचे. शेतकरी संघटनेच्या पहिल्या/दुसर्या फळीतील काही नेते मंडळी वेगळाच किंवा अगदीच उलट सूर काढायचीत पण त्याला अजिबातच समर्थन न मिळाल्याने ते मुद्दे आपोआपच बाजूला पडायचे. विचार शरद जोशींचेच पण त्याला लोकमान्यता मिळाल्याने ते विचार शेतकरी संघटनेचे विचार ठरायचे. महत्त्वाचे निर्णय शरद जोशींचेच असले तरी ते अधिवेशनाच्या माध्यमातून जनमान्यता पावल्याने त्याला लोकशाही प्रक्रियेचे अधिष्ठान प्राप्त व्हायचे आणि म्हणूनच अधिवेशनात घेतलेले सर्व निर्णय शेतकरी संघटनेच्या पाईकांनीच घेतले होते, असे म्हणावे लागेल.\nआंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे मला गवसलेले सूत्र असे की, आजपर्यंतच्या शेतकरी संघटनेच्या प्रवासात जेवढे काही निर्णय घ्यायची वेळ आली आणि निर्णय घेतले गेले, ते निर्णय जर मला अजिबात चुकीचे वाटत नसेल किंवा योग्यच वाटत असेल तर मला ते योग्यच का वाटतात, याचा शोध घेणे गरजेचे ठरते. ते मला मनोमन पटले म्हणून मी समर्थन केले की केवळ शरद जोशींवर नितांत श्रद्धा आहे म्हणून मी डोळे मिटून समर्थन केले याचा जर शोध घ्यायचा असेल तर \"शरद जोशी ऐवजी जर मी असतो तर काय निर्णय घेतले असते, असा विचार करून शक्यता पडताळून पाहणे\" यापेक्षा अधिक चांगला दुसरा मार्ग असू शकत नाही. मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा असे दिसते की, अनेक निर्णय मी तसेच घेतले असते, जसे शरद जोशींनी घेतले आहेत. त्यात मला आजवर कुठलाच विरोधाभास आढळला नाही. मला असा एकही निर्णय दिसत नाही की येथे शरद जोशींचे चुकले, असे मी म्हणू शकेन. मात्र असे काही निर्णय आहेत की, मी अगदी त्याच्या उलट निर्णय घेतले असते, असे मला वाटते. जसे की, जर अभ्यास आणि आकलन शक्तीच्या बळावर निर्णय घ्यायची माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ आली असती तर मी डंकेल प्रस्तावाला, गॅट कराराला, बिटी तंत्रज्ञानाला, मुक्तअर्थव्यवस्थेला कडाडून विरोध केला असता.\nमी नक्की असेच केले असते कारण की मी आयुष्यातले १६-१७ वर्ष शाळा-कॉलेजात शिक्षण घेण्यात खर्ची घालवले, अवांतर साहित्याची पुस्तके वाचून डोळेफ़ोड केली, पुढार्यांची भाषणे मन लावून कानात तेल ओतून ऐकलीत; त्याबदल्यात या सर्वांनी मिळून त्यांना ऐ��ीने जीवन जगता यावे यासाठी शेतीला लुटून आपापले ऐश्वर्य वाढविण्यासाठी त्यांचा एक हस्तक/दलाल म्हणून मला घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. सरकार हे शेतकर्यांसाठी मायबाप असते व व्यापारी मात्र लुटारू असून ते पावलोपावली शेतकर्यांची लूट करतात, असेच माझ्या मनावर ठसविण्यात या शिक्षणप्रणालीने कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. शरद जोशी जर भारतात आले नसते आणि या शेतीच्या लुटीच्या रहस्याचा सप्रमाण भेद जर शेतकरी समाजासमोर खुला केला नसता तर आमच्या सारख्या शेतकरीपुत्रांना मुक्तअर्थव्यवस्थेतच शेतकर्यांचे हित आहे हे कधी कळलेच नसते.\nशेतकरी संघटनेचा विचार कानात पडला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. हे गमक ज्याक्षणी मला कळले त्याच क्षणी मुखातून शब्द बाहेर पडले होते,\nसरकारच्या धोरणापायी, छक्के-पंजे आटले\nबरं झालं देवाबाप्पा, शरद जोशी भेटले\nसंघटना शेतकर्यांची असली तरी या संघटनेचा विचार केवळ शेतकर्यांचे हित साधण्यापुरताच मर्यादित नाही. शेतकरी संघटनेने देश वाचविण्याचा विचार मांडला आहे. हा विचार म्हणजे अनेक तुकडे एकत्र करून बांधलेल्या गोधड्यांचे गाठोडे नसून एकाच धाग्याने विणलेले महावस्त्र आहे. बेरोजगारी पासून महागाईपर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ताकद या विचारसरणीत आहे. संघटनेचा विचार म्हणजे एक मार्ग आहे. ज्याला ज्याला संघटना कळली त्या सर्वांची वाटचाल ह्याच मार्गावरून व्हायला हवी. विचारधारेतच दिशानिर्देशन करायचे सामर्थ्य असेल तर त्या विचाराशी बांधिलकी जोपासणारे एकाच मार्गाने जात आहे, असे म्हणावे लागेल. त्यात कुणी कुणाचे अंधानुकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\n१९८० च्या सुमारास संघटना, चळवळ आणि संप-आंदोलनाचे पेवच फुटले होते. शिक्षकांचा संप, कामगारांचा संप, आसामचे आंदोलन, कर्मचार्यांच्या संघटना, हमालांच्या संघटना, उग्रवादी चळवळीमध्ये बोडोलॅन्ड, नागालॅन्ड, काश्मीर, खलिस्तान वगैरे. कुणाच्याच पदरात काहीच न पडताच या सर्व चळवळी संपून गेल्यात. फक्त शेतकरी संघटनाच एवढा प्रचंड काळ टिकून आहे त्याचे कारण विचारांची ताकद हेच आहे. शरद जोशी नावाचा विचार शेतकर्याच्या घराघरात पोहचला आहे. शेतीतील दारिद्र्याचा नायनाट करण्याची क्षमता केवळ शरद जोशींनी दाखविलेल्या मार्गात आहे, याची सर्वांना खात्री पटली आहे.\nमुक्तअ���्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी जेव्हा या देशातले मोठमोठे उद्योगपती, नामवंत अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्राचे प्राध्यापक जेव्हा कचखाऊ वृत्ती बाळगून आहे, तेव्हा या देशातला अनपढ-अनाडी शेतकरी मात्र मुक्तअर्थव्यवस्थेच्या बाजूने खंबीरपणे उभा ठाकला आहे. जे भल्याभल्यांना समजत नाही ते अर्थशास्त्र शेतकर्यांना कळलेले आहे आणि हा चमत्कार शरद जोशी नावाच्या वादळाने घडवून आणला आहे.\nअडीच तपा एवढा प्रदीर्घ काळ कोटी कोटी शेतकर्यांच्या हृदयात अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारे वादळ ३ सप्टेंबरला वयाचे ७६ टप्पे पूर्ण करून ७७ व्या टप्प्यात पदार्पण करीत आहे, त्यानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभावे म्हणून समस्त शेतकरी बांधवातर्फे माझ्या त्यांना लाखलाख शुभेच्छा...\nमा. शरद जोशी यांना बळीराजा डॉट कॉम सदस्य परिवारातर्फे\nशरद जोशी यांना मी मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा \nअगदी प्रामाणिक कथन आहे.\nशरद जोशींबाबत एक वेगळेच आकर्षण मनात आहे. विखुरलेल्या, पराभुत मनोवृत्ती पिढ्यानुपिढ्या ज्यांच्या अंगी रुजली होती अशा शेतकर्यांना एकत्र आणुन त्यांची केडरबेस्ड संघटना बांधण्याचे त्यांचे कार्य तर उत्तुंग आहेच पण त्यांची सोप्या भाषेत विविध जटील गोष्टी समजावुन सांगण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.\nजोशींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते जे कार्य करीत आहेत ते सुरु ठेवण्यासाठी त्यांना प्रदीर्घ व निरोगी जीवन लाभावे ही प्रार्थना.\nशेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना उदंड आयुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nकोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा.\nकोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा.\nशरद जोशी यांना बळीराजा डॉट कॉम सदस्य परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा \nशेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना उदंड आयुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nतिमिरातून प्रकाशाची वाट आपण दाखवली,\nम्हणूनच आमचे जगणे सुसह्य झाले,\nघामाचे दाम घेण्याचे आपण शिकवले,\nदयाधन परमेश्वर आपणास निरामय उदंड आयुष्य देवो....\nकिसान महात्मा, पितृतुल्य माननीय खासदार शरद जोशी साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....\nसुधाकर कराळे आणि परिवार,\nतालुका-राहुरी, जिल्हा - अहमदनगर\nसन्माननिय शरद जोशी साहेब,\nआपणास आपल्या जन्मदिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा..\nआपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ....\nता.- राहुरी, जि. -अहमदनगर.\nकोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-attack-vehicles-pimpri-chinchwad-91256", "date_download": "2019-03-25T08:26:24Z", "digest": "sha1:FB4RHHXWQOCZOPLJ3UMVGNIKGTEVDDOZ", "length": 10817, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune news attack on vehicles in Pimpri Chinchwad पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसोमवार, 8 जानेवारी 2018\nपिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात टोळक्याने येथील वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता.८) पहाटे उघडकिस आली.\nपिंपरी : गेल्यावर्षी पिंपरी चिंचवड सुरू असलेले तोडफोडीचे सत्र यावर्षीही कायम आहे. पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात टोळक्याने येथील वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता.८) पहाटे उघडकिस आली.\nयेथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन आहे. या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसणाऱ्या टोळक्याने ही तोडफोड केली. १५ दिवसापूर्वी याठिकाणी वाळलेल्या गवताला कोणीतरी आग लावली होती. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.\nकसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात...\nमहिला, मुलींमधील भय संपता संपेना\nपौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन म���लींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड,...\nपुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्या...\nभुरट्या चोरांची नजर सायकलींवर\nपुणे - शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला असताना पुणेकरांचा पुन्हा सायकल वापरण्याचा कल वाढत आहे. शाळकरी मुलांसह...\nगुन्हेगारांना भय राहिले कुठे\nनवीन पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात ‘रामराज्य’ येईल, अशी एक आशा होती. पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अशी भरभक्कम टीम...\nपिंपळे गुरवमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड\nपिंपरी : पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही ओढून नेले. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://devanaguide.huertatipografica.com/glyph.php?nombre=zero-deva", "date_download": "2019-03-25T08:38:29Z", "digest": "sha1:ZV7LRH4TY6RJ3FRYIEGAM7SFYVF35IVI", "length": 1814, "nlines": 41, "source_domain": "devanaguide.huertatipografica.com", "title": "Devanaguide- zero-deva", "raw_content": "\n२० १०ंआका ८४० २० ६० ८४० २० ८४० २० ८४० १० २० ८४० ६० ६० ८४० २० २० १०ंआका १०ंआका १० २० ६० १०ंआका १०ंआका १०ंआका १० १० २० २० ८४० २० ६० ८४० १० १० ६० १०ंआका २० ६० १० १० ८४० १० २० ६० २० २० ८४० ६० ६० २० ६० १० ६० १० ८४० २० ६० २० २० ६० २० ८४० १०ंआका १०ंआका २० १० ८४० १० २० १० ६० २० १०ंआका ८४० ६० ६० २० ६० १० ६० ६० २० २० १०ंआका १० २० १०ंआका २० २० ६० ८४० १० १०ंआका १० ६० ६० ६० ६०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialMay2015.html", "date_download": "2019-03-25T08:14:27Z", "digest": "sha1:Q7QJW7MU5OBNH45Q5UAG3GPC4T23PFMA", "length": 25394, "nlines": 25, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - भारतीय शेतक���्यांचे टॉंलस्टॉंय !", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. जयंतराव शामराव पाटील यांचे मंगळवार दि. ७ एप्रिल २०१५ रोजी दु. ३.०० वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाल्याचे कळले आणी एक माझा जीवस्य, कंठस्य, आधारवड, ज्येष्ठ स्नेही निघून गेल्याचे मला दु:ख झाले, ते कायम माझ्यासाठी दिपस्तंभासारखे उभे राहत.\nडॉ. जयंतरावांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील (आताच पालघर) बोर्डी येथे २८ मार्च १९२७ रोजी एका हाडाच्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे कृषी महाविद्यालयात झाले. १९४८ साली ते कृषी पदवीधर झाले. प्राध्यापक झेंडे सरांचे ते विद्यार्थी होते. त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.एस्सी.(कृषी) पदवी घेतली व नंतर अमेरिकेतील फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळवून तेथील कॅनसस राज्यातील विद्यापीठाची एम.एस.पदवी संपादन केली.\nत्यांचा आणी माझा परिचय १९७८ साली ज्यावेळेस ते पुना रोझ सोसायटीच्या कार्यक्रमाला येत असत तेव्हा झाला. मला पहिल्यापासून गुलाबाच्या फुलांबद्दल आवड होती. त्यामध्ये गावठी गुलाबाचे मला फार आकर्षण होते. मला जळगावच्या हायस्कूलमध्ये शिकताना तेथील गावठी गुलाबाचा सहवास वाढला. गोवर्धन सुंदरदास कृषी विद्यालय येथे ८ वी ते ११ वी पर्यंतचे शिक्षण घेत असताना पिंप्राळे फार्मवर देशी गावठी गुलाबावर डोळे भरण्याचे प्रशिक्षण मिळाले आणि पुण्याच्या शेतकी कॉलेजमध्ये १९५७ साली दाखल झाल्यानंतर मामांकडे राहत असताना तेथील घरगुती दोन कुंड्यातील गुलाबावर १५ - १६ व्या वर्षी, वाया गेलेल्या दाढीच्या ब्लेडने वेगवेगळे डोळे भरण्याचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. गुलाबावर टी (T) आकाराचा कट करून त्यात डोळा भरला की, ८ ते १० दिवसात डोळा फुटायचा व कुंड्यात रंगीबेरंगी फुले येत होती. त्यातून गुलाबाविषयीची ओढ अधिकच वाढू लागली. त्यामुळे पुण्यातील रोझ प्रदर्शनास मी जात असे. तेथे डॉ. जयंतराव पाटील यांच्याशी माझी भेट होवून विविध विषयावर चर्चा होत असे. त्यांच्या विषयी मी बरेच ऐकले होते. ते हाडाचे शेतकरी होते. त्यांना अंत: करणापासून शेतीविषयीची गोडी होती. शेतकऱ्यांच्या शेतीविषयीच्या अनेक समस्या व त्यावरील प्रत्यक्ष उपाय सुचविण्यामध्ये व लोकांच्या शंका निरसन करण्यात, मार्गदर्शन करण्यात ते पारंगत होते. कुठलीही गोष्ट किंवा सिद्धा��त मांडताना त्याची पार्श्वभूमी, इतिहास आणि त्याचा व्यवहारी उपयोग (Application) कसे करता येवून ते बहुजन शेतकरी वर्गाला कसे उपयुक्त आहे हे देश - परदेशातील शास्त्रज्ञांची, थोर समाजसेवकांची उदाहरणे किंवा त्यांनी केलेले प्रयोग कसे सिद्ध केले व उपयुक्त ठरले. याचे ते मुर्तीमंत उदाहरण आपल्यासमोर उभे करत असत. जुनी पिढी, तरुण पिढी, शास्त्रज्ञ, ग्रामीण विकासातील लोक यांना प्रेरणा देणारा ते अखंड झरा होते. खरे तर मदत टेरेसा यांनी जसे स्वत:चे जीवन गरीबीसाठी अर्पण केले होते तसेच आदिवासी भागातील गरीब जनतेचा व शेतकऱ्यांचा साक्षात विकास करणारे भारताचे ते 'टॉंलस्टॉंय' होते. कोकणातील ठाणे जिल्हा, बोर्डी, डहाणू, पालघर या भागात त्यांनी हापूस व केशर आंबा, कोकम, काजू, चिकू, बहाडोली जांभूळ, लिची या विविध फळपिकांमध्ये मोठे योगदान दिले. डहाणू तालुक्यातील बोर्डीमधील भात पीक संपल्यानंतर र्सर्व शेतकऱ्यांनी विविध फळपिके लावावीत. यासाठी त्यांनी प्रोत्साहीत केले. शहरातील माणसांना कोकणातील हापूस आंबा फक्त माहित होता आणि जेव्हा हापूस दुनियेला माहित नव्हता, तेव्हा त्या - त्या ठिकाणी गावठी आंबे देशावर मुबलक प्रमाणात होत असत. परंतु केशर आंब्याचा उदय प्रथमत: भारतात गुजरातमध्ये ५० वर्षापुर्वी झाला. नंतर त्याचा प्रसार महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात तसेच कर्नाटक, मध्येप्रदेश, गुजरात या राज्यात प्रचंड प्रमाणात झाला. तर या आंब्याबद्दल डॉ. जयंतराव पाटील फार आग्रही असत. त्यांना नेहमी वाटे की, मध्यवर्गीय आणि शहरी माणूस ज्या सुख - सुविधा व मजा उपभोगतो, तशा त्या दर्जाच्या जरी नाही मिळाल्या तरी त्याच्या ५०% तरी सुविधा गरीब शेतकऱ्यांना मिळाव्यात अशी त्यांची अंतरी तळमळ असे. याकरिता केशरआंबा, जांभूळ, करवंदे या रानमेव्याची शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर लागवड करून त्याचा आपल्या आहारात वापर करावा. त्यासाठी गरीब व आदिवासी लोकांना ते कायम प्रेरणा देत असत.\nपी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि महारष्ट्रात त्यावेळेस सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. तेव्हा एकावेळेस दिल्लीला जाताना विमानात नरसिंहरावांच्या सुधाकरराआदि नाईक यांना विचारले की, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील एका जाणकाराचे नाव तुमच्या लक्षात आले तर मला सांगा, कारण त्यांना भारताच्या नियोजन अयोगावर नेमायचे आ��े. तेव्हा सुधाकरराव नाईक यांच्या डोळ्यासमोर एकमेव नाव डॉ. जयंतरावांचे आले. कारण वसंतराव नाईक हे त्यांच्या उरुळीकांचनच्या द्राक्ष शेतीवर डॉ. जयंतराव पाटील यांना मार्गदर्शनासाठी बोलवित असत. त्यावरून त्यांनी डॉ. जयंतरावांचे नाव सुचविले. मग दिल्लीला नरसिंहराव पोहचल्यावर त्यांनी त्यांच्या सचिवाला ह्या नावाची आकाशवाणीवर घोषणा करण्यास सांगितले. तेव्हा त्या सचिवानी डॉ. जयंतराव पाटलांना फोनवर संमती विचारली. तेव्हा जयंतराव म्हणाले, अगोदर तुम्हाला मी माझा बायोडाटा पाठवितो. तेव्हा सचिवानी त्यांना सांगितले, पंतप्रधानांनीच तुमचे नाव सुचविले आहे. त्याची आकाशवाणीवरून घोषणा काही वेळातच व्हायची आहे. तेव्हा तुमची फक्त संमती मागतो आहे. हा किस्सा त्यांनी मला दिल्ली येथे त्यांच्या घरच्या भेटीत सांगितला. मला जेव्हा पहिले आंतरराष्ट्रीय विकासरत्न अॅवार्ड मिळाले. तेव्हा डॉ. जयंतराव पाटील त्या कार्यक्रमास अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्या - ज्यावेळी माझे दिल्लीला जाणे होई तेव्हा त्यांची - माझी आवर्जुन भेट होत असे. त्यांना नवीन तंत्रज्ञान व गरीब शेतकऱ्यांविषयी संशोधन करणाऱ्यांविषयी फार आपुलकी होती. त्यांना आम्ही 'कृषी विज्ञान' मासिक नियमित पाठवित असू. तेव्हा त्यांनी माझे १६ जानेवारी २००२ ला पत्र पाठवून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्यांना 'कृषी विज्ञान' ऑक्टोबर २०१४ चा अंक मिळाल्यावर माझ्या संशोधनाची पावती त्यांनी १७ ऑक्टोबर २०१४ ला पत्र लिहून \"हे मासिक किती उपयुक्त आहे आणि तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते, हे वाचून तंत्रज्ञान तुम्ही शेतकऱ्यांत प्रत्यक्ष रुजवता हे अत्यंत महत्त्वाचे आहे\" असे मला पत्राद्वारे मुद्दाम कळविले. त्याच बरोबर पत्रामध्ये मुद्दाम उल्लेख केला की, \"२५ वर्षापुर्वी तुम्ही दिलेल्या 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याच्या बियाचे झाड लावले ते अद्यापही डिसेंबर ते मे असे उत्पन्न देते.\" मी २५ वर्षापुर्वी जेव्हा शेवग्यावर संशोधन सुरू केले तेव्हा शेवगा हा तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रांतील शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष आहे. त्यांनी पत्रात तसाच शेवगा हा भाजीपाल्याचा कल्पवृक्ष आहे असा उल्लेख करून हे पोषणाचे वर्ष असल्याने त्याचा महाराष्ट्रभर प्रसार करावा असे सुचविले. हे पत्र मिळताच मी लगेच त्यांना फोन केला, त�� अर्धा तास आम्ही वेगवेगळ्या विषयवार चर्चा करीत होतो. ते नेहमी वडीलकीच्या नात्याने चांगला सल्ला देत व चांगल्या कामासाठी पाठीवर थाप देत. त्यांनी या पत्रात 'कृषी विज्ञान' च्या अंकात अमेरिकेची सोयाबीनची हेक्टरी उत्पादनकता ही भारतातील सरासरीपेक्षा जास्त आहे, हे वाचल्यानंतर त्यांनी मला भारतातील शेतकऱ्यांची उत्पादकता आपल्या तंत्रज्ञानाने सुधारावी, असे सुचविले. त्यावर मी गलेच डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने गेल्या १५ ते २० वर्षापासून सोयाबीनचे एकरी १८ ते २२ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या सांगली जिल्हातील शेतकऱ्यांचे संदर्भ पुढील अंकात प्रसिद्ध केले.\nदिल्लीवरून डॉ. जयंतराव निवृत्त झाल्यानंतर ते मुंबईला राहत असत. तेव्हा आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने जो आम्ही २००२ ला पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला होता त्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून दिवसभर हजर राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यक्रमास आलेल्या प्रगतीशील शेतकऱ्यांना, तंत्रज्ञाना, शास्त्रज्ञांना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा, तंत्रज्ञांचा सत्कार केला. हा २ दिवसांचा कार्यक्रम त्यांना फार आवडला. एकदा एका कॉन्फरन्समध्ये भाभा अणुशक्ती केंद्रावर डॉ. शरद काळे, जैव तंत्रज्ञान शास्त्रज्ञ यांनी मला व डॉ. जयंतरावांना बोलविले होते. तेथे आम्ही दोघे प्रमुख अतिथी होतो. तेथे भाभा अणुशक्ती केंद्राने विकसित केलेला बायोगॅस प्लँट त्यांनी आम्हाला दाखविला व जेवणानंतर शास्त्रज्ञांच्या एका परिषदेचे अध्यक्षस्थान भुषविण्यासाठी मला काळेंनी विनंती केली. त्यात अनेक शास्त्रज्ञांनी आपले पेपर सादर केले. त्यांना मार्गदर्शन केले. एकदा डहाणूला माझे चिकूवर भाषण होते तेव्हा त्यांना फोन केला की मी डहाणूला आलो आहे. तेव्हा बोर्डीला त्यांना भेटायला गेलो व आदरातिथ्य झाले. तेथे १ ते १ तास शास्त्रीय चर्चा व कौटुंबिक गप्पा झाल्या.\nडॉ. जयंतराव पाटील यांच्या कार्यावर महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व बोर्डीचे आचार्य भिसे यांच्या विचारांचा पगडा होता. कृषी क्षेत्रातील विकास, ग्रामीण विकास, फळबागांतील उत्थान, बहुवर्षीय फलोत्पादन भारताला कसे वरदान आहे हे त्यांनी भाषणातून सांगितले नाही तर ते नियोजन मंडळाचे सभासद असताना त्यांनी नवीन लागवड व संवर्धन या��िषयी प्रचंड कार्य केले व जनजागृती मोठ्या प्रमाणात केली.\nडॉ. बोरलॉग यांनी ज्या अमेरिकन बुटक्या गव्हाच्या जाती अथक परिश्रमातून शोधून काढल्या, यामुळे जगातील व भारत देशातील भूक मिटली व भारताची अन्नधान्याची उत्पादकता वाढून अत्यावश्यक अन्नधान्याची आयात थांबली. भारत अन्नधान्य निर्मितीत स्वावलंबी झाला. याचा डॉ. बोरलॉग यांचा ते आदराने उल्लेख करीत असत. डॉ. स्वामीनाथन यांच्या धोरणात्मक विचारांबद्दल त्यांच्या संशोधन कार्याबद्दल, सरकार व जागतिक पातळीवर विशेषकरून गरीब व ग्रामणी भागातील लोकांसाठी सुचविलेले उपाय किती दूरगामी परिणाम करणारे आहेत. ह्याचा डॉ. जयंतराव त्यांच्या लिखाणातून मुद्दाम उल्लेख करीत असत.\nदेशभरातील शेतीचा त्यांचा सखोल अभ्यास होता. शेतीअभ्यासाच्या अनुषंगाने ते जगभर फिरले. त्यांच्या कृषी व ग्रामीण पुनर्रचनेच्या कार्याबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १९८१ मध्ये त्यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद पदवी प्रदान केली. महाराष्ट्र शासनाने २००३ यावर्षी 'कृषीरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देवून गौरविले होते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची कृषी व फलोत्पादन क्षेत्रात ३५ वर्षाहून अधिक काळ सेवा केल्याबद्दल त्यांना १९७९ मध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या 'जमनालाल बजाज' पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. पाटील यांनी कृषी औद्योगिक समाज रचनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानने १९९८ मध्ये त्यांना 'यशवंतराव चव्हाण' पुरस्काराने गौरविले. कृषी क्षेत्रातील साहित्याबद्दल वसंतराव नाईक प्रतिष्ठानने 'वसंतराव नाईक' पारितोषिकाने सन्मानित केले.\nत्यांनी दिलेले विचार, कृती ही केंद्र सरकारने व राज्यसरकारने जर तंतोतंत पाळून कृतीत उतरविली तर शेतीची आताची आतबट्ट्याची परिस्थिती आहे ती हळूहळू कमी होवून शेतकरी कर्जमुक्त होवून सुखाचे २ घास खाईल, हीच डॉ. जयंतरावांना खरी आदरांजली ठरेल. 'कृषी विज्ञान' परिवारातर्फे त्यांना मानाचा मुजरा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-jpc-demand-congress-fraudulent-advocate-prakash-ambedkar-4080", "date_download": "2019-03-25T07:42:05Z", "digest": "sha1:WBZGWILOCDXS4CNPE5IK4MMSO6A3WFPO", "length": 8783, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news JPC demand of congress is fraudulent advocate prakash ambedkar | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्���ाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेसची जेपीसीची मागणी फसवी : प्रकाश आंबेडकर\nकाँग्रेसची जेपीसीची मागणी फसवी : प्रकाश आंबेडकर\nकाँग्रेसची जेपीसीची मागणी फसवी : प्रकाश आंबेडकर\nकाँग्रेसची जेपीसीची मागणी फसवी : प्रकाश आंबेडकर\nशुक्रवार, 4 जानेवारी 2019\nलातूर : भारतीय जनता पक्ष व काँग्रेसला राफेलप्रकरणाची खऱी माहिती जनतेसमोर येवू द्यायची नाही. निवडणुकीच्या अगोदर ही माहिती समोर येवू नये अशीच पावले दोन्ही पक्षाकडून टाकली जात आहेत. या प्रकरणी काँग्रेसने केलेली जेपीसीची मागणी ही तर फसवी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. बोफर्स प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित होते तर राफेल प्रकरण हे देशाच्या सुरक्षीततेशी खेळल्याचे प्रकरण आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nलातूर : भारतीय जनता पक्ष व काँग्रेसला राफेलप्रकरणाची खऱी माहिती जनतेसमोर येवू द्यायची नाही. निवडणुकीच्या अगोदर ही माहिती समोर येवू नये अशीच पावले दोन्ही पक्षाकडून टाकली जात आहेत. या प्रकरणी काँग्रेसने केलेली जेपीसीची मागणी ही तर फसवी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. बोफर्स प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित होते तर राफेल प्रकरण हे देशाच्या सुरक्षीततेशी खेळल्याचे प्रकरण आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nयेत्या नव्वद दिवसानंतर लोकसभा निवडणुका असणार आहेत. सध्याच्या सभागृहात असलेले अर्धवट काम तेथेच संपते. पुढच्या सभागृहात त्याला महत्व राहत नाही. काँग्रेसला खरेच हे प्रकरण बाहेर काढायचे असते तर त्यांनी पब्लिक अकाऊंट कमिटीकडे ही मागणी केली असते. या कमिटीचे अध्यक्ष काँग्रेसचेच नेते मल्लिकार्जून खर्गे हे आहेत. या कमिटीने राफेलची कागदपत्रे मागितली असती तर ती सरकारला देणे बंधनकारक होती. काँग्रेसने ही कागदपत्र का मागितली नाहीत याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आता त्यांची जेपीसीची मागणी ही फसवी आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसने सभागृहात या प्रकरणाची कंट्रोलर आणि आॅडिटर जनरल यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा असा ठराव जरी घेतला अस���ा तरी दूध का दूध पाणी का पाणी झाले असते असे आंबेडकर म्हणाले.\nराफेलमध्ये शंभर टक्के घोटाळा आहे. या व्यवहारात विमानाची किंमत एक हजार कोटी रुपयांनी कशी वाढली याचा खुलास सरकार करीत नाही. तसेच या व्यवहारात फ्रान्स सरकारने कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. या विमानाचा एखादा पार्टही खराब झाला तर ते कचऱयाच्या टोपलीत टाकावे लागणार आहे. यात फ्रान्स सरकारने कोणतीही हमी घेतलेली नाही. हा खरा मुद्दा आहे, असे आंबेडकर म्हणाले.\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. पण काँग्रेस अद्याप रिअॅक्ट झालेली नाही. काँग्रेसने आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू अशी माहिती श्री. आंबेडकर यांनी यावेळी दिली.\nकाँग्रेस प्रकाश आंबेडकर prakash ambedkar निवडणूक\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/node/2313", "date_download": "2019-03-25T07:57:42Z", "digest": "sha1:4YYKKII3G6BSYSV5REME2QKTSI4TZEDH", "length": 5743, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news telangana maratha protest | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतेलंगणाच्या सीमावर्ती भागातही मराठा बंदला उस्फुर्त प्रतिसाद\nतेलंगणाच्या सीमावर्ती भागातही मराठा बंदला उस्फुर्त प्रतिसाद\nतेलंगणाच्या सीमावर्ती भागातही मराठा बंदला उस्फुर्त प्रतिसाद\nमंगळवार, 24 जुलै 2018\nनांदेड - तेलंगणा व महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर उमरी, किनवट, हिमायतनगर या सीमावर्ती तालुक्यातही मराठा आंदोलनाला आज दुपारनंतर प्रतिसाद मिळाला.\nउर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत या भागात हिंसक घटना कमी असल्या तरी जिल्ह्यात आज या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला. सीमेवरील भोकर, उमरीत कडकडीत बंद ठेवण्यात आला. उमरीत शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले.\nकिनवटमध्ये आजच्या आंदोलनात मराठा युवकांचा मोठा सहभाग होता. बंदला १००टक्के प्रतिसाद मिळाला. धर्माबादेत शहर बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nनांदेड - तेलंगणा व महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर उमरी, किनवट, हिमायतनगर या सीमावर्ती तालुक्यातही मराठा आंदोलनाला आज दुपारनंतर प्रतिसाद मिळाला.\nउर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत या भागात हिंसक घटना कमी असल्या तरी जिल्ह्यात आज या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला. सीमेवरील भोकर, उमरीत कडकडीत बंद ठेवण्यात आला. उमरीत शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले.\nकिनवटमध्ये आजच्या आंदोलनात मराठा युवकांचा मोठा सहभाग होता. बंदला १००टक्के प्रतिसाद मिळाला. धर्माबादेत शहर बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nनांदेड nanded महाराष्ट्र maharashtra आंदोलन agitation\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/colors-marathi/", "date_download": "2019-03-25T07:35:55Z", "digest": "sha1:3IGYCRMS7R64WJVFYP6MLLJ6O42U4NAM", "length": 6453, "nlines": 76, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Colors Marathi - मराठी कलाकार", "raw_content": "\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\nआजकाल जे क्षेञ बघावं त्यात चढाओढ सुरु आहे. त्या त्या क्षेत्रातील स्पर्धकांमध्ये कमालीची स्पर्धा आजच्या जमान्यात...\n“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.\n“घाडगे & सून” ही कलर्स मराठीवरील मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत...\nबिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा नाडकर्णी.\n‘बिग बॉस’ या रिएलिटी शोनंतर महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी...\nस्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची धमाल.निमित्त ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमाचं.\nमहाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने...\nसई आणि रेशममध्ये वाद कोण होणार नवा कॅप्टन\nबिगबॉस मराठीचा शो आता झपाट्याने पुढे सरकत असून टास्कमागे टास्क घरातील सदस्यांना मिळतं असल्याचं आपल्याला हल्ली...\nनंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री\nशर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर नंतर बिगबॉसच्या घरात आता वेळ आलीय अजून एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीची. होय...\nसई आणि रेशम, जुई आणि आस्तादमध्ये होणार वाद “बाबागाडी घराबाहेर काढी” टास्क\nबिगबॉसच्या घरात होत काय तर काही सदस्य इथे राहायला येतात. त्यांना काही टास्कस बिगबॉसने दिलेले असतात....\nमर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार बिगबॉसने दिले SR चे संकेत\n नाव एवढं गूढ मात्र आजवरच्या बिगबॉसच्या घरातील टास्क्सपैकी धक्काबुक्की, शाब्दिक चकमक न होता पार...\nअभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\nबिगबॉस मराठीमध्ये सध्या बऱ्याच घटना वातावरण ढवळून काढतायत. बिगबॉसने दिलेलं मर्डर मिस्टरी टास्क, त्रुतुजाचं घर सोडून...\nबिगबॉस मराठीमध्ये आता मर्डर मिस्टरी\nएका फ्रेश टास्कसोबत आपल्याला बिगबॉसच्या नव्या आठवड्याची सुरुवात होताना आज दिसली. घरातील आजवर पार पडलेली टास्कस...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-03-25T08:18:48Z", "digest": "sha1:NDHRM5GFU2OVHFJGIGNMYLVXHRQLNWUG", "length": 12132, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॅनियल व्हेट्टोरी - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव डॅनियल लुका व्हेट्टोरी\nजन्म २७ जानेवारी, १९७९ (1979-01-27) (वय: ४०)\nउंची ६ फु ३ इं (१.९१ मी)\nगोलंदाजीची पद्धत स्लो डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स\nक.सा. पदार्पण (२००) ६ फेब्रुवारी १९९७: वि इंग्लंड\nशेवटचा क.सा. १९ जानेवारी २०११: वि पाकिस्तान\nआं.ए.सा. पदार्पण (१००) २५ मार्च १९९७: वि श्रीलंका\nएकदिवसीय शर्ट क्र. ११\n२००८ – २०१० दिल्ली डेरडेव्हिल्स\n२०११ – present रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने १०५ २६६ १५७ ३३३\nधावा ४,१६७ २,०५२ ६,०१४ ३,३०६\nफलंदाजीची सरासरी ३०.१९ १७.२४ ३०.३७ २०.४०\nशतके/अर्धशतके ६/२२ ०/४ ९/३२ २/१०\nसर्वोच्च धावसंख्या १४० ८३ १४० १३८\nचेंडू २६,८६० १२,६४५ ३७,५८५ १६,०६३\nबळी ३४५ २७९ ५१९ ३५८\nगोलंदाजीची सरासरी ३३.९८ ३१.२७ ३२.०५ ३०.४६\nएका डावात ५ बळी १९ २ २९ २\nएका सामन्यात १० बळी ३ n/a ३ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ७/८७ ५/७ ७/८७ ५/७\nझेल/यष्टीचीत ५७/– ७६/– ८१/– १०७/–\n८ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nकसोटी सामन्यात अष्टपैलू क्रिकेटपटूंचे डबल (२००० धावा आणि २०० बळी) मिळवणारे खेळाडू\nवासिम अक्रम ७८ कसोटी • रिची बेनॉ ६० कसोटी • इयान बॉथम ४२ कसोटी • Chris Cairns ५८ कसोटी • रिचर्ड हॅडली ५४ कसोटी • जॉक कालिस १०२ कसोटी • कपिल देव ५० कसोटी • इमरान खान ५० कसोटी • अनिल कुंबळे ११० कसोटी • शॉन पोलॉक ५६ कसोटी • गारफील्ड सोबर्स ८० कसोटी • चमिंडा वास ८२ कसोटी • डॅनियल व्हेट्टोरी ६९ कसोटी • शेन वॉर्न १०० कसोटी\nकसोटी क्रिकेट मध्ये ३०० बळी घेणारे खेळाडू\nटळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत.\n• शेन वॉर्न (७०८) • ग्लेन मॅकग्रा (५६३) • डेनिस लिली (३५५) • ब्रेट ली (३१०)\n• इयान बॉथम (३८३) • बॉब विलिस (३२५) • फ्रेड ट्रमन (३०७)\n• अनिल कुंबळे (६१९) • कपिल देव (४३४) • हरभजनसिंग (४०६)\n• रिचर्ड हॅडली (४३१) • डॅनियल व्हेट्टोरी (३५५)\n• वसिम अक्रम (४१४) • वकार युनिस (३७३) • इम्रान खान (३६२)\n• शॉन पोलॉक (४२१) • मखाया न्तिनी (३९०) • अॅलन डॉनल्ड (३३०)\n• मुथिया मुरलीधरन (८००) • चामिंडा वास (३५५)\n• कर्टनी वॉल्श (५१९) • कर्टली अँब्रोस (४०५) • माल्कम मार्शल (३७६) • लान्स गिब्स (३०९)\nन्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३\n१ फ्लेमिंग • २ ऍड्म्स • ३ ऍस्टल • ४ बॉन्ड • ५ क्रेन्स • ६ हॅरीस • ७ मॅककुलम • ८ मॅकमिलन • ९ मिल्स • १० ओराम • ११ सिंकलेर • १२ स्टायरिस • १३ टफी • १४ व्हेट्टोरी • १५ व्हिंसेंट\nन्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ फ्लेमिंग • २ व्हेट्टोरी • ३ बॉन्ड • ४ फ्रँकलिन • ५ फुल्टन • ६ गिलेस्पी • ७ मॅककुलम • ८ मॅकमिलन • ९ मार्शल • १० मार्टीन • ११ मॅसन • १२ ओराम • १३ पटेल • १४ स्टायरिस • १५ टेलर • १६ टफी • १७ व्हिंसेंट • प्रशिक्षक: ब्रेसवेल\nटफी व व्हिंसेंट यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. त्यांच्या ऐवजी मार्टिन व मार्शल यांचा समावेश करण्यात आला.\nन्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n११ व्हेट्टोरी(ना.) •४२ ब्रॅन्डन(य.) •५२ बेनेट्ट •७० फ्रँकलिन •३१ गुप्टिल • हॉव •१५ नेथन •३७ मिल्स •२४ ओराम •७७ रायडर •३८ साउथी •५६ स्टायरिस •३ टेलर • २२ विल्यमसन • वूडकॉक •प्रशिक्षक: राईट\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स – सद्य संघ\n२ कैफ • ३ पुजारा • ९ कार्थिक • १२ पोमर्सबाच • १४ अगरवाल • १८ कोहली • ३२ तिवारी • -- रोसोव • -- झोल • ११ व्हेट्टोरी • ४ मॅकडोनाल्ड • ७ पठा • २३ दिलशान • ३३३ गेल • -- भटकल • -- नायर • -- थिगराजन • १७ डी व्हिलियर्स • -- गौतम • १ पटेल • ५ रहमान • ८ मोहम्मद • २५ मिथुन • ३४ खान • ३७ अरविंद • ६३ नेन्स • ६७ लँगेवेल्ड्ट • ८०० मुरलीधरन • -- अपन्ना • -- काझि • -- निनान • -- मोरे • प्रशिक्षक जेनिंग्स\nइ.स. १९७९ मधील जन्म\nइ.स. १९७९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२७ जानेवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स सद्य खेळाडू\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:28:56Z", "digest": "sha1:DMRD6EQ3NQRJYIWGKM5FVNC2RI4Y4US2", "length": 3660, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामाचा शेला - विकिपीडिया", "raw_content": "\nरामाचा शेला ही साने गुरुजी यांची एक कादंबरी आहे. या कादंबरीत साने गुरुजींनी प्रेम, विधवाविवाह, अस्पॄश्योद्धार इत्यादि विषय हाताळले आहेत. ही कादंबरी पहिल्यांदा इसवी सन १९४४ मध्ये कॉन्टिनेंटल प्रकाशनाद्वारे प्रकाशीत करण्यात आली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१८ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-apmc-traffic-82265", "date_download": "2019-03-25T08:16:12Z", "digest": "sha1:RVW3L3BCJTBGEN4EM2RFANVS2VFQZNRT", "length": 20364, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news APMC traffic एपीएमसीत वाहतुकीचा बोजवारा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमंगळवार, 14 नोव्हेंबर 2017\nनवी मुंबई - वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईवरील भार हलका करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईतील वाशी येथे स्थलांतरीत केली; परंतु त्या वेळी समितीच्या घाऊक बाजारात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येचे आणि वाहनतळाचा विचार करून नियोजन केले नसल्याने आज एपीएमसीत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. येथे दररोज हजार ते दीड हजार वाहनांची ये-जा होत असते; मात्र पार्किंगची जागा अपुरी पडू लागल्याने वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे.\nनवी मुंबई - वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईवरील भार हलका करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईतील वाशी येथे स्थलांतरीत केली; परंतु त्या वेळी समितीच्या घाऊक बाजारात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येचे आणि वाहनतळाचा विचार करून नियोजन केले नसल्याने आज एपीएमसीत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. येथे दररोज हजार ते दीड हजार वाहनांची ये-जा होत असते; मात्र पार्किंगची जागा अपुरी पडू लागल्याने वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे.\nस्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील वाहनांची संख्या सध्या पाच लाखांच्या घरात आहे. दर वर्षी ती २० हजारांनी वाढत आहे. शहरातून मुंबई-पुणे महामार्ग जातो. त्यामुळे त्यावरून धावणाऱ्या हजारो वाहनांचीही त्यात भर पडते.\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशभरातून दररोज हजारो वाहने येतात. तेवढीच वाहने येथून जातात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते. येथील पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने बाजार समितीच्या परिसरात नेहमीच वाहतूक कोलमडते. शहरात येणाऱ्या वाहनांमध्ये एपीएमसीमध्ये सर्वांत जास्त वाहने दररोज येतात. त्यामुळे हा भाग नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची वाहने दुकानांसमोरच उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बाजार समितीमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी येथे स्वतंत्र वाहनतळाची गरज आहे.\nबाजार समितीच्या आवारात एक वाहनतळ आहे; परंतु तोही अपुरा पडतो. बाजारात कृषी माल घेऊन येणाऱ्या व इतर कारणांसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या फार मोठी आहे. माल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजारात थांबण्यासाठी रीतसर परवानगी दिली जाते; मात्र इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येतात.\nमध्यंतरी व्यापाऱ्यांच्या खासगी वाहनांना मार्केटच्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा पार्किंगसाठी वापर करण्याची परवानगी दिली होती; मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. या सर्व्हिस रोडवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. बाजारात आलेल्या गाड्या रिकाम्या करण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे बाजारात वाहनांच्या रांगा लागतात. ही समस्या भाजीपाला आणि फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. इतर बाजारात गाड्या रिकामी होईपर्यंत दुसऱ्या गाड्या थांबवण्यासाठी पुरेशी जागा आहे. त्यामुळे तिथे गोंधळ उडत नसला, तरी नियोजन करणे गरजेचे आहे.\nवाहनांचे योग्य पार्किंग करण्यासाठी मल्टिस्टोरेज पार्किंगची गरज आहे. अवजड वाहने सर्वांत खाली त्याच्यावर हलकी वाहने अशा पद्धतीच्या मल्टिस्टोरेज पार्किंगची बाजारात गरज आहे. स्वतंत्र वाहनतळासाठी बाजार समितीच्या वतीने सिडकोबरोबरच पालिका आयुक्त रामास्वामी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. पालिकेने जागा दिली, तर वाहनतळ उभारण्यासाठी ५० टक्के खर्च करण्याची आमची तयारी आहे.\n- सतीश सोनी, प्रशासक, बाजार समिती\nबाजार परिसरात वाहन पार्किंगसाठी कुठेही स्वतंत्र जागाच नाही. त्यामुळे येणाऱ्या गाड्या एक तर रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या जातात किंवा मधेच. बाजार आहे म्हटल्यावर गाड्या येणारच. त्यामुळे इथे स्वतंत्र वाहनतळाची गरज आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आम्ही नेहमी वाहतूक पोलिस तैनात करतो; मात्र हा त्यावरील उपाय नाही. त्यासाठी स्वतंत्र वाहनतळ आवश्यक आहे.\n- मच्छिंद्र खाडे, वाहतूक पोलिस निरीक्षक\nवाहनतळासाठी जागा नसल्याचे कारण पुढे येत आहे. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी बाजाराला लागून असलेल्या नाल्यावर पार्किंगची सुविधा पालिकेने उपलब्ध करून द्यावी, असा पर्याय आम्ही सुचवला आहे. पालिका आयुक्तांकडे तशी मागणीही केली आहे. यामुळे वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल आणि उघड्या नाल्याची समस्याही दूर होईल.\n- संजय पानसरे, माजी संचालक\nबाजार समितीमध्ये वाढती वाहन संख्या पाहता इथे भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता आहे. पार्किंगचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. येथे पूर्ण क्षमतेचे वाहनतळ आवश्यक आहे. येथील वाहनचालकांसाठी राहण्याची व खाण्याची योग्य दरात व्यवस्था असावी. बाजार समितीत नवीन वाहनतळासाठी जागा नसल्याने मल्टि���्टोरेज पार्किंग करावे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला; परंतु काहीच फायदा झाला नाही.\n- भरत सामंत, सामाजिक कार्यकर्ते\nशिवाजी रस्त्याचा कोंडला श्वास; चतुर्थीमुळे दगडुशेठ मंदिर परिसरात वाहतूक कोंडी\nपुणे : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी रस्त्यावर आज (ता. 24) सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नागरिकांना या वाहतूक कोंडीच्या...\nपुणे-नगर रस्त्यावर महिनाभर अवजड वाहनांना बंदी\nतळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात...\n#TrafficIssue पुणेकरांची होणार कोंडीतून सुटका\nपुणे - शहरातील वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून त्यावर आधारित उपाययोजनांचा आराखडा वाहतूक पोलिसांनी तयार केला आहे. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्यास...\nसेतू पुरुष : प्रशांत शेटये\n२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे...\nदोनशे बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल\nपुणे : नो-एंट्रीतून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या सुमारे 200 जणांवर वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांत गुन्हे दाखल केले. कारवाईची थंडावलेली मोहीम पुन्हा...\nपुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) आणि नदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/ulhasnagar-breaking-news-youth-commits-suicide-video-call-53821", "date_download": "2019-03-25T08:51:13Z", "digest": "sha1:TWVQRCOZAUTBADTJVO6SPBWFAMDC2WJU", "length": 14948, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ulhasnagar breaking news youth commits suicide on video call प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nप���रेयसीला व्हिडिओ कॉल करून तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड\nसोमवार, 19 जून 2017\nउल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये राहणारा 29 वर्षीय हनी असवानी हा व्यापा-याचा मुलगा. हनी आणि नालासोपारा येथे राहणा-या तरुणीचे पाच सहा वर्षा पासून प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचे प्रेम संबंध तुटले. दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरवले. 2 जुलै रोजी हनीचे लग्न होणार होते तर आज (सोमवारी) तरुणी लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे.\nउल्हासनगर : प्रेम प्रकरण तुटल्यानंतर व घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमीकेला व्हिडीओ कॉल करुन लाईव्ह आत्महत्या केल्याची घटना महिन्यानंतर उघडकिस आली आहे. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे आज सोमवारी ही तरुणी लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे.\nउल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये राहणारा 29 वर्षीय हनी असवानी हा व्यापा-याचा मुलगा. हनी आणि नालासोपारा येथे राहणा-या तरुणीचे पाच सहा वर्षा पासून प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचे प्रेम संबंध तुटले. दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरवले. 2 जुलै रोजी हनीचे लग्न होणार होते तर आज (सोमवारी) तरुणी लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे.\n''महिन्यापूर्वी हनी आणि तरुणीची भेट झाली. त्यांच्यात भांडण झाल्यावर 21 मे रोजी हनीने आत्महत्या केली. त्याने गळफास घेण्यापूर्वी तरुणीला व्हिडिओ कॉल केला. आत्महत्या करत असल्याच्या तो म्हणाला. तिने त्याला आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही. 'आत्महत्या करुन दाखव,' असे तरुणीने म्हटल्यावर हनीने आत्महत्या केली,\" अशी खळबळ जनक तक्रार हनीचे वडील नरेश आसनानी यांनी आज हिल लाईन पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार तरुणीवर आत्महत्तेस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.\nयासंदर्भात हिल लाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता, हनीने व्हिडिओ कॉल करुन लाईव्ह आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली आहे, असे सांगितले. त्यानुसार तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्हिडिओ कॉल नीट दिसत नाही.तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असून व्हिडिओ नीट दिसल्यावर पुढील तपा��� करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\n'ई सकाळ'वरील आणखी वाचा\nsarkarnama.in : विशेष बातम्या\nआज दिवसभरात... (ई सकाळ व्हिडिओ बुलेटिन)\nजिवंत पत्नीला मृत दाखवून केले दुसरे लग्न\nनागपूर - जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावरून एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी मृत पावल्याची खोटी माहिती दुसऱ्या घटस्फोटित महिलेला देत तिच्याशी लग्न केले...\nकोई मुर्गा नही काटेगा एैसा मेरे बच्चे के साथ हुवा है\nजळगाव - टोणगाव (ता. भडगाव) येथील बेपत्ता बब्बू सय्यद यांचा मुलगा इसम (वय ९) याच्या अपहरणानंतर खून करून मृतदेह शेतात फेकण्यात आल्याने खळबळ उडाली....\nपीडिता ती अन् फितूरही तीच\nपुणे - कोवळ्या वयात झालेल्या अत्याचाराविरोधात ती न्यायाची लढाई लढते. मात्र खटल्यातील विलंबाचा फायदा घेत आरोपींकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडत...\nमुलीची लादलेल्या मातृत्वातून अखेर सुटका\nपुणे - बलात्कारातून गरोदर झालेल्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या लढ्याला यश आले. उच्च...\nपुण्यामध्ये मुलींचा बालविवाह रोखला\nपुणे - खरं तर त्या दोघीही अभ्यासात हुशार... आता त्या दहावीची परीक्षा देत होत्या अन् पुढे शिकण्याची त्यांची प्रबळ इच्छाही होती. मात्र आई-वडिलांनी...\nनाट्यबीजाची 'पेरणी' (प्रवीण तरडे)\nआमची उंब्रजमधल्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-tanishka-digital-literacy-tanishka-52715", "date_download": "2019-03-25T08:52:33Z", "digest": "sha1:RSZY2THFA2K4F3GVQFV2SAZE22U72OEC", "length": 18474, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news tanishka Digital Literacy by Tanishka तनिष्का करणार 'डिजिटल' साक्षरता | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्��� 25, 2019\nतनिष्का करणार 'डिजिटल' साक्षरता\nगुरुवार, 15 जून 2017\nटाटा ट्रस्ट, गुगलच्या बरोबर साडेतीन हजार गावांत लवकरच काम\nटाटा ट्रस्ट, गुगलच्या बरोबर साडेतीन हजार गावांत लवकरच काम\nपुणे - महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेत चौदा नगरपालिका हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या यशस्वी होत असतानाच नऊशेहून अधिक तनिष्का आता महाराष्ट्रात \"इंटरनेट साथी' म्हणून काम करणार आहेत. टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया आणि सकाळ सोशल फाउंडेशन यांच्या या संयुक्त प्रकल्पात राज्यातील सुमारे तीन हजार 692 गावांत डिजिटल परिवर्तनाच्या दूत म्हणून \"तनिष्का' काम पाहतील.\nसमाजोपयोगी कामांमध्ये अग्रेसर असलेला टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडियाच्या या प्रकल्पात गेल्या दोन वर्षांपासून देशातील बारा राज्यांतील 82 हजार गावांत 23 हजार \"इंटरनेट साथी' ग्रामीण महिलांसाठी इंटरनेट वापरातून रोजगाराच्या संधी शोधून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम करीत आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सकाळ सोशल फाउंडेशन राज्यातील 33 जिल्ह्यांतल्या 246 तालुक्यांत 924 तनिष्कांच्या मदतीने काम करणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून तनिष्का कोकणातील रायगडपासून कोल्हापूर, नंदुरबारचा दुर्गम आदिवासी भाग ते विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांतल्या तीन हजार 692 गावांतल्या सुमारे सहा लाख स्त्रियांपर्यंत आता नेहमीच्या कामांव्यतिरिक्त इंटरनेट साथी म्हणून पोचणार आहेत.\nपूरक सामाजिक, सांस्कृतिक वातावरण आणि साधनांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांचे इंटरनेट वापरून माहिती घेण्याचे प्रमाण कमी आहे. \"इंटरनेट साथी' त्यावर मात करण्याचा एक प्रयत्न आहे. दहावी, बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा आणि समाजात वावरण्याची थोडी तयारी असणाऱ्या, स्मार्ट फोन, टॅब वापरू शकणाऱ्या ग्रामीण भागातील महिलेला साथी म्हणून काम करण्याची संधी मिळते. \"इंटरनेट साथी'च्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक यशोगाथा साकारल्या आहेत. इंटरनेटचा वापर करून ग्रामीण भागात स्त्रियांनी दारूबंदी केली. इंटरनेटवरून कपड्यांच्या नव्या फॅशन त्या शिकतात, आरोग्याची, शेतीची माहिती घेतात. ग्रामीण स्त्रिया���ना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात, नवनव्या माहितीचे दालन त्यांच्यापुढे खुले व्हावे हा हेतू या प्रकल्पात साध्य झाला आहे.\nएक साथी पोचते सहाशेजणींपर्यंत\nइंटरनेट साथी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. एक इंटरनेट साथी ती राहत असलेल्या गावाखेरीज लगतच्या तीन ते पाच गावांतील सुमारे सहाशे ते आठशे स्त्रियांना सहा महिन्यांत इंटरनेटच्या वापराची माहिती देते. त्यासाठी तिला टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडिया यांच्याकडून फोन आणि टॅब तर मिळतोच, शिवाय टाटा ट्रस्ट मानधनही देते. समाजबदलाच्या कामात पुढाकार घेणाऱ्या तनिष्का सदस्या ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता रूजवण्याच्या अनोख्या प्रकल्पात आता सहभागी होत आहेत. गुरुवार (ता. 15) पासून पहिल्या टप्प्यातल्या इंटरनेट साथींचे प्रशिक्षण राज्याच्या विविध भागांत सुरू होत आहे.\nसर्वांत मोठे डिजिटल नेटवर्क\nपुढील दोन वर्षांत (2019 पर्यंत) देशातील तीन लाख गावांपर्यंत पोचण्याचे टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडियाचे उद्दिष्ट आहे. सुमारे 90 हजार प्रशिक्षित इंटरनेट साथी असलेले हे भारताच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठे डिजिटल नेटवर्क असेल. ग्रामीण भारतातल्या एक कोटींहून अधिक लोकांना सध्या या प्रकल्पाचा लाभ मिळतो आहे. पुढील दोन वर्षांत पाच कोटी लोकांना याचा लाभ मिळावा, असे नियोजन आहे. गेल्या चार वर्षांत पाणी, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात आपल्या कामाद्वारे ठसा उमटवणाऱ्या तनिष्का व्यासपीठाला जागतिक पातळीवर नावाजलेल्या टाटा ट्रस्ट आणि गुगलसारख्या संस्थांबरोबर या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.\nशिवाजी रस्त्याचा कोंडला श्वास; चतुर्थीमुळे दगडुशेठ मंदिर परिसरात वाहतूक कोंडी\nपुणे : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी रस्त्यावर आज (ता. 24) सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नागरिकांना या वाहतूक कोंडीच्या...\nगुगलवरील पत्ता आरटीईसाठी कन्फर्म असावा\nपिंपरी - आरटीई प्रवेशांतर्गत ऑनलाइन फॉर्म भरताना ‘गुगल’वर घराचा पत्ता चुकीचा दर्शविला जात असल्याने पालकांनी अर्ज ‘कन्फर्म’ करताना पत्ता योग्य...\n Google च्या दोन सेवा 15 दिवसांत होतायत बंद\nगुगल या कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांचे Inbox हे ई-मेल अॅप बंद होणार असल्याचे जाहीर केले होते. आज (ता. 21) त्यांनी हे अॅ��� 2 एप्रिल बंद होणार...\n'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'च्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद\nदेशातील बांधकाम क्षेत्राला (रिअल इस्टेट) नवीन दिशा देणाऱ्या आयपीओला भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद देत बांधकाम क्षेत्राचे उज्वल भविष्य...\nगुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड\nब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑनलाइन...\nगुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स\nनवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 ऍप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवण्यात आले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/special-ambulance-pregnant-women-139975", "date_download": "2019-03-25T08:26:50Z", "digest": "sha1:G7Y6KBVWQVIKLAIU47A4WYU54UCIH2FN", "length": 14682, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Special Ambulance for Pregnant women गर्भवतींसाठी विशेष रुग्णवाहिका | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nपुणे - गर्भवतींची हेळसांड रोखण्यासाठी महापालिकेने उपाय आखण्यास सुरवात केली आहे. प्रसूतीसाठी महिलांना लगेचच रुग्णालयात पोचता येईल, या उद्देशाने खास रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन फिरत्या रुग्णवाहिका रस्त्यावर येतील, यामध्ये प्रसूतितज्ज्ञासह गर्भवतींना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या असतील.\nपुणे - गर्भवतींची हेळसांड रोखण्यासाठी महापालिकेने उपाय आखण्यास सुरवात केली आहे. प्रसूतीसाठी महिलांना लगेचच रुग्णालयात पोचता येईल, या उद्देशाने खास रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन फिरत्या रुग्णवाहिका रस्त्यावर येतील, यामध्ये प्रसूतितज्ज्ञासह गर्भवतींना सर्व प्रकारच्या सुवि��ा पुरविल्या असतील.\nमहापालिकेच्या रुग्णालयामध्ये गर्भवतींची हेळसांड होत असल्याकडे ‘सकाळ’ने ‘तिच्या कळा’ या वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधले होते. दुर्बल घटकातील महिलांना या सुविधेचा फायदा होणार असून, ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. त्याकरिता स्वतंत्र संपर्क यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन रुग्णवाहिकांना महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. साधारणतः दीड महिन्यात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्थायी समिती आणि आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या रुग्णवाहिकांची संख्या नंतर वाढविण्यात येणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधील सेवा-सुविधा विस्तारण्यात येत असल्या, तरी गर्भवतींसाठी त्या प्रमाणात सुविधा नाहीत.\nत्यातच, येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात शुभांगी जानकर या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. उपचारासाठी नेण्याकरिता वाहन न मिळाल्याचे कारणही त्यांच्या मृत्यूला जबाबदार होते. या पार्श्वभूमीवर गर्भवतींसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका सुरू करण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले आणि वृषाली चौधरी यांनी मांडला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.\nमहिलांच्या दृष्टीने महत्त्वाची सुविधा आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येईल, त्याकरिता पुरेसा निधी देण्यात येईल.\n- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती\nप्रसूतीआधी महिलांना वेळेत रुग्णालयात जाता यावे, यासाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात येत आहेत. मागणीनुसार ती उपलब्ध होईल.\n- राजश्री नवले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती\nजिवंत पत्नीला मृत दाखवून केले दुसरे लग्न\nनागपूर - जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावरून एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी मृत पावल्याची खोटी माहिती दुसऱ्या घटस्फोटित महिलेला देत तिच्याशी लग्न केले...\nचाळीसगाव : अभोणे तांडावासीयांची पाण्यासाठी भटकंती\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे...\nलंडन कॉलिंग मी गेले बरेच दिवस एका डाएटवर आहे. खरंतर गेली अनेक वर्षं डाएटवरच आहे. माझं निम्मं वय स्वतःला आणि स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करण्यात...\nघोलवडमधील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठ���ल्याने पाण्यासाठी वणवण\nडहाणु : डहाणु तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायत क्षेत्रातील टोकेपाडा भागतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. अवघ्या...\nपोलिस वसाहतीत पाणीटंचाईच्या झळा\nपुणे - स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पंधरा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पाणी...\nLoksabha 2019 : तोफखाना सज्ज; बंदुकाही रोखल्या\nमोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/functions", "date_download": "2019-03-25T08:42:46Z", "digest": "sha1:6KVMZRAJC3AXQUQKKEZGEQUFQ4EL24PV", "length": 8891, "nlines": 105, "source_domain": "gangadharmute.com", "title": " समारंभ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साह��त्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nमीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे 1,874 30-05-2011\nस्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा 2,289 30-05-2011\nसत्कार समारंभ : वर्धा 3,286 02-07-2011\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 2,335 02-07-2011\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,130 02-07-2011\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,377 25-07-2012\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन 1,093 09-10-2013\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी) 861 19-04-2014\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,568 24-06-2014\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,431 14-09-2014\n- नागपुरी तडका - ई पुस्तक\nकवी - गंगाधर मुटे\nप्रकाशक - ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे\nअंक वाचण्यासाठी अंकावर क्लिक करा. पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.\n-नागपुरी तडका - ई पुस्तक Pdf डाऊनलोड करून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/grahakhit-indian-people-not-get-medicine-low-cost-407646-2/", "date_download": "2019-03-25T08:11:57Z", "digest": "sha1:5H7VG6QMUIYVUWEIS657Z6TZ2IKLXYZC", "length": 16611, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#ग्राहकहित : वेसण गरजेचीच (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#ग्राहकहित : वेसण गरजेचीच (भाग २)\n– सूर्यकांत पाठक (कार्याध्यक्ष अ.भा.ग्राह��� पंचायत)\n#ग्राहकहित : वेसण गरजेचीच (भाग १)\nदेशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटून गेली तरी नागरिकांना स्वस्त आणि सुरक्षित औषधे मिळू नयेत, हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल. याचे कारण म्हणजे आरोग्यासारख्या अत्यावश्यक सेवेचे व्यापारीकरण झाले असून, भांडवलदार आणि दलालांनी या क्षेत्रावर कब्जा केला आहे. खासगी रुग्णालये जीवनदान देण्याची केंद्रे न ठरता नोटा छापण्याची यंत्रे झाली आहेत. देशाच्या आरोग्य क्षेत्रातून दलाल आणि भांडवलदारांना हद्दपार करून हे क्षेत्र स्वच्छ करणे ही काळाची गरज आहे.\nगेल्या काही वर्षांत माणसावर केल्या जाणाऱ्या औषध परीक्षणाची सर्वांत मोठी प्रयोगशाळा म्हणून भारताचे नाव घेतले जात आहे. ज्या औषधांच्या चाचण्या परदेशांमध्ये प्राण्यांवर घेतल्या जात होत्या, त्या चाचण्या सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता भारतात चक्क माणसांवर केल्या जात आहेत. काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि आसपासच्या परिसरात गर्भनिरोधक औषधांचे परीक्षण थेट महिलांवर केल्यामुळे अनेक महिलांना वंध्यत्व आले. कायद्यात स्पष्ट तरतुदी नसल्यामुळे परदेशी कंपन्या गरिबांना प्रलोभने दाखवून चाचण्यांसाठी तयार करतात, हे भयंकर आहे.\nया प्रक्रियेत डॉक्टरांनाही मोठे कमिशन दिले जाते आणि दलालांचे एक मोठे जाळे विणले जाते. या जाळ्यात एकदा अडकल्यानंतर बाहेर पडणे गरिबांसाठी अवघड होऊन बसते. सर्वोच्च न्यायालयानेही औषधांच्या चाचण्यांसंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांवर नुकतेच ताशेरे ओढले होते. ज्या लोकांवर औषधांचे प्रयोग केले जातात, त्यांच्या जीवनाच्या सुरक्षिततेची व्यवस्था केलीच पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले होते. भारतात जेनेरिक औषधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते.\nआजमितीस आपल्या गरजेच्या 85 टक्के औषधांची निर्मिती आपण देशातच करू शकतो. भारतीय जेनेरिक औषधांची गुणवत्ता प्रत्येक कसोटीत उतरली आहे आणि म्हणूनच युनिसेफ आपल्या गरजेच्या 50 टक्के जेनेरिक औषधे भारताकडून मागविते, हे लक्षात घेतले पाहिजे. अन्य काही देशांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांना भरपूर मागणी आहे. जेनेरिक औषधांच्या वाढत्या निर्यातीवरूनही आपल्याला त्याचे आकलन होऊ शकते. सध्या भारतातून 245 हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात केली जातात.\nजेनेरिक औषधांचा कोणताही वि��िष्ट ब्रॅंड नसतो. परंतु तरीही जेनेरिक औषधांची किंमत अन्य औषधांच्या तुलनेत तब्बल 100 टक्क्यांनी कमी असतात. उदाहरणार्थ, बेयर या बहुराष्ट्रीय कंपनीच्या नॅक्सावर या कर्करोगावरील औषधाच्या 120 गोळ्यांची किंमत 2 लाख 80 हजार एवढी आहे, तर नॅटको या देशी कंपनीचे तेच औषध असलेल्या 120 गोळ्यांची किंमत अवघी 8800 रुपये आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी जेनेरिक औषधे बनविणे बहुराष्ट्रीय कंपन्यांना नको आहे. भारतीय जेनेरिक औषधांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे अमेरिकेलासुद्धा भारतीय जेनेरिक औषधांची आयात करावी लागते. सध्याच्या काळात भारताकडून जेनेरिक औषधे आयात करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.\nसध्याच्या व्यापारी युद्धाच्या काळात अमेरिकेने स्ट्राइड्स आर्कोलॅब, वॉकहार्ट, आरपीजी लाइफ सायन्सेस, फ्रासीनियस काबी ऑन्कॉलॉजी आदी भारतीय कंपन्यांबाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. वस्तुतः जेनेरिक औषधांचा थेट फायदा गरिबांना होतो. ही बाब श्रीमंत देशांना मान्य नाही. कारण यामुळे त्यांच्या देशातील बड्या बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांचे नुकसान होते.\nऔषधाची भारतीय बाजारपेठ विस्तृत असल्यामुळे सर्व बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना या बाजारपेठेवर कब्जा करायचा आहे. त्यामुळेच, जेनेरिक औषधांच्या निर्मितीच्या बाबतीत आपला देश भले जगात स्वावलंबी असला, तरी अशी औषधे गरीब रुग्णांना सुलभतेने मिळण्याची व्यवस्था करणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्यासाठी विकसित देशांच्या आकांक्षांना भीक न घालता सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nराज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले\n‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीस���च्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/phadtare-trek-1163936/", "date_download": "2019-03-25T08:33:06Z", "digest": "sha1:ERPM4IAXWLXT7Q7L5PC5H2O4SME2LCE7", "length": 38902, "nlines": 263, "source_domain": "www.loksatta.com", "title": "phadtare trek, trekker blogger, trek, trekking, blog, blogger | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nकधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते.\nकधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते. संधी मिळताच पुन्हा उचल खाते आणि शेवटी एकदाचे त्या वाटेवर भटकल्यावरच जिवाला शांतता मिळते. फडताड नाळेच्या ट्रेकबाबत असंच म्हणावं लागेल.\nफेब्रुवारी महिन्यात आम्ही फडताडसाठी गेलो, पण तेव्हा पालखीचा योग होता. अर्थातच फडताडचा ट्रेक केल्याशिवाय आता शांतता लाभणार नव्हती. अगदी मोजक्याच नोंदी असणाऱ्या वाटांपैकी एक आणि त्यातही खडतर. वर्���ळ नसल्यामुळे काहीशी विस्मृतीत गेलेली. ती धूळ झटकण्याचा योग यंदाच्या दिवाळीत आला.\nशुक्रवार रात्री तोरण्याला बगल देत भट्टी घाट ओलांडून गाडी सिंगापूरजवळच्या कुसरपेठेकडे पिटाळली. गेल्या चार वर्षांत घाटवाटांच्या भटकंतीच्या निमित्ताने या भागात येणं-जाणं होतं. खिंडीतून गाडी कुसरपेठेकडे वळली आणि दोन वर्षांपूर्वी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेल्या एकल्याची नाळ, सिंगापूरनाळ ट्रेकच्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हा ह्यच िखडीत खडबडीत दगडी कच्च्या रस्त्यापुढे आमच्या खाजगी वाहनाने संपूर्ण शरणागती पत्करली होती. आता चित्र एकदम पालटलं आहे. पूर्वीच्या कठीण चढाईच्या वाटेवरून आता एसटीदेखील आरामात जाऊ शकेल. कोण्या बडय़ा कंपनीने आजूबाजूच्या डोंगररांगांतील तीन-चारशे एकर जमीन भूमिपुत्रांच्या पितरांना गंडे घालून पूर्वीच किरकोळ भावात खरेदी केली होती. आता रस्त्याच्या दुतर्फा तारेचं कुंपण घालून याच जमिनीचा सहा लाख सहा गुंठे हा बाजार सुरू आहे. वीकेंड होमच्या फॅडमुळे सह्यद्रीचा होणारा ऱ्हास उघडय़ा डोळ्यांनी पाहात सडक पार केली.\nपहाटे चारला कुसरपेठेत पोहोचलो तेव्हा कुडकुडत्या थंडीत वळचणीला निजलेल्या कुत्र्यांनाही आमची दखल घ्यावीशी वाटली नाही. गाव चिडीचूप निद्राधीन होतं. शाळेच्या वऱ्हांडय़ात पथाऱ्या पसरल्या. सकाळी साडे सातच्या सुमारास ‘‘ते फडताडला जाण्यासाठी येणार आहेत ते तुम्हीच का’’ असं विचारत एका तरुणाने आम्हाला जागं केलं. पालखीच्या नाळेच्या ट्रेक दरम्यान पदरातून फडताडकडे जाण्याऱ्या मार्गाच्या दुर्गमतेचा अंदाज आल्यामुळे वाटाडय़ा घेण्याच्या माझ्या आग्रहास्तव प्रसादने फोन करून वाटाडय़ाची सोय करून ठेवली होती. तोच हा वाटाडय़ा बबन.\nप्रसाद आणि यज्ञेशचा प्लॅन होता की जननीच्या नाळेने उतरून जायचं आणि पदरातून आडवं जात फडताड गाठायची. सकाळी लवकर जननीने उतरलो तर सूर्यास्तापर्यंत फडताड चढून वर येणं सहजशक्य होतं. पण मला आजवरच्या अनुभवावरून हा प्लान अजिबात मंजूर नव्हता. अवघड नवखी वाट शक्यतो दिवसाउजेडी आणि ताज्या दमाचे असताना करावी, माहितीची पायाखालची वाट उशीर झाला अंधारून आला तर विजेरीच्या उजेडातदेखील पार करता येते. त्यामुळे मला फडताड उतरून जावं, पदरातील जंगलात मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी जननी किंवा भिकनाळ चढून यावं अथ��ा फडताड पूर्ण उतरून पणदेरी गाठावं असं वाटत होतं. हे दोघं आपल्याच प्लानवर अडल्याने मी शरणागती पत्करली.\nइक्विपमेंटची वाटावाटी करून बबन दादांसोबत आम्ही गाव सोडलं तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते. एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी वेळापत्रकाचा कच्चा पाढा गिरवून घेतला. कुसरपेठेतून साडेआठ वाजता सुरुवात करून जननीने उतरून दिवसाउजेडी फडताड गाठायची असेल तर पदरातून फडताडकडे जाणारी वाट नक्की माहीत असायला हवी. बबन दादांना ती कितपत माहीत आहे ह्यचा अंदाज घेण्यास सुचवलं.\nकुसरपेठेतून सिंगापूरकडे जाणारी गाडीवाट सोडून डावीकडच्या पायवाटेने टेपाडाला वळसा देत पठारावर आलं की समोर दिसणारा सह्यद्रीचा रौद्रभीषण पण चित्तथरारक देखावा जागीच खिळवून ठेवतो. डोंगरमाथ्यावरून नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता एकल गावाच्या माथ्यावरून डोंगरापलीकडे अचानक लुप्त होतो. रस्त्यापासून जरा खालच्या अंगाला वसलेल्या एकल गावाच्या डोंगरउतारावर केलेली वरई पोपटी शेती विशेष लक्ष वेधून घेते.\nतिथेच पुढे दिसते ती गावापासून सरळ कारवीच्या जंगलातून सुरू होत कोकणात उतरत गेलेली आग्याची नाळ म्हणजेच एकल्याची नाळ आणि त्यापलीकडे दिमाखात मिरवणारा दुर्गम दुर्ग लिंगाणा. त्यापलीकडे खानूचा डिग्गा, कोकण दिवा, कावळ्याची िखड अशा एकामागोमाग एक डोंगरांच्या अनेक घडय़ा धूसर होत पार क्षितिजापर्यंत पसरलेल्या दिसतात. पण ह्य सगळ्यात देखणं रूप पहावं ते दुर्गदुर्गेश्वर रायगडचं. जगदीश्वराचं दूरवरून होणारं दर्शनदेखील रायगडी जाऊन आल्याचं समाधान देत होतं.\nगावापासून २० मिनिटे अंतरावर जमीन मालकाने विहीर खोदून घेतली आहे. तिला बाराही महिने मुबलक पाणी असतं. आम्ही पाणपिशव्या भरून घेतल्या आणि कच्च्या मार्गाने पुढे निघालो. एव्हाना बबन दादांना पदरातील वाटांचा अजिबात अंदाज नसल्याचा साक्षात्कार झाल्याने जननीने उतरण्याचा आग्रह सोडून आम्ही फडताडला प्राधान्य देत जननीच्या राईकडे मोर्चा वळवला.\nविहिरीपासून १५ मिनिटांच्या चालीवर डावीकडे कारवीच्या रानात घुसणारी ओळखीची पायवाट मागे सोडून आम्ही बैलगाडीच्या रस्त्याने पुढे चालत राहिलो. डावीकडच्या पायवाटेने कारवीतून सरळ चढत डोंगररांगेचा माथा गाठायला साधारण अर्धा तास लागतो. हीच वाट पुढे आणखी अध्र्या-पाऊण तासाच्या चालीने भिकनाळेकडे घेऊन जाते. फेब्रुवारी महिन्यात भिकनाळ, जननीची नाळ ट्रेक दरम्यान हा भाग बऱ्यापैकी पायाखालून गेला असल्यामुळे इथल्या पायवाटा आता चांगल्याच ओळखीच्या झालेल्या.\nबैलगाडीची वाट कारवीच्या रानात लुप्त झाली आणि सुरू झाली कारवीच्या खरखरीत पानांशी कडवी झुंज. गुडघाभर उंचीची कारवी खांद्याशी झोंबायला लागली. पुढे जात होतो तशी कारवीच्या रानाची उंची आणि दाटी वाढत गेली. भिकनाळेकडे जाणाऱ्या डोंगररांगेला डावीकडे ठेवत घसाऱ्याच्या वाटेने कारवीतून चालत बाहेर पडलो आणि समोर आली दक्षिणोत्तर इंग्रजी सी आकारात पसरलेली डोंगररांग. या अर्धवर्तुळाकार डोंगराचा कोकणाकडील भाग म्हणजे निव्वळ तुटलेला कडाच जणू. उन-पाऊस-वाऱ्याच्या माऱ्याने याही डोंगराला मिनी कोकणकडय़ाचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.\nयाच पट्टय़ातून कोकणात तीन घाटवाटा उतरतात. दक्षिणेकडील टोकातून उतरते भिकनाळ, उत्तरेकडून फडताड तर या दोहोंच्या मधून सरळसोट उतरणारी निमुळती वाट म्हणजे जननीची नाळ. कोकणातील लोक हिलाच पालखीची वाट असंही संबोधतात. कोणे एकेकाळी या वाटेने घाटावरील मंदिराच्या बांधणीसाठी मोठमोठे वासे नेण्यात आले होते. त्यामुळे तिचं नाव पालखीची वाट असं पडलं असावं- इति पणदेरी ग्रामस्थ.\nजननी आणि फडताड नाळ या दरम्यानचा घाटमाथा सदाहरित दाट जंगल पट्टय़ानं व्यापलेला आहे. येथेच जननी मातेचं ठाणे वसल्यामुळे या भागाला जननीची राई म्हणून संबोधलं जातं. आजूबाजूचे ग्रामस्थ नवरात्रीत देवीच्या दर्शनाला येत असल्यानं पायवाटा बऱ्यापैकी शाबूत आहेत.\nजननीच्या ठाण्यापाशी हात जोडून आम्ही फडताडच्या दिशेला मोहरा वळवला. या भागात वावर नसल्यानं पायवाटा मोडलेल्या. पण बबन दादांना नाळेची सुरुवात अचूक माहीत होती. ते कारवी, बांबूच्या वनातून झपाझप पुढे सरकत होते. बांबूच्या जाळीच्या पलीकडे एक छोटंसं पठार लागलं. ते ओलांडून पुन्हा एकदा कारवीच्या जाळीत घुसलो आणि उतारावर कारवीचा आधार घेत तोल सांभाळत अखेर फडताडीच्या मुखाशी येऊन पोहोचलो. फडताडला अति दुर्गम का म्हणतात याचा प्रत्यय प्रथमदर्शनीचा आला. शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस येथे लागणार होता.\nनाळेच्या मुखाशी पोहोचण्यासाठीच जवळ जवळ ९० अंशात ४० फूट उतरून जावं लागतं. दोन्ही बाजूला खोल दरी. आधाराला वाळक्या गवताशिवाय काहीच नाही आणि पायाखालची माती म्हणजे नुसता निसटता मुरूम. नाळेच्या तोंडाशी बांबूच्या जाळीत आठ-दहाजण बसू शकतील एवढी जागा. तिथेच सुका खाऊ आणि ताकाचा फडशा पाडून आम्ही नाळ उतरायला लागलो तेव्हा अकरा वाजले होते. नोव्हेंबर असूनही हवेत प्रचंड उष्मा होता. दक्षिणाभिमुख उतारावर भर दुपारची सूर्याची प्रखर किरणे थेट डोळ्यावरच येत होती.\nनाळेतून जरा खाली उतरलो आणि समोर ४०-५० फुटी कातळ टप्पा वाट अडवून उभा ठाकला. बबन दादा पुरते गोंधळले. ‘जरा थांबा वाट वरच्या अंगाला हाए वाटतं’ म्हणत दादा उजवीकडे गवतात शिरले, प्रसादही त्यांच्या मागे गेला. आदी आणि यज्ञेश कातळ टप्प्यापाशी डोकावून खालच्या वाटेचा आढावा घेऊ लागले. उजवा ट्रॅव्हर्स मारून दृष्टिआड झालेले प्रसाद आणि बबन दादा तब्बल अध्र्या तासाने धापा टाकत परत आले. पलीकडच्या नळीत उतरण्यासाठी ट्रॅव्हर्सवाल्या वाटेने गेल्यास सरळ सोट दांडावरून जीवघेणी कसरत करावी लागणार होती. हा दांडा जवळ जवळ ८० अंश तिरकस उताराचा आणि प्रचंड घसाऱ्याचा होता. त्यात आधाराला गवताशिवाय काहीही नाही. वास्तविक बबन दादा या तीन वाटांपैकी कोणत्याही वाटेनं कधीच कोकणात उतरले नव्हते. त्यांना फक्त घाटावरून या वाटांची सुरुवात माहीत होती. आता पुढची वाट शोधण्याची जबाबदारी आमच्यावरच आली होती.\nयज्ञनेशने जीपीएस सुरू केलं. गुगल मॅपवर फडताड लोकेट केली. आम्ही ज्या नाळेत होतो त्यानंच आणखी खाली उतरून उजवीकडे ट्रॅव्हर्स मारत आम्हाला परत नाळेत पोहचायचं होतं. वाटेची खात्री झाल्यावर भराभर रोप सोडला. त्या चिंचोळ्या गवतानं झाकोळलेल्या नाळेत एक एक पाऊल जपून टाकावं लागत होतं. खूप काळजीपूर्वक, रोपचा आधार घेत एक एक जण खाली उतरलो. कातळ टप्पा उतरून पुन्हा नाळेत आलो. आता नाळेचा उतार अधिकाधिक तीव्र होत होता.\nअजिबात वावर नसल्यामुळे संपूर्ण नाळेत बोचरे गवत आणि काटेरी झुडुपांचे रान माजले होते. काटेरी झुडुपांचे ओरखडे झेलत, कुसळांनी लडबडून घेत, खाजऱ्या वनस्पतींचे जळजळीत दंश सोशीत पदराच्या पट्टय़ापर्यंत पोहोचलो तेव्हा उन्हं कलायला लागली होती. आता जेमतेम तासभरच उजेड मिळणार. पाण्याच्या पिशव्यांनी तळ गाठला होता. प्रत्येकी फक्त दीड दोन लिटर पाणीच शिल्लक होते. पदरातील जंगलात एकाच जागी पाणी उपलब्ध असून ती जागा सहजासहजी मिळण्याजोगी नाही. ते पाणी मिळाले नाही तर अपुऱ्या पाण्यानिशी पुन्हा कोणत्य���ही वाटेने वर चढून जाणे कठीणच होते.\nदिवसभर घसारा, कारवी, गवत आणि खाजऱ्या वनस्पतींशी झगडून सगळ्यांचाच जीव मेटाकुटीला आलेला. सूर्याने सगळी ऊर्जा शोषून घेतली होती. नाळेत एक सोयीची जागा पाहून रात्री तेथेच मुक्काम करायचे ठरले. अजून दिवस मावळायला अवकाश असल्यानं प्रसाद, राजस आणि बबन दादा डावीकडच्या पदराच्या जंगलाचा आढावा घेण्यासाठी निघून गेले. पदरातले पाणी सहज मिळाले तर बरेच होते. पदरातलं पाणी नाही मिळालं तर उजवीकडचा ट्रॅव्हर्स मारून खाली उतरायचं आणि पणदेरी गाठायचे हा बेत नक्की होता. भिकनाळ आणि जननीची नाळ पाहिली होती. येथूनच पुन्हा वर गेलो असतो तर फडताडचा खालचा टप्पा हुकला असता.\nप्रसाद आणि दादा परतेपर्यंत यज्ञेश आणि आदी उजवीकडचा ट्रॅव्हर्स आणि पलीकडच्या नाळेत उतरण्याचा अॅप्रोच पडताळून आले होते. अपेक्षेप्रमाणे पाणी मिळाले नाही आणि दुसऱ्या दिवशी पणदेरीत उतरून जायचे नक्की झाले.\nअंधार पडल्यावर समोर कोकणात पणदेरी गावातील दिवे लुकुलुकु लागले. हवेतील उष्मा हळू हळू कमी होऊन मंद, शीतल वाऱ्याची झुळूक घामेजल्या अंगाला सुखावू लागली. आकाश सहस्र तारकांनी झळाळत होते. अशा वेळी आपल्या आवडीच्या सवंगडय़ांसोबत जंगलच्या मधोमध नाळेच्या कडय़ाशी बसून निवांत गप्पा मारण्यात जी मजा आहे ती शब्दात व्यक्त करता नाही येऊ शकत. जेवणाचा कार्यक्रम गप्पांच्या रंगात बराच वेळ लांबला. दमलेले जीव दगडाच्या गादीवर समाधानाने शांत निजले तेव्हा दहा वाजले होते.\nपहाटेच्या गार हळुवार वाऱ्यानं अलगद जाग आली. हवेतला गारवा सुखावह वाटत होता. सकाळच्या कोवळ्या किरणांत पणदेरीतील शेती अधिकच सोनपिवळी झाली होती. रात्री शांत निपचित पडलेलं जंगल अनेकविध पक्ष्यांमुळे चांगलेच किलबिलत होते. हलका नाश्ता उरकून, शिल्लक पाण्याचे समान वाटप करून निघालो.\nमुख्य नाळेच्या उजवीकडील ट्रॅव्हर्स कसोटी पाहत होता. पुन्हा एकदा बोचरी झाडं, ओरखडे आणि जळजळ असा छळ सुरू झाला. कारवीच्या ओल्या दांडय़ांचा आधार घेत पायाखालून अलगद निसटणाऱ्या मुरूम मातीवर पाय गच्च रोवत तोल सांभाळण्याची जीवघेणी कसरत करत दोन टेपाड आडवी पार करत एकदाचे आम्ही हिरव्याकंच झाडांनी झाकोळलेल्या फडताडीच्या खालच्या टप्प्यातील नाळेत पोहोचलो. इथून पुढचा प्रवास अगदी सुखकर होता. नेहमीचीच कोकणातील नाळेतील उतराई. गर्द राईच्य�� आच्छादनामुळे हवेत गारवा होता. साधारण पाऊण तासाने नाळेत पाणी मिळाले.\n१२-१४ तास पाणी बेताने वापरल्याने पाण्याच्या नुसत्या दर्शनानेच सगळे सुखावून गेलो. एक एक लिटर पाणी रिचवूनही तहान शमेना, तहान सुख म्हणजे नेमके काय हे या अशा क्षणी अनुभवता येते. वेळ असल्यामुळे येथे विश्रांती घेतली. पाण्याच्या पिशव्या भरून घेतल्या. येथून पुढे गावापर्यंत नाळेत सर्वत्र वाहते पाणी होतेच. आणखी पंधरा मिनिटं नाळ उतरत गेलो की ही नाळ डावीकडून येणाऱ्या मुख्य नाळेच्या ओढय़ाला मिळते. येथून पुढील चाल म्हणजे ओढय़ातील दगडगोटय़ांवरून उडय़ा मारत गाव जवळ करणे होय. वीसेक मिनिटात ओढय़ातून डावीकडे वळलेल्या पायवाटेनं आम्ही पणदेरी गावाच्या शेतात पोहोचलो. झापावर थांबून भूकाग्निला शांत केले आणि पणदेरी गाठले.\nगावात मोहिते मामांना भेटायची इच्छा त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे पूर्ण होऊ शकली नाही. भिकनाळ – जननीची नाळ ट्रेकदरम्यान पणदेरीला आमच्या वास्तव्यात मोहिते मामांनी फार अगत्याने आमचा पाहुणचार केला होता. टमटम उपलब्ध नसल्याने रणरणत्या उन्हात आणखी दीड किलोमीटर डांबरी सडकेवर रटाळ पायपीट करत मांघरूण गाठावे लागले. तिथून पुढे बिरमाणी-ढालकाठी येथून कोकण सोडून वरंध घाटाने भोरला आलो. तेथून कापूरहोळ-चेलाडी-वेल्हा असे अनेक वाहने बदलत वेल्ह्य़ाहून मुंबईला निघालो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशाईपेन, नव्हे आठवणींची लेखणी\nकाळ आला होता, पण..\nमामा आणि त्याचं गाव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/2691038", "date_download": "2019-03-25T08:14:07Z", "digest": "sha1:GTA6WV6DWR7IOYH7MC2Q26DD4H3CQOEF", "length": 17327, "nlines": 62, "source_domain": "isabelny.com", "title": "पीपीसी जाहिरात कॉपी कशी लिहावी: 4 जाहिरात टेम्पलेट ज्यामुळे क्लिक्स आणि Semaltेट होतात", "raw_content": "\nपीपीसी जाहिरात कॉपी कशी लिहावी: 4 जाहिरात टेम्पलेट ज्यामुळे क्लिक्स आणि Semaltेट होतात\nजाहिरात प्रत ही यशस्वी पीपीसी मोहिमेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे: यशस्वीरित्या जाहिरात मजकूर क्रॉफ्ट करणे आणि अनुकूलित करणे अनेकदा सशुल्क शोध मोहिम तयार किंवा खंडित करेल.\nपण पीपीसी जाहिरात तयार करणे आणि त्याची चाचणी करणे कठीण आहे. आपल्याला कित्येक घटक लक्षात घ्यावे लागतील:\nसंदेशासाठी खोली फारसे नाही \"शोध इंजिने केवळ प्रत्येक मथळामध्ये 25 वर्ण आणि दोन वर्णन ओळींमध्ये प्रत्येकी 35 वर्ण घेऊ शकतात:\nमजकूर कीवर्ड गटांमध्ये संबंधित असणे आवश्यक आहे \"कारण ऍडवर्ड्स संपूर्ण जाहिरात ग्रुपशी बोलण्यासाठी जाहिरात प्रत तयार केली आहे, आपल्याला आपले कीवर्ड व्यवस्थित व रणनीतिकरित्या समूहबद्ध करण्याची आवश्यकता आहे, नंतर आपल्याला सर्वसाठी जाहिरात प्रत लिहिण्याची आवश्यकता आहे त्या गटात समाविष्ट असलेल्या कीवर्डबद्दल.\nआपल्याला विविध जाहिरातींची कामगिरी जाणून घ्यावी लागेल \"आपल्याला सर्वात प्रभावी असणारे कोणते जाहिरात आहे हे कधीही कळत नाही; आपण लिहू शकता अशा विविध प्रकारचे जाहिराती आहेत आणि अनेकदा ज्या जाहिरातीवर आपण कमीत कमी संशय घेऊ इच्छित आहात त्या वेळा , नाही.\nआपल्याला योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने प्रतिसाद द्यावा \"आपण मजकूर तयार करण्यामध्ये विविध प्रकारची चांगली माहिती सादर केली आहे: क्लिक-थ्रू रेट, रूपांतरण दर, खर्च, दर प्रति क्लिक इ. काय उत्तर द्यावे हे जाणून घेणे आणि ते कसे करावे हे अवघड आहे - google telefono argentina.\nसिक्युलेट म्हणजे सशुल्क शोधकरिता प्रभावी जाहिरात प्रत बनविणे आणि बॅक एंडवर चाचणी आणि ट्रॅकिंग सेट करण्यासाठी विविध मार्ग आहेत. या कल्पनेतील सर्वात महत्वाचे तुकडे एक, तरी, एक मजबूत पाया तयार आहे.\nजाहिरात कॉपी तयार करणे: जाहिरातींचे चार प्रकार आपण कोणत्याही अनुलंब ���ाठी तयार करू शकता\nआपण जाहिरातींचे परीक्षण करणे आणि समायोजन करणे सुरू करण्यापूर्वी, आपल्याला आपली पहिली फेरी तयार केली गेली पाहिजे. कॉपीचे हे प्रथम फेरे तयार करणे अवघड असू शकते. मला एका चाचणी घटकापासून प्रारंभ करायला आवडेल. आपण परीक्षण करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत , परंतु सामान्यत: मला हेडलाइन आपल्याला आपल्या बोनससाठी सर्वात मोठा धक्का मिळते, म्हणून ही कदाचित सुरुवातीला चांगली जागा आहे.\nसृजनशीलतेचा कोणत्याही प्रकारचा सर्वात महत्वाचा भाग आपल्या स्वत: च्या रोलिंग करत आहे आणि आपली विशिष्ट ऑफरसाठी सर्वोत्तम आहे याची खात्री करुन घ्या, परंतु आपण कोणत्याही उभ्या अंगणात हे चार प्रकारचे जाहिराती पाहू शकता:\n1. कीवर्ड फोकस्ड हेडलाइन\nआपल्या जाहिरातीच्या कॉपीमध्ये कीवर्ड क्रॅगिंग करताना आपला गुणवत्ता-स्तरीय गुणोत्तर आपल्या क्लिक-थ्रू रेटपेक्षा (जितके येथे गुणवत्ता स्केल घटक येथे ) तितकेच परिणाम होत नाही, तेथे काही उदाहरणे आहेत जेथे क्वेरीचा शोध घेण्यात आला आहे वर आकर्षक असतील आणि आपल्या क्लिक-थ्रू रेट वाढवण्यासाठी मदत करेल:\nबोस्टन वेब डिझाइन हेतूची एक फार विशिष्ट स्तर दर्शविते; हा शोधकर्ता फक्त एक स्थानिक डिझाइन कंपनीशी व्यवहार करताना स्वारस्य असू शकते, म्हणूनच आपल्या जाहिरात प्रतीमध्ये क्लिक केल्यावर क्लिक आणि रूपांतरणकरिता पुरेसे असू शकते.\n2. डायनॅमिक कीवर्ड प्रविष्ट करणे (डीकेआय)\nहे त्याच ओळींवर आहे, पण एक अवघड असू शकते. मूलत: आपण आपल्या जाहिरात मजकूरात एक शोध ट्रिगर असे कीवर्ड समाविष्ट करत आहात. डायनॅमिक कीवर्ड समाविष्ट करणे अयोग्यरित्या लागू असल्यास अनावश्यक किंवा अगदी कायदेशीरपणे घाणेरडा जाहिराती तयार करणे हे सोपे आहे.\n3. क्लिक प्राप्त करणे जाहिरात कॉपी आणि एक\nइमेजपासून सर्व जाहिरातींसाठी सर्व लिखित प्रत लिखित स्वरूपात सर्वोत्कृष्ट पारितोषिक म्हणजे प्रश्न क्लिकने व्युत्पन्न करतात रहस्य एक छान घटक आहे; शोध सर्वसाधारणपणे विस्तृत प्रश्न आणि उत्तराचे सत्र आहे. शोधकांना काहीतरी आकर्षक विचारू नका शोधकांच्या हेतूवर मिळत असलेल्या मार्केटिंग प्रताप्रमाणेच की ही आहे. त्यांना डिझाइन मदत हवी आहे शोधकांच्या हेतूवर मिळत असलेल्या मार्केटिंग प्रताप्रमाणेच की ही आहे. त्यांना डिझाइन मदत हवी आहे ते एक चांगले ब्रँड बनव�� इच्छित आहेत ते एक चांगले ब्रँड बनवू इच्छित आहेत ते आणखी विश्वासार्ह दिसत आहेत का ते आणखी विश्वासार्ह दिसत आहेत का त्याला बाहेर काढा, नंतर त्यांना विचारा\nव्यावसायिक ग्रेड साइट डिझाइनमध्ये सुधारणा करण्याचा विचार करणार्या मध्यभागी असलेला प्रश्न कदाचित त्यांना आकर्षित करेल, जे आपण आकर्षित करू इच्छित असलेला ग्राहकच असा असू शकतो.\nवाइल्ड कार्ड कॉपी \"वेधबिंदू करण्यासाठी योग्य आणि बोला बोला\nयापुढे विविधता अनेक आकार आणि आकार घेतात. सामान्य रचनेचा अर्थ आहे की कीवर्ड क्रॅम्डिंग, प्रश्न आणि डीकेआय यांच्याकडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. Semalt वेब डिझाइन शोधकर्ता काहीतरी विशिष्ट असताना, कदाचित सर्वोत्कृष्ट वेब डिझाइनसाठी एक शोध वेगळे असेल (एखाद्या कीवर्डसाठी प्रत्येक सुधारक हेतूचा एक भिन्न स्तर दर्शवितो)\nयेथे पर्यायी मजकूर पाठ्यांच्या काही कल्पना आहेत:\nएक वेदना बिंदू \"आपल्या उद्योगातील ग्राहकांसाठी सामान्य वेदनांचा विचार करा कदाचित आपण हे ऐकू शकता की वेब डिझायनर्स अव्यवहार्य आहेत किंवा एसईओ अनुकूल वेब डिझाईन आणि विकासाची गरज आहे. त्या समस्येचे निराकरण करा, लोकांना आपल्या जाहिरात मजकूरासह कळवा.\nगॅंबल अप \"आपण किमान चार जाहिराती चालवत आहात आणि चाचणी घेत आहात म्हणून, आपण असे कार्य करू शकता जे ते काम करेल असे दिसत नाही परंतु आपल्याला काही मजकूर जाहिरात भेदभाव प्रदान करेल . आव्हानात्मक व्हा किंवा कठोर किंवा पूर्णपणे बंद-विजय आणि आव्हानात्मक, जसे: आपल्या वेबसाइटवर कार्य आवश्यक आहे (लक्षात ठेवा, अर्थातच, आपल्या साइटची URL आणि त्यानंतर आपला ब्रँड जाहिरातीशी जोडला जाईल.)\nआपल्या वाहतुकीची पात्रता \"सर्वच क्लिक चांगले क्लिक नाहीत.जर आपण उच्च-डिझाइन डिझाईन शॉप असाल तर आपण कमी अंत डिझाइन सोल्यूशन्स शोधणार्या लोकांकडून बरेच ट्रॅफिक आकर्षित करू इच्छित नसाल; आपल्या दराने वाढीव दराने वाढ होईल, अप्रासंगिक वाहतूक आपल्या तळाची ओळी काढून टाकेल.म्हणून आपण असे काहीतरी करू शकता: प्रीमियम वेब डिझाइन सेवा आपल्या मथळा म्हणून.\nमुख्य कल्पना म्हणजे कल्पना किंवा तीन घेणे आणि त्यांना चाचणी मिश्रणात टाकणे. आपण आपल्या चाचणीची बारकाईने लक्ष ठेवत असल्यास, एकही जाहिरात पाठ फरक आपल्याला जवळ जवळही खर्च करू शकणार नाही कारण कसोटी स्वतःच दीर्घ काला��धीत आपली मदत करते.\nहे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपल्या जाहिरातीचे मजकूर तयार केल्यानंतर आपल्यास विचारात घेण्यासारखे बरेच काही आहे. हे सेट करा आणि हे विसरू नका की हे शोध मार्केटिंगमध्ये कधीही एक साधे धोरण नसते आणि जाहिरात कॉपी निर्मिती ही काही अपवाद नाही. जसे कि:\nइतर घटक जे आपण चाचणीसाठी प्रारंभ करू शकाल (लाभ स्टेटमेन्ट, कृती करण्यासाठी कॉल, URL प्रदर्शित करा .सूची चालू असते)\nआपल्या नमुना आकार लक्षणीय आहे (असे काही उपकरणे आहेत जे आपल्याला महत्वाचे ठरवितात हे निर्धारित करण्यात मदत करतात)\nआपण योग्य कामगिरी निर्देशक (क्लिक्स, रुपांतरे, इतर मेट्रिक्स) चा विचार करीत आहात\nआपण Google ला आपली जाहिरात चाचणी चालवू देऊ नये, किंवा जाहिरातीस समान रीतीने सेवा देण्याचा आणि स्वत: परीक्षणाने ऑर्केस्ट्रेट करू शकाल\nआपण विजेता कसा निवडाल\nआपण आपल्या पीपीसी जाहिरात प्रत ऑप्टिमाइझ करण्याचा प्रयत्न करत असतांना फक्त काही प्रश्नांचीच जुळतील. चांगली बातमी म्हणजे चाचणीसाठी काही मजबूत जाहिरात भिन्नता तयार करणे ही एक चांगली सुरुवात आहे\nटॉम डेमर वर्डस्ट्रीट इंक येथे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक आहेत. वर्डस्ट्रीम एसइओ आणि पीपीसीसाठी कीवर्ड व्यवस्थापन समाधान देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/bhavkavita/shabdanvin-alavin/", "date_download": "2019-03-25T07:41:05Z", "digest": "sha1:AZ46M4TFHLZXSMOQJQ3H5KXUNSYD5HF2", "length": 5314, "nlines": 70, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nउषादेवी, संध्याराणी उघडा गं अंतरंग\nघेईन मी साठवून उमलते रस रंग.\nगीत तुमचे खगांनो, येते सहज आतून\nथोडेतरी तयातून मज घेऊ द्या स्फुरण.\nपसरून गीतगंध, सुखविशी सकलांना\nतुझ्यापासून पवना, मला घेऊ दे प्रेरणा.\nफुले – नव्हे विकसल्या जणु सृष्टीच्या भावना\nकोमलांनो कानी सांगा, भाव सौंदर्याच्या खुणा.\nउसळत्या लहरींनो, तुम्ही नाचा थयथय\nमनी मुरवू द्या मला सम, ताल आणि लय.\nमध्यरात्री एकांतात, अंतरीच्या गाभाऱ्यात\nशब्दांविण आळवीन माझे गोड भावगीत \nआई व मूल (ओव्या)\nआई आणि मूल (कविता)\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्त��� वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/Gtalk-to-close-down-on-Feb-16.html", "date_download": "2019-03-25T07:55:18Z", "digest": "sha1:5VOVOQNQOU7RG3VPDPFWUUKCVGPPP2XN", "length": 7202, "nlines": 105, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "ऑर्कुटनंतर जीटॉकचंही लॉगआऊट, पुढच्या आठवड्यात जीटॉक निरोप घेणार ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nऑर्कुटनंतर जीटॉकचंही लॉगआऊट, पुढच्या आठवड्यात जीटॉक निरोप घेणार\nईमेल अकाऊंटसोबतच चॅटिंग आणि शेअरिंगसाठी गुगलने सुरू केलेली 'जी-टॉक' सेवा १६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे आता चॅटिंग, शेअरींगसाठी अॅडव्हान्स असे गुगल हँगआऊट अॅप्लिकेशन वापरा, असेही कंपनीकडून कळवण्यात आले आहे.\nजी-टॉक ही चॅटिंग आणि शेअरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पहिल्या काही इंटरनेट अॅपपैकी एक होतं. मात्र व्हॉट्सअॅप, हाइकने चॅटिंग आणि माहिती शेअर करण्यात जी-टॉकला मागे टाकलं. त्यामुळे या अॅप्सना तगडी टक्कर देण्यासाठी हँगआऊट हे अप्लिकेशन गुगलने बाजारात आणलं.\nहँगआऊटमधून व्हिडिओ कॉलिंग आणि जगभरात कुठेही फोन कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच हँगआऊट वापरताना डेस्कटॉपवर सुरू असलेल्या कामात अडथळाही निर्माण होत नाही. त्यामुळे स्पर्धेत मागे पडत चाललेली जी-टॉक सेवा बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.\nदरम्यान, हँगआऊट हे अॅप्लिकेशन गुगल क्रोमला सपोर्ट करत असल्याने क्रोम न वापरणाऱ्या यूजर्सची पंचाईत होण्याची शक्यता आहे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fafdanvis-press-conference-on-the-milestone-achievement-of-rural-maharashtra/", "date_download": "2019-03-25T08:27:22Z", "digest": "sha1:BPSXR2ENEW7GIYLTQ3RWBL6NTJLCBDH4", "length": 5422, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्य हागणदारी मुक्त झाले ; मुख्यमंत्र्यांचा दावा", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nराज्य हागणदारी मुक्त झाले ; मुख्यमंत्र्यांचा दावा\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nअतिथी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली आहे. दरम्यान, हागणदारी मुक्तचा पहिल�� टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nअक्षयतृतीया: दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य\n“मला तिकीट देऊन न्याय द्यायचा की, अन्याय करायचा हे शरद पवार यांनीच ठरवावे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-25T07:59:06Z", "digest": "sha1:FCYCPCSTDH256OLJUK5HLZS7X3RSLFLB", "length": 6429, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "५४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ट्युरिंग मशिन : भाग २ - विचारप्रवाह", "raw_content": "\n५४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ट्युरिंग मशिन : भाग २\nशालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ॲलन ट्युरिंग यांनी केंब्रिज विद्यापिठातील गणिताच्या शाखेत प्रवेश मिळवला. तेथील वातावरण वैचारिकदृष्ट्या प्रगत होते. त्यामुळे तिथे त्यांच्या अंगभूत गुणांस चालना मिळाली. १९३५ साली त्यांनी पहिली श्रेणी मिळवत गणितची प्रदवी प्राप्त केली. यादरम्यान त्यांच्या संवेदनशील तत्त्वचिंतक मनास गणिताची जोड मिळाली. त्यामुळे त्यांचे मन गणित आणि तत्त्वज्ञान याची सांगड घालू लागले.\nपुढील काळात ॲलन ट्युरिंग यांनी ‘युनिव्हर्सल मशिन’ची संकल्पना मांडली. ‘गणितीय विधाने तर्कशास्त्राच्या आधारे मांडता येतील का’ हा त्या संकल्पनेमागील प्रमुख प्रश्न होता. यातूनच ‘सैद्धांतिक संगणक विज्ञान’ या विषयाची पायाभरणी झाली असे मानले जाते. ‘आदर्श संगणक कसा असेल’ हा त्या संकल्पनेमागील प्रमुख प्रश्न होता. यातूनच ‘सैद्धांतिक संगणक विज्ञान’ या विषयाची पायाभरणी झाली असे मानले जाते. ‘आदर्श संगणक कसा असेल’ हे ट्युरिंग यांनी आपल्या ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’च्या सहाय्याने दाखवून दिले. सोडवता येणारा कोणताही प्रश्न या काल्पनिक यंत्राच्या कार्यपद्धतीतून सोडवता आला असता.\nतर्काच्या (Logic) आधारे सूचनावली (Instruction Set) तयार करायची. मग त्या सूचना ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’ला द्यायच्या. त्यानंतर आपली वैशिष्ट्यपूर्ण परंतु सोपी पद्धत वापरुन ते यंत्र आपणास उत्तर ��िळवून देईल, अशी त्या यंत्रामागील सर्वसाधारण कल्पना होती. थोडक्यात ॲलन ट्युरिंग यांनी त्यावेळी एका प्रोग्रॅमेबल संगणकाची संकल्पना मांडली असे म्हणता येईल. कोणताही संगणक ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’हून अधिक सक्षम असू शकत नाही, असे मानले जाते. म्हणूनच ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’कडे संगणक क्षेत्रात एक मानक म्हणून पाहिले जाते.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n२३. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : हर्मन हॉलरॅथ\n१. संगणकाची गोष्ट : प्रस्तावना\n२८. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : रेमिंग्टन टाईपरायटर : टायपिंग\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/books/prabhatkal/", "date_download": "2019-03-25T08:01:36Z", "digest": "sha1:3YFHDILBVC65UQF67L5VM4HHH7KVWQFF", "length": 8216, "nlines": 60, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nप्रभात फिल्म कंपनीत व्यतीत केलेल्या काळातील आठवणींवर आधारित 'प्रभात फिल्म कंपनी'चा इतिहास आठवले यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांना कथन केला आहे. जे त्यांनी पुढे आयुष्यात केले त्याचा वसा किंवा त्याचे संस्कार त्यांना त्यांच्या बालपणात कसे प्राप्त झाले, प्रभातमध्ये पदार्पण होण्यास त्यांच्या तारुण्यातील काही घटना कशा कारणीभूत ठरल्या हेही त्यांनी थोडक्यात सांगितले आहे. प्रभात चित्रांच्या आणि काही गीतांच्या जन्मकथा, प्रभातमधील श्रेष्ठ कलाकारांच्या महानतेच्या गाथा यांचा त्यात समावेश आहे. व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, एस.फतेलाल ऊर्फ साहेबमामा, के.नारायण काळे, केशवराव भोळे, शांता आपटे, राजा नेने, शंकरराव दामले, अभिनेते केशवराव दाते, कथा आणि संवाद लेखक शिवराम वाशीकर, कॅशिअर वासुनाना देसाई, तबलजी बळवंतराव रुकडीकर अशा काही व्यक्तींची शब्दचित्रे हेही त्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य आहे.\nप्रभात ही 'संस्था' म्हणून आणि तिचे व्यवस्थापन कसे आदर्श होते हेही त्यात दाखविले आहे. त्यात काम करणारा प्रत्येकजण 'आपण प्रभातचे पुजारी आहोत' या भावनेने काम करीत असे. संशय आणि आळस यांना तिथे मज्जाव होता. साधेपणा हा तिथला विशेष होता. नाविन्यपूर्ण, आनंददायी, उद्बोधन करणाऱ्या रम्य कलाकृती निर्माण करणे हे एकच ध्येय, हा एकच शौक आणि ही एकच चैन त्यांना ठाऊक होती. \"शांतारामबापूंचे कुशल नेतृत्व, प्रतिभाशाली दिग्दर्शन, विष्णुपंत दामले यांची व्यावहारिक निपुणता, दक्ष, संयमी कार्यकुशलता, साहेबमामांचे कल्पनेच्या पंखांवर आरूढ झालेले कलाचातुर्य यांचा त्रिगुणात्मक संगम म्हणजे 'प्रभातचित्र' अशी व्याख्या आठवले यांनी केली आहे. त्यांच्या नजरेतून लिहिला असला तरी मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा इतिहास या दृष्टीनेही या पुस्तकाला फार मोठे स्थान आहे.\nसाधा विषय मोठा आशय\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialAugust2015.html", "date_download": "2019-03-25T07:51:44Z", "digest": "sha1:ACGIDEAG7ENZYPN4A5CQXYRMDRQVBZYW", "length": 30928, "nlines": 30, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - नुसती द्राक्ष निर्यात करण्यापेक्षा त्याचे बेदाणे करून जगभर निर्यात केली तर शेतकरी समृध्दीची फळे चाखू शकतील !", "raw_content": "\nनुसती द्राक्ष निर्यात करण्यापेक्षा त्याचे बेदाणे करून जगभर निर्यात केली तर शेतकरी समृध्दीची फळे चाखू शकतील \nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nजसे केळी हे माणसाचे आरोग्य, वजन, वाढविणारे व व्हिटॅमीन ए देणारे फळ आहे. तसे लहान - मध्यम, मध्यम - मध्यम व उच्च वर्गात द्राक्ष या फळाला महत्वाचे स्थान आहे. परंतु द्राक्षाचा हंगाम हा डिसेंबर (नाताळ) पासून सुरू होतो. भारतात साधारण फेब्रुवारी ते मार्चपर्यंत गोड द्राक्ष ही (टेबल पर्पज) अधिक प्रमाणात मार्केटला येतात. या द्राक्षामध्ये व्हिटॅमीन सी व शर्करा याचे प्रमाण अधिक असते. द्राक्षामध्ये लांब मणी व चकाकी असलेल्या द्राक्षाला (सोनाका, माणिक चमन, तास - ए - गणेश) चांगली मागणी असते. आखाती व सार्क राष्ट्रात आशियाई लोक अधिक आहेत. त्यामुळे भारतात निर्माण होणारी द्राक्ष फेब्रुवारी - मार्च - एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात तिकडे निर्यात होतात. मे अखेर मालाच्या भावात घसरण होते. ऐन उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने द्राक्ष क्वालिटीत मार खातात. तसेच या काळात आंबा मार्केटला आल्याने भाव ढासळतात. जांभळ्या रंगाच्या (शरद) किसमिस चोर्नी द्राक्षाला रमजान, नाताळमध्ये मार्केट चांगले असते. गेल्या १० - २० वर्षात ५५ ते ६० रू. असा तेजीचा भाव असायचा तो आता ९० रुपयावर स्थिरावला आहे. यानंतर थॉमसन हा ४० - ५० रू. ने सुरू होतो व तेजी वाढल्यावर ६० रू. वर जातो, तर निचांकीला ३० - ३५ रुपयावर खाली येतो. तास - ए- गणेश द्राक्षाला वरील द्राक्षापेक्षा १० - २० रू./किलो भाव अधिक असतो. सर्वात जास्त सोनाकाला भारतात दर जास्त मिळतो. याचे मणी साधारण पाऊण ते सव्वा इंच लांब, आकर्षक, वजनदार, पाकळ्या खुल्या असलेला, गोड असल्याने याला भाव अधिक राहतो. या सर्व जातींना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने सनबर्न, ममीफिकेशन, शॉर्टबेरीज, वॉटरबेरीज, पिंकबेरीज अशा विकृती येत नाहीत. हे हजारो शेतकऱ्यांनी अनुभवल��� आहे. युरोप, अमेरिका, केनडात मात्र गोल, हिरवी, अतिशय आंबट, घट्ट, काचेच्या मण्यासारखी कडक द्राक्ष, वजनदार, व्हिटॅमीन सी चे प्रमाण सर्वात अधिक असलेल्या द्राक्षास मागणी अधिक असते.\nपरदेशातील (चीली, इस्राईल, फ्रान्स, अमेरिका) जातींना बाराही महिने मागणी असते. यांचा रंग अधिकतर वाईन (तांबूस) कलरचा असतो. याचे दर १०० ते २०० रू. किलो असतात. रशिया, फ्रान्स, चिली, इस्राईल यांच्या जाती ह्या पल्प जास्त, गोडी कमी, व्हिटॅमीन - सी चे प्रमाण अधिक अशा असतात. ह्या जाती आड हंगामी येतात व याला १२५ - १५० रू./किलो भाव असतो.\nजगाची लोकसंख्या ही ६०० कोटी आहे. यातील ३०० कोटी लोक हे कमी क्रयशक्ती असलेले मध्यम खालच्या वर्गातील आहेत. हे लोक द्राक्ष खाऊ शकत नाहीत. उरलेल्यातील १०० कोटी लोक द्राक्ष ही त्या - त्या हंगामात खाऊ शकतात. तर २०० कोटी लोक हे अधून मधून खाऊ शकतात. जगातील पुर्वेकडील जपान, चायना अशा राष्ट्रात व उरलेल्या अर्ध्या आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका खंड, उर्वरीत आशियाचा भाग व युरोपमध्ये वाईन व दारू बनविण्यासाठी द्राक्ष पिकविली जातात. तेथे पाण्यासारखी ही वाईन वापरली जाते. तेथे वाईनचे मोठे कारखाने आहेत.\nआता आपण भारतातील द्राक्ष लागवड व उत्पादनाकडे वळूया - भारतातील एकूण क्षेत्र ३४ हजार हे. (८५ हजार एकर) तर उत्पादन १० लाख टन विविध जातींचे होते व देशातील १४० कोटीपैंकी ४० - ४२% लोक हे टेबल पर्पल द्राक्ष ही ४० - ६० रू. किलो भाव असतो तेव्हा ते महिन्यातून ४ ते ८ वेळा खाऊ शकतात. नंतर जो ६०% तरूणवर्ग आहे तो २ ते ४ वेळां द्राक्ष खातो, परंतु त्यातील काही तरुणवर्गाचा कल हा दारू आणि वाईन घेण्याकडे असतो आणि ४०% तरुण हे द्राक्ष खातात. ३०% लोक हे दारिद्रय रेषेखाली असल्याने ते द्राक्ष खाऊ शकत नाहीत. भारतात वाईनसाठी द्राक्षना मागणी फारच नगण्य आहे. त्यामुळे भारतात टेबल पर्पजसाठीच्या जाती आहेत. जेव्हा मार्केटमध्ये द्राक्ष (खाण्यासाठी जास्त) येतात तेव्हा द्राक्ष भाव हे ४० - ५० रू. /किलो पर्यंत खाली येतो. सर्वसाधारण लोक यावेळी द्राक्ष खाऊ शकतात.\nबेदाण्याचा प्रक्रिया उद्योग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वीपणे बहरला \nजेव्हा पीक जास्त येते तेव्हा मार्केटला मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने भाव कोसळतात. म्हणून द्राक्ष मार्केटला नेण्यापेक्षा त्याचे रूपांतर बेदाणा व किसमिस यामध्ये केले म्ह���जे ४ किलो द्राक्षापासून पारंपारिक पद्धतीने १ किलो बेदाणा होतो. तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १२५० ते १३०० ग्रॅम बेदाणा मिळतो आणि गेल्या ५ ते १० वर्षात जो बेदाण्याचा भाव ८० ते १०० रू./किलो होता तो १४० ते १६० रू वर स्थिर झालेला आहे. परंतु सांगली जिल्ह्यात गेल्या १५ - २० वर्षात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्षाचा दर्जा व उत्पादनात क्रांती झालेली आहे. जिथे भुरी, डावणी व इतर रोगांवर औषध फवारण्याचा खर्च इतर कंपन्यांची औषधे महागडी व रिझल्ट उशीरा आणि कमी येत असे. त्यामुळे ती वारंवार फवारावी लागत असे. यामध्ये अनावश्यक खर्चात वाढ होत असे. परंतु जेव्हा सांगली जिल्ह्यात गेल्या १५ - २० वर्षात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी तंतोतंत सातत्याने वापरल्याने शेतकऱ्यांना 'हार्मोनी' व 'स्प्लेंडर' वापरून इतर महागड्या औषधापेक्षा आपल्या द्राक्षाला जिवनाधार (Life Line) वाटला. इतर औषधापेक्षा कमी खर्चात परिणामकारक व वारंवारच्या फवारण्या टळून अनावश्यक खर्च वाचला, शिवाय दर्जा व उत्पादनात भरीव वाढ झाली. कमी पाण्यात द्राक्ष निर्माण करता येवू लागली आणि दर्जेदार विषमुक्त द्राक्ष साऱ्या देशभर या तंत्रज्ञानाने पिकवता येऊ लागली. त्यामुळे द्राक्षाची निर्यात क्षमता वाढवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला. परंतु जेव्हा चिलीची द्राक्ष जागतिक मार्केटमध्ये उतरतात तेव्हा त्यांचा दर्जा कमी असल्याने भाव कमी होतो. त्यामुळे भारतीय द्राक्षाचा दर्जा चांगला असूनदेखील मार्केट तोडले जाते व भारतीय द्राक्षाची कोंडी होते. अशा विचित्र अवस्थेत ज्या ठिकाणी बेदाण्यासाठी हवामान अनुकूल आहे अशा ठिकाणी आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष उत्पादन करून ते मार्केटला न आणता किंवा निर्यात न करता त्याचा बेदाणा तयार करून त्याला २५० रू./किलो भाव (२०१४) होलसेल मार्केटमध्ये मिळू लागला आहे. त्यामुळे एकरी सर्वसाधारण १४ टन द्राक्ष उत्पादन मिळाले तर त्यापासून ३ ते ४ टन बेदाणा होतो. तो २५० रू./किलो दराने विकला म्हणजे एकरी ८ लाख ७५ हजार रू. ते ११ लाख २५ हजार होतात. या व्यतिरिक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एक किलो द्राक्षापासून १२५० ते १३०० ग्रॅम बेदाणा निर्माण होत असल्याने २५० ग्रॅम बेदाणा जास्त मिळून २ लाख रू. ज्यादा बोनस म्हणून मिळतात आणि साधी द्राक्ष जर मार्केटला नेली आणि ती मंदीत जर सापडली तर फार नुक���ान होते. तेव्हा त्याचा बेदाणा तयार करून कोल्ड स्टोअरेजला ठेवून तो दिवाळी, रमजान, नाताळ अशा सणात विकला असता भाव अधिक मिळतो.\nजी. आय. (भौगोलिक ओळख) :\nGeographical Identification चे काम करणारे एक वकील त्यांचे सहकारी वाघ्या घेवडा (राजमा - सातारा कोरेगाव) जो उत्तर प्रदेश, दिल्लीला राजमाची पार्टी पाहुण्यांना पक्वान्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. तेव्हा त्याविषयी माहिती घेण्यासाठी आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना ७ - ८ वस्तूंचा जी. आय. करा अशी सुचना केली होती. तेव्हा त्यात सांगलीचा बेदाणाही सांगितला आणि ६ महिन्यापूर्वीच सांगलीच्या बेदाण्यास (GI) त्या भागाची ओळख मिळाल्याचे वाचले. त्यामुळे दुधात साखरच पडली. सांगली जिल्ह्यात ८०% मालाचा बेदाणा केला जातो, सोलापुर (जुनोनी), नाशिक, लातूर, उस्मानाबाद येथेही बेदाण्याकडे शेतकरी वळाले आहेत. नाशिकमध्ये ५०% माल एक्सपोर्ट व देशांतर्गत मार्केट केले जाते. मध्यम मालास बांग्लादेशात जास्त मागणी आहे.\nहवामान बदलल्याने रोग व विकृती वाढले आहेत. तसेच निविष्ठांचे दर वाढल्याने एकूण द्राक्ष उत्पादनाचा खर्च काही ठिकाणी १००% वाढला. त्यामुळे उत्पादन व खर्चाची तोंडमिळविणी करणे फार मेटाकुटीला येते. अशातच जर अवकाळी पाऊस, वादळ व गारपीट झाली तर शेतकऱ्यांचे १००% नुकसान होते. ते हतबल होतात. कारण द्राक्ष हे खर्चिक व बदलत्या हवामानास संवेदनशिल पीक आहे. याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी राष्ट्रीकृत व सहकारी बँकाकडून कर्ज घेवून हा खर्च करत असतात. यातून जर अशा अवकाळी परिस्थितीत द्राक्ष सापडली तर ती वाचवणे व त्यातून मार्ग काढणे फार अवघड होते. अशा परिस्थितीत बहुतेक शेतकरी हे द्राक्षापासून डाळींबाकडे वळले आहेत. विशेषकरून भगवा डाळींबास दर चांगले मिळत असल्याने त्याच्या लागवडी वाढलेल्या आहेत. परंतु येथेही तेल्या रोगाचा तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. भांडवली खर्चात वाढ झाल्याने द्राक्ष बागा कमी होऊ लागल्या आहेत. शेतकरी याकरिता पर्यायी व्यापारी पीक शोधू लागलेला आहे. नुकत्याच डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या गारपीट व पावसाने द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे द्राक्ष मार्केटला कमी आली. दर्जा कमी झाल्याने त्या���ा दर ५० ते ८० रू./किलो झाला. नवीन खराब माल कमी दर्जाचा वाया गेला. ३० ते ४० रू./किलो भाव (डिसेंबर २०१४) मिळतोय. नवीन माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील ५००० एकरावरील द्राक्ष ही युरोपीयन मार्केटमध्ये निर्यात होण्याची शक्यता आहे.\nसांगली भागातील द्राक्षांना गैरमौसमी डिसेंबर २०१४ मध्ये पावसाचा तडाखा इतर बागापेक्षा कमी बसल्याने येथील द्राक्षास मागणी बऱ्यापैकी आहे. मात्र नाशिक भागात त्याचा उपद्रव झाल्याने तेथील परिस्थिती ही अधिक नुकसानीने दोलायमान आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन कमी झाल्याने १२० रू. किलो भाव झाला आहे. (संदर्भ : ६ जानेवारी २०१५ ची टाईम्स ऑफ इंडिया, पान नं. ४ वरील बातमी) तेव्हा शास्त्रज्ञांपुढील व द्राक्षातील संशोधकांनी प्रतिकूल हवामानाला दाद देणाऱ्या द्राक्षाच्या जाती जागतिक लोकांची चव व गरज लक्षात घेवून निर्माण करणे गरजेचे आहे. बँका व नाबार्ड ने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना परिस्थितीचा अभ्यास करून कर्ज पुरवठा वेळेवर करणे गरजेचे आहे व जेव्हा आपत्ती शेतकरी सापडतो तेव्हा विमा संरक्षण संरक्षणाचे कवच शेतकऱ्यांना विमा कंपन्यामार्फत व सरकारमार्फत देणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना काही सबब सांगून त्यांना नाडणे काही संयुक्तीक होणार नाही. गेल्या २ - ३ वर्षात नैसर्गिक आपत्ती व वादळी वारा, पाऊस, गारपीटीने प्रचंड नुकसान झाले तर विशेषत: गारपिटीपासून पिकाचा बचाव करण्यासाठी हवामान खात्याचा अंदाज २ - ३ दिवसापर्यंत अगोदर उपलब्ध होत असून ती सुचना खरी ठरत असल्याने गारपीट व पावसापासून द्राक्ष वाचवण्यासाठी शेडनेट हे अगोदरच शेतात आणून ते वादळाची चाहूल लागायच्या १५ तासे ते १ दिवस अगोदर फळबागेच्या मांडवावर अंथरून घेतले कि नुकसान कमी होते, असे काही शेतकऱ्यांनी अनुभवले आहे.\nयासाठी ७५ ते १००% अनुदानावर शेडनेट बँका सरकारने पुरवाव्यात अशी सुचना करावीशी वाटते. असे २ - ३ वर्षात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघेल व शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ (Economically Viable) झाल्यावर हे अनुदान सरकारने काढून घ्यावे. नंतर बंद केले तरी चालेल. म्हणजे नंतर द्राक्षबागायतदार स्वत: गारपीटीपासून संरक्षणासाठी स्वखर्चाने शेडनेट घेतील.\nबेदाण्याच्या प्रक्रिया उद्योगासाठी शेडसाठी अनुदान द्यावे व बेदाणे साठविण्यासाठी कोल्ड स्टोअरेजचे जाळे निर्माण करावे. हे काम सरकार, बँका बागायतदार यांनी एकजुटीने युद्ध पातळीवर करावे. म्हणजे द्राक्ष बागायदारांना चांगले दिवस येतील. चांगले दिवस येतील.\nगेल्या अनेक वर्षातील हवामान व वातावरणातील संवेदनशील बदलाचा द्राक्ष पिकावर २०% पासून ८० ते १००% पर्यंत परिणाम होतो. यामध्ये आर्द्रता, धुके, तापमानातील बदल, अवेळी पाऊस, गारपीट याचा परिणाम द्राक्ष बागेवर होत असतो. यातून बागेवर डावणी, भुरीसारखे रोग व पिंकबेरीज, वॉटरबेरीज, ममीफिकेशन, शॉर्टबेरीज अशा विकृत येऊ नये म्हणून किंवा त्याच्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त विषारी, महागड्या किटननाशक व बुरशीनाशकांच्या फावाण्या केल्या जातात. त्यामुळे द्राक्ष घडांमध्ये, मण्यांमध्ये विषारी अंश आढळतात. असा माल निर्यातीत बाद/रद्द ठरवून परत पाठविला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१० मध्ये युरोपमध्ये क्वरंटाईन करून पाठविलेले असताना त्यातील क्लोरोमॅक्वेट क्लोराईड (Chloromequat Chloride -CCC) या विषारी घटकाच्या अधिक प्रमाणामुळे ३८५ कंटेनर द्राक्ष परदेशी (युरोप) पाठविल्यावर ८ महिन्यांनी ते बाद (Reject) होऊन भारतात परत आले. ती द्राक्ष शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांने प्रचंड नुकसान झाले. ही देशाला मोठी नामुष्कीची बाब आहे. शेतकऱ्यांना अशा परिस्थितीतून उभे राहायचे म्हणजे तेथून सलग ५ वर्ष अनुकूल हवामान व सर्व परिस्थिती (आर्थिक दृष्ट्या) लाभली तरच शक्य होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक बुरशीनाशके व किटकनाशकांऐवजी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला त्यांनी देशांतर्गत मार्केटमध्ये, जागतिक मार्केटमध्ये एक नंबर भावात द्राक्ष विकली. हे तंत्रज्ञान फवारले तर द्राक्षामध्ये विषारी अंश (Residue) येत नाही आणि चुकून एखादी रासायनिक औषधांची फवारणी घेतली गेली असल्यास त्याचा द्राक्ष मालामध्ये असणारा विषारी अंश डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नंतर केलेल्या फवारण्यांनी निघून जातो. ती विषमुक्त होतात. असे अनेक शेतकऱ्यांनी आम्हास कळविले. तेव्हा हे तंत्रज्ञान द्राक्ष पिकविणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी वापरावे.\nज्याप्रमाणे द्राक्षावर प्रक्रिया केल्यानंतर मुल्यवर्धन होते त्याचप्रमाणे इतर शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचा टिकाऊपणा (Shelflife), उपयुक्तता, आरोग्यता वाढवावी. प्रक्रियेमुळे वर्षभर त्याचा व्यापार चालत��. निर्यातीमुळे परकीय चलन मिळते. त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था बळकट होते. रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळतो. भारतीय शेतीला खऱ्या अर्थाने श्रमाच्या 'अर्था' चे पाठबळ मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/a-thug-who-sold-the-red-fort-taj-mahal-and-rashtrapati-bhavan-2/", "date_download": "2019-03-25T08:10:10Z", "digest": "sha1:IJYHQJHIXGLPEODJAEZKKNT7HJFZJJ3O", "length": 11401, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एक असा ठग ज्याने विकला लाल किल्ला ,ताजमहल आणि राष्ट्रपती भवन", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nएक असा ठग ज्याने विकला लाल किल्ला ,ताजमहल आणि राष्ट्रपती भवन\nवेब टीम ; एखाद्या व्यक्तीने जर कुणाची फसवणूक केली त्या व्यक्तीला नटवर लाल म्हणून संबोधण्यात येत, कोण हा नटवर लाल,कोणाला त्याने फसवलं एवढा कुप्रसिद्ध असणारा हा इसम कोण याबद्दल फारशी माहिती नसताना देखील आपल्या तोंडून अजाणतेपणे हे नाव उच्चारले जाते . आज आपण याच नटवर लाल बद्दल जाणून घेणार आहोत .तो सामान्य ठग नव्हता . निर्भीडपणे सर्वत्र वावर आणि अनोख्या संवादशैलीमुळे बरेचं लोक त्याच्याकडून फसवले गेले.\nमिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवर लाल हा भारताच्या इतिहासात सर्वात मोठा ठग म्हणून ओळखला जातो . त्याचा जन्म बिहारच्या सीवान जिल्ह्यातील जीरादेई या गावामध्ये झाला होता . लग्नानंतर अवघ्या काही वर्षातच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता शिवाय त्याला मुलबाळ देखील नव्हत. त्याने वकिलीचे देखील शिक्षण घेतले होते असं देखील सांगितलं जात.तो मोडकी तोडकी इंग्रजी देखील बोलू शकत होता. त्याने काही काळ पटवाऱ्याची देखील नोकरी केली मात्र त्याचं मन नोकरीमध्ये रमत नसे . त्याला लोकांना फसवण्यात विलक्षण आनंद मिळत असे.नटवर लाल ने तीन वेळा ताजमहल ,दोन वेळा लाल किल्ला तर एकदा चक्क राष्ट्रपती भवनच विकले होते यावरून तो छोटा-मोठा ठग नव्हत�� हे लक्षात येत .\nनटवर लाल नकली हस्ताक्षर करण्यात पटाईत होता. एकदा पाहिलेली सही तो मोठ्या सफाईदार पद्धतीने करून लोकांना दाखवत असे . एकदा भारताचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद त्यांच्या गावी आले असता प्रसाद यांची सही त्याने त्यांच्या समक्ष अगदी हुबेहूब करून दाखवली . दस्तुरखुद्द राजेंद्र प्रसाद देखील आश्चर्यचकित झाले होते . पुढे याच कलेचा वापर करून त्याने शेजाऱ्याच्या चेकवर नकली सही करून १००० रुपये बँकेतून काढले आणि अशा रीतीने ठगगिरीला सुरुवात झाली . यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि अशा शेकडो लोकांची फसवणूक त्याने आयुष्यभर केली .\nनटवर लाल बद्दल जे किस्से सांगितले जातात त्यामध्ये तीन वेळा ताजमहल ,दोन वेळा लाल किल्ला तर एकदा राष्ट्रपती भवनच विकले याची सर्वात जास्त चर्चा केली जाते. डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या सहीची नक्कल करून त्याने या इमारती विकल्या होत्या . त्याने सर्वात जास्त सरकारी कर्मचारी आणि मध्यमवर्गीय लोकांना फसवले . बिहार,मध्य प्रदेश,दिल्ली हरियाणाया राज्यात शेकडो केसेस दाखल झाल्या होत्या . त्याच्या आयुष्यात त्याला ९ वेळा पोलिसांना पकडण्यात यश आलं मात्र तो फक्त ११ वर्षे जेल मध्ये राहिला तर ३० केसेस मध्ये पुराव्याभावी निर्दोष सुटला .\nनटवर लाल स्वतः ला रॉबिन हूड मानत असे . त्याने केलेल्या लोकांच्या फसवणुकीचा त्याला कधीही पश्चाताप झाला नाही . तो म्हणत असे की मी कोणतीही हिंसा केली नाही ,तसेच कोणत्याही हत्याराचा वापर देखील केला नाही मी फक्त लोकांना वेगवेगळी कारण सांगून पैसे मागितले आणि लोकांनी ते स्वतः दिले त्यामुळे त्यात गैर ते काय असा सवाल तो नेहमी विचारत असे.\nत्याने स्वतःची वेगवेगळी अशी तब्बल ५६ नावे ठेवली होती परंतु सर्वात जास्त त्याच नटवर लाल हेच नाव लोकांना माहित होत . नटवर ला शेवटच दरभंगा स्टेशनवर पाहिलं गेलं होत . एका पोलीस शिपायानेच त्याला ओळखलं होत जो त्याला लहानपणापासून ओळखत होता . मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्या आधीच नटवर पळून गेला त्यानंतर तो पुन्हा कधीही दिसला नाही . २००४ मध्ये पुन्हा एकदा नटवर लाल हे नाव चर्चेत आलं . एका वकिलाने नटवर लाल चं मृत्युपत्र त्याच्याकडे दिल्याचा दावा केला मात्र त्याच्या नातेवाईकांच्या मतानुसार त्याचा मृत्य १९९६सालीच झाल्याचा दावा केला होता असं असलं तरीही नटवर लालच्या मृत्यू बाबत कोणतीही ठोस माहिती आज उपलब्ध नाही.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\n‘बाहुबली ब्रेन सर्जरी’- ब्रेन सर्जरी दरम्यान चक्क पेशंट पाहत होता चित्रपट\nविद्यापीठा विरोधात विद्यार्थी संघटनांचा एल्गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/mp-supriya-sule-criticize-on-government-policy-on-banking-charges-latest-update/", "date_download": "2019-03-25T08:10:51Z", "digest": "sha1:WO3F5WFSWICULAIUN657PRHYRIX6J22M", "length": 5603, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्जबुडव्यांना पाठीशी घालायचं आणि सामन्यांच्या पाकिटावर डल्ला; आता जनता हे सहन करणार नाही - सुप्रिया सुळे", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nकर्जबुडव्यांना पाठीशी घालायचं आणि सामन्यांच्या पाकिटावर डल्ला; आता जनता हे सहन करणार नाही – सुप्रिया सुळे\nटीम महाराष्ट्र देशा: आजवर ज्या बँकिंगसेवा निशुल्क मिळत होत्या त्यांच्यासाठी आता शुल्क आकारले जाणार असल्याच दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रक्कम जमा करणे, रक्कम काढणे, मोबाइल क्रमांक बदलणे, केवायसीसाठी पत्ता बदलणे, नेटबँकिंग किंवा चेकबुक इत्यादी सेवांसाठी जादा शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.\nसरकारकडून एका बाजूला ऑनलाईन बँकिंगसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे अशाप्रकरे सामन्यांच्या खिशावर डल्ला मारला जात असल्याने यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ‘हे सरकार कर्ज कर्जबुडव्यांना पाठीशी घालायचं आणि ज्येष्ठ नागरिक, छोटे-मोठे दुकानदार, मध्यमवर्गीय यांच्या पाकिटावर हल्ला करायच काम करत आहे. मात्र सामान्य माणूस हे सहन करणार नसल्याची’ टीका केली आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nविद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या लिपिकाला नागरीकांनी दिला चोप\n‘मी येतोय’ या सिनेमातून छोटा पुढारी लवकरच रुपेरी पडद्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090622/main.htm", "date_download": "2019-03-25T08:24:35Z", "digest": "sha1:LQ2ONUP5T7IKFE67VE3KZVUJYHMJIQPF", "length": 18597, "nlines": 55, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार , २२ जून २००९\nइंडोनेशियन ओपनचे ऐतिहासिक विजेतेपद\nनवी दिल्ली, २१ जून / पीटीआय\nभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आज पुन्हा एकदा इतिहास घडविला. ऑलिम्पिकच्या उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या सायनाने इंडोनेशियन ओपन स्पर्धेत आपल्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या चीनच्या लिन वांगला नमवून विजेतेपद पटकाविले. सुपर सिरीजची स्पर्धाजिंकणारी सायना ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे.\nसायनाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत वांगवर १२-२१, २१-१८, २१-९ अशी मात केली. ४९ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात सायनाने पहिला गेम गमावला होता, पण अखेर तिने बाजी उलटवित स्पर्धा जिंकली.\nश्रीलंकेला ८ विकेट्सनी नमवून पाकिस्तान विश्वविजेता\nशाहिद आफ्रिदी सामनावीर ’ दिलशान स्पर्धेत सर्वोत्तम\nलंडन, २१ जून / वृत्तसंस्था\nदहशतवादामुळे पोखरलेल्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून अलग पडलेल्या पाकिस्तानला ज्या दिलासा देणाऱ्या, आत्मविश्वास उंचावणाऱ्या, देशातील प्रत्येकाच्या आयुष्यात अशा कठीण परिस्थितीतही आनंदाचे चार क्षण देणाऱ्या विजयाची गरज होती, तो विजय त्यांना लॉर्ड्सवर गवसला. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला ८ विकेट्सनी पराभूत करीत पाकिस्तानने विश्वचषकाला कवटाळले. विश्वविजयाचे ‘पाक’ आणि तेवढेच बुलंद इरादे मनात ठेवून मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.\nएकमेकांवर दोषारोप करणे थांबवा - अडवाणी\nहुसैन-नकवी यांची मनेकांशी शाब्दिक खडाजंगी\nदेशव्यापी दौरा करण्याची अडवाणी यांची घोषणा\nभाजप कार्यकारिणी अधिवेशनाचे सूप वाजले\nनवी दिल्ली, २१ जून/खास प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर ��दखदणाऱ्या असंतोषाच्या पाश्र्वभूमीवर सुरु झालेल्या भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मनेका गांधी आणि मुख्तार अब्बास नकवी यांच्यात उडालेल्या तीव्र खडाजंगीमुळे अंतर्गत कलहाने कळस गाठला. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या बैठकीचा समारोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे कोणतेही संकेत दिले नाही. उलट जनतेत जाऊन पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी येत्या काही महिन्यात आपण पुन्हा देशव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nरेल्वे स्टेशनवर दहा रुपयांत पुरीभाजी\nनवी दिल्ली, २१ जून/पीटीआय\nरेल्वेला मानवी चेहरा देण्याचा वज्रनिर्धार करणाऱ्या ममतादीदींनी धडाक्याने निर्णय घेण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या सर्व विभागांतील रेल्वेस्थानकांवर लवकरच किफायतशीर दरात म्हणजे केवळ दहा रुपयांत पुरीभाजी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुरीभाजीची ही पॅकेट्स लवकरच स्थानकांवर दिसू लागतील. विशेष म्हणजे ही पुरीभाजी गलिच्छ ठिकाणी तयार केली जाणार नसून, स्वच्छ अशा स्वयंपाकघरांमध्ये तयार केली जाणार आहे.अगोदर रेल्वेस्थानकांवरच गलिच्छपणे हे सगळे अन्नपदार्थ तयार केले जात होते, आता तसे होणार नाही. सर्व विभागीय अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, दहा रुपयांत पुरीभाजी रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून द्यावी, असे सांगण्यात आले आहे. या फूड पॅकेटमध्ये सात पुऱ्या व बटाटय़ाची भाजी दिली जाईल व लोणचेही असेल. हे जनता जेवण म्हणूनही प्रसिद्ध आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nमुंबई, २१ जून / प्रतिनिधी\nशनिवारी असलेले ढगाळ वातावरण, मुंबईच्या काही उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी परिसरात झालेला हलका ते मध्यम पाऊस यामुळे तमाम मुंबईकरांना आता रविवारी पाऊस येणारच, अशी खात्री वाटत होती. मात्र पावसाने मुंबईकरांना हूल दिली. दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी शहर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. मुंबईकरांना आता पावसाचा शिडकावा नको आहे, त्यांना प्रतिक्षा आहे ती वाजत, गाजत आणि गर्जत येणाऱ्या जोरदार पावसाची. दरम्यान मान्सून अलिबागपर्यत येऊन पोहोचला असून पुढील २४ ते ४८ तासात तो मुंबई व उपनगरात दाखल होईल, असे वेधशाळेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nपराभवाचा अहवाल कपोलकल्पित कटकारस्थान उदयनराजेंनी पक्षशिस्तीच्या चौकटीत काम करावे -आर. आर.\nराष्ट्रवादीच्या पराभवाचा अहवाल हे कपोलकल्पित कटकारस्थान आहे. पक्षाने कोणतीही समिती नेमलेली नाही. उदयनराजेंनी पक्षशिस्तीच्या चौकटीत काम करावे, पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले व निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे चालवलेले गुऱ्हाळ व घातलेला घोळच राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत असल्याचे सांगितले. उदयनराजे यांना राष्ट्रवादीमध्ये घेतले. त्यांची भूमिका पक्षाला तारक आहे की मारक, याबाबत विचारले असता आर. आर. पाटील म्हणाले, की आता तरी तारक असल्याचे सिद्ध झाले आहे. आणखी काम केले तर भविष्यातही तारक ठरेल अशी अपेक्षा आहे. वैयक्तिक मते मांडण्याचे पक्षांतर्गत पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यासाठी पक्षाचे व्यासपीठ आहे. त्याबाहेर जाऊन कुणी पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये.\n९०:१० कोटय़ाच्या समर्थनार्थ पालक-शिक्षक संघटनेचीही याचिका\nमुंबई, २१ जून / प्रतिनिधी\nअकरावी प्रवेशासाठी ९०:१० कोटा लागू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर सीबीएसई व आयसीएसईच्या पालकांनी उच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. परंतु, ९०:१० कोटय़ाचा निर्णय योग्य असल्याने या कोटय़ाच्या समर्थनार्थ पालक-शिक्षक संघटनेच्या वतीने उद्या, सोमवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारनेही यापूर्वीच न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. राज्य शिक्षण मंडळ, आयसीएसई व सीबीएसई या तिन्ही मंडळांची विषय पद्धत, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, गुणदान योजना यांमध्ये मोठा फरक आहे.\nलालगढ मोहीम फत्ते आता स्वारी रामगढवर\nलालगढ येथील महत्त्वाचे पोलीस ठाणे काबीज केल्यानंतर सुरक्षा दलांनी आज आणखी खोलवर मुसंडी मारली. माओवाद्यांनी त्यांचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या सुमारे १७ खेडय़ांना वेढा दिला असून, तेथील आदिवासींचा त्यांना पाठिंबा असल्याचे बोलले जाते. हा वेढा मोडून काढण्यासाठी आता सुरक्षा दलांचे जवान प्रयत्नशील आहेत. सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले, की केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल व पश्चिम बंगाल पोलीस यांनी लालगढ येथ��न रामगढकडे कूच करायला सुरुवात केली आहे. इतर सतरा खेडय़ांकडे जाणारे रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. या खेडय़ांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर माओवाद्यांनी अडथळे निर्माण केले आहेत.\nगोराई खाडीत नौका उलटून तिघे तरुण बेपत्ता\nमुंबई , २१ जून / प्रतिनिधी\nमासेमारीसाठी गेलेली नौका बोरिवली येथील गोराई खाडीमध्ये उलटून त्यातील तीन तरूण बेपत्ता झाले , तर नऊ तरूणांना वाचविण्यात जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार , २० ते २५ वयोगटातील १२ तरुण रविवार असल्याने सकाळी गोराई खाडीमध्ये मासेमारीसाठी गेले होते. मात्र दुपारी पावसाळी वातावरणामुळे उसळलेल्या लाटांनी त्यांची नौका उलटली व सर्व तरुण त्यात अडकले. त्यानंतर काही वेळाने जीवरक्षक आणि अग्निशमन दलाला घटनेविषयी माहिती मिळाली व बचावकार्याला सुरूवात झाली. सायंकाळी उशिरा १२ पैकी नऊ तरुणांना वाचविण्यात जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र तीन तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये महेश (२४) आणि परेश पागे (२४) या दोन भावासह विजय पागे (३०) या त्यांच्या नातेवाईकाचा समावेश आहे. विजयला पोहता येते परंतु महेश आणि परेश या दोघा भावांना पोहता येत नाही , असे वाचविण्यात आलेल्या तरुणांनी सांगितल्याचे बॅनजी म्हणाले. रात्री उशिरापर्यंत या तिघांना शोधण्याचे काम सुरू होते.\nमहाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_63.html", "date_download": "2019-03-25T07:47:47Z", "digest": "sha1:IYKY7KW7EVKSZQGKRVWG46QZOBUN4QDR", "length": 6125, "nlines": 119, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "पिरेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nपिरेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं...\nकाय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं...\nअन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं..\nत्याचं प्रेम म्हणजे त्याने\nतिला दिलेलं पहिल- वहिल ग्रेटिंग..\nअन आमच हे पिरेम म्हंजी\nशेजारच्या बाळ्यान लावून दिलेली सेटिंग..\nत्याचं ते प्रेम म्हणजे\nदोन पाखरांची गोड गुलाबी मजा..\nअन आमच हे पिरेम म्हंजी\nसाऱ्या गावभर झालेला गाजावाजा..\nत्याचं ते प्रेम म्हणजे\nचौपाटीवाल्या फाईव्हस्टार मध्ये डेट..\nअन आमच हे पिरेम म्हंजी\nगावच्या बंधाऱ्यावरची पाच मिनटाची भेट...\nपण त्याचं ते प्रेम म्हणजे चार\nअन आमच हे पिरेम म्हंजी\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/sahitya/gudgulya/", "date_download": "2019-03-25T07:49:17Z", "digest": "sha1:H2O7XHGQI7JL6TFX7V4LTQE2WQFUDMNF", "length": 14706, "nlines": 197, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nगुदगुल्या - नर्म विनोदी कविता\nफलक \"नाही धोका – - वेगे हाका\"\nलग्नदिवस मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा\nचुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\nमंगळावरची मुलगी मुलगी आमुची\n२११० साली \" – शतकही नाही झाले अजुनी\nगळ्यात काळी पोत बांधुनी –\nदास्याची जी उघड निशाणी \nतिलाच 'मंगलसूत्र' म्हणोनी –\nमिरवीत होत्या खुळ्या अडाणी\nनाटिका प्रेमभराने सांगत होती\nशांत बिचारा नवरा होता\nउशिरा येणारे मास्तर विशाल विद्यालय विश्वाचे\nतिथे मुरब्बी 'अनुभव' मास्तर\nअवलक्षण पण एकच त्यांचे\nसदा उशिरा ये कामावर \nनवे घर खाणावळ भोजनाला\nआणा शपथा ज्या चंद्राला साक्षी ठेवुन\nझाल्या आपुल्या आणा शपथा\nसमजून आले मज मागाहून\nचंद्र सखे तो कृत्रिम होता\nकुंकू आणि लिपस्टिक लावीत हो��ो पूर्वी आम्ही\nकाळ बदलला तशा बदलल्या\nत्या तिलकाचे रूप बदलते\nभूपाळी गोड गुलाबी झोपेमधुनी\nजागे करिते मला पहाटे\nनव्हे – मुलांची माझ्या दंगल\nनवा आरसा पहिला वाहिला केस पांढरा\nअसा कुणीतरी शोधुनि काढा\nसिद्धांत जितकी ज्याची ठाम मते\nतितके त्याचे मन कोते\nधोका लाल रंग ही धोक्याची अन् अपघाताची खूण\nशाळेमध्ये झाले होते बाळाला हे ज्ञान\nविद्यार्थी तो सहज विचारी पित्यास अपुली शंका\nआईच्या ओठाची लाली सुचवी कसला धोका\nबदल होतात बदल जे लग्नाने पुरुषात\nबहुमोल वाटतो मजला हा सर्वात\nकधिकधी वाटते योग्यांनाही कठिण\nते आपोआपच साधे त्याला – 'मौन'\nसुख जगात मिळते सुख पैशाने\nद्रव्य न लाभे हाय\n) स्तुतिपाठकाचे घर असावे शेजारी\nसोपे होईल करणे मग प्रेम तयावरी\nरहस्य वयोवृद्ध तो हासत गाली,\nजगावेगळे गमेल माझे एकांतिक सांगणे\nसंसारातील सुखशांतीचे रहस्य घ्या समजुन –\n'खरे नेहमी लपवित जावे अर्धांगीपासुन'\nनीती प्याल्यावाचुनी मदिरा उंची,\nनकाच चर्चा करू नीतिची\nरजा आणि पगार पगार आणि रजा यामधे\nअसे रजेचे महत्व मोठे\nपगार पुरतो आणि वाढतो,\nरजा न वाढे, कधी न पुरते\nनवे नाव विवाहाचे नवे नाव – 'घटस्फोटास पात्रता\nविष्णूची ललना शर्यतीतल्या घोडयांना असेल का ही कल्पना\n'जॉकी' –नव्हे – पाठीवरी धावे 'विष्णूची ललना'\nखूण \"कुठे राहता आपण\n\"अंत्यविधी सामानाचे आहे खालती दुकान\nआणि वरती प्रसिद्ध आहे 'प्रसूती सदन' \nनवलकथा 'तो' आणि 'ती ' यांची होती प्रीती\nविवाहात ती करुनी परिणत\nआणिक ऐका पुढती – अद्भुत\nअजुनि सुखाने नीट नांदती\nजग धरणी आणिक आभाळाचे\nरुसली, बसली 'आई' खाली\n'बाप' भडकला चढे महाली\nमध्ये जगाचे बालक तान्हे\nउद्याचा संसार जन्म जाहला पृथ्वीवरती\nनकली हास्य मी हसतो – पण माझे हसणे\nजगास भासे – उदास उसने\nदोष न माझा नसे जगाचा\nकसे फुटावे हास्य गोमटे\nदातच असता नकली खोटे\nझाकली मूठ 'पुरुषांचे आहे जग हे' सगळे म्हणती\nका वाटुनी घेता तुम्ही स्त्रियांनो खंती\nतुमचेच शेवटी विश्वावर स्वामित्व\nउघडून पहा की घट्ट आपुली मूठ\nकानगोष्ट टिकावयाचे असेल जर का\nसतत आपुले सांसारिक सुख\nनका कधीही बघू सकाळी\nबाळे येतिल जी जन्माला\nहाक मारतील ती कोणाला\nअभिन्नता लग्नानंतर दोन जिवांची\nकोठे पतीची, कुठे पत्निची\nस्फूर्ती जेव्हां जेव्हां पत्नीसंगे\nघरात माझे होते भांडण\nतेव्हां तेव्हां फुलते स्फूर्ती\nप्रेमकाव��य मी लिहितो नूतन\nटेकडी उजाड काळी, कोमलतेशी सदा जिचे भांडण\nगावाबाहेर उभी टेकडी फुगून रागावून\nतिथेच येती परी विहारा रसिक विलासी जन\nकुरुपतेतही कुणाकुणाच्या असते आकर्षण\nपैसा बोलतो पैसा बोलतो हे मजला पटले\n'जातो मी' त्याने कालच म्हटले\nलाटा वाऱ्याला नवकविता स्फुरली\nओष्टद्वय \"ओठांना या मी न लाविली अजुनि सिगरेट\"\n\"मीही नाही कधी मढविले लालीने ओठ\"\nअरसिक तरुण देखण्या पत्नीसंगे\nकधी न करणे रुसवा भांडण\nयाहून दुसरे नाही लक्षण\nमाणसे आणि मते बापाची गांधींवर निष्ठा,\nलाल बावटा दावी बेटा\nटिकाऊ धन होईल केवी जगी मानवा प्राप्त दीर्घ जीवन\nशास्त्रज्ञांनो यास्तव झिजवा खुशाल तन मन धन\nत्या आधी पण शोधुनि काढा दिव्य असे साधन\nटिकेल ज्याने चंचल अमुचे बटव्यामधले धन\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-best-strike-and-irresponsible-statement-mp-sanjay-raut-4123", "date_download": "2019-03-25T08:20:10Z", "digest": "sha1:3JHKZ6CZ6F3FTBNXOQSIGXYU3SQS4EEL", "length": 6954, "nlines": 100, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news BEST strike and irresponsible statement of MP sanjay raut | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबेस्टच्या संपाचं शिवसेना नेत्यांना गांभीर्य नाही; संजय राऊत यांनी बेस्ट कामगार, मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं मिठ\nबेस्टच्या संपाचं शिवसेना नेत्यांना गांभीर्य नाही; संजय राऊत यांनी बेस्ट कामगार, मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं मिठ\nबेस्टच्या संपाचं शिवसेना नेत्यांना गांभीर्य नाही; संजय राऊत यांनी बेस्ट कामगार, मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं मिठ\nबेस्टच्या संपाचं शिवसेना नेत्यांना गांभीर्य नाही; संजय राऊत यांनी बेस्ट कामगार, मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं मिठ\nबेस्टच्या संपाचं शिवसेना नेत्यांना गांभीर्य नाही; संजय राऊत यांनी बेस्ट कामगार, मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं मिठ\nशनिवार, 12 जानेवारी 2019\nBESTच्या संपाबाबत शिवसेनेला शून्य गांभीर्य BEST च्या संपाची सेनेकडून थट्टा\nVideo of BESTच्या संपाबाबत शिवसेनेला शून्य गांभीर्य BEST च्या संपाची सेनेकडून थट्टा\nबेस्टचा संप कधी नव्हे इतका लांबलाय.. बेस्टच्या संपामुळं मुंबईकरांचे अतोनात हाल होताहेत.. मुंबईकर बेस्टच्या संपामुळं भरडला जात असतानाच पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांना मात्र या संपाचं काहीही गांभीर्य नाही असं म्हणावं लागतंय. कारणही तसंच आहे, ठाकरे या सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या वेळी साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेस्टबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊतांना काय उत्तर देत बेस्टच्या संपाची खिल्ली उडवलीय ते तुम्ही ऐकाच.\nबेस्टचा संप कधी नव्हे इतका लांबलाय.. बेस्टच्या संपामुळं मुंबईकरांचे अतोनात हाल होताहेत.. मुंबईकर बेस्टच्या संपामुळं भरडला जात असतानाच पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांना मात्र या संपाचं काहीही गांभीर्य नाही असं म्हणावं लागतंय. कारणही तसंच आहे, ठाकरे या सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या वेळी साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेस्टबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊतांना काय उत्तर देत बेस्टच्या संपाची खिल्ली उडवलीय ते तुम्ही ऐकाच.\nसंप साम टीव्ही टीव्ही संजय राऊत sanjay raut strike sanjay raut\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-25T08:27:43Z", "digest": "sha1:4WS6G6GWPBFWHILVBO67TFEV7CLWYVTK", "length": 7418, "nlines": 85, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "जे कधी न जमले मजला . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nजे कधी न जमले मजला . .\nवा. न. सरदेसाई January 8, 2019 मात्रावृत्तातील, गझल\nगण : मात्रा : एकूण मात्रा २८ ( १४ + १४ ) | लगावली : मात्रा : एकूण मात्रा २८ ( १४ + १४ ) | लक्षणे : मात्रा : एकूण मात्रा २८ ( १४ + १४ )\nवृत्त : विधाता ( हिंदी )\nमात्रा : एकूण मात्रा २८ ( १४ + १४ )\nजे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते…\nमज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते \nमी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;\nप्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते \nत्या घेराव्यातच मजला, जी झाली धक्काबुक्की..\nमाझ्यावर ते कुसुमांचे, हारांतुन हमले होते \nतांबडे फुटेतो तू-मी, त्या रात्री जागत असता,\nविझण्याचे विसरुन तारे, चमकण्यात रमले होते \nएकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,\nपाखरू मनाचे माझ्या, वळचणीस घुमले होते \nहोकार घेउनी जेव्हा, आलीस अंगणी माझ्या,\nनवसाच्या प्राजक्ताचे, झाडच घमघमले होते \nमी गझल गुणगुणत माझी, रस्त्याने चालत होतो..\nआकाश मजपुढे तेव्हा, अदबीने नमले होते \nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या ना��काचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_73.html", "date_download": "2019-03-25T07:47:30Z", "digest": "sha1:42CFG7Y4NLSGVAYLWRTYDDPEWUALSOTP", "length": 6040, "nlines": 122, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तिची तर आठवण आहे ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतिची तर आठवण आहे\nतिची तर आठवण आहे,\nजी मनातून जात नाही..\nएक तिचाच तर विचार आहे,\nजो डोक्यातून जात नाही..\n... तेवढ जास्तच आठवण्यास होते\nमन आपोआपचं अधीर व्हायला लागते..\nएवढ कुणाच्यात गुंतत जात असतात का..\nएकदा सहजच बोलून गेली ती.. पण कस सांगू\nतुझ्यातून जेवढ बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय\nतेवढाच आता अडकत चाललोय\nअजूनचच जास्त गुंतत चाललोय..\nमला माहिती आहे कि..\nमी जमिनीवरून कितीही उड्या मारून हात\nउंचावला तरी.. चंद्राला तर हात लावू शकत\nयाची कल्पना असून सुद्धा हे\nनाजूक मन तिचे स्वप्न बघायचे थांबत नाही..\nएक तिची तर आठवण आहे, जी मनातून जात\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aneyagro.com/", "date_download": "2019-03-25T08:25:14Z", "digest": "sha1:KEAGELDAUM4Z6OQ4HVKPQJMQTI75ETFH", "length": 14577, "nlines": 62, "source_domain": "www.aneyagro.com", "title": "Aney Agro Aneya Agro Bio Production", "raw_content": "\nआम्हाला कॉल करा : ९१३० ०८१ १५५\nअनेय ॲग्रो बायो प्रोडक्शन प्रा.लि. कृषि आधारित उत्पादनाची कंपनी आहे, २०१८ पासून तावडी फलटण (सातारा) येथे कार्यरत आहे . सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे .\nसेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे .\n1) दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी मधील ग्लिसिरीन मुळे झाडांच्या मुळाची वाढ चांगली होते ग्लिसिरीनमुळे शेतीचा सामू चांगला होण्यास मदत होते आणि पीकांची जोमाने वाढ होते. तसेच हे नायट्रेट आणि फॉस्फरस प्रमाण वाढवण्याचे काम करते . दशपर्णी मधून विविध प्रकारची मिनरलस पिकांना मिळतात ज्यांच्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत मिळते . उदा - नायट्रेट,सल्फर ,लोह,फॉस्फरस , इ . 2) दशपर्णी मुळे मुळाची वाढ चांगली होते व पानांची काळोखी आणि पाने जाड व पसराट होतात.दशपर्णी मुळे रोग व किडींचे प्रकटन होऊन पिकांना नवचैतन्य प्राप्त होऊन ते लवकर रोगमुक्त होतात ,दशपर्णीमुळे पिके सुदृढ सक्षम व निरोगी होतात. दशपर्णीमुळे उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या क्वालिटी मध्ये वाढ होते .पिकांच्या क्वालिटी व उत्पादना करिता दशपर्णीचा हमखास वापर होतो 3)डाळींब बागां मध्ये क्वालिटी वाढवणासाठी आणि डाळींबाला दाट रंग व चकाकी येण्याकरता दशपर्णी चा उपयोग होतो .दशपर्णी च्या वापरा मुळे थ्रिप्स, माईट, कीड , अळी ,तेलया, करपा, मर, प्लेग ,फ्लावर ड्रॉपिंग इ. रोगा वरती नियंत्रित करीता येते. ऊस,भेंडी ,कांदा ,शेवगा ,वांगी ,मका,आल, हळद, भात व अनेक पालेभाज्या यासाठी सेंद्रिय दशपर्णी अर्कचा वापर करावा .पिकांना दर्जेदार बनवण्याचे आणि भरघोस उत्पन्न देण्याचे कामे हे दशपर्णी अर्क करते . 4) दशपर्णी चे द्रावण तयार करताना त्यात कसलेही रसायन जसे की स्प्रेडर, स्टीकर, वेटिंग एजन्ट, इन्सेक्टरीसाईड, पेस्ट्रीसाईड, सायट्रीक ॲसिड किंवा साबणाचे पाणी असे काही मिसळू नये .नुसत्या पाण्यात दशपर्णीचे द्रावण तयार करून फवारावे ,दशपर्णी चा वापर १२ हि महिने करावा . दशपर्णी चा वापर फळबागांसाठी त्याचे प्रमाण १०० ली. पाण्यातून २ ते २.५ ली.घ्यावे व पाले भाज्यांसाठी प्रती ली.२ ते २.५ मि.ली. घ्यावे आणि दशपर्णीचे २ ते ३ फवारण्या दर ४ ते ५ दिवसांच्या अंतरांनी घ्याव्यात. फवारणी दाट व चपचपून घ्यावी.\n1) सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पाहणे गरजेचे आहे. या सर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी सेंद्रिय ह्युमिकचा वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रिय ह्युमिकचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे सेंद्रिय ह्युमिक म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. 2) सेंद्रिय ह्युमिक हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.सेंद्रिय ह्युमिकमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.सेंद्रिय ह्युमिक हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते. 3) जैविक ह्युमिक मुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया उत्तेजित होते, ज्यामुळे झाडे हळूहळू वाढतात आणि शाखा वाढते. हे वनस्पतीच्या तृतीयांश मुळे विकसित करते जेणेकरून जेरेमीद्वारे पोषक तत्व शोषले जाऊ शकतात. वनस्पती मध��ये फळ आणि फुले वाढते , मातीची प्रजननक्षमता वाढवते , वनस्पती चयापचय क्रियाकलाप वाढवते , उत्पन्न देखील वाढते. सेंद्रिय ह्युमिकमुळे नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या उपयोगिता दरामध्ये वाढ होऊ शकते, परंतु पोटॅश खतांचा वापर देखील वाढू शकतो. पाण्यात विसर्जित खतांमध्ये, निरनिराळ्या अंशांमध्ये खारट असलेले उर्वरकांचा उपयोगिता दर वाढतो. 4) सेंद्रिय ह्युमिक वनस्पतींच्या अवयवाच्या 24 तासांच्या आत पोहचू शकतो, जे जमिनीच्या निषेधापेक्षा वेगवान आहे. आर्द्र अम्लचे कालांतराने फवारणीमुळे कमीपणाचे लक्ष कमी होते आणि निश्चित लक्षण असल्यावर शक्य तितक्या लवकर पीक पुनर्संचयित करता येते.\nसेंद्रिय दशपर्णी अर्क ५०० मि.लि.\nRs.२२० उत्पादन तपशील पहा\nसेंद्रिय दशपर्णी अर्क १ लि\nRs.३८० उत्पादन तपशील पहा\nसेंद्रिय दशपर्णी अर्क ५ लि.\nRs.1720 उत्पादन तपशील पहा\nRs.5000 उत्पादन तपशील पहा\nRs.wdw उत्पादन तपशील पहा\nअनेय ॲग्रो बायो प्रोडक्शन प्रा.लि. कृषि आधारित उत्पादनाची कंपनी आहे, २०१८ पासून तावडी फलटण (सातारा) येथे कार्यरत आहे . सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .\nपत्ता:गट क्रमांक -२२९, तावडी फलटण रोड, तावडी, ता-फलटण जि-सातारा -४१५५२३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2015-SiddhivinayakShevgya.html", "date_download": "2019-03-25T07:48:17Z", "digest": "sha1:TP5PKI2AC6JFNR33BSX737LJU5Z4HMYG", "length": 4303, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड", "raw_content": "\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानाने 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड\nश्री. अजित एकनाथ पाटील, मु.पो. सादळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मोबा. ९६५७८४७११८\nमी शिक्षक असून घरची शेतीही करीत असतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर १ वर्षापासून चालू केला आहे. प्रथम काकडी, टोमॅटो, वांगी या पिकांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेतल्या व औषधांचा रिझल्ट पाहिला. तो अतिशय चांगला वाटला. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची माहिती वाचली व शेवगा लावायचे ठरविले. १९ ऑगस्ट २०१४ रोजी मध्यम १२ गुंठे क्षेत्रात शेवग्याची लागवड केली. शेवगा लावल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची फवारणी दर १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार केली. त्यामुळे रोपांची वाढ वाढ चांगली व सुदृढ झाली. परंतु २ ते ३ झाडांवर आळ्यांचे प्रमाण दिसल्याने प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाची फवारणी करून किडीचे प्रमाण आटोक्यात आणले. त्याचबरोबर प्रती झाड लागवडीच्या वेळेस २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत व ५ किलो शेणखत घातले. दर दोन महिन्यांनी २०० ग्रॅम कल्पतरू खत प्रतिरोप देत आहे. सध्या रोपांची वाढ सशक्त आहे व पहिला बहार लागण्यास सुरुवात होत आहे. त्यामध्येच आंतरपीक काकडी व वांगी लावली आहेत. अशा पद्धती ने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर चालू आहे. तरी माझे म्हणने असे आहे की, डॉ.बावसकर सरांची औषधे स्वस्त व खात्रीशीर रिझल्ट देणारी आहेत. त्याचबरोबर ती सेंद्रिय असल्याने शेती मालात अपायकारक घटक राहत नाही. बाजारात अशा सेंद्रिय शेती मालास चांगला भाव मिळतो. सेंद्रिय शेती उत्पादन मानवी शरीरास चांगले असल्याने आयुष्यभर सेंद्रिय औषधांचा वापर ठेवणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/bjp-laments-rahul-gandhis-hunger-strike/", "date_download": "2019-03-25T08:02:22Z", "digest": "sha1:3DSG6C3T7E3LRYTYJJ7MU2HKE7GWF2Z3", "length": 5862, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'उपवास का उपहास' भाजपने उडवली राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\n‘उपवास का उपहास’ भाजपने उडवली राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली\nनवी दिल्ली: काँग्रेस पक्षातर्फे देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचे योजिले होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजघाटावर येऊन सकाळी १० वाजता उपोषणाला बसतील असे सांगण्यात आले. मात्र १२ वाजले तरी राहुल गांधींचा राजघाटावर पत्ता नव्हता. दरम्यान, भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली उडवली आहे.\nभाजपच्या अकाऊंट वरून कॉंग्रेस नेत्यांच्या हॉटेलमध्ये जेवतानाचा फोटो शेयर करण्यात आला. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये जेवणारे कॉंग्रेस कार्यकर्ते आणि उपोषणाला बसलेले कार्यकर्ते यांनी सारखा ड्रेस परिधान केलेले आहेत. त्यामुळे आधी पोटभर जेवण करून कॉंग्रेसनेते उपोषणाला बसले का अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, या छायाचित्रात छोल भटुरेवर आडवा हात मारणारे काँग्रेस नेते अरविंद सिंग लवली यांनी हे छायाचित्र सकाळी आठ पूर्वीचे असल्याचे सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nशिवसेनेन सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवल – दिलीप वळसे\nउदयनराजे वरिष्ठ नेते ते आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत कशाला फिरतील- अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathikavita-mi-marathi-majhi-marathi.html", "date_download": "2019-03-25T08:19:23Z", "digest": "sha1:SZRIQ4H3OJRHLYSUINF43EJ42OT3EAJY", "length": 5870, "nlines": 113, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "फक्त एकदा फक्त एकदा तिला भेटावसं वाटतय ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nफक्त एकदा फक्त एकदा तिला भेटावसं वाटतय\nएकदा तिला भेटावसं वाटतय......\nआज तिची खूप आठवण येतेय\nएकदा तिला बगावसं वाटतय\nएकदा तिला जवळ घ्यावसं वाटतय\nएकदा तिला खूप सारं प्रेम द्यावसं वाटतय\nएकदा तिच्या डोळ्यात बगावसं वाटतय\nतिच्या डोळ्यातल्या अश्रूंना पियावासं वाटतय\nतिचे सर्व दुख स्वतः सहन करावसं वाटतय\nतिच्याशी खूप सारं बोलावसं वाटतय\nतिला पूर्ण आयुष्याची ख़ुशी द्यावीशी वाटतय\nतिच्या संग एकदा आयुष्याचा खुशीचा क्षण घालावासा वाटतोय\nफक्त एकदा फक्त एकदा तिला भेटावसं वाटतय\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सा��े खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2019/03/13/anjir-khajur-roll/", "date_download": "2019-03-25T07:40:12Z", "digest": "sha1:3OAUXER6AMBRBO3YDWERZSQVHVNIP6YT", "length": 9945, "nlines": 158, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल ) – Delicious Sugar free sweet using Figs and Dates | My Family Recipes", "raw_content": "\nअंजीर खजूर रोल मराठी\nअंजीर खजूर रोल – शुगर फ्री\nही शुगर फ्री बर्फी सुके अंजीर आणि खजूर घालून बनवली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. ही पौष्टिक आणि स्वादिष्ट बर्फी तुम्ही डेसर्ट म्हणून देऊ शकता किंवा मधल्या वेळी खायला ही देऊ शकता.\nसाहित्य (२८–३० रोल बनवण्यासाठी)\nबारीक चिरलेला खजूर २५ (मऊ खजूर वापरा; बिया काढून टाका)\nबदाम १५ बारीक तुकडे करून\nकाजू १५ बारीक तुकडे करून\nपिस्ते १५ बारीक तुकडे करून\nखारीक पावडर २ टेबलस्पून\nसाजूक तूप २ चमचा\n१. अंजीर २ तास पाण्यात भिजवून ठेवा. २ तासानंतर पाणी काढून टाका आणि अंजिराचे बारीक तुकडे करा.\n२. अंजीर आणि खजूर मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. पाणी घालू नका.\n३. एका कढईत बदाम,काजू आणि पिस्त्याचे चे तुकडे घालून मंद आचेवर २–३ मिनिटं भाजून घ्या. एका ताटलीत काढून घ्या.\n४. त्याच कढईत तूप घालून खसखस घाला. मंद आचेवर खसखस थोडी गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. वेगळ्या ताटलीत काढून घ्या.\n५. त्याच कढईत १ चमचा तूप घालून खारीक पावडर घालून २ मिनिटं भाजून घ्या. वेगळ्या ताटलीत काढून घ्या.\n६. त्याच कढईत १ चमचा तूप घालून अंजीर, खजुराची पेस्ट घाला. मंद आचेवर परतत रहा. ह्या मिश्रणातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे.\n७. मिश्रण सुकत आलं की त्यात खारीक पावडर आणि ड्राय फ्रुट घाला. सारखं ढवळत रहा.\n८. मिश्रण कडेनी सुटायला लागले की तूप लावलेल्या ताटलीत / बटर पेपर वर पसरून त्याची घट्ट गुंडाळी (रोल) करा.\n९. खसखस वरून शिंपडून रोलच्या सर्व बाजूला चिकटवा. रोल थंड झाला की अर्धा इंच जाडीचे तुकडे करा.\n१०. स्वादिष्ट आणि पौष्टिक अंजीर खजूर रोल तयार आहेत.\n११. हे रोल १ आठवडा फ्रिज मध्ये न ठेवता टिकतील.\n१. तुमच्या आवडीची ड्राय फ्र���टस वापरू शकता.\n२. बर्फी बनवायची असेल तर स्टेप ८ मध्ये रोल न बनवता मिश्रण ताटलीत थापून घ्या. गार झाल्यावर वड्या पाडा.\nपुरणपोळी ची रेसिपी ब्लॉगवर आहे. ब्लॉगवर PURAN सर्च केलं की मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/mns-chief-raj-thackeray-cartoon-narendra-modi-and-cbi-issue-4107", "date_download": "2019-03-25T07:34:14Z", "digest": "sha1:4DRAJAIYYEV3YSZTRQBZQNWJRXTYNRJX", "length": 6917, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MNS chief Raj Thackeray cartoon on Narendra Modi and CBI issue | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा\nराज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा\nराज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा\nराज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा\nबुधवार, 9 जानेवारी 2019\nमुंबई : सीबीआयमधील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वार केला आहे.\nमुंबई : सीबीआयमधील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वार केला आहे.\nराज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात त्यांनी प्रत्येकाला 'जागा' दाखवली असे शिर्षक दिले आहे. या व्यंगचित्रात सरन्यायाधीश सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना या वर्माजी बसा असे म्हणत आहेत. तर, मोदी हे वर्मांकडे बघून न्यायालयात बोलताना दाखविण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत तडकाफडकी काढून टाकलेल्या आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी सर्वोच्च न्यायालयाने फेरनियुक्ती केली, असा विषयही लिहिण्यात आला आहे.\nसुटीवर पाठवण्याच्या आदेशाविरोधात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. केंद्र सरकारने 23 ऑक्टोबरला सीबीआयचे संचालक आलोक वर्मा विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सुटीवर पाठवले होते; तसेच सहसंचालक एम. नागेश्वर राव यांना हंगामी संचालक म्हणून नेमले होते. तसेच 13 अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या. तत्पूर्वी विशेष संचालक राकेश अस्था���ा यांच्याविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सीव्हीसी, सीबीआय, आलोक वर्मा आणि विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवत आज निर्णय दिला. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाला झटका बसला आहे.\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/web-title-rajasthan-chhatisgarh-madhya-pradesh-elections-result-congress-win-3924", "date_download": "2019-03-25T07:55:54Z", "digest": "sha1:BUZ5QQTVDB27WBQZ6DVNQYVNP47AMDOD", "length": 7589, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Web Title: Rajasthan Chhatisgarh Madhya Pradesh Elections result Congress win | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष\nएकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष\nएकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष\nएकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे जवळपास कल समोर येण्यास सुरवात झाली आहे. चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसकडून जोरदार धक्का मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली.\nनवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे जवळपास कल समोर येण्यास सुरवात झाली आहे. चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसकडून जोरदार धक्का मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली.\nयावेळी एकीकडे दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात शुकशुकाट दिसत आहे. सतत कार्यकर्त्यांचा जल्लोष असणाऱ्या भाजप कार्यालयात आज कमालीची शांतता दिसून येत आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या काँग्रेस कार्यालयात मात्र मोठा जल्लोष चालू असल्याचे चित्र दिसत आहे.\nदरम्यान, लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यात सत्ताधारी भाजपला जोरदार दणका बसला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या लढाईत प्रथमच राहुल यांची सरशी होताना दिसत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दीर्घ कालावधीपासून भाजपची सत्ता आहे. ही राज्ये यंदा काँग्रेसने खेचून घेतली आहेत, असे मतमोजणीच्या सुरवातीचे चित्र आहे.\nदिल्ली भाजप मध्य प्रदेश madhya pradesh राजस्थान छत्तीसगड काँग्रेस खत fertiliser भारत नरेंद्र मोदी narendra modi rajasthan madhya pradesh congress\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2019-03-25T07:41:13Z", "digest": "sha1:SKPQBP5ZWP26ZFFV4UEY2KTWCT2SOU7E", "length": 4481, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ४० चे - पू. ३० चे - पू. २० चे - पू. १० चे - पू. ० चे\nवर्षे: पू. २७ - पू. २६ - पू. २५ - पू. २४ - पू. २३ - पू. २२ - पू. २१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे २० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F", "date_download": "2019-03-25T08:19:06Z", "digest": "sha1:WX6EUQTKXY25YWX7BNCFALYBWMHN7P2A", "length": 7028, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉफ्री बॉयकॉट - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव जॉफ्री बॉयकॉट\nउपाख्य बॉय्क्स, जॉफ, फायरी, जीएलवाय(ग्रेटेस्ट लिविंग यॉर्कशायर मॅन)\nजन्म २१ ऑक्टोबर, १९४० (1940-10-21) (वय: ७८)\nउंची ५ फु १० इं (१.७८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम\nक.सा. पदार्पण (४२२) ४ जून १९६४: वि ऑस्ट्रेलिया\nशेवटचा क.सा. १ जानेवारी १९८२: वि भारत\nआं.ए.सा. पदार्पण (१) ५ जानेवारी १९७१: वि ऑस्ट्रेलिया\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने १०८ ३६ ६०९ ३१३\nधावा ८११४ १०८२ ४८४२६ १००९५\nफलंदाजीची सरासरी ४७.७२ ३६.०६ ५६.८३ ३९.१२\nशतके/अर्धशतके २२/४२ १/९ १५१/२३८ ८/७४\nसर्वोच्च धावसंख्या २४६* १०५ २६१* १४६\nचेंडू ९४४ १६८ ३६८५ १९७५\nबळी ७ ५ ४५ ३०\nगोलंदाजीची सरासरी ५४.५७ २१.०० ३२.४२ ४०.२६\nएका डावात ५ बळी ० ० ० ०\nएका सामन्यात १० बळी ० – ० –\nसर्वोत्तम गोलंदाजी ३/४७ २/१४ ४/१४ ३/१५\nझेल/यष्टीचीत ३३/– ५/– २६४/– ९९/–\n७ डिसेंबर, इ.स. २००८\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७९ (उप-विजेता)\n१ माइक ब्रेअर्ली (क) • २ इयान बॉथम • ३ जॉफ्री बॉयकॉट • ४ फिल एडमंड्स • ५ ग्रॅहाम गूच • ६ डेव्हिड गोवर • ७ माइक हेंड्रिक्स • ८ वेन लार्किन्स • ९ जॉफ मिलर • १० क्रिस ओल्ड • ११ डेरेक रॅन्डल • १२ बॉब टेलर (य) • १३ बॉब विलिस\nइ.स. १९४० मधील जन्म\nइ.स. १९४० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२१ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-03-25T07:26:55Z", "digest": "sha1:DS5W5FP5RD5V3HUNYEISXXZ77VL5VXBV", "length": 11680, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अफगाणिस्तानात भारतीयाचे अपहरण करून हत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअफगाणिस्तानात भारतीयाचे अपहरण करून हत्या\nकाबूल – अफगाणिस्तानमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीयासह तीन परदेशी नागरिकांचे अपहरण केले. तिन्ही अपहृतांची नंतर हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या भारतीयाची ओळख तातडीने जाहीर करण्यात आलेली नाही.\nबंदुकधाऱ्यांनी हत्या केलेल्यांमध्ये 39 वर्षीय भारतीयाबरोबरच मलेशियन आणि मॅकडोनियन नागरिकांचा समावेश आहे. ते तिघेही सोडेक्सो या खाद्यपदार्थांची सेवा पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्रेंच कंपनीमध्ये आचारी म्हणून काम करत होते. ते सकाळी काबूलमध्ये कंपनीच्या वाहनातून कामासाठी निघाले होते. रस्त्यात चार बंदुकधाऱ्यांनी त्यांचे वाहन रोखले आणि तिन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले.\nअपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून वाहनाचा चालक कंपनीच्या कार्यालयात पोहचला. त्यामुळे अपहरणाची माहिती समजली. कंपनीच्या प्रशासनाने ही घटना कळवल्यावर पोलिसांनी तातडीने अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. काबूलच्या दुर्गम ठिकाणी कंपनीचे वाहन आढळले. पोलिसांना पाहताच अपहरणकर्त्यांनी दुसऱ्या कारमधून घटनास्थळावरून पयालन केले. कंपनीच्या वाहनात पोलिसांना तिन्ही परदेशी नागरिकांचे मृतदेह आढळले.\nत्यांच्या हत्येची जबाबदारी तूर्त कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. अफगाणमध्ये साधारणपणे तालिबान ही दहशतवादी संघटना परदेशी नागरिकांचे अपहरण करते. काही गुन्हेगारी टोळ्याही खंडणी मिळवण्यासाठी अपहरणाचे कृत्य करतात. दरम्यान, भारताने आपल्या नागरिकासह तिघांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. अपहरण आणि हत्येच्या घटनेनंतर काबूलमधील भारतीय दूतावास अफगाण अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.\nजेट एअरवेजला वाचवा; केंद्राची सरकारी बॅंकांना सूचना\nअफगाणिस्तानचा पहिला कसोटी विजय\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nअफगाणिसानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान 40 ठार\nकाश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत चार गनिम ठार\nउद्धव ठाकरेंबरोबरच्या चर्चेत सहभागी होणार नाही\nचंद्रपुर येथे रेल्वेच्या धडकेत दोन वाघांचा मृत्यू\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/mi-pan-sachin-movie/", "date_download": "2019-03-25T08:03:17Z", "digest": "sha1:7VNHV6BSNKOVPK7OMDP3CGFSEOQQWCBK", "length": 2216, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": "mi pan sachin movie - मराठी कलाकार", "raw_content": "\nक्रिकेटरच्या भूमिकेसाठी “चॉकलेट बॉय”स्वप्नीलची कठोर मेहनत.\nचॉकलेट बॉयची इमेज तोडत नवीन वर्षात स्वप्नील जोशी आपल्याला एका दमदार आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे....\nआणि स्वप्नील म्हणतो “आयला आला रे सचिन”.पहा का ते.\nयेत्या १ फेब्रुवारी रोजी ‘मी पण सचिन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्निल जोशी या...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/music-helps-children-with-learning-disabilities-1528710/", "date_download": "2019-03-25T08:45:40Z", "digest": "sha1:3JVA2HYPSF6AG6NBOKSFE7E3NLCHH2C7", "length": 25567, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "music helps children with learning disabilities | संगीताचे जादूई विश्व! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nमागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फळवाला भेटला.\nगाण्यात सगळीच मुलं मस्त रमून जातात\nमुलांच्या अध्ययनात येणारी एक गंभीर समस्या म्हणजे ‘अध्ययन अक्षमता.’ इंग्रजीमध्ये त्याला ‘लर्निग डिसअॅबिलिटी’ असे म्हणतात. ज्या मुलांमध्ये अशी ‘अध्ययन अक्षमता’ आहे, त्यांच्यातले कला-गुण ओळखून ते जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर तीही मुलं नक्की पुढे येतात. थोडक्यात कला ही या व अशा सर्वच मुलांना सामावून घेते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच नव्हे तर सर्वागीण विकास होतो.\nसंगीत ही एक अशी जादू आहे जी आपल्याला आनंद देऊन जाते, आपल्या प्रत्येक भावनेमध्ये साथ देते. तुम्ही उदास असाल तरीही आणि धम्माल मस्तीच्या मुडमध्ये असाल तरीही आणि प्रेमात असाल तरीही. सगळ्याच भावभावना व्यक्त करणारं संगीत सर्वव्यापी आहे. त्याला जशी भावनेची मर्यादा नाही तशी माणसामाणसातील भेदभावांचीही नाही. देश, संस्कृती, जात, धर्म सर्वाच्या पलीकडे हे संगीत आपल्याला नेऊन पोहोचवतच, पण त्याही पलीकडे तुमच्यातल्या शारीरिक कमतरतेलाही व्यापून उरतं.\nमागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फळवाला भेटला. दु:खी दिसत होता. मी त्याला विचारताच म्हणाला, ‘‘अहो माझ्या मुलीची शाळा बदलायची आहे. ती वाचन बरी करते, पण लिहिताना चुकते अन् मग माझ्या हातचा मार खाते.’’ माझ्या लगेचच लक्षात आलं की या मुलीला वाचनात नाही तरी लिहिताना अडथळा येतोय. म्हणजे हिला ‘लर्निग डिसअॅबिलिटी’ असू शकते. मुलांच्या अध्ययनात येणारीही एक गंभीर समस्या अलीकडे प्रकर्षांने लक्षात यायला लागली आहे. याला मराठीत ‘अध्ययन अक्षमता’ असे म्हणतात व इंग्रजीमध्ये ‘लर्निग डिसअॅबिलिट��’ (एल.डी.) म्हणतात. थोडक्यात समजवायचे तर ‘एल.डी.’ चे तीन प्रकार असतात. १) डिस्लेक्सिया (वाचनात अडथळा)२) डिस्ग्राफिया (लिखाणात अडथळा) ३) डिस्कॅलक्युलिया (गणितात अडथळा) म्हणजेच या मुलांची बौद्धिक हुशारी जरी चांगली असली तरी या मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळणं कठीण जातं. तुम्ही सर्वानी जर ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल. हो, पण अशा मुलांना गुरू मात्र चांगलाच मिळायला हवा. या चित्रपटात शिक्षक असणाऱ्या आमिर खानने त्या मुलाची समस्या अचूक ओळखून, ती समजून त्याला जरी अध्ययनात अडथळा असला तरी चित्रकलेची आवड आहे हे शोधून काढले व ती जोपासायला मदत केली. त्यामुळे त्या मुलाचा आत्मविश्वास तर वाढलाच पण त्याचं हरवलेलं हसू, आनंद परत मिळाला. सगळीच मुलं अभ्यासातच चमकली पाहिजेत, असं नाही हे त्या चित्रपटातून पोहोचवलं गेलय. ज्या मुलांमध्ये अशी ‘अध्ययन अक्षमता’ आहे, त्यांच्यातले कला-गुण ओळखून ते जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर तीही मुलं नक्की पुढे येतील, नाही येतातच अन् अगदी हेच मला त्या फळवाल्याच्या मुलीबद्दल जाणवलं. मग मी त्यादृष्टीने विचार करायला सुरुवात केली.\nती मुलगी शिकत होती एका महानगरपालिकेच्या शाळेत. माझा अनुभव म्हणून सांगते, काही शाळा वगळल्या तर बऱ्याच शाळांमध्ये या ‘अध्ययन अक्षमतेची’ म्हणजेच ‘एल.डी.’ ची माहिती असेल कदाचित. पण तिथे तितकीशी जागरूकता व उपाय मात्र होताना दिसत नाहीत. आणि जर असं असेल तर त्याकरिता शाळेतल्या शिक्षकांना त्याचं (एल.डी.) विशेष प्रशिक्षण देणे जरुरी आहे व अशा विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात जरी अडथळा असला तरी या मुलांची बौद्धिक पातळी बऱ्याच वेळा सरासरी बुद्धीपेक्षा जास्तच आढळते व त्यांच्यात काही विशेष कला गुण नक्कीच असतात. अन् माझ्या मनात अगदी हेच आलं की आपण या महानगरपालिकेमधल्या सर्वच मुलांना ‘संगीताद्वारे समुपदेशन’ केलं तर त्यांना त्यांच्या अभ्यासातही नक्कीच फायदा होईल. काही दिवसांतच योगायोगाने मला एक उत्कृष्ट संधी चालून आली. ‘व्हच्र्युअल क्लास’ घेण्याची. व्हच्र्युअल क्लास म्हणजे मी एका स्टुडिओत बसून सॅटेलाइट द्वारे एकाचवेळेस या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास सव्वाचारशे शाळांमधल्या मुलांशी संवाद साधत होते. ‘संगीताद्वारे समुपदेशन’ ही माझी इच्छा पूर्ण होत हो���ी. वेगवेगळ्या शाळांमधल्या मुलांचे स्क्रीन माझ्यासमोर होते व त्या मुलांशी माझा परस्परसंवाद चालू होता आणि त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा माझ्यापर्यंत लगेच पोहोचत होत्या. त्यात दैनंदिन आयुष्यात संगीताचे महत्त्व व वापर, त्याचबरोबर अभ्यासाचे नियोजन, वेळापत्रक, एकमेकांशी तुलना न करणे इत्यादी सांगण्यात आले. मुलांनीसुद्धा गाणी म्हटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला फार मज्जा आली. बरं यामध्ये वर्गीकरण नव्हतं. यात सरसकट अगदी पाचवीपासून दहावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी होते. पण त्यापैकी ज्यांना अध्ययन अक्षमता असेल किंवा असते त्यांना बहुतांश वेळा संगीत हा विषय आवडतच असतो. मग अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व त्या मुलाचा/ मुलीचा कल पाहून एखादे कोणतेही वाद्य अथवा गाण्याचा क्लास लावला तर असं आढळून येतं की कालांतराने त्यांच्या अध्ययनात देखील प्रगती होऊ लागते. त्याचा फायदा असा होतो की त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच व ती खूश राहू लागतात.\nतशीच आणखी एक समस्या म्हणजे ‘ऑटिझम.’ ‘ऑटिझम’ला ‘आत्ममग्नता’ असे म्हणतात. अशीच दोन मुलं आमच्या ‘स्वरमानस’मध्ये यायची. त्यांना गाणं ऐकण्याची व गायची प्रचंड आवड होती. इतर वेळेस आपल्या आई-वडिलांचंही विशेष न ऐकणारी ही मुलं आमच्या क्लासमध्ये बऱ्यापैकी शांतपणे गाणं ऐकायची. त्यातली जी मुलगी होती ती माझ्या नजरेला नजर न मिळवता खाली मान घालून गात असे. मध्येच ओरडतही असे (विशेषत: तिची आई काही बोलली तर) व तिच्या बोलण्यातही अस्पष्टता होती. पण गाणं ही एकच गोष्ट तिला खूपआवडे, त्यामुळे या गाण्याच्या क्लासची मात्र ती आतुरतेने वाट पाहायची. इतकी की गाण्याच्या क्लासच्या दिवशी, वेळेच्या आधीच ती तिच्या आईच्या मागे भूणभूण लावायची. कालांतराने तिच्यात या संगीतामुळे आमूलाग्र बदल झाला. ती गाणं खाली मान न घालता, थेट माझ्याकडे अधूनमधून बघत गाणं म्हणायला लागली व तिच्या उच्चारातही बदल होऊ लागला. ती जेव्हा मन लावून गाणं म्हणायची तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यातलं कौतुक पाहून आम्हा सर्वच शिक्षकांना खूप समाधान वाटे. तर थोडक्यात असं की संगीत या व अशा सर्वच मुलांना सामावून घेतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच नव्हे तर सर्वागीण विकास होतो.\nमाझे हे सर्व अनुभव गाणं गाणाऱ्यांपैकीचेच आहेत. पण या मुलांपैकी काहीजणांना तबलाही उत्क���ष्ट वाजवता येऊ शकेल किंवा पेटीही. किंबहुना अनेक वाद्यांपैकी कुठलंही वाद्य जे त्यांना भावतं ते कारण आपण सर्वच जाणतो, जेव्हा सृष्टी आपल्याला एखादी गोष्ट कमी देते तेव्हा एखादी गोष्ट जास्त प्रमाणात ही देते. म्हणजेच निसर्ग आपल्याकडून फक्त हिरावून घेत नसतो तर आपल्याला अनेक गोष्टी भरभरून देत पण असतो\nनिसर्गावरून आठवलं की आम्ही रत्नागिरी, जव्हार, अगदी पार नागपूर जवळ एक उमरेड नावाचं छोटंसं गाव आहे. तिथपर्यंत गाण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत, लहान मुलांकरिता. उमरेडमध्ये खाणीत करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी गाण्याच्या कार्यशाळा घेतल्या होत्या. तिथे कायमस्वरुपी घरे फार कमी. जिकडे काम मिळेल तिथेच तात्पुरते झोपडं बांधून ही लोकं रहातात. ज्या मानाने अंग मेहनत त्या मानाने पैसे फारच कमी. त्यामुळे केव्हा तरी अन्न. कमी असेल तर वेळेअभावी उंदीरही मारून खातात. इतकी वाईट परिस्थिती. अशा ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्यांचा अभ्यास घेतात. आमची ‘स्वरमानस’ची टीम तिकडे शिकवायला गेली होती. एवढी गरिबी असून मुलं मात्र चुणचुणीत, हसरी, ज्ञान मिळवण्यासाठी आतूर होती. गाणं शिकवायला घेतलं. आम्ही एक ओळ म्हटली की लगेच आमच्या पाठोपाठ ती मुलं अचूक गात होती. अगदी आमच्यासारखेच हुबेहूब हावभाव करत, एका सुरात गाणं म्हणत. आश्चर्यच वाटत होते.\nनदीचा प्रवाह, ओढय़ाचा खळखळाट, वाऱ्याची शीळ पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाची रिमझिम, पानांची सळसळ या सर्वातच संगीत भरलेलं असतं. त्यामुळेच कदाचित या गावच्या मुलांना संगीत खूप जवळचं वाटून चटकन आत्मसात होत असावं. त्यांच्याबरोबरच अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता.\nसंगीत एखादी जादूची कांडी फिरावी तसं लहान मुलांचं अन् मोठय़ांचं आयुष्य समृद्ध करत असतं, हेच प्रत्ययाला येत होतं. येत रहातं..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविश्वचषकाआधी भारताला मोठा धक्का पहिल्याच सामन्यात बुमराहला गंभीर दुखापत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'काँग्रेसचा उमेदवार इमरान मसूद हा तर मसूद अझहरचा जावई'\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2016-Dalimb.html", "date_download": "2019-03-25T07:48:39Z", "digest": "sha1:PTHF7VBS4TRTWVQ6UVCMDM5QTP5MZYTT", "length": 8764, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डाळींब पिकामध्ये नवीन असूनही ४८१ झाडांवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २२ हजार, उत्पादन १३ टन, ७३ रु./किलो दर, उत्पन्न ९।। लाख", "raw_content": "\nडाळींब पिकामध्ये नवीन असूनही ४८१ झाडांवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २२ हजार, उत्पादन १३ टन, ७३ रु./किलो दर, उत्पन्न ९\nश्री अनिल श्रीरंग घाडगे, मु.पो. ललगुन, ता. खटाव, जि. सातारा. मो. ९८५०७२०९५७\nमी जानेवारी २०१६ पासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर टोमॅटो, वांगी, कांदा या पिकावर केला आहे. पुसेगाव प्रदर्शनामधून (७ जानेवारी २०१६) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे घेवून वापरली आहेत.\nवरील पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा वापर केल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही पिके तग धरून जोमाने वाढली व उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे माझ्याकडे ऑगस्ट २०१३ मध्ये ६५ गुंठे क्षेत्रामध्ये मध्यम ते हलक्या प्रकारच्या जमिनीत १२' x १०' अनंतराव लागवड केलेल्या भगवा डाळींबासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले व त्यानुसार नंतर दुसऱ्या दिवशी प्रदर्शनामध्ये जाऊन कंपनी प्रतिनिधी श्री. रविंद्र सुरळकर यांच्या सल्ल्यानुसार डाळींब पिकास सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या ५ फवारणीची संपुर्ण सप्तामृत औषधे घेऊन गेलो व त्याचा वापर केला.\nबागेला डिसेंबरमध्ये ताण दिला होता. मग जानेवारीमध्ये बागेची छाटणी करून ४८१ झाडांना ६ ट्रॉली शेणखत देऊन ११ जानेवारी २०१६ ला पहिले पाणी सोडले. त्यानंतर दुसरे पाणी देताना जर्मिनेटर १ लि. आणि प्रिझम १ लि. ची आ���वणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिझम १ लि. + जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर २५० मिली ची २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे बागेला जोमाने फुट निघण्यास चांगली मदत झाली. त्यानंतर २० दिवसन्नी दुसरी फवारणी प्रिझम १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली आणि त्यानंतर १५ दिवसांनी तिसरी फवारणी कळी निघतेवेळी थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर २५० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. या २ फवारण्यांमुळे बहार चांगला फुटला. कळी सेटिंग होण्यास मदत झाली.\nत्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारणीमुळे झाडांवर जांभळाच्या फुलांप्रमाणे कळ्या लगडल्या होत्या. एप्रिल व मे मध्ये कळीचे रूपांतर गाठीत होत असताना बऱ्याच कळ्या काढून टाकल्या. तरीही मे महिन्यामध्ये धरलेल्या (लागलेल्या) फळांची संख्या प्रत्येक झाडावर १२५ - १५० होती. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सल्ल्यानुसार प्रत्येक झाडावरील अशक्त व लहान २० - ३० फळे काढून टाकली. शेवटच्या टप्प्यातील फवारणीमुळे मालावर शाईनिंग, कलर, साईज यामध्ये बराच फरक जाणवला. प्रत्येक फळाचे वजन १८० ते ३०० ग्रॅम पर्यंत होते. हे फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यामुळे व इतर गरजेनुसार घेतलेल्या फवारण्यांमुळे बहार चांगल्याप्रकारे यशस्वी झाला. एकूण १ लाख रु. खर्च झाला. यामधील शेणखतावर २२,००० रु . आणि ते झाडांना देण्यासाठीची मजुरी ३००० रु., छाटणी बहार धरण्यापुर्वीची १ व बहार धरतानाची १ अशा २ छाटण्यांचा २५,००० रु., डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांवरील २२,००० रु., इतर बाहेरील औषधे व विद्राव्य खते यांचा ४५ हजार रु., आधारासाठीच्या काठ्या व इतर मजुरी याचा ३५,००० रु. असा एकूण १ लाख रु. खर्च झाला. यामधील शेणखतावर २२,००० रु . आणि ते झाडांना देण्यासाठीची मजुरी ३००० रु., छाटणी बहार धरण्यापुर्वीची १ व बहार धरतानाची १ अशा २ छाटण्यांचा २५,००० रु., डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांवरील २२,००० रु., इतर बाहेरील औषधे व विद्राव्य खते यांचा ४५ हजार रु., आधारासाठीच्या काठ्या व इतर मजुरी याचा ३५,००० रु. असा एकूण १ लाख रु. खर्च झाला आणि ४८१ झाडांपासून १२ टन ६०० किलो माल व्यापाऱ्यांनी जागेवरून ७३ रु./किलो भावाने नेला. ४ ऑगस्टला तोडा चालू झाला. ४०० - ५०० किलो माल लोकल मार्केटला विकला. असे एकूण ९ लाख रु. खर्च झाला आणि ४८१ झाडांपासून १२ टन ६०० किलो माल व्यापाऱ्यांनी जागेवरून ७३ रु./किलो भावाने नेला. ४ ऑगस्टला तोडा चालू झाला. ४०० - ५०० किलो माल लोकल मार्केटला विकला. असे एकूण ९ लाख रु. उत्पन्न मिळाले. डाळींब पिकामध्ये मी नवीन असताना केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे यशस्वी झालो एवढेच सांगू इच्छितो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2015-Sugarcane.html", "date_download": "2019-03-25T08:09:30Z", "digest": "sha1:MTDPGNKVOQ5FGMP6MFQP4R4GYYFY5HT5", "length": 5978, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - शेजारील उसापेक्षा १० महिन्यातच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट वाढ", "raw_content": "\nशेजारील उसापेक्षा १० महिन्यातच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट वाढ\nश्री. इंदरराव तुळशीराम लाटे, मु.पो. देवला, ता. सेलू, जि. परभणी\nमी पुर्वी पारंपारिक पद्धतीने शेती करीत होतो. पण गेल्यावर्षी किसान कृषी प्रदर्शन (पुणे) मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा स्टॉल पाहिल्यावर तेथून तंत्रज्ञानाबद्दल माहिती तसेच ऊस व कृषी विज्ञानची काही पुस्तके घेतली. घरी गेल्यावर ती पुस्तके वाचल्यानंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शेती करण्याचा निर्णय घेतला. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शेती करण्याचा निर्णय घेतला. डॉ.बावसकर तंत्रज्ञाना प्रथम ऊस पिकावर वापरायचे ठरविले. त्याकरिता लागवडीसाठी १ लि. जर्मिनेटर तिरूमल अॅग्रो डेव्हलपर्स, परभणी येथून आणले. १०० लि. पाण्यामध्ये १ लि. जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात उसाचे बेणे १५ मिनिटे बुडवून ३१ डिसेंबर २०१४ ला लागवड केली. यामध्ये ३१०२ वाणाची १ एकर आणि ८४०१२ वाणाची २० गुंठे अशी एकूण १ एकरमध्ये ५ x ५ फुटावर ही लागवड केली आहे.\nजर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच ११ - १२ व्या दिवशी सर्वत्र एकसारखे फुटवे दिसून आले. त्यानंतर मग १ महिन्याने ड्रीपद्वारे एकरी १ लि. जर्मिनेटर दिले आणि थ्राईवर ४० मिली, क्रॉपशाईनर ४० मिली, प्रिझम ४० मिली आणि राईपनर ३० मिली/पंप (१५ लि. पाणी) याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे उसाची जोमाने वाढ होऊ लागली.\nया उसाला रासायनिक खतांचा अल्प प्रमाणात वापर केला. ज्���ावेळेस ३ महिन्यांचा ऊस होता तेव्हा दुसरी फवारणी थ्राईवर १ लि. राईपनर १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलो + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. पुन्हा १ महिन्यांनी थ्राईवर, राईपनर, प्रोटेक्टंट सोबत १ लि. न्युट्राटोन घेऊन तिसरी फवारणी केली. त्यानंतर ४ महिन्याचा ऊस असताना २ लि. जर्मिनेटर १ महिन्याचा ऊस असताना २ लि. जर्मिनेटर १ एकरसाठी ३०० लि. पाण्यातून ड्रीपद्वारे दिले. त्यानंतर मात्र उसाला काही फवारणी केली नाही. तरी वरीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने सध्या १० महिन्याच्या उसावर आतापर्यंत कोणत्याही रोग - किडीचा प्रादुर्भाव नाही. सध्या २८ ते ३० कांड्यांवर ऊस आहे. उसाच्या जाडीत व पेऱ्यातही नेहमीपेक्षा जास्त वाढ जाणवत आहे. उसाची पाने हिरवी व रुंद आहेत.\nआमच्या शेजाऱ्याच्या शेतातील उसापेक्षा दीडपट वाढ अधिक आहे. शिवाय तिही कमी खर्चात, त्यामुळे डॉ.बावसकर तंत्रज्ञानावर आम्ही समाधानी आहोत. एकरी ७० ते ८० टन उत्पादन निश्चितच मिळेल अशी खात्री आहे. आमच्या भागात सरासरी ४० ते ५० टनापर्यंतच उत्पादन मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-03-25T07:27:37Z", "digest": "sha1:OVRAUXX22GP6IBU7CIBPQ5BOPEESX6WO", "length": 4032, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गातील मुख्य समन्वय पान विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► सदस्य hi (४ प)\n► निवासानुसार सदस्य (२८ क)\n► भारतीय विकिपीडिया सदस्य (६ प)\n► भाषेप्रमाणे विकि संपादक (४१ क, १४ प)\n► वनस्पती प्रकल्पातील सहभागी सदस्य (१ क, १० प)\n► विकिपीडिया व्यवस्थापन (३ क, १ प)\n► विकिपीडिया सदस्य (८ क, ४ प)\n► विकिपीडिया सहकार्य (१ क, १ प)\n► विकिपीडिया सांगकामे (२ क, ८६ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २००९ रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090806/main.htm", "date_download": "2019-03-25T08:48:02Z", "digest": "sha1:QB3Q2JDYVYINA7GLCLTF6FHY4AY2PED2", "length": 17426, "nlines": 48, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ६ ऑगस्ट २००९\nरुग्णालयांमध्ये गर्दी आणि संताप\nपुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी\n‘अहो, माझ्या मुलाला ताप, खोकला नि सर्दी आहे.. खासगी डॉक्टरांनी तुमच्याकडे तपासणीसाठी पाठवलंय.. तुम्ही म्हणता त्याला काही झाले नाही.. म्हणजे नेमके खरे कोणाचे समजायचे..’, ‘सकाळपासून रांगेत उभा आहे मुलीला घेऊन.. ती तापलेली आहे.. तिची तुम्हाला तपासणी करावीच लागेल..’, ‘तुमच्या ओळखीच्या नागरिकांच्या मुलांची तपासणी पहिल्यांदा करता..\nसंपकरी बॅंक कर्मचाऱ्यांचा आजपासून ‘लाँग वीकएण्ड\nमुंबई, ५ ऑगस्ट/ व्यापार प्रतिनिधी\nभारतीय बँक महासंघाबरोबर वेतनवाढीविषयक वाटाघाटी फिसकटल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने ६ व ७ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बँकांचा ‘वीकएण्ड ब्रेक’ हा यंदा गुरुवारपासूनच सुरू होईल, तर धनादेश वठून पैसे हाती पडण्यासाठी ग्राहकांना पुढच्या बुधवापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.\nबाळ ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन मुंबई, ठाण्यात\nमुंबई, ५ ऑगस्ट / खास प्रतिनिधी\nमराठी माणूस आणि शिवसेना यांचे द्वैत कसे जमले महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरही मराठी माणसाच्या मुंबईत होत असलेल्या घुसमटीला कोणी आवाज दिला महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरही मराठी माणसाच्या मुंबईत होत असलेल्या घुसमटीला कोणी आवाज दिला १३ ऑगस्टपासून मुंबई आणि ठाण्यात आयोजिल्या जाणाऱ्या ‘मार्मिक’ प्रदर्शनात या अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत १३ ऑगस्टपासून मुंबई आणि ठाण्यात आयोजिल्या जाणाऱ्या ‘मार्मिक’ प्रदर्शनात या अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत शिवसेनेच्या जन्माआधीच्या घडामोडींत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘मार्मिक’ च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन मुंबईत रवींद्र नाटय़ मंदिरात तर ठाण्यात गडकरी रंगायतनमधील नवीन कलादालनात आयोजिण्यात येणार आहे \n‘मुझे भी कोई राखी बांधने आयेगा क्या\nमुंबई, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी\nसीएसटी स्थानक, कामा रुग्णालय परिसर, मेट्रो जंक्शन आणि गिरगाव चौपाटी येथे अनेक निष्पापांचे बळी घेणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आज त्याच्या हातावर राखी बांधायला कोणी येईल का याचे वेध लागले होते. न्यायाधीश, सुरक्षेसाठी असलेले पोलीस, वकील आणि पत्रकार यांच्या हातावर रंगीबेरंगी राखी बांधल्याचे पाहून कसाबने अखेर आपल्या वकिलांकडेच ‘मुझे भी कोई राखी बांध ने आयेगा क्या’, अशी विचारणा केली.\nमुद्रांकातून महसूल चोरीवर राजरोस शिक्कामोर्तब\nसोपान बोंगाणे , ठाणे, ५ ऑगस्ट\nदेशभरात गाजलेला हजारो कोटींचा तेलगी स्टँप घोटाळा हळूहळू विस्मरणात जात असतानाच त्याच्या स्मृती पुन्हा ताज्या करणारा दस्तऐवज नोंदणीतील कोटय़वधी रुपयांचा दुसरा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड होण्याची चिन्हे आहेत. महसूल विभागातील अधिकारी आणि बडय़ा बिल्डरांच्या संगनमताने मुद्रांक शुल्क नोंदणीत नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क लावून शासनाच्या तिजोरीला करोडो रुपयांची बिळे पाडण्याचा ‘मूषक उद्योग’ मुद्रांक शुल्क विभागात सुरू असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्यातून गेल्या चार वर्षांंत एकटय़ा ठाणे जिल्ह्यातच नोंदणी झालेल्या दस्तांच्या व्यवहारात शासनाचे सुमारे १५० ते २०० कोटी रुपयांची आर्थिक नुकसान झाल्याचा संशय त्यातील जाणकार व्यक्त करीत आहेत.\n‘जैश’, ‘लष्कर’ आदी २५ संघटनांवर पाकिस्तानची बंदी\nइस्लामाबाद, ५ ऑगस्ट / वृत्तसंस्था\nलष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महंमद आणि जमात-उद-दवा या तीन दहशतवादी संघटनांसह २५ धार्मिक संघटनांवर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने रात्री ही माहिती दिली. बंदी घालण्यात आलेल्या संघटनांची यादी जाहीर करण्यात आली असून, ‘सुन्नी तेहरिक’ या संघटनेवर बंदी घालण्यात आली नसली तरीही तिच्यावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.बंदी घालण्यात आलेल्या इतर संघटनांमध्ये तेहरिक-ई-तालिबान पाकिस्तान, तेहरिक-ई-निफाज-ई-शरिया-मोहम्मदी, लष्कर-ए-जांघवी, इस्लामिक स्टुडण्टस् मूव्हमेण्ट, खैर-उन-निसार इंटरनॅशनल ट्रस्ट, इस्लामी तेहरिक-ई-पाकिस्तान, लष्कर-ए-इस्लाम, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, जमी-उन-निसार, खादम इस्लाम आणि मिल्लत-ए-इस्लामिया पाकिस्तान यांचा मुख्यत्वे समावेश आहे. यापैकी बहुतांश संघटनांचा पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले आणि आत्मघाती बॉम्ब हल्ल्यांमध्ये हात आहे. भारतात २००१ साली संस�� भवनावर झालेला दहशतवादी हल्ला, तसेच मुंबईवरील हल्ला या घटनांमध्ये जमात-उद-दवा, लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-महंमद या संघटनांचा हात असल्याचे भारतानेही पूर्वी अनेकदा म्हटले आहे. जमात-उद-दवा ही संघटना लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवादी कारवायांची अंमलबजावणी करण्यात सर्वात पुढे असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानने जमात-उद-दवावर बंदी घातलेली होतीच. याशिवाय २००२ मध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-महंमद यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.\nएक कोटी रुपयांचे लाच प्रकरण\nसरबज्योत सिंगला न्यायालयीन कोठडी\nमुंबई, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी\nराष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांचा मुलगा सरबज्योत सिंग याच्यासह अन्य तीन आरोपींना अधिक काळ आपल्या ताब्यात ठेवण्याची मुभा द्यावी, ही सीबीआयने केलेली विनंती आज विशेष न्यायालयाने फेटाळली आणि या आरोपींची १२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरबज्योत आणि अन्य तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व आरोपींनी केलेल्या जामीनअर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.सदर लाचखोरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणेला पुरेसा वेळ देण्यात आला असल्याचे कारण देऊन विशेष न्यायालयाने आरोपींना अधिक काळ सीबीआयच्या ताब्यात देण्यास नकार दिला. सीबीआयला अधिक चौकशीची गरज नाही, असे आपले मत असल्याचे न्या. एस. पी. हयातनगरकर म्हणाले.सरबज्योत सिंग याच्यासह अनुप बेगी, दुखसिंग चौहान आणि मदन सोळंकी यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक येथील घंटागाडी कंत्राटदार रामराव पाटील याचे एक प्रकरण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगापुढे प्रलंबित असून ते प्रकरण बंद करण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी सरबज्योत सिंग आणि अन्य आरोपींनी केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाटील यांनी बँकेतून १०० सफाई कामगारांच्या नावावर त्यांची परवानगी न घेताच १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि ती रक्कम परत करण्यास पाटील असमर्थ ठरले. सरबज्योत सिंग चौकशीत सहकार्य करीत नसल्याचा आरोप सीबीआयने केला असून सरबज्योत याने गुन्ह्यांत सहभाग असल्याच्या आरोपाचा इन्कार केला, असे सीबीआयने न्यायालयास सांगितले.\nकाठमांडूत कारखाली चिरडून सहा भारतीय ठार\nएका १५ वर्षीय मुलाची व���द्यकीय तपासणी करून बाहेर पडलेल्या सहा भारतीयांचा एका भरधाव कारने ठोकरल्याने मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. मृतांमध्ये मुलाचाही समावेश आहे.\nहे सर्व सात भारतीय नागरिक मूळ बिहारमधील असून सध्या ते काठमांडूत राहात आहेत. या मुलाला बीर रुग्णालयात तपासणीसाठी ते घेऊन गेले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर पदपथावरून जात असताना एका कारने त्यांना ठोकरले. मध्यरात्री पाऊणच्या सुमारास ही घटना घडली. ठोकर देऊन कार न थांबता निघून गेल्याने घटनास्थळी थोडय़ाच वेळात मोठा जमाव जमला. तर सकाळी ही घटना कळल्यावर अपराध्यांना पकडावे या मागणीसाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. अपघातग्रस्त कार पोलिसांना सापडली आहे. मात्र तिच्या चालकाचा पत्ता अद्याप लागलेला नाही. या अपघातात जखमी व मृत पावलेले सगळेजण बिहारमधील सीतामढी व मोतिहारी जिल्'ाांतील रहिवाशी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/gully-boy/", "date_download": "2019-03-25T07:35:39Z", "digest": "sha1:ZCR6H5NYHFHXDPHISSFIHZMVYKL5VIIL", "length": 1762, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Gully Boy - मराठी कलाकार", "raw_content": "\nरणवीरच्या आईची भूमिका साकारतेय”हि”मराठमोळी अभिनेत्री\nसध्या सगळीकडे रणवीर सिंग आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाची चर्चा आहे....\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/123143-salt-wordpress-plugin-tips", "date_download": "2019-03-25T08:07:04Z", "digest": "sha1:Q2AYBTC6JNJVHCQMRLB2XXKS6QJFOTPA", "length": 8819, "nlines": 31, "source_domain": "isabelny.com", "title": "मीठ: वर्डप्रेस प्लगइन टिप्स", "raw_content": "\nमीठ: वर्डप्रेस प्लगइन टिप्स\nकाही प्रकरणांमध्ये, वर्डप्रेस सुरुवातीला त्यांच्या वेबसाइटवर अतिरिक्त कार्यक्षमता जोडण्याची आवश्यकता असू शकते. प्लगिन एकूण वेबसाइट कोड फेरफार न करता आपल्या वर्डप्रेस थीमवर वैशिष्ट्ये जो घाला PHP फाइल्स सह येतात सामान्य प्लगइन्सच्या विपरीत, साइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइन आपण आपली थीम बदलता त��व्हा देखील आपल्या शॉर्टकॉन्ड्स ठेवू शकतात. या प्रकरणात, आपल्या वर्ड प्रेस वेबसाइटवर वापरण्यासाठी आपल्याला एक सानुकूल प्लगिन तयार करण्याची आवश्यकता असू शकते बहुतेक ऑनलाइन मार्गदर्शक तत्त्वे साइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइन कशी तयार करावी हे स्पष्ट करीत नाहीत - grain management pest stored.\nया लेखातील Semaltट मधील अग्रगण्य विशेषज्ञ अँड्र्यू डेहान यांनी प्रदान केलेले, आपण आपल्या PHP प्लगइनची रचना करण्यासाठी एक पद्धत शिकू शकाल. आपण आपल्या स्नइपेट तयार करण्यास देखील सक्षम व्हाल जे आपल्या वर्डप्रेस वेबसाइटला एक किंवा दोन पसंतीक्रम जोडू शकते.\nसाइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइन काय आहे\nसाइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइन एक प्लॅटफॉर्म बनवते ज्याला आपण नॉन-थीम-संबंधित स्निपेट जोडू शकता. काही उदाहरणे मध्ये, आपण आपल्या वर्डप्रेस वेबसाइटसाठी अनेक 'कसे' कार्यपद्धती प्रती ठेच शकते यापैकी बरेच पद्धतींमध्ये सानुकूल स्निपेट समाविष्ट आहेत जे अपरिहार्यपणे प्लगइन किंवा नसतील या ज्ञानामुळे, हे प्रभाव मिळविण्यासाठी आपण आपल्या स्नॅपेट्स आपल्या फंक्शन्स. Php मध्ये जोडू शकता. हे स्निपेट आपल्या वर्तमान थीम स्थिरता यावर अवलंबून आहेत. जेव्हा आपण थीम सुधारित करता, आपली थीम बदलू किंवा त्याच्या काही फंक्शन्स सुधारित करता तेव्हा आपण सर्व बदल गमावू शकता. तथापि, जेव्हा आपण बदल करता तेव्हा साइट-विशिष्ट प्लगइन हे सर्व बदल राखून ठेवते.\nएक साइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइन वापरण्यासाठी कारणे\nआपण आपल्या वेबसाइटवर खारा भाग बदलता तेव्हा साइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइन लक्षणीय बदल ठेवू शकता. शिवाय, आपण कस्टम पोस्ट प्रकार वापरून, वर्डप्रेस लघुप्रतिमा समर्थन जोडणे, शॉर्टकोड जोडणे किंवा रँडम पोस्टमध्ये अभ्यागतांचे पुनर्निर्देशित करणे यासारखी आपली थीमवर विश्वास ठेवू नका अशा गोष्टी समाविष्ट करू शकता.\nवरील गरजा पासून, आपल्याला आपल्या थीममध्ये बदल करतांना आपली सेटिंग्ज बदलून ठेवण्यासाठी आपल्याला प्लगइन किंवा कोडची आवश्यकता आहे.शक्यक्रिया चालू करण्याच्या पारंपारिक पद्धतींपैकी बहुतांश तात्पुरते आहेत .काही प्रकरणांमध्ये आपल्याला साइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइनचा वापर घेऊन आपल्या साइटवर आपले सर्व कोड ठेवणे.\nकाही इतर प्रकरणांमध्ये, स्निपेट्स वर्डप्रेस वेबसाइटवरील अपयश होऊ शकतात. उदाहरणार्थ, नवीन फॉरमॅटिंग वापरून वर्डप्रेसमध्ये स्निपेट पेस्ट करू शकतात. या त्रुटीमुळे मृत्यूचे पांढरे पडदा होऊ शकते, अशी परिस्थिती जी संपूर्ण साइटचे नुकसान होऊ शकते किंवा जतन न केलेले बदल होऊ शकते. इतर बाबतीत, वापरकर्त्यांनी वर्डप्रेस बॅकएंड वापरून त्यांचे स्निपेट संपादित केले आहेत. साइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगिन नवीन युक्त्या वापरण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे.\nएक साइट-विशिष्ट वर्डप्रेस प्लगइन तयार करणे\nही एक सरळ प्रक्रिया आहे. आपण आपल्या WP वेबसाइट प्लगइन निर्देशिका मध्ये एक नवीन फोल्डर तयार करणे आवश्यक आहे. उदाहरण: / wp-content / plugins / yoursitename-plugin /\nया स्थानावर, एक फोल्डर तयार करा आणि त्यावर एक PHP फाइल जोडा. आपण फोल्डरचे नाव यासारखीच फाइल नाव वापरत असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, एका साध्या प्लगइनसाठी, आपण कोड वापरू शकता:\nप्लगइनचे नाव: thisexample.com साठी साइट प्लगइन\n/ * या लाईन खाली फंक्शन्स जोडणे सुरू करा * /\n/ * या लाईन खाली फंक्शन्स जोडणे थांबवा * /\nआपण नंतर अपलोड करू आणि वर्डप्रेस डॅशबोर्डवर आपल्या निर्देशिकामध्ये हे प्लगइन जतन करू शकता. प्लगइन सक्रिय करण्याचे लक्षात ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-retired-teachers-15-lakh-fraud-case/", "date_download": "2019-03-25T08:25:06Z", "digest": "sha1:OGDCBSYEO7P4YRY62DFAFTBBTA7VWHL7", "length": 9657, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवृत्त शिक्षकाला १५ लाखाला गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › निवृत्त शिक्षकाला १५ लाखाला गंडा\nनिवृत्त शिक्षकाला १५ लाखाला गंडा\nतुमच्या नावावर बेहिशेबी काळा पैसा असून तुम्हाला कोर्टातून क्लीन चीट मिळण्यासाठी व तुमच्या खात्यावरील सर्व रक्कम तुम्हाला परत मिळवून देतो, असे सांगून सेवानिवृत्त शिक्षकाला सुमारे पंधरा लाखांना गंडा घातला. याप्रकरणी नोएडा येथील टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनी अधिकार्यासह सात जणांवर कराड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी संभाजी ज्ञानदेव दाभोळे (वय 62, रा. बालाजी कॉलनी, आगाशिवनगर, मूळ रा. साळशिरंबे, ता. कराड) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून जगमोहन सक्सेना, अमन मल्होत्रा, अनुराग बासू, सत्यजित पाठक, राजसिंह मल्होत्रा, रामकुमार यादव, दीनदयाळ रेड्डी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, संभाजी दाभोळ��� हे सेवानिवृत्त शिक्षक असून आगाशिवनगर येथे राहण्यास आहेत. त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उंडाळे तसेच आगाशिवनगर येथे सेव्हिंग खाते आहे. त्यांना जानेवारी 2016 पासून सोनिया शर्मा यांचा टाटा लाइफ इन्शुरन्स कंपनी ग्रेटर नोएडा येथील कंपनीत तुमच्या नावावर दोन लाख रुपये आहेत, असा वारंवार फोन येत होता. त्यानंतर जगमोहन सक्सेना यांच्याकरवी संपर्क साधून तुमच्या नावावर कंपनीने दोन लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यासाठी तीस हजार रुपयांची विमा पॉलिसी काढावी लागेल, असेही सांगण्यात आले.\nत्यामुळे दाभोळे यांनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीची 15 हजार 500 रुपयांची पॉलिसी घेतली. पॉलिसीची कागदपत्रे मिळताच 25 हजार 500 रुपयांची दुसरी पॉलिसी घेतली. असे करत दाभोळे यांच्या नावावर आठ तर त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन, मुलीच्या नावावर दोन तर जावयांच्या नावावर पाच पॉलिसी करण्यात आल्या. तर सर्व पोलिसी जगमोहन सक्सेना, अमन मल्होत्रा, अनुराग बासू या एजंट लोकांकडे करण्यात आल्या. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये निलेश भाई गांधी गुवाहाटी यांनी फोन करून दाभोळे यांना लवकरच बोनस व पॉलिसीची रक्कम मिळेल असे सांगितले. मनीष शर्मा सिमला यांनीही तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे सांगितले. त्यानंतर संभाजी दाभोळे यांनी टाटा डीआईजी कंपनीतून आलेल्या फोन नंबर वर संपर्क साधला असता सत्यजित पाठक यांनी बोनस फंडाविषयी चौकशी केली तसेच आपण वित्त मंत्रालयात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने दाभोळे यांच्या नावावर कंपनीत 24 लाख 73 हजार तीनशे नव्वद रुपये 75 पैसे एवढी रक्कम असल्याचे सांगितले. हा सर्व रक्कम मिळण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स घेतली. त्यानंतर जीएसटी भरावी लागेल असे सांगितले. म्हणून दाभोळे यांनी वेगवेगळ्या तारखेला दोन लाख 86 हजार 320 रुपये भरले. हे पैसे भरल्यानंतर संबंधितांनी दाभोळे यांना 31 लाख 5 हजार 335 रुपये किमतीच्या डीडीची झेरॉक्स व्हाट्सअप वर पाठवली. त्यानंतर संबंधितांनी दाभोळे यांच्याकडून दहा टक्के स्टॅम्प ड्युटी म्हणून 2 लाख 2 हजार रुपये भरून घेतले. तसेच ऍडव्हान्स इन्कम टॅक्स भरण्यासाठी 93 हजार 988 रुपये भरले. एवढी रक्कम भरल्यानंतर दाभोळे यांच्या खात्यात 35 लाख 36 हजार तीनशे रुपये जमा आहेत, असे सांगितले. अशाप्रकारे वेगवेग��ी कारणे सांगून दाभोळे यांच्याकडून 14 लाख 24 हजार 274 रुपये उकळले. संशयितांनी आयकर विभाग, कोर्ट व पोलिसांची भीती घालून संभाजी दाभोळे यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाभोळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी करत आहेत.\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/traveling-to-infinity-my-life-with-stephen/articleshow/24762420.cms", "date_download": "2019-03-25T08:54:36Z", "digest": "sha1:YV3YJCHPAH7NREJLM4VGOHWRDZXQAQRK", "length": 25472, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Stephen Hawking: नात्याच्या प्रवासाची अनोखी गोष्ट - traveling to infinity: my life with stephen | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nनात्याच्या प्रवासाची अनोखी गोष्ट\nस्टीफन हॉकिंग हे केवळ विज्ञान जगतातच नव्हे तर त्याबाहेर अगदी जगभरातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेलं नाव. त्यांच्या ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाने अडीच कोटी प्रतींच्या खपाचा विक्रम केलाय. ‘द टाइम्स’ ने ‘अकरा परीमितींमधून विचार करणारा वैज्ञानिक’ म्हणून गौरव केलेला हा शास्त्रज्ञ.\nनात्याच्या प्रवासाची अनोखी गोष्ट\nस्टीफन हॉकिंग हे केवळ विज्ञान जगतातच नव्हे तर त्याबाहेर अगदी जगभरातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेलं नाव. त्यांच्या ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाने अडीच कोटी प्रतींच्या खपाचा विक्रम केलाय. ‘द टाइम्स’ ने ‘अकरा परीमितींमधून विचार करणारा वैज्ञानिक’ म्हणून गौरव केलेला हा शास्त्रज्ञ.\nविश्वाच्या उत्पत्तीचं अवघड गणित सर्वसामान्यांच्या भाषेत समजावणाऱ्या या अलौकिक बुद्धिमत्तेच्या शास्त्रज्ञाला मोटार न्युरोन डिसीज आहे. पंचविशीतच त्याच्या साऱ्या हालचाली व्हील चेअरशी जखडून टाकल्या गेल्या. स्नायूंच्या हालचाली हळूहळू मंदावत जात असताना त्याचं असाधारण काम दुप्पट वेगानं सुरू राहिलं. जेन ही स्टीफनची पत्नी. त्याच्या असाध्य आजारासह त्याला सर्वार्थाने स्वीकारणारी, त्याच्या जगण्याचा भाग होऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी धडपडणारी स्वतंत्र विचारांची स्त्री. पंचवीस वर्षांच्या सहजीवनानंतर त्याच्या सेवेत असलेल्या एका नर्ससाठी लग्न मोडलं आणि त्यांच्या वाट वेगळ्या झाल्या.\nविकलांग नवऱ्याची दिवसरात्र सेवा करणारी, त्याच्या कामात मनापासून रस घेणारी, कुटुंबासाठी खस्ता खाणारी, मुलांना घडवण्यासाठी धडपडणारी, आणि हे करताना स्वतः स्पॅनिश साहित्यातील पीएच. डी. जिद्दीने मिळवणारी जेन ही स्टीफन इतकीच अफलातून स्त्री आहे. ‘ट्रॅव्हल टू इन्फिनिटी: माय लाइफ विथ स्टीफन’ हे तिचं आत्मचरित्र. लग्न मोडल्यानंतर कुठेही कटुता, द्वेष या भावनांची हलकीशी रेषाही उमटू न देता अत्यंत पारदर्शकपणे जेनने आपलं कौटुंबिक आयुष्य हळुवारपणे उलगडून दाखवलं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केलाय. मराठी वाचकांसाठी एका असामान्य शास्त्रज्ञाच्या तेवढ्याच असामान्य पत्नीच्या विलक्षण कहाणीचा आस्वाद घेण्याची संधी त्यामुळे मराठी वाचकांना मिळाली आहे.\nस्टीफन जेनची कहाणी सुरू होते तिच्या शाळकरी आयुष्यासोबत. स्टीफनच्या बहिणी तिच्या शाळूसोबती. त्या कुटुंबाचं इतरांपेक्षा वेगळं असणं, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच विक्षिप्तपणा याच्याशी तेव्हापासूनच परिचित असूनही या वेगळेपणामुळेच ती स्टीफनकडे ओढली जाते. स्टीफनला केंब्रिजमध्ये प्रवेश मिळणं, त्यांचं एकत्र हिंडण्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे क्षण जेन अगदी हळुवारपणे मांडते. मात्र या काळातही स्टीफनच्या आजाराची सोबत असतेच. त्याला तेव्हापासूनच त्याच्या आजाराबद्दल सहानुभूती तर सोडाच, पण साधी चर्चाही केलेली खपायची नाही. त्याचं मन सांभाळण्याची धडपड, तिची काळजी, कोवळ्या वयात कधीही बऱ्या न होणाऱ्या आजारासह स्टीफनच्या आयुष्याशी जोडलं जाण्यातली जबाबदारी आणि दुसरीकडे त्याच्याविषयी वाटणारं आत्यंतिक प्रेम... ही ओढाताण, घालमेल जेन वाचकापर्यंत नेमकेपणाने पोहोचवते. नुकत्याच विद्यापीठात पाऊल ठेवलेल्या स्टीफनचे ज्येष्ठ संशोधक प्रो. फ्रेड हॉइल यांच्य��सोबत जे जगप्रसिद्ध मतभेद झाले, तो प्रसंग मुळातूनच वाचण्यासारखा.\nस्टीफन आणि जेनच्या लग्नानंतर त्यांच्या मुलखावेगळ्या संसाराला दीर्घकाळ साक्षीदार असलेलं त्यांचं ६, लिटल सेंट मेरी लेन या पत्त्यावरचं घर म्हणजे तिच्या आत्मकथनातलं एक जिवंत पात्र आहे. याच गल्लीत राहणाऱ्या आणि हॉकिंग कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या थेल्मा थॅचर या बाईही वाचकांच्या ओळखीच्या होऊन जातात.\nयाच घरातले रोबर्ट आणि ल्युसी या मुलांचे जन्म आणि त्यांच्या बालपणातील अवखळ आठवणी सांगताना जेन रंगून जाते. मात्र त्याचवेळी स्टीफन च्या हालचालीना आणखी मर्यादा येतात. व्हील चेअरला कायमचंच जखडून राहावं लागतं. मुलांना आणि स्टीफनला द्यावा लागणारा वेळ, त्यात होणारी शारीरिक दमवणूक, आर्थिक घडी बसवताना होणारी तारांबळ जेनने कुठेही मोठेपणाचा आव न आणता गप्पा माराव्यात तितक्या सहजतेने सांगितली आहे.\nस्टीफनच्या जगण्याचा भाग होताना जेन तिचं स्पनिश साहित्यावरचं प्रेम विसरली नाही. अतिशय चिवटपणे तिने पीएच. डी. पूर्ण केली. स्टीफनचा यात पाठिंबा तर नाहीच, पण हा विषय कसा निरुपयोगी आहे, हे मात्र तो ऐकवतो. पण याबद्दलही जेनची तक्रार नाही.\nस्टीफन कट्टर विज्ञानवादी आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून मगच तो ती स्वीकारतो. जेन मात्र धार्मिक आहे. तिचे नियमित चर्चमध्ये जाणे, तिथल्या संगीतविषयक कार्यक्रमात सहभागी होणे तिने कायम ठेवले. दोघांची ही मते कुठेही एकमेकांच्या आड येत नाहीत.\nस्टीफनचं आजारपण त्यांना सामाजिक कामांकडे घेऊन जातं. अपंगांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी हे दोघेही जोडलेले होते, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून व्हील चेअरमध्ये बसून मोर्चामध्ये सामील होण्याइतकी सजगता ही दोघे दाखवतात. अपंगांसाठी आर्थिक मदतीसाठीच्या कार्यक्रमातही सहभागी होतात.\nशारीरिक मर्यादेमुळे स्टीफन मुलांच्या जडणघडणीत सहभाग नसणार, हे जेनने गृहीत धरलं आहे. त्याबद्दल काहीही तक्रार न करता मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तिने केलेले प्रयत्न, त्यात तिची होणारी मानसिक आणि शारीरिक दमवणूक अचंबित करते.\nजेन तिच्या दोन्ही कुटुंबातील लोकांबद्दल बोलते. हॉकिंग कुटुंबाच्या विक्षिप्तपणाचे किस्से ती सांगते तशी, त्यांच्यातल्या चांगुलपणाविषयीही बोलते. स���टीफनशी नातं तुटल्यावरही हॉकिंग कुटुंबाशी संबंध ठेवत जुन्या गोष्टी विसरून जाण्याइतका मोठेपणाही दाखवते.\nसंपूर्ण पुस्तकात व्यापून राहिलेली गोष्ट म्हणजे, स्टीफन विषयी वाटणारा जेनला वाटणारा अभिमान. त्याच्या कामावरचं तिचं प्रेम वरवरचं नाही, तर त्याच्या कामात रस दाखवत, तिच्या कुवतीप्रमाणे ती ते समजून घेते. त्याचा पहिला शोध प्रबंध स्वतः जेनने टंकलिखित केलाय.\nस्टीफनच्या कामाला जगभर मान्यता आणि प्रसिद्धी मिळत गेली, तसतसा तो अधिकाधिक स्वतःमध्ये गुरफटत गेला. बोलण्यावागण्यात ‘आम्ही’ जाऊन ‘मी’ आलं. दौरे वाढले. त्याच बरोबर शारीरिक परावलंबित्व वाढत होतं. मुलं आणि घराच्या जबादारीमध्ये स्टीफनची पूर्ण काळजी घेणं जेनला अवघड जाऊ लागलं. त्याच दरम्यान घरात त्याची काळजी घेण्यासाठी नर्सेस आल्या आणि ही घटना दोघांच्या सहजीवनाला धक्का देणारी ठरली.\nदरम्यान जेनच्या आयुष्यात जोनाथन आला. जेनसारखाच संगीतात रमणारा, जेनकडून कसलीही अपेक्षा न बाळगता स्टीफनची सेवा करणारा. जेनच्या कुटुंबात मिसळून गेलेला जोनाथन त्यांच्याकडे राहायलाच आला आणि गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या. जोनाथनविषयीही जेन मोकळेपणाने बोलते. त्याच्याविषयीच्या भावना, वाटणारं आकर्षण, त्याने दिलेला भावनिक, मानसिक आधार, त्याची घरात होणारी मदत याबद्दल दोषी वाटून न घेता ती वाचकांसमोर सहजतेने मांडते.\nपुढे जीनिव्हातल्या एका दौऱ्यात स्टीफन मरणाच्या दारातून परत आला तेव्हा, त्याने वाचा पूर्णतः गमावली. नर्सेस हा त्याच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग होऊन गेल्या. घरातला त्यांचा वावर. जाता येता होणारा पाणउतारा, जोनाथनवरून मिळणारे टोमणे या असह्य ताणातून अधून मधून स्फोट होत गेले. दुरावा वाढ गेला. आणि एके दिवशी स्टीफन घर सोडून निघून गेला.\nपंचवीस वर्षांचं सहजीवन कोलमडून पडताना झालेली असह्य तगमग मांडताना आत कुठेतरी लपलेली सुटकेची भावना जेनने लपवलेली नाही. ही जशी जेनची कहाणी, तशी स्टीफन नावाच्या ‘माणसाचीही. असाध्य विकारासोबत झुंजत विज्ञान विश्वाला हादरे देणारं संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकाचं हे आयुष्य आहे. यात कोण चूक आणि कोण बरोबर याची निवड करण्याचा अधिकार वाचक म्हणून आपल्याला नक्कीच नाही, पण मोठ्या माणसांच्या जगण्यातले नाजूक कप्पे उघड करणारं जेनचं प्रांजळ निवेदन वाचल्यावर स्टीफनशिवायची स्वतंत्र जेनही पक्की ध्यानात राहते...आणि हीच तिची खरी ओळख आहे.\nट्रॅव्हल टू इन्फिनिटी: माय लाइफ विथ स्टीफन\nमूळ लेखिका : जेन हॉकिंग\nअनुवाद : सुदर्शन आठवले\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे\nकिंमत : ५९५ रु.\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\nमटा संवाद याा सुपरहिट\nत्यांना वापरून दूर सारण्याआधी...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनात्याच्या प्रवासाची अनोखी गोष्ट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://prorens.nl/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-25T07:59:40Z", "digest": "sha1:4BWGT25TJZ35NN2VL4DHW66W2UA6DPI5", "length": 25919, "nlines": 120, "source_domain": "prorens.nl", "title": "ऑनलाइन जुगार कशासाठी अग्रेषित आहे? – ProRens", "raw_content": "\nकॅसिनो विरुद्ध ऑनलाइन कॅसिनो\nऑनलाइन जुगार कशासाठी अग्रेषित आहे\nFiled under कॅसिनो विरुद्ध ऑनलाइन कॅसिनो\nऑनलाइन जुगार कशासाठी अग्रेषित आहे\nऑनलाइन जुंबिंगमुळे आपण चांगले कॅसिनोमध्ये “प्लेइंग” पेक्षा राऊटशी जुळवून घेण्याच्या अधिक चांगल्या स्थितींना देतो\n1. यशस्वी जुगार करण्यासाठी भरपूर शिस्त व आत्म-नियंत्रण असणे आवश्यक आहे. जवळपासचे सर्व लोक, संगीत खेळणे वगैरे प्रत्यक्ष कॅसिनमध्ये\nएकाग्रता न गमावता गंभीरपणे काम करण्याची आपण कशी अपेक्षा करू शकता\nआपल्या घराच्या सोयीनुसार, परिस्थिती नेहमीच परिपूर्ण असेल\n2. जर आपण वास्तविक ���ॅसिनोमध्ये खेळले असाल आणि गमावले किंवा आपल्या पूर्वनिर्धारित विजय-गोलापर्यंत पोचला असेल तर खेळायला जाणे आणि घरी जाणे किंवा चालविणे कठीण आहे. सर्व केल्यानंतर, आपण कॅसिनो सर्व मार्ग आला, आपण छान कपडे आहेत आणि आपण 30 मिनिटे किंवा त्यामुळे नंतर घरी जाऊ इच्छित नाही.\nव्हेरास घरी, ब्रेक घेणे सोपे आहे; प्रोग्रामीमधून बाहेर पडून संगणक बंद करणं तुम्हाला फक्त करायचे आहे.\n3. प्रत्यक्ष कॅसिनोमध्ये, फारच, आपल्याकडे\nयोग्य खेळण्याच्या योग्य निर्णयांसाठी पुरेसे वेळ विचार करण्याची वेळ नाही .\nघरी असताना, आपल्याला हवे असलेले सर्व वेळ: निर्णय घेण्याआधी, निर्णय घेण्यापूर्वी आणि विचारपूर्वक खेळण्याकरता (उदाहरणार्थ रुलेट संख्या), खाली विचार करण्यासाठी, विचार करण्यासाठी\n4. शिवाय आणखी, कॅसिनोमध्ये आम्ही या साइटवर शिफारस करतो (या पृष्ठाच्या तळाशी पहा), आपण आपली खाजगी टेबल राखून ठेवू शकता आणि आपल्या स्वत: च्या रेथ्यावर नक्की खेळू शकता. जर, उदाहरणार्थ, आपण एक धोरण वापरत आहात जिथे आपल्याला निर्णय घेण्याकरिता आणि आपल्या दलाला ठेवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही; जसे आपण आपल्या दलाल ठेवले आहे म्हणून आपण\n“समाप्त” वर क्लिक करा आणि तात्काळ चेंडू सुरळीत सुरू होते. आपण दर तासाला शंभर स्पिन सहज घेऊ शकता.\n5. सर्वाधिक ऑनलाइन कॅसिनो रीबेट फंक्शन ऑफर करते. आपण वापरत असलेल्या धोरणावर अवलंबून,\nहे एक अमूल्य फायदे आहे.\nखालील गोष्टींची कल्पना करा:\nआपल्या सट्टेबाजीची रणनीती म्हणजे शेवटच्या 18 संख्येत सट्टेबाजीमध्ये समाविष्ट आहेत\n(कोणती एक वाईट रणनीती नाही) एकदा आपण लेआउटवर आपले पहिले 18 चिप्स ठेवल्यावर\n(आणि त्या 18 क्रमांकाच्या कागदाच्या तुकड्यावर लिहून घेतल्यानंतर),\nस्पिन नंतर आपल्याला करावे लागते, आपल्या कीबोर्डवरील “रिबेट” (किंवा एफ 1) दाबा ) आणि आपल्या चिप्स ताबडतोब त्याच 18 संख्या ठेवलेल्या आहेत.\nआपण आपल्या शेवटच्या फिरकीवर एक क्रमांक दाबल्यास, तोच आहे, आपण पुढच्या फिरकीसाठी सज्ज आहात.\nशेवटच्या फिरकीवर आपल्या 18 संख्येपैकी कोणालाही फटका लावलेले नसेल तर आपल्याला फक्त\nकागदावर नवीन क्रमांक जोडणे आणि “सर्वात जुने” एक ठेवणे; नंतर\nआपण “रीबिट” (किंवा आपल्या कीबोर्डवरील एफ 1) दाबू शकता, नवीन नंबरवर एक चिप टाकला आणि\nत्यावर उजवे-क्लिक करून लेआउट बंद करण्याचा सर्वात जुना घेतला आणि आपण पुढील स्पीनसाठी तयार आहात\nवास्तविक कॅसिनो मध्ये हे धोरण वापरून खूप,\nखूप अवघड, जवळजवळ अशक्य होईल (टेबलवर बर्याच इतर चिप्स, बरेच इतर\nलोक खेळत आहेत, खूप त्रासदायक इ.) इत्यादी.\n6. आपण वापरत असलेल्या धोरणानुसार आपण नवीन गेम (शून्य स्पीन्स\nप्रदर्शित) सुरू करण्याची आवश्यकता असू शकते . प्रत्यक्ष कॅसिनोमध्ये, आपल्याकडे नवीन संधी जेव्हा उघडेल तेव्हाच आपल्याकडे ही संधी असेल.\nकॅसिनो मध्ये शिफारस, आपण आपल्या खाजगी टेबल आरक्षित करू शकता आणि कधीही नवीन खेळ (शून्य स्पीन्स प्रदर्शित) सुरू करू शकता.\n7. वास्तविक कॅसिनो मध्ये, फक्त रूले टेबल पुरेसे नाहीत.\nशिफारस केलेल्या ऑनलाइन कॅसिनिनमध्ये, आपल्याकडे\n9 0 रूलेट टेबल आहेत उदाहरणासाठी जर आपण एखादी खेळ निवडण्यासाठी एक टेबल शोधायची असेल ज्याचा आपण पैज लावण्याचा निर्णय घेतला असेल तर हा मोठा आणि मोठा फायदा आहे. जर आपण दोन सलग स्पीनसाठी खेळत नाही\n, तर आपल्याला आपले स्थान निर्धारीत करण्यास सांगितले जाईल, परंतु आपण खेळ पहाणे आणि\nसंधी पुन्हा लिहून येईपर्यंत संधी पुन्हा लिहून ठेवू शकता .\n8. आपण आपल्या दलाल ऑनलाइन ठेवण्यासाठी एक संगणक वापरत असताना, आपण\nगणना करण्यासाठी दुसर्या संगणकाचा वापर करू शकता आणि ते कसे निश्चित करावे हे निश्चित करण्यासाठी (एक्सेल आणि व्हिज्युअल बेसिक आपल्यासाठी हे करेल\n; रूले विश्लेषण करणारे साधने “).\nवास्तविक कॅसिनो आपल्याला आपल्या शर्यतीच्या एक संगणकासह रूलेट टेबलमध्ये बसण्यास अनुमती देत नाही\n9. ऑनलाइन कॅसिनो दिवसाचे 24 तास खुले असतात.\nहे नेहमी आपल्याला खेळण्यासाठी सर्वोत्तम क्षण निवडण्याची परवानगी देते (कार्य); आणि याचाच अर्थ असा की आपण\nकामा नये (काम), जेव्हा आपण थकल्यासारखे असाल किंवा तणावग्रस्त, निराश किंवा मद्यधुंद असाल\nदुर्दैवाने, एका वास्तविक कॅसिनोमध्ये आणि बर्याच वेगवेगळ्या कारणांमुळे हे बर्याच वेळा घडते.\n(आपण मजा करू इच्छित असल्यास आपण प्रत्यक्ष कॅसिनोवर जाऊ शकता. आपल्या बरोबर निश्चित रक्कम घ्या\n– क्रेडिट कार्ड नाही – आणि चांगला वेळ घालवा, परंतु\nकमीतकमी दीर्घावधीत पैसे कमविणे अपेक्षित नाही ).\n10. वास्तविक कॅसिनो पैसे खर्च पैसे नाटक दरम्यान, तुम्ही काही अतिरिक्त पैशांचा खर्च\nघरी, ड्रेसिंग नियम नाही.\nपुढील काही परिच्छेदात, मी एक खेळाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करेल जे अनेक जुगारांना वाटते की त्यांना विजयावर संधी आहे. मी सर्व प्रथम स्पष्टीकरण माझ्या सर्वोत्तम करू जात आहे, Roulette खेळण्यासाठी सर्व एक चांगला खेळ नाही का. या अखेरीस, आपल्याला खर्या अर्थाने तंत्रज्ञानासह लागेल जे खरंच रूलेसारख्या प्रणालीला कसे मारेल यावर आपले डोळे उघडेल. काय आपण या रोमांचक वर्ग तळाशी वाचा जात आहेत, आपण खेळ खेळ, Roulette एक चांगले समजून देईल.\nकृपया लक्षात ठेवा: हे वर्ग कॅसिनमध्ये असताना प्रारंभ करणार्या आणि लोकांसाठी नाही. आपल्याकडे बरेच जलद प्रवास आणि पैसा व्यवस्थापन स्ट्रॅटेजी आहेत आपण कॅसिनो विरुद्ध अपर हँड मिळविण्यासाठी शिकले पाहिजे.\nपहिल्यांदा आपण रूलेटच्या गेमबद्दल चांगल्याप्रकारे माहिती मिळवू शकता की टेबलवरील एकूण 38 संख्या दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण आपल्या पद्धतीप्रमाणे अंदाज लावता, तेव्हा आपण कधीही जुगार खेळू शकत नाही, तेव्हा घराचा तुमच्यावर मोठा फायदा होतो. खेळाडूंना त्यांच्या वाढदिवस, वर्धापनदिन, मुलांची संख्या, किंवा त्यांच्या आवडत्या बास्केटबॉल खेळाडूची संख्या अशी सक्ती करतात. जेव्हा डीलर बॉलला चेंडू फिरतो तेव्हा नक्कीच आपण अंदाज लावत असतो की बॉल आपल्या नंबरवर उतरणार आहे.\nतसेच, रूले च्या खेळ आपण अनेक दलाल देते, जे प्लेअरच्या फायद्याचे दिसत आहे. खाली रूलेट चाकवरील सर्व बेट्सची सूची आणि घराविरुद्धची ती बाजी मारण्याची संधी टक्केवारीत आहे. आपण घराचा गेम म्हणून संदर्भित का आहे हे आपण लवकर प्रारंभ कराल.\nया बॅटरी बाहेर आहेत\n1) काळा आणि लाल 48%\n2) प्रथम, द्वितीय, तृतीय बारा 31%\nप्रथम, द्वितीय, 3 रा स्तंभ\n1) एक नंबर वर सरळ अप पण 35-1\n3) गल्ली (3 नंबरची बेट) 11-1\n4) कोपरा (4 क्रमांक बीट) 8-1\n5) दुहेरी गाडी (6 नंबर बीट) 5-1\nआपण गणित करण्यासाठी वेळ घेता तेव्हा, आपण त्यांचे फायदा कसे तयार करतात ते त्वरीत पाहू शकता. खाली पहा आणि गणित पहा आणि कसे आम्ही फक्त बद्दल वाचा bets कार्य करते.\nरुलेट बोर्डवर 38 नंबर आहेत. आपण जेव्हा एखादी शर्त ठेवता तेव्हा आपल्याला किमान $ 5- $ 10 डॉलर्सची सारणी पूर्ण करावी लागते. म्हणून जरी आपण भाग्यवान होऊन 38 पैकी एक संख्या दाबा आणि त्यातील $ 35 डॉलर्स बंद करा, आपण प्रत्यक्षात केवळ $ 31 बनवले कारण आपण $ 5 आवश्यकता पूर्ण केल्या आहेत. खालील गणित पहा:\nपेऑफ म्हणजे पेओऑफच्या संख्येची संख्या.\nआपण स्पष्टपणे पाहू शकता क��� आपण किती अधिक पैज लावून घेणे, पेऑफवर कमी परतावे\nरूलेटमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे कमविण्याची इच्छा असलेल्या कोणालाही मी प्रभावित करू इच्छितो, पण निवडीसाठी फक्त एकच पैज आहे. अगदी सरळ सर्वात मोठी परतावा असलेली ही सर्वात कमी गुंतवणूक आहे.\nब्लॉक सट्टेबाजी एक अशी क्रीडा प्रकार आहे जिच्यात कैसिनो व्यवसायात कित्येक वर्षे आहे खूप काही तो mastered आहेत आणि या कारण, कॅसिनो ते करू की पैसा बनवण्यासाठी ठेवा.\nब्लॉक सट्टेबाजी हे रौलेट लेआउटवर नव्हे तर चाक डोक्यावर एका ओळीत संख्येने मालिका निवडण्याची कला आहे. कोणत्याही कॅसिनोवर जा आणि त्यांच्या चाकाचा डोक्याची एक प्रत मिळवा. तो रूलेट टेबलवर असावा, फक्त एक विक्रेता विचारू. आपण इच्छित (माझ्या कार्डावरील चित्र पहा) चाकाने डोक्यावर 9 पंक्ती काढा. येथे प्रमुख क्रमांक 9 आहे. या संख्या आपल्या भाग्यवान संख्येसह असू शकतात किंवा प्रारंभ करू शकतात, काही फरक पडत नाही. नंतर एकदा आपण 9 क्रमांकाची निवड केली की, आपण 9 नंबर थेट चाक डोक्याच्या उलट बाजूला आपल्या पहिल्या 9 क्रमांकाच्या विरूद्ध दिलेले आहेत.\nसट्टेबाजी करताना, आपण वाचक मंडळाकडे पाहत आहात आणि शेवटच्या सहा स्पिनमध्ये आलेली संख्या पहा. आपण हे पूर्ण केल्यावर, आपण आपल्या दोन संख्यांच्या एका पानाचा निवड कराल आणि सलग 4 वेळा प्ले करा.\nगणित पहा: 9 संख्या, सलग 4 वेळा 36 चीप आहेत. आपण एका नंबरवर चार प्रयत्नांमध्ये मारा केला तर आपल्याला 35-1 पेक्षा जास्त पैसे मिळतात आणि आपण ज्या क्रमांकावर बसतो त्या नंबरवरच आपण एक चिप लावला आहे आणि 36 आहे. हे तत्त्व कमी होत जाणाऱ्या परताव्यासह करावे लागते. जर आपण एकदा 4 वेळा प्रयत्न केले तर तुम्ही अगदीच, तुमच्या ब्लॉकमध्ये 2 किंवा 3 वेळा दाबाल तर तुम्ही 70 किंवा 105 चीप असाल. जर हे $ 1 डॉलरचे चिप्स आपण चांगले शोधत आहात, परंतु जर ते $ 5 डॉलर्स किंवा $ 25 डॉलरचे चिप्स आहेत, तर तुम्ही $ 350 – $ 1750 डॉलर्स 4 स्पीन मध्ये आणि आपण रोखू शकता \nआपण जितके जास्त खेळू शकाल आणि लाईफ लाईडर प्राप्त कराल, कॅसिनोची पैसा परत मिळविण्याची उत्तम संधी. एकदा आपण मोठी विजयी केल्यानंतर, बाहेर पडा देते की वाक्यांश लक्षात ठेवा: “एक थोडे गुंतवा, खूप घ्या.” जुगार मध्ये कोणत्याही चांगल्या प्रणाली की मुख्य हरक आहे.\n200 कॅसिनो स्वागत बोनस उत्तम लाईव्हर रूले यूके ऑनलाइन कॅसिनो ऑफर ऑनलाइन कॅसिनो साईन अप ऑफर ऑनलाइन गेम खेळण्यासाठी सर्वोत्तम स्लॉट खेळ ऑनलाइन थेट कॅसिनो कॅनडा ऑनलाइन लाइव्ह कॅसिनो यूके ऑनलाइन लाइव्ह रूले यूके ऑनलाइन स्लॉट आणि गेम ऑनलाइन स्लॉट खेळ यूके ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस ऑनलाइन स्लॉट मोबाइल द्वारा भुगतान करते हैं ऑनलाइन स्लॉट्स यूके ऑस्टेलियन ऑनलाइन कॅसिनो पुनरावलोकने कॅसिनो लाइव्ह बोनस कॅसिनो साइन अप ऑफर कॅसिनो स्वागत बोनस यूके जुगार खेळ थेट कॅसिनो साइट नवीन ऑनलाइन कॅसिनो नवीन ऑनलाइन स्लॉट नवीन ग्राहक ऑफर पैसे जिंकण्यासाठी जुगार साइट्स प्रथम ठेव बोनस स्लॉट बँक हस्तांतरण ऑनलाइन कॅसिनो बोनस स्लॉट वर साइन अप करा मजासाठी लाइव्ह रूले प्ले करा मोबाइल कॅसिनो द्वारे भरावे रूटर साइन अप बोनस रूले ठेव बोनस लाइव्ह डीलर रूलेट लाइव्ह ब्लॅकजॅक प्ले करा लाइव्ह रूलेट टेबल लाइव्ह रूलेट व्हील लाइव्ह रूलेट साइट वास्तविक पैशासाठी ब्लॅकजॅक साइट सर्वात मोठा ऑनलाइन स्लॉट विजय सर्वात मोठी ऑनलाइन कॅसिनो विजय सर्वोत्तम ऑनलाइन कॅसिनो बोनसमध्ये सामील होत आहेत सर्वोत्तम ऑनलाइन जुगाराचा खेळ साइट यूके सर्वोत्तम कॅसिनो स्वागत ऑफर सर्वोत्तम नवीन ऑनलाइन स्लॉट स्लॉट बोनस यूके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/aurangabad-municipal-corporations-indore-tour-next-week/", "date_download": "2019-03-25T08:08:57Z", "digest": "sha1:ITLB3AM42JLXBTCWM444VES2CHPIIG2A", "length": 5749, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुढील आठवड्यात औरंगाबाद महापालिकेचा इंदौर दौरा", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nपुढील आठवड्यात औरंगाबाद महापालिकेचा इंदौर दौरा\nऔरंगाबाद: कचरा प्रश्न चाळीस दिवसापासून कोंडी करून बसला होता. चिकलठाणा येथील दुग्धनगरीसाठीची ३५ एकर जागा मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निश्चित केली. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. शहरात नागरिक कचऱ्याने त्रस्त असताना काही दिवसापूर्वी शहराचे महापौर, आमदार व नगरसेवक हे फैमली सहल करून आले आणि प्रभारी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कचऱ्यामध्ये स्वतःला वाहून घेतले.\nआता पुन्हा हे पथक इंदौरचा दौरा करणार आहे पण हा दौरा कामानिम्मित्त असणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा निश्चित झाली असता त्यावर प्रक्रियेसाठीची आवश्यक यंत्रसामुग्रीची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे पथक पुढील आठवड्यात इंदूरचा दौरा करणार आहे. कचऱ्यासाठीचा डीपीआर स्वच्छ इंदूरच्या धर्तीवर केला असल्यामुळे इंदौर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राची पाहणी करून यंत्र खरेदीचा निर्णय घेण्यासाठी हा दौरा होणार आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nघरपट्टी भरण्यासाठी काँग्रेसवर वर्गणीतून पैसा गोळा करण्याची वेळ\nसंकेत जायभाये आणखी चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/mahadev-janakar-news/", "date_download": "2019-03-25T08:13:01Z", "digest": "sha1:32SBWF2AUGEH4TOJIQX6M6COR3TF5REY", "length": 6406, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nशेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर\nनाशिक: पोल्ट्री उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून त्यामाध्यमातून राज्यात अंडी व ब्रायलरचे उत्पादन वाढवण्यासाठी शासन सर्व सुविधा देईल यासाठी पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे असे प्रतिपादन पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. दोन दिवसीय इंडीया पोल्ट्री एक्सो 2018 च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.\nमंत्री जानकर म्हणाले, राज्यात अंडी व चिकनची मागणीच्या प्रमाणात उत्पादन होत नाही त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून याची मागणी पूरवली जात आहे. उद्योगांसारखा रोजगार देण्याची क्षमता आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत असे ते म्हणाले.याप्रसंगी आमदार सीमा हिरे, डॉ. पेडगावकर, वसंतकुमार, शुक्ला व पवार यांनी विचार व्यक्त केले.\nयावेळी मंत्रमहोदयांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शन 27 ते 29 जानेवरी 2018 या कालावधीत ठक्कर डोम येथे सुरु राहणार असून पोल्ट्री उद्योगासाठी लागणारे फिड, पशूंची औषधे व शेड उभारणीसाठी लागणारे विविध साहित्य येथे उपलब्ध असून याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्रे या दोन दिवसात होणार आहेत.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nभुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरा – कॉंग्रेस आमदार\nसरकार शेतकऱ्याच्या जमिनचा लिलाव करून त्याची ईज्जत काढते ही शरमेची बाब-शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-celebrates-the-festival-of-binary-money-sunil-tatkares-bjp-sena-collapses/", "date_download": "2019-03-25T08:10:29Z", "digest": "sha1:2ZI4J5OY2OBUD2QQRID6YDWOTIDISXSH", "length": 5705, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्रात बिन पैशाचा तमाशा सुरू; सुनील तटकरेंचा भाजप-सेनेला टोला", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nमहाराष्ट्रात बिन पैशाचा तमाशा सुरू; सुनी�� तटकरेंचा भाजप-सेनेला टोला\nपुणे: सध्या राज्यामध्ये सत्ताधारी शिवसेना- भाजप एकमेकांची उनीधुनी काढण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे एका प्रकारे राज्यात बिन पैशाचा तमाशा सुरू असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. हल्लाबोल आंदोनच्या दरम्यान पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nपश्चिम महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता आज होत आहे. तत्पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुनिल तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे, मात्र भाजप वर्धापनदिनी आयोजित सभेतील सध्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा चुकीची असल्यास यावेळी तटकरे म्हणाले. तसेच राज्यातील शेतकऱ्याचा सातबारा पूर्ण कोरा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\n काँग्रेस बारामतीतून लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटच जप्त होणार : अजित पवार\nकेडगाव हत्याकांड प्रकरणात चौघे निष्पन्न: संदिप गुंजाळ अटकेत तर संदिप गीऱ्हे फरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/purandra-airport-news/", "date_download": "2019-03-25T08:07:22Z", "digest": "sha1:GL37ULZTA45O7WOTQEIQDMPBTYSDXYEH", "length": 8446, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विमानतळासाठी जमिनीचे संपादन, प्रकल्पग्रस्तांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nविमानतळासाठी जमिनीचे संपादन, प्रकल्पग्रस्तांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी\nपुणे : प��रंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात आता सातही गावातील शेतकरी एकवटले. हजारो शेतकऱ्यांनी महाग्रामसभा घेवून कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रपतींनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी असा ठराव करण्यात आला.\nपुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वणपुरी व उदाचीवाडी या ७ गावांच्या परिसरातील सुमारे ६ हजार एकर क्षेत्रावर छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाला हव्या असणा-या सर्व परवानग्या मिळाल्याने लवकरच जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.\nया पार्श्वभुमीवर आज या बाधित सातही गावातील शेतक-यांनी पारगाव येथे एकत्र येवून महाग्रामसभा घेतली. विविध आंदोलने करून, निवेदने देवून देखील शासनाचे डोळे उघडत नाही. मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणा-या धर्मा पाटलांचा मार्गच योग्य असल्याचे म्हणत ग्रामस्थांनी राष्ट्रपतींनी आम्हाला इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी इच्छा मरणाचे अर्ज देखील भरून घेण्यात आले.\nपुरंदर तालुक्याची दुष्काळी तालुका ओळख पुसून तालुक्यातील शेतकरी आता फळबागा करू लागले आहेत. या ठिकाणी अंजीर, सीताफळे, डांळीब यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि ही फळे परदेशीही पाठवले जातात. काही परदेशी नागरिक सुद्धा या ठिकाणी जमिनी घेऊन शेती करत आहेत. अशाच डोली पंडोल या देखील विमानतळ बाधित शेत्रात शेती करतात. त्यांनीही विमानतळाला विरोध केला.\nकाही दिवसांपुर्वी याच तालुक्यातील आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथील शेतकऱ्यांना कोचीन विमानतळाच्या धर्तीवर भागदारक आणि जमीन अधिग्रहण कायद्यानुसार १० पट जमिनीचा मोबदला या २ अटी शेतकऱ्यांसमोर ठेवल्या होत्या. पण महाग्रामसभेतील शेतकऱ्यांचा पवित्र पाहता प्रस्तावित विमानतळासाठी जमीन संपादित करणे अवघड होणार आहे. हे शेतकरी १५ दिवसांमध्ये पुण्यात मोर्चा घेऊन जाणार आहेत. खेडमधील शेतकऱ्यांचा वाढलेल्या विरोधामुळे पुरंदरला विमानतळ हलवण्यात आले.\nमात्र स्थानिकांचा होणारा सततचा विरोध पाहता पुरंदरमधील विमानतळाचे उड्डाण पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेने���ा चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nदौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल\nजैन समाज पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/salman-ask-for-70-pantarship-for-rase-3/", "date_download": "2019-03-25T08:05:25Z", "digest": "sha1:3JMGVZ74TFBYKLUCA3434WZZQTPBMBBN", "length": 4145, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सलमान खानने एका चित्रपटासाठी मागितली ७०% भागीदारी", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nसलमान खानने एका चित्रपटासाठी मागितली ७०% भागीदारी\nवेबटीम-सलमान खान त्यांच्या मानधनासाठी व चित्रपट कमाईतील भागीदारीसाठी नेहमीच चर्चेत असतो.नेहमी तो ५०% भागीदार असतो पण आता मात्र सलमाने रेस ३ चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल ७०% भागीदारीची अट ठेवली आहे.रेस २ मध्ये जॉन अब्राहम होता पण आता जर जॉन जर रेस ३ मध्ये असेल तर सलमान या चित्रपटात काम करणार नाही.असे सलमान ने स्पष्ट केले आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nबार्शी कुर्डूवाडी रस्त्यासाठी आता डझनभर ग्राम पंचायतींचा एकत्र लढा\nदिवंगत उपमहापौरांच्या मुलीला युती कडून उमेदवारी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE%2C_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2019-03-25T07:56:10Z", "digest": "sha1:PYSXH25NUW6NYJ4TUZJ7UIS5NTA5RPSG", "length": 18657, "nlines": 327, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९ - विकिपीडि���ा", "raw_content": "इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nइंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट ईंडीझ दौरा, २००९\nतारीख जानेवारी २५, २००९ – एप्रिल ३ २००९\nसंघनायक अँड्रु स्ट्रॉस क्रिस गेल\n२.१ पहिला कसोटी सामना\n२.५ पाचवा कसोटी सामना\nफेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ८\nकेव्हिन पीटरसन ९७ (१७२)\nसुलेमान बेन ४/७७ (४४.२ षटके)\nरामनरेश सरवण १०७ (२९०)\nस्टुअर्ट ब्रॉड ५/८५ (२९ षटके)\nअँड्रु फ्लिन्टॉफ २४ (४७)\nजेरोम टेलर ५/११ (९ षटके)\nवेस्ट इंडीज एक डाव व २३ धावांनी विजयी\nसबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका\nपंच: टोनी हिल आणि रुडी कोर्ट्झन\nफेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १७\nअँड्रु स्ट्रॉस ६* (८)\nसर विवियन रिचर्ड्स मैदान, अँटिगा\nपंच: डॅरिल हार्पर (ऑ) & टोनी हिल (न्यू)\nफेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १९\n५६६/९ dec. (१६५.२ षटके)\nअँड्रु स्ट्रॉस १६९ (२७८)\nजेरोम टेलर २/७३ (२८ षटके)\nरामनरेश सरवण ९४ (१३३)\nग्रेम स्वान ५/५७ (२४ षटके)\n२२१/८ dec. (५०.० षटके)\nअॅलास्टेर कूक ५८ (१०३)\nडॅरेन पॉवेल २/३३ (७ षटके)\nरामनरेश सरवण १०६ (१९६)\nस्टुअर्ट ब्रॉड ३/६९ (२१ षटके)\nफेब्रुवारी २६ - मार्च २\n६००/६ (१५३.२ षटके, डाव घोषित)\nअँड्रु स्ट्रॉस १४२ (२१०)\nफिडेल एडवर्ड्स ३/१५१ (३० षटके)\n७४९/९ (१९४.४ षटके, डाव घोषित)\nरामनरेश सरवण २९१ (४५२)\nग्रेम स्वान ५/१६५ (५०.४ षटके)\nअॅलास्टेर कूक १३९* (२५६)\nक्रिस गेल १/४६ (१७ षटके)\nकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस\nपंच: अलिम दर (पा) आणि रसेल टिफिन (झि)\nमार्च ६ - मार्च १०\n५४६/६ डाव घोषित (१५८.५ षटके)\nपॉल कॉलिंगवूड १६१ (२८८)\nलायोनेल बेकर २/७७ (२३ षटके)\nशिवनारायण चंदरपॉल १४७* (३६१)\nस्टुअर्ट ब्रॉड ३/६७ (३० षटके)\n२३७/६ डाव घोषित (३८.४ षटके)\nकेव्हिन पीटरसन १०२ (९२)\nलायोनेल बेकर २/३९ (८ षटके)\nरायन हाइंड्स २० (९४)\nग्रेम स्वान ३/१३ (२१ षटके)\nक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद\nपंच: डॅरिल हार्पर आणि रसेल टिफिन\nजानेवारी २५ - जानेवारी २७\n४२४/८ dec. (९१.५ षटके)\nमाँटी पानेसर ४/५३ (१७.३)\n२६५/५ dec. (५८ षटके)\nअँड्रु स्ट्रॉस १०३ (११६)\nमाँटी पानेसर ३/५१ (१५)\nजानेवारी २९ - जानेवारी ३१\n५७४/८ dec. (१४९.५ षटके)\nस्टीव हार्मिसन ४/१०१ (२५.५)\nअँड्रु स्ट्रॉस ९७ (१३५)\nफेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३\n२५१/८ dec. (७५ षटके)\nरवी बोपारा १२४* (१२५)\nइयान बेल ७२ (९१)\n^ मिलर, अँड्रु (फेब्रुवारी १३, २००९). \"Play abandoned after sandpit farce\" (इंग्लिश मजकूर). CricInfo. २००९-०२-१३ रोजी पाहिले.\nमागील हंगाम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nआय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग ४ • भारत वि. ऑस्ट्रेलिया • बांगलादेश वि. न्यू झीलँड • २००८ चौकोणी २०-२० मालिका, कँनडा • २००८ एसोसिएट त्रिकोणी मालिका, केन्या • दक्षिण आफ्रिका वि. केन्या\nदक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश • पाकिस्तान वि. वेस्ट ईंडीझ (UAE) • भारत वि. इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड (Test) • झिम्बाब्वे वि. श्रीलंका\nन्यू झीलँड वि. वेस्ट ईंडीझ • ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nबांगलादेश वि. झिम्बाब्वे • बांगलादेश त्रिकोणी मालिका • वेस्ट ईंडीझ वि. इंग्लंड • आय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग ३ • पाकिस्तान वि श्रीलंका · केन्या वि झिम्बाब्वे · श्रीलंका वि. भारत\nऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड (ODI) • दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया • न्यू झीलँड वि. भारत\nबांगलादेश वि. वेस्ट ईंडीझ • विश्वचषक पात्रता सामने\nपुढील हंगाम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१८ रोजी ११:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/mazya-maheri/", "date_download": "2019-03-25T08:11:28Z", "digest": "sha1:VJ5JJNTIENTDBJ2OYPSCKWERGBQDGWB4", "length": 5165, "nlines": 50, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nमाझ्या माहेरी सुखाची सावली गं\nमाझ्या माहेरी सुखाची सावली गं\nमाझ्या माहेरी सुखाची सावली.\nओढ्याकाठी आंबराई लवली गं\nमाझ्या माहेरी सुखाची सावली.\nमाझ्या आईची माझ्यावर माया\nजशी आभाळाची जगावर छाया\nप्रेमा पाजिते पावलो पावली गं\nमाझ्या माहेरी सुखाची सावली.\nजसा सूर्याचा पहारा नभ���\nतशी शेताच्या बांध्यावर उभी\nमाझ्या बाबांची मूर्ती सावळी गं\nमाझ्या माहेरी सुखाची सावळी.\nमाझ्या अंगणी गोठाभर गाई\nगोऱ्हे बैलांची गणतीच नाही\nही दौलत सोन्याहून पिवळी गं\nमाझ्या माहेरी सुखाची सावळी.\nसुख ललाटी आता आलं\nमाझ्या भक्तीला अंबाबाई पावली गं\nमाझ्या माहेरी सुखाची सावली.\n१९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन, सामान्यांचा त्यांना मिळालेला सक्रीय, धाडसी पाठिंबा अशी राजकीय पार्श्वभूमी, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग आणि \"निर्भयतेने जीवन जग\" असा संदेश देणारे हे चित्र होते. पटकथा, गीते आणि दिग्दर्शन या जबाबदाऱ्या आठवले यांनी उचलल्या. केशवराव भोळे यांनी श्रीधर पार्सेकर या तरुण संगीतकाराबरोबर आठवल्यांच्या गीतांना संगीताने नटवले. शांता आपटे, बाबुराव पेंढारकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत पु.ल.देशपांडे यांनीही या चित्रपटात भूमिका केली होती. तो त्यांचा दुसराच चित्रपट होता.\nमाझ्या माहेरी सुखाची सावली गं\nदेव खरा आधार, दयाघन देव खरा आधार\nपाटलाच्या पोरा जरा जपून जपून\nवीरा झोप सुखे तू घेई\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-25T07:24:09Z", "digest": "sha1:GAXK4I7J3RJTUGYGNQYQMBD5ZX7O3KAC", "length": 10696, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहा दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसहा दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त\nपुणे – गुन्हे शाखेच्या गुंडास्कॉड उत्तर विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून अल्पवयीन मुलाने चोरलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस शिपाई दत्ता फुलसुंदर यांना पिंपरी येथील शगुन चौक भागात अल्पवयीन मुलगा नंबर प्लेट नसलेली एक गाडी विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती.\nप���क घटनास्थळी पोहोचले तेव्हा एक मुलगा मोपेड गाडीवरून संशयीतरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने ती गाडी वायसीएम रुग्णालय येथून चोरल्याचे सांगितले. याबरोबरच आणखी पिंपरी, पुणे, कॅम्प आणि शिवाजीनगर परिसरातून पाच दुचाकी चोरल्याचे त्याने कबूल केले. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे शाखा 2 चे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, सहायक पोलीस फौजदार नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर, शितल शिंदे, रमेश भिसे, प्रदीप शेलार, अतुल मेंगे, नवनाथ चांदणे अणि कांतिलाल बनसोडे यांनी ही कारवाई केली.\nएक्सेल व्हेईकल्सची विक्रमी ट्रक विक्री\nअवैध दारू अड्ड्यांवर उंब्रज पोलिसांची कारवाई\nस्नुकर अजिंक्यपद स्पर्धा : वाडेश्वर विझार्डस संघाचा बाद फेरीत प्रवेश\nपुना क्लब, सनी इलेव्हन उपांत्य फेरीत दाखल\nप्रचाराबरोबर गुन्ह्यांचीही जाहिरात करणे बंधनकारक\nअरुण गवळीच्या संचित रजेवर सोमवारी निर्णय\nदारू पिण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला\nपंधरा लाखांची वीज चोरी; तिघांवर गुन्हा\nनशेत दुचाकी पेटवली, आरोपीला अटक\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्य��ची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/The-parties-and-the-desires-of-the-inclination-continue/", "date_download": "2019-03-25T07:45:34Z", "digest": "sha1:43LCTDM2FEMCNL6M2KR7A4D3G32A4P7N", "length": 18153, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत पक्ष अन् इच्छुकांची लगीनघाई सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत पक्ष अन् इच्छुकांची लगीनघाई सुरू\nसांगलीत पक्ष अन् इच्छुकांची लगीनघाई सुरू\nसांगली : अमृत चौगुले\nमहापालिकेची आचारसंहिता जाहीर होताच पक्षीय पातळीवर मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे अधिक पर्याय उपलब्ध असल्याने इच्छुकांची संख्याही यावेळी अधिक वाढली आहे. त्यामुळे आता पॅनेल पध्दतीतून संधीसाठी इच्छुकांची धावाधाव सुरू झाली आहे. दि. 4 ते दि.11 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानुसार प्रबळ दावेदारांची पळापळ आणि वापळवी सुरू होईल. यादृष्टीने पक्षीय बैठका आणि इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे.\nमहापालिका स्थापनेपासून महाआघाडीची एक टर्म वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीचीच महापालिकेवर सत्ता आहे. परंतु यावेळी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आपसारख्या विविध पक्षांनी आव्हान उभे केले आहे. यामुळे निवडणूक बहुरंगी होणार हे स्पष्ट आहे.साहजिकच यावेळी इच्छुकांची संख्याही त्या तुलनेत वाढली आहे. ती हजारांच्या घरात गेली आहे. सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून अर्जही मागविले आहेत. पक्षनेत्यांनी इच्छुकांना जनसंपर्काच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येकाने प्रभागनिहाय दोन-तीन फेर्याही पूर्ण केल्या आहेत. सर्वच पक्षीय नेत्यांनी महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी अधिकाधिक प्रबळ दावेदारांना उमेदवारीची संधी देण्यावरही खल सुरू झाला आहे.\nकाँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या निधनानंतर होणारी महापालिका निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे. यादृष्टीने ���ाँग्रेसनेत्या जयश्री पाटील, आमदार मोहनराव कदम, डॉ. विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवानेते विशाल पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आपापल्या समर्थकांना संधी देण्यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यामध्ये महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांनीही प्रत्यक्ष इच्छुकांची तुल्यबळ ताकद अजमावून उमेदवारी आणि आघाडीचा निर्णय घेण्याची भूमिका ठेवली आहे. काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी झालेल्या कामांचे मार्केटिंग करण्याबरोबरच भाजपच्या केंद्र, राज्यातील सत्तेला टार्गेट करण्यात येणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे नूतन प्रभारी व पक्षाचे महासचिव खासदार मल्लिकार्जुन खारगे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची फौज सांगलीला ताकद देणार आहे. महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे दिलेली आहे.\nअर्थात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसकडून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची चर्चा सुरू आहे. आघाडीचे प्रयत्न सुरू ठेवतच राष्ट्रवादीकडून विकासाचा अजेंडा घेऊन सत्ता सोपवण्याचे आवाहनही सुरू ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील आदिंनीही आघाडीचा आग्रह धरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा खल सुरू असला तरी दोन्हीकडून इच्छुकांची संख्याही मोठी आहे. शिवाय काँग्रेसकडूनच पाठपुरावा करूनही आघाडीचा हात पुढे आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ताकदीने लढण्याची भूमिका ठेवली आहे. यासाठी माजी मंत्री अजित पवार, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आदींसह नेत्यांची फौज येणार आहे.\nभाजपनेही केंद्र, राज्य, नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीपाठोपाठ महापालिकेवरही झेंडा फडकविण्याची तयारी केली आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनीही यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. यासाठी खासदार संजय पाटील, मनपा निवडणुकीचे नेतृत्व करणारे शहर जिल्���ाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार यांनी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. सोबतच त्या पक्षातील आजी-माजी नगरसेवक, प्रबळ कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यामध्ये मिरजेतील 13 आजी-माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन एक झलक दाखविली आहे. पुढे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींसह अनेक मंत्र्यांची फौज प्रचार आणि नियाजनासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसह समविचारी आघाडीचा सूर पुढे आला आहे. त्यामुळे भाजपनेही स्व:बळाचा नारा सोडून महायुतीतील रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, रासपसह अन्य पक्षांनाही सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु जागावाटपात हे कसे गणित जमेल यावर ते ठरणार आहे.\nशिवसेनेकडूनही माजी आमदार संभाजी पवार गटाचे पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार, नगरसेवक व नेते शेखर माने, जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्यासह पदाधिकार्यांनी स्व:बळावरच निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे, संपर्कनेते गजानन कीर्तीकर यांनीही ताकद पणाला लावली आहे. पुढच्या टप्प्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांची फौज आणि रसद मिळणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शिवसेनाही प्रबळ दावेदार ठरणार आहे.स्थानिक पातळीवर जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी आपच्या सहकार्याने सत्ता परिवर्तनासाठी चळवळ सुरू केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, तानाजीराव जाधव यांनी नेहमीप्रमाणे मनपात प्रवेशासाठी धडक देण्यासाठी तयारी सुरू ठेवली आहे. डाव्या पक्षांनीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत.\nअर्थात या सर्वांच्या माध्यमातून इच्छुकांच्या ओढाओढीची रस्सीखेच आता सुरू होणार आहे. सोबतच इच्छुकांकडूनही जनतेला पसंत पडेल, पक्षीय बळ मिळेल अशा पक्षांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यातून आरक्षण आणि चार सदस्यीय पॅनेलमध्ये जे सोयीस्कर ठरेल त्याकडेच सर्वांचा कल राहील. अर्थात यासाठी प्रमुख पक्षांनी इच्छुकांचे अर्जही मागवून घेतले आहेत. आता यातून आघाडी आणि प्रबळ दावेदारांची यादी करण्यासाठी तयारी सुरू झाली\nदि.4 जुलैपासून उमेदवारी अर्ज भरणा सुरू होईल. त्यामुळे सर्वच पक्षांकडून इच्छुकांतील ���्रभागनिहाय तुल्यबळ प्रबळ दावेदार निवडीसाठी आता बैठका सुरू झाल्या आहेत. यातून संधी न मिळाल्यास पुन्हा गटबाजी उफाळणार हे स्पष्ट आहे. उमेदवारी अर्जासोबतच पक्षाचा एबी फॉर्म बंधनकारक आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत 11 जुलै अर्ज भरणा सुरू राहणार आहे. अर्थात खेळ 17 तारखेला अर्ज माघारीपर्यंत सुरूच राहील. त्यानुसार 17 तारखेलाच खर्या अर्थाने तुल्यबळ लढती ठरणार आहेत.\nआजी-माजी नगरसेवक प्रबळ दावेदार\nमहापालिका निवडणुकीमध्ये प्रामुख्याने स्थानिक समस्यांचा उहापोह अद्यापही सुरू झालेला नाही. इच्छुकांमध्ये आजी-माजी नगरसेवक प्रबळ दावेदार हे साहजिकच सर्वच पक्षातून दल बदलून उतरणार आहेत. यामुळे मागे झालेल्या कारभाराचा,भ्रष्टाचाराचा उहापोह त्यांच्याही अंगलट येऊ शकतो. त्यामुळे स्थानिक प्रश्नांना बगलच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीकडून भाजप, शिवसेनेला विरोध करताना केंद्र, राज्य सरकारवर टीका रंगणार आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेनेकडून मात्र स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रीत करतानाही सांभाळूनच टीका होईल.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/nagpurvidharbh-news/tobacco-harmful-and-useful-1138681/", "date_download": "2019-03-25T08:17:03Z", "digest": "sha1:EKZVOP4CEDTFYJXKKVNW2QO3ROZGFBMS", "length": 14354, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nतंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही..\nतंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही..\nतंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे\nऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठाच्या वैज्ञानिकांचे संशोधन\nकर्करोगासाठी कारणीभूत मानला जाणारा तंबाखूच कर्करोगाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे नवे संशोधन समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटय़ुट फॉर मॉलिक्युलर सायन्स’च्या वैज्ञानिकांनी तंबाखूच्या रोपातील फुलात हा अणू असल्याचे शोधून काढले आहे. याच संशोधनाचा आधार घेत लाखलाखोळी डाळीसंदर्भात लढा देणारे वैज्ञानिक डॉ. शांतीलाल कोठारी यांनी केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. स्वास्थीचरण यांना पत्र लिहिले आहे.\nतंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे. या संशोधनानुसार तंबाखूच्या रोपामध्ये आढळणारा एक अणू मानवी शरिरातील कर्करोगाच्या पेशींना संपविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तंबाखूच्या रोपाला येणाऱ्या फुलांमध्ये तो असतो. त्यात कर्करोगाच्या विषाणूला नष्ट करण्यासोबतच कर्करोगाच्या पेशींना ओळखण्याची आणि त्याला मारण्याची क्षमतासुद्धा आहे. या अणूला ‘एनटी-१’ असे नाव देण्यात आले आहे. ‘इ-लाईफ जर्नल’ मध्ये हा संपूर्ण शोधप्रबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यातील प्रमुख संशोधक मार्क हुलेट यांच्या मते तंबाखूत एक खास पदार्थ विकसिीा होतो, जो केवळ कर्करोगावर मारा करतो. मनुष्याच्या शरिरातील पेशींवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. या संदर्भात कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या विशेषज्ञांसोबतचा एक अभ्यासदेखील कोलेरॅडोच्या एन लेंडमेन यांनी प्रकाशित केला आहे. ऑस्ट्रेलियातील या विद्यापीठाच्या संशोधनानंतर डॉ. शांतीलाल कोठारी यांनीही ८० टक्याहून अधिक लोकांना वर्षभर कायमस्वरूपी रोजगार तंबाखूच्या उत्पादनामुळे उपलब्ध होईल, असे सांगितले. मुळात तंबाखू वाईट नाही, पण त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनात इतरही घातक घटक मिसळले जात असल्याने त्याचे परिणाम वाईट होतात. तंबाखू आरोग्याला हानीकारक म्हणून मोठमोठय़ा जाहिराती केल्या जातात, पण भारतातील वैज्ञानिक तंबाखूच्या उत्पादनातील हे सत्य समोर का आणत नाही, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\n१९७० मध्ये मोहीम अस्तित्वात\nलोकांच्या मनातून तंबाखूविषयीचा गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने तंबाखू कंपन्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाज वैज्ञानिक आणि वैज्ञानिकांना एकत्र आणून धुम्रपानाच्या बाजूने जोरदार मोहीम चालवली आहे. कर्करोगाच्या बाजूने आलेले हे संशोधन याच मोहिमेची पुढची कडी आहे, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. या अध्ययनानुसार मनोवैज्ञानिक हैंस आइसेंक आणि स्कट्रन या मोहिमेशी जुळले आहेत. ही मोहीम १९७० मध्ये प्रकाशात आली होती. जगातील सात प्रमुख सिगारेट कंपन्यांची एक बैठक १९७७ मध्ये झाली. यात एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘धूम्रपान, तंबाखू सेवनावर बहिष्कार टाका’\nतंबाखूचे आग्नेय आशियात दरवर्षी तेरा लाख बळी\nआग्नेय आशियाला तंबाखूचा विळखा\nकारागृहात मोबाईल, विडी व तंबाखूजन्य पदार्थासह कांदे, बटाटे, लसणाची चटणीही\n२७.५ कोटी जनतेला तंबाखूचे व्यसन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/08/04/lal-bhopalyacha-halwa/", "date_download": "2019-03-25T08:34:58Z", "digest": "sha1:FJHAS7T7MEQVICW6NKKKGB7JOFHOXQ7C", "length": 8108, "nlines": 136, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा) – Red Pumpkin(Kadu) Halwa - Sugarfree (No White Sugar) | My Family Recipes", "raw_content": "\nलाल भोपळ्याचा हलवा मराठी\nलाल भोपळ्याचा हलवा – उपासासाठी स्वादिष्ट पदार्थ\nआपण लाल भोपळा नेहमी भाजी / भरतासाठी / सूप साठी वापरतो. पण भोपळ्याचा हलवा ही खूप छान होतो. मी पांढरी साखर न घा��ता गूळ घालून हा हलवा बनवते. मावा ही घालत नाही. त्यामुळे घरात असणाऱ्या साहित्यापासून च स्वादिष्ट हलवा बनू शकतो.\nमधुमेही लोकांसाठी नाहीये ही रेसिपी. पण मुलांसाठी / मधुमेह नसलेल्या लोकांसाठी पांढरी साखर चांगली नसते. त्यांना गूळ/ मध घातलेले पदार्थ चांगले. त्यांच्या साठी उत्तम.\nलाल भोपळ्याचा कीस अडीच कप (जरा जाड किसणी वापरा )\nचिरलेला गूळ अर्धा कप (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )\nदुधाची पावडर / मलई १ मोठा चमचा\nवेलची पूड पाव चमचा\nमीठ चिमूटभर (हवे असल्यास)\nसाजूक तूप १ चमचा\nसुका मेवा आवडीप्रमाणे तुकडे करून\n१. एका कढईत तूप घालून सुक्या मेव्याचे तुकडे तळून ताटलीत काढून घ्या.\n२. त्याच कढईत भोपळ्याचा कीस घालून २–३ मिनिटं परतून झाकण ठेवून मंद आचेवर ४ मिनिटं वाफवून घ्या. मधे मधे ढवळा.\n३. आता दूध घालून मिक्स करा. झाकण ठेवून शिजवा. फार जास्त शिजवू नका. भोपळा जरा मऊ झाला की पुरे.\n४. आता गूळ घालून मिक्स करा. गूळ वितळेपर्यंत शिजवा.\n५. दुधाची पावडर / मलई घाला. मिक्स करा. जसा घट्ट हवा असेल तसा आटवून घ्या. थंड झाल्यावर हलवा थोडा घट्ट होतो.\n६. मीठ, वेलची पूड आणि सुके मेवे घालून मिक्स करा.\n७. भोपळ्याचा स्वादिष्ट हलवा तयार आहे. गरम किंवा गार कसाही सर्व्ह करा.\n८. जरा कोमट हलव्यावर वॅनिला आईस क्रिम घालून खूप छान लागतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/iqbal-khan/", "date_download": "2019-03-25T07:35:29Z", "digest": "sha1:UBF72WPABVIFSMXR4MZGYL7NNRUCEMMS", "length": 1864, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " iqbal khan - मराठी कलाकार", "raw_content": "\n‘चॉकलेट बॉय’ची इमेज पुसणार आहे ‘हा’ अभिनेता.आगामी मराठी सिनेमा’मुंबई आपली आहे’.\nमराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/mahesh-manjrekar/", "date_download": "2019-03-25T07:35:25Z", "digest": "sha1:B2HZ45M64VSB5DYK2UWFN7JOEHALGJ4X", "length": 6049, "nlines": 76, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Mahesh Manjrekar - मराठी कलाकार", "raw_content": "\nभाईंचा ‘विग’आणि तिरुपतीहून मागवले केस\nभाई व्यक्ती कि वल्ली सिनेमाचा पूर्वार्ध प्रेक्षकांना भावून गेला. येत्या ८ फेब्रुवारीला भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज...\nमहेश माजरेकरांचा हा भन्नाट अवतार बघितलात का\nमराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीत महेश माजंरेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे व्यक्तिमत्त्व कितीही रोखठोक...\nसत्य घटनेवर आधारित ‘टेक केअर गुड नाईट’ आगामी सिनेमा विशेष. पहा ट्रेलर\nमराठी सिनेमात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो,हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी...\nनंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री\nशर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर नंतर बिगबॉसच्या घरात आता वेळ आलीय अजून एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीची. होय...\nपुष्कर आणि आस्तादमध्ये बाचाबाची कालच्या खेळण्यांनी आज घेतला बदला\nमराठी बिगबॉस दिवस २५. आजचा घरातील दिवस नुसता बदला घेण्यासाठीचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं...\nबिगबॉस मराठी लॉन्च सोहळा\nमहाराष्ट्रात संगीत, नाच, किंवा इतर धर्तीवर आधारित कित्येक रिऍलिटी शोज् वाहिन्यांवर येऊन गेले. पण यापेक्षा सर्वात...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nबिगबॉस मराठी १५ एप्रिल पासून भेटीला महेश मांजरेकर करतायत होस्ट\n‘बिगबॉस चाहते है’ हे वाक्य कानावर पडताच काहीतरी औत्सुक्याचं घडणार हे निश्चित आता आपल्याला हे मराठीत...\nमहेश मांजरेकर होस्ट करणार बिगबॉस मराठी\nबिगबॉस म्हणजे सतत चर्चेत राहणारा रिएलिटी शो. सलग 11 सिझन्स पार पाडलेल्या ह्या शोचा होस्ट सलमान...\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nमराठी सिनेमाने वेगवेगळ्या विषयांवर दमदार भाष्य केलं आहे. साचेबद्धपणा सोडून प्रशंसनीय सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत....\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6", "date_download": "2019-03-25T07:27:16Z", "digest": "sha1:AIQWBMMVUEQEZDTWHS4IZQSRLJ5WADN3", "length": 8087, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बीजांडकोश - विकिपीडिया", "raw_content": "\nगर्भाशयाच्या दोन्ही बाजुला असणारे बीजांडकोश\nप्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. बीजांडनिर्मिती करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून इस्ट्रोजेन (Estrogen) व प्रोजेस्टेरॉन (Progesterone) ही संप्रेरकेही स्रवत असल्याने अंतःस्रावी ग्रंथी म्हणूनही ते काम करतात.\nबीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होते. हे संप्रेरक मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पोष ग्रंथीत (पिट्युटरी ग्रंथी - Pituitary gland) निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच बीजांडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन - Ovulation) असे म्हणतात.\nमुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सुमारे दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सुमारे तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या २०-२४ वर्षांच्या प्रजनन कालात त्यांतील फक्त ३०० ते ४०० अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा ऱ्हास होतो.\nमहिला स्वास्थ्य अभियान २०१८\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१८ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहिती���ाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/sare-pravasi/", "date_download": "2019-03-25T07:52:02Z", "digest": "sha1:NCIGJ5GGALI3TJHQM4HHYYB5O5J5K6OV", "length": 7558, "nlines": 68, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nसारे प्रवासी घडीचे, नांदू सुखे संगती.\nया दुनियेच्या अफाट हाटी\nपडती गाठी भेटी अवचित,\nबोलू संगे, चालू संगे\nखेळू नाचू हसू रुसू संगे.\nपाहू संगे सुख सोहाळे\nसाहू संगे विजा वादळे\nजीव संगे भाव संगे\nप्रीति मैत्रीच्या पावन तीर्थी\nन्हाऊ, देऊ जिवा सुख शांती.\nहिंदु मुसलमान ऐक्य या संवेदनशील विषयावरील 'शेजारी' या चित्रपटाच्या प्रत्येक गीतासाठी व्ही शांताराम यांनी अतिशय परिणामकारक प्रसंगांची निवड केली होती. \"शब्दात जेवढे लालित्य, चित्रमयता आणि वैविध्य आणता येईल तेवढे आणा\" अशी सूचना त्यांनी आठवल्यांना केली होती. मास्टर कृष्णराव यांच्याकडून आगळ्या वेगळ्या चाली काढून घेतल्या होत्या आणि बहारदार पार्श्वसंगीताची योजना केली होती. नायक नायिकांचे प्रेमप्रसंग खुलवणारी 'हासत वसंत ये वनी', राधिका चतुर बोले', अशी गोड प्रेमगीते आठवल्यांनी लिहिली. त्यात 'अलबेला; यासारखे अनवट शब्द वापरून ती खुलवली. 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' हे मशालींचे नृत्यगीत तर अजरामर आहे. आजही, सत्तर वर्षांनंतर ते अनेक कार्यक्रमात सादर होते आणि नव्या गाण्यांहून जास्त गाजते. धरण फुटून प्रलय होतो. गाव वाहून जाते असे दृश्य खरे वाटावे म्हणून ही शांताराम यांनी खास प्रल्हाददत्त नावाचा स्पेशल इफेक्ट्सचा तज्ञ आणला होता. त्या प्रसंगानंतरचे 'सारे प्रवासी घडीचे' हे समूहगीत त्यातल्या अर्थपूर्ण शब्दांनी चित्रपटाचा शेवट वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nहासत वसंत ये वनी अलबेला\nराधिका चतुर बोले, तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा\nजिवाचं मैतर तुम्ही माज्या\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा ���ाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Vegetable-prices-increased-mumbai/", "date_download": "2019-03-25T07:44:26Z", "digest": "sha1:46NIKIGN7TSE6UVBPNRAOQMFQLFJ4VRN", "length": 5208, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाज्यांचे भाव कडाडले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाज्यांचे भाव कडाडले\nराज्यभरातील शेतकर्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळेे शेतीमालाची आवक 10 ते 15 टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. अगोदरच इंधन दरवाढीमुळे गोरगरीब-मध्यमवर्गीय हैराण असताना भाजीपाला महागल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे.\nसरसकट कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव व व्यवस्थापन खर्च, शेतीपंपासाठी मोफत वीज यांसारख्या मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुकारलेल्या संपाच्या आवक घटल्याने मुंबईतील भायखळा येथील जुन्या भाजीपाला मंडईत शुकशुकाट दिसून आला. एकीकडे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांतील भाजीपाल्याची आवक कमी झाली असताना मात्र परराज्यांतून मात्र मालाची आवक सुरूच आहे.महाराष्ट्रातील भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे भाजीपाल्याचे वाढू लागले आहेत असे भाजीपाला विक्रेत्यांडून सांगण्यात आले.\nसंपाचा फायदा छोट्या व्यापा-यांनी उचलला\nदेशव्यापी शेतकरी संपामूळे शेतमालाची घट होण्यापुर्वीच याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. मुंबई, ठाणे आदी महानगरांमध्ये संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर छोट्या व्यापा-यांनी 20 ते 30 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चटका बसत असला तरी छोट्या व्यापा-यांनी मात्र भाज्यांची आवक कमी झाल्याचा चांगलाच फायदा घेतल्याचे दिसून आले.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/raigad-is-a-queue-and-it-will-remain-in-queue-eat-sambhaji-chhatrapati-new-update/", "date_download": "2019-03-25T08:01:31Z", "digest": "sha1:HCOTDZX3SNDBX7GM57LNADTPJ7CRM43R", "length": 6342, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रायगड रांगडा आहे आणि तो रांगडाच राहील ; खा.छत्रपती संभाजीराजे", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nरायगड रांगडा आहे आणि तो रांगडाच राहील ; खा.छत्रपती संभाजीराजे\nकोल्हापूर: कोरेगाव भीमा दंगलीनंतर संभाजी भिडे याचं नाव चर्चेत आहे. संभाजी भिडे यांची ओळख एक प्राध्यापक, समाजसेवक तर आहेच. नवीन म्हणजे भिडे यांनी रायगडावर ३२ टन सोन्याच सिहांसन बसवण्याचा संकल्प केला आहे. मात्र त्यासाठी प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. अमुक एकाच्या मनात आले म्हणून काही होणार नाही, तर प्राधिकरणाच्या कठोर चाचणीनंतरच एकेक गोष्ट पुढे सरकेल. असे मत खासदार व रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी (बुधवारी) पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.\nकाय म्हणाले खासदार छत्रपती संभाजीराजे\nरायगड रांगडा आहे आणि तो रांगडाच रा���ील. रायगडची अवस्था राजस्थानच्या किल्ल्यासारखी करायची नाही. रायगडच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता पुर्नबांधणी होईल यासाठी सहाशे कोटींची निधी मंजूर आहे. रायगडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) गडबडीत सादर झाला तरी त्यात तात्कालिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. गडाबरोबर लगतच्या गावांचा विकास महत्त्वाचा आहे. रायगडच्या परिक्रमेत २१गावे मोडतात. नव्याने ८८ एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. रायगड हा मॉडेल फोर्ट ठरेल; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांचाही इतिहास समोर यावा, यासाठी शिवसृष्टी साकारण्याचा विचार आहे. प्राधिकरणात पुरातत्त्व खात्यापासून तज्ज्ञांचा समावेश आहे.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nनानांच्या हाती पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा\nआमदाराची धास्ती की पंकजा मुंडेंचा उद्दामपणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-25T07:50:12Z", "digest": "sha1:QTTX5WA3WM4RV3WDRLANZ7UVID7KXWKA", "length": 15309, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हा रुग्णालयाला भुरट्या समाजसेवकांचा विळखा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्हा रुग्णालयाला भुरट्या समाजसेवकांचा विळखा\nचिरिमिरी घेउन मोफत उपचारांचा होलसेल धंदा\nसातारा- सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी मोफत उपचारासाठी लाईफ लाईन असणारे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय भुरट्या समाजसेवकांच्या कारनाम्यामुळे चर्चेत आहे. शंभर पाचशेच्या चिरिमिरीत दारिद्रय रेषेखालील रुग्णांकडून शासकीय मोफत उपचारांचा होलसेल धंदा तेजीत आला आहे. अशा नतद्रष्ट दलालांना प्रशासनातील कर्मचारी सामील असल्याने उपचारांच्या नावाखाली रुग्णांची लूट सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाचा कारभार सतत या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो याचे कारण येथील काही झारीतील शुक्राचार्य त्यांना सामील असलेले दलाल यांच्याकडून सर्वसामान्य रुग्णांना नाडण्याचे प्रकार सर्रास सुरु असतात.\nसाधारण पंधरा प्रकारच्या आजारांना जिल्हा रुग्णालयात दारिद्रय रेषेखालील रुग्णांना राजीव गांधी जीवनदायिनी योजनेअंर्तगत मोफत उपचार दिले जातात. यासाठी रुग्णांचा फोटो पिवळे रेशनकार्ड आधार कार्ड क्रमांक डॉक्टरची शिफारस केसपेपर अशा कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र त्यावर जिल्हा रुग्णालयातील शिक्क्यांची गरज असते. शिक्का आणि सही याकरिता गरीब रुग्णांकडून पाचशे ते हजार रुपयांच्या दरम्यान काम करणारी बोगस समाजसेवकांची टोळीच रुग्णालयात सक्रीय असल्याने जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना पध्दतशीरपणे नाडले जाते. रुग्णालयात दिवसाला शंभर ते सव्वाशे रुग्णांचा डिस्चार्ज होतो मात्र तो घेताना काही कागदपत्रांची पूर्तता तसेच मोफत उपचारांसाठी वैयक्तिक माहितीचे पुरावे छायांकित प्रतीत सादर करावे लागतात. मात्र याच कागदपत्रांच्या क्लिष्टतेचे बागुलबुवा उभा करून काही दलाल रुग्णालयातील काही ठराविक जणांकडे पोहोचून त्यावर शिक्का मारून घेतात. मात्र काही शिक्के आणि सह्यांची किंमत पाचशे ते हजार रूपयांच्या दरम्यान असतो. त्यामुळे दिवसाला दहा हजार रुपयांचे उखळ पांढरे करणारे दलाल सामान्यांच्या खिशाला चाट देतात.\nरुग्णांना लुटणाऱ्या दलालांना आवरा जिल्हा रुग्णालयाचा कारभार जिल्हा शल्यचिकित्सक चालवतात की झारीतले शुक्राचार्य हे कधीच समजून आलेले नाही. डॉ. श्रीकांत भोई यांच्या काळात या दलालांची मुजोरी फारच वाढली होती. अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार योग्य ती दलाली घेऊन सोयीस्कर प्रमाणपत्र देणाऱ्या महाभागांचा रुग्णालयात वावर असतो. अगदी जिल्हा परिषदेच्या घोळात अडकलेल्या शिक्षक बदल्यांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रे सरकारी आशीर्वादाने याच शुक्राचार्यांनी दिली होती अशी खाजगीमध्ये खसखसं आहे. आता डॉ आमोद गदीकर यांच्या राज्यात तरी गरीबांना न्याय मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.\nजिल्हा रुग्णालयात सुविधा आणि मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. याशिवाय प्रत्येक विभागातील सुप्त दलालीचा चाललेला खेळ ताबडतोब थांबवण्याची गरज आहे. डॉ. आमोद गडी कर यांनी मावळ तालुक्यात आपल्या कामाची चांगलीच छाप उठवली आहे. रुग्णालयाच्या आवारात विनाकारण रेंगाळणाऱ्या बिनकामाच्या समाजसेवकांना चाप लावण्याचे आव्हान नव्या जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर आहे.\nहात नसलेली ���र्चना सोडविते 10 वीचे पेपर\nभुईंज पोलीसांना कायद्यापेक्षा आयजी मोठा \nपवारांनी साताऱ्याची द ग्रेट सर्कस केली; पंजाबराव पाटलांची घणाघाती टिका\nमोदीनंतर आता पवारांची साताऱ्यात व्हिडीओ कॉन्फरन्स\nपक्षाने उमेदवारी दिल्यास खासदारकी ताकदीने लढू\nखासदार उदयनराजेंनी पुन्हा कॉलर उडवली\nछ. उदयनराजेंचे चिन्ह कोणते याचीच उत्सुकता\nसातऱ्यात राष्ट्रवादीचा दबावाच्या सर्जिकल स्ट्राईकशी सामना\n#व्हिडीओ : भारतीय वायूसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/cabinet-decision-updte/", "date_download": "2019-03-25T08:34:29Z", "digest": "sha1:HRHU5ZNTV4FXKQES4QC3VHN53EW2DMYW", "length": 7917, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भूमीहिनांना जमिन द���ण्यासाठी जमीन मालकाला मिळणार रेडी रेकनरच्या दुपटीपर्यंत मोबदला", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभूमीहिनांना जमिन देण्यासाठी जमीन मालकाला मिळणार रेडी रेकनरच्या दुपटीपर्यंत मोबदला\nमुंबई : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमीहिन लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जमीन मालकाला रेडी रेकनर दराच्या दुपटीपर्यंत मोबदला देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीये.\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावण्यासह त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. याअंतर्गत संबंधित समाजातील दारिद्र्यरेषेखालील आणि भूमीहिन शेतमजूर कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.\nयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वर्ष 2012 मध्ये केलेल्या बदलांनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रथमत: प्रचलित रेडी रेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करेल. रेडी रेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन उपलब्ध होत नसल्यास जमिनीच्या मुल्याबाबत संबंधित जमीन मालकाशी वाटाघाटी करण्यात येतील. त्यानुसार रेडी रेकनरची किंमत अधिक 20 टक्क्यांपर्यंत प्रथम वाढ देण्यात येईल. तरीसुद्धा जमीन विकत मिळत नसल्यास 20 टक्क्यांच्या पटीत 100 टक्क्यांपर्यंत म्हणजेच रेडी रेकरनर दराच्या दुपटीपर्यंत मोबदला देण्यात येईल.\nहा मोबदला प्रती एकर तीन लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत निश्चित करण्यात येत होता. मात्र, गेल्या का��ी वर्षात जमिनीच्या दरांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता या योजनेचा लाभ अधिकाधिक कुटुंबांना मिळण्यासाठी जमीन खरेदी किंमत आणि शासन निधीच्या निकषामध्ये सुधारणा करण्यासह जमीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nचंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे- अशोक चव्हाण\nअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षकच्या १२० जागांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-played-cricket-in-parali/", "date_download": "2019-03-25T08:15:52Z", "digest": "sha1:B26VE5KULULYN5HCIGUOBGEX3DEFFXCP", "length": 7505, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...जेव्हा क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडे नावाचं वादळ येतं.", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\n…जेव्हा क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडे नावाचं वादळ येतं.\nपरळी :आपल्या आक्रमक, अभ्यासपूर्ण भाषणशैलीमुळे सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे याच आज एक वेगळं रूप पहायला मिळालं. एरव्ही आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी करणारे धनंजय मुंडे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडताना पहायला मिळाले . फक्त राजकारणातच नव्हे तर मैदानात देखील आपणच सबसे बडा खिलाडी असल्याचं दाखवून दिलं.\nशेतकऱ्यांच्या , सर्वसामान्यांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे नेहमीच आक्रमकपणे जनतेची बाजू मांडत असतात.त्यांच्या याच आक्रमक राजकारणाच्या याच स्टाईलमुळे ते महाराष्ट्रभर ओळखले जातात आणि हे सर्वच जण जाणतात. मात्र मुंडे हे उत्तम फलंदाज देख��ल आहेत हे खूप थोड्या लोकांना माहित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून सरपंच चषक या दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन , वाव मिळावा यासाठी परळीत सुरु असलेल्या या टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेत ( सरपंच चषक ) संयोजक आणि खेळाडूंच्या आग्रहास्तव मुंडे सहभागी झाले .\nधनंजय मुंडे यांनी परळी येथील नगरसेवक 11 विरुद्ध जिल्हा परिषद सदस्य 11 या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली एवढंच नव्हे तर संघाला विजय मिळवून देत नाबाद राहिले. शालेय जीवनापासूनच क्रिकेटची विशेष आवड असलेल्या मुंडे यांनी यापूर्वीपण ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. तसेच अनेकवेळा एका संघाच्या माध्यमातून यशस्वी फलंदाजीसुद्धा केलेली आहे.यानिमित्ताने नेहमी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चौफेर फटकेबाजी करणारे धनंजय मुंडे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना दिसले.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nBirthday Special- ऑस्कर विजेता ए. आर. रहमान बद्दल जाणून घ्या या गोष्टी\nया वर्षी वरून धवन अडकणार लग्नाच्या बेडीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/accident-in-baglkot-nine-dead/", "date_download": "2019-03-25T08:18:12Z", "digest": "sha1:KSJ6TY3R66DW65CEJA7INMVGRIIC2D7V", "length": 3940, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रकने बैलगाडीला उडवल्याने 9 ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ट्रकने बैलगाडीला उडवल्याने 9 ठार\nट्रकने बैलगाडीला उडवल्याने 9 ठार\nभरधाव ट्रकने बैलगाडीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात बैलगाडीतील 9 जण ठार झाल्याची दुर्घटना बेळगावबागलकोट राष्ट्रीय महामार्ग 20 वरील रक्कसगी (ता.हुनगुंद) येथे शुक्रवारी रात्री घडली.\nअपघातातील सर्व मृत रक्कसगी येथील असल्याचे समजते. चंद्रय्या हिरमेठ (वय 50), पत्नी रत्नव्वा (वय 40), मुलगी काशम्मा (वय 30), विजयालक्ष्मी चं. हिरेमठ (वय 23), सिद्दम्मा हूगार (वय 58), गंगम्मा हूगार (वय 55), बसम्मा गोरवर (वय 55) हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेले संगनबसप्पा हिरेमठ (वय 68) व गंगम्मा गौडर (वय 44) यांचा इस्पितळात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. शेतकरी कुटुंबातील हे सर्वजण तुरीची मळणी करून रक्कसगी येथील आपल्या घराकडे बैलगाडीतून येत असताना विरुद्ध दिशेने आलेला ट्रक बैलगाडीवर आदळला. अपघातात दोन बैलांचाही जागीच मृत्यू झाला. अमीनगड पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Natioanl-Congress-Party-Criticised-devendra-fadanvis-government-In-kolhapur/", "date_download": "2019-03-25T07:42:26Z", "digest": "sha1:XL2Q4PUGIESVFI372RLV7EJUWNF6PYPH", "length": 7168, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'आई अंबाबाई महाराष्ट्राला वाचव'; पवारांचे देवीला साकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › 'आई अंबाबाई महाराष्ट्राला वाचव'; पवारांचे देवीला साकडे\n'आई अंबाबाई महाराष्ट्राला वाचव'; पवारांचे देवीला साकडे\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\n'पीएनबी घोटाळा, उद्याोजक आणि मंत्र्यांचे कर्ज प्रकरणे, भ्रष्टाचार या सगळ्यातून महाराष्ट्राला वाचव', असे साकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अंबाबाईच्या चरणी घातले. मंत्र्यांचे कर्ज सेटल होतं, निरव मोदी पैसे घेऊन पळून जातो, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. इतर राज्यांत पेट्रोल स्वस्त आहे, महाराष्ट्रातच महाग का असे सर्व प्रश्न घेऊन आम्ही हल्लाबोल करत आहोत, असेही ते म्हणाले. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरूवात पश्चिम महाराष्ट्रातून झाली. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले आणि राज्याला वाचव असे साकडे घातले.\nसभागृह म्हणजे काय प्राणी संग्रहालय वाटलं का\nमंत्रालयात उघडकीस आलेला उंदीर घोटाळा यावरूनही त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारतर्फे केवळ उंदीर, वाघ, सिंह याची चर्चा झाली. सरकारला सभागृह म्हणजे काय प्राणी संग्रहालय वाटलं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन होतं पण सर्व राहिले बाजूला सरकारने या अधिवेशनाच्या माध्यमातून काहीही केले नसल्याची टीकाह अजित पवार यांनी केली.\nया सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना या भागात विशेष लक्ष होते. आज राज्यात प्रत्येक घटकाचे मोर्चे निघत आहेत. सरकार शाळा बंद करत आहे. पेपर फुटतात, कायदा सुव्यवस्था नीट नाही. सरकार यावर उत्तर देत नाही, वेळ मारून नेत आहे असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. राज्यातील अस्वस्थता संपू दे, शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे जाऊ दे, म्हणून माता अंबाबाईला साकडं घातल असल्याचेही ते म्हणाले.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-traffic-story/", "date_download": "2019-03-25T07:46:25Z", "digest": "sha1:IZSKL6IJULTBRWQVZKOTPZZUCK4GKALH", "length": 8578, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आम्हाला काय कुणाची भीती! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आम्हाला काय कुणाची भीती\nआम्हाला काय कुणाची भीती\nकोल्हापूर : विजय पाटील\nदुकानात जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून सुर्या बिल्डर वन वे असणार्या रस्त्याचा वापर करतो. समोरून येणार्याने जर सुर्या बिल्डरला हटकला तर तो त्यालाच दंडाची बेडकुळी फुगवून तराटणी देत निघून जातो. टॉम्या शायनर तर एकाही सिग्नलला थांबत नाही. त्याच्या या पराक्रमाचं () कौतुक कॉलेज कॅम्पसमध्ये त्याच्या मैत्रिणीही करतात म्हणे. अशी फुकाची मर्दुमकी दाखवणारे कोल्हापुरात पायलीला पन्नास सापडतात. आम्हाला काय कुणाची भीती) कौतुक कॉलेज कॅम्पसमध्ये त्याच्या मैत्रिणीही करतात म्हणे. अशी फुकाची मर्दुमकी दाखवणारे कोल्हापुरात पायलीला पन्नास सापडतात. आम्हाला काय कुणाची भीती असं वागणं असणार्यांना दोन-चार दिवस तुरुगांची हवा खायला मिळाली तरच कदाचित हे सुधारतील आणि नियमांचा सन्मान करतील.\nसुरक्षित आणि विना त्रास प्रवासाचा आनंद वाहतुकीचे नियम पाळणार्यांना दोनशे टक्के होतो हे उघड आहे, पण सहज नियम मोडण्याची स्पर्धा असल्यासारखे वर्तन करणार्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळेच अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाहतूक कोंडी तर सगळ्यांनी मान्य केलेली समस्या बनली आहे. लाल मुंग्याचं निरीक्षण केले तर दिसेल त्या कशा शिस्तबद्ध रांगेत आपले काम करतात. त्यांच्या शिस्तीमुळे हजारो मुंग्या असतानाही गर्दी दिसत नाही की गोंधळ वाटत नाही. हाच वाहतुकीचा प्रमुख नियम आहे.\nलायसन्स काढताना वाहतुकीचे नियम माहिती असणे आवश्यक असते. सरळ आणि सोपे हे नियम असतात, पण बहुतांश जण हे नियम पाठ करण्यापेक्षा एजंटाला गाठून लायसन्स मिळवून रिकामे होतात. हे नियम आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी असतात हेच विसरले जाते.\nआज सव्वाअकराच्या सुमारास एक तरुण पार्वती टॉकीज सिग्नल चौकात सिग्नल तोडून सुसाट गेला. पुढच्या चौकातील सिग्नल तोडून तसाच पुढे जाताना एका वाहनधारकाने त्याला हळू जा की कोर्टात तारीख आहे काय असा टोला मारला असता या बहाद्दराने तुझं काम बघ. माझ्या नादाला लागू नकोस, असा दम भरला आणि पुन्हा सुसाट निघून गेला. या पठ्ठ्याने एकूण चार सिग्नल तोडले. याचाच अर्थ त्याने चार माणसे मारली असती, असा होऊ शकतो; पण पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या प्रसंगावधनाने त्यांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्यावर कारवाई केली आहे, पण अशा मंडळींवर कडक कारवाई केली तरच अशांची गुर्मी उतरेल, अन्यथा यांच्यामुळे अपघात ठरलेला आहे.\n16 लाखांचा दंड भरूनही...\nगतवर्षी कुठेही पार्किंग करून वाहतुकीला अडथळा करणार्या शहरातील 7 हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड करूनही अडथळा करणार्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.\nवनवेतून उलट्या दिशेने वाहन नेणार्यांपैकी 65 टक्के लोकांचा अपघात होत असल्याचे वाहतूक जागृती सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे, तर अतिवेगाने वाहन चालवणार्यांपैकी 57 टक्के लोकांचा प्रवास जीवघेणा आणि धोकादायक ठरू शकतो, असेही हे सर्वेक्षण सांगते. महाद्वार रोडमध्ये पापाची तिकटी येथून अनेक वाहनधारक घुसतात. हीच स्थिती शिवाजी रोडची आहे. हाच प्रकार बिंदू चौक ते मिरजकर तिकटी मार्गाचा आहे.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/women-murder/", "date_download": "2019-03-25T08:09:28Z", "digest": "sha1:F7RSWGJHC76CPM6ZH7Y64AG5EM2TAHAD", "length": 4649, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा महिलांकडून विवाहितेचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सहा महिलांकडून विवाहितेचा खून\nसहा महिलांकडून विवाहितेचा खून\nप्रेमसंबधांचा संशय आल्याने दहींबे येथील आदिवासी जमातीतील रेखा लक्ष्मण मुकना (वय 43) या प्रौढ महिलेला सहाजणींनी मिळून ठार मारले आहे. ही घटना 22 मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात मृत महिलेची मुलगी निशा नितीन मोरे (29, रा. दहींबे आदिवासीवाडी) हिने मंडणगड पोलिस ठाण्यात दि.23 मे रोजी दुपारी फिर्याद दाखल केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील मृत महिला व शांताराम रावजी जाधव यांचे प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज करून वाडीतीलच संगीता शांताराम जाधव, शोभा सुरेश मुकना, चंद्री सहदेव मुकना, योगिता योगेश जाधव, वत्सला शंकर जाधव, भागी प्रकाश मुकना (सर्व रा. दहींबे आदीवासीवाडी) या सहा महिलांनी मिळून 22 मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेखा मुकना हिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण ���ेली. यातील संगीता शांताराम जाधव हिने काठीने मारहाण करून रेखा हिच्यावर दगड फेकून मारले. सहाजणींनी केलेल्या मारहाणीत रेखा हिचा मृत्यू झाला आहे.\nयाबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/risk-is-increasing/", "date_download": "2019-03-25T07:44:10Z", "digest": "sha1:ZCQTHNOALSVDOJFRX25VWSLIE6X5N2GE", "length": 8297, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धोका वाढतो आहे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › धोका वाढतो आहे\nस्वाईन फ्लूने ऑगस्ट महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक महिला उस्मानाबाद, दुसरी हडपसर तर तिसरी शिवाजीनगर येथील राहणार्या होत्या. सध्या 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मृत्यू झालेल्या महिलांपैकी तिघींनाही उपचारादरम्यान न्युमोनिया झाला होता, तर देाघींचे अवयव निकामी झाले होते.\nमूळ येवती, उस्मानाबाद येथील 36 वर्षीय महिलेचा 3 ऑगस्टला शहरातील पुणे स्टेशन जवळील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरवातीला तिला सोलापुर येथील रुग्णालयात दाखल केले असता, 22 जुलै रोजी स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले होते. नंतर या महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान स्वाईन फ्लूसह न्युमोनिया, सेप्टीसेमिया आणि विविध अवयव निकामी झाल्याने 3 ऑगस्टला रात्री एक वाजता मृत्यू झाला. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे राहणार्या एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू 19 ऑगस्टला सकाळी कर्वे रोडवरील खासगी रुग्णालयात झाला.\nतिला 18 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. या महिलेला आधीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब हा त्रास होता. तसेच तिची हृदयाची शस्त्रक्रियाही ���ाली होती. अठरा ऑगस्ट रोजी सकाळी तीव्र श्वसनविकार, स्वाईन फ्लू, न्युमोनिया आणि विविध अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. हडपसर येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू 21 ऑगस्ट रोजी एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात झाला. या महिलेला पुर्वीचा कोणताही आजार नव्हता. 14 ऑगस्ट रोजी तिला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. स्वाइन फ्लूसह तीव्र श्वसनविकार, न्युमोनिया, सेप्सिस यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.\nशहरात सध्या विविध रुग्णालयात स्वाईन फ्लूचे 15 रुग्ण उपचार घेत अहेत. त्यातील 11 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आतापर्यंत 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वर्षी आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या संशयावरुन 5 लाख 61 हजार 817 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 5 हजार 374 जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. त्यातील आठशे रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाची तपासणी करण्यात आली असून, यातील 36 रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. तर बुधवारी 3 हजार 258 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 34 जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. तर, 5 जणांच्या घशातील द्रव पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यातील 4 जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.\nपिंपरीत चार पॉझिटिव्ह रुग्ण\nपिंपरी : पिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज एक तरी संशयित रुग्ण सापडतो आहे. गुरुवार आणखी चार स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले आहेत. शहरात स्वाईन फ्लूने सध्या 3 जणांचा बळी घेतला आहे. तर 105 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-education-Sector-Private-Companies-issue/", "date_download": "2019-03-25T07:42:22Z", "digest": "sha1:MT5Z6IVZJ7OO6M63CV6W4EUXQFU54ROR", "length": 6374, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा\nशिक्षक, संस्थाचालकांचा धडक मोर्चा\nराज्य सरकारने शिक्षण क्षेत्र खासगी कंपन्यांना देण्याचा घाट घातला आहे, तो थांबवावा. दहा विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, वेतनेत्तर अनुदान त्वरित द्यावे, आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालक आज रस्त्यावर उतरले. सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.\nदरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा, शाळा इमारतींना कुलूप लावण्याचा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी दिला. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून दुपारी दोनच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, शिक्षण संस्था संघटनेचे खजिनदार रावसाहेब पाटील, आर. एस. चोपडे, एस. डी. लाड, सुभाष माने, राजेंद्र नागरगोजे, अशोक थोरात, विनायक शिंदे, रघुनाथ सातपुते आदी सहभागी झाले होते. तसेच सांगली शहरासह जिल्ह्यातील शिक्षकही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाषणे झाली. त्यामध्ये मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा, प्रसंगी परीक्षावर बहिष्कार टाकत शाळा इमारतींना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळातर्फे मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे, विद्यार्थी संख्येवर आधारीत संच मान्यतेचा आदेश रद्द करावा. इमारत भाडे मिळावे, थकीत वेतनेत्तर अनुदान तातडीने द्यावे, मुक्त शाळा जी.आर. रद्द करावा, पटसंख्येच्या आधारे शाळा बंद करू नये, शाळा तेथे मुख्याध्यापक पद असावे या मागण्या केल्या आहेत.\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियु���्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nमोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली, मुंबई, गोव्यात अलर्ट\nसुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले\n'या' कारणामुळे आरके स्टुडिओच्या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद (Video)\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Over-a-year-BJP-government-says-Prithviraj-Chavan/", "date_download": "2019-03-25T08:18:59Z", "digest": "sha1:NGPTU462JE3XYQNWE5H25XREN6CO4J56", "length": 7857, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वर्षभरच भाजपचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वर्षभरच भाजपचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण\nवर्षभरच भाजपचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण\nकराडात नगरसेवकांनी विश्वासघात केल्याचे सांगत कोणी आपल्या अडचणी तर कोणी आरक्षण उठवण्यासाठी भाजपाकडे जात आहे. मात्र वर्षभरच भाजपाचे सरकार आहे. आता मुख्यमंत्री सर्वांनाच क्लिन चिट देत आहेत. त्यामुळेच तक्रार करूनही काही उपयोग होत नाही. मात्र आपण लोकांच्या तक्रारींबाबत माहिती घेत असून प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्याचे स्पष्ट संकेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.कराडमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आ. चव्हाण यांनी कराड नगरपालिकेबाबत मनात असलेली खंत बोलून दाखवली.\nआ. चव्हाण म्हणाले, मी नगरपालिका राजकारणात कधीच पडलो नव्हतो. मात्र 2016 ची निवडणूक लढवताना आपले नेतृत्व पुढे करून आघाडी करण्यात आली होती. लोकांसमोर या आघाडीच्या माध्यमातून जाऊन बहुमतही मिळवले. मात्र त्यानंतर नगरसेवकांनी विश्वासघात केला. मी नगरपालिकेला भरपूर निधी दिला होता. लोकांकडून या कामांच्या दर्जाबाबत तक्रारी कानावर पडतात. त्यामुळेच या तक्रारीबाबत आपण माहिती घेत आहोत.\nराज्यात मुख्यमंत्री राजकारण लक्षात घेत सर्वांनाच क्लिन चीट देत आहेत. कराडमध्येही काहीजण न्यायालयात गेले होते. मात्र मंत्र्यांनी अधिकारांचा वापर करत काहींना अभय दिले आहे. जर शासनच चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत असेल तर काय होईल असा प्रश्न उपस्थित करत आपण माहि��ी घेत असून भाजपाचे सरकार वर्षभरच सत्तेवर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आमचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचे सांगत आ. चव्हाण यांनी विरोधकांना अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला आहे.\nदरम्यान, मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक ही विकासकामांवरच होणार आहे. नगरपंचायतीची नगरपालिका झाली असती, तर वाढीव निधी मिळाला असता. मात्र राजकारण डोळ्यासमोर ठेऊन नगरपंचायतीची नगरपालिका होण्यास विरोध केला जात आहे. त्यामुळे मलकापूरला नगरपालिका म्हणून मिळणारा जादा निधी आता मिळणार नाही. म्हणून विकासकामांना कोण विरोध करत आहे हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.\nराज्यमंत्री, छे... त्यांना कसले अधिकार \nभाजपने कराड दक्षिणमध्ये दोन राज्यमंत्रीपदे दिल्याकडे लक्ष वेधले असता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे कोणाला काय अधिकार असतात याची जाणीव आपणास आहे. अशा राज्यमंत्र्यांना कसले अधिकार याची जाणीव आपणास आहे. अशा राज्यमंत्र्यांना कसले अधिकार असा उपरोधिक प्रश्न आ. पृृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच दोनच काय पण, आणखी तीन ते चार जणांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला तरी काहीही फरक पडणार नाही, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nसपना चौधरीने केले कन्फ्युज; भाजपमध्ये प्रवेश\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.farmguru.in/new-blog/2015/11/27/--1", "date_download": "2019-03-25T08:03:03Z", "digest": "sha1:SFQXVKZZXA3V4MNUADF7JYPZQIIP34SX", "length": 3051, "nlines": 35, "source_domain": "www.farmguru.in", "title": "कांदा ग्रुप कॅम्पेन — farmguru", "raw_content": "\n२ डिसेंबर २०१५ पर्यंत\nधनलक्ष्मी कॅम्पेनला प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार फार्मगुरू घेऊन आल आहे नविन \"ओनिअन ग्रुप कॅम्पेन\". यामध्ये कांदा उत्पादकांसाठी व्यापक पीक सरंक्षण आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, अॅनट्राकॉल व कांद्यावरील मावा व विविध कीटकावर नियंत्रण करणारी कराटे, कॉन्फिडोर आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी, दर्जेदार उत्पादनासाठी ह्युमीक अॅसिड तसेच खास कांद्यासाठी वापरली जाणारी तणनाशक गोल आणि टर्गा सुपर ही उत्पादने आहेत. ७ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत.\nसंपूर्ण ७ उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक १०० रुपये सूट.\nफार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा.\n१०० % मूळ उत्पादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/pandurang-bheti/", "date_download": "2019-03-25T07:45:57Z", "digest": "sha1:OAJP7DNZ6KUQZ2BK2PQTQXMW4KFB2CAR", "length": 5757, "nlines": 66, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nपांडुरंग भेटी वैष्णव निघाले\nपांडुरंग भेटी वैष्णव निघाले\nविठ्ठल विठ्ठल घोषे अंबर कोंदले.\nउभा विटेवरी आम्हा विठ्ठल हाकारी\nपंढरीसी जाऊ, जाऊ चंद्रभागे तीरी\nपंढरीसी जाऊ, जाऊ विठूच्या नगरी.\nजाऊ कशी, पाहू केवी रुपडे सावळे\nजिऊ उताविळ माझा शिणुले डोळुले.\nठायी ठायी वाटे काटे, अंधकार दाटे\nनुरे आस कासावीस, लेकरू धाकुटे.\nदावी दावी चरण माये, निववी लोचन\nमहासुख लाहीन मी, श्रीमुख पाहीन.\n'संत सखू' हाही प्रभातच्या संतपटांच्या पठडीतील आणखी एक चित्रपट. भक्तीरसातील गीते हे त्या चित्राचेही वैशिष्ठ्य ठरले. या चित्रपटापासून गाण्यांना उसना आवाज देण्यात येऊ लागला. संत सखूचे काम करणाऱ्या हंसा वाडकर यांच्यासाठी विनोदिनी देसाई यांचा आवाज वापरण्यात आला.\nपांडुरंग भेटी वैष्णव निघाले\nभाव भुकेला हरी करीतसे भक्तांची चाकरी\nशुभ बोल मुखे बोलावे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड��या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-June2017-Moringa.html", "date_download": "2019-03-25T07:50:22Z", "digest": "sha1:BY2NK3NEGXAFDI7UVGDAFOXHDPBRUM7K", "length": 21202, "nlines": 32, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड व तंत्रज्ञान व्यवस्थित वापरले तर इतर पिकांपेक्षा चांगला फायदा होतो", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड व तंत्रज्ञान व्यवस्थित वापरले तर इतर पिकांपेक्षा चांगला फायदा होतो\nश्री. बाळासाहेब महादेव शेलार, मु.पो. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे, मो. ८६९८९०९७७९\nआम्ही पुर्वी ऊस पीक घेत होतो. मात्र पुढे उसाला पाणी, खते जादा लागूनही उत्पादन (टनेज) पाहिजे तसे मिळत नव्हते. तसेच ह्या पिकाला लागणार कालावधी जादा, म्हणजे १ ते १ वर्षातून १ पीक, एकरी ५० - ५५ टनाचा उतारा आणि १६०० - १७०० रु./ टन भाव. या सर्वांमुळे ऊस पीक काही परवडेनासे झाले. त्यामुळे आम्ही नगदी पिकाच्या शोधात होतो. मार्केटमध्ये कोणत्या पिकाला भाव आहेत याचा शोध घेतला. त्यानंतर आम्ही कलिंगड, खरबुज या पिकांची निवड केली. त्यापासून उत्पादन बरे मिळाले. मात्र यासाठी मजुरी व औषध फवारण्या यांचा खर्च वाढू लागला. त्यामध्येही पुढे मजुर मिळेनासा झाल्याने कलिंगड, खरबुजाची शेती कठीण जाऊ लागली. मग याला पर्यायी पिकाचा शोध चालूच होता. तेव्हा बाजारपेठेत शेवगा पिकाला भाव स्थिर असल्याचे लक्षात आले. मग चांगल्या वाणाच्या शोधात होतो. मग पुर्वी ५ - ६ वर्षाअगोदर लिंबू पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे सरांच्या मार्गदर्शनानुसार वापरली होती. तेव्हा त्याचे रिझल्ट चांगले मिळाले होते. मात्र पुढे लिंबाची रात्रीचीच चोरी होऊ लागल��याने उत्पादन येऊनही परवडेनासे झाले. तेव्हा डॉ.बावसकर सरांनी मला 'सिद्धीविनायक' शेवग्याबद्दल माहिती दिली होती. त्यावरून मी २०१५ मध्ये सरांचाच 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचे ठरविले.\nजून २०१५ मध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा बियाची २० पाकिटे आणि जर्मिनेटर १ लि. घेऊन गेलो. बियाणे जर्मिनेटर १०० मिली + २ लि. पाणी या द्रावणात रात्रभर भिजवून सावलीत सुकविले. तत्पुर्वी उन्हळ्यात जमिनीची मशागत केली. प्रथम नांगरट करून कल्टिव्हेटर मारून १० फुट अंतरावर ट्रॅक्टरने सऱ्या पाडल्या आणि नेटाफेमचे ठिबक अंथरून घेतले. बी लागवडीपुर्वी २ द्विस अगोदर १२ तास ठिबक चालवले. त्यामुळे जमिनीत गारवा निर्माण झाला. मग दुसऱ्या दिवशी चिखल असल्याने तिसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर बायांना जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केलेले बी आणि ५ फुट लांबीची काठी दिली. मग ५ फुटाच्या काठीने मापे घेऊन ५ - ५ फुटावर वाफश्यावर खुरप्याने गल पाडून त्यामध्ये १ - १ चमचा कल्पतरू खत आणि निबोंळी पेंड टाकून त्यावर थोडी माती ढकलून बियांची टोकण (थेट जमिनीत लागवड) केली. ठिबक दररोज १ तास (ताशी ३ लि.) बी उगवेपर्यंत चालवले. सुरुवातीची वाफसा अवस्था व जर्मिनेटरची बीज प्रक्रिया यामुळे ५ व्या दिवशी कोंब दिसला. आठवड्यात उगवण पुर्ण झाली.\n फुट वाढ होईपर्यंत ठिबकने दिवसाआड पाणी १ ते २ तास असे सकाळी १०.०० वा. च्या आत देत असे. महिन्याभरातच १ ते २ तास असे सकाळी १०.०० वा. च्या आत देत असे. महिन्याभरातच १ फुट उंचीची झाडे झाली. या अवस्थते डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरच्या १५ लि. पंपास प्रत्येकी ३० मिली प्रमाणे १५ दिवसाला अशा २ फवारण्या केल्या होत्या. त्यानंतर २ फुट उंचीची झाडे झाली. या अवस्थते डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरच्या १५ लि. पंपास प्रत्येकी ३० मिली प्रमाणे १५ दिवसाला अशा २ फवारण्या केल्या होत्या. त्यानंतर २ फुटाची झाडे होईपर्यंत फक्त पाणी गरजेनुसार २ - ३ दिवसाआड देत होतो.\n फुट उंचीचा शेवगा झाल्यावर फुटवे निघण्यासाठी प्रथम शेंडा खुडला. त्यानंतर ४ - ४, ५ - ५ फुटवे निघाले. या फांद्या १ फुट लांबीच्या झाल्यावर त्याचाही शेंडा खुडला. त्यानंतर झाडांचे पोषण होण्यासाठी १ घमेले शेणखत, २५० ते ३०० ग्रॅम कल्पतरू खत, २५० ग्रॅम निंबोळी पेंड असा खताचा डोस प्रत्येक झाडास देऊन छोट्या ट्रॅक्टरने ओळीच्या दोन्ही बाजुने सरी पाडून झाडांना मातीची भर लावून बेड तयार केले व त्यावरून ठिबकची लाईन सोडली. बेड तयार झाल्यावर पाण्याचे प्रमाण वाढविले. दिवसाआड ३ तास ठिबक चालू ठेवू लागलो. (तासाला ३ लि. प्रमाणे ९ लि. प्रत्येक झाडास पाणी देऊ लागलो.) त्यावेळी ठिबकमधून १२:६१:० २ किलो/ एकरी १५ दिवसाला असे ३ वेळा सोडले. मग फुटवे जोमदार झाल्यावर १३:४०:१३ हे १५ दिवसाला ३ - ४ किलो सोडत होतो. या १५ दिवसाच्या मध्ये ८ व्या दिवशी जर्मिनेटर एकरी १ लि. सोडत होतो. असे २ महिने सोडले. जर्मिनेटरमुळे मुळांची वाढ होऊन दिलेल्या खताला प्रतिसाद मिळून झाडे जोमाने वाढत होती.\n५ व्या महिन्यात फुल लागले त गळले. नंतर १५ दिवसांनी लागलेली फुले टिकली. त्या अवस्थेत जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंटच्या फवारण्या घेत होतो. त्यामुळे फुलातून वाध्या निधू लागल्या. हवामानात बदल जरी झाला तरी गळ होत नव्हती. प्रोटेक्टंटने मधमाशांचे प्रमाण वाढले होते. शंग लागल्यानंतर १ महिन्यांनी तोडा सुरू झाला. सुरूवातीला झाडाचा आकार लहान, ताकद कमी असते त्यामुळे शेंग ८ - ८ दिवसांनी तोडण्यास येते. पुढे जसे झाडाची ताकद वाढेल तसे शेंगाचे प्रमाण वाढून पोषण वेगाने होऊन लागले. तेव्हा ३ ऱ्या दिवशी तोडा करू लागलो.\nडिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी २०१६ या काळात ७० - ८० रु. किलो भाव मिळाला. शेंग हिरवीगार १ ते २ फुट लांबीची एकसारखी वजनदार मिळत होती. याकरिता सप्तामृतातील राईपनर, न्युट्राटोनचा अधिक फायदा झाला. आठवड्यातून ३ वेळा शेंगा काढत होतो. तोड्याला २०० किलो शेंग निघत होती. नंतर जसे ऊन वाढू लागले. तसा माल अधिकच वाढू लागला. तेव्हा ३०० ते ४०० किलो शेंगा मिळू लागल्या. जसे ऊन वाढू लागते तसे बाजारात मालाची आवक वाढते. त्यामुळे भाव कमी - कमी होत जातात. सुरुवातीचे ३ महिने (फेबुवारी २०१६ पर्यंत) ७० - ८० रु. ने जाणारी शेंग ५०, ४०, ३० रू. किलो मार्चमध्ये होऊन एप्रिलमध्ये १० रु. वर भाव आले. एकरी ७ - ८ टन असा २ एकरातून १५ टन माल पहिल्या बहाराचा मिळाला. याचे सरासरी ३० रु. किलो भावानुसार ४ - ४ ते २ फुट लांबीची एकसारखी वजनदार मिळत होती. याकरिता सप्तामृतातील राईपनर, न्युट्राटोनचा अधिक फायदा झाला. आठवड्यातून ३ वेळा शेंगा काढत होतो. तोड्याला २०० किलो शेंग निघत होती. नंतर जसे ऊन वाढू लागले. तसा माल अधिकच वाढू लागला. तेव्हा ३०��� ते ४०० किलो शेंगा मिळू लागल्या. जसे ऊन वाढू लागते तसे बाजारात मालाची आवक वाढते. त्यामुळे भाव कमी - कमी होत जातात. सुरुवातीचे ३ महिने (फेबुवारी २०१६ पर्यंत) ७० - ८० रु. ने जाणारी शेंग ५०, ४०, ३० रू. किलो मार्चमध्ये होऊन एप्रिलमध्ये १० रु. वर भाव आले. एकरी ७ - ८ टन असा २ एकरातून १५ टन माल पहिल्या बहाराचा मिळाला. याचे सरासरी ३० रु. किलो भावानुसार ४ - ४ लाख रु. झाले. यासाठी एकूण ७० -८० हजार रु. खर्च आला.\nमग पुढे भाव कमी झल्यावर मे २०१६ मध्ये झाडांची छाटणी केली. जमिनीपासून १ ते १ फुट खोड ठेवून छाटणी केली आणि जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. हे २०० लि. पाण्यातून फवारले. यामध्ये १०० मिली नुवान वारपले. नुवानने आळीचा प्रादुर्भाव टळला आणि जर्मिनेटर, प्रिझममुळे फुटवा चांगला वेगाने निघाला. खोडाला १०:२६:२६ ४०० ग्रॅम , कल्पतरू ३०० - ४०० ग्रॅम, निंबोळी पेंड ५०० ग्रॅम असा प्रत्येक झाडास रिंग पद्धतीने खताचा डोस दिला. सप्तामृत फवारणी बरोबर किटकनाशकही पौर्णिमेच्या व अमावास्येच्या आदल्या दिवशी अशी नियमित १५ दिवसाला घेत होतो.\nपाणी नेहमीप्रमाणे दिवसाआड ३ - ४ तास देत होतो. सुरूवातीला ३ फुटावर शेंडे खुडले. पुढे जसे फुटवे निघून ३ फुटाचे होतील तशी शेंडे खुडणी चालूच होती.\nमग हा बहार पुन्हा नोव्हेंबर २०१६ ला सुरू झाला. हा दुसरा बहार असल्याने झाडाची खोडे मजबूत होती. त्यामुळे पहिल्या बहारापेक्षा जादा माल लागला. फुटवे निघून फुलकळी निघताना १२:६१:० हे १५ दिवसाला ४ किलो असे २ वेळा सोडले. त्यानंतर शेंगा लागल्यावर १३:४०:१३ हे ४ किलो १५ दिवसाला असे २ - ३ महिने दिले. मध्ये १५ दिवसाला सप्तामृत फवारणी चालूच असते. या व्यतिरिक्त काही वापरत नाही. पावसाळी हवामानाचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर फवारतो, त्यामुळे शेंग वाकडी होत नाही. शेंग हिरवीगार, वजनदार निघण्यासाठी राईपनरसोबत न्युट्राटोन वापरतो. तसेच परागीभवनासाठी प्रोटेक्टंट घेतो. यासर्वांमुळे फलधारणा चांगल्या प्रकारे होऊन शेंगा हिरव्यागार, वजनदार मिळतात.\nनोव्हेंबरमध्ये सुरुवातीला ४० - ५० किलो शेंगा ४ थ्या दिवशी निघाली. पुढे तिसऱ्या दिवशी १०० किलो अशी वाढत जाऊन डिसेंबरमध्ये २०० किलो शेंगा निघू लागल्या. जानेवारीत ३०० किलो निघू लागल्या. फेब्रुवारी - मार्चमध्ये याच पद्धतीने ३०० ते ५०० किलोपर्यंत शेंगा तोड्याला (३ ऱ्या द��वशी) निघत होत्या. चालूवर्षी भाव कमी होता. तरी इतरांना ७ - ८ रु. भाव असताना आम्हाला १० - ११ रु./किलो भाव मिळत होता. आतापर्यंत (एप्रिल २०१७ अखेर) या बहाराचा एकूण १० टन माल विकला आहे. जाऊन तोडे चालू आहेत.\nशेंगाची काढणी सकाळी ७ वाजता सुरू करतो. घरची ३ माणसे ९.३० - १०.० वाजेपर्यंत ३०० किलो शेंगा काढतात. शेंगा काढल्यानंतर सावलीला तळवटावर ठेवून शेंगावर पाणी मारतो आणि हडपसर मार्केटला पाठविण्यासाठी २ किलोचे व पुणे गुलटेकडी मार्केटला पाठविण्यासाठी २ किलोचे व पुणे गुलटेकडी मार्केटला पाठविण्यासाठी ५ किलोचे बंडल बांधतो. हे बंडल बांधून झाल्यावर पोत्यात भरतो व पोटे शिवतो. हे काम दुपारी २ वाजेपर्यंत पुर्ण होते. मग २ वाजता शेंगा भरलेल्या पोत्यावर पाणी मारतो. त्यानंतर २ - २ तासांनी म्हणजे ४ वाजता आणि पुन्हा ६ वाजता असे एकूण ३ वेळा पाणी मारून लगेच गाडीत भरून रात्री ७ - ८ वाजता गाडी मार्केटला रवाना होते. या पद्धतीमुळे शेंग बाजारात हिरवीगार व टवटवीत राहते. आपली शेंग १ - २ फुट लांबीची एकसारख्या जाडीची, गरबाज, वजनदार हिरवीगार, टवटवीत असल्याने बाजारात पहिल्यांदा आपली शेंग विकली जाते.\nबाजारामध्ये जर ७ - ८ रु. भाव असला तर आम्हाला ९-१०-११ रु./किलो असा भाव मिळतो. एका किलोमध्ये १५ - १६ शेंगा बसतात.\nसरासरी १० टन माल (शेंगा) १० रु. किलोप्रमाणे विकून एप्रिल २०१७ अखेर भाव कमी असूनही १ लाख रु. झाले आहेत. अजाऊं मे मध्ये माल वाढला असून २ - ३ दिवसाआड ५०० - ६०० किलो शेंगा मिळत आहेत. तसेच शेंग उत्कृष्ट दर्जाची असल्याने भाव १० - १२ रु. किलो असताना आम्हाला २० रु. किलो भाव मिळत आहे.\nत्यामुळे मी महिन्यात ५० - ६० हजार रु. चा शेवगा होईल. त्यानंतर पुन्हा छाटणी करून तिसऱ्या बहाराचे वरीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी ने नियोजन करणार आहे.\nयावरील माझी मुलाखत डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीच्या (www.drbawasakar.com) वेबसाईटवरील 'पहाट' या सदरात यु टुबवर (Episode - ४०) प्रसारीत झाली आहे. ती आपणास उद्बोधक ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato8.html", "date_download": "2019-03-25T07:50:55Z", "digest": "sha1:DCUKV72CSMU5DSXRTRVKAYPYOFMXJ2KX", "length": 5094, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - १८ एकर टोमॅटोसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा प्रतिकूल परिस्थितीतही फायदा", "raw_content": "\n१८ एकर टोमॅटोसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा ��्रतिकूल परिस्थितीतही फायदा\nश्री. भाऊसाहेब किसनराव नाईकवाडी, मु.पो. निगडोळ, ता. दिंडोरी, जि. नाशिक.\nमाझी शेती अकोले तालुक्यात आहे. तेथे मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा वापर करत होतोच आणि आता नवीन जमीन नाशिक जिल्ह्यात दिंडोडी तालुक्यात निगडोळ गावी १२० एकर घेतली आणि पहिल्याच वर्षी १८ एकर टोमॅटोची लागवड केली. लागवड झाल्यावर ८ दिवसांनी जर्मिनेटर + थाईवर + क्रॉपशाईनर या औषधांची पहिली फवारणी केली असता वाढ जोमाने होऊ लागली. मर व गळ असा प्रकार झालाच नाही. पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे प्लॉट निकामी झाले. आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची पहिली फवारणी केली नसती तर आमचेही फार मोठे नुकसान झाले असते. अशातच दुसरी फवारणी थ्राईवर + क्रॉपशाईनर या औषधांची केली असता झाडांवर काळोखी आली. फुटवही चांगला होऊन वाढ जोमदार झाली आणि झाडातच रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे करपा, घुबड्या हा रोग आला नाही. झाडांची वाढ तर ४ फुटापर्यंत झाल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी हे आवर्जुन प्लॉट बघायला येत असता आणि विचारपुससुद्धा करत की, \"ही कोणती टोमॅटो आहेत आणि कोणती अशी औषधे वारपाली की, त्यामुळे इतका फुटवा य वाढ झाली.\" तेव्हा मी सांगितले की, आजच्या काळात फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच वरदान आहे. त्याचा सातत्याने वापर करीत आहे. तिसरी फवारणी थ्राईवर + क्रॉपशाईनर + राईपनरची केली. या औषधांची फुलकळी मोठ्या प्रमाणात लागली. फळांना चमक व कडकपणा आला. फळे मोठ्या आकाराची, गडद रंगाची, एकसारखी मिळाली. विशेष म्हणजे फळसड अजिबात झाली नाही. माल मोठ्या प्रमाणत चालू झाला. सुरुवातीला चांगले भाव मिळाले. एकरी ८० क्विंटल उत्पादन निघाले. पाण्याची कमतरता असूनसुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे फवारली तर पीक पाण्याचा ताणसुद्धा सहन करून उत्पादन बऱ्यापैकी मिळते याचा यावेळेस अनुभव आला. द्राक्ष बागेची नवीन लागवड ३२ एकरमध्ये करणार आहे. त्यासाठी जर्मिनेटर कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/how-pyramids-were-built-new-discovery/", "date_download": "2019-03-25T07:28:23Z", "digest": "sha1:4R7UUOPQ55I6TE5DLMHOCYPWXQJPJNYT", "length": 13238, "nlines": 103, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पिरॅमिडच्या बांधकामामागचं गूढ उलगडलंय...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपिरॅमिडच्या बांधकामामागचं गूढ उलगडलंय…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nइजिप्तचे पिरॅमिड सर्व जगात प्रसिद्ध आहेत. जीवनात एकदा तरी इजिप्तला जाऊन जगातील हे महान आश्चर्य उघड्या डोळ्यांनी पाहावे अशी प्रत्येक भटक्याची इच्छा असते. हे पिरॅमिड म्हणजे आजही एक कोडंच आहेत. दगडांवर दगड रचून कश्याप्रकारे ते बांधले हे अजूनही शास्त्रज्ञांना किंवा जाणकारांना ठोसपणे सांगता येत नाहीये.\nअगदी प्राचीन काळी कुठे होती आधुनिकता, कुठे होती यंत्रे आणि मनुष्यबळही इतके नव्हते. मग या लोकांनी पिरॅमिड कशाच्या माध्यमातून बांधले\nहे तुम्हाला-आम्हाला पडणारे प्रश्न अनेक शोधकर्त्यांना देखील पडत असतात आणि मग सुरु होतो अभ्यास अश्या गूढ गोष्टींचा\nपिरॅमिड बाबत याच कुतुहलाने एक संशोधन सुरु केले साउथ वेल्समधील सिंटेक इंटरनॅशनलमधील पीटर जेम्स या अभियंत्याने आणि त्याने आजवर कधीही न मांडला गेलेला एक आगळावेगळा सिद्धांत मांडून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.\nपिरॅमिडचे बांधकाम करताना सर्वप्रथम आतल्या बाजूने मोठा ढिगारा तयार करून नंतर त्याच्या बाहेरून विटा जोडल्या असाव्यात.\nपिरॅमिडच्या बांधकामाबाबतच्या प्रचलित सिद्धांतानुसार महाकाय दगडी ठोकळे अतिशय लांबलचक घसरगुंडय़ांसारखा उतार वापरून एकमेकांवर ठेवून हे पिरॅमिड बांधण्यात आले. मात्र, जेम्स यांच्या दाव्यानुसार बांधकामाचा हा प्रकार शक्य नाही.\nअशा प्रकारच्या पद्धतीने बांधकाम करण्यासाठी हे ठोकळे इतक्या उंचावर घेऊन जाण्यासाठी योग्य कोन तयार करताना सुमारे पाव मैल लांबीचा उतार लागला असता.\nत्याच प्रकारे सध्याच्या सिद्धांतानुसार सुमारे २० लाख दगडी ठोकळे एकावर एक रचण्यासाठी त्या काळातील इजिप्शिअन लोकांना दर तीन मिनिटाने एक या गतीने या उतारावर ठेवावे लागले असते, असे जेम्स यांचे म्हणणे आहे.\nजर तसे झाले असते तर त्या उताराच्या खुणा त्यावर दिसून आल्या असत्या. मात्र, तशा कोणत्याही खुणा त्यावर दिसून येत नाहीत.\nपीटर जेम्स गेल्या वीस वर्षांपासून इजिप्तच्या पिरॅमिडचा अभ्यास करत आहेत. त्यांनी ४६०० वर्षे जुन्या स्टेप पिरॅमिड आणि रेड पिरॅमिडमधील दफन कक्षांचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.\nया स्टेप पिरॅमिडच्या आत जेम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक टन वजनाचे लहान लहान दगड हजारो वर्षे जुन्या पाम व��क्षाच्या केवळ एका फांदीला लटकत ठेवल्याचे आढळले.\nत्यावरूनच हे पिरॅमिड आतल्या बाजूने लहान, सुटसुटीत ठोकळ्यांनी बांधून त्यावर मोठेठोकळे बसवले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. म्हणजेच हे बांधकाम ‘बाहेरून आत’ असे न होता ‘आतून बाहेर’ असे झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.\nहा नवा सिद्धांत तर्कशुद्ध असून त्यामुळे पिरॅमिड संशोधनाला नवीन दिशा मिळाली आहे. येणाऱ्या काळात अजून नवनवीन गोष्टी या सिद्धांतामुळे नक्कीच पुढे येतील.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← महाभारतातील अत्यंत महत्वाचे ५ अज्ञात प्रसंग, जे आपल्याला मानवी मुल्यांची शिकवण देतात\nआपण बालाकोटचा जिहादी तळ पूर्वीसुद्धा उद्धवस्त केला होता : वाचा २०० वर्ष जुना शौर्य-इतिहास\n“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा\n९० वर्षापूर्वीच्या या फ्लाइंग बोट्स काही विमानापेक्षा कमी नव्हत्या\nसहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….\nरक्तरंजित चीनी राज्यक्रांतीचा उत्कंठावर्धक आढावा\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nसर्जिकल स्ट्राईकमागचं राजकारण आणि मोदींमधील “राज नेता”\nआव्हाड साहेब, जनाची नाही मनाची तरी लाज वाटू द्या\nएकदाच जगायला मिळणाऱ्या आयुष्याचं महत्व सांगणारा चित्रपट, “ZNMD” सात वर्षांचा झालाय\nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\nदारू-सिगारेटची व्यसनं सर्वश्रुत आहेत – पण “ह्या” ७ व्यसनांच्या बाबतीत अनेक जण गाफील असतात.\nआणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत\nअनुपम खेर “त्या” जज वर एवढे का चिडले होते\nकर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग\n‘संजू’ : तुमच्या आवडत्या सिनेपरीक्षकाचे पितळ उघडे पडणारा चित्रपट\nभारतासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेत कसा गेला मोठ्या “घोळाची” रंजक कथा\nडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री \nबुलेट प्रूफ जॅकेट घालूनसुद्धा भारतीय जवान शत्रूची गोळी लागून हुतात्मा का होतात\nपुरोगाम्यांना अचानक वाजपेयी प्रेम का येतंय : वाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ : भाऊ तोरसेकर\nस्त्रीचे विवाहबाह्य संबंध – ‘स्त्री-स्वातंत्र्य’ की व��यभिचारी फार्स\nसैफ-नवाजुद्दीनची “सेक्रेड गेम्स” आवडली असेल तर ह्या ८ सिरीज नक्की बघाच\nFlipkart वरच्या “डिस्काऊन्ट्स” चा परिणाम – २,००० करोडचा वार्षिक तोटा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/why-north-indians-are-migrating-to-home/", "date_download": "2019-03-25T07:41:51Z", "digest": "sha1:LCC7SO4TWBPBWHE2FDK5RRSLPS3UCZZ6", "length": 22786, "nlines": 121, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पोटापाण्यासाठी गुजरातमध्ये आलेले, घाबरलेले उत्तर भारतीय झुंडीने गुजरात सोडून का जात आहेत?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपोटापाण्यासाठी गुजरातमध्ये आलेले, घाबरलेले उत्तर भारतीय झुंडीने गुजरात सोडून का जात आहेत\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nप्रादेशिक अस्मिता, त्याचे अनेक प्रकारचे कंगोरे आणि त्यावरून बाहेरून आलेले लोक यांच्यात होणारे वाद नवीन नाहीत. कामाच्या शोधात आलेले उत्तर भारतीय आणि त्या त्या प्रदेशातल्या लोकांमध्ये नेहमीच काहींना काही विषयांवरून ठिणग्या पडत आलेल्या आहेत.\nपण एकाच वेळी एखाद्या प्रदेशातून मोठ्याप्रमाणात हे बाहेरचे कामगार सगळं सोडून जात असल्याची किंवा गेल्याची घटना अजून तरी भारतात घडलेली नव्हती.\nगुजरात सारख्या राज्यात मात्र चित्र वेगळं आहे. गेल्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात गुजरात व्यतिरिक्त अन्य राज्यातून आलेले कामगार वर्गातील लोकं स्थलांतर करत आहेत.\nयांमध्ये विशेषतः उत्तर भारतीय राज्यांमधल्या कामगारांचा समावेश अधिक आहे.\n२८ सप्टेंबरला गुजरात मधल्या साबरकांठा जिल्ह्यातल्या एका गावात, हिम्मतनगर एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले. बलात्कार करून आरोपी फरार झाला. काही वेळातच स्थानिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या पण जेव्हा त्याची ओळख समोर आली तेव्हापासून हा स्थलांतर विषय सुरु झाला.\nत्या १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणारा हा १९ वर्षांचा उत्तर भारतीय तरुण कामगार होता. स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली असली तरीही त्याच्यामुळे पुर्वीपासुन दाबून असलेला प्रादेशिक मतभेदांचा हा वाद उघडपणे दिसू लागला.\nस्थानिक पातळीवर जितक्या प्रमाणात हा वाद होता त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात सोशल मिडियातल्या गुजराती विरुद्ध अन्य अशा प्रकारच्या पोस्ट्स आणि टॅग्स मुळे त्यात अजून तेल ��तलं गेलं.\nत्यानंतर मात्र स्थानिकांच्या भावनांचा भडका उडाला आणि उत्तर भारतीयांवर हल्ले होणं सुरु झालं. रस्त्यावर सापडणाऱ्याला मारहाण करणे, उत्तर भारतीय राहत असणाऱ्या घरांवर दगडफेक करणे असे नानाविध प्रकार होऊ लागले. त्या गुन्हेगाराच्या अटकेनंतर आतापर्यंत जवळपास १८ अशा इतर गुन्हांची नोंद त्या परिसरात झाली आहे.\nमात्र या नोंदींपेक्षा घटनांची संख्या जास्त आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.\nहिम्मतनगरच्या परिसरात जवळपास सव्वा लाख उत्तर भारतीय कामगार राहतात. या परिसरात सिमेंट आणि सिरॅमिक्सचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. एकंदरीत या सगळ्या घटनांमुळे तिथल्या व्यवसायावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची चिंता व्यक्त झाली आहे.\nया सगळ्यावर बोलताना तिथले सिरॅमिक्स अससोसिएशनचे सचिव असलेले कमलेश पटेल सांगतात की, या सगळ्या परिसरात महिन्याला जवळपास ८९ ते ९० करोड इतका व्यवसाय असून त्यात काम करणारे कामगार हे ५०-६० % उत्तर भारतीय आहेत. त्यातले जवळपास ३५% लोकं गुजरात सोडून निघून गेले आहेत.\nअशा घटना फक्त हिम्मतनगरमध्येच घडल्या असं नाही. संपूर्ण गुजरात मध्ये बाहेरच्या लोकांबाबतचा हा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साबरकांठा, अहमदाबाद, चांदखेडा, बापुखेडा या ठिकाणी सुद्धा उत्तर भारतीय लोकांवर हल्ले झाले आहेत.\nसुरत सचिन, पंडसेरा आणि डिंडोली या भागातही हल्ले झाले आहेत. पोलिसांनीं सतर्क राहून परिस्थितीचा ताबा मिळवला आहे पण हल्ले अजून थांबलेले नाहीत.\nपोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. या हल्ला ग्रस्त भागात पोलिसांच्या जवळपास ४० तूकड्या गस्त घालत आहेत. सूत्रांच्या हवाल्यानुसार ज्या १८ हल्ल्यांची नोंद झाली आहे त्याबाबत आतापर्यंत जवळपास १५० जणांना अटक झाली आहे.\nसोशल मीडियावरून या गोष्टींवर अजून भडकपणे लिहीणा-या जवळपास २४ जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.\nकुठल्याही समस्येचे रूपांतर आपल्या राजकीय पोळीत करून घेण्यात राजकारणी माहीर असतातच. या घटनेच्याही बाबतीत काहीसे असेच होत आहे.\nहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गुजरात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोपांची खैरात होत आहे.\nभाजपने आरोप केलाय की या हल्यात अल्पेश ठाकूरचा हात आहे. आल्पेश ठाकूरवर असे आरोप संशय वाढवू शकतात कारण अत्याचार पीडित ठाकुर जातीच्या आहेत. अल्पेश ठाकूर यांना बिहारमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून पाठविण्यात आले आहे. भाजपने केलेले हे आरोप पूर्णपणे राजकीय असल्याची चर्चा आहे.\nराजकीय विश्लेषक या आरोपांना भाजपची एक चाल मानतात. हे हल्ले कॉंग्रेस मुद्दामहून घडवून आणत आहे असे भाजपचे थेट म्हणणे आहे. मोदी मुख्यमंत्री असताना असे हल्ले हो नव्हते असेही अनेक भाजप नेते सांगताना दिसत आहेत.\nपक्षावर झालेल्या अरोपावर उत्तर देताना कॉंग्रेस नेते मनीष दोशी यांनी पत्रकार परिषदेत उलटा भाजपवर आरोप केला. सुरक्षा यंत्रणा ताब्यात असताना असे हल्ले होत राहणं हे लज्जास्पद आहे असे त्यांनी विधान केले आहे.\nसद्य परिस्थितीचा विचार केल्यास गुजरात मध्ये उत्तर भारतीय कामगार वर्गाची सख्या अधिक आहे हे स्पष्ट आहेच परंतु त्यांच्या द्वारे होण्यार्या उत्पन्नाची हि संख्या मोठी आहे. पण जसे ईतर राज्यातही उत्तर भारतीयांबाबत विरोध वाढत आहे तसेच गुजरात मध्ये त्याला आता विशिष्ठ आकार दिला जात आहे.\nगेल्या महिन्या मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी अशी घोषणा केली गुजरात मधल्या स्थानिकांनाच इथल्या कंपन्या आणि कारखान्यान्नाम्ध्ये ८०% पेक्षा जास्त काम मिळावं असा कायदा लवकरच केला जाईल.\nयाचा अर्थ सरकार सुद्धा उघडपणे अशाप्रकारचे विषमतेच धोरण स्वीकारत आहे असे दिसत आहे.\nसुरात मधल्या राजकीय अभ्यासक असलेले प्रा.किरण देसाई यांनी अशा हल्ल्यंना संपूर्णपणे राजकीय स्टंट असल्याचे म्हटले. त्यांच्या मते दरवेळी सरकार असे काही मुद्दे काढते की त्यामुळे त्यांच्या नाकर्तेपणाला झाकता येईल. सध्या स्थानिक तरुणांची बेजारोजागरी हा मुद्दा आहे.\nमुळात सुरतमध्ये सगळ्यात जास्त गुजराती व्यतिरिक्त लोक असुन सुद्धा कुठलाही हल्ला किंवा अन्य घटना झाली नाही. बेरोजगारांना त्यांच्या हक्काचे आमिष दाखवून अशा घटना करायला लावणं सोप असत असेही ते नमूद करतात.\nदेशाचा विचार करता उत्तरेकडची बहुतांश राज्य ही आर्थिकदृष्ट्या मागास याच गटात मोडतात. त्यांच्या राज्यात रोजगारासाठी फार साधने उपलब्ध नाहीत. परिणामी या राज्यातले तरुण संपूर्न भारतात मिळेल ते काम करण्यासाठी फिरतात. अतिशय हलाखीचे आणि काठीन काम करणारे हेच लोक आहेत.\nगुजरात असेल किंवा मग महाराष्ट्र सेंटरिंगपासून ते सिरामिक्���पर्यंत सगळ्या प्रकारची कामे हेच लोक करतात.\nत्यामुळे समजा उद्या बऱ्याच राज्यातून हे लोक बाहेर गेले तरी त्यांची काम स्थानिक लोक करू शकतील का हा मुद्दा देखील अधोरेखित करण्यासारखा आहे.\nमुळात अशा मजूर लोकांना स्थानिक राजकीय नेते नेहमीच टार्गेट करत आलेले आहेत. त्यांच्या दृष्टीने रोजगारावर राजकारण अत्यंत सोप आहे. महाराष्ट्रातही मागे मराठी विरुद्ध बिहारी हा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटला होता. आता गुजरात मध्ये त्याच केंद्र आहे. भविष्यात अशा घटना वाढण्याची चिंता मात्र नक्कीच आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ह्या अमेरिकास्थित भारतीय दाम्पत्याच्या ऐश्वर्याचा अख्खी अमेरिका हेवा करत असेल\nमोदीजी… तुमच्या प्रिय गंगा नदीसाठी जीव गमावणाऱ्या स्वामींच्या मृत्यूस जबाबदार कोण\n : इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी\nसूर्याचं मंदिर, जिथे सुर्याचीच पूजा करण्यास मनाई आहे\nभारतातल्या या राज्यांत बायको भाड्याने मिळते \nदुबईचं इतकं अद्भुत रुप तुम्ही कधी पाहिलं आहे का\nपेटीएम विसरा, जय “भीम” म्हणा \nअंबानीच्या घरचा कचरा फेकला जात नाही. मग काय केलं जातं त्याचं\nसोशल मिडीयामुळे दिग्गज पत्रकारांना आपण मुकतोय का\nऑफिसमध्ये ७-८ तास बसून काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘हे’ नक्की वाचलंच पाहिजे\nया काही विचित्र ‘फोबिया’मुळे अनेकांना जीवन त्रासदायक होऊन बसले आहे..\nयेथे १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होते मुलींची विक्री\nतुकोबांसारखे संत जन्माला येतात ते त्यांच्या घरच्या संस्कारांमुळे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २५\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nया महिलेने १ ते ९ अंकांच्या सहाय्याने साकारल्या गणेशाच्या प्रतिमा \nभारताने “पाकव्याप्त काश्मीर” जिंकला का नाही ह्याचं खरं उत्तर – काश्मीर आणि भारतीय जनमानस ३\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\n स्त्री पुरूष समान नाहीतच \nभारतीय कैद्यांना दुसऱ्या महायुद्धात भोगाव्या लागलेल्या नरक यातना\n‘लिव्ह इन’मध्ये अर्धशतक, ऐंशीव्या वर्षी लग्न उदयपूरच्या जोडप्याचा असामान्य जीवनप्रवास\nचॅटिंग करताना नेहमी वापरल्या जाणाऱ्या या शॉर्टकटचे अर्थ अनेकांना माहितीच नसतात\nएक मध्य��वर्गीय मराठी माणूस, भारत-नॉर्थ कोरिया संबंध दृढ करण्यासाठी भारताने पाठवलेला शिलेदार\nजिओ इन्स्टिट्यूटच्या “एमिनंट” असण्याबद्दल वाद घालण्याआधी – हे वाचा सत्य\n“जंगल जंगल बात चली है” – नाना पाटेकर, इरफान, ओम पुरी आणि प्रियांका चोप्राची \nभारतातील “सर्वात मोठा रेल्वे अपघात” – अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090125/main.htm", "date_download": "2019-03-25T08:22:33Z", "digest": "sha1:YASOVOEE7QCV5VLUG6QIAKBII7T2Y6ZE", "length": 22179, "nlines": 53, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..\nउमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..\nकालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..\nजातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..\nएकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,\nतर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..\nतिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..\nअसा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..\nवाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..\nबदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..\nपण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..\nतो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..\nसोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..\nअचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..\n(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)\nमहाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जाईन -राज ठाकरे\nमहाराष्ट्र, मराठी अस्मिता व मराठी माणसाच्या प्रश्नांवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उत्तर भारतीय नेत्यांपुढे गुडघे टेकले आहेत. ठाण्यातील लोकसभा व विधानसभेच्या जागा वाढविण्यामागेही त्यांचेच षडयंत्र आहे. या भागातून मोठय़ा प्रमाणावर बिहारी व उत्तर भारतीयांना निवडून आणून एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेचाही ताबा मिळविण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे माझ्यावर भाषणबंदी अथवा कोणत्याही प्रकारच्या कारवाया करून कितीही वेळा अटक केली तरी महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी सुरू असलेली माझी सर्व आंदोलने यापुढेही सुरूच राहतील, असा वज्रनिर्धार व्यक्त करून आगामी निवडणुकांत मराठी माणसाने सावध राहण��याचा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.ठाण्याच्या सेंट्रल मैदानावरील प्रचंड मोठय़ा जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. या सभेला जमलेल्या आलोट गर्दीने आजपर्यंतचे या मैदानावरील गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले.\nडॉ. मनमोहन सिंग यांच्यावर बायपास सर्जरी यशस्वी\nनवी दिल्ली, २४ जानेवारी/खास प्रतिनिधी\nसाऱ्या देशवासियांचे लक्ष वेधून घेणारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी जगातील ११ मातब्बर ह्रदयशल्य चिकित्सकांच्या देखरेखीखाली आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) यशस्वीपणे पार पडली. तब्बल सात तास चाललेल्या या सर्जरीनंतर मनमोहन सिंग यांना कार्डियाक केअर युनिटमध्ये हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुक्रवारीच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेसात वाजता त्यांना कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरीसाठी ऑपरेशन थिएटर पाचमध्ये नेण्यात आले. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटचे नावाजलेले ह्रदयशल्य चिकित्सक रमाकांत पांडा यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पंतप्रधानांच्या धडधडत्या ह्रदयावर बायपास सर्जरी पार पाडली. ही शस्त्रक्रिया लांबलचक असली तरी त्यात फारशी जोखीम नसते. विशेषत विविध आजार असलेल्या वृद्ध व्यक्तींवर दुसऱ्यांदा बायपास सर्जरी करण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते, असे ह्रदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\n‘शहीद शशांक शिंदे यांचे शौर्य कुठे कमी पडले\nमुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी\nमुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राणांची पर्वा न करता सर्वप्रथम दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत शहीद झालेले सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशांक शिंदे यांची मरणानंतरही घोर उपेक्षा अद्याप थांबलेली नाही. शांतताकाळात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याकरिता बहाल करण्यात येणाऱ्या अशोकचक्रासाठी त्यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांप्रमाणेच सर्वसामान्यांमध्येही सरकारच्या निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ वरिष्ठांनी दिले तेच बलिदान आणि मग कनिष्ठांचे दिले ते काय होते असा सवाल करून शौर्य पुरस्कारासाठीही राजकारण का केले जाते असा सवाल करून शौर्य पुरस्कारासाठीही राजकारण का केले जाते अशी विचारणा केली जात आहे. शिंदे यांना अशोकचक्र मिळालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी मुंबईकरांनी केली आहे.\nमुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी\nअमरावती जिल्ह्यातील खारतळे या लहानशा गावातून संगीताच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याच्या इर्षेने मुंबईत आलेल्या वैशाली माडेने १८ लाख ९६ हजार २६० मते मिळवत झी टीव्हीच्या ‘सारेगमप चॅलेंज २००९’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. वैशाली म्हणाली की, हा पुरस्कार मी जगभरातील संगीतरसिकांना अर्पण करत आहे. मराठी ‘सारेगमप’ची महागायिका ठरलेल्या वैशालीला ‘सारेगमप चॅलेंज’मध्ये थेट प्रवेश मिळाला होता. या संधीचे सोने करत मराठी भाषिकांप्रमाणेच जगभरातील संगीतरसिकांना तिने आपल्या आवाजाने भुरळ घातली आणि सारेगमप स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीतील उपविजेती ठरलेल्या याशिता शर्माला १७ लाख ३३ हजार ५९५ तर तिसऱ्या क्रमांकावरील सोमेन नंदीला १६ लाख ४९५ मते मिळाली. ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात आज रंगलेल्या झी टीव्हीच्या ‘सा रे ग म प चॅलेंज २००९’च्या अंतिम फेरीच्या सुरुवात शंकर महादेवनने गायलेल्या ‘सब से आगे होंगे हिंदुस्तानी’ या गाण्याने झाली. आदेश श्रीवास्तवनेही ‘कर चले हम फिदा’ गाणे गात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. थोडय़ा थोडय़ा वेळाने एकेका विभागातून आलेली मते जाहीर करण्यात येत होती. आंतरराष्ट्रीय फोन लाईन्सनुसार वैशाली तिसऱ्या क्रमांकावर होती, सोमेन दुसऱ्या क्रमांकावर तर याशिता शर्मा पहिल्या क्रमांकावर होती. उत्तर विभागाने याशिताला पसंती दिली होती, पूर्व विभागातून आलेल्या निकालानुसार सोमेनला सर्वात जास्त मते मिळाली होती तर पश्चिम आणि दक्षिण विभागातून मात्र वैशालीच्या नावाला पसंती देण्यात आली होती. त्यामुळे विजेतेपद कोण पटकाविणार याबद्दल सर्व उपस्थितांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर तो क्षण आला आणि अक्षयकुमारने वैशाली माडेचे नाव जाहीर केले. झी मराठीवरील सारेगमप स्पर्धेसाठी पहिल्यांदा ऑडिशन दिले होते. त्यावेळी तिची निवड न झाल्यामुळे तिची उमेद खचली. पण वैशालीचे पती अनंत माडे यांनी तिला धीर दिला. दुसऱ्या प्रयत्नात मात्र तिला यश मिळाले. झी मराठीवरील ‘सारेगपम’ या स्पर्धेची अंतिम फेरीच नव्हे तर महागायिकेची माळही वैशालीच्याच गळ्यात पडली आणि आता हिंदी सारेगमपचे विजेतेपद पटकाविल्यामुळे आता जगभरातील संगीतरसिकांच्या कौतुकाची धनी झाली आहे.\nपूल कोसळून ७ मजूर ठार, ८ जखमी\nउध्र्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात ७ मजूर मलब्याखाली दबून ठार तर ८ पेक्षा अधिक जबर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. उध्र्व प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम सुरू असून या कालव्यावर चार ठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. येथून ११ किलोमीटरवर इंझाळ्यापुढे याच कालव्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत यवतमाळ येथील कंत्राटदार अवधारीया कंस्ट्रक्शन कंपनी मार्फत पुलाचे काम सुरू आहे. पुलावर स्लॅब टाकण्यासाठी नवीन पद्धतीने आधार नसलेल्या शटरिंगवर लोखंड बांधण्याचे काम सुरू होते. याच कामावर आज स्लॅब टाकण्यासाठी पडेगाव येथे सुरू असलेल्या कामावरून १५ ते १६ मजूर आणण्यात आले होते. हे सर्व मजूर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील सुरपूर येथील आहेत.\nपाटसजवळील अपघातात मुंबईतील सहा ठार\nदौंड तालुक्यातील चौफुल्यापासून चार कि.मी. अंतरावर चौफुला-सुपा रस्त्यावर मालट्रक व तवेरा गाडीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तवेरा गाडीतील सहा ठार, तर सात व्यक्ती जखमी झाल्या. मृतांमध्ये तीन महिला व लहान बालिका आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून मृत व जखमी करीरोड मुंबईचे रहिवासी आहेत. हा अपघात आज सकाळी ९.१५ च्या सुमारास घडला.\nअपघातातील तवेरा गाडीतील निर्मला बरमू पाटील (वय ३८), सचिन शंकर कोल्हे (वय ३०), साखरूबाई बरमू पाटील (वय ७०), शंकर आण्णा कोल्हे (वय ५६), लिला शंकर कोल्हे (वय ५०) असे पाचजण जागीच ठार झाले तर भूमी सचिन कोल्हे ही ८ महिन्यांची मुलगी दवाखान्यात नेताना मरण पावली. वैभव शंकर कोल्हे (वय २५) व रेखा सचिन कोल्हे (वय २४) या जबर दोन जखमींना ग्लोबल हॉस्पीटल, हडपसर पुणे येथे नेण्यात आले आहे. सर्वजण राहणार राजगड बिल्डिंग, महादेव पालवमार्ग, करीरोड मुंबई येथील आहेत. मुंबईचे कोल्हे-पाटील कुटुंबीय चौफुल्यावरून मोरगावकडे गणपती दर्शनासाठी तवेरा गाडीतून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकची धडक बसून हा दुर्दैवी भीषण अपघात झाला.\n‘सन्मान डावलणे हा शिंदे यांच्या बलिदानाचा आणि आमचा अपमानच\nकेंद्र सरकारच्या विशेष समितीने अशोकचक्रासाठी शिंदे यांचे नाव डावलले असले तरी राज्य सरकारने शिंदे यांना हा सन्मान मिळण्याकरिता सतत पाठपुरावा करणे गरजेचे होते. पण आम्ही शिंदे यांचे नाव अशोकचक्रासाठी पाठवले होते असे सांगून राज्य सरकार स्वत:चा बचाव करण्याचा आटापीटा करीत आहे. त्यांच्या या कृतीने माझ्या पतीच्या बलिदानाचा आणि आमचा अपमान झाला आहे, असा आरोप शशांक शिंदे यांच्या पत्नी मानसी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. शशांक यांनी ज्या धैर्याने, शौर्याने सीएसटी येथे दहशतवाद्यांचा सामना केला व देशासाठी बलिदान दिले हे सर्वाना माहीत आहेच व त्यांनी त्याची सीसीटीव्हीमधील दृश्येही वृत्तवाहिन्यांवर पाहिलेली आहेत. त्यांच्या या बलिदानाचा सन्मान झालाच पाहिजे, असे सांगून माझ्या पतीला हा सन्मान मिळवून देण्यासाठी मी मरेपर्यंत लढेन, असेही मानसी यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-prem-kavita-mi-marathi-majhi-marathi_61.html", "date_download": "2019-03-25T08:05:31Z", "digest": "sha1:TSNGQXQ4SIFKMR6X36I3VMU7MH5CJCCG", "length": 6125, "nlines": 132, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "एक तरफी प्रेम.... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nएक तरफी प्रेम माझे....\nआज तरी तुला कळेल का\nमाझ्या कडे वळेल का\nमाझा मनात तूच राणी\nतुझा मनात मीच का\nएक तरफी प्रेम माझे ....\nआज तरी तुला कळेल का\nतुला ते प्रेम होते कळाले का\nएक तरफी प्रेम माझे ....\nआज तरी तुला कळेल का\nएकीकडे तू दुसऱ्याशी बोलायची\nमजला तू फारच सतवायची\nमी तुज समोर आल्यावर\nएक तरफी प्रेम माझे....\nआज तरी तुला कळेल का\nतुला कोणी घेवून फिरताना\nतू त्याच्या वर हसताना\nमी तुला मुक्यान बगताना\nओळखून घेशील का तू मला\nएक तरफी प्रेम माझे....\nआज तरी तुला कळेल का\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एव��े केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/files/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-13487-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-03-25T07:48:58Z", "digest": "sha1:HY42UWIWRVGJZBBMWLRV6P2QKTF62VVT", "length": 2271, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "रेल्वेमध्ये 13,487 जागांसाठी भरती.. जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी आहे ही भरती | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेल्वेमध्ये 13,487 जागांसाठी भरती.. जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी आहे ही भरती\nVideo of रेल्वेमध्ये 13,487 जागांसाठी भरती.. जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी आहे ही भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/lucky-marathi-movie/", "date_download": "2019-03-25T07:37:45Z", "digest": "sha1:T5JELYRQUATS3S5V25XIDT7Z63EYORBJ", "length": 2408, "nlines": 43, "source_domain": "marathikalakar.com", "title": " lucky marathi movie - मराठी कलाकार", "raw_content": "\n“हे”विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.\nनुकतंच ‘लकी’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तूफान...\nदुनियादारी नंतर २०१९ च्या व्हॅलेंटाईन वीकला रसिकांना मिळणार “हे” मल्टीस्टारर सरप्राईझ\nसंजय जाधव दिग्दर्शित तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा, दुनियादारी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1411", "date_download": "2019-03-25T08:32:23Z", "digest": "sha1:VMABOQAOOIYR4JZOOLCOOPFHG2P2UTYK", "length": 4470, "nlines": 73, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अठुर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठीमध्ये ‘अठुर’ म्हणजे पुष्कळ, भरपूर असा शब्द आहे. त्यावरून ‘अठुर विसावे दारिद्र्य’ (अठूर विसवे) भरपूर दारिद्र्य. त्याचा अपभ्रंश ‘अठरा विश्वे’ होऊ शकतो का साधारणत: अवघड उच्चाराचा सोपा उच्चार करणारा अपभ्रंश होताना दिसतो. आणखी एक कुतूहल: ‘अठरा विश्वे’ हे विशेषण फक्त दारिद्र्यासाठी वापरलेले दिसते. सततचा आनंद, किंवा तत्सम वापर दिसत नाही.\nश्री.न.गुत्तीकर - सी-7, आसावरी अपार्टमेंटस, सर्व्हे क्र. 22, प्लॉंट क्र. 10 सहवास सोसायटीजवळ, पुणे 411 052 दूरध्वनी : (020) 2545 2240 , भ्रमणध्वनी : 09890882712\nगांगलांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे\nश्यामची आई आणि आजची मुले\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nगुढीपाडवा - परंपरा आणि आधुनिकता\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-25T07:29:02Z", "digest": "sha1:VXWDDNVFB2M4YQTP3VJKOJMEVX64XQGO", "length": 10580, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर : बोटा येथील कचेश्वर मंदिरात चोरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंगमनेर : बोटा येथील कचेश्वर मंदिरात चोरी\nसंगमनेर – तालुक्यातील बोटा येथील कचनदी तिरावरील श्री कचेश्वर मंदिरातील दानपेटी चोरटयांनी फोडली,तसेच मंदिरातील साउंड मशिन शिस्टमची देखील चोरी केली .शुक्रवारी रात्री साडेदहा ते शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बोटा येथे कचनदी तिरावर हे प्राचीन कचेश्वर मंदिर आहे. शुक्रवारी रात्री पूजा झाल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले. शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुजारी व भाविक मंदिरात पूजेसाठी जात असता त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वाराचा आणि गाभाऱ्याच्या कोंडा कापलेला दिसून आला.\nत्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता त्यांना तेथील दानपेटी फोडलेली दिसून आली. चोरी झाल्याचा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी याबबत सरपंच विकास शेळके यांना कळविली. त्यांनी घारगाव पोलिसांना फोन द्वारे मंदिरात चोरी झाल्याचे सांगितले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांना दानपेटीत पैसे न मिळाल्याने त्यांनी मंदिरातील साउंड मशिन शिस्टम घेऊन पोबारा केला.\nसरकार खोटे बोलुन सत्तेत आले, आता जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल – रोहीत पवार\nमुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांची महसूल पथकाला दमदाटी\nलोकन्यायालयात दोन हजार खटले निकाली\nनगर जिल्ह्यात 9 लाख 2 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा\nनगर : शिवसेनेत संपर्कप्रमुख हटाव मोहीम शमली\nमला अटकच करा : शंकरराव गडाख\nमोक्यातील पसार आरोपीला नगरमध्ये अटक\nपवित्र पोर्टलवर उमेदवारांना संवर्गनिहाय जागाच दिसेनात\nश्रीगोंद्यात सिनेस्टाईलने भरदिवसा दीड लाख पळविले\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/existence-tour/articleshow/66479121.cms", "date_download": "2019-03-25T08:55:26Z", "digest": "sha1:74JCMCNBVZOHG36RYNPFGGIAZE3CZOIZ", "length": 18186, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: अस्तित्वाची यात्रा - existence tour | Maharashtra Times", "raw_content": "\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nपरीक्षा संपली...आता सुट्टीत काय कराल\nसत्ताधारी भाजपच्या विरोधात जनसामान्यांमध्ये आवाज उठविण्यासाठी काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप औरंगाबादेत गुरुवारी झाला. मात्र, त्यासाठी गर्दी खेचण्यात हा पक्ष अपयश ठरला. काँग्रेसचा संघर्ष कायम असल्याचे यातून दिसते.\nसत्ताधारी भाजपच्या विरोधात जनसामान्यांमध्ये आवाज उठविण्यासाठी काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप औरंगाबादेत गुरुवारी झाला. मात्र, त्यासाठी गर्दी खेचण्यात हा पक्ष अपयश ठरला. काँग्रेसचा संघर्ष कायम असल्याचे यातून दिसते. जनसंघर्ष नावाने ही यात्रा काढली गेली असली तरी प्रत्यक्षात ती पक्षाच्या अस्तित्त्वासाठीचअसल्याचे चित्र होते. भाजप सरकारचा खोटेपणा समोर आणण्यासाठी, देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने कोल्हापूरमधून ३१ ऑगस्टपासून सुरू केलेल्या या यात्रेतून त्याच पक्षातील हेवेदावे पुढे आले. विरोधी पक्ष म्हणून आपला ठसा काँग्रेसला उमटविता आला नसला, तरी या यात्रेमुळे या पक्षाचे नेते गावागावांत पोहोचले. मात्र, यात्रेतील पक्षनेत्यांत एकसूत्रीपणा नव्हता. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ४८पैकी केवळ दोन मतदारसंघांत काँग्रेसला यश मिळाले; तेही मराठवाड्यात. नरेंद्र मोदी यांची लाट असताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून बाजी मारली आणि युवक काँग्रेसचे नेते आणि राहुल यांचे विश्वासू राजीव सातव हे हिंगोलीत जिंकले. त्यानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्येही काँग्रेसला छाप पाडता आली नाही. अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेड महापालिका पुन्हा ताब्यात ठेवण्यात तेवढे यश आले. मतदारांनी घरी बसविल्यानंतरही काँग्रेसनेते आपल्याच धुंदीत आहेत. शरद पवार यांनी 'हल्लाबोल आंदोलन' करून राज्य पिंजून काढले. त्याचा परिणाम म���ाठवाड्यात दिसू लागला आहे. हे आंदोलन सुरू असताना काँग्रेस गप्प बसली. निवडणुका तोंडावर आल्यानंतर या यात्रेच्या निमित्ताने अशोक चव्हाणांनी पहिल्यांदाच राज्य पिंजून काढले. यात्रा, रॅली यासाठी भाजपला पैशांची कमी नाही. काँग्रेसची अशी अवस्था राहिलेली नाही. मात्र, काँग्रेसचे नेते बडे आहेत. ज्या बड्या नेत्यांनी निधी उभारला, तेथे जनसंघर्ष यात्रा काहीशी यशस्वी ठरली आहे. अशोक चव्हाणांनी उद्ध्वस्त झालेल्या काँग्रेसची फेरबांधणी सुरू केली आहे. पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांची त्यांना साथ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी निश्चित झाल्यामुळे काँग्रेसची ताकद असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने यात्रा गेली. सत्ताधाऱ्यांविरुद्धच्या आक्रमकतेपेक्षा काँग्रेसचे ही प्रचार मोहीमच होती. काँग्रेसला सुरक्षित वाटणाऱ्या मतदारसंघांवरच या यात्रेत भर देण्यात आला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला खरोखरीच जनतेची साथ मिळणार आहे का, हा खरा प्रश्न असून, त्याचे उत्तर यात्रेत मिळाले नाही. उलट पक्षांतर्गत गटागटाचे राजकारण उफाळून मात्र आले. तसे होऊ नये यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. कर्नाटकातील मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारखा नेता महाराष्ट्राचा प्रभारी आहे. खरगे यांनीही या जनसंघर्ष यात्रेत येऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. या सर्व प्रयत्नांमुळे पक्षाची 'जान' राहाणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ, राफेल, सीबीआय संचालक या सर्व मुद्द्यांवर घाव घालत काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यभर भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नाही. उदाहरणार्थ, बीडमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद शून्य आहे. गेल्या दोन दशकांत सातत्याने औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पराभूत होत आहे. रजनी पाटील या गांधी घराण्याच्या जवळच्या तरीही त्यांना बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढवता आली नाही. त्या ओसाडगावच्या कारभारी ठरल्या आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सहकारी चळवळीतून काँग्रेस केव्हाच हद्दपार झाली आहे. पक्षाचे संघटनही कमकुवत झाले आहे. राज्यस्तरापासून खालच्या पातळीपर्यंत पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष यामुळे काँग्रेसला घरघर लागली असून, जनसंघर्ष यात्रेत देशातील व राज्यातील नेते एकत्र आले ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. या यात्रेचा समारोप मराठवाड्यात झाला असल्याने दुष्काळाचे जे राजकारण झाले, याचा ऊहापोहही या यात्रेत झाला. चार वर्षांतील भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा यानिमित्ताने वाचला गेला. भाजप सरकारने दिलेले आश्वासने आणि प्रत्यक्षात जनतेला काय मिळाले, यावरच भर देत नेत्यांनी यात्रेत जनतेसमोर ठेवला. दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीचे टप्पे आजही सुरू आहेत. या यात्रेच्या निमित्ताने नांदेडमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजपमधील बॅनर युद्ध चांगलेच रंगले होते. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघांत यात्रेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यात कितपत यशस्वी ठरली आहे, हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nभारताचा POKमध्ये हल्ला; १००० किलोचा बॉम्ब टाक...\nलग्नात मटण नाही; वऱ्हाडींचा मंडपात गोंधळ\nkumbh mela buses: बसच्या लांबच लांब रांगाचा अ...\nभारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक\nपुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरुप सुटका\nभायखळा फळ बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी\nमहाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांमध्ये महिलाराज\nअलीगढ: राजस्थानच्या राज्यपालांकडून भाजपचा प्रचार\nअल्पसंख्याकांना पाकमध्ये राहायचं की नाही ते ठरवू द्या: हुसैन\nमुंबईसह गोवा, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट\n'भाई' बद्दल आम्ही समाधानी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदिलासा न्यावा सर्वदूर …...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/zop-ghe-re/", "date_download": "2019-03-25T07:40:02Z", "digest": "sha1:YRYFPZWFO3V5Y5ZAMAPJUJAYBP32AJ7L", "length": 6839, "nlines": 71, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा द���पावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nअंगाईच्या पदराखाली लपल्या अमृतधारा\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nरणमर्दांच्या पायकुळी तुज जन्म लाभला वीरा\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nतशी तिकडची स्वारी बाळा\nत्या तेजाच्या तालावरती माझा डौल पिसारा\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nझोप राजसा आज सुखाने\nतूच एक आधार जिवलगा भार तुझ्यावर सारा\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nमंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.\nवय माझं सोळा जवानीचा मळा\nनका बोलू असे दूर दूर बसून\nझोप घे रे चिमण्या सरदारा\nनंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदेरी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2019-03-25T07:36:37Z", "digest": "sha1:LHPVFVZ5GT6VGZIATDA7OLU7HGX7GFEO", "length": 8764, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुरुळी शाळेत उन्हाळी शिबिराचा शुभारंभ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकुरुळी शाळेत उन्हाळी शिबिराचा शुभारंभ\nचिंबळी- कुरूळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत मुलींसाठी खास महिंद्रा ऍन्ड महिंद्रा कपंनीच्या वतीने नन्ही कली उपक्रमांतर्गत आयोजित उन्हाळी शिबिराचा आज (सोमवारी) शुभारंभ करण्यात आल्याचे मुख्याध्यापक शोभा सुतार सांगितले. हे शिबिर मंगळवार (दि. 15 मे) पर्यंत चालणार आहे. यात मुलींना कला, नृत्य, क्राफ्ट, विविध मनोरंजनाच्या खेळातून शिक्षण दिले जाणार असल्याने त्यामुळे मुलींचा शैक्षणिक विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी सरपंच चंद्रकांत बधाले, उपसंरपच विद्या बागडे, माजी उपसंरपच अमित मुऱ्हे, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बधाले, उपअध्यक्ष नवनाथ मेमाणे व सर्व शिक्षकवृंद तसेच नन्ही कलीच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/things-you-should-know-about-isis/", "date_download": "2019-03-25T08:00:19Z", "digest": "sha1:6Z3WXFJOW2QUUKX4RGTAERKN2EYSHPL3", "length": 19909, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अतिशय क्रूर दहशतवादी संघटना ISIS बद्दल तुम्ही कधीही न वाचलेल्या गोष्टी!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअतिशय क्रूर दहशतवादी संघटना ISIS बद्दल तुम्ही कधीही न वाचलेल्या गोष्टी\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nसध्या ISIS ही संघटना संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घालत आहे. कित्येक निष्पाप जीवांच्या हत्येचे पातक त्यांच्या माथी आहे, पण त्याची त्यांना बिलकुलही जाणीव नाही, उलट त्यांचा हा नरसंहार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धर्माच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना आकर्षित करून खोट्या विचारधारेवर आधारित साम्राज्य निर्माण करण्याचे त्यांचे ध्येयच त्यांना कधी न कधी तरी खड्ड्यात घालणार आहे आणि तो दिवस लवकरात लवकर येवो आणि हा निष्पाप रक्तसंहार थांबो ही आशा. असो आज आपण याच क्रूर दहशतवादी संघटनेबद्दल काही सत्य गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला आजवर कोणीही सांगितल्या नसतील.\nISIS म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया, हे या संघटनेचे पूर्ण नाव होय. कधीकाळी इराकमध्ये आयएसआयएस ही संघटना अल-कायदा म्हणूनच ओळखली जात होती. मात्र, २००६ मध्ये अमेरिका आणि स्थानिक अमेरिकन सैनिकांनी अल-कायदाचा पाडाव केला. त्यांना या संघटनेचा खात्मा झाला असे वाटत असले तरी ती पूर्णपणे संपली नव्हती.\n२०११ मध्ये हा ग्रूप पुन्हा तयार झाला. त्यांनी इराकच्या तुरुंगात असलेल्या अनेक कैद्यांना सोडवले आणि हळु-हळु स्वतःची ताकद वाढवण्यास सुरवात केली. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये या संघटनेने अल-कायदाच्या छत्रछायेतून बाहेर पडत आयएसआयएस नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तेव्हा आयएसआयएसने दावा केला होता की, सीरियामध्ये असलेला अल-कायदाचा प्रमुख गट अल-नुसरा हा त्यांच्या प्रभावाखाली आहे. त्यानंतर वर्चस्वाच्या लढाईत आयएसआयएसने अल-कायदाचा तत्कालिन प्रमुख आयमन अल-जवाहिरीचा आदेश ऐकण्यास नकार देत अल-कायदाच्या विरोधात जाणारी पहिली संघटना म्हणून स्वतःला समोर आणले.\nजगावर दहशत निर्माण करणा-या ओसामा बिन लादेनने अल-कायदा ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती. आता जगातील इस्लामिक देशांमधील कट्टरपंथी संघटनांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी आयएसआयएस आणि अल-कायदा यांच्यात स्पर्धा सुरू झाली. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते आयएसआयएसने अल-कायदाला मागे टाकून जगातील इस्लामिक दहशतवादी संघटनांवर प्रभाव निर्माण केला आहे.\nआयएसआयएसचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे कट्टर सुन्नी इस्लामिक राष्ट्र स्थापन करणे. आयएसआयएसला आखाती देश आणि उत्तर अफ्रिकेच्या काही भागावर आपला प्रभाव निर्माण करण्याची इच्छा आहे. याशिवाय आयएसआयएसच्या इस्लामिक वर्चस्वचा एक भाग भारत देखिल आहे. संघटनेने एका नकाशात इस्लामिक स्टेट ऑफ खोरेसानचा उल्लेख केला होता, यात भारताचा उत्तर पश्चिम भाग असून गुजरातचा देखील समावेश आहे.\nइराकमध्ये आयएसआयएसचा अचानक प्रभाव वाढण्याचे एकमेव कारण आहे शिया-सुन्नी यांच्यातील वाद. इरामध्ये शिया मुस्लिम बहुसंख्यांक आहेत. मात्र, सद्दाम हुसेनचे सरकार आल्यानंतर सुन्नींचा प्रभाव वाढला. त्याला कारण म्हणजे, सद्दाम स्वतः सुन्नी होता. तो सत्तेत आल्यानंतर त्याने सुन्नीच बहुसंख्यांक असल्याची अफवा पसरवली आणि ती आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे सुन्नींना सत्तेत अधिक वाटा हवा असतो. मात्र जोपर्यंत शिया सत्तेत आहेत तोपर्यंत सुन्नींना आपला सत्तेतील हिस्सा कमी असल्याचे वाटत राहाणार आणि हाच असंतोष आयएसआयएसने हेरला व त्यांची संघटना मजबूत झाली.\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही जगातील सर्वात श्रीमंत संघटना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आयएसआयएसने २०१४ साली तेल संपन्न मोसूल शहरावर ताबा मिळविला होता. त्यानंतर काही दिवसात स्थानिकांनी त्यांना तेथून मागे फिरण्यास भाग पाडले. मात्र, तोपर्यंत या संघटनेच्या दहशतवाद्यांनी शहरातील बँकांमधून अब्जावधींचे सोने आणि रोकड लुटली होती.\nमोसूलवर ताबा मिळविण्��ाआधी आयएसआयएसकडे ८७५ मिलियन संपत्ती (जवळपास 5200 कोटी रुपये) होती. मोसूल लुटीनंतर त्यांच्या संपत्तीत १.५ बिलियन डॉलर अर्थात ९००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आयएसआयएस संपत्तीचा मुख्य स्त्रोत हा लुटमार आणि जबरस्ती वसुली हा आहे. त्याशिवाय ट्रक चालक आणि व्यापा-यांकडून ते बळजबरीने वसुली करतात. या संघटनेचे क्राइम नेटवर्कही मोठे असून त्यांनी सोन्याच्या पेढ्या लुटल्या आहेत.\nआज पर्यंतच्या दहशतवादी संघटनांच्या तुलनेत आयएसआयएस ही संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवण्यात आघाडीवर आहे. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नरसंहाराची छायाचित्रे पोस्ट करत असतं. पूर्वी त्यांनी ‘द डॉन ऑफ ग्लॅड टायडिंग्स’ नावाचे अँड्रॉइड अॅप्लिकेशन लॉन्च केले होते. या अॅपच्या माध्यमातून सीरिया, इराक आणि मुस्लिम जगतातील बातम्या दिल्या जात असतं. ज्या दिवशी आयएसआयएसने मोसुल शहरावर ताबा मिळविला त्या दिवशी या अॅपच्या माध्यमातून ४० हजार ट्विट केले गेले.\nक्रूर, निर्दयी, पापी अशी सर्व विशेषणे कमी पडावीत अशी ही आयएसआयएस संघटना म्हणजे आजच्या आधुनिक युगाला लागलेली कीड आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, हि कीड लवकरात लवकर ठेचली पाहिजे, अन्यथा येणारा काळ हा संपूर्ण जगासाठी एखाद्या अंधाऱ्या जगापेक्षा कमी नसेल.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← जाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बदल काही आश्चर्यकारक गोष्टी\nआपल्याच मातेचा वध करणाऱ्या भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत आश्चर्यकारक गोष्टी\nहॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर\nभारताने रोमच्या अस्ताची ही ६ प्रमुख कारणं समजून घ्यायला हवीत…अन्यथा…\nयोगगुरु बाबा रामदेव यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या धक्कादायक गोष्टी\nOne thought on “अतिशय क्रूर दहशतवादी संघटना ISIS बद्दल तुम्ही कधीही न वाचलेल्या गोष्टी\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २\nहोळीची विविध राज्यांतील रूपं पाहून “भारत” देशाचं एक वेगळंच रंगीत चित्�� उभं रहातं\nदैनंदिन जीवनातल्या या सामान्य सवयी तुमच्या आजारपणाचे कारण बनत आहेत का\nकौन बनेगा करोडपतीमधील हे ७ कोट्याधीश – सर्वांचं डोळे उघडणारं वास्तव\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा”\nसेक्सकडे पहाण्याचा “असाही” दृष्टिकोन – स्त्रियांची “एकांतातील सुखप्राप्ती”\n‘ह्या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी\nदेशाला ४० हुतात्मा माहितीयेत, पण त्यांच्या फोर्सबद्दल आजही लोकांना माहिती नाहीये\nभारतातील सर्वात सक्षम सुरक्षा यंत्रणा वापरतात ही अद्वितीय हत्यारे\nहे आहेत “कांन्स फिल्म फेस्टिवल”मध्ये भारताचा डंका वाजवणारे भारतीय चित्रपट \nमहाभारतातील अत्यंत महत्वाचे ५ अज्ञात प्रसंग, जे आपल्याला मानवी मुल्यांची शिकवण देतात\n“ब्रिटिशांनी गांधीजींना बहिष्कृत करावं अशी विनंती शंकराचार्यांनी केली होती\nसंघ कार्यकर्ता विरुद्ध भाजप राज्य सरकार : एका अक्राळविक्राळ घोटाळ्याची भेदक कथा\nसभोवतालच्या ५ नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला depression मध्ये नेवु शकतात\nलेनिनचा पुतळा, पुतळ्याचा लेनिन : रक्तरंजित क्रांतीच्या समर्थकांना पुतळ्याचं कौतुक का\nचिनी स्त्रियांच्या सुंदर नितळ त्वचेचं काय आहे रहस्य\nप्राचीन भारतीय विद्वतेची साक्ष देणारे १४०० वर्षे जुने ‘सूर्य घड्याळ’\nकौरवांनी याच ठिकाणी पांडवाना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/gully-boy-movie/", "date_download": "2019-03-25T08:13:53Z", "digest": "sha1:S25NMBUS2GHOO3UEY4HKFZVGTFSTCQ65", "length": 1778, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Gully Boy movie - मराठी कलाकार", "raw_content": "\nरणवीरच्या आईची भूमिका साकारतेय”हि”मराठमोळी अभिनेत्री\nसध्या सगळीकडे रणवीर सिंग आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाची चर्चा आहे....\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2015-DrBawasakarTechnology1.html", "date_download": "2019-03-25T07:52:22Z", "digest": "sha1:ZQWCQSPRC7QDFI2Q5AJCTCLXP5KOG5GM", "length": 8383, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bcy - डा.बावसकर टेक्नालाजि - 'कृषी विज्ञान' व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही", "raw_content": "\n'कृषी विज्ञान' व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही\nश्री. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर लोहार, चोबे पिंपरी, पो. ढवळस, ता. माढा, जि. सोलापूर. मोबा. ९४०३४४५२४०\nसध्या २ रू. किलो गहू व ३ रू. किलो तांदूळ या सरकारच्या योजनेमुळे शेतीस मजुर मिळेनासे झालेत. आमच्या ज्वारीची काढणी करण्यास जोडीला ७०० रू. मजुरी द्यावी लागत आहे. त्यात १०० पेंढ्यादेखील काढत नाहीत. कांदा लागवडीला बाईला २०० रू. हजेरी आहे. बाया ११.०० वा. येतात व ५.०० जातात. मध्येच लाईट गेली तरी पुर्ण द्यावीच लागते.\nउजणीधरण ७० - ८०% भरले की, माढा तालुक्यातील पिंप्री, ढवळस, जाकले, भागेवाडी, गवळेवाडी, महादेववाडी, कवे, रोपळे, बिटरगाव, मुंगशी, म्हैसगाव, रिधोरे, पापनस, आणि शिना - माढा बोगदा उचलपाण्यावरची गावे यामध्ये प्रचंड ऊस पट्टा होतोत. उसाशिवाय दुसरे पीकच दिसत नाही. त्यामुळे ऊस वेळेवर जात नाही. या भागात ४ - ५ साखर कारखाने असूनदेखील ऊस वेळेवर जात नाही. १८ महिन्यानंतरच तोड बसते. कारखान्यांनी सध्या १५०० चा सुरूवातीचा भाव काढला आहे, त्यामुळे कसे परवडायचे पाणी भरपूर आहे, मात्र सरासरी उतारा ३५ ते ४० टनाचा आहे. क्वचित सुधारित शेतकऱ्याला ६० - ६५ टनाप्रर्यंत उतारा मिळत आहे.\nदुघ्धव्यवसाय करावा तर दुधाचेही भाव ढासळलेत. १७ रू. प्रमाणे डेअरीवाले दूध घेतात आणि पशुखाद्याचे दर हे वाढतच आहेत. आज गोळी पेंडीचे ५० किलोचे पोते ११०० रू. ला झाले आहे. पहिले ते ७०० रू. ला मिळत असे. यामुळे दुग्धव्यवसायही परवडेनासा झाला आहे. माझ्याकडे १० एकर शेती आहे. ३ बोअर आहेत. प्रत्येक बोअरला २ इंच पाणी आहे ते विहीरीत सोडून नंतर शेतीस वापरतो. मजुर व भारनियमन या मुख्य दोन्ही समस्यांमुळे शेती परवडेनाशी झाली आहे. २ मुले उच्चशिक्षित आहेत. ती नोकरीला आहेत. सुनादेखील उच्चशिक्षीत असल्याने त्यांना शेती करण्याची आवड नाही. मी, माझी पत्नी व वडील तिघेच शेत��� करीत आहे. तिघांना एवढी १० एकर शेती पेलत नाही. मजुर काय मिळत नाही.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर माझी पुर्ण श्रद्धा आहे. सरांच्या मार्गदर्शनामुळे मागे खरबुज ३ एकर लावले होते तर खर्च वजा जाता २ लाख रू. ३ महिन्यात झाले होते. नंतर पावसाळी मिरची १ एकर लावली होती. तर हिरव्या मिरचीचे (कुर्डुवाडी मार्केटला) ६० - ६५ रू. किलो दराने ६० - ७० हजार रू. झाले होते. टोमॅटो ३० गुंठे जुनची लागण होती, त्यापासून १ लाख ३० हजार रू. झाले होते. मात्र सध्या मजुरांच्या समस्येने वेळेवर कुठलीच कामे होत नसल्याने शेती परवडेनाशी झाली आहे.\nयावर सरच काहीतरी मार्ग सुचवतील या आशेने सरांकडे आज (२७ फेब्रुवारी २०१५) आलो आहे. सरांनी सांगितले, \"जमीन हलकी असल्याने तुम्ही ठिबक करून ' सिद्धीविनायक' शेवगा व डाळींब लावा, तसेच जर्शी गाई परवडत नाहीत. त्या कमी करून सेंद्रिय शेती करण्यासाठी देशी गाईंचे संगोपन करा. \" मी 'कृषी विज्ञान' मध्ये मागे वाचले आहे की, देशी गाई पालन कृषी क्षेत्रात क्रांती करतील. यांच्या गोमुत्राने व शेणखताने कमी खर्चात नैसर्गिक सेंद्रिय शेती बहरून दर्जेदार सेंद्रिय शेतीमाल उत्पादन होत आहे. त्यामुळे आता हळू हळू देशी गाई वाढवून सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा व भगवा डाळींब शेतीचे नियोजन करणार आहे.\nसरांचे तंत्रज्ञानाबद्दल एवढी खात्री आहे की, हे एकमेव तंत्रज्ञान असे आहे की, त्याने शेतकरी समृद्ध होवून समाधानी राहील. त्यामुळे हे तंत्रज्ञाना व 'कृषी विज्ञान' मासिक मी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. कृषी विज्ञानची मागील वर्गणी संपत आल्याने आज पुन्हा वार्षिक वर्गणी भरत आहे. यावेळी सरांनी मला 'कृषीविज्ञान' मार्च २०१५ चे मासिक भेट दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2016-Dalimb.html", "date_download": "2019-03-25T07:53:06Z", "digest": "sha1:EIGYI5JSZN2PZNQOBA4BZBBHF2BUT7FF", "length": 7085, "nlines": 26, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - धरण परिसरातील उरलेल्या माळरानावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ एकर डाळींब प्रयोगाचा यशस्वी प्रयत्न", "raw_content": "\nधरण परिसरातील उरलेल्या माळरानावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ एकर डाळींब प्रयोगाचा यशस्वी प्रयत्न\nप्रा. शिरीष बळीराम पाटील, (M.Sc. वनस्पती शास्त्र) मु.पो. हिंगणे बु॥, ता. जामनेर, जि. जळगाव. मो. नं. ९४२०११२८५३\nमाझ्याकडे, माझी व भावाची एकत्र १३ ��कर मुरमाड, हलकी, माळरानाची जमीन आहे. आमचे शिवार वाघुर धरणाच्या बॅक वॉटर परिसरातले. भारी जमीन धरण क्षेत्रात पाण्याखाली गेल्यावर हेच माळरान हाती शिल्लक राहिले. या माळरानात धरणातून पाणी आणून त्यात डाळींब लावावे असे ठरवले.\nराहुरी विद्यापीठ येथून १७०० रोपे आणून १२ x १० फुट अंतरावर ५ एकर लागवड सप्टेंबर २०१४ ला केली. लागवडीच्या वेळी खड्डे भरताना शेणखतासोबत कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केला. जर्मिनेटर मध्ये बुडवून गुटी रोपांची लागवड केली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, जळगाव ऑफिसमधून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आळवणी, फवारे यासाठी सप्तामृताचा वापर सुरूवातीपासून सुरू ठेवला.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व उत्पादने मी याआधी सुद्धा (२००६ पासून) केळी, कापूस, टरबूज या पिकांसाठी वापरत आलो आहे.\nडाळींबाच्या बाबतीत आम्ही सुरवातीपासून सेंद्रिय पद्धतीवर भर देत आहोत. शेणखत, शेण-कडधान्य स्लरी, ईएम यांचा वापर केला. लागवडीनंतर प्रत्येक झाडाला मल्चींग पेपर आंथरला. त्याचा खुपच फायदा झाडांना झाला. झाडे जोमाने वाढली. पांढरी मुळे जोमाने वाढली. झाडाखाली वाफसा स्थिती कायम राहिली. तणांचा त्रास ६ महिने झाला नाही.\nझाडांची छाटणी प्रत्येक ६ व्या महिन्यात केली. रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवला. जर्मिनेटरचा वापर फवारणी, ड्रेंचिंगसाठी वेळोवेळी केला. एका वर्षाच्या काळात झाडे एकदम सशक्त व जोमदारपणे वाढली. १४ व्या महिन्यातच ४ ते ५ फुटाचा घेर व उंची ६ फुटापर्यंत गेली. झाडे बहार घेण्यालायक तयार झाली.\nनोव्हेंबर २०१५ ला बागेला ताण देऊन आंबे बहार घेण्याचे नियोजन केले आहे. दीड महिन्यात ७५% पानगळ होऊन नवीन पालवी फुलोऱ्यासह निघाली ताणाच्या काळात बागेत रोटर मारून १० ट्रॉली शेणखत चांगले मुरलेले प्रत्येक झाडाला १५ किलो याप्रमाणे दिले पहिले पाणी सुरू केल्यानंतर जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली सप्तामृतची फवारणी केली. त्यामुळे पानांना चकाकी व रुंदपणा आला. कळी सेटिंग चांगली झाली.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमीत फवारणी व आळवणीमुळे रसशोषक किडी, बुरशी रोगांचा प्रादुर्भाव बागेत जास्त जाणवला नाही.\nप्रत्येक झाडाची क्षमता पाहून पहिल्या बहाराचे नियोजन आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे म्हणजे अगदी Eco-Friendly औषधे आहेत. ती मधमाशा, मित्रकीटक व मानवासाठी अपायकारक नाहीत. त्रासदायक किडी���चा, बुरशी रोगांचा बंदोबस्त होतो. झाडांची निरोगी, जोमदार वाढ होते.\nडॉ.बावसकर तंत्रज्ञाना हे एक अस्सल भारतीय तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे व इस्त्राईल तंत्रज्ञानाच्याच तोडीचे आहे. शेतकऱ्यांनी अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-25T08:23:46Z", "digest": "sha1:WOKLGBNPI77WDAL3SZOUKUBITWIIH3UM", "length": 5948, "nlines": 42, "source_domain": "vicharpravah.in", "title": "'इनसाईट मार्स लँडर' मंगळावर उतरले - विचारप्रवाह", "raw_content": "\n‘इनसाईट मार्स लँडर’ मंगळावर उतरले\n‘इनसाईट मार्स लँडर’ या नासाच्या मंगळ मोहिमेबाबत मला प्रचंड उत्सुकता होती. ‘इनसाईट’ मंगळकडे झेपावल्यापासून पाहता पाहता सहा महिने निघून गेले आणि दोन दिवसांपूर्वी ते मंगळावर अगदी सुखरूप उतरले. मंगळावरील वातावरणाचा दबाव पुरेसा नसल्याने बग्गी उतरावण्याच्या दृष्टीने मंगळाच्या जमिनीला स्पर्श करणे जिकरीचे मानले जाते. जगभरातील अंतराळ मोहिमांना याकामी अनेकदा अपयश आहे. अशाने ‘इनसाईट’ मंगळावर सुखरूप पोहचेपर्यंत या मोहिमेमागे कार्यरत असलेले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, तसेच खगोलप्रेमी यांचा जीव टांगणीला लागला होता. सरतेशेवटी मोहीम यशस्वीरीत्या पार पडल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला विशेष म्हणजे ‘इनसाईट मार्स लँडर’ने आता मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवण्यास सुरुवात देखील केली आहे.\nइनसाईट मार्स लँडरने घेतलेला पहिला फोटो | सौजन्य : नासा\nजेंव्हा एखाद्या मोहिमेमागे जीव ओतून काम केले जाते आणि ती मोहीम यशस्वी होते, तेंव्हा त्याचे एक वेगळेच समाधान असते. ‘इनसाईट’ मोहिमेच्या माध्यमातून मंगळ ग्रह आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेल आणि भविष्यात या ग्रहावर वसाहत करण्याच्या दृष्टीने त्याचा पुष्कळ फायदा होईल हे निश्चित\nइनसाईट मार्स लँडरने मंगळावर उतरल्यानंतर सभोवतालच्या परिसराचा घेतलेला एक सुरेख फोटो | सौजन्य : नासा\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n‘व्हॉयेजर २’ हे तपासयान सूर्यमालेबाहेर पडले असण्याची शक्यता असून नासातर्फे लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते.\n‘ओमुआमुआ’ प्रत्यक्षात परग्रहवासीयांचे अंतराळ यान असण्याची शक्यता हार्वर्ड मधील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे\nचीनमध्ये AI (कृत��रिम बुद्धिमत्ता) वृत्तनिवेदक\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/three-died-mangalvedha-road-accident-135535", "date_download": "2019-03-25T08:18:20Z", "digest": "sha1:DS3M7KBFT4HMQEOYCDEWDFB46JO7LFF6", "length": 12678, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three died in mangalvedha road accident मंगळवेढा मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nमंगळवेढा मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nदोन्ही वाहने इंचगाव शिवारात येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यात वरील तिघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.\nमोहोळ : मोटार सायकल व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पती पत्नी व त्यांची नात असा तिघांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात आज दुपारी साडेतीन वाजता बेगमपूर ते मंगळवेढा मार्गावरील इंचगाव शिवारात झाला.\nसदाशिव अंबादास गुंड (55) कमल सदाशिव गुंड (48) व आरती अमोल गुंड (6) तिघेही रा. शिवणी ता. उतर सोलापूर अशी अपघात मृत झालेल्यांची नावे आहेत. कामती पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, गुंड पती पत्नी मोटार सायकल क्र. एम. एच. 13/ ए एम 7776 वरून बेगमपूर हून मंगळवेढयाकडे निघाले होते. तर मालट्रक क्र. एम. एच. 20 ए. टी. 3900 ही विरूद्द दिशेने येत होती. दोन्ही वाहने इंचगाव शिवारात येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यात वरील तिघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.\nअपघाताची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे व अपघात पथकाने घटना स्थळाला भेट दिली.\nया अपघाताची फिर्याद संतोष चंद्रसेन गुंड रा. शिवनी यांनी का���ती पोलिस ठाण्यात दिली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nLoksabha 2019 : अर्ज भरताना तरी 'युती की जय हो' म्हणा\nसोलापूर - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १९९३च्या पोटनिवडणुकीत आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोलाची मदत केली होती. त्यामुळे अनेकांना आमदारकीची...\nLoksabha 2019 : महास्वामी म्हणाले, किती माताधिक्य द्या\nसोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. राजकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर...\n#WeCareForPune बंडगार्डन परिसरात पदपथावर अतिक्रमण\nपुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल...\n#WeCareForPune फलक कोसळून अपघाताची शक्यता\nपुणे : कात्रज नऱ्हे रस्त्य़ावर भुमकर चौकात दिशादर्शक फलक धोकादायक अवस्थेत लटकत असून केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. तरी याकडे गांभीर्याने लक्ष...\nLoksabha 2019 : आघाडीत एकजूट; युतीत दिलजमाई बाकी\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/kids-mom-fest-47697", "date_download": "2019-03-25T08:57:43Z", "digest": "sha1:JWNNLGKBZUXSAOHR6XEVRZ7EPANA7CWF", "length": 15070, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "kids & mom fest ‘किड्स अँड मॉम फेस्ट’चा रविवारी जल्लोष | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\n‘किड्स अँड मॉम फेस्ट’चा रविवारी जल्लोष\nगुरुवार, 25 मे 2017\n‘सकाळ’, पुणे सेंट्रल मॉलतर्फे आयोजन; बच्चेकंपनी आणि पालकांसाठी नृत्य स्पर्धा, नोंदणी सुरू\nपुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी मुले व पालकांसाठी ‘सकाळ’ने ‘किड्स अँड मॉम फेस्ट’ आयोजित केला आहे. हा फेस्टिव्हल येत्या रविवारी (ता. २८) कोरेगाव पार्क येथील पुणे सेंट्रल मॉल येथे होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये बच्चेकंपनीसह पालकांनाही विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानी मिळणार असून, फेस्टची नोंदणी सुरू झाली आहे.\n‘सकाळ’, पुणे सेंट्रल मॉलतर्फे आयोजन; बच्चेकंपनी आणि पालकांसाठी नृत्य स्पर्धा, नोंदणी सुरू\nपुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी मुले व पालकांसाठी ‘सकाळ’ने ‘किड्स अँड मॉम फेस्ट’ आयोजित केला आहे. हा फेस्टिव्हल येत्या रविवारी (ता. २८) कोरेगाव पार्क येथील पुणे सेंट्रल मॉल येथे होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये बच्चेकंपनीसह पालकांनाही विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानी मिळणार असून, फेस्टची नोंदणी सुरू झाली आहे.\nमुले व पालकांनी एकत्रितरीत्या वेगवेगळ्या उपक्रमांत सहभागी व्हावे, या उद्देशाने या भन्नाट ‘फेस्ट’मध्ये आई आणि मुलांसाठी खास डान्स वर्कशॉप घेण्यात येणार आहे. ज्यांची मुले तीन महिने ते सात वर्षे या वयोगटात आहेत, अशा महिलांना या वर्कशॉपमध्ये सहभागी होता येईल.\nनृत्य स्पर्धेद्वारा सायकल व ‘पीएसपी’सारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मुलांना मिळणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी आपल्या गाण्याची ‘एमपी थ्री सीडी’ सोबत आणावयाची असून, प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त दोन मिनिटे नृत्यासाठी दिली जातील. सोलो डान्स स्पर्धेसाठी आयटम साँगची निवड करता येणार नाही. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी होणार आहे.\nकिड्स अँड मॉम डान्स वर्कशॉप\nकधी - रविवार, २८ मे वेळ : सायं. ५ ते ६ वा.\n३ महिने ते ७ वर्ष या वयोगटातील मुले असलेल्या महिलांसाठी\nशुल्क - २०० रु. (प्रत्येक जोडी)\nग्रुप ए - नर्सरी ते तिसरी ग्रुप बी - चौथी ते सहावी\nग्रुप सी - सातवी ते दहावी वेळ : ���ायं. ६.३० पासून\nशुल्क : १०० रु. प्रत्येकी\nकिड्स अँड मॉम फेस्ट\nकधी : २८ मे २०१७\nकोठे : पुणे सेंट्रल मॉल, नीतेश हब, वेस्टीन हॉटेलजवळ, कोरेगाव पार्क\nनोंदणीसाठी संपर्क : पुणे सेंट्रल मॉल, नीतेश हब, कोरेगाव पार्क (दु. १२ ते रात्री ८) व ‘सकाळ’ शिवाजीनगर कार्यालय (स. ११ ते सायंकाळी ५)\nदूरध्वनी - ८८०५००९३९५, ९८२२०७८४१५ किंवा ९५५२५३३७१३\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nLoksabha 2019 : पुण्यात रंगणार बापट विरुद्ध गायकवाड सामना\nपुणे : काँग्रेसकडून पुण्याच्या जागेवर अजूनही चर्चाच सुरु असताना, प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे...\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nLoksabha 2019 : अर्ज भरताना तरी 'युती की जय हो' म्हणा\nसोलापूर - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १९९३च्या पोटनिवडणुकीत आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोलाची मदत केली होती. त्यामुळे अनेकांना आमदारकीची...\nLoksabha 2019 : महास्वामी म्हणाले, किती माताधिक्य द्या\nसोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. राजकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर...\nपुण्यातील गुंडाकडून आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार\nवाई (सातारा) - आनेवाडी टोलनाक्यावर टोल भरण्यावरून पुणे येथील सराईत गुंड रोहीदास उर्फ बापु चोरगे याने व त्याच्या एका साथीदाराने साताऱ्याहून पुण्याकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/pravin-tokekar-writes-about-hollywood-directors-50077", "date_download": "2019-03-25T08:12:21Z", "digest": "sha1:7WWZPFLE7FIREQJVJHPS3TCIYDYXMEAY", "length": 44583, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "pravin tokekar writes about hollywood directors आणखी एक नोहा... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nरविवार, 4 जून 2017\nवास्तविक असं वाटतं की ‘शिंडलर्स लिस्ट’ या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटावर काही लिहूच नये. इथं शब्द थिटे पडतात. माणुसकीची ही अनोखी कहाणी स्पीलबर्गनं पडद्यावर आणली त्याला पंचवीसेक वर्षं लोटली; पण हा चित्रपट कालातीत आहे. तो कधीही बघावा. बघून झाल्यावर मूकपणानं स्वत:त डोकावावं.\nवास्तविक असं वाटतं की ‘शिंडलर्स लिस्ट’ या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटावर काही लिहूच नये. इथं शब्द थिटे पडतात. माणुसकीची ही अनोखी कहाणी स्पीलबर्गनं पडद्यावर आणली त्याला पंचवीसेक वर्षं लोटली; पण हा चित्रपट कालातीत आहे. तो कधीही बघावा. बघून झाल्यावर मूकपणानं स्वत:त डोकावावं.\nयेहोवाने नोह ह्यांस आज्ञापिलें : लौकरच मी जळप्रळय धाडिणार असून त्यायोगे सृष्टी नष्ट होईल. तू सत्वर एक नौका बांध व प्रत्येक प्रजातीच्या जोड्यांस एकत्रित घे. ज्याचे इमान शाबूत आहे, तोंचि प्रळयात जगेल, बाकी सारे नष्ट होईल. नौका बांधून वाट पहा. ज्या दिशी पेटत्या चुलीतून पाणी वर येऊ लागेल, त्या दिशी नौकेत जा...येहोवाच्या आज्ञेनुसार नोहाने आपल्या कुटुंबासमवेत एक नौका बांधिली, जी प्राणिमात्रें आणि इमानासह जळप्रळयांत तरली. एणें मनुष्यमात्र सृष्टीच्या विलयानंतरही तगून राहिला.\nदुसऱ्या महायुद्धाच्या काळातली गोष्ट. नाझी वरवंट्यासमोर पोलंड केव्हाच पडलं होतं. विस्तुला नदीच्या काठावर वसलेलं क्रॅकोव हे यहुदीबहुल पोलिश गाव बघता बघता नाझी फौजांच्या दाढेखाली रगडलं गेलं. गेली ६०० वर्षं इथं यहुद्यांनी राज्य केलं. उत्तम धंदा, चोख व्यवहार साधत समृद्धी साधली. क्रॅकोवच्या हमरस्त्यावर उजळलेले तेलाचे नक्षीदार दिवे याची साक्ष देताहेत; पण क्रॅकोवच्या या वैभवाला काही आठवड्यांतच भराभरा तडे गेले.\nआता इतिहासानं एक जीवघेणी करवट घेतली आहे. क्रॅकोवच्या आयुष्यात गेली ६०० वर्षं कधी उगवलीच नव्हती, असं सांगणारा दिवस उगवला. ‘यहुद्यांनी आपापली भव्य घरं, मालमत्ता सोडून नव्या वस्त्यांमध्ये राहायला जावं. पुढील सूचना मिळेपर्यंत हालचाल करू नये,’ असा नाझी फतवा न���घाला. नाझी एसएस सैनिकांनी घराघरातून चिवट यहुदी फटके देत हाकलून काढले. ज्यांनी थोडा प्रतिकार करायचा प्रयत्न केला, त्यांचे भर रस्त्यात मुडदे पडले. क्रॅकोवचं नशीब फिरलं होतं.\nयहुद्यांचे लोंढे मेंढरांप्रमाणे नव्या वस्त्यांकडं निघाले होते, तेव्हा उलट दिशेनं एक उंचापुरा गृहस्थ क्रॅकोवच्या हमरस्त्यांवर चालत निघाला होता. महागडा लाँग कोट, गिर्रेबाज हॅट, शानदार सदरा, त्याला मौल्यवान कफलिंक्स...हेर डिरेक्टोर ऑस्कर शिंडलर याला क्रॅकोवमध्ये कोण ओळखत नाही तो मूळचा चेकोस्लोवाकियाचा. तो एक उद्योजक आहे. अर्थात जर्मन आहे. नुसताच जर्मन नव्हे, तर नाझी पार्टीचा सक्रिय सदस्य आहे. क्रॅकोवमध्ये स्वस्त मजूर मिळवून त्याला एनामलच्या भांड्यांचा कारखाना काढायचा आहे. नाझींची देशांतर्गत गुप्तचर संघटना ‘ॲबवेहर’चा तो माणूस असल्याचं बोललं जातं. म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनांची, विरोधकांच्या हालचालींची खबर एसएस सैनिकांना देणारा. म्हणजे हैवानच. त्याच्या डोळ्यात कावेबाजपणा चमकतो. त्याच्या दिलखुलास हास्यापाठीमागचं स्वार्थी मन लपत नाही. नाझी फौजांच्या अधिकाऱ्यांशी त्याचे दोस्तीचे संबंध आहेत. त्यांना वेळोवेळी दारू आणि बाया पुरवण्याचे उद्योग ऑस्कर शिंडलर मोठ्या उत्साहानं करतो. तोही ‘त्यातला’च आहे. सिगरेट, दारू आणि बाई...ओठांना हवीच तो मूळचा चेकोस्लोवाकियाचा. तो एक उद्योजक आहे. अर्थात जर्मन आहे. नुसताच जर्मन नव्हे, तर नाझी पार्टीचा सक्रिय सदस्य आहे. क्रॅकोवमध्ये स्वस्त मजूर मिळवून त्याला एनामलच्या भांड्यांचा कारखाना काढायचा आहे. नाझींची देशांतर्गत गुप्तचर संघटना ‘ॲबवेहर’चा तो माणूस असल्याचं बोललं जातं. म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनांची, विरोधकांच्या हालचालींची खबर एसएस सैनिकांना देणारा. म्हणजे हैवानच. त्याच्या डोळ्यात कावेबाजपणा चमकतो. त्याच्या दिलखुलास हास्यापाठीमागचं स्वार्थी मन लपत नाही. नाझी फौजांच्या अधिकाऱ्यांशी त्याचे दोस्तीचे संबंध आहेत. त्यांना वेळोवेळी दारू आणि बाया पुरवण्याचे उद्योग ऑस्कर शिंडलर मोठ्या उत्साहानं करतो. तोही ‘त्यातला’च आहे. सिगरेट, दारू आणि बाई...ओठांना हवीच शिंडलरनं आजवर खूप उटपटांग धंदे करून पाहिले आहेत. सगळ्यात अपयश. पण युद्ध छेडल्यावर त्याला बरकतीची स्वप्नं पडू लागली आहेत.\nकुठुन कुठून गाड्या भरभरून य��ुदी माणसं येताहेत. नावनोंदणी होऊन त्यांची झोपडपट्टीवजा वस्त्यांमध्ये रवानगी होते आहे. ‘आपापल्या मौल्यवान वस्तू नीट वर्गीकरण करून नावानिशी जमा करा. सोबत काहीही घेऊ नका’ अशा सूचनांचा भडिमार होतोय. ‘युद्ध संपलं की आपली मालमत्ता हे सैनिक परत देणार आहेत,’ अशी एक भाबडी समजूतही पसरली आहे. मौल्यवान घड्याळं, पेंटिंग्ज, जडजवाहीर, जोडे, कपडे, भांडीकुंडी, मेणबत्त्यांची रत्नजडित तिकाटणी...क्रॅकोवच्या यहुदी घराघरातला ऐवज अनायास नाझींच्या हाती पडू लागला.\nशिंडलरच्या कारखान्याला मात्र टाळं लागलेलं नाही. लागणार कसं तो तर नाझी पार्टीचाच माणूस आहे. शिंडलरचा एक अकाउंटंट आहे ः यिट्झॅक स्टर्न. अर्धटकल्या. चष्मिष्ट. अबोल आणि महाबेरकी. काळ्या बाजारातली गल्लीबोळ माहीत असलेला. तो यहुदी असला तरी त्याला तूर्त अभय मिळालं आहे. ‘समर्थाघरचं श्वान’च ते. आपल्या मालकाचे सगळे काळे-गोरे धंदे त्याच्या चोपड्यांमध्ये बंदिस्त आहेत. तो स्वत: कमालीचा एकनिष्ठ आहे.\n...एक दिवस नाझी अधिकाऱ्यांच्या घरी-ऑफिसांमध्ये भरभक्कम भेटवस्तू येऊन थडकल्या. मद्याची उंची बाटली, अत्तरं, बिस्किटं, चॉकलेटं, चीज, अगदी बायकांच्या लिपस्टिक्स आणि स्टॉकिंग्जसकट. हे गिफ्ट हॅम्पर भलतंच उंची होतं. युद्धकाळात तर बघायलाही मिळणार नाही असं. सोबत पत्र :\nआदरणीय हेर कर्नल अमुक अमुक, आमच्या ‘डॉइश एमेलवारेनफाब्रिक’ या एनामेलवेअर भांडी बनवणाऱ्या कारखान्यात जागतिक दर्जाची उत्पादनं होत असून सैन्यासाठी ती अत्यंत उपयुक्त आहेत. या दर्जाची उत्पादनं अन्यत्र कुठंही बनत नसतील, हे मी आपणांला खात्रीनं सांगतो. ती कृपया वापरून बघावीत. देशकार्यामध्ये त्याचा उपयोग झाला तर ते खचितच आपणां उभयतांना आनंददायी असेल. सोबत एक छोटीशी भेटवस्तू पाठवत आहे. स्वीकार व्हावा. आपला, ऑस्कर शिंडलर.\nशिंडलरच्या कारखान्याला सैन्याचीच चिक्कार कंत्राटं मिळायला लागली. उत्पादनाचा वेगही वाढवावा लागला. त्याच्या हातात पैसा खेळायला लागला. शिंडलरच्या मेजवान्या गाजत होत्या. गाणी-बजावणी, नाच, बाया, दारूचा महापूर...\nयहुदी लोक मजूर म्हणून स्वस्त होते. मजुरीचा खर्च जवळजवळ नाहीच. (त्या काळी यहुदी मजुरांचा पगार थेट राइशमध्ये जमा होई). सैन्य अधिकाऱ्यांना पटवून शिंडलरनं यहुदी लोकांना कारखान्यात लावून घ्यायचा सपाटा लावला. त्याचा अ��ाउंटंट नावं सुचवायचा. त्या यहुद्याला ठेवून घेतलं जायचं. इथंच राहा. इथंच खा-प्या. इथंच काम करा. बाकीच्या यहुद्यांचं काय होत होतं, हे शिंडलरला माहीत होतंच. एसएस गार्डस घराघरात घुसून मुडदे पाडत होते, लूटमार सुरू होती. म्हाताऱ्यांना तर भर रस्त्यात, बर्फात गोळ्या घातल्या जात. लहान मुलं गायब होत. तरणेताठे तेवढे छळछावणीत जात. तरण्या बाया ठेवून घेतल्या जात.\nशिंडलरचा अकाउंटंट नवनवी यहुदी माणसं घेऊन येई. शिंडलर त्यांना ठेवून घेई. ‘तू लेका एक दिवस मला लटकवणार आहेस’ असं वर ऐकवी. स्टर्न काही बोलत नसे. ‘पाऊणशे वयाची माणसं तुला काय करायची आहेत कारखान्यात’ असं नाझी अधिकारी शिंडलरला छेडत; पण ‘तो चांगला कास्टिंग एक्स्पर्ट म्हातारा आहे’ अशी थातुरमातुर कारणं शिंडलर द्यायचा. मात्र, त्याच्या आमिषांपुढं नाझी अधिकारी हतबल होते.\n...एक दिवस एक बाई त्याच्याकडं आली. तिच्या आई-बापांना आऊसविट्झच्या छळछावणीत पाठवतायत. ‘त्यांना आश्रय द्या’ असा तिचा आग्रह होता. शिंडलर भडकला. ‘‘मला सापळ्यात अडकवतेस, भवाने...चालती हो इथून. माझा कारखाना म्हणजे धर्मादाय आश्रम वाटला काय फूट\n...पण त्यानं तिच्या आई-बापांना नाझींच्या तावडीतून सोडवून आणलं आणि कारखान्यान ठेवलं. एव्हाना त्याच्या कारखान्यात १७०० ‘कामगार’ भरती झाले होते. बनिया वृत्तीच्या शिंडलरच्या आयुष्याचा हेतू नकळत बदलून गेला होता...\nशिंडलरची बायको एमिली दूर एका गावात राहायची. आठवड्यातून एकदा क्रॅकोवला यायची. दरवेळी नवी बाई आपल्या नवऱ्याकडं मोलकरीण म्हणून कामाला असते. तिच्या डोक्यात तिडीक जायची; पण बोलणार कुणाकडं एका संध्याकाळी शिंडलरनं तिला एका महागड्या हॉटेलात नेलं.\n‘‘मी यशस्वी होतोय, एमिली...अखेर यश मिळालं. इतके धंदे केले पण...काहीतरी मिसिंग होतं. तू बघशील, ऑस्कर शिंडलर हे नाव यापुढं लोक आदरानं घेतील. .\n‘‘तिकडं गावी तुझ्याबद्दल लोक हेच बोलताहेत.’’\n‘‘हेच...की ऑस्करनं नशीब काढलं. टक्के-टोणपे खात शेवटी तो सुधारला.’’\n‘‘ यश आणि अपयश यांच्यामध्ये काहीतरी असतं, हनी,’’ सिगारेटचा एक निर्मम झुरका घेत शिंडलर म्हणाला, ‘‘अपयशाचं रूपांतर यशात होण्यासाठी एक गोष्ट नितांत गरजेची असते. ती मिसिंग होती..’’\nहेर हॉप्टस्टर्मफ्यूरर लेफ्टनंट कर्नल ॲमोन गोथ क्रॅकोवच्या छावणीत बदलून आला, तोवर आऊसविट्झची छावणी कार्यान्वित झालेली होती. क्रॅकोवच्या यहुद्यांबद्दल कमालीची तिडीक घेऊनच गोथ येऊन थडकला. छावणीच्या मधोमध त्याचा बंगला होता. त्याच्या सज्जात बसून तो दूरवर काम करणाऱ्या यहुदी कामगारांना नेम धरून उडवायचा. कामचुकार लेकाचे हेलन हिर्श नावाची एक तरुण यहुदी पोरगी त्यानं घरकामाला आणून ठेवली होती. छंद म्हणून तो तिला फोडून काढत असे. याच हेलेनला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी शिंडलरला त्याच्या आयुष्याची मिळकत पणाला लावावी लागली.\nगोथला शिंडलरनं चांगलंच खिशात टाकलं होतं; पण इतक्यात बर्लिनहून गोथला संदेश आला की क्रॅकोव आणि प्लास्झोच्या छावण्या बंद करून मारलेल्या यहुद्यांना तिथंच पुरावं किंवा जाळावं. बाकी उर्वरितांना आऊसविट्झला हलवावं. एसएस गार्डसनी घोषणा केली की छावणी हलवण्यात येतेय. तरुण माणसं-बायांनी रेल्वेगाडीशी जमावं. त्यांना घेऊन सुरक्षित कामाच्या ठिकाणी नेण्यात येईल.\nलहान मुलं सोबत घेऊ नयेत. छावणीतली लहान मुलं मिळेल त्या खबदाडीत लपली. काही तर चक्क ड्रेनेजमध्ये. तिथंही गिचमिडच होती...\nशिंडलरनं हिकमतीनं आपली माणसं सोडवली. हिकमतीनं म्हणजे गोथला प्रत्येक माणसामागं लाच खिलवून. तरीही दुर्दैवानं बायका आणि लहान मुलांनी भरलेली एक रेल्वेगाडी आऊसविट्झला पोचलीच; पण धावत-पळत शिंडलर तिथं जाऊन थडकला आणि गॅस चेंबरच्या दारापासून त्यानं त्यांना वाचवलं. विषारी गॅसऐवजी कैद्यांना आंघोळीचं पाणी मिळालं. नाझींवर दबाव वाढत होता. युद्धाचं पारडं कललं होतं. ‘मी कारखाना सुडेटन प्रांतात हलवतो’ असं टुमणं शिंडलरनं नाझी अधिकाऱ्यांकडं लावलं. त्याला रुकार मिळाला. तिथं तुलनेनं कमी धोका होता. त्याच्या कारखान्यात यहुद्यांच्या प्रार्थना गुपचूप चालत. हेर शिंडलरच्या वाढदिवसाला तर एक साधासा केक त्याला प्रेझेंट करण्यात आला. तिथं शिंडलरनं एका ज्यू मुलीची पापी घेतल्यानं नाझी अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला चौकशीला सामोरं जावं लागलं.\nनाझींचा पाडाव होत होता. हिटलरच्या फौजा जीव खाऊन पळू लागल्या. यहुदी बंदिवान सुटू लागले. छळ-छावण्यांचं अस्तित्व नष्ट होऊ लागलं. छळाच्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या. शिंडलरच्या कारखान्यातल्या कामगारांनी जल्लोष केला; पण त्या क्षणापासून यहुदी स्वतंत्र होते. मात्र, त्यांचा तारणहार ऑस्कर शिंडलर हा नाझी पार्टीचा सद���्य असल्यानं अटकेस पात्र ठरला होता. आपल्या १२०० कामगारांना वाचवण्याच्या खटपटीत त्याचा सगळा पैसा-अडका खर्च झाला होता. कफल्लक अवस्थेतच कामगारांचा निरोप घेऊन मध्यरात्रीच्या अंधारात तो पळाला. शिंडलरचं पुढलं आयुृष्य हे एक परावलंबी आयुष्य होतं. अर्जेंटिनात काही काळ घालवल्यावर त्यानं नादारी घोषित केली. फ्रॅंकफर्टला एका खोलीत तो राहत असे. काही धंदे त्यानं करून पाहिले; पण साफ कोसळले. मग त्यानं वाचवलेल्या यहुद्यांनीच त्याला जवळपास पोसलं. ‘जो एक जीव वाचवतो, तो विश्व वाचवतो’ हे ‘तालमुड’मधलं (यहुद्यांचा पवित्र ग्रंथ) वाक्य कोरलेली एक अंगठी त्याच्याजवळ राहिली. त्याच्या कामगारांनीच त्याला ती दिली होती. मरणानंतर इस्राईल सरकारनं अत्यंत आदरानं जेरुसलेमच्या पवित्र भूमीत त्याचं दफन केलं.\nसात लाख यहुद्यांचे बळी घेणाऱ्या नाझी पार्टीचा एक सदस्य, बाईलबाज, दारूबाज, स्वार्थी, अप्पलपोटा उद्योजक ऊर्फ ऑस्कर शिंडलर एक देवदूत म्हणून अजरामर झाला.\nवास्तविक असं वाटतं की ‘शिंडलर्स लिस्ट’ या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटावर काही लिहूच नये. इथं शब्द थिटे पडतात. माणुसकीची ही अनोखी कहाणी स्पीलबर्गनं पडद्यावर आणली त्याला पंचवीसेक वर्षं लोटली; पण हा चित्रपट कालातीत आहे. तो कधीही बघावा. बघून झाल्यावर मूकपणानं स्वत:त डोकावावं. थॉमस केनीली नावाच्या एका लेखकानं १९८२ मध्ये ‘शिंडलर्स आर्क’ ही जीवनगाथा लिहून काढली. त्याला मॅन बुकर पुरस्कारही मिळाला होता. (‘ॲमेझॉन’ व अन्य काही ग्रंथस्थळी उपलब्ध आहे.) त्यावर चित्रपट बनवण्याचं बरीच वर्षं स्पीलबर्गच्या मनात होतं; पण धीर होत नव्हता. खरंतर ऑस्कर शिंडलरची ही खरीखुरी कहाणी स्पीलबर्गला पडद्यावर आणायचीच नव्हती. त्या काळात तो ‘ज्युरासिक पार्क’ची जुळवाजुळव करत होता. त्यानं प्रसिद्ध दिग्दर्शक रोमान पोलान्स्कीला गळ घातली; पण खुद्द पोलान्स्की स्वत: वयाची आठ वर्षं छळछावणीतच वाढलेला. ‘माझ्याच्यानं हे प्रकरण झेपणार नाही,’ असं स्वच्छ शब्दात त्यानं सांगून टाकलं. अखेर स्पीलबर्गनं स्वत:च मैदानात उतरायचं ठरवलं.\nसंपूर्ण चित्रपट कृष्ण-धवल रंगात आहे. ‘‘माझ्या कल्पनेनुसार रंग म्हणजे जीवन...मला मृत्यूचं अस्तित्व दाखवायचं होतं. म्हणून...’’ असं स्पीलबर्गनं त्याचं रास्त समर्थन केलं आहे. शिवाय, त्यामुळं या चित्रपटाला आप��पत: एक कालातीतताही आली आहे. या चित्रपटानं देदीप्यमान यश मिळवलं. अर्धा डझन ऑस्कर मिळवले; पण या यशाचं स्पीलबर्गनं एकदाही सेलिब्रेशन केलं नाही; किंबहुना या चित्रपटातून त्याला मिळालेला प्रत्येक पैसा महायुद्धातल्या बळींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वाटण्यात आला.\n‘‘इतका भयानक चित्रपट निर्माण करून लोकांना अस्वस्थ करण्याऐवजी होलोकॉस्टची कामं करणाऱ्या एनजीओला देणगी का देत नाहीस’’ असा सवाल त्याला नंतर त्याच्याच एका तंत्रज्ञानं रडत रडत केला होता. तेव्हा स्पीलबर्गनं उत्तर दिलं नव्हतं. संगीतकार जॉन विल्यम्स यांची ‘शिंडलर्स लिस्ट’ची खास सुरावट हा अभिजात पश्चिमी संगीतातला ठेवा बनली आहे. ती वाजवण्यासाठी विख्यात व्हायोलिनवादक इट्झॅक पेर्लमन यांना पाचारण करण्यात आलं. पेर्लमन स्वत: ज्यू आहेत. चित्रपटाची काही दृश्यं बघून ते इतके हादरून गेले की डोळे पुसत म्हणाले : ‘‘या चित्रपटासाठी तुला खरंतर माझ्यापेक्षा चांगल्या संगीतकाराची गरज आहे.’’ त्यावर स्पीलबर्ग शांतपणे म्हणाला ः ‘‘खरंय, पण ते आता हयात कुठं आहेत’’ असा सवाल त्याला नंतर त्याच्याच एका तंत्रज्ञानं रडत रडत केला होता. तेव्हा स्पीलबर्गनं उत्तर दिलं नव्हतं. संगीतकार जॉन विल्यम्स यांची ‘शिंडलर्स लिस्ट’ची खास सुरावट हा अभिजात पश्चिमी संगीतातला ठेवा बनली आहे. ती वाजवण्यासाठी विख्यात व्हायोलिनवादक इट्झॅक पेर्लमन यांना पाचारण करण्यात आलं. पेर्लमन स्वत: ज्यू आहेत. चित्रपटाची काही दृश्यं बघून ते इतके हादरून गेले की डोळे पुसत म्हणाले : ‘‘या चित्रपटासाठी तुला खरंतर माझ्यापेक्षा चांगल्या संगीतकाराची गरज आहे.’’ त्यावर स्पीलबर्ग शांतपणे म्हणाला ः ‘‘खरंय, पण ते आता हयात कुठं आहेत\nशिंडलरच्या प्रमुख भूमिकेत लियॅम नीसन हा उंचापुरा अभिनेता आहे. त्याच्या कामगिरीला दाद तरी कशी द्यावी वाटतं की कुठं यदाकदाचित भेटलाच, तर नुसतेच त्याचे दोन्ही हात हातात घेऊन मिनिटभर उभं राहावं. बस्स. त्याचा अबोल अकाउंटंट आहे आपला ‘गांधी’ फेम बेन किंग्जली. यहुद्याचा चिवटपणा आणि मालकाविषयी असलेली निष्ठा याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे त्याची अफलातून भूमिका. लेफ्टनंट कर्नल ॲमोन गोथची अमानवी भूमिका राल्फ फिएन्सनं केली आहे. त्याच्या नजरेतच एक विकृत लैंगिकता आहे. हे तिघंही शेक्सपीरिअन ��ंगभूमी गाजवलेले नट आहेत. ‘शिंडलर्स लिस्ट’ची जातकुळीही आपलं नातं थेट शेक्सपीअरच्या विकारविलसितांशी आहे, असं चौकटीचौकटीतून सांगते.\nखराखुरा शिंडलर हा काही देवमाणूस नव्हता. तसा चित्रपटातही तो दाखवण्यात आलेला नाही; पण ‘माणुसकी की अमानुष धंदा’ यात त्यानं पहिली निवड केली. सर्व तमोगुणांचं आगर असूनही तो देवदूतच ठरला. त्याच्या आयुष्यातली शेवटची काही वर्षं तर देणग्या आणि मदतीवर त्याला काढावी लागली. मरताना त्याच्याकडं फुटकी कवडी नव्हती; पण त्याच्या जेरुसलेममधल्या थडग्यावरचं वाक्य त्याला पुण्यात्मा ठरवतं.- ‘जो एक जीव वाचवतो, तो विश्व वाचवतो.’ जगात आजमितीस सहा हजार यहुदी ‘शिंडलर्स ज्यूज्’ म्हणून ओळखले जातात. ही कुटुंबं पुन्हा स्थिर-स्थावर झालेली आहेत. शिंडलर हा त्यांच्यात चक्क पूजला जातो. प्रलयात नौका लोटणारा नोहा आणि महायुद्धाच्या वणव्यात असहाय्यांना तारून नेणारा शिंडलर यांच्यात त्यांना फारसा फरक करता येत नाही. फरक इतकाच की नोहा पुराणात होता, शिंडलर त्यांच्या आयुष्यात एक होडी घेऊनच आला होता.\nशिवाजीनगरवासींच्या त्रासाला सत्तेतील भाजपच जबाबदार : गुलाबराव देवकर\nजळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत....\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nLoksabha 2019 : रावेर लोकसभेतून संतोष चौधरींची माघार\nभुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा...\nबाजारासाठी निवडणूक किती महत्त्वाची\nआता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना...\nकोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात\nचिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे...\n'फिल्मफेअर 2019' मध्ये रंगला प्रेमाचा सोहळ���; 'हे' ठरले मानकरी\nफिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://devanaguide.huertatipografica.com/glyph.php?nombre=two-deva", "date_download": "2019-03-25T08:37:56Z", "digest": "sha1:5J3UJKAZNEER6QWSTSUUXOM2EAJJUD2K", "length": 2851, "nlines": 41, "source_domain": "devanaguide.huertatipografica.com", "title": "Devanaguide- two-deva", "raw_content": "\nसहायक२ स्थान२ १२ स्थान२ पक्षी२ १२दर्जन सहायक२ पक्षी२ आनेवाला२७ १२ सहायक२ स्थान२ १२दर्जन सहायक२ स्थान२ स्थान२ १२ १२दर्जन सहायक२ सहायक२ पक्षी२ १२दर्जन स्थान२ १२ १२ सहायक२ आनेवाला२७ पाठ्यक्रम२ स्थान२ पक्षी२ पाठ्यक्रम२ सहायक२ आनेवाला२७ पक्षी२ सहायक२ लगभग२ सहायक२ १२दर्जन १२ सहायक२ स्थान२ पक्षी२ पाठ्यक्रम२ १२दर्जन आनेवाला२७ १२दर्जन १२ १२ पक्षी२ लगभग२ लगभग२ १२ सहायक२ पक्षी२ स्थान२ पक्षी२ स्थान२ आनेवाला२७ स्थान२ स्थान२ पक्षी२ पाठ्यक्रम२ पाठ्यक्रम२ पक्षी२ सहायक२ १२ १२दर्जन १२दर्जन आनेवाला२७ आनेवाला२७ १२ आनेवाला२७ लगभग२ आनेवाला२७ १२दर्जन लगभग२ पाठ्यक्रम२ आनेवाला२७ सहायक२ सहायक२ लगभग२ आनेवाला२७ पक्षी२ आनेवाला२७ लगभग२ पक्षी२ लगभग२ पक्षी२ पक्षी२ लगभग२ पक्षी२ लगभग२ स्थान२ सहायक२ १२दर्जन सहायक२ लगभग२ आनेवाला२७ लगभग२ १२", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/1171", "date_download": "2019-03-25T08:50:17Z", "digest": "sha1:L43OMXBE5ADHEA5NLX54FLNMLJGAEQZ2", "length": 9677, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " होळीच्या हार्दीक शुभेच्छा...! | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स���टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / होळीच्या हार्दीक शुभेच्छा...\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी रवी, 12/03/2017 - 12:30 ह्यावेळी प्रकाशित केले.\nगुलाबी हृदयांना गुलाबी शुभेच्छा...\nघाबरटांना गर्द पिवळ्या शुभेच्छा...\nमख्खं म्हसोबांना शुभ्र पांढऱ्या शुभेच्छा...\nउरल्या - सुरल्या तमाम बावळटांना\nशुभेच्छूक : बहुरंगी गंगाधर मुटे\nतुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी ��ढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/new-notes-500-and-2-thousand-notes-15859", "date_download": "2019-03-25T08:40:43Z", "digest": "sha1:HYL4QLNSJGMYP7SD5PGB5VBEQQKZT7YS", "length": 10752, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "New notes of 500 and 2 thousand notes या पाहा 500 आणि 2 हजारच्या नव्या नोटा! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nया पाहा 500 आणि 2 हजारच्या नव्या नोटा\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. आता लवकरच 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात येणार आहे. या नव्या नोटांचे नमुनेही जाहीर करण्यात आले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. आता लवकरच 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात येणार आहे. या नव्या नोटांचे नमुनेही जाहीर करण्यात आले आहेत.\nसमर्थ नेतृवाच्या हाती देश असल्याने भाजपत 'इनकमिंग’ सुरू : आमदार खडसे\nभुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते...\nLoksabha 2019 : भाजप नेतेच म्हणतात, मी तर ब्राह्मण, चौकीदार नाही\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नावापुढे चोकीदार लावलेले नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी माझे नाव...\nआई अंबाबाई युतीची सत्ता येऊ दे, मोदी पंतप्रधान होऊ देत\nकोल्हापूर - \"आई अंबाबाई केंद्रात युतीची सत्ता येऊ दे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ देत.' अशी प्रार्थना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...\nमोदींना आणखी पाच वर्षे संधी द्या; माजी पंतप्रधानांच्या कन्येचे मत\nलातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. त्यांचे व्हिजन चांगले आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण आणखी एक टर्म...\nLoksabha 2019 : वारसदारांमध्ये प्रतिष्ठेची झुंज\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात दोन मातब्बर राजकारण्यांचे वारसदार विजयासाठी झुंजणार आहेत. सहकाराची पायाभरणी, दुधाचा महापूर, \"रोहयो' ते शेतीतील प्रयोगातून...\nमोदी-मोदी कराल तर कानाखाली देईन; आमदाराचे वक्तव्य\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून विविध राज्यात प्रचारसभा घेण्यात येत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/trekker-blogger-palkhi-phadtada-1150589/", "date_download": "2019-03-25T08:15:20Z", "digest": "sha1:FRICKZ2LKSRT2Z7SMEPEGCPYKB4DRZX4", "length": 46791, "nlines": 271, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘फडताडा’साठी तडमड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nफडताडासाठी पूर्ण तयारीने गेलो होतो, पण फडताडाचा नव्हे तर पालखीचा योग होता.\nडोंगरात भटकताना दर वेळी आधी ठरविल्याप्रमाणे होतेच असे नाही. फडताडासाठी पूर्ण तयारीने गेलो होतो, पण फडताडाचा नव्हे तर पालखीचा योग होता. अर्थात त्यामुळे डोंगरातली ही तडमड वाया न जाता सार्थकीच लागली असं म्हणावं लागेल.\nहिवाळ्यात जवळपास सगळेच वीकेंड सत्कारणी लागल्यानं मी आधीच खूश होतो. अमुक-तमुक ट्रेनिंगच्या कारणानं प्रीती १५ दिवसांसाठी पुण्यात आली होती. साहजिकच भेट झाली. मी आपला निवांत पुणे शहरातल्या माझ्या सर्वात लाडक्या भागात म्हणजे कर्वे रोडच्या सुजाताची सिताफळ मस्तानी नरडय़ातून खाली जातानाचा आंनद घेत होतो आणि अचानक प्रीतीनं पिलू सोडलं, ‘‘वीकेंडला भिकनाळ आणि फडताड करायचा राजस आणि यज्ञेश येतील गाडी घेऊन’’. विचारात एवढा गुंतलो की उरलेली मस्तानी कधी संपली ते कळलं नाही आणि स्ट्रॉचा फुर्र्रर आवाज आला तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं विचारमंथन सुरू झालं.\nफडताड हे नाव काही माझ्यासाठी आणि तिच्यासाठी नवीन नव्हतं. २००८ मध्ये एकदा स्टुडिओतल्या संजय काकाकडे असताना द��वाकरच्या तोंडी हे नाव ऐकलं होतं. छातीत धडकी भरावी असा तो ट्रेक हे ऐकूनच होतो. एकंदरच कळून चुकलं की जायचंय तर तयारीने जावं लागेल. तसं म्हणलं तर आमच्यासोबत जो एक गडी येणार होता त्यानं हा ट्रेक केला होता. पण त्यानं प्लान ऐकायच्या आधीच माघार घेतली. कुणाच्या पोटात दुखलं तर दुखू दे, जे होईल ते बघू म्हणून आम्ही प्लान कायम ठेवला.\nशुक्रवारी संध्याकाळी भेटून मी आणि प्रीतीनं खाण्याचं सामान गोळा केलं आणि ठरल्याप्रमाणं राजस आणि यज्ञेश रात्री कारने पुण्याला आले. पौड रोडपाशी प्रीतीला पिकअप करून ते सगळे मला कात्रजच्या नाक्यावर भेटले. यज्ञेशशी माझी नीट ओळख करून देईपर्यंत आम्ही चेलाडीला पोहोचलो.\nराजसला थोडा आराम मिळावा म्हणून चेलाडीपासून प्रीतीनं गाडी चालवायला घेतली. ‘झोपेची वेळ + थंडी + वेल्ह्य़ापर्यंत ठिकठाक असा रस्ता’ या सगळ्या सॉर्टेड-आउट गोष्टींना मात देणारी प्रीतीची ड्रायव्हिंग डोळा अजिबातच लागला नाही. हसत-खिदळत वेल्ह्य़ात पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती. गावात कुस्तीची स्पर्धा असल्यानं आदल्या रात्री चपटी न लावलेले सगळे जागे झाले होते. आम्हालाच उशीर झाल्यागत वाटत होतं. आम्ही गडबड करणाऱ्यातले नाही हे त्यांना जाणवलं असावं. आम्ही काही तासभर तिथून हललो नाही. चहा आणि क्रीमरोल पोटात कोंबून आम्ही पुढं निघालो.\nकानंद खिंडीजवळ झालेलं स्वर्गीय नर्तकाचं दर्शन, अभेद्य दिसणारा तोरणा, हवेतला गारवा आणि चांडाळचौकडी.. सगळं काही मनासारखं. गाडी पाच मिनिटं बाजूला थांबवून विशेष वटवट न करता आम्ही सगळेच नि:शब्द होऊन निसर्गाची उधळण टिपत होतो. उगाच ट्रेक मारणं, घाटवाट उडवणं असल्या गप्पा नाहीत, घडय़ाळाशी स्पर्धा नाही.\nपासली फाटय़ानंतर अतिशय सुमार अशा रस्त्यानं गाडी जपून चालवत आम्ही कुसरपेठेत आलो. एका जीपमध्ये गावातली चिल्लर पार्टी रंगबिरंगी कपडे घालून बसली होती. वेल्ह्य़ाच्या जत्रेत जायची उत्सुकता दिसत होती. एरवी गुरापाठी बिनधास्त भटकणारी, झाडाच्या अंगाखांद्यावर खेळणारी किंवा शहरातली पोरं कायम वंचित राहतील असे नाना प्रकारचे खेळ खेळताना दिसणारी ही कारटी आज पावडर फासून, तयार होऊन जाताना किती वेगळी वाटत होती.\nगावातल्या थोरल्या मंडळींना विचारून सावलीच्या जागी गाडी ठेवली. कुसरपेठेतून भिकनाळेचा साधारण अंदाज मला होता, तरी आम्ही गावात थोडी चौकशी केली��. फाटय़ा आणण्यासाठी मावशी त्याच बाजूला निघाल्या होत्या, मग आम्ही त्यांच्यासोबतच निघालो. सिंगापूरच्या दिशेनं थोडं पुढे जाऊन धुत्या हाताला वळलात की एक पत्र्याचं खोपटं दिसतं, त्याच्या समोरच एक विहीरवजा डबकं खोदलं आहे. पाणी पिण्यालायक आहे. कोवळ्या उन्हामुळं गारठा जरा कमी झाला होता.\nछाताड काढून उभा असलेला लिंगाणा, त्यापल्याड लिंगाण्यापेक्षा इंचभर डोकं वर काढून बोराटय़ाच्या नाळेला बगलेत मारून मिरवणारं रायलिंग, समोरच्या बाजूला रायगड, अन् नजर डावीकडे भिरकवली की रानापलीकडं आ वासून बसलेल्या भिकनाळेचा कडा दिसायला लागला. उजव्या हाताला थोडं पुढे पोटाशी आग्यानाळ.\nपुढे बैलगाडीची चाकोरी सोडून डावीकडे वर कारवीत शिरलो, अन् मग तसंच छोटी दरी डावीकडे ठेवून सोंडेवर चालत गेलो. साधारणत: ३५-४० मिनिटं. तशी विशेष चढण नसलेल्या डोंगरसोंडेवर पायपीट केल्यावर उजवीकडल्या कारवीच्या दाट जाळीमागे फडताडकडून येणाऱ्या वाटेजवळ मावशीने आम्हाला सोडलं आणि त्या माघारी गेल्या. मी या जागी दीडएक वर्षांपूर्वी आलो होतो. समोरच कडय़ापलीकडे भिकनाळ आणि तिच्या तोंडाशी असलेली दाट कारवी. घसा ओला करून आम्ही परत डावीकडे कारवीत शिरलो. एका ढोरवाटेवर थोडं उतरून एका छोटय़ा आणि कोरडय़ा मिऱ्यापाशी येऊन थांबलो. नाळीच्या आत शिरायला वाट मिळते का हे पाहायचं होतं. प्रीती आणि यज्ञेश थोडं पुढे पाहायला गेले आणि मी आणि राजस कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवी ओलांडून नाळेच्या तोंडाशी पोहोचलो. प्रीती आणि यज्ञेशला हाळी दिली.\nपोटातल्या कावळ्यांचा ऑपेरा ऐकू यायच्या आत वाटेच्या सुरुवातीलाच टेकायला सोयीस्कर अशी सावली पाहून नाश्ता करून घ्यायचा ठराव बिनविरोध मंजूर झाला. मग ब्रेड, बिस्कीट, चिवडय़ापाठोपाठ खजूर पोटात ढकलले आणि आम्ही निघालो. तासभर कधी आणि कसा गेला ते कळलंच नाही, पण मग उत्तराभिमुख असल्यानं नाळेत दिवसभर सावली राहणार हे साहजिक होतं, आणि जमेची बाजू अशी होती की आजचा मुक्काम पणदेरी गावात होता, त्यामुळे वेळेचं विशेष बंधन नव्हतं. उगाच हाणामारी करत उडय़ा मारत जाणे हा प्लॅनच नव्हता.\n‘एकच पायवाट’ असं काही कौतुकास्पद प्रकरण ते नव्हतंच. उन्हाळ्यातही चिवटपणे तग धरून असलेली बोचरी झुडपी आणि निसटणारे दगड ह्य़ातनं वाट काढत, अनेकदा मिसकॉल देत आम्ही खाली उतरत होतो. बुटाच्या तोंडाशी, मोज्याच्���ा लोकरीत, पँटच्या पायाशी अडकणारी रावणं आणि काटाळं झटकत साधारण अध्र्या तासात आम्ही एका मोठय़ा धोंडय़ापाशी आलो. त्या पलीकडची उडी पाहता सॅक पाठीवरून काढून खाली ठेवली. रोप आणि बाकीचं सामान बाहेर काढलं. थोडं वरच्या बाजूला योग्य जागा पाहून आम्ही रोप बांधला आणि यज्ञेशला खाली सोडलं. त्या पाठोपाठ राजस आणि प्रीती मग मी. पॅच संपतो तिथंच कोपऱ्यात एक माणूस पद्धतशीर फेरी मारून येईल एवढी नैसर्गिक गुहा आहे. ती गुहा म्हणजे वटवाघुळांचं आगार बॅटमॅनमधल्या बेल भाऊसारखं आम्ही डोकं खाली वाकवून रोप गुंडाळून बॅगेत भरला आणि निघालो.\nजसं थोडं खाली आलो तशी नाळ रुंद झाली. झाडी-काटकी वाढली, तरी उतार काही मंदावेना. तसंच टप्पे उतरत आम्ही खाली जाऊ लागलो. वाटेत एका ठिकाणी थबकलो. समोर उडी टाकायला ६० फुटाचा कडा आणि इथं पडी टाकायला आणि उदरभरणाला मस्त सावली ते ‘वदनी कवळ घेता’ राहिलं बाजूला आणि आमच्या पैजा चालू झाल्या त्या समोरच्या नाळेवर. मी ठाम होतो की त्यात वाट असणार ते ‘वदनी कवळ घेता’ राहिलं बाजूला आणि आमच्या पैजा चालू झाल्या त्या समोरच्या नाळेवर. मी ठाम होतो की त्यात वाट असणार समोरच्या अभेद्य वाटणाऱ्या कडय़ाला माणसाच्या अचाट इच्छाशक्तीनं कुठंतरी भेद दिला असावा असं वाटत होतं. पोळ्या, लसूण-शेंगदाण्याची चटणी, दही, गोडलिंबू आणि खजूराचं लोणचं आणि मग त्यावर गूळ-खवा पोळी असं जेवण आणि मग त्यावर ताक असं सगळं पोटात ढकलल्यावर आमची आळशी गाढवं झाली. सॅकला पाठ टेकवून आम्ही परत नाळ चर्चेत आणली.\nयज्ञेश आणि माझं एकच म्हणणं, वाट असणार, वर एखादा पॅच असणार. प्रीती, राजस आणि यज्ञेशचं मत असं होतं की, खाली जाऊ गावात, थोडी विचारपूस करू म्हणजे नक्की काय ते कळेल.\nआता खाली जाण्याचा मार्ग शोधणं गरजेचं होतं. मी उजवीकडे शिरलो तर यज्ञेश एक टप्पा उतरून खाली गेला. बराच आटापिटा केल्यावरसुद्धा मला वरून वाट मिळाली नाही. मग यज्ञेशने आम्हाला हाक दिली आणि आम्ही तिघे तो टप्पा उतरून यज्ञेशपर्यंत गेलो. उजवीकडे दिसणाऱ्या कडय़ाखालच्या घळीत आम्ही पोहोचलो. वाट शोधायला गेल्यावर कारवी आणि ऊन्हामुळे जो काही छळ झाला होता, त्यानंतर मोकळ्या घळीत येऊन हायसं वाटलं. पुढे गावात पोहोचणं काही विशेष अवघड नसलं तरी बराच पल्ला बाकी होता.\nमग विशेष घाई न करता आम्ही निवांत खाली उतरत गेलो. नाळेत असल्याने इथे-तिथे भरकटण्याचा प्रश्नच नव्हता. थोडं पुढे राहून मी आपला सुपर मारिओ खेळल्यागत उडय़ा मारत मारत सावली हेरायचो आणि डुलकी काढायचो. जसं खाली आलो तसं मग आम्ही अजूनच निवांत झालो. मध्येच एका ठिकाणी एकाच कुटुंबाची वस्ती लागली. हे लोक सगळ्यात बेकार. एकाच पट्टय़ातली झाडं उभीच्या उभी तोडतात, पेटवतात आणि त्यावर माती-वाळू दाबून धूर करतात. त्यातनं कोळसा होतो. जंगलातले अख्खेच्या अख्खे पट्टे गायब करणारे हे लोक. सद्य परिस्थिती पाहता जिवंत झाडातून असा कोळसा काढणं पर्यावरणाच्या आणि विशेषत: वन्यजीवासाठी किती नुकसानदायी आहे, तसंच ते कितपत महाग पडेल हे सांगायची गरज नाही.\nत्यांना उचक्या देत, आम्ही तासाभरात पणदेरी गावाशी पोहोचलो. साडेपाचच्या सुमारास पोहोचल्यानं शेताची कामं संपवून गावाबाहेर निवांत बसलेला बळीराजा. त्यांच्याशी वाटेबद्दल विचारपूस केली आणि भिकनाळेतून दिसलेल्या ‘त्या’ वाटेवर शिक्कामोर्तब झालं. गावात क्रिकेट खेळत असणाऱ्या पोरांमध्ये जाऊन चार पट्टे फिरवायचा मोह आवरून सरपंचांच्या घराकडे निघालो. त्यांनीही वाट असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. शाळेत मुक्कामाची परवानगी घेऊन आम्ही पुन्हा उरलेल्या दोन कारटयांपाशी आलो.\nसरपंचांना भेटल्यानंतरही आम्ही गावात बऱ्याच लोकांकडे पालखीच्या वाटेबद्दल चौकशी केली. मोहिते काकांच्या ओसरीत त्यांच्याशी गप्पा मारताना बरीच माहिती मिळाली. लोकांच्या सांगण्यानुसार त्या वाटेनं कोणे एकेकाळी मंदिरासाठी मोठे लाकडी वासे ओढून नेले होते. वासे ओढून नेण्याइतपत मोठी वाट असावी अशी अपेक्षाच नव्हती. पण सह्य़ाद्रीत अशा अनेक अजब-गजब वाटा आहेत जिथून वाट असणं अशक्य वाटतं, पण वाट असतेच खेतोबा काय, पाथरा काय किंवा चिपाचं दार काय.. अशी बरीच उदाहरणं देता येतील.\nबोलता बोलता आम्ही मोहिते काकांना सांगितलं की आम्ही खरंतर फडताडने वर जायचा प्लान केला होता; पण आता ती भिकनाळेतून पाहिलेली वाट करायची असं ठरलंय तेव्हा त्यांनीही सांगितलं की साधारणत: महिन्याभरापूर्वी पालखीच्या नाळेनं काही लोक आले होते. त्यांच्या आणि अनेक गावकऱ्यांच्या मते भर उन्हात फडताड करण्यात जोखीम होती, त्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान प्लान करणं योग्य होतं. एकंदरच आजच्या घडीला पालखीची वाट करणं कधीही योग्य होतं. त्यात आम्हालाही नवीन वाटेचं आकर्षण होतंच. फडताडस���ठी एवढी वर्षं वाट पाहिली होती, अजून थोडी कळ काढायला हरकत नव्हती.\nमोहिते काकांनी गावातल्या एका दादाला सोबत देऊन मला एकाच्या घरी पाठवलं. त्यांना तिथल्या साऱ्या वाटा माहीत होत्या. ते जर वाट दाखवायला आले असते तर सगळंच सोईचं झालं असतं. बराच आटापिटा करूनदेखील त्यांची मजुरी दोन हजाराखाली येईना. ते आम्हाला परवडणारं नव्हतं. मग आम्ही शाळेत थांबलोय, विचार बदललात तर सकाळी या सहाला असं सांगून तिथून निघालो. रात्रीसाठी पटकन जेवण उरकून दुसऱ्या दिवशीसाठी पाणी भरून घेतलं, आणि पडी टाकली. विशेष थंडी नव्हती, शाळेच्या आवारात असल्यानं स्वत:ला फटके मारायची गरज नव्हती. नेहमीच्या सवयीप्रमाणं मी दोनच्या दरम्यान का होईना, पण झोपलो.\nपहाटे पहाटे टीव्हीवर योगासनाचं च्यानल लावल्यागत काहीतरी आवाज आले आणि मला जाग आली. पाहतो तर राजस योगासनं करत होता. हे बेणं पहाटे योगा करतं आणि मग दिवसभर कितीही पळवा चार पावलं पुढे पळतं.\nनिघायला सात वाजले. वाट दाखवायला मामा काही आले नाही. मग स्वत:च बघून घेऊ म्हणून आम्ही गावाबाहेरची वाट धरली. कोळसेवाल्यांच्या वस्तीपर्यंत कालच्याच वाटेने जायचं होतं. कोरडय़ा नाळेतून जाताना गुडघ्याच्या वाटय़ा करकरतात आणि मांडय़ा बोंबलतात. म्हणून तिथून पुढे नाळेनं वर जाण्याऐवजी आम्ही डावीकडल्या सोंडेवर चढून मधल्या पट्टय़ातल्या जंगलातून त्या छोटय़ा धारेवर चढायचं ठरवलं. कोळसेवाल्यांच्या वस्तीपाशी वर जायची वाट विचारली असता त्यांच्यातला एक दादा थोडं वर वाट दाखवायला तयार झाला. दादा, त्याचा अबोल साथीदार आणि चार-पाच कुत्री. त्यांच्यापाठी चालून, खरं सांगायचं झालं तर पळून आमचीच गत कुत्र्यासारखी झाली होती.\nकाही ठिकाणी अरुंद आणि पुसट अशी ती पाऊल वाट. दादाच्या सांगण्यानुसार तीच वाट फडताडला जाण्यासाठीही वापरली जाऊ शकते, हे कळल्यावर त्यांना तीही वाट विचारून घेतली. दादाने जे काही हातवारे केले त्यातनं जमेल तेवढं डोक्यात भरलं.\nपुढे थोडं चढून आम्ही कातळकडय़ाच्या खाली मधल्या गचपणात उजवीकडे वळलो. डुकराच्या शिकारीसाठी केलेला चर ओलांडण्यासाठी बरेच द्राविडी प्राणायाम करावे लागले. ते करून आम्ही पदरातल्या रानात शिरलो. गच्च रान, मोठमोठी झाडी. इंजिन आधीच तापलेलं असल्यानं आणि त्यात तिथं दाट पण उंच झाडी असल्यानं तो सुखद पट्टा पार करायला विशेष वेळ लागला नाही. ���्यात तिथं झाडीत एका कारची चावी मिळाल्यानं विशेष वापरात नसली तरी आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री झाली.\nरानातून पालखीची नाळ सोडा, एवढी मोठी भिकनाळ पण दिसत नाही. जंगलातून बाहेर आलो की थोडं उजवीकडे जायचं आणि घळ लागली की गोटे आळीत न जाता डावीकडे वर चढायचं. त्यात नेमकी वाट हुकली की तुमचा बोऱ्या वाजलाच म्हणून समजा. तिथं दादा थोडं वर चढून गेले आणि वर चढल्यावर खाली येता येईना म्हणून त्यांचं श्वानपथक ओरडू लागलं.\nआमच्यातल्या दोघांना नाळेत शिरायची जागा दाखवली, कुत्र्यांना खाली वाटेला लावलं आणि त्यांची रास्त मजुरी घेऊन दादा खाली निघून गेले. ‘वाट’ म्हणायला तसं फारसं काही नव्हतंच तिथे, पण ‘वाट’ लागायला बरंच काही. भर उन्हात त्या वाटेनं जायचं म्हणजे शिक्षा स्क्रीचे दोन खडे पॅच चढून एका झुडपापाशी आम्ही विसावलो. नरडं ओलं करून पुन्हा निघणं जिवावर आलं होतं पण तिथं बसून उन्हानं काहिली करून घेण्यात काही हशील नव्हतं.\nमग पुढे यज्ञेश, मग प्रीती आणि राजस आणि गरजेनुसार मध्ये किंवा शेवटी मी असा कॉन्वॉय वरवर सरकू लागला. पुढे आणि एक छोटा पॅच आणि दोन एक्स्पोज्ड ट्रॅवर्स पार करून आम्ही नाळेत पोहोचलो. नाळेची लांबी जास्त नसल्याने नाळ कमी खिंड जास्त वाटली ती. बरीच हाणामारी करून झाली असल्यानं आणि वरची झाडी नजरेत आल्यानं आपण वर पोहोचल्यात जमा आहोत असं गृहीत धरलं आणि जेवण उरकायचं ठरवलं.\nजेवणाचा कार्यक्रम गप्पा रंगल्यानं दीड तास चालला. मी, प्रीती आणि राजस बऱ्याच वर्षांनंतर एकत्र ट्रेक करत होतो, त्यामुळे बरेच किस्से ऐकले- सांगितले गेले. कसलीच घाई नव्हती. शेवटी साडेचार वाजता आम्ही तिथून निघालोच. पंधरा मिनिटे वर चढून आलो आणि जसजसं वर आलो तसतसं एक-एक करत चार बोटं तोंडात घालायची वेळ आली. समोर ५० फुटांचा खडा पॅच. मग मात्र इशारे झाले की झाला तो टाइमपास पुरेसा आहे, आता कामाला लागा.\nइथून-तिथून मिथुन झाल्यावर चढायला योग्य जागा पाहून यज्ञेश वर चढू लागला. यज्ञेशच्या हालचालीतला द्राविडी प्राणायाम पाहता पॅच तसा अवघड वाटला. जे धरेल ते निसटून हातात येत होतं. यज्ञेश वर पोहोचला आणि त्यानं रोप लावला. पण यज्ञेश गेला तिथून वर जाणं म्हणजे जरा अवघडच होतं म्हणून मी थोडं बाजूने जिथं कातळ होता तिथून प्रयत्न केला आणि वर गेलो.\nहा खटाटोप उरकेपर्यंत अंधारून आलं. नाळीच्या तोंडाशी उजेड ��सला तरी अजून बरंच अंतर कापायचं होतं, आणि बाकीचे दोघे व सामान वर येता येता काळोख होणं साहजिक होतं. त्यात उल्हास म्हणजे मी वर आलो तिथं रोप बांधायला जागा नव्हती आणि रोप आहे त्या ठिकाणी ठेवून मी चढलो तसं चढताना जरा गडबड झाली की झोपाळा झालाच म्हणून समजा. मग मी थोडं खाली उतरून सेल्फ-अरेस्टसाठी छानशी जागा निवडली आणि रोप फिरवून घेतला. आधी दोन सॅका वर घेतल्या. मग प्रीती आणि उरलेल्या दोन सॅका वर आल्या. त्या वर ओढताना आई आठवली आणि लगेच वाटून गेलं की गंज चढता कामा नये, या असल्या आडवाटेची सवय असलीच पाहिजे. राजस अंधारातच वर आला. सगळा सेट-अप व्यवस्थित सॅकमध्ये जाईपर्यंत आठ वाजले होते. तसं म्हणावं तर पालखीची वाट झाली होती आणि आम्ही खूश होतो.\nघाटमाथ्यावर आलो तरी अजून गंमत बाकी होतीच. रात्री त्या कारवीतल्या गच्चपणातून कुसरपेठ ते मोठय़ा नाळेच्या वपर्यंत आलेल्या धारेवर येणं म्हणजे छळ होता. पण मी आधी तिथं वरवरचं तीन वेळा भटकल्यानं मला नेमकी वाट माहीत नसली तरी दिशेचा अंदाज होता.\nशेवटी अंधारात कारवीच्या दाट जाळीतून मारामारी करत आम्ही एका सपाटीला आलो. इथून पुढे वाट मला नक्की माहीत होती. मग, दुपारचं खाणं पार जिरलं असल्यानं आम्ही तिथं निवांत बसून खजुरावर ताव मारला. दमछाक झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक होतं. उशीर तर झालाच होता, पण आता धावपळ करण्यात काही हशील नव्हतं. तसंही असे ट्रेक करताना आपण उगाच घाई करत येण्यात अर्थ नाहीये हे माझं वैयक्तिक मत. पण मग चारही डोकी एकाच विचाराची असली की घडय़ाळ पाहत ट्रेक ‘मारण्या’पेक्षा निवांत गप्पा मारत खोल दरीत दिसणाऱ्या टिमटिमत्या लाइट पाहण्यात भरपूर काही हशील होतं. आम्ही तसंही पुण्यात पहाटेच जाणार होतो. त्यात चांदोबा पण साथीला होताच.\nरमतगमत आदल्या दिवशी सकाळी आलो त्याच धारेवरच्या वाटेनं आम्ही रात्री बारा वाजता कुसरपेठेत आलो. काणंद खिंडीच्या अलीकडे एका छानशा जागी गाडी थांबवून झोप काढली आणि पहाटे पुण्यात. फडताड साठीचा योग येणं गरजेचं झालं होतं. मात्र आजच्या तडमडीतनं पालखीचा योग आल्यामुळे ही तडमड सार्थकी लागली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nट्रेकिंग गिअर्स : प्रस्तरारोहण\nमाऊलींच्या पालखीने ओलांडला खडतर दिवेघाट, मुक्काम सोपानकाकांच्या गावी\nविठ्ठलनामाचा गजर करत ज्ञानोबामाऊली-तुकोब���माऊलींच्या पालख्या पुण्यात\nतुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\n आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/my-second-best-knock-kohli/", "date_download": "2019-03-25T07:24:48Z", "digest": "sha1:QXYZXKGSOK5TWBSREXLJQTP5VLC56IRG", "length": 15094, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माझी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी- कोहली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाझी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी- कोहली\nऍडलेड येथील खेळी सर्वोत्कृष्ट\nबर्मिंगहॅम: विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी खेळी करताना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे आव्हान कायम राखले. विराटच्या 149 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या पहिल्या डावातील 287 धावांच्या प्रत्युत्तरात 274 धावांची मजल मारली. परंतु ही खेळी आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले. तसेच या खेळीत आपल्या मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी लागल्याचेही कोहलीने सांगितले.\nसुमारे चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऍडलेड येथील कसोटी सामन्यात माफक धावसंख्येचा पाठलाग करताना विराटने 141 धावांची संस्मरणीय खेळी केली होती. आपल्या मते ती खेळी आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचेही विराटने म्हटले आहे. त्या वेळी भारतासमोर विजयासाठी कोणते लक्ष्य आहे, याची मला पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे विशिष्ट लक्ष्य ठेवूनच मी फलंदाजी केली होती. परंतु या वेळच्या डावात माझ्यासमोर तसे कोणतेही निश्चित लक्ष्य नव्हते. त्यामुळे भारताला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्यात यश आल्याबद्दल मी समाधानी आहे, असेही विराटने सांगितले.\nडिसेंबर 2014 मध्ये ऍडलेड येथे झालेल्या त्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावांत शतके झळकावली होती. तरीही दुसऱ्या बाजूने विराटला कोणाचीही साथ न मिळाल्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला होता. कालचा दिवस काही अर्थांने तसाच होता. परंतु या कसोटीतील हा पहिलाच डाव असल्यामुळे आपल्यावर तुलनेने कमी दडपण होते, असे कोहलीने सांगितले.\nइंग्लंडच्या 287 धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताला मुरली विजय आणि शिखर धवन यांनी 50 धावांची सलामी दिली होती. परंतु सॅम करनच्या माऱ्यासमोर भारताची 5 बाद 100 आणि नंतर 8 बाद 182 अशी घसरगुंडी झाली. यावेळी भारतीय संघ चांगलाच खिंडीत सापडला होता. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज भरात आले होते आणि भारतीय संघ 105 धावांनी पिछाडीवर होता. मात्र कोहलीने ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांना हाताशी घेऊन भारताला 274 धावांपर्यंत नेले.\nकोहलीने तळाच्या फलंदाजांची प्रशंसा करताना सांगितले की, हार्दिकने उपयुक्त कामगिरी केली. तसेच ईशांत आणि उमेश यांनी समयोचित कामगिरी करीत मला साथ दिली. या तिघांची साथ खरोखरीच बहुमोल अशी होती.\nआघाडी न घेता आल्याचा खेद नाही\nमला केवळ शतक झळकावून थांबायचे नव्हते, तर भारतीय संघाचे तारू इंग्लंडच्या धावसंख्येच्या पलीकडे न्यायचे होते. माझा प्रयत्न केवळ 13 धावांनी कमी पडला. तसेच मला किमान 15-20 धावांची आघाडी घ्यायची होती. परंतु वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तितक्या वेळ आम्ही खेळलो असतो, तर इंग्लंडला दुसऱ्या डावांत फलंदाजी करता आली नसती आणि आम्हाला एक बळी घेता आला, तसेही घडले नसते, असे सांगून कोहली म्हणाला की, संघाला गरज असताना मी कसोटीला उतरल्याचा मला आनंद वाटतो. गेल्या दौऱ्यात मला सतावणाऱ्या अँडरसनवरही मला वर्चस्व गाजविता आले, याचेही मला समाधान वाटते. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी मी केलेली पूर्वतयारी योग्य असल्याचे सिद्ध झाले. माझे सहकारी फलंदाज अपयशी ठरले, परंतु यशापयश हा खेळाचाच एक भाग आहे. संघाला बरोबर घेऊन मला पुढे जायचे आहे.\n#IPL2019 : पंजाबसमोर आज राजस्थानचे कडवे आव्हान\nमहिला रेसर स्नेहा शर्मा मलेशियात दुसऱ्या स्थानी\nइंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी\nसंघटनांच्या वादाचा फटका राजस्थानच्या खेळाडूंना\nते बीसीसीआयला विचारा : स्टिव्ह स्मिथ\nकसोटी क्रिकेटच्या पोषाखात बदल होणार\n#IPL2019 : हरभजनच्या नावेही अनोखा विक्रम\nसुरेश रैनाच्या आयपीएलमधे 5 हजार धावा\nसीसीआय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nचाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nमतदार यादीत नावनोंदणीसाठी आज अंतिम मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Resolution-to-break-the-unauthorized-homes-of-the-Keralites/", "date_download": "2019-03-25T08:31:39Z", "digest": "sha1:2A3WCQVTJQXBUZJVBL5RYUVZOIR4X7I3", "length": 8281, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केरळीयनांची अनधिकृत घरे तोडण्याचा ठराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › केरळीयनांची अनधिकृत घरे तोडण्याचा ठराव\nकेरळीयनांची अनधिकृत घरे तोडण्याचा ठराव\nघारपी गावातील सामाईक जमिनीत केरळीय��ांनी केलेल्या बेकायदा बांधकामाविरोधात ग्रामसभेत तीव्र पडसाद उमटले. या अनधिकृत घरांना ग्रा.पं.जबाबदार असून ग्रामसेवक केरळीयनांची पाठराखण करीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. केरळीयनांची अनधिकृत घरे तत्काळ जमीनदोस्त करावीत, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत शिक्क्यांवर घारपीचा उल्लेख नसल्याने प्रशासकीय कामांमध्ये येणार्या अडचणींबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी विविध विषयांवरुन ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात खडाजंगी झाल्याने ग्रामसभा वादळी झाली.\nघारपी येथील माऊली मंदिरात फुकेरी-घारपी-उडेली ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सावित्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसरपंच सौ. जानकी गावडे, ग्रा.पं.सदस्य अमित गवस, गौरी गावडे, बाबू आईर, पोलिस पाटील महेश आईर, ग्रामसेवक सोमनाथ वाघमोडे आदी उपस्थित होते.\nग्रामसभेत शासकीय निधी फुकेरी व घारपी गावात समसमान खर्च करण्यात यावा,अशी मागणी शिवराम गावडे यांनी केली. निधी खर्च करताना घारपी गावाला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. चौदाव्या वित्त आयोगाचा 100 टक्के निधी खर्च झाल्याचे ग्रामसेवक वाघमोडे यांनी सांगितले. मात्र आराखड्यातील कामे निधीअभावी अद्यापही अपूर्ण असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.\nफुकेरी ग्रुप ग्रा.पं.मध्ये घारपी गावाचा समावेश असूनही शिक्क्यांवर केवळ फुकेरी गावाचाच उल्लेख आहे. फुकेरी गाव हे दोडामार्ग तालुक्यात येते. तर घारपी हे गाव सावंतवाडी तालुक्यात येत असल्याने घारपी ग्रामस्थांना प्रशासकीय कामे करताना अडचणी निर्माण होतात याकडे लक्ष वेधण्यात आले. यासाठी शिक्क्यांवर घारपी गावाचा उल्लेख करावा असा ठराव घेण्यात आला.फुकेरी व घारपी गावांचे भौगोलिकदृष्ट्या अंतर हे दूरचे आहे. घारपीवासीयांना दाखल्यांसाठी फुकेरी येथे जाण्यासाठी सुमारे 7 कि.मी. पायपीट करावी लागते. ही पायवाट झाडाझुडपांनी वेढली असल्याने या पायवाटेवरील झुडपांची तातडीने सफाई करण्याची मागणी करण्यात आली.\nघारपी गाव हे सावंतवाडी तालुक्यात येत असल्याने या गावाचे विभाजन करून स्वतंत्र महसूली गाव करावे अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली. गावातील 102 एकर क्षेत्र हे ग्रा.पं.च्या अखत्यारीत असून या जमिनीवर केरळीयनांनी बागा केल्या आहेत. याव��� ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली. ग्रा.पं.ने याबाबत कोणती कारवाई केलीअसा सवाल उपस्थित केला. यावर ग्रामसेवक वाघमोडे यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ आक्रमक होत परप्रांतीयांची ग्रामसेवक पाठराखण करत असल्याचा आरोप करत धारेवर धरले.दीपक गावडे, आना गावडे, हरी गावडे, अजय गावडे, महेश नाईक यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामसभेसाठी 139 ग्रामस्थ उपस्थित होते.\nपुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी\nअमिताभ यांच्यापासून सुभाष घईपर्यंत बंद झाल्या अनेक रंगपंचमी\nशक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nजवान सुरज मस्कर यांना अखेरचा निरोप\nगोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला काँग्रेससह शिवसेनेचा आक्षेप\nतापलेली मुंबई पोहोचली चाळीशीच्या जवळ\nपादचारी पुलांसाठी मध्य रेल्वेचे नवे तंत्र\nकाँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला\nनांदेडला चिखलीकर विरुद्ध चव्हाण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:27:47Z", "digest": "sha1:NWDRT5ASHEZBUUXIXA3QIGAPIKSZDLM7", "length": 11371, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एकच प्याला - विकिपीडिया", "raw_content": "\nएकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी बडोद्यात, तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी सोलापुरात केला [१]. गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पुरे केले; तथापि ते नाटक ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वत:चा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतून नि रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या न���टकात केली आहे.[२]\n‘एकच प्याला’मध्ये दारूच्या नशेत आपल्या वकिलीसह सर्वच गमावत चाललेल्या सुधाकर आणि त्याची पतिव्रता पत्नी सिंधूची शोकांतिका आहे. दारूच्या नशेत सुधाकर एका क्षणी आपल्या मुलालाही मारतो. पुढे सिंधूचाही मृत्यू होतो आणि सुधाकर आत्महत्या करतो.[३]\n^ श्रीराम रानडे (२१ जानेवारी, इ.स. २०१०). \"'स्मरण राम गणेशांचे'\" (मराठी मजकूर). लोकसत्ता.\n^ लोकसत्ता टीम (4 मार्च 2018). \"‘एकच प्याला’ ही ट्रॅजेडी आहे काय\". लोकसत्ता (Marathi मजकूर). 14-03-2018 रोजी पाहिले. \"दारूचे व्यसन मनुष्याला एकदा लागले, की त्याच्यापायी त्याचा नि त्याच्या संसाराचा केवढा भयंकर विध्वंस होतो, एवढे एकच चित्र गडकऱ्यांना जास्तीत जास्त भयानक, विदारक आणि थरारकरीतीने या नाटकात चितारावयाचे होते.\"\n^ आशुतोष पोतदार (4 मार्च 2018). \"‘एकच प्याला’.. शंभर वर्षांचा\". लोकसत्ता (Marathi मजकूर). 14-03-2018 रोजी पाहिले.\n\"‘एकच प्याला’च्या प्रसववेणा\". लोकसत्ता (Marathi मजकूर). 4 मार्च 2018. 14-03-2018 रोजी पाहिले. \"नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकात सुधाकरची भूमिका करणाऱ्या नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांच्या आत्मचरित्रातील आठवणी..\"\n\". लोकसत्ता (Marathi मजकूर). 4 मार्च 2018. 14-03-2018 रोजी पाहिले. \"रा. ग. गडकरी यांच्या जन्मशताब्दीला (१९८५ साली) ‘एकच प्याला’ या नाटकाची पुनर्माडणी करून त्याची दोन अंकी रंगावृत्ती डॉ. श्रीराम लागू यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाली. त्याबद्दल डॉ. लागू यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेली ही नोंद..\"\nआठवणीतली गाणी.कॉम - \"एकच प्याला\" नाटकातील पदे (मराठी मजकूर)\n· अतिनाट्य (मेलोड्रामा) · अभिजात नाटक\n· असंगत नाट्य (न-नाट्य) · आधुनिक अभिजात नाटक\n· एकपात्री नाटक · एकांकिका\n· गद्यनाटक · ग्रामीण नाटक\n· दशावतार · दीर्घनाटक\n· न-नाट्य (असंगत नाट्य) · नभोनाट्य (श्रुतिका) · नाटिका · नाटिका · नाट्यत्रयी · नाट्यवाचन · नृत्यनाटिका (बॅले)\n· पथनाट्य · पुरुषपात्रविरहित नाटक · पौराणिक नाटक · प्रहसन (फार्स) · प्रायोगिक नाटक\n· बाल रंगभूमी · बालनाट्य · बाहुली नाट्य (कठपुतळी) · बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)\n· भयनाट्य · भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले) · भाषांतरित-रूपांतरित नाटके\n· मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड) · मूकनाट्य\n· लघुनाटक · ललित · लोकनाट्य ·\n· वास्तववादी नाटक · विनोदी नाटक · विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले) · विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी) · व्यक्तिकेंद्री नाटक\n· स्त्रीपात्रविरहित नाटक · श्रुतिका (नभोनाट्य) · संगीत नाटक · संगीतिका (ऑपेरा) · समस्याप्रधान नाटक · समूहकेंद्री नाटक · साभिनय नाट्यवाचन · सामाजिक नाटक · सुखात्मिका · सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)\nराम गणेश गडकरी यांचे साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०१९ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.farmguru.in/new-blog/2016/1/28/-", "date_download": "2019-03-25T07:32:52Z", "digest": "sha1:CL6IWFDCHOS55MYDVJWQTH2453JXCUDI", "length": 2475, "nlines": 35, "source_domain": "www.farmguru.in", "title": "ओनिअन ए-वन कॅम्पेन — farmguru", "raw_content": "\n२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत\nफार्मगुरू घेऊन आल आहे नविन “कांदा ए वन कॅम्पेन\" खास कांदा उत्पादकांसाठी ६ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी तज्ञांच्या सल्ला व मार्गदर्शनाखाली निवडलेल्या या बास्केटमध्ये कॅनन, नुवान, कॉन्फिडोर या सारखी किटक नाशक आणि रिडोमिल गोल्ड , स्कोअर, अॅनट्राकॉल हि बुरशी नाशक तसेच दर्जेदार उत्पादनासाठी झाईम गोल्ड प्लस ही उत्पादने आहेत.\nही उत्पादने पिकाला पूर्ण पीक संरक्षण प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहेत.\nफार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.\n१०० % मूळ उत्पादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2015-SiddhivinayakShevgya.html", "date_download": "2019-03-25T07:52:37Z", "digest": "sha1:6O47XFBA7O7Z4WWVNU34JL7HD44VWI6C", "length": 7797, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - 'सिद्धीविनायक' शेवग्यात कांदा, मिरची, दुधी व डांगर भोपळ्याचे आंतरपीक", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' शेवग्यात कांदा, मिरची, दुधी व डांगर भोपळ्याचे आंतरपीक\nश्री. अशिष दिगंबर गायकवाड, मु.पो. जांबे (रसिकवाडी), ता. मुळशी , जि. पुणे. मो. ९७६७२०२०४७\n'सिद्धीविनायक' शेवग्याचे मार्च २०१४ मध्ये बी टोकून रोपे तयार केली. ती रोपे जुनमध्ये अर्ध्या एकरात ६' x ८' वर लावली. जमीन मध्यम, निचऱ्याची आहे. याला पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. हा शेवगा ६ महिन्यात (नोव्हेंबर २०१४ ला) चालू झाला. दररोज ५० - ६० किलो असे १ महिना चालला. शेंगा दररोज पिंपरी मार्केटला घेऊन जात असे. तेथे ३० - ४० रू. ने विक्री होत असे. जानेवारीत माल संपल्यावर छाटणी केली. कल्पतरू खत देऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या. तो पुन्हा जून - जुलै २०१५ ला चालू झाला. सुरुवातीला ३० ते ४० रू. भाव मिळाला. नंतर तोच भाव जुलै मध्ये ६० ते ७० रू./किलो मिळाला. पुन्हा ऑगस्टमध्ये भाव कमी झाला. जुनमध्ये ६० - ७० किलो शेंगा ३- ४ थ्या दिवशी निघायच्या. या काळात पाऊस असल्याने फुलगळ होत होती. त्यामुळे माल कमी निघत असे. जुलै - ऑगस्ट मध्येही याचप्रमाणे माल मिळाला. आता पुन्हा छाटणी केली आहे.\nमागच्या (पहिल्या) बहाराचे २० - २२ हजार रू. झाले होते. दुसऱ्या बहाराचे ३० -४० हजार रू. झाले आहेत. या शेवग्यात साधारण ७ ते ८ गुंठ्यात जुलै २०१४ मध्ये घरचेच कांदा बी जर्मिनेटरची प्रक्रिया करून फोकले आहे. तर उगवणही चांगली झाली. शेवग्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करत असताना खाली पडलेले तेवढेच औषध कांद्याला मिळत असे, वेगळी फवारणी घेतली नाही. तरी ६ पोती (६० किलोची) कांदा विकून व काही कांद्याच्या वेण्या बांधून (साधारण ५ पोती) घरी खाण्यासाठी साठवून ठेवला आहे. त्यातीलही ४० किलो कांदा मागच्या आठवड्यात (ऑगस्ट २०१५) कांद्याचे अचानक भाव वाढल्याने विकला. तर ५० रू. किलोने त्याचे २ हजार रू. झाले. असे कांद्याचे एकूण ६ - ७ क्विंटल उत्पादन मिळाले.\nकांद्याबरोबर या शेवग्यात मिरचीचेही आंतरपीक घेतले होते. सितारा मिरचीची ३५० रोपे जून २०१४ ला लावली होती. मिरचीला सप्तामृत शेवग्याबरोबर फवारत असे, त्यामुळे बोटाएवढी मिरची झाडांना लागली होती. फुलेही भरपूर होती, ती ३ महिन्यात चालू झाली. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१४ मध्ये मिरची चालली. सुरुवातीला १० - १५ दिवस दररोज ५ - ६ किलो निघत होती, त्यानंतर दिवसाड १५ ते २० किलो निघू लागली. तेव्हा भाव तेजीचे होते. ५० ते ६० रू. किलो भाव मिळाला. कोकणे चौकात (रहाटणी) आमचा भाजी विक्रीया गाळा होता. त्यामुळे हात विक्रीतून या मिरचीचे चांगले १५ - १६ हजार रू. झाले. तसेच घरच्यासाठी पिकेलेल्या लाल मिरचीचा मसाला झाला.\nआता (सप्टेंबर २०१५) शेवग्याची छाटणी करून त्यामध्ये दुधी भोपळा १० गुंठ्यात व डांगर भोपळा १० गुंठ्यात (आंतरपीक) लावला आहे. वेल २ - २ फुट आहेत. त्यालाही वेळोवेळी सप्तामृत फवारण्या घेत आहे.\nजून २०१५ ला सव्वा एकरात अजित बोलगार्ड कापूस लावला आहे. ३ फुटाच्या सरीला दोन्ही बाजूने तिरकस १ - १ फुटावर लागवड आहे. सध्या झाडे गुडघ्याच्यावर आहेत. झाडावर २५ - ३० फुलपात्या लागल्या आहेत. त्यासाठी आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत वापरणार आहे. २ वर्षापुर्वी कापूस १ एकर लावला होता. तो अहमदनगर मार्केटला विकला, तेव्हा १५ क्विंटल मालाला ५ हजार रू. भाव मिळून ७५ हजार रू. झाले होते. या अनुभवातून यावर्षी कापूस लावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.qypaperbox.com/mr/black-may-flower-pattern-box.html", "date_download": "2019-03-25T07:24:40Z", "digest": "sha1:CEDMWTCADPFXQKO7YINPGV75NBVESDYE", "length": 3644, "nlines": 158, "source_domain": "www.qypaperbox.com", "title": "", "raw_content": "ब्लॅक मे फ्लॉवर नमुना बॉक्स - चीन Longyou छिंग यान पेपर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफीतीसह कुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nकुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nफीतीसह ब्लू मे फ्लॉवर बॉक्स\nब्लॅक मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nब्लॅक मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमागील: लाल फीत काळा बॉक्स\nपुढे: रिबन काळा मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nफीतीसह कुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nलाल फीत काळा बॉक्स\nफीतीसह lenny पोत कागद बॉक्स\nकुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2019-03-25T07:45:32Z", "digest": "sha1:LGJLIVR7TGG3JJGGXPQI7AMY2GHN2IPB", "length": 14459, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कायम ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकायम ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट\nपुणे म्हटलं की पीएमटी आणि पीएमटी म्हणजे सार्वजनिक प्रवास, पुण्यात सीटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव साधारण सारखाच. आपल्याला जी बस हवी ती वेळेवर येत नाही. दुसऱ्या अनेक बसेस येतात पण जिची आतुरतेने वाट पहात असतो ती आपल्याला ताटकळत ठेवते.\nआली तर बस थांब्यावर थांबत नाही आणि थांबली तर त्यात मुंगीलाही पाय ठेवायला जागा नसते. प्रचंड कसरत करून बसमध्ये प्रवेश मिळवावा लागतो अन् चला आताचा दिवस जाण्यापुरता निदान पार पडला म्ह���ून हुश्श्य करून एक सुस्कारा टाकला जातो. परतीच्या प्रवासाचं संध्याकाळी पुन्हा बघू… होय हाच अनुभव असतो. त्यातल्या त्यात आता काही मार्गावर बीआरटी सुरू केल्यामुळे बस थांबण्याची खात्री असली, तरी गर्दीचा प्रश्न असतोच.\nअशा खचाखच भरलेल्या पीएमटीमध्ये सापडतं कसं घबाड हो एकदा नव्हे, अनेकदा हा अनुभव आला आणि क्षणभर कुठेतरी स्वतःचा सार्थ अभिमान वाटला. स्वतः एक प्राथमिक शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान. पीएमटीतील विविध व्यवधान घेऊन प्रवास करणाऱ्या साऱ्या प्रवाशांनाही तो “क्षण’ गहिवरून टाकणारा ठरला. दुपारची वेळ. उन्हाचा कडाका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणं गरजेचं होतं. त्यातून आजच्या तरुणवयात बायकांनी गाडी म्हणजे “दुचाकी’ चालवण्याचं फॅडच नव्हते.\nनव्हे ते जरा आगाऊपणाचं मानलं जायचं. अन् आता केव्हा शिकणार म्हातारपणात यामुळे एकमेव वाहन पीएमटी. हवी ती बस आली. बसमध्ये घुसले असं म्हणण्यापेक्षा ढकलले गेले. अन् तोल सांभाळण्यासाठी एका दांड्याला पकडलं. पाय ठेवायला जागा नाही, अशी अवस्था होती. अशा वेळी भरल्या गर्दीत कानावर कोणाचा तरी आवाज पडला, “”मॅडम तुम्ही यामुळे एकमेव वाहन पीएमटी. हवी ती बस आली. बसमध्ये घुसले असं म्हणण्यापेक्षा ढकलले गेले. अन् तोल सांभाळण्यासाठी एका दांड्याला पकडलं. पाय ठेवायला जागा नाही, अशी अवस्था होती. अशा वेळी भरल्या गर्दीत कानावर कोणाचा तरी आवाज पडला, “”मॅडम तुम्ही या, या इकडे, इथं बसा या, या इकडे, इथं बसा” सगळेच अवाक् नुसताच आवाज नाही, तर लगोलग कृतीही. 24/25 वर्षे वयाची एक सुंदर रुबाबदार युवती पुढे आली.\nइतक्या गर्दीतही वाकण्याचा प्रयत्न करत तिने नमस्कार केला आणि म्हणाली, “”आमच्या मॅडम आहेत या. त्यांनी नुसतंच वर्गातले धडे नाही शिकवले, तर जीवनातील समस्याचं निराकरण करण्याचं धाडस दिलं, निर्णय घेण्याची क्षमता दिली. थोरामोठ्यांचा आदर करण्याचं व्रत दिलं. हसत जगण्याचं न संपणारं रसायन आमच्यात भरलं” एवढ्या गर्दीत एवढी चार/पाच वाक्य बोलत ती मुलगी मला तिच्या जागेपर्यंत घेऊन गेली. खाली बसवलं, चौकशी केली. म्हणाली, “”मॅडम, तुमचे संस्कार आज मला इथपर्यंत घेऊन आले आहेत\nअगदी कृतार्थ वाटलं मला. कुठला अशील वकिलाला बसायला अशी आपली जागा देतो कुठला रुग्ण डॉक्टरला ओळख देऊन एवढ्या आदराने वागवतो आणि तेही 15/20 वर्षांनी भेटल्यावर. धन्य वाटलं, शिक्षक असल्याबद्दल. गाठीला फार धन नसेल, पण आज असंख्य विद्यार्थी समाजात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पदावर काम करतात.\nभेटल्यावर आवर्जून सांगतात, “”मॅडम तुमच्यामुळे घडलो.” हे विद्यार्थी म्हणजे शिक्षकाच्या गाठी असलेली कायमची ठेव. प्रचंड आश्वासक. चक्रवाढीने आनंद देणारी ही ठेव मिळायला भाग्यच लागतं. ते मला भरभरून मिळाले आहे.\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/ndia-will-become-hindu-rashtra-by-2024-says-uttar-pradeshs-bjp-mla-surendra-singh/", "date_download": "2019-03-25T08:09:06Z", "digest": "sha1:RMYFBDSAWNY3BVENE3YUF5ZNOFBRB7K3", "length": 6209, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून राहावे लागेल;ज्यांना पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे-भाजप आमदार", "raw_content": "\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nमुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून राहावे लागेल;ज्यांना पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे-भाजप आमदार\nटीम महाराष्ट्र देशा: भाजप मधील वाचाळवीरांचे वक्तव्य काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता २०२४ पर्यंत भारत हे हिंदुराष्ट्र होणार असल्याच अजब वक्तव्य केल आहे.\nआमदार सुरेंद्र सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “देशात काही मुस्लिम हे देशभक्त आहेत पण जेव्हा भारत हिंदू राष्ट्र होईल तेव्हा मुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून मिसळून राहावे लागेल तरच ते देशात राहू शकतील, ज्यांना हे पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अवतार पुरूष आहेत. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असून २०२४ मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचवेळी भारत हा महाशक्ती झालेला असेल त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही वाटा असणार आहे.”\nया नंतर सुरेंद्र सिंह यांनी आपल्या वाक्याचा विपर्यास केला असल्याच सांगून आता घुमजाव केल आहे. मात्र, भाजप आपल्या या वाचाळवीरांचा कसा बंदोबस्त करणार हे पाहण्यासारख असणार आहे.\nऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निव��णुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nआज सैन्य दिनी भारताच्या लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला खडसावले\nम.गांधींची हत्या झाली नसती तर आज देश वेगळय़ा स्थितीत दिसला असता – कलानंद मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/the-next-chief-minister-will-be-of-shiv-sena-uddhav-thackeray/", "date_download": "2019-03-25T08:02:07Z", "digest": "sha1:S2TFMAYZW3AQRG4VHVWP65FIRIHNQWOU", "length": 6639, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल : उद्धव ठाकरे", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nपुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल : उद्धव ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा- ‘धो धो पावसाची पर्वा न करता अथक मेहनत घेतलेल्या शिवसैनिकांमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवर भगवा फडकला. इरेला पेटला की शिवसैनिक काय करतो त्याची प्रचीती देणारा हा विजय होता. ही पुढच्या निवडणुकीची रंगीत तालीम होती. यापुढे लढायचं आणि जिंकायचंच शिवसैनिक असाच एकवटला तर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’ असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.\nमुंबई पदवीधर मतदारसंघात १९ हजार ४०३ मते मिळवून दणदणीत विजयी झालेल्या विलास पोतनीस यांचा आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आमदार व विभागप्रमुख ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.\nनेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे \n‘धो धो पावसाची पर्वा न करता अथक मेहनत घेतलेल्या शिवसैनिकांमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवर भगवा फडकला. इरेला पेटला की शिवसैनिक काय करतो त्याची प्रचीती देणारा हा विजय होता. ही पुढच्या निवडणुकीची रंगीत तालीम होती. यापुढे लढायचं आणि जिंकायचंच शिवसैनिक असाच एकवटला तर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल.हा विजय मी शिवसैनिकांना विनम्रपणे अर्पण करतो. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून द्या’.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nअंधेरीतील रेल्वे पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेची पुन्हा एकदा पोलखोल – नवाब मलिक\nआईच्या सांगण्यावरून मुलीनेच केली पित्याची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/sohala-marathi-movie/", "date_download": "2019-03-25T08:00:41Z", "digest": "sha1:OOAYLJRUI35BQKCUHYJCOKTNAGXSURBU", "length": 1854, "nlines": 39, "source_domain": "marathikalakar.com", "title": " sohala marathi movie - मराठी कलाकार", "raw_content": "\nएखाद्या तरुणाप्रमाणे एनर्जेटिक आहेत सचिन पिळगांवकर-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे\nअभिनय, नृत्य, संगीत अशा एक ना विविध कलेत पारंगत असणारे महाराष्ट्राचे महागुरू म्हणजेच जेष्ठ अभिनेते सचिन...\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/three-death-while-taking-selfie-sangrampur-buldana-139171", "date_download": "2019-03-25T08:46:16Z", "digest": "sha1:6BJESEFTG7I3UVOAVFRH7GBMDAQB55NM", "length": 13246, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three death while taking a selfie at Sangrampur Buldana सेल्फी काढण्याच्या नादात कुटूंब गेले वाहून! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, मार्च 25, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 25, 2019\nसेल्फी काढण्याच्या नादात कुटूंब गेले वाहून\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nप्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी मुलासह नवरा बायको खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुलाखाली गेले होते. लहान मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पुराचे पाण्यात वाहून जाताना दिसताच त्याचे आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता ती पण पाण्यात घसरली.\nसंग्रामपूर (बुलढाणा) : सेल्फी काढण्याचे नादात खिरोडा पूर्णेच्या पात्र���त मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना आज 22 ऑगस्टचे सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान घडली.\nप्राप्त माहितीनुसार आज (ता. 22) सायंकाळी राजेश चव्हाण बायको-मुलासह खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुलाखाली गेले होते. लहान मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पुराचे पाण्यात वाहून जाताना दिसताच त्याचे आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता ती पण पाण्यात घसरली.\nदोघे माय लेक वाहत असल्याचे पाहून बापानेही पात्रात धाव घेतली आणि तेही पाण्यात वाहत गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच खिरोडा येथील लोकांनी पुलाकडे धाव घेतली. नदीला मोठा पूर आलेला असून पुलाचे 10 फूट खाली पाणी वाहत आहे.\nवाहून गेलेले जळगाव जा. चे राजेश चव्हाण बुलढाणा अर्बन मध्ये कर्मचारी होते. मूळचे अकोला जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथील ते रहिवाशी आहेत. जळगाव जा. येथे बुलढाणा अर्बन मध्ये नोकरी असल्याने ते सध्या जळगाव मध्ये सावरकर नगर येथे राहत होते. नुकतीच नवीन गाडी घेऊन घरी परत येत असताना ही घटना घडली. अशी माहिती आहे सद्यस्थितीत तामगाव पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून वाहून गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा मोबाईल आणि चप्पल ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिस नदीपात्रात तिघांचा शोध घेत आहेत.\nLoksabha 2019 : रावेर लोकसभेतून संतोष चौधरींची माघार\nभुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा...\nLoksabha 2019 : वारसदारांमध्ये प्रतिष्ठेची झुंज\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात दोन मातब्बर राजकारण्यांचे वारसदार विजयासाठी झुंजणार आहेत. सहकाराची पायाभरणी, दुधाचा महापूर, \"रोहयो' ते शेतीतील प्रयोगातून...\nपुणे : बेकायदा वाळु विक्री प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल\nपुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nआशियातील सर्वांत उंच केबल पूल\nपुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यानची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन बोगदे व एक केबल ब्रिज बांधण्याच्या कामास...\nशहरीकरणात वनांच्या संरक्षणाचे आव्हान\nपुणे - आपल्यापासून तास-दीड तासाच्या अंतरावर असणारा हडपसर, सोल���पूर हा गवताळ प्रदेश होता. तेथे चित्ता, चिंकारा, लांडगा यांचे वास्तव्य होते. पण, या...\nकारखान्यांकडून एकरकमी ‘एफआरपी’बाबत मौन\nकाशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/blog-post_19.html", "date_download": "2019-03-25T07:43:03Z", "digest": "sha1:QR3GLSE2H5NVYPAKM5XJATHB7ZRKNAKK", "length": 12182, "nlines": 104, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.. ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nआज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती..\nशिवाजी राजा मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु ‘लोकनायक राजा’ अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय.\nशिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९.२.१६३० (जुनी तारीख ६.४.१६२७) रोजी झाला. मराठी राष्ट्र हे शिवाजी राजांची निर्मिती होय. शहाजीने आपली पुणे, सुपे येथील जहागीर, जी प्रायः स्वतंत्र होती. ती शिवाजी राजांना बहाल केली. त्यांनी मावल, कोकण, आणि देश या प्रदेशातील लोकांच्या समोर स्वराज्याचे, महाराष्ट्र धर्माचे ध्येय ठेवून त्यांना संघटित केले, आणि परकी सत्तांना परभूत करून स्वराज्य स्थापन केले. या नूतन महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासन देऊन त्यांनी ते भक्कम पायावर उभे केले. आर्थिक दृष्ट्या देखील त�� स्वावलंबी बनविले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरून सर्व धर्म पंथांना आपल्या राज्यांत सामावून घेतले. आपल्या राज्याभिषेक प्रंसंगी (१६७४) राजशक सुरू करणारा, आणि स्वतःची शिवराई आणि होन’ ही सोन्याची नाणी चालू करणारा शिवाजी राजा हा पहिला मराठी छत्रपती होय. त्याच्या अकाली मृत्यूमुळे-वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी (५ एप्रिल १६८०) महाराष्ट्रांत एक पोकळी निर्माण झाली. मध्ययुगाच्या इतिहांसातील शिवाजी महाराजांचे स्थान सुप्रसिद्ध वंग इतिहासकार, यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रांत विशद केले आहे. ते म्हणतात,`शिवजी राजा हा केवल मराठी राष्ट्राचा निर्माता नव्हता, तर तो मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु ‘लोकनायक राजा’ अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय.\nशिवाजी राजांचा पुत्र संभाजी (इ.स. १६५७-८९) याची कारकीर्द अवघे नऊ वर्षांची झाली. या छोट्या काळांत त्याला अंतर्गत कलह आणि शिद्दी, पोर्तुगीज, मुघल यासारखे शत्रू यांच्याशी मुकाबला करावा लागला. मुघलांच्या हातून त्याचा १६८९ साली जो अमानुष वध झाला त्यामुळे मराठी लोकामध्ये देशप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण झाली, आणि शिवाजी महाराजांचा कनिष्ठ पुत्र राजाराम (१६७०-१७००) याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. आपला बलाढ्य फौजफाटा घेऊन औरंगजेब बादशहाने मरेपर्यंत (१७०७) मराठी सत्ता नेस्तनाबूत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने स्वातंत्र्ययुद्धाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि आपला पुत्र दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. परंतु औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेला संभाजीचा पुत्र शाहू याची जेव्हा १७०७ साली सुटका झाली तेव्हा शाहूपक्ष आणि ताराबाई पक्ष असे दोन तट मराठी राज्यात पडले आणि त्यांच्यात यादवी युद्धाला सुरवात झाली. शाहूने साताऱ्यास तर ताराबाईने पन्हाळ्यास आपली स्वंतत्र गादी स्थापन केली. या दुसऱ्या गादीच्या संदर्भात १७१४ साली एक राजवाड्यांतच छोटीशी राज्यक्रांती कोल्हापुरात झाली. आणि राजारामाचा दुसरा पुत्र संभाजी (इ.स. १६९८ ते १७���०) यास कोल्हापूरची गादी मिळाली. शाहूने वारणेच्या तहान्वये (१७३१) संभाजीस कोल्हापूरचा छत्रपती म्हणून मान्यता दिली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://shantaramathavale.com/chitrapat-geete/bhav-bhukela-hari/", "date_download": "2019-03-25T07:45:18Z", "digest": "sha1:YO5REZS5K46GQNIIYG3EAWZMQH7JUVIR", "length": 5883, "nlines": 63, "source_domain": "shantaramathavale.com", "title": "Shantaram Athavale", "raw_content": "\nसाखरझोप प्रभातकाल मध्यान्ह सायंकाळ\nपुस्तके चित्रपट गीते काव्य आणि कविता गुदगुल्या अहा तो क्षण आनंदाचा दीपावली शुभेच्छा बालगीते इतर भावकविता\n१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)\nजन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५\nभाव भुकेला हरी, करीतसे भक्तांची चाकरी\nभाव भुकेला हरी, करीतसे भक्तांची चाकरी\nभेटी आला भक्त सुदामा, भुलला त्याच्या भक्तीप्रेमा\nदैन्य त्याचे हरी, करीतसे भक्तांची चाकरी.\nत्रैलोक्याचा धनी श्रीपती, सुखे होऊनी पार्थसारथी\nश्रमे पाण्डवाघरी, करीतसे भक्तांची चाकरी.\nभक्त कबीरा कृष्ण कृपाळू, विणू लागतो शेले शालू\nबैसुनी मागावरी, करीतसे भक्तांची चाकरी.\nअंगण झाडी, जाते ओढी, संत जनीच्या घरी\nकावडी रांजणात हा भरी, करीतसे भक्तांची चाकरी.\n'संत सखू' हाही प्रभातच्या संतपटांच्या पठडीतील आणखी एक चित्रपट. भक्तीरसातील गीते हे त्या चित्राचेही वैशिष्ठ्य ठरले. या चित्रपटापासून गाण्यांना उसना आवाज देण्यात येऊ लागला. संत सखूचे काम करणाऱ्या हंसा वाडकर यांच्यासाठी विनोदिनी देसाई यांचा आवाज वापरण्यात आला.\nपांडुरंग भेटी वैष्णव निघाले\nभाव भुकेला हरी करीतसे भक्तांची चाकरी\nशुभ बोल मुखे बोलावे\nचित्रपट गीते (Film Songs)\nसाठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा\nआधी बीज एकले - संत तुकाराम\nदोन घडीचा डाव - रामशास्त्री\nलख लख चंदे��ी - शेजारी\nमन सुद्ध तुझं - कुंकू\nसुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा\nतू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या\nबघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण\nतुझा नि माझा एकपणा - भावगीत\nगुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)\n\"नाही धोका वेगे हाका\"\n\"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता\"\n\"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा\"\nकवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:\n\"अहा तो क्षण आनंदाचा\nदीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)\nबालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)\nइतर भावकविता (Other Poems)\nमाझा मुलगा संत ज्ञानेश्वर\n“याला जीवन ऐसे नाव”\nशांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी \"याला जीवन ऐसे नाव\" ही व्ही सी डी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2019-03-25T07:39:47Z", "digest": "sha1:LBPMIFX7K55TPSPGKWRNVI6ANDFOOIDB", "length": 10353, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोकरीच्या अमिषाने लुटणाऱ्याला पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनोकरीच्या अमिषाने लुटणाऱ्याला पोलीस कोठडी\nहिंजवडी पोलिसांनी केली आहे दिल्लीतून अटक\nपुणे – असेंजर कंपनीत सिनिअर सिस्टीम इंजिनिअर म्हणून नोकरी लावण्याच्या अमिषाने 2 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात दिल्ली येथून एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 8 मोबाईल, 2 राऊटर, 1 हार्डडिस्क, 1 रबरी शिक्का, 7 सिमकार्ड, 4 बॅंक पासबुक, 14 चेकबुक, 13 डेबीट कार्ड, 1 वॉकी आणि रोख रक्कम 9 हजार 500 जप्त केली आहे. दरम्यान त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी दिला आहे.\nमोहम्मद एहसान हुसेन सलमान (वय 28, रा. दिल्ली, मुळ रा. गाझियाबाद, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत क्रांतीकुमार अंजैय्य सालीकांती (वय 24, रा. हिंजवडी, मुळ रा. तेलंगना राज्य) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 9 मार्च 2018 ते 14 मे 2018 या कालावधीत घडली.\nसालीकांती हे हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत कामाला असताना ई-मेल करण्यात आला. नोकरीचे अमिष दाखवून त्यांना वेळोवेळी 2 लाख 11 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. मात्र, त्यां���ा नोकरी लावली नाही. पैसेही परत दिले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी आणखी काही लोकांनी फिर्यादींशी संपर्क केला आहे. त्यांच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.\nमोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा ‘बलोच’\nपुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\nपुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध\nभारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर\nमी ब्राह्मण असल्याने नावापुढे चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nपुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या\nअंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\nनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक\nलोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही\nउस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर\nपक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो \nउदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट\nएप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्यता\nकाँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार\nसातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच\nभाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील\nसातारा काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ\n१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार शरद पवार दोन दिवस नगरमध्ये\n‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://vicharpravah.in/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2019-03-25T07:33:44Z", "digest": "sha1:25ZSDQS3YEAB5BPLHKJV3JIWA75QOA3H", "length": 9497, "nlines": 43, "source_domain": "vicharpravah.in", "title": "७४. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग ३ - विचारप्रवाह", "raw_content": "\n७४. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग ३\nविल्क्स यांनी कोर्सदरम्यान जॉन मॉकली व जे. प्रेसपर एकर्ट यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत संगणकाच्या भवितव्याबाबत चर्चा केली. मूरे स्कूलमधील कोर्स संपल्यानंतर विल्क्स यांना इंग्लंडला जाण्यास अजून थोडा अवकाश होता. तेंव्हा त्यांनी हार्वर्ड विद्यापिठास भेट दिली. त्यावेळी तिथे ‘हार्वर्ड मार्क २’ या संगणकाची बांधणी सुरु होती. विल्क्स यांनी ‘हार्वर्ड मार्क १’ या संगणकाची पहाणी केली. ‘हार्वर्ड मार्क १’ हा आयबीएम कंपनीने तयार केलेला इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणक होता. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तो सर्वोत्तम संगणक म्हणून ओळखला जात असे. त्याची एकंदरित कार्यप्रणाली पाहता विल्क्स फारसे प्रभावित झाले नाहीत. त्यानंतर ते ‘एमआयटी’मधील अत्याधुनिक ‘डिफरन्शिअल ॲनॅलायझर’ पहायला गेले. तेथील तंत्रज्ञानानेही त्यांस आकर्षित केले नाही. पूर्वी वापरात असलेले तंत्रज्ञान आता कालबाह्य होऊ लागले होते. तेंव्हा एकंदरित विचार करता ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ हेच संगणकविश्वाचे भवितव्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबाबत त्यांच्या मनात तिळमात्रही शंका उरली नाही\n१९४६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मॉरिस विल्स्क अमेरिकेहून इंग्लंडला परतले. त्यावेळी ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ तयार करण्याचा त्यांनी मनोमन निर्धार केला होता. केंब्रिज विद्यापिठातील त्यांच्या गणितीय प्रयोगशाळेकडे काही निधी उपलब्धता होता. त्यामुळे पैशांची तजविज करण्याकरिता त्यांना इतरत्र जावे लागले नाही. संगणक निर्मितीचे काम सुरु करण्यास तेव्हढा निधी पुरेसा ठरला. पुढील तीन वर्षं विल्क्स यांनी त्यांच्या सहकार्यांसह भरपूर मेहनत घेतली. याच काळात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सची प्रयोगशाळा उभी केली. संगणक क्षेत्रात संशोधन करुन तंत्रज्ञानात भर घालणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर उपलब्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामचलाऊ संगणक तयार करणे त्यांस अभिप्रेत होते. कारण याकामी सढळहस्ते खर्च करवा इतका निधी त्यांच्याकडे नव्हता.\n‘जे लायन्स अँड को.’ ही इंग्लंडमधील कंपनी त्याकाळी खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात आघाडीवर होती. या कंपनीने आपले दोन वरिष्ठ व्यवस्थापक अमेरिकेतील युद्धकालिन तंत्रज्ञानाचा आभ्यास करण्याकरिता पाठवले. तिथे त्यांची हर्मन गोल्डस्टाईन यांच्याशी भेट झाली. तेंव्हा संगणकाच��� व्यवसायातील महत्त्व त्यांना चांगल्याप्रकारे लक्षात आले. मॉरिस विल्क्स हे प्रत्यक्ष इंग्लंडमध्येच अशाप्रकारचा संगणक तयार करत असल्याचे गोल्डस्टाईन यांनी त्यांना सांगितले. इंग्लंडला परतल्यानंतर या व्यवस्थापकांनी विल्क्स यांची केंब्रिज विद्यापिठात भेट घेतली. तेंव्हा विल्क्स यांनी त्यांच्यासमोर आपली अडचण मांडली. एडसॅक प्रकल्पाला जर थोडा अधिक निधी मिळाला, तर ते काम लवकर पूर्ण होऊ शकेल असे त्यांनी त्या व्यवस्थापकांस सांगितले. वरिष्ठ व्यवस्थापकांनी कंपनीतर्फे विल्क्स यांना काही निधी पुरवला आणि त्यांच्यासोबत काम करण्याकरिता एक अतिरिक्त तंत्रज्ञ देखील दिला.\nमागील भाग | पुढील भाग\nआपणाला हेही वाचायला आवडेल\n२१. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : ॲनॅलिटिकल इंजिन : भाग २\n७२. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग १\n२३. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : हर्मन हॉलरॅथ\nविषयप्रकार Select Category अभिरुची मनोविश्व मराठी इंटरनेट मराठी महाराष्ट्र विचारप्रवाह शब्दकोश संगणकाची गोष्ट समकालीन\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n‘भाषा जगली काय, मेली काय’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो’ हा उथळ समाजवादी विचार पवार कुटुंबीयांनी फारच मनावर घेतलेला दिसतो कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल कदाचित त्यामुळेच पार्थ पवारांना साधे मराठीतून व्यवस्थित बोलताही येत नाही; तरी मराठीचे व्यवहारातील महत्त्व मात्र आता त्यांच्या चांगलेच लक्षात आले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/magnus-carlsen-fabiano-caruana-fight-for-world-championships-1786101/", "date_download": "2019-03-25T08:28:59Z", "digest": "sha1:EG3IWTJCIPFA525EDNSSAMU3H7SDB34I", "length": 12870, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Magnus Carlsen, Fabiano Caruana Fight for world championships | ६४ घरांचा राजा कोण? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\n६४ घरांचा राजा कोण\n६४ घरांचा राजा कोण\n१२ फेऱ्यांच्या या शर्यतीत जर आधी किंवा नंतर निर्ण��� घेण्याची वेळ आली तर कारुआना हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.\nजागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा\nजगज्जेतेपदासाठी मॅग्नस कार्लसन, फॅबियानो कारुआना यांच्यात शुक्रवारपासून लढत\nगतविजेता मॅग्नस कार्लसन आणि आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यात शुक्रवारपासून लंडन येथील द कॉलेजमध्ये जगज्जेतेपदासाठीची झुंज रंगणार आहे. नॉर्वेच्या २७ वर्षीय कार्लसनने याआधी अमेरिकेच्या २६ वर्षीय कारुआनाविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यामुळे कार्लसन २०१३ पासून आपले जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्लसन (२८३५) आणि कारुआना (२८३२) यांच्या रेटिंग गुणांमध्ये फक्त तीन गुणांचा फरक असल्यामुळे ही जगज्जेतेपदाची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.\n१२ फेऱ्यांच्या या शर्यतीत जर आधी किंवा नंतर निर्णय घेण्याची वेळ आली तर कारुआना हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र क्लासिकल फेऱ्यांची ही लढत ६-६ अशी बरोबरीत सुटली तर आक्रमक आणि वेगवान खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कार्लसन हा टायब्रेकमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असेल.\nअलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रतिस्पध्र्याविषयी कार्लसन म्हणाला होता की, ‘‘कारुआनाची खेळण्याची शैली भक्कम असली तरी तो डावाचा खोलवर अभ्यास करतो. कारुआना आपले प्यादे गमावण्याला प्राधान्य देत नसून प्रतिस्पध्र्याच्या प्याद्याच्या पुढे जाऊन तो थेट राजावर हल्ला चढवतो.कारुआनाच्या हल्ल्यांवर प्रतिहल्ले चढवून मी त्याच्याविरुद्धच्या अनेक लढतीत विजय मिळवला आहे.’’\nकार्लसन तीन जगज्जेतेपदांचा मानकरी\n२०१४ मध्ये भारतात झालेल्या जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनने विश्वनाथन आनंदची मक्तेदारी मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. त्याच वर्षी त्याने आनंदला हरवून ब्लिट्झ प्रकाराचेही जगज्जेतेपद पटकावले होते. २०१६ मध्ये रशियाच्या सर्जी कार्याकिनला धूळ चारून कार्लसन तिसऱ्यांदा जगज्जेता ठरला होता.\n१९७२ मध्ये बॉबी फिशर यांनी अमेरिकेसाठी अखेरचे जेतपद पटकावले होते. अमेरिकेचा फिशर आणि रशियाचा बोरीस स्पास्की या दोन महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशांमधील खेळाडूंमध्ये जणू युद्धच रंगले होते. त्यानंतर अमेरिकेच्या एकाही बुद्धिबळपटूने जगज्जेतेपद पटक���वले नाही. त्यामुळे कारुआनाच्या कामगिरीकडे अमेरिकन प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले आहे.\nस्थळ : द कॉलेज, लंडन\nवेळ : रात्री १०.३० वा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nजावेद अख्तर यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांचं स्पष्टीकरण\nकंगनाचा भाव वधारला, बायोपिकसाठी घेणार तब्बल २४ कोटी रुपये\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा 'बलोच'\nFilmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, 'I Love You '\n 'या' दिवशी तानाजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमोठी घराणी भाजपच्या आश्रयाला\nम्हाडाच्या विलंबामुळे सोसायटय़ांना भुर्दंड\n मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : पवार\nछप्पन पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही : फडणवीस\nधोकादायक पुलांच्या पाडकामाचा सपाटा\nअपक्ष लढण्यावर सत्तार ठाम\nपित्याचे धूम्रपान बाळासाठी घातक\n‘बीएसएनएल’, ‘एमटीएनएल’ला निवडणुकांचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.chinacombinerbox.com/mr/four-in-one-rib-out-of-the-exchange-of-ac-convergence-integrated-components-amj2-4003h1003hx4.html", "date_download": "2019-03-25T07:24:54Z", "digest": "sha1:7KLBHUGWHF2CLWD3SK7RNXOTL5B3OD2U", "length": 13579, "nlines": 212, "source_domain": "www.chinacombinerbox.com", "title": "चार-इन-एक एसी एककेंद्राभिमुखता एकात्मिक घटक AMJ2-4003H / 1003HX4 विनिमय बाहेर बरगडी - चीन शांघाय IPKIS", "raw_content": "\nतापमान आणि आर्द्रता कंट्रोलर\nतापमान आणि आर्द्रता कंट्रोलर\nचार-इन-एक एसी एककेंद्राभिमुखता एकात्मिक घटक विनिमय बाहेर बरगडी AMJ2-4003H / 1003HX4\nविहंगावलोकन AMJ1 busbar एकात्मिक घटक तीन टप्प्यांत मल्टि-शाखा शाखा चालू एकीकरण IPKIS केलेल्या रचना एक मॉड्यूलर कनेक्ट घटक आहे. रचना संक्षिप्त आणि सुंदर आहे, आणि कनेक्शन सोयीस्कर आणि सुरक्षित आहे. मॉड्यूलर डिझाइन माध्यमातून क्लिष्ट ऑपरेशन विभाजन ओळ फक्त एक पेचकस सह घट्ट सोपी आहे. त्याच वेळी, विभाग प्रत्यक्ष शाखा गरजा, खूप श्रम खर्च आणि जागा खर्च, आणि connec वाचवतो त्यानुसार spliced केले जाऊ शकते ...\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nAMJ1 busbar एकात्मिक घटक तीन टप्प्यांत मल्टि-शाखा शाखा चालू एकीकरण IPKIS केलेल्या रचना एक मॉड्यूलर कनेक्ट घटक आहे. रचना संक्षिप्त आणि सुंदर आहे, आणि कनेक्शन ���ोयीस्कर आणि सुरक्षित आहे. मॉड्यूलर डिझाइन माध्यमातून क्लिष्ट ऑपरेशन विभाजन ओळ फक्त एक पेचकस सह घट्ट सोपी आहे. त्याच वेळी, विभाग प्रत्यक्ष शाखा गरजा, खूप श्रम खर्च आणि जागा खर्च वाचवतो त्यानुसार spliced जाऊ शकते, आणि कनेक्शन अतिशय सुंदर आहे.\nमऊ कनेक्शन स्विच busbars कनेक्ट करण्यासाठी मऊ तांबे बार वापरा\nहार्ड कनेक्शन तांबे बार आणि busbars वापरून केले जातात\nविशिष्ट परिमाणे वैशिष्ट्य निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष गरजेनुसार, मागणी क्वेरी वापर द्या.\nमुख्य स्विच 400A तीन टप्प्यांत शि बाबतीत स्विच\nउप-स्विच 100A तीन टप्प्यांत शि बाबतीत स्विच\nमुख्य कनेक्शन मऊ कनेक्शन\n● थेट स्थापित एक मॉड्यूलर स्विच मूळ फक्त तांबे शर्यतीच्या.\nपुढील हलवा शेवट, पुढील बाहेर: ● उत्पादने विविध मार्गांनी मध्ये आयोजित केले जाऊ शकतात.\n● आमच्या विभागात सर्व सॉफ्ट रांगेत मांडी, थेट विभाग, बदलानुकारी अंतर वरील स्विच फार चेसिस जागा कमी असू शकते.\n● आमच्या मुख्य पंक्ती आणि उप-पंक्ती खास डिझाइन पकडीत घट्ट रचना, तांबे विविध वैशिष्ट्य योग्य आलटून ग्राहकांना विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शर्यतीच्या स्विच विविधता व्यवस्था.\n● PA66 साहित्य सह संरक्षणात्मक शेल.\n● उच्च दर्जाचे तांबे मुख्य ओळीत.\nवरील 18KA; ● बस अल्पकालीन withstand चालू (Icw)\n● येणारी जोडणी: तीन टप्प्यांत / चार टप्प्यात 250A ~ 800A, मऊ किंवा हार्ड रांगेत;\n● busbar: उच्च क्षारता तांबे निकेल मुलाला;\n● संरक्षक शेल: PA66;\n● शाखा कनेक्शन: पेक्षा अधिक दोन टप्प्यात तीन टप्प्यांत / 63A पेक्षा अधिक, मऊ किंवा हार्ड ओळीत.\nशांघाय IPKIS पॉवर तंत्रज्ञान कंपनी, एकात्मिक कंबायनरचा बॉक्स प्रणाली आणि पूरक सुविधा, विजेची जोडणी तंत्रज्ञान संशोधन आणि विकास आणि सन वैज्ञानिक संशोधन गुंतवणूक वर्षी अर्ज वीज वितरण पूर्ण सेटवर लि लक्ष केंद्रित, पेटंट अर्ज एक सद्गुणी निर्मिती मंजूर मंडळ, वैज्ञानिक संशोधन परिवर्तन समाधान देणारा, शांघाय टेक उपक्रम आहे; ग्राहकांना अतिरिक्त मूल्य तयार करण्यासाठी, विजेची जोडणी उपाय प्रदान करणे प्रणाली कंपनी आमच्या व्यावसायिक, वेळेवर आणि जलद सहकार्य कंपनी व्यावसायिक आणि तांत्रिक फायदे चांगले आहे, आणि ग्राहकांना तयार अनेक वर्षे माध्यमातून संबंध आधार बंद, तो एक स्थापन केली आहे अद्वितीय व्यवसाय मॉडेल आणि उपक्रम निरोगी विकास ओळ एक पर्यावरणीय मंडळ स्���ापना केली. overcapacity, तांत्रिक अपग्रेड करण्यासाठी आणि औद्योगिक एकात्मता विद्यमान पार्श्वभूमी अंतर्गत, ते सक्रियपणे लहान उद्योगांना जगण्याची आणि विकासासाठी नवीन कल्पना अन्वेषण करण्यासाठी आवश्यक आहे.\nउत्पादन गुणवत्तेला व्यवसाय कार्ड आहे, गुणवत्ता आम्ही सामान्यपणा नाकारू. आम्ही तपशील, सतत सुधारणा काळजी आहोत, हे एक प्रमाणपत्र आहे, ते सर्व IPKISer चे काम करणार्या लोकांपैकी प्रतिनिधी आहे.\nमागील: मागे-माऊंट चार-इन-एक फोटोव्होल्टाइक एसी एककेंद्राभिमुखता एकात्मिक घटक AMJ1-2503S / 0633SX4\nपुढे: एक फोटोव्होल्टाइक एसी एककेंद्राभिमुखता एकात्मिक घटक AMJ2-4003H / 1003HX6 मध्ये जनावराचे सहा\n180a विद्युत वितरण बॉक्स\n6 मध्ये 1 कंबायनरचा बॉक्स\nडीसी विद्युत वितरण बॉक्स\nउच्च गुणवत्ता सौर कंबायनरचा बॉक्स\nपॅनेल कंबायनरचा बॉक्स सौर\nप्लॅस्टिक सौर डीसी जंक्शन बॉक्स\nपीव्ही पत्रे कंबायनरचा बॉक्स\nपीव्ही पत्रे स्ट्रिंग कंबायनरचा बॉक्स\nपीव्ही पॅनल स्ट्रिंग बॉक्स\nपी सौर पॅनेल कंबायनरचा बॉक्स\nसौर कंबायनरचा बॉक्स 16\nसौर IP65 कंबायनरचा बॉक्स\nसौर मॉड्यूल जंक्शन बॉक्स\nसौर मॉड्यूल स्ट्रिंग बॉक्स\nसौर पॅनेल डीसी कंबायनरचा बॉक्स\nसौर स्ट्रिंग कंबायनरचा बॉक्स\nबॅक-त्रिशंकू तीन-इन-एक फोटोव्होल्टाइक एसी येणे ...\nडुकराचे मांस आठ एक फोटोव्होल्टाइक एसी एककेंद्राभिमुखता मी मध्ये ...\nएक फोटोव्होल्टाइक एसी एककेंद्राभिमुखता int मध्ये सहा जनावराचे ...\nफोटोव्होल्टाइक एसी सह मध्ये मार्ग बॅक-नी ...\nएक पीव्ही एसी conver रस्ता तीन गळून ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/in-2015-1.5K-phone-launches-Report.html", "date_download": "2019-03-25T07:46:05Z", "digest": "sha1:2FNAVDDV3PD5WUOWENHLVOGCVCMA4TP2", "length": 7164, "nlines": 106, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "यावर्षी 1500 मोबाइल फोन मॉडेल लाँचिंगची शक्यता ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nयावर्षी 1500 मोबाइल फोन मॉडेल लाँचिंगची शक्यता\nशाओमी, आसु���, मोटोरोला यासारख्या मोबाइल कंपन्या फोन ब्राँण्डच्या माध्यमातून भारतातील आपली भागदारी वाढविण्यासाठी या वर्षभरात देशामध्ये जवळपास 1400 ते 1500 नवे मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. असे 91मोबाइल डॉट कॉमच्या एका अहवालात म्हटले आहे.\n“आम्हाला २०१५ मध्ये मोबाइल फोनचे जवळपास 1400-1500 मॉडेल लाँच होण्याची आशा आहे. मागील वर्षी जवळजवळ 1137 मोबाइल लाँच झाले होते. तर २०१३ मध्ये 957 मोबाइल लाँच करण्यात आले होते.” असे अहवालात म्हटले आहे.\nशाओमी, मोटोरोला, आसुस, ओबी यासारखे नवे ब्राँण्ड हे नवनवे मॉडेल लाँच करुन आधीपासूनच भारतीय बाजारपेठ पाय रोवलेल्या मोबाइल कंपन्यांना चांगलीच टक्कर देतील. असेही अहवालात म्हणण्यात आले आहे.\nनुकताच लाँच करण्यात आलेल्या शाओमीच्या Mi 4 या मोबाइल स्मार्टफोनने भारतीय बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या फोनला प्रचंड मागणी असल्याचेही दिसून आले होते.\nअहवालानुसार, २०१३ आणि २०१४ मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा स्मार्टफोन घेणारे ग्राहक अधिक महाग स्मार्टफोन विकत घेत असल्याचे दिसून आले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/538", "date_download": "2019-03-25T08:52:48Z", "digest": "sha1:2ZDMHQIXPR7FKOTP5HLTVSBBVE72UUKJ", "length": 21113, "nlines": 242, "source_domain": "gangadharmute.com", "title": " हिमालय की गोद मे : पूर्वार्ध | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टा�� माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nहिमालय की गोद मे : पूर्वार्ध\nमुखपृष्ठ / हिमालय की गोद मे : पूर्वार्ध\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी सोम, 17/03/2014 - 10:56 ह्यावेळी प्रकाशित केले.\n\"face Black\" न झालेल्या सर्व \"facebook\" मित्रांना/मैत्रीनींना\n'Block' न झालेल्या सर्व \"Blogger\" मित्रांना/मैत्रीनींना\nभांगविरहित अजिबात \"ओल्या\" नसलेल्या कोरड्या ठणठणीत भयंकर रंगीबिरंगी हार्दिक शुभेच्छा.\nहिमालय की गोद मे : पूर्वार्ध\nदिनांक १६ जानेवारी ते २७ जानेवारी २०१४ या दरम्यान मी पूर्वभारताची भ्रमंती करून आलो. कोलकोता, गंगासागर, दार्जिलिंग, काठमांडू, अयोध्या, खजूराहो असा सुमारे ५७०० किलोमिटरचा प्रवास आणि तोही ११ दिवसात. या प्रवासातील वृत्तांताचे सविस्तर वर्णन लिहायचे असे ठरवले होते पण वेळेअभावी काही शक्य झाले नाही. त्यामुळे वाचकांसाठी आता केवळ चित्रवृत्तांत.\nकाकव्दीप – येथून गंगा सागरात विलीन व्हायला सुरुवात होते.\nगंगासागर – सारे तिरथ बार बार, गंगासागर एक बार\nगंगासागरच्या तीरावर असलेले कपीलमुनी मंदीर\nजानेवारी २०१२ मध्ये आम्ही नागपूर-कलकत्ता फ़्लाईटने गंगासागर, कोणार्क, जगन्नाथपुरीला गेलो होतो. तेव्हाचे एक विमानातील छायाचित्र. =^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o=\nजय महाकाली – काली कलकत्तेवाली\nकोलकात्याचा जगप्रसिद्ध हावडा ब्रीज\nदार्जिलिंग – जापानीज बौद्धमंदीर\nदार्जिलिंगच्या टायगरहील वरून दिसणारा सुर्योदय. सुर्याचे पहिले किरण कांचनजंगा शिखराच्या अग्रभागी पडायला सुरुवात होते आणि समोरील निसर्गरमनीय दृष्य फ़ारफ़ार मनोहारी असते.\nकांचनजंगा शिखर – माऊंट एवरेस्ट नंतरचे जगातील तीन नंबरचे सर्वोच्च शिखर\nआसमंत सोनेरी करून टाकत हळुवारपणे होणारा सुर्याचा उदय\nकाठमांडू – श्रीविष्णू मंदीर\nकाठमांडू - भगवान श्रीविष्णूची ५ मिटर उंचीची झोपलेली मुर्ती\nपशुपतीनाथ मंदीर – काठमांडू - बागमती नदीच्या तीरावरील पशुपतीनाथ मंदीर\nपशुपतीनाथ मंदीर – काठमांडू\nअयोध्या – जय श्रीराम\nअयोध्या – प्रमूरामचंद्राच्या मंदीर निर्माणाची अशी जय्यत तयारी सुरू आहे.\n“मंदीरासाठी जन्मभूमीस्थळी चार तासात आम्ही जागा मोकळी करून दाखवली त्याप्रमाणेच योग्यवेळ येताच संधी साधून फ़क्त २४ तासात राममंदीर उभे करून दाखवू” असे एक अयोध्येचा रामभक्त म्हणाला. तो बढाया मारत नव्हता. मंदीराला लागणारी सर्व शिला-सामुग्री तयार करण्याचे कार्य जोरासोरात सुरू आहे. एकदा सर्व सामुग्री तयार झाली की एकावर एक शिला रचणे तेवढे बाकी आहे. सिमेंट किंवा अॅडेजिव्ह पदार्थ न वापरताच केवळ शिला रचून मंदीर उभारायचे डिझायनिंग तयार आहे. संधी मिळताच दगडावर दगड रचत नेले की जन्मभूमीस्थळी भव्यदिव्य मंदीर तयार. (कदाचित अक्षरश: २४ तासात)\nबोलो प्रभूरामचंद्र की जय\nसर्वात महागडे अन्नधान्य म्हणजे धान/तांदुळ/भात.\nपण गरिबी भात उत्पादक शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाही.\nआणि तरीही भारतीय सुशिक्षित, सुजान जनमानसाला \"अन्नसुरक्षा\" हवी आहे व ती सुद्धा कमीतकमी मोबदल्यात. ऐताखाऊंना एका रुपयात पाच-दहा किलो धान्य मिळाले तर हवेच आहे.\nशेतकऱ्याच्या कमरेला धडुतं शिल्लक राहिलं काय, नाही राहिलं काय, पर्वा आहेच कुणाला धान्याचे भाव जरासे जरी वाढले तरी \"महागाई\" वाढली म्हणून बोंबलायला मोकळे धान्याचे भाव जरासे जरी वाढले तरी \"महागाई\" वाढली म्हणून बोंबलायला मोकळे\nदेशविदेशातील पर्यटकांना कायम भूरळ पाडणारे\nव शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - १\nशिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - २\nमध्य प्रदेश���तील छतरपुर ज़िल्ह्यात असलेले खजुराहो प्रख्यात पर्यटन स्थळ आहे.\nभारतात ताजमहल नंतर सर्वात जास्त पर्यटकांना आकृष्ट करणारे असे हे स्थळ आहे.\nशिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ३\nशिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ४\nशिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ५\nशिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ६\nएकदा दर्शन करून यावा.\nदोन धार्मिक समुदायामध्ये अयोध्येत वारंवार \"हाणामाऱ्या\" झाल्या आहेत. या हाणामाऱ्यांना देशभर \"दंगल\" असे संबोधण्यात येते. अयोध्येत मात्र याच हाणामाऱ्यांचा \"युद्ध\" असा उल्लेख केला जात असल्याचे मला ठळकपणे जाणवले.\nखूप सुरेख फोटो सर __/\\__\nबाकी तो धबधब्याजवळचा फारच भारी\nआम्ही दार्जिलिंगला पोचलो तेव्हा फारच कडाक्याची थंडी होती. पिण्याचे पाणी सुद्धा गरम करून प्यायला लागायचे.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-03-25T07:29:15Z", "digest": "sha1:UTZY4RM2PJADWS77LQWPK7YXXV6MURN3", "length": 16711, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा - विकिपीडिया", "raw_content": "\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\n१ विकिपीडिया ग्रंथालय परिषद २०१९ (भारत)\n२ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा\n३ एस. व्ही. जी. भाषांतर अभियान २०१९\n४ महिला दिन कार्यशाळा\n५ सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचा २०१९-२० चा कृती आराखडा\nविकिपीडिया ग्रंथालय परिषद २०१९ (भारत)[संपादन]\nविकिपीडिया व विकिस्रोत समृद्ध करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया ग्रंथालय प्रकल्पाचे महत्व खूप आहे. भारतीय भाषांपैकी हिंदी भाषेत या प्रकल्पाची शाखा विकसित होत आहे. सर्व भाषा समुदायांमध्ये याविषयी जागृती व्हावी यासाठी वरील परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. मेटावरील प्रकल्पपान पहा आणि जरुर अर्ज करा.दि.२७ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे.\n-सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२९, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा[संपादन]\nदरवर्षी १ ते १५ जान��वारी या कालावधीत महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. या निमित्ताने गेल्या वर्षीपासून मराठी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित केल्या जातात. राज्य मराठी विकास संस्था तसेच सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्था याच्या आयोजनात सहभागी असतात. याही वर्षी शासनातर्फे हे परिपत्रक काढून सर्व विभागांना अशा कार्यशाळा आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. आपण आपल्या ठिकाणी अशी कार्यशाळा आयोजित करू इच्छित असाल किंवा प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तयारी असल्यास अवश्य संपर्क साधावा. ईमेल व दूरध्वनी तपशील परिपत्रकात दिले आहेत. आपण येथेही प्रतिसाद नोंदवू शकता.\n--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२१, १७ डिसेंबर २०१८ (IST)\nएस. व्ही. जी. भाषांतर अभियान २०१९[संपादन]\nमराठीतून लेबल असलेली चित्रे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इंग्रजीत असलेली चित्रे लेखांत वापरण्यासाठी अशा आकृत्या व चित्रे यांचे भाषांतर करण्यासाठी एस. व्ही. जी. भाषांतर अभियान २०१९ २१ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे. या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कार्यशाळा योजण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही कार्यशाळा जळगाव येथे दि.१५ मार्च रोजी होणार आहे. अशीच कार्यशाळा पुणे येथे घेण्याचा विचार आहे. आपल्या सूचना द्याव्यात. इच्छुकांनी संपर्क साधावा ही विनंती.\nजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि. ९ मार्च २०१९ रोजी लेक लाडकी अभियान, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,सातारा व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे स.११ ते ५ या वेळेत मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा ही विनंती.\nसेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचा २०१९-२० चा कृती आराखडा[संपादन]\nवरील कृती आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरु आहे. तरी सर्वांना या दुव्यावरील अर्जात आपल्या सूचना नोंदविण्यासाठी आवाहन करीत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१९ रोजी १७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त ��टी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/this-politics-is-dangerous-for-the-state-ajit-pawar/", "date_download": "2019-03-25T08:06:19Z", "digest": "sha1:EP3QZ6D2IAFQGAO76QANJRDGPSDLRZ2R", "length": 5516, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हे राजकारण राज्यासाठी घातक : अजित पवार", "raw_content": "\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nकार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद\nभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी\nबारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला\nहे राजकारण राज्यासाठी घातक : अजित पवार\nपुणे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमधील कामशेतमध्ये झालेल्या सभेत खासदार नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. राणे यांनी आजपर्यंत विविध पक्षांमधून केलेल्या राजकीय प्रवासाच्या मुद्द्यावरून पवार यांनी टीका केली आहे. अश्या पद्धतीचे राजकारण हे घातक असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं.\nकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान नारायण राणे यांच्या संदर्भात जो प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचा धागा पकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणे आणि सेना – भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सेनेसोबत भाजपने युती केल्यास मी तुम्हाला सोडून जाईन असं राणे भाजपला सांगत आहेत.खासदारकी दिली तरी सुद्धा सोडून जाऊ असं ते म्हणत आहेत. नारायण राणे यांनी आजपर्यंत शिवसेना,कॉंग्रेस,भाजपा,स्वाभिमान पक्ष असा प्रवास केला तो त्यांचा अधिकार आहे मात्र हे जे राजकारण आहे ते राज्यासाठी घातक असल्याची टीका पवार यांनी केली.\nनाद करा की.. पण आमचा कुठं…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ\nपालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..\nमी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी\nनगरला बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस व्हॅनचा अपघात; ११ पोलीस जखमी\nअजितदादा कशाला हसं करून घेताय… \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/urmila-matondkar-sonali-kulkarni-together-in-madhuri/", "date_download": "2019-03-25T07:54:24Z", "digest": "sha1:DZPK5HI3DJEZCW7C3W22XYCUAPR23FXN", "length": 9794, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "उर्मिला मातोंडकर आणि सोनाली कुलकर्णी प्रथमच एकत्र.\"माधुरी\" सिनेमाचा फर्स्ट लूक.", "raw_content": "\nउर्मिला मातोंडकर आणि सोनाली कुलकर्णी प्रथमच एकत्र.”माधुरी” सिनेमाचा फर्स्ट लूक.\nफॅन्सच्या लाईक्स मिळतायंत सोनालीचे कुलकर्णीचे”हे”फोटोज.\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nफॅन्स पसंत करतायत”ह्या”चौघांची जोडी.पहा व्हीडिओ.\nउर्मिला मातोंडकर आणि सोनाली कुलकर्णी प्रथमच एकत्र.”माधुरी” सिनेमाचा फर्स्ट लूक.\nमराठी सिनेमाचे नेहमीच बॉलिवूड किंवा इतर प्रादेशिक मनोरंजन उद्योगांकडून नेहमीच कौतुक होत आलेले आहे. मराठी कलाकारांचा तगडा अभिनय, आणि त्यासाठी लागणाऱ्या संपन्न अश्या कथा हेच कदाचित ह्या यशामागील गमक असावं. बॉलिवूडकरांनाही हल्ली मराठी सिनेमाचं वेड लागलेलं दिसतंय. सलमान खान, जॉन अब्राहम, अजय देवगण, माधुरी दीक्षित अशा एक ना अनेक दिग्गज ताऱ्यांनी या ना त्या प्रकारे मराठीत काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता यात आणखी मोठी भर पडणार आहे ते आगामी सिनेमा “माधुरी” च्या निमित्ताने. सुरुवातीस आलेल्या बातमीनुसार ह्यात केवळ बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची भूमिका आहे असं माहिती होतं, पण तिच्या साथीला सिनेमात अष्टपैलू अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचीही भूमिका आहे.\nउर्मिला मातोंडकर आपल्याला टायटल रोल मध्ये दिसेल असं सुरुवातीस सर्वाना वाटलं होतं, पण सिनेमात सोनाली कुलकर्णी आपल्याला टायटल रोल मध्ये दिसणार आहे. एक सुंदर संदेश असणारा सिनेमा असून निःसंशयपणे, या सिनेमामुळे उर्मिला आणि मराठी प्रेक्षकांमधील प्रेमळ संबंध बळकट होतील. सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच लॉन्च करण्यात आला असून “माधुरी”च्या निमित्ताने लवकरच रसिकांना उर्मिला मातोंडकर आणि सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाची मेजवानी एकत्र मिळणार आहे. ३० नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\nफॅन्सच्या लाईक्स मिळतायंत सोनालीचे कुलकर्णीचे”हे”फोटोज.\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रे��ात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nफॅन्स पसंत करतायत”ह्या”चौघांची जोडी.पहा व्हीडिओ.\nमुक्ता बर्वे झळकतेय डॅशिंग लूक मध्ये.पहा ‘बंदिशाळा’सिनेमाचा मोशन पोस्टर.\n‘बंदिशाळा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर व्हिडीओ नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वेने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे....\nयुथफूल “आम्ही बेफिकर”२९ मार्चला प्रदर्शित होणार.\nखूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर...\nयेत्या व्हॅलेंटाईनला वैभव आणि प्रार्थनाच्या “रेडीमिक्स”ची धुम.ट्रेलरला मिळतेय लोकांची पसंती.\nफेब्रुवारी म्हणजे प्रेमवीरांसाठीचा खास महिना. या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे तरुणाईमध्ये एक वेगळाच सळसळता उत्साह पाहायला...\nपारधी समाजाचे वास्तव मांडणारा”पारधाड”.आगामी सिनेमा.\nनुकताच पारधी समाजातील लोकांच्या लक्षणीय उपस्थितीत ‘पारधाड’ या सिनेमाचा पोस्टर आणि ट्रेलर लाँच सोहळा पुण्यात पार...\nदुनियादारी नंतर २०१९ च्या व्हॅलेंटाईन वीकला रसिकांना मिळणार “हे” मल्टीस्टारर सरप्राईझ\nसंजय जाधव दिग्दर्शित तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा, दुनियादारी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर...\nअभिनेता के.के.मेननच्या अभिनयाची जुगलबंदी मराठीत. ‘एक सांगायचंय’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च.\nअभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केलं पोस्टर.”एक राधा एक मीरा” आगामी सिनेमा.\nपूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\n“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3001", "date_download": "2019-03-25T08:35:41Z", "digest": "sha1:SJTJZXWMHW34VQSHGZG3AIYXUO2DDFMJ", "length": 27748, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर\nमाणसाचे आयुष्य अनिश्चिततेने भरलेले असते. मी संशोधनाच्या क्षेत्रात काही करू श���ेन असे माझ्या दोन-तीन कुंडल्या बनवणाऱ्यांनाही सांगता आले नसते. मी शिपाई म्हणून ‘साने गुरुजी शिक्षण मंडळा’च्या बारागाव पिंप्री (तालुका सिन्नर) येथील माध्यमिक शाळेत नोकरीला 1984 मध्ये लागलो, तेव्हा मी बार बार बारावी नापास झालेला होतो मी पुढे शिक्षणाची आणि सेवेची एकेक पायरी चढत गेलो. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रकिया आहे यावर माझा विश्वास ना मी पुढे शिक्षणाची आणि सेवेची एकेक पायरी चढत गेलो. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रकिया आहे यावर माझा विश्वास ना ‘साधने’चे संपादक यदुनाथ थत्ते यांनी ‘नवनिर्माणकारी बेचैनी’ असा एक सिद्धांत मांडला आहे. माझे शिक्षण-वाचन-लेखन बेचैनीतूनच होत गेले आणि मी झाडू ते खडू असा प्रवास सुरू केला, तो पुढे संशोधनापर्यंत पोचला\nपीएच.डी.ची पदवी मिळवली म्हणजे संशोधन झाले असे होत नाही. संशोधनासाठी रूची असणाऱ्या विषयाची निवड केली, तर संशोधनकार्य पूर्ण होताना समाधानही मिळते.\nमी मराठी विषयात एमए होऊन ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या ‘बिटको महाविद्यालया’त कादंबरीकार वि.वा. हडप पारितोषिकाचा मानकरी ठरलो होतो. मी शिक्षणाचा एकेक गड सर करत माध्यमिक शिक्षक म्हणून स्थिरावलो होतो. मी शिक्षकांच्या पतसंस्थेत संचालक म्हणून काम करत असतानाच ‘रयत शिक्षण संस्थे’च्या दहिवडी कॉलेज येथे अधिव्याख्याता म्हणून माझी निवड झाली. एनडीएसटी (Nashik District Secondary Teachers Society) सोसायटीच्या गुणवंत शिक्षक निवडीच्या कमिटीवर दिलीप धोंडगे हे सदस्य होते. धोंडगेसर हे माझे मित्र. माझा ‘मरणगाथा’ कवितासंग्रह 1985 मध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा एकनाथ पगार, धोंडगे हे दोघे पाठीवर थाप देण्यासाठी सिन्नरला आले होते. त्यांच्या बरोबरच्या भेटीत गप्पा होत. काय वाचले काय लिहिले हे गप्पांचे सूत्र असे.\nएकदा, धोंडगे व मी, आम्ही दोघे वर्टी कॉलनीतील एका झाडाखाली उभे होतो. त्यावेळी गप्पांत पीएचडीचा विषय निघाला. ते म्हणाले, काम कशावर करणार माझ्या डोक्यात मराठी तमाशातील सोंगाडया हा विषय होता. कारण आमच्या घरातच तमाशा आणि सोंगाडया होता. ‘तमासगिराचे प्वॉर’ ही माझी पहिली ओळख. दुसरा विषय पत्रकारिता हे सूत्र घेऊन काही करावे असा होता. सेवा दलात जात असल्याने सामाजिक चळवळी माहीत होत्या आणि बडोद्यात राहून मराठी वृत्तपत्र चालवणारे ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर यांच्याविषयी ऐकून होतो. भगवंतरावांचे नातू सुभाष पाळेकर यांच्याशी परिचयदेखील झालेला होता. पाळेकरांचा परिचय संदर्भ-साधने मिळण्यासाठी उपयोगी ठरणार होता.\nदिलीप धोंडगे यांनी तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीच्या पत्रकारितेवर पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिटयूट’मध्ये शोधनिबंध सादर केला होता. त्यांना ‘जागृति’कार पाळेकरांवर काम होऊ शकेल असे वाटले. त्यांनीच सदानंद मोरे यांनी संपादित केलेल्या पाळेकरांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला. ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर हे मूळ कळवण तालुक्यातील पाळ्याचे. पाळेकरांच्या वृक्षाची एक फांदी बडोद्याला गेली, तर दुसरी भालूरला स्थलांतरित झाली.\nविषय तर नक्की झाला. धोंडगे नुकतेच पीएचडीचे गाईड झाले असल्याने मार्गदर्शकाचा शोधही संपला आणि मी प्रवेशप्रकियेतून पुढे गेलो. ललित लेखन, वृत्तलेखन, स्तंभलेखन आणि संशोधन हे वेगवेगळे असते याची जाणीव त्या काळात झाली. पुण्यात जाऊन मराठी वृत्तपत्रांचा इतिहास (रा.के.लेले), ‘‘जागृति’कार पाळेकर\" (संपादक सदानंद मोरे ), ‘दिनकरराव जवळकर समग्र वाड़मय’ ( य. दि. फडके ) अशी पुस्तके जमवण्यास सुरुवात केली. धोंडगे प्रत्येक भेटीत नवनवीन संदर्भसाधनांविषयी बोलत आणि मी त्यामागे लागत असे. एकदा कवी विलास शेळके, अमोल बागूल व मी, असे आम्ही तिघे निळू फुले यांना भेटण्यासाठी गेलो. निळू फुले यांचा चळवळींचा अभ्यास असल्याने ते सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळींविषयी भरभरून बोलले आणि पुढील पंधरा दिवसांत निळूभाऊंकडून ‘जागृति’कार पाळेकर आणि केशवराव विचारे यांची पुस्तके कुरियरने हजर झाली आश्चर्य म्हणजे त्यात पुस्तके पाठवण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरीचे पत्र होते. मला निळू फुले यांच्यामुळे पाळेकर बडोद्याला जाऊन पाळेकर झाले, पण ते मूळ पाळ्याचे आहेत हा शोध लागला.\nसंशोधन ग्रंथालयात, महाविद्यालयात बसून करायचे काम नाही. त्यासाठी संदर्भ साधनांचा शोध आणि अभ्यासविषयाशी संबंधित माणसांशी संवाद महत्त्वाचा असतो.\nमी अहमदनगरच्या ‘राधाबाई काळे महिला महाविद्यालया’तून फेलोशिप घेऊन तेव्हाच्या पुणे विद्यापीठात दाखल झालो. सहा नंबर होस्टेलमधील रूम नं 11 हे माझे दोन वर्षें अभ्यासाचे स्थान. मराठी विभागात राजन गवस होते. होस्टेलमध्ये नारायण भोसले यांच्यासारखे अभ्यासक होते. राजन गवस यांनी गंभीरपणे विषयाची व प्रबंधलेखनाची अंगोपांगे सांगितली. ��ी ‘लोकमान्य ते महात्मा’ हे स्तंभलेखन अधूनमधून वाचले होते. सदानंद मोरे यांचे ते लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्याची प्रसिद्धीपूर्व नोंदणी करून ते मिळवले. मोरे यांच्याशी चर्चा संशोधनाला दिशा देणारी ठरली. सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर या चळवळींचे मूळ दस्तऐवज हे बाबा आढाव यांच्या ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ने जतन केले आहेत. बाबांनी पाळेकरांचे समग्र वाङ्मय जतन, संवर्धन, संपादनाचे कामही केले आहे. तेथे अनेक दुर्मीळ कागदपत्रे पाहण्यास मिळाली. संदर्भ साधनांची माहिती ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या ग्रंथालयात बसून घेतली. संशोधकाला संदर्भाविषयी खूप काळजी घ्यावी लागते. तेथे एका संशोधकाने पाळेकर यांना एका ग्रंथाच्या लेखनाचे श्रेय दिल्याचे पाहिले, पण तो ग्रंथ पाळेकर यांचा नसल्याचे छाननीत लक्षात आले.\nधोंडगे म्हणाले, की बडोद्याला चक्कर मारून या. बडोदा गाठले. सुभाष पाळेकर यांनी साधने उपलब्ध करून दिली. सयाजीराव विद्यापीठात पाळेकर यांच्याविषयी अनास्था दिसून आली. पाळेकर यांच्या संदर्भात य.दि. फडके यांच्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ या खंडात्मक लेखनात विपुल संदर्भांची नोंद आढळली. पुण्यात संदर्भ साधनांची दोन वर्षांत विपुल सामग्री जमा झाली, वाचनही झाले, पण प्रबंधलेखन काही झाले नाही. पुन्हा नगरला कॉलेजमध्ये नोकरीवर जॉईन झालो. तेथे मराठीतील ज्येष्ठ संशोधक र.बा. मंचरकर होते. त्यांनी प्रबंधलेखनासाठी काही तंत्र आणि मंत्र सांगितले. महाविद्यालयात स्थिरस्थावर होता होता वर्ष सरले. मला मे महिन्याची सुटी प्रबंधलेखनासाठी उपयुक्त ठरली. रात्रीचा दिवस करणे ही लोकोक्ती खरी ठरली. बोऱ्हाडे रात्री लिहिण्यास बसत- कधी कधी पहाटेपर्यंत लेखन सुरू असे. दिवसा झोप. दीड महिन्यांत प्रबंधलेखनाचा आनंद अनुभवला आणि सुटी संपल्यानंतर कॉलेज पुन्हा जॉईन केले. बदलीची ऑर्डर हातात पहिल्याच दिवशी मिळाली. श्रीगोंदा-नगर परतीचा प्रवास. दीड महिन्यांत पनवेल कॉलेजला पुन्हा बदली. ‘रयत शिक्षण संस्थे’त महाराष्ट्र दर्शनाची संधी मिळाली, पण प्रबंधलेखनात अडथळा आला.\nदरम्यान, महाविद्यालयीन प्राध्यापकांचा संप सुरू झाला. मी थेट नाशिक गाठले आणि रात्रीचा दिवस पुन्हा सुरू केला. संप ही मला पर्वणी ठरली. प्रबंधाचा खर्डा पूर्ण झाला. संपाचाही कंटाळा आला. आठ दिवस नाशकात काही उलाढाली करत फिरलो आणि संप यशस्वी झाल्याचे संकेत मिळताच कॉलेज जॉईन केले. प्रबंधलेखन हा तांत्रिक भाग असतो. संदर्भसूची, विषयसूची, व्यक्तिनामसूची, मुद्रितशोधन हे तांत्रिक काम. त्याला मदत नसेल तर ते कंटाळवाणे ठरते. त्यावेळी रवींद्र मालुंजकर मदतीला धावून आला. मी पनवेल ते नाशिक असा परतीचा प्रवास दोन महिने रोज केला. तांत्रिक भाग संपवून धोंडगे यांना प्रंबध वाचण्यास दिला. धोंडगे यांच्यासारख्या समीक्षकापासून काही मंडळी दूर राहते. त्यांचा लौकिक झटपट पीएच डी असा नाही. त्यांनी ते बहुप्रसवा मार्गदर्शकांच्या पंगतीतील नसल्याने निवडक विद्यार्थी घेतले. मी धोंडगे यांच्याकडे संशोधन करतो असे म्हटल्यावर ‘अरेरे अरेरे’चे सुरही कानावर येत. पण तो काळ माझ्यासाठी संपन्नतेचा होता. सरांनी वाचन-लेखनाची शिस्त लावली. अभ्यासाची दिशा दाखवली आणि उत्तम काम व्हावे याची काळजी घेतली. नाशिक ते सटाणा हा परतीचा प्रवास म्हणजे नवे काही शिकल्याचा असायचा. सरांनी प्रबंध वाचला आणि एक अक्षरही न बदलता विद्यापीठाला सादर करण्यास सांगितले\nमला सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ, चळवळीची साधने, पत्रकारिता, वृत्तपत्रांचा इतिहास- त्यातील पाळेकर यांनी बडोद्यात राहून 1917ते 1948 या काळात चालवलेले ‘जागृति’ नावाचे मराठी पत्र, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात असलेली पाळेकर यांची भूमिका, परिवर्तनवादी चळवळीतील ताणेबाणे, ब्राह्मणेतर पत्रकारांची दृष्टी आणि सृष्टी या गोष्टी समजावून घेता आल्या आणि वाङ्मय इतिहासातील उणिवाही लक्षात आल्या. मला आपल्याकडील इतिहास लेखनाने गौरवीकरणाला महत्त्व दिले, पण वंचितांचा इतिहास लिहिला नाही हे तथ्य समजले. सकाळचे वृत्तपत्र सायंकाळी शिळे होते का पाळेकर म्हणतात, “वृत्तपत्रातील बरेचसे लेखन तात्पुरत्या स्वरूपाचे असते, यात संशय नाही. तसे असणे अपरिहार्य आहे. तथापि विचार जागृत करण्यात आणि भाषेला वळण लावण्यात वृत्तपत्रे महत्त्वाची कामगिरी बजावतात. नियतकालिकांतील निवडक लेख गोळा करून प्रसिद्ध केले तर वाङ्मयात खरोखर भर पडेल. असे लेखसंग्रह अनेक गचाळ पुस्तकांपेक्षा नि:संशय संग्राह्य होतील.” (6 जानेवारी 1945) मी वृत्तपत्रीय लेखनाकडे पाळेकर यांच्यामुळेच नीरक्षीर विवेकाने पाहू शकतो. विद्यापीठीय विद्वानांच्या शोधनिबंधांपेक्षा मला वृत्तपत्���ातील लेखन अधिक जवळचे वाटते आणि मी लिहितो.\nशंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात.\nनामवंत लेखकांना अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाची निवडणूक, बडोदा\nत्रिकोणातील वादळ पेलताना - बाईच्या जगण्याची चित्तरकथा\nसंदर्भ: कादंबरी, लतिका चौधरी\nसाहित्य संमेलनांचे अध्यक्ष - नाण्याची दुसरी बाजू\nसंदर्भ: साहित्य संमेलनाची निवडणूक, साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख\nबहुजन सांस्कृतिकवादाकडे – जयंत पवार\nसाहित्य संमेलनाच्या अलिकडे - पलिकडे\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख, बडोदा\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्नर तालुका\nसंदर्भ: नवरात्र, देवी, सिन्नर तालुका, वडांगळी गाव, Nasik, sinnar tehsil, Wadangali Village\nटिप्परघाई - वडांगळी गावचा शिमगा\nवावीचे वारकरी संत – रामगिरी महाराज\nलेखक: पुनम कैलास गोसावी\nसंदर्भ: सिन्नर तालुका, वावी गाव, वारकरी, Nasik, sinnar tehsil, Warkari, महाराष्ट्रातील संत\nप्रविण वामने यांचा ग्रामोद्धाराचा वसा\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: ग्रामविकास, सिन्नर तालुका, डुबेरे गाव, स्मशानभूमी, sinnar tehsil, Dubere\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/02/marathi-lekh-prem-mi-marathi-majhi-marathi.html", "date_download": "2019-03-25T07:42:44Z", "digest": "sha1:ECWODXF33UYZQSBTB5Y2WNSE33PE2F5T", "length": 12091, "nlines": 169, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तुला माझ्याबद्दल काय वाटतं??? ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतुला माझ्याबद्दल काय वाटतं\nलग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...\n\"तुला माझ्याबद्दल काय वाटतं \nतो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... \nप्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...\nपण मग लग्न झालं ...\nसंसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...\nआणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...\nत्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..\nसमोर तापलेला तवा ...\nत्यानं संभाव्य धोका ओळखला ..\nआणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..\nसंध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'\nअसं म्हणून तो कामावर सटकला ... \nतो घरातून बाहेर पडला खरा ...\nपण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. \nअख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...\nकठीण असतं हो ...\nनात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..\nतो विचार करत होता ..\nमी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...\nनको .. फार फिल्मी वाटतं ..\nतू खूप छान आहेस ...\nअसं म्हणावं ... नको ...\nतिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..\nसमजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...\nतर ती नक्की म्हणेल ...\nराजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...\nत्याला काहीच सुचेना ...\nबायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...\nलाईन लागेल नवऱ्यांची ...\nत्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..\nघरी जायची वेळ झाली ..\nआपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...\nयाची त्याला खात्री होती ...\nघरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...\nत्यानं बेल वाजवली ..\nअपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..\nत्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...\nमुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... \"भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ...\"\nतो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...\nबायकोनं भज्यांची प्लेट समोर मा���डली ...\nत्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...\nतिनं तोंडभर हसून विचारलं .. \"काही सुचलं ... \nत्यानं नकारार्थी मान हलवली ...\nतशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... \"मलाही नाही सुचलं ... \nतो पुन्हा गोंधळला ...\nइतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... \nआणि ती बोलतच होती ...\n\"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...\nतुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... \nसात दिवस विचार केला ..\nपण मला काही सांगताच येईना ...\nमग भीति वाटली ...\nमाझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. \nअपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...\nमला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.\nम्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...\nवाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..\nपण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...\nम्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...\nजिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...\nआता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...\nकारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... \"\nअसं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...\nत्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता \nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://gangadharmute.com/node/261", "date_download": "2019-03-25T08:44:53Z", "digest": "sha1:WSXIJTW5CMTBPI7AF4JH6E2VXNALZYFM", "length": 40993, "nlines": 150, "source_domain": "gangadharmute.com", "title": " सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आं���ोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध\nमुखपृष्ठ / सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 14/09/2011 - 08:01 ह्यावेळी प्रकाशित केले.\n(वांगे अमर रहे पुस्तकात प्रकाशित)\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध\nसमाजाची जसजशी पुढे वाटचाल होत जाते तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरायला लागतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे, नातवाला आजोबाचे विचार सनातन वाटायला लागणे किंवा सासू आणि सुनेच्या विचारात जनरेशन गॅप दिसायला लागणे, हा सामूहिक मानसिकतेतील बदल याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेला असतो. काळानुरूप भ्रष्टाचाराच्या व्याख्याच बदलत गेल्य��ने कालच्या भ्रष्टाचाराची जागा आज शिष्टाचाराने घेतली असते. मात्र भ्रष्टाचार पूर्वापार काळापासून चालत आला असला तरी आजच्या एवढी अत्युच्च पातळी कधीच गाठलेली नव्हती, असे मात्र नक्कीच म्हणता येईल. भ्रष्टाचाराचे मुख्य कारण सरकारच्या चुकीच्या धोरणातच दडलेले असल्याने, राज्यकर्ते हेच मुख्यत: भ्रष्टाचारात डुबलेले असल्यानेच भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाल्याचे अघोषित स्वरूप प्राप्त झाले आहे. भ्रष्टाचार एका निहीत मर्यादेपर्यंत खपवून घेतला जाऊ शकतो पण आज शासकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराने मर्यादेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आवर घालणे ही काळाची गरज झाली आहे. नाकाला सुसह्य असणारा मोती दागिना ठरत असला तरी तोच मोती जर नाकापेक्षा जड व्हायला लागला तर ते असह्य व हानिकारक ठरत असते मग त्याला काढून फेकण्याशिवाय गत्यंतर उरत नसते. भ्रष्टाचाराने नैतिकता आणि सभ्यतेच्या पार व्याख्याच बदलून टाकल्या आहेत. धर्म-पंथाच्या शिकवणी व मूल्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत इतिहासजमा झालेली आहेत. धर्मपंथांवर किंवा पापपुण्यावर श्रद्धा बाळगणारे भ्रष्टाचारापासून दूर आहेत, असे काही आज चित्र राहिलेले नाही.\nभ्रष्टाचारामुळे वैतागलेल्या जनतेला आता दाहक चटके बसू लागल्याने त्याविरोधात प्रचंड जनमानस तयार व्हायला लागले आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी त्यांच्यात एकमत असले तरी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात मात्र मतभिन्नता आढळते. भ्रष्टाचार संपला पाहिजे असे ज्यांना वाटते, त्यांच्यात भ्रष्टाचार संपविण्याविषयीचे प्रामुख्याने दोन मतप्रवाह आढळतात.\nकठोर जनलोकपाल : टीम अण्णा आणि त्यांच्या समर्थकांना कठोर जनलोकपाल विधेयक आणले की, भ्रष्टाचाराला आळा बसेल असे वाटते. याव्यतिरिक्त इतर काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा तर्हेच्या भूमिकेचे अजून तरी त्यांनी सूतोवाच केलेले नाही किंवा यासंदर्भात त्यांना शास्त्रीय किंवा अधिक तार्किक विचार करण्याची फारशी गरज भासत आहे, असेही दिसत नाही.\nनैतिकतेची पातळी उंचावणे : लोकपाल वगैरे आणल्याने भ्रष्टाचार संपणार नाही कारण भ्रष्टाचाराची सुरुवात नैतिकतेची पातळी खालावल्याने झाली असे ज्यांना वाटते त्यांची लोकपालाने काहीही साध्य होणार नाही, अशी धारणा आहे. त्यासाठी जनजागरण करून जनतेत उच्च कोटीची नैतिकता रुजविली पाहिजे असे त्यांना वाटते.\nमला मात्र तसे वाटत नाही. कठोर जनलोकपाल आणल्याने किंवा नैतिकतेची पातळी उंचावल्याने अंशतः भ्रष्टाचाराला आळा बसेल परंतू आर्थिक भ्रष्टाचार पूर्णतः नियंत्रणात येऊच शकणार नाही. कारण मागील लेखात म्हटल्याप्रमाणे मनुष्यस्वभावातच विविधता भरली आहे. आर्थिक भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने विचार केल्यास मनुष्यस्वभावाचे ढोबळमानाने चार प्रकारात वर्गीकरण करता येईल.\nअ) काही व्यक्ती निष्कलंक चारित्र्याच्या असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो.\nब) काही व्यक्ती समाजाला व कायद्याला भीत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात.\nक) काही व्यक्तींच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणार्या असतात.\nड) मात्र व्यक्तींचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. नानाविध कॢप्त्या लढवीत असतो, कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा सतत प्रयत्न करत असतो.\nअ आणि ब वर्गप्रकारातील व्यक्ती स्वमर्जीनेच वाम मार्गाने जाण्याचे टाळतात. त्यांचा स्वतःचा स्वतःवर ताबा असतो. त्यांना ऐहिक किंवा भौतिक सुखापेक्षा आत्मसुख महत्त्वाचे वाटते. अशा व्यक्ती भ्रष्टाचाराशी दूरान्वयानेही आपला संबंध येऊ देत नाही. पण ह्या व्यक्ती राजकारणात किंवा प्रशासनात जायचे टाळतात. उच्च आदर्श घेऊन राजकारणात गेल्याच तर आजच्या काळात हमखास अयशस्वी होऊन अडगळीत फेकल्या जातात. उच्च आदर्श घेऊन प्रशासनात वावरताना अशा व्यक्तींची पुरेपूर दमछाक होते. प्रशासनात एकलकोंडी किंवा निरर्थक भूमिका वाट्याला येते. इतरांप्रमाणेच भ्रष्टाचारात सामील होता येत नसल्याने वारंवार प्रशासकीय बदल्यांना सामोरे जावे लागते. या व्यक्ती स्वतःहूनच भ्रष्टाचार करीत नसल्याने यांना कायदा किंवा नैतिकता शिकविण्याची गरजही उरत नाही.\nब वर्गप्रकारातील व्यक्तींना नैतिकतेचे धडे देऊन किंवा कायद्याचा धाक दाखवून भ्रष्टारापासून रोखले जाऊ शकते. मग नैतिकता कोणी कुणाला शिकवायची याचा विचार करणे आवश्यक ठरते. ज्ञानदेव, तुकारामांचा काळ संपल्यानंतर गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यासारखे थोडेफार अपवाद वगळले तर नैतिकतेची शिकवण देणार्या \"लोकशिक्षकांची\" पिढीच लयास गेली आहे. शाळा-महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नैतिकतेची शिकवण हा उद्देशच निकाली काढण्यात आला आहे. शासकीय किंवा निमशासकीय शिक्षण संस्थेला लाच दिल्याशिवाय शिक्षकाची किंवा प्राध्यापकाची नोकरीच मिळत नसेल तर मग अशा परिस्थितीत आजच्या युगातील गुरू किंवा गुरुकुलाच्या स्थानी निर्माण झालेल्या शिक्षणसंस्था कोणत्या तोंडाने विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणार, याचाही विचार झाला पाहिजे. अशा नीतिमत्ता गमविलेल्या शिक्षणव्यवस्थेत शिकून बाहेर पडणारा ब प्रकारातील मनुष्यस्वभाव असलेला विद्यार्थी प्रशासनात गेला किंवा राजकारणात गेला तर तेथे भ्रष्टाचारापासून अलिप्त राहील अशी कल्पनाच करणे मूर्खपणाचे ठरते. पण ब प्रकारच्या व्यक्ती कायद्याला घाबरणार्या असल्याने कठोर कायद्याने आणि त्याच्या अंमलबजावणीने वठणीवर येऊ शकतात. त्यांच्या साठी कठोर जनलोकपालासारखा कायदा रामबाण इलाज ठरू शकतो.\nड प्रकारातील व्यक्ती मात्र नैतिकता आणि कायदा दोहोंनाही घाबरत नाही. नैतिकता बासनात गुंडाळून कायद्याला हवे तसे वाकविण्यात ही मंडळी तरबेज असतात. आज भ्रष्टाचाराने जे उग्र रूप धारण केले आहे त्याचे खरेखुरे कारण येथेच दडले आहे.\nउच्च शिक्षण घेणे आणि प्रशासनात नोकरी मिळविणे, या दोन्ही प्रकारामध्ये पाय रोवण्याचा आधारच जर गुणवत्तेपेक्षा आर्थिकप्रबळतेवर आधारलेला असेल तर तेथे नैतिकतेची भाषा केवळ दिखावाच ठरत असते, हे मान्य केलेच पाहिजे.\nप्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता\nआज राजकारण देखील अत्यंत महागडे झाले आहे. तुरळक अपवाद वगळले तर खासदारकीची निवडणूक लढायला कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. खर्च करण्याच्या बाबतीत एकएक उमेदवार आठ-नऊ-दहा अंकीसंख्या पार करतो, हे आता लपून राहिलेले नाही. ज्याला राजकारणात जायचे असेल त्याला प्रथम बर्यापैकी माया जमविल्याखेरीज राजकारणात जाण्याचे स्वप्नही पाहता येत नाही. राजकारणात जाणे दूर; केवळ स्वप्न पाहायचे असेल तरी माया जमविण्यासाठी भ्रष्टाचार करणे अपरिहार्य आणि अनिवार्य झाले आहे.\nलोकशाहीच्या मार्गाने देशातील सर्वच नागरिकांना निवडणुका लढण्याचे अधिकार आहेत, हे वाक्य उच्चारायला सोपे आहे. पण निवडणूक लढवायची झाल्यास भारतातील नव्वद टक्के जनतेकडे कोट्यवधी रुपये आहेत कुठे राजकारण आणि सत्ताकारणावर कायमची मजबूत पकड ठेवण्यासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रस्थापित व्यवस्थेकडे एवढे प्रचंड आर्थिक पाठबळ तयार झाले आहे की, आता देशातील नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त जनतेचे राजकारणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत.\nम्हणून भ्रष्टाचार नियंत्रण किंवा भ्रष्टाचारमुक्तीचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शासन आणि प्रशासनावर घट्ट पकड ठेवून असलेले सर्व प्रस्थापित हे \"ड\" या वर्गप्रकारातीलच आहे. यांना नैतिकतेचे धडे शिकवणे जसे उपयोगाचे नाही तसे कठोर कायदे करूनही फारसा उपयोग नाही, कारण कायदे बनविणारेही तेच, कायदे राबविणारेही तेच आणि सोयीनुसार कायद्याला हवे तसे वाकविणारेही तेच; असा एकंदरीत मामला आहे.\nनेता तस्कर, गुंडा अफ़सर\nसर्व बाजूंनी विचार करता एक मुद्दा सहज उलगडत जातो की, केवळ नैतिकतेची शिकवण देऊन किंवा कठोर कायदे केल्याने भ्रष्टाचार आटोक्यात येण्याची शक्यता नाही. नैतिकता आणि कायदे यांनाही काही मर्यादा आहेत, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात म. गांधींचा स्वदेशी-गांधीवाद बासनात गुंडाळून नेहरूनितीचे या देशाच्या शासकीय व्यवस्थेवर रोपण करण्यात आले. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणाला चालना देण्यात आली. लायसन्स-कोटा-परमिटचे राज्य प्रस्थापित करण्यात आले. देशातल्या ९०-९५ टक्के लोकांना अजिबात अक्कल नाही, असे गृहीत धरून या ९०-९५ टक्के सामान्य जनतेवर पुढारी आणि सरकारी नोकरांचे पावलोपावली नियंत्रण लादण्यात आले. त्यातूनच देशाला विकासाकडे नेण्याची आणि देशाचा गाढा सक्षमपणे चालविण्याची पात्रतेसहित अक्कल केवळ पुढारी व नोकरशहा यांनाच आहे; उर्वरित ९०-९५ टक्के आम जनता म्हणजे केवळ निर्बुद्ध, देशबुडवी, तंटेखोर, करबुडवी आहे, अशा तर्हेचे विचित्र जनमानस या देशात तयार झाले. पुढारी किंवा नोकरशाही यांची रीतसर परवानगी मिळविल्याशिवाय ९०-९५ टक्के आम जनतेला काहीही करता येत नाही, असे चित्र तयार झाले. आम जनता दुर्बल आणि मूठभर राज्यकर्ते-नोकरशाही प्रचंड शक्तिशाली असे समीकरण निर्माण झाले. स्वातंत्र्योत्तर काळात सारे अधिकार नोकरशाहीच्या अखत्यारीत गेलेले आहेत. काहीही करण्यासाठी पु���े पाऊल टाकायचे म्हटले तर पावलोपावली नोकरशाही आडवी येते. शेती करायची असो की व्यापार, उद्योग करायचा असो की स्वयंरोजगार, ही नोकरशाही जागोजाग अडवणुकीसाठी ठाण मांडून बसलेली आढळते. अगदी स्वतःचे मकान स्वतःचे जागेवर बांधायचे ठरवले तरी कागदोपत्रांच्या जंजाळाला तोंड द्यावे लागते. ही नोकरशाही कधीच कोणाला कसलीच मदत करीत नाही. उलट आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करण्याऐवजी पॅकेजवर डल्ला मारून जाते. वाहन कसे चालवायचे याचे शिक्षण देत नाही मात्र लायसंस देण्यासाठी उकळता येईल तेवढा निधी उकळते. नोकरशाहीचा प्रत्येक विभाग याच तर्हेने चालतो. आमदार-खासदार-मंत्री दर पाच वर्षाने बदलत राहतात. त्यांच्या मालमत्तेचे आकारमान व घनता दोन्ही बदलत जाते पण आम जनतेचे नशीब काही केल्या बदलत नाही. सरकारे बदलतात पण सरकारी धेय्यधोरणे आहे तीच कायम राहतात. सत्ताधारी बदलतात पण सत्ता बदलत नाही म्हणून आमजनतेचे प्रश्नही निकाली निघत नाही. सत्तेकडे जाणारी पावले जनसेवा करण्याच्या उद्देशाने नव्हे तर सत्तेत असलेल्या मलिद्यांच्या आकर्षणाने सत्तेकडे आकर्षित होतात, हे मूलभूत तत्त्व मान्य केल्याखेरीज आणि त्या अनुरूप उपाययोजना केल्याखेरीज भ्रष्टाचाराचा प्रश्न निकाली निघणे केवळ अशक्य आहे.\nलायसन्स-कोटा-परमिटच्या अतिरेकामुळे राजकारणी आणि प्रशासकीय मंडळींना चरण्यासाठी मोठे कुरण उपलब्ध झाले आहे. टप्प्याटप्प्यावर निर्माण झालेल्या शासकीय चारा केंद्रांवर अंकुश लावण्यासाठी जोपर्यंत धोरणात्मक पावले उचलण्यात येत नाही तोपर्यंत भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. अण्णा हजारेंचे भ्रष्टाचाराविरोधातील आणि जनलोकपाल विधेयकाच्या समर्थनार्थ सुरू असलेले आंदोलन या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे एवढेच म्हणता येईल. टीम अण्णाला जनलोकपाल विधेयकाच्या मसुद्याखेरीज करावयाच्या अन्य उपाययोजनांबद्दल अजूनही नीटशी मांडणी करता आलेली नाही. गरजेनुसार वेळोवेळी टीम अण्णा वेगवेगळे विचार मांडतात, त्यांच्या विचारात एकजिनसीपणा फारसा आढळत नाही, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. दर वर्षाला चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार असलेल्या राशनव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यात त्यांना स्वारस्य नाही, हेही दिसून आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनमानस तापविण्याचे म��ठे कार्य अण्णांनी केले आहे, हे जरी खरे असले तरी केवळ जनलोकपाल विधेयकामुळे भ्रष्टाचार आटोक्यात येईल, हा केवळ कल्पनाविलास आहे. भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रथम लायसन्स-कोटा-परमिटचे राज्य संपवणे गरजेचे आहे. पण नेमका हाच मुद्दा सोडून बाकी अवांतर मुद्द्यावरच चर्चा केली जात आहे. घरभर गूळ आणि साखर अस्ताव्यस्त पसरवून द्यायची, मग मुंग्यांना साखर खाण्यापासून रोखण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करायची. माशांना हाकलण्यासाठी दुसरी यंत्रणा निर्माण करायची. माकोडे अडवण्यासाठी तिसरी यंत्रणा निर्माण करायची. या यंत्रणांना मुंग्या-माशां-माकोड्यांना अडवण्यात यश येत नाही असे दिसले की चवथी यंत्रणा उभारण्याची मागणी करायची, असा सारा हा प्रकार चाललेला आहे. गूळ किंवा साखर हवाबंद डब्यात ठेवली की मुंग्या-माशांना सहज चरण्यासाठी उपलब्ध असणारे केंद्र आपोआप नष्ट होते आणि प्रश्न सहजगत्या निकाली निघतो. अगदी त्याच धर्तीवर भ्रष्टाचार नियंत्रित करण्यासाठी भ्रष्टाचाराचा उगम आणि शक्तिशाली केंद्रे शोधून ती नष्ट केली पाहिजेत. तरच भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. पण माशा-माकोडे हाकलण्याच्या नावाखाली या यंत्रणांनाच गुळासाखरेवर डल्ला मारायचा असल्याने ते सहजासहजी कोणत्याही व्यवस्थाबदलाला राजी होतील, अशी शक्यता आज तरी दिसत नाही.\n(समाप्त) - गंगाधर मुटे\nमंत्रालय हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक -१\nदेवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २\nउत्तरार्ध अजून सविस्तर असायला हवा होता.\nघरभर गूळ आणि साखर अस्ताव्यस्त पसरवून द्यायची, मग मुंग्यांना साखर खाण्यापासून रोखण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करायची. माशांना हाकलण्यासाठी दुसरी यंत्रणा निर्माण करायची. माकोडे अडवण्यासाठी तिसरी यंत्रणा निर्माण करायची. या यंत्रणांना मुंग्या-माशां-माकोड्यांना अडवण्यात यश येत नाही असे दिसले की चवथी यंत्रणा उभारण्याची मागणी करायची, असा सारा हा प्रकार चाललेला आहे...\nहे आकलन अत्यंत सुंदर आणि समर्पक... संपूर्ण लेखच अत्यंत चांगला. विचारप्रवण..\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/550400", "date_download": "2019-03-25T07:43:32Z", "digest": "sha1:CNW7KTR22WFWN76M5RXA6OMMPVFAF7BW", "length": 7289, "nlines": 31, "source_domain": "isabelny.com", "title": "Google Tag Semalt मध्ये मी कंटेनर कसा प्रकाशित करू शकेन?", "raw_content": "\nGoogle Tag Semalt मध्ये मी कंटेनर कसा प्रकाशित करू शकेन\nGoogle टॅग Semaltेटमध्ये कंटेनर नावानंतर काही चिन्ह आहेत, प्रतिमा पहा. परंतु त्यावर क्लिक केलेले नाहीत. हे अगदी साध्या इंटरफेस असल्यामुळे, मी त्यांना फक्त त्यावर क्लिक करण्यायोग्य विसरून जाण्याचा संशय घेतो.\nमाझा प्रश्न असा आहे की मी कंटेनर कसा प्रकाशित करू शकेन\nआपल्या साइटवर आपला कंटेनर टॅग सेट करा आणि कदाचित कंटेनर खाली काही टॅग तयार करा\nआवृत्त्यांच्या खाली डाव्या बाजूला, ओव्हरव्यूवर क्लिक करा\nस्वतंत्र आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी प्रत्येक वेळी आपण आपल्या कंटेनरचे नवीन आवृत्ती तयार करण्याची आवश्यकता आहे, म्हणून त्या 4 लहान चिन्हाच्या उजवीकडील वरील आवृत्ती तयार करा (जे मी विचार देखील केले आहे) क्लिक करा.\nआपले नवीन आवृत्ती नंतर तयार केले जाईल आणि आपल्या कंटेनरचे नाव बदलण्यासाठी पृष्ठावर एक संपादित पर्याय असेल. उदाहरणार्थ: अॅडवर्ड ऑर्डर व्हॅल्यू टेस्ट\nया नवीन कंटेनरमध्ये पूर्वावलोकन म्हणते की एक बटण आहे. ते क्लिक करणे ड्रॉपडाउन मेन्यूसह पूर्वावलोकन आणि डीबग करण्यासाठी पर्याय देईल, जे मी जोरदार शिफारस करतो. ऑर्डर दिल्याने (आपण चाचणी करत असलेल्या टॅगवर अवलंबून. माझ्या बाबतीत हेच अॅडवर्डसचे आहे) समान ब्राउजरच्या दुसऱ्या टॅबमध्ये तुम्हाला हे टॅग Google Tag Manager\nमध्ये गोळीबारीत आहे का हे पाहण्यासाठी पर्याय देईल.\nआपले टॅग्ज कार्यरत असल्याची समाधान झाल्यानंतर, पूर्वावलोकन बटणाच्या पुढील पानाच्या शीर्षस्थानी प्रकाशित करा बटण क्लिक करा. आपण आता कंटेनरची ती आवृत्ती प्रकाशित केली आहे आणि जर आपण एखादी चूक केल�� असेल तर नंतरच्या टप्प्यात कोणत्याही अन्य प्रकाशित केलेल्या आवृत्त्यांवर परत जाऊ शकता.\nविहंगावलोकन पृष्ठामध्ये गुगल टॅग मॅनेजरकडे जा, त्यानंतर तुम्ही तिथे आवृत्ती पर्याय तयार करा क्लिक करा. त्यानंतर आपण आपले कन्टेनरचे पूर्वावलोकन करा आणि प्रकाशित करा\nजे संपादित चिन्ह वापरले जाते तेच आम्ही दुसर्या वापरकर्त्यास हे खाते पाहू शकतो आणि हे खाते संपादित आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरतो\nकंटेनरचे पूर्वावलोकन करण्यापूर्वी किंवा कंटेनर प्रकाशित करण्यापूर्वी आपल्याला नवीन आवृत्ती तयार करणे अनिवार्य आहे.\nआपल्या कंटेनरची नवीन आवृत्ती तयार करण्यासाठी GTM च्या आवृत्त्या विभागात नेव्हिगेट करा. नंतर नवीन आवृत्ती तयार करण्यासाठी स्क्रीनच्या शीर्षस्थानी उजवीकडील आवृत्ती बटण वापरा.\nएकदा आपल्याकडे नवीन आवृत्ती झाल्यानंतर आपण आवृत्तीचे पूर्वावलोकन करू शकता किंवा आपण ते प्रकाशित करू शकता.\nटिप: एखादी समस्या असल्यास आपण आपल्या कंटेनर टॅगला पूर्वीच्या आवृत्तीवर \"रोल बॅक\" करू शकता. आपण ज्या आवृत्तीवर \"रोल बॅक\" करू इच्छिता त्या आवृत्तीवर क्लिक करा आणि शीर्ष उजव्या कोपर्यात प्रकाशित बटण क्लिक करा.\nGoogle टॅग व्यवस्थापक मध्ये साइन इन करा. खात्यामध्ये खाते आणि कंटेनर निवडा. डाव्या बाजूला वापरकर्ते लिंक क्लिक करा. वापरकर्त्यांची सूची कंटेनर परवानग्या उजवीकडे दर्शविली जाईल. खाते आणि कंटेनर परवानग्या अद्यतनित करण्यासाठी वापरकर्त्याचे नाव क्लिक करा. परवानगीस परवानगी असलेली चित्रे चिन्ह.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato6.html", "date_download": "2019-03-25T08:15:16Z", "digest": "sha1:33YHH4ZFS743DYPE54ROJ24ZF4AMVYFX", "length": 2994, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - वाया गेलेला २० गुंठे टोमॅटोचा प्लॉट सुधारला", "raw_content": "\nवाया गेलेला २० गुंठे टोमॅटोचा प्लॉट सुधारला\nश्री. नारायण रामचंद्र ढोकणे, मु.पो. पांढुर्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक\nमाझी पांढुर्ली येथे ५ एकर, काळी कसदार जमीन असून ती आजपर्यंत पारंपारिक पद्धतीने करत होतो. दि. ३१/०७/२००६ रोजी ट्रान्सपोर्टच्या कामानिमित्त वाशी फ्रुट मार्केटला गेलो होतो. त्यावेळी सहज चौकशीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी, वाशी सेंटर येथे टोमॅटो, वांगी, भात पिकांबद्दल माहिती घेतली. माझ्याक���े १५ दिवसापूर्वी वर्षा १० ग्रॅमची २ पाकिटे २० गुंठ्यामध्ये लावलेली आहेत. त्यांची चालू वर्षीच्या संततधार पावसामुळे वाढ होत नव्हती. म्हणून नाशिक सेंटर येथून १०० मिली पंचामृत औषध घेऊन गेलो व सांगितल्याप्रमाणे फवारणी केली. तर १० ते १५ दिवसात फरक जाणवला. तारेच्या वर फुटवे गेले, त्यामुळे गावातील इतर शेतकऱ्यांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल माहिती दिली. नंतर मी पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी दिंडोरी रोड, नाशिक येथून औषधे व कल्पतरू ५० किलो घेऊन गेलो. कल्पतरू खताची १ बॅग आणि २०:२०:० खताची १ बॅग अशी एकत्र मात्रा दिली सांगितल्याप्रमाणे औषध फवारणी करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamtv.com/files/exclusive-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-03-25T07:35:00Z", "digest": "sha1:Z3LBIFFT4VVMQBMYVJFDAKEIZHR5PJ5X", "length": 2334, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "EXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर.. निलेश खरे यांनी घेतलेला स्पेशल इंटरव्ह्यू | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nEXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर.. निलेश खरे यांनी घेतलेला स्पेशल इंटरव्ह्यू\nVideo of EXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर.. निलेश खरे यांनी घेतलेला स्पेशल इंटरव्ह्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/green-crackers-from-130-years-in-assam/", "date_download": "2019-03-25T07:23:09Z", "digest": "sha1:WS7OAUASZB36ZKJ5ZEQKBFPUEOZ2YSNI", "length": 21518, "nlines": 124, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"पर्यावरणपूरक\" फटाके बनवणाऱ्या आसाममधील कारखान्याची कथा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“पर्यावरणपूरक” फटाके बनवणाऱ्या आसाममधील कारखान्याची कथा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nदिवाळी पूर्वी सुप्रीम कोर्टाने फटाके वाजवण्या बाबत जो निर्णय दिला त्याने चांगलाच गदारोळ माजला होता. असे न्यायालयाने ठरवून दिलेल्या दोन तासांच्य��� वेळेत फटाके वाजवणे अनेकांना मान्य नाही. न्यायालय आमच्या आनंदाच्या आड येतेय अशी भूमिका त्यांनी घेतली. फटाक्यांशिवाय सण साजरा कसा होणार अशीही अनेकांना चिंता होती.\nशिवाय न्यायालयाने या दोन तासांत नेहमीचे फटाके वाजवण्यासाठी सुद्धा मनाई केली.\nया पारंपारिक फटक्यांमध्ये बरियम नायट्रेट आणि अल्युमिनियमचा वापर केला जातो. ही दोन्हीही अतिशय घातक प्रदूषके आहेत. फटाके वाजवल्यावर तर ते दुष्परिणाम करतातच. पण ते बनवणाऱ्या कामगारांना सुद्धा खूप अपाय करतात. कितीतरी लोकांचे आरोग्य धोक्यात आणतात.\nत्यामुळेच न्यायालयाने यांचा वापर करून बनवलेल्या फटाक्यांवर बंदी आणत पर्यावरण पूरक फटाके वापरण्याचे आवाहन केले होते.\nपरंतु यावर न्यायालयाची खिल्ली उडविली गेली. पर्यावणपूरक फटाके म्हणजे नक्की काय त्यांची व्याख्या काय आणि असे फटाके असणे शक्य तरी आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.\nखरंतर कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR ) मधील वैज्ञानिक असे पर्यावरणपूरक फटाके तयार करण्यासाठी अनेक प्रयोग करत आहेत. त्यात त्यांना यशही येईल. पण सध्या न्यायालयाने अशा प्रकारच्या फटाक्यांची कोणतीही माहिती वा व्याख्या न सांगितल्यामुळे हा गोंधळ झालंय.\nहे साहजिकच होते. फटाके म्हणजे प्रदूषण हेच समीकरण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता पर्यावरण पूरक फटाके ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. कारण आजवर आपण न असे ऐकलेय न बघितलेय.\nपण आसामच्या एका छोट्याशा खेडयातील लोकांनी याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्याकडे आपल्या प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांना पर्याय म्हणून पर्यावारणपूरक फटाके उपलब्धआहेत.\nआता तुम्हाला असा प्रश्न पडेल की मोठ मोठे वैज्ञानिक अजून याचा शोध घेत आहेत आणि या खेडूतांना याचे उत्तर कसे काय माहिती. आणि आजवर याबद्दल ऐकण्यात कसे आले नाही. पण हे खरे आहे.\nआसामच्या बारपेटा जिल्ह्यातील गानाकुच्ची या गावाकडे घातक प्रदूषके असणाऱ्या फटाक्यांना पर्यायी फटाके उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे गेली १३० वर्षे असे पर्यावरणपूरक फटाके इथे बनवले जातात. याची खबर आपल्याला आजवर नव्हती.\nन्यायालयाच्या निर्णयानंतर या गावाचे आणि त्यांच्याकडील फटाके बनवण्याच्या पद्धतीचे महत्त्व अचानक वाढले आहे.\nत्यामुळेच आत्ता कुठे ही १३० वर्ष जुनी पद्धत प्रकाशा��� आली. १८८५ पासून इथे हे फटाके बनवले जातात. ते बनवण्यासाठी आजही जुन्या प्रक्रियेचा वापर केला जातो. या प्रक्रियेत घातक प्रदुषकांचा समावेश नाही. त्यामुळे हे फटाके कमी आवाज, कमी धूर आणि कमी प्रकाश देणारे असतात. असे असले तरीही या गावातील लोकांनी या पद्धतीत अजिबात बदल केलेला नाही.\nया फटाक्यांचा आवाज आणि प्रकाश जरी कमी असला तरी आपला आनंद साजरा करण्यासाठी ते पुरेसे ठरतात. त्यांनी प्रदूषण तर कमी होतेच पण आपल्यालाही आतिषबाजी केल्याचा आनंद मिळतो.\nहे संपूर्ण गाव कित्येक पिढ्यांपासून हाच व्यवसाय करते. शिवाय त्यांनी त्यांची पद्धत कायम ठेवली ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.\nयाच गावातील चार पिढ्यांपासून फटाक्यांचे उत्पादन करणारे गोपजीत पाठक म्हणतात की,\n“आम्ही उत्पादन करत असलेले फटाके जवळपास पर्यावरणपूरकच आहेत. ते खूप कमी प्रदूषण करतात कारण आम्ही त्यात कोणतीही घातक आणि जास्त प्रभावी स्फोटके वापरत नाही.\nफटाके तयार करण्यामागची (आणि फुटण्यामागची) “अमेझिंग” प्रक्रिया समजून घ्या\nदिवाळीत फटाके फोडण्याची खरंच गरज आहे \nपण आपल्या देशातली समस्या अशी आहे की कोणते फटाके पर्यावरणपूरक आहेत आणि कोणते नाहीत हे ठरवण्यासाठी आपल्याला तज्ञ आणि मोठी यंत्रणाच हवी असते. त्यांनी प्रमाणपत्र दिले तरच तुमच्या कामाला काहीतरी अर्थ असतो. त्यामुळे एकदा का असे झाले की मग आमच्यासारख्या लहान उद्योगांची भरभराट होईल.\nपुढे ते असंही म्हणाले की न्यायालयाने ज्या बरियम नायट्रेट आणि अल्युमिनियम वर बंदी आणली आहे. ते आम्ही पूर्वीपासूनच वापरत नाही. शिवाय सगळे काम आम्ही हातानेच करतो. त्यामुळे हे फटाके पर्यावरणपूरक आहेत असे म्हणायला हरकत नाही.”\nअसेच एक उत्पादक नारायण दास यांनी अशी खंत व्यक्त केली की,\n“आम्ही सगळे काम हातानेच करतो. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रे किंवा नवीन तंत्र नाही. त्यामुळे आम्हाला उत्पादनात वेगवेगळे प्रयोग करता येत नाहीत. परिणामी आम्ही वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे उत्पादन घेत आहोत.”\nही बाब लक्षात घेऊन आसाम सरकारने या गावाला काही प्रमाणात यंत्रे पुरवली आहेत. परंतु हे काम पूर्णपणे यंत्रावर विकसित होण्यास काही अवधी जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय फटाक्यांची मागणी बघता अधिक यंत्र सामुग्रीची गरज आहे. उत्पादन जर यंत्रांवर सुरु केले तर ते कित्येक पटींनी वाढेल.\nपर्यावणपूरक फटाक्यांची नेमकी व्याख्या जरी न्यायालयाने सांगितली नसली तरी आसामच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाने हे फटाके कमी प्रदूषण करतात असे मान्य केले आहे. ते कमी धूर आणि कमी आवाज करत असल्याने त्यांच्याकडे सध्या पर्याय म्हणून बघता येऊ शकते असे त्यांनी मान्य केलेय.\nहे फटाके पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव सेफ्टी ऑर्गनायझेशन ( PESO ) कडॆ तपासणीसाठी पाठवले जातील. ही संस्था उत्पादन सुरक्षेच्या दृष्टीने कसे आहे आणि एकंदरीत उत्पादनाचा दर्जा काही अटी आणि नियमांनुसार ठरवते.\nजर PESO ने हे फटाके पर्यावरण पुरक आहेत यावर शिक्कामोर्तब केले तर या उत्पादकांना मदत पुरवण्यात येईल. जेणेकरून ते मोठया प्रमाणात पुरवठा करु शकतील.\nया उत्पादकांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न एक कोटी एवढे आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या फटाक्यांची मागणी वाढेल म्हणून ते खुश आहेतच. पण जर PESO ने हे फटाके पर्यावरण पुरक आहेत यावर शिक्कामोर्तब केले तर त्यांचे उत्पन्न कितीतरी पटींनी वाढेल आणि हा आनंद द्विगुणीत होईल.\nत्यामुळे यानंतर सुरक्षित आणि पर्यावरण पुरक फटाके मनमोकळेपणाने वाजवता येतील अशी आशा करायला हरकत नाही.\nदिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..\n“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे →\nदिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..\nदिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय आधी हे वाचून बघा\n“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\n“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय\nचीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\nकांती सतेज करणारे स्व���ंपाकघरातील गुणकारी औषध\nइन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nपैसे गुंतवण्याचा विचार करण्याआधी जाणून घ्या : गुंतवणुकीच्या भविष्यदिशा\nभारतातून नक्षलवाद न संपण्यामागचं कारण आहे – एक व्यापक “कारस्थान”\nजॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…\n२६/११ च्या पीडितांचे हे अनुभव आज दहा वर्षानंतरही अंगावर सरसरून काटा आणतात\n२०२२ मध्ये भारतातील माणसांना अंतराळात पाठवण्याची तयारी करतेय एक भारतीय महिला\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nमोदी आणि केजरीवाल : खरी ‘लहर’ कुणाची\nराष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये\nओला/उबर टॅक्सी बुक करण्याआधी – हा थरारक अनुभव लक्षात असू द्या\n“शून्य” चा आकडा जिथे पहिल्यांदा सापडला – त्या किल्ल्याची अत्यंत रोचक कथा…\nपरमवीर जोगिंदरसिंग : एक धाडसी सैनिक ज्यांचा चीनी सैन्यानेही सन्मान केला\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\n सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग : भाग २\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://isabelny.com/-google-analytics-ip", "date_download": "2019-03-25T08:27:28Z", "digest": "sha1:DFCFLOHYSVUJ4OIFACMN77NL5B6PDPCU", "length": 8694, "nlines": 31, "source_domain": "isabelny.com", "title": "आपल्या Google Analytics कडून IP पत्ता वगळण्यासाठी कशी Semaltवरील आकर्षक टिपा", "raw_content": "\nआपल्या Google Analytics कडून IP पत्ता वगळण्यासाठी कशी Semaltवरील आकर्षक टिपा\nआपल्या Google Analytics चा आपला IP पत्ता वगळता आपल्या मोहिमेसाठी strategizing म्हणून महत्त्वाचे आहे. आपला डेटा अचूक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, आपल्या वेबसाइटवर Google Analytics स्थापित करण्याचा विचार करा. आपल्या वेबसाइटवर GA प्रतिष्ठापित आणि अद्ययावत केल्यानंतर, आपल्या संभाव्य अभ्यागतांना दर बाऊन्ससह गोंधळ टाळण्यासाठी आपला स्वत: चा IP पत्ता काढा. अंतर्गत रहदारीमुळे केवळ आपल्या अभ्यागतांबरोबर दर बाऊन्स केल्या जात नाहीत परंतु आपल्या अहवालांवर विपरित परिणाम देखील होतो - kanger protank mini kit.\nमागील तीन आठवडे, कार्यालयातून निर्माण झालेली वाहतूक आणि अंतर्गत वाहतुकीमुळे अनेक ग्राहकांच्या डेटावर ��रिणाम होत आहे. रेफरर आणि भूत स्पॅम देखील मोठ्या संख्येने अंतर्गत रहदारीमध्ये योगदान देत आहेत. शोध इंजिन ऑप्टिमायझेशन कार्यान्वित करताना आपल्या वापरकर्त्याची प्रतिबद्धता वाढविणे फार महत्त्वाचे आहे. अधिक वास्तववादी डेटा प्राप्त करण्यासाठी आपल्या डेटावरून आपला IP पत्ता, ज्ञात स्पायडर आणि सांगकामे वगळा.\nस्पॅम, भूत रेफरर स्पॅम आणि आपला पत्ता प्रभावीपणे फिल्टर करण्यासाठी ऑलिव्हर किंग, ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Semaltट द्वारे प्रदान केलेल्या टिपा वापरा. \nआपण आपल्या Google Analytics मध्ये आपल्या स्वत: च्या IP पत्ता दूर करणे आवश्यक आहे का\nआपल्या स्वत: च्या वेबसाइटवर कार्य करणे अंतर्गत रहदारीमध्ये योगदान देते. अधिक आपण आणि आपले कर्मचारी आपल्या वेबसाइट्सच्या पृष्ठांवर क्लिक करून, अभ्यागत वाढविण्याची संख्या जितकी जास्त वाढेल. कर्मचार्यांसह ग्राहकांनी त्यांचे IP पत्ते पूर्णपणे वगळले पाहिजेत. आपल्या शोध इंजिन ऑप्टिमायझेशन मोहिमेत आपल्या बाउंस रेट कमी करण्याच्या महत्त्वावर जोर दिला जाऊ शकत नाही. बाउंस दर आपल्या रुपांतर केलेल्या कीवर्ड श्रेणीत प्रमुख भूमिका निभावतात.\nउशीराची दर बहुतेक वेळा आपल्या वेबसाइटला भेट देणा-या ग्राहकांच्या संख्येवरून मोजली जाते आणि नंतर परत क्लिक करते. आपल्या बाउंस दरांना ठेवणे हे आपल्याला आश्वासन देते की आपल्या पृष्ठास भेट देणार्या ज्यांनी इतर पृष्ठांमधून जाण्यासाठी व्यवस्थापित केले आहे..आपल्या साइटवरून तुमचा आयपी पत्ता वगळता बाउंस दर कमी करता येत आहे म्हणूनच आपले रुपांतर Google द्वारे सुसंगत मानले जाते.\nआपल्या जीए पासून आपला IP पत्ता वगळण्यासाठी कसे\nआपल्या Google Analytics मधील आपला IP पत्ता वगळता प्रक्रियात्मक प्रक्रिया आवश्यक आहे आपल्या डेटासह गोंधळ टाळण्यासाठी या प्रक्रियेचे अनुसरण करा.\n1) 'पुढील रिपोर्टिंग' पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या वेबसाइटचा शोध घ्या.\n2) उजव्या शीर्ष कोपर्यात, 'प्रशासन' बटणावर क्लिक करा.\n3) आपल्या वेबसाइट डेटा लिंक तपासा आणि दृश्य पाहण्यासाठी क्लिक करा.\n4) Google Analytics सह आलेले डिफॉल्ट फिल्टरवर क्लिक करा.\n5) 'न्यू फिल्टर्स' वर क्लिक करा. या स्टेजला, आपण आपला IP पत्ता अडचणी न सोडता सक्षम होऊ शकता.\n6) आपल्या जीएवर प्रदर्शित झालेल्या ड्रॉप बॉक्सवर चेक करा आणि 'वगळा' निवडा. सुरू ठेवा आणि 'आपल्या IP पत्त्यावरील रहदारी' निवडा.\n7) आपल्या आयपी पत्त्याची तपासणी करण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात. आपण आपला IP विनंत्या किंवा आपल्या पत्त्याची HTTP विनंती टाईप करुन आपल्या कॉम्प्यूटर कमांड लाइनवरून पत्ता पुनर्प्राप्त करू शकता.\nआपला IP पत्ता प्राप्त केल्यानंतर, आपल्या Google Analytics पृष्ठावर परत जा आणि आपल्या पत्त्यामध्ये प्रदान केलेल्या गॅप बॉक्समध्ये फीड करा. आपल्या वेबसाइट आणि आपल्या Google Analytics मधील आपला IP पत्ता फिल्टर करण्यासाठी वगळा आणि क्लिक करा. रेफरर स्पॅम, बॉटस्, आणि स्पायडर गेल्या काही आठवडे ऑनलाइन व्यवसायांसाठी इतक्या भयानक आहेत. आपल्या मोहिमांचे दर कमी आणि आपल्या मोहिमेसाठी स्वच्छ डेटा पुनर्प्राप्त करणे फार महत्वाचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1842", "date_download": "2019-03-25T08:32:45Z", "digest": "sha1:HBM647W2K5FJTW5HW3R4VPEBDTOJ34GM", "length": 7284, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुतोवाच वादसंवादाचे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ पुस्तकानिमित्ताने २६-२७ ऑक्टोबरला पुण्यात चर्चा झाली. ती ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने गांधी स्मारक निधीच्या (पुणे) सहकार्याने योजली. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे प्रतिनिधी दोन दिवस येऊन गेले. परिचर्चेनंतर कृतीच्या अंगाने काही घडावे हा जसा विचार व्यक्त झाला; तसेच या निमित्ताने ‘वादसंवाद’ सुरू व्हावा असेही मत, विशेषतः मोहन हिरालाल यांनी व्यक्त केले. त्याचा आरंभ तोच करून देत आहे. त्या पाठोपाठ, अवधूत परळकर याने ‘महाराष्ट्र टाइम्स मध्ये‘ परिचर्चेबाबत जो लेख लिहिला तो प्रसिद्ध करत आहोत. त्यानंतर या निमित्ताने जे साहित्य जमा झाले आहे ते एकेक प्रकट होत जाईल...\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.\nमाधुरी दीक्षित - नेने\nसचिनने गैर काय केले\nसंदर्भ: अवधूत परळकर, महात्मा गांधी, हिंदस्वराज्य, चर्चा\nसत्य���ला सामोरे की शब्दचातुर्य\nसंदर्भ: महात्मा गांधी, हिंदस्वराज्य, चर्चा\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nसंदर्भ: महात्मा गांधी, हिंदस्वराज्य, पुस्तके\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nसंदर्भ: महात्मा गांधी, हिंदस्वराज्य\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912203842.71/wet/CC-MAIN-20190325072024-20190325094024-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
]